>>कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात..
लेख अन लेखाचा ह बोध आवडला.
चला, तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले.
तत्व, पुरातन काळात ऍप्लिकेबल असलेले संस्कार वैगेरे गोष्टींचे 'बाबा वाक्यं प्रमाणम' श्टाईलने पालन करणे बर्याचदा आयुष्याला रुक्ष नॉनप्रॉडक्टिव्ह बनवते, कथानायिकेने तत्वांची मोडलेली चौकट स्तुत्य आहे.
II राजे II (verified= न पडताळणी केलेला)Tue, 07/01/2008 - 11:54नवीन
मस्त जमला आहे.... अनुभव छान आहे.. सर्वांनी कधी ना कधी कोणच्या ना कोणाच्या मदतीसाठी उभे राहावे.... ह्यातच खुप पुण्य आहे... देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे...
कधीकधी आपली शुष्क तत्त्वे बाजुला ठेवून काही करण्यातूनदेखील आयुष्य जगण्यातली खरी मजा चाखायला मिळते म्हणतात
+१ .... १००% सहमत.
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
पोटात कालवलं माझ्या. मी इथे ३०%च्या स्लॅबमधून १०%च्या स्लॅबमध्ये यायला निव्वळ फोटोकॉपीमध्ये ५० रुपये उडवले होते आणि हा माणूस २-३हजारात त्याचं अख्खं कुटुंब महिनाभर चालवायला मिळाले तरी खूप झाले म्हणत होता ! लाज वाटली माझीच मला.
आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका. कारण कदाचित........
ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी....
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
सहज, आनाबै, मी, ऋचा, आनंदयात्री, राजे, शितल, नारदाचार्य आणि नाना, सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
आनंदयात्री,
>तत्व सापेक्ष असतात हे तर पृव्ह झाले.
तत्वसापेक्षता ही तर सिद्धतेची गरज नसलेली गोष्ट आहे. कथानायिकेच्या ( ही कोण असा प्रश्न पडलेला मला.. मग कळलं की मीच ! ) बाबतीत परत एकदा सिद्ध झाले म्हणाल तर अगदी मान्य.
राजे,
>देवा समोर.. काही शे अथवा काही लाख रुपये चढवण्यापेक्षा तर नक्कीच जास्त पुण्य ह्या काम आहे.
पूर्णपणे सहमत.
शितल,
>दुसर्या॑ना मदत केल्यावर मिळणारा आन॑द खुप असतो.
मदत जर योग्य व्यक्तीला झाली तरच मिळतो हा आनंद.. :)
नारदाचार्य,
>साध्या सोप्या भाषेत लिहिला आहे.
आपल्याकडे सगळंच साधंसरळ असतं.. हायफंडू काही येतच नाही.
नाना,
>आपण आय टि मधे असाल तर हा अनुभव अजिबात विसरु नका.
मी कुठल्याही क्षेत्रात असते तरीही हा अनुभव विसरले नसते. इतक्या मोठ्या माणसाने माझे पाय धरावे.. बापरे !
> कारण कदाचित........ईश्वरा आय टी मधील लोकांना मानसिक शक्ती दे येणारे आघात सहन करण्या साठी....
हाहाहाहा.. एकाच क्षेत्रावर अवलंबून रहाणे कधीही धोकादायकच. भलेभले आघात पचवून बसलेली असल्याने पुढेमागे आयटी क्षेत्रातील माझ्या करीअरला काही धोका निर्माण झाल्यास तीही एक संधी असल्याच्या आनंदात त्याहून जास्त आनंद देणारे क्षेत्र मी शोधून काढेन माझ्यासाठी. :)
प्रतिक्रिया