मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पण काहितरी बदलतयं...

मनिष ·

प्राजु 20/05/2008 - 19:56
सुंदर मुक्तछंदातले काव्य.. शेवटचं कडवं तर खूप छान. खास करून, तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! आवडलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 20/05/2008 - 21:19
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं तिची हसरी नजर मलाही हसवतेयं हे जास्त आवडलं...

मदनबाण 21/05/2008 - 04:26
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं हे मस्तच..... तू काय पाहिलसं माझ्यात हा प्रश्नही अनुत्तरीत :? फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! व्वा क्या बात है | (बदलता येईल सगळं ) असेच म्हणणारा..... मदनबाण.....

फटू 21/05/2008 - 06:51
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर 21/05/2008 - 07:31
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा सगळंच अपरिचित ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा भाबडेपणा म्हणजे निरागस लहान मूल. तिथे देवाचा अंश असतो. ह्याच दैवी प्रकटनाकडे कवी आकर्षीत झाला नसेल ना?..... खूप सकारात्मक कविता...

विसोबा खेचर 21/05/2008 - 09:16
वा मनिषराव! सुरेख कविता.... तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं या ओळी क्लासच! आपला, (कविताप्रेमी) तात्या. अवांतर - हे लिखाण आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते, बाकी फक्त 'मिसळपाव' साठी! जियो...! आपला, (मिसळपावकर) तात्या.

मनिष 21/05/2008 - 12:28
बापरे! एवढे सारे प्रतिसाद मला खरच अपेक्षित नव्ह्ते...मि.पा. ची जिंदादिली जिंदाबाद! :) आणि सर्वांना मनापासून धन्यवाद! [:)] @ अरुण मनोहर - भाबडेपणा, निरागसपणात एक विलक्षण "healing, soothing power" असते हे मला कित्येक वेळा अनुभवायला आले आहे. मला लहान मुलांबरोबर खेळणे/बोलणे हा एक उत्कृष्ट स्ट्रेस-बस्टर वाटतो. अवांतर - कवितेतील "ती" आता नुकतीच बायको झाली आहे. :) कधी कधी रोजच्या व्यवहारात तिच्या ह्याच भाबडेपणाचा वैताग येऊन वाटते, "इतकी कशी तू/ही बावळट पणे वागू शकतेस?" -- आणि मग मी ह्याच भाबडेपणावर कसा फिदा होतो हेही आठवते (नाहितर ती आठवण करून देतेच!:)), आणि मी स्वत:लाच समजावतो. कवितारुपी 'लिखित पुराव्याचा" असाही एक उपयोग!! (फायदा की तोटा ते ज्याने त्याने ठरवावे! :D) बाकी व.पु. म्हणाले तसं "क्षण एक भाळण्याचा, बाकी सांभाळण्याचे" चा प्रत्यय येतच असतो - दोघांनाही! :) सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद! - मनिष स्वगत : अवांतर जरा 'जास्तच' झालं का?

आनंदयात्री 21/05/2008 - 12:34
मनिष .. सह्ही कविता .. च्यामारी काय अचुक उतरवलय भावनांना शब्दात .. कविता लै लै आवडली.

आनंदयात्री 21/05/2008 - 12:37
मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयं… तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं सहीये बॉस्स ... परत वाचली .. परत वाचली अन वाचतच राहिलोय .. आपण तर फ्यान बॉ तुमचे !!

मनस्वी 21/05/2008 - 18:21
मनिष.. कोणत्या ओळी क्वोट करू.. सगळ्याच आवडल्या..
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं!
विचार छान उतरलेत.

बेसनलाडू 21/05/2008 - 20:22
कविता आवडली. काही ठिकाणी संदिग्ध वाटली; पण एकंदर छान. लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनिष 22/05/2008 - 11:05
नक्की काय संदिग्ध वाटले हे जाणून घ्यायला आवडेल. कदाचित संतर्भ माझ्या मनात स्पष्ट होते, पण लिहितांना संदिग्ध झाले असतील. तुला काय/कुठल्या ओळी संदिग्ध वाटल्या? सर्वच प्रतिक्रिया देणार्‍यांचे आभार! - मनिष

In reply to by मनिष

बेसनलाडू 22/05/2008 - 11:20
काही ठराविक ओळींकडे स्पष्ट निर्देष करता येत नाही; पण आठ्या विसरणे,जखमा पुसणे,भाबडेपणा आवडणे,तिचे हसणे, समजावणे या संदर्भांचे कवितेतील नेमके स्थान लक्षात घेतले तर पूर्ण कविता समजून घ्यायला (निदान मला तरी) बरेचदा खालीवर करावे लागले. यात वाचक म्हणून माझी फ्रेम ऑफ रेफरन्स/ओरिजिन हरवली/ले असू शकते. कविता टॉप टू बॉटम पद्धतीने वाचून समजली तर खुमारी वाढते (असे मला वाटते). मग ती भले २-३दा वाचायला लागो. पण या कवितेच्या बाबतीत मला बरेचदा खालीवर नाचानाची करावी लागली. पुढचे समजून घेताना मागे काय म्हटलंय याचा पुनर्विचार, त्यासाठी पुन्हा मागे जाऊन पुनर्वाचन. गद्य लेखनात एकवेळ चालूनही जाते, विशेषतः वैचारीक स्वरूपाच्या लेखनात. पण कवितेत असे होऊ नये असे वाटते. चूभूद्याघ्या. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनिष 22/05/2008 - 14:25
मला वाटले की तो फ्लो सरळ आहे गद्यासारखा, पण हे लक्षात ठेवेन. खालीवर करावे लागू नये असे मलाही वाटते - ह्या कवितेत ते तसे नाही असे मला वातले - पण कदाचित मी आत्ता पुर्ण त्रयस्थासारखा नाही वाचू शकत माझीच कविता.

शितल 22/05/2008 - 05:20
एकदम अफलातुन रचना, मस्त भाव छेडलेत. आणखी काय बोलु शब्दच हरवलेत.

प्राजु 20/05/2008 - 19:56
सुंदर मुक्तछंदातले काव्य.. शेवटचं कडवं तर खूप छान. खास करून, तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! आवडलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 20/05/2008 - 21:19
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं तिची हसरी नजर मलाही हसवतेयं हे जास्त आवडलं...

मदनबाण 21/05/2008 - 04:26
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं हे मस्तच..... तू काय पाहिलसं माझ्यात हा प्रश्नही अनुत्तरीत :? फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! व्वा क्या बात है | (बदलता येईल सगळं ) असेच म्हणणारा..... मदनबाण.....

फटू 21/05/2008 - 06:51
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर 21/05/2008 - 07:31
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा सगळंच अपरिचित ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा भाबडेपणा म्हणजे निरागस लहान मूल. तिथे देवाचा अंश असतो. ह्याच दैवी प्रकटनाकडे कवी आकर्षीत झाला नसेल ना?..... खूप सकारात्मक कविता...

विसोबा खेचर 21/05/2008 - 09:16
वा मनिषराव! सुरेख कविता.... तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं या ओळी क्लासच! आपला, (कविताप्रेमी) तात्या. अवांतर - हे लिखाण आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते, बाकी फक्त 'मिसळपाव' साठी! जियो...! आपला, (मिसळपावकर) तात्या.

मनिष 21/05/2008 - 12:28
बापरे! एवढे सारे प्रतिसाद मला खरच अपेक्षित नव्ह्ते...मि.पा. ची जिंदादिली जिंदाबाद! :) आणि सर्वांना मनापासून धन्यवाद! [:)] @ अरुण मनोहर - भाबडेपणा, निरागसपणात एक विलक्षण "healing, soothing power" असते हे मला कित्येक वेळा अनुभवायला आले आहे. मला लहान मुलांबरोबर खेळणे/बोलणे हा एक उत्कृष्ट स्ट्रेस-बस्टर वाटतो. अवांतर - कवितेतील "ती" आता नुकतीच बायको झाली आहे. :) कधी कधी रोजच्या व्यवहारात तिच्या ह्याच भाबडेपणाचा वैताग येऊन वाटते, "इतकी कशी तू/ही बावळट पणे वागू शकतेस?" -- आणि मग मी ह्याच भाबडेपणावर कसा फिदा होतो हेही आठवते (नाहितर ती आठवण करून देतेच!:)), आणि मी स्वत:लाच समजावतो. कवितारुपी 'लिखित पुराव्याचा" असाही एक उपयोग!! (फायदा की तोटा ते ज्याने त्याने ठरवावे! :D) बाकी व.पु. म्हणाले तसं "क्षण एक भाळण्याचा, बाकी सांभाळण्याचे" चा प्रत्यय येतच असतो - दोघांनाही! :) सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद! - मनिष स्वगत : अवांतर जरा 'जास्तच' झालं का?

आनंदयात्री 21/05/2008 - 12:34
मनिष .. सह्ही कविता .. च्यामारी काय अचुक उतरवलय भावनांना शब्दात .. कविता लै लै आवडली.

आनंदयात्री 21/05/2008 - 12:37
मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयं… तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं सहीये बॉस्स ... परत वाचली .. परत वाचली अन वाचतच राहिलोय .. आपण तर फ्यान बॉ तुमचे !!

मनस्वी 21/05/2008 - 18:21
मनिष.. कोणत्या ओळी क्वोट करू.. सगळ्याच आवडल्या..
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं!
विचार छान उतरलेत.

बेसनलाडू 21/05/2008 - 20:22
कविता आवडली. काही ठिकाणी संदिग्ध वाटली; पण एकंदर छान. लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनिष 22/05/2008 - 11:05
नक्की काय संदिग्ध वाटले हे जाणून घ्यायला आवडेल. कदाचित संतर्भ माझ्या मनात स्पष्ट होते, पण लिहितांना संदिग्ध झाले असतील. तुला काय/कुठल्या ओळी संदिग्ध वाटल्या? सर्वच प्रतिक्रिया देणार्‍यांचे आभार! - मनिष

In reply to by मनिष

बेसनलाडू 22/05/2008 - 11:20
काही ठराविक ओळींकडे स्पष्ट निर्देष करता येत नाही; पण आठ्या विसरणे,जखमा पुसणे,भाबडेपणा आवडणे,तिचे हसणे, समजावणे या संदर्भांचे कवितेतील नेमके स्थान लक्षात घेतले तर पूर्ण कविता समजून घ्यायला (निदान मला तरी) बरेचदा खालीवर करावे लागले. यात वाचक म्हणून माझी फ्रेम ऑफ रेफरन्स/ओरिजिन हरवली/ले असू शकते. कविता टॉप टू बॉटम पद्धतीने वाचून समजली तर खुमारी वाढते (असे मला वाटते). मग ती भले २-३दा वाचायला लागो. पण या कवितेच्या बाबतीत मला बरेचदा खालीवर नाचानाची करावी लागली. पुढचे समजून घेताना मागे काय म्हटलंय याचा पुनर्विचार, त्यासाठी पुन्हा मागे जाऊन पुनर्वाचन. गद्य लेखनात एकवेळ चालूनही जाते, विशेषतः वैचारीक स्वरूपाच्या लेखनात. पण कवितेत असे होऊ नये असे वाटते. चूभूद्याघ्या. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनिष 22/05/2008 - 14:25
मला वाटले की तो फ्लो सरळ आहे गद्यासारखा, पण हे लक्षात ठेवेन. खालीवर करावे लागू नये असे मलाही वाटते - ह्या कवितेत ते तसे नाही असे मला वातले - पण कदाचित मी आत्ता पुर्ण त्रयस्थासारखा नाही वाचू शकत माझीच कविता.

शितल 22/05/2008 - 05:20
एकदम अफलातुन रचना, मस्त भाव छेडलेत. आणखी काय बोलु शब्दच हरवलेत.
लेखनविषय:
मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयं… तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं तिची हसरी नजर मलाही हसवतेयं ‘सगळं छान होईल’ ती मला समजवतेयं तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा सगळंच अपरिचित आणि तिचं माझ्यावरील प्रेम अगदिचं अनपेक्षित तू काय पाहिलसं माझ्यात हा प्रश्नही अनुत्तरीत आणि तिच्या डोळ्यात प्रश्नच हरवतात हा शोधही अवचित पण काहितरी बदलतयं… कपाळावरील आठी जाऊन स्मित हळुच फुलतयं ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा असं उगाचंच वाट

मी पाहिलेले मयत

आंबोळी ·

प्राजु 20/05/2008 - 20:02
आधी वाटले, हे काहीतरी गंभिर लेखन असेल.... पण पेटत्या चितेवर अंग शेकणारा आणि विडी शिलगावणारा माणूस... हे वाचून एकदम हसू आले. प्रसंग डोळ्यापुढे आला आणि तुमची काय अवस्था झाली असेल ही कल्पना आली. चांगले लेखन. पुढचा भाग लवकर येऊद्यात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आयला हा आंबोळी सगळ्या अशा मरणाशी संबंधीत कथा का लिहीत आहे? तो काय मृत्यूचा दूत वगैरे आहे का? का त्याला 'अंधेरा कायम रहे ' वाल्याने सर्वाना घाबरवण्याचे कंत्राट दिले आहे. :) (ह.घ्या.) पण बाकी याने मयत आणि बाकी सर्व गोष्टींचे वर्णन भारी केले आहे. मागे एकदा मी माझ्या आजोळी केळशीला गेलो होतो, ८-९ वीत(इयत्तेत) असेन तेव्हा. तिथे छान उथळ असा समुद्रकिनारा आहे मस्त डुंबता येते. आम्ही सर्वजण समुद्रावर खेळायला आणि डुंबायला गेलो होतो. तिथेच समुद्रकिनार्‍यावर एक स्मशान पण आहे. स्मशान म्हणजे फक्त एक चौथरा ज्यावर चिता रचण्यासाठी ६ लोखंडी दांडे उभे पुरलेले असतात आणि त्यावर एक पत्र्याची शेड असते. मी तेव्हा अगदी चिता रचण्या पासून ते अग्नि देईपर्यंत सगळे विधी पाहीले होते. आणि तेवढ्यात कोणाच्यातरी लक्षात आले की मी सर्व खेळणार्‍या मुलांच्यात नाहीये. मग शोधाशोध सुरू झाली. पण लगेच मी या स्मशानातल्या गर्दीत सापडलो. लगेच मला आजोबांनी समुद्रात बुडी मारून यायला लावली . आणि मी पाण्यात गेल्यावर हळूहळू सर्वजण पाण्यात उतरून खेळायला लागले. :) पुण्याचे पेशवे

स्वयंभू 20/05/2008 - 21:04
आम्ही एकदा कोकणात फिरत असताना नदीचा एक सुन्दर घाट दिसला. बाईक्स थांबवून जरा आम्ही तिथले सौंदर्य बघत होतो. बरंच अंतर कापायचं असल्याने मोठ्या मुश्कीलीने नदीत उतरायचा मोह टाळला. पण पायर्‍यांवर बसून फोटो वगरे काढले. नि तेवढ्यात एक मित्र ओरडला 'आयला ते बघ काय', बघितलं तर एक छोटसं मडकं पाण्यात तरंगत होतं. शंका आली म्हणून आजू बाजूला बघितलं तर जवळच स्मशान होतं नी तो घाट अस्थीविसर्जनाचा होता. आम्ही घाबरलो वगरे नाही. पण इतकं अप्रतीम निसर्ग सौंदर्य नी स्मशान ह काँट्रास्ट मात्र जाणवून गेला. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन 20/05/2008 - 22:19
छान लिहिता तुम्ही आंबोळीराव. पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! :-) (कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार :-) ह.घ्या.) आपलाच जाम टरकलेला, मनोबा

भयानक आवडली गोष्ट. पण अहो तुम्ही बघितलेला माणूस सभ्य होता असंच म्हणावं लागेल. आमच्या गोरेगावला एक 'अंत्यसंस्कार' फेम गुरूजी होते ते तर विधी संपून चिता पेटली रे पेटली की मस्त छान त्याच चितेवर बीडी वगैरे पेटवून मोकळे. माणूस गप्पिष्ट. बाकीचे लोक जायला नुघाले की आग्रह वगैरे करून थांबवायचे, म्हणायचे "थांबा हो, जायचा तो गेला, तुम्ही थांबा" बिपिन.

विकास 21/05/2008 - 01:06
हा लेख वाचताना आठवलेल्या दोन गोष्टी: (जशी आठवत तशी:) सुधीर गाडगीळांनी एकदा त्यांच्या कार्यक्रमात पुण्यातील अशा केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते (आडनाव विसरलो). त्यांनी त्यातील एका गुरूजींना स्मशानभूमीत प्रश्न विचारला की तुमचे यावर कसे भागते? त्यावर ते म्हणाले की अहो कधी कधी मृत व्यक्तींच्या अंगात दागीने ठेवले जातात ते आम्हीच घेतो वगैरे... नंतर काही काळाने गाडगीळ कुणाच्या तरी अंत्यसंस्काराला वैकुंठ स्मशानभूमीत गेले असताना ते गुरूजी परत भेटले तर ते तावातावाने चिडून म्हणाले की गाडगीळ तुमच्या अंत्यसंस्काराला आम्ही कोणी येणार नाही... का म्हणून गाडगीळांनी विचारले तर म्हणाले की मागच्या वेळेस माझी घेत असलेली मुलाखत ही प्रक्षेपित होणार आहे हे माहीत नव्हते (थोडक्यात धंद्याचे गुपीत उघडकीस आले). ---------------------------- कधी काळी मित्र कॉळेजच्या परीक्षा संपल्यावर अलीबाग/मुरूड जंजीरा ह्या भागातील पण कुठल्याशा वेगळ्या समुद्र किनार्‍यावर गेलो होतो. समुद्रात पाय घालून ओले झाल्यावर वाळू झटकायला म्हणून बाजूच्या दगडी कट्ट्यावर पाय हलवत आम्ही बसलो. तेव्हढ्यात (उभा असलेल्या) एकाची नजर त्या कट्ट्याच्या भिंतीवर लिहीलेल्या सुचनेकडे गेली: (या अर्थी) "मयताला ठेवायची जागा" - त्याने मोठ्यांदा वाचताच सर्वजण दचकून उठले आणि मुकाट्याने गाडीकडे वळले!

In reply to by विकास

मदनबाण 21/05/2008 - 05:10
हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... मदनबाण.....

चतुरंग 21/05/2008 - 01:19
शेवटी तो अग्नीच, त्यामुळे थंडीपासून रक्षण करणार्‍या त्या आगीकडे तो माणूस आपसूक आला आणि अंग शेकून गेला इतकच नाही तर बिडीसुद्धा पेटवून गेला! तुमची काहीवेळ पाचावर धारण बसली असणार ह्याचा विचार मनात येऊन हसू आले! :) (स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? :? ) चतुरंग

वरदा 21/05/2008 - 02:50
कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार किती हो मरणावर लिहिणार जरा जगण्यावर लिहा ना.... :S स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... :?

कसला तो अनुभव... टरकावून टाकणारा.. >:) अवांतर : ओ मतकरी, दुसरं काहीतरी लिहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

अहाहा. इथे इतके वेगवेगळ्या जॉनरचे ( लेखनप्रकार असा एक फालतु प्रतिशब्द सध्या सुचतो आहे , पण तो अपुरा आहे हे ठाऊक असल्याने ..."जॉनरच " )... लिहिणारे लोक आहेत की एकदम बेष्ट वाटते... ... आंबोळीराव, तुमची काळजी वाटते हो... तुम्ही जरा उतारा म्हणून हलक्या फुलक्या निसर्ग, प्रेम, पाखरे , नदी नाले, दर्‍याखोर्‍या यांच्या चारोळ्या वाचत आणि पाडत चला..... थोडं ऑर्कुट वरती गेल्यासारखं वाटेल पण मानसोपचारतज्ञाला त्रास आणि पैसे देण्यापेक्षा हे फार बरे... काही नमुने... ______________________________________ " तू आलीस तिकडून सखे आनंदाचा पूर आला भावनांनी माझा ऊर भरून आला... सखे तुझ्या पावलांची मंद सळसळ पैंजणांची तर रूणझूण , खचितच माझ्या वेड लावते गे जीवाला...." _____________________ तू कधी येणार? वाट पाहतोय.. येशील ना? ______________-- फुलणार फुलणार... आमच्या प्रतिभेचा चाफा फुलणार? काय गं? ओळख आहे ना? ________________________ ओढ वाटते जीवाला , सारखी तुझीच आठवण... ध्यास तुझा , कधी फळेल हे जीवन... __________________________________ असलं काहीबाही पाडत रहा नाहीतर मानसिक त्रास होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 21/05/2008 - 09:33
टरकथा लेखक. :-) कंदिल.... आता मयत.. चांगले आहे. चालु द्या. "वाचतोय व बहुतेक वाचु" ;-)

ऋचा 21/05/2008 - 09:39
>>हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... खरचं तो भीमा असेल असं वाटलं

आंबोळी म्हटला की ते मरणाचा 'कंदील' आठवतो. च्यायला येऊन जाऊन मरणाचाच विषय कसा सुचतो राव तुम्हाला !!! बाकी मयताचे वर्णन तर असे केले की आम्हीही आपल्याबरोबर तो कार्यक्रम अटेंड केल्यासारखा वाटला. बाकी त्या धिप्पाड माणसाची इंट्री मस्तच झाली !!! येऊ दे !!! येऊ दे !!! आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. :)

मनस्वी 21/05/2008 - 10:34
मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास??

केशवसुमार 21/05/2008 - 11:42
अंबोळीशेठ, लेख चांगला झाला आहे..प्रसंगाचे वर्णन उत्तम :SS ..पुढचा भाग लवकर येऊदे.. (वाचक) केशवसुमार स्वगतः रात्री कुणाचा त्रास नको म्हणून स्मशानात दारू पिणारे आणि जुगार खेळणारे आणि भूक लागल्यावर अता बाहेर कुठे जायचे म्हणून पिंडाचा भात कावळ्यांना हकलून खाणारे बघितले आहेत त्या मुळे चितेच्या धगीवर हात शेकण्याचे काहीच वाटले नाही >:P

विजुभाऊ 21/05/2008 - 12:36
कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार =)) कन्दील नरेश आम्बोळी ...कन्दील काय ?मयत काय? आता या पुढचे लिखाणाचे विषय " मृत्युच्या सूचना आणि मृत्युनन्तरचे जिवन" असा घे बघ. मजा येइल. आणि त्या पुढचा विषय "पुनर्जन्म" हा घे. त्या पुढे जाऊन आणखी विषय मिपा चे गवकरी देतिलच. बाकी प्रगती बेष्टच. कन्दीलाची एजन्सी कोणाला दिलीस? आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? तू सरळ दाम्बीस काकांचे नाव ठोकुन दे असल्या प्रश्नावर. मी तेच करतो.

केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते मोघे गुरूजी वाचका॑चे प्रतिसाद पाहून द.मा.मिरासदारा॑ची 'विर॑गुळा' नावाची गोष्ट आठवली, त्यातल्या तात्या देशपा॑डे॑ना असल्या' गोष्टीत भय॑कर रस असतो..

मला हे वाचुन राम नगरकरांच्या 'रामनगरी' तील वर्‍हाडाचा प्रसंग आठवला. नवरामुलगा प्रेताला टेकुन आराम करत असतो.. तो प्रसंग. छान आहे लेखन..

अभिज्ञ 22/05/2008 - 13:57
ह्या वेगळ्या विषयावर छान लिहिले आहे. मिपावर एकाच विषयावर सातत्याने आणि कसबीने लिहिणारे आपण बहुधा पहिलेच असाल. ;) बाकी ,स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता. स्मशानातील भाषणेबिषणे वगैरे कव्हर कराल असे वाटले होते. जमल्यास पुढच्या भागात येउ देत. आंबोळीराव , तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. तुम्हाला जे आवडते ते लिहा.लेखन हे प्रसिद्धिकरीता नसून स्वसमाधानाकरीता असावे असे वाटते. फक्त लेखन हे किती सकस आहे हेच महत्वाचे. पुढील भागाची वाट पहात आहे. अभिज्ञ. B)

आंबोळी 22/05/2008 - 16:27
सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे व वाचणार्‍यांचे आभार. मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते असा माझा अनुभव आहे. आणि मी तेच करत असतो. फक्त मरण या शाश्वत गोष्टीबद्दल कोणी फारसे लिहिताना आढळले नाही. ती राहिलेली फट बुजवण्याचा हा प्रमाणिक प्रयत्न. आपण सर्वानी गोड (?) मानुन घ्या. >>पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! अहो इथे घाबरलात की इतर लेखकांचे अल्हादायी लेखन वाचतानाचा आनंद द्वीगुणीत होइल. >>(स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? ) माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. >>आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. आयला... माझे लेखन व्यसन लागण्याइतके नशीली आसेल असे मला स्वप्नातसुध्धा वाटले नव्हते. (बहुतेक "रक्तगाभुळली वटवाघळे,उप्पिटम" वगैरे वाचुन प्रवास करत नसल्यामुळे स्वप्नात तसे वाटत नसेल.....) >>मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? स्वप्नभटके विजुभौ >>स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता>> अहो मी फक्त घडलेला प्रसंग सांगीतला. पण पुढच्यावेळी लक्षात ठेवीन. >>तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. या दिलेल्या सल्ल्याविषयीही आपले हेच मत आहे? ;) >>स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... आरे हो ती स्टोरी सांगायची राहिली. पुर्वी आम्ही एक पोरगी पटवली होती. म्हन्जे जातायेता इशारे, खाणाखुणा आणि पत्रव्यवहार इथपर्यंतच मामला होता. शेवटी आम्ही एकदा भेटून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे ठरवले. आता गावात एकांत मिळेल असे एकच ठिकाण होते ते म्हंजे स्मशान. तेंव्हा संध्याकाळी ७ नंतर तिथे भेटायचे ठरले. आम्ही निघालो. थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. (वरच्या स्टोरीतली सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत) (कृतज्ञ)आंबोळी

In reply to by आंबोळी

प्रमोद देव 22/05/2008 - 19:12
थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर 23/05/2008 - 07:43
मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. धन्यवाद आंबोळीराव! अहो पण जरा हळू बोला! मिपाच्या हितशत्रूंना हे वाक्य आवडणार नाही! त्यांना असं वाटतं की मिपा हे फक्त काहितरी पोरकट टाईमपास असणारं, व सतत काहितरी फालतूगिरी चालू असलेलं संस्थळ आहे! हां, आता वडील वारल्यासारखे चेहरे करून सतत दुसर्‍याच्या शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका काढण्यातच मिपाकर धन्यता मानत नाहीत, त्याला काय इलाज बरं?! :) असो... तात्या.

धमाल मुलगा 22/05/2008 - 16:50
च्यायला, लै म्हणजे लैच उशीर घडला बॉ प्रतिक्रिया द्यायला :( आम्बोळ्या, भौ हे खरंच असं घडलं होतं? आयला, चितेवर बिडी पेटवायची म्हणजे काय गंमत आहे का? नेहमीप्रमाणे लेख उत्तम आहेच हे वे.सां.न.ल. :)
...प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता.
हाण तिच्याआयला! एकदम जब्राट! च्यायला हा किस्सा तर लैच भारी! अवांतरः नाही नाही त्या गोष्टी शिकवून बायकोचे कान भरणार्‍या तिच्या माहेरच्या भोचक नातेवाईकांवर हा कंदील काम करतो का?
मी पण पाहिलेली मयत :
आम्ही साधारण १२वीत असु. एक मित्र, पराग नाव त्याचं, नुकताच गाडी शिकला होता आणि त्याच्या बा नं त्याला यामाहा घेऊन दिली होती. मग काय हो...भर गावातून बुंग..बुंग करत हिंडायचो आम्ही. एक दिवस असेच सुसाट फिरत होतो, तर समोरुन एक अंत्ययात्रा आली, म्हण्जे अंत्ययात्रा चाललीच होती, आम्ही तिच्यासमोर आलो. पर्‍याचा गाडीवर काहीकेल्या ताबा राहिना....टरकून मी मागच्यामागं उडी टाकली. आणि हा बहाद्दर........ गेलेल्या माणसाला जे चार खांदेकरी घेऊन चालले होते, सरळ त्यांच्यातच गाडी घेऊन घुसला...अरारारा...तिरडी टाकून जी काय पळापळ झाली....हातात मडकं घेऊन पुढं चालणारा त्या मयताचा मुलगा मडक्यासकट सांडला. ती तिरडी, तिच्यावरचं ते प्रेत आणि तो पडलेला मुलगा हे सगळं जस्संच्या तस्संच ठेऊन त्या सगळ्यांनी पर्‍याला बेक्कार धूतला :( नंतर पोलिसकेस केली...ह्या सगळ्या गडबडीत पर्‍याच्या बापसाला आणायला म्हणून मी गेलो तो परत येऊन पाहतो तर पर्‍या एका बाजुला डोकं धरुन बसलेला, मामालोकांनी पंचनामा करुन घेतलेला, रस्त्यात वेडावाकडा पडलेला मुलगा, ते मडकं तिरडी इ.इ. सगळं खडूनं आखून घेतलेलं.... काय तिच्यामारी एकेक अनुभव आहेत आमचे!

In reply to by धमाल मुलगा

शिद 21/02/2014 - 18:50
नेहमीच्या रटाळ धाग्यांना कंटाळुन जरा जुने लेख चाळत होतो त्यामधे हे रत्न सापडले... धमाल मुलगा ह्यांचा हा प्रतिसाद पण एक्दम जबरा... ठ्या करुन फोटलो एक्दम... =)) =)) अवांतरः आंबोळी यांचे 'कंदील व कंदील-२' हे लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचावे हे नम्रपणे सुचवतो.

वरदा 22/05/2008 - 17:53
मानलं तुम्हाला...धन्य आहात कसली ष्टोरी आहे जबराट पुढं हे नाही सांगितलं आजोबांना पाहीलं आणि मागे पाहिलं तर ती मुलगी गायब झालेली.....कोण होती ती? ........ कुठुन सुचतं हो... माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. :O

आनंदयात्री 22/05/2008 - 19:00
>>माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले >>पाहिजे एकदा. विसर शिंच्या नाव विसर माझे ...

आंबोळी 22/05/2008 - 19:46
येथे जातीने उपस्थीत राहून माझ्या मयताला खांदा दिल्याबद्दल तात्या व इतर गावकरी मंडळींचे मनःपुर्वक आभार !!! असाच योग पुन्हःपुन्हा येवो. (आभारी) आंबोळी

अभिता 23/05/2008 - 01:58
मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%.

In reply to by अभिता

मन 23/05/2008 - 17:00
मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%. नक्किच. १००००% मान्य्. आपलाच, मनोबा

In reply to by अनुप ढेरे

सोत्रि 21/02/2014 - 20:31
शेम टो शेम हेच म्हणतो. हे असले जुने लेख खाणकाम करुन काढत राहिले पाहिजे. जरा तजेला येइल इथे परत! - (जुना मिपाकर) सोकाजी

कंजूस 23/02/2014 - 06:07
हा धागा उघडला तर २००८ सालचा आता खणून वर काढलेला . उत्सुकता म्हणून वाचून काढला . "क्रमश:" हा शब्द बऱ्याच जणांच्या भावना दुखावणारा वाटला .पण यात तांत्रिक दृषट्या गैर काहीच वाटले नाही . हापण विषय क्रमश: होऊ शकतो . आता मूळ धागाकर्ता जोपर्यंत काही नवीन भर घालत नाही तोपर्यँत प्रतिसाद वाढवण्यात काहीच उपयोग नाही .यात्रेचे मजेदार अनुभव असू शकतात यावर आपल्या विनोदी लेखकांनी प्रकाशकांचा सल्याने कमीच लिहिले आहे .

प्राजु 20/05/2008 - 20:02
आधी वाटले, हे काहीतरी गंभिर लेखन असेल.... पण पेटत्या चितेवर अंग शेकणारा आणि विडी शिलगावणारा माणूस... हे वाचून एकदम हसू आले. प्रसंग डोळ्यापुढे आला आणि तुमची काय अवस्था झाली असेल ही कल्पना आली. चांगले लेखन. पुढचा भाग लवकर येऊद्यात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आयला हा आंबोळी सगळ्या अशा मरणाशी संबंधीत कथा का लिहीत आहे? तो काय मृत्यूचा दूत वगैरे आहे का? का त्याला 'अंधेरा कायम रहे ' वाल्याने सर्वाना घाबरवण्याचे कंत्राट दिले आहे. :) (ह.घ्या.) पण बाकी याने मयत आणि बाकी सर्व गोष्टींचे वर्णन भारी केले आहे. मागे एकदा मी माझ्या आजोळी केळशीला गेलो होतो, ८-९ वीत(इयत्तेत) असेन तेव्हा. तिथे छान उथळ असा समुद्रकिनारा आहे मस्त डुंबता येते. आम्ही सर्वजण समुद्रावर खेळायला आणि डुंबायला गेलो होतो. तिथेच समुद्रकिनार्‍यावर एक स्मशान पण आहे. स्मशान म्हणजे फक्त एक चौथरा ज्यावर चिता रचण्यासाठी ६ लोखंडी दांडे उभे पुरलेले असतात आणि त्यावर एक पत्र्याची शेड असते. मी तेव्हा अगदी चिता रचण्या पासून ते अग्नि देईपर्यंत सगळे विधी पाहीले होते. आणि तेवढ्यात कोणाच्यातरी लक्षात आले की मी सर्व खेळणार्‍या मुलांच्यात नाहीये. मग शोधाशोध सुरू झाली. पण लगेच मी या स्मशानातल्या गर्दीत सापडलो. लगेच मला आजोबांनी समुद्रात बुडी मारून यायला लावली . आणि मी पाण्यात गेल्यावर हळूहळू सर्वजण पाण्यात उतरून खेळायला लागले. :) पुण्याचे पेशवे

स्वयंभू 20/05/2008 - 21:04
आम्ही एकदा कोकणात फिरत असताना नदीचा एक सुन्दर घाट दिसला. बाईक्स थांबवून जरा आम्ही तिथले सौंदर्य बघत होतो. बरंच अंतर कापायचं असल्याने मोठ्या मुश्कीलीने नदीत उतरायचा मोह टाळला. पण पायर्‍यांवर बसून फोटो वगरे काढले. नि तेवढ्यात एक मित्र ओरडला 'आयला ते बघ काय', बघितलं तर एक छोटसं मडकं पाण्यात तरंगत होतं. शंका आली म्हणून आजू बाजूला बघितलं तर जवळच स्मशान होतं नी तो घाट अस्थीविसर्जनाचा होता. आम्ही घाबरलो वगरे नाही. पण इतकं अप्रतीम निसर्ग सौंदर्य नी स्मशान ह काँट्रास्ट मात्र जाणवून गेला. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन 20/05/2008 - 22:19
छान लिहिता तुम्ही आंबोळीराव. पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! :-) (कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार :-) ह.घ्या.) आपलाच जाम टरकलेला, मनोबा

भयानक आवडली गोष्ट. पण अहो तुम्ही बघितलेला माणूस सभ्य होता असंच म्हणावं लागेल. आमच्या गोरेगावला एक 'अंत्यसंस्कार' फेम गुरूजी होते ते तर विधी संपून चिता पेटली रे पेटली की मस्त छान त्याच चितेवर बीडी वगैरे पेटवून मोकळे. माणूस गप्पिष्ट. बाकीचे लोक जायला नुघाले की आग्रह वगैरे करून थांबवायचे, म्हणायचे "थांबा हो, जायचा तो गेला, तुम्ही थांबा" बिपिन.

विकास 21/05/2008 - 01:06
हा लेख वाचताना आठवलेल्या दोन गोष्टी: (जशी आठवत तशी:) सुधीर गाडगीळांनी एकदा त्यांच्या कार्यक्रमात पुण्यातील अशा केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते (आडनाव विसरलो). त्यांनी त्यातील एका गुरूजींना स्मशानभूमीत प्रश्न विचारला की तुमचे यावर कसे भागते? त्यावर ते म्हणाले की अहो कधी कधी मृत व्यक्तींच्या अंगात दागीने ठेवले जातात ते आम्हीच घेतो वगैरे... नंतर काही काळाने गाडगीळ कुणाच्या तरी अंत्यसंस्काराला वैकुंठ स्मशानभूमीत गेले असताना ते गुरूजी परत भेटले तर ते तावातावाने चिडून म्हणाले की गाडगीळ तुमच्या अंत्यसंस्काराला आम्ही कोणी येणार नाही... का म्हणून गाडगीळांनी विचारले तर म्हणाले की मागच्या वेळेस माझी घेत असलेली मुलाखत ही प्रक्षेपित होणार आहे हे माहीत नव्हते (थोडक्यात धंद्याचे गुपीत उघडकीस आले). ---------------------------- कधी काळी मित्र कॉळेजच्या परीक्षा संपल्यावर अलीबाग/मुरूड जंजीरा ह्या भागातील पण कुठल्याशा वेगळ्या समुद्र किनार्‍यावर गेलो होतो. समुद्रात पाय घालून ओले झाल्यावर वाळू झटकायला म्हणून बाजूच्या दगडी कट्ट्यावर पाय हलवत आम्ही बसलो. तेव्हढ्यात (उभा असलेल्या) एकाची नजर त्या कट्ट्याच्या भिंतीवर लिहीलेल्या सुचनेकडे गेली: (या अर्थी) "मयताला ठेवायची जागा" - त्याने मोठ्यांदा वाचताच सर्वजण दचकून उठले आणि मुकाट्याने गाडीकडे वळले!

In reply to by विकास

मदनबाण 21/05/2008 - 05:10
हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... मदनबाण.....

चतुरंग 21/05/2008 - 01:19
शेवटी तो अग्नीच, त्यामुळे थंडीपासून रक्षण करणार्‍या त्या आगीकडे तो माणूस आपसूक आला आणि अंग शेकून गेला इतकच नाही तर बिडीसुद्धा पेटवून गेला! तुमची काहीवेळ पाचावर धारण बसली असणार ह्याचा विचार मनात येऊन हसू आले! :) (स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? :? ) चतुरंग

वरदा 21/05/2008 - 02:50
कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार किती हो मरणावर लिहिणार जरा जगण्यावर लिहा ना.... :S स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... :?

कसला तो अनुभव... टरकावून टाकणारा.. >:) अवांतर : ओ मतकरी, दुसरं काहीतरी लिहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

अहाहा. इथे इतके वेगवेगळ्या जॉनरचे ( लेखनप्रकार असा एक फालतु प्रतिशब्द सध्या सुचतो आहे , पण तो अपुरा आहे हे ठाऊक असल्याने ..."जॉनरच " )... लिहिणारे लोक आहेत की एकदम बेष्ट वाटते... ... आंबोळीराव, तुमची काळजी वाटते हो... तुम्ही जरा उतारा म्हणून हलक्या फुलक्या निसर्ग, प्रेम, पाखरे , नदी नाले, दर्‍याखोर्‍या यांच्या चारोळ्या वाचत आणि पाडत चला..... थोडं ऑर्कुट वरती गेल्यासारखं वाटेल पण मानसोपचारतज्ञाला त्रास आणि पैसे देण्यापेक्षा हे फार बरे... काही नमुने... ______________________________________ " तू आलीस तिकडून सखे आनंदाचा पूर आला भावनांनी माझा ऊर भरून आला... सखे तुझ्या पावलांची मंद सळसळ पैंजणांची तर रूणझूण , खचितच माझ्या वेड लावते गे जीवाला...." _____________________ तू कधी येणार? वाट पाहतोय.. येशील ना? ______________-- फुलणार फुलणार... आमच्या प्रतिभेचा चाफा फुलणार? काय गं? ओळख आहे ना? ________________________ ओढ वाटते जीवाला , सारखी तुझीच आठवण... ध्यास तुझा , कधी फळेल हे जीवन... __________________________________ असलं काहीबाही पाडत रहा नाहीतर मानसिक त्रास होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 21/05/2008 - 09:33
टरकथा लेखक. :-) कंदिल.... आता मयत.. चांगले आहे. चालु द्या. "वाचतोय व बहुतेक वाचु" ;-)

ऋचा 21/05/2008 - 09:39
>>हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... खरचं तो भीमा असेल असं वाटलं

आंबोळी म्हटला की ते मरणाचा 'कंदील' आठवतो. च्यायला येऊन जाऊन मरणाचाच विषय कसा सुचतो राव तुम्हाला !!! बाकी मयताचे वर्णन तर असे केले की आम्हीही आपल्याबरोबर तो कार्यक्रम अटेंड केल्यासारखा वाटला. बाकी त्या धिप्पाड माणसाची इंट्री मस्तच झाली !!! येऊ दे !!! येऊ दे !!! आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. :)

मनस्वी 21/05/2008 - 10:34
मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास??

केशवसुमार 21/05/2008 - 11:42
अंबोळीशेठ, लेख चांगला झाला आहे..प्रसंगाचे वर्णन उत्तम :SS ..पुढचा भाग लवकर येऊदे.. (वाचक) केशवसुमार स्वगतः रात्री कुणाचा त्रास नको म्हणून स्मशानात दारू पिणारे आणि जुगार खेळणारे आणि भूक लागल्यावर अता बाहेर कुठे जायचे म्हणून पिंडाचा भात कावळ्यांना हकलून खाणारे बघितले आहेत त्या मुळे चितेच्या धगीवर हात शेकण्याचे काहीच वाटले नाही >:P

विजुभाऊ 21/05/2008 - 12:36
कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार =)) कन्दील नरेश आम्बोळी ...कन्दील काय ?मयत काय? आता या पुढचे लिखाणाचे विषय " मृत्युच्या सूचना आणि मृत्युनन्तरचे जिवन" असा घे बघ. मजा येइल. आणि त्या पुढचा विषय "पुनर्जन्म" हा घे. त्या पुढे जाऊन आणखी विषय मिपा चे गवकरी देतिलच. बाकी प्रगती बेष्टच. कन्दीलाची एजन्सी कोणाला दिलीस? आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? तू सरळ दाम्बीस काकांचे नाव ठोकुन दे असल्या प्रश्नावर. मी तेच करतो.

केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते मोघे गुरूजी वाचका॑चे प्रतिसाद पाहून द.मा.मिरासदारा॑ची 'विर॑गुळा' नावाची गोष्ट आठवली, त्यातल्या तात्या देशपा॑डे॑ना असल्या' गोष्टीत भय॑कर रस असतो..

मला हे वाचुन राम नगरकरांच्या 'रामनगरी' तील वर्‍हाडाचा प्रसंग आठवला. नवरामुलगा प्रेताला टेकुन आराम करत असतो.. तो प्रसंग. छान आहे लेखन..

अभिज्ञ 22/05/2008 - 13:57
ह्या वेगळ्या विषयावर छान लिहिले आहे. मिपावर एकाच विषयावर सातत्याने आणि कसबीने लिहिणारे आपण बहुधा पहिलेच असाल. ;) बाकी ,स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता. स्मशानातील भाषणेबिषणे वगैरे कव्हर कराल असे वाटले होते. जमल्यास पुढच्या भागात येउ देत. आंबोळीराव , तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. तुम्हाला जे आवडते ते लिहा.लेखन हे प्रसिद्धिकरीता नसून स्वसमाधानाकरीता असावे असे वाटते. फक्त लेखन हे किती सकस आहे हेच महत्वाचे. पुढील भागाची वाट पहात आहे. अभिज्ञ. B)

आंबोळी 22/05/2008 - 16:27
सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे व वाचणार्‍यांचे आभार. मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते असा माझा अनुभव आहे. आणि मी तेच करत असतो. फक्त मरण या शाश्वत गोष्टीबद्दल कोणी फारसे लिहिताना आढळले नाही. ती राहिलेली फट बुजवण्याचा हा प्रमाणिक प्रयत्न. आपण सर्वानी गोड (?) मानुन घ्या. >>पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! अहो इथे घाबरलात की इतर लेखकांचे अल्हादायी लेखन वाचतानाचा आनंद द्वीगुणीत होइल. >>(स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? ) माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. >>आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. आयला... माझे लेखन व्यसन लागण्याइतके नशीली आसेल असे मला स्वप्नातसुध्धा वाटले नव्हते. (बहुतेक "रक्तगाभुळली वटवाघळे,उप्पिटम" वगैरे वाचुन प्रवास करत नसल्यामुळे स्वप्नात तसे वाटत नसेल.....) >>मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? स्वप्नभटके विजुभौ >>स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता>> अहो मी फक्त घडलेला प्रसंग सांगीतला. पण पुढच्यावेळी लक्षात ठेवीन. >>तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. या दिलेल्या सल्ल्याविषयीही आपले हेच मत आहे? ;) >>स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... आरे हो ती स्टोरी सांगायची राहिली. पुर्वी आम्ही एक पोरगी पटवली होती. म्हन्जे जातायेता इशारे, खाणाखुणा आणि पत्रव्यवहार इथपर्यंतच मामला होता. शेवटी आम्ही एकदा भेटून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे ठरवले. आता गावात एकांत मिळेल असे एकच ठिकाण होते ते म्हंजे स्मशान. तेंव्हा संध्याकाळी ७ नंतर तिथे भेटायचे ठरले. आम्ही निघालो. थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. (वरच्या स्टोरीतली सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत) (कृतज्ञ)आंबोळी

In reply to by आंबोळी

प्रमोद देव 22/05/2008 - 19:12
थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर 23/05/2008 - 07:43
मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. धन्यवाद आंबोळीराव! अहो पण जरा हळू बोला! मिपाच्या हितशत्रूंना हे वाक्य आवडणार नाही! त्यांना असं वाटतं की मिपा हे फक्त काहितरी पोरकट टाईमपास असणारं, व सतत काहितरी फालतूगिरी चालू असलेलं संस्थळ आहे! हां, आता वडील वारल्यासारखे चेहरे करून सतत दुसर्‍याच्या शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका काढण्यातच मिपाकर धन्यता मानत नाहीत, त्याला काय इलाज बरं?! :) असो... तात्या.

धमाल मुलगा 22/05/2008 - 16:50
च्यायला, लै म्हणजे लैच उशीर घडला बॉ प्रतिक्रिया द्यायला :( आम्बोळ्या, भौ हे खरंच असं घडलं होतं? आयला, चितेवर बिडी पेटवायची म्हणजे काय गंमत आहे का? नेहमीप्रमाणे लेख उत्तम आहेच हे वे.सां.न.ल. :)
...प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता.
हाण तिच्याआयला! एकदम जब्राट! च्यायला हा किस्सा तर लैच भारी! अवांतरः नाही नाही त्या गोष्टी शिकवून बायकोचे कान भरणार्‍या तिच्या माहेरच्या भोचक नातेवाईकांवर हा कंदील काम करतो का?
मी पण पाहिलेली मयत :
आम्ही साधारण १२वीत असु. एक मित्र, पराग नाव त्याचं, नुकताच गाडी शिकला होता आणि त्याच्या बा नं त्याला यामाहा घेऊन दिली होती. मग काय हो...भर गावातून बुंग..बुंग करत हिंडायचो आम्ही. एक दिवस असेच सुसाट फिरत होतो, तर समोरुन एक अंत्ययात्रा आली, म्हण्जे अंत्ययात्रा चाललीच होती, आम्ही तिच्यासमोर आलो. पर्‍याचा गाडीवर काहीकेल्या ताबा राहिना....टरकून मी मागच्यामागं उडी टाकली. आणि हा बहाद्दर........ गेलेल्या माणसाला जे चार खांदेकरी घेऊन चालले होते, सरळ त्यांच्यातच गाडी घेऊन घुसला...अरारारा...तिरडी टाकून जी काय पळापळ झाली....हातात मडकं घेऊन पुढं चालणारा त्या मयताचा मुलगा मडक्यासकट सांडला. ती तिरडी, तिच्यावरचं ते प्रेत आणि तो पडलेला मुलगा हे सगळं जस्संच्या तस्संच ठेऊन त्या सगळ्यांनी पर्‍याला बेक्कार धूतला :( नंतर पोलिसकेस केली...ह्या सगळ्या गडबडीत पर्‍याच्या बापसाला आणायला म्हणून मी गेलो तो परत येऊन पाहतो तर पर्‍या एका बाजुला डोकं धरुन बसलेला, मामालोकांनी पंचनामा करुन घेतलेला, रस्त्यात वेडावाकडा पडलेला मुलगा, ते मडकं तिरडी इ.इ. सगळं खडूनं आखून घेतलेलं.... काय तिच्यामारी एकेक अनुभव आहेत आमचे!

In reply to by धमाल मुलगा

शिद 21/02/2014 - 18:50
नेहमीच्या रटाळ धाग्यांना कंटाळुन जरा जुने लेख चाळत होतो त्यामधे हे रत्न सापडले... धमाल मुलगा ह्यांचा हा प्रतिसाद पण एक्दम जबरा... ठ्या करुन फोटलो एक्दम... =)) =)) अवांतरः आंबोळी यांचे 'कंदील व कंदील-२' हे लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचावे हे नम्रपणे सुचवतो.

वरदा 22/05/2008 - 17:53
मानलं तुम्हाला...धन्य आहात कसली ष्टोरी आहे जबराट पुढं हे नाही सांगितलं आजोबांना पाहीलं आणि मागे पाहिलं तर ती मुलगी गायब झालेली.....कोण होती ती? ........ कुठुन सुचतं हो... माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. :O

आनंदयात्री 22/05/2008 - 19:00
>>माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले >>पाहिजे एकदा. विसर शिंच्या नाव विसर माझे ...

आंबोळी 22/05/2008 - 19:46
येथे जातीने उपस्थीत राहून माझ्या मयताला खांदा दिल्याबद्दल तात्या व इतर गावकरी मंडळींचे मनःपुर्वक आभार !!! असाच योग पुन्हःपुन्हा येवो. (आभारी) आंबोळी

अभिता 23/05/2008 - 01:58
मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%.

In reply to by अभिता

मन 23/05/2008 - 17:00
मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%. नक्किच. १००००% मान्य्. आपलाच, मनोबा

In reply to by अनुप ढेरे

सोत्रि 21/02/2014 - 20:31
शेम टो शेम हेच म्हणतो. हे असले जुने लेख खाणकाम करुन काढत राहिले पाहिजे. जरा तजेला येइल इथे परत! - (जुना मिपाकर) सोकाजी

कंजूस 23/02/2014 - 06:07
हा धागा उघडला तर २००८ सालचा आता खणून वर काढलेला . उत्सुकता म्हणून वाचून काढला . "क्रमश:" हा शब्द बऱ्याच जणांच्या भावना दुखावणारा वाटला .पण यात तांत्रिक दृषट्या गैर काहीच वाटले नाही . हापण विषय क्रमश: होऊ शकतो . आता मूळ धागाकर्ता जोपर्यंत काही नवीन भर घालत नाही तोपर्यँत प्रतिसाद वाढवण्यात काहीच उपयोग नाही .यात्रेचे मजेदार अनुभव असू शकतात यावर आपल्या विनोदी लेखकांनी प्रकाशकांचा सल्याने कमीच लिहिले आहे .
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण ७-८ वर्षापूर्वीची कथा. आषाढातला रविवार. पाउस धो धो कोसळत होता. दुपारची जेवणे होउन जरा पडापड होतेय तेवढ्यात फोन वाजला. गावाकडे चुलत आजी वारल्याची बातमी आली. सगळी आवराआवर करुन आम्ही घरातले सगळे २० मैलावर आसलेल्या गावी निघालो. गावाकडचा आमचा दुमजली वाडा एकदम टिपिकल आहे. दगडी पायर्‍या. दींडी दरवाजा , तटबंदी,पायर्‍यांना लागुन डाव्याबाजुला दगडी कट्टा. पायर्‍यांच्या उजव्या बाजुला मोकळे वावर. तिथे म्हशींचे गोठे. गोबरग्यासची टाकी. दरवाज्यातून आत गेले की मोठे अंगण. खालचा सोपा, वरचा सोपा, माजघर, स्वयंपाकघर. ७-७ फूटी मातीच्या भिंती. भिंतीतून वर जायला जिने. मागच्याबाजुला २ एकराचे परस.

(पीस)

केशवसुमार ·

प्राजु 20/05/2008 - 20:05
लय भारी.. अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! सह्ह्ह्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आंबोळी 20/05/2008 - 20:08
मानले बॉ तुला.... शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... अरे वैश्विक सत्य सांगून मोकळा झालास की रे...... लाख दंडवत रे तुला.

चतुरंग 20/05/2008 - 20:45
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... एकदम दे दणादण! ;) चतुरंग

मदनबाण 21/05/2008 - 05:49
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... जबरदस्त..... मदनबाण.....

विसोबा खेचर 21/05/2008 - 09:29
मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... वा वा! सुंदर रे केशवा.... आपला, (मिपाकर) तात्या.

बेसनलाडू 21/05/2008 - 10:17
पाहिले मी काल, आवडलीस तू काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! हाहाहा (वाचक)बेसनलाडू

केशवसुमार 23/05/2008 - 10:09
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) केशवसुमार

अजिंक्य 27/05/2008 - 12:45
लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! क्या बात है!! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... मार डाला!!! मस्त!

प्राजु 20/05/2008 - 20:05
लय भारी.. अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! सह्ह्ह्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आंबोळी 20/05/2008 - 20:08
मानले बॉ तुला.... शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... अरे वैश्विक सत्य सांगून मोकळा झालास की रे...... लाख दंडवत रे तुला.

चतुरंग 20/05/2008 - 20:45
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... एकदम दे दणादण! ;) चतुरंग

मदनबाण 21/05/2008 - 05:49
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... जबरदस्त..... मदनबाण.....

विसोबा खेचर 21/05/2008 - 09:29
मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... वा वा! सुंदर रे केशवा.... आपला, (मिपाकर) तात्या.

बेसनलाडू 21/05/2008 - 10:17
पाहिले मी काल, आवडलीस तू काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! हाहाहा (वाचक)बेसनलाडू

केशवसुमार 23/05/2008 - 10:09
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) केशवसुमार

अजिंक्य 27/05/2008 - 12:45
लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! क्या बात है!! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... मार डाला!!! मस्त!
लेखनविषय:

मिलिंद फणसें  पीस बघून मोहरले पण आम्हाला 'पीस' बघून आलेला अनुभव फार भयंकर होता.

आपण कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलेत?

भाई ·

भाई 20/05/2008 - 11:36
गेल्या ३ वर्षांत कोणत्या माध्यमात किती मुलांनी प्रवेश घेतला याबाबत गेल्या आठवड्यात एक अहवाल प्रसिध्द झाला. हिंदी, मराठी नंतर इंग्लिशचा क्रमांक लागला. इथे एक उत्सुकता म्हणून हा कौल (किंवा सर्वेक्षण म्हणा) घेत आहे. मिपा सदस्यांमध्ये हे प्रमाण कसे आहे? हा, जरी उत्सुकता म्हणून हे सर्वेक्षण घेतले असले तरी त्यावरून काही निष्कर्ष काढण्याचे हक्क सर्वांनाच देत आहे :-) -भाई (मराठी माध्यमवाला)

मी मराठीमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले....... शास्त्र गणित सगळं मराठीत.... आपला ( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा ) भडकमकर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आंबोळी 20/05/2008 - 19:56
( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा ) =)) =)) =)) =)) (जलव्यालाच्या तंतूमधिल स्फटिकांचे सूक्ष्मदर्शकाखाली रसग्रहण करणारा)आंबोळी

यशोधरा 20/05/2008 - 16:49
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या! त्याबाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते.

In reply to by यशोधरा

मी सुद्धा मराठी माध्यमात दहावीपर्यंत शिकलो . नववी-दहावीला मराठीच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांच्या अजूनही संपर्कात आहे :) विशेष म्हणजे माझी आई त्याच शाळेच्या इंग्लिश माध्यमाला हिंदी आणि मराठीची शिक्षिका होती :) ती आता निवृत्त झालीय. ----- अवांतरः कुणाला उत्सुकता असल्यास -- महाराष्ट्रीय मंडळ, गुलटेकडी - पुणे.

राजे 20/05/2008 - 17:10
८ वी - ड नुतन मराठी विद्यालय, कोल्हापुर ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा 20/05/2008 - 17:30
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या नाहीत! पण काय करणार आम्ही शिकलो आई बाबांनी शिकवून आणि क्लासमधे जाऊन....

शितल 20/05/2008 - 17:45
राजे, तुम्ही नुतन मराठी कोल्हापुर, मी प्रायव्हेट हायस्कुल, कोल्हापुर, तुमची शाळा आमच्या शाळेची शाखा आहे.

In reply to by शितल

राजे 20/05/2008 - 17:49
अरे वा ! मिरजकर टिकटी जवळ ना :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by स्वाती राजेश

राजे 20/05/2008 - 17:55
अरे वा ! तुम्ही पण कोल्हापुरकर का ? राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by स्वाती राजेश

१ ते ४ थी : रा ना सामाणी विद्यालय,कोल्हापूर. ५ ते १० वी : स म लोहिया हायस्कूल,कोल्हापूर. ११,१२ वी : न्यू कॉलेज ,कोल्हापूर. संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी)....

In reply to by तात्या विंचू

छोटा डॉन 22/05/2008 - 08:10
>>संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी).... मी पण तिथलाच ... कुठली बॅच ? व्य. नी. वरुन संपर्क साधा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आर्य 20/05/2008 - 18:42
१० वी 'अ' - सांगली उच्चशिक्षण पुणे - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे. (कृष्णा काठी रमणारा) आर्य

आनंदयात्री 20/05/2008 - 18:48
प्रसाद मुळे इयत्ता १ ली फ सरस्वती भुवन प्रशाला औरंगाबाद ४३१००१ (१ली ते १०वी जवळ्पास प्रत्येक मास्तराचे टोले अन प्रत्येक मास्तरणीच्या चापटा खाल्लेला) (१ली ते १०वी जवळ्पास दिवसातुन एकदा तरी वर्गाबाहेर अंगठे धरलेला) (शाळा संपल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडलेला) -आंद्या फ

चतुरंग 20/05/2008 - 19:16
नवीन मराठी शाळा, अहमदनगर (अत्यंत उत्तम शिक्षक/शिक्षिका लाभले हे भाग्य! अवांतर - ह्या शाळेत लाकडी पट्ट्यांची मारामारी आणि सतरंजीत गुंडाळून मुलांना चोपणे हे नियमाने केले.) पाचवी ते दहावी - अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल. (पुन्हा एकदा तळमळीने शिकवणारे शिक्षक भेटले ही आयुष्यभराची शिदोरी मानतो! :) अवांतर - सायकलीवरुन पाठलाग आणि पाडापाडी, चेंडूने रप्पाधप्पी पासून ते मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणे इत्यादी सर्व उद्योग केले. ) चतुरंग

१-४ भावे प्राथमिक, सदाशिव पेठ, पुणे ३० ५ वी भावे हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे ३० ६वी ७वी जोग हायस्कूल, कोथरुड पुणे २९ ८वी ते १०वी सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना पुणे ४ असा होता माझा शिक्षण प्रवास. एकदा आमच्या शाळेतल्या म्हेत्रे सरांना मी म्हणले होते "सर , मी लई शाळा पाहील्या आहेत." :) पुण्याचे पेशवे

शिंगाड्या 20/05/2008 - 20:27
मराठी १ ते ४ थी ...आलेगावकर प्रशाला..खडकी,पुणे ... (शाळेच्या पहिल्याच दिवशी बाईना येनार्‍या संकटांची जाणिव झाली असावी...अन् थोडयाच काळात 'डोक्यावर मिरे वाटतोस' असा म्हणनार्‍या व्यक्तिंच्या संख्येत भर पडली :) ४ थी ते १०वी स्वामी विवेकानंद,दापोडी,पुणे..१२ (हा पिनकोडयोग अगदी जुळुन आलाय ;)

ईश्वरी 20/05/2008 - 21:43
मी ही मराठी माध्यम - हुजूरपागा हायस्कूल, पुणे ३० फक्त - ८ ते १० वी सायन्स व गणित इंग्लीश माध्यम ईश्वरी

धनंजय 20/05/2008 - 21:47
आणि शाळेत कोंकणी बोलू नये असा दंडक होता. पण तो कडकपणे पाळला जात नसे. त्यामुळे शाळेत वर्गाबाहेर अर्धा वेळ मुले कोंकणीत बोलत. घरी फक्त मराठीत बोलणेच चाले. लहान मुलांची मासिके फक्त मराठीच विकत आणत. इंग्रजी बोलणे घरात (गृहपाठ, घोकंपट्टी सोडल्यात) वर्ज्य नव्हते. वाचणे, लिहिणे अर्थातच कुठल्याही भाषेत आमच्या घरात वर्ज्य नव्हते. शालेय वयात लिखाण ९०% इंग्रजीतच झाले. मराठी लेखनाचा मला सराव नाही, म्हणून त्यात कमकुवतपणा जाणवतो. मिपा वगैरे संकेतस्थळांवर मराठीतून लिहून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे : "डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा" मध्ये फक्त "डिंभक" शब्दाचा माझा अर्थ चुकला, बाकी शब्द समजले. स्वतःची पाठ थोपटून घेताना हात मुरगळला, तो आता दुखतो आहे.

एक 20/05/2008 - 21:55
१ ते १० तुकडी अ (अपवाद २ री ब) म.ए.सो. प्राथमिक आणि पेरूगेट हायस्कूल. ८ वी पर्यंत मराठी त्यानंतर शास्त्र, गणित इंग्लीश मधे.. आम्हाला इंग्लिश शिकवणार्‍या बाई मराठी मधून ईंग्लिश शिकवायच्या :-)

In reply to by एक

धमाल मुलगा 22/05/2008 - 15:23
५ ते १० तुकडी अ म.ए.सो. माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय, बारामती. १०वी पर्यंत सुध्द म्हराटी ;) आमच्या शाळेत भावे सरांचा मराठीचा तास संस्कृतप्रचुर, इंग्रजीच्या पोतनीस सरांचा तास चित्रकलासंपन्न आणि संस्कृतचा तास पुन्हा भावे सरांचा तोही छान मराठीपुर्ण :) बाकी यत्ता ९वीत वेलणकर मास्तरांचा इंग्रजीचा तास त्यांच्या थापा ऐकायसाठी म्हणून आम्ही आवडीने बसायचो ;)

विकास 20/05/2008 - 23:01
१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून. शिक्षक-शिक्षिका चांगल्या भेटल्या. त्यांना तसे वाटते का ते माहीत नाही, कारण अजून पण आमची आठवण काढतात असे ऐकून आहे :-)

In reply to by विकास

१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून.शाळेत आमची बॅच शास्त्रगणित इंग्रजीतूनची पहिली बॅच! शिक्षक-शिक्षिका चांगल्याच भेटल्या, अजूनही आमची ,आमच्या सगळ्या बॅचची आठवण काढतात,:) हे नुसते ऐकूनच नाही तर मागच्या भारतवारीत शाळेत गेले असताना काही जुन्या शिक्षकांच्या भेटीचा योग आला,त्यांच्याकडूनच ऐकले,:)(अर्थात आता आमच्या वेळचे एखाददोन वगळता जवळ जवळ सगळे शिक्षक निवृत्त झाले असल्याने ती पूर्वीची शाळा राहिली नाही असे वाटले खरे..) स्वाती

देवदत्त 20/05/2008 - 23:11
मी ही दहावीपर्यंत मराठीत १ली ते २ री - श्रीरंग, ठाणे २ री ते ३ री - दांडेकरवाडी, भिवंडी ४थी- विद्याविहार, अंधेरी ५ ते १०वी वर्सोवा वेल्फेअर, सात बंगला, अंधेरी

भाग्यश्री 21/05/2008 - 00:00
मी १ली ते १०वी मराठी माध्यम.. ८वी ते १०वी सायन्स, गणित इंग्लिश मधून.. १ली ते ६वी - अभिनव मराठी... ७वी ते १०वी - म्.ए.सो. चे सौ विमलाबाई गरवारे हायस्कुल..! चांगले शिक्षक? ह्म्म.. माहीत नाही.. त्यांना काही फार गुणी स्टुडंट मिळाली नाही इतकं नक्की.. :)) (वर्गात अखंड बडबड करणारी)भाग्यश्री...

रविराज 21/05/2008 - 00:12
१० वी ड. आण्णासाहेब कल्याणी विद्यालय रयत शिक्षण संस्था. कॅम्प सातारा. जिंकून जिंकून जिंकणार कोणं? दहावी ड शिवाय हायच कोणं!

विसोबा खेचर 21/05/2008 - 08:33
१ ते ४ तुकडी अ - पी ई एस टी ची प्राथमिक शाळा. (मराठी माध्यम) ५ ते १० वी - मो ह विद्यालय, ठाणे. (मराठी माध्यम) आपला, (शाळाप्रेमी) तात्या.

गणा मास्तर 21/05/2008 - 09:45
मराठी नाना मी तुमच्याशी सहमत आहे. मी एक नवीन कौल लावलाय " तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या माध्यमातुन शिक्षण देत आहात कि॑वा द्याल" त्याचा निकाल हेच दाखवतो. ९८ टक्के लोक मराठीत शिकुन चांगले कर्तेसवरते कमावते चांगल्या कंपनीत कामाला आहेत पण स्वतःच्या पोरामचे नुकसान (म्हणजे नक्की काय) होवु नये म्हणुन आंग्ल भाषेच्या शाळेत घालुन त्यांचा पोपट (अककल शुन्य बडबड करणारा ) करतात मराठीत शिकुन तुम्ही जर कर्तृत्व गाजवु शकता तर तुमची मुले गाजवणार नाहित कशावरुन? पण लोकान्ना पटत नाही. खुप दु:ख वाटते. मराठी माणसा जागा हो रे. बातमी वाचा मराठी असे आमुची शिक्षणभाषा http://esakal.com/esakal/esakal/05022008/rightframe.html

limbutimbu 21/05/2008 - 10:50
मात्रुभाषा मराठितून शिक्षण घेतल, अन त्यामूळे आम्हाला काही तोटा झाल्याच अजुनतरी दिसत नाहीये आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

ईश्वरी 21/05/2008 - 12:43
--समृद्ध गुलाम बिचारे नाना चेंगट यांनी वापरलेल्या या शब्दांवर माझा आक्षेप आहे. असच म्हणायच असेल तर जे जे लोक नोकरी करतात त्या सर्वानाच गुलाम म्हणावे लागेल. फक्त अनिवासी महाराष्ट्रीयनच का? शिवाय कित्येक निवासी महाराष्ट्रीयनही भारतातील कंपनी मधे नोकरी करीत असताना कंपनीच्या कामासाठी दिर्घकालीन परदेशी वास्तव्य करून आहेत. ईश्वरी

बालवाडी ते बारावी! बालवाडी ते ७वी - मराठी माध्यम ८वी ते १० वी - सेमी इंग्रजी ११वी ते १२वी - इंग्रजी (ए तुकडीतला वात्रट कार्टा) टिंग्या ;) अवांतर - आमचा वात्रटपणा तेव्हापासुनचा बरं का! :D

In reply to by ब्रिटिश टिंग्या

नूमवीयांचा एकच बाणा हाती घ्याल ते घरी न्या ! असे माझे नूमवीय मित्र सांगत असत. ;) (हघ्याहेवेसांनल) पुण्याचे पेशवे

आमचे शालेय शिक्षण डो॑बिवली येथे 'टिळकनगर विद्याम॑दिर' नामक एका नामी शाळेत झाले, फार चा॑गले शिक्षक लाभले.. (पळधे बाई॑चा आवडता विद्यार्थी) प्रसाद

कावळा 22/05/2008 - 11:58
नमस्कार शुभ सकाळ मित्रा॑नो माझे सर्व शिक्षण सुभेदार वाडा (कल्याण)नामक मराठी माध्यमातील शाळेत झाले. अगदी महाविद्यालया पर्य॑त (बिर्ला महाविद्यालय) आपलाच (सोमण मास्तरा॑चा प्रेमळ विद्यार्थी ) विवेक वि.

एडिसन 22/05/2008 - 13:25
१ ते ४ थी : बापट बाल विद्यामंदिर, सांगली (तुकडी 'ड'). ५ ते १० वी : सिटी हायस्कूल, सांगली (तुकडी 'अ'). ११,१२ वी : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली. विद्युत अभियांत्रिकी: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली. सध्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई येथे विद्यावाचस्पती (ओळखा पाहू, म्हणजे काय ते? ;) ) पदवीसाठी कार्यरत आहे.

भोचक 22/05/2008 - 16:21
१-४ जिल्हा परिषद शाळा, मोखाडा (जि. ठाणे) ५-१० रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, मोखाडा ११-१५ केटिएचएम कॉलेज नाशिक पत्रकारिता एचपीटी कॉलेज, नाशिक दहावीपर्यंतच्या शाळेत आदिवासी विद्यार्थी बहुसंख्याक होते. त्यातही रयतच्या शाळेचे नियम फारच वेगळे. डोक्यावर पांढरी गांधी टोपी. हाफ चड्डी (दहावीपर्यंत) आणि मुलींनाही फ्रॉक. आदिवासी मुले मुळातच उशीरा शाळेत दाखल व्हायची. त्यामुळे दहावीतला मुलगाही अनेकदा सतरा, अठरा वर्षासारखा असायचा. काहींची तर लग्न झालेली, ठरलेली असायची. (मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असता ना माझ्या एका आदिवासी मित्राला तीन मुले झाली होती.). शाळेतली शिक्षकही भारी. यल, यम, यन अशी इंग्रजी बाराखडी शिकवणारे. पाचवीत आलो तेव्हा गोटखिंडीकर सर नावाचे मुख्याध्यापक होते. यांना इंग्रजी बोलण्याचा भारी सोस. शाळेतल्या जेमतेम चौथी शिकलेल्या शिपायाशी ते इंग्रजीत बोलत. पण मुले जवळपास सगळीच दारिद्र्य रेषेच्या खालची. काही तर अतिशय हुषार. पण पैसा नसल्याने शिकायच्या वाटा बंद झालेली. कधी कधी काहींच्या आठवणीने विषण्ण व्हायला होतं.

चावटमेला 22/05/2008 - 18:53
१० वी अ , सिटी हायस्कूल, सान्गली. परमाणुशास्त्र अभियान्त्रिकी, वालचन्द अभियान्त्रिकी महाविद्यालय , सान्गली सध्या - पुणे/यु.के. (तळ्यात/मळ्यात) (अखेरच्या श्वासापर्यन्त मराठी) चावटमेला

In reply to by चावटमेला

एडिसन 22/05/2008 - 19:20
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो.

अभिता 23/05/2008 - 00:22
मला इग्रंजी येत नाहि.कारण जेव्हा ५वी त इग्रंजी सुरु झाले तेव्हा पुर्ण वर्ष वर्गाबाहेर उभे राहुन शिकले. सरस्वती सेंकडरी स्कूल.(टिळक सरांची शाळा) मराठी माध्यम ५ ते १० वी ब वर्ग.

ऋषिकेश 23/05/2008 - 00:38
सेमी इंग्रजी!! शास्त्र, गणित इंग्रजीतून आणि बाकी विषयमराठीतून :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

फटू 23/05/2008 - 07:42
आमचं मराठी (किंवा आमचं इंग्रजी ) यावर आम्ही इथं खूप काही लिहिलं आहे. आणि तेही सगळं खरं खरं... अगदी अक्षर नं अक्षर खरं आहे.... तरीही थोडंसं इथेही लिहीण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून... आम्ही पहीली ते चौथी आमच्या गावातल्या शाळेत शिकलो... शाळेचं नाव रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव कॉंड पाचवी ते बारावी आम्ही गोरेगावच्या शाळेत शिकलो...शाळेचं नाव ना म जोशी विद्याभवन गोरेगाव - रायगड दोन्ही शाळा मराठीच (अगदी अकरावी बारावीला विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम इंग्रजीत होता तरी प्राध्यापक मराठीतच शिकवायचे. परीक्षा मात्र इंग्रजीत द्यावी लागायची) जाता जाता पुन्हा सागांवंसं वाटतं... आम्ही मराठीतूनच शिकलो... आणि तरीही आम्ही कुठे मागे पडलो नाही... हा आता थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली... पण त्यात काही विशेष नाही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चावटमेला 23/05/2008 - 11:25
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो. मी २००० च्या सिटी हायस्कूल बॅच चा विद्यार्थी, २००६ ला वालचंद मधून बी.ई. झालो. (कृष्णाकाठचे ऋण कधीही न विसरु शकणारा) चावटमेला

माझ शिक्षण १००% मराठी शाळेतून झालय आज जेव्हा मी फ्रेंच भाषांतरकार दुभाषा( ट्रांस्लेटर इंटरप्रिटर) म्हणून काम करतो तेव्हा मी ही गोष्ट अभिमानाने सांगतो

दवबिन्दु 30/04/2009 - 08:51
इगलिश स्कुलमधी शिकलो. इंगलिश भाषाच नोकरी देनारी आहे. फोनवर स्मुथ इंगलिश बोल्ता आल पाह्यजे. तर नोकरी मिलनार. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

१ ली ते ४ थी गुजराती माध्यम सुर्तेला मग ५ ते १० मराठी माध्यम खोडाल्याला. मग ११ वी dnanvardhini baswant college शापुरात. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

भोचक 30/04/2009 - 11:37
१ ते ४ थी जिल्हा परिषद शाळा मोखाडा (जि. ठाणे) ५ ते १० रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय मोखाडा (जि. ठाणे) ११ ते १५- केटिएचएम कॉलेज नाशिक (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

१ली ते ४थी - पुणे विद्यार्थी गृह, पुणे ५वी ते ७वी - ए एम आय [ऑल महाराष्ट्र इंस्टिट्युट], पुणे. ही शाळा लॉ कॉलेज रस्त्यावर आहे. आता नाव बदललेले आहे. ८वी ते १०वी - एम आय टी, पुणे. सेमी ईंग्लिश. एक दीड वर्षाचा असताना भिवंडिजवळ पडघे नावाचे गाव आहे, तेथे रहात होतो. वडिल भिवंडिला मराविमंमध्ये होते. तर पडघ्याला कॉन्हेंट बालवाडीत जायचो, एका चर्चमध्ये. पण नंतर पुण्याला आल्यानंतर मराठी शाळेत [बालवाडी] जावु लागलो. सुरवातीला मराठी [अबकड] काही समजायचेच नाही त्यामुळे झोपुन जायचो :) - संताजी धनाजी

हर्षद बर्वे 30/04/2009 - 15:53
शिशू वर्ग ते ४थी ब्राह्मण शिक्षण मंडळाचे, ब्राह्मण विद्यालय ठाणे. ५ वी ते १० वी पी. ई. सोसाईटीचे न्यू इंग्लिश स्कूल {संपूर्ण मराठी माध्यम (८- १० विज्ञान आणि बीजगणित सुद्धा) } ठाणे. आजही तेथील जुने शिक्षक भेटले की आनंद होतो....मलाही आणि त्यांनाही....{ म्हणजे दिसताच गल्लीत पळ काढणे, रस्ता ओलांडणे असे प्रकार दोन्ही बाजूनी घडत नाहीत :) } एच.बी. ठाणे

नितिन थत्ते 30/04/2009 - 17:31
मराठीतूनच शिक्षण मॉण्टेसरी ते १० वी डॉ बेडेकर विद्या मंदिर ठाणे, मुलीला मराठी शाळेतच घातली आहे. (मोठेपणी नुकसान केले म्हणून शिव्या खायची तयारी ठेवली आहे). खराटा (रंग माझा वेगळा)

भाई 20/05/2008 - 11:36
गेल्या ३ वर्षांत कोणत्या माध्यमात किती मुलांनी प्रवेश घेतला याबाबत गेल्या आठवड्यात एक अहवाल प्रसिध्द झाला. हिंदी, मराठी नंतर इंग्लिशचा क्रमांक लागला. इथे एक उत्सुकता म्हणून हा कौल (किंवा सर्वेक्षण म्हणा) घेत आहे. मिपा सदस्यांमध्ये हे प्रमाण कसे आहे? हा, जरी उत्सुकता म्हणून हे सर्वेक्षण घेतले असले तरी त्यावरून काही निष्कर्ष काढण्याचे हक्क सर्वांनाच देत आहे :-) -भाई (मराठी माध्यमवाला)

मी मराठीमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले....... शास्त्र गणित सगळं मराठीत.... आपला ( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा ) भडकमकर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आंबोळी 20/05/2008 - 19:56
( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा ) =)) =)) =)) =)) (जलव्यालाच्या तंतूमधिल स्फटिकांचे सूक्ष्मदर्शकाखाली रसग्रहण करणारा)आंबोळी

यशोधरा 20/05/2008 - 16:49
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या! त्याबाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते.

In reply to by यशोधरा

मी सुद्धा मराठी माध्यमात दहावीपर्यंत शिकलो . नववी-दहावीला मराठीच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांच्या अजूनही संपर्कात आहे :) विशेष म्हणजे माझी आई त्याच शाळेच्या इंग्लिश माध्यमाला हिंदी आणि मराठीची शिक्षिका होती :) ती आता निवृत्त झालीय. ----- अवांतरः कुणाला उत्सुकता असल्यास -- महाराष्ट्रीय मंडळ, गुलटेकडी - पुणे.

राजे 20/05/2008 - 17:10
८ वी - ड नुतन मराठी विद्यालय, कोल्हापुर ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा 20/05/2008 - 17:30
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या नाहीत! पण काय करणार आम्ही शिकलो आई बाबांनी शिकवून आणि क्लासमधे जाऊन....

शितल 20/05/2008 - 17:45
राजे, तुम्ही नुतन मराठी कोल्हापुर, मी प्रायव्हेट हायस्कुल, कोल्हापुर, तुमची शाळा आमच्या शाळेची शाखा आहे.

In reply to by शितल

राजे 20/05/2008 - 17:49
अरे वा ! मिरजकर टिकटी जवळ ना :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by स्वाती राजेश

राजे 20/05/2008 - 17:55
अरे वा ! तुम्ही पण कोल्हापुरकर का ? राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by स्वाती राजेश

१ ते ४ थी : रा ना सामाणी विद्यालय,कोल्हापूर. ५ ते १० वी : स म लोहिया हायस्कूल,कोल्हापूर. ११,१२ वी : न्यू कॉलेज ,कोल्हापूर. संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी)....

In reply to by तात्या विंचू

छोटा डॉन 22/05/2008 - 08:10
>>संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी).... मी पण तिथलाच ... कुठली बॅच ? व्य. नी. वरुन संपर्क साधा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आर्य 20/05/2008 - 18:42
१० वी 'अ' - सांगली उच्चशिक्षण पुणे - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे. (कृष्णा काठी रमणारा) आर्य

आनंदयात्री 20/05/2008 - 18:48
प्रसाद मुळे इयत्ता १ ली फ सरस्वती भुवन प्रशाला औरंगाबाद ४३१००१ (१ली ते १०वी जवळ्पास प्रत्येक मास्तराचे टोले अन प्रत्येक मास्तरणीच्या चापटा खाल्लेला) (१ली ते १०वी जवळ्पास दिवसातुन एकदा तरी वर्गाबाहेर अंगठे धरलेला) (शाळा संपल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडलेला) -आंद्या फ

चतुरंग 20/05/2008 - 19:16
नवीन मराठी शाळा, अहमदनगर (अत्यंत उत्तम शिक्षक/शिक्षिका लाभले हे भाग्य! अवांतर - ह्या शाळेत लाकडी पट्ट्यांची मारामारी आणि सतरंजीत गुंडाळून मुलांना चोपणे हे नियमाने केले.) पाचवी ते दहावी - अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल. (पुन्हा एकदा तळमळीने शिकवणारे शिक्षक भेटले ही आयुष्यभराची शिदोरी मानतो! :) अवांतर - सायकलीवरुन पाठलाग आणि पाडापाडी, चेंडूने रप्पाधप्पी पासून ते मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणे इत्यादी सर्व उद्योग केले. ) चतुरंग

१-४ भावे प्राथमिक, सदाशिव पेठ, पुणे ३० ५ वी भावे हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे ३० ६वी ७वी जोग हायस्कूल, कोथरुड पुणे २९ ८वी ते १०वी सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना पुणे ४ असा होता माझा शिक्षण प्रवास. एकदा आमच्या शाळेतल्या म्हेत्रे सरांना मी म्हणले होते "सर , मी लई शाळा पाहील्या आहेत." :) पुण्याचे पेशवे

शिंगाड्या 20/05/2008 - 20:27
मराठी १ ते ४ थी ...आलेगावकर प्रशाला..खडकी,पुणे ... (शाळेच्या पहिल्याच दिवशी बाईना येनार्‍या संकटांची जाणिव झाली असावी...अन् थोडयाच काळात 'डोक्यावर मिरे वाटतोस' असा म्हणनार्‍या व्यक्तिंच्या संख्येत भर पडली :) ४ थी ते १०वी स्वामी विवेकानंद,दापोडी,पुणे..१२ (हा पिनकोडयोग अगदी जुळुन आलाय ;)

ईश्वरी 20/05/2008 - 21:43
मी ही मराठी माध्यम - हुजूरपागा हायस्कूल, पुणे ३० फक्त - ८ ते १० वी सायन्स व गणित इंग्लीश माध्यम ईश्वरी

धनंजय 20/05/2008 - 21:47
आणि शाळेत कोंकणी बोलू नये असा दंडक होता. पण तो कडकपणे पाळला जात नसे. त्यामुळे शाळेत वर्गाबाहेर अर्धा वेळ मुले कोंकणीत बोलत. घरी फक्त मराठीत बोलणेच चाले. लहान मुलांची मासिके फक्त मराठीच विकत आणत. इंग्रजी बोलणे घरात (गृहपाठ, घोकंपट्टी सोडल्यात) वर्ज्य नव्हते. वाचणे, लिहिणे अर्थातच कुठल्याही भाषेत आमच्या घरात वर्ज्य नव्हते. शालेय वयात लिखाण ९०% इंग्रजीतच झाले. मराठी लेखनाचा मला सराव नाही, म्हणून त्यात कमकुवतपणा जाणवतो. मिपा वगैरे संकेतस्थळांवर मराठीतून लिहून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे : "डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा" मध्ये फक्त "डिंभक" शब्दाचा माझा अर्थ चुकला, बाकी शब्द समजले. स्वतःची पाठ थोपटून घेताना हात मुरगळला, तो आता दुखतो आहे.

एक 20/05/2008 - 21:55
१ ते १० तुकडी अ (अपवाद २ री ब) म.ए.सो. प्राथमिक आणि पेरूगेट हायस्कूल. ८ वी पर्यंत मराठी त्यानंतर शास्त्र, गणित इंग्लीश मधे.. आम्हाला इंग्लिश शिकवणार्‍या बाई मराठी मधून ईंग्लिश शिकवायच्या :-)

In reply to by एक

धमाल मुलगा 22/05/2008 - 15:23
५ ते १० तुकडी अ म.ए.सो. माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय, बारामती. १०वी पर्यंत सुध्द म्हराटी ;) आमच्या शाळेत भावे सरांचा मराठीचा तास संस्कृतप्रचुर, इंग्रजीच्या पोतनीस सरांचा तास चित्रकलासंपन्न आणि संस्कृतचा तास पुन्हा भावे सरांचा तोही छान मराठीपुर्ण :) बाकी यत्ता ९वीत वेलणकर मास्तरांचा इंग्रजीचा तास त्यांच्या थापा ऐकायसाठी म्हणून आम्ही आवडीने बसायचो ;)

विकास 20/05/2008 - 23:01
१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून. शिक्षक-शिक्षिका चांगल्या भेटल्या. त्यांना तसे वाटते का ते माहीत नाही, कारण अजून पण आमची आठवण काढतात असे ऐकून आहे :-)

In reply to by विकास

१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून.शाळेत आमची बॅच शास्त्रगणित इंग्रजीतूनची पहिली बॅच! शिक्षक-शिक्षिका चांगल्याच भेटल्या, अजूनही आमची ,आमच्या सगळ्या बॅचची आठवण काढतात,:) हे नुसते ऐकूनच नाही तर मागच्या भारतवारीत शाळेत गेले असताना काही जुन्या शिक्षकांच्या भेटीचा योग आला,त्यांच्याकडूनच ऐकले,:)(अर्थात आता आमच्या वेळचे एखाददोन वगळता जवळ जवळ सगळे शिक्षक निवृत्त झाले असल्याने ती पूर्वीची शाळा राहिली नाही असे वाटले खरे..) स्वाती

देवदत्त 20/05/2008 - 23:11
मी ही दहावीपर्यंत मराठीत १ली ते २ री - श्रीरंग, ठाणे २ री ते ३ री - दांडेकरवाडी, भिवंडी ४थी- विद्याविहार, अंधेरी ५ ते १०वी वर्सोवा वेल्फेअर, सात बंगला, अंधेरी

भाग्यश्री 21/05/2008 - 00:00
मी १ली ते १०वी मराठी माध्यम.. ८वी ते १०वी सायन्स, गणित इंग्लिश मधून.. १ली ते ६वी - अभिनव मराठी... ७वी ते १०वी - म्.ए.सो. चे सौ विमलाबाई गरवारे हायस्कुल..! चांगले शिक्षक? ह्म्म.. माहीत नाही.. त्यांना काही फार गुणी स्टुडंट मिळाली नाही इतकं नक्की.. :)) (वर्गात अखंड बडबड करणारी)भाग्यश्री...

रविराज 21/05/2008 - 00:12
१० वी ड. आण्णासाहेब कल्याणी विद्यालय रयत शिक्षण संस्था. कॅम्प सातारा. जिंकून जिंकून जिंकणार कोणं? दहावी ड शिवाय हायच कोणं!

विसोबा खेचर 21/05/2008 - 08:33
१ ते ४ तुकडी अ - पी ई एस टी ची प्राथमिक शाळा. (मराठी माध्यम) ५ ते १० वी - मो ह विद्यालय, ठाणे. (मराठी माध्यम) आपला, (शाळाप्रेमी) तात्या.

गणा मास्तर 21/05/2008 - 09:45
मराठी नाना मी तुमच्याशी सहमत आहे. मी एक नवीन कौल लावलाय " तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या माध्यमातुन शिक्षण देत आहात कि॑वा द्याल" त्याचा निकाल हेच दाखवतो. ९८ टक्के लोक मराठीत शिकुन चांगले कर्तेसवरते कमावते चांगल्या कंपनीत कामाला आहेत पण स्वतःच्या पोरामचे नुकसान (म्हणजे नक्की काय) होवु नये म्हणुन आंग्ल भाषेच्या शाळेत घालुन त्यांचा पोपट (अककल शुन्य बडबड करणारा ) करतात मराठीत शिकुन तुम्ही जर कर्तृत्व गाजवु शकता तर तुमची मुले गाजवणार नाहित कशावरुन? पण लोकान्ना पटत नाही. खुप दु:ख वाटते. मराठी माणसा जागा हो रे. बातमी वाचा मराठी असे आमुची शिक्षणभाषा http://esakal.com/esakal/esakal/05022008/rightframe.html

limbutimbu 21/05/2008 - 10:50
मात्रुभाषा मराठितून शिक्षण घेतल, अन त्यामूळे आम्हाला काही तोटा झाल्याच अजुनतरी दिसत नाहीये आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

ईश्वरी 21/05/2008 - 12:43
--समृद्ध गुलाम बिचारे नाना चेंगट यांनी वापरलेल्या या शब्दांवर माझा आक्षेप आहे. असच म्हणायच असेल तर जे जे लोक नोकरी करतात त्या सर्वानाच गुलाम म्हणावे लागेल. फक्त अनिवासी महाराष्ट्रीयनच का? शिवाय कित्येक निवासी महाराष्ट्रीयनही भारतातील कंपनी मधे नोकरी करीत असताना कंपनीच्या कामासाठी दिर्घकालीन परदेशी वास्तव्य करून आहेत. ईश्वरी

बालवाडी ते बारावी! बालवाडी ते ७वी - मराठी माध्यम ८वी ते १० वी - सेमी इंग्रजी ११वी ते १२वी - इंग्रजी (ए तुकडीतला वात्रट कार्टा) टिंग्या ;) अवांतर - आमचा वात्रटपणा तेव्हापासुनचा बरं का! :D

In reply to by ब्रिटिश टिंग्या

नूमवीयांचा एकच बाणा हाती घ्याल ते घरी न्या ! असे माझे नूमवीय मित्र सांगत असत. ;) (हघ्याहेवेसांनल) पुण्याचे पेशवे

आमचे शालेय शिक्षण डो॑बिवली येथे 'टिळकनगर विद्याम॑दिर' नामक एका नामी शाळेत झाले, फार चा॑गले शिक्षक लाभले.. (पळधे बाई॑चा आवडता विद्यार्थी) प्रसाद

कावळा 22/05/2008 - 11:58
नमस्कार शुभ सकाळ मित्रा॑नो माझे सर्व शिक्षण सुभेदार वाडा (कल्याण)नामक मराठी माध्यमातील शाळेत झाले. अगदी महाविद्यालया पर्य॑त (बिर्ला महाविद्यालय) आपलाच (सोमण मास्तरा॑चा प्रेमळ विद्यार्थी ) विवेक वि.

एडिसन 22/05/2008 - 13:25
१ ते ४ थी : बापट बाल विद्यामंदिर, सांगली (तुकडी 'ड'). ५ ते १० वी : सिटी हायस्कूल, सांगली (तुकडी 'अ'). ११,१२ वी : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली. विद्युत अभियांत्रिकी: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली. सध्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई येथे विद्यावाचस्पती (ओळखा पाहू, म्हणजे काय ते? ;) ) पदवीसाठी कार्यरत आहे.

भोचक 22/05/2008 - 16:21
१-४ जिल्हा परिषद शाळा, मोखाडा (जि. ठाणे) ५-१० रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, मोखाडा ११-१५ केटिएचएम कॉलेज नाशिक पत्रकारिता एचपीटी कॉलेज, नाशिक दहावीपर्यंतच्या शाळेत आदिवासी विद्यार्थी बहुसंख्याक होते. त्यातही रयतच्या शाळेचे नियम फारच वेगळे. डोक्यावर पांढरी गांधी टोपी. हाफ चड्डी (दहावीपर्यंत) आणि मुलींनाही फ्रॉक. आदिवासी मुले मुळातच उशीरा शाळेत दाखल व्हायची. त्यामुळे दहावीतला मुलगाही अनेकदा सतरा, अठरा वर्षासारखा असायचा. काहींची तर लग्न झालेली, ठरलेली असायची. (मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असता ना माझ्या एका आदिवासी मित्राला तीन मुले झाली होती.). शाळेतली शिक्षकही भारी. यल, यम, यन अशी इंग्रजी बाराखडी शिकवणारे. पाचवीत आलो तेव्हा गोटखिंडीकर सर नावाचे मुख्याध्यापक होते. यांना इंग्रजी बोलण्याचा भारी सोस. शाळेतल्या जेमतेम चौथी शिकलेल्या शिपायाशी ते इंग्रजीत बोलत. पण मुले जवळपास सगळीच दारिद्र्य रेषेच्या खालची. काही तर अतिशय हुषार. पण पैसा नसल्याने शिकायच्या वाटा बंद झालेली. कधी कधी काहींच्या आठवणीने विषण्ण व्हायला होतं.

चावटमेला 22/05/2008 - 18:53
१० वी अ , सिटी हायस्कूल, सान्गली. परमाणुशास्त्र अभियान्त्रिकी, वालचन्द अभियान्त्रिकी महाविद्यालय , सान्गली सध्या - पुणे/यु.के. (तळ्यात/मळ्यात) (अखेरच्या श्वासापर्यन्त मराठी) चावटमेला

In reply to by चावटमेला

एडिसन 22/05/2008 - 19:20
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो.

अभिता 23/05/2008 - 00:22
मला इग्रंजी येत नाहि.कारण जेव्हा ५वी त इग्रंजी सुरु झाले तेव्हा पुर्ण वर्ष वर्गाबाहेर उभे राहुन शिकले. सरस्वती सेंकडरी स्कूल.(टिळक सरांची शाळा) मराठी माध्यम ५ ते १० वी ब वर्ग.

ऋषिकेश 23/05/2008 - 00:38
सेमी इंग्रजी!! शास्त्र, गणित इंग्रजीतून आणि बाकी विषयमराठीतून :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

फटू 23/05/2008 - 07:42
आमचं मराठी (किंवा आमचं इंग्रजी ) यावर आम्ही इथं खूप काही लिहिलं आहे. आणि तेही सगळं खरं खरं... अगदी अक्षर नं अक्षर खरं आहे.... तरीही थोडंसं इथेही लिहीण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून... आम्ही पहीली ते चौथी आमच्या गावातल्या शाळेत शिकलो... शाळेचं नाव रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव कॉंड पाचवी ते बारावी आम्ही गोरेगावच्या शाळेत शिकलो...शाळेचं नाव ना म जोशी विद्याभवन गोरेगाव - रायगड दोन्ही शाळा मराठीच (अगदी अकरावी बारावीला विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम इंग्रजीत होता तरी प्राध्यापक मराठीतच शिकवायचे. परीक्षा मात्र इंग्रजीत द्यावी लागायची) जाता जाता पुन्हा सागांवंसं वाटतं... आम्ही मराठीतूनच शिकलो... आणि तरीही आम्ही कुठे मागे पडलो नाही... हा आता थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली... पण त्यात काही विशेष नाही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चावटमेला 23/05/2008 - 11:25
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो. मी २००० च्या सिटी हायस्कूल बॅच चा विद्यार्थी, २००६ ला वालचंद मधून बी.ई. झालो. (कृष्णाकाठचे ऋण कधीही न विसरु शकणारा) चावटमेला

माझ शिक्षण १००% मराठी शाळेतून झालय आज जेव्हा मी फ्रेंच भाषांतरकार दुभाषा( ट्रांस्लेटर इंटरप्रिटर) म्हणून काम करतो तेव्हा मी ही गोष्ट अभिमानाने सांगतो

दवबिन्दु 30/04/2009 - 08:51
इगलिश स्कुलमधी शिकलो. इंगलिश भाषाच नोकरी देनारी आहे. फोनवर स्मुथ इंगलिश बोल्ता आल पाह्यजे. तर नोकरी मिलनार. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

१ ली ते ४ थी गुजराती माध्यम सुर्तेला मग ५ ते १० मराठी माध्यम खोडाल्याला. मग ११ वी dnanvardhini baswant college शापुरात. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

भोचक 30/04/2009 - 11:37
१ ते ४ थी जिल्हा परिषद शाळा मोखाडा (जि. ठाणे) ५ ते १० रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय मोखाडा (जि. ठाणे) ११ ते १५- केटिएचएम कॉलेज नाशिक (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

१ली ते ४थी - पुणे विद्यार्थी गृह, पुणे ५वी ते ७वी - ए एम आय [ऑल महाराष्ट्र इंस्टिट्युट], पुणे. ही शाळा लॉ कॉलेज रस्त्यावर आहे. आता नाव बदललेले आहे. ८वी ते १०वी - एम आय टी, पुणे. सेमी ईंग्लिश. एक दीड वर्षाचा असताना भिवंडिजवळ पडघे नावाचे गाव आहे, तेथे रहात होतो. वडिल भिवंडिला मराविमंमध्ये होते. तर पडघ्याला कॉन्हेंट बालवाडीत जायचो, एका चर्चमध्ये. पण नंतर पुण्याला आल्यानंतर मराठी शाळेत [बालवाडी] जावु लागलो. सुरवातीला मराठी [अबकड] काही समजायचेच नाही त्यामुळे झोपुन जायचो :) - संताजी धनाजी

हर्षद बर्वे 30/04/2009 - 15:53
शिशू वर्ग ते ४थी ब्राह्मण शिक्षण मंडळाचे, ब्राह्मण विद्यालय ठाणे. ५ वी ते १० वी पी. ई. सोसाईटीचे न्यू इंग्लिश स्कूल {संपूर्ण मराठी माध्यम (८- १० विज्ञान आणि बीजगणित सुद्धा) } ठाणे. आजही तेथील जुने शिक्षक भेटले की आनंद होतो....मलाही आणि त्यांनाही....{ म्हणजे दिसताच गल्लीत पळ काढणे, रस्ता ओलांडणे असे प्रकार दोन्ही बाजूनी घडत नाहीत :) } एच.बी. ठाणे

नितिन थत्ते 30/04/2009 - 17:31
मराठीतूनच शिक्षण मॉण्टेसरी ते १० वी डॉ बेडेकर विद्या मंदिर ठाणे, मुलीला मराठी शाळेतच घातली आहे. (मोठेपणी नुकसान केले म्हणून शिव्या खायची तयारी ठेवली आहे). खराटा (रंग माझा वेगळा)

मेथी पापडनु शाक

विजुभाऊ ·

वरदा 20/05/2008 - 17:24
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. काय विजुभाऊ आम्ही सगळ्या (सुगरणी :$ ) काय तुम्हाला अशा वाटलो? इतक्या नाही काही आम्ही आळशी... फोडणीत हिंग हळद टाकायची की नाही का? किती वेळ आधी करुन ठेवलं तर चालेल?

In reply to by वरदा

आनंदयात्री 20/05/2008 - 18:28
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. विजुभाउ ८ दिवसांपासुन पुण्यात आलेत, वारं लागलं वाटत :)

मेथीच्या दाण्यामुळे कडवट होत नाही ना? कारण तुम्ही तिखट कमी घालायला सांगितले म्हणून विचारले? शिवाय साखर/गुळ नाही...:) बाकी रेसिपी छान वाटते. मेथी पौष्टीक असल्यामुळे छान आहे मुलांसाठी सुद्धा, नक्की करून पाहीन.:)

In reply to by स्वाती राजेश

विजुभाऊ 20/05/2008 - 18:18
किंचीत कडवट आंबट तिखट अशी नेहमीच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे फार तिखट केल्यास मेथीची चव लागत नाही. तसेच लसुण व कांदा वापरला तरीही तसेच होते. तरीही आवडीनुसार प्रमाण बदलावे. फोडणीत हिंग टाकुन मी पाहिले नाही. हळद चालेल.

मनस्वी 20/05/2008 - 18:26
विजुभाऊ "शाक" या शब्दाचा अर्थ काय? उडदाचेच पापड वापरायचे का? कच्चा पापड दातांना चिकटत नाही का? पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? हे रायत्यासारखे खावे का? रेसिपी छान वाटतीये. तसंही साखर-गूळ कमीच वापरते मी स्वयंपाकात. लसूण नाही पण कांदा नक्की टाकेन मी.

विजुभाऊ 20/05/2008 - 19:00
पापड टाकल्यानन्तर फार वेळ उकळु नये. पापड दाताना चिकटत नाही गुजरातीमध्ये शाक म्हणजे भाजी. पालेभाजी नव्हे त्याला फक्त भाजी म्हणतात. उडदाचेच पापड वापरायचे का? हो मी इतर पापड वापरुन पाहीले नाहित. पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? एका जेवणात. हा पदार्थ शिल्लक रहात नाही. दही व उडीद एकत्र फारवेळ ठेवत नाहीत. हे रायत्यासारखे खावे का? याबद्दल काय सांगु...........

प्राजु 20/05/2008 - 19:04
वेगळी रेसिपि. नक्क्की करून बघेन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वेगळा प्रकार दिसतो आहे,करुन पाहिला पाहिजे. अवांतर-विजुभाऊ मेथीचं शाक पाकक्रिया विभागात का नाही लिहिलंत? स्वाती

मेथी पापडनु शाक बहु सारू लागे छे! आवता रविवारे करीश. चोक्कस! एक विचारवू हतु, पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? डाळ ढोकळी जेवा?

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ 21/05/2008 - 12:40
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? घणा नाना नै करशो . नै तो एनी स्पागेटी बनी जशे. दाळ ढोकळी मा ढोकळी माटे जे रोटली वणो छो एना कटका जाडा होय छे ते माटे नाना होय छे. पापड तो पातळो होय छे. एटले घणा नाना कटका न चाले.

In reply to by विजुभाऊ

भले. मुद्दो सांभळ्यो. हवे जाणी-जोईने शाक बनाविश. धन्यवाद विजुभाऊ. पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? एक नानकडी टायपिंग मिश्टेक थई. आ शब्द वधारे एवो वाचजो. सोरी.

वरदा 21/05/2008 - 00:50
सह्ही गुजराथी बोलता तुम्ही एकदम... पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? म्हणजे काय?

In reply to by वरदा

पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? टंकलेखनात जरा चूक झाली. वधाने नाही, वधारे असे वाचावे. वाक्याचा अर्थ, 'पापडाचे तुकडे जास्त लहान केले तर चालतील का?' असा आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा 21/05/2008 - 22:16
आता कळ्ळं..गुजराथी शिकावं म्हणते...मला शिकवाल का पेठकर काका आणि विजुभाऊ तुम्ही?

वाचून तरी ही पाककृती फार मस्त लागत असेल असे वाटते. स्वगतः कोणीतरी पाककृतीमधे इंटरेस्टेड माणूस शोधून त्याला ही पाककृती द्यावी आणि आपण स्वतः फुकट चापायला जावे. पुण्याचे पेशवे

मनिष 21/05/2008 - 13:06
आमची आई अशीच "पापडाची भाजी" म्हणऊन करते; फक्त ती दही टाकत नाही. आता दही टाकून प्रयत्न करुया! - (खवैया) मनिष अवांतर : त्या कच्च्या पापडांमधल्या सोड्यामुळे मला चव फारशी आवडली नव्हती असे आठवते.

वरदा 20/05/2008 - 17:24
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. काय विजुभाऊ आम्ही सगळ्या (सुगरणी :$ ) काय तुम्हाला अशा वाटलो? इतक्या नाही काही आम्ही आळशी... फोडणीत हिंग हळद टाकायची की नाही का? किती वेळ आधी करुन ठेवलं तर चालेल?

In reply to by वरदा

आनंदयात्री 20/05/2008 - 18:28
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. विजुभाउ ८ दिवसांपासुन पुण्यात आलेत, वारं लागलं वाटत :)

मेथीच्या दाण्यामुळे कडवट होत नाही ना? कारण तुम्ही तिखट कमी घालायला सांगितले म्हणून विचारले? शिवाय साखर/गुळ नाही...:) बाकी रेसिपी छान वाटते. मेथी पौष्टीक असल्यामुळे छान आहे मुलांसाठी सुद्धा, नक्की करून पाहीन.:)

In reply to by स्वाती राजेश

विजुभाऊ 20/05/2008 - 18:18
किंचीत कडवट आंबट तिखट अशी नेहमीच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे फार तिखट केल्यास मेथीची चव लागत नाही. तसेच लसुण व कांदा वापरला तरीही तसेच होते. तरीही आवडीनुसार प्रमाण बदलावे. फोडणीत हिंग टाकुन मी पाहिले नाही. हळद चालेल.

मनस्वी 20/05/2008 - 18:26
विजुभाऊ "शाक" या शब्दाचा अर्थ काय? उडदाचेच पापड वापरायचे का? कच्चा पापड दातांना चिकटत नाही का? पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? हे रायत्यासारखे खावे का? रेसिपी छान वाटतीये. तसंही साखर-गूळ कमीच वापरते मी स्वयंपाकात. लसूण नाही पण कांदा नक्की टाकेन मी.

विजुभाऊ 20/05/2008 - 19:00
पापड टाकल्यानन्तर फार वेळ उकळु नये. पापड दाताना चिकटत नाही गुजरातीमध्ये शाक म्हणजे भाजी. पालेभाजी नव्हे त्याला फक्त भाजी म्हणतात. उडदाचेच पापड वापरायचे का? हो मी इतर पापड वापरुन पाहीले नाहित. पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? एका जेवणात. हा पदार्थ शिल्लक रहात नाही. दही व उडीद एकत्र फारवेळ ठेवत नाहीत. हे रायत्यासारखे खावे का? याबद्दल काय सांगु...........

प्राजु 20/05/2008 - 19:04
वेगळी रेसिपि. नक्क्की करून बघेन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वेगळा प्रकार दिसतो आहे,करुन पाहिला पाहिजे. अवांतर-विजुभाऊ मेथीचं शाक पाकक्रिया विभागात का नाही लिहिलंत? स्वाती

मेथी पापडनु शाक बहु सारू लागे छे! आवता रविवारे करीश. चोक्कस! एक विचारवू हतु, पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? डाळ ढोकळी जेवा?

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ 21/05/2008 - 12:40
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? घणा नाना नै करशो . नै तो एनी स्पागेटी बनी जशे. दाळ ढोकळी मा ढोकळी माटे जे रोटली वणो छो एना कटका जाडा होय छे ते माटे नाना होय छे. पापड तो पातळो होय छे. एटले घणा नाना कटका न चाले.

In reply to by विजुभाऊ

भले. मुद्दो सांभळ्यो. हवे जाणी-जोईने शाक बनाविश. धन्यवाद विजुभाऊ. पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? एक नानकडी टायपिंग मिश्टेक थई. आ शब्द वधारे एवो वाचजो. सोरी.

वरदा 21/05/2008 - 00:50
सह्ही गुजराथी बोलता तुम्ही एकदम... पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? म्हणजे काय?

In reply to by वरदा

पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? टंकलेखनात जरा चूक झाली. वधाने नाही, वधारे असे वाचावे. वाक्याचा अर्थ, 'पापडाचे तुकडे जास्त लहान केले तर चालतील का?' असा आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा 21/05/2008 - 22:16
आता कळ्ळं..गुजराथी शिकावं म्हणते...मला शिकवाल का पेठकर काका आणि विजुभाऊ तुम्ही?

वाचून तरी ही पाककृती फार मस्त लागत असेल असे वाटते. स्वगतः कोणीतरी पाककृतीमधे इंटरेस्टेड माणूस शोधून त्याला ही पाककृती द्यावी आणि आपण स्वतः फुकट चापायला जावे. पुण्याचे पेशवे

मनिष 21/05/2008 - 13:06
आमची आई अशीच "पापडाची भाजी" म्हणऊन करते; फक्त ती दही टाकत नाही. आता दही टाकून प्रयत्न करुया! - (खवैया) मनिष अवांतर : त्या कच्च्या पापडांमधल्या सोड्यामुळे मला चव फारशी आवडली नव्हती असे आठवते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मेथी पापडनु शाक साहित्य : मेथीचे दाणे ५ टी स्पून ,किंचीत आंबट दही १ वाटी , पाणी अर्धा वाटी , कच्चे पापड ५, आवडत असल्यास टोमॆटो २ , मोहोरी , हळद एक चमचा , मीठ , तीखट , तूप/ तेल फ़ोडणी साठी साधरण एक तास अगोदर मेथीचे दाणे भिजत ठेवावे,दही घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात फ़ोडणीसाठी तूप/तेल(२/३ चमचे) तापवत ठेवावे.चांगले तापले की त्यात मोहोरी टाकावी , ही फ़ोडणी झाली की त्याच भांड्यात घोटलेले दही. थोडे पातळ करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाकावे हळद , तिखट चवीपुरते घालावे.

गुलाम वजीर!

चतुरंग ·

वाचून वाईट वाटले की इतक्या उत्तम खेळणार्‍या खेळाडूला गुलाम असल्याकारणे मालक परत आल्यावर परत यावे लागले. कदाचित त्या पटाच्या बादशहाला त्याचे वैषम्य वाटले देखील नसेल. असो जर हा बादशहा जागतिक बुद्धिबळाच्या पटावर असता तर कदाचित अनेक मी मी म्हणणार्‍याना त्याने गुलाम केले असते. त्या गुलाम 'वजीराला' माझा सलाम. चतुरंगराव इतक्या सुंदर माहीती बद्दल धन्यवाद. पुण्याचे पेशवे

शितल 20/05/2008 - 06:50
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आणि प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही. हे तर अगदी भन्नाट वाक्य आहे. अशा ह्या असामान्य मीर सुलतानचं उदयाला येणं जसं सहज आनंददायी होतं तसंच त्याचं अलगद विस्मृतीत विरुन जाणंही चटका लावून जाणारं ठरलं. सध्याच्या पाकिस्तानातल्या सरगोधा प्रांतात आपल्या कुटुंबासमवेत छोट्या जमिनीच्या तुकड्यावर समाधानाने गुजराण करणार्‍या ह्या 'गुलाम वजिराने' १९६६ साली काळाच्या पटावरुन प्रस्थान ठेवले! हे तर अगदी मनाला चुटुका लावुन जाते.

मस्त गोष्ट ... त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले... बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही... (असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंगजी, माफ करा! पण मीही तो डाव (कॅपाब्लॅकाविरुद्धचा) पाहिला ओरिजिनल साईटवर जाऊन! त्या कॅपाब्लॅकाच्या **वर तुम्ही एक लाथ का दिली नाहीत याचेच आश्चर्य वाटले!!!!! एक हत्ती राजाला जखडवून टाकीत असतांना त्याने दुसरा हत्ती तिथे आणण्याचे प्रयोजन काय? अरे त्या खानाचा एकतरी हत्ती तुला खाता येत होता ना!! मग ते कर ना!! आणि तो वजिराशी काय खेळ खेळ्तोय? अरे वजीर हा कत्तलीसाठी च असतो हे तो विसरला काय? नुसता पुढेमागे-पुढेमागे करतोय !! अरे काहीतरी कत्तल कर ना!! समोरच्या खानाला जरा बुचकळ्यात पाड ना!! माफ करा चतुरंगजी! पण या खेळांत आम्हाला खानाची बुद्धी दिसण्यापेक्षा त्या कॅपाब्लॅकाची निर्बुद्ध बुद्धीच दिसली!! आम्हाला निदान दोनचार जागा तरी अशा दिसल्या की जर आम्ही तिथे जर असतो तर त्या खानाला नक्कीच हार्ड टाईम दिला असता! तो कॅपाब्लँका पुरता खानाला घाबरून गेलेला दिसला!! स्पष्ट बोलण्याबद्द्ल क्षमस्व!! आपला (बुद्धिबळात रस असलेला), पिवळा डाबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 20/05/2008 - 20:42
मी ही हा गेम पूर्वीच पाहिलाय. पोझिशनल ऍडव्हांटेज - ह्या कल्पनेचा इतका अफलातून विस्तार करुन नंतर एका वजिरापेक्षा दोन हत्ती हे वरचढ ठरणार हे जाणून केवळ मोहर्‍यांच्या हालचालीची लवचिकता ह्या एकाच गोष्टीवर भर देत प्रतिस्पर्ध्याच्या वजिराला फक्त येरझार्‍या घालायला लावणे (ते ही कॅपा.सारख्याला) आणि शांतपणे पकड आवळत नेऊन शेवटी पासपॉन मधे रुपांतर करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे! ह्यातल्या मीरच्या पाचव्या खेळीवर पुढे पेट्रोशान आणि त्यानंतर गॅरी कास्पारोव सारख्या लोकांनी अधिक काम करुन त्यातले डीप थेऑरेटिकल काम अधिक स्पष्ट केले. पण ते समजून घेण्याइतका माझा बुद्धिबळाचा अभ्यास नाही! स्वतः कॅपाब्लांकाने ज्याचे वर्णन 'जीनियस' असे केले आहे त्या मीर बद्दल म्या पामराने काय बोलावे? त्यामुळे आपली असहमती नेमकी कोणत्या कारणाकरिता आहे ह्याचा नक्की उलगडा मला तरी झाला नाही. चतुरंग

आनंदयात्री 20/05/2008 - 10:17
चतुरंग राव छान लेख अन अत्यंत समर्पक शिर्षक. बुद्धीबळातल्या निरनिराळ्या खेळाडुंची ओळख करुन देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन अन धन्यवाद. पुढील लेखाची वाट पहात आहे. :)

आर्य 20/05/2008 - 18:34
भारताने शोध लावलेल्या (चतुरंग) या खेळातील, भारतीय दिग्गजांची माहिती करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! ऐखाद्या प्यादाचा व़जीर कसा होतो, याचा प्रत्यय मीरला आयुष्यात आला असावा :H

रानावनात गुराढोरांच्या मागे पळणार्‍या एखाद्या काटकुळ्या पोराने थोड्या सरावाने असामान्य गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकावी तसंच काहीसं! आवडले. शीर्षकही समर्पक आहे. त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले... बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही... (असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......) मास्तरांशी सहमत, स्वाती

मन 20/05/2008 - 12:40
मिळाली. ह्या खेळाडुबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय. मस्त लेख आहे. आपलाच, मनोबा

सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुमीत 20/05/2008 - 14:29
परत एकदा तुम्ही फक्त बुद्धीबळाच्या महान खेळाडूची ओळखच नव्हे तर त्याच्या खेळातली महानतेची ओळख करून दिलीत.

विसोबा खेचर 20/05/2008 - 15:55
रंगा, बुद्धीबळ आणि बुधिबळाच्या खेळाडूविषयीचे तुझे लेख पाहून कौतुक वाटते. माझाही हा अत्यंत आवडता खेळ आहे, परंतु मी बर्‍याचदा हारतो! :( आपल्याला बॉ जमतच नाही त्यातल्या काही चालींना उत्तर देणे, परंतु हा खेळ खेळायला खूप मौज वाटते. बुद्धिबळविषयक लेखन अजूनही येऊ दे... बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :) आपला, (कास्पारावप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

_बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :)) :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? कारण त्याने हा डाव चाल-बाय-चाल पाहिला आणि त्याचा आटाच सटकला.... असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे.:)

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 21/05/2008 - 08:06
असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे. धत तेरीकी! अरे चालल्या असत्या दोन-चार शिव्या! मिसळपाववर सोवळं-ओवळं हा प्रकार नाही! :) असो... अवांतर - बर्‍याचदा सोवळ्याच्या आडच अनेक गोष्टी चालतात. त्यापेक्षा ओवळं राहिलेलं बरं! :)) आपला, (ओवळा) तात्या.

अन्या दातार 21/05/2008 - 01:55
अप्रतिम लेख. एका दुर्दैवी खेळाडूची चांगली ओळख करुन दिल्याबद्दल चतुरंग यांचे आभार.

धनंजय 21/05/2008 - 08:27
वजिराची कुचंबणा बघितली. पण खालच्या संवादातला एक प्रतिसाद वाचून गंमत वाटली: "आखेलीन म्हणाले की सुलतान खान यांना जर सुरुवाती माहीत असत्या तर ते विश्वविजेते झाले असते. (आखेलीन आणि कापाब्लांका कडून स्तुती) ही दोन विश्वविजेत्यांकडून उच्च प्रशंसा होय. सुरुवाती माहीत नसणार्‍यासाठी त्यांचा खेळ फार चांगला होता. सुलतान खान आणि मी, दोघांमध्ये खूप साम्य आहे. दोघांपैकी कोणालाच सुरुवाती येत नाहीत. दुर्दैवाने साम्य तिथे संपते ;)" दुर्दैवाने, माझेही तेच आहे. कोणीतरी प्रेमाने आणि दयाळूपणे मला सुरुवाती समजावून सांगितल्यात तर मोठे उपकार होतील. १२व्या खेळीत मोठीच घटना झाली तितके मलाही समजले. "सी" कॉलम पूर्ण मोकळा झाला. पण याचा फायदा काळ्याला होणार की पांढर्‍याला ते कळण्याइतके माझे बुद्धीचे बळ नाही. (पांढर्‍याने सापळा लावून "सी" कॉलम उघडला, म्हणजे पांढर्‍याला फायदा होण्यासाठीच... पण तो कसा?) असो. चतुरंग यांनी मस्त लेख लिहिला आहे. या विलक्षण खेळाडूची ओळख झाली. चतुरंग यांनी थोडेसे बाळबोध रसग्रहणही शिकवावे. उदाहरणार्थ Queens Indian Defence हा थोडा समजावून सांगितला तर मजा येईल. उदाहरणार्थ सहाव्या खेळीत पांढर्‍याने ए३ (डाव्या हत्तीचे प्यादे) पुढे केले नसते तर काय झाले असते? हे काळ्या उंटाचा मार्ग रोखण्यासाठी आहे का? हेच का? दुसरे काही का नाही? सी कॉलम मोकळा करण्यासाठी सापळा कधी आणि कसा लागला? काळा वजीर उजवीकडे (एच, जी, कॉलममध्ये) हेलपाटे घालत होता, ते एफ-जी-एच कॉलममधील प्याद्यांना धाक द्यायला का? त्यामुळे पराभव थोडा तरी लांबला का? अशा प्रश्नांनी बेजार होऊन मी बुद्धिबळाचा नाद पूर्णपणे सोडला आहे. (शिवाय नेहमी हरायचो, ही वेगळी गोष्ट.)

वाचक 21/05/2008 - 08:32
मलाही 'बुद्धिबळात' अर्थात प्रचंड गती आहे असे नव्हे पण मलाही अगदी असेच वाटले कि काळा वजिर पटाच्या उजवीकडे नुस्ताच 'मागे पुढे' करत होता. निदान ते प्यादे तरी खाल्ले असते तर थोडा मार्ग तरी मोकळा झाला असता.

विसोबा खेचर 21/05/2008 - 08:38
रंगा, इथे माझ्यासकट अन्य सभासदांनाही या खेळात बराच रस दिसतो आहे. तू लेका लिहीच एखादी लेखमालिका जी साध्या सोप्या रितीने बुद्धीबळाची ओपनींग्ज समजावून सांगेल. माझ्यासारखे अनेकजण ओपनिंग्ज मध्येच मार खातात त्यामुळे पुढची हार जवळजवळ निश्चित होते! :) आपला, (फ्रेंच डिफेन्स प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 21/05/2008 - 08:52
आत्ताच मी आलेले प्रतिसाद बघत होतो आणि त्या अनुषंगानेच विचार सुरु होता. बुद्धिबळ ओपनिंग्ज हा एक फार मोठा विषय आहे पण मी त्यातली काही प्राथमिक घेऊन काय लिहिता येईल ते बघतो. अभ्यासाला थोडा वेळ लागेल पण जरुर काहीतरी चांगले देऊ शकेन असे वाटते. प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! :) चतुरंग

केशवसुमार 21/05/2008 - 09:53
रंगाशेठ, मस्त लेख.. बुद्धीबळ!! आमचा एकदम आवडता खेळ.. रात्ररात्र (|: डाव लावून बसायचे.. :W ~X( खूप वर्षांपुर्वी काही कारणाने आम्हाला ह्या आमच्या आवडत्या खेळाला रामराम ठोकावा लागला.. :& या लेखाने त्या सगळ्या जून्या आठवणी ताज्या केल्या.. :B (एके काळचा वजीर्)केशवसुमार स्वगतः कोण रे तो मोठ्याने हसला आम्ही बुद्धीबळ खेळायचे म्हणल्यावर.. X(

वाचून वाईट वाटले की इतक्या उत्तम खेळणार्‍या खेळाडूला गुलाम असल्याकारणे मालक परत आल्यावर परत यावे लागले. कदाचित त्या पटाच्या बादशहाला त्याचे वैषम्य वाटले देखील नसेल. असो जर हा बादशहा जागतिक बुद्धिबळाच्या पटावर असता तर कदाचित अनेक मी मी म्हणणार्‍याना त्याने गुलाम केले असते. त्या गुलाम 'वजीराला' माझा सलाम. चतुरंगराव इतक्या सुंदर माहीती बद्दल धन्यवाद. पुण्याचे पेशवे

शितल 20/05/2008 - 06:50
तुम्ही खुप छान माहिती दिली आहे आणि प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही. हे तर अगदी भन्नाट वाक्य आहे. अशा ह्या असामान्य मीर सुलतानचं उदयाला येणं जसं सहज आनंददायी होतं तसंच त्याचं अलगद विस्मृतीत विरुन जाणंही चटका लावून जाणारं ठरलं. सध्याच्या पाकिस्तानातल्या सरगोधा प्रांतात आपल्या कुटुंबासमवेत छोट्या जमिनीच्या तुकड्यावर समाधानाने गुजराण करणार्‍या ह्या 'गुलाम वजिराने' १९६६ साली काळाच्या पटावरुन प्रस्थान ठेवले! हे तर अगदी मनाला चुटुका लावुन जाते.

मस्त गोष्ट ... त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले... बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही... (असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंगजी, माफ करा! पण मीही तो डाव (कॅपाब्लॅकाविरुद्धचा) पाहिला ओरिजिनल साईटवर जाऊन! त्या कॅपाब्लॅकाच्या **वर तुम्ही एक लाथ का दिली नाहीत याचेच आश्चर्य वाटले!!!!! एक हत्ती राजाला जखडवून टाकीत असतांना त्याने दुसरा हत्ती तिथे आणण्याचे प्रयोजन काय? अरे त्या खानाचा एकतरी हत्ती तुला खाता येत होता ना!! मग ते कर ना!! आणि तो वजिराशी काय खेळ खेळ्तोय? अरे वजीर हा कत्तलीसाठी च असतो हे तो विसरला काय? नुसता पुढेमागे-पुढेमागे करतोय !! अरे काहीतरी कत्तल कर ना!! समोरच्या खानाला जरा बुचकळ्यात पाड ना!! माफ करा चतुरंगजी! पण या खेळांत आम्हाला खानाची बुद्धी दिसण्यापेक्षा त्या कॅपाब्लॅकाची निर्बुद्ध बुद्धीच दिसली!! आम्हाला निदान दोनचार जागा तरी अशा दिसल्या की जर आम्ही तिथे जर असतो तर त्या खानाला नक्कीच हार्ड टाईम दिला असता! तो कॅपाब्लँका पुरता खानाला घाबरून गेलेला दिसला!! स्पष्ट बोलण्याबद्द्ल क्षमस्व!! आपला (बुद्धिबळात रस असलेला), पिवळा डाबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 20/05/2008 - 20:42
मी ही हा गेम पूर्वीच पाहिलाय. पोझिशनल ऍडव्हांटेज - ह्या कल्पनेचा इतका अफलातून विस्तार करुन नंतर एका वजिरापेक्षा दोन हत्ती हे वरचढ ठरणार हे जाणून केवळ मोहर्‍यांच्या हालचालीची लवचिकता ह्या एकाच गोष्टीवर भर देत प्रतिस्पर्ध्याच्या वजिराला फक्त येरझार्‍या घालायला लावणे (ते ही कॅपा.सारख्याला) आणि शांतपणे पकड आवळत नेऊन शेवटी पासपॉन मधे रुपांतर करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे! ह्यातल्या मीरच्या पाचव्या खेळीवर पुढे पेट्रोशान आणि त्यानंतर गॅरी कास्पारोव सारख्या लोकांनी अधिक काम करुन त्यातले डीप थेऑरेटिकल काम अधिक स्पष्ट केले. पण ते समजून घेण्याइतका माझा बुद्धिबळाचा अभ्यास नाही! स्वतः कॅपाब्लांकाने ज्याचे वर्णन 'जीनियस' असे केले आहे त्या मीर बद्दल म्या पामराने काय बोलावे? त्यामुळे आपली असहमती नेमकी कोणत्या कारणाकरिता आहे ह्याचा नक्की उलगडा मला तरी झाला नाही. चतुरंग

आनंदयात्री 20/05/2008 - 10:17
चतुरंग राव छान लेख अन अत्यंत समर्पक शिर्षक. बुद्धीबळातल्या निरनिराळ्या खेळाडुंची ओळख करुन देण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन अन धन्यवाद. पुढील लेखाची वाट पहात आहे. :)

आर्य 20/05/2008 - 18:34
भारताने शोध लावलेल्या (चतुरंग) या खेळातील, भारतीय दिग्गजांची माहिती करुन दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! ऐखाद्या प्यादाचा व़जीर कसा होतो, याचा प्रत्यय मीरला आयुष्यात आला असावा :H

रानावनात गुराढोरांच्या मागे पळणार्‍या एखाद्या काटकुळ्या पोराने थोड्या सरावाने असामान्य गुणवत्तेच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकावी तसंच काहीसं! आवडले. शीर्षकही समर्पक आहे. त्याला इंग्लंडहून परतावे लागले हे वाचून वाईट वाटले... बुद्धिमत्ता ही कोण्या लक्ष्मीपुत्राची जहागिरी नव्हे... देव कोणाला काय देऊन पाठवेल सांगता येत नाही... (असे कित्येक मीर आजही दुर्लक्षित असतील......) मास्तरांशी सहमत, स्वाती

मन 20/05/2008 - 12:40
मिळाली. ह्या खेळाडुबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय. मस्त लेख आहे. आपलाच, मनोबा

सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुलतान खान ह्यांची बुद्धीबळातील चमक विस्मयकारक आहे. अशा खेळाडूची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद. छान शब्दात अत्यंत माहिती पूर्ण लेख आहे. अभिनंदन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुमीत 20/05/2008 - 14:29
परत एकदा तुम्ही फक्त बुद्धीबळाच्या महान खेळाडूची ओळखच नव्हे तर त्याच्या खेळातली महानतेची ओळख करून दिलीत.

विसोबा खेचर 20/05/2008 - 15:55
रंगा, बुद्धीबळ आणि बुधिबळाच्या खेळाडूविषयीचे तुझे लेख पाहून कौतुक वाटते. माझाही हा अत्यंत आवडता खेळ आहे, परंतु मी बर्‍याचदा हारतो! :( आपल्याला बॉ जमतच नाही त्यातल्या काही चालींना उत्तर देणे, परंतु हा खेळ खेळायला खूप मौज वाटते. बुद्धिबळविषयक लेखन अजूनही येऊ दे... बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :) आपला, (कास्पारावप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

_बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? :)) :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

बाय द वे, हा डांबिस रांडेचा इतक्या शिव्या का देतो आहे? कारण त्याने हा डाव चाल-बाय-चाल पाहिला आणि त्याचा आटाच सटकला.... असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे.:)

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 21/05/2008 - 08:06
असो. आता अभिप्रायाला स्वच्छ धूवून, पुसून, सोवळ्यात नेसून बसवला आहे. धत तेरीकी! अरे चालल्या असत्या दोन-चार शिव्या! मिसळपाववर सोवळं-ओवळं हा प्रकार नाही! :) असो... अवांतर - बर्‍याचदा सोवळ्याच्या आडच अनेक गोष्टी चालतात. त्यापेक्षा ओवळं राहिलेलं बरं! :)) आपला, (ओवळा) तात्या.

अन्या दातार 21/05/2008 - 01:55
अप्रतिम लेख. एका दुर्दैवी खेळाडूची चांगली ओळख करुन दिल्याबद्दल चतुरंग यांचे आभार.

धनंजय 21/05/2008 - 08:27
वजिराची कुचंबणा बघितली. पण खालच्या संवादातला एक प्रतिसाद वाचून गंमत वाटली: "आखेलीन म्हणाले की सुलतान खान यांना जर सुरुवाती माहीत असत्या तर ते विश्वविजेते झाले असते. (आखेलीन आणि कापाब्लांका कडून स्तुती) ही दोन विश्वविजेत्यांकडून उच्च प्रशंसा होय. सुरुवाती माहीत नसणार्‍यासाठी त्यांचा खेळ फार चांगला होता. सुलतान खान आणि मी, दोघांमध्ये खूप साम्य आहे. दोघांपैकी कोणालाच सुरुवाती येत नाहीत. दुर्दैवाने साम्य तिथे संपते ;)" दुर्दैवाने, माझेही तेच आहे. कोणीतरी प्रेमाने आणि दयाळूपणे मला सुरुवाती समजावून सांगितल्यात तर मोठे उपकार होतील. १२व्या खेळीत मोठीच घटना झाली तितके मलाही समजले. "सी" कॉलम पूर्ण मोकळा झाला. पण याचा फायदा काळ्याला होणार की पांढर्‍याला ते कळण्याइतके माझे बुद्धीचे बळ नाही. (पांढर्‍याने सापळा लावून "सी" कॉलम उघडला, म्हणजे पांढर्‍याला फायदा होण्यासाठीच... पण तो कसा?) असो. चतुरंग यांनी मस्त लेख लिहिला आहे. या विलक्षण खेळाडूची ओळख झाली. चतुरंग यांनी थोडेसे बाळबोध रसग्रहणही शिकवावे. उदाहरणार्थ Queens Indian Defence हा थोडा समजावून सांगितला तर मजा येईल. उदाहरणार्थ सहाव्या खेळीत पांढर्‍याने ए३ (डाव्या हत्तीचे प्यादे) पुढे केले नसते तर काय झाले असते? हे काळ्या उंटाचा मार्ग रोखण्यासाठी आहे का? हेच का? दुसरे काही का नाही? सी कॉलम मोकळा करण्यासाठी सापळा कधी आणि कसा लागला? काळा वजीर उजवीकडे (एच, जी, कॉलममध्ये) हेलपाटे घालत होता, ते एफ-जी-एच कॉलममधील प्याद्यांना धाक द्यायला का? त्यामुळे पराभव थोडा तरी लांबला का? अशा प्रश्नांनी बेजार होऊन मी बुद्धिबळाचा नाद पूर्णपणे सोडला आहे. (शिवाय नेहमी हरायचो, ही वेगळी गोष्ट.)

वाचक 21/05/2008 - 08:32
मलाही 'बुद्धिबळात' अर्थात प्रचंड गती आहे असे नव्हे पण मलाही अगदी असेच वाटले कि काळा वजिर पटाच्या उजवीकडे नुस्ताच 'मागे पुढे' करत होता. निदान ते प्यादे तरी खाल्ले असते तर थोडा मार्ग तरी मोकळा झाला असता.

विसोबा खेचर 21/05/2008 - 08:38
रंगा, इथे माझ्यासकट अन्य सभासदांनाही या खेळात बराच रस दिसतो आहे. तू लेका लिहीच एखादी लेखमालिका जी साध्या सोप्या रितीने बुद्धीबळाची ओपनींग्ज समजावून सांगेल. माझ्यासारखे अनेकजण ओपनिंग्ज मध्येच मार खातात त्यामुळे पुढची हार जवळजवळ निश्चित होते! :) आपला, (फ्रेंच डिफेन्स प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 21/05/2008 - 08:52
आत्ताच मी आलेले प्रतिसाद बघत होतो आणि त्या अनुषंगानेच विचार सुरु होता. बुद्धिबळ ओपनिंग्ज हा एक फार मोठा विषय आहे पण मी त्यातली काही प्राथमिक घेऊन काय लिहिता येईल ते बघतो. अभ्यासाला थोडा वेळ लागेल पण जरुर काहीतरी चांगले देऊ शकेन असे वाटते. प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! :) चतुरंग

केशवसुमार 21/05/2008 - 09:53
रंगाशेठ, मस्त लेख.. बुद्धीबळ!! आमचा एकदम आवडता खेळ.. रात्ररात्र (|: डाव लावून बसायचे.. :W ~X( खूप वर्षांपुर्वी काही कारणाने आम्हाला ह्या आमच्या आवडत्या खेळाला रामराम ठोकावा लागला.. :& या लेखाने त्या सगळ्या जून्या आठवणी ताज्या केल्या.. :B (एके काळचा वजीर्)केशवसुमार स्वगतः कोण रे तो मोठ्याने हसला आम्ही बुद्धीबळ खेळायचे म्हणल्यावर.. X(
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रतिस्पर्ध्याच्या मोहर्‍यांची चाल ओळखता येण्यासाठी तुम्ही सुशिक्षित असावंच लागतं असं नाही. लौकिकार्थानं अक्षरशत्रू असलेला मीर सुलतान खान बुद्धिबळातल्या भल्याभल्यांना अक्षरशः शत्रू वाटला असला तर नवल नाही! हिंदुस्थानात जे काही महान बुद्धिबळपटू होऊन गेले त्यात सुलतान खानचा क्रमांक आपल्याला बराच वर लावावा लागेल. सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या मिठ्ठा प्रांतात १९०५ साली जन्मलेला, 'मीर सुलतान खान' असं एखाद्या नबाबाप्रमाणे भारदस्त नाव असलेला, हा महान बुद्धिबळपटू प्रत्यक्षात 'नबाब मलिक उमर हयात खान' ह्या पंजाब प्रांतातल्या एका सरंजामशहाच्या पदरी एक यकःश्चित गुलाम होता!

संडे स्पेशल (सांज्याच्या पोळ्या)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर 19/05/2008 - 18:26
प्रथम सांदणं आता सांज्याच्या पोळ्या! अहो स्वातीताई, का असा अन्याय करता आहात? एवढ्या सुंदर पाकृ चाखायला न मिळता नुसत्या वाचायलाच मिळताहेत हा अन्यायच नव्हे का? :) आपला, (सांदणं, सांज्याच्या पोळ्या ही नुसती नावं वाचूनच बेचैन झालेला!) तात्या.

सांज्याची पोळी माझी आवडती.खूप दिवसात केल्या नाहीत.आता तुझी पाकृ वाचून करायचा मूड आला आहे,आता करते लवकरच. (मी रवा साजूक तूपावर भाजते,आता तुझ्या कृतीप्रमाणे रिफाइंड तेलावर भाजून पाहते.) मला गुळाचा शिरा पण भारी आवडतो,त्यामुळे पोळ्यांसाठी मी जरा जास्तच शिरा करते,नुसता खायला,:)

In reply to by स्वाती दिनेश

रवा तुपावर/डालड्यात भाजलास तर थंड झाल्यावर तूप/डालडा थिजून सांजा खूप घट्ट होतो व पोळी नीट लाटली न जाता काठ राहतात.

वरदा 19/05/2008 - 21:39
साजुक तुपावर भाजला रवा मग शिरा घट्टं झाल्यावर किंचित दुध घातलं आणि केल्या पोळ्या ;) आता हे नक्की करेन... काय मस्त दिल्यायस दोन्ही पा. क्रु. अवांतरः खव्याच्या, खजुराच्या पोळ्याही छान लागतात नाही? मी १-२ वेळाच केल्या होत्या...त्याचही प्रमाण टाक ना तुला वेळ झाला की....

बेसनलाडू 20/05/2008 - 09:11
पुण्याला काकांकडे, आदल्या दिवशी केलेला गोडाचा शिरा संपला नाही की नंतरच्या दिवशी त्याच्या सांजोर्‍या होत. सांज्याच्या पोळ्या = सांजोर्‍या(? चूभूद्याघ्या). मग आम्ही भावंडं आंब्याचं लोणचं नि सांजोर्‍या अशा बेतावर तुटून पडत असू, याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

शितल 20/05/2008 - 19:17
मला ही सा॑ज्याच्या पोळ्या आवडतात माझी मावशी त्या करायची आणि आम्हाला पाठवायची, पण खव्याच्या पोळ्या मला प्रच॑ड आवडात पण खाल्या आहेत नुसत्या घरी केल्या नाहीत , तुला जर त्याची पाककृती माहित असेल सा॑ग.

विसोबा खेचर 19/05/2008 - 18:26
प्रथम सांदणं आता सांज्याच्या पोळ्या! अहो स्वातीताई, का असा अन्याय करता आहात? एवढ्या सुंदर पाकृ चाखायला न मिळता नुसत्या वाचायलाच मिळताहेत हा अन्यायच नव्हे का? :) आपला, (सांदणं, सांज्याच्या पोळ्या ही नुसती नावं वाचूनच बेचैन झालेला!) तात्या.

सांज्याची पोळी माझी आवडती.खूप दिवसात केल्या नाहीत.आता तुझी पाकृ वाचून करायचा मूड आला आहे,आता करते लवकरच. (मी रवा साजूक तूपावर भाजते,आता तुझ्या कृतीप्रमाणे रिफाइंड तेलावर भाजून पाहते.) मला गुळाचा शिरा पण भारी आवडतो,त्यामुळे पोळ्यांसाठी मी जरा जास्तच शिरा करते,नुसता खायला,:)

In reply to by स्वाती दिनेश

रवा तुपावर/डालड्यात भाजलास तर थंड झाल्यावर तूप/डालडा थिजून सांजा खूप घट्ट होतो व पोळी नीट लाटली न जाता काठ राहतात.

वरदा 19/05/2008 - 21:39
साजुक तुपावर भाजला रवा मग शिरा घट्टं झाल्यावर किंचित दुध घातलं आणि केल्या पोळ्या ;) आता हे नक्की करेन... काय मस्त दिल्यायस दोन्ही पा. क्रु. अवांतरः खव्याच्या, खजुराच्या पोळ्याही छान लागतात नाही? मी १-२ वेळाच केल्या होत्या...त्याचही प्रमाण टाक ना तुला वेळ झाला की....

बेसनलाडू 20/05/2008 - 09:11
पुण्याला काकांकडे, आदल्या दिवशी केलेला गोडाचा शिरा संपला नाही की नंतरच्या दिवशी त्याच्या सांजोर्‍या होत. सांज्याच्या पोळ्या = सांजोर्‍या(? चूभूद्याघ्या). मग आम्ही भावंडं आंब्याचं लोणचं नि सांजोर्‍या अशा बेतावर तुटून पडत असू, याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

शितल 20/05/2008 - 19:17
मला ही सा॑ज्याच्या पोळ्या आवडतात माझी मावशी त्या करायची आणि आम्हाला पाठवायची, पण खव्याच्या पोळ्या मला प्रच॑ड आवडात पण खाल्या आहेत नुसत्या घरी केल्या नाहीत , तुला जर त्याची पाककृती माहित असेल सा॑ग.
या दोन प्रकारे करता येतात. गुळाच्या किंवा साखरेच्या. पण सर्वसाधारणपणे सांज्याच्या म्हटल्यावर गुळाच्याच केल्या जातात. साहित्यः १ वाटी जाड रवा दिड वाटी गुळ २ वाट्या पाणी १/२ च. जायफळ पूड १/२ च. वेलदोडा पूड १/२ वाटी रिफाडंड तेल पाव च.मीठ २ वाट्या कणिक १/२वाटी मैदा पाव वाटी तेल तांदळाची पिठी १.जाड रवा रिफाइंड तेलात खमंग भाजून घ्यावा. २.दोन वाट्यापाणी+२ वाट्या गुळ एकत्र उकळत ठेवावे. गुळ विरघळला कि त्यात रवा घालून हलवावे व वाफ आणावी. चांगली वाफ येऊन रवा शिजला कि त्यात वेलदोडा -जायफळ पूड घालावी.

आता काय करायच॑ ?

पिस्तुल्या ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आता काय करयच॑ ? आता काय करायच॑? तिला भेटायला जायच॑ पण तिन॑ नाही म्हणायच॑, तिन॑ दुसय्रा बरोबर फिरयच॑ मग आपण कशाला मरायच॑ आता काय करायच॑? तिने कालेजला जायच॑ पहिल्या बे॑चवर बसायच॑ आपण शुक शुक करायच॑ पण तिन॑ नाही बघायच॑ आता काय करायच॑? तिला हॉटेलमध्ये न्यायच॑ तिच॑ दिल जि॑कण्यासाठी तिच॑ बिल भरायच॑ तिन॑ खोट॑ thanks म्हणायच॑ आता काय करायच॑? तिला लव्हर शिप मागायची तिन॑ मात्र राखी बा॑धायची याला काय म्हणायच॑ नशीब बेकार म्हणायच॑ आता काय करायच॑? आता दुसरीला शोधायच॑

संडे स्पेशल ( आंब्याचे सांदणे)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर 19/05/2008 - 18:20
बाई गं मिपाच्या अन्नपूर्णे, वा! आंब्याच्या सांदणाची पाकृ! मिपाचे रसोईघर आज तृप्त झाले, धन्य झाले! :) आंब्याच्या सांदणाबद्दल मी काय लिहू? माझ्या मते ही अत्यंत शुभ, अत्यंत मंगलदायी अशी पाकृ आहे! आम्ही कोकणात बहुत करून बरक्या फणसाची सांदणं करतो, तीही फारच सुरेख लागतात! असो, सांदणं आंब्याची असोत वा बरक्या फणसाची असोत, माझ्या मते 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते....' या यादीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यात सांदणांचा क्रमांक निश्चितच खूप वरचा लागतो! तात्या.

आंब्याची,फणसाची दोन्ही सांदणे मला फार आवडतात.. डब्यातल्या आंब्या,फणसाची सांदणे करायचे डोक्यातच आले नाही (तशी कधी गरज पडत नाही तिथे हे ही तितकेच खरे,:)) पण आता करून पाहिन ,:)

धन्यवाद!!! काल गेट टुगेदर होते,त्यात मी केले होते, सगळ्यांना खूप आवडले... एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली......:)

In reply to by स्वाती राजेश

विसोबा खेचर 19/05/2008 - 18:31
एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली...... वा वा! आमच्या कोकणची पाकृ गोर्‍या सायबिणीपर्यंत पोहोचली म्हणायची! :) धन्यवाद स्वातीताई! झंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा...! :) आपला, (आनंदीत!) तात्या.

यशोधरा 19/05/2008 - 18:31
सांदणं...... आई गं...... अश्या सुंदर पाककृती टाकायच्या आणि मग मी बसते इथे =P~ आणि :( का बरं असा छळवाद??? का? का?? का??? ~X(

राजे 19/05/2008 - 18:38
निषेध !!!! पाक-क्रिया लिहणा-या सर्व मिपा सदस्यांचा निषेध !!!! अहो असले काहीतरी लिहता व आमच्या जिवाची तळमळ होते... तुम्हाला काय माहीत आहे बहादुरच्या हातचे तेच तेच खाणे खाऊ विटलो आहे... जरा बाहेर हॉटेलमध्ये खावे तर दिल्ली मध्ये सगळ्याच पदार्थामध्ये पनीर असे भरलेले असते की असे वाटते हॉटेलला आग लावावी ! मस्त रेसेपी आहे ... पण चहा पावडर व साखर (चव बधून) ह्या अतीरिक्त मला स्वयंपाक घरातील काही कळत नाही ह्याचे आज खुप दुखः वाटत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा 19/05/2008 - 21:34
माझ्याकडे एक टीन उरलाय आमरसाचा करेन हे नक्की..मी आज्जीकडून ऐकायची नेहेमी पण कधी खाऊन नाही पाहिली कशी लागतात...

विसोबा खेचर 19/05/2008 - 18:20
बाई गं मिपाच्या अन्नपूर्णे, वा! आंब्याच्या सांदणाची पाकृ! मिपाचे रसोईघर आज तृप्त झाले, धन्य झाले! :) आंब्याच्या सांदणाबद्दल मी काय लिहू? माझ्या मते ही अत्यंत शुभ, अत्यंत मंगलदायी अशी पाकृ आहे! आम्ही कोकणात बहुत करून बरक्या फणसाची सांदणं करतो, तीही फारच सुरेख लागतात! असो, सांदणं आंब्याची असोत वा बरक्या फणसाची असोत, माझ्या मते 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते....' या यादीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यात सांदणांचा क्रमांक निश्चितच खूप वरचा लागतो! तात्या.

आंब्याची,फणसाची दोन्ही सांदणे मला फार आवडतात.. डब्यातल्या आंब्या,फणसाची सांदणे करायचे डोक्यातच आले नाही (तशी कधी गरज पडत नाही तिथे हे ही तितकेच खरे,:)) पण आता करून पाहिन ,:)

धन्यवाद!!! काल गेट टुगेदर होते,त्यात मी केले होते, सगळ्यांना खूप आवडले... एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली......:)

In reply to by स्वाती राजेश

विसोबा खेचर 19/05/2008 - 18:31
एका ब्रिटीश बाईने माझ्याकडून रेसिपी घेतली...... वा वा! आमच्या कोकणची पाकृ गोर्‍या सायबिणीपर्यंत पोहोचली म्हणायची! :) धन्यवाद स्वातीताई! झंडा उंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा...! :) आपला, (आनंदीत!) तात्या.

यशोधरा 19/05/2008 - 18:31
सांदणं...... आई गं...... अश्या सुंदर पाककृती टाकायच्या आणि मग मी बसते इथे =P~ आणि :( का बरं असा छळवाद??? का? का?? का??? ~X(

राजे 19/05/2008 - 18:38
निषेध !!!! पाक-क्रिया लिहणा-या सर्व मिपा सदस्यांचा निषेध !!!! अहो असले काहीतरी लिहता व आमच्या जिवाची तळमळ होते... तुम्हाला काय माहीत आहे बहादुरच्या हातचे तेच तेच खाणे खाऊ विटलो आहे... जरा बाहेर हॉटेलमध्ये खावे तर दिल्ली मध्ये सगळ्याच पदार्थामध्ये पनीर असे भरलेले असते की असे वाटते हॉटेलला आग लावावी ! मस्त रेसेपी आहे ... पण चहा पावडर व साखर (चव बधून) ह्या अतीरिक्त मला स्वयंपाक घरातील काही कळत नाही ह्याचे आज खुप दुखः वाटत आहे ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा 19/05/2008 - 21:34
माझ्याकडे एक टीन उरलाय आमरसाचा करेन हे नक्की..मी आज्जीकडून ऐकायची नेहेमी पण कधी खाऊन नाही पाहिली कशी लागतात...
हल्ली आंब्याच्या रसाचे डबे सहज उपलब्ध असतात. त्यामुळे हे पक्वान्न केव्हाही करता येते. आंब्याच्या रसाच्या रंगामुळे अतिशय सुरेख दिसते व चवही उत्तम लागते. फक्त वाफवून करायचे आहे, त्यामुळे तब्येतीस चांगले व पौष्टीकही आहेच! सीझन मधे आंबे मिळतात, तेव्हा त्यांचा ताजा, हापूस आंब्याचा रस वापरला तरी चालतो. साहित्यः २ वाट्या तांदळाचा रवा किंवा साधा रवा २ वाट्या साखर २ वाट्या हापूस आंब्याचा रस १/२ वाटी दूध जरूरी नुसार २ टी.स्पून लोणी ताटाला लावण्यास साजूक तूप १.प्रथम तांदळाचा रवा भाजून घ्यावा.

विजय तेंडुलकर लेखन कार्यशाळा...

भडकमकर मास्तर ·

मास्तर, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर मराठी नाटकाचा झंजावात. त्यांचा स्वभाव आणि नाटके सतत चर्चेत राहणारी अशीच होती. ऐंशी संहितेमधून आपल्या संहितेची निवड होऊन आपणास नाट्य लेखन कार्यशाळेत त्यांचे मार्गदर्शन घेता आले आपण भाग्यवान आहात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शितल 19/05/2008 - 17:51
तुमचे नशिब मोठे तुम्हाला ते॑डु॑लकरा॑चे मार्गदर्शन लाभले, आणि स॑देश कुलकर्णी हे देखिल माझे आवडते व्यक्तीमत्व आहे. तेडु॑लकरा॑ना माझी विनम्र आदरा॑जली.

कलंत्री 19/05/2008 - 19:32
तुम्हाला योग्य ते दिशा आणि विचार मिळालाले आहेत. या विचारावरच पूढील कार्य चालु ठेवा. नाहीतर अश्या मान्यवरांच्या मृत्युनंतर आपण परत विसरतो. अश्या कार्यशाला भरविणे हीच खरी श्रद्धाजंली असेल.

चतुरंग 19/05/2008 - 19:38
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! चतुरंग

In reply to by चतुरंग

मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! असेच म्हणते,चतुरंगसारखेच. स्वाती

त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?" त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा.. मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्‍याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. .... नाटक कुठेही घडू शकते. एका मध्य प्रदेशातील नक्षलवादी दुर्गम भागात मी हिन्दी घाशीरामचा प्रयोग पाहिला आहे. पण दोनच कलाकारांचा... फार छान होता तो प्रयोग... दोघे उत्तम गायक होते आणि अभिनेते... नाटकातला त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय सत्तास्पर्धेचा आशय ते उत्तम मांडत होते. यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे" ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विकास 20/05/2008 - 08:31
तेंडुलकरांबरोबर काम करायला मिळाले हे भाग्य आहे. खालील माझा प्रतिसाद टिकात्मक असला तरी मला देखील त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले असते तर आवडले असते. गेल्या पिढीतील अनेक बुद्धीवादी लेखकांपैकी तेंडूलकर होते. त्यांच्यातील बुद्धीवंताला आदरांजली वाहत असतानाच त्यांच्याच पद्धतीने थोडेसे लिहावेसे वाटले...मला कल्पना आहे की कदाचीत मला जे काही वाटते ते अनेकांना पटणार नाही, पण त्यांच्याच, म्हणजे तेंडुलकरांप्रमाणे जे वाटते ते स्पष्टपणे लिहून ही अनोखी पण मनापासून आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. असे म्हणायचे कारण इतकेच की पु ल आणि कुसुमाग्रजांसारख्यांना (त्यांच्या मृत्यूनंतरही) तेंडूलकरांनी बुद्धीवाद म्हणून टिका करत नावे ठेवल्याचे आठवते...एकीकडे श्री पु भागवतांना मनोहर जोशींकडून पुरस्कार घेऊ नये म्हणून जाहीर दबाव आणणारे तेंडूलकर नंतर त्याच जोशीबुवांबरोबर न्युयॉर्कला एकाच व्यासपिठावर बसल्याचे आठवते... त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. जर वरील विधान हे तेंडूलकरांनी केले असले तर सखेद आश्चर्य वाटले...विचार करा तेंडुलकरांचे इतर बाबतीत विचार काय असावेत याचा : जर असेच विधान हे हिंदू पुढार्‍याने अन्याय झाला म्हणून मुसलमानांविरुद्ध नाटके करायला केले, अथवा आता राज ठाकरे अथवा कधिही शिवसेना जे काही परप्रांतिंयांविरुद्ध त्यांच्याकडून होणार्‍या कथीत अन्यायाविरुद्ध वाचा फोडून "राडा" करते त्यात आणि तेंडूलकरांच्या विचारात काय फरक? मग एकाचे चांगले आणि दुसर्‍यांचे अतिरेकी का म्हणायचे? मला थोडक्यात इतकेच म्हणायचे आहे की स्वतःच्या बुद्धीचा वापर जर समाजात कुठल्याही पद्धतीचा द्वेष तयार करायला अथवा "पेटवायला" करण्यात येत असला तर त्याचे कौतुक का करायचे? हिंसा ही हिंसा असतेच - आणि ती कधी कधी तलवारी पेक्षा लेखणीने अधीक होऊ शकते. कधी दंगलीच्या रुपात तर कधी समाजात अंतर्गत द्वेष निर्माण करून... कदाचीत असे करताना तेंडुलकरांनी पोटतिडकीने केले असेल - होणारे अन्याय पाहून... पण तेच इतरांचे झालेले असू शकते. म्हणून कुठेतरी असे राहून राहून वाटते की विचारी आणि बुद्धीवादी असून आणि उत्कृष्ठ साहीत्यनिर्मिती करत असताना देखील हे समाजाला वैचारीक दिशा देण्याच्या संदर्भात कुठेतरी वाट चुकलेले व्यक्तिमत्व होते.

In reply to by विकास

त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही... त्यांचा कोणत्या आतिरेकी, नक्षलवादी विचारांना कितपत पाठिंबा होता की नव्हता मला ठाउक नाही...तिथे तर ( आणि मी लिहिले आहे त्यातही ) सन्दर्भ फक्त नाटक कोठेही होऊ शकते एवढाच असावा.... बाकी चालूद्यात.... _ _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही...
असा अर्थ विकासरावांच्या लिखाणातुन ही कोठेहि ध्वनित होत नाही. त्यांची आंदरांजली मात्र अगदी "तेंडुलकरी" वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by विकास

तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! नाटककार म्हणून एक भूमिका असणे निराळे आणि विचारवंत म्हणून तीच भूमिका निभावणे निराळे!!!! विचारवंत म्हणून तेंडुलकर अपुरे पडले हे निश्चित!!!!! कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विकास 20/05/2008 - 16:24
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! १००% मान्य आणि मला त्यांची नाटके आवडतात. उगाच त्यांच्या नाटकांबद्दल (विशेष करून घाशिराम) जो काही गोंधळ घातला गेला तो मला कधी आवडला / आवडत नाही. टिका करणे वेगळे आणि विचार करायलाच विरोध करणे वेगळे. पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! इतकेच कुठेतरी वाटते. मी स्वतः कधी स्वतःला समाजवादी समजत नसलो, तरी पुर्वी सारख्या समाजवाद्यांची (विशेष करून मराठी) गरज आजही आहे असे वाटते. कुठलाच समाज एकेरी नसावा, जर तो चांगला प्रौढत्वाला (मॅचूअर) होणे गरजेचे वाटत असेल तर. त्यात आपल्याकडील समाजवाद्यांचे योगदान चांगले आहे. कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!! माझा देखील "टिका" करणे हा उद्देश नव्हता. पण जेंव्हा एखादे व्यक्तिमत्व हे विशाल असते तेंव्हा त्याला "मी श्रद्धांजली" वाहतो इतकेच अशा चर्च्रेत म्हणायच्या ऐवजी कुठेतरी थोडे त्या व्यक्तीचे आणि ती व्यक्ती ज्या विचारांचे प्रतिनिधित्व कदाचीत तिच्या कळतनकळत करते त्या विचारांचे थोडेसे विश्लेषण करावेसे वाटले.

इथे सर्व जण तेंडुलकरांवरती आरोप करणार आणि मग त्यांना मास्तर उत्तरे देणार असा विषय नाहीये , याची इथल्या सूज्ञांना कल्पना असणार याची मला खात्री आहे.... :) (खुद्द माझ्या घरीही "तुमचे ते तेंडुलकर ..... " आणि मग हेच वरचे सर्व ऐकायची मला सवय आहे....) मी छोटा माणूस त्याला काय उत्तरे देणार ? त्यांच्याकडून चार दिवस नाटक शिकलो , मला आनंद आहे.... ( पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आणि नाटकातील सर्व विचारांचा मी सपोर्टर आहे असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, आणि इथे तो विषयही नाही.... मला न आवडणारे तेंडुलकर असा विषय ज्याने त्याने काढून आपापली मते त्यात जरूर लिहावीत... प्रत्येकाला तो अधिकार आहेच... ) इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 20/05/2008 - 10:12
इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... खरं आहे आपलं म्हणणं! अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 20/05/2008 - 18:38
>>>कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! +१. आपला हा लेख आणि अनुभव मला देखील नक्कीच आवडला आणि त्यात रसभंग व्हावा अशी माझी देखील इच्छा नव्हती/नाही. पण जेंव्हा मुक्त व्यासपिठावर एखादा विषय चर्चेला येतो तेंव्हा त्यात वाचताना जे सुचले ते पटकन लिहीले गेले. आपल्याला जर त्यात व्यक्तिगत टिका वाटली असल्यास क्षमस्व. आणि हो, तेंडुलकरांना मी फक्त "तुमचे" मानत नाही. कुठलेही असामान्य व्यक्तिमत्व हे त्या समाजातील सर्वांचे असते आणि म्हणून त्यांच्यातील आवडणार्‍या आणि नावडणार्‍या गुणावगुणांसहीत ते "आमचे" ही आहेत आणि त्यात आनंद आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय!! तुमची काही चूक नाही हो!! असलीच तर "विजय तेंडुलकर" या महान विषयाला हात घालण्याचीच आहे!!:)) तो माणूसच इतका महान होता की त्याच्या साहित्यिक आणि विचारवंती कामगिरीविषयक निरनिराळी मतं असणारच!! तेंडुलकर नाटककार म्हणून महान होते यात काहीच संशय नाही हो!!! महान व्यक्तीच्याच कार्याचे मूल्यमापन होते!! भडक मकरांच्या कार्यांचे कोणी मूल्यमापन करील काय? (ह. घ्या.!!!) आमचे म्हणणे इतकेच की त्यांची नाटककार म्हणून भूमिका आणि त्यांची विचारवंत म्हणून भूमिका (विशेषतः मोदींविषयी!!!!!!) यांचा मेळ लागत नाही!!! कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!! आमचे काही चुकले काय? असेल तर स्पष्ट करा........ आम्हाला आपल्या संतांचे एक वचन आठवते... "देव्हार्‍यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम" आता आपले संत खरे की तेंडुलकर मोठे!!!! स्पष्टोक्तीबद्द्ल क्षमा असावी!! तुम्ही नाही म्हटलंत तरी "आपलाच", पिवळा डांबिस

कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!!
गोची होते खरी! काय करणार? http://sadhanatrust.com/pdf/SW20080510.pdf या ठिकाणी पान नं २९ वर राहुल रेवले यांचा 'समाजवाद्यांनी केलेली सर्वात मोठी चुक ' हा लेख . यावर साधनाच्या संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. वाचनीय आहे. प्रकाश घाटपांडे

मास्तर, जेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर मराठी नाटकाचा झंजावात. त्यांचा स्वभाव आणि नाटके सतत चर्चेत राहणारी अशीच होती. ऐंशी संहितेमधून आपल्या संहितेची निवड होऊन आपणास नाट्य लेखन कार्यशाळेत त्यांचे मार्गदर्शन घेता आले आपण भाग्यवान आहात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शितल 19/05/2008 - 17:51
तुमचे नशिब मोठे तुम्हाला ते॑डु॑लकरा॑चे मार्गदर्शन लाभले, आणि स॑देश कुलकर्णी हे देखिल माझे आवडते व्यक्तीमत्व आहे. तेडु॑लकरा॑ना माझी विनम्र आदरा॑जली.

कलंत्री 19/05/2008 - 19:32
तुम्हाला योग्य ते दिशा आणि विचार मिळालाले आहेत. या विचारावरच पूढील कार्य चालु ठेवा. नाहीतर अश्या मान्यवरांच्या मृत्युनंतर आपण परत विसरतो. अश्या कार्यशाला भरविणे हीच खरी श्रद्धाजंली असेल.

चतुरंग 19/05/2008 - 19:38
मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! चतुरंग

In reply to by चतुरंग

मोठ्या लोकांचा असा छोटासा सहवासही खूप काही देऊन जातो. आपण भाग्यवान आहात. वाटचाल चालू ठेवा. शुभेच्छा! असेच म्हणते,चतुरंगसारखेच. स्वाती

त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?" त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा.. मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्‍याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. .... नाटक कुठेही घडू शकते. एका मध्य प्रदेशातील नक्षलवादी दुर्गम भागात मी हिन्दी घाशीरामचा प्रयोग पाहिला आहे. पण दोनच कलाकारांचा... फार छान होता तो प्रयोग... दोघे उत्तम गायक होते आणि अभिनेते... नाटकातला त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय सत्तास्पर्धेचा आशय ते उत्तम मांडत होते. यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे" ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विकास 20/05/2008 - 08:31
तेंडुलकरांबरोबर काम करायला मिळाले हे भाग्य आहे. खालील माझा प्रतिसाद टिकात्मक असला तरी मला देखील त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले असते तर आवडले असते. गेल्या पिढीतील अनेक बुद्धीवादी लेखकांपैकी तेंडूलकर होते. त्यांच्यातील बुद्धीवंताला आदरांजली वाहत असतानाच त्यांच्याच पद्धतीने थोडेसे लिहावेसे वाटले...मला कल्पना आहे की कदाचीत मला जे काही वाटते ते अनेकांना पटणार नाही, पण त्यांच्याच, म्हणजे तेंडुलकरांप्रमाणे जे वाटते ते स्पष्टपणे लिहून ही अनोखी पण मनापासून आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न आहे. असे म्हणायचे कारण इतकेच की पु ल आणि कुसुमाग्रजांसारख्यांना (त्यांच्या मृत्यूनंतरही) तेंडूलकरांनी बुद्धीवाद म्हणून टिका करत नावे ठेवल्याचे आठवते...एकीकडे श्री पु भागवतांना मनोहर जोशींकडून पुरस्कार घेऊ नये म्हणून जाहीर दबाव आणणारे तेंडूलकर नंतर त्याच जोशीबुवांबरोबर न्युयॉर्कला एकाच व्यासपिठावर बसल्याचे आठवते... त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. जर वरील विधान हे तेंडूलकरांनी केले असले तर सखेद आश्चर्य वाटले...विचार करा तेंडुलकरांचे इतर बाबतीत विचार काय असावेत याचा : जर असेच विधान हे हिंदू पुढार्‍याने अन्याय झाला म्हणून मुसलमानांविरुद्ध नाटके करायला केले, अथवा आता राज ठाकरे अथवा कधिही शिवसेना जे काही परप्रांतिंयांविरुद्ध त्यांच्याकडून होणार्‍या कथीत अन्यायाविरुद्ध वाचा फोडून "राडा" करते त्यात आणि तेंडूलकरांच्या विचारात काय फरक? मग एकाचे चांगले आणि दुसर्‍यांचे अतिरेकी का म्हणायचे? मला थोडक्यात इतकेच म्हणायचे आहे की स्वतःच्या बुद्धीचा वापर जर समाजात कुठल्याही पद्धतीचा द्वेष तयार करायला अथवा "पेटवायला" करण्यात येत असला तर त्याचे कौतुक का करायचे? हिंसा ही हिंसा असतेच - आणि ती कधी कधी तलवारी पेक्षा लेखणीने अधीक होऊ शकते. कधी दंगलीच्या रुपात तर कधी समाजात अंतर्गत द्वेष निर्माण करून... कदाचीत असे करताना तेंडुलकरांनी पोटतिडकीने केले असेल - होणारे अन्याय पाहून... पण तेच इतरांचे झालेले असू शकते. म्हणून कुठेतरी असे राहून राहून वाटते की विचारी आणि बुद्धीवादी असून आणि उत्कृष्ठ साहीत्यनिर्मिती करत असताना देखील हे समाजाला वैचारीक दिशा देण्याच्या संदर्भात कुठेतरी वाट चुकलेले व्यक्तिमत्व होते.

In reply to by विकास

त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता. या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही... त्यांचा कोणत्या आतिरेकी, नक्षलवादी विचारांना कितपत पाठिंबा होता की नव्हता मला ठाउक नाही...तिथे तर ( आणि मी लिहिले आहे त्यातही ) सन्दर्भ फक्त नाटक कोठेही होऊ शकते एवढाच असावा.... बाकी चालूद्यात.... _ _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

या वाक्यातून ते आतिरेकी आणि नक्षलवादी होते असे कोठेही ध्वनित होत नाही...
असा अर्थ विकासरावांच्या लिखाणातुन ही कोठेहि ध्वनित होत नाही. त्यांची आंदरांजली मात्र अगदी "तेंडुलकरी" वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by विकास

तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! नाटककार म्हणून एक भूमिका असणे निराळे आणि विचारवंत म्हणून तीच भूमिका निभावणे निराळे!!!! विचारवंत म्हणून तेंडुलकर अपुरे पडले हे निश्चित!!!!! कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!!

In reply to by पिवळा डांबिस

विकास 20/05/2008 - 16:24
तेंडुलकर नाटककार म्हणुन महान होते यात शंकाच नाही! नाहीतर "सखाराम बाईंडर" आणि "घाशीराम कोतवाल" सारखी नाटकं लिहिणं आणि त्यामागे खंबीरपणे उभं रहाणं हे येरागबाळ्याचे काम नोहे!! १००% मान्य आणि मला त्यांची नाटके आवडतात. उगाच त्यांच्या नाटकांबद्दल (विशेष करून घाशिराम) जो काही गोंधळ घातला गेला तो मला कधी आवडला / आवडत नाही. टिका करणे वेगळे आणि विचार करायलाच विरोध करणे वेगळे. पण अलिकडे त्यांचे (आणि सगळ्याच समाजवाद्यांचे) गणित कोठेतरी चुकल्यासारखे वाटते!!!! इतकेच कुठेतरी वाटते. मी स्वतः कधी स्वतःला समाजवादी समजत नसलो, तरी पुर्वी सारख्या समाजवाद्यांची (विशेष करून मराठी) गरज आजही आहे असे वाटते. कुठलाच समाज एकेरी नसावा, जर तो चांगला प्रौढत्वाला (मॅचूअर) होणे गरजेचे वाटत असेल तर. त्यात आपल्याकडील समाजवाद्यांचे योगदान चांगले आहे. कृपया ही तेंडुलकरांवरची टीका समजू नये तर ही मानवी जीवनाची शोकांतिका समजावी!!!!! माझा देखील "टिका" करणे हा उद्देश नव्हता. पण जेंव्हा एखादे व्यक्तिमत्व हे विशाल असते तेंव्हा त्याला "मी श्रद्धांजली" वाहतो इतकेच अशा चर्च्रेत म्हणायच्या ऐवजी कुठेतरी थोडे त्या व्यक्तीचे आणि ती व्यक्ती ज्या विचारांचे प्रतिनिधित्व कदाचीत तिच्या कळतनकळत करते त्या विचारांचे थोडेसे विश्लेषण करावेसे वाटले.

इथे सर्व जण तेंडुलकरांवरती आरोप करणार आणि मग त्यांना मास्तर उत्तरे देणार असा विषय नाहीये , याची इथल्या सूज्ञांना कल्पना असणार याची मला खात्री आहे.... :) (खुद्द माझ्या घरीही "तुमचे ते तेंडुलकर ..... " आणि मग हेच वरचे सर्व ऐकायची मला सवय आहे....) मी छोटा माणूस त्याला काय उत्तरे देणार ? त्यांच्याकडून चार दिवस नाटक शिकलो , मला आनंद आहे.... ( पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा आणि नाटकातील सर्व विचारांचा मी सपोर्टर आहे असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही, आणि इथे तो विषयही नाही.... मला न आवडणारे तेंडुलकर असा विषय ज्याने त्याने काढून आपापली मते त्यात जरूर लिहावीत... प्रत्येकाला तो अधिकार आहेच... ) इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 20/05/2008 - 10:12
इथे लेखन कार्यशाळा असा विषय टाकून त्यात त्यांनी नाट्यलेखन विषयक काय सांगितले त्याची उजळणी करायचा प्रयत्न होता माझा... खरं आहे आपलं म्हणणं! अजूनही नाट्यलेख्ननविषयक बरेच लिहिणार होतो पण वेगळ्याच प्रतिसादांमुळे विषय भरकटेल ...त्यामुळे थांबणे बरे .... कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 20/05/2008 - 18:38
>>>कृपया थांबू नका. अवश्य लिहा अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती! आपल्या नाट्यलेखनविषयक मुद्द्यांवर मला वाचायला आवडेल! +१. आपला हा लेख आणि अनुभव मला देखील नक्कीच आवडला आणि त्यात रसभंग व्हावा अशी माझी देखील इच्छा नव्हती/नाही. पण जेंव्हा मुक्त व्यासपिठावर एखादा विषय चर्चेला येतो तेंव्हा त्यात वाचताना जे सुचले ते पटकन लिहीले गेले. आपल्याला जर त्यात व्यक्तिगत टिका वाटली असल्यास क्षमस्व. आणि हो, तेंडुलकरांना मी फक्त "तुमचे" मानत नाही. कुठलेही असामान्य व्यक्तिमत्व हे त्या समाजातील सर्वांचे असते आणि म्हणून त्यांच्यातील आवडणार्‍या आणि नावडणार्‍या गुणावगुणांसहीत ते "आमचे" ही आहेत आणि त्यात आनंद आहे.

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय!! तुमची काही चूक नाही हो!! असलीच तर "विजय तेंडुलकर" या महान विषयाला हात घालण्याचीच आहे!!:)) तो माणूसच इतका महान होता की त्याच्या साहित्यिक आणि विचारवंती कामगिरीविषयक निरनिराळी मतं असणारच!! तेंडुलकर नाटककार म्हणून महान होते यात काहीच संशय नाही हो!!! महान व्यक्तीच्याच कार्याचे मूल्यमापन होते!! भडक मकरांच्या कार्यांचे कोणी मूल्यमापन करील काय? (ह. घ्या.!!!) आमचे म्हणणे इतकेच की त्यांची नाटककार म्हणून भूमिका आणि त्यांची विचारवंत म्हणून भूमिका (विशेषतः मोदींविषयी!!!!!!) यांचा मेळ लागत नाही!!! कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!! आमचे काही चुकले काय? असेल तर स्पष्ट करा........ आम्हाला आपल्या संतांचे एक वचन आठवते... "देव्हार्‍यावरी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी तो अधम" आता आपले संत खरे की तेंडुलकर मोठे!!!! स्पष्टोक्तीबद्द्ल क्षमा असावी!! तुम्ही नाही म्हटलंत तरी "आपलाच", पिवळा डांबिस

कुठेतरी हंबग वाटते!! त्यांच्याच नाही तर सगळ्याच समाजवाद्यांच्या बाबतीत!!!!!
गोची होते खरी! काय करणार? http://sadhanatrust.com/pdf/SW20080510.pdf या ठिकाणी पान नं २९ वर राहुल रेवले यांचा 'समाजवाद्यांनी केलेली सर्वात मोठी चुक ' हा लेख . यावर साधनाच्या संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. वाचनीय आहे. प्रकाश घाटपांडे
लेखनप्रकार
२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती... २० मे ते २४ मे २००६...