मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विजय तेंडुलकर लेखन कार्यशाळा...

भडकमकर मास्तर ·

मास्तर, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर मराठी नाटकाचा झंजावात. त्यांचा स्वभाव आणि नाटके सतत चर्चेत राहणारी अशीच होती. ऐंशी संहितेमधून आपल्या संहितेची निवड होऊन आपणास नाट्य लेखन कार्यशाळेत त्यांचे मार्गदर्शन घेता आले आपण भाग्यवान आहात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शितल 19/05/2008 - 17:51
तुमचे नशिब मोठे तुम्हाला ते॑डु॑लकरा॑चे मार्गदर्शन लाभले, आणि स॑देश कुलकर्णी हे देखिल माझे आवडते व्यक्तीमत्व आहे. तेडु॑लकरा॑ना माझी विनम्र आदरा॑जली.

कलंत्री 19/05/2008 - 19:32
तुम्हाला योग्य ते दिशा आणि विचार मिळालाले आहेत. या विचारावरच पूढील कार्य चालु ठेवा. नाहीतर अश्या मान्यवरांच्या मृत्युनंतर आपण परत विसरतो. अश्या कार्यशाला भरविणे हीच खरी श्रद्धाजंली असेल.

चतुरंग 19/05/2008 - 19:38
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! चतुरंग

In reply to by चतुरंग

मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! असेच म्हणते,चतुरंगसारखेच. स्वाती

त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?" त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा.. मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्‍याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. .... नाटक कुठेही घडू शकते. एका मध्य प्रदेशातील नक्षलवादी दुर्गम भागात मी हिन्दी घाशीरामचा प्रयोग पाहिला आहे. पण दोनच कलाकारांचा... फार छान होता तो प्रयोग... दोघे उत्तम गायक होते आणि अभिनेते... नाटकातला त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय सत्तास्पर्धेचा आशय ते उत्तम मांडत होते. यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे" ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विकास 20/05/2008 - 08:31
तेंडुलकरांबरोबर काम करायला मिळाले हे भाग्य आहे. खालील माझा प्रतिसाद टिकात्मक असला तरी मला देखील त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले असते तर आवडले असते. गेल्या पिढीतील अनेक बुद्धीवादी लेखकांपैकी तेंडूलकर होते. त्यांच्यातील बुद्धीवंताला आदरांजली वाहत असतानाच त्यांच्याच पद्धतीने थोडेसे लिहावेसे वाटले...मला कल्पना आहे की कदाचीत मला जे काही वाटते ते अनेकांना पटणार नाही, पण त्यांच्याच, म्हणजे तेंडुलकरांप्रमाणे जे वाटते ते स्पष्टपणे लिहून ही अनोखी पण मनापासून आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. असे म्हणायचे कारण इतकेच की पु ल आणि कुसुमाग्रजांसारख्यांना (त्यांच्या मृत्यूनंतरही) तेंडूलकरांनी बुद्धीवाद म्हणून टिका करत नावे ठेवल्याचे आठवते...एकीकडे श्री पु भागवतांना मनोहर जोशींकडून पुरस्कार घेऊ नये म्हणून जाहीर दबाव आणणारे तेंडूलकर नंतर त्याच जोशीबुवांबरोबर न्युयॉर्कला एकाच व्यासपिठावर बसल्याचे आठवते... त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. जर वरील विधान हे तेंडूलकरांनी केले असले तर सखेद आश्चर्य वाटले...विचार करा तेंडुलकरांचे इतर बाबतीत विचार काय असावेत याचा : जर असेच विधान हे हिंदू पुढार्‍याने अन्याय झाला म्हणून मुसलमानांविरुद्ध नाटके करायला केले, अथवा आता राज ठाकरे अथवा कधिही शिवसेना जे काही परप्रांतिंयांविरुद्ध त्यांच्याकडून होणार्‍या कथीत अन्यायाविरुद्ध वाचा फोडून "राडा" करते त्यात आणि तेंडूलकरांच्या विचारात काय फरक? मग एकाचे चांगले आणि दुसर्‍यांचे अतिरेकी का म्हणायचे? मला थोडक्यात इतकेच म्हणायचे आहे की स्वतःच्या बुद्धीचा वापर जर समाजात कुठल्याही पद्धतीचा द्वेष तयार करायला अथवा "पेटवायला" करण्यात येत असला तर त्याचे कौतुक का करायचे? हिंसा ही हिंसा असतेच - आणि ती कधी कधी तलवारी पेक्षा लेखणीने अधीक होऊ शकते. कधी दंगलीच्या रुपात तर कधी समाजात अंतर्गत द्वेष निर्माण करून... कदाचीत असे करताना तेंडुलकरांनी पोटतिडकीने केले असेल - होणारे अन्याय पाहून... पण तेच इतरांचे झालेले असू शकते. म्हणून कुठेतरी असे राहून राहून वाटते की विचारी आणि बुद्धीवादी असून आणि उत्कृष्ठ साहीत्यनिर्मिती करत असताना देखील हे समाजाला वैचारीक दिशा देण्याच्या संदर्भात कुठेतरी वाट चुकलेले व्यक्तिमत्व होते.

In reply to by विकास

त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही... त्यांचा कोणत्या आतिरेकी, नक्षलवादी विचारांना कितपत पाठिंबा होता की नव्हता मला ठाउक नाही...तिथे तर ( आणि मी लिहिले आहे त्यातही ) सन्दर्भ फक्त नाटक कोठेही होऊ शकते एवढाच असावा.... बाकी चालूद्यात.... _ _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही...
असा अर्थ विकासरावांच्या लिखाणातुन ही कोठेहि ध्वनित होत नाही. त्यांची आंदरांजली मात्र अगदी "तेंडुलकरी" वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by विकास

तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! नाटककार म्हणून एक भूमिका असणे निराळे आणि विचारवंत म्हणून तीच भूमिका निभावणे निराळे!!!! विचारवंत म्हणून तेंडुलकर अपुरे पडले हे निश्चित!!!!! कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विकास 20/05/2008 - 16:24
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! १००% मान्य आणि मला त्यांची नाटके आवडतात. उगाच त्यांच्या नाटकांबद्दल (विशेष करून घाशिराम) जो काही गोंधळ घातला गेला तो मला कधी आवडला / आवडत नाही. टिका करणे वेगळे आणि विचार करायलाच विरोध करणे वेगळे. पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! इतकेच कुठेतरी वाटते. मी स्वतः कधी स्वतःला समाजवादी समजत नसलो, तरी पुर्वी सारख्या समाजवाद्यांची (विशेष करून मराठी) गरज आजही आहे असे वाटते. कुठलाच समाज एकेरी नसावा, जर तो चांगला प्रौढत्वाला (मॅचूअर) होणे गरजेचे वाटत असेल तर. त्यात आपल्याकडील समाजवाद्यांचे योगदान चांगले आहे. कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!! माझा देखील "टिका" करणे हा उद्देश नव्हता. पण जेंव्हा एखादे व्यक्तिमत्व हे विशाल असते तेंव्हा त्याला "मी श्रद्धांजली" वाहतो इतकेच अशा चर्च्रेत म्हणायच्या ऐवजी कुठेतरी थोडे त्या व्यक्तीचे आणि ती व्यक्ती ज्या विचारांचे प्रतिनिधित्व कदाचीत तिच्या कळतनकळत करते त्या विचारांचे थोडेसे विश्लेषण करावेसे वाटले.

इथे सर्व जण तेंडुलकरांवरती आरोप करणार आणि मग त्यांना मास्तर उत्तरे देणार असा विषय नाहीये , याची इथल्या सूज्ञांना कल्पना असणार याची मला खात्री आहे.... :) (खुद्द माझ्या घरीही "तुमचे ते तेंडुलकर ..... " आणि मग हेच वरचे सर्व ऐकायची मला सवय आहे....) मी छोटा माणूस त्याला काय उत्तरे देणार ? त्यांच्याकडून चार दिवस नाटक शिकलो , मला आनंद आहे.... ( पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आणि नाटकातील सर्व विचारांचा मी सपोर्टर आहे असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, आणि इथे तो विषयही नाही.... मला न आवडणारे तेंडुलकर असा विषय ज्याने त्याने काढून आपापली मते त्यात जरूर लिहावीत... प्रत्येकाला तो अधिकार आहेच... ) इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 20/05/2008 - 10:12
इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... खरं आहे आपलं म्हणणं! अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 20/05/2008 - 18:38
>>>कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! +१. आपला हा लेख आणि अनुभव मला देखील नक्कीच आवडला आणि त्यात रसभंग व्हावा अशी माझी देखील इच्छा नव्हती/नाही. पण जेंव्हा मुक्त व्यासपिठावर एखादा विषय चर्चेला येतो तेंव्हा त्यात वाचताना जे सुचले ते पटकन लिहीले गेले. आपल्याला जर त्यात व्यक्तिगत टिका वाटली असल्यास क्षमस्व. आणि हो, तेंडुलकरांना मी फक्त "तुमचे" मानत नाही. कुठलेही असामान्य व्यक्तिमत्व हे त्या समाजातील सर्वांचे असते आणि म्हणून त्यांच्यातील आवडणार्‍या आणि नावडणार्‍या गुणावगुणांसहीत ते "आमचे" ही आहेत आणि त्यात आनंद आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय!! तुमची काही चूक नाही हो!! असलीच तर "विजय तेंडुलकर" या महान विषयाला हात घालण्याचीच आहे!!:)) तो माणूसच इतका महान होता की त्याच्या साहित्यिक आणि विचारवंती कामगिरीविषयक निरनिराळी मतं असणारच!! तेंडुलकर नाटककार म्हणून महान होते यात काहीच संशय नाही हो!!! महान व्यक्तीच्याच कार्याचे मूल्यमापन होते!! भडक मकरांच्या कार्यांचे कोणी मूल्यमापन करील काय? (ह. घ्या.!!!) आमचे म्हणणे इतकेच की त्यांची नाटककार म्हणून भूमिका आणि त्यांची विचारवंत म्हणून भूमिका (विशेषतः मोदींविषयी!!!!!!) यांचा मेळ लागत नाही!!! कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!! आमचे काही चुकले काय? असेल तर स्पष्ट करा........ आम्हाला आपल्या संतांचे एक वचन आठवते... "देव्हार्‍यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम" आता आपले संत खरे की तेंडुलकर मोठे!!!! स्पष्टोक्तीबद्द्ल क्षमा असावी!! तुम्ही नाही म्हटलंत तरी "आपलाच", पिवळा डांबिस

कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!!
गोची होते खरी! काय करणार? http://sadhanatrust.com/pdf/SW20080510.pdf या ठिकाणी पान नं २९ वर राहुल रेवले यांचा 'समाजवाद्यांनी केलेली सर्वात मोठी चुक ' हा लेख . यावर साधनाच्या संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. वाचनीय आहे. प्रकाश घाटपांडे

मास्तर, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर मराठी नाटकाचा झंजावात. त्यांचा स्वभाव आणि नाटके सतत चर्चेत राहणारी अशीच होती. ऐंशी संहितेमधून आपल्या संहितेची निवड होऊन आपणास नाट्य लेखन कार्यशाळेत त्यांचे मार्गदर्शन घेता आले आपण भाग्यवान आहात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शितल 19/05/2008 - 17:51
तुमचे नशिब मोठे तुम्हाला ते॑डु॑लकरा॑चे मार्गदर्शन लाभले, आणि स॑देश कुलकर्णी हे देखिल माझे आवडते व्यक्तीमत्व आहे. तेडु॑लकरा॑ना माझी विनम्र आदरा॑जली.

कलंत्री 19/05/2008 - 19:32
तुम्हाला योग्य ते दिशा आणि विचार मिळालाले आहेत. या विचारावरच पूढील कार्य चालु ठेवा. नाहीतर अश्या मान्यवरांच्या मृत्युनंतर आपण परत विसरतो. अश्या कार्यशाला भरविणे हीच खरी श्रद्धाजंली असेल.

चतुरंग 19/05/2008 - 19:38
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! चतुरंग

In reply to by चतुरंग

मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! असेच म्हणते,चतुरंगसारखेच. स्वाती

त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?" त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा.. मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्‍याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. .... नाटक कुठेही घडू शकते. एका मध्य प्रदेशातील नक्षलवादी दुर्गम भागात मी हिन्दी घाशीरामचा प्रयोग पाहिला आहे. पण दोनच कलाकारांचा... फार छान होता तो प्रयोग... दोघे उत्तम गायक होते आणि अभिनेते... नाटकातला त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय सत्तास्पर्धेचा आशय ते उत्तम मांडत होते. यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे" ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विकास 20/05/2008 - 08:31
तेंडुलकरांबरोबर काम करायला मिळाले हे भाग्य आहे. खालील माझा प्रतिसाद टिकात्मक असला तरी मला देखील त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले असते तर आवडले असते. गेल्या पिढीतील अनेक बुद्धीवादी लेखकांपैकी तेंडूलकर होते. त्यांच्यातील बुद्धीवंताला आदरांजली वाहत असतानाच त्यांच्याच पद्धतीने थोडेसे लिहावेसे वाटले...मला कल्पना आहे की कदाचीत मला जे काही वाटते ते अनेकांना पटणार नाही, पण त्यांच्याच, म्हणजे तेंडुलकरांप्रमाणे जे वाटते ते स्पष्टपणे लिहून ही अनोखी पण मनापासून आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. असे म्हणायचे कारण इतकेच की पु ल आणि कुसुमाग्रजांसारख्यांना (त्यांच्या मृत्यूनंतरही) तेंडूलकरांनी बुद्धीवाद म्हणून टिका करत नावे ठेवल्याचे आठवते...एकीकडे श्री पु भागवतांना मनोहर जोशींकडून पुरस्कार घेऊ नये म्हणून जाहीर दबाव आणणारे तेंडूलकर नंतर त्याच जोशीबुवांबरोबर न्युयॉर्कला एकाच व्यासपिठावर बसल्याचे आठवते... त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. जर वरील विधान हे तेंडूलकरांनी केले असले तर सखेद आश्चर्य वाटले...विचार करा तेंडुलकरांचे इतर बाबतीत विचार काय असावेत याचा : जर असेच विधान हे हिंदू पुढार्‍याने अन्याय झाला म्हणून मुसलमानांविरुद्ध नाटके करायला केले, अथवा आता राज ठाकरे अथवा कधिही शिवसेना जे काही परप्रांतिंयांविरुद्ध त्यांच्याकडून होणार्‍या कथीत अन्यायाविरुद्ध वाचा फोडून "राडा" करते त्यात आणि तेंडूलकरांच्या विचारात काय फरक? मग एकाचे चांगले आणि दुसर्‍यांचे अतिरेकी का म्हणायचे? मला थोडक्यात इतकेच म्हणायचे आहे की स्वतःच्या बुद्धीचा वापर जर समाजात कुठल्याही पद्धतीचा द्वेष तयार करायला अथवा "पेटवायला" करण्यात येत असला तर त्याचे कौतुक का करायचे? हिंसा ही हिंसा असतेच - आणि ती कधी कधी तलवारी पेक्षा लेखणीने अधीक होऊ शकते. कधी दंगलीच्या रुपात तर कधी समाजात अंतर्गत द्वेष निर्माण करून... कदाचीत असे करताना तेंडुलकरांनी पोटतिडकीने केले असेल - होणारे अन्याय पाहून... पण तेच इतरांचे झालेले असू शकते. म्हणून कुठेतरी असे राहून राहून वाटते की विचारी आणि बुद्धीवादी असून आणि उत्कृष्ठ साहीत्यनिर्मिती करत असताना देखील हे समाजाला वैचारीक दिशा देण्याच्या संदर्भात कुठेतरी वाट चुकलेले व्यक्तिमत्व होते.

In reply to by विकास

त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही... त्यांचा कोणत्या आतिरेकी, नक्षलवादी विचारांना कितपत पाठिंबा होता की नव्हता मला ठाउक नाही...तिथे तर ( आणि मी लिहिले आहे त्यातही ) सन्दर्भ फक्त नाटक कोठेही होऊ शकते एवढाच असावा.... बाकी चालूद्यात.... _ _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही...
असा अर्थ विकासरावांच्या लिखाणातुन ही कोठेहि ध्वनित होत नाही. त्यांची आंदरांजली मात्र अगदी "तेंडुलकरी" वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by विकास

तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! नाटककार म्हणून एक भूमिका असणे निराळे आणि विचारवंत म्हणून तीच भूमिका निभावणे निराळे!!!! विचारवंत म्हणून तेंडुलकर अपुरे पडले हे निश्चित!!!!! कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विकास 20/05/2008 - 16:24
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! १००% मान्य आणि मला त्यांची नाटके आवडतात. उगाच त्यांच्या नाटकांबद्दल (विशेष करून घाशिराम) जो काही गोंधळ घातला गेला तो मला कधी आवडला / आवडत नाही. टिका करणे वेगळे आणि विचार करायलाच विरोध करणे वेगळे. पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! इतकेच कुठेतरी वाटते. मी स्वतः कधी स्वतःला समाजवादी समजत नसलो, तरी पुर्वी सारख्या समाजवाद्यांची (विशेष करून मराठी) गरज आजही आहे असे वाटते. कुठलाच समाज एकेरी नसावा, जर तो चांगला प्रौढत्वाला (मॅचूअर) होणे गरजेचे वाटत असेल तर. त्यात आपल्याकडील समाजवाद्यांचे योगदान चांगले आहे. कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!! माझा देखील "टिका" करणे हा उद्देश नव्हता. पण जेंव्हा एखादे व्यक्तिमत्व हे विशाल असते तेंव्हा त्याला "मी श्रद्धांजली" वाहतो इतकेच अशा चर्च्रेत म्हणायच्या ऐवजी कुठेतरी थोडे त्या व्यक्तीचे आणि ती व्यक्ती ज्या विचारांचे प्रतिनिधित्व कदाचीत तिच्या कळतनकळत करते त्या विचारांचे थोडेसे विश्लेषण करावेसे वाटले.

इथे सर्व जण तेंडुलकरांवरती आरोप करणार आणि मग त्यांना मास्तर उत्तरे देणार असा विषय नाहीये , याची इथल्या सूज्ञांना कल्पना असणार याची मला खात्री आहे.... :) (खुद्द माझ्या घरीही "तुमचे ते तेंडुलकर ..... " आणि मग हेच वरचे सर्व ऐकायची मला सवय आहे....) मी छोटा माणूस त्याला काय उत्तरे देणार ? त्यांच्याकडून चार दिवस नाटक शिकलो , मला आनंद आहे.... ( पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आणि नाटकातील सर्व विचारांचा मी सपोर्टर आहे असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, आणि इथे तो विषयही नाही.... मला न आवडणारे तेंडुलकर असा विषय ज्याने त्याने काढून आपापली मते त्यात जरूर लिहावीत... प्रत्येकाला तो अधिकार आहेच... ) इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 20/05/2008 - 10:12
इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... खरं आहे आपलं म्हणणं! अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 20/05/2008 - 18:38
>>>कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! +१. आपला हा लेख आणि अनुभव मला देखील नक्कीच आवडला आणि त्यात रसभंग व्हावा अशी माझी देखील इच्छा नव्हती/नाही. पण जेंव्हा मुक्त व्यासपिठावर एखादा विषय चर्चेला येतो तेंव्हा त्यात वाचताना जे सुचले ते पटकन लिहीले गेले. आपल्याला जर त्यात व्यक्तिगत टिका वाटली असल्यास क्षमस्व. आणि हो, तेंडुलकरांना मी फक्त "तुमचे" मानत नाही. कुठलेही असामान्य व्यक्तिमत्व हे त्या समाजातील सर्वांचे असते आणि म्हणून त्यांच्यातील आवडणार्‍या आणि नावडणार्‍या गुणावगुणांसहीत ते "आमचे" ही आहेत आणि त्यात आनंद आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय!! तुमची काही चूक नाही हो!! असलीच तर "विजय तेंडुलकर" या महान विषयाला हात घालण्याचीच आहे!!:)) तो माणूसच इतका महान होता की त्याच्या साहित्यिक आणि विचारवंती कामगिरीविषयक निरनिराळी मतं असणारच!! तेंडुलकर नाटककार म्हणून महान होते यात काहीच संशय नाही हो!!! महान व्यक्तीच्याच कार्याचे मूल्यमापन होते!! भडक मकरांच्या कार्यांचे कोणी मूल्यमापन करील काय? (ह. घ्या.!!!) आमचे म्हणणे इतकेच की त्यांची नाटककार म्हणून भूमिका आणि त्यांची विचारवंत म्हणून भूमिका (विशेषतः मोदींविषयी!!!!!!) यांचा मेळ लागत नाही!!! कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!! आमचे काही चुकले काय? असेल तर स्पष्ट करा........ आम्हाला आपल्या संतांचे एक वचन आठवते... "देव्हार्‍यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम" आता आपले संत खरे की तेंडुलकर मोठे!!!! स्पष्टोक्तीबद्द्ल क्षमा असावी!! तुम्ही नाही म्हटलंत तरी "आपलाच", पिवळा डांबिस

कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!!
गोची होते खरी! काय करणार? http://sadhanatrust.com/pdf/SW20080510.pdf या ठिकाणी पान नं २९ वर राहुल रेवले यांचा 'समाजवाद्यांनी केलेली सर्वात मोठी चुक ' हा लेख . यावर साधनाच्या संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. वाचनीय आहे. प्रकाश घाटपांडे
२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती... २० मे ते २४ मे २००६...

काही प्रश्न!!

केशवसुमार ·

मुक्तसुनीत 19/05/2008 - 16:34
बर्‍याचदा आपण कलाकार आणि तुमच्याआमच्यासारखा माणूस या गोष्टींमधे गल्लत करतो. कलाकार शेवटी माणूसच. जोवर तो लिहीतो, गातो, नृत्य करतो, अभिनय करतो तोवरच्या क्षणांमधे आपल्यापेक्षा वेगळा; इतकेच. बाकी तो/ती तुमच्या आमच्यासारखेच , कमी अधिक फरकाने. त्यांनाही गरजा आहेत , त्यांनाही विकार आहेत. शेवटी एक कलावंत म्हणून तो/ती आपल्याला काय सांगत आहेत, आपल्या नेहमीच्या जगातून त्यांनी निर्मिलेल्या सृष्टीत ते कितपत परिणामकारकरीत्या नेऊ शकतात ते महत्त्वाचे. त्यांच्या "रोजमर्रा की जिंदगी में" ते आपल्यापेक्षा फार वेगळे नाहीत.

In reply to by मुक्तसुनीत

केशवसुमार 19/05/2008 - 16:39
ते हे मान्य का करत नाहीत? तेही नाही आणि त्यांच्या भोवती आसलेले त्यांचे भाट ही नाही.. सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? केशवसुमार

In reply to by केशवसुमार

आनंदयात्री 19/05/2008 - 16:42
>>सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? सहमत.

हेरंब 19/05/2008 - 17:09
अशा व्यसनी कलाकारांना जवळच्या लोकांनी समज द्यायला पाहिजे. नाटकातले एक थोर कलाकार माझे मित्र आहेत. दारु हा संध्याकाळचा एक अविभाज्य घटक आहे असे त्यांचे मत आहे. तसेच ते जरी सरळमार्गी असले तरी इतर कलाकारांच्या भानगडींचे समर्थन करतात. हे मला पटत नाही असे मी त्यांना अनेकदा स्पष्ट सुनावले आहे.

आर्य 19/05/2008 - 18:05
काही कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ असतात हे खरे पण सगळी च मंडळी नसतात- ती आपल्या कला निर्मीतीत ईतकी गुंग असतात की भोवतालच्या जगाचे ज्ञानच ऊरत नाही. याची धुंदी कधी ऊतरुच नये अश्या वाटण्यातून सृजनाची नवी संधी न-शोधता त्याच निर्मीतीचा आनंदात बुडून जातात. कदाचीत हे त्याचे परीणाम ! या यशोधुंदीतुन बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय नव निर्मीती अशक्य आहे. (कलंदर) आर्य :D

सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? वर त्याला कलंदरीचे गोंडस नाव ही देतात.. अगदी सहमत! हे स्वत:ला 'डिस्काउंट देणे'च झाले..

राजे 19/05/2008 - 18:43
शक्यतो... कलाकृती निर्माण झाल्यानंतर अथवा निर्माण करताना... जो आनंद / दुखः ते लोक अनुभवत असतील त्याचे निराकरण करण्यासाठी शक्यतो ते व्यसनाचा मार्ग पकडत असतील असे मला वाटते. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कुंदन 19/05/2008 - 18:49
व्यसनी लोकांना फक्त निमित्त हवे .... भले ते आनंद साजरा करण्यासाठी असो अथवा दुखः विसरण्यासाठी असो.

यांना लहान वयात पैसा, प्रसिद्धी मिळालेली असते.. त्यामुळे त्यांच्यासमोर लक्ष्य (एम)असे काही नसते....आता पुढे काय करायला नसल्यामुळे ही मंडळी अशी व्यसनी होतात असे वाटते.

चतुरंग 19/05/2008 - 19:25
चंगीभंगीपणा, विक्षिप्तपणा हवाच किंवा असणारच हा एक फार मोठा गैरसमज बर्‍याचवेळा असतो - त्या कलाकार व्यक्तीचा आणि आजूबाजूच्या लोकांचा. त्या माणसाच्या कलेचा आणि ह्या इतर गोष्टींचा अन्योन्य संबंध लावून आपण त्या माणसाला माफ करुन टाकतो. किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींना ते लक्षात जरी आले तरी त्याची कानउघाडणी करण्याचे नैतिक धैर्य त्यांच्यात नसते कारण एकतर त्यांच्या म्हणण्याला कोणी किंमत देणार नाही ही भीती किंवा त्या कलाकाराला मिळणारे यश, पैसा, मानमरातब ह्यांने आलेले मिंधेपण. अनेक मोठे लोक ह्यातून सुटले नाहीत. (एक उदाहरणच घ्यायचे झाले तर - असामान्य गायकनट बालगंधर्व यांची अखेरच्या दिवसात झालेली अवस्था बघवत नसे असे लोक सांगतात. मराठी रंगभूमीवरचा हा चमत्कार तितक्याच विचित्र पद्धतीने अस्तंगत व्हावा हा मोठा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.) कलाकार म्हणून ते कितीही मोठे असले तरी व्यक्ती म्हणून, व्यवहाराचे भान असलेला एक माणूस म्हणून ते ह्या जागी कमीच पडले असे खेदाने म्हणावे लागते. ह्या मोठया लोकांना एकप्रकारे देवत्व बहाल करुन आपणच त्यांच्या कित्येक भल्या/बुर्‍या गोष्टी ह्या असामान्यत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची बातमी होते. कलाकारातला विवेक जागा असेल तर तो अशा भूलभुलैय्याला बळी न पडता त्यातला माणूस जागा ठेवून वाटचाल करु शकतो. कित्येकदा आयुष्यातले मोठे अपघात त्या व्यक्तीला जागेवर आणायला कारणीभूत ठरतात. कित्येकदा कशानेच त्यातला माणूस हा ह्या जगात येत नाही आणि त्यांची दुरवस्था होते. कोणत्याही कारणाने व्यसनाधीन होणे हा मनाचा कमकुवतपणाच म्हणायला हवा. ती पळवाट आहे. काही छोट्या कलाकारांना त्यांच्या भोवतालचे लोभी वर्तुळ स्वतःच्या लाभापायी सत्याची जाणीव करुन देत नाहीत. सर्वसामान्य रसिकाच्या मनात त्याच्या कलेविषयी आदरही असतो आणि व्यसनीपणा/विक्षिप्तपणाबद्दल दु:ख, वेदना, सलही असतो. फक्त ती वेदना व्यक्त करण्याचे धैर्य त्याच्यात नसते कारण त्यामुळे त्याच्यातल्या कलाकाराला आपण पारखे होऊ ही भीती असावी. तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात असे प्रसंग आले तर त्याला झाकोळून टाकणारे प्रसिध्दी, कला, ह्यांचे वलय आपल्याभोअवती नसते त्यामुळे आपण लगेच उघडे पडतो. समाजाच्या दबावापयी, काही नैतिक बंधनांपायी आपण स्वतःला जबाबदार्‍यांपासून सहजासहजी तोडून टाकू शकत नाही. कारण त्यामुळे होणार्‍या मानहानीला तोंड देण्यासाठी लागणारे सुरक्षा कवच आपल्याकडे नसते. (ज्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे त्यातलेही बरेच लोक असे वागताना आपण वाचतो/पाहतो/ऐकतो पण ह्याठिकाणी तो विषय नव्हे.)त्यामुळे कलाकारातला माणूस त्यातले गुण-दोष आणि आपल्यातला माणूस आपल्यातले तसेच गुण-दोष ह्यातला मुख्य फरक हा प्रसिध्दीच्या वलयामुळे आलेला असतो. हे वलय दूर व्हायचा अवकाश की ते धाडदिशी कोसळलेच म्हणून समजा. आपल्या पूर्वसूरींचे यशापयश, मानमरातब आणि मानहानी, उदंड कीर्ती आणि उध्वस्त करुन टाकणारी अपकीर्ती ह्यातून जे शिकतात ते कलाकार माणूस म्हणूनही मोठे ठरतात. आपण आधी माणूस आहोत, मग कलाकार आणि हे जग सोडून जातानाही माणूस म्हणूनच जाणार आहोत ह्याचे भान जे सोडत नाहीत त्यांच्या चरणी आपण लीन होतो. चतुरंग

केशवसुमार 20/05/2008 - 09:09
चर्चेत भाग घेतलेल्या आणि चर्चेत भाग न घेतलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

विसोबा खेचर 20/05/2008 - 09:42
बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? हम्म! ह प्रश्न थोडा मोघम वाटतो. जसे बरेच कलाकार व्यसनी, विक्षिप्त व गचाळ असतात त्याचप्रमाणे अनेक कलाकार निर्व्यसनी, सुस्वभावी व स्वच्छही असतात! तेव्हा व्यक्ति तितक्या प्रकृती! आता केशवा, तुझंच उदाहरण घे. तू एक कलाकार आहेस, शिवाय निर्व्यसनी, सुस्वभावी आणि स्वच्छ व नीटनेटका आहेसच की! :) त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? हे विधानही मोघम आहे. अशीही अनेक माणसं आहेत की जी कलाकार नाहीत व त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान नसते, व असेही अनेक कलाकार आहेत की ज्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान असते! अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? माझ्या मते कलेचे कौतुक करावे! कुणी कसं वागावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. ते ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? तुम्ही कसं वागताय हे तो कलाकार बघायला येतो आहे का? त्याचा तुम्हाला जाब विचारतो आहे का? मग तो कलाकार त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा वागतो ह्यासंबंधी कॉमेन्टस पास करण्याचा किंवा मतप्रदर्शन करण्याचा तुम्हाला तरी काय अधिकार? तुमचा मतलब फक्त त्याच्या कलेशी! तिच्याबद्दल आवडली, आवडली नाही याबद्दलच फक्त तुम्ही बोलू शकता! आत आमचे रहिमतखासाहेब! रात्रंदिवस अफूच्या नशेत असायचे. परंतु त्यांच्या गायकीत जी जादू होती ती केवळ अवर्णनीय होती! आपण फक्त कला बघावी. कलाकारही शेवटी माणूसच असतो, तो कुणी देव नसतो! त्यामुळे तुमच्याआमच्या सामान्य माणसात असलेले सर्व गुणदोष त्याच्यातही असतात! रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला?? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनिष 20/05/2008 - 09:55
मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला?? तात्या.
सहमत!!! आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये.

In reply to by मनिष

विसोबा खेचर 20/05/2008 - 10:06
आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये. फक्त कलाकारच का? आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 20/05/2008 - 10:46
कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन! हे मान्य.. फक्त कलाकारच का? सामान्य जनतेच्या बाबतीत ही हे लागू आहे.. पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचे अनुकरण लगेच होते...त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे? (परखड)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 20/05/2008 - 11:11
लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. त्याला कलाकाराचा काय इलाज? माझं अनुकरण करा असं तो सांगतो लोकांना? त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. त्यांचं इतर वागणं चांगलं की वाईट ह्याकडे लक्ष देणारे किंवा दुर्लक्ष करणारे तुम्ही कोण? तुम्हाला न्यायासनावर कुणी बसवलं?? उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे? चोरी, खून, दरोडा, इत्यादी कायदेशीर गुन्हे झाले. त्याबाबत न्यायापेक्षा कुणीच मोठा नाही. परंतु केशवराव, आता तुम्हीच चर्चा भरकटवत आहात. आपला स्वत:चाच चर्चाविषय आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावा अशी आपल्याला विनंती! बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? वरील चार प्रश्न आपण उपस्थित केले होतेत! आता खूनाचा मुद्दा आपण नव्यानेच मांडत आहात व चर्चा भरकटवत आहात असं वाटतं! कलाकाराने खून केल्यास त्याचा खुनाचा गुन्हाही माफ व्हावा असं मीही कुठे म्हटलेलं नाही! म्हटले असल्यास कृपया दाखवून द्या! तात्या.

In reply to by केशवसुमार

भाई 20/05/2008 - 11:11
हा आपला माझा सुसाट तर्क आहे, यामागे अभ्यास नाही. कला हा प्रकार इतर मानवी व्यवहारांपेक्षा थोडा वेगळा आहे. इथे हिशोब चालत नाहीत. उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. (मी फक्त खरोखरच्या प्रतिभावंतांबद्दल लिहितोय; सर्वच होतकरूंनाही प्रतिभावान म्हणवले जाण्याच्या आजच्या काळात हे मुद्दाम नमूद केले पाहीजे.). असे लोक तुम्हाआम्हासारखे जगण्याचे हिशोबही करत नसावेत. त्यांचे जगणेही तसेच निव्वळ एका उर्मीतून दुसर्‍या उर्मीकडे असे जात असावे. आपण आपल्या मापाने ते हिशोब मोजणे योग्य होणार नाही. हे त्याचे जेनेटिक प्रोग्रॅमिंग असावे. नाहीतर इतक्या मुलांची जबाबदारी असताना दीनानाथ आर्थिक सुरक्षिततेला न दुर्लक्षित करते. पण, एक सामान्य (नॉर्मल) माणूस नाटक कंपनी काढायचा विचारही करु शकणार नाही. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. पण हे फक्त फार वरच्या पातळीच्या कलाकारांबाबत लागू होते. राहीला मुद्दा अनुकरणाचा आणि प्रभावाचा. ते दुर्दैवी वास्तव आहे. लोकमान्याचा अडकित्ता घेतला जातो, गीतारहस्य नाही. हा मानवी स्वभाव काही प्रमाणात संस्कारांनी नियंत्रित करता येतो. -भाई (काहीही कला न येणारा अत्यंत हिशोबी माणूस)

In reply to by भाई

विसोबा खेचर 20/05/2008 - 11:17
उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. क्या बात है, भाईशी सहमत आहे... हिशेबी माणसं फक्त २ + २ = ४ करण्यातच धन्यता मानतात! तसं कलाकारांचं नसतं! ते अवलिया असतात,कलंदर असतात!! त्यांची गणीतंच वेगळी असतात! तात्या.

In reply to by केशवसुमार

तुम्ही म्हणाल यात काय नाविन्य आहे म्हणा!!!!:)) आय डोन्ट केअर!!! पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. असहमत!!!! लोक/जनता यांच्यावर कोणीही ओझं दिलेलं नसतं की कलाकारांचं अनुकरण करा म्हणून! ही सामान्य लोकांनी आपल्या दोषांचे समर्थन करण्यासाठी शोधलेली पळवाट आहे!!!! प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!! तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!! सर्वसामान्यांना गोंजारायचे दिवस संपले!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 20/05/2008 - 11:22
प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!! हा हा हा! हा मुद्दा खरा आहे रे डांबिसा...! तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!! अगदी सहमत आहे...!! आपला, (सर्वसामान्य रसिकाच्या भूमिकेतून कलाकाराच्या कलेचा मनमुराद आस्वाद घेणारा परंतु त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघण्याची शाणपट्टी व असभ्यपण न करणारा!) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

केशवसुमार 20/05/2008 - 11:30
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. असहमत!!!! पिंडाशेठ / तात्या ..मग प्रश्नच संपला... ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्‍या...आदर्श, अनुकरण, प्रभाव पाडणे ह्या सर्व मुर्ख कल्पना आहेत.. असो..

In reply to by केशवसुमार

ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्‍या आत्ता तुम्ही मुद्द्यावर आलांत!!:)) सामाजिक जाणिवा आणि नैतिक जबाबदार्‍या असतांत, पण त्या "कलाकारांवर" जास्त आणि "सर्वसामान्यांवर" कमी हे म्हणणे आमच्या मते तरी भोंदूपणाचे लक्षण आहे. त्या सर्वांवर सारख्याच असतात!! कलाकार त्याच्या कलेच्या प्रदर्शनाचे प्रसंग सोडले तर इतर वेळी सर्वसामान्य नागरीकच असतात!! त्यांच्याकडून असामान्य नागरी लक्षणांची अपेक्षा करणे व ती पूर्तता झाली नाही म्हणून निराश होणे. अथवा कलाकारांच्या व्यसनांचे आपल्या व्यसनांसाठी समर्थन देणे हा भोंदूपणा आहे हेच आमचे म्हणणे होते!!!! अवर "सर्वसामान्य" नागरीक नीडस् टू ग्रो अप!! तुम्हाला नाही वाटत असे?

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 20/05/2008 - 12:16
केशवराव, आत्ताच आपल्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यामुळे काही गोष्टींचा उलगडा झाला. सबब, तूर्तास आम्ही हा विषय इथेच थांबवत आहोत... कळावे, आपला, (स्नेहांकित) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

हर्षद बर्वे 22/05/2008 - 18:19
" प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!!...................." क्षमस्व परंतू या मुद्द्याशी मी असहमत आहे. व्यक्तीचे प्रौढत्व त्याच्या वयावर अवलंबून असते. आणि काय बरोबर आणि काय चूक ते कळणे याला प्रगल्भता यावी लागते. प्रगल्भता येण्याचे प्रत्येक व्यक्तीचे वय वेगळे असते. काही व्यक्तींना त्यांचा सहस्रचंद्रदर्शन ़सोहळा आटोपला तरी प्रगल्भता येतेच असे नाही. याची जिवंत उदाहरणे प्रत्येकांस आपल्या आजुबाजूला बघावयास मिळतील. तरी यावर विचार व्हावा..... आप्ला.. हर्षद

In reply to by केशवसुमार

मराठी_माणूस 20/05/2008 - 11:25
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते ९ ते ५ नोकरी करणार्‍या सामान्य माणसाचे अनुकरण करण्याची शक्यता कमी असते (तो / ती कीतीही मोठ्या पदावर असला/ली तरीही) . कलाकार प्रसिध्धीच्या झोतात असल्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त असते.

मुक्तसुनीत 19/05/2008 - 16:34
बर्‍याचदा आपण कलाकार आणि तुमच्याआमच्यासारखा माणूस या गोष्टींमधे गल्लत करतो. कलाकार शेवटी माणूसच. जोवर तो लिहीतो, गातो, नृत्य करतो, अभिनय करतो तोवरच्या क्षणांमधे आपल्यापेक्षा वेगळा; इतकेच. बाकी तो/ती तुमच्या आमच्यासारखेच , कमी अधिक फरकाने. त्यांनाही गरजा आहेत , त्यांनाही विकार आहेत. शेवटी एक कलावंत म्हणून तो/ती आपल्याला काय सांगत आहेत, आपल्या नेहमीच्या जगातून त्यांनी निर्मिलेल्या सृष्टीत ते कितपत परिणामकारकरीत्या नेऊ शकतात ते महत्त्वाचे. त्यांच्या "रोजमर्रा की जिंदगी में" ते आपल्यापेक्षा फार वेगळे नाहीत.

In reply to by मुक्तसुनीत

केशवसुमार 19/05/2008 - 16:39
ते हे मान्य का करत नाहीत? तेही नाही आणि त्यांच्या भोवती आसलेले त्यांचे भाट ही नाही.. सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? केशवसुमार

In reply to by केशवसुमार

आनंदयात्री 19/05/2008 - 16:42
>>सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? सहमत.

हेरंब 19/05/2008 - 17:09
अशा व्यसनी कलाकारांना जवळच्या लोकांनी समज द्यायला पाहिजे. नाटकातले एक थोर कलाकार माझे मित्र आहेत. दारु हा संध्याकाळचा एक अविभाज्य घटक आहे असे त्यांचे मत आहे. तसेच ते जरी सरळमार्गी असले तरी इतर कलाकारांच्या भानगडींचे समर्थन करतात. हे मला पटत नाही असे मी त्यांना अनेकदा स्पष्ट सुनावले आहे.

आर्य 19/05/2008 - 18:05
काही कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ असतात हे खरे पण सगळी च मंडळी नसतात- ती आपल्या कला निर्मीतीत ईतकी गुंग असतात की भोवतालच्या जगाचे ज्ञानच ऊरत नाही. याची धुंदी कधी ऊतरुच नये अश्या वाटण्यातून सृजनाची नवी संधी न-शोधता त्याच निर्मीतीचा आनंदात बुडून जातात. कदाचीत हे त्याचे परीणाम ! या यशोधुंदीतुन बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय नव निर्मीती अशक्य आहे. (कलंदर) आर्य :D

सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? वर त्याला कलंदरीचे गोंडस नाव ही देतात.. अगदी सहमत! हे स्वत:ला 'डिस्काउंट देणे'च झाले..

राजे 19/05/2008 - 18:43
शक्यतो... कलाकृती निर्माण झाल्यानंतर अथवा निर्माण करताना... जो आनंद / दुखः ते लोक अनुभवत असतील त्याचे निराकरण करण्यासाठी शक्यतो ते व्यसनाचा मार्ग पकडत असतील असे मला वाटते. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कुंदन 19/05/2008 - 18:49
व्यसनी लोकांना फक्त निमित्त हवे .... भले ते आनंद साजरा करण्यासाठी असो अथवा दुखः विसरण्यासाठी असो.

यांना लहान वयात पैसा, प्रसिद्धी मिळालेली असते.. त्यामुळे त्यांच्यासमोर लक्ष्य (एम)असे काही नसते....आता पुढे काय करायला नसल्यामुळे ही मंडळी अशी व्यसनी होतात असे वाटते.

चतुरंग 19/05/2008 - 19:25
चंगीभंगीपणा, विक्षिप्तपणा हवाच किंवा असणारच हा एक फार मोठा गैरसमज बर्‍याचवेळा असतो - त्या कलाकार व्यक्तीचा आणि आजूबाजूच्या लोकांचा. त्या माणसाच्या कलेचा आणि ह्या इतर गोष्टींचा अन्योन्य संबंध लावून आपण त्या माणसाला माफ करुन टाकतो. किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींना ते लक्षात जरी आले तरी त्याची कानउघाडणी करण्याचे नैतिक धैर्य त्यांच्यात नसते कारण एकतर त्यांच्या म्हणण्याला कोणी किंमत देणार नाही ही भीती किंवा त्या कलाकाराला मिळणारे यश, पैसा, मानमरातब ह्यांने आलेले मिंधेपण. अनेक मोठे लोक ह्यातून सुटले नाहीत. (एक उदाहरणच घ्यायचे झाले तर - असामान्य गायकनट बालगंधर्व यांची अखेरच्या दिवसात झालेली अवस्था बघवत नसे असे लोक सांगतात. मराठी रंगभूमीवरचा हा चमत्कार तितक्याच विचित्र पद्धतीने अस्तंगत व्हावा हा मोठा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.) कलाकार म्हणून ते कितीही मोठे असले तरी व्यक्ती म्हणून, व्यवहाराचे भान असलेला एक माणूस म्हणून ते ह्या जागी कमीच पडले असे खेदाने म्हणावे लागते. ह्या मोठया लोकांना एकप्रकारे देवत्व बहाल करुन आपणच त्यांच्या कित्येक भल्या/बुर्‍या गोष्टी ह्या असामान्यत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची बातमी होते. कलाकारातला विवेक जागा असेल तर तो अशा भूलभुलैय्याला बळी न पडता त्यातला माणूस जागा ठेवून वाटचाल करु शकतो. कित्येकदा आयुष्यातले मोठे अपघात त्या व्यक्तीला जागेवर आणायला कारणीभूत ठरतात. कित्येकदा कशानेच त्यातला माणूस हा ह्या जगात येत नाही आणि त्यांची दुरवस्था होते. कोणत्याही कारणाने व्यसनाधीन होणे हा मनाचा कमकुवतपणाच म्हणायला हवा. ती पळवाट आहे. काही छोट्या कलाकारांना त्यांच्या भोवतालचे लोभी वर्तुळ स्वतःच्या लाभापायी सत्याची जाणीव करुन देत नाहीत. सर्वसामान्य रसिकाच्या मनात त्याच्या कलेविषयी आदरही असतो आणि व्यसनीपणा/विक्षिप्तपणाबद्दल दु:ख, वेदना, सलही असतो. फक्त ती वेदना व्यक्त करण्याचे धैर्य त्याच्यात नसते कारण त्यामुळे त्याच्यातल्या कलाकाराला आपण पारखे होऊ ही भीती असावी. तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात असे प्रसंग आले तर त्याला झाकोळून टाकणारे प्रसिध्दी, कला, ह्यांचे वलय आपल्याभोअवती नसते त्यामुळे आपण लगेच उघडे पडतो. समाजाच्या दबावापयी, काही नैतिक बंधनांपायी आपण स्वतःला जबाबदार्‍यांपासून सहजासहजी तोडून टाकू शकत नाही. कारण त्यामुळे होणार्‍या मानहानीला तोंड देण्यासाठी लागणारे सुरक्षा कवच आपल्याकडे नसते. (ज्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे त्यातलेही बरेच लोक असे वागताना आपण वाचतो/पाहतो/ऐकतो पण ह्याठिकाणी तो विषय नव्हे.)त्यामुळे कलाकारातला माणूस त्यातले गुण-दोष आणि आपल्यातला माणूस आपल्यातले तसेच गुण-दोष ह्यातला मुख्य फरक हा प्रसिध्दीच्या वलयामुळे आलेला असतो. हे वलय दूर व्हायचा अवकाश की ते धाडदिशी कोसळलेच म्हणून समजा. आपल्या पूर्वसूरींचे यशापयश, मानमरातब आणि मानहानी, उदंड कीर्ती आणि उध्वस्त करुन टाकणारी अपकीर्ती ह्यातून जे शिकतात ते कलाकार माणूस म्हणूनही मोठे ठरतात. आपण आधी माणूस आहोत, मग कलाकार आणि हे जग सोडून जातानाही माणूस म्हणूनच जाणार आहोत ह्याचे भान जे सोडत नाहीत त्यांच्या चरणी आपण लीन होतो. चतुरंग

केशवसुमार 20/05/2008 - 09:09
चर्चेत भाग घेतलेल्या आणि चर्चेत भाग न घेतलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

विसोबा खेचर 20/05/2008 - 09:42
बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? हम्म! ह प्रश्न थोडा मोघम वाटतो. जसे बरेच कलाकार व्यसनी, विक्षिप्त व गचाळ असतात त्याचप्रमाणे अनेक कलाकार निर्व्यसनी, सुस्वभावी व स्वच्छही असतात! तेव्हा व्यक्ति तितक्या प्रकृती! आता केशवा, तुझंच उदाहरण घे. तू एक कलाकार आहेस, शिवाय निर्व्यसनी, सुस्वभावी आणि स्वच्छ व नीटनेटका आहेसच की! :) त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? हे विधानही मोघम आहे. अशीही अनेक माणसं आहेत की जी कलाकार नाहीत व त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान नसते, व असेही अनेक कलाकार आहेत की ज्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान असते! अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? माझ्या मते कलेचे कौतुक करावे! कुणी कसं वागावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. ते ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? तुम्ही कसं वागताय हे तो कलाकार बघायला येतो आहे का? त्याचा तुम्हाला जाब विचारतो आहे का? मग तो कलाकार त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा वागतो ह्यासंबंधी कॉमेन्टस पास करण्याचा किंवा मतप्रदर्शन करण्याचा तुम्हाला तरी काय अधिकार? तुमचा मतलब फक्त त्याच्या कलेशी! तिच्याबद्दल आवडली, आवडली नाही याबद्दलच फक्त तुम्ही बोलू शकता! आत आमचे रहिमतखासाहेब! रात्रंदिवस अफूच्या नशेत असायचे. परंतु त्यांच्या गायकीत जी जादू होती ती केवळ अवर्णनीय होती! आपण फक्त कला बघावी. कलाकारही शेवटी माणूसच असतो, तो कुणी देव नसतो! त्यामुळे तुमच्याआमच्या सामान्य माणसात असलेले सर्व गुणदोष त्याच्यातही असतात! रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला?? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनिष 20/05/2008 - 09:55
मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला?? तात्या.
सहमत!!! आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये.

In reply to by मनिष

विसोबा खेचर 20/05/2008 - 10:06
आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये. फक्त कलाकारच का? आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 20/05/2008 - 10:46
कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन! हे मान्य.. फक्त कलाकारच का? सामान्य जनतेच्या बाबतीत ही हे लागू आहे.. पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचे अनुकरण लगेच होते...त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे? (परखड)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 20/05/2008 - 11:11
लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. त्याला कलाकाराचा काय इलाज? माझं अनुकरण करा असं तो सांगतो लोकांना? त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. त्यांचं इतर वागणं चांगलं की वाईट ह्याकडे लक्ष देणारे किंवा दुर्लक्ष करणारे तुम्ही कोण? तुम्हाला न्यायासनावर कुणी बसवलं?? उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे? चोरी, खून, दरोडा, इत्यादी कायदेशीर गुन्हे झाले. त्याबाबत न्यायापेक्षा कुणीच मोठा नाही. परंतु केशवराव, आता तुम्हीच चर्चा भरकटवत आहात. आपला स्वत:चाच चर्चाविषय आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावा अशी आपल्याला विनंती! बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? वरील चार प्रश्न आपण उपस्थित केले होतेत! आता खूनाचा मुद्दा आपण नव्यानेच मांडत आहात व चर्चा भरकटवत आहात असं वाटतं! कलाकाराने खून केल्यास त्याचा खुनाचा गुन्हाही माफ व्हावा असं मीही कुठे म्हटलेलं नाही! म्हटले असल्यास कृपया दाखवून द्या! तात्या.

In reply to by केशवसुमार

भाई 20/05/2008 - 11:11
हा आपला माझा सुसाट तर्क आहे, यामागे अभ्यास नाही. कला हा प्रकार इतर मानवी व्यवहारांपेक्षा थोडा वेगळा आहे. इथे हिशोब चालत नाहीत. उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. (मी फक्त खरोखरच्या प्रतिभावंतांबद्दल लिहितोय; सर्वच होतकरूंनाही प्रतिभावान म्हणवले जाण्याच्या आजच्या काळात हे मुद्दाम नमूद केले पाहीजे.). असे लोक तुम्हाआम्हासारखे जगण्याचे हिशोबही करत नसावेत. त्यांचे जगणेही तसेच निव्वळ एका उर्मीतून दुसर्‍या उर्मीकडे असे जात असावे. आपण आपल्या मापाने ते हिशोब मोजणे योग्य होणार नाही. हे त्याचे जेनेटिक प्रोग्रॅमिंग असावे. नाहीतर इतक्या मुलांची जबाबदारी असताना दीनानाथ आर्थिक सुरक्षिततेला न दुर्लक्षित करते. पण, एक सामान्य (नॉर्मल) माणूस नाटक कंपनी काढायचा विचारही करु शकणार नाही. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. पण हे फक्त फार वरच्या पातळीच्या कलाकारांबाबत लागू होते. राहीला मुद्दा अनुकरणाचा आणि प्रभावाचा. ते दुर्दैवी वास्तव आहे. लोकमान्याचा अडकित्ता घेतला जातो, गीतारहस्य नाही. हा मानवी स्वभाव काही प्रमाणात संस्कारांनी नियंत्रित करता येतो. -भाई (काहीही कला न येणारा अत्यंत हिशोबी माणूस)

In reply to by भाई

विसोबा खेचर 20/05/2008 - 11:17
उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. क्या बात है, भाईशी सहमत आहे... हिशेबी माणसं फक्त २ + २ = ४ करण्यातच धन्यता मानतात! तसं कलाकारांचं नसतं! ते अवलिया असतात,कलंदर असतात!! त्यांची गणीतंच वेगळी असतात! तात्या.

In reply to by केशवसुमार

तुम्ही म्हणाल यात काय नाविन्य आहे म्हणा!!!!:)) आय डोन्ट केअर!!! पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. असहमत!!!! लोक/जनता यांच्यावर कोणीही ओझं दिलेलं नसतं की कलाकारांचं अनुकरण करा म्हणून! ही सामान्य लोकांनी आपल्या दोषांचे समर्थन करण्यासाठी शोधलेली पळवाट आहे!!!! प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!! तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!! सर्वसामान्यांना गोंजारायचे दिवस संपले!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 20/05/2008 - 11:22
प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!! हा हा हा! हा मुद्दा खरा आहे रे डांबिसा...! तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!! अगदी सहमत आहे...!! आपला, (सर्वसामान्य रसिकाच्या भूमिकेतून कलाकाराच्या कलेचा मनमुराद आस्वाद घेणारा परंतु त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघण्याची शाणपट्टी व असभ्यपण न करणारा!) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

केशवसुमार 20/05/2008 - 11:30
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. असहमत!!!! पिंडाशेठ / तात्या ..मग प्रश्नच संपला... ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्‍या...आदर्श, अनुकरण, प्रभाव पाडणे ह्या सर्व मुर्ख कल्पना आहेत.. असो..

In reply to by केशवसुमार

ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्‍या आत्ता तुम्ही मुद्द्यावर आलांत!!:)) सामाजिक जाणिवा आणि नैतिक जबाबदार्‍या असतांत, पण त्या "कलाकारांवर" जास्त आणि "सर्वसामान्यांवर" कमी हे म्हणणे आमच्या मते तरी भोंदूपणाचे लक्षण आहे. त्या सर्वांवर सारख्याच असतात!! कलाकार त्याच्या कलेच्या प्रदर्शनाचे प्रसंग सोडले तर इतर वेळी सर्वसामान्य नागरीकच असतात!! त्यांच्याकडून असामान्य नागरी लक्षणांची अपेक्षा करणे व ती पूर्तता झाली नाही म्हणून निराश होणे. अथवा कलाकारांच्या व्यसनांचे आपल्या व्यसनांसाठी समर्थन देणे हा भोंदूपणा आहे हेच आमचे म्हणणे होते!!!! अवर "सर्वसामान्य" नागरीक नीडस् टू ग्रो अप!! तुम्हाला नाही वाटत असे?

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 20/05/2008 - 12:16
केशवराव, आत्ताच आपल्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यामुळे काही गोष्टींचा उलगडा झाला. सबब, तूर्तास आम्ही हा विषय इथेच थांबवत आहोत... कळावे, आपला, (स्नेहांकित) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

हर्षद बर्वे 22/05/2008 - 18:19
" प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!!...................." क्षमस्व परंतू या मुद्द्याशी मी असहमत आहे. व्यक्तीचे प्रौढत्व त्याच्या वयावर अवलंबून असते. आणि काय बरोबर आणि काय चूक ते कळणे याला प्रगल्भता यावी लागते. प्रगल्भता येण्याचे प्रत्येक व्यक्तीचे वय वेगळे असते. काही व्यक्तींना त्यांचा सहस्रचंद्रदर्शन ़सोहळा आटोपला तरी प्रगल्भता येतेच असे नाही. याची जिवंत उदाहरणे प्रत्येकांस आपल्या आजुबाजूला बघावयास मिळतील. तरी यावर विचार व्हावा..... आप्ला.. हर्षद

In reply to by केशवसुमार

मराठी_माणूस 20/05/2008 - 11:25
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते ९ ते ५ नोकरी करणार्‍या सामान्य माणसाचे अनुकरण करण्याची शक्यता कमी असते (तो / ती कीतीही मोठ्या पदावर असला/ली तरीही) . कलाकार प्रसिध्धीच्या झोतात असल्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त असते.
बर्‍याच दिवसांन पासून काही प्रश्न मला भेडसावत आहेत.. ह्या चर्चेतून ह्या प्रश्नांची उत्तरे शोधणाचा एक प्रयत्न.. बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? (व्यथित) केशवसुमार

गरज

मेघना भुस्कुटे ·

स्वयंभू 19/05/2008 - 14:58
लेख झक्कास जमलाय. बँगलोर मधे असाल तर पुढल्या मिपा ओसरी ल या नक्की. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसोबा खेचर 19/05/2008 - 17:55
लेख वाचून क्षणभर गरगरलंच! छ्या! मेघनाताई, अहो तुम्ही किती गोष्टींचा जीवाला त्रास करून घेता बुवा! :) बाय द वे, लेख बाकी फक्कड जमलाय. तुमची सामाजिक जाणीव फारच तरल आहे बॉ! :) असो... माझ्या माहितीप्रमाणे, तुमचं मिपावरील हे पहिलंच स्वतंत्र लेखन आहे. या निमित्ताने आपल्या पहिल्यावहिल्या लेखाचं मी मिपावर मनपासून स्वागत करतो आणि यापुढेही असंच स्वच्छंद व मनमोकळं लेखन आपण मिपावर करावं, अशी आपल्याला विनंती करतो.. तात्या.

राजे 19/05/2008 - 18:33
अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! लेख मस्त जमला आहे ... पुढील लेखनाची वाट पाहत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कुंदन 19/05/2008 - 19:06
शिक्षण वा नोकरी निमित्त घरापासून लांब राहताना असे बरेच प्रसंग येतात. त्यावर उपाय म्हणजे जमेल तेंव्हा अधुन मधुन घरी एक पखालफेरी मारून येणे हे सर्वोत्तम....

बेसनलाडू 19/05/2008 - 20:17
लेखन फार आवडले. त्यातली तिडीक जाणवली, सामाजिक भान नि संवेदना जाणवली. पुढील लेखनसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (वाचक)बेसनलाडू

वरदा 19/05/2008 - 20:42
लिहिलयच गं मेघना..किती वैतागलेयस ते दिसतय.. पखालफेरी काय असतं गं?

देवदत्त 19/05/2008 - 20:46
छान लिहिलंय... मनातील विचार बाहेर आल्यासारखे वाटतात :)

गृहिणि 19/05/2008 - 20:46
सहिच जमलाय लेख. मी तुमचा ब्लॉग नेहमि वाचते, खुप छान लिहिता तुम्हि नेहमिच. हा लएख एक्दम भिडला कारण असच काहिस इथे (सातासमुद्रापार) नेहमि वाटत असत पण दुदैवाने "पखालफेरि" मारण शक्य नसल्याने "राहिले दुर घर माझे..." अशि अवस्था होते.

यशोधरा 19/05/2008 - 22:02
मेघना, आवडलं लिहिलेलं. मी आत दोन दिवसांनीच मारते आहे पखाल फेरी :)

छोटा डॉन 20/05/2008 - 07:48
मेघना तुझ्या लेखातुन अस्सल मराठी असलेल्या परंतु सध्या "बेंगलोरनिवासी" असलेल्या मराठी [ व त्यात पुणेकर ] व्यक्तीची मानसीक स्थिती चांगली मांडली गेली आहे ... बाकीचे म्हटल्याप्रमाणेच मी विचारतो "किती ग विचार करतेस तु ? अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! " बाकी तु म्हटल्याप्रमाणे आहेच तसे बंगलोर, साले *** रिक्षावाले रात्री ८ नंतर कमीतकमी २० रुपये जादा घेतात.... लोक इथल्या हवेचे कौतुक अगदी तोंड फाटूस्तोवर करतात पण जर दर ८ दिवसांनी पाउस पडून हवा जर ढगाळ होत असेल आणि जीव नकोसा होत असेल तर कसले कौतुक हे मला तरी समजले नाही ... बाकी "मॉल्स आणि मोठी थेटरे " याबद्दल मला काडीइतके अप्रुप नाही. जर "जोधा-अकबर वा तसाच एखादा तत्सम फालतू " पिक्चर जर तुम्हाला पर हेड ३०० रुपये ची फोडणी लावत असेल तर अजुन "६० रुपयात" पिक्चर दाखवणारे पुण्याचे "मंगला" काय वाईट ? बाकी "बागांबद्दल " मी सहमत नाही, बेंगलोरमध्ये तेवढीच एक गोष्ट आहे की जिथे "ट्रॅफीक जॅम" नाही. अगदी निवांत बसता येते, कुनाची कटकट नाही. जर मानसीक शांती साठी एवढी किंमत मोजावी लागत असेल तर आजच्या काळात ती बिलकूल जास्त नाही असे मी म्हणेन ... बाकी एक सिंपल गोष्ट आहे, जास्त त्रास करुन घ्यायचा नाही . कशाकशाचा त्रास करुन घेणार ? ही तर फक्त झलक आहे. अजुन आपण फक्त "कॉर्पोरेट कल्चर" बद्दल बोलत आहोत, इथले "लोकल आणि सोशल कल्चर" तर अजुन "खतरनाक" आहे आणि मराठी माणसाला तर झेपणे शक्यच नाही. तर "टेक व चील पील !!!!"..... बाकी "ऍडी" म्हणल्याप्रमाणे पुढच्यावेळी "कट्ट्याला" ये जमले तर ... मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर च्या अध्यक्ष छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाई 20/05/2008 - 10:53
मिपावाले बेंगलोरकर महाराष्ट्र मंडळात जातात का? गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? मी बेंगलोर सोडून ५ वर्षे झाली. त्यापूर्वी कधी मधी जायचो. बाकी मराठी माणसाला आवडण्यासारख्या फार गोष्टी बेंगलोरमध्ये नाहीत असे वाटते. -अर्धे तप बेंगलोरमध्ये काढूनही तिथे न रमलेला भाई

In reply to by भाई

देवदत्त 05/06/2008 - 21:21
गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? हो, होत असतात इतरही कार्यक्रम. :) गेले ३/४ वर्षे २ याहू गृप्सचा मिळून कार्यक्रम होत असतो. 'जल्लोष' त्याचे नाव. आता १ जून ला कार्यक्रम झाला असे ऐकले. मला सध्या वेळ मिळाला नाही नाहीतर मी त्याची माहिती इथे दिलीच असती. :( सदस्यांच्या कार्यक्रम/स्पर्धांसोबत नामांकित लोकांचे कार्यक्रमही होतात. ह्या वर्षी दिलीप प्रभावळकर येणार होते. मागील वर्षी शिरीष कणेकरांचे 'कणेकरी' ही झाले होते. तसेच इतर वेळी आणखीही कार्यक्रम असतात. २००५ मध्ये असेच 'आयुष्यावर बोलू काही' सादर केले होते. इतरही काही नाटकांचे प्रयोग झाले होते. (त्या मित्रांनाही मिपाचे आमंत्रण देतो :) . राहूनच गेले होते :( )

मनस्वी 20/05/2008 - 11:00
अक्षरश: असंच वाटतं मेघनाताई. मी ६ महिने होते तिथे.. ट्रॅफिक, रिक्षा, बागा, हवामान अन् मॉल्स - सगळे अनुभव असेच. सगळ्यात डोक्यात जातात ते रिक्षावाले.
'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...'
वाट बघतीये.

कौतुकाबद्दल आभार मंडळी! बाय दी वे, मी पुणेकर नाहीय. :( पखालफेरी: आय वॉज रेफरिंग टु कॅमल! पखाल भरून घेतली की काही महिने पाहायला नको!

वरदा 20/05/2008 - 21:27
कळ्ळं गं मेघना.. तुम्ही बँगलोर मधे राहून किती वैतागलेले दिसताय..मी तिथे परत आल्यावर बँगलोरला येण्याचा विचार करत होते माझ्या कं. चं ऑफिस आहे म्हणून आता विचार केला पाहिजे..... :S

अभिज्ञ 21/05/2008 - 00:14
मेघनाताई, आपल्या ह्या लेखाचे प्रयोजन कळाले नाही. फारच नकारार्थक भूमिकेतून लिहिल्यासारखा वाटला. अहो प्रत्येक शहरात असे कमी अधिक उणे मुद्दे असतातच. त्यात एकट्या बंगलोरला टारगेट करणे बरोबर नाही. मी हि आजपर्यंत दिल्ली,मुंबई,चेन्नई.. बगैरे अशा ब-याच शहरात वावरलो/राहिले आहे.जागोजागी चांगले वाईट अनुभव हे येणारच. रिक्षावाले म्हणाल तर प्रत्येक शहरात हे असले प्रकार चालतातच.ती जमातच वेगळी ... इथे वाईट काय आहे ह्याची उजळणी करत बसण्यापे़क्षा इथे चांगले काय आहे हे सांगितले असते तर जास्त आवडले असते. असो, पुढील लेखनाला शुभेच्छा. अभिज्ञ.

शशांक 21/05/2008 - 14:19
मुक्तचिंतन आवडले. मुंबईतून भारतात कुठेही गेलात तर थोडाफार त्रास होईलच असे वाटते. बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती ;) आपला (पुणेग्राम(त्र)स्त) शशांक

In reply to by शशांक

मनस्वी 21/05/2008 - 15:58
बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती
असहमत. मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला.. त्रस्त शशांक.. तुम्हाला असे अनुभव आले असतील तर जरूर कळवा. तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.

In reply to by मनस्वी

शशांक 21/05/2008 - 16:08
मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला..
दिवसाकाठी एखादा
  1. पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. पुणेरी रिक्षावाला म्हणजे नुसता पुण्यात रिक्षा चालवणारा नव्हे तर 'पुणेरी' रिक्षावाला. कसा ओळखावा? त्याला ज्या दिशेला जायचे नाही तिकडे जाण्याविषयी विचारले तर तुमच्याकडे अतिशय तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून मान हालवणारा किंवा नुसतेच दुसरीकडे पाहणारा किंवा दोन-तीन किलोमीटर साठी 'दोनशे रूपये होतील' म्हणणारा किंवा रात्री ८ वाजल्यापासून 'हाफ रिटन' मागणारा)
  2. दुकानदार (हा मारवाडी, बनिया किंवा बिहारी असेल तर बरे, मराठी असेल तर तुम्ही मेलात. हे दुकानदार धंदा करायला बसतात की दुर्लक्ष/अपमान करण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत बसतात हा संशोधनाचा विषय आहे. (हे संशोधन पुणे विद्यापीठातल्या मध्यम किंवा उतारवयीन काका/काकूंनी करावे. इतरांनी असा मनस्तापजनक कालापव्यव करू नये))
  3. बस कंडक्टर (यांच्याविषयी काही स्फुट आम्ही इथे लिहिले आहे, अवश्य वाचा)
  4. किंवा नुसता साधा (!!!) पुणेरी पुणेकर (पुण्यात राहणारे सगळेच पुणेरी नसतात ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट)
इतके चार-पाच लोक भेटले तरी एक मुक्तचिंतन लिहिले जाण्याइतपत अनुभव नक्कीच येतील :)
तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.
सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी? मनस्वी आणि समस्त पुणेकर काका-काकू हे सर्व जरा हलकेच घ्या. गमतीने लिहिले आहे.

In reply to by शशांक

भाग्यश्री 21/05/2008 - 21:44
काही गरज नाही 'पुणेकरांनी' सुधरण्याची! ते तसे आहेत, तो त्यांचा स्वभाव आहे असं समजा... हा रिक्षेवाले सुधरले पाहीजेत, कारण ते बर्‍याचदा कारण नसताना नाही म्हणतात, भाडं जास्त मागतात, तसे असेल तर ते सुधरले पाहीजेत.. अर्थात सगळेच रिक्षेवाले असे नसतात.. पुण्यात येऊन,पुण्याच्या सगळ्या सोयींचा वापर करून वर, पुण्याला नावं ठेवणार्या लोकांची मला कमाल वाटते !!! तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर हा सल्ला पटतो अशा वेळी !! (तसे हलकेच घेतले आहे.. पण गमतीत सुद्धा जरा जास्त वेळेला पुण्याला धोपटले जाते, त्यामुळे हा लेखनप्रपंच.. )

In reply to by शशांक

कुंदन 22/05/2008 - 13:23
एकदा एका संध्याकाळी सिमला ऑफिस ते बाणेर्/म्हाळुंगे प्रवासाचा योग आला होता. तासभर प्रतिक्षा केल्यावर एक पी एम टी आली , अर्ध्या प्रवासानंतर बसमधील दिव्यांनी मान टाकली , कदाचित भार नियमन असेल म्हणून दुर्लक्ष केले. अजून थोड्या वेळाने इंजिनाने देखील असहकार पुकारला. आई शप्पथ , तेंव्हापासून पी एम टी चा धसका घेतला आपण ...

यशोधरा 21/05/2008 - 22:14
>>>पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. नक्कीच तुम्ही बेंगलोरचे रिक्षावाले पाहिलेले दिसत नाहीत!! त्यांच्या मानाने पुणेरी रिक्षावाले म्हणजे देवमाणसं!! :D >>>सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी? परफेक्शन को और क्या सुधारोगे??? :D

एक 06/06/2008 - 02:09
१०००००००% सहमत.. पुणेकरांच्या सुधारण्याची काळजी बाकिच्यांनी करण्याची गरज नाही. -कट्टर सदाशिव पेठी पुणेकर.

स्वयंभू 19/05/2008 - 14:58
लेख झक्कास जमलाय. बँगलोर मधे असाल तर पुढल्या मिपा ओसरी ल या नक्की. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसोबा खेचर 19/05/2008 - 17:55
लेख वाचून क्षणभर गरगरलंच! छ्या! मेघनाताई, अहो तुम्ही किती गोष्टींचा जीवाला त्रास करून घेता बुवा! :) बाय द वे, लेख बाकी फक्कड जमलाय. तुमची सामाजिक जाणीव फारच तरल आहे बॉ! :) असो... माझ्या माहितीप्रमाणे, तुमचं मिपावरील हे पहिलंच स्वतंत्र लेखन आहे. या निमित्ताने आपल्या पहिल्यावहिल्या लेखाचं मी मिपावर मनपासून स्वागत करतो आणि यापुढेही असंच स्वच्छंद व मनमोकळं लेखन आपण मिपावर करावं, अशी आपल्याला विनंती करतो.. तात्या.

राजे 19/05/2008 - 18:33
अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! लेख मस्त जमला आहे ... पुढील लेखनाची वाट पाहत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कुंदन 19/05/2008 - 19:06
शिक्षण वा नोकरी निमित्त घरापासून लांब राहताना असे बरेच प्रसंग येतात. त्यावर उपाय म्हणजे जमेल तेंव्हा अधुन मधुन घरी एक पखालफेरी मारून येणे हे सर्वोत्तम....

बेसनलाडू 19/05/2008 - 20:17
लेखन फार आवडले. त्यातली तिडीक जाणवली, सामाजिक भान नि संवेदना जाणवली. पुढील लेखनसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (वाचक)बेसनलाडू

वरदा 19/05/2008 - 20:42
लिहिलयच गं मेघना..किती वैतागलेयस ते दिसतय.. पखालफेरी काय असतं गं?

देवदत्त 19/05/2008 - 20:46
छान लिहिलंय... मनातील विचार बाहेर आल्यासारखे वाटतात :)

गृहिणि 19/05/2008 - 20:46
सहिच जमलाय लेख. मी तुमचा ब्लॉग नेहमि वाचते, खुप छान लिहिता तुम्हि नेहमिच. हा लएख एक्दम भिडला कारण असच काहिस इथे (सातासमुद्रापार) नेहमि वाटत असत पण दुदैवाने "पखालफेरि" मारण शक्य नसल्याने "राहिले दुर घर माझे..." अशि अवस्था होते.

यशोधरा 19/05/2008 - 22:02
मेघना, आवडलं लिहिलेलं. मी आत दोन दिवसांनीच मारते आहे पखाल फेरी :)

छोटा डॉन 20/05/2008 - 07:48
मेघना तुझ्या लेखातुन अस्सल मराठी असलेल्या परंतु सध्या "बेंगलोरनिवासी" असलेल्या मराठी [ व त्यात पुणेकर ] व्यक्तीची मानसीक स्थिती चांगली मांडली गेली आहे ... बाकीचे म्हटल्याप्रमाणेच मी विचारतो "किती ग विचार करतेस तु ? अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! " बाकी तु म्हटल्याप्रमाणे आहेच तसे बंगलोर, साले *** रिक्षावाले रात्री ८ नंतर कमीतकमी २० रुपये जादा घेतात.... लोक इथल्या हवेचे कौतुक अगदी तोंड फाटूस्तोवर करतात पण जर दर ८ दिवसांनी पाउस पडून हवा जर ढगाळ होत असेल आणि जीव नकोसा होत असेल तर कसले कौतुक हे मला तरी समजले नाही ... बाकी "मॉल्स आणि मोठी थेटरे " याबद्दल मला काडीइतके अप्रुप नाही. जर "जोधा-अकबर वा तसाच एखादा तत्सम फालतू " पिक्चर जर तुम्हाला पर हेड ३०० रुपये ची फोडणी लावत असेल तर अजुन "६० रुपयात" पिक्चर दाखवणारे पुण्याचे "मंगला" काय वाईट ? बाकी "बागांबद्दल " मी सहमत नाही, बेंगलोरमध्ये तेवढीच एक गोष्ट आहे की जिथे "ट्रॅफीक जॅम" नाही. अगदी निवांत बसता येते, कुनाची कटकट नाही. जर मानसीक शांती साठी एवढी किंमत मोजावी लागत असेल तर आजच्या काळात ती बिलकूल जास्त नाही असे मी म्हणेन ... बाकी एक सिंपल गोष्ट आहे, जास्त त्रास करुन घ्यायचा नाही . कशाकशाचा त्रास करुन घेणार ? ही तर फक्त झलक आहे. अजुन आपण फक्त "कॉर्पोरेट कल्चर" बद्दल बोलत आहोत, इथले "लोकल आणि सोशल कल्चर" तर अजुन "खतरनाक" आहे आणि मराठी माणसाला तर झेपणे शक्यच नाही. तर "टेक व चील पील !!!!"..... बाकी "ऍडी" म्हणल्याप्रमाणे पुढच्यावेळी "कट्ट्याला" ये जमले तर ... मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर च्या अध्यक्ष छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाई 20/05/2008 - 10:53
मिपावाले बेंगलोरकर महाराष्ट्र मंडळात जातात का? गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? मी बेंगलोर सोडून ५ वर्षे झाली. त्यापूर्वी कधी मधी जायचो. बाकी मराठी माणसाला आवडण्यासारख्या फार गोष्टी बेंगलोरमध्ये नाहीत असे वाटते. -अर्धे तप बेंगलोरमध्ये काढूनही तिथे न रमलेला भाई

In reply to by भाई

देवदत्त 05/06/2008 - 21:21
गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? हो, होत असतात इतरही कार्यक्रम. :) गेले ३/४ वर्षे २ याहू गृप्सचा मिळून कार्यक्रम होत असतो. 'जल्लोष' त्याचे नाव. आता १ जून ला कार्यक्रम झाला असे ऐकले. मला सध्या वेळ मिळाला नाही नाहीतर मी त्याची माहिती इथे दिलीच असती. :( सदस्यांच्या कार्यक्रम/स्पर्धांसोबत नामांकित लोकांचे कार्यक्रमही होतात. ह्या वर्षी दिलीप प्रभावळकर येणार होते. मागील वर्षी शिरीष कणेकरांचे 'कणेकरी' ही झाले होते. तसेच इतर वेळी आणखीही कार्यक्रम असतात. २००५ मध्ये असेच 'आयुष्यावर बोलू काही' सादर केले होते. इतरही काही नाटकांचे प्रयोग झाले होते. (त्या मित्रांनाही मिपाचे आमंत्रण देतो :) . राहूनच गेले होते :( )

मनस्वी 20/05/2008 - 11:00
अक्षरश: असंच वाटतं मेघनाताई. मी ६ महिने होते तिथे.. ट्रॅफिक, रिक्षा, बागा, हवामान अन् मॉल्स - सगळे अनुभव असेच. सगळ्यात डोक्यात जातात ते रिक्षावाले.
'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...'
वाट बघतीये.

कौतुकाबद्दल आभार मंडळी! बाय दी वे, मी पुणेकर नाहीय. :( पखालफेरी: आय वॉज रेफरिंग टु कॅमल! पखाल भरून घेतली की काही महिने पाहायला नको!

वरदा 20/05/2008 - 21:27
कळ्ळं गं मेघना.. तुम्ही बँगलोर मधे राहून किती वैतागलेले दिसताय..मी तिथे परत आल्यावर बँगलोरला येण्याचा विचार करत होते माझ्या कं. चं ऑफिस आहे म्हणून आता विचार केला पाहिजे..... :S

अभिज्ञ 21/05/2008 - 00:14
मेघनाताई, आपल्या ह्या लेखाचे प्रयोजन कळाले नाही. फारच नकारार्थक भूमिकेतून लिहिल्यासारखा वाटला. अहो प्रत्येक शहरात असे कमी अधिक उणे मुद्दे असतातच. त्यात एकट्या बंगलोरला टारगेट करणे बरोबर नाही. मी हि आजपर्यंत दिल्ली,मुंबई,चेन्नई.. बगैरे अशा ब-याच शहरात वावरलो/राहिले आहे.जागोजागी चांगले वाईट अनुभव हे येणारच. रिक्षावाले म्हणाल तर प्रत्येक शहरात हे असले प्रकार चालतातच.ती जमातच वेगळी ... इथे वाईट काय आहे ह्याची उजळणी करत बसण्यापे़क्षा इथे चांगले काय आहे हे सांगितले असते तर जास्त आवडले असते. असो, पुढील लेखनाला शुभेच्छा. अभिज्ञ.

शशांक 21/05/2008 - 14:19
मुक्तचिंतन आवडले. मुंबईतून भारतात कुठेही गेलात तर थोडाफार त्रास होईलच असे वाटते. बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती ;) आपला (पुणेग्राम(त्र)स्त) शशांक

In reply to by शशांक

मनस्वी 21/05/2008 - 15:58
बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती
असहमत. मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला.. त्रस्त शशांक.. तुम्हाला असे अनुभव आले असतील तर जरूर कळवा. तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.

In reply to by मनस्वी

शशांक 21/05/2008 - 16:08
मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला..
दिवसाकाठी एखादा
  1. पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. पुणेरी रिक्षावाला म्हणजे नुसता पुण्यात रिक्षा चालवणारा नव्हे तर 'पुणेरी' रिक्षावाला. कसा ओळखावा? त्याला ज्या दिशेला जायचे नाही तिकडे जाण्याविषयी विचारले तर तुमच्याकडे अतिशय तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून मान हालवणारा किंवा नुसतेच दुसरीकडे पाहणारा किंवा दोन-तीन किलोमीटर साठी 'दोनशे रूपये होतील' म्हणणारा किंवा रात्री ८ वाजल्यापासून 'हाफ रिटन' मागणारा)
  2. दुकानदार (हा मारवाडी, बनिया किंवा बिहारी असेल तर बरे, मराठी असेल तर तुम्ही मेलात. हे दुकानदार धंदा करायला बसतात की दुर्लक्ष/अपमान करण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत बसतात हा संशोधनाचा विषय आहे. (हे संशोधन पुणे विद्यापीठातल्या मध्यम किंवा उतारवयीन काका/काकूंनी करावे. इतरांनी असा मनस्तापजनक कालापव्यव करू नये))
  3. बस कंडक्टर (यांच्याविषयी काही स्फुट आम्ही इथे लिहिले आहे, अवश्य वाचा)
  4. किंवा नुसता साधा (!!!) पुणेरी पुणेकर (पुण्यात राहणारे सगळेच पुणेरी नसतात ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट)
इतके चार-पाच लोक भेटले तरी एक मुक्तचिंतन लिहिले जाण्याइतपत अनुभव नक्कीच येतील :)
तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.
सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी? मनस्वी आणि समस्त पुणेकर काका-काकू हे सर्व जरा हलकेच घ्या. गमतीने लिहिले आहे.

In reply to by शशांक

भाग्यश्री 21/05/2008 - 21:44
काही गरज नाही 'पुणेकरांनी' सुधरण्याची! ते तसे आहेत, तो त्यांचा स्वभाव आहे असं समजा... हा रिक्षेवाले सुधरले पाहीजेत, कारण ते बर्‍याचदा कारण नसताना नाही म्हणतात, भाडं जास्त मागतात, तसे असेल तर ते सुधरले पाहीजेत.. अर्थात सगळेच रिक्षेवाले असे नसतात.. पुण्यात येऊन,पुण्याच्या सगळ्या सोयींचा वापर करून वर, पुण्याला नावं ठेवणार्या लोकांची मला कमाल वाटते !!! तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर हा सल्ला पटतो अशा वेळी !! (तसे हलकेच घेतले आहे.. पण गमतीत सुद्धा जरा जास्त वेळेला पुण्याला धोपटले जाते, त्यामुळे हा लेखनप्रपंच.. )

In reply to by शशांक

कुंदन 22/05/2008 - 13:23
एकदा एका संध्याकाळी सिमला ऑफिस ते बाणेर्/म्हाळुंगे प्रवासाचा योग आला होता. तासभर प्रतिक्षा केल्यावर एक पी एम टी आली , अर्ध्या प्रवासानंतर बसमधील दिव्यांनी मान टाकली , कदाचित भार नियमन असेल म्हणून दुर्लक्ष केले. अजून थोड्या वेळाने इंजिनाने देखील असहकार पुकारला. आई शप्पथ , तेंव्हापासून पी एम टी चा धसका घेतला आपण ...

यशोधरा 21/05/2008 - 22:14
>>>पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. नक्कीच तुम्ही बेंगलोरचे रिक्षावाले पाहिलेले दिसत नाहीत!! त्यांच्या मानाने पुणेरी रिक्षावाले म्हणजे देवमाणसं!! :D >>>सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी? परफेक्शन को और क्या सुधारोगे??? :D

एक 06/06/2008 - 02:09
१०००००००% सहमत.. पुणेकरांच्या सुधारण्याची काळजी बाकिच्यांनी करण्याची गरज नाही. -कट्टर सदाशिव पेठी पुणेकर.
गरज १. 'साले माजलेत...' या उक्तीखेरीज ज्यांचं वर्णन अपुरं ठरतं असे रिक्षावाले.२. जुनी, पिवळी पडलेली पुस्तकं मेहेरबानी केल्याच्या थाटात पुरवणारं सरकारी वाचनालय आणि तिथले कर्मचारी.३. सदैव कशासाठी तरी उकरून ठेवलेले आणि ट्रॅफिकनं बुजबुजलेले रस्ते, झाकणं चोरीला गेलेली गटारांची असहाय्य तोंडं, उखडलेल्या लाद्या, भाजीवाल्यांनी आणि पायरेटेड सीडीवाल्यांनी हक्कानं व्यापलेले फुटपाथ.४. रात्री अडीच वाजताही आश्चर्यकारक गर्दीनं ओसंडणारं रेल्वे स्टेशन.५.

आज बुद्ध पौर्णिमा

मन ·

बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!! हा बुद्धाचा संदेश महत्त्वाचा आहेच. मात्र १९७४ व १९९८ साली "शांततेकरता अणुस्फोट", बुद्धपौर्णिमेलाच जाणिवपूर्वक घडवून आणून, आपण "बुद्ध हसला" ह्याची प्रचिती दाखवून दिलेली आहे. म्हणजेच अहिंसक असूनही, आम्ही शक्तीचेच उपासक असल्याचे आम्ही दाखवून दिलेले आहे. यासाठी बुद्धपौर्णिमेचे आपल्याकरता आता एक वेगळेच महत्त्व प्रस्थापित झालेले आहे.

बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!! हा बुद्धाचा संदेश महत्त्वाचा आहेच. मात्र १९७४ व १९९८ साली "शांततेकरता अणुस्फोट", बुद्धपौर्णिमेलाच जाणिवपूर्वक घडवून आणून, आपण "बुद्ध हसला" ह्याची प्रचिती दाखवून दिलेली आहे. म्हणजेच अहिंसक असूनही, आम्ही शक्तीचेच उपासक असल्याचे आम्ही दाखवून दिलेले आहे. यासाठी बुद्धपौर्णिमेचे आपल्याकरता आता एक वेगळेच महत्त्व प्रस्थापित झालेले आहे.
त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जगाला बौद्ध तत्वज्ञ्द्यानाने समृद्ध करणार्‍या,शुद्ध आचरणाचे महत्व पटवणार्‍या, विष्णुचा नववा अवतार म्हणुन मान्यता असलेल्या तथागत गौतम बुद्धास विनम्र अभिवादन. आपलाच मनोबा.

विजय तेंडुलकरांना आदरांजली.

नीलकांत ·

आनंदयात्री 19/05/2008 - 11:22
>>मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली.

नीलकांत 19/05/2008 - 11:37
तेंडुलकरांविषयी अधीक माहिती मटावर वाचता येईल. खाली एक दूवा देत आहे. त्या पानावर खाली इतर दूवे आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2681229.cms

छोटा डॉन 19/05/2008 - 11:43
या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली. सध्या त्यांचे "हे सर्व कोठुन येते" हे पुस्तक वाचायला घेतले आहे, भारी लिहीत होता हा माणूस .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by आर्य

राजे 19/05/2008 - 11:57
ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव 19/05/2008 - 12:33
विजय तेंडुलकर ह्या महान लेखकास माझीही विनम्र श्रद्धांजली. कथालेखक,नाटककार,कादंबरीकार ,पटकथाकार म्हणून तेंडुलकर थोरच होते पण एक अस्सल माणूसपण त्यांच्या ठायी होतं जे आपल्याला ठायी ठायी त्यांच्या लेखनातून डोकावताना दिसत असे. त्या अस्सल माणूसपणालाही माझा सलाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धोंडोपंत 19/05/2008 - 14:22
श्री. विजय तेंडुलकर हे प्रतिभावान साहित्यिक होते याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्राची हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आपला, (खिन्न) धोंडोपंत विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. आपला, (स्पष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. १००% सहमत पण त्या॑च्यातल्या नाटककाराला सलाम.. ते॑' च्या आक्षेपार्ह लिखाणाविषयी व मता॑विषयी चर्चा करणे आत्ता अस्थानी आहे, न॑तर कधीतरी..

आनंद 19/05/2008 - 18:05
विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते तसेच माणूस म्हणून महान होते. त्यांच्या साहित्याकडे पुर्वग्रहदुषित नजरेने न पहिल्यास ,ते माणुस म्हणून ही किती मोठे ते लक्शात येते. नरेंद्र मोदींबद्दलच्या उद्गाराबद्द्ल म्हणाल तर गुजरातचा नरसंहार पाहुन झालेली तात्कालिक प्रतिक्रिया होती. -आपला आनंद

चतुरंग 19/05/2008 - 19:34
खडबडीत, विद्रूप, कुरुप असाही त्याचा चेहरा असतो आणि तो तितकाच खरा असतो ह्याची जाणीव मोठ्या धाडसाने मराठी रंगभूमीला आणि एकूणच मराठी मनाला करुन देण्याचे काम करणार्‍या विजय तेंडुलकर ह्या महान लेखकाला प्रणाम. चतुरंग

वाचक 26/05/2008 - 02:55
तेंडुलकर मागे एकदा इथे बॉस्टनला आले होते तेव्हा इथल्या एका ज्येष्ठ लेखिकेच्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या होत्या - तेसुद्धा हार्वर्ड च्या पायर्‍यांवर बसून. त्यावेळी त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत थोडीफार उलगडून सांगितली होती. प्रियाच्या (अकाली) निधनाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. माणूस म्हणून ते महान होते की नाही ते सांगता येणार नाही पण ' त्यांच्या बोलण्यातले सच्चेपण' मात्र जरुर जाणवले.

केशवराव 26/05/2008 - 06:41
या माणसाची मला प्रथम ओळख झाली ती साप्ताहिक 'माणूस' पासून. या साप्ताहिकात 'तें ' नी अनेक सदरें लिहीली. नंतर नाटकें, एकांकिका, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून हा माणूस आमच्या पिढीच्या अंगावर आला. आमच्या जीवनात एक स्थान पटकावून बसला. कायम वादात राहूनही याला नजरेआड करता आले नाही. त्यांची नाटकें, चित्रपट, एकांकिका डोक्यांत भिणभिणत रहायच्या. आमचा एक मित्र म्हणायचा, " काय वाईट्ट लिहीतो हा ! डोके भणाणून सोडतो." ' तें ' ना विनम्र आदरांजली.

आनंदयात्री 19/05/2008 - 11:22
>>मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली.

नीलकांत 19/05/2008 - 11:37
तेंडुलकरांविषयी अधीक माहिती मटावर वाचता येईल. खाली एक दूवा देत आहे. त्या पानावर खाली इतर दूवे आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2681229.cms

छोटा डॉन 19/05/2008 - 11:43
या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली. सध्या त्यांचे "हे सर्व कोठुन येते" हे पुस्तक वाचायला घेतले आहे, भारी लिहीत होता हा माणूस .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by आर्य

राजे 19/05/2008 - 11:57
ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव 19/05/2008 - 12:33
विजय तेंडुलकर ह्या महान लेखकास माझीही विनम्र श्रद्धांजली. कथालेखक,नाटककार,कादंबरीकार ,पटकथाकार म्हणून तेंडुलकर थोरच होते पण एक अस्सल माणूसपण त्यांच्या ठायी होतं जे आपल्याला ठायी ठायी त्यांच्या लेखनातून डोकावताना दिसत असे. त्या अस्सल माणूसपणालाही माझा सलाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धोंडोपंत 19/05/2008 - 14:22
श्री. विजय तेंडुलकर हे प्रतिभावान साहित्यिक होते याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्राची हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आपला, (खिन्न) धोंडोपंत विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. आपला, (स्पष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. १००% सहमत पण त्या॑च्यातल्या नाटककाराला सलाम.. ते॑' च्या आक्षेपार्ह लिखाणाविषयी व मता॑विषयी चर्चा करणे आत्ता अस्थानी आहे, न॑तर कधीतरी..

आनंद 19/05/2008 - 18:05
विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते तसेच माणूस म्हणून महान होते. त्यांच्या साहित्याकडे पुर्वग्रहदुषित नजरेने न पहिल्यास ,ते माणुस म्हणून ही किती मोठे ते लक्शात येते. नरेंद्र मोदींबद्दलच्या उद्गाराबद्द्ल म्हणाल तर गुजरातचा नरसंहार पाहुन झालेली तात्कालिक प्रतिक्रिया होती. -आपला आनंद

चतुरंग 19/05/2008 - 19:34
खडबडीत, विद्रूप, कुरुप असाही त्याचा चेहरा असतो आणि तो तितकाच खरा असतो ह्याची जाणीव मोठ्या धाडसाने मराठी रंगभूमीला आणि एकूणच मराठी मनाला करुन देण्याचे काम करणार्‍या विजय तेंडुलकर ह्या महान लेखकाला प्रणाम. चतुरंग

वाचक 26/05/2008 - 02:55
तेंडुलकर मागे एकदा इथे बॉस्टनला आले होते तेव्हा इथल्या एका ज्येष्ठ लेखिकेच्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या होत्या - तेसुद्धा हार्वर्ड च्या पायर्‍यांवर बसून. त्यावेळी त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत थोडीफार उलगडून सांगितली होती. प्रियाच्या (अकाली) निधनाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. माणूस म्हणून ते महान होते की नाही ते सांगता येणार नाही पण ' त्यांच्या बोलण्यातले सच्चेपण' मात्र जरुर जाणवले.

केशवराव 26/05/2008 - 06:41
या माणसाची मला प्रथम ओळख झाली ती साप्ताहिक 'माणूस' पासून. या साप्ताहिकात 'तें ' नी अनेक सदरें लिहीली. नंतर नाटकें, एकांकिका, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून हा माणूस आमच्या पिढीच्या अंगावर आला. आमच्या जीवनात एक स्थान पटकावून बसला. कायम वादात राहूनही याला नजरेआड करता आले नाही. त्यांची नाटकें, चित्रपट, एकांकिका डोक्यांत भिणभिणत रहायच्या. आमचा एक मित्र म्हणायचा, " काय वाईट्ट लिहीतो हा ! डोके भणाणून सोडतो." ' तें ' ना विनम्र आदरांजली.
मराठीतील एक दिग्गज व्यक्तीमत्व, जेष्ठ नाटककार तसेच पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं वृध्दापकाळानं आज पुण्यात निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या गाजलेल्या नाटकांत ' श्रीमंत ' , ' गिधाडे ', ' शांतता कोर्ट चालू आहे ', ' सखाराम बाईंडर ', ' घाशिराम कोतवाल ', ' कमला ' यांचा समावेश होतो. मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. समस्त मराठी साहित्यविश्वातून आज शोक व्यक्त होतोय. मिसळपाव परिवार सुध्दा विजय तेंडुलकरांना आदरांजली वाहत आहे.

’वि.वा.’ कुसुमाग्रज - एक अवलोकन

देवदत्त ·

विसोबा खेचर 19/05/2008 - 08:04
दत्तरव, कुसुमाग्रजांच्या ह्या संचाची अगदी उत्तम ओळख करून दिलीत. मलाही हा संच घ्यायचा आहे. आजच नोंदणी करतो... धन्यवाद.. आपला, (कुसुमाग्रजभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 15/07/2008 - 01:56
खूप छान ओळख करून दिलीत. तात्या, माझ्यासाठीही ऑर्डर कराल का? मी तुम्हाला चेक पाठवण्याची व्यवस्था करते. तिकडे आले की घेईन तुमच्याकडून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 14/07/2008 - 22:58
:) काल पुन्हा सतारीचे बोल फक्त ऐकले. तेव्हा नुसते ऐकण्यात जास्त चांगले वाटले. आणि कोणी घेतला आहे का हा संच?

विकास 15/07/2008 - 01:46
या माहीतीसाठी धन्यवाद. त्यांची स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ही भारतीय स्वातंत्र्यास जेंव्हा ५० वर्षे झाली त्यावेळची संपूर्ण कविता जालावर उपलब्ध आहे का? "पन्नाशीची उमर गाठीली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते तुम्हा शेवटी वाट वाकडी धरू नका... " असे काहीसे त्याचे शब्द आहेत.

विसोबा खेचर 19/05/2008 - 08:04
दत्तरव, कुसुमाग्रजांच्या ह्या संचाची अगदी उत्तम ओळख करून दिलीत. मलाही हा संच घ्यायचा आहे. आजच नोंदणी करतो... धन्यवाद.. आपला, (कुसुमाग्रजभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु 15/07/2008 - 01:56
खूप छान ओळख करून दिलीत. तात्या, माझ्यासाठीही ऑर्डर कराल का? मी तुम्हाला चेक पाठवण्याची व्यवस्था करते. तिकडे आले की घेईन तुमच्याकडून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 14/07/2008 - 22:58
:) काल पुन्हा सतारीचे बोल फक्त ऐकले. तेव्हा नुसते ऐकण्यात जास्त चांगले वाटले. आणि कोणी घेतला आहे का हा संच?

विकास 15/07/2008 - 01:46
या माहीतीसाठी धन्यवाद. त्यांची स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ही भारतीय स्वातंत्र्यास जेंव्हा ५० वर्षे झाली त्यावेळची संपूर्ण कविता जालावर उपलब्ध आहे का? "पन्नाशीची उमर गाठीली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते तुम्हा शेवटी वाट वाकडी धरू नका... " असे काहीसे त्याचे शब्द आहेत.
नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे. महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील.

मी मराठी (अर्थात माझं इंग्रजी आणि मी )

फटू ·

मन 19/05/2008 - 02:37
अगदि "शेम्-टु-शेम" ष्टोरि आह्ये की राव आपली.(अन् जवळपास आपण करीत असलेले/केलेले "उपाय" सुद्धा.) फरक इतकाच की इथं मिल्टन कीन्स राहुन आम्ही अजुनही आंग्ल भाषा न शिकता राहुन दाखवलयं. :-) ;-) आपलाच, (Ambition is the poor excuse for not being enough lazy.) असं मानणारा, मनोबा

हा लेख चांगला झाला आहे... अवांतर : कोणताही अभिनिवेश न बाळगता सरळ मनाने लिहिलेले लेख मस्त वाटतात... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 19/05/2008 - 04:45
सहज लिहिलय एकदम्...सिक्स फ्लॅग ला गेला होतात न्यू जर्सीत असता की काय तुम्ही?

मुक्तसुनीत 19/05/2008 - 06:53
लेख प्रामाणिक आहे. त्यातील अनुभवाच्या खरेपणामुळे , विशेष म्हणजे प्रतिष्ठेच्या रूढ कल्पनांना झुगारून , आपल्याला जाणवलेल्या आपल्या मर्यादांचा दिलखुलासपणे उल्लेखांमुळे एकदम प्रत्ययकारी वाटेल असा. मात्र इंग्रजी भाषेचा वापर दिखाऊपणाकरता करणे हे जसे त्याज्य , तसेच त्या भाषेमधल्या ज्ञानाचे थोडे कण तरी आत्मसात करण्याकरता त्या भाषेशी जवळीक साधणे इष्ट. ही जवळीक साधताना काय जाणवले , कसल्या अडचणी आल्या , त्यांच्यावर मात कशी केली याबाबतसुद्धा लिहायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 19/05/2008 - 08:10
सतिशराव, छान जमला आहे लेख, अजुन येऊ द्यात असेच म्हणतो .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 19/05/2008 - 07:10
प्रामाणिक लेखन. प्रचलित व्यवस्थेतून जाताना येणार्‍या अडचणी मोकळेपणाने मांडण्याचे धाडस वाखाणण्याजोगे. बाकी मुक्तसुनीतशी सहमत. चतुरंग

यशोधरा 19/05/2008 - 08:22
आवडला लेख. प्रामाणिकपणे लिहिलय. मीही मराठी माध्यमातून शिकले आहे. जरी व्याकरण दृष्ट्या इंग्लिश व्यवस्थित होतं/ आहे, आणि लिहिताना काही अडचण जाणवायची नाही तरी कॉलेजमधे गेल्यावर सुरुवातीला बोलता यायच नाही तेवढ्या सफाईदारपणे. शेवटी तेही जमलं. न्यूनगंड न बाळगणं महत्वाचं. असो. अमेरिकन माणासाचा हात देवनागरी लिपीत वळवलात?? है शाब्बास!! :)

राजे 19/05/2008 - 11:54
वा ! छान ! लेखन पध्दत आवडली ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कलंत्री 19/05/2008 - 13:22
आपले कथन आवडले. आपल्या प्रगतीसाठी मनपूर्वक अभिनंदन. मराठीच्या माध्यमाच्या मुलांसाठी मात्र काहीतरी भरीव करायला हवे हे मात्र कोठेतरी जाणवत होते.

In reply to by कलंत्री

गणा मास्तर 20/05/2008 - 11:13
मी पण सतीश आणि यशोधराप्रमाणे मराठी माध्यमातुन शिकलो. मला पण ईन्जिनीर होइपर्यन्त तान्त्रिक इन्ग्रजी यायचे पण बोलता येत नव्हते. पुढे मी माझ्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर तीन महिन्यात अगदी फाडफाड इन्ग्रजी बोलु लागलो. मला तर मराठीतुन शिकल्याचा फायदाच झाला. मराठीच्या माध्यमाच्या मुलांनी कसलाही न्युनगन्ड बाळगु नये. त्यान्ची आकलन शक्ती चान्गली असते. पालकानी पण मुलांना मराठी माध्यमात घालावे असे मला वाटते. मराठीच्या माध्यमाच्या मुलांना फक्त थोड्याशा सरावाची गरज असते. अप्रतिम लेखाबद्द्ल धन्यवाद सतीश . शुद्ध्लेखनाच्या चुका माफ कराव्यात. अनिकेत

चेतन 19/05/2008 - 14:48
लेख मस्तचं जमलायं.... लगे रहो.... पुढच्या लेखनाला शुभेच्छा.... इंग्रजी ऐकण्याला थोडाफार सरावलेला... (चेतन) अवांतरः तुझ्याप्रमाणे मलाही गोरेगावच्या शळेतले "दिवसाचे तारे चांगलेच आठवले"

प्रामाणिक लेखातून अस्सल भावनांचे प्रकटीकरण मनाला स्पर्शून गेले. यशोधरा ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे न्यूनगंड न बाळगणं महत्वाचं. हे अतिशय महत्वाचे. आत्मविश्वास आणि चिकित्सक बुद्धी माणसाला प्रगती पथावर साथ देते. एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर ती ताबडतोब मित्राला/सहकार्‍याला विचारली तर आपले अज्ञान एका पुढेच उघडे पडते पण त्याने समजावून सांगितल्यावर त्याला त्या ज्ञानापुरते 'गुरू'चे श्रेय दिल्यावर आपल्याला कमीपणा वाटत नाही. ज्ञानात भर पडलेली असते. पुढचे अनेक अवघड प्रसंग टळतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी 19/05/2008 - 19:05
छान लिहिलंय रे सतीश.. आवडलं.
ताबडतोब मित्राला/सहकार्‍याला विचारली तर
काका, हल्लीचे सहकारी (अपवाद वगळता) खूपच डांबिस असतात.

In reply to by मनस्वी

कुंदन 19/05/2008 - 19:15
एकदम सहमत ..... कधी कधी सहकार्‍यांना knowledge sharing (यासाठी योग्य मराठी शब्द काय?) म्हणजे त्यांच्या एकाधिकारशाहीला (मोनोपॉलीला) धक्का पोहोचावणारे वाटते. ( नोकरीत एकाधिकारशाहीचा चांगला अनुभव असणारा आणि तशा सर्वांना पुरुन उरलेला) ...कुंदन

In reply to by मनस्वी

काका, हल्लीचे सहकारी (अपवाद वगळता) खूपच डांबिस असतात. हल्लीचेच नाही ही सर्वकालीन समस्या आहे. माझ्या काळातह होतीच. पण आपण माणूस परखूनच मैत्री करीत असतो. आणि 'गुरू' निवडण्याचे स्वातंत्र्यही आपल्या हातात असते. जग १००% वाईट नाही असा माझा विश्वास (आणि अनुभव) आहे.

अनिल हटेला 19/05/2008 - 17:12
छान !!! आमुचे इन्ग्रजी सुद्धा इतकेच सून्दर आहे.. आनी आम्ही तर चीन नावाच्या ज्या देशात आहोत तीथे तर चायनीज भाशा च बोलावी लगते.. असो ... बाकी वृत्तान्त पून्हा कधी~~~~~ मात्र लेख खरच मस्त वाटला.....

मला पण अशा इंग्रजी शब्दांबद्दल बरेच कुतूहल होते. कारण बहुतवेळा त्याचा मुळ उच्चार हा थोडा मराठीकरण होऊन समोर येई. उदा. डिस्टॉप म्हणजे डिस्टर्ब. आणि घरी तर मराठीचा आग्रह असल्याने मला तर बरेच शब्द मराठीतून माहीती होते. उदा: डीश अँटेना ला बशी नभोगता(चायला कसा आणि कोणी काढला हा शब्द कोणास ठाऊक) रेडीओ ला अर्थातच आकाशवाणी. टी.व्ही. ला दूररर्शन. कॉलेज ला महाविद्यालय. रोड ला रस्ता.(रोड, स्ट्रीट आणि वे मधे नक्की काय फरक असतो कोण जाणे. कदाचित रस्ता, मार्ग, पथ सारखे शब्द असतील ते) तसेच चहाची किटली आणि तीर्थाची झारी का असाही मला प्रश्न मला पडत असे. कारण रचना तर दोन्हीची सारखी असते फक्त आकारात फरक. असो तर थोड्या फार फरकाने मी पण सतिशसारख्याच अनुभवातून गेलेलो आहे. :) अवांतरः डेक्कन कॉलेजच्या एका सुपरीटेंडंटची म्हातारी आई कोकणात सर्वाना अभिमानाने सांगत असे "आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे". पुण्याचे पेशवे

गणा मास्तर 20/05/2008 - 11:14
मी पण सतीश आणि यशोधराप्रमाणे मराठी माध्यमातुन शिकलो. मला पण ईन्जिनीर होइपर्यन्त तान्त्रिक इन्ग्रजी यायचे पण बोलता येत नव्हते. पुढे मी माझ्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर तीन महिन्यात अगदी फाडफाड इन्ग्रजी बोलु लागलो. मला तर मराठीतुन शिकल्याचा फायदाच झाला. मराठीच्या माध्यमाच्या मुलांनी कसलाही न्युनगन्ड बाळगु नये. त्यान्ची आकलन शक्ती चान्गली असते. पालकानी पण मुलांना मराठी माध्यमात घालावे असे मला वाटते. मराठीच्या माध्यमाच्या मुलांना फक्त थोड्याशा सरावाची गरज असते. अप्रतिम लेखाबद्द्ल धन्यवाद सतीश . शुद्ध्लेखनाच्या चुका माफ कराव्यात. अनिकेत

ऋचा 20/05/2008 - 11:29
मी सुध्दा मराठी माध्यमातच शिकले आहे. १० पर्यंतचे शास्त्र,गणित मराठीत ११ मी शास्त्र शाखा घेतली आणि आमची बोंबाबोंब सुरु झाली :''( मी सहामाहीत नापास झाले ~X( पण प्रयत्न पुर्वक मी पुढच्या सर्व परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत गेले. (१ वर्ष देखील फुकट न घालवता) आज मी उत्तम इंग्रजी बोलू शकते :B

"मी जगाच्या पाठीवर ज्या भूमीत असेल, तिथल्या संस्कृतीबद्दल, लोकांबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर असेल... पण त्याचबरोबर मला अभिमान असेल माझ्या मराठी भाषेचा, माझ्या मराठी पणाचा..." अगदी मनातलं लिहिलं त!! लेख सुरेख झालाय. --कल्याणी

आमच्या टायमाला बेल्ह्यात (आमच्या गावाला) पहिली ते सातवी पोत्तर जिवन शिक्शन मंदिर बेल्हे लाकुड काम नं १ अशी पाटी असलेली म्हन्जे प्राथमिक शाळा असायची व देव गुर्जी व्ह्ते. ५ वि ते ७ वी. तव्हा हायस्कूलला आमचे गुरुजी पवाराचा वाडा म्हनायचे. आन आमाला ८ वी पासून विंग्रजी होते ते हायस्कूल मदि गेल्याव. ए बी शी डी आम्ही ८ वीला शिकलो.८ वी ९ वी विंग्रजीचा कंडेस्ड कोर्स होता. ज्यात ५ वी ते ९ वीच इंग्रजी अभ्यासक्रम क्व्हर केला होता.आन दहावीला परत सम्द्यांबरुबर यसयस्सी. पुन्यात मामाकड यायचो तव्हा म्हनायचे तुमचा रिजर्ट कधी हाय? मला काय समजायच नाय. मंग अंदाजपंजे समजाया लाग्ल की ते पास्-नापास कवा असतय अस इचारतात. यकदा हायस्कुल मंदी एका सरानी चाचणी घेताना विचारल व्हाट इज युअर सरनेम ? म्ह्नल हित हायस्कुल मदी प्रत्येक इशयाला वायले सर असत्यात. हा कंच्या सराच नाव इचारतो. आन इचारत असन तर तो अपॉस्ट्रोफी यस का नाही म्हनत? हा क्लास टीचर च त नाव इचारत नाही ना? मी म्हन्लो माय सर्स नेम इज कर्णे. त्यानी पुना पुना इचारल आमि पुना पुना सांगातल. मंग त्यानी सांगातल कि सर नेम म्ह्जी आडनेम. पन पुस्तकात शब्दच गेला नव्हता मला मंग मी काय करनार? सायन्सला क्वालेज मदी शिकायला पुन्यात आलो. वेळापत्रकावर लिहिल होत zoology, botany आता मपल्याला बायोलॉजी शब्द गेला होता केमेस्ट्री माहित होता. पन हे झुलॉजी आन बॉटनी काय भानगड हाय काय कळना? बर लोकान्ला इचाराव त मंग आपल्या न्यानाचे वाभाडे काडनार ही शहरी मुल. कोन नुमवी तर कोन न्यु इंग्लिश स्कूल मदुन आलेली प्वॉर. म्हन्ल गप र्‍हावं . पहिल्या तासाला (ज्याला झूलॉजी म्हन्ल होत त्या)येक नकटी बाई आली आन काय काय बडबडबडायला लागली. मपल्याल त काय सुदर ना. पन मंग चित्र दाखवल्याव समजाया लागल कि हे जीवशास्त्रातलंच आहे. आन आपल्याला झालेल आहे. एकाला इचारल फायलम म्हजे काय? तो निस्ता पघायला लागला. गनिताला बि असच. अल्जिब्रा आन जॉमेट्री . ते सायमल्टेनियस इक्वेशन आल. त्याला इचारल कि सायमल्टेनियस म्हन्जे काय? त्याची सम्जुन सांगायची विच्छा दिसली पन त्याची गाडी " यु सी.....इट्स अ सॉर्ट ऑफ इक्वेशन यु नो......" फळ्याव काडल मंग समाजल कि हे एकसामायकि समिकरन हाय. बाहेर आल्याव गेट कुठ आहे आपन कुठ आहोत? या बोल्डिंगी कंच्या कंच्या? काय सुदराना भौ! त्यात आमचा शानपना म्हन्जे हायर इंग्लिश व लोअर जर्मन घेतल अकरावीला स्वारी एफ वाय जे सी. आन बी तुकडी म्हजी डी पेक्षा भारी आन ए पेक्षा म्हने हल्की. वार्षिक मदी जर्मन ला मंग कंपास झालो. आन हायर विंग्रजी काठाव. तांत्रिक विंग्रजी मंग समजायला लागल. हळू हळू भाषा त्यातल्या त्यात शुद्ध असली तरी टोन गावठीच होता. त्यात हळू हळू बदल व्हायला लागला. ज्योतिषाच्या नादापायी बारावी नंतर एफवाय बीएस्सीच वर्ष वाया घालवलं नंतर ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा न एक वर्ष वाया घालवल. अशी पंचवार्षिक योजना आमच्या बीएस्सीची झाली. गावाकडून आल्याचा न्युनगंडही हळु हळु गेला. आता अहंगडाने पछाडले जाउ नये याची काळजी घ्यावी लागते. प्रकाश घाटपांडे

डोमकावळा 20/05/2008 - 17:44
मराठी माध्यमात दहावी पर्यंत शिक्षण घेवून पुढे अकरावी-बारावी पब्लिक स्कुल (आता याला मराठीत काय म्हणायचं ? :-/ ) मध्ये शिकायला आलो त्यावेळी माझा सुद्धा असाच अनुभव आहे. गणिताच्या पहिल्या तासाला वर्गात सरांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय अस विचारलं तेव्हा मला एकदम गोंधळल्यासारखं झालं होतं. सरांच्या एकंदरीत लक्षात आल्यावर त्यांनी जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्गसमीकरण सांगितलं तेव्हा जरा कुठे हायसं वाटलं. :)

शितल 20/05/2008 - 18:50
तुमचा मराठी ते इ॑ग्रजी प्रवास अतिशय मस्त शब्दात तुम्ही वर्णन केला आहे. सिक्स फ्लॅग डिस्कवरी किन्गडमला जाण्याचा आमचा मागच्या विका॑ताचे प्लॅनि॑ग होते पण पावसामुळे रद्द झाले, कदाचित ह्या विका॑ताल पुर्ण होईल.

चित्रा 22/05/2008 - 01:22
खुसखुशीत. लेखन खूप आवडले. मराठी माध्यमातून दहावी केल्यानंतर एकदम कॉलेजमध्ये गेल्यावर गणित विषय इंग्रजीतून शिकताना एकदम धक्का बसला त्याची आठवण झाली. फाड फाड इंग्रजी बोलणारी एक आगाऊ (वाटलेली) मराठी बया मला लॅब पार्टनर मिळू नको दे असा धावा केल्याचे आठवते :-) माझ्या दुर्दैवाने तीच माझ्या वाट्याला आली. आणि आधीच इंग्रजीच्या मार्‍यामुळे गांजलेली असताना ही काय नवी ब्याद असे वाटले. तिलाही तसेच वाटले असावे. नंतर मात्र आम्ही चांगल्या रूळलो. मुंबईत बालमोहन शाळा मला वाटते मराठी शाळेतील मुलांना दहावीनंतरच्या उन्हाळी सुटीत कॉलेजात लागणार्‍या इंग्रजीचे किंवा तत्सम काही साध्या "स्टडी स्किल्स"चे धडे द्यायची असे ऐकल्याचे आठवते. खरेच असे होते का हे माहिती नाही. आहेत का इथे कोणी बालमोहनवाले लोक?!

सुमीत 22/05/2008 - 20:30
अनुभव आणि ते सुद्धा १०० ट्क्के खरे, मनापासून आवडले तुझे लेखन.

गणा मास्तर 23/05/2008 - 06:05
खरेच अशा स्टडी स्किल्सची फक्त गरज आहे. थोडे ईंग्रजी संवाद कौशल्य मराठी शाळांत शिकवले पाहिजे. खरेतर मराठी माध्यमातुन शिकुन आपला काहीच तोटा झाला नाही. उलट मात्रुभाषेमुळे विषय चांगले समजले. आजची मराठीची अवस्था बिकट आहे. इथे बघा http://www.misalpav.com/node/1845 http://www.misalpav.com/node/1837 मराठी माध्यमातुन शिकलेले आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेले लोक आपल्या मुलांना मात्र ईंग्रजीत शिकवतात. आपण घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतो असे त्यांना का वाटत नाही? की मराठीचा अभिमानच उरलेला नाही.

तुमचा उद्देश लक्षात आला... घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतो मग त्यांच्याशी घरी इंग्रजीत बोलले पाहिजे... आमच्या इमारतीत एक पूर्ण मराठी कुटुंब त्यांच्या तीन वर्षाच्या पोराशी " गो देअर.... कम हिअर..... वी विल गो हां बाबा.... व्हॉट डू यू वाँट?" असे सतत बोलताना दिसते.... माझी बायको म्हणते की हे ऐकून वाटते कुत्र्याशी बोलताहेत... आता घरी मराठी शिकवणे सोपे का इंग्रजी हे ज्याचे त्याने ठरवायचे असे म्हटले तर काय चूक? शाळेत पोरगा इंग्रजी शिकेल, बोलेल, आणि घरी झक मारत मराठीच बोलेल, वाचेल आणि लिहील.... मग मराठी शाळा बंद पडतील, त्याचे काय? मला दोन्ही बाजू पटतात, मला एवढे मात्र नक्की वाटते, घरी मराठी शिकवणे सोपे, वाचून घेणे , लिहून घेणे जास्त सोपे... ( गोंधळलेला) भडकमकर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गणा मास्तर 23/05/2008 - 12:37
लोक मुलांना लहानपणीच ईंग्रजी माध्यमात घालतात आणि मग तुम्ही सांगितल्यासारखे" गो देअर.... कम हिअर..... वी विल गो हां बाबा.... व्हॉट डू यू वाँट?" चालू होते. ते चुकिचे आहे या मताचा मी देखिल आहे. अशी मुले पुढे " मिल्क दे , मी डॉगला घाबरतो "असले धेडगुजरी मराठी बोलतात. जो तो आपापल्या हुशारीवर पुढे जात असतो. मी ईंग्रजी स्वताहुन शिकलो. माझ्या घरी कोणालाही ईंग्रजी बोलता येत नाही. आपण घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतोहे वाक्य त्या लोकांसाठी आहे जे मराठीतुन शिकले पण मुले मागे पडू नयेत म्हणुन मुलांना ईंग्रजी माध्यमात घालतात. ते लोक असा विचार का करत नाहीत की आपण जसे ईंग्रजी स्वताहुन शिकलो तसे मुलेही शिकतील. मुले ८-१०वीत गेल्यावर ईंग्रजी संवाद कौशल्यासाठी मदत करावी. सोबत थोडा सराव करावा. असे केले तर मराठी शाळा पण टिकतील, मराठीपण टिकेल आणि ईंग्रजीची भितीपण वाटणार नाही. आपला अनिकेत

गिरिजा 28/05/2008 - 15:27
आज इंग्रजी भाषेची बिलकुल अडचण जाणवत नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मी मराठीच वापरतो. मी सुद्धा!! :) वाह.. छानच लिहिल आहे.. आणि शर्टावरील कलाही छान आहे.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

मन 19/05/2008 - 02:37
अगदि "शेम्-टु-शेम" ष्टोरि आह्ये की राव आपली.(अन् जवळपास आपण करीत असलेले/केलेले "उपाय" सुद्धा.) फरक इतकाच की इथं मिल्टन कीन्स राहुन आम्ही अजुनही आंग्ल भाषा न शिकता राहुन दाखवलयं. :-) ;-) आपलाच, (Ambition is the poor excuse for not being enough lazy.) असं मानणारा, मनोबा

हा लेख चांगला झाला आहे... अवांतर : कोणताही अभिनिवेश न बाळगता सरळ मनाने लिहिलेले लेख मस्त वाटतात... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 19/05/2008 - 04:45
सहज लिहिलय एकदम्...सिक्स फ्लॅग ला गेला होतात न्यू जर्सीत असता की काय तुम्ही?

मुक्तसुनीत 19/05/2008 - 06:53
लेख प्रामाणिक आहे. त्यातील अनुभवाच्या खरेपणामुळे , विशेष म्हणजे प्रतिष्ठेच्या रूढ कल्पनांना झुगारून , आपल्याला जाणवलेल्या आपल्या मर्यादांचा दिलखुलासपणे उल्लेखांमुळे एकदम प्रत्ययकारी वाटेल असा. मात्र इंग्रजी भाषेचा वापर दिखाऊपणाकरता करणे हे जसे त्याज्य , तसेच त्या भाषेमधल्या ज्ञानाचे थोडे कण तरी आत्मसात करण्याकरता त्या भाषेशी जवळीक साधणे इष्ट. ही जवळीक साधताना काय जाणवले , कसल्या अडचणी आल्या , त्यांच्यावर मात कशी केली याबाबतसुद्धा लिहायला हवे.

In reply to by मुक्तसुनीत

छोटा डॉन 19/05/2008 - 08:10
सतिशराव, छान जमला आहे लेख, अजुन येऊ द्यात असेच म्हणतो .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 19/05/2008 - 07:10
प्रामाणिक लेखन. प्रचलित व्यवस्थेतून जाताना येणार्‍या अडचणी मोकळेपणाने मांडण्याचे धाडस वाखाणण्याजोगे. बाकी मुक्तसुनीतशी सहमत. चतुरंग

यशोधरा 19/05/2008 - 08:22
आवडला लेख. प्रामाणिकपणे लिहिलय. मीही मराठी माध्यमातून शिकले आहे. जरी व्याकरण दृष्ट्या इंग्लिश व्यवस्थित होतं/ आहे, आणि लिहिताना काही अडचण जाणवायची नाही तरी कॉलेजमधे गेल्यावर सुरुवातीला बोलता यायच नाही तेवढ्या सफाईदारपणे. शेवटी तेही जमलं. न्यूनगंड न बाळगणं महत्वाचं. असो. अमेरिकन माणासाचा हात देवनागरी लिपीत वळवलात?? है शाब्बास!! :)

राजे 19/05/2008 - 11:54
वा ! छान ! लेखन पध्दत आवडली ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कलंत्री 19/05/2008 - 13:22
आपले कथन आवडले. आपल्या प्रगतीसाठी मनपूर्वक अभिनंदन. मराठीच्या माध्यमाच्या मुलांसाठी मात्र काहीतरी भरीव करायला हवे हे मात्र कोठेतरी जाणवत होते.

In reply to by कलंत्री

गणा मास्तर 20/05/2008 - 11:13
मी पण सतीश आणि यशोधराप्रमाणे मराठी माध्यमातुन शिकलो. मला पण ईन्जिनीर होइपर्यन्त तान्त्रिक इन्ग्रजी यायचे पण बोलता येत नव्हते. पुढे मी माझ्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर तीन महिन्यात अगदी फाडफाड इन्ग्रजी बोलु लागलो. मला तर मराठीतुन शिकल्याचा फायदाच झाला. मराठीच्या माध्यमाच्या मुलांनी कसलाही न्युनगन्ड बाळगु नये. त्यान्ची आकलन शक्ती चान्गली असते. पालकानी पण मुलांना मराठी माध्यमात घालावे असे मला वाटते. मराठीच्या माध्यमाच्या मुलांना फक्त थोड्याशा सरावाची गरज असते. अप्रतिम लेखाबद्द्ल धन्यवाद सतीश . शुद्ध्लेखनाच्या चुका माफ कराव्यात. अनिकेत

चेतन 19/05/2008 - 14:48
लेख मस्तचं जमलायं.... लगे रहो.... पुढच्या लेखनाला शुभेच्छा.... इंग्रजी ऐकण्याला थोडाफार सरावलेला... (चेतन) अवांतरः तुझ्याप्रमाणे मलाही गोरेगावच्या शळेतले "दिवसाचे तारे चांगलेच आठवले"

प्रामाणिक लेखातून अस्सल भावनांचे प्रकटीकरण मनाला स्पर्शून गेले. यशोधरा ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे न्यूनगंड न बाळगणं महत्वाचं. हे अतिशय महत्वाचे. आत्मविश्वास आणि चिकित्सक बुद्धी माणसाला प्रगती पथावर साथ देते. एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल तर ती ताबडतोब मित्राला/सहकार्‍याला विचारली तर आपले अज्ञान एका पुढेच उघडे पडते पण त्याने समजावून सांगितल्यावर त्याला त्या ज्ञानापुरते 'गुरू'चे श्रेय दिल्यावर आपल्याला कमीपणा वाटत नाही. ज्ञानात भर पडलेली असते. पुढचे अनेक अवघड प्रसंग टळतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी 19/05/2008 - 19:05
छान लिहिलंय रे सतीश.. आवडलं.
ताबडतोब मित्राला/सहकार्‍याला विचारली तर
काका, हल्लीचे सहकारी (अपवाद वगळता) खूपच डांबिस असतात.

In reply to by मनस्वी

कुंदन 19/05/2008 - 19:15
एकदम सहमत ..... कधी कधी सहकार्‍यांना knowledge sharing (यासाठी योग्य मराठी शब्द काय?) म्हणजे त्यांच्या एकाधिकारशाहीला (मोनोपॉलीला) धक्का पोहोचावणारे वाटते. ( नोकरीत एकाधिकारशाहीचा चांगला अनुभव असणारा आणि तशा सर्वांना पुरुन उरलेला) ...कुंदन

In reply to by मनस्वी

काका, हल्लीचे सहकारी (अपवाद वगळता) खूपच डांबिस असतात. हल्लीचेच नाही ही सर्वकालीन समस्या आहे. माझ्या काळातह होतीच. पण आपण माणूस परखूनच मैत्री करीत असतो. आणि 'गुरू' निवडण्याचे स्वातंत्र्यही आपल्या हातात असते. जग १००% वाईट नाही असा माझा विश्वास (आणि अनुभव) आहे.

अनिल हटेला 19/05/2008 - 17:12
छान !!! आमुचे इन्ग्रजी सुद्धा इतकेच सून्दर आहे.. आनी आम्ही तर चीन नावाच्या ज्या देशात आहोत तीथे तर चायनीज भाशा च बोलावी लगते.. असो ... बाकी वृत्तान्त पून्हा कधी~~~~~ मात्र लेख खरच मस्त वाटला.....

मला पण अशा इंग्रजी शब्दांबद्दल बरेच कुतूहल होते. कारण बहुतवेळा त्याचा मुळ उच्चार हा थोडा मराठीकरण होऊन समोर येई. उदा. डिस्टॉप म्हणजे डिस्टर्ब. आणि घरी तर मराठीचा आग्रह असल्याने मला तर बरेच शब्द मराठीतून माहीती होते. उदा: डीश अँटेना ला बशी नभोगता(चायला कसा आणि कोणी काढला हा शब्द कोणास ठाऊक) रेडीओ ला अर्थातच आकाशवाणी. टी.व्ही. ला दूररर्शन. कॉलेज ला महाविद्यालय. रोड ला रस्ता.(रोड, स्ट्रीट आणि वे मधे नक्की काय फरक असतो कोण जाणे. कदाचित रस्ता, मार्ग, पथ सारखे शब्द असतील ते) तसेच चहाची किटली आणि तीर्थाची झारी का असाही मला प्रश्न मला पडत असे. कारण रचना तर दोन्हीची सारखी असते फक्त आकारात फरक. असो तर थोड्या फार फरकाने मी पण सतिशसारख्याच अनुभवातून गेलेलो आहे. :) अवांतरः डेक्कन कॉलेजच्या एका सुपरीटेंडंटची म्हातारी आई कोकणात सर्वाना अभिमानाने सांगत असे "आमचा बन्या ढेकूण कालेजात सुपारीटुण् टुण् आहे". पुण्याचे पेशवे

गणा मास्तर 20/05/2008 - 11:14
मी पण सतीश आणि यशोधराप्रमाणे मराठी माध्यमातुन शिकलो. मला पण ईन्जिनीर होइपर्यन्त तान्त्रिक इन्ग्रजी यायचे पण बोलता येत नव्हते. पुढे मी माझ्याच महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर तीन महिन्यात अगदी फाडफाड इन्ग्रजी बोलु लागलो. मला तर मराठीतुन शिकल्याचा फायदाच झाला. मराठीच्या माध्यमाच्या मुलांनी कसलाही न्युनगन्ड बाळगु नये. त्यान्ची आकलन शक्ती चान्गली असते. पालकानी पण मुलांना मराठी माध्यमात घालावे असे मला वाटते. मराठीच्या माध्यमाच्या मुलांना फक्त थोड्याशा सरावाची गरज असते. अप्रतिम लेखाबद्द्ल धन्यवाद सतीश . शुद्ध्लेखनाच्या चुका माफ कराव्यात. अनिकेत

ऋचा 20/05/2008 - 11:29
मी सुध्दा मराठी माध्यमातच शिकले आहे. १० पर्यंतचे शास्त्र,गणित मराठीत ११ मी शास्त्र शाखा घेतली आणि आमची बोंबाबोंब सुरु झाली :''( मी सहामाहीत नापास झाले ~X( पण प्रयत्न पुर्वक मी पुढच्या सर्व परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत गेले. (१ वर्ष देखील फुकट न घालवता) आज मी उत्तम इंग्रजी बोलू शकते :B

"मी जगाच्या पाठीवर ज्या भूमीत असेल, तिथल्या संस्कृतीबद्दल, लोकांबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर असेल... पण त्याचबरोबर मला अभिमान असेल माझ्या मराठी भाषेचा, माझ्या मराठी पणाचा..." अगदी मनातलं लिहिलं त!! लेख सुरेख झालाय. --कल्याणी

आमच्या टायमाला बेल्ह्यात (आमच्या गावाला) पहिली ते सातवी पोत्तर जिवन शिक्शन मंदिर बेल्हे लाकुड काम नं १ अशी पाटी असलेली म्हन्जे प्राथमिक शाळा असायची व देव गुर्जी व्ह्ते. ५ वि ते ७ वी. तव्हा हायस्कूलला आमचे गुरुजी पवाराचा वाडा म्हनायचे. आन आमाला ८ वी पासून विंग्रजी होते ते हायस्कूल मदि गेल्याव. ए बी शी डी आम्ही ८ वीला शिकलो.८ वी ९ वी विंग्रजीचा कंडेस्ड कोर्स होता. ज्यात ५ वी ते ९ वीच इंग्रजी अभ्यासक्रम क्व्हर केला होता.आन दहावीला परत सम्द्यांबरुबर यसयस्सी. पुन्यात मामाकड यायचो तव्हा म्हनायचे तुमचा रिजर्ट कधी हाय? मला काय समजायच नाय. मंग अंदाजपंजे समजाया लाग्ल की ते पास्-नापास कवा असतय अस इचारतात. यकदा हायस्कुल मंदी एका सरानी चाचणी घेताना विचारल व्हाट इज युअर सरनेम ? म्ह्नल हित हायस्कुल मदी प्रत्येक इशयाला वायले सर असत्यात. हा कंच्या सराच नाव इचारतो. आन इचारत असन तर तो अपॉस्ट्रोफी यस का नाही म्हनत? हा क्लास टीचर च त नाव इचारत नाही ना? मी म्हन्लो माय सर्स नेम इज कर्णे. त्यानी पुना पुना इचारल आमि पुना पुना सांगातल. मंग त्यानी सांगातल कि सर नेम म्ह्जी आडनेम. पन पुस्तकात शब्दच गेला नव्हता मला मंग मी काय करनार? सायन्सला क्वालेज मदी शिकायला पुन्यात आलो. वेळापत्रकावर लिहिल होत zoology, botany आता मपल्याला बायोलॉजी शब्द गेला होता केमेस्ट्री माहित होता. पन हे झुलॉजी आन बॉटनी काय भानगड हाय काय कळना? बर लोकान्ला इचाराव त मंग आपल्या न्यानाचे वाभाडे काडनार ही शहरी मुल. कोन नुमवी तर कोन न्यु इंग्लिश स्कूल मदुन आलेली प्वॉर. म्हन्ल गप र्‍हावं . पहिल्या तासाला (ज्याला झूलॉजी म्हन्ल होत त्या)येक नकटी बाई आली आन काय काय बडबडबडायला लागली. मपल्याल त काय सुदर ना. पन मंग चित्र दाखवल्याव समजाया लागल कि हे जीवशास्त्रातलंच आहे. आन आपल्याला झालेल आहे. एकाला इचारल फायलम म्हजे काय? तो निस्ता पघायला लागला. गनिताला बि असच. अल्जिब्रा आन जॉमेट्री . ते सायमल्टेनियस इक्वेशन आल. त्याला इचारल कि सायमल्टेनियस म्हन्जे काय? त्याची सम्जुन सांगायची विच्छा दिसली पन त्याची गाडी " यु सी.....इट्स अ सॉर्ट ऑफ इक्वेशन यु नो......" फळ्याव काडल मंग समाजल कि हे एकसामायकि समिकरन हाय. बाहेर आल्याव गेट कुठ आहे आपन कुठ आहोत? या बोल्डिंगी कंच्या कंच्या? काय सुदराना भौ! त्यात आमचा शानपना म्हन्जे हायर इंग्लिश व लोअर जर्मन घेतल अकरावीला स्वारी एफ वाय जे सी. आन बी तुकडी म्हजी डी पेक्षा भारी आन ए पेक्षा म्हने हल्की. वार्षिक मदी जर्मन ला मंग कंपास झालो. आन हायर विंग्रजी काठाव. तांत्रिक विंग्रजी मंग समजायला लागल. हळू हळू भाषा त्यातल्या त्यात शुद्ध असली तरी टोन गावठीच होता. त्यात हळू हळू बदल व्हायला लागला. ज्योतिषाच्या नादापायी बारावी नंतर एफवाय बीएस्सीच वर्ष वाया घालवलं नंतर ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा न एक वर्ष वाया घालवल. अशी पंचवार्षिक योजना आमच्या बीएस्सीची झाली. गावाकडून आल्याचा न्युनगंडही हळु हळु गेला. आता अहंगडाने पछाडले जाउ नये याची काळजी घ्यावी लागते. प्रकाश घाटपांडे

डोमकावळा 20/05/2008 - 17:44
मराठी माध्यमात दहावी पर्यंत शिक्षण घेवून पुढे अकरावी-बारावी पब्लिक स्कुल (आता याला मराठीत काय म्हणायचं ? :-/ ) मध्ये शिकायला आलो त्यावेळी माझा सुद्धा असाच अनुभव आहे. गणिताच्या पहिल्या तासाला वर्गात सरांनी क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय अस विचारलं तेव्हा मला एकदम गोंधळल्यासारखं झालं होतं. सरांच्या एकंदरीत लक्षात आल्यावर त्यांनी जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्गसमीकरण सांगितलं तेव्हा जरा कुठे हायसं वाटलं. :)

शितल 20/05/2008 - 18:50
तुमचा मराठी ते इ॑ग्रजी प्रवास अतिशय मस्त शब्दात तुम्ही वर्णन केला आहे. सिक्स फ्लॅग डिस्कवरी किन्गडमला जाण्याचा आमचा मागच्या विका॑ताचे प्लॅनि॑ग होते पण पावसामुळे रद्द झाले, कदाचित ह्या विका॑ताल पुर्ण होईल.

चित्रा 22/05/2008 - 01:22
खुसखुशीत. लेखन खूप आवडले. मराठी माध्यमातून दहावी केल्यानंतर एकदम कॉलेजमध्ये गेल्यावर गणित विषय इंग्रजीतून शिकताना एकदम धक्का बसला त्याची आठवण झाली. फाड फाड इंग्रजी बोलणारी एक आगाऊ (वाटलेली) मराठी बया मला लॅब पार्टनर मिळू नको दे असा धावा केल्याचे आठवते :-) माझ्या दुर्दैवाने तीच माझ्या वाट्याला आली. आणि आधीच इंग्रजीच्या मार्‍यामुळे गांजलेली असताना ही काय नवी ब्याद असे वाटले. तिलाही तसेच वाटले असावे. नंतर मात्र आम्ही चांगल्या रूळलो. मुंबईत बालमोहन शाळा मला वाटते मराठी शाळेतील मुलांना दहावीनंतरच्या उन्हाळी सुटीत कॉलेजात लागणार्‍या इंग्रजीचे किंवा तत्सम काही साध्या "स्टडी स्किल्स"चे धडे द्यायची असे ऐकल्याचे आठवते. खरेच असे होते का हे माहिती नाही. आहेत का इथे कोणी बालमोहनवाले लोक?!

सुमीत 22/05/2008 - 20:30
अनुभव आणि ते सुद्धा १०० ट्क्के खरे, मनापासून आवडले तुझे लेखन.

गणा मास्तर 23/05/2008 - 06:05
खरेच अशा स्टडी स्किल्सची फक्त गरज आहे. थोडे ईंग्रजी संवाद कौशल्य मराठी शाळांत शिकवले पाहिजे. खरेतर मराठी माध्यमातुन शिकुन आपला काहीच तोटा झाला नाही. उलट मात्रुभाषेमुळे विषय चांगले समजले. आजची मराठीची अवस्था बिकट आहे. इथे बघा http://www.misalpav.com/node/1845 http://www.misalpav.com/node/1837 मराठी माध्यमातुन शिकलेले आणि आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेले लोक आपल्या मुलांना मात्र ईंग्रजीत शिकवतात. आपण घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतो असे त्यांना का वाटत नाही? की मराठीचा अभिमानच उरलेला नाही.

तुमचा उद्देश लक्षात आला... घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतो मग त्यांच्याशी घरी इंग्रजीत बोलले पाहिजे... आमच्या इमारतीत एक पूर्ण मराठी कुटुंब त्यांच्या तीन वर्षाच्या पोराशी " गो देअर.... कम हिअर..... वी विल गो हां बाबा.... व्हॉट डू यू वाँट?" असे सतत बोलताना दिसते.... माझी बायको म्हणते की हे ऐकून वाटते कुत्र्याशी बोलताहेत... आता घरी मराठी शिकवणे सोपे का इंग्रजी हे ज्याचे त्याने ठरवायचे असे म्हटले तर काय चूक? शाळेत पोरगा इंग्रजी शिकेल, बोलेल, आणि घरी झक मारत मराठीच बोलेल, वाचेल आणि लिहील.... मग मराठी शाळा बंद पडतील, त्याचे काय? मला दोन्ही बाजू पटतात, मला एवढे मात्र नक्की वाटते, घरी मराठी शिकवणे सोपे, वाचून घेणे , लिहून घेणे जास्त सोपे... ( गोंधळलेला) भडकमकर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गणा मास्तर 23/05/2008 - 12:37
लोक मुलांना लहानपणीच ईंग्रजी माध्यमात घालतात आणि मग तुम्ही सांगितल्यासारखे" गो देअर.... कम हिअर..... वी विल गो हां बाबा.... व्हॉट डू यू वाँट?" चालू होते. ते चुकिचे आहे या मताचा मी देखिल आहे. अशी मुले पुढे " मिल्क दे , मी डॉगला घाबरतो "असले धेडगुजरी मराठी बोलतात. जो तो आपापल्या हुशारीवर पुढे जात असतो. मी ईंग्रजी स्वताहुन शिकलो. माझ्या घरी कोणालाही ईंग्रजी बोलता येत नाही. आपण घरी मुलांना ईंग्रजी संवाद कौशल्य सहज शिकवु शकतोहे वाक्य त्या लोकांसाठी आहे जे मराठीतुन शिकले पण मुले मागे पडू नयेत म्हणुन मुलांना ईंग्रजी माध्यमात घालतात. ते लोक असा विचार का करत नाहीत की आपण जसे ईंग्रजी स्वताहुन शिकलो तसे मुलेही शिकतील. मुले ८-१०वीत गेल्यावर ईंग्रजी संवाद कौशल्यासाठी मदत करावी. सोबत थोडा सराव करावा. असे केले तर मराठी शाळा पण टिकतील, मराठीपण टिकेल आणि ईंग्रजीची भितीपण वाटणार नाही. आपला अनिकेत

गिरिजा 28/05/2008 - 15:27
आज इंग्रजी भाषेची बिलकुल अडचण जाणवत नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मी मराठीच वापरतो. मी सुद्धा!! :) वाह.. छानच लिहिल आहे.. आणि शर्टावरील कलाही छान आहे.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
साधारण १९८७ - १९८८ काळ असावा. आम्ही तेव्हा चड्डीत होतो. ('चड्डीत्त र्‍हा ना भौ' मधलं चड्डीत नाही. आम्ही तेव्हा चार पाच वर्षांचे होतो. म्हणजे चड्डीतच होतो. ) तेव्हा रामानंद सागरांची रामायण ही मालिका दूरदर्शन वर लागत असे. तो काळ दूरदर्शन चा सुवर्णकाळ होता असे म्हणतात (आता दुरदर्शनची पार दुर्दशा झाली आहे .) असो. तर ही रामायण मालिका पाहायला मी माझ्या काकान्च्या घरी जात असे. आमचं गाव कोकणातलं खेडेगाव. आख्ख्या गावामध्ये फक्त एकच दूरदर्शन संच होता. ( आणि तोही कृष्ण धवल. बहुतेक क्रावून कंपनीचा असावा.) त्यामुळे आख्खं गाव काकान्च्या घरी त्या वेळेला जमा व्हायचं. मालिका सुरू होण्यापूर्वी त्या मालिकेच्या प्रायोजकांची जाहीरात यायची. या जाहीरातींना गोरेगावच्या शाळेत जाणारी मुलं 'आडुटाइज' म्हणायची. हाच माझ्या आयुष्यात मी ऐकलेला ख~या अर्थाने पहीला इंग्रजी शब्द. तर त्या 'आडुटाइज' मधली ती निरमाची 'इसके झागने जादू कर दी' ही जिंगल (?) संपली की कानावर सूर पडायचे 'सीता राम चरित अती पावन...' आणि मग सुरू व्हायची पूर्ण भारतवर्षाला वन्दनीय असणा~या मर्यादा पुरुषोत्तमाची कहाणी. आम्ही चौथी 'पास' झाल्यावर गोरेगावच्या शाळेत जाऊ लागलो. (यथावकाश या गोरेगावच्या शाळेला 'हास्कुल' म्हणतात आसं कळलं ) पण आम्ही आमच्या गावातल्या शाळेत असताना ऐकलं होतं की गोरेगावच्या शाळेत 'बेंजो' वर बसतात. पण हे 'बेंजो' कुठे दिसेनात. (आम्ही ज्याला बेंजो म्हणायचो ते बेंजो नसून बेंच, बसायची बाकडी आहेत हे कळायला आम्हाला सहा महीने लागले.) आम्ही पाचवीत असताना ब तुकडीत होतो. परंतु सहावी सुरू झाल्यावर आमची हुशारी (?) पाहून आमच्या आदरणीय शेख सरांनी आम्हाला सहावी अ मध्ये बसवलं. अकरा वाजता शाळेत जाण्यापुर्वी सात ते दहा या वेळात गुरं चारायला नेणारा एक खेड्यातला मुलगा आपल्या हुशारीच्या जोरावर पांढरपेशांच्या (म्हणजे नेमकं काय, हे मला आजही कळलेलं नाही ) पोरांसोबत अ वर्गात शिकू लागला. आणि अ वर्गात बसण्याचे दुश्परिणामही दिसू लागले. ... झालं अस की आमच्या एका खडूस बाईंचा (माफ करा, मॅडम चा) तास चालू होता. तास चालू असतानाच आमच्या बाकावरील मित्राची मागच्या बाकावरील पोराशी काहीतरी विचारांची देवाणघेवाण चालू होती. त्या दोघांच्या बोलण्यात तिस~याने तोंड घातलं. 'मला डिस्टर्ब करू नका रे' अस काहीतरी तो म्हणाला. तो 'डिस्टर्ब' शब्द काही मला कळला नाही. (आम्हीही ते संभाषण ऐकत होतो हे सांगणे न लगे ). आमची जिज्ञासा अर्थात जाणुन घेण्याची इच्छा काही आम्हाला स्वस्थ बसू देईना. लगेचच मित्राला विचारलं 'डिस्टर्ब' म्हणजे काय रे. आणि आमचं दुर्दैव अस की नेमकं त्याच वेळी आमच्या मॅडम नी आमच्याकडे पाहीलं. त्यानंतर काय झालं असेल हे सांगण्याची गरज नाही. त्या प्रसंगाने आम्ही इतके 'डिस्टर्ब' झालो की आजही कधी आमची जिज्ञासा (किंवा जाणून घेण्याची इच्छा ) कितीही अनावर झाली तरी कुणाला काही विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. मुकाट्याने घरी येऊन शब्दकोश पाहतो किंवा गूगलवर धाव घेतो... बहुतेक मी तेव्हा आठवीत होतो. मधली सुट्टी झाली होती. डबे वगैरे खाऊन सारे गप्पा मारत होते. बोलता बोलता एक जण म्हणाला की, 'तिने त्याला प्रपोज केले' (आम्हाला 'वन पीस' राहायचं असल्यामुळे नामां ऐवजी सर्वनामांचा वापर केला आहे ) वाक्य खूप लहान होतं. दोन नामे आणि एक क्रियापद. पण क्रियापद इंग्रजी असल्यामुळे आणि आम्हाला त्याचा अर्थ माहिती नसल्यामुळे 'तिने' 'त्याला' नेमकं काय केलं हे कळेना. 'डिस्टर्ब' चा अनुभव पाठीशी असल्यामुळे कुणाला विचारलं वगैरे नाही. सन्ध्याकाळी घरी आलो. शब्दकोश उघडला. 'प्रपोज' चा अर्थ पाहीला. आणी आम्ही चक्क हादरलो. 'टु प्रपोज' म्हणजे लग्नाची मागणी घालणे अस होतं. आठवीतल्या मुलीने आठवीतल्या मुलाला लग्नाची मागणी घातली हे काही मला झेपेना. आणी मी तो विषय तिथेच सोडून दिला. दहावीची परिक्षा संपली. निकाल लागला. मला ७६% गुण मिळाले होते. बोलता बोलता एक मित्र म्हणाला की मला 'डिस्टिन्क्शन' मिळाली आहे. आई शप्पथ, 'डिस्टिन्क्शन' हा शब्द मी तेव्हा पहिल्यांदा ऐकला. पुन्हा अर्थ माहीती नसल्यामुळे मला 'डिस्टिन्क्शन' मिळाली आहे म्हणजे नेमकं काय झालं आहे हे कळेना. शब्दकोशात पाहिल्यानंतर कळलं की मी 'विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत' उत्तीर्ण झालो होतो. पुढे अकरावीला विज्ञान शाखा घेतली. अभ्यासक्रम इंग्रजीत होता. पण इथे मात्र फारसं अडलं नाही. सगळे विषय इंग्रजीतून असल्यामुळे मी 'अभ्यासाच्या' इंग्रजीला चांगलाच सरावलो. पुढे अभियांत्रिकीला गेलो. इथेही इंग्रजीची अडचण जाणवली नाही. 'तांत्रीक' इंग्रजी भाषा मला अगदी व्यवस्थित जमायची. गोची व्हायची ती अतांत्रीक इंग्रजी बोलताना. यथावकाश चार वर्षानी आम्ही 'अणुविद्युत आणि दूरसंचार अभियंता' झालो. संगणक अभियंता म्हणून काम करू लागलो. एक दिवस आम्हाला कळल की अमेरिकन ग्राहकाच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आमची निवड झाली आहे. एका सुदिनी (किंवा दुर्दिनी ) आमची ग्राहकाशी दूरध्वणीय मुलाखत 'शेज्यूल' झाली आहे. आणी आमचे धाबे दणाणले. आम्हास अमेरिकन उच्चार कळत नाही हे आम्ही चांगलेच ओळखून होतो. (ए एक्स एन, एच बी ओ, झी मुव्हीज हे चॅनेल आम्ही फक्त 'पाहायचो' ) परंतु यावरही आमच्या सुपीक मेंदूने तोडगा काढला. ती मुलाखत आम्ही स्पिकर फोन वरुन दिली. आमच्या सोबत आमची एक अमेरिकन इंग्रजी उच्चार कळणारी मैत्रीण होती. ग्राहकाने काही विचारलं की ती ते फळ्यावर लिहायची. आणी आम्ही तो फळ्यावरचा प्रश्न वाचून उत्तर द्यायचो. (ती मुलाखत व्यवस्थीत पार पडून पुढे आम्ही त्या प्रकल्पावर काम करू लागलो, हे सांगणे न लगे) पुढे अमेरिकेत आलो. ग्राहकाच्या कार्यालायातून काम करू लागलो.आमची ग्राहक इतकी सुसाट वेगाने बोलायची की काहीच कळायचं नाही. अशा वेळी आम्ही फक्त 'ओके', 'येस', 'नो' यातलं काहीतरी एक म्हणायचो. (आणि झालेलं संभाषण नंतर लिखीत स्वरुपात ई पत्राद्वारे तिच्याकडून मागवून घ्यायचो. त्यामुळे ती तेव्हा काय म्हणाली होती हे कळायचं आणि बोलताना झालेल्या चुका नन्तर ई पत्राद्वारे सुधारून घ्यायचो) आता मात्र 'ईंग्लिश' शिकण्याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला कळून चुकले. आणि आम्ही इंग्रजीवर मेहनत घ्यायला सुरूवात केली... आणि चक्क महिन्याभरात जाणवलं की आपण खूप व्यवस्थित इंग्रजी समजू आणी बोलू शकतो. तर अशी ही माझी इंग्रजी भाषा शिकण्याची कहाणी... आज इंग्रजी भाषेची बिलकुल अडचण जाणवत नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मी मराठीच वापरतो. माझं ओर्कूट वरील प्रोफाइल बर्‍यापैकी मराठीत आहे. माझा ब्लॉग पूर्णपणे मराठीत आहे. अगदी काल जेव्हा मी फिरायला सिक्स फ्लॅग डिस्कवरी किन्गडमला फिरायला गेलो तेव्हा तिथे शर्टवर तिथले कलाकार चित्र काढून देताना पाहिले. मी त्यातल्या एका कलाकाराकडून माझ्या शर्टवर मराठीतून नाव लिहून घेतलं. सुरुवातीला त्या अमेरिकन चित्रकाराला माझं मराठी नाव कागदावर लिहून दाखवूनही जमेना. पण मी चिकाटी सोडली नाही... आणि त्याला ते जमलं... (...शेवटी मी त्याला मराठी लिहायला लावलं) मी जगाच्या पाठीवर ज्या भूमीत असेल, तिथल्या संस्कृतीबद्दल, लोकांबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर असेल... पण त्याचबरोबर मला अभिमान असेल माझ्या मराठी भाषेचा, माझ्या मराठी पणाचा... असशील जरी तू भाषा सार्‍या जगाची नसेल कुणात हिंमत तुला बोलण्याची तरी जेव्हा आईची आठवण येईल कधी आठवेल तेव्हा मला माझी माय मराठी (आणि जाता जाता त्या शर्टाच चित्र... ज्याच्यावर आम्ही अमेरिकन चित्रकाराकडून मराठीत आमचं नाव लिहून घेतलं. शर्टाच्या आतमधला 'प्राणी' म्हणजे अस्मादिक आहोत... माझ्या मिसळ पावावरच्या रसिक मित्रानी ( आणि मैत्रिणींनी ) अभिप्राय द्यावयाचा झाल्यास फक्त या लेखावरच द्यावा. अस्मादिकान्चा चेहरा राणीच्या बागेतील ब~याच प्राण्यांशी साम्य दाखवतो हे आम्ही जाणून आहोत...)

फिशपाँड....

बिपिन कार्यकर्ते ·

टारझन 05/10/2008 - 00:51
कॉलेजात आमच्या एक साउथ इंडियन पोरगी होतो.. रंगाने चॉकलेटी .. =)) आणि मनाने फार मोठी पण उंची फक्त ५ फुट आणि नुसतं खी खी खी करून हसणं ... तिला टाकलेला हा ... सकाळी हसतेस .. दुपारीही हसतेस .. संध्याकाळी हसतेस .. आणि रात्री ही हसतेस .. श्यामले .. तुला काय वाटतं ? तु काय एकटीच दात घासतेस ? (आणि नंतर सगळ्यांनी नाकाला हात लावले) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

टुकुल 05/10/2008 - 01:02
>>> 'लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी दहा घरची' =)) .. लई भारी.. आमचेही काही मुलींच्या चेश्टेसाठी.. "आप आये तो बहार आयी, आप गये तो ओर चार आयी" सावळ्या (काळ्या) यक्तिसाठी... "पाठुन पाहिलं तर ईस्त्री कडक, पुढुन पाहिलं तर डांबरी सडक."

आम्हाला इंजिनियरिंग ग्राफिक्स शिकवायला एक काटकुळे मास्तर होते. त्यांना वार्षिक स्नेहसंमेलनात पडलेला फिशपाँड - "फ्रंटव्ह्युमे लाईन! टॉपव्ह्युमे पॉईंट!"

In reply to by अथांग सागर

हा मला मिळाला होता शाळेत कधीतरी! आणि माझा बाळूपणा म्हणजे त्याच दिवशी मला असा काही प्रकार असतो हे आणि माझं नाव वर्गातल्या पोरांना माहित आहे हेही समजलं होतं! :-)

विजुभाऊ 16/10/2008 - 16:02
मला पडलेला फिश्पॉन्ड गुजर रहे थे वह जिस गली से गुजर रहे थे हम भी उसी गलीसे फूल बरस रहेथ उनपर फूल बरस रहे थे हमपर मगर........ मगर वे थे डोलीमे और हम थे डोली उथाये खान्दोपर

अनिल हटेला 16/10/2008 - 17:19
कॉलेज कसं, पंढरी जसं.... शिक्षक कसे, विट्ठल-रुखमाइ जसे.. कॉलेज च्या मुली कशा, चंद्रभागेतल्या मासोळ्या जशा.. कॉलेजची मुलं कशी, त्यावर टपलेली बगळी जशी...!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्पृहा 16/10/2008 - 17:52
माझ्या हसण्यावर जाऊ नका माझ्या रुसण्यावर जाऊ नका जरी पुरुषासारखा असलो तरी माझ्या पुरुषत्वावर जाऊ नका.... ;)

In reply to by स्पृहा

टारझन 16/10/2008 - 18:35
जरी पुरुषासारखा असलो तरी माझ्या पुरुषत्वावर जाऊ नका....
हो स्प्रुहा भाऊ .. त्याची कल्पना तुमच्या नावावरनंच आली :) (ह.घ्या) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

नितीनमहाजन 16/10/2008 - 18:12
प्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या मुलाला मिळालेला हा: युवर फादर इज अ ग्रेट आर्टिस्ट ऍण्ड यू आर हिज मास्टरपीस.

आमच्या क्लासमधल्या एका अतिशय जाड-जूड मुलीला हा वाईट फिशपॉन्ड मिळाला होता 'दूरसे देखा तो चीनका गेट था, पास आके देखा तो ००० का पेट था' खेड्यातून आलेल्या मुला॑ना हा हमखास मिळत असे, 'पौडावरून आल॑य येड॑, बर्फाला म्हनत॑य पेढ॑' आता विचार केला की थोड॑ वाईटही वाटत॑ पण ते॑व्हा वात्रटपणा करता॑ना दुसर्‍याच्या भावना॑चा वगैरे विचार करायची अक्कल नव्हती!

प्राजु 16/10/2008 - 19:54
मला मिळालेले फिशपॉण्ड.. १. किरकोळ गप्पांचे ठोक व्यापारी - प्राजक्ता २. प्राजक्ता गेली करायला रक्तदान ,डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजु 16/10/2008 - 19:57
त्यावेळी कॉलेज मध्ये होते बाई. वजनाचा काटा ४२-४५ किलो च्या पुढे जातच नसे आणि आता..मागे यायचं नाव घेत नाही बघ. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

टारझन 16/10/2008 - 20:18
. वजनाचा काटा ४२-४५ किलो च्या पुढे जातच नसे अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

In reply to by टारझन

प्राजु 16/10/2008 - 20:58
अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला अरे तुझ्यावजनाबद्दल चाललं नाहिये. माझ्याबद्दल चालू आहे. तुझ्याकडे बघूनच तुझा वजनकाटा असेच म्हणत असेल याची कल्पना येते. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला अरे तुझ्यावजनाबद्दल चाललं नाहिये. माझ्याबद्दल चालू आहे. तुझ्याकडे बघूनच तुझा वजनकाटा असेच म्हणत असेल याची कल्पना येते. तुझ्याबद्दलच आहे ते प्राजू, फक्त ९०-९५ पाऊंड आहे ते! टार्‍याचं वजनाबद्दल एवढा अनादर नको दाखवूस, चार आकडी नाही आलं म्हणजे मिळवलं! आता बोल टार्‍या!

विचारी मना 16/10/2008 - 21:10
आमच्या कॉलेजात पड्लेले फिशपॉन्ड............... १. आमची माती आमची माणस गुड्घ्यात मेन्दू अन डोक्यात कणस ! २. कॉलेजमध्ये येतो सुटाबुटात घरी झोपतो गोनपाटात !

मुक्तसंगः अनहंवादि आमच्याच (उरोज सौश्ठवात ) उन्नती नसलेल्या (वर्ग)मैत्रिणीला दिलेला: म्यांचेश्टर !

मुक्तसंगः अनहंवादि आमच्यापेक्ष्या एक वर्ष पुढे असलेल्या जोडीला (मुलाचे नांव उदा. काळे व मुलीचे नांव उदा. काकोडकर वगैरे) : ते दोघे एकत्रच (एकाच गाडीने एकाच डब्यातुन) कॉलेजला येत - जात. एकाच बाकावर बसत. प्राक्टिकललाही पार्टनर (आल्फाबेटीकल रोल नंबर्स) इ.इ. नॉट टु बी लू़ज शंटेड!

टारझन 05/10/2008 - 00:51
कॉलेजात आमच्या एक साउथ इंडियन पोरगी होतो.. रंगाने चॉकलेटी .. =)) आणि मनाने फार मोठी पण उंची फक्त ५ फुट आणि नुसतं खी खी खी करून हसणं ... तिला टाकलेला हा ... सकाळी हसतेस .. दुपारीही हसतेस .. संध्याकाळी हसतेस .. आणि रात्री ही हसतेस .. श्यामले .. तुला काय वाटतं ? तु काय एकटीच दात घासतेस ? (आणि नंतर सगळ्यांनी नाकाला हात लावले) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

टुकुल 05/10/2008 - 01:02
>>> 'लेक लाडकी ह्या घरची, होणार सून मी दहा घरची' =)) .. लई भारी.. आमचेही काही मुलींच्या चेश्टेसाठी.. "आप आये तो बहार आयी, आप गये तो ओर चार आयी" सावळ्या (काळ्या) यक्तिसाठी... "पाठुन पाहिलं तर ईस्त्री कडक, पुढुन पाहिलं तर डांबरी सडक."

आम्हाला इंजिनियरिंग ग्राफिक्स शिकवायला एक काटकुळे मास्तर होते. त्यांना वार्षिक स्नेहसंमेलनात पडलेला फिशपाँड - "फ्रंटव्ह्युमे लाईन! टॉपव्ह्युमे पॉईंट!"

In reply to by अथांग सागर

हा मला मिळाला होता शाळेत कधीतरी! आणि माझा बाळूपणा म्हणजे त्याच दिवशी मला असा काही प्रकार असतो हे आणि माझं नाव वर्गातल्या पोरांना माहित आहे हेही समजलं होतं! :-)

विजुभाऊ 16/10/2008 - 16:02
मला पडलेला फिश्पॉन्ड गुजर रहे थे वह जिस गली से गुजर रहे थे हम भी उसी गलीसे फूल बरस रहेथ उनपर फूल बरस रहे थे हमपर मगर........ मगर वे थे डोलीमे और हम थे डोली उथाये खान्दोपर

अनिल हटेला 16/10/2008 - 17:19
कॉलेज कसं, पंढरी जसं.... शिक्षक कसे, विट्ठल-रुखमाइ जसे.. कॉलेज च्या मुली कशा, चंद्रभागेतल्या मासोळ्या जशा.. कॉलेजची मुलं कशी, त्यावर टपलेली बगळी जशी...!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्पृहा 16/10/2008 - 17:52
माझ्या हसण्यावर जाऊ नका माझ्या रुसण्यावर जाऊ नका जरी पुरुषासारखा असलो तरी माझ्या पुरुषत्वावर जाऊ नका.... ;)

In reply to by स्पृहा

टारझन 16/10/2008 - 18:35
जरी पुरुषासारखा असलो तरी माझ्या पुरुषत्वावर जाऊ नका....
हो स्प्रुहा भाऊ .. त्याची कल्पना तुमच्या नावावरनंच आली :) (ह.घ्या) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

नितीनमहाजन 16/10/2008 - 18:12
प्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या मुलाला मिळालेला हा: युवर फादर इज अ ग्रेट आर्टिस्ट ऍण्ड यू आर हिज मास्टरपीस.

आमच्या क्लासमधल्या एका अतिशय जाड-जूड मुलीला हा वाईट फिशपॉन्ड मिळाला होता 'दूरसे देखा तो चीनका गेट था, पास आके देखा तो ००० का पेट था' खेड्यातून आलेल्या मुला॑ना हा हमखास मिळत असे, 'पौडावरून आल॑य येड॑, बर्फाला म्हनत॑य पेढ॑' आता विचार केला की थोड॑ वाईटही वाटत॑ पण ते॑व्हा वात्रटपणा करता॑ना दुसर्‍याच्या भावना॑चा वगैरे विचार करायची अक्कल नव्हती!

प्राजु 16/10/2008 - 19:54
मला मिळालेले फिशपॉण्ड.. १. किरकोळ गप्पांचे ठोक व्यापारी - प्राजक्ता २. प्राजक्ता गेली करायला रक्तदान ,डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजु 16/10/2008 - 19:57
त्यावेळी कॉलेज मध्ये होते बाई. वजनाचा काटा ४२-४५ किलो च्या पुढे जातच नसे आणि आता..मागे यायचं नाव घेत नाही बघ. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

टारझन 16/10/2008 - 20:18
. वजनाचा काटा ४२-४५ किलो च्या पुढे जातच नसे अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

In reply to by टारझन

प्राजु 16/10/2008 - 20:58
अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला अरे तुझ्यावजनाबद्दल चाललं नाहिये. माझ्याबद्दल चालू आहे. तुझ्याकडे बघूनच तुझा वजनकाटा असेच म्हणत असेल याची कल्पना येते. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

अरे बापरे .. हो हे फक्त त्या काळी शक्य आहे . हल्ली काटा ९०-९५ च्या खाली यायला नको म्हणतो ... विचारा काट्याला अरे तुझ्यावजनाबद्दल चाललं नाहिये. माझ्याबद्दल चालू आहे. तुझ्याकडे बघूनच तुझा वजनकाटा असेच म्हणत असेल याची कल्पना येते. तुझ्याबद्दलच आहे ते प्राजू, फक्त ९०-९५ पाऊंड आहे ते! टार्‍याचं वजनाबद्दल एवढा अनादर नको दाखवूस, चार आकडी नाही आलं म्हणजे मिळवलं! आता बोल टार्‍या!

विचारी मना 16/10/2008 - 21:10
आमच्या कॉलेजात पड्लेले फिशपॉन्ड............... १. आमची माती आमची माणस गुड्घ्यात मेन्दू अन डोक्यात कणस ! २. कॉलेजमध्ये येतो सुटाबुटात घरी झोपतो गोनपाटात !

मुक्तसंगः अनहंवादि आमच्याच (उरोज सौश्ठवात ) उन्नती नसलेल्या (वर्ग)मैत्रिणीला दिलेला: म्यांचेश्टर !

मुक्तसंगः अनहंवादि आमच्यापेक्ष्या एक वर्ष पुढे असलेल्या जोडीला (मुलाचे नांव उदा. काळे व मुलीचे नांव उदा. काकोडकर वगैरे) : ते दोघे एकत्रच (एकाच गाडीने एकाच डब्यातुन) कॉलेजला येत - जात. एकाच बाकावर बसत. प्राक्टिकललाही पार्टनर (आल्फाबेटीकल रोल नंबर्स) इ.इ. नॉट टु बी लू़ज शंटेड!
आत्ताच एका प्रतिसादात ऋषिकेशने वापरलेला कंडा हा शब्द बघितला. खूप दिवसांनी हा शब्द समोर आला. तसा हा शब्द खूपच जुना. भाईकाकांनी पण हा शब्द वापरला आहे, पूर्वरंग मधे, मलाय भाषेत त्यांना हा शब्द 'मुलगी' ह्या अर्थी सापडला होता. मी सुद्धा आठवायचा प्रयत्न करायला लागलो की आमच्या वेळेला काय शब्द फेमस होते ते... पण छया: काही आठवायला तयार नाही. पण तेवढ्यात एकावरून एक असे काहितरी जुने जुने आठवायला लागले आणि अचानक आमच्या शाळेत १०वी च्या शेवटी झालेला 'सेंड ऑफ' चा कार्यक्रम डोळ्यासमोर आला. खासकरून त्यातले काही फिशपाँड्स... त्यात काही 'नेहमीचे यशस्वी' घिसेपिटे होतेच, उदा.

मनाचिया अंगणात.....

उदय सप्रे ·

धमाल मुलगा 18/05/2008 - 21:36
गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत?
हे खास आवडलं. :) उदयराव, स्पष्ट सांगतो, राग नसावा, पण नाय बॉ भिडली ही गज़ल. आणखी येऊद्या....छान...ह्याहून मस्त :)

In reply to by धमाल मुलगा

उदय सप्रे 18/05/2008 - 22:46
दोस्त, तुमचा राग ठरवून पण येणे शक्य नाही ! असं होऊ शकतं , मी जीव तोडून लिहिलेलं सगळंच सगळ्यांना तेव्हढं भिडेलच असं नाहे, मई याहून चांगलं लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. उदय सप्रे

धमाल मुलगा 18/05/2008 - 21:36
गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत?
हे खास आवडलं. :) उदयराव, स्पष्ट सांगतो, राग नसावा, पण नाय बॉ भिडली ही गज़ल. आणखी येऊद्या....छान...ह्याहून मस्त :)

In reply to by धमाल मुलगा

उदय सप्रे 18/05/2008 - 22:46
दोस्त, तुमचा राग ठरवून पण येणे शक्य नाही ! असं होऊ शकतं , मी जीव तोडून लिहिलेलं सगळंच सगळ्यांना तेव्हढं भिडेलच असं नाहे, मई याहून चांगलं लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. उदय सप्रे
मनाचिया अंगणात मनाचिया अंगणात दरवळतो हा वसंत संगतीस नाहिस तू , ठुसठुसते हीच खंत ! गुरफटलो अवचित मी , मोकळ्यां केसांत तुझ्या तप भंगले महर्षिंचे , मी कुठला होय संत? भिजलेल्या रात्रींच्या आठवणी त्या अनंत जगण्याचे श्वास ज्यांस नसे आदी नसे अंत ! संवेदनांच्या पल्याड , जाऊन मी तिष्ठतोय होशील ना माझी मग, जन्माची सरताच भिंत ? -----------------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे------१८ मे, २००८------------ आम्हांस इथे ही भेटा..... कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ कवितांजली :http://uday-sapre.blogspot

साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी

ऋषिकेश ·

शितल 18/05/2008 - 18:21
तुमचा साबुदाणा तळणे हा प्रयत्न आवडला, डोळ्यावर गॉगल घालुन तुम्ही कसे तो शाबुदाणा तळत असाल ह्या चा फोटो डोळ्यासमोर तयार झाला, असा फोटो काढुन जर मिपा वर चढवला असता तर अजुन हसुन हसुन पुरेवाट झाली असती. बाकी लेख मस्त.

मन 18/05/2008 - 20:05
छानच लेख. त्यातही :- ...झाकण ठेवावं तर जळणार आणि झाकण काढावं तर उडणार अशी पंचाईत झाली होती. हे भारिच. आपलाच, मनोबा

ईश्वरी 18/05/2008 - 22:27
भावाला विचारल्यावर उपकार केल्याच्या थाटात "तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा! तुला हा पदार्थ नक्की जमेल!" अशी अगदी सदाशिवपेठी कमेंट मारून हा हा हा करून हसून घेण्याशिवाय त्याने काहि केलं नाहि. लहान भावंडे अशीच असतात का हो? मलाही अनुभव आहे. :) बाकी .. लेख मस्त झालाय....एकदम खुसखुशीत. मजा आली वाचताना. गॉगल घालून साबुदाणा तळला...सही अगदी. ईश्वरी

विसोबा खेचर 18/05/2008 - 23:52
अरे वा ऋषिकेशराव, आम्हालाही एकदा खाऊन पाहिला पाहिजे तुमच्या हातचा साबुदाण्याचा चिवडा! :) बाकी लेख मस्त आणि खुसखुशीत. वाचून मौज वाटली....:) अजूनही तुमच्या अश्या गॉगल लावून केलेल्या भन्नाट पाकृ आणि अनुभव येऊ द्यात प्लीज... आपला, (साबुदाणा खिचडी प्रेमी) तात्या.

वरदा 19/05/2008 - 00:27
मी अगदी अश्शाच रविवारच्या दुपारी एकटी बसलेय साबुदाणा तळू का? खी खी खी. नको माझं स्वयपाकघर साबुदाणामय झालं तर आई नाही काही येणार साफ करायला....चहाच टाकावा म्हणते येतय का कुणी चहा घ्यायला? पोह्याचा चिवडा आहे माझ्याकडे परवा केलेला....

पक्या 19/05/2008 - 01:02
वा , मस्त..आज सकाळी सकाळी छान मिळाल वाचायला....खुसखुशीत, चटकदार, चमचमीत, खंमग, कुरकुरीत.... मजा आली राव वाचताना. धन्यवाद

रविराज 19/05/2008 - 02:12
एकदम झकास लिहलयं!!! माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो. =))

छोटा डॉन 19/05/2008 - 08:38
च्यायला हसुन हसुन पुरेवाट झाली ... लेख फक्कड जमला आहे... अजुन येऊ द्यात ... बाकी "चिवडा " झाला की नाही ? "माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो." हे वाक्य भारी ... "भावाला म्हटलं चलरे आपण मस्तपैकी काहितरी बनवुया खायला. भावाने एक असा काहि लुक दिला की तुला जे काहि करायचय ते कर, मला ते खायला लाऊ नकोस असं तो बजावतोय हे न बोलताही मला स्पष्ट ऐकु आल" हम्म. शेवटी घरोघरी मातीच्या चुली [ किंवा फार तर गॅस ] म्हणा ... फरक इतकाच की आमच्या इथे असा "मूड - ऑफ " करायला स्वताला आमचा मित्र म्हणवणारे काही हलकट, नालायक असे लोक राहतात व आपले काम इमानदारीने करतात ... स्वगत : आपण सुद्धा असल्या विषयावर लिहायला हरकत नाही ... पदार्थ जमत नाही म्हणून काय झालं जर लेख जमला तरी हरकत नाही, कोण डोंबलाच येतय बघायला मी खरच केला होता की नाही ते ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार 19/05/2008 - 09:01
दाभोळकरशेठ, बर्‍याच दिवसांनी येणे केलेत.. कुठे दडी मारली होती.. अनुभव कथन एकंदर उत्तम.. वरचे वर येत जा आणि लिहित जा.. (वाचक)केशवसुमार स्वगतः मिपावर येणारे सगळेच माझ्यासारखे निरुद्योगी किंवा 'उद्योगी' असतात की काय? :?

चिवडा मस्त जमलाय! केसु म्हणतात तसेच..,बरेच दिवसांनी येणं केलं,कुठे दडी मारली होती? स्वाती

चिवड्याचा अनुभव सही रे !!! डोळ्यावर गॉगल लावून शाबूदाना तळला हे तर लय भारी !!!! अवांतर : डोळ्यावर गॉगल लावलेला फोटो आम्ही तर पाहतोच असतो !!! :)

राजे 19/05/2008 - 12:13
हा ! हा ! हा हा ! =)) :)) :D =)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ऋषिकेश 19/05/2008 - 14:33
शितल, असे उद्योग करतानाचे फोटो काढले तर आई-बाबाच्या हाती लागण्याचा दाट शक्यतेमुळे या (व अश्या अनेक) उद्योगांचा फोटो नाही. :-) असता तर नक्की डकवला असता. प्रतिक्रियेबद्दल आभार डॉन, चिवडा झाला म्हणजे काय.. एकदम फक्कड झाला. त्यात भावाला फक्त चमचाभर दिला आणि बाकीचा त्याच्या समोरच बसून संपवला ;) त्याला ही चिवडा आवडला पण सांगणार कसे त्यामुळे माझ्याकडे बघत बसावे लागले :प. बाकी प्रतिक्रियेबद्दल आभार. तुझ्याही यशस्वी/फसलेल्या पाकृ येउ देत. वाट पाहतोय केसु /स्वाती, महिनाभर गुजरातमधे गांधीनगरला होतो. जालापासूनच काय तर कोणत्याही शहरी मायाजालापासून दूर होतो :) फार मस्त अनुभव आहेत तिथले. बघु वेळ मिळेल तसे ते अनुभवही सांगीनच. बाकी लेख आवडल्याचे कळविल्याबद्द्ल दोघांनाही धन्यु! बाकी मन, इश्वरी, तात्या, वरदा, पक्या, रविराज, दिगंबर, प्राडॉ आणि राजे सार्‍यांचे प्रोत्साहन दिल्याबद्दल अनेक आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

याचे उत्तर मिळाले....त्यामुळे विचारत नाही. आम्ही वाट पाहात होतो कि कोणत्या इंग्लीश गाण्याचे भाषांतर आम्हाला वाचायला मिळेल?:) तसेच नविन सिनेमाची परीक्षणे.... वरील लेख फारच छान.....यादगार्....परत चिवडा केलास तर तो चवीला कसा झाला? हे न लिहिता, कसा केलास? हे लिही....:) कारण तुला भरपूर मार्गदर्शन मिळाले आहे वरील प्रतिक्रियांमधून....तेव्हा त्याचा वापर कर... :)) :)) :))

In reply to by स्वाती राजेश

ऋषिकेश 19/05/2008 - 20:31
स्वातीताई, अभिप्रायाबद्द्ल धन्यु! एक ऍनिमेटेड सिनेमावर लेख लिहिणार होतोच. तुमच्या प्रोत्साहनाने उत्साह वाढला. लवकरच लिहिन :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

धमाल मुलगा 22/05/2008 - 13:02
वा बंधो, मुदपाकखान्यातला उपद्व्याप यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन! तो गॉगल लावून तडीस नेला, ह्या 'ष्टायली'ची कल्पना आवडली :)
तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा!
=)) खत्तरा :) लै लै जोरात पोपट रे! बाकी पुरंदर पायथ्याची मिसळ चापणार्‍याला हे असं कुजकट बोलणार्‍या भावाच्या तोंडात त्या चिवड्याचे निव्वळ चार-दोन दाणे घालून मस्त बदला घेतला हां :)

शितल 18/05/2008 - 18:21
तुमचा साबुदाणा तळणे हा प्रयत्न आवडला, डोळ्यावर गॉगल घालुन तुम्ही कसे तो शाबुदाणा तळत असाल ह्या चा फोटो डोळ्यासमोर तयार झाला, असा फोटो काढुन जर मिपा वर चढवला असता तर अजुन हसुन हसुन पुरेवाट झाली असती. बाकी लेख मस्त.

मन 18/05/2008 - 20:05
छानच लेख. त्यातही :- ...झाकण ठेवावं तर जळणार आणि झाकण काढावं तर उडणार अशी पंचाईत झाली होती. हे भारिच. आपलाच, मनोबा

ईश्वरी 18/05/2008 - 22:27
भावाला विचारल्यावर उपकार केल्याच्या थाटात "तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा! तुला हा पदार्थ नक्की जमेल!" अशी अगदी सदाशिवपेठी कमेंट मारून हा हा हा करून हसून घेण्याशिवाय त्याने काहि केलं नाहि. लहान भावंडे अशीच असतात का हो? मलाही अनुभव आहे. :) बाकी .. लेख मस्त झालाय....एकदम खुसखुशीत. मजा आली वाचताना. गॉगल घालून साबुदाणा तळला...सही अगदी. ईश्वरी

विसोबा खेचर 18/05/2008 - 23:52
अरे वा ऋषिकेशराव, आम्हालाही एकदा खाऊन पाहिला पाहिजे तुमच्या हातचा साबुदाण्याचा चिवडा! :) बाकी लेख मस्त आणि खुसखुशीत. वाचून मौज वाटली....:) अजूनही तुमच्या अश्या गॉगल लावून केलेल्या भन्नाट पाकृ आणि अनुभव येऊ द्यात प्लीज... आपला, (साबुदाणा खिचडी प्रेमी) तात्या.

वरदा 19/05/2008 - 00:27
मी अगदी अश्शाच रविवारच्या दुपारी एकटी बसलेय साबुदाणा तळू का? खी खी खी. नको माझं स्वयपाकघर साबुदाणामय झालं तर आई नाही काही येणार साफ करायला....चहाच टाकावा म्हणते येतय का कुणी चहा घ्यायला? पोह्याचा चिवडा आहे माझ्याकडे परवा केलेला....

पक्या 19/05/2008 - 01:02
वा , मस्त..आज सकाळी सकाळी छान मिळाल वाचायला....खुसखुशीत, चटकदार, चमचमीत, खंमग, कुरकुरीत.... मजा आली राव वाचताना. धन्यवाद

रविराज 19/05/2008 - 02:12
एकदम झकास लिहलयं!!! माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो. =))

छोटा डॉन 19/05/2008 - 08:38
च्यायला हसुन हसुन पुरेवाट झाली ... लेख फक्कड जमला आहे... अजुन येऊ द्यात ... बाकी "चिवडा " झाला की नाही ? "माझा प्रश्न होता घरात असलेला कच्चा माल आणि माझं पाककौशल्य यांच्या लसावितून काय बनवता येईल असा सारसार विचार करत होतो." हे वाक्य भारी ... "भावाला म्हटलं चलरे आपण मस्तपैकी काहितरी बनवुया खायला. भावाने एक असा काहि लुक दिला की तुला जे काहि करायचय ते कर, मला ते खायला लाऊ नकोस असं तो बजावतोय हे न बोलताही मला स्पष्ट ऐकु आल" हम्म. शेवटी घरोघरी मातीच्या चुली [ किंवा फार तर गॅस ] म्हणा ... फरक इतकाच की आमच्या इथे असा "मूड - ऑफ " करायला स्वताला आमचा मित्र म्हणवणारे काही हलकट, नालायक असे लोक राहतात व आपले काम इमानदारीने करतात ... स्वगत : आपण सुद्धा असल्या विषयावर लिहायला हरकत नाही ... पदार्थ जमत नाही म्हणून काय झालं जर लेख जमला तरी हरकत नाही, कोण डोंबलाच येतय बघायला मी खरच केला होता की नाही ते ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार 19/05/2008 - 09:01
दाभोळकरशेठ, बर्‍याच दिवसांनी येणे केलेत.. कुठे दडी मारली होती.. अनुभव कथन एकंदर उत्तम.. वरचे वर येत जा आणि लिहित जा.. (वाचक)केशवसुमार स्वगतः मिपावर येणारे सगळेच माझ्यासारखे निरुद्योगी किंवा 'उद्योगी' असतात की काय? :?

चिवडा मस्त जमलाय! केसु म्हणतात तसेच..,बरेच दिवसांनी येणं केलं,कुठे दडी मारली होती? स्वाती

चिवड्याचा अनुभव सही रे !!! डोळ्यावर गॉगल लावून शाबूदाना तळला हे तर लय भारी !!!! अवांतर : डोळ्यावर गॉगल लावलेला फोटो आम्ही तर पाहतोच असतो !!! :)

राजे 19/05/2008 - 12:13
हा ! हा ! हा हा ! =)) :)) :D =)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ऋषिकेश 19/05/2008 - 14:33
शितल, असे उद्योग करतानाचे फोटो काढले तर आई-बाबाच्या हाती लागण्याचा दाट शक्यतेमुळे या (व अश्या अनेक) उद्योगांचा फोटो नाही. :-) असता तर नक्की डकवला असता. प्रतिक्रियेबद्दल आभार डॉन, चिवडा झाला म्हणजे काय.. एकदम फक्कड झाला. त्यात भावाला फक्त चमचाभर दिला आणि बाकीचा त्याच्या समोरच बसून संपवला ;) त्याला ही चिवडा आवडला पण सांगणार कसे त्यामुळे माझ्याकडे बघत बसावे लागले :प. बाकी प्रतिक्रियेबद्दल आभार. तुझ्याही यशस्वी/फसलेल्या पाकृ येउ देत. वाट पाहतोय केसु /स्वाती, महिनाभर गुजरातमधे गांधीनगरला होतो. जालापासूनच काय तर कोणत्याही शहरी मायाजालापासून दूर होतो :) फार मस्त अनुभव आहेत तिथले. बघु वेळ मिळेल तसे ते अनुभवही सांगीनच. बाकी लेख आवडल्याचे कळविल्याबद्द्ल दोघांनाही धन्यु! बाकी मन, इश्वरी, तात्या, वरदा, पक्या, रविराज, दिगंबर, प्राडॉ आणि राजे सार्‍यांचे प्रोत्साहन दिल्याबद्दल अनेक आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

याचे उत्तर मिळाले....त्यामुळे विचारत नाही. आम्ही वाट पाहात होतो कि कोणत्या इंग्लीश गाण्याचे भाषांतर आम्हाला वाचायला मिळेल?:) तसेच नविन सिनेमाची परीक्षणे.... वरील लेख फारच छान.....यादगार्....परत चिवडा केलास तर तो चवीला कसा झाला? हे न लिहिता, कसा केलास? हे लिही....:) कारण तुला भरपूर मार्गदर्शन मिळाले आहे वरील प्रतिक्रियांमधून....तेव्हा त्याचा वापर कर... :)) :)) :))

In reply to by स्वाती राजेश

ऋषिकेश 19/05/2008 - 20:31
स्वातीताई, अभिप्रायाबद्द्ल धन्यु! एक ऍनिमेटेड सिनेमावर लेख लिहिणार होतोच. तुमच्या प्रोत्साहनाने उत्साह वाढला. लवकरच लिहिन :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

धमाल मुलगा 22/05/2008 - 13:02
वा बंधो, मुदपाकखान्यातला उपद्व्याप यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन! तो गॉगल लावून तडीस नेला, ह्या 'ष्टायली'ची कल्पना आवडली :)
तु ना, दाण्याच्या कुटात साखर घालून खा!
=)) खत्तरा :) लै लै जोरात पोपट रे! बाकी पुरंदर पायथ्याची मिसळ चापणार्‍याला हे असं कुजकट बोलणार्‍या भावाच्या तोंडात त्या चिवड्याचे निव्वळ चार-दोन दाणे घालून मस्त बदला घेतला हां :)
आई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट! घरावर मी आणि माझा धाकटा भाऊ दोघांचच राज्य होतं. भावाने चतुराईने टिव्हीच्या रिमोटवरचं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. अगदी बाथरूमला जातानाही रिमोट बरोबर घेऊन जात होता म्हणा ना! त्यामुळे चालु कार्यक्रम आवडता असुनही, त्याने लावलेला कार्यक्रम कसा बघणार, असा प्रश्न इगोचा असल्याने मी टिव्ही बघु शकत नव्हतो. माझे मित्र (ज्यांबरोबर फिरताना रविवार कमी पडत असे) आता एकच मिळणार्‍या रविवारी झोपलो नाहि तर ऑफिसात लागलेली सवय मोडेल या कारणाने दुपारच्या झोपा काढत होते.