मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राजस्थानच्या ट्रिपचा शेवटचा दिवस उजाडला. आज आमचं संध्याकाळचं विमान होतं. आम्ही सिटी पॅलेसच्याच भागात मुक्कामी होतो. त्या भागात थोडी पायी भटकंती करून आलो. आधी गणगौर घाटावर गेलो. गणगौर म्हणजे शिव गौरी. हे या घाटाचं नाव आहे, हा एक सणसुद्धा आहे, आणि त्या दिवशी करायचा एक पारंपरिक नृत्यखेळाचा प्रकारसुद्धा आहे. मुन्नाभाई मध्ये लक्की सिंगचा एक डायलॉग आहे. त्याला अधिकारी विचारतो २० मजल्याची परवानगी असताना इमारत २५ मजल्यांची कशी बनवलीस? तो म्हणतो "बनते बनते बन गयी यार!!".

गॅस साठी दाही दिशा ....

बाजीगर ·
लेखनविषय:
गॅस साठी आता | धावा दाही दिशा | आम्हा फिरविली कसा |जगदीशा || काय आमची चूक |कसा सत्यनास | कुणी देता का गॅस | विठू राया || झाली इंधन टंचाई | सिलिंडर साठी रांगा | सुरू करा टांगा | पांडुरंगा || ऐका आकाशवाणी| बंद हॉर्मुझ सामुद्रधुनी | हाताने धुवा धुणी | चक्रपाणी || कशी पेटवू चूल |कसे राखू घरपण | पुन्हा शोधा सरपण |रानोमाळी || घ्यावी आंघोळ सुटी |नका मारू बोंब| पुन्हा पेटवा बंब| मोरी तला|| अहंकारी आणि चक्रम |चालक ट्रम्प तात्या | मालक बुडीत खात्या |देवा धाव || डिलीट करा स्विगी |झाले बंद हॉटेल | कसे चालेल हॉस्टेल | चिंतामणी || बाजीगर खरेदी | इंडक्शन तवा | राईस कुकर नवा | इलेक्ट्रिक ||

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

पाषाणभेद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) २१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद ✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम ✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै ✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास ✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट ✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ ✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत ✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना नमस्कार. गेल्या जानेवारीमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" हा विषय घेऊन १८६१ किलोमीटर सोलो सायकल प्रवास केला होता. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा हा उपक्रम होता.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

सैरभैर डायरी - ३

कपिलमुनी ·

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सैरभैर डायरी - १ सैरभैर डायरी - २

गावाकडच्या गप्पा

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या . दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ होमसिक झाल्याची भावना! ✪ रामगंगेच्या किनार्‍याने घाट वाटेचा प्रवास ✪ विवेकानंदांचं अलमोडा आणि नीम करोली बाबांचं कैंची धाम! ✪ तीन बाजूंने पर्वत आणि दूरवर सपाट जमीन ✪ काठगोदाम- लाकडं नेण्यासाठी ब्रिटीशांनी बांधलेलं स्टेशन ✪ दक्षिण भारत सायकल प्रवासाची उत्सुकता ११ डिसेंबरच्या पहाटे सत्गड़वरून निघालो! ठीक साडेपाच वाजता जीप आली. भर अंधारात प्रवास सुरू झाला! सत्गड़ला नातेवाईकांसोबत दिवस छान गेले. छान भेटी झाल्या. हिमालय, तिथली गावं आणि लोक! आणि अर्थातच तिथलं ट्रेकिंग आणि आकाश दर्शन! पण आता निघायची वेळ झाली. निघताना फाssर होमसिक वाटतंय! पहाटेचा अंधारातला परिसर!

सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)

Bhakti ·

श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/12/2026 - 01:00
सिंथिया फरार यांच्याबाबत या लेखामुळे प्रथमच कळले. तपशीलवार लेख आवडला. या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by श्रीरंग_जोशी

Bhakti गुरुवार, 03/12/2026 - 08:36
सिंथिया फरार यांच्या प्रशिक्षणानंतर पुण्यात सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मार्गारेट आणि जेम्स मिचेल यांनी सावित्रीबाई यांना पुन्हा औपचारिकपणे शिक्षिका प्रशिक्षण दिले. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद श्रीरंग.

अभ्या.. Sat, 03/14/2026 - 19:04
व्वा. सुंदर ओळख करुन दिली आहे. जिथे जिथे ब्रिटीशांनी रेल्वे नेली, उद्योग आणि गिरण्या सुरु केल्या, आर्मीचे कॅम्प्स केले तिथे तिथे मिशनरी लोकांनी शाळा सुरु केल्या. मुलींसाठी शिक्षिका प्रशिक्षण शाळाही त्याचेच एक वैशिष्ट्य. मुंबई, पुणे, नगरसोबतच सोलापूर हे असेच नाव. माझी आईही अशाच एका मिशनरी संस्थेच्या शिक्षिका प्रशिक्षण शाळेतून शिक्षिका झाली त्यामुळे वेगळीच अनुभूती लेख वाचताना झाली.
सावित्रीबाई व्यावसायिक शिक्षिका झाल्या. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मानल्या जातात.
खरेच नमन आहे त्या माऊलीला

श्वेता२४ Sun, 03/15/2026 - 15:02
सिंथिया फरार यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. तसेच शिक्षिका होण्यासाठी सावित्रीबाईंनी विशेष प्रशिक्षण घेतले होते याबद्दलही कधी वाचण्यात आले नव्हते. ही लेखमाला माझ्या अतिशय आवडीची आहे. वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकातून अनेक नवनवीन माहिती आणि दृष्टिकोन कळत असतात.

Bhakti Sun, 03/15/2026 - 17:27
श्वेता आणि अभ्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. अभ्या, पुणे नगर सोलापूर बरोबर साम्य सांगितले. नगरचे रेल्वे स्टेशनं १८७८ सालापासून दिमाखात उभे आहे.मिलिटरी एरियातून तर मी रोज जाते. प्रचंड सुंदर परिसर आहे. एका ठिकाणी तर दुर्मिळ असे पिवळे पळस रांगेत (दहा ते अकरा )सध्या फुलले आहेत. पण आम्हाला दुरूनच पाहावे लागते, नो एन्ट्री :) सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?

In reply to by Bhakti

अभ्या.. Sun, 03/15/2026 - 18:24
सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?
नाही. पण शहरात कॅम्प आणि लष्कर नावाचे दोन मोट्ठे एरिया आहेत. कॅम्प हा अ‍ॅक्चुअली सेटलमेंट वसाहतीला जवळ. गुन्हेगारी जमातीसाठी केलेला तो प्रयोग होता. बंदीस्त कुंपणात एक मोट्ठी वसाहत, तेथील लोक इतर कामे करण्यासाठी शहरात येत आणि संध्याकाळी परत जात, त्यांची खानेसुमारी ठेवलेली असायची. गुन्हा घडला की पोलीस प्रथम तिथेच शोध घ्यायचे. पारधी, कैकाडी आदी जमाती असायच्या. नेहरुंच्या काळात त्यांची मुक्तता झाली. पण सोलापूरचे रेल्वे स्टेशन १८६० सालाचे आहे. नगरपेक्षा जुने. दक्षिणेला जोडणार्‍या मार्गावर असलेने जास्त महत्त्व. सूतगिरण्या असल्याने वाहतुकीला सोपे. १८३८ पासून सोलापूर हा अहमदनगरचा उपजिल्हा होता. राज्यपुनरचनेनंतर १९६० ला पुर्णांशाने स्वतंत्र जिल्हा बनला. आर्मीचा नसला तरी सोलापुरात राज्य राखीव पोलीस दलाचा मोट्ठा बल गट आहे. प्रशिक्षण केंद्र ही आहे.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/12/2026 - 01:00
सिंथिया फरार यांच्याबाबत या लेखामुळे प्रथमच कळले. तपशीलवार लेख आवडला. या लेखासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by श्रीरंग_जोशी

Bhakti गुरुवार, 03/12/2026 - 08:36
सिंथिया फरार यांच्या प्रशिक्षणानंतर पुण्यात सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मार्गारेट आणि जेम्स मिचेल यांनी सावित्रीबाई यांना पुन्हा औपचारिकपणे शिक्षिका प्रशिक्षण दिले. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद श्रीरंग.

अभ्या.. Sat, 03/14/2026 - 19:04
व्वा. सुंदर ओळख करुन दिली आहे. जिथे जिथे ब्रिटीशांनी रेल्वे नेली, उद्योग आणि गिरण्या सुरु केल्या, आर्मीचे कॅम्प्स केले तिथे तिथे मिशनरी लोकांनी शाळा सुरु केल्या. मुलींसाठी शिक्षिका प्रशिक्षण शाळाही त्याचेच एक वैशिष्ट्य. मुंबई, पुणे, नगरसोबतच सोलापूर हे असेच नाव. माझी आईही अशाच एका मिशनरी संस्थेच्या शिक्षिका प्रशिक्षण शाळेतून शिक्षिका झाली त्यामुळे वेगळीच अनुभूती लेख वाचताना झाली.
सावित्रीबाई व्यावसायिक शिक्षिका झाल्या. त्या भारतातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका मानल्या जातात.
खरेच नमन आहे त्या माऊलीला

श्वेता२४ Sun, 03/15/2026 - 15:02
सिंथिया फरार यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. तसेच शिक्षिका होण्यासाठी सावित्रीबाईंनी विशेष प्रशिक्षण घेतले होते याबद्दलही कधी वाचण्यात आले नव्हते. ही लेखमाला माझ्या अतिशय आवडीची आहे. वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकातून अनेक नवनवीन माहिती आणि दृष्टिकोन कळत असतात.

Bhakti Sun, 03/15/2026 - 17:27
श्वेता आणि अभ्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. अभ्या, पुणे नगर सोलापूर बरोबर साम्य सांगितले. नगरचे रेल्वे स्टेशनं १८७८ सालापासून दिमाखात उभे आहे.मिलिटरी एरियातून तर मी रोज जाते. प्रचंड सुंदर परिसर आहे. एका ठिकाणी तर दुर्मिळ असे पिवळे पळस रांगेत (दहा ते अकरा )सध्या फुलले आहेत. पण आम्हाला दुरूनच पाहावे लागते, नो एन्ट्री :) सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?

In reply to by Bhakti

अभ्या.. Sun, 03/15/2026 - 18:24
सोलापूरला पण मिलिटरी एरिया आहे का?
नाही. पण शहरात कॅम्प आणि लष्कर नावाचे दोन मोट्ठे एरिया आहेत. कॅम्प हा अ‍ॅक्चुअली सेटलमेंट वसाहतीला जवळ. गुन्हेगारी जमातीसाठी केलेला तो प्रयोग होता. बंदीस्त कुंपणात एक मोट्ठी वसाहत, तेथील लोक इतर कामे करण्यासाठी शहरात येत आणि संध्याकाळी परत जात, त्यांची खानेसुमारी ठेवलेली असायची. गुन्हा घडला की पोलीस प्रथम तिथेच शोध घ्यायचे. पारधी, कैकाडी आदी जमाती असायच्या. नेहरुंच्या काळात त्यांची मुक्तता झाली. पण सोलापूरचे रेल्वे स्टेशन १८६० सालाचे आहे. नगरपेक्षा जुने. दक्षिणेला जोडणार्‍या मार्गावर असलेने जास्त महत्त्व. सूतगिरण्या असल्याने वाहतुकीला सोपे. १८३८ पासून सोलापूर हा अहमदनगरचा उपजिल्हा होता. राज्यपुनरचनेनंतर १९६० ला पुर्णांशाने स्वतंत्र जिल्हा बनला. आर्मीचा नसला तरी सोलापुरात राज्य राखीव पोलीस दलाचा मोट्ठा बल गट आहे. प्रशिक्षण केंद्र ही आहे.
लेखनविषय:
सावित्रीबाई फुले यांना आज स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन! 1 इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे

मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...

कंजूस ·
मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी... कवितेची काही कडवी असतात आणि दोन कडव्यांमध्ये समजा चार किंवा अधिक ओळींचे अंतर ठेवायचे आहे तर असे लिहिता येईल. [<br /> किंवा <p> </p> यांचा उपयोग होत नाही.]

रिकाम्या ओळींसाठी &nbsp; type करणे.

Ready template
कवितेच्या ओळी

श्वेता२४ Sun, 03/08/2026 - 15:31
काल मी अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.. आज आपण नवीन धागाच काढला ते बरं झालं. जेणेकरून सर्वांनाच यापुढे ही माहिती उपयुक्त ठरेल. आपण सांगितल्याप्रमाणे कविता प्रतिसादात पाठवून बघते. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!

In reply to by श्वेता२४

कंजूस Sun, 03/08/2026 - 19:12
लिहायचं आहे , फोटो टाकायचे आहेत पण कसे ते माहीत नसल्याने अडून राहायला नको. मलाही पूर्वी अडचणी येत होत्या. मग W3schools आणि इतर अशाच वेबसाइट्स धुंडाळून html tags तसेच CSS पाहून यातलं काय उपयोगी आहे हे शोधलं. परंतू आता मिसळपाव तसेच इतर मराठी संस्थळांवरून यांचा वापर मर्यादित केला आहे. त्यामुळे परत तपसावं लागतं.

चौथा कोनाडा Mon, 03/09/2026 - 22:01
क्शी वाटतेय टाईमपास जिलेबी ?       ओळ पहिली
उन्हाची काहिली
त्रस्त सावली
लपूनच राहिली
    मैत्रीण दुसरी
खूप हसरी
सतत स्वमग्न
नाव विसरी
    गर्लफ्रेंड पाचवी
तालावर नाचवी
कैच्याकै सुचवी
पेग-पेग रिचवी

श्वेता२४ Sun, 03/08/2026 - 15:31
काल मी अनेक जुन्या जाणत्या मिपाकरांना याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.. आज आपण नवीन धागाच काढला ते बरं झालं. जेणेकरून सर्वांनाच यापुढे ही माहिती उपयुक्त ठरेल. आपण सांगितल्याप्रमाणे कविता प्रतिसादात पाठवून बघते. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!!

In reply to by श्वेता२४

कंजूस Sun, 03/08/2026 - 19:12
लिहायचं आहे , फोटो टाकायचे आहेत पण कसे ते माहीत नसल्याने अडून राहायला नको. मलाही पूर्वी अडचणी येत होत्या. मग W3schools आणि इतर अशाच वेबसाइट्स धुंडाळून html tags तसेच CSS पाहून यातलं काय उपयोगी आहे हे शोधलं. परंतू आता मिसळपाव तसेच इतर मराठी संस्थळांवरून यांचा वापर मर्यादित केला आहे. त्यामुळे परत तपसावं लागतं.

चौथा कोनाडा Mon, 03/09/2026 - 22:01
क्शी वाटतेय टाईमपास जिलेबी ?       ओळ पहिली
उन्हाची काहिली
त्रस्त सावली
लपूनच राहिली
    मैत्रीण दुसरी
खूप हसरी
सतत स्वमग्न
नाव विसरी
    गर्लफ्रेंड पाचवी
तालावर नाचवी
कैच्याकै सुचवी
पेग-पेग रिचवी

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

श्वेता२४ ·

बाजीगर Sun, 03/08/2026 - 09:50
आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली. यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून. अभिनंदन.

कंजूस Sun, 03/08/2026 - 11:36
परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली. जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.

श्वेता२४ Mon, 03/09/2026 - 12:39
आपल्याला रचना आवडली हे वाचून आनंद झाला. आपल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी आभारी आहे.

बाजीगर Sun, 03/08/2026 - 09:50
आपली ही अतिसुंदर कविता वाचून इंदिरा संत यांची आठवण झाली. यात तुम्ही सर्व च समावेशले आहे, की कशी एक स्त्री आपले प्रतिभेचे पंख मिटून घरट्यात समर्पित झाली आहे, आपली उडान अर्पण करून. अभिनंदन.

कंजूस Sun, 03/08/2026 - 11:36
परिस्थितीला भेदून आशावादी आणि आनंदी होण्याची कल्पना आवडली. जगात विविध देशांत स्त्रियांना जे स्वातंत्र्य आहे त्यात भारत अगदी वरती आहे. फक्त त्यांनी पाऊल पुढे टाकायचे आहे.

श्वेता२४ Mon, 03/09/2026 - 12:39
आपल्याला रचना आवडली हे वाचून आनंद झाला. आपल्या मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी आभारी आहे.
लेखनविषय:
अक्षरांचे पंख होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी? घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!! — श्वेता माईणकर सूर्यवंशी © 2026