मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन

अभ्या.. ·

भीमराव 29/01/2017 - 11:08
आभ्यादादा आमच्या पॉम्लेट/ह्यांडवेल कारेक्रमाची आठवण झाली बघ, गावात सलग सुट्ट्यांचा काळ बघुन आम्ही पोरं पोरं क्रिकेट म्याचेस भरवायचो, गावातलाच प्रिंटींग वाला काकोबा बघुन त्याच्याकडुन हि हस्तपत्रके छापुन घ्याची, आणि सायकल वर कधी डब्बल तर कधी टिब्बल शीट जाऊन आसपास जितक्या गावात वाटता येतील तितक्या गावात वाटायची, आसपासचे दोनतीन भाऊ तात्या आप्पा आण्णा बक्षीसाच्या रकमेसाठी पाहुन ठेवायचे, जेवढी जास्त बक्षीस रक्कम,तितक्या जास्त एन्ट्र्या आणि जितक्या जास्त एन्ट्रया तितके जास्त पैसे. पण त्यासाठी हि पॉम्पलेट हेच आमचे जाहीरातीचे मुख्य साधन होते.

In reply to by भीमराव

अभ्या.. 30/01/2017 - 19:21
राईट्ट बाबुदादा, हॅन्डवेल नावानं लै आठवणी जागृत झाल्या. गावाकडं अजुन हाच शब्द वापरतात. क्रिकेटच्या टूर्नामेंटाची लै हॅन्डबिलं केली राव. :)

वरुण मोहिते 29/01/2017 - 12:08
आपला लेख आणि आजच लोकसत्ता च्या पुरवणीसोबत २ डव्ह शाम्पू अटॅच आले आहेत . पॅम्प्लेट आणि बाकी वेळा असं शाम्पू किंवा कॅलेंडर पाठवणं ह्यात दरांचा हि फरक असेल ना ? अवांतर -मागे एकदा जागतिक एड्स दिनानिमित्त टाइम्स ऑफ इंडिया ह्या पेपरासोबत कंडोम अटॅच होते जाहिरात किंवा सामाजिक उपक्रम म्हणून ते लीगल होतं का ??कारण नंतर टाइम्स ने असा प्रयोग केला नाही.

In reply to by वरुण मोहिते

अभ्या.. 29/01/2017 - 14:29
वरुणभाव, खाली संदीपाण्णा म्हणतेत तसे आहे. ह्यात इल्लीगल काही नाही पण पेपर डायरेक्ट घरी जातो. लहान मुले बघतात वगैरे इश्शु होतात. आजकाल शाळेतच लैंगिक शिक्षण दिले जाते त्यामुळे ह्यात थोडासा अवघडलेपणा सोडले तर इलीगल काही नाही. बाकी तुमचा प्रश्न जरा वेगळाय. तुम्ही दिलेली उदाहरणे ही डायरेक्ट त्यात्या पेपरने घेतलेले क्लायंट असतात. डव्हवाले टाईम्सला पैसे देतात. टाईम्सवाले त्यांचा स्टाफ वापरुन ते अ‍ॅट्च करतात. मी दिलीत त्या इन्सर्शन मेथडमध्ये न्युजपेपरला एक छदामही जात नाही. विक्रेत्यांची यंत्रणा हे कुरीअरसारखे काम करते. टाइम्सचा फुलपेज अ‍ॅडचा रेट मेन एडीशनला पाच दहा लाख असेल तर दै. डावी भुसारी कॉलनी गर्जना चा रेट दहा हजारात भागतो. इनसर्शनला दोन्हीचे सोयरसुतक नाही. दोन्ही पेपरात इन्सर्शन वीस पैशातच होते. हे पैसे अंक टाकणार्‍याचे असतात. माझ्या माहीतीतला एकजण दहावी पास असून पेपर टाकत मोठा एजंट बनलाय. संघाचा अध्यक्ष आहे. फोरव्हीलरमधून फिरतो. त्याच्याकडे आज ४०-५० मुले आहेत पेपर टाकायला. इन्सर्शनची बिलेच दर महिना लाखालाखाची गोळा करतो. हि यंत्रणा न्युजपेपरचा एन्व्हलप सारखे माध्यम म्हणून वापर करुन घेते फक्त.

राही 29/01/2017 - 13:36
जाहिरात आणि मुद्रण या व्यवसायातले बारकावे आणि हातघाई टिपणारे आपले लेखन आवडत असते. साधी सोपी बोलीभाषा, छोटीछोटी वाक्ये, अकृत्रिम, अनौपचरिक शब्दयोजना यामुळे आणि या विश्वातल्या अद्भुतरम्य तपशीलांमुळे लेख वाचावेसे वाटतात. असेच चालू राहू दे.

अनिंद्य 29/01/2017 - 20:30
पेपरात ढिगाने आलेले पॅम्प्लेट्स कधी नीट बघितले सुद्धा नाहीत, त्याच्यामागे एवढी मेहनत आणि लोक-साखळी असते हे नव्याने समजले! पु भा प्र.

खेडूत 29/01/2017 - 23:33
सविस्तर वर्णन आवडले. अशी पहाटेची मंडई भरलेली आणी लीफलेटस टाकण्याची लग्बग पुण्यात अनेक ठिकाणी दिसते. थंडीच्या दिवसांत त्यांची दयाही येते. पुभाप्र!

लीना कनाटा 30/01/2017 - 05:39
अभ्या दादा छान माहिती दिलीय. या बद्दल थोडी फार कल्पना होती परंतु एव्हडी डिटेलवार माहिती नव्हती. यातील सर्वात वैतागवाना प्रकार म्हणजे आपली इच्छा आणि गरज नसताना देखील आपल्या हातात अशी पॅम्पलेट्स कोंबू पाहणारी मंडळी आणि अशी पॅम्प्लेट्स तिथेच इकडे तिकडे फेकून कचरा करणारे लोक्स. अशी मंडळी बहुधा रेल्वेच्या फलाटावर दिसतात. याचा नवीन अविष्कार म्हणजे आंजा वर विहार करताना येणारे पॉप-अप्स किंवा तूनळीवरील जाहिराती. हे कमीत कमी ब्लॉक तरी करता येतात परंतु टीव्ही च्या पडद्यावर खालच्या बाजूला धावणाऱ्या एकोळी जाहिराती कशा थांबवायच्या?

चौकटराजा 30/01/2017 - 16:43
मला असले रिपोर्ट वाले लेख आवडतात. मी अनिल अवचट यांचा त्याखातर पंखा आहे. अभ्याने काही काही पंचेस मात्र जबरा टाकले आहेत."एक दिवस अभ्याबरोबर " असा मी माझा भावी कार्यक्रम ठरवला आहे.

मस्तच ! तुमचा लेख वाचून लहानपणचे दिवस आठवले. सक्काळी सक्काळी उठून पेपर टाकणे (महिना ४० रु. फक्त) त्यातही नगरसेवक राहत असणारी बिल्डींग माझ्याकडे होती त्यामुळे फुकटचं छाती दोन इंच फुगवून चालणं, रात्री लायटीच्या खांबांवर चढून क्लासेसचे फ्लेक्स बांधणे (हे घरच्यांच्या अपरोक्ष) अशी कामे केली ती झरकन डोळ्यासमोरुन गेली. पुर्वीच्या काळी पेपरची लाईन टाकून मोठे होणार्‍यांना मान होता. आता काळं कुत्रं बी हिंग लावून विचारत नाही. उलट एखाद्या बिल्डींगमधे चोरीबिरी झाली तर सोसायटीवाले पहिले यांच्यावरच शक घेतात. शिवाय असं सांगणं म्हणजे स्वतःला डाऊनमार्केट करुन घेणं. असो ! गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी. प्रिंटींगव्यवसायात देखील ४-५ वर्षे काढली असल्यामुळे लेखाशी चटकन रिलेट होता आलं. ( कालखंड : अ‍ॅल्डस पेजमेकर ५ ते अ‍ॅडोब पेजमेकर ७ आणि कोरल ४,५ वापरण्याचा. नंतर कोरल १२ पर्यंत वापरले पण आपला खरा जीव होता पेजमेकर वरच. गणेशोत्सव मंडळांचे अहवाल छापायला एकदम नामी. कोरलवाली मंडळी एकदम तोंडात बोट घालून बगायची. आता बहुधा पेजमेकर वापरणारी जमात नामशेषच झाली असावी. जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद !

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 30/01/2017 - 18:31
छान प्रतिसाद! पेजमेकर नामशेष झालंय आता. त्याचं आधुनिक रुप म्हणजे अ‍ॅडोबी इन्डिझाइन... पुस्तकांची कामे, अहवाल, वर्तमानपत्रे इत्यादीसाठी उत्तम. बाकी जुने पेजमेकरवाले उस्ताद लोक जेव्हा माऊस न वापरता फक्त किबोर्डवर शॉर्टकटकिज वर सुस्साट काम करायचे ते बघून खरंच आमच्यासारख्या कोरलबालकांची बोटे तोंडात जायचीच. कोरल १८ आलंय आता तरी बर्‍याच फ्लेक्सवाल्यांकडे १२ वरच कामं चालतात.

In reply to by संदीप डांगे

कोरल १८ आलंय आता तरी बर्‍याच फ्लेक्सवाल्यांकडे १२ वरच कामं चालतात पण त्याचं मुळ कारण म्हणजे सुटसुटीतपणा आणि क्रॅक करण्याचा सोपेपणा एवढेच असावे. शिवाय एकदा हात बसल्यावर त्यावरुन हात काढावा वाटत नाही हे देखील खरेच. अ‍ॅल्डस पेजमेकर ५ चालत होतं तेव्हा मी शाईनिंग मारायला नुकतेच बाजारात आलेले अ‍ॅडोब पेजमेकर ६.० देखील टाकले होते. नंतर हळुहळू आवडत गेले. त्याकाळी कुंडली चे सॉफ्टवेअर देखील नवीनच बाजारात आले होते. मी चक्क रु. १०,००० टाकून विकत घेतले आणि ५० रुपयात ५ पानांची कुंडली छापून द्यायचा व्यवसाय चालू केला होता. त्यानिमित्ताने बरेच ज्योतिषी, कॉलेजला जाणारी आणि एकतर्फी लाईन असणारी पोरे, लग्नाळु मुले माझी गिर्‍हाईके झाली होती. काही जण तर आम्हाला चार-पाच पानांची कुंडली नको फक्त मॅच मेकींगवाले पेज छापून द्या १०-२० रुपयांत असे म्हणायचे. सॉफ्टवेअरने प्रिंट मारायच्या नादात आणि ज्योतिषांना गिर्‍हाईक बनवण्याच्या नादात मी देखील त्यांचे गिर्‍हाईक बनलो पण तो वेगळ्या लेखाच्या विषय होईल. असो. इथे येणार्‍या सगळ्या प्रिंटींगच्या लेखांवर नजर ठेऊन असतो याची पोचपावती देण्यासाठी हा अट्टाहास !

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. 30/01/2017 - 19:27
थॅन्क्स धर्मराज, संदीप माझ्याकडे कोरल १२ लीगल होते. त्याचीच सवय लागलेली. सध्या एक्ससिक्स आहे पण १२ ची मज्जा येत नाही. पेजमेकरवर टॅब्ज आणि इंडेट हँगर वापरुन जे लोक्स काम करतात त्यांच्याविषयी जाम रिस्पेक्ट आहे. पेजमेकर कंपोझीटर लोकांच्या हिशोबाने होते अगदी. प्लेस केलेले ऑब्जेक्ट एम्बेड असल्याने फाईली वजनदार नसायच्या हे मस्त. बँकाचे अहवाल हा एक दिव्य प्रकार करणार्‍या माणसाला डीटीपीचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. (मलापण ;))

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 30/01/2017 - 20:00
बँकाचे अहवाल हा एक दिव्य प्रकार करणार्‍या माणसाला डीटीपीचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. (मलापण ;)) >>> खरे आहे अगदी. पेजमेकरबद्दल फारसं माहित नसतांना उमेदवारीच्या काळात हा प्रकार एकदाच केला देवा. आपण जन्मालाच कशाला आलो असे वाटण्याची वेळ होती ती. ;-) स्लीपलेस नाईट्स, बसून बसून पोटर्‍यांची सूज आणि सतत पांढरे स्क्रीन बघून डोळे लाल-भडक... त्यावेळची मनोवस्था शब्दांत नाही सांगता यायची. :-)

In reply to by अभ्या..

आदिजोशी 03/02/2017 - 17:26
प्लेस केलेले ऑब्जेक्ट एम्बेड असल्याने फाईली वजनदार नसायच्या माझ्या माहिती नुसार इमेज एम्बेड केली की फाईल साईज वाढते. लिंक / प्लेस सली की फाईलची साईज कमी राहते.

In reply to by आदिजोशी

अभ्या.. 03/02/2017 - 18:06
तेच रे रे ते आदी. ओले ओले (ऑब्जेक्ट लिंक एम्बेडेड) म्हणायचे राहिले. कोरलला इम्पोर्ट केलेली इमेज अन पेजमेकराला प्लेस केलेली इमेज ह्याच्यामुळे फाईलीतल्या वजनातला फरक सांगत होतो.

गामा पैलवान 31/01/2017 - 00:24
लेख मस्तंच आहे. पण च्यायला ही प्यांपलेटं कसली टाकता राव ! त्यापेक्षा खरीखुरी पापलेटं टाका ना! कोळणीकडून घ्यायची आणि कॉलनीभर वाटायची. हाकानाका! सक्काळीसक्काळी फडफडीत पापलेट आपुल्या दारी. पेपरवाल्यांना ही आयडिया दिली पाहिजे. नाहीतरी त्यांना प्यांपलेटांतून फुटकी कवडीही लाभंत नाही. -गा.पै.

गणामास्तर 31/01/2017 - 12:37
एवढी किचकिच करून पेपरात टाकलेले ते कागदं न बघताचं फेकून देतो राव. अवांतर: मी येतो शनिवार रविवार तुझ्यासोबत गट्ठे टाकायला. काम झाले कि तुळजापूरला मटन खायला जाऊ, ओके ?

सिरुसेरि 31/01/2017 - 15:56
छान माहिती . काहि वर्षांपुर्वी एका ऑटोमोबाईल कंपनीने ( वोल्क्सवॅगन ?) आपल्या गाडीची माहिती देणारा स्पीकर पेपरमधुन वाटला होता ते आठवले .

अभ्या.. 02/02/2017 - 18:48
सर्व वाचक प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद. आता आगामी लेख: साईनबोर्ड. आमचा आवडता विषय पण मोट्ठा असल्याने टप्प्याटप्प्यात. शशक आटोपल्या की लगेच. ;)

१२वीला असताना मी सुधा लाइन टाकायचो.उल्हासनगर लालचक्की पासुन अंबरनाथ कानसाई पर्यन्त. १८० पेपर. १५० लाइन चे आणी ३० सेल चे. सोबत एक घोडा सायकल. डबल दांड्याची आणी मोठा क्यारीयर लावलेली. महिना ४०० मिळायचे आणी मोठी कमाइ म्हणजे सायकल २४ तास माझ्याकडेच रहायची. उल्हासनगर च्या चांदीबाइ कॉलेजच्या समोर हा पेपर चा बाजार भरायचा. अभ्या ने म्हटल्या प्रमाणे पँपलेट्स टाकायचे म्हणजे बोनस असायचा. आम्ही १०० पँपलेट्स ला ५ रुपये घ्यायचो (साल होतं २००५). पँपलेट्स वाला नजरेआड झाला की नीम्मे पँपलेट्स कॉलेजसमोरच्या नाल्यात.

भीमराव 29/01/2017 - 11:08
आभ्यादादा आमच्या पॉम्लेट/ह्यांडवेल कारेक्रमाची आठवण झाली बघ, गावात सलग सुट्ट्यांचा काळ बघुन आम्ही पोरं पोरं क्रिकेट म्याचेस भरवायचो, गावातलाच प्रिंटींग वाला काकोबा बघुन त्याच्याकडुन हि हस्तपत्रके छापुन घ्याची, आणि सायकल वर कधी डब्बल तर कधी टिब्बल शीट जाऊन आसपास जितक्या गावात वाटता येतील तितक्या गावात वाटायची, आसपासचे दोनतीन भाऊ तात्या आप्पा आण्णा बक्षीसाच्या रकमेसाठी पाहुन ठेवायचे, जेवढी जास्त बक्षीस रक्कम,तितक्या जास्त एन्ट्र्या आणि जितक्या जास्त एन्ट्रया तितके जास्त पैसे. पण त्यासाठी हि पॉम्पलेट हेच आमचे जाहीरातीचे मुख्य साधन होते.

In reply to by भीमराव

अभ्या.. 30/01/2017 - 19:21
राईट्ट बाबुदादा, हॅन्डवेल नावानं लै आठवणी जागृत झाल्या. गावाकडं अजुन हाच शब्द वापरतात. क्रिकेटच्या टूर्नामेंटाची लै हॅन्डबिलं केली राव. :)

वरुण मोहिते 29/01/2017 - 12:08
आपला लेख आणि आजच लोकसत्ता च्या पुरवणीसोबत २ डव्ह शाम्पू अटॅच आले आहेत . पॅम्प्लेट आणि बाकी वेळा असं शाम्पू किंवा कॅलेंडर पाठवणं ह्यात दरांचा हि फरक असेल ना ? अवांतर -मागे एकदा जागतिक एड्स दिनानिमित्त टाइम्स ऑफ इंडिया ह्या पेपरासोबत कंडोम अटॅच होते जाहिरात किंवा सामाजिक उपक्रम म्हणून ते लीगल होतं का ??कारण नंतर टाइम्स ने असा प्रयोग केला नाही.

In reply to by वरुण मोहिते

अभ्या.. 29/01/2017 - 14:29
वरुणभाव, खाली संदीपाण्णा म्हणतेत तसे आहे. ह्यात इल्लीगल काही नाही पण पेपर डायरेक्ट घरी जातो. लहान मुले बघतात वगैरे इश्शु होतात. आजकाल शाळेतच लैंगिक शिक्षण दिले जाते त्यामुळे ह्यात थोडासा अवघडलेपणा सोडले तर इलीगल काही नाही. बाकी तुमचा प्रश्न जरा वेगळाय. तुम्ही दिलेली उदाहरणे ही डायरेक्ट त्यात्या पेपरने घेतलेले क्लायंट असतात. डव्हवाले टाईम्सला पैसे देतात. टाईम्सवाले त्यांचा स्टाफ वापरुन ते अ‍ॅट्च करतात. मी दिलीत त्या इन्सर्शन मेथडमध्ये न्युजपेपरला एक छदामही जात नाही. विक्रेत्यांची यंत्रणा हे कुरीअरसारखे काम करते. टाइम्सचा फुलपेज अ‍ॅडचा रेट मेन एडीशनला पाच दहा लाख असेल तर दै. डावी भुसारी कॉलनी गर्जना चा रेट दहा हजारात भागतो. इनसर्शनला दोन्हीचे सोयरसुतक नाही. दोन्ही पेपरात इन्सर्शन वीस पैशातच होते. हे पैसे अंक टाकणार्‍याचे असतात. माझ्या माहीतीतला एकजण दहावी पास असून पेपर टाकत मोठा एजंट बनलाय. संघाचा अध्यक्ष आहे. फोरव्हीलरमधून फिरतो. त्याच्याकडे आज ४०-५० मुले आहेत पेपर टाकायला. इन्सर्शनची बिलेच दर महिना लाखालाखाची गोळा करतो. हि यंत्रणा न्युजपेपरचा एन्व्हलप सारखे माध्यम म्हणून वापर करुन घेते फक्त.

राही 29/01/2017 - 13:36
जाहिरात आणि मुद्रण या व्यवसायातले बारकावे आणि हातघाई टिपणारे आपले लेखन आवडत असते. साधी सोपी बोलीभाषा, छोटीछोटी वाक्ये, अकृत्रिम, अनौपचरिक शब्दयोजना यामुळे आणि या विश्वातल्या अद्भुतरम्य तपशीलांमुळे लेख वाचावेसे वाटतात. असेच चालू राहू दे.

अनिंद्य 29/01/2017 - 20:30
पेपरात ढिगाने आलेले पॅम्प्लेट्स कधी नीट बघितले सुद्धा नाहीत, त्याच्यामागे एवढी मेहनत आणि लोक-साखळी असते हे नव्याने समजले! पु भा प्र.

खेडूत 29/01/2017 - 23:33
सविस्तर वर्णन आवडले. अशी पहाटेची मंडई भरलेली आणी लीफलेटस टाकण्याची लग्बग पुण्यात अनेक ठिकाणी दिसते. थंडीच्या दिवसांत त्यांची दयाही येते. पुभाप्र!

लीना कनाटा 30/01/2017 - 05:39
अभ्या दादा छान माहिती दिलीय. या बद्दल थोडी फार कल्पना होती परंतु एव्हडी डिटेलवार माहिती नव्हती. यातील सर्वात वैतागवाना प्रकार म्हणजे आपली इच्छा आणि गरज नसताना देखील आपल्या हातात अशी पॅम्पलेट्स कोंबू पाहणारी मंडळी आणि अशी पॅम्प्लेट्स तिथेच इकडे तिकडे फेकून कचरा करणारे लोक्स. अशी मंडळी बहुधा रेल्वेच्या फलाटावर दिसतात. याचा नवीन अविष्कार म्हणजे आंजा वर विहार करताना येणारे पॉप-अप्स किंवा तूनळीवरील जाहिराती. हे कमीत कमी ब्लॉक तरी करता येतात परंतु टीव्ही च्या पडद्यावर खालच्या बाजूला धावणाऱ्या एकोळी जाहिराती कशा थांबवायच्या?

चौकटराजा 30/01/2017 - 16:43
मला असले रिपोर्ट वाले लेख आवडतात. मी अनिल अवचट यांचा त्याखातर पंखा आहे. अभ्याने काही काही पंचेस मात्र जबरा टाकले आहेत."एक दिवस अभ्याबरोबर " असा मी माझा भावी कार्यक्रम ठरवला आहे.

मस्तच ! तुमचा लेख वाचून लहानपणचे दिवस आठवले. सक्काळी सक्काळी उठून पेपर टाकणे (महिना ४० रु. फक्त) त्यातही नगरसेवक राहत असणारी बिल्डींग माझ्याकडे होती त्यामुळे फुकटचं छाती दोन इंच फुगवून चालणं, रात्री लायटीच्या खांबांवर चढून क्लासेसचे फ्लेक्स बांधणे (हे घरच्यांच्या अपरोक्ष) अशी कामे केली ती झरकन डोळ्यासमोरुन गेली. पुर्वीच्या काळी पेपरची लाईन टाकून मोठे होणार्‍यांना मान होता. आता काळं कुत्रं बी हिंग लावून विचारत नाही. उलट एखाद्या बिल्डींगमधे चोरीबिरी झाली तर सोसायटीवाले पहिले यांच्यावरच शक घेतात. शिवाय असं सांगणं म्हणजे स्वतःला डाऊनमार्केट करुन घेणं. असो ! गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी. प्रिंटींगव्यवसायात देखील ४-५ वर्षे काढली असल्यामुळे लेखाशी चटकन रिलेट होता आलं. ( कालखंड : अ‍ॅल्डस पेजमेकर ५ ते अ‍ॅडोब पेजमेकर ७ आणि कोरल ४,५ वापरण्याचा. नंतर कोरल १२ पर्यंत वापरले पण आपला खरा जीव होता पेजमेकर वरच. गणेशोत्सव मंडळांचे अहवाल छापायला एकदम नामी. कोरलवाली मंडळी एकदम तोंडात बोट घालून बगायची. आता बहुधा पेजमेकर वापरणारी जमात नामशेषच झाली असावी. जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद !

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 30/01/2017 - 18:31
छान प्रतिसाद! पेजमेकर नामशेष झालंय आता. त्याचं आधुनिक रुप म्हणजे अ‍ॅडोबी इन्डिझाइन... पुस्तकांची कामे, अहवाल, वर्तमानपत्रे इत्यादीसाठी उत्तम. बाकी जुने पेजमेकरवाले उस्ताद लोक जेव्हा माऊस न वापरता फक्त किबोर्डवर शॉर्टकटकिज वर सुस्साट काम करायचे ते बघून खरंच आमच्यासारख्या कोरलबालकांची बोटे तोंडात जायचीच. कोरल १८ आलंय आता तरी बर्‍याच फ्लेक्सवाल्यांकडे १२ वरच कामं चालतात.

In reply to by संदीप डांगे

कोरल १८ आलंय आता तरी बर्‍याच फ्लेक्सवाल्यांकडे १२ वरच कामं चालतात पण त्याचं मुळ कारण म्हणजे सुटसुटीतपणा आणि क्रॅक करण्याचा सोपेपणा एवढेच असावे. शिवाय एकदा हात बसल्यावर त्यावरुन हात काढावा वाटत नाही हे देखील खरेच. अ‍ॅल्डस पेजमेकर ५ चालत होतं तेव्हा मी शाईनिंग मारायला नुकतेच बाजारात आलेले अ‍ॅडोब पेजमेकर ६.० देखील टाकले होते. नंतर हळुहळू आवडत गेले. त्याकाळी कुंडली चे सॉफ्टवेअर देखील नवीनच बाजारात आले होते. मी चक्क रु. १०,००० टाकून विकत घेतले आणि ५० रुपयात ५ पानांची कुंडली छापून द्यायचा व्यवसाय चालू केला होता. त्यानिमित्ताने बरेच ज्योतिषी, कॉलेजला जाणारी आणि एकतर्फी लाईन असणारी पोरे, लग्नाळु मुले माझी गिर्‍हाईके झाली होती. काही जण तर आम्हाला चार-पाच पानांची कुंडली नको फक्त मॅच मेकींगवाले पेज छापून द्या १०-२० रुपयांत असे म्हणायचे. सॉफ्टवेअरने प्रिंट मारायच्या नादात आणि ज्योतिषांना गिर्‍हाईक बनवण्याच्या नादात मी देखील त्यांचे गिर्‍हाईक बनलो पण तो वेगळ्या लेखाच्या विषय होईल. असो. इथे येणार्‍या सगळ्या प्रिंटींगच्या लेखांवर नजर ठेऊन असतो याची पोचपावती देण्यासाठी हा अट्टाहास !

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. 30/01/2017 - 19:27
थॅन्क्स धर्मराज, संदीप माझ्याकडे कोरल १२ लीगल होते. त्याचीच सवय लागलेली. सध्या एक्ससिक्स आहे पण १२ ची मज्जा येत नाही. पेजमेकरवर टॅब्ज आणि इंडेट हँगर वापरुन जे लोक्स काम करतात त्यांच्याविषयी जाम रिस्पेक्ट आहे. पेजमेकर कंपोझीटर लोकांच्या हिशोबाने होते अगदी. प्लेस केलेले ऑब्जेक्ट एम्बेड असल्याने फाईली वजनदार नसायच्या हे मस्त. बँकाचे अहवाल हा एक दिव्य प्रकार करणार्‍या माणसाला डीटीपीचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. (मलापण ;))

In reply to by अभ्या..

संदीप डांगे 30/01/2017 - 20:00
बँकाचे अहवाल हा एक दिव्य प्रकार करणार्‍या माणसाला डीटीपीचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. (मलापण ;)) >>> खरे आहे अगदी. पेजमेकरबद्दल फारसं माहित नसतांना उमेदवारीच्या काळात हा प्रकार एकदाच केला देवा. आपण जन्मालाच कशाला आलो असे वाटण्याची वेळ होती ती. ;-) स्लीपलेस नाईट्स, बसून बसून पोटर्‍यांची सूज आणि सतत पांढरे स्क्रीन बघून डोळे लाल-भडक... त्यावेळची मनोवस्था शब्दांत नाही सांगता यायची. :-)

In reply to by अभ्या..

आदिजोशी 03/02/2017 - 17:26
प्लेस केलेले ऑब्जेक्ट एम्बेड असल्याने फाईली वजनदार नसायच्या माझ्या माहिती नुसार इमेज एम्बेड केली की फाईल साईज वाढते. लिंक / प्लेस सली की फाईलची साईज कमी राहते.

In reply to by आदिजोशी

अभ्या.. 03/02/2017 - 18:06
तेच रे रे ते आदी. ओले ओले (ऑब्जेक्ट लिंक एम्बेडेड) म्हणायचे राहिले. कोरलला इम्पोर्ट केलेली इमेज अन पेजमेकराला प्लेस केलेली इमेज ह्याच्यामुळे फाईलीतल्या वजनातला फरक सांगत होतो.

गामा पैलवान 31/01/2017 - 00:24
लेख मस्तंच आहे. पण च्यायला ही प्यांपलेटं कसली टाकता राव ! त्यापेक्षा खरीखुरी पापलेटं टाका ना! कोळणीकडून घ्यायची आणि कॉलनीभर वाटायची. हाकानाका! सक्काळीसक्काळी फडफडीत पापलेट आपुल्या दारी. पेपरवाल्यांना ही आयडिया दिली पाहिजे. नाहीतरी त्यांना प्यांपलेटांतून फुटकी कवडीही लाभंत नाही. -गा.पै.

गणामास्तर 31/01/2017 - 12:37
एवढी किचकिच करून पेपरात टाकलेले ते कागदं न बघताचं फेकून देतो राव. अवांतर: मी येतो शनिवार रविवार तुझ्यासोबत गट्ठे टाकायला. काम झाले कि तुळजापूरला मटन खायला जाऊ, ओके ?

सिरुसेरि 31/01/2017 - 15:56
छान माहिती . काहि वर्षांपुर्वी एका ऑटोमोबाईल कंपनीने ( वोल्क्सवॅगन ?) आपल्या गाडीची माहिती देणारा स्पीकर पेपरमधुन वाटला होता ते आठवले .

अभ्या.. 02/02/2017 - 18:48
सर्व वाचक प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद. आता आगामी लेख: साईनबोर्ड. आमचा आवडता विषय पण मोट्ठा असल्याने टप्प्याटप्प्यात. शशक आटोपल्या की लगेच. ;)

१२वीला असताना मी सुधा लाइन टाकायचो.उल्हासनगर लालचक्की पासुन अंबरनाथ कानसाई पर्यन्त. १८० पेपर. १५० लाइन चे आणी ३० सेल चे. सोबत एक घोडा सायकल. डबल दांड्याची आणी मोठा क्यारीयर लावलेली. महिना ४०० मिळायचे आणी मोठी कमाइ म्हणजे सायकल २४ तास माझ्याकडेच रहायची. उल्हासनगर च्या चांदीबाइ कॉलेजच्या समोर हा पेपर चा बाजार भरायचा. अभ्या ने म्हटल्या प्रमाणे पँपलेट्स टाकायचे म्हणजे बोनस असायचा. आम्ही १०० पँपलेट्स ला ५ रुपये घ्यायचो (साल होतं २००५). पँपलेट्स वाला नजरेआड झाला की नीम्मे पँपलेट्स कॉलेजसमोरच्या नाल्यात.
माझ्यासाठी ५.०० एएम म्हणजे लेट नाईट असते बर्‍याचदा पण अर्ली मॉर्निंग कधीच नाही. तरीही ह्या पंचपंचऊ:षकाले अ‍ॅक्टीव्हाला किका मारुन वैतागलोय. बटनस्टार्ट तर होतच नाहीये, किक अ‍ॅणि स्टॅन्डमधला फरकही कळत नाही. स्वतःची नेहमीची बाईक देऊन मागून घेतलीय मित्राची अ‍ॅक्टीव्हा. कारणही तसेच. धंदा हो. दुसरे काय. इन्सर्शन्स टाकायचेत एक लाखभर. ......................... इन्सर्शन्स म्हणजे आपले पॅम्पलेटस हो. फ्लायरपण म्हणतात बरेच क्लायंट. ते नसतात का शन्वार रविवारच्या पेपरच्या पानात. पेपरची घडी उलगडताना सुळ्ळकन सांडतात. एकदा बघितले की पुड्या बांधायला, विमान करायला नाहीतर काचा पुसायला उपयोगी येतात ते.

झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच !

माहितगार ·

कंजूस 22/01/2017 - 17:36
या केसबद्दल तेव्हा वाचलं होतं आणि बहुतेक कॅापीराइट भंग होत नाही शैक्षणिक पुस्तकांचे फोटोकॅापी केल्याने असा निर्णर वाचल्याचे आठवतय. पुढे काय झालं?

In reply to by कंजूस

माहितगार 22/01/2017 - 18:18
बातम्यांमध्ये गाजावाजा आहे तेवढा केसचा पूर्ण निकाल लागलेला नाही पण अंतरीम निर्णयसुद्धा बर्‍यापैकी नोंद घेण्यासारखा आहे. वृत्तपत्रिय बातम्यापेक्षा केस मूळातून वाचणे आणि लिगल ओपीनीयन वाचणे अधिकश्रेयस्कर असावे. गैरसमज टळावेत म्हणुन नेमक्या शब्दांच्या योजनेची आवश्यकता असावी म्हणून अधिक लिहिण्यापूर्वी अंमळवेळ घेईन.

कंजूस 22/01/2017 - 19:03
डिटिएच चानेलवरचे सिनेमे,कार्यक्रम आपण सेटटॅापबॅाक्समध्ये रेकॅार्ड करू शकतो पण ते आपल्याच डिवाइसमधून चालतात /प्ले होतात. ते पेन ड्राइवमध्ये असले तरी दुसय्रा सेट टॅाप मधून अथवा कंम्प्युटरातून चालत नाहीत॥ अशा रितीने ग्राहक फक्त स्वत:च्याच वापरासाठी घेत असल्याने कॅापीराइटचा भंग होत नाही. याच प्रकारे विद्यार्थी पुस्तकांचे फोटोकॅापी काढून फक्त स्वत:साठीच वापरत असतो,ते दुसय्रा कुणास पुन्हा विकत नाही म्हणून कॅापीराइटचा भंग होत नाही असा प्रतिवाद न्यायालयाने प्रथमपायरीस ग्राह्य मानला हे वाचल्याचे आठवते आहे.

In reply to by कंजूस

खेडूत 22/01/2017 - 23:33
असे असेल तर हा केवळ 'पुढे विकत नाही' प्रतिवाद चुकीचा वाटतो. मग गाणी, चित्रपटही आपण वैयक्तिक वापरासाठीच घेतो ना? या न्यायाने तो झेरॉक्सवाला कुठचीही उत्पादने, खाद्यपदार्थ, ब्रँडच्या नावाने विकेल अन म्हणेल ते ग्राहक स्वतः वापरताहेत आणि पुढे विकत नाहीत. पण मूळ व्यावसायिकाचा धंदा बुडाला त्याचं काय?

In reply to by खेडूत

माहितगार 23/01/2017 - 10:04
यात बरेच बारकावे आहेत, पण थोडक्यात पुर्नप्रकाशन, पुर्ननिर्मिती, वाटप, पुर्नवाटप, फॉर्वर्डींग, अपलोडींग, सेलींग करणार्‍यांनी अधिक काळजी घ्यावयास हवी. रिसीव्ह करणारा सर्व नसेल पण बर्‍याच काही केसेसमध्ये पुर्नप्रकाशन, पुर्ननिर्मिती, वाटप, पुर्नवाटप, फॉर्वर्डींग, अपलोडींग, सेलींग इत्यादी करत नसेल स्वतःपुरते वापरुन चूप बसत असेल तर कायद्याच्या उल्लंघन टाळू शकतो असे म्हणता येईल का ?

कंजूस 23/01/2017 - 07:54
>>मग गाणी, चित्रपटही आपण वैयक्तिक वापरासाठीच घेतो ना?>> -- नक्की कुठून? १) अशा साइटवर गाणी अपलोड करताना एक मेसिज येतो" कॅापिराइटिड गाणी अपलोड करू नका." २)एफेम रेकॅार्डींग करणारे काही फोन्स आहेत. त्यात फाइलला एक डिजिटल टॅग जोडला जातो. ही गाण्याची फाइल दुसय्रा फोनमध्ये ब्लुटुथने पाठवता येते. असा प्रसार करता येतो॥ काही फोन्समध्ये या टॅग्जकडे दुर्लक्ष केले जाते. जर सरकारने काटेकोर पालन केले तर दुसय्रा फोनमध्ये वाजणार नाही. काही फोप्समध्ये DRM सॅाफ्टवेर असते ते या टॅग्जकडे लक्ष देतात व गाण्याची पाठवलेली फाइल घेतच नाहीत.

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 24/01/2017 - 13:45
बातमी सप्टेंबर मधली एक न्यायाधिशीय पिठाने निर्णय दिल्यानंतरची आहे नंतर ही प्रकाशक मंडळी अपिलात गेलीतर डिव्हीजन बेंचाने काही व्याख्या नव्याने मांडल्या, निर्णयात काही बदल केले. त्यामुळे आपण दिलेला बातमी दुवा तेवढा अद्ययावत म्हणता येईल का या बाबत साशंकता वाटते.

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 24/01/2017 - 21:59
होय ना, ९ डिसेंबरला दोन न्यायाधीशांच्या बेंचने रिवाईज्ड निकाल दिला आहे, आधीचा निकाल पूर्ण रामेश्वरी फोटोकॉपीच्या बाजूने होता; ९ डिसेंबरच्या निकालाने आधीच्या (सप्टेंबरातल्या) निकालाला अंशतः बाजूला ठेऊन कोर्सपॅक आणि पूर्ण पुस्तकाचे झेरॉक्सींगची केस रोस्टर न्यायाधिशांना रिवाइज्ड टर्मस खाली पुन्हा अभ्यासण्यास सांगितली आहे. पण हे करताना त्यांनी काही गोष्टी नव्याने डिफाईन केल्या म्हणुन हा ९ डिसेंबरच्या निकालाचे महत्व असेल. (जर केस पुढे सर्वोच्च न्यायालयात गेली नाहीतर; अशा कॉपीराईट केसेस दिल्ली उच्चन्यायालयात जास्त प्रमाणात दिसतात सर्वोच्च न्यायालय एकदम पलटी मारणारा निकाल देण्याची शक्यता कमी असेल असे माझे व्यक्तिगत मत)

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 25/01/2017 - 11:19
या संदर्भाने बर्‍यापैकी न्यायालयीन निर्णय आहेत (जिज्ञासुंना त्यातील काही सर्वसाधारण वाचनासाठीही रोचक वाटू शकतात indiankanoon.org हि न्यायालयीन निर्णय शोधण्यासाठी चांगली साईट आहे) , अर्थात या विषया बाबत माझे स्वतःचे वाचन कमी आहे. तसे बातमीची बातमी देणे हे उचीत वापरात मोडते पण त्याचा अर्थ सरसकट कॉपीपेस्ट होत नसावा.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 25/01/2017 - 11:32
अमूक वाहिनीच्या सौजन्याने असा उल्लेख करावा लागतो. पूर्वी व्हायचा, आता होतो का माहित नाही. मध्यंतरी दुसर्‍या वाहिनीचा लोगो पिक्सलेट (मिटवून) करुन फूटेज दाखावायचे. खरे तर फूटेज ही त्या विशिष्ट चॅनेलची खाजगी मालमत्ता असते. त्यावर कॉपीराईट असलाच पाहिजे.

पैसा 25/01/2017 - 18:39
माझा प्रश्न जरा वेगळा आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या पुस्तकातला एखदाच चॅप्टर अभ्यासाला अचानक हवा असतो. ही पुस्तके सहसा खूप महाग असतात. लायब्ररीत मर्यादित पुस्तके उपलब्ध असतात. मुलांकडे अचानक लागले तर खर्चायला पैसे असून कितीसे असणार? फोटोकॉपी शिवाय त्यांना स्वस्तात मटेरियल मिळवायचा दुसरा पर्याय उपलब्ध असतो का?

In reply to by पैसा

संदीप डांगे 25/01/2017 - 18:53
दुर्दैवाने नाही. शिक्षण महाग असणे ह्यामागे ही महागडी पुस्तके आहेतच ना. एखादे पुस्तक अभ्यासक्रमाला लावतांना ते विद्यार्थ्याला परवडेल काय असा विचार होत नसावा. ज्ञान हे विकत घ्यावं अशी जबरदस्ती विद्यार्थ्यांवर होते. त्यातून विद्यार्थी मार्ग काढणारच. ह्यात पुस्तकवाल्यांचं काहीच चुकत नाही, विद्यार्थ्यांचंही आणि झेरॉक्सवाल्याचंही.. पण व्यवस्था अशी आहे की... बस!

In reply to by संदीप डांगे

पैसा 25/01/2017 - 18:59
अभ्यासाला पुस्तके लावताना ती विद्यार्थ्याना स्वस्तात उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न करणे ही कोणाची तरी जबाबदारी असली पाहिजे. मग ते सरकार असेल, विद्यापीठ असेल, शिक्षण संस्था किंवा पुस्तकाचे प्रकाशक.

In reply to by पैसा

संदीप डांगे 25/01/2017 - 19:28
त्यासाठीच डिजिटलकडे १००% वळणं आवश्यक आहे. संपूर्ण पुस्तक, चॅप्टरवाईज नॉमिनल सबस्क्रिप्शन फी लावून मोबाईल-टॅब वर उपलब्ध झाले तर जितका झेरॉक्सवाल्याला पैसे देतात तेवढयात पुस्तकवाल्यांनीच विकावे.... जेव्हा पायरेटेड सिडीचा धुमाकूळ सुरु झाला तेव्हा असं ऐकण्यात आलं की रस्त्यावर सिडीज विकल्या जातात म्हणून हैराण झालेल्यांनी मग हीच शक्कल लढवली.. स्वत:च पायरेटेड दिसतील अशा सीडी रस्त्यापर्यंत पोचतील अशी व्यवस्था केली... त्यातून पैसे काढले. दुसरे आपलं कॉपी करुन विकतात ना मग त्यांच्यापेक्शा दहा रुपये कमी घेऊन तुलनेने चांगली ओरिजिनल प्रत विकावी.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे 25/01/2017 - 19:31
बहुतेक मोजरबीअर ने स्वस्तात फिल्मसिडीची शक्कल काढली असं आठवतं.... रस्त्यावर ५० ला बकवास क्वालिटी घेण्यापेक्षा ६०-७० रुपये देऊन ओरिजिनल क्वालिटी लोक घेतील असा कयास होता.. तो यशस्वी झाला होता...

माहितगार 26/01/2017 - 09:27
The appeal is disposed of declaring the law as above and setting aside the impugned judgment and decree holding that no triable issue on fact arises. As we have already held the triable issue on fact would be as indicated in paragraph 56 above. Another triable issue on fact would be as per paragraph 79 above. The suit is restored for trial on the issue of fact and for which parties would be permitted to lead expert witness testimony. आपला अनुवाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरला जाईल

कंजूस 22/01/2017 - 17:36
या केसबद्दल तेव्हा वाचलं होतं आणि बहुतेक कॅापीराइट भंग होत नाही शैक्षणिक पुस्तकांचे फोटोकॅापी केल्याने असा निर्णर वाचल्याचे आठवतय. पुढे काय झालं?

In reply to by कंजूस

माहितगार 22/01/2017 - 18:18
बातम्यांमध्ये गाजावाजा आहे तेवढा केसचा पूर्ण निकाल लागलेला नाही पण अंतरीम निर्णयसुद्धा बर्‍यापैकी नोंद घेण्यासारखा आहे. वृत्तपत्रिय बातम्यापेक्षा केस मूळातून वाचणे आणि लिगल ओपीनीयन वाचणे अधिकश्रेयस्कर असावे. गैरसमज टळावेत म्हणुन नेमक्या शब्दांच्या योजनेची आवश्यकता असावी म्हणून अधिक लिहिण्यापूर्वी अंमळवेळ घेईन.

कंजूस 22/01/2017 - 19:03
डिटिएच चानेलवरचे सिनेमे,कार्यक्रम आपण सेटटॅापबॅाक्समध्ये रेकॅार्ड करू शकतो पण ते आपल्याच डिवाइसमधून चालतात /प्ले होतात. ते पेन ड्राइवमध्ये असले तरी दुसय्रा सेट टॅाप मधून अथवा कंम्प्युटरातून चालत नाहीत॥ अशा रितीने ग्राहक फक्त स्वत:च्याच वापरासाठी घेत असल्याने कॅापीराइटचा भंग होत नाही. याच प्रकारे विद्यार्थी पुस्तकांचे फोटोकॅापी काढून फक्त स्वत:साठीच वापरत असतो,ते दुसय्रा कुणास पुन्हा विकत नाही म्हणून कॅापीराइटचा भंग होत नाही असा प्रतिवाद न्यायालयाने प्रथमपायरीस ग्राह्य मानला हे वाचल्याचे आठवते आहे.

In reply to by कंजूस

खेडूत 22/01/2017 - 23:33
असे असेल तर हा केवळ 'पुढे विकत नाही' प्रतिवाद चुकीचा वाटतो. मग गाणी, चित्रपटही आपण वैयक्तिक वापरासाठीच घेतो ना? या न्यायाने तो झेरॉक्सवाला कुठचीही उत्पादने, खाद्यपदार्थ, ब्रँडच्या नावाने विकेल अन म्हणेल ते ग्राहक स्वतः वापरताहेत आणि पुढे विकत नाहीत. पण मूळ व्यावसायिकाचा धंदा बुडाला त्याचं काय?

In reply to by खेडूत

माहितगार 23/01/2017 - 10:04
यात बरेच बारकावे आहेत, पण थोडक्यात पुर्नप्रकाशन, पुर्ननिर्मिती, वाटप, पुर्नवाटप, फॉर्वर्डींग, अपलोडींग, सेलींग करणार्‍यांनी अधिक काळजी घ्यावयास हवी. रिसीव्ह करणारा सर्व नसेल पण बर्‍याच काही केसेसमध्ये पुर्नप्रकाशन, पुर्ननिर्मिती, वाटप, पुर्नवाटप, फॉर्वर्डींग, अपलोडींग, सेलींग इत्यादी करत नसेल स्वतःपुरते वापरुन चूप बसत असेल तर कायद्याच्या उल्लंघन टाळू शकतो असे म्हणता येईल का ?

कंजूस 23/01/2017 - 07:54
>>मग गाणी, चित्रपटही आपण वैयक्तिक वापरासाठीच घेतो ना?>> -- नक्की कुठून? १) अशा साइटवर गाणी अपलोड करताना एक मेसिज येतो" कॅापिराइटिड गाणी अपलोड करू नका." २)एफेम रेकॅार्डींग करणारे काही फोन्स आहेत. त्यात फाइलला एक डिजिटल टॅग जोडला जातो. ही गाण्याची फाइल दुसय्रा फोनमध्ये ब्लुटुथने पाठवता येते. असा प्रसार करता येतो॥ काही फोन्समध्ये या टॅग्जकडे दुर्लक्ष केले जाते. जर सरकारने काटेकोर पालन केले तर दुसय्रा फोनमध्ये वाजणार नाही. काही फोप्समध्ये DRM सॅाफ्टवेर असते ते या टॅग्जकडे लक्ष देतात व गाण्याची पाठवलेली फाइल घेतच नाहीत.

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 24/01/2017 - 13:45
बातमी सप्टेंबर मधली एक न्यायाधिशीय पिठाने निर्णय दिल्यानंतरची आहे नंतर ही प्रकाशक मंडळी अपिलात गेलीतर डिव्हीजन बेंचाने काही व्याख्या नव्याने मांडल्या, निर्णयात काही बदल केले. त्यामुळे आपण दिलेला बातमी दुवा तेवढा अद्ययावत म्हणता येईल का या बाबत साशंकता वाटते.

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 24/01/2017 - 21:59
होय ना, ९ डिसेंबरला दोन न्यायाधीशांच्या बेंचने रिवाईज्ड निकाल दिला आहे, आधीचा निकाल पूर्ण रामेश्वरी फोटोकॉपीच्या बाजूने होता; ९ डिसेंबरच्या निकालाने आधीच्या (सप्टेंबरातल्या) निकालाला अंशतः बाजूला ठेऊन कोर्सपॅक आणि पूर्ण पुस्तकाचे झेरॉक्सींगची केस रोस्टर न्यायाधिशांना रिवाइज्ड टर्मस खाली पुन्हा अभ्यासण्यास सांगितली आहे. पण हे करताना त्यांनी काही गोष्टी नव्याने डिफाईन केल्या म्हणुन हा ९ डिसेंबरच्या निकालाचे महत्व असेल. (जर केस पुढे सर्वोच्च न्यायालयात गेली नाहीतर; अशा कॉपीराईट केसेस दिल्ली उच्चन्यायालयात जास्त प्रमाणात दिसतात सर्वोच्च न्यायालय एकदम पलटी मारणारा निकाल देण्याची शक्यता कमी असेल असे माझे व्यक्तिगत मत)

In reply to by एकुलता एक डॉन

माहितगार 25/01/2017 - 11:19
या संदर्भाने बर्‍यापैकी न्यायालयीन निर्णय आहेत (जिज्ञासुंना त्यातील काही सर्वसाधारण वाचनासाठीही रोचक वाटू शकतात indiankanoon.org हि न्यायालयीन निर्णय शोधण्यासाठी चांगली साईट आहे) , अर्थात या विषया बाबत माझे स्वतःचे वाचन कमी आहे. तसे बातमीची बातमी देणे हे उचीत वापरात मोडते पण त्याचा अर्थ सरसकट कॉपीपेस्ट होत नसावा.

In reply to by माहितगार

संदीप डांगे 25/01/2017 - 11:32
अमूक वाहिनीच्या सौजन्याने असा उल्लेख करावा लागतो. पूर्वी व्हायचा, आता होतो का माहित नाही. मध्यंतरी दुसर्‍या वाहिनीचा लोगो पिक्सलेट (मिटवून) करुन फूटेज दाखावायचे. खरे तर फूटेज ही त्या विशिष्ट चॅनेलची खाजगी मालमत्ता असते. त्यावर कॉपीराईट असलाच पाहिजे.

पैसा 25/01/2017 - 18:39
माझा प्रश्न जरा वेगळा आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या पुस्तकातला एखदाच चॅप्टर अभ्यासाला अचानक हवा असतो. ही पुस्तके सहसा खूप महाग असतात. लायब्ररीत मर्यादित पुस्तके उपलब्ध असतात. मुलांकडे अचानक लागले तर खर्चायला पैसे असून कितीसे असणार? फोटोकॉपी शिवाय त्यांना स्वस्तात मटेरियल मिळवायचा दुसरा पर्याय उपलब्ध असतो का?

In reply to by पैसा

संदीप डांगे 25/01/2017 - 18:53
दुर्दैवाने नाही. शिक्षण महाग असणे ह्यामागे ही महागडी पुस्तके आहेतच ना. एखादे पुस्तक अभ्यासक्रमाला लावतांना ते विद्यार्थ्याला परवडेल काय असा विचार होत नसावा. ज्ञान हे विकत घ्यावं अशी जबरदस्ती विद्यार्थ्यांवर होते. त्यातून विद्यार्थी मार्ग काढणारच. ह्यात पुस्तकवाल्यांचं काहीच चुकत नाही, विद्यार्थ्यांचंही आणि झेरॉक्सवाल्याचंही.. पण व्यवस्था अशी आहे की... बस!

In reply to by संदीप डांगे

पैसा 25/01/2017 - 18:59
अभ्यासाला पुस्तके लावताना ती विद्यार्थ्याना स्वस्तात उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न करणे ही कोणाची तरी जबाबदारी असली पाहिजे. मग ते सरकार असेल, विद्यापीठ असेल, शिक्षण संस्था किंवा पुस्तकाचे प्रकाशक.

In reply to by पैसा

संदीप डांगे 25/01/2017 - 19:28
त्यासाठीच डिजिटलकडे १००% वळणं आवश्यक आहे. संपूर्ण पुस्तक, चॅप्टरवाईज नॉमिनल सबस्क्रिप्शन फी लावून मोबाईल-टॅब वर उपलब्ध झाले तर जितका झेरॉक्सवाल्याला पैसे देतात तेवढयात पुस्तकवाल्यांनीच विकावे.... जेव्हा पायरेटेड सिडीचा धुमाकूळ सुरु झाला तेव्हा असं ऐकण्यात आलं की रस्त्यावर सिडीज विकल्या जातात म्हणून हैराण झालेल्यांनी मग हीच शक्कल लढवली.. स्वत:च पायरेटेड दिसतील अशा सीडी रस्त्यापर्यंत पोचतील अशी व्यवस्था केली... त्यातून पैसे काढले. दुसरे आपलं कॉपी करुन विकतात ना मग त्यांच्यापेक्शा दहा रुपये कमी घेऊन तुलनेने चांगली ओरिजिनल प्रत विकावी.

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे 25/01/2017 - 19:31
बहुतेक मोजरबीअर ने स्वस्तात फिल्मसिडीची शक्कल काढली असं आठवतं.... रस्त्यावर ५० ला बकवास क्वालिटी घेण्यापेक्षा ६०-७० रुपये देऊन ओरिजिनल क्वालिटी लोक घेतील असा कयास होता.. तो यशस्वी झाला होता...

माहितगार 26/01/2017 - 09:27
The appeal is disposed of declaring the law as above and setting aside the impugned judgment and decree holding that no triable issue on fact arises. As we have already held the triable issue on fact would be as indicated in paragraph 56 above. Another triable issue on fact would be as per paragraph 79 above. The suit is restored for trial on the issue of fact and for which parties would be permitted to lead expert witness testimony. आपला अनुवाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरला जाईल
नव्हेंबर डिसंबर २०१६ नोटबंदी निर्णयामुळे इतर छोट्या मोठ्या बातम्या पडद्या आड राहील्या त्यातील एक छोटी बातमी दिल्लीच्या रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसची. आजुबाजूच्या फोटोकॉपींग सेंटरवरच्या विद्यार्थ्यांकडून (आणि इतरांकडून) पुस्तकांच्या झेरॉक्सींगच्या वेळी लेखक-प्रकाशकांच्या कॉपिराईटचे काय खोबरे होते याची कुणि फारशी काळजी करत नाही. कारण सरसामान्यपणे सर्वसामान्य भारतीयांची वृत्ती कायद्यांकडे झेंगट म्हणून पहाण्याची झाली असावी.

कोड मंत्र - अत्यंत प्रभावी सादरीकरण

श्रीगुरुजी ·

खेडूत 10/01/2017 - 15:09
या वेगळ्या अन चांगल्या नाटकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद. हा विषय रंगभूमीवर आणणे हेच धाडस आहे. शिवाय ते नेपथ्य अणि ४० कलाकार म्हणजे सोपे काम नाही. नक्की पहाणार...!

नाटक किंवा सिनेमा हे जीवनातले निखळ मनोरंजनाचे विषय आहेत अशी भूमिका असल्यानं या नाटकाला जाणार नाही. तरी गुरुजींमुळे मराठी नाट्यभूमीशी अपडेट राहायला मदत होते हे नक्की.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 11/01/2017 - 14:48
धन्यवाद! निखळ मनोरंजन हवे असेल तर 'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटक बघावे. एका फिक्शनवर आधारीत हे धमाल नाटक आहे. सर्व तरूण कलाकारांमुळे (सुव्रत जोशी, सखी गोखले, अमेय टिळक इ.) नाटक ताजेतवाने वाटते.

परमवीरचक्र / महावीरचक्र / वीरचक्र युद्धातील शौर्यासाठी दिले जाते, शांतताकालीन अंतर्गत शौर्यासाठी (उदा अतिरेक्याविरोधातील कारवाई, नक्षलवाद्यांविरोधातील शौर्य, इत्यादी) अशोकचक्र / कीर्तीचक्र/ शौर्यचक्र दिले जाते. नाटकाचा परिचय आवडला. नाटकाची कथावस्तूही खिळवून ठेवणारी आहे.

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी 11/01/2017 - 14:50
नाटकातच आसामच्या जंगलातील नक्षलवादी कारवायांविरूद्ध केलेल्या कामगिरीमुळे परमवीर चक्र जाही झाले असा उल्लेख आहे. नाटककाराची ही तांत्रिक चूक दिसते.

पगला गजोधर 10/01/2017 - 18:11
परीक्षण छान. पण...

फ्यु गुड मेन, या इंग्रजी चित्रपटाची कॉपी टू कॉपी माशी टू माशी नक्कल आहे हे नाटक

, असं वाटतंय हे परीक्षण वाचून fgm

In reply to by पगला गजोधर

अनुप ढेरे 10/01/2017 - 18:33
नाटक ठीक आहे पण नक्कल नीट जमलेली नाही. पात्रांमध्ये बळच नाती जोडलेली आहेत. गोष्टीशी आणि विषयाशी काहीही संबंध नसताना, मूळ गोष्टीत नसताना उगाच काही पात्रांना एकमेकांचं नातेवाईक दाखवलेलं आहे. या बदलांनी गोष्टीच्या प्रभावात अजिबात फरक पडत नाही. उलट उगाच पायात पाय होतात. ( हेच शौर्य सिनेमातपण केलय, राहुल बोसने जावेद जाफरीचं लग्न लावणे वगैरे भंकस...) विषय गंभीर आणि तसा नवा असल्याने या बळच गोष्टी घुसडायला नको होत्या असं वाटतं.

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी 11/01/2017 - 14:53
नाटकातील भावनिक गुंतागुंत तशी अनावश्यक होती. भारतीय प्रेक्षकांना भावनिक गुंतागुंत, मेलोड्रामा इ. गोष्टी आवडतात असा नाटककाराचा समज असावा. अर्थात या गुंतागुंतीमुळे नाटकाचा सादरीकरणात व प्रभावात फरक पडलेला नाही.

एस 10/01/2017 - 18:15
नक्षलवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराला कधी उतरवले गेले? आणि सीमेपलीकडील व्यक्तींना मारल्याबद्दल मानवी हक्क आयोगाची केस कशी बनू शकते? अभिनय छानच झालाय कलाकारांचा आणि नेपथ्यही छान आहे. पण कथेतल्या असल्या कच्च्या दुव्यांमुळे विरस होतो.

In reply to by एस

श्रीगुरुजी 11/01/2017 - 14:56
नक्षलवाद्यांविरूद्ध सैन्याचा कोणतातरी विशिष्ट विभाग लढतो (Central Reserve Police Force (CRPF) )असे वाचले आहे. लष्कराच्या थलसेनेचे जवान त्यात नसावेत.

In reply to by श्रीगुरुजी

एस 11/01/2017 - 19:23
तेच. केंद्रीय राखीव पोलीस बल नक्षलवाद्यांविरुद्ध तैनात आहे छत्तीसगढ सारख्या राज्यांमध्ये. परंतु भारतीय पायदळ (army) किंवा इतर दोन सैन्यदले (नौदल व वायुदल) हे नक्षलवाद्यांविरुद्ध कधीच वापरली गेलेली नाहीत, जात नाहीत. याचे कारण म्हणजे लष्कराला परकीय शत्रूंविरुद्ध लढायचे प्रशिक्षण दिलेले असते. त्यांना आपल्याच देशाच्या नागरिकांविरुद्ध लढायला लावणे हे निष्ठेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. डॉ. खरे जास्त चांगले सांगू शकतील. पण केवळ याच कारणामुळे आत्तापर्यंतच्या सर्व संरक्षणमंत्र्यांनी नक्षलवादाविरुद्ध सैन्यदल तैनात करण्याच्या राज्यांच्या मागणीला ठाम नकार दिलेला आहे. लेखकाची मोठीच चूक झालेली आहे.

ए साला, इंडियन फिल्म इंडस्ट्रीवाला पोरेलोक ने आदीच 'शौर्य' ह्या नेम ने 'फ्यु गुड मेन' पूर्ण लिफ्ट केला होता, वापस आणी एक थिएटर ने सुद्धा लिफ्ट केला? व्हेरी बॅड, व्हेर इज द ओरिजिनालिटी मेन. बाकी मिलिटरी प्रोसीजर्स अपुनला माहिती न्हाय सो नो कॉमेंट्स , असला थिएटर परफॉरमन्स पाहन्यापेक्षा आपुन घरीच फ्यु गुड मेन चा ब्ल्यू रे कॉपी लावून बसू आपुनच्या ५२ इंचप्लाझ्मा वरती.

In reply to by फेदरवेट साहेब

महासंग्राम 11/01/2017 - 15:59
ए साला फेदरवेट, तू साला बेन्सन & जॉन्सन कंपनीत मार्केटिंगला होता का रे ?? आय टेल यु झैरात मस्त ज्यमते तुला !!!

In reply to by फेदरवेट साहेब

महासंग्राम 11/01/2017 - 16:55
भाऊसाहेब, नाय वळखत आपन. आपलं कसं असते आपण बरं आणि आपलं काम बरं. मग साला साऱ्यांचा घमपती बाप्पा मोर्या का होऊ दे !!!

खेडूत 10/01/2017 - 15:09
या वेगळ्या अन चांगल्या नाटकाच्या परिचयाबद्दल धन्यवाद. हा विषय रंगभूमीवर आणणे हेच धाडस आहे. शिवाय ते नेपथ्य अणि ४० कलाकार म्हणजे सोपे काम नाही. नक्की पहाणार...!

नाटक किंवा सिनेमा हे जीवनातले निखळ मनोरंजनाचे विषय आहेत अशी भूमिका असल्यानं या नाटकाला जाणार नाही. तरी गुरुजींमुळे मराठी नाट्यभूमीशी अपडेट राहायला मदत होते हे नक्की.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी 11/01/2017 - 14:48
धन्यवाद! निखळ मनोरंजन हवे असेल तर 'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटक बघावे. एका फिक्शनवर आधारीत हे धमाल नाटक आहे. सर्व तरूण कलाकारांमुळे (सुव्रत जोशी, सखी गोखले, अमेय टिळक इ.) नाटक ताजेतवाने वाटते.

परमवीरचक्र / महावीरचक्र / वीरचक्र युद्धातील शौर्यासाठी दिले जाते, शांतताकालीन अंतर्गत शौर्यासाठी (उदा अतिरेक्याविरोधातील कारवाई, नक्षलवाद्यांविरोधातील शौर्य, इत्यादी) अशोकचक्र / कीर्तीचक्र/ शौर्यचक्र दिले जाते. नाटकाचा परिचय आवडला. नाटकाची कथावस्तूही खिळवून ठेवणारी आहे.

In reply to by तुषार काळभोर

श्रीगुरुजी 11/01/2017 - 14:50
नाटकातच आसामच्या जंगलातील नक्षलवादी कारवायांविरूद्ध केलेल्या कामगिरीमुळे परमवीर चक्र जाही झाले असा उल्लेख आहे. नाटककाराची ही तांत्रिक चूक दिसते.

पगला गजोधर 10/01/2017 - 18:11
परीक्षण छान. पण...

फ्यु गुड मेन, या इंग्रजी चित्रपटाची कॉपी टू कॉपी माशी टू माशी नक्कल आहे हे नाटक

, असं वाटतंय हे परीक्षण वाचून fgm

In reply to by पगला गजोधर

अनुप ढेरे 10/01/2017 - 18:33
नाटक ठीक आहे पण नक्कल नीट जमलेली नाही. पात्रांमध्ये बळच नाती जोडलेली आहेत. गोष्टीशी आणि विषयाशी काहीही संबंध नसताना, मूळ गोष्टीत नसताना उगाच काही पात्रांना एकमेकांचं नातेवाईक दाखवलेलं आहे. या बदलांनी गोष्टीच्या प्रभावात अजिबात फरक पडत नाही. उलट उगाच पायात पाय होतात. ( हेच शौर्य सिनेमातपण केलय, राहुल बोसने जावेद जाफरीचं लग्न लावणे वगैरे भंकस...) विषय गंभीर आणि तसा नवा असल्याने या बळच गोष्टी घुसडायला नको होत्या असं वाटतं.

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी 11/01/2017 - 14:53
नाटकातील भावनिक गुंतागुंत तशी अनावश्यक होती. भारतीय प्रेक्षकांना भावनिक गुंतागुंत, मेलोड्रामा इ. गोष्टी आवडतात असा नाटककाराचा समज असावा. अर्थात या गुंतागुंतीमुळे नाटकाचा सादरीकरणात व प्रभावात फरक पडलेला नाही.

एस 10/01/2017 - 18:15
नक्षलवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराला कधी उतरवले गेले? आणि सीमेपलीकडील व्यक्तींना मारल्याबद्दल मानवी हक्क आयोगाची केस कशी बनू शकते? अभिनय छानच झालाय कलाकारांचा आणि नेपथ्यही छान आहे. पण कथेतल्या असल्या कच्च्या दुव्यांमुळे विरस होतो.

In reply to by एस

श्रीगुरुजी 11/01/2017 - 14:56
नक्षलवाद्यांविरूद्ध सैन्याचा कोणतातरी विशिष्ट विभाग लढतो (Central Reserve Police Force (CRPF) )असे वाचले आहे. लष्कराच्या थलसेनेचे जवान त्यात नसावेत.

In reply to by श्रीगुरुजी

एस 11/01/2017 - 19:23
तेच. केंद्रीय राखीव पोलीस बल नक्षलवाद्यांविरुद्ध तैनात आहे छत्तीसगढ सारख्या राज्यांमध्ये. परंतु भारतीय पायदळ (army) किंवा इतर दोन सैन्यदले (नौदल व वायुदल) हे नक्षलवाद्यांविरुद्ध कधीच वापरली गेलेली नाहीत, जात नाहीत. याचे कारण म्हणजे लष्कराला परकीय शत्रूंविरुद्ध लढायचे प्रशिक्षण दिलेले असते. त्यांना आपल्याच देशाच्या नागरिकांविरुद्ध लढायला लावणे हे निष्ठेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. डॉ. खरे जास्त चांगले सांगू शकतील. पण केवळ याच कारणामुळे आत्तापर्यंतच्या सर्व संरक्षणमंत्र्यांनी नक्षलवादाविरुद्ध सैन्यदल तैनात करण्याच्या राज्यांच्या मागणीला ठाम नकार दिलेला आहे. लेखकाची मोठीच चूक झालेली आहे.

ए साला, इंडियन फिल्म इंडस्ट्रीवाला पोरेलोक ने आदीच 'शौर्य' ह्या नेम ने 'फ्यु गुड मेन' पूर्ण लिफ्ट केला होता, वापस आणी एक थिएटर ने सुद्धा लिफ्ट केला? व्हेरी बॅड, व्हेर इज द ओरिजिनालिटी मेन. बाकी मिलिटरी प्रोसीजर्स अपुनला माहिती न्हाय सो नो कॉमेंट्स , असला थिएटर परफॉरमन्स पाहन्यापेक्षा आपुन घरीच फ्यु गुड मेन चा ब्ल्यू रे कॉपी लावून बसू आपुनच्या ५२ इंचप्लाझ्मा वरती.

In reply to by फेदरवेट साहेब

महासंग्राम 11/01/2017 - 15:59
ए साला फेदरवेट, तू साला बेन्सन & जॉन्सन कंपनीत मार्केटिंगला होता का रे ?? आय टेल यु झैरात मस्त ज्यमते तुला !!!

In reply to by फेदरवेट साहेब

महासंग्राम 11/01/2017 - 16:55
भाऊसाहेब, नाय वळखत आपन. आपलं कसं असते आपण बरं आणि आपलं काम बरं. मग साला साऱ्यांचा घमपती बाप्पा मोर्या का होऊ दे !!!
लष्कराचे सैनिकांसाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण सुरू आहे. मराठा रेजिमेंटच्या सैनिकांची एक मोठी तुकडी अत्यंत कठोर प्रशिक्षणाची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवित आहे. परंतु या तुकडीतल्या रवी शेलार नावाच्या प्रशिक्षणार्थीला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाहीय्ये. इतरांच्या तुलनेत तो मागे पडतो. त्यांच्या अधिकार्‍याला, कर्नल प्रतापराव निंबाळकरांना त्याचे मागे पडणे अजिबात सहन होत नाही.ते स्वतः अत्यंत कर्तव्यकठोर आहेत. नक्षलवाद्यांशी समोरासमोर लढताना स्वतःला गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केलेला आहे.

जाणता राजा

महासंग्राम ·

अनन्त अवधुत 26/12/2016 - 14:18
पन कोनीतरी म्हटल्याप्रमाणे गडकिल्ले किंवा स्मारक असे नाही , आपल्याले दोनीबी पायजे. आपल्यापुढे समद्याईले १. अन्न नाही २. वस्त्र नाही ३ निवारा नाही ४ रस्ते नाही ५ ट्रेन नाही ६ शाया नाही ७ मोबाईल नाही ८. लाईट नाही ९ फलाना नाही १० ढिकाना नाही असे सततच काही तरी नन्नाचा पाढा असणार. मंग काय हे अन स्मारक कदीच करायचं नाही का? अन शिवाजीचे स्मारक होऊन राहिले आहे , मंदिर बांधून कोणी आरती नाही गाऊन राहिले. तवा कुरुंदकर कितीबी खरे बोल्ले असले तरी इकडं लागू होत नाही.

In reply to by अनन्त अवधुत

महासंग्राम 26/12/2016 - 14:59
अनन्त अवधुत आपण लेख पुन्हा वाचण्याची तसदी घेतली तर स्मारक कधीच नव्हे तर, योग्य जागी व्हावे असं लिहिले आहे हे आपल्या लक्षात येईल. मोहिमेवर असताना रयतेच्या गवताच्या काडीलाही हात न लावण्याची ताकीद महाराजांची होती. तेव्हा त्यांच्याच रयतेच्या पोटावर पाय देऊन त्या ठिकाणी स्मारक उभारणं कितपत योग्य याचा विचार आपण नक्कीच कराल अशी आशा आहे.
शिवाजीचे स्मारक होऊन राहिले आहे , मंदिर बांधून कोणी आरती नाही गाऊन राहिले.
उद्या आरत्या सुद्धा होणार नाही याची खात्री आपण कोणीच देवू शकत नाही ???

In reply to by महासंग्राम

बोका-ए-आझम 26/12/2016 - 17:36
हे स्मारक नाही झालं तर महाराष्ट्रापुढचे सगळे प्रश्न सुटणार आहेत असं आहे का? तुम्ही राममंदिर म्हटलं असतंत तर मी मान्य केलं असतं. तो वेडगळपणा आहे आणि धार्मिक उन्माद आहे. हा इतिहासाचा भाग आहे. उद्या लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. इथे परतावा अपेक्षित आहे.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम 26/12/2016 - 17:44
देवा, सगळे नाही तर काही प्रश्न कमी होण्यास नक्की मदत होईल. मग ते प्रमाण १-२% का असेना. बाकी परतावा म्हणाल तर स्मारक दुसऱ्या जागी उभं केलं असतं तरी भेटला असताच. समजा विजयदुर्गाजवळ हे स्मारक उभं केलं असतं तर स्थानिक पर्यटनाला चालना मिळून तिथल्या स्थनिक लोकांना लाभ झाला असता. हे तुम्ही पण मेनी करालच.

In reply to by बोका-ए-आझम

लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. हे टुमच्या विधान, अज्ञानोद्भव टरी हाय किंवा सोईस्कर डूर्लक्ष टरी हाय, मंगलयान, चांद्रयान हे प्रोजेक्ट 'capability demonstrator' प्रोजेक्ट अस्ते सन, अश्या प्रोजेक्ट मधून टेक्निकल क्षमता एसर्ट केल्या जाते जेच्यामुळे इंडियाला अटीशाय lucrative (वर्षाला $५ बिलियन तूर्तास) अश्या space launch business मदी पैका बनवायचा (तो बी फॉरेक्स) चान्स भेटते, सद्ध्या भारत डेस चा ह्या मार्केट मंदी शेर लै कमी हाय ठो ग्रो करायला, अशे प्रोजेक्ट मदत करते. सो स्टॉप गिविंग दॅट बुलशीट आरग्युमेंट इफ यु मे सन. उदाहरण :- २०१४ मंदी इंडिया ने मंगलयान धाडून 'कॅपबिलिटी डेमॉन्सत्रेत' केली म्हनून टर २०१६ मदी इंडिया अँड इसरोला एकदम २० सॅटेलाईट लॉन्च करायचा बिझनेस मिळाला. क्लिअर? पीएस :- माय आयडी इज स्टील हेल्दी अँड फेरिंग वेल, थँक यु

In reply to by बोका-ए-आझम

चिनार 27/12/2016 - 15:11
उद्या लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. इथे परतावा अपेक्षित आहे.
गाववाले असं नसते ते.. चांद्रयान आणि मंगळयान च्या भरवश्यावर ISRO ला भरपूर बाहेरील देशांच्या सॅटेलाईट वगैरेंच्या ऑर्डर्स मिळतात.

In reply to by चिनार

बरोबर! म्हणजेच मंगळयान मोहिमेवरील ४५० कोटींचा प्रत्यक्ष परतावा काही विशेष नाहीये. पण अप्रत्यक्ष परतावा खूप मोठा असू शकतो. म्हणजे, इतर देश आपल्या स्पेस टेक्नॉलॉजीला विश्वासार्ह्य मानून आपल्याकडून संबंधित उपकरणांची खरेदी करतील, आपले स्पेस लॉन्चर वापरतील किंवा स्पेस टेक्नॉलॉजी आणि मिसाईल टेक्नॉलॉजी बेस जवळपास सारखा असल्याने मिसाईलची निर्यात वाढणे वगैरेतुन अप्रत्यक्षपणे परतावा मिळेलच. मग अशा अप्रत्यक्ष फायद्यांचा विचार स्मारकाच्या बाबतीत करायला काय हरकत आहे (तोही काही लोक खर्चाची चर्चा "अपव्यय" ह्या एकाच पैलूने करत असल्याने)?

In reply to by फेदरवेट साहेब

चंद्रयानाचा खर्च आणि अपव्यय या दोन संदर्भांना धरून वरचा प्रतिसाद आहे. तुम्ही जर "जसे चांद्रयानामुळे आपली काही गोष्टींची निर्यात वाढेल तसे पुतळ्यामुळेही काही गोष्टींची वाढेल" या अर्थाने विचारत असाल तर मला तसे म्हणायचे नव्हते. मुळात या प्रकल्पात खर्च वसूल होण्याबाबत काही विचार करावा असं मला अजिबात वाटत नाही. मी माझे मत फक्त हा खर्च म्हणजे अपव्यय आहे यासंदर्भात मांडत आहे. मला असे वाटते कि भारतात पर्यटकांना आकर्षित करण्यासारख्या बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी आहेत पण फक्त त्याच पर्यटकांना आकर्षित करतात असं नाही. भारताच्या जिडीपीच्या जवळजवळ ६% पर्यटनातून येतं. यातलं अर्धं म्हणजे साधारणपणे ३% पर्यटनाच्या अप्रत्यक्ष परिणामातून येते. म्हणजे पर्यटकांच्या भेटीतील हॉटेल्स(राहणे, खाणे), छोट्या मोठ्या खरेदी (भेटवस्तू, कपडे इ. ), वाहतूक इ.तुन जमणारे उत्पन्न. म्हणून माझे असे म्हणणे आहे कि असे प्रकल्प जितके जास्त तितकं पर्यटन वाढण्याची शक्यता असेल आणि त्यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळणारं उत्पन्न जिडीपीला हातभार लावू शकतं! अवांतर : मी या बाबतीतला जाणकार नाही, वाचिव गोष्टिंतील माहिती सांगण्याचा प्रयत्न!

अमितदादा 26/12/2016 - 18:06
छान लेख सहमत. तुमच्या लेखाशी समांतर असा लेख आज वाचला दर्या खुश.. त्या लेखातील आवडलेलं वाक्य खुद्द शिवरायानाही जमले नव्हते अश्या स्मारकाचे बांधकाम, त्यांनी उभारला तो महाराष्ट्र..

In reply to by लालगरूड

महासंग्राम 27/12/2016 - 11:21
लालगरूड आपण कोणती तुलना कशाशी करता आहात ध्यानात घ्या. कुठे मेट्रो आणि कुठे स्मारक दोन्हीची तुलना होऊच शकत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम 27/12/2016 - 11:14
मास्तर, तुमच्याकडून जरा अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा होती, पण तुम्ही निराश केलं, असो

In reply to by महासंग्राम

बोका-ए-आझम 27/12/2016 - 11:30
डावे विचारवंत जे म्हणतात त्याच्या बरोबर उलटं करतात. लेनिन, मार्क्स,स्टॅलिन, माओ यांची त्यांनी दैवतं बनवलीच की. इतकी की त्यांच्या तत्वांमध्ये थोडासा फरक करणाऱ्यांनाही ते revisionist म्हणून बहिष्कृत करतात. अशा दांभिक लोकांच्या तत्वांचा निर्वाळा तुम्ही दिल्यावर मला स्वारस्य उरलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम 27/12/2016 - 11:53
देवा, आमचं सूत्र सबका साथ सबका विकास हे आहे हो. बाकी तुम्ही कुरुंदकरांना डावे म्हणत असाल तर ते मान्य, पण त्यांचे महाराजांविषयीचे विचार पटतात. बाकी डाव्यांविषयी ममत्व बिलकुल नाही. फक्त महाराजच नाही तर इतरही लोकांना देवत्व न बहाल करता प्रॅक्टिकल नजरेने पहायला हवं हे म्हणणं आहे.

जर असाच विचार शहाजहानने केला असता तर कदाचित ताजमहाल नसता आणि भारताचं नाव जगाच्या पाटीवर कधी लिहिलं गेलं नसत. हे मान्य आहे की अजून अनेक बेसिक प्रश्न आहेत. पण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र सरकारच काम बघितलं तर असं वाटत की हे प्रश्न देखील सोडवले जातील पुढील भविष्यात. मुख्य म्हणजे एकदा हे स्मारक झालं की ते पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक येतील आणि त्यातून जे अर्थार्जन होईल ते नक्कीच विकास कामांसाठी वापरलं जाईल त्यात गफला होणार नाही; निदान इतका विश्वास तर फडणवीस सरकारने कमावला आहे. आता विषय स्मारकाच्या जागेचा. येणारे पर्यटक हे केवळ स्मारकच नाही तर जगत्विविख्यात मुंबापुरी देखील बघतील. म्हणजे अजून जास्त अर्थार्जन होईल. दोस्तानो, हा निर्णय घेताना नक्कीच खूप विचार झाला असणार. शेवटी मोदीजी बनिया आहेत!☺

In reply to by ज्योति अळवणी

महासंग्राम 27/12/2016 - 11:20
आपली गल्लत होतेय शिव स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला होता, आणि फक्त मुंबईच का ??? अजिंठा-वेरूळ, लोणार, खिद्रापूर कोप्पेश्वर, सिन्नरच शिवपंचायतन हे काय दुसऱ्या आहेत का ??? इथला विकास नको व्हायला. बाकी ठिकाणी अर्थांजन नको व्हायला असे तुमचे म्हणणे आहे समजायचं का ???

In reply to by महासंग्राम

केवळ महाराष्ट्रचं का संपूर्ण भारत प्रगत झाला पाहिजे असं माझं मत आहे. पण त्यासाठी लागणारा पैसा जर विदेशी नागरिक इथे आल्याने उभा राहत असेल तर काय हरकत आहे? तुम्हाला एक कांडी फिरवून जादूची अपेक्षा का आहे? निर्णय कोणाच्याही काळात झाला असो, execution आता होतं आहे. या सरकारचे प्रगतीसाठीचे प्रयत्न प्रामाणिक आहेत; असं नाही का वाटत तुम्हाला. जे 60 वर्षात झालं नाही ते 60 महिन्यात व्हावं असं का वाटत आपल्याला? मागील सरकारने अनेक निर्णय घेतले आणि काम नाही केलं. या सरकारने कामाला सुरुवात तर केली आहे. थोडा विश्वास ठेवला तर कदाचित positive results दिसतील की

In reply to by ज्योति अळवणी

महासंग्राम 28/12/2016 - 12:19
हे माझ्या आपण विषय दुसरीकडे नेता आहात, इथे ६० वर्ष आणि ६० महिने तुलना कुठून आली. आपण मुद्द्यांना दहरुन उत्तर द्याल हि अपॆक्षा आहे.

पैसा 27/12/2016 - 11:22
माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.""समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."
एकदम सही लिहिलंय. लेख आवडला. पण बहिर्‍या कानांवर पडणार आहे. :( लोकांचे टॅक्सचे पैसे इकडे खर्च करण्यापेक्षा सरकारने राज ठाकरे, करण जोहर वगैरे मुख्यमंत्र्यांचे जे मित्र सैनिक कल्याण निधीला पैसे द्यायला तयार होते त्यांच्याकडून आणि उद्योगपतींकडून पैसे गोळा करावेत आणि स्मारक बांधावे. रस्ते जसे टोलवाल्यांना बांधा, डागडुजी करा आणि मग सरकारच्या हवाली करा म्हणून सांगतात तसे हे स्मारकही करावे. कोणालाच कटकट नको.

सतिश पाटील 27/12/2016 - 12:58
थोडक्यात का्य तर मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवलीय यांनी. एवढे पैसे जर गड किल्ल्यांची डागडूजीसाठी वापरले तर सबंध महाराष्ट्रात पर्यटन वाढ होईल एवढेकिल्ले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात. इतिहास, किल्ल, पार्श्वभूमी अणि शिवाजी पण समजेल, पाहिजे त्या ठिकाणी एवढे पैसे खर्च केल्यावर. पण परदेशी लोकांना तिकडे मुम्बैच्या किनार्यावरच शिवाजी दाखवायचा, म्हणजे आतली पड़झड लपवता येइल.

वरुण मोहिते 27/12/2016 - 13:06
हे स्मारक आणि भाजप यांचा बिलकुल संबंध नाही . आज सत्ता त्यांची म्हणून अतिशय चुकीचं आणि भपकेबाज प्रदर्शन केलं. ह्यामुळेच १२ वर्षांपूर्वी भाजप ची सत्ता गेली होती .मूळ निर्णय काँग्रेस चा असो काँग्रेस चा हि हक्क नाही . पण जाहिरातबाजी मध्ये भाजप अव्वल आहे . साधं अजून कामाचा टेंडर नाही निघालंय त्यामुळे घाईत मत मांडणं चुकीचं होईल . स्मारक व्हावं हि इच्छा आहे स्मारक का व्हावं त्यालाही काही कारण आहेत पण त्याचा बाकीच्या पैसांशी संबंध लावणं हाच पैसा इथे गेला तर चांगला अशी तुलना अस्थानी आहे . राज्य शासनाची कामे ठराविक मंत्रालय त्यांना मिळालेला निधी हे नियोजित असतं.

In reply to by वरुण मोहिते

संदीप डांगे 27/12/2016 - 13:31
अहो, कॉन्ग्रेसने (खरंतर साहेबांनी) ही टूम काढली ती मराठा मतांची मोळी बांधायला. शिवसेनेनी महाराज कवटाळून धरलेत, मग स्मारक करुन मते फोडायची चाल होती. त्याला तेव्हाही विरोध झालेलाच. कुमार केतकरांनी उपरोधपूर्ण लेख लिहिला तेव्हा त्यांच्या घरावर विनायक मेटेनी जमाव नेऊन तोडफोड केली होती. समुद्रातले शिवस्मारक ह्याला अनेक शिवप्रेमींचा विरोध तेव्हाही होता आताही आहे. तो तेव्हाही सरकार बघून होत नव्हता आताही नाही. सरकार कोणाचे आहे हे बघून स्मारकाला विरोध होतोय म्हणणारे कदाचित २००८ मध्ये जन्माला आलेले नसतील. =))

In reply to by संदीप डांगे

हे तेच २००८ वाले विरोधक आहेत हे मोठ्या खात्रीने सांगत आहात आपण! पण हेच लॉजिक स्मारकाच्या समर्थकांना लागू नाही होत बहुतेक! ते आताच्या भाजप सरकारचे समर्थक असा सूर दिसतो, असो!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित 27/12/2016 - 13:56
हेच लॉजिक स्मारकाच्या समर्थकांनाच म्हणजेच भाजपच्या समर्थकांना लागू होतंय, म्हणून तर एवढी आदळआपट आहे. बाकी असो...!!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 27/12/2016 - 14:53
गल्लत होते आहे का मुद्दा समजण्यात? विरोधकांचे महत्त्वाचे मुद्दे: १. वायफळ खर्च - हाच खर्च किल्ल्यांवर अपेक्षित २. मतांचे राजकारण - शिवाजी महाराज निवडणुकीतल्या मतांसाठी वापरले जाणे कोण्याही खर्‍या शिवभक्ताला आवडणार नाहीच. ३. अनावश्यकता - सत्ताधार्‍यांकडून स्मारकाची आवश्यकता पटवून देणारे कोणतेही लॉजिकल कारण नाही. पर्यटनविकास-महसूल कातडी-बचाव प्रयत्न आहेत राजकारण लपवण्याचे. तेव्हाही आताही. ४. दिखावूगिरी - राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना भपकेबाजीचा भंपकपणा करण्याची गरज नाही. तेवढाच खर्च कल्याणकारी योजनांमध्ये, ज्यांच्या प्रेरणा त्याकाळात राजांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांमधे असू शकतात, केल्यास व त्यांना महाराजांचे नाव देऊन चालवल्यास जास्त उपयुक्त प्रकल्प तयार होतील. आता हेच मुद्दे तेव्हा आणि आताही कायम असतील तर २००८ चेच विरोधक आताही आहेत असे म्हणायला हरकत नाही. आणि हे मुद्दे पक्षसापेक्ष नाहीत तर स्मारकसापेक्ष आहेत. विरोधक शिवस्मारक हे मतांच्या पेटीसाठी वापरले जाण्याविरूद्ध आहे. उलट तेव्हाचे समर्थक आताही समर्थकच असतील तर मला तरी काही म्हणायचे नाही. तेही सरकार कोणाचे हे बघून निर्णय घेत नाहीत असे म्हणता येईल फारतर.. त्यांच्याशी स्मारक का असावे की नसावे, असले तर कसे असावे, नसले तर काय करावे अशी चर्चा करता येईल जी उत्पादक, विधायक होऊ शकते. ज्यांना 'स्मारकाचे श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळावे' असे वाटत असेल किंवा 'श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळेल म्हणूनच विरोध होतोय' किंवा 'भाजप/कॉन्ग्रेस राजकारण करतात म्हणून यांच्या पोटात दुखतंय' असे वाटत असेल त्यांचं प्रेम महाराजांपेक्षा राजकिय पक्षांवर जास्त आहे असे समजूयात. अशांशी चर्चा करणे म्हणजे चिखलात उतरणे आहे. अशा चर्चांमधे शेवटी मजबूत मुद्दे नसलेले लोक फुटकळ, असंबंद्ध तपशील आणून विखारी व्यक्तिगत होतात असे एव्हाना लक्षात आले आहे. त्यापेक्षा न केलेल्या बर्‍या. और कुछ? :-)

In reply to by संदीप डांगे

त्यांच्याशी स्मारक का असावे की नसावे, असले तर कसे असावे, नसले तर काय करावे अशी चर्चा करता येईल जी उत्पादक, विधायक होऊ शकते
आता कसं पटण्यासारखं बोललात बघा! हेच सांगणं आहे एकमेव! भाजप राजकारण करतोय, फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय, दिखाऊगिरी चाललीय, मतांचे राजकारण चाललंय, खरे शिवभक्त, खोटे शिवभक्त वगैरे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणून दुसऱ्या धाग्यावर तुम्हाला टाकलेला प्रतिसाद पुन्हा इकडे टाकतो (तिकडे तुम्ही वाचनमात्र झालात म्हणून) - "बाकी हे सरकार हे कशासाठी करतंय (निवडणुकांसाठी, मराठा मोर्चान्ना उत्तर, शिवसेनेवर कुरघोडी) वगैरे मुद्दे आपण "राजकारण" आणि "तळे राखील तो पाणी चाखील" या सदरात टाकून थोडावेळ बाजूला ठेवू आणि खालील मुद्द्यांवर बोलू - १. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्व याला शोभेल असे स्मारक नको का? २. हे स्मारक भव्य असू नये का? आणि असावे तर मग खर्च तसाच मोठा असणार नाही का? ३. हे मुंबईला असणे हे एकूणच फायदेशीर नाही का? (पर्यटन, आंतरराष्ट्रीय ख्याती वगैरेसाठी) ४. गड किल्ल्यांवर स्मारक करणे हे ह्या भव्यदिव्य स्मारकाइतके परिणामकारक ठरेल का? ५. पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने सरकार किंवा अजून कोणी यात गुंतवणूक करावी का? ६. पैसे परत मिळूच शकनार नाहीत का?"

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बोका-ए-आझम 27/12/2016 - 20:25
डांगे अण्णांना भाजप आवडत नाही एवढी एक साधी सरळ गोष्ट ते सांगत नाहीत आणि वितंडवाद घालत बसतात, वर परत दुस-यांच्याकडे मुद्दे नाहीत वगैरे म्हणतात. आता इथे नाव घेतल्यानंतर ते मी व्यक्तिगत होतोय असं म्हणतील आणि याही धाग्यावर conveniently वाचनमात्र होतील. आपला विरोध राजकीय आहे हे मान्य करायचं सोडून लोक तात्विक मुलामा का लावतात तेच कळत नाही. सांगा ना सरळ - भाजपला श्रेय मिळतंय म्हणून आम्हाला हे खपत नाहीये. उगाचच या पैशांत हे करता येईल आणि ते करता येईल अशा पळवाटा कशाला काढता? आपण स्पष्टपणे म्हणतो - मी ज्या पक्षाला समर्थन देतो त्याने घेतलेला हा निर्णय मला आवडलेला आहे. मी त्याचं समर्थन करणार म्हणजे करणारच.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 27/12/2016 - 21:01
कोण काय आहे ह्याचं सर्टीफिकेट तुम्हाला द्यायला नियुक्त केलंय हे माहित नव्हतं. धन्यवाद! मला भाजप आवडत नाही, मी वितंडवाद घालतो, माझा विरोध राजकिय आहे, शिवाय भाजपला श्रेय मिळतंय म्हणून मला खपत नाही म्हणून मी मुंबईतल्या शिवस्मारकाला विरोध करतो हा आपण लावलेला शोध महान आहे. गुड! प्रयत्न चांगला आहे. लगे रहो. आता इतके तुम्हाला इत्थंभूत पक्के माहित आहे तर फक्त एक सांगा की २००८ मध्येही ह्या स्मारकाला माझा विरोधच होता, तो का असेल बुवा? (अवांतर सूचना: वाह्यात ट्रोल्सना उत्तरे दिली जाणार नाहीत याची कृपया सर्व ट्रोलभैरवांनी नोंद घ्यावी)

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 27/12/2016 - 21:41
त्या वेळचे सगळे संदर्भ कालबाह्य झालेले आहेत. तेव्हा तुम्ही तुमचा विरोध कुठे व्यक्त केला असेल तर त्या संस्थळाचं नाव सांगा. शोधून निष्कर्ष ऐकवू. हाकानाका. फक्त प्रामाणिकपणा दाखवा एवढं म्हटल्यावर तु्म्ही चिडला आहात. त्यावरून काय ते समजतंय. तुमचा विरोध असायला हरकत नाही, पण त्याला तात्विक मुलामा देऊ नये. तुम्ही प्रामाणिक आहात अाणि स्पष्ट काय ते बोलता असा समज होता. तो गैरसमज ठरला याचा खेद आहे.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 27/12/2016 - 21:59
त्या वेळचे सगळे संदर्भ कालबाह्य झालेले आहेत. ^^^ how convenient is that...;) जरा स्पष्ट कराल काय कोणते संदर्भ कालबाह्य झालेत ते..

In reply to by बोका-ए-आझम

तुमचं मत अगदी मान्य. याशिवाय असही वाटत की थोडा काळ या सरकारला देऊन बघायला काय हरकत आहे? त्यांचे इतर प्रयत्न प्रामाणिक आहेत हे सिद्ध झालं आहेच न

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 27/12/2016 - 20:53
कसं आहे प्रसादजी, जो महत्त्वाचा मुद्दा आहे "राजकारण" हाच तुम्ही बाजूला टाकताय. कोणत्याही राजकिय पक्षाची बाजू न घेताही ह्या निर्णयावर राजकिय दृष्टीकोनातून चर्चा करता येते. कारण स्मारकाची संकल्पना जिथून उचलली गेलीये, ज्यासाठी उचलली गेलीये ते राजकारण आहे फक्त. बाकीचे सगळे मुद्दे त्या मूळ राजकारणाला लपवण्यासाठी केली जाणारी सारवासारव आहे. खोड तोडा, सगळ्या शाखा गळून पडतील. तरी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. १. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्व याला शोभेल असे स्मारक नको का? कशाला काय शोभेल आणि त्यासाठी काय करावं ह्याच्या संकल्पना व्यक्तिसापेक्ष आहेत. माझ्यामते भव्य स्मारक हवे असेल तर रायगड किल्ल्यावर सर्व डागडुजी करुन, लायब्ररी, थीएटर इत्यादी मुंबईतल्या संयोजित स्मारकातल्या गोष्टी तिथेही होऊ शकतात. जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला, जीथून मराठा साम्राज्याची सुरुवात झाली ती जागाच जीवंत स्मारक असतांना नवीन भलतीकडे बांधायची गरज नाही. २. हे स्मारक भव्य असू नये का? आणि असावे तर मग खर्च तसाच मोठा असणार नाही का? स्मारक भव्य नसायला काहीच हरकत नाही. शिवभक्तांनी स्वतःच्या खिशातून करत असल्यास कितीही खर्च केल्यास कुणाची ना नाही. सरकारचे म्हणजे पर्यायाने टॅक्सपेयरचे पैसे इथे वापरु नये. कोणाचीही स्मारके (अगदी शिवाजीमहाराज असो की बाबासाहेब आंबेडकर) बांधणे हे सरकारचे काम नव्हे. असले तरी स्मारके ही तरी सरकारची प्राथमिकता नसावी. ३. हे मुंबईला असणे हे एकूणच फायदेशीर नाही का? (पर्यटन, आंतरराष्ट्रीय ख्याती वगैरेसाठी) मग दिल्लीलाच का नको? आणखी आंतरराष्ट्रिय ख्याती हवी असेल तर दुबई, सिंगापूर, मलेशिया, न्यूयॉर्क इथेही जागा घेऊन एक एक स्मारक बांधायला हरकत नाही. पर्यटन, ख्याती हे ठिसूळ कारणे आहेत. ही कारणे देणार्‍यांना दोन्हीपैकी एकाबाबत तरी पुरेसा अभ्यास आहे का असा प्रश्न आहे. मुंबईच्या गर्दीवर, गलिच्छपणावर, ट्रान्स्पोर्ट, नागरीसुविधांवर, जरा नीट लक्ष देऊन काम केले तर जास्त ख्याती होईल. जगातल्या बहुतेक सर्वांना स्टॅच्यु ऑफ लिबर्टी माहित आहे, पण त्यामागची कथा माहिती आहे? चीनची भींत माहित आहे, कुणी कशाला बांधली माहित आहे? आयफेल टॉवर का बांधला माहित आहे? झुलत्यामनोर्‍याची कारणं? बहुतेकांना ही नावे आणि चित्रात बघून ओळख असते. त्यामागची कथा बहुसंख्य लोकांना अभ्यासल्याशिवाय, स्वतःहून शोधल्याशिवाय माहित नसते. ख्यातीचे असे असते. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आंतरराष्ट्रिय पातळीवर पोचवायचे तर त्यासाठी अमेरिकन फंडे वापरले पाहिजेत. नुसती स्मारकं बांधून आपोआप ख्याती होत नसते. त्याचाही काही अभ्यास आहे. चला मला ह्या प्रश्नांची उत्तरे मिळवून द्या: शिवाजींचा पुतळा म्हणून ओळख हवी की जगातला (भारतातला किंवा व्हाटेवर) सर्वात मोठा पुतळा अशी ओळख हवी? स्मारकाचं ब्रॅण्डींग/पोजिशनिंग नक्की काय असेल? मार्केटींगचे मूलभूत तत्व काय असेल? ताजमहाल, लिबर्टी पुतळा, आय्फेल टॉवर, पिसामनोरा ह्यासारखे इथेही विदेशी-देशी बावळट पर्यटकांनी येऊन शिवाजीमहाराजांची टोपी, तलवार वगैरे चिमटीत पकडून फोटो काढावे आणि जालावर अपलोड करावे अशी संकल्पना नसावी बहुतेक. मलातरी तसलं काही अजिबात आवडणार नाही. ४. गड किल्ल्यांवर स्मारक करणे हे ह्या भव्यदिव्य स्मारकाइतके परिणामकारक ठरेल का? नक्कीच. तुमच्या मते परिणामकारक म्हणजे काय याबद्दल स्पष्टीकरण दिलंत तर सांगताही येईल. ५. पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने सरकार किंवा अजून कोणी यात गुंतवणूक करावी का? पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने स्मारक होतंय काय? राजाच्या स्मारकासाठी असले दळभद्री विचार? हौसेला मोल नसतं, हे तर साक्षात शिवबांचं स्मारक, शिवप्रेमींकडून देणगीची अजिबात कमतरता येणार नाही. प्रसंगी आपला एक एक वर्षाचा पगार, धंद्यातला नफा, शेतीतली कमाई इत्यादी देऊन छत्तीसशे कोटीच काय छ्त्तीस हजार कोटीही गोळा होतील. ६. पैसे परत मिळूच शकनार नाहीत का?" हवेतच कुणाला इथे पैसे परत? मुंबईत अनावश्यक स्मारकाचा राजकिय स्वार्थासाठी खटाटोप करणारांना 'पैसे परत मिळतील, महसूल मिळेल' हे गाजर जनतेसमोर टाकलंय. खर्‍या शिवप्रेमींनी महाराजांची ख्याती जगभर कशी पसरेल ह्यावर लक्ष केंद्रीत करावे, काही गोष्टींमधे परतावा मिळावा अशी अपेक्षा धरत नसतात. राजांनी रयतेकडून केली नाही, आपण त्यांच्या स्मारकाकडून तरी का करावी? जर गडकिल्ल्यांवर स्मारक झालं तर उलट जास्तीत जास्त नीटनेटका ठेवायला लागेल तेवढा खर्च करावा. बाकी समर्थकांना नक्की काय हवंय हे स्पष्ट नै अजून. पर्यटनस्थळ हवंय, स्मारक हवंय, सर्वात उंच पुतळा हवाय, महाराजांची ख्याती हवीय, नक्की काय हवंय? सर्व एकत्र हवंय असं काही उत्तर देऊ नये. सिंगल लाईन नॅरेटीव च्या जमान्यात आहोत आपण. स्मारकाचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत? देशी/परदेशी/महाराष्ट्रीय, नक्की कोण? समर्थकांसाठी माझ्याकडेही अनेक प्रश्न आहेत. ते नंतर बघूया. वन बाय वन. :-)

In reply to by संदीप डांगे

मेगाबायटी प्रतिसाद देणं अजिबात आवडत नाही, पण पर्याय नव्हता :(.
माझ्यामते भव्य स्मारक हवे असेल तर रायगड किल्ल्यावर सर्व डागडुजी करुन, लायब्ररी, थीएटर इत्यादी मुंबईतल्या संयोजित स्मारकातल्या गोष्टी तिथेही होऊ शकतात.
हे काहींच्या काही वाटतेय! थोडक्यात रायगडाचे संवर्धन म्हणजे रायगडावर सुविधा पुरवण्यासाठी सिमेंटचं जंगल आणणे आहे! मुळात गड किल्ल्यांवर काय केले म्हणजे लोक तिकडे फिरकतील आणि महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त पोहोचवता येईल यावर थोडा प्रकाश टाकता आला तर बघा! आणि डागडुजी करायची म्हणाल तर उत्कृष्ट स्थितीत असणाऱ्या परांडा किल्ल्याला महाराष्ट्रातील तरी लोक भेट देतात का हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे!
सरकारचे म्हणजे पर्यायाने टॅक्सपेयरचे पैसे इथे वापरु नये.
हे पटतंय तुम्हाला? म्हणजे आपल्या न आवडलेल्या प्रकल्पांवर सरकारने आपल्या करातून पैसा गुंतवावा कि नाही हे (व्यक्तिसापेक्षपणे) ठरवण्याची मुभा करदात्याला देण्यात यावी असं आहे तर! प्राथमिकता - हे बरोबर बोललात! आता सरकारची प्राथमिकता कशी ठरवायची हे पण समोर यायला हवं ना? या हिशेबाने जोपर्यंत सगळ्यांच्या पोटात अन्न पोहोचत नाही तोपर्यंत शौचालय वगैरे योजनांवर एक रुपयाही खर्च करायला नको असं काहींचं मत येऊ शकतं!
मग दिल्लीलाच का नको? आणखी आंतरराष्ट्रिय ख्याती हवी असेल तर दुबई, सिंगापूर, मलेशिया, न्यूयॉर्क इथेही जागा घेऊन एक एक स्मारक बांधायला हरकत नाही.
काहींच्या काही! हे आपलं खरंच मत आहे कि आपलं उगाच मुद्द्याला मुद्दा? स्मारकाचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे आणि प्रकल्प महाराष्ट्रात कुठे एवढाच मुद्दा आहे! पर्यटन आणि ख्याती हि कारणे ठिसूळ आहेत असं आपल्या पुरेश्या अभ्यासाने दाखवून दिलंत कि बाकीचे आपोआप उघडे पडतील आणि माझ्यासारखे चारदोन हि कारणे वापरणार नाहीत किंवा पर्यायाने प्रकल्पाचं समर्थन करणार नाहीत. जगातल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर, चीन ची भिंत वगैरे ठिकाणी भेट दिलेल्या बहुतांशी लोकांना त्या त्या ठिकाणाची माहिती नसणारच असा आपला दावा आहे का? आणि या स्मारकामध्ये कलादालन, ऑडिटोरियम वगैरे गोष्टी आहेत, याचा योग्य वापर करून गड किल्ल्यांची माहिती आलेल्या पर्यटकांना सांगितली तर ते लोक आपसूकच गड किल्ल्यांकडे वळणार नाहीत का?
शिवाजींचा पुतळा म्हणून ओळख हवी की जगातला (भारतातला किंवा व्हाटेवर) सर्वात मोठा पुतळा अशी ओळख हवी?
जगातला सर्वात मोठा पुतळा शिवाजी नावाच्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील कर्तृत्ववान राजाचा आहे अशी ओळख मिळयाला काही हरकत असू शकते का?
ताजमहाल, लिबर्टी पुतळा, आय्फेल टॉवर, पिसामनोरा ह्यासारखे इथेही विदेशी-देशी बावळट पर्यटकांनी येऊन....
थोडक्यात भेट देणारे सर्व पर्यटक बावळटच असतील असं गृहीतक आहे तर? आणि गड किल्ल्यांवर स्मारक केलं तर तिथे प्रेमाचे चाळे, दारूपार्ट्या, खडूने लिहिणे वगैरे प्रकार करणारे बावळट लोक येणार नाहीत का? परिणामकारक म्हणजे जास्तीत जास्त लोक भेट देतील आणि महाराजांचा जाज्वल्य इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल! हे मुंबईच्या जवळ असणाऱ्या एका भव्यदिव्य स्मारक अधिक बरंच काही असणाऱ्या ठिकाणाहून सहज पोहोचवता येईल असं माझं मत आहे! बाकी विरोधकांना कशाला विरोध करायचा आहे हेच स्पष्ट नै अजून! पैसे कसे ओतणार आहेत हे अजून स्पष्ट नसताना उगाच वितंडवाद कशाला? एका बाजूला एवढा खर्च करदात्यांच्या पैशातून का म्हणून ओरडायचे आणि मग त्यातून परतावा मिळू शकतो म्हणून सांगितले कि म्हणायचं "पैसे हवेतच कुणाला?" याला काही अर्थ आहे का? "पर्यटनस्थळ हवंय, स्मारक हवंय, सर्वात उंच पुतळा हवाय, महाराजांची ख्याती हवीय, नक्की काय हवंय" याला - स्मारक हवंय पण अगदी विचार्पूर्वक हे स्मारक एक नुसताच पुतळा म्हणून उभारण्यापेक्षा महाराजांची ख्याती पोहोचवू शकणारं, जगातील एकमेवाद्वितीय उत्कृष्ट सुविधा असणारं पर्यटन स्थळ म्हाणून तयार गेलं तर "सर्व एकत्र हवंय मिळतंय" म्हणायला काही हरकत असावी का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 28/12/2016 - 16:04
मेगाबायटी प्रतिसाद आवडत नाही म्हणता, सगळे प्रतिसाद वनलाईनर हवेत की व्हॉट्सॅपीय चर्चा हवी? थोडक्यात रायगडाचे------करण्यासारखी गोष्ट आहे! किती विरोधाभास आहे बघा इथे. रायगडावर सिमेंटचे जंगल होईल त्याची चिंता पण समुद्रात भराव टाकून जलचर आणि पर्यावरणाचे नुकसान होईल त्याबाबत मौन. गडकिल्ल्यांवर काय करावे याबद्दल आधीच सांगितलंय. पर्यटक अजिंठा,वेरुळसाठी औरंगाबादला जातात पण मुंबईपासून तेवढेच अंतर असलेल्या परांडा किल्ल्याला का भेट देत नाहीत याची कारणे शोधावी. किल्ल्यांवर डागडुजी उपयोगी नाही असं वाटतंय का? आपल्या न ---- मत येऊ शकतं गरजू शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या अनुदानांवर डोळा वटारणारा करदाता शिवस्मारकावर उधळल्या जाणार्‍या पैशाबद्दल सोयिस्कर मौन घेतोय असं निरिक्षण आहे. अन्न-शौचालय वगैरे लाड तरी कशाला हवे, ते सगळं सोडून आधी स्मारके बांधायला हवीत. महाराजांना जनता विसरली-बिसरली तर काय घ्या, नै का? जगातल्या ------वळणार नाहीत का? मी असा कोणताही दावा केलेला नाही. गडकिल्ल्यांबद्दल माहिती घ्यायला पर्यटकांना स्मारकाला भेट द्यावी लागेल, त्याआधी स्मारकाला भेट द्यावी म्हणून मार्केटींग करावी लागेल. एवढ्या द्राविडी प्राणायमाची गरज काय? पर्यटनस्थळांचे आंतरराष्ट्रिय स्तरावर मार्केटींग हा एक गहन विषय आहे. उभारले स्मारक की झाली पब्लिसिटी अन आली गर्दी असे होत नाही. जगातला सर्वात मोठा ------असू शकते का? तुम्ही सांगताय ते लांबलचक होतंय, आणि खूप एक्स्प्लेन करायला लागतंय. एक मराठी म्हणून नव्हे तर परदेशी अनभिज्ञ पर्यटक म्हणुन ह्याकडे पहा. थोडक्यात --------बावळट लोक येणार नाहीत का? "सर्व पर्यटक बावळटच" हे माझे शब्द नव्हेत. प्रेमाचे चाळे, दारूपार्ट्या, खडूने लिहिणे हे प्रकार उत्तम सुरक्षाव्यवस्था असलेल्या गडकिल्ल्यांवरच्या स्मारकांमधे होतील अशी आपली खात्री आहे? परिणामकारक ------ मत आहे! सहज पोचता येतं म्हणून पर्यटनस्थळे विकसित झालेली नसतात, होत नसतात. जाज्वल्य इतिहास पोचवण्याबद्दलः शिवस्मारक हा काही महाराजांच्या कर्तृत्वाचा पुरावा नव्हे. त्यांच्या कर्तृत्वाचे पुरावे महाराष्ट्रात ठायीठायी जीवंत आहेत. बाकी ---- अर्थ आहे का? हे हे हे! विरोध कशाला करायचा हे स्पष्ट नै? वरच चार मुद्दे स्पष्ट दिलेत की? पैसे कसे ओतणार हे स्पष्ट नाही म्हणता? मग स्पष्ट आहे तरी काय? पैसे परत मिळतील हा समर्थकांचा दावा आहे, विरोधकांनी केलेली मागणी नव्हे. परताव्याचे गाजर दाखवून खर्चाची भलामण करणारे महान आहेत. हौसेला मोल नसतं हे आधीच मी म्हटलंय. ते समजायला इतके कठिण का असावे? खर्चाला जे डिफेन्ड करत आहेत त्यांनीच परत पैसे वसूल होतील, कमाई होइल, रोजगार होइल, पर्यटन होईल असे तकलादू मुद्दे काढलेत. रोजगार, पर्यटनविकास, हे उद्दिष्ट असेल तर वेगळे मार्ग आहेत, शिवाजींची ख्याती पोचवायची तर त्याचेही वेगळे मार्ग आहेत, ह्या दोन्हींचा मेळ घालायचा तर तेही शक्य आहे. त्यासाठी स्मारकाशिवाय काही तरणोपायच नाही असे काही नाही. तसे बघायचे तर राजकिय पक्षांना स्मारकाशिवाय पर्याय नाही हे मात्र खरे!

In reply to by संदीप डांगे

वरुण मोहिते 28/12/2016 - 16:57
खूप मोठा इतिहास आहे त्याची तुलना परांडा किल्ल्याशी होऊ शकत नाही . विदेशी पर्यटकांमध्ये त्याची क्रेझ आहे . युनेस्को ची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती . मी कित्येकदा विदेशी मित्रांना मैत्रिणींना घेऊन गेलोय तिथे तर तिथे किती विकास झाला . महसूल किती विकास किती ह्याची आकडेवारी द्यावी . आजही जागतिक दर्जाचं असून तिथे विकास नाही . समुद्र पर्यावरण वैग्रे असेल तर समुद्रात कधी काही कामच झाला नाही असा दावा आहे का ? अगदी ताजमहाल हॉटेल पण समुद्रात भराव टाकून बांधलं होतं. जगात अनेक गोष्टी आहेत अश्या . आपला मुद्दा बरोबर असला शिवप्रेमींचा तरी हे कार्य समजायची आवश्यकता होती त्यामुळे ते ठिकाण निवडलं. बाकी भाजप ने तर बिलकुल हुरळून जाऊ नये प्रकल्प नियोजित होता ह्यांच्या काळात भूमिपूजन झालं इतकंच. उद्या सत्ता नसली तर काँग्रेस ओपनिंग करेल . अजून कोणी करेल .त्यात काय

In reply to by वरुण मोहिते

संदीप डांगे 28/12/2016 - 17:31
विदेशी पर्यटकांमध्ये त्याची क्रेझ आहे आणि आजही जागतिक दर्जाचं असून तिथे विकास नाही ही वाक्ये संधी असून पर्यटनविकासाला सरकारच्या दृष्टीने किती प्राथमिकता आहे त्याचीच द्योतक आहेत. माझेच मत आपण सिद्ध करत आहात की पर्यटनविकास हे फक्त गाजर आहे, बाकी, अख्खी मुंबई समुद्रात भर घालून बनवलेली आहे. तीची बकाल अवस्था सुधारण्याचं सरकार कधी मनावर घेईल कोण जाणे. महाराजांचे कार्य 'कोणाला' समजवायचे आहे, ते करायला स्मारकच कसे उपयुक्त ठरेल, त्याने कोणती उद्दिष्टे सफल होतील व कशी? ह्याचे मुद्देसूद स्पष्टिकरण अजून समर्थकांकडून आलेले नाही. समर्थक विरोधकांनाच उलट प्रश्न विचारत आहेत असे दिसले. विरोधाचे स्पष्टिकरण दिले मग समर्थनाचेही स्पष्टिकरण दिले पाहिजे की नाही? बाकी हूरळून जायचा मुद्दा आपण अचूक बोललात. यु मे नेवर नो काय घडेल. बाकी, गडावरही नको आणि समुद्रातही नको, माझी स्मारकाबद्दल काही संकल्पना आहे, ती नंतर मांडतो.

In reply to by संदीप डांगे

डांगेंजी, एक खुलासा : मेगाबायटी प्रतिसाद देणे "मला" आवडत नाही असे मी म्हणालो वर त्यामुळे तुम्ही वन लायनर किंवा व्हॉट्सॅपीय प्रतिसाद न देता मेगाबायटी प्रतिसाद देण्यास मोकळे आहातच! मोठे प्रतिसाद कमी लोकांपर्यंत पोहोचतात असं माझं वैयक्तिक मत आहे, तुमचंही तेच मत असण्याची आवश्यकता नाही. बाकी तुमच्या/विरोधकांच्या चारही मुद्द्यांचे/आक्षेपांचे उत्तर माझ्या वरच्या एक दोन तसेच बाकी मिपाकरांच्या प्रतिसादात आलेच आहेत, त्यावरच परत परत प्रतिवाद करण्यात काही हाशील नाही. तस्मात - इथून पुढचा वितंडवाद टाळण्याच्या दृष्टीने माझी असहमतीवर सहमती! कसे?

विशुमित 27/12/2016 - 15:04
ज्यांना 'स्मारकाचे श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळावे' असे वाटत असेल किंवा 'श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळेल म्हणूनच विरोध होतोय' किंवा 'भाजप/कॉन्ग्रेस राजकारण करतात म्हणून यांच्या पोटात दुखतंय' असे वाटत असेल त्यांचं प्रेम महाराजांपेक्षा राजकिय पक्षांवर जास्त आहे असे समजूयात. अशांशी चर्चा करणे म्हणजे चिखलात उतरणे आहे.>>>> -- एक्साक्टली. या विचारला प्रचंड अनुमोदन. पण महाराजांचे नाव घेऊन जगणाऱ्या बांडगुळांना त्याचे काहीच सोयरेसुतक नाही.

स्मारकाचा निर्णय आवडलेला नाही. स्मारक व्हावं, त्याला पर्यटक मिळतील वगैरे सगळं खरं असलं तरी गड किल्ल्यांची अवस्था इतकी वाईट असताना येड्यासारखा पैसा स्मारकात ओतणं हेच गाढवपणाचे लक्षण आहे. म्हणजे तिकडे वर्डक्लास स्मारक आणि इकडे अत्यंत बेक्कार अवस्थेतले गड-किल्ले.. काहीही अर्थ नाही. दोन्ही गोष्टी सुद्धा होऊ शकतातच.. तसं होणार असेल तर "आधी" गड-किल्ल्यांचं पहा.. नंतर काय स्मारकं उभी करायची ती करा..

ट्रेड मार्क 28/12/2016 - 01:52
हे स्मारक व्हायला पाहिजे असं मनापासून वाटतं पण आपले भारतीय लोक किती काळ हे स्मारक सुस्थितीत राहू देतील? सगळीकडे थुंकणे, कचरा टाकणे, आपली नावे लिहिणे ह्यात धन्यता मानणारे आपले लोकच त्याची वाट लावतील. एवढ्या एकांतातल्या जागी असल्याने, कुठला ना कुठला मार्ग शोधून, रात्रीच्या वेळेला जाऊन नसते उद्योग करणारे कमी नसतील. पक्षी स्मारकांवर/ पुतळ्यावर घाण करतात हे आहेच. त्यांना कळत नाही, पण माणसांचं काय? प्रत्यक्ष महाराजांनी बांधलेले आणि वास्तव्य केलेले किल्ले व महाल यांची काय दयनीय अवस्था करून ठेवली आहे. यात फक्त सरकारच दोषी नसून जनताही तेवढीच दोषी आहे. आपला कुठलाही वारसा आपल्याला जपता येत नाही हेच खरं.

लालगरूड 28/12/2016 - 02:13
Which Indian city do foreign tourists visit the most? Where do they spend the most? The answer to both the questions is Mumbai, according to a study by card payment services provider, MasterCard. In 2016, the city had 4.86 million overnight visitors who spent a collective $3.6 billion, or Rs 24,120 crore, said the study.

अर्धवटराव 28/12/2016 - 04:54
छत्रपतींच्या कर्तुत्वाचा आलेख मांडणारे संग्रहालय सदृष ऑडीटोरीअम, मराठा साम्राज्याची शक्य तेव्हढी माहिती रंजक पद्धतीने देणार्‍या चित्रफिती, गड-किल्ल्यांच्या ऐतिहासीक माहितीसह सफारी आयोजन करणारी पथकं, शिवाय बाकी पर्यटन सोयींनी युक्त असं भव्य स्मारक झालं तर काय बहार येईल. स्मारक असं व्हावं कि छत्रपतींबद्दल अगदी जुजबी/शुण्य माहिती असणार्‍या व्यक्तीने आत पाऊल टाकावं व शिव-कर्तुत्वाने भारावुन जावुनच बाहेर पडावं. छत्रपतींच्या पुतळ्याची भव्यता त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशी असल्याची खात्री पटावी. मराठी/मराठा वगैरे कुंपणांत बदीस्त शिवबा आजवर आपल्याला अखील भारतीय गौरवाच्या पातळीवर स्थापन करता आला नाहि. हे स्मारक त्या दृष्टीने दमदार पाऊल पडावं. भारतीय पराक्रमाचा, शहाण्या राजसत्तेचा मानबींदु म्हणुन छत्रपतींचं नाव जगभर गाजावं. आधी गड-किल्ल्यांच्या अवस्थेचं बघा वगैरे म्हणण्यात काहि अर्थ नाहि. स्मारकाच्या टार्गेट ऑडीयन्सपैकी १०% सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकणार नाहि. गड-किल्ल्यांची व्य्ववस्था वेगळ्या पातळीवर करायला लागेल. किंबहुना स्मारकाने प्रभावीत होऊन गड-किल्ल्यांकडे पाऊले वळायला लागली तर किल्ल्यांची अवस्था नीट लावण्याची अवष्यकता तीव्रतेने जाणवायला लागेल.

In reply to by अर्धवटराव

महासंग्राम 29/12/2016 - 10:19
स्मारकाच्या टार्गेट ऑडीयन्सपैकी १०% सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकणार नाहि.
तसं झालं तर सरकारच्या मार्केटिंगच पराभव ठरेल.

In reply to by महासंग्राम

अर्धवटराव 30/12/2016 - 02:08
वय वर्षे १० ते ७० हा स्मारकाचा टार्गेट ऑडीयन्स धरला, त्यात मराठी/अमराठी/परदेशी सगळे आले, तर त्यापैकी १०% लोकांकडुन सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकायची अपेक्षा नाहि. शिवाजीला लोकांपर्यंत पोचवायला प्रस्तावीत स्मारक जास्त प्रभावी आहे गड-किल्ल्यांपेक्षा.

आडोसा मारामारी आन तिकडं दर्यात आजून येक. महाराजांसारखं वागून दाखवा, त्यांनी तयार केलेली व्यवस्था परत तयार करा ... हर गाव हर शहर, पुतले, नगर, रस्ते महाराजजीके नामपे है. मग अजून एक बांधून काय फायदा?

अनन्त अवधुत 26/12/2016 - 14:18
पन कोनीतरी म्हटल्याप्रमाणे गडकिल्ले किंवा स्मारक असे नाही , आपल्याले दोनीबी पायजे. आपल्यापुढे समद्याईले १. अन्न नाही २. वस्त्र नाही ३ निवारा नाही ४ रस्ते नाही ५ ट्रेन नाही ६ शाया नाही ७ मोबाईल नाही ८. लाईट नाही ९ फलाना नाही १० ढिकाना नाही असे सततच काही तरी नन्नाचा पाढा असणार. मंग काय हे अन स्मारक कदीच करायचं नाही का? अन शिवाजीचे स्मारक होऊन राहिले आहे , मंदिर बांधून कोणी आरती नाही गाऊन राहिले. तवा कुरुंदकर कितीबी खरे बोल्ले असले तरी इकडं लागू होत नाही.

In reply to by अनन्त अवधुत

महासंग्राम 26/12/2016 - 14:59
अनन्त अवधुत आपण लेख पुन्हा वाचण्याची तसदी घेतली तर स्मारक कधीच नव्हे तर, योग्य जागी व्हावे असं लिहिले आहे हे आपल्या लक्षात येईल. मोहिमेवर असताना रयतेच्या गवताच्या काडीलाही हात न लावण्याची ताकीद महाराजांची होती. तेव्हा त्यांच्याच रयतेच्या पोटावर पाय देऊन त्या ठिकाणी स्मारक उभारणं कितपत योग्य याचा विचार आपण नक्कीच कराल अशी आशा आहे.
शिवाजीचे स्मारक होऊन राहिले आहे , मंदिर बांधून कोणी आरती नाही गाऊन राहिले.
उद्या आरत्या सुद्धा होणार नाही याची खात्री आपण कोणीच देवू शकत नाही ???

In reply to by महासंग्राम

बोका-ए-आझम 26/12/2016 - 17:36
हे स्मारक नाही झालं तर महाराष्ट्रापुढचे सगळे प्रश्न सुटणार आहेत असं आहे का? तुम्ही राममंदिर म्हटलं असतंत तर मी मान्य केलं असतं. तो वेडगळपणा आहे आणि धार्मिक उन्माद आहे. हा इतिहासाचा भाग आहे. उद्या लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. इथे परतावा अपेक्षित आहे.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम 26/12/2016 - 17:44
देवा, सगळे नाही तर काही प्रश्न कमी होण्यास नक्की मदत होईल. मग ते प्रमाण १-२% का असेना. बाकी परतावा म्हणाल तर स्मारक दुसऱ्या जागी उभं केलं असतं तरी भेटला असताच. समजा विजयदुर्गाजवळ हे स्मारक उभं केलं असतं तर स्थानिक पर्यटनाला चालना मिळून तिथल्या स्थनिक लोकांना लाभ झाला असता. हे तुम्ही पण मेनी करालच.

In reply to by बोका-ए-आझम

लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. हे टुमच्या विधान, अज्ञानोद्भव टरी हाय किंवा सोईस्कर डूर्लक्ष टरी हाय, मंगलयान, चांद्रयान हे प्रोजेक्ट 'capability demonstrator' प्रोजेक्ट अस्ते सन, अश्या प्रोजेक्ट मधून टेक्निकल क्षमता एसर्ट केल्या जाते जेच्यामुळे इंडियाला अटीशाय lucrative (वर्षाला $५ बिलियन तूर्तास) अश्या space launch business मदी पैका बनवायचा (तो बी फॉरेक्स) चान्स भेटते, सद्ध्या भारत डेस चा ह्या मार्केट मंदी शेर लै कमी हाय ठो ग्रो करायला, अशे प्रोजेक्ट मदत करते. सो स्टॉप गिविंग दॅट बुलशीट आरग्युमेंट इफ यु मे सन. उदाहरण :- २०१४ मंदी इंडिया ने मंगलयान धाडून 'कॅपबिलिटी डेमॉन्सत्रेत' केली म्हनून टर २०१६ मदी इंडिया अँड इसरोला एकदम २० सॅटेलाईट लॉन्च करायचा बिझनेस मिळाला. क्लिअर? पीएस :- माय आयडी इज स्टील हेल्दी अँड फेरिंग वेल, थँक यु

In reply to by बोका-ए-आझम

चिनार 27/12/2016 - 15:11
उद्या लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. इथे परतावा अपेक्षित आहे.
गाववाले असं नसते ते.. चांद्रयान आणि मंगळयान च्या भरवश्यावर ISRO ला भरपूर बाहेरील देशांच्या सॅटेलाईट वगैरेंच्या ऑर्डर्स मिळतात.

In reply to by चिनार

बरोबर! म्हणजेच मंगळयान मोहिमेवरील ४५० कोटींचा प्रत्यक्ष परतावा काही विशेष नाहीये. पण अप्रत्यक्ष परतावा खूप मोठा असू शकतो. म्हणजे, इतर देश आपल्या स्पेस टेक्नॉलॉजीला विश्वासार्ह्य मानून आपल्याकडून संबंधित उपकरणांची खरेदी करतील, आपले स्पेस लॉन्चर वापरतील किंवा स्पेस टेक्नॉलॉजी आणि मिसाईल टेक्नॉलॉजी बेस जवळपास सारखा असल्याने मिसाईलची निर्यात वाढणे वगैरेतुन अप्रत्यक्षपणे परतावा मिळेलच. मग अशा अप्रत्यक्ष फायद्यांचा विचार स्मारकाच्या बाबतीत करायला काय हरकत आहे (तोही काही लोक खर्चाची चर्चा "अपव्यय" ह्या एकाच पैलूने करत असल्याने)?

In reply to by फेदरवेट साहेब

चंद्रयानाचा खर्च आणि अपव्यय या दोन संदर्भांना धरून वरचा प्रतिसाद आहे. तुम्ही जर "जसे चांद्रयानामुळे आपली काही गोष्टींची निर्यात वाढेल तसे पुतळ्यामुळेही काही गोष्टींची वाढेल" या अर्थाने विचारत असाल तर मला तसे म्हणायचे नव्हते. मुळात या प्रकल्पात खर्च वसूल होण्याबाबत काही विचार करावा असं मला अजिबात वाटत नाही. मी माझे मत फक्त हा खर्च म्हणजे अपव्यय आहे यासंदर्भात मांडत आहे. मला असे वाटते कि भारतात पर्यटकांना आकर्षित करण्यासारख्या बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी आहेत पण फक्त त्याच पर्यटकांना आकर्षित करतात असं नाही. भारताच्या जिडीपीच्या जवळजवळ ६% पर्यटनातून येतं. यातलं अर्धं म्हणजे साधारणपणे ३% पर्यटनाच्या अप्रत्यक्ष परिणामातून येते. म्हणजे पर्यटकांच्या भेटीतील हॉटेल्स(राहणे, खाणे), छोट्या मोठ्या खरेदी (भेटवस्तू, कपडे इ. ), वाहतूक इ.तुन जमणारे उत्पन्न. म्हणून माझे असे म्हणणे आहे कि असे प्रकल्प जितके जास्त तितकं पर्यटन वाढण्याची शक्यता असेल आणि त्यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळणारं उत्पन्न जिडीपीला हातभार लावू शकतं! अवांतर : मी या बाबतीतला जाणकार नाही, वाचिव गोष्टिंतील माहिती सांगण्याचा प्रयत्न!

अमितदादा 26/12/2016 - 18:06
छान लेख सहमत. तुमच्या लेखाशी समांतर असा लेख आज वाचला दर्या खुश.. त्या लेखातील आवडलेलं वाक्य खुद्द शिवरायानाही जमले नव्हते अश्या स्मारकाचे बांधकाम, त्यांनी उभारला तो महाराष्ट्र..

In reply to by लालगरूड

महासंग्राम 27/12/2016 - 11:21
लालगरूड आपण कोणती तुलना कशाशी करता आहात ध्यानात घ्या. कुठे मेट्रो आणि कुठे स्मारक दोन्हीची तुलना होऊच शकत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम 27/12/2016 - 11:14
मास्तर, तुमच्याकडून जरा अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा होती, पण तुम्ही निराश केलं, असो

In reply to by महासंग्राम

बोका-ए-आझम 27/12/2016 - 11:30
डावे विचारवंत जे म्हणतात त्याच्या बरोबर उलटं करतात. लेनिन, मार्क्स,स्टॅलिन, माओ यांची त्यांनी दैवतं बनवलीच की. इतकी की त्यांच्या तत्वांमध्ये थोडासा फरक करणाऱ्यांनाही ते revisionist म्हणून बहिष्कृत करतात. अशा दांभिक लोकांच्या तत्वांचा निर्वाळा तुम्ही दिल्यावर मला स्वारस्य उरलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम 27/12/2016 - 11:53
देवा, आमचं सूत्र सबका साथ सबका विकास हे आहे हो. बाकी तुम्ही कुरुंदकरांना डावे म्हणत असाल तर ते मान्य, पण त्यांचे महाराजांविषयीचे विचार पटतात. बाकी डाव्यांविषयी ममत्व बिलकुल नाही. फक्त महाराजच नाही तर इतरही लोकांना देवत्व न बहाल करता प्रॅक्टिकल नजरेने पहायला हवं हे म्हणणं आहे.

जर असाच विचार शहाजहानने केला असता तर कदाचित ताजमहाल नसता आणि भारताचं नाव जगाच्या पाटीवर कधी लिहिलं गेलं नसत. हे मान्य आहे की अजून अनेक बेसिक प्रश्न आहेत. पण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र सरकारच काम बघितलं तर असं वाटत की हे प्रश्न देखील सोडवले जातील पुढील भविष्यात. मुख्य म्हणजे एकदा हे स्मारक झालं की ते पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक येतील आणि त्यातून जे अर्थार्जन होईल ते नक्कीच विकास कामांसाठी वापरलं जाईल त्यात गफला होणार नाही; निदान इतका विश्वास तर फडणवीस सरकारने कमावला आहे. आता विषय स्मारकाच्या जागेचा. येणारे पर्यटक हे केवळ स्मारकच नाही तर जगत्विविख्यात मुंबापुरी देखील बघतील. म्हणजे अजून जास्त अर्थार्जन होईल. दोस्तानो, हा निर्णय घेताना नक्कीच खूप विचार झाला असणार. शेवटी मोदीजी बनिया आहेत!☺

In reply to by ज्योति अळवणी

महासंग्राम 27/12/2016 - 11:20
आपली गल्लत होतेय शिव स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला होता, आणि फक्त मुंबईच का ??? अजिंठा-वेरूळ, लोणार, खिद्रापूर कोप्पेश्वर, सिन्नरच शिवपंचायतन हे काय दुसऱ्या आहेत का ??? इथला विकास नको व्हायला. बाकी ठिकाणी अर्थांजन नको व्हायला असे तुमचे म्हणणे आहे समजायचं का ???

In reply to by महासंग्राम

केवळ महाराष्ट्रचं का संपूर्ण भारत प्रगत झाला पाहिजे असं माझं मत आहे. पण त्यासाठी लागणारा पैसा जर विदेशी नागरिक इथे आल्याने उभा राहत असेल तर काय हरकत आहे? तुम्हाला एक कांडी फिरवून जादूची अपेक्षा का आहे? निर्णय कोणाच्याही काळात झाला असो, execution आता होतं आहे. या सरकारचे प्रगतीसाठीचे प्रयत्न प्रामाणिक आहेत; असं नाही का वाटत तुम्हाला. जे 60 वर्षात झालं नाही ते 60 महिन्यात व्हावं असं का वाटत आपल्याला? मागील सरकारने अनेक निर्णय घेतले आणि काम नाही केलं. या सरकारने कामाला सुरुवात तर केली आहे. थोडा विश्वास ठेवला तर कदाचित positive results दिसतील की

In reply to by ज्योति अळवणी

महासंग्राम 28/12/2016 - 12:19
हे माझ्या आपण विषय दुसरीकडे नेता आहात, इथे ६० वर्ष आणि ६० महिने तुलना कुठून आली. आपण मुद्द्यांना दहरुन उत्तर द्याल हि अपॆक्षा आहे.

पैसा 27/12/2016 - 11:22
माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.""समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."
एकदम सही लिहिलंय. लेख आवडला. पण बहिर्‍या कानांवर पडणार आहे. :( लोकांचे टॅक्सचे पैसे इकडे खर्च करण्यापेक्षा सरकारने राज ठाकरे, करण जोहर वगैरे मुख्यमंत्र्यांचे जे मित्र सैनिक कल्याण निधीला पैसे द्यायला तयार होते त्यांच्याकडून आणि उद्योगपतींकडून पैसे गोळा करावेत आणि स्मारक बांधावे. रस्ते जसे टोलवाल्यांना बांधा, डागडुजी करा आणि मग सरकारच्या हवाली करा म्हणून सांगतात तसे हे स्मारकही करावे. कोणालाच कटकट नको.

सतिश पाटील 27/12/2016 - 12:58
थोडक्यात का्य तर मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवलीय यांनी. एवढे पैसे जर गड किल्ल्यांची डागडूजीसाठी वापरले तर सबंध महाराष्ट्रात पर्यटन वाढ होईल एवढेकिल्ले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात. इतिहास, किल्ल, पार्श्वभूमी अणि शिवाजी पण समजेल, पाहिजे त्या ठिकाणी एवढे पैसे खर्च केल्यावर. पण परदेशी लोकांना तिकडे मुम्बैच्या किनार्यावरच शिवाजी दाखवायचा, म्हणजे आतली पड़झड लपवता येइल.

वरुण मोहिते 27/12/2016 - 13:06
हे स्मारक आणि भाजप यांचा बिलकुल संबंध नाही . आज सत्ता त्यांची म्हणून अतिशय चुकीचं आणि भपकेबाज प्रदर्शन केलं. ह्यामुळेच १२ वर्षांपूर्वी भाजप ची सत्ता गेली होती .मूळ निर्णय काँग्रेस चा असो काँग्रेस चा हि हक्क नाही . पण जाहिरातबाजी मध्ये भाजप अव्वल आहे . साधं अजून कामाचा टेंडर नाही निघालंय त्यामुळे घाईत मत मांडणं चुकीचं होईल . स्मारक व्हावं हि इच्छा आहे स्मारक का व्हावं त्यालाही काही कारण आहेत पण त्याचा बाकीच्या पैसांशी संबंध लावणं हाच पैसा इथे गेला तर चांगला अशी तुलना अस्थानी आहे . राज्य शासनाची कामे ठराविक मंत्रालय त्यांना मिळालेला निधी हे नियोजित असतं.

In reply to by वरुण मोहिते

संदीप डांगे 27/12/2016 - 13:31
अहो, कॉन्ग्रेसने (खरंतर साहेबांनी) ही टूम काढली ती मराठा मतांची मोळी बांधायला. शिवसेनेनी महाराज कवटाळून धरलेत, मग स्मारक करुन मते फोडायची चाल होती. त्याला तेव्हाही विरोध झालेलाच. कुमार केतकरांनी उपरोधपूर्ण लेख लिहिला तेव्हा त्यांच्या घरावर विनायक मेटेनी जमाव नेऊन तोडफोड केली होती. समुद्रातले शिवस्मारक ह्याला अनेक शिवप्रेमींचा विरोध तेव्हाही होता आताही आहे. तो तेव्हाही सरकार बघून होत नव्हता आताही नाही. सरकार कोणाचे आहे हे बघून स्मारकाला विरोध होतोय म्हणणारे कदाचित २००८ मध्ये जन्माला आलेले नसतील. =))

In reply to by संदीप डांगे

हे तेच २००८ वाले विरोधक आहेत हे मोठ्या खात्रीने सांगत आहात आपण! पण हेच लॉजिक स्मारकाच्या समर्थकांना लागू नाही होत बहुतेक! ते आताच्या भाजप सरकारचे समर्थक असा सूर दिसतो, असो!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित 27/12/2016 - 13:56
हेच लॉजिक स्मारकाच्या समर्थकांनाच म्हणजेच भाजपच्या समर्थकांना लागू होतंय, म्हणून तर एवढी आदळआपट आहे. बाकी असो...!!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 27/12/2016 - 14:53
गल्लत होते आहे का मुद्दा समजण्यात? विरोधकांचे महत्त्वाचे मुद्दे: १. वायफळ खर्च - हाच खर्च किल्ल्यांवर अपेक्षित २. मतांचे राजकारण - शिवाजी महाराज निवडणुकीतल्या मतांसाठी वापरले जाणे कोण्याही खर्‍या शिवभक्ताला आवडणार नाहीच. ३. अनावश्यकता - सत्ताधार्‍यांकडून स्मारकाची आवश्यकता पटवून देणारे कोणतेही लॉजिकल कारण नाही. पर्यटनविकास-महसूल कातडी-बचाव प्रयत्न आहेत राजकारण लपवण्याचे. तेव्हाही आताही. ४. दिखावूगिरी - राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना भपकेबाजीचा भंपकपणा करण्याची गरज नाही. तेवढाच खर्च कल्याणकारी योजनांमध्ये, ज्यांच्या प्रेरणा त्याकाळात राजांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांमधे असू शकतात, केल्यास व त्यांना महाराजांचे नाव देऊन चालवल्यास जास्त उपयुक्त प्रकल्प तयार होतील. आता हेच मुद्दे तेव्हा आणि आताही कायम असतील तर २००८ चेच विरोधक आताही आहेत असे म्हणायला हरकत नाही. आणि हे मुद्दे पक्षसापेक्ष नाहीत तर स्मारकसापेक्ष आहेत. विरोधक शिवस्मारक हे मतांच्या पेटीसाठी वापरले जाण्याविरूद्ध आहे. उलट तेव्हाचे समर्थक आताही समर्थकच असतील तर मला तरी काही म्हणायचे नाही. तेही सरकार कोणाचे हे बघून निर्णय घेत नाहीत असे म्हणता येईल फारतर.. त्यांच्याशी स्मारक का असावे की नसावे, असले तर कसे असावे, नसले तर काय करावे अशी चर्चा करता येईल जी उत्पादक, विधायक होऊ शकते. ज्यांना 'स्मारकाचे श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळावे' असे वाटत असेल किंवा 'श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळेल म्हणूनच विरोध होतोय' किंवा 'भाजप/कॉन्ग्रेस राजकारण करतात म्हणून यांच्या पोटात दुखतंय' असे वाटत असेल त्यांचं प्रेम महाराजांपेक्षा राजकिय पक्षांवर जास्त आहे असे समजूयात. अशांशी चर्चा करणे म्हणजे चिखलात उतरणे आहे. अशा चर्चांमधे शेवटी मजबूत मुद्दे नसलेले लोक फुटकळ, असंबंद्ध तपशील आणून विखारी व्यक्तिगत होतात असे एव्हाना लक्षात आले आहे. त्यापेक्षा न केलेल्या बर्‍या. और कुछ? :-)

In reply to by संदीप डांगे

त्यांच्याशी स्मारक का असावे की नसावे, असले तर कसे असावे, नसले तर काय करावे अशी चर्चा करता येईल जी उत्पादक, विधायक होऊ शकते
आता कसं पटण्यासारखं बोललात बघा! हेच सांगणं आहे एकमेव! भाजप राजकारण करतोय, फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय, दिखाऊगिरी चाललीय, मतांचे राजकारण चाललंय, खरे शिवभक्त, खोटे शिवभक्त वगैरे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणून दुसऱ्या धाग्यावर तुम्हाला टाकलेला प्रतिसाद पुन्हा इकडे टाकतो (तिकडे तुम्ही वाचनमात्र झालात म्हणून) - "बाकी हे सरकार हे कशासाठी करतंय (निवडणुकांसाठी, मराठा मोर्चान्ना उत्तर, शिवसेनेवर कुरघोडी) वगैरे मुद्दे आपण "राजकारण" आणि "तळे राखील तो पाणी चाखील" या सदरात टाकून थोडावेळ बाजूला ठेवू आणि खालील मुद्द्यांवर बोलू - १. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्व याला शोभेल असे स्मारक नको का? २. हे स्मारक भव्य असू नये का? आणि असावे तर मग खर्च तसाच मोठा असणार नाही का? ३. हे मुंबईला असणे हे एकूणच फायदेशीर नाही का? (पर्यटन, आंतरराष्ट्रीय ख्याती वगैरेसाठी) ४. गड किल्ल्यांवर स्मारक करणे हे ह्या भव्यदिव्य स्मारकाइतके परिणामकारक ठरेल का? ५. पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने सरकार किंवा अजून कोणी यात गुंतवणूक करावी का? ६. पैसे परत मिळूच शकनार नाहीत का?"

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बोका-ए-आझम 27/12/2016 - 20:25
डांगे अण्णांना भाजप आवडत नाही एवढी एक साधी सरळ गोष्ट ते सांगत नाहीत आणि वितंडवाद घालत बसतात, वर परत दुस-यांच्याकडे मुद्दे नाहीत वगैरे म्हणतात. आता इथे नाव घेतल्यानंतर ते मी व्यक्तिगत होतोय असं म्हणतील आणि याही धाग्यावर conveniently वाचनमात्र होतील. आपला विरोध राजकीय आहे हे मान्य करायचं सोडून लोक तात्विक मुलामा का लावतात तेच कळत नाही. सांगा ना सरळ - भाजपला श्रेय मिळतंय म्हणून आम्हाला हे खपत नाहीये. उगाचच या पैशांत हे करता येईल आणि ते करता येईल अशा पळवाटा कशाला काढता? आपण स्पष्टपणे म्हणतो - मी ज्या पक्षाला समर्थन देतो त्याने घेतलेला हा निर्णय मला आवडलेला आहे. मी त्याचं समर्थन करणार म्हणजे करणारच.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 27/12/2016 - 21:01
कोण काय आहे ह्याचं सर्टीफिकेट तुम्हाला द्यायला नियुक्त केलंय हे माहित नव्हतं. धन्यवाद! मला भाजप आवडत नाही, मी वितंडवाद घालतो, माझा विरोध राजकिय आहे, शिवाय भाजपला श्रेय मिळतंय म्हणून मला खपत नाही म्हणून मी मुंबईतल्या शिवस्मारकाला विरोध करतो हा आपण लावलेला शोध महान आहे. गुड! प्रयत्न चांगला आहे. लगे रहो. आता इतके तुम्हाला इत्थंभूत पक्के माहित आहे तर फक्त एक सांगा की २००८ मध्येही ह्या स्मारकाला माझा विरोधच होता, तो का असेल बुवा? (अवांतर सूचना: वाह्यात ट्रोल्सना उत्तरे दिली जाणार नाहीत याची कृपया सर्व ट्रोलभैरवांनी नोंद घ्यावी)

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 27/12/2016 - 21:41
त्या वेळचे सगळे संदर्भ कालबाह्य झालेले आहेत. तेव्हा तुम्ही तुमचा विरोध कुठे व्यक्त केला असेल तर त्या संस्थळाचं नाव सांगा. शोधून निष्कर्ष ऐकवू. हाकानाका. फक्त प्रामाणिकपणा दाखवा एवढं म्हटल्यावर तु्म्ही चिडला आहात. त्यावरून काय ते समजतंय. तुमचा विरोध असायला हरकत नाही, पण त्याला तात्विक मुलामा देऊ नये. तुम्ही प्रामाणिक आहात अाणि स्पष्ट काय ते बोलता असा समज होता. तो गैरसमज ठरला याचा खेद आहे.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे 27/12/2016 - 21:59
त्या वेळचे सगळे संदर्भ कालबाह्य झालेले आहेत. ^^^ how convenient is that...;) जरा स्पष्ट कराल काय कोणते संदर्भ कालबाह्य झालेत ते..

In reply to by बोका-ए-आझम

तुमचं मत अगदी मान्य. याशिवाय असही वाटत की थोडा काळ या सरकारला देऊन बघायला काय हरकत आहे? त्यांचे इतर प्रयत्न प्रामाणिक आहेत हे सिद्ध झालं आहेच न

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 27/12/2016 - 20:53
कसं आहे प्रसादजी, जो महत्त्वाचा मुद्दा आहे "राजकारण" हाच तुम्ही बाजूला टाकताय. कोणत्याही राजकिय पक्षाची बाजू न घेताही ह्या निर्णयावर राजकिय दृष्टीकोनातून चर्चा करता येते. कारण स्मारकाची संकल्पना जिथून उचलली गेलीये, ज्यासाठी उचलली गेलीये ते राजकारण आहे फक्त. बाकीचे सगळे मुद्दे त्या मूळ राजकारणाला लपवण्यासाठी केली जाणारी सारवासारव आहे. खोड तोडा, सगळ्या शाखा गळून पडतील. तरी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. १. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्व याला शोभेल असे स्मारक नको का? कशाला काय शोभेल आणि त्यासाठी काय करावं ह्याच्या संकल्पना व्यक्तिसापेक्ष आहेत. माझ्यामते भव्य स्मारक हवे असेल तर रायगड किल्ल्यावर सर्व डागडुजी करुन, लायब्ररी, थीएटर इत्यादी मुंबईतल्या संयोजित स्मारकातल्या गोष्टी तिथेही होऊ शकतात. जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला, जीथून मराठा साम्राज्याची सुरुवात झाली ती जागाच जीवंत स्मारक असतांना नवीन भलतीकडे बांधायची गरज नाही. २. हे स्मारक भव्य असू नये का? आणि असावे तर मग खर्च तसाच मोठा असणार नाही का? स्मारक भव्य नसायला काहीच हरकत नाही. शिवभक्तांनी स्वतःच्या खिशातून करत असल्यास कितीही खर्च केल्यास कुणाची ना नाही. सरकारचे म्हणजे पर्यायाने टॅक्सपेयरचे पैसे इथे वापरु नये. कोणाचीही स्मारके (अगदी शिवाजीमहाराज असो की बाबासाहेब आंबेडकर) बांधणे हे सरकारचे काम नव्हे. असले तरी स्मारके ही तरी सरकारची प्राथमिकता नसावी. ३. हे मुंबईला असणे हे एकूणच फायदेशीर नाही का? (पर्यटन, आंतरराष्ट्रीय ख्याती वगैरेसाठी) मग दिल्लीलाच का नको? आणखी आंतरराष्ट्रिय ख्याती हवी असेल तर दुबई, सिंगापूर, मलेशिया, न्यूयॉर्क इथेही जागा घेऊन एक एक स्मारक बांधायला हरकत नाही. पर्यटन, ख्याती हे ठिसूळ कारणे आहेत. ही कारणे देणार्‍यांना दोन्हीपैकी एकाबाबत तरी पुरेसा अभ्यास आहे का असा प्रश्न आहे. मुंबईच्या गर्दीवर, गलिच्छपणावर, ट्रान्स्पोर्ट, नागरीसुविधांवर, जरा नीट लक्ष देऊन काम केले तर जास्त ख्याती होईल. जगातल्या बहुतेक सर्वांना स्टॅच्यु ऑफ लिबर्टी माहित आहे, पण त्यामागची कथा माहिती आहे? चीनची भींत माहित आहे, कुणी कशाला बांधली माहित आहे? आयफेल टॉवर का बांधला माहित आहे? झुलत्यामनोर्‍याची कारणं? बहुतेकांना ही नावे आणि चित्रात बघून ओळख असते. त्यामागची कथा बहुसंख्य लोकांना अभ्यासल्याशिवाय, स्वतःहून शोधल्याशिवाय माहित नसते. ख्यातीचे असे असते. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आंतरराष्ट्रिय पातळीवर पोचवायचे तर त्यासाठी अमेरिकन फंडे वापरले पाहिजेत. नुसती स्मारकं बांधून आपोआप ख्याती होत नसते. त्याचाही काही अभ्यास आहे. चला मला ह्या प्रश्नांची उत्तरे मिळवून द्या: शिवाजींचा पुतळा म्हणून ओळख हवी की जगातला (भारतातला किंवा व्हाटेवर) सर्वात मोठा पुतळा अशी ओळख हवी? स्मारकाचं ब्रॅण्डींग/पोजिशनिंग नक्की काय असेल? मार्केटींगचे मूलभूत तत्व काय असेल? ताजमहाल, लिबर्टी पुतळा, आय्फेल टॉवर, पिसामनोरा ह्यासारखे इथेही विदेशी-देशी बावळट पर्यटकांनी येऊन शिवाजीमहाराजांची टोपी, तलवार वगैरे चिमटीत पकडून फोटो काढावे आणि जालावर अपलोड करावे अशी संकल्पना नसावी बहुतेक. मलातरी तसलं काही अजिबात आवडणार नाही. ४. गड किल्ल्यांवर स्मारक करणे हे ह्या भव्यदिव्य स्मारकाइतके परिणामकारक ठरेल का? नक्कीच. तुमच्या मते परिणामकारक म्हणजे काय याबद्दल स्पष्टीकरण दिलंत तर सांगताही येईल. ५. पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने सरकार किंवा अजून कोणी यात गुंतवणूक करावी का? पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने स्मारक होतंय काय? राजाच्या स्मारकासाठी असले दळभद्री विचार? हौसेला मोल नसतं, हे तर साक्षात शिवबांचं स्मारक, शिवप्रेमींकडून देणगीची अजिबात कमतरता येणार नाही. प्रसंगी आपला एक एक वर्षाचा पगार, धंद्यातला नफा, शेतीतली कमाई इत्यादी देऊन छत्तीसशे कोटीच काय छ्त्तीस हजार कोटीही गोळा होतील. ६. पैसे परत मिळूच शकनार नाहीत का?" हवेतच कुणाला इथे पैसे परत? मुंबईत अनावश्यक स्मारकाचा राजकिय स्वार्थासाठी खटाटोप करणारांना 'पैसे परत मिळतील, महसूल मिळेल' हे गाजर जनतेसमोर टाकलंय. खर्‍या शिवप्रेमींनी महाराजांची ख्याती जगभर कशी पसरेल ह्यावर लक्ष केंद्रीत करावे, काही गोष्टींमधे परतावा मिळावा अशी अपेक्षा धरत नसतात. राजांनी रयतेकडून केली नाही, आपण त्यांच्या स्मारकाकडून तरी का करावी? जर गडकिल्ल्यांवर स्मारक झालं तर उलट जास्तीत जास्त नीटनेटका ठेवायला लागेल तेवढा खर्च करावा. बाकी समर्थकांना नक्की काय हवंय हे स्पष्ट नै अजून. पर्यटनस्थळ हवंय, स्मारक हवंय, सर्वात उंच पुतळा हवाय, महाराजांची ख्याती हवीय, नक्की काय हवंय? सर्व एकत्र हवंय असं काही उत्तर देऊ नये. सिंगल लाईन नॅरेटीव च्या जमान्यात आहोत आपण. स्मारकाचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत? देशी/परदेशी/महाराष्ट्रीय, नक्की कोण? समर्थकांसाठी माझ्याकडेही अनेक प्रश्न आहेत. ते नंतर बघूया. वन बाय वन. :-)

In reply to by संदीप डांगे

मेगाबायटी प्रतिसाद देणं अजिबात आवडत नाही, पण पर्याय नव्हता :(.
माझ्यामते भव्य स्मारक हवे असेल तर रायगड किल्ल्यावर सर्व डागडुजी करुन, लायब्ररी, थीएटर इत्यादी मुंबईतल्या संयोजित स्मारकातल्या गोष्टी तिथेही होऊ शकतात.
हे काहींच्या काही वाटतेय! थोडक्यात रायगडाचे संवर्धन म्हणजे रायगडावर सुविधा पुरवण्यासाठी सिमेंटचं जंगल आणणे आहे! मुळात गड किल्ल्यांवर काय केले म्हणजे लोक तिकडे फिरकतील आणि महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त पोहोचवता येईल यावर थोडा प्रकाश टाकता आला तर बघा! आणि डागडुजी करायची म्हणाल तर उत्कृष्ट स्थितीत असणाऱ्या परांडा किल्ल्याला महाराष्ट्रातील तरी लोक भेट देतात का हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे!
सरकारचे म्हणजे पर्यायाने टॅक्सपेयरचे पैसे इथे वापरु नये.
हे पटतंय तुम्हाला? म्हणजे आपल्या न आवडलेल्या प्रकल्पांवर सरकारने आपल्या करातून पैसा गुंतवावा कि नाही हे (व्यक्तिसापेक्षपणे) ठरवण्याची मुभा करदात्याला देण्यात यावी असं आहे तर! प्राथमिकता - हे बरोबर बोललात! आता सरकारची प्राथमिकता कशी ठरवायची हे पण समोर यायला हवं ना? या हिशेबाने जोपर्यंत सगळ्यांच्या पोटात अन्न पोहोचत नाही तोपर्यंत शौचालय वगैरे योजनांवर एक रुपयाही खर्च करायला नको असं काहींचं मत येऊ शकतं!
मग दिल्लीलाच का नको? आणखी आंतरराष्ट्रिय ख्याती हवी असेल तर दुबई, सिंगापूर, मलेशिया, न्यूयॉर्क इथेही जागा घेऊन एक एक स्मारक बांधायला हरकत नाही.
काहींच्या काही! हे आपलं खरंच मत आहे कि आपलं उगाच मुद्द्याला मुद्दा? स्मारकाचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे आणि प्रकल्प महाराष्ट्रात कुठे एवढाच मुद्दा आहे! पर्यटन आणि ख्याती हि कारणे ठिसूळ आहेत असं आपल्या पुरेश्या अभ्यासाने दाखवून दिलंत कि बाकीचे आपोआप उघडे पडतील आणि माझ्यासारखे चारदोन हि कारणे वापरणार नाहीत किंवा पर्यायाने प्रकल्पाचं समर्थन करणार नाहीत. जगातल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर, चीन ची भिंत वगैरे ठिकाणी भेट दिलेल्या बहुतांशी लोकांना त्या त्या ठिकाणाची माहिती नसणारच असा आपला दावा आहे का? आणि या स्मारकामध्ये कलादालन, ऑडिटोरियम वगैरे गोष्टी आहेत, याचा योग्य वापर करून गड किल्ल्यांची माहिती आलेल्या पर्यटकांना सांगितली तर ते लोक आपसूकच गड किल्ल्यांकडे वळणार नाहीत का?
शिवाजींचा पुतळा म्हणून ओळख हवी की जगातला (भारतातला किंवा व्हाटेवर) सर्वात मोठा पुतळा अशी ओळख हवी?
जगातला सर्वात मोठा पुतळा शिवाजी नावाच्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील कर्तृत्ववान राजाचा आहे अशी ओळख मिळयाला काही हरकत असू शकते का?
ताजमहाल, लिबर्टी पुतळा, आय्फेल टॉवर, पिसामनोरा ह्यासारखे इथेही विदेशी-देशी बावळट पर्यटकांनी येऊन....
थोडक्यात भेट देणारे सर्व पर्यटक बावळटच असतील असं गृहीतक आहे तर? आणि गड किल्ल्यांवर स्मारक केलं तर तिथे प्रेमाचे चाळे, दारूपार्ट्या, खडूने लिहिणे वगैरे प्रकार करणारे बावळट लोक येणार नाहीत का? परिणामकारक म्हणजे जास्तीत जास्त लोक भेट देतील आणि महाराजांचा जाज्वल्य इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल! हे मुंबईच्या जवळ असणाऱ्या एका भव्यदिव्य स्मारक अधिक बरंच काही असणाऱ्या ठिकाणाहून सहज पोहोचवता येईल असं माझं मत आहे! बाकी विरोधकांना कशाला विरोध करायचा आहे हेच स्पष्ट नै अजून! पैसे कसे ओतणार आहेत हे अजून स्पष्ट नसताना उगाच वितंडवाद कशाला? एका बाजूला एवढा खर्च करदात्यांच्या पैशातून का म्हणून ओरडायचे आणि मग त्यातून परतावा मिळू शकतो म्हणून सांगितले कि म्हणायचं "पैसे हवेतच कुणाला?" याला काही अर्थ आहे का? "पर्यटनस्थळ हवंय, स्मारक हवंय, सर्वात उंच पुतळा हवाय, महाराजांची ख्याती हवीय, नक्की काय हवंय" याला - स्मारक हवंय पण अगदी विचार्पूर्वक हे स्मारक एक नुसताच पुतळा म्हणून उभारण्यापेक्षा महाराजांची ख्याती पोहोचवू शकणारं, जगातील एकमेवाद्वितीय उत्कृष्ट सुविधा असणारं पर्यटन स्थळ म्हाणून तयार गेलं तर "सर्व एकत्र हवंय मिळतंय" म्हणायला काही हरकत असावी का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 28/12/2016 - 16:04
मेगाबायटी प्रतिसाद आवडत नाही म्हणता, सगळे प्रतिसाद वनलाईनर हवेत की व्हॉट्सॅपीय चर्चा हवी? थोडक्यात रायगडाचे------करण्यासारखी गोष्ट आहे! किती विरोधाभास आहे बघा इथे. रायगडावर सिमेंटचे जंगल होईल त्याची चिंता पण समुद्रात भराव टाकून जलचर आणि पर्यावरणाचे नुकसान होईल त्याबाबत मौन. गडकिल्ल्यांवर काय करावे याबद्दल आधीच सांगितलंय. पर्यटक अजिंठा,वेरुळसाठी औरंगाबादला जातात पण मुंबईपासून तेवढेच अंतर असलेल्या परांडा किल्ल्याला का भेट देत नाहीत याची कारणे शोधावी. किल्ल्यांवर डागडुजी उपयोगी नाही असं वाटतंय का? आपल्या न ---- मत येऊ शकतं गरजू शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या अनुदानांवर डोळा वटारणारा करदाता शिवस्मारकावर उधळल्या जाणार्‍या पैशाबद्दल सोयिस्कर मौन घेतोय असं निरिक्षण आहे. अन्न-शौचालय वगैरे लाड तरी कशाला हवे, ते सगळं सोडून आधी स्मारके बांधायला हवीत. महाराजांना जनता विसरली-बिसरली तर काय घ्या, नै का? जगातल्या ------वळणार नाहीत का? मी असा कोणताही दावा केलेला नाही. गडकिल्ल्यांबद्दल माहिती घ्यायला पर्यटकांना स्मारकाला भेट द्यावी लागेल, त्याआधी स्मारकाला भेट द्यावी म्हणून मार्केटींग करावी लागेल. एवढ्या द्राविडी प्राणायमाची गरज काय? पर्यटनस्थळांचे आंतरराष्ट्रिय स्तरावर मार्केटींग हा एक गहन विषय आहे. उभारले स्मारक की झाली पब्लिसिटी अन आली गर्दी असे होत नाही. जगातला सर्वात मोठा ------असू शकते का? तुम्ही सांगताय ते लांबलचक होतंय, आणि खूप एक्स्प्लेन करायला लागतंय. एक मराठी म्हणून नव्हे तर परदेशी अनभिज्ञ पर्यटक म्हणुन ह्याकडे पहा. थोडक्यात --------बावळट लोक येणार नाहीत का? "सर्व पर्यटक बावळटच" हे माझे शब्द नव्हेत. प्रेमाचे चाळे, दारूपार्ट्या, खडूने लिहिणे हे प्रकार उत्तम सुरक्षाव्यवस्था असलेल्या गडकिल्ल्यांवरच्या स्मारकांमधे होतील अशी आपली खात्री आहे? परिणामकारक ------ मत आहे! सहज पोचता येतं म्हणून पर्यटनस्थळे विकसित झालेली नसतात, होत नसतात. जाज्वल्य इतिहास पोचवण्याबद्दलः शिवस्मारक हा काही महाराजांच्या कर्तृत्वाचा पुरावा नव्हे. त्यांच्या कर्तृत्वाचे पुरावे महाराष्ट्रात ठायीठायी जीवंत आहेत. बाकी ---- अर्थ आहे का? हे हे हे! विरोध कशाला करायचा हे स्पष्ट नै? वरच चार मुद्दे स्पष्ट दिलेत की? पैसे कसे ओतणार हे स्पष्ट नाही म्हणता? मग स्पष्ट आहे तरी काय? पैसे परत मिळतील हा समर्थकांचा दावा आहे, विरोधकांनी केलेली मागणी नव्हे. परताव्याचे गाजर दाखवून खर्चाची भलामण करणारे महान आहेत. हौसेला मोल नसतं हे आधीच मी म्हटलंय. ते समजायला इतके कठिण का असावे? खर्चाला जे डिफेन्ड करत आहेत त्यांनीच परत पैसे वसूल होतील, कमाई होइल, रोजगार होइल, पर्यटन होईल असे तकलादू मुद्दे काढलेत. रोजगार, पर्यटनविकास, हे उद्दिष्ट असेल तर वेगळे मार्ग आहेत, शिवाजींची ख्याती पोचवायची तर त्याचेही वेगळे मार्ग आहेत, ह्या दोन्हींचा मेळ घालायचा तर तेही शक्य आहे. त्यासाठी स्मारकाशिवाय काही तरणोपायच नाही असे काही नाही. तसे बघायचे तर राजकिय पक्षांना स्मारकाशिवाय पर्याय नाही हे मात्र खरे!

In reply to by संदीप डांगे

वरुण मोहिते 28/12/2016 - 16:57
खूप मोठा इतिहास आहे त्याची तुलना परांडा किल्ल्याशी होऊ शकत नाही . विदेशी पर्यटकांमध्ये त्याची क्रेझ आहे . युनेस्को ची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती . मी कित्येकदा विदेशी मित्रांना मैत्रिणींना घेऊन गेलोय तिथे तर तिथे किती विकास झाला . महसूल किती विकास किती ह्याची आकडेवारी द्यावी . आजही जागतिक दर्जाचं असून तिथे विकास नाही . समुद्र पर्यावरण वैग्रे असेल तर समुद्रात कधी काही कामच झाला नाही असा दावा आहे का ? अगदी ताजमहाल हॉटेल पण समुद्रात भराव टाकून बांधलं होतं. जगात अनेक गोष्टी आहेत अश्या . आपला मुद्दा बरोबर असला शिवप्रेमींचा तरी हे कार्य समजायची आवश्यकता होती त्यामुळे ते ठिकाण निवडलं. बाकी भाजप ने तर बिलकुल हुरळून जाऊ नये प्रकल्प नियोजित होता ह्यांच्या काळात भूमिपूजन झालं इतकंच. उद्या सत्ता नसली तर काँग्रेस ओपनिंग करेल . अजून कोणी करेल .त्यात काय

In reply to by वरुण मोहिते

संदीप डांगे 28/12/2016 - 17:31
विदेशी पर्यटकांमध्ये त्याची क्रेझ आहे आणि आजही जागतिक दर्जाचं असून तिथे विकास नाही ही वाक्ये संधी असून पर्यटनविकासाला सरकारच्या दृष्टीने किती प्राथमिकता आहे त्याचीच द्योतक आहेत. माझेच मत आपण सिद्ध करत आहात की पर्यटनविकास हे फक्त गाजर आहे, बाकी, अख्खी मुंबई समुद्रात भर घालून बनवलेली आहे. तीची बकाल अवस्था सुधारण्याचं सरकार कधी मनावर घेईल कोण जाणे. महाराजांचे कार्य 'कोणाला' समजवायचे आहे, ते करायला स्मारकच कसे उपयुक्त ठरेल, त्याने कोणती उद्दिष्टे सफल होतील व कशी? ह्याचे मुद्देसूद स्पष्टिकरण अजून समर्थकांकडून आलेले नाही. समर्थक विरोधकांनाच उलट प्रश्न विचारत आहेत असे दिसले. विरोधाचे स्पष्टिकरण दिले मग समर्थनाचेही स्पष्टिकरण दिले पाहिजे की नाही? बाकी हूरळून जायचा मुद्दा आपण अचूक बोललात. यु मे नेवर नो काय घडेल. बाकी, गडावरही नको आणि समुद्रातही नको, माझी स्मारकाबद्दल काही संकल्पना आहे, ती नंतर मांडतो.

In reply to by संदीप डांगे

डांगेंजी, एक खुलासा : मेगाबायटी प्रतिसाद देणे "मला" आवडत नाही असे मी म्हणालो वर त्यामुळे तुम्ही वन लायनर किंवा व्हॉट्सॅपीय प्रतिसाद न देता मेगाबायटी प्रतिसाद देण्यास मोकळे आहातच! मोठे प्रतिसाद कमी लोकांपर्यंत पोहोचतात असं माझं वैयक्तिक मत आहे, तुमचंही तेच मत असण्याची आवश्यकता नाही. बाकी तुमच्या/विरोधकांच्या चारही मुद्द्यांचे/आक्षेपांचे उत्तर माझ्या वरच्या एक दोन तसेच बाकी मिपाकरांच्या प्रतिसादात आलेच आहेत, त्यावरच परत परत प्रतिवाद करण्यात काही हाशील नाही. तस्मात - इथून पुढचा वितंडवाद टाळण्याच्या दृष्टीने माझी असहमतीवर सहमती! कसे?

विशुमित 27/12/2016 - 15:04
ज्यांना 'स्मारकाचे श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळावे' असे वाटत असेल किंवा 'श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळेल म्हणूनच विरोध होतोय' किंवा 'भाजप/कॉन्ग्रेस राजकारण करतात म्हणून यांच्या पोटात दुखतंय' असे वाटत असेल त्यांचं प्रेम महाराजांपेक्षा राजकिय पक्षांवर जास्त आहे असे समजूयात. अशांशी चर्चा करणे म्हणजे चिखलात उतरणे आहे.>>>> -- एक्साक्टली. या विचारला प्रचंड अनुमोदन. पण महाराजांचे नाव घेऊन जगणाऱ्या बांडगुळांना त्याचे काहीच सोयरेसुतक नाही.

स्मारकाचा निर्णय आवडलेला नाही. स्मारक व्हावं, त्याला पर्यटक मिळतील वगैरे सगळं खरं असलं तरी गड किल्ल्यांची अवस्था इतकी वाईट असताना येड्यासारखा पैसा स्मारकात ओतणं हेच गाढवपणाचे लक्षण आहे. म्हणजे तिकडे वर्डक्लास स्मारक आणि इकडे अत्यंत बेक्कार अवस्थेतले गड-किल्ले.. काहीही अर्थ नाही. दोन्ही गोष्टी सुद्धा होऊ शकतातच.. तसं होणार असेल तर "आधी" गड-किल्ल्यांचं पहा.. नंतर काय स्मारकं उभी करायची ती करा..

ट्रेड मार्क 28/12/2016 - 01:52
हे स्मारक व्हायला पाहिजे असं मनापासून वाटतं पण आपले भारतीय लोक किती काळ हे स्मारक सुस्थितीत राहू देतील? सगळीकडे थुंकणे, कचरा टाकणे, आपली नावे लिहिणे ह्यात धन्यता मानणारे आपले लोकच त्याची वाट लावतील. एवढ्या एकांतातल्या जागी असल्याने, कुठला ना कुठला मार्ग शोधून, रात्रीच्या वेळेला जाऊन नसते उद्योग करणारे कमी नसतील. पक्षी स्मारकांवर/ पुतळ्यावर घाण करतात हे आहेच. त्यांना कळत नाही, पण माणसांचं काय? प्रत्यक्ष महाराजांनी बांधलेले आणि वास्तव्य केलेले किल्ले व महाल यांची काय दयनीय अवस्था करून ठेवली आहे. यात फक्त सरकारच दोषी नसून जनताही तेवढीच दोषी आहे. आपला कुठलाही वारसा आपल्याला जपता येत नाही हेच खरं.

लालगरूड 28/12/2016 - 02:13
Which Indian city do foreign tourists visit the most? Where do they spend the most? The answer to both the questions is Mumbai, according to a study by card payment services provider, MasterCard. In 2016, the city had 4.86 million overnight visitors who spent a collective $3.6 billion, or Rs 24,120 crore, said the study.

अर्धवटराव 28/12/2016 - 04:54
छत्रपतींच्या कर्तुत्वाचा आलेख मांडणारे संग्रहालय सदृष ऑडीटोरीअम, मराठा साम्राज्याची शक्य तेव्हढी माहिती रंजक पद्धतीने देणार्‍या चित्रफिती, गड-किल्ल्यांच्या ऐतिहासीक माहितीसह सफारी आयोजन करणारी पथकं, शिवाय बाकी पर्यटन सोयींनी युक्त असं भव्य स्मारक झालं तर काय बहार येईल. स्मारक असं व्हावं कि छत्रपतींबद्दल अगदी जुजबी/शुण्य माहिती असणार्‍या व्यक्तीने आत पाऊल टाकावं व शिव-कर्तुत्वाने भारावुन जावुनच बाहेर पडावं. छत्रपतींच्या पुतळ्याची भव्यता त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशी असल्याची खात्री पटावी. मराठी/मराठा वगैरे कुंपणांत बदीस्त शिवबा आजवर आपल्याला अखील भारतीय गौरवाच्या पातळीवर स्थापन करता आला नाहि. हे स्मारक त्या दृष्टीने दमदार पाऊल पडावं. भारतीय पराक्रमाचा, शहाण्या राजसत्तेचा मानबींदु म्हणुन छत्रपतींचं नाव जगभर गाजावं. आधी गड-किल्ल्यांच्या अवस्थेचं बघा वगैरे म्हणण्यात काहि अर्थ नाहि. स्मारकाच्या टार्गेट ऑडीयन्सपैकी १०% सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकणार नाहि. गड-किल्ल्यांची व्य्ववस्था वेगळ्या पातळीवर करायला लागेल. किंबहुना स्मारकाने प्रभावीत होऊन गड-किल्ल्यांकडे पाऊले वळायला लागली तर किल्ल्यांची अवस्था नीट लावण्याची अवष्यकता तीव्रतेने जाणवायला लागेल.

In reply to by अर्धवटराव

महासंग्राम 29/12/2016 - 10:19
स्मारकाच्या टार्गेट ऑडीयन्सपैकी १०% सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकणार नाहि.
तसं झालं तर सरकारच्या मार्केटिंगच पराभव ठरेल.

In reply to by महासंग्राम

अर्धवटराव 30/12/2016 - 02:08
वय वर्षे १० ते ७० हा स्मारकाचा टार्गेट ऑडीयन्स धरला, त्यात मराठी/अमराठी/परदेशी सगळे आले, तर त्यापैकी १०% लोकांकडुन सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकायची अपेक्षा नाहि. शिवाजीला लोकांपर्यंत पोचवायला प्रस्तावीत स्मारक जास्त प्रभावी आहे गड-किल्ल्यांपेक्षा.

आडोसा मारामारी आन तिकडं दर्यात आजून येक. महाराजांसारखं वागून दाखवा, त्यांनी तयार केलेली व्यवस्था परत तयार करा ... हर गाव हर शहर, पुतले, नगर, रस्ते महाराजजीके नामपे है. मग अजून एक बांधून काय फायदा?
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा.

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

अभ्या.. ·

In reply to by यशोधरा

नाखु 01/11/2016 - 13:17
आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन.. बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय? फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 01/11/2016 - 13:19
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =)) बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

In reply to by सतिश गावडे

नाखु 02/11/2016 - 08:48
सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी. तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/11/2016 - 13:31
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)
ब्येस्ट. आता कोण? संजयजी का? येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

जयू कर्णिक 01/11/2016 - 17:02
प्रिय 'अभ्या'सक, "क्या बात है!" वाचून मजा आली. 'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला. जबरा कमांड आहे आपली. ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले. धन्यवाद.

चौथा कोनाडा 01/11/2016 - 18:13
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !
कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.
सुपर्सिध्द गावातील.. :-))))
पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
हा.... हा.... हा... !
कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.
आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?
हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे
ह्ये क्लासिकच !
कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?
आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',
टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !
तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.
क्या बात, क्या बात, जी नाईन बात !
पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.
या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत ! आणि शेवटी

वटवट 01/11/2016 - 20:36
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार... अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला..... तगडी स्पर्धा...

In reply to by यशोधरा

नाखु 01/11/2016 - 13:17
आणि पिंचितलयाही कट्ट्याला अनुमोदन.. बाकी काही धोतरांना (असेच)सोडून का दिलेय? दिवाळी बोनस म्हणून (ता.क.काही फटाके दिवाळी नंतर फुटतात ह्या वचनाचा अर्थ बुवांकडून विचारून घ्यावा की काय? फराळा ते धुराळा साक्षीदार नाखु

In reply to by यशोधरा

टवाळ कार्टा 01/11/2016 - 13:19
खिक्क...नीलकांत अण्णा आलेले कि पुण्याच्या (३ धागेवाल्या) ऐतिहासिक कट्ट्याला :)...अभ्याने चटणी नसेल दिली तेव्हा नैतर लग्गेच संपादक झाला असता =)) बाकी असे धागे काढावेत तर अभ्यानेच

In reply to by सतिश गावडे

नाखु 02/11/2016 - 08:48
सूचना चितळे शाखा अता चिंचवडात (चाफेकर चौक) आणि प्राधिकरणात (नाय्डू बेकरी समोर व बेरकी माणसाच्या परिसरात आहे) दोन्ही पर्यंत घेञ्न जायची जिम्मेदारी माझी. तत्पर मदतनीस मित्रमंडळ पिंचि शाखा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 01/11/2016 - 13:31
(मी ठरवलं आहे, अभ्याचं कौतुक बंद)
ब्येस्ट. आता कोण? संजयजी का? येनीवे आताच कुणीतरी आपलंच माणूस म्हणलं ब्वा. "आपलं भांडन आचा-याच्या जिल्बीशी की आचा-याशी एकदा ठरवलं पाहिजे." :)

जयू कर्णिक 01/11/2016 - 17:02
प्रिय 'अभ्या'सक, "क्या बात है!" वाचून मजा आली. 'मिपा'चा रिफ्रेशर कोर्स केल्यासारखा वाटला. जबरा कमांड आहे आपली. ह्यवेळी दिवाळीच्या फराळात अनारसे खायचे राहीलेच होते.तेही खुसखुशीत मिळाले. धन्यवाद.

चौथा कोनाडा 01/11/2016 - 18:13
लैच जबरी विडंबन आस्तयं की बे अभ्या ! म्हंजे आगदी गस्टेल की लगा !
कारण आमच्या बे ची इतकी चेष्टा पच्चिम महाराष्ट्रातील नातेवाईकात झालीय की पाव्हण्याराव्हळ्यात म्युटच व्हायला होतं.
एका सुपर्सिध्द गावातील कट्ट्याला भेटण्यापूर्वी माझी आख्खी कुंडली त्यांना पाठ होती.
सुपर्सिध्द गावातील.. :-))))
पण हल्ली स्वतःचे हपिस असल्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखण्याचा गुण जरा बोथटच झालाय.
हा.... हा.... हा... !
कारण मिपाचे संस्कार झालेली व्यक्ती मनाने आयुष्यभर मिपा परिवाराचीच असते असं मला वाटतं. ते संस्कार असे सहजासहजी पुसता येतील असं मला वाटतं नाही.
आता या कोट बद्द्ल येगळं काय ल्हायचं ?
हो, एक वर्षांपूर्वी मी घेतलेले आहे अन स्वतः रंगवलेले आहे
ह्ये क्लासिकच !
कां, फ्लेक्स लावून, टिशर्ट छापून दुसर्‍यांची मापं काढायची, त्याचं काय?
आणि आताही तसं बघितलं तर तुझं चांगल्या धाग्याचा खरडफळा करण्याचं कसब, अंगात असलेला टवाळपणा, पूर्वग्रह न बाळगता कुणाची टर उडवण्याचा असलेला खत्रुडपणा हेच दर्शवते की माझ्या बोलण्यात तथ्य आहे. तेंव्हा मिपा संस्काराचा वारसा जपणाऱ्या, त्याची पताका कालानुरूप पुढे नेण्याचा वसा घेतलेल्या तुझ्यासारख्याचं आयुष्य म्हणजे एक अखंड दिंडी आहे. ',
टाळया...... टाळ्या ...... अखडं टाळ्या !
तू नुकत्याच काही प्रतिसादात केलेला कंपूबाजपणा मी आवर्जून पाह्यला. तुझी खुन्नस आणि नीचपणा त्यातून दिसतो. मिपासाठी तू अजूनही खूप काही करू शकतो असा मला विश्वास वाटतो.
क्या बात, क्या बात, जी नाईन बात !
पुण्यातल्या कट्ट्याला नको, जवळ पिंचीत कट्टा करु. वाटल्यास सोलापूर रोडला मध्येच इंदापूरला करु पण भेटूच.
या, या भावी संपादकशेठ, तुमचे पिंचिंवाडीत सहर्ष स्वागत ! आणि शेवटी

वटवट 01/11/2016 - 20:36
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार... अर्णब गोस्वामी सुद्धा मिपाचा संपादक होण्यासाठी उत्सुक आहे... उगाच नाही त्याने टाइम्स नाऊच्या संपादक पदाचा राजीनामा दिला..... तगडी स्पर्धा...
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

दिवाळी अंक २०१६

यशोधरा ·

यशोधरा 28/10/2016 - 22:01
पुण्यातील मिपाकर 'पुणे मराठी ग्रंथालय' इथे दिवाळी अंकांसाठी सभासदत्व घेऊ शकतात. साधनाचा दिवाळी अंक ऑनलाईन उपलब्ध आहे http://www.weeklysadhana.com/saptahik.php

In reply to by यशोधरा

आदूबाळच्या प्रतिभेला सलाम. दुसरे जुने मिपाकर, धनंजय यांची कथाही अत्यंत वाचनीय आहे. या लेखनाला किंवा सादरीकरणाला 'कथा' म्हणणं ही भाषेची मर्यादा आहे. धनंजयने पदोपदी दुभंगत, वाचकाच्या मनाप्रमाणे आकार घेणारी कथा लिहिलेली आहे. ती एक कथा नसून दर काही शब्दांनंतर फाटे फुटत शेकडो कथा बनतात. प्रत्येक कथा तीनचार वाक्यांचीच, पण एका प्रेमाच्या नात्याची वेगवेगळी विधिलिखितं सांगणारी. अशी कथा आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. म्हणून त्या माध्यमाचा पूर्ण वापर करून घेणारी ठरते. http://aisiakshare.com/node/5593

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 29/10/2016 - 15:26
डिजिटलचा अंक जबरद्स्त झालाय. कंटेंट रीच म्हणता येईल. उत्तम साहित्य, वैविध्य. वाचायला बसलो तर सोडवणार नाही इतक्या रसाळ भाषेत घेतेलेला आढावा. मस्त एकदम. ह्याची पीडीएफ करुन ठेवलीच पाहिजे संग्रही.

पाषाणभेद 29/10/2016 - 01:18
पाहण्यात असे आले आहे की, आजकाल म्हणजे गेल्या दहा एक किंबहूना कमी किंवा जास्त - वेळेची फुटपट्टी (की वर्षपट्टी ??) कमी जास्त होवू शकते - वर्षात ग्लोबलायझेशनमुळे जग संकूचीत झाले आहे. भारतातील - महाराष्ट्रातील अनेक जण/ जणी परदेशात जावून आले किंवा तेथे स्थायिक झालेले आहेत. अशा अस्थायी किंवा एनआरआय लोकांचे लेख फार मोठ्या प्रमाणात दीवाळी अंक, साप्ताहीक पुरवण्या, संकेतस्थळे आदींवर दिसत आहेत. हे लेख म्हणजे साधारणः परदेशवारी, तेथील एखादे ठिकाण, जाण्ययेण्यातील त्रास किंवा सुविधा, तेथील आधूनिक वातावरण, खाद्यपदार्थ, अनुवादीत किंवा रूपांतरीत कथा कादंबर्‍या, तिकडे कसे गोग्गोड आदींभोवती रेंगाळत राहते. किंबहूना माझे म्हणणे असे आहे की एखाद्या अंकात (तो कुठलाही असेल तरी) वरील प्रमाणांचे लेख जास्त प्रमाणात व साहित्य या अर्थाने कमी असे आहे. म्हणण्याचा विपर्यास नसावा. तसेच वरील म्हणणे मिपाच्या अंकास धरून नाही! आजकाल ( पुन्हा तेच वेळेचे प्रमाण घ्या) पुस्तकांचा खप वाढल्याचे एखाद्या एजन्सीच्या सर्वेक्षणात लक्षात आले आहे. ती पुस्तके कोणती तर स्पर्धापरीक्षा, स्वभाव-वर्तवणूक- यशस्वी कसे व्हावे आदी आदी. यात साहित्याशी संबंधीत कितीक पुस्तके होती? याच चालीवर वरील लेख असावेत/ किंवा वर्गवारी वाचावी असे मला वाटते. वरील वक्तव्याचा अर्थाअर्थानेही लेखीकेने लिहीलेल्या धाग्याशी संबंध नाही पण मला वाटले ते दीवाळी अंकांच्या संदर्भाने आले आहे.

In reply to by प्रचेतस

बोका-ए-आझम 29/10/2016 - 19:08
यंदा कथांचा दर्जा अजिबात राखला गेलेला नाहीये. रहस्यकथा, भयकथा, युद्धकथा, शिकारकथा - या तुलनेने उपेक्षित मानल्या गेलेल्या कथाप्रकाराला प्रतिष्ठा धनंजयने मिळवून दिली हे खरं आहे, पण पूर्वपुण्याईवर किती दिवस ते दर्ज्याशी तडजोड करत राहणार आहेत हा खरा प्रश्न आहे.

कंजूस 29/10/2016 - 06:25
प्रतिसादांशी सहमत.इंग्रजी माध्यमांच्या शालेय शिक्षणाने मराठी लेखन मुळातच यथातथा होत चालले आहे.पुलंच्या लिखाणाला कितीदा उकळी काढणार आहेत? त्या साठ-सत्तरच्या दशकांतले समाजजीवन नव्वदीतच बदलले. १ )इंटरनेटच्या प्रसाराने किंचिंत लेखकही त्यांचे लेखन लगेचच कुठेतरी लिहून टाकतात, दिवाळी अंकासाठी पाठवू म्हणून ठेवत नाहीत. २ )कलाकारांच्या मुलाखतीही टिव्हिवर अगोदरच उचितवेळी प्रसारित होऊन जातात. ३)पाककृतींत नवीन काही राहिले नसून नेहमीच्याच कृती कलाकार (= सिलेब्रिटी ) कशा बिघडवतात हे पाहाण्यास अधिक मजा येते. थोडक्यात जे काही थोडंफार चांगलं करमणूक करणारं साहित्य आहे त्यास अगोदरच गळती लागते.रोजच दिवाळी सुरू असते. *बरेचजण आता मोबाइलवरून प्रतिसाद लिहू लागले आहेत त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका संपादन बटण नसल्याने काढता येत नाहीत. ही सोय पुनश्च मिपाने सुरू करावी.

अनिंद्य 29/10/2016 - 09:16
डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/ धन्यवाद यशोधरा. तुम्ही लिंक दिल्याने अंक वाचला. आदिवासी संस्कृतीचा आणि भारतीय मुस्लिम खाद्यसंस्कृतीवरचा मोहसिनाजींचा लेख विशेष वाचनीय.

यशोधरा 29/10/2016 - 11:46
महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक आज हातात आलाय. मराठी ग्रंथालयाने १३४ अंक वाचनासाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. बालविभागात २२ अंक वाचनासाठी उपलब्ध आहेत. दुष्काळ आणि महराष्ट्राची जलसंपत्ती हा विभाग वाचनीय असेलसे वाटते आहे. श्रीकांत बोजेवार, हर्ष भोगले इत्यांदिचे लेखन दिसते आहे. वाचून झाला की आवडलेल्या लेखांविषयी लिहीन.

बोका-ए-आझम 29/10/2016 - 19:25
सुषमा स्वराज आणि हिलरी क्लिंटन यांचा परिचय, हर्ष भोगले यांचा आपल्या नसलेल्या क्रीडासंस्कृतीचं परखड विश्लेषण करणारा लेख, श्रीकांत बोजेवार यांचा बाॅलिवूडमध्ये २००० ते २०१५ या १५ वर्षांत आलेल्या बदलांवरचा लेख, मराठवाड्यावरचे विजय दिवाण आणि रवी कोरडे यांचे लेख - हे चांगले लेख. प्रकाश बाळ आणि आनंद पाटील यांचे अनुक्रमे युरोपमधील निर्वासित आणि शेक्सपिअरचा प्रभाव यांच्याबद्दल लेख आहे. त्यातला प्रकाश बाळांचा लेख अप्रतिम आहे. जागतिकीकरण आणि आर्थिक स्थलांतर आणि त्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारे बदल यांचा परस्परांशी असलेला संबंध त्यांनी छान उलगडून दाखवलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

यशोधरा 01/11/2016 - 21:58
हिलरीवरचा लेख ओके वाटला. लढा इथला संपत नाही - सुरेखा दळवी ह्यांनी जंगले आणि आदिवासी लोकांचे हक्क व समस्या ह्यावर लिहिलेला लेख सुरेख. सुषमा स्वराज ह्यांच्यावरचाही लेख चाम्गला आहे. एक सत्यकथा - सपनोंकी सरहद नहीं होती वाचून फार अस्वस्थ वाटते. बाकी अजून वाचतेय.

अजया 29/10/2016 - 20:26
वाचतेय.डिजिटल दिवाळीचे काही लेख छान तर काही बाळबोध वाटले.विशेषतः स्वतः सायली राजाध्यक्ष यांचा चहावरचा लेख.मिपाभाषेत जिलबी पाडली आहे! शुभांगी गोखले यांचे सुरेख अभिवाचन अचानक त्रोटकपणे संपले आहे. लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!

In reply to by अजया

यशोधरा 29/10/2016 - 20:29
लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!
अग्गागा! म्हणजे आता तुला त्यातील काही आवडले नाही तर माझे दात उपटशील तर! =))

अजया 29/10/2016 - 20:30
हो मग! पुण्याला फेरी आहेच पुस्तकं आणि अंक घेण्यासाठी.लगेहाथ ..

अजया 29/10/2016 - 21:22
नाक मुरडण्याचे सर्वाधिकार राखून ठेवले आहेत. काय ते मेलं पुणं.फ्लॅट शोध मोहिमेतच प्रदुषणाने घसा धरला ,डोळे लाल झाले =))) फार अवांतर झाले गो ;)

In reply to by विंजिनेर

यशोधरा 21/11/2016 - 21:21
किस्त्रिममधले श्यामसुंदर मुळे, ह मो मराठे, मकरंद करंदीकर, डॉ. माणिक खेर ह्यांचे लेख मला आवडले. बराचसा अंक वाचायचा बाकी राहिला. पुन्हा आणेन. ही किस्त्रिम दिवाळी अंक २०१६ ची अनुक्रमणिका.

In reply to by आदूबाळ

पुंबा 26/11/2016 - 19:59
ओहो! बालराजांचं देखील काव्यसृष्टीत आगमन? हे म्हणजे मराठी सारस्वताच्या अंगणात पडलेलं शरदाचं सुंदर चांदणं! आता प्रवीणसुत(?) आणि दस्तुरखुद्द संमेलनाध्यक्ष प्रवीण मिळून मराठी भाषेला सुंदर सुंदर कवितांची फुलं अर्पण करतील. मित्रांनो, आपलं आयुष्य सुद्धा असंच असतं कि नाही, म्हणजे बघा नाती बहरतात ती मनाच्या हिरव्यागार......... :P :P

कंजूस 30/10/2016 - 05:54
दिवाळी अंक वाचायला वेळ लागतो तो दिवाळीत मिळत नाही. थोडं थांबा आणि महिन्याने धागा येईल वरती. एक विशेष गोष्ट म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक दोन वर्ष निघाला नाही हे फार विचित्र वाटतं.

मदनबाण 30/10/2016 - 08:50
अजुन वेगवेगळ्या लिंक्स इथे पोस्ट करता आल्या तर उत्तम होइल....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

यशोधरा 30/10/2016 - 09:59
सकाळचा दिवाळी अंक आला आहे आज. साप्ताहिक सकाळ नव्हे. काहीच खास नाही. काही पाने सेलेब्रिटींनी आपापल्या जोडेदाराला प्रपोझ कसे केले, काही पाने सामान्य वाचकांनी एकमेकांना प्रपोझ कसे केले आणि उरलेली पाने नांदेड सिटी व अन्य बांधकामे पुण्याच्या सौंदर्यात (?!) कशी भर घालती झाली आहेत त्यावर. काही ३-४ पाने प्रेमकविता आहेत म्हणे. अजून वाचल्या नाहीत. अंक नाही वाचला तरी चालेल.

In reply to by यशोधरा

आदूबाळ 30/10/2016 - 12:48
अगाई! (डोले झाकून अश्रू ढाळणारी स्मायली) एकेकाळी रविवार सकाळ दिवाळी अंकात इतर भारतीय भाषांतल्या कथांचे अनुवाद असत. भीष्म सहानी, मंटो, जयकांतन वगैरे नावं त्यातूनच समजली. ये कहां आ गये हम!

मित्रहो 30/10/2016 - 14:06
आता यायला लागलेत, काही दिवाळी अंक मागच्या आठवड्यात प्रकाशित झाले. ते बुकगंगा कडे यायला आणखीन काही दिवस लागले. तेंव्हा आता दिवाळी झाल्यावरच बोलावू. वरील चर्चेवरुन लोकसत्ता आणि डिजीटल दिवाळी अंक चांगला दिसतोय. अक्षर, अंतर्नाद, इत्यादी, कथाश्री कुणी वाचलेय का? कसे आहेत? सध्यातरी लोकसत्ता आणि आवाज (आवाज हा हवाच) बोलवनार. युनिक फीचर्सने माझी कथा त्यांच्या दिवाळी अंकात प्रकाशित केल्याने युनिक फीचर्सचे चारही दिवाळी अंक आणि प्रकाश आमटे चे प्रकाशवाटा हे पुस्तक बुकगंगावरुन बोलावलेय. अजून पोहचायचे आहेत.

नाखु 31/10/2016 - 11:59
कालनिर्णय दिवाळी अम्क वाचत आहे, ग्रॅहम बेलने केलेली संशोधन श्रेय घेण्यासाठी केलेली लबाडी यावर एक चांगला लेख आहे , बाकी अम्क अजूनतरी वाचला नाही. घरच्या अंकातले उरलले प्रवेश साकारत आहे (लेकीला शाळेला सुट्टी आहे,आणि मी हाफीसात आहे)

वरुण मोहिते 01/11/2016 - 18:13
उत्तम अनुवाद , युनिक फीचर्स चा महा अनुभव आणि लोकमत दीपोत्सव छान आहेत. विशेष करून लोकमत दीपोत्सव. बाकी लोकसत्ता ,मटा, नेहमीप्रमाणे दर्जा राखून आहेत. पुरुष स्पंदन चांगला झालाय. ऋतुरंगही ठीक. बाकी वाचून कळवतो. चांगले 20-25 अंक आणले आहेत हळू हळू भर टाकतो

अभ्या.. 01/11/2016 - 22:01
हे पेपरवाले जशी ऑनलाईन आवृत्ती काढतात रोजच्या अंकाची तशी दिवाळी अंकाची काढत नाहीत का? असल्यास लिंका देणे ज्याने वाचल्यात त्याने. कृपा होईल.

In reply to by अभ्या..

भावा, आमचाबी हाय ई-अंक. फुरसतीत वाचण्यासारखा. http://www.evivek.com/DiwaliAnk2016. (ई-अंकात रूपांतर (कन्व्हर्जन) करताना काही त्रुटी (उदा. 'द्ध'ऐवजी 'ध्द') राहून जातात, त्या चालवून घ्या.) या अंकातली माझी शिफारस - आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी 'मेक इन इंडिया' - प्रा.डॉ. ज्येष्ठराज जोशी आणि प्रा.डॉ. मिलिंद सोहोनी यांची मुलाखत माझी आनंदयात्रा - शशिकांत सावंत (खास वाचनवेड्यांसाठी) मुक्त-विमुक्त बंदिश - रेणू दांडेकर - शांतीनिकेतनवरचा लेख गगनविहार - डॉ. बाळ फोंडके - इस्रोची वाटचाल भेटवा विठ्ठलाला - विद्याधर ताठे - पंढरपूर विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी (सर्वांसाठी) खुलं व्हावं, यासाठी साने गुरुजींनी दिलेल्या लढ्यावर प्रदीर्घ लेख अशोकायण - अरुणचंद्र पाठक - सम्राट अशोकावर लेख. विज्ञानवादी भविष्यवेत्ता - रमेश पतंगे - ऑलविन टॉफलरवर लेख. तसा छापील अंकही आहे... ४८० पानांचा, जाडजूड.

In reply to by यशोधरा

ई-अंक म्हणजे छापील अंकाची पीडीएफ नाही. त्यामुळे ई-अंकात जाहिराती, रेखाचित्रं नाहीत. तसंच, कविता अजून अपलोड केलेल्या नाहीत. फक्त महत्त्वाचे लेख, कथा, मुलाखत, परिसंवाद इ. अपलोड केले आहेत. त्यातलेच काही 'माझी शिफारस' म्हणून वर दिले आहेत.

नाखु 02/11/2016 - 09:00
न्या.चपळगांवकर यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय साम्जीक योगदान्,तत्कालीन घटनांवर परिणाम करणारे निर्णय्,आणि स्वभावाचे,तत्वांचे पैलु उलगडून दाखविणारा लेख आहे.अर्थात वाचनीय आणि दखलपात्र आहे.मला आवडलेला भाग. "१९४८ मध्ये भाषण करताना सरदार म्हणतात या देशात आपला देश म्हणून राहिलेल्या मुस्लीमांनी फक्त हा देश आमचा आहे असे म्हणून चालणार नाही तर तसे सिद्ध करावे लागेल्,जेंव्हा पाकिस्तानने काश्मीरात हिंदुवर हल्ला करून हत्याकांड केला त्याचा जोरदार निषेध का केला नाही. एकदा इ़कडे राहिल्यावर निष्ठा इकडेच पाहिजेत.दोन घोड्यांवर स्वार होऊन चालणार नाही आणि त्याला भविष्यही नाही" जमल्यास किमान या उतार्याचीतरी पीडीएफ टाक्ण्याचा प्रयत्न करतो अर्थात त्यांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही चांगले खडे बोल सुनावले आहेत. दिवाळी अंक वाचक नाखु

ऋषिकेश 02/11/2016 - 09:19
रेषेवरची अक्षरेचा अंक गेली काही वर्षे निघतो आहे तो दिसला नाही. मात्र यंदा दिवाळी अंकांची परिक्षणं करणार आहेत असं दिसतंय ल्क्ष ठेवायला हवं इथे

यशोधरा 02/11/2016 - 11:14
मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, खास काही नाही. bridges of madison county चा अनुवाद मेहता तर्फे प्रकाशित होतोय, त्याचा काही भाग ह्या अंकात आहे. अनुवाद फारसा पकड घेत नाहीये.. नाही आवडला इतका. बाकी अंक ठीकच. दिप्ती नवलने लिहिलेल्या द मॅड तिबेटीयन ह्या पुस्तकाच्या काही भागाचा अनुवाद बरा आहे. मूळ पुस्तक वाचावयास हवे असे वाटले. कविताही आहेत पण अजून वाचल्या नाहीत. तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... असे वाचले, मग नंतरच वाचू असे ठरवलेय.

In reply to by यशोधरा

प्रदीप 05/11/2016 - 10:54
तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... अकु आता दिवाळी अंकांतूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध करायला लागले? चांगली प्रगति आहे!!

उपलब्ध इअंकांमध्ये - साधनाच्या अंकातली मराठा आंदोलनावरची डॉ. कसबेंची मुलाखत चांगली आहे. विनय हर्डीकरांचा शरद जोशींवरचा लेख पसरट आहे, पण काही मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. साधनाच्या युवा अंकातल्या मोनिका लेविन्स्कीच्या भाषणाचा अनुवाद उत्तम. मूळ भाषण - https://www.ted.com/talks/monica_lewinsky_the_price_of_shame?language=en 'मौज' मधला नरेंद्र चपळगावकरांचा नेहरू आणि पटेलांवरचा लेख माहितीपूर्ण आणि संतुलित वाटला.

In reply to by यशोधरा

सस्नेह 05/11/2016 - 15:29
'मौज' मधला रवींद्र अभ्यंकरांचा गोनिदांवरचा लेख सुरेख आहे. नरेंद्र चपळगावकर पास. विनया जंगले यांचा फुलपाखरे विषयावरच लेख सुरेख माहितीपूर्ण. इतर नामावली चांगलीच आहे. आशा बगे, अनिल अवचट, इरावती कर्णिक, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, गोविंद तळवलकर. यशवंत मनोहर, लक्ष्मिकांत तांबोळी... उफ्फ.. टंकाळा आला. लेख छान आहेत, पण अंकाची मांडणी विस्कळीत वाटली. तरीही वाचनीय.

In reply to by सस्नेह

ते संजोपराव उर्फ़ जालावरचे रावसाहेब जे लेखक आहे त्यांना मौज या दिवाळी अंकाचं विनाकारण कौतुक करायची सवय आहे, आपली अभिरूची कशी उच्च आहे, वगैरे तो प्रकार असतो. त्यांचं लेखन वाचून अंक खरेदी करू नका. आपली आवड़ पाहुन दिवाळी अंक खरेदी करावा असे सुचवीन. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by विशाखा पाटील

यशोधरा 05/11/2016 - 18:00
मनापासून आभार! डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या भाषणांचे संपादित अंश मिळाले तेथे. ह्या लिंका मी ज्ञानब्रह्मापुढे आहुतीच्या तयारीनं उभा …तर ती जगण्याशी प्रतारणा ठरेल! मी महासमन्वयाचा लहानसा दुवा

यशोधरा 05/11/2016 - 16:23
आपल्या स्वातीताईचा लेख काही संस्करण करून माझी सहेली ह्या दिवाळी अंकात आला आहे. खाली मूळ लेखाची लिंक दिली आहे, अभिनंदन स्वातीताई! http://www.misalpav.com/node/30637

नाखु 07/11/2016 - 14:23
मेनका अंक वाचत आहे. गुरुनाथ तेंडुलकर कथा ठीक ठाक्,रुस्तुम सिनेमा ज्या घटनएवर आहे त्याचा लेखा जोखा करणारा तपशीलासह लेख आला आहे आणि वाचनीय आहे. दुसरी देशमुख यांची कथा ठीक पण अजून काही वाचावा असा वाटला नाही.कदाचित एखादा विनोदी अंक वाचण्याचा इरादा आहे.

मित्रहो 07/11/2016 - 20:02
डिजीटल दिवाळी बघितला - मला वाटत हेच बरोबर आहे. प्रकाशित लेखांचे (अभि?)वाचन ह्या स्वरुपाचा दिवाळी अंक आहे. ह्रुषिकेश जोशीेचे मद्यपानवरील विवेचन आवडले. इतर ठिक ठाक आहे. अक्षरनामा फक्त इरावती कर्णिक यांचे मनोगत वाचले आणि आवडले. इतर वाचतोय सवडीने. लोकसत्ता अनवट भटकंती आवडली. या देशात कधी जाणे होइल असे मात्र वाटत नाही. सुदानवरील लेख हा भटकंती पेक्षा लेखकाला त्याच्या कामाच्या निमित्ताने आलेला काही व्यक्तींचा अनुभव आहे. शैलेंद्रवरील तिसरी कसमचा लेख जुनीच माहीती देत असला तरी फिल्मी पद्धतीने लिहिल्याने वाचायला मजा येते. म्हणजे बोलता तो मधेच उठून गेला किंवा त्याने सिगरेट शिलगावली सारखी वर्णने. नेताजींच्या मृत्युविषयीचा लेख तोचतोच आहे. मुळात या विषयात नेहमी तेचतेच मुद्दे येत राहतात. ज्यांचा नेताजींचा मृत्यु अपघातात झाला यावर विश्वास नाही ते कधीच विश्वास ठेवनार नाही हेच हा लेख सांगतो. पुतीन वरील लेख वाचायला सुरवात केली आणि सोडून दिला. कंटाळा आला. लोकमत मित्राकडे चाळला, वाचला नाही. फार जास्त बुद्धीजीवी किंवा माहीतीपर वाचायचा कंटाळा आला आता. बुद्धीच्या खाद्याची सीमा संपलीय. आता फारकाही पचवू शकनार नाही तरीही अनुभव अजून वाचायचा आहे. साधना किंवा अंतर्नाद बोलावून ठेवून नंतर कधीतरी सहा महिन्यानी वाचू असा विचार सुरु आहे. 'आवाज' अजून घरी पोहचला नाही. 'कॉमेडी कट्टा'मधे पुलंच्या गाठोड या पुस्तकातला 'रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त' हा लेख प्रचंड विनोदी आहे. हे पुस्तक मी या आधी वाचले नव्हते त्यामुळे लेख पण वाचला नव्हता. 'व्हाट्सअप दिनचर्या' फार्सिकल आहे काही पंचेस मस्त आहे. वाचन सुरुच आहे.

In reply to by मित्रहो

मित्रहो 21/11/2016 - 12:50
दोन दिवस आजारी होतो तेंव्हा पडून पडून काय करायचे म्हणून अंतर्नाद सोडला तर होते ते सारे वाचून काढले. डिजीटल दिवाळी अभिवाचनाव्यतिरीक्त इतरही लेख त्यात आहेत. वर म्हटल्याप्रमाणे खादाडीला वाहीलेला अंक. मालिकेतले स्वयंपाक घर हे शुभांगी गोखले यांचे अभिवाचन मस्त आहे. लिहिलेही छान आहे आणि संयत अभिनयासहीत अभिवाचन आहे. मस्त आहे. इतरही काही लेख किंवा अभिवाचन चांगले आहेत. महेश एलकुंचलवारांची मुलाखत सहजच वैदर्भिय खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देते. अनुभव कथा विभाग यथा तथाच आहे. मला एकही कथा फारशी आवडली नाही. अरुणाचलच विषयीचा अनुभव चांगला आहे. नेहमीचे प्रवास वर्णन नाही किंवा शाळेत न येनारे विद्यार्थी नाहीत. १२ तास ब्रम्हपुत्रेचा प्रवास, किंवा ऑपरेशनचा अनुभव मस्त आहे. साधना शिलेदार यांचा कुमार गंधर्व आणि देवास वरचा लेख सुरवातीला नेहमीसारखा आहे म्हणजे हीच ती वास्तू जिथे कुमार गंधर्वानी गायन शिकले किंवा म्हटले. इत्यादी. नंतर लोकसंगीताच्या शोधार्थ आसपासच्या गावागावात केलेली भटकंती मस्त आहे. कदाचित हा एका वेगळ्या लेखाचा विषय होउ शकेल. अनिल अवचट यांचा स्टॉइनबर्ग वरील लेख मस्त आहे. एक व्यंगचित्रकार त्याने काढलेल्या रेषांपेक्षा न काढलेल्या रेषातून जे सांगतो ते अप्रतिम. मस्त आहे. त्याचे चित्र मस्त समजावून सांगितले आहेत.मुकुंद टाकसाळे यांची मेलामेली पण मस्त आहे. अमेरीका किंवा इतर लेख ठिकठाक आहे. मुशाफिरी मधला ट्रेक केल्यानंतर खायच्या चांगल्या किंवा वाइट जागा यावर लेख आहे. नवीन माहीती आहे. आवाज हल्ली विनोदी कथा त्याच त्याच प्रकारात मोडनाऱ्या असतात. गावातला इरसाल पाटील आणि त्याचे एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स, प्रेमकथा आणि ट्रिक्स, काही इरसाल पोर. आवाजचा हा अंकही त्याला अपवाद नाही. मंगला गोडबोलेंची कथा किंवा लेख वेगळा आहे. २०५० साली मराठी संस्कृतीचे मुझियम वगेरे असली कल्पना आहे. इतर कथा नेहमीच्या लेखकांनी नेहमीच्या पद्धतिने लिहिलेल्या आहेत.त्यातल्या त्यात मिलिंद शिंत्रे यांची कथा चटकदार संवादामुळे मजेशीर आहे. चित्रे वगेरे आवाज सारखीच. लोकप्रभामधे कथा स्पर्धेतल्या कथांव्यतिरीक्त फार काही वाचले नाही. लहान मुलांचे म्हणून असनारे अंक wimpy kid किंवा geronimo stilton वाचनाऱ्या हल्लीच्या मुलांना वाचावयावसे वाटत नाही. आता अंतर्नाद सहा महिन्यांनंतर, डोक्याला थोडी विश्रांती हवी. तेंव्हा दिवाळी अंक वाचन जवळ जवळ संपले.

In reply to by मित्रहो

नाखु 21/11/2016 - 14:43
सहमत. अगदी गंडलेला आणि खिडकीचित्रे विनोदी कमी ओंगळ जास्ती आहेत कथा भागात आनंदी आनंद आहे. कथाश्री वाचला काही कथा छान आहेत आणि चक्क सकारात्मक आहेत त्या मुळे आवडल्या "दवणे"वगळता बहुतांश वाचल्या (आणि पश्चाताप झाला नाही)

सस्नेह 21/11/2016 - 12:54
'माहेर' वाचला. केवळ अनुल्लेखनीय ! मांडणी विस्कळित. जाहिराती मायंदाळ ! दर्जा घसरलाय. २-३ कथा/लेख चांगले आहेत. बाकी ठीक.

यशोधरा 21/11/2016 - 21:28
आज मौज दिवाळी अंक आणला आहे. कथा, कविता ह्यासोबत रेखाटने, ललित लेख आणि वैचारीक साहित्य असे बरेच काही आहे असे दिसतेय. मिलिंद बोकीलांची सरोवर ही लघुकादंबरी.

In reply to by यशोधरा

यशोधरा 27/11/2016 - 15:25
मौज वाचते आहे आणि आवडतो आहे. कथांमध्ये - आशा बगे आणि शर्मिला फडके ह्यांच्या कथा वाचून झाल्या आहेत आणि आवडल्यात. बाकीच्या २-३ अजून वाचायच्या आहेत. कविता विभागामध्ये - चिमण्या (सतीश काळसेकर), सुंदर (वि ज बोरकर), अर्पण (वसंत वाहोकार), स्वातंत्र्य (नीलिमा गुंडी) ह्या मला आवडलेल्या. बाकीच्याही चांगल्या आहेत. ललित लेख - सगळेच वाचनीय. कथा फुलपाखरांची हा विनया जंगले ह्यांचा फुलपाखरांच्या जगाविषयीचा लेख अत्यंत सुरेख जमलाय, पुन्हा पुन्हा वाचावा असा. डॉ अरूण टिकेकरांवरचा - विवेक पेरणारे गुरु हाही एक जमलेला लेख. एक उत्तम, साक्षेपी संपादक आपल्या सहकार्‍यांनाही किती अनुभवसंपन्न आणि शहाणे करुन सोडतो हे सांगणारा संयत भाषेतला लेख. रवींद्र अभ्यंकरांचा अप्पांच्या आठवणी, अवचटांचा साधना आणि शांता शेळक्यांच्या घरा आणि घरातल्यांविषयींचे लेखही आवडले. बर्‍याच काळानंतर अवचटांचे काहीही उपदेशपर नसलेले लेखन वाचायला आवडले. उर्वरित अंक संपल्यावर...

प्रदीप 26/11/2016 - 19:47
निवृत्त न्यायधिश नरेन्द्र चपळगांवकर ह्यांचा राजाजींच्या राजकीय जीवनावर लिहीलेला विस्तृत व माहितीपूर्ण लेख, तसेच भानू काळेंच्या आगामी "अंगारवाटा: शोध शरद जोशींचा" ह्य चरित्रात्मक पुस्तकातील,जोशींच्या पंजाब-स्वारीबद्दलचा प्रदीर्घ लेख अंतर्नादचे वैशिष्ट्य ठरावे. ह्याचबरोबर, विनय हर्डीकरांचा गोविंदराव तळवलकरांवरील लेखही वाचनीय आहे. अंजलि कीर्तने त्यांच्या आनंबईबाई जोशींवर काढलेल्या लघुपटाबद्दल माहिती देत आहेत; दीपक करंजीकरांच्या आयुष्यातली अचानक आलेली वळणे त्यांनी कथिली आहेत. जे. के. रोलीगवर विवेक गोविलकरांचा लेख आहे. विजय पाडळकरांनी हायकूबद्दल स्फूटलेख लिहीला आहे. अवधूत परळरांनी,, सुहास बहुलकरांच्या चित्र-शिलप कलेसंदर्भतील तीन पुस्तके लिहीली आहेत, त्यांजविषयी थोडक्यात पण अचूक माहिती देणारा चांगला लेख लिहीला आहे. ह्यातील दोन पुस्तके, चित्रकार देऊसकर, व शिल्पकार करमकरांच्या कलाप्रगतीचा आढावा घेणारी आहेत, त्यात सदर कलाकारांच्या त्यांच्या कलेशी निगडीत आयुष्याचा धांडोळा घेतला आहे, हे परळकरांनी मुद्दाम नजरेत आणून दिले आहे. तिसरे पुस्तक जे. जे. स्कूलच्या भोवती केंद्रीत झालेल्या 'स्कूल ऑफ आर्ट'विषयीचे आहे. त्यात बहुलकरांनी ह्या स्कूलने कुठल्या वाटा चोखाळल्या, त्याबद्द्दल टिपण्णी केली आहे. शैलेश माळोदे ह्यांचा भारतात गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या, मग इथेच स्थायिक होऊन कार्यरत असलेल्या आफ्रिकन लोकांविषयी लिहीलेला लेख अनोखी माहिती देतो. गिरीश कुबेरांच्या पुतीनकालीन रशियावरील आगामी पुस्तकातील एक मोठा उतारा लोकसत्तेचे वैशिष्ट्य आहे. विजय पाडळकरांनी शैलेंद्रच्या 'तीसरी कसम' च्या निर्मीतीची हकिकत सांगणारा लेख आहे, ज्यात शैलेंद्र ह्य निर्मीतीच्या उद्योगात कसा भरडून निघाला, व त्यातच त्याचा शेवटी दुर्दैवी अंत कसा झाला, त्याविषयी सविस्तर माहिती आहे. जुने व जाणते रंगकर्मी माधव वझे ह्यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर लिहीलेला लेख व ताज्या दमाचे रंगकर्मी अतुल पेठे ह्यांचा कलाकारांच्या सर्जनक्रियेची उहापोह करणारा लेख, दोन्ही अनोख्या विषयांवरील आहेत. सत्यशील देशपांडेंनी 'ख्याल गायकी'वरील चिंतनाविषयी लिहीले आहे. ह्याव्यतिरीक्त ह्या अंकात तीन विषयांवरील लेखांचे संकलन आहे. पहिला विषय, अनोख्या देशांत सफर करून आलेल्यांनी तेथील अनुभव व त्यांची तेथील जीवनवैशिष्ट्यांबद्दलची टिपणे. ह्यांतील अफगानिस्तान, सुदान, कंबोडिया व उझबेकिस्तानवरील लेख उल्लेखनीय वाटले. दुसरा विषय राजकीय आहे: वेगवेगळ्या देशांत नवे राजकीय प्रवाह आणणार्‍या पुढार्‍याविषयी ह्या लेखांत आढावा घेतला गेला आहे. तिसरा विषय आहे, पाशिमात्य देशांतील कॉर्पोरेट जगतांतील कार्यसंकृती. ह्यांत गूगल, मेड-एल इलेक्ट्रॉनिक्स व कमिन्स येथे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या तरूण मराठी व्यक्तिंची कथने आहेत.

यशोधरा 30/11/2016 - 19:23
सामनामधील उल्लेखनीय लेख - संजय नहार ह्यांचा 'तोपर्यंत कश्मीर असेच जळत राहील' हा लेख. वीरांच्या गावा जावे हा मिलिटरी अपशिंगे ह्या सातार्‍यापासून १७ किमी अंतरावर असलेल्या गावावरचा लेख. गॉडमदर हा शिरिष कणेकरांचा लतावरील लेख. कथा - कंसातील वाक्यं - मंगला गोडबोले आणि ललाटीचे लेख(क) - अजय पुरंदरे. मिपाकर प्रसन्न केसकरांचा सेल्फीचा धूमधडाका हा लेखही आहे ह्या अंकात.

लोकमान्य सेवासंघ विलेपार्ले, मुंबई वाचनालयात दर वर्षीप्रमाणे यंदाही १५० रुपयात १५० दिवाळी अंक ही योजना चालू आहे. २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत अंक घरी नेता येतील (नाव नोंदणी अजूनही शक्य आहे). कालच मी जीवन ज्योत हा अंक आणला. डॉक्टर विद्याधर ओक यांचा '२२ श्रुती संशोधन' हा लेख अत्यंत माहितीपूर्ण वाटला या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. दुसरा चांगला लेख म्हणजे मुकुंद सराफ यांचा 'वाटचाल भावगीतांची १९२६-२०१६.'

यशोधरा 28/10/2016 - 22:01
पुण्यातील मिपाकर 'पुणे मराठी ग्रंथालय' इथे दिवाळी अंकांसाठी सभासदत्व घेऊ शकतात. साधनाचा दिवाळी अंक ऑनलाईन उपलब्ध आहे http://www.weeklysadhana.com/saptahik.php

In reply to by यशोधरा

आदूबाळच्या प्रतिभेला सलाम. दुसरे जुने मिपाकर, धनंजय यांची कथाही अत्यंत वाचनीय आहे. या लेखनाला किंवा सादरीकरणाला 'कथा' म्हणणं ही भाषेची मर्यादा आहे. धनंजयने पदोपदी दुभंगत, वाचकाच्या मनाप्रमाणे आकार घेणारी कथा लिहिलेली आहे. ती एक कथा नसून दर काही शब्दांनंतर फाटे फुटत शेकडो कथा बनतात. प्रत्येक कथा तीनचार वाक्यांचीच, पण एका प्रेमाच्या नात्याची वेगवेगळी विधिलिखितं सांगणारी. अशी कथा आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. म्हणून त्या माध्यमाचा पूर्ण वापर करून घेणारी ठरते. http://aisiakshare.com/node/5593

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 29/10/2016 - 15:26
डिजिटलचा अंक जबरद्स्त झालाय. कंटेंट रीच म्हणता येईल. उत्तम साहित्य, वैविध्य. वाचायला बसलो तर सोडवणार नाही इतक्या रसाळ भाषेत घेतेलेला आढावा. मस्त एकदम. ह्याची पीडीएफ करुन ठेवलीच पाहिजे संग्रही.

पाषाणभेद 29/10/2016 - 01:18
पाहण्यात असे आले आहे की, आजकाल म्हणजे गेल्या दहा एक किंबहूना कमी किंवा जास्त - वेळेची फुटपट्टी (की वर्षपट्टी ??) कमी जास्त होवू शकते - वर्षात ग्लोबलायझेशनमुळे जग संकूचीत झाले आहे. भारतातील - महाराष्ट्रातील अनेक जण/ जणी परदेशात जावून आले किंवा तेथे स्थायिक झालेले आहेत. अशा अस्थायी किंवा एनआरआय लोकांचे लेख फार मोठ्या प्रमाणात दीवाळी अंक, साप्ताहीक पुरवण्या, संकेतस्थळे आदींवर दिसत आहेत. हे लेख म्हणजे साधारणः परदेशवारी, तेथील एखादे ठिकाण, जाण्ययेण्यातील त्रास किंवा सुविधा, तेथील आधूनिक वातावरण, खाद्यपदार्थ, अनुवादीत किंवा रूपांतरीत कथा कादंबर्‍या, तिकडे कसे गोग्गोड आदींभोवती रेंगाळत राहते. किंबहूना माझे म्हणणे असे आहे की एखाद्या अंकात (तो कुठलाही असेल तरी) वरील प्रमाणांचे लेख जास्त प्रमाणात व साहित्य या अर्थाने कमी असे आहे. म्हणण्याचा विपर्यास नसावा. तसेच वरील म्हणणे मिपाच्या अंकास धरून नाही! आजकाल ( पुन्हा तेच वेळेचे प्रमाण घ्या) पुस्तकांचा खप वाढल्याचे एखाद्या एजन्सीच्या सर्वेक्षणात लक्षात आले आहे. ती पुस्तके कोणती तर स्पर्धापरीक्षा, स्वभाव-वर्तवणूक- यशस्वी कसे व्हावे आदी आदी. यात साहित्याशी संबंधीत कितीक पुस्तके होती? याच चालीवर वरील लेख असावेत/ किंवा वर्गवारी वाचावी असे मला वाटते. वरील वक्तव्याचा अर्थाअर्थानेही लेखीकेने लिहीलेल्या धाग्याशी संबंध नाही पण मला वाटले ते दीवाळी अंकांच्या संदर्भाने आले आहे.

In reply to by प्रचेतस

बोका-ए-आझम 29/10/2016 - 19:08
यंदा कथांचा दर्जा अजिबात राखला गेलेला नाहीये. रहस्यकथा, भयकथा, युद्धकथा, शिकारकथा - या तुलनेने उपेक्षित मानल्या गेलेल्या कथाप्रकाराला प्रतिष्ठा धनंजयने मिळवून दिली हे खरं आहे, पण पूर्वपुण्याईवर किती दिवस ते दर्ज्याशी तडजोड करत राहणार आहेत हा खरा प्रश्न आहे.

कंजूस 29/10/2016 - 06:25
प्रतिसादांशी सहमत.इंग्रजी माध्यमांच्या शालेय शिक्षणाने मराठी लेखन मुळातच यथातथा होत चालले आहे.पुलंच्या लिखाणाला कितीदा उकळी काढणार आहेत? त्या साठ-सत्तरच्या दशकांतले समाजजीवन नव्वदीतच बदलले. १ )इंटरनेटच्या प्रसाराने किंचिंत लेखकही त्यांचे लेखन लगेचच कुठेतरी लिहून टाकतात, दिवाळी अंकासाठी पाठवू म्हणून ठेवत नाहीत. २ )कलाकारांच्या मुलाखतीही टिव्हिवर अगोदरच उचितवेळी प्रसारित होऊन जातात. ३)पाककृतींत नवीन काही राहिले नसून नेहमीच्याच कृती कलाकार (= सिलेब्रिटी ) कशा बिघडवतात हे पाहाण्यास अधिक मजा येते. थोडक्यात जे काही थोडंफार चांगलं करमणूक करणारं साहित्य आहे त्यास अगोदरच गळती लागते.रोजच दिवाळी सुरू असते. *बरेचजण आता मोबाइलवरून प्रतिसाद लिहू लागले आहेत त्यामध्ये शुद्धलेखनाच्या चुका संपादन बटण नसल्याने काढता येत नाहीत. ही सोय पुनश्च मिपाने सुरू करावी.

अनिंद्य 29/10/2016 - 09:16
डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/ धन्यवाद यशोधरा. तुम्ही लिंक दिल्याने अंक वाचला. आदिवासी संस्कृतीचा आणि भारतीय मुस्लिम खाद्यसंस्कृतीवरचा मोहसिनाजींचा लेख विशेष वाचनीय.

यशोधरा 29/10/2016 - 11:46
महाराष्ट्र टाईम्सचा दिवाळी अंक आज हातात आलाय. मराठी ग्रंथालयाने १३४ अंक वाचनासाठी उपलब्ध करुन दिलेले आहेत. बालविभागात २२ अंक वाचनासाठी उपलब्ध आहेत. दुष्काळ आणि महराष्ट्राची जलसंपत्ती हा विभाग वाचनीय असेलसे वाटते आहे. श्रीकांत बोजेवार, हर्ष भोगले इत्यांदिचे लेखन दिसते आहे. वाचून झाला की आवडलेल्या लेखांविषयी लिहीन.

बोका-ए-आझम 29/10/2016 - 19:25
सुषमा स्वराज आणि हिलरी क्लिंटन यांचा परिचय, हर्ष भोगले यांचा आपल्या नसलेल्या क्रीडासंस्कृतीचं परखड विश्लेषण करणारा लेख, श्रीकांत बोजेवार यांचा बाॅलिवूडमध्ये २००० ते २०१५ या १५ वर्षांत आलेल्या बदलांवरचा लेख, मराठवाड्यावरचे विजय दिवाण आणि रवी कोरडे यांचे लेख - हे चांगले लेख. प्रकाश बाळ आणि आनंद पाटील यांचे अनुक्रमे युरोपमधील निर्वासित आणि शेक्सपिअरचा प्रभाव यांच्याबद्दल लेख आहे. त्यातला प्रकाश बाळांचा लेख अप्रतिम आहे. जागतिकीकरण आणि आर्थिक स्थलांतर आणि त्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारे बदल यांचा परस्परांशी असलेला संबंध त्यांनी छान उलगडून दाखवलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

यशोधरा 01/11/2016 - 21:58
हिलरीवरचा लेख ओके वाटला. लढा इथला संपत नाही - सुरेखा दळवी ह्यांनी जंगले आणि आदिवासी लोकांचे हक्क व समस्या ह्यावर लिहिलेला लेख सुरेख. सुषमा स्वराज ह्यांच्यावरचाही लेख चाम्गला आहे. एक सत्यकथा - सपनोंकी सरहद नहीं होती वाचून फार अस्वस्थ वाटते. बाकी अजून वाचतेय.

अजया 29/10/2016 - 20:26
वाचतेय.डिजिटल दिवाळीचे काही लेख छान तर काही बाळबोध वाटले.विशेषतः स्वतः सायली राजाध्यक्ष यांचा चहावरचा लेख.मिपाभाषेत जिलबी पाडली आहे! शुभांगी गोखले यांचे सुरेख अभिवाचन अचानक त्रोटकपणे संपले आहे. लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!

In reply to by अजया

यशोधरा 29/10/2016 - 20:29
लोकसत्ताचा अंक यशोचे वाचून मागवला आहे!
अग्गागा! म्हणजे आता तुला त्यातील काही आवडले नाही तर माझे दात उपटशील तर! =))

अजया 29/10/2016 - 20:30
हो मग! पुण्याला फेरी आहेच पुस्तकं आणि अंक घेण्यासाठी.लगेहाथ ..

अजया 29/10/2016 - 21:22
नाक मुरडण्याचे सर्वाधिकार राखून ठेवले आहेत. काय ते मेलं पुणं.फ्लॅट शोध मोहिमेतच प्रदुषणाने घसा धरला ,डोळे लाल झाले =))) फार अवांतर झाले गो ;)

In reply to by विंजिनेर

यशोधरा 21/11/2016 - 21:21
किस्त्रिममधले श्यामसुंदर मुळे, ह मो मराठे, मकरंद करंदीकर, डॉ. माणिक खेर ह्यांचे लेख मला आवडले. बराचसा अंक वाचायचा बाकी राहिला. पुन्हा आणेन. ही किस्त्रिम दिवाळी अंक २०१६ ची अनुक्रमणिका.

In reply to by आदूबाळ

पुंबा 26/11/2016 - 19:59
ओहो! बालराजांचं देखील काव्यसृष्टीत आगमन? हे म्हणजे मराठी सारस्वताच्या अंगणात पडलेलं शरदाचं सुंदर चांदणं! आता प्रवीणसुत(?) आणि दस्तुरखुद्द संमेलनाध्यक्ष प्रवीण मिळून मराठी भाषेला सुंदर सुंदर कवितांची फुलं अर्पण करतील. मित्रांनो, आपलं आयुष्य सुद्धा असंच असतं कि नाही, म्हणजे बघा नाती बहरतात ती मनाच्या हिरव्यागार......... :P :P

कंजूस 30/10/2016 - 05:54
दिवाळी अंक वाचायला वेळ लागतो तो दिवाळीत मिळत नाही. थोडं थांबा आणि महिन्याने धागा येईल वरती. एक विशेष गोष्ट म्हणजे मायबोलीचा दिवाळी अंक दोन वर्ष निघाला नाही हे फार विचित्र वाटतं.

मदनबाण 30/10/2016 - 08:50
अजुन वेगवेगळ्या लिंक्स इथे पोस्ट करता आल्या तर उत्तम होइल....

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

यशोधरा 30/10/2016 - 09:59
सकाळचा दिवाळी अंक आला आहे आज. साप्ताहिक सकाळ नव्हे. काहीच खास नाही. काही पाने सेलेब्रिटींनी आपापल्या जोडेदाराला प्रपोझ कसे केले, काही पाने सामान्य वाचकांनी एकमेकांना प्रपोझ कसे केले आणि उरलेली पाने नांदेड सिटी व अन्य बांधकामे पुण्याच्या सौंदर्यात (?!) कशी भर घालती झाली आहेत त्यावर. काही ३-४ पाने प्रेमकविता आहेत म्हणे. अजून वाचल्या नाहीत. अंक नाही वाचला तरी चालेल.

In reply to by यशोधरा

आदूबाळ 30/10/2016 - 12:48
अगाई! (डोले झाकून अश्रू ढाळणारी स्मायली) एकेकाळी रविवार सकाळ दिवाळी अंकात इतर भारतीय भाषांतल्या कथांचे अनुवाद असत. भीष्म सहानी, मंटो, जयकांतन वगैरे नावं त्यातूनच समजली. ये कहां आ गये हम!

मित्रहो 30/10/2016 - 14:06
आता यायला लागलेत, काही दिवाळी अंक मागच्या आठवड्यात प्रकाशित झाले. ते बुकगंगा कडे यायला आणखीन काही दिवस लागले. तेंव्हा आता दिवाळी झाल्यावरच बोलावू. वरील चर्चेवरुन लोकसत्ता आणि डिजीटल दिवाळी अंक चांगला दिसतोय. अक्षर, अंतर्नाद, इत्यादी, कथाश्री कुणी वाचलेय का? कसे आहेत? सध्यातरी लोकसत्ता आणि आवाज (आवाज हा हवाच) बोलवनार. युनिक फीचर्सने माझी कथा त्यांच्या दिवाळी अंकात प्रकाशित केल्याने युनिक फीचर्सचे चारही दिवाळी अंक आणि प्रकाश आमटे चे प्रकाशवाटा हे पुस्तक बुकगंगावरुन बोलावलेय. अजून पोहचायचे आहेत.

नाखु 31/10/2016 - 11:59
कालनिर्णय दिवाळी अम्क वाचत आहे, ग्रॅहम बेलने केलेली संशोधन श्रेय घेण्यासाठी केलेली लबाडी यावर एक चांगला लेख आहे , बाकी अम्क अजूनतरी वाचला नाही. घरच्या अंकातले उरलले प्रवेश साकारत आहे (लेकीला शाळेला सुट्टी आहे,आणि मी हाफीसात आहे)

वरुण मोहिते 01/11/2016 - 18:13
उत्तम अनुवाद , युनिक फीचर्स चा महा अनुभव आणि लोकमत दीपोत्सव छान आहेत. विशेष करून लोकमत दीपोत्सव. बाकी लोकसत्ता ,मटा, नेहमीप्रमाणे दर्जा राखून आहेत. पुरुष स्पंदन चांगला झालाय. ऋतुरंगही ठीक. बाकी वाचून कळवतो. चांगले 20-25 अंक आणले आहेत हळू हळू भर टाकतो

अभ्या.. 01/11/2016 - 22:01
हे पेपरवाले जशी ऑनलाईन आवृत्ती काढतात रोजच्या अंकाची तशी दिवाळी अंकाची काढत नाहीत का? असल्यास लिंका देणे ज्याने वाचल्यात त्याने. कृपा होईल.

In reply to by अभ्या..

भावा, आमचाबी हाय ई-अंक. फुरसतीत वाचण्यासारखा. http://www.evivek.com/DiwaliAnk2016. (ई-अंकात रूपांतर (कन्व्हर्जन) करताना काही त्रुटी (उदा. 'द्ध'ऐवजी 'ध्द') राहून जातात, त्या चालवून घ्या.) या अंकातली माझी शिफारस - आर्थिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी 'मेक इन इंडिया' - प्रा.डॉ. ज्येष्ठराज जोशी आणि प्रा.डॉ. मिलिंद सोहोनी यांची मुलाखत माझी आनंदयात्रा - शशिकांत सावंत (खास वाचनवेड्यांसाठी) मुक्त-विमुक्त बंदिश - रेणू दांडेकर - शांतीनिकेतनवरचा लेख गगनविहार - डॉ. बाळ फोंडके - इस्रोची वाटचाल भेटवा विठ्ठलाला - विद्याधर ताठे - पंढरपूर विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी (सर्वांसाठी) खुलं व्हावं, यासाठी साने गुरुजींनी दिलेल्या लढ्यावर प्रदीर्घ लेख अशोकायण - अरुणचंद्र पाठक - सम्राट अशोकावर लेख. विज्ञानवादी भविष्यवेत्ता - रमेश पतंगे - ऑलविन टॉफलरवर लेख. तसा छापील अंकही आहे... ४८० पानांचा, जाडजूड.

In reply to by यशोधरा

ई-अंक म्हणजे छापील अंकाची पीडीएफ नाही. त्यामुळे ई-अंकात जाहिराती, रेखाचित्रं नाहीत. तसंच, कविता अजून अपलोड केलेल्या नाहीत. फक्त महत्त्वाचे लेख, कथा, मुलाखत, परिसंवाद इ. अपलोड केले आहेत. त्यातलेच काही 'माझी शिफारस' म्हणून वर दिले आहेत.

नाखु 02/11/2016 - 09:00
न्या.चपळगांवकर यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकीय साम्जीक योगदान्,तत्कालीन घटनांवर परिणाम करणारे निर्णय्,आणि स्वभावाचे,तत्वांचे पैलु उलगडून दाखविणारा लेख आहे.अर्थात वाचनीय आणि दखलपात्र आहे.मला आवडलेला भाग. "१९४८ मध्ये भाषण करताना सरदार म्हणतात या देशात आपला देश म्हणून राहिलेल्या मुस्लीमांनी फक्त हा देश आमचा आहे असे म्हणून चालणार नाही तर तसे सिद्ध करावे लागेल्,जेंव्हा पाकिस्तानने काश्मीरात हिंदुवर हल्ला करून हत्याकांड केला त्याचा जोरदार निषेध का केला नाही. एकदा इ़कडे राहिल्यावर निष्ठा इकडेच पाहिजेत.दोन घोड्यांवर स्वार होऊन चालणार नाही आणि त्याला भविष्यही नाही" जमल्यास किमान या उतार्याचीतरी पीडीएफ टाक्ण्याचा प्रयत्न करतो अर्थात त्यांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही चांगले खडे बोल सुनावले आहेत. दिवाळी अंक वाचक नाखु

ऋषिकेश 02/11/2016 - 09:19
रेषेवरची अक्षरेचा अंक गेली काही वर्षे निघतो आहे तो दिसला नाही. मात्र यंदा दिवाळी अंकांची परिक्षणं करणार आहेत असं दिसतंय ल्क्ष ठेवायला हवं इथे

यशोधरा 02/11/2016 - 11:14
मेहता ग्रंथजगतचा अंक ठीकठाक, खास काही नाही. bridges of madison county चा अनुवाद मेहता तर्फे प्रकाशित होतोय, त्याचा काही भाग ह्या अंकात आहे. अनुवाद फारसा पकड घेत नाहीये.. नाही आवडला इतका. बाकी अंक ठीकच. दिप्ती नवलने लिहिलेल्या द मॅड तिबेटीयन ह्या पुस्तकाच्या काही भागाचा अनुवाद बरा आहे. मूळ पुस्तक वाचावयास हवे असे वाटले. कविताही आहेत पण अजून वाचल्या नाहीत. तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... असे वाचले, मग नंतरच वाचू असे ठरवलेय.

In reply to by यशोधरा

प्रदीप 05/11/2016 - 10:54
तुझी नव्हाळी, माझी नव्हाळी काळ्या फुलांची काळी डहाळी ... अकु आता दिवाळी अंकांतूनही त्यांच्या कविता प्रसिद्ध करायला लागले? चांगली प्रगति आहे!!

उपलब्ध इअंकांमध्ये - साधनाच्या अंकातली मराठा आंदोलनावरची डॉ. कसबेंची मुलाखत चांगली आहे. विनय हर्डीकरांचा शरद जोशींवरचा लेख पसरट आहे, पण काही मुद्दे लक्षात घेण्याजोगे आहेत. साधनाच्या युवा अंकातल्या मोनिका लेविन्स्कीच्या भाषणाचा अनुवाद उत्तम. मूळ भाषण - https://www.ted.com/talks/monica_lewinsky_the_price_of_shame?language=en 'मौज' मधला नरेंद्र चपळगावकरांचा नेहरू आणि पटेलांवरचा लेख माहितीपूर्ण आणि संतुलित वाटला.

In reply to by यशोधरा

सस्नेह 05/11/2016 - 15:29
'मौज' मधला रवींद्र अभ्यंकरांचा गोनिदांवरचा लेख सुरेख आहे. नरेंद्र चपळगावकर पास. विनया जंगले यांचा फुलपाखरे विषयावरच लेख सुरेख माहितीपूर्ण. इतर नामावली चांगलीच आहे. आशा बगे, अनिल अवचट, इरावती कर्णिक, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, गोविंद तळवलकर. यशवंत मनोहर, लक्ष्मिकांत तांबोळी... उफ्फ.. टंकाळा आला. लेख छान आहेत, पण अंकाची मांडणी विस्कळीत वाटली. तरीही वाचनीय.

In reply to by सस्नेह

ते संजोपराव उर्फ़ जालावरचे रावसाहेब जे लेखक आहे त्यांना मौज या दिवाळी अंकाचं विनाकारण कौतुक करायची सवय आहे, आपली अभिरूची कशी उच्च आहे, वगैरे तो प्रकार असतो. त्यांचं लेखन वाचून अंक खरेदी करू नका. आपली आवड़ पाहुन दिवाळी अंक खरेदी करावा असे सुचवीन. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by विशाखा पाटील

यशोधरा 05/11/2016 - 18:00
मनापासून आभार! डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या भाषणांचे संपादित अंश मिळाले तेथे. ह्या लिंका मी ज्ञानब्रह्मापुढे आहुतीच्या तयारीनं उभा …तर ती जगण्याशी प्रतारणा ठरेल! मी महासमन्वयाचा लहानसा दुवा

यशोधरा 05/11/2016 - 16:23
आपल्या स्वातीताईचा लेख काही संस्करण करून माझी सहेली ह्या दिवाळी अंकात आला आहे. खाली मूळ लेखाची लिंक दिली आहे, अभिनंदन स्वातीताई! http://www.misalpav.com/node/30637

नाखु 07/11/2016 - 14:23
मेनका अंक वाचत आहे. गुरुनाथ तेंडुलकर कथा ठीक ठाक्,रुस्तुम सिनेमा ज्या घटनएवर आहे त्याचा लेखा जोखा करणारा तपशीलासह लेख आला आहे आणि वाचनीय आहे. दुसरी देशमुख यांची कथा ठीक पण अजून काही वाचावा असा वाटला नाही.कदाचित एखादा विनोदी अंक वाचण्याचा इरादा आहे.

मित्रहो 07/11/2016 - 20:02
डिजीटल दिवाळी बघितला - मला वाटत हेच बरोबर आहे. प्रकाशित लेखांचे (अभि?)वाचन ह्या स्वरुपाचा दिवाळी अंक आहे. ह्रुषिकेश जोशीेचे मद्यपानवरील विवेचन आवडले. इतर ठिक ठाक आहे. अक्षरनामा फक्त इरावती कर्णिक यांचे मनोगत वाचले आणि आवडले. इतर वाचतोय सवडीने. लोकसत्ता अनवट भटकंती आवडली. या देशात कधी जाणे होइल असे मात्र वाटत नाही. सुदानवरील लेख हा भटकंती पेक्षा लेखकाला त्याच्या कामाच्या निमित्ताने आलेला काही व्यक्तींचा अनुभव आहे. शैलेंद्रवरील तिसरी कसमचा लेख जुनीच माहीती देत असला तरी फिल्मी पद्धतीने लिहिल्याने वाचायला मजा येते. म्हणजे बोलता तो मधेच उठून गेला किंवा त्याने सिगरेट शिलगावली सारखी वर्णने. नेताजींच्या मृत्युविषयीचा लेख तोचतोच आहे. मुळात या विषयात नेहमी तेचतेच मुद्दे येत राहतात. ज्यांचा नेताजींचा मृत्यु अपघातात झाला यावर विश्वास नाही ते कधीच विश्वास ठेवनार नाही हेच हा लेख सांगतो. पुतीन वरील लेख वाचायला सुरवात केली आणि सोडून दिला. कंटाळा आला. लोकमत मित्राकडे चाळला, वाचला नाही. फार जास्त बुद्धीजीवी किंवा माहीतीपर वाचायचा कंटाळा आला आता. बुद्धीच्या खाद्याची सीमा संपलीय. आता फारकाही पचवू शकनार नाही तरीही अनुभव अजून वाचायचा आहे. साधना किंवा अंतर्नाद बोलावून ठेवून नंतर कधीतरी सहा महिन्यानी वाचू असा विचार सुरु आहे. 'आवाज' अजून घरी पोहचला नाही. 'कॉमेडी कट्टा'मधे पुलंच्या गाठोड या पुस्तकातला 'रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त' हा लेख प्रचंड विनोदी आहे. हे पुस्तक मी या आधी वाचले नव्हते त्यामुळे लेख पण वाचला नव्हता. 'व्हाट्सअप दिनचर्या' फार्सिकल आहे काही पंचेस मस्त आहे. वाचन सुरुच आहे.

In reply to by मित्रहो

मित्रहो 21/11/2016 - 12:50
दोन दिवस आजारी होतो तेंव्हा पडून पडून काय करायचे म्हणून अंतर्नाद सोडला तर होते ते सारे वाचून काढले. डिजीटल दिवाळी अभिवाचनाव्यतिरीक्त इतरही लेख त्यात आहेत. वर म्हटल्याप्रमाणे खादाडीला वाहीलेला अंक. मालिकेतले स्वयंपाक घर हे शुभांगी गोखले यांचे अभिवाचन मस्त आहे. लिहिलेही छान आहे आणि संयत अभिनयासहीत अभिवाचन आहे. मस्त आहे. इतरही काही लेख किंवा अभिवाचन चांगले आहेत. महेश एलकुंचलवारांची मुलाखत सहजच वैदर्भिय खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देते. अनुभव कथा विभाग यथा तथाच आहे. मला एकही कथा फारशी आवडली नाही. अरुणाचलच विषयीचा अनुभव चांगला आहे. नेहमीचे प्रवास वर्णन नाही किंवा शाळेत न येनारे विद्यार्थी नाहीत. १२ तास ब्रम्हपुत्रेचा प्रवास, किंवा ऑपरेशनचा अनुभव मस्त आहे. साधना शिलेदार यांचा कुमार गंधर्व आणि देवास वरचा लेख सुरवातीला नेहमीसारखा आहे म्हणजे हीच ती वास्तू जिथे कुमार गंधर्वानी गायन शिकले किंवा म्हटले. इत्यादी. नंतर लोकसंगीताच्या शोधार्थ आसपासच्या गावागावात केलेली भटकंती मस्त आहे. कदाचित हा एका वेगळ्या लेखाचा विषय होउ शकेल. अनिल अवचट यांचा स्टॉइनबर्ग वरील लेख मस्त आहे. एक व्यंगचित्रकार त्याने काढलेल्या रेषांपेक्षा न काढलेल्या रेषातून जे सांगतो ते अप्रतिम. मस्त आहे. त्याचे चित्र मस्त समजावून सांगितले आहेत.मुकुंद टाकसाळे यांची मेलामेली पण मस्त आहे. अमेरीका किंवा इतर लेख ठिकठाक आहे. मुशाफिरी मधला ट्रेक केल्यानंतर खायच्या चांगल्या किंवा वाइट जागा यावर लेख आहे. नवीन माहीती आहे. आवाज हल्ली विनोदी कथा त्याच त्याच प्रकारात मोडनाऱ्या असतात. गावातला इरसाल पाटील आणि त्याचे एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर्स, प्रेमकथा आणि ट्रिक्स, काही इरसाल पोर. आवाजचा हा अंकही त्याला अपवाद नाही. मंगला गोडबोलेंची कथा किंवा लेख वेगळा आहे. २०५० साली मराठी संस्कृतीचे मुझियम वगेरे असली कल्पना आहे. इतर कथा नेहमीच्या लेखकांनी नेहमीच्या पद्धतिने लिहिलेल्या आहेत.त्यातल्या त्यात मिलिंद शिंत्रे यांची कथा चटकदार संवादामुळे मजेशीर आहे. चित्रे वगेरे आवाज सारखीच. लोकप्रभामधे कथा स्पर्धेतल्या कथांव्यतिरीक्त फार काही वाचले नाही. लहान मुलांचे म्हणून असनारे अंक wimpy kid किंवा geronimo stilton वाचनाऱ्या हल्लीच्या मुलांना वाचावयावसे वाटत नाही. आता अंतर्नाद सहा महिन्यांनंतर, डोक्याला थोडी विश्रांती हवी. तेंव्हा दिवाळी अंक वाचन जवळ जवळ संपले.

In reply to by मित्रहो

नाखु 21/11/2016 - 14:43
सहमत. अगदी गंडलेला आणि खिडकीचित्रे विनोदी कमी ओंगळ जास्ती आहेत कथा भागात आनंदी आनंद आहे. कथाश्री वाचला काही कथा छान आहेत आणि चक्क सकारात्मक आहेत त्या मुळे आवडल्या "दवणे"वगळता बहुतांश वाचल्या (आणि पश्चाताप झाला नाही)

सस्नेह 21/11/2016 - 12:54
'माहेर' वाचला. केवळ अनुल्लेखनीय ! मांडणी विस्कळित. जाहिराती मायंदाळ ! दर्जा घसरलाय. २-३ कथा/लेख चांगले आहेत. बाकी ठीक.

यशोधरा 21/11/2016 - 21:28
आज मौज दिवाळी अंक आणला आहे. कथा, कविता ह्यासोबत रेखाटने, ललित लेख आणि वैचारीक साहित्य असे बरेच काही आहे असे दिसतेय. मिलिंद बोकीलांची सरोवर ही लघुकादंबरी.

In reply to by यशोधरा

यशोधरा 27/11/2016 - 15:25
मौज वाचते आहे आणि आवडतो आहे. कथांमध्ये - आशा बगे आणि शर्मिला फडके ह्यांच्या कथा वाचून झाल्या आहेत आणि आवडल्यात. बाकीच्या २-३ अजून वाचायच्या आहेत. कविता विभागामध्ये - चिमण्या (सतीश काळसेकर), सुंदर (वि ज बोरकर), अर्पण (वसंत वाहोकार), स्वातंत्र्य (नीलिमा गुंडी) ह्या मला आवडलेल्या. बाकीच्याही चांगल्या आहेत. ललित लेख - सगळेच वाचनीय. कथा फुलपाखरांची हा विनया जंगले ह्यांचा फुलपाखरांच्या जगाविषयीचा लेख अत्यंत सुरेख जमलाय, पुन्हा पुन्हा वाचावा असा. डॉ अरूण टिकेकरांवरचा - विवेक पेरणारे गुरु हाही एक जमलेला लेख. एक उत्तम, साक्षेपी संपादक आपल्या सहकार्‍यांनाही किती अनुभवसंपन्न आणि शहाणे करुन सोडतो हे सांगणारा संयत भाषेतला लेख. रवींद्र अभ्यंकरांचा अप्पांच्या आठवणी, अवचटांचा साधना आणि शांता शेळक्यांच्या घरा आणि घरातल्यांविषयींचे लेखही आवडले. बर्‍याच काळानंतर अवचटांचे काहीही उपदेशपर नसलेले लेखन वाचायला आवडले. उर्वरित अंक संपल्यावर...

प्रदीप 26/11/2016 - 19:47
निवृत्त न्यायधिश नरेन्द्र चपळगांवकर ह्यांचा राजाजींच्या राजकीय जीवनावर लिहीलेला विस्तृत व माहितीपूर्ण लेख, तसेच भानू काळेंच्या आगामी "अंगारवाटा: शोध शरद जोशींचा" ह्य चरित्रात्मक पुस्तकातील,जोशींच्या पंजाब-स्वारीबद्दलचा प्रदीर्घ लेख अंतर्नादचे वैशिष्ट्य ठरावे. ह्याचबरोबर, विनय हर्डीकरांचा गोविंदराव तळवलकरांवरील लेखही वाचनीय आहे. अंजलि कीर्तने त्यांच्या आनंबईबाई जोशींवर काढलेल्या लघुपटाबद्दल माहिती देत आहेत; दीपक करंजीकरांच्या आयुष्यातली अचानक आलेली वळणे त्यांनी कथिली आहेत. जे. के. रोलीगवर विवेक गोविलकरांचा लेख आहे. विजय पाडळकरांनी हायकूबद्दल स्फूटलेख लिहीला आहे. अवधूत परळरांनी,, सुहास बहुलकरांच्या चित्र-शिलप कलेसंदर्भतील तीन पुस्तके लिहीली आहेत, त्यांजविषयी थोडक्यात पण अचूक माहिती देणारा चांगला लेख लिहीला आहे. ह्यातील दोन पुस्तके, चित्रकार देऊसकर, व शिल्पकार करमकरांच्या कलाप्रगतीचा आढावा घेणारी आहेत, त्यात सदर कलाकारांच्या त्यांच्या कलेशी निगडीत आयुष्याचा धांडोळा घेतला आहे, हे परळकरांनी मुद्दाम नजरेत आणून दिले आहे. तिसरे पुस्तक जे. जे. स्कूलच्या भोवती केंद्रीत झालेल्या 'स्कूल ऑफ आर्ट'विषयीचे आहे. त्यात बहुलकरांनी ह्या स्कूलने कुठल्या वाटा चोखाळल्या, त्याबद्द्दल टिपण्णी केली आहे. शैलेश माळोदे ह्यांचा भारतात गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या, मग इथेच स्थायिक होऊन कार्यरत असलेल्या आफ्रिकन लोकांविषयी लिहीलेला लेख अनोखी माहिती देतो. गिरीश कुबेरांच्या पुतीनकालीन रशियावरील आगामी पुस्तकातील एक मोठा उतारा लोकसत्तेचे वैशिष्ट्य आहे. विजय पाडळकरांनी शैलेंद्रच्या 'तीसरी कसम' च्या निर्मीतीची हकिकत सांगणारा लेख आहे, ज्यात शैलेंद्र ह्य निर्मीतीच्या उद्योगात कसा भरडून निघाला, व त्यातच त्याचा शेवटी दुर्दैवी अंत कसा झाला, त्याविषयी सविस्तर माहिती आहे. जुने व जाणते रंगकर्मी माधव वझे ह्यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर लिहीलेला लेख व ताज्या दमाचे रंगकर्मी अतुल पेठे ह्यांचा कलाकारांच्या सर्जनक्रियेची उहापोह करणारा लेख, दोन्ही अनोख्या विषयांवरील आहेत. सत्यशील देशपांडेंनी 'ख्याल गायकी'वरील चिंतनाविषयी लिहीले आहे. ह्याव्यतिरीक्त ह्या अंकात तीन विषयांवरील लेखांचे संकलन आहे. पहिला विषय, अनोख्या देशांत सफर करून आलेल्यांनी तेथील अनुभव व त्यांची तेथील जीवनवैशिष्ट्यांबद्दलची टिपणे. ह्यांतील अफगानिस्तान, सुदान, कंबोडिया व उझबेकिस्तानवरील लेख उल्लेखनीय वाटले. दुसरा विषय राजकीय आहे: वेगवेगळ्या देशांत नवे राजकीय प्रवाह आणणार्‍या पुढार्‍याविषयी ह्या लेखांत आढावा घेतला गेला आहे. तिसरा विषय आहे, पाशिमात्य देशांतील कॉर्पोरेट जगतांतील कार्यसंकृती. ह्यांत गूगल, मेड-एल इलेक्ट्रॉनिक्स व कमिन्स येथे प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या तरूण मराठी व्यक्तिंची कथने आहेत.

यशोधरा 30/11/2016 - 19:23
सामनामधील उल्लेखनीय लेख - संजय नहार ह्यांचा 'तोपर्यंत कश्मीर असेच जळत राहील' हा लेख. वीरांच्या गावा जावे हा मिलिटरी अपशिंगे ह्या सातार्‍यापासून १७ किमी अंतरावर असलेल्या गावावरचा लेख. गॉडमदर हा शिरिष कणेकरांचा लतावरील लेख. कथा - कंसातील वाक्यं - मंगला गोडबोले आणि ललाटीचे लेख(क) - अजय पुरंदरे. मिपाकर प्रसन्न केसकरांचा सेल्फीचा धूमधडाका हा लेखही आहे ह्या अंकात.

लोकमान्य सेवासंघ विलेपार्ले, मुंबई वाचनालयात दर वर्षीप्रमाणे यंदाही १५० रुपयात १५० दिवाळी अंक ही योजना चालू आहे. २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत अंक घरी नेता येतील (नाव नोंदणी अजूनही शक्य आहे). कालच मी जीवन ज्योत हा अंक आणला. डॉक्टर विद्याधर ओक यांचा '२२ श्रुती संशोधन' हा लेख अत्यंत माहितीपूर्ण वाटला या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. दुसरा चांगला लेख म्हणजे मुकुंद सराफ यांचा 'वाटचाल भावगीतांची १९२६-२०१६.'
फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत. आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे. इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती.

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

खेडूत ·

In reply to by एस

मोदक 18/10/2016 - 13:40
हेच बोलतो... ..आणि ही नवीन गोष्ट असेल असे वाटले नव्हते. एक साधा विचार करा. "मूळ गाण्यातला प्रत्येक सूर जुळवत, वाद्यांचे त्या त्या ठिकाणचे आवाज आजिबात न चुकता योग्य ठिकाणी वाजवत आणि स्टेजवर न दमता इतकी नाचानाची करत तेच गाणे तस्सेच्च म्हणले जाणे" आपल्याला दिसते तेंव्हा मागे गाणे सुरू आहे आणि गायक लोक्स नाटक करत आहेत हे सहज लक्षात येते. हल्ली फॉरवर्ड होत असलेल्या एक दोन रिअ‍ॅलिटी शो मधल्या मुलांच्या गाण्यालाही हीच शंका येते. अर्थात याला अपवाद वाटलेले अनेक कार्यक्रम आहेत.. सगळेच लोक असे करतात असे नक्कीच नसावे.

In reply to by मोदक

अनुप ढेरे 18/10/2016 - 15:58
स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं गाणं देखील खूप गायक ऑटो ट्यून मधून काढतात असं ऐकलेलं आहे ज्यात बेसुर सूर ठीक करता येतात सॉफ्टवेअरमधून. स्टूडिओमध्येदेखील जर एवढी वेळ येत असेल तर लाईवमध्ये बरोब्बर सुरात गाणं अशक्य आहे.

किसन शिंदे 18/10/2016 - 12:36
बॉलीवूडमध्ये हा प्रकार तर पूर्वीपासूनच सुरू आहे. आता परवाच्या लोकसत्तामध्ये कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीमधील आनंदजी यांनी किशोर कुमारबाबत सांगितलेला किस्साही अशाच प्रकारचा होता. त्या लेखातला काही भाग..
त्या वेळी किशोरवर आकाशवाणीचा अघोषित बॅन होता. ‘दूरदर्शन’वरही त्याची गाणी लागत नसत. आमच्या कार्यक्रमासाठी ‘दूरदर्शन’ने त्याला बोलावलं, पण त्यानं नकार दिला. आम्ही प्रयत्न करतो, असं म्हणालो. किशोर म्हणाला, ‘‘मी गाणार नाही.’’ मी म्हणालो, ‘‘अरे गाऊ नकोस. अ‍ॅक्टर म्हणून ये.’’ तो तयार झाला. मी एक युक्ती केली. ती आज उघडी करतोय. आम्ही मागे साऊंड ट्रॅक लावला व किशोरनं त्यावर ओठ हलवलेत फक्त. पण तो कार्यक्रम हिट झाला.

In reply to by किसन शिंदे

पुंबा 18/10/2016 - 12:39
ही युक्ती नाही तर अत्यंत गलीच्छ फसवणूक आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ते निर्लजापणे सांगतात, म्हणून कलावंतांची कदर केली जात नाही या देशात. सगळ्यांचे पाय मातीचेच असतात हे खरे.

पुंबा 18/10/2016 - 12:36
१. हो २. दुर्दैवाने हो. अगदी लता, आशा, रेहमान वगैरेसुद्धा असे करत असत असे काल वाचले. ३. हो ४. चार पैसे फेकले की वृत्तपत्र नावाचे कुत्रे गोंडा घोळत येते असे ऐकून आहे. ५. त्याची गरज होती आणि सैराट deserved it. ६. आजीबात नाही. मुळात अश्या फसवनुकीत सहभाग घेने हेच प्रोफेशनल एथिक्सच्या विरोधात आहे. ७. मागता यायला हवेत. प्रेक्शकांची ही खुप मोठी फसवणूक आहे. ग्राहक न्यायालयात याबद्दल दाद मागता यायला हवी. अर्थात हे सिद्ध कसे करणार हा प्रश्न आहेच.

१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? >>>>>हो, बहुतेक सर्व भारतीय कार्यक्रम (चित्रपटसंगीताशी संबंधित) हे रेकॉर्डेड असतात व आपल्यासाठी ते 'लाईव्ह असल्याचा आभास केला जातो. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? >>>>> (चित्रपट संगीताशि संबंधित बहुतेक सर्व कार्यक्रम) हो. सर्व अ‍ॅवॉर्ड सोहळ्यातील गाण्याचे कार्यक्रमसुद्धा. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? >>>>> त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने असं नव्हे, तर जास्त परफेक्शन साठी होत असेल. झटपट पैशांबाबतः तो कोणाला नको असतो? ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? >>>>> दिसतंय की! लोकसत्ता ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? >>>>> याड लागलं आणि सैराट झालं जी या दोन गाण्यांचा वाद्यमेळ अफाट सुंदर आहे. त्याला (जर)साठ-सत्तर लाख खर्च केले असतील, तर ते नक्कीच पैसा वसूल काम झालंय! ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? >>>>> अर्थात! लाईव्ह कार्यक्रमात/नाटकात/स्टेज शो मध्ये/सत्कार कार्यक्रमात/राजकीय सभांमध्ये अशा गडबड गोष्टी होतच असतात. त्यातून कार्यक्रम जास्तीत जास्त स्मुथली पुढे नेण्यात सूत्रसंचालकाचे खरे कसब असते. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? >>>>> डिस्क्लेमर वगैरे कोणी टाकणार नाही. तिकिटाचे पैसेही परत मागता येतील असे वाटत नाही. युक्तिवाद असा असू शकतो: ' अजय अतुल लाईव्ह असा कार्यक्रम होता. अजय अतुल तिथे प्रत्यक्ष उपस्थित होऊन गाणी गायल्याचा प्रत्यक्ष अभिनयही करीत होते. ते प्रत्यक्ष गाणी म्हणतील असा कुठेही उल्लेख आम्ही केला नव्हता' *माझी मते नेहमीच लवचिक असतात.

In reply to by तुषार काळभोर

खेडूत 18/10/2016 - 13:14
:) मकरंद अनासपुरेंच्या अन्य सामाजिक कामांमुळे त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असतात, त्यामुळे असे वाटले, अन्यथा सूत्रसंचालकाने प्रसंगावधान राखून वेळ मारून नेणे योग्यच.

वेल्लाभट 18/10/2016 - 13:31
म्हणून सांगतो; मैफिल ऐकावी शास्त्रीय, उपशास्त्रीय, अगदी सुगमही. ज्यात गायक वादक समोर स्प्ष्ट दिसतील. कॉन्सर्ट च्या नावाने पैसे वाया घालवू नये.

वरुण मोहिते 18/10/2016 - 14:15
बायकोच्या हट्टामुळे. बाकी असा होतंच असतं त्यात काही नवीन नाही पण शास्त्रीय संगीत किंवा एखादा बॅण्ड परदेशी कलाकारांचा लाईव्ह बघणं हे बेस्ट त्यापेक्षा .

In reply to by आदूबाळ

विशुमित 18/10/2016 - 16:35
जाणीव पूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. काही अंशी मला ही तेच वाटत. http://www.loksatta.com/manoranjan-news/atul-gogavales-clarification-over-lip-syncing-row-1320720/

In reply to by आदूबाळ

खेडूत 18/10/2016 - 16:41
त्यांचं म्हणणं असं दिसतंय की मायनस ट्रॅकवर मुद्रित संगीताच्या साथीत ते खरंच गात होते आणि बंद पडून पुन्हा सुरू होताना टेक्निशियनने प्लस ट्रॅक लावला. हे खरं मानलं तर आधी वादक वाजवल्याचा अभिनयच करत होते असा होतो!

In reply to by खेडूत

आदूबाळ 18/10/2016 - 17:08
एग्जॅक्टली! म्हणूनच "मग ऐंशी वादकांचा ताफा आम्ही का नेला असता" वगैरे पोकळ वाटतं. @विशुमितः जाणीवपूर्वक गैरसमज का बरं पसरवले जातील?

कंजूस 18/10/2016 - 15:48
हजारो वॅाट्स स्पिकर ध्वनिवर्धक लावून अशा मोकळ्या जागेत शक्य नसावे.कारण नाजूक वाद्यांचा आवाज,गायकाचा आवाज माइक्रोफोनने पकडून मोठा करायचा उघड्यावर सोपे वाटत नाही. शास्त्रिय गायक ओरडून गात नाहीत.

बाजीप्रभू 18/10/2016 - 16:11
२००३ साली अमेरिकेच्या कुठल्यातरी इनॉग्रेशन डेच्या दिवशी गायिका बेयोँसे आणि तिचा वाद्यवृंद नाटक करतांना रेड हँडेड पकडला गेला होता. लोकांनी आणि मीडियाने खूप "पिसं" काढली, माफी मागायला लावली. ओबामाभाऊ सुद्धा रेड हँडेड पकडला गेला होता एकदा. हा पहा व्हिडीओ, Obama

कंजूस 18/10/2016 - 16:56
गायक तुमच्यासमोर तीन तास आले,कार्यक्रम सादर केला आणखी काय पाहिजे? हीच गोष्ट शाळाकॅालेजच्या शिक्षणाची आहेच. तुम्ही चांगल्या संस्थेत पैसे खल्च करून मुलांना पाठवता मग आखी दहापट फी क्लासची का भरता? तुमची मुलं तुम्हाला फसवतातच ना?

In reply to by कंजूस

खेडूत 18/10/2016 - 17:06
तसे नव्हे. ही तुलना पटली नाही. गायक तुमच्यासाठी गायला येतोय म्हणून हजार रूपये तिकीट काढून आपण जातो. गाणे शंभर टक्के ' मूळ आहे तसेच' ऐकण्याची अपेक्षा नसतेच. तान्त्रिक/ नैसर्गिक मर्यादा येत असतील तर तसे स्पष्ट सांगावे, हरकत असायचे कारण नाही. शंकर महादेवन, शौनक अभिषेकी किंवा राहुल देशपांडे यांची मैफिल ऐकली तर अनेकदा गाणे मूळ गाण्यापेक्षा पूर्ण वेगळेच सादर केले जाते. ते चांगलेही वाटते.

In reply to by खेडूत

कंजूस 19/10/2016 - 03:58
हवा येऊ द्या कार्यक्रमात बरीच गाणीे तरी माइक सिस्टिम स्थानिकच असते ती मंत्र्यांच्या भाषणात वापरतात.

पद्मावति 18/10/2016 - 17:23
जर प्री रेकॉर्डेड ट्रॅक वर ही मंडळी लीप सिंक करत असतील तरीही हरकत नाही. फक्त मग त्याला लाईव शो म्हणू नये इतकेच मला वाटते. बाकी कॉन्सर्ट मधे प्रचंड ऑडियेन्स मधे खर्या गाण्याचा बहुतेक आवाजही नीट पोहोचणार नाही आणि लाईव शो मधे गायकाच्या किंवा वाद्यवृंदाच्या चुकीमुळे पूर्ण शोचा विचका होऊ शकतो त्यामुळे हे प्री रेकॉर्डेड प्रकार सुरू झाले असावेत. ते ठीकच आहे पण मग ते स्पष्टपणे सांगावे.

रेवती 18/10/2016 - 17:36
१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? उत्तर- हो, हा प्रकार होतो असेच फार्फार वर्षांपूर्वीच ऐकले होते. आपण त्याची सवय करायला नको, या कार्य्क्रमान्ला जाऊ नये असे मला वाटते. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? उत्तर- तसे ऐकले तरी आहे. शिवाय या धाग्यानिमित्ताने जर एखादा तूनळीवरील लाईव्ह शोचा व्हिडिओ पाहिलात तर आवडण्यासारखे काही दिसत नाही. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? उत्तर- अजय अतुल काय किंवा कोणी दुसरे काय, मर्यादा प्रत्येकालाच असतात. जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमातील एक गाणे ऐकण्यात आले, त्यातील संगीत लक्षपूर्वक ऐकले तर सैराटमधील एका गाण्याची आठवण यावी असे आहे. ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? उत्तर- ही बातमी होती हे माहित नसल्याने पास. ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? उत्तर- माहित नाही. तरी संगीत चांगले झाले असल्यास ठीक आहे असे म्हणावे लागेल. ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? उत्तर- असे केले हे माहित नव्हते पण केले असल्यास चुकीचे आहे तरी मित्र मित्रांना सांभाळून घेतायत असे म्हणावे लागेल, फक्त सांभाळून घेण्याचा मार्ग प्रेक्षकांच्या खिश्यातून जातोय. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? उत्तर- तिकिटांचे पैसे परत मागता यावेत असे वाटते.

फेरफटका 18/10/2016 - 19:37
हा प्रकार नवीन नाही. माझा एक अनुभव म्हणजे १९९९ साली ३१ डिसेंबर चा एक शो आम्ही परगावी एका रिसॉर्ट मधे केला होता. तेव्हा गायक / निवेदक जरी लाईव्ह गात असले, तरी सगळं संगीत हे ट्रॅक वर होतं आणी मागे ठेवलेल्या वाद्यांवर बसलेले वादक 'अभिनय' करत होते. ह्या प्रकाराचं आश्चर्य वाटावं ईतका हा प्रकार नवीन नक्कीच नाहीये. उघड्या मैदानात, प्रेक्षकांच्या जल्लोशात, नाचताना वगैरे गाण्याचे सूर संभाळता येतील हे खूप अवघड आहे. इच्छूकांनी चालत चालत गाणं गुणगुणून बघावं.

शब्दबम्बाळ 18/10/2016 - 20:19
बऱ्याचदा तांत्रिक कारणामुळे(स्पीकर अथवा माईक खराब) लाईव्ह कार्यक्रम खराब होऊ शकतो. त्यातल्या त्यात तो कार्यक्रम संगीताचा असला कि जास्तच काळजी! लोक भरमसाठ किमतीची तिकिटे काढून येतात त्यांना दोषरहित आणि खिळवून ठेवणारा अनुभव देण्यासाठी लिपसिंक केले जात असावे. 13-14 वर्षांपूर्वी शाळेत असताना नाटक सादर करताना आम्हीही हि गोष्ट केली होती. शाळेमध्ये मिळणारे माईक कायम मधेच खराब व्हायचे किंवा किssssss कुssss असले चित्र विचित्र आवाज काढायचे ज्याने सादरीकरणातली सगळी मजा निघून जायची. हे टाळण्यासाठी आम्ही आख्खे नाटक कॅसेटवर रेकॉर्ड केले. हे करण्यामागे प्रेक्षकांना चांगले सादरीकरण पाहाता यावे हाच हेतू होता आणि रेकॉर्डिंग वर लीपसिंक करायला सुद्धा खूप मेहनत लागली होती! मग इथे जर यांनी पूर्ण गाणी लिपसिंक केली (असतील) तर त्यामागे देखील मेहनत असणारच आहे... अरिजित सिंग ने सादर केलेला रेडिओ मिरची अवॉर्ड मधला परफॉर्मन्स खूप छान आहे! त्याचा ऑडिओ जवळपास रोज ऐकतो. पण त्या कार्यक्रमात देखील त्याने लिपसिंक केले होते! :) गाण्याची लिंक, 3:33 मिनिट च्या इथे पहा, गाण्यात 'हलकासा' शब्द आहे पण तो 'थोडासा' असे बोलतो! ;)

संदीप डांगे 18/10/2016 - 20:21
खरं तर बोलण्यासारखं काहीच नाही आणि खूप काही आहेही, अनेकांनी इथे मांडले आहेसुद्धा, Live concert हे फक्त शास्त्रीय संगीत व रॉक यांचीच टिकेट काढून बघायला जावी, बाकी सगळा काळाबाजार आहे! पूर्वमुद्रित रेकॉर्डवर गाणारे लोक ज्या कॉन्सर्ट सादर करतात त्यात गाणे ऐकण्यापेक्षा गाणारे, जे सेलिब्रिटी आहेत त्यांना गाताना बघायला जाणे जास्त महत्वाचे असते, कोणी दुकानाची फीत कापायला येणे आणि हि गाणी ऐकायला जाणे यात फार फरक नाही. सेलेब्रिटी प्रत्यक्ष बघायला मिळणे हेच फलित, बाकी काही नाही, तसेच जे काही लोक्स पैसे लुबाडल्याबद्दल कुरबुर करतायत ते लोक ते ऐकत असलेले प्रत्येक गाणे, बघत असलेला प्रत्येक चित्रपट विकत घेऊन ऐकत/बघत असतील तर माझा त्यांच्या फसवल्या गेल्याच्या भावनेला बिनशर्त पाठिंबा आहे. अन्यथा ह्या कलाकारांच्या कलाकृती फुकट उपभोगायच्या आणि त्यांनी फसवले कि बोंबाबोंब करायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. ;)

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या 18/10/2016 - 21:47
एका चुकीचे समर्थन करण्याकरता दुसर्‍या चुकीकडे बोट दाखवणे काही पटत नाही. काही लोक फुकट डिव्हीडी, व्हिडियो बघतात म्हणून लाइव्ह कन्सर्ट मधे गाणे म्हणण्याचे नाटक करणे न्याय्य ठरते हे काही पटत नाही. सगळे कॉन्सर्टला आलेले तमाम प्रेक्षक हे फुकट डीव्हीडी वालेच होते ह्याला काय पुरावा?

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या 18/10/2016 - 22:17
जर सगळे प्रेक्षक बेकायदा गाणी ऐकणारे आहेत असा काही पुरावा असता तर सरसकटीकरण कदाचित (होय, कदाचितच) योग्य ठरले असते. पण तसे काही नसले तर तो मुद्द पूर्ण गैरलागू आहे. तिकिट काढून आलेल्या ग्राहकाला पूर्ण माहिती न देता असा प्रकार करणे हे चूकच. मग तक्रार करणारे गिर्‍हाईक हे आदर्श नागरिक आहे का, त्याने वा तिने कधी कुठला कायदा मोडला आहे का असा उलटा कांगावा करणे चूक आहे. अशा प्रकारचा आदर्श नागरिक नसेल तर त्याला वा तिला अशी तक्रार करण्याचा हक्कच नाही वगैरे म्हणणे पूर्णपणे गैरलागू आहे.

In reply to by हुप्प्या

संदीप डांगे 19/10/2016 - 00:23
तसेच सगळे प्रेक्षक बेकायदा गाणी ऐकणारे नाहीतच ह्याचाही काय पुरावा आहे? माझे विधान कोणतेही प्रामाणिक प्रेक्षक उगाच अंगावर घेणार नाहीत, पण चोराच्या मनात चांदणे असेल तर नाईलाज आहे.

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या 19/10/2016 - 07:15
प्रेक्षकांच्या ग्राहक म्हणून हक्काचा हा प्रश्न आहे. ज्यांनी तिकिटे काढून हा शो पाहिला त्यांची फसवणूक झाली आहे का हाच चर्चेचा मुद्दा आहे. आता त्याला प्रेक्षक स्वत: किती प्रामाणिक आहेत वगैरे फाटे फोडणे हे साफ गैरलागू आहे. काही मोजके वा बरेच वा सगळेच प्रेक्षक कधी ना कधी वा कधीतरी बेकायदा सिनेमे बघत वा बेकायदा गाणी ऐकत असतील का ह्या मुद्द्याचा प्रस्तुत चर्चेशी काहीही संबंध नाही. उपस्थित प्रेक्षकांपैकी ज्यांना आपली फसवणूक झाली असे वाटते आहे त्यांना त्याची तक्रार करण्याचा हक्क आहे. एखादा फसवणूक झाली म्हणून तक्रार घेऊन आला तर तू कधी बिनातिकिट प्रवास केला असशील तर तुला फसवणुकीची तक्रार दाखल करायचा हक्कच नाही असे म्हणण्यासारखे आहे. केवळ आदर्श, कधीही कायदा न मोडलेल्या स्त्री वा पुरुषालाच फसवणुकीची तक्रार करण्याचा हक्क आहे असे म्हणणे हे आततायीपणाचे आणि चूक आहे. जाता जाता: मी आजपर्यंत असले कन्सर्ट कधी पाहिले नाहीत आणि भविष्यात पाहीन असे वाटत नाही त्यामुळे चोराच्या मनात चांदणे वगैरे वैयक्तिक आरोपांचे आणखी नवीन फाटे फोडू नये. मुख्य मुद्द्यावरच रहावे ही विनंती.

In reply to by हुप्प्या

संदीप डांगे 19/10/2016 - 07:55
माझा काय मुद्दा होता हे तुम्ही नीट समजून घेतला नाही तेव्हा असो. बाकी आता फसवणुकीची तक्रार दाखल करण्याबद्दल, तर कायदेशिरपणे तसे कोणीही करू शकतो, ग्राहक म्हणून प्रत्येकाचा तो हक्क आहे, माझा मुद्दा नैतिकतेबद्दल होता, कायदेशीर बद्दल नाही, तो मुद्दा वेगळा. कोर्टात ही फसवणूक सिद्ध करणे अवघड आहे त्यामुळे असो. अजय अतुलवर बहिष्कार घालत असतील तरी माझं काही वाया जात नाही.. ;) आपण सिग्नल मोडायचा पण तोच दुसर्याने मोडला कि बोंबाबोंब करायची यात तुमच्या मते काही गैर नसेल तर ठीक आहे,असो. तरीही मी सर्वांच्या सर्वच प्रेक्षक अगदी तस्सेच दांभिक असतात असं कुठेही कधीही म्हटले नाही - फक्त एक दृष्टिकोन दिला, विनाकारण माझ्या मुद्द्याला गैरलागू म्हणण्याची गरज नव्हती, नसलेले शब्द माझ्या तोंडी कोंबण्याची गरज नव्हती, तेव्हा तेही असोच. चर्चेबद्दल धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

तसेच जे काही लोक्स पैसे लुबाडल्याबद्दल कुरबुर करतायत ते लोक ते ऐकत असलेले प्रत्येक गाणे, बघत असलेला प्रत्येक चित्रपट विकत घेऊन ऐकत/बघत असतील तर माझा त्यांच्या फसवल्या गेल्याच्या भावनेला बिनशर्त पाठिंबा आहे. अन्यथा ह्या कलाकारांच्या कलाकृती फुकट उपभोगायच्या आणि त्यांनी फसवले कि बोंबाबोंब करायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. ;) ही पण बाजू मान्य

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या 22/10/2016 - 05:29
-- आपण सिग्नल मोडायचा पण तोच दुसर्याने मोडला कि बोंबाबोंब करायची यात तुमच्या मते काही गैर नसेल तर ठीक आहे,असो. इथे जे दोन गुन्हे आपण एकाच पारड्यात तोलत आहात ते एकसारखे नाहीत. एका बाजूला काही कलाकारांनी आपले नाव वापरुन हजारो प्रेक्षकांना लाईव्ह शोची तिकिटे विकली आहेत. आणि प्रत्यक्षात शो लाईव्ह नव्हताच. दुसर्या बाजूला काही प्रेक्षकांनी कधीतरी फुकट वा स्वस्तात बेकायदा पद्धतीने गाणी ऐकली असतील असा आपला दावा. हे दोन पूर्ण दोन वेगळे गुन्हे आहेत. वेगळ्या पातळीवरचे गुन्हे आहेत. दोन्ही गुन्ह्यांकरता वेगळ्या शिक्षा आहेत. ह्यातला दोन नंबरचा गुन्हा ज्यांनी केला आहे त्यांना एक नंबरच्या गुन्ह्याबद्दल दाद मागायचा हक्क नाही हा आपला तर्क साफ चुकीचा आहे. त्याला कायदेशीर वा नैतिक आधार मलातरी आढळलेला नाही. बेकायदा गाणी ऐकणे वा पहाणे हा एक स्वतंत्र विषय आहे. तोही अत्यंत किचकट विषय आहे. लाईव्ह शो बाबतच्या फसवणूकीचा मुद्द्दा चर्चेत असतना तो उकरुन काढण्याचे प्रयोजन समजले नाही.

रॉजरमूर 18/10/2016 - 20:42
शकिरा ......... शकिरा ने ही 2006 मध्ये जर्मनीत त झालेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या उदघाटनाला हाच प्रकार केला होता . त्यावेळेस तिने "हीप्स डोन्ट लाय " या गाण्याचे "बाम्बो" हे रिमिक्स व्हर्शन गायले होते . त्या प्रचंड स्टेडियम मध्ये प्रेक्षकांच्या कोलाहलात हा परफॉर्मन्स तिने दिला होता . व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसतंय की ती ओठ हलवतेय आणि वादक नाटक करताहेत . बाम्बो

In reply to by अविनाशकुलकर्णी

मागे एका कार्यक्रमात वैभव मांगलेंनी अजयच्या जबड्याची हुबेहूब नक्कल केली होती.

हुप्प्या 18/10/2016 - 21:50
काही लोकांना असे नकली कन्सर्ट करण्यात वावगे वाटत नाही असे दिसते आहे. ग्राहकाला ह्याची माहिती असावी म्हणून कन्सर्टच्या जाहिरातीत निदान बारीक अक्षरात तळटीप असावी की सर्व गाणी ही प्रत्यक्ष गायलेली असतीलच असे नाही. काही गाणी पार्श्वसंगीताच्या स्वरूपात सादर होतील. अशी माहिती आधीच दिलेली असेल तर ग्राहक तशी अपेक्षा ठेवूनच जातील आणि असा अपेक्षाभंग होणार नाही. व्यक्तिशः मला तरी असा प्रकार आवडत नाही. भरपूर पैसे देऊन अशा प्रकारचे शो बघण्याची माझी तरी इच्छा नाही. ज्यांना हा प्रकार रुचतो त्यांनी तो जरुर पहावा.

बोका-ए-आझम 19/10/2016 - 09:42
१. अजय-अतुल यांनी अल्पावधीत मिळवलेल्या यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी ही बातमी तिखट-मीठ लावलेल्या स्वरूपात छापून आणलेली असण्याची दाट शक्यता आहे. या इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतातच. २. अजय-अतुल जे lip sync करत होते ते त्यांच्या स्वतःच्याच गाण्यांचे ट्रॅक्स होते. इतर कोणाच्या गाण्यांचे नाहीत. म्हणजे मूळ मेहनत तर त्यांनी केलेली आहे. ३. प्रेक्षकांच्या फसवणूकीचा जो मुद्दा आहे - प्रेक्षकांची गाणं live ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती का? तसं असेल तर फसवणूक झाली असं म्हणू शकतो. पण जर तसं नसेल तर मग काय फरक पडतो? उद्या एखादा गायक live गातो म्हणून लोक जातील का? ते अजय-अतुल यांच्या नावामुळे जातील. मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो? ४. शास्त्रीय संगीत ऐकायला जाणारे श्रोते अाणि अजय-अतुल किंवा इतर कोणाच्याही concerts ऐकायला जाणारे प्रेक्षक यांच्यात फरक आहे. अशा concerts मध्ये प्रचंड गोंगाट असतो. एखाद्या गायकाने live गाणं म्हणणं हे त्याच्यासाठी त्याची कारकीर्द नष्ट करु शकतं. त्याचा आवाज पूर्णपणे निकामी होऊ शकतो. असं झालं तर प्रेक्षक त्याची जबाबदारी घेतील का? ५. स्टार्स appearance money म्हणून आयोजकांकडून पैसे घेतात. अजय-अतुल आज लोकप्रिय आहेत. आयोजक त्याच लोकप्रियतेचा फायदा उठवत आहेत. परत तोच मुद्दा येतो. उद्या एखादा गायक live गातो म्हणून लोक जातील का? ते अजय-अतुल यांच्या नावामुळे जातील. मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?

In reply to by बोका-ए-आझम

खेडूत 19/10/2016 - 10:08
यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी
त्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी? बिचारे निलेश मोहरीर/ सलील कुलकर्णी/ अवधूत (!) वगैरे हे आपापले मर्यादित स्थान टिकवून आहेत.
तसं असेल तर फसवणूक झाली असं म्हणू शकतो.
तसंच आहे, आणि असतं. अन्यत्र प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लाईव्ह गाताना सूर हलले तरी लोक समजून घेतीलच. आवाज खराब व्हायचं काही कारण नाही, अति हळू आवाजात गायले तरी ११० डेसिबल्सला असह्य आवाज येतो!
मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात. त्यांनी तसे सांगितले तर निम्मी तिकीटेही संपणार नाहीत. कदाचित या भीतीनेच तिकीटाचे दरही खूप जास्त ठेवतात. अन्यथा प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे? या साखळीत सगळेजण प्रामाणिकपणे कर भरत असतील तर ती एक आनंदाची बाब असेल. आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.

बोका-ए-आझम 19/10/2016 - 10:26
त्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी?
हिंदीत आहेत. मराठी कलाकारांविषयी हिंदी चित्रपटसृष्टीत आकस आहे ही वस्तुस्थिती आहे. अाणि त्यांचे मराठीतले प्रतिस्पर्धी असं करणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? सारेगम च्या एका भागात अजय-अतुल पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा नटरंग चं संगीत गाजत होतं. त्यांचं कौतुक होत असताना जज सलील कुलकर्णींचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
तसंच आहे, आणि असतं.
एवढी ठाम खात्री असेल तर विषयच खुंटला.
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात.
लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा.
प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे?
जागेचं भाडं आणि करमणूक कर.
आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.
तो त्यांचा मूर्खपणा/चांगुलपणा आहे. त्यांना एखादी गोष्ट चूक वाटू शकते. म्हणजे ती असेलच असं नाही. कितीतरी वेळा लोक न केलेल्या चुकांची क्षमा मागतात.

In reply to by बोका-ए-आझम

विशुमित 19/10/2016 - 11:24
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात. लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा. --- तिकीट काढून क्रिकेट म्याच पाहायला कोण जातं? फक्त एन्जॉयमेंटच असते ती. जे बुद्धिजीवी असतात ते एकतर शास्त्रीय आणि सुगम संगीत ऐकायला जातील नाहीतर घरात बसतील. असल्या शो मध्ये जाणार नाहीत.

भाते 19/10/2016 - 11:07
एका वेळी सलग १४ गाणी प्रत्यक्ष म्हणणे अशक्य आहे. पूर्वी मी टीव्हीवर एमजेच्या कॉन्सर्टस बघायचो त्यावेळी मला हाच प्रश्न पडायचा. सलग २ तास इतकी सगळी गाणी म्हणणे कसे शक्य आहे? मग लक्षात आले कि तो काही मोजकी गाणी प्रत्यक्ष गातो आणि बाकीची सगळी लिपसिंकिंग असतात. तीन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत मुग्धा वैशंपायनच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तीन तासाच्या कार्यक्रमात तिने दोन राग आणि चार गाणी म्हणाली. पण मध्ये गप्पा/मुलाखत आणि मध्ये गाणी असा कायर्क्रम असल्याने ते शक्य झाले. इथे तर बऱ्याच कलावंतांनी त्याचे समर्थन केले आहे.

दिलीप सावंत 19/10/2016 - 11:46
मराठीमधील सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात असे पण होऊ शकते असे मला वाटले नव्हते. याला तिथले व्यवस्थापक जबाबदार आहेत असे मला वाटते.

प्रदीप 19/10/2016 - 14:44
प्रथम लेखातील काही प्रश्नांना माझी उत्तरे: १. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? उ: नेहेमीच हे होते किंवा नाही, ह्याविषयी माहिती नाही. इथे तरी झाले असे दिसते. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? उ: ठाऊक नाही. खरे तर अगदी व्यवस्थित माहिती असल्याशिवाय एकाद्या कलाकाराच्या अशा शोविषयी काहीही सांगणे चुकीचे आहे. सौरा ह्यांनी अगदी लता, आशा ह्या तसे करत आसल्याचे कुठेतरी वाचले आहे, असे लिहील आहे. तर त्याचा दुवा असल्यास द्यावा. मी स्वतः आमच्या शहरात लताचा शो १९९५ साली पाहिला, आशाचा अलिकडे सुमारे ५ वर्षांपूर्वी पाहिला. ह्या दोन्ही शोंचे (वेगवेगळे) आयोजक अथवा त्यात बॅकस्टेजशी संबंधित व्यक्ति माझ्या ओळखीच्या असल्याने मी हे ठामपणे येथे सांगू शकतो, की त्या दोन्ही शोजमधे असे काही केले गेले नाही. वास्तविक काराओकी मोडमधे गाणे त्या दोघींना नवे आहे, अपरिचीत नच्व्हे, कारण अलिकडील बहुतेक सर्वच रेकॉर्डिंग्सही जवळजवळ तशीच करावी लागतात आणि त्या दोघींनीही ते व्यवस्थित केलेलेही आहे. पण हे त्यांचे 'नेटिव्ह मोड' नव्हे. तसेच लता १९७४ पासून नियमित रूपाने असे शोज करते आहे. त्या अगोदर अधूनमधून काही ना काही निमीत्ताने असे शोज व्ह्यायचे (युद्धे, फिल्मफेयर अ‍ॅवॉर्ड्स वगैरे). ह्या सर्व वेळी आताचे टेक्निक उपलब्ध नव्हते. सर्व शोज त्यावेळी लाईव्हच व्हायचे. ते त्यांना जास्त जवळचे वाटावे- तेव्हा आणि आताही. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? उ: असे नसावे. दोन्ही गोष्टी एकाचवेळी करता येतात की! ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? उ: ह्या प्रश्नाला काय म्हणावे? चित्रपट हा व्यवसाय आहे. त्याच्या रेकॉर्डींगचा खर्च प्रोड्यूसर करतो, त्यावेळी तो त्यातील रीटर्न्सवर लक्ष ठेऊनच करतो. समजा अगादी अजय- अतुल ह्यांनी तो खर्च स्वतः केला, तरी तेव्हा त्यांनी त्याच्या रीटर्न्सवर लक्ष ठेवले असेलच. म्हणजे काही व्यावसायिक आडाखे कुणीतरी (प्रोड्यूसर अथवा संगीतकार) ह्यांनी बांधले, ते रीस्क त्यांनी घेतले. त्त्याबद्दल त्याची गरज होती किंवा नाही ह्याची उठाठेव आपणास कशाला असावी? ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? उ: ते त्या शोचे एमसी असतील तर तशी सारसारव करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग होता. वेळप्रसंग मारून नेणे हे त्या व्यक्तिपेक्षा इतर कुणीही ऑन- द- स्पॉट करेल असे वाटत नाही. तेव्हा उत्तर 'हो' असे आहे. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? उ: एका अर्थी ही फसवणूक आहे. पण असा डिस्क्लेमर कुणीही देणार नाही. झालेल्या प्रसंगाची आता भरपूर शोभा माध्यमांतून झाल्याने प्रेक्षकांनी सजग व्ह्यावे! आता इतर काही टिपण्णी: मायनस ट्रॅकः हा काराओकीसाठी वापरतात तसा ट्रॅक. म्हणजे त्यात सर्व ऑर्केस्ट्रेशन व पर्क्युजन असते, फक्त गाणार्‍यांचे आवाज नसतात. तेव्हा काराओकीप्रमाणे, गायकांना त्या ट्रॅकवर गावे लागते. हा ट्रॅक अगोदर तयार केलेला असतो. मूळ रेकॉर्डिंगमधे आवश्यक तसे मल्टि- ट्रॅक्स असतील-- जसे ते अलिकडच्या सर्वच रेकॉर्डिंग्जमधे असतात- तर तांत्रिकदृष्ट्या, अशा रेकॉर्डिंगवरून मायनस ट्रॅक करणे अगदी सोपे आहे. जेव्हा मूळ रेकॉर्डिंगमधे हवे तसे मल्टी- ट्रॅक्स उपलब्ध नाहीत, तिथे (म्हणजे पूर्वीच्या सगळ्याच गाण्यांच्या रेकोर्डिंग्ज), अलिकडे सहज व स्वस्तात उपलब्ध असलेली काही सॉफ्टवेयर अ‍ॅप्लिकेशन्स वापरून असा ट्रॅक तयार करणे शक्य आहे. असे का करत असावेत? - तर तुम्हाला काही भव्यदिव्य दाखवायचे आहे, म्हणजे १५ - २० व्हायोलिन्स, अ‍ॅकॉर्डियन,,फ्लूट्स, सगळी पर्क्यूजन वाद्ये, ऑक्टोपॅड, सिंथेसायजर्स, सॅक्स इत्यादी-- तर ते तसेच्या तसे अ‍ॅकॉस्टिक्स फारसे नसलेल्या हॉलमधे, अथवा उघड्या प्रेक्षागृहात- व्यवस्थित प्रत्यक्ष वाजवून त्यांचा उचित मिक्स करून ते प्रेक्षकांपुढे पोहोचवणे, अतिशय जिकीरीचे आहे. ह्यात बरेच रिस्क आहे, मुळात इतके फॅक्टर्स आहेत (जसे वादकांना उपलब्ध असलेली जागा, त्यांची एकमेकांशी असलेली प्रॉक्झिमीटी, त्यांना मिळणारा 'फोल्डबॅक साऊंड', गायका- वादकांचे त्यांच्या माईक्सच्या समोरून हलणे इत्यादी ) की थोड्या वेळात हे सगळे तिथे मांडून, त्याची टेस्ट घेऊन, मग ते रीतसर कसलाही प्रॉब्लेम न येता (फीडबॅक-- जो 'कुंई.... ' असा आवाज कधीतरी येतो तो, एकाद्या वाद्याचा आवाजच येतो आहे, येत नाही...) प्रत्यक्ष सादर करणे जवळजवळ अवघड आहे. त्यासाठी अतिशय काटेकोर प्लॅनिंग करावे लागेल, सादरीकरण जिथे करायचे आहे, तेथील परिस्थिती लक्षात घेऊन त्यात आवश्यक ते फेरबदल करावे लागतील, ह्यात बराच वेळ व पैसा खर्चावा लागेल. इतके सगळे करण्यापेक्षा काराओकीचा मार्ग तुलनेने बराच सोपा. त्यात गाणेही प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचते, आणि ते सगळे दिसतेही भव्य- दिव्य. अजय अतुल ह्यांनी मटाच्या खुलाशाच्या बातमीत 'लाईव्ह कन्सर्टमधे बॅकग्राऊंडचा टेंपो कमीजास्त होत असतो म्हणून असे करावे लागते' असे म्हटले आहे, ते मलातरी अगम्य वाटते! तुम्ही लाईव्ह गाता आहात, सर्व म्युझिकही लाईव्हच आहे, मग टेंपो कमीजास्त झालाच तर प्रॉब्लेम काय आहे? हे काही पटत नाही. ही सारवासारव तर नव्हे? अशा तर्‍हेच्या सर्वच ऑर्केस्ट्रांच्या कार्यक्रमांतून हे असेच केले जाते का? मी अलिकडे यू- ट्यूबवर अनेक जुन्या हिंदी चित्रपट गीतांचे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम पहात आहे. हे सर्व त्या त्या ऑर्केस्ट्राच्या चालक- मालकांनीच अपलोड केलेले आहेत, तेव्हा त्यात काही खोटे- चूक नसावे. माझे ह्यांविषयीचे एक सर्वसाधारण निरीक्षण असे आहे की, जिथे अगदी थोडी वाद्ये आहेत-- एक सिंथ, एक फ्ल्यूट, एकादी सतार, थोडे पर्क्त्या, थोडक्यात जिथे १५ ~ २० व्हायोलिन्स, चेल्लो, सॅक्स वगैरे नाहीत-- तिथे ते कार्यक्रम संपूर्ण लाईव्ह पेश केले गेले. हा माझा ढोबळ अंदाज आहे. आणि कुणास ह्याची काही उदाहरणे पहायची असतील तर माझ्याशी खरडीतून संपर्क साधावा, काही दुवे देता येतील.

In reply to by प्रदीप

खेडूत 19/10/2016 - 15:29
सहमत. मला काय म्हणायचे ते आपण नेमके आणि सविस्तर लिहीलेत. गेल्या वीस वर्षांत अनेक लाईव्ह कार्यक्रम पाहिले-ऐकले. आशाताईंचा 'नक्षत्रांचे देणे' हा त्यात सर्वांत आवडलेला कार्यक्रम! १९९३ च्या काळात मर्यादित तन्त्राच्या मदतीने किती सुंदर कार्यक्रम करायच्या त्या. अल्बर्ट हॉलचा लतादीदींचा कार्यक्रम आजही ऐकावासा वाटतो. पुढे बर्लिन, स्टुट्गार्ट, लिवरपूल आणि पुण्यात अजय-अतुल, शंकर महादेवन हे सगळे कार्यक्रम पहायला मिळाले, आणि आवडलेही. मात्र इतकय सराईतपणे अलिकडे ट्रॅक वापरत असतात हे नवीनच होते, म्हणून धक्का बसला इतकेच. व्यवसाय कुणी कसा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला असे कार्यक्रम आवडणार नाहीत हे निश्चित. बाकी स्टुडिओची उठाठेव उत्सुकतेपोटी केली, कारण एकच गाणे कुठले ते वेगळे-विशेष असे कळले नाही, थेटरात बसूनही. मकरंद अनासपुरेंचे सामाजिक कामात योगदान आणि संवेदनशीलता पाहून तो प्रश्न पडला. अन्य कलाकार असता तर वाटले नसते. स्वतः अनासपुरेंनाही ते करताना वाईट वाटलेच असेल. निव्वळ एंजॉय करायला जाणार्‍यांनी तसे जावेच. नको कोण म्हणतंय! आम्हाला फरक पडतो इतकेच.

In reply to by खेडूत

प्रदीप 19/10/2016 - 19:20
मलाही बसला. ह्या प्रोग्राम्समधे असे वाजवले जाते हे मला माहिती नव्हते. बाकी स्टुडिओची उठाठेव उत्सुकतेपोटी केली, कारण एकच गाणे कुठले ते वेगळे-विशेष असे कळले नाही, थेटरात बसूनही. म्हणजे त्यांच्या त्या प्रचंड खर्चाचे जस्टिफिकेशन झालेले दिसत नाही. मी 'उठाठेव' वगैरे कडक शब्द वापरल्याबद्दल मात्र माफी मागतो, राहवले नाही म्हणून तसे लिहून गेलो. निव्वळ एंजॉय करायला जाणार्‍यांनी तसे जावेच. नको कोण म्हणतंय! आम्हाला फरक पडतो इतकेच. १००% सहमत. फरक मलाही पडलाच आहे.

In reply to by प्रदीप

मराठी_माणूस 19/10/2016 - 17:47
सौरा ह्यांनी अगदी लता, आशा ह्या तसे करत आसल्याचे कुठेतरी वाचले आहे, असे लिहील आहे. तर त्याचा दुवा असल्यास द्यावा.
मीही आशा, लता ही नावे वाचुन माझ्या वरच्या एका प्रतिसादात संदर्भ मागीतला आहे. कारण पुर्वी हे तंत्र जेंव्हा उपलब्ध नव्हते तेंव्हा ही असे लाइव्ह कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत.

In reply to by मराठी_माणूस

पुंबा 19/10/2016 - 18:27
मी असे फेबूवर, मुकेश माचकर यांनी एका कमेंटमध्ये, आणि बिपीन कुलकर्णी यांच्या याविषयीच्या पोस्ट्वरील कमेंट्समध्ये वाचले आहे. अर्थात माझ्याकडे याचा आणखी काही पुरावा नाही.

In reply to by मराठी_माणूस

प्रदीप 19/10/2016 - 19:36
मराठी दैनिकातील पत्रकार आहेत. दुसरे कोण आहेत, माहिती नाही. पूर्वी लताचे (आशाचे माहिती नाही, पण,ह्याबाबतीत फरक नसावा) दूरदर्शनवर कार्यक्रम कधीमधी व्ह्यायचे, (मदनमोहन १९७५ साली गेल्यावर तसा एक त्याच्यावरील कार्यक्रम झाला होता, ते मला आठवते) तेव्हा तेथील ध्वनियंत्रणेच्या व अ‍ॅकॉस्टिक्सच्या लिमीटेशनमुळे ती गाणी 'फोल्डबॅक' मधे चित्रीत केली गेली, असे मी तेथील काही कर्मचार्‍यांकडून ऐकले होते. म्हणजे गीत रेकॉर्डींग स्टुडियोत प्रथम ध्वनिमुद्रित केले गेले, व त्याचे चित्रीकरण लिप्सिंक करून केले गेले, असा तो प्रकार. हे असे असेल तर इतरही काही कलकारांच्या बाबतीत तसे केले गेले असण्याची शक्यता आहे. ह्यामागे जाबाबदारी त्या त्या कलाकारांची नव्हे, हे उघड आहे. असो.

सुबोध खरे 19/10/2016 - 18:26
केवळ एक तानपुरा आणि एक तबला असला तरी खरा गायक सप्तस्वरांचा स्वर्ग उभा करील. अन्यथा पन्नास वाद्यांचे कडबोळे करून जगणारे गायक संगीतकार कमी नाहीत अशा अर्थाचे श्री पु ल देशपान्डे यांचे वाक्य आठवले. भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचे "शिवकल्याण राजा" हे गीत आजच (परत) ऐकले. केवळ मागे तानपुरा सोडला तर इतर कोणतेही वाद्य नसताना अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू उभे राहतील इतके भावपूर्ण गायन आहे.(किंवा श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान ऐकून पहा) त्याची आठवण झाली.

In reply to by सुबोध खरे

प्रदीप 19/10/2016 - 19:28
पुल, जीए हे सगळे मला अतिशय माननीय, वंदनीय आहेत, पण म्हणून त्यांची सगळी मते, विधाने मान्य आहेत असे नव्हे. नाहीतर टाईट जीन्स घातलेली स्त्री पाहून ती 'ढुंगणावरचे रूधिराभिसरण' दाखवते आहे, असे मला वाटत रहिले असते. चित्रपट संगीत व शास्त्रीय अथवा सुगम संगीत ह्यांत काही मूलभूत फरक आहेत. त्यांनुसार त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. हे लक्षात ठेऊन टिका करावी. अन्यथा, माझ्यासारख्या फिल्म संगीत (व तेही ६० - ७० जणांचा, ब्रास, विंड, पर्क्युजन अशांनी नटलेला भरजरी) गाण्यांच्या चाहत्याला 'काय ते तुमचे 'ओ ...' वगैरे अशी टिका करता येणे कठीण नाही. पण हे सगळे विषयाला सोडून झाले.

सुबोध खरे 19/10/2016 - 20:31
नाही. एवढ्या मोठ्या ताफ्यामध्ये गायकाची गरज आहे का ? असे वाटले. कारण तो ही आवाज आता संगणकावर काढता येतो. आणि इथे लाईव्ह कार्यक्रम काही लोक त्यांच्या "दर्शनासाठी" गेले होते असे वाटत नाही. बाकी घरात "बोस" किंवा "हर्मन" सारखी उच्च दर्जाची होम थिएटर असणारी मंडळी भारतात कमी नाहीत. हे जर असे "रेकॉर्डेड" (ध्वनिमुद्रित) संगीत ऐकायला कोणी "लाईव्ह" कार्यक्रमाला भरपूर पैसे मोजून जात असतील असे वाटत नाही. बाकी चालू द्या.

रेवती 20/10/2016 - 19:02
अजय अतुलला लाईव्ह बघण्यासाठी जातात वगैरे मान्य नाही. लाईव्ह कार्यक्रमात आणि रेकॉर्डेड कार्यक्रमात वेगळेपणा आहे आणि असायलाच हवा. हे प्रिरेकॉर्डेड असले तरी चालतय वगैरे न्यू नॉर्मल आहे. मुळात तसे नसावे. शास्त्रीय संगिताच्या मैफिली जर लाईव्ह होऊ शकतात तर हे कार्य्क्रम का नाही? शेकडो वादक घेऊन येणे (गरज आहे की नाही माहित नाही) किंवा आकाशातून धरणीवर पडणे, नाहीतर पृथ्वीवरून आकाशात झेप घेऊन गाणे वगैरे अचाट करण्यापेक्षा जी गाणी गायचीयेत ती रेकॉर्डेडपेक्षा वेगळी भासणार आहेत याची कल्पना प्रेक्षकांना असायला पाहिजे. मलातरी लाईव्ह कार्य्क्रम आवडत नाहीत. गाणे ऐकताना गाण्यावर लक्ष देता येत नाही तर झगमगीत कपडे, काहीतरी करामती पहाव्या लागतात. बरं, हे केलं नाही तर कार्यक्रम निरस वाटण्याचा धोका असतो हेही मान्य! परदेशातल्या कुठल्यातशी लाईव्ह शोमध्ये कविता कृष्णमूर्ती हिने इतकी साधी साडी नेसली होती की ते ही बरे वाटत नव्हते (तूनळीवर दिसले). एकंदरीतच विचित्र प्रकरण असतं असं वाटतय. कलाकारांसाठीही ते फारसं सोयिचं नसावं. एखादे दिवशी घसा बसलेला असला (खासकरून परदेशी बर्फाळ थंडी असताना, जास्त मैफिली करून पिट्टा पडलेला असताना), दमलेला आवाज, वादकांपैकी कोणाची तरी फ्लाईट उशिरा, लवकर येणे वगैरेतून जमवाजमव करायची हे सोपं असेल असं नाही. हिकडे राहूल देशपांडेच्या कार्य्क्रमालाही एकदा उशीर झाला होता (त्या कार्य्क्रमाला मी गेले होते). कारण फार सिरियस नसेल पण उशीर होऊ शकतो.

७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल
टाकावाच. त्यामुळे वादकांच्या ताफ्याचा खर्चही वाचेल व कमी दरात लोकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा 'लाईव्ह' शो बघायला मिळेल.

In reply to by एस

मोदक 18/10/2016 - 13:40
हेच बोलतो... ..आणि ही नवीन गोष्ट असेल असे वाटले नव्हते. एक साधा विचार करा. "मूळ गाण्यातला प्रत्येक सूर जुळवत, वाद्यांचे त्या त्या ठिकाणचे आवाज आजिबात न चुकता योग्य ठिकाणी वाजवत आणि स्टेजवर न दमता इतकी नाचानाची करत तेच गाणे तस्सेच्च म्हणले जाणे" आपल्याला दिसते तेंव्हा मागे गाणे सुरू आहे आणि गायक लोक्स नाटक करत आहेत हे सहज लक्षात येते. हल्ली फॉरवर्ड होत असलेल्या एक दोन रिअ‍ॅलिटी शो मधल्या मुलांच्या गाण्यालाही हीच शंका येते. अर्थात याला अपवाद वाटलेले अनेक कार्यक्रम आहेत.. सगळेच लोक असे करतात असे नक्कीच नसावे.

In reply to by मोदक

अनुप ढेरे 18/10/2016 - 15:58
स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं गाणं देखील खूप गायक ऑटो ट्यून मधून काढतात असं ऐकलेलं आहे ज्यात बेसुर सूर ठीक करता येतात सॉफ्टवेअरमधून. स्टूडिओमध्येदेखील जर एवढी वेळ येत असेल तर लाईवमध्ये बरोब्बर सुरात गाणं अशक्य आहे.

किसन शिंदे 18/10/2016 - 12:36
बॉलीवूडमध्ये हा प्रकार तर पूर्वीपासूनच सुरू आहे. आता परवाच्या लोकसत्तामध्ये कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीमधील आनंदजी यांनी किशोर कुमारबाबत सांगितलेला किस्साही अशाच प्रकारचा होता. त्या लेखातला काही भाग..
त्या वेळी किशोरवर आकाशवाणीचा अघोषित बॅन होता. ‘दूरदर्शन’वरही त्याची गाणी लागत नसत. आमच्या कार्यक्रमासाठी ‘दूरदर्शन’ने त्याला बोलावलं, पण त्यानं नकार दिला. आम्ही प्रयत्न करतो, असं म्हणालो. किशोर म्हणाला, ‘‘मी गाणार नाही.’’ मी म्हणालो, ‘‘अरे गाऊ नकोस. अ‍ॅक्टर म्हणून ये.’’ तो तयार झाला. मी एक युक्ती केली. ती आज उघडी करतोय. आम्ही मागे साऊंड ट्रॅक लावला व किशोरनं त्यावर ओठ हलवलेत फक्त. पण तो कार्यक्रम हिट झाला.

In reply to by किसन शिंदे

पुंबा 18/10/2016 - 12:39
ही युक्ती नाही तर अत्यंत गलीच्छ फसवणूक आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ते निर्लजापणे सांगतात, म्हणून कलावंतांची कदर केली जात नाही या देशात. सगळ्यांचे पाय मातीचेच असतात हे खरे.

पुंबा 18/10/2016 - 12:36
१. हो २. दुर्दैवाने हो. अगदी लता, आशा, रेहमान वगैरेसुद्धा असे करत असत असे काल वाचले. ३. हो ४. चार पैसे फेकले की वृत्तपत्र नावाचे कुत्रे गोंडा घोळत येते असे ऐकून आहे. ५. त्याची गरज होती आणि सैराट deserved it. ६. आजीबात नाही. मुळात अश्या फसवनुकीत सहभाग घेने हेच प्रोफेशनल एथिक्सच्या विरोधात आहे. ७. मागता यायला हवेत. प्रेक्शकांची ही खुप मोठी फसवणूक आहे. ग्राहक न्यायालयात याबद्दल दाद मागता यायला हवी. अर्थात हे सिद्ध कसे करणार हा प्रश्न आहेच.

१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? >>>>>हो, बहुतेक सर्व भारतीय कार्यक्रम (चित्रपटसंगीताशी संबंधित) हे रेकॉर्डेड असतात व आपल्यासाठी ते 'लाईव्ह असल्याचा आभास केला जातो. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? >>>>> (चित्रपट संगीताशि संबंधित बहुतेक सर्व कार्यक्रम) हो. सर्व अ‍ॅवॉर्ड सोहळ्यातील गाण्याचे कार्यक्रमसुद्धा. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? >>>>> त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने असं नव्हे, तर जास्त परफेक्शन साठी होत असेल. झटपट पैशांबाबतः तो कोणाला नको असतो? ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? >>>>> दिसतंय की! लोकसत्ता ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? >>>>> याड लागलं आणि सैराट झालं जी या दोन गाण्यांचा वाद्यमेळ अफाट सुंदर आहे. त्याला (जर)साठ-सत्तर लाख खर्च केले असतील, तर ते नक्कीच पैसा वसूल काम झालंय! ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? >>>>> अर्थात! लाईव्ह कार्यक्रमात/नाटकात/स्टेज शो मध्ये/सत्कार कार्यक्रमात/राजकीय सभांमध्ये अशा गडबड गोष्टी होतच असतात. त्यातून कार्यक्रम जास्तीत जास्त स्मुथली पुढे नेण्यात सूत्रसंचालकाचे खरे कसब असते. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? >>>>> डिस्क्लेमर वगैरे कोणी टाकणार नाही. तिकिटाचे पैसेही परत मागता येतील असे वाटत नाही. युक्तिवाद असा असू शकतो: ' अजय अतुल लाईव्ह असा कार्यक्रम होता. अजय अतुल तिथे प्रत्यक्ष उपस्थित होऊन गाणी गायल्याचा प्रत्यक्ष अभिनयही करीत होते. ते प्रत्यक्ष गाणी म्हणतील असा कुठेही उल्लेख आम्ही केला नव्हता' *माझी मते नेहमीच लवचिक असतात.

In reply to by तुषार काळभोर

खेडूत 18/10/2016 - 13:14
:) मकरंद अनासपुरेंच्या अन्य सामाजिक कामांमुळे त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असतात, त्यामुळे असे वाटले, अन्यथा सूत्रसंचालकाने प्रसंगावधान राखून वेळ मारून नेणे योग्यच.

वेल्लाभट 18/10/2016 - 13:31
म्हणून सांगतो; मैफिल ऐकावी शास्त्रीय, उपशास्त्रीय, अगदी सुगमही. ज्यात गायक वादक समोर स्प्ष्ट दिसतील. कॉन्सर्ट च्या नावाने पैसे वाया घालवू नये.

वरुण मोहिते 18/10/2016 - 14:15
बायकोच्या हट्टामुळे. बाकी असा होतंच असतं त्यात काही नवीन नाही पण शास्त्रीय संगीत किंवा एखादा बॅण्ड परदेशी कलाकारांचा लाईव्ह बघणं हे बेस्ट त्यापेक्षा .

In reply to by आदूबाळ

विशुमित 18/10/2016 - 16:35
जाणीव पूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. काही अंशी मला ही तेच वाटत. http://www.loksatta.com/manoranjan-news/atul-gogavales-clarification-over-lip-syncing-row-1320720/

In reply to by आदूबाळ

खेडूत 18/10/2016 - 16:41
त्यांचं म्हणणं असं दिसतंय की मायनस ट्रॅकवर मुद्रित संगीताच्या साथीत ते खरंच गात होते आणि बंद पडून पुन्हा सुरू होताना टेक्निशियनने प्लस ट्रॅक लावला. हे खरं मानलं तर आधी वादक वाजवल्याचा अभिनयच करत होते असा होतो!

In reply to by खेडूत

आदूबाळ 18/10/2016 - 17:08
एग्जॅक्टली! म्हणूनच "मग ऐंशी वादकांचा ताफा आम्ही का नेला असता" वगैरे पोकळ वाटतं. @विशुमितः जाणीवपूर्वक गैरसमज का बरं पसरवले जातील?

कंजूस 18/10/2016 - 15:48
हजारो वॅाट्स स्पिकर ध्वनिवर्धक लावून अशा मोकळ्या जागेत शक्य नसावे.कारण नाजूक वाद्यांचा आवाज,गायकाचा आवाज माइक्रोफोनने पकडून मोठा करायचा उघड्यावर सोपे वाटत नाही. शास्त्रिय गायक ओरडून गात नाहीत.

बाजीप्रभू 18/10/2016 - 16:11
२००३ साली अमेरिकेच्या कुठल्यातरी इनॉग्रेशन डेच्या दिवशी गायिका बेयोँसे आणि तिचा वाद्यवृंद नाटक करतांना रेड हँडेड पकडला गेला होता. लोकांनी आणि मीडियाने खूप "पिसं" काढली, माफी मागायला लावली. ओबामाभाऊ सुद्धा रेड हँडेड पकडला गेला होता एकदा. हा पहा व्हिडीओ, Obama

कंजूस 18/10/2016 - 16:56
गायक तुमच्यासमोर तीन तास आले,कार्यक्रम सादर केला आणखी काय पाहिजे? हीच गोष्ट शाळाकॅालेजच्या शिक्षणाची आहेच. तुम्ही चांगल्या संस्थेत पैसे खल्च करून मुलांना पाठवता मग आखी दहापट फी क्लासची का भरता? तुमची मुलं तुम्हाला फसवतातच ना?

In reply to by कंजूस

खेडूत 18/10/2016 - 17:06
तसे नव्हे. ही तुलना पटली नाही. गायक तुमच्यासाठी गायला येतोय म्हणून हजार रूपये तिकीट काढून आपण जातो. गाणे शंभर टक्के ' मूळ आहे तसेच' ऐकण्याची अपेक्षा नसतेच. तान्त्रिक/ नैसर्गिक मर्यादा येत असतील तर तसे स्पष्ट सांगावे, हरकत असायचे कारण नाही. शंकर महादेवन, शौनक अभिषेकी किंवा राहुल देशपांडे यांची मैफिल ऐकली तर अनेकदा गाणे मूळ गाण्यापेक्षा पूर्ण वेगळेच सादर केले जाते. ते चांगलेही वाटते.

In reply to by खेडूत

कंजूस 19/10/2016 - 03:58
हवा येऊ द्या कार्यक्रमात बरीच गाणीे तरी माइक सिस्टिम स्थानिकच असते ती मंत्र्यांच्या भाषणात वापरतात.

पद्मावति 18/10/2016 - 17:23
जर प्री रेकॉर्डेड ट्रॅक वर ही मंडळी लीप सिंक करत असतील तरीही हरकत नाही. फक्त मग त्याला लाईव शो म्हणू नये इतकेच मला वाटते. बाकी कॉन्सर्ट मधे प्रचंड ऑडियेन्स मधे खर्या गाण्याचा बहुतेक आवाजही नीट पोहोचणार नाही आणि लाईव शो मधे गायकाच्या किंवा वाद्यवृंदाच्या चुकीमुळे पूर्ण शोचा विचका होऊ शकतो त्यामुळे हे प्री रेकॉर्डेड प्रकार सुरू झाले असावेत. ते ठीकच आहे पण मग ते स्पष्टपणे सांगावे.

रेवती 18/10/2016 - 17:36
१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? उत्तर- हो, हा प्रकार होतो असेच फार्फार वर्षांपूर्वीच ऐकले होते. आपण त्याची सवय करायला नको, या कार्य्क्रमान्ला जाऊ नये असे मला वाटते. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? उत्तर- तसे ऐकले तरी आहे. शिवाय या धाग्यानिमित्ताने जर एखादा तूनळीवरील लाईव्ह शोचा व्हिडिओ पाहिलात तर आवडण्यासारखे काही दिसत नाही. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? उत्तर- अजय अतुल काय किंवा कोणी दुसरे काय, मर्यादा प्रत्येकालाच असतात. जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमातील एक गाणे ऐकण्यात आले, त्यातील संगीत लक्षपूर्वक ऐकले तर सैराटमधील एका गाण्याची आठवण यावी असे आहे. ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? उत्तर- ही बातमी होती हे माहित नसल्याने पास. ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? उत्तर- माहित नाही. तरी संगीत चांगले झाले असल्यास ठीक आहे असे म्हणावे लागेल. ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? उत्तर- असे केले हे माहित नव्हते पण केले असल्यास चुकीचे आहे तरी मित्र मित्रांना सांभाळून घेतायत असे म्हणावे लागेल, फक्त सांभाळून घेण्याचा मार्ग प्रेक्षकांच्या खिश्यातून जातोय. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? उत्तर- तिकिटांचे पैसे परत मागता यावेत असे वाटते.

फेरफटका 18/10/2016 - 19:37
हा प्रकार नवीन नाही. माझा एक अनुभव म्हणजे १९९९ साली ३१ डिसेंबर चा एक शो आम्ही परगावी एका रिसॉर्ट मधे केला होता. तेव्हा गायक / निवेदक जरी लाईव्ह गात असले, तरी सगळं संगीत हे ट्रॅक वर होतं आणी मागे ठेवलेल्या वाद्यांवर बसलेले वादक 'अभिनय' करत होते. ह्या प्रकाराचं आश्चर्य वाटावं ईतका हा प्रकार नवीन नक्कीच नाहीये. उघड्या मैदानात, प्रेक्षकांच्या जल्लोशात, नाचताना वगैरे गाण्याचे सूर संभाळता येतील हे खूप अवघड आहे. इच्छूकांनी चालत चालत गाणं गुणगुणून बघावं.

शब्दबम्बाळ 18/10/2016 - 20:19
बऱ्याचदा तांत्रिक कारणामुळे(स्पीकर अथवा माईक खराब) लाईव्ह कार्यक्रम खराब होऊ शकतो. त्यातल्या त्यात तो कार्यक्रम संगीताचा असला कि जास्तच काळजी! लोक भरमसाठ किमतीची तिकिटे काढून येतात त्यांना दोषरहित आणि खिळवून ठेवणारा अनुभव देण्यासाठी लिपसिंक केले जात असावे. 13-14 वर्षांपूर्वी शाळेत असताना नाटक सादर करताना आम्हीही हि गोष्ट केली होती. शाळेमध्ये मिळणारे माईक कायम मधेच खराब व्हायचे किंवा किssssss कुssss असले चित्र विचित्र आवाज काढायचे ज्याने सादरीकरणातली सगळी मजा निघून जायची. हे टाळण्यासाठी आम्ही आख्खे नाटक कॅसेटवर रेकॉर्ड केले. हे करण्यामागे प्रेक्षकांना चांगले सादरीकरण पाहाता यावे हाच हेतू होता आणि रेकॉर्डिंग वर लीपसिंक करायला सुद्धा खूप मेहनत लागली होती! मग इथे जर यांनी पूर्ण गाणी लिपसिंक केली (असतील) तर त्यामागे देखील मेहनत असणारच आहे... अरिजित सिंग ने सादर केलेला रेडिओ मिरची अवॉर्ड मधला परफॉर्मन्स खूप छान आहे! त्याचा ऑडिओ जवळपास रोज ऐकतो. पण त्या कार्यक्रमात देखील त्याने लिपसिंक केले होते! :) गाण्याची लिंक, 3:33 मिनिट च्या इथे पहा, गाण्यात 'हलकासा' शब्द आहे पण तो 'थोडासा' असे बोलतो! ;)

संदीप डांगे 18/10/2016 - 20:21
खरं तर बोलण्यासारखं काहीच नाही आणि खूप काही आहेही, अनेकांनी इथे मांडले आहेसुद्धा, Live concert हे फक्त शास्त्रीय संगीत व रॉक यांचीच टिकेट काढून बघायला जावी, बाकी सगळा काळाबाजार आहे! पूर्वमुद्रित रेकॉर्डवर गाणारे लोक ज्या कॉन्सर्ट सादर करतात त्यात गाणे ऐकण्यापेक्षा गाणारे, जे सेलिब्रिटी आहेत त्यांना गाताना बघायला जाणे जास्त महत्वाचे असते, कोणी दुकानाची फीत कापायला येणे आणि हि गाणी ऐकायला जाणे यात फार फरक नाही. सेलेब्रिटी प्रत्यक्ष बघायला मिळणे हेच फलित, बाकी काही नाही, तसेच जे काही लोक्स पैसे लुबाडल्याबद्दल कुरबुर करतायत ते लोक ते ऐकत असलेले प्रत्येक गाणे, बघत असलेला प्रत्येक चित्रपट विकत घेऊन ऐकत/बघत असतील तर माझा त्यांच्या फसवल्या गेल्याच्या भावनेला बिनशर्त पाठिंबा आहे. अन्यथा ह्या कलाकारांच्या कलाकृती फुकट उपभोगायच्या आणि त्यांनी फसवले कि बोंबाबोंब करायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. ;)

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या 18/10/2016 - 21:47
एका चुकीचे समर्थन करण्याकरता दुसर्‍या चुकीकडे बोट दाखवणे काही पटत नाही. काही लोक फुकट डिव्हीडी, व्हिडियो बघतात म्हणून लाइव्ह कन्सर्ट मधे गाणे म्हणण्याचे नाटक करणे न्याय्य ठरते हे काही पटत नाही. सगळे कॉन्सर्टला आलेले तमाम प्रेक्षक हे फुकट डीव्हीडी वालेच होते ह्याला काय पुरावा?

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या 18/10/2016 - 22:17
जर सगळे प्रेक्षक बेकायदा गाणी ऐकणारे आहेत असा काही पुरावा असता तर सरसकटीकरण कदाचित (होय, कदाचितच) योग्य ठरले असते. पण तसे काही नसले तर तो मुद्द पूर्ण गैरलागू आहे. तिकिट काढून आलेल्या ग्राहकाला पूर्ण माहिती न देता असा प्रकार करणे हे चूकच. मग तक्रार करणारे गिर्‍हाईक हे आदर्श नागरिक आहे का, त्याने वा तिने कधी कुठला कायदा मोडला आहे का असा उलटा कांगावा करणे चूक आहे. अशा प्रकारचा आदर्श नागरिक नसेल तर त्याला वा तिला अशी तक्रार करण्याचा हक्कच नाही वगैरे म्हणणे पूर्णपणे गैरलागू आहे.

In reply to by हुप्प्या

संदीप डांगे 19/10/2016 - 00:23
तसेच सगळे प्रेक्षक बेकायदा गाणी ऐकणारे नाहीतच ह्याचाही काय पुरावा आहे? माझे विधान कोणतेही प्रामाणिक प्रेक्षक उगाच अंगावर घेणार नाहीत, पण चोराच्या मनात चांदणे असेल तर नाईलाज आहे.

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या 19/10/2016 - 07:15
प्रेक्षकांच्या ग्राहक म्हणून हक्काचा हा प्रश्न आहे. ज्यांनी तिकिटे काढून हा शो पाहिला त्यांची फसवणूक झाली आहे का हाच चर्चेचा मुद्दा आहे. आता त्याला प्रेक्षक स्वत: किती प्रामाणिक आहेत वगैरे फाटे फोडणे हे साफ गैरलागू आहे. काही मोजके वा बरेच वा सगळेच प्रेक्षक कधी ना कधी वा कधीतरी बेकायदा सिनेमे बघत वा बेकायदा गाणी ऐकत असतील का ह्या मुद्द्याचा प्रस्तुत चर्चेशी काहीही संबंध नाही. उपस्थित प्रेक्षकांपैकी ज्यांना आपली फसवणूक झाली असे वाटते आहे त्यांना त्याची तक्रार करण्याचा हक्क आहे. एखादा फसवणूक झाली म्हणून तक्रार घेऊन आला तर तू कधी बिनातिकिट प्रवास केला असशील तर तुला फसवणुकीची तक्रार दाखल करायचा हक्कच नाही असे म्हणण्यासारखे आहे. केवळ आदर्श, कधीही कायदा न मोडलेल्या स्त्री वा पुरुषालाच फसवणुकीची तक्रार करण्याचा हक्क आहे असे म्हणणे हे आततायीपणाचे आणि चूक आहे. जाता जाता: मी आजपर्यंत असले कन्सर्ट कधी पाहिले नाहीत आणि भविष्यात पाहीन असे वाटत नाही त्यामुळे चोराच्या मनात चांदणे वगैरे वैयक्तिक आरोपांचे आणखी नवीन फाटे फोडू नये. मुख्य मुद्द्यावरच रहावे ही विनंती.

In reply to by हुप्प्या

संदीप डांगे 19/10/2016 - 07:55
माझा काय मुद्दा होता हे तुम्ही नीट समजून घेतला नाही तेव्हा असो. बाकी आता फसवणुकीची तक्रार दाखल करण्याबद्दल, तर कायदेशिरपणे तसे कोणीही करू शकतो, ग्राहक म्हणून प्रत्येकाचा तो हक्क आहे, माझा मुद्दा नैतिकतेबद्दल होता, कायदेशीर बद्दल नाही, तो मुद्दा वेगळा. कोर्टात ही फसवणूक सिद्ध करणे अवघड आहे त्यामुळे असो. अजय अतुलवर बहिष्कार घालत असतील तरी माझं काही वाया जात नाही.. ;) आपण सिग्नल मोडायचा पण तोच दुसर्याने मोडला कि बोंबाबोंब करायची यात तुमच्या मते काही गैर नसेल तर ठीक आहे,असो. तरीही मी सर्वांच्या सर्वच प्रेक्षक अगदी तस्सेच दांभिक असतात असं कुठेही कधीही म्हटले नाही - फक्त एक दृष्टिकोन दिला, विनाकारण माझ्या मुद्द्याला गैरलागू म्हणण्याची गरज नव्हती, नसलेले शब्द माझ्या तोंडी कोंबण्याची गरज नव्हती, तेव्हा तेही असोच. चर्चेबद्दल धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

तसेच जे काही लोक्स पैसे लुबाडल्याबद्दल कुरबुर करतायत ते लोक ते ऐकत असलेले प्रत्येक गाणे, बघत असलेला प्रत्येक चित्रपट विकत घेऊन ऐकत/बघत असतील तर माझा त्यांच्या फसवल्या गेल्याच्या भावनेला बिनशर्त पाठिंबा आहे. अन्यथा ह्या कलाकारांच्या कलाकृती फुकट उपभोगायच्या आणि त्यांनी फसवले कि बोंबाबोंब करायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. ;) ही पण बाजू मान्य

In reply to by संदीप डांगे

हुप्प्या 22/10/2016 - 05:29
-- आपण सिग्नल मोडायचा पण तोच दुसर्याने मोडला कि बोंबाबोंब करायची यात तुमच्या मते काही गैर नसेल तर ठीक आहे,असो. इथे जे दोन गुन्हे आपण एकाच पारड्यात तोलत आहात ते एकसारखे नाहीत. एका बाजूला काही कलाकारांनी आपले नाव वापरुन हजारो प्रेक्षकांना लाईव्ह शोची तिकिटे विकली आहेत. आणि प्रत्यक्षात शो लाईव्ह नव्हताच. दुसर्या बाजूला काही प्रेक्षकांनी कधीतरी फुकट वा स्वस्तात बेकायदा पद्धतीने गाणी ऐकली असतील असा आपला दावा. हे दोन पूर्ण दोन वेगळे गुन्हे आहेत. वेगळ्या पातळीवरचे गुन्हे आहेत. दोन्ही गुन्ह्यांकरता वेगळ्या शिक्षा आहेत. ह्यातला दोन नंबरचा गुन्हा ज्यांनी केला आहे त्यांना एक नंबरच्या गुन्ह्याबद्दल दाद मागायचा हक्क नाही हा आपला तर्क साफ चुकीचा आहे. त्याला कायदेशीर वा नैतिक आधार मलातरी आढळलेला नाही. बेकायदा गाणी ऐकणे वा पहाणे हा एक स्वतंत्र विषय आहे. तोही अत्यंत किचकट विषय आहे. लाईव्ह शो बाबतच्या फसवणूकीचा मुद्द्दा चर्चेत असतना तो उकरुन काढण्याचे प्रयोजन समजले नाही.

रॉजरमूर 18/10/2016 - 20:42
शकिरा ......... शकिरा ने ही 2006 मध्ये जर्मनीत त झालेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या उदघाटनाला हाच प्रकार केला होता . त्यावेळेस तिने "हीप्स डोन्ट लाय " या गाण्याचे "बाम्बो" हे रिमिक्स व्हर्शन गायले होते . त्या प्रचंड स्टेडियम मध्ये प्रेक्षकांच्या कोलाहलात हा परफॉर्मन्स तिने दिला होता . व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसतंय की ती ओठ हलवतेय आणि वादक नाटक करताहेत . बाम्बो

In reply to by अविनाशकुलकर्णी

मागे एका कार्यक्रमात वैभव मांगलेंनी अजयच्या जबड्याची हुबेहूब नक्कल केली होती.

हुप्प्या 18/10/2016 - 21:50
काही लोकांना असे नकली कन्सर्ट करण्यात वावगे वाटत नाही असे दिसते आहे. ग्राहकाला ह्याची माहिती असावी म्हणून कन्सर्टच्या जाहिरातीत निदान बारीक अक्षरात तळटीप असावी की सर्व गाणी ही प्रत्यक्ष गायलेली असतीलच असे नाही. काही गाणी पार्श्वसंगीताच्या स्वरूपात सादर होतील. अशी माहिती आधीच दिलेली असेल तर ग्राहक तशी अपेक्षा ठेवूनच जातील आणि असा अपेक्षाभंग होणार नाही. व्यक्तिशः मला तरी असा प्रकार आवडत नाही. भरपूर पैसे देऊन अशा प्रकारचे शो बघण्याची माझी तरी इच्छा नाही. ज्यांना हा प्रकार रुचतो त्यांनी तो जरुर पहावा.

बोका-ए-आझम 19/10/2016 - 09:42
१. अजय-अतुल यांनी अल्पावधीत मिळवलेल्या यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी ही बातमी तिखट-मीठ लावलेल्या स्वरूपात छापून आणलेली असण्याची दाट शक्यता आहे. या इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतातच. २. अजय-अतुल जे lip sync करत होते ते त्यांच्या स्वतःच्याच गाण्यांचे ट्रॅक्स होते. इतर कोणाच्या गाण्यांचे नाहीत. म्हणजे मूळ मेहनत तर त्यांनी केलेली आहे. ३. प्रेक्षकांच्या फसवणूकीचा जो मुद्दा आहे - प्रेक्षकांची गाणं live ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती का? तसं असेल तर फसवणूक झाली असं म्हणू शकतो. पण जर तसं नसेल तर मग काय फरक पडतो? उद्या एखादा गायक live गातो म्हणून लोक जातील का? ते अजय-अतुल यांच्या नावामुळे जातील. मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो? ४. शास्त्रीय संगीत ऐकायला जाणारे श्रोते अाणि अजय-अतुल किंवा इतर कोणाच्याही concerts ऐकायला जाणारे प्रेक्षक यांच्यात फरक आहे. अशा concerts मध्ये प्रचंड गोंगाट असतो. एखाद्या गायकाने live गाणं म्हणणं हे त्याच्यासाठी त्याची कारकीर्द नष्ट करु शकतं. त्याचा आवाज पूर्णपणे निकामी होऊ शकतो. असं झालं तर प्रेक्षक त्याची जबाबदारी घेतील का? ५. स्टार्स appearance money म्हणून आयोजकांकडून पैसे घेतात. अजय-अतुल आज लोकप्रिय आहेत. आयोजक त्याच लोकप्रियतेचा फायदा उठवत आहेत. परत तोच मुद्दा येतो. उद्या एखादा गायक live गातो म्हणून लोक जातील का? ते अजय-अतुल यांच्या नावामुळे जातील. मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?

In reply to by बोका-ए-आझम

खेडूत 19/10/2016 - 10:08
यशामुळे वैतागलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी
त्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी? बिचारे निलेश मोहरीर/ सलील कुलकर्णी/ अवधूत (!) वगैरे हे आपापले मर्यादित स्थान टिकवून आहेत.
तसं असेल तर फसवणूक झाली असं म्हणू शकतो.
तसंच आहे, आणि असतं. अन्यत्र प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लाईव्ह गाताना सूर हलले तरी लोक समजून घेतीलच. आवाज खराब व्हायचं काही कारण नाही, अति हळू आवाजात गायले तरी ११० डेसिबल्सला असह्य आवाज येतो!
मग ते ट्रॅकवर गाताहेत की live - याने काय फरक पडतो?
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात. त्यांनी तसे सांगितले तर निम्मी तिकीटेही संपणार नाहीत. कदाचित या भीतीनेच तिकीटाचे दरही खूप जास्त ठेवतात. अन्यथा प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे? या साखळीत सगळेजण प्रामाणिकपणे कर भरत असतील तर ती एक आनंदाची बाब असेल. आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.

बोका-ए-आझम 19/10/2016 - 10:26
त्यांना कोण आहेत म्हणे प्रतिस्पर्धी?
हिंदीत आहेत. मराठी कलाकारांविषयी हिंदी चित्रपटसृष्टीत आकस आहे ही वस्तुस्थिती आहे. अाणि त्यांचे मराठीतले प्रतिस्पर्धी असं करणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? सारेगम च्या एका भागात अजय-अतुल पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा नटरंग चं संगीत गाजत होतं. त्यांचं कौतुक होत असताना जज सलील कुलकर्णींचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
तसंच आहे, आणि असतं.
एवढी ठाम खात्री असेल तर विषयच खुंटला.
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात.
लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा.
प्रायोजक आणि दूरचित्रवाहिन्यांचे हक्क विकूनही इतके महाग तिकीट का असावे?
जागेचं भाडं आणि करमणूक कर.
आता तुमचे स्पष्टीकरण मान्य करावे तर दुसरा प्रश्न येतो, की हे अजय-अतुल का बोलत नाहीत? ते तर सारवा सारव करताना दिसतायत.
तो त्यांचा मूर्खपणा/चांगुलपणा आहे. त्यांना एखादी गोष्ट चूक वाटू शकते. म्हणजे ती असेलच असं नाही. कितीतरी वेळा लोक न केलेल्या चुकांची क्षमा मागतात.

In reply to by बोका-ए-आझम

विशुमित 19/10/2016 - 11:24
लोक ते लाईव्ह गातात असा समज करून घेऊन तिकीट काढतात आणि जातात. लोक enjoy करायला जातात. Live मुळे track पेक्षा जास्त मनोरंजन होतं असा विदा असल्यास द्यावा. --- तिकीट काढून क्रिकेट म्याच पाहायला कोण जातं? फक्त एन्जॉयमेंटच असते ती. जे बुद्धिजीवी असतात ते एकतर शास्त्रीय आणि सुगम संगीत ऐकायला जातील नाहीतर घरात बसतील. असल्या शो मध्ये जाणार नाहीत.

भाते 19/10/2016 - 11:07
एका वेळी सलग १४ गाणी प्रत्यक्ष म्हणणे अशक्य आहे. पूर्वी मी टीव्हीवर एमजेच्या कॉन्सर्टस बघायचो त्यावेळी मला हाच प्रश्न पडायचा. सलग २ तास इतकी सगळी गाणी म्हणणे कसे शक्य आहे? मग लक्षात आले कि तो काही मोजकी गाणी प्रत्यक्ष गातो आणि बाकीची सगळी लिपसिंकिंग असतात. तीन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत मुग्धा वैशंपायनच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तीन तासाच्या कार्यक्रमात तिने दोन राग आणि चार गाणी म्हणाली. पण मध्ये गप्पा/मुलाखत आणि मध्ये गाणी असा कायर्क्रम असल्याने ते शक्य झाले. इथे तर बऱ्याच कलावंतांनी त्याचे समर्थन केले आहे.

दिलीप सावंत 19/10/2016 - 11:46
मराठीमधील सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात असे पण होऊ शकते असे मला वाटले नव्हते. याला तिथले व्यवस्थापक जबाबदार आहेत असे मला वाटते.

प्रदीप 19/10/2016 - 14:44
प्रथम लेखातील काही प्रश्नांना माझी उत्तरे: १. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? उ: नेहेमीच हे होते किंवा नाही, ह्याविषयी माहिती नाही. इथे तरी झाले असे दिसते. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? उ: ठाऊक नाही. खरे तर अगदी व्यवस्थित माहिती असल्याशिवाय एकाद्या कलाकाराच्या अशा शोविषयी काहीही सांगणे चुकीचे आहे. सौरा ह्यांनी अगदी लता, आशा ह्या तसे करत आसल्याचे कुठेतरी वाचले आहे, असे लिहील आहे. तर त्याचा दुवा असल्यास द्यावा. मी स्वतः आमच्या शहरात लताचा शो १९९५ साली पाहिला, आशाचा अलिकडे सुमारे ५ वर्षांपूर्वी पाहिला. ह्या दोन्ही शोंचे (वेगवेगळे) आयोजक अथवा त्यात बॅकस्टेजशी संबंधित व्यक्ति माझ्या ओळखीच्या असल्याने मी हे ठामपणे येथे सांगू शकतो, की त्या दोन्ही शोजमधे असे काही केले गेले नाही. वास्तविक काराओकी मोडमधे गाणे त्या दोघींना नवे आहे, अपरिचीत नच्व्हे, कारण अलिकडील बहुतेक सर्वच रेकॉर्डिंग्सही जवळजवळ तशीच करावी लागतात आणि त्या दोघींनीही ते व्यवस्थित केलेलेही आहे. पण हे त्यांचे 'नेटिव्ह मोड' नव्हे. तसेच लता १९७४ पासून नियमित रूपाने असे शोज करते आहे. त्या अगोदर अधूनमधून काही ना काही निमीत्ताने असे शोज व्ह्यायचे (युद्धे, फिल्मफेयर अ‍ॅवॉर्ड्स वगैरे). ह्या सर्व वेळी आताचे टेक्निक उपलब्ध नव्हते. सर्व शोज त्यावेळी लाईव्हच व्हायचे. ते त्यांना जास्त जवळचे वाटावे- तेव्हा आणि आताही. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? उ: असे नसावे. दोन्ही गोष्टी एकाचवेळी करता येतात की! ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? उ: ह्या प्रश्नाला काय म्हणावे? चित्रपट हा व्यवसाय आहे. त्याच्या रेकॉर्डींगचा खर्च प्रोड्यूसर करतो, त्यावेळी तो त्यातील रीटर्न्सवर लक्ष ठेऊनच करतो. समजा अगादी अजय- अतुल ह्यांनी तो खर्च स्वतः केला, तरी तेव्हा त्यांनी त्याच्या रीटर्न्सवर लक्ष ठेवले असेलच. म्हणजे काही व्यावसायिक आडाखे कुणीतरी (प्रोड्यूसर अथवा संगीतकार) ह्यांनी बांधले, ते रीस्क त्यांनी घेतले. त्त्याबद्दल त्याची गरज होती किंवा नाही ह्याची उठाठेव आपणास कशाला असावी? ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? उ: ते त्या शोचे एमसी असतील तर तशी सारसारव करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग होता. वेळप्रसंग मारून नेणे हे त्या व्यक्तिपेक्षा इतर कुणीही ऑन- द- स्पॉट करेल असे वाटत नाही. तेव्हा उत्तर 'हो' असे आहे. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? उ: एका अर्थी ही फसवणूक आहे. पण असा डिस्क्लेमर कुणीही देणार नाही. झालेल्या प्रसंगाची आता भरपूर शोभा माध्यमांतून झाल्याने प्रेक्षकांनी सजग व्ह्यावे! आता इतर काही टिपण्णी: मायनस ट्रॅकः हा काराओकीसाठी वापरतात तसा ट्रॅक. म्हणजे त्यात सर्व ऑर्केस्ट्रेशन व पर्क्युजन असते, फक्त गाणार्‍यांचे आवाज नसतात. तेव्हा काराओकीप्रमाणे, गायकांना त्या ट्रॅकवर गावे लागते. हा ट्रॅक अगोदर तयार केलेला असतो. मूळ रेकॉर्डिंगमधे आवश्यक तसे मल्टि- ट्रॅक्स असतील-- जसे ते अलिकडच्या सर्वच रेकॉर्डिंग्जमधे असतात- तर तांत्रिकदृष्ट्या, अशा रेकॉर्डिंगवरून मायनस ट्रॅक करणे अगदी सोपे आहे. जेव्हा मूळ रेकॉर्डिंगमधे हवे तसे मल्टी- ट्रॅक्स उपलब्ध नाहीत, तिथे (म्हणजे पूर्वीच्या सगळ्याच गाण्यांच्या रेकोर्डिंग्ज), अलिकडे सहज व स्वस्तात उपलब्ध असलेली काही सॉफ्टवेयर अ‍ॅप्लिकेशन्स वापरून असा ट्रॅक तयार करणे शक्य आहे. असे का करत असावेत? - तर तुम्हाला काही भव्यदिव्य दाखवायचे आहे, म्हणजे १५ - २० व्हायोलिन्स, अ‍ॅकॉर्डियन,,फ्लूट्स, सगळी पर्क्यूजन वाद्ये, ऑक्टोपॅड, सिंथेसायजर्स, सॅक्स इत्यादी-- तर ते तसेच्या तसे अ‍ॅकॉस्टिक्स फारसे नसलेल्या हॉलमधे, अथवा उघड्या प्रेक्षागृहात- व्यवस्थित प्रत्यक्ष वाजवून त्यांचा उचित मिक्स करून ते प्रेक्षकांपुढे पोहोचवणे, अतिशय जिकीरीचे आहे. ह्यात बरेच रिस्क आहे, मुळात इतके फॅक्टर्स आहेत (जसे वादकांना उपलब्ध असलेली जागा, त्यांची एकमेकांशी असलेली प्रॉक्झिमीटी, त्यांना मिळणारा 'फोल्डबॅक साऊंड', गायका- वादकांचे त्यांच्या माईक्सच्या समोरून हलणे इत्यादी ) की थोड्या वेळात हे सगळे तिथे मांडून, त्याची टेस्ट घेऊन, मग ते रीतसर कसलाही प्रॉब्लेम न येता (फीडबॅक-- जो 'कुंई.... ' असा आवाज कधीतरी येतो तो, एकाद्या वाद्याचा आवाजच येतो आहे, येत नाही...) प्रत्यक्ष सादर करणे जवळजवळ अवघड आहे. त्यासाठी अतिशय काटेकोर प्लॅनिंग करावे लागेल, सादरीकरण जिथे करायचे आहे, तेथील परिस्थिती लक्षात घेऊन त्यात आवश्यक ते फेरबदल करावे लागतील, ह्यात बराच वेळ व पैसा खर्चावा लागेल. इतके सगळे करण्यापेक्षा काराओकीचा मार्ग तुलनेने बराच सोपा. त्यात गाणेही प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचते, आणि ते सगळे दिसतेही भव्य- दिव्य. अजय अतुल ह्यांनी मटाच्या खुलाशाच्या बातमीत 'लाईव्ह कन्सर्टमधे बॅकग्राऊंडचा टेंपो कमीजास्त होत असतो म्हणून असे करावे लागते' असे म्हटले आहे, ते मलातरी अगम्य वाटते! तुम्ही लाईव्ह गाता आहात, सर्व म्युझिकही लाईव्हच आहे, मग टेंपो कमीजास्त झालाच तर प्रॉब्लेम काय आहे? हे काही पटत नाही. ही सारवासारव तर नव्हे? अशा तर्‍हेच्या सर्वच ऑर्केस्ट्रांच्या कार्यक्रमांतून हे असेच केले जाते का? मी अलिकडे यू- ट्यूबवर अनेक जुन्या हिंदी चित्रपट गीतांचे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम पहात आहे. हे सर्व त्या त्या ऑर्केस्ट्राच्या चालक- मालकांनीच अपलोड केलेले आहेत, तेव्हा त्यात काही खोटे- चूक नसावे. माझे ह्यांविषयीचे एक सर्वसाधारण निरीक्षण असे आहे की, जिथे अगदी थोडी वाद्ये आहेत-- एक सिंथ, एक फ्ल्यूट, एकादी सतार, थोडे पर्क्त्या, थोडक्यात जिथे १५ ~ २० व्हायोलिन्स, चेल्लो, सॅक्स वगैरे नाहीत-- तिथे ते कार्यक्रम संपूर्ण लाईव्ह पेश केले गेले. हा माझा ढोबळ अंदाज आहे. आणि कुणास ह्याची काही उदाहरणे पहायची असतील तर माझ्याशी खरडीतून संपर्क साधावा, काही दुवे देता येतील.

In reply to by प्रदीप

खेडूत 19/10/2016 - 15:29
सहमत. मला काय म्हणायचे ते आपण नेमके आणि सविस्तर लिहीलेत. गेल्या वीस वर्षांत अनेक लाईव्ह कार्यक्रम पाहिले-ऐकले. आशाताईंचा 'नक्षत्रांचे देणे' हा त्यात सर्वांत आवडलेला कार्यक्रम! १९९३ च्या काळात मर्यादित तन्त्राच्या मदतीने किती सुंदर कार्यक्रम करायच्या त्या. अल्बर्ट हॉलचा लतादीदींचा कार्यक्रम आजही ऐकावासा वाटतो. पुढे बर्लिन, स्टुट्गार्ट, लिवरपूल आणि पुण्यात अजय-अतुल, शंकर महादेवन हे सगळे कार्यक्रम पहायला मिळाले, आणि आवडलेही. मात्र इतकय सराईतपणे अलिकडे ट्रॅक वापरत असतात हे नवीनच होते, म्हणून धक्का बसला इतकेच. व्यवसाय कुणी कसा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला असे कार्यक्रम आवडणार नाहीत हे निश्चित. बाकी स्टुडिओची उठाठेव उत्सुकतेपोटी केली, कारण एकच गाणे कुठले ते वेगळे-विशेष असे कळले नाही, थेटरात बसूनही. मकरंद अनासपुरेंचे सामाजिक कामात योगदान आणि संवेदनशीलता पाहून तो प्रश्न पडला. अन्य कलाकार असता तर वाटले नसते. स्वतः अनासपुरेंनाही ते करताना वाईट वाटलेच असेल. निव्वळ एंजॉय करायला जाणार्‍यांनी तसे जावेच. नको कोण म्हणतंय! आम्हाला फरक पडतो इतकेच.

In reply to by खेडूत

प्रदीप 19/10/2016 - 19:20
मलाही बसला. ह्या प्रोग्राम्समधे असे वाजवले जाते हे मला माहिती नव्हते. बाकी स्टुडिओची उठाठेव उत्सुकतेपोटी केली, कारण एकच गाणे कुठले ते वेगळे-विशेष असे कळले नाही, थेटरात बसूनही. म्हणजे त्यांच्या त्या प्रचंड खर्चाचे जस्टिफिकेशन झालेले दिसत नाही. मी 'उठाठेव' वगैरे कडक शब्द वापरल्याबद्दल मात्र माफी मागतो, राहवले नाही म्हणून तसे लिहून गेलो. निव्वळ एंजॉय करायला जाणार्‍यांनी तसे जावेच. नको कोण म्हणतंय! आम्हाला फरक पडतो इतकेच. १००% सहमत. फरक मलाही पडलाच आहे.

In reply to by प्रदीप

मराठी_माणूस 19/10/2016 - 17:47
सौरा ह्यांनी अगदी लता, आशा ह्या तसे करत आसल्याचे कुठेतरी वाचले आहे, असे लिहील आहे. तर त्याचा दुवा असल्यास द्यावा.
मीही आशा, लता ही नावे वाचुन माझ्या वरच्या एका प्रतिसादात संदर्भ मागीतला आहे. कारण पुर्वी हे तंत्र जेंव्हा उपलब्ध नव्हते तेंव्हा ही असे लाइव्ह कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत.

In reply to by मराठी_माणूस

पुंबा 19/10/2016 - 18:27
मी असे फेबूवर, मुकेश माचकर यांनी एका कमेंटमध्ये, आणि बिपीन कुलकर्णी यांच्या याविषयीच्या पोस्ट्वरील कमेंट्समध्ये वाचले आहे. अर्थात माझ्याकडे याचा आणखी काही पुरावा नाही.

In reply to by मराठी_माणूस

प्रदीप 19/10/2016 - 19:36
मराठी दैनिकातील पत्रकार आहेत. दुसरे कोण आहेत, माहिती नाही. पूर्वी लताचे (आशाचे माहिती नाही, पण,ह्याबाबतीत फरक नसावा) दूरदर्शनवर कार्यक्रम कधीमधी व्ह्यायचे, (मदनमोहन १९७५ साली गेल्यावर तसा एक त्याच्यावरील कार्यक्रम झाला होता, ते मला आठवते) तेव्हा तेथील ध्वनियंत्रणेच्या व अ‍ॅकॉस्टिक्सच्या लिमीटेशनमुळे ती गाणी 'फोल्डबॅक' मधे चित्रीत केली गेली, असे मी तेथील काही कर्मचार्‍यांकडून ऐकले होते. म्हणजे गीत रेकॉर्डींग स्टुडियोत प्रथम ध्वनिमुद्रित केले गेले, व त्याचे चित्रीकरण लिप्सिंक करून केले गेले, असा तो प्रकार. हे असे असेल तर इतरही काही कलकारांच्या बाबतीत तसे केले गेले असण्याची शक्यता आहे. ह्यामागे जाबाबदारी त्या त्या कलाकारांची नव्हे, हे उघड आहे. असो.

सुबोध खरे 19/10/2016 - 18:26
केवळ एक तानपुरा आणि एक तबला असला तरी खरा गायक सप्तस्वरांचा स्वर्ग उभा करील. अन्यथा पन्नास वाद्यांचे कडबोळे करून जगणारे गायक संगीतकार कमी नाहीत अशा अर्थाचे श्री पु ल देशपान्डे यांचे वाक्य आठवले. भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचे "शिवकल्याण राजा" हे गीत आजच (परत) ऐकले. केवळ मागे तानपुरा सोडला तर इतर कोणतेही वाद्य नसताना अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू उभे राहतील इतके भावपूर्ण गायन आहे.(किंवा श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान ऐकून पहा) त्याची आठवण झाली.

In reply to by सुबोध खरे

प्रदीप 19/10/2016 - 19:28
पुल, जीए हे सगळे मला अतिशय माननीय, वंदनीय आहेत, पण म्हणून त्यांची सगळी मते, विधाने मान्य आहेत असे नव्हे. नाहीतर टाईट जीन्स घातलेली स्त्री पाहून ती 'ढुंगणावरचे रूधिराभिसरण' दाखवते आहे, असे मला वाटत रहिले असते. चित्रपट संगीत व शास्त्रीय अथवा सुगम संगीत ह्यांत काही मूलभूत फरक आहेत. त्यांनुसार त्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. हे लक्षात ठेऊन टिका करावी. अन्यथा, माझ्यासारख्या फिल्म संगीत (व तेही ६० - ७० जणांचा, ब्रास, विंड, पर्क्युजन अशांनी नटलेला भरजरी) गाण्यांच्या चाहत्याला 'काय ते तुमचे 'ओ ...' वगैरे अशी टिका करता येणे कठीण नाही. पण हे सगळे विषयाला सोडून झाले.

सुबोध खरे 19/10/2016 - 20:31
नाही. एवढ्या मोठ्या ताफ्यामध्ये गायकाची गरज आहे का ? असे वाटले. कारण तो ही आवाज आता संगणकावर काढता येतो. आणि इथे लाईव्ह कार्यक्रम काही लोक त्यांच्या "दर्शनासाठी" गेले होते असे वाटत नाही. बाकी घरात "बोस" किंवा "हर्मन" सारखी उच्च दर्जाची होम थिएटर असणारी मंडळी भारतात कमी नाहीत. हे जर असे "रेकॉर्डेड" (ध्वनिमुद्रित) संगीत ऐकायला कोणी "लाईव्ह" कार्यक्रमाला भरपूर पैसे मोजून जात असतील असे वाटत नाही. बाकी चालू द्या.

रेवती 20/10/2016 - 19:02
अजय अतुलला लाईव्ह बघण्यासाठी जातात वगैरे मान्य नाही. लाईव्ह कार्यक्रमात आणि रेकॉर्डेड कार्यक्रमात वेगळेपणा आहे आणि असायलाच हवा. हे प्रिरेकॉर्डेड असले तरी चालतय वगैरे न्यू नॉर्मल आहे. मुळात तसे नसावे. शास्त्रीय संगिताच्या मैफिली जर लाईव्ह होऊ शकतात तर हे कार्य्क्रम का नाही? शेकडो वादक घेऊन येणे (गरज आहे की नाही माहित नाही) किंवा आकाशातून धरणीवर पडणे, नाहीतर पृथ्वीवरून आकाशात झेप घेऊन गाणे वगैरे अचाट करण्यापेक्षा जी गाणी गायचीयेत ती रेकॉर्डेडपेक्षा वेगळी भासणार आहेत याची कल्पना प्रेक्षकांना असायला पाहिजे. मलातरी लाईव्ह कार्य्क्रम आवडत नाहीत. गाणे ऐकताना गाण्यावर लक्ष देता येत नाही तर झगमगीत कपडे, काहीतरी करामती पहाव्या लागतात. बरं, हे केलं नाही तर कार्यक्रम निरस वाटण्याचा धोका असतो हेही मान्य! परदेशातल्या कुठल्यातशी लाईव्ह शोमध्ये कविता कृष्णमूर्ती हिने इतकी साधी साडी नेसली होती की ते ही बरे वाटत नव्हते (तूनळीवर दिसले). एकंदरीतच विचित्र प्रकरण असतं असं वाटतय. कलाकारांसाठीही ते फारसं सोयिचं नसावं. एखादे दिवशी घसा बसलेला असला (खासकरून परदेशी बर्फाळ थंडी असताना, जास्त मैफिली करून पिट्टा पडलेला असताना), दमलेला आवाज, वादकांपैकी कोणाची तरी फ्लाईट उशिरा, लवकर येणे वगैरेतून जमवाजमव करायची हे सोपं असेल असं नाही. हिकडे राहूल देशपांडेच्या कार्य्क्रमालाही एकदा उशीर झाला होता (त्या कार्य्क्रमाला मी गेले होते). कारण फार सिरियस नसेल पण उशीर होऊ शकतो.

७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल
टाकावाच. त्यामुळे वादकांच्या ताफ्याचा खर्चही वाचेल व कमी दरात लोकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा 'लाईव्ह' शो बघायला मिळेल.
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते.

जाऊं द्याना बाळासाहेब : वेगळ्या वाटेवरच्या माणसाची अर्धवट गोष्ट

महासंग्राम ·

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 10/10/2016 - 12:23
चित्रपट बघितला, बरेच कलाकार अक्षरशः वाया घालवलेत, गिरीश कुलकर्णी उत्तम कलाकार आहे पण त्याने दिग्दर्शन करू नये. चित्रपट पाहून आमच्याही 'मनाला मार' लागलेला आहे याची नोंद घ्यावी

नाखु 10/10/2016 - 08:26
वरती मित्रांनी सांगीतलय म्हटल्यावर तर नक्कीच, बाल्कांची सुट्टी साजरी करायची संधी सोडणार नाही.

आवर्जून पाहण्यासारखा आहे. थोडंफार सैराटशी साम्य असं आहे: बरेच लोक्स गाणी बघून फुल्ल्टू टैमपाससाठी जातात, अन् सैराटचा शेवट पाहून सुन्न होतात. बाळासाहेबच्या शेवटी सुन्न नाही झाली तरी गंंभीर नक्कीच होतात. विशेषतः शेवटी नाटकाला बाळासाहेबांच्या निवेदनाच्यावेळी.

राजाभाउ 10/10/2016 - 11:01
परवा पाहीला. छान आहे, एकदातरी पाहण्यासारखा आहे हा चित्रपट. अभिनय, संवाद आणि चित्रीकरण खासच. काही प्रसंगात तोच तोच पणा आला आहे त्यामुळे चित्रपटाची लांबी थोडी वाढली आहे व मध्यंतरापुर्वी चित्रपट थोडा संथ होतो. पण यापेक्षाही मला थोडीशी(च) खटकलेली एक गोष्ट म्हणजे चित्रपटाचा संदेश फारच थेट थेट मांडल्या मुळे तो जरा बाळबोध वाटतो. देउळ, वळु मध्ये तो एकदम सटली दिल्यामुळे तो जास्त भीडत होता. तरीही चित्र्पट एकदम सुखद अनुभव आहे.

गणेशा 10/10/2016 - 15:15
कालच पाहिला .. ग्रेट पिक्चर.. निखळ विनोद .. हसुन हसुन पुरेवाट .. नक्की पहावा असाच.. परिक्षण छान .. सिनेमा त्या पेक्षा छान आहे मात्र ... पुन्हा पाहणार आहे

बोका-ए-आझम 11/10/2016 - 13:23
नक्की पाहा. मालोजीरावांशी सहमत! गिरीश कुलकर्णी अभिनेता म्हणून चांगला आहे पण स्वतःच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचे तोटे जास्त. त्याने अग्ली मध्ये अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली जसा अभिनय केला होता तसा इथे झाला नाही हे तितकंच खरं आहे. पण हे असूनही चित्रपट भारी आहे.पोष्टर बाॅईज नंतर इतका धमाल विनोदी पण अंतर्मुख करणारा चित्रपट पाहायला मिळाला.

जगप्रवासी 19/10/2016 - 16:18
परीक्षण खूप चांगलं लिहिलं आहे. बरेचसे मुद्दे पटले नाहीत. असो. कालच चित्रपट पाहिला, वळू देऊळ सारखे चित्रपट बनवणारे कुलकर्णी जोडीने हा तद्दन फालतू चित्रपट बनवला आहे यावर विश्वास बसत नव्हता. सैराट मधील झिंगाट गाण्याचा पुनः प्रत्यय देण्यासाठी मोना डार्लिंग गाणं बनवलंय असं वाटत राहील बघताना. म्हणजे कुठलंही कारण नसताना वाजत असणारी, अजय अतुल प्रोडक्शन आहे म्हणून जबरदस्तीने घुसवलेली गाणी. "वाट दिसू दे" आणि "गोंधळ" ही गाणी सोडली तर दुसरं एक ही गाणं आठवणीत राहत नाही. शेवटी सर्व लोक उमेशच्या मागून चालतात कशासाठी माहित नाही? त्याने असं काय काम केलं आहे की लोक त्याच्या पाठीशी चालतात तेच कळत नाही. नाटकात त्याच स्वगत ऐकून लोकांना काय आवडलं म्हणून ते टाळ्या वाजवतात ते कळलं नाही. चित्रपट रेंगाळत राहतो. या झाल्या चित्रपटातील खटकलेल्या गोष्टी, आता आवडलेल्या गोष्टी. नाटकातील ह्यूमर भारी आहे. भाऊच डोळे मिचकवून निरागसतेने केलेलं काम, मोहन जोशींनी रंगवलेला राजकारणी बाप, अधे मध्ये असलेले विनोदी प्रसंग, उमेशने मनात होत असणारी घुसमट व्यवस्थित सादर केली आहे.

आवडला ... शेवटाला गडबडगुंडा झालाय ... या गोष्टीचं नक्की काय आणि कसं करायचं, असा गोंधळ वाटतो, गाणी घुसडलेली आहेत ... पण पहिला भाग जास्त आवडला, झोप येण्यासाठी बाळासाहेबाने जड जड लेखन भाऊकडून वाचून घेणे हा प्रसंग जबरदस्त जमला आहे...

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 10/10/2016 - 12:23
चित्रपट बघितला, बरेच कलाकार अक्षरशः वाया घालवलेत, गिरीश कुलकर्णी उत्तम कलाकार आहे पण त्याने दिग्दर्शन करू नये. चित्रपट पाहून आमच्याही 'मनाला मार' लागलेला आहे याची नोंद घ्यावी

नाखु 10/10/2016 - 08:26
वरती मित्रांनी सांगीतलय म्हटल्यावर तर नक्कीच, बाल्कांची सुट्टी साजरी करायची संधी सोडणार नाही.

आवर्जून पाहण्यासारखा आहे. थोडंफार सैराटशी साम्य असं आहे: बरेच लोक्स गाणी बघून फुल्ल्टू टैमपाससाठी जातात, अन् सैराटचा शेवट पाहून सुन्न होतात. बाळासाहेबच्या शेवटी सुन्न नाही झाली तरी गंंभीर नक्कीच होतात. विशेषतः शेवटी नाटकाला बाळासाहेबांच्या निवेदनाच्यावेळी.

राजाभाउ 10/10/2016 - 11:01
परवा पाहीला. छान आहे, एकदातरी पाहण्यासारखा आहे हा चित्रपट. अभिनय, संवाद आणि चित्रीकरण खासच. काही प्रसंगात तोच तोच पणा आला आहे त्यामुळे चित्रपटाची लांबी थोडी वाढली आहे व मध्यंतरापुर्वी चित्रपट थोडा संथ होतो. पण यापेक्षाही मला थोडीशी(च) खटकलेली एक गोष्ट म्हणजे चित्रपटाचा संदेश फारच थेट थेट मांडल्या मुळे तो जरा बाळबोध वाटतो. देउळ, वळु मध्ये तो एकदम सटली दिल्यामुळे तो जास्त भीडत होता. तरीही चित्र्पट एकदम सुखद अनुभव आहे.

गणेशा 10/10/2016 - 15:15
कालच पाहिला .. ग्रेट पिक्चर.. निखळ विनोद .. हसुन हसुन पुरेवाट .. नक्की पहावा असाच.. परिक्षण छान .. सिनेमा त्या पेक्षा छान आहे मात्र ... पुन्हा पाहणार आहे

बोका-ए-आझम 11/10/2016 - 13:23
नक्की पाहा. मालोजीरावांशी सहमत! गिरीश कुलकर्णी अभिनेता म्हणून चांगला आहे पण स्वतःच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचे तोटे जास्त. त्याने अग्ली मध्ये अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली जसा अभिनय केला होता तसा इथे झाला नाही हे तितकंच खरं आहे. पण हे असूनही चित्रपट भारी आहे.पोष्टर बाॅईज नंतर इतका धमाल विनोदी पण अंतर्मुख करणारा चित्रपट पाहायला मिळाला.

जगप्रवासी 19/10/2016 - 16:18
परीक्षण खूप चांगलं लिहिलं आहे. बरेचसे मुद्दे पटले नाहीत. असो. कालच चित्रपट पाहिला, वळू देऊळ सारखे चित्रपट बनवणारे कुलकर्णी जोडीने हा तद्दन फालतू चित्रपट बनवला आहे यावर विश्वास बसत नव्हता. सैराट मधील झिंगाट गाण्याचा पुनः प्रत्यय देण्यासाठी मोना डार्लिंग गाणं बनवलंय असं वाटत राहील बघताना. म्हणजे कुठलंही कारण नसताना वाजत असणारी, अजय अतुल प्रोडक्शन आहे म्हणून जबरदस्तीने घुसवलेली गाणी. "वाट दिसू दे" आणि "गोंधळ" ही गाणी सोडली तर दुसरं एक ही गाणं आठवणीत राहत नाही. शेवटी सर्व लोक उमेशच्या मागून चालतात कशासाठी माहित नाही? त्याने असं काय काम केलं आहे की लोक त्याच्या पाठीशी चालतात तेच कळत नाही. नाटकात त्याच स्वगत ऐकून लोकांना काय आवडलं म्हणून ते टाळ्या वाजवतात ते कळलं नाही. चित्रपट रेंगाळत राहतो. या झाल्या चित्रपटातील खटकलेल्या गोष्टी, आता आवडलेल्या गोष्टी. नाटकातील ह्यूमर भारी आहे. भाऊच डोळे मिचकवून निरागसतेने केलेलं काम, मोहन जोशींनी रंगवलेला राजकारणी बाप, अधे मध्ये असलेले विनोदी प्रसंग, उमेशने मनात होत असणारी घुसमट व्यवस्थित सादर केली आहे.

आवडला ... शेवटाला गडबडगुंडा झालाय ... या गोष्टीचं नक्की काय आणि कसं करायचं, असा गोंधळ वाटतो, गाणी घुसडलेली आहेत ... पण पहिला भाग जास्त आवडला, झोप येण्यासाठी बाळासाहेबाने जड जड लेखन भाऊकडून वाचून घेणे हा प्रसंग जबरदस्त जमला आहे...
नमस्कार, रसिक मायबापहो चित्रपट हे कायम समाजाचं प्रतिबिंब दाखवतं असं कोणत्या तरी महान माणसाने म्हंटल आहे आणि काही प्रमाणात हे खरंही आहे. 'देऊळ', 'वळू' मधून ग्रामीण जीवनाची झलक दाखवत वेगळे विषय हाताळणार्या गिरीष कुलकर्णीनी यावेळेस थोडा वेगळा पण गावाशीच निगडित असणारा असाच विषय 'जाऊं द्याना बाळासाहेब' मधून मांडला आहे . पैशामुळे येणारी बेफिकीर प्रवृत्ती , गावमधली जाती पातीची उतरंड, फ्लेक्स संस्कृती यासर्वांवर केलेलं खुसखुशीत भाष्य म्हणजे 'जाऊं द्याना बाळासाहेब'.

खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर ·

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

Please, Look After Mom!

शिव कन्या ·
Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो. खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे.