मुक्तक
आत्मपॅम्फ्लेट-वेगळ्याच धाटणीचा सिनेमा
शाळा, टाईमपास, ती सध्या काय करते?,फॅन्ड्री असे लहानपणीच्या कोमल?;) प्रेमाचे सिनेमा मराठीत असताना परत आत्मपॅम्फ्लेट त्याच बालवयातील प्रेमाचा सिनेमा कशाला पाहायचा अस ठरवल होतं.पण दिवाळीच्या आदल्या दिवशी मस्त गोडधोड खाऊन बसले तर हा चित्रपट घरच्यांनी लावला होता.
शूर्पणखा
परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो.
भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. .
सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय.
देखणं चेन्नई सेंट्रल
ललितबंध -लेखक रा.चि.ढेरे (ऐसी अक्षरे... मेळवीन -१२)
सर्वत्र धर्म, संस्कृती याविषयी उथळ चर्चांना उधाण आलेले असताना.रा.चि.ढेरे यांचे ललितबंध (प्रकाशित २०१७)हे पुस्तक वाचणे म्हणजे केवळ सुखद अनुभव होता.ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये अशी म्हण विनाकारण आहे ,हे पुस्तक वाचतांना पटते.कारण एकंदरीत मज सारख्या मुळातून मुळाच्या शोधाची आवड असणाऱ्या वाचकाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. धर्मोइतिहास वाचन अवजड भाषा असल्याने वाचनाची गोडी लागत नाही पण रा.चि.ढेरे यांचे लेखन अत्यंत सुगम आहे.
कावळ्यांची फिर्याद -२
कावळ्यांची फिर्याद
पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा....
चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा.
संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला....
पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला.
कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ?
क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला.
लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....
हिन कर्म,पाप त्याचे,शाप आपल्या माथी गेला मारूनी.
250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला"
चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले
देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले
स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले
हसले फिदीफिदी, छद्मवेषी
म्हणती
नऊशे कोटी मातीत घातले.
"आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना,
दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना
दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना
एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को',
फिरसे बनाओ चांद्रयान तीन को"....
घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला
मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला
मी पाऊस आणि कविता
काही गोष्टी बदलत नाही म्हणतात ना ते खरे आहे. आता हेच बघा उन्हामुळे तापून पाण्याचे बाष्प होते. त्याचे ढगात रुपांतर होते. कुठेतरी कसातरी कमी दाबाचा पट्टा वगैरे तयार होतो आणि मग पाऊस पडतो. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यासाठी कोण कुठे काय खणतो ते माहित नाही पण तो तयार होत असतो. थोडक्यात काय पाऊस पडणे ही एक सरळ साधी नैसर्गिक प्रक्रिया आहे. दवाखान्यात उगाचच चेकअपसाठी अॅडमिशन घ्यावी इतकं हे रटाळ प्रकरण आहे.