मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आणिबाणी

विकास ·
२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले.

कार्लिनबुवा आणि कर्वेबाई

धनंजय ·
जून २२, २००८ रोजी जॉर्ज कार्लिन हे अमेरिकेतील ज्येष्ठ विनोदी कलाकार वारले. ते जिवंत असताना त्यांच्याविषयी मला काही माहीत नव्हते. पण त्यांच्या मृत्यूच्या संदर्भाने अनेक वर्तमानपत्रांत स्मरणलेख आलेत, त्यावरून एका काळच्या त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आली. त्यांचा एका विशिष्ट विनोदी भाषणाचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी आला "Seven Words You Can Never Say on Television" (दूरदर्शनवर कधीही न म्हणता येणारे सात शब्द).

रूबिक्स क्यूब

लंबूटांग ·
कोणी solve केला आहे का? मी आत्ताच पूर्ण केला. Algorithm आणि video इथे आहे. कितीतरी वर्षांपासून प्रयत्न करत होतो. पहिले तर video बघून पण गोंधळ घातला होता. पण आत्ताच solve केला.

शादी से पहले और शादी के बाद !

संदीप चित्रे ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शादी से पहले हाथों में हाथ लबों पर भी खूब मिठास घंटोंतक चलें फोन पे बात हर शाम उन्हें मिलने के बाद अंबर का हो रंग नीला या फिर हो घनघोर वर्षा इक छोटा, कप कॉफी का साथ देता दिवानों का… शादी होते सबकुछ बदला उनका न सिर्फ नाम बदला घर आते हैं साँझ ढले हम लिए हाथ सब्जी का थैला… बातें अब भी होती हैं घटोंतक वे चलती हैं घरखर्चा और बच्चोंकी फीस क्या जेब में अब कुछ बाकी है? ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!! -------------------------------- http://www.atakmatak.blogspot.com --------------------------------

शालूची शालीनता

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची. शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम.

(सख्या रे, घामट मी तरुणी!)

चतुरंग ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जगदीश खेबुडकरांचं, दीदींच्या आवाजातलं 'सख्या रे घायाळ मी हरणी' हे सुंदर गीत ऐकलं. प्रियकराला भेटायला निघालेल्या पण उन्हाळ्यानं आणि प्रदूषणानं हैराण झालेल्या तरुणीची कैफियत आमच्या नजरेसमोर आली! (श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले!

शिंपीणिचं घरटं

रामदास ·
लेखनविषय:
गावाचं तेव्हा शहर व्हायचं होतं.वाड्याला लागून वाडे होते . छेडा-गाला-ठक्कर नावाची माणसं फिरकत नव्हती. गावाला गुजराथ्यांचं वावडं नव्हतं.गावात गुजराथी कुटुंब बरीच होती. त्यांना गुज्जर म्हणायचे. धारीया ,सेठ , शहा अशी नेमकीच आडनावं होती. गुज्जरांची मोजणी वेगळी नसायची. हळूहळू बदल येत गेला.भाडोत्री नावाची कुटुंब वाड्यात रहायला आली.त्यांना गावाबद्दल कधीच प्रेम नव्हतं.त्यांना त्यांचंच गाव आवडायचं .पण पोट भरायला बिचारी आमच्या गावात आली होती.पण हळूहळू बदल येत होता. पंचायतीची इमारत उभी राहीली.टेलीफोनच्या लायनी रस्त्यावरून लोंबायला लागल्या. शाळा मोठी झाली.

उघड्या खांद्यावरती सखये--

पुष्कराज ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उघड्या खांद्यावरती सखये जरा ओढ्णी ओढून घे तू नजर विखारी असते सखये त्या नजरेला जाणून घे तू साडी जेव्हा नेसतेस तू गाली जेव्हा हासतेस तू शततारा त्या जळूनी जाती अशी अप्सरा वाटतेस तू सुंदरता तू नकोस लपवू परि मोकळी नकोस उधळू डंख मारण्या सगळे तत्पर एवढेच बघ जाणून घे तू वीज नभातील लखलख्णारी सहज जाळ्ते कोणालाही परि ती उतरून येता खाली सखे शेवटी विझूनी जाई शाप लज्जा नाही सखये सौंदर्याची ही अभीव्यक्ती सखे कमी तू नाहीस कोठे जाणून घे तू तव स्त्री शक्ती

पुस्तक परिक्षण... भोगले जे दु:ख त्याला (आशा आपराद)

प्रगती ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तकाचे नाव : "भोगले जे दु:ख त्याला" लेखिका : आशा आपराद प्रकाशन : मुल्य :