Skip to main content

राजकारण

महाराष्ट्रातले मजेशीर राजकारण

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 31/07/2017 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
४ मुख्य पक्ष भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे सरकार पडणे अवघड आहे पण १) शिवसेना पुढे विकास पावेल का ? २) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ? ३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?

शिवसेना भवितव्य ?

लेखक वाल्मिकी यांनी रविवार, 16/07/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
तसा विजू भाऊंचा धागा असला तरी माझे प्रश्न वेगळे आहेत १) सत्तेत असून पण विरोधकांची भूमिका मतदार लोकांना पटणार नाही ,ह्याचा पुढच्या निवडणुनीत परिणाम होऊ शकतो ? २) भाजप मध्ये पण घोटाळे झाले जसे चिक्की घोटाळा ,व्यापम ,ह्यावेळी शिवसेना गप्प होती का ? ३) विखे पाटील ह्यांना शिवसेनेने मंत्री केले होते तर का बिनसले व नुकत्याच घुमजाव प्रकरणाचं सेना भांडवल का नाही करत ? ४) लोक आता केजरीवाल शी तुलना करत आहेत हे बरे वाटतेय का ? ५) शिवसेने ने ३ वर्षात सत्तेत राहून काय केले ?

सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 16/07/2017 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
सिक्कीम भारतात सामील झाला कसा ? (संदर्भ:इंदिरा गांधी, आणीबाणी आणि भारतीय लोकशाही – लेखक पी. एन. धर, अनुवाद- अशोक जैन) गेले काही दिवस भारत आणि चीन मधले संबंध परत ताणले गेले आहेत. दोन्ही देशात परत एखाद्या युद्धाला सुरुवात होते कि काय अशी अवस्था निर्माण झाली. आता काय होणार हे तर कालच ठरवेल परंतु ह्यावेळच्या कात्कातीचे कारण ठरला तो सिक्कीम-आपल्या सिक्कीम राज्याच्या सीमेलगत असलेला डोकाला ( ला म्हणजे खिंड)ह्या भागात चीन ने घुसखोरी करत सुरु केलेले रस्त्याचे बांधकाम आणि भारताने घेतलेला आक्षेप.साधारण गेले महिनाभर भारत आणि चीनी सैन्यात ह्यावरून तणाव आहे .

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी मंगळवार, 11/07/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . .

चायना आणि चुंबी (३) संधी मुत्सद्देगिरीची

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/07/2017 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
डोकलामच्या टापूवर रस्त्याच्या बांधणीची चीनची वेळ चुकली का ? माहित नाही, शस्त्रास्त्र स्पर्धेत चीन भारतापेक्षा आघाडीवर असला, आणि डराकाळ्या कितीही फोडल्या तरी याक्षणी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत प्रत्यक्षात अडचणीत आहे. इथे ९९ गुण डोवाल डॉक्ट्राईनला १ गुण आमेरीकनांच्याही अडकलेल्या हाताला. दोन देशात खरेच युद्ध झाले तर आर्थीक आणि जिवीत हानीची दोन्ही देशांना मोठी किंमत मोजावी लागेल हे खरे असले तरी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत एखाद्या वस्तुचा सौदा करण्याचा प्रयत्न करतो तशी स्थिती असते. बाजारातला सौदा फिस्कटला तर युद्धे होत नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणात सौदा होऊ शकला नाही तर युद्धापर्यंत गोष्ट जाऊ शकते.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

जय महाराष्ट्र बोला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/06/2017 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला कुणाच्या बापाची भीती नाय बोला दणकूण बोला तुम्ही जय महाराष्ट्र बोला अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही उगा पिरपिर करू नका नाहीतर एकच ठेवून देवू टोला बोला बोला जय महाराष्ट्र बोला बापजादे खपले आमचे सीमालढा देवून लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून खोटे गुन्हे नका दाखल करू कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा बोला बोला जय महाराष्ट्र बोला मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो सोईचे नियम केले हो केले दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले खेळी केली अन गावं खिशात घा
काव्यरस

लाल दिवा . . . . . .

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 29/05/2017 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
होय मी लाल दिवा बोलतोय . . . . . . माझं मन आज पहिल्यांदाच मांडतोय . . . . . मी तोच ज्याची शान आगळीच होती . . . प्रतिष्ठेची एक खूण म्हणून मजा वेगळीच होती . . . दुतर्फा रस्ते रिकामे व्हायचे, कित्येकजण दर्शनासाठी तिष्ठायचे . . "टोल"वाटोलवी म्हणजे काय ते तर मला कधीही नाही समजायचे . . . . गाडीवर असता विराजमान . . . पाहिले फक्त जोडलेले हात अन् झुकलेली मान . . . . माझ्या अस्तित्वाने गाडीतले व्हायचे माजोरी . . . भरतच राहिले ते आपापली तिजोरी . . . जनतेच्या पैशाने जनतेचेच प्रश्न सोडवायचे . . . . पैसे मिळायचे साहेबांना पण प्रश्न तसेच रहायचे . . . . आजूबाजूला कायम लवाजमा . . .

राजकारण आणि We...The People!

लेखक चिनार यांनी सोमवार, 08/05/2017 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे खूप पॉलिटिक्स चालतं रे इथं. मी म्हटलं होतं ना तुला! आता बघ,तुला मेल पाठवला त्यानं..मला नाही पाठवला!", माझा कलीग तणतणत म्हणाला. कंपनीच्या मेलबॉक्सवर येणाऱ्या असंख्य बिनकामांच्या मेलपैकी एक मेल आमच्या मॅनेजरने त्याला पाठवला नाही ह्यावरून तो चिडला होता. खरं म्हणजे त्या ईमेलचा माझ्याशीच काय तर आमच्या अक्ख्या डिपार्टमेंटशी काहीही संबंध नव्हता. मॅनेजरला FYI म्हणून आलेला ईमेल त्याने पुढे पाठवण्याची तशी काही गरज नसते. पण मेल पाठवणं हा मॅनेजरलोकांचा आवडता उद्योग असतो.तेव्हढंच रिकाम्या हाताला काम मिळतं बाकी काही नाही!! आता 'मला का नाही पाठवला?' ह्या प्रश्नाचं माझ्याजवळ काहीही उत्तर नव्हतं.