Skip to main content

राजकारण

सरकार...- मलाबी दयाना

लेखक Dinesh Satpute यांनी सोमवार, 21/03/2016 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या मित्रा सोबत गप्पा सुरु होत्या. मित्राने सुरुवात केली. सरकारनं मल्ल्यांची मालमत्ता जप्त केली तरी त्याने बुडविलेल्या अशा किती कर्जाची वसुली होईल. मी म्हटलं ..जेवढे वसूल होईल तेवढे होईल ..पण सरकारनं ठरवलं तर त्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सरकारला गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणता येतील....पैसा हि कमवता येईल. हे काय नवीन..मित्राने मधेच प्रश्न केला. मी सुद्धा मग योजना काय असू शकते हे सांगण्यास सुरुवात केली... आता हे बघ..जप्त केलेली मालमत्ता विकून आलेल्या पैशात "तुला बी घेना"सारखी कर्ज योजना आणता येईल. कर्ज घेणा-यासाठी अट एकच...

भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

लेखक गॅरी शोमन यांनी शनिवार, 19/03/2016 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे. ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता.

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 15/03/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारीच्या ९ तारखेला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली.

ठळक बातम्या

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी रविवार, 06/03/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
राजकीय- > पंतप्रधान मोदी अजूनही भारतातच. > राहुल गांधी यांनी आज कुठलाही मूर्खपणा केला नाही. > अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार मध्ये (पुन्हा) "जंग". कला- > "BA पास" नंतर "MA पास" चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित. "NET/ SET Qualified" आणि "Doctorate" या त्यापुढिल भागांचीही उत्सुकता. > शाहरुख़ चा FAN लौकरच प्रदर्शित होणार. " जबरा फ़ैन" गाण्यात कंगना राणावत चा जलवा. (चुकीची दुरुस्ती- "जबरा फैन" गाण्यात शाहरुख़च आहे, जरी कंगना सारखा दिसत असला तरी.) क्रीड़ा- > भारताकडून पराभूत होण्यास बांगलादेश सज्ज.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ७)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 03/03/2016 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ ----------------------------------------------- मला सर्व २९ घोषणांचा तपशील मिळाला नाही. म्हणून ज्यांच्याबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा झाली त्याबद्दलच बोलतो. ज्या क्रमाने ह्या घोषणा दिल्या गेल्या तो क्रम मला माहीत नाही, म्हणून मी मला आठवल्या त्या क्रमाने त्यांबद्दल लिहितो.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ६)

लेखक Anand More यांनी शनिवार, 27/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ -------------------------------------- पर्शियन ऐवजी इंग्रजीचा राजभाषा म्हणून वापर व्हावा या मागणीचे खंदे समर्थक, इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचा आणि इंग्रजी भाषेतून शिक्षणाचा पाया घातल्याने भारतात कुप्रसिद्ध झालेल्या मेकॉले साहेबांनी Indian Penal Code म्हणजे भारतीय दंड संहितेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ५)

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 26/02/2016 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ |भाग ४ ----------------------------- कोणी देश अखंड रहावा म्हणून झटत होते. तर कोणी आपले संस्थान टिकावे म्हणून. कोणी स्वार्थाने अंध झाले होते तर कोणी परमार्थाने धुंद झाले होते. कोणी हक्क टिकवून ठेवण्याची पराकाष्ठा करत होते तर कोणी कर्तव्यपूर्तीसाठी झटत होते.

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 25/02/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २.

ज्योती आणि स्मृती

लेखक विनायक पन्त यांनी गुरुवार, 25/02/2016 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, काल तब्येत ठीक नसल्यामुळे पूर्ण वेळ लोकसभा आणि राज्यसभा channels पाहिले. ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी आणि अनुराग ठाकूर यांची संसदिय भाषणे ऐकली. स्मृती इराणी आणि ज्योतिरादित्य यांनी जे काही दाखले/पुरावे दिलेत, त्यावरून तरी काँग्रेस आणि भाजप JNU प्रकरणात राजकारण करत आहे असंच वाटतंय. खरं-खोटं न्यायव्यवस्था बघून घेईल. मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे, देशाच्या एकात्मतेविरोधात जर एखादी घटना घडत असेल (सिद्ध झालेले नाहीये, तरी पण गृहीत धरू कि घडलीये), तर सरकार म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून जी असंवेदनशीलता यांनी दाखवलेली आहे तो योग्य आहे का?

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 25/02/2016 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ ------------- काश्मीर प्रश्नाचे वेगळे[पण समजून घेण्यासाठी मी प्रथम त्याची जुनागढ आणि हैद्राबाद बरोबर तुलना करतो आणि मग तेंव्हाचा घटनाक्रम सांगतो. जुनागढ भारतीय भूभागाला लागून होते. हैद्राबाद भारतीय भूभागाने वेढलेले होते. या दोन्ही संस्थानांची पाकिस्तानशी भौगोलिक जवळीक किंवा सलगता नव्हती. तर काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांबरोबर मोठी सीमा असलेले संस्थान होते.