हि कविता माझी नसुन, माझ्या मित्राच्या काकांच्या निधनानंतर, मित्राने त्यांच्या जिवनावर केलेली कविता.
जगलो जरी मी खुप
परी ते जगणे नव्हते,
विद्वतेचा किताब घेवुन
हात कधीच थांबले होते
पडलो न कुणाच्या कामी
तो शब्दांचा बाजार होता,
त्या बाजारातच माझ्या
व्यक्तिमत्वाचा र्हास होता.
परी न दाखवली मी कुणा
नाराजी असुनी या अंतरी,
माझ्या पिलांनीच माझी
फसगत केली सारी,
परी जीव गुंतला त्यात
जरी झाले मजला परके,
ह्रुदयातील सांगु मी दु:ख कुणा
करावयास मन माझे हलके,
जातानाही नाही सुटतील
हे बंध रेशमाचे,
या मायेच्या कपड्याला,
शिवणारे हात विणकर्याचे..
जगलो जरी मी खुप.................
वाट
जन्मोजन्म
सुरेख कविता
मस्त
सुंदर
एककी वाट
छान
उशीरा वाचली
उत्तम
सूंदर...