नचिकेत्याचे आख्यान
लेखनप्रकार
(मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मला माहिती असलेली गोष्ट मी माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला अहे. लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.)
नचिकेत्याचे आख्यान
नचिकेत्याची गोष्ट कठ नामक उपनिषदात आढळते. नचिकेत्याचे वडील उद्दालक ऋषींनी एकदा विश्वजीत यज्ञाची तयारी केली होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे यज्ञ करणार्या ब्राम्हणांना गायी दान कराव्या लागत. उद्दालक ऋषींनी सगळ्या म्हातार्या झालेल्या आणि दूध आटलेल्या गायी देण्याचा सपाटा लावला. बापाची ही लबाडी नचिकेत्याच्या लक्षात आली. मुळातच धार्मिक वृत्तीचा, सत्त्वगुणी नचिकेता 'अशाने आपल्या वडिलांना पुण्य कसे लाभणार' या विचाराने अस्वस्थ झाला. जर आपल्या वडिलांना पुण्य मिळवायचे असेल तर त्यांनी एखादी खरोखरची मौल्यवान वस्तू दान केली पाहिजे असे त्यास वाटू लागले. विचार करू जाता आपण स्वतःच आपल्या वडिलांची एकप्रकारे संपत्तीच आहोत असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आपलेच दान जर त्यानी केले तर त्यांना पुण्य मिळू शकेल असे त्यास वाटले. अशा रितीने बापाकरता आत्मत्याग करायला नचिकेता तयार झाला.
वडिलांकडे जाऊन नचिकेत्याने त्यांना प्रश्न केला, "बाबा, तुम्ही मला कोणाला दान केले आहे?" मुलाचा हा प्रश्न पोरकट वाटून बापाने त्याकडे प्रथम दुर्लक्ष केले. पण बाप उत्तर देत नाहीसा पाहून नचिकेता पुनःपुन्हा तोच प्रश्न विचारू लागला. शेवटी संतापून जाऊन बाप कडाडला, "जा, मी तुला म्रुत्युला दान दिले आहे." हे ऐकून नचिकेता चमकला. पण बापाचा शब्द खरा करण्यासठी तो खरोखरच आत्मबळावर यमलोकी जाऊन उपस्थित झाला.
तेव्हा दुर्दैवाने यमराज तिथे नव्हते. यमलोकीच्या द्वारपालांच्या विनवण्यांनंतरही नचिकेता यमराजांची वाट बघत दाराशीच तीन दिवस आणि तीन रात्री बसून राहिला. परत आल्यावर नचिकेत्याची सगळी इत्थंभूत हकिगत ऐकून यमराज कळवळले व आतिथ्यात झालेल्या कमतरतेची भरपाई म्हणून प्रत्येक दिवसासाठी एक असे एकूण तीन वर त्यांनी नचिकेत्यास देऊ केले.
तेव्हा नचिकेत्याने 'माझ्या वडिलांचा माझ्यावरचा रोष मावळो आणि त्यांना यज्ञाचे पुण्य प्राप्त होवो' असा पहिला वर मागितला. दुसर्या वराने त्याने अग्निविद्या मागितली. तिसर्या वराच्या वेळेला मात्र त्याने एका गूढ प्रश्नाला हात घातला. तो म्हणाला, "जेव्हा माणूस मरतो तेव्हा काहीजण म्हणतात की तो पूर्णपणे नष्ट होतो तर काही म्हणतात की मृत्युच्या वेळेला फक्त शरीरपात होतो व शरीरातील 'खरा माणूस' तत्वतः जिवंतच राहतो (अस्ति इति एके नास्ति इति च एके). तुम्ही मृत्युदेवता आहात. तुम्ही मला सत्य काय ते सांगा. हेच मी तिसरा वर म्हणुन मागत आहे."
एका बालकाने विचारलेला हा प्रश्न ऐकून यमराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी नचिकेत्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते म्हणाले, "मुला, हा प्रश्न तू विचारू नकोस. ह्या प्रश्नाचा उलगड भल्याभल्यांना होत नाही. सुरलोकातील श्रेष्ठ देवतादेखील ह्या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत. तू दुसरे काहीतरी माग." नचिकेता तत्काळ उत्तरला, "तसेच जर असेल तर माझी तुमच्याशीच गाठ पडली हे माझे भाग्यच. देवतांकडूनही जे ज्ञान मिळणार नाही ते मिळवण्याची संधी मी अशी वाया घालवू का?" यमराज यावर निरूत्तर झाले.
मग त्यांनी नचिकेत्याला अनेक आमिषे दाखवायला सुरुवात केली. ते म्हणले, " तू या प्रश्नाऐवजी पृथ्वीवरचे अनेक उत्तमोत्तम उपभोग मागून घे. दिर्घायुष्य माग. निष्कंटक सार्वभौम साम्राज्य माग. पुत्रपौत्र माग. या बघ, या दिव्य रथात बसलेल्या आणि पुरुषांना रमवण्यात कुशल अशा अप्सरा माग. यातले काहीच नको असेल तर ज्याने काहीही विकत घेत येते अशी धनसंपत्ती माग. मी सिद्धसंकल्प आहे. मी तुला कुबेरापेक्षाही अधिक श्रीमंत करू शकतो. सुरलोकातील देवगणांनाही दुर्लभ असे उपभोग तुला देऊ शकतो. तू काय हवे ते माग पण तुझा हा प्रश्न परत घे." नचिकेता म्हाणाला, "यमराज, तुम्ही हे इतके ज्ञानी असून हे काय बोलता? तुम्ही दाखवलेल्या या सगळ्याच वस्तू क्षणभंगुर नाहीत काय? या सगळ्या वस्तू आज कितीही चांगल्या दिसत असल्या तरी त्यांची अंतिम गती ही मृत्यु - तुम्ही स्वतःच - नाही काय? असे असून का माझी अशी परीक्षा घेता?"
पुनःपुन्हा दाखविलेल्या आकर्षणांनतरही नचिकेत जराही चळत नाही हे बघून यमराज संतुष्ट झाले. नचिकेत्याच्या वैराग्याची प्रशंसा करून त्यांनी त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगितले.
ते ज्ञान घेऊन नचिकेता मृत्युलोकी परत आला आणि आपण केलेली भयानक चूक लक्षात येऊन कष्टी झलेल्या आपल्या वडिलांना भेटला. त्यंना त्याने सगळी हकिगत ऐकवली आणि त्यांना शांत केले. अशा प्रकारे नचिकेता नंतरच्या काळात सगळ्या कुमारवयीन साधकांसठी एक आदर्श बनून राहिला.
याच उपनिषदात यमराज सर्वांनाच आवाहन करतात,
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया
दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति
अर्थात, उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका.
ठणठणपाळ
वाचने
13889
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
उत्तम
In reply to उत्तम by आनंदयात्री
असेच
ज्ञानात भर
नचिकेत्या
In reply to नचिकेत्या by ठणठणपाळ
नचिकेत्या का नचिकेता ?
In reply to नचिकेत्या by ठणठणपाळ
छान
In reply to छान by धनंजय
सहमत ....
In reply to सहमत .... by सागर
धन्यवाद
आभारी
In reply to आभारी by धमाल मुलगा
आभार
आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान
In reply to आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान by विजुभाऊ
एक शंका
In reply to एक शंका by मुक्तसुनीत
आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व
In reply to आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व by चतुरंग
सुरेख विवेचन !
In reply to आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व by चतुरंग
आत्म्याची संख्या...
In reply to आत्म्याची संख्या... by एक
प्रत्येक जिवंत गोष्टीत चैतन्य असतेच.
In reply to आत्म्याची संख्या... by एक
आत्म्याची
In reply to आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व by चतुरंग
वा !
In reply to आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान by विजुभाऊ
रुपांतर
In reply to रुपांतर by व्यंकट
१०० वॉटच्या दिव्याची ऊर्जा
In reply to १०० वॉटच्या दिव्याची ऊर्जा by चतुरंग
धन्यवाद
In reply to धन्यवाद by व्यंकट
ऊर्जा आणि तिचे स्वरुप हा फार मोठा विषय आहे.
In reply to ऊर्जा आणि तिचे स्वरुप हा फार मोठा विषय आहे. by चतुरंग
धन्यवाद
उत्तम लेख
सुंदर कथा !!!
न पेलणार्या गोळ्या!
१०० % मान्य
हम्म्म्म्म......
In reply to हम्म्म्म्म...... by धमाल मुलगा
टाळ्या
In reply to हम्म्म्म्म...... by धमाल मुलगा
क्या बात है..
In reply to हम्म्म्म्म...... by धमाल मुलगा
आजपासुन तूच आमचा नचिकेता
नचिकेत