मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात...

अविनाश ओगले ·

मी कधीही त्यांचा आवाज ऐकला नाही, पण माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत ते रेडिओ सिलोन चे भक्त. त्यांच्याकडून खूप ऐकले आहे. मी कल्पना करू शकतो रेडिओ सिलोन च्या भक्तांसाठी हा अनुभव काय असेल. बिपिन.

चतुरंग 23/06/2008 - 02:14
फक्त 'आकाशवाणी' वरुन ऐकू येणारा आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळणे हे तसे रोमांचित करणारेच! :) (पूर्वी अमीन सयानीचेही निवेदन असेच असे. त्याच्या खास अनुनासिक, उत्साही आवाजात त्याने "आवाज की दुनियां के दोस्तो, अब अगला गाना जो आप सुनने जा रहे है, वो है रफी साहबका चौदवी का चांद"... असे काही म्हटले की जिवाचे कान करुन ऐकणे म्हणजे काय त्याचा प्रत्यय येत असे.) चतुरंग

मी कधीही त्यांचा आवाज ऐकला नाही, पण माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत ते रेडिओ सिलोन चे भक्त. त्यांच्याकडून खूप ऐकले आहे. मी कल्पना करू शकतो रेडिओ सिलोन च्या भक्तांसाठी हा अनुभव काय असेल. बिपिन.

चतुरंग 23/06/2008 - 02:14
फक्त 'आकाशवाणी' वरुन ऐकू येणारा आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळणे हे तसे रोमांचित करणारेच! :) (पूर्वी अमीन सयानीचेही निवेदन असेच असे. त्याच्या खास अनुनासिक, उत्साही आवाजात त्याने "आवाज की दुनियां के दोस्तो, अब अगला गाना जो आप सुनने जा रहे है, वो है रफी साहबका चौदवी का चांद"... असे काही म्हटले की जिवाचे कान करुन ऐकणे म्हणजे काय त्याचा प्रत्यय येत असे.) चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार
रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा बेळगावात... आजची संध्याकाळ बेळगावकरांच्या आयुष्यातील एक अनोखी, अविस्मरणीय संध्याकाळ ठरली आहे. रेडिओ सिलोनच्या सुप्रसिद्ध निवेदिका पद्मिनी परेरा यांनी आज बेळगावमध्ये एक कार्यक्रम सादर केला. बेळगावात सध्या वास्तव्यास असलेले जुन्या चित्रपट गीतांचे रसिक संग्राहक विजय नाफडे यांनी हा योग जुळवून आणला. त्यांनी निवडलेली तीस जुनी गाणी पद्मिनी परेरा यांच्या अप्रतिम निवेदनासह रसिकांनी छोट्या पडद्यावर पाहिली.

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ११

स्वाती दिनेश ·

ऋषिकेश 22/06/2008 - 20:27
सुंदर वर्णन!.. एखाद्या स्थळाइतकीच मला व्यक्तींची सवयींची थोडक्यात त्या देशातील माणसांची वर्णनं वाचायला फार आवडतं आणि तुमच्या वर्णनात नुसते स्थळ नाही तर तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता :) या भागातील लोकांचा सोशल सेंस मनाला भावला. आणि
रस्ते तर इतके स्वच्छ की चक्क पान घेऊन पंगत मांडावी
हे वाक्य प्रचंड छान! त्या फुला-फुलांनी सजलेल्या सुंदर रस्त्यावर पंगत आहे. आपले सगळे मिपाकर त्या मैफिलीचा आस्वाद घेत आहेत. (ती कुत्री समोरच्या स्टँडलाच बांधलेली बरी ;) ) असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. नेहेमी प्रमाणे मस्त भाग.. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

नंदन 23/06/2008 - 00:39
>>> तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता -- असेच म्हणतो. हा भागही आवडला. रिसायकलिंगचा अनुभवही अतिशय बोलका.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता हा भाग सुद्धा आवडला !!! लिहिण्याची शैली आणि भाषा नेहमीसारखीच जिवाभावाची !!! अवांतर : अ.भा.मराठी साहित्य संमेलन चलो कॅलोफोर्निया !!! बोटावर मोजता येतील अशा पदाधिका-यांच्या हातात अ.भा.साहित्य महामंडळ असले की काय होते त्याचा हा उत्तम नमुना !!! चालु दे !!!

In reply to by ऋषिकेश

II राजे II 23/06/2008 - 09:55
१००% सहमत. हेच म्हणतो ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

चतुरंग 23/06/2008 - 04:28
तुम्ही केलेल्या निखळ वर्णनातून तुमचे अनुभव मनापासून घेतलेले आहेत असे जाणवते. चित्रेही एकदम सुरेख आणि नेटकी आहेत. (अवांतर - "कुत्र्यांसाठी पेश्शल हाटेल" होते. ह्या सगळ्या श्वानमाता बहुतेक वेळा आपली खरेदी करून झाल्यावर किवा आधी त्या हाटेलात आपल्या "पपीला" नेऊन खायला प्यायला घालून लाड करताना दिसत. हे वाक्य वाचून माणसांच्या "हॉटेल कपिला" सारखं कुत्र्यांचं "हॉटेल पपिला" असेल का असा एक प्रश्न मनात आला! ;)) चतुरंग

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:09
वा स्वाती! फुलांची चित्रे फारच सुरेख.. जपानची लेखमाला अत्यंत देखणी व बोलकी होत आहे...! जियो.. तात्या. अवांतर - काशीला गेलो असताना रस्त्यात घाण की घाणीत रस्ता आहे हे समजत नव्हते. इतर देशांचं कौतुक जरूर करावं पण ते करताना भारतातील शहरांना नावं ठेवण्याचं काय कारण? ती मंडळी असतील ग्रेट तर त्यांच्या घरची! सालं नाकारतंय कोण? आणि तुलनाच करायची असेल तर फक्त घाणीचीच तुलना का? बनारसमधील चांगल्या गोष्टींची तुलनाही जपानशी करा की! बनारसच्या थाट बाजारात (चूभूदेघे) मिळणारी साजूक तुपातली जिलेबी, द्रोणातली सुरेख लालसर गुलाबी रबडी अन् अत्यंत रसिले गुलाबजामून तुमच्या जपानमध्ये जळ्ळे बघायला तरी मिळतात काय? जीव ओवाळून टाकावा अश्या बनारसी ठुमरीतली एक जागा जपान्यांनी घेऊन दाखवावी! आमच्या सिद्धेश्वरीदेवीच्या ठुमरी-दादर्‍याची सर किंवा बनारसच्या उस्ताद बिस्मिल्लाखासहेबांच्या सनईची तुलना कुठल्या जपान्याशी होईल काय? परदेशाचं कौतुक करताना येतजाता भारताला थपडा मारायची हल्ली ष्टाईलच झाली आहे. आणि मारे एवढाच जर पुळका असेल भारताबद्दल तर इथे येऊन रहा आणि सुधारा की भारताला! नाही कुणी म्हटलंय? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बनारसचे पहिले दर्शन खरोखरच " रस्त्यात घाण की घाणीत रस्ते " असे होते. भले नाही आमच्याकडे पैसा,असू आम्ही गरीब..पण स्वच्छ,नीटनेटके राहणे तर आहे ना आमच्या हातात. आपल्या अंगणातला कचरा दुसर्‍याच्या अंगणात सारायचा.खिडकीतून आमटीपासून काहीही खाली टाकून द्यायचं..मग भले खालून कोणी जात असेल.त्याचे कपडे खराब होतील.. हे पहायचं नाही की त्याचा विचार करायचा नाही.. 'सामाजिक शिस्त आणि स्वच्छता ' हे आपल्यासाठी जणू नाहीतच! अशाच समजुतीत रहायचं. बनारसच नव्हे तर अनेक तीर्थक्षेत्रांची हीच अवस्था! रसरशीत गुलाबजामून,द्रोणातील खरपूस रबडी,जीवघेणे बनारसी पान ह्याचं कौतुक आहेच,त्यासाठी जीव तरसतोही..पण ते कसे बनवतात हे जेव्हा पाहिलं,तेव्हा मात्र! खव्याने भरलेल्या खोल्याच्या खोल्या..पायांनी खवा मळणे चाललेले..घोंघावणार्‍या माशांनी खव्याला झाकलेले.. तिथेच पलिकडे 'सगळे' विधी चाललेले... आपले एवढे १२ ज्योतिर्लिंगातले एक काशी विश्वेश्वराचे देऊळ,पण त्याचे पावित्र्य,स्वच्छता राखली जाते? पापनाशिनी गंगा बिचारी पापं आणि प्रेतं वाहून वाहून इतकी मलीन झाली आहे की खरच वाईट वाटतं.वाटतं का नाही आपला लोकांना ही सामाजिक जाणीव? जपानसारखा राखेतून उभा राहिलेला देश,जर्मनीसारखा गावेच्या गावे बेचिराख झालेला देश जर त्यातून पुन्हा नंदनवन उभारू शकतो तर आपण का नाही? नुसते मतांचे आणि जातींचे राजकारण करून आपल्या आणि पुढच्या ७/८ पिढ्यांचे कल्याण करून ठेवायचे एवढाच सिमित उद्योग बहुतांश राजकारणी करताना दिसतात.(सन्माननीय अपवाद आहेतही!) परदेशात जेव्हा जेव्हा आपल्यासारखेच सामान्य लोकं देशाच्या प्रगतीला वैयक्तिक हातभार लावताना पाहिले की नकळत "आम्ही ह्यात कोठे बसतो?" हा विचार हटकून येतोच मनात..आणि तो फ्याशन म्हणून नव्हे तर भारताच्या प्रेमापोटीच असतो.आपल्याकडील लोकांच्यात असे काही ऐकून,वाचून तरी काही फरक पडावा,त्रुटी कमी व्हाव्यात असा उद्देश असतो. बनारसवरची डॉक्युमेंटरी इथे जेव्हा दाखवतात तेव्हा ती मलिन गंगा,तिच्याकाठी जळणारी प्रेतं ,राख सावडून सोनं मिळतय का ते शोधणारे लोकं,मनकर्णिका घाट,महास्मशान.. हे दाखवतात.तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतात,त्या जर्मन /इंग्लिशमधे भाषांतरितही करतात,तेव्हा त्या 'राख सावडण्याचा 'अर्थही इथल्या लोकांना समजतो.आम्ही ते हताशपणे पाहतो. हे सगळं दूरदेशी पाहताना आपलीच लाज वेशीवर टांगली जाते आहे असे वाटते. "भारतात येऊन राहणं आणि सुधारणं " हा त्यावर उपाय आहे? प्रत्येक सुजाण नागरिकाने किमान सामाजिक स्वास्थ्य, आरोग्यविषयक काही बंधनं पाळली ना तरी बरीच सुधारणा होईल.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

II राजे II 23/06/2008 - 12:00
O:) टाळ्या ! विचारांशी सहमत. राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 23/06/2008 - 12:59
"भारतात येऊन राहणं आणि सुधारणं " हा त्यावर उपाय आहे? का नाही? भारताबद्दल इतकी आच असेल तर रहावं इथे येऊन अन् करावीत समाज सुधारणेची कामं! गाडगेबाबांनी नाही केली? तिकडे परक्यांच्या देशात, जर्मनीत बसून भारताला नावं ठेवणं खूप सोप्पं आहे, त्याची वैगुण्ये दाखवणं खूप सोप्पं आहे..! बनारसवरची डॉक्युमेंटरी इथे जेव्हा दाखवतात तेव्हा ती मलिन गंगा,तिच्याकाठी जळणारी प्रेतं ,राख सावडून सोनं मिळतय का ते शोधणारे लोकं,मनकर्णिका घाट,महास्मशान.. हे दाखवतात. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतात,त्या जर्मन /इंग्लिशमधे भाषांतरितही करतात,तेव्हा त्या 'राख सावडण्याचा 'अर्थही इथल्या लोकांना समजतो. बरं मग? येणार आहेत का ती लोकं इथली घाण साफ करायला? भारत कसा आहे, काय आहे, स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे हे आमचं आम्ही पाहून घेऊ! इतर देशांनी मारे त्याच्या इंग्लिश भाषांतरीत डॉक्युमेन्टरीज दाखवल्या तर दाखवोत बापडे पण भारताचं मूल्यमापन करण्याचा अधिकार त्यांना भारताने दिलेला नाही! शिवाय मी असंही विचारत होतो की भारतीय संगीत आणि भारतीय पाककला या विषयी त्या डॉक्युमेन्टरीजमध्ये काही दाखवतात की नाही? की फक्त भारताची वाईट बाजूच दाखवतात? आणि भारत इतका वाईट असूनही हीच मंडळी इथे उद्योगधंदे करून दमड्या कमवायला झक्कत येतातच ना? :) भारतात अस्वच्छता, बकालपणा नाही हे मी मुळीच नाकारत नाही. परंतु काही जमेच्या बाजूही अनेक आहेत ज्यांचा उल्लेख परदेशाची कवतिकं करताना केला जात नाही. नेहमी फक्त दोषांचाच उल्लेख केला जातो. म्हणूनच मी असं मुद्दामून विचारत होतो की जसा बनारसचा पुरब अंगाचा ठुमरीदादरा हा भारतीय संगीताला मोठं योगदान ठरला तसा जपानच्या कुठल्या भागाने कुठला गानप्रकार जपानी संगीताला देऊ केला ज्यावर लोकं डॉक्टरेट करत आहेत? असो.. माझ्याकरता हा विषय संपलेला आहे. फक्त जपानपुरताच विचार करायचा म्हटला तर तुझी लेखमालिका निश्चितच चांगली व वाचनीय आहे. पुलेशु.... आपला, (अस्वच्छ व बकाल देशाचा नागरीक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, भारताला नावे ठेवणे,हिणवणे हा हेतू नाही. भारताबद्दलच्या प्रेमापोटीच,कळकळीपोटीच इतरांच्या चांगल्याशी तुलना केली जाते. भारताकडे इतके पोटेन्शियल असताना फक्त त्यातील उणीवाच जगापुढे मांडल्या जातात. ह्या डॉक्युमेंटरीज करताना जेव्हा लोकांच्या मुलाखती घेतात तेव्हा एक्काच्याही मनात आपलं दारिद्रय असं वेशीवर न टांगता चांगल्या गोष्टी जगापुढे मांडाव्यात असं येत नाही ,ह्याचं वाईट वाटतं.आपल्या इथल्या बकालतेला आपलेच लोकं जबाबदार आहेत आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही,ह्याचं वाईट वाटतं.राग येतो. भारतीय खाद्यपदार्थ जगभर मशहूर आहेत पण जेव्हा कळकट आणि अस्वच्छ भटारखाने,उघड्यावरचे,माशा बसत असलेले खाद्यपदार्थ जेव्हा व्हीडीओत दाखवले जातात तेव्हा साहजिकच 'हायजीन'चा प्रश्न उभा राहतो. संगीताबद्दल तुझ्या सारख्या अधिकारी व्यक्तिपुढे मी काय बोलणार? आणि अर्थातच मला त्यात गतीही नाही,फक्त चांगले संगीत ऐकायला आवडते एवढीच मजल आहे. असो. माझ्याही कडून ह्या विषयाला पूर्णविराम. स्वाती

प्राजु 23/06/2008 - 09:53
सुंदर वर्णन आणि चित्रे. इतकी स्वच्छता तर मी अमेरिकेतसुद्धा नाही पाहिली. बर्‍याचदा रस्त्यांवर बियरचे, कोकचे टिन्स, सिगरेटची थोटकं.. सर्रास दिसतात. खूप दिवसांनी लिहिलास गं हा भाग.. मस्त एकदम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 23/06/2008 - 17:12
छान वर्णन्...मी इथे आले तेव्हाचे दिवस आठवले...तुम्ही तर मैत्रीणी तरी असायचात्...मी तर एकटी अशा मॉल मधे रोज ३-४ तास भटकायचे.....आजूबाजूला असलेले गुजराथी अज्जिबात बोलायचे नाहीत्....बाकी सगळे अमेरिकन्..मग काय करणार्.... पंगत वाढण्याइतके स्वच्छ रस्ते इथेही नाही दिसले अजून्..पण कचरा टाकण्यातला काटेकोर पणा कॉलेज मधे अगदी सगळ्या लोकांमधे पाहिला...घरातही प्रत्येकाच्या ३ वेगळे ट्रॅश कॅन्स असतातच..... नेहेमीप्रमाणे खूप मस्त लेख... पुलेशु..

केशवसुमार 23/06/2008 - 20:46
स्वातीताई, नेहमी प्रमाणेच सुंदर वर्णन..चालू दे.. वाचतो आहे (वाचक)केशवसुमार बाकी भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही.. (भारतीय)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

कुंदन 23/06/2008 - 20:56
अगदी जर्मनी , अमेरीका यासारखी पाश्चात्य राष्ट्रेच कशाला , ईजिप्त,ट्युनिशिया मध्ये देखील मला भारतातील इतर कुठल्याही शहरापेक्षा जास्त स्वच्छता आणि शिस्त आढळली. -- ( भटक्या) कुंदन

In reply to by केशवसुमार

ऋषिकेश 23/06/2008 - 22:35
बाकी भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही..
लाख मोलाचं बोललात! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बाकी भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही.. अगदी खरे! माझा मुद्दा तुम्ही एका ओळीत स्पष्ट केलात.धन्यु. स्वाती

भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही.. प्राथमिक गरजा जिथे पुर्ण होत नाही. तिथे अस्वच्छता, बेशिस्तीबद्दल बोलणं फार सोप्प आहे. हमे हमारे हाल पे छोड दो !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 23/06/2008 - 23:21
हा प्रश्न 'स्वच्छ शहरांचा' नाहीये हा प्रश्न 'स्वच्छ मानसिकतेचा' आहे. आणि शेवटी स्वच्छ शहरं तरी कशी निर्माण होतात? प्रत्येक माणसाने स्वच्छ्तेने वागायची एक अंगभूत शिस्त लावून घेण्यानेच. प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत अशा भागांबद्दल सोडून द्या - पण जिथे आलबेल आहे अशा भागात तरी किती शिस्त पाळली जाते? आपल्या फ्लॅट्/बंगल्यासमोरचा कचरा शेजारच्याच्या दारात ठेवणारे, नदीत निर्माल्य भिरकावून देणारे, कचराकुंडीची सोय असूनही कचरा बाहेर भिरकावून देणारे, कितीतरी आपल्या आसपासच आहेत त्यांच्या प्राथमिक गरजांबद्दल काय? आम्ही देशाबाहेर राहून उपदेशाचे डोस पाजतोय असे वाटत असेल तर आपल्याकडे सुरत शहराने अशी स्वच्छता मोहीम हाती घेऊन इतर सर्व मोठ्या शहरांना एक उदाहरण घालून दिलंच होतं, त्याचं तरी अनुकरण किती शहरांनी केलं? तेव्हा मूळ प्रश्न हा 'हमें हमारे हाल पे छोड दो' ही मानसिकता टाकून देण्याचा आहे असे मला प्रामाणिकपणे वागते. अहो बाहेर रहात असलो तरी आम्ही मूळ भारतीयच आहोत/राहू पण अशी 'तुम्ही-आम्ही' भाषेतली दरी दूर लोटायला कारणीभूत ठरते. वेदना देऊन जाते. भारताबद्दल कोणी काही तारे तोडले तर आम्ही त्यांच्या तंगड्या सव्याज गळ्यात घालायला मागे पुढे पहात नाही पण आपलेच नाणे खोटे असेल तर मग मान खाली जाते. आपल्या देशाची उजळ प्रतिमा सगळीकडेच असावी ह्या तळमळीने लिहिले, काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रश्न 'स्वच्छ शहरांचा' नाहीये हा प्रश्न 'स्वच्छ मानसिकतेचा' आहे. आणि शेवटी स्वच्छ शहरं तरी कशी निर्माण होतात? प्रत्येक माणसाने स्वच्छ्तेने वागायची एक अंगभूत शिस्त लावून घेण्यानेच. मानसिकतेच्या इतकाच हा प्रश्न व्यवस्थेचा आहे, असे वाटते. शहरातील गर्दी हा काही नवीन विषय नाही. शहरातील औद्यागिकरणाने शहरे गजबजून गेली. ग्रामीण भागातील लोढ्यांनी त्याच्यात सतत भर टाकली रेल्वे, बस, रस्ते, वीज्,पाणी, शिक्षण, हे सर्व शहरात असल्यामुले शहरांकडे सतत गर्दी वाढतच आहे. गर्दीमुळे टंचाई,महागाई,दिरंगाई, आणि बेपर्वाई सतत वाढत असते. वाढणा-या झोपडपट्या, त्यांच्या गैरसोयी, शहरातील सांडपाण्याची अपुरी व्यवस्था यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि हे प्रश्न सोडवायचे असेल तर शासनकर्ते आणि नागरिकात जागृतीची आवश्यकता असते. साधी गोष्ट आहे, गर्दी वाढली की समस्या निर्माण होतात, जागा,पाणी, संडास,कचरा, वाया गेलेले अन्न......आणि दुर्दैवाने अशाच गोष्टींचे भडक चित्रण केल्या जाते. संडासात जाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात, लहान मुलांना संडासाऐवजी बाहेर बसवावे लागते, कचराकुंड्या गच्च भरुन जातात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी साधणे अपुरे पडतात, कच-याभोवती, कावळे, डुकरे,कुत्रे पोसली जातात तेच जास्त घाण पसरवतात. त्याचबरोबर गर्दीमुळे झोपण्यासाठी जागा नाही, उघड्यावर आंघोळी, अशा कितीतरी समस्या केवळ गर्दीने होते. आणि माझीच भावंडे चकचकीत शहरात राहुन स्वच्छतेचे, शिस्तीचे धडे देतात त्याचे जरासे वाईटच वाटते. शहरीकरणाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे झोपडपट्यांची निर्मिती. ज्या शहरात नियोजन नाही, तिथे वाटेल तिथे झोपड्या पडतात. त्या ऐवजी त्यांना वसवण्यासाठी जागा दिली पाहिजे, त्यांच्यासाठी योग्य नियोजन झाले पाहिजे. पंचवार्षिक योजनेत प्रत्येक महानगरपालिकांना स्वछतेविषयी विविध योजना राबवायच्या होत्या, राबविल्याही पण नेहमीप्रमाणे नागरिकांचा सहभाग अल्प असाच राहिला आहे. गलिच्छ वस्त्या, झोपडपट्ट्या,मजुरांच्या वस्त्या, रस्त्यावर फिरणारे भिकारी, आणि इथे जन्माला येणारी पुढील पिढीच्या सर्वांगीण विकासाची, कुटुंब शिक्षणाची, प्रशिक्षणाची, योजना राबविली पाहिजे हे काही राज्यकर्त्यांना, शासनास, आणि नागरिकांना कळत नाही का ? कळते पण करायचं कोणालाच नाही ? झोपडपट्या चांगल्या ठिकाणी हलवल्या पाहिजे. त्याचबरोबर रोजगार दिला पाहिजे, संडास, पाण्याची व्यवस्था, वीज, दुकाने,दवाखाने, इत्यांदीची व्यवस्था असली पाहिजे. दारुबंदी, वेश्याववसाय बंदी, गुन्हेगारी मुलांसाठी शाळा, अशा मोहिमा घेवून झोपडपट्टीतील रहिवाश्यांना सर्वांगीण विकासकार्यक्रमात सामावून घेतले पाहिजे. त्यांच्यासाठी विकासाचे कार्यक्रम राबविले पाहिजे. स्वच्छता आणि शिस्त कोणाला आवडणार नाही, पण मुळ प्रश्न सोडविण्याची उदासिनता इथे आहे. म्हणुन प्राथमिक गरजा जिथे पुर्ण होत नाही. तिथे अस्वच्छता, बेशिस्तीबद्दल बोलणं फार सोप्प आहे. हमे हमारे हाल पे छोड दो असे आम्ही म्हणालो. ( जे आहे, ते बरं आहे, अशी भावना होती ) त्याच्यात देशाबाहेर राहणा-या भारतियांना दोष देण्याचा कुठेही हेतू नव्हता, नाहीच. मात्र येथील चांगल्या गोष्टींचेही आपण कौतुक केले पाहिजे, ज्या गोष्टींमुळे मान खाली जाते असे विषयांची चर्चा जरा त्रासदायकच ठरते. अशा प्रश्नांच्या उपायांसाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी जरी नाही करता आली तरी स्वप्नातील भारत रंगवतांना सकारात्मक विचार आपल्या लेखन/प्रतिसादातून दिसला तर आपणास भारतीय म्हणुन जो आनंद होईल तितकाच आनंद आम्हाला होईल इतकीच त्या मागची भावना आहे कारण आपल्या सर्वांचेच भारतावर खूप खूप प्रेम आहे. आपल्या देशाची उजळ प्रतिमा सगळीकडेच असावी ह्या तळमळीने लिहिले, काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी! आपल्या देशाची प्रतिमा उजळ होतांना मुळ प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष होते. ते होऊ नये या तळमळीनेच आम्हीही लिहिले. काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 24/06/2008 - 21:08
सध्या तरी माझ्याकडे ह्यावर अधिक बोलण्यासारखे काही नाही. धन्यवाद डॉसाहेब, आपली भूमिका समजली. चतुरंग

नेहमीप्रमाणेच चित्रदर्शी, वाचनीय. एक गुण आणखी वाढला. विचारप्रवर्तक. ऋषिकेशच्या प्रतिसादाशी सहमत. पुढील भाग लौकर येऊ द्यात. सुधीर कांदळकर.

ऋषिकेश 22/06/2008 - 20:27
सुंदर वर्णन!.. एखाद्या स्थळाइतकीच मला व्यक्तींची सवयींची थोडक्यात त्या देशातील माणसांची वर्णनं वाचायला फार आवडतं आणि तुमच्या वर्णनात नुसते स्थळ नाही तर तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता :) या भागातील लोकांचा सोशल सेंस मनाला भावला. आणि
रस्ते तर इतके स्वच्छ की चक्क पान घेऊन पंगत मांडावी
हे वाक्य प्रचंड छान! त्या फुला-फुलांनी सजलेल्या सुंदर रस्त्यावर पंगत आहे. आपले सगळे मिपाकर त्या मैफिलीचा आस्वाद घेत आहेत. (ती कुत्री समोरच्या स्टँडलाच बांधलेली बरी ;) ) असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. नेहेमी प्रमाणे मस्त भाग.. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

नंदन 23/06/2008 - 00:39
>>> तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता -- असेच म्हणतो. हा भागही आवडला. रिसायकलिंगचा अनुभवही अतिशय बोलका.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

तो देश माणसांसकट भेटतो .. तुम्ही एकदम देशाला जिवंत करता हा भाग सुद्धा आवडला !!! लिहिण्याची शैली आणि भाषा नेहमीसारखीच जिवाभावाची !!! अवांतर : अ.भा.मराठी साहित्य संमेलन चलो कॅलोफोर्निया !!! बोटावर मोजता येतील अशा पदाधिका-यांच्या हातात अ.भा.साहित्य महामंडळ असले की काय होते त्याचा हा उत्तम नमुना !!! चालु दे !!!

In reply to by ऋषिकेश

II राजे II 23/06/2008 - 09:55
१००% सहमत. हेच म्हणतो ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

चतुरंग 23/06/2008 - 04:28
तुम्ही केलेल्या निखळ वर्णनातून तुमचे अनुभव मनापासून घेतलेले आहेत असे जाणवते. चित्रेही एकदम सुरेख आणि नेटकी आहेत. (अवांतर - "कुत्र्यांसाठी पेश्शल हाटेल" होते. ह्या सगळ्या श्वानमाता बहुतेक वेळा आपली खरेदी करून झाल्यावर किवा आधी त्या हाटेलात आपल्या "पपीला" नेऊन खायला प्यायला घालून लाड करताना दिसत. हे वाक्य वाचून माणसांच्या "हॉटेल कपिला" सारखं कुत्र्यांचं "हॉटेल पपिला" असेल का असा एक प्रश्न मनात आला! ;)) चतुरंग

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:09
वा स्वाती! फुलांची चित्रे फारच सुरेख.. जपानची लेखमाला अत्यंत देखणी व बोलकी होत आहे...! जियो.. तात्या. अवांतर - काशीला गेलो असताना रस्त्यात घाण की घाणीत रस्ता आहे हे समजत नव्हते. इतर देशांचं कौतुक जरूर करावं पण ते करताना भारतातील शहरांना नावं ठेवण्याचं काय कारण? ती मंडळी असतील ग्रेट तर त्यांच्या घरची! सालं नाकारतंय कोण? आणि तुलनाच करायची असेल तर फक्त घाणीचीच तुलना का? बनारसमधील चांगल्या गोष्टींची तुलनाही जपानशी करा की! बनारसच्या थाट बाजारात (चूभूदेघे) मिळणारी साजूक तुपातली जिलेबी, द्रोणातली सुरेख लालसर गुलाबी रबडी अन् अत्यंत रसिले गुलाबजामून तुमच्या जपानमध्ये जळ्ळे बघायला तरी मिळतात काय? जीव ओवाळून टाकावा अश्या बनारसी ठुमरीतली एक जागा जपान्यांनी घेऊन दाखवावी! आमच्या सिद्धेश्वरीदेवीच्या ठुमरी-दादर्‍याची सर किंवा बनारसच्या उस्ताद बिस्मिल्लाखासहेबांच्या सनईची तुलना कुठल्या जपान्याशी होईल काय? परदेशाचं कौतुक करताना येतजाता भारताला थपडा मारायची हल्ली ष्टाईलच झाली आहे. आणि मारे एवढाच जर पुळका असेल भारताबद्दल तर इथे येऊन रहा आणि सुधारा की भारताला! नाही कुणी म्हटलंय? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बनारसचे पहिले दर्शन खरोखरच " रस्त्यात घाण की घाणीत रस्ते " असे होते. भले नाही आमच्याकडे पैसा,असू आम्ही गरीब..पण स्वच्छ,नीटनेटके राहणे तर आहे ना आमच्या हातात. आपल्या अंगणातला कचरा दुसर्‍याच्या अंगणात सारायचा.खिडकीतून आमटीपासून काहीही खाली टाकून द्यायचं..मग भले खालून कोणी जात असेल.त्याचे कपडे खराब होतील.. हे पहायचं नाही की त्याचा विचार करायचा नाही.. 'सामाजिक शिस्त आणि स्वच्छता ' हे आपल्यासाठी जणू नाहीतच! अशाच समजुतीत रहायचं. बनारसच नव्हे तर अनेक तीर्थक्षेत्रांची हीच अवस्था! रसरशीत गुलाबजामून,द्रोणातील खरपूस रबडी,जीवघेणे बनारसी पान ह्याचं कौतुक आहेच,त्यासाठी जीव तरसतोही..पण ते कसे बनवतात हे जेव्हा पाहिलं,तेव्हा मात्र! खव्याने भरलेल्या खोल्याच्या खोल्या..पायांनी खवा मळणे चाललेले..घोंघावणार्‍या माशांनी खव्याला झाकलेले.. तिथेच पलिकडे 'सगळे' विधी चाललेले... आपले एवढे १२ ज्योतिर्लिंगातले एक काशी विश्वेश्वराचे देऊळ,पण त्याचे पावित्र्य,स्वच्छता राखली जाते? पापनाशिनी गंगा बिचारी पापं आणि प्रेतं वाहून वाहून इतकी मलीन झाली आहे की खरच वाईट वाटतं.वाटतं का नाही आपला लोकांना ही सामाजिक जाणीव? जपानसारखा राखेतून उभा राहिलेला देश,जर्मनीसारखा गावेच्या गावे बेचिराख झालेला देश जर त्यातून पुन्हा नंदनवन उभारू शकतो तर आपण का नाही? नुसते मतांचे आणि जातींचे राजकारण करून आपल्या आणि पुढच्या ७/८ पिढ्यांचे कल्याण करून ठेवायचे एवढाच सिमित उद्योग बहुतांश राजकारणी करताना दिसतात.(सन्माननीय अपवाद आहेतही!) परदेशात जेव्हा जेव्हा आपल्यासारखेच सामान्य लोकं देशाच्या प्रगतीला वैयक्तिक हातभार लावताना पाहिले की नकळत "आम्ही ह्यात कोठे बसतो?" हा विचार हटकून येतोच मनात..आणि तो फ्याशन म्हणून नव्हे तर भारताच्या प्रेमापोटीच असतो.आपल्याकडील लोकांच्यात असे काही ऐकून,वाचून तरी काही फरक पडावा,त्रुटी कमी व्हाव्यात असा उद्देश असतो. बनारसवरची डॉक्युमेंटरी इथे जेव्हा दाखवतात तेव्हा ती मलिन गंगा,तिच्याकाठी जळणारी प्रेतं ,राख सावडून सोनं मिळतय का ते शोधणारे लोकं,मनकर्णिका घाट,महास्मशान.. हे दाखवतात.तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतात,त्या जर्मन /इंग्लिशमधे भाषांतरितही करतात,तेव्हा त्या 'राख सावडण्याचा 'अर्थही इथल्या लोकांना समजतो.आम्ही ते हताशपणे पाहतो. हे सगळं दूरदेशी पाहताना आपलीच लाज वेशीवर टांगली जाते आहे असे वाटते. "भारतात येऊन राहणं आणि सुधारणं " हा त्यावर उपाय आहे? प्रत्येक सुजाण नागरिकाने किमान सामाजिक स्वास्थ्य, आरोग्यविषयक काही बंधनं पाळली ना तरी बरीच सुधारणा होईल.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

II राजे II 23/06/2008 - 12:00
O:) टाळ्या ! विचारांशी सहमत. राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर 23/06/2008 - 12:59
"भारतात येऊन राहणं आणि सुधारणं " हा त्यावर उपाय आहे? का नाही? भारताबद्दल इतकी आच असेल तर रहावं इथे येऊन अन् करावीत समाज सुधारणेची कामं! गाडगेबाबांनी नाही केली? तिकडे परक्यांच्या देशात, जर्मनीत बसून भारताला नावं ठेवणं खूप सोप्पं आहे, त्याची वैगुण्ये दाखवणं खूप सोप्पं आहे..! बनारसवरची डॉक्युमेंटरी इथे जेव्हा दाखवतात तेव्हा ती मलिन गंगा,तिच्याकाठी जळणारी प्रेतं ,राख सावडून सोनं मिळतय का ते शोधणारे लोकं,मनकर्णिका घाट,महास्मशान.. हे दाखवतात. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतात,त्या जर्मन /इंग्लिशमधे भाषांतरितही करतात,तेव्हा त्या 'राख सावडण्याचा 'अर्थही इथल्या लोकांना समजतो. बरं मग? येणार आहेत का ती लोकं इथली घाण साफ करायला? भारत कसा आहे, काय आहे, स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे हे आमचं आम्ही पाहून घेऊ! इतर देशांनी मारे त्याच्या इंग्लिश भाषांतरीत डॉक्युमेन्टरीज दाखवल्या तर दाखवोत बापडे पण भारताचं मूल्यमापन करण्याचा अधिकार त्यांना भारताने दिलेला नाही! शिवाय मी असंही विचारत होतो की भारतीय संगीत आणि भारतीय पाककला या विषयी त्या डॉक्युमेन्टरीजमध्ये काही दाखवतात की नाही? की फक्त भारताची वाईट बाजूच दाखवतात? आणि भारत इतका वाईट असूनही हीच मंडळी इथे उद्योगधंदे करून दमड्या कमवायला झक्कत येतातच ना? :) भारतात अस्वच्छता, बकालपणा नाही हे मी मुळीच नाकारत नाही. परंतु काही जमेच्या बाजूही अनेक आहेत ज्यांचा उल्लेख परदेशाची कवतिकं करताना केला जात नाही. नेहमी फक्त दोषांचाच उल्लेख केला जातो. म्हणूनच मी असं मुद्दामून विचारत होतो की जसा बनारसचा पुरब अंगाचा ठुमरीदादरा हा भारतीय संगीताला मोठं योगदान ठरला तसा जपानच्या कुठल्या भागाने कुठला गानप्रकार जपानी संगीताला देऊ केला ज्यावर लोकं डॉक्टरेट करत आहेत? असो.. माझ्याकरता हा विषय संपलेला आहे. फक्त जपानपुरताच विचार करायचा म्हटला तर तुझी लेखमालिका निश्चितच चांगली व वाचनीय आहे. पुलेशु.... आपला, (अस्वच्छ व बकाल देशाचा नागरीक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, भारताला नावे ठेवणे,हिणवणे हा हेतू नाही. भारताबद्दलच्या प्रेमापोटीच,कळकळीपोटीच इतरांच्या चांगल्याशी तुलना केली जाते. भारताकडे इतके पोटेन्शियल असताना फक्त त्यातील उणीवाच जगापुढे मांडल्या जातात. ह्या डॉक्युमेंटरीज करताना जेव्हा लोकांच्या मुलाखती घेतात तेव्हा एक्काच्याही मनात आपलं दारिद्रय असं वेशीवर न टांगता चांगल्या गोष्टी जगापुढे मांडाव्यात असं येत नाही ,ह्याचं वाईट वाटतं.आपल्या इथल्या बकालतेला आपलेच लोकं जबाबदार आहेत आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही,ह्याचं वाईट वाटतं.राग येतो. भारतीय खाद्यपदार्थ जगभर मशहूर आहेत पण जेव्हा कळकट आणि अस्वच्छ भटारखाने,उघड्यावरचे,माशा बसत असलेले खाद्यपदार्थ जेव्हा व्हीडीओत दाखवले जातात तेव्हा साहजिकच 'हायजीन'चा प्रश्न उभा राहतो. संगीताबद्दल तुझ्या सारख्या अधिकारी व्यक्तिपुढे मी काय बोलणार? आणि अर्थातच मला त्यात गतीही नाही,फक्त चांगले संगीत ऐकायला आवडते एवढीच मजल आहे. असो. माझ्याही कडून ह्या विषयाला पूर्णविराम. स्वाती

प्राजु 23/06/2008 - 09:53
सुंदर वर्णन आणि चित्रे. इतकी स्वच्छता तर मी अमेरिकेतसुद्धा नाही पाहिली. बर्‍याचदा रस्त्यांवर बियरचे, कोकचे टिन्स, सिगरेटची थोटकं.. सर्रास दिसतात. खूप दिवसांनी लिहिलास गं हा भाग.. मस्त एकदम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 23/06/2008 - 17:12
छान वर्णन्...मी इथे आले तेव्हाचे दिवस आठवले...तुम्ही तर मैत्रीणी तरी असायचात्...मी तर एकटी अशा मॉल मधे रोज ३-४ तास भटकायचे.....आजूबाजूला असलेले गुजराथी अज्जिबात बोलायचे नाहीत्....बाकी सगळे अमेरिकन्..मग काय करणार्.... पंगत वाढण्याइतके स्वच्छ रस्ते इथेही नाही दिसले अजून्..पण कचरा टाकण्यातला काटेकोर पणा कॉलेज मधे अगदी सगळ्या लोकांमधे पाहिला...घरातही प्रत्येकाच्या ३ वेगळे ट्रॅश कॅन्स असतातच..... नेहेमीप्रमाणे खूप मस्त लेख... पुलेशु..

केशवसुमार 23/06/2008 - 20:46
स्वातीताई, नेहमी प्रमाणेच सुंदर वर्णन..चालू दे.. वाचतो आहे (वाचक)केशवसुमार बाकी भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही.. (भारतीय)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

कुंदन 23/06/2008 - 20:56
अगदी जर्मनी , अमेरीका यासारखी पाश्चात्य राष्ट्रेच कशाला , ईजिप्त,ट्युनिशिया मध्ये देखील मला भारतातील इतर कुठल्याही शहरापेक्षा जास्त स्वच्छता आणि शिस्त आढळली. -- ( भटक्या) कुंदन

In reply to by केशवसुमार

ऋषिकेश 23/06/2008 - 22:35
बाकी भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही..
लाख मोलाचं बोललात! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बाकी भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही.. अगदी खरे! माझा मुद्दा तुम्ही एका ओळीत स्पष्ट केलात.धन्यु. स्वाती

भारताच्या जर अस्वच्छता आणि बेशिस्त ह्या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या जगात भारताला तोड नाही.. प्राथमिक गरजा जिथे पुर्ण होत नाही. तिथे अस्वच्छता, बेशिस्तीबद्दल बोलणं फार सोप्प आहे. हमे हमारे हाल पे छोड दो !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 23/06/2008 - 23:21
हा प्रश्न 'स्वच्छ शहरांचा' नाहीये हा प्रश्न 'स्वच्छ मानसिकतेचा' आहे. आणि शेवटी स्वच्छ शहरं तरी कशी निर्माण होतात? प्रत्येक माणसाने स्वच्छ्तेने वागायची एक अंगभूत शिस्त लावून घेण्यानेच. प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत अशा भागांबद्दल सोडून द्या - पण जिथे आलबेल आहे अशा भागात तरी किती शिस्त पाळली जाते? आपल्या फ्लॅट्/बंगल्यासमोरचा कचरा शेजारच्याच्या दारात ठेवणारे, नदीत निर्माल्य भिरकावून देणारे, कचराकुंडीची सोय असूनही कचरा बाहेर भिरकावून देणारे, कितीतरी आपल्या आसपासच आहेत त्यांच्या प्राथमिक गरजांबद्दल काय? आम्ही देशाबाहेर राहून उपदेशाचे डोस पाजतोय असे वाटत असेल तर आपल्याकडे सुरत शहराने अशी स्वच्छता मोहीम हाती घेऊन इतर सर्व मोठ्या शहरांना एक उदाहरण घालून दिलंच होतं, त्याचं तरी अनुकरण किती शहरांनी केलं? तेव्हा मूळ प्रश्न हा 'हमें हमारे हाल पे छोड दो' ही मानसिकता टाकून देण्याचा आहे असे मला प्रामाणिकपणे वागते. अहो बाहेर रहात असलो तरी आम्ही मूळ भारतीयच आहोत/राहू पण अशी 'तुम्ही-आम्ही' भाषेतली दरी दूर लोटायला कारणीभूत ठरते. वेदना देऊन जाते. भारताबद्दल कोणी काही तारे तोडले तर आम्ही त्यांच्या तंगड्या सव्याज गळ्यात घालायला मागे पुढे पहात नाही पण आपलेच नाणे खोटे असेल तर मग मान खाली जाते. आपल्या देशाची उजळ प्रतिमा सगळीकडेच असावी ह्या तळमळीने लिहिले, काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी! चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रश्न 'स्वच्छ शहरांचा' नाहीये हा प्रश्न 'स्वच्छ मानसिकतेचा' आहे. आणि शेवटी स्वच्छ शहरं तरी कशी निर्माण होतात? प्रत्येक माणसाने स्वच्छ्तेने वागायची एक अंगभूत शिस्त लावून घेण्यानेच. मानसिकतेच्या इतकाच हा प्रश्न व्यवस्थेचा आहे, असे वाटते. शहरातील गर्दी हा काही नवीन विषय नाही. शहरातील औद्यागिकरणाने शहरे गजबजून गेली. ग्रामीण भागातील लोढ्यांनी त्याच्यात सतत भर टाकली रेल्वे, बस, रस्ते, वीज्,पाणी, शिक्षण, हे सर्व शहरात असल्यामुले शहरांकडे सतत गर्दी वाढतच आहे. गर्दीमुळे टंचाई,महागाई,दिरंगाई, आणि बेपर्वाई सतत वाढत असते. वाढणा-या झोपडपट्या, त्यांच्या गैरसोयी, शहरातील सांडपाण्याची अपुरी व्यवस्था यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि हे प्रश्न सोडवायचे असेल तर शासनकर्ते आणि नागरिकात जागृतीची आवश्यकता असते. साधी गोष्ट आहे, गर्दी वाढली की समस्या निर्माण होतात, जागा,पाणी, संडास,कचरा, वाया गेलेले अन्न......आणि दुर्दैवाने अशाच गोष्टींचे भडक चित्रण केल्या जाते. संडासात जाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात, लहान मुलांना संडासाऐवजी बाहेर बसवावे लागते, कचराकुंड्या गच्च भरुन जातात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी साधणे अपुरे पडतात, कच-याभोवती, कावळे, डुकरे,कुत्रे पोसली जातात तेच जास्त घाण पसरवतात. त्याचबरोबर गर्दीमुळे झोपण्यासाठी जागा नाही, उघड्यावर आंघोळी, अशा कितीतरी समस्या केवळ गर्दीने होते. आणि माझीच भावंडे चकचकीत शहरात राहुन स्वच्छतेचे, शिस्तीचे धडे देतात त्याचे जरासे वाईटच वाटते. शहरीकरणाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे झोपडपट्यांची निर्मिती. ज्या शहरात नियोजन नाही, तिथे वाटेल तिथे झोपड्या पडतात. त्या ऐवजी त्यांना वसवण्यासाठी जागा दिली पाहिजे, त्यांच्यासाठी योग्य नियोजन झाले पाहिजे. पंचवार्षिक योजनेत प्रत्येक महानगरपालिकांना स्वछतेविषयी विविध योजना राबवायच्या होत्या, राबविल्याही पण नेहमीप्रमाणे नागरिकांचा सहभाग अल्प असाच राहिला आहे. गलिच्छ वस्त्या, झोपडपट्ट्या,मजुरांच्या वस्त्या, रस्त्यावर फिरणारे भिकारी, आणि इथे जन्माला येणारी पुढील पिढीच्या सर्वांगीण विकासाची, कुटुंब शिक्षणाची, प्रशिक्षणाची, योजना राबविली पाहिजे हे काही राज्यकर्त्यांना, शासनास, आणि नागरिकांना कळत नाही का ? कळते पण करायचं कोणालाच नाही ? झोपडपट्या चांगल्या ठिकाणी हलवल्या पाहिजे. त्याचबरोबर रोजगार दिला पाहिजे, संडास, पाण्याची व्यवस्था, वीज, दुकाने,दवाखाने, इत्यांदीची व्यवस्था असली पाहिजे. दारुबंदी, वेश्याववसाय बंदी, गुन्हेगारी मुलांसाठी शाळा, अशा मोहिमा घेवून झोपडपट्टीतील रहिवाश्यांना सर्वांगीण विकासकार्यक्रमात सामावून घेतले पाहिजे. त्यांच्यासाठी विकासाचे कार्यक्रम राबविले पाहिजे. स्वच्छता आणि शिस्त कोणाला आवडणार नाही, पण मुळ प्रश्न सोडविण्याची उदासिनता इथे आहे. म्हणुन प्राथमिक गरजा जिथे पुर्ण होत नाही. तिथे अस्वच्छता, बेशिस्तीबद्दल बोलणं फार सोप्प आहे. हमे हमारे हाल पे छोड दो असे आम्ही म्हणालो. ( जे आहे, ते बरं आहे, अशी भावना होती ) त्याच्यात देशाबाहेर राहणा-या भारतियांना दोष देण्याचा कुठेही हेतू नव्हता, नाहीच. मात्र येथील चांगल्या गोष्टींचेही आपण कौतुक केले पाहिजे, ज्या गोष्टींमुळे मान खाली जाते असे विषयांची चर्चा जरा त्रासदायकच ठरते. अशा प्रश्नांच्या उपायांसाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी जरी नाही करता आली तरी स्वप्नातील भारत रंगवतांना सकारात्मक विचार आपल्या लेखन/प्रतिसादातून दिसला तर आपणास भारतीय म्हणुन जो आनंद होईल तितकाच आनंद आम्हाला होईल इतकीच त्या मागची भावना आहे कारण आपल्या सर्वांचेच भारतावर खूप खूप प्रेम आहे. आपल्या देशाची उजळ प्रतिमा सगळीकडेच असावी ह्या तळमळीने लिहिले, काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी! आपल्या देशाची प्रतिमा उजळ होतांना मुळ प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष होते. ते होऊ नये या तळमळीनेच आम्हीही लिहिले. काही अधिकउणा शब्द गेला असेल तर माफी असावी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 24/06/2008 - 21:08
सध्या तरी माझ्याकडे ह्यावर अधिक बोलण्यासारखे काही नाही. धन्यवाद डॉसाहेब, आपली भूमिका समजली. चतुरंग

नेहमीप्रमाणेच चित्रदर्शी, वाचनीय. एक गुण आणखी वाढला. विचारप्रवर्तक. ऋषिकेशच्या प्रतिसादाशी सहमत. पुढील भाग लौकर येऊ द्यात. सुधीर कांदळकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

बावीस जून!

डॉ.प्रसाद दाढे ·

ईश्वरी 22/06/2008 - 23:43
>>२२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला. पुण्याच्या इतिहासातील ही एक महत्वाची घटना आहे. चापेकर बंधू प्रखर देशभक्तीने भारलेले सच्चे क्रांतिकारक होते. ह्याच घटनेवर बनलेला '२२ जून १८९७ ' ह्या लहानपणी पाहीलेल्या सिनेमाची आठवण झाली. अतिशय सुंदर सिनेमा होता. हा सिनेमा आठवला की 'गोंद्या आला रे आला ' ही आरोळी हमखास आठवतेच. '२२ जून १८९७ ' ला २ राष्ट्रीय आणि २ राज्यस्तरीय पारितोषिकं मिळाली होती. अवांतरः सिनेमाचे संवाद विजय तेंडुलकरांचे होते. दिग्दर्शन नचिकेत व जयू पटवर्धन ह्या जोडप्याचे होते. त्यांचे दिग्दर्शनातील हे पहिले पाऊल होते. ईश्वरी

चतुरंग 22/06/2008 - 23:59
१९८० साली बघितलेल्या ह्या सिनेमातली 'गोंद्या आला रे!' ही आरोळी आजही आठवते. अत्यंत थोडक्या बजेटमधे, परिणामकारक सिनेमा कसा बनवता येतो ह्याचे हे उत्तम उदाहरण होते. रवींद्र मंकणीचे मी पाहिलेले हे पहिलेच काम आणि मला ते फार आवडले होते. चापेकरांचे चरित्र इतक्या प्रेरकपणे ह्या सिनेमातून मांडले आहे की बस. फितुरीमुळे पकडले जाऊन त्यांना शेवटी फासावर जावे लागते ते बघून जीव गलबलला होता रक्त उसळलं होतं! ह्याचे संवाद बहुदा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन ह्यांनी लिहिले होते. तेंडुलकरांनी नव्हे. (चुभूदेघे). चतुरंग

In reply to by चतुरंग

ईश्वरी 23/06/2008 - 03:19
>>ह्याचे संवाद बहुदा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन ह्यांनी लिहिले होते. तेंडुलकरांनी नव्हे. (चुभूदेघे). माझ्या माहितीप्रमाणे कथा - पटकथा शंकर नाग व संवाद तेंडुलकर यांचे होते. पटवर्धनांचे दिग्दर्शन होते. त्यांचा कथा वा संवाद लेखनात सहभाग होता की नाही हे माहीत नाही. ईश्वरी

प्राजु 23/06/2008 - 10:01
२२ जून : वर्षातला सगळ्यात मोठा दिवस. सुर्यास्त सगळ्यांत उशिरा होतो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋचा 23/06/2008 - 10:16
नाही. २१ जुन हा सगळ्यात मोठा दिवस असतो. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विदुषक 23/06/2008 - 14:36
एकाच घरातल्या ३ भाउ देशासाठी बलिदान देतात हे अजोड उदाहरण आहे धन्य ती चाफेकर माता !!! मजेदार विदुषक

चाफेकरबंधुंच्या पवित्र स्मृतीला प्रणाम..! - टिंग्या अवांतर - थोडेसे स्पेनच्या फुटबॉल टीमविषयी! :) १. दिनांक - २२ जुन १९८६ प्रतिस्पर्धी - बेल्जियम स्थळ - वर्ल्डकप (मेक्सिको) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! २. दिनांक - २२ जुन १९९६ प्रतिस्पर्धी - इंग्लंड स्थळ - युरोकप (इंग्लंड) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! ३. दिनांक - २२ जुन २००२ प्रतिस्पर्धी - साऊथ कोरिया स्थळ - वर्ल्डकप (जपान/कोरिया) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! ४. दिनांक - २२ जुन २००८ प्रतिस्पर्धी - इटली स्थळ - युरोकप (ऑस्ट्रिआ/स्विस) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये (अखेर) स्पेन विजयी! #:S हुश्श!

चाफेकर बंधूंवरचा तो सिनेमा पहायला शाळाशाळातून मुले नेली होती,आणि आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी शाळेतर्फे तो सिनेमा एकत्र पाहिला आणि एकत्रच भारावलो होतो,त्याची आठवण झाली. चाफेकरबंधूंच्या स्मृतीला प्रणाम! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

भाग्यश्री 23/06/2008 - 22:44
एकत्रच भारावलो होतो!! हेहे !! मला पण तो सिनेमा आठवतोय.. खरंच भारावून जायचे मी.. स्पेनची माहीती मस्त आहे!! हेहे जिंकले एकदाचे ! http://bhagyashreee.blogspot.com/

ईश्वरी 22/06/2008 - 23:43
>>२२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला. पुण्याच्या इतिहासातील ही एक महत्वाची घटना आहे. चापेकर बंधू प्रखर देशभक्तीने भारलेले सच्चे क्रांतिकारक होते. ह्याच घटनेवर बनलेला '२२ जून १८९७ ' ह्या लहानपणी पाहीलेल्या सिनेमाची आठवण झाली. अतिशय सुंदर सिनेमा होता. हा सिनेमा आठवला की 'गोंद्या आला रे आला ' ही आरोळी हमखास आठवतेच. '२२ जून १८९७ ' ला २ राष्ट्रीय आणि २ राज्यस्तरीय पारितोषिकं मिळाली होती. अवांतरः सिनेमाचे संवाद विजय तेंडुलकरांचे होते. दिग्दर्शन नचिकेत व जयू पटवर्धन ह्या जोडप्याचे होते. त्यांचे दिग्दर्शनातील हे पहिले पाऊल होते. ईश्वरी

चतुरंग 22/06/2008 - 23:59
१९८० साली बघितलेल्या ह्या सिनेमातली 'गोंद्या आला रे!' ही आरोळी आजही आठवते. अत्यंत थोडक्या बजेटमधे, परिणामकारक सिनेमा कसा बनवता येतो ह्याचे हे उत्तम उदाहरण होते. रवींद्र मंकणीचे मी पाहिलेले हे पहिलेच काम आणि मला ते फार आवडले होते. चापेकरांचे चरित्र इतक्या प्रेरकपणे ह्या सिनेमातून मांडले आहे की बस. फितुरीमुळे पकडले जाऊन त्यांना शेवटी फासावर जावे लागते ते बघून जीव गलबलला होता रक्त उसळलं होतं! ह्याचे संवाद बहुदा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन ह्यांनी लिहिले होते. तेंडुलकरांनी नव्हे. (चुभूदेघे). चतुरंग

In reply to by चतुरंग

ईश्वरी 23/06/2008 - 03:19
>>ह्याचे संवाद बहुदा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन ह्यांनी लिहिले होते. तेंडुलकरांनी नव्हे. (चुभूदेघे). माझ्या माहितीप्रमाणे कथा - पटकथा शंकर नाग व संवाद तेंडुलकर यांचे होते. पटवर्धनांचे दिग्दर्शन होते. त्यांचा कथा वा संवाद लेखनात सहभाग होता की नाही हे माहीत नाही. ईश्वरी

प्राजु 23/06/2008 - 10:01
२२ जून : वर्षातला सगळ्यात मोठा दिवस. सुर्यास्त सगळ्यांत उशिरा होतो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋचा 23/06/2008 - 10:16
नाही. २१ जुन हा सगळ्यात मोठा दिवस असतो. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विदुषक 23/06/2008 - 14:36
एकाच घरातल्या ३ भाउ देशासाठी बलिदान देतात हे अजोड उदाहरण आहे धन्य ती चाफेकर माता !!! मजेदार विदुषक

चाफेकरबंधुंच्या पवित्र स्मृतीला प्रणाम..! - टिंग्या अवांतर - थोडेसे स्पेनच्या फुटबॉल टीमविषयी! :) १. दिनांक - २२ जुन १९८६ प्रतिस्पर्धी - बेल्जियम स्थळ - वर्ल्डकप (मेक्सिको) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! २. दिनांक - २२ जुन १९९६ प्रतिस्पर्धी - इंग्लंड स्थळ - युरोकप (इंग्लंड) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! ३. दिनांक - २२ जुन २००२ प्रतिस्पर्धी - साऊथ कोरिया स्थळ - वर्ल्डकप (जपान/कोरिया) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद! ४. दिनांक - २२ जुन २००८ प्रतिस्पर्धी - इटली स्थळ - युरोकप (ऑस्ट्रिआ/स्विस) सामना - क्वार्टर फायनल निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये (अखेर) स्पेन विजयी! #:S हुश्श!

चाफेकर बंधूंवरचा तो सिनेमा पहायला शाळाशाळातून मुले नेली होती,आणि आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी शाळेतर्फे तो सिनेमा एकत्र पाहिला आणि एकत्रच भारावलो होतो,त्याची आठवण झाली. चाफेकरबंधूंच्या स्मृतीला प्रणाम! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

भाग्यश्री 23/06/2008 - 22:44
एकत्रच भारावलो होतो!! हेहे !! मला पण तो सिनेमा आठवतोय.. खरंच भारावून जायचे मी.. स्पेनची माहीती मस्त आहे!! हेहे जिंकले एकदाचे ! http://bhagyashreee.blogspot.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज बावीस जून! काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना ह्या दिवशी घडल्या आहेत, त्या॑चा हा धा॑डोळा.. १) २२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला. सार्वभौम ब्रिटीश सत्तेवर प्रहार झाला. भारतीय स्वात॑त्र्यलढ्यातील एक महत्वाचे पान उलगडले गेले.. २) २२ जून १९४० रोजी फ्रान्सने (दुसर्‍या महायुद्धात) हिटलरपुढे गुढगे टेकले, बिनशर्त शरणागती पत्करली. हिटलरने पहिल्या महायुद्धातल्या पराजयाचा सूड उगवला. ३) २२ जून १९४१ रोजी हिटलरने रशियावर स्वारी केली (ऑपरेशन बार्बारोसा). ही त्याची लष्करी घोडचूक ठरली.

काबूल ब्युटी स्कूल... डेबोरा रॉड्रिग्ज.

प्राजु ·

चित्रा 22/06/2008 - 21:35
पुस्तक वाचायला उत्सुक आहे. अशा लोकांचे अनुभव पांढरपेश्या आणि घडीदार जीवनापेक्षा निराळे असतात. अशावेळी कधी असे वाटते की आपण एखाद्याच्या आयुष्याबद्दल खूपच पटकन "मते" देतो, (जजमेंट) अशा अर्थाने, त्यामुळे तसे करणे टाळून लोकांचे अनुभव वाचणे हे तसे कर्मकठीण काम. त्यामुळे सहसा मी अशी पुस्तके नुसती चाळते, पण हे नक्की वाचीन म्हणते. धन्यवाद!

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:18
वा प्राजू, थोडक्यात परंतु सुंदर परिचय करून दिला आहेस... स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल... अगदी अवश्य वाचीन हे पुस्तक! तात्या.

सहज 23/06/2008 - 07:57
अफगणीस्तान किंवा अफ्रिकेतील काही देश जसे आयव्हरी कोस्ट, काँगो, रवांडा आदी देशातील परिस्थीती पाहुन खरोखर सुन्न व्हायला होते. कुठल्याही अराजक माजलेल्या देशात नेहमीच बळी पडतात ते म्हणजे बायका व मुले. अफगणिस्तानातील तालीबान राजवटीच्या काळात महीलांना काम करायला बंदी तर होतीच पण घराबाहेर पडताना देखील त्यांच्याबरोबर पुरुष नसेल तर अगदी देहांताची शिक्षा देखील व्हायची. अश्या परिस्थीतीत एक आई व तिची मुलगी घरात एकही पुरुष नसताना कसे काय जगत असतील यावर एक "ओसामा" नावाचा सिनेमा आला होत. बघण्यासारखा आहे. थोडक्यात कथानक. शेवटी अशी पुस्तके, सिनेमे पाहुन प्रत्येकाने स्वताला विचारले पाहीजे की ही परिस्थीती बदलण्यासाठी मी स्वता काय करु शकतो/शकते. अफगणिस्तानाला, तेथील भावी पिढीला ह्या अराजकतेतुन बाहेर काढणे स्वतंत्र जगाचे कर्तव्य आहे. निदान भारताला तरी भौगोलिक परिस्थीतीमुळे धोका होउ शकतो ह्या भावनेतुन तरी मदत केलीच पाहीजे. अफगणिस्तानमधे काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. एक सुची येथे.

ईश्वरी 23/06/2008 - 13:23
वा प्रा़जू , पुस्तक परिक्षण आवडले. एका छान पुस्तकाचा तेवढाच छान परिचय करून दिलास त्या बद्द्ल धन्यवाद. तुझे पुस्तक परिक्षण वाचल्यानंतर हे पुस्तक वाचावेसे वाटत आहे. ईश्वरी

आनंदयात्री 23/06/2008 - 13:34
छान परिक्षण प्राजु ! नक्की वाचीन हे पुस्तक. अशीच उत्तमोत्तम परिक्षणे येउ दे !

वरदा 23/06/2008 - 22:52
पुस्तकाची छानच ओळख करुन दिलेयस... आता तिथे गेले की वाचतेच मी...आईला घेऊन ठेवायला सांगेन....

चित्रा 22/06/2008 - 21:35
पुस्तक वाचायला उत्सुक आहे. अशा लोकांचे अनुभव पांढरपेश्या आणि घडीदार जीवनापेक्षा निराळे असतात. अशावेळी कधी असे वाटते की आपण एखाद्याच्या आयुष्याबद्दल खूपच पटकन "मते" देतो, (जजमेंट) अशा अर्थाने, त्यामुळे तसे करणे टाळून लोकांचे अनुभव वाचणे हे तसे कर्मकठीण काम. त्यामुळे सहसा मी अशी पुस्तके नुसती चाळते, पण हे नक्की वाचीन म्हणते. धन्यवाद!

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:18
वा प्राजू, थोडक्यात परंतु सुंदर परिचय करून दिला आहेस... स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल... अगदी अवश्य वाचीन हे पुस्तक! तात्या.

सहज 23/06/2008 - 07:57
अफगणीस्तान किंवा अफ्रिकेतील काही देश जसे आयव्हरी कोस्ट, काँगो, रवांडा आदी देशातील परिस्थीती पाहुन खरोखर सुन्न व्हायला होते. कुठल्याही अराजक माजलेल्या देशात नेहमीच बळी पडतात ते म्हणजे बायका व मुले. अफगणिस्तानातील तालीबान राजवटीच्या काळात महीलांना काम करायला बंदी तर होतीच पण घराबाहेर पडताना देखील त्यांच्याबरोबर पुरुष नसेल तर अगदी देहांताची शिक्षा देखील व्हायची. अश्या परिस्थीतीत एक आई व तिची मुलगी घरात एकही पुरुष नसताना कसे काय जगत असतील यावर एक "ओसामा" नावाचा सिनेमा आला होत. बघण्यासारखा आहे. थोडक्यात कथानक. शेवटी अशी पुस्तके, सिनेमे पाहुन प्रत्येकाने स्वताला विचारले पाहीजे की ही परिस्थीती बदलण्यासाठी मी स्वता काय करु शकतो/शकते. अफगणिस्तानाला, तेथील भावी पिढीला ह्या अराजकतेतुन बाहेर काढणे स्वतंत्र जगाचे कर्तव्य आहे. निदान भारताला तरी भौगोलिक परिस्थीतीमुळे धोका होउ शकतो ह्या भावनेतुन तरी मदत केलीच पाहीजे. अफगणिस्तानमधे काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. एक सुची येथे.

ईश्वरी 23/06/2008 - 13:23
वा प्रा़जू , पुस्तक परिक्षण आवडले. एका छान पुस्तकाचा तेवढाच छान परिचय करून दिलास त्या बद्द्ल धन्यवाद. तुझे पुस्तक परिक्षण वाचल्यानंतर हे पुस्तक वाचावेसे वाटत आहे. ईश्वरी

आनंदयात्री 23/06/2008 - 13:34
छान परिक्षण प्राजु ! नक्की वाचीन हे पुस्तक. अशीच उत्तमोत्तम परिक्षणे येउ दे !

वरदा 23/06/2008 - 22:52
पुस्तकाची छानच ओळख करुन दिलेयस... आता तिथे गेले की वाचतेच मी...आईला घेऊन ठेवायला सांगेन....
काबूल ब्युटी स्कूल , एका अमेरिकन स्त्रीने बुरख्या आडून घेतलेला शोध. लेखिका : डेबोरा रॉड्रिग्ज. अनुवाद : उषा तांबे. प्रकाशक : कॉनसेप्ट बुक्स, पुणे. मूल्य : १९५ रू. मंडळी, काबूल ब्यूटी स्कूल हे पुस्तक नुकतंच माझ्या वाचनात आलं. मला मिळालं, आणि सहज चाळता चाळता मी ते झपाटल्यासारखं ४-५ दिवसांत वाचून काढलं. अफगाणिस्तानातल्या स्त्रियांच्यावर बरंच वाचलं आणि ऐकलं होतं. एस्केप फ्रॉम तालिबान या आणि अशा पुस्तकातून अफगाणी स्त्रीचं आयुष्य किती खडतर आहे हे थोडं समजलं होतं. पण काबूल ब्यूटी...

कहाणी अक्कलदाढेची

डॉ.प्रसाद दाढे ·

प्राजु 22/06/2008 - 19:33
डॉक्टरसाहेब, उत्तम उपक्रम चालू केला आहे. या (बे)अक्कलदाढेनं खूप जणांना बेजार केलेलं पाहिलेलं आहे .आता याची कारणं समजतील.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपल्या उपक्रमाचे स्वागत आहे. दातांच्या वेदना काय भयंकर असतात हो, डॊक्टर साहेब. वेदनाक्षामक गोळ्यांची नावे सांगत जा बॊ !!! फीस देऊ भेट झाल्यावर !!!:) अवांतर : डॊक्टर साहेब, आमचा एक मित्र वय ३४. जांभया दिल्यावर त्याचा जबडा एकदा उघडाच राहिला. डॊक्टरांनी नंतर दोन्ही अंगठे दातावर प्रेस देऊ ते सर्व पुर्ववत केले, याचा आणि दाताचा काही संबध ? -दिलीप बिरुटे (फुकट्या रुग्ण )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 23/06/2008 - 05:13
वेदनाक्षामक गोळ्यांची नावे सांगत जा बॊ !!! अधनंमधनं कॉंबिफ्लॅमची गोळी घ्यायला हरकत नाही, पण सवय नको. नायतर ऍसिडिटी होईल.. :) डॉ तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर : डॊक्टर साहेब, आमचा एक मित्र वय ३४. जांभया दिल्यावर त्याचा जबडा एकदा उघडाच राहिला. डॊक्टरांनी नंतर दोन्ही अंगठे दातावर प्रेस देऊ ते सर्व पुर्ववत केले, याचा आणि दाताचा काही संबध ? उशिरा प्रतिसादाबद्दल माफ करा.. बिरूटेकाका, तुम्ही वर्णन केलेली अवस्था म्हणजे जबड्याचा सा॑धा निखळणे होय. (डिसलोकेशन) ज्यामध्ये कानासमोर असणारा आपल्या खालच्या जबड्याचा सा॑धा खोबणीतून निसटतो. काही लोका॑मध्ये सा॑ध्याच्या झिजेमुळे असे होते तर काही॑मध्ये अति तो॑ड उघडल्यामुळेसुद्धा होऊ शकते. (उदा उगाचच भलीमोठी जा॑भई देणे, खूप मोठा चावा घेण्याचा प्रयत्न करणे..बर्गर, पाणी-पुरी इ.) बराच वेळ तो॑ड उघडे ठेवल्यामुळेसुद्धा हे होऊ शकते.. बराच वेळ चालणार्‍या दाताच्या उपचारा॑दरम्यानही असे प्रकार घडतात. ही अतिशय वेदनादायक स्थिती असते व आपण अतिशय योग्य शब्दा॑त वर्णन केल्याप्रमाणे तज्ञ डे॑टीस्ट सा॑धा जागेवर बसवू शकतो. (तुमचे निरीक्षण सॉलीड आहे..!) पण ही कृती लवकरात लवकर करणे गरजेचे असते अन्यथा रूग्णास पूर्णपणॅ बेशूद्ध करून सा॑धा बसवावा लागतो.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

डॉ.साहेब माहितीबद्दल आभारी आहे !!! आपला (बिरुटे काका ) बिरुटे काका आत्तापर्यंत कोणी म्हटले नव्हते हाच दिवस पाहण्याचे राहिले होते, च्यायला इथे माझा स्मार्ट फोटो टाकावाच लागतो :)

प्रमोद देव 22/06/2008 - 19:50
आधी तेहतीस होते(एक जोडदात आहे. :) ). त्यातील एक वरच्या रांगेतला उजवा सुळा कीड लागून अर्धा तुटला. आता राहिले साडे बत्तीस दात. काही वर्षांनी तो अर्धा राहिलेला भाग आपोआप गळून पडला. ह्या घटकेला माझे बत्तीस दात शाबूत आहेत. म्हणजे मला अक्कलदाढा असाव्यात बहुदा!(अक्कल नसली तरी .) ;) मला मात्र कोणताही नवा दात अथवा दाढ उगवताना त्रास झाल्याचे आठवत नाही. हे कसे शक्य आहे? कुणास ठाऊक. म्हणजे अक्कलदाढ आलीच नाही की काय??? :? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

उत्क्रा॑तीची प्रक्रिया चालू आहे. जबड्याच्या हाडात पुरेशी जागा उपलब्ध असेल तर अक्कलदाढा पूर्ण उगवू शकतात. पर॑तु आजच्या पिढीचा जबडा त्यामानाने तोडा लहान आहे त्यामुळे अर्धवट उगवलेल्या अक्कलदाढा॑चे प्रमाणा जास्त आहे. ह्यापुढची पायरी म्हणजे अक्कलदाढा तयारच होणार नाहीत..आताच काही लोका॑ना अक्कलदाढा मुळी तयारच झालेल्या नाहीत. पुढे कदाचित दोन क्रमा॑काचे पटाशीचे दात (लॅटरल इन्सायजर) कि॑वा उपदाढा अडकू लागतील व न॑तर निर्माणच होणार नाहीत..

अक्कलदाढ साधारणतः कोणत्या वर्षी येते? सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

In reply to by सखाराम_गटणे™

गटणे साहेब अक्कलदाढ साधारणतः सोळाव्या-सतराव्या वर्षी येते. त्यान॑तरही कधीही येऊ शकते (अगदी नव्वदाव्या वर्षीसुद्धा येऊ शकते!)

In reply to by कुंदन

:) तसा काहीही स॑बध नाही. पण ही दाढ सोळाव्या वर्षी येते व मुला-मुली॑ना 'जास्तीची' अक्कलही त्याच सुमारास येत असल्याने तिला अक्कलदाढ असे म्हणत असावेत.

चतुरंग 22/06/2008 - 23:18
ह्या अक्कलदाढेचा माझा अनुभवही अगदी बेअक्कल करुन टाकणारा आहे! माझी उजवीकडची खालची अक्कलदाढ किडली - कारण हेच, तिरकी उगवली होती (जवळजवळ ४५ अंशाच्या कोनातच म्हणा ना!) त्यामुळे पुढची दाढ आणि त्या अक्कलदाढेच्यामधे अन्न अडकून... इ.इ. २००६ च्या डिसें मधे इथे अमेरिकेतच काढून घेतली. सुदैवाने दातांचाही मेडिकल इंश्युअरन्स असल्याने निभावले (नाहीतर बिल देताना उरलेले दात घशात गेले असते! ;)) ते एक छोटे ऑपरेशनच असते. मला खुर्चीवर आडवे पाडून नर्सने माझ्या तोंडावर दिवे लावले आणि मी आ वासला (म्हणजे 'आ करा असे तिने सांगितले म्हणून, तिच्याकडे बघून नव्हे! तशी दिसायला बरी होती म्हणा, पण त्यावेळी माझे भीतीमुळे चित्त थार्‍यावर नव्हते;), गोड गोड बोलून माझे टेन्शन हलके करण्याचा निष्फळ प्रयत्न केला! दाताचा एक्स रे काढून मला समजावून सांगत होती की कसे ऑपरेशन होईल, काय काय काँप्लिकेशन्स होऊ शकतात इ. आधीच आलेले टेन्शन कमी होण्या ऐवजी वाढलेच! तेवढ्यात पांढर्‍या गाऊन मधले डॉ. आत आलेच (राजकारणी जमातीच्या लोकांनी नेहेमी पांढर्‍या वेषात राहूनही कुकर्मे करुन आपली प्रतिमा एवढी काळीकुट्ट करुन घेतली आहे की पांढर्‍या कपड्यातले डॉ. सुद्धा मला बेभरवशाचे वाटू लागलेत! - समस्त डॉ. मंडळी ह. घ्या.). त्या अत्यंत ताकदवान दिसणार्‍या डॉ. नामक प्राण्याने (रोज बेंच प्रेस मारत होते की काय कोण जाणे)'हाय, हौ आर यू टुडे?" असं विचारलं, "आय ऍम फाईन, थँक्स" असं म्हणताना घशात अवंढा अडकला, खोटं बोलताना मनाला किती वेदना होत होत्या ते माझं मलाच माहीत! "डू यू हॅव एनी ऍलर्जीज?" दुसरा प्रश्न. "नो." मी. "गुड. नाऊ आय ऍम गोइंग टु गिव टू स्मॉल शॉट्स" (इथे इंजेक्शनला 'शॉट' म्हणतात - किती समर्पक आहे ना शब्द?!) "लोकल ऍनस्थेशिया", मी जनरल नॉलेज पाजळलं, टेन्शन कमी करण्याचा दुबळा प्रयत्न! "ओ, येस. यू नो द स्टफ." कसलं डोंबलाचं, नो द स्ट्फ? माझी काय तंतरली होती ते त्याला काय सांगायचे? १५ सेकंदाच्या अंतरात दोन सुया माझ्या गाल आणि हिरडीच्या मधल्या भागाचा वेध घेऊन गेल्या! इंजेक्शन देण्यातली त्याची सफाई मात्र वाखाणण्याजोगी होती! "आय विल बि बॅक इन अनदर फाइव मिनिट्स". म्हणून ते नाहिसे झाले. शेजारच्या दुसर्‍या रुममधल्या आधी बधिरुन ठेवलेल्या पेशंटकडे गेले होते. माझे कान तिकडून काही भयावह आवाज वगैरे येतात की काय ह्याचा वेध घेत होते! साधारण मिनिटाभरात उजवा गाल आणि दातांची उजवी बाजू बधिर झाली. "हाऊ आर यू" नर्स पुटपुटली. मला फक्त डाव्या कानानेच ऐकू येतंय असा भास झाला. जड जिभेनेच "ओके" म्हटलं. बळी द्यायला नेण्यात येणार्‍या प्राण्याच्या मानात जसे भाव असतील तसे माझ्या मनात होते. तेवढ्यात डॉ. आले. एखाद्या लष्करशहाच्या तोंडावर असावेत तसे कठोर भाव मास्कच्या मागे झाकत शेजारचे स्टूल पुढे ओढून, त्यांनी माझ्या तोंडाचा ताबा घेतला. (तोंड उघडायला लावून 'मुस्कटदाबी' करणारा दंतवैद्य हा जगातला एकमेव प्राणी असावा! :)) (आपल्या चेहेर्‍यावरचे कठोर भाव बघून आधीच घाबरलेला पेशंट गर्भगळित होऊ नये म्हणून मास्क लावतात की काय कोण जाणे!) नर्सने पुढे केलेल्या हत्यारांच्या ट्रे मधून एक मजबूत लखलखती पकड घेऊन त्यांनी माझ्या तोंडात घातली. माझ्या पोटात खड्डा पडला! :( दाढेशी त्यांनी थोडी झटापट केली. "क्वाइट डिप रुटेड!" असं काहीतरी पुटपुटले. एक ड्रिल मशीन आणून दातावर चालवले. तोंडात मचूळ पाणी जमा झाले. ते सक्शन करुन पुन्हा ड्रिल. एक वाकड्या तोंडाची पकड घेऊन माझा दात त्यांनी पिरगाळला आणि उपटून काढला. हिरडी फाटून भळाभळा रक्त आले. चुळा भरुन सक्शन करुन घेतले. अर्धचंद्राकृती सुई घेऊन त्यांनी अत्यंत सफाईने आणि वेगाने हिरडीला टाके घातले. विलक्षण सफाईने त्यांचा हात चालत होता. मलातर समोर मोठ्या प्रमाणावर रक्त बघून मळमळायला लागते. हे कसं काय सहन करतात कोण जाणे? टाके घातलेल्या जागी एक कोणतासा स्प्रे मारुन त्यांनी त्यावर कापूस दाबून धरायला लावला आणि म्हणाले, "ओके यंग मॅन, आय ऍम डन! इट इस क्वाइट नाइस नाउ, नथिंग टु वरी. नो कॉफी ऑर एनी सॉफ्टड्रिंक फॉर अटलीस्ट अ डे." मग पुन्हा नर्सने वेदनाशामक गोळ्या देऊन कधी घ्यायच्या वगैरे सांगितले आणि माझी बोळवण केली. माझी जखम भरुन यायला १० दिवस लागले. पण नंतर काही त्रास नाही. चतुरंग

विसोबा खेचर 23/06/2008 - 05:13
दाढेसाहेब, अक्कलदाढेची ष्टोरी मजेशीर वाटली, अजूनही माहिती येऊ द्या.. तात्या.

चाणक्य 23/06/2008 - 11:42
ज्या जबड्यात आधी बत्तीस दात मावत होते तिथे जबड्याचा आकार कमी झाल्यावर अठ्ठावीसच दात मावू लागले. उरलेले चार मात्र आतच अडकून राहिले. त्याच त्या कुप्रसिद्ध अक्कलदाढा..
तिच्यायला, असं आहे होय हे त्रांगडं... !
( वरच्या वाकड्या अक्कलदाढा काढून घेतलेला) पेशंट भडकमकर
आरं तिच्यायला, दातांच्या डॉक्टरांनाही अक्कलदाढा येतात तर ;) (ह.घ्या.) चाणक्य

II राजे II 23/06/2008 - 11:49
माहीतीपर लेखन.पुढचे वाचण्यास उत्सुक. हेच म्हणतो ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

झकासराव 23/06/2008 - 14:05
अकलदाढेसंबंधी माहिती छान. :) चतुरंग वर्णन मस्त केल आहे तुम्ही. (आपला अकलेसहीत अक्कलदाढ नसलेला भाग्यवान) झकास ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुचेल तसं 23/06/2008 - 17:13
जिथे अक्कलदाढ येणार असते त्या जागेवर सारखी जीभ लावावीशी वाटते. त्यामुळे काही दिवसांत अक्कलदाढेबरोबर जीभेचा शेंडा पण दुखायला लागतो. फार अस्वस्थ वाटतं त्यामुळे. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

ऋचा 23/06/2008 - 17:19
मला अक्कलदाढेच्या वेळी सगळे दात पडून जातील आणि फक्त अक्कलदाढ शिल्लक राहील असे वाटत होते. तोंडातले एकूण एक दंत मुळापासुन दुखत होते. आणि काही तर हालत पण होते. @) अकाली तोंडाचे बोळके होणार असे वाटुन रडायची वेळ येत असे. अजुनही ती अक्कलदाढ अर्धीच बाहेर आलीये. ~X( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by संजीव नाईक

दाता॑चा आणि नजरेचा तसा थेट काहीच स॑ब॑ध नाही. दात काढल्यावर डोळ्या॑नी कमी दिसते अशी एक अ॑धश्रद्धा प्रचलित आहे. हे जर खरे असते तर कवळी लावणारे सगळेच आ॑धळे झाले असते की.. :)

मला अक्कलदाढेच्या वेळी सगळे दात पडून जातील आणि फक्त अक्कलदाढ शिल्लक राहील असे वाटत होते. तोंडातले एकूण एक दंत मुळापासुन दुखत होते. माझेही,आणि एकदा नव्हे चारदा!कसला वैताग आला होता,मी तर एकदा दिनेशला म्हटलं की सगळे दात काढून टाकून कवळीच बसवू का?अजूनही कधीतरी त्यातली एक व्रात्य बया त्रास देतेच. अक्कलदाढेची कहाणी लिवाच डॉ.साहेब. स्वाती

वरदा 23/06/2008 - 22:15
मी तर पहिले दात आल्यापासुन डेंटीस्ट कडे जातेय ती अजून जातेच आहे...एकही दात धड येईल तर शप्पथ! चतुरंग बरं झालं अनुभव सांगितला माझ्या चारही अक्कलदाढा आतच राहिल्यात आणि त्या वाकड्या आहेत असं एक्स रे मधे दिसतय्..मला ६ महिने आधी सांगितलय सगळ्या काढाच्या लागतील्...एकदा एक दाढ सूजुन झालेय्...तेवढ्यापुरत्या पेनिसिलिन घेऊन गप्प बसलेय मी...जावं की नाही ती सर्जरी करायला त्याचा विचार करतेय....आता तुम्ही म्हणतात तसं खूप त्रास होत नाही असं दिसतय्...गेलं पाहिजे... डॉक्टर खरच मला नेहेमीच पडतो हा प्रश्न कशाला येते अक्कलदाढ्...खूप छान समजावलयत तुम्ही....

प्राजु 22/06/2008 - 19:33
डॉक्टरसाहेब, उत्तम उपक्रम चालू केला आहे. या (बे)अक्कलदाढेनं खूप जणांना बेजार केलेलं पाहिलेलं आहे .आता याची कारणं समजतील.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपल्या उपक्रमाचे स्वागत आहे. दातांच्या वेदना काय भयंकर असतात हो, डॊक्टर साहेब. वेदनाक्षामक गोळ्यांची नावे सांगत जा बॊ !!! फीस देऊ भेट झाल्यावर !!!:) अवांतर : डॊक्टर साहेब, आमचा एक मित्र वय ३४. जांभया दिल्यावर त्याचा जबडा एकदा उघडाच राहिला. डॊक्टरांनी नंतर दोन्ही अंगठे दातावर प्रेस देऊ ते सर्व पुर्ववत केले, याचा आणि दाताचा काही संबध ? -दिलीप बिरुटे (फुकट्या रुग्ण )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 23/06/2008 - 05:13
वेदनाक्षामक गोळ्यांची नावे सांगत जा बॊ !!! अधनंमधनं कॉंबिफ्लॅमची गोळी घ्यायला हरकत नाही, पण सवय नको. नायतर ऍसिडिटी होईल.. :) डॉ तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवांतर : डॊक्टर साहेब, आमचा एक मित्र वय ३४. जांभया दिल्यावर त्याचा जबडा एकदा उघडाच राहिला. डॊक्टरांनी नंतर दोन्ही अंगठे दातावर प्रेस देऊ ते सर्व पुर्ववत केले, याचा आणि दाताचा काही संबध ? उशिरा प्रतिसादाबद्दल माफ करा.. बिरूटेकाका, तुम्ही वर्णन केलेली अवस्था म्हणजे जबड्याचा सा॑धा निखळणे होय. (डिसलोकेशन) ज्यामध्ये कानासमोर असणारा आपल्या खालच्या जबड्याचा सा॑धा खोबणीतून निसटतो. काही लोका॑मध्ये सा॑ध्याच्या झिजेमुळे असे होते तर काही॑मध्ये अति तो॑ड उघडल्यामुळेसुद्धा होऊ शकते. (उदा उगाचच भलीमोठी जा॑भई देणे, खूप मोठा चावा घेण्याचा प्रयत्न करणे..बर्गर, पाणी-पुरी इ.) बराच वेळ तो॑ड उघडे ठेवल्यामुळेसुद्धा हे होऊ शकते.. बराच वेळ चालणार्‍या दाताच्या उपचारा॑दरम्यानही असे प्रकार घडतात. ही अतिशय वेदनादायक स्थिती असते व आपण अतिशय योग्य शब्दा॑त वर्णन केल्याप्रमाणे तज्ञ डे॑टीस्ट सा॑धा जागेवर बसवू शकतो. (तुमचे निरीक्षण सॉलीड आहे..!) पण ही कृती लवकरात लवकर करणे गरजेचे असते अन्यथा रूग्णास पूर्णपणॅ बेशूद्ध करून सा॑धा बसवावा लागतो.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

डॉ.साहेब माहितीबद्दल आभारी आहे !!! आपला (बिरुटे काका ) बिरुटे काका आत्तापर्यंत कोणी म्हटले नव्हते हाच दिवस पाहण्याचे राहिले होते, च्यायला इथे माझा स्मार्ट फोटो टाकावाच लागतो :)

प्रमोद देव 22/06/2008 - 19:50
आधी तेहतीस होते(एक जोडदात आहे. :) ). त्यातील एक वरच्या रांगेतला उजवा सुळा कीड लागून अर्धा तुटला. आता राहिले साडे बत्तीस दात. काही वर्षांनी तो अर्धा राहिलेला भाग आपोआप गळून पडला. ह्या घटकेला माझे बत्तीस दात शाबूत आहेत. म्हणजे मला अक्कलदाढा असाव्यात बहुदा!(अक्कल नसली तरी .) ;) मला मात्र कोणताही नवा दात अथवा दाढ उगवताना त्रास झाल्याचे आठवत नाही. हे कसे शक्य आहे? कुणास ठाऊक. म्हणजे अक्कलदाढ आलीच नाही की काय??? :? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

उत्क्रा॑तीची प्रक्रिया चालू आहे. जबड्याच्या हाडात पुरेशी जागा उपलब्ध असेल तर अक्कलदाढा पूर्ण उगवू शकतात. पर॑तु आजच्या पिढीचा जबडा त्यामानाने तोडा लहान आहे त्यामुळे अर्धवट उगवलेल्या अक्कलदाढा॑चे प्रमाणा जास्त आहे. ह्यापुढची पायरी म्हणजे अक्कलदाढा तयारच होणार नाहीत..आताच काही लोका॑ना अक्कलदाढा मुळी तयारच झालेल्या नाहीत. पुढे कदाचित दोन क्रमा॑काचे पटाशीचे दात (लॅटरल इन्सायजर) कि॑वा उपदाढा अडकू लागतील व न॑तर निर्माणच होणार नाहीत..

अक्कलदाढ साधारणतः कोणत्या वर्षी येते? सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

In reply to by सखाराम_गटणे™

गटणे साहेब अक्कलदाढ साधारणतः सोळाव्या-सतराव्या वर्षी येते. त्यान॑तरही कधीही येऊ शकते (अगदी नव्वदाव्या वर्षीसुद्धा येऊ शकते!)

In reply to by कुंदन

:) तसा काहीही स॑बध नाही. पण ही दाढ सोळाव्या वर्षी येते व मुला-मुली॑ना 'जास्तीची' अक्कलही त्याच सुमारास येत असल्याने तिला अक्कलदाढ असे म्हणत असावेत.

चतुरंग 22/06/2008 - 23:18
ह्या अक्कलदाढेचा माझा अनुभवही अगदी बेअक्कल करुन टाकणारा आहे! माझी उजवीकडची खालची अक्कलदाढ किडली - कारण हेच, तिरकी उगवली होती (जवळजवळ ४५ अंशाच्या कोनातच म्हणा ना!) त्यामुळे पुढची दाढ आणि त्या अक्कलदाढेच्यामधे अन्न अडकून... इ.इ. २००६ च्या डिसें मधे इथे अमेरिकेतच काढून घेतली. सुदैवाने दातांचाही मेडिकल इंश्युअरन्स असल्याने निभावले (नाहीतर बिल देताना उरलेले दात घशात गेले असते! ;)) ते एक छोटे ऑपरेशनच असते. मला खुर्चीवर आडवे पाडून नर्सने माझ्या तोंडावर दिवे लावले आणि मी आ वासला (म्हणजे 'आ करा असे तिने सांगितले म्हणून, तिच्याकडे बघून नव्हे! तशी दिसायला बरी होती म्हणा, पण त्यावेळी माझे भीतीमुळे चित्त थार्‍यावर नव्हते;), गोड गोड बोलून माझे टेन्शन हलके करण्याचा निष्फळ प्रयत्न केला! दाताचा एक्स रे काढून मला समजावून सांगत होती की कसे ऑपरेशन होईल, काय काय काँप्लिकेशन्स होऊ शकतात इ. आधीच आलेले टेन्शन कमी होण्या ऐवजी वाढलेच! तेवढ्यात पांढर्‍या गाऊन मधले डॉ. आत आलेच (राजकारणी जमातीच्या लोकांनी नेहेमी पांढर्‍या वेषात राहूनही कुकर्मे करुन आपली प्रतिमा एवढी काळीकुट्ट करुन घेतली आहे की पांढर्‍या कपड्यातले डॉ. सुद्धा मला बेभरवशाचे वाटू लागलेत! - समस्त डॉ. मंडळी ह. घ्या.). त्या अत्यंत ताकदवान दिसणार्‍या डॉ. नामक प्राण्याने (रोज बेंच प्रेस मारत होते की काय कोण जाणे)'हाय, हौ आर यू टुडे?" असं विचारलं, "आय ऍम फाईन, थँक्स" असं म्हणताना घशात अवंढा अडकला, खोटं बोलताना मनाला किती वेदना होत होत्या ते माझं मलाच माहीत! "डू यू हॅव एनी ऍलर्जीज?" दुसरा प्रश्न. "नो." मी. "गुड. नाऊ आय ऍम गोइंग टु गिव टू स्मॉल शॉट्स" (इथे इंजेक्शनला 'शॉट' म्हणतात - किती समर्पक आहे ना शब्द?!) "लोकल ऍनस्थेशिया", मी जनरल नॉलेज पाजळलं, टेन्शन कमी करण्याचा दुबळा प्रयत्न! "ओ, येस. यू नो द स्टफ." कसलं डोंबलाचं, नो द स्ट्फ? माझी काय तंतरली होती ते त्याला काय सांगायचे? १५ सेकंदाच्या अंतरात दोन सुया माझ्या गाल आणि हिरडीच्या मधल्या भागाचा वेध घेऊन गेल्या! इंजेक्शन देण्यातली त्याची सफाई मात्र वाखाणण्याजोगी होती! "आय विल बि बॅक इन अनदर फाइव मिनिट्स". म्हणून ते नाहिसे झाले. शेजारच्या दुसर्‍या रुममधल्या आधी बधिरुन ठेवलेल्या पेशंटकडे गेले होते. माझे कान तिकडून काही भयावह आवाज वगैरे येतात की काय ह्याचा वेध घेत होते! साधारण मिनिटाभरात उजवा गाल आणि दातांची उजवी बाजू बधिर झाली. "हाऊ आर यू" नर्स पुटपुटली. मला फक्त डाव्या कानानेच ऐकू येतंय असा भास झाला. जड जिभेनेच "ओके" म्हटलं. बळी द्यायला नेण्यात येणार्‍या प्राण्याच्या मानात जसे भाव असतील तसे माझ्या मनात होते. तेवढ्यात डॉ. आले. एखाद्या लष्करशहाच्या तोंडावर असावेत तसे कठोर भाव मास्कच्या मागे झाकत शेजारचे स्टूल पुढे ओढून, त्यांनी माझ्या तोंडाचा ताबा घेतला. (तोंड उघडायला लावून 'मुस्कटदाबी' करणारा दंतवैद्य हा जगातला एकमेव प्राणी असावा! :)) (आपल्या चेहेर्‍यावरचे कठोर भाव बघून आधीच घाबरलेला पेशंट गर्भगळित होऊ नये म्हणून मास्क लावतात की काय कोण जाणे!) नर्सने पुढे केलेल्या हत्यारांच्या ट्रे मधून एक मजबूत लखलखती पकड घेऊन त्यांनी माझ्या तोंडात घातली. माझ्या पोटात खड्डा पडला! :( दाढेशी त्यांनी थोडी झटापट केली. "क्वाइट डिप रुटेड!" असं काहीतरी पुटपुटले. एक ड्रिल मशीन आणून दातावर चालवले. तोंडात मचूळ पाणी जमा झाले. ते सक्शन करुन पुन्हा ड्रिल. एक वाकड्या तोंडाची पकड घेऊन माझा दात त्यांनी पिरगाळला आणि उपटून काढला. हिरडी फाटून भळाभळा रक्त आले. चुळा भरुन सक्शन करुन घेतले. अर्धचंद्राकृती सुई घेऊन त्यांनी अत्यंत सफाईने आणि वेगाने हिरडीला टाके घातले. विलक्षण सफाईने त्यांचा हात चालत होता. मलातर समोर मोठ्या प्रमाणावर रक्त बघून मळमळायला लागते. हे कसं काय सहन करतात कोण जाणे? टाके घातलेल्या जागी एक कोणतासा स्प्रे मारुन त्यांनी त्यावर कापूस दाबून धरायला लावला आणि म्हणाले, "ओके यंग मॅन, आय ऍम डन! इट इस क्वाइट नाइस नाउ, नथिंग टु वरी. नो कॉफी ऑर एनी सॉफ्टड्रिंक फॉर अटलीस्ट अ डे." मग पुन्हा नर्सने वेदनाशामक गोळ्या देऊन कधी घ्यायच्या वगैरे सांगितले आणि माझी बोळवण केली. माझी जखम भरुन यायला १० दिवस लागले. पण नंतर काही त्रास नाही. चतुरंग

विसोबा खेचर 23/06/2008 - 05:13
दाढेसाहेब, अक्कलदाढेची ष्टोरी मजेशीर वाटली, अजूनही माहिती येऊ द्या.. तात्या.

चाणक्य 23/06/2008 - 11:42
ज्या जबड्यात आधी बत्तीस दात मावत होते तिथे जबड्याचा आकार कमी झाल्यावर अठ्ठावीसच दात मावू लागले. उरलेले चार मात्र आतच अडकून राहिले. त्याच त्या कुप्रसिद्ध अक्कलदाढा..
तिच्यायला, असं आहे होय हे त्रांगडं... !
( वरच्या वाकड्या अक्कलदाढा काढून घेतलेला) पेशंट भडकमकर
आरं तिच्यायला, दातांच्या डॉक्टरांनाही अक्कलदाढा येतात तर ;) (ह.घ्या.) चाणक्य

II राजे II 23/06/2008 - 11:49
माहीतीपर लेखन.पुढचे वाचण्यास उत्सुक. हेच म्हणतो ! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

झकासराव 23/06/2008 - 14:05
अकलदाढेसंबंधी माहिती छान. :) चतुरंग वर्णन मस्त केल आहे तुम्ही. (आपला अकलेसहीत अक्कलदाढ नसलेला भाग्यवान) झकास ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुचेल तसं 23/06/2008 - 17:13
जिथे अक्कलदाढ येणार असते त्या जागेवर सारखी जीभ लावावीशी वाटते. त्यामुळे काही दिवसांत अक्कलदाढेबरोबर जीभेचा शेंडा पण दुखायला लागतो. फार अस्वस्थ वाटतं त्यामुळे. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

ऋचा 23/06/2008 - 17:19
मला अक्कलदाढेच्या वेळी सगळे दात पडून जातील आणि फक्त अक्कलदाढ शिल्लक राहील असे वाटत होते. तोंडातले एकूण एक दंत मुळापासुन दुखत होते. आणि काही तर हालत पण होते. @) अकाली तोंडाचे बोळके होणार असे वाटुन रडायची वेळ येत असे. अजुनही ती अक्कलदाढ अर्धीच बाहेर आलीये. ~X( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by संजीव नाईक

दाता॑चा आणि नजरेचा तसा थेट काहीच स॑ब॑ध नाही. दात काढल्यावर डोळ्या॑नी कमी दिसते अशी एक अ॑धश्रद्धा प्रचलित आहे. हे जर खरे असते तर कवळी लावणारे सगळेच आ॑धळे झाले असते की.. :)

मला अक्कलदाढेच्या वेळी सगळे दात पडून जातील आणि फक्त अक्कलदाढ शिल्लक राहील असे वाटत होते. तोंडातले एकूण एक दंत मुळापासुन दुखत होते. माझेही,आणि एकदा नव्हे चारदा!कसला वैताग आला होता,मी तर एकदा दिनेशला म्हटलं की सगळे दात काढून टाकून कवळीच बसवू का?अजूनही कधीतरी त्यातली एक व्रात्य बया त्रास देतेच. अक्कलदाढेची कहाणी लिवाच डॉ.साहेब. स्वाती

वरदा 23/06/2008 - 22:15
मी तर पहिले दात आल्यापासुन डेंटीस्ट कडे जातेय ती अजून जातेच आहे...एकही दात धड येईल तर शप्पथ! चतुरंग बरं झालं अनुभव सांगितला माझ्या चारही अक्कलदाढा आतच राहिल्यात आणि त्या वाकड्या आहेत असं एक्स रे मधे दिसतय्..मला ६ महिने आधी सांगितलय सगळ्या काढाच्या लागतील्...एकदा एक दाढ सूजुन झालेय्...तेवढ्यापुरत्या पेनिसिलिन घेऊन गप्प बसलेय मी...जावं की नाही ती सर्जरी करायला त्याचा विचार करतेय....आता तुम्ही म्हणतात तसं खूप त्रास होत नाही असं दिसतय्...गेलं पाहिजे... डॉक्टर खरच मला नेहेमीच पडतो हा प्रश्न कशाला येते अक्कलदाढ्...खूप छान समजावलयत तुम्ही....
"अहो जरा बघता का..मेघनाचा गाल कालपासून सुजलाय, कानपण दुखतोय, डोक॑ ठणकत॑य" सौ.परा॑जपे म्हणाल्या. "अरे बाप रे.. हिलातर तापही आलाय बहुतेक, थर्मामीटर आण ग॑ जरा.. अरेच्च्या, मेघना तुझ॑ तो॑डही उघडत नाहीये.." बहुतेक वेळा हेच स॑वाद होतात घरा-घरातून जे॑व्हा "अक्कलदाढ" उगवत असते.. "डॉक्टर एव्हढा त्रास देऊन ही मेली अक्कलदाढ येतेच कशाला.. आणि मलाच का? माझ्या कुठल्याच मैत्रिणीला अजुन अक्कलदाढ आलेली नाहिये.." हा प्रश्नही खूप कॉमन आहे. मी प्रस्तूत लेखात अक्कलदाढेच्या त्रासाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीन.. 'उत्क्रा॑ती' ही एक सतत चालू असणारी प्रक्रिया आहे.

मैसूर बोंडा

स्वप्ना हसमनीस ·

II राजे II 22/06/2008 - 12:34
स्वयंपाक घरातलं काही कळत नाय बॉ... पण तुम्ही देत असलेल्या कृतींची नावे मात्र भन्नाट आहेत हे नक्की ;) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:34
ही पाकृ बाकी सह्ही आणि रुचकर दिसते आहे! धन्यवाद स्वप्ना... वि.सू. : मैदा शक्यतो टाळणार्‍या तात्यांसारख्या व्यक्तिंनी एक किंवा दोन बोंडेच खावेत. अधाशीपणे खाल्ल्यास पोटाला त्रास होण्याची शक्यता!!!! हम्म! खरं आहे. पण एक किंवा दोनच बोंडे कदाचित पुरणार नाहीत, तीन किंवा चार तरी खावे लागतील. मग मात्र थांबेन... :) आपला, (मैद्याचे पदार्थ आवडणारा परंतु ते शक्यतोवर टाळणारा) तात्या.

सहज 23/06/2008 - 08:06
मागे एका ओळखीच्यांकडे खाल्ला होता हा प्रकार. मला वाटले ही कसली भजी, आता काहीच नाही. नुस्ते पीठ, मीठ, जिरे. ना बटाटा, कांदा ना कुठले पान. पण दोन तीन सुंदर चटण्या केल्या होत्या त्यांनी, त्याबरोबर खाल्ले. आता कळले की त्याला बोंडा म्हणतात व तो असाच असतो. :-)

II राजे II 22/06/2008 - 12:34
स्वयंपाक घरातलं काही कळत नाय बॉ... पण तुम्ही देत असलेल्या कृतींची नावे मात्र भन्नाट आहेत हे नक्की ;) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

विसोबा खेचर 23/06/2008 - 06:34
ही पाकृ बाकी सह्ही आणि रुचकर दिसते आहे! धन्यवाद स्वप्ना... वि.सू. : मैदा शक्यतो टाळणार्‍या तात्यांसारख्या व्यक्तिंनी एक किंवा दोन बोंडेच खावेत. अधाशीपणे खाल्ल्यास पोटाला त्रास होण्याची शक्यता!!!! हम्म! खरं आहे. पण एक किंवा दोनच बोंडे कदाचित पुरणार नाहीत, तीन किंवा चार तरी खावे लागतील. मग मात्र थांबेन... :) आपला, (मैद्याचे पदार्थ आवडणारा परंतु ते शक्यतोवर टाळणारा) तात्या.

सहज 23/06/2008 - 08:06
मागे एका ओळखीच्यांकडे खाल्ला होता हा प्रकार. मला वाटले ही कसली भजी, आता काहीच नाही. नुस्ते पीठ, मीठ, जिरे. ना बटाटा, कांदा ना कुठले पान. पण दोन तीन सुंदर चटण्या केल्या होत्या त्यांनी, त्याबरोबर खाल्ले. आता कळले की त्याला बोंडा म्हणतात व तो असाच असतो. :-)
मैसूर बोंडा
साहित्य : एक वाटी मैदा, एक वाटी दही , जिरे, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. कृती : रात्री एक वाटी मैद्यात एक वाटी दही घालून हे मिश्रण चांगले फेटून ठेवावे. सकाळी त्यात मीठ,जिरे,बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून भज्यांप्रमाणे तळून काढावीत. हे बोंडे खूप फुगतात व रुचकर लागतात. कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावेत. :) वि.सू.

त्या गुर्जरनगरी: प्रथम तुज पाहता

ऋषिकेश ·

अवलिया 22/06/2008 - 11:45
गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात. वा तुम्ही आमच्याच जातकुळीतले... मस्त नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

In reply to by अवलिया

ऍडीजोशी 23/06/2008 - 18:13
अणूमोदण आहे :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

प्रथम दर्शनाचे वर्णन आवडले. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात. हम्म.. बरोबर.. पण गांधीनगर किवा चंदीगढ किवा अगदी आपलं नव्या मुंबईतलं वाशी सुध्दा कधी मैत्री करून जातं कारण त्या आखीव पोषाखीपणामागे सुध्दा अस्सल भारतीय मन असतं.त्यामुळे नीट भांग बिंग पाडून,स्वच्छ कपडे घातलेल्या गोंडस मुलासारखी ही शहरं वाटतात,तर आत्ताच मातीत मनसोक्त खेळून,पायाला चिखल,चुरगळलेले कपडे पण चेहर्‍यावर खेळाचा अपार आनंद..अशी आपली ही पेठा,गल्ल्या,बोळ वाली गावं दिसतात.ती ही तितकीच गोजिरवाणी वाटतात. (मला दोन्ही प्रकारची शहरं,गावं वाचायला ; त्यांना भेटायला आवडतं.) लेख उत्तम झाला आहे.पण आता गुज्जू आदरातिथ्य लवकर येऊ दे.जमल्यास फोटो टाक ना.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

II राजे II 22/06/2008 - 12:06
त्यामुळे नीट भांग बिंग पाडून,स्वच्छ कपडे घातलेल्या गोंडस मुलासारखी ही शहरं वाटतात,तर आत्ताच मातीत मनसोक्त खेळून,पायाला चिखल,चुरगळलेले कपडे पण चेहर्‍यावर खेळाचा अपार आनंद..अशी आपली ही पेठा,गल्ल्या,बोळ वाली गावं दिसतात.ती ही तितकीच गोजिरवाणी वाटतात. वा वा काय उपमा दिली आहे छान !!! बाकी लेखमाला जबरस्त चालू आहे... ! मोदीची माया आहे की काय असे वाटतं गुजरात मध्ये गेल्यावर... ;) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

अनिल हटेला 22/06/2008 - 17:33
छान प्रवास्वर्णन चालू आहे... आवडल बुवा आपल्याला.... पु. भा.प्र...................

चतुरंग 23/06/2008 - 04:39
मला आखीवरेखीव आणि 'जिवंत' अशी दोन्ही शहरे तितकीच छान वाटतात. प्रशस्त गुर्जरनगरीत तीन तीन मोरांनी तुझे 'मोर'दार स्वागत केलेले वाचून छान वाटले. ;) चतुरंग

विद्याधर३१ 23/06/2008 - 07:23
तुमची गुजरात सफर वाचायला आवडेल. मला ही क.. ख.. ग.. घ... कंसेप्ट जाम आवडली..... मलापण. विद्याधर

सहज 23/06/2008 - 07:31
गुजराथचे [गांधीनगर] वर्णन आवडले. वर्णनावरुन नक्कीच पारितोषीक विजेते शहर वाटते. पुढचा भाग लवकर येउ देत.

अमोल केळकर 23/06/2008 - 09:18
गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात. एकदम बरोबर मला वाटत त्यामुळे अहमदाबाद हे गांधीनगर पेक्षा जास्त जवळचे ( आपले) वाटते कारण आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे हे तुलनेने अहमदाबाद मधे जास्त आढळतात. पुढचा भाग लवकर येऊ दे.खमण खाण्यास उत्सुक आहे

ऋषिकेश 23/06/2008 - 22:28
सर्व प्रतिसादकर्त्यांचे, तसेच व्यनी-खरडींतून प्रोत्साहन देणार्‍या सार्‍यांचे अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अवलिया 22/06/2008 - 11:45
गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात. वा तुम्ही आमच्याच जातकुळीतले... मस्त नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

In reply to by अवलिया

ऍडीजोशी 23/06/2008 - 18:13
अणूमोदण आहे :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

प्रथम दर्शनाचे वर्णन आवडले. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात. हम्म.. बरोबर.. पण गांधीनगर किवा चंदीगढ किवा अगदी आपलं नव्या मुंबईतलं वाशी सुध्दा कधी मैत्री करून जातं कारण त्या आखीव पोषाखीपणामागे सुध्दा अस्सल भारतीय मन असतं.त्यामुळे नीट भांग बिंग पाडून,स्वच्छ कपडे घातलेल्या गोंडस मुलासारखी ही शहरं वाटतात,तर आत्ताच मातीत मनसोक्त खेळून,पायाला चिखल,चुरगळलेले कपडे पण चेहर्‍यावर खेळाचा अपार आनंद..अशी आपली ही पेठा,गल्ल्या,बोळ वाली गावं दिसतात.ती ही तितकीच गोजिरवाणी वाटतात. (मला दोन्ही प्रकारची शहरं,गावं वाचायला ; त्यांना भेटायला आवडतं.) लेख उत्तम झाला आहे.पण आता गुज्जू आदरातिथ्य लवकर येऊ दे.जमल्यास फोटो टाक ना.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

II राजे II 22/06/2008 - 12:06
त्यामुळे नीट भांग बिंग पाडून,स्वच्छ कपडे घातलेल्या गोंडस मुलासारखी ही शहरं वाटतात,तर आत्ताच मातीत मनसोक्त खेळून,पायाला चिखल,चुरगळलेले कपडे पण चेहर्‍यावर खेळाचा अपार आनंद..अशी आपली ही पेठा,गल्ल्या,बोळ वाली गावं दिसतात.ती ही तितकीच गोजिरवाणी वाटतात. वा वा काय उपमा दिली आहे छान !!! बाकी लेखमाला जबरस्त चालू आहे... ! मोदीची माया आहे की काय असे वाटतं गुजरात मध्ये गेल्यावर... ;) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

अनिल हटेला 22/06/2008 - 17:33
छान प्रवास्वर्णन चालू आहे... आवडल बुवा आपल्याला.... पु. भा.प्र...................

चतुरंग 23/06/2008 - 04:39
मला आखीवरेखीव आणि 'जिवंत' अशी दोन्ही शहरे तितकीच छान वाटतात. प्रशस्त गुर्जरनगरीत तीन तीन मोरांनी तुझे 'मोर'दार स्वागत केलेले वाचून छान वाटले. ;) चतुरंग

विद्याधर३१ 23/06/2008 - 07:23
तुमची गुजरात सफर वाचायला आवडेल. मला ही क.. ख.. ग.. घ... कंसेप्ट जाम आवडली..... मलापण. विद्याधर

सहज 23/06/2008 - 07:31
गुजराथचे [गांधीनगर] वर्णन आवडले. वर्णनावरुन नक्कीच पारितोषीक विजेते शहर वाटते. पुढचा भाग लवकर येउ देत.

अमोल केळकर 23/06/2008 - 09:18
गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात. एकदम बरोबर मला वाटत त्यामुळे अहमदाबाद हे गांधीनगर पेक्षा जास्त जवळचे ( आपले) वाटते कारण आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे हे तुलनेने अहमदाबाद मधे जास्त आढळतात. पुढचा भाग लवकर येऊ दे.खमण खाण्यास उत्सुक आहे

ऋषिकेश 23/06/2008 - 22:28
सर्व प्रतिसादकर्त्यांचे, तसेच व्यनी-खरडींतून प्रोत्साहन देणार्‍या सार्‍यांचे अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १त्या गुर्जरनगरी: ओळख वरून पुढे... पहिल्या दिवशी सरळ ऑफिसाला जायचे होते व तेथून संध्याकाळी हॉटेलवर. प्रीपेड टॅक्सी केली. एकटाच असल्याचे पुढेच बसलो. गाडी विमानतळाच्या आवारातून बाहेर पडली आणि एका हमरस्त्याला लागली. अहमदाबाद विरळ होत गेलं आणि गांधीगरच्या रस्त्याला लागलो होतो. इथे माझं लक्ष वेधलं ते इथल्या रस्त्यांनी... अहाहा! रस्ते असावेत तर असे.. तेही भारतात.. संपूर्ण प्रवासात कुठेही खड्डा दिसलाच नाही.

लावणी - प्रणयरातीला कुठे चालला

पुष्कराज ·

मिसळपाव 22/06/2008 - 18:21
नाव वाचून जरा बाचकतंच उघडली कविता, पण बरं झालं टाळली नाहि ते! .....प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका ... प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी ..... हि कडवी मस्तच आहेत.

स्वप्निल मन 22/06/2008 - 19:10
प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी ..... खरच हि कडवी खुपच छान आहेत. स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.

शेखर 23/06/2008 - 11:50
हे खुपच भावलं.... प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी अस सामोर जाव रातीला रोजच व्हावी रात नवी शेखर...

प्राजु 23/06/2008 - 11:55
सुंदर आहे बाज लावणीचा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका आहाहा काय सुंदर शब्द आहेत, प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी जिंकलस पुष्कराज. छानच लावणी. पुण्याचे पेशवे

मिसळपाव 22/06/2008 - 18:21
नाव वाचून जरा बाचकतंच उघडली कविता, पण बरं झालं टाळली नाहि ते! .....प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका ... प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी ..... हि कडवी मस्तच आहेत.

स्वप्निल मन 22/06/2008 - 19:10
प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी ..... खरच हि कडवी खुपच छान आहेत. स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.

शेखर 23/06/2008 - 11:50
हे खुपच भावलं.... प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी अस सामोर जाव रातीला रोजच व्हावी रात नवी शेखर...

प्राजु 23/06/2008 - 11:55
सुंदर आहे बाज लावणीचा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका आहाहा काय सुंदर शब्द आहेत, प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी जिंकलस पुष्कराज. छानच लावणी. पुण्याचे पेशवे
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रात चांदण टिपूर सांडल वार्‍याचा बी साज नवा प्रणयरातीला कुठ चालला शृंगाराला सोडून या नथनी पैंजण दूर ठेवल कशास त्यांची भीड उगा प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका हाती माझ्या हात सख्याचा अन् फुललेली रात हवी नभांगणातील लाख चांदणी प्रीत बघुनी जळल मनी प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी अस सामोर जाव रातीला रोजच व्हावी रात नवी

सैतानाची बाळे

हेरंब ·

कथानक चांगले आहे. लवकरात लवकर दुसरा भाग टाकावा ही विनंती. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

कथानक चांगले आहे. लवकरात लवकर दुसरा भाग टाकावा ही विनंती. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ : - सैतानाची कंट्रोलरुम. एका भव्य ,गोलाकार ,सुसज्ज ,बंदिस्त जागेमधे सैतानाची बाळे गोलाकार बसली आहेत. प्रत्येकाच्या समोर एक संगणकाचा पडदा. प्रत्येक बाळ आपल्याला नेमून दिलेले काम अतिशय आनंदाने चित्कारत करत आहे. सैतानाची फेरी दिवसातून एकदाच होत असते. काम व्यवस्थित चालले असेल तर न बोलताच, पण एका विलक्षण जरबेच्या वातावरणात ती पार पडते. प्रत्येकाच्या वाट्याला (वाट लावायला) एकेक देश दिलेला आहे. पृथ्वीवर काही बाळे 'सिव्हिलायझेशन्स्' वा तत्सम नांवाचे गेम्स् खेळतात तसेच. पण फरक इतकाच की हे खोटे नसतात. त्या त्या देशांत, प्रत्येक खेळी प्रत्यक्षांत येत असते.

पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस

नरेंद्र गोळे ·

'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!! मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पक्या 22/06/2008 - 14:02
>> 'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!! मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते. हेच म्हणतो मी .

बिरुटेसाहेब आणि पक्या प्रतिसादाखातर धन्यवाद. मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?

In reply to by नरेंद्र गोळे

मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? धन्यवाद साहेब, सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? ;) आपणास झाल्या तसदीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 23/06/2008 - 04:59
सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? बिरुटेसरांचं उत्तर आवडलं! :) गोळेशेठ, मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! असो, पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद... तात्या.

In reply to by नरेंद्र गोळे

ध्रुव 23/06/2008 - 12:46
मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? विषय - पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस - असा असल्याने परिचय असेल अस वाटले होते. असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला. पुढच्या वेळेला कृपया विषय: अ ब क - पुस्तक दुवा असा द्यावा म्हणजे इतरांचा वेळ नाही जाणार. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर 23/06/2008 - 13:12
असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला. वरील वाक्यातील 'भ्रम' या शब्दाची योजना आवडली! :) आपला, (शब्दवेल्हाळ) तात्या.

In reply to by ध्रुव

ध्रुव महोदय, प्रतिसादाखातर धन्यवाद. आपला वेळ फारच महत्वाचा आहे हे उघडच दिसून येते. या विषयलेखनातील चुकीमुळे त्याचा बराच अपव्ययही झाला असावा असे दिसते. त्याची जबाबदारी मात्र सर्वस्वी आपल्यावरच आहे. आपण आपल्या आवडीच्या विषयांत लक्ष घातल्यास वेळेचा अपव्यय टाळू शकाल. आपल्याला, मी वर लिहीलेल्या परिचयात्मक वाक्यांची दखलही घ्यावीशी वाटली नाही त्यावरून, ह्या विषयात आपल्याला रुचीही कमीच असावी असा समज होऊ शकतो. तेव्हा आपण इकडे दुर्लक्ष करावे ही नम्र विनंती. तरीही, आपल्या सूचनेची योग्य ती दखल घेतली आहे.

हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! >> तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल? मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल. अर्थात, अधिक अपेक्षा करणार्‍या डॉ.बिरुटे सारख्यांना एवढे फटकळ उत्तर मिळण्याची खरोखरीच अपेक्षा नसणार. ते काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे. मूळ पी. डी. एफ. फाईल केवळ १ मेगाबाईटच्या आसपासच असल्याने आपण कुणा ब्रॉडबॅन्डधारक मित्रास डाऊनलोड करायला सांगून त्याचेकडून मागवून घेऊ शकता. मला आपला विरोपपत्ता कळवल्यास मीही आपल्याला पाठवू शकेन.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर 23/06/2008 - 10:55
तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल? हम्म! हा मुद्दा मला पटला. मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल. येस्स! मलाही फटकळच म्हणायचे होते. तो शब्द मला सुचला नाही आणि मी चुकून 'उर्मट' हा शब्द वापरला. क्षमस्व! काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे. देअर एन्डस द मॅटर! विषय मिटला... धन्यवाद गोळेशेठ. पुलेशु... :) तात्या.

'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!! मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पक्या 22/06/2008 - 14:02
>> 'सुर्य पेरणारा माणूस' पुस्तक परिचयाबद्दल आपले आभार !!! मांडणी अधिक तपशिलवार असती तर अधिक ओळख झाली असती असे वाटते. हेच म्हणतो मी .

बिरुटेसाहेब आणि पक्या प्रतिसादाखातर धन्यवाद. मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे?

In reply to by नरेंद्र गोळे

मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? धन्यवाद साहेब, सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? ;) आपणास झाल्या तसदीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 23/06/2008 - 04:59
सदरील दुव्यावरुन पुस्तके डाऊन लोड करणे आमच्या जालाच्या वेगामुळे आम्हाला जमले नाही. म्हणुन आम्ही तपशिलवार पुस्तक परिचय इथेच असता तर बरे झाले असते, असे म्हटले होते. अर्थात तपशीलाचा आपणास कंटाळा असेल तर पुढील वेळेस केवळ 'दुवा' द्यावा, तिथेच वाचण्याचा प्रयत्न करु, काय म्हणता ? बिरुटेसरांचं उत्तर आवडलं! :) गोळेशेठ, मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! असो, पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद... तात्या.

In reply to by नरेंद्र गोळे

ध्रुव 23/06/2008 - 12:46
मात्र वर दिलेल्या दुव्यावर संपूर्ण पुस्तकच सहज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतांना अधिक परिचयाची गरजच काय आहे? विषय - पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस - असा असल्याने परिचय असेल अस वाटले होते. असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला. पुढच्या वेळेला कृपया विषय: अ ब क - पुस्तक दुवा असा द्यावा म्हणजे इतरांचा वेळ नाही जाणार. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर 23/06/2008 - 13:12
असो, तुमच्या या उत्तराने भ्रम दूर झाला. वरील वाक्यातील 'भ्रम' या शब्दाची योजना आवडली! :) आपला, (शब्दवेल्हाळ) तात्या.

In reply to by ध्रुव

ध्रुव महोदय, प्रतिसादाखातर धन्यवाद. आपला वेळ फारच महत्वाचा आहे हे उघडच दिसून येते. या विषयलेखनातील चुकीमुळे त्याचा बराच अपव्ययही झाला असावा असे दिसते. त्याची जबाबदारी मात्र सर्वस्वी आपल्यावरच आहे. आपण आपल्या आवडीच्या विषयांत लक्ष घातल्यास वेळेचा अपव्यय टाळू शकाल. आपल्याला, मी वर लिहीलेल्या परिचयात्मक वाक्यांची दखलही घ्यावीशी वाटली नाही त्यावरून, ह्या विषयात आपल्याला रुचीही कमीच असावी असा समज होऊ शकतो. तेव्हा आपण इकडे दुर्लक्ष करावे ही नम्र विनंती. तरीही, आपल्या सूचनेची योग्य ती दखल घेतली आहे.

हा प्रश्न अंमळ मनोगती वाटला, थोडासा उर्मटही वाटला! >> तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल? मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल. अर्थात, अधिक अपेक्षा करणार्‍या डॉ.बिरुटे सारख्यांना एवढे फटकळ उत्तर मिळण्याची खरोखरीच अपेक्षा नसणार. ते काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे. मूळ पी. डी. एफ. फाईल केवळ १ मेगाबाईटच्या आसपासच असल्याने आपण कुणा ब्रॉडबॅन्डधारक मित्रास डाऊनलोड करायला सांगून त्याचेकडून मागवून घेऊ शकता. मला आपला विरोपपत्ता कळवल्यास मीही आपल्याला पाठवू शकेन.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर 23/06/2008 - 10:55
तात्या, लोकांशी संवाद साधून त्यांना आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबाबत माहिती आपणहून सांगणारा उर्मट कसा काय असू शकेल? हम्म! हा मुद्दा मला पटला. मी दिलेले उत्तर कदाचित काहीसे फटकळ वाटू शकेल. येस्स! मलाही फटकळच म्हणायचे होते. तो शब्द मला सुचला नाही आणि मी चुकून 'उर्मट' हा शब्द वापरला. क्षमस्व! काहीसे सौम्यपणेही सांगता आले असते. तेव्हा बिरुटेसाहेब मी फटकळपणाखातर मात्र दिलगीर आहे. देअर एन्डस द मॅटर! विषय मिटला... धन्यवाद गोळेशेठ. पुलेशु... :) तात्या.
पुस्तक-परिचयः सूर्य पेरणारा माणूस नुकतेच प्रा. प्रवीण दवणे यांचे "सूर्य पेरणारा माणूस" नावाचे पुस्तक वाचनात आले. प्रकाशक: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था), प्रथमावृत्तीः ८ मे २००८, मूल्यः रु. १००/- फक्त. विस्मयकारक नावाच्या, या पुस्तकात विस्मयचकित करणाऱ्या एका आयुष्याचा आलेख साकारला आहे. उण्यापुऱ्या एका दशकाच्या कालावधीत नव्या मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेल्या "हावरे बिल्डर्स" चे संस्थापक कै. सतीश काशिनाथ हावरे यांचे ते चरित्र आहे. आजमितीस 'हावरे बिल्डर्स' दररोज दहा-बारा घरे आणि दुकानांचा ताबा ग्राहकास सुपूर्त करत आहेत.