मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शनिवारचा उतारा - दुविधा

३_१४ विक्षिप्त अदिती · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं... हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध धुडगूस करत, विडंबन पाडत रहावं लागतं कंपूविरुद्ध लिहीताना, आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............

वाचने 3180 वाचनखूण प्रतिक्रिया 11

संजा 12/12/2009 - 12:26
सुंदर कवीता. मनाची नेमकी अवस्था पकडलीय. आपले मनःपुर्वक अभिनंदन

आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं क्या बात है ! एक वास्तववादी कविता. आणिबाणी, शुद्धलेखन, चौकट, लाईन, कवड्या, दमड्या, मानधन,[एकाच शब्दासाठी वापरलेले पर्याय केवळ सुंदर] या शब्दांनी कविता वाचकांना एक उंचीवर घेऊन जाते. कवीतेतील तरंग पोहचले. :)
चालू दे, अजून येऊ दे, .. पुढील रचनेसाठी शुभेच्छा..!
-दिलीप बिरुटे [गोंधळलेला,खाडखोड वाचक]

दशानन 13/12/2009 - 18:24
छान छान ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

नंदन 13/12/2009 - 19:57
या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध
-- जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे? विडंबन मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध
वर नंदनने योग्य शब्दात लिहिले आहे. विडंबन आवडले निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 14/12/2009 - 15:34
परंतु, म्हणावे तसे नाही जमले. आपली योग्यता लक्षात घेता ह्यापेक्षाही सरस दर्जा आपण गाठू शकता, नव्हे पुर्वी गाठला आहे ह्याची आठवण प्रकर्षाने झाली. माफ करा, परखडपणेच बोललो, परंतु, जे वाटले ते बोललो. ह्याउप्पर बोलायचे तर कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं.... हे काही नीटसे नाही पटले. सर्वत्र असे असतेच असे नाही.ओघ अविरत असु शकतो त्यासाठी कुठे जाण्याची गरज पडावी न पडावी!

चतुरंग 14/12/2009 - 19:10
'इकडे' 'तिकडे' उडणारं तुमच्या मनाचं फुलपाखरु लवकरच एका ठिकाणी स्थिर बसेल अशी आशा करतो! :W बाकी विडंबन एकदम टुन्न!! ;) (कोषातला)चतुरंग