मॉल संस्कृति आणि फ़ेरीवाले
काही दीवसांपुर्वी आलेल्या मॉल संस्कृति धाग्यावर बर्याचजणांनी मॉलमधून भाजी न घेता रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून आपण का खरेदी करतो / करावी याची कारणे दीली आहेत.
माझ्या माहीतीतले बरेच लोकही त्याच मताचे आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की हेच लोक आरक्षणामुळे आपल्यावर कसा अन्याय होतो हे कंटाळा येईपर्यंत सांगत असतात. पण फेरीवाल्यांमुळे कायदेशीरपणे दुकान चालवणार्या दुकानदारावर होणारया अन्यायाचे भागीदार असतात.
बाकी फेरीवाल्यांकडील मालाचा दर्जाची काही खात्री नसणे, फेरीवाल्यांमुळे वाढणारा शहराचा बकाल पणा, त्यांनी केलेल्या घणीमुळे वाढणारी रोगराई, ती निस्तरताना पालीका, शासन यंत्रंणा यांचावर येणारा ताण, शासनाचा बुडणारा महसुल, करदात्यांच्या पैशाचा होणारा अपव्यय, लोकांची होणारी गैरसोय, परप्रांतीयांचे वाढणारे लोंढे, त्या अनुशंगाने वाढणारी झोपडपट्टी अशा समस्या असतातच.
मग या सगळ्याला कारणीभुत असलेल्या फेरीवाल्यांना सहानुभुती आणि उत्तेजन देउन आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत नाही का?
आपल्याला वाचणारे आपले थोडेसे पैसे या सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहेत का? आपण जर वाढलेल्या रोगराईला बळी पडून, किंवा गाडीवरचे खाउन एकदा जरी आजारी पडलो आणी डॉक्टरकडे गेलो व सुट्टी घेउन घरी बसलो तर वाचवलेल्या सर्व पैशांपेक्षा जास्त पैसे घालवणार नाही का?
मग खरोखरच फेरीवाल्यांकडून खरेदी करणे गरजेचे (/वर्थ) आहे का?
प्रतिक्रिया
साहेब
केवळ मॉलच नाही
मॉलमधे खालील वस्तू खरेदी
धागाकर्त्याशी सहमत.
मॉल वि. फेरीवाले/ पथारीवाले
सहमत आहे.