मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ये मेरी दुनिया नहीं !

उदय सप्रे ·

विदेश 16/04/2008 - 20:10
प्रत्येक जण "नोटा-डॉलर-यूरो" छापण्याच्या नादात इतका व्यस्त असायचा की त्यासाठी पोटाला पण पूर्ण खायचा नाही! -म्हणजे काय? ---काही न कळलेला शहाणा.

In reply to by विदेश

उदय सप्रे 17/04/2008 - 08:41
माननीय "शहाणे", म्हणजे असे की, प्रत्येकाला तिकडे आपापला वैयक्तीक खर्च भागविण्यासाठी कंपनी "यूरो" द्यायची आणि महिन्याला अलाऊन्स म्हणून "डॉलर्स" द्यायची , वैयक्तीक "यूरो" मधून खाणे पिणे वगैरे भागविण्याऐवजी कसेतरी अर्धपोटी राहून लोक ते "यूरो" वाचवायचे जेणेकरून भारतात परत आल्यावर त्याचे जास्त "रुपये" होतील !

विदेश 17/04/2008 - 11:18
यूरो छापण्याच्या नादात -पेक्षा- यूरो वाचवण्याच्या नादात -असे मी वाचावयास पाहिजे होते. क्षमस्व!

विदेश 16/04/2008 - 20:10
प्रत्येक जण "नोटा-डॉलर-यूरो" छापण्याच्या नादात इतका व्यस्त असायचा की त्यासाठी पोटाला पण पूर्ण खायचा नाही! -म्हणजे काय? ---काही न कळलेला शहाणा.

In reply to by विदेश

उदय सप्रे 17/04/2008 - 08:41
माननीय "शहाणे", म्हणजे असे की, प्रत्येकाला तिकडे आपापला वैयक्तीक खर्च भागविण्यासाठी कंपनी "यूरो" द्यायची आणि महिन्याला अलाऊन्स म्हणून "डॉलर्स" द्यायची , वैयक्तीक "यूरो" मधून खाणे पिणे वगैरे भागविण्याऐवजी कसेतरी अर्धपोटी राहून लोक ते "यूरो" वाचवायचे जेणेकरून भारतात परत आल्यावर त्याचे जास्त "रुपये" होतील !

विदेश 17/04/2008 - 11:18
यूरो छापण्याच्या नादात -पेक्षा- यूरो वाचवण्याच्या नादात -असे मी वाचावयास पाहिजे होते. क्षमस्व!
लेखनविषय:
रसिक वाचक हो ,मी माझ्या कंपनी तर्फे गेल्या वर्षी इटाली-मिलान येथे गेलो होतो.सगळेच लोक जे इथे हसतमुख असायचे , ते तिकडे जाऊन अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हायचे ! प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर "मीच शहाणा!" चे भाव असायचे , प्रत्येकाला आपल्याला मिळत असलेल्या २३ यूरो "खर्ची" मधून जास्तीत जास्त यूरो कसे वाचवता येतात याचीच जास्त "चिंता".या जगात प्रत्येक शेरास सव्वा-शेर असतोच हे ह्यांच्या गावीच नाहे जणू !

आभास

सुवर्णमयी ·

धनंजय 16/04/2008 - 03:08
सर्व सुंदर अशआरांपैकी १, २, ३, ४, ६वे अधिक आवडले. पैकी सर्वाधिक : गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा

In reply to by धनंजय

चित्रा 16/04/2008 - 03:32
सुरेख. ५ वे कडवे नसते तर अर्थ वेगळा लागला असता का?

In reply to by चतुरंग

सुवर्णमयी 16/04/2008 - 16:32
वाघाचे कातडे पांघरून वागणारे गाढव या गोष्टीचा संदर्भ या शेरात आहे.पण अर्थ वेगळा - प्रत्येक व्यक्ती वर सोंग आणून वावरत असली तर आपली कुवत ओळखून असते असे म्हणायचे आहे... ते स्पष्ट झाले नाही .. जरा वेगळे लिहून बघेन

विसोबा खेचर 16/04/2008 - 08:39
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा क्या बात है सोनाली! अत्यंत दर्जेदार काव्य! जियो....! तात्या.

आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा वा क्या बात है, एकदम मस्त गझल !!! फक्त पाचव्या शेराचा आस्वाद नाही घेता आला बॉ :(
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 16/04/2008 - 10:29
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा
हे छानच...गज़ल वाचताना, पटकन लक्ष वेधून घेणार्‍या ओळी !
गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा
आहाहा !!! कसं माझ्या मनातलं उतरवलंय गज़लेत. मस्त. पण शेवटच्या कडव्याचा अर्थ नाही लागला. वैयक्तिक गोष्टींशी संबंधित नसेल तर जरा उकलून सांगणार का? ------- अवांतरः आ.का.का.क.ना.हे.वे.सां.न.ल. अशी झोकात सही ठोकणारा मी, हल्ली आवडीनं कविता बिविता वाचतोय, गज़लेतल्या कडव्यांचे अर्थ विचारतोय....मिपानं पार बिघडवलं बुवा आम्हाला!

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 16/04/2008 - 10:48
म्हणतो, बर्‍याच दिवसांनी काहितरी छानसे वाचायला मिळाले. शेवटचे कडव्याचा मात्र वरच्या सगळ्या कडव्यांच्या संदर्भात अर्थ लावता आला नाही. :( होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा) भारी !! -(गाढव) आनंदयात्री

उदय सप्रे 16/04/2008 - 16:33
सोनाली जी, अतिशय सुरेख ! या काही ओळी कश्या वाटतात बघा : पाहून आज तुजला, बसले चितेत ताठ असुनी तुझाच "खांदा", सुस्तावले कितीदा? होती सदाच जेंव्हा धुंदावली पहाट, "उदया"विनाच तेंव्हा , अस्तावले कितीदा? सुरेश भट साहेबांची आठवण झाली. माझ्या काही कलाकृती तुम्हाला खाली दिलेल्या २ ब्लॉग्ज वर पहायला मिळतील, वेळ झाल्यास बघून अभिप्राय कळवा. उदय "सप्रे" http://uday-saprem.blogspot.com/ आणि http://uday-sapre.blogspot.com/

शितल 16/04/2008 - 18:18
वाचता वाचता काव्य कधी वाचुन स॑पते कळ्त नाही, फक्त आमचे घोडे ही गाढवार आडकले.

धनंजय 16/04/2008 - 03:08
सर्व सुंदर अशआरांपैकी १, २, ३, ४, ६वे अधिक आवडले. पैकी सर्वाधिक : गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा

In reply to by धनंजय

चित्रा 16/04/2008 - 03:32
सुरेख. ५ वे कडवे नसते तर अर्थ वेगळा लागला असता का?

In reply to by चतुरंग

सुवर्णमयी 16/04/2008 - 16:32
वाघाचे कातडे पांघरून वागणारे गाढव या गोष्टीचा संदर्भ या शेरात आहे.पण अर्थ वेगळा - प्रत्येक व्यक्ती वर सोंग आणून वावरत असली तर आपली कुवत ओळखून असते असे म्हणायचे आहे... ते स्पष्ट झाले नाही .. जरा वेगळे लिहून बघेन

विसोबा खेचर 16/04/2008 - 08:39
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा क्या बात है सोनाली! अत्यंत दर्जेदार काव्य! जियो....! तात्या.

आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा वा क्या बात है, एकदम मस्त गझल !!! फक्त पाचव्या शेराचा आस्वाद नाही घेता आला बॉ :(
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 16/04/2008 - 10:29
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा
हे छानच...गज़ल वाचताना, पटकन लक्ष वेधून घेणार्‍या ओळी !
गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा
आहाहा !!! कसं माझ्या मनातलं उतरवलंय गज़लेत. मस्त. पण शेवटच्या कडव्याचा अर्थ नाही लागला. वैयक्तिक गोष्टींशी संबंधित नसेल तर जरा उकलून सांगणार का? ------- अवांतरः आ.का.का.क.ना.हे.वे.सां.न.ल. अशी झोकात सही ठोकणारा मी, हल्ली आवडीनं कविता बिविता वाचतोय, गज़लेतल्या कडव्यांचे अर्थ विचारतोय....मिपानं पार बिघडवलं बुवा आम्हाला!

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 16/04/2008 - 10:48
म्हणतो, बर्‍याच दिवसांनी काहितरी छानसे वाचायला मिळाले. शेवटचे कडव्याचा मात्र वरच्या सगळ्या कडव्यांच्या संदर्भात अर्थ लावता आला नाही. :( होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा) भारी !! -(गाढव) आनंदयात्री

उदय सप्रे 16/04/2008 - 16:33
सोनाली जी, अतिशय सुरेख ! या काही ओळी कश्या वाटतात बघा : पाहून आज तुजला, बसले चितेत ताठ असुनी तुझाच "खांदा", सुस्तावले कितीदा? होती सदाच जेंव्हा धुंदावली पहाट, "उदया"विनाच तेंव्हा , अस्तावले कितीदा? सुरेश भट साहेबांची आठवण झाली. माझ्या काही कलाकृती तुम्हाला खाली दिलेल्या २ ब्लॉग्ज वर पहायला मिळतील, वेळ झाल्यास बघून अभिप्राय कळवा. उदय "सप्रे" http://uday-saprem.blogspot.com/ आणि http://uday-sapre.blogspot.com/

शितल 16/04/2008 - 18:18
वाचता वाचता काव्य कधी वाचुन स॑पते कळ्त नाही, फक्त आमचे घोडे ही गाढवार आडकले.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आभास आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता मुद्दाम आठवांना त्या टाळले कितीदा होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा) नव्हते म्हणे कुणाच्या यादीत नाव माझे मुद्दाम त्यास त्यांनी डागाळले कितीदा सोनाली जोशी

"टिंग्या" एक ह्रद्यस्पर्श अनुभव.

प्रगती ·

अभिज्ञ 16/04/2008 - 14:15
फारच गुळमुळित समी़क्षा आहे.तुम्हाला बहुतेक भडकमकरांची शिकवणि घ्यावि लागेल...) ह्.घ्या. प्रगति ताई, फारच थोडक्यात तुम्ही चित्रपटाचि कथा उरकलित..... तरिपण आपल्या परि़क्षणानुसार हा चित्रपट पहायलाच हवा असे वाटले. टिंग्याच्या ओळखीबद्दल धन्यवाद. अबब.

सन्जोप राव 16/04/2008 - 14:16
'टिंग्या' पहाण्याची जबरदस्त इच्छा आहे. 'लाईफ इज बीईंग मिसस्पेंट इन परस्यूट ऑफ कॉमर्स...' सन्जोप राव

In reply to by मुक्तसुनीत

व्ही सी डी किंवा डीवीडी वर मिळतो का ? उत्सुकता म्हणून ठीक आहे, आणि बाहेरच्या देशात तर मराठी थिएटर्ला लागणे अशक्य आहे ., या सर्व गोष्टी मान्य आहेत......अहो पण फक्त चार दिवसांपूर्वी रिलीज झालाय हो हा सिनेमा... जेव्हा रिलीजच्या दिवशीच लोक हे प्रश्न विचारतात ,तेव्हा एका प्रोड्यूसर आणि डिरेक्टर ला फार यातना होतात म्हणे , .... ( सिनेमा थिएटरमध्ये पाहणारा) स भडकमकर

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 16/04/2008 - 23:19
तुमच्या भावना समजू शकतो. मी इतकेच सांगतो की जेव्हा जेव्हा एखादा चांगला चित्रपट लागतो - मग तो कुठल्याही भाषेतला असो - तो आवर्जून हॉलमधे जाऊनच पहातो. अलिकडची उदाहरणे : तारे जमीं पर , चक दे इंडिया. "श्वास" चा खे़ळ येथल्या मराठी मंडळींनी हॉलमधे लावला होता तिथे आम्हा सर्वांचा उत्तम प्रतिसाद होता. पण हे शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी न खरेदी करता, योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ?

In reply to by मुक्तसुनीत

परदेशात एक वेळ ठीक आहे हो तुमचं...पण अहो देशावर अगदी महाराष्ट्रात राहूनही लोक हाच प्रश्न विचारतात.... (परवा आय बी एन लोकमत वाहिनीवर वळूच्या गँगची मुलाखत होती...त्यात दिग्दर्शक उमेश कुलकर्णी एका प्रेक्षकाच्या याच प्रश्नाने वैतागला....).... "अहो थिएटरला बघा हो, "अशी विनन्ती केली त्याने.... "सिनेमा जोपर्यंत चालतोय, तोपर्यंत तरी डी व्हीडी वगैरे काढायचा अजिबात विचार नाही" असेही म्हणाला.... आता रिलीजच्या आठवड्यात तुम्ही हा डीव्हीडीचा प्रश्न विचारत आहात म्हणजे दोन शक्यता...एकतर तुम्ही पायरेटेड कॉपीबद्दल बोलत आहात किंवा दुसरं म्हणजे सिनेमा प्रचंड आपटला तर उत्पन्नचं अजून एक साधन म्हणून निर्माता योग्य ती डीव्हीडी काढतो, त्याबद्दल बोलत आहात...... दोन्ही शक्यता दिग्दर्शकाला दु:खदायकच... योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ? आहे की.... सिनेमा आत्ताच रिलीज होत आहे...मग योग्य ती कॉपी ( म्हणजे प्रोड्यूसरने काढलेली ) कशी असेल?? अर्थातच ती नाही.... त्यामुळे जर सिनेमा चालला तर योग्य ती कॉपी लवकर येणार नाही... त्यासाठी वाट पाहणे योग्य...

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 17/04/2008 - 00:30
तुमच्या स्पष्टीकरणामधे जो अध्याहृत आरोप आहे त्याचे निराकरण करणे योग्य होईल. आता रिलीजच्या आठवड्यात तुम्ही हा डीव्हीडीचा प्रश्न विचारत आहात म्हणजे दोन शक्यता...एकतर तुम्ही पायरेटेड कॉपीबद्दल बोलत आहात किंवा दुसरं म्हणजे सिनेमा प्रचंड आपटला तर उत्पन्नचं अजून एक साधन म्हणून निर्माता योग्य ती डीव्हीडी काढतो, त्याबद्दल बोलत आहात...... यापैकी दोन्ही गोष्टी माझ्या मनात नव्हत्या. सिनेमा कधी प्रदर्शित झाला , प्रदर्शित झाल्या झाल्या त्याची सीडी निघाली का ? सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल मला अजिबात कल्पना नाही. परंतु वरील विधाने करताना तुमचा लांच्छन लावण्याचा जो प्रकार केला आहे त्याचा मी निषेध नोंदवतो. स्पष्टीकरण ऐकूनही परत तुम्ही घालून पाडून बोललात. हा प्रकार अश्लाघ्य आहे.

In reply to by मुक्तसुनीत

प्रदर्शित झाल्या झाल्या त्याची सीडी निघाली का ? सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल मला अजिबात कल्पना नाही. या वाक्याने सगळेच क्लिअर झाले आम्हाला....सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल अजिबात कल्पना नसणे, ही एक तिसरी शक्यता... आम्ही गृहित धरले हो...ते चुकले.... ... आम्ही बोललो हेच चुकले..सॉरी स्पष्टीकरण ऐकूनही परत तुम्ही घालून पाडून बोललात. हा प्रकार अश्लाघ्य आहे. सोडून द्या, परत सॉरी म्हणतो..

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम 17/04/2008 - 07:34
पण हे शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी न खरेदी करता, योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ? आणि तेही शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी बघीतली तर चालते का? पण त्यातही मी एक तत्व पाळतो "पायरटेड कॉपी कधीही विकत घ्यायची नाही!"... इंटरनेटावर फुकट बघायची -बगाराम

In reply to by भडकमकर मास्तर

अभिज्ञ 16/04/2008 - 23:50
तेव्हा एका प्रोड्यूसर आणि डिरेक्टर ला फार यातना होतात म्हणे , .... मी तरी,असे मानत नाहि. एखाद्या कलेतून प्रोडयुसर/डायरे़क्टरला कितपत उत्पन्न असावे ह्याला काहि मर्यादा आहेत का? ही मंडळि ,ऩक्कि किति खर्चात सिनेमे बनवतात? ह्याचि खरी माहिती कधी बाहेर आलि आहे? एखादा सिनेमा ९० कोटि रुपयात बनतो?????? आइला कमाल आहे!!!! मी तरी अद्याप कुठल्याहि चित्रपट निर्मात्या कडुन ह्या किमतिचा ब्रेक अप दिलेला ऐकला नाहिये. आणि एवढे पैशे ह्यांच्या कडे येतातच कुठुन्?शाहरुख खान आय पी एल ची अक्खि टिमच विकत घेतो ती सुध्दा काहि करोड रुपयांना. बाकि मी पायरसि चे समर्थन करत नाहिये,पण यातना होतात वगैरे शी पुर्णतः सहमत नाहि. अबब.

In reply to by अभिज्ञ

साहेब, सन्दर्भ मराठी सिनेमांचा आहे.... ते पुढचं सगळं (९० कोटि,एवढे पैशे ह्यांच्या कडे येतातच कुठुन्?शाहरुख खान आय पी एल ची अक्खि टिमच )गैरलागू आहे... ९० कोटींमध्ये किमान २०० मराठी सिनेमे बनतील... ...मन्गेशाने जुन्नरजवळच्या खेड्यातून एक स्वप्न घेऊन येऊन एफ टी आय आय मध्ये दिग्दर्शनाची पदवी घेऊन मग एक फिल्म लिहिली, त्याला प्रोड्यूसर अर्थात मिळत नाही म्हणून खूप भटकन्ती झाली, काही वर्षे मध्ये गेली.......... लइ कष्टांनी एक प्रोड्यूसर मिळवले आहेत, रवि राय नावाचे...आणि मग बनवलेला आहे सिनेमा...सिनेमा चांगला बनलेला आहे, कुठे कुठे बक्षिसे घेऊन आला आहे, आणि आता रिलीज होत आहे... त्याच दिवशी डीव्हीडी मिळते का ही चर्चा होणे , नक्कीच वेदनादायक आहे.... आता बघा पटते का.... हे म्हणजे लग्नाच्या दिवशी हॉलवर येऊन घटस्फोटाच्या वकिलाने आपले कार्ड दिल्यासारखे आहे, ....

In reply to by भडकमकर मास्तर

अभिज्ञ 17/04/2008 - 00:34
आपले "यातना होतात" हे विधान मी तरि जनरल संदर्भात धरले होते/आहे. हि चर्चा जर मराठी सिनेमांबद्दल असेल तर ह्या बाबत आपण दिलेले स्पष्टीकरण पटते. परंतु आपण मी आधि विचारलेल्या मुद्यांवर काहिच प्रतिसाद दिलेला नाहि. १.प्रोड्युसर चित्रपट बनवतो तो काहि व्यावसायिक फायदा पाहुनच.(अर्थातच आर्थिक.) २.दिग्दर्शक/अभिनेते स्वतःची किंमत (ती काहि विचारु नका) वसुल करतातच. ३.तो वितरित करणारे पण त्यांचा आर्थिक फायदाच पाहतात. ४.चित्रपट दाखवणारे सुध्दा ,आजकालचे मल्टिप्लेक्स, त्यांचा आर्थिक फायदाच पाहतात. आता ह्या चारहि प्रकारात मला तरि कोणि समाजसेवा करताना दिसत नाहि.(फारच क्वचित ..) मग राहतो कोण? तो ति़किट काढणारा सामान्य प्रे़क्षकच. सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते? हे म्हणजे लग्नाच्या दिवशी हॉलवर येऊन घटस्फोटाच्या वकिलाने आपले कार्ड दिल्यासारखे आहे, .... आता उद्या लग्नाला पण तिकिट लावलेत अन घटस्फोटाचा वकिल आला तरि त्याचे अप्रूप वाटणार नाहि. अबब

In reply to by अभिज्ञ

नाही नाही म्हटलात तरी तुमचा बेसिक मुद्दा पायरसीचे समर्थन असा दिसतो.... आता सिमिलर उदाहरण... १. शेतकरी भाजी पिकवतो.( फायदा घेउन विकतो..) २. होलसेलवाला फायदा घेउन आणखी एका रिटेलर ला विकतो. ३. मंडईत भाजीवाला अजून फायदा घेऊन विकतो... आता मध्येच कोणीतरी चोर त्यातली भाजी चोरून चोरताना खराब झालेली भाजी स्वस्तात विकतो...कोणीतरी घेतेच.... सडकी भाजी गोड मानून खाणारे आहेतच्....त्यात आर्थिक फायदाही होतोच....आता कसली भाजी कशी खायची तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे...पण भाजी चोरीची आहे आणि बेकायदेशीर आहे हे नक्की..... सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते? आता चित्रपट बघणे म्हणजे नक्की काय , ते आधी मनाशी पक्के पाहिजे... पायरेटेड सीडीवरती संवाद ऐकू न येता चित्रांचा आनंद न घेता फक्त गोष्ट कळणे म्हणजे चित्रपट पाहणे असे ज्यांना वाटते त्यांनी सीडीवरती पहावा... भरपूर आर्थिक फायदा होईल...

In reply to by आनंदयात्री

आंबोळी 17/04/2008 - 14:58
आता उद्या लग्नाला पण तिकिट लावलेत अन घटस्फोटाचा वकिल आला तरि त्याचे अप्रूप वाटणार नाहि. सहमत... उद्या नवरा-नवरी चे पालक(प्रोडुसर) भरपूर पैसे कमावण्यासाठी पोरांची लग्ने ठरवणार, नवरा , नवरी भरमसाठ बिदागी घेउन लग्नाला उभे राहिले...भटजी (मग तो प्रस्थापीत असो किंवा खेडेगावातून स्वप्न घेउन आलेला असो) स्वत:चा फायदा बघून लग्न लावणार. कार्यालयवाला स्वत:चा फायदा बघुन त्या लग्नाची तिकीटे विकणार. मग स्वत:चा फायदा बघायला घटस्फोटाचा वकिल जर तिथे पोचला तर त्याचे काय चुकले? त्याला पोट नाही? त्याला यातना नाहीत? आणि तिकीटे काढून गेलेल्या सामान्य प्रेक्षकाचे काय? त्याच्या पानात जर जिलबीचा फक्त एक तुकडा येणार आसेल किंवा पोटभर जेवायला मिळणार नसेल तर त्याने कुणाकडे दाद मागायची? त्याने कमी पैशात जास्त जिलब्या मिळवायचा प्रयत्न केला तर काय चुकले? शेवटी कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम् बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्ने इतरेजना: हेच खरे. अवांतर : मला ह्या विषयावर प्रतिसाद दिला गेला तरि आम्हि तो वैयक्तिक न घेता चर्चेचा भागच समजु/समजतो. (मिष्टान्ने चापणारा)आंबोळी

In reply to by आंबोळी

अहो आम्बोळी.... एका लग्नाची गोष्ट झकास... अप्रतिम प्रतिसाद... आवडला.... पण हा चर्चेचा भाग समजा....आम्ही केलेले कौतुक वैयक्तिक घेऊ नका... :):)

पतिंग्या नव्हे.... बैलाचे नाव "चितंग्या" असे आहे.... "तुझं आभाळ मला माझं आभाळ तुला" नव्हे... माझं आभाळ तुला घे..तुझं आभाळ मला...असे हवे.... टिंग्या सुरेख आहे...जरूर बघा.... -सो कॉल्ल्ड समीक्षक तो मी नव्हेच.. (भडकमकर तुमचा करस्पाँडन्स कोर्स आहे का हो???)

धमाल मुलगा 17/04/2008 - 10:52
मुक्तसुनितराव, बहुधा आपण भडकमकरांचं बोलणं व्यक्तिशः घेतलं असावं असा माझा कयास आहे. परंतु जर आपण एका बराच काळ अभिनयक्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तिच्या जागी स्वतःला ठेऊन हा विचार केला तर नक्की भडकमकरांची तळमळ आपल्याला जाणवेल. हा जो काही सर्वसाधारण राग आहे डिव्हीडी आणि पायरसीबाबत, त्यापायी कदाचित त्यांच्याकडून आपल्याला दुखावणारी काही वाक्यं आलेली असु शकतात. जसं भ्रष्टाचार, आणि सवंग राजकारणाबाबत बोलताना आपोआप आपल्या तोंडून नेहमीपेक्षा जास्त कडक विचार निघतात तसंच आहे हे. जोपर्यंत मोठ्या हौसेने आणि अपेक्षेने उभे केलेले नाटक्/चित्रपट केवळ वर उल्लेखात आलेल्या कारणांपायी चालत नाही ना, तोपर्यंत ही अशी तळमळ, चिडचिड मनाच्या गाभ्यापासून नाही हो येत. अबबशेठ, आपण हिंदी चित्रपटांचा मुद्दा सरळ बाजुलाच ठेऊया. मराठी सिनेमे हे बर्‍याचदा सरकारच्या मदतीवर आणि प्रोड्युसर्सच्या हाता-पाया पडून उभे राहतात. इथं दुबईचा पैसा येत नाही. प्रसंगी निर्माता-दिग्दर्शक पदरमोड करुन पैसा उभारतात. श्वास सारखा अप्रतिम चित्रपट जेंव्हा ऑस्करला जाणार असतो तेंव्हा दिग्दर्शकापासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांना हातात पत्र्याची डबडी घेऊन रस्त्यातून 'ऑस्कर-निधी' साठी भिका मागत फिरावं लागतं. ही अवस्था 'सुवर्णकमळ' विजेत्या चित्रपटाची...तर इतरांची काय कथा हो? आता सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते? ह्यामध्ये आर्थिक फायदा ही 'रिलेटिव्ह कॉन्सेप्ट' वाटते. निर्माता-दिग्दर्शक त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सिनेमा काढतो, अभिनेते त्यांचा फायदा बघून काम करतात, चित्रपटगृहं त्यांचा फायदा बघतात, ब्लॅकवाले त्यांचा फायदा बघतात (मराठीसाठी ब्लॅक?), पण म्हणून आपला आर्थिक फायदा बघताना आपण ओरिजनल नव्हे तर नक्कल खरेदी करतो आहोत असं नाहीय्ये का? म्हणजे पुडा ही पिवळा, त्यावरच्या मुलाचं चित्रही तसंच, आणि नावात मात्र 'पारले-जी' चं 'पाले-जी' करायचं आणि रद्दी बिस्किटं आठ आणे-रुपया कमी किंमतीनं विकायचं असं नाही का होतय? बिस्किटं दोन्ही पुड्यात आहेत. पुडेही दिसायला जवळपास सारखे आहेत. पण पारलेच्या बिस्किटाची चव, दर्जा 'पाले'च्या बिस्किटाला आहे का? बरं हे कोण कुठले 'पाले', त्यानी मानकांचं पालन केलं आहे का? त्यांना ब्रँड मार्केटींगचा खर्च आला का? 'पारले'ला हे सगळं आहे, म्हणून त्यांची किंमत थोडी जास्त ! आता मला सांगा, ४ पैसे कमी देऊन टुकार प्रिंट आणायची आणि चित्रपटात काय वाक्यं आहेत, काय बोलताहेत हे कान ताणून ऐकण्याचा प्रयत्न करायचा, चित्रही तेव्हढं योग्य दर्जाचं नसतं. चित्रपट बघितल्याच्या समाधानाची पार काशी होऊन नाही जात काहो? असो, राग नसावा. माझं बोलणं खटकलं असल्यास मोठ्या दिलानं माफ करुन टाका! अहो, बोलुनचालुन टवाळ आम्ही! आमचं म्हणणं काय मनावर घेता? -(श्वासच्या ऑस्कर-निधीसाठी भिका मागत हिंडलेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 17/04/2008 - 11:21
वा धम्या, सुंदर अन संयत प्रतिसाद. पायरसीबद्दलची कळ्कळ पोचली. आता ओरिजनलच खरेदी करणार अन एटलिष्ट मराठी तरी थेटरातच बघणार. भडकमकरांनी अशा तर्‍हेने वाकडे न बोलता प्रतिसाद द्यायला हरकत नव्हती असे वाटले, असो, भडकमकर साहेब नो ऑफेन्स मिन्ट बरका !

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 17/04/2008 - 11:40
आता ओरिजनलच खरेदी करणार अन एटलिष्ट मराठी तरी थेटरातच बघणार. आनंदयात्रीशेठ, शतशः आभार ! असेच आपण सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल. -(आभारी) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 17/04/2008 - 12:48
मी नेहेमी थेटरातच बघणे पसंत करते. आणि खूपच प्रेक्षणीय आणि मनोरंजक वाटला तरच बाजारात चकती आल्यावर चकती घेते. अवांतर :
तर नक्कीच मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल.
म्हणजे पायरटेड न घेता ओरीजनल व्हीसीडी घेतल्यास मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल? हम्म्म्म.. हे विधान जरा विचारमंथनीय आहे. अहो कोणाला वाटणार नाही मराठी रंगपट दणदणून निघावा. पण काय आजचे ते चित्रपट, काय ती गाणी, काय ते विनोद (हसू ही रडू!), काय ते नाच (शाळेतल्या गॅदरींगमध्ये तरी चांगले). (१-२% अपवाद वगळता.जसे उत्तरायण, श्वास, वळू, टिंग्या, डोंबिवली फास्ट, तू तिथं मी इ.) बनवाबनवी, गंमत जंमत, नवरी मिळे नवर्‍याला, एकापेक्षा एक, भूताचा भाऊ इ. मनोरंजक चित्रपट देणारा सचिन नवरा माझा नवसाचा देतो, धुमधडाका, थरथराट, दे दणा दण, झपाटलेला महेश कोठारे 'क्यू की मै झूठ नही बोलता' चे मराठीकरण - नाव पण आठवत नाही. पूर्वीच्या लावण्या बघायला अजूनही मस्त वाटते आणि आत्ताच्या - न बोललेलेच बरे. हिंदी रंगपटातील कलाकारांना ५-१० मिनिटे झळकवण्याचा अट्टहास, हिंदी गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अट्टहास, वेस्टर्न नाचण्याचा अट्टहास.. का? किती मराठी चित्रपट संगीताच्या ध्वनीफिती निघतात आज? चांगली गाणी कोणाला आवडत नाहीत. फिटे अंधाराचे जाळे का हाऊसफुल्ल जातो? नव्या पिढीच्या राहुल देशपांडेचे बगळ्यांची माळफुले, दाटून कंठ येतो का वन्स मोअर घेते? सांगा बरं काल परवा निघालेल्या चित्रपटांची नावे, लक्षात राहिलेले कलाकार, लक्षात राहिलेली गाणी, लक्षात राहिलेले विनोद? मराठी रंगपटाचा प्रेक्षकवर्ग म्हणाल तर त्याला जे हिंदीत बघायला मिळतेय आणि तो बघतोय, म्हणजेच मराठी, घरच्या चित्रपटांकडून नक्कीच त्याच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. श्यामची आई, गोरा कुंभार, शिवाजी महाराज, पिंजरा, दादा कोंडके, राजा गोसावी, दामुअण्णा, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रंजना, सुलोचना, जयश्री, साधी माणसं, आत्मविश्वास, दोघी, सरकारनामा रुचणारी माणसं पळालेली कोंबडी धरायला का म्हणून जातील. दर्जा दाखवा पावती मिळेल. * वरील मत हे वैयक्तिक आहे.

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 17/04/2008 - 12:57
म्हणजे पायरटेड न घेता ओरीजनल व्हीसीडी घेतल्यास मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल? असहमत .. धम्याला म्हणायचे आहे की थेटरात पाहिल्याने मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल. बाकी सर्व मुद्द्यांशी अगदी तंतोतंत सहमत. बहुतांशी पिक्चर भुक्कड असतात, काय तो "नाना मामा","नाथा पुरे आता" .. भरत जाधव ने तर आधी चांगले कमावलेले नाव गमावलेय आता .. वात आणतो तो आता अगदी त्या होममिनिष्टर पेक्षाही ..

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 17/04/2008 - 13:04
भरत जाधव?.. मला नाव आठवलेही नाही!
थेटरात पाहिल्याने मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल.
टुकार पिक्चर बघायला कोण जाईल थेटरात? वेळ खर्च, पैसा खर्च, स्टोरी समजून घेता घेता डोक्याची मंडई. आजचा सामान्य मराठी माणूस त्यापेक्षा मिसळपाव / वडापाव / भेळ खाईल, ताम्हिणीच्या घाटात फिरायला जाईल.

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 17/04/2008 - 13:14
>>टुकार पिक्चर बघायला कोण जाईल थेटरात? खरे आहे, जत्रा मधले ह्यालागाड त्यालागाड पाहुन त्या भरत जाधवला गाडावे वाटत होते, अर्ध्यातुन उठुन आलो, पैसे गेले मनस्ताप झाला अन "सांगितले होते मराठी पिक्चर नको ! कोणत्या भुक्कड पिक्चरला घेउन आलास !" असे बोलने खाल्ले ते वेगळेच. पण श्वास, डोंबिवली फास्ट, डोह, सरीवर सरी अशीच काही चांगली चित्र पण येतात ती पहायला मात्र थेटरातच जायला पाहिजे, धम्या म्हणतो तसा खरच या लोकांकडे दुबइचा पैसा नाही. खारीचा वाटा तर उचलला जाइल.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 17/04/2008 - 14:06
श्वास, डोंबिवली फास्ट, डोह, सरीवर सरी अशीच काही चांगली चित्र पण येतात ती पहायला मात्र थेटरातच जायला पाहिजे,
मान्य.
खरच या लोकांकडे दुबइचा पैसा नाही.
म्हणजे उत्तम कलाकृती बघायला ५०-१०० करोड लागतातच? पूर्वीच्या लोकांकडे होता का हो दुबईचा पैसा? श्यामची आई पठडीतला पिक्चर दाखवायला लागतात का करोडोंचे सेट्स, फॉरेन लोकेशन्स आणि स्पेशल इफेक्ट्स? आम्हाला मराठी माणसाला बांधून ठेवणारे कथा, कलाकार आणि संवाद (डायलॉग्ज्) हवे आहेत.

In reply to by धमाल मुलगा

अभिज्ञ 18/04/2008 - 03:40
मला वाटते कि हि चर्चा फ़ारच भरकटलि आहे. मुळात माझा आक्षेप हा "निर्माता दिग्दर्शक ह्यांना फ़ार यातना होतात हो" ह्या वाक्यावर आहे/होता. श्री भडकमकर आणि धमाल मुलगा ह्यांनि सांगितलेले बरेचसे विचार पटले. परंतु काहि मुद्यांवर मी तरी सहमत नाहि. नाहि नाहि म्हंटले तरी तुम्हि पायरसिचे समर्थन करताय....... भडकमकरांनि आम्हाला या पायरसिच्या वादात शेवटि ओढलेच.) नुसतेच मराठी चित्रपट चालत नाहित हि बोंब मारत सुटायचे,हे गेले कित्येक वर्षे मी पाहतोय, ऐकतोय.....वरील चर्चांमधुनहि हाच सुर ऐकायला मिळाला. आपल्याला असेच म्हणायचे आहे ना......कि "एकतर चित्रग्रुह नाहित,वर सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकवर्ग नाहि.त्यात परत हि पायरसिची भानगड...म्हणजे निर्माता/दिग्दर्शक झोपलाच की. मग निर्माता शेवटि कंटाळून चित्रपटाचे हक्क एखाद्या टी.व्हि.चॆनेलला विकून स्वत:चा खर्च काढून घेतो.............मग काय घरबसल्याच जाहिराती पहात पहात तो बघायचा.तोच एक शेवटचा नैतिक मार्ग." डी.व्हि.डी............... मुळात मराठी चित्रपटाचि डी.व्हि.डी निघते का हो?(चोथी शक्यता...) बर हि डि.व्हि.डि. प्रत्येक वेळेस पायरेटेडच असेल कशावरून? मग ती ख्ररेदि केली तर बिघड्ले कुठे? किंवा लोकांनि त्या चित्रपटाचा भर ओसरुन तो चित्रपट डि.व्हि.डि वर येइ पर्यंत वाट पहायचि? मराठि चित्रपटांना ह्या बाबी लागु होताना दिसतच नाहीत. मराठी चित्रपटाचि डी.व्हि.डी मी तर फ़ार क्वचित वेळा पाहिलि असेन. महाराष्ट्रात अशा किति चित्रग्रूहात मराठी चित्रपट लागतात हो? आणि लागले तर किती दिवस चालतात?एकुणच पहायच्या संधि कमीच..... मग माणुस जर ह्या माध्यमाकडे जर वळाला तर त्यात नवल ते काय?किंबहुना अशा वेळि तो प्रामुख्याने हिंदि चित्रपटाकडे वळतो.आणि खुद्द महाराष्ट्रात जर ही अवस्था तर बाहेर हा प्रश्नच येत नाहि. (ह्याच पुण्या मुंम्बैत भोजपुरी चित्रपट मात्र जोरात चालतात.) आता वळुयात पायरसिकडे.... मुळात पायरसि वाइट हेच विधान मी चुकीचे मानतो.किंवा पायरसि हि सुद्धा relative concept आहे. आश्चर्य वाटून घेउ नका.भडकमकर आणि ध.मु. ह्यांनि दिलेली उदाहरणॆ अजिबात पटत नाहित. आपण सांगितलेली सडकि भाजी आणि पारले-पाले उदाहरणे दिशाभुल करणारी आहेत. ती पायरसिच्या व्याख्येत जरी बसत असलि तरी ती इथे लागु होत नाहीत. आमच्या मतानुसार चित्रपटाचि डी.व्हि.डि. आणि सि.डि. हे दोन्हि प्रकार मुळ चित्रपटच दाखवतात. त्यात सडकि भाजी किंवा पाले जी असला प्रकार नसतो.(इथे बनावट आहे.) अबबशेठ, आपण हिंदी चित्रपटांचा मुद्दा सरळ बाजुलाच ठेऊया. मराठी सिनेमे हे बर्‍याचदा सरकारच्या मदतीवर आणि प्रोड्युसर्सच्या हाता-पाया पडून उभे राहतात. इथं दुबईचा पैसा येत नाही. प्रसंगी निर्माता-दिग्दर्शक पदरमोड करुन पैसा उभारतात. श्वास सारखा अप्रतिम चित्रपट जेंव्हा ऑस्करला जाणार असतो तेंव्हा दिग्दर्शकापासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांना हातात पत्र्याची डबडी घेऊन रस्त्यातून 'ऑस्कर-निधी' साठी भिका मागत फिरावं लागतं. ही अवस्था 'सुवर्णकमळ' विजेत्या चित्रपटाची...तर इतरांची काय कथा हो? मान्य........... आता फ़क्त मराठी सिनेमांनाच पायरसिचा धोका का हो? तामिळ,तेलुगु,कन्नड सर्वच भाषांच्या चित्रपटांच्या पायरेटेड डी.व्हि.डी. पोत्याने मिळतात, तरीहि तिथली थेअटर्स हाउसफ़ुल्लच दिसतात. मग चुकतेय कुठे? मला वाटते कि मराठी चित्रपटांची अधोगति होण्यास ही पायरसि जबाबदार नसुन बाकी बरेचसे प्रकार मुख्यत: जबाबदार आहेत. १.बॉलिवूड........मुख्य धोका तोच आहे.मराठी चित्रपटांच्या अधोगतिस हाच एक जबाबदार असा भाग आहे. मराठी चित्रपटस्रुष्टि घ्या किंवा मराठी भाषाच घ्या....अस्तित्वासाठी जेवढा संघर्ष ह्यांना करावा लागतो तेवढा संघर्ष कुठ्ल्याही भाषेला करावा लागत असेल असे माझ्या पाहण्यात तरी नाहि. मराठी सिनेमाला जगवायचे असेल तर हि बॉलिवूडची घाण प्रथम इथून बाहेर काढलि पाहिजे. २.मराठी चित्रपटांचि जास्त जाहिरात होताना दिसत नाहि. ३.आर्थिक अभाव,प्रदर्शनाकरिता उपलब्ध संधि नाहित.... ४.एकंदरीत मराठी समाजाचि उदासिनता..................... आणिक बरेच काहि देता येइल.... तर मुद्दा हा पायरसि संदर्भात होता........... या पायरसि संदर्भात मी इथे काहि उदाहरणे देउ इच्छितो. १.मायक्रोसॉफ़्ट विन्डोज चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे. आपल्या पैकि किति जणांनि आजपर्यंत हा प्रकार कधिहि पायरेटेड वापरलेला नाहि? ह्याचे उत्तर जवळपास ० असेच असेल. बाजारात ह्या सॉफ़्टवेअरचे पायरेटेड वर्जन बहुत करून मायक्रोसॉफ्ट्च आणते अशीच धारणा आहे. २.आमच्या व्यावसायिक अंगात autocad नावाचे एक सॉफ़्टवेअर आहे. माझ्या माहिति प्रमाणे हे बनवणारी कंपनीच ह्याचे पायरेटेड वर्जन बाजारात आणते. आता ह्या दोन्हिहि अतिशय प्रस्थापित अशा कंपन्या आहेत.तरीहि दोन्ही हा प्रकार करतात. कारण सोप्पे आहे.बाजारावर पकड. माणसाला आपल्या उत्पादनाचि सवयच लावून टाकतात.माणसाला त्या प्रणालीचा गुलाम करुन टाकतात. मग हळूहळू माणूस एक का होइना ओरिजिनल वर्जन घेतोच. समजा ,विण्डॊज हि वर्जन जर पहिल्यापासुनच फ़क्त पैशे देणा-यालाच मिळेल ह्या तत्वावर त्यांनी जगात राबवली असति तर आजपर्यंत एवढि हीट झाली असति का? आधि मला विंडोज हे काय आहे हे जो पर्यंत कळ्त नाहि तो पर्यंत मी तरी ती कशी काय विकत घेउ? ३.आपण टि.व्हि.,वर्तमानपत्र ह्यात ब-याच वेळा ऐकले/वाचले असेल,कि अफ़गाणिस्तान,पाकिस्तान येथे हिंदि चित्रपट फ़ारच हिट आहेत.तेथे ते officially प्रदर्शित होत नाहित तरिहि ते तेथे पायरेटेड सी.डी. वगैरे प्रकाराने उपलब्ध असतात. त्या बद्दल एकाहि बॉलिवूडकराला मी गळे काढताना पाहिलेले नाहि.उलट ह्याचे आपल्या सर्वांना कौतुकच असते, नाहि का? मग मला तरी हाच प्रश्न पडतो कि च्याइला आपणच का एवढे कर्मदरिद्रि? का नाहि आपले चित्रपट चालत,ते हि आपल्याच राज्यात!!!!!!!!!! मुळात आपली कला/अविष्कार लोकांपर्यंत पोहोचतोय का?लोकांना ते माहिति आहे का? लोकांपर्यंत आपले काम कसे पोहचोवता येइल? लोक येउन माझे काम पाहणार का मी स्वत:हा ते लोकांना दाखवायला पाहिजे? हे विचार कोणि करतेय?????? खरि गोम तर मला इथेच आढळते. लोकांनि येउन माझे काम पहावे.ते हि पैशे देउन (अर्थातच).मी कशाला लोकांना दाखवायला जाउ? आधि माझा झालेला खर्च काढा.............हि असलि व्रुत्ति............. अरे मित्रा, जर तुझ्या सिनेमाच्या पाय़रेटेड सि.डि. बाजारात आल्या तर त्यातूनहि तुलाच प्रसिद्धि मिळते. लोकांना नाहि.त्याप्रसिद्धिवर तुलाच पूढचे चित्रपट जास्त फ़ायदा करतिल. आज संदिप खरे,सलील कुलकर्णि हे का एवढे प्रसिध्द आहेत?त्यांचि गाणिहि नेटवर मिळतातच कि फ़ुकट. तरिहि लोक त्यांच्या शोजना गर्दि करतातच ना. का? तर तिथे दर्जा तर आहेच,पण तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झालेत. आणि हा प्रकार फ़क्त चित्रपटांच्या बाबतीत आहे असे नाहि. नाटक घ्या.पुणे मुंबई सोडले तर नाटकाचा प्रोडुयुसर मराठवाडा,विदर्भ अशा लांबच्या ठिकाणि जायला नाखुशच असतो. का तर तिथे नाटकाला कितपत प्रतिसाद मिळेल अशि शंका. पुण्यात तर कानडि,तेलुगु वगैरे बहुभाषिक वर्तमानपत्रे मिळतात.पण बेळगाव सोड्ल कि महाराष्ट्राबाहेर मराठी व्रुत्तपत्रे का मिळत नाहित? सगळी कडे आर्थिक गणितेच पहायचि.नाहि का? आत्ता खरि गरज आहे ती "मराठी चित्रपट बघा" हे सांगायचि.मग तो तुम्हि थेटरात बघा किंवा पायरेटेड सी.डि. वर बघा. कसाहि बघा ,अरे पण बघा.उगाच नसत्या झुलि पांघरुन बसु नका. बाकि, मुळात तुम्हाला "श्रीमंत झालेला मराठी" पहायचाय की "श्रीमंत झालेली मराठी" पहायचि आहे? पहा, दोन्हित खुप फ़रक आहे.पहिल्या प्रकार घडल्याने दुसरी गोष्ट घडेलच असे नाहि,पण दुसरा प्रकार घडला तर पहिले प्रकार लाखोंनि पहायला मिळतिल. (मराठी सिनेमाप्रेमी) अबब अवांतर-असो, राग नसावा. माझं बोलणं खटकलं असल्यास मोठ्या दिलानं माफ करुन टाका! अहो, बोलुनचालुन टवाळ आम्ही! आमचं म्हणणं काय मनावर घेता? हे कोणाकरिता होते?

भोचक 17/04/2008 - 14:07
माझं आभाळ तुला घे तुझं आभाळ मला आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला ही प्रकाश होळकरांची एक छान कविता आहे. त्याचेच टिंग्यामध्ये गाणे केले आहे. होळकर मुळचे लासलगाव (जि.नाशिक) येथील कवी आहेत. नव्या पिढीतील होळकर एक सशक्त कवी आहे. त्यांच्या कविता आशयघन आहेत. कोरडे नक्षत्र हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे.

बघितला पाहिजे टिंग्या..... अवांतर - चामारी आमच्या नावाचा शिणेमा???? अन् आमाला त्याचं आवतान बी नाय...... आयला कमीत कमी रॉयल्टी तरी द्या राव....... आपला, (वरिजनल) टिंग्या ;)

धमाल मुलगा 17/04/2008 - 18:10
सर्वप्रथम आनंदयात्री माझ्या म्हणण्याशी सहमत झालात, आणि माझ्या अनुपस्थितीत किल्ला लढवलात त्याबद्दल आभार! मनस्वी, अगदी बिनतोड आहेत तुझे मुद्दे.
काय आजचे ते चित्रपट, काय ती गाणी, काय ते विनोद (हसू ही रडू!), काय ते नाच (शाळेतल्या गॅदरींगमध्ये तरी चांगले). ...न बोललेलेच बरे. हिंदी रंगपटातील कलाकारांना ५-१० मिनिटे झळकवण्याचा अट्टहास, हिंदी गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अट्टहास, वेस्टर्न नाचण्याचा अट्टहास.. का? किती मराठी चित्रपट संगीताच्या ध्वनीफिती निघतात आज?
अगदी मान्य! पण ह्याच्या मुळाशी दुष्टचक्र आहे. 'प्रेक्षकांची अशी आवड/मागणी असते म्हणून आम्ही असं बनवतो'...आणि 'दुसरं काही नाही म्हणून हेच बघतो' सास-बहू इ.इ. प्रकार आधी बघायचे, नंतर चटक लागली की टाळता येत नाहीत! लोक बघताहेत म्हणून बदाबदा सगळ्या असल्याच मालिका काढायच्या...असाच प्रकार आहे मराठीतही. बरं, काही वेळा दर्जेदार देणार्‍यांनाही सवंग देणं भाग असतं... प्रत्येक प्रकारची लाट येत असते, इनोदी की इनोदीच....बांगड्या आणि तंगड्या की तेच ते...रोमँटीक आले की फटाफट तसलेच आणखी चित्रपट. इथं अस्तित्व टिकवणं हे देखील एक कारण असतं. शेवटी वाहत्या गंगेत हात धूणं कोणाला नकोय? फिटे अंधाराचे जाळे का हाऊसफुल्ल जातो? नव्या पिढीच्या राहुल देशपांडेचे बगळ्यांची माळफुले, दाटून कंठ येतो का वन्स मोअर घेते? अभिरुचीसंपन्न प्रेक्षक/रसिक नक्कीच चांगलं तेच उचलतात...पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच, ह्याची खात्री वाटली नाही की मग असं व्हायला होतं! आजही चांगले चित्रपट निघत आहेत. आता, नाण्याच्या बाजूप्रमाणे चांगल्याबरोबर वाईटही येणारच. फरक एव्हढाच आहे की वाईट जास्त आहे, चांगलं कमी. कारण सोपं आहे, चांगल्या कलाकृतीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, विषयाचा योग्य अभ्यास करावा लागतो. त्यात वेळा खर्ची पडतो, पैसाही लागतो...एव्हढ्या वेळात जर आलेली लाट परत गेली तर? म्हणून बरेच जण आपली पोळी ह्या तापल्या तव्यावर भाजून घेतात! परिणामः तद्दन भिकार चित्रपट. मला खात्री आहे, परिस्थिती नक्की सुधारेल. गजेंद्र, मंगेश, किंचित संतोष ही आणि अशी मंडळी नक्की मराठी रंगपटाला वर आणतील. हळू हळू प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलतील...सातत्याने असे दर्जेदार चित्रपट आल्यानंतर त्यांची सवय लागून फालतू प्रकार प्रेक्षकांकडून नाकारले जातील. पण..थोडा धीर धरायला हवा, पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय?
म्हणजे उत्तम कलाकृती बघायला ५०-१०० करोड लागतातच? पूर्वीच्या लोकांकडे होता का हो दुबईचा पैसा?
दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच : 'नाही' आणि कोण म्हणतं करोडोंनी पैसा ओतले की चित्रपट चांगले बनतात? लो-बजेट वाले नागेश कुकनुरचे चित्रपट आहेत साक्षीला.. आणि भव्य-दिव्य सेट्सवाले गर्भश्रीमंत चित्रपटही...जे सडकून आपटले आहेत. अर्थात हा नियम सार्वत्रीक नाही. दुबईचा संदर्भ मी अबबशेठच्या हिंदी-मराठी चित्रपट तुलनेशी बोलताना दिला होता.
आम्हाला मराठी माणसाला बांधून ठेवणारे कथा, कलाकार आणि संवाद (डायलॉग्ज्) हवे आहेत.
त्यासाठी गरज आहे ती उत्तम लेखकांची, दिग्दर्शकांची आणि सकस अभिनयक्षमतेच्या अभिनेत्यांची...हे सगळं येतं ते पैसा ओतूनच. मग त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज नको व्हायला? त्यांना योग्य तो मोबदला नको मिळायला? हाच माझा सूर आहे...चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा म्हणण्यामागे.

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 17/04/2008 - 18:45
'प्रेक्षकांची अशी आवड/मागणी असते म्हणून आम्ही असं बनवतो'
हे विधान चुकीचे वाटते (तुझे नाही, जो करतो त्याचे.) ही प्रेक्षकांची आवड अजिबात नसते, म्हणूनच गर्दी खेचत नाही.
लोक बघताहेत म्हणून बदाबदा सगळ्या असल्याच मालिका काढायच्या...असाच प्रकार आहे मराठीतही.
बरोबर आहे. पण सिनेमा, नाटक, मालिका हे समाजाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे असे मी समजते. आजच्या मालिका बघणार्‍या बहुसंख्य महिला वर्गाची सायकोलॉजी बदलण्याची शक्ती त्यांच्यात असते आणि त्यांनी ती सत्कारणी लावावी असे मला वाटते. आज विचारले तुला टिपरे आवडेल की या सुखांनो - तर पटकन टिपरे हेच उत्तर येईल. रडुबाई, हतबल, काळी जादू, जळुबाई, खलनायकी विचार न येता आधीच टेन्शनमध्ये असलेल्या बायकांच्या मनात हलकेफुलके, प्रगल्भ, विनोदी, खंबीर असे विचार यावेत असे मला वाटते.
पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच,
हवाय कशाला तोच रसिक. आपापला प्रेक्षकवर्ग तयार करा पण तो तरी कायम ठेवा. जसे दादा कोंडके.
एव्हढ्या वेळात जर आलेली लाट परत गेली तर? म्हणून बरेच जण आपली पोळी ह्या तापल्या तव्यावर भाजून घेतात! परिणामः तद्दन भिकार चित्रपट.
बरोब्बर. म्हणून पोळी भाजून घेणार्‍याने भाजावी पोळी. पण ती पोळी त्यांची त्यांनाच खावी लागणार आहे हे विसरू नये. असे म्हणू नये मराठी प्रेक्षकाने पाठ फिरवली वगैरे.
मला खात्री आहे, परिस्थिती नक्की सुधारेल. थोडा धीर धरायला हवा.
मान्य आहे.
पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय?
बाळसं धरता धरता २० वर्ष सरली हो. बाळाचा बाळ्या झाला.
मग त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज नको व्हायला? त्यांना योग्य तो मोबदला नको मिळायला?
हो, मी सहमत आहे. म्हणूनच म्हटलं, चांगला मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाउनच बघावा. आणि त्याची सीडी / व्हीसीडी पण ओरीजनलच घ्यावी. टुकार चित्रपटांची पायरटेड तरी कोण घेणारेय?

मुक्तसुनीत 17/04/2008 - 19:47
भडकमकर आणि धमु यांना थोडे स्पष्टीकरण देणे योग्य होईल. मी नोंदवलेला निषेध हा भडकमकरांच्या एका विधानाचा निषेध होता. त्याबाबत मी व्यक्तिगत आकस किंवा अनादर दाखविलेला नाही. त्यांचे विधान मी व्यक्तिशः घेतले असे धमु म्हणतात. तसे ते सरळसरळ व्यक्तिगत निर्देश करणारे होतेच. भडकमकरांची तळमळ मी समजतो असे मी याधीच म्हण्टले आहे. या निमित्ताने त्यानी हा महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आणला, लावून धरला हे स्पृहणीय आहे. धमु आणि आनंदयात्री यांचे प्रतिसाद विशेष उल्लेखनीय, समंजस आहेत. त्यांचे अभिनंदन.

धमाल मुलगा 18/04/2008 - 11:41
मुळात तुम्हाला "श्रीमंत झालेला मराठी" पहायचाय की "श्रीमंत झालेली मराठी" पहायचि आहे? पहा, दोन्हित खुप फ़रक आहे.पहिल्या प्रकार घडल्याने दुसरी गोष्ट घडेलच असे नाहि,पण दुसरा प्रकार घडला तर पहिले प्रकार लाखोंनि पहायला मिळतिल.
क्या बात है! नक्कीच!
पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच, हवाय कशाला तोच रसिक. आपापला प्रेक्षकवर्ग तयार करा पण तो तरी कायम ठेवा. जसे दादा कोंडके.
तेच रसिक मी अश्या अर्थानं म्हणालो, की जे कलेसाठी गर्दी करतात..जीव टाकतात.
पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय? बाळसं धरता धरता २० वर्ष सरली हो. बाळाचा बाळ्या झाला.
सुरुवात झालेली आहे... निव्वळ इनोदी चित्रपटांचा रतीब घालून तेच ते दाखवणं कमी झालं असून सुधारित दर्जाची निर्मीती चढत्या भाजणीने निदर्शनास येऊ लागलेली आहे.
मग मला तरी हाच प्रश्न पडतो कि च्याइला आपणच का एवढे कर्मदरिद्रि? का नाहि आपले चित्रपट चालत,ते हि आपल्याच राज्यात!!!!!!!!!!
:-)) जेव्हा एक देशपांडा एका जोश्याशी सार्वजनीक ठिकाणी बोलताना देखील मायमराठीचा वापर करायला लाजतो तेव्हा हा प्रश्न विचारणंच चूकीचं ठरतं. सर्वसाधारण मनोवृत्ती म्हणजे, "थेटरात जाऊन तिकीट काढून पिक्चर बघायचं आणि तेही मराठी? काय येडा झालास का तू?"
अरे मित्रा, जर तुझ्या सिनेमाच्या पाय़रेटेड सि.डि. बाजारात आल्या तर त्यातूनहि तुलाच प्रसिद्धि मिळते. लोकांना नाहि.त्याप्रसिद्धिवर तुलाच पूढचे चित्रपट जास्त फ़ायदा करतिल.
काही प्रमाणात असहमत. प्रसिद्धी नक्कीच मिळते, कित्येकांची अशीही उदाहरणं आहेतच की, ज्यांचे चित्रपट सडकून आपटले, कुत्रंही गेलं नाही बघायला, पण त्यांना पुढे कामं मिळत गेली...यशस्वीही झाले.
सगळी कडे आर्थिक गणितेच पहायचि.नाहि का?
का नाही? मायबाप प्रेक्षक, कलेची सेवा इ.इ. सगळ्या गोष्टी मनाला समाधान देतात, पण त्या समाधानाच्या जोरावर मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश नाही घेता येत, त्यासाठी मोजावा लागतो तो पैसाच. दोन वेळचं जेवण-खाण, औषध-पाणी हे समाधानाने नाही विकत घेता येत. पुर्वीचे मराठी अभिनेते आर्थिक गणितं पहायचे नाहीत, काही अपवाद वगळता काय झालं त्यांच्या आयुष्याच्या शेवटी?
नाटक घ्या.पुणे मुंबई सोडले तर नाटकाचा प्रोडुयुसर मराठवाडा,विदर्भ अशा लांबच्या ठिकाणि जायला नाखुशच असतो. का तर तिथे नाटकाला कितपत प्रतिसाद मिळेल अशि शंका.
शेठ, एके काळी आम्हीही व्यावसायीक नाटकं केली आहेत. एका दौर्‍याचा खर्च किती येतो, काय त्रास पडतो हे चांगलं ठाऊक आहे. स्थळाप्रमाणे आवड बदलते. पुणे-मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी फार्सिकल शिवाय फारसं काहीच चालत नाही. पुण्या-मुंबईत 'गोलपीठा' चाललं(!) म्हणून ते इतर ठिकाणी चालेलच ह्याची वेडी आशा बाळगणं योग्य नाही. तिथे 'मोरुची मावशी' आणि 'वासुची सासु' च न्यायला हवं. असो, बरंच पुराण चालवलं मी. आता थांबतो. मुक्तसुनीतराव, अभिनंदनाबद्दल आणि विशेष दखल घेतल्याबद्दल आभारी आहे. -ध मा ल.

पायरसी थांबविण्याच्या उद्देशाबाबत खुद्द निर्माते किती उदासीन आहेत हे खालील लिंक वर वाचता येईल. http://www.loksatta.com/daily/20080424/mp06.htm

In reply to by प्रभाकर पेठकर

आता निर्मात्यांनाच उत्साह नाही पायरसी थांबवायसाठी तर आम्हाला का असावा? ... मी अबब साहेबांशी सहमत आहे, पायरेटेड प्रिंट पाहायचे त्यांचे लॉजिक आम्हाला आवडले.

In reply to by डॉ. श्लोक _भातखंडे

मनस्वी 24/04/2008 - 15:17
डॉक्टर.. तुम्हीसुद्धा..?? :)

In reply to by मनस्वी

आम्हाला फक्त लॉजिक आवडले....पायरेटेड प्रिंट संवाद ऐकू येत नाहीत त्यामुळे अजिबात आवडत नाहीत... केबलवाला लावतो तेव्हा मी ती प्रिंट पाहत नाही....एक अक्षर कळत नाही...आपल्याच भाषेतला पिक्चर तमिळ किंवा मल्याळी सिनेमासारखा पहावा लागतो , ते मला आवडत नाही.....

प्रमोद देव 28/04/2008 - 23:46
टिंग्या हा चित्रपट बर्‍याच लोकांना आवडला तो त्यातल्या कथेमुळे आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे. विशेषतः टिंग्याच्या भूमिकेतील बालकलाकाराच्या अभिनयामुळे. मी स्वतः चित्रपट पाहात नसल्यामुळे माझे स्वतःचे असे ह्याबाबत काहीच मत नाही.आत्तापर्यंत इतरांकडून ऐकलेल्या मतांमध्ये जरा वेगळे वाटलेले आणि विचारप्रवृत्त करणारे हे मत वाचल्यावर ते आपल्यासमोर मांडावे असे वाटले. त्या चित्रपटाच्या कथेसंबंधात आणि एकूणच आपल्या प्रेक्षक मंडळींबद्दल एक गमतीदार तरीही वास्तववादी वाटणारा हा अभिप्राय वाचा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

प्रमोदकाका, अभिप्राय वाचला. अंतर्मुख करायला लावणारा आहे. आवडला. श्री. स _भडकमकर प्रमोदकाक? प्रमोदकाकांना तुम्ही अगदीच कावळा करून टाकलेत हो... असे करू नका. प्लीज...

अभिज्ञ 16/04/2008 - 14:15
फारच गुळमुळित समी़क्षा आहे.तुम्हाला बहुतेक भडकमकरांची शिकवणि घ्यावि लागेल...) ह्.घ्या. प्रगति ताई, फारच थोडक्यात तुम्ही चित्रपटाचि कथा उरकलित..... तरिपण आपल्या परि़क्षणानुसार हा चित्रपट पहायलाच हवा असे वाटले. टिंग्याच्या ओळखीबद्दल धन्यवाद. अबब.

सन्जोप राव 16/04/2008 - 14:16
'टिंग्या' पहाण्याची जबरदस्त इच्छा आहे. 'लाईफ इज बीईंग मिसस्पेंट इन परस्यूट ऑफ कॉमर्स...' सन्जोप राव

In reply to by मुक्तसुनीत

व्ही सी डी किंवा डीवीडी वर मिळतो का ? उत्सुकता म्हणून ठीक आहे, आणि बाहेरच्या देशात तर मराठी थिएटर्ला लागणे अशक्य आहे ., या सर्व गोष्टी मान्य आहेत......अहो पण फक्त चार दिवसांपूर्वी रिलीज झालाय हो हा सिनेमा... जेव्हा रिलीजच्या दिवशीच लोक हे प्रश्न विचारतात ,तेव्हा एका प्रोड्यूसर आणि डिरेक्टर ला फार यातना होतात म्हणे , .... ( सिनेमा थिएटरमध्ये पाहणारा) स भडकमकर

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 16/04/2008 - 23:19
तुमच्या भावना समजू शकतो. मी इतकेच सांगतो की जेव्हा जेव्हा एखादा चांगला चित्रपट लागतो - मग तो कुठल्याही भाषेतला असो - तो आवर्जून हॉलमधे जाऊनच पहातो. अलिकडची उदाहरणे : तारे जमीं पर , चक दे इंडिया. "श्वास" चा खे़ळ येथल्या मराठी मंडळींनी हॉलमधे लावला होता तिथे आम्हा सर्वांचा उत्तम प्रतिसाद होता. पण हे शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी न खरेदी करता, योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ?

In reply to by मुक्तसुनीत

परदेशात एक वेळ ठीक आहे हो तुमचं...पण अहो देशावर अगदी महाराष्ट्रात राहूनही लोक हाच प्रश्न विचारतात.... (परवा आय बी एन लोकमत वाहिनीवर वळूच्या गँगची मुलाखत होती...त्यात दिग्दर्शक उमेश कुलकर्णी एका प्रेक्षकाच्या याच प्रश्नाने वैतागला....).... "अहो थिएटरला बघा हो, "अशी विनन्ती केली त्याने.... "सिनेमा जोपर्यंत चालतोय, तोपर्यंत तरी डी व्हीडी वगैरे काढायचा अजिबात विचार नाही" असेही म्हणाला.... आता रिलीजच्या आठवड्यात तुम्ही हा डीव्हीडीचा प्रश्न विचारत आहात म्हणजे दोन शक्यता...एकतर तुम्ही पायरेटेड कॉपीबद्दल बोलत आहात किंवा दुसरं म्हणजे सिनेमा प्रचंड आपटला तर उत्पन्नचं अजून एक साधन म्हणून निर्माता योग्य ती डीव्हीडी काढतो, त्याबद्दल बोलत आहात...... दोन्ही शक्यता दिग्दर्शकाला दु:खदायकच... योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ? आहे की.... सिनेमा आत्ताच रिलीज होत आहे...मग योग्य ती कॉपी ( म्हणजे प्रोड्यूसरने काढलेली ) कशी असेल?? अर्थातच ती नाही.... त्यामुळे जर सिनेमा चालला तर योग्य ती कॉपी लवकर येणार नाही... त्यासाठी वाट पाहणे योग्य...

In reply to by भडकमकर मास्तर

मुक्तसुनीत 17/04/2008 - 00:30
तुमच्या स्पष्टीकरणामधे जो अध्याहृत आरोप आहे त्याचे निराकरण करणे योग्य होईल. आता रिलीजच्या आठवड्यात तुम्ही हा डीव्हीडीचा प्रश्न विचारत आहात म्हणजे दोन शक्यता...एकतर तुम्ही पायरेटेड कॉपीबद्दल बोलत आहात किंवा दुसरं म्हणजे सिनेमा प्रचंड आपटला तर उत्पन्नचं अजून एक साधन म्हणून निर्माता योग्य ती डीव्हीडी काढतो, त्याबद्दल बोलत आहात...... यापैकी दोन्ही गोष्टी माझ्या मनात नव्हत्या. सिनेमा कधी प्रदर्शित झाला , प्रदर्शित झाल्या झाल्या त्याची सीडी निघाली का ? सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल मला अजिबात कल्पना नाही. परंतु वरील विधाने करताना तुमचा लांच्छन लावण्याचा जो प्रकार केला आहे त्याचा मी निषेध नोंदवतो. स्पष्टीकरण ऐकूनही परत तुम्ही घालून पाडून बोललात. हा प्रकार अश्लाघ्य आहे.

In reply to by मुक्तसुनीत

प्रदर्शित झाल्या झाल्या त्याची सीडी निघाली का ? सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल मला अजिबात कल्पना नाही. या वाक्याने सगळेच क्लिअर झाले आम्हाला....सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल अजिबात कल्पना नसणे, ही एक तिसरी शक्यता... आम्ही गृहित धरले हो...ते चुकले.... ... आम्ही बोललो हेच चुकले..सॉरी स्पष्टीकरण ऐकूनही परत तुम्ही घालून पाडून बोललात. हा प्रकार अश्लाघ्य आहे. सोडून द्या, परत सॉरी म्हणतो..

In reply to by मुक्तसुनीत

बगाराम 17/04/2008 - 07:34
पण हे शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी न खरेदी करता, योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ? आणि तेही शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी बघीतली तर चालते का? पण त्यातही मी एक तत्व पाळतो "पायरटेड कॉपी कधीही विकत घ्यायची नाही!"... इंटरनेटावर फुकट बघायची -बगाराम

In reply to by भडकमकर मास्तर

अभिज्ञ 16/04/2008 - 23:50
तेव्हा एका प्रोड्यूसर आणि डिरेक्टर ला फार यातना होतात म्हणे , .... मी तरी,असे मानत नाहि. एखाद्या कलेतून प्रोडयुसर/डायरे़क्टरला कितपत उत्पन्न असावे ह्याला काहि मर्यादा आहेत का? ही मंडळि ,ऩक्कि किति खर्चात सिनेमे बनवतात? ह्याचि खरी माहिती कधी बाहेर आलि आहे? एखादा सिनेमा ९० कोटि रुपयात बनतो?????? आइला कमाल आहे!!!! मी तरी अद्याप कुठल्याहि चित्रपट निर्मात्या कडुन ह्या किमतिचा ब्रेक अप दिलेला ऐकला नाहिये. आणि एवढे पैशे ह्यांच्या कडे येतातच कुठुन्?शाहरुख खान आय पी एल ची अक्खि टिमच विकत घेतो ती सुध्दा काहि करोड रुपयांना. बाकि मी पायरसि चे समर्थन करत नाहिये,पण यातना होतात वगैरे शी पुर्णतः सहमत नाहि. अबब.

In reply to by अभिज्ञ

साहेब, सन्दर्भ मराठी सिनेमांचा आहे.... ते पुढचं सगळं (९० कोटि,एवढे पैशे ह्यांच्या कडे येतातच कुठुन्?शाहरुख खान आय पी एल ची अक्खि टिमच )गैरलागू आहे... ९० कोटींमध्ये किमान २०० मराठी सिनेमे बनतील... ...मन्गेशाने जुन्नरजवळच्या खेड्यातून एक स्वप्न घेऊन येऊन एफ टी आय आय मध्ये दिग्दर्शनाची पदवी घेऊन मग एक फिल्म लिहिली, त्याला प्रोड्यूसर अर्थात मिळत नाही म्हणून खूप भटकन्ती झाली, काही वर्षे मध्ये गेली.......... लइ कष्टांनी एक प्रोड्यूसर मिळवले आहेत, रवि राय नावाचे...आणि मग बनवलेला आहे सिनेमा...सिनेमा चांगला बनलेला आहे, कुठे कुठे बक्षिसे घेऊन आला आहे, आणि आता रिलीज होत आहे... त्याच दिवशी डीव्हीडी मिळते का ही चर्चा होणे , नक्कीच वेदनादायक आहे.... आता बघा पटते का.... हे म्हणजे लग्नाच्या दिवशी हॉलवर येऊन घटस्फोटाच्या वकिलाने आपले कार्ड दिल्यासारखे आहे, ....

In reply to by भडकमकर मास्तर

अभिज्ञ 17/04/2008 - 00:34
आपले "यातना होतात" हे विधान मी तरि जनरल संदर्भात धरले होते/आहे. हि चर्चा जर मराठी सिनेमांबद्दल असेल तर ह्या बाबत आपण दिलेले स्पष्टीकरण पटते. परंतु आपण मी आधि विचारलेल्या मुद्यांवर काहिच प्रतिसाद दिलेला नाहि. १.प्रोड्युसर चित्रपट बनवतो तो काहि व्यावसायिक फायदा पाहुनच.(अर्थातच आर्थिक.) २.दिग्दर्शक/अभिनेते स्वतःची किंमत (ती काहि विचारु नका) वसुल करतातच. ३.तो वितरित करणारे पण त्यांचा आर्थिक फायदाच पाहतात. ४.चित्रपट दाखवणारे सुध्दा ,आजकालचे मल्टिप्लेक्स, त्यांचा आर्थिक फायदाच पाहतात. आता ह्या चारहि प्रकारात मला तरि कोणि समाजसेवा करताना दिसत नाहि.(फारच क्वचित ..) मग राहतो कोण? तो ति़किट काढणारा सामान्य प्रे़क्षकच. सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते? हे म्हणजे लग्नाच्या दिवशी हॉलवर येऊन घटस्फोटाच्या वकिलाने आपले कार्ड दिल्यासारखे आहे, .... आता उद्या लग्नाला पण तिकिट लावलेत अन घटस्फोटाचा वकिल आला तरि त्याचे अप्रूप वाटणार नाहि. अबब

In reply to by अभिज्ञ

नाही नाही म्हटलात तरी तुमचा बेसिक मुद्दा पायरसीचे समर्थन असा दिसतो.... आता सिमिलर उदाहरण... १. शेतकरी भाजी पिकवतो.( फायदा घेउन विकतो..) २. होलसेलवाला फायदा घेउन आणखी एका रिटेलर ला विकतो. ३. मंडईत भाजीवाला अजून फायदा घेऊन विकतो... आता मध्येच कोणीतरी चोर त्यातली भाजी चोरून चोरताना खराब झालेली भाजी स्वस्तात विकतो...कोणीतरी घेतेच.... सडकी भाजी गोड मानून खाणारे आहेतच्....त्यात आर्थिक फायदाही होतोच....आता कसली भाजी कशी खायची तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे...पण भाजी चोरीची आहे आणि बेकायदेशीर आहे हे नक्की..... सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते? आता चित्रपट बघणे म्हणजे नक्की काय , ते आधी मनाशी पक्के पाहिजे... पायरेटेड सीडीवरती संवाद ऐकू न येता चित्रांचा आनंद न घेता फक्त गोष्ट कळणे म्हणजे चित्रपट पाहणे असे ज्यांना वाटते त्यांनी सीडीवरती पहावा... भरपूर आर्थिक फायदा होईल...

In reply to by आनंदयात्री

आंबोळी 17/04/2008 - 14:58
आता उद्या लग्नाला पण तिकिट लावलेत अन घटस्फोटाचा वकिल आला तरि त्याचे अप्रूप वाटणार नाहि. सहमत... उद्या नवरा-नवरी चे पालक(प्रोडुसर) भरपूर पैसे कमावण्यासाठी पोरांची लग्ने ठरवणार, नवरा , नवरी भरमसाठ बिदागी घेउन लग्नाला उभे राहिले...भटजी (मग तो प्रस्थापीत असो किंवा खेडेगावातून स्वप्न घेउन आलेला असो) स्वत:चा फायदा बघून लग्न लावणार. कार्यालयवाला स्वत:चा फायदा बघुन त्या लग्नाची तिकीटे विकणार. मग स्वत:चा फायदा बघायला घटस्फोटाचा वकिल जर तिथे पोचला तर त्याचे काय चुकले? त्याला पोट नाही? त्याला यातना नाहीत? आणि तिकीटे काढून गेलेल्या सामान्य प्रेक्षकाचे काय? त्याच्या पानात जर जिलबीचा फक्त एक तुकडा येणार आसेल किंवा पोटभर जेवायला मिळणार नसेल तर त्याने कुणाकडे दाद मागायची? त्याने कमी पैशात जास्त जिलब्या मिळवायचा प्रयत्न केला तर काय चुकले? शेवटी कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम् बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्ने इतरेजना: हेच खरे. अवांतर : मला ह्या विषयावर प्रतिसाद दिला गेला तरि आम्हि तो वैयक्तिक न घेता चर्चेचा भागच समजु/समजतो. (मिष्टान्ने चापणारा)आंबोळी

In reply to by आंबोळी

अहो आम्बोळी.... एका लग्नाची गोष्ट झकास... अप्रतिम प्रतिसाद... आवडला.... पण हा चर्चेचा भाग समजा....आम्ही केलेले कौतुक वैयक्तिक घेऊ नका... :):)

पतिंग्या नव्हे.... बैलाचे नाव "चितंग्या" असे आहे.... "तुझं आभाळ मला माझं आभाळ तुला" नव्हे... माझं आभाळ तुला घे..तुझं आभाळ मला...असे हवे.... टिंग्या सुरेख आहे...जरूर बघा.... -सो कॉल्ल्ड समीक्षक तो मी नव्हेच.. (भडकमकर तुमचा करस्पाँडन्स कोर्स आहे का हो???)

धमाल मुलगा 17/04/2008 - 10:52
मुक्तसुनितराव, बहुधा आपण भडकमकरांचं बोलणं व्यक्तिशः घेतलं असावं असा माझा कयास आहे. परंतु जर आपण एका बराच काळ अभिनयक्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तिच्या जागी स्वतःला ठेऊन हा विचार केला तर नक्की भडकमकरांची तळमळ आपल्याला जाणवेल. हा जो काही सर्वसाधारण राग आहे डिव्हीडी आणि पायरसीबाबत, त्यापायी कदाचित त्यांच्याकडून आपल्याला दुखावणारी काही वाक्यं आलेली असु शकतात. जसं भ्रष्टाचार, आणि सवंग राजकारणाबाबत बोलताना आपोआप आपल्या तोंडून नेहमीपेक्षा जास्त कडक विचार निघतात तसंच आहे हे. जोपर्यंत मोठ्या हौसेने आणि अपेक्षेने उभे केलेले नाटक्/चित्रपट केवळ वर उल्लेखात आलेल्या कारणांपायी चालत नाही ना, तोपर्यंत ही अशी तळमळ, चिडचिड मनाच्या गाभ्यापासून नाही हो येत. अबबशेठ, आपण हिंदी चित्रपटांचा मुद्दा सरळ बाजुलाच ठेऊया. मराठी सिनेमे हे बर्‍याचदा सरकारच्या मदतीवर आणि प्रोड्युसर्सच्या हाता-पाया पडून उभे राहतात. इथं दुबईचा पैसा येत नाही. प्रसंगी निर्माता-दिग्दर्शक पदरमोड करुन पैसा उभारतात. श्वास सारखा अप्रतिम चित्रपट जेंव्हा ऑस्करला जाणार असतो तेंव्हा दिग्दर्शकापासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांना हातात पत्र्याची डबडी घेऊन रस्त्यातून 'ऑस्कर-निधी' साठी भिका मागत फिरावं लागतं. ही अवस्था 'सुवर्णकमळ' विजेत्या चित्रपटाची...तर इतरांची काय कथा हो? आता सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते? ह्यामध्ये आर्थिक फायदा ही 'रिलेटिव्ह कॉन्सेप्ट' वाटते. निर्माता-दिग्दर्शक त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सिनेमा काढतो, अभिनेते त्यांचा फायदा बघून काम करतात, चित्रपटगृहं त्यांचा फायदा बघतात, ब्लॅकवाले त्यांचा फायदा बघतात (मराठीसाठी ब्लॅक?), पण म्हणून आपला आर्थिक फायदा बघताना आपण ओरिजनल नव्हे तर नक्कल खरेदी करतो आहोत असं नाहीय्ये का? म्हणजे पुडा ही पिवळा, त्यावरच्या मुलाचं चित्रही तसंच, आणि नावात मात्र 'पारले-जी' चं 'पाले-जी' करायचं आणि रद्दी बिस्किटं आठ आणे-रुपया कमी किंमतीनं विकायचं असं नाही का होतय? बिस्किटं दोन्ही पुड्यात आहेत. पुडेही दिसायला जवळपास सारखे आहेत. पण पारलेच्या बिस्किटाची चव, दर्जा 'पाले'च्या बिस्किटाला आहे का? बरं हे कोण कुठले 'पाले', त्यानी मानकांचं पालन केलं आहे का? त्यांना ब्रँड मार्केटींगचा खर्च आला का? 'पारले'ला हे सगळं आहे, म्हणून त्यांची किंमत थोडी जास्त ! आता मला सांगा, ४ पैसे कमी देऊन टुकार प्रिंट आणायची आणि चित्रपटात काय वाक्यं आहेत, काय बोलताहेत हे कान ताणून ऐकण्याचा प्रयत्न करायचा, चित्रही तेव्हढं योग्य दर्जाचं नसतं. चित्रपट बघितल्याच्या समाधानाची पार काशी होऊन नाही जात काहो? असो, राग नसावा. माझं बोलणं खटकलं असल्यास मोठ्या दिलानं माफ करुन टाका! अहो, बोलुनचालुन टवाळ आम्ही! आमचं म्हणणं काय मनावर घेता? -(श्वासच्या ऑस्कर-निधीसाठी भिका मागत हिंडलेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 17/04/2008 - 11:21
वा धम्या, सुंदर अन संयत प्रतिसाद. पायरसीबद्दलची कळ्कळ पोचली. आता ओरिजनलच खरेदी करणार अन एटलिष्ट मराठी तरी थेटरातच बघणार. भडकमकरांनी अशा तर्‍हेने वाकडे न बोलता प्रतिसाद द्यायला हरकत नव्हती असे वाटले, असो, भडकमकर साहेब नो ऑफेन्स मिन्ट बरका !

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 17/04/2008 - 11:40
आता ओरिजनलच खरेदी करणार अन एटलिष्ट मराठी तरी थेटरातच बघणार. आनंदयात्रीशेठ, शतशः आभार ! असेच आपण सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल. -(आभारी) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 17/04/2008 - 12:48
मी नेहेमी थेटरातच बघणे पसंत करते. आणि खूपच प्रेक्षणीय आणि मनोरंजक वाटला तरच बाजारात चकती आल्यावर चकती घेते. अवांतर :
तर नक्कीच मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल.
म्हणजे पायरटेड न घेता ओरीजनल व्हीसीडी घेतल्यास मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल? हम्म्म्म.. हे विधान जरा विचारमंथनीय आहे. अहो कोणाला वाटणार नाही मराठी रंगपट दणदणून निघावा. पण काय आजचे ते चित्रपट, काय ती गाणी, काय ते विनोद (हसू ही रडू!), काय ते नाच (शाळेतल्या गॅदरींगमध्ये तरी चांगले). (१-२% अपवाद वगळता.जसे उत्तरायण, श्वास, वळू, टिंग्या, डोंबिवली फास्ट, तू तिथं मी इ.) बनवाबनवी, गंमत जंमत, नवरी मिळे नवर्‍याला, एकापेक्षा एक, भूताचा भाऊ इ. मनोरंजक चित्रपट देणारा सचिन नवरा माझा नवसाचा देतो, धुमधडाका, थरथराट, दे दणा दण, झपाटलेला महेश कोठारे 'क्यू की मै झूठ नही बोलता' चे मराठीकरण - नाव पण आठवत नाही. पूर्वीच्या लावण्या बघायला अजूनही मस्त वाटते आणि आत्ताच्या - न बोललेलेच बरे. हिंदी रंगपटातील कलाकारांना ५-१० मिनिटे झळकवण्याचा अट्टहास, हिंदी गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अट्टहास, वेस्टर्न नाचण्याचा अट्टहास.. का? किती मराठी चित्रपट संगीताच्या ध्वनीफिती निघतात आज? चांगली गाणी कोणाला आवडत नाहीत. फिटे अंधाराचे जाळे का हाऊसफुल्ल जातो? नव्या पिढीच्या राहुल देशपांडेचे बगळ्यांची माळफुले, दाटून कंठ येतो का वन्स मोअर घेते? सांगा बरं काल परवा निघालेल्या चित्रपटांची नावे, लक्षात राहिलेले कलाकार, लक्षात राहिलेली गाणी, लक्षात राहिलेले विनोद? मराठी रंगपटाचा प्रेक्षकवर्ग म्हणाल तर त्याला जे हिंदीत बघायला मिळतेय आणि तो बघतोय, म्हणजेच मराठी, घरच्या चित्रपटांकडून नक्कीच त्याच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. श्यामची आई, गोरा कुंभार, शिवाजी महाराज, पिंजरा, दादा कोंडके, राजा गोसावी, दामुअण्णा, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रंजना, सुलोचना, जयश्री, साधी माणसं, आत्मविश्वास, दोघी, सरकारनामा रुचणारी माणसं पळालेली कोंबडी धरायला का म्हणून जातील. दर्जा दाखवा पावती मिळेल. * वरील मत हे वैयक्तिक आहे.

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 17/04/2008 - 12:57
म्हणजे पायरटेड न घेता ओरीजनल व्हीसीडी घेतल्यास मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल? असहमत .. धम्याला म्हणायचे आहे की थेटरात पाहिल्याने मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल. बाकी सर्व मुद्द्यांशी अगदी तंतोतंत सहमत. बहुतांशी पिक्चर भुक्कड असतात, काय तो "नाना मामा","नाथा पुरे आता" .. भरत जाधव ने तर आधी चांगले कमावलेले नाव गमावलेय आता .. वात आणतो तो आता अगदी त्या होममिनिष्टर पेक्षाही ..

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 17/04/2008 - 13:04
भरत जाधव?.. मला नाव आठवलेही नाही!
थेटरात पाहिल्याने मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल.
टुकार पिक्चर बघायला कोण जाईल थेटरात? वेळ खर्च, पैसा खर्च, स्टोरी समजून घेता घेता डोक्याची मंडई. आजचा सामान्य मराठी माणूस त्यापेक्षा मिसळपाव / वडापाव / भेळ खाईल, ताम्हिणीच्या घाटात फिरायला जाईल.

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 17/04/2008 - 13:14
>>टुकार पिक्चर बघायला कोण जाईल थेटरात? खरे आहे, जत्रा मधले ह्यालागाड त्यालागाड पाहुन त्या भरत जाधवला गाडावे वाटत होते, अर्ध्यातुन उठुन आलो, पैसे गेले मनस्ताप झाला अन "सांगितले होते मराठी पिक्चर नको ! कोणत्या भुक्कड पिक्चरला घेउन आलास !" असे बोलने खाल्ले ते वेगळेच. पण श्वास, डोंबिवली फास्ट, डोह, सरीवर सरी अशीच काही चांगली चित्र पण येतात ती पहायला मात्र थेटरातच जायला पाहिजे, धम्या म्हणतो तसा खरच या लोकांकडे दुबइचा पैसा नाही. खारीचा वाटा तर उचलला जाइल.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी 17/04/2008 - 14:06
श्वास, डोंबिवली फास्ट, डोह, सरीवर सरी अशीच काही चांगली चित्र पण येतात ती पहायला मात्र थेटरातच जायला पाहिजे,
मान्य.
खरच या लोकांकडे दुबइचा पैसा नाही.
म्हणजे उत्तम कलाकृती बघायला ५०-१०० करोड लागतातच? पूर्वीच्या लोकांकडे होता का हो दुबईचा पैसा? श्यामची आई पठडीतला पिक्चर दाखवायला लागतात का करोडोंचे सेट्स, फॉरेन लोकेशन्स आणि स्पेशल इफेक्ट्स? आम्हाला मराठी माणसाला बांधून ठेवणारे कथा, कलाकार आणि संवाद (डायलॉग्ज्) हवे आहेत.

In reply to by धमाल मुलगा

अभिज्ञ 18/04/2008 - 03:40
मला वाटते कि हि चर्चा फ़ारच भरकटलि आहे. मुळात माझा आक्षेप हा "निर्माता दिग्दर्शक ह्यांना फ़ार यातना होतात हो" ह्या वाक्यावर आहे/होता. श्री भडकमकर आणि धमाल मुलगा ह्यांनि सांगितलेले बरेचसे विचार पटले. परंतु काहि मुद्यांवर मी तरी सहमत नाहि. नाहि नाहि म्हंटले तरी तुम्हि पायरसिचे समर्थन करताय....... भडकमकरांनि आम्हाला या पायरसिच्या वादात शेवटि ओढलेच.) नुसतेच मराठी चित्रपट चालत नाहित हि बोंब मारत सुटायचे,हे गेले कित्येक वर्षे मी पाहतोय, ऐकतोय.....वरील चर्चांमधुनहि हाच सुर ऐकायला मिळाला. आपल्याला असेच म्हणायचे आहे ना......कि "एकतर चित्रग्रुह नाहित,वर सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकवर्ग नाहि.त्यात परत हि पायरसिची भानगड...म्हणजे निर्माता/दिग्दर्शक झोपलाच की. मग निर्माता शेवटि कंटाळून चित्रपटाचे हक्क एखाद्या टी.व्हि.चॆनेलला विकून स्वत:चा खर्च काढून घेतो.............मग काय घरबसल्याच जाहिराती पहात पहात तो बघायचा.तोच एक शेवटचा नैतिक मार्ग." डी.व्हि.डी............... मुळात मराठी चित्रपटाचि डी.व्हि.डी निघते का हो?(चोथी शक्यता...) बर हि डि.व्हि.डि. प्रत्येक वेळेस पायरेटेडच असेल कशावरून? मग ती ख्ररेदि केली तर बिघड्ले कुठे? किंवा लोकांनि त्या चित्रपटाचा भर ओसरुन तो चित्रपट डि.व्हि.डि वर येइ पर्यंत वाट पहायचि? मराठि चित्रपटांना ह्या बाबी लागु होताना दिसतच नाहीत. मराठी चित्रपटाचि डी.व्हि.डी मी तर फ़ार क्वचित वेळा पाहिलि असेन. महाराष्ट्रात अशा किति चित्रग्रूहात मराठी चित्रपट लागतात हो? आणि लागले तर किती दिवस चालतात?एकुणच पहायच्या संधि कमीच..... मग माणुस जर ह्या माध्यमाकडे जर वळाला तर त्यात नवल ते काय?किंबहुना अशा वेळि तो प्रामुख्याने हिंदि चित्रपटाकडे वळतो.आणि खुद्द महाराष्ट्रात जर ही अवस्था तर बाहेर हा प्रश्नच येत नाहि. (ह्याच पुण्या मुंम्बैत भोजपुरी चित्रपट मात्र जोरात चालतात.) आता वळुयात पायरसिकडे.... मुळात पायरसि वाइट हेच विधान मी चुकीचे मानतो.किंवा पायरसि हि सुद्धा relative concept आहे. आश्चर्य वाटून घेउ नका.भडकमकर आणि ध.मु. ह्यांनि दिलेली उदाहरणॆ अजिबात पटत नाहित. आपण सांगितलेली सडकि भाजी आणि पारले-पाले उदाहरणे दिशाभुल करणारी आहेत. ती पायरसिच्या व्याख्येत जरी बसत असलि तरी ती इथे लागु होत नाहीत. आमच्या मतानुसार चित्रपटाचि डी.व्हि.डि. आणि सि.डि. हे दोन्हि प्रकार मुळ चित्रपटच दाखवतात. त्यात सडकि भाजी किंवा पाले जी असला प्रकार नसतो.(इथे बनावट आहे.) अबबशेठ, आपण हिंदी चित्रपटांचा मुद्दा सरळ बाजुलाच ठेऊया. मराठी सिनेमे हे बर्‍याचदा सरकारच्या मदतीवर आणि प्रोड्युसर्सच्या हाता-पाया पडून उभे राहतात. इथं दुबईचा पैसा येत नाही. प्रसंगी निर्माता-दिग्दर्शक पदरमोड करुन पैसा उभारतात. श्वास सारखा अप्रतिम चित्रपट जेंव्हा ऑस्करला जाणार असतो तेंव्हा दिग्दर्शकापासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांना हातात पत्र्याची डबडी घेऊन रस्त्यातून 'ऑस्कर-निधी' साठी भिका मागत फिरावं लागतं. ही अवस्था 'सुवर्णकमळ' विजेत्या चित्रपटाची...तर इतरांची काय कथा हो? मान्य........... आता फ़क्त मराठी सिनेमांनाच पायरसिचा धोका का हो? तामिळ,तेलुगु,कन्नड सर्वच भाषांच्या चित्रपटांच्या पायरेटेड डी.व्हि.डी. पोत्याने मिळतात, तरीहि तिथली थेअटर्स हाउसफ़ुल्लच दिसतात. मग चुकतेय कुठे? मला वाटते कि मराठी चित्रपटांची अधोगति होण्यास ही पायरसि जबाबदार नसुन बाकी बरेचसे प्रकार मुख्यत: जबाबदार आहेत. १.बॉलिवूड........मुख्य धोका तोच आहे.मराठी चित्रपटांच्या अधोगतिस हाच एक जबाबदार असा भाग आहे. मराठी चित्रपटस्रुष्टि घ्या किंवा मराठी भाषाच घ्या....अस्तित्वासाठी जेवढा संघर्ष ह्यांना करावा लागतो तेवढा संघर्ष कुठ्ल्याही भाषेला करावा लागत असेल असे माझ्या पाहण्यात तरी नाहि. मराठी सिनेमाला जगवायचे असेल तर हि बॉलिवूडची घाण प्रथम इथून बाहेर काढलि पाहिजे. २.मराठी चित्रपटांचि जास्त जाहिरात होताना दिसत नाहि. ३.आर्थिक अभाव,प्रदर्शनाकरिता उपलब्ध संधि नाहित.... ४.एकंदरीत मराठी समाजाचि उदासिनता..................... आणिक बरेच काहि देता येइल.... तर मुद्दा हा पायरसि संदर्भात होता........... या पायरसि संदर्भात मी इथे काहि उदाहरणे देउ इच्छितो. १.मायक्रोसॉफ़्ट विन्डोज चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे. आपल्या पैकि किति जणांनि आजपर्यंत हा प्रकार कधिहि पायरेटेड वापरलेला नाहि? ह्याचे उत्तर जवळपास ० असेच असेल. बाजारात ह्या सॉफ़्टवेअरचे पायरेटेड वर्जन बहुत करून मायक्रोसॉफ्ट्च आणते अशीच धारणा आहे. २.आमच्या व्यावसायिक अंगात autocad नावाचे एक सॉफ़्टवेअर आहे. माझ्या माहिति प्रमाणे हे बनवणारी कंपनीच ह्याचे पायरेटेड वर्जन बाजारात आणते. आता ह्या दोन्हिहि अतिशय प्रस्थापित अशा कंपन्या आहेत.तरीहि दोन्ही हा प्रकार करतात. कारण सोप्पे आहे.बाजारावर पकड. माणसाला आपल्या उत्पादनाचि सवयच लावून टाकतात.माणसाला त्या प्रणालीचा गुलाम करुन टाकतात. मग हळूहळू माणूस एक का होइना ओरिजिनल वर्जन घेतोच. समजा ,विण्डॊज हि वर्जन जर पहिल्यापासुनच फ़क्त पैशे देणा-यालाच मिळेल ह्या तत्वावर त्यांनी जगात राबवली असति तर आजपर्यंत एवढि हीट झाली असति का? आधि मला विंडोज हे काय आहे हे जो पर्यंत कळ्त नाहि तो पर्यंत मी तरी ती कशी काय विकत घेउ? ३.आपण टि.व्हि.,वर्तमानपत्र ह्यात ब-याच वेळा ऐकले/वाचले असेल,कि अफ़गाणिस्तान,पाकिस्तान येथे हिंदि चित्रपट फ़ारच हिट आहेत.तेथे ते officially प्रदर्शित होत नाहित तरिहि ते तेथे पायरेटेड सी.डी. वगैरे प्रकाराने उपलब्ध असतात. त्या बद्दल एकाहि बॉलिवूडकराला मी गळे काढताना पाहिलेले नाहि.उलट ह्याचे आपल्या सर्वांना कौतुकच असते, नाहि का? मग मला तरी हाच प्रश्न पडतो कि च्याइला आपणच का एवढे कर्मदरिद्रि? का नाहि आपले चित्रपट चालत,ते हि आपल्याच राज्यात!!!!!!!!!! मुळात आपली कला/अविष्कार लोकांपर्यंत पोहोचतोय का?लोकांना ते माहिति आहे का? लोकांपर्यंत आपले काम कसे पोहचोवता येइल? लोक येउन माझे काम पाहणार का मी स्वत:हा ते लोकांना दाखवायला पाहिजे? हे विचार कोणि करतेय?????? खरि गोम तर मला इथेच आढळते. लोकांनि येउन माझे काम पहावे.ते हि पैशे देउन (अर्थातच).मी कशाला लोकांना दाखवायला जाउ? आधि माझा झालेला खर्च काढा.............हि असलि व्रुत्ति............. अरे मित्रा, जर तुझ्या सिनेमाच्या पाय़रेटेड सि.डि. बाजारात आल्या तर त्यातूनहि तुलाच प्रसिद्धि मिळते. लोकांना नाहि.त्याप्रसिद्धिवर तुलाच पूढचे चित्रपट जास्त फ़ायदा करतिल. आज संदिप खरे,सलील कुलकर्णि हे का एवढे प्रसिध्द आहेत?त्यांचि गाणिहि नेटवर मिळतातच कि फ़ुकट. तरिहि लोक त्यांच्या शोजना गर्दि करतातच ना. का? तर तिथे दर्जा तर आहेच,पण तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झालेत. आणि हा प्रकार फ़क्त चित्रपटांच्या बाबतीत आहे असे नाहि. नाटक घ्या.पुणे मुंबई सोडले तर नाटकाचा प्रोडुयुसर मराठवाडा,विदर्भ अशा लांबच्या ठिकाणि जायला नाखुशच असतो. का तर तिथे नाटकाला कितपत प्रतिसाद मिळेल अशि शंका. पुण्यात तर कानडि,तेलुगु वगैरे बहुभाषिक वर्तमानपत्रे मिळतात.पण बेळगाव सोड्ल कि महाराष्ट्राबाहेर मराठी व्रुत्तपत्रे का मिळत नाहित? सगळी कडे आर्थिक गणितेच पहायचि.नाहि का? आत्ता खरि गरज आहे ती "मराठी चित्रपट बघा" हे सांगायचि.मग तो तुम्हि थेटरात बघा किंवा पायरेटेड सी.डि. वर बघा. कसाहि बघा ,अरे पण बघा.उगाच नसत्या झुलि पांघरुन बसु नका. बाकि, मुळात तुम्हाला "श्रीमंत झालेला मराठी" पहायचाय की "श्रीमंत झालेली मराठी" पहायचि आहे? पहा, दोन्हित खुप फ़रक आहे.पहिल्या प्रकार घडल्याने दुसरी गोष्ट घडेलच असे नाहि,पण दुसरा प्रकार घडला तर पहिले प्रकार लाखोंनि पहायला मिळतिल. (मराठी सिनेमाप्रेमी) अबब अवांतर-असो, राग नसावा. माझं बोलणं खटकलं असल्यास मोठ्या दिलानं माफ करुन टाका! अहो, बोलुनचालुन टवाळ आम्ही! आमचं म्हणणं काय मनावर घेता? हे कोणाकरिता होते?

भोचक 17/04/2008 - 14:07
माझं आभाळ तुला घे तुझं आभाळ मला आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला ही प्रकाश होळकरांची एक छान कविता आहे. त्याचेच टिंग्यामध्ये गाणे केले आहे. होळकर मुळचे लासलगाव (जि.नाशिक) येथील कवी आहेत. नव्या पिढीतील होळकर एक सशक्त कवी आहे. त्यांच्या कविता आशयघन आहेत. कोरडे नक्षत्र हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे.

बघितला पाहिजे टिंग्या..... अवांतर - चामारी आमच्या नावाचा शिणेमा???? अन् आमाला त्याचं आवतान बी नाय...... आयला कमीत कमी रॉयल्टी तरी द्या राव....... आपला, (वरिजनल) टिंग्या ;)

धमाल मुलगा 17/04/2008 - 18:10
सर्वप्रथम आनंदयात्री माझ्या म्हणण्याशी सहमत झालात, आणि माझ्या अनुपस्थितीत किल्ला लढवलात त्याबद्दल आभार! मनस्वी, अगदी बिनतोड आहेत तुझे मुद्दे.
काय आजचे ते चित्रपट, काय ती गाणी, काय ते विनोद (हसू ही रडू!), काय ते नाच (शाळेतल्या गॅदरींगमध्ये तरी चांगले). ...न बोललेलेच बरे. हिंदी रंगपटातील कलाकारांना ५-१० मिनिटे झळकवण्याचा अट्टहास, हिंदी गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अट्टहास, वेस्टर्न नाचण्याचा अट्टहास.. का? किती मराठी चित्रपट संगीताच्या ध्वनीफिती निघतात आज?
अगदी मान्य! पण ह्याच्या मुळाशी दुष्टचक्र आहे. 'प्रेक्षकांची अशी आवड/मागणी असते म्हणून आम्ही असं बनवतो'...आणि 'दुसरं काही नाही म्हणून हेच बघतो' सास-बहू इ.इ. प्रकार आधी बघायचे, नंतर चटक लागली की टाळता येत नाहीत! लोक बघताहेत म्हणून बदाबदा सगळ्या असल्याच मालिका काढायच्या...असाच प्रकार आहे मराठीतही. बरं, काही वेळा दर्जेदार देणार्‍यांनाही सवंग देणं भाग असतं... प्रत्येक प्रकारची लाट येत असते, इनोदी की इनोदीच....बांगड्या आणि तंगड्या की तेच ते...रोमँटीक आले की फटाफट तसलेच आणखी चित्रपट. इथं अस्तित्व टिकवणं हे देखील एक कारण असतं. शेवटी वाहत्या गंगेत हात धूणं कोणाला नकोय? फिटे अंधाराचे जाळे का हाऊसफुल्ल जातो? नव्या पिढीच्या राहुल देशपांडेचे बगळ्यांची माळफुले, दाटून कंठ येतो का वन्स मोअर घेते? अभिरुचीसंपन्न प्रेक्षक/रसिक नक्कीच चांगलं तेच उचलतात...पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच, ह्याची खात्री वाटली नाही की मग असं व्हायला होतं! आजही चांगले चित्रपट निघत आहेत. आता, नाण्याच्या बाजूप्रमाणे चांगल्याबरोबर वाईटही येणारच. फरक एव्हढाच आहे की वाईट जास्त आहे, चांगलं कमी. कारण सोपं आहे, चांगल्या कलाकृतीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, विषयाचा योग्य अभ्यास करावा लागतो. त्यात वेळा खर्ची पडतो, पैसाही लागतो...एव्हढ्या वेळात जर आलेली लाट परत गेली तर? म्हणून बरेच जण आपली पोळी ह्या तापल्या तव्यावर भाजून घेतात! परिणामः तद्दन भिकार चित्रपट. मला खात्री आहे, परिस्थिती नक्की सुधारेल. गजेंद्र, मंगेश, किंचित संतोष ही आणि अशी मंडळी नक्की मराठी रंगपटाला वर आणतील. हळू हळू प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलतील...सातत्याने असे दर्जेदार चित्रपट आल्यानंतर त्यांची सवय लागून फालतू प्रकार प्रेक्षकांकडून नाकारले जातील. पण..थोडा धीर धरायला हवा, पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय?
म्हणजे उत्तम कलाकृती बघायला ५०-१०० करोड लागतातच? पूर्वीच्या लोकांकडे होता का हो दुबईचा पैसा?
दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच : 'नाही' आणि कोण म्हणतं करोडोंनी पैसा ओतले की चित्रपट चांगले बनतात? लो-बजेट वाले नागेश कुकनुरचे चित्रपट आहेत साक्षीला.. आणि भव्य-दिव्य सेट्सवाले गर्भश्रीमंत चित्रपटही...जे सडकून आपटले आहेत. अर्थात हा नियम सार्वत्रीक नाही. दुबईचा संदर्भ मी अबबशेठच्या हिंदी-मराठी चित्रपट तुलनेशी बोलताना दिला होता.
आम्हाला मराठी माणसाला बांधून ठेवणारे कथा, कलाकार आणि संवाद (डायलॉग्ज्) हवे आहेत.
त्यासाठी गरज आहे ती उत्तम लेखकांची, दिग्दर्शकांची आणि सकस अभिनयक्षमतेच्या अभिनेत्यांची...हे सगळं येतं ते पैसा ओतूनच. मग त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज नको व्हायला? त्यांना योग्य तो मोबदला नको मिळायला? हाच माझा सूर आहे...चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा म्हणण्यामागे.

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 17/04/2008 - 18:45
'प्रेक्षकांची अशी आवड/मागणी असते म्हणून आम्ही असं बनवतो'
हे विधान चुकीचे वाटते (तुझे नाही, जो करतो त्याचे.) ही प्रेक्षकांची आवड अजिबात नसते, म्हणूनच गर्दी खेचत नाही.
लोक बघताहेत म्हणून बदाबदा सगळ्या असल्याच मालिका काढायच्या...असाच प्रकार आहे मराठीतही.
बरोबर आहे. पण सिनेमा, नाटक, मालिका हे समाजाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे असे मी समजते. आजच्या मालिका बघणार्‍या बहुसंख्य महिला वर्गाची सायकोलॉजी बदलण्याची शक्ती त्यांच्यात असते आणि त्यांनी ती सत्कारणी लावावी असे मला वाटते. आज विचारले तुला टिपरे आवडेल की या सुखांनो - तर पटकन टिपरे हेच उत्तर येईल. रडुबाई, हतबल, काळी जादू, जळुबाई, खलनायकी विचार न येता आधीच टेन्शनमध्ये असलेल्या बायकांच्या मनात हलकेफुलके, प्रगल्भ, विनोदी, खंबीर असे विचार यावेत असे मला वाटते.
पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच,
हवाय कशाला तोच रसिक. आपापला प्रेक्षकवर्ग तयार करा पण तो तरी कायम ठेवा. जसे दादा कोंडके.
एव्हढ्या वेळात जर आलेली लाट परत गेली तर? म्हणून बरेच जण आपली पोळी ह्या तापल्या तव्यावर भाजून घेतात! परिणामः तद्दन भिकार चित्रपट.
बरोब्बर. म्हणून पोळी भाजून घेणार्‍याने भाजावी पोळी. पण ती पोळी त्यांची त्यांनाच खावी लागणार आहे हे विसरू नये. असे म्हणू नये मराठी प्रेक्षकाने पाठ फिरवली वगैरे.
मला खात्री आहे, परिस्थिती नक्की सुधारेल. थोडा धीर धरायला हवा.
मान्य आहे.
पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय?
बाळसं धरता धरता २० वर्ष सरली हो. बाळाचा बाळ्या झाला.
मग त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज नको व्हायला? त्यांना योग्य तो मोबदला नको मिळायला?
हो, मी सहमत आहे. म्हणूनच म्हटलं, चांगला मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाउनच बघावा. आणि त्याची सीडी / व्हीसीडी पण ओरीजनलच घ्यावी. टुकार चित्रपटांची पायरटेड तरी कोण घेणारेय?

मुक्तसुनीत 17/04/2008 - 19:47
भडकमकर आणि धमु यांना थोडे स्पष्टीकरण देणे योग्य होईल. मी नोंदवलेला निषेध हा भडकमकरांच्या एका विधानाचा निषेध होता. त्याबाबत मी व्यक्तिगत आकस किंवा अनादर दाखविलेला नाही. त्यांचे विधान मी व्यक्तिशः घेतले असे धमु म्हणतात. तसे ते सरळसरळ व्यक्तिगत निर्देश करणारे होतेच. भडकमकरांची तळमळ मी समजतो असे मी याधीच म्हण्टले आहे. या निमित्ताने त्यानी हा महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आणला, लावून धरला हे स्पृहणीय आहे. धमु आणि आनंदयात्री यांचे प्रतिसाद विशेष उल्लेखनीय, समंजस आहेत. त्यांचे अभिनंदन.

धमाल मुलगा 18/04/2008 - 11:41
मुळात तुम्हाला "श्रीमंत झालेला मराठी" पहायचाय की "श्रीमंत झालेली मराठी" पहायचि आहे? पहा, दोन्हित खुप फ़रक आहे.पहिल्या प्रकार घडल्याने दुसरी गोष्ट घडेलच असे नाहि,पण दुसरा प्रकार घडला तर पहिले प्रकार लाखोंनि पहायला मिळतिल.
क्या बात है! नक्कीच!
पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच, हवाय कशाला तोच रसिक. आपापला प्रेक्षकवर्ग तयार करा पण तो तरी कायम ठेवा. जसे दादा कोंडके.
तेच रसिक मी अश्या अर्थानं म्हणालो, की जे कलेसाठी गर्दी करतात..जीव टाकतात.
पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय? बाळसं धरता धरता २० वर्ष सरली हो. बाळाचा बाळ्या झाला.
सुरुवात झालेली आहे... निव्वळ इनोदी चित्रपटांचा रतीब घालून तेच ते दाखवणं कमी झालं असून सुधारित दर्जाची निर्मीती चढत्या भाजणीने निदर्शनास येऊ लागलेली आहे.
मग मला तरी हाच प्रश्न पडतो कि च्याइला आपणच का एवढे कर्मदरिद्रि? का नाहि आपले चित्रपट चालत,ते हि आपल्याच राज्यात!!!!!!!!!!
:-)) जेव्हा एक देशपांडा एका जोश्याशी सार्वजनीक ठिकाणी बोलताना देखील मायमराठीचा वापर करायला लाजतो तेव्हा हा प्रश्न विचारणंच चूकीचं ठरतं. सर्वसाधारण मनोवृत्ती म्हणजे, "थेटरात जाऊन तिकीट काढून पिक्चर बघायचं आणि तेही मराठी? काय येडा झालास का तू?"
अरे मित्रा, जर तुझ्या सिनेमाच्या पाय़रेटेड सि.डि. बाजारात आल्या तर त्यातूनहि तुलाच प्रसिद्धि मिळते. लोकांना नाहि.त्याप्रसिद्धिवर तुलाच पूढचे चित्रपट जास्त फ़ायदा करतिल.
काही प्रमाणात असहमत. प्रसिद्धी नक्कीच मिळते, कित्येकांची अशीही उदाहरणं आहेतच की, ज्यांचे चित्रपट सडकून आपटले, कुत्रंही गेलं नाही बघायला, पण त्यांना पुढे कामं मिळत गेली...यशस्वीही झाले.
सगळी कडे आर्थिक गणितेच पहायचि.नाहि का?
का नाही? मायबाप प्रेक्षक, कलेची सेवा इ.इ. सगळ्या गोष्टी मनाला समाधान देतात, पण त्या समाधानाच्या जोरावर मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश नाही घेता येत, त्यासाठी मोजावा लागतो तो पैसाच. दोन वेळचं जेवण-खाण, औषध-पाणी हे समाधानाने नाही विकत घेता येत. पुर्वीचे मराठी अभिनेते आर्थिक गणितं पहायचे नाहीत, काही अपवाद वगळता काय झालं त्यांच्या आयुष्याच्या शेवटी?
नाटक घ्या.पुणे मुंबई सोडले तर नाटकाचा प्रोडुयुसर मराठवाडा,विदर्भ अशा लांबच्या ठिकाणि जायला नाखुशच असतो. का तर तिथे नाटकाला कितपत प्रतिसाद मिळेल अशि शंका.
शेठ, एके काळी आम्हीही व्यावसायीक नाटकं केली आहेत. एका दौर्‍याचा खर्च किती येतो, काय त्रास पडतो हे चांगलं ठाऊक आहे. स्थळाप्रमाणे आवड बदलते. पुणे-मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी फार्सिकल शिवाय फारसं काहीच चालत नाही. पुण्या-मुंबईत 'गोलपीठा' चाललं(!) म्हणून ते इतर ठिकाणी चालेलच ह्याची वेडी आशा बाळगणं योग्य नाही. तिथे 'मोरुची मावशी' आणि 'वासुची सासु' च न्यायला हवं. असो, बरंच पुराण चालवलं मी. आता थांबतो. मुक्तसुनीतराव, अभिनंदनाबद्दल आणि विशेष दखल घेतल्याबद्दल आभारी आहे. -ध मा ल.

पायरसी थांबविण्याच्या उद्देशाबाबत खुद्द निर्माते किती उदासीन आहेत हे खालील लिंक वर वाचता येईल. http://www.loksatta.com/daily/20080424/mp06.htm

In reply to by प्रभाकर पेठकर

आता निर्मात्यांनाच उत्साह नाही पायरसी थांबवायसाठी तर आम्हाला का असावा? ... मी अबब साहेबांशी सहमत आहे, पायरेटेड प्रिंट पाहायचे त्यांचे लॉजिक आम्हाला आवडले.

In reply to by डॉ. श्लोक _भातखंडे

मनस्वी 24/04/2008 - 15:17
डॉक्टर.. तुम्हीसुद्धा..?? :)

In reply to by मनस्वी

आम्हाला फक्त लॉजिक आवडले....पायरेटेड प्रिंट संवाद ऐकू येत नाहीत त्यामुळे अजिबात आवडत नाहीत... केबलवाला लावतो तेव्हा मी ती प्रिंट पाहत नाही....एक अक्षर कळत नाही...आपल्याच भाषेतला पिक्चर तमिळ किंवा मल्याळी सिनेमासारखा पहावा लागतो , ते मला आवडत नाही.....

प्रमोद देव 28/04/2008 - 23:46
टिंग्या हा चित्रपट बर्‍याच लोकांना आवडला तो त्यातल्या कथेमुळे आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे. विशेषतः टिंग्याच्या भूमिकेतील बालकलाकाराच्या अभिनयामुळे. मी स्वतः चित्रपट पाहात नसल्यामुळे माझे स्वतःचे असे ह्याबाबत काहीच मत नाही.आत्तापर्यंत इतरांकडून ऐकलेल्या मतांमध्ये जरा वेगळे वाटलेले आणि विचारप्रवृत्त करणारे हे मत वाचल्यावर ते आपल्यासमोर मांडावे असे वाटले. त्या चित्रपटाच्या कथेसंबंधात आणि एकूणच आपल्या प्रेक्षक मंडळींबद्दल एक गमतीदार तरीही वास्तववादी वाटणारा हा अभिप्राय वाचा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

प्रमोदकाका, अभिप्राय वाचला. अंतर्मुख करायला लावणारा आहे. आवडला. श्री. स _भडकमकर प्रमोदकाक? प्रमोदकाकांना तुम्ही अगदीच कावळा करून टाकलेत हो... असे करू नका. प्लीज...
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच "टिंग्या" हा प्रकाश हाडवळे यांचा चित्रपट पाहिला. खेडेगावाचं व तेथिल ग्रामिण जीवनाचं नितांतसुंदर चित्रण केलं आहे. एक सरळ साधी कथा आहे टिंग्या व त्याचा बैल पतिंग्या याची, बरोबरोनी आजच्या शेतकर्‍याचं दाहक वास्तव आपल्या समोर येतं. ओतुर जवळच्या मांडवा या खेडेगावात ही कथा घडते, लावणी चे दिवस असताना अचानक टिंग्याच्या दोन बैलांपैकी एक बैल (पतिंग्या) बसतो म्हणजेच कामाला निरुपयोगी होतो.

मी पाहिलेला मृत्यू

आंबोळी ·

विजुभाऊ 15/04/2008 - 19:00
तेंव्हा कन्दील कोठे होता तुझा? कोणी लावला होता? तरी सांगत होतो की तो कन्दील जाळुन टाक म्हणुन. मला वाटते की तेंव्हा बहुतेक त्यातले सेल संपले होते त्यामुळे बल्ब नीट पेटला नाही हे तुझे सुदैव

विकास 15/04/2008 - 20:09
>>>तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, यावरून एक (ऐकीव पण) सत्यकथा आठवली: असेच एक अर्भक मृतावस्थेत जन्माला आले. घरच्यांना वाईट वाटले. त्याला घेऊन जाण्याआधी घरातली मोठी व्यक्ती म्हणजे त्या अर्भकाची होउ शकलेली आजीने विचार केला की नाहीतरी मेलेलेच जन्माला आलयं काय बिघडत, असे म्हणत तिने शेगडीतील एक निखारा काढला आणि त्या बाळाच्या पोटावर अलगद ठेवला... आणि ट्यँ म्हणत ते बाळ जोरात रडायला लागले. त्या चटक्यातून पण ते वाचले! विचार करा वाचले नसते तर गीतरामायण आणि अनेक त्या तोडीची सुंदर गाणी कोणी लिहू शकले असते का?

इनोबा म्हणे 15/04/2008 - 20:54
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

गोट्या 16/04/2008 - 10:46
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) ;) हा हा हाहा ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by इनोबा म्हणे

आंबोळी 16/04/2008 - 11:12
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) हाहाहा हे बाकी खरे! पण काका ते पुनर्जन्मावरचे (असंभव) विसरलात. आणि मदनबाणाच्या फोटूला चारोळ्या बी लिवल्यात्या. बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) मतकरींचे लहानपणी निम्माशिम्मा राक्षस ऐकले होते. नंतर नाही हो काही वाचले त्यांचे. || भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| -आम्बोळी म्हणे

In reply to by आंबोळी

धमाल मुलगा 16/04/2008 - 11:22
|| भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| -आम्बोळी म्हणे
हाण तिच्याआयला !!!! इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय. -ध मा ल्या म्हणे

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 16/04/2008 - 12:38
इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय. मला बी आसंच वाटतंय. || भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| हा हा हा,आंबोळ्या.लगे रहो. आजकाल लोकं स्वाक्षरीची बी विडंबनं कराय लागलीत. || भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी || ह्ये कसं वाटतंय... :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आंबोळी 16/04/2008 - 17:35
|| भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी || ह्ये कसं वाटतंय... :) मृत्यू बोलविण्या लोकाघरी | कंदील टांगू खुंटीवरी || (कंदीलधारी)आंबोळी

एक 15/04/2008 - 22:55
दिड वर्ष होत आलं त्या गोष्टीला पण अजुनही धक्का पचवू शकलो नाही.. लग्न झाल्यावर एका महिन्यानंतर हे जोडपं हवाई ला हनिमून ला गेलं. एका खडकावर हा बसला होता आणि त्याची बायको फोटो काढत होती. तेव्ढ्यात एक लाट उसळली आणि हा तोल जावून समुद्रात पडला..खडकावर पडून मार वर्मी बसला असावा त्याला हातपाय मारायलापण अवसर मिळाला नाही. त्याच्या बायकोने त्याला वाचवायला उडी मारली. त्याला वाचवू शकली नाही. अर्धातास बिचारी पाण्यात हातपाय मारत होती. थकली आणि ती सुद्धा गेली.. तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची आम्ही कल्पना ही करू शकत नाही... खडकावर कॅमेरामिळाला घरच्यांनी तो ताब्यात घेतला. आपण गेलो हे त्या मित्राला तरी खरं वाटलं असेल का? आम्ही एक कंपनी काढणार होतो..हनिमून वरून आल्यावर ऍक्टिव्हली कामाची सुरूवात करायची होती. या मित्राने मला गोल्फ खेळायला शिकवलं. वेगवेगळ्या कोर्सेसवर जाण्याचे आमचे बेत होते.. पण एका रविवारी सकाळी सगळे बेत, सगळे प्लॅन्स कोसळले..क्षणभंगुरता म्हणजे काय तेव्हा कळालं. तेव्हापासून मी परत कधी बीचवर गेलो नाही.. सगळीकडे पोहेन पण समुद्राला पाय लावणार नाही..

मी पण असे अनेक अपघात पाहीले आहेत मुंबई बंगळूर हायवे वर. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. त्या अपघातांचा उल्लेख मी 'मी पाहीलेला मृत्यू' म्हणूनच करेन. पुण्याचे पेशवे

श्री 16/04/2008 - 10:28
मी आणी मित्र असे मिळुन ११ जण ३० डीसेबर २००६ रोजी क्वालीस गाडीने गणपतीपुळे साठी जात असता गोवा हायवे वर पेण नजीक आमच्या गाडीला अपघात झाला. माझे ३ मित्र त्या अपघातात वारले व बाकीचे जबरद्स्त ज़खमी झाले पण नशीबाने मला फक्त खरचटले, अपघाताच्या वेळी सर्व जण झोपी गेले होते, मी आणी ड्राईव्हर फक्त जागे होतो, ड्राईव्हर तर जागीच वारला पण आज ही मला तो अपघात चित्रपटात दाखवतात त्या पेक्षा ही भयानक वाटतो. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. अहो त्या अपघाताने फार चांगले /वाईट अनुभव दिले. जे ना ओळखिचे ते त्या रात्री आम्हाला मदत करायला धावले तर काहीनी मदतीच्या नावाने मोबाईल, पाकीट गायब केले. अम्बुलन्स वाल्यानी फ्री सेवा दीली पण 'टीप' घ्याला वीसरले नाहीत. त्यानंतर पोलिस, court- कचेरी बापरे बाप................

साधारण ४ वर्षा पूर्वी मी सुधा मरण अगदी जवळून पाहीलय. माझी सीए ची परीक्शा होती आणि माझा टॉन्सिल्स च ऑपरेशन झाल होत. ऑपरेशन मधे वापरल्या जाणार्या एका औषधा ची जबरदस्त रीऍक्शन येउन माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या. तात्काळ दीनानाथ मन्गेशकर मधे मला हलवल. साधारण तीन दिवस मी आय सी यु मधे राहुन मी जेव्हा तीथून बाहेर आलो तेव्हा चा आई बाबान्चा चेहेरा मी कधीच विसरु शकणार नाही. पण हा प्रसन्ग माला अजुन सम्रुद्ध करुन गेला. मी हॉस्पिटल मधे पोचण्या आधी तिथे पोचलेले मित्र मला मिळाले. आईच्या मायेने काळजी घेणार्या डॉक्टर मिळाल्या. तीथल्या मामा आणि मावशीन्शी माझी मैत्री झाली जी आजही टीकुन आहे. त्या दिवसा पासुन मी खरा आयुष्य भक्त झालो अणि अगदि छोट्या अणि साधारण वाटणार्या गोष्टी मधे मला खुप आनन्द सापडु लागला. मरणा चा अनुभव जगण्यातली मजा सान्गून गेला

अभिज्ञ 16/04/2008 - 14:00
मरता मरता वाचण्याची माझी ही तिसरी खेप. .... अरेरे ......वाचून वाईट वाटले.....( "बाकि आमच्या आळीत एक म्हातारी होती,पण ती लहानपणीच मेली." आम्हि पाहिलेले हे एवढेच एकमेव मरण. अबब.

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ 16/04/2008 - 16:53
अहो वरच्या स्टो-या वाचून पार घाबरुन गेलो होतो. थोडे वातावरण हलके करावे म्हणुन केलेला हा प्रयत्न. बाकि, कंदिल लावल्याने जर माणसे मरत असतिल,तर म्हातारि लहानपणिच का मरु नये?)))ह.घ्या. अबब.

शितल 16/04/2008 - 18:56
दिपावली निमित्त मी सासरी कोल्हाप्॑रला गेले होते, माझा मुलगा जो त्यावेळी २ वर्ष ४ महिन्याचा होता तो, एका मुला बरोबर खेळ्त होता, त्याच्याबरोबर खेळ्णारा दुसरा मुलगा ६ वर्षाचा होता, त्याने पळ्त पळत जाऊन पाण्याच्या टाकी वरुन उडी मारली, माझाही लेक त्याच्या पाठीमागुन गेला पण जमिनी लगतच टाकी होती, आणि त्याचे झाकण अर्ध उघडे होते, त्यामध्ये तो पड्ला पण पड्ताना त्याने हाताने एकदम काठाला धरले तरी ही तो॑डापर्यत पाणी आले होते, जवळ्च सासुबाई होत्या त्या॑नी त्याला हाताला धरुन वर खेचले , जर त्याचा हात सुट्ला असता तर, कारण पळ्त पळ्त पडल्यामुळे हाताला हिस्का बसुन हाताच्या बोटा॑ना लागले होते . आणि तो म्हणतो आई मी कसा पाण्यात धप्पाक करुन पड्लो.

गणपा 17/04/2008 - 03:56
सगळ्यांचे अनुभव वाचले. म्हंटल की माझा गणपतीबाप्पा मोरया होता होता कसा राहीला त्याची कथा तुम्हास सांगावी. ६ वर्षांपुर्वी गणपतीच्या सुमरास भारतात सुट्टीवर यायचा योग आला. गणपती माझ अराध्य दे॑वत आणि गणपतीची खरी मजा गावाला. त्यामुळे दुस‍र्याच दिवशी गावाला प्रयाण केल. सुट्टीचे दिवस, त्यामुळे सगळी चुलत, मावस, मामे भावंड जमली होती. पावसाळा नुकताच झाल्यामुळे गावचा तलाव पण मस्त भरला होता . मी सगळया भावंडात मोठा, त्यामुळे सगळे मागे लागले की पोहायला जाउया. ( कुणी मोठ असल्याशीवाय घरचे पोहायला सोडत नसत.) आमच्या लहानपणी आम्ही असच कुणाला तरी मामा करायचो. (आता पोरांनी मला मामा बनवल. नवीन पिढी जुन्या पिढी कढुनच शिकते म्हणा.....चलताय ) बर्‍याच वर्षांनी पोहायला उतरलो. लहान भावंडांपुढे फुशारकी मारण्याचा मोह आवरेना. भराभर हात पाय मारले. ३-४ मीनीटांत अर्ध तळ पारपण केल. ट्यूब घेतली न्हवतीच (इज्ज्त का सवाल) . आणि तेवढच इंप्रेशन जास्त(कोण म्हणतय रे अतीशहाणा) मागे वळून पाहील पोरांच्या डोळ्यात अपार कवतीक दाटल होत (छाती २ इंच वर आली, पण पोटाच्या घेरापुढे लाजुन तीने लगेच मान टाकली ती गोष्ट वेगळी). आताशी जवळपास कुणी न्हवत. तेवढ्यात पायला क्रँप्स आले. बोंबला.... धड पुढे जाता येइना की मागे पण फिरता येइना. एकदा पाण्यात बुडी मारुन पायाला तळ लागतो का याचा अंदाज घेतला. पण पायी काही लागल नाही, उलट नाका तोंडात पाणी भरुन वर आलो. बर मदतीसाठी हाक मारवी तर पोपट होइल म्हणून गप्प बसलो. हळु हळु पाण्यात हात मारत राहीलो. कसबस ३/४ तळ पार केल. आता हातांनी पण साथ सोडायची तायरी चालवली. परत एकदा तळ्याच्या तळाला पाय लागतोका ते पाहील. परत एकदा पाणी चाखत चाखत वर आलो. (वर आलो हे नशीब.) मग मात्र धाब दणाणल आमचं. ब्रंम्हांड का काय म्हणतात ते आठवल. आताशी कुणाला हाका मारुन पण उपयोग न्हवता, मदत पोहोचेस्तव माझ विसर्जन आटोपल असत. तितक्यात समोरच्या काठावरुन आमचे तीर्थरुप येताना दिसले. एकदा वाटल की त्यांना हाक मारवी, पण त्यांना उच्च रक्तदाबाचा विकार. चोहुबाजूला मरण दिसत असतानाही त्यांना हाक मारयच टाळल. (इथे पोपट बीपट काही नाही.) त्यांना हाका मारुन काही उपयोग न्हवता, तेही माझ्या पर्यंत वेळेत पोहचू शकले नसते. नी आपल्या तरुण मुलाचा अंत त्यांनी डोळ्यादेखत पाहुनये असच वाटत होत. मनातल्या मनात गणपतीबाप्पांचा धावा केला. स्वतःलाच समजावत रहीलो अजुन थोडच उरलय... (Just do it...) अगदी इंच इंच पाणी कापत रहीलो. १० - १५ मीनीटांच्या अथक प्रय्त्नांती एकदाचे तळ्याच्या काठाला पाय टेकले. आणि मग जी ताणुन दिली तिथेच काठावर की ज्याच नाव ते... १/२ तास शवासन करत पडलो होतो. पाण्याची इतकी धास्ती घेतली होती की दुसर्‍या दिवशी गणपती विसर्जनाला बाप्पाला काठावरुनच निरोप दिला. लहान (पहिलीत) असताना पण पाण्याने अशीच एकदा सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. ती गोष्ट पुन्हा कधीतरी...............तुर्तास इतीश्री. -गणपा.

In reply to by गणपा

अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. हा माझा अनुभव आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोट्या 28/04/2008 - 23:25
"अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. " सहमत. असा अनुभव घेत मी लहानपणी अनेकवेळा पंचगंगा ह्या काटावरुन त्या काठावर पार केली आहे व तोच अनुभव मला इतर जागी देखील नेहमी मदत करतो कारण आम्ही (म्हणजेच मी) धुम्रपान करतो तेव्हा श्वास जाण्याची शक्यता नेहमी असते त्यामुळे पाण्यामध्ये ही ट्रीक नेहमी वापरतोच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 01/05/2008 - 02:06
खरय पेठकर काका, पण जाम टरकलो होतो. इतका की तळ्याच्या काठाशीवाय दुसर काहीही सुचतच न्हवत.

जयवी 19/04/2008 - 11:56
इतक्या सगळ्यांच्या कथा वाचून काटाच आला अंगावर....!!

मदनबाण 19/04/2008 - 19:29
चला मी सुद्दा असंभव पाहीला सुरुवात करतो,,,,,च्या मारी शुभ्राचा नवरा नोकरी न करतासुद्दा मस्त लाईफ जगतोय. बायकोही सोज्वळ दिसते आहे.....(अजुन पर्यंन्त सासु-सुनेच भांडणच झाले नाही????? हे कसं शक्य आहे?????) आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन..... (शुभ्राचा जबरदस्त पंखा) मदनबाण>>>>>

In reply to by मदनबाण

आंबोळी 28/04/2008 - 23:44
बाण्या (मला बेण्या म्हणायचे होते) , आयला इथे असंभवचा काय संबंध? आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन..... सहमत... (शुभ्राचा जबरदस्त पंखा) डबल सहमत --आंबोळी

विजुभाऊ 15/04/2008 - 19:00
तेंव्हा कन्दील कोठे होता तुझा? कोणी लावला होता? तरी सांगत होतो की तो कन्दील जाळुन टाक म्हणुन. मला वाटते की तेंव्हा बहुतेक त्यातले सेल संपले होते त्यामुळे बल्ब नीट पेटला नाही हे तुझे सुदैव

विकास 15/04/2008 - 20:09
>>>तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, यावरून एक (ऐकीव पण) सत्यकथा आठवली: असेच एक अर्भक मृतावस्थेत जन्माला आले. घरच्यांना वाईट वाटले. त्याला घेऊन जाण्याआधी घरातली मोठी व्यक्ती म्हणजे त्या अर्भकाची होउ शकलेली आजीने विचार केला की नाहीतरी मेलेलेच जन्माला आलयं काय बिघडत, असे म्हणत तिने शेगडीतील एक निखारा काढला आणि त्या बाळाच्या पोटावर अलगद ठेवला... आणि ट्यँ म्हणत ते बाळ जोरात रडायला लागले. त्या चटक्यातून पण ते वाचले! विचार करा वाचले नसते तर गीतरामायण आणि अनेक त्या तोडीची सुंदर गाणी कोणी लिहू शकले असते का?

इनोबा म्हणे 15/04/2008 - 20:54
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

गोट्या 16/04/2008 - 10:46
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) ;) हा हा हाहा ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by इनोबा म्हणे

आंबोळी 16/04/2008 - 11:12
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) हाहाहा हे बाकी खरे! पण काका ते पुनर्जन्मावरचे (असंभव) विसरलात. आणि मदनबाणाच्या फोटूला चारोळ्या बी लिवल्यात्या. बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) मतकरींचे लहानपणी निम्माशिम्मा राक्षस ऐकले होते. नंतर नाही हो काही वाचले त्यांचे. || भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| -आम्बोळी म्हणे

In reply to by आंबोळी

धमाल मुलगा 16/04/2008 - 11:22
|| भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| -आम्बोळी म्हणे
हाण तिच्याआयला !!!! इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय. -ध मा ल्या म्हणे

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 16/04/2008 - 12:38
इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय. मला बी आसंच वाटतंय. || भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| हा हा हा,आंबोळ्या.लगे रहो. आजकाल लोकं स्वाक्षरीची बी विडंबनं कराय लागलीत. || भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी || ह्ये कसं वाटतंय... :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आंबोळी 16/04/2008 - 17:35
|| भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी || ह्ये कसं वाटतंय... :) मृत्यू बोलविण्या लोकाघरी | कंदील टांगू खुंटीवरी || (कंदीलधारी)आंबोळी

एक 15/04/2008 - 22:55
दिड वर्ष होत आलं त्या गोष्टीला पण अजुनही धक्का पचवू शकलो नाही.. लग्न झाल्यावर एका महिन्यानंतर हे जोडपं हवाई ला हनिमून ला गेलं. एका खडकावर हा बसला होता आणि त्याची बायको फोटो काढत होती. तेव्ढ्यात एक लाट उसळली आणि हा तोल जावून समुद्रात पडला..खडकावर पडून मार वर्मी बसला असावा त्याला हातपाय मारायलापण अवसर मिळाला नाही. त्याच्या बायकोने त्याला वाचवायला उडी मारली. त्याला वाचवू शकली नाही. अर्धातास बिचारी पाण्यात हातपाय मारत होती. थकली आणि ती सुद्धा गेली.. तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची आम्ही कल्पना ही करू शकत नाही... खडकावर कॅमेरामिळाला घरच्यांनी तो ताब्यात घेतला. आपण गेलो हे त्या मित्राला तरी खरं वाटलं असेल का? आम्ही एक कंपनी काढणार होतो..हनिमून वरून आल्यावर ऍक्टिव्हली कामाची सुरूवात करायची होती. या मित्राने मला गोल्फ खेळायला शिकवलं. वेगवेगळ्या कोर्सेसवर जाण्याचे आमचे बेत होते.. पण एका रविवारी सकाळी सगळे बेत, सगळे प्लॅन्स कोसळले..क्षणभंगुरता म्हणजे काय तेव्हा कळालं. तेव्हापासून मी परत कधी बीचवर गेलो नाही.. सगळीकडे पोहेन पण समुद्राला पाय लावणार नाही..

मी पण असे अनेक अपघात पाहीले आहेत मुंबई बंगळूर हायवे वर. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. त्या अपघातांचा उल्लेख मी 'मी पाहीलेला मृत्यू' म्हणूनच करेन. पुण्याचे पेशवे

श्री 16/04/2008 - 10:28
मी आणी मित्र असे मिळुन ११ जण ३० डीसेबर २००६ रोजी क्वालीस गाडीने गणपतीपुळे साठी जात असता गोवा हायवे वर पेण नजीक आमच्या गाडीला अपघात झाला. माझे ३ मित्र त्या अपघातात वारले व बाकीचे जबरद्स्त ज़खमी झाले पण नशीबाने मला फक्त खरचटले, अपघाताच्या वेळी सर्व जण झोपी गेले होते, मी आणी ड्राईव्हर फक्त जागे होतो, ड्राईव्हर तर जागीच वारला पण आज ही मला तो अपघात चित्रपटात दाखवतात त्या पेक्षा ही भयानक वाटतो. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. अहो त्या अपघाताने फार चांगले /वाईट अनुभव दिले. जे ना ओळखिचे ते त्या रात्री आम्हाला मदत करायला धावले तर काहीनी मदतीच्या नावाने मोबाईल, पाकीट गायब केले. अम्बुलन्स वाल्यानी फ्री सेवा दीली पण 'टीप' घ्याला वीसरले नाहीत. त्यानंतर पोलिस, court- कचेरी बापरे बाप................

साधारण ४ वर्षा पूर्वी मी सुधा मरण अगदी जवळून पाहीलय. माझी सीए ची परीक्शा होती आणि माझा टॉन्सिल्स च ऑपरेशन झाल होत. ऑपरेशन मधे वापरल्या जाणार्या एका औषधा ची जबरदस्त रीऍक्शन येउन माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या. तात्काळ दीनानाथ मन्गेशकर मधे मला हलवल. साधारण तीन दिवस मी आय सी यु मधे राहुन मी जेव्हा तीथून बाहेर आलो तेव्हा चा आई बाबान्चा चेहेरा मी कधीच विसरु शकणार नाही. पण हा प्रसन्ग माला अजुन सम्रुद्ध करुन गेला. मी हॉस्पिटल मधे पोचण्या आधी तिथे पोचलेले मित्र मला मिळाले. आईच्या मायेने काळजी घेणार्या डॉक्टर मिळाल्या. तीथल्या मामा आणि मावशीन्शी माझी मैत्री झाली जी आजही टीकुन आहे. त्या दिवसा पासुन मी खरा आयुष्य भक्त झालो अणि अगदि छोट्या अणि साधारण वाटणार्या गोष्टी मधे मला खुप आनन्द सापडु लागला. मरणा चा अनुभव जगण्यातली मजा सान्गून गेला

अभिज्ञ 16/04/2008 - 14:00
मरता मरता वाचण्याची माझी ही तिसरी खेप. .... अरेरे ......वाचून वाईट वाटले.....( "बाकि आमच्या आळीत एक म्हातारी होती,पण ती लहानपणीच मेली." आम्हि पाहिलेले हे एवढेच एकमेव मरण. अबब.

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ 16/04/2008 - 16:53
अहो वरच्या स्टो-या वाचून पार घाबरुन गेलो होतो. थोडे वातावरण हलके करावे म्हणुन केलेला हा प्रयत्न. बाकि, कंदिल लावल्याने जर माणसे मरत असतिल,तर म्हातारि लहानपणिच का मरु नये?)))ह.घ्या. अबब.

शितल 16/04/2008 - 18:56
दिपावली निमित्त मी सासरी कोल्हाप्॑रला गेले होते, माझा मुलगा जो त्यावेळी २ वर्ष ४ महिन्याचा होता तो, एका मुला बरोबर खेळ्त होता, त्याच्याबरोबर खेळ्णारा दुसरा मुलगा ६ वर्षाचा होता, त्याने पळ्त पळत जाऊन पाण्याच्या टाकी वरुन उडी मारली, माझाही लेक त्याच्या पाठीमागुन गेला पण जमिनी लगतच टाकी होती, आणि त्याचे झाकण अर्ध उघडे होते, त्यामध्ये तो पड्ला पण पड्ताना त्याने हाताने एकदम काठाला धरले तरी ही तो॑डापर्यत पाणी आले होते, जवळ्च सासुबाई होत्या त्या॑नी त्याला हाताला धरुन वर खेचले , जर त्याचा हात सुट्ला असता तर, कारण पळ्त पळ्त पडल्यामुळे हाताला हिस्का बसुन हाताच्या बोटा॑ना लागले होते . आणि तो म्हणतो आई मी कसा पाण्यात धप्पाक करुन पड्लो.

गणपा 17/04/2008 - 03:56
सगळ्यांचे अनुभव वाचले. म्हंटल की माझा गणपतीबाप्पा मोरया होता होता कसा राहीला त्याची कथा तुम्हास सांगावी. ६ वर्षांपुर्वी गणपतीच्या सुमरास भारतात सुट्टीवर यायचा योग आला. गणपती माझ अराध्य दे॑वत आणि गणपतीची खरी मजा गावाला. त्यामुळे दुस‍र्याच दिवशी गावाला प्रयाण केल. सुट्टीचे दिवस, त्यामुळे सगळी चुलत, मावस, मामे भावंड जमली होती. पावसाळा नुकताच झाल्यामुळे गावचा तलाव पण मस्त भरला होता . मी सगळया भावंडात मोठा, त्यामुळे सगळे मागे लागले की पोहायला जाउया. ( कुणी मोठ असल्याशीवाय घरचे पोहायला सोडत नसत.) आमच्या लहानपणी आम्ही असच कुणाला तरी मामा करायचो. (आता पोरांनी मला मामा बनवल. नवीन पिढी जुन्या पिढी कढुनच शिकते म्हणा.....चलताय ) बर्‍याच वर्षांनी पोहायला उतरलो. लहान भावंडांपुढे फुशारकी मारण्याचा मोह आवरेना. भराभर हात पाय मारले. ३-४ मीनीटांत अर्ध तळ पारपण केल. ट्यूब घेतली न्हवतीच (इज्ज्त का सवाल) . आणि तेवढच इंप्रेशन जास्त(कोण म्हणतय रे अतीशहाणा) मागे वळून पाहील पोरांच्या डोळ्यात अपार कवतीक दाटल होत (छाती २ इंच वर आली, पण पोटाच्या घेरापुढे लाजुन तीने लगेच मान टाकली ती गोष्ट वेगळी). आताशी जवळपास कुणी न्हवत. तेवढ्यात पायला क्रँप्स आले. बोंबला.... धड पुढे जाता येइना की मागे पण फिरता येइना. एकदा पाण्यात बुडी मारुन पायाला तळ लागतो का याचा अंदाज घेतला. पण पायी काही लागल नाही, उलट नाका तोंडात पाणी भरुन वर आलो. बर मदतीसाठी हाक मारवी तर पोपट होइल म्हणून गप्प बसलो. हळु हळु पाण्यात हात मारत राहीलो. कसबस ३/४ तळ पार केल. आता हातांनी पण साथ सोडायची तायरी चालवली. परत एकदा तळ्याच्या तळाला पाय लागतोका ते पाहील. परत एकदा पाणी चाखत चाखत वर आलो. (वर आलो हे नशीब.) मग मात्र धाब दणाणल आमचं. ब्रंम्हांड का काय म्हणतात ते आठवल. आताशी कुणाला हाका मारुन पण उपयोग न्हवता, मदत पोहोचेस्तव माझ विसर्जन आटोपल असत. तितक्यात समोरच्या काठावरुन आमचे तीर्थरुप येताना दिसले. एकदा वाटल की त्यांना हाक मारवी, पण त्यांना उच्च रक्तदाबाचा विकार. चोहुबाजूला मरण दिसत असतानाही त्यांना हाक मारयच टाळल. (इथे पोपट बीपट काही नाही.) त्यांना हाका मारुन काही उपयोग न्हवता, तेही माझ्या पर्यंत वेळेत पोहचू शकले नसते. नी आपल्या तरुण मुलाचा अंत त्यांनी डोळ्यादेखत पाहुनये असच वाटत होत. मनातल्या मनात गणपतीबाप्पांचा धावा केला. स्वतःलाच समजावत रहीलो अजुन थोडच उरलय... (Just do it...) अगदी इंच इंच पाणी कापत रहीलो. १० - १५ मीनीटांच्या अथक प्रय्त्नांती एकदाचे तळ्याच्या काठाला पाय टेकले. आणि मग जी ताणुन दिली तिथेच काठावर की ज्याच नाव ते... १/२ तास शवासन करत पडलो होतो. पाण्याची इतकी धास्ती घेतली होती की दुसर्‍या दिवशी गणपती विसर्जनाला बाप्पाला काठावरुनच निरोप दिला. लहान (पहिलीत) असताना पण पाण्याने अशीच एकदा सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. ती गोष्ट पुन्हा कधीतरी...............तुर्तास इतीश्री. -गणपा.

In reply to by गणपा

अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. हा माझा अनुभव आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोट्या 28/04/2008 - 23:25
"अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. " सहमत. असा अनुभव घेत मी लहानपणी अनेकवेळा पंचगंगा ह्या काटावरुन त्या काठावर पार केली आहे व तोच अनुभव मला इतर जागी देखील नेहमी मदत करतो कारण आम्ही (म्हणजेच मी) धुम्रपान करतो तेव्हा श्वास जाण्याची शक्यता नेहमी असते त्यामुळे पाण्यामध्ये ही ट्रीक नेहमी वापरतोच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 01/05/2008 - 02:06
खरय पेठकर काका, पण जाम टरकलो होतो. इतका की तळ्याच्या काठाशीवाय दुसर काहीही सुचतच न्हवत.

जयवी 19/04/2008 - 11:56
इतक्या सगळ्यांच्या कथा वाचून काटाच आला अंगावर....!!

मदनबाण 19/04/2008 - 19:29
चला मी सुद्दा असंभव पाहीला सुरुवात करतो,,,,,च्या मारी शुभ्राचा नवरा नोकरी न करतासुद्दा मस्त लाईफ जगतोय. बायकोही सोज्वळ दिसते आहे.....(अजुन पर्यंन्त सासु-सुनेच भांडणच झाले नाही????? हे कसं शक्य आहे?????) आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन..... (शुभ्राचा जबरदस्त पंखा) मदनबाण>>>>>

In reply to by मदनबाण

आंबोळी 28/04/2008 - 23:44
बाण्या (मला बेण्या म्हणायचे होते) , आयला इथे असंभवचा काय संबंध? आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन..... सहमत... (शुभ्राचा जबरदस्त पंखा) डबल सहमत --आंबोळी
लेखनविषय:
लेखनप्रकार
अगदी थोडक्यात मरता मरता वाचलो.... काळ आला होता पण वेळ आली नव्हती... असले वाक्प्रचार आपण बर्‍याच वेळा वापरतो / ऐकतो. पण खरेच कधी कधी अगदी जिवावरचा प्रसंग ओढवलेला आसतो. माझ्या आयुष्यातले असे 2 प्रसंग येथे सांगतो. आपल्यालाही असे अनुभव आले असतील तर जरूर सांगा. तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, अशी आख्यायिका माझी आजी, आई आमच्याविषयी सांगतात पण तो प्रसंग नीट आठवत नसल्याने येथे तपशीलवार देत नाही. पण थोडक्यात मरता मरता मी जन्माला आलो असे म्हणता येईल. मी साधारण 6-7 वर्षाचा आसताना आम्ही एका वाड्यात माडीवर राहात होतो.

नचिकेत्याचे आख्यान

ठणठणपाळ ·

ठणठणपाळ 15/04/2008 - 15:51
नचिकेत्याबद्दल आधीच्या लेखात धनंजय यांनी माहिती दिल्याचं आणि सागर यांना ध्वनि स्वरुपात हवी ती माहिती मिळाल्याचं हा लेख प्रकाशित केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. क्षमस्व!

In reply to by ठणठणपाळ

धनंजय 15/04/2008 - 16:47
मी अगदीच त्रोटक माहिती दिली होती. तुम्ही कथा सुंदर खुलवली. लेख आवडला.

In reply to by धनंजय

सागर 17/04/2008 - 15:04
धनंजयरावांशी सहमत.... तुमच्या शब्दांत सुरेख आणि योग्य त्या संक्षिप्त स्वरुपात मला नचिकेताचे आख्यान दिले त्याबद्दल धन्यवाद अवांतरः (मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मीच तो सभासद :) नचिकेताच्या आख्यानाने माझ्या (अ)ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद -सागर

धमाल मुलगा 15/04/2008 - 16:09
आभारी आहे. ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार. अर्थात, मला ठाऊक असलेली नचिकेताची गोष्ट इतकी संतुलीत नव्हती. बहुधा ती गोष्टीरुपाने पिढ्यांपिढ्या चालत आल्याने असेल, पण काही गोष्टी मुळ कथेत नसलेल्या आज जाणवलं. धन्यवाद.

In reply to by धमाल मुलगा

ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार. असेच म्हणते, स्वाती

विजुभाऊ 15/04/2008 - 19:48
आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान म्हणजे आत्मा हा अमर आहे. त्याला तुम्ही निर्माण करु शकत नाही , नश्ट करु शकत नाही. आत्मा एका शरीरातुन दुसररे शरीर धारण करु शकतो. अर्वाचीन भौतिक शासत्रात हाच सिद्धान्त ऊर्जेचा अविनाशत्वाचा नियम म्हणून सांगितला जातो.( लॉ ऑफ कॉन्झर्वेषन ऑफ एनर्जी) ऊर्जा निर्माण करता येत नाही , ती नष्ट करत येत नाही. ऊर्जा एका स्वरूपातुन दुसर्‍या स्वरुपात जाते. ........नचिकेताचा आश्रम सोबती :विजुभाउ

In reply to by विजुभाऊ

मुक्तसुनीत 15/04/2008 - 22:33
आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व अशी तुलना वाचताना माझ्या मनात नेहमी एंट्रॉपी चा विचार येतो. काळ अनंत आहे, ऊर्जा संपत नाही , हे विश्व विस्तारत आहे हे सर्व (तत्वतः ) मान्यच. पण हेच शास्त्र हेही सांगते की, एकूण ऊर्जेमधे जरी बदल घडत नसला तरी एंट्रॉपी - म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता - ही एक सतत वाढत रहाणारी गोष्ट आहे. तसे असल्यास अविनाशी आत्म्यालाही , युगानुयुगांनंतर "म्हातारे" होण्याच्या प्रक्रियेमधून जावे लागते , असे मानायचे काय ?

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 16/04/2008 - 01:58
ही एक समांतर कल्पना असली तरी तंतोतंत सारखी आहे असे वाटत नाही. वर उल्लेखलेली एंट्रॉपी म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता ही ज्या व्यवस्थेतून हे मोजमाप होते आहे त्या सिस्टिमशी (व्यवस्थेशी) निगडित असते. आता संपूर्ण वैश्विक पातळीवर ती व्यवस्था कोणती? तिथे एंट्रॉपी वाढते आहे म्हणजे ती कोणत्या दुसर्‍या व्यवस्थेसापेक्ष? असे प्रश्न उपस्थित होतात असे वाटते. आपण जर असे मानले की एक विशिष्ठ कार्य करण्यासंदर्भातली ऊर्जा कमी झाली तर त्याचवेळी दुसर्‍या कोणत्यातरी कार्यासंदर्भात ती वाढलेली असणार हे निश्चित (जसे भरती-ओहोटीचे चक्र जगाच्या दोन टोकांना एकाच वेळी सुरु असते तसे काहीसे). त्यामुळे वाढत जाणारी एंट्रॉपी ही भासमान आहे, सापेक्ष आहे. त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते? माझ्या विचार करण्याच्या सध्याच्या कुवतीनुसार हे सर्व आत्मे एकाच चैतन्यतत्त्वाचा हिस्सा आहेत. (किंबहुना 'हिस्सा' हा शब्दही तितकासा योग्य नाही, त्याऐवजी एकच चैतन्य आहेत हे जास्त योग्य), त्यामधे एक, दोन, तीन असे संख्यात्मक वेगळे असे काही नाहीच. वेगळी आहेत ती शरीरे ती आपण मोजू शकतो त्यामुळे लोकसंख्या कमी किंवा जास्त असली तरी आत्म्याला (चैतन्याला) काही फरक पडत नाही - हीच कदाचित जिवा-शिवाची एकरुपता असावी! त्यामुळे शरीराच्या संख्येनुसार एंट्रॉपी कमीजास्त होत असेल पण एकून ऊर्जास्रोताचा विचार केला तर काही फरक नाही. अजून थोडे खोलात जाऊन पाहूयात. आपल्या सर्वाना एक अनुभव नक्कीच आलेला असेल. कित्येक वेळा आपण एखाद्या ठिकाणी पहात असतो नजरेसमोरुन काही गोष्टी जातात, आपल्याला दिसल्याचे कळत नाही, काही वेळाने भानावर येतो त्यावेळी अमूकअमूक घडले ह्याची जाणीव दुसर्‍या कोणी दिली तर आपण म्हणतो "कधी झाले? मला तर समजलेच नाही." हे कशामुळे होते? तर माझ्या मते इंद्रियातल्या त्यावेळच्या चैतन्याच्या अभावामुळे! हे कोणत्याही ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत अनुभवायला येते. अजून थोडे पुढे जाऊयात. मूलतः सर्व पदार्थातले अणू एकसारखेच आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रेण्वीय रचनांमधून वेगवेगळी मूलद्रव्ये तयार होतात. अशा विशिष्ठ संरचनांमधून माणूस बनवता येईल का? कदाचित हो. त्यात चैतन्य्/आत्मा आणता येईल का? सांगता येत नाही. एखादा माणूस मृत होतो म्हणजे त्यातले चैतन्य नष्ट होते. त्याचे डोळे बघू शकत नाहीत. पण त्याने नेत्रदान केलेले असले आणि ते नेत्र दुसर्‍या माणसाला बसवले तर तो माणूस मात्र 'त्या मृत' डोळ्यांनी बघू शकतो! ह्याचं कारण डोळे मृत असणे किंवा नसणे हे चैतन्याच्या असण्या-नसण्यावर अवलंबून आहे! म्हणजेच ते सापेक्ष आहे! एकाची एंट्रॉपी दुसर्‍याची एंथाल्पी झाली! आत्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याशिवाय तो ही अणूंची मूलभूत संरचना 'चालवू' शकणार नाही. त्याचवेळी तो संपूर्ण विश्व व्यापणारा असणार त्याखेरीज तो ही व्यवस्था धारण करु शकणार नाही. ''अणु रणिया थोकडा|तुका आकाशाएवढा||" म्हणजे तरी काय? तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात. त्या मितीमधून आपले शरीर वेगळे झाले की ते मृत होते. पुन्हा मितीत आले की जिवंत होते. असे वाटते. ह्या विचारानुसार आत्म्याला "म्हातारपण" नसावे! चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत 16/04/2008 - 02:26
विजूभाऊ आणि चतुरंगरावांचे मनःपूर्वक आभार. चतुरंगरावांनी या विषयाचा चांगला सांगोपांग विचार केला आहे असे जाणवले. माझ्या साध्याशा शंकेला त्यांनी फार समर्पक उत्तर लिहीले आहे.

In reply to by चतुरंग

एक 16/04/2008 - 03:45
"..त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते?...." जगाची लोकसंख्या वाढत आहे. म्हणजेच मानवजातीची संख्या वाढत आहे..पण याच बरोबर काही प्राणी एक्स्टिंक्ट होत आहेत. हे आत्मे तिथून तर येत नसतील. विनोदाने म्हणत नाही आहे. पण आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे. म्हणजे टोटल आत्म्यांची संख्या ही फक्त मानवजातीच्या संख्येएवढी नसावी..

In reply to by एक

चतुरंग 16/04/2008 - 08:30
माझ्या विवेचनात मी 'आत्म्यांची संख्या' असा शब्दप्रयोग मुद्दम केला कारण पुढच्या स्पष्टीकरणात माझ्या मते असे काही नाहीये हे मला सांगायचे होते - असते ती शरीरांची संख्या. इथूनतिथून सर्वात एकच चैतन्य व्यापलेले असते. बाकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्राण्यांच्या एक्स्टिंगशन मुळे त्यांच्या शरीरांची संख्या कमी होईल पण आत्म्याला काही फरक पडत नाही असे वाटते. चतुरंग

In reply to by एक

विजुभाऊ 18/04/2008 - 06:39
आत्म्याची संख्या...आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे बरोब्बर. आपल्या पैकी काही जण गेल्या जन्मी अमिबा नायतर देवी चे जन्तु , मलेरिया चे व्हायरस असु शकतो. रौरव , पयान्तक आणि कुंभीपाक ( ही नरकांची नावे आहेत) या स्कूल चे हेडमास्तर म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही या जन्मी जे पाप कराल ते पुढच्या जन्मात फेडावे लागते. ::: पुढचा जन्म चिकन चा असेल की पापलेट सुरमयी असेल या चिन्तेत विजुभाऊ

In reply to by चतुरंग

धमाल मुलगा 16/04/2008 - 12:34
चतुरंगराव, वास्तववादी वैचारिक अभ्यासपुर्ण आणि शास्त्र+तर्कशात्राच्या अनुशंगाने आलेली प्रतिक्रिया ! एव्हढेच म्हणू शकेन मी. खूप छान सांगितलंत.
तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात.
आवडलं. आठवण झाली ती काही वर्षांपुर्वी एका मित्रासोबत त्याच्या सेमिनारची तयारी करतानाची. फोर्थ डायमेंन्शन असा त्याचा विषय होता. पुस्तकांचे ढिगारे, जालावरचे संदर्भ, सगळं उपसुन शेवटी आमचंही अगदी असंच मत झालं होतं. आमच्या ह्या रिसर्चचा निष्कर्षही एकदम 'हटके' काढला होता.. Time, being the forth dimension of this so-called three dimensional world makes the things relate to a certain block of identity for the happenings. As one can rotate the three dimensional object & can view the desired pattern of that specific dimension,If....if one succeeds into turning to the forth dimension that is time, this three dimensional world may see an absolutely different aspect of the each & every incident happened or happening or going to happen ! We may kiss good bye to fortune tellers (हे जवळपास ६-८ वर्षांपुर्वीचे असल्यामुळे वाक्यरचना जशीच्या तशी अस्ल्याची गॅरेंटी नाही.) -ध मा ल. (इन फोर्थ डायमेंनशन)

In reply to by विजुभाऊ

व्यंकट 16/04/2008 - 01:10
खरं आहे, पण समजा १०० वॉटचा एक दिवा एका पूर्ण बंद खोलीत तासभर लावला, म्हणजे, वीज-उर्जेच रुपांतर प्रकाश उर्जेत झालं, तर मग नंतर त्या प्रकाश उर्जेला पुन्हा वीजेत बदलून वीज तुडवड्याचा प्रश्न सोडवता का येत नसावा? व्यंकट

In reply to by व्यंकट

चतुरंग 16/04/2008 - 08:45
मुख्यत्वे ऊष्णता व प्रकाश ह्या मार्गे व्यय होईल. त्यातल्या फक्त प्रकाशाचा वापर करुन विद्युत शक्ती निर्माण करायची ठरवली तरी फोटोव्होल्टाइक सेलने ते शक्य होईलही. त्यातही परिवर्तनातला व्यय आणि निर्माण झालेल्या ऊर्जेची शक्ती ही अत्यंत मर्यादित असेल. शिवाय एकूण नफा- नुकसानीचा विचार करता हा पर्याय अजिबात व्यवहार्य ठरत नाही. (अवांतर - मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेचा वापर हा स्वस्तातला पर्याय करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु आहेत -दुर्दैवाने भारतात ह्याबद्दल जेवढे व्हायला हवेत तेवढे प्रयत्न होत नाहीत. आपण व्यक्तिगत स्वरुपात सौर पॅनल बसवून छोट्याप्रमाणावर का होईना विजेचा प्रश्न आपल्यापुरता सोडवू शकतो. तेवढे केले तरी सुरुवात तर होईल.) चतुरंग

In reply to by चतुरंग

व्यंकट 16/04/2008 - 09:49
धन्यवाद चतुरंगसाहेब, उर्जा संपत नाही तिचे रुपांतर होते, असे असता, उष्णता आणि प्रकाश ह्यामार्गे रुपांतरीत झालेली उर्जा पुढे कशात रुपांतरीत होते? कारण ती नष्ट तर होत नाही, मग जर नष्ट होत नसेल तर ती एकतर कुठेतरी साचून राहीली असेल अथवा रुपांतरीत झाली असेल. मग ही जी कुणीतरी साठवली आहे ती कुंणी भिंतींनी ? फर्नीचर्नी ? ती ज्यानी साठवली ते तिला रिलीज करतात का? पुढे तिचे काय होते? थोडक्यात ह्या व्यय होणार्‍या उर्जेचा पूर्ण माग शास्त्रज्ञांनी काढला आहे का? समजा, एखाद्याने जेवण करून उर्जा मिळवली, ती त्याने घाम गाळून खर्च केली, समजा नुस्ता रिकामा चरखा चालवला... आता ही उर्जा कुठे गेली ? एकूणच कुठल्याही एकदा वापरून झालेली उर्जा जाते तरी कुठे? व्यंकट

ठणठणपाळराव, नचिकेताचे आख्यान चांगले झाले आहे. त्याचबरोबर 'आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान काय आहे ? हेही कधीतरी सांगावे असे वाटते. तसेच आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्वच 'चतुरंगाचे' विवेचनही झकास झाले आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 16/04/2008 - 11:16
अवांतर - लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.) हे आपण आपल्यापुरतं म्हणत असाल तर आमचं काहीच म्हणणं नाही. आपण काहीही म्हणावयास मुखत्यार आहात, नव्हे तो आपला अधिकारच आहे! परंतु आमच्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही 'प्रमाणभाषा' ही संकल्पनाच मानत नाही! भाषा ही प्रत्येकाकरता आहे, सर्वांकरता आहे. आमच्या मते अमूक भाषा म्हणजे 'प्रमाणभाषा' आणि तमूक भाषा म्हणजे 'अप्रमाणभाषा' अशी भाषेची कुठलीही बालिश वर्गवारी नसते! असो.. अर्थात, उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्‍याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका. हा हा हा! अहो कसला डोंबलाचा दुर्घट मार्ग आलाय? उगाच काय धारदार वस्तर्‍याचं पातं नी बितं?! आणि जळ्ळं आत्मज्ञान करून घ्यायला योग्य व्यक्ति तरी कशाला पाहिजे?! उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति धत् तुमची रांडेच्यांनो ;) च्यामारी, आपल्या जुन्या ग्रंथात 'आत्मज्ञान' हा शब्द उगाचच्या उगाच मारे जड वगैरे करून ठेवला आहे! उगाच च्यायला संस्कृतमधले जड जड शब्द वापरून एखद्याला आत्मज्ञान या शब्दाबद्दल आत्मियता वाटण्याऐवजी त्या शब्दाची भिती कशी बसेल हेच पाहिले आहे! 'आत्मज्ञान!', 'आत्मपाप्ती' ही म्हणजे काहीतरी भयंकर दुर्लभ गोष्ट आहे असाच एकूण सूर दिसतो! ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे! च्यामारी नचिकेताला आत्मप्राप्तीच्या इतक्या साध्या अन् सोप्या व्याख्याही समजू नयेत याचे नवल वाटते! आणि आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्‍या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते! असो... आपला, (आत्मानंदी!) तात्याभैय्या देवासकर, देवसकरांची कोठी, इंदौर. -- "अरे श्याम, बेटा ठेव ते गीतेचं पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे ते. पण आपण नाही ना तेवढे थोर!" "बेटा श्याम, न पेलणार्‍या गोळ्या घेऊ नयेत! मग त्या भांगेच्या असोत, वा आध्यात्माच्या असोत!" "न पेलणार्‍या पट्टीत गाऊ नये. सगळं गाणं बेसूर होऊन जातं! आपली पट्टी काळी दोन. पांढरी तीन, पांढरी चार पट्टी आपल्याला जमायची कशी?!" (इति काकाजी, नाटक तुझे आहे तुजपाशी)

आर्य 16/04/2008 - 11:50
आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्‍या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते! सुरलोकातील श्रेष्ठ देवतादेखील ह्या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत? च्यामरी मग कशाला पाहिजे असंल ज्ञान ? यमानेच जर अमरत्वाचे तत्वज्ञान सांगितले आहे तर तेच वाचुन काढायचं .............झालं आणि ओरिजनल पाहिजेच असेल तर "यमराज"च देतील ना ? नचिकेताला दिलं तस............मेल्यावर बधू...... बाकी चैतन्य काय आहे ह्या सगळ्यात? ते कुठून आलं तेवढ सांगा त्याचा पुढचा प्रवास / रुपांतरण मी सांगतो...... (योग्य व्यक्ति ?) आर्य

धमाल मुलगा 16/04/2008 - 12:11
गोष्ट म्हणून आवडली खरं,मोठं भारावून जायला झालं...ते आत्मा,परमात्मा,मुक्ति, श्वर-नश्वराचं गौडबंगाल...पण तात्याभैय्या देवासकरांच्या प्रतिक्रियेने जमिनीवर आलो.
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान? इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची. हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे! अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्‍याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका.
कस्सलं काय? एखादा मित्र बर्‍याच दिवसांनी त्याच्या घरी चाललाय, मोठ्या आनंदाने तुमच्यापाशी येतो,म्हणतो, "ओय यार! परसो मै घर जा रहा हूं | पूरा एक हफ्ता अपनी फॅमिलीके साथ बिताऊंगा |" त्याच्या नजरेत तरळणारा आनंद,चेहर्‍यावरचं हसु बघा...साथीच्या रोगासारखं तुमच्याही चेहर्‍यावर तेच झळकेल. त्याला कडकडून मिठी मारा, म्हणा, "जा साले, हफ्ताभर ऐश कर के आ. मॉं जीके हाथों बना जी भर के खाके आ | मेराभी प्रणाम देना उनको" आता पुन्हा त्याच्या डोळ्यात बघा...हे जग-बिग सगळं तिच्याआयला त्या आनंदावरुन ओवाळून टाकावसं नाही वाटलं तर सांगा! पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान ! ह्यावर मला 'आनंद' चित्रपटातलं एक वाक्य आठवतं... "बाबूमोशाय...जिंदगी बडी होनी चाहिये.....लम्बी नही| मै हसते-खेलते छे: महिने जिया, आप बिना हसे सौ साल जिये..बोलो कौन ज्यादा जिया? " [वाक्य तंतोतंत आठवत नाहीय्ये, पण आशय हाच आहे] अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? (निदान मला तरी) आपला, -(हृषीदांचा आनंद) ध मा ल

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 16/04/2008 - 12:27
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान? इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची. हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे! अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
+१

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 16/04/2008 - 12:57
पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान ! क्या बात है धमाल्या! सुंदर रे! आपला, (आत्मज्ञानी धमाल्याचा आत्मानंदी गुरू!) तात्या. :)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 18/04/2008 - 06:18
अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? अरे बापरे ! हे काय ? धमु बाळा तू चार्वाकाचे सारे तत्वज्ञान एका वाक्यात उतरलवस की रे.झकास. आजपासुन तूच आमचा नचिकेता

तुम्हाला बर्याच जणानी नचिकेताबद्द्ल माहीती दिली आहे, पण माझ्या वाचण्यात आलेली गोष्ट थोडी वेगळी आहे.त्याचे बाबा वाजश्रवस तेजस्वी ब्राम्हण होते,सन्स्क्रूतीच्या कार्यात आपले आयुष्य दिले, त्यामुळेच नचिकेत सुद्धा तेजस्वी होता. त्याने यमाकडे ३ वर मागितले १ वडिलाचा राग शान्त व्हावा. २ अग्निविद्या, ३ महत्वाच म्हणजे आत्मज्ञान ज्याची १ली पायरी - माणुस पशु नाही इश्वराविषयी क्रुतज्ञा बुद्धि जीवनात आणणे, २री पायरी मी माणूस आहे,म्हणुन माणुसकी प्रमाणे जगा, ३री पायरी अहं ब्रम्हास्मि | मी ईश्वर आहे, ईश्वर माझ्यातच आहे नचिकेताच्या वडिलांनी सर्वस्व दक्षिणा नावाचा यज्ञ केला होता कारण नचिकेत वडिलांप्रमाणॅच तेजस्वी होता त्याला स्वत:च्या बळावर सर्व मिळवावयाच होत.[ श्राद्ध भाग २ हे पुस्तक परम पुज्य पांडुरंग शास्त्री आटवले ह्यांच्या सद्वीचार दर्शन ह्यातुन घेतले आहे ] त्यात ही कथा सविस्तरपणे आहे

ठणठणपाळ 15/04/2008 - 15:51
नचिकेत्याबद्दल आधीच्या लेखात धनंजय यांनी माहिती दिल्याचं आणि सागर यांना ध्वनि स्वरुपात हवी ती माहिती मिळाल्याचं हा लेख प्रकाशित केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. क्षमस्व!

In reply to by ठणठणपाळ

धनंजय 15/04/2008 - 16:47
मी अगदीच त्रोटक माहिती दिली होती. तुम्ही कथा सुंदर खुलवली. लेख आवडला.

In reply to by धनंजय

सागर 17/04/2008 - 15:04
धनंजयरावांशी सहमत.... तुमच्या शब्दांत सुरेख आणि योग्य त्या संक्षिप्त स्वरुपात मला नचिकेताचे आख्यान दिले त्याबद्दल धन्यवाद अवांतरः (मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मीच तो सभासद :) नचिकेताच्या आख्यानाने माझ्या (अ)ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद -सागर

धमाल मुलगा 15/04/2008 - 16:09
आभारी आहे. ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार. अर्थात, मला ठाऊक असलेली नचिकेताची गोष्ट इतकी संतुलीत नव्हती. बहुधा ती गोष्टीरुपाने पिढ्यांपिढ्या चालत आल्याने असेल, पण काही गोष्टी मुळ कथेत नसलेल्या आज जाणवलं. धन्यवाद.

In reply to by धमाल मुलगा

ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार. असेच म्हणते, स्वाती

विजुभाऊ 15/04/2008 - 19:48
आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान म्हणजे आत्मा हा अमर आहे. त्याला तुम्ही निर्माण करु शकत नाही , नश्ट करु शकत नाही. आत्मा एका शरीरातुन दुसररे शरीर धारण करु शकतो. अर्वाचीन भौतिक शासत्रात हाच सिद्धान्त ऊर्जेचा अविनाशत्वाचा नियम म्हणून सांगितला जातो.( लॉ ऑफ कॉन्झर्वेषन ऑफ एनर्जी) ऊर्जा निर्माण करता येत नाही , ती नष्ट करत येत नाही. ऊर्जा एका स्वरूपातुन दुसर्‍या स्वरुपात जाते. ........नचिकेताचा आश्रम सोबती :विजुभाउ

In reply to by विजुभाऊ

मुक्तसुनीत 15/04/2008 - 22:33
आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व अशी तुलना वाचताना माझ्या मनात नेहमी एंट्रॉपी चा विचार येतो. काळ अनंत आहे, ऊर्जा संपत नाही , हे विश्व विस्तारत आहे हे सर्व (तत्वतः ) मान्यच. पण हेच शास्त्र हेही सांगते की, एकूण ऊर्जेमधे जरी बदल घडत नसला तरी एंट्रॉपी - म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता - ही एक सतत वाढत रहाणारी गोष्ट आहे. तसे असल्यास अविनाशी आत्म्यालाही , युगानुयुगांनंतर "म्हातारे" होण्याच्या प्रक्रियेमधून जावे लागते , असे मानायचे काय ?

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग 16/04/2008 - 01:58
ही एक समांतर कल्पना असली तरी तंतोतंत सारखी आहे असे वाटत नाही. वर उल्लेखलेली एंट्रॉपी म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता ही ज्या व्यवस्थेतून हे मोजमाप होते आहे त्या सिस्टिमशी (व्यवस्थेशी) निगडित असते. आता संपूर्ण वैश्विक पातळीवर ती व्यवस्था कोणती? तिथे एंट्रॉपी वाढते आहे म्हणजे ती कोणत्या दुसर्‍या व्यवस्थेसापेक्ष? असे प्रश्न उपस्थित होतात असे वाटते. आपण जर असे मानले की एक विशिष्ठ कार्य करण्यासंदर्भातली ऊर्जा कमी झाली तर त्याचवेळी दुसर्‍या कोणत्यातरी कार्यासंदर्भात ती वाढलेली असणार हे निश्चित (जसे भरती-ओहोटीचे चक्र जगाच्या दोन टोकांना एकाच वेळी सुरु असते तसे काहीसे). त्यामुळे वाढत जाणारी एंट्रॉपी ही भासमान आहे, सापेक्ष आहे. त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते? माझ्या विचार करण्याच्या सध्याच्या कुवतीनुसार हे सर्व आत्मे एकाच चैतन्यतत्त्वाचा हिस्सा आहेत. (किंबहुना 'हिस्सा' हा शब्दही तितकासा योग्य नाही, त्याऐवजी एकच चैतन्य आहेत हे जास्त योग्य), त्यामधे एक, दोन, तीन असे संख्यात्मक वेगळे असे काही नाहीच. वेगळी आहेत ती शरीरे ती आपण मोजू शकतो त्यामुळे लोकसंख्या कमी किंवा जास्त असली तरी आत्म्याला (चैतन्याला) काही फरक पडत नाही - हीच कदाचित जिवा-शिवाची एकरुपता असावी! त्यामुळे शरीराच्या संख्येनुसार एंट्रॉपी कमीजास्त होत असेल पण एकून ऊर्जास्रोताचा विचार केला तर काही फरक नाही. अजून थोडे खोलात जाऊन पाहूयात. आपल्या सर्वाना एक अनुभव नक्कीच आलेला असेल. कित्येक वेळा आपण एखाद्या ठिकाणी पहात असतो नजरेसमोरुन काही गोष्टी जातात, आपल्याला दिसल्याचे कळत नाही, काही वेळाने भानावर येतो त्यावेळी अमूकअमूक घडले ह्याची जाणीव दुसर्‍या कोणी दिली तर आपण म्हणतो "कधी झाले? मला तर समजलेच नाही." हे कशामुळे होते? तर माझ्या मते इंद्रियातल्या त्यावेळच्या चैतन्याच्या अभावामुळे! हे कोणत्याही ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत अनुभवायला येते. अजून थोडे पुढे जाऊयात. मूलतः सर्व पदार्थातले अणू एकसारखेच आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रेण्वीय रचनांमधून वेगवेगळी मूलद्रव्ये तयार होतात. अशा विशिष्ठ संरचनांमधून माणूस बनवता येईल का? कदाचित हो. त्यात चैतन्य्/आत्मा आणता येईल का? सांगता येत नाही. एखादा माणूस मृत होतो म्हणजे त्यातले चैतन्य नष्ट होते. त्याचे डोळे बघू शकत नाहीत. पण त्याने नेत्रदान केलेले असले आणि ते नेत्र दुसर्‍या माणसाला बसवले तर तो माणूस मात्र 'त्या मृत' डोळ्यांनी बघू शकतो! ह्याचं कारण डोळे मृत असणे किंवा नसणे हे चैतन्याच्या असण्या-नसण्यावर अवलंबून आहे! म्हणजेच ते सापेक्ष आहे! एकाची एंट्रॉपी दुसर्‍याची एंथाल्पी झाली! आत्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याशिवाय तो ही अणूंची मूलभूत संरचना 'चालवू' शकणार नाही. त्याचवेळी तो संपूर्ण विश्व व्यापणारा असणार त्याखेरीज तो ही व्यवस्था धारण करु शकणार नाही. ''अणु रणिया थोकडा|तुका आकाशाएवढा||" म्हणजे तरी काय? तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात. त्या मितीमधून आपले शरीर वेगळे झाले की ते मृत होते. पुन्हा मितीत आले की जिवंत होते. असे वाटते. ह्या विचारानुसार आत्म्याला "म्हातारपण" नसावे! चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत 16/04/2008 - 02:26
विजूभाऊ आणि चतुरंगरावांचे मनःपूर्वक आभार. चतुरंगरावांनी या विषयाचा चांगला सांगोपांग विचार केला आहे असे जाणवले. माझ्या साध्याशा शंकेला त्यांनी फार समर्पक उत्तर लिहीले आहे.

In reply to by चतुरंग

एक 16/04/2008 - 03:45
"..त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते?...." जगाची लोकसंख्या वाढत आहे. म्हणजेच मानवजातीची संख्या वाढत आहे..पण याच बरोबर काही प्राणी एक्स्टिंक्ट होत आहेत. हे आत्मे तिथून तर येत नसतील. विनोदाने म्हणत नाही आहे. पण आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे. म्हणजे टोटल आत्म्यांची संख्या ही फक्त मानवजातीच्या संख्येएवढी नसावी..

In reply to by एक

चतुरंग 16/04/2008 - 08:30
माझ्या विवेचनात मी 'आत्म्यांची संख्या' असा शब्दप्रयोग मुद्दम केला कारण पुढच्या स्पष्टीकरणात माझ्या मते असे काही नाहीये हे मला सांगायचे होते - असते ती शरीरांची संख्या. इथूनतिथून सर्वात एकच चैतन्य व्यापलेले असते. बाकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्राण्यांच्या एक्स्टिंगशन मुळे त्यांच्या शरीरांची संख्या कमी होईल पण आत्म्याला काही फरक पडत नाही असे वाटते. चतुरंग

In reply to by एक

विजुभाऊ 18/04/2008 - 06:39
आत्म्याची संख्या...आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे बरोब्बर. आपल्या पैकी काही जण गेल्या जन्मी अमिबा नायतर देवी चे जन्तु , मलेरिया चे व्हायरस असु शकतो. रौरव , पयान्तक आणि कुंभीपाक ( ही नरकांची नावे आहेत) या स्कूल चे हेडमास्तर म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही या जन्मी जे पाप कराल ते पुढच्या जन्मात फेडावे लागते. ::: पुढचा जन्म चिकन चा असेल की पापलेट सुरमयी असेल या चिन्तेत विजुभाऊ

In reply to by चतुरंग

धमाल मुलगा 16/04/2008 - 12:34
चतुरंगराव, वास्तववादी वैचारिक अभ्यासपुर्ण आणि शास्त्र+तर्कशात्राच्या अनुशंगाने आलेली प्रतिक्रिया ! एव्हढेच म्हणू शकेन मी. खूप छान सांगितलंत.
तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात.
आवडलं. आठवण झाली ती काही वर्षांपुर्वी एका मित्रासोबत त्याच्या सेमिनारची तयारी करतानाची. फोर्थ डायमेंन्शन असा त्याचा विषय होता. पुस्तकांचे ढिगारे, जालावरचे संदर्भ, सगळं उपसुन शेवटी आमचंही अगदी असंच मत झालं होतं. आमच्या ह्या रिसर्चचा निष्कर्षही एकदम 'हटके' काढला होता.. Time, being the forth dimension of this so-called three dimensional world makes the things relate to a certain block of identity for the happenings. As one can rotate the three dimensional object & can view the desired pattern of that specific dimension,If....if one succeeds into turning to the forth dimension that is time, this three dimensional world may see an absolutely different aspect of the each & every incident happened or happening or going to happen ! We may kiss good bye to fortune tellers (हे जवळपास ६-८ वर्षांपुर्वीचे असल्यामुळे वाक्यरचना जशीच्या तशी अस्ल्याची गॅरेंटी नाही.) -ध मा ल. (इन फोर्थ डायमेंनशन)

In reply to by विजुभाऊ

व्यंकट 16/04/2008 - 01:10
खरं आहे, पण समजा १०० वॉटचा एक दिवा एका पूर्ण बंद खोलीत तासभर लावला, म्हणजे, वीज-उर्जेच रुपांतर प्रकाश उर्जेत झालं, तर मग नंतर त्या प्रकाश उर्जेला पुन्हा वीजेत बदलून वीज तुडवड्याचा प्रश्न सोडवता का येत नसावा? व्यंकट

In reply to by व्यंकट

चतुरंग 16/04/2008 - 08:45
मुख्यत्वे ऊष्णता व प्रकाश ह्या मार्गे व्यय होईल. त्यातल्या फक्त प्रकाशाचा वापर करुन विद्युत शक्ती निर्माण करायची ठरवली तरी फोटोव्होल्टाइक सेलने ते शक्य होईलही. त्यातही परिवर्तनातला व्यय आणि निर्माण झालेल्या ऊर्जेची शक्ती ही अत्यंत मर्यादित असेल. शिवाय एकूण नफा- नुकसानीचा विचार करता हा पर्याय अजिबात व्यवहार्य ठरत नाही. (अवांतर - मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेचा वापर हा स्वस्तातला पर्याय करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु आहेत -दुर्दैवाने भारतात ह्याबद्दल जेवढे व्हायला हवेत तेवढे प्रयत्न होत नाहीत. आपण व्यक्तिगत स्वरुपात सौर पॅनल बसवून छोट्याप्रमाणावर का होईना विजेचा प्रश्न आपल्यापुरता सोडवू शकतो. तेवढे केले तरी सुरुवात तर होईल.) चतुरंग

In reply to by चतुरंग

व्यंकट 16/04/2008 - 09:49
धन्यवाद चतुरंगसाहेब, उर्जा संपत नाही तिचे रुपांतर होते, असे असता, उष्णता आणि प्रकाश ह्यामार्गे रुपांतरीत झालेली उर्जा पुढे कशात रुपांतरीत होते? कारण ती नष्ट तर होत नाही, मग जर नष्ट होत नसेल तर ती एकतर कुठेतरी साचून राहीली असेल अथवा रुपांतरीत झाली असेल. मग ही जी कुणीतरी साठवली आहे ती कुंणी भिंतींनी ? फर्नीचर्नी ? ती ज्यानी साठवली ते तिला रिलीज करतात का? पुढे तिचे काय होते? थोडक्यात ह्या व्यय होणार्‍या उर्जेचा पूर्ण माग शास्त्रज्ञांनी काढला आहे का? समजा, एखाद्याने जेवण करून उर्जा मिळवली, ती त्याने घाम गाळून खर्च केली, समजा नुस्ता रिकामा चरखा चालवला... आता ही उर्जा कुठे गेली ? एकूणच कुठल्याही एकदा वापरून झालेली उर्जा जाते तरी कुठे? व्यंकट

ठणठणपाळराव, नचिकेताचे आख्यान चांगले झाले आहे. त्याचबरोबर 'आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान काय आहे ? हेही कधीतरी सांगावे असे वाटते. तसेच आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्वच 'चतुरंगाचे' विवेचनही झकास झाले आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 16/04/2008 - 11:16
अवांतर - लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.) हे आपण आपल्यापुरतं म्हणत असाल तर आमचं काहीच म्हणणं नाही. आपण काहीही म्हणावयास मुखत्यार आहात, नव्हे तो आपला अधिकारच आहे! परंतु आमच्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही 'प्रमाणभाषा' ही संकल्पनाच मानत नाही! भाषा ही प्रत्येकाकरता आहे, सर्वांकरता आहे. आमच्या मते अमूक भाषा म्हणजे 'प्रमाणभाषा' आणि तमूक भाषा म्हणजे 'अप्रमाणभाषा' अशी भाषेची कुठलीही बालिश वर्गवारी नसते! असो.. अर्थात, उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्‍याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका. हा हा हा! अहो कसला डोंबलाचा दुर्घट मार्ग आलाय? उगाच काय धारदार वस्तर्‍याचं पातं नी बितं?! आणि जळ्ळं आत्मज्ञान करून घ्यायला योग्य व्यक्ति तरी कशाला पाहिजे?! उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति धत् तुमची रांडेच्यांनो ;) च्यामारी, आपल्या जुन्या ग्रंथात 'आत्मज्ञान' हा शब्द उगाचच्या उगाच मारे जड वगैरे करून ठेवला आहे! उगाच च्यायला संस्कृतमधले जड जड शब्द वापरून एखद्याला आत्मज्ञान या शब्दाबद्दल आत्मियता वाटण्याऐवजी त्या शब्दाची भिती कशी बसेल हेच पाहिले आहे! 'आत्मज्ञान!', 'आत्मपाप्ती' ही म्हणजे काहीतरी भयंकर दुर्लभ गोष्ट आहे असाच एकूण सूर दिसतो! ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे! च्यामारी नचिकेताला आत्मप्राप्तीच्या इतक्या साध्या अन् सोप्या व्याख्याही समजू नयेत याचे नवल वाटते! आणि आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्‍या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते! असो... आपला, (आत्मानंदी!) तात्याभैय्या देवासकर, देवसकरांची कोठी, इंदौर. -- "अरे श्याम, बेटा ठेव ते गीतेचं पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे ते. पण आपण नाही ना तेवढे थोर!" "बेटा श्याम, न पेलणार्‍या गोळ्या घेऊ नयेत! मग त्या भांगेच्या असोत, वा आध्यात्माच्या असोत!" "न पेलणार्‍या पट्टीत गाऊ नये. सगळं गाणं बेसूर होऊन जातं! आपली पट्टी काळी दोन. पांढरी तीन, पांढरी चार पट्टी आपल्याला जमायची कशी?!" (इति काकाजी, नाटक तुझे आहे तुजपाशी)

आर्य 16/04/2008 - 11:50
आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्‍या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते! सुरलोकातील श्रेष्ठ देवतादेखील ह्या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत? च्यामरी मग कशाला पाहिजे असंल ज्ञान ? यमानेच जर अमरत्वाचे तत्वज्ञान सांगितले आहे तर तेच वाचुन काढायचं .............झालं आणि ओरिजनल पाहिजेच असेल तर "यमराज"च देतील ना ? नचिकेताला दिलं तस............मेल्यावर बधू...... बाकी चैतन्य काय आहे ह्या सगळ्यात? ते कुठून आलं तेवढ सांगा त्याचा पुढचा प्रवास / रुपांतरण मी सांगतो...... (योग्य व्यक्ति ?) आर्य

धमाल मुलगा 16/04/2008 - 12:11
गोष्ट म्हणून आवडली खरं,मोठं भारावून जायला झालं...ते आत्मा,परमात्मा,मुक्ति, श्वर-नश्वराचं गौडबंगाल...पण तात्याभैय्या देवासकरांच्या प्रतिक्रियेने जमिनीवर आलो.
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान? इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची. हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे! अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्‍याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका.
कस्सलं काय? एखादा मित्र बर्‍याच दिवसांनी त्याच्या घरी चाललाय, मोठ्या आनंदाने तुमच्यापाशी येतो,म्हणतो, "ओय यार! परसो मै घर जा रहा हूं | पूरा एक हफ्ता अपनी फॅमिलीके साथ बिताऊंगा |" त्याच्या नजरेत तरळणारा आनंद,चेहर्‍यावरचं हसु बघा...साथीच्या रोगासारखं तुमच्याही चेहर्‍यावर तेच झळकेल. त्याला कडकडून मिठी मारा, म्हणा, "जा साले, हफ्ताभर ऐश कर के आ. मॉं जीके हाथों बना जी भर के खाके आ | मेराभी प्रणाम देना उनको" आता पुन्हा त्याच्या डोळ्यात बघा...हे जग-बिग सगळं तिच्याआयला त्या आनंदावरुन ओवाळून टाकावसं नाही वाटलं तर सांगा! पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान ! ह्यावर मला 'आनंद' चित्रपटातलं एक वाक्य आठवतं... "बाबूमोशाय...जिंदगी बडी होनी चाहिये.....लम्बी नही| मै हसते-खेलते छे: महिने जिया, आप बिना हसे सौ साल जिये..बोलो कौन ज्यादा जिया? " [वाक्य तंतोतंत आठवत नाहीय्ये, पण आशय हाच आहे] अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? (निदान मला तरी) आपला, -(हृषीदांचा आनंद) ध मा ल

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 16/04/2008 - 12:27
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान? इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची. हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे! अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
+१

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 16/04/2008 - 12:57
पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान ! क्या बात है धमाल्या! सुंदर रे! आपला, (आत्मज्ञानी धमाल्याचा आत्मानंदी गुरू!) तात्या. :)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 18/04/2008 - 06:18
अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? अरे बापरे ! हे काय ? धमु बाळा तू चार्वाकाचे सारे तत्वज्ञान एका वाक्यात उतरलवस की रे.झकास. आजपासुन तूच आमचा नचिकेता

तुम्हाला बर्याच जणानी नचिकेताबद्द्ल माहीती दिली आहे, पण माझ्या वाचण्यात आलेली गोष्ट थोडी वेगळी आहे.त्याचे बाबा वाजश्रवस तेजस्वी ब्राम्हण होते,सन्स्क्रूतीच्या कार्यात आपले आयुष्य दिले, त्यामुळेच नचिकेत सुद्धा तेजस्वी होता. त्याने यमाकडे ३ वर मागितले १ वडिलाचा राग शान्त व्हावा. २ अग्निविद्या, ३ महत्वाच म्हणजे आत्मज्ञान ज्याची १ली पायरी - माणुस पशु नाही इश्वराविषयी क्रुतज्ञा बुद्धि जीवनात आणणे, २री पायरी मी माणूस आहे,म्हणुन माणुसकी प्रमाणे जगा, ३री पायरी अहं ब्रम्हास्मि | मी ईश्वर आहे, ईश्वर माझ्यातच आहे नचिकेताच्या वडिलांनी सर्वस्व दक्षिणा नावाचा यज्ञ केला होता कारण नचिकेत वडिलांप्रमाणॅच तेजस्वी होता त्याला स्वत:च्या बळावर सर्व मिळवावयाच होत.[ श्राद्ध भाग २ हे पुस्तक परम पुज्य पांडुरंग शास्त्री आटवले ह्यांच्या सद्वीचार दर्शन ह्यातुन घेतले आहे ] त्यात ही कथा सविस्तरपणे आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
(मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मला माहिती असलेली गोष्ट मी माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला अहे. लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.) नचिकेत्याचे आख्यान नचिकेत्याची गोष्ट कठ नामक उपनिषदात आढळते. नचिकेत्याचे वडील उद्दालक ऋषींनी एकदा विश्वजीत यज्ञाची तयारी केली होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे यज्ञ करणार्‍या ब्राम्हणांना गायी दान कराव्या लागत. उद्दालक ऋषींनी सगळ्या म्हातार्‍या झालेल्या आणि दूध आटलेल्या गायी देण्याचा सपाटा लावला. बापाची ही लबाडी नचिकेत्याच्या लक्षात आली.

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ६)

चतुरंग ·

धनंजय 15/04/2008 - 05:06
नेहमीसारखे मस्त. (आता माझा नेहमीचा छिद्रान्वेष :-) २६. जगती जरि ह्या होळी-दिवाळी एकदाच तरी वर्षाला, एकदाच फुलबाजी झडते, आणि दिव्यांची ती माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| पहिल्या ओळीतली दिवाळी काढून होळीलाच बलवान केले तर बरे होईल. दिवस आणि रात्र जसे समसमान वजनाचे, तसे हे दोन सण समसमान वजनाचे. शिवाय दिव्याच्या माळेला स्वतःचे क्रियापद द्यावे. नाहीतर दिव्याची माळ झडते असा विपरित अर्थ व्हायचा. ३०. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, वर्षा ऋतुसम मधुशाला ||३०|| "वर्षा ऋतुसम मधुशाला" ऐवजी "ऋतु वर्षेचा मधुशाला" किंवा "वर्षा ऋतूच मधुशाला" असे काही असावे. बाकी सर्व रूपके, आणि "सम" घालून हीच एक उपमा केलेली खटकते. "खटकते" म्हणजे काही फार नाही, हे सांगणे नलगे. छान चालू आहे.

विसोबा खेचर 15/04/2008 - 23:58
एकदाच प्रतिवर्षी येई होळी घेउन ज्वाळेला, एकदाच फुलबाजी झडते, लागे दीपांची माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| वा! वा! नेहमीप्रमाणेच सुरेख अनुवाद...! रंगा, तुझी ही मधुशाला म्हणजे मिपाच्या तुर्‍यातलं मोरपीस आहे रे! तात्या.

प्राजु 15/04/2008 - 23:59
सुंदर.. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा 16/04/2008 - 00:27
आणि आवडतेही आहे.. सर्व वाचून झाल्यावर प्रतिक्रिया देईन, पण उत्तम प्रकल्प आहे.

धनंजय 15/04/2008 - 05:06
नेहमीसारखे मस्त. (आता माझा नेहमीचा छिद्रान्वेष :-) २६. जगती जरि ह्या होळी-दिवाळी एकदाच तरी वर्षाला, एकदाच फुलबाजी झडते, आणि दिव्यांची ती माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| पहिल्या ओळीतली दिवाळी काढून होळीलाच बलवान केले तर बरे होईल. दिवस आणि रात्र जसे समसमान वजनाचे, तसे हे दोन सण समसमान वजनाचे. शिवाय दिव्याच्या माळेला स्वतःचे क्रियापद द्यावे. नाहीतर दिव्याची माळ झडते असा विपरित अर्थ व्हायचा. ३०. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, वर्षा ऋतुसम मधुशाला ||३०|| "वर्षा ऋतुसम मधुशाला" ऐवजी "ऋतु वर्षेचा मधुशाला" किंवा "वर्षा ऋतूच मधुशाला" असे काही असावे. बाकी सर्व रूपके, आणि "सम" घालून हीच एक उपमा केलेली खटकते. "खटकते" म्हणजे काही फार नाही, हे सांगणे नलगे. छान चालू आहे.

विसोबा खेचर 15/04/2008 - 23:58
एकदाच प्रतिवर्षी येई होळी घेउन ज्वाळेला, एकदाच फुलबाजी झडते, लागे दीपांची माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| वा! वा! नेहमीप्रमाणेच सुरेख अनुवाद...! रंगा, तुझी ही मधुशाला म्हणजे मिपाच्या तुर्‍यातलं मोरपीस आहे रे! तात्या.

प्राजु 15/04/2008 - 23:59
सुंदर.. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा 16/04/2008 - 00:27
आणि आवडतेही आहे.. सर्व वाचून झाल्यावर प्रतिक्रिया देईन, पण उत्तम प्रकल्प आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
3

एप्रिल फळ (५)

विजुभाऊ ·

त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् मसाला, फ़ोडणी, यांचा अभिशेक केला जातो. लोणच्या चे हे वर्णन आवडले.बाकी आंबा महात्म्य काय वर्णावे? स्वाती

व्यंकट 14/04/2008 - 20:35
>>आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल. ह्म्म चांगला व्यासंग आहे... व्यंकट

इनोबा म्हणे 14/04/2008 - 20:36
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. क्या बात है विजुभाऊ... अगदी भरलेले ताट डोळ्यासमोर आले... जिभेला पाणी सुटले की हो! एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात. अगदी बरोबर बोललात बघा. आमच्या घरी आता लोणचे वगैरे बनवत नाहीत,त्यामुळे बरणी तशीच पडून आहे.कुणाला पाहीजे असेल तर सांगा भौ. विजुभाऊ हा भाग सुद्धा पहील्या भागांसारखाच उत्तम जमला आहे.अगदी मुरलेल्या कैरीच्या लोणच्यासारखा... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

शितल 14/04/2008 - 20:42
लेखातील पहिला परिच्छेद वाचल्यावरच तो॑डा॑ला पाणी सुटले, मी आ॑ब्याच्या सीझनला भारतात नाही ह्याचे खुप दु:ख वाटते, लेख वाचल्यावर आजोळी कोकणात जाऊन आल्या सारखे वाटले, पाहु इथे देवगडचा हापुस आ॑बा कोठे मिळ्तो ते. शेवटी आम्ही पडलो कोकणी त्यामुळे आ॑बा, फणस, रातआ॑बे , काजु, करव्॑द, जा॑भुळ हे वीक पॉइ॑ट.

छोटा डॉन 14/04/2008 - 20:53
दिवसेंदिवस असे लिख लिहून "विजूभाऊंनी" आमचे येथील जगणे अशक्य करून टाकले आहे. कारण इथले वर्ण्न वाचून तोंड खवळते आणि ते शांत करायला काय तर "राईस्-रस्सम". असो. क्या करें ? "पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ........." हे मात्र जास्त होतं हं, असं लिहून आम्हाला का छळता ? थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ? चेष्टा नाही बरं का, नक्की समजा ... आता करा तयारी आमच्या आदरातिथ्याची .... अवांतर : बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!! छोटा डॉन काका [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे 14/04/2008 - 21:05
थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ? डॉन्या लेका काय समजलास काय विजुभाऊंना... अरे मागून तर बघ.तू एक मागशील तर ते दहा देतील. काय विजुभौ... बरोबर ना? बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!! कधीही बोलव भाऊ...आपण तयारच आहोत. (फूकट ते पौष्टीक माननारा) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 14/04/2008 - 21:08
"(फूकट ते पौष्टीक माननारा"" हा हा हा, पटलं आवडलं आणि आजपासून अंगिकारलं मग विजूभाऊंची पार्टी फिक्स !!! हाय दंगा आता ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

फु़कट ते पौष्टीक कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे 15/04/2008 - 18:58
कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे. हा माणूस कशाचा काय अर्थ काढेल काहि नेम नाही. ... :) माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे म्हणजे न्कम टॅक्सवाले का हो? || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

छोटा डॉन 15/04/2008 - 18:37
पेहवेसाहेब आम्ही आय टी वाले नाही .... आम्ही "आर & डी , इंजिन डिजाईन " या नावाखाली सध्या चालू असलेल्या इंजिनात काड्या करण्याचे काम करतो. सध्या "जगातील सगळ्यात मोठ्या कार मेकर" कंपनीत आमची "काड्यागिरी" चलू आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चंबा मुतनाळ 14/04/2008 - 20:59
विजुभाऊंना विधात्याने आंब्यांचा ब्रँड अँबॅसिडर करावा! त्रिलोकातून आंब्याला मागण्या येतील!! अप्रतीम भाग झाले आहेत सर्व. असेच येवूद्यात

पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् .......... सहीSSSSSSSSSSSSSS मला कुणीतरी सवाष्ण म्हणून जेवायला बोलावले आहे असे वाटले.:))))) विजुभाऊ, मस्त लेख लिहीला आहे. प्रत्येक लेखामधे काही ना काही तरी वैशिष्ठ्य आहे. लेख बुक मार्क करून ठेवण्यासारखे आहेत.(मी सेव्ह केले आहेत.) कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:))))

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे 15/04/2008 - 00:49
कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:)))) पोराला कॉपी करायला शिकवताय की काय? :) (ह.घ्या बरं का!) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. फारच बेष्ट वर्णन ...काय सांगू?? जेवण झालंय तरी पुन्हा भूक लागल्यासारखी वाटतेय....

In reply to by नंदन

विसोबा खेचर 15/04/2008 - 18:47
हा भागही अतिशय आवडला. वाढलेल्या पानाचं वर्णन तर बेष्टच! हेच म्हणतो! विजूभाऊ, तुम्ही कमाल केलीत! अहो आमच्यासारख्या खुद्द देवगडात, आंब्याफणसात वाढलेल्या माणसालादेखील असं लिहिणं सुचणार नाही! झक्कास लेखन... आपला, (देवगडातला एक छोटासा आंबा व्यापारी) तात्या.

रविराज 15/04/2008 - 06:45
विजुभाऊ, अतिशय छान लिहिल आहे. सगळेच भाग एकसे बढकर एक. मंत्रमुग्ध करतात. पुन्हा पुन्हा वाचवण्यासारखे. धन्यवाद. रवी.

सहज 15/04/2008 - 07:09
मस्त आंबामय करुन टाकलेत. पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. जबरी!! परवाचा तो फोटू अन हे वर्णन....... हं इंटरेस्टींग, मधे भारतीय टीम ७६ धावात आउट झाली होती त्या दिवशी हा बेत होता की काय?

मनापासुन 15/04/2008 - 07:51
बाकी वर्णनाबद्दल काही बोलायलाच नको पण यातले मला आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते. हे मनापासुन आवडले. डोळ्यात पाणी आले.

प्रमोद देव 15/04/2008 - 09:10
विजुभाऊ, जिथे, आंबा ह्या रसाळ फळाबद्दल, तितकेच रसाळ आणि भरभरून लिहिण्यासारखे असू शकते , ही कल्पनाही आमच्यासारख्यांना पेलत नाही, तिथे तुम्ही हे ५-५ भाग कसे लिहू शकता? ह्याची मात्र कमाल वाटते. आपल्या कल्पना शक्तीला आणि लेखन कर्तृत्वाला आमचा कडक सलाम! आता आंब्याचे नुसते नाव निघताच त्याबरोबर विजुभाऊ देखिल आमच्या नजरेसमोर येतील. आजवरचे तुमचे चहा,आंबा असे विविध प्रकारचे लेखन वाचल्यावर मला आपल्याला विजुभाऊ च्या ऐवजी "रसिकभाऊ किंवा रसिकलाल" असे म्हणावेसे वाटू लागलेय. रोजच्या खाण्यातल्या ह्या पदार्थांबद्दल इतके भरभरून बोलणारा आणि लिहिणारा तुमच्यासारखा माणूस खरंच रसिक दिलाचाच असणार ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. गालबोट: आता तुमचे हे इतके सुंदर लिखाण वाचल्यावर त्याला दृष्ट लागू नये म्हणून हे एक गालबोट....... विजुभाऊ उत्साहाच्या भरात तुम्ही लिहिता आणि लगेच चढवता, तेव्हा इथे ते चढवण्या आधी दोनतीन वेळा नीट वाचून घ्यावे अशी अपेक्षा करतो. ज्यामुळे टंकलेखनात होणार्‍या अक्षम्य चुका तुमच्या तुम्हालाच दिसतील आणि त्यात योग्य त्या सुधारणा करता आल्यामुळे वाचताना होणारा रसभंग खूपच कमी होईल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा 15/04/2008 - 14:26
विजुभाऊ सध्या 'होमग्राऊंडवर' खेळत आहेतसं दिसतंय. धडाधड सेन्च्युर्‍या काढताहेत. काय हे भाऊ? आता तुम्हाला नक्की काय म्हणायचं? विजुभाऊ 'चहा' ? की आंबासम्राट विजुभाऊ?
घरात् अशी एखादी पंगत बसलेली असते. मुले लेकी सुना जावई नातवंडे सगळे हसत् खिदळत् थट्ट मस्करी करत् गप्पा मारत् आमरसावर् ताव मारत् असतात. आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.
ओहोहो !!!! अरे काय रे हावरटांनो? लेको, आंबापुराण आणि केळीच्या पानावरच्या जेवणात इतके गुंग झालात की विजुभाऊंनी हळूच घेतलेली एक हलकीशी रोमॅन्टीक गिरकी तुमच्या लक्षातच आली नाही? आयला! लय भारी भाऊ :-) नजरेसमोर आलं दृष्य! सगळे मस्त दंगा-धूडगुस घालत जेवताहेत...आणि आजी-आजोबांची नजरानजर होते....दोघं एकमेकांशी नजरेनेच बोलतात...बस्स..एकच क्षण..पुरेसा आहे तेव्हढाच...पटकन आजी लाजते. त्या वाढत्या वयानुसार गोडवा वाढत गेलेल्या चेहर्‍यावर एक गोडसं अस्फुट हसु फुटतं...ते बघून आजोबाही मिशीतल्या मिशीत हळूच हसतात..आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते...... आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी ! आपला (तृप्त) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 15/04/2008 - 14:30
म्हणतो. उत्तम लिखाण. बाकी हे असे उत्तमोताम लेख लिहिता तुम्ही आम्हाला जोरदार भुक लागते हो, हाण हादडतो आम्ही, वजनाची चिंता. :(

सगळेच भाग एकापेक्षा एक (ते महागुरूवाले नाही हा॑) मस्त झाले आहेत.. तुमचा देवगडा॑स सत्कार केला पाहिजे (देवगड गा॑व हो, 'म्हातारो देवगडाक गेलो' ते नव्हे ;))

विदेश 15/04/2008 - 17:23
प्रभाकर पेठकरानी समोर ठेवली आहे आमरसपुरीची थाळी आणि विजूभाऊनी चालवलाय पंगतीतला आग्रह! दोन्ही एकदम्बेषटच. अ......आआआआआआ....अब्ब!

विजुभाऊ 15/04/2008 - 22:09
आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते...... आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी ! आपला (तृप्त) ध मा ल. धमाल्या मला तुझी ("तृप्त) ध मा ल." सिग्नेचर आवडली

त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् मसाला, फ़ोडणी, यांचा अभिशेक केला जातो. लोणच्या चे हे वर्णन आवडले.बाकी आंबा महात्म्य काय वर्णावे? स्वाती

व्यंकट 14/04/2008 - 20:35
>>आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल. ह्म्म चांगला व्यासंग आहे... व्यंकट

इनोबा म्हणे 14/04/2008 - 20:36
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. क्या बात है विजुभाऊ... अगदी भरलेले ताट डोळ्यासमोर आले... जिभेला पाणी सुटले की हो! एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात. अगदी बरोबर बोललात बघा. आमच्या घरी आता लोणचे वगैरे बनवत नाहीत,त्यामुळे बरणी तशीच पडून आहे.कुणाला पाहीजे असेल तर सांगा भौ. विजुभाऊ हा भाग सुद्धा पहील्या भागांसारखाच उत्तम जमला आहे.अगदी मुरलेल्या कैरीच्या लोणच्यासारखा... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

शितल 14/04/2008 - 20:42
लेखातील पहिला परिच्छेद वाचल्यावरच तो॑डा॑ला पाणी सुटले, मी आ॑ब्याच्या सीझनला भारतात नाही ह्याचे खुप दु:ख वाटते, लेख वाचल्यावर आजोळी कोकणात जाऊन आल्या सारखे वाटले, पाहु इथे देवगडचा हापुस आ॑बा कोठे मिळ्तो ते. शेवटी आम्ही पडलो कोकणी त्यामुळे आ॑बा, फणस, रातआ॑बे , काजु, करव्॑द, जा॑भुळ हे वीक पॉइ॑ट.

छोटा डॉन 14/04/2008 - 20:53
दिवसेंदिवस असे लिख लिहून "विजूभाऊंनी" आमचे येथील जगणे अशक्य करून टाकले आहे. कारण इथले वर्ण्न वाचून तोंड खवळते आणि ते शांत करायला काय तर "राईस्-रस्सम". असो. क्या करें ? "पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ........." हे मात्र जास्त होतं हं, असं लिहून आम्हाला का छळता ? थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ? चेष्टा नाही बरं का, नक्की समजा ... आता करा तयारी आमच्या आदरातिथ्याची .... अवांतर : बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!! छोटा डॉन काका [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे 14/04/2008 - 21:05
थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ? डॉन्या लेका काय समजलास काय विजुभाऊंना... अरे मागून तर बघ.तू एक मागशील तर ते दहा देतील. काय विजुभौ... बरोबर ना? बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!! कधीही बोलव भाऊ...आपण तयारच आहोत. (फूकट ते पौष्टीक माननारा) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 14/04/2008 - 21:08
"(फूकट ते पौष्टीक माननारा"" हा हा हा, पटलं आवडलं आणि आजपासून अंगिकारलं मग विजूभाऊंची पार्टी फिक्स !!! हाय दंगा आता ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

फु़कट ते पौष्टीक कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे 15/04/2008 - 18:58
कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे. हा माणूस कशाचा काय अर्थ काढेल काहि नेम नाही. ... :) माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे म्हणजे न्कम टॅक्सवाले का हो? || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

छोटा डॉन 15/04/2008 - 18:37
पेहवेसाहेब आम्ही आय टी वाले नाही .... आम्ही "आर & डी , इंजिन डिजाईन " या नावाखाली सध्या चालू असलेल्या इंजिनात काड्या करण्याचे काम करतो. सध्या "जगातील सगळ्यात मोठ्या कार मेकर" कंपनीत आमची "काड्यागिरी" चलू आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चंबा मुतनाळ 14/04/2008 - 20:59
विजुभाऊंना विधात्याने आंब्यांचा ब्रँड अँबॅसिडर करावा! त्रिलोकातून आंब्याला मागण्या येतील!! अप्रतीम भाग झाले आहेत सर्व. असेच येवूद्यात

पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् .......... सहीSSSSSSSSSSSSSS मला कुणीतरी सवाष्ण म्हणून जेवायला बोलावले आहे असे वाटले.:))))) विजुभाऊ, मस्त लेख लिहीला आहे. प्रत्येक लेखामधे काही ना काही तरी वैशिष्ठ्य आहे. लेख बुक मार्क करून ठेवण्यासारखे आहेत.(मी सेव्ह केले आहेत.) कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:))))

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे 15/04/2008 - 00:49
कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:)))) पोराला कॉपी करायला शिकवताय की काय? :) (ह.घ्या बरं का!) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. फारच बेष्ट वर्णन ...काय सांगू?? जेवण झालंय तरी पुन्हा भूक लागल्यासारखी वाटतेय....

In reply to by नंदन

विसोबा खेचर 15/04/2008 - 18:47
हा भागही अतिशय आवडला. वाढलेल्या पानाचं वर्णन तर बेष्टच! हेच म्हणतो! विजूभाऊ, तुम्ही कमाल केलीत! अहो आमच्यासारख्या खुद्द देवगडात, आंब्याफणसात वाढलेल्या माणसालादेखील असं लिहिणं सुचणार नाही! झक्कास लेखन... आपला, (देवगडातला एक छोटासा आंबा व्यापारी) तात्या.

रविराज 15/04/2008 - 06:45
विजुभाऊ, अतिशय छान लिहिल आहे. सगळेच भाग एकसे बढकर एक. मंत्रमुग्ध करतात. पुन्हा पुन्हा वाचवण्यासारखे. धन्यवाद. रवी.

सहज 15/04/2008 - 07:09
मस्त आंबामय करुन टाकलेत. पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. जबरी!! परवाचा तो फोटू अन हे वर्णन....... हं इंटरेस्टींग, मधे भारतीय टीम ७६ धावात आउट झाली होती त्या दिवशी हा बेत होता की काय?

मनापासुन 15/04/2008 - 07:51
बाकी वर्णनाबद्दल काही बोलायलाच नको पण यातले मला आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते. हे मनापासुन आवडले. डोळ्यात पाणी आले.

प्रमोद देव 15/04/2008 - 09:10
विजुभाऊ, जिथे, आंबा ह्या रसाळ फळाबद्दल, तितकेच रसाळ आणि भरभरून लिहिण्यासारखे असू शकते , ही कल्पनाही आमच्यासारख्यांना पेलत नाही, तिथे तुम्ही हे ५-५ भाग कसे लिहू शकता? ह्याची मात्र कमाल वाटते. आपल्या कल्पना शक्तीला आणि लेखन कर्तृत्वाला आमचा कडक सलाम! आता आंब्याचे नुसते नाव निघताच त्याबरोबर विजुभाऊ देखिल आमच्या नजरेसमोर येतील. आजवरचे तुमचे चहा,आंबा असे विविध प्रकारचे लेखन वाचल्यावर मला आपल्याला विजुभाऊ च्या ऐवजी "रसिकभाऊ किंवा रसिकलाल" असे म्हणावेसे वाटू लागलेय. रोजच्या खाण्यातल्या ह्या पदार्थांबद्दल इतके भरभरून बोलणारा आणि लिहिणारा तुमच्यासारखा माणूस खरंच रसिक दिलाचाच असणार ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. गालबोट: आता तुमचे हे इतके सुंदर लिखाण वाचल्यावर त्याला दृष्ट लागू नये म्हणून हे एक गालबोट....... विजुभाऊ उत्साहाच्या भरात तुम्ही लिहिता आणि लगेच चढवता, तेव्हा इथे ते चढवण्या आधी दोनतीन वेळा नीट वाचून घ्यावे अशी अपेक्षा करतो. ज्यामुळे टंकलेखनात होणार्‍या अक्षम्य चुका तुमच्या तुम्हालाच दिसतील आणि त्यात योग्य त्या सुधारणा करता आल्यामुळे वाचताना होणारा रसभंग खूपच कमी होईल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा 15/04/2008 - 14:26
विजुभाऊ सध्या 'होमग्राऊंडवर' खेळत आहेतसं दिसतंय. धडाधड सेन्च्युर्‍या काढताहेत. काय हे भाऊ? आता तुम्हाला नक्की काय म्हणायचं? विजुभाऊ 'चहा' ? की आंबासम्राट विजुभाऊ?
घरात् अशी एखादी पंगत बसलेली असते. मुले लेकी सुना जावई नातवंडे सगळे हसत् खिदळत् थट्ट मस्करी करत् गप्पा मारत् आमरसावर् ताव मारत् असतात. आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.
ओहोहो !!!! अरे काय रे हावरटांनो? लेको, आंबापुराण आणि केळीच्या पानावरच्या जेवणात इतके गुंग झालात की विजुभाऊंनी हळूच घेतलेली एक हलकीशी रोमॅन्टीक गिरकी तुमच्या लक्षातच आली नाही? आयला! लय भारी भाऊ :-) नजरेसमोर आलं दृष्य! सगळे मस्त दंगा-धूडगुस घालत जेवताहेत...आणि आजी-आजोबांची नजरानजर होते....दोघं एकमेकांशी नजरेनेच बोलतात...बस्स..एकच क्षण..पुरेसा आहे तेव्हढाच...पटकन आजी लाजते. त्या वाढत्या वयानुसार गोडवा वाढत गेलेल्या चेहर्‍यावर एक गोडसं अस्फुट हसु फुटतं...ते बघून आजोबाही मिशीतल्या मिशीत हळूच हसतात..आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते...... आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी ! आपला (तृप्त) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 15/04/2008 - 14:30
म्हणतो. उत्तम लिखाण. बाकी हे असे उत्तमोताम लेख लिहिता तुम्ही आम्हाला जोरदार भुक लागते हो, हाण हादडतो आम्ही, वजनाची चिंता. :(

सगळेच भाग एकापेक्षा एक (ते महागुरूवाले नाही हा॑) मस्त झाले आहेत.. तुमचा देवगडा॑स सत्कार केला पाहिजे (देवगड गा॑व हो, 'म्हातारो देवगडाक गेलो' ते नव्हे ;))

विदेश 15/04/2008 - 17:23
प्रभाकर पेठकरानी समोर ठेवली आहे आमरसपुरीची थाळी आणि विजूभाऊनी चालवलाय पंगतीतला आग्रह! दोन्ही एकदम्बेषटच. अ......आआआआआआ....अब्ब!

विजुभाऊ 15/04/2008 - 22:09
आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते...... आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी ! आपला (तृप्त) ध मा ल. धमाल्या मला तुझी ("तृप्त) ध मा ल." सिग्नेचर आवडली
लेखनविषय:
लेखनप्रकार
आंबे चिरुन ,तुकडे करुन फोडी करुन , घोळुन चोखुन, रस काढुन, आटवुन , उन्हात वाळवुन, बर्फी करुन, दुधात मिसळून, वाफवुन, उकडुन,कच्चे , पिकलेले, ड्राय करुन, पाकात मुरवुन, मसाल्यात मुरवुन असे अनेक प्रकारे खाल्ले जातात. पण् इतर आंब्याला भाजी मधे टाकण्याचा अगोचर् पणा कोणी कधी केला नाही. सिकंदर् समोर इभ्या राहीलेल्या पोरस् राजाच्या भाषेत म्हणायचे झाले तर् सम्राटाला सम्राटासारखेच् वागवले जाते. नाही म्हणायला गुजराती लोकांत् "फ़जितो" नामक् आंब्याचे कढी सारखे पेय केले जाते. नावावरुन् कल्पना करायला गेलो तर फ़जिती च् होते.

विनोद हवे

विजय गणेश खर्डे ·

विजुभाऊ 14/04/2008 - 20:25
या संस्थळा वरचे लोक समर्थांची भक्त आहेत. टवाळा आवडे विनोद : हे वाक्य त्यान्चे घोष वाक्य आहे

नीलकांत 14/04/2008 - 20:58
या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. नीलकांत

In reply to by नीलकांत

विकास 15/04/2008 - 20:12
>>>या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. त्यातील विनोद वाचताना नक्की कधी हसायचे ते समजत नाही. त्यांनी निदान संकेतस्थळावर तरी पार्श्वभूमीवर महेंद्र कपूरचे गाणे "हसा मुलांनो हसा.." लावले पाहीजे असे वाटते.

विदेश 14/04/2008 - 22:39
"शोध" मध्ये टाईप करा-विनोद तुम्हाला हवे असलेले विनोद शोधा.

In reply to by आंबोळी

छोटा डॉन 15/04/2008 - 20:18
"आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;)))"" ते ठीक आहे हो, पण क्लास मध्ये तुम्ही तुमचा अख्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध असलेला कंदील लावणार नाही ना नाहीतर आम्हाला फुकटच मरावे लागेल ... फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... हा पण विनोद होता बरं का .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे 15/04/2008 - 21:04
फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 15/04/2008 - 21:53
"च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका..." नाही हो विनोबा, आता त्याला विनोद पाहिजे म्हणून म्हटले . बाकी तुस्सी डायलाक दा जवाब नही ,,, छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 14/04/2008 - 20:25
या संस्थळा वरचे लोक समर्थांची भक्त आहेत. टवाळा आवडे विनोद : हे वाक्य त्यान्चे घोष वाक्य आहे

नीलकांत 14/04/2008 - 20:58
या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. नीलकांत

In reply to by नीलकांत

विकास 15/04/2008 - 20:12
>>>या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. त्यातील विनोद वाचताना नक्की कधी हसायचे ते समजत नाही. त्यांनी निदान संकेतस्थळावर तरी पार्श्वभूमीवर महेंद्र कपूरचे गाणे "हसा मुलांनो हसा.." लावले पाहीजे असे वाटते.

विदेश 14/04/2008 - 22:39
"शोध" मध्ये टाईप करा-विनोद तुम्हाला हवे असलेले विनोद शोधा.

In reply to by आंबोळी

छोटा डॉन 15/04/2008 - 20:18
"आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;)))"" ते ठीक आहे हो, पण क्लास मध्ये तुम्ही तुमचा अख्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध असलेला कंदील लावणार नाही ना नाहीतर आम्हाला फुकटच मरावे लागेल ... फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... हा पण विनोद होता बरं का .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे 15/04/2008 - 21:04
फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 15/04/2008 - 21:53
"च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका..." नाही हो विनोबा, आता त्याला विनोद पाहिजे म्हणून म्हटले . बाकी तुस्सी डायलाक दा जवाब नही ,,, छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मला ह्या साईट वर विनोद कोठे मिळतील?

मी शिवाजी बोलतोय !

उदय सप्रे ·
लेखनविषय:
आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठ - म्हणजे तुमच्या भाषेत हां ! आज तुमच्यापैकी काहींच्या मते माझी जयंती-बाकी काहींच्या मते ती ६-एप्रिल रोजी आहे !

भारतरत्नाची जयंती

विकि ·

माझीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपुर्ण आदरांजली. अवांतरः मागच्याच आठवड्यात मी डॉ.नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक वाचले. त्यावेळी डॉ.आंबेडकर यांची आठवण त्या पुस्तकामुळे झाली होती.

नीलकांत 14/04/2008 - 16:42
babasaheba भारताच्या इतिहासाला नवं वळण लावणार्‍या, अनेक अर्थानं समाजाला भरीव योगदान देणार्‍या या महामानवास विनम्र अभिवादन ! उध्दरली कोटी कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे ! - वामनदादा कर्डक. ------------------------------------------------ बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तुत्वाला माझं वंदन. नीलकांत

विसोबा खेचर 14/04/2008 - 19:06
महामानवाला माझेही लाख सलाम! खूप मोठा माणूस! परंतु खुद्द त्यांच्या अनुयायांनाच त्यांचं मोठेपण कळलं नाही, हे दुर्दैव! तात्या.

चतुरंग 14/04/2008 - 20:21
शिका, संघटित व्हा, आणि तुमच्या बरोबर सगळ्यांना घेऊन पुढे चला हा संदेश आचरणात आणणार्‍या; जातिभेदाची भयाण दरी उल्लंघून जाण्याचा भीमपराक्रम करणार्‍या; भारतासारख्या खंडप्राय देशाला एक अभिनव अशी राज्यघटना प्रदान करण्यात फार मोठा सहभाग असलेल्या; देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्‍या - ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट मिळवली तेथील लेहमन वाचनालयात त्यांच्या सन्मानार्थ ब्राँझ अर्धपुतळा उभारण्यात आलाय! आयुष्यभर ज्ञानसाधना करुन ज्ञान हाच खर्‍या मुक्तीचा राजमार्ग आहे हे सिध्द करणार्‍या महामानवाला प्रणाम! चतुरंग

सगळ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सदिच्छा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार - सदानंद मोरे https://bit.ly/2Ii5lkN दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती - अंकुश कदम https://bit.ly/2E0rnVZ साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले? https://bit.ly/2DaK3kW धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण https://bit.ly/2Uk1u8h डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख https://bit.ly/2Hb0S3Q संविधान म्हणजे काय रे भाऊ! - राजा शिरगुप्पे https://bit.ly/2CKb8dV सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही - जयदेव डोळे https://bit.ly/2DBdMnR -दिलीप बिरुटे

माझीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपुर्ण आदरांजली. अवांतरः मागच्याच आठवड्यात मी डॉ.नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक वाचले. त्यावेळी डॉ.आंबेडकर यांची आठवण त्या पुस्तकामुळे झाली होती.

नीलकांत 14/04/2008 - 16:42
babasaheba भारताच्या इतिहासाला नवं वळण लावणार्‍या, अनेक अर्थानं समाजाला भरीव योगदान देणार्‍या या महामानवास विनम्र अभिवादन ! उध्दरली कोटी कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे ! - वामनदादा कर्डक. ------------------------------------------------ बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तुत्वाला माझं वंदन. नीलकांत

विसोबा खेचर 14/04/2008 - 19:06
महामानवाला माझेही लाख सलाम! खूप मोठा माणूस! परंतु खुद्द त्यांच्या अनुयायांनाच त्यांचं मोठेपण कळलं नाही, हे दुर्दैव! तात्या.

चतुरंग 14/04/2008 - 20:21
शिका, संघटित व्हा, आणि तुमच्या बरोबर सगळ्यांना घेऊन पुढे चला हा संदेश आचरणात आणणार्‍या; जातिभेदाची भयाण दरी उल्लंघून जाण्याचा भीमपराक्रम करणार्‍या; भारतासारख्या खंडप्राय देशाला एक अभिनव अशी राज्यघटना प्रदान करण्यात फार मोठा सहभाग असलेल्या; देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्‍या - ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट मिळवली तेथील लेहमन वाचनालयात त्यांच्या सन्मानार्थ ब्राँझ अर्धपुतळा उभारण्यात आलाय! आयुष्यभर ज्ञानसाधना करुन ज्ञान हाच खर्‍या मुक्तीचा राजमार्ग आहे हे सिध्द करणार्‍या महामानवाला प्रणाम! चतुरंग

सगळ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सदिच्छा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार - सदानंद मोरे https://bit.ly/2Ii5lkN दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती - अंकुश कदम https://bit.ly/2E0rnVZ साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले? https://bit.ly/2DaK3kW धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण https://bit.ly/2Uk1u8h डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख https://bit.ly/2Hb0S3Q संविधान म्हणजे काय रे भाऊ! - राजा शिरगुप्पे https://bit.ly/2CKb8dV सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही - जयदेव डोळे https://bit.ly/2DBdMnR -दिलीप बिरुटे
आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि अनावश्यक गोष्टी संपादित केलेल्या आहेत. :संपादक