मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुलाम वजीर!

चतुरंग ·

वाचून वाईट वाटले की इतक्या उत्तम खेळणार्‍या खेळाडूला गुलाम असल्याकारणे मालक परत आल्यावर परत यावे लागले. कदाचित त्या पटाच्या बादशहाला त्याचे वैषम्य वाटले देखील नसेल. असो जर हा बादशहा जागतिक बुद्धिबळाच्या पटावर असता तर कदाचित अनेक मी मी म्हणणार्‍याना त्याने गुलाम केले असते. त्या गुलाम 'वजीराला' माझा सलाम. चतुरंगराव इतक्या सुंदर माहीती बद्दल धन्यवाद. पुण्याचे पेशवे

शितल Tue, 05/20/2008 - 06:50
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आणि प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही. हे तर अगदी भन्नाट वाक्य आहे. अशा ह्या असामान्य मीर सुलतानचं उदयाला येणं जसं सहज आनंददायी होतं तसंच त्याचं अलगद विस्मृतीत विरुन जाणंही चटका लावून जाणारं ठरलं. सध्याच्या पाकिस्तानातल्या सरगोधा प्रांतात आपल्या कुटुंबासमवेत छोट्या जमिनीच्या तुकड्यावर समाधानाने गुजराण करणार्‍या ह्या 'गुलाम वजिराने' १९६६ साली काळाच्या पटावरुन प्रस्थान ठेवले! हे तर अगदी मनाला चुटुका लावुन जाते.

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 09:32
मस्त गोष्ट ... त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले... बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही... (असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 20:29
चतुरंगजी, माफ करा! पण मीही तो डाव (कॅपाब्लॅकाविरुद्धचा) पाहिला ओरिजिनल साईटवर जाऊन! त्या कॅपाब्लॅकाच्या **वर तुम्ही एक लाथ का दिली नाहीत याचेच आश्चर्य वाटले!!!!! एक हत्ती राजाला जखडवून टाकीत असतांना त्याने दुसरा हत्ती तिथे आणण्याचे प्रयोजन काय? अरे त्या खानाचा एकतरी हत्ती तुला खाता येत होता ना!! मग ते कर ना!! आणि तो वजिराशी काय खेळ खेळ्तोय? अरे वजीर हा कत्तलीसाठी च असतो हे तो विसरला काय? नुसता पुढेमागे-पुढेमागे करतोय !! अरे काहीतरी कत्तल कर ना!! समोरच्या खानाला जरा बुचकळ्यात पाड ना!! माफ करा चतुरंगजी! पण या खेळांत आम्हाला खानाची बुद्धी दिसण्यापेक्षा त्या कॅपाब्लॅकाची निर्बुद्ध बुद्धीच दिसली!! आम्हाला निदान दोनचार जागा तरी अशा दिसल्या की जर आम्ही तिथे जर असतो तर त्या खानाला नक्कीच हार्ड टाईम दिला असता! तो कॅपाब्लँका पुरता खानाला घाबरून गेलेला दिसला!! स्पष्ट बोलण्याबद्द्ल क्षमस्व!! आपला (बुद्धिबळात रस असलेला), पिवळा डाबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Tue, 05/20/2008 - 20:42
मी ही हा गेम पूर्वीच पाहिलाय. पोझिशनल ऍडव्हांटेज - ह्या कल्पनेचा इतका अफलातून विस्तार करुन नंतर एका वजिरापेक्षा दोन हत्ती हे वरचढ ठरणार हे जाणून केवळ मोहर्‍यांच्या हालचालीची लवचिकता ह्या एकाच गोष्टीवर भर देत प्रतिस्पर्ध्याच्या वजिराला फक्त येरझार्‍या घालायला लावणे (ते ही कॅपा.सारख्याला) आणि शांतपणे पकड आवळत नेऊन शेवटी पासपॉन मधे रुपांतर करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे! ह्यातल्या मीरच्या पाचव्या खेळीवर पुढे पेट्रोशान आणि त्यानंतर गॅरी कास्पारोव सारख्या लोकांनी अधिक काम करुन त्यातले डीप थेऑरेटिकल काम अधिक स्पष्ट केले. पण ते समजून घेण्याइतका माझा बुद्धिबळाचा अभ्यास नाही! स्वतः कॅपाब्लांकाने ज्याचे वर्णन 'जीनियस' असे केले आहे त्या मीर बद्दल म्या पामराने काय बोलावे? त्यामुळे आपली असहमती नेमकी कोणत्या कारणाकरिता आहे ह्याचा नक्की उलगडा मला तरी झाला नाही. चतुरंग

आनंदयात्री Tue, 05/20/2008 - 10:17
चतुरंग राव छान लेख अन अत्यंत समर्पक शिर्षक. बुद्धीबळातल्या निरनिराळ्या खेळाडुंची ओळख करुन देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन अन धन्यवाद. पुढील लेखाची वाट पहात आहे. :)

आर्य Tue, 05/20/2008 - 18:34
भारताने शोध लावलेल्या (चतुरंग) या खेळातील, भारतीय दिग्गजांची माहिती करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! ऐखाद्या प्यादाचा व़जीर कसा होतो, याचा प्रत्यय मीरला आयुष्यात आला असावा :H

स्वाती दिनेश Tue, 05/20/2008 - 12:28
रानावनात गुराढोरांच्या मागे पळणार्‍या एखाद्या काटकुळ्या पोराने थोड्या सरावाने असामान्य गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकावी तसंच काहीसं! आवडले. शीर्षकही समर्पक आहे. त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले... बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही... (असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......) मास्तरांशी सहमत, स्वाती

मन Tue, 05/20/2008 - 12:40
मिळाली. ह्या खेळाडुबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय. मस्त लेख आहे. आपलाच, मनोबा

प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2008 - 13:09
सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुमीत Tue, 05/20/2008 - 14:29
परत एकदा तुम्ही फक्त बुद्धीबळाच्या महान खेळाडूची ओळखच नव्हे तर त्याच्या खेळातली महानतेची ओळख करून दिलीत.

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 15:55
रंगा, बुद्धीबळ आणि बुधिबळाच्या खेळाडूविषयीचे तुझे लेख पाहून कौतुक वाटते. माझाही हा अत्यंत आवडता खेळ आहे, परंतु मी बर्‍याचदा हारतो! :( आपल्याला बॉ जमतच नाही त्यातल्या काही चालींना उत्तर देणे, परंतु हा खेळ खेळायला खूप मौज वाटते. बुद्धिबळविषयक लेखन अजूनही येऊ दे... बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :) आपला, (कास्पारावप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 16:18
_बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :)) :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 20:34
बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? कारण त्याने हा डाव चाल-बाय-चाल पाहिला आणि त्याचा आटाच सटकला.... असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे.:)

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:06
असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे. धत तेरीकी! अरे चालल्या असत्या दोन-चार शिव्या! मिसळपाववर सोवळं-ओवळं हा प्रकार नाही! :) असो... अवांतर - बर्‍याचदा सोवळ्याच्या आडच अनेक गोष्टी चालतात. त्यापेक्षा ओवळं राहिलेलं बरं! :)) आपला, (ओवळा) तात्या.

अन्या दातार Wed, 05/21/2008 - 01:55
अप्रतिम लेख. एका दुर्दैवी खेळाडूची चांगली ओळख करुन दिल्याबद्दल चतुरंग यांचे आभार.

धनंजय Wed, 05/21/2008 - 08:27
वजिराची कुचंबणा बघितली. पण खालच्या संवादातला एक प्रतिसाद वाचून गंमत वाटली: "आखेलीन म्हणाले की सुलतान खान यांना जर सुरुवाती माहीत असत्या तर ते विश्वविजेते झाले असते. (आखेलीन आणि कापाब्लांका कडून स्तुती) ही दोन विश्वविजेत्यांकडून उच्च प्रशंसा होय. सुरुवाती माहीत नसणार्‍यासाठी त्यांचा खेळ फार चांगला होता. सुलतान खान आणि मी, दोघांमध्ये खूप साम्य आहे. दोघांपैकी कोणालाच सुरुवाती येत नाहीत. दुर्दैवाने साम्य तिथे संपते ;)" दुर्दैवाने, माझेही तेच आहे. कोणीतरी प्रेमाने आणि दयाळूपणे मला सुरुवाती समजावून सांगितल्यात तर मोठे उपकार होतील. १२व्या खेळीत मोठीच घटना झाली तितके मलाही समजले. "सी" कॉलम पूर्ण मोकळा झाला. पण याचा फायदा काळ्याला होणार की पांढर्‍याला ते कळण्याइतके माझे बुद्धीचे बळ नाही. (पांढर्‍याने सापळा लावून "सी" कॉलम उघडला, म्हणजे पांढर्‍याला फायदा होण्यासाठीच... पण तो कसा?) असो. चतुरंग यांनी मस्त लेख लिहिला आहे. या विलक्षण खेळाडूची ओळख झाली. चतुरंग यांनी थोडेसे बाळबोध रसग्रहणही शिकवावे. उदाहरणार्थ Queens Indian Defence हा थोडा समजावून सांगितला तर मजा येईल. उदाहरणार्थ सहाव्या खेळीत पांढर्‍याने ए३ (डाव्या हत्तीचे प्यादे) पुढे केले नसते तर काय झाले असते? हे काळ्या उंटाचा मार्ग रोखण्यासाठी आहे का? हेच का? दुसरे काही का नाही? सी कॉलम मोकळा करण्यासाठी सापळा कधी आणि कसा लागला? काळा वजीर उजवीकडे (एच, जी, कॉलममध्ये) हेलपाटे घालत होता, ते एफ-जी-एच कॉलममधील प्याद्यांना धाक द्यायला का? त्यामुळे पराभव थोडा तरी लांबला का? अशा प्रश्नांनी बेजार होऊन मी बुद्धिबळाचा नाद पूर्णपणे सोडला आहे. (शिवाय नेहमी हरायचो, ही वेगळी गोष्ट.)

वाचक Wed, 05/21/2008 - 08:32
मलाही 'बुद्धिबळात' अर्थात प्रचंड गती आहे असे नव्हे पण मलाही अगदी असेच वाटले कि काळा वजिर पटाच्या उजवीकडे नुस्ताच 'मागे पुढे' करत होता. निदान ते प्यादे तरी खाल्ले असते तर थोडा मार्ग तरी मोकळा झाला असता.

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:38
रंगा, इथे माझ्यासकट अन्य सभासदांनाही या खेळात बराच रस दिसतो आहे. तू लेका लिहीच एखादी लेखमालिका जी साध्या सोप्या रितीने बुद्धीबळाची ओपनींग्ज समजावून सांगेल. माझ्यासारखे अनेकजण ओपनिंग्ज मध्येच मार खातात त्यामुळे पुढची हार जवळजवळ निश्चित होते! :) आपला, (फ्रेंच डिफेन्स प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Wed, 05/21/2008 - 08:52
आत्ताच मी आलेले प्रतिसाद बघत होतो आणि त्या अनुषंगानेच विचार सुरु होता. बुद्धिबळ ओपनिंग्ज हा एक फार मोठा विषय आहे पण मी त्यातली काही प्राथमिक घेऊन काय लिहिता येईल ते बघतो. अभ्यासाला थोडा वेळ लागेल पण जरुर काहीतरी चांगले देऊ शकेन असे वाटते. प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! :) चतुरंग

केशवसुमार Wed, 05/21/2008 - 09:53
रंगाशेठ, मस्त लेख.. बुद्धीबळ!! आमचा एकदम आवडता खेळ.. रात्ररात्र (|: डाव लावून बसायचे.. :W ~X( खूप वर्षांपुर्वी काही कारणाने आम्हाला ह्या आमच्या आवडत्या खेळाला रामराम ठोकावा लागला.. :& या लेखाने त्या सगळ्या जून्या आठवणी ताज्या केल्या.. :B (एके काळचा वजीर्)केशवसुमार स्वगतः कोण रे तो मोठ्याने हसला आम्ही बुद्धीबळ खेळायचे म्हणल्यावर.. X(

वाचून वाईट वाटले की इतक्या उत्तम खेळणार्‍या खेळाडूला गुलाम असल्याकारणे मालक परत आल्यावर परत यावे लागले. कदाचित त्या पटाच्या बादशहाला त्याचे वैषम्य वाटले देखील नसेल. असो जर हा बादशहा जागतिक बुद्धिबळाच्या पटावर असता तर कदाचित अनेक मी मी म्हणणार्‍याना त्याने गुलाम केले असते. त्या गुलाम 'वजीराला' माझा सलाम. चतुरंगराव इतक्या सुंदर माहीती बद्दल धन्यवाद. पुण्याचे पेशवे

शितल Tue, 05/20/2008 - 06:50
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आणि प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही. हे तर अगदी भन्नाट वाक्य आहे. अशा ह्या असामान्य मीर सुलतानचं उदयाला येणं जसं सहज आनंददायी होतं तसंच त्याचं अलगद विस्मृतीत विरुन जाणंही चटका लावून जाणारं ठरलं. सध्याच्या पाकिस्तानातल्या सरगोधा प्रांतात आपल्या कुटुंबासमवेत छोट्या जमिनीच्या तुकड्यावर समाधानाने गुजराण करणार्‍या ह्या 'गुलाम वजिराने' १९६६ साली काळाच्या पटावरुन प्रस्थान ठेवले! हे तर अगदी मनाला चुटुका लावुन जाते.

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 09:32
मस्त गोष्ट ... त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले... बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही... (असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 20:29
चतुरंगजी, माफ करा! पण मीही तो डाव (कॅपाब्लॅकाविरुद्धचा) पाहिला ओरिजिनल साईटवर जाऊन! त्या कॅपाब्लॅकाच्या **वर तुम्ही एक लाथ का दिली नाहीत याचेच आश्चर्य वाटले!!!!! एक हत्ती राजाला जखडवून टाकीत असतांना त्याने दुसरा हत्ती तिथे आणण्याचे प्रयोजन काय? अरे त्या खानाचा एकतरी हत्ती तुला खाता येत होता ना!! मग ते कर ना!! आणि तो वजिराशी काय खेळ खेळ्तोय? अरे वजीर हा कत्तलीसाठी च असतो हे तो विसरला काय? नुसता पुढेमागे-पुढेमागे करतोय !! अरे काहीतरी कत्तल कर ना!! समोरच्या खानाला जरा बुचकळ्यात पाड ना!! माफ करा चतुरंगजी! पण या खेळांत आम्हाला खानाची बुद्धी दिसण्यापेक्षा त्या कॅपाब्लॅकाची निर्बुद्ध बुद्धीच दिसली!! आम्हाला निदान दोनचार जागा तरी अशा दिसल्या की जर आम्ही तिथे जर असतो तर त्या खानाला नक्कीच हार्ड टाईम दिला असता! तो कॅपाब्लँका पुरता खानाला घाबरून गेलेला दिसला!! स्पष्ट बोलण्याबद्द्ल क्षमस्व!! आपला (बुद्धिबळात रस असलेला), पिवळा डाबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Tue, 05/20/2008 - 20:42
मी ही हा गेम पूर्वीच पाहिलाय. पोझिशनल ऍडव्हांटेज - ह्या कल्पनेचा इतका अफलातून विस्तार करुन नंतर एका वजिरापेक्षा दोन हत्ती हे वरचढ ठरणार हे जाणून केवळ मोहर्‍यांच्या हालचालीची लवचिकता ह्या एकाच गोष्टीवर भर देत प्रतिस्पर्ध्याच्या वजिराला फक्त येरझार्‍या घालायला लावणे (ते ही कॅपा.सारख्याला) आणि शांतपणे पकड आवळत नेऊन शेवटी पासपॉन मधे रुपांतर करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे! ह्यातल्या मीरच्या पाचव्या खेळीवर पुढे पेट्रोशान आणि त्यानंतर गॅरी कास्पारोव सारख्या लोकांनी अधिक काम करुन त्यातले डीप थेऑरेटिकल काम अधिक स्पष्ट केले. पण ते समजून घेण्याइतका माझा बुद्धिबळाचा अभ्यास नाही! स्वतः कॅपाब्लांकाने ज्याचे वर्णन 'जीनियस' असे केले आहे त्या मीर बद्दल म्या पामराने काय बोलावे? त्यामुळे आपली असहमती नेमकी कोणत्या कारणाकरिता आहे ह्याचा नक्की उलगडा मला तरी झाला नाही. चतुरंग

आनंदयात्री Tue, 05/20/2008 - 10:17
चतुरंग राव छान लेख अन अत्यंत समर्पक शिर्षक. बुद्धीबळातल्या निरनिराळ्या खेळाडुंची ओळख करुन देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन अन धन्यवाद. पुढील लेखाची वाट पहात आहे. :)

आर्य Tue, 05/20/2008 - 18:34
भारताने शोध लावलेल्या (चतुरंग) या खेळातील, भारतीय दिग्गजांची माहिती करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! ऐखाद्या प्यादाचा व़जीर कसा होतो, याचा प्रत्यय मीरला आयुष्यात आला असावा :H

स्वाती दिनेश Tue, 05/20/2008 - 12:28
रानावनात गुराढोरांच्या मागे पळणार्‍या एखाद्या काटकुळ्या पोराने थोड्या सरावाने असामान्य गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकावी तसंच काहीसं! आवडले. शीर्षकही समर्पक आहे. त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले... बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही... (असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......) मास्तरांशी सहमत, स्वाती

मन Tue, 05/20/2008 - 12:40
मिळाली. ह्या खेळाडुबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय. मस्त लेख आहे. आपलाच, मनोबा

प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2008 - 13:09
सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुमीत Tue, 05/20/2008 - 14:29
परत एकदा तुम्ही फक्त बुद्धीबळाच्या महान खेळाडूची ओळखच नव्हे तर त्याच्या खेळातली महानतेची ओळख करून दिलीत.

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 15:55
रंगा, बुद्धीबळ आणि बुधिबळाच्या खेळाडूविषयीचे तुझे लेख पाहून कौतुक वाटते. माझाही हा अत्यंत आवडता खेळ आहे, परंतु मी बर्‍याचदा हारतो! :( आपल्याला बॉ जमतच नाही त्यातल्या काही चालींना उत्तर देणे, परंतु हा खेळ खेळायला खूप मौज वाटते. बुद्धिबळविषयक लेखन अजूनही येऊ दे... बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :) आपला, (कास्पारावप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 16:18
_बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :)) :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 20:34
बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? कारण त्याने हा डाव चाल-बाय-चाल पाहिला आणि त्याचा आटाच सटकला.... असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे.:)

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:06
असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे. धत तेरीकी! अरे चालल्या असत्या दोन-चार शिव्या! मिसळपाववर सोवळं-ओवळं हा प्रकार नाही! :) असो... अवांतर - बर्‍याचदा सोवळ्याच्या आडच अनेक गोष्टी चालतात. त्यापेक्षा ओवळं राहिलेलं बरं! :)) आपला, (ओवळा) तात्या.

अन्या दातार Wed, 05/21/2008 - 01:55
अप्रतिम लेख. एका दुर्दैवी खेळाडूची चांगली ओळख करुन दिल्याबद्दल चतुरंग यांचे आभार.

धनंजय Wed, 05/21/2008 - 08:27
वजिराची कुचंबणा बघितली. पण खालच्या संवादातला एक प्रतिसाद वाचून गंमत वाटली: "आखेलीन म्हणाले की सुलतान खान यांना जर सुरुवाती माहीत असत्या तर ते विश्वविजेते झाले असते. (आखेलीन आणि कापाब्लांका कडून स्तुती) ही दोन विश्वविजेत्यांकडून उच्च प्रशंसा होय. सुरुवाती माहीत नसणार्‍यासाठी त्यांचा खेळ फार चांगला होता. सुलतान खान आणि मी, दोघांमध्ये खूप साम्य आहे. दोघांपैकी कोणालाच सुरुवाती येत नाहीत. दुर्दैवाने साम्य तिथे संपते ;)" दुर्दैवाने, माझेही तेच आहे. कोणीतरी प्रेमाने आणि दयाळूपणे मला सुरुवाती समजावून सांगितल्यात तर मोठे उपकार होतील. १२व्या खेळीत मोठीच घटना झाली तितके मलाही समजले. "सी" कॉलम पूर्ण मोकळा झाला. पण याचा फायदा काळ्याला होणार की पांढर्‍याला ते कळण्याइतके माझे बुद्धीचे बळ नाही. (पांढर्‍याने सापळा लावून "सी" कॉलम उघडला, म्हणजे पांढर्‍याला फायदा होण्यासाठीच... पण तो कसा?) असो. चतुरंग यांनी मस्त लेख लिहिला आहे. या विलक्षण खेळाडूची ओळख झाली. चतुरंग यांनी थोडेसे बाळबोध रसग्रहणही शिकवावे. उदाहरणार्थ Queens Indian Defence हा थोडा समजावून सांगितला तर मजा येईल. उदाहरणार्थ सहाव्या खेळीत पांढर्‍याने ए३ (डाव्या हत्तीचे प्यादे) पुढे केले नसते तर काय झाले असते? हे काळ्या उंटाचा मार्ग रोखण्यासाठी आहे का? हेच का? दुसरे काही का नाही? सी कॉलम मोकळा करण्यासाठी सापळा कधी आणि कसा लागला? काळा वजीर उजवीकडे (एच, जी, कॉलममध्ये) हेलपाटे घालत होता, ते एफ-जी-एच कॉलममधील प्याद्यांना धाक द्यायला का? त्यामुळे पराभव थोडा तरी लांबला का? अशा प्रश्नांनी बेजार होऊन मी बुद्धिबळाचा नाद पूर्णपणे सोडला आहे. (शिवाय नेहमी हरायचो, ही वेगळी गोष्ट.)

वाचक Wed, 05/21/2008 - 08:32
मलाही 'बुद्धिबळात' अर्थात प्रचंड गती आहे असे नव्हे पण मलाही अगदी असेच वाटले कि काळा वजिर पटाच्या उजवीकडे नुस्ताच 'मागे पुढे' करत होता. निदान ते प्यादे तरी खाल्ले असते तर थोडा मार्ग तरी मोकळा झाला असता.

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:38
रंगा, इथे माझ्यासकट अन्य सभासदांनाही या खेळात बराच रस दिसतो आहे. तू लेका लिहीच एखादी लेखमालिका जी साध्या सोप्या रितीने बुद्धीबळाची ओपनींग्ज समजावून सांगेल. माझ्यासारखे अनेकजण ओपनिंग्ज मध्येच मार खातात त्यामुळे पुढची हार जवळजवळ निश्चित होते! :) आपला, (फ्रेंच डिफेन्स प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Wed, 05/21/2008 - 08:52
आत्ताच मी आलेले प्रतिसाद बघत होतो आणि त्या अनुषंगानेच विचार सुरु होता. बुद्धिबळ ओपनिंग्ज हा एक फार मोठा विषय आहे पण मी त्यातली काही प्राथमिक घेऊन काय लिहिता येईल ते बघतो. अभ्यासाला थोडा वेळ लागेल पण जरुर काहीतरी चांगले देऊ शकेन असे वाटते. प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! :) चतुरंग

केशवसुमार Wed, 05/21/2008 - 09:53
रंगाशेठ, मस्त लेख.. बुद्धीबळ!! आमचा एकदम आवडता खेळ.. रात्ररात्र (|: डाव लावून बसायचे.. :W ~X( खूप वर्षांपुर्वी काही कारणाने आम्हाला ह्या आमच्या आवडत्या खेळाला रामराम ठोकावा लागला.. :& या लेखाने त्या सगळ्या जून्या आठवणी ताज्या केल्या.. :B (एके काळचा वजीर्)केशवसुमार स्वगतः कोण रे तो मोठ्याने हसला आम्ही बुद्धीबळ खेळायचे म्हणल्यावर.. X(
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही. लौकिकार्थानं अक्षरशत्रू असलेला मीर सुलतान खान बुद्धिबळातल्या भल्याभल्यांना अक्षरशः शत्रू वाटला असला तर नवल नाही! हिंदुस्थानात जे काही महान बुद्धिबळपटू होऊन गेले त्यात सुलतान खानचा क्रमांक आपल्याला बराच वर लावावा लागेल. सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या मिठ्ठा प्रांतात १९०५ साली जन्मलेला, 'मीर सुलतान खान' असं एखाद्या नबाबाप्रमाणे भारदस्त नाव असलेला, हा महान बुद्धिबळपटू प्रत्यक्षात 'नबाब मलिक उमर हयात खान' ह्या पंजाब प्रांतातल्या एका सरंजामशहाच्या पदरी एक यकःश्चित गुलाम होता!

संडे स्पेशल (सांज्याच्या पोळ्या)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 18:26
प्रथम सांदणं आता सांज्याच्या पोळ्या! अहो स्वातीताई, का असा अन्याय करता आहात? एवढ्या सुंदर पाकृ चाखायला न मिळता नुसत्या वाचायलाच मिळताहेत हा अन्यायच नव्हे का? :) आपला, (सांदणं, सांज्याच्या पोळ्या ही नुसती नावं वाचूनच बेचैन झालेला!) तात्या.

स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 18:27
सांज्याची पोळी माझी आवडती.खूप दिवसात केल्या नाहीत.आता तुझी पाकृ वाचून करायचा मूड आला आहे,आता करते लवकरच. (मी रवा साजूक तूपावर भाजते,आता तुझ्या कृतीप्रमाणे रिफाइंड तेलावर भाजून पाहते.) मला गुळाचा शिरा पण भारी आवडतो,त्यामुळे पोळ्यांसाठी मी जरा जास्तच शिरा करते,नुसता खायला,:)

In reply to by स्वाती दिनेश

स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 18:31
रवा तुपावर/डालड्यात भाजलास तर थंड झाल्यावर तूप/डालडा थिजून सांजा खूप घट्ट होतो व पोळी नीट लाटली न जाता काठ राहतात.

वरदा Mon, 05/19/2008 - 21:39
साजुक तुपावर भाजला रवा मग शिरा घट्टं झाल्यावर किंचित दुध घातलं आणि केल्या पोळ्या ;) आता हे नक्की करेन... काय मस्त दिल्यायस दोन्ही पा. क्रु. अवांतरः खव्याच्या, खजुराच्या पोळ्याही छान लागतात नाही? मी १-२ वेळाच केल्या होत्या...त्याचही प्रमाण टाक ना तुला वेळ झाला की....

बेसनलाडू Tue, 05/20/2008 - 09:11
पुण्याला काकांकडे, आदल्या दिवशी केलेला गोडाचा शिरा संपला नाही की नंतरच्या दिवशी त्याच्या सांजोर्‍या होत. सांज्याच्या पोळ्या = सांजोर्‍या(? चूभूद्याघ्या). मग आम्ही भावंडं आंब्याचं लोणचं नि सांजोर्‍या अशा बेतावर तुटून पडत असू, याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

शितल Tue, 05/20/2008 - 19:17
मला ही सा॑ज्याच्या पोळ्या आवडतात माझी मावशी त्या करायची आणि आम्हाला पाठवायची, पण खव्याच्या पोळ्या मला प्रच॑ड आवडात पण खाल्या आहेत नुसत्या घरी केल्या नाहीत , तुला जर त्याची पाककृती माहित असेल सा॑ग.

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 18:26
प्रथम सांदणं आता सांज्याच्या पोळ्या! अहो स्वातीताई, का असा अन्याय करता आहात? एवढ्या सुंदर पाकृ चाखायला न मिळता नुसत्या वाचायलाच मिळताहेत हा अन्यायच नव्हे का? :) आपला, (सांदणं, सांज्याच्या पोळ्या ही नुसती नावं वाचूनच बेचैन झालेला!) तात्या.

स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 18:27
सांज्याची पोळी माझी आवडती.खूप दिवसात केल्या नाहीत.आता तुझी पाकृ वाचून करायचा मूड आला आहे,आता करते लवकरच. (मी रवा साजूक तूपावर भाजते,आता तुझ्या कृतीप्रमाणे रिफाइंड तेलावर भाजून पाहते.) मला गुळाचा शिरा पण भारी आवडतो,त्यामुळे पोळ्यांसाठी मी जरा जास्तच शिरा करते,नुसता खायला,:)

In reply to by स्वाती दिनेश

स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 18:31
रवा तुपावर/डालड्यात भाजलास तर थंड झाल्यावर तूप/डालडा थिजून सांजा खूप घट्ट होतो व पोळी नीट लाटली न जाता काठ राहतात.

वरदा Mon, 05/19/2008 - 21:39
साजुक तुपावर भाजला रवा मग शिरा घट्टं झाल्यावर किंचित दुध घातलं आणि केल्या पोळ्या ;) आता हे नक्की करेन... काय मस्त दिल्यायस दोन्ही पा. क्रु. अवांतरः खव्याच्या, खजुराच्या पोळ्याही छान लागतात नाही? मी १-२ वेळाच केल्या होत्या...त्याचही प्रमाण टाक ना तुला वेळ झाला की....

बेसनलाडू Tue, 05/20/2008 - 09:11
पुण्याला काकांकडे, आदल्या दिवशी केलेला गोडाचा शिरा संपला नाही की नंतरच्या दिवशी त्याच्या सांजोर्‍या होत. सांज्याच्या पोळ्या = सांजोर्‍या(? चूभूद्याघ्या). मग आम्ही भावंडं आंब्याचं लोणचं नि सांजोर्‍या अशा बेतावर तुटून पडत असू, याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

शितल Tue, 05/20/2008 - 19:17
मला ही सा॑ज्याच्या पोळ्या आवडतात माझी मावशी त्या करायची आणि आम्हाला पाठवायची, पण खव्याच्या पोळ्या मला प्रच॑ड आवडात पण खाल्या आहेत नुसत्या घरी केल्या नाहीत , तुला जर त्याची पाककृती माहित असेल सा॑ग.
या दोन प्रकारे करता येतात. गुळाच्या किंवा साखरेच्या. पण सर्वसाधारणपणे सांज्याच्या म्हटल्यावर गुळाच्याच केल्या जातात. साहित्यः १ वाटी जाड रवा दिड वाटी गुळ २ वाट्या पाणी १/२ च. जायफळ पूड १/२ च. वेलदोडा पूड १/२ वाटी रिफाडंड तेल पाव च.मीठ २ वाट्या कणिक १/२वाटी मैदा पाव वाटी तेल तांदळाची पिठी १.जाड रवा रिफाइंड तेलात खमंग भाजून घ्यावा. २.दोन वाट्यापाणी+२ वाट्या गुळ एकत्र उकळत ठेवावे. गुळ विरघळला कि त्यात रवा घालून हलवावे व वाफ आणावी. चांगली वाफ येऊन रवा शिजला कि त्यात वेलदोडा -जायफळ पूड घालावी.

आता काय करायच॑ ?

पिस्तुल्या ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आता काय करयच॑ ? आता काय करायच॑? तिला भेटायला जायच॑ पण तिन॑ नाही म्हणायच॑, तिन॑ दुसय्रा बरोबर फिरयच॑ मग आपण कशाला मरायच॑ आता काय करायच॑? तिने कालेजला जायच॑ पहिल्या बे॑चवर बसायच॑ आपण शुक शुक करायच॑ पण तिन॑ नाही बघायच॑ आता काय करायच॑? तिला हॉटेलमध्ये न्यायच॑ तिच॑ दिल जि॑कण्यासाठी तिच॑ बिल भरायच॑ तिन॑ खोट॑ thanks म्हणायच॑ आता काय करायच॑? तिला लव्हर शिप मागायची तिन॑ मात्र राखी बा॑धायची याला काय म्हणायच॑ नशीब बेकार म्हणायच॑ आता काय करायच॑? आता दुसरीला शोधायच॑

संडे स्पेशल ( आंब्याचे सांदणे)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 18:20
बाई गं मिपाच्या अन्नपूर्णे, वा! आंब्याच्या सांदणाची पाकृ! मिपाचे रसोईघर आज तृप्त झाले, धन्य झाले! :) आंब्याच्या सांदणाबद्दल मी काय लिहू? माझ्या मते ही अत्यंत शुभ, अत्यंत मंगलदायी अशी पाकृ आहे! आम्ही कोकणात बहुत करून बरक्या फणसाची सांदणं करतो, तीही फारच सुरेख लागतात! असो, सांदणं आंब्याची असोत वा बरक्या फणसाची असोत, माझ्या मते 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते....' या यादीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यात सांदणांचा क्रमांक निश्चितच खूप वरचा लागतो! तात्या.

स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 18:24
आंब्याची,फणसाची दोन्ही सांदणे मला फार आवडतात.. डब्यातल्या आंब्या,फणसाची सांदणे करायचे डोक्यातच आले नाही (तशी कधी गरज पडत नाही तिथे हे ही तितकेच खरे,:)) पण आता करून पाहिन ,:)

स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 18:27
धन्यवाद!!! काल गेट टुगेदर होते,त्यात मी केले होते, सगळ्यांना खूप आवडले... एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली......:)

In reply to by स्वाती राजेश

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 18:31
एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली...... वा वा! आमच्या कोकणची पाकृ गोर्‍या सायबिणीपर्यंत पोहोचली म्हणायची! :) धन्यवाद स्वातीताई! झंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा...! :) आपला, (आनंदीत!) तात्या.

यशोधरा Mon, 05/19/2008 - 18:31
सांदणं...... आई गं...... अश्या सुंदर पाककृती टाकायच्या आणि मग मी बसते इथे =P~ आणि :( का बरं असा छळवाद??? का? का?? का??? ~X(

राजे Mon, 05/19/2008 - 18:38
निषेध !!!! पाक-क्रिया लिहणा-या सर्व मिपा सदस्यांचा निषेध !!!! अहो असले काहीतरी लिहता व आमच्या जिवाची तळमळ होते... तुम्हाला काय माहीत आहे बहादुरच्या हातचे तेच तेच खाणे खाऊ विटलो आहे... जरा बाहेर हॉटेलमध्ये खावे तर दिल्ली मध्ये सगळ्याच पदार्थामध्ये पनीर असे भरलेले असते की असे वाटते हॉटेलला आग लावावी ! मस्त रेसेपी आहे ... पण चहा पावडर व साखर (चव बधून) ह्या अतीरिक्त मला स्वयंपाक घरातील काही कळत नाही ह्याचे आज खुप दुखः वाटत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा Mon, 05/19/2008 - 21:34
माझ्याकडे एक टीन उरलाय आमरसाचा करेन हे नक्की..मी आज्जीकडून ऐकायची नेहेमी पण कधी खाऊन नाही पाहिली कशी लागतात...

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 18:20
बाई गं मिपाच्या अन्नपूर्णे, वा! आंब्याच्या सांदणाची पाकृ! मिपाचे रसोईघर आज तृप्त झाले, धन्य झाले! :) आंब्याच्या सांदणाबद्दल मी काय लिहू? माझ्या मते ही अत्यंत शुभ, अत्यंत मंगलदायी अशी पाकृ आहे! आम्ही कोकणात बहुत करून बरक्या फणसाची सांदणं करतो, तीही फारच सुरेख लागतात! असो, सांदणं आंब्याची असोत वा बरक्या फणसाची असोत, माझ्या मते 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते....' या यादीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यात सांदणांचा क्रमांक निश्चितच खूप वरचा लागतो! तात्या.

स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 18:24
आंब्याची,फणसाची दोन्ही सांदणे मला फार आवडतात.. डब्यातल्या आंब्या,फणसाची सांदणे करायचे डोक्यातच आले नाही (तशी कधी गरज पडत नाही तिथे हे ही तितकेच खरे,:)) पण आता करून पाहिन ,:)

स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 18:27
धन्यवाद!!! काल गेट टुगेदर होते,त्यात मी केले होते, सगळ्यांना खूप आवडले... एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली......:)

In reply to by स्वाती राजेश

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 18:31
एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली...... वा वा! आमच्या कोकणची पाकृ गोर्‍या सायबिणीपर्यंत पोहोचली म्हणायची! :) धन्यवाद स्वातीताई! झंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा...! :) आपला, (आनंदीत!) तात्या.

यशोधरा Mon, 05/19/2008 - 18:31
सांदणं...... आई गं...... अश्या सुंदर पाककृती टाकायच्या आणि मग मी बसते इथे =P~ आणि :( का बरं असा छळवाद??? का? का?? का??? ~X(

राजे Mon, 05/19/2008 - 18:38
निषेध !!!! पाक-क्रिया लिहणा-या सर्व मिपा सदस्यांचा निषेध !!!! अहो असले काहीतरी लिहता व आमच्या जिवाची तळमळ होते... तुम्हाला काय माहीत आहे बहादुरच्या हातचे तेच तेच खाणे खाऊ विटलो आहे... जरा बाहेर हॉटेलमध्ये खावे तर दिल्ली मध्ये सगळ्याच पदार्थामध्ये पनीर असे भरलेले असते की असे वाटते हॉटेलला आग लावावी ! मस्त रेसेपी आहे ... पण चहा पावडर व साखर (चव बधून) ह्या अतीरिक्त मला स्वयंपाक घरातील काही कळत नाही ह्याचे आज खुप दुखः वाटत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा Mon, 05/19/2008 - 21:34
माझ्याकडे एक टीन उरलाय आमरसाचा करेन हे नक्की..मी आज्जीकडून ऐकायची नेहेमी पण कधी खाऊन नाही पाहिली कशी लागतात...
हल्ली आंब्याच्या रसाचे डबे सहज उपलब्ध असतात. त्यामुळे हे पक्वान्न केव्हाही करता येते. आंब्याच्या रसाच्या रंगामुळे अतिशय सुरेख दिसते व चवही उत्तम लागते. फक्त वाफवून करायचे आहे, त्यामुळे तब्येतीस चांगले व पौष्टीकही आहेच! सीझन मधे आंबे मिळतात, तेव्हा त्यांचा ताजा, हापूस आंब्याचा रस वापरला तरी चालतो. साहित्यः २ वाट्या तांदळाचा रवा किंवा साधा रवा २ वाट्या साखर २ वाट्या हापूस आंब्याचा रस १/२ वाटी दूध जरूरी नुसार २ टी.स्पून लोणी ताटाला लावण्यास साजूक तूप १.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा.

विजय तेंडुलकर लेखन कार्यशाळा...

भडकमकर मास्तर ·

मास्तर, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर मराठी नाटकाचा झंजावात. त्यांचा स्वभाव आणि नाटके सतत चर्चेत राहणारी अशीच होती. ऐंशी संहितेमधून आपल्या संहितेची निवड होऊन आपणास नाट्य लेखन कार्यशाळेत त्यांचे मार्गदर्शन घेता आले आपण भाग्यवान आहात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शितल Mon, 05/19/2008 - 17:51
तुमचे नशिब मोठे तुम्हाला ते॑डु॑लकरा॑चे मार्गदर्शन लाभले, आणि स॑देश कुलकर्णी हे देखिल माझे आवडते व्यक्तीमत्व आहे. तेडु॑लकरा॑ना माझी विनम्र आदरा॑जली.

कलंत्री Mon, 05/19/2008 - 19:32
तुम्हाला योग्य ते दिशा आणि विचार मिळालाले आहेत. या विचारावरच पूढील कार्य चालु ठेवा. नाहीतर अश्या मान्यवरांच्या मृत्युनंतर आपण परत विसरतो. अश्या कार्यशाला भरविणे हीच खरी श्रद्धाजंली असेल.

चतुरंग Mon, 05/19/2008 - 19:38
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! चतुरंग

In reply to by चतुरंग

स्वाती दिनेश Tue, 05/20/2008 - 12:36
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! असेच म्हणते,चतुरंगसारखेच. स्वाती

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 01:03
त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?" त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा.. मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्‍याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. .... नाटक कुठेही घडू शकते. एका मध्य प्रदेशातील नक्षलवादी दुर्गम भागात मी हिन्दी घाशीरामचा प्रयोग पाहिला आहे. पण दोनच कलाकारांचा... फार छान होता तो प्रयोग... दोघे उत्तम गायक होते आणि अभिनेते... नाटकातला त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय सत्तास्पर्धेचा आशय ते उत्तम मांडत होते. यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे" ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विकास Tue, 05/20/2008 - 08:31
तेंडुलकरांबरोबर काम करायला मिळाले हे भाग्य आहे. खालील माझा प्रतिसाद टिकात्मक असला तरी मला देखील त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले असते तर आवडले असते. गेल्या पिढीतील अनेक बुद्धीवादी लेखकांपैकी तेंडूलकर होते. त्यांच्यातील बुद्धीवंताला आदरांजली वाहत असतानाच त्यांच्याच पद्धतीने थोडेसे लिहावेसे वाटले...मला कल्पना आहे की कदाचीत मला जे काही वाटते ते अनेकांना पटणार नाही, पण त्यांच्याच, म्हणजे तेंडुलकरांप्रमाणे जे वाटते ते स्पष्टपणे लिहून ही अनोखी पण मनापासून आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. असे म्हणायचे कारण इतकेच की पु ल आणि कुसुमाग्रजांसारख्यांना (त्यांच्या मृत्यूनंतरही) तेंडूलकरांनी बुद्धीवाद म्हणून टिका करत नावे ठेवल्याचे आठवते...एकीकडे श्री पु भागवतांना मनोहर जोशींकडून पुरस्कार घेऊ नये म्हणून जाहीर दबाव आणणारे तेंडूलकर नंतर त्याच जोशीबुवांबरोबर न्युयॉर्कला एकाच व्यासपिठावर बसल्याचे आठवते... त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. जर वरील विधान हे तेंडूलकरांनी केले असले तर सखेद आश्चर्य वाटले...विचार करा तेंडुलकरांचे इतर बाबतीत विचार काय असावेत याचा : जर असेच विधान हे हिंदू पुढार्‍याने अन्याय झाला म्हणून मुसलमानांविरुद्ध नाटके करायला केले, अथवा आता राज ठाकरे अथवा कधिही शिवसेना जे काही परप्रांतिंयांविरुद्ध त्यांच्याकडून होणार्‍या कथीत अन्यायाविरुद्ध वाचा फोडून "राडा" करते त्यात आणि तेंडूलकरांच्या विचारात काय फरक? मग एकाचे चांगले आणि दुसर्‍यांचे अतिरेकी का म्हणायचे? मला थोडक्यात इतकेच म्हणायचे आहे की स्वतःच्या बुद्धीचा वापर जर समाजात कुठल्याही पद्धतीचा द्वेष तयार करायला अथवा "पेटवायला" करण्यात येत असला तर त्याचे कौतुक का करायचे? हिंसा ही हिंसा असतेच - आणि ती कधी कधी तलवारी पेक्षा लेखणीने अधीक होऊ शकते. कधी दंगलीच्या रुपात तर कधी समाजात अंतर्गत द्वेष निर्माण करून... कदाचीत असे करताना तेंडुलकरांनी पोटतिडकीने केले असेल - होणारे अन्याय पाहून... पण तेच इतरांचे झालेले असू शकते. म्हणून कुठेतरी असे राहून राहून वाटते की विचारी आणि बुद्धीवादी असून आणि उत्कृष्ठ साहीत्यनिर्मिती करत असताना देखील हे समाजाला वैचारीक दिशा देण्याच्या संदर्भात कुठेतरी वाट चुकलेले व्यक्तिमत्व होते.

In reply to by विकास

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 09:21
त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही... त्यांचा कोणत्या आतिरेकी, नक्षलवादी विचारांना कितपत पाठिंबा होता की नव्हता मला ठाउक नाही...तिथे तर ( आणि मी लिहिले आहे त्यातही ) सन्दर्भ फक्त नाटक कोठेही होऊ शकते एवढाच असावा.... बाकी चालूद्यात.... _ _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही...
असा अर्थ विकासरावांच्या लिखाणातुन ही कोठेहि ध्वनित होत नाही. त्यांची आंदरांजली मात्र अगदी "तेंडुलकरी" वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by विकास

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 09:32
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! नाटककार म्हणून एक भूमिका असणे निराळे आणि विचारवंत म्हणून तीच भूमिका निभावणे निराळे!!!! विचारवंत म्हणून तेंडुलकर अपुरे पडले हे निश्चित!!!!! कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विकास Tue, 05/20/2008 - 16:24
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! १००% मान्य आणि मला त्यांची नाटके आवडतात. उगाच त्यांच्या नाटकांबद्दल (विशेष करून घाशिराम) जो काही गोंधळ घातला गेला तो मला कधी आवडला / आवडत नाही. टिका करणे वेगळे आणि विचार करायलाच विरोध करणे वेगळे. पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! इतकेच कुठेतरी वाटते. मी स्वतः कधी स्वतःला समाजवादी समजत नसलो, तरी पुर्वी सारख्या समाजवाद्यांची (विशेष करून मराठी) गरज आजही आहे असे वाटते. कुठलाच समाज एकेरी नसावा, जर तो चांगला प्रौढत्वाला (मॅचूअर) होणे गरजेचे वाटत असेल तर. त्यात आपल्याकडील समाजवाद्यांचे योगदान चांगले आहे. कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!! माझा देखील "टिका" करणे हा उद्देश नव्हता. पण जेंव्हा एखादे व्यक्तिमत्व हे विशाल असते तेंव्हा त्याला "मी श्रद्धांजली" वाहतो इतकेच अशा चर्च्रेत म्हणायच्या ऐवजी कुठेतरी थोडे त्या व्यक्तीचे आणि ती व्यक्ती ज्या विचारांचे प्रतिनिधित्व कदाचीत तिच्या कळतनकळत करते त्या विचारांचे थोडेसे विश्लेषण करावेसे वाटले.

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 09:56
इथे सर्व जण तेंडुलकरांवरती आरोप करणार आणि मग त्यांना मास्तर उत्तरे देणार असा विषय नाहीये , याची इथल्या सूज्ञांना कल्पना असणार याची मला खात्री आहे.... :) (खुद्द माझ्या घरीही "तुमचे ते तेंडुलकर ..... " आणि मग हेच वरचे सर्व ऐकायची मला सवय आहे....) मी छोटा माणूस त्याला काय उत्तरे देणार ? त्यांच्याकडून चार दिवस नाटक शिकलो , मला आनंद आहे.... ( पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आणि नाटकातील सर्व विचारांचा मी सपोर्टर आहे असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, आणि इथे तो विषयही नाही.... मला न आवडणारे तेंडुलकर असा विषय ज्याने त्याने काढून आपापली मते त्यात जरूर लिहावीत... प्रत्येकाला तो अधिकार आहेच... ) इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 10:12
इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... खरं आहे आपलं म्हणणं! अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास Tue, 05/20/2008 - 18:38
>>>कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! +१. आपला हा लेख आणि अनुभव मला देखील नक्कीच आवडला आणि त्यात रसभंग व्हावा अशी माझी देखील इच्छा नव्हती/नाही. पण जेंव्हा मुक्त व्यासपिठावर एखादा विषय चर्चेला येतो तेंव्हा त्यात वाचताना जे सुचले ते पटकन लिहीले गेले. आपल्याला जर त्यात व्यक्तिगत टिका वाटली असल्यास क्षमस्व. आणि हो, तेंडुलकरांना मी फक्त "तुमचे" मानत नाही. कुठलेही असामान्य व्यक्तिमत्व हे त्या समाजातील सर्वांचे असते आणि म्हणून त्यांच्यातील आवडणार्‍या आणि नावडणार्‍या गुणावगुणांसहीत ते "आमचे" ही आहेत आणि त्यात आनंद आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 10:50
मास्तर, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय!! तुमची काही चूक नाही हो!! असलीच तर "विजय तेंडुलकर" या महान विषयाला हात घालण्याचीच आहे!!:)) तो माणूसच इतका महान होता की त्याच्या साहित्यिक आणि विचारवंती कामगिरीविषयक निरनिराळी मतं असणारच!! तेंडुलकर नाटककार म्हणून महान होते यात काहीच संशय नाही हो!!! महान व्यक्तीच्याच कार्याचे मूल्यमापन होते!! भडक मकरांच्या कार्यांचे कोणी मूल्यमापन करील काय? (ह. घ्या.!!!) आमचे म्हणणे इतकेच की त्यांची नाटककार म्हणून भूमिका आणि त्यांची विचारवंत म्हणून भूमिका (विशेषतः मोदींविषयी!!!!!!) यांचा मेळ लागत नाही!!! कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!! आमचे काही चुकले काय? असेल तर स्पष्ट करा........ आम्हाला आपल्या संतांचे एक वचन आठवते... "देव्हार्‍यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम" आता आपले संत खरे की तेंडुलकर मोठे!!!! स्पष्टोक्तीबद्द्ल क्षमा असावी!! तुम्ही नाही म्हटलंत तरी "आपलाच", पिवळा डांबिस

कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!!
गोची होते खरी! काय करणार? http://sadhanatrust.com/pdf/SW20080510.pdf या ठिकाणी पान नं २९ वर राहुल रेवले यांचा 'समाजवाद्यांनी केलेली सर्वात मोठी चुक ' हा लेख . यावर साधनाच्या संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. वाचनीय आहे. प्रकाश घाटपांडे

मास्तर, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर मराठी नाटकाचा झंजावात. त्यांचा स्वभाव आणि नाटके सतत चर्चेत राहणारी अशीच होती. ऐंशी संहितेमधून आपल्या संहितेची निवड होऊन आपणास नाट्य लेखन कार्यशाळेत त्यांचे मार्गदर्शन घेता आले आपण भाग्यवान आहात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शितल Mon, 05/19/2008 - 17:51
तुमचे नशिब मोठे तुम्हाला ते॑डु॑लकरा॑चे मार्गदर्शन लाभले, आणि स॑देश कुलकर्णी हे देखिल माझे आवडते व्यक्तीमत्व आहे. तेडु॑लकरा॑ना माझी विनम्र आदरा॑जली.

कलंत्री Mon, 05/19/2008 - 19:32
तुम्हाला योग्य ते दिशा आणि विचार मिळालाले आहेत. या विचारावरच पूढील कार्य चालु ठेवा. नाहीतर अश्या मान्यवरांच्या मृत्युनंतर आपण परत विसरतो. अश्या कार्यशाला भरविणे हीच खरी श्रद्धाजंली असेल.

चतुरंग Mon, 05/19/2008 - 19:38
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! चतुरंग

In reply to by चतुरंग

स्वाती दिनेश Tue, 05/20/2008 - 12:36
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! असेच म्हणते,चतुरंगसारखेच. स्वाती

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 01:03
त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?" त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा.. मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्‍याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. .... नाटक कुठेही घडू शकते. एका मध्य प्रदेशातील नक्षलवादी दुर्गम भागात मी हिन्दी घाशीरामचा प्रयोग पाहिला आहे. पण दोनच कलाकारांचा... फार छान होता तो प्रयोग... दोघे उत्तम गायक होते आणि अभिनेते... नाटकातला त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय सत्तास्पर्धेचा आशय ते उत्तम मांडत होते. यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे" ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विकास Tue, 05/20/2008 - 08:31
तेंडुलकरांबरोबर काम करायला मिळाले हे भाग्य आहे. खालील माझा प्रतिसाद टिकात्मक असला तरी मला देखील त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले असते तर आवडले असते. गेल्या पिढीतील अनेक बुद्धीवादी लेखकांपैकी तेंडूलकर होते. त्यांच्यातील बुद्धीवंताला आदरांजली वाहत असतानाच त्यांच्याच पद्धतीने थोडेसे लिहावेसे वाटले...मला कल्पना आहे की कदाचीत मला जे काही वाटते ते अनेकांना पटणार नाही, पण त्यांच्याच, म्हणजे तेंडुलकरांप्रमाणे जे वाटते ते स्पष्टपणे लिहून ही अनोखी पण मनापासून आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. असे म्हणायचे कारण इतकेच की पु ल आणि कुसुमाग्रजांसारख्यांना (त्यांच्या मृत्यूनंतरही) तेंडूलकरांनी बुद्धीवाद म्हणून टिका करत नावे ठेवल्याचे आठवते...एकीकडे श्री पु भागवतांना मनोहर जोशींकडून पुरस्कार घेऊ नये म्हणून जाहीर दबाव आणणारे तेंडूलकर नंतर त्याच जोशीबुवांबरोबर न्युयॉर्कला एकाच व्यासपिठावर बसल्याचे आठवते... त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. जर वरील विधान हे तेंडूलकरांनी केले असले तर सखेद आश्चर्य वाटले...विचार करा तेंडुलकरांचे इतर बाबतीत विचार काय असावेत याचा : जर असेच विधान हे हिंदू पुढार्‍याने अन्याय झाला म्हणून मुसलमानांविरुद्ध नाटके करायला केले, अथवा आता राज ठाकरे अथवा कधिही शिवसेना जे काही परप्रांतिंयांविरुद्ध त्यांच्याकडून होणार्‍या कथीत अन्यायाविरुद्ध वाचा फोडून "राडा" करते त्यात आणि तेंडूलकरांच्या विचारात काय फरक? मग एकाचे चांगले आणि दुसर्‍यांचे अतिरेकी का म्हणायचे? मला थोडक्यात इतकेच म्हणायचे आहे की स्वतःच्या बुद्धीचा वापर जर समाजात कुठल्याही पद्धतीचा द्वेष तयार करायला अथवा "पेटवायला" करण्यात येत असला तर त्याचे कौतुक का करायचे? हिंसा ही हिंसा असतेच - आणि ती कधी कधी तलवारी पेक्षा लेखणीने अधीक होऊ शकते. कधी दंगलीच्या रुपात तर कधी समाजात अंतर्गत द्वेष निर्माण करून... कदाचीत असे करताना तेंडुलकरांनी पोटतिडकीने केले असेल - होणारे अन्याय पाहून... पण तेच इतरांचे झालेले असू शकते. म्हणून कुठेतरी असे राहून राहून वाटते की विचारी आणि बुद्धीवादी असून आणि उत्कृष्ठ साहीत्यनिर्मिती करत असताना देखील हे समाजाला वैचारीक दिशा देण्याच्या संदर्भात कुठेतरी वाट चुकलेले व्यक्तिमत्व होते.

In reply to by विकास

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 09:21
त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही... त्यांचा कोणत्या आतिरेकी, नक्षलवादी विचारांना कितपत पाठिंबा होता की नव्हता मला ठाउक नाही...तिथे तर ( आणि मी लिहिले आहे त्यातही ) सन्दर्भ फक्त नाटक कोठेही होऊ शकते एवढाच असावा.... बाकी चालूद्यात.... _ _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही...
असा अर्थ विकासरावांच्या लिखाणातुन ही कोठेहि ध्वनित होत नाही. त्यांची आंदरांजली मात्र अगदी "तेंडुलकरी" वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by विकास

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 09:32
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! नाटककार म्हणून एक भूमिका असणे निराळे आणि विचारवंत म्हणून तीच भूमिका निभावणे निराळे!!!! विचारवंत म्हणून तेंडुलकर अपुरे पडले हे निश्चित!!!!! कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विकास Tue, 05/20/2008 - 16:24
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! १००% मान्य आणि मला त्यांची नाटके आवडतात. उगाच त्यांच्या नाटकांबद्दल (विशेष करून घाशिराम) जो काही गोंधळ घातला गेला तो मला कधी आवडला / आवडत नाही. टिका करणे वेगळे आणि विचार करायलाच विरोध करणे वेगळे. पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! इतकेच कुठेतरी वाटते. मी स्वतः कधी स्वतःला समाजवादी समजत नसलो, तरी पुर्वी सारख्या समाजवाद्यांची (विशेष करून मराठी) गरज आजही आहे असे वाटते. कुठलाच समाज एकेरी नसावा, जर तो चांगला प्रौढत्वाला (मॅचूअर) होणे गरजेचे वाटत असेल तर. त्यात आपल्याकडील समाजवाद्यांचे योगदान चांगले आहे. कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!! माझा देखील "टिका" करणे हा उद्देश नव्हता. पण जेंव्हा एखादे व्यक्तिमत्व हे विशाल असते तेंव्हा त्याला "मी श्रद्धांजली" वाहतो इतकेच अशा चर्च्रेत म्हणायच्या ऐवजी कुठेतरी थोडे त्या व्यक्तीचे आणि ती व्यक्ती ज्या विचारांचे प्रतिनिधित्व कदाचीत तिच्या कळतनकळत करते त्या विचारांचे थोडेसे विश्लेषण करावेसे वाटले.

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 09:56
इथे सर्व जण तेंडुलकरांवरती आरोप करणार आणि मग त्यांना मास्तर उत्तरे देणार असा विषय नाहीये , याची इथल्या सूज्ञांना कल्पना असणार याची मला खात्री आहे.... :) (खुद्द माझ्या घरीही "तुमचे ते तेंडुलकर ..... " आणि मग हेच वरचे सर्व ऐकायची मला सवय आहे....) मी छोटा माणूस त्याला काय उत्तरे देणार ? त्यांच्याकडून चार दिवस नाटक शिकलो , मला आनंद आहे.... ( पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आणि नाटकातील सर्व विचारांचा मी सपोर्टर आहे असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, आणि इथे तो विषयही नाही.... मला न आवडणारे तेंडुलकर असा विषय ज्याने त्याने काढून आपापली मते त्यात जरूर लिहावीत... प्रत्येकाला तो अधिकार आहेच... ) इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 10:12
इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... खरं आहे आपलं म्हणणं! अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास Tue, 05/20/2008 - 18:38
>>>कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! +१. आपला हा लेख आणि अनुभव मला देखील नक्कीच आवडला आणि त्यात रसभंग व्हावा अशी माझी देखील इच्छा नव्हती/नाही. पण जेंव्हा मुक्त व्यासपिठावर एखादा विषय चर्चेला येतो तेंव्हा त्यात वाचताना जे सुचले ते पटकन लिहीले गेले. आपल्याला जर त्यात व्यक्तिगत टिका वाटली असल्यास क्षमस्व. आणि हो, तेंडुलकरांना मी फक्त "तुमचे" मानत नाही. कुठलेही असामान्य व्यक्तिमत्व हे त्या समाजातील सर्वांचे असते आणि म्हणून त्यांच्यातील आवडणार्‍या आणि नावडणार्‍या गुणावगुणांसहीत ते "आमचे" ही आहेत आणि त्यात आनंद आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 10:50
मास्तर, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय!! तुमची काही चूक नाही हो!! असलीच तर "विजय तेंडुलकर" या महान विषयाला हात घालण्याचीच आहे!!:)) तो माणूसच इतका महान होता की त्याच्या साहित्यिक आणि विचारवंती कामगिरीविषयक निरनिराळी मतं असणारच!! तेंडुलकर नाटककार म्हणून महान होते यात काहीच संशय नाही हो!!! महान व्यक्तीच्याच कार्याचे मूल्यमापन होते!! भडक मकरांच्या कार्यांचे कोणी मूल्यमापन करील काय? (ह. घ्या.!!!) आमचे म्हणणे इतकेच की त्यांची नाटककार म्हणून भूमिका आणि त्यांची विचारवंत म्हणून भूमिका (विशेषतः मोदींविषयी!!!!!!) यांचा मेळ लागत नाही!!! कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!! आमचे काही चुकले काय? असेल तर स्पष्ट करा........ आम्हाला आपल्या संतांचे एक वचन आठवते... "देव्हार्‍यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम" आता आपले संत खरे की तेंडुलकर मोठे!!!! स्पष्टोक्तीबद्द्ल क्षमा असावी!! तुम्ही नाही म्हटलंत तरी "आपलाच", पिवळा डांबिस

कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!!
गोची होते खरी! काय करणार? http://sadhanatrust.com/pdf/SW20080510.pdf या ठिकाणी पान नं २९ वर राहुल रेवले यांचा 'समाजवाद्यांनी केलेली सर्वात मोठी चुक ' हा लेख . यावर साधनाच्या संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. वाचनीय आहे. प्रकाश घाटपांडे
लेखनप्रकार
२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती... २० मे ते २४ मे २००६...

काही प्रश्न!!

केशवसुमार ·

मुक्तसुनीत Mon, 05/19/2008 - 16:34
बर्‍याचदा आपण कलाकार आणि तुमच्याआमच्यासारखा माणूस या गोष्टींमधे गल्लत करतो. कलाकार शेवटी माणूसच. जोवर तो लिहीतो, गातो, नृत्य करतो, अभिनय करतो तोवरच्या क्षणांमधे आपल्यापेक्षा वेगळा; इतकेच. बाकी तो/ती तुमच्या आमच्यासारखेच , कमी अधिक फरकाने. त्यांनाही गरजा आहेत , त्यांनाही विकार आहेत. शेवटी एक कलावंत म्हणून तो/ती आपल्याला काय सांगत आहेत, आपल्या नेहमीच्या जगातून त्यांनी निर्मिलेल्या सृष्टीत ते कितपत परिणामकारकरीत्या नेऊ शकतात ते महत्त्वाचे. त्यांच्या "रोजमर्रा की जिंदगी में" ते आपल्यापेक्षा फार वेगळे नाहीत.

In reply to by मुक्तसुनीत

केशवसुमार Mon, 05/19/2008 - 16:39
ते हे मान्य का करत नाहीत? तेही नाही आणि त्यांच्या भोवती आसलेले त्यांचे भाट ही नाही.. सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? केशवसुमार

In reply to by केशवसुमार

आनंदयात्री Mon, 05/19/2008 - 16:42
>>सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? सहमत.

हेरंब Mon, 05/19/2008 - 17:09
अशा व्यसनी कलाकारांना जवळच्या लोकांनी समज द्यायला पाहिजे. नाटकातले एक थोर कलाकार माझे मित्र आहेत. दारु हा संध्याकाळचा एक अविभाज्य घटक आहे असे त्यांचे मत आहे. तसेच ते जरी सरळमार्गी असले तरी इतर कलाकारांच्या भानगडींचे समर्थन करतात. हे मला पटत नाही असे मी त्यांना अनेकदा स्पष्ट सुनावले आहे.

आर्य Mon, 05/19/2008 - 18:05
काही कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ असतात हे खरे पण सगळी च मंडळी नसतात- ती आपल्या कला निर्मीतीत ईतकी गुंग असतात की भोवतालच्या जगाचे ज्ञानच ऊरत नाही. याची धुंदी कधी ऊतरुच नये अश्या वाटण्यातून सृजनाची नवी संधी न-शोधता त्याच निर्मीतीचा आनंदात बुडून जातात. कदाचीत हे त्याचे परीणाम ! या यशोधुंदीतुन बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय नव निर्मीती अशक्य आहे. (कलंदर) आर्य :D

स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 18:41
सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? वर त्याला कलंदरीचे गोंडस नाव ही देतात.. अगदी सहमत! हे स्वत:ला 'डिस्काउंट देणे'च झाले..

राजे Mon, 05/19/2008 - 18:43
शक्यतो... कलाकृती निर्माण झाल्यानंतर अथवा निर्माण करताना... जो आनंद / दुखः ते लोक अनुभवत असतील त्याचे निराकरण करण्यासाठी शक्यतो ते व्यसनाचा मार्ग पकडत असतील असे मला वाटते. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कुंदन Mon, 05/19/2008 - 18:49
व्यसनी लोकांना फक्त निमित्त हवे .... भले ते आनंद साजरा करण्यासाठी असो अथवा दुखः विसरण्यासाठी असो.

स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 19:14
यांना लहान वयात पैसा, प्रसिद्धी मिळालेली असते.. त्यामुळे त्यांच्यासमोर लक्ष्य (एम)असे काही नसते....आता पुढे काय करायला नसल्यामुळे ही मंडळी अशी व्यसनी होतात असे वाटते.

चतुरंग Mon, 05/19/2008 - 19:25
चंगीभंगीपणा, विक्षिप्तपणा हवाच किंवा असणारच हा एक फार मोठा गैरसमज बर्‍याचवेळा असतो - त्या कलाकार व्यक्तीचा आणि आजूबाजूच्या लोकांचा. त्या माणसाच्या कलेचा आणि ह्या इतर गोष्टींचा अन्योन्य संबंध लावून आपण त्या माणसाला माफ करुन टाकतो. किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींना ते लक्षात जरी आले तरी त्याची कानउघाडणी करण्याचे नैतिक धैर्य त्यांच्यात नसते कारण एकतर त्यांच्या म्हणण्याला कोणी किंमत देणार नाही ही भीती किंवा त्या कलाकाराला मिळणारे यश, पैसा, मानमरातब ह्यांने आलेले मिंधेपण. अनेक मोठे लोक ह्यातून सुटले नाहीत. (एक उदाहरणच घ्यायचे झाले तर - असामान्य गायकनट बालगंधर्व यांची अखेरच्या दिवसात झालेली अवस्था बघवत नसे असे लोक सांगतात. मराठी रंगभूमीवरचा हा चमत्कार तितक्याच विचित्र पद्धतीने अस्तंगत व्हावा हा मोठा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.) कलाकार म्हणून ते कितीही मोठे असले तरी व्यक्ती म्हणून, व्यवहाराचे भान असलेला एक माणूस म्हणून ते ह्या जागी कमीच पडले असे खेदाने म्हणावे लागते. ह्या मोठया लोकांना एकप्रकारे देवत्व बहाल करुन आपणच त्यांच्या कित्येक भल्या/बुर्‍या गोष्टी ह्या असामान्यत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची बातमी होते. कलाकारातला विवेक जागा असेल तर तो अशा भूलभुलैय्याला बळी न पडता त्यातला माणूस जागा ठेवून वाटचाल करु शकतो. कित्येकदा आयुष्यातले मोठे अपघात त्या व्यक्तीला जागेवर आणायला कारणीभूत ठरतात. कित्येकदा कशानेच त्यातला माणूस हा ह्या जगात येत नाही आणि त्यांची दुरवस्था होते. कोणत्याही कारणाने व्यसनाधीन होणे हा मनाचा कमकुवतपणाच म्हणायला हवा. ती पळवाट आहे. काही छोट्या कलाकारांना त्यांच्या भोवतालचे लोभी वर्तुळ स्वतःच्या लाभापायी सत्याची जाणीव करुन देत नाहीत. सर्वसामान्य रसिकाच्या मनात त्याच्या कलेविषयी आदरही असतो आणि व्यसनीपणा/विक्षिप्तपणाबद्दल दु:ख, वेदना, सलही असतो. फक्त ती वेदना व्यक्त करण्याचे धैर्य त्याच्यात नसते कारण त्यामुळे त्याच्यातल्या कलाकाराला आपण पारखे होऊ ही भीती असावी. तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात असे प्रसंग आले तर त्याला झाकोळून टाकणारे प्रसिध्दी, कला, ह्यांचे वलय आपल्याभोअवती नसते त्यामुळे आपण लगेच उघडे पडतो. समाजाच्या दबावापयी, काही नैतिक बंधनांपायी आपण स्वतःला जबाबदार्‍यांपासून सहजासहजी तोडून टाकू शकत नाही. कारण त्यामुळे होणार्‍या मानहानीला तोंड देण्यासाठी लागणारे सुरक्षा कवच आपल्याकडे नसते. (ज्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे त्यातलेही बरेच लोक असे वागताना आपण वाचतो/पाहतो/ऐकतो पण ह्याठिकाणी तो विषय नव्हे.)त्यामुळे कलाकारातला माणूस त्यातले गुण-दोष आणि आपल्यातला माणूस आपल्यातले तसेच गुण-दोष ह्यातला मुख्य फरक हा प्रसिध्दीच्या वलयामुळे आलेला असतो. हे वलय दूर व्हायचा अवकाश की ते धाडदिशी कोसळलेच म्हणून समजा. आपल्या पूर्वसूरींचे यशापयश, मानमरातब आणि मानहानी, उदंड कीर्ती आणि उध्वस्त करुन टाकणारी अपकीर्ती ह्यातून जे शिकतात ते कलाकार माणूस म्हणूनही मोठे ठरतात. आपण आधी माणूस आहोत, मग कलाकार आणि हे जग सोडून जातानाही माणूस म्हणूनच जाणार आहोत ह्याचे भान जे सोडत नाहीत त्यांच्या चरणी आपण लीन होतो. चतुरंग

केशवसुमार Tue, 05/20/2008 - 09:09
चर्चेत भाग घेतलेल्या आणि चर्चेत भाग न घेतलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 09:42
बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? हम्म! ह प्रश्न थोडा मोघम वाटतो. जसे बरेच कलाकार व्यसनी, विक्षिप्त व गचाळ असतात त्याचप्रमाणे अनेक कलाकार निर्व्यसनी, सुस्वभावी व स्वच्छही असतात! तेव्हा व्यक्ति तितक्या प्रकृती! आता केशवा, तुझंच उदाहरण घे. तू एक कलाकार आहेस, शिवाय निर्व्यसनी, सुस्वभावी आणि स्वच्छ व नीटनेटका आहेसच की! :) त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? हे विधानही मोघम आहे. अशीही अनेक माणसं आहेत की जी कलाकार नाहीत व त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान नसते, व असेही अनेक कलाकार आहेत की ज्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान असते! अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? माझ्या मते कलेचे कौतुक करावे! कुणी कसं वागावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. ते ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? तुम्ही कसं वागताय हे तो कलाकार बघायला येतो आहे का? त्याचा तुम्हाला जाब विचारतो आहे का? मग तो कलाकार त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा वागतो ह्यासंबंधी कॉमेन्टस पास करण्याचा किंवा मतप्रदर्शन करण्याचा तुम्हाला तरी काय अधिकार? तुमचा मतलब फक्त त्याच्या कलेशी! तिच्याबद्दल आवडली, आवडली नाही याबद्दलच फक्त तुम्ही बोलू शकता! आत आमचे रहिमतखासाहेब! रात्रंदिवस अफूच्या नशेत असायचे. परंतु त्यांच्या गायकीत जी जादू होती ती केवळ अवर्णनीय होती! आपण फक्त कला बघावी. कलाकारही शेवटी माणूसच असतो, तो कुणी देव नसतो! त्यामुळे तुमच्याआमच्या सामान्य माणसात असलेले सर्व गुणदोष त्याच्यातही असतात! रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला?? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनिष Tue, 05/20/2008 - 09:55
मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला?? तात्या.
सहमत!!! आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये.

In reply to by मनिष

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 10:06
आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये. फक्त कलाकारच का? आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार Tue, 05/20/2008 - 10:46
कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन! हे मान्य.. फक्त कलाकारच का? सामान्य जनतेच्या बाबतीत ही हे लागू आहे.. पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचे अनुकरण लगेच होते...त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे? (परखड)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 11:11
लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. त्याला कलाकाराचा काय इलाज? माझं अनुकरण करा असं तो सांगतो लोकांना? त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. त्यांचं इतर वागणं चांगलं की वाईट ह्याकडे लक्ष देणारे किंवा दुर्लक्ष करणारे तुम्ही कोण? तुम्हाला न्यायासनावर कुणी बसवलं?? उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे? चोरी, खून, दरोडा, इत्यादी कायदेशीर गुन्हे झाले. त्याबाबत न्यायापेक्षा कुणीच मोठा नाही. परंतु केशवराव, आता तुम्हीच चर्चा भरकटवत आहात. आपला स्वत:चाच चर्चाविषय आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावा अशी आपल्याला विनंती! बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? वरील चार प्रश्न आपण उपस्थित केले होतेत! आता खूनाचा मुद्दा आपण नव्यानेच मांडत आहात व चर्चा भरकटवत आहात असं वाटतं! कलाकाराने खून केल्यास त्याचा खुनाचा गुन्हाही माफ व्हावा असं मीही कुठे म्हटलेलं नाही! म्हटले असल्यास कृपया दाखवून द्या! तात्या.

In reply to by केशवसुमार

भाई Tue, 05/20/2008 - 11:11
हा आपला माझा सुसाट तर्क आहे, यामागे अभ्यास नाही. कला हा प्रकार इतर मानवी व्यवहारांपेक्षा थोडा वेगळा आहे. इथे हिशोब चालत नाहीत. उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. (मी फक्त खरोखरच्या प्रतिभावंतांबद्दल लिहितोय; सर्वच होतकरूंनाही प्रतिभावान म्हणवले जाण्याच्या आजच्या काळात हे मुद्दाम नमूद केले पाहीजे.). असे लोक तुम्हाआम्हासारखे जगण्याचे हिशोबही करत नसावेत. त्यांचे जगणेही तसेच निव्वळ एका उर्मीतून दुसर्‍या उर्मीकडे असे जात असावे. आपण आपल्या मापाने ते हिशोब मोजणे योग्य होणार नाही. हे त्याचे जेनेटिक प्रोग्रॅमिंग असावे. नाहीतर इतक्या मुलांची जबाबदारी असताना दीनानाथ आर्थिक सुरक्षिततेला न दुर्लक्षित करते. पण, एक सामान्य (नॉर्मल) माणूस नाटक कंपनी काढायचा विचारही करु शकणार नाही. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. पण हे फक्त फार वरच्या पातळीच्या कलाकारांबाबत लागू होते. राहीला मुद्दा अनुकरणाचा आणि प्रभावाचा. ते दुर्दैवी वास्तव आहे. लोकमान्याचा अडकित्ता घेतला जातो, गीतारहस्य नाही. हा मानवी स्वभाव काही प्रमाणात संस्कारांनी नियंत्रित करता येतो. -भाई (काहीही कला न येणारा अत्यंत हिशोबी माणूस)

In reply to by भाई

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 11:17
उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. क्या बात है, भाईशी सहमत आहे... हिशेबी माणसं फक्त २ + २ = ४ करण्यातच धन्यता मानतात! तसं कलाकारांचं नसतं! ते अवलिया असतात,कलंदर असतात!! त्यांची गणीतंच वेगळी असतात! तात्या.

In reply to by केशवसुमार

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 11:11
तुम्ही म्हणाल यात काय नाविन्य आहे म्हणा!!!!:)) आय डोन्ट केअर!!! पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. असहमत!!!! लोक/जनता यांच्यावर कोणीही ओझं दिलेलं नसतं की कलाकारांचं अनुकरण करा म्हणून! ही सामान्य लोकांनी आपल्या दोषांचे समर्थन करण्यासाठी शोधलेली पळवाट आहे!!!! प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!! तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!! सर्वसामान्यांना गोंजारायचे दिवस संपले!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 11:22
प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!! हा हा हा! हा मुद्दा खरा आहे रे डांबिसा...! तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!! अगदी सहमत आहे...!! आपला, (सर्वसामान्य रसिकाच्या भूमिकेतून कलाकाराच्या कलेचा मनमुराद आस्वाद घेणारा परंतु त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघण्याची शाणपट्टी व असभ्यपण न करणारा!) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

केशवसुमार Tue, 05/20/2008 - 11:30
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. असहमत!!!! पिंडाशेठ / तात्या ..मग प्रश्नच संपला... ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्‍या...आदर्श, अनुकरण, प्रभाव पाडणे ह्या सर्व मुर्ख कल्पना आहेत.. असो..

In reply to by केशवसुमार

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 11:44
ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्‍या आत्ता तुम्ही मुद्द्यावर आलांत!!:)) सामाजिक जाणिवा आणि नैतिक जबाबदार्‍या असतांत, पण त्या "कलाकारांवर" जास्त आणि "सर्वसामान्यांवर" कमी हे म्हणणे आमच्या मते तरी भोंदूपणाचे लक्षण आहे. त्या सर्वांवर सारख्याच असतात!! कलाकार त्याच्या कलेच्या प्रदर्शनाचे प्रसंग सोडले तर इतर वेळी सर्वसामान्य नागरीकच असतात!! त्यांच्याकडून असामान्य नागरी लक्षणांची अपेक्षा करणे व ती पूर्तता झाली नाही म्हणून निराश होणे. अथवा कलाकारांच्या व्यसनांचे आपल्या व्यसनांसाठी समर्थन देणे हा भोंदूपणा आहे हेच आमचे म्हणणे होते!!!! अवर "सर्वसामान्य" नागरीक नीडस् टू ग्रो अप!! तुम्हाला नाही वाटत असे?

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 12:16
केशवराव, आत्ताच आपल्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यामुळे काही गोष्टींचा उलगडा झाला. सबब, तूर्तास आम्ही हा विषय इथेच थांबवत आहोत... कळावे, आपला, (स्नेहांकित) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

हर्षद बर्वे गुरुवार, 05/22/2008 - 18:19
" प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!!...................." क्षमस्व परंतू या मुद्द्याशी मी असहमत आहे. व्यक्तीचे प्रौढत्व त्याच्या वयावर अवलंबून असते. आणि काय बरोबर आणि काय चूक ते कळणे याला प्रगल्भता यावी लागते. प्रगल्भता येण्याचे प्रत्येक व्यक्तीचे वय वेगळे असते. काही व्यक्तींना त्यांचा सहस्रचंद्रदर्शन ़सोहळा आटोपला तरी प्रगल्भता येतेच असे नाही. याची जिवंत उदाहरणे प्रत्येकांस आपल्या आजुबाजूला बघावयास मिळतील. तरी यावर विचार व्हावा..... आप्ला.. हर्षद

In reply to by केशवसुमार

मराठी_माणूस Tue, 05/20/2008 - 11:25
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते ९ ते ५ नोकरी करणार्‍या सामान्य माणसाचे अनुकरण करण्याची शक्यता कमी असते (तो / ती कीतीही मोठ्या पदावर असला/ली तरीही) . कलाकार प्रसिध्धीच्या झोतात असल्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त असते.

मुक्तसुनीत Mon, 05/19/2008 - 16:34
बर्‍याचदा आपण कलाकार आणि तुमच्याआमच्यासारखा माणूस या गोष्टींमधे गल्लत करतो. कलाकार शेवटी माणूसच. जोवर तो लिहीतो, गातो, नृत्य करतो, अभिनय करतो तोवरच्या क्षणांमधे आपल्यापेक्षा वेगळा; इतकेच. बाकी तो/ती तुमच्या आमच्यासारखेच , कमी अधिक फरकाने. त्यांनाही गरजा आहेत , त्यांनाही विकार आहेत. शेवटी एक कलावंत म्हणून तो/ती आपल्याला काय सांगत आहेत, आपल्या नेहमीच्या जगातून त्यांनी निर्मिलेल्या सृष्टीत ते कितपत परिणामकारकरीत्या नेऊ शकतात ते महत्त्वाचे. त्यांच्या "रोजमर्रा की जिंदगी में" ते आपल्यापेक्षा फार वेगळे नाहीत.

In reply to by मुक्तसुनीत

केशवसुमार Mon, 05/19/2008 - 16:39
ते हे मान्य का करत नाहीत? तेही नाही आणि त्यांच्या भोवती आसलेले त्यांचे भाट ही नाही.. सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? केशवसुमार

In reply to by केशवसुमार

आनंदयात्री Mon, 05/19/2008 - 16:42
>>सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? सहमत.

हेरंब Mon, 05/19/2008 - 17:09
अशा व्यसनी कलाकारांना जवळच्या लोकांनी समज द्यायला पाहिजे. नाटकातले एक थोर कलाकार माझे मित्र आहेत. दारु हा संध्याकाळचा एक अविभाज्य घटक आहे असे त्यांचे मत आहे. तसेच ते जरी सरळमार्गी असले तरी इतर कलाकारांच्या भानगडींचे समर्थन करतात. हे मला पटत नाही असे मी त्यांना अनेकदा स्पष्ट सुनावले आहे.

आर्य Mon, 05/19/2008 - 18:05
काही कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ असतात हे खरे पण सगळी च मंडळी नसतात- ती आपल्या कला निर्मीतीत ईतकी गुंग असतात की भोवतालच्या जगाचे ज्ञानच ऊरत नाही. याची धुंदी कधी ऊतरुच नये अश्या वाटण्यातून सृजनाची नवी संधी न-शोधता त्याच निर्मीतीचा आनंदात बुडून जातात. कदाचीत हे त्याचे परीणाम ! या यशोधुंदीतुन बाहेर पडणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय नव निर्मीती अशक्य आहे. (कलंदर) आर्य :D

स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 18:41
सत्य न पचवता व्यसनाच्या ह्या पळवाटा शोधणे हा मनाचा दुबळे पणाच नाही का? वर त्याला कलंदरीचे गोंडस नाव ही देतात.. अगदी सहमत! हे स्वत:ला 'डिस्काउंट देणे'च झाले..

राजे Mon, 05/19/2008 - 18:43
शक्यतो... कलाकृती निर्माण झाल्यानंतर अथवा निर्माण करताना... जो आनंद / दुखः ते लोक अनुभवत असतील त्याचे निराकरण करण्यासाठी शक्यतो ते व्यसनाचा मार्ग पकडत असतील असे मला वाटते. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कुंदन Mon, 05/19/2008 - 18:49
व्यसनी लोकांना फक्त निमित्त हवे .... भले ते आनंद साजरा करण्यासाठी असो अथवा दुखः विसरण्यासाठी असो.

स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 19:14
यांना लहान वयात पैसा, प्रसिद्धी मिळालेली असते.. त्यामुळे त्यांच्यासमोर लक्ष्य (एम)असे काही नसते....आता पुढे काय करायला नसल्यामुळे ही मंडळी अशी व्यसनी होतात असे वाटते.

चतुरंग Mon, 05/19/2008 - 19:25
चंगीभंगीपणा, विक्षिप्तपणा हवाच किंवा असणारच हा एक फार मोठा गैरसमज बर्‍याचवेळा असतो - त्या कलाकार व्यक्तीचा आणि आजूबाजूच्या लोकांचा. त्या माणसाच्या कलेचा आणि ह्या इतर गोष्टींचा अन्योन्य संबंध लावून आपण त्या माणसाला माफ करुन टाकतो. किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींना ते लक्षात जरी आले तरी त्याची कानउघाडणी करण्याचे नैतिक धैर्य त्यांच्यात नसते कारण एकतर त्यांच्या म्हणण्याला कोणी किंमत देणार नाही ही भीती किंवा त्या कलाकाराला मिळणारे यश, पैसा, मानमरातब ह्यांने आलेले मिंधेपण. अनेक मोठे लोक ह्यातून सुटले नाहीत. (एक उदाहरणच घ्यायचे झाले तर - असामान्य गायकनट बालगंधर्व यांची अखेरच्या दिवसात झालेली अवस्था बघवत नसे असे लोक सांगतात. मराठी रंगभूमीवरचा हा चमत्कार तितक्याच विचित्र पद्धतीने अस्तंगत व्हावा हा मोठा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.) कलाकार म्हणून ते कितीही मोठे असले तरी व्यक्ती म्हणून, व्यवहाराचे भान असलेला एक माणूस म्हणून ते ह्या जागी कमीच पडले असे खेदाने म्हणावे लागते. ह्या मोठया लोकांना एकप्रकारे देवत्व बहाल करुन आपणच त्यांच्या कित्येक भल्या/बुर्‍या गोष्टी ह्या असामान्यत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीची बातमी होते. कलाकारातला विवेक जागा असेल तर तो अशा भूलभुलैय्याला बळी न पडता त्यातला माणूस जागा ठेवून वाटचाल करु शकतो. कित्येकदा आयुष्यातले मोठे अपघात त्या व्यक्तीला जागेवर आणायला कारणीभूत ठरतात. कित्येकदा कशानेच त्यातला माणूस हा ह्या जगात येत नाही आणि त्यांची दुरवस्था होते. कोणत्याही कारणाने व्यसनाधीन होणे हा मनाचा कमकुवतपणाच म्हणायला हवा. ती पळवाट आहे. काही छोट्या कलाकारांना त्यांच्या भोवतालचे लोभी वर्तुळ स्वतःच्या लाभापायी सत्याची जाणीव करुन देत नाहीत. सर्वसामान्य रसिकाच्या मनात त्याच्या कलेविषयी आदरही असतो आणि व्यसनीपणा/विक्षिप्तपणाबद्दल दु:ख, वेदना, सलही असतो. फक्त ती वेदना व्यक्त करण्याचे धैर्य त्याच्यात नसते कारण त्यामुळे त्याच्यातल्या कलाकाराला आपण पारखे होऊ ही भीती असावी. तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात असे प्रसंग आले तर त्याला झाकोळून टाकणारे प्रसिध्दी, कला, ह्यांचे वलय आपल्याभोअवती नसते त्यामुळे आपण लगेच उघडे पडतो. समाजाच्या दबावापयी, काही नैतिक बंधनांपायी आपण स्वतःला जबाबदार्‍यांपासून सहजासहजी तोडून टाकू शकत नाही. कारण त्यामुळे होणार्‍या मानहानीला तोंड देण्यासाठी लागणारे सुरक्षा कवच आपल्याकडे नसते. (ज्या लोकांकडे प्रचंड पैसा आहे त्यातलेही बरेच लोक असे वागताना आपण वाचतो/पाहतो/ऐकतो पण ह्याठिकाणी तो विषय नव्हे.)त्यामुळे कलाकारातला माणूस त्यातले गुण-दोष आणि आपल्यातला माणूस आपल्यातले तसेच गुण-दोष ह्यातला मुख्य फरक हा प्रसिध्दीच्या वलयामुळे आलेला असतो. हे वलय दूर व्हायचा अवकाश की ते धाडदिशी कोसळलेच म्हणून समजा. आपल्या पूर्वसूरींचे यशापयश, मानमरातब आणि मानहानी, उदंड कीर्ती आणि उध्वस्त करुन टाकणारी अपकीर्ती ह्यातून जे शिकतात ते कलाकार माणूस म्हणूनही मोठे ठरतात. आपण आधी माणूस आहोत, मग कलाकार आणि हे जग सोडून जातानाही माणूस म्हणूनच जाणार आहोत ह्याचे भान जे सोडत नाहीत त्यांच्या चरणी आपण लीन होतो. चतुरंग

केशवसुमार Tue, 05/20/2008 - 09:09
चर्चेत भाग घेतलेल्या आणि चर्चेत भाग न घेतलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 09:42
बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? हम्म! ह प्रश्न थोडा मोघम वाटतो. जसे बरेच कलाकार व्यसनी, विक्षिप्त व गचाळ असतात त्याचप्रमाणे अनेक कलाकार निर्व्यसनी, सुस्वभावी व स्वच्छही असतात! तेव्हा व्यक्ति तितक्या प्रकृती! आता केशवा, तुझंच उदाहरण घे. तू एक कलाकार आहेस, शिवाय निर्व्यसनी, सुस्वभावी आणि स्वच्छ व नीटनेटका आहेसच की! :) त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? हे विधानही मोघम आहे. अशीही अनेक माणसं आहेत की जी कलाकार नाहीत व त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान नसते, व असेही अनेक कलाकार आहेत की ज्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान असते! अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? माझ्या मते कलेचे कौतुक करावे! कुणी कसं वागावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. ते ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? तुम्ही कसं वागताय हे तो कलाकार बघायला येतो आहे का? त्याचा तुम्हाला जाब विचारतो आहे का? मग तो कलाकार त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात कसा वागतो ह्यासंबंधी कॉमेन्टस पास करण्याचा किंवा मतप्रदर्शन करण्याचा तुम्हाला तरी काय अधिकार? तुमचा मतलब फक्त त्याच्या कलेशी! तिच्याबद्दल आवडली, आवडली नाही याबद्दलच फक्त तुम्ही बोलू शकता! आत आमचे रहिमतखासाहेब! रात्रंदिवस अफूच्या नशेत असायचे. परंतु त्यांच्या गायकीत जी जादू होती ती केवळ अवर्णनीय होती! आपण फक्त कला बघावी. कलाकारही शेवटी माणूसच असतो, तो कुणी देव नसतो! त्यामुळे तुमच्याआमच्या सामान्य माणसात असलेले सर्व गुणदोष त्याच्यातही असतात! रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला?? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनिष Tue, 05/20/2008 - 09:55
मुळात रसिकांनी फक्त त्याच्या कलेशीच मतलब ठेवावा! त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क रसिकाला कुणी दिला?? तात्या.
सहमत!!! आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये.

In reply to by मनिष

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 10:06
आणि त्याच न्यायाने कलाकारांनीही आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) लोकांना शिकवायला जाऊ नये. फक्त कलाकारच का? आपले क्षेत्र सोडून इतर गोष्टी (आवश्यक त्या अभ्यासाशिवाय) कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार Tue, 05/20/2008 - 10:46
कुणीच कुणाला शिकवायला जाऊ नये, असं मी म्हणेन! हे मान्य.. फक्त कलाकारच का? सामान्य जनतेच्या बाबतीत ही हे लागू आहे.. पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचे अनुकरण लगेच होते...त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे? (परखड)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 11:11
लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. त्याला कलाकाराचा काय इलाज? माझं अनुकरण करा असं तो सांगतो लोकांना? त्यामुळे नुसत्या कलेकडे बघून त्यांच्या इतर वागण्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.. त्यांचं इतर वागणं चांगलं की वाईट ह्याकडे लक्ष देणारे किंवा दुर्लक्ष करणारे तुम्ही कोण? तुम्हाला न्यायासनावर कुणी बसवलं?? उद्या एखाद्या कलाकाराने खून केला तर त्याला ..जाउदे किती महान कलाकार आहे म्हणून काय त्याला खून माफ करावे? चोरी, खून, दरोडा, इत्यादी कायदेशीर गुन्हे झाले. त्याबाबत न्यायापेक्षा कुणीच मोठा नाही. परंतु केशवराव, आता तुम्हीच चर्चा भरकटवत आहात. आपला स्वत:चाच चर्चाविषय आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचावा अशी आपल्याला विनंती! बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? वरील चार प्रश्न आपण उपस्थित केले होतेत! आता खूनाचा मुद्दा आपण नव्यानेच मांडत आहात व चर्चा भरकटवत आहात असं वाटतं! कलाकाराने खून केल्यास त्याचा खुनाचा गुन्हाही माफ व्हावा असं मीही कुठे म्हटलेलं नाही! म्हटले असल्यास कृपया दाखवून द्या! तात्या.

In reply to by केशवसुमार

भाई Tue, 05/20/2008 - 11:11
हा आपला माझा सुसाट तर्क आहे, यामागे अभ्यास नाही. कला हा प्रकार इतर मानवी व्यवहारांपेक्षा थोडा वेगळा आहे. इथे हिशोब चालत नाहीत. उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. (मी फक्त खरोखरच्या प्रतिभावंतांबद्दल लिहितोय; सर्वच होतकरूंनाही प्रतिभावान म्हणवले जाण्याच्या आजच्या काळात हे मुद्दाम नमूद केले पाहीजे.). असे लोक तुम्हाआम्हासारखे जगण्याचे हिशोबही करत नसावेत. त्यांचे जगणेही तसेच निव्वळ एका उर्मीतून दुसर्‍या उर्मीकडे असे जात असावे. आपण आपल्या मापाने ते हिशोब मोजणे योग्य होणार नाही. हे त्याचे जेनेटिक प्रोग्रॅमिंग असावे. नाहीतर इतक्या मुलांची जबाबदारी असताना दीनानाथ आर्थिक सुरक्षिततेला न दुर्लक्षित करते. पण, एक सामान्य (नॉर्मल) माणूस नाटक कंपनी काढायचा विचारही करु शकणार नाही. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. पण हे फक्त फार वरच्या पातळीच्या कलाकारांबाबत लागू होते. राहीला मुद्दा अनुकरणाचा आणि प्रभावाचा. ते दुर्दैवी वास्तव आहे. लोकमान्याचा अडकित्ता घेतला जातो, गीतारहस्य नाही. हा मानवी स्वभाव काही प्रमाणात संस्कारांनी नियंत्रित करता येतो. -भाई (काहीही कला न येणारा अत्यंत हिशोबी माणूस)

In reply to by भाई

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 11:17
उर्मी आणि प्रतिभा या गोष्टी अभ्यास वगैरे करुन जमत नाहीत. ते जनुकिय मिश्रणच वेगळे असते. घर सोडून गुरुच्या घरी नुसते पाणी भरायची मानसिकता हिशोबी माणसाकडे असणार नाही आणि तो भीमसेनही होणार नाही. क्या बात है, भाईशी सहमत आहे... हिशेबी माणसं फक्त २ + २ = ४ करण्यातच धन्यता मानतात! तसं कलाकारांचं नसतं! ते अवलिया असतात,कलंदर असतात!! त्यांची गणीतंच वेगळी असतात! तात्या.

In reply to by केशवसुमार

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 11:11
तुम्ही म्हणाल यात काय नाविन्य आहे म्हणा!!!!:)) आय डोन्ट केअर!!! पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. असहमत!!!! लोक/जनता यांच्यावर कोणीही ओझं दिलेलं नसतं की कलाकारांचं अनुकरण करा म्हणून! ही सामान्य लोकांनी आपल्या दोषांचे समर्थन करण्यासाठी शोधलेली पळवाट आहे!!!! प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!! तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!! सर्वसामान्यांना गोंजारायचे दिवस संपले!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 11:22
प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!! हा हा हा! हा मुद्दा खरा आहे रे डांबिसा...! तेंव्हा काय करायचंय ते करा पण उगाच कलाकार वगैरे मंडळींवर तुमच्या वागण्याचे खापर फोडू नका असे "सर्वसामान्यांना" सांगावेसे वाटते!! अगदी सहमत आहे...!! आपला, (सर्वसामान्य रसिकाच्या भूमिकेतून कलाकाराच्या कलेचा मनमुराद आस्वाद घेणारा परंतु त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघण्याची शाणपट्टी व असभ्यपण न करणारा!) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

केशवसुमार Tue, 05/20/2008 - 11:30
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते.. म्हणून त्यांच्यावर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी जास्त असते.. असहमत!!!! पिंडाशेठ / तात्या ..मग प्रश्नच संपला... ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्‍या...आदर्श, अनुकरण, प्रभाव पाडणे ह्या सर्व मुर्ख कल्पना आहेत.. असो..

In reply to by केशवसुमार

पिवळा डांबिस Tue, 05/20/2008 - 11:44
ज्याला जसे हवे तसे त्याने वागावे.. कुठला समाज.. कसल्या सामाजिक जाणिवा आणि कसल्या नैतिक जबाबदर्‍या आत्ता तुम्ही मुद्द्यावर आलांत!!:)) सामाजिक जाणिवा आणि नैतिक जबाबदार्‍या असतांत, पण त्या "कलाकारांवर" जास्त आणि "सर्वसामान्यांवर" कमी हे म्हणणे आमच्या मते तरी भोंदूपणाचे लक्षण आहे. त्या सर्वांवर सारख्याच असतात!! कलाकार त्याच्या कलेच्या प्रदर्शनाचे प्रसंग सोडले तर इतर वेळी सर्वसामान्य नागरीकच असतात!! त्यांच्याकडून असामान्य नागरी लक्षणांची अपेक्षा करणे व ती पूर्तता झाली नाही म्हणून निराश होणे. अथवा कलाकारांच्या व्यसनांचे आपल्या व्यसनांसाठी समर्थन देणे हा भोंदूपणा आहे हेच आमचे म्हणणे होते!!!! अवर "सर्वसामान्य" नागरीक नीडस् टू ग्रो अप!! तुम्हाला नाही वाटत असे?

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Tue, 05/20/2008 - 12:16
केशवराव, आत्ताच आपल्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यामुळे काही गोष्टींचा उलगडा झाला. सबब, तूर्तास आम्ही हा विषय इथेच थांबवत आहोत... कळावे, आपला, (स्नेहांकित) तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

हर्षद बर्वे गुरुवार, 05/22/2008 - 18:19
" प्रत्येक प्रौढ माणसाला ठाऊक असते की काय बरोबर आणि काय चूक ते!!!!!...................." क्षमस्व परंतू या मुद्द्याशी मी असहमत आहे. व्यक्तीचे प्रौढत्व त्याच्या वयावर अवलंबून असते. आणि काय बरोबर आणि काय चूक ते कळणे याला प्रगल्भता यावी लागते. प्रगल्भता येण्याचे प्रत्येक व्यक्तीचे वय वेगळे असते. काही व्यक्तींना त्यांचा सहस्रचंद्रदर्शन ़सोहळा आटोपला तरी प्रगल्भता येतेच असे नाही. याची जिवंत उदाहरणे प्रत्येकांस आपल्या आजुबाजूला बघावयास मिळतील. तरी यावर विचार व्हावा..... आप्ला.. हर्षद

In reply to by केशवसुमार

मराठी_माणूस Tue, 05/20/2008 - 11:25
पण कलाकार हा प्रसिद्धित आसतात.. लोक/जनता, तरूण पिढी त्यांचे अनुकरण करत असते ९ ते ५ नोकरी करणार्‍या सामान्य माणसाचे अनुकरण करण्याची शक्यता कमी असते (तो / ती कीतीही मोठ्या पदावर असला/ली तरीही) . कलाकार प्रसिध्धीच्या झोतात असल्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त असते.
बर्‍याच दिवसांन पासून काही प्रश्न मला भेडसावत आहेत.. ह्या चर्चेतून ह्या प्रश्नांची उत्तरे शोधणाचा एक प्रयत्न.. बरेच कलाकार मंडळी ही व्यसनी, विक्षिप्त, गचाळ का असतात? त्यांना घरादाराची चिंता, आपल्या नैतिक जबाबदार्‍या ह्याचे भान का नसते? अशा कलाकाराच्या कलेचे कौतुक करावे की त्यांच्या व्यसनी वागणूकीची निर्भत्सना? रसिकांनी त्यांच्या इतर छंदाफंदांकडे दुर्लक्ष करून केलेले कौतुक तर ह्याला जबाबदार नाही ना? (व्यथित) केशवसुमार

गरज

मेघना भुस्कुटे ·

स्वयंभू Mon, 05/19/2008 - 14:58
लेख झक्कास जमलाय. बँगलोर मधे असाल तर पुढल्या मिपा ओसरी ल या नक्की. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 17:55
लेख वाचून क्षणभर गरगरलंच! छ्या! मेघनाताई, अहो तुम्ही किती गोष्टींचा जीवाला त्रास करून घेता बुवा! :) बाय द वे, लेख बाकी फक्कड जमलाय. तुमची सामाजिक जाणीव फारच तरल आहे बॉ! :) असो... माझ्या माहितीप्रमाणे, तुमचं मिपावरील हे पहिलंच स्वतंत्र लेखन आहे. या निमित्ताने आपल्या पहिल्यावहिल्या लेखाचं मी मिपावर मनपासून स्वागत करतो आणि यापुढेही असंच स्वच्छंद व मनमोकळं लेखन आपण मिपावर करावं, अशी आपल्याला विनंती करतो.. तात्या.

राजे Mon, 05/19/2008 - 18:33
अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! लेख मस्त जमला आहे ... पुढील लेखनाची वाट पाहत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कुंदन Mon, 05/19/2008 - 19:06
शिक्षण वा नोकरी निमित्त घरापासून लांब राहताना असे बरेच प्रसंग येतात. त्यावर उपाय म्हणजे जमेल तेंव्हा अधुन मधुन घरी एक पखालफेरी मारून येणे हे सर्वोत्तम....

बेसनलाडू Mon, 05/19/2008 - 20:17
लेखन फार आवडले. त्यातली तिडीक जाणवली, सामाजिक भान नि संवेदना जाणवली. पुढील लेखनसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (वाचक)बेसनलाडू

वरदा Mon, 05/19/2008 - 20:42
लिहिलयच गं मेघना..किती वैतागलेयस ते दिसतय.. पखालफेरी काय असतं गं?

देवदत्त Mon, 05/19/2008 - 20:46
छान लिहिलंय... मनातील विचार बाहेर आल्यासारखे वाटतात :)

गृहिणि Mon, 05/19/2008 - 20:46
सहिच जमलाय लेख. मी तुमचा ब्लॉग नेहमि वाचते, खुप छान लिहिता तुम्हि नेहमिच. हा लएख एक्दम भिडला कारण असच काहिस इथे (सातासमुद्रापार) नेहमि वाटत असत पण दुदैवाने "पखालफेरि" मारण शक्य नसल्याने "राहिले दुर घर माझे..." अशि अवस्था होते.

यशोधरा Mon, 05/19/2008 - 22:02
मेघना, आवडलं लिहिलेलं. मी आत दोन दिवसांनीच मारते आहे पखाल फेरी :)

छोटा डॉन Tue, 05/20/2008 - 07:48
मेघना तुझ्या लेखातुन अस्सल मराठी असलेल्या परंतु सध्या "बेंगलोरनिवासी" असलेल्या मराठी [ व त्यात पुणेकर ] व्यक्तीची मानसीक स्थिती चांगली मांडली गेली आहे ... बाकीचे म्हटल्याप्रमाणेच मी विचारतो "किती ग विचार करतेस तु ? अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! " बाकी तु म्हटल्याप्रमाणे आहेच तसे बंगलोर, साले *** रिक्षावाले रात्री ८ नंतर कमीतकमी २० रुपये जादा घेतात.... लोक इथल्या हवेचे कौतुक अगदी तोंड फाटूस्तोवर करतात पण जर दर ८ दिवसांनी पाउस पडून हवा जर ढगाळ होत असेल आणि जीव नकोसा होत असेल तर कसले कौतुक हे मला तरी समजले नाही ... बाकी "मॉल्स आणि मोठी थेटरे " याबद्दल मला काडीइतके अप्रुप नाही. जर "जोधा-अकबर वा तसाच एखादा तत्सम फालतू " पिक्चर जर तुम्हाला पर हेड ३०० रुपये ची फोडणी लावत असेल तर अजुन "६० रुपयात" पिक्चर दाखवणारे पुण्याचे "मंगला" काय वाईट ? बाकी "बागांबद्दल " मी सहमत नाही, बेंगलोरमध्ये तेवढीच एक गोष्ट आहे की जिथे "ट्रॅफीक जॅम" नाही. अगदी निवांत बसता येते, कुनाची कटकट नाही. जर मानसीक शांती साठी एवढी किंमत मोजावी लागत असेल तर आजच्या काळात ती बिलकूल जास्त नाही असे मी म्हणेन ... बाकी एक सिंपल गोष्ट आहे, जास्त त्रास करुन घ्यायचा नाही . कशाकशाचा त्रास करुन घेणार ? ही तर फक्त झलक आहे. अजुन आपण फक्त "कॉर्पोरेट कल्चर" बद्दल बोलत आहोत, इथले "लोकल आणि सोशल कल्चर" तर अजुन "खतरनाक" आहे आणि मराठी माणसाला तर झेपणे शक्यच नाही. तर "टेक व चील पील !!!!"..... बाकी "ऍडी" म्हणल्याप्रमाणे पुढच्यावेळी "कट्ट्याला" ये जमले तर ... मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर च्या अध्यक्ष छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाई Tue, 05/20/2008 - 10:53
मिपावाले बेंगलोरकर महाराष्ट्र मंडळात जातात का? गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? मी बेंगलोर सोडून ५ वर्षे झाली. त्यापूर्वी कधी मधी जायचो. बाकी मराठी माणसाला आवडण्यासारख्या फार गोष्टी बेंगलोरमध्ये नाहीत असे वाटते. -अर्धे तप बेंगलोरमध्ये काढूनही तिथे न रमलेला भाई

In reply to by भाई

देवदत्त गुरुवार, 06/05/2008 - 21:21
गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? हो, होत असतात इतरही कार्यक्रम. :) गेले ३/४ वर्षे २ याहू गृप्सचा मिळून कार्यक्रम होत असतो. 'जल्लोष' त्याचे नाव. आता १ जून ला कार्यक्रम झाला असे ऐकले. मला सध्या वेळ मिळाला नाही नाहीतर मी त्याची माहिती इथे दिलीच असती. :( सदस्यांच्या कार्यक्रम/स्पर्धांसोबत नामांकित लोकांचे कार्यक्रमही होतात. ह्या वर्षी दिलीप प्रभावळकर येणार होते. मागील वर्षी शिरीष कणेकरांचे 'कणेकरी' ही झाले होते. तसेच इतर वेळी आणखीही कार्यक्रम असतात. २००५ मध्ये असेच 'आयुष्यावर बोलू काही' सादर केले होते. इतरही काही नाटकांचे प्रयोग झाले होते. (त्या मित्रांनाही मिपाचे आमंत्रण देतो :) . राहूनच गेले होते :( )

मनस्वी Tue, 05/20/2008 - 11:00
अक्षरश: असंच वाटतं मेघनाताई. मी ६ महिने होते तिथे.. ट्रॅफिक, रिक्षा, बागा, हवामान अन् मॉल्स - सगळे अनुभव असेच. सगळ्यात डोक्यात जातात ते रिक्षावाले.
'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...'
वाट बघतीये.

कौतुकाबद्दल आभार मंडळी! बाय दी वे, मी पुणेकर नाहीय. :( पखालफेरी: आय वॉज रेफरिंग टु कॅमल! पखाल भरून घेतली की काही महिने पाहायला नको!

वरदा Tue, 05/20/2008 - 21:27
कळ्ळं गं मेघना.. तुम्ही बँगलोर मधे राहून किती वैतागलेले दिसताय..मी तिथे परत आल्यावर बँगलोरला येण्याचा विचार करत होते माझ्या कं. चं ऑफिस आहे म्हणून आता विचार केला पाहिजे..... :S

अभिज्ञ Wed, 05/21/2008 - 00:14
मेघनाताई, आपल्या ह्या लेखाचे प्रयोजन कळाले नाही. फारच नकारार्थक भूमिकेतून लिहिल्यासारखा वाटला. अहो प्रत्येक शहरात असे कमी अधिक उणे मुद्दे असतातच. त्यात एकट्या बंगलोरला टारगेट करणे बरोबर नाही. मी हि आजपर्यंत दिल्ली,मुंबई,चेन्नई.. बगैरे अशा ब-याच शहरात वावरलो/राहिले आहे.जागोजागी चांगले वाईट अनुभव हे येणारच. रिक्षावाले म्हणाल तर प्रत्येक शहरात हे असले प्रकार चालतातच.ती जमातच वेगळी ... इथे वाईट काय आहे ह्याची उजळणी करत बसण्यापे़क्षा इथे चांगले काय आहे हे सांगितले असते तर जास्त आवडले असते. असो, पुढील लेखनाला शुभेच्छा. अभिज्ञ.

शशांक Wed, 05/21/2008 - 14:19
मुक्तचिंतन आवडले. मुंबईतून भारतात कुठेही गेलात तर थोडाफार त्रास होईलच असे वाटते. बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती ;) आपला (पुणेग्राम(त्र)स्त) शशांक

In reply to by शशांक

मनस्वी Wed, 05/21/2008 - 15:58
बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती
असहमत. मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला.. त्रस्त शशांक.. तुम्हाला असे अनुभव आले असतील तर जरूर कळवा. तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.

In reply to by मनस्वी

शशांक Wed, 05/21/2008 - 16:08
मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला..
दिवसाकाठी एखादा
  1. पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. पुणेरी रिक्षावाला म्हणजे नुसता पुण्यात रिक्षा चालवणारा नव्हे तर 'पुणेरी' रिक्षावाला. कसा ओळखावा? त्याला ज्या दिशेला जायचे नाही तिकडे जाण्याविषयी विचारले तर तुमच्याकडे अतिशय तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून मान हालवणारा किंवा नुसतेच दुसरीकडे पाहणारा किंवा दोन-तीन किलोमीटर साठी 'दोनशे रूपये होतील' म्हणणारा किंवा रात्री ८ वाजल्यापासून 'हाफ रिटन' मागणारा)
  2. दुकानदार (हा मारवाडी, बनिया किंवा बिहारी असेल तर बरे, मराठी असेल तर तुम्ही मेलात. हे दुकानदार धंदा करायला बसतात की दुर्लक्ष/अपमान करण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत बसतात हा संशोधनाचा विषय आहे. (हे संशोधन पुणे विद्यापीठातल्या मध्यम किंवा उतारवयीन काका/काकूंनी करावे. इतरांनी असा मनस्तापजनक कालापव्यव करू नये))
  3. बस कंडक्टर (यांच्याविषयी काही स्फुट आम्ही इथे लिहिले आहे, अवश्य वाचा)
  4. किंवा नुसता साधा (!!!) पुणेरी पुणेकर (पुण्यात राहणारे सगळेच पुणेरी नसतात ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट)
इतके चार-पाच लोक भेटले तरी एक मुक्तचिंतन लिहिले जाण्याइतपत अनुभव नक्कीच येतील :)
तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.
सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी? मनस्वी आणि समस्त पुणेकर काका-काकू हे सर्व जरा हलकेच घ्या. गमतीने लिहिले आहे.

In reply to by शशांक

भाग्यश्री Wed, 05/21/2008 - 21:44
काही गरज नाही 'पुणेकरांनी' सुधरण्याची! ते तसे आहेत, तो त्यांचा स्वभाव आहे असं समजा... हा रिक्षेवाले सुधरले पाहीजेत, कारण ते बर्‍याचदा कारण नसताना नाही म्हणतात, भाडं जास्त मागतात, तसे असेल तर ते सुधरले पाहीजेत.. अर्थात सगळेच रिक्षेवाले असे नसतात.. पुण्यात येऊन,पुण्याच्या सगळ्या सोयींचा वापर करून वर, पुण्याला नावं ठेवणार्या लोकांची मला कमाल वाटते !!! तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर हा सल्ला पटतो अशा वेळी !! (तसे हलकेच घेतले आहे.. पण गमतीत सुद्धा जरा जास्त वेळेला पुण्याला धोपटले जाते, त्यामुळे हा लेखनप्रपंच.. )

In reply to by शशांक

कुंदन गुरुवार, 05/22/2008 - 13:23
एकदा एका संध्याकाळी सिमला ऑफिस ते बाणेर्/म्हाळुंगे प्रवासाचा योग आला होता. तासभर प्रतिक्षा केल्यावर एक पी एम टी आली , अर्ध्या प्रवासानंतर बसमधील दिव्यांनी मान टाकली , कदाचित भार नियमन असेल म्हणून दुर्लक्ष केले. अजून थोड्या वेळाने इंजिनाने देखील असहकार पुकारला. आई शप्पथ , तेंव्हापासून पी एम टी चा धसका घेतला आपण ...

यशोधरा Wed, 05/21/2008 - 22:14
>>>पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. नक्कीच तुम्ही बेंगलोरचे रिक्षावाले पाहिलेले दिसत नाहीत!! त्यांच्या मानाने पुणेरी रिक्षावाले म्हणजे देवमाणसं!! :D >>>सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी? परफेक्शन को और क्या सुधारोगे??? :D

एक Fri, 06/06/2008 - 02:09
१०००००००% सहमत.. पुणेकरांच्या सुधारण्याची काळजी बाकिच्यांनी करण्याची गरज नाही. -कट्टर सदाशिव पेठी पुणेकर.

स्वयंभू Mon, 05/19/2008 - 14:58
लेख झक्कास जमलाय. बँगलोर मधे असाल तर पुढल्या मिपा ओसरी ल या नक्की. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 17:55
लेख वाचून क्षणभर गरगरलंच! छ्या! मेघनाताई, अहो तुम्ही किती गोष्टींचा जीवाला त्रास करून घेता बुवा! :) बाय द वे, लेख बाकी फक्कड जमलाय. तुमची सामाजिक जाणीव फारच तरल आहे बॉ! :) असो... माझ्या माहितीप्रमाणे, तुमचं मिपावरील हे पहिलंच स्वतंत्र लेखन आहे. या निमित्ताने आपल्या पहिल्यावहिल्या लेखाचं मी मिपावर मनपासून स्वागत करतो आणि यापुढेही असंच स्वच्छंद व मनमोकळं लेखन आपण मिपावर करावं, अशी आपल्याला विनंती करतो.. तात्या.

राजे Mon, 05/19/2008 - 18:33
अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! लेख मस्त जमला आहे ... पुढील लेखनाची वाट पाहत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कुंदन Mon, 05/19/2008 - 19:06
शिक्षण वा नोकरी निमित्त घरापासून लांब राहताना असे बरेच प्रसंग येतात. त्यावर उपाय म्हणजे जमेल तेंव्हा अधुन मधुन घरी एक पखालफेरी मारून येणे हे सर्वोत्तम....

बेसनलाडू Mon, 05/19/2008 - 20:17
लेखन फार आवडले. त्यातली तिडीक जाणवली, सामाजिक भान नि संवेदना जाणवली. पुढील लेखनसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (वाचक)बेसनलाडू

वरदा Mon, 05/19/2008 - 20:42
लिहिलयच गं मेघना..किती वैतागलेयस ते दिसतय.. पखालफेरी काय असतं गं?

देवदत्त Mon, 05/19/2008 - 20:46
छान लिहिलंय... मनातील विचार बाहेर आल्यासारखे वाटतात :)

गृहिणि Mon, 05/19/2008 - 20:46
सहिच जमलाय लेख. मी तुमचा ब्लॉग नेहमि वाचते, खुप छान लिहिता तुम्हि नेहमिच. हा लएख एक्दम भिडला कारण असच काहिस इथे (सातासमुद्रापार) नेहमि वाटत असत पण दुदैवाने "पखालफेरि" मारण शक्य नसल्याने "राहिले दुर घर माझे..." अशि अवस्था होते.

यशोधरा Mon, 05/19/2008 - 22:02
मेघना, आवडलं लिहिलेलं. मी आत दोन दिवसांनीच मारते आहे पखाल फेरी :)

छोटा डॉन Tue, 05/20/2008 - 07:48
मेघना तुझ्या लेखातुन अस्सल मराठी असलेल्या परंतु सध्या "बेंगलोरनिवासी" असलेल्या मराठी [ व त्यात पुणेकर ] व्यक्तीची मानसीक स्थिती चांगली मांडली गेली आहे ... बाकीचे म्हटल्याप्रमाणेच मी विचारतो "किती ग विचार करतेस तु ? अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! " बाकी तु म्हटल्याप्रमाणे आहेच तसे बंगलोर, साले *** रिक्षावाले रात्री ८ नंतर कमीतकमी २० रुपये जादा घेतात.... लोक इथल्या हवेचे कौतुक अगदी तोंड फाटूस्तोवर करतात पण जर दर ८ दिवसांनी पाउस पडून हवा जर ढगाळ होत असेल आणि जीव नकोसा होत असेल तर कसले कौतुक हे मला तरी समजले नाही ... बाकी "मॉल्स आणि मोठी थेटरे " याबद्दल मला काडीइतके अप्रुप नाही. जर "जोधा-अकबर वा तसाच एखादा तत्सम फालतू " पिक्चर जर तुम्हाला पर हेड ३०० रुपये ची फोडणी लावत असेल तर अजुन "६० रुपयात" पिक्चर दाखवणारे पुण्याचे "मंगला" काय वाईट ? बाकी "बागांबद्दल " मी सहमत नाही, बेंगलोरमध्ये तेवढीच एक गोष्ट आहे की जिथे "ट्रॅफीक जॅम" नाही. अगदी निवांत बसता येते, कुनाची कटकट नाही. जर मानसीक शांती साठी एवढी किंमत मोजावी लागत असेल तर आजच्या काळात ती बिलकूल जास्त नाही असे मी म्हणेन ... बाकी एक सिंपल गोष्ट आहे, जास्त त्रास करुन घ्यायचा नाही . कशाकशाचा त्रास करुन घेणार ? ही तर फक्त झलक आहे. अजुन आपण फक्त "कॉर्पोरेट कल्चर" बद्दल बोलत आहोत, इथले "लोकल आणि सोशल कल्चर" तर अजुन "खतरनाक" आहे आणि मराठी माणसाला तर झेपणे शक्यच नाही. तर "टेक व चील पील !!!!"..... बाकी "ऍडी" म्हणल्याप्रमाणे पुढच्यावेळी "कट्ट्याला" ये जमले तर ... मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर च्या अध्यक्ष छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाई Tue, 05/20/2008 - 10:53
मिपावाले बेंगलोरकर महाराष्ट्र मंडळात जातात का? गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? मी बेंगलोर सोडून ५ वर्षे झाली. त्यापूर्वी कधी मधी जायचो. बाकी मराठी माणसाला आवडण्यासारख्या फार गोष्टी बेंगलोरमध्ये नाहीत असे वाटते. -अर्धे तप बेंगलोरमध्ये काढूनही तिथे न रमलेला भाई

In reply to by भाई

देवदत्त गुरुवार, 06/05/2008 - 21:21
गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? हो, होत असतात इतरही कार्यक्रम. :) गेले ३/४ वर्षे २ याहू गृप्सचा मिळून कार्यक्रम होत असतो. 'जल्लोष' त्याचे नाव. आता १ जून ला कार्यक्रम झाला असे ऐकले. मला सध्या वेळ मिळाला नाही नाहीतर मी त्याची माहिती इथे दिलीच असती. :( सदस्यांच्या कार्यक्रम/स्पर्धांसोबत नामांकित लोकांचे कार्यक्रमही होतात. ह्या वर्षी दिलीप प्रभावळकर येणार होते. मागील वर्षी शिरीष कणेकरांचे 'कणेकरी' ही झाले होते. तसेच इतर वेळी आणखीही कार्यक्रम असतात. २००५ मध्ये असेच 'आयुष्यावर बोलू काही' सादर केले होते. इतरही काही नाटकांचे प्रयोग झाले होते. (त्या मित्रांनाही मिपाचे आमंत्रण देतो :) . राहूनच गेले होते :( )

मनस्वी Tue, 05/20/2008 - 11:00
अक्षरश: असंच वाटतं मेघनाताई. मी ६ महिने होते तिथे.. ट्रॅफिक, रिक्षा, बागा, हवामान अन् मॉल्स - सगळे अनुभव असेच. सगळ्यात डोक्यात जातात ते रिक्षावाले.
'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...'
वाट बघतीये.

कौतुकाबद्दल आभार मंडळी! बाय दी वे, मी पुणेकर नाहीय. :( पखालफेरी: आय वॉज रेफरिंग टु कॅमल! पखाल भरून घेतली की काही महिने पाहायला नको!

वरदा Tue, 05/20/2008 - 21:27
कळ्ळं गं मेघना.. तुम्ही बँगलोर मधे राहून किती वैतागलेले दिसताय..मी तिथे परत आल्यावर बँगलोरला येण्याचा विचार करत होते माझ्या कं. चं ऑफिस आहे म्हणून आता विचार केला पाहिजे..... :S

अभिज्ञ Wed, 05/21/2008 - 00:14
मेघनाताई, आपल्या ह्या लेखाचे प्रयोजन कळाले नाही. फारच नकारार्थक भूमिकेतून लिहिल्यासारखा वाटला. अहो प्रत्येक शहरात असे कमी अधिक उणे मुद्दे असतातच. त्यात एकट्या बंगलोरला टारगेट करणे बरोबर नाही. मी हि आजपर्यंत दिल्ली,मुंबई,चेन्नई.. बगैरे अशा ब-याच शहरात वावरलो/राहिले आहे.जागोजागी चांगले वाईट अनुभव हे येणारच. रिक्षावाले म्हणाल तर प्रत्येक शहरात हे असले प्रकार चालतातच.ती जमातच वेगळी ... इथे वाईट काय आहे ह्याची उजळणी करत बसण्यापे़क्षा इथे चांगले काय आहे हे सांगितले असते तर जास्त आवडले असते. असो, पुढील लेखनाला शुभेच्छा. अभिज्ञ.

शशांक Wed, 05/21/2008 - 14:19
मुक्तचिंतन आवडले. मुंबईतून भारतात कुठेही गेलात तर थोडाफार त्रास होईलच असे वाटते. बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती ;) आपला (पुणेग्राम(त्र)स्त) शशांक

In reply to by शशांक

मनस्वी Wed, 05/21/2008 - 15:58
बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती
असहमत. मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला.. त्रस्त शशांक.. तुम्हाला असे अनुभव आले असतील तर जरूर कळवा. तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.

In reply to by मनस्वी

शशांक Wed, 05/21/2008 - 16:08
मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला..
दिवसाकाठी एखादा
  1. पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. पुणेरी रिक्षावाला म्हणजे नुसता पुण्यात रिक्षा चालवणारा नव्हे तर 'पुणेरी' रिक्षावाला. कसा ओळखावा? त्याला ज्या दिशेला जायचे नाही तिकडे जाण्याविषयी विचारले तर तुमच्याकडे अतिशय तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून मान हालवणारा किंवा नुसतेच दुसरीकडे पाहणारा किंवा दोन-तीन किलोमीटर साठी 'दोनशे रूपये होतील' म्हणणारा किंवा रात्री ८ वाजल्यापासून 'हाफ रिटन' मागणारा)
  2. दुकानदार (हा मारवाडी, बनिया किंवा बिहारी असेल तर बरे, मराठी असेल तर तुम्ही मेलात. हे दुकानदार धंदा करायला बसतात की दुर्लक्ष/अपमान करण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत बसतात हा संशोधनाचा विषय आहे. (हे संशोधन पुणे विद्यापीठातल्या मध्यम किंवा उतारवयीन काका/काकूंनी करावे. इतरांनी असा मनस्तापजनक कालापव्यव करू नये))
  3. बस कंडक्टर (यांच्याविषयी काही स्फुट आम्ही इथे लिहिले आहे, अवश्य वाचा)
  4. किंवा नुसता साधा (!!!) पुणेरी पुणेकर (पुण्यात राहणारे सगळेच पुणेरी नसतात ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट)
इतके चार-पाच लोक भेटले तरी एक मुक्तचिंतन लिहिले जाण्याइतपत अनुभव नक्कीच येतील :)
तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.
सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी? मनस्वी आणि समस्त पुणेकर काका-काकू हे सर्व जरा हलकेच घ्या. गमतीने लिहिले आहे.

In reply to by शशांक

भाग्यश्री Wed, 05/21/2008 - 21:44
काही गरज नाही 'पुणेकरांनी' सुधरण्याची! ते तसे आहेत, तो त्यांचा स्वभाव आहे असं समजा... हा रिक्षेवाले सुधरले पाहीजेत, कारण ते बर्‍याचदा कारण नसताना नाही म्हणतात, भाडं जास्त मागतात, तसे असेल तर ते सुधरले पाहीजेत.. अर्थात सगळेच रिक्षेवाले असे नसतात.. पुण्यात येऊन,पुण्याच्या सगळ्या सोयींचा वापर करून वर, पुण्याला नावं ठेवणार्या लोकांची मला कमाल वाटते !!! तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर हा सल्ला पटतो अशा वेळी !! (तसे हलकेच घेतले आहे.. पण गमतीत सुद्धा जरा जास्त वेळेला पुण्याला धोपटले जाते, त्यामुळे हा लेखनप्रपंच.. )

In reply to by शशांक

कुंदन गुरुवार, 05/22/2008 - 13:23
एकदा एका संध्याकाळी सिमला ऑफिस ते बाणेर्/म्हाळुंगे प्रवासाचा योग आला होता. तासभर प्रतिक्षा केल्यावर एक पी एम टी आली , अर्ध्या प्रवासानंतर बसमधील दिव्यांनी मान टाकली , कदाचित भार नियमन असेल म्हणून दुर्लक्ष केले. अजून थोड्या वेळाने इंजिनाने देखील असहकार पुकारला. आई शप्पथ , तेंव्हापासून पी एम टी चा धसका घेतला आपण ...

यशोधरा Wed, 05/21/2008 - 22:14
>>>पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. नक्कीच तुम्ही बेंगलोरचे रिक्षावाले पाहिलेले दिसत नाहीत!! त्यांच्या मानाने पुणेरी रिक्षावाले म्हणजे देवमाणसं!! :D >>>सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी? परफेक्शन को और क्या सुधारोगे??? :D

एक Fri, 06/06/2008 - 02:09
१०००००००% सहमत.. पुणेकरांच्या सुधारण्याची काळजी बाकिच्यांनी करण्याची गरज नाही. -कट्टर सदाशिव पेठी पुणेकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गरज १. 'साले माजलेत...' या उक्तीखेरीज ज्यांचं वर्णन अपुरं ठरतं असे रिक्षावाले.२. जुनी, पिवळी पडलेली पुस्तकं मेहेरबानी केल्याच्या थाटात पुरवणारं सरकारी वाचनालय आणि तिथले कर्मचारी.३. सदैव कशासाठी तरी उकरून ठेवलेले आणि ट्रॅफिकनं बुजबुजलेले रस्ते, झाकणं चोरीला गेलेली गटारांची असहाय्य तोंडं, उखडलेल्या लाद्या, भाजीवाल्यांनी आणि पायरेटेड सीडीवाल्यांनी हक्कानं व्यापलेले फुटपाथ.४. रात्री अडीच वाजताही आश्चर्यकारक गर्दीनं ओसंडणारं रेल्वे स्टेशन.५.

आज बुद्ध पौर्णिमा

मन ·

नरेंद्र गोळे Mon, 05/19/2008 - 16:02
बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!! हा बुद्धाचा संदेश महत्त्वाचा आहेच. मात्र १९७४ व १९९८ साली "शांततेकरता अणुस्फोट", बुद्धपौर्णिमेलाच जाणिवपूर्वक घडवून आणून, आपण "बुद्ध हसला" ह्याची प्रचिती दाखवून दिलेली आहे. म्हणजेच अहिंसक असूनही, आम्ही शक्तीचेच उपासक असल्याचे आम्ही दाखवून दिलेले आहे. यासाठी बुद्धपौर्णिमेचे आपल्याकरता आता एक वेगळेच महत्त्व प्रस्थापित झालेले आहे.

नरेंद्र गोळे Mon, 05/19/2008 - 16:02
बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि!! संघं शरणं गच्छामि!!! हा बुद्धाचा संदेश महत्त्वाचा आहेच. मात्र १९७४ व १९९८ साली "शांततेकरता अणुस्फोट", बुद्धपौर्णिमेलाच जाणिवपूर्वक घडवून आणून, आपण "बुद्ध हसला" ह्याची प्रचिती दाखवून दिलेली आहे. म्हणजेच अहिंसक असूनही, आम्ही शक्तीचेच उपासक असल्याचे आम्ही दाखवून दिलेले आहे. यासाठी बुद्धपौर्णिमेचे आपल्याकरता आता एक वेगळेच महत्त्व प्रस्थापित झालेले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जगाला बौद्ध तत्वज्ञ्द्यानाने समृद्ध करणार्‍या,शुद्ध आचरणाचे महत्व पटवणार्‍या, विष्णुचा नववा अवतार म्हणुन मान्यता असलेल्या तथागत गौतम बुद्धास विनम्र अभिवादन. आपलाच मनोबा.

विजय तेंडुलकरांना आदरांजली.

नीलकांत ·

आनंदयात्री Mon, 05/19/2008 - 11:22
>>मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली.

नीलकांत Mon, 05/19/2008 - 11:37
तेंडुलकरांविषयी अधीक माहिती मटावर वाचता येईल. खाली एक दूवा देत आहे. त्या पानावर खाली इतर दूवे आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2681229.cms

छोटा डॉन Mon, 05/19/2008 - 11:43
या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली. सध्या त्यांचे "हे सर्व कोठुन येते" हे पुस्तक वाचायला घेतले आहे, भारी लिहीत होता हा माणूस .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by आर्य

राजे Mon, 05/19/2008 - 11:57
ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव Mon, 05/19/2008 - 12:33
विजय तेंडुलकर ह्या महान लेखकास माझीही विनम्र श्रद्धांजली. कथालेखक,नाटककार,कादंबरीकार ,पटकथाकार म्हणून तेंडुलकर थोरच होते पण एक अस्सल माणूसपण त्यांच्या ठायी होतं जे आपल्याला ठायी ठायी त्यांच्या लेखनातून डोकावताना दिसत असे. त्या अस्सल माणूसपणालाही माझा सलाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धोंडोपंत Mon, 05/19/2008 - 14:22
श्री. विजय तेंडुलकर हे प्रतिभावान साहित्यिक होते याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्राची हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आपला, (खिन्न) धोंडोपंत विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. आपला, (स्पष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

डॉ.प्रसाद दाढे Mon, 05/19/2008 - 17:50
विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. १००% सहमत पण त्या॑च्यातल्या नाटककाराला सलाम.. ते॑' च्या आक्षेपार्ह लिखाणाविषयी व मता॑विषयी चर्चा करणे आत्ता अस्थानी आहे, न॑तर कधीतरी..

आनंद Mon, 05/19/2008 - 18:05
विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते तसेच माणूस म्हणून महान होते. त्यांच्या साहित्याकडे पुर्वग्रहदुषित नजरेने न पहिल्यास ,ते माणुस म्हणून ही किती मोठे ते लक्शात येते. नरेंद्र मोदींबद्दलच्या उद्गाराबद्द्ल म्हणाल तर गुजरातचा नरसंहार पाहुन झालेली तात्कालिक प्रतिक्रिया होती. -आपला आनंद

चतुरंग Mon, 05/19/2008 - 19:34
खडबडीत, विद्रूप, कुरुप असाही त्याचा चेहरा असतो आणि तो तितकाच खरा असतो ह्याची जाणीव मोठ्या धाडसाने मराठी रंगभूमीला आणि एकूणच मराठी मनाला करुन देण्याचे काम करणार्‍या विजय तेंडुलकर ह्या महान लेखकाला प्रणाम. चतुरंग

वाचक Mon, 05/26/2008 - 02:55
तेंडुलकर मागे एकदा इथे बॉस्टनला आले होते तेव्हा इथल्या एका ज्येष्ठ लेखिकेच्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या होत्या - तेसुद्धा हार्वर्ड च्या पायर्‍यांवर बसून. त्यावेळी त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत थोडीफार उलगडून सांगितली होती. प्रियाच्या (अकाली) निधनाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. माणूस म्हणून ते महान होते की नाही ते सांगता येणार नाही पण ' त्यांच्या बोलण्यातले सच्चेपण' मात्र जरुर जाणवले.

केशवराव Mon, 05/26/2008 - 06:41
या माणसाची मला प्रथम ओळख झाली ती साप्ताहिक 'माणूस' पासून. या साप्ताहिकात 'तें ' नी अनेक सदरें लिहीली. नंतर नाटकें, एकांकिका, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून हा माणूस आमच्या पिढीच्या अंगावर आला. आमच्या जीवनात एक स्थान पटकावून बसला. कायम वादात राहूनही याला नजरेआड करता आले नाही. त्यांची नाटकें, चित्रपट, एकांकिका डोक्यांत भिणभिणत रहायच्या. आमचा एक मित्र म्हणायचा, " काय वाईट्ट लिहीतो हा ! डोके भणाणून सोडतो." ' तें ' ना विनम्र आदरांजली.

आनंदयात्री Mon, 05/19/2008 - 11:22
>>मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली.

नीलकांत Mon, 05/19/2008 - 11:37
तेंडुलकरांविषयी अधीक माहिती मटावर वाचता येईल. खाली एक दूवा देत आहे. त्या पानावर खाली इतर दूवे आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2681229.cms

छोटा डॉन Mon, 05/19/2008 - 11:43
या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली. सध्या त्यांचे "हे सर्व कोठुन येते" हे पुस्तक वाचायला घेतले आहे, भारी लिहीत होता हा माणूस .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by आर्य

राजे Mon, 05/19/2008 - 11:57
ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रमोद देव Mon, 05/19/2008 - 12:33
विजय तेंडुलकर ह्या महान लेखकास माझीही विनम्र श्रद्धांजली. कथालेखक,नाटककार,कादंबरीकार ,पटकथाकार म्हणून तेंडुलकर थोरच होते पण एक अस्सल माणूसपण त्यांच्या ठायी होतं जे आपल्याला ठायी ठायी त्यांच्या लेखनातून डोकावताना दिसत असे. त्या अस्सल माणूसपणालाही माझा सलाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धोंडोपंत Mon, 05/19/2008 - 14:22
श्री. विजय तेंडुलकर हे प्रतिभावान साहित्यिक होते याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्राची हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आपला, (खिन्न) धोंडोपंत विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. आपला, (स्पष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

डॉ.प्रसाद दाढे Mon, 05/19/2008 - 17:50
विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. १००% सहमत पण त्या॑च्यातल्या नाटककाराला सलाम.. ते॑' च्या आक्षेपार्ह लिखाणाविषयी व मता॑विषयी चर्चा करणे आत्ता अस्थानी आहे, न॑तर कधीतरी..

आनंद Mon, 05/19/2008 - 18:05
विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते तसेच माणूस म्हणून महान होते. त्यांच्या साहित्याकडे पुर्वग्रहदुषित नजरेने न पहिल्यास ,ते माणुस म्हणून ही किती मोठे ते लक्शात येते. नरेंद्र मोदींबद्दलच्या उद्गाराबद्द्ल म्हणाल तर गुजरातचा नरसंहार पाहुन झालेली तात्कालिक प्रतिक्रिया होती. -आपला आनंद

चतुरंग Mon, 05/19/2008 - 19:34
खडबडीत, विद्रूप, कुरुप असाही त्याचा चेहरा असतो आणि तो तितकाच खरा असतो ह्याची जाणीव मोठ्या धाडसाने मराठी रंगभूमीला आणि एकूणच मराठी मनाला करुन देण्याचे काम करणार्‍या विजय तेंडुलकर ह्या महान लेखकाला प्रणाम. चतुरंग

वाचक Mon, 05/26/2008 - 02:55
तेंडुलकर मागे एकदा इथे बॉस्टनला आले होते तेव्हा इथल्या एका ज्येष्ठ लेखिकेच्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या होत्या - तेसुद्धा हार्वर्ड च्या पायर्‍यांवर बसून. त्यावेळी त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत थोडीफार उलगडून सांगितली होती. प्रियाच्या (अकाली) निधनाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. माणूस म्हणून ते महान होते की नाही ते सांगता येणार नाही पण ' त्यांच्या बोलण्यातले सच्चेपण' मात्र जरुर जाणवले.

केशवराव Mon, 05/26/2008 - 06:41
या माणसाची मला प्रथम ओळख झाली ती साप्ताहिक 'माणूस' पासून. या साप्ताहिकात 'तें ' नी अनेक सदरें लिहीली. नंतर नाटकें, एकांकिका, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून हा माणूस आमच्या पिढीच्या अंगावर आला. आमच्या जीवनात एक स्थान पटकावून बसला. कायम वादात राहूनही याला नजरेआड करता आले नाही. त्यांची नाटकें, चित्रपट, एकांकिका डोक्यांत भिणभिणत रहायच्या. आमचा एक मित्र म्हणायचा, " काय वाईट्ट लिहीतो हा ! डोके भणाणून सोडतो." ' तें ' ना विनम्र आदरांजली.
लेखनप्रकार
मराठीतील एक दिग्गज व्यक्तीमत्व, जेष्ठ नाटककार तसेच पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं वृध्दापकाळानं आज पुण्यात निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या गाजलेल्या नाटकांत ' श्रीमंत ' , ' गिधाडे ', ' शांतता कोर्ट चालू आहे ', ' सखाराम बाईंडर ', ' घाशिराम कोतवाल ', ' कमला ' यांचा समावेश होतो. मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. समस्त मराठी साहित्यविश्वातून आज शोक व्यक्त होतोय. मिसळपाव परिवार सुध्दा विजय तेंडुलकरांना आदरांजली वाहत आहे.

’वि.वा.’ कुसुमाग्रज - एक अवलोकन

देवदत्त ·

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 08:04
दत्तरव, कुसुमाग्रजांच्या ह्या संचाची अगदी उत्तम ओळख करून दिलीत. मलाही हा संच घ्यायचा आहे. आजच नोंदणी करतो... धन्यवाद.. आपला, (कुसुमाग्रजभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Tue, 07/15/2008 - 01:56
खूप छान ओळख करून दिलीत. तात्या, माझ्यासाठीही ऑर्डर कराल का? मी तुम्हाला चेक पाठवण्याची व्यवस्था करते. तिकडे आले की घेईन तुमच्याकडून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त Mon, 07/14/2008 - 22:58
:) काल पुन्हा सतारीचे बोल फक्त ऐकले. तेव्हा नुसते ऐकण्यात जास्त चांगले वाटले. आणि कोणी घेतला आहे का हा संच?

विकास Tue, 07/15/2008 - 01:46
या माहीतीसाठी धन्यवाद. त्यांची स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ही भारतीय स्वातंत्र्यास जेंव्हा ५० वर्षे झाली त्यावेळची संपूर्ण कविता जालावर उपलब्ध आहे का? "पन्नाशीची उमर गाठीली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते तुम्हा शेवटी वाट वाकडी धरू नका... " असे काहीसे त्याचे शब्द आहेत.

विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 08:04
दत्तरव, कुसुमाग्रजांच्या ह्या संचाची अगदी उत्तम ओळख करून दिलीत. मलाही हा संच घ्यायचा आहे. आजच नोंदणी करतो... धन्यवाद.. आपला, (कुसुमाग्रजभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Tue, 07/15/2008 - 01:56
खूप छान ओळख करून दिलीत. तात्या, माझ्यासाठीही ऑर्डर कराल का? मी तुम्हाला चेक पाठवण्याची व्यवस्था करते. तिकडे आले की घेईन तुमच्याकडून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त Mon, 07/14/2008 - 22:58
:) काल पुन्हा सतारीचे बोल फक्त ऐकले. तेव्हा नुसते ऐकण्यात जास्त चांगले वाटले. आणि कोणी घेतला आहे का हा संच?

विकास Tue, 07/15/2008 - 01:46
या माहीतीसाठी धन्यवाद. त्यांची स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ही भारतीय स्वातंत्र्यास जेंव्हा ५० वर्षे झाली त्यावेळची संपूर्ण कविता जालावर उपलब्ध आहे का? "पन्नाशीची उमर गाठीली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते तुम्हा शेवटी वाट वाकडी धरू नका... " असे काहीसे त्याचे शब्द आहेत.
नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे. महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील.