कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला,
जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला,
चक्र असेच दौडले तर,
भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....??
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??
डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे
हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे
चक्र असेच दौडले तर,
भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....??
नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...??
विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले
वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले
उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले
चटके देऊ
छान!!!
अंकुरात माया असुनी मातीशी