( ए आय,चाटगपट,जेमीनीबाबा,कृबू,)

लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर-: सदर लेख केवळ मनोरंजनार्थ आहे. वेळ भरपूर,रिकामा मेंदू,स्वतःशी वाचाळ पंचाळशी करताना प्रसवलेल्या विचारातून प्रसूत झालेला आहे.याचा मृत अथवा जीवीत व्यक्तीशी,स्थळाशी,कल्पनां यांच्याशी काही एक संबंध नाही.

फाया

लेखनविषय:
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ? मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते ! काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही गरज तुझी यासाठी कशाला?

म्हातारा न इतूका....

लेखनविषय:
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली.

<एक मजेशीर आणि हृद्य आठवण >

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं बालपण हे साधं होतं – म्हणजे फक्त शेजारी माझं नाव ऐकून मुलांना शाळेत घ्यायचे. मी रडायचो, तेव्हा पावसाळा यायचा. आणि मी हसायचो, तेव्हा उन्हाळा कमी व्हायचा. पण आज मी सांगणार आहे ती मजेशीर, ती हृद्य आठवण – जीने माझ्या आयुष्यात मला एकदा पुन्हा स्वतःची महानता (म्हणजे रोजचंच) अनुभवायला दिली. प्रा. अरुणकुमार यांनी मला प्रोजेक्टवर घेतलं – आणि त्यांनी असं करून खरं तर भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना घडवली. प्रोजेक्ट सुरू झाला, मी २-३ महिने तिथे येत होतो. (येत होतो – म्हणजे येत होतो, जात होतो, काम काहीसं होत होतं, पण थोडंसं नाही होत होतं).

चक्र

लेखनविषय:
कवीने वाचावे वाचले साचावे वाचले, साचले साचले, सुचले आतल्या आचेच्या प्रखर धगीत प्रज्ञेच्या मुशीत शब्दांच्या साच्यात अल्लाद ओतून पाचही प्राणांची पाखर घालून उत्फुल्ल, उत्कट प्रतिभा शिंपून वाटून टाकावे पुन्हा एकदा कागद कोरा ~ सृजन चक्राचा नवीन फेरा

इंद्रायणीकाठी

लेखनविषय:
काव्यरस
इंद्रायणी काठी सुंदर कुंडमळा वैष्णवांचा मेळा दाटतो इथे.... पावसाची झडी इंद्रायणी दुथडी वैष्णवांची दाटी इंद्रायणीकाठी...... एकच तो सांधा वैष्णवांचा वांधा आड्याल पड्याल कसे जावे.... विकांती आकांत एक्याजागी दाटला सहावेना भार वैष्णवांचा.... शेल्फ्या,तूनळ्यांची उडाली एकच घाई पायपोस कुणाचा कुणाच्या पायी?.... थरारला सांधा पेकाट मोडले वैष्णव अवघे सांडले,इंद्रायणी भितोत्सवे आता उठला कल्लोळ उडाला गोंधळ भावीकांचा... इथे दोषी कोण सांधा बंद होता वैष्णव दाटले प्रशासन म्हणे... धावले नामवंत प्रशासन कृपावंत देणगी पाच लाख वारसांना.... कुणी सामावले जळी कुणी तरले,वाहीले पुन्हा तीच खेळी म्होरल्

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

लेखनविषय:
लेखनप्रकार
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व १ गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट! #मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा

शाळेचा पहिला दिवस...

उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

त्रिमितीच्या तुरुंगात

लेखनविषय:
त्रिमितीच्या तुरुंगात घुसमटे जीव ज्यांचा उघडीन त्यांच्यासाठी मार्ग चवथ्या मितीचा कळसा नंतर पाया तिथे नियम असतो कार्यकारण भावाचा जाच जराही नसतो स्थळ-काळात तिथल्या पेव खाच खळग्यांचे उतरवी वर्तमान भूत वेडे भविष्याचे दोर परतीचे मात्र नाही कापणार नक्की आपापल्या कोठडीची खूण ध्यानी ठेवा पक्की :)
Subscribe to मुक्तक