परतीचा प्रवास, वाटेत फक्त अंधार..
क्षितिजाची फक्त चाहूल, बाकी सर्व काळोख..
रातकिड्यांची किर्र किर्र, हलकेच वाऱ्याची शिळ..
पत्थरांची रेलचेल पायी, ठेच - खाच खळगेची साथ..
असं कसं घडलं, नक्की कुठे पाल शिंकली..
सर्व काही नीट चालू असता, कशी सर्व घडी विस्कटली..
आपण सूर्याला गाठलेलं, त्याला हसून हस्तांदोलन केलेलं..
जे न पाहिलं त्या रवीने, ते आपण दोघांनी सहज अनुभवलेलं..
तसं आठवतं घडलेलं सर्व काही, पण मन काही मानत नाही..
आठवणी येत राहतात , मनातून काही जात नाही..
आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता..
आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता..
मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो..
वासनेच्या हिंदोळ्याल