मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्याकरण आणि वृत्त

संदीप चित्रे ·
मराठी व्याकरण -- विशेषतः वृत्ते (भुजंगप्रयात, मंदाक्रांता इ.) ह्यांची सोपी माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे का?

ही केशरी संध्याकाळ

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-शीव शंकर वशिष्ट) ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार ते दोन दोन विहंग उडून गगनी होती धूंद लक्षावधी गगने येवूनी करिती माझ्या मनी आक्रंद सप्तरंगात मी हरवली झुळझुळ झऱ्यात मी न्हाहली छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार फुलांचा सुगंध घेवूनी हा वारा येवूनी बिलगे माझ्या शरिरा रंगात मिसळूनी रंग गगनी दिसती हे पतंग विहार करिती एकमेका संग ही केशरी संध्याकाळ छेडीते मनाची तार वाटे उडून जावे निळ्या नभाच्या पार श्रीकृष्ण सामंत

पाब्लो नेरूदा - I do not love you... अनुवाद

मनिष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पाब्लो नेरूदा’ हे नोबेल पारीतोषक विजेते कवी. विसाव्या शतकातील (१९०४ - १९७३) एक अतिशय प्रभावशाली आणि श्रेष्ठ कवी. त्यांच्या कविता बर्‍याचदा अतिशय गुढ (surrealist?), इंटेन्स अशा आहेत. त्या मुळ स्पॅनिश भाषेत लिहिल्या असून त्यांचे इंग्लिश अनुवाद सहजपणे उपलब्ध आहेत. माझा हा मराठी अनुवादही अशाच एका इंग्लिश अनुवादावरुन घेतला आहे, त्या अर्थाने तो double-indirection असा आहे; तो कितपत जमला आहे, ते अवश्य सांगा...मला त्यातली वाक्यरचना फार गुंतागुंतीची झाली आहे असे वाटते, पण ती सहज, सोपी अशी नाही रुपांतरीत करता येत आहे!

पायसम

वैशाली हसमनीस ·
पायसम साहित्य--एक वाटी बारीक शेवया(जाड असल्यास अर्धा वाटी),एक लिटर दूध,दीड वाटी साखर,पाव वाटी साबूदाणा,वेलचीपूड,काजूकाप,पिस्ता कृति-प्रथम साबूदाणा पाण्यात अर्धा तास भिजवावा,दूध आटवत ठेवावे,शेवया उकळत्या पाण्यात एक मिनिट टाकून त्यातील पाणी काढून टाकावे,नंतर आटवत ठेवलेल्या दूधात शेवया व साबुदाणा घालावा,चवीनुसार साखर घालावी,साखर नीट विरघळेपर्यंत दूध हालवित रहावे,थंड झाल्यावर वेलचीपूड,काजूकाप,पिस्ताकाप घालावेत. हा पदार्थ अतिशय रुचकर लागतो.

मामाच्या गावाला

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जायचेना आपल्याला, मामाच्या गावाला आगगाडीत बसून, गंमत बघायला
गाडीच्या प्रवासात, मी जागाच रहाणार बर्थवरून सारखा, खालीवर खेळणार
मला नको टिफीनचा, चिवडा लाडू कोरडा बोलाव फेरीवाल्याला, घे गरम वडा
इतका वेळ इथे, गाडी थांबली कशाला? उतरून खाली धक्का, मारू मी डब्याला?
पुलावरून जातांना, धडधड आवाज होती पडणार नाही ना खाली, मला वाटते भीती

सहज आठवलं म्हणून...

वेदश्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"मौम, मैं जरा फटाकसे जाके ये डॉक्युमेंटसकी फोटोकॉपी करके आती हूं। मिनव्हाईल अगर प्रसाद मुझे ढुंढता है तो उसे बोल देना की ऑफिसका झेरॉक्समशीन ठीक करवाए। इंकमटॅक्स सबमिशनके लिये वो फायनान्सवाले सिरपे बैठे है और ये नामाकुल मशीनभी अभी बंद पडना था। उसे बोल देना.. ठीक है? " मौमिता माझी प्रोजेक्टमधली खासंखास दोस्त. दोघी एकमेकींना विश्वासात घेऊन मदत करत पुढे जाणाऱ्या. प्रसाद माझा पीएल ! "ठीक है। लेकीन तू जल्दी आ। हमेशा देर होती है खाना खानेको तेरीवजहसे.. " "हां हां..

पारिजात

मृत्युन्जय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नव्हती कधीच अपेक्शा सख्ये तुझ्या समागमाची भेटीस हाय का मग आली माझ्या ही रात्र आसवाची केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे दुरस्थ मी जरासा होतो रणान्गणाहुनि जखम हि अशी या अश्वथाची हाय का आली मग नशिबी आता कुठेशी होती झाली जगण्यास सुरुवात माझ्या हे घाव का मग बान्धिलेस तु ललाटीस माझ्या गुन्फले तुज मी स्वप्नात माझ्या, श्वासात माझ्या चान्दण्याचे शाप का मग निद्रेस माझ्या नव्हती कधीच अपेक्शा ना मोगरयाची ना चाफेकळीची गजरा काट्यान्चा हाय का मग असा हा नशिबी माझ्या वेचिल्या तुझ्यचसाठी मी तारकान्च्या दीपमाळा माझ्याच आसमन्ती हाय का मग उल्केचा हा रोष

ईश्वर!!!

पिवळा डांबिस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी माझ्या अनंत पसार्‍यात मी एकटाच बसलोय! नेहमीप्रमांणे कृतकॄत्य न वाटता आज मन अगदी क्षुब्ध झालंय!! राहून राहून माझी नजर त्या गोलकावर जात्येय...... तसं मी हे सर्वच विश्व जन्माला घातलं..... पण मी अतिशय हौसेनं ज्ञन्माला घातलेला तो गोलक........ पाण्याच्या प्रभावाने टचटचीत फुगलेला तो गोलक.... त्याची किती निगराणी केली होती मी..... किती जोपासना केली....... वेळोवेळी काळजी घेतली घेतली, आवश्यक ती उपाययोजना केली........ अनेक आजारांतून त्याला वाचवला........ आणि अखेरीस तो अगदी परिपक्व केला.... मलाच केव्हढा अभिमान वाटला होता स्वतःचा त्यावे़ळेस........ रसरशीत आणि टचटचीत....... सर्व योग्य परिस्थिती मी निर्माण

सांदण

श्रीयुत संतोष जोशी ·
नमस्कार, साहित्य : १ वाटी तांदूळ ; २ वाट्या बरक्या फणसाचा रस ; गूळ ; वेलची पावडर. कॄति : प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून २ तास वाळवून घ्या.मग त्याचा जाडसर रवा काढून तो चांगला भाजून घ्यावा. पूर्ण पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे घ्यावे आणि नुसते स्टीलच्या चाळणीवर चांगले घोटून त्याचा रस काढून घ्यावा. साधारणपणे इडली सारखे होईल इतपत फणसाचा रस आणि तांदळाचा रवा यांचे मिश्रण करुन २ तास भिजत ठेवावे. मग त्यात व्यवस्थित गूळ घालून तो गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा.