मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

...आणि मॅनीमल प्ल्यानेटात निवडून येताना .... :( :( :( :) :) :)

माहितगार ·
लेखनप्रकार
"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :) कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :) आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ?

आयड्याबाज

आनंद कांबीकर ·
लेखनविषय:
गांव जन्मल्यापासून म्हणा किंवा मग देशात आमदार-खासदार निवाडायची प्रथा चालु झाल्यापासून म्हणा, पहिल्यांदाच या गावाला कुणी आमदार भेट द्यायला येणार होता. मागचे इलेक्शन झाल्यापासुन जवळपास पाच वर्षात या गावाची लोकसंख्या दोनावरून चारावर गेली. बहुदा त्याचेच गणित बांधुन ही भेट योजिलेली असावी. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच विनायकराव एकटेच डोक्याला हात लाउन बसलेले. पाच दिवसांनी आमदार साहेब येणार ही गोष्ट त्यांना आजच समजलेली. ती समजल्या पासून विचार करुन करुन त्यांच्या डोक्याचा पार खुळखुळा झालेला. आता पुढल्या दोन चार महिन्यात आमदारकीचे मतदान. म्हणजे साहेब आले की जाऊन थेट लोकायलाच भेटनार.

कोहीनूर हिरा, .. आणि इतिहासाच्या मागील पानावरुन पुढे जाताना .. ..

माहितगार ·
सोने असो वा जड जवाहीर यांच्यावर निव्वळ अय्याशीखातर आयातीसाठी परकीय चलन वाया घालवावे एवढे नक्कीच महत्वाचे नाहीत. पण काही गोष्टींना सांस्कृतीक वारशाचे महत्व असते, अशा वारशा सोबत अस्मिता जोडल्या गेल्या असतात. एखादी गोष्ट तुम्ही बाजारात सहज विकायला ऑक्शनमध्ये ठेवता आणि कुणि विकत घेऊन जाते तर तुमचा अभिमान आणि तुमचे मन दुखावले जात नाही. पण कुणि तुमच्या पराभवाचा लाभ घेऊन वस्तु आणि तेही अस्मिता जोडलेली सांस्कृतीक वारसा असलेली असेल तर समाजमनाचा हळवा कोपरा दुखावला जातोच. अस्मिता हिरावलं जाण्याचं हे खुपणं वस्तु हिरावून घेऊन जाणार्‍यांना लक्षात येतच असं नाही.

मारीचझंपीचे (बंगाली) कम्युनीस्ट ( )मृग ( )

माहितगार ·
लेखनविषय:
आंतरजाल न्याहाळताना कोणतीशी दडपशाहींची यादी नजरे समोर उगवली, सहसा दडपशाहीच्या कथांमध्ये केवळ पात्रे बदललेली मनुष्य सर्वत्र सारखा असतो असा विचार करत फारसे डिटेल्स न वाचता वेगाने पुढे गेलो पण एक वेगळच नाव दिसलं मारीचझंपी, स्थळनामांची गमंत असते काय असेल या स्थळनामा मागे या उत्सुकतेने डिटेल्स उघडले. मारीचझंपी हे एक बेट आहे, पश्चिम बंगालच्या सुंदरबनातील एक संरक्षीत वन्यक्षेत्र हे लक्षात आलं.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

मृत्युन्जय ·
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.

१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ

स्वामी संकेतानंद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वी १०५ आकडा दिला जाई, हल्ली हल्ली १०७ म्हटले जाते.( एक कोल्हापूरकर नाव आहे, दुसरे माहीत नाही). तर आपण सोयीसाठी १०७ हुतात्मे धरू. त्यांची संख्या इथे महत्वाची नाही तर त्यांच्या हौतात्म्याचे कारण महत्वाचे आहे. वेगळ्या विदर्भाचा विषय निघाला की एकदम भावनिक मुद्दा काही हळवे मावळे पुढे आणत असतात. ' संयुक्त महाराष्ट्रासाठी १०७ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, त्यांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही' या आशयाचे वाक्य फेकले जातात. मी म्हटलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास पाहू जरा. मराठी विश्वकोश वाचले(विकिपंडित म्हणू नये म्हणून.

पट पट पट मोजीत नोटा

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
काव्यरस
पट पट पट पट मोजित नोटा चाले राजा नेता ओठावरती जीन मिसळूनी घेतो रुपेरी सोडा उंची फेरारी स्वतःस छान जनास करी ईंधन दरवाढ भाववाढ ती सामान्यांस अन स्वत: फिरवीतो स्कोडा नेता राजा फार हुषार सत्तेवर तो होता स्वार नुसता त्याला पुरे हवाला स्वीस अकौन्ट काढा सात सदनिका भूखंड सात बळकावितो हा एक दमात आला आला राजा नेता सोडा रस्ता सोडा मूळ कविता: टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा उंच भरारी दोन्ही कान ऐटीत वळवी मान कमान मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबुक ओढ़ा सात अरण्ये समुद्र सात ओ

सरकार...- मलाबी दयाना

Dinesh Satpute ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गावाकडच्या मित्रा सोबत गप्पा सुरु होत्या. मित्राने सुरुवात केली. सरकारनं मल्ल्यांची मालमत्ता जप्त केली तरी त्याने बुडविलेल्या अशा किती कर्जाची वसुली होईल. मी म्हटलं ..जेवढे वसूल होईल तेवढे होईल ..पण सरकारनं ठरवलं तर त्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सरकारला गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणता येतील....पैसा हि कमवता येईल. हे काय नवीन..मित्राने मधेच प्रश्न केला. मी सुद्धा मग योजना काय असू शकते हे सांगण्यास सुरुवात केली... आता हे बघ..जप्त केलेली मालमत्ता विकून आलेल्या पैशात "तुला बी घेना"सारखी कर्ज योजना आणता येईल. कर्ज घेणा-यासाठी अट एकच...

भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

गॅरी शोमन ·
लेखनविषय:
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे. ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता.