उंदीर
घरात पडला उंदीर मरूनी
थकलो सगळे शोध घेऊनी
चंद्रावर गेला मानव तरीही
उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...
घरात पडला उंदीर मरूनी
थकलो सगळे शोध घेऊनी
चंद्रावर गेला मानव तरीही
उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...
मागे वळून बघू नये,
म्हातार्याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?
अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?
कातरवेळी झुरू नये,
कांचनसंध्यी उमलू नये,
गजरा भाळी माळू नये,
असं कुठं लिहिलंय?
एकांताशी बोलू नये,
भरल्या डोळी डोलू नये,
ओल्या शब्दीं भिजू नये,
असं कुठं लिहिलंय?
गेले द्यायचे राहून.....,
म्हणत आयुष्य Mute केलं
प्रारब्ध, नशीब म्हणत .....
कण्हत,कण्हतआयुष्य Cute केलं
जगण्याची मजा काय विचारता?
स्वतःच्या मनाला mute करून,
दुसऱ्यांच्या अपेक्षांना like करत जगतोय...
Wi-Fi शिवाय चालणाऱ्या मोबाईलवर
Google करून बघतोय!
घे भरारी,स्काय इज द Limit....कुणीतरी greet केलं
मागे वळून बघता, काय miss न् काय Meet केलं ....
इच्छा,आकांक्षाना फाट्यावर मारत
Telling lies करतोय....
worried असलो तरी हॅप्पीली married म्हणतोय.
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती.
सुट्टी
चालत्या घड्ञाळासारखी असावी
बाकीच्या जगाला चालू दिसताना
आत ते नियमीत निवांत
अनवाईण्ड होत असते.
ते इतरांच्या वेळेवर नाही
पळत, इतरांना
स्वतःच्या वेळेवर पळवते.
जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते
तेव्हा त्याचा आराम चालू होतो
पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत
जरा सोडला लगाम ढिला,
अंग प्रत्यंगाने संकेत दिला.
हळूहळू कुरकूर करू लागलं.
गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं.
हात पायाच्या झाल्या काड्या,
कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या.
कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता.
दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता.
कधी माझ्या भोवती जग फिरले,
तर कधी डोळ्यासमोर तारे विरले.
भर दुपारी जगाला भोवळ आली.
आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली.
काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले,
तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले.
हृदयाची सतार बिघडली होती
दिड दा दिड दा लय बेकाबू होती
लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली
जशी झुळूक वार्याची, ग्रिष्माच्या काहीली
लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण
गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं
ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा
गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा
लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा
बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.
घ्या कविता....
सोनार आठवण
करुन देतात,
पेपरमधे पानभर
जाहीराती देतात...
अलीबाबाची गुहा,
सापडल्यासारखे,
दागिन्यांचे फोटोज ।
कंगन हार कर्णफूलं
कंठे तोडे नाणी कलश,
चळत बिस्किटोज ।।
कुणालाच आठवत नाहित ।
घामटलेले खाणकामगार,त्यांचे
कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।।
भट्टीत तापून सुलाखून ।
कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी,
घडवतोय बारीक नक्षी फूलं।।
मालक गुलजार हसतोय ।
पेठेत अजून एक नवे,
दालन उघडतांना दिसतोय ।।
मी नाही कुणाचा बाप
मी नाही कुणाचा आजा
रंग बदलतो मी वारंवार
कुंपणावरचा सरडा जसा
मी न कुणाचे खातो, ल्यातो
तो श्रीराम आम्हांला देतो
लळा जिव्हाळा नाती गोती
मी वेशीवर टांगून रहातो
नाही कुणाची पर्वा, आशा
नाही पुसले म्हणून निराशा
स्वानंदाचे टाळ घेऊन हाती
जगतो मी माझीच मिराशी
तुझ्या कप्पाळीचे बिंब
भासे मध्यान्हीचा भानू
लल्लाटीच्या लाटा बघुनी
'उन्हाळी', लागते गं जानू
नाही गंधार कोमलं,
करपले मन नुस्ताच विषाद
नाच नाचता नाचता
आता धपापतो ऊर
जुनेरले नाते आपुले
आता कुठवरं पाळू
वयमान पाऊणशे अवघे,
आता तरी नको छळू
प्रारब्धाचा खेळं
विळ्या भोपळ्याचे नाते
दिनरात अशी साथ
कधी सरेल जन्मठेपेचा काळं?