मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

श्रीगणेशदर्शन

प्रसाद गोडबोले ·

Bhakti 21/12/2024 - 10:33
फारच सुंदर!असा विचारच केला नव्हता.तुमचा अद्वैताचा अभ्यास खरोखर शुद्ध, शास्त्रोक्त आहे,हे खुप दुर्मिळ आहे.मला ज्यावेळी शिवशक्ती अद्वैत उमगले तत्क्षणी बरेच बदल झाले.

वेगळी अनुभूती... हा माझा प्रांत नाही, हे तरी उमजले..... आमचे कपाट वेगळे... C to C via C हे आमचे कपाट.... (चाणक्य ते चार्ली चॅप्लिन व्हाया Chivas Regal....)

Bhakti 21/12/2024 - 10:33
फारच सुंदर!असा विचारच केला नव्हता.तुमचा अद्वैताचा अभ्यास खरोखर शुद्ध, शास्त्रोक्त आहे,हे खुप दुर्मिळ आहे.मला ज्यावेळी शिवशक्ती अद्वैत उमगले तत्क्षणी बरेच बदल झाले.

वेगळी अनुभूती... हा माझा प्रांत नाही, हे तरी उमजले..... आमचे कपाट वेगळे... C to C via C हे आमचे कपाट.... (चाणक्य ते चार्ली चॅप्लिन व्हाया Chivas Regal....)
||मोरया || काल संकष्टीचतुर्थी होती, श्रीगणेशाचे दर्शन "झालं" का ? नाही झालं ? लक्षात नाही राहिलं ? विसरुन गेलास ? हरकत नाही , आत्ता करू दर्शन. ____________________________ मुळात शिवशक्ती द्वैत च नाही. जो शिव आहे तीच शक्ती आहे, जी शक्ती आहे तोच शिव आहे ! हे दोघे भिन्न आहेत असे वाटणे , हे द्वैत आहे , असे वाटणे हा "तुझा" विचार आहे . आणि हा विचार मायेचा आहे, एकट्या शक्तीचा आहे, फक्त एकट्या शक्तीने घडवलेला आहे. कारण मुळात शुध्द शिवस्वरुपाच्याठायी विचार वगैरे काहीच नाही.

अघमर्षण

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 20/12/2024 - 05:25
साष्टांग दंडवत प्रगो. हे सगळे मजसारख्या पामरांना कळेल अश्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगावे ही नम्र विनंती.
शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप. शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच. -- उदाहरणार्थ मला ('मी' ला) या दोन्हीपैकी काहीच वाटत नाही. अश्या लोकांनी काय करावे ?

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद चित्रगुप्त काका. आपण नेहमी आवर्जुन प्रतिसाद देता हे लेखनाचा हुरुप वाढवणारे आहे.
अश्या लोकांनी काय करावे ?
सगळ्यांना सगळं कळलेच पाहिजे असा दुराग्रह नाही. ह्या इथे मला अमृतानुभवातील ३ ओव्या उधृत कराव्याश्या वाटतात :
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तरी ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तरी कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥
समजा राजाला तुम्ही तुम्ही राजा असे नाही म्हणालात तरी तो राजाच असतो. त्याचे राजेपण तुम्हाला जो प्रत्यय येतोय किंव्वा येत नाहीये ह्यावर अवलंबुन नसते. तसेच शिवस्वरुपाला तुम्ही समजुन घेतले काय किंवा नाही समजुन घेतले काय , त्याने काहीच फरक पडत नाही ! आहे हे असं आहे. :) दोन्ही पैकी काहीच वाटत नाही हे अनध्ययनाचे प्रतीक आहे, आता सगळ्यांनी अध्ययन केलेच पाहिजे असा आपला हट्ट नाही. तुम्हाला हौस असल्यास करा , नसल्यास नका करु. हे समजुन घ्यायची हौस आहे पण कळत नाहीये असे म्हणत असाल तर मात्र मी तुम्हाला शंकराचार्य उपनिषदभाष्य वगैरे वाचण्याआधी, लोकमान्यांचे गीतारहस्य वाचन करा असे सुचवेन कारण त्यांनी एकदम उत्तम पध्दतीने स्टेप बाय स्टेप विवेचन केले आहे ! :) पुनश्च एकवार धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 20/12/2024 - 09:51
मुळात 'पाप' म्हणजे (नेमके) काय ? विविध धर्मात वेगवेगळ्या कृत्यांची गणना 'पाप' म्हणून होते. तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?

In reply to by चित्रगुप्त

तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?
>>> उत्तर वर लेखातच आहे अगदी सुरुवातीलाच !

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 20/12/2024 - 17:20
अध्यात्म वैगेरे फारसे समजत आणि पटत नसल्याने बाकी काही नाही. पण लेखात पाप म्हणजे काय हे सापडले नाही. पापाची दोन उदाहरणे मात्र आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 21/12/2024 - 20:00
प्राडॉ ..... पण फूल टू करमणूक असते म्हणून असे विषय इंजॉय करण्याशी असहमत .. असं वाचन करत हळूहळु समजुन घेणं, प्रगल्भ होत जाणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.. गंभीरपणेच घ्यायला हवी असं मला वाटतं !

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या बद्दल धन्यवाद.... नक्कीच वाचीन... अहंकार कमी करायला, ह्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो का? कारण, कमी अधिक प्रमाणात, प्रत्येक व्यक्तीला थोडा तरी अहंकार असतोच.

In reply to by मुक्त विहारि

आपल्याला अहंकार कमी करणे जास्त करणे वगैरे सव्यापसव्य करावयाचे नाहीत, आपल्याला फक्त ह्यातील "अहं" कोण आहे एवढाच शोध घ्यायचा आहे . तुम्हाला गीतारहस्यातील चौथ्या प्रकरणात "आधिभौतिक सुखवाद" ह्या प्रकरणात उत्तर मिळेल अशी आशा आहे !

In reply to by मुक्त विहारि

सखोल अभ्यास असे नाही पण वाचन मात्र नीट केले आहे. माझ्या मते गीतारहस्य हा इतका लोकोत्तर ग्रंथ आहे लोकमान्यांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात स्वदेश स्वराज्य ह्या विषयी काडीमात्र काम केले नसते तरीही केवळ हा एक ग्रंथ लिहिला म्हणुन त्यांचे नाव इतिहासात कोरलेच गेले असते ! अवांतर : गीतारहस्याच्या , त्यातील सिध्दांतांच्या , अनुमानांच्या काही मर्यादा आहेत , पण वेदांताचा , आचार्यांच्या भाष्याचा सखोल अभ्यास केलेल्या व्यक्तींनाच त्या जाणवु शकतात . तस्मात त्याविषयी मी बोलणे टाळतो . अन केवल माऊलींची ज्ञानेस्वरीतील ही ओवी उधृत करतो : जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥ जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥ १७२ ॥ धन्यवाद !

प्रचेतस 20/12/2024 - 06:23
आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि । ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि ॥ योहमस्मि ब्रह्माहमस्मि । अहमस्मि ब्रह्माहमस्मि ॥ अहमेवाहं मां जुहोमि स्वाहा ॥
तुमच्या विधानात "मी" आणि "ब्रह्म" यांना समानार्थी मानले आहे, मात्र यामध्ये तर्कसुसंगती आवश्यक आहे. "मी" म्हणजे व्यक्तीचे अहंभाव किंवा आत्मचेतना. "ब्रह्म" म्हणजे विश्वव्यापी, शाश्वत, निर्गुण सत्य. व्यक्तीचा "मी" (अहं) मर्यादित असतो, तर ब्रह्म अमर्यादित आहे. मग मर्यादित "मी" अमर्यादित "ब्रह्म" कसा होऊ शकतो? शिवाय ज्ञान ही निर्जीव गोष्ट नाही, तर ज्ञान हे अनुभवातून साकार होते. मग फक्त "मी" ला ज्ञान कसे म्हणता येईल? "मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते. खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म. येथे "मी" म्हणजे शुद्ध आत्मा आहे, जो ब्रह्माशी एकरूप आहे. शेवटी हा द्वैताद्वाचा खेळच झाला.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्ली सर !
"मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते.
अगदी अगदी एकदम योग्य बोललात ! ही साधनेच्या स्तरावरील शेवटची पायरी मानतात . तुमच्या पायात लोखंडाची बेडी होती, त्याची तुम्हाला किल्ली सापडली, ती किल्ली मात्र शुध्द सोन्याची आहे ! आता तुम्ही ह्या किल्लीने लोकांडाच्या बेडीतुन मुक्त झालात तर किल्लीचीही गरज नाही ना ! बेडी काढुन टाकली तशी किल्ली ही टाकुन द्या ! किल्ली सुंदर आहे, मौल्यवान आहे, असे वाटते त्यांची अवस्था दयनीय आहे . #माय_प्रेशियस इये विषयी आपल्याला इशोपनिषदात एक सुंदर विधान सापडते
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते। ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः ॥
जे लोक "मी ब्रह्म नाही , काहीतरी भिन्न देह वगैरे आहे " ह्या अज्ञानाचा आश्रय करुन राहतात ते अंधःकारात भरकटालेले आहेत, मात्र जे "मी ब्रह्म आहे" ह्या ज्ञानात गुंतुन पडले आहेत ते त्याही पेक्षा गहन अंधःकारात भरकटलेले आहेत ! ! ह्यावर ओशो ने अतिषय सुंदर प्रवचन दिलंय पण मला आत्ता त्याची लिंक सापडत नाहीये .
खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म.
अगदी बरोबर. ह्या ब्रह्मानुभवात, अनुभव , अनुभाव्य आणि अनुभाविक राहातच नाहीत ! काय बोलणार ! जे जे काही ह्या वस्थेचे वर्णन करणारे साहित्य आहे ते सारे त्या लोकांनी लिहिलेले आहे जे ह्या शुध्द ब्रह्म अवस्थेतेतुन एक पातळी खाली उतरले आहेत . आणि संस्कृतमध्ये खाली उतरणे ला काय म्हणतात ? अव + तर = अवतार ! शुध्द अनुभव हा शब्दातीत आहे - त्या साठी आचार्यांनी अपरोक्षअनुभूती असा शब्द वापरला आहे, समर्थांनी अनुर्वाच्च समाधान असा शब्द वापरला आहे , माऊली म्हणतात >
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
मीही हे जे काही लिहितोय हा सगळा शब्देविण संवादु , दुजेविण अनुवादु आहे. "ज्यांना कळतं, त्यांना कळतं" , ते माझ्याकडे पाहुन फक्त हसतात गालातल्या गालात. त्यांना माहीती आहे मी कोण आहे , मला माहीती आहे ते कोण आहेत . :) m meherbaba nkb

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 21/12/2024 - 12:17
प्रगो सर, काही तात्विक चर्चा- किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे. "विद्या आणि अविद्या" यांचे उदाहरण दिले गेले आहे, परंतु दोन्ही अवस्थांमध्ये अंधःकार असल्याचे विधान चुकीचे वाटते. ज्ञान (विद्या) हे नेहमीच प्रकाशाचा स्रोत मानले जाते, आणि त्यामध्ये गहन अंधःकाराचा उल्लेख करण्याचा अर्थ आत्मज्ञानाच्या संकल्पनेलाच विरोधाभासी ठरतो. त्यामुळे इथे उपनिषदातील विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. तुम्ही नंतर अवताराचा उल्लेख केलात त्याच्याच व्याख्येनुसार "अवतार" म्हणजे खाली उतरणे असे मानले गेले आहे, पण शुद्ध ब्रह्मानुभवातून खाली येणे म्हणजे तो अनुभवच भंग पावतो. खाली उतरलेल्या व्यक्तीला त्या अवस्थेचा पूर्ण सत्यभाव कसा सांगता येईल? आता तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता की "शुद्ध अनुभव हा शब्दातीत आहे." हे विधान योग्य आहे, परंतु अनुभवाची संकल्पना मांडण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो. तुम्हीच श्लोकांचा, वाक्यांचा उपयोग करत आहात, म्हणजे स्वतःच्या विधानाचाच विरोध करत आहात.

In reply to by प्रचेतस

किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे. काही अंशी सहमत | एकदा बेडीतून मुक्त झाल्यावर किल्लीचा उपयोग नाही म्हणून किल्ली सोन्याची असली तरी (नव्हे सोन्याची असल्यामुळेच टाकून द्यावी, नाहीतर तिचा देखील मोह होतो) अशा अर्थाने वाचावे. मात्र एकदा बेडी सुटली म्हणजे परत मनुष्य बेडीत अडकणारच नाही असे देखील नाही. मात्र नवीन बेडीला पुर्वीचीच किल्ली लागेल काय याची शाश्वती नाही. (किंबहुना न लागण्याचीच शक्यता अधि़क) त्यामुळे कदाचित किल्लीचा त्याग करावा असा विचार असावा. अहंकारमुक्त होण्याचा साधनेचाच माणसास अहंकार येतो अशी उदाहरणे जागोजागी सापडतात. मानवदेह म्हटला की अहंकार, मोह मरेपर्यंत सुटत नाही. साधूला लंगोटीचा देखील मोह पडतो अशी देखील उदाहरणे आहेत. मात्र आपण प्रयत्न करावे. अपयश देणे न देणे दुसर्‍या कोणाच्या तरी हाती आहे असे समजले की कर्माचा अहंकार आणि साधनेचा भार होत नाही. असो.

उजव्या हातात पाणी घ्या , ऋतं च सत्यं ... म्हणा , ओंजळीतील पाण्यावर उछ्वास टाकून ते डाव्याबाजूला टाकून द्या. झालं अघमर्षण। आता पापं संपली.
चला लागा कामाला...! =)) -दिलीप बिरुटे (पापमुक्त)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला लागा कामाला...! =))
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही ! पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे , मोठ्ठ्या माश्याने छोट्या माश्याला खाल्ले म्हणुन त्याला पाप लागत नाही :) ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही ! धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 20/12/2024 - 10:18
ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही !
रूढीप्रमाणे 'द्विज' जरी असलो तरी 'पाप म्हणजे काय माहीतच नाही' या क्याट्यागरीत 'मी' येत असल्याने या भानगडीत पडण्याचे कारण नाही. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

एक्झ्यॅक्टली काका एक्झ्यॅक्टली ! मनुस्मृती अन अन्य अनेक ठिकाणी हे जे काही म्हणले आहे की "वेदाध्ययनाचा , उपनिषदांचा अधिकार केवळ द्विजांना आहे , इतरांना नाही. " त्याचा अर्थ हाच होता जो तुम्ही वर लिहिलेला आहे. इतरांना गरजच नाही ह्या भानगडीत पडायची ! आता द्विज म्हणजे फक्त ब्राह्मण . कारण क्षत्रिय वैश्य असं कोणी राहिलंच नाही. आता ह्या ब्राह्मणातही तुम्ही म्हणालात तसे बहुसंख्य हे "रूढीप्रमाणे 'द्विज' " असल्याने त्यांनाही गरज च नाही वेदाध्ययन उपनिषद वगैरे अभ्यासण्याची ! ह्याला उच्च्नीचता किंवा भेदभाव म्हणुन बघुच नका. ही केवळ अनावश्यकता आहे ! as simple as that ! अगदी पटकन सहज सुचले म्हणुन एक मजेशीर उदाहरण सांगतो - तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 20/12/2024 - 13:37
तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे
यावरून आठवले, 'सैराट' च्या दोनतीन गाण्यांचे रेकॉर्डिंग अमेरिकेत झाले. भलामोठा सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. त्यांना वाजवण्यासाठी दिलेले लिखित संगीताचे 'स्कोअर्स' अजय-अतुललापण दिले गेले, त्यांनी संगितले की आम्हाला यातले काहीही समजत नाही. तिथले वादक थक्कच झाले की यांना काहीही कळत नसता एवढी सुंदर संगीतरचना मुळात यांनी केलीच कशी ? https://youtu.be/yo4E0tWGcV4?si=tB-nNrYzTh_29bmx

In reply to by चित्रगुप्त

तुर्रमखान 20/12/2024 - 14:33
कै कै गोष्टींचं फारच शैक्षणिकीकरण झाल्यामुळे एका विशिष्ठ साच्याच घालून त्याला कैतरी नाव देवून शिकवणं सुरू झालं. एखाद्याला तो प्रकार माहीत नसणं म्हणजे ती संकल्पनाच माहीत नसणं असं होत नाही. एकही भाषा ज्ञात नसलेली व्यक्ती विचार करू शकतेच की. 'एखादी गोष्ट पाप आहे हे माहीत नसेल तर पाप लागत नाही' म्हणजे तर हैट आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे....
होय, मलाही धक्का बसलेला हे लक्षात आल्यावर . सध्या धर्मशास्त्राचा इतिहास वाचत आहे आमचा भारतरत्न पां.वा. काणे सरांनी लिहिलेला. त्यात काही प्रकर्षाने जाणवलेली उदाहरणे लिहितो इथे . समुद्रउल्लंघन हे पाप मानले जायचे . धर्मशात्रानुसार हे पाप फक्त ब्राह्मणांच्या करिता होते , क्षत्रिय वैश्य शुद्रांना मुक्त संचार करण्याची मुभा होती. मद्यपान हे पाप मानले जायचे - पण हे फक्त ब्राह्मणांच्या आणि वैश्यांच्या करिता, क्षत्रिय आणि शुद्रांना मद्यपानाची मुभा होती. धनसंचय करणे हे ब्राह्मणाच्यासाठी पाप मानले होते मात्र क्षत्रिय वैश्यांना आणि शुद्रांना त्याची मुभा होती. धर्मशास्त्रात त्रैवर्णिकांना घटस्फोट नावाचा विधीच नाही, पण शुद्रांना काडीमोड घेण्याची मुभा होती. थोडक्यात काय तर पाप आणि प्रायश्चित्त हे बहुतांश करुन द्विजांकरिताच होते , शुद्रांना बहुसंख्य वेळा हे नियम, ह्या संकल्पना बांधील नसत ! खुप उदाहरणे आहेत. सर्वच लिहित बसत नाही. धर्मशास्त्राचा इतिहास संपुर्ण वाचुन झाल्यावर सारांश रुप लिहिण्याचा मानस आहे तेव्हा लिहिन नक्की !

In reply to by प्रसाद गोडबोले

धक्का वगैरे काही बसवून घ्यायचे नाही. वाचन आणि समज वाढली की, हळुहळु सगळं लक्षात येत जातं. साक्षात ज्या विधात्याच्या मुखातून द्विजन उत्पन्न झाल्यामुळे, आणि त्याच्या श्रेष्ठत्वामुळे जे सर्व वर्णाचे जे स्वामी बनले आहेत त्यांना खरं तर, पाप पूण्य वगैरे नसायलाच पाहिजे होतं. क्षत्रीय वैश्य शूद्र यांच्या जिविताचे मोल तसं ही धर्मशास्त्रानूसार अल्प समजल्या जात होतं. गतजन्मातील पाप-पुण्य कर्म-आणि पापांमुळेच तर, त्यांना अपवित्र अशा क्षत्रीय-वैश्य किंवा शुद्राचा जन्म त्यांना मिळाला असावा. (अवघड आहे सगळं ) ज्या कोणी बिचा-या सुत्रकारांनी द्विजनांना समुद्रौल्लंघन पाप ठरवले असेल त्यांचा अभ्यास कमी पडला असावा असे वाटते. आणि ज्यांनी कोणी असे समुद्रोल्लंघन केले असेल ते डाव्या-उजव्या बाजूला पाणी शिंपडून तसेही पापमुक्त झालेच असतील. शास्त्रे -सुत्रे ही आजच्या भाषेत त्याकाळातील सर्वोच्च कायदे असल्यामुळे त्यांनी जे लिहिले आहे, इतरांनी तितकेच फॉलो करायचं. विधात्याच्या मुखातून निर्माण झालेले ऑलरेडी पवित्र आणि सर्वोच्च होते. शास्त्रांच्या नियमांनुसार वागतांना इतर आणि स्ववर्णांवर वचक राहिला पाहिजे, इतरत्र जगभ्रमण करु नये म्हणून त्याला पाप ठरवले असावे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:29
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही !
च्यामारी ब्राह्मण कोण? क्षत्रिय कोण? वैश्य कोण? आणि शुद्र कोण? ह्यावर प्रचंड वैचारिक गोंधळ माजला आहे माझ्या डोक्यात! जात्याधारित वर्णव्यवस्था मानावी तर अस्मादिकांचा जन्म कोकणस्थ ब्राम्हण परिवारात झाला आहे त्यामुळे 'ब्राम्हण' असे म्हणता येईल! कर्माधारित वर्णव्यवस्था मानावी तर मी एक व्यापारी/व्यावसायिक असल्याने वैश्य, माझ्याकडे नोकरीवर रुजू होणाऱ्यांना काम कसे करावे ते शिकवतो म्हणजे अध्यापन करतो म्हणुन ब्राम्हण, (पूर्वी समाजातील कोणासाठीही रस्त्यावरही उतरणारा) पण आता फक्त परिचयातील कोणावरही अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उभा राहतो त्यामुळे क्षत्रिय, की घरी नेमलेले सफाई कर्मचारी अनुपस्थित असतील त्यादिवशी किंवा विकएंड होमवर कोणी मदतनीस उपलब्ध नं झाल्यास आपल्याच घरातील संडास साफ करावा लागल्यास, किंवा फार्म वरील एखाद्या पाळीव प्राण्याचा अंत्यसंस्कार आपल्याच हातानी करावा लागल्यास शूद्र ठरणार असीन तर मी नक्की कोण आहे? त्यामुळे माझ्या मते मी आणि माझ्या आजूबाजूला राहणारे / वावरणारे / बोलणारे सगळे मनुष्यप्राणी आहेत... त्यांची जात कुठली आणि धर्म कुठला ह्याला माझ्यादृष्टीने तरी काही महत्व नाही आणि त्याच्या तपशीलात जायची मलातरी गरज वाटत नाही. माझे काही गैरसमज असल्यास ते जरूर दूर करावेत... पण कृपया बोली/व्यावहारिक भाषेत... ती वेद आणि उपनिषादांची भाषा मज पामराच्या आकलनाच्या पलीकडची आहे साहेब!

In reply to by टर्मीनेटर

नमस्कार टर्मिनेटर ! ब्राह्मण - ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण क्षत्रिय - आपल्या भूमीची देशाची धर्माची देवाची संस्कृतीची रक्षा करतो तो क्षत्रिय वैश्य - जो देशात वास करतो , दैनंदिन व्यवहार चालावेत म्हणुन कामे करतो शेती , पशुपालन , कोणत्याही प्रकारचा व्यापार करतो वैश्य शुद्र - वरील त्रैवर्णिकांना त्यांच्या कामात मदत करतो तो शुद्र . वैदिक कालात कर्माने ठरत होते वर्ण , नंतर जन्माने ठरायला लागले , आता वृत्तीने ठरतात असे माझे मत आहे. सो सोप्प्या शब्दात बोलायचं तर तुम्हाला चॉईस आहे तुम्हाला कोणता वर्ण निवडा ! कोणी उच्च नाहीये कोणी नीच नाहीये , जो तो आपापल्या कामात महत्वाचाच आहे. पुरुषसुक्तात म्हणलं आहे तसे - एका देहाचे अवयव ! बाकी धर्माची उतरंड जातींचे पिरॅमिड ही संकल्पनाच चुकीची आहे. उपमा द्यायचीच झाली तर गोएथिक आर्च ही उपमा देता येईल arch ह्यात की स्टोन शीर्षस्थानी आहे म्हणुन तो उच्च असे ठरत नसते , ह्या कमानीतील अन्य कोणताही दगड त्या की स्टोन इतकाच महत्वाचा असतो. कारण कोणताही काढला तरी आर्च ढासळणारच आहे ! असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र एकामेकांवर अवलंबुन आहेत ! थोडक्यात काय तर तुम्हाला तुमचा वर्ण कोणता हे ठरवायची मुभा आहे ! लोकं काहीही का म्हणेनात - इट्स युवर लाईफ, युवर चॉईस !

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 21/12/2024 - 08:57
हे कितीही आदर्शवादी वाटत असलं तरी वास्तवात तसं नसतं. कर्माधारीत वर्णव्यवस्था असती तर उच्चकुलीन क्षत्रिय विश्वामित्राला ब्राह्मण बनण्यासाठी इतका संघर्ष करावा लागता ना. इथं तर वैश्य शूद्रांचा विषयच नाही.

In reply to by कॉमी

Bhakti 21/12/2024 - 11:13
असे लोक धर्माचे रक्षक नाहीत,धर्माचे भक्षक आहेत.ज्ञान साधना जन्माधारित वर्णव्यवस्थेवर आता नक्कीच नाही. आजच्या ही काळात ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा वर्ण मानणारे फेल गेले आहेत.हेच लोक( अशुद्ध विचारसरणी) सनातन बुडवणार....

In reply to by प्रचेतस

अरे वा ! सर्वच जण इतक्या श्रध्देने जन्माधारित वर्णाश्रम व्यवस्था मानत असतील तर त्यात मला आनंदच आहे ! वर्णाश्रमव्यवस्थेने घालुन दिलेली कर्माची बैठक हाच चारही पुरुषार्थांचा आणि विशेषकरुन मोक्षाचा सर्वात सुलभ मार्ग आहे . इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मन:। संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ आणि विश्वामित्रांच्या विषयी आपण स्वतंत्रपणे बोलु कारण तो मोठ्ठा विषय आहे. तुर्तास इतकेच म्हणतो कि विश्वामित्रांची वृत्ती क्षत्रियच होती. त्यांची ब्राह्मण होण्याची मनीषा मुळातच वसिष्ठांच्या प्रति असलेल्या असुयेतुन निर्माण झाली होती. कामधेनु आपल्याकडे असावी ह्या इर्ष्येतुन झालेली होती . ही मुळ वृत्ती बदलल्या शिवाय कसे ब्राह्मण होता येईल ? मात्र एकदा ती वृत्ती बदलल्यावर ब्राह्मण विश्वामित्रांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो अक्षरशः लोकोत्तर होता - गायत्री मंत्र जो सर्वात पवित्र मंत्र मानला जातो त्याचे ऋषी हे विश्वामित्र आहेत ! वसिष्ठ नाहीत !! असो. अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर 21/12/2024 - 10:35
"अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from !"
कर्मधर्मसंयोगाने आमचेही गोत्र कौशिक आहे 😀 So now you know where 'all this' is going to... 😂 BTW आत्ता सहज 'कौशिक गोत्र' असे गुगलवर टंकले तर खालील AI जनरेटेड रिस्पॉन्स आला. त्यातल्या ठळक केलेल्या गोष्टी वाचुन गंमत वाटली... कौशिक, ब्राह्मणों का एक गोत्र और उपनाम है. इसका नाम ब्रह्मर्षि विश्वामित्र के नाम पर रखा गया है. कौशिक गोत्र से जुड़ी कुछ और बातेंः
  • कौशिक एक प्राचीन भारतीय गोत्र है.
  • कौशिक गोत्र के लोगों को कौशिके भी कहा जाता है.
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे काफ़ी गुस्से वाले होते हैं.
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे नेपाल में हिमालय से निकलने वाली कोसी नदी के किनारे रहते थे.
  • विश्वामित्र को इसी नदी के किनारे तपस्या करते हुए ऋषि का दर्जा मिला था.
  • कौशिक एक भारतीय उपनाम भी है जो बरनवाल का एक गोत्र है.
जनरेटिव एआई की सुविधा फ़िलहाल एक्सपेरिमेंट के तौर पर उपलब्ध है. 😀

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 21/12/2024 - 12:12
कदाचित त्यामुळेच, तुझे आणि माझे, पहिल्याच भेटीत, विश्वासाचे नाते तयार झाले असावे का?
हा हा हा... असुही शकेल तसे, ब्रम्हर्षी विश्वमित्रांनाच ठाऊक 😀 बाकी ह्यावरुन वरती जो AI जनरेटेड रिस्पॉन्स दिला आहे त्यात
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि उनके आपस में ढेर सारे वैचारिक मतभेद होते हैं
असेही एक वाक्य असायला हवे होते असंही वाटायला लागलंय, कारण आपल्यातही अनेक बाबतीत पराकोटीची मतभिन्नता आहे आणि प्रगो त्यांच्या लेखनातुन/प्रतिसादांतुन जे विचार मांडत असतात त्यातल्या कित्येक विचारांच्या अगदी विरुद्ध टोकाचे माझे विचार असतात! गंमतच आहे सगळी 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 21/12/2024 - 13:37
मतभेद असणे ही गोष्ट वेगळी... पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
अर्थातच... आणि मतभेद असुनही विश्वास आणि मैत्री पण आहे म्हणुनच तर "गंमतच आहे सगळी 😂 😂 😂" असे लिहिले होते!
प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...
त्यांचे तत्वज्ञानावर आधारीत विचार माझ्याही पार डोक्यावरून जातात, पण सर्वसामान्य किंवा सामाजिक विचार जे सहज 'समजतात' त्यातल्या काही (किंवा बऱ्याच म्हणा हवंतर) बाबतीत वैचारीक मतभेद आहेत असे म्हणयचे होते 😀

In reply to by प्रचेतस

मान्य आहे... सामजिक स्तरावर हे मान्य होणे कठीण आहे...(पण अशक्य नाही. कारण तसे असते तर, वाल्या कोळी याला, वाल्मिकी ऋषीं, हे पद नसते मिळाले.) आपण आपला वैयक्तिक पातळीवर विचार करायचा.. आपल्या पुरती तरी जात पात पाळायची नाही. इतर जनतेला जसा विचार करायचा असेल तसा करू देत.. आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, प्रत्येकाचे वैयक्तिक कपाट वेगळेच असते.आपली कापडे त्यात कोंबायला जाऊ नये.

कंजूस 20/12/2024 - 16:30
ज्यांना गणितातील सेट थिअरी. सेट डायग्राम्स माहिती आहेत त्यांना चित्रे काढून दाखवता शक्य आहे. शब्द जंजाळाशिवाय. एका विश्वात अनेक विश्व असतात. त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. ती संपूर्ण वेगळीच असतात. राजाचं राज्य आणि त्यातली प्रजा एक विश्व धरलं तरी अरण्यात शिकारीला गेल्यावर तिथल्या भिल्ल, अरण्यवासीयांवर त्याचा आदेश चालत नाही. ते अरण्य त्याच्याच राज्यात असलं तरी.

In reply to by कंजूस

गणितातील सेट थिअरी >>> होय होय. मलाही संख्याशास्त्रचा विध्यार्थी असल्याने असा विचार करायला आवडते ! ह्याला अ‍ॅनालिटिकल फिलॉसॉफी म्हणतात . मी एक दोन दा तसा प्रयत्न केला होता , सर्व काही गणिती भाषेत लिहायचा . पण त्यावर एक मित्र बस मला इतकेच म्हणाला - Gödel's incompleteness theorems ! "Any consistent formal system F within which a certain amount of elementary arithmetic can be carried out is incomplete; i.e. there are statements of the language of F which can neither be proved nor disproved in F." आता ह्यावर काय बोलणार ! आम्हाला आता शब्दजंजाळाशिवाय पर्यायच नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

कंजूस 21/12/2024 - 12:53
'मी' नावाचा एक गोल दुसऱ्या एका मोठ्या गोलात काढला आणि त्या मोठ्या गोलाला ' ब्रह्म' हे नाव दिले तर मी आणि ब्रह्म यांचे स्पष्टीकरण खूप शब्दजंजाळापेक्षा सोपे होईल समजायला. अशीच चित्रे काढून विविध कल्पना समजावता येतील. परंतू 'ज्ञान' किंवा 'विद्या' यांचे गोल कुठे आणि कसे दाखवायचे हे फार कठीण आहे कारण त्यांच्या व्याख्याच स्पष्ट होत नाहीत. सर्व गोल हे एकाच प्रतलावर आहेत असं समजून आपण चित्र मांडायला बसतो तेव्हा काही गोल वेगळ्याच प्रतलांत असण्याची शक्यताही लक्षात घ्यावी लागते. यातून तो ' Gödel's incompleteness theorems !' मांडला जात असणार.

Bhakti 20/12/2024 - 19:40
चैतन्याला पाप पुण्याचा भोग नसतो.तो जीवात्म्याला असतो.चैतन्यस्वरूपाचा ध्यास असावा,चैतन्याचा आदर असावा.
तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त
यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल.

In reply to by Bhakti

यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल. >> एक खुप सुंदर उदाहरण आठवलं - समजा तुम्ही झोपलेले आहात. अगदी गाढ झोपेत . इतके गाढ झोपेत की तुमच्यासाठी तुमचे स्वप्न हेच सत्य झालेले आहे . आता कल्पना करा की स्वप्नात तुमच्या मागे वाघ लागलाय , तुम्ही जीवाच्या आकांताने पळाताय , तरीही वाघाने तुम्हाला पकडलेच , वाघाची नखं तुमच्या बरगड्यात घुसत आहेत , वाघ तुमच्या नरडीच्या घोट घेत आहे , आता तुम्ही झोपेत जीवाच्या आकांताने ओरडताय , वाचवा .... वाचवा ! आता तुम्हाला ह्या वाघापासुन वाचवण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय काय ? तुम्हाला झोपेतुन जागे करणे ! दॅट्स इट ! मी जीवात्मा आहे, ह्या देहात अडकलो आहे , हे भोग भोगतोय, वगैरे वगैरे स्वप्नातील भास असल्यासारखे आहे, त्यापासुन तुम्हाला तुम्हीच वाचवु शकता ! बस विचाराने विचार बदलुन ! समर्थ म्हणातात : इतुकीं वेडें लाविलीं । ते माथा खेळे खेळ येकली । ते मायेनेंच विराली । पाहिजे माया ॥ श्रीराम मी जीवात्मा आहे , असे वाटणे ही माया आहे , भास आहे , माया तीची ती एकटीच खेळत आहे , तिचा नाश कसा करणार ? मी शिव आहे ह्या धारणेने , ह्या विचाराने . पण हा विचारही मायाच आहे की ! मायेचे बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां समाधान ।मायाचि गोंवी आणि बंधन । तोडी , तेही माया ॥ श्रीराम आणि माऊलींचे काय बोलणार , त्यांनी तर कहर उपमा दिली आहे ! जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें । तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ जसे पती पत्नीने आपला अनुभव घ्यायचा म्हणुन आपपली मस्तके छाटली अन दुसर्‍याला बसवली तरी तिथे पालट होतच नाही , उलट दोघांचाही जीव जातो ! तसेच "अहं ब्रह्मास्मि" ह्या ज्ञानाने , विचाराने, "मी देहधारी जीवात्मा आहे" ह्या अज्ञानाचे, ह्या विचाराचे खंडन करायला गेल्यास तिथे अज्ञानही रहात नाही आणि ज्ञानही रहात नाही ! . . . माया योग्याची मा‍उली । जेथील तेथें ने‍ऊन घाली । कृपाळूपणें नाथिली । आपण होय ॥ श्रीराम ! अवांतर : हे असं काही आठवलं की कोल्हापुरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घ्यायची फार इच्छा होते ! पण मागच्यावेळेस दर्शनाला गेलेलो तेव्हा खुप रुसलो होतो जगदंबेवर. महाद्वारात उभा राहुन कडक नवस बोललो , आता तो पुर्ण जाल्याशिवाय तुझ्या दर्शनाला येणार नाही असं म्हणालो. तस्मात, आता बघु कधी बोलावणे धाडते ती ते !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 21/12/2024 - 07:06
गाढ झोप (स्वप्नावस्था) आणि जागृत याचे तुम्ही दिलेले पहिले उदाहरण तर खुप प्रसिद्ध आहेच.आदि शंकराचार्य आणि अद्वैत यांचा अभ्यास करतांना ही पोस्ट मागे एकदा लिहिली होती,ती देते.यात तेच पुन्हा समजते शुद्ध ब्रम्ह... शुद्ध चैतन्य..हेच अद्वैत..पाप पुण्य परे आहे _/\_मलापण काहीतरी सापडलंय..पण नीट मांडता येत नाही.तुम्ही इतक अभ्यासपूर्ण मांडता ,हेवा वाटतो :) धन्यवाद! एक गंमत सांगते याविषयावर एक लेख वाचला होता. याला hallucinations म्हटले जाते???(लोकांना विचारावर विचार करणाऱ्यांना सिक म्हणावं वाटतं, आश्चर्यच आहे ;) #अद्वैत #consciousness अद्वैत तत्त्वज्ञान जाणतांना जनक राजाची गोष्ट समजते. जनक राजाला स्वप्न पडते.त्यात शत्रूंनी त्याच्या राज्यावर आक्रमण केले आहे.तो हरतो,अन्नान दशेत फिरतो.कोणी त्याला शत्रू भीतीने खायला देत नाही.राजा भुकेलेल्या लोकांच्या रांगेत उभा राहतो.जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा अन्न संपते.त्याला उरलेली खरवड मिळते.या सगळ्या अपमानामुळे राजा कोलमडतो आणि रडत देवाचा धावा करत कोसळतो. या दरम्यान झोपेत त्याचा ह्रदय वेग वाढतो, तो जागा होतो.आरडा ओरडा करतो.राणी , सेनापती सर्व राजाला समजावतात.पण राजा बडबडत राहतो. शेवटी अष्टावक्र ऋषी येतात. राजा त्यांना विचारतो" सर्व म्हणत आहे ते स्वप्न होते,पण मी तो अपमान ती अन्नाची भूक सगळं अनुभवलय मग ते खोटं कसं?आता ते कसं नाही?" अष्टावक्र म्हणतात "राजा आता इथे तुला राणी दिसत आहे.सगळ्यांनाही दिसते.ही जागृत अवस्था मना बाहेर पाहते,ही सत्य आहे.स्वप्नात घडलेल्या गोष्टीं मधले शत्रू ,राणी,तुझी भूक याच साक्षीदार तू आहेस तीही स्वप्न अवस्था सत्य आहे.हेही सत्य तेही सत्य.जगत मिथ्या,दोन्ही अवस्थेत तू खरा आहेस." याच्या पुढेच सोन्याचे उदाहरण दिले जाते.सोन्याचे दागिने हार,बांगड्या केल्या जातात.पण हे सर्व वितळवलं तर राहते सोनं राहतेच. ही स्वप्नं,जागृत अवस्थेत आपणच असतो.तेच ब्रम्ह तत्व ,तीच ब्रम्ह अवस्था सतत जाणून राहिल्यास आपण कधीही स्थिर राहू शकतो. चेतनेची एकच कायमस्वरूपी अवस्था आहे आणि ती म्हणजे ब्रह्म. यात जगत मिथ्या म्हटलं गेलंय.पण शंकराचार्यांनी जगाला मिथ्या मानलं नाही.तर जगत आहे,मायाने जग बुद्धीवर आवरण चढून ब्रम्ह अवस्थेचा विसर पडतो. -भक्ती

In reply to by Bhakti

वाह भक्ती ताई ! मलाही अष्टावक्रगीतेची आठवण आलेली . त्यातील एक श्लोक उदृत करतो : मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ आणि म्हणुनच एकदा 'अघमर्षण ' केले की तुम्ही सुटलेले आहात ! त्यानंतर तुमचे सर्व प्रापंचिक व्यवहार हे खेळ आहेत बस्स ... तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥५॥ ___________/\____________

२-३ वेळा वाचला--पण झेपत नाहीये. असो. आपल्याला सगळे समजलेच पाहीजे असा आग्रह नाही. ते रमण महर्षी आणि नीमकरोली बाबा यांच्यामधे कोण आहेत हो गालातल्या गालात हसणारे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 21/12/2024 - 07:14
हे नगरचे अवतार मेहेरबाबा! नक्की भेट द्या ,इतके शांत स्थळी आहे.यावरचा आधीचा लेख https://www.misalpav.com/node/49208 फोटो गेले आहेत.विकिपिडिया सर्च करा फोटोसाठी मेहेराबाद,अहिल्या नगर.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

+१ मातुल घराण्यात दत्तसंप्रदायाच्या अधिकारी,अनुग्रहित व्यक्ती होऊन गेल्यात. माझी पणजी,पणजोबा आणी आजोबा मामा देशपांडे. प्रेम मिळाले पण ज्ञान नाही. मी चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या साधू सारखा. साधू तपस्या करत असताना त्यांना देव भेटला. महाराजांनी विचारले ,देवा मोक्ष कधी मिळणार?देव म्हणाला, या झाडावर जीतकी पाने आहेत तितक्या वर्षानंतर. सध्या पाने मोजत आहे. लिहीत रहा वाचत राहू. जेव्हां उजाडेल तेव्हां उजाडेल. काही घाई नाही.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/12/2024 - 13:25
ह्या विषयी शांतिपर्वातील जनक-पंचशिख संवाद व तद्नुषंगाने होणारे बौद्धमताचे खंडन मुळातून वाचणे आवश्यक आहे.

चित्रगुप्त 20/12/2024 - 05:25
साष्टांग दंडवत प्रगो. हे सगळे मजसारख्या पामरांना कळेल अश्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगावे ही नम्र विनंती.
शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप. शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच. -- उदाहरणार्थ मला ('मी' ला) या दोन्हीपैकी काहीच वाटत नाही. अश्या लोकांनी काय करावे ?

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद चित्रगुप्त काका. आपण नेहमी आवर्जुन प्रतिसाद देता हे लेखनाचा हुरुप वाढवणारे आहे.
अश्या लोकांनी काय करावे ?
सगळ्यांना सगळं कळलेच पाहिजे असा दुराग्रह नाही. ह्या इथे मला अमृतानुभवातील ३ ओव्या उधृत कराव्याश्या वाटतात :
कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तरी ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया । तरी कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता । चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥
समजा राजाला तुम्ही तुम्ही राजा असे नाही म्हणालात तरी तो राजाच असतो. त्याचे राजेपण तुम्हाला जो प्रत्यय येतोय किंव्वा येत नाहीये ह्यावर अवलंबुन नसते. तसेच शिवस्वरुपाला तुम्ही समजुन घेतले काय किंवा नाही समजुन घेतले काय , त्याने काहीच फरक पडत नाही ! आहे हे असं आहे. :) दोन्ही पैकी काहीच वाटत नाही हे अनध्ययनाचे प्रतीक आहे, आता सगळ्यांनी अध्ययन केलेच पाहिजे असा आपला हट्ट नाही. तुम्हाला हौस असल्यास करा , नसल्यास नका करु. हे समजुन घ्यायची हौस आहे पण कळत नाहीये असे म्हणत असाल तर मात्र मी तुम्हाला शंकराचार्य उपनिषदभाष्य वगैरे वाचण्याआधी, लोकमान्यांचे गीतारहस्य वाचन करा असे सुचवेन कारण त्यांनी एकदम उत्तम पध्दतीने स्टेप बाय स्टेप विवेचन केले आहे ! :) पुनश्च एकवार धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 20/12/2024 - 09:51
मुळात 'पाप' म्हणजे (नेमके) काय ? विविध धर्मात वेगवेगळ्या कृत्यांची गणना 'पाप' म्हणून होते. तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?

In reply to by चित्रगुप्त

तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?
>>> उत्तर वर लेखातच आहे अगदी सुरुवातीलाच !

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 20/12/2024 - 17:20
अध्यात्म वैगेरे फारसे समजत आणि पटत नसल्याने बाकी काही नाही. पण लेखात पाप म्हणजे काय हे सापडले नाही. पापाची दोन उदाहरणे मात्र आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 21/12/2024 - 20:00
प्राडॉ ..... पण फूल टू करमणूक असते म्हणून असे विषय इंजॉय करण्याशी असहमत .. असं वाचन करत हळूहळु समजुन घेणं, प्रगल्भ होत जाणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.. गंभीरपणेच घ्यायला हवी असं मला वाटतं !

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या बद्दल धन्यवाद.... नक्कीच वाचीन... अहंकार कमी करायला, ह्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो का? कारण, कमी अधिक प्रमाणात, प्रत्येक व्यक्तीला थोडा तरी अहंकार असतोच.

In reply to by मुक्त विहारि

आपल्याला अहंकार कमी करणे जास्त करणे वगैरे सव्यापसव्य करावयाचे नाहीत, आपल्याला फक्त ह्यातील "अहं" कोण आहे एवढाच शोध घ्यायचा आहे . तुम्हाला गीतारहस्यातील चौथ्या प्रकरणात "आधिभौतिक सुखवाद" ह्या प्रकरणात उत्तर मिळेल अशी आशा आहे !

In reply to by मुक्त विहारि

सखोल अभ्यास असे नाही पण वाचन मात्र नीट केले आहे. माझ्या मते गीतारहस्य हा इतका लोकोत्तर ग्रंथ आहे लोकमान्यांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात स्वदेश स्वराज्य ह्या विषयी काडीमात्र काम केले नसते तरीही केवळ हा एक ग्रंथ लिहिला म्हणुन त्यांचे नाव इतिहासात कोरलेच गेले असते ! अवांतर : गीतारहस्याच्या , त्यातील सिध्दांतांच्या , अनुमानांच्या काही मर्यादा आहेत , पण वेदांताचा , आचार्यांच्या भाष्याचा सखोल अभ्यास केलेल्या व्यक्तींनाच त्या जाणवु शकतात . तस्मात त्याविषयी मी बोलणे टाळतो . अन केवल माऊलींची ज्ञानेस्वरीतील ही ओवी उधृत करतो : जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥ जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥ १७२ ॥ धन्यवाद !

प्रचेतस 20/12/2024 - 06:23
आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि । ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि ॥ योहमस्मि ब्रह्माहमस्मि । अहमस्मि ब्रह्माहमस्मि ॥ अहमेवाहं मां जुहोमि स्वाहा ॥
तुमच्या विधानात "मी" आणि "ब्रह्म" यांना समानार्थी मानले आहे, मात्र यामध्ये तर्कसुसंगती आवश्यक आहे. "मी" म्हणजे व्यक्तीचे अहंभाव किंवा आत्मचेतना. "ब्रह्म" म्हणजे विश्वव्यापी, शाश्वत, निर्गुण सत्य. व्यक्तीचा "मी" (अहं) मर्यादित असतो, तर ब्रह्म अमर्यादित आहे. मग मर्यादित "मी" अमर्यादित "ब्रह्म" कसा होऊ शकतो? शिवाय ज्ञान ही निर्जीव गोष्ट नाही, तर ज्ञान हे अनुभवातून साकार होते. मग फक्त "मी" ला ज्ञान कसे म्हणता येईल? "मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते. खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म. येथे "मी" म्हणजे शुद्ध आत्मा आहे, जो ब्रह्माशी एकरूप आहे. शेवटी हा द्वैताद्वाचा खेळच झाला.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्ली सर !
"मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते.
अगदी अगदी एकदम योग्य बोललात ! ही साधनेच्या स्तरावरील शेवटची पायरी मानतात . तुमच्या पायात लोखंडाची बेडी होती, त्याची तुम्हाला किल्ली सापडली, ती किल्ली मात्र शुध्द सोन्याची आहे ! आता तुम्ही ह्या किल्लीने लोकांडाच्या बेडीतुन मुक्त झालात तर किल्लीचीही गरज नाही ना ! बेडी काढुन टाकली तशी किल्ली ही टाकुन द्या ! किल्ली सुंदर आहे, मौल्यवान आहे, असे वाटते त्यांची अवस्था दयनीय आहे . #माय_प्रेशियस इये विषयी आपल्याला इशोपनिषदात एक सुंदर विधान सापडते
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते। ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः ॥
जे लोक "मी ब्रह्म नाही , काहीतरी भिन्न देह वगैरे आहे " ह्या अज्ञानाचा आश्रय करुन राहतात ते अंधःकारात भरकटालेले आहेत, मात्र जे "मी ब्रह्म आहे" ह्या ज्ञानात गुंतुन पडले आहेत ते त्याही पेक्षा गहन अंधःकारात भरकटलेले आहेत ! ! ह्यावर ओशो ने अतिषय सुंदर प्रवचन दिलंय पण मला आत्ता त्याची लिंक सापडत नाहीये .
खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म.
अगदी बरोबर. ह्या ब्रह्मानुभवात, अनुभव , अनुभाव्य आणि अनुभाविक राहातच नाहीत ! काय बोलणार ! जे जे काही ह्या वस्थेचे वर्णन करणारे साहित्य आहे ते सारे त्या लोकांनी लिहिलेले आहे जे ह्या शुध्द ब्रह्म अवस्थेतेतुन एक पातळी खाली उतरले आहेत . आणि संस्कृतमध्ये खाली उतरणे ला काय म्हणतात ? अव + तर = अवतार ! शुध्द अनुभव हा शब्दातीत आहे - त्या साठी आचार्यांनी अपरोक्षअनुभूती असा शब्द वापरला आहे, समर्थांनी अनुर्वाच्च समाधान असा शब्द वापरला आहे , माऊली म्हणतात >
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
मीही हे जे काही लिहितोय हा सगळा शब्देविण संवादु , दुजेविण अनुवादु आहे. "ज्यांना कळतं, त्यांना कळतं" , ते माझ्याकडे पाहुन फक्त हसतात गालातल्या गालात. त्यांना माहीती आहे मी कोण आहे , मला माहीती आहे ते कोण आहेत . :) m meherbaba nkb

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 21/12/2024 - 12:17
प्रगो सर, काही तात्विक चर्चा- किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे. "विद्या आणि अविद्या" यांचे उदाहरण दिले गेले आहे, परंतु दोन्ही अवस्थांमध्ये अंधःकार असल्याचे विधान चुकीचे वाटते. ज्ञान (विद्या) हे नेहमीच प्रकाशाचा स्रोत मानले जाते, आणि त्यामध्ये गहन अंधःकाराचा उल्लेख करण्याचा अर्थ आत्मज्ञानाच्या संकल्पनेलाच विरोधाभासी ठरतो. त्यामुळे इथे उपनिषदातील विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. तुम्ही नंतर अवताराचा उल्लेख केलात त्याच्याच व्याख्येनुसार "अवतार" म्हणजे खाली उतरणे असे मानले गेले आहे, पण शुद्ध ब्रह्मानुभवातून खाली येणे म्हणजे तो अनुभवच भंग पावतो. खाली उतरलेल्या व्यक्तीला त्या अवस्थेचा पूर्ण सत्यभाव कसा सांगता येईल? आता तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता की "शुद्ध अनुभव हा शब्दातीत आहे." हे विधान योग्य आहे, परंतु अनुभवाची संकल्पना मांडण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो. तुम्हीच श्लोकांचा, वाक्यांचा उपयोग करत आहात, म्हणजे स्वतःच्या विधानाचाच विरोध करत आहात.

In reply to by प्रचेतस

किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे. काही अंशी सहमत | एकदा बेडीतून मुक्त झाल्यावर किल्लीचा उपयोग नाही म्हणून किल्ली सोन्याची असली तरी (नव्हे सोन्याची असल्यामुळेच टाकून द्यावी, नाहीतर तिचा देखील मोह होतो) अशा अर्थाने वाचावे. मात्र एकदा बेडी सुटली म्हणजे परत मनुष्य बेडीत अडकणारच नाही असे देखील नाही. मात्र नवीन बेडीला पुर्वीचीच किल्ली लागेल काय याची शाश्वती नाही. (किंबहुना न लागण्याचीच शक्यता अधि़क) त्यामुळे कदाचित किल्लीचा त्याग करावा असा विचार असावा. अहंकारमुक्त होण्याचा साधनेचाच माणसास अहंकार येतो अशी उदाहरणे जागोजागी सापडतात. मानवदेह म्हटला की अहंकार, मोह मरेपर्यंत सुटत नाही. साधूला लंगोटीचा देखील मोह पडतो अशी देखील उदाहरणे आहेत. मात्र आपण प्रयत्न करावे. अपयश देणे न देणे दुसर्‍या कोणाच्या तरी हाती आहे असे समजले की कर्माचा अहंकार आणि साधनेचा भार होत नाही. असो.

उजव्या हातात पाणी घ्या , ऋतं च सत्यं ... म्हणा , ओंजळीतील पाण्यावर उछ्वास टाकून ते डाव्याबाजूला टाकून द्या. झालं अघमर्षण। आता पापं संपली.
चला लागा कामाला...! =)) -दिलीप बिरुटे (पापमुक्त)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चला लागा कामाला...! =))
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही ! पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे , मोठ्ठ्या माश्याने छोट्या माश्याला खाल्ले म्हणुन त्याला पाप लागत नाही :) ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही ! धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 20/12/2024 - 10:18
ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही !
रूढीप्रमाणे 'द्विज' जरी असलो तरी 'पाप म्हणजे काय माहीतच नाही' या क्याट्यागरीत 'मी' येत असल्याने या भानगडीत पडण्याचे कारण नाही. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

एक्झ्यॅक्टली काका एक्झ्यॅक्टली ! मनुस्मृती अन अन्य अनेक ठिकाणी हे जे काही म्हणले आहे की "वेदाध्ययनाचा , उपनिषदांचा अधिकार केवळ द्विजांना आहे , इतरांना नाही. " त्याचा अर्थ हाच होता जो तुम्ही वर लिहिलेला आहे. इतरांना गरजच नाही ह्या भानगडीत पडायची ! आता द्विज म्हणजे फक्त ब्राह्मण . कारण क्षत्रिय वैश्य असं कोणी राहिलंच नाही. आता ह्या ब्राह्मणातही तुम्ही म्हणालात तसे बहुसंख्य हे "रूढीप्रमाणे 'द्विज' " असल्याने त्यांनाही गरज च नाही वेदाध्ययन उपनिषद वगैरे अभ्यासण्याची ! ह्याला उच्च्नीचता किंवा भेदभाव म्हणुन बघुच नका. ही केवळ अनावश्यकता आहे ! as simple as that ! अगदी पटकन सहज सुचले म्हणुन एक मजेशीर उदाहरण सांगतो - तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 20/12/2024 - 13:37
तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे
यावरून आठवले, 'सैराट' च्या दोनतीन गाण्यांचे रेकॉर्डिंग अमेरिकेत झाले. भलामोठा सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. त्यांना वाजवण्यासाठी दिलेले लिखित संगीताचे 'स्कोअर्स' अजय-अतुललापण दिले गेले, त्यांनी संगितले की आम्हाला यातले काहीही समजत नाही. तिथले वादक थक्कच झाले की यांना काहीही कळत नसता एवढी सुंदर संगीतरचना मुळात यांनी केलीच कशी ? https://youtu.be/yo4E0tWGcV4?si=tB-nNrYzTh_29bmx

In reply to by चित्रगुप्त

तुर्रमखान 20/12/2024 - 14:33
कै कै गोष्टींचं फारच शैक्षणिकीकरण झाल्यामुळे एका विशिष्ठ साच्याच घालून त्याला कैतरी नाव देवून शिकवणं सुरू झालं. एखाद्याला तो प्रकार माहीत नसणं म्हणजे ती संकल्पनाच माहीत नसणं असं होत नाही. एकही भाषा ज्ञात नसलेली व्यक्ती विचार करू शकतेच की. 'एखादी गोष्ट पाप आहे हे माहीत नसेल तर पाप लागत नाही' म्हणजे तर हैट आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे....
होय, मलाही धक्का बसलेला हे लक्षात आल्यावर . सध्या धर्मशास्त्राचा इतिहास वाचत आहे आमचा भारतरत्न पां.वा. काणे सरांनी लिहिलेला. त्यात काही प्रकर्षाने जाणवलेली उदाहरणे लिहितो इथे . समुद्रउल्लंघन हे पाप मानले जायचे . धर्मशात्रानुसार हे पाप फक्त ब्राह्मणांच्या करिता होते , क्षत्रिय वैश्य शुद्रांना मुक्त संचार करण्याची मुभा होती. मद्यपान हे पाप मानले जायचे - पण हे फक्त ब्राह्मणांच्या आणि वैश्यांच्या करिता, क्षत्रिय आणि शुद्रांना मद्यपानाची मुभा होती. धनसंचय करणे हे ब्राह्मणाच्यासाठी पाप मानले होते मात्र क्षत्रिय वैश्यांना आणि शुद्रांना त्याची मुभा होती. धर्मशास्त्रात त्रैवर्णिकांना घटस्फोट नावाचा विधीच नाही, पण शुद्रांना काडीमोड घेण्याची मुभा होती. थोडक्यात काय तर पाप आणि प्रायश्चित्त हे बहुतांश करुन द्विजांकरिताच होते , शुद्रांना बहुसंख्य वेळा हे नियम, ह्या संकल्पना बांधील नसत ! खुप उदाहरणे आहेत. सर्वच लिहित बसत नाही. धर्मशास्त्राचा इतिहास संपुर्ण वाचुन झाल्यावर सारांश रुप लिहिण्याचा मानस आहे तेव्हा लिहिन नक्की !

In reply to by प्रसाद गोडबोले

धक्का वगैरे काही बसवून घ्यायचे नाही. वाचन आणि समज वाढली की, हळुहळु सगळं लक्षात येत जातं. साक्षात ज्या विधात्याच्या मुखातून द्विजन उत्पन्न झाल्यामुळे, आणि त्याच्या श्रेष्ठत्वामुळे जे सर्व वर्णाचे जे स्वामी बनले आहेत त्यांना खरं तर, पाप पूण्य वगैरे नसायलाच पाहिजे होतं. क्षत्रीय वैश्य शूद्र यांच्या जिविताचे मोल तसं ही धर्मशास्त्रानूसार अल्प समजल्या जात होतं. गतजन्मातील पाप-पुण्य कर्म-आणि पापांमुळेच तर, त्यांना अपवित्र अशा क्षत्रीय-वैश्य किंवा शुद्राचा जन्म त्यांना मिळाला असावा. (अवघड आहे सगळं ) ज्या कोणी बिचा-या सुत्रकारांनी द्विजनांना समुद्रौल्लंघन पाप ठरवले असेल त्यांचा अभ्यास कमी पडला असावा असे वाटते. आणि ज्यांनी कोणी असे समुद्रोल्लंघन केले असेल ते डाव्या-उजव्या बाजूला पाणी शिंपडून तसेही पापमुक्त झालेच असतील. शास्त्रे -सुत्रे ही आजच्या भाषेत त्याकाळातील सर्वोच्च कायदे असल्यामुळे त्यांनी जे लिहिले आहे, इतरांनी तितकेच फॉलो करायचं. विधात्याच्या मुखातून निर्माण झालेले ऑलरेडी पवित्र आणि सर्वोच्च होते. शास्त्रांच्या नियमांनुसार वागतांना इतर आणि स्ववर्णांवर वचक राहिला पाहिजे, इतरत्र जगभ्रमण करु नये म्हणून त्याला पाप ठरवले असावे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:29
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही !
च्यामारी ब्राह्मण कोण? क्षत्रिय कोण? वैश्य कोण? आणि शुद्र कोण? ह्यावर प्रचंड वैचारिक गोंधळ माजला आहे माझ्या डोक्यात! जात्याधारित वर्णव्यवस्था मानावी तर अस्मादिकांचा जन्म कोकणस्थ ब्राम्हण परिवारात झाला आहे त्यामुळे 'ब्राम्हण' असे म्हणता येईल! कर्माधारित वर्णव्यवस्था मानावी तर मी एक व्यापारी/व्यावसायिक असल्याने वैश्य, माझ्याकडे नोकरीवर रुजू होणाऱ्यांना काम कसे करावे ते शिकवतो म्हणजे अध्यापन करतो म्हणुन ब्राम्हण, (पूर्वी समाजातील कोणासाठीही रस्त्यावरही उतरणारा) पण आता फक्त परिचयातील कोणावरही अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उभा राहतो त्यामुळे क्षत्रिय, की घरी नेमलेले सफाई कर्मचारी अनुपस्थित असतील त्यादिवशी किंवा विकएंड होमवर कोणी मदतनीस उपलब्ध नं झाल्यास आपल्याच घरातील संडास साफ करावा लागल्यास, किंवा फार्म वरील एखाद्या पाळीव प्राण्याचा अंत्यसंस्कार आपल्याच हातानी करावा लागल्यास शूद्र ठरणार असीन तर मी नक्की कोण आहे? त्यामुळे माझ्या मते मी आणि माझ्या आजूबाजूला राहणारे / वावरणारे / बोलणारे सगळे मनुष्यप्राणी आहेत... त्यांची जात कुठली आणि धर्म कुठला ह्याला माझ्यादृष्टीने तरी काही महत्व नाही आणि त्याच्या तपशीलात जायची मलातरी गरज वाटत नाही. माझे काही गैरसमज असल्यास ते जरूर दूर करावेत... पण कृपया बोली/व्यावहारिक भाषेत... ती वेद आणि उपनिषादांची भाषा मज पामराच्या आकलनाच्या पलीकडची आहे साहेब!

In reply to by टर्मीनेटर

नमस्कार टर्मिनेटर ! ब्राह्मण - ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण क्षत्रिय - आपल्या भूमीची देशाची धर्माची देवाची संस्कृतीची रक्षा करतो तो क्षत्रिय वैश्य - जो देशात वास करतो , दैनंदिन व्यवहार चालावेत म्हणुन कामे करतो शेती , पशुपालन , कोणत्याही प्रकारचा व्यापार करतो वैश्य शुद्र - वरील त्रैवर्णिकांना त्यांच्या कामात मदत करतो तो शुद्र . वैदिक कालात कर्माने ठरत होते वर्ण , नंतर जन्माने ठरायला लागले , आता वृत्तीने ठरतात असे माझे मत आहे. सो सोप्प्या शब्दात बोलायचं तर तुम्हाला चॉईस आहे तुम्हाला कोणता वर्ण निवडा ! कोणी उच्च नाहीये कोणी नीच नाहीये , जो तो आपापल्या कामात महत्वाचाच आहे. पुरुषसुक्तात म्हणलं आहे तसे - एका देहाचे अवयव ! बाकी धर्माची उतरंड जातींचे पिरॅमिड ही संकल्पनाच चुकीची आहे. उपमा द्यायचीच झाली तर गोएथिक आर्च ही उपमा देता येईल arch ह्यात की स्टोन शीर्षस्थानी आहे म्हणुन तो उच्च असे ठरत नसते , ह्या कमानीतील अन्य कोणताही दगड त्या की स्टोन इतकाच महत्वाचा असतो. कारण कोणताही काढला तरी आर्च ढासळणारच आहे ! असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र एकामेकांवर अवलंबुन आहेत ! थोडक्यात काय तर तुम्हाला तुमचा वर्ण कोणता हे ठरवायची मुभा आहे ! लोकं काहीही का म्हणेनात - इट्स युवर लाईफ, युवर चॉईस !

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 21/12/2024 - 08:57
हे कितीही आदर्शवादी वाटत असलं तरी वास्तवात तसं नसतं. कर्माधारीत वर्णव्यवस्था असती तर उच्चकुलीन क्षत्रिय विश्वामित्राला ब्राह्मण बनण्यासाठी इतका संघर्ष करावा लागता ना. इथं तर वैश्य शूद्रांचा विषयच नाही.

In reply to by कॉमी

Bhakti 21/12/2024 - 11:13
असे लोक धर्माचे रक्षक नाहीत,धर्माचे भक्षक आहेत.ज्ञान साधना जन्माधारित वर्णव्यवस्थेवर आता नक्कीच नाही. आजच्या ही काळात ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा वर्ण मानणारे फेल गेले आहेत.हेच लोक( अशुद्ध विचारसरणी) सनातन बुडवणार....

In reply to by प्रचेतस

अरे वा ! सर्वच जण इतक्या श्रध्देने जन्माधारित वर्णाश्रम व्यवस्था मानत असतील तर त्यात मला आनंदच आहे ! वर्णाश्रमव्यवस्थेने घालुन दिलेली कर्माची बैठक हाच चारही पुरुषार्थांचा आणि विशेषकरुन मोक्षाचा सर्वात सुलभ मार्ग आहे . इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मन:। संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥ आणि विश्वामित्रांच्या विषयी आपण स्वतंत्रपणे बोलु कारण तो मोठ्ठा विषय आहे. तुर्तास इतकेच म्हणतो कि विश्वामित्रांची वृत्ती क्षत्रियच होती. त्यांची ब्राह्मण होण्याची मनीषा मुळातच वसिष्ठांच्या प्रति असलेल्या असुयेतुन निर्माण झाली होती. कामधेनु आपल्याकडे असावी ह्या इर्ष्येतुन झालेली होती . ही मुळ वृत्ती बदलल्या शिवाय कसे ब्राह्मण होता येईल ? मात्र एकदा ती वृत्ती बदलल्यावर ब्राह्मण विश्वामित्रांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो अक्षरशः लोकोत्तर होता - गायत्री मंत्र जो सर्वात पवित्र मंत्र मानला जातो त्याचे ऋषी हे विश्वामित्र आहेत ! वसिष्ठ नाहीत !! असो. अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

टर्मीनेटर 21/12/2024 - 10:35
"अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from !"
कर्मधर्मसंयोगाने आमचेही गोत्र कौशिक आहे 😀 So now you know where 'all this' is going to... 😂 BTW आत्ता सहज 'कौशिक गोत्र' असे गुगलवर टंकले तर खालील AI जनरेटेड रिस्पॉन्स आला. त्यातल्या ठळक केलेल्या गोष्टी वाचुन गंमत वाटली... कौशिक, ब्राह्मणों का एक गोत्र और उपनाम है. इसका नाम ब्रह्मर्षि विश्वामित्र के नाम पर रखा गया है. कौशिक गोत्र से जुड़ी कुछ और बातेंः
  • कौशिक एक प्राचीन भारतीय गोत्र है.
  • कौशिक गोत्र के लोगों को कौशिके भी कहा जाता है.
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे काफ़ी गुस्से वाले होते हैं.
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि वे नेपाल में हिमालय से निकलने वाली कोसी नदी के किनारे रहते थे.
  • विश्वामित्र को इसी नदी के किनारे तपस्या करते हुए ऋषि का दर्जा मिला था.
  • कौशिक एक भारतीय उपनाम भी है जो बरनवाल का एक गोत्र है.
जनरेटिव एआई की सुविधा फ़िलहाल एक्सपेरिमेंट के तौर पर उपलब्ध है. 😀

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 21/12/2024 - 12:12
कदाचित त्यामुळेच, तुझे आणि माझे, पहिल्याच भेटीत, विश्वासाचे नाते तयार झाले असावे का?
हा हा हा... असुही शकेल तसे, ब्रम्हर्षी विश्वमित्रांनाच ठाऊक 😀 बाकी ह्यावरुन वरती जो AI जनरेटेड रिस्पॉन्स दिला आहे त्यात
  • कौशिक गोत्र के लोगों के बारे में कहा जाता है कि उनके आपस में ढेर सारे वैचारिक मतभेद होते हैं
असेही एक वाक्य असायला हवे होते असंही वाटायला लागलंय, कारण आपल्यातही अनेक बाबतीत पराकोटीची मतभिन्नता आहे आणि प्रगो त्यांच्या लेखनातुन/प्रतिसादांतुन जे विचार मांडत असतात त्यातल्या कित्येक विचारांच्या अगदी विरुद्ध टोकाचे माझे विचार असतात! गंमतच आहे सगळी 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर 21/12/2024 - 13:37
मतभेद असणे ही गोष्ट वेगळी... पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
अर्थातच... आणि मतभेद असुनही विश्वास आणि मैत्री पण आहे म्हणुनच तर "गंमतच आहे सगळी 😂 😂 😂" असे लिहिले होते!
प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...
त्यांचे तत्वज्ञानावर आधारीत विचार माझ्याही पार डोक्यावरून जातात, पण सर्वसामान्य किंवा सामाजिक विचार जे सहज 'समजतात' त्यातल्या काही (किंवा बऱ्याच म्हणा हवंतर) बाबतीत वैचारीक मतभेद आहेत असे म्हणयचे होते 😀

In reply to by प्रचेतस

मान्य आहे... सामजिक स्तरावर हे मान्य होणे कठीण आहे...(पण अशक्य नाही. कारण तसे असते तर, वाल्या कोळी याला, वाल्मिकी ऋषीं, हे पद नसते मिळाले.) आपण आपला वैयक्तिक पातळीवर विचार करायचा.. आपल्या पुरती तरी जात पात पाळायची नाही. इतर जनतेला जसा विचार करायचा असेल तसा करू देत.. आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, प्रत्येकाचे वैयक्तिक कपाट वेगळेच असते.आपली कापडे त्यात कोंबायला जाऊ नये.

कंजूस 20/12/2024 - 16:30
ज्यांना गणितातील सेट थिअरी. सेट डायग्राम्स माहिती आहेत त्यांना चित्रे काढून दाखवता शक्य आहे. शब्द जंजाळाशिवाय. एका विश्वात अनेक विश्व असतात. त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. ती संपूर्ण वेगळीच असतात. राजाचं राज्य आणि त्यातली प्रजा एक विश्व धरलं तरी अरण्यात शिकारीला गेल्यावर तिथल्या भिल्ल, अरण्यवासीयांवर त्याचा आदेश चालत नाही. ते अरण्य त्याच्याच राज्यात असलं तरी.

In reply to by कंजूस

गणितातील सेट थिअरी >>> होय होय. मलाही संख्याशास्त्रचा विध्यार्थी असल्याने असा विचार करायला आवडते ! ह्याला अ‍ॅनालिटिकल फिलॉसॉफी म्हणतात . मी एक दोन दा तसा प्रयत्न केला होता , सर्व काही गणिती भाषेत लिहायचा . पण त्यावर एक मित्र बस मला इतकेच म्हणाला - Gödel's incompleteness theorems ! "Any consistent formal system F within which a certain amount of elementary arithmetic can be carried out is incomplete; i.e. there are statements of the language of F which can neither be proved nor disproved in F." आता ह्यावर काय बोलणार ! आम्हाला आता शब्दजंजाळाशिवाय पर्यायच नाही !

In reply to by प्रसाद गोडबोले

कंजूस 21/12/2024 - 12:53
'मी' नावाचा एक गोल दुसऱ्या एका मोठ्या गोलात काढला आणि त्या मोठ्या गोलाला ' ब्रह्म' हे नाव दिले तर मी आणि ब्रह्म यांचे स्पष्टीकरण खूप शब्दजंजाळापेक्षा सोपे होईल समजायला. अशीच चित्रे काढून विविध कल्पना समजावता येतील. परंतू 'ज्ञान' किंवा 'विद्या' यांचे गोल कुठे आणि कसे दाखवायचे हे फार कठीण आहे कारण त्यांच्या व्याख्याच स्पष्ट होत नाहीत. सर्व गोल हे एकाच प्रतलावर आहेत असं समजून आपण चित्र मांडायला बसतो तेव्हा काही गोल वेगळ्याच प्रतलांत असण्याची शक्यताही लक्षात घ्यावी लागते. यातून तो ' Gödel's incompleteness theorems !' मांडला जात असणार.

Bhakti 20/12/2024 - 19:40
चैतन्याला पाप पुण्याचा भोग नसतो.तो जीवात्म्याला असतो.चैतन्यस्वरूपाचा ध्यास असावा,चैतन्याचा आदर असावा.
तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त
यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल.

In reply to by Bhakti

यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल. >> एक खुप सुंदर उदाहरण आठवलं - समजा तुम्ही झोपलेले आहात. अगदी गाढ झोपेत . इतके गाढ झोपेत की तुमच्यासाठी तुमचे स्वप्न हेच सत्य झालेले आहे . आता कल्पना करा की स्वप्नात तुमच्या मागे वाघ लागलाय , तुम्ही जीवाच्या आकांताने पळाताय , तरीही वाघाने तुम्हाला पकडलेच , वाघाची नखं तुमच्या बरगड्यात घुसत आहेत , वाघ तुमच्या नरडीच्या घोट घेत आहे , आता तुम्ही झोपेत जीवाच्या आकांताने ओरडताय , वाचवा .... वाचवा ! आता तुम्हाला ह्या वाघापासुन वाचवण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय काय ? तुम्हाला झोपेतुन जागे करणे ! दॅट्स इट ! मी जीवात्मा आहे, ह्या देहात अडकलो आहे , हे भोग भोगतोय, वगैरे वगैरे स्वप्नातील भास असल्यासारखे आहे, त्यापासुन तुम्हाला तुम्हीच वाचवु शकता ! बस विचाराने विचार बदलुन ! समर्थ म्हणातात : इतुकीं वेडें लाविलीं । ते माथा खेळे खेळ येकली । ते मायेनेंच विराली । पाहिजे माया ॥ श्रीराम मी जीवात्मा आहे , असे वाटणे ही माया आहे , भास आहे , माया तीची ती एकटीच खेळत आहे , तिचा नाश कसा करणार ? मी शिव आहे ह्या धारणेने , ह्या विचाराने . पण हा विचारही मायाच आहे की ! मायेचे बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां समाधान ।मायाचि गोंवी आणि बंधन । तोडी , तेही माया ॥ श्रीराम आणि माऊलींचे काय बोलणार , त्यांनी तर कहर उपमा दिली आहे ! जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें । तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥ जसे पती पत्नीने आपला अनुभव घ्यायचा म्हणुन आपपली मस्तके छाटली अन दुसर्‍याला बसवली तरी तिथे पालट होतच नाही , उलट दोघांचाही जीव जातो ! तसेच "अहं ब्रह्मास्मि" ह्या ज्ञानाने , विचाराने, "मी देहधारी जीवात्मा आहे" ह्या अज्ञानाचे, ह्या विचाराचे खंडन करायला गेल्यास तिथे अज्ञानही रहात नाही आणि ज्ञानही रहात नाही ! . . . माया योग्याची मा‍उली । जेथील तेथें ने‍ऊन घाली । कृपाळूपणें नाथिली । आपण होय ॥ श्रीराम ! अवांतर : हे असं काही आठवलं की कोल्हापुरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घ्यायची फार इच्छा होते ! पण मागच्यावेळेस दर्शनाला गेलेलो तेव्हा खुप रुसलो होतो जगदंबेवर. महाद्वारात उभा राहुन कडक नवस बोललो , आता तो पुर्ण जाल्याशिवाय तुझ्या दर्शनाला येणार नाही असं म्हणालो. तस्मात, आता बघु कधी बोलावणे धाडते ती ते !

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 21/12/2024 - 07:06
गाढ झोप (स्वप्नावस्था) आणि जागृत याचे तुम्ही दिलेले पहिले उदाहरण तर खुप प्रसिद्ध आहेच.आदि शंकराचार्य आणि अद्वैत यांचा अभ्यास करतांना ही पोस्ट मागे एकदा लिहिली होती,ती देते.यात तेच पुन्हा समजते शुद्ध ब्रम्ह... शुद्ध चैतन्य..हेच अद्वैत..पाप पुण्य परे आहे _/\_मलापण काहीतरी सापडलंय..पण नीट मांडता येत नाही.तुम्ही इतक अभ्यासपूर्ण मांडता ,हेवा वाटतो :) धन्यवाद! एक गंमत सांगते याविषयावर एक लेख वाचला होता. याला hallucinations म्हटले जाते???(लोकांना विचारावर विचार करणाऱ्यांना सिक म्हणावं वाटतं, आश्चर्यच आहे ;) #अद्वैत #consciousness अद्वैत तत्त्वज्ञान जाणतांना जनक राजाची गोष्ट समजते. जनक राजाला स्वप्न पडते.त्यात शत्रूंनी त्याच्या राज्यावर आक्रमण केले आहे.तो हरतो,अन्नान दशेत फिरतो.कोणी त्याला शत्रू भीतीने खायला देत नाही.राजा भुकेलेल्या लोकांच्या रांगेत उभा राहतो.जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा अन्न संपते.त्याला उरलेली खरवड मिळते.या सगळ्या अपमानामुळे राजा कोलमडतो आणि रडत देवाचा धावा करत कोसळतो. या दरम्यान झोपेत त्याचा ह्रदय वेग वाढतो, तो जागा होतो.आरडा ओरडा करतो.राणी , सेनापती सर्व राजाला समजावतात.पण राजा बडबडत राहतो. शेवटी अष्टावक्र ऋषी येतात. राजा त्यांना विचारतो" सर्व म्हणत आहे ते स्वप्न होते,पण मी तो अपमान ती अन्नाची भूक सगळं अनुभवलय मग ते खोटं कसं?आता ते कसं नाही?" अष्टावक्र म्हणतात "राजा आता इथे तुला राणी दिसत आहे.सगळ्यांनाही दिसते.ही जागृत अवस्था मना बाहेर पाहते,ही सत्य आहे.स्वप्नात घडलेल्या गोष्टीं मधले शत्रू ,राणी,तुझी भूक याच साक्षीदार तू आहेस तीही स्वप्न अवस्था सत्य आहे.हेही सत्य तेही सत्य.जगत मिथ्या,दोन्ही अवस्थेत तू खरा आहेस." याच्या पुढेच सोन्याचे उदाहरण दिले जाते.सोन्याचे दागिने हार,बांगड्या केल्या जातात.पण हे सर्व वितळवलं तर राहते सोनं राहतेच. ही स्वप्नं,जागृत अवस्थेत आपणच असतो.तेच ब्रम्ह तत्व ,तीच ब्रम्ह अवस्था सतत जाणून राहिल्यास आपण कधीही स्थिर राहू शकतो. चेतनेची एकच कायमस्वरूपी अवस्था आहे आणि ती म्हणजे ब्रह्म. यात जगत मिथ्या म्हटलं गेलंय.पण शंकराचार्यांनी जगाला मिथ्या मानलं नाही.तर जगत आहे,मायाने जग बुद्धीवर आवरण चढून ब्रम्ह अवस्थेचा विसर पडतो. -भक्ती

In reply to by Bhakti

वाह भक्ती ताई ! मलाही अष्टावक्रगीतेची आठवण आलेली . त्यातील एक श्लोक उदृत करतो : मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥ आणि म्हणुनच एकदा 'अघमर्षण ' केले की तुम्ही सुटलेले आहात ! त्यानंतर तुमचे सर्व प्रापंचिक व्यवहार हे खेळ आहेत बस्स ... तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥५॥ ___________/\____________

२-३ वेळा वाचला--पण झेपत नाहीये. असो. आपल्याला सगळे समजलेच पाहीजे असा आग्रह नाही. ते रमण महर्षी आणि नीमकरोली बाबा यांच्यामधे कोण आहेत हो गालातल्या गालात हसणारे?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 21/12/2024 - 07:14
हे नगरचे अवतार मेहेरबाबा! नक्की भेट द्या ,इतके शांत स्थळी आहे.यावरचा आधीचा लेख https://www.misalpav.com/node/49208 फोटो गेले आहेत.विकिपिडिया सर्च करा फोटोसाठी मेहेराबाद,अहिल्या नगर.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

+१ मातुल घराण्यात दत्तसंप्रदायाच्या अधिकारी,अनुग्रहित व्यक्ती होऊन गेल्यात. माझी पणजी,पणजोबा आणी आजोबा मामा देशपांडे. प्रेम मिळाले पण ज्ञान नाही. मी चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या साधू सारखा. साधू तपस्या करत असताना त्यांना देव भेटला. महाराजांनी विचारले ,देवा मोक्ष कधी मिळणार?देव म्हणाला, या झाडावर जीतकी पाने आहेत तितक्या वर्षानंतर. सध्या पाने मोजत आहे. लिहीत रहा वाचत राहू. जेव्हां उजाडेल तेव्हां उजाडेल. काही घाई नाही.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/12/2024 - 13:25
ह्या विषयी शांतिपर्वातील जनक-पंचशिख संवाद व तद्नुषंगाने होणारे बौद्धमताचे खंडन मुळातून वाचणे आवश्यक आहे.
अघमर्षण : संध्येमधील एक महत्वाचा विधी. अघमर्षण म्हणजे पापाचा नाश करणे , त्याग करणे ! पण मुळात पाप म्हणजे काय ? पाप, शिक्षा आणि प्रायश्चित्त म्हणजे नक्की काय ? शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप. त्या पापाची शिक्षा म्हणजेच द्वैत. शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच. त्या पापाची शिक्षा म्हणजे असं "वाटणं". अरे पण मग ह्याचे प्रायश्चित्त काय ? कसा त्याग करायचा ह्या पापांचा ? तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त . म्हणून आता अघमर्षण. https://www.youtube.com/watch?v=aa2LM2tLnlk झाला विचार .

इव्हेंटफुल रात्र

कर्नलतपस्वी ·

कंजूस 13/12/2024 - 07:59
माझाही विश्वास बसेना. धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता. पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का? माझा विश्वास बसेना. एकही कविता नाही?

In reply to by मुक्त विहारि

प्धरतिसादा बद्दल धन्यवाद. स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे. माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका. कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे. भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली. ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला. सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले. असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली... CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे. राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना... एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते. दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना... जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा. किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by कर्नलतपस्वी

इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे? पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

In reply to by कर्नलतपस्वी

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद... वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच. आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत. https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-sanwar-patel-received-death-threats-case-filed-against-10-people-ann-2839884 ------ अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक... .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही... बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम. बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

In reply to by कर्नलतपस्वी

रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले. ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा. अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते! आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता! .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 20/12/2024 - 20:01
जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.
अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये. आठवा पावनखिंडीतली रात्र... आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

वामन देशमुख 14/12/2024 - 14:23
धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय. धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं. पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला. --- अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

In reply to by वामन देशमुख

अगदी,अगदी. स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती. व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले. हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत. सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले. कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत. धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

In reply to by कर्नलतपस्वी

वामन देशमुख 19/12/2024 - 13:31
सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....
सरकारी फी किती लागली?
कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.
सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात. अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात. विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.

कंजूस 13/12/2024 - 07:59
माझाही विश्वास बसेना. धागा पुन्हा वाचला स्वप्न होते. शेवटी चहा खराच होता. पण धागा कर्नलसाहेबांचाच आहे का? माझा विश्वास बसेना. एकही कविता नाही?

In reply to by मुक्त विहारि

प्धरतिसादा बद्दल धन्यवाद. स्कूटर तर तीन वर्षां पुर्वीच सरकारच्या नवीन नियमानुसार स्क्रॅप मधे दिली आहे. माझी गाडी लखनऊ पासींग,जवळपास तीस वर्ष झाली होती. नूतनीकरण केलेले नव्हते. पुणे आर टी ओ ला विचारले तर म्हणाले लखनऊला न्यावी लागेल म्हणून पडून होती. बायकोचा लकडा मागे लागला होता. भंगार घरात ठेवले तर लक्ष्मी नाराज होते. लवकरात लवकर काढून टाका. कोणा ऐरा गैरा नथ्थू खैरा कसा उपयोग करेल माहीत नाही म्हणून द्यायला भिती वाटत होती.साध्वी बरोबर काय झाले होते माहित होते. एकदा विचार केला गाडी लखनऊ ला घेऊन जावी पण खुप खर्च येत होता. गपगुमान बसलो होतो. स्वताला आणी सरकारला कोसत होतो.गडकरींच्या साक्षात्कारात ऐकले की सरकार काही नवीन कायदा आणत आहे. भाजप सरकार ने नवीन कायदा आणला. जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली. ऑल इंडिया नोकरदारांना फारच मोठा दिलासा मिळाला. सर्व कागद कारवाई कंपनीकडून केली गेली व रूपये पंधराशे बँकेत जमा केले. असा कायदा मागील सत्तर वर्षांत कुणालाच कसा सुचला नाही नवल वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

वरील वाक्य लिहून, तुम्ही काही लोकांची झोप उडवली... CAA, NRC, One Nation One Election, समान नागरिकत्व, अशा बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी बाकी आहे. राष्ट्र प्रथम...

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्र प्रथम... कुठलं? कारण काही लोक स्टेट्स ला राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट असे टाकतात नी असतात अरबी मुस्लिमांकडे चाकरी करत नाहीतर हरिते पत्रा साथी अमेरिकन सरकारच्या पाया पडत असतात!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अरबस्तानात किवां अम्रीकेत नोकरी केली तरी याचा फायदा देशालाच होतो ना... एक, देशातील इतर तरुणांसाठी जो परदेशात जाऊन नोकरी करू शकत नाही त्याच्या साठी एक व्हेकन्सी उपलब्ध होते. दोन,आई वडील यांना पाठवलेले डालरा देशात खर्च होतात त्यामुळे देशातील उद्योगाला अप्रत्यक्षरित्या फायदा होतोच ना... जाऊ द्यात, सावन के XX को हरा ही नजर आयेगा. किंवा कावीळ झाल्यानंतर सर्व जग पिवळे दिसते असे म्हणतात.

In reply to by कर्नलतपस्वी

इतकी जर त्यांना समज असती , तर अजुन काय हवे? पण, काही लोकांना बाहेरच्या जगांत कोण विचारतो? मग अशी काही अतृप्त मंडळी, आकांडतांडव करणारच....

In reply to by कर्नलतपस्वी

मुद्दा तो नाहीच कर्नल साहेब विदेशात जावेच! नक्कीच जावे! विदेशात जाण्याला कुठूनही विरोध नाही. अगदी मलाही संधी मिळाली तर पहिली फ्लाईट धरून जाईन. पण मुस्लिम देशात जायचे, पॉज़ कमवायचे नी भारतात मुस्लिम द्वेश करुन वातावरण कलुषित करायचे, वरुण राष्ट्रप्रथम म्हणून लोकाना शहाणपण शिकवायचा! ह्याला काय अर्थ??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

परत एकदा वैयक्तिक पातळीवरचा प्रतिसाद... वक्फ बोर्डाच्या बाबतीत विरोध तर मी आधी पण करत होतोच. आणि त्याला विरोध तर काही मुस्लिम मंडळी पण करत आहेत. https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-waqf-board-chairman-sanwar-patel-received-death-threats-case-filed-against-10-people-ann-2839884 ------ अजुनही आपल्या डोक्यात काही प्रकाश पडला असेल तर ठीक... .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुद्दा, राष्ट्रीय पातळीवरच्या, आर्थिक आणि संरक्षण आणि सामाजिक, प्रश्नांवर आहे. वैयक्तिक आयुष्यावर नाही... बाकी, तुमच्या माहितीसाठी, चंद्रगुप्त मौर्य, यांच्या बद्दल माहिती घेतलीत तर उत्तम. बाकी नेहमी प्रमाणेच, मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरता.

In reply to by कर्नलतपस्वी

रूपये पंधराशे स्क्रॅप चे माझ्या बँकेत जमा केले. सर्व कागदांची पुर्तता व स्कुटर कंपनीने आपल्याच ट्रान्सपोर्ट ने घरातून घेऊन गेले. ही सर्व कारवाई करता कंपनीला एक फोन केला बाकी सर्व कंपनीच्या कर्मचारीवर्गाने केले. मला कुठल्याच प्रकारचा खर्च किवां कष्ट करावे लागले नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

छान कर्नल साहेब, तरी ते स्क्रॅप प्रमाणपत्र जपून ठेवा. अजून एक नियम आहे स्क्रॅप प्रमाणपत्र नवीन गाडी घेताना दाखवले तर नव्या गाडीवर कितीतरी टक्के सूट मिळते! आमची मारुती आल्टो महिंद्रा फर्स्ट चोईस ला विकली नी त्या नव्या मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली नाही, तो नवा मालक सिग्नल तोड, हाय स्पीड तोड, सिट बेल्ट लावला नाही, असे असंख्य नियम तोडत होता नी चलनाच्या नोटीस आम्हाला येत होत्या, कंपनीला मेल/फ़ोन केले पण कायद्याचा घो* लागल्याशिवाय काही करायचं नाही असा भारतीय कंपनींचा अलिखित नियम असल्याने त्यांनी काही केले नाही. शेवटीग राष्ट्रीय ग्राहक मंचात ऑनलाइन तक्रार दाखल केली, कंपनीने तिकडेच मेल करुन सांगितले की एक महिन्यात करतो, १५ दिवसांनी फोन आला ओटीपी साठी, मालकाची कागदपत्रे ही मागवली नी ओटीपी देऊन गाडी त्याच्या नावावर केली. त्यामुळे आपल्या कडे कागदपत्रे नीट जपून ठेवावी. आमच्या कडून चुकून विकलेल्या गाडीचा कागद हरवला होता! .

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौगुल्यांना दिली व आल्ट, घेतली. पहिल्या मारूतीचे वय चौदा वर्ष काही महिने होते. त्यामुळेच काही धोका नव्हता. आता दुसरी लेक सुद्धा तेरा वर्षाची झाली आहे एखाद वर्षात सासरी पाठवीन म्हणतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 20/12/2024 - 20:01
जुन्या गाड्या, कुठल्याही पासिंगच्या, कुठल्याच कागद कारवाई शिवाय कुठल्याही जागी स्क्रॅप करता येतील. सरकार आणी महिंद्रा कंपनीने साठ शहरात सुरवातीस अशी सोय सुरू केली.
अशी सोय टाटा कंपनीने सुद्धा सुरू केलीय .. पण दुचक्यासाठी आहे की नाही यांची कल्पना नाही ही घ्या लिंक : https://rewire.tatamotors.com/

सर्वच रात्रीं बद्दल एक सारखा विचार करू नये. आठवा पावनखिंडीतली रात्र... आठवा मेजर कुलबिर सिंह चांदुर आणी त्यांच्या सहकार्यांनी घालवलेली लोंगेवाला सीमेवरील रात्र...

वामन देशमुख 14/12/2024 - 14:23
धागा आधीच वाचला होता; प्रतिसाद उशिरा लिहितोय. धागा उघडण्याआधी, "विवेकपटाईतांच्या साबणाच्या आंघोळीनंतर पुढचा टप्पा म्हणजे कर्नलतपस्वींची इव्हेंटफुल रात्र" असं काही तरी वाटलं होतं. पण ठीक आहे. प्रसंग रोचक आहेत. स्क्रॅपचा किस्सा आवडला. --- अवांतर: पंधरा वर्षांहून अधिक जुनी सगळीच वाहने स्क्रॅप करण्यासारखी नसतात. व्यावहारिक दृष्ट्या, प्रदूषण मानके हा एक मुद्दा विचारात घेऊनही ती वाहने पुढे वापरली जाऊ शकतात.

In reply to by वामन देशमुख

अगदी,अगदी. स्कुटी पेप वय वर्ष पंधराची व्हायला आली होती. मुली साठी कालेजात जाण्यास घेतली होती. व्यवहारिक दृष्टीकोनातून, माझे वय एक अधिक सत्तर. जास्तीत जास्त आणखीन चार पाच वर्ष गाडी चालवायचं वय. अर्थात देवा घरचे ज्ञात कुणाला. नातीचे वय दहा म्हणजे आणखीन पाच वर्षांत तीलाही वाहन लागणार ढोबळ मानाने हिशोब करता स्कुटीची शरीर प्रकृती माझ्या सारखीच ठणठणीत, पेपर वर आणखीन पाच वर्ष जीवनदान मीळाल्यास बरेच फायदे होतील हे लक्षात आले. हल्ली भाजप सरकार, विशेषता, मा. गडकरींचाया कृपेने परिवहन सेवा अतिशय सोप्या व सुधारू झाल्या आहेत. सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली. गाडी घेऊन पासींग ला गेलो. परिवहन निरिक्षक अत्यंत कार्यक्षम आणी इमानदार कर्मचारी. माझा नंबर आल्यावर नियमानुसार वाहन निरीक्षण करून पाच वर्ष स्कुटी वय वाढवले. कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत. धन्स गडकरी सो आणी त्यांचे शिलेदार.

In reply to by कर्नलतपस्वी

वामन देशमुख 19/12/2024 - 13:31
सारथी वर अर्ज केला. सरकारी फि भरली....
सरकारी फी किती लागली?
कुठल्याच प्रकारे सरकारी सेवेचे गुणधर्म इथे दिसून आले नाहीत.
सवांतर: नवे वाहन नोंदणी, चालक परवाना, वाहन कर्जमुक्त झाल्यानंतरची नवी आरसी वगैरे कामे तेलंगणात वेळेवर होतात. थोडा वेळ काढल्यास केवळ सरकारी शुल्कात होतात. वेळ नसल्यास एजंटांकडून माफक खर्चात होतात. अवांतर: दुय्यम निबन्धक कार्यालयांतील कामेही एजंटांकडून माफक खर्चात होतात. विहित वेळेत कागदपत्रे हातात येतात.
प्रसंग क्र. १.... खाडकन झोपमोड झाली. घड्याळ बघीतले रात्रीचे पावणे तीन वाजले होते.घाई घाईत खाली गेलो. पार्किंग मधे माझी लाडकी पाढंरी बजाज चेतक दिसली नाही. इकडे तिकडे शोधले पण कुठेच दिसत नव्हती. चिंताग्रस्त अवस्थेत परत घरात आलो. बिछान्यावर बायको घोरत होती. तीला उठवून विचारण्यात काही अर्थ नव्हता. शेजारील टीपाॅय वरच्या बाटलीतून एक घोट पाणी प्यालो व लगेचच पुन्हा झोप लागली. ________________________________________ प्रसंग क्र-२.... "सापडली,सापडली", झोपेतच जोर जोरात ओरडत उठलो.बायकोची पण झोपमोड झाली होती.

वावटळ

सुजित जाधव ·

श्रीगुरुजी 12/12/2024 - 21:37
वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . . पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील. आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

In reply to by रात्रीचे चांदणे

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 22:40
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला? ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का? मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत 13/12/2024 - 12:06
ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती. बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख 13/12/2024 - 17:56
१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

In reply to by मनो

प्रचेतस 17/12/2024 - 05:13
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'. मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

In reply to by प्रचेतस

अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते. हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते. लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले. प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

चौथा कोनाडा 16/12/2024 - 14:58
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.
अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात.... यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते
ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?
काय बोलणार यावर ?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 21:37
वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . . पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील. आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

In reply to by रात्रीचे चांदणे

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी 12/12/2024 - 22:40
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला? ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का? मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत 13/12/2024 - 12:06
ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती. बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख 13/12/2024 - 17:56
१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

In reply to by मनो

प्रचेतस 17/12/2024 - 05:13
१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'. मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

In reply to by प्रचेतस

अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते. हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते. लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले. प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

चौथा कोनाडा 16/12/2024 - 14:58
काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.
अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात.... यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते
ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?
काय बोलणार यावर ?
पुस्तक_परिचय: वावटळ लेखक: व्यंकटेश माडगूळकर जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला. ______________________________________________ ३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली.

ओशो ध्यान शिबिराचा अनुभव

मार्गी ·

शुभेच्छा. इंजॉय. बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना. तपशीलवार मराठीत इकडे लिहा. वेळ मिळाला की वाचत राहीन. -दिलीप बिरुटे ( मन-मौजी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंतरजालीय प्रतिक्रियांवरुन माणूस प्रेमाने विचारतोय, उत्सुकतेने विचारतोय की खवचटपणाने विचारतोय, काही म्हणता काही कळत नाही. आता खालील वाक्यच बघा ना..
बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना.
म्हणजे हे तुम्ही उत्सुकतेने विचारताय की जर पहिल्या पानावरच येत असेल तर कशाला नसते उपद्व्याप करा या अर्थाने लिहिले याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून मला समोरासमोरचा वार्तालाप आवडतो. (अर्थात तिथेही मी माणसे ओळखण्यात कमी पडतो म्हणा). अवांतर : निवडणूकीच्या कामातून मोकळे झाला असाल तर त्याविषयी फर्स्ट हँड रिपोर्ट दुसर्‍ञा एका लेखात येऊ द्यात. ही विनंती करायची ही जागा नव्हे हे मान्य !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रि 01/12/2024 - 08:55
काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना
अर्थात मन पहिल्या पानावर येणारच. पण जगण्या-मरण्याच्या धावपळीत तेच मन कसं ताळ्यावर ठेवायचं याची जाणीव ध्यानामुळे झालेली असते, त्यामुळे जरी पहिल्या पानावर मन आलं तरीही ते पहिल्याप्रमाणेच अवखळ न राहता किंचीत ताब्यात येऊ शकतं! - (पहिल्या पानावर असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत 01/12/2024 - 16:14
सहमत. अशी शिबीरं म्हणजे नेटप्रॅक्टीस. जास्तीत जास्त अनुकूल परिस्थितीत मनावर ताबा मिळवण्याचा केलेला प्रयत्न. नेहमाचं जिवन जगणं ही जणू प्रत्यक्ष मॅच.

छान ! ध्यानाचा अनुभव न घेताही मला त्याचे महत्त्व पटते आहे पण कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. असो.

सुबोध खरे 29/11/2024 - 19:09
कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे प्राणायामाचा आणि ध्यान धारणेचा, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावावर उत्तम उपयोग होतो असे अनेक वैद्यकीय शोध निबंधात सिद्ध झालेले आहे. परंतु अजूनही मला त्यात अजिबात रस वाटत नाही. आपली पट्टी काळी २, त्यामुळे हे पांढरी पाच मध्ये गाणे झेपत नाही हेच खरं.

सोत्रि 01/12/2024 - 07:44
सक्रीय ध्यानाबद्दल माहिती शोधताना ओशोंच हे व्याख्यान मिळालं. ते प्राणायामातील भस्त्रिकेच ओशोकरण केलेलं रूप आहे हे कळल. पण त्यानंतर काय करावं हे जे त्यांनी सांगितलंय ते महत्वाच वाटलं. व्याख्यानाची लिंकः https://youtu.be/msZ4gc3bqK0?si=mvSM0LHgWP6gW_i5 - (सक्रीय) सोकाजी

मार्गी 01/12/2024 - 11:47
कळतंय पण वळत नाही म्हणजे राग- संताप- लोभ हानीकारक आहे हे कळतं, पण ते बदलवता येत नाही हा जो फरक आहे त्यासाठीच सक्रिय ध्यान उपयोगी असतं. कॉन्शस पातळीवर- बुद्धीच्या पातळीवर आपल्याला सगळं कळतं, पण आणीबाणीच्या ऐन मोक्याच्या वेळी ते वापरता येत नाही. कारण अवचेतन मनामध्ये तो संताप/ लोभ साठलेला असतो. सक्रिय ध्यान खोलवर ही समज नेण्यासाठी उपयोगी पडतं. प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! ध्यानाचा कोणताही प्रकार/ पद्धत असली तरी त्यामध्ये "जागरूकता" महत्त्वाची‌ असते. शिबिरात एक- दोन दिवस करून फक्त ती टेक्निक कळते. पुढे ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. @ सो त्रि जी, सक्रिय ध्यान केवळ भस्त्रिका नाहीय. केवळ त्याबद्दल ऐकून किंवा त्याचे व्हिडिओज/ ऑडिओज ऐकून पूर्ण कल्पना येणार नाही. तो एक खरंच वेगळा अनुभव आहे. धन्यवाद.

In reply to by मार्गी

सोत्रि 01/12/2024 - 13:39
ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
डीट्टो!!! - (सातत्य साधण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

चौथा कोनाडा 02/12/2024 - 11:35
छान माहिती मिळाली. चर्चा ही उत्तम. हें करायलाच हवे या मताचा मी आहे. मागे २२-२५ वर्षांपूर्वी जवळच्या विवेकानंद केंद्रात उबव्यायाम, सूर्य नमस्कार, आसने चा १० दिवसांचा एक तासाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तेव्हा सर्व फायदे कळालेच. पण हळूहळू त्यात खंड पडला. आता जेमतेम करतो. संकल्प शक्ती कमी पडते. थोडा वेळ लागेल, पण पुढे मागे करणार हे नक्की. हेच आद्य आहे, हेच अभिजात आहे, बाकी सगळं प्रासंगिक ट्रेंड्स आहेत. याची मनोमन खात्री पटलेली आहे.

अर्धवटराव 03/12/2024 - 21:43
योगानंदांनी स्थापन केलेली YSS क्रियायोगातुन ध्यान शिकवते हे माहित होतं.. त्यात बहुतेक शक्तीपात दिक्षा पण असते. ओशो सुद्ध त्याच मार्गातले आहेत का ?? ओशोंबद्दल जे काहि थोडंफार वाचलं / ऐकलं त्यात क्रियायोग संप्रदायाचा उल्लेख आल्याचं आठवत नाहि. ज्ञानगंज संबंधी साधक मात्र ओशोंचा उल्लेख करतात.

शुभेच्छा. इंजॉय. बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना. तपशीलवार मराठीत इकडे लिहा. वेळ मिळाला की वाचत राहीन. -दिलीप बिरुटे ( मन-मौजी )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंतरजालीय प्रतिक्रियांवरुन माणूस प्रेमाने विचारतोय, उत्सुकतेने विचारतोय की खवचटपणाने विचारतोय, काही म्हणता काही कळत नाही. आता खालील वाक्यच बघा ना..
बाय द वे, काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना.
म्हणजे हे तुम्ही उत्सुकतेने विचारताय की जर पहिल्या पानावरच येत असेल तर कशाला नसते उपद्व्याप करा या अर्थाने लिहिले याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून मला समोरासमोरचा वार्तालाप आवडतो. (अर्थात तिथेही मी माणसे ओळखण्यात कमी पडतो म्हणा). अवांतर : निवडणूकीच्या कामातून मोकळे झाला असाल तर त्याविषयी फर्स्ट हँड रिपोर्ट दुसर्‍ञा एका लेखात येऊ द्यात. ही विनंती करायची ही जागा नव्हे हे मान्य !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोत्रि 01/12/2024 - 08:55
काही दिवसांच्या ध्यान-धारणा-मौन वगैरे नंतर, रुटीन जगण्या-मरण्याच्या धावपळीत आपलं मन पुन्हा पहिल्या पानावर येत असेलच ना
अर्थात मन पहिल्या पानावर येणारच. पण जगण्या-मरण्याच्या धावपळीत तेच मन कसं ताळ्यावर ठेवायचं याची जाणीव ध्यानामुळे झालेली असते, त्यामुळे जरी पहिल्या पानावर मन आलं तरीही ते पहिल्याप्रमाणेच अवखळ न राहता किंचीत ताब्यात येऊ शकतं! - (पहिल्या पानावर असणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

शाम भागवत 01/12/2024 - 16:14
सहमत. अशी शिबीरं म्हणजे नेटप्रॅक्टीस. जास्तीत जास्त अनुकूल परिस्थितीत मनावर ताबा मिळवण्याचा केलेला प्रयत्न. नेहमाचं जिवन जगणं ही जणू प्रत्यक्ष मॅच.

छान ! ध्यानाचा अनुभव न घेताही मला त्याचे महत्त्व पटते आहे पण कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे. असो.

सुबोध खरे 29/11/2024 - 19:09
कळते पण वळत नाही अशी अवस्था आहे प्राणायामाचा आणि ध्यान धारणेचा, उच्च रक्तदाब आणि मानसिक तणावावर उत्तम उपयोग होतो असे अनेक वैद्यकीय शोध निबंधात सिद्ध झालेले आहे. परंतु अजूनही मला त्यात अजिबात रस वाटत नाही. आपली पट्टी काळी २, त्यामुळे हे पांढरी पाच मध्ये गाणे झेपत नाही हेच खरं.

सोत्रि 01/12/2024 - 07:44
सक्रीय ध्यानाबद्दल माहिती शोधताना ओशोंच हे व्याख्यान मिळालं. ते प्राणायामातील भस्त्रिकेच ओशोकरण केलेलं रूप आहे हे कळल. पण त्यानंतर काय करावं हे जे त्यांनी सांगितलंय ते महत्वाच वाटलं. व्याख्यानाची लिंकः https://youtu.be/msZ4gc3bqK0?si=mvSM0LHgWP6gW_i5 - (सक्रीय) सोकाजी

मार्गी 01/12/2024 - 11:47
कळतंय पण वळत नाही म्हणजे राग- संताप- लोभ हानीकारक आहे हे कळतं, पण ते बदलवता येत नाही हा जो फरक आहे त्यासाठीच सक्रिय ध्यान उपयोगी असतं. कॉन्शस पातळीवर- बुद्धीच्या पातळीवर आपल्याला सगळं कळतं, पण आणीबाणीच्या ऐन मोक्याच्या वेळी ते वापरता येत नाही. कारण अवचेतन मनामध्ये तो संताप/ लोभ साठलेला असतो. सक्रिय ध्यान खोलवर ही समज नेण्यासाठी उपयोगी पडतं. प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! ध्यानाचा कोणताही प्रकार/ पद्धत असली तरी त्यामध्ये "जागरूकता" महत्त्वाची‌ असते. शिबिरात एक- दोन दिवस करून फक्त ती टेक्निक कळते. पुढे ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. @ सो त्रि जी, सक्रिय ध्यान केवळ भस्त्रिका नाहीय. केवळ त्याबद्दल ऐकून किंवा त्याचे व्हिडिओज/ ऑडिओज ऐकून पूर्ण कल्पना येणार नाही. तो एक खरंच वेगळा अनुभव आहे. धन्यवाद.

In reply to by मार्गी

सोत्रि 01/12/2024 - 13:39
ते ध्यान सातत्याने करणं व २३ तासांमध्ये अप्लाय करण्याची सवय लावणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
डीट्टो!!! - (सातत्य साधण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

चौथा कोनाडा 02/12/2024 - 11:35
छान माहिती मिळाली. चर्चा ही उत्तम. हें करायलाच हवे या मताचा मी आहे. मागे २२-२५ वर्षांपूर्वी जवळच्या विवेकानंद केंद्रात उबव्यायाम, सूर्य नमस्कार, आसने चा १० दिवसांचा एक तासाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तेव्हा सर्व फायदे कळालेच. पण हळूहळू त्यात खंड पडला. आता जेमतेम करतो. संकल्प शक्ती कमी पडते. थोडा वेळ लागेल, पण पुढे मागे करणार हे नक्की. हेच आद्य आहे, हेच अभिजात आहे, बाकी सगळं प्रासंगिक ट्रेंड्स आहेत. याची मनोमन खात्री पटलेली आहे.

अर्धवटराव 03/12/2024 - 21:43
योगानंदांनी स्थापन केलेली YSS क्रियायोगातुन ध्यान शिकवते हे माहित होतं.. त्यात बहुतेक शक्तीपात दिक्षा पण असते. ओशो सुद्ध त्याच मार्गातले आहेत का ?? ओशोंबद्दल जे काहि थोडंफार वाचलं / ऐकलं त्यात क्रियायोग संप्रदायाचा उल्लेख आल्याचं आठवत नाहि. ज्ञानगंज संबंधी साधक मात्र ओशोंचा उल्लेख करतात.
सर्वांना नमस्कार. नुकतंच २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरमध्ये पुण्याजवळ लव्हासा रस्त्यालगत आनंद क्रिया योगाश्रम येथे दोन दिवसीय ओशो- ध्यान शिबिराचा आनंद घेतला. सक्रिय ध्यान, नादब्रह्म ध्यान व इतर विविध प्रकारचे अभ्यास व पद्धती त्यात होत्या. परिसरसुद्धा अतिशय सुंदर होता. सोबत संगीत व नृत्यही होतं. ध्यानासह संगीताचा उत्कट मिलाफ होता. त्या शिबिराचे अनुभव माझ्या ब्लॉगवर हिन्दीत लिहीले आहेत. मराठीत लगेच लिहीणं शक्य होत नाहीय. म्हणून इथे ब्लॉगची लिंक देत आहे.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·

सुरिया 22/11/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.

सुरिया 22/11/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

दहीभात...

किल्लेदार ·

Bhakti 12/11/2024 - 12:46
सुंदर लिहिलंय! लहानपणी मोठ्यांच्या पंगती बसायच्या तीनदा भात वाढायचे असतं एवढ सांगितले जायचे.शेवटचा भात दहीभात घेण्याचा आग्रह व्हायचा.

टर्मीनेटर 12/11/2024 - 16:20
दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला.
लेख वाचायला सुरुवात केल्यावर आलेल्या ह्या दुसऱ्याच वाक्याला जाम हसलो 😀 मी भातप्रेमी नाही आणि नुसता ताक भात किंवा दही भात अजिबात आवडत नाही. पण दाक्षिणात्य पद्धतीची दही-बुत्ती खायला आवडते, विशेषतः उडदाच्या डाळीमुळे आणि लाल मिरचीमुळे तीला जो स्वाद प्राप्त होतो तो फार आवडतो!

सरनौबत 12/11/2024 - 16:45
माझा देखील अतिशय आवडता पदार्थ आहे. दहीपोह्यात मला दाण्याचा कूट आणि किंचित साखर आवडते. ज्ञानोबांनी देखील दहिभाताची उंडी लाविन तुझिये तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांगे वेगी ॥ म्हणलं आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 19:06
हे घ्या मोरमिलगाई मिरची,केरळी खाद्य पदार्थ दुकानातून घेतलेली.मी तर रोज कोशिंबीरला याच मिरचीची फोडणी देते. https://www.misalpav.com/node/52379

किल्लेदार 13/11/2024 - 23:02
कर्नलतपस्वी, Bhakti, कंजूस, अथांग आकाश - प्रतिक्रियांबद्दल आभार टर्मीनेटर - पोळ्या करायचा कंटाळा आणि पचायला हलका असल्यामुळे मी भातप्रेमी झालो आहे. विशेषतः दर वेळी वेगवेगळा तांदूळ अजमावून बघायला मजा येते. एखादी लेखमाला तांदळावरही लिहून काढा. सरनौबत - मास्तरांच्या बासनातले दही पोहे खाल्लेत कि काय ?

मस्स्स्त लेख. दहीभात अत्यंत आवडता प्रकार. जपानात शिकायला असताना एकदा बरोबरीच्या जपानी मुलांना सांगितलं दहिभाताबद्दल. तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. एकानी विचारलं की मळमळत नाही का हे कॉम्बिनेशन बघूनच. म्हटलं की अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून खातोय ते आणि मुळात सगळं जेवण झालं की छान शांत होतं पोट. तरीदेखील दहीभाताला दोष देणं थांबवलं नाही. तेव्हा मी देखील त्यांना म्हटलं की तुम्हीसुद्धा ऑक्टॉपस खाताना दिसलात की मला मळमळतं! तेव्हा थांबले.

Bhakti 12/11/2024 - 12:46
सुंदर लिहिलंय! लहानपणी मोठ्यांच्या पंगती बसायच्या तीनदा भात वाढायचे असतं एवढ सांगितले जायचे.शेवटचा भात दहीभात घेण्याचा आग्रह व्हायचा.

टर्मीनेटर 12/11/2024 - 16:20
दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला.
लेख वाचायला सुरुवात केल्यावर आलेल्या ह्या दुसऱ्याच वाक्याला जाम हसलो 😀 मी भातप्रेमी नाही आणि नुसता ताक भात किंवा दही भात अजिबात आवडत नाही. पण दाक्षिणात्य पद्धतीची दही-बुत्ती खायला आवडते, विशेषतः उडदाच्या डाळीमुळे आणि लाल मिरचीमुळे तीला जो स्वाद प्राप्त होतो तो फार आवडतो!

सरनौबत 12/11/2024 - 16:45
माझा देखील अतिशय आवडता पदार्थ आहे. दहीपोह्यात मला दाण्याचा कूट आणि किंचित साखर आवडते. ज्ञानोबांनी देखील दहिभाताची उंडी लाविन तुझिये तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांगे वेगी ॥ म्हणलं आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 19:06
हे घ्या मोरमिलगाई मिरची,केरळी खाद्य पदार्थ दुकानातून घेतलेली.मी तर रोज कोशिंबीरला याच मिरचीची फोडणी देते. https://www.misalpav.com/node/52379

किल्लेदार 13/11/2024 - 23:02
कर्नलतपस्वी, Bhakti, कंजूस, अथांग आकाश - प्रतिक्रियांबद्दल आभार टर्मीनेटर - पोळ्या करायचा कंटाळा आणि पचायला हलका असल्यामुळे मी भातप्रेमी झालो आहे. विशेषतः दर वेळी वेगवेगळा तांदूळ अजमावून बघायला मजा येते. एखादी लेखमाला तांदळावरही लिहून काढा. सरनौबत - मास्तरांच्या बासनातले दही पोहे खाल्लेत कि काय ?

मस्स्स्त लेख. दहीभात अत्यंत आवडता प्रकार. जपानात शिकायला असताना एकदा बरोबरीच्या जपानी मुलांना सांगितलं दहिभाताबद्दल. तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. एकानी विचारलं की मळमळत नाही का हे कॉम्बिनेशन बघूनच. म्हटलं की अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून खातोय ते आणि मुळात सगळं जेवण झालं की छान शांत होतं पोट. तरीदेखील दहीभाताला दोष देणं थांबवलं नाही. तेव्हा मी देखील त्यांना म्हटलं की तुम्हीसुद्धा ऑक्टॉपस खाताना दिसलात की मला मळमळतं! तेव्हा थांबले.
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

भोरगिरी ते भीमाशंकर

Bhakti ·

कंजूस 12/11/2024 - 08:39
एक महिन्यात वाटा वाळलेल्या दिसताहेत. भीमाशंकरला गर्दी शनिवार रविवारी असते बहुतेक. भोरगिरीला गाडी ठेवल्याने परत तिकडेच आलात का ट्रेक करत? जुन्नरच्या मोठा बाजार रविवारी असतो. पुढच्या वेळेस तिकडून या. पूर्वी डाळी स्वस्त मिळत असतं.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 10:37
हो सर्व वाटा,ओढे कोरडे होते.एक दोन ठिकाणीच पाणी होते. नाही गाडी भीमाशंकरला बोलावली.मग तिकडून डिंभेला गेलो.खुप उशीर झाला होता आणि नारायणगावला मावशीकडे जायचं होतं म्हणून ओझर , जुन्नर केलं नाही. इंद्रायणी ६५ / किलो ठीक मिळाला का ? का महाग मिळाला?

In reply to by Bhakti

प्रचेतस 13/11/2024 - 09:06
५० ते ५५ रुपयात मिळायला हवा. डिंभ्यातून वरती गेलं तर तासा भरात आहुपेसारख्या नितांत सुंदर ठिकाणी जाता येतं.

खेड,राजगुरुनगर येथे रहात असल्यामुळे दर शिवरात्रीला भोभी ट्रेक जरूर व्हायचा. त्यावेळेस या पेक्षा घनदाट जंगल होते. वाड्याला, अर्थात जुने वाडा येथे संघाच्या दिवाळी शिबीरासाठी जायचो. पुढे दुष्काळ पडला व मॅट्रिक पास असल्याने कळमोडी येथे मिस्त्री म्हणून काही दिवस राज्य शासना करता सेवा दिली. तेव्हां पाझर तलावाचे काम होते पुढे त्याचे कळमोडी धरणात रूपांतर झाले. आता हा जल साठा बर्‍याच लोकांसाठी जीवनदायी ठरत आहे. एका मोठ्या धरणाच्या पायाभरणीचे श्रेय चित्रगुप्ताने माझ्या खात्यावर नक्कीच नोंदवले असेल. स्वर्गात जागा पक्की केली असावी. या भागात बरेच वर्षात गेलो नाही. पुढे ३१ ऑक्टोबर १९८५ ला मंचर,घोडेगाव मार्गे डिंभे धरणाच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तात्पुरत्या नोकरांच्या वसाहतीत गेलो होतो. धरणाचा पायाभरणी व इतर बांधकाम चालू होते. आमचे काका तीथे हिशोबनवीस होते. तारीख पक्की लक्षात कारण इंदिरा गांधी यांचा खून झाला व क्रिकेट मॅच बंद पडली होती. आपल्या भटकंतीने जुन्या आठवणींचे मोहळ फुटले. लेख छान आहे पण घाई घाईत त्रोटक लिहील्या सारखा वाटतो.फोटो छान आहेत.आमच्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मधे पायवाटा होत्या. डेहणे गावापर्यंत लालपरी व नंतर आकरा नंबरची एक्स्प्रेस.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 12/11/2024 - 12:04
खुप छान आठवणी आहेत. मला अजूनही डिंभे धरणाच्या बांधकामाच्या आठवणी सांगणारे मंचरमधले लोकं भेटतात.

चौथा कोनाडा 12/11/2024 - 14:34
व्वा.. सुंदर भटकंती.... फोटो छानच... वर्णन मात्र आणखी विस्तृत चालले असते .. हा परिसर निसर्गरम्य..सुंदर आहे.. ट्रेकिंग ला बेस्ट, फॅमिली ट्रेकिंगला ही उत्तम मे-जून महिन्याच्या आसपास इथं करवंद फुलते.. काळी मैना करवंदाची मोठी मेजवानी मिळते.. काय टपोरी असतात फळं..

नठ्यारा 12/11/2024 - 19:15
भक्तीताई, पदभ्रमण ( ट्रेक ) आटोपशीर दिसतंय. आमच्यासारख्या कोकणातनं चढून येणाऱ्यांच्या नशिबी हे सुख वा दु:ख नाही. :-) ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे. शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

Bhakti 12/11/2024 - 20:27
ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे.
ते मलापण समजलं नाही,पण घरचे सांगत होते, त्यासाठीच हे कुंपण असेल.
शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो.
हो ,अनेकदा माझ्या थेट बोलण्यामुळे नवरा म्हणतो तू चुकून मुलगी झाली आहेस ;) आणि अहो, मी ताई आहे हे केव्हाच सिद्ध झालंय.

प्रचेतस 13/11/2024 - 09:05
छोटेखानी वृत्तांत आवडला. भीमाशंकर जंगलांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड मोठमोठे उंच वृक्ष, शेकरूंना घरटी करण्यास आदर्श असे. गुप्त भीमशंकर वाट सुंदर आहे, मात्र मंदिराच्या मागच्या बाजूला खूप कचरा आहे.

कंजूस 12/11/2024 - 08:39
एक महिन्यात वाटा वाळलेल्या दिसताहेत. भीमाशंकरला गर्दी शनिवार रविवारी असते बहुतेक. भोरगिरीला गाडी ठेवल्याने परत तिकडेच आलात का ट्रेक करत? जुन्नरच्या मोठा बाजार रविवारी असतो. पुढच्या वेळेस तिकडून या. पूर्वी डाळी स्वस्त मिळत असतं.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 10:37
हो सर्व वाटा,ओढे कोरडे होते.एक दोन ठिकाणीच पाणी होते. नाही गाडी भीमाशंकरला बोलावली.मग तिकडून डिंभेला गेलो.खुप उशीर झाला होता आणि नारायणगावला मावशीकडे जायचं होतं म्हणून ओझर , जुन्नर केलं नाही. इंद्रायणी ६५ / किलो ठीक मिळाला का ? का महाग मिळाला?

In reply to by Bhakti

प्रचेतस 13/11/2024 - 09:06
५० ते ५५ रुपयात मिळायला हवा. डिंभ्यातून वरती गेलं तर तासा भरात आहुपेसारख्या नितांत सुंदर ठिकाणी जाता येतं.

खेड,राजगुरुनगर येथे रहात असल्यामुळे दर शिवरात्रीला भोभी ट्रेक जरूर व्हायचा. त्यावेळेस या पेक्षा घनदाट जंगल होते. वाड्याला, अर्थात जुने वाडा येथे संघाच्या दिवाळी शिबीरासाठी जायचो. पुढे दुष्काळ पडला व मॅट्रिक पास असल्याने कळमोडी येथे मिस्त्री म्हणून काही दिवस राज्य शासना करता सेवा दिली. तेव्हां पाझर तलावाचे काम होते पुढे त्याचे कळमोडी धरणात रूपांतर झाले. आता हा जल साठा बर्‍याच लोकांसाठी जीवनदायी ठरत आहे. एका मोठ्या धरणाच्या पायाभरणीचे श्रेय चित्रगुप्ताने माझ्या खात्यावर नक्कीच नोंदवले असेल. स्वर्गात जागा पक्की केली असावी. या भागात बरेच वर्षात गेलो नाही. पुढे ३१ ऑक्टोबर १९८५ ला मंचर,घोडेगाव मार्गे डिंभे धरणाच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तात्पुरत्या नोकरांच्या वसाहतीत गेलो होतो. धरणाचा पायाभरणी व इतर बांधकाम चालू होते. आमचे काका तीथे हिशोबनवीस होते. तारीख पक्की लक्षात कारण इंदिरा गांधी यांचा खून झाला व क्रिकेट मॅच बंद पडली होती. आपल्या भटकंतीने जुन्या आठवणींचे मोहळ फुटले. लेख छान आहे पण घाई घाईत त्रोटक लिहील्या सारखा वाटतो.फोटो छान आहेत.आमच्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मधे पायवाटा होत्या. डेहणे गावापर्यंत लालपरी व नंतर आकरा नंबरची एक्स्प्रेस.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 12/11/2024 - 12:04
खुप छान आठवणी आहेत. मला अजूनही डिंभे धरणाच्या बांधकामाच्या आठवणी सांगणारे मंचरमधले लोकं भेटतात.

चौथा कोनाडा 12/11/2024 - 14:34
व्वा.. सुंदर भटकंती.... फोटो छानच... वर्णन मात्र आणखी विस्तृत चालले असते .. हा परिसर निसर्गरम्य..सुंदर आहे.. ट्रेकिंग ला बेस्ट, फॅमिली ट्रेकिंगला ही उत्तम मे-जून महिन्याच्या आसपास इथं करवंद फुलते.. काळी मैना करवंदाची मोठी मेजवानी मिळते.. काय टपोरी असतात फळं..

नठ्यारा 12/11/2024 - 19:15
भक्तीताई, पदभ्रमण ( ट्रेक ) आटोपशीर दिसतंय. आमच्यासारख्या कोकणातनं चढून येणाऱ्यांच्या नशिबी हे सुख वा दु:ख नाही. :-) ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे. शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

Bhakti 12/11/2024 - 20:27
ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे.
ते मलापण समजलं नाही,पण घरचे सांगत होते, त्यासाठीच हे कुंपण असेल.
शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो.
हो ,अनेकदा माझ्या थेट बोलण्यामुळे नवरा म्हणतो तू चुकून मुलगी झाली आहेस ;) आणि अहो, मी ताई आहे हे केव्हाच सिद्ध झालंय.

प्रचेतस 13/11/2024 - 09:05
छोटेखानी वृत्तांत आवडला. भीमाशंकर जंगलांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड मोठमोठे उंच वृक्ष, शेकरूंना घरटी करण्यास आदर्श असे. गुप्त भीमशंकर वाट सुंदर आहे, मात्र मंदिराच्या मागच्या बाजूला खूप कचरा आहे.
अ भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे.अशा नदीच्या उगम स्थानी सतत पाण्याची खळखळ वातावरणात नादमयता ठेवत असते.सह्याद्रीच्या निसर्ग कुशीत भीमाशंकर ट्रेक हा खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे.यंदा पावसाळाही चांगला चार महिने होता पण मला तेव्हा जमलच नाही.तरीही जवळपासचा त्यातही सोपा "भोभी" जंगल ट्रेक काल करायचा ठर