एवढे तास काम करुन माणसची कार्यक्षमता तर संपतेच, परंतु व्याधीही मागे लागतात.
बाxxxx तो साहेब (आणि ती डेडलाईन), त्याला फाट्यावर मारुन घरी जाणे हाच उपाय.
वयाच्या तिशीत मी असले उपद्व्याप करित असे. पण असे लक्षात येऊ लागले की:
१)डेड लाईन जन्मात कधी संपत नाही.
२)कं. पगार देते म्हणजे नोकरांनी राबलेच पाहेजे, ही व्यवस्थापनाची ठाम समजुत असते.
(टाटाचा इंडिका प्लांट उभा रहात असताना, दिवाळिच्या सुमारास ती कुप्रसिद्ध डेडलाईन आली.
तिथल्या एका उच्चपदस्थाने (बॉसने), सगळ्यांची दिवाळीची सुट्टी रद्द करुन, त्यांना धक्याला लावले आणि स्वतः मात्र दिवाळी साजरी करायला, पोराबाळांसहित, गोव्याला निघुन गेला. ह्यात आमच्या काही सहकार्यांचीही दिवाळी बुडाली.)
३)जितके ज्यास्त तास काम तितक्या जास्त चुका. ४-५ तास काम करुन मिळवलेले यश, नंतरच्या ६ तासात आपण गमावतो.
आणी दुसर्या दिवशी सकाळी आदल्यादिवशीच्या चुका सुधारत बसतो.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
डॉन भाऊ, माझी सहानुभुती रे!
ज्याच॑ जळत॑ त्यालाच कळत॑ म्हणतात ते खोट॑ नाही.
तुम्ही जात्यात दिसताय...आम्हीही सुपात आहोत..पुढच्या महिन्यात आहे आमचा जोरदार शिमगा!!!
मग काय, प्रोजेक्ट मॅनेजरच्या बैलाला...
असो, बाकी ते मेल मात्र यच्चयावत I.T. हमाला॑च॑ आवडत॑ आहे बहुधा :)
आपला
- ध मा ल. (सुपातला)
प्रतिक्रिया
सांभाळ बाबारे...
पामर सरकारि नोकराचा तुम्हा सलाम
सहानुभुती..