मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लैराईदेवी जत्रा चेंगराचेंगरी

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हिंदुस्थानात सर्वात स्वस्त गोष्ट माणसाचा जीव. रोज मरताहेत अकाली कशी करावी कीव? गोवा,शिरगाव येथील लैराईदेवी जत्रा जमले होते 40 हजार नऊ शे सतरा. गेले होते आशीर्वाद घेण्या, मिरवणुकीत सहभाग देण्या. करण्या कुटुंबाची हौस आणि मुलांची थोडी मौज. मिरवणुकीदरम्यान, एका ठिकाणी उतार, लोकांना नाही कळले ना रांग, नाही कतार गोंधळात लोक पडले, काही जोरात ओरडले एकमेकांवर लागले पडू बायका,मुले लागले रडू झाली भयानक चेंगराचेंगरी, 7 जण जागीच मेले, जशी मेंढरी 80 जण जखमी झाले त्यांना हॉस्पिटल नेले. संयोजकांचा आहेच दोष, तसेच भक्तांचा उन्माद जोश. मागे मांढरादेवी च्या जत्रेत मेले अनेक, कोर्ट शोधू शकले नाही कारण एक. आता काय बोलायचे 'हे असेच चालायचे....'

वाचने 1158 वाचनखूण प्रतिक्रिया 2

आत्ता कवितेच्या माध्यमातून लैरादेवीच्या दुर्घटनेची बातमी पाहिली. दुर्दैवी सगळं. अनेकदा अशा गर्दींची चर्चा होते. लोक विसरुन जातात आणि अशा दुर्घटना घडतात. -दिलीप बिरुटे