मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ही केशरी संध्याकाळ

श्रीकृष्ण सामंत ·

शितल 01/07/2008 - 23:03
फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा येवूनी बिलगे माझ्या शरिरा रंगात मिसळूनी रंग गगनी दिसती हे पतंग विहार करिती एकमेका संग हे कडवे मस्तच

In reply to by अरुण मनोहर

अरुण मनोहर , आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शितल 01/07/2008 - 23:03
फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा येवूनी बिलगे माझ्या शरिरा रंगात मिसळूनी रंग गगनी दिसती हे पतंग विहार करिती एकमेका संग हे कडवे मस्तच

In reply to by अरुण मनोहर

अरुण मनोहर , आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-शीव शंकर वशिष्ट) ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार ते दोन दोन विहंग उडून गगनी होती धूंद लक्षावधी गगने येवूनी करिती माझ्या मनी आक्रंद सप्तरंगात मी हरवली झुळझुळ झऱ्यात मी न्हाहली छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा येवूनी बिलगे माझ्या शरिरा रंगात मिसळूनी रंग गगनी दिसती हे पतंग विहार करिती एकमेका संग ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार श्रीकृष्ण सामंत

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष,लय,संवाद,जॉनर

भडकमकर मास्तर ·

मनिष 01/07/2008 - 15:51
उदाहरणांमुळे जास्त मजा येते आहे. अवांतर - नुकत्याच पाहिलेल्या 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष आवडला.

In reply to by मनिष

मे अमीर पाहिलेला नाहीये... 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष याबद्दल अजून माहिती द्या... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 01/07/2008 - 20:15
हा भाग जास्त छान समजला...उदाहरणं जास्त किंवा सोपी असल्याने असेल कदाचित... माझी अशी एच आर इंटर्व्यु साठी तयारी झाली होती ते आठवलं कुठल्याही प्रश्नाला...माझ्यापुढचा प्रॉब्लेम, माझी थॉट प्रोसेस, माझं सोल्युशन आणि त्याचा रिझल्ट असं उत्तर द्यावं लागायचं...एक्दम तस्संच वाटलं मला... पु ले शु... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 02/07/2008 - 08:17
हा लेख पण लै भारी वाटला! मास्तर, तुमचा या विषयातला व्यासंग पाहून अंमळ थक्क व्हायला होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

आमच्या काही आवडत्या वेबसाईट्स..... १.playwriting seminars खूप मोठी साईट आहे ही.... http://www.vcu.edu/arts/playwriting/seminar.html २.होतकरू पटकथालेखकांसाठी http://www.toronto-filmmaking.com/screenwriting.html ३.पटकथालेखनासाठी काही टिप्स .by Billy Wilder http://www.writingclasses.com/InformationPages/index.php/PageID/270 ४.Emotional plots and suspense plots...भावकथा आणि गूढकथा (?) जोडीनं येतात इथे.... http://www.vcu.edu/arts/playwriting/plot.html ५.नाट्यलेखनाची मूलभूत तत्त्वे...by Charles Deemer http://www.geocities.com/cdeemer/Play.htm ६. आणि सबसे बढिया... लायोस ( की लाजोस) एग्रि भाऊचे पुस्तक...सर्जनशील लेखनाची कला. हे पुस्तक एफ्टीआयाय मध्ये लेखक मंडळी पाठ्यपुस्तकासारखे वापरतात, असे ऐकले. मला संपूर्ण इ बुक नाही सापडले पण या नोट्स सापडल्या..... भन्नाट प्रकार आहे... Lajos egri's book art of creative writing... http://www.darkcloudpress.com/%5Cblog_files%5Cegri_notes.pdf ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लय (rhythm) गोष्टीला किंवा नाटकाला एक लय असते.प्रत्येक गोष्टीला लय असते. आपल्या आयुष्यात सुद्धा काही दिवस सावकाश जाणारे, कंटाळवाणे असतात तर काही घटनांनी भरलेले वेगवान असतात... लय सगळीकडेच असते. ..., गाण्यांमध्ये / संगीतात / नृत्यनाट्यात तर असतेच पण संवादांमध्ये , नेपथ्य आणि पात्रांच्या हालचालीमध्ये सुद्धा असते...रेसमध्ये धावणार्‍या घोड्याला स्वत:ची लय असते आणि सर्व धावणार्‍या घोड्यांची मिळून एक लय असते.... तेंडुलकर म्हणतात," अननुभवी लेखक लयीसाठी दिग्दर्शकावर अवलंबून असतो"...विशेषत: कादंबरीचे नाट्यरूपांतर किंवा सिनेरूपांतर करताना ती लय टिकवणं मुश्किल..... किंवा "वाडा चिरेबंदी त्रिनाट्याचे एकच नाटक करायचा एक प्रयत्न झाला, त्यात लय सांभाळणे अवघड जाते " मला स्वत:ला खूप पूर्वी वाचलेली आनंदाचं झाड कादंबरी आवडलेली होती पण चित्रपट अगदीच सुमार वाटला. घटनांसंदर्भात बोलायचं तर ही लयच वेगवान घटना आणि व्यक्तिरेखांची खोली यामधला तोल सांभाळणार असते. हॊरिझॊंटल ऎक्शन गोष्ट पुढे नेते. घटना घडवते. व्हर्टिकल ऎक्शन वेग कमी करते. व्यक्तिरेखांमधलं मानसिक चिंतन दर्शवते. ( आंतरिक अंतर्गत संघर्ष) गोष्टीतले अनेक पदर उलगडून दाखवते. या दोन्ही ऎक्शन आणि त्यातला तोल साधणं गोष्टीसाठी आवश्यक ... मारधाडपटात जास्त हॊरिझॊंटल ऎक्शन असते. चेकॊव्हच्या नाटकात व्हर्टिकल ऎक्शन जास्त असते. _____________________-- त्यामुळे उत्तम पटकथेत भांडण / मारामारीच्या सीननंतर लगेचच पुन्हा मारामारी नसते.... मग शांतता...प्रेमाचे दृश्य / किंवा फ्लॅशबॅक जुन्या आठवणी / गाणी / मानसिक चिंतन वगैरे... हा सारा लयीचा भाग आहे. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संवादलेखन १. व्यक्तिरेखेच्या मनातलं जसंच्या तसं लिहू नये.. आपण रोजच्या आयुष्यात तरी कुठे अगदी खरं मनातलं बोलत असतो ? त्यांना उपरोधाने बोलूदेत, कधी खोटंसुद्धा बोलूदेत..कधी अडखळत, थट्टा करत,कधी कॊमेंट पास करत , टोमणे मारत संवाद पुढे सरकायला हवा. पात्राच्या मनात काय आहे हे अप्रत्यक्षपणे समजलं तर संवाद बरा चाललाय असं समजावं... २. कधीकधी काही अस्वस्थ हालचाली , वागण्याच्या पद्धती असतात ज्या पात्राच्या मनात काय चाललंय ते दर्शवतात.अशा छोट्याछोट्या हालचाली शोधून काढून त्यात्या प्रसंगात पात्रांना चिकटवाव्या लागतात. ( पात्रांची शारीरिक जडणघडण इथे उपयोगी पडते) ३. आपण स्वत:सुद्धा बर्‍याचदा मनातल्या मनात संवाद तयार करत असतो. पार्टीत किंवा गप्पा मारताना आपल्याला कधी मस्त कॊमेंट सुचते आणि बोलायची राहून जाते, मग आपण संवाद तयार करत राहतो की तो जर असं बोलला असता तर मी मग असं बोललो असतो वगैरे... ४.विशेषत: एकांकिकांसाठी संवाद छोटे हवेत.वेगवान हवेत. छोटे म्हणजे किती छोटे ? एका भाषणात एकच कल्पना. (one idea per speech) ५. संवाद लिहिताना संवाद सतत वाचत राहा आणि आता या वाक्यानंतर रंगमंचावर हजर पात्रांपैकी कोण यात व्यत्यय आणणार याचा अंदाज घेत घेत पुढे जा. ६. "दाखवा...सांगू नका." हे सर्वात महत्त्वाचं.. उदा. ती हुशार मुलगी आहे असं कोणी सांगण्यापेक्षा ते प्रसंगातून दिसूद्या. ७. कथेच्या रूपांतरामध्ये सूत्रधार गोष्ट सांगतो अशा युक्त्या शक्यतो वापरू नयेत. ( ती एक पळवाट आहे असं माझं वैयक्तिक मत) ८. बर्‍याचदा दोन ( विरुद्ध स्वभावाच्या सुद्धा) पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे असा भास होतो... कौशल्याचा भाग हाच की पात्रे जीवंत होण्यासाठी संवाद त्यांचे स्वतःचे वाटले पाहिजेत... त्याच व्यक्तिरेखा बोलताहेत असं वाटलं पाहिजे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हा माझा सध्याचा आवडता सिनेमा. गंमत म्हणजे ही सगळी सूत्रं त्याला चपखल लावून दाखवता येतात. पूर्वपक्ष? जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. उलट चिरोंजीलाल अमेरिकेत निघून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला या प्रकरणात अज्याबात गुंतायचं नाही आहे, मग सूड-बिड तर दूरच राहिला. ते सभ्यपणे पोलिसांकडेही जाऊन पाहतात, पण तिथेही काही डाळ शिजत नाही. मग नाईलाज म्हणून म्हणा, योगायोगानं तो दलाल भेटतो म्हणून म्हणा, थोडी खुमखुमी असल्यामुळे म्हणा - मंडळी या अचाट प्लॅनमधे सामील होतात आणि बघता बघता गोष्ट वेग घेते. प्रमुख व्यक्तिरेखा - यातली सगळ्यांत लोभसवाणी आणि खरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अनुपम खेरची. फसवणूक त्याची झालीय. या सगळ्या अव्यापारेषु व्यापारातून त्याला पैसे आणि घर तर मिळतंच. पण त्याचं हातून निसटणारं कुटुंबही अनपेक्षितपणे परत मिळून जातं. या प्रवासातून दिसणारा-घडणारा टिपिकल मध्यमवर्गीय, पापभीरू, कुटुंबवत्सल, नेक बाप अक्षरशः लाजवाब आहे. तो असतो पार्श्वभूमीला. सतत मोडता घालत, चिडत-वैतागत-खंतावत. पण ही गोष्ट त्याचीच. पोरगा मोठ्या कंपनीत आहे असं अभिमानानं कुणालाही सांगणं काय, किंवा 'इसके साथ कुछ चटनी वगैरा है क्या?' असं पिझ्झा पाहून वैतागानं विचारणं काय! त्याला त्याचा इतिहास-भूगोल आहे आणि तो नेमका दिसत राहतो. हेच इथल्या सगळ्या व्यक्तिरेखांना लागू होतं. भलेही चार फ्रेमकरता का पात्र पडद्यावर येईना, ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. त्यांच्या कपडे घालण्याच्या, खाण्या-पिण्याच्या पद्धती (बोमन इराणीचं नि:संकोचपणे आपल्याच घराच्या आवारात जरा लांब जाऊन लघवी करणं!), त्यांची भाषा (मेघनाच्या मैत्रिणीनं 'बास्टर्ड' अशी शिवी हासडणं!), त्यांचे मॅनरिझम्स (सतत घायकुतीला आलेला काहीसा नर्व्हस असा बापूंचा सेक्रेटरी)... आहाहा! संघर्ष - खोसला कुटुंब आणि बोमन इराणीचं पात्र (नाव विसरले!) यांच्यातला हा संघर्ष असं ढोबळ मानानं म्हणता येईल. पण तो बाह्य संघर्ष झाला. खरा संघर्ष अनुपम खेरचा. कुटुंबाशी, नव्या मूल्यव्यवस्थेशी आणि स्वत:शी. अशी फसवाफसवी करून पैसे परत मिळवावेत की न मिळवावेत, या त्याच्या 'भवति न भवति'मधून तो अचूक दिसत राहतो. तो पोरांवर चिडल्यासारखं करतो, पण पोटातून मात्र सुखावलेला. काळजी आणि कौतुक करणारा. तरी चिरोंजीलाल पैसे घेऊन आल्यावर त्याला पुरेसा आणि निर्भेळ आनंदही होत नाही. मासिक वाचल्याचं नाटक करत तो आपला व्हरांड्यातच. आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? संवाद - 'हम आपके' मधे सुरुवातीला आलोकनाथ आणि कुणाचातरी एक संवाद आहे. कसला विनोदी आहे तो! तुम्ही भाऊ वारल्यावर पुतण्यांना कसं सांभाळलंत आणि त्यासाठी लग्न टाळलंत, तुम्ही किती थोर, असं आलोकनाथलाच सांगण्यात येतं! अरे, त्याला माहीत नाही का हे? ही कुठली निर्बुद्ध पद्धत पात्राची पार्श्वभूमी सांगायची? असो. असले आचरट संवाद 'खोसला..'मधे नाहीत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात. बिनदिक्कत (आणि गरज पडेल - नाईलाज होईल तेव्हाच!) शिव्या देतात. उगीचच्या उगीच भाषणं न झोडता एखाद्याच लुकनं आपलं म्हणणं स्पष्ट करतात. (चिरोंजीची बहीण अनुपम खेरला कसले खतरनाक लुक्स देत असते सतत! 'बाबा म्हणजे ना... ' असं कौतुक कम वैताग सरळ वाचता येतो त्यात.) लय - आधी काहीशी संथ आहे गोष्ट. सगळ्या माणसांशी पुरेशी ओळख होते आपली. सगळ्यांची गोची - स्वभाव - अडचणी - एकात एक गुंतलेल्या तंगड्या... सगळं स्पष्ट होतं. आणि मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते! पेहेलवान, पोलीस, नाटक मंडळी, फिशरी जमिनीवरचं नाटक... अशा चढत्या क्रमानं गोष्टी घडत जातात. ही मास्तरांची हॉरिझॉण्टल लय असावी बहुधा. पण पार्श्वभूमीला त्याला आडवा छेद देत, अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत! मास्तर, बरोबर आहे का हो?

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष 02/07/2008 - 11:00
'खोसला का घोसला' खरच छान आहे. ते व्हर्टिकल/हॉरिझॉण्टल माहित नाही. पण व्यक्तिरेखा फारच सुरेख लिहिल्यात आणि अभिनेत्यांनी त्याला मस्तच न्याय दिलाय. अनुपम खेर -- केवळ अशक्य!! अभिनयाचा वस्तुपाठ म्हणा ना...ते दारू घेऊन येतांना त्याचे चालणे? वा!!!

In reply to by मेघना भुस्कुटे

जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. परफेक्ट...पूर्वपक्ष डायरेक्ट न सांगता आपोआप कळायला हवा... ते इथे एकदम जमतेच... ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. ...........आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? एकदम सहमत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात आणि बापूचे ते पैसे पाहून घाबरून परत येणं, आणि अनुपमला सॉरी म्हणणं...आणि इतर सगळे बापूवर वैतागलेले असताना अनुपमने येऊन सांत्वन करणं.हा एक अप्रतिम सीन आहे... मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते हे एकदम मस्त .. अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत!... एकदम पटले.... ही व्हर्टिकल ऍक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

वरदा 02/07/2008 - 20:36
सॉलीड अभ्यास केलायस गं....माझा पण हा सगळ्यात लाडका सिनेमा.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by मेघना भुस्कुटे

महेश हतोळकर 02/07/2008 - 23:31
मेघना म्हणाल्या ते मनापासून पटले. उगीच संवाद बोलून पात्राच्या आडून प्रेक्षकांना त्याच पात्राची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न अगदीच हास्यास्पद होता. मास्तरांच्याच शिकवणीवरून वरील प्रसंग बदलण्याचा प्रयत्न. बघा कसा वाटतो ते. (अलोकनाथ व अजीत वाच्छानी अलोकनाथच्या दिवाणखान्यात बसले आहेत. अलोकनाथच्या मागे भिंतीवर त्याच्या भाऊ-भावजयीचा फोटो टांगला आहे.) अजीत वाच्छानी: भाईसहाब अब राजेश की शादी का दिल पे ले ही लिजीये| अलोकनाथ: हां भाईसहाब, (फोटोकडे निर्देश करून) भय्या भाभी की अशिर्वादसे राजेश बिजीनेसको अच्छी तरहसे संभाल रहा है| अब प्रेम भी MBA खत्म करके उसके साथ जुड जायेगा| आपकी नजरमे कोई लडकी हो तो बताईये| (एवढ्यात प्रेम येतो. तो खूप आनंदात आहे.) प्रेमः (दोघांच्या पाया पडून). प्रणाम चाचाजी| प्रणाम मामाजी| अजीत वाच्छानी: भाईसहाब लगता है प्रेम का Result उम्मीद के मुताबिक निकला है| क्यों बेटा? प्रेमः हा मामाजी! मै अव्वल आया| अजीत वाच्छानी: भई व्वा! कृपया हिंदी कडे थोडे दुर्लक्ष करा. खूप चिंध्या केल्या आहेत

In reply to by महेश हतोळकर

...मस्त रे "मी " खूप छान प्रयत्न... ... किंवा "शो डोंन्ट टेल "...पद्धतीने हे सारे अत्यंत कमी किंवा शून्य संवादात दाखवताही आले असते.... .... (आलोकनाथ मोहनीश बहलसाठी स्थळं पाहायला म्हणून हातात मुलींचे फोटो, पत्रिका आणि माहिती वगैरे घेऊन बसला आहे, त्याचे समोरच्या भाऊ आणि भावजयीच्या फोटोकडे लक्ष जाते ....फोटोवर क्लोज मग आलोकनाथवर क्लोज्...त्याला आठवतं, त्याच्या भावाच्या मृत्यूसमयी दोन घाबरलेली लहान मुलं काकाला बिलगतात आणि हा त्यांना डोळ्यातलं पाणी थोपवत शांत करतो,थोपटतो...पुन्हा आलोकनाथचा चेहरा दिसतो, त्याच्या डोळ्यात अश्रू पण चेहर्‍यावर समाधान...( भावाला दिलेलं त्या पोरांना नीट सांभाळायचं वचन पूर्ण केल्याचं वगैरे समाधान) . शेजारी स्थानिक वर्तमानपत्रात मोहनीशचा यंग बिझिनेसमन ऑफ द इयर वगैरे पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो आहे, त्या फोटोकडं तो अभिमानानं पाहतो आणि साधारण पसंत असलेल्या मुलीचा फोटो त्याच्याशेजारी धरतो, नापसंत करतो, असं दोन तीन वेळा होतानाच प्रेम आलेला आहे...).... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

वरदा 03/07/2008 - 00:32
मस्तच आहे मास्तर्....मला आवडली ही आयडीया एक्दम्.... "मी" ची पण आयडीया आवडली... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? उदा. भाग २ च्या लेखाखाली भाग १ आणि भाग ३ चे दुवे ! तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? आता तसे केले आहे. -- जनरल डायर. -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

भाग एक http://www.misalpav.com/node/2344 भाग दोन.. http://www.misalpav.com/node/2347 आता तसे केले आहे. -- जनरल डायर. धन्यवाद डायरसाहेब... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दामिनी... कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते... पूर्वपक्ष जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच... प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत. १.भावना (character) : सत्य २.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं.. म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात. प्रमुख व्यक्तिरेखा १. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते. २. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...? ३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात. ४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो. ( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)... संघर्ष कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष... बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष. शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय. आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ? संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स. सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो. संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड. प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम. फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात. छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात. वाढता संघर्ष : सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... :) .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला.. या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो... संवाद पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते. दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं... अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे :) ... "ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद. लय सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन... त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनिष 03/07/2008 - 12:29
मला पटकथा, प्रिमाईस आवडले तरी प्रत्यक्ष सिनेमा फार भडक/लाऊड वाटला होता.... सनीचा रोल तर फारच...नंतर एकदा चॅनेल सर्फ करतांना एका साऊथ च्या सिनेमात (नाव माहित नाही) तस्सच हात करून बोलणार वकिल पाहिला...फारच विनोदी वाटलं ते सगळ. त्यापेक्षा ऋषी कपूर चा अभिनय आवडला (ह्याला खरं तर कोणी नीट वापरला नाही, बराच चांगला अभिनेता अहे, फक्त फार फालतू रोल मधे अडकला)...त्याने त्याचे ते "दु:ख तो इस बात का है दामिनी, की तुम्हारे लिये मुझस, हम दोनोसे जरुरी कुछ और हे" अशा अर्थाच्या संवादाच्यावेळी द्विधा होणे किंवा व्याकूळ होणे खूपच चांगले दाखवले ... एकूणात मला "व्हर्टिकल ऍक्शन", "हॉरिझाँटल ऍक्शन" पेक्षा जास्त आवडते असे वाटते! - ( "व्हर्टिकल ऍक्शन" प्रेमी) मनिष

In reply to by मनिष

सनी देओल इतका परिणामकारक वाटलाय तो निव्वळ त्या स्क्रिप्ट आणि संवादांमुळे. एरवी तो कसला! ऋषी कपूर मलापण फार आवडतो यातला. त्याच्या ऑफीसातला एक सीन आहे ना, त्याचा कुणीतरी एम्प्लॉयी काहीतरी क्षुल्लक खोटं सांगतो त्याला, आणि ऋषी कपूर वेडावाकडा भडकतो. 'हम झूठ क्यों बोलते हैं यार?' हा त्याचा सवाल स्वतःलाच. कसला हताश वाटतो तो तेव्हा. तसाच त्याचा संताप. अमरिश पुरीची कॉलर धरून त्याला मधे न पडण्याबद्दल बजावताना काय बोललीय त्याची नजर. सनीला 'ए गोविंद..' म्हणून धमकावतानाचा त्याचा उफाळून आलेला संताप. काय चूक काय बरोबर, हे कळतं आहे खरं तर. पण चौकटीबाहेर जाऊन कुटुंबाला विरोध करण्याचा धीर नाहीय. ही तगमग आणि त्या पार्श्वभूमीवर दामिनीवरचं नितांत प्रेम. सनी त्याच्या पासंगालाही पुरायचा नाही.

In reply to by मनिष

हो, कोर्टात तिला वेडं ठरवताना तर सिनेमा एकदम मद्रासी टाईपचा भडक होतो... (९४ साली एका फॅमिली गेदरिंगला कोणती व्हिडीओ कॅसेट बघायला आणावी , या विचारात असताना सर्व लहानांनी मोठ्यांच्या मनावर भडक सिनेमामुळे वाईट परिणाम नकोत म्हणून हा सिनेमा आणायचे कॅन्सल केले होते...) :) .. आणि ऋषीचं काम फार छान आहे सिनेमात फक्त त्याला टाळ्या शिट्यांचे संवाद नाहीत इतकेच...( सनी फक्त स्क्रिप्ट + संवादावर मारून नेतो गोष्टी)... ते तारीख पे तारीख असं म्हणत जजवर ओरडणं मला अंमळ विनोदी वाटलं होतं... आणि ऋषीशी सनीची काही तुलनाच नाही हेही खरेच... :) असतात काही माणसं नशीबवान... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१. आपल्या सर्व व्यक्तिरेखा नीट समजून घ्या... त्यांची सारी पार्श्वभूमी आणि विशिष्ट वागण्याची कारणमीमांसा ,प्रेरणा तयार असूद्या. २.नायक आणि खलनायक त्या सार्या व्यक्तिरेखामध्ये न तुटणारं एक नातं तयार होऊद्यात.का? अन्ब्रेकेबल बाँड का? तर ही विरुद्ध स्वभावाची मंडळी गोष्टीत एकमेकांशिवाय राहू शकायला नाही पाहिजेत. ... इंट्रेस्ट गुंतले नाहीत तर लोक सोडून जातील ना एकमेकांना.... ३. आपल्या गोष्टीची थीम ठरवा, मुख्य पात्राचं ध्येय काय ते ठरवा.... तुम्हाला काय सांगायचंय ? प्रीमाईस ४. मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..( १०० % कंपल्सिव्ह ट्रेट).. आता दामिनीच्या उदाहरणात बघा... ती सत्य आणि न्यायासाठी इतकी टोकाला जाते, नवर्‍यापासून सगळ्यांशी लढते...आता एवढं काय गरज होती का करायची? पण नाही... चक्रमपणा असलेली माणसं काहीतरी करून दाखवतात...म्हणून उत्तम गोष्टीतलं पात्र विशिष्ट् बाबतीत चक्रम असतं... ५.आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय.. इथे संघर्ष सुरू. ६.त्याच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळं तो अधिकाधिक संकटात , अडचणीत सापडतो.... आणि अस्तित्त्वासाठी, जगण्यासाठी संघर्षात पडावंच लागतं.. अधिकाधिक गुंतत जावं लागतं...अधिकाधिक नाट्यमय घटना...व्यक्तिरेखा अधिकाधिक संकटात... ७. त्यातून बाहेर पडत पडत उत्कर्षबिंदू...आता माघार नाही... ८.उत्कर्ष निराकरण...त्यातूनच प्रेमाईस ची सत्यता व्यक्तिरेखांना आणि प्रेक्षकांना कळते...(काय धडा घेतला... काय शिकवण मिळाली??) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 03/07/2008 - 17:55
मास्तर तीनही भाग, उदाहरणे, प्रतिसाद अतिशय वाचनीय.

मुक्तसुनीत 04/07/2008 - 01:55
आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले ! भडकमकर, तुमच्याबरोबर एखादे नाटक पहायला आवडेल बुवा ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

genre याचा उच्चार बरेच जण जॉनर / जॉन्रा / जॅनर असा करताना ऐकले आहेत..मी सध्या जॉनर म्हणतो...ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही ... मी याला लेखनप्रकार , लेखन शैली म्हणेन... (अधिक चांगला प्रतिशब्द कोणीतरी देइलच..) उदा. सामाजिक, थरार, गूढ, फ़ॆंटसी, कॊमेडी, प्रेमकथा वगैरे वगैरे... आता थेट उदाहरणे घेऊ... समजा घटना हीच आहे ... एक मनुष्य त्याच्या मित्राच्या घरात येतो तेव्हा तो मित्र मेलेला आढळतो... आता याच घटनेचे जॊनरप्रमाणे पुढे कथानकाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल होतात... उदाहरणार्थ... १.सामाजिक नाट्य : या मृत्यूला कोणती सामाजिक कारणं आहेत,जर समजा चोरी साठी हा खून झाला असेल तर गरीबी, बेरोजगारी.. किंवा हार्ट ऎटॆकने गेला असेल तर वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणे... वगैरे वगैरे... यावर चर्चा... आसवं गाळत स्वगत वगैरे... २.सस्पेन्स.. ( गूढ उकलणे)...मित्र घरात इकडे तिकडे पाहतो, तर त्याला सिगरेटचे थोटूक , कोटचं तुटलेले बटन आणि लायटर सापडतो.. ( मित्र सिगरेट न ओढणारा वगैरे). ३.थरार... ( थ्रिलर).. घड्याळात बाराचे टोले पडतात..बाहेर काहीतरी आवाज होतो आणि खिडकीतून एक काळी आकृती जाताना दिसते... ४.फ़ॆंटसी :यमदूत मेलेल्या मित्राच्या आत्म्याला म्हणतो, " अरेरे, खरंतर या दुसया मित्रालाच मारायचं होतं...चूक झाली... आता काय करायचं?" ५. कॊमेडी.. : तेवढ्यात बेल वाजते,...मित्र घाबरून ते प्रेत लपवायच्या प्रयत्नाला लागतो... त्यातून गोंधळ उडतो... ६. रोमॆंटिक : मित्राच्या निराधार बहिणीला तो भावनिक आधार देतो आणि त्यातून त्यांचं प्रेम फ़ुलतं वगैरे... आता साधारणपणे एकच एक जॆनर नसतो तर त्याची मिश्रणे असतात... उदाहरणार्थ रोमेंटिक कॊमेडी.., सस्पेन्स थ्रिलर... सगळं तसं एकमेकांच्यात गुंतलेलंच असतं... फ़ार वेगळं काढून दाखवता येत नाही असं मला वाटतं... जॊनर हा प्रकार फ़क्त एकूण लेखकाला लिहायला सुरुवात करण्यापूर्वी एक मार्गदर्शक म्हणून असावा, की बाबा आपल्याला काय शैलीत लिहायचंय... एकूण त्या बाबतीत गोंधळ माज्ला की अवघड जातं.. .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 04/07/2008 - 12:03
भडकमकरांची ही सगळी लेखमाला मला आवडली हे आधीच सांगितले आहे. असे म्हणतात की मोठ्या कलाकृतींमधे बर्‍याचदा , त्या त्या कलेच्या क्षेत्रातील नियम , संकेत मोडल्याचे दिसून येते. विशेषतः चित्रकलेमधे असे वारंवार घडले. (इम्प्रेशनिझम हे एक ठळक उदाहरण.) युलिसिस ही कादंबरी म्हणे प्रसिद्ध झाली तेव्हा "संज्ञाप्रवाही कादंबरी" हा प्रकार जन्माला आला. आपल्याकडील नेमाडे, मर्ढेकर यांची अशी "क्रांतिकारकाची" उदाहरणे आहेतच. माझी भडकमकरना अशी विनंती आहे की त्यानी जे नियम समजावून दिलेत त्याना छेद देणार्‍या नाट्य किंवा सिनेकृतींचाही उल्लेख उदाहरणांसकट करावा. नियम असतात ते मोडण्याकरता , हे चांगल्या अर्थाने खरे करणार्‍या , एकूण कलाप्रकाराची कक्षा वाढवणारे त्यांनी काही पाहिले काय ? असल्यास काय ते जाणून घ्यायला उत्सुक आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अगदी मनातलं बोललात. परंपरेच्या विरोधात केलेली अर्थपूर्ण आणि अपरिहार्य बंडखोरी परंपरेला अधिक सशक्त करत जाते - बंडखोरीच्या अशा अनेक कड्यांची मिळून समृद्ध परंपरा तयार होत असते... अशा अर्थाचं एक विधान तेंडुलकरांनी कुठेतरी केलेलं आहे, त्याची आठवण झाली. नुकतंच वाचलेलं मनस्विनी लता रवींद्रचं 'सिगारेट्स' आठवतं आहे. या नाटकाला रूढार्थानं कथा नाही. प्रमुख पात्र असंही नक्की नाही. सगळेच आपापल्या परीनं चक्रम आणि चाकोरीतलेही असलेले तरुण. नायक नाही आणि खलनायकही. आपल्या लैंगिक - शारीरिक आणि मानसिकही - गरजांना हे सगळे जण रिऍक्ट होत राहतात. त्यांचे प्रश्न प्रामाणिक आहेत आणि उत्तरं शोधण्याचे प्रयत्न धीट. त्यात कसलाही अभिनिवेश नाही. सोवळेपणाचा आव वा दुटप्पीपणाही नाही. निव्वळ आयुष्याचा एक तुकडा. जिवंत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात की नाही, त्यांच्या शोधात-लढ्यात ते यशस्वी होतात की नाही, ते सुखी होतात की दु:खी यांतल्या कसल्याही प्रश्नांची आयती उत्तरं मिळत नाहीत. जिथून नाटक सुरू होतं तिथे आणि जिथे संपतं तिथे - बाह्य परिस्थितीत काहीच फरक नाही. पण सगळ्यांच्या शरीरा-मनात काहीतरी घडून गेलं आहे - जे उत्तरं मागणार आहे. कुणी त्याला सामोरं जाईल, कुणी तोंड लपवून पळ काढील... आपापल्या वकुबानुसार. नाटक फक्त आपल्या आयुष्याचा हा एक अस्पर्श भाग आपल्या पुढ्यात आणून टाकतं. जिवंत. कसल्याही रूढ नियमांखेरीज. हे तर प्रायोगिक - त्यामुळे काहीश्या आडबाजूच्या - नाटकाचं उदाहरण झालं. पण मुख्य धारेत राहून 'दिल चाहता है'नं असे कितीतरी नियम मोडले. त्यालाही गोष्ट अशी नव्हतीच. फार तर ओढून ताणून तिला नायकांच्या 'ग्रोइंग अप्'चीही कथा म्हणता आलं असतं. पण त्यातही नायक नव्हताच, खलनायकही. एक आयुष्याचा रसरशीत तुकडा. काही घटना. काही प्रश्न. बस. काही म्हणा, नियम मोडायलाच मज्जा येते! :)

मनिष 01/07/2008 - 15:51
उदाहरणांमुळे जास्त मजा येते आहे. अवांतर - नुकत्याच पाहिलेल्या 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष आवडला.

In reply to by मनिष

मे अमीर पाहिलेला नाहीये... 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष याबद्दल अजून माहिती द्या... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 01/07/2008 - 20:15
हा भाग जास्त छान समजला...उदाहरणं जास्त किंवा सोपी असल्याने असेल कदाचित... माझी अशी एच आर इंटर्व्यु साठी तयारी झाली होती ते आठवलं कुठल्याही प्रश्नाला...माझ्यापुढचा प्रॉब्लेम, माझी थॉट प्रोसेस, माझं सोल्युशन आणि त्याचा रिझल्ट असं उत्तर द्यावं लागायचं...एक्दम तस्संच वाटलं मला... पु ले शु... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 02/07/2008 - 08:17
हा लेख पण लै भारी वाटला! मास्तर, तुमचा या विषयातला व्यासंग पाहून अंमळ थक्क व्हायला होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

आमच्या काही आवडत्या वेबसाईट्स..... १.playwriting seminars खूप मोठी साईट आहे ही.... http://www.vcu.edu/arts/playwriting/seminar.html २.होतकरू पटकथालेखकांसाठी http://www.toronto-filmmaking.com/screenwriting.html ३.पटकथालेखनासाठी काही टिप्स .by Billy Wilder http://www.writingclasses.com/InformationPages/index.php/PageID/270 ४.Emotional plots and suspense plots...भावकथा आणि गूढकथा (?) जोडीनं येतात इथे.... http://www.vcu.edu/arts/playwriting/plot.html ५.नाट्यलेखनाची मूलभूत तत्त्वे...by Charles Deemer http://www.geocities.com/cdeemer/Play.htm ६. आणि सबसे बढिया... लायोस ( की लाजोस) एग्रि भाऊचे पुस्तक...सर्जनशील लेखनाची कला. हे पुस्तक एफ्टीआयाय मध्ये लेखक मंडळी पाठ्यपुस्तकासारखे वापरतात, असे ऐकले. मला संपूर्ण इ बुक नाही सापडले पण या नोट्स सापडल्या..... भन्नाट प्रकार आहे... Lajos egri's book art of creative writing... http://www.darkcloudpress.com/%5Cblog_files%5Cegri_notes.pdf ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लय (rhythm) गोष्टीला किंवा नाटकाला एक लय असते.प्रत्येक गोष्टीला लय असते. आपल्या आयुष्यात सुद्धा काही दिवस सावकाश जाणारे, कंटाळवाणे असतात तर काही घटनांनी भरलेले वेगवान असतात... लय सगळीकडेच असते. ..., गाण्यांमध्ये / संगीतात / नृत्यनाट्यात तर असतेच पण संवादांमध्ये , नेपथ्य आणि पात्रांच्या हालचालीमध्ये सुद्धा असते...रेसमध्ये धावणार्‍या घोड्याला स्वत:ची लय असते आणि सर्व धावणार्‍या घोड्यांची मिळून एक लय असते.... तेंडुलकर म्हणतात," अननुभवी लेखक लयीसाठी दिग्दर्शकावर अवलंबून असतो"...विशेषत: कादंबरीचे नाट्यरूपांतर किंवा सिनेरूपांतर करताना ती लय टिकवणं मुश्किल..... किंवा "वाडा चिरेबंदी त्रिनाट्याचे एकच नाटक करायचा एक प्रयत्न झाला, त्यात लय सांभाळणे अवघड जाते " मला स्वत:ला खूप पूर्वी वाचलेली आनंदाचं झाड कादंबरी आवडलेली होती पण चित्रपट अगदीच सुमार वाटला. घटनांसंदर्भात बोलायचं तर ही लयच वेगवान घटना आणि व्यक्तिरेखांची खोली यामधला तोल सांभाळणार असते. हॊरिझॊंटल ऎक्शन गोष्ट पुढे नेते. घटना घडवते. व्हर्टिकल ऎक्शन वेग कमी करते. व्यक्तिरेखांमधलं मानसिक चिंतन दर्शवते. ( आंतरिक अंतर्गत संघर्ष) गोष्टीतले अनेक पदर उलगडून दाखवते. या दोन्ही ऎक्शन आणि त्यातला तोल साधणं गोष्टीसाठी आवश्यक ... मारधाडपटात जास्त हॊरिझॊंटल ऎक्शन असते. चेकॊव्हच्या नाटकात व्हर्टिकल ऎक्शन जास्त असते. _____________________-- त्यामुळे उत्तम पटकथेत भांडण / मारामारीच्या सीननंतर लगेचच पुन्हा मारामारी नसते.... मग शांतता...प्रेमाचे दृश्य / किंवा फ्लॅशबॅक जुन्या आठवणी / गाणी / मानसिक चिंतन वगैरे... हा सारा लयीचा भाग आहे. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संवादलेखन १. व्यक्तिरेखेच्या मनातलं जसंच्या तसं लिहू नये.. आपण रोजच्या आयुष्यात तरी कुठे अगदी खरं मनातलं बोलत असतो ? त्यांना उपरोधाने बोलूदेत, कधी खोटंसुद्धा बोलूदेत..कधी अडखळत, थट्टा करत,कधी कॊमेंट पास करत , टोमणे मारत संवाद पुढे सरकायला हवा. पात्राच्या मनात काय आहे हे अप्रत्यक्षपणे समजलं तर संवाद बरा चाललाय असं समजावं... २. कधीकधी काही अस्वस्थ हालचाली , वागण्याच्या पद्धती असतात ज्या पात्राच्या मनात काय चाललंय ते दर्शवतात.अशा छोट्याछोट्या हालचाली शोधून काढून त्यात्या प्रसंगात पात्रांना चिकटवाव्या लागतात. ( पात्रांची शारीरिक जडणघडण इथे उपयोगी पडते) ३. आपण स्वत:सुद्धा बर्‍याचदा मनातल्या मनात संवाद तयार करत असतो. पार्टीत किंवा गप्पा मारताना आपल्याला कधी मस्त कॊमेंट सुचते आणि बोलायची राहून जाते, मग आपण संवाद तयार करत राहतो की तो जर असं बोलला असता तर मी मग असं बोललो असतो वगैरे... ४.विशेषत: एकांकिकांसाठी संवाद छोटे हवेत.वेगवान हवेत. छोटे म्हणजे किती छोटे ? एका भाषणात एकच कल्पना. (one idea per speech) ५. संवाद लिहिताना संवाद सतत वाचत राहा आणि आता या वाक्यानंतर रंगमंचावर हजर पात्रांपैकी कोण यात व्यत्यय आणणार याचा अंदाज घेत घेत पुढे जा. ६. "दाखवा...सांगू नका." हे सर्वात महत्त्वाचं.. उदा. ती हुशार मुलगी आहे असं कोणी सांगण्यापेक्षा ते प्रसंगातून दिसूद्या. ७. कथेच्या रूपांतरामध्ये सूत्रधार गोष्ट सांगतो अशा युक्त्या शक्यतो वापरू नयेत. ( ती एक पळवाट आहे असं माझं वैयक्तिक मत) ८. बर्‍याचदा दोन ( विरुद्ध स्वभावाच्या सुद्धा) पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे असा भास होतो... कौशल्याचा भाग हाच की पात्रे जीवंत होण्यासाठी संवाद त्यांचे स्वतःचे वाटले पाहिजेत... त्याच व्यक्तिरेखा बोलताहेत असं वाटलं पाहिजे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हा माझा सध्याचा आवडता सिनेमा. गंमत म्हणजे ही सगळी सूत्रं त्याला चपखल लावून दाखवता येतात. पूर्वपक्ष? जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. उलट चिरोंजीलाल अमेरिकेत निघून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला या प्रकरणात अज्याबात गुंतायचं नाही आहे, मग सूड-बिड तर दूरच राहिला. ते सभ्यपणे पोलिसांकडेही जाऊन पाहतात, पण तिथेही काही डाळ शिजत नाही. मग नाईलाज म्हणून म्हणा, योगायोगानं तो दलाल भेटतो म्हणून म्हणा, थोडी खुमखुमी असल्यामुळे म्हणा - मंडळी या अचाट प्लॅनमधे सामील होतात आणि बघता बघता गोष्ट वेग घेते. प्रमुख व्यक्तिरेखा - यातली सगळ्यांत लोभसवाणी आणि खरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अनुपम खेरची. फसवणूक त्याची झालीय. या सगळ्या अव्यापारेषु व्यापारातून त्याला पैसे आणि घर तर मिळतंच. पण त्याचं हातून निसटणारं कुटुंबही अनपेक्षितपणे परत मिळून जातं. या प्रवासातून दिसणारा-घडणारा टिपिकल मध्यमवर्गीय, पापभीरू, कुटुंबवत्सल, नेक बाप अक्षरशः लाजवाब आहे. तो असतो पार्श्वभूमीला. सतत मोडता घालत, चिडत-वैतागत-खंतावत. पण ही गोष्ट त्याचीच. पोरगा मोठ्या कंपनीत आहे असं अभिमानानं कुणालाही सांगणं काय, किंवा 'इसके साथ कुछ चटनी वगैरा है क्या?' असं पिझ्झा पाहून वैतागानं विचारणं काय! त्याला त्याचा इतिहास-भूगोल आहे आणि तो नेमका दिसत राहतो. हेच इथल्या सगळ्या व्यक्तिरेखांना लागू होतं. भलेही चार फ्रेमकरता का पात्र पडद्यावर येईना, ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. त्यांच्या कपडे घालण्याच्या, खाण्या-पिण्याच्या पद्धती (बोमन इराणीचं नि:संकोचपणे आपल्याच घराच्या आवारात जरा लांब जाऊन लघवी करणं!), त्यांची भाषा (मेघनाच्या मैत्रिणीनं 'बास्टर्ड' अशी शिवी हासडणं!), त्यांचे मॅनरिझम्स (सतत घायकुतीला आलेला काहीसा नर्व्हस असा बापूंचा सेक्रेटरी)... आहाहा! संघर्ष - खोसला कुटुंब आणि बोमन इराणीचं पात्र (नाव विसरले!) यांच्यातला हा संघर्ष असं ढोबळ मानानं म्हणता येईल. पण तो बाह्य संघर्ष झाला. खरा संघर्ष अनुपम खेरचा. कुटुंबाशी, नव्या मूल्यव्यवस्थेशी आणि स्वत:शी. अशी फसवाफसवी करून पैसे परत मिळवावेत की न मिळवावेत, या त्याच्या 'भवति न भवति'मधून तो अचूक दिसत राहतो. तो पोरांवर चिडल्यासारखं करतो, पण पोटातून मात्र सुखावलेला. काळजी आणि कौतुक करणारा. तरी चिरोंजीलाल पैसे घेऊन आल्यावर त्याला पुरेसा आणि निर्भेळ आनंदही होत नाही. मासिक वाचल्याचं नाटक करत तो आपला व्हरांड्यातच. आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? संवाद - 'हम आपके' मधे सुरुवातीला आलोकनाथ आणि कुणाचातरी एक संवाद आहे. कसला विनोदी आहे तो! तुम्ही भाऊ वारल्यावर पुतण्यांना कसं सांभाळलंत आणि त्यासाठी लग्न टाळलंत, तुम्ही किती थोर, असं आलोकनाथलाच सांगण्यात येतं! अरे, त्याला माहीत नाही का हे? ही कुठली निर्बुद्ध पद्धत पात्राची पार्श्वभूमी सांगायची? असो. असले आचरट संवाद 'खोसला..'मधे नाहीत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात. बिनदिक्कत (आणि गरज पडेल - नाईलाज होईल तेव्हाच!) शिव्या देतात. उगीचच्या उगीच भाषणं न झोडता एखाद्याच लुकनं आपलं म्हणणं स्पष्ट करतात. (चिरोंजीची बहीण अनुपम खेरला कसले खतरनाक लुक्स देत असते सतत! 'बाबा म्हणजे ना... ' असं कौतुक कम वैताग सरळ वाचता येतो त्यात.) लय - आधी काहीशी संथ आहे गोष्ट. सगळ्या माणसांशी पुरेशी ओळख होते आपली. सगळ्यांची गोची - स्वभाव - अडचणी - एकात एक गुंतलेल्या तंगड्या... सगळं स्पष्ट होतं. आणि मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते! पेहेलवान, पोलीस, नाटक मंडळी, फिशरी जमिनीवरचं नाटक... अशा चढत्या क्रमानं गोष्टी घडत जातात. ही मास्तरांची हॉरिझॉण्टल लय असावी बहुधा. पण पार्श्वभूमीला त्याला आडवा छेद देत, अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत! मास्तर, बरोबर आहे का हो?

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष 02/07/2008 - 11:00
'खोसला का घोसला' खरच छान आहे. ते व्हर्टिकल/हॉरिझॉण्टल माहित नाही. पण व्यक्तिरेखा फारच सुरेख लिहिल्यात आणि अभिनेत्यांनी त्याला मस्तच न्याय दिलाय. अनुपम खेर -- केवळ अशक्य!! अभिनयाचा वस्तुपाठ म्हणा ना...ते दारू घेऊन येतांना त्याचे चालणे? वा!!!

In reply to by मेघना भुस्कुटे

जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. परफेक्ट...पूर्वपक्ष डायरेक्ट न सांगता आपोआप कळायला हवा... ते इथे एकदम जमतेच... ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. ...........आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? एकदम सहमत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात आणि बापूचे ते पैसे पाहून घाबरून परत येणं, आणि अनुपमला सॉरी म्हणणं...आणि इतर सगळे बापूवर वैतागलेले असताना अनुपमने येऊन सांत्वन करणं.हा एक अप्रतिम सीन आहे... मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते हे एकदम मस्त .. अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत!... एकदम पटले.... ही व्हर्टिकल ऍक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

वरदा 02/07/2008 - 20:36
सॉलीड अभ्यास केलायस गं....माझा पण हा सगळ्यात लाडका सिनेमा.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by मेघना भुस्कुटे

महेश हतोळकर 02/07/2008 - 23:31
मेघना म्हणाल्या ते मनापासून पटले. उगीच संवाद बोलून पात्राच्या आडून प्रेक्षकांना त्याच पात्राची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न अगदीच हास्यास्पद होता. मास्तरांच्याच शिकवणीवरून वरील प्रसंग बदलण्याचा प्रयत्न. बघा कसा वाटतो ते. (अलोकनाथ व अजीत वाच्छानी अलोकनाथच्या दिवाणखान्यात बसले आहेत. अलोकनाथच्या मागे भिंतीवर त्याच्या भाऊ-भावजयीचा फोटो टांगला आहे.) अजीत वाच्छानी: भाईसहाब अब राजेश की शादी का दिल पे ले ही लिजीये| अलोकनाथ: हां भाईसहाब, (फोटोकडे निर्देश करून) भय्या भाभी की अशिर्वादसे राजेश बिजीनेसको अच्छी तरहसे संभाल रहा है| अब प्रेम भी MBA खत्म करके उसके साथ जुड जायेगा| आपकी नजरमे कोई लडकी हो तो बताईये| (एवढ्यात प्रेम येतो. तो खूप आनंदात आहे.) प्रेमः (दोघांच्या पाया पडून). प्रणाम चाचाजी| प्रणाम मामाजी| अजीत वाच्छानी: भाईसहाब लगता है प्रेम का Result उम्मीद के मुताबिक निकला है| क्यों बेटा? प्रेमः हा मामाजी! मै अव्वल आया| अजीत वाच्छानी: भई व्वा! कृपया हिंदी कडे थोडे दुर्लक्ष करा. खूप चिंध्या केल्या आहेत

In reply to by महेश हतोळकर

...मस्त रे "मी " खूप छान प्रयत्न... ... किंवा "शो डोंन्ट टेल "...पद्धतीने हे सारे अत्यंत कमी किंवा शून्य संवादात दाखवताही आले असते.... .... (आलोकनाथ मोहनीश बहलसाठी स्थळं पाहायला म्हणून हातात मुलींचे फोटो, पत्रिका आणि माहिती वगैरे घेऊन बसला आहे, त्याचे समोरच्या भाऊ आणि भावजयीच्या फोटोकडे लक्ष जाते ....फोटोवर क्लोज मग आलोकनाथवर क्लोज्...त्याला आठवतं, त्याच्या भावाच्या मृत्यूसमयी दोन घाबरलेली लहान मुलं काकाला बिलगतात आणि हा त्यांना डोळ्यातलं पाणी थोपवत शांत करतो,थोपटतो...पुन्हा आलोकनाथचा चेहरा दिसतो, त्याच्या डोळ्यात अश्रू पण चेहर्‍यावर समाधान...( भावाला दिलेलं त्या पोरांना नीट सांभाळायचं वचन पूर्ण केल्याचं वगैरे समाधान) . शेजारी स्थानिक वर्तमानपत्रात मोहनीशचा यंग बिझिनेसमन ऑफ द इयर वगैरे पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो आहे, त्या फोटोकडं तो अभिमानानं पाहतो आणि साधारण पसंत असलेल्या मुलीचा फोटो त्याच्याशेजारी धरतो, नापसंत करतो, असं दोन तीन वेळा होतानाच प्रेम आलेला आहे...).... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

वरदा 03/07/2008 - 00:32
मस्तच आहे मास्तर्....मला आवडली ही आयडीया एक्दम्.... "मी" ची पण आयडीया आवडली... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? उदा. भाग २ च्या लेखाखाली भाग १ आणि भाग ३ चे दुवे ! तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? आता तसे केले आहे. -- जनरल डायर. -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

भाग एक http://www.misalpav.com/node/2344 भाग दोन.. http://www.misalpav.com/node/2347 आता तसे केले आहे. -- जनरल डायर. धन्यवाद डायरसाहेब... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दामिनी... कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते... पूर्वपक्ष जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच... प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत. १.भावना (character) : सत्य २.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं.. म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात. प्रमुख व्यक्तिरेखा १. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते. २. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...? ३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात. ४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो. ( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)... संघर्ष कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष... बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष. शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय. आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ? संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स. सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो. संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड. प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम. फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात. छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात. वाढता संघर्ष : सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... :) .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला.. या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो... संवाद पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते. दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं... अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे :) ... "ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद. लय सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन... त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनिष 03/07/2008 - 12:29
मला पटकथा, प्रिमाईस आवडले तरी प्रत्यक्ष सिनेमा फार भडक/लाऊड वाटला होता.... सनीचा रोल तर फारच...नंतर एकदा चॅनेल सर्फ करतांना एका साऊथ च्या सिनेमात (नाव माहित नाही) तस्सच हात करून बोलणार वकिल पाहिला...फारच विनोदी वाटलं ते सगळ. त्यापेक्षा ऋषी कपूर चा अभिनय आवडला (ह्याला खरं तर कोणी नीट वापरला नाही, बराच चांगला अभिनेता अहे, फक्त फार फालतू रोल मधे अडकला)...त्याने त्याचे ते "दु:ख तो इस बात का है दामिनी, की तुम्हारे लिये मुझस, हम दोनोसे जरुरी कुछ और हे" अशा अर्थाच्या संवादाच्यावेळी द्विधा होणे किंवा व्याकूळ होणे खूपच चांगले दाखवले ... एकूणात मला "व्हर्टिकल ऍक्शन", "हॉरिझाँटल ऍक्शन" पेक्षा जास्त आवडते असे वाटते! - ( "व्हर्टिकल ऍक्शन" प्रेमी) मनिष

In reply to by मनिष

सनी देओल इतका परिणामकारक वाटलाय तो निव्वळ त्या स्क्रिप्ट आणि संवादांमुळे. एरवी तो कसला! ऋषी कपूर मलापण फार आवडतो यातला. त्याच्या ऑफीसातला एक सीन आहे ना, त्याचा कुणीतरी एम्प्लॉयी काहीतरी क्षुल्लक खोटं सांगतो त्याला, आणि ऋषी कपूर वेडावाकडा भडकतो. 'हम झूठ क्यों बोलते हैं यार?' हा त्याचा सवाल स्वतःलाच. कसला हताश वाटतो तो तेव्हा. तसाच त्याचा संताप. अमरिश पुरीची कॉलर धरून त्याला मधे न पडण्याबद्दल बजावताना काय बोललीय त्याची नजर. सनीला 'ए गोविंद..' म्हणून धमकावतानाचा त्याचा उफाळून आलेला संताप. काय चूक काय बरोबर, हे कळतं आहे खरं तर. पण चौकटीबाहेर जाऊन कुटुंबाला विरोध करण्याचा धीर नाहीय. ही तगमग आणि त्या पार्श्वभूमीवर दामिनीवरचं नितांत प्रेम. सनी त्याच्या पासंगालाही पुरायचा नाही.

In reply to by मनिष

हो, कोर्टात तिला वेडं ठरवताना तर सिनेमा एकदम मद्रासी टाईपचा भडक होतो... (९४ साली एका फॅमिली गेदरिंगला कोणती व्हिडीओ कॅसेट बघायला आणावी , या विचारात असताना सर्व लहानांनी मोठ्यांच्या मनावर भडक सिनेमामुळे वाईट परिणाम नकोत म्हणून हा सिनेमा आणायचे कॅन्सल केले होते...) :) .. आणि ऋषीचं काम फार छान आहे सिनेमात फक्त त्याला टाळ्या शिट्यांचे संवाद नाहीत इतकेच...( सनी फक्त स्क्रिप्ट + संवादावर मारून नेतो गोष्टी)... ते तारीख पे तारीख असं म्हणत जजवर ओरडणं मला अंमळ विनोदी वाटलं होतं... आणि ऋषीशी सनीची काही तुलनाच नाही हेही खरेच... :) असतात काही माणसं नशीबवान... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१. आपल्या सर्व व्यक्तिरेखा नीट समजून घ्या... त्यांची सारी पार्श्वभूमी आणि विशिष्ट वागण्याची कारणमीमांसा ,प्रेरणा तयार असूद्या. २.नायक आणि खलनायक त्या सार्या व्यक्तिरेखामध्ये न तुटणारं एक नातं तयार होऊद्यात.का? अन्ब्रेकेबल बाँड का? तर ही विरुद्ध स्वभावाची मंडळी गोष्टीत एकमेकांशिवाय राहू शकायला नाही पाहिजेत. ... इंट्रेस्ट गुंतले नाहीत तर लोक सोडून जातील ना एकमेकांना.... ३. आपल्या गोष्टीची थीम ठरवा, मुख्य पात्राचं ध्येय काय ते ठरवा.... तुम्हाला काय सांगायचंय ? प्रीमाईस ४. मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..( १०० % कंपल्सिव्ह ट्रेट).. आता दामिनीच्या उदाहरणात बघा... ती सत्य आणि न्यायासाठी इतकी टोकाला जाते, नवर्‍यापासून सगळ्यांशी लढते...आता एवढं काय गरज होती का करायची? पण नाही... चक्रमपणा असलेली माणसं काहीतरी करून दाखवतात...म्हणून उत्तम गोष्टीतलं पात्र विशिष्ट् बाबतीत चक्रम असतं... ५.आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय.. इथे संघर्ष सुरू. ६.त्याच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळं तो अधिकाधिक संकटात , अडचणीत सापडतो.... आणि अस्तित्त्वासाठी, जगण्यासाठी संघर्षात पडावंच लागतं.. अधिकाधिक गुंतत जावं लागतं...अधिकाधिक नाट्यमय घटना...व्यक्तिरेखा अधिकाधिक संकटात... ७. त्यातून बाहेर पडत पडत उत्कर्षबिंदू...आता माघार नाही... ८.उत्कर्ष निराकरण...त्यातूनच प्रेमाईस ची सत्यता व्यक्तिरेखांना आणि प्रेक्षकांना कळते...(काय धडा घेतला... काय शिकवण मिळाली??) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 03/07/2008 - 17:55
मास्तर तीनही भाग, उदाहरणे, प्रतिसाद अतिशय वाचनीय.

मुक्तसुनीत 04/07/2008 - 01:55
आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले ! भडकमकर, तुमच्याबरोबर एखादे नाटक पहायला आवडेल बुवा ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

genre याचा उच्चार बरेच जण जॉनर / जॉन्रा / जॅनर असा करताना ऐकले आहेत..मी सध्या जॉनर म्हणतो...ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही ... मी याला लेखनप्रकार , लेखन शैली म्हणेन... (अधिक चांगला प्रतिशब्द कोणीतरी देइलच..) उदा. सामाजिक, थरार, गूढ, फ़ॆंटसी, कॊमेडी, प्रेमकथा वगैरे वगैरे... आता थेट उदाहरणे घेऊ... समजा घटना हीच आहे ... एक मनुष्य त्याच्या मित्राच्या घरात येतो तेव्हा तो मित्र मेलेला आढळतो... आता याच घटनेचे जॊनरप्रमाणे पुढे कथानकाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल होतात... उदाहरणार्थ... १.सामाजिक नाट्य : या मृत्यूला कोणती सामाजिक कारणं आहेत,जर समजा चोरी साठी हा खून झाला असेल तर गरीबी, बेरोजगारी.. किंवा हार्ट ऎटॆकने गेला असेल तर वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणे... वगैरे वगैरे... यावर चर्चा... आसवं गाळत स्वगत वगैरे... २.सस्पेन्स.. ( गूढ उकलणे)...मित्र घरात इकडे तिकडे पाहतो, तर त्याला सिगरेटचे थोटूक , कोटचं तुटलेले बटन आणि लायटर सापडतो.. ( मित्र सिगरेट न ओढणारा वगैरे). ३.थरार... ( थ्रिलर).. घड्याळात बाराचे टोले पडतात..बाहेर काहीतरी आवाज होतो आणि खिडकीतून एक काळी आकृती जाताना दिसते... ४.फ़ॆंटसी :यमदूत मेलेल्या मित्राच्या आत्म्याला म्हणतो, " अरेरे, खरंतर या दुसया मित्रालाच मारायचं होतं...चूक झाली... आता काय करायचं?" ५. कॊमेडी.. : तेवढ्यात बेल वाजते,...मित्र घाबरून ते प्रेत लपवायच्या प्रयत्नाला लागतो... त्यातून गोंधळ उडतो... ६. रोमॆंटिक : मित्राच्या निराधार बहिणीला तो भावनिक आधार देतो आणि त्यातून त्यांचं प्रेम फ़ुलतं वगैरे... आता साधारणपणे एकच एक जॆनर नसतो तर त्याची मिश्रणे असतात... उदाहरणार्थ रोमेंटिक कॊमेडी.., सस्पेन्स थ्रिलर... सगळं तसं एकमेकांच्यात गुंतलेलंच असतं... फ़ार वेगळं काढून दाखवता येत नाही असं मला वाटतं... जॊनर हा प्रकार फ़क्त एकूण लेखकाला लिहायला सुरुवात करण्यापूर्वी एक मार्गदर्शक म्हणून असावा, की बाबा आपल्याला काय शैलीत लिहायचंय... एकूण त्या बाबतीत गोंधळ माज्ला की अवघड जातं.. .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 04/07/2008 - 12:03
भडकमकरांची ही सगळी लेखमाला मला आवडली हे आधीच सांगितले आहे. असे म्हणतात की मोठ्या कलाकृतींमधे बर्‍याचदा , त्या त्या कलेच्या क्षेत्रातील नियम , संकेत मोडल्याचे दिसून येते. विशेषतः चित्रकलेमधे असे वारंवार घडले. (इम्प्रेशनिझम हे एक ठळक उदाहरण.) युलिसिस ही कादंबरी म्हणे प्रसिद्ध झाली तेव्हा "संज्ञाप्रवाही कादंबरी" हा प्रकार जन्माला आला. आपल्याकडील नेमाडे, मर्ढेकर यांची अशी "क्रांतिकारकाची" उदाहरणे आहेतच. माझी भडकमकरना अशी विनंती आहे की त्यानी जे नियम समजावून दिलेत त्याना छेद देणार्‍या नाट्य किंवा सिनेकृतींचाही उल्लेख उदाहरणांसकट करावा. नियम असतात ते मोडण्याकरता , हे चांगल्या अर्थाने खरे करणार्‍या , एकूण कलाप्रकाराची कक्षा वाढवणारे त्यांनी काही पाहिले काय ? असल्यास काय ते जाणून घ्यायला उत्सुक आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अगदी मनातलं बोललात. परंपरेच्या विरोधात केलेली अर्थपूर्ण आणि अपरिहार्य बंडखोरी परंपरेला अधिक सशक्त करत जाते - बंडखोरीच्या अशा अनेक कड्यांची मिळून समृद्ध परंपरा तयार होत असते... अशा अर्थाचं एक विधान तेंडुलकरांनी कुठेतरी केलेलं आहे, त्याची आठवण झाली. नुकतंच वाचलेलं मनस्विनी लता रवींद्रचं 'सिगारेट्स' आठवतं आहे. या नाटकाला रूढार्थानं कथा नाही. प्रमुख पात्र असंही नक्की नाही. सगळेच आपापल्या परीनं चक्रम आणि चाकोरीतलेही असलेले तरुण. नायक नाही आणि खलनायकही. आपल्या लैंगिक - शारीरिक आणि मानसिकही - गरजांना हे सगळे जण रिऍक्ट होत राहतात. त्यांचे प्रश्न प्रामाणिक आहेत आणि उत्तरं शोधण्याचे प्रयत्न धीट. त्यात कसलाही अभिनिवेश नाही. सोवळेपणाचा आव वा दुटप्पीपणाही नाही. निव्वळ आयुष्याचा एक तुकडा. जिवंत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात की नाही, त्यांच्या शोधात-लढ्यात ते यशस्वी होतात की नाही, ते सुखी होतात की दु:खी यांतल्या कसल्याही प्रश्नांची आयती उत्तरं मिळत नाहीत. जिथून नाटक सुरू होतं तिथे आणि जिथे संपतं तिथे - बाह्य परिस्थितीत काहीच फरक नाही. पण सगळ्यांच्या शरीरा-मनात काहीतरी घडून गेलं आहे - जे उत्तरं मागणार आहे. कुणी त्याला सामोरं जाईल, कुणी तोंड लपवून पळ काढील... आपापल्या वकुबानुसार. नाटक फक्त आपल्या आयुष्याचा हा एक अस्पर्श भाग आपल्या पुढ्यात आणून टाकतं. जिवंत. कसल्याही रूढ नियमांखेरीज. हे तर प्रायोगिक - त्यामुळे काहीश्या आडबाजूच्या - नाटकाचं उदाहरण झालं. पण मुख्य धारेत राहून 'दिल चाहता है'नं असे कितीतरी नियम मोडले. त्यालाही गोष्ट अशी नव्हतीच. फार तर ओढून ताणून तिला नायकांच्या 'ग्रोइंग अप्'चीही कथा म्हणता आलं असतं. पण त्यातही नायक नव्हताच, खलनायकही. एक आयुष्याचा रसरशीत तुकडा. काही घटना. काही प्रश्न. बस. काही म्हणा, नियम मोडायलाच मज्जा येते! :)

पाब्लो नेरूदा - I do not love you... अनुवाद

मनिष ·

माझे मन तुझे झाले.... ! इतके जवळ, की तू डोळे मिटतेस आणि मला झोप लागते. ही कल्पनाच एकदम निराळी आहे... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनिष 01/07/2008 - 15:58
मी झोपतो आणि तुझे दोळे मिटतात असे पहिजे होते - मुळ कवितेनुसार! अफलातून कल्पना हे पाब्लो नेरूदाचे एक महत्वाचे (आणि माझे सगळ्यात आवडते) वैशिष्ट्य! जाऊ द्या! मनिषभाई, तुझे कुछ झेपा नही यार! - (ओशाळलेला) मनिष

मनिष 01/07/2008 - 15:54
मीच माझा अनुवाद वाचून पाहिला आणि ते जमले नाही हे जाणवले! :( पाब्लो नेरुदाची त्रिवार माफी! पुढच्या वेळी माझ्याच एखाद्या कवितेचा अनुवाद करून पाहीन.

आनंदयात्री 01/07/2008 - 16:27
जमलाय रे मनिष, का उगाच असे म्हणतो, उदा --thanks to your love a certain solid fragrance, --हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध हे बघ बरं किती मस्त जमलयं. बाकी कविता भारी आहे पण जराशी गुढ वाटली ! मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे, पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात! मला डोळे झोप पेक्षा हे कडवे खुपच आवडले, डिफ्रंट कल्पना आहे एकदम, न फुललेले रोप त्याच्या उरात त्याच्याच न फुललेल्या फुलाची सल, धरेतुन उमलुन येणारा मृदगंध पण तो ही रहाणार अंधारुन त्याच्या देहात अन ते पण न उमललेल्या फुलाच्या ज्योतीबरोबर ...... बापरे !!!!! खुप म्हणजे खुपच वेगळे वाचायला मिळाले, शतशः धन्यवाद.

In reply to by आनंदयात्री

मनिष 01/07/2008 - 17:26
मला खूपच ओढून-ताणून आणलेल्या वाटतात आहे ओळी.
मला डोळे झोप पेक्षा हे कडवे खुपच आवडले, डिफ्रंट कल्पना आहे एकदम, न फुललेले रोप त्याच्या उरात त्याच्याच न फुललेल्या फुलाची सल, धरेतुन उमलुन येणारा मृदगंध पण तो ही रहाणार अंधारुन त्याच्या देहात अन ते पण न उमललेल्या फुलाच्या ज्योतीबरोबर ...... बापरे !!!!! खुप म्हणजे खुपच वेगळे वाचायला मिळाले, शतशः धन्यवाद.
वेगळेपणा आहे खरच पाब्लो नेरूदा ह्यांच्या कवितेत...त्या वेगळेपणाची आणि पाब्लो नेरूदा ची ओळख करून द्यावी हाच माझा उद्देश!

धनंजय 01/07/2008 - 20:39
पाब्लो नेरुदा यांची प्रेमगीते जितकी थेट सहज हृदयाला भिडतात, तितकीच हळुवार भावनांची गुंतागुंत असते. मस्त प्रयत्न! (कोणाला ध्वनी-संगीत हवे असेल तर मूळ स्पॅनिश असे : Soneto XVII (Pablo Neruda) No te amo como si fueras rosa de sal, topacio o flecha de claveles que propagan el fuego: te amo como se aman ciertas cosas oscuras, secretamente, entre la sombra y el alma. Te amo como la planta que no florece y lleva dentro de sí, escondida, la luz de aquellas flores, y gracias a tu amor vive oscuro en mi cuerpo el apretado aroma que ascendió de la tierra. Te amo sin saber cómo, ni cuándo, ni de dónde, te amo directamente sin problemas ni orgullo: así te amo porque no sé amar de otra manera, sino así de este modo en que no soy ni eres, tan cerca que tu mano sobre mi pecho es mía, tan cerca que se cierran tus ojos con mi sueño. )

यशोधरा 01/07/2008 - 21:36
आनंदयात्रीला अनुमोदन. मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे, पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची हे सुरेखच जमलेय!

शितल 01/07/2008 - 23:14
अनुवादाचा प्रयत्न चागला आहे मनिष वाईट वाटुन घेऊ नका :) पण जे कवी लिहितो त्याने त्याच्या कविते असे काही स्वत:चे ओतले असते की बाकीच्यानी अनुवाद केला तरी तो मुळ कवितेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्यावर त्याने अनुवाद अवलबुन आहे.

चित्रा 02/07/2008 - 00:21
वेगळीच कविता. आणि अनुवादही चांगला उतरला आहे, थोडे बदलता येईल असे वाटते, पण सुरेख प्रयत्न. or the arrow of carnations the fire shoots off. यात "अग्निचे स्फुल्लिंग निघते अशी कार्नेशन आहे, म्हणून नाही." याऐवजी आगीची फुले असा काही अर्थ आहे का (म्हणजे फुलबाज्यांच्या टोकाशी जशी फुले दिसतात तसे) इंग्रजी अनुवादही आवडला. स्पॅनिश कळत नाही :-( या कवीची आणि कवितेचीही ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by चित्रा

धनंजय 02/07/2008 - 00:59
"आग फैलवणार्‍या कार्नेशन फुलांचा बाण" अशी काही मूळ प्रतिमा आहे. (इथे बहुधा इंग्रजी अनुवाद फसला आहे.) कार्नेशनची रंगसंगती कधीकधी पसरणार्‍या ज्वाळांसारखी असते. Carnation जंगली गुलाब : wild rose यातील पहिल्या ओळींमधल्या सर्व प्रतिमा - जंगली गुलाब, टोपाझ, कार्नेशन, सुंदर आणि काहीसे भडक आहेत, आणि खास दुर्मिळ किंवा बेशकिमती नाहीत. त्यापेक्षा ज्याची फुले दिसतच नाही पण त्यांचा उज्ज्वल रंग आतमध्ये भरलेला आहे, त्या न फुलणार्‍या झाडाचे असे प्रेम आहे, आणि कवीच्या अंगात ("तू"च्या मुळे) गुप्तपणे एकटावलेला मृद्गंध आहे, तसे कवीचे प्रेम आहे, इ.इ.

In reply to by धनंजय

चित्रा 02/07/2008 - 19:33
दिसतात खरी आगीच्या जाळासारखी. शोधले तर जालावर दोन अनुवाद मिळाले ज्यात फक्त ही एक ओळ वेगळी आहे ( मूळ अनुवादकाने चूक दुरूस्त केली असावी). मनिष यांनी एक अनुवाद मराठीत अनुवाद करण्यासाठी वापरला आणि दुसरा चुकून इथे जोडला असावा. पण काही बिघडले नाही, अनुवाद छानच जमला आहे..

In reply to by धनंजय

मनिष 02/07/2008 - 20:48
यातील पहिल्या ओळींमधल्या सर्व प्रतिमा - जंगली गुलाब, टोपाझ, कार्नेशन, सुंदर आणि काहीसे भडक आहेत, आणि खास दुर्मिळ किंवा बेशकिमती नाहीत. त्यापेक्षा ज्याची फुले दिसतच नाही पण त्यांचा उज्ज्वल रंग आतमध्ये भरलेला आहे, त्या न फुलणार्‍या झाडाचे असे प्रेम आहे, आणि कवीच्या अंगात ("तू"च्या मुळे) गुप्तपणे एकटावलेला मृद्गंध आहे, तसे कवीचे प्रेम आहे, इ.इ.
हे बरोबर आहे, असेच म्हणतो...पाब्लो नेरूदांच्या काव्याचे गद्य रसग्रहण करता येईल फार तर, पण अनुवाद फार अवघड गेला...तो काही जमला नाही मला.

विसोबा खेचर 02/07/2008 - 17:16
हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात! ह्या ओळी सुंदर आहेत... एकंदरीत कविता ठीक वाटली. परंतु यात नेरुदांचे मोठेपण किंवा वेगळेपण जाणवण्याइतकी ही कविता खास वाटली नाही. आपल्या मराठीत अश्या ५६ प्रेमकविता वाचायला मिळतात! मनिषराव, नेरुदांचं वेगळेपण, मोठेपण जाणवेल असं काहीतरी भारीतलं येऊ द्या की! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनिष 02/07/2008 - 20:52
तात्या, तुमचे पटते आहे मला...ह्यात तो फार काही ग्रेट वाटत नाही. तो तसा जाणवेल अस मला लिहिता येईल का ही शंकाच आहे. जमल्यास एक-दोन कवितांवर "गद्य" लिहीन जमले/झेपले तर.

शेखस्पिअर 02/07/2008 - 21:10
मला वाटले पाब्लो पिकासो हाच फक्त गूढ आहे.. हा पण त्याच तोडीचा वाटतो... दिलीपोत्तम यांची पण एक कविता अशीच काहीशी आहे.. काही प्राक्रुत शब्द वापरून..

In reply to by शेखस्पिअर

मनिष 02/07/2008 - 21:16
गंमत म्हणजे, पाब्लो नेरूदा ला कवितेतला पिकासो म्हणतात..गूढ आहे खरच तो....आणि त्या गुढतेत लपलेले कित्येक अर्थ, पिकासोच्या पिवळ्या रंगासारखेच... त्याचेच आकर्षण वाटते.

शेखस्पिअर 02/07/2008 - 21:28
माणसाला गूढतेचे आकर्षण असतेच... त्यात हे पाब्लो लोक अजुन भर घालतात..

माझे मन तुझे झाले.... ! इतके जवळ, की तू डोळे मिटतेस आणि मला झोप लागते. ही कल्पनाच एकदम निराळी आहे... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनिष 01/07/2008 - 15:58
मी झोपतो आणि तुझे दोळे मिटतात असे पहिजे होते - मुळ कवितेनुसार! अफलातून कल्पना हे पाब्लो नेरूदाचे एक महत्वाचे (आणि माझे सगळ्यात आवडते) वैशिष्ट्य! जाऊ द्या! मनिषभाई, तुझे कुछ झेपा नही यार! - (ओशाळलेला) मनिष

मनिष 01/07/2008 - 15:54
मीच माझा अनुवाद वाचून पाहिला आणि ते जमले नाही हे जाणवले! :( पाब्लो नेरुदाची त्रिवार माफी! पुढच्या वेळी माझ्याच एखाद्या कवितेचा अनुवाद करून पाहीन.

आनंदयात्री 01/07/2008 - 16:27
जमलाय रे मनिष, का उगाच असे म्हणतो, उदा --thanks to your love a certain solid fragrance, --हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध हे बघ बरं किती मस्त जमलयं. बाकी कविता भारी आहे पण जराशी गुढ वाटली ! मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे, पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात! मला डोळे झोप पेक्षा हे कडवे खुपच आवडले, डिफ्रंट कल्पना आहे एकदम, न फुललेले रोप त्याच्या उरात त्याच्याच न फुललेल्या फुलाची सल, धरेतुन उमलुन येणारा मृदगंध पण तो ही रहाणार अंधारुन त्याच्या देहात अन ते पण न उमललेल्या फुलाच्या ज्योतीबरोबर ...... बापरे !!!!! खुप म्हणजे खुपच वेगळे वाचायला मिळाले, शतशः धन्यवाद.

In reply to by आनंदयात्री

मनिष 01/07/2008 - 17:26
मला खूपच ओढून-ताणून आणलेल्या वाटतात आहे ओळी.
मला डोळे झोप पेक्षा हे कडवे खुपच आवडले, डिफ्रंट कल्पना आहे एकदम, न फुललेले रोप त्याच्या उरात त्याच्याच न फुललेल्या फुलाची सल, धरेतुन उमलुन येणारा मृदगंध पण तो ही रहाणार अंधारुन त्याच्या देहात अन ते पण न उमललेल्या फुलाच्या ज्योतीबरोबर ...... बापरे !!!!! खुप म्हणजे खुपच वेगळे वाचायला मिळाले, शतशः धन्यवाद.
वेगळेपणा आहे खरच पाब्लो नेरूदा ह्यांच्या कवितेत...त्या वेगळेपणाची आणि पाब्लो नेरूदा ची ओळख करून द्यावी हाच माझा उद्देश!

धनंजय 01/07/2008 - 20:39
पाब्लो नेरुदा यांची प्रेमगीते जितकी थेट सहज हृदयाला भिडतात, तितकीच हळुवार भावनांची गुंतागुंत असते. मस्त प्रयत्न! (कोणाला ध्वनी-संगीत हवे असेल तर मूळ स्पॅनिश असे : Soneto XVII (Pablo Neruda) No te amo como si fueras rosa de sal, topacio o flecha de claveles que propagan el fuego: te amo como se aman ciertas cosas oscuras, secretamente, entre la sombra y el alma. Te amo como la planta que no florece y lleva dentro de sí, escondida, la luz de aquellas flores, y gracias a tu amor vive oscuro en mi cuerpo el apretado aroma que ascendió de la tierra. Te amo sin saber cómo, ni cuándo, ni de dónde, te amo directamente sin problemas ni orgullo: así te amo porque no sé amar de otra manera, sino así de este modo en que no soy ni eres, tan cerca que tu mano sobre mi pecho es mía, tan cerca que se cierran tus ojos con mi sueño. )

यशोधरा 01/07/2008 - 21:36
आनंदयात्रीला अनुमोदन. मी तुझ्यावर प्रेम करतो ते एका न फुललेल्या रोपासारखे, पण ते रोप जपते उरात ज्योत लपलेल्या फुलांची हे सुरेखच जमलेय!

शितल 01/07/2008 - 23:14
अनुवादाचा प्रयत्न चागला आहे मनिष वाईट वाटुन घेऊ नका :) पण जे कवी लिहितो त्याने त्याच्या कविते असे काही स्वत:चे ओतले असते की बाकीच्यानी अनुवाद केला तरी तो मुळ कवितेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्यावर त्याने अनुवाद अवलबुन आहे.

चित्रा 02/07/2008 - 00:21
वेगळीच कविता. आणि अनुवादही चांगला उतरला आहे, थोडे बदलता येईल असे वाटते, पण सुरेख प्रयत्न. or the arrow of carnations the fire shoots off. यात "अग्निचे स्फुल्लिंग निघते अशी कार्नेशन आहे, म्हणून नाही." याऐवजी आगीची फुले असा काही अर्थ आहे का (म्हणजे फुलबाज्यांच्या टोकाशी जशी फुले दिसतात तसे) इंग्रजी अनुवादही आवडला. स्पॅनिश कळत नाही :-( या कवीची आणि कवितेचीही ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by चित्रा

धनंजय 02/07/2008 - 00:59
"आग फैलवणार्‍या कार्नेशन फुलांचा बाण" अशी काही मूळ प्रतिमा आहे. (इथे बहुधा इंग्रजी अनुवाद फसला आहे.) कार्नेशनची रंगसंगती कधीकधी पसरणार्‍या ज्वाळांसारखी असते. Carnation जंगली गुलाब : wild rose यातील पहिल्या ओळींमधल्या सर्व प्रतिमा - जंगली गुलाब, टोपाझ, कार्नेशन, सुंदर आणि काहीसे भडक आहेत, आणि खास दुर्मिळ किंवा बेशकिमती नाहीत. त्यापेक्षा ज्याची फुले दिसतच नाही पण त्यांचा उज्ज्वल रंग आतमध्ये भरलेला आहे, त्या न फुलणार्‍या झाडाचे असे प्रेम आहे, आणि कवीच्या अंगात ("तू"च्या मुळे) गुप्तपणे एकटावलेला मृद्गंध आहे, तसे कवीचे प्रेम आहे, इ.इ.

In reply to by धनंजय

चित्रा 02/07/2008 - 19:33
दिसतात खरी आगीच्या जाळासारखी. शोधले तर जालावर दोन अनुवाद मिळाले ज्यात फक्त ही एक ओळ वेगळी आहे ( मूळ अनुवादकाने चूक दुरूस्त केली असावी). मनिष यांनी एक अनुवाद मराठीत अनुवाद करण्यासाठी वापरला आणि दुसरा चुकून इथे जोडला असावा. पण काही बिघडले नाही, अनुवाद छानच जमला आहे..

In reply to by धनंजय

मनिष 02/07/2008 - 20:48
यातील पहिल्या ओळींमधल्या सर्व प्रतिमा - जंगली गुलाब, टोपाझ, कार्नेशन, सुंदर आणि काहीसे भडक आहेत, आणि खास दुर्मिळ किंवा बेशकिमती नाहीत. त्यापेक्षा ज्याची फुले दिसतच नाही पण त्यांचा उज्ज्वल रंग आतमध्ये भरलेला आहे, त्या न फुलणार्‍या झाडाचे असे प्रेम आहे, आणि कवीच्या अंगात ("तू"च्या मुळे) गुप्तपणे एकटावलेला मृद्गंध आहे, तसे कवीचे प्रेम आहे, इ.इ.
हे बरोबर आहे, असेच म्हणतो...पाब्लो नेरूदांच्या काव्याचे गद्य रसग्रहण करता येईल फार तर, पण अनुवाद फार अवघड गेला...तो काही जमला नाही मला.

विसोबा खेचर 02/07/2008 - 17:16
हे तुझ्या प्रेमाचेच देणे; एक आगळा-वेगळा, धुंद, मृदगंध ह्या धरेतून उमलून, राहतो अंधारून माझ्या ह्या देहात! ह्या ओळी सुंदर आहेत... एकंदरीत कविता ठीक वाटली. परंतु यात नेरुदांचे मोठेपण किंवा वेगळेपण जाणवण्याइतकी ही कविता खास वाटली नाही. आपल्या मराठीत अश्या ५६ प्रेमकविता वाचायला मिळतात! मनिषराव, नेरुदांचं वेगळेपण, मोठेपण जाणवेल असं काहीतरी भारीतलं येऊ द्या की! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनिष 02/07/2008 - 20:52
तात्या, तुमचे पटते आहे मला...ह्यात तो फार काही ग्रेट वाटत नाही. तो तसा जाणवेल अस मला लिहिता येईल का ही शंकाच आहे. जमल्यास एक-दोन कवितांवर "गद्य" लिहीन जमले/झेपले तर.

शेखस्पिअर 02/07/2008 - 21:10
मला वाटले पाब्लो पिकासो हाच फक्त गूढ आहे.. हा पण त्याच तोडीचा वाटतो... दिलीपोत्तम यांची पण एक कविता अशीच काहीशी आहे.. काही प्राक्रुत शब्द वापरून..

In reply to by शेखस्पिअर

मनिष 02/07/2008 - 21:16
गंमत म्हणजे, पाब्लो नेरूदा ला कवितेतला पिकासो म्हणतात..गूढ आहे खरच तो....आणि त्या गुढतेत लपलेले कित्येक अर्थ, पिकासोच्या पिवळ्या रंगासारखेच... त्याचेच आकर्षण वाटते.

शेखस्पिअर 02/07/2008 - 21:28
माणसाला गूढतेचे आकर्षण असतेच... त्यात हे पाब्लो लोक अजुन भर घालतात..
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाब्लो नेरूदा’ हे नोबेल पारीतोषक विजेते कवी. विसाव्या शतकातील (१९०४ - १९७३) एक अतिशय प्रभावशाली आणि श्रेष्ठ कवी. त्यांच्या कविता बर्‍याचदा अतिशय गुढ (surrealist?), इंटेन्स अशा आहेत. त्या मुळ स्पॅनिश भाषेत लिहिल्या असून त्यांचे इंग्लिश अनुवाद सहजपणे उपलब्ध आहेत. माझा हा मराठी अनुवादही अशाच एका इंग्लिश अनुवादावरुन घेतला आहे, त्या अर्थाने तो double-indirection असा आहे; तो कितपत जमला आहे, ते अवश्य सांगा...मला त्यातली वाक्यरचना फार गुंतागुंतीची झाली आहे असे वाटते, पण ती सहज, सोपी अशी नाही रुपांतरीत करता येत आहे!

पायसम

वैशाली हसमनीस ·

गिरिजा 01/07/2008 - 15:23
वाह! मस्तच लागतं हे! पण, त्यात साबूदाणा घालुन केलं नाहीए कधि, करुन बघायला हवं! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

वरदा 02/07/2008 - 21:10
आम्हाला एकदा बोलवा ना तुमच्याकडे जेवायला वैशालीताई...सगळ्या दाक्षिणात्य पाक्रु मस्त देताय तुम्ही..... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मी खवय्या 11/07/2008 - 17:45
वैशाली ताई (सगळ्यांना ताई म्हटले तर आमचि पंचाईत :-)), मी आता मेलबोर्नला मलेशियाला मार्गे जाणार आहे, तेव्हा येतो तुमच्याकडे.मला आमंत्रणाची आवश्यकता नाही. असो, कोणी भारतात आहे का?

गिरिजा 01/07/2008 - 15:23
वाह! मस्तच लागतं हे! पण, त्यात साबूदाणा घालुन केलं नाहीए कधि, करुन बघायला हवं! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

वरदा 02/07/2008 - 21:10
आम्हाला एकदा बोलवा ना तुमच्याकडे जेवायला वैशालीताई...सगळ्या दाक्षिणात्य पाक्रु मस्त देताय तुम्ही..... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मी खवय्या 11/07/2008 - 17:45
वैशाली ताई (सगळ्यांना ताई म्हटले तर आमचि पंचाईत :-)), मी आता मेलबोर्नला मलेशियाला मार्गे जाणार आहे, तेव्हा येतो तुमच्याकडे.मला आमंत्रणाची आवश्यकता नाही. असो, कोणी भारतात आहे का?
पायसम साहित्य--एक वाटी बारीक शेवया(जाड असल्यास अर्धा वाटी),एक लिटर दूध,दीड वाटी साखर,पाव वाटी साबूदाणा,वेलचीपूड,काजूकाप,पिस्ता कृति-प्रथम साबूदाणा पाण्यात अर्धा तास भिजवावा,दूध आटवत ठेवावे,शेवया उकळत्या पाण्यात एक मिनिट टाकून त्यातील पाणी काढून टाकावे,नंतर आटवत ठेवलेल्या दूधात शेवया व साबुदाणा घालावा,चवीनुसार साखर घालावी,साखर नीट विरघळेपर्यंत दूध हालवित रहावे,थंड झाल्यावर वेलचीपूड,काजूकाप,पिस्ताकाप घालावेत. हा पदार्थ अतिशय रुचकर लागतो.

मामाच्या गावाला

अरुण मनोहर ·

आनंदयात्री 01/07/2008 - 14:49
>>पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून >>बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन? उत्तम !!

धनंजय 01/07/2008 - 23:16
छान! मीही आज दोन दिवस मनातल्या मनात रेल्वेप्रवासात गुंगलेलो आहे.

सुचेल तसं 02/07/2008 - 08:37
अरुण मनोहरजी, खुप छान कविता. सहज आणि सुंदर अशी. पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन? ---हे तर खुपच मस्त. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

विसोबा खेचर 02/07/2008 - 16:53
माझंही मत वरील सर्वांप्रमाणेच. अतिशय सुरेख कविता. वाचून दिल खुश झाला! :) अरूणराव, जियो..! :) तात्या.

आनंदयात्री 01/07/2008 - 14:49
>>पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून >>बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन? उत्तम !!

धनंजय 01/07/2008 - 23:16
छान! मीही आज दोन दिवस मनातल्या मनात रेल्वेप्रवासात गुंगलेलो आहे.

सुचेल तसं 02/07/2008 - 08:37
अरुण मनोहरजी, खुप छान कविता. सहज आणि सुंदर अशी. पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन? ---हे तर खुपच मस्त. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

विसोबा खेचर 02/07/2008 - 16:53
माझंही मत वरील सर्वांप्रमाणेच. अतिशय सुरेख कविता. वाचून दिल खुश झाला! :) अरूणराव, जियो..! :) तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जायचेना आपल्याला, मामाच्या गावाला आगगाडीत बसून, गंमत बघायला
गाडीच्या प्रवासात, मी जागाच रहाणार बर्थवरून सारखा, खालीवर खेळणार
मला नको टिफीनचा, चिवडा लाडू कोरडा बोलाव फेरीवाल्याला, घे गरम वडा
इतका वेळ इथे, गाडी थांबली कशाला? उतरून खाली धक्का, मारू मी डब्याला?
पुलावरून जातांना, धडधड आवाज होती पडणार नाही ना खाली, मला वाटते भीती

सहज आठवलं म्हणून...

वेदश्री ·

सहज 01/07/2008 - 14:49
लेख वाचुन मस्त वाटले. वेदश्री योग्य तेच तत्व जवळ केलेस. धन्यवाद.

अनिल हटेला 01/07/2008 - 14:59
@ वेदश्री !!! गूड वन .!!!!!!! आवडला लेख आपल्याला.....!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ऋचा 01/07/2008 - 15:16
मस्त लेख आहे. खुप भावला. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आनंदयात्री 01/07/2008 - 15:17
>>कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात.. लेख अन लेखाचा ह बोध आवडला. चला, तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले. तत्व, पुरातन काळात ऍप्लिकेबल असलेले संस्कार वैगेरे गोष्टींचे 'बाबा वाक्यं प्रमाणम' श्टाईलने पालन करणे बर्‍याचदा आयुष्याला रुक्ष नॉनप्रॉडक्टिव्ह बनवते, कथानायिकेने तत्वांची मोडलेली चौकट स्तुत्य आहे.

II राजे II 01/07/2008 - 15:24
मस्त जमला आहे.... अनुभव छान आहे.. सर्वांनी कधी ना कधी कोणच्या ना कोणाच्या मदतीसाठी उभे राहावे.... ह्यातच खुप पुण्य आहे... देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे... कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात +१ .... १००% सहमत. राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

शितल 01/07/2008 - 16:02
वेदश्री, छान जमलाय लेख, दुसर्‍या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो.

अवलिया 01/07/2008 - 18:21
पोटात कालवलं माझ्या. मी इथे ३०%च्या स्लॅबमधून १०%च्या स्लॅबमध्ये यायला निव्वळ फोटोकॉपीमध्ये ५० रुपये उडवले होते आणि हा माणूस २-३हजारात त्याचं अख्खं कुटुंब महिनाभर चालवायला मिळाले तरी खूप झाले म्हणत होता ! लाज वाटली माझीच मला. आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. कारण कदाचित........ ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी.... नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

वेदश्री 01/07/2008 - 18:51
सहज, आनाबै, मी, ऋचा, आनंदयात्री, राजे, शितल, नारदाचार्य आणि नाना, सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आनंदयात्री, >तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले. तत्वसापेक्षता ही तर सिद्धतेची गरज नसलेली गोष्ट आहे. कथानायिकेच्या ( ही कोण असा प्रश्न पडलेला मला.. मग कळलं की मीच ! ) बाबतीत परत एकदा सिद्ध झाले म्हणाल तर अगदी मान्य. राजे, >देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे. पूर्णपणे सहमत. शितल, >दुसर्‍या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो. मदत जर योग्य व्यक्तीला झाली तरच मिळतो हा आनंद.. :) नारदाचार्य, >साध्या सोप्या भाषेत लिहिला आहे. आपल्याकडे सगळंच साधंसरळ असतं.. हायफंडू काही येतच नाही. नाना, >आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. मी कुठल्याही क्षेत्रात असते तरीही हा अनुभव विसरले नसते. इतक्या मोठ्या माणसाने माझे पाय धरावे.. बापरे ! > कारण कदाचित........ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी.... हाहाहाहा.. एकाच क्षेत्रावर अवलंबून रहाणे कधीही धोकादायकच. भलेभले आघात पचवून बसलेली असल्याने पुढेमागे आयटी क्षेत्रातील माझ्या करीअरला काही धोका निर्माण झाल्यास तीही एक संधी असल्याच्या आनंदात त्याहून जास्त आनंद देणारे क्षेत्र मी शोधून काढेन माझ्यासाठी. :)

एडिसन 01/07/2008 - 19:00
हे एकच तत्त्व आहे या जगात..दुसर्‍याच्या उपयोगी पडलात तर तुम्ही 'माणूस' आहात..छान लेख..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

वरदा 01/07/2008 - 20:09
इतकं छान काम केल्याबद्दल तुझं अभिनंदन! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वेदश्री 02/07/2008 - 12:42
एडिसन, प्रा.डॉ.दिलीप, चतुरंग, वरदा, यशोधरा, सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभार.

सहज 01/07/2008 - 14:49
लेख वाचुन मस्त वाटले. वेदश्री योग्य तेच तत्व जवळ केलेस. धन्यवाद.

अनिल हटेला 01/07/2008 - 14:59
@ वेदश्री !!! गूड वन .!!!!!!! आवडला लेख आपल्याला.....!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ऋचा 01/07/2008 - 15:16
मस्त लेख आहे. खुप भावला. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आनंदयात्री 01/07/2008 - 15:17
>>कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात.. लेख अन लेखाचा ह बोध आवडला. चला, तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले. तत्व, पुरातन काळात ऍप्लिकेबल असलेले संस्कार वैगेरे गोष्टींचे 'बाबा वाक्यं प्रमाणम' श्टाईलने पालन करणे बर्‍याचदा आयुष्याला रुक्ष नॉनप्रॉडक्टिव्ह बनवते, कथानायिकेने तत्वांची मोडलेली चौकट स्तुत्य आहे.

II राजे II 01/07/2008 - 15:24
मस्त जमला आहे.... अनुभव छान आहे.. सर्वांनी कधी ना कधी कोणच्या ना कोणाच्या मदतीसाठी उभे राहावे.... ह्यातच खुप पुण्य आहे... देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे... कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात +१ .... १००% सहमत. राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

शितल 01/07/2008 - 16:02
वेदश्री, छान जमलाय लेख, दुसर्‍या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो.

अवलिया 01/07/2008 - 18:21
पोटात कालवलं माझ्या. मी इथे ३०%च्या स्लॅबमधून १०%च्या स्लॅबमध्ये यायला निव्वळ फोटोकॉपीमध्ये ५० रुपये उडवले होते आणि हा माणूस २-३हजारात त्याचं अख्खं कुटुंब महिनाभर चालवायला मिळाले तरी खूप झाले म्हणत होता ! लाज वाटली माझीच मला. आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. कारण कदाचित........ ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी.... नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

वेदश्री 01/07/2008 - 18:51
सहज, आनाबै, मी, ऋचा, आनंदयात्री, राजे, शितल, नारदाचार्य आणि नाना, सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. आनंदयात्री, >तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले. तत्वसापेक्षता ही तर सिद्धतेची गरज नसलेली गोष्ट आहे. कथानायिकेच्या ( ही कोण असा प्रश्न पडलेला मला.. मग कळलं की मीच ! ) बाबतीत परत एकदा सिद्ध झाले म्हणाल तर अगदी मान्य. राजे, >देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे. पूर्णपणे सहमत. शितल, >दुसर्‍या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो. मदत जर योग्य व्यक्तीला झाली तरच मिळतो हा आनंद.. :) नारदाचार्य, >साध्या सोप्या भाषेत लिहिला आहे. आपल्याकडे सगळंच साधंसरळ असतं.. हायफंडू काही येतच नाही. नाना, >आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. मी कुठल्याही क्षेत्रात असते तरीही हा अनुभव विसरले नसते. इतक्या मोठ्या माणसाने माझे पाय धरावे.. बापरे ! > कारण कदाचित........ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी.... हाहाहाहा.. एकाच क्षेत्रावर अवलंबून रहाणे कधीही धोकादायकच. भलेभले आघात पचवून बसलेली असल्याने पुढेमागे आयटी क्षेत्रातील माझ्या करीअरला काही धोका निर्माण झाल्यास तीही एक संधी असल्याच्या आनंदात त्याहून जास्त आनंद देणारे क्षेत्र मी शोधून काढेन माझ्यासाठी. :)

एडिसन 01/07/2008 - 19:00
हे एकच तत्त्व आहे या जगात..दुसर्‍याच्या उपयोगी पडलात तर तुम्ही 'माणूस' आहात..छान लेख..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

वरदा 01/07/2008 - 20:09
इतकं छान काम केल्याबद्दल तुझं अभिनंदन! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

वेदश्री 02/07/2008 - 12:42
एडिसन, प्रा.डॉ.दिलीप, चतुरंग, वरदा, यशोधरा, सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मौम, मैं जरा फटाकसे जाके ये डॉक्युमेंटसकी फोटोकॉपी करके आती हूं। मिनव्हाईल अगर प्रसाद मुझे ढुंढता है तो उसे बोल देना की ऑफिसका झेरॉक्समशीन ठीक करवाए। इंकमटॅक्स सबमिशनके लिये वो फायनान्सवाले सिरपे बैठे है और ये नामाकुल मशीनभी अभी बंद पडना था। उसे बोल देना.. ठीक है? " मौमिता माझी प्रोजेक्टमधली खासंखास दोस्त. दोघी एकमेकींना विश्वासात घेऊन मदत करत पुढे जाणाऱ्या. प्रसाद माझा पीएल ! "ठीक है। लेकीन तू जल्दी आ। हमेशा देर होती है खाना खानेको तेरीवजहसे.. " "हां हां..

पारिजात

मृत्युन्जय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नव्हती कधीच अपेक्शा सख्ये तुझ्या समागमाची भेटीस हाय का मग आली माझ्या ही रात्र आसवाची केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे दुरस्थ मी जरासा होतो रणान्गणाहुनि जखम हि अशी या अश्वथाची हाय का आली मग नशिबी आता कुठेशी होती झाली जगण्यास सुरुवात माझ्या हे घाव का मग बान्धिलेस तु ललाटीस माझ्या गुन्फले तुज मी स्वप्नात माझ्या, श्वासात माझ्या चान्दण्याचे शाप का मग निद्रेस माझ्या नव्हती कधीच अपेक्शा ना मोगरयाची ना चाफेकळीची गजरा काट्यान्चा हाय का मग असा हा नशिबी माझ्या वेचिल्या तुझ्यचसाठी मी तारकान्च्या दीपमाळा माझ्याच आसमन्ती हाय का मग उल्केचा हा रोष

ईश्वर!!!

पिवळा डांबिस ·

विजुभाऊ 01/07/2008 - 12:53
श्री श्री श्री १००८डांबीस काका. (कॅलिफोर्नियापीठाधीश) रूपक छान आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 01/07/2008 - 13:14
रूपक छान आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर 01/07/2008 - 13:11
आयला डांबिसा! टोमॅटोचे रुपक वापरून जबरदस्त कविता केली आहेस! अंगावर आली ही कविता....! साला, वाचताना क्षणभर मला तर वाटलं की मी कुणा मोठ्या विंग्रजी कवीच्या कवितेचे भाषांतर वाचतो आहे! शेचटी बघतो तर तो मोठा कवी खुद्द आमचा डांबिसकाकाच निघाला! मनापासून अभिनंदन! खूप आवडली ही कविता.... तात्या.

प्रमोद देव 01/07/2008 - 13:29
खरंच असे होऊही शकते. शंकररावांनी आपला तिसरा डोळा उघडला तर जग भस्मसात होते अशी कल्पना आपल्या पुराणात आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नाही वाटत. :) इथे प्रत्यक्ष शंकर वगैरे असोत नसोत.... निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप आता मर्यादेच्या बाहेर चाललेला आहे.. तेव्हा असा नैसर्गिक विस्फोट केव्हाही होऊ शकतो. धरणीकंप,त्सुनामी,वादळं ह्या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळताहेतच. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अनिल हटेला 01/07/2008 - 14:10
छान कविता!! अजुन वाचायला आवडेल...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

वरदा 01/07/2008 - 18:43
मस्तच कविता....आवडलि आणि पटली... खरंच असे होऊही शकते. शंकररावांनी आपला तिसरा डोळा उघडला तर जग भस्मसात होते अशी कल्पना आपल्या पुराणात आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नाही वाटत. इथे प्रत्यक्ष शंकर वगैरे असोत नसोत.... निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप आता मर्यादेच्या बाहेर चाललेला आहे.. तेव्हा असा नैसर्गिक विस्फोट केव्हाही होऊ शकतो. धरणीकंप,त्सुनामी,वादळं ह्या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळताहेतच. १००% सहमत...

एडिसन 01/07/2008 - 19:10
रूपक मस्त आहे..आणि तात्या म्हणतात त्याप्रमाणे खरोखर एखाद्या इंग्रजी कवितेचा भास होतोय..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

टारझन 02/07/2008 - 02:00
लई भारी.... पेले ३ वेळा आर्धा आर्धा वाच्या.. पण सगळा बोउंसर गया. नंतर मग अंत तक वाच्या तो कळ्या... वा पिडा काका तुमने षटकार हान्या.... आमको कोइ ईक अटोमबॉम्ब दो रे... साला त्या आमेरिका के वरच डाल के येतो. साले लै ऊड्या मारून रायलेत.. अस्सल भारतप्रेमी आणि लादेन मामांएवढांच अमेरिकेचा राग अशणारा कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

बेसनलाडू 02/07/2008 - 03:41
प्रासंगिक गोलकविचार. आवडले. शेवट अधिक विचार करण्यायोग्य वाटला. (विचारशील)बेसनलाडू

विजुभाऊ 01/07/2008 - 12:53
श्री श्री श्री १००८डांबीस काका. (कॅलिफोर्नियापीठाधीश) रूपक छान आहे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे 01/07/2008 - 13:14
रूपक छान आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर 01/07/2008 - 13:11
आयला डांबिसा! टोमॅटोचे रुपक वापरून जबरदस्त कविता केली आहेस! अंगावर आली ही कविता....! साला, वाचताना क्षणभर मला तर वाटलं की मी कुणा मोठ्या विंग्रजी कवीच्या कवितेचे भाषांतर वाचतो आहे! शेचटी बघतो तर तो मोठा कवी खुद्द आमचा डांबिसकाकाच निघाला! मनापासून अभिनंदन! खूप आवडली ही कविता.... तात्या.

प्रमोद देव 01/07/2008 - 13:29
खरंच असे होऊही शकते. शंकररावांनी आपला तिसरा डोळा उघडला तर जग भस्मसात होते अशी कल्पना आपल्या पुराणात आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नाही वाटत. :) इथे प्रत्यक्ष शंकर वगैरे असोत नसोत.... निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप आता मर्यादेच्या बाहेर चाललेला आहे.. तेव्हा असा नैसर्गिक विस्फोट केव्हाही होऊ शकतो. धरणीकंप,त्सुनामी,वादळं ह्या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळताहेतच. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अनिल हटेला 01/07/2008 - 14:10
छान कविता!! अजुन वाचायला आवडेल...... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

वरदा 01/07/2008 - 18:43
मस्तच कविता....आवडलि आणि पटली... खरंच असे होऊही शकते. शंकररावांनी आपला तिसरा डोळा उघडला तर जग भस्मसात होते अशी कल्पना आपल्या पुराणात आहे. तेव्हा हे अगदीच अशक्य नाही वाटत. इथे प्रत्यक्ष शंकर वगैरे असोत नसोत.... निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप आता मर्यादेच्या बाहेर चाललेला आहे.. तेव्हा असा नैसर्गिक विस्फोट केव्हाही होऊ शकतो. धरणीकंप,त्सुनामी,वादळं ह्या सगळ्या धोक्याच्या सूचना आपल्याला वेळोवेळी मिळताहेतच. १००% सहमत...

एडिसन 01/07/2008 - 19:10
रूपक मस्त आहे..आणि तात्या म्हणतात त्याप्रमाणे खरोखर एखाद्या इंग्रजी कवितेचा भास होतोय..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

टारझन 02/07/2008 - 02:00
लई भारी.... पेले ३ वेळा आर्धा आर्धा वाच्या.. पण सगळा बोउंसर गया. नंतर मग अंत तक वाच्या तो कळ्या... वा पिडा काका तुमने षटकार हान्या.... आमको कोइ ईक अटोमबॉम्ब दो रे... साला त्या आमेरिका के वरच डाल के येतो. साले लै ऊड्या मारून रायलेत.. अस्सल भारतप्रेमी आणि लादेन मामांएवढांच अमेरिकेचा राग अशणारा कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

बेसनलाडू 02/07/2008 - 03:41
प्रासंगिक गोलकविचार. आवडले. शेवट अधिक विचार करण्यायोग्य वाटला. (विचारशील)बेसनलाडू
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी माझ्या अनंत पसार्‍यात मी एकटाच बसलोय! नेहमीप्रमांणे कृतकॄत्य न वाटता आज मन अगदी क्षुब्ध झालंय!! राहून राहून माझी नजर त्या गोलकावर जात्येय...... तसं मी हे सर्वच विश्व जन्माला घातलं..... पण मी अतिशय हौसेनं ज्ञन्माला घातलेला तो गोलक........ पाण्याच्या प्रभावाने टचटचीत फुगलेला तो गोलक.... त्याची किती निगराणी केली होती मी..... किती जोपासना केली....... वेळोवेळी काळजी घेतली घेतली, आवश्यक ती उपाययोजना केली........ अनेक आजारांतून त्याला वाचवला........ आणि अखेरीस तो अगदी परिपक्व केला.... मलाच केव्हढा अभिमान वाटला होता स्वतःचा त्यावे़ळेस........ रसरशीत आणि टचटचीत....... सर्व योग्य परिस्थिती मी निर्माण

सांदण

श्रीयुत संतोष जोशी ·

विसोबा खेचर 01/07/2008 - 13:22
संतोषशेठ, केवळ अप्रतिम पाकृ! आमची अतिशय आवडती...! :) आपला, (सांदणंप्रेमी) तात्या देवगडकर.

सहज 01/07/2008 - 13:28
पाककृतीवरुन असे वाटतेय की सांदण खायला नक्की मजा येईल धन्यवाद संतोषशेठ.

मदनबाण 01/07/2008 - 13:59
बर्‍याच वर्षां पुर्वी जेव्हा कोकणातला नातेवाईकांकडे गेलो होतो तेव्हा हा पदार्थ खाल्ला होता...आज परत आठवण आली.. (खादाड) मदनबाण.....

वरदा 01/07/2008 - 18:37
एकदम लहान असताना खाल्ली होती सांदणं....बरका फणसाचे गरे आम्हाला कुठुन मिळायला....:( मस्त पाक्रु...

धनंजय 01/07/2008 - 20:57
बरका फणस कुठे मिळणार :-( पण अति-पिकलेल्या केळ्याचे, आमरसाचे, किसलेल्या काकडीचे, असेच सांदण करता येते. पाककृती वरच्यासारखीच. ओली हळद कुंडीतसुद्धा रुजून त्याचे झाड येते :-) त्यामुळे आजकाल जपूनजपून माझ्या घरी सांदणात हळदीचे पानही पडते. यानेसुद्धा अस्सल कोकणी चव येते - हळदीचे पान मिळाले तर जरूर वापरावे. सांदणाक गोयांत "धोणास" अशे नांव आसा.

In reply to by धनंजय

चित्रा 01/07/2008 - 23:47
सांदणे मस्त. काकडीची कल्पना छान. अवांतर - आमच्या घरी काकडीचे गोड किंवा तिखट घावनही करतात.

In reply to by चित्रा

वरदा 01/07/2008 - 23:49
तांदुळाच्या पिठात घालून करतात का घावन? अजून कय घालतात? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

चित्रा 02/07/2008 - 00:38
तांदळाच्या पिठातच. अजून फक्त गूळ, थोडे तेल, चवीला मीठ. फक्त ते घट्टसर भिजवावे लागते, काकडीलाही पाणी सुटते, त्यामुळे पाणी बघूनच घालायचे, नाहीतर ते तव्याला चिकटतात. काहीजण त्यात थोडी कणीकही घालतात /जिरे/कोथिंबीर घालतात असे वाचून आहे! पण आमच्याकडे गोडच घावन करीत.

वरदा 01/07/2008 - 21:10
मस्त माहीती..केळ्याचं तर नक्की करता येईल्....करुन पाहिन नक्की..धन्यु धनंजय! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 01/07/2008 - 13:22
संतोषशेठ, केवळ अप्रतिम पाकृ! आमची अतिशय आवडती...! :) आपला, (सांदणंप्रेमी) तात्या देवगडकर.

सहज 01/07/2008 - 13:28
पाककृतीवरुन असे वाटतेय की सांदण खायला नक्की मजा येईल धन्यवाद संतोषशेठ.

मदनबाण 01/07/2008 - 13:59
बर्‍याच वर्षां पुर्वी जेव्हा कोकणातला नातेवाईकांकडे गेलो होतो तेव्हा हा पदार्थ खाल्ला होता...आज परत आठवण आली.. (खादाड) मदनबाण.....

वरदा 01/07/2008 - 18:37
एकदम लहान असताना खाल्ली होती सांदणं....बरका फणसाचे गरे आम्हाला कुठुन मिळायला....:( मस्त पाक्रु...

धनंजय 01/07/2008 - 20:57
बरका फणस कुठे मिळणार :-( पण अति-पिकलेल्या केळ्याचे, आमरसाचे, किसलेल्या काकडीचे, असेच सांदण करता येते. पाककृती वरच्यासारखीच. ओली हळद कुंडीतसुद्धा रुजून त्याचे झाड येते :-) त्यामुळे आजकाल जपूनजपून माझ्या घरी सांदणात हळदीचे पानही पडते. यानेसुद्धा अस्सल कोकणी चव येते - हळदीचे पान मिळाले तर जरूर वापरावे. सांदणाक गोयांत "धोणास" अशे नांव आसा.

In reply to by धनंजय

चित्रा 01/07/2008 - 23:47
सांदणे मस्त. काकडीची कल्पना छान. अवांतर - आमच्या घरी काकडीचे गोड किंवा तिखट घावनही करतात.

In reply to by चित्रा

वरदा 01/07/2008 - 23:49
तांदुळाच्या पिठात घालून करतात का घावन? अजून कय घालतात? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

चित्रा 02/07/2008 - 00:38
तांदळाच्या पिठातच. अजून फक्त गूळ, थोडे तेल, चवीला मीठ. फक्त ते घट्टसर भिजवावे लागते, काकडीलाही पाणी सुटते, त्यामुळे पाणी बघूनच घालायचे, नाहीतर ते तव्याला चिकटतात. काहीजण त्यात थोडी कणीकही घालतात /जिरे/कोथिंबीर घालतात असे वाचून आहे! पण आमच्याकडे गोडच घावन करीत.

वरदा 01/07/2008 - 21:10
मस्त माहीती..केळ्याचं तर नक्की करता येईल्....करुन पाहिन नक्की..धन्यु धनंजय! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
नमस्कार, साहित्य : १ वाटी तांदूळ ; २ वाट्या बरक्या फणसाचा रस ; गूळ ; वेलची पावडर. कॄति : प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून २ तास वाळवून घ्या.मग त्याचा जाडसर रवा काढून तो चांगला भाजून घ्यावा. पूर्ण पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे घ्यावे आणि नुसते स्टीलच्या चाळणीवर चांगले घोटून त्याचा रस काढून घ्यावा. साधारणपणे इडली सारखे होईल इतपत फणसाचा रस आणि तांदळाचा रवा यांचे मिश्रण करुन २ तास भिजत ठेवावे. मग त्यात व्यवस्थित गूळ घालून तो गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा.

( जाता दुरदेशी सुख वाटे जीवा -)

अमोल केळकर ·

कुंदन 01/07/2008 - 12:18
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा पळुन यावेसे वाटतेय भारतात.

विसोबा खेचर 01/07/2008 - 13:26
पोटापाण्याच्या उद्योगाकरता परदेशी राहणार्‍या मंडळींची व्यथा चांगल्या रितीने मांडली आहे... केळकरसाहेब, पुलेशु... आपला, (अण्णांचा भक्त) तात्या.

मदनबाण 01/07/2008 - 14:02
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा !! ६!! हे १००% सत्य..... मदनबाण.....

गणा मास्तर 02/07/2008 - 14:57
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा ! आपल्या गावापरीस सुख न्हाय बग गड्या

अरुण मनोहर 03/07/2008 - 10:27
या चलनाची उपमा नाही त्रिभुवनी! डॉलरची घसरगुंडी पहाता वरील ओळ उलट्या अर्थाने पटते! ऐसे सरकार लावी करावर कर आउट्सोअर्सिंग चालू येथे !!५!! वाचून असे वाटले, भारतात करांच्या द्र्ष्टीने नंदनवन आहे की काय? ---डॉलर घसरगुंडीने पोळलेला

कुंदन 01/07/2008 - 12:18
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा पळुन यावेसे वाटतेय भारतात.

विसोबा खेचर 01/07/2008 - 13:26
पोटापाण्याच्या उद्योगाकरता परदेशी राहणार्‍या मंडळींची व्यथा चांगल्या रितीने मांडली आहे... केळकरसाहेब, पुलेशु... आपला, (अण्णांचा भक्त) तात्या.

मदनबाण 01/07/2008 - 14:02
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा !! ६!! हे १००% सत्य..... मदनबाण.....

गणा मास्तर 02/07/2008 - 14:57
पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा ! आपल्या गावापरीस सुख न्हाय बग गड्या

अरुण मनोहर 03/07/2008 - 10:27
या चलनाची उपमा नाही त्रिभुवनी! डॉलरची घसरगुंडी पहाता वरील ओळ उलट्या अर्थाने पटते! ऐसे सरकार लावी करावर कर आउट्सोअर्सिंग चालू येथे !!५!! वाचून असे वाटले, भारतात करांच्या द्र्ष्टीने नंदनवन आहे की काय? ---डॉलर घसरगुंडीने पोळलेला
लेखनविषय:
जाता दुरदेशी सुख वाटे जीवा! डॉलरे भेटता आनंदहोई !!१!! या चलनाची उपमा नाही त्रिभुवनी! करुन चाकरी इतर देशा !!२!! ऐसा परदेश ऐसे देशोदेशी लोक ! ऐसे रहाणीमान दावा कोठें !!३!! ऐसी उठाठेव ऐसा व्यवहार! ऐसा N R I कोणी दावा !!४!! ऐसे सरकार लावी करावर कर आउट्सोअर्सिंग चालू येथे !!५!! पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा !!