मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"पुरोहिताचे भूत"

अविनाशकुलकर्णी ·

सुनील 02/09/2014 - 10:14
अकुंचा धागा उघडल्याचे सार्थक झाले! ;) एक धम्माल चित्रपट बनू शकेल ह्या कथेवर. शेवट मात्र बदलून थोडा 'गोड' करावा लागेल!

अनुप ढेरे 02/09/2014 - 10:22
हा हा हा. आपली माणसं सिनेमा आठवला. याच धाटणीची गोष्ट आहे. अशोक सराफ, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर वगैरे लोक आहेत.

विटेकर 02/09/2014 - 12:04
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो..
हा आता भूतकाळ झाला मिष्टर ! १. आता ब्राहमण गरिब नाहीत २. ते आता गावातही रहात नाहीत. आता कथेची सुरुवात अशी असायला हवी .. नुकताच सिलिकॉन व्हॅलीवरुन परतलेल्या अमक्या तमक्याच्या नातवाने गावाकडे जमीन विकत घेतली आणि अधुनिक शेतीचे प्रयोग सुरु केले... दिवस बदलले आता ! आणि ते ही विना आरक्षणाचे !

In reply to by जेपी

विटेकर 03/09/2014 - 10:16
अपवादानेच नियम सिद्ध होतो !!! १. असे अपवाद असतीलच तर ते पुढच्या काही काळात गाव सोडतीलच कारण त्यांचे ८०-९०%हून अधिक नातेवाईक पुणे - मुम्बई आणि पल्याड पोचले आहेत. २. गावात रहाणार्‍या ब्राह्मणांचे विवाह होणे दिवसेदिवस कर्मकठीण होत चालले आहे. कारण गावात रहायचेच असेल तर आता सहसा भिक्षुकी शिवाय दुसरा मार्ग उरला नाही. त्याची प्रतिष्ठाही आता ( निदान गावात तरी ) लयाला गेली आहे. अशा ठिकाणी मुलगी देण्यास कोणी धजावत नाही. दुसरा व्यवसाय अथवा शेती करणार्‍यासाठी लागणारी "मसल-पॉवर" आता ब्राह्मणांकडे उरली नाही. असे व्यवसाय जर ब्राह्मण करत असतील तर ते १-२ पिढ्यात गुंडाळतीलच. ३. आणि यावेळी पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार आले तर १९४८ च्या जळीताची पुनरावृत्ती (किंवा तत्सम) होऊन उरले- सुरले गाव सोडून पळून जातील हे निश्चित ! ४. जोपर्यंत समाजाला ब्राह्मणांची गरज होती तोपर्यन्त प्रथम शेती आणि नंतर शिक्षकी पेशा/ सरकारी नोकरी स्वीकारुन ब्राहमण गावात रहात होते. पण प्रथम जळीत आणि पाठोपाठ कुळकायदा आला आणि शेती व्यवसायातून ब्राहमण हद्दपार झाला. आरक्षणाने आणि राजकारणांच्या अतिरेकी हस्तक्षेपाने ब्राहमण शिक्षक/ सरकारी नोकरीतून ही हद्दपार झाले ! ५. ब्राह्मणांनी गावात रहाणे आता असुरक्षित ही झाले आहे. गावचा पाटील, जो संरक्षक , तोच आता भक्षक झाला आहे. कोणाच्या जीवावर ब्राहमण आता गावात राहतील ? आधीचे अल्पसंख्यांक आता अति-अल्प झाले आहेत, स्वाभाविकतः ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होतीलच. हे माझे निरिक्षण पश्चिम महाराष्ट्र मध्यवर्ती धरुन आहे पण अन्यत्र वेगळी स्थिती असेल असे वाटत नाही. गाव याचा अर्थ तालुक्याच्या ठिकाणापेक्षा/ बाजारच्या गावापेक्षा लहान गाव ! अर्थात असे घडले नाही तर मला आनंदच होईल. सर्व जाती - जमाती आप-आपले विहित व्यवसाय संभाळून ( पण जातीची उतरंड लाथाडून ) गुण्या- गोविन्दाने आप- आपल्या ठिकाणीच राहतील तो खरा सुदीन !

In reply to by बाळ सप्रे

विटेकर 03/09/2014 - 11:06
आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. कृपया , मी काय सोडून काय वाचावे असा सल्ला आपल्याला विचारायला येईन तेव्हाच सल्ला द्यावा ही विनंती. अकारण भोचकपणा करु नये .

In reply to by विटेकर

१९४८ चे जळीत फक्त प महाराष्ट्रात तेही सांगली मिरज भागात जास्त घडले, परंतु असे भासवले जाते कि आख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात ब्राह्मणांना झोडपले गेले. बहुतांश ठिकाणी मराठा व तत्सम लोकांनी ब्राह्मणांना आश्रय व अभय दिले होते. कुळकायदाच्या आधिच ब्राह्मणांचे शहराकडे स्थलांतरण सुरु होते, शिक्षणाधारीत नोकर्या शहरी नीमशहरी भागात असल्याने ब्राह्मण तिकडे स्थाईक झाले, गावाकडच्या जमीन भाऊबंदांनी बळकावल्या, कूळकायद्यात गेल्या, बहुतांश जमीनी ब्राह्मणांनीच विकल्या. कष्टाची कामे करण्यात ब्राह्मण इच्छुक नसतात, त्यामुळे शेतीकडे ते कधीच लक्ष देत नव्हते, बामणाची शेती आणि पाटलाचं टकुरं कधीच पिकत नाही अशी ग्राम्य म्हण आहे. गावात राहणार्या ब्राह्मणाचे लग्न होत नाही याचे कारण ब्राह्मण मुलींच्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षा हे आहे, त्यासाठी गांधी काँग्रेस सोनीया राहुल जबाबदार कसे? काँग्रेस/ राकाँ सरकारने जागतिकीकरणाच्या धोरणातून आयटी एज्युकेशन बँकीँग वा तत्सम 'ब्राह्मण एक्सक्लुजीव' क्षेत्रांचाच विकास केला आहे,त्याचा फायदा ब्राह्मणांच सर्वाधिक झाला आहे, अगदी परदेशात स्थाईक होण्यापर्यंत. ब्राह्मण पाचटक्के असल्याने आरक्षणाने त्यांचे विशेष नुकसान झालेले नाही.

In reply to by बॅटमॅन

येस्स. अगदी पुण्यात पण. कोकणात वगैरे छोट्या गावांमधे सुधा २-३ मिलिटरी येऊन राहील्याची आठवण माझी आजी आजही सांगते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सौंदाळा 04/09/2014 - 18:08
मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते. त्याच गावचे आमचे एक परिचित सांगतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते.
तिकडे "राष्ट्रवादी" विचारांचे लोक नसतील तेव्हा *biggrin*

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एस 02/09/2014 - 23:58
मला कथेतील नामे, सर्वनामे, क्रियापदे आणि अव्यये यांच्या मध्ये सोडलेल्या रिकाम्या जागा खटकल्या. :-))

मराठे 02/09/2014 - 20:02
चांदोबा मधे अशा गोष्टी असायच्या. पुरोहोताच्या मित्राने त्याच्या बायकोशी संगनमत करून पुरोहिताचा मामा केला असा कायतरी मसाला भरायचा ना ष्टोरीत.

In reply to by मराठे

समीरसूर 03/09/2014 - 12:57
मग 'प्यासी बेवफाई' असा एक ब-दर्जा चित्रपटच निघू शकेल. पुरोहितच्या रोलसाठी चंद्रचूड सिंग, पुरोहिताच्या बायकोच्या रोलसाठी पूनम पांडे, पुरोहिताच्या मित्राच्या रोलसाठी ईम्रान हाश्मी यांना घेऊ या. गावचा पाटील प्रकाश राज, किराणामाल दुकानदार सोनू सूद असा नटसंच घेऊ या. चित्रपटाला शहरात घडवावे लागेल. खेड्याच्या पार्श्वभूमीचे चित्रपट चालत नाहीत. एका उच्चभ्रू सोसायटीत चंद्रचूड सिंग, पूनम पांडे आणि त्यांचे एक मूल राहत असते. प्रकाश राज हा सोसायटीचा चेअरमन आणि भागातला नगरसेवक असतो (ओरिजिनल पाटलाचा रोल). सोनू सूद एका मोठ्या सुपर स्टोअरचा देखणा मालक असतो. इम्रान हाश्मी शेअरब्रोकर असतो. चंद्रचूड सिंग एका सरकारी नोकरीत असतो असं दाखवू या. चंद्रचूडला सतत चिंता करण्याची सवय असते. एका पबमध्ये चंद्रचूड मनातली ही भीती इम्रानला सांगतो आणि तिथेच इम्रानच्या मनात एक प्लॅन तयार होतो. तो हळूहळू पूनमला वश करण्याचे प्रयत्न सुरु करतो. चंद्रचूड खानदानी श्रीमंत असतो. इम्रानला दुहेरी फायदा दिसतो. पूनमला वश करण्यासाठी तो सोनू सूदचा वापर करायला लागतो. चंद्रचूडला पूनमच्या मनातून घालवण्यासाठी इम्रान चंद्रचूडला काही चुका करायला भाग पाडतो. चंद्रचूड भोळा असल्याने तो त्या चुका करतो. उदा. पूनमवर संशय घेणे, तिचे चारित्र्य तपासून पाहणे, वगैरे. त्यामुळे पूनम नाराज होते. हळूहळू ती इम्रानच्या कह्यात जाते. इम्रान असाच गेम तिच्याकडून पण खेळतो. एक वेळ अशी येते की पूनम इम्रानच्या संपूर्ण कह्यात जाते. मग इम्रान हळूच चंद्रचूडला मृत्यूची खोटी बातमी पेरून पूनमची वफादारी तपासून बघण्याची युक्ती सांगतो. चंद्रचूड ऐकतो. मग नंतर काय होते? मध्येच सोनू सूद इम्रानचे भांडे फोडू अशी धमकी देऊन पूनमकडे नको ती मागणी करतो. चंद्रचूड गायब होतो. नंतर परत येतच नाही. इम्रान तशी सोय करतो. मग पुढे काय होते? बघा मोठ्या पडद्यावर 'प्यासी बेवफाई' मध्ये. २-३ पावसातली गाणी टाकायची, एक सॉलीड आयटेम साँग्...वाह, अविनाशजी, क्या ष्टोरी लिखी है... मिपाकर्स, करायचा का हा पिक्चर प्रोड्युस? ;-) आपण वाटलं तर अ-दर्जा बनवू. नट बदलायचे. पावसाचं एकच गाणं टाकायचं. बाकी मसाला कमी करायचा. हाय काय नाय काय्...क्या बोलते?

In reply to by समीरसूर

प्यारे१ 03/09/2014 - 13:02
=)) या खुदा! अल्लाह करे आप जल्दसे जल्द नौकरी शुरु करे. मेलो हसून हसून. आमची नोकरी जायची. बॉस चिडायला (खरा शब्द वेगळा आहे;) ) लागलाय.

In reply to by बाळ सप्रे

अहो ऑटकम महत्वाचा आणि तो केव्हाच ठरलाय ! देउळ, देवळातला देव, पिक्चर... ही सगळी टूल्स हैत. आउटकम महत्वाचा ! समझ्ये का नाय ?! ;)

In reply to by प्यारे१

औट घटकेचाच नाय हो. जरा आजूबाजूला बघीतलंत तर एकेका देवळाच्या/संस्थेच्या आउटकमामध्ये असंख्य विश्वस्त लोकांची सात पिढ्यांची कमाई झालेली दिसेल. :)

In reply to by बाळ सप्रे

समीरसूर 03/09/2014 - 14:07
केले म्हणजे पैसा वसूल होण्याचे मार्ग मोकळे राहतात. देऊळ तयार झाले की पिक्चरमधले देवळातले सीन्स तिथेच घेता येतील. फक्त देऊळ आणि पिक्चर एकाच संस्थेचे आहेत हे गुपित ठेवायचं नाहीतर घोळ होईल. देवळात प्रवचनं आयोजित करून 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायला लावायचे. म्हणजे चित्रपटाची प्रसिद्धी होईल. प्रवचनकाराला ११११ रुपये एक्स्ट्रा द्यायचे ही टीका करण्याचे. भारतीय संस्कृती, परंपरा, स्त्रीचे पावित्र्य, षड्रिपू वगैरे वरून गाडी अलगद आजकालच्या चित्रपटांमुळे आपल्या संस्कारांना असणारा धोका या ट्रॅकवर आणायला सांगायची. तोपर्यंत 'प्यासी बेवफाई'चे पोस्टर्स रीलिज करून ठेवायचे आणि पूनम पांडेला एखादे धक्कादायक विधान, जसे की, "दुनिया में प्यास ही सबसे एहम जज्बा हैं...भले वो पानी की प्यास हो, कामयाबी की प्यास हो, कुर्सी की प्यास हो या फिर जिस्म की प्यास हो. 'प्यासी बेवफाई' में हम ने इसी प्यास की कहानी पेश की हैं. मै तो कहती हूं की हर परिवार को, बडे-बुजुर्ग को, बच्चे-बच्चे को यह फिल्म देखनी चाहिये ताकि उनको प्यास की एहमियत का जल्द से जल्द अंदाजा हो जाय" करायला लावायचे. ट्विटरवर ही कमेंट ताकून द्यायची. एक पूनम-स्टाईल व्हिडीओ युट्युबवर टाकून द्यायचा. हवा गरम झाली की कीर्तनकार बुवांनी देवळातल्या कार्यक्रमात 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायचे. म्हणजे मग दोन्ही बिझनेसेस मध्ये सिनर्जी निर्माण होईल. म्हणजे मग 'एक बिझनेस दुसरे बिझनेस की सीढी होता हैं' हे तत्व प्रसिद्ध करता येईल. मग याच तत्वावर आधारित दुसरा पिक्चर काढायचा "पायदान - स्टेप्स टू सक्सेस इन बिझनेस". कैसा लगा आयडिया? ;-)

In reply to by समीरसूर

प्यारे१ 03/09/2014 - 14:18
समीरसूर ह्यांनी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग सुश्री पूनम पांडेचा अभ्यास करण्यासाठी केला असावा काय असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आहे एवढंच्च. (हलकं घ्या)

In reply to by प्यारे१

समीरसूर 03/09/2014 - 14:31
सुट्टी नाही हो. कार्यालयात आहे. :-) सध्या थोडा मोकळा वेळ आहे इतकंच. :-) पूनम पांडेचं म्हणाल तर अभ्यास सगळ्यांचाच करून ठेवलेला बरा; कधी कामात येईल सांगता येत नाही.

In reply to by समीरसूर

किसन शिंदे 03/09/2014 - 14:27
कहर कहर. =)) काय ती अफाट प्रतिभा. या निर्माण होणार्या चित्रपटांची समीक्षाही तुम्ही तुमच्या पद्धतीने आत्ता या धाग्यावरच लिहून टाका. रादर आपण त्याचे राईट्स फक्त तुम्हालाच देऊ.

In reply to by समीरसूर

मराठे 03/09/2014 - 19:35
अफाट! अशीच तडकती भडकती मसाला ष्टोरी पायजेल! पण चंद्रचूड शिंग म्हणजे 'छोड आये हम वो गलिंयां' वाला ना? कुठे शोधायचा त्याला. त्यापेक्षा दुसरा कोणी चम्या चालेल का? आफताब शिवदासानी सध्या घरी पडीकच असतो म्हणतात. सस्त्यात पडेल.

In reply to by प्रचेतस

बंदुकात्माhttp://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gifआगोबा! @आम्हाला एक भूत असलेले पुरोहित माहीत आहेत>>> http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scary-skull-smiley-emoticon.gif @प्यारे१ >>> :-/ .. :-/ .. :-/ @आम्हाला एक पुरोहित असलेले भूत माहीत आहे.>>> कोण...http://www.sherv.net/cm/emoticons/horror/flying-ghost-smiley-emoticon.gif कोण...ते!? :D :p :D

खटपट्या 03/09/2014 - 06:29
मस्त कथा !! "मंदिर काढा" चालूच आहे. आता एक "मालिका काढूया" कथा लेखक, नट, नट्या, फायनान्सर, नेपथ्यकार, कॅमेरामन… कथेमधून पाणी टाकून पातळ करणारे असे सर्वजण आहेत.

चित्रगुप्त 03/09/2014 - 08:08
यावर एक हिंदी पिच्चर काढूया. सध्या आमिर खान विद्या बालन सोबत एक पिच्चर करण्यासाठी ष्टोरीच्या शोधात आहे, अशी आतल्या गोटातली बातमी आहे. त्याला पाठवा ही कथा. मागे आम्ही सोनाक्षी-सल्लू वाल्या सिणेमासाठी तीन भागातले कथानक सुचवले होते, तसा तीन भागातला पिच्चरही होऊ शकतो यावर.

मराठी_माणूस 03/09/2014 - 12:10
हा जिवलग मित्र सुरवातीला मदत करतो , नंतर मात्र तो असा का वागतो ते स्पष्ट होत नाही . गावकरि मदत करणार नाहीत त्यावर तो मित्र वेगळा तोडगा काढतो असे दाखवले असते तर ते त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसे झाले असते तसेच त्याच्या मदत करण्याशी सुसंगत दिसले असते.

In reply to by मराठी_माणूस

समीरसूर 03/09/2014 - 12:40
गावातल्या लोकांना आणि पुरोहिताच्या मित्राला पुरोहिताच्या बायकोच्या आरामाची आणि आयुष्याची चिंता. बिचारा पुरोहित जगो की मरो, की फर्क पैंदा है? बाकी ष्टोरी आवडली. :-) अकारण चिंता खरोखर चितासमान होती है हे ठळकपणे बिंबवून गेली ही गोष्ट!

शेवटी द्रव्येण सर्वे वशः ! यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः। पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।।

दिपक.कुवेत 03/09/2014 - 15:39
अश्या अफाट / छप्परफाडु कथा लिहिणं? टायटल वाचुन मला जिमोंचीच कथा वाटली. त्यांची "गावातलं भुत" हि कथा चांगलीच आठवतेय.

पैसा 03/09/2014 - 16:34
गोष्ट आवडली. अकुंचा धागा म्हणून रामाचं नाव घेत घाबरत उघडला होता, पण गोष्ट आवडली आणि समीरसूरचं व्हेरिएशन पण!

जियो मेरे अविकाका. स्टोरी थोडी सुखात्मिक पाहिजे होती. मित्राचा 'कशावर' डोळा तर नै ना अशी शंका आली होती. असो, काका असंच लेखन येऊ दे. -दिलीप बिरुटे

सुनील 02/09/2014 - 10:14
अकुंचा धागा उघडल्याचे सार्थक झाले! ;) एक धम्माल चित्रपट बनू शकेल ह्या कथेवर. शेवट मात्र बदलून थोडा 'गोड' करावा लागेल!

अनुप ढेरे 02/09/2014 - 10:22
हा हा हा. आपली माणसं सिनेमा आठवला. याच धाटणीची गोष्ट आहे. अशोक सराफ, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर वगैरे लोक आहेत.

विटेकर 02/09/2014 - 12:04
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो..
हा आता भूतकाळ झाला मिष्टर ! १. आता ब्राहमण गरिब नाहीत २. ते आता गावातही रहात नाहीत. आता कथेची सुरुवात अशी असायला हवी .. नुकताच सिलिकॉन व्हॅलीवरुन परतलेल्या अमक्या तमक्याच्या नातवाने गावाकडे जमीन विकत घेतली आणि अधुनिक शेतीचे प्रयोग सुरु केले... दिवस बदलले आता ! आणि ते ही विना आरक्षणाचे !

In reply to by जेपी

विटेकर 03/09/2014 - 10:16
अपवादानेच नियम सिद्ध होतो !!! १. असे अपवाद असतीलच तर ते पुढच्या काही काळात गाव सोडतीलच कारण त्यांचे ८०-९०%हून अधिक नातेवाईक पुणे - मुम्बई आणि पल्याड पोचले आहेत. २. गावात रहाणार्‍या ब्राह्मणांचे विवाह होणे दिवसेदिवस कर्मकठीण होत चालले आहे. कारण गावात रहायचेच असेल तर आता सहसा भिक्षुकी शिवाय दुसरा मार्ग उरला नाही. त्याची प्रतिष्ठाही आता ( निदान गावात तरी ) लयाला गेली आहे. अशा ठिकाणी मुलगी देण्यास कोणी धजावत नाही. दुसरा व्यवसाय अथवा शेती करणार्‍यासाठी लागणारी "मसल-पॉवर" आता ब्राह्मणांकडे उरली नाही. असे व्यवसाय जर ब्राह्मण करत असतील तर ते १-२ पिढ्यात गुंडाळतीलच. ३. आणि यावेळी पुन्हा राष्ट्रवादीचे सरकार आले तर १९४८ च्या जळीताची पुनरावृत्ती (किंवा तत्सम) होऊन उरले- सुरले गाव सोडून पळून जातील हे निश्चित ! ४. जोपर्यंत समाजाला ब्राह्मणांची गरज होती तोपर्यन्त प्रथम शेती आणि नंतर शिक्षकी पेशा/ सरकारी नोकरी स्वीकारुन ब्राहमण गावात रहात होते. पण प्रथम जळीत आणि पाठोपाठ कुळकायदा आला आणि शेती व्यवसायातून ब्राहमण हद्दपार झाला. आरक्षणाने आणि राजकारणांच्या अतिरेकी हस्तक्षेपाने ब्राहमण शिक्षक/ सरकारी नोकरीतून ही हद्दपार झाले ! ५. ब्राह्मणांनी गावात रहाणे आता असुरक्षित ही झाले आहे. गावचा पाटील, जो संरक्षक , तोच आता भक्षक झाला आहे. कोणाच्या जीवावर ब्राहमण आता गावात राहतील ? आधीचे अल्पसंख्यांक आता अति-अल्प झाले आहेत, स्वाभाविकतः ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होतीलच. हे माझे निरिक्षण पश्चिम महाराष्ट्र मध्यवर्ती धरुन आहे पण अन्यत्र वेगळी स्थिती असेल असे वाटत नाही. गाव याचा अर्थ तालुक्याच्या ठिकाणापेक्षा/ बाजारच्या गावापेक्षा लहान गाव ! अर्थात असे घडले नाही तर मला आनंदच होईल. सर्व जाती - जमाती आप-आपले विहित व्यवसाय संभाळून ( पण जातीची उतरंड लाथाडून ) गुण्या- गोविन्दाने आप- आपल्या ठिकाणीच राहतील तो खरा सुदीन !

In reply to by बाळ सप्रे

विटेकर 03/09/2014 - 11:06
आपल्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. कृपया , मी काय सोडून काय वाचावे असा सल्ला आपल्याला विचारायला येईन तेव्हाच सल्ला द्यावा ही विनंती. अकारण भोचकपणा करु नये .

In reply to by विटेकर

१९४८ चे जळीत फक्त प महाराष्ट्रात तेही सांगली मिरज भागात जास्त घडले, परंतु असे भासवले जाते कि आख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात ब्राह्मणांना झोडपले गेले. बहुतांश ठिकाणी मराठा व तत्सम लोकांनी ब्राह्मणांना आश्रय व अभय दिले होते. कुळकायदाच्या आधिच ब्राह्मणांचे शहराकडे स्थलांतरण सुरु होते, शिक्षणाधारीत नोकर्या शहरी नीमशहरी भागात असल्याने ब्राह्मण तिकडे स्थाईक झाले, गावाकडच्या जमीन भाऊबंदांनी बळकावल्या, कूळकायद्यात गेल्या, बहुतांश जमीनी ब्राह्मणांनीच विकल्या. कष्टाची कामे करण्यात ब्राह्मण इच्छुक नसतात, त्यामुळे शेतीकडे ते कधीच लक्ष देत नव्हते, बामणाची शेती आणि पाटलाचं टकुरं कधीच पिकत नाही अशी ग्राम्य म्हण आहे. गावात राहणार्या ब्राह्मणाचे लग्न होत नाही याचे कारण ब्राह्मण मुलींच्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षा हे आहे, त्यासाठी गांधी काँग्रेस सोनीया राहुल जबाबदार कसे? काँग्रेस/ राकाँ सरकारने जागतिकीकरणाच्या धोरणातून आयटी एज्युकेशन बँकीँग वा तत्सम 'ब्राह्मण एक्सक्लुजीव' क्षेत्रांचाच विकास केला आहे,त्याचा फायदा ब्राह्मणांच सर्वाधिक झाला आहे, अगदी परदेशात स्थाईक होण्यापर्यंत. ब्राह्मण पाचटक्के असल्याने आरक्षणाने त्यांचे विशेष नुकसान झालेले नाही.

In reply to by बॅटमॅन

येस्स. अगदी पुण्यात पण. कोकणात वगैरे छोट्या गावांमधे सुधा २-३ मिलिटरी येऊन राहील्याची आठवण माझी आजी आजही सांगते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सौंदाळा 04/09/2014 - 18:08
मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते. त्याच गावचे आमचे एक परिचित सांगतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मात्र नथुरामचे गाव - कामशेतजवळचे उकसान मात्र अगदी शांत होते.
तिकडे "राष्ट्रवादी" विचारांचे लोक नसतील तेव्हा *biggrin*

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एस 02/09/2014 - 23:58
मला कथेतील नामे, सर्वनामे, क्रियापदे आणि अव्यये यांच्या मध्ये सोडलेल्या रिकाम्या जागा खटकल्या. :-))

मराठे 02/09/2014 - 20:02
चांदोबा मधे अशा गोष्टी असायच्या. पुरोहोताच्या मित्राने त्याच्या बायकोशी संगनमत करून पुरोहिताचा मामा केला असा कायतरी मसाला भरायचा ना ष्टोरीत.

In reply to by मराठे

समीरसूर 03/09/2014 - 12:57
मग 'प्यासी बेवफाई' असा एक ब-दर्जा चित्रपटच निघू शकेल. पुरोहितच्या रोलसाठी चंद्रचूड सिंग, पुरोहिताच्या बायकोच्या रोलसाठी पूनम पांडे, पुरोहिताच्या मित्राच्या रोलसाठी ईम्रान हाश्मी यांना घेऊ या. गावचा पाटील प्रकाश राज, किराणामाल दुकानदार सोनू सूद असा नटसंच घेऊ या. चित्रपटाला शहरात घडवावे लागेल. खेड्याच्या पार्श्वभूमीचे चित्रपट चालत नाहीत. एका उच्चभ्रू सोसायटीत चंद्रचूड सिंग, पूनम पांडे आणि त्यांचे एक मूल राहत असते. प्रकाश राज हा सोसायटीचा चेअरमन आणि भागातला नगरसेवक असतो (ओरिजिनल पाटलाचा रोल). सोनू सूद एका मोठ्या सुपर स्टोअरचा देखणा मालक असतो. इम्रान हाश्मी शेअरब्रोकर असतो. चंद्रचूड सिंग एका सरकारी नोकरीत असतो असं दाखवू या. चंद्रचूडला सतत चिंता करण्याची सवय असते. एका पबमध्ये चंद्रचूड मनातली ही भीती इम्रानला सांगतो आणि तिथेच इम्रानच्या मनात एक प्लॅन तयार होतो. तो हळूहळू पूनमला वश करण्याचे प्रयत्न सुरु करतो. चंद्रचूड खानदानी श्रीमंत असतो. इम्रानला दुहेरी फायदा दिसतो. पूनमला वश करण्यासाठी तो सोनू सूदचा वापर करायला लागतो. चंद्रचूडला पूनमच्या मनातून घालवण्यासाठी इम्रान चंद्रचूडला काही चुका करायला भाग पाडतो. चंद्रचूड भोळा असल्याने तो त्या चुका करतो. उदा. पूनमवर संशय घेणे, तिचे चारित्र्य तपासून पाहणे, वगैरे. त्यामुळे पूनम नाराज होते. हळूहळू ती इम्रानच्या कह्यात जाते. इम्रान असाच गेम तिच्याकडून पण खेळतो. एक वेळ अशी येते की पूनम इम्रानच्या संपूर्ण कह्यात जाते. मग इम्रान हळूच चंद्रचूडला मृत्यूची खोटी बातमी पेरून पूनमची वफादारी तपासून बघण्याची युक्ती सांगतो. चंद्रचूड ऐकतो. मग नंतर काय होते? मध्येच सोनू सूद इम्रानचे भांडे फोडू अशी धमकी देऊन पूनमकडे नको ती मागणी करतो. चंद्रचूड गायब होतो. नंतर परत येतच नाही. इम्रान तशी सोय करतो. मग पुढे काय होते? बघा मोठ्या पडद्यावर 'प्यासी बेवफाई' मध्ये. २-३ पावसातली गाणी टाकायची, एक सॉलीड आयटेम साँग्...वाह, अविनाशजी, क्या ष्टोरी लिखी है... मिपाकर्स, करायचा का हा पिक्चर प्रोड्युस? ;-) आपण वाटलं तर अ-दर्जा बनवू. नट बदलायचे. पावसाचं एकच गाणं टाकायचं. बाकी मसाला कमी करायचा. हाय काय नाय काय्...क्या बोलते?

In reply to by समीरसूर

प्यारे१ 03/09/2014 - 13:02
=)) या खुदा! अल्लाह करे आप जल्दसे जल्द नौकरी शुरु करे. मेलो हसून हसून. आमची नोकरी जायची. बॉस चिडायला (खरा शब्द वेगळा आहे;) ) लागलाय.

In reply to by बाळ सप्रे

अहो ऑटकम महत्वाचा आणि तो केव्हाच ठरलाय ! देउळ, देवळातला देव, पिक्चर... ही सगळी टूल्स हैत. आउटकम महत्वाचा ! समझ्ये का नाय ?! ;)

In reply to by प्यारे१

औट घटकेचाच नाय हो. जरा आजूबाजूला बघीतलंत तर एकेका देवळाच्या/संस्थेच्या आउटकमामध्ये असंख्य विश्वस्त लोकांची सात पिढ्यांची कमाई झालेली दिसेल. :)

In reply to by बाळ सप्रे

समीरसूर 03/09/2014 - 14:07
केले म्हणजे पैसा वसूल होण्याचे मार्ग मोकळे राहतात. देऊळ तयार झाले की पिक्चरमधले देवळातले सीन्स तिथेच घेता येतील. फक्त देऊळ आणि पिक्चर एकाच संस्थेचे आहेत हे गुपित ठेवायचं नाहीतर घोळ होईल. देवळात प्रवचनं आयोजित करून 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायला लावायचे. म्हणजे चित्रपटाची प्रसिद्धी होईल. प्रवचनकाराला ११११ रुपये एक्स्ट्रा द्यायचे ही टीका करण्याचे. भारतीय संस्कृती, परंपरा, स्त्रीचे पावित्र्य, षड्रिपू वगैरे वरून गाडी अलगद आजकालच्या चित्रपटांमुळे आपल्या संस्कारांना असणारा धोका या ट्रॅकवर आणायला सांगायची. तोपर्यंत 'प्यासी बेवफाई'चे पोस्टर्स रीलिज करून ठेवायचे आणि पूनम पांडेला एखादे धक्कादायक विधान, जसे की, "दुनिया में प्यास ही सबसे एहम जज्बा हैं...भले वो पानी की प्यास हो, कामयाबी की प्यास हो, कुर्सी की प्यास हो या फिर जिस्म की प्यास हो. 'प्यासी बेवफाई' में हम ने इसी प्यास की कहानी पेश की हैं. मै तो कहती हूं की हर परिवार को, बडे-बुजुर्ग को, बच्चे-बच्चे को यह फिल्म देखनी चाहिये ताकि उनको प्यास की एहमियत का जल्द से जल्द अंदाजा हो जाय" करायला लावायचे. ट्विटरवर ही कमेंट ताकून द्यायची. एक पूनम-स्टाईल व्हिडीओ युट्युबवर टाकून द्यायचा. हवा गरम झाली की कीर्तनकार बुवांनी देवळातल्या कार्यक्रमात 'प्यासी बेवफाई' वर कडक ताशेरे ओढायचे. म्हणजे मग दोन्ही बिझनेसेस मध्ये सिनर्जी निर्माण होईल. म्हणजे मग 'एक बिझनेस दुसरे बिझनेस की सीढी होता हैं' हे तत्व प्रसिद्ध करता येईल. मग याच तत्वावर आधारित दुसरा पिक्चर काढायचा "पायदान - स्टेप्स टू सक्सेस इन बिझनेस". कैसा लगा आयडिया? ;-)

In reply to by समीरसूर

प्यारे१ 03/09/2014 - 14:18
समीरसूर ह्यांनी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग सुश्री पूनम पांडेचा अभ्यास करण्यासाठी केला असावा काय असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आहे एवढंच्च. (हलकं घ्या)

In reply to by प्यारे१

समीरसूर 03/09/2014 - 14:31
सुट्टी नाही हो. कार्यालयात आहे. :-) सध्या थोडा मोकळा वेळ आहे इतकंच. :-) पूनम पांडेचं म्हणाल तर अभ्यास सगळ्यांचाच करून ठेवलेला बरा; कधी कामात येईल सांगता येत नाही.

In reply to by समीरसूर

किसन शिंदे 03/09/2014 - 14:27
कहर कहर. =)) काय ती अफाट प्रतिभा. या निर्माण होणार्या चित्रपटांची समीक्षाही तुम्ही तुमच्या पद्धतीने आत्ता या धाग्यावरच लिहून टाका. रादर आपण त्याचे राईट्स फक्त तुम्हालाच देऊ.

In reply to by समीरसूर

मराठे 03/09/2014 - 19:35
अफाट! अशीच तडकती भडकती मसाला ष्टोरी पायजेल! पण चंद्रचूड शिंग म्हणजे 'छोड आये हम वो गलिंयां' वाला ना? कुठे शोधायचा त्याला. त्यापेक्षा दुसरा कोणी चम्या चालेल का? आफताब शिवदासानी सध्या घरी पडीकच असतो म्हणतात. सस्त्यात पडेल.

In reply to by प्रचेतस

बंदुकात्माhttp://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gifआगोबा! @आम्हाला एक भूत असलेले पुरोहित माहीत आहेत>>> http://www.sherv.net/cm/emoticons/horror/scary-skull-smiley-emoticon.gif @प्यारे१ >>> :-/ .. :-/ .. :-/ @आम्हाला एक पुरोहित असलेले भूत माहीत आहे.>>> कोण...http://www.sherv.net/cm/emoticons/horror/flying-ghost-smiley-emoticon.gif कोण...ते!? :D :p :D

खटपट्या 03/09/2014 - 06:29
मस्त कथा !! "मंदिर काढा" चालूच आहे. आता एक "मालिका काढूया" कथा लेखक, नट, नट्या, फायनान्सर, नेपथ्यकार, कॅमेरामन… कथेमधून पाणी टाकून पातळ करणारे असे सर्वजण आहेत.

चित्रगुप्त 03/09/2014 - 08:08
यावर एक हिंदी पिच्चर काढूया. सध्या आमिर खान विद्या बालन सोबत एक पिच्चर करण्यासाठी ष्टोरीच्या शोधात आहे, अशी आतल्या गोटातली बातमी आहे. त्याला पाठवा ही कथा. मागे आम्ही सोनाक्षी-सल्लू वाल्या सिणेमासाठी तीन भागातले कथानक सुचवले होते, तसा तीन भागातला पिच्चरही होऊ शकतो यावर.

मराठी_माणूस 03/09/2014 - 12:10
हा जिवलग मित्र सुरवातीला मदत करतो , नंतर मात्र तो असा का वागतो ते स्पष्ट होत नाही . गावकरि मदत करणार नाहीत त्यावर तो मित्र वेगळा तोडगा काढतो असे दाखवले असते तर ते त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसे झाले असते तसेच त्याच्या मदत करण्याशी सुसंगत दिसले असते.

In reply to by मराठी_माणूस

समीरसूर 03/09/2014 - 12:40
गावातल्या लोकांना आणि पुरोहिताच्या मित्राला पुरोहिताच्या बायकोच्या आरामाची आणि आयुष्याची चिंता. बिचारा पुरोहित जगो की मरो, की फर्क पैंदा है? बाकी ष्टोरी आवडली. :-) अकारण चिंता खरोखर चितासमान होती है हे ठळकपणे बिंबवून गेली ही गोष्ट!

शेवटी द्रव्येण सर्वे वशः ! यावत् वित्तोपार्जनसक्तस्तावन् निजपरिवारे रक्तः। पश्चाज्जर्जर भूते देहे वार्ता कोऽपि न पृच्छति गेहे।।

दिपक.कुवेत 03/09/2014 - 15:39
अश्या अफाट / छप्परफाडु कथा लिहिणं? टायटल वाचुन मला जिमोंचीच कथा वाटली. त्यांची "गावातलं भुत" हि कथा चांगलीच आठवतेय.

पैसा 03/09/2014 - 16:34
गोष्ट आवडली. अकुंचा धागा म्हणून रामाचं नाव घेत घाबरत उघडला होता, पण गोष्ट आवडली आणि समीरसूरचं व्हेरिएशन पण!

जियो मेरे अविकाका. स्टोरी थोडी सुखात्मिक पाहिजे होती. मित्राचा 'कशावर' डोळा तर नै ना अशी शंका आली होती. असो, काका असंच लेखन येऊ दे. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
एका गावात एक गरीब ब्राह्मण रहात असतो.. स्वभाव भित्रा व कशाची तरी सारखी काळजी करणे असा त्याचा स्वभाव असतो...गरीब असल्याने लग्न हि लांबले होते.. शेवटी ग्रहमान उच्चीचे येते व वयाच्या ४०-४२ वर्षी लग्न होते...३ मुले होतात.. आधीच गरिबी त्यात पोरवाडा या मुळे प्रापंचिक ओढाताणीने तो जेरीस आला असतो..व त्यांतून आपले पुढे कसे होणार या काळजीने तो खंगू लागतो.. त्यातच तो आजारी पडतो..अन बिछान्यावर पडल्या पडल्या व अश्या आजारात जर माझा मृत्यू झाला तर बायका पोरांचे काय होणार या विचाराने त्याच्या काळजात धडकी भरते..आजारातून बरा होतो पण काळजी काही पाठ सोडत नाही. त्याचा त्याच गावत एक जिवलग मित्र रहात असतो...तो मित्र

मटाराची दिंडे / दिंड

सानिकास्वप्निल ·

रायनची आई 02/09/2014 - 10:46
क्लासिक यार्..एकदम सुन्दर दिसत आहेत्.नक्की करुन बघणार्..पण उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घ्यायचे प्रयोजन समजले नाही.. ते न घालता करुन बघितले तर?

In reply to by रायनची आई

उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घेतले कारण दुधाने व तुपाने उकड मऊसूत होते, नरम राहते वातड होत नाही. तुम्ही पूर्णपणे पाण्याचा वापर ही करु शकता फक्त उकड काढताना तूप घालावे व खूप मळावे. धन्यवाद :)

आंssss... पहिल्या फोटूनीच मारलं! आता मि.पा. बल्ल्लवाचार्य अणी चार्यांच्या कडून १ कट्टा जालाच पायजे! :-\ आम्ही फ़ोटूवर कीती दिवस काढायचे!? :-(

भिंगरी 02/09/2014 - 16:32
मटारच्या करंज्या करते नेहमी,पण हे नविनच आहे पाहुनच कधी करते असं झालय. रेवतीताईंनी थोडी जागा दिली तर मीही शेजारी येईन म्हणते. सुंदरपाकृ

रायनची आई 02/09/2014 - 10:46
क्लासिक यार्..एकदम सुन्दर दिसत आहेत्.नक्की करुन बघणार्..पण उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घ्यायचे प्रयोजन समजले नाही.. ते न घालता करुन बघितले तर?

In reply to by रायनची आई

उकड काढताना त्यात पाण्याबरोबर दूध घेतले कारण दुधाने व तुपाने उकड मऊसूत होते, नरम राहते वातड होत नाही. तुम्ही पूर्णपणे पाण्याचा वापर ही करु शकता फक्त उकड काढताना तूप घालावे व खूप मळावे. धन्यवाद :)

आंssss... पहिल्या फोटूनीच मारलं! आता मि.पा. बल्ल्लवाचार्य अणी चार्यांच्या कडून १ कट्टा जालाच पायजे! :-\ आम्ही फ़ोटूवर कीती दिवस काढायचे!? :-(

भिंगरी 02/09/2014 - 16:32
मटारच्या करंज्या करते नेहमी,पण हे नविनच आहे पाहुनच कधी करते असं झालय. रेवतीताईंनी थोडी जागा दिली तर मीही शेजारी येईन म्हणते. सुंदरपाकृ
हल्ली गणपतीत रोज काही ना काही गोड खाणं होत आहे विचार केला काहीतरी चमचमीत, तिखट तसेच सात्विक बनवावे म्हणजे सणासुदीचे पदार्थ खाण्याची रंगत अजून वाढेल :) . साहित्य सारणः १ वाटी फ्रोझन मटार (तुम्ही कच्चे मटार घेतले तर ते आधी बोटचेपे वाफवून घ्या) १ टेस्पून आले+ हि.मिरची+ कोथींबीर पेस्ट १ टेस्पून खवलेला ओला नारळ १ टीस्पून लिंबाचा रस मीठ चवीनुसार १/२ टीस्पून साखर बारीक चिरलेली कोथींबीर

रनिंग फ़्रॉम लिंचींग

मारवा ·

स्पंदना 02/09/2014 - 04:12
किती भयानक! किती घाणेरडी विचारसरणी. मला दुसर्‍याचा छळ करुन सुख भोगणे ही कल्पनाच उमजत नाही.

एस 03/09/2014 - 13:01
त्यातले क्रौर्य अंगावर काटा आणणारे आहे. त्याहुन शॉकींग म्हणजे त्या काळातील त्या विशीष्ट समाजाचा या सर्व प्रकाराला असणारा पाठींबा व या प्रकाराला ते कीती सहजतेने व नॉर्मल ट्रीट करीत असत हे बघुन आश्चर्य वाटते.
मानवी समाजातल्या अशा विकृती पूर्णपणे संपल्या आहेत असे अजूनही म्हणता येत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. तूर्तास लेखाबद्दल आणि 'रुट्स' या कादंबरीच्या ओळखीबद्दल धन्यवाद.

पैसा 03/09/2014 - 17:17
रूट्स वाचायची आहे. माणसाने माणसाला गुलाम करणे हेच फार भयानक आहे.

In reply to by पैसा

नक्की वाचा... भयानक पुस्तक आहे.मी सहज म्हणून वाचायला घेतली आणि पुर्ण रात्र वाचत बसलो होतो.दुसर्‍या दिवशी कामावर पण गेलो नाही.

स्पंदना 02/09/2014 - 04:12
किती भयानक! किती घाणेरडी विचारसरणी. मला दुसर्‍याचा छळ करुन सुख भोगणे ही कल्पनाच उमजत नाही.

एस 03/09/2014 - 13:01
त्यातले क्रौर्य अंगावर काटा आणणारे आहे. त्याहुन शॉकींग म्हणजे त्या काळातील त्या विशीष्ट समाजाचा या सर्व प्रकाराला असणारा पाठींबा व या प्रकाराला ते कीती सहजतेने व नॉर्मल ट्रीट करीत असत हे बघुन आश्चर्य वाटते.
मानवी समाजातल्या अशा विकृती पूर्णपणे संपल्या आहेत असे अजूनही म्हणता येत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. तूर्तास लेखाबद्दल आणि 'रुट्स' या कादंबरीच्या ओळखीबद्दल धन्यवाद.

पैसा 03/09/2014 - 17:17
रूट्स वाचायची आहे. माणसाने माणसाला गुलाम करणे हेच फार भयानक आहे.

In reply to by पैसा

नक्की वाचा... भयानक पुस्तक आहे.मी सहज म्हणून वाचायला घेतली आणि पुर्ण रात्र वाचत बसलो होतो.दुसर्‍या दिवशी कामावर पण गेलो नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१२ डीसेंबर १७१२ हा दिवस व्हर्जीनीयातील जंटलमेन्स साठी फ़ार महत्वाचा होता. कारण त्यांच्याइतकाच जेंटल (इंग्रजी तील ) असणारा मॅन Willie Lynch त्यांना त्याच्या मेहनतीने व कल्पकतेने डेव्हलप केलेली. गुलाम बनविण्याची रेसीपी शेअर करायला येणार होता. हा पाहुणा दयाळु इश्वराचा अर्थातच मोठा भक्त होता राजा जेम्स ची ही त्याने आवर्जुन आठवण भाषणाच्या सुरुवातीला च काढली. (बायबल वाला जेम्स ) प्राचीन रोमन्स ही माझ्या गुलाम बनविण्याच्या मेथड चा हेवा करतील हे ही ठणकावुन सांगुन भाषणाला सुरुवात केली. या भाषणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे बघा लिंच ची अप्रतिम इंग्रजी भाषा. अतिशय आखीव रेखीव अत्यंत नीटनेटकी.

कृष्णमयी

सस्नेह ·

किसन शिंदे 02/09/2014 - 00:13
प्रचंड आवडलं. एकीकडे राधेची भावव्याकुळता तर दुसरीकडे कृष्णाचा अल्लडपणा! या दोघांच्याही अंतरंगात डोकावून ते तितक्याच समर्थपणे सादर करण्याच्या तुझ्या लेखणीला सलाम.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 04/09/2014 - 15:44
जय जयदेव, जय गीतगोविंद
अगदी अगदी हेच म्हणतो!!!! अतिअवांतरः धीरसमीरे यमुनातीरे वसति वने वनमाली गोपीपीनपयोधरमर्दन चंचलकरयुगशाली ;) हा लेख म्हणजे जणू गीतगोविंदाच्या एखाद्या भागाचे गद्य भाषांतरच वाटते आहे.

In reply to by सस्नेह

बॅटमॅन 05/09/2014 - 14:48
गीतगोविंद वाचा, मग कळेल किती तस्संच्या तस्सं लिहिलंय ते. मला वाटलेलं तुम्ही अगोदर गीतगोविंद वाचला होता म्हणून. पण खाली गोनीदांचा उल्लेख केल्यावर रम्य शैलीचे रहस्य उलगडले! शैली खासच जमलीये.

In reply to by सस्नेह

प्रचेतस 05/09/2014 - 17:46
नाही हो, तुलना नाहीच. पण राधेसारख्या काल्पनिक पात्राला जयदेव कवीने गीतगोंविंदात आणून इतकं अजरामर केलंय जणू ती मूळ संहितेतच मिसळून गेलीय. गीतगोविंद वाचाच एकदा. रसाळ आहे खूप.

In reply to by बॅटमॅन

सस्नेह 05/09/2014 - 21:54
वाचायलाच हवे आता. राधा हे पात्र सर्व गोपींच्या कृष्णावरील उत्कट प्रीती आणि भक्तीचे प्रतीकात्मक प्रतिनिधी आहे असे वाटते. दुसर्‍या बाजूने ते परमेश्वराशी निरलस भक्ती, समर्पण अन एकरूपतेचे दर्शक वाटते.

पैसा 04/09/2014 - 16:11
गोनीदांच्या हळुवार रसाळ लिखाणाची आठवण आली! मस्त लिहिलंय!

सखी 05/09/2014 - 21:40
सुरेख लिहलं आहेस स्नेहांकिता, तुझ्या लिखाणाची ही शैलीपण आवडली.

किसन शिंदे 02/09/2014 - 00:13
प्रचंड आवडलं. एकीकडे राधेची भावव्याकुळता तर दुसरीकडे कृष्णाचा अल्लडपणा! या दोघांच्याही अंतरंगात डोकावून ते तितक्याच समर्थपणे सादर करण्याच्या तुझ्या लेखणीला सलाम.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 04/09/2014 - 15:44
जय जयदेव, जय गीतगोविंद
अगदी अगदी हेच म्हणतो!!!! अतिअवांतरः धीरसमीरे यमुनातीरे वसति वने वनमाली गोपीपीनपयोधरमर्दन चंचलकरयुगशाली ;) हा लेख म्हणजे जणू गीतगोविंदाच्या एखाद्या भागाचे गद्य भाषांतरच वाटते आहे.

In reply to by सस्नेह

बॅटमॅन 05/09/2014 - 14:48
गीतगोविंद वाचा, मग कळेल किती तस्संच्या तस्सं लिहिलंय ते. मला वाटलेलं तुम्ही अगोदर गीतगोविंद वाचला होता म्हणून. पण खाली गोनीदांचा उल्लेख केल्यावर रम्य शैलीचे रहस्य उलगडले! शैली खासच जमलीये.

In reply to by सस्नेह

प्रचेतस 05/09/2014 - 17:46
नाही हो, तुलना नाहीच. पण राधेसारख्या काल्पनिक पात्राला जयदेव कवीने गीतगोंविंदात आणून इतकं अजरामर केलंय जणू ती मूळ संहितेतच मिसळून गेलीय. गीतगोविंद वाचाच एकदा. रसाळ आहे खूप.

In reply to by बॅटमॅन

सस्नेह 05/09/2014 - 21:54
वाचायलाच हवे आता. राधा हे पात्र सर्व गोपींच्या कृष्णावरील उत्कट प्रीती आणि भक्तीचे प्रतीकात्मक प्रतिनिधी आहे असे वाटते. दुसर्‍या बाजूने ते परमेश्वराशी निरलस भक्ती, समर्पण अन एकरूपतेचे दर्शक वाटते.

पैसा 04/09/2014 - 16:11
गोनीदांच्या हळुवार रसाळ लिखाणाची आठवण आली! मस्त लिहिलंय!

सखी 05/09/2014 - 21:40
सुरेख लिहलं आहेस स्नेहांकिता, तुझ्या लिखाणाची ही शैलीपण आवडली.
4 कातरवेळ झाली अन सकाळपासून तिच्या मनी दाटलेल्या हुरहुरीने आणखीनच उग्र रूप धारण केले. आज दिवसभर त्याचे दर्शन नाही. नित्यकर्मे करताना मनाची तहान वाढतच गेली. अन आता संध्याकाळी त्या व्याकुळतेने पुरते पिसे लावले. अंधार दाटला, तसे राधेला काही सुचेना. शामसुंदर, श्रीहरी, कृष्ण काळा, कान्हा, मुरारी, मुकुंद, गोविंद, माधव, मिलिंद सगळी नावे आलटून पालटून घेऊन झाली. त्याची लोभस रूपे मन:चक्षुंनी हजार वेळा न्याहाळली.

प्रार्थना प्रिमियर लीग विजयाची

वेल्लाभट ·

पैसा 01/09/2014 - 16:23
:D नव्या युगातली नवी प्रार्थना!

पैसा 01/09/2014 - 16:23
:D नव्या युगातली नवी प्रार्थना!
लेखनविषय:
काव्यरस
पुन्हा एकवार, मॅन्चेस्टर युनायटेड फॅन या नात्याने गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय, ही ईपीएल जिंकण्यासाठी. गणपती बाप्पा काय काय सांगू आलोय आम्ही मागायला ते ते सगळं, जे जे लागतं, प्रिमियर लीग मारायला ||धॄ|| कोच आहे विद्वान खरा आहे जरा निराळी त-हा मात्र सगळ्या प्लेयर्सना शिकवा त्याचं ऐकायला ||१|| संघ टाकतोय कात जरी नेहमीचीच ही बात जरी नव्या जुन्याची सांगड तेवढी मदत करा घालायला ||२|| बुद्धी पास द्यायला आणि ताकद किक मारायला जोर थोडा पायांमध्ये बॉक्स टू बॉक्स धावायला ||३|| संघ जरासा गळपटलाय विश्वास थोडा डळमळलाय एकच तगडा विजय हवाय ती आग पुन्हा लागायला ||४|| हार जीत होतेच नेहमी जाणतो जरी सारे आ

वरुण राजाला सांगड

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रावण सगळा सरला टिपूस नाही पडला. बळीराजाच्या अश्रूंनी धरती जळून गेली. सांगड घातल इंद्राला वरुणराजा धावत आला वादळ फोडून पाऊस बरसला. गुरं-ढोरं पुरात गेली वाहून पीक सगलं खलास झालं बळीराजाच नशीब फुटलं. वरुण राजा तू तर देव आकाशाचा का वागतो लहरी सारखा? गत जन्मांच्या कर्मांचा का हिशोब घेतो आता? झाल्या चुका माफ कर कृपा कर पामरांवर सांगड घालतो तुच्या चरणी पुढच्या वर्षी तरी पाऊस पाड नेमान.

आदिकैलास, ओमपर्वतदर्शन,पार्वती सरोवर परिक्रमा भाग-५

खुशि ·

खुशि 01/09/2014 - 18:29
जरुर जा.दिल्लीहुन काठगोदाम एक्स्प्रेस किंवा बसने काठगोदाम येथे जाउन तिथुन बसने धारचुला येथे जावे तिथुन जीप मिळते.नेटवर सर्च करुन लेटेस्ट माहिती मिळू शकेल.मी पिकासावर कैलास यात्रेचे फोटॉ टाकले आहेत.

In reply to by कविता१९७८

खुशि 02/09/2014 - 18:11
कविता, अग हेच टाइप करताना नाकात दम येतो, शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करत असते,पारिग्राफ करते पण तरिही प्रकाशित झाल्यावर सरळ एका मागोमागच लिहिले गेलेले असते,असे का होते काही समजत नाही.जमेल तसे लिहिते ग!तुम्ही इतक्या आपुलकीने वाचता म्हणून लिहावेसे वाटते.

एस 03/09/2014 - 19:26
----------------- तुम्हांला मराठीतून टंकलेखन सहाय्य इथे मिळेलः http://www.misalpav.com/node/1312 बादवे ते भोजनप्रसादाच्या बेताचं वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटले आहे! ;-) (संमं - नंतर हा प्रतिसाद उडवा बरं का! ) :-)

खुशि 01/09/2014 - 18:29
जरुर जा.दिल्लीहुन काठगोदाम एक्स्प्रेस किंवा बसने काठगोदाम येथे जाउन तिथुन बसने धारचुला येथे जावे तिथुन जीप मिळते.नेटवर सर्च करुन लेटेस्ट माहिती मिळू शकेल.मी पिकासावर कैलास यात्रेचे फोटॉ टाकले आहेत.

In reply to by कविता१९७८

खुशि 02/09/2014 - 18:11
कविता, अग हेच टाइप करताना नाकात दम येतो, शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करत असते,पारिग्राफ करते पण तरिही प्रकाशित झाल्यावर सरळ एका मागोमागच लिहिले गेलेले असते,असे का होते काही समजत नाही.जमेल तसे लिहिते ग!तुम्ही इतक्या आपुलकीने वाचता म्हणून लिहावेसे वाटते.

एस 03/09/2014 - 19:26
----------------- तुम्हांला मराठीतून टंकलेखन सहाय्य इथे मिळेलः http://www.misalpav.com/node/1312 बादवे ते भोजनप्रसादाच्या बेताचं वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटले आहे! ;-) (संमं - नंतर हा प्रतिसाद उडवा बरं का! ) :-)
आज सोसा-नारायण आश्रम मार्गे सिर्खा. अंतर १६ किमी. उंची ९००० फूट. पहाटे ५-३० वाजता पराठे, बोर्नव्हिटा असा नाश्ता करुन चालायला सुरूवात केली. पांगूचा अवघड डोंगर उतरून खाली आलो, तर सोसाच्या डोंगराला जोडणारा नदीवरचा पूल पडला आहे असे दिसले. मराठी गाईड सुनील पित्रे आणि पांडेजी यांनी नदीचा उतार शोधला, आणि मग एकमेकांच्या आधाराने सर्वांनी नदी ओलांडली. घोड्यावरुन जाणारे लांबच्या रस्त्याने गेले होते. खरे म्हणजे घोडे गेले तो मोटार रस्ता आहे नारायण आश्रमापर्यंतचा, पण निगम वाहनाची व्यवस्था करत नाही म्हणून डोंगर चढून रस्त्यावर आलो.

कोकण.....वरंधा व मालवण

जयंत कुलकर्णी ·
परवा मालवणला गेलो होतो तेथे काही फोटो काढले ते देत आहे....लिहिण्यासारखे काही घडले नसल्यामुळे छायाचित्रांचाच आनंद घ्यावा..... वरंधा घाट... Simple, Free Image and File Hosting at MediaFire वरंधा घाट... Simple, Free Image and File Hosting at MediaFi

In reply to by जयंत कुलकर्णी

Flickr मध्ये फोटोज अधिक चांगले दिसतात असे निरिक्षण आहे. मात्र ते बर्‍याच हापिसांमध्ये प्रतिबंधित असते त्यामुळे वाचकांचा हिरमोड होतो. नुकतेच Photobucket वापरून पाहिले ते देखील चांगले वाटले.

In reply to by जयंत कुलकर्णी

Flickr मध्ये फोटोज अधिक चांगले दिसतात असे निरिक्षण आहे. मात्र ते बर्‍याच हापिसांमध्ये प्रतिबंधित असते त्यामुळे वाचकांचा हिरमोड होतो. नुकतेच Photobucket वापरून पाहिले ते देखील चांगले वाटले.

भक्तीमार्गातील अडथळे.

प्रभाकर पेठकर ·

In reply to by धन्या

आतिवास 01/09/2014 - 22:21
मार्केटिंग आणि भक्ती यातल्या सीमारेषा पुसट झाल्यात; नीर-क्षीर विवेकाची आज आपल्याला (पुन्हा एकदा) गरज आहे.

चित्रगुप्त 01/09/2014 - 03:03
तळमळीने लिहिलेला उत्तम लेख. मानवी जीवनाच्या अगदी प्रत्येक क्षेत्रात अमाप धंदेबाजी बोकाळलेली आहे. धूर्त धंदेवाल्यांनी आपल्या जीवनाचा पूर्ण कब्जा घेतलेला आहे. ज्याने त्याने स्वतः सावध राहून ('सावधपण सर्वविषयीं') तिच्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. माझ्या वडिलांनी तरूणपणीच घरातले सर्व 'देव' नर्मदेत विसर्जित केले होते, आणि त्यानंतर ते कधीही कोणत्या मंदिरातही गेले नाहीत, बाबा-स्वामींचा तर प्रश्नच नाही. हीच परंपरा आमच्या घरात चालत आली. मला तर हे हजारो-लाखो लोक असल्या ठिकाणी कडमडायला मुळात जातातच का, याचेच नेहमी आश्चर्य वाटते.

In reply to by चित्रगुप्त

विलासराव 01/09/2014 - 08:44
माझ्या वडिलांनी तरूणपणीच घरातले सर्व 'देव' नर्मदेत विसर्जित केले होते त्यामुळेच आम्च्यासारखे अश्रद्धावान नर्मदेची परीक्रमा करतात.

तळमळीने लिहिलेलं थेट अंतःकरणाला भिडलं. माध्यमिक शाळेत असल्यापासून मी गर्दी असणार्‍या देवदर्शनाला जाणे बंद केले ते अजुनही पाळतोय. अमेरिकेतील हिंदू मंदिरांची कार्यपद्धती जवळून पाहिली आहे. स्वकष्टाने उद्योग / व्यवसाय उभा करणार्‍या कुणालाही हेवा वाटेल असे त्यांचे बिझनेस मॉडेल असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अमेरिकेतील हिंदू मंदिरांची कार्यपद्धती जवळून पाहिली आहे. स्वकष्टाने उद्योग / व्यवसाय उभा करणार्‍या कुणालाही हेवा वाटेल असे त्यांचे बिझनेस मॉडेल असते. अमेरिकेतच कशाला भारतही बिझनेस मॉडेलच्या बाबतीत आजिबात मागे नाही. मात्र स्थळ-काळ-परिस्थिती यामुळे या दोन मॉडेल्सच्या बाह्यरुपात फरक झाले आहेत... पण गाभ्याला फारसा धक्का न पोचवता *HAPPY* देवळात चकचकीतपणा आणि स्वच्छतेचा अभाव असतो... पण या दोन गोष्टी नसल्या तरी भारतात भाविकांच्या संखेवर काही परिणाम होत नाही. म्हणून तो खर्च अनावश्यक समजला जातो. फिनान्शियल ऑप्टिमाझेशन ते हेच नव्हे काय? पूर्ण फिजिबिलिटी स्टडी केल्याशिवाय आणि कॉस्ट-बेनेफिट (खर्च / गल्ला) रेशो असल्याशिवाय मंदिर बांधले जात नाही. उगाच काय आजकाल नविन मंदिरांतील देवाच्या निवडीत साईबाबा आणि बालाजी हे पुढे आहेत आणि राम-कृष्ण-शिव-गणेश मागे पडलेत ?! :) ;) पण इतके सगळे असले तरी हिंदू मंदिरे आणि एकंदरीत हिंदू धर्म हे वैयक्तिक किंवा फारतर छोट्या समुहांच्या प्रयत्नांवर जास्त अवलंबून आहेत. ख्रिश्चन चर्च आणि इस्लाम उम्मा यांच्या शतकानुशतके चालू असलेल्या जागतिक संघटनकौशल्याच्या ते पासंगालाही पुरणार नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 01/09/2014 - 19:54
+१२३४५६. चिकनच्या ठोक विक्रेत्याचं प्रति ... मंदीर. माजी आमदाराचं प्रति ...बाबा मंदीर. आम्ही विकेण्डला जातो. पाया पडतो, कृतकृत्य होतो. मज्जानु लाईफ. बाकी ते जागतिक संघटनकौशल्याबाबत हज्जारदा सहमत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यावरून एक किस्सा आठवला. सेन्ट लुईसला एकदा लोकल ट्रेनमधून जात असताना एक तरूण भेटला. तो नुकताच भारतात जाऊन आला होता. तो सांगत होता की त्याचे वडील भारतातील चर्चमध्ये गुंतवणूक करतात. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. हे बिझनेस मॉडेल नेमके कसे काम करते याबद्दल कुतूहल आहे. बाकी भारतात मी एकाच घरात तीन तीन धर्म पाळले गेलेले पाहिले आहेत. आर्थिक फायदा हा त्यामागे केंद्रस्थानी असतो असे निरिक्षण आहे.

In reply to by कवितानागेश

समीरसूर 02/09/2014 - 11:59
एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी. अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो. अशा ष्टोर्‍या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही. दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-) एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)

विलासराव 01/09/2014 - 08:50
काकांची आमच्या लालबागच्या राजावर श्रद्धाच नाही दिसत.अहो काल तर ५-१० मीनीटात दर्शन देत होता राजा(पावसाच्या कृपेमुळे). लेखाशी सहमत . अवांतरः परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. (हे स्वतः करणे हे फार अवघड असल्याने हे फक्त उपदेशामृत म्हनुन वापरावे) स्वतः बदला जग बदलेल. (अर्थातच आपल्यापुरते).

In reply to by विलासराव

आयुर्हित 08/09/2014 - 23:25
लालबागचा राजाने ह्या १० दिवसात फक्त ७ करोड रुपये दान पेटीतुन मिळवले आहेत. कॄपया "लालबागचा राजा" गणपती मंडळाचे गेल्या वर्षाचे "बॅलँस शीट" कोणी डकवू शकेल काय?

नाखु 01/09/2014 - 09:23
स्वीकारा .रोख्ठोक. शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी हेच खरे. अवांतर :बाकी "अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात असे निरिक्ष्ण आहे.

In reply to by नाखु

"अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात समाजातील विविध आर्थिक पातळीवरच्या व्यक्ती मनी भक्तीभाव बाळगत असतात. प्रत्येकाला आपला आर्थिक स्तर उंचवायचा असतोच. वाढत्या महागाईने सर्वच जण बेजार आहेत. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना परमेश्वराची साथ मिळाली तर नशिब बदलून इप्सित साध्य होईल इतका साधा विचार त्या मागे असतो. पण सर्व भाविक आर्थिक फायद्याच्याच मागे असतात असेही नाही. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रियां स्वतःला फार असुरक्षित समजत असतात. हि असुरक्षितता नेहमीच आर्थिक नसते, भावनिक ही असते. नवरा मनाविरुद्ध वागत असतो, मुलं अभ्यासात प्रगती करीत नसतात, कधी आयुष्याकडून अपेक्षाच जास्त असतात, कधी घरच्यांची आजारपणं, असाध्य व्याधी काहीही असतं. 'असुरक्षिततेची' ही वेगवेगळी रुपं कुठल्याही, मनाने कमजोर, व्यक्तीला घाबरवितात. पण स्त्री वर्ग ह्या भक्तीभावात सर्वात जास्त बुडालेला दिसतो. पुरुष मंडळी त्या मानाने, मनाने कमी आणि कर्तव्य म्हणून जास्त गुंतलेली असतात. हे वाईट नाही पण ईश्वरावरील परावलंबित्व चुकीचं आणि भक्ताची विचारशक्ती, सारासार बुद्धी बधीर करणारं असेल तर समस्या निर्माण होतात. मी जेव्हढं देवासाठी जास्त जास्त करेन तेव्हढं आयुष्यात देव मला भरभरून देईल हा विचार घातक आहे. देवावर श्रद्धा असू दे, भक्तीभाव असू दे पण त्याला पैशात तोलू नका. इश्वराला पैसे, सोने-चांदी, खाद्य पदार्थ अर्पण करू नका. दोन हात जोडून मस्तक टेका आणि मनोमन प्रार्थना करा. तुमचे मनोबल वाढायला एव्हढेच पुरेसे आहे. घरातल्या देवाच्या तसबिरीसमोर साधं गुळ-खोबरं, दुध साखर ह्याहून जास्त काही करावे लागत नाही. बाकी, तुमच्या समस्या दूर करायला 'तुम्ही स्वतःच' शर्थीचे प्रयत्न करा आणि मिळणार्‍या यशावर समाधानी राहा. शिवाय देव एके ठिकाणी (देवळात, तिर्थक्षेत्री) नाही तर चराचरास व्यापून आहे कुठल्याही दिशेने 'मनापासून' नमस्कार करा तो देवाला पोहोचतोच पोहोचतो. त्यासाठी लालबागच्या गणपतीसमोर रांगा लावाव्या लागत नाहीत की शिर्डीला साईचरणी धाव घ्यावी लागत नाही. परस्परांचा सन्मान करा, निसर्गाचा सन्मान करा, गोर गरीबांना यथाशक्ती यथामती मदत करा की तुमची इश्वरसेवा परिपूर्ण झाली. देवाच्या 'दलालांना' त्यांच्या दुष्कृत्यात बळ देऊ नका. एव्हढंच माझं म्हणणं आहे.

In reply to by नाखु

धन्या 01/09/2014 - 14:52
बाकी "अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात असे निरिक्ष्ण आहे.
अवतरणात टाकलेल्या अतिरिक्त शब्दांत तुम्हाला काय अभिप्रेत आहे हे माहिती नाही. मात्र आयटीवाल्यांमध्ये हे साई-बालाजीचे फॅड खुप आहे. विकेंडला साई किंवा बालाजीला जाऊन देवदर्शन अधिक आऊटींग अशा दोन गोष्टी साधायच्या, फेसबुकवर फोटो टाकायचे, ऑफीसला आल्यावर फ्लोअरला "प्रशाद अ‍ॅट माय डेस्क" म्हणून मेल टाकायची. :)

In reply to by बाळ सप्रे

अतिरिक्त उत्पन्न म्हणजे "सर्व आवश्यक खर्च करून उरलेले उत्पन्न म्हणजेच डिस्पोझेबल इन्कम" असा अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो.

In reply to by धन्या

नाखु 02/09/2014 - 08:57
नावारूपाला येण्यास "सिनेमा-मंडळी/बिल्डर/राजकारणी" अशीच मांदियाळी आहे. परिचयातील खाजगी कंपनीतील हमखास"वरकमाई" करणार्या लोकांचा एक ग्रुप दरवर्शी बालाजी दर्शन करतोच. आणी आल्यावर आम्ही कसे अन्न्दान केले/रांगेत थांबलो याच्या सुरस कथा इतर नास्तीकांना (त्यांच्या दृष्टीने नास्तीक) एकवत असतो. मात्र आयटीवाल्यांमध्ये हे साई-बालाजीचे फॅड खुप आहे. + यास प्रचंड सहमत.

स्पा 01/09/2014 - 10:33
रोखठोक लिखाण. ण पटण्यासारखे काहीच नाही ऑफिस ला लागून लालबाग आहे.. तरीही जावेसे वाटत नाही

vikramaditya 01/09/2014 - 11:03
मनापासुन लिहिलात. कोणत्याही leading daily मध्ये प्रकाशित व्हावा अशा तोडीचा लेख आहे. जो विषय घेतलात त्याला पूर्ण न्याय दिलात. (१२ वर्षाखालील मुलांना उंच थरावर चढु न दिल्याने कुठल्या संस्क्रुतीचा -हास होतो हे केवळ राजकारण्यांनाच ठाउक.) अतिशय समतोल विचार मांडलेत. मुख्य म्हणजे भक्तिमार्ग आणि ईश्वरप्राप्ती ह्यातिल ढोंग,भ्रष्टाचार, अराजकता, अंधानुकरण ह्यावर कडाडुन हल्ला चढवलात, परंतु भक्तिमार्ग आणि ईश्वरप्राप्ती हे थोतांडच आहे ('मी सांगतो म्हणुन') असला आक्रस्ताळी पवित्रा घेतला नाहीत. हे फार अभिनंदनीय आहे.

In reply to by vikramaditya

हे म्हणजे आक्ख्या भक्तीमंडळावर जोड्यांची पुष्पवृष्टी झाली. आणि भक्तगण हसत मुखानं म्हणतोयं `सगळ्यांनाच बसले, त्यात काय विषेश, हॅ! हॅ! हॅ ! .... आणि सगळे पुन्हा... भक्तीभावानं रांगेत उभे!

In reply to by संजय क्षीरसागर

व्वा! काय सुंदर उपमा आहे हो! आधी होते जोडे मग त्यांची झाली पुष्पं आणि मग झाली त्या पुष्पांची वॄष्टी... मला तर आता या अभिजात साहित्याचा आस्वाद घेत आनंदाने छानसं ओरडावसं वाटतंय .... हॉSकूSSS हॉSकूSSS हॉSकूSSS .

कंजूस 01/09/2014 - 11:15
चरणी सादर प्रणाम. आणखी काय लिहिणार? भक्तीमार्ग पुरे म्हणण्याची वेळ आली आहे. विघ्नकर्ता त्यात विघ्न आणण्यास समर्थ आहे. तरी कार्यात आपली अनुपस्थिती आवश्यक आहे हीच विनंती.

मस्त लेख ! या जगात "चलाख आस्तिकाने" नेहमीच "आस्तिकावर" मात केली आहे कारण चलाख आस्तिकाचे अंतिम लक्ष व्यक्तिगत फायदा असते... त्यासाठी जरूर ते सर्व मार्ग चोखाळायला त्याची तयारी असते... आस्तिकतेचा अधिकाधिक आकर्षक देखावा करणे हे त्यातले एक प्रभावी मार्केटींग टेक्निक आहे.

स्मिता. 01/09/2014 - 15:13
काका, अगदी रोखठोक लिहिलंय. लेख वाचतांना असं वाटलं की त्यातला शब्दन् शब्द माझ्या मनातला आहे. अर्थातच लेख १००% पटला. या लेखाचा दुवा माझ्या फेसबूक भिंतीवर देतेय. किती लोक लेख पूर्ण वाचतील आणि त्यातले किती अंमलात आणतील याची काहीच खात्री नाही. तरी मी आपला खारीचा वाटा उचलणार!

समीरसूर 01/09/2014 - 15:29
लेख खरंच खूप पोटतिडकीने लिहिला आहे. विचारांशी सहमत आहे. मला तर आपल्या अतिउत्सवी वातावरणाचा भयानक कंटाळा आलाय. दहीहंडी हा प्रकारच कायद्याने बंद करायला हवा. आपल्या इथे वाईट खोड अशी आहे की आपण प्रत्येक घटनेचं, भावनेचं उत्सवीकरण करतो. आणि मुळात आपण इतरांचा आदर करणारे, इतरांना आपल्या कुठल्याही गोष्टींमुळे त्रास होणार नाही याची काळजी घेणारे, शांतता बाळगणारे असे कधीच नव्हतो आणि पुढचे ५०० वर्षे होणार नाही. कुठलाही सण आला की आसपासच्या भागात भयंकर अशांतता माजवून अघोरी पद्धतीने सेलिब्रेशन करणे म्हणजे सणांचे चैतन्य अशी भयानक समजूत आपण करून घेतली आहे. लाख-दोन लाख फेकले की सिनेमातल्या नट्या नाचायला येतात; दहीहंडीमध्ये भाग घेणारे सगळेच एकजात टवाळखोर असतात; त्यांना फूस लावणारे राजकारणी त्याहून जास्त टवाळखोर असतात; सगळा हरामाचा पैसा असतो; अतिशय अश्लाघ्य उन्माद, बेताल वागणे हे सगळे राजरोसपणे दाखवण्याची माध्यमे म्हणजे दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे सण! आपल्या जनतेचा तेवढाच दोष आहे. त्यांना देखील असला थिल्लरपणा आवडतो. सनी लिओन आली की जातात जिभा बाहेर कढून तिला बघायला. जसं काही यांना ती अलिंगनच देणार आहे. नट आणि नट्यांना बघायला जाणार्‍या लोकांच्या बुद्ध्यांकाविषयी मला जबरदस्त शंका आहे. नट-नट्यांना काय पहायचं? असे काय तीर मारलेले असतात त्यांनी? पण आपली बिनडोक जनता जाते. जितेंद्र आव्हाडसारखे मुजोर आणि हलकट नेते कायदा धाब्यावर बसवून पोलिसांच्या नाकावर टिच्चून एक-एक नियम मोडतात आणि वरून अरेरावी करतात. दहीहंडीसारख्या उत्सवावर लाखो रुपये खर्च होत असतांना जनतेच्या लक्षात हे नाही येत की हा पैसा यांनी त्यांच्याच खिशांवर डल्ला मारून उडवलेला असतो. म्हणून तर इतका पैसा दहीहंडीसारख्या सणावर खर्च करतांना असल्या फालतू नेत्यांना दु:ख होत नाही. काल झी मराठीवर कुठलातरी फालतू कार्यक्रम सुरू होता. सुरेखा कुडची अतिशय भयंकर मेकप करून अतिशय घाणेरडे, किळसवाणे अंगविक्षेप करून कुठल्यातरी फालतू लावणीवर तितकाच फालतू नाच करत होती. लहान मुलांसोबत बघायला लाज वाटावी असला थिल्लर प्रकार चालू होता. आणि प्रेक्षक धुंद होऊन नाचत होते. लहान लहान मुले कंबर हलवून हलवून नाचत होती. असं असल्यावर भविष्य काय असणार हे सांगायची गरज नाही. मुळात तमाशा, लावणी वगैरे लोककला राहिलेत का हे तपासाण्याची वेळ आलेली आहे. तमाशा आणि लावणीच का बदनाम आहे? कथ्थक किंवा भरतनाट्यम का बदनाम नाही? तमाशाला कुणी सहकुटुंब जातांना का दिसत नाही? तमाशा बघायला जाणे म्हणजे काहीतरी वाईट असे का आहे? मराठी नाटक बघायला जाणे वाईट का समजले जात नाही? हे प्रश्न थेट विचारून तमाशा आणि लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे हा समज पूर्णपणे मिटवायला हवा. असला थिल्लर आणि निर्लज्ज प्रकार एका पुरोगामी राज्याची लोककला कसा काय असू शकतो हे कणखरपणे विचारून सत्य स्वीकारले गेले पाहिजे. पण आजकाल उत्सवीकरणाच्या नादात कुणालाच भान नाहीये की आपण काय पेरतोय. गणेशोत्सवाची तशीच तर्‍हा! पण उत्सवातले, सणांमधले चैतन्य, ऊर्जा, नवीन हुरूप देणारा सळसळता उत्साह वगैरे गोड शब्दांखाली हा सगळा ओंगळ प्रकार सहन करावा लागतोय. टीव्हीने तर हा सगळा प्रकार अगदी डोक्यावर घेतलाय. आमच्या घराजवळ मोठी दहीहंडी आयोजित केली होती. कुठल्यातरी नटीला बोलावले होते. संध्याकाळी ५ वाजेपासूनच रस्ता बंद ठेवला होता. स्पीकर्सच्या भिंती रचून ५ वाजेपासूनच कानठळ्या बसाव्यात अशा आवाजात फालतू गाणी चालू होती. आयोजकांचे टोळके दादा असल्यासारखे फिरत होते. रात्री ११ पर्यंत हा टुकारपणा चालू होता. आमच्या भागात जाणारा हा एक मुख्य रस्ता होता. तो संपूर्णपणे बंद होता. दुसरा रस्ता लांबून होता. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शाळांच्या बसेस, रिक्शा वगैरेंना खूप त्रास झाला. "थोडा त्रास झाला तर काय फरक पडतो; सहन करायचा" ही आणखी एक मुजोरी. कुणी चकार शब्द बोलू शकत नाही. बोलला त्याला मारून मारून अर्धमेला करू अशी मस्ती सगळ्यांच्या डोळ्यातून झिरपत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय (किंबहुना शरद पवारांसारख्या नेत्याचा उदय म्हटले तरी चालेल) ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची सगळ्यात मोठी शोकांतिका!! त्यामुळे बाकीचे पक्ष देखील गुंडगिरी करायला सरसावले. आणि राष्ट्रवादीनेच ही गुंडगिरी रस्त्यांवर आणि लोकांच्या उंबरठ्यांपर्यंत नेली. सामान्य जनतेचं जगणं हराम करून टाकलं राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी गुंडांनी. असो. हे बदलणं शक्य नाही. त्यामुळे निमूटपणे सहन करायचं आणि जमेल तसं स्वतःला आणि आपल्या लोकांना वाचवायचं. अजून दुसरं काहीच शक्य नाही. :-(

In reply to by समीरसूर

आजानुकर्ण 01/09/2014 - 20:53
लेख व वरील प्रतिसाद आवडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय (किंबहुना शरद पवारांसारख्या नेत्याचा उदय म्हटले तरी चालेल) ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची सगळ्यात मोठी शोकांतिका!! त्यामुळे बाकीचे पक्ष देखील गुंडगिरी करायला सरसावले. आणि राष्ट्रवादीनेच ही गुंडगिरी रस्त्यांवर आणि लोकांच्या उंबरठ्यांपर्यंत नेली. सामान्य जनतेचं जगणं हराम करून टाकलं राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी गुंडांनी.
यात थोडीशी दुरुस्ती करावीशी वाटते. महाराष्ट्रापुरती राजकारणातील आणि रस्त्यावरील राजरोस गुंडगिरीची सुरुवात राष्ट्रवादीने केली नसून ती शिवसेनेने केली आहे. याचेच एक उदा. म्हणजे खुनाचे आरोप असलेली राण्यांसारखी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसवणे. या सर्व गोष्टींची जनतेला फिकीर नसल्याचे इतर राजकीय पक्षांच्या लक्षात आल्यावर पुढे त्यांनीही तोच कित्ता गिरवला.

In reply to by आजानुकर्ण

समीरसूर 02/09/2014 - 10:05
आपल्याशी काही अंशी सहमत असलो तरी शिवसेनेच्या गुंडगिरीची व्याप्ती बर्‍याच अंशी मर्यादित होती. जनसामान्यांच्या रोजच्या जगण्यात अडथळा येईल अशी गुंडगिरी नव्हती शिवसेनेची. शिवाय शिवसेनेने नाही म्हटलं तरी बरीच विधायक कामे देखील केली आहेत. काही कारणांमुळे शिवसेनेला आक्रमक भूमिका त्या काळात घ्यावी लागली. नंतर अर्थात त्यात गुंडगिरी आली असली तरी थेट सामान्यांच्या जगण्याशी त्याचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रवादीचा पायाच शेकडो एकर जमिनींची मग्रूर मालकी, अफाट पैसा, पराकोटीचा जातीभेद, सरळ हाणामारी आणि धमकी, साखर कारखाने, वगैरेंसारख्या माजोर्ड्या तत्वांवर आधारलेला आहे. कसेही करून सत्ता मिळवायची फक्त हेच त्यांचे धोरण राष्ट्रवादीचे राहिले आहे. त्यासाठी गुंडगिरी आणि जातीभेदाचे विष पेरणे देखील राष्ट्रवादीने त्याज्य मानले नाही. कुठलाही विधीनिषेध न बाळगता फक्त सत्तेवर आणि संपत्तीवर डोळा ठेवून अमाप भ्रष्टाचाराचे राजकारण करण्यातच राष्ट्रवादीने धन्यता मानली. पुणे, पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनींच्या बळावर मुजोर बनलेल्या धनदांडग्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली आणि त्यांची समाजविघातक तत्वे पोसली. शिवसेना हा पक्ष बहुतांशी सामान्य लोकांचा होता. त्यात धनदांडगे क्वचित होते. अमाप संपत्तीचे ओंगळवाणे राजकारण शिवसेनेत कधीच नव्हते. त्यामुळे त्यांची आक्रमकता खूपच मर्यादित राहिली. त्यांची ही आक्रमकता सामान्य लोकांचे जगणे हराम करून नाही गेली. शिवाय शिवसेनेने कधी जाती-जातींमध्ये तेढ माजवल्याचे ऐकले नाही. अठरापगड जातीची माणसे शिवसेनेत होती. नाही म्हणायला त्यांचा हिंदुत्ववादी चेहरा होता परंतु त्याच्यामुळे फार दुही माजली असे म्हणता येणार नाही. शिवसेना राष्ट्रवादीच्या तुलनेत खूपच मवाळ आणि सोवळी होती. राष्ट्रवादी मात्र भयंकर विषारी आहे. त्यांची तत्वेच मुळात चुकीची आहेत. म्हणून शिवसेना इतकी वर्षे टिकली, फोफावली. राष्ट्रवादी १५ वर्षात लोप होण्याच्या मार्गावर आहे. आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपणे अत्यंत आवश्यक आहे. ६-जुलै-२०१४ च्या लोकसत्ता मध्ये संजय पवारांनी अतिशय परखड शब्दात राष्ट्रवादी-मुक्त महाराष्ट्राची गरज व्यक्त केली होती. फेसबुकवर तो लेख अजूनही असेल. लोकसत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीमधून तो अचानक गायब झाला. साहजिकच राष्ट्रवादीच्या दमदाटीमुळेच तो काढून टाकण्यात आला असावा. तो लेख शरद पवारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा होता. तो लेख कुठे मिळाल्यास सगळ्यांनी अवश्य वाचावा. अगदी सडेतोड भाषेत संजय पवारांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची आणी त्यांच्या बीभत्स राजकारणाची हजेरी घेतली आहे. शिवसेनेचे उपद्रव मुल्य राष्ट्रवादीच्या उपद्रव मुल्यापुढे क्षुल्लक आहे. शिवसेनेत चार चांगल्या गोष्टी देखील होत्या/आहेत. राष्ट्रवादीमध्ये बारकीशी गोष्ट देखील कधीच चांगली नव्हती आणी पुढेही कधीच नसेल.

In reply to by समीरसूर

प्रसाद१९७१ 02/09/2014 - 10:46
म्हणून शिवसेना इतकी वर्षे टिकली, फोफावली. राष्ट्रवादी १५ वर्षात लोप होण्याच्या मार्गावर आहे.>>>>>>> राष्ट्रवादी बद्दल च्या तुमच्या मताशी १००% सहमत असुन ही हे सांगावेसे वाटते की एखादी गोष्ट बरीच वर्ष टीकली म्हणजे ती चांगली असेलच असे नाही आणि लोप पावली म्हणजे वाईट असेल असे नाही. गेल्या १० वर्षात राष्ट्रवादी फोफावली म्हणजे तेंव्हा ती चांगली होती का? तुम्ही म्हणताय ती शिवसेना २० वर्षापूर्वीच लोप पावली. आता तिच्यात आणि राष्ट्रवादीत काही फरक असेल तर १९-२० चा च. राष्ट्रवादी लोप वगैरे काही पावणार नाही, जास्तीत जास्त नाव बदलून तिच लोक पुन्हा सत्ते वर येतील

In reply to by समीरसूर

आजानुकर्ण 02/09/2014 - 16:25
राजकीय गुंडगिरीची आणि त्या सर्व प्रकाराला 'शिवसेनेने आपल्या स्टाईलने/पद्धतीने दिलेले उत्तर' असे गौरवाने संबोधणे या सर्व प्रकाराची सुरुवात करण्याचे श्रेय निःसंशय शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी जसे जातीजातींमध्ये वाद लावते तसा निदान धर्माधर्मांमध्ये वाद लावण्याचे श्रेय शिवसेनेचे आहे. शिवसेनेच्या गुंडगिरीची व्याप्ती तो पक्ष जिथवर पसरला होता तिथवरच होती. आज राष्ट्रवादीच्या गुंडगिरीची व्याप्तीही तो पक्ष जिथवर पसरला आहे तिथवरच आहे. राजकारण म्हणजे गजकरण असे 'मार्मिक' मध्ये सुरुवातीला येत असे. मात्र नंतर काय झाले? कसेही करुन सत्ता मिळवायची हे धोरण शिवसेनेचीही झालेच की. (नामांतर आंदोलनापासून अगदी शिर्डीच्या निवडणुकीपर्यंत रामदास आठवल्यांचा शेलक्या शब्दात उल्लेख 'सामना'मध्ये होत असे). शिवसेनेची आक्रमकता सामान्य लोकांना त्रास देत नव्हती हे तुमचे मत म्हणजे तुम्हाला या आक्रमकतेचा त्रास झालेला नाही एवढेच दिसते. एक उदा. माझ्या एका मित्राच्या वडिलांची वडापावची गाडी कल्याण शहरात होती. तिथल्या मोक्याच्या जागेवर धंदा करण्यासाठी सर्व गाडीवाल्यांना गेली वीस वर्षे 'शाखेला' नियमित 'देणगी' द्यावी लागते. ठाणे-कल्याण परिसरातील शिवसेनेची दहशत तुम्हाला माहीत आहे का? शिवसेनेचा केवळ चेहरा हिंदुत्ववादी नसून त्या पक्षाच्या प्रमुखाला न्यायव्यवस्थेने मुंबईतील दंगलींना जबाबदार ठरवले होते हे विसलात काय? मुंबईतील गणेशमंडळे/दहिहंडीमंडळे ही प्रामुख्याने शिवसेनेच्या नगरसेवकांची वर्षानुवर्षे जहागीर होती. या सर्व कामांना 'समाजसेवा' असेही म्हटले जात असे. असो... कोणाचे उपद्रव मूल्य जास्त आणि कमी हा मुद्दा नाही. राष्ट्रवादी हा शिवसेनेपेक्षा चांगला पक्ष आहे असेही मला म्हणायचे नाही. मात्र या गुंडगिरीच्या राजरोस प्रकाराला एकंदर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य शिवसेनेने केले आहे. बाकी या चांगल्या चर्चेत मला पक्षीय राजकारण आणायचे नव्हते. मात्र Credit should be given where it's due.

In reply to by आजानुकर्ण

बाळ सप्रे 03/09/2014 - 09:42
सहमत.. शिवसेनेच्या गुंडगिरीवरील समीरसूर यांचे भाष्य 'आपला तो बाब्या' स्वरूपाचे वाटले..

In reply to by बाळ सप्रे

समीरसूर 03/09/2014 - 09:55
मी शिवसेनेचा नाही. मी कुठल्याच राजकीय पक्षाचा नाही. :-) त्यामुळे शिवसेना माझा 'बाब्या' असण्याचा प्रश्नच येत नाही. :-) शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कुणा एकाला 'बाब्या' म्हणावे असे माझ्या खास जवळचे असे (उदा. जातीचे वर्चस्व, मोठ्या हुद्द्यावर कुणी जवळचा आप्त, कुणी मंत्री ओळखीचा, वगैरे) काहीच नाही. शेकडो एकर जमिनी, साखर कारखाने, अफाट श्रीमंती, शुद्ध सोने वापरून बनवलेले कोट्यवधींचे शर्ट्स (ते ही नगरसेवकांनी) या ताकदीच्या आधारावर राष्ट्रवादीने आणलेली गुंडगिरी भयंकर आहे एवढेच मला म्हणायचे होते. अशी ताकद शिवसेनाच काय इतर कुठल्याच पक्षात (थोड्या प्रमाणात काँग्रेस वगळता पण काँग्रेसनेही एवढी पराकोटीची गुंडगिरी सामान्यांच्या पुढ्यात आणून ठेवल्याचे स्मरत नाही) आधी कधीच नव्हती. ते श्रेय फक्त राष्ट्रवादीचे. :-)

सस्नेह 01/09/2014 - 15:31
आशयाशी प्रचंड सहमत. आश्चर्य याचे वाटते की सर्व जण सहमत असताना उत्सवात गर्दी कोण बेटे करतात ?

In reply to by सस्नेह

काळा पहाड 08/09/2014 - 19:46
आशयाशी प्रचंड सहमत. आश्चर्य याचे वाटते की सर्व जण सहमत असताना उत्सवात गर्दी कोण बेटे करतात ?
ज्यांना त्यातून कमाई होते असे भूमिपुत्र..

पैसा 01/09/2014 - 15:42
अतिशय सुरेख, वाचनीय लेख! नीलकांतने ज्या उद्देशाने ही लेखमालिका सुरू केली होती, तो उद्देश अशा लेखांतूनच परिपूर्ण होतो! धन्यवाद पेठकर काका!

विजुभाऊ 01/09/2014 - 16:23
धन्यवाद पेठकर काका. मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरेतर प्रत्येकजण धर्माचा आणि त्यातील कर्मकांडाचा सोयीस्कर अर्थ लावत आलेला आहे. ठरावेक दिवशी साइ /बालाजीला जाणे वारीला जाण्याचा इव्हेन्ट करणे इत्यादी अत्यंत फालतु गोष्टीना अवास्तव महत्व आणणे हा मूर्खपणा आपण कधी सोडून देणार आहोत कोण जाणे? या असल्या वेडाचारातून फक्त व्हेस्टेड इन्तेरेस्ट असणारांचेच फावते. सर्वसामान्यांचा मात्र फक्त वेळ आणि पैसा वाया जातो. राधेमा , निर्मल बाबा ,आसाराम हे कमी पडत असावेत की काय हनुमान सुरक्षा कवच ,नजर सुरक्षा कवच असले प्रकार राजरोस टीव्हीवर येत असतात. टीव्हीवर जे दिसते किंवा जे वर्तमान पत्रात छापले जाते ते सर्व खरे असते असे मानणारा एक मोठा वर्ग अजूनही समाजाचा भाग आहे. आपला एकूणच समाज हा अंधश्रद्धेवर पोसला जातोय याचे कोणालाच वाईट वाटत नाहिय्ये. चलाख आस्तिकांचे नेहमीच एक सोप्पे आणि फसवे पालुपद असते के अंधश्रद्ध नको पण श्रद्ध असायला काय हरकत आहे.पण त्या तथाकथीत आस्तिकाना श्रद्धा म्हणजे काय हे विचारले तर मात्र सोयीस्कर मौन किंवा पळवाट शोधली जाते ( उदा : डॉक्टर बरे करेल ही तुमची श्रद्धा असते ना.. पण डॉक्टरवरचा विश्वास हा त्याच्या डिग्री आनि ती डिग्री देणारे विद्यापीठ यावर असतो हे कोणी मान्य करत नाही.) ज्या दिवशी सगळे देव नाहिसे होतील तो खरा सुदिन ..............

इनिगोय 01/09/2014 - 18:28
सुंदर लेख. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या गर्दी खेचण्यात नंबर एक असलेल्या गणेशमंदिरामध्ये असाच मनस्ताप देणारा अनुभव आल्यानंतर मंदिरात जाणे बंदच केले आहे. देवाचा बाजार. भक्तीची किंमत. सगळं रोखठोक. देवदर्शनासाठी पास काढणे हाही प्रकार असाच चीड आणतो. प्राॅब्लेम हा आहे, की हे प्रकार आयोजित करणा-यांना आणि त्यात सहभागी होणा-यांनाही अशा सूज्ञ बोलांनी काही फरक पडत नाही. ते सगळं निर्बुद्धपणे तसंच सुरू राहतं.

हे प्रकार आयोजित करणा-यांना आणि त्यात सहभागी होणा-यांनाही अशा सूज्ञ बोलांनी काही फरक पडत नाही. ते सगळं निर्बुद्धपणे तसंच सुरू राहतं. कारण त्यांच्या व्यवसायाचं मुळ मुद्दल हे भोळे (कींवा मूर्ख) भाविक हे असतं. त्याचा तुटवडा भासू लागेल तेंव्हा राजकारण्यांचे आणि आयोजकांचे दुकान आपोआप बंद पडेल. भक्तांनाच सुबुद्ध करून सोडा.

अनिता ठाकूर 01/09/2014 - 18:57
पेठकरांप्रमाणेच समीरसूरांच्या लेखातील तळमळहि समजते आहे. खरच, ते नट्या-बिट्या अगदी फालतू आहे. आणि तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे असे वाचले वा ऐकले की अगदी शरम वाटते.पण ह्यातले काहीहि कमी वा बंद होणार नाही, उलट हे सगळं वाढतच चाललय.

प्यारे१ 01/09/2014 - 19:05
समाजाला सातत्यानं कुठल्या तरी टेकूची गरज असते. त्यातला एक टेकू म्हणजे सार्वजनिक पूजा अर्चा नि उत्सव. त्या टेकूला सजवणारे स्वतः तथाकथित भक्त आणि राजकारणी, कुठल्याही कारणानं टेकू काढून घेऊ म्हणून भीती घालणारे धर्ममार्तंड आणि त्या टेकूला काढून त्याच्या दुसर्‍या बाजूचा टेकू पकडून ठेवणारे इथंही तथाकथितच विचारवंत नि डोळस लोक. चालायचंच. टेकू लागतातच.

काहीसा असहमत. कर्मकाडांत एखाद्याला आनंद मिळतोच. जसे आमचे काही मित्र मोप दारू पितात, मी जराही पीत नाही परंतु बसणे या कर्मकांडात जो काही आनंद असतो तो घ्यावासा वाटतो. बाकी राहीला प्रश्न दशभुजा गणपती बाहेरच्या भिकार्‍यांचा, तर इतकेच म्हणतो ते भिकारी गरीब नाहीत. त्यांच्या देखील पाळ्या ठरलेल्या असतात. आणि तेही बख्खळ पैसा बाळगून असतात. आणि माझे स्पष्ट मत असे आहे की जर कष्ट करायची तयारी असेल तर कोणावरही भिक मागायची वेळ येत नाही. एक मुलांनी टाकून दिलेला वेड लागलेला म्हातारा आमच्या गल्लीत राहतो. लोक विषेशतः दुकानदार, छोटे हॉटेलवाले त्याला काहीतरी काम सांगतात तो ते करतो (म्हणजे कचरा टाकणे वगैरे ). त्याबद्दल ते त्याला रोज जेऊखाऊ घालतात. म्हणजे कोण ना कोणतरी. त्याला आजवर मी बडबड करताना, शिवीगाळ करताना पाहीले आहे पण भिक मागताना नाही पाहीले. बस्स इतकेच.

सुहास.. 01/09/2014 - 19:19
सल्लारुपी सुंदर लेख पटला . काही मुद्दे .. १ ) अश्या समारंभ ( इव्हेन्ट ) ला वाढत असलेली गर्दी आणि लोकप्रियता ही, विषेशतः तरुणाईची ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. २ ) स्टार माझा सारखं चॅनेल " बाप्पा माझा " हा विषेश कार्यक्रम लावते दरवर्षी , मी एकदा मेघराज पाटील ( कन्टेट एडिटर ) यांच्याशी बोलताना सहज या प्रकारावर भाष्य केले होते. त्या वेळी त्यांनी वापरलेले वाक्य " अश्या ठेवणीतल्या (आजचा सवाल सकट) टिआरपीजन्य कार्यक्रमांना मी एकटा वा चॅनेल जबाबदार नाही, आकडे बघतो आम्ही टिआरपीचे , महाभयानक वाढ झालेली असते, ते किळसवाणे आणि हिडीस असले तरी लोकं रिपीट देखील बघतात, तोच एखादा कृषी - विषयक, जन जागृती विषयक मात्र कोणी बघत नाही, दाभोळकारांविषयी एकुण ११ एपिसोड तयार केले होते, दुसर्‍या भागातच गच्छंती लागली टिआरपी ला !! " ..आपल तर तोंड बंद ...... ३ ) खरच समाजमन बदललयं की सेलीब्रेशन ची पध्दत हेच मुळात कळत नाही, याच मिपावर " प्या बिनधास्त मुंजीला " पासुन ते " साकी शराब पिने दे मस्जिद मैं बैठकर " इथवर झालयं, हे तर केवळ आभासी आंतरजालीय जग, प्रॅक्टीकली मात्र " विचार करा, पुण्याच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये एका माडंवात एक गणपती ठेवला आहे, संगीत नाही की आरास नाही, चार टवाळके दिसणारे नाहीत, आजुबाजुला गर्दी नाही.काय म्हणाल ? अरे इथे मंडळाच कोणीतरी गेलेले दिसतय, गर्दीत अश्या ठिकाणी पाय धजत नाहीत, वाटत काही तरी मिसींग आहे " हे वाक्य माझ्या हाफिसात बसलेल्या शेजारणीचे आहे. सवय झाली असावी. मुंबईत साजर्‍या होणार्‍या आंबेडकर जयंतीला आपण, 'आंबेडकरी' जनता शहरात घाण कचरा पसरवते म्हणून नांवे ठेवतो आणि आषाढीला वारीला मात्र न चुकता हजेरी लावतो. मुसलमानांच्या रस्त्यावरच्या नमाजाला, ध्वनीक्षेपकांना विरोध करतो पण गणेशोत्सव, नवरात्र, जन्माष्टमी आदी मोठ्या हिरीरीने उत्सवात साजरे करतो. आपल्या पदयात्रांप्रमाणे इतर सर्व धर्मियांनी, जाती-जमातींनी त्यांच्या त्यांच्या चालीरिती पाळायच्या ठरवल्या तर आपल्या देशात एव्हढे विविध धर्म, जाती, जमाती आहेत की वर्षभर रस्त्यांवर फक्त पदयात्रा करणारेच दिसतील. रस्ते, महामार्ग वाहनांसाठी बंद करावे लागतील. की इतरांनी त्यांच्या धर्माचे, चालीरितींचे पालन करू नये? ही मुभा फक्त माझ्याच धर्माला असावी का? शिर्डीच्या वाटेवर कफनी, चिमटा, चिलिम बाळगणारे सर्वच साईबाबा असतात का? उत्तरेत तर अनेक साधूंच्या जथ्थ्यात कित्येक गुन्हेगार, गांजेकस, भोंदू माणसांचा भरणा असतो. कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा. >>> या वाक्यासाठी टाळ्या !!

प्रसाद१९७१ 01/09/2014 - 20:09
ह्या उत्सवाच्या निमित्ताने हे दिसुन येत की समाज पूर्ण पणे दोन गटात विभागला गेला आहे. हे जास्त धोकादायक आहे. अतिशय अल्पसंख्य असलेले ( कदाचित ५% ) लोक, ज्यांना हे जे काही उत्सवाच्या निमित्ताने चालू आहे त्याची शिसारी आली आहे. आणि दुसरा ९५% समाज हेच उत्सव Enjoy करतो आहे. हा जो ५% वाला गट आहे तो उरलेल्या ९५% टक्क्यांकडे तुछ्छतेने बघतो आहे आणि ९५% वाला समाज कसा तुम्हा ५% वाल्यांना त्रास दिला असा असुरी आनंद उपभोगतो आहे. गम्मत अशी आहे की हे ५% जे हिंदू उत्सवांना नावे ठेवत आहेत, त्या पैकी ८०-९० टक्के बीजेपी चे मतदार आहेत. माझ्या लहानपणी हे दोन समाजाचे तट बर्‍यापैकी एकत्र होते. तत्वविहीन राजकारण जे ८० सालापासुन आणि काही लोकांपासुन सुरु झाले तेंव्हा पासुन हे दोन समाज दुर होत गेले.

मनिष 01/09/2014 - 20:18
कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा.
अगदी, अगदी!!! मस्त लेख झालाय काका! अगदी मनापासून लिहिलाय हे जाणवतय!

निखळानंद 01/09/2014 - 20:36
बहुतांश मिपाकर लेखाशी सहमत असल्याचे पाहून छान वाटलं.. आपल्या सारखे समविचारी आपल्या आसपास आहेत हे बघून उभारी येते.. पण आपण एवढे सगळे सहमत असूनही उत्सवांचे बाजारीकरण चालू असतेच आणि ते वाढत जाणारच. हा देव, भक्ती, धर्म, संस्कृती चा व्यापार न व्हावा म्हणून आपण काही करू शकतो का? मी मझ्या परीने जे करू शकतो ते करतो - म्हणजे कुठ्ल्याही 'राजा' च्या दर्शनासाठी जात नाही जेणे करून
देवाच्या 'दलालांना' त्यांच्या दुष्कृत्यात बळ देऊ नका
हे पेठकर काकांचे म्हणणे सार्थ होईल.. पण मुळात या दलालांना दुष्कृत्य करण्याचेच बळ येऊ नये म्हणून काही करता येईल का? मिपाकरांची ताकद एकवटून काही होऊ शकेल काय? या निमित्ताने कुणा थोराचे एक वाक्य आठवले -- The world suffers not because of the violence of bad people, but because of the Silence of good people.. विचार करण्याजोगे..

In reply to by निखळानंद

प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी. आपण स्वतः बदलावे. मुलांवर योग्य ते संस्कार करावे. देवाची भिती घालू नये. इश्वरसेवेचा खरा अर्थ समजावून द्यावा. कर्मकांडाचे महत्व बिंबवू नये. सद्वर्तनाचे महत्व वाढीस लागेल असे पाहावे. स्तोत्र, आरत्या ह्यांचे महत्त्व त्यातील उच्चारांना अधोरेखित करून जीभेला वळण लावणे, श्वासावर नियंत्रण आणि स्पष्टोच्चार एवढेच असो द्यावे. देवाचे केल्याने परिक्षेत चांगले मार्क मिळतील, देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणी मुलांच्या गळी उतरवू नये. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन महत्वाच्या बाबींचे महत्त मुलांच्या मनावर बिंबवावे. 'देवाला कांहीतरी 'देऊन' स्वतःसाठी कांही 'मिळवावे'' ह्या विचारांपासून स्वतःला आणि मुलांना अलिप्त ठेवावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यापेक्षा स्वतःपासून करावी! देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणीतून मुक्त व्हावे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टींना पर्याय नाही असा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन राखावा. 'देवाला कांहीतरी 'देऊन' स्वतःसाठी कांही 'मिळवावे'' ह्या विचारांपासून दूर होऊन, देव ही निव्वळ कल्पना आहे ही साधी गोष्ट लक्षात घ्यावी! आयला, पेठकर तुम्ही लिहीलंय म्हणून बरं, माझी पोस्ट असती तर, व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, जनश्रद्धांना दुखावणे आणि (सरते शेवटी), स्वतःला कोण समजता? या वळवणावर गेली असती. मुद्दा तोच आहे पण सगळं श्रेय तुमच्या मांडणीला आहे. या लेखानं का होईना प्रबोधन झालं तर आनंद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 02/09/2014 - 10:02
संक्षी साहेब दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच पण ज्यांचे प्रबोधन व्हायला पाहिजे ते लोक असे लेख वाचतच नाहीत. आता काय करावे? खर तर असे लेख व्हाटस एप्प किंवा तत्सम सार्वजनिक न्यासावर पाठवले पाहिजेत म्हणजे ते वाचणार्यापैकी १ % लोकांनी बोध घेतला तर बरे. नाहीतर तेथेही रोज सकाळ दुपार संध्याकाळ लालबागचा राजा किंवा साईबाबा यांचे दर्शन होत असतेच.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, >>>>>दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच.... मिपा वाचकांना माझे मुद्दे पटले असतील तर ते 'दुर्दैवं' आहे? मी म्हणेन 'सुदैवाने' मुद्दे पटले आहेत. अगदी इथेही १ टक्का वाचकांच्या विचारसरणीत बदल झाला आणि ते खर्‍या अर्थाने भक्तीमार्गावर आले तरी भरून पावलो.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यांना बहुतेक असं म्हणायचं आहे... >>>...दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच पण दुर्दैवाने ज्यांचे प्रबोधन व्हायला पाहिजे ते लोक असे लेख वाचतच नाहीत. आता काय करावे?>>> (असा माझा अंदाज आहे) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 02/09/2014 - 12:36
पेठकर साहेब क्षमस्व एक्का साहेब धन्यवाद आपल्या खुलाश्याप्रमाणेच मला लिहायचे होते. चुकून एक शब्द इकडचा तिकडे झाला

अर्धवटराव 02/09/2014 - 06:36
या सगळ्या तमाशाला एक महत्वाचं कारण म्हणजे माणसाला जीवनाचं सौंदर्य उमगतच नाहि. त्यामुळे आपण त्या सौंदर्याला धक्का लावतोय, ते पायदळी तुडवतोय याची जाणिवच नसते. आणि जिथे सौंदर्यच आकर्षीत करत नाहि तिथे त्या सौंदर्याला अभिव्यक्त करणारी सृष्टीची, समाजाची प्रचंड मशीनरी कशी लक्षात येईल... एव्हढं मस्तं जीवन लाभलय, धडधाकट शरीर आहे, कल्पना करता येणार नाहि इतक्या प्रचंड शक्तीचं भंडार असं मन आहे, आकाशगंगेपासुन ते पार अणुरेणुची चीरफाड करु शकणारी धारदार बुद्धी आहे, दशदिशांना उजळुन टाकणारा विवेकाचा प्रकाश आहे... आणि निव्वळ अत्यर्क अशी कर्मशक्ती-इच्छाशक्ती आहे... हे सगळं दिलं सोडुन, आणि आपल्याला नेमकं काय-कसं-किती हवं याचा काहिही-कसलाही विचार न करता काहितरी 'फिक्स' करुन आपल्या समस्या ( ज्या ९९ टक्के खोट्या असतात )सोडवल्या जाव्यात म्हणुन गोट्या खेळण्याचे हे प्रकार वैचारीक दिवाळखोरी न आणतील तर आणखी काय. लेखातली उदाहरणं निदान दृष्य वैगुण्य तरी दाखवतात. कोरेगावपार्कातल्या हाय-फाय साधुबाबांच्या आणि त्यांच्या प्रवचनाने सिद्धी पावलेल्या मनोरुग्ण महात्म्यांच्या सुरस कथा तर काय वर्णाव्या. असो... तुपाचे दिवे जाळुन सोन्यारुप्याचा लखलखणारा हा प्रकाश मनाच्या अंधारातुन उगम पावतोय. किंबहुना कुठलंतरी बाह्य कृत्रीम झमझ्म लाईटींग लाऊन हा अंधार दूर होईल असाच आक्रोश हि लेखात वर्णन केलेली डोकेदुखी निर्माण करतो आहे. कधि ना कधि त्याचं निराकारण होईल अशी आशा करुया.

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव 02/09/2014 - 10:10
धाग्याच्या टायटलशी काहिसा असहमत आहे... धाग्यात जे काहि लिहीलय ते भक्तीमार्गातले अडथळे नसुन भक्तीमार्ग उमगण्यातील अडथळे आहेत. किंबहुना भक्तीशी या भानगडींचं काहि घेणं देणं नाहि. जि गोष्ट प्रेमाने सुरु होऊन प्रेमातच विलीन होते तिचा मानव समाज वा एकुणच विश्वाच्या पसार्‍याला उपद्व्याप होईलच कसा.... झाला तर फायदाच होईल.

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव, ईश्वरसेवा, ईश्वरभक्ती करताना आपण आणि ईश्वर ह्या मार्गावर, पक्षी: भक्तीमार्गावर, आपले अनेक समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रदा, स्वार्थ, आळस, देवालयांचे व्यापारीकरण, पाप-पुण्याचा विधिनिषेध न बाळगणारे देवालयांचे दलाल, राजकारणी, कर्मकांडांचे अवास्तव महत्त्व वाढविणारी माध्यमे आदी अनेक अडथळे आहेत. ह्या सर्वांना टाळून आपण आपला भक्तीमार्ग निष्कंटक करून थेट देवाची भक्ती करणं ही काळाची गरज आहे असे मला वाटते. जर शीर्षक चुकले असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी. फक्त आशय लक्षात घ्यावा ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 02/09/2014 - 17:55
अहो क्षमा असावी वगैरे इतकं फॉर्मल का होताय... लेखातल्या विचारांशी कुणिही असहमत होणार नाहि. मी फक्त हेच म्हटलं कि हा सगळा तमाशा भक्तीमार्गावरचा नसुन भक्तीमार्गावर न पोचलेल्यांचा आहे. असो.

श्रद्धा, भावनेच्या सहाय्याने उत्सवाचे विकृतीकरण थांबवता येत नाही. यात मुख्य दोष पुरोगाम्यांचा नाही की उत्सवांना ताब्यात घेऊन आपल्या ब्रेड-बटर ला वाईन ची जोड देणार्‍या गुंडपुंडांचाही. दोष आहे तो स्वतःला 'खरे सश्रद्ध' म्हणवणार्‍या, हा सगळा बाजार आम्हाला पटत नै बर्का असा बाऽरीक चिरका सूर काढणार्‍या, पण जेव्हा हे थांबवा म्हणत कुणी बोलू लागतो तेव्हा अचानक २८ इंची छाती ५६ इंची असल्यासारखी ताणून 'आमच्या सणांवर बोलणारे तुम्ही कोण? त्यांना सांगा की.' म्हणत धावून येऊन गुंडाचीच बाजू घेणार्‍या षंढांचा. दुर्दैवानी ही 'आम्ही तुमच्या बाजूचे' असे दोन्ही बाजूंना पटवणारी नि गुंडांना शरण जाणारी कातडीबचावू जमातच बहुसंख्य असल्याने पुरोगामी विचाराच्या मंडळींना हताश होऊन पहात राहण्याखेरीज काही करता येत नाही- लेखन श्रेय मन्दार काळे. फेबु वरुन सभार

In reply to by पिंपातला उंदीर

बाळ सप्रे 02/09/2014 - 11:18
सहमत.. या धाग्यावरपण सहमती आणि तितक्याच उत्साहाने पुण्याची शान असणार्‍या सार्वजनिक गणपतींची भलामण इतर धाग्यांवर !!

विटेकर 02/09/2014 - 11:57
माझा असा अनुभव आहे की , ज्या ज्या क्षेत्रात राजकारणी शिरले , तिथे तिथे त्यांनी डाळ नासली. मग ते बान्धकाम क्षेत्र असो की धार्मिक क्षेत्र, शैक्षणिक असो अथवा पर्यटन ! त्यांनी जाईल तिथे घाण करुन ठेवली. उद्योजकाकडे असणारा स्मार्ट्नेस सामान्य माणसांकडे नसतो आणि त्यामुळे सामान्य माणूस या नालायकांना चार हात दूर ठेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे , उलट त्यांच्या भपक्यांना आणि भूलथापांना सामान्य लोक बळी पडतात , आपसूक त्यांचेच शिकार बनतात. त्यातच राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण ( किंवा उलटे) झाल्याने प्रश्न आता अतिगंभिर झाला आहे. ही घाण हा फक्त भक्तिमार्गातील अडथळा नसून आमच्या जीवनातीलच अडथळा आहे. मतपेटीतून यांना त्यांची जागा दाखवून देणे हाच त्याचा खरा उपाय आहे.

>>>>ही घाण हा फक्त भक्तिमार्गातील अडथळा नसून आमच्या जीवनातीलच अडथळा आहे. मतपेटीतून यांना त्यांची जागा दाखवून देणे हाच त्याचा खरा उपाय आहे. सहमत.

होकाका 02/09/2014 - 13:13
काही प्रतिसादांबद्दल कोणाचे नाव न घेता सांगू इच्छीतो की दोन गोष्टी विसंगत वाटल्या तरी त्यांना एकमेकांसह स्थान नाही असं नाही. समाजात सर्व काही असणारच. गोंदवलेकर महाराजांना एका माणसानं विचारलं ज्ञानी लो़कं सगुण परमात्मा मानत नाहीत पण आपण मात्र सगुणभक्ती आणि नामाचा महिमा सांगता. आंम्ही यातलं खरं काय जाणावं? गोंदवलेकर महाराजांनी एक उदाहरण दिलं: समजा तुम्ही तुमच्या मित्राच्या घराचा पत्ता शोधत आहात. कोणीतरी वाटेत तुंम्हाला सांगतं की इथून सरळ पुढे जा, डावीकडे जा, एक पोस्टाच्या खांब दिसेल, तिकडेच मागे तुमच्या मित्राचं घर आहे. ईश्वराच्या सगुण रुपाचं महत्व या पोस्टाच्या खांबासारखं आहे. जोपर्यंत तुंम्हाला तुमच्या मित्राचं घर कुठे आहे हे माहीत नाही तोपर्यंतच त्या खांबाचं महत्व. तसंच आणि तेवढच प्रतिमेतल्या देवाचं. यापुढे जाऊन एका देवभक्त संताचा अजून असा एक विचार आहे: देव आहे देव आहे जनी बोलावे | देव नाही देव नाही मनी जाणावे || जर कुणी म्हणणार असेल की देव या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे मूर्ख आहेत तर ते त्या म्हणणार्‍या व्यक्तीचं अभिव्यक्तीस्वातंत्र आहे. आणि त्याच न्यायाने जर कोणी अशा मूर्ख म्हणणार्‍याला मूर्ख म्हणणार असेल तर त्यांनाही ते अभिव्यक्तीस्वातंत्र आहेच. आपण असं समजूयात की काही लोकांना देव आहे या संकल्पनेचा आधार वाटतो आणि योग्य ती कॄती करण्याचं मानसिक बळ निर्माण होतं तर त्यात बिघडलं कुठं? त्याच तत्वाने, अजून काही लोकांना देव ही भ्रामक समजूत आहे असं जाणवून योग्य कार्य करण्याची प्रेरणा मिळत असेल तर त्यात बिघडलं कुठं? पण जर यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर निर्बंध आणले जात असतील तर ते व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणं ठरेल. लेख आवडला, पटला.

सखी 03/09/2014 - 00:34
लेख आवडला, पटला, अस्वस्थही करुन गेला. आपल्या समाजाचं हे अंधश्रद्ध चित्र मला फार विचलीत करतं. खरंच, आपण कधीच बदलणार नाही का? हा कळीचा मुद्दा आहे, टिळक, आगरकर, फुले दांपत्य ही फार मोठी नावं झाली. पण कुठेतरी आरंभ जरी झाला तर आजपासुन ५० वर्षांनी चित्र जरातरी सुधारलं असेल अशी आशा करायला हरकत नाही.

चौथा कोनाडा 08/09/2014 - 18:14
सुंदर उद्बोधक लेख ! ||देव आहे देव आहे जनी बोलावे | देव नाही देव नाही मनी जाणावे || -- हे तर खासच ! "देव" या संकल्पनेचा मर्यादित वापर करून खरोखरची समाज"सेवा" करणारे गाडगेबाबांसारखे मोजके थोर संत विरळाच ! खर्‍या भक्तीमार्गाला डावलून "भक्ती"च्याच नावाने भाबड्या लोकांना वापरून स्वतःचा स्वार्थ साधणे की समाजातल्या काही घटकांची, लोकांची मजबूरी आहे. आपल्या सारख्या "डोळस" लोकांनी वेळीच यापासून बाजूला होणे व आपली मते इतरांना पटवून देत राहणे हाच यावरचा उपाय आहे. या संदर्भात चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी उधृत करतो: इथे सर्वजण समजतात स्वतःला शहाणे, आपल्या हातत एकच शांतपणे पाहणे.

In reply to by धन्या

आतिवास 01/09/2014 - 22:21
मार्केटिंग आणि भक्ती यातल्या सीमारेषा पुसट झाल्यात; नीर-क्षीर विवेकाची आज आपल्याला (पुन्हा एकदा) गरज आहे.

चित्रगुप्त 01/09/2014 - 03:03
तळमळीने लिहिलेला उत्तम लेख. मानवी जीवनाच्या अगदी प्रत्येक क्षेत्रात अमाप धंदेबाजी बोकाळलेली आहे. धूर्त धंदेवाल्यांनी आपल्या जीवनाचा पूर्ण कब्जा घेतलेला आहे. ज्याने त्याने स्वतः सावध राहून ('सावधपण सर्वविषयीं') तिच्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. माझ्या वडिलांनी तरूणपणीच घरातले सर्व 'देव' नर्मदेत विसर्जित केले होते, आणि त्यानंतर ते कधीही कोणत्या मंदिरातही गेले नाहीत, बाबा-स्वामींचा तर प्रश्नच नाही. हीच परंपरा आमच्या घरात चालत आली. मला तर हे हजारो-लाखो लोक असल्या ठिकाणी कडमडायला मुळात जातातच का, याचेच नेहमी आश्चर्य वाटते.

In reply to by चित्रगुप्त

विलासराव 01/09/2014 - 08:44
माझ्या वडिलांनी तरूणपणीच घरातले सर्व 'देव' नर्मदेत विसर्जित केले होते त्यामुळेच आम्च्यासारखे अश्रद्धावान नर्मदेची परीक्रमा करतात.

तळमळीने लिहिलेलं थेट अंतःकरणाला भिडलं. माध्यमिक शाळेत असल्यापासून मी गर्दी असणार्‍या देवदर्शनाला जाणे बंद केले ते अजुनही पाळतोय. अमेरिकेतील हिंदू मंदिरांची कार्यपद्धती जवळून पाहिली आहे. स्वकष्टाने उद्योग / व्यवसाय उभा करणार्‍या कुणालाही हेवा वाटेल असे त्यांचे बिझनेस मॉडेल असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अमेरिकेतील हिंदू मंदिरांची कार्यपद्धती जवळून पाहिली आहे. स्वकष्टाने उद्योग / व्यवसाय उभा करणार्‍या कुणालाही हेवा वाटेल असे त्यांचे बिझनेस मॉडेल असते. अमेरिकेतच कशाला भारतही बिझनेस मॉडेलच्या बाबतीत आजिबात मागे नाही. मात्र स्थळ-काळ-परिस्थिती यामुळे या दोन मॉडेल्सच्या बाह्यरुपात फरक झाले आहेत... पण गाभ्याला फारसा धक्का न पोचवता *HAPPY* देवळात चकचकीतपणा आणि स्वच्छतेचा अभाव असतो... पण या दोन गोष्टी नसल्या तरी भारतात भाविकांच्या संखेवर काही परिणाम होत नाही. म्हणून तो खर्च अनावश्यक समजला जातो. फिनान्शियल ऑप्टिमाझेशन ते हेच नव्हे काय? पूर्ण फिजिबिलिटी स्टडी केल्याशिवाय आणि कॉस्ट-बेनेफिट (खर्च / गल्ला) रेशो असल्याशिवाय मंदिर बांधले जात नाही. उगाच काय आजकाल नविन मंदिरांतील देवाच्या निवडीत साईबाबा आणि बालाजी हे पुढे आहेत आणि राम-कृष्ण-शिव-गणेश मागे पडलेत ?! :) ;) पण इतके सगळे असले तरी हिंदू मंदिरे आणि एकंदरीत हिंदू धर्म हे वैयक्तिक किंवा फारतर छोट्या समुहांच्या प्रयत्नांवर जास्त अवलंबून आहेत. ख्रिश्चन चर्च आणि इस्लाम उम्मा यांच्या शतकानुशतके चालू असलेल्या जागतिक संघटनकौशल्याच्या ते पासंगालाही पुरणार नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ 01/09/2014 - 19:54
+१२३४५६. चिकनच्या ठोक विक्रेत्याचं प्रति ... मंदीर. माजी आमदाराचं प्रति ...बाबा मंदीर. आम्ही विकेण्डला जातो. पाया पडतो, कृतकृत्य होतो. मज्जानु लाईफ. बाकी ते जागतिक संघटनकौशल्याबाबत हज्जारदा सहमत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यावरून एक किस्सा आठवला. सेन्ट लुईसला एकदा लोकल ट्रेनमधून जात असताना एक तरूण भेटला. तो नुकताच भारतात जाऊन आला होता. तो सांगत होता की त्याचे वडील भारतातील चर्चमध्ये गुंतवणूक करतात. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. हे बिझनेस मॉडेल नेमके कसे काम करते याबद्दल कुतूहल आहे. बाकी भारतात मी एकाच घरात तीन तीन धर्म पाळले गेलेले पाहिले आहेत. आर्थिक फायदा हा त्यामागे केंद्रस्थानी असतो असे निरिक्षण आहे.

In reply to by कवितानागेश

समीरसूर 02/09/2014 - 11:59
एक बालाजी/साई बाबा/हनुमान/शंकर/वैष्णोदेवी यांचे मंदिर उभारायचे. हा सगळ्यात सोपा मार्ग. देव नॅशनल (इंटरनॅशनल) अपील असणारा हवा. प्रदेशिक देवांच्या मंदिरात कमाई फारशी नाही. म्हणूनच दत्त, खंडोबा, स्वामी समर्थ आदी मंदिरे इतकी श्रीमंत नाहीत. स्टार लेव्हलचा देव असला की मंदिर आपसूकच ग्लॅमरस बनते. उद्घाटनाला एखादा सेलिब्रिटी बोलवायचा. भरपूर जाहिरात करायची. हळूच 'नवसाला पावणारा' अशी बातमी सोडून द्यायची. दगडूशेठ गणपती हा पूर्वी (९० च्या दशकात) नवसाला पावणारा म्हणून फेमस नव्हता. गेल्या १०-१२ वर्षात जोरदार मार्केटिंग करून त्याला हे बिरूद मिळाले आहे. त्यासाठी बिझनेस डेवलपमेंट ऑफीसर्स नेमायचे. त्यांना क्लायंट्स आणायला सांगायचे आणि त्यावर ५% कमिशन द्यायचे. काही मोठी माणसे भक्त म्हणून नेमायची. गरज पडल्यास दान पेटीतला कट त्यांना द्यायचा. मंदिरात चविष्ट असा प्रसाद अहोरात्र ठेवायचा. जसा तिरुपती बालाजीचा लाडू प्रसिद्ध आहे तसलं काहीतरी स्पेशल ठेवायचं. ब्रँड डेवलप करण्यात प्रसाद मोठी भूमिका बजावतो. काजूकतली किंवा पिस्ता बर्फी असा तगडा प्रसाद ठेवायचा. आंडू-पांडू साखरफुटाणे वगैरे नाही ठेवायचे. सुरुवातीचा खर्च गुंतवणूक म्हणून नेटाने करत रहायचा. मंदिरासाठी सुरुवातीला कुठेतरी आडवळणाला ५०० स्क्वे. फू. जागा पुरेशी आहे. नंतर ती आपसूकच वाढत जाते. सगळ्या मिपाकरांनी मिळून दहा-दहा हजार रुपये काढले तर असे एक छानसे मंदिर सहज उभे राहू शकते. गुंतवणुकीच्या प्रमाणात मंदिराच्या उत्पन्नाचा शेअर वाटून घेण्याचे ठरवून टाकायचे. मंदिरात छान-छान भजने सतत चालू ठेवायची. एक दिवा/धुनी सतत पेटत ठेवायचे. समोर एका सुरेख बोर्डावर त्याची कपोलकल्पित कहाणी लिहायची. "श्री ---- यांच्या या पवित्र देवळाच्या बांधकामासाठी पाया खोदतांना या जागेवर जमिनीच्या आठ फूट खाली एक पुरातन समई सापडली. समई बाहेर काढताच ती तेवत असल्याचा भास सगळ्यांना झाला. नंतर त्या समईची विधीवत पूजा करून ज्योत पेटवण्यात आली. समईमधले तेल संपले तरी समई अखंड तेवत असते. ही श्री ---- यांची किमया! त्यांच्या या कृपेचा प्रसाद आपणा सर्वांवर अखंड बरसत राहो ही प्रार्थना!" अशी ष्टोरी लिहिली की मंदिर फेमस व्हायला वेळ लागणार नाही. अशी समई सापडेल अशी व्यवस्था पाया खोदण्याच्या आधी करून ठेवावी. अजून एखादे वैशिष्ट्य डेवलप केल्यास ब्रँड व्हॅल्यू कैक पटीने वाढेल. उदाहरणार्थ १००१ वेळा विशिष्ट मंत्राचा जप पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात उपाशीपोटी बसून केल्यास घरातल्या सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते किंवा उपास करून देवाचे दर्शन घेतल्यानंतर अन्नदान केल्यास घरादाराला बरकत राहते वगैरे वैशिष्ट्य हळूहळू एस्टॅब्लिश करत जायचे. त्यासाठी सुरेख अभिनय करणारे भोळे भक्त वाटणारे एजंट्स नेमायचे. मंत्र नवीन शोधून काढायचा. नेहमीच्या मंत्रामुळे भक्त इंप्रेस होतीलच असे नाही. मिळणारे फळ मोघम ठेवायचे. म्हणजे आरोग्य चांगले राहील किंवा बरकत राहील वगैरे. तात्काळ मिळणारी स्पेसिफिक फळे मेनु मध्ये ठेवू नयेत. अशी फळे न मिळाल्यास लोकांचा विश्वास उडण्याचा धोका असतो. अशा ष्टोर्‍या प्रसिद्ध झाल्या की मग मस्त ब्रँड तयार होईल. अधून-मधून धार्मिक कार्यक्रम घेत रहायचे. सेलिब्रिटीजना बोलवत रहायचे. अगदी सुरेखा पुणेकर, बाबासाहेब पुरंदरे, राजकुमार तांगडे, सई ताम्हणकर, राखी सावंत, परिणीती चोप्रा, पूनम पांडे, माधुरी पुरंदरे, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, भाई वैद्य (थोडा निराळा कार्यक्रम ठेवून), मेधा पाटकर, भैय्युजी महाराज, सैफ अली खान, जेनेलिया डिसुझा, मानसी नाईक, बाबा आढाव, शमसुद्दीन तांबोळी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिंधूताई सपकाळ, सुरेश कलमाडी, अनिल शिरोळे, जितेंद्र आव्हाड असे सगळ्यांना बोलवायचे. कुठलाच भेदभाव ठेवायचा नाही. दहा वर्षात आपण सगळे मर्सिडीझ मधून फिरत असू. मला 'नोकरी बदलायची आहे' असं आर्जव टाकण्याची गरज पडणार नाही. :-) एकच अडचण आहे; हे सगळं करण्यासाठी जे मन लागतं ते कुठून मिळवायचं? बाकी सब तो चुटकी में अरेंज हो जायेगा... :-)

विलासराव 01/09/2014 - 08:50
काकांची आमच्या लालबागच्या राजावर श्रद्धाच नाही दिसत.अहो काल तर ५-१० मीनीटात दर्शन देत होता राजा(पावसाच्या कृपेमुळे). लेखाशी सहमत . अवांतरः परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. (हे स्वतः करणे हे फार अवघड असल्याने हे फक्त उपदेशामृत म्हनुन वापरावे) स्वतः बदला जग बदलेल. (अर्थातच आपल्यापुरते).

In reply to by विलासराव

आयुर्हित 08/09/2014 - 23:25
लालबागचा राजाने ह्या १० दिवसात फक्त ७ करोड रुपये दान पेटीतुन मिळवले आहेत. कॄपया "लालबागचा राजा" गणपती मंडळाचे गेल्या वर्षाचे "बॅलँस शीट" कोणी डकवू शकेल काय?

नाखु 01/09/2014 - 09:23
स्वीकारा .रोख्ठोक. शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी हेच खरे. अवांतर :बाकी "अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात असे निरिक्ष्ण आहे.

In reply to by नाखु

"अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात समाजातील विविध आर्थिक पातळीवरच्या व्यक्ती मनी भक्तीभाव बाळगत असतात. प्रत्येकाला आपला आर्थिक स्तर उंचवायचा असतोच. वाढत्या महागाईने सर्वच जण बेजार आहेत. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना परमेश्वराची साथ मिळाली तर नशिब बदलून इप्सित साध्य होईल इतका साधा विचार त्या मागे असतो. पण सर्व भाविक आर्थिक फायद्याच्याच मागे असतात असेही नाही. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रियां स्वतःला फार असुरक्षित समजत असतात. हि असुरक्षितता नेहमीच आर्थिक नसते, भावनिक ही असते. नवरा मनाविरुद्ध वागत असतो, मुलं अभ्यासात प्रगती करीत नसतात, कधी आयुष्याकडून अपेक्षाच जास्त असतात, कधी घरच्यांची आजारपणं, असाध्य व्याधी काहीही असतं. 'असुरक्षिततेची' ही वेगवेगळी रुपं कुठल्याही, मनाने कमजोर, व्यक्तीला घाबरवितात. पण स्त्री वर्ग ह्या भक्तीभावात सर्वात जास्त बुडालेला दिसतो. पुरुष मंडळी त्या मानाने, मनाने कमी आणि कर्तव्य म्हणून जास्त गुंतलेली असतात. हे वाईट नाही पण ईश्वरावरील परावलंबित्व चुकीचं आणि भक्ताची विचारशक्ती, सारासार बुद्धी बधीर करणारं असेल तर समस्या निर्माण होतात. मी जेव्हढं देवासाठी जास्त जास्त करेन तेव्हढं आयुष्यात देव मला भरभरून देईल हा विचार घातक आहे. देवावर श्रद्धा असू दे, भक्तीभाव असू दे पण त्याला पैशात तोलू नका. इश्वराला पैसे, सोने-चांदी, खाद्य पदार्थ अर्पण करू नका. दोन हात जोडून मस्तक टेका आणि मनोमन प्रार्थना करा. तुमचे मनोबल वाढायला एव्हढेच पुरेसे आहे. घरातल्या देवाच्या तसबिरीसमोर साधं गुळ-खोबरं, दुध साखर ह्याहून जास्त काही करावे लागत नाही. बाकी, तुमच्या समस्या दूर करायला 'तुम्ही स्वतःच' शर्थीचे प्रयत्न करा आणि मिळणार्‍या यशावर समाधानी राहा. शिवाय देव एके ठिकाणी (देवळात, तिर्थक्षेत्री) नाही तर चराचरास व्यापून आहे कुठल्याही दिशेने 'मनापासून' नमस्कार करा तो देवाला पोहोचतोच पोहोचतो. त्यासाठी लालबागच्या गणपतीसमोर रांगा लावाव्या लागत नाहीत की शिर्डीला साईचरणी धाव घ्यावी लागत नाही. परस्परांचा सन्मान करा, निसर्गाचा सन्मान करा, गोर गरीबांना यथाशक्ती यथामती मदत करा की तुमची इश्वरसेवा परिपूर्ण झाली. देवाच्या 'दलालांना' त्यांच्या दुष्कृत्यात बळ देऊ नका. एव्हढंच माझं म्हणणं आहे.

In reply to by नाखु

धन्या 01/09/2014 - 14:52
बाकी "अतिरिक्त (?)" उत्पन्नवाले ज्यास्ती "दान-धर्म्-पूजा-अर्चा" विषेशतः "साई-बालाजी" करताना दिसतात असे निरिक्ष्ण आहे.
अवतरणात टाकलेल्या अतिरिक्त शब्दांत तुम्हाला काय अभिप्रेत आहे हे माहिती नाही. मात्र आयटीवाल्यांमध्ये हे साई-बालाजीचे फॅड खुप आहे. विकेंडला साई किंवा बालाजीला जाऊन देवदर्शन अधिक आऊटींग अशा दोन गोष्टी साधायच्या, फेसबुकवर फोटो टाकायचे, ऑफीसला आल्यावर फ्लोअरला "प्रशाद अ‍ॅट माय डेस्क" म्हणून मेल टाकायची. :)

In reply to by बाळ सप्रे

अतिरिक्त उत्पन्न म्हणजे "सर्व आवश्यक खर्च करून उरलेले उत्पन्न म्हणजेच डिस्पोझेबल इन्कम" असा अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो.

In reply to by धन्या

नाखु 02/09/2014 - 08:57
नावारूपाला येण्यास "सिनेमा-मंडळी/बिल्डर/राजकारणी" अशीच मांदियाळी आहे. परिचयातील खाजगी कंपनीतील हमखास"वरकमाई" करणार्या लोकांचा एक ग्रुप दरवर्शी बालाजी दर्शन करतोच. आणी आल्यावर आम्ही कसे अन्न्दान केले/रांगेत थांबलो याच्या सुरस कथा इतर नास्तीकांना (त्यांच्या दृष्टीने नास्तीक) एकवत असतो. मात्र आयटीवाल्यांमध्ये हे साई-बालाजीचे फॅड खुप आहे. + यास प्रचंड सहमत.

स्पा 01/09/2014 - 10:33
रोखठोक लिखाण. ण पटण्यासारखे काहीच नाही ऑफिस ला लागून लालबाग आहे.. तरीही जावेसे वाटत नाही

vikramaditya 01/09/2014 - 11:03
मनापासुन लिहिलात. कोणत्याही leading daily मध्ये प्रकाशित व्हावा अशा तोडीचा लेख आहे. जो विषय घेतलात त्याला पूर्ण न्याय दिलात. (१२ वर्षाखालील मुलांना उंच थरावर चढु न दिल्याने कुठल्या संस्क्रुतीचा -हास होतो हे केवळ राजकारण्यांनाच ठाउक.) अतिशय समतोल विचार मांडलेत. मुख्य म्हणजे भक्तिमार्ग आणि ईश्वरप्राप्ती ह्यातिल ढोंग,भ्रष्टाचार, अराजकता, अंधानुकरण ह्यावर कडाडुन हल्ला चढवलात, परंतु भक्तिमार्ग आणि ईश्वरप्राप्ती हे थोतांडच आहे ('मी सांगतो म्हणुन') असला आक्रस्ताळी पवित्रा घेतला नाहीत. हे फार अभिनंदनीय आहे.

In reply to by vikramaditya

हे म्हणजे आक्ख्या भक्तीमंडळावर जोड्यांची पुष्पवृष्टी झाली. आणि भक्तगण हसत मुखानं म्हणतोयं `सगळ्यांनाच बसले, त्यात काय विषेश, हॅ! हॅ! हॅ ! .... आणि सगळे पुन्हा... भक्तीभावानं रांगेत उभे!

In reply to by संजय क्षीरसागर

व्वा! काय सुंदर उपमा आहे हो! आधी होते जोडे मग त्यांची झाली पुष्पं आणि मग झाली त्या पुष्पांची वॄष्टी... मला तर आता या अभिजात साहित्याचा आस्वाद घेत आनंदाने छानसं ओरडावसं वाटतंय .... हॉSकूSSS हॉSकूSSS हॉSकूSSS .

कंजूस 01/09/2014 - 11:15
चरणी सादर प्रणाम. आणखी काय लिहिणार? भक्तीमार्ग पुरे म्हणण्याची वेळ आली आहे. विघ्नकर्ता त्यात विघ्न आणण्यास समर्थ आहे. तरी कार्यात आपली अनुपस्थिती आवश्यक आहे हीच विनंती.

मस्त लेख ! या जगात "चलाख आस्तिकाने" नेहमीच "आस्तिकावर" मात केली आहे कारण चलाख आस्तिकाचे अंतिम लक्ष व्यक्तिगत फायदा असते... त्यासाठी जरूर ते सर्व मार्ग चोखाळायला त्याची तयारी असते... आस्तिकतेचा अधिकाधिक आकर्षक देखावा करणे हे त्यातले एक प्रभावी मार्केटींग टेक्निक आहे.

स्मिता. 01/09/2014 - 15:13
काका, अगदी रोखठोक लिहिलंय. लेख वाचतांना असं वाटलं की त्यातला शब्दन् शब्द माझ्या मनातला आहे. अर्थातच लेख १००% पटला. या लेखाचा दुवा माझ्या फेसबूक भिंतीवर देतेय. किती लोक लेख पूर्ण वाचतील आणि त्यातले किती अंमलात आणतील याची काहीच खात्री नाही. तरी मी आपला खारीचा वाटा उचलणार!

समीरसूर 01/09/2014 - 15:29
लेख खरंच खूप पोटतिडकीने लिहिला आहे. विचारांशी सहमत आहे. मला तर आपल्या अतिउत्सवी वातावरणाचा भयानक कंटाळा आलाय. दहीहंडी हा प्रकारच कायद्याने बंद करायला हवा. आपल्या इथे वाईट खोड अशी आहे की आपण प्रत्येक घटनेचं, भावनेचं उत्सवीकरण करतो. आणि मुळात आपण इतरांचा आदर करणारे, इतरांना आपल्या कुठल्याही गोष्टींमुळे त्रास होणार नाही याची काळजी घेणारे, शांतता बाळगणारे असे कधीच नव्हतो आणि पुढचे ५०० वर्षे होणार नाही. कुठलाही सण आला की आसपासच्या भागात भयंकर अशांतता माजवून अघोरी पद्धतीने सेलिब्रेशन करणे म्हणजे सणांचे चैतन्य अशी भयानक समजूत आपण करून घेतली आहे. लाख-दोन लाख फेकले की सिनेमातल्या नट्या नाचायला येतात; दहीहंडीमध्ये भाग घेणारे सगळेच एकजात टवाळखोर असतात; त्यांना फूस लावणारे राजकारणी त्याहून जास्त टवाळखोर असतात; सगळा हरामाचा पैसा असतो; अतिशय अश्लाघ्य उन्माद, बेताल वागणे हे सगळे राजरोसपणे दाखवण्याची माध्यमे म्हणजे दहीहंडी, गणेशोत्सव वगैरे सण! आपल्या जनतेचा तेवढाच दोष आहे. त्यांना देखील असला थिल्लरपणा आवडतो. सनी लिओन आली की जातात जिभा बाहेर कढून तिला बघायला. जसं काही यांना ती अलिंगनच देणार आहे. नट आणि नट्यांना बघायला जाणार्‍या लोकांच्या बुद्ध्यांकाविषयी मला जबरदस्त शंका आहे. नट-नट्यांना काय पहायचं? असे काय तीर मारलेले असतात त्यांनी? पण आपली बिनडोक जनता जाते. जितेंद्र आव्हाडसारखे मुजोर आणि हलकट नेते कायदा धाब्यावर बसवून पोलिसांच्या नाकावर टिच्चून एक-एक नियम मोडतात आणि वरून अरेरावी करतात. दहीहंडीसारख्या उत्सवावर लाखो रुपये खर्च होत असतांना जनतेच्या लक्षात हे नाही येत की हा पैसा यांनी त्यांच्याच खिशांवर डल्ला मारून उडवलेला असतो. म्हणून तर इतका पैसा दहीहंडीसारख्या सणावर खर्च करतांना असल्या फालतू नेत्यांना दु:ख होत नाही. काल झी मराठीवर कुठलातरी फालतू कार्यक्रम सुरू होता. सुरेखा कुडची अतिशय भयंकर मेकप करून अतिशय घाणेरडे, किळसवाणे अंगविक्षेप करून कुठल्यातरी फालतू लावणीवर तितकाच फालतू नाच करत होती. लहान मुलांसोबत बघायला लाज वाटावी असला थिल्लर प्रकार चालू होता. आणि प्रेक्षक धुंद होऊन नाचत होते. लहान लहान मुले कंबर हलवून हलवून नाचत होती. असं असल्यावर भविष्य काय असणार हे सांगायची गरज नाही. मुळात तमाशा, लावणी वगैरे लोककला राहिलेत का हे तपासाण्याची वेळ आलेली आहे. तमाशा आणि लावणीच का बदनाम आहे? कथ्थक किंवा भरतनाट्यम का बदनाम नाही? तमाशाला कुणी सहकुटुंब जातांना का दिसत नाही? तमाशा बघायला जाणे म्हणजे काहीतरी वाईट असे का आहे? मराठी नाटक बघायला जाणे वाईट का समजले जात नाही? हे प्रश्न थेट विचारून तमाशा आणि लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे हा समज पूर्णपणे मिटवायला हवा. असला थिल्लर आणि निर्लज्ज प्रकार एका पुरोगामी राज्याची लोककला कसा काय असू शकतो हे कणखरपणे विचारून सत्य स्वीकारले गेले पाहिजे. पण आजकाल उत्सवीकरणाच्या नादात कुणालाच भान नाहीये की आपण काय पेरतोय. गणेशोत्सवाची तशीच तर्‍हा! पण उत्सवातले, सणांमधले चैतन्य, ऊर्जा, नवीन हुरूप देणारा सळसळता उत्साह वगैरे गोड शब्दांखाली हा सगळा ओंगळ प्रकार सहन करावा लागतोय. टीव्हीने तर हा सगळा प्रकार अगदी डोक्यावर घेतलाय. आमच्या घराजवळ मोठी दहीहंडी आयोजित केली होती. कुठल्यातरी नटीला बोलावले होते. संध्याकाळी ५ वाजेपासूनच रस्ता बंद ठेवला होता. स्पीकर्सच्या भिंती रचून ५ वाजेपासूनच कानठळ्या बसाव्यात अशा आवाजात फालतू गाणी चालू होती. आयोजकांचे टोळके दादा असल्यासारखे फिरत होते. रात्री ११ पर्यंत हा टुकारपणा चालू होता. आमच्या भागात जाणारा हा एक मुख्य रस्ता होता. तो संपूर्णपणे बंद होता. दुसरा रस्ता लांबून होता. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शाळांच्या बसेस, रिक्शा वगैरेंना खूप त्रास झाला. "थोडा त्रास झाला तर काय फरक पडतो; सहन करायचा" ही आणखी एक मुजोरी. कुणी चकार शब्द बोलू शकत नाही. बोलला त्याला मारून मारून अर्धमेला करू अशी मस्ती सगळ्यांच्या डोळ्यातून झिरपत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय (किंबहुना शरद पवारांसारख्या नेत्याचा उदय म्हटले तरी चालेल) ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची सगळ्यात मोठी शोकांतिका!! त्यामुळे बाकीचे पक्ष देखील गुंडगिरी करायला सरसावले. आणि राष्ट्रवादीनेच ही गुंडगिरी रस्त्यांवर आणि लोकांच्या उंबरठ्यांपर्यंत नेली. सामान्य जनतेचं जगणं हराम करून टाकलं राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी गुंडांनी. असो. हे बदलणं शक्य नाही. त्यामुळे निमूटपणे सहन करायचं आणि जमेल तसं स्वतःला आणि आपल्या लोकांना वाचवायचं. अजून दुसरं काहीच शक्य नाही. :-(

In reply to by समीरसूर

आजानुकर्ण 01/09/2014 - 20:53
लेख व वरील प्रतिसाद आवडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय (किंबहुना शरद पवारांसारख्या नेत्याचा उदय म्हटले तरी चालेल) ही महाराष्ट्रातल्या राजकारणाची सगळ्यात मोठी शोकांतिका!! त्यामुळे बाकीचे पक्ष देखील गुंडगिरी करायला सरसावले. आणि राष्ट्रवादीनेच ही गुंडगिरी रस्त्यांवर आणि लोकांच्या उंबरठ्यांपर्यंत नेली. सामान्य जनतेचं जगणं हराम करून टाकलं राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी गुंडांनी.
यात थोडीशी दुरुस्ती करावीशी वाटते. महाराष्ट्रापुरती राजकारणातील आणि रस्त्यावरील राजरोस गुंडगिरीची सुरुवात राष्ट्रवादीने केली नसून ती शिवसेनेने केली आहे. याचेच एक उदा. म्हणजे खुनाचे आरोप असलेली राण्यांसारखी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसवणे. या सर्व गोष्टींची जनतेला फिकीर नसल्याचे इतर राजकीय पक्षांच्या लक्षात आल्यावर पुढे त्यांनीही तोच कित्ता गिरवला.

In reply to by आजानुकर्ण

समीरसूर 02/09/2014 - 10:05
आपल्याशी काही अंशी सहमत असलो तरी शिवसेनेच्या गुंडगिरीची व्याप्ती बर्‍याच अंशी मर्यादित होती. जनसामान्यांच्या रोजच्या जगण्यात अडथळा येईल अशी गुंडगिरी नव्हती शिवसेनेची. शिवाय शिवसेनेने नाही म्हटलं तरी बरीच विधायक कामे देखील केली आहेत. काही कारणांमुळे शिवसेनेला आक्रमक भूमिका त्या काळात घ्यावी लागली. नंतर अर्थात त्यात गुंडगिरी आली असली तरी थेट सामान्यांच्या जगण्याशी त्याचा फारसा संबंध नव्हता. राष्ट्रवादीचा पायाच शेकडो एकर जमिनींची मग्रूर मालकी, अफाट पैसा, पराकोटीचा जातीभेद, सरळ हाणामारी आणि धमकी, साखर कारखाने, वगैरेंसारख्या माजोर्ड्या तत्वांवर आधारलेला आहे. कसेही करून सत्ता मिळवायची फक्त हेच त्यांचे धोरण राष्ट्रवादीचे राहिले आहे. त्यासाठी गुंडगिरी आणि जातीभेदाचे विष पेरणे देखील राष्ट्रवादीने त्याज्य मानले नाही. कुठलाही विधीनिषेध न बाळगता फक्त सत्तेवर आणि संपत्तीवर डोळा ठेवून अमाप भ्रष्टाचाराचे राजकारण करण्यातच राष्ट्रवादीने धन्यता मानली. पुणे, पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनींच्या बळावर मुजोर बनलेल्या धनदांडग्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली आणि त्यांची समाजविघातक तत्वे पोसली. शिवसेना हा पक्ष बहुतांशी सामान्य लोकांचा होता. त्यात धनदांडगे क्वचित होते. अमाप संपत्तीचे ओंगळवाणे राजकारण शिवसेनेत कधीच नव्हते. त्यामुळे त्यांची आक्रमकता खूपच मर्यादित राहिली. त्यांची ही आक्रमकता सामान्य लोकांचे जगणे हराम करून नाही गेली. शिवाय शिवसेनेने कधी जाती-जातींमध्ये तेढ माजवल्याचे ऐकले नाही. अठरापगड जातीची माणसे शिवसेनेत होती. नाही म्हणायला त्यांचा हिंदुत्ववादी चेहरा होता परंतु त्याच्यामुळे फार दुही माजली असे म्हणता येणार नाही. शिवसेना राष्ट्रवादीच्या तुलनेत खूपच मवाळ आणि सोवळी होती. राष्ट्रवादी मात्र भयंकर विषारी आहे. त्यांची तत्वेच मुळात चुकीची आहेत. म्हणून शिवसेना इतकी वर्षे टिकली, फोफावली. राष्ट्रवादी १५ वर्षात लोप होण्याच्या मार्गावर आहे. आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपणे अत्यंत आवश्यक आहे. ६-जुलै-२०१४ च्या लोकसत्ता मध्ये संजय पवारांनी अतिशय परखड शब्दात राष्ट्रवादी-मुक्त महाराष्ट्राची गरज व्यक्त केली होती. फेसबुकवर तो लेख अजूनही असेल. लोकसत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीमधून तो अचानक गायब झाला. साहजिकच राष्ट्रवादीच्या दमदाटीमुळेच तो काढून टाकण्यात आला असावा. तो लेख शरद पवारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा होता. तो लेख कुठे मिळाल्यास सगळ्यांनी अवश्य वाचावा. अगदी सडेतोड भाषेत संजय पवारांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची आणी त्यांच्या बीभत्स राजकारणाची हजेरी घेतली आहे. शिवसेनेचे उपद्रव मुल्य राष्ट्रवादीच्या उपद्रव मुल्यापुढे क्षुल्लक आहे. शिवसेनेत चार चांगल्या गोष्टी देखील होत्या/आहेत. राष्ट्रवादीमध्ये बारकीशी गोष्ट देखील कधीच चांगली नव्हती आणी पुढेही कधीच नसेल.

In reply to by समीरसूर

प्रसाद१९७१ 02/09/2014 - 10:46
म्हणून शिवसेना इतकी वर्षे टिकली, फोफावली. राष्ट्रवादी १५ वर्षात लोप होण्याच्या मार्गावर आहे.>>>>>>> राष्ट्रवादी बद्दल च्या तुमच्या मताशी १००% सहमत असुन ही हे सांगावेसे वाटते की एखादी गोष्ट बरीच वर्ष टीकली म्हणजे ती चांगली असेलच असे नाही आणि लोप पावली म्हणजे वाईट असेल असे नाही. गेल्या १० वर्षात राष्ट्रवादी फोफावली म्हणजे तेंव्हा ती चांगली होती का? तुम्ही म्हणताय ती शिवसेना २० वर्षापूर्वीच लोप पावली. आता तिच्यात आणि राष्ट्रवादीत काही फरक असेल तर १९-२० चा च. राष्ट्रवादी लोप वगैरे काही पावणार नाही, जास्तीत जास्त नाव बदलून तिच लोक पुन्हा सत्ते वर येतील

In reply to by समीरसूर

आजानुकर्ण 02/09/2014 - 16:25
राजकीय गुंडगिरीची आणि त्या सर्व प्रकाराला 'शिवसेनेने आपल्या स्टाईलने/पद्धतीने दिलेले उत्तर' असे गौरवाने संबोधणे या सर्व प्रकाराची सुरुवात करण्याचे श्रेय निःसंशय शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी जसे जातीजातींमध्ये वाद लावते तसा निदान धर्माधर्मांमध्ये वाद लावण्याचे श्रेय शिवसेनेचे आहे. शिवसेनेच्या गुंडगिरीची व्याप्ती तो पक्ष जिथवर पसरला होता तिथवरच होती. आज राष्ट्रवादीच्या गुंडगिरीची व्याप्तीही तो पक्ष जिथवर पसरला आहे तिथवरच आहे. राजकारण म्हणजे गजकरण असे 'मार्मिक' मध्ये सुरुवातीला येत असे. मात्र नंतर काय झाले? कसेही करुन सत्ता मिळवायची हे धोरण शिवसेनेचीही झालेच की. (नामांतर आंदोलनापासून अगदी शिर्डीच्या निवडणुकीपर्यंत रामदास आठवल्यांचा शेलक्या शब्दात उल्लेख 'सामना'मध्ये होत असे). शिवसेनेची आक्रमकता सामान्य लोकांना त्रास देत नव्हती हे तुमचे मत म्हणजे तुम्हाला या आक्रमकतेचा त्रास झालेला नाही एवढेच दिसते. एक उदा. माझ्या एका मित्राच्या वडिलांची वडापावची गाडी कल्याण शहरात होती. तिथल्या मोक्याच्या जागेवर धंदा करण्यासाठी सर्व गाडीवाल्यांना गेली वीस वर्षे 'शाखेला' नियमित 'देणगी' द्यावी लागते. ठाणे-कल्याण परिसरातील शिवसेनेची दहशत तुम्हाला माहीत आहे का? शिवसेनेचा केवळ चेहरा हिंदुत्ववादी नसून त्या पक्षाच्या प्रमुखाला न्यायव्यवस्थेने मुंबईतील दंगलींना जबाबदार ठरवले होते हे विसलात काय? मुंबईतील गणेशमंडळे/दहिहंडीमंडळे ही प्रामुख्याने शिवसेनेच्या नगरसेवकांची वर्षानुवर्षे जहागीर होती. या सर्व कामांना 'समाजसेवा' असेही म्हटले जात असे. असो... कोणाचे उपद्रव मूल्य जास्त आणि कमी हा मुद्दा नाही. राष्ट्रवादी हा शिवसेनेपेक्षा चांगला पक्ष आहे असेही मला म्हणायचे नाही. मात्र या गुंडगिरीच्या राजरोस प्रकाराला एकंदर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य शिवसेनेने केले आहे. बाकी या चांगल्या चर्चेत मला पक्षीय राजकारण आणायचे नव्हते. मात्र Credit should be given where it's due.

In reply to by आजानुकर्ण

बाळ सप्रे 03/09/2014 - 09:42
सहमत.. शिवसेनेच्या गुंडगिरीवरील समीरसूर यांचे भाष्य 'आपला तो बाब्या' स्वरूपाचे वाटले..

In reply to by बाळ सप्रे

समीरसूर 03/09/2014 - 09:55
मी शिवसेनेचा नाही. मी कुठल्याच राजकीय पक्षाचा नाही. :-) त्यामुळे शिवसेना माझा 'बाब्या' असण्याचा प्रश्नच येत नाही. :-) शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कुणा एकाला 'बाब्या' म्हणावे असे माझ्या खास जवळचे असे (उदा. जातीचे वर्चस्व, मोठ्या हुद्द्यावर कुणी जवळचा आप्त, कुणी मंत्री ओळखीचा, वगैरे) काहीच नाही. शेकडो एकर जमिनी, साखर कारखाने, अफाट श्रीमंती, शुद्ध सोने वापरून बनवलेले कोट्यवधींचे शर्ट्स (ते ही नगरसेवकांनी) या ताकदीच्या आधारावर राष्ट्रवादीने आणलेली गुंडगिरी भयंकर आहे एवढेच मला म्हणायचे होते. अशी ताकद शिवसेनाच काय इतर कुठल्याच पक्षात (थोड्या प्रमाणात काँग्रेस वगळता पण काँग्रेसनेही एवढी पराकोटीची गुंडगिरी सामान्यांच्या पुढ्यात आणून ठेवल्याचे स्मरत नाही) आधी कधीच नव्हती. ते श्रेय फक्त राष्ट्रवादीचे. :-)

सस्नेह 01/09/2014 - 15:31
आशयाशी प्रचंड सहमत. आश्चर्य याचे वाटते की सर्व जण सहमत असताना उत्सवात गर्दी कोण बेटे करतात ?

In reply to by सस्नेह

काळा पहाड 08/09/2014 - 19:46
आशयाशी प्रचंड सहमत. आश्चर्य याचे वाटते की सर्व जण सहमत असताना उत्सवात गर्दी कोण बेटे करतात ?
ज्यांना त्यातून कमाई होते असे भूमिपुत्र..

पैसा 01/09/2014 - 15:42
अतिशय सुरेख, वाचनीय लेख! नीलकांतने ज्या उद्देशाने ही लेखमालिका सुरू केली होती, तो उद्देश अशा लेखांतूनच परिपूर्ण होतो! धन्यवाद पेठकर काका!

विजुभाऊ 01/09/2014 - 16:23
धन्यवाद पेठकर काका. मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरेतर प्रत्येकजण धर्माचा आणि त्यातील कर्मकांडाचा सोयीस्कर अर्थ लावत आलेला आहे. ठरावेक दिवशी साइ /बालाजीला जाणे वारीला जाण्याचा इव्हेन्ट करणे इत्यादी अत्यंत फालतु गोष्टीना अवास्तव महत्व आणणे हा मूर्खपणा आपण कधी सोडून देणार आहोत कोण जाणे? या असल्या वेडाचारातून फक्त व्हेस्टेड इन्तेरेस्ट असणारांचेच फावते. सर्वसामान्यांचा मात्र फक्त वेळ आणि पैसा वाया जातो. राधेमा , निर्मल बाबा ,आसाराम हे कमी पडत असावेत की काय हनुमान सुरक्षा कवच ,नजर सुरक्षा कवच असले प्रकार राजरोस टीव्हीवर येत असतात. टीव्हीवर जे दिसते किंवा जे वर्तमान पत्रात छापले जाते ते सर्व खरे असते असे मानणारा एक मोठा वर्ग अजूनही समाजाचा भाग आहे. आपला एकूणच समाज हा अंधश्रद्धेवर पोसला जातोय याचे कोणालाच वाईट वाटत नाहिय्ये. चलाख आस्तिकांचे नेहमीच एक सोप्पे आणि फसवे पालुपद असते के अंधश्रद्ध नको पण श्रद्ध असायला काय हरकत आहे.पण त्या तथाकथीत आस्तिकाना श्रद्धा म्हणजे काय हे विचारले तर मात्र सोयीस्कर मौन किंवा पळवाट शोधली जाते ( उदा : डॉक्टर बरे करेल ही तुमची श्रद्धा असते ना.. पण डॉक्टरवरचा विश्वास हा त्याच्या डिग्री आनि ती डिग्री देणारे विद्यापीठ यावर असतो हे कोणी मान्य करत नाही.) ज्या दिवशी सगळे देव नाहिसे होतील तो खरा सुदिन ..............

इनिगोय 01/09/2014 - 18:28
सुंदर लेख. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या गर्दी खेचण्यात नंबर एक असलेल्या गणेशमंदिरामध्ये असाच मनस्ताप देणारा अनुभव आल्यानंतर मंदिरात जाणे बंदच केले आहे. देवाचा बाजार. भक्तीची किंमत. सगळं रोखठोक. देवदर्शनासाठी पास काढणे हाही प्रकार असाच चीड आणतो. प्राॅब्लेम हा आहे, की हे प्रकार आयोजित करणा-यांना आणि त्यात सहभागी होणा-यांनाही अशा सूज्ञ बोलांनी काही फरक पडत नाही. ते सगळं निर्बुद्धपणे तसंच सुरू राहतं.

हे प्रकार आयोजित करणा-यांना आणि त्यात सहभागी होणा-यांनाही अशा सूज्ञ बोलांनी काही फरक पडत नाही. ते सगळं निर्बुद्धपणे तसंच सुरू राहतं. कारण त्यांच्या व्यवसायाचं मुळ मुद्दल हे भोळे (कींवा मूर्ख) भाविक हे असतं. त्याचा तुटवडा भासू लागेल तेंव्हा राजकारण्यांचे आणि आयोजकांचे दुकान आपोआप बंद पडेल. भक्तांनाच सुबुद्ध करून सोडा.

अनिता ठाकूर 01/09/2014 - 18:57
पेठकरांप्रमाणेच समीरसूरांच्या लेखातील तळमळहि समजते आहे. खरच, ते नट्या-बिट्या अगदी फालतू आहे. आणि तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे असे वाचले वा ऐकले की अगदी शरम वाटते.पण ह्यातले काहीहि कमी वा बंद होणार नाही, उलट हे सगळं वाढतच चाललय.

प्यारे१ 01/09/2014 - 19:05
समाजाला सातत्यानं कुठल्या तरी टेकूची गरज असते. त्यातला एक टेकू म्हणजे सार्वजनिक पूजा अर्चा नि उत्सव. त्या टेकूला सजवणारे स्वतः तथाकथित भक्त आणि राजकारणी, कुठल्याही कारणानं टेकू काढून घेऊ म्हणून भीती घालणारे धर्ममार्तंड आणि त्या टेकूला काढून त्याच्या दुसर्‍या बाजूचा टेकू पकडून ठेवणारे इथंही तथाकथितच विचारवंत नि डोळस लोक. चालायचंच. टेकू लागतातच.

काहीसा असहमत. कर्मकाडांत एखाद्याला आनंद मिळतोच. जसे आमचे काही मित्र मोप दारू पितात, मी जराही पीत नाही परंतु बसणे या कर्मकांडात जो काही आनंद असतो तो घ्यावासा वाटतो. बाकी राहीला प्रश्न दशभुजा गणपती बाहेरच्या भिकार्‍यांचा, तर इतकेच म्हणतो ते भिकारी गरीब नाहीत. त्यांच्या देखील पाळ्या ठरलेल्या असतात. आणि तेही बख्खळ पैसा बाळगून असतात. आणि माझे स्पष्ट मत असे आहे की जर कष्ट करायची तयारी असेल तर कोणावरही भिक मागायची वेळ येत नाही. एक मुलांनी टाकून दिलेला वेड लागलेला म्हातारा आमच्या गल्लीत राहतो. लोक विषेशतः दुकानदार, छोटे हॉटेलवाले त्याला काहीतरी काम सांगतात तो ते करतो (म्हणजे कचरा टाकणे वगैरे ). त्याबद्दल ते त्याला रोज जेऊखाऊ घालतात. म्हणजे कोण ना कोणतरी. त्याला आजवर मी बडबड करताना, शिवीगाळ करताना पाहीले आहे पण भिक मागताना नाही पाहीले. बस्स इतकेच.

सुहास.. 01/09/2014 - 19:19
सल्लारुपी सुंदर लेख पटला . काही मुद्दे .. १ ) अश्या समारंभ ( इव्हेन्ट ) ला वाढत असलेली गर्दी आणि लोकप्रियता ही, विषेशतः तरुणाईची ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. २ ) स्टार माझा सारखं चॅनेल " बाप्पा माझा " हा विषेश कार्यक्रम लावते दरवर्षी , मी एकदा मेघराज पाटील ( कन्टेट एडिटर ) यांच्याशी बोलताना सहज या प्रकारावर भाष्य केले होते. त्या वेळी त्यांनी वापरलेले वाक्य " अश्या ठेवणीतल्या (आजचा सवाल सकट) टिआरपीजन्य कार्यक्रमांना मी एकटा वा चॅनेल जबाबदार नाही, आकडे बघतो आम्ही टिआरपीचे , महाभयानक वाढ झालेली असते, ते किळसवाणे आणि हिडीस असले तरी लोकं रिपीट देखील बघतात, तोच एखादा कृषी - विषयक, जन जागृती विषयक मात्र कोणी बघत नाही, दाभोळकारांविषयी एकुण ११ एपिसोड तयार केले होते, दुसर्‍या भागातच गच्छंती लागली टिआरपी ला !! " ..आपल तर तोंड बंद ...... ३ ) खरच समाजमन बदललयं की सेलीब्रेशन ची पध्दत हेच मुळात कळत नाही, याच मिपावर " प्या बिनधास्त मुंजीला " पासुन ते " साकी शराब पिने दे मस्जिद मैं बैठकर " इथवर झालयं, हे तर केवळ आभासी आंतरजालीय जग, प्रॅक्टीकली मात्र " विचार करा, पुण्याच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये एका माडंवात एक गणपती ठेवला आहे, संगीत नाही की आरास नाही, चार टवाळके दिसणारे नाहीत, आजुबाजुला गर्दी नाही.काय म्हणाल ? अरे इथे मंडळाच कोणीतरी गेलेले दिसतय, गर्दीत अश्या ठिकाणी पाय धजत नाहीत, वाटत काही तरी मिसींग आहे " हे वाक्य माझ्या हाफिसात बसलेल्या शेजारणीचे आहे. सवय झाली असावी. मुंबईत साजर्‍या होणार्‍या आंबेडकर जयंतीला आपण, 'आंबेडकरी' जनता शहरात घाण कचरा पसरवते म्हणून नांवे ठेवतो आणि आषाढीला वारीला मात्र न चुकता हजेरी लावतो. मुसलमानांच्या रस्त्यावरच्या नमाजाला, ध्वनीक्षेपकांना विरोध करतो पण गणेशोत्सव, नवरात्र, जन्माष्टमी आदी मोठ्या हिरीरीने उत्सवात साजरे करतो. आपल्या पदयात्रांप्रमाणे इतर सर्व धर्मियांनी, जाती-जमातींनी त्यांच्या त्यांच्या चालीरिती पाळायच्या ठरवल्या तर आपल्या देशात एव्हढे विविध धर्म, जाती, जमाती आहेत की वर्षभर रस्त्यांवर फक्त पदयात्रा करणारेच दिसतील. रस्ते, महामार्ग वाहनांसाठी बंद करावे लागतील. की इतरांनी त्यांच्या धर्माचे, चालीरितींचे पालन करू नये? ही मुभा फक्त माझ्याच धर्माला असावी का? शिर्डीच्या वाटेवर कफनी, चिमटा, चिलिम बाळगणारे सर्वच साईबाबा असतात का? उत्तरेत तर अनेक साधूंच्या जथ्थ्यात कित्येक गुन्हेगार, गांजेकस, भोंदू माणसांचा भरणा असतो. कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा. >>> या वाक्यासाठी टाळ्या !!

प्रसाद१९७१ 01/09/2014 - 20:09
ह्या उत्सवाच्या निमित्ताने हे दिसुन येत की समाज पूर्ण पणे दोन गटात विभागला गेला आहे. हे जास्त धोकादायक आहे. अतिशय अल्पसंख्य असलेले ( कदाचित ५% ) लोक, ज्यांना हे जे काही उत्सवाच्या निमित्ताने चालू आहे त्याची शिसारी आली आहे. आणि दुसरा ९५% समाज हेच उत्सव Enjoy करतो आहे. हा जो ५% वाला गट आहे तो उरलेल्या ९५% टक्क्यांकडे तुछ्छतेने बघतो आहे आणि ९५% वाला समाज कसा तुम्हा ५% वाल्यांना त्रास दिला असा असुरी आनंद उपभोगतो आहे. गम्मत अशी आहे की हे ५% जे हिंदू उत्सवांना नावे ठेवत आहेत, त्या पैकी ८०-९० टक्के बीजेपी चे मतदार आहेत. माझ्या लहानपणी हे दोन समाजाचे तट बर्‍यापैकी एकत्र होते. तत्वविहीन राजकारण जे ८० सालापासुन आणि काही लोकांपासुन सुरु झाले तेंव्हा पासुन हे दोन समाज दुर होत गेले.

मनिष 01/09/2014 - 20:18
कोणावर विश्वास ठेवावा? मला वाटतं फक्त स्वतःवर ठेवावा, स्वतःच्या विचारशक्तीवर ठेवावा.
अगदी, अगदी!!! मस्त लेख झालाय काका! अगदी मनापासून लिहिलाय हे जाणवतय!

निखळानंद 01/09/2014 - 20:36
बहुतांश मिपाकर लेखाशी सहमत असल्याचे पाहून छान वाटलं.. आपल्या सारखे समविचारी आपल्या आसपास आहेत हे बघून उभारी येते.. पण आपण एवढे सगळे सहमत असूनही उत्सवांचे बाजारीकरण चालू असतेच आणि ते वाढत जाणारच. हा देव, भक्ती, धर्म, संस्कृती चा व्यापार न व्हावा म्हणून आपण काही करू शकतो का? मी मझ्या परीने जे करू शकतो ते करतो - म्हणजे कुठ्ल्याही 'राजा' च्या दर्शनासाठी जात नाही जेणे करून
देवाच्या 'दलालांना' त्यांच्या दुष्कृत्यात बळ देऊ नका
हे पेठकर काकांचे म्हणणे सार्थ होईल.. पण मुळात या दलालांना दुष्कृत्य करण्याचेच बळ येऊ नये म्हणून काही करता येईल का? मिपाकरांची ताकद एकवटून काही होऊ शकेल काय? या निमित्ताने कुणा थोराचे एक वाक्य आठवले -- The world suffers not because of the violence of bad people, but because of the Silence of good people.. विचार करण्याजोगे..

In reply to by निखळानंद

प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी. आपण स्वतः बदलावे. मुलांवर योग्य ते संस्कार करावे. देवाची भिती घालू नये. इश्वरसेवेचा खरा अर्थ समजावून द्यावा. कर्मकांडाचे महत्व बिंबवू नये. सद्वर्तनाचे महत्व वाढीस लागेल असे पाहावे. स्तोत्र, आरत्या ह्यांचे महत्त्व त्यातील उच्चारांना अधोरेखित करून जीभेला वळण लावणे, श्वासावर नियंत्रण आणि स्पष्टोच्चार एवढेच असो द्यावे. देवाचे केल्याने परिक्षेत चांगले मार्क मिळतील, देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणी मुलांच्या गळी उतरवू नये. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन महत्वाच्या बाबींचे महत्त मुलांच्या मनावर बिंबवावे. 'देवाला कांहीतरी 'देऊन' स्वतःसाठी कांही 'मिळवावे'' ह्या विचारांपासून स्वतःला आणि मुलांना अलिप्त ठेवावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यापेक्षा स्वतःपासून करावी! देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणीतून मुक्त व्हावे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टींना पर्याय नाही असा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन राखावा. 'देवाला कांहीतरी 'देऊन' स्वतःसाठी कांही 'मिळवावे'' ह्या विचारांपासून दूर होऊन, देव ही निव्वळ कल्पना आहे ही साधी गोष्ट लक्षात घ्यावी! आयला, पेठकर तुम्ही लिहीलंय म्हणून बरं, माझी पोस्ट असती तर, व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, जनश्रद्धांना दुखावणे आणि (सरते शेवटी), स्वतःला कोण समजता? या वळवणावर गेली असती. मुद्दा तोच आहे पण सगळं श्रेय तुमच्या मांडणीला आहे. या लेखानं का होईना प्रबोधन झालं तर आनंद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 02/09/2014 - 10:02
संक्षी साहेब दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच पण ज्यांचे प्रबोधन व्हायला पाहिजे ते लोक असे लेख वाचतच नाहीत. आता काय करावे? खर तर असे लेख व्हाटस एप्प किंवा तत्सम सार्वजनिक न्यासावर पाठवले पाहिजेत म्हणजे ते वाचणार्यापैकी १ % लोकांनी बोध घेतला तर बरे. नाहीतर तेथेही रोज सकाळ दुपार संध्याकाळ लालबागचा राजा किंवा साईबाबा यांचे दर्शन होत असतेच.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, >>>>>दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच.... मिपा वाचकांना माझे मुद्दे पटले असतील तर ते 'दुर्दैवं' आहे? मी म्हणेन 'सुदैवाने' मुद्दे पटले आहेत. अगदी इथेही १ टक्का वाचकांच्या विचारसरणीत बदल झाला आणि ते खर्‍या अर्थाने भक्तीमार्गावर आले तरी भरून पावलो.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यांना बहुतेक असं म्हणायचं आहे... >>>...दुर्दैवाने मिपावरील वाचकाला पेठकर साहेबांनी लिहिलेले पटलेले आहेच पण दुर्दैवाने ज्यांचे प्रबोधन व्हायला पाहिजे ते लोक असे लेख वाचतच नाहीत. आता काय करावे?>>> (असा माझा अंदाज आहे) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे 02/09/2014 - 12:36
पेठकर साहेब क्षमस्व एक्का साहेब धन्यवाद आपल्या खुलाश्याप्रमाणेच मला लिहायचे होते. चुकून एक शब्द इकडचा तिकडे झाला

अर्धवटराव 02/09/2014 - 06:36
या सगळ्या तमाशाला एक महत्वाचं कारण म्हणजे माणसाला जीवनाचं सौंदर्य उमगतच नाहि. त्यामुळे आपण त्या सौंदर्याला धक्का लावतोय, ते पायदळी तुडवतोय याची जाणिवच नसते. आणि जिथे सौंदर्यच आकर्षीत करत नाहि तिथे त्या सौंदर्याला अभिव्यक्त करणारी सृष्टीची, समाजाची प्रचंड मशीनरी कशी लक्षात येईल... एव्हढं मस्तं जीवन लाभलय, धडधाकट शरीर आहे, कल्पना करता येणार नाहि इतक्या प्रचंड शक्तीचं भंडार असं मन आहे, आकाशगंगेपासुन ते पार अणुरेणुची चीरफाड करु शकणारी धारदार बुद्धी आहे, दशदिशांना उजळुन टाकणारा विवेकाचा प्रकाश आहे... आणि निव्वळ अत्यर्क अशी कर्मशक्ती-इच्छाशक्ती आहे... हे सगळं दिलं सोडुन, आणि आपल्याला नेमकं काय-कसं-किती हवं याचा काहिही-कसलाही विचार न करता काहितरी 'फिक्स' करुन आपल्या समस्या ( ज्या ९९ टक्के खोट्या असतात )सोडवल्या जाव्यात म्हणुन गोट्या खेळण्याचे हे प्रकार वैचारीक दिवाळखोरी न आणतील तर आणखी काय. लेखातली उदाहरणं निदान दृष्य वैगुण्य तरी दाखवतात. कोरेगावपार्कातल्या हाय-फाय साधुबाबांच्या आणि त्यांच्या प्रवचनाने सिद्धी पावलेल्या मनोरुग्ण महात्म्यांच्या सुरस कथा तर काय वर्णाव्या. असो... तुपाचे दिवे जाळुन सोन्यारुप्याचा लखलखणारा हा प्रकाश मनाच्या अंधारातुन उगम पावतोय. किंबहुना कुठलंतरी बाह्य कृत्रीम झमझ्म लाईटींग लाऊन हा अंधार दूर होईल असाच आक्रोश हि लेखात वर्णन केलेली डोकेदुखी निर्माण करतो आहे. कधि ना कधि त्याचं निराकारण होईल अशी आशा करुया.

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव 02/09/2014 - 10:10
धाग्याच्या टायटलशी काहिसा असहमत आहे... धाग्यात जे काहि लिहीलय ते भक्तीमार्गातले अडथळे नसुन भक्तीमार्ग उमगण्यातील अडथळे आहेत. किंबहुना भक्तीशी या भानगडींचं काहि घेणं देणं नाहि. जि गोष्ट प्रेमाने सुरु होऊन प्रेमातच विलीन होते तिचा मानव समाज वा एकुणच विश्वाच्या पसार्‍याला उपद्व्याप होईलच कसा.... झाला तर फायदाच होईल.

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव, ईश्वरसेवा, ईश्वरभक्ती करताना आपण आणि ईश्वर ह्या मार्गावर, पक्षी: भक्तीमार्गावर, आपले अनेक समज, गैरसमज, श्रद्धा, अंधश्रदा, स्वार्थ, आळस, देवालयांचे व्यापारीकरण, पाप-पुण्याचा विधिनिषेध न बाळगणारे देवालयांचे दलाल, राजकारणी, कर्मकांडांचे अवास्तव महत्त्व वाढविणारी माध्यमे आदी अनेक अडथळे आहेत. ह्या सर्वांना टाळून आपण आपला भक्तीमार्ग निष्कंटक करून थेट देवाची भक्ती करणं ही काळाची गरज आहे असे मला वाटते. जर शीर्षक चुकले असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी. फक्त आशय लक्षात घ्यावा ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 02/09/2014 - 17:55
अहो क्षमा असावी वगैरे इतकं फॉर्मल का होताय... लेखातल्या विचारांशी कुणिही असहमत होणार नाहि. मी फक्त हेच म्हटलं कि हा सगळा तमाशा भक्तीमार्गावरचा नसुन भक्तीमार्गावर न पोचलेल्यांचा आहे. असो.

श्रद्धा, भावनेच्या सहाय्याने उत्सवाचे विकृतीकरण थांबवता येत नाही. यात मुख्य दोष पुरोगाम्यांचा नाही की उत्सवांना ताब्यात घेऊन आपल्या ब्रेड-बटर ला वाईन ची जोड देणार्‍या गुंडपुंडांचाही. दोष आहे तो स्वतःला 'खरे सश्रद्ध' म्हणवणार्‍या, हा सगळा बाजार आम्हाला पटत नै बर्का असा बाऽरीक चिरका सूर काढणार्‍या, पण जेव्हा हे थांबवा म्हणत कुणी बोलू लागतो तेव्हा अचानक २८ इंची छाती ५६ इंची असल्यासारखी ताणून 'आमच्या सणांवर बोलणारे तुम्ही कोण? त्यांना सांगा की.' म्हणत धावून येऊन गुंडाचीच बाजू घेणार्‍या षंढांचा. दुर्दैवानी ही 'आम्ही तुमच्या बाजूचे' असे दोन्ही बाजूंना पटवणारी नि गुंडांना शरण जाणारी कातडीबचावू जमातच बहुसंख्य असल्याने पुरोगामी विचाराच्या मंडळींना हताश होऊन पहात राहण्याखेरीज काही करता येत नाही- लेखन श्रेय मन्दार काळे. फेबु वरुन सभार

In reply to by पिंपातला उंदीर

बाळ सप्रे 02/09/2014 - 11:18
सहमत.. या धाग्यावरपण सहमती आणि तितक्याच उत्साहाने पुण्याची शान असणार्‍या सार्वजनिक गणपतींची भलामण इतर धाग्यांवर !!

विटेकर 02/09/2014 - 11:57
माझा असा अनुभव आहे की , ज्या ज्या क्षेत्रात राजकारणी शिरले , तिथे तिथे त्यांनी डाळ नासली. मग ते बान्धकाम क्षेत्र असो की धार्मिक क्षेत्र, शैक्षणिक असो अथवा पर्यटन ! त्यांनी जाईल तिथे घाण करुन ठेवली. उद्योजकाकडे असणारा स्मार्ट्नेस सामान्य माणसांकडे नसतो आणि त्यामुळे सामान्य माणूस या नालायकांना चार हात दूर ठेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे , उलट त्यांच्या भपक्यांना आणि भूलथापांना सामान्य लोक बळी पडतात , आपसूक त्यांचेच शिकार बनतात. त्यातच राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण ( किंवा उलटे) झाल्याने प्रश्न आता अतिगंभिर झाला आहे. ही घाण हा फक्त भक्तिमार्गातील अडथळा नसून आमच्या जीवनातीलच अडथळा आहे. मतपेटीतून यांना त्यांची जागा दाखवून देणे हाच त्याचा खरा उपाय आहे.

>>>>ही घाण हा फक्त भक्तिमार्गातील अडथळा नसून आमच्या जीवनातीलच अडथळा आहे. मतपेटीतून यांना त्यांची जागा दाखवून देणे हाच त्याचा खरा उपाय आहे. सहमत.

होकाका 02/09/2014 - 13:13
काही प्रतिसादांबद्दल कोणाचे नाव न घेता सांगू इच्छीतो की दोन गोष्टी विसंगत वाटल्या तरी त्यांना एकमेकांसह स्थान नाही असं नाही. समाजात सर्व काही असणारच. गोंदवलेकर महाराजांना एका माणसानं विचारलं ज्ञानी लो़कं सगुण परमात्मा मानत नाहीत पण आपण मात्र सगुणभक्ती आणि नामाचा महिमा सांगता. आंम्ही यातलं खरं काय जाणावं? गोंदवलेकर महाराजांनी एक उदाहरण दिलं: समजा तुम्ही तुमच्या मित्राच्या घराचा पत्ता शोधत आहात. कोणीतरी वाटेत तुंम्हाला सांगतं की इथून सरळ पुढे जा, डावीकडे जा, एक पोस्टाच्या खांब दिसेल, तिकडेच मागे तुमच्या मित्राचं घर आहे. ईश्वराच्या सगुण रुपाचं महत्व या पोस्टाच्या खांबासारखं आहे. जोपर्यंत तुंम्हाला तुमच्या मित्राचं घर कुठे आहे हे माहीत नाही तोपर्यंतच त्या खांबाचं महत्व. तसंच आणि तेवढच प्रतिमेतल्या देवाचं. यापुढे जाऊन एका देवभक्त संताचा अजून असा एक विचार आहे: देव आहे देव आहे जनी बोलावे | देव नाही देव नाही मनी जाणावे || जर कुणी म्हणणार असेल की देव या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे मूर्ख आहेत तर ते त्या म्हणणार्‍या व्यक्तीचं अभिव्यक्तीस्वातंत्र आहे. आणि त्याच न्यायाने जर कोणी अशा मूर्ख म्हणणार्‍याला मूर्ख म्हणणार असेल तर त्यांनाही ते अभिव्यक्तीस्वातंत्र आहेच. आपण असं समजूयात की काही लोकांना देव आहे या संकल्पनेचा आधार वाटतो आणि योग्य ती कॄती करण्याचं मानसिक बळ निर्माण होतं तर त्यात बिघडलं कुठं? त्याच तत्वाने, अजून काही लोकांना देव ही भ्रामक समजूत आहे असं जाणवून योग्य कार्य करण्याची प्रेरणा मिळत असेल तर त्यात बिघडलं कुठं? पण जर यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर निर्बंध आणले जात असतील तर ते व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणं ठरेल. लेख आवडला, पटला.

सखी 03/09/2014 - 00:34
लेख आवडला, पटला, अस्वस्थही करुन गेला. आपल्या समाजाचं हे अंधश्रद्ध चित्र मला फार विचलीत करतं. खरंच, आपण कधीच बदलणार नाही का? हा कळीचा मुद्दा आहे, टिळक, आगरकर, फुले दांपत्य ही फार मोठी नावं झाली. पण कुठेतरी आरंभ जरी झाला तर आजपासुन ५० वर्षांनी चित्र जरातरी सुधारलं असेल अशी आशा करायला हरकत नाही.

चौथा कोनाडा 08/09/2014 - 18:14
सुंदर उद्बोधक लेख ! ||देव आहे देव आहे जनी बोलावे | देव नाही देव नाही मनी जाणावे || -- हे तर खासच ! "देव" या संकल्पनेचा मर्यादित वापर करून खरोखरची समाज"सेवा" करणारे गाडगेबाबांसारखे मोजके थोर संत विरळाच ! खर्‍या भक्तीमार्गाला डावलून "भक्ती"च्याच नावाने भाबड्या लोकांना वापरून स्वतःचा स्वार्थ साधणे की समाजातल्या काही घटकांची, लोकांची मजबूरी आहे. आपल्या सारख्या "डोळस" लोकांनी वेळीच यापासून बाजूला होणे व आपली मते इतरांना पटवून देत राहणे हाच यावरचा उपाय आहे. या संदर्भात चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी उधृत करतो: इथे सर्वजण समजतात स्वतःला शहाणे, आपल्या हातत एकच शांतपणे पाहणे.
काही दिवसांपूर्वी जन्माष्टमी झाली. जन्माष्टमीच्या आधी झी-२४ तास वर अत्यंत उद्बोधक चर्चा (रोखठोक) ऐकायला मिळाली. गेल्या जन्माष्टमीला मानवी मनोरा कोसळून, खालच्याच थरावर असलेला, एकजण जबर जखमी झाला होता. मानेला दुखापत झाल्याने कमरेखाली लुळा पडला होता. ६ महिन्यांच्या उपचारांनंतर कुबड्याघेऊन चालण्याइतपत परिस्थिती सुधारली तरीपण कोणाच्या आधाराविना जगू शकत नाही. २० वर्षाचा मुलगा त्याच्या पुढे डोंगराएव्हढे आयुष्य आहे. चर्चेत तो आणि त्याची आई आले होते. त्याच्या आईला एकंदर प्रकाराबद्दल मत विचारले असता ती म्हणाली, 'ह्याच्या आयुष्याची वाट लागली आहे.

बटाटेवडे आणि चिंच-खजूर आंबटगोड चटणी (फक्त फोटो...)

एस ·

खजूराची चटणी? आयला, तुम्ही पुणेकर दिसता...तेच ते दही-मिसळ खाणारे... गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 01/09/2014 - 12:20
दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो आम्ही. पण मिसळीत दही घालुन खाण्याचा करंटेपणा करत नाही. नाही म्हणायला पुण्यात एका ठिकाणची दही भेळ भारी फेमस आहे म्हणे. मी त्याच्याही वाट्ञाला आजवर गेलेलो नाही. पण दही भेळ हा प्रकार तुमच्या ममईतही मिळतो बरे, बादवे ठाणे मुंबैच्या बाहेर येते हे मान्य पण आम्ही ठाणे = मुंबई समजतो. आणि तिथेतरी वडा चिंचगुळाच्या चटणी बरोबर मिळतो. ठाण्यात ५ वर्षे राहिलो असल्याने तिथले सगळे वडापाव खाल्ले आहेत. अर्थात राजमाता आणि दुर्गा मध्ये चटण्या लै म्हणजे लै च भारी असतात पण कुंजविहार आणि इतर अनेक ठिकाणी गोड चटणी मिळते मात्र जवळजवळ प्रत्येक ठिकाणी तिखट चटणीदेखील मिळते. पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत. पुण्यात तर राहतोच असल्याने अजुन काही बोलत नाही.

In reply to by मृत्युन्जय

दिपक.कुवेत 01/09/2014 - 13:07
एवढि गोड / घट्ट चटणी देत नाहित. अर्थात गाडिवाल्यांना परवडतपण नाहि म्हणा. पण चिंचगुळाच्या पातळ पाण्यामधे तिखट आणि बारीक चीरलेला कच्चा कांदा घालुन "चटणी' म्हणुन ती पावाला फासतात. निदान मला तरी अशी चटणी आवडते. घरी वडे केले कि मीहि अशी चटणि करतो. अर्थात गाडिवर वडापाव सोबत वड्यांच्या भुग्यात तिखट्/खोबरं घालुन बनवलेली चटणीहि असते. ती हि आवडते. आवड-निवद व्यक्तिसापेक्ष वेगवेगळी असु शकते पण अट्ट्ल खवैय्या सगळे पदार्थ निदान एकदा तरी चाखुन बघतोच.

In reply to by दिपक.कुवेत

गाडिवाल्यांना परवडतपण नाही. गैरसमज आहे दिपकराव. आणि उत्तम चवीसाठी दोन पैसे जास्त आकारले तर गिर्‍हाईके तक्रार करीत नाहीत. पण दोन पैसे जास्त न आकारताही दाट चटणी देता येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 01/09/2014 - 13:23
पण अजुन पर्यंत तरी काय दाट चटणी कुठल्याच गाडिवर पाहण्यात आली नाहि ब्वॉ. पण ईथे मात्र मिळते...बर्गरच्या पावात घालुन :)

In reply to by दिपक.कुवेत

चिंचेच्या चटणीत आम्ही खजूरही वापरतो. खजूर जरा महाग पडतो. पण ती चटणी चवीला जास्त उजवी असते. चिंच गुळाची चटणी पातळ ठेवण्यामागील कारण म्हणजे पातळ चटणी ही दाट चटणीपेक्षा, पावावर, पसरवायला (स्प्रेडेबल) सोपी असते. विशेषतः गर्दीच्या वेळी. आम्ही इथे चिंच-गुळ-खजूर अशी चटणी बनवितो. ती सुद्धा दाट नसते, जरा पातळच असते. त्या मागील कारण म्हणजे भेळेत ओलावा राहण्यासाठी, नीट समतोल मिसळण्यासाठी सोपी जाते. समोशाबरोबर खायला दाट चटणी चांगली लागते. पण पुन्हा दोन वेगवेगळ्या चटण्या करा आणि अडीच बाय ४ फुट टेबलावर अजून एक भांडे वाढवा हे त्रासाचे होते. त्यामुळे आहे तीच पातळ चटणी सर्व (भेळपुरी, दहिबटाटा पुरी, शेवबटाटा पुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, दहीवडा, समोसा) पदार्थांमध्ये वापरली जाते. नेहमी आर्थिक गणित पाहिले जात नाही. ते सोडविणे सोपे असते. पण आपल्या कारागिराच्या सवयी (जसे चटणीवर हात आखडता असणे किंवा ढिला असणे), पदार्थातील इतर जिन्नसांचा मुळ चवीवरील प्रभाव नियंत्रण करणे, पदार्थ बनविण्यसाठी लागणारा वेळ वगैरे वगैरे इतर बाबींचा विचार करून ही कांही चटण्या जास्त प्रवाही बनविणे आवश्यक असते. हिरव्या मिरचीची चटणी, जी व्हेज. सँडविचला लावतात. ती जर दाट आणि जास्त तिखट असेल तर चवीवर नियंत्रण करण्यासाठी काकडी, टोमॅटो, बटाटा, बटर आदी जिन्नस जास्त वापरावे लागतील. त्यांचे पावाशी असणारे प्रमाण (रेशो) बिघडतो आणि चवीत फरक पडतो. पातळ आणि कमी तिखट चटणी पसरवायला सोपी आणि तिखट पणा नियंत्रणात राहून बाकी जिन्नसांच्या पातळ चकत्या वापरता येवून खाताने ते सँडविच हाताळणे गिर्‍हाईकालाही सोपे जाते आणि जास्त तिखट लागत नाही.

In reply to by मृत्युन्जय

मनिष 01/09/2014 - 13:24
अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. :(
पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत.
+१११११११११११११

In reply to by मनिष

असे काही नाही हो....पुणेकर वागतात तस तसे, तर कौतूक करणे भाग आहे ना? आता "पुणेरी दही-मिसळ" आणि "कोल्हापूरी मिसळ" ह्यात तुलना केली तर आम्हाला कोल्हापूरीच मिसळ आवडते....

In reply to by मुक्त विहारि

सस्नेह 01/09/2014 - 15:43
मिसळच काय, बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) खावा तो कोल्हापुरातच. कराड-सातार्यापासून उत्तरेकडे जावे तसे वड्याचे आकारमान हवा गेलेल्या टायरसारखे अन चवही साधारण तशीच होत जाते, असा अनुभव आहे.

In reply to by पैसा

एस 01/09/2014 - 16:50
तुम्हांला काही काम नाही का? पुण्याबद्दल कोणी काडी लावली की फुंकर घालून व्यवस्थित कशी पेटेल याची काळजी घ्यायला लगेच पुढे असता! ;-) बादवे, टायरची आणि तेही हवा गेलेल्या टायरची चव पुणेकरांना काही माहिती नाही बुवा. हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.

In reply to by एस

पैसा 01/09/2014 - 16:54
:D हर काडी काडी पे लिखा है जलानेवाले का नाम! :D बरं वडे र्‍हाऊ द्या, ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात?

In reply to by पैसा

सूड 01/09/2014 - 16:56
>>ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात? काय हे, आता पियुष कसं बनवतात त्याची रेसिपी टाकायलाच हवी !!

In reply to by दिपक.कुवेत

काळा पहाड 27/10/2014 - 20:01
खरं बोलतायत हो त्या. कोल्हापूरचा वडा खाणारा माणूस जेव्हा पुण्यात वडा नावाचा विनोदी पदार्थ खातात, तेव्हा पुणेकरांची कीव करावी की हसावं हे समजत नाही हे ही खरं.

In reply to by बॅटमॅन

किसन शिंदे 01/09/2014 - 21:31
पीयूष म्ह. श्रीखंडाची भांडी दुधाने धुतल्यावर तयार होणारे पेय.
=)) नाय रे ब्याट्या. ये एकदा आमच्या ठाण्यात, तुला आमच्या गोखलेतलं(गोखले उपहार गृह ;) ) पीयूष पाजतो.

In reply to by बॅटमॅन

सस्नेह 01/09/2014 - 22:27
पाकृ सोप्या कशा कराव्या हे उणे..सॉरी, पुणेकरांकडून शिकावे !

In reply to by एस

विजुभाऊ 01/09/2014 - 19:25
हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.
त्याम्च्याबद्दल बोलूच नका. वड्याचा आकार गोल( चेंडूप्रमाणे) असण्या ऐवजी चक्क चपटा असतो तेथे. बहुतेक वड्याला सुद्धा इस्त्री करत असावेत

In reply to by सस्नेह

मृत्युन्जय 01/09/2014 - 19:11
बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) माफ करा पण बटाटावडा म्हणजे कटवडा नाही आणि कोल्हापूरातही बटाटावडा म्हटल्यावर कटवडा देत नाहित. कटवडा कोल्हापूरात चांगलाच मिळत असेल पण पुण्यातही तो बर्‍याच ठिकाणी उत्तम मिळतो. इच्छुकांनी प्रथम कर्वे नगरातल्या शिवदीप कडे प्रयाण करावे.

In reply to by मृत्युन्जय

सस्नेह 01/09/2014 - 22:05
मिसळपाव अन मिसळ यात जो फरक आहे, तोच कटवडा अन बटाटावडा यात आहे. कृपया अभ्यास वाढवावा. वाटल्यास 'अभ्यास' करण्यासाठी एकदा कोल्हापुरात यावे. अ

In reply to by सस्नेह

असंका 02/09/2014 - 10:41
कटवडा म्हणजे बटाटावडा? पातळ भाजीतला वरचा कट ज्यास पुण्यात 'सँपल' म्हणतात तो बटाटेवड्यावर घालून दिला तर तो कटवडा असं मला वाटायचं.

In reply to by सस्नेह

मृत्युन्जय 02/09/2014 - 15:48
कटवडा आणि बटाटावडा एकच? आयला कोल्हापुरात आजकाल काय वाट्टेल ते घडायला लागले आहे. आमच्यावेळेस असे नव्हते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी ३ वर्षे कोल्हापुरात राह्यलेलो आहे (अर्थात तेव्हा लहान होतो (अजुनही आहे :D) ) आमच्या पुण्यात (आणि इतर जगभरात) बटाटावडा साधारण असा असतो: batatawada आणि कट असा: kat कटवडा असा: katwada *तिन्ही चित्रे अपर्णातैंच्या धाग्यावरुन साभार (विनापरवानगी घेतल्याबद्दल माफी) बटाटावडा कटात मिसळल्यावर त्याचा कटवडा होतो, पण आम्ही (आणि इतर सामान्य मनुष्ये) बटाटावडा कटाशिवायही (बर्‍याचवेळा कटाशिवायच) खातो (पण कटवडा आम्हाला फार प्रिय). आमच्याकडे केळ, दूध आणि शिकरण सुद्धा वेगवेगळ मानतात. तेच दूध, त्याच दूधात टाकल्यावर शिकरण बनते. पण म्हणुन केळ्याला शिकरण म्हणण्याचा करंटेपणा आम्ही करत नाही. शिवाय आमच्यासाठी शिरखुर्मा वेगळा आणि नुसत्याच शेवया वेगळ्या. ईडली वेगळी आणि सांबार वेगळा. अजुन बरेच आहे. पण तुर्तास इथेच थांबतो. अजुन ज्ञान मिळवायचे असल्यास पुण्याला यावे. इथे एक आख्खी खाद्य संस्कृती आहे. तुम्हाला जरुर दर्शन घडवेन (खर्च तुमचा (माझ्या खाण्यापिण्यासकट) :) )

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 02/09/2014 - 16:04
मृत्युंजया, एकदम पोटावर (शेपटीवर च्या चालीवर) पाय दिल्यासारखा उसळला आहेस? पुणेंकर शोभतोंस बरें! =)) ती आपातै एक भारी, स्नेहातै भारीत भारी आणि तू जगात भारी. :D :P

In reply to by कवितानागेश

एस 01/09/2014 - 19:33
स्नेहातैंना माहिती असावी. हवा भरलेल्या आणि हवा गेलेल्या टायरांची चव वेगवेगळी लागते का असा उपप्रश्न. आणि का लागते असा पुरवणी उपप्रश्न.

In reply to by एस

सस्नेह 01/09/2014 - 22:08
चाखली आहे चव एकदा पुण्यात या हवा-लेस टायरची पुण्यात. पुण्यात येऊन वडा खाण्याचे पाप केले तेव्हा. बाकी, पुणेकरांना ती चव तोंडात बसल्याने त्यात निराळे काय ते जाणवत नाही, हे साहजिक आहे ! अ

In reply to by सस्नेह

आलू बोंडे सोडून.... आता नागपूरला गेलो की परत एकदा आलू-बोंडे खायला लागणार. आमचा पिंडच मुळी सावजी मटण आणि आलू-बोंड्यावर पोसला गेलाय.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 01/09/2014 - 19:08
मिसळ आम्हाला तरी बेडेकरांची आवडते तशीच मामलेदारांची आवडते तशीच दिवे आगरच्या आवळसकरांची आवडते तशीच काट्टाकिर्र्र ची आवडते तशीच बावड्याची आवडते तशीच नेवाळ्यांची आवडते. पण कृपा करुन फडतर्‍यांच्या आणि रामनाथाच्या मिसळीबद्दल चांगले बोलायला लावु नका.

In reply to by मुक्त विहारि

सूड 01/09/2014 - 14:17
>>गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या. हो आता ज्याची त्याची आवड!! नुसता झणझणीत जाळ हीच जर 'चवीची' व्याख्या असेल तर तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे. :D

In reply to by सूड

वडे म्हटले की जाळ हा हवाच त्याशिवाय लाळ कशी गळणार? अर्थात, कोंबडीचे, चिकन झाले की थोडा-फार फरक पडणारच... आम्हाला त्या बटर-चिकन पेक्षा, तांबड्या रश्यातली कोंबडीच प्रिय... तसेच वडे म्हटले की सणसणीत चटणी ही हवीच.... असो, कधी येताय वडे खायला? कदाचित नंतर तुम्ही पण चिंचेच्या चटणीला विसरून जाल..

In reply to by सूड

ओके... कट्ट्याच्या वेळी निवांत बोलू.... पुणेरी चिंचेची चटणी चांगली की डोंबोलीतली थोरल्या ठाकूरांकडची चटणी चांगली, ह्या विषयावर एकदा चर्चा करायचा बेत करू या.... बादवे, आपला तो हुकलेला मिसळपावचा बेत पण परत एकदा आखू या....

In reply to by मुक्त विहारि

एस 01/09/2014 - 14:52
अजून शंका आहे का मध्यवर्तीकर?
गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.
आम्ही हे पण खातो आणि ते पण खातो. पुण्याची खाद्यसंस्कृती काय काढताय तुम्ही? :-)

In reply to by एस

हम्म्म्म्म्म्म्म्म.... पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात. पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो. पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते. पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो. आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते. आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही... शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा. असो, सध्या इतकी उदाहरणे बस्स झाली. बाकी पुण्यातल्या लोकांना स्वतःचे उणेपण समजत नाही, ह्यात नवल ते काय? पुण्याशिवाय इतर पण शहरे आहेत आणि ती पण आपापला आब राखून आहेत.... असो, एकूण काय तर पुण्यातल्या लोकांना दुर्वांकूर आणि पेशवाई प्रिय. नागपूरला आर्यभुवन मध्ये, किंवा वलसाडला स्टेशन जवळ किंवा अहमदाबादला (हॉटेलचे नांव विसरलो) पुण्यातल्या पेक्षा उत्तम जेवण मिळते. अर्थात, त्यासाठी मध्यवर्ती भागात यावे लागते.शिक्षण म्हणू नका की नौकरी म्हणू नका.पुणे फार पुर्वीच परीघाबाहेर गेले आहे.सध्यातरी पुण्यात सगळेच उणे आहे.हवेशीर आणि गार-गार हवा पण आजकाल पुणे सोडून इतरस्त्र गेली आहे, असे ऐकिवात आहे. जावू दे.... अजूनही तुम्हाला वाटत असेल की पुणे उत्तम तर आमची संमती आहे. आम्हाला पुण्यापेक्षा, पुणेकर आणि त्यातूनही मिपाकर जास्त प्रिय आहेत.

In reply to by आदूबाळ

सूड 01/09/2014 - 22:21
बदलापूरात पण आहे, पण शिंचे एक चटणीची पिशवी जास्त मागितली तर महापाप केल्यासारखी रिअ‍ॅक्शन देतात.

In reply to by आदूबाळ

आमच्या डोंबोलीत आहेत... मानपाडा रोडवर.. गोदरेज शोरूमच्या पुढे...जैन मंदिराच्या जवळ... बादवे, सध्या आमच्या पुरते, मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मिपाकर... त्यामुळे डोंबोलीला "मध्यवर्ती" हे बिरूद लावलेले नाही, हे लक्षांत आले असेलच..

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 02/09/2014 - 15:55
पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात. पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो. पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते. पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो. आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते. आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही... शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा. मान्य आहे. जगातले सगळे चविष्ट पदार्थ सर्वोत्तम पुण्यात कसे मिळत्तील. पण वरील सर्व पदार्थ पुण्यात उत्कृष्ट मिळतात. हेच पुण्याचे वैशिष्ट्य, नाही म्हणजे कुठे पान चांगले मिळते, कुठे वडा, कुठे बासुंदी. आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही. बादवे जगातली सर्वात चविष्ट मिसळ माझा आत्तेभाऊ बनवतो. ;) . तुमचा मित्र नाही.

In reply to by मृत्युन्जय

"आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही." तेच तर आहे ना... म्हणजे सर्वोत्तम वस्तू दुसर्‍या गावांत आणि नांव मात्र पुण्याचे....

In reply to by मृत्युन्जय

पुण्यापेक्ष्या चांगले पियुष आमचा डोंबिवली वली मधील फडके रोडवरील कुलकर्णी कडे मिळते .

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 09/09/2014 - 14:36
आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही...
बिर्यानी...इने च्चार्र्मिनारा के पिच्चु के गली में इस्माईलभाई की बीर्यानी खाने को देव रे...फिर तुम किदर्कुभी जाव..और दुसरी बीर्यानी नक्को

In reply to by टवाळ कार्टा

उस टाईम कट्टा करणेका हय... तुम चिंता मत करणा... शिवास रीगल के साथ हमारे डोंबोली की बिर्याणी खाणेका. अब इतनाच बोलो, मटण बिर्याणेका आरडर दू या प्रॉन्स बिर्याणी या फिर चिकण? वैसे उसकी व्हेज भी सुंदर होती हय. तुम बोलणेका हम बिर्याणी और बाटली (बिबा) लेके आता हय. तुम बीच में वो दात दूखने का बिबा नहीं डालनेका...

In reply to by मुक्त विहारि

मुळात बिर्यानी ही कोलांबीची असूच कशी शकते. माझ्या शुल्लक माहितीप्रमाणे ती फक्त कोंबडी किवा मटनाचीच असते. बाकी डोंबवलीत काहीही घडू शकत हे दक्षिण मुंबई मधे राहणारे समजू शकतात. :D

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 17/09/2014 - 23:45
का हो मुविकाका, इतकं सगळं पुण्यापेक्षा इतर शहरांत उत्तम आहे तर तुम्हे काही मंडळी सतत पुण्याबद्दलच का बोलता? आपापल्या शहरांचा थोदा फार अभ्यास करा ना त्यापेक्षा :P की तिथे काही नाहीच अभ्यास करण्याजोगं? :D

In reply to by यशोधरा

हाच तो टिपीकल पुणेकर प्रतिसाद.... आणि पुण्यापेक्षा आमचे यानबू उत्तम आहे. निदान इथे तरी वड्यांबरोबर चिंचेची चटणी देत नाहीत. आणि सांभार पण देत नाहीत. अर्थात जिथे जेमतेम घोटभर चहाला, "अम्रुत-तुल्य" म्हटल्या जाते, त्या शहराबद्दल काय बोलणार? बाद्वे उद्या पुण्यात मेदूवडे आणि चिंचेची चटणी किंवा गेला बाजार, इडली आणि चिंचेची चटणी, असा पण बेत असू शकतो.

In reply to by कवितानागेश

एस 01/09/2014 - 14:54
कोथिंबिर खास मुठेच्या पाण्याने धुतात आमच्याकडे विशेषतः पाहुण्यांना निमंत्रण दिले असल्यास. कधी येताय बरं मग आमच्याकडे?

In reply to by खटपट्या

तुम्ही पण त्या कुंजविहार्चे फॅन का? ह्या जन्मात तरी परत त्या कुंज-विहार मध्ये जाणार नाही.एकदाच चून गेलो होतो. मेल्याने वड्या बरोबर चिंचेची चटणी दिली आणि भर म्हणून मारवाडी मिरच्या. च्यामारी आमच्या सारख्या गावरान माणसांचे हे खाणेच न्ह्वे. गेला उडत... आम्ही अद्याप झमझमीत वडे आणि चटकदार चटणी पचवू शकतो.

In reply to by किसन शिंदे

तुम्ही एकदा थोरल्या ठाकूरांचा डब्बल वडा-पाव खायला हवा होता... अर्थात त्या साठी तुम्हाला डोंबोलीला यावे लागले असते. मस्त हिरव्या मिरच्यांची चटणी आणि कांदा-लिंबू मारून वडा-पाव द्यायचा. असो.... आम्ही पुण्यवान की, आम्हाला थोरल्या ठाकुरांचे वडे मनसोक्त खाता आले...

In reply to by मुक्त विहारि

किसन शिंदे 01/09/2014 - 00:04
२००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर बंद झाले नसतील तिथला वडापाव खाल्ल्याची शक्यता शंभर टक्के आहे, फक्त आता आठवत नाही. बादवे कुठे होता हा वडापाव?

In reply to by किसन शिंदे

प्रश्र्नांतच उत्तर आहे... सध्या डोंबोलीला जशी मून-मून मिसळ फेमस आहे, तसे ह्या वडा-पावचे नांव होते. सुरुवातीला केळकर रोड, मानपाडा रोडला जिथे मिळायचा तिथे मिळायचा. नंतर नगरपालिकेच्या जवळ सुरु झाला. सध्या आदित्य मंगलकार्यालयाच्या समोर मिळतो, पण तो आमच्या साठी नसतो. शिंचे आजकाल चिंचेची चटणी टाकतात आणि मक्याचे पोहे देतो. आणि परत त्या मारवाडी मिरच्या. ठाकूर बुवा मस्त एक-दोन लवंगी मिरच्या टाकायचा. जावू दे, लग्न झाल्या पासून आम्हाला पण घरी रहायचे असल्याने चिंचेची चटणी आवडली, असे दाखवायला लागते.(अशावेळी बियर उपयोगी पडते.त्या कडवड पण मधूर चवी बरोबर, ती चटणी चालून जाते.) पण तो जुलुमाचा राम-राम. आता पुढच्या वेळी आलो की, झमझमीत वडे आणि लसणाच्या चटणी सोबतच कट्टा करू या. तुम भी क्या याद करोगे.

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा जेथे मुविच्या भाषणाला बक्षिस मिळाले होते त्या बाजूला त्रिमूर्ती ह्यांचा वडापावात झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी असते. नुसत्या आठवणीने तोंड भरून आले.

In reply to by निनाद मुक्काम …

आज-काल तिथे पण ह्या गुज्जू मंडळींच्या नादाने खजूर-चिंचेची चटणी असते. जावुदे, फडके रोड जिथे प्रधान डॉ.च्या बंगल्याच्या रोडला मिळतो, तिथले कुळकर्णी जरा बरे वडे विकतो.पण तो त्याच बरोबर इतरही बरेच पदार्थ विकत असल्याने, त्याच्या कडे पण चिंचेची चटणी आणि वडे खाणारे आहेतच. हा हंत हंत... ते थोरले ठाकूर गेले आणि डोंबोलीतल्या वडा-पावाची मज्जाच गेली.निदान ठाकुरांनी तरी चिंचेची चटणी आणि वडे हे काँबिनेशन ठेवायला नको होते. मी ती चिंचेची चटणी पुरण-पोळी बरोबर खाइन कदाचित श्रीखंडा बरोबर पण खाईन.पण बटाटेवडे आणि चिंचेची चटणी एकत्र अजिबात खाणार नाही. लसणाची चटणी आणि बटाटे वडे हेच खरे. ते मद्राशी तर बटाटे वडे आणि सांभार पण खातात. आणि लोकं पण त्या वडा-सांभारा बरोबर पाव खातात.त्या मद्राशांचे एक ठीक आहे, पण आपलीच, रांगडी मराठी पुरुष मंडळी, चिंचेची चटणी खातांना बघून कसेसेच होते. वाघाने गवत खाल्ले तरी चालेल, पण मराठी पुरुषांनी चिंचेची चटणी वड्यांच्या बरोबर खाणे, हे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही. एकूणच, आमचा राग चिंचेच्या चटणीवर आहे, हे सुज्ञ माणसांच्या लक्षांत आलेच असेल.

In reply to by मुक्त विहारि

येथे उशिरा लक्ष गेले त्रिमूर्ती च्या बाजूला सुभाष डेअरी आहे तेथे पूर्वी मातोश्रींचा वाडा होता , खानदानी डोंबिवलीकर असल्याचा सार्थ अभिमान बाळगून सांगतो , त्रीमृती मध्ये वडापाव खायला जाणार असे सांगताच माझ्या डोंबिवलीकर मामे बहिणींनी लगेच ओरिजनल वडा पाव बनवणार्याने चवीशी इमान राखता यावे म्हणून सर्वेश जवळ नवीन दुकान थाटले असल्याचे कळले आहे , पावसळ्यात गाड्यांचा गोंधळ असायचा तेव्हा आईची ७ पर्यंत वाट पहायची नाहीतर त्रिमूर्ती मध्ये जाऊन घरगुती जेवण आणावे. असा रिवाज होता , त्रिमूर्ती आमची दुसरी आई होत्या , गुज्जू लोकांसाठी चवीसाठी प्रतारणा पाहून वाईट वाटले.

दिपक.कुवेत 01/09/2014 - 11:51
एवढा टेम्टींग फोटो टाकून जळवल्याबद्दल. मित्रा पाकृ रेडिमेड असली तरी फोटो तरी स्टेप बाय स्टेप टाकत जा...उदा. बाहेरुन वडे आणल्यास त्यांचा पुडितच ठेवुन काढलेला फोटो, प्लेट स्वच्छ पुसतानाचा, कोथींबीर धुतानाचा :D मग वडे प्लेट मधे ठेवुन चटणीची वाटि मधे ठेवतानाचा आणि मग शेवटि अर्धवट खाल्ल्याचा....बघ विचार कर.

पैसा 01/09/2014 - 14:07
"कुटुंबाला" तरी दिले का नाही? वडे खायची घाई फोटोवरून जाणवते आहे. वड्यांच्या फार जवळून काढलेला फोटो आहे अशी एक शंका आली. का चटणी आपण केल्यामुळे तिचा फोटो फोकस करून द्यायचा असं ठरवलं होतं? असो. कुटुंबाला सांगा, वडे छान दिसताहेत. :-/

In reply to by पैसा

एस 01/09/2014 - 14:50
वड्यांपासून चटणीपर्यंत सगळं काही आम्हीच केलंय. तरीपण 'कुटुंबा'पर्यंत तुमची दाद पोहोचवण्यात येईल.

कंजूस 01/09/2014 - 16:36
कोसळत्या पावसात सर्वाँच्या तोंडाला पाणी सुटेल, काहींचे डोळे पाणावतील, असा विषय काढल्याबद्दल धन्यवाद. एक शंका. नाशिक जळगाव वर्धा नागपूरची वेगळी शाखा आहे का मिपाची? तिथून काही पोच येत नाहीत. आमच्याकडे असं असतं वगैरे.

एस 01/09/2014 - 22:50
माझ्या पहिल्यावहिल्या पाककृतीचं पुणे Vs इतर सर्व असं यशस्वी रूपांतर आणि शतकोत्तर कामगिरीकडे ढकलणे या अजोड कामगिरीबद्दल मुवि आणि स्नेहांकिता या दोन्ही आयडींचे हाभिनंदण. घाईगडबडीत केलेल्या पाककृतीच्या त्याच दर्जाच्या धाग्यावर पहिल्याच दिवशी प्रतिक्रियांचा पाऊस. अरेरे! बाकी छायाचित्रणासारख्या विषयावर जीव तोडून लिहिलेल्या धाग्यांवर कुत्रेही फिरकत नाही हेही मिपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. :-) धन्य! चलो बायबाय! :-)

खजूराची चटणी? आयला, तुम्ही पुणेकर दिसता...तेच ते दही-मिसळ खाणारे... गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 01/09/2014 - 12:20
दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो आम्ही. पण मिसळीत दही घालुन खाण्याचा करंटेपणा करत नाही. नाही म्हणायला पुण्यात एका ठिकाणची दही भेळ भारी फेमस आहे म्हणे. मी त्याच्याही वाट्ञाला आजवर गेलेलो नाही. पण दही भेळ हा प्रकार तुमच्या ममईतही मिळतो बरे, बादवे ठाणे मुंबैच्या बाहेर येते हे मान्य पण आम्ही ठाणे = मुंबई समजतो. आणि तिथेतरी वडा चिंचगुळाच्या चटणी बरोबर मिळतो. ठाण्यात ५ वर्षे राहिलो असल्याने तिथले सगळे वडापाव खाल्ले आहेत. अर्थात राजमाता आणि दुर्गा मध्ये चटण्या लै म्हणजे लै च भारी असतात पण कुंजविहार आणि इतर अनेक ठिकाणी गोड चटणी मिळते मात्र जवळजवळ प्रत्येक ठिकाणी तिखट चटणीदेखील मिळते. पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत. पुण्यात तर राहतोच असल्याने अजुन काही बोलत नाही.

In reply to by मृत्युन्जय

दिपक.कुवेत 01/09/2014 - 13:07
एवढि गोड / घट्ट चटणी देत नाहित. अर्थात गाडिवाल्यांना परवडतपण नाहि म्हणा. पण चिंचगुळाच्या पातळ पाण्यामधे तिखट आणि बारीक चीरलेला कच्चा कांदा घालुन "चटणी' म्हणुन ती पावाला फासतात. निदान मला तरी अशी चटणी आवडते. घरी वडे केले कि मीहि अशी चटणि करतो. अर्थात गाडिवर वडापाव सोबत वड्यांच्या भुग्यात तिखट्/खोबरं घालुन बनवलेली चटणीहि असते. ती हि आवडते. आवड-निवद व्यक्तिसापेक्ष वेगवेगळी असु शकते पण अट्ट्ल खवैय्या सगळे पदार्थ निदान एकदा तरी चाखुन बघतोच.

In reply to by दिपक.कुवेत

गाडिवाल्यांना परवडतपण नाही. गैरसमज आहे दिपकराव. आणि उत्तम चवीसाठी दोन पैसे जास्त आकारले तर गिर्‍हाईके तक्रार करीत नाहीत. पण दोन पैसे जास्त न आकारताही दाट चटणी देता येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

दिपक.कुवेत 01/09/2014 - 13:23
पण अजुन पर्यंत तरी काय दाट चटणी कुठल्याच गाडिवर पाहण्यात आली नाहि ब्वॉ. पण ईथे मात्र मिळते...बर्गरच्या पावात घालुन :)

In reply to by दिपक.कुवेत

चिंचेच्या चटणीत आम्ही खजूरही वापरतो. खजूर जरा महाग पडतो. पण ती चटणी चवीला जास्त उजवी असते. चिंच गुळाची चटणी पातळ ठेवण्यामागील कारण म्हणजे पातळ चटणी ही दाट चटणीपेक्षा, पावावर, पसरवायला (स्प्रेडेबल) सोपी असते. विशेषतः गर्दीच्या वेळी. आम्ही इथे चिंच-गुळ-खजूर अशी चटणी बनवितो. ती सुद्धा दाट नसते, जरा पातळच असते. त्या मागील कारण म्हणजे भेळेत ओलावा राहण्यासाठी, नीट समतोल मिसळण्यासाठी सोपी जाते. समोशाबरोबर खायला दाट चटणी चांगली लागते. पण पुन्हा दोन वेगवेगळ्या चटण्या करा आणि अडीच बाय ४ फुट टेबलावर अजून एक भांडे वाढवा हे त्रासाचे होते. त्यामुळे आहे तीच पातळ चटणी सर्व (भेळपुरी, दहिबटाटा पुरी, शेवबटाटा पुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, दहीवडा, समोसा) पदार्थांमध्ये वापरली जाते. नेहमी आर्थिक गणित पाहिले जात नाही. ते सोडविणे सोपे असते. पण आपल्या कारागिराच्या सवयी (जसे चटणीवर हात आखडता असणे किंवा ढिला असणे), पदार्थातील इतर जिन्नसांचा मुळ चवीवरील प्रभाव नियंत्रण करणे, पदार्थ बनविण्यसाठी लागणारा वेळ वगैरे वगैरे इतर बाबींचा विचार करून ही कांही चटण्या जास्त प्रवाही बनविणे आवश्यक असते. हिरव्या मिरचीची चटणी, जी व्हेज. सँडविचला लावतात. ती जर दाट आणि जास्त तिखट असेल तर चवीवर नियंत्रण करण्यासाठी काकडी, टोमॅटो, बटाटा, बटर आदी जिन्नस जास्त वापरावे लागतील. त्यांचे पावाशी असणारे प्रमाण (रेशो) बिघडतो आणि चवीत फरक पडतो. पातळ आणि कमी तिखट चटणी पसरवायला सोपी आणि तिखट पणा नियंत्रणात राहून बाकी जिन्नसांच्या पातळ चकत्या वापरता येवून खाताने ते सँडविच हाताळणे गिर्‍हाईकालाही सोपे जाते आणि जास्त तिखट लागत नाही.

In reply to by मृत्युन्जय

मनिष 01/09/2014 - 13:24
अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. :(
पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत.
+१११११११११११११

In reply to by मनिष

असे काही नाही हो....पुणेकर वागतात तस तसे, तर कौतूक करणे भाग आहे ना? आता "पुणेरी दही-मिसळ" आणि "कोल्हापूरी मिसळ" ह्यात तुलना केली तर आम्हाला कोल्हापूरीच मिसळ आवडते....

In reply to by मुक्त विहारि

सस्नेह 01/09/2014 - 15:43
मिसळच काय, बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) खावा तो कोल्हापुरातच. कराड-सातार्यापासून उत्तरेकडे जावे तसे वड्याचे आकारमान हवा गेलेल्या टायरसारखे अन चवही साधारण तशीच होत जाते, असा अनुभव आहे.

In reply to by पैसा

एस 01/09/2014 - 16:50
तुम्हांला काही काम नाही का? पुण्याबद्दल कोणी काडी लावली की फुंकर घालून व्यवस्थित कशी पेटेल याची काळजी घ्यायला लगेच पुढे असता! ;-) बादवे, टायरची आणि तेही हवा गेलेल्या टायरची चव पुणेकरांना काही माहिती नाही बुवा. हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.

In reply to by एस

पैसा 01/09/2014 - 16:54
:D हर काडी काडी पे लिखा है जलानेवाले का नाम! :D बरं वडे र्‍हाऊ द्या, ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात?

In reply to by पैसा

सूड 01/09/2014 - 16:56
>>ते एक श्रीखंड पात्तळ केलेलं पेय (त्याला म्हणतात मात्र पियुष, म्हणजे अमृत) मिळतं का अजून पुण्यात? काय हे, आता पियुष कसं बनवतात त्याची रेसिपी टाकायलाच हवी !!

In reply to by दिपक.कुवेत

काळा पहाड 27/10/2014 - 20:01
खरं बोलतायत हो त्या. कोल्हापूरचा वडा खाणारा माणूस जेव्हा पुण्यात वडा नावाचा विनोदी पदार्थ खातात, तेव्हा पुणेकरांची कीव करावी की हसावं हे समजत नाही हे ही खरं.

In reply to by बॅटमॅन

किसन शिंदे 01/09/2014 - 21:31
पीयूष म्ह. श्रीखंडाची भांडी दुधाने धुतल्यावर तयार होणारे पेय.
=)) नाय रे ब्याट्या. ये एकदा आमच्या ठाण्यात, तुला आमच्या गोखलेतलं(गोखले उपहार गृह ;) ) पीयूष पाजतो.

In reply to by बॅटमॅन

सस्नेह 01/09/2014 - 22:27
पाकृ सोप्या कशा कराव्या हे उणे..सॉरी, पुणेकरांकडून शिकावे !

In reply to by एस

विजुभाऊ 01/09/2014 - 19:25
हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.
त्याम्च्याबद्दल बोलूच नका. वड्याचा आकार गोल( चेंडूप्रमाणे) असण्या ऐवजी चक्क चपटा असतो तेथे. बहुतेक वड्याला सुद्धा इस्त्री करत असावेत

In reply to by सस्नेह

मृत्युन्जय 01/09/2014 - 19:11
बटाटावडा (कोल्हापुरी नाव कटवडा) माफ करा पण बटाटावडा म्हणजे कटवडा नाही आणि कोल्हापूरातही बटाटावडा म्हटल्यावर कटवडा देत नाहित. कटवडा कोल्हापूरात चांगलाच मिळत असेल पण पुण्यातही तो बर्‍याच ठिकाणी उत्तम मिळतो. इच्छुकांनी प्रथम कर्वे नगरातल्या शिवदीप कडे प्रयाण करावे.

In reply to by मृत्युन्जय

सस्नेह 01/09/2014 - 22:05
मिसळपाव अन मिसळ यात जो फरक आहे, तोच कटवडा अन बटाटावडा यात आहे. कृपया अभ्यास वाढवावा. वाटल्यास 'अभ्यास' करण्यासाठी एकदा कोल्हापुरात यावे. अ

In reply to by सस्नेह

असंका 02/09/2014 - 10:41
कटवडा म्हणजे बटाटावडा? पातळ भाजीतला वरचा कट ज्यास पुण्यात 'सँपल' म्हणतात तो बटाटेवड्यावर घालून दिला तर तो कटवडा असं मला वाटायचं.

In reply to by सस्नेह

मृत्युन्जय 02/09/2014 - 15:48
कटवडा आणि बटाटावडा एकच? आयला कोल्हापुरात आजकाल काय वाट्टेल ते घडायला लागले आहे. आमच्यावेळेस असे नव्हते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी ३ वर्षे कोल्हापुरात राह्यलेलो आहे (अर्थात तेव्हा लहान होतो (अजुनही आहे :D) ) आमच्या पुण्यात (आणि इतर जगभरात) बटाटावडा साधारण असा असतो: batatawada आणि कट असा: kat कटवडा असा: katwada *तिन्ही चित्रे अपर्णातैंच्या धाग्यावरुन साभार (विनापरवानगी घेतल्याबद्दल माफी) बटाटावडा कटात मिसळल्यावर त्याचा कटवडा होतो, पण आम्ही (आणि इतर सामान्य मनुष्ये) बटाटावडा कटाशिवायही (बर्‍याचवेळा कटाशिवायच) खातो (पण कटवडा आम्हाला फार प्रिय). आमच्याकडे केळ, दूध आणि शिकरण सुद्धा वेगवेगळ मानतात. तेच दूध, त्याच दूधात टाकल्यावर शिकरण बनते. पण म्हणुन केळ्याला शिकरण म्हणण्याचा करंटेपणा आम्ही करत नाही. शिवाय आमच्यासाठी शिरखुर्मा वेगळा आणि नुसत्याच शेवया वेगळ्या. ईडली वेगळी आणि सांबार वेगळा. अजुन बरेच आहे. पण तुर्तास इथेच थांबतो. अजुन ज्ञान मिळवायचे असल्यास पुण्याला यावे. इथे एक आख्खी खाद्य संस्कृती आहे. तुम्हाला जरुर दर्शन घडवेन (खर्च तुमचा (माझ्या खाण्यापिण्यासकट) :) )

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 02/09/2014 - 16:04
मृत्युंजया, एकदम पोटावर (शेपटीवर च्या चालीवर) पाय दिल्यासारखा उसळला आहेस? पुणेंकर शोभतोंस बरें! =)) ती आपातै एक भारी, स्नेहातै भारीत भारी आणि तू जगात भारी. :D :P

In reply to by कवितानागेश

एस 01/09/2014 - 19:33
स्नेहातैंना माहिती असावी. हवा भरलेल्या आणि हवा गेलेल्या टायरांची चव वेगवेगळी लागते का असा उपप्रश्न. आणि का लागते असा पुरवणी उपप्रश्न.

In reply to by एस

सस्नेह 01/09/2014 - 22:08
चाखली आहे चव एकदा पुण्यात या हवा-लेस टायरची पुण्यात. पुण्यात येऊन वडा खाण्याचे पाप केले तेव्हा. बाकी, पुणेकरांना ती चव तोंडात बसल्याने त्यात निराळे काय ते जाणवत नाही, हे साहजिक आहे ! अ

In reply to by सस्नेह

आलू बोंडे सोडून.... आता नागपूरला गेलो की परत एकदा आलू-बोंडे खायला लागणार. आमचा पिंडच मुळी सावजी मटण आणि आलू-बोंड्यावर पोसला गेलाय.

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 01/09/2014 - 19:08
मिसळ आम्हाला तरी बेडेकरांची आवडते तशीच मामलेदारांची आवडते तशीच दिवे आगरच्या आवळसकरांची आवडते तशीच काट्टाकिर्र्र ची आवडते तशीच बावड्याची आवडते तशीच नेवाळ्यांची आवडते. पण कृपा करुन फडतर्‍यांच्या आणि रामनाथाच्या मिसळीबद्दल चांगले बोलायला लावु नका.

In reply to by मुक्त विहारि

सूड 01/09/2014 - 14:17
>>गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या. हो आता ज्याची त्याची आवड!! नुसता झणझणीत जाळ हीच जर 'चवीची' व्याख्या असेल तर तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे. :D

In reply to by सूड

वडे म्हटले की जाळ हा हवाच त्याशिवाय लाळ कशी गळणार? अर्थात, कोंबडीचे, चिकन झाले की थोडा-फार फरक पडणारच... आम्हाला त्या बटर-चिकन पेक्षा, तांबड्या रश्यातली कोंबडीच प्रिय... तसेच वडे म्हटले की सणसणीत चटणी ही हवीच.... असो, कधी येताय वडे खायला? कदाचित नंतर तुम्ही पण चिंचेच्या चटणीला विसरून जाल..

In reply to by सूड

ओके... कट्ट्याच्या वेळी निवांत बोलू.... पुणेरी चिंचेची चटणी चांगली की डोंबोलीतली थोरल्या ठाकूरांकडची चटणी चांगली, ह्या विषयावर एकदा चर्चा करायचा बेत करू या.... बादवे, आपला तो हुकलेला मिसळपावचा बेत पण परत एकदा आखू या....

In reply to by मुक्त विहारि

एस 01/09/2014 - 14:52
अजून शंका आहे का मध्यवर्तीकर?
गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.
आम्ही हे पण खातो आणि ते पण खातो. पुण्याची खाद्यसंस्कृती काय काढताय तुम्ही? :-)

In reply to by एस

हम्म्म्म्म्म्म्म्म.... पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात. पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो. पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते. पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो. आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते. आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही... शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा. असो, सध्या इतकी उदाहरणे बस्स झाली. बाकी पुण्यातल्या लोकांना स्वतःचे उणेपण समजत नाही, ह्यात नवल ते काय? पुण्याशिवाय इतर पण शहरे आहेत आणि ती पण आपापला आब राखून आहेत.... असो, एकूण काय तर पुण्यातल्या लोकांना दुर्वांकूर आणि पेशवाई प्रिय. नागपूरला आर्यभुवन मध्ये, किंवा वलसाडला स्टेशन जवळ किंवा अहमदाबादला (हॉटेलचे नांव विसरलो) पुण्यातल्या पेक्षा उत्तम जेवण मिळते. अर्थात, त्यासाठी मध्यवर्ती भागात यावे लागते.शिक्षण म्हणू नका की नौकरी म्हणू नका.पुणे फार पुर्वीच परीघाबाहेर गेले आहे.सध्यातरी पुण्यात सगळेच उणे आहे.हवेशीर आणि गार-गार हवा पण आजकाल पुणे सोडून इतरस्त्र गेली आहे, असे ऐकिवात आहे. जावू दे.... अजूनही तुम्हाला वाटत असेल की पुणे उत्तम तर आमची संमती आहे. आम्हाला पुण्यापेक्षा, पुणेकर आणि त्यातूनही मिपाकर जास्त प्रिय आहेत.

In reply to by आदूबाळ

सूड 01/09/2014 - 22:21
बदलापूरात पण आहे, पण शिंचे एक चटणीची पिशवी जास्त मागितली तर महापाप केल्यासारखी रिअ‍ॅक्शन देतात.

In reply to by आदूबाळ

आमच्या डोंबोलीत आहेत... मानपाडा रोडवर.. गोदरेज शोरूमच्या पुढे...जैन मंदिराच्या जवळ... बादवे, सध्या आमच्या पुरते, मध्यवर्ती ठिकाण म्हणजे मिपाकर... त्यामुळे डोंबोलीला "मध्यवर्ती" हे बिरूद लावलेले नाही, हे लक्षांत आले असेलच..

In reply to by मुक्त विहारि

मृत्युन्जय 02/09/2014 - 15:55
पुण्यातल्या पोह्यांपेक्षा उत्तम पोहे इंदौरला मिळतात. पुण्यातल्याच न्हवे तर सगळ्या जगातली उत्तम मिसळ माझा डोंबोलीतला मित्र बनवतो. पुण्यातल्या पियुष पेक्षा उत्तम पियुष ठाण्यात मिळते. पुण्यातल्या मसाला डोश्यापेक्षा उत्तम डोसा इथे यानबूत मिळतो. आणि पुणेरी बासुंदी पेक्षा उत्तम बासूंदी आमच्या डोंबोलीतल्या अनंत हलवाई कडे मिळते. आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही... शिवाय पुणेरी मसाला पानापेक्षा, नागपूरातल्या आनंद पान भंडारला भेट द्या किंवा संभाजी नगरात पान खावून बघा. मान्य आहे. जगातले सगळे चविष्ट पदार्थ सर्वोत्तम पुण्यात कसे मिळत्तील. पण वरील सर्व पदार्थ पुण्यात उत्कृष्ट मिळतात. हेच पुण्याचे वैशिष्ट्य, नाही म्हणजे कुठे पान चांगले मिळते, कुठे वडा, कुठे बासुंदी. आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही. बादवे जगातली सर्वात चविष्ट मिसळ माझा आत्तेभाऊ बनवतो. ;) . तुमचा मित्र नाही.

In reply to by मृत्युन्जय

"आमच्याकडे सग्गळे चांगले मिळते, सर्वोत्तम असेलच असा दावा नाही." तेच तर आहे ना... म्हणजे सर्वोत्तम वस्तू दुसर्‍या गावांत आणि नांव मात्र पुण्याचे....

In reply to by मृत्युन्जय

पुण्यापेक्ष्या चांगले पियुष आमचा डोंबिवली वली मधील फडके रोडवरील कुलकर्णी कडे मिळते .

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा 09/09/2014 - 14:36
आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्‍याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही...
बिर्यानी...इने च्चार्र्मिनारा के पिच्चु के गली में इस्माईलभाई की बीर्यानी खाने को देव रे...फिर तुम किदर्कुभी जाव..और दुसरी बीर्यानी नक्को

In reply to by टवाळ कार्टा

उस टाईम कट्टा करणेका हय... तुम चिंता मत करणा... शिवास रीगल के साथ हमारे डोंबोली की बिर्याणी खाणेका. अब इतनाच बोलो, मटण बिर्याणेका आरडर दू या प्रॉन्स बिर्याणी या फिर चिकण? वैसे उसकी व्हेज भी सुंदर होती हय. तुम बोलणेका हम बिर्याणी और बाटली (बिबा) लेके आता हय. तुम बीच में वो दात दूखने का बिबा नहीं डालनेका...

In reply to by मुक्त विहारि

मुळात बिर्यानी ही कोलांबीची असूच कशी शकते. माझ्या शुल्लक माहितीप्रमाणे ती फक्त कोंबडी किवा मटनाचीच असते. बाकी डोंबवलीत काहीही घडू शकत हे दक्षिण मुंबई मधे राहणारे समजू शकतात. :D

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 17/09/2014 - 23:45
का हो मुविकाका, इतकं सगळं पुण्यापेक्षा इतर शहरांत उत्तम आहे तर तुम्हे काही मंडळी सतत पुण्याबद्दलच का बोलता? आपापल्या शहरांचा थोदा फार अभ्यास करा ना त्यापेक्षा :P की तिथे काही नाहीच अभ्यास करण्याजोगं? :D

In reply to by यशोधरा

हाच तो टिपीकल पुणेकर प्रतिसाद.... आणि पुण्यापेक्षा आमचे यानबू उत्तम आहे. निदान इथे तरी वड्यांबरोबर चिंचेची चटणी देत नाहीत. आणि सांभार पण देत नाहीत. अर्थात जिथे जेमतेम घोटभर चहाला, "अम्रुत-तुल्य" म्हटल्या जाते, त्या शहराबद्दल काय बोलणार? बाद्वे उद्या पुण्यात मेदूवडे आणि चिंचेची चटणी किंवा गेला बाजार, इडली आणि चिंचेची चटणी, असा पण बेत असू शकतो.

In reply to by कवितानागेश

एस 01/09/2014 - 14:54
कोथिंबिर खास मुठेच्या पाण्याने धुतात आमच्याकडे विशेषतः पाहुण्यांना निमंत्रण दिले असल्यास. कधी येताय बरं मग आमच्याकडे?

In reply to by खटपट्या

तुम्ही पण त्या कुंजविहार्चे फॅन का? ह्या जन्मात तरी परत त्या कुंज-विहार मध्ये जाणार नाही.एकदाच चून गेलो होतो. मेल्याने वड्या बरोबर चिंचेची चटणी दिली आणि भर म्हणून मारवाडी मिरच्या. च्यामारी आमच्या सारख्या गावरान माणसांचे हे खाणेच न्ह्वे. गेला उडत... आम्ही अद्याप झमझमीत वडे आणि चटकदार चटणी पचवू शकतो.

In reply to by किसन शिंदे

तुम्ही एकदा थोरल्या ठाकूरांचा डब्बल वडा-पाव खायला हवा होता... अर्थात त्या साठी तुम्हाला डोंबोलीला यावे लागले असते. मस्त हिरव्या मिरच्यांची चटणी आणि कांदा-लिंबू मारून वडा-पाव द्यायचा. असो.... आम्ही पुण्यवान की, आम्हाला थोरल्या ठाकुरांचे वडे मनसोक्त खाता आले...

In reply to by मुक्त विहारि

किसन शिंदे 01/09/2014 - 00:04
२००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर बंद झाले नसतील तिथला वडापाव खाल्ल्याची शक्यता शंभर टक्के आहे, फक्त आता आठवत नाही. बादवे कुठे होता हा वडापाव?

In reply to by किसन शिंदे

प्रश्र्नांतच उत्तर आहे... सध्या डोंबोलीला जशी मून-मून मिसळ फेमस आहे, तसे ह्या वडा-पावचे नांव होते. सुरुवातीला केळकर रोड, मानपाडा रोडला जिथे मिळायचा तिथे मिळायचा. नंतर नगरपालिकेच्या जवळ सुरु झाला. सध्या आदित्य मंगलकार्यालयाच्या समोर मिळतो, पण तो आमच्या साठी नसतो. शिंचे आजकाल चिंचेची चटणी टाकतात आणि मक्याचे पोहे देतो. आणि परत त्या मारवाडी मिरच्या. ठाकूर बुवा मस्त एक-दोन लवंगी मिरच्या टाकायचा. जावू दे, लग्न झाल्या पासून आम्हाला पण घरी रहायचे असल्याने चिंचेची चटणी आवडली, असे दाखवायला लागते.(अशावेळी बियर उपयोगी पडते.त्या कडवड पण मधूर चवी बरोबर, ती चटणी चालून जाते.) पण तो जुलुमाचा राम-राम. आता पुढच्या वेळी आलो की, झमझमीत वडे आणि लसणाच्या चटणी सोबतच कट्टा करू या. तुम भी क्या याद करोगे.

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा जेथे मुविच्या भाषणाला बक्षिस मिळाले होते त्या बाजूला त्रिमूर्ती ह्यांचा वडापावात झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी असते. नुसत्या आठवणीने तोंड भरून आले.

In reply to by निनाद मुक्काम …

आज-काल तिथे पण ह्या गुज्जू मंडळींच्या नादाने खजूर-चिंचेची चटणी असते. जावुदे, फडके रोड जिथे प्रधान डॉ.च्या बंगल्याच्या रोडला मिळतो, तिथले कुळकर्णी जरा बरे वडे विकतो.पण तो त्याच बरोबर इतरही बरेच पदार्थ विकत असल्याने, त्याच्या कडे पण चिंचेची चटणी आणि वडे खाणारे आहेतच. हा हंत हंत... ते थोरले ठाकूर गेले आणि डोंबोलीतल्या वडा-पावाची मज्जाच गेली.निदान ठाकुरांनी तरी चिंचेची चटणी आणि वडे हे काँबिनेशन ठेवायला नको होते. मी ती चिंचेची चटणी पुरण-पोळी बरोबर खाइन कदाचित श्रीखंडा बरोबर पण खाईन.पण बटाटेवडे आणि चिंचेची चटणी एकत्र अजिबात खाणार नाही. लसणाची चटणी आणि बटाटे वडे हेच खरे. ते मद्राशी तर बटाटे वडे आणि सांभार पण खातात. आणि लोकं पण त्या वडा-सांभारा बरोबर पाव खातात.त्या मद्राशांचे एक ठीक आहे, पण आपलीच, रांगडी मराठी पुरुष मंडळी, चिंचेची चटणी खातांना बघून कसेसेच होते. वाघाने गवत खाल्ले तरी चालेल, पण मराठी पुरुषांनी चिंचेची चटणी वड्यांच्या बरोबर खाणे, हे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही. एकूणच, आमचा राग चिंचेच्या चटणीवर आहे, हे सुज्ञ माणसांच्या लक्षांत आलेच असेल.

In reply to by मुक्त विहारि

येथे उशिरा लक्ष गेले त्रिमूर्ती च्या बाजूला सुभाष डेअरी आहे तेथे पूर्वी मातोश्रींचा वाडा होता , खानदानी डोंबिवलीकर असल्याचा सार्थ अभिमान बाळगून सांगतो , त्रीमृती मध्ये वडापाव खायला जाणार असे सांगताच माझ्या डोंबिवलीकर मामे बहिणींनी लगेच ओरिजनल वडा पाव बनवणार्याने चवीशी इमान राखता यावे म्हणून सर्वेश जवळ नवीन दुकान थाटले असल्याचे कळले आहे , पावसळ्यात गाड्यांचा गोंधळ असायचा तेव्हा आईची ७ पर्यंत वाट पहायची नाहीतर त्रिमूर्ती मध्ये जाऊन घरगुती जेवण आणावे. असा रिवाज होता , त्रिमूर्ती आमची दुसरी आई होत्या , गुज्जू लोकांसाठी चवीसाठी प्रतारणा पाहून वाईट वाटले.

दिपक.कुवेत 01/09/2014 - 11:51
एवढा टेम्टींग फोटो टाकून जळवल्याबद्दल. मित्रा पाकृ रेडिमेड असली तरी फोटो तरी स्टेप बाय स्टेप टाकत जा...उदा. बाहेरुन वडे आणल्यास त्यांचा पुडितच ठेवुन काढलेला फोटो, प्लेट स्वच्छ पुसतानाचा, कोथींबीर धुतानाचा :D मग वडे प्लेट मधे ठेवुन चटणीची वाटि मधे ठेवतानाचा आणि मग शेवटि अर्धवट खाल्ल्याचा....बघ विचार कर.

पैसा 01/09/2014 - 14:07
"कुटुंबाला" तरी दिले का नाही? वडे खायची घाई फोटोवरून जाणवते आहे. वड्यांच्या फार जवळून काढलेला फोटो आहे अशी एक शंका आली. का चटणी आपण केल्यामुळे तिचा फोटो फोकस करून द्यायचा असं ठरवलं होतं? असो. कुटुंबाला सांगा, वडे छान दिसताहेत. :-/

In reply to by पैसा

एस 01/09/2014 - 14:50
वड्यांपासून चटणीपर्यंत सगळं काही आम्हीच केलंय. तरीपण 'कुटुंबा'पर्यंत तुमची दाद पोहोचवण्यात येईल.

कंजूस 01/09/2014 - 16:36
कोसळत्या पावसात सर्वाँच्या तोंडाला पाणी सुटेल, काहींचे डोळे पाणावतील, असा विषय काढल्याबद्दल धन्यवाद. एक शंका. नाशिक जळगाव वर्धा नागपूरची वेगळी शाखा आहे का मिपाची? तिथून काही पोच येत नाहीत. आमच्याकडे असं असतं वगैरे.

एस 01/09/2014 - 22:50
माझ्या पहिल्यावहिल्या पाककृतीचं पुणे Vs इतर सर्व असं यशस्वी रूपांतर आणि शतकोत्तर कामगिरीकडे ढकलणे या अजोड कामगिरीबद्दल मुवि आणि स्नेहांकिता या दोन्ही आयडींचे हाभिनंदण. घाईगडबडीत केलेल्या पाककृतीच्या त्याच दर्जाच्या धाग्यावर पहिल्याच दिवशी प्रतिक्रियांचा पाऊस. अरेरे! बाकी छायाचित्रणासारख्या विषयावर जीव तोडून लिहिलेल्या धाग्यांवर कुत्रेही फिरकत नाही हेही मिपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. :-) धन्य! चलो बायबाय! :-)
थांबा, थांबा, थांबा. ही काही पाककृती नाही. एकच फोटो टाकणार आहे. पाककृतीबिती टाकायला मी काही बल्लवाचार्य नाही. बटाटेवड्यांची पाककृती Mrunalini यांनी आधीच मिपावर देऊन ठेवली आहे. उत्सुकांनी ती आवर्जून वाचा. इथे फक्त एक फोटो पहायला मिळेल. तोही अजिबात धड नाहीये. तेवढा धीर धरवला नाही आणि सर्व वडे + चटणी गट्टम केले गेले. ;-)

Batatewade&Chutney
हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.