मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

गीतारहस्य प्रकरण ८ -विश्वाची उभारणी व संहारणी

Bhakti ·

उत्तम ! एक शंका : आधी बुद्धी की आधी अहंकार ? माझ्या आकलनानुसार अहंकार हा आधी येत असला पाहिजे आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या "मी" ह्या जाणिवेला टिकवून ठेवण्यासाठी बुद्धीचा उगम होत असावा. बुद्धी नसते तेव्हाही अहंकार असतोच ना.

Bhakti 13/08/2025 - 14:48
अहंकार हा बुद्धीचाच एक पोटभेद असल्यामुळे पहिल्यानें बुद्धि झाल्याखेरीज अहंकार उत्पन्न होऊ शकत नाहीं. म्हणून अहंकार हा दुसरा म्हणजे बुद्धीच्या मागाहूनचा गुण आहे असें सांख्यांनी ठरविलें आहे. सात्त्विक, राजस व तामस भेदानें बुद्धीप्रमाणें अहंकारहि अनंत प्रकारचा असतो हैं सांगावयास नको. पुढील गुणहि याचप्रमाणें प्रत्येकीं त्रिघात अनंत आहेत. किंबहुना व्यक्त सृष्टींत प्रत्येक वस्तूचे याचप्रमाणें अनंत सात्त्विक, राजस व तामस भेद होत असतात; व या सिद्धान्तास अनुसरूनच गीतेंत गुणत्रयविभाग व श्रद्धात्रयविभाग सांगितले आहेत (गी. अ. १४ व १७).
बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.
मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात. १ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि २.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि
ग्रंथात याबाबत सांख्यांचे स्पष्टीकरण सांगितले आहे.वेदांताचा याबाबत संदर्भ या ग्रंथात नाही. तसेच प्रकृतिला किंवा ब्रम्हाला आधी व्यवसायात्मक बुद्धी जी अचेतन आहे ती होऊन विस्तार करावा वाटतो.
अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढें व्यक्त सृष्टि निर्माण करण्याचा निश्चय प्रथम करीत असते निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणें हैं बुद्धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतींत व्यवसायात्मिक बुद्धि हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असें सांख्यानीं ठरविलें आहे. सारांश, मनुष्याला ज्याप्रमाणें एखादें कृत्य करण्याची बुद्धि प्रथम होते, त्याचप्रमाणें प्रकृतीलाहि आपला पसारा करण्याची बुद्धि प्रथम व्हावी लागते. निण मनुष्यप्राणी सचेतन असल्यामुळे, म्हणजे त्याच्या ठायीं प्रकृतीच्या बुद्धीशीं सचेतन पुरुषाचा (आत्म्याचा) संयोग झाला असल्यामुळे, मनुष्याला झालेली व्यवसायात्मिक बुद्धि मनुष्याला समजते, आणि प्रकृति स्वतः अचेतन म्हणजे जड असल्यामुळे तिच्या बुद्धीचें तिला स्वतःला ज्ञान नसतें, असा या दोहोंमध्यें मोठा फरक आहे, हा फरक पुरुषाच्या संयोगानें प्रकृतींत उत्पन्न झालेल्या चैतन्यामुळे होत असतो; तो नुसत्या जड प्रकृतीचा गुण नव्हे. मानवी इच्छेच्या तोडीची पण अस्वयंवेद्य शक्ति जड पदार्थांतहि आहे असें मानिल्याखेरीज गुरुत्वाकर्षण किंवा रसायनक्रियेचें व लोहचुंबकाचें आकर्षण व अपसारण, इत्यादि केवळ जड सृष्टींतच आढळून येणाऱ्या आवडीनिवडीची नीट उपपत्ति लागत नाहीं, असें अर्वाचीन आधिभौतिक सृष्टिशास्त्रज्ञहि आतां म्हणू लागले आहेत, हैं लक्षांत आणिलें म्हणजे प्रकृतींत प्रथम बुद्धि हा गुण उत्पन्न होतो, या सांख्याच्या सिद्धान्ताचें आश्चर्य वाटण्याचें कांहीं कारण रहात नाहीं. प्रकृर्तीत प्रथम उत्पन्न होणाऱ्या या गुणास पाहिजे तर अचेतन किंवा अस्वयंवेद्य म्हणजे स्वतःस न कळणारी बुद्धि म्हणा. पण कांहीं म्हटलें तरी मनुष्यास होणारी बुद्धि आणि प्रकृतीस होणारी बुद्धि या दोन्ही मुळांत एकाच वर्गातल्या आहेत हें उघड आहे

उत्तम ! एक शंका : आधी बुद्धी की आधी अहंकार ? माझ्या आकलनानुसार अहंकार हा आधी येत असला पाहिजे आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या "मी" ह्या जाणिवेला टिकवून ठेवण्यासाठी बुद्धीचा उगम होत असावा. बुद्धी नसते तेव्हाही अहंकार असतोच ना.

Bhakti 13/08/2025 - 14:48
अहंकार हा बुद्धीचाच एक पोटभेद असल्यामुळे पहिल्यानें बुद्धि झाल्याखेरीज अहंकार उत्पन्न होऊ शकत नाहीं. म्हणून अहंकार हा दुसरा म्हणजे बुद्धीच्या मागाहूनचा गुण आहे असें सांख्यांनी ठरविलें आहे. सात्त्विक, राजस व तामस भेदानें बुद्धीप्रमाणें अहंकारहि अनंत प्रकारचा असतो हैं सांगावयास नको. पुढील गुणहि याचप्रमाणें प्रत्येकीं त्रिघात अनंत आहेत. किंबहुना व्यक्त सृष्टींत प्रत्येक वस्तूचे याचप्रमाणें अनंत सात्त्विक, राजस व तामस भेद होत असतात; व या सिद्धान्तास अनुसरूनच गीतेंत गुणत्रयविभाग व श्रद्धात्रयविभाग सांगितले आहेत (गी. अ. १४ व १७).
बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.
मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात. १ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि २.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि
ग्रंथात याबाबत सांख्यांचे स्पष्टीकरण सांगितले आहे.वेदांताचा याबाबत संदर्भ या ग्रंथात नाही. तसेच प्रकृतिला किंवा ब्रम्हाला आधी व्यवसायात्मक बुद्धी जी अचेतन आहे ती होऊन विस्तार करावा वाटतो.
अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढें व्यक्त सृष्टि निर्माण करण्याचा निश्चय प्रथम करीत असते निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणें हैं बुद्धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतींत व्यवसायात्मिक बुद्धि हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असें सांख्यानीं ठरविलें आहे. सारांश, मनुष्याला ज्याप्रमाणें एखादें कृत्य करण्याची बुद्धि प्रथम होते, त्याचप्रमाणें प्रकृतीलाहि आपला पसारा करण्याची बुद्धि प्रथम व्हावी लागते. निण मनुष्यप्राणी सचेतन असल्यामुळे, म्हणजे त्याच्या ठायीं प्रकृतीच्या बुद्धीशीं सचेतन पुरुषाचा (आत्म्याचा) संयोग झाला असल्यामुळे, मनुष्याला झालेली व्यवसायात्मिक बुद्धि मनुष्याला समजते, आणि प्रकृति स्वतः अचेतन म्हणजे जड असल्यामुळे तिच्या बुद्धीचें तिला स्वतःला ज्ञान नसतें, असा या दोहोंमध्यें मोठा फरक आहे, हा फरक पुरुषाच्या संयोगानें प्रकृतींत उत्पन्न झालेल्या चैतन्यामुळे होत असतो; तो नुसत्या जड प्रकृतीचा गुण नव्हे. मानवी इच्छेच्या तोडीची पण अस्वयंवेद्य शक्ति जड पदार्थांतहि आहे असें मानिल्याखेरीज गुरुत्वाकर्षण किंवा रसायनक्रियेचें व लोहचुंबकाचें आकर्षण व अपसारण, इत्यादि केवळ जड सृष्टींतच आढळून येणाऱ्या आवडीनिवडीची नीट उपपत्ति लागत नाहीं, असें अर्वाचीन आधिभौतिक सृष्टिशास्त्रज्ञहि आतां म्हणू लागले आहेत, हैं लक्षांत आणिलें म्हणजे प्रकृतींत प्रथम बुद्धि हा गुण उत्पन्न होतो, या सांख्याच्या सिद्धान्ताचें आश्चर्य वाटण्याचें कांहीं कारण रहात नाहीं. प्रकृर्तीत प्रथम उत्पन्न होणाऱ्या या गुणास पाहिजे तर अचेतन किंवा अस्वयंवेद्य म्हणजे स्वतःस न कळणारी बुद्धि म्हणा. पण कांहीं म्हटलें तरी मनुष्यास होणारी बुद्धि आणि प्रकृतीस होणारी बुद्धि या दोन्ही मुळांत एकाच वर्गातल्या आहेत हें उघड आहे
गीतारहस्य -प्रकरण८ ( पान क्र. १०२-११८) **विश्वाची उभारणी व संहारणी सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे. प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे.

बखरीच्या पानाआड

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त 11/08/2025 - 18:15
गहन आशयाची साध्या सोप्या शब्दातली मांडणी आवडली. जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी ++ हेच रामायण- महाभारत - ग्रीक - रोमन- चिनी - इजिप्शियन - पासूनच्या सगळ्या 'इतिहासा'चे वास्तव.

स्वधर्म 11/08/2025 - 20:11
बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड? या ओळी खासच. सत्य फार 'महाग' असते, किंमत दिल्याशिवाय गवसत नाही.

चित्रगुप्त 11/08/2025 - 18:15
गहन आशयाची साध्या सोप्या शब्दातली मांडणी आवडली. जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी ++ हेच रामायण- महाभारत - ग्रीक - रोमन- चिनी - इजिप्शियन - पासूनच्या सगळ्या 'इतिहासा'चे वास्तव.

स्वधर्म 11/08/2025 - 20:11
बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड? या ओळी खासच. सत्य फार 'महाग' असते, किंमत दिल्याशिवाय गवसत नाही.
बखरीच्या पानाआड पाहिले मी क्षणभर दडपल्या वास्तवाचे छिन्नभिन्न कलेवर प्रचलित इतिहास तुझ्या माझ्या मेंदूतून अज्ञाताच्या शक्यतांना टाके पुरता पुसून जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड?

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)

Bhakti ·

पुस्तक जाऊ दे खड्ड्यात, म्हणजे ते आधीच गेलेले आहे पण मला एक प्रश्न पडला आहे की प्रकाशकांना परवडते कसे अशी पुस्तके प्रकाशित करणे ? मराठी प्रकाशन व्यवसायातील कोणाला तरी बोलावून पॉडकास्ट करायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 23/07/2025 - 14:20
काय माहीती नाही? पॉप्युलर प्रकाशन आहे. अवांतर पण प्रकाशक आणि लेखक यांच्यातील मधुर नात्यांचं एक उदाहरण पुन्हा समजले.पद्मगंधा चे जाखडे हे २१ जुलैला रा.चि.ढेरे यांच्या जन्मदिनी त्यांचे एकतरी पुस्तक पुर्नप्रकाशन करतात.नरहर कुरुंदकर म्हटले की देशमुख आणि कंपनी अजोड नातं होतं.गो.नी.दांडेकर आणि मृण्मयी प्रकाशन आहेच. हरारी,डारियस प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद, अच्युत गोडबोले म्हटलं की मधुश्री प्रकाशन समीकरण दिसते. अजून आठवलं की सांगते.

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 06:09
गोनीदा आणि मॅजेस्टिक हे नातं होतं. त्यांची बहुतेक पुस्तकं मॅजेस्टिकची आहेत. मृण्मयी प्रकाशन ही त्यांच्या मुलीची, वीणा देव यांची प्रकाशन संस्था आहे जी गोनीदांची पुस्तके आता पुन:प्रकाशित करत आहे

In reply to by प्रचेतस

Bhakti 26/07/2025 - 10:46
अच्छा! मृण्मयी वीणा देव यांचे हे माहिती होतं.पण वाटलं सुरूवात गोनीदा यांनी केली असेल. पु.लं.ची पुस्तके मौज प्रकाशनाची दिसत आहेत.दुर्गाबाईंची वरदा प्रकाशनाची आहेत,पण पैसे,दुपानी,ऋतूचक्र इतर प्रकाशनाची आहेत.प्रसिद्ध पुस्तकांचे हक्क मिळवण्यासाठी नंतर चढाओढ असते असे वाचलं होतं.

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 11:13
रामदास भटकळांचे पॉप्युलर, श्री पु भागवतांचे मौज, कोठावळ्यांचे मॅजेस्टिक, माजगावकरांचे राजहंस, अनंतराव कुलकर्ण्यांचे कॉन्टिनेन्टल ह्या जुन्या प्रकाशन संस्थांनी अनेक दर्जेदार लेखक घडवून पुस्तकेही दर्जेदार दिली असे म्हणता येईल. ह्या संस्था उत्तम लेखक जिव्हाळ्याने राखून ठेवण्यासाठी देखील प्रसिद्ध होत्या आणि आहेत. वरदाच्या ह. अ. भावेंनी प्राचीन साहित्य मराठीत आणून आतबट्ट्याचाही व्यवहार केला असे म्हणता येईल. मराठी वाचकांवर ह्यांचे मोठे ऋण आहे. आता मात्र तसे लेखक राहिले नाहीत आणि मेहतांसारख्या तद्दन बाजारु प्रकाशन संस्था सध्या जोरात कार्यरत आहेत. मात्र त्यांनी देखील भैरप्पांची पुस्तके मराठीत आणून मोठे कार्य केले आहे असे म्हणता येईल.

चौथा कोनाडा 23/07/2025 - 13:41
आटोपशीर आणि सुंदर ओळख. मी पहिले तीनही भाग वाचलेले आहेत.. काही ठिकाणी रटाळपणा नक्कीच अनुभवायला येतो.. कादंबऱ्यांमध्ये सुद्धा पुनरुक्ती जाणवत राहते. पण त्या रटाळपणासहित कादंबऱ्या आवडून जातात.. मनात घर करून राहतात. ही सुद्धा यादीच आहे.. अजून योग आलेला नाहीये. ही तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकली?

कपिलमुनी 25/07/2025 - 21:35
रामूने सत्या बनवला.. मग सत्यासारखं काहीतरी बनवायचा म्हणून ढीगभर पिक्चर केले.. नेमाडेंनी कोसला लिहिली..मग कोसला सारखा काहीतरी लिहायचा म्हणून हिंदू लिहिली.

यांची कोसला खुप लोकांना आवडले. माझ्या संग्रहात आहे पण कधीही वाचायला घेतल्यावर एकदोन पानाच्या पुढे प्रगती होत नाही. तेच भैरप्पांचे अनुवादित पुस्तक एका बैठकीत संपते. असो. किंडलपेक्षा कागदी पुस्तके आवडतात. नवीन आणले की त्याचा येणारा वेगळाच सुवास लहानपणीच्या नवीन शाळेची पुस्तके आठवतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 26/07/2025 - 10:54
भैरप्पा _/\_ सध्या ' पर्व 'ऐकायला सुरूवात केली आहे.माझं आताच भैरप्पांच्या कादंबरीबरोबर नातं निर्माण झालंय.आवरण,वंशवृक्ष अक्षरशः वेड लावलं.त्यांच्या कानडी कादंबरींचा भावानुवाद मराठीत करून उमा कुलकर्णी यांनी वाचकांसाठी खुप खुप बहुमोल कार्य केले‌ आहे _/\_

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 11:22
जा ओलांडूनी, सार्थ, पारखा ह्या देखील उत्कृष्ट कादंबर्‍या आहेत, त्या आवर्जून वाचा. कन्नड कादंबर्‍यांमुळे मी तर भारावून गेलोय. अफलातून चित्रण असते. शिवराम कारंथांची पुस्तके तर आवर्जून वाचा, मुकज्जी, अशी ही धरणीची माया, चोमा महार, डोंगराएव्हढा ह्या त्यांच्या एकाहून एक सरस कादंबर्‍या आहेत. ह्या शिवाय अनंतमूर्ती ह्यांची संस्कार, रावबहादूर कुलकर्णी ह्यांची ग्रामायण, गोपाळकृष्ण पै यांची स्वप्न सारस्वत ह्या सर्वच कादंबर्‍या आवर्जून वाचण्यासारख्या आहेत.

In reply to by प्रचेतस

अंजावर चकटफू पडफ मिळाले. तीनशे पानं एका सटक्यात वाचली. महाभारतावरील एक वेगळा दृष्टिकोन आवडला म्हणून अमेझोन वरून मागवले. नंतर तुमच्याच (प्रचेतस, ) शिफारशीनुसार बाकीची अक्षरधारामधे खरेदी केली. सर्व चांगली आहेत.. कारंथांची मागवतो. सध्या फोटोग्राफी चा नाद लागलाय. अधुनिक तंत्रज्ञानामुळे बरेच फोटो बरेच येतात पण जरा शास्त्रशुद्ध शिकावे म्हणून डाॅक्टर कात्रे यांचे डिजीटल फोटोग्राफी हे पुस्तक मागवले आहे.

श्वेता२४ 26/07/2025 - 13:14
म्हणून ऑफीसच्या पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक खरेदी करणार एवढ्यात माझ्या वरीष्ठांनी माझ्यकडे आहे घेउ नका म्हणाले. नंतर त्यांनी आणून दिले. काही पाने वाचूनच ही पुस्तक पूर्ण होणर नाही याची खात्री पटली. पुस्तक परत केले व पैसे वाचवल्याबद्दल सरांना चहा दिला. :))

मारवा 27/07/2025 - 19:42
मौज प्रकाशनाने नेमाडे यांचे महत्व ओळखण्यात चूक केली. माझ्या माहितीप्रमाणे कोसला चा पहिला खर्डा मौजेकडे गेला होता व तो नाकारण्यात आला होता चूकभूल देणे घेणे. मौजे च्या प्रकाशकांचा एक साहित्यविषयक विशिष्ट दृष्टीकोन होता. कलात्मक सौंदर्य त्यात ते महत्वाचे मानत. त्यांना सामाजिकतेचे वावडे होते असे नव्हे.पण त्यांना मूलभूत कलात्मक सौंदर्य साहित्यिक मूल्य जे घाट शैली आशय संदर्भात आहे ते अधिक मोलाचे वाटत. कलेसाठी कला या बाजूचे मौज प्रकाशन होते. पण त्यांनी या मर्यादेमुळे एकीकडे अनेक चांगलेनलेखन नाकारले हे जसे खरे आहे तसेच भागवत आदींनी त्यांच्या साहित्य तत्वांचा अंगीकार असलेले अतिशय सकानसुंदर साहित्य सुद्धा प्रकाशित करून एकूण मराठी साहित्य समृद्ध केले. श्रीपु एकदा म्हणाले की आम्ही काय नाही दिले पेक्षा काय दिले प्रकाशिले त्यावरून आमचं मूल्यमापन करावे पॉप्युलर चे भटकळ हे मौजेचे उत्तम तत्व आणि मौजे ने नाकारलेले किंवा सामाजिक आशयप्रधान साहित्य या दोघांचा उत्कृष्ट balance पॉप्युलर ने केला असे माझे मत आहे. एकीकडे ग्रेस यांचे सर्व साहित्य आणि एकीकडे नेमाडे यांचे साहित्य पॉप्युलर सारखी संस्था प्रकाशित करू शकते हे भटकळ यांचे greatness आहे विशाल साहित्यिक दृष्टिकोन आहे. Best of both worlds मौज चां दमदार विरोधी बाजूचा काउंटर प्रवाह प्रकाशित करणारी संस्था बघू गेलो तर सर्वात वर लोक vangmay गृह हे आहे. ही साम्यवादी मंडळींची संस्था आहे पण अतिशय दमदार सकस साहित्य निर्मिती इथे होते. राजहंस ही पॉप्युलर चा पाया प्रेरणा असलेली संस्था आहे. पण त्याहून अधिक चे वैशिष्ट्य म्हणजे ती आधुनिक आणि खऱ्या अर्थाने पॉप्युलर साहित्या ची सुद्धा प्रकाशन करणारी आहे. गंमत म्हणजे मौज आणि पॉप्युलर हे जसे नावाच्या विरुद्ध गंभीर साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था आहेत. Lokwvangmay गृह नावाला जगते. पद्मगंधेचा कल हा संशोधनात्मक वैचारिक स्वरूपाच्या साहित्य कडे अधिक आहे. (या सर्वांनी या प्रकाशक मी लेखक घडवले असे म्हणणे हा सर्व महान लेखकांचा अपमान आहे ) मला स्वतःला भागवत फार snobbish elite वाटतात. त्यापेक्षा मला भटकळ जवळचे वाटतात. भागवत मला गमतीने कधी कधी fountain head कादंबरीतील ellsworth toohey पात्रासारखे भासतात. काही लेखक स्वतः च प्रकाशित होतात जसे उत्तम कसदार लेखन असले तरी आणिंकही ठिकाणी पूर्णपणे प्रचारी चुकीचे असले तरी आ हा साळुंखे वगैरे स्वतःची पुस्तके स्वच्छ छापतात. उद्धव शेळके धग कार स्वतः प्रकाशन संस्था चालवत त्यांची परिस्थिती हलाखीची होती पुस्तक विक्री हा पोटाचा व्यवसाय होता असेही आहेत काहींप्रकाशक. प्रास प्रकाशन सारखे अशोक शहाणे सारखे अतिशय मनस्वी प्रकाशक ज्यांनी अरुण कोल्हटकरांच्या अद्भुत सुंदर कविता अतीव सुंदर रीतीने प्रकाशित केल्या या कवितेच्या पुस्तकांचा कागद त्यांचा रंग त्यांचा आकार सर्व काही वेगळा प्रयोगशील आणि फार काबील ए तारीफ असा आहे. याला म्हणतात साहित्यावरील प्रेम. निर्मितीं मूल्ये राजहंस ची उत्कृष्ट आहेत .मेहता प्रकाशन प्रामुख्याने अनुवादित साहित्य प्रकाशित करते आणि बिकने वाला मालं त्यांची काही साहित्यिक धारणा असेल असे वाटत नाही. श्री गजानन बुक डेपो म्हणजे महाराष्ट्राचा गीता प्रेस सारखा अवतार काहीसा. शब्दालय हे श्रीरामपूर सारख्या आडगावचे प्रकाशन पण भारी पुस्तके प्रकाशित करतात विलास सारंग आदनची सुद्धा. पेंग्विन सारख्या जागतिक प्रकाशनाने एक उत्तम.मराठी कथांचे संकलन प्रसिद्ध केले होते. ते कौतुकाने घेतले. निशिकांत मिरजकर हे संकलक होते उत्तम कथा पण पुस्तकात इतक्या ढिगाने व्याकरण आणि शब्द यांच्या चुका होत्या की माझ्या या प्रतिसादाला तुम्ही चक्क निर्दोष म्हणाल.त्यावर मेघना पेठे यांनी पेंग्विन ची खूप खेचली होती. मराठीत आहे तर काहीही छापा अशी चूक पठ्ठे इंग्रजीत करतील का ? अंतर्नाद चे प्रकाशन मौजे च्या सत्यकथे ला टक्कर होते. कॉम्रेड भानू काळे हे थोर साहित्यिक जाण असलेले प्रकाशक होते. अंतर्नाद बंद करावे लागले याची मोती खंत आहे सध्या नव्या दमाचे पपायरस प्रकाशन सुंदर आणि उत्कृष्ट लेखन घेऊन येत आहे.

In reply to by मारवा

Bhakti 27/07/2025 - 20:21
खुपच सुंदर प्रतिसाद!मला म्हणून मिपावर लेख लिहायला आवडतात.नाहीतर ही माहिती माझ्यापर्यंत यायला अजून पाच वर्षे लागली असती :) लोकवाङमयची पुस्तकं हा समाज हुंकार आहे.आ.ह.साळुंखे म्हणजे लोकायत संस्था.होय पपायरस प्रकाशनही उत्तम पुस्तकं छापित आहेत.

पुस्तक जाऊ दे खड्ड्यात, म्हणजे ते आधीच गेलेले आहे पण मला एक प्रश्न पडला आहे की प्रकाशकांना परवडते कसे अशी पुस्तके प्रकाशित करणे ? मराठी प्रकाशन व्यवसायातील कोणाला तरी बोलावून पॉडकास्ट करायला मजा येईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 23/07/2025 - 14:20
काय माहीती नाही? पॉप्युलर प्रकाशन आहे. अवांतर पण प्रकाशक आणि लेखक यांच्यातील मधुर नात्यांचं एक उदाहरण पुन्हा समजले.पद्मगंधा चे जाखडे हे २१ जुलैला रा.चि.ढेरे यांच्या जन्मदिनी त्यांचे एकतरी पुस्तक पुर्नप्रकाशन करतात.नरहर कुरुंदकर म्हटले की देशमुख आणि कंपनी अजोड नातं होतं.गो.नी.दांडेकर आणि मृण्मयी प्रकाशन आहेच. हरारी,डारियस प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद, अच्युत गोडबोले म्हटलं की मधुश्री प्रकाशन समीकरण दिसते. अजून आठवलं की सांगते.

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 06:09
गोनीदा आणि मॅजेस्टिक हे नातं होतं. त्यांची बहुतेक पुस्तकं मॅजेस्टिकची आहेत. मृण्मयी प्रकाशन ही त्यांच्या मुलीची, वीणा देव यांची प्रकाशन संस्था आहे जी गोनीदांची पुस्तके आता पुन:प्रकाशित करत आहे

In reply to by प्रचेतस

Bhakti 26/07/2025 - 10:46
अच्छा! मृण्मयी वीणा देव यांचे हे माहिती होतं.पण वाटलं सुरूवात गोनीदा यांनी केली असेल. पु.लं.ची पुस्तके मौज प्रकाशनाची दिसत आहेत.दुर्गाबाईंची वरदा प्रकाशनाची आहेत,पण पैसे,दुपानी,ऋतूचक्र इतर प्रकाशनाची आहेत.प्रसिद्ध पुस्तकांचे हक्क मिळवण्यासाठी नंतर चढाओढ असते असे वाचलं होतं.

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 11:13
रामदास भटकळांचे पॉप्युलर, श्री पु भागवतांचे मौज, कोठावळ्यांचे मॅजेस्टिक, माजगावकरांचे राजहंस, अनंतराव कुलकर्ण्यांचे कॉन्टिनेन्टल ह्या जुन्या प्रकाशन संस्थांनी अनेक दर्जेदार लेखक घडवून पुस्तकेही दर्जेदार दिली असे म्हणता येईल. ह्या संस्था उत्तम लेखक जिव्हाळ्याने राखून ठेवण्यासाठी देखील प्रसिद्ध होत्या आणि आहेत. वरदाच्या ह. अ. भावेंनी प्राचीन साहित्य मराठीत आणून आतबट्ट्याचाही व्यवहार केला असे म्हणता येईल. मराठी वाचकांवर ह्यांचे मोठे ऋण आहे. आता मात्र तसे लेखक राहिले नाहीत आणि मेहतांसारख्या तद्दन बाजारु प्रकाशन संस्था सध्या जोरात कार्यरत आहेत. मात्र त्यांनी देखील भैरप्पांची पुस्तके मराठीत आणून मोठे कार्य केले आहे असे म्हणता येईल.

चौथा कोनाडा 23/07/2025 - 13:41
आटोपशीर आणि सुंदर ओळख. मी पहिले तीनही भाग वाचलेले आहेत.. काही ठिकाणी रटाळपणा नक्कीच अनुभवायला येतो.. कादंबऱ्यांमध्ये सुद्धा पुनरुक्ती जाणवत राहते. पण त्या रटाळपणासहित कादंबऱ्या आवडून जातात.. मनात घर करून राहतात. ही सुद्धा यादीच आहे.. अजून योग आलेला नाहीये. ही तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकली?

कपिलमुनी 25/07/2025 - 21:35
रामूने सत्या बनवला.. मग सत्यासारखं काहीतरी बनवायचा म्हणून ढीगभर पिक्चर केले.. नेमाडेंनी कोसला लिहिली..मग कोसला सारखा काहीतरी लिहायचा म्हणून हिंदू लिहिली.

यांची कोसला खुप लोकांना आवडले. माझ्या संग्रहात आहे पण कधीही वाचायला घेतल्यावर एकदोन पानाच्या पुढे प्रगती होत नाही. तेच भैरप्पांचे अनुवादित पुस्तक एका बैठकीत संपते. असो. किंडलपेक्षा कागदी पुस्तके आवडतात. नवीन आणले की त्याचा येणारा वेगळाच सुवास लहानपणीच्या नवीन शाळेची पुस्तके आठवतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 26/07/2025 - 10:54
भैरप्पा _/\_ सध्या ' पर्व 'ऐकायला सुरूवात केली आहे.माझं आताच भैरप्पांच्या कादंबरीबरोबर नातं निर्माण झालंय.आवरण,वंशवृक्ष अक्षरशः वेड लावलं.त्यांच्या कानडी कादंबरींचा भावानुवाद मराठीत करून उमा कुलकर्णी यांनी वाचकांसाठी खुप खुप बहुमोल कार्य केले‌ आहे _/\_

In reply to by Bhakti

प्रचेतस 26/07/2025 - 11:22
जा ओलांडूनी, सार्थ, पारखा ह्या देखील उत्कृष्ट कादंबर्‍या आहेत, त्या आवर्जून वाचा. कन्नड कादंबर्‍यांमुळे मी तर भारावून गेलोय. अफलातून चित्रण असते. शिवराम कारंथांची पुस्तके तर आवर्जून वाचा, मुकज्जी, अशी ही धरणीची माया, चोमा महार, डोंगराएव्हढा ह्या त्यांच्या एकाहून एक सरस कादंबर्‍या आहेत. ह्या शिवाय अनंतमूर्ती ह्यांची संस्कार, रावबहादूर कुलकर्णी ह्यांची ग्रामायण, गोपाळकृष्ण पै यांची स्वप्न सारस्वत ह्या सर्वच कादंबर्‍या आवर्जून वाचण्यासारख्या आहेत.

In reply to by प्रचेतस

अंजावर चकटफू पडफ मिळाले. तीनशे पानं एका सटक्यात वाचली. महाभारतावरील एक वेगळा दृष्टिकोन आवडला म्हणून अमेझोन वरून मागवले. नंतर तुमच्याच (प्रचेतस, ) शिफारशीनुसार बाकीची अक्षरधारामधे खरेदी केली. सर्व चांगली आहेत.. कारंथांची मागवतो. सध्या फोटोग्राफी चा नाद लागलाय. अधुनिक तंत्रज्ञानामुळे बरेच फोटो बरेच येतात पण जरा शास्त्रशुद्ध शिकावे म्हणून डाॅक्टर कात्रे यांचे डिजीटल फोटोग्राफी हे पुस्तक मागवले आहे.

श्वेता२४ 26/07/2025 - 13:14
म्हणून ऑफीसच्या पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक खरेदी करणार एवढ्यात माझ्या वरीष्ठांनी माझ्यकडे आहे घेउ नका म्हणाले. नंतर त्यांनी आणून दिले. काही पाने वाचूनच ही पुस्तक पूर्ण होणर नाही याची खात्री पटली. पुस्तक परत केले व पैसे वाचवल्याबद्दल सरांना चहा दिला. :))

मारवा 27/07/2025 - 19:42
मौज प्रकाशनाने नेमाडे यांचे महत्व ओळखण्यात चूक केली. माझ्या माहितीप्रमाणे कोसला चा पहिला खर्डा मौजेकडे गेला होता व तो नाकारण्यात आला होता चूकभूल देणे घेणे. मौजे च्या प्रकाशकांचा एक साहित्यविषयक विशिष्ट दृष्टीकोन होता. कलात्मक सौंदर्य त्यात ते महत्वाचे मानत. त्यांना सामाजिकतेचे वावडे होते असे नव्हे.पण त्यांना मूलभूत कलात्मक सौंदर्य साहित्यिक मूल्य जे घाट शैली आशय संदर्भात आहे ते अधिक मोलाचे वाटत. कलेसाठी कला या बाजूचे मौज प्रकाशन होते. पण त्यांनी या मर्यादेमुळे एकीकडे अनेक चांगलेनलेखन नाकारले हे जसे खरे आहे तसेच भागवत आदींनी त्यांच्या साहित्य तत्वांचा अंगीकार असलेले अतिशय सकानसुंदर साहित्य सुद्धा प्रकाशित करून एकूण मराठी साहित्य समृद्ध केले. श्रीपु एकदा म्हणाले की आम्ही काय नाही दिले पेक्षा काय दिले प्रकाशिले त्यावरून आमचं मूल्यमापन करावे पॉप्युलर चे भटकळ हे मौजेचे उत्तम तत्व आणि मौजे ने नाकारलेले किंवा सामाजिक आशयप्रधान साहित्य या दोघांचा उत्कृष्ट balance पॉप्युलर ने केला असे माझे मत आहे. एकीकडे ग्रेस यांचे सर्व साहित्य आणि एकीकडे नेमाडे यांचे साहित्य पॉप्युलर सारखी संस्था प्रकाशित करू शकते हे भटकळ यांचे greatness आहे विशाल साहित्यिक दृष्टिकोन आहे. Best of both worlds मौज चां दमदार विरोधी बाजूचा काउंटर प्रवाह प्रकाशित करणारी संस्था बघू गेलो तर सर्वात वर लोक vangmay गृह हे आहे. ही साम्यवादी मंडळींची संस्था आहे पण अतिशय दमदार सकस साहित्य निर्मिती इथे होते. राजहंस ही पॉप्युलर चा पाया प्रेरणा असलेली संस्था आहे. पण त्याहून अधिक चे वैशिष्ट्य म्हणजे ती आधुनिक आणि खऱ्या अर्थाने पॉप्युलर साहित्या ची सुद्धा प्रकाशन करणारी आहे. गंमत म्हणजे मौज आणि पॉप्युलर हे जसे नावाच्या विरुद्ध गंभीर साहित्य प्रकाशित करणाऱ्या संस्था आहेत. Lokwvangmay गृह नावाला जगते. पद्मगंधेचा कल हा संशोधनात्मक वैचारिक स्वरूपाच्या साहित्य कडे अधिक आहे. (या सर्वांनी या प्रकाशक मी लेखक घडवले असे म्हणणे हा सर्व महान लेखकांचा अपमान आहे ) मला स्वतःला भागवत फार snobbish elite वाटतात. त्यापेक्षा मला भटकळ जवळचे वाटतात. भागवत मला गमतीने कधी कधी fountain head कादंबरीतील ellsworth toohey पात्रासारखे भासतात. काही लेखक स्वतः च प्रकाशित होतात जसे उत्तम कसदार लेखन असले तरी आणिंकही ठिकाणी पूर्णपणे प्रचारी चुकीचे असले तरी आ हा साळुंखे वगैरे स्वतःची पुस्तके स्वच्छ छापतात. उद्धव शेळके धग कार स्वतः प्रकाशन संस्था चालवत त्यांची परिस्थिती हलाखीची होती पुस्तक विक्री हा पोटाचा व्यवसाय होता असेही आहेत काहींप्रकाशक. प्रास प्रकाशन सारखे अशोक शहाणे सारखे अतिशय मनस्वी प्रकाशक ज्यांनी अरुण कोल्हटकरांच्या अद्भुत सुंदर कविता अतीव सुंदर रीतीने प्रकाशित केल्या या कवितेच्या पुस्तकांचा कागद त्यांचा रंग त्यांचा आकार सर्व काही वेगळा प्रयोगशील आणि फार काबील ए तारीफ असा आहे. याला म्हणतात साहित्यावरील प्रेम. निर्मितीं मूल्ये राजहंस ची उत्कृष्ट आहेत .मेहता प्रकाशन प्रामुख्याने अनुवादित साहित्य प्रकाशित करते आणि बिकने वाला मालं त्यांची काही साहित्यिक धारणा असेल असे वाटत नाही. श्री गजानन बुक डेपो म्हणजे महाराष्ट्राचा गीता प्रेस सारखा अवतार काहीसा. शब्दालय हे श्रीरामपूर सारख्या आडगावचे प्रकाशन पण भारी पुस्तके प्रकाशित करतात विलास सारंग आदनची सुद्धा. पेंग्विन सारख्या जागतिक प्रकाशनाने एक उत्तम.मराठी कथांचे संकलन प्रसिद्ध केले होते. ते कौतुकाने घेतले. निशिकांत मिरजकर हे संकलक होते उत्तम कथा पण पुस्तकात इतक्या ढिगाने व्याकरण आणि शब्द यांच्या चुका होत्या की माझ्या या प्रतिसादाला तुम्ही चक्क निर्दोष म्हणाल.त्यावर मेघना पेठे यांनी पेंग्विन ची खूप खेचली होती. मराठीत आहे तर काहीही छापा अशी चूक पठ्ठे इंग्रजीत करतील का ? अंतर्नाद चे प्रकाशन मौजे च्या सत्यकथे ला टक्कर होते. कॉम्रेड भानू काळे हे थोर साहित्यिक जाण असलेले प्रकाशक होते. अंतर्नाद बंद करावे लागले याची मोती खंत आहे सध्या नव्या दमाचे पपायरस प्रकाशन सुंदर आणि उत्कृष्ट लेखन घेऊन येत आहे.

In reply to by मारवा

Bhakti 27/07/2025 - 20:21
खुपच सुंदर प्रतिसाद!मला म्हणून मिपावर लेख लिहायला आवडतात.नाहीतर ही माहिती माझ्यापर्यंत यायला अजून पाच वर्षे लागली असती :) लोकवाङमयची पुस्तकं हा समाज हुंकार आहे.आ.ह.साळुंखे म्हणजे लोकायत संस्था.होय पपायरस प्रकाशनही उत्तम पुस्तकं छापित आहेत.
गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :) हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .

नक्षत्रांचे देणे होते

अनन्त्_यात्री ·

निनाद 21/08/2025 - 14:54
विषय छान आहे. नक्षत्रांनी अव्हेरून उल्का पाठविली काट्यांशीच केली मैत्री फुले त्यांची झाली चमत्कृती आहे, गझल होऊ शकेल.

गणेशा 24/08/2025 - 09:46
नक्षत्रांचे देणे होते द्यायचे राहिले जगण्याच्या वाटेवर काटेच भेटले छान... पहिल्या दोन ओळींवरुन.. जगायचं राहिलं ह्या ओळी सुचल्या.. नंतर कधी post करेल

मनिष 09/09/2025 - 11:03
हे सुरेख आहे...
सृजनाच्या मृदेवर आमुची पाखर निर्मितीची उर्मी गाठो एक नवा स्तर

निनाद 21/08/2025 - 14:54
विषय छान आहे. नक्षत्रांनी अव्हेरून उल्का पाठविली काट्यांशीच केली मैत्री फुले त्यांची झाली चमत्कृती आहे, गझल होऊ शकेल.

गणेशा 24/08/2025 - 09:46
नक्षत्रांचे देणे होते द्यायचे राहिले जगण्याच्या वाटेवर काटेच भेटले छान... पहिल्या दोन ओळींवरुन.. जगायचं राहिलं ह्या ओळी सुचल्या.. नंतर कधी post करेल

मनिष 09/09/2025 - 11:03
हे सुरेख आहे...
सृजनाच्या मृदेवर आमुची पाखर निर्मितीची उर्मी गाठो एक नवा स्तर
नक्षत्रांचे देणे होते द्यायचे राहिले जगण्याच्या वाटेवर काटेच भेटले नक्षत्रांनी अव्हेरून उल्का पाठविली काट्यांशीच केली मैत्री फुले त्यांची झाली एकेका फुलाचे रंग आठवत होतो निर्माल्य फुलांचे झाले -बेसावध होतो निर्माल्य होताना फुले नि:शब्द म्हणाली, "खत होणे हेच थोर भाग्य आम्हा भाळी सृजनाच्या मृदेवर आमुची पाखर निर्मितीची उर्मी गाठो एक नवा स्तर पीक विलक्षणाचेच येईल, तोवरी नक्षत्रांनो थांबा,आज रिक्त देणेकरी"

निसर्गायण (ऐसी अक्षरे -३०)

Bhakti ·

In reply to by श्वेता व्यास

Bhakti 21/07/2025 - 19:36
धन्यवाद श्वेता.व्यक्तीनिष्ठता नैतिक वैचारिक घडवून आणल्यास हळूहळू जागतिक गोंधळ कमी होऊन भोगवादी होण्याऐवजी,निसर्गाच्या‌ ऋणात व्यक्ती येईल,असे पुस्तकात सुचवले आहे.समोरचा करत नाही तर मी का सुरुवात करू ही वृत्ती बदलली पाहिजे.

In reply to by श्वेता व्यास

Bhakti 21/07/2025 - 19:36
धन्यवाद श्वेता.व्यक्तीनिष्ठता नैतिक वैचारिक घडवून आणल्यास हळूहळू जागतिक गोंधळ कमी होऊन भोगवादी होण्याऐवजी,निसर्गाच्या‌ ऋणात व्यक्ती येईल,असे पुस्तकात सुचवले आहे.समोरचा करत नाही तर मी का सुरुवात करू ही वृत्ती बदलली पाहिजे.
निसर्गायण लेखक- दिलीप कुलकर्णी. १ जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे. हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो.

खडपाकोळी

कर्नलतपस्वी ·

सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस 03/07/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.

सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.

धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी. सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्‍याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी... प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.

कंजूस 03/07/2025 - 21:58
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू. पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी राखू कशी, अंगावरली ? राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!! कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील. सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो. पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.

स्वार्थी फुलांचा परमार्थ

Bhakti ·

कंजूस 03/07/2025 - 05:06
जनातलं मनातलं आहे हे पटतंय. फार लांबवले नाही.आवडलं. चित्राने काम केलंय. पारिजाताचा हार कल्पना बरोबर. सुगंधामुळे तुम्ही झाडापाशी येता, खालीच फुलांचा सडा पडलेला असतो ती वेचता सकाळी. रात्रीच कीटकांची आस्वाद घेतलेला असतो. बीजधारणा झालेली असते. शेवटीही फुलांनी परमार्थ साधलेला असतो. स्वर्गातलेच झाड ते.

प्रचेतस 03/07/2025 - 07:12
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ माझ्या घरातलीच अडगळ झालीय. पुस्तक अजिबात आवडले नाही. कोसला, चांगदेव चतुष्टय, हिंदू वाचून नेमाडे एक ओव्हरहाईप झालेले लेखक आहेत असे प्रामाणिक मत झाले.

विवेकपटाईत 03/07/2025 - 08:54
एका हत्तीला सहा आंधळे वेगवेगळ्या अनुभवाने पाहतात. ज्याचा अनुभव जसा असेल, तसे तो हिंदू जीवन पद्धतीला पाहणार. लेखकाने संपूर्ण हत्तीचा अनुभव घेतला असता तर कादंबरी वेगळी असती.

Bhakti 03/07/2025 - 10:41
सर्वांना _/\_ मी पुस्तक वाचत नाही तर ऐकतेय, त्यामुळे मला या पुस्तकातले नाट्य अधिक भावत आहे.खुपच नाट्यमय पद्धतीने अभिवाचन केले आहे. पण अजूनही नेमाडेंना नक्की काय म्हणायचे आहे हे समजलं नाही.१३ तासांचे श्रवण बाकी आहे,तेव्हा ही गोम कळेल ही आशा करते.पण वेगळ्याच पद्धतीची कादंबरी आहे

कंजूस 03/07/2025 - 11:03
मला कोसलाही आवडले आणि हे हिंदू एक अडगळही आवडले. जे काय झाले, भावले, नाही जमले ते मांडलंय लेखकाने. त्यात काही साहित्यिक आव आणून लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न नाही . खरं तर प्रत्येक लेखकाने असं लिहिलं पाहिजे. भावनांची कडबोळी कादंबरीतून दूरून फेकण्यापेक्षा हे बरं. हल्लीच एका मुलाखतीत( एबिपी माझाही) कोसला कसं घडलं ते सांगितलंय. खानदेश, विदर्भातले लेखक प्रामाणिकपणे लिहितात असं माझं मत झालंय.

खरेदी केलं पण वाचण्यात मन रमल नाही. पुन्हा प्रयत्न करीन. सदर पुस्तक माहीत नव्हते, जमल्यास वाचायचा प्रयत्न करेन. बाकी भक्तीने भक्तीपूर्वक वर्णन केले आहे आवडले.

कंजूस 03/07/2025 - 05:06
जनातलं मनातलं आहे हे पटतंय. फार लांबवले नाही.आवडलं. चित्राने काम केलंय. पारिजाताचा हार कल्पना बरोबर. सुगंधामुळे तुम्ही झाडापाशी येता, खालीच फुलांचा सडा पडलेला असतो ती वेचता सकाळी. रात्रीच कीटकांची आस्वाद घेतलेला असतो. बीजधारणा झालेली असते. शेवटीही फुलांनी परमार्थ साधलेला असतो. स्वर्गातलेच झाड ते.

प्रचेतस 03/07/2025 - 07:12
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ माझ्या घरातलीच अडगळ झालीय. पुस्तक अजिबात आवडले नाही. कोसला, चांगदेव चतुष्टय, हिंदू वाचून नेमाडे एक ओव्हरहाईप झालेले लेखक आहेत असे प्रामाणिक मत झाले.

विवेकपटाईत 03/07/2025 - 08:54
एका हत्तीला सहा आंधळे वेगवेगळ्या अनुभवाने पाहतात. ज्याचा अनुभव जसा असेल, तसे तो हिंदू जीवन पद्धतीला पाहणार. लेखकाने संपूर्ण हत्तीचा अनुभव घेतला असता तर कादंबरी वेगळी असती.

Bhakti 03/07/2025 - 10:41
सर्वांना _/\_ मी पुस्तक वाचत नाही तर ऐकतेय, त्यामुळे मला या पुस्तकातले नाट्य अधिक भावत आहे.खुपच नाट्यमय पद्धतीने अभिवाचन केले आहे. पण अजूनही नेमाडेंना नक्की काय म्हणायचे आहे हे समजलं नाही.१३ तासांचे श्रवण बाकी आहे,तेव्हा ही गोम कळेल ही आशा करते.पण वेगळ्याच पद्धतीची कादंबरी आहे

कंजूस 03/07/2025 - 11:03
मला कोसलाही आवडले आणि हे हिंदू एक अडगळही आवडले. जे काय झाले, भावले, नाही जमले ते मांडलंय लेखकाने. त्यात काही साहित्यिक आव आणून लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न नाही . खरं तर प्रत्येक लेखकाने असं लिहिलं पाहिजे. भावनांची कडबोळी कादंबरीतून दूरून फेकण्यापेक्षा हे बरं. हल्लीच एका मुलाखतीत( एबिपी माझाही) कोसला कसं घडलं ते सांगितलंय. खानदेश, विदर्भातले लेखक प्रामाणिकपणे लिहितात असं माझं मत झालंय.

खरेदी केलं पण वाचण्यात मन रमल नाही. पुन्हा प्रयत्न करीन. सदर पुस्तक माहीत नव्हते, जमल्यास वाचायचा प्रयत्न करेन. बाकी भक्तीने भक्तीपूर्वक वर्णन केले आहे आवडले.
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की, ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच! पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला प्रश्न पडलेला.पारिजात फु

पार

अनन्त्_यात्री ·

कविता मला तरी बाऊंसर गेली , मग शेवटी AI ला अर्थ विचारला , आणि विडंबन लिहायला सांगितले कवितेचे विडंबन खालीलप्रमाणे: जनुकांचा जिना सोसे नोकरीच्या कळा पगारवाढीच्या पलीकडे बिलांचा गळा सेल्फीचा जाऊ पाहे चेहऱ्याच्याही पार फडफडुनी डेटा उरे स्क्रीन आरपार बिल्डिंगच्या कोपऱ्याशी वाईफाईचा दिवा शोधण्यास कोण येते डाटा पॅक जीवा सिग्नलच्या पार जाई रीलचा तो पैस रीचार्जच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार स्टेटस पोहोचूनी गेली लाईकसाठी राजा खेळे तरी इंटरनेटची भूक लागली!

युयुत्सु 14/07/2025 - 17:34
डीपसिकचे विश्लेषण नक्की वाचा- ही अप्रतिम कविता (जनुकांचा जिना सोसे...) **मराठीतील ख्यातनाम कवी विंदा करंदीकर** यांच्या **"घासगत शब्द"** (१९८३) या संग्रहातील आहे. ती करंदीकरांच्या अत्यंत प्रतीकात्मक, गहन आणि दार्शनिक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कवितेचा अर्थ व अर्थछटा: 1. **"पार" या संकल्पनेवरील भर:** संपूर्ण कविता "पार" (पलीकडे, पार करणे, मर्यादा ओलांडणे) या केंद्रीय संकल्पनेभोवती फिरते. ही मर्यादा शारीरिक, मानसिक, भावनिक, संवेदनात्मक, आध्यात्मिक किंवा कलात्मक असू शकते. 2. **प्रसवाची वेदना आणि जन्म:** पहिल्या चरणातील "प्रसवाच्या कळा" हे केवळ स्त्रीच्या प्रसूतीवेदनेचे नव्हे तर कोणत्याही नवीन सृष्टीच्या, नव्या अस्तित्वाच्या जन्माला येण्याच्या संघर्षाचे प्रतीक आहे. "अनाहत निळा" हे अनंतत्वाचे, आध्यात्मिकतेचे प्रतीक असू शकते. 3. **प्रतिबिंबाचे मायाजाल:** दुसरा चरण स्वतःच्या प्रतिमेपलीकडे जाण्याचा प्रयत्न आणि त्यातून निर्माण होणारा विखुरलेपणा ("उडोनिया पारा") दर्शवतो. "काच आरपार" हे स्पष्टतेचे प्रतीक असूनही, तिच्यामधून पाहणे हे विकृत होऊ शकते (पारा उडणे). 4. **अंधारातील प्रकाशाची वाट पाहणे:** तिसरा चरण एका एकाकी आणि कदाचित भयावह प्रतीक्षेची भावना निर्माण करतो. पिंपळाच्या झाडाखाली (ज्याला पारंपरिकदृष्ट्या आध्यात्मिक महत्त्व आहे) दिवा लावण्याची वाट पाहणे, पण तो कोण येऊन लावेल याची चिंता ("घोर लागे जीवा") व्यक्त होते. हे दैवी प्रकाश, ज्ञान किंवा प्रेरणेच्या शोधाचे प्रतीक असू शकते. 5. **मिथक, नक्षत्रे आणि सृष्टीचा कोलाहल:** चौथ्या चरणात कवी मिथकांच्या जगातून (जे मानवी कल्पनेची मर्यादा दर्शवते) नक्षत्रांच्या पलीकडे (भौतिक विश्वाची मर्यादा) जाण्याचा प्रयत्न करतो. "सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस" हे सृष्टीच्या अफाट गोंधळात, त्याच्या अराजकात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या मानवी प्रयत्नाचे द्योतक आहे. 6. **कवितेची परम शक्ती आणि माया:** शेवटचा चरण कवितेच्या शक्तीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. कवी सांगतो की कविता शब्दांच्या मर्यादा ("शब्दांच्याही पार ओळ") ओलांडून जाते. पण शेवटच्या दोन ओळी गहन व विरोधाभासी आहेत: "लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली". जरी हे सर्व विश्व (राजा) एक खेळ, एक भास (भातुकली) असले तरीही ते "लुटुपुटू" (विध्वंसक, विखुरलेले, किंवा दुःखद) असू शकते. हे अस्तित्वाच्या मूलभूत विरोधाभासाकडे (सृष्टीचे सौंदर्य आणि त्यातील दुःख/नाश) नेणारे दार्शनिक विधान आहे. **कवितेचे सारांश:** ही कविता मानवी अस्तित्वाच्या विविध मर्यादा (शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कलात्मक) ओलांडून जाण्याच्या सततच्या प्रयत्नाची आणि संघर्षाची कथा सांगते. ती जन्माच्या वेदनेपासून ते मृत्यूच्या विचारापर्यंत, भास (माया) आणि वास्तव यातील तणावपूर्ण संबंधांचे भेदक चित्रण करते. विंदा करंदीकरांची ही कविता त्यांच्या गहन विचारशक्ती, अत्यंत नवीन प्रतिमाविधान आणि दार्शनिक खोलीचे उत्तम उदाहरण म्हणून मराठी साहित्यात अजरामर आहे.

कविता मला तरी बाऊंसर गेली , मग शेवटी AI ला अर्थ विचारला , आणि विडंबन लिहायला सांगितले कवितेचे विडंबन खालीलप्रमाणे: जनुकांचा जिना सोसे नोकरीच्या कळा पगारवाढीच्या पलीकडे बिलांचा गळा सेल्फीचा जाऊ पाहे चेहऱ्याच्याही पार फडफडुनी डेटा उरे स्क्रीन आरपार बिल्डिंगच्या कोपऱ्याशी वाईफाईचा दिवा शोधण्यास कोण येते डाटा पॅक जीवा सिग्नलच्या पार जाई रीलचा तो पैस रीचार्जच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार स्टेटस पोहोचूनी गेली लाईकसाठी राजा खेळे तरी इंटरनेटची भूक लागली!

युयुत्सु 14/07/2025 - 17:34
डीपसिकचे विश्लेषण नक्की वाचा- ही अप्रतिम कविता (जनुकांचा जिना सोसे...) **मराठीतील ख्यातनाम कवी विंदा करंदीकर** यांच्या **"घासगत शब्द"** (१९८३) या संग्रहातील आहे. ती करंदीकरांच्या अत्यंत प्रतीकात्मक, गहन आणि दार्शनिक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कवितेचा अर्थ व अर्थछटा: 1. **"पार" या संकल्पनेवरील भर:** संपूर्ण कविता "पार" (पलीकडे, पार करणे, मर्यादा ओलांडणे) या केंद्रीय संकल्पनेभोवती फिरते. ही मर्यादा शारीरिक, मानसिक, भावनिक, संवेदनात्मक, आध्यात्मिक किंवा कलात्मक असू शकते. 2. **प्रसवाची वेदना आणि जन्म:** पहिल्या चरणातील "प्रसवाच्या कळा" हे केवळ स्त्रीच्या प्रसूतीवेदनेचे नव्हे तर कोणत्याही नवीन सृष्टीच्या, नव्या अस्तित्वाच्या जन्माला येण्याच्या संघर्षाचे प्रतीक आहे. "अनाहत निळा" हे अनंतत्वाचे, आध्यात्मिकतेचे प्रतीक असू शकते. 3. **प्रतिबिंबाचे मायाजाल:** दुसरा चरण स्वतःच्या प्रतिमेपलीकडे जाण्याचा प्रयत्न आणि त्यातून निर्माण होणारा विखुरलेपणा ("उडोनिया पारा") दर्शवतो. "काच आरपार" हे स्पष्टतेचे प्रतीक असूनही, तिच्यामधून पाहणे हे विकृत होऊ शकते (पारा उडणे). 4. **अंधारातील प्रकाशाची वाट पाहणे:** तिसरा चरण एका एकाकी आणि कदाचित भयावह प्रतीक्षेची भावना निर्माण करतो. पिंपळाच्या झाडाखाली (ज्याला पारंपरिकदृष्ट्या आध्यात्मिक महत्त्व आहे) दिवा लावण्याची वाट पाहणे, पण तो कोण येऊन लावेल याची चिंता ("घोर लागे जीवा") व्यक्त होते. हे दैवी प्रकाश, ज्ञान किंवा प्रेरणेच्या शोधाचे प्रतीक असू शकते. 5. **मिथक, नक्षत्रे आणि सृष्टीचा कोलाहल:** चौथ्या चरणात कवी मिथकांच्या जगातून (जे मानवी कल्पनेची मर्यादा दर्शवते) नक्षत्रांच्या पलीकडे (भौतिक विश्वाची मर्यादा) जाण्याचा प्रयत्न करतो. "सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस" हे सृष्टीच्या अफाट गोंधळात, त्याच्या अराजकात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या मानवी प्रयत्नाचे द्योतक आहे. 6. **कवितेची परम शक्ती आणि माया:** शेवटचा चरण कवितेच्या शक्तीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. कवी सांगतो की कविता शब्दांच्या मर्यादा ("शब्दांच्याही पार ओळ") ओलांडून जाते. पण शेवटच्या दोन ओळी गहन व विरोधाभासी आहेत: "लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली". जरी हे सर्व विश्व (राजा) एक खेळ, एक भास (भातुकली) असले तरीही ते "लुटुपुटू" (विध्वंसक, विखुरलेले, किंवा दुःखद) असू शकते. हे अस्तित्वाच्या मूलभूत विरोधाभासाकडे (सृष्टीचे सौंदर्य आणि त्यातील दुःख/नाश) नेणारे दार्शनिक विधान आहे. **कवितेचे सारांश:** ही कविता मानवी अस्तित्वाच्या विविध मर्यादा (शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कलात्मक) ओलांडून जाण्याच्या सततच्या प्रयत्नाची आणि संघर्षाची कथा सांगते. ती जन्माच्या वेदनेपासून ते मृत्यूच्या विचारापर्यंत, भास (माया) आणि वास्तव यातील तणावपूर्ण संबंधांचे भेदक चित्रण करते. विंदा करंदीकरांची ही कविता त्यांच्या गहन विचारशक्ती, अत्यंत नवीन प्रतिमाविधान आणि दार्शनिक खोलीचे उत्तम उदाहरण म्हणून मराठी साहित्यात अजरामर आहे.
जनुकांचा जिना सोसे प्रसवाच्या कळा श्रवणाच्या पार उभा अनाहत निळा प्रतिबिंब जाऊ पाहे बिंबाच्याही पार उडोनिया पारा उरे काच आरपार पिंपळाच्या पारापाशी खोरणात दिवा लावण्यास कोण येते घोर लागे जीवा नक्षत्रांच्या पार जाई मिथकांचा पैस सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार ओळ कवितेची गेली लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली

सुरीला दारूडा,..

Bhakti ·

Bhakti 02/07/2025 - 11:09
दोघांच्या प्रतिसादात उल्लेखल्यामुळे तळीराम आठवला... एकच प्याला मराठी नाटकामुळे अजरामर झालेला तळीराम!
तळीराम - बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वतःलाच मदिराक्ष बनता येतं! तळीराम : मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

गवि 02/07/2025 - 11:46
तळीराम हा विनोदाचा विषय आहे. लेख सुंदर आहे. लेखात जो उल्लेख केला आहे की खुद्द मद्यपि व्यक्तीला ते कळत नसेल का? तर याचे उत्तर हेच की मद्यपाश हा एक गंभीर आजार आहे. तळीराम वगैरे विनोद ठीकच पण त्यात अनेकदा हा विचार नसतो. आणि तो आजार दुर्धर आहे. रुग्णाला मदत करणे किंवा वाचवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची बिकट अवस्था होऊ शकते. म्हणून कोणी ते करायला जात नाही.

In reply to by गवि

Bhakti 02/07/2025 - 12:15
होय, मैत्रीणाचे मावसभाऊ अशाच व्यसनापायी अकाली वारले.ती सांगायची कोणी कोणीच काही करू शकत नव्हते.केवळ वाताहत पाहणे हेच उरले.वंशच संपला.

Bhakti 02/07/2025 - 11:09
दोघांच्या प्रतिसादात उल्लेखल्यामुळे तळीराम आठवला... एकच प्याला मराठी नाटकामुळे अजरामर झालेला तळीराम!
तळीराम - बाबतीत श्रेष्ठ आहे. पाहा, प्रेमात राजासुध्दा अगदी गुलाम होतो, पण मदिरेत गुलामसुध्दा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेम भीक मागायला शिकवतं, तर मदिरेच्या उदारतेला मर्यादा नसते. प्रेमाखातर प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, तर मदिरेच्या जोरावर सगळ्या जगाला लाथ मारता येते. प्रेमामुळं काही सुचेनासं होतं, तर मदिरेमुळं कल्पनाशक्ती अनिवार वाढते. फार कशाला? प्रेमानं फार झालं तर एखादी मदिराक्षी मिळविता येईल, पण दारू पिऊन डोळे लाल झाले म्हणजे स्वतःलाच मदिराक्ष बनता येतं! तळीराम : मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे. ऐका कसं ते. मद्यपी कधी खोटं बोलत नाही. कारण खोटं रचून त्याला कधी सांगताच येत नाही! मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करीत नाही. कारण, मागं कोण काय बोलला याची त्याला आठवण नसते! तो कधी कुणाचा विश्वासघात करीत नाही, कारण, त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवीत नाही!

गवि 02/07/2025 - 11:46
तळीराम हा विनोदाचा विषय आहे. लेख सुंदर आहे. लेखात जो उल्लेख केला आहे की खुद्द मद्यपि व्यक्तीला ते कळत नसेल का? तर याचे उत्तर हेच की मद्यपाश हा एक गंभीर आजार आहे. तळीराम वगैरे विनोद ठीकच पण त्यात अनेकदा हा विचार नसतो. आणि तो आजार दुर्धर आहे. रुग्णाला मदत करणे किंवा वाचवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची बिकट अवस्था होऊ शकते. म्हणून कोणी ते करायला जात नाही.

In reply to by गवि

Bhakti 02/07/2025 - 12:15
होय, मैत्रीणाचे मावसभाऊ अशाच व्यसनापायी अकाली वारले.ती सांगायची कोणी कोणीच काही करू शकत नव्हते.केवळ वाताहत पाहणे हेच उरले.वंशच संपला.
संध्याकाळचे सात-साडेसातला कुकरची शिट्टी होऊ लागली, की तिच्या सूऊऊऊ आवाजाच्यानंतर ,कधी आधी "चंदनाची चोळी अंग अंग जाळी... बाई ठिपक्यांची.. ठिपक्यांची.." असा तालामुरातला खडा आवाजान गाणारा बेवडा ऐकू यायचा. घरासमोरच्या मुख्य हमरस्ता कायम वाह‌ता असतो.फाटक्या शर्टमधला तो मळका दारूडा झिंगत रस्त्याहून धीमेपणाने घरी जायचा . बर नुसता झिंगायचा नाही तर वरच्या पट्टीत गात चालायचा. "चंदनाची चोळी अंगजाळी, बाई ठिपक्यांची हे त्याचे विशेष गाणं होत. "बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची ..." हे तो इतकं अप्रतिम गायचा. वरच्या आवाजात बाई ठिपक्यांची गात हळू हळू आवाज करत, बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची..

राडा

तुमचा अभिषेक ·

In reply to by गवि

धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

In reply to by Bhakti

गवि 30/06/2025 - 12:55
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

In reply to by Bhakti

राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

सौंदाळा 01/07/2025 - 10:24
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू

In reply to by श्वेता व्यास

आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)

In reply to by गवि

धन्यवाद गवि, बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

In reply to by Bhakti

गवि 30/06/2025 - 12:55
राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच. पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

In reply to by Bhakti

राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

सौंदाळा 01/07/2025 - 10:24
वेलकम ब्याक अप्रतिम लेख आणि वर्णन राडा घाला आता इथे फुल्ल्टू

In reply to by श्वेता व्यास

आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)
राडा ______ स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते. आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती.