मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुटेनबर्ग

स्वाती दिनेश ·
. पुस्तकं वाचायला सर्वांनाच आवडतात पण आपल्याला ही पुस्तके कोणामुळे वाचता येणे शक्य झाले आहे हे मात्र बर्याच जणांना माहित नसते. त्याच कलंदर अवलियाची ही ओळख! १५व्या शतकाचा सुरुवातीचा काळ! र्‍हाइन आणि माइन नद्यांच्या संगमावर वसलेलं छोटंसं टुमदार गाव, 'माइन्झ'! फ्रिडरिश ( फ्रिलं) ग्लेन्सफ्लाइश आणि एल्स वायरीश हे सोनारकाम करणारे दांपत्य तिथं सुखानं नांदत होते. त्यांना तीन मुले फ्रिलं (ज्यु), एल्स (ज्यु) आणि सगळ्यात धाकटा योहानेस (योहान)!

विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?

खटासि खट ·

खट्या, अरे 'विद्वत्तापूर्ण प्रतिसाद पहायचे असतील तर ते खटासी खट ह्याचे प्रतिसाद पहा' असे हे कालच म्हणाले. जेपी,श्रीगुरुजी,जॅक स्पॅरो,मीरजकर-बॅटमॅन.. हे ही शर्यतीत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई तुम्ही टवाळ कार्ट्यास, आजानुकर्णास आणि इतर अनेक जेष्ठ मिपाकरांना विसरलात काय वयोमानाप्रमाणे =))

संदीप डांगे 06/03/2015 - 13:26
१. दुसर्‍याला ठार अज्ञानी ठरवून त्याच्या बुद्धीचा, आकलनाचा कमाल अपमान करणे. २. आपल्याला सगळ्यातले सगळे कळते असा ठाम विश्वास असणे. ३. आपल्याकडे मुद्दा असो वा नसो पण शब्दबंबाळ प्रतिसाद लिहिणे प्रचंड आवश्यक. वरीलप्रमाणे गोष्टी तुमच्या प्रतिसादात असतील तर तुम्ही विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद दिला आहे असे समजावे. हाय काय नाय काय.

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे 06/03/2015 - 13:30
या तिन्ही निकषांवर पुरेपुर उतरणारा एक विद्वान आयडी काही काळापूर्वी सरुटॉबानेच्या सहभोजनाचे अजीर्ण होऊन हेवनवासी झाला.

In reply to by सुबोध खरे

सांजसंध्या 07/03/2015 - 12:49
घर कसं चालवावं, घर आणि ऑफीस यांची तारेवरची कसरत कशी करावी, मुलांचा अभ्यास, त्यांचं भावविश्व, त्यांच्यावरचे संस्कार, पाककृती आत्मसात करणं आणि खाऊ घालणं, घर नीटनेटकं आणि सुंदर लावणं, स्वच्छता ठेवणं आणि तत्सम विषय सोडून कुठल्याही विषयावर बिनधास्त मत दिलं की ते विप्र ठरतं ही खूणगाठ मनाशी बाळगावी...

कंजूस 06/03/2015 - 15:01
१)ज्याच्या लेखाला वि॰ प्रतिसाद द्यायचे असतील तो आईडी फार मुरलेला आणि प्रसिद्ध नसावा नवखा असावा. २)त्याची रास ४ -८ -१२ असावी. क्रमश:

आणि दर वेळी त्याचे पठण/ मनन/ चिंतन केल्यावर प्रत्येक वेळी भलभलते अर्थ निघतील तेव्हाच तुम्ही विद्वत्ताप्रचुर म्हणून ओळखले जाल हो !!

नाखु 06/03/2015 - 15:48
नियम : तुम्ही टंकलेले तुम्हालाच शेवटपर्यंत कळले नाही आणि भविष्यातही कळणार नाही अशी श्बद्योजना ठेवा हळूहळू तुम्ही वि.प्र. म्हणून गणले जाल. वाचकांची पत्रेवाला भोट वाचक नाखु.

In reply to by नाखु

खटासि खट 08/03/2015 - 11:45
काल मधरात्री जाग आली तेव्हां हे संस्थळ देखभालीसाठी बंद असल्याचे लक्षात आले. या समयी या संस्थळावर एक संदेश झळकत होता की हे संस्थळ मधरात्री ००.१० वा निद्रावस्थेत जाईल आणि मध्यरात्री १.०० वाजता पुन्हा जागृतावस्थेत येईल. तरी सदस्य व लेखकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. पण १.०० वाजता काही हे संस्थळ चालू झाले नाही.२. वाजताही ते चालू नव्हते. केव्हां चालू झाले हे समजले नाही. पण या काळात एक सत्य उमगले ते असे की लेखक झाल्याशिवाय लेखकाची दु:खे उमजत नाहीत. संस्थळ चालू झाले, न झाले सदस्यांना काही फरक पडत नाही. ते सन्नी देओल अथवा अन्य कुणाच्या अदाकारी पाहू शकतात. पण लेखकाचे तसे नसते. आपल्या अदाकारीवर किती लाईक्स आले आहेत. किती प्रतिसाद आले आहेत हे कळावे यासाठी तो रात्रीचा दिवस करू शकतो. अशा वेळी एक एक सेकंद सुद्धा त्याला युगासारखा वाटू शकतो. लेखकांया या अवस्थेची टिंगल करणा-यांनी स्वतः लेखक होऊन पहावे. उपोषणाशिवाय महात्मा होता येत नाही तसे प्रतिसादाशिवाय लेखक बनता येत नाही हे सत्य आम्हाला निद्रीतावस्थेतील संस्थळावर येऊन उमगले आहे.

सूड 06/03/2015 - 16:39
दारू पिण्यास सुरूवात कशी करावी
पाणी पितो तशीच, तोंडाने!!
जुगारात यशस्वी कसे व्हावे
सतत खेळावे, एकतर कंगाल व्हाल किंवा शहाणपण येईल.
बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे
आधीच भोकं असलेले, ब्लेड मारल्यासारखे दिसणारे फ्याशनेबल बनियान घ्यावे. म्हणजे भोक पडायची वाट बघून "आता काय करु" असा प्रश्न पडणार नाही.
अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे
लंगोट वापरावयास सुरुवात करावी, म्हणजे इलॅस्टीकचा प्रश्न सतावणार नाही.

In reply to by सूड

सोत्रि 08/03/2015 - 06:11
धागाकर्त्याच्या मनात असलेले प्रश्न अगदी योग्य आहेत. किंबहूना बहुसंख्यांच्या मनात हे प्रश्न पडत असतीलच. त्यामुळे ती प्रश्नावळी व्यापक आणि जनताभिमुख होती असे मानन्यास प्रत्यवाय नसावा. परंतु सूडरावांनी त्या प्रश्नांंना दिलेली उत्तरे ही मूळ प्रश्नांशी नाळ सोडून भलतीच उपरोधिक आहेत. त्यामुळे जनताभिमुख प्रश्नांना असे अतिउरफाटे वळण देणे हे अतिशय अश्लाघ्य वर्तन आहे असेही म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. ह्या उपरिनिर्दिष्ट प्रश्नांची ठाम उत्तरे अस्मादिकांकडे आहेतच, पण जनमाणसांत त्यावर काही वक्तव करणे हे सूडरावांनी केलेल्या अश्लाघ्य वर्तनाच्या पार्श्वभूमीवर सयुक्तिक न ठरावे, सबब खजिल होऊन प्रश्नांवर मौन बाळगण्याचे ठरविले गेल्या आहे! - (स्वयंघोषित विद्वत्ताप्रचुर) सोकाजी

In reply to by सोत्रि

नैष्ठिक मौन असेल तर मंडळींनी सांगितल्यावर पाव कप दुध पिऊन मौन सोडावे ... आणि मौनाचे फायदे ह्यावर एक मौलिक व्याख्यान द्यावे आपणास मिपाच्या माध्यमातून या ठिकाणी अशा पद्धतीने विनंती करणेत येत आहे ...

खट्या, अरे 'विद्वत्तापूर्ण प्रतिसाद पहायचे असतील तर ते खटासी खट ह्याचे प्रतिसाद पहा' असे हे कालच म्हणाले. जेपी,श्रीगुरुजी,जॅक स्पॅरो,मीरजकर-बॅटमॅन.. हे ही शर्यतीत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई तुम्ही टवाळ कार्ट्यास, आजानुकर्णास आणि इतर अनेक जेष्ठ मिपाकरांना विसरलात काय वयोमानाप्रमाणे =))

संदीप डांगे 06/03/2015 - 13:26
१. दुसर्‍याला ठार अज्ञानी ठरवून त्याच्या बुद्धीचा, आकलनाचा कमाल अपमान करणे. २. आपल्याला सगळ्यातले सगळे कळते असा ठाम विश्वास असणे. ३. आपल्याकडे मुद्दा असो वा नसो पण शब्दबंबाळ प्रतिसाद लिहिणे प्रचंड आवश्यक. वरीलप्रमाणे गोष्टी तुमच्या प्रतिसादात असतील तर तुम्ही विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद दिला आहे असे समजावे. हाय काय नाय काय.

In reply to by संदीप डांगे

सतिश गावडे 06/03/2015 - 13:30
या तिन्ही निकषांवर पुरेपुर उतरणारा एक विद्वान आयडी काही काळापूर्वी सरुटॉबानेच्या सहभोजनाचे अजीर्ण होऊन हेवनवासी झाला.

In reply to by सुबोध खरे

सांजसंध्या 07/03/2015 - 12:49
घर कसं चालवावं, घर आणि ऑफीस यांची तारेवरची कसरत कशी करावी, मुलांचा अभ्यास, त्यांचं भावविश्व, त्यांच्यावरचे संस्कार, पाककृती आत्मसात करणं आणि खाऊ घालणं, घर नीटनेटकं आणि सुंदर लावणं, स्वच्छता ठेवणं आणि तत्सम विषय सोडून कुठल्याही विषयावर बिनधास्त मत दिलं की ते विप्र ठरतं ही खूणगाठ मनाशी बाळगावी...

कंजूस 06/03/2015 - 15:01
१)ज्याच्या लेखाला वि॰ प्रतिसाद द्यायचे असतील तो आईडी फार मुरलेला आणि प्रसिद्ध नसावा नवखा असावा. २)त्याची रास ४ -८ -१२ असावी. क्रमश:

आणि दर वेळी त्याचे पठण/ मनन/ चिंतन केल्यावर प्रत्येक वेळी भलभलते अर्थ निघतील तेव्हाच तुम्ही विद्वत्ताप्रचुर म्हणून ओळखले जाल हो !!

नाखु 06/03/2015 - 15:48
नियम : तुम्ही टंकलेले तुम्हालाच शेवटपर्यंत कळले नाही आणि भविष्यातही कळणार नाही अशी श्बद्योजना ठेवा हळूहळू तुम्ही वि.प्र. म्हणून गणले जाल. वाचकांची पत्रेवाला भोट वाचक नाखु.

In reply to by नाखु

खटासि खट 08/03/2015 - 11:45
काल मधरात्री जाग आली तेव्हां हे संस्थळ देखभालीसाठी बंद असल्याचे लक्षात आले. या समयी या संस्थळावर एक संदेश झळकत होता की हे संस्थळ मधरात्री ००.१० वा निद्रावस्थेत जाईल आणि मध्यरात्री १.०० वाजता पुन्हा जागृतावस्थेत येईल. तरी सदस्य व लेखकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. पण १.०० वाजता काही हे संस्थळ चालू झाले नाही.२. वाजताही ते चालू नव्हते. केव्हां चालू झाले हे समजले नाही. पण या काळात एक सत्य उमगले ते असे की लेखक झाल्याशिवाय लेखकाची दु:खे उमजत नाहीत. संस्थळ चालू झाले, न झाले सदस्यांना काही फरक पडत नाही. ते सन्नी देओल अथवा अन्य कुणाच्या अदाकारी पाहू शकतात. पण लेखकाचे तसे नसते. आपल्या अदाकारीवर किती लाईक्स आले आहेत. किती प्रतिसाद आले आहेत हे कळावे यासाठी तो रात्रीचा दिवस करू शकतो. अशा वेळी एक एक सेकंद सुद्धा त्याला युगासारखा वाटू शकतो. लेखकांया या अवस्थेची टिंगल करणा-यांनी स्वतः लेखक होऊन पहावे. उपोषणाशिवाय महात्मा होता येत नाही तसे प्रतिसादाशिवाय लेखक बनता येत नाही हे सत्य आम्हाला निद्रीतावस्थेतील संस्थळावर येऊन उमगले आहे.

सूड 06/03/2015 - 16:39
दारू पिण्यास सुरूवात कशी करावी
पाणी पितो तशीच, तोंडाने!!
जुगारात यशस्वी कसे व्हावे
सतत खेळावे, एकतर कंगाल व्हाल किंवा शहाणपण येईल.
बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे
आधीच भोकं असलेले, ब्लेड मारल्यासारखे दिसणारे फ्याशनेबल बनियान घ्यावे. म्हणजे भोक पडायची वाट बघून "आता काय करु" असा प्रश्न पडणार नाही.
अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे
लंगोट वापरावयास सुरुवात करावी, म्हणजे इलॅस्टीकचा प्रश्न सतावणार नाही.

In reply to by सूड

सोत्रि 08/03/2015 - 06:11
धागाकर्त्याच्या मनात असलेले प्रश्न अगदी योग्य आहेत. किंबहूना बहुसंख्यांच्या मनात हे प्रश्न पडत असतीलच. त्यामुळे ती प्रश्नावळी व्यापक आणि जनताभिमुख होती असे मानन्यास प्रत्यवाय नसावा. परंतु सूडरावांनी त्या प्रश्नांंना दिलेली उत्तरे ही मूळ प्रश्नांशी नाळ सोडून भलतीच उपरोधिक आहेत. त्यामुळे जनताभिमुख प्रश्नांना असे अतिउरफाटे वळण देणे हे अतिशय अश्लाघ्य वर्तन आहे असेही म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. ह्या उपरिनिर्दिष्ट प्रश्नांची ठाम उत्तरे अस्मादिकांकडे आहेतच, पण जनमाणसांत त्यावर काही वक्तव करणे हे सूडरावांनी केलेल्या अश्लाघ्य वर्तनाच्या पार्श्वभूमीवर सयुक्तिक न ठरावे, सबब खजिल होऊन प्रश्नांवर मौन बाळगण्याचे ठरविले गेल्या आहे! - (स्वयंघोषित विद्वत्ताप्रचुर) सोकाजी

In reply to by सोत्रि

नैष्ठिक मौन असेल तर मंडळींनी सांगितल्यावर पाव कप दुध पिऊन मौन सोडावे ... आणि मौनाचे फायदे ह्यावर एक मौलिक व्याख्यान द्यावे आपणास मिपाच्या माध्यमातून या ठिकाणी अशा पद्धतीने विनंती करणेत येत आहे ...
आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?) इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले. तरी विद्वान म्हणवून घेण्यासाठी काय करावे ?

ई बे वरिल ऑनलाईन खरेदी

बाप्पू ·

२. चार्जर वेगळा असू शकतो, कारण वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या आकाराची विद्युत कनेक्टर्स असतात. ३. ५ तास ते ५ वर्षे (कितीही) वापरलेला जुना फोन फॅक्टरी रिसेट केल्यावर नव्यासारखा चालू होतो. त्यामुळे "पूर्ण सेटअप विचारणे" हे फोन नवा असण्याचे लक्षण नाही. ४. फ्लिपकार्ट पैसा व कागद वाचवणासाठी इन्वॉईसची हार्डकॉपी देत नाही, डिलीव्हरीनंतर मेलवर पीडीएफ स्वरुपात इन्वॉईसची सॉफ्ट्कॉपी येते. ही वॉरंटी दाव्यासाठी प्रिंट काढून वापरता येते. ५. नक्की माहिती नाही, बहुतेक पोलिसांना चालत असावेत.

मालोजीराव 26/02/2015 - 17:35
काही वर्षांपूर्वी बरेच फोन भारतात उपलब्ध नव्हते त्यावेळी HTC चे २-३ फोन मी असेच थर्ड पार्टी वॉरन्टी सह मागवले होते.चांगले आणि स्वस्त मिळालेले HTC Touch pro 2 HTC Advantage HTC Mytouch 3g Slide

आदूबाळ 26/02/2015 - 17:46
कस्टम्स तत्त्वतः उघडून बघू शकतात, पण बघतील असं नाही. ते बहुतेक सँपल बेसिसवर तपासणी करत असल्यामुळे न उघडण्याची शक्यता जास्त असते. हा फोन "रीफर्बिश्ड" आहे का? म्ह० परदेशात कोणीतरी अगोदर वापरलेला फोन नव्यासारखा चकाचक करून द्यायचा. वेगळ्याच अ‍ॅक्सेसरीज वगैरे याच्याशी सुसंगत आहे. रीफर्बिश्ड असेल तर - सेकंड हँड फोन आयात करता येतो का हा प्रश्न आहे. बर्‍याच सेकंड हँड गोष्टी आयात करायला बंदी असते, किंवा त्यावर भयानक मोठी कस्टम्स ड्यूटी असते. उदा. सेकंडहँड कारवर माझ्या माहितीप्रमाणे १८०% कस्टम्स ड्यूटी असते. उगाच घाबरवण्याची इच्छा नाही, अन् मला पूर्ण माहितीही नाही. तरी काळजी घ्या असं सुचवेन.

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 26/02/2015 - 17:53
बर्‍याच सेकंड हँड गोष्टी आयात करायला बंदी असते, किंवा त्यावर भयानक मोठी कस्टम्स ड्यूटी असते.
असे असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ती वस्तु ऑन्लैन खुलेआम कशी विकली जौ शकते? आणि कस्टम्स ड्यूटी आयात करणार्याने भरायला हवी....इथे विकत घेणार्याने नाही ना

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ 26/02/2015 - 18:22
आयात करणाराच भरतो, आणि मग वस्तूच्या किंमतीत अ‍ॅडवतो. म्हणजे शेवटी विकत घेणार्‍याच्या शिरावरच ती ड्यूटी पडते.

योगी९०० 26/02/2015 - 20:44
३) फोन मी जेव्हा पहिल्यांदा चालू केला तेव्हा तो डायरेक्ट सुरु न होता त्याने मला त्याने पूर्ण सेटअप विचारले. याचा अर्थ, फोन हा नवीन आहे. हे माझे assumption बरोबर आहे का? एखादा फोन वापरून नंतर फॅक्टरी रिसेट केला तर तो पुर्ण सेटअप परत विचारू शकतो किंवा त्यातली मुळ OS चा build परत टाकला तरी तो पुर्णपणे परत सेटअप विचारतो. असा स्वस्तातला घेतला गेलेला फोन हा एकतर चोरीचा असण्याची शक्यता आहे किंवा रिफर्बिश्ड असण्याची शक्यता आहे. बाकी LG चा कोणता फोन घेतला? LG G2 घेतला का?

यमगर्निकर 27/02/2015 - 11:37
माझ्या मते हा क्लोन पिस असावा, मध्यंतरि माझ्या मित्राने आय फोन ५ क्लोन पिस घेतला होता, तोहि ९०००/- मध्ये (ओरिजनल किंमत ४५०००/- होति,) पण कितिहि निर्खुन पाहिले तरि ओरिजनल आणि क्लोन पिस मध्ये फरक ओळखुन येत नव्हता, तर तसा काहि प्रकार आहे का? याचि खात्रि करुन घ्या, तशि खत्रि तुम्हाला एल जि च्या सर्विस सेंटर मध्येच होउ शकते.

In reply to by यमगर्निकर

क्लोन पिस असावा ला +१०० सद्या "सामसुंग" हा शब्द गाळून फक्त गॅलॅक्सी नोट३, गॅलॅक्सी नोट४, अश्या नावांनी सर्व गॅलॅक्सी सिरीजमधले अगदी मूळ फोनसारखे दिसणारे फोन जालावर आणि ईमेलवरून सर्रास विकले जात आहेत. काही जाहिरातीत क्लोन आहे असे कुठेतरी कोपर्‍यात लिहीलेले असते तर इतर काहीत तेही नसते ! इतर कंपन्यांच्या बाबतीत तसेच होत असल्यास आश्चर्य नाही.

हितु 27/02/2015 - 17:32
११) इम्पोर्टेड फोने नेमके काय असतात? ते इथे भारतात विकणे आणि वापरणे गैर तर नाही ना ? हा फोन भरता साठी बनवलेला नसून, हा फोन अमेरिका किवा चीन या सारख्या देसंसाठी बनवलेला अस्तो. असे फोने इम्पोर्ट करणे किवा विकणे इल्लिगल नहि. फक्त हा फोन कश्या प्रकारे इम्पोर्ट केला आहे त्याच्या वर लीगल किवा इल्लिगल सांगता येईल . २) फोन चे अक्सेसरीज हि देशानुसार बदलतात का ? हो, अमेरिका मध्ये ११० volt वापरतात,आणि अमेरिकन charger पिन पण वेगळी असते . ३) फोन मी जेव्हा पहिल्यांदा चालू केला तेव्हा तो डायरेक्ट सुरु न होता त्याने मला त्याने पूर्ण सेटअप विचारले. याचा अर्थ, फोन हा नवीन आहे. हे माझे assumption बरोबर आहे का? assumtion बरोबर असू सकते पण, फोन हार्ड रीसेट केल्यावर पण असाच मेनू येतो. ४) फोनला १ वर्षाची थर्ड पार्टी वॉरन्टी आहे. थर्ड पार्टी वॉरन्टीम्हणजे नेमके काय? हि विश्वसनीय आहे का.? third party warranty म्हणजे , unautorized भारतातील सेर्विस कंपनी ची warranty . या कंपनिन ची सरविस नेहमीच चांगली असते असे नाही . पण त्याचे असे आहे कि "दुबते हुवे को तिन्केका सहारा " ५) फोन ची रिसीट आणि वॉरन्टी ची त्याने सौफ्टकॉपी देण्याचे त्याने काबुल केले आहे. हे दोन्ही नसल्यामुळे मी हा फोन परत घ्यावा म्हणून मेल केला होता. मेल केल्यानंतर त्याने दोन्ही डॉक्युमेंट ई मेल करतो त्याची प्रिंट काढून घ्या असे सांगितलेय अश्या पद्धतीने मिळालेली डॉक्युमेंटस ग्राय्ह धरली जातात का ? -- असी documents चालतीलच असे नाही, document मिळाल्यावर जवळच्या service center मध्ये दाखवून खात्री करून घ्या . ६) हे डॉक्युमेंट, फोन हरवल्यावर पोलिस कम्प्लेंट करतांना ग्राह्य धरले जातील का ? -- police station मध्ये ओळख किती आहे यावर हे अवलंबून आहे. माझ्या मते original documents असलेली बरि. मी स्वता mobile import करून विकलेले आहेत,

२. चार्जर वेगळा असू शकतो, कारण वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या आकाराची विद्युत कनेक्टर्स असतात. ३. ५ तास ते ५ वर्षे (कितीही) वापरलेला जुना फोन फॅक्टरी रिसेट केल्यावर नव्यासारखा चालू होतो. त्यामुळे "पूर्ण सेटअप विचारणे" हे फोन नवा असण्याचे लक्षण नाही. ४. फ्लिपकार्ट पैसा व कागद वाचवणासाठी इन्वॉईसची हार्डकॉपी देत नाही, डिलीव्हरीनंतर मेलवर पीडीएफ स्वरुपात इन्वॉईसची सॉफ्ट्कॉपी येते. ही वॉरंटी दाव्यासाठी प्रिंट काढून वापरता येते. ५. नक्की माहिती नाही, बहुतेक पोलिसांना चालत असावेत.

मालोजीराव 26/02/2015 - 17:35
काही वर्षांपूर्वी बरेच फोन भारतात उपलब्ध नव्हते त्यावेळी HTC चे २-३ फोन मी असेच थर्ड पार्टी वॉरन्टी सह मागवले होते.चांगले आणि स्वस्त मिळालेले HTC Touch pro 2 HTC Advantage HTC Mytouch 3g Slide

आदूबाळ 26/02/2015 - 17:46
कस्टम्स तत्त्वतः उघडून बघू शकतात, पण बघतील असं नाही. ते बहुतेक सँपल बेसिसवर तपासणी करत असल्यामुळे न उघडण्याची शक्यता जास्त असते. हा फोन "रीफर्बिश्ड" आहे का? म्ह० परदेशात कोणीतरी अगोदर वापरलेला फोन नव्यासारखा चकाचक करून द्यायचा. वेगळ्याच अ‍ॅक्सेसरीज वगैरे याच्याशी सुसंगत आहे. रीफर्बिश्ड असेल तर - सेकंड हँड फोन आयात करता येतो का हा प्रश्न आहे. बर्‍याच सेकंड हँड गोष्टी आयात करायला बंदी असते, किंवा त्यावर भयानक मोठी कस्टम्स ड्यूटी असते. उदा. सेकंडहँड कारवर माझ्या माहितीप्रमाणे १८०% कस्टम्स ड्यूटी असते. उगाच घाबरवण्याची इच्छा नाही, अन् मला पूर्ण माहितीही नाही. तरी काळजी घ्या असं सुचवेन.

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 26/02/2015 - 17:53
बर्‍याच सेकंड हँड गोष्टी आयात करायला बंदी असते, किंवा त्यावर भयानक मोठी कस्टम्स ड्यूटी असते.
असे असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ती वस्तु ऑन्लैन खुलेआम कशी विकली जौ शकते? आणि कस्टम्स ड्यूटी आयात करणार्याने भरायला हवी....इथे विकत घेणार्याने नाही ना

In reply to by टवाळ कार्टा

आदूबाळ 26/02/2015 - 18:22
आयात करणाराच भरतो, आणि मग वस्तूच्या किंमतीत अ‍ॅडवतो. म्हणजे शेवटी विकत घेणार्‍याच्या शिरावरच ती ड्यूटी पडते.

योगी९०० 26/02/2015 - 20:44
३) फोन मी जेव्हा पहिल्यांदा चालू केला तेव्हा तो डायरेक्ट सुरु न होता त्याने मला त्याने पूर्ण सेटअप विचारले. याचा अर्थ, फोन हा नवीन आहे. हे माझे assumption बरोबर आहे का? एखादा फोन वापरून नंतर फॅक्टरी रिसेट केला तर तो पुर्ण सेटअप परत विचारू शकतो किंवा त्यातली मुळ OS चा build परत टाकला तरी तो पुर्णपणे परत सेटअप विचारतो. असा स्वस्तातला घेतला गेलेला फोन हा एकतर चोरीचा असण्याची शक्यता आहे किंवा रिफर्बिश्ड असण्याची शक्यता आहे. बाकी LG चा कोणता फोन घेतला? LG G2 घेतला का?

यमगर्निकर 27/02/2015 - 11:37
माझ्या मते हा क्लोन पिस असावा, मध्यंतरि माझ्या मित्राने आय फोन ५ क्लोन पिस घेतला होता, तोहि ९०००/- मध्ये (ओरिजनल किंमत ४५०००/- होति,) पण कितिहि निर्खुन पाहिले तरि ओरिजनल आणि क्लोन पिस मध्ये फरक ओळखुन येत नव्हता, तर तसा काहि प्रकार आहे का? याचि खात्रि करुन घ्या, तशि खत्रि तुम्हाला एल जि च्या सर्विस सेंटर मध्येच होउ शकते.

In reply to by यमगर्निकर

क्लोन पिस असावा ला +१०० सद्या "सामसुंग" हा शब्द गाळून फक्त गॅलॅक्सी नोट३, गॅलॅक्सी नोट४, अश्या नावांनी सर्व गॅलॅक्सी सिरीजमधले अगदी मूळ फोनसारखे दिसणारे फोन जालावर आणि ईमेलवरून सर्रास विकले जात आहेत. काही जाहिरातीत क्लोन आहे असे कुठेतरी कोपर्‍यात लिहीलेले असते तर इतर काहीत तेही नसते ! इतर कंपन्यांच्या बाबतीत तसेच होत असल्यास आश्चर्य नाही.

हितु 27/02/2015 - 17:32
११) इम्पोर्टेड फोने नेमके काय असतात? ते इथे भारतात विकणे आणि वापरणे गैर तर नाही ना ? हा फोन भरता साठी बनवलेला नसून, हा फोन अमेरिका किवा चीन या सारख्या देसंसाठी बनवलेला अस्तो. असे फोने इम्पोर्ट करणे किवा विकणे इल्लिगल नहि. फक्त हा फोन कश्या प्रकारे इम्पोर्ट केला आहे त्याच्या वर लीगल किवा इल्लिगल सांगता येईल . २) फोन चे अक्सेसरीज हि देशानुसार बदलतात का ? हो, अमेरिका मध्ये ११० volt वापरतात,आणि अमेरिकन charger पिन पण वेगळी असते . ३) फोन मी जेव्हा पहिल्यांदा चालू केला तेव्हा तो डायरेक्ट सुरु न होता त्याने मला त्याने पूर्ण सेटअप विचारले. याचा अर्थ, फोन हा नवीन आहे. हे माझे assumption बरोबर आहे का? assumtion बरोबर असू सकते पण, फोन हार्ड रीसेट केल्यावर पण असाच मेनू येतो. ४) फोनला १ वर्षाची थर्ड पार्टी वॉरन्टी आहे. थर्ड पार्टी वॉरन्टीम्हणजे नेमके काय? हि विश्वसनीय आहे का.? third party warranty म्हणजे , unautorized भारतातील सेर्विस कंपनी ची warranty . या कंपनिन ची सरविस नेहमीच चांगली असते असे नाही . पण त्याचे असे आहे कि "दुबते हुवे को तिन्केका सहारा " ५) फोन ची रिसीट आणि वॉरन्टी ची त्याने सौफ्टकॉपी देण्याचे त्याने काबुल केले आहे. हे दोन्ही नसल्यामुळे मी हा फोन परत घ्यावा म्हणून मेल केला होता. मेल केल्यानंतर त्याने दोन्ही डॉक्युमेंट ई मेल करतो त्याची प्रिंट काढून घ्या असे सांगितलेय अश्या पद्धतीने मिळालेली डॉक्युमेंटस ग्राय्ह धरली जातात का ? -- असी documents चालतीलच असे नाही, document मिळाल्यावर जवळच्या service center मध्ये दाखवून खात्री करून घ्या . ६) हे डॉक्युमेंट, फोन हरवल्यावर पोलिस कम्प्लेंट करतांना ग्राह्य धरले जातील का ? -- police station मध्ये ओळख किती आहे यावर हे अवलंबून आहे. माझ्या मते original documents असलेली बरि. मी स्वता mobile import करून विकलेले आहेत,
ई बे वर नुकताच मी एक मोबाइल फोन खरेदी केला. फोन ची कंडीशन व पर्फोर्मन्स हे दोन्ही पण योग्य वाटत आहे. हा फोन इम्पोर्टेड असल्यामुळे तो बराच स्वस्त मिळाला. (२६००० रुपये ओरिजनल किंमत असलेला फोन १२००० ला मिळाला ) फोन चेक केला असता तो unsealed होता. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले कि हे फोन इम्पोर्टेड असल्यामुळे त्यांचे कस्टम कडून चेकिंग होते. तसेच या फोन मधले अक्सेसरीज देखील थोडी वेगळी आहेत. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले कि हे सर्व अक्सेसरीज भारतासाठी नसून ते इतर देशांसाठी केले जातात त्यामुळे ती वेगळी आहेत. हे सर्व त्याने त्याच्या जाहिरातीमध्येही नमूद केले होते.

प्रिंटरवर छापलेल्या विमानातून प्रवास करायला तयार व्हा !

डॉ सुहास म्हात्रे ·

खटपट्या 15/02/2015 - 02:43
३डी चपाई करुन बनवलेल्या वस्तू आणि पारंपारीक तंत्रज्ञान वापरुन बनवलेल्या वस्तू यामधे काय फरक आहे. उदा. उत्पादन खर्च, टीकाउपणा, बनवण्यासाठी लागणारा वेळ वगैरे.

In reply to by खटपट्या

वरती छायाचित्रांमधे विमानाचा भाग असं नावं लिहिलेला जो भाग आहे तो एक इंपेलर आहे. अश्या पद्धतीचा भाग मशिनींग ऑपरेशन्स नी बनवण्यासाठी काही तासांपासुन काही दिवसांपर्यंतचा वेळही लागु शकतो. तसचं फाईव्ह अ‍ॅक्सीस सी.एन.सी. मशिन्स चा वापर करावा लागतो. ह्या मशिनच्या अतिशय उच्च अ‍ॅक्युरसीच्या मशिन्स ची किंमत सुमारे ७२ लाख रुपयांपासुन सुरु होते. मझाक सारख्या मशिन्स ची किंमत तर चक्क १ कोटी १५ लाखं वगैरे एवढी प्रचंड असते. ह्या मशिन्स ची पर अवर रनिंग कॉस्ट, टुलिंग कॉस्ट ही अतिप्रचंड असते. ह्यामधल्या साध्या लाईव्ह टुलिंगची किंमत ५-५ लाखापासुन सुरु होते. अर्थातचं त्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात असतो..तसचं लीड टाईमसुद्धा ३-डी पेक्षा जास्तं असतो. टीकाउपणा हा काय बनवताय आणि कशापासुन बनवताय ह्याच्यावर अवलंबुन असतो. सद्द्य परिस्थितीमधे उपलब्ध असणार्‍या ३-डी प्रिंटरमधे धातु वापरण्यावर मर्यादा आहेत. अर्थातचं त्या भागासाठी लागणार्‍या हिट ट्रीटमेंट आणि हिट ट्रीटमेंटनंतर असणार्‍या फिनिशिंग ऑपरेशन्स वरती मर्यादा येतात. बाकी सवडीनी टंकीन.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यसवायजी 15/02/2015 - 09:22
सवड काढाच. मी Cnc commissioning engg असल्याने, ५ एक्सिस मशीन हा आवडीचा (आणि रोजच्या कामाचा) विषय आहे. ---- ५ ax machining चा vdo इथे पाहता येईल. http://youtu.be/CqePrbeAQoM

In reply to by खटपट्या

मॉरिस टेक्नॉलॉजिजच्या Direct Metal Laser Sintering तंत्रामध्ये १००० डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान वापरून सर्व प्रकारचे धातू/मिश्रधातू वापरता येतात. तसेच या तंत्रात धातूंचे अत्यंत लहान कण (पार्टीकल्स / पावडर) वापरून थरावर थर चढवत भाग (पार्ट्स) बनवले जात असल्याने अत्यंत महागडे धातू फुकट जाण्याचे (waste) प्रमाण नगण्य असते... आता प्रचारात असणार्‍या सर्वसाधारण प्रक्रियेत धातूचा तुकडा घासून (मिलिंग, टर्निंग, इ) भाग बनवताना लक्षणीय प्रमाणात महागडा धातू फुकट जातो. त्यामुळे 3D छपाई प्रक्रिया वापरल्याने मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैश्याची बचत होणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण बाकीच्या गोष्टींच काय? सिंटरिंग पोरोसिटीमुळे त्या विशिष्ट भागाची स्ट्रेंथ, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन वगैरे गोष्टींचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय ह्या गोष्टी थेट विमानासारख्या अ‍ॅप्लिकेशनमधे वापरणं मात्र थोडं धोक्याचं वाटतयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी यातला तज्ञ नाही. केवळ कंपनीने दिलेल्या माहितीवरून लिहीलंय. परंतू तरीही GE Aviation सारख्या अग्रगण्य कंपनीने हे तंत्र वापरून बनवलेली इंजिने पुढच्या वर्षा-दीड वर्षात (२०१६ मध्ये) जागतिक स्तरावर कमर्शियल विमानवाहतूक करणार्‍या मोठ्या विमानांत वापरण्याचे आणि २०२० मध्ये वितरित होणार्‍या अजस्त्र 9X इंजिनांची बांधणी करण्याचे ($११ बिलियन किंमतीचे) वचन Emirates या जगातल्या सर्वात मोठ्या विमानवाहतूक करणार्‍या कंपनीला दिले आहे. Boeing + GE Aviation ने 777X + 9X इंजिनांचे केलेले काही मोठे करार: विमानकंपनी : 777X विमाने / 9X इंजिने / बोईंग कंपनीची विमानांची किंमत १. Emirates Airline : १५० / ३०० / $७६ बिलियन २. Qatar Airways : ५० / १०० / $१९ बिलियन ३. Etihad Airways : २५ / ५० / अंदाजे $१० बिलियन इतर काही विमानकंपन्या... Cathay Pacific Airways Ltd. व International Consolidated Airlines Group SA, parent of British Airways. यावरून कंपनीने त्यांच्या फ्लॅगशिप विमानात वापरण्याचे हे तंत्रज्ञान पुरेसे विकसित केले असावे यावर विश्वास वाटतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

छान. जी.ई. असेल तर क्वालिटी च्या बाबतीत तडजोड होणार नाही हा विश्वास आहे. तरीही थोडं अजुन संशोधन आणि अ‍ॅनालिसीस व्हायला हवं.

In reply to by श्रीरंग_जोशी

सोत्रि 15/02/2015 - 10:10
धागा वाचल्यावर हिच लिंक द्यायला आलो खाली तर, रंगाराव, तुम्ही मा़झे श्रम वाचवलेत असे दिसले :) धन्यवाद! - (आभारी) सोकाजी

पिंगू 15/02/2015 - 11:34
पुण्यातील एका प्रदर्शनामध्ये ३ डी प्रिंटर बघितला होता. तेव्हा तर मला वाटले होते की फक्त मॉडेल बनवायला या प्रिंटरचा उपयोग होईल. आता हे वाचून तर वाटू लागलय की ३ डी प्रिंटर वापरुन बर्‍याच गोष्टी तयार करता येतील. आता त्याला मर्यादा असल्या तरी भविष्यात हे अशक्य नाही.

मदनबाण 15/02/2015 - 19:57
मध्यंतरी आपल्या हिंदूस्थानात घडलेली घटना याच बाबतीत म्हणजे याच तंत्रज्ञाना विषयी आहे. शाहरुख खानचा ३ डी पुतळा ! यावर अधिक इकडे :- Life-sized 3D Printed Statue of Bollywood Star, Shahrukh Khan, Created by Red Chillies VFX & Autodesk India Shah Rukh Khan immortalised in first life size 3D printed model in the world आता अशीच बझ एका नविन तंत्रा विषयी होइल... ते तंत्रज्ञान म्हणजे क्वांटम कंम्प्यूटर्स . सध्या नासा , Lockheed Martin आणि गुगल यांनी डी-व्हेव { D-Wave } हा क्वांटम काँप्यूटर विकत घेतला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- कभी भुला कधी याद किया... { Sapne Saajan Ke }

बॅटमॅन 15/02/2015 - 20:45
थ्रीडी प्रिंटिंग इतके पसरेल हे वाटत होतेच. पण कप्तानसाहेबांनी उपस्थित केलेला पोरॉसिटीचा मुद्दा बिनतोड आहे. ते कसे मात करतील यावर हे पहायला आवडेल.

आता वेळ मिळाला म्हणुन टंकतो. ३-डी तंत्रज्ञान नक्कीचं फायदेशिर आहे. तुम्ही दिलेल्या वापरांबरोबरचं येत्या काही वर्षांमधे "ह्युमन ऑर्गन्स" सुद्धा जैवतंत्रज्ञान, पेशी आणि माणसाचे बायोलॉगिकल स्कॅन्स घेउन तयार करता येतील. आत्ता सद्ध्याच्या काळातही जिवंत मानवी पेशी आणि रक्तनमुने वापरुन माणसाचे कानं आणि ओठं यशस्वीपणे बनवण्यात आलेले आहेत. स्वतःच्याचं शरिरामधल्या पेशी ३-डी प्रिंटर वापरुन असे अवयवं तयार केले गेल्यानी शरिर ते परपेशीप्रमाणे नाकारणारही नाही. सद्ध्या बायोस्कॅन्स वापरुन जिवंत कृत्रिम किडनी वाढवायचे प्रयत्न चालु आहेत. आणि त्यास काही प्रमाणात यशही मि़ळत आहे. तंत्रज्ञान जसं प्रगत होईल तसं ही गोष्ट शक्य होईल आणि स्वस्त होईल ह्यातही काही शंका नाही. ३-डी तंत्रज्ञानाला ह्याबाबतीत अनेक शुभेच्छा. आता अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर ह्या तंत्रज्ञानावर अजुनही संशोधन व्हायला हवं असं माझं मत आहे. वरती जो विमानाचा इंपेलर आहे त्याबद्दलचं थोडं लिहितो. कुठलही यंत्र किंवा यंत्राचा भाग डिझाईन होतं असताना त्या भागावर येणारे वेगवेगळे ताणतणाव, त्या भागाची वापरली जाण्याची वारंवारिता, लाईफसायकल, त्यामधे वापरण्यात आलेला धातु किंवा अलॉय, त्याचं शेवटच्या अवस्थेमधलं अपेक्षित मायक्रोस्ट्रक्चर, त्यावर होणार्‍या हिट ट्रीटमेंट्स, पोस्ट हिट ट्रीटमेंट प्रोसेसेस ह्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं. विमानाच्या टर्बाईनचा वेग चक्क ४०,००० ते ८०,००० आर.पी.एम. इतका प्रचंड असु शकतो. जी.ई. इंजिन बेंचमार्किंग मधे जेट विमानाचं इंजिन चक्क १,६४,००० आर.पी.एम. पर्यंत पुश करण्यात आलेलं होतं. मटेरिअल पोरस असेल तर एवढ्या जास्त वेगामधे "मटेरिअल इंटेग्रीटी" कितपत विश्वासार्ह असु शकेल? फोर्ज्ड मटेरिअल मधे अलॉय हे धागे स्वरुपात असल्यानी एकमेकांना घट्ट पकडुन राहु शकतात. तसचं हिट ट्रीटमेंटचा प्रश्णही अनुत्तरीत राहतोय. एवढ्या जास्तं वेगानी फिरणार्‍या भागामधे सॉलिड बेअरींग्ज वापरु शकतं नाहीत तर हायड्रोडायनामिक बिअरिंग्ज वापरल्या जातात. त्याचं वॉल प्रेशर हे भाग सहन कसे करु शकतील? एवढ्या वेगानी फिरणार्‍या भागामधे गॅप स्लीव्हज वापरलं जाणं हे ही धोक्याचचं आहे. कोणाकडे ह्याविषयी अधिक माहिती असेल तर कृपया इथे द्यावी. तोपर्यंत कॉलिंग गवि.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 16/02/2015 - 10:54
कॅजॅस्पॅच्या शेवटच्या परिच्छेदातल्याच शंका धागा वाचून मनात आल्या होत्या. प्रचंड आरपीएम, आणि काही पार्टसबाबतीत उच्च तापमान, आणि इतर काहींबाबत रिपीटेड स्ट्रेसमुळे येणारा फटिग या गोष्टी फारच महत्वाच्या असतात. कणाकणाने जोडून बनलेला पार्ट जर योग्य त्या मटेरियलचा असेल आणि कणाकणाने जोडून बनवण्याच्या पद्धतीत तो अधिक भक्कम बनत असेल (विदाउट इंटर्नल फ्रॅक्चर्स, फिशर्स वगैरे) तर ही थ्री डी प्रिंटिंग पद्धत उजवी असू शकेल. पण नेमकं कसं बनतं ते इमॅजिन करता येत नाहीये. प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टरसारख्या मटेरियलपासून असं प्रिंटेड मॉडेल बनवणं मी समजू शकलो होतो. पण विमानाच्या इंजिनातले धातूचे पार्ट हे पार्टिकल्स जोडूनजोडून प्रिंट करायचे असतील तर प्रचंड तापमानाला हे काम केलं पाहिजे.. म्हणजे धातू हा द्रवरुपात असला तरच तो चिकटेल आधीच्या धातूला. मग लगेच थंड करुन तो घनरुपात आणला पाहिजे. या सर्व प्रक्रियेत अत्युच्च उष्णता देणे आणि त्याचवेळी थंड करणे हे तंत्र एकाच जागी कसं जमवत असतील?

In reply to by गवि

या विषयातली माझी रुची टेक्निकल कमी (किंबहुना नगण्य) आणि व्यावहारीक उपयोग/व्यापारी (बिझनेस) दॄष्टीकोनातून जास्त आहे. त्यामुळे या तंत्राच्या तकनिकी दर्जाची माझी खात्री बिझनेस कारवाईवरून अनुमानित (डिराईव्हड) आहे. मोठ्या करारांतला 'डिफॉल्ट क्लॉज' चांगलाच (अनेक बिलियन डॉलर्सचा) चटका देणारा असतो. बोईंगला ड्रिमलायनर प्रकरणात आणि एअरबसला A380 प्रकरणात (अनेक बिलियनचे) प्रसिद्ध मोठे चटके बसल्यानंतर बोईंग व एअरबस भविष्यातले कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे करार / जाहिरात "ताकही फूंकून फूंकून पीत" करतील हे नक्की. या पार्श्वभूमीवर हा नविन 3D प्रिंटिंग असलेला प्रकल्प नुसता जाहीर केलेला नाही तर त्याचे $१०० बिलियन पेक्षा जास्त किंमतीच्या विक्रीचे 'टाईट' वेळापत्रकही जाहीर केलेले आहे... पहिले मध्यम आकाराचे विमान पुढच्याच वर्षी (२०१६) मध्ये आणि 777X / 9X विमाने २०२० पासून हस्तांतरीत करण्याचे करार झाले आहेत. पुढच्या वर्षी व्यापारी तत्वावर हस्तांतर म्हणजे या वर्षी पार्ट्स केवळ तयार नाही तर त्यांची कसून तपासणी झाली असणार... शेवटी हा केवळ तंत्राचा प्रश्न नसून तो १५०-४०० प्रवाश्यांच्या आणि कंपनीच्याही जीवनमरणाचा प्रश्न आहे. या प्रकल्पासाठी GE Aviation ने मॉरीस टेक्नॉलॉजिज तिच्या सर्व उपकंपन्यांसह विकत घेतली आहे आणि अजून दोन नविन 3D प्रिंटिंग प्लँटस उभारले आहेत. अर्थातच, या प्रकारच्या उच्च कोटीच्या तंत्रज्ञानाच्या (IPR) सर्व खाचाखोचा कोणतीही कंपनी एका विशिष्ट मर्यादेपलिकडे सर्वसामान्य माध्यमांत उघड करणे शक्य वाटत नाही. वर चर्चा केलेल्या मुद्द्यातील काहींचा त्रोटक उहापोह माध्यमांत आला होता... ...The additive manufacturing process involves taking digital designs from computer aided design (CAD) software, and laying horizontal cross-sections to manufacture the part. The process creates the layered cross-sections using a laser beam to melt the raw material. These parts tend to be lighter than traditional forged parts because they don't require the same level of welding. Additive manufacturing also generates less scrap material during the fabrication process... ...Morris Technologies and Rapid Quality Manufacturing focus on the aerospace, energy, oil & gas, and medical industries. तांत्रिक नियतकालिकांत (professional journals) कदाचित जास्त माहिती असू शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गवि 16/02/2015 - 11:53
हे मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे म्हणजे ते शक्य, तुलनेत स्वस्त, सुरक्षित, अधिक दर्जाचं असणार यात शंका नाहीच मुळात. नेमक्या तपशिलाबद्दलच उत्सुकता आहे फक्त..

In reply to by गवि

सहमतं. जनरल इल. सारखी कंपनी गुणवत्ता राखुनचं काम करणार ह्यात शंका नाही. पण कशी हे जर समजलं असतं तर बरं झालं असतं. बिझनेस ट्रेड सिक्रेट अर्थातचं एम्प्लॉयी आणि आर अँड डी वाले सोडुन कोणालाचं समजणार नाही हे ही निश्चित.

सौंदाळा 16/02/2015 - 11:42
प्रोटोटाईप बनवण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान आहे इतपत माहीती होती. पण या तंत्रावरुन उत्पादनसुद्धा आणि ते पण विमानाचे इंजिन हे नविनच आहे. जी. ई सारखी कंपनी हे करत आहे म्हणजे हे तंत्रज्ञान मागच्या ३-४ वर्षात प्रचंड वेगाने विकसीत झाले असेल. कॅ.जॅ. स्पॅ चा प्रतिसाद उपयुक्त. तुम्हाला पडलेले प्रश्नच स्पेशली हिट ट्रिटमेंट, मशिनिंग याची उत्तरे मिळवण्यास उत्सुक आहे.

विटेकर 16/02/2015 - 12:37
उत्तम लेख , उपयुक्त माहीती. अजून येऊ द्या ! गुण्वत्तेच्याबाबतीत - फक्त गुणवत्ताच नव्हे तर प्रखर चाचण्या घेणे आवश्यक आहे. गविशेट - रस्त्यावर धावणारी वाहने भारतात ए आर ए आय प्रमणित करते , तसे विमाने कोण प्रमाणित करते ?

In reply to by विटेकर

हेच काम अमेरिकेत Federal Aviation Administration करतं. त्यांचे संकेतस्थळ. नुकतेच त्यांनी अमेरिकेतील ड्रोन वापराविषयी नियमावली जाहिर केली आहे.

खूप छान माहितीपूर्ण धागा , आता ह्या ३D प्रिण्टेर्स ने स्व:ताच्या प्रतिकृती बनवायला सुरुवात केली तर मानव संस्कृती सुध्धा धोक्यात येणार :)

In reply to by माझीही शॅम्पेन

या दिशेनेही प्रगती चालू आहे ;) जरा वेळ लागेल, पण कोणी सांगावे... जमेलही नजिकच्या भविष्यात :)

कंजूस 16/02/2015 - 17:36
या यंत्राचा माहितीपट DW-TV चानेलवर पाहिला होता यंत्राची जाहिरात: "आमच्या यंत्राने काहीही छापा परंतू कृपया आमचेच यंत्र छापू नका."

जेपी 16/02/2015 - 21:07
माहितीपुर्ण. अवांतर-एक प्रश्न , या विमानातुन आपला नेहमीचा लेझर प्रिंटर घेऊन प्रवास करता येईल का ?

In reply to by जेपी

अत्यंत माहितीपुर्ण अवांतर प्रश्ण विचारल्याबद्दल श्री.जे.पी. यांचे एक ३-डी प्रिंटरची कलर लेजर प्रिंटाऊट (२ रुपये पर्पेज वाली), तसचं एक झाडावर नैसर्गिकरित्या वाढलेला नारळ देउन करण्यात येत आहे. तसचं त्यांच्या पुढच्या प्रिंटर खरेदीवर घसघशीत २५% ची सुड...आपलं सुट देण्यात येत आहे. (अखिल मिपा मापंकाढे समिती)

प्रियाजी 16/02/2015 - 21:08
या तंत्रामुळे जग परत एकदा पूर्ण बदलणार हे निश्चित. हे यंत्र प्रत्यक्षात बघण्याची आपण सर्वजण वाट पाहूया. ही सर्व माहिती खुपच सोप्या भाषेत दिल्याबद्दल ई.एक्का, कॅ.जॅ.स्पॅ. व ईतरान्चे मनापसून आभार.

त्रिमिती छपाई व्यवहारात आणण्यासाठी होणार्‍या दिरंगाईमागे तंत्रज्ञान नाही तर निर्णयप्रक्रिया घेणार्‍या अधिकार्‍यांचे अज्ञान आणि त्यामुळे होणारी चाकढकल आहे असेच दिसते आहे. त्याबाबतीत McKinsey & Company या जगप्रसिद्ध व्यवस्थापन संशोधन आणि सल्लागार कंपनीचे मत आणि इतर रोचक माहिती या दुव्यावर आहे... Are you ready for 3-D printing?

बबन ताम्बे 24/02/2015 - 12:00
पण मला एक शंका आहे. जसे यंत्रे आली त्यावेळी हस्त कौशल्य वापरून उत्पादन करणारे बेकार झाले. (जसे आपल्याकडे कापड बनवणारे, अवजारे बनवणारे), तसे ३ डी प्रिंटींग मुळे होणार तर नाही? कारण आज एखादा स्पेसिफिक मशिन पार्ट बनवायला टर्नर, मिलर पासून ड्रिलर्/रीमर पर्यंत स्पेशालिस्ट लागतात. ३डी प्रिंटींग मुळे या स्पेशालिस्ट लोकांची गरजच रहाणार नाही. आय. टी. आयची गरज कमी होईल की काय?

In reply to by बबन ताम्बे

गवि 24/02/2015 - 12:17
बनवण्याचे तंत्रज्ञान केवळ जास्त हातांना काम मिळावे म्हणून मागास राहू दिल्याने अन्य अनेक क्षेत्रांत भरभराटीचा आणि रोजगारांचा वेग मंद राहतो हे एक.. आणि आत्ताहून कमी भांडवलात वस्तू बनवता येण्याने ती वस्तू जास्त स्वस्त होऊन जास्त लोकांना परवडते हे दुसरे महत्वाचे.. भरपूर कामगार / मॅन्युअल एफर्ट लागणारी उत्पादनप्रक्रिया अधिक लोकांना रोजगार देत असली तरी अल्टिमेटली त्यातून येणारी उत्पादने तुलनेत जास्त महाग राहात असल्याने मागच्या दाराने कामगार जेव्हा एरवी उपभोक्ता ग्राहक या भूमिकेत येतो तेव्हा त्याच्या खिशाला अधिक मोठी भोके पाडतात. उदा. विमानाचे भाग कमी मनुष्यबळात मिळाल्याने विमानाची किंमत कमी होणे.. त्यामुळे एअरलाईन्सचा भांडवली अन सुट्याभागांचा ऑपरेशनल खर्च कमी होऊन विमान प्रवास स्वस्त होणे, हातमागाऐवजी पॉवरलूमवर जास्त कापड कमी वेळात काढल्याने कापडाची किंमत कमी होणे, बैल नांगर या पद्धतीने आठवडाभर नांगरण्याऐवजी यांत्रिक नांगरवाहनाने एका दिवसात अनेक एकर नांगरुन होणे आणि धान्य स्वस्त होणे, इ या मार्गांनी उत्पादने स्वस्त होऊन जास्त लोकांना परवडतात. एक महत्वाचं तत्वः बिनरोजगाराचे श्रम करुन घेणे जितके निरुपयोगी आणि घातक तितकेच घातक बिनश्रमाचा रोजगार देणे.. याठिकाणी कमी श्रमात गोष्ट होत असताना रोजगारासाठी श्रम निर्माण करुन ते करुन घेण्याचा आटापिटा होईल. घाम गाळणे म्हणजे खरे अर्थशास्त्रीय श्रम नव्हेत. जे श्रम किमान त्या श्रमांच्या उत्पादनाइतकी किंवा जास्त क्रयशक्ती तयार करु शकतात ते खरे श्रम. (उदा. बाकीचे सारे अनुदानच. यंत्राने खड्डे खणणे जास्त एफिशियंट असताना रोजगाराच्या हमीसाठी खड्डे खणण्याची कामे ही सश्रम भीकच. माझं म्हणणं क्लियर होतंय का माहीत नाही, पण प्रयत्न केला शब्दांत मांडण्याचा.

In reply to by गवि

+१ थोडक्यात म्हणजे... अ) बैलगाडी ऐवजी चारचाक्या आल्याने गाडीची वाहतूक जास्त स्वस्त, जास्त सुखकारक आणि जास्त लोकांना (बैलगाडीच्या जमान्यात ती ठेवणे परवडत नाही म्हणून पायी चालणार्‍या लोकांनाही) सहज उपलब्ध झाली आहे. आ) पूर्वी मशीन्स आली म्हणून हाताने वस्तू तयार करणार्‍या कामगारांचे काय होईल अशी भिती व्यक्त केली गेली. मात्र काही थोडे अपवाद वगळता इतर सर्व कारागीर मशीनचा वापर करणे अथवा आपल्या चरितार्थाच्या कामात बदल करून पहिल्यापेक्षा जास्त सधन झाले आहेत. इ) त्रिमिती छपाईने आणि इतर काही तंत्रांनी जर विमानप्रवास अधिक सोपा, सुखकर आणि विषेश म्हणजे स्वस्त झाला तर तो केवळ विकसितच होणार नाही तर तुलनेने कमी उत्पन्न असणार्‍या लोकांच्या आवाक्यात येईल. यालाच सर्वसाधारणपणे प्रगती म्हणतात आणि त्यामुळेच मानवाचे जीवनमान सतत उंचावर जात राहीले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 27/02/2015 - 01:34
इतर काही तंत्रांनी जर विमानप्रवास अधिक सोपा, सुखकर आणि विषेश म्हणजे स्वस्त झाला तर तो केवळ विकसितच होणार नाही तर तुलनेने कमी उत्पन्न असणार्‍या लोकांच्या आवाक्यात येईल. नुसता सहमतच नाही तर हे वास्तवात यावे याची वाट बघतो आहे. आत्ता ड्रोन विकसीत झाले आहेत ते छोट्या वस्तू ने-आण करु शकतात. अजून थोडे विकसीत करून एक किंवा दोन माण्सांची ने-आण शक्य झाली तर बर्‍याच नागरी सेवांवरचा ताण आणि खर्च कमी होइल.

In reply to by संदीप डांगे

आत्ता ड्रोन विकसीत झाले आहेत ते छोट्या वस्तू ने-आण करु शकतात. अजून थोडे विकसीत करून एक किंवा दोन माण्सांची ने-आण शक्य झाली तर बर्‍याच नागरी सेवांवरचा ताण आणि खर्च कमी होइल.
जेव्हा अ‍ॅमेझॉनने त्यांच्या ड्रोन डिलिव्हरीबात जाहिर केले होते तेव्हा हापिसातील सहकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेत मी पण हिच संकल्पना मांडली होती. ट्रॅफिकमध्ये रोज दोन अडीच तास घालवणार्‍यांसाठी ड्रोनप्रवास हे एक वरदान ठरू शकते. अजुनतरी सुरक्षित प्रवासाच्या बाबतीत ड्रोन्स तंत्रज्ञान बाल्यावस्थेमध्ये आहे. ड्रोन्सद्वारे वस्तुंची ने-आण नियमीतपणे सुरू व्हायला अजुन बरीच वर्षे लागू शकतात. एरिअल फोटोग्राफी व व्हिडिओ शुटींगसाठी मात्र ड्रोन्सचा वापर बर्‍यापैकी सुरू झालेला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

संदीप डांगे 27/02/2015 - 02:13
सुरक्षेच्या बाबतीत फार कठीण जाऊ नये असे वाटते कारण इतर वाहनांमधे वापरली जाणारी सुरक्षायंत्रणा इथेही जशीच्या तशी किंवा थोडी बदलून वापरता येइल. जसे: १. गूगल कार चे तंत्रज्ञान वापरून स्वयंचलित यंत्रणेद्वारे उडणार्‍या प्रत्येक ड्रोनचा स्थळ, जमीनीपासूनची उंची आणि मार्ग यांचा विदा ठेवून इतर ड्रोनशी समन्वय करणे. त्यासाठी उपभोक्त्याने फक्त उतरायचे ठिकाण आणि वेळ नमूद करणे. बाकी मार्ग, वेग आणि प्रवास याची काळजी स्वयंचलीत यंत्रणा घेऊ शकेल. २. मर्सिडिझ व इतर हाय-एंड कार्स मधे वापरल्या जाणारी धडक-विरोधी-यंत्रणा वापरून एकाच वेळेस एकाच मार्गावर सुरक्षीत अंतर राखून अनेक ड्रोन्सना सुरक्षीत प्रवास करता येइल. जेणेकरून रस्त्यावरची चौरसफूटाची जागा न वापरता घनफूटात मार्ग वापरता येइल. ३. अपघाताने ड्रोन कोसळले तर विशिष्ट उंचीसाठी पॅराशूट तर जमीनीलगत तत्काळ अपघातांसाठी एअरबॅग यंत्रणा वापरता येइल. ४. सौर-उर्जेचा वापर करून बॅटरी चार्ज करणे त्यामुळे वापर-खर्च कमी. अजून इतर बर्‍याच तांत्रिक सोयी आजच्या काळात आहेत ज्या सरसकट ड्रोनसाठी वापरता येतील. बाकी तज्ञ आहेतच पुढचा विचार करायला. फक्त एकच इच्छा आहे ती ही की हे सर्व लवकरात लवकर घडून यावे आणि तेही सर्वसामान्य माणसास परवडण्यासारखे असावे. एक्दम ४०-५० हजार तर नाही पण २ लाख रुपयांपर्यंत किंमत असल्यास इतर गोष्टींचा विचार करता परवडण्यासारखे असेल.

In reply to by संदीप डांगे

वरील मुद्द्यांशी सहमत पण मी वर मांडलेली शंका नैसर्गिक आव्हानांबाबतीत होती. जेव्हा अ‍ॅमेझॉनने ड्रोन डिलिव्हरीबाबत प्रथम घोषणा केली तेव्हा टिव्हीवरील एका चर्चेत एव्हिएशन इंडस्ट्रीमधून निवृत्त झालेला एक तंत्रज्ञ म्हणाला होता की कित्येक वेळा अचानक आलेल्या वादळामुळे किंवा दुसर्‍या आव्हानात्मक परिस्थितीमुळे छोटी विमाने व हेलिकॉप्टर्स अपघातग्रस्त होतात. त्या तुलनेत डिलिव्हरीसाठी वापरले जाणारे ड्रोन्स कुठेच नाहीत. काळाबरोबर या आव्हानांवरही उपाय शोधले जातीलच.

In reply to by श्रीरंग_जोशी

संदीप डांगे 27/02/2015 - 02:30
हो. तेही खरे आहेच. जसे प्रत्येक वाहनात काही ना काही उणीवा असतात आणि कालांतराने त्यावर उपाय शोधले जातात तशीच ड्रोनसोबत होईलच म्हणा. शहरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मात्र 'वर'दान ठरू शकतील हे ड्रोन्स.

In reply to by बबन ताम्बे

गवि 24/02/2015 - 12:34
हो. प्रायमरी (उत्पादन, शेती, मॅन्युफॅक्चरिंग) प्रकारच्या उद्योगांत जितके कमी मनुष्यबळ लागेल तितकी स्वस्त उत्पादने मिळतात.. त्यामुळे ग्राहकसंख्या वाढून अनुषंगिक सेकंडरी व्यवसाय विस्तारतात आणि सेकंडरी (विक्री, सेवा, सल्ला, मार्केटिंग, वितरण) वगैरे क्षेत्रात मूळ प्रायमरीत गमावलेल्या रोजगारांपेक्षा प्रचंड जास्त पटीने रोजगार उपलब्ध होतात. साठ किंवा पन्नास टक्के लोक एक ते पाच एकरांच्या छोट्याछोट्या तुकड्यांच्या शेतीत विखुरलेले असणे हे भूषण नसून चुकीचे आहे. दहा टक्के लोकांनी प्रत्येकी प्रचंड आकाराच्या एरियात बाकीच्या नव्वदांना पुरेल इतकी यांत्रिक शेती करणे हा फायद्याचा मार्ग आहे.

In reply to by गवि

तुमच्या दोन्ही प्रतिसादांशी व्यावहारिकदृष्ट्या सहमत आणि तात्विकदृष्ट्या असहमत. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वगैरे सगळ्या गोष्टी ठिक आहेत. आणि त्या अनुषंगानी जे सेकंडरी व्यवसाय बहरतात असं तुम्ही म्हणताय त्यामधे ज्यांच्या नोकर्‍या गेल्या त्यांना काय स्थान असेल? एखादा मनुष्य आयुष्याची वीस वर्षं शॉप फ्लोअर वर मशिनिस्ट चं काम करतोय त्याला एकतर वयोमानामुळे दुसरा जॉब मिळणं अतिशय अवघड असेल. आणि सेकंडरी उद्योगांमधे अपेक्षित असणारे स्किलसेट्स नसल्याने तो बेरोजगार होईल हा ही एक घटक विचारात घेण्यासारखा आहे.

In reply to by कपिलमुनी

मराठे 24/02/2015 - 20:58
कार बनवताना ह्या वेळच्या डेट्रोईट ऑटो-शो मधे पाहिलं आहे. हे तंत्रज्ञान मुख्यत्वे करून अंतराळ तंत्रज्ञान म्हणून प्रथम विकसित केलं गेलं. जर स्पेसस्टेशन वर एखाद्या गोष्टीची गरज लागली, (म्हणजे दुरुस्तीसाठी लागणारी हत्यारं वगैरे) तर तिथल्या शास्त्रज्ञांना पुढचं स्पेस शटल कधी येईल त्याची वाट बघत बसण्यापेक्षा जर तिथल्या तिथे ''प्रिंट' करून त्या वापरता येतील. (या पुढची स्टेप म्हणजे, स्पेस स्टेशनवर अन्न 'प्रिंट' करण्याचं तंत्रज्ञान सुद्धा विकसित झालेलं आहे पण अजून 'टेस्टींग' :) फेज मध्ये आहे.)

मदनबाण 24/02/2015 - 19:51
नॅनो टेक्नॉलॉजिचा वापर कोटींग करण्यासाठी केल्यावर... बाकी paramagnetic paint ची कमाल पहा ! :) आणि टीपी म्हणुन Water Transfer Printing सुद्धा पहा :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }

In reply to by मालोजीराव

अशी बंदूक छापून तिच्यातून खरी गोळ्या झाडून झालेल्या आहे. बंदूकीच्या गोळ्या छापण्याचे तंत्र मात्र अजून विकसित झालेले नाही :) हे घ्या त्या बंदूकीबद्दलचा व्हिडिओ (World's First 3D Printed Metal Gun) ... यु टुबमध्ये 3D printing of gun अशी विचारणा केल्यास अजून बरेच व्हिडिओ सापडतील.

3D Printing: Make anything you want... या रोचक व्हिडिओत त्रिमीती छपाईचे वैद्यकशास्त्रातले (कान, नाक, मूत्रपिंड, इ इंद्रिये छापण्यासाठी); पाककलेतले (चॉकलेट, केक, इ छापण्यासाठी) आणि इतर बरेच काही उपयोग पाहता येतील...

जेपी 27/02/2015 - 17:24
चांगली माहिती आहे. अवांतर-नाय मंज उगीच एक प्रश्न पडला ह्या विमानातुन आपला नेहमीचा प्रिंटर घेऊन प्रवास करता येईल का ? उगी ईचारलेल बर ..कस्स!! *biggrin*

In reply to by जेपी

निस्तं इमानातून न्हाय, राकेटमदूनबी त्येला अवकाशात (म्हंजी अंत्राळयानात, पर्ग्रहावर, वेग्रे) न्यायचा ईचार्बी हाय. म्हंजे आसं हाय बगा. तितं एखांदा यानाचा नायतर मशिनीचा पार्ट बोंबलला तर हितून माग्वायची सोय नस्ती ना ! आनी सग्ळ्या पार्टांचा लय मोट्टा ष्टाकबी नेता येत नाय. मंग काय काडायचा प्रिंटर भाईर आणि छापायचा हवा तो पार्ट हवा तेवा ! कशी काय आयड्या हाय ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ब्येस हाये आयड्या. नॉर्थ पोल एक्स्पेडिशन मधे ह्या प्रिंट झालेल्या एका प्रेशर सीलने टीमचे प्राणं वाचवल्याची बातमी आहे. दुवा मिळाला की टाकतो.

अर्धवटराव 27/02/2015 - 20:20
आता आमचा टोळ्भैरवांचा ग्रुप संसार सागरात पडुन थोडा शांत आणि सभ्य झालाय.... काहि वर्षांपुर्वी जर हि टेक्नोलॉजी आमच्य हाती लागली असती तर त्याच्या अत्यंत इनोव्हेटीव्ह उपयोगाच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतोय =))

In reply to by अर्धवटराव

उलट, आताही थंड डोक्याने इनोव्हेशन केले तर हे सहजसाध्य आणि तुलनेने स्वस्त उपकरण घेऊन पुढचा बिलियनेर भारतातही बनू शकतो ! तर, चला उठा, 3D प्रिंटरने सुसज्ज व्हा आणि...

पैसा 27/02/2015 - 21:19
मस्त धागा आणि चर्चा! अशी मोठी पॅनेल्स किंवा संपूर्ण घरे छापून घरे बांधणे स्वस्त केले पाहिजे म्हणजे गरीब लोकांना परवडतील अशी घरे काही प्रमाणात तरी मिळतील.

इस्पिकचा एक्का साहेब , कॅप्टन जॅक आणि गवि जी अतिशय आभार . सर्वच सदस्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी हा धागा अतिशय रोचक झाला आहे धन्यवाद

आज माध्यमांत ही बातमी दिसली. Dubai developer Emaar to build 3D printed home in Arabian Ranches III दुबईतील Emaar Properties ही नामवंत बांधकाम कंपनीने तिच्या एका प्रतिष्ठित गृहप्रकल्पात त्रिमीती छपाई वापरून घरे बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे, घरे लवकर आणि कमी खर्चात बांधली जातील असा दावा त्या कंपनीने केला आहे. अनेक क्षेत्रांत नवकल्पनांचा सर्वप्रथम वापर करण्यात दुबई जगाच्या पुढे एक पाऊल ठेवून आहे, हे परत एकदा सिद्ध होत आहे ! "संगणकाच्या उपयोगाची सीमा फक्त मानवी विचारशक्तीच्या भरारीच्या कक्षेनेच ठरवली जाईल" असे म्हटले जात होते. आता ते त्रिमीती छपाईच्याबाबतीतहि चपखलपणे लागू होते. अर्थात, त्रिमीती छपाई हा संगणकाचाच एक अविष्कार असल्याने ते सहजपणे होणार होतेच म्हणा.

In reply to by जॉनविक्क

मानवाच्या आतापर्यंतच्या प्रत्येक क्रांतीकारक विकसन पायरीवर, "आता अमुक अमुक लोक बेकारीने मरणार" असा हाकारा होतो. पण, आतापर्यंत तो हाकारा दर वेळेस खोटा ठरलेला आहे. बदलणार्‍या व्यवस्थेला चालवायला माणसांची गरज लागतेच, फक्त त्यांच्याकडे जरूर असणारी कौशल्ये वेगळी असावी लागतात... आणि, स्वतःहून म्हणा की जरूरीच्या रेट्यामुळे म्हणा, जरूर ती कौशल्ये आत्मसात करून माणसाने पूर्वीपेक्षा जास्त विकसित जीवनमान साध्य केले आहे. उदाहरणेच पहायची झाली तर खालील मोजके क्रांतीकारक कालखंड तपासून पाहता येतील... १. मानवाच्या/प्राण्यांच्या श्रमांवर अवलंबून असलेल्या वहातूकीच्या साधनांचा वापर ---> काही दशके अगोदर कल्पनेतही नसणार्‍या यांत्रिक वाहतूकीच्या साधनांचा (दुचाकी, चारचाकी, रेल्वे, विमान, इ) वापर. आताही, विजेवर चालणार्‍या गाड्या आल्यावर, यांत्रिक गाड्या तयार करणार्‍या उद्योगधंद्यांचे (आणि त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे) काय होणार अशी सार्वजनिक (!) चिंता लागून राहिली आहेच... पण, त्या उद्योगधंद्यातील विचार्वंत धुरीणांनी काही वर्षांपूर्वीच रूळ बदलायला सुरुवात करून वीजेवर चालणार्‍या गाड्यांसंबंधी संशोधन सुरू केले आहे. २. यांत्रिक साधने व पूर्णपणे मानवी श्रम वापर करून उत्पादने तयार करणे व सेवा देणे ---> संगणकाचा वापर करून उत्पादने तयार करणे व सेवा देणे : हा बदल तर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दोनेक दशकांपूर्वी सुरू झाला आहे आणि अजून होत आहे. नव्वदीच्या दशकात तर, 'संगणकांमुळे जगभरात बेकारी माजेल" असा जोरदार हाकारा झाला होता आणि संगणकांच्या उपयोगाला बराच विरोध केला गेला होता. यामध्ये लक्षात ठेवण्याजोगी एक फार महत्वाची गोष्ट अशी की, बदलापूर्वीच्या प्रत्येक कालखंडापेक्षा बदलानंतरची लोकसंख्या बरीच मोठी होत गेलेली आहे. तरीही दर नव्या व्यवस्थेत बेकारी तर वाढली नाहीच पण प्रत्यक्षात मानवी जीवनमान सुधारले आहे. म्हणजे, दर नव्या व्यवस्थेने सतत वाढत्या नोकरी-व्यवसायाच्या संधी निर्माण केलेल्या आहेत. जे बदलांची दिशा वेळीच (किंबहुना, वेळेआधीच) जोखतात आणि स्वतःहून त्या बदलांना अनुरुप बदल घडवून आणतात, ते बदलांमुळे निर्माण होणार्‍या संधीचा भरपूर फायदा उठवतात (The early bird gets the worm). जे त्याबाबतीत मागे राहतात, त्यांना नाईलाजाने का होईना स्वतःत बदल घडवून आणावेच लागतात. उदा: १९८०-९०च्या दशकांत ज्यांनी संगणकाचे शिक्षण घेऊन ज्यांनी तो मार्ग स्विकारला (व ज्यांनी आपला पूर्वीचा मार्ग बदलला) त्यांना संगणकक्रांतीमुळे निर्माण झालेल्या नवीन संधी पटकावल्या. ज्यांनी ते करण्यात टाळाटाळ केली ते केवळ मागेच राहीले नाही तर त्यांना अखेरीस कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संगणकशिक्षण घेणे भाग पडले आहे / पडत आहे. एकंदरीत, बदलाच्या संक्रमणकालामध्ये काही लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे, पण बदल मुरल्यानंतरच्या काळात सगळे बर्‍यापैकी सुरळीत झाले आहे. ही एक प्रकारे, व्यवहारात दिसणारी डार्विनच्या सिद्धांताची पुष्टी आहे... "जो जीव बदलांना तोंड देऊ शकतो आणि / किंवा बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक बदल करू शकतो, तो टिकून राहतो." आतापर्यंत, वारंवार, हेच सिद्ध झाले आहे की, "दर बदलांमध्ये, आपल्या बुद्धीचातुर्याने, मानव केवळ टिकूनच राहीला नाही तर, तो अधिकाधिक समृद्ध होत गेला आहे" (Man has not only survived, but has prospered, with each change).

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क 20/07/2019 - 19:13
दर बदलांमध्ये, आपल्या बुद्धीचातुर्याने, मानव केवळ टिकूनच राहीला नाही तर, तो अधिकाधिक समृद्ध होत गेला आहे" (Man has not only survived, but has prospered, with each change).
आता challange त्याच्या या बुद्धीचातुर्यालाच निर्माण होत आहे म्हणून चिंता वाटते.

In reply to by जॉनविक्क

आता challange त्याच्या या बुद्धीचातुर्यालाच निर्माण होत आहे म्हणून चिंता वाटते. चिंता नको, बुद्धीचातुर्याला सतत मिळालेल्या आव्हाना(challange)मुळेच माणसाची गेल्या दहा-वीस लाख वर्षांची प्रगती झाली आहे आणि त्या दर आव्हानाचा सामना करताना बुद्धीचातुर्याचीसुद्धा* सतत प्रगती होत आहे ! जेवढे मोठे आव्हान तेवढे बुद्धीचातुर्य जास्त जोरात धावते. :) ****** * हे जरी मी मानवी समाजाच्या एकूण बुद्धीचातुर्याबद्दल बोलत असलो तरी, 'जी टाळकी कधीच सुधारणार नाहीत' असे वाटत असते, ती सुद्धा स्वतःला चटका लागू लागला की सरळ मार्गावर येतात. जी टाळकी फारच टोकाची निर्बुद्ध असतात, ती (स्वतःच्या कर्माने) भूतकाळात जमा होतात. डार्विनचा नियम ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क 20/07/2019 - 20:27
ठिकय, सध्या जे राक्षसी यांत्रिकीकरण होतंय त्याची भीती वाटते .पण बहुदा हा वाढत्या वयाचा परिणाम असावा, माणूस थांबला नाही थांबणारही नाहीच. आता चष्मा एकदा तपासून घ्यावा म्हणतो. :)

Rajesh188 20/07/2019 - 20:29
कोणताही शोध लागला किंवा तंत्र शोधलं की फक्त आणि फक्त त्याच्या उपयुक्त चेची चर्चा होते आणि ही एकांगी चर्चा त्या शोधाची परिपूर्ण माहिती देत नाही . 3d प्रिंटर ची दुसरी बाजू सुद्धा असणार तर त्या विषयी सुद्धा माहिती द्यावी

Rajesh188 20/07/2019 - 20:53
कॉम्प्युटर ,इंटरनेट आले तेव्हा हे माहीत नव्हतं (असेल सुधा लपवलं असेल)की तुमचा कम्प्युटर हॅक करून त्या माहितीत हवा तो बदल तिसरी व्यक्ती करेल एटीएम कार्ड आले तेव्हा नाहीत नव्हतं की पिन नंबर शोधून तुमच्या खात्या मधून हवी तेवढी रक्कम कोण्ही काढू शकतो . प्रत्येक नवीन तंत्र ज्ञान हे फक्त सोयीचं नसतं तर गैर सोयीचं सुद्धा असते . त्या मुळे ३d प्रिंटर चा गैर वापर कसा होवू शकतो ह्याची माहिती असणे गरजेचे आ

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत 23/07/2019 - 07:05
कसले लोक आहेत. गाड्यांचा शोध लागला तेव्हा फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे सोईचे इतकेच सांगितले. प्रदूषणाबद्दल कोणीच नाही बोलले. शिवाय गाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यू होऊ शकतो असे पण कोणी नाही सांगितले. कोठलाही शोध हा कोणत्या बाजूने वापरायचा हे वापर करणाऱ्यावर ठरते. शिवाय एखाद्या शोधाचा गैर फायदा कोणी घेऊ लागले तर त्याला प्रतिबंध करणारी नवीन प्रणाली विकसित करण्यात येते, अथवा त्या शोधाच्या नवीन आवृत्त्या दुरुपयोगाला प्रतिबंध घालतात. उदा. एटीम बद्दलच सांगायचे तर आधी प्रत्येक व्यवहाराची माहिती खातेधारकाला एसमेएस ने कळवायचे (अजून पण कळवतात) पण त्याशिवाय २ फॅक्टर ऑथ आले. म्हणजे एखादा अनपेक्षित व्यवहार दिसला तर बँक तो व्यवहार पूर्ण होऊ देत नाही, पण ग्राहकाकडून कॉन्फीर्मशन घेते (उदा. one time पासवर्ड ). आता 3D तंत्रज्ञान वापरून कोणी घरीच बंदुका तयार केल्या तर?

लेख वाचता वाचता मनातउमटणा र्‍या शंका जोजो वाचीत गेलो तो तो दूर होत गेल्या. नंतर आलेल्या तांत्रिक तसेच वाह्यात शंका प्रतिसादात दूर झाल्या. लक्ष लक्ष धन्यवाद. अर्ध्या लेख लिहिल्याबद्दल आणि बाकीच्या त्यात आता नवीन भर टाकल्याबद्दल. मानवाच्या प्रगती पथावरचे भाष्य मस्त, तर्कसुसंगत आणि सहज पटणारे आहे.

खटपट्या 15/02/2015 - 02:43
३डी चपाई करुन बनवलेल्या वस्तू आणि पारंपारीक तंत्रज्ञान वापरुन बनवलेल्या वस्तू यामधे काय फरक आहे. उदा. उत्पादन खर्च, टीकाउपणा, बनवण्यासाठी लागणारा वेळ वगैरे.

In reply to by खटपट्या

वरती छायाचित्रांमधे विमानाचा भाग असं नावं लिहिलेला जो भाग आहे तो एक इंपेलर आहे. अश्या पद्धतीचा भाग मशिनींग ऑपरेशन्स नी बनवण्यासाठी काही तासांपासुन काही दिवसांपर्यंतचा वेळही लागु शकतो. तसचं फाईव्ह अ‍ॅक्सीस सी.एन.सी. मशिन्स चा वापर करावा लागतो. ह्या मशिनच्या अतिशय उच्च अ‍ॅक्युरसीच्या मशिन्स ची किंमत सुमारे ७२ लाख रुपयांपासुन सुरु होते. मझाक सारख्या मशिन्स ची किंमत तर चक्क १ कोटी १५ लाखं वगैरे एवढी प्रचंड असते. ह्या मशिन्स ची पर अवर रनिंग कॉस्ट, टुलिंग कॉस्ट ही अतिप्रचंड असते. ह्यामधल्या साध्या लाईव्ह टुलिंगची किंमत ५-५ लाखापासुन सुरु होते. अर्थातचं त्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात असतो..तसचं लीड टाईमसुद्धा ३-डी पेक्षा जास्तं असतो. टीकाउपणा हा काय बनवताय आणि कशापासुन बनवताय ह्याच्यावर अवलंबुन असतो. सद्द्य परिस्थितीमधे उपलब्ध असणार्‍या ३-डी प्रिंटरमधे धातु वापरण्यावर मर्यादा आहेत. अर्थातचं त्या भागासाठी लागणार्‍या हिट ट्रीटमेंट आणि हिट ट्रीटमेंटनंतर असणार्‍या फिनिशिंग ऑपरेशन्स वरती मर्यादा येतात. बाकी सवडीनी टंकीन.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यसवायजी 15/02/2015 - 09:22
सवड काढाच. मी Cnc commissioning engg असल्याने, ५ एक्सिस मशीन हा आवडीचा (आणि रोजच्या कामाचा) विषय आहे. ---- ५ ax machining चा vdo इथे पाहता येईल. http://youtu.be/CqePrbeAQoM

In reply to by खटपट्या

मॉरिस टेक्नॉलॉजिजच्या Direct Metal Laser Sintering तंत्रामध्ये १००० डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान वापरून सर्व प्रकारचे धातू/मिश्रधातू वापरता येतात. तसेच या तंत्रात धातूंचे अत्यंत लहान कण (पार्टीकल्स / पावडर) वापरून थरावर थर चढवत भाग (पार्ट्स) बनवले जात असल्याने अत्यंत महागडे धातू फुकट जाण्याचे (waste) प्रमाण नगण्य असते... आता प्रचारात असणार्‍या सर्वसाधारण प्रक्रियेत धातूचा तुकडा घासून (मिलिंग, टर्निंग, इ) भाग बनवताना लक्षणीय प्रमाणात महागडा धातू फुकट जातो. त्यामुळे 3D छपाई प्रक्रिया वापरल्याने मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैश्याची बचत होणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण बाकीच्या गोष्टींच काय? सिंटरिंग पोरोसिटीमुळे त्या विशिष्ट भागाची स्ट्रेंथ, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन वगैरे गोष्टींचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय ह्या गोष्टी थेट विमानासारख्या अ‍ॅप्लिकेशनमधे वापरणं मात्र थोडं धोक्याचं वाटतयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी यातला तज्ञ नाही. केवळ कंपनीने दिलेल्या माहितीवरून लिहीलंय. परंतू तरीही GE Aviation सारख्या अग्रगण्य कंपनीने हे तंत्र वापरून बनवलेली इंजिने पुढच्या वर्षा-दीड वर्षात (२०१६ मध्ये) जागतिक स्तरावर कमर्शियल विमानवाहतूक करणार्‍या मोठ्या विमानांत वापरण्याचे आणि २०२० मध्ये वितरित होणार्‍या अजस्त्र 9X इंजिनांची बांधणी करण्याचे ($११ बिलियन किंमतीचे) वचन Emirates या जगातल्या सर्वात मोठ्या विमानवाहतूक करणार्‍या कंपनीला दिले आहे. Boeing + GE Aviation ने 777X + 9X इंजिनांचे केलेले काही मोठे करार: विमानकंपनी : 777X विमाने / 9X इंजिने / बोईंग कंपनीची विमानांची किंमत १. Emirates Airline : १५० / ३०० / $७६ बिलियन २. Qatar Airways : ५० / १०० / $१९ बिलियन ३. Etihad Airways : २५ / ५० / अंदाजे $१० बिलियन इतर काही विमानकंपन्या... Cathay Pacific Airways Ltd. व International Consolidated Airlines Group SA, parent of British Airways. यावरून कंपनीने त्यांच्या फ्लॅगशिप विमानात वापरण्याचे हे तंत्रज्ञान पुरेसे विकसित केले असावे यावर विश्वास वाटतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

छान. जी.ई. असेल तर क्वालिटी च्या बाबतीत तडजोड होणार नाही हा विश्वास आहे. तरीही थोडं अजुन संशोधन आणि अ‍ॅनालिसीस व्हायला हवं.

In reply to by श्रीरंग_जोशी

सोत्रि 15/02/2015 - 10:10
धागा वाचल्यावर हिच लिंक द्यायला आलो खाली तर, रंगाराव, तुम्ही मा़झे श्रम वाचवलेत असे दिसले :) धन्यवाद! - (आभारी) सोकाजी

पिंगू 15/02/2015 - 11:34
पुण्यातील एका प्रदर्शनामध्ये ३ डी प्रिंटर बघितला होता. तेव्हा तर मला वाटले होते की फक्त मॉडेल बनवायला या प्रिंटरचा उपयोग होईल. आता हे वाचून तर वाटू लागलय की ३ डी प्रिंटर वापरुन बर्‍याच गोष्टी तयार करता येतील. आता त्याला मर्यादा असल्या तरी भविष्यात हे अशक्य नाही.

मदनबाण 15/02/2015 - 19:57
मध्यंतरी आपल्या हिंदूस्थानात घडलेली घटना याच बाबतीत म्हणजे याच तंत्रज्ञाना विषयी आहे. शाहरुख खानचा ३ डी पुतळा ! यावर अधिक इकडे :- Life-sized 3D Printed Statue of Bollywood Star, Shahrukh Khan, Created by Red Chillies VFX & Autodesk India Shah Rukh Khan immortalised in first life size 3D printed model in the world आता अशीच बझ एका नविन तंत्रा विषयी होइल... ते तंत्रज्ञान म्हणजे क्वांटम कंम्प्यूटर्स . सध्या नासा , Lockheed Martin आणि गुगल यांनी डी-व्हेव { D-Wave } हा क्वांटम काँप्यूटर विकत घेतला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- कभी भुला कधी याद किया... { Sapne Saajan Ke }

बॅटमॅन 15/02/2015 - 20:45
थ्रीडी प्रिंटिंग इतके पसरेल हे वाटत होतेच. पण कप्तानसाहेबांनी उपस्थित केलेला पोरॉसिटीचा मुद्दा बिनतोड आहे. ते कसे मात करतील यावर हे पहायला आवडेल.

आता वेळ मिळाला म्हणुन टंकतो. ३-डी तंत्रज्ञान नक्कीचं फायदेशिर आहे. तुम्ही दिलेल्या वापरांबरोबरचं येत्या काही वर्षांमधे "ह्युमन ऑर्गन्स" सुद्धा जैवतंत्रज्ञान, पेशी आणि माणसाचे बायोलॉगिकल स्कॅन्स घेउन तयार करता येतील. आत्ता सद्ध्याच्या काळातही जिवंत मानवी पेशी आणि रक्तनमुने वापरुन माणसाचे कानं आणि ओठं यशस्वीपणे बनवण्यात आलेले आहेत. स्वतःच्याचं शरिरामधल्या पेशी ३-डी प्रिंटर वापरुन असे अवयवं तयार केले गेल्यानी शरिर ते परपेशीप्रमाणे नाकारणारही नाही. सद्ध्या बायोस्कॅन्स वापरुन जिवंत कृत्रिम किडनी वाढवायचे प्रयत्न चालु आहेत. आणि त्यास काही प्रमाणात यशही मि़ळत आहे. तंत्रज्ञान जसं प्रगत होईल तसं ही गोष्ट शक्य होईल आणि स्वस्त होईल ह्यातही काही शंका नाही. ३-डी तंत्रज्ञानाला ह्याबाबतीत अनेक शुभेच्छा. आता अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर ह्या तंत्रज्ञानावर अजुनही संशोधन व्हायला हवं असं माझं मत आहे. वरती जो विमानाचा इंपेलर आहे त्याबद्दलचं थोडं लिहितो. कुठलही यंत्र किंवा यंत्राचा भाग डिझाईन होतं असताना त्या भागावर येणारे वेगवेगळे ताणतणाव, त्या भागाची वापरली जाण्याची वारंवारिता, लाईफसायकल, त्यामधे वापरण्यात आलेला धातु किंवा अलॉय, त्याचं शेवटच्या अवस्थेमधलं अपेक्षित मायक्रोस्ट्रक्चर, त्यावर होणार्‍या हिट ट्रीटमेंट्स, पोस्ट हिट ट्रीटमेंट प्रोसेसेस ह्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं. विमानाच्या टर्बाईनचा वेग चक्क ४०,००० ते ८०,००० आर.पी.एम. इतका प्रचंड असु शकतो. जी.ई. इंजिन बेंचमार्किंग मधे जेट विमानाचं इंजिन चक्क १,६४,००० आर.पी.एम. पर्यंत पुश करण्यात आलेलं होतं. मटेरिअल पोरस असेल तर एवढ्या जास्त वेगामधे "मटेरिअल इंटेग्रीटी" कितपत विश्वासार्ह असु शकेल? फोर्ज्ड मटेरिअल मधे अलॉय हे धागे स्वरुपात असल्यानी एकमेकांना घट्ट पकडुन राहु शकतात. तसचं हिट ट्रीटमेंटचा प्रश्णही अनुत्तरीत राहतोय. एवढ्या जास्तं वेगानी फिरणार्‍या भागामधे सॉलिड बेअरींग्ज वापरु शकतं नाहीत तर हायड्रोडायनामिक बिअरिंग्ज वापरल्या जातात. त्याचं वॉल प्रेशर हे भाग सहन कसे करु शकतील? एवढ्या वेगानी फिरणार्‍या भागामधे गॅप स्लीव्हज वापरलं जाणं हे ही धोक्याचचं आहे. कोणाकडे ह्याविषयी अधिक माहिती असेल तर कृपया इथे द्यावी. तोपर्यंत कॉलिंग गवि.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 16/02/2015 - 10:54
कॅजॅस्पॅच्या शेवटच्या परिच्छेदातल्याच शंका धागा वाचून मनात आल्या होत्या. प्रचंड आरपीएम, आणि काही पार्टसबाबतीत उच्च तापमान, आणि इतर काहींबाबत रिपीटेड स्ट्रेसमुळे येणारा फटिग या गोष्टी फारच महत्वाच्या असतात. कणाकणाने जोडून बनलेला पार्ट जर योग्य त्या मटेरियलचा असेल आणि कणाकणाने जोडून बनवण्याच्या पद्धतीत तो अधिक भक्कम बनत असेल (विदाउट इंटर्नल फ्रॅक्चर्स, फिशर्स वगैरे) तर ही थ्री डी प्रिंटिंग पद्धत उजवी असू शकेल. पण नेमकं कसं बनतं ते इमॅजिन करता येत नाहीये. प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टरसारख्या मटेरियलपासून असं प्रिंटेड मॉडेल बनवणं मी समजू शकलो होतो. पण विमानाच्या इंजिनातले धातूचे पार्ट हे पार्टिकल्स जोडूनजोडून प्रिंट करायचे असतील तर प्रचंड तापमानाला हे काम केलं पाहिजे.. म्हणजे धातू हा द्रवरुपात असला तरच तो चिकटेल आधीच्या धातूला. मग लगेच थंड करुन तो घनरुपात आणला पाहिजे. या सर्व प्रक्रियेत अत्युच्च उष्णता देणे आणि त्याचवेळी थंड करणे हे तंत्र एकाच जागी कसं जमवत असतील?

In reply to by गवि

या विषयातली माझी रुची टेक्निकल कमी (किंबहुना नगण्य) आणि व्यावहारीक उपयोग/व्यापारी (बिझनेस) दॄष्टीकोनातून जास्त आहे. त्यामुळे या तंत्राच्या तकनिकी दर्जाची माझी खात्री बिझनेस कारवाईवरून अनुमानित (डिराईव्हड) आहे. मोठ्या करारांतला 'डिफॉल्ट क्लॉज' चांगलाच (अनेक बिलियन डॉलर्सचा) चटका देणारा असतो. बोईंगला ड्रिमलायनर प्रकरणात आणि एअरबसला A380 प्रकरणात (अनेक बिलियनचे) प्रसिद्ध मोठे चटके बसल्यानंतर बोईंग व एअरबस भविष्यातले कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे करार / जाहिरात "ताकही फूंकून फूंकून पीत" करतील हे नक्की. या पार्श्वभूमीवर हा नविन 3D प्रिंटिंग असलेला प्रकल्प नुसता जाहीर केलेला नाही तर त्याचे $१०० बिलियन पेक्षा जास्त किंमतीच्या विक्रीचे 'टाईट' वेळापत्रकही जाहीर केलेले आहे... पहिले मध्यम आकाराचे विमान पुढच्याच वर्षी (२०१६) मध्ये आणि 777X / 9X विमाने २०२० पासून हस्तांतरीत करण्याचे करार झाले आहेत. पुढच्या वर्षी व्यापारी तत्वावर हस्तांतर म्हणजे या वर्षी पार्ट्स केवळ तयार नाही तर त्यांची कसून तपासणी झाली असणार... शेवटी हा केवळ तंत्राचा प्रश्न नसून तो १५०-४०० प्रवाश्यांच्या आणि कंपनीच्याही जीवनमरणाचा प्रश्न आहे. या प्रकल्पासाठी GE Aviation ने मॉरीस टेक्नॉलॉजिज तिच्या सर्व उपकंपन्यांसह विकत घेतली आहे आणि अजून दोन नविन 3D प्रिंटिंग प्लँटस उभारले आहेत. अर्थातच, या प्रकारच्या उच्च कोटीच्या तंत्रज्ञानाच्या (IPR) सर्व खाचाखोचा कोणतीही कंपनी एका विशिष्ट मर्यादेपलिकडे सर्वसामान्य माध्यमांत उघड करणे शक्य वाटत नाही. वर चर्चा केलेल्या मुद्द्यातील काहींचा त्रोटक उहापोह माध्यमांत आला होता... ...The additive manufacturing process involves taking digital designs from computer aided design (CAD) software, and laying horizontal cross-sections to manufacture the part. The process creates the layered cross-sections using a laser beam to melt the raw material. These parts tend to be lighter than traditional forged parts because they don't require the same level of welding. Additive manufacturing also generates less scrap material during the fabrication process... ...Morris Technologies and Rapid Quality Manufacturing focus on the aerospace, energy, oil & gas, and medical industries. तांत्रिक नियतकालिकांत (professional journals) कदाचित जास्त माहिती असू शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गवि 16/02/2015 - 11:53
हे मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे म्हणजे ते शक्य, तुलनेत स्वस्त, सुरक्षित, अधिक दर्जाचं असणार यात शंका नाहीच मुळात. नेमक्या तपशिलाबद्दलच उत्सुकता आहे फक्त..

In reply to by गवि

सहमतं. जनरल इल. सारखी कंपनी गुणवत्ता राखुनचं काम करणार ह्यात शंका नाही. पण कशी हे जर समजलं असतं तर बरं झालं असतं. बिझनेस ट्रेड सिक्रेट अर्थातचं एम्प्लॉयी आणि आर अँड डी वाले सोडुन कोणालाचं समजणार नाही हे ही निश्चित.

सौंदाळा 16/02/2015 - 11:42
प्रोटोटाईप बनवण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान आहे इतपत माहीती होती. पण या तंत्रावरुन उत्पादनसुद्धा आणि ते पण विमानाचे इंजिन हे नविनच आहे. जी. ई सारखी कंपनी हे करत आहे म्हणजे हे तंत्रज्ञान मागच्या ३-४ वर्षात प्रचंड वेगाने विकसीत झाले असेल. कॅ.जॅ. स्पॅ चा प्रतिसाद उपयुक्त. तुम्हाला पडलेले प्रश्नच स्पेशली हिट ट्रिटमेंट, मशिनिंग याची उत्तरे मिळवण्यास उत्सुक आहे.

विटेकर 16/02/2015 - 12:37
उत्तम लेख , उपयुक्त माहीती. अजून येऊ द्या ! गुण्वत्तेच्याबाबतीत - फक्त गुणवत्ताच नव्हे तर प्रखर चाचण्या घेणे आवश्यक आहे. गविशेट - रस्त्यावर धावणारी वाहने भारतात ए आर ए आय प्रमणित करते , तसे विमाने कोण प्रमाणित करते ?

In reply to by विटेकर

हेच काम अमेरिकेत Federal Aviation Administration करतं. त्यांचे संकेतस्थळ. नुकतेच त्यांनी अमेरिकेतील ड्रोन वापराविषयी नियमावली जाहिर केली आहे.

खूप छान माहितीपूर्ण धागा , आता ह्या ३D प्रिण्टेर्स ने स्व:ताच्या प्रतिकृती बनवायला सुरुवात केली तर मानव संस्कृती सुध्धा धोक्यात येणार :)

In reply to by माझीही शॅम्पेन

या दिशेनेही प्रगती चालू आहे ;) जरा वेळ लागेल, पण कोणी सांगावे... जमेलही नजिकच्या भविष्यात :)

कंजूस 16/02/2015 - 17:36
या यंत्राचा माहितीपट DW-TV चानेलवर पाहिला होता यंत्राची जाहिरात: "आमच्या यंत्राने काहीही छापा परंतू कृपया आमचेच यंत्र छापू नका."

जेपी 16/02/2015 - 21:07
माहितीपुर्ण. अवांतर-एक प्रश्न , या विमानातुन आपला नेहमीचा लेझर प्रिंटर घेऊन प्रवास करता येईल का ?

In reply to by जेपी

अत्यंत माहितीपुर्ण अवांतर प्रश्ण विचारल्याबद्दल श्री.जे.पी. यांचे एक ३-डी प्रिंटरची कलर लेजर प्रिंटाऊट (२ रुपये पर्पेज वाली), तसचं एक झाडावर नैसर्गिकरित्या वाढलेला नारळ देउन करण्यात येत आहे. तसचं त्यांच्या पुढच्या प्रिंटर खरेदीवर घसघशीत २५% ची सुड...आपलं सुट देण्यात येत आहे. (अखिल मिपा मापंकाढे समिती)

प्रियाजी 16/02/2015 - 21:08
या तंत्रामुळे जग परत एकदा पूर्ण बदलणार हे निश्चित. हे यंत्र प्रत्यक्षात बघण्याची आपण सर्वजण वाट पाहूया. ही सर्व माहिती खुपच सोप्या भाषेत दिल्याबद्दल ई.एक्का, कॅ.जॅ.स्पॅ. व ईतरान्चे मनापसून आभार.

त्रिमिती छपाई व्यवहारात आणण्यासाठी होणार्‍या दिरंगाईमागे तंत्रज्ञान नाही तर निर्णयप्रक्रिया घेणार्‍या अधिकार्‍यांचे अज्ञान आणि त्यामुळे होणारी चाकढकल आहे असेच दिसते आहे. त्याबाबतीत McKinsey & Company या जगप्रसिद्ध व्यवस्थापन संशोधन आणि सल्लागार कंपनीचे मत आणि इतर रोचक माहिती या दुव्यावर आहे... Are you ready for 3-D printing?

बबन ताम्बे 24/02/2015 - 12:00
पण मला एक शंका आहे. जसे यंत्रे आली त्यावेळी हस्त कौशल्य वापरून उत्पादन करणारे बेकार झाले. (जसे आपल्याकडे कापड बनवणारे, अवजारे बनवणारे), तसे ३ डी प्रिंटींग मुळे होणार तर नाही? कारण आज एखादा स्पेसिफिक मशिन पार्ट बनवायला टर्नर, मिलर पासून ड्रिलर्/रीमर पर्यंत स्पेशालिस्ट लागतात. ३डी प्रिंटींग मुळे या स्पेशालिस्ट लोकांची गरजच रहाणार नाही. आय. टी. आयची गरज कमी होईल की काय?

In reply to by बबन ताम्बे

गवि 24/02/2015 - 12:17
बनवण्याचे तंत्रज्ञान केवळ जास्त हातांना काम मिळावे म्हणून मागास राहू दिल्याने अन्य अनेक क्षेत्रांत भरभराटीचा आणि रोजगारांचा वेग मंद राहतो हे एक.. आणि आत्ताहून कमी भांडवलात वस्तू बनवता येण्याने ती वस्तू जास्त स्वस्त होऊन जास्त लोकांना परवडते हे दुसरे महत्वाचे.. भरपूर कामगार / मॅन्युअल एफर्ट लागणारी उत्पादनप्रक्रिया अधिक लोकांना रोजगार देत असली तरी अल्टिमेटली त्यातून येणारी उत्पादने तुलनेत जास्त महाग राहात असल्याने मागच्या दाराने कामगार जेव्हा एरवी उपभोक्ता ग्राहक या भूमिकेत येतो तेव्हा त्याच्या खिशाला अधिक मोठी भोके पाडतात. उदा. विमानाचे भाग कमी मनुष्यबळात मिळाल्याने विमानाची किंमत कमी होणे.. त्यामुळे एअरलाईन्सचा भांडवली अन सुट्याभागांचा ऑपरेशनल खर्च कमी होऊन विमान प्रवास स्वस्त होणे, हातमागाऐवजी पॉवरलूमवर जास्त कापड कमी वेळात काढल्याने कापडाची किंमत कमी होणे, बैल नांगर या पद्धतीने आठवडाभर नांगरण्याऐवजी यांत्रिक नांगरवाहनाने एका दिवसात अनेक एकर नांगरुन होणे आणि धान्य स्वस्त होणे, इ या मार्गांनी उत्पादने स्वस्त होऊन जास्त लोकांना परवडतात. एक महत्वाचं तत्वः बिनरोजगाराचे श्रम करुन घेणे जितके निरुपयोगी आणि घातक तितकेच घातक बिनश्रमाचा रोजगार देणे.. याठिकाणी कमी श्रमात गोष्ट होत असताना रोजगारासाठी श्रम निर्माण करुन ते करुन घेण्याचा आटापिटा होईल. घाम गाळणे म्हणजे खरे अर्थशास्त्रीय श्रम नव्हेत. जे श्रम किमान त्या श्रमांच्या उत्पादनाइतकी किंवा जास्त क्रयशक्ती तयार करु शकतात ते खरे श्रम. (उदा. बाकीचे सारे अनुदानच. यंत्राने खड्डे खणणे जास्त एफिशियंट असताना रोजगाराच्या हमीसाठी खड्डे खणण्याची कामे ही सश्रम भीकच. माझं म्हणणं क्लियर होतंय का माहीत नाही, पण प्रयत्न केला शब्दांत मांडण्याचा.

In reply to by गवि

+१ थोडक्यात म्हणजे... अ) बैलगाडी ऐवजी चारचाक्या आल्याने गाडीची वाहतूक जास्त स्वस्त, जास्त सुखकारक आणि जास्त लोकांना (बैलगाडीच्या जमान्यात ती ठेवणे परवडत नाही म्हणून पायी चालणार्‍या लोकांनाही) सहज उपलब्ध झाली आहे. आ) पूर्वी मशीन्स आली म्हणून हाताने वस्तू तयार करणार्‍या कामगारांचे काय होईल अशी भिती व्यक्त केली गेली. मात्र काही थोडे अपवाद वगळता इतर सर्व कारागीर मशीनचा वापर करणे अथवा आपल्या चरितार्थाच्या कामात बदल करून पहिल्यापेक्षा जास्त सधन झाले आहेत. इ) त्रिमिती छपाईने आणि इतर काही तंत्रांनी जर विमानप्रवास अधिक सोपा, सुखकर आणि विषेश म्हणजे स्वस्त झाला तर तो केवळ विकसितच होणार नाही तर तुलनेने कमी उत्पन्न असणार्‍या लोकांच्या आवाक्यात येईल. यालाच सर्वसाधारणपणे प्रगती म्हणतात आणि त्यामुळेच मानवाचे जीवनमान सतत उंचावर जात राहीले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 27/02/2015 - 01:34
इतर काही तंत्रांनी जर विमानप्रवास अधिक सोपा, सुखकर आणि विषेश म्हणजे स्वस्त झाला तर तो केवळ विकसितच होणार नाही तर तुलनेने कमी उत्पन्न असणार्‍या लोकांच्या आवाक्यात येईल. नुसता सहमतच नाही तर हे वास्तवात यावे याची वाट बघतो आहे. आत्ता ड्रोन विकसीत झाले आहेत ते छोट्या वस्तू ने-आण करु शकतात. अजून थोडे विकसीत करून एक किंवा दोन माण्सांची ने-आण शक्य झाली तर बर्‍याच नागरी सेवांवरचा ताण आणि खर्च कमी होइल.

In reply to by संदीप डांगे

आत्ता ड्रोन विकसीत झाले आहेत ते छोट्या वस्तू ने-आण करु शकतात. अजून थोडे विकसीत करून एक किंवा दोन माण्सांची ने-आण शक्य झाली तर बर्‍याच नागरी सेवांवरचा ताण आणि खर्च कमी होइल.
जेव्हा अ‍ॅमेझॉनने त्यांच्या ड्रोन डिलिव्हरीबात जाहिर केले होते तेव्हा हापिसातील सहकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेत मी पण हिच संकल्पना मांडली होती. ट्रॅफिकमध्ये रोज दोन अडीच तास घालवणार्‍यांसाठी ड्रोनप्रवास हे एक वरदान ठरू शकते. अजुनतरी सुरक्षित प्रवासाच्या बाबतीत ड्रोन्स तंत्रज्ञान बाल्यावस्थेमध्ये आहे. ड्रोन्सद्वारे वस्तुंची ने-आण नियमीतपणे सुरू व्हायला अजुन बरीच वर्षे लागू शकतात. एरिअल फोटोग्राफी व व्हिडिओ शुटींगसाठी मात्र ड्रोन्सचा वापर बर्‍यापैकी सुरू झालेला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

संदीप डांगे 27/02/2015 - 02:13
सुरक्षेच्या बाबतीत फार कठीण जाऊ नये असे वाटते कारण इतर वाहनांमधे वापरली जाणारी सुरक्षायंत्रणा इथेही जशीच्या तशी किंवा थोडी बदलून वापरता येइल. जसे: १. गूगल कार चे तंत्रज्ञान वापरून स्वयंचलित यंत्रणेद्वारे उडणार्‍या प्रत्येक ड्रोनचा स्थळ, जमीनीपासूनची उंची आणि मार्ग यांचा विदा ठेवून इतर ड्रोनशी समन्वय करणे. त्यासाठी उपभोक्त्याने फक्त उतरायचे ठिकाण आणि वेळ नमूद करणे. बाकी मार्ग, वेग आणि प्रवास याची काळजी स्वयंचलीत यंत्रणा घेऊ शकेल. २. मर्सिडिझ व इतर हाय-एंड कार्स मधे वापरल्या जाणारी धडक-विरोधी-यंत्रणा वापरून एकाच वेळेस एकाच मार्गावर सुरक्षीत अंतर राखून अनेक ड्रोन्सना सुरक्षीत प्रवास करता येइल. जेणेकरून रस्त्यावरची चौरसफूटाची जागा न वापरता घनफूटात मार्ग वापरता येइल. ३. अपघाताने ड्रोन कोसळले तर विशिष्ट उंचीसाठी पॅराशूट तर जमीनीलगत तत्काळ अपघातांसाठी एअरबॅग यंत्रणा वापरता येइल. ४. सौर-उर्जेचा वापर करून बॅटरी चार्ज करणे त्यामुळे वापर-खर्च कमी. अजून इतर बर्‍याच तांत्रिक सोयी आजच्या काळात आहेत ज्या सरसकट ड्रोनसाठी वापरता येतील. बाकी तज्ञ आहेतच पुढचा विचार करायला. फक्त एकच इच्छा आहे ती ही की हे सर्व लवकरात लवकर घडून यावे आणि तेही सर्वसामान्य माणसास परवडण्यासारखे असावे. एक्दम ४०-५० हजार तर नाही पण २ लाख रुपयांपर्यंत किंमत असल्यास इतर गोष्टींचा विचार करता परवडण्यासारखे असेल.

In reply to by संदीप डांगे

वरील मुद्द्यांशी सहमत पण मी वर मांडलेली शंका नैसर्गिक आव्हानांबाबतीत होती. जेव्हा अ‍ॅमेझॉनने ड्रोन डिलिव्हरीबाबत प्रथम घोषणा केली तेव्हा टिव्हीवरील एका चर्चेत एव्हिएशन इंडस्ट्रीमधून निवृत्त झालेला एक तंत्रज्ञ म्हणाला होता की कित्येक वेळा अचानक आलेल्या वादळामुळे किंवा दुसर्‍या आव्हानात्मक परिस्थितीमुळे छोटी विमाने व हेलिकॉप्टर्स अपघातग्रस्त होतात. त्या तुलनेत डिलिव्हरीसाठी वापरले जाणारे ड्रोन्स कुठेच नाहीत. काळाबरोबर या आव्हानांवरही उपाय शोधले जातीलच.

In reply to by श्रीरंग_जोशी

संदीप डांगे 27/02/2015 - 02:30
हो. तेही खरे आहेच. जसे प्रत्येक वाहनात काही ना काही उणीवा असतात आणि कालांतराने त्यावर उपाय शोधले जातात तशीच ड्रोनसोबत होईलच म्हणा. शहरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मात्र 'वर'दान ठरू शकतील हे ड्रोन्स.

In reply to by बबन ताम्बे

गवि 24/02/2015 - 12:34
हो. प्रायमरी (उत्पादन, शेती, मॅन्युफॅक्चरिंग) प्रकारच्या उद्योगांत जितके कमी मनुष्यबळ लागेल तितकी स्वस्त उत्पादने मिळतात.. त्यामुळे ग्राहकसंख्या वाढून अनुषंगिक सेकंडरी व्यवसाय विस्तारतात आणि सेकंडरी (विक्री, सेवा, सल्ला, मार्केटिंग, वितरण) वगैरे क्षेत्रात मूळ प्रायमरीत गमावलेल्या रोजगारांपेक्षा प्रचंड जास्त पटीने रोजगार उपलब्ध होतात. साठ किंवा पन्नास टक्के लोक एक ते पाच एकरांच्या छोट्याछोट्या तुकड्यांच्या शेतीत विखुरलेले असणे हे भूषण नसून चुकीचे आहे. दहा टक्के लोकांनी प्रत्येकी प्रचंड आकाराच्या एरियात बाकीच्या नव्वदांना पुरेल इतकी यांत्रिक शेती करणे हा फायद्याचा मार्ग आहे.

In reply to by गवि

तुमच्या दोन्ही प्रतिसादांशी व्यावहारिकदृष्ट्या सहमत आणि तात्विकदृष्ट्या असहमत. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वगैरे सगळ्या गोष्टी ठिक आहेत. आणि त्या अनुषंगानी जे सेकंडरी व्यवसाय बहरतात असं तुम्ही म्हणताय त्यामधे ज्यांच्या नोकर्‍या गेल्या त्यांना काय स्थान असेल? एखादा मनुष्य आयुष्याची वीस वर्षं शॉप फ्लोअर वर मशिनिस्ट चं काम करतोय त्याला एकतर वयोमानामुळे दुसरा जॉब मिळणं अतिशय अवघड असेल. आणि सेकंडरी उद्योगांमधे अपेक्षित असणारे स्किलसेट्स नसल्याने तो बेरोजगार होईल हा ही एक घटक विचारात घेण्यासारखा आहे.

In reply to by कपिलमुनी

मराठे 24/02/2015 - 20:58
कार बनवताना ह्या वेळच्या डेट्रोईट ऑटो-शो मधे पाहिलं आहे. हे तंत्रज्ञान मुख्यत्वे करून अंतराळ तंत्रज्ञान म्हणून प्रथम विकसित केलं गेलं. जर स्पेसस्टेशन वर एखाद्या गोष्टीची गरज लागली, (म्हणजे दुरुस्तीसाठी लागणारी हत्यारं वगैरे) तर तिथल्या शास्त्रज्ञांना पुढचं स्पेस शटल कधी येईल त्याची वाट बघत बसण्यापेक्षा जर तिथल्या तिथे ''प्रिंट' करून त्या वापरता येतील. (या पुढची स्टेप म्हणजे, स्पेस स्टेशनवर अन्न 'प्रिंट' करण्याचं तंत्रज्ञान सुद्धा विकसित झालेलं आहे पण अजून 'टेस्टींग' :) फेज मध्ये आहे.)

मदनबाण 24/02/2015 - 19:51
नॅनो टेक्नॉलॉजिचा वापर कोटींग करण्यासाठी केल्यावर... बाकी paramagnetic paint ची कमाल पहा ! :) आणि टीपी म्हणुन Water Transfer Printing सुद्धा पहा :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }

In reply to by मालोजीराव

अशी बंदूक छापून तिच्यातून खरी गोळ्या झाडून झालेल्या आहे. बंदूकीच्या गोळ्या छापण्याचे तंत्र मात्र अजून विकसित झालेले नाही :) हे घ्या त्या बंदूकीबद्दलचा व्हिडिओ (World's First 3D Printed Metal Gun) ... यु टुबमध्ये 3D printing of gun अशी विचारणा केल्यास अजून बरेच व्हिडिओ सापडतील.

3D Printing: Make anything you want... या रोचक व्हिडिओत त्रिमीती छपाईचे वैद्यकशास्त्रातले (कान, नाक, मूत्रपिंड, इ इंद्रिये छापण्यासाठी); पाककलेतले (चॉकलेट, केक, इ छापण्यासाठी) आणि इतर बरेच काही उपयोग पाहता येतील...

जेपी 27/02/2015 - 17:24
चांगली माहिती आहे. अवांतर-नाय मंज उगीच एक प्रश्न पडला ह्या विमानातुन आपला नेहमीचा प्रिंटर घेऊन प्रवास करता येईल का ? उगी ईचारलेल बर ..कस्स!! *biggrin*

In reply to by जेपी

निस्तं इमानातून न्हाय, राकेटमदूनबी त्येला अवकाशात (म्हंजी अंत्राळयानात, पर्ग्रहावर, वेग्रे) न्यायचा ईचार्बी हाय. म्हंजे आसं हाय बगा. तितं एखांदा यानाचा नायतर मशिनीचा पार्ट बोंबलला तर हितून माग्वायची सोय नस्ती ना ! आनी सग्ळ्या पार्टांचा लय मोट्टा ष्टाकबी नेता येत नाय. मंग काय काडायचा प्रिंटर भाईर आणि छापायचा हवा तो पार्ट हवा तेवा ! कशी काय आयड्या हाय ?!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ब्येस हाये आयड्या. नॉर्थ पोल एक्स्पेडिशन मधे ह्या प्रिंट झालेल्या एका प्रेशर सीलने टीमचे प्राणं वाचवल्याची बातमी आहे. दुवा मिळाला की टाकतो.

अर्धवटराव 27/02/2015 - 20:20
आता आमचा टोळ्भैरवांचा ग्रुप संसार सागरात पडुन थोडा शांत आणि सभ्य झालाय.... काहि वर्षांपुर्वी जर हि टेक्नोलॉजी आमच्य हाती लागली असती तर त्याच्या अत्यंत इनोव्हेटीव्ह उपयोगाच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतोय =))

In reply to by अर्धवटराव

उलट, आताही थंड डोक्याने इनोव्हेशन केले तर हे सहजसाध्य आणि तुलनेने स्वस्त उपकरण घेऊन पुढचा बिलियनेर भारतातही बनू शकतो ! तर, चला उठा, 3D प्रिंटरने सुसज्ज व्हा आणि...

पैसा 27/02/2015 - 21:19
मस्त धागा आणि चर्चा! अशी मोठी पॅनेल्स किंवा संपूर्ण घरे छापून घरे बांधणे स्वस्त केले पाहिजे म्हणजे गरीब लोकांना परवडतील अशी घरे काही प्रमाणात तरी मिळतील.

इस्पिकचा एक्का साहेब , कॅप्टन जॅक आणि गवि जी अतिशय आभार . सर्वच सदस्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांनी हा धागा अतिशय रोचक झाला आहे धन्यवाद

आज माध्यमांत ही बातमी दिसली. Dubai developer Emaar to build 3D printed home in Arabian Ranches III दुबईतील Emaar Properties ही नामवंत बांधकाम कंपनीने तिच्या एका प्रतिष्ठित गृहप्रकल्पात त्रिमीती छपाई वापरून घरे बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे, घरे लवकर आणि कमी खर्चात बांधली जातील असा दावा त्या कंपनीने केला आहे. अनेक क्षेत्रांत नवकल्पनांचा सर्वप्रथम वापर करण्यात दुबई जगाच्या पुढे एक पाऊल ठेवून आहे, हे परत एकदा सिद्ध होत आहे ! "संगणकाच्या उपयोगाची सीमा फक्त मानवी विचारशक्तीच्या भरारीच्या कक्षेनेच ठरवली जाईल" असे म्हटले जात होते. आता ते त्रिमीती छपाईच्याबाबतीतहि चपखलपणे लागू होते. अर्थात, त्रिमीती छपाई हा संगणकाचाच एक अविष्कार असल्याने ते सहजपणे होणार होतेच म्हणा.

In reply to by जॉनविक्क

मानवाच्या आतापर्यंतच्या प्रत्येक क्रांतीकारक विकसन पायरीवर, "आता अमुक अमुक लोक बेकारीने मरणार" असा हाकारा होतो. पण, आतापर्यंत तो हाकारा दर वेळेस खोटा ठरलेला आहे. बदलणार्‍या व्यवस्थेला चालवायला माणसांची गरज लागतेच, फक्त त्यांच्याकडे जरूर असणारी कौशल्ये वेगळी असावी लागतात... आणि, स्वतःहून म्हणा की जरूरीच्या रेट्यामुळे म्हणा, जरूर ती कौशल्ये आत्मसात करून माणसाने पूर्वीपेक्षा जास्त विकसित जीवनमान साध्य केले आहे. उदाहरणेच पहायची झाली तर खालील मोजके क्रांतीकारक कालखंड तपासून पाहता येतील... १. मानवाच्या/प्राण्यांच्या श्रमांवर अवलंबून असलेल्या वहातूकीच्या साधनांचा वापर ---> काही दशके अगोदर कल्पनेतही नसणार्‍या यांत्रिक वाहतूकीच्या साधनांचा (दुचाकी, चारचाकी, रेल्वे, विमान, इ) वापर. आताही, विजेवर चालणार्‍या गाड्या आल्यावर, यांत्रिक गाड्या तयार करणार्‍या उद्योगधंद्यांचे (आणि त्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे) काय होणार अशी सार्वजनिक (!) चिंता लागून राहिली आहेच... पण, त्या उद्योगधंद्यातील विचार्वंत धुरीणांनी काही वर्षांपूर्वीच रूळ बदलायला सुरुवात करून वीजेवर चालणार्‍या गाड्यांसंबंधी संशोधन सुरू केले आहे. २. यांत्रिक साधने व पूर्णपणे मानवी श्रम वापर करून उत्पादने तयार करणे व सेवा देणे ---> संगणकाचा वापर करून उत्पादने तयार करणे व सेवा देणे : हा बदल तर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दोनेक दशकांपूर्वी सुरू झाला आहे आणि अजून होत आहे. नव्वदीच्या दशकात तर, 'संगणकांमुळे जगभरात बेकारी माजेल" असा जोरदार हाकारा झाला होता आणि संगणकांच्या उपयोगाला बराच विरोध केला गेला होता. यामध्ये लक्षात ठेवण्याजोगी एक फार महत्वाची गोष्ट अशी की, बदलापूर्वीच्या प्रत्येक कालखंडापेक्षा बदलानंतरची लोकसंख्या बरीच मोठी होत गेलेली आहे. तरीही दर नव्या व्यवस्थेत बेकारी तर वाढली नाहीच पण प्रत्यक्षात मानवी जीवनमान सुधारले आहे. म्हणजे, दर नव्या व्यवस्थेने सतत वाढत्या नोकरी-व्यवसायाच्या संधी निर्माण केलेल्या आहेत. जे बदलांची दिशा वेळीच (किंबहुना, वेळेआधीच) जोखतात आणि स्वतःहून त्या बदलांना अनुरुप बदल घडवून आणतात, ते बदलांमुळे निर्माण होणार्‍या संधीचा भरपूर फायदा उठवतात (The early bird gets the worm). जे त्याबाबतीत मागे राहतात, त्यांना नाईलाजाने का होईना स्वतःत बदल घडवून आणावेच लागतात. उदा: १९८०-९०च्या दशकांत ज्यांनी संगणकाचे शिक्षण घेऊन ज्यांनी तो मार्ग स्विकारला (व ज्यांनी आपला पूर्वीचा मार्ग बदलला) त्यांना संगणकक्रांतीमुळे निर्माण झालेल्या नवीन संधी पटकावल्या. ज्यांनी ते करण्यात टाळाटाळ केली ते केवळ मागेच राहीले नाही तर त्यांना अखेरीस कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संगणकशिक्षण घेणे भाग पडले आहे / पडत आहे. एकंदरीत, बदलाच्या संक्रमणकालामध्ये काही लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे, पण बदल मुरल्यानंतरच्या काळात सगळे बर्‍यापैकी सुरळीत झाले आहे. ही एक प्रकारे, व्यवहारात दिसणारी डार्विनच्या सिद्धांताची पुष्टी आहे... "जो जीव बदलांना तोंड देऊ शकतो आणि / किंवा बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक बदल करू शकतो, तो टिकून राहतो." आतापर्यंत, वारंवार, हेच सिद्ध झाले आहे की, "दर बदलांमध्ये, आपल्या बुद्धीचातुर्याने, मानव केवळ टिकूनच राहीला नाही तर, तो अधिकाधिक समृद्ध होत गेला आहे" (Man has not only survived, but has prospered, with each change).

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क 20/07/2019 - 19:13
दर बदलांमध्ये, आपल्या बुद्धीचातुर्याने, मानव केवळ टिकूनच राहीला नाही तर, तो अधिकाधिक समृद्ध होत गेला आहे" (Man has not only survived, but has prospered, with each change).
आता challange त्याच्या या बुद्धीचातुर्यालाच निर्माण होत आहे म्हणून चिंता वाटते.

In reply to by जॉनविक्क

आता challange त्याच्या या बुद्धीचातुर्यालाच निर्माण होत आहे म्हणून चिंता वाटते. चिंता नको, बुद्धीचातुर्याला सतत मिळालेल्या आव्हाना(challange)मुळेच माणसाची गेल्या दहा-वीस लाख वर्षांची प्रगती झाली आहे आणि त्या दर आव्हानाचा सामना करताना बुद्धीचातुर्याचीसुद्धा* सतत प्रगती होत आहे ! जेवढे मोठे आव्हान तेवढे बुद्धीचातुर्य जास्त जोरात धावते. :) ****** * हे जरी मी मानवी समाजाच्या एकूण बुद्धीचातुर्याबद्दल बोलत असलो तरी, 'जी टाळकी कधीच सुधारणार नाहीत' असे वाटत असते, ती सुद्धा स्वतःला चटका लागू लागला की सरळ मार्गावर येतात. जी टाळकी फारच टोकाची निर्बुद्ध असतात, ती (स्वतःच्या कर्माने) भूतकाळात जमा होतात. डार्विनचा नियम ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क 20/07/2019 - 20:27
ठिकय, सध्या जे राक्षसी यांत्रिकीकरण होतंय त्याची भीती वाटते .पण बहुदा हा वाढत्या वयाचा परिणाम असावा, माणूस थांबला नाही थांबणारही नाहीच. आता चष्मा एकदा तपासून घ्यावा म्हणतो. :)

Rajesh188 20/07/2019 - 20:29
कोणताही शोध लागला किंवा तंत्र शोधलं की फक्त आणि फक्त त्याच्या उपयुक्त चेची चर्चा होते आणि ही एकांगी चर्चा त्या शोधाची परिपूर्ण माहिती देत नाही . 3d प्रिंटर ची दुसरी बाजू सुद्धा असणार तर त्या विषयी सुद्धा माहिती द्यावी

Rajesh188 20/07/2019 - 20:53
कॉम्प्युटर ,इंटरनेट आले तेव्हा हे माहीत नव्हतं (असेल सुधा लपवलं असेल)की तुमचा कम्प्युटर हॅक करून त्या माहितीत हवा तो बदल तिसरी व्यक्ती करेल एटीएम कार्ड आले तेव्हा नाहीत नव्हतं की पिन नंबर शोधून तुमच्या खात्या मधून हवी तेवढी रक्कम कोण्ही काढू शकतो . प्रत्येक नवीन तंत्र ज्ञान हे फक्त सोयीचं नसतं तर गैर सोयीचं सुद्धा असते . त्या मुळे ३d प्रिंटर चा गैर वापर कसा होवू शकतो ह्याची माहिती असणे गरजेचे आ

In reply to by Rajesh188

अनन्त अवधुत 23/07/2019 - 07:05
कसले लोक आहेत. गाड्यांचा शोध लागला तेव्हा फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे सोईचे इतकेच सांगितले. प्रदूषणाबद्दल कोणीच नाही बोलले. शिवाय गाडीच्या चाकाखाली येऊन मृत्यू होऊ शकतो असे पण कोणी नाही सांगितले. कोठलाही शोध हा कोणत्या बाजूने वापरायचा हे वापर करणाऱ्यावर ठरते. शिवाय एखाद्या शोधाचा गैर फायदा कोणी घेऊ लागले तर त्याला प्रतिबंध करणारी नवीन प्रणाली विकसित करण्यात येते, अथवा त्या शोधाच्या नवीन आवृत्त्या दुरुपयोगाला प्रतिबंध घालतात. उदा. एटीम बद्दलच सांगायचे तर आधी प्रत्येक व्यवहाराची माहिती खातेधारकाला एसमेएस ने कळवायचे (अजून पण कळवतात) पण त्याशिवाय २ फॅक्टर ऑथ आले. म्हणजे एखादा अनपेक्षित व्यवहार दिसला तर बँक तो व्यवहार पूर्ण होऊ देत नाही, पण ग्राहकाकडून कॉन्फीर्मशन घेते (उदा. one time पासवर्ड ). आता 3D तंत्रज्ञान वापरून कोणी घरीच बंदुका तयार केल्या तर?

लेख वाचता वाचता मनातउमटणा र्‍या शंका जोजो वाचीत गेलो तो तो दूर होत गेल्या. नंतर आलेल्या तांत्रिक तसेच वाह्यात शंका प्रतिसादात दूर झाल्या. लक्ष लक्ष धन्यवाद. अर्ध्या लेख लिहिल्याबद्दल आणि बाकीच्या त्यात आता नवीन भर टाकल्याबद्दल. मानवाच्या प्रगती पथावरचे भाष्य मस्त, तर्कसुसंगत आणि सहज पटणारे आहे.
डोळे चोळू नका. तुमचे डोळे ठीक आहेत... आणि इथे टंकनचूकही झालेली नाही ! तंत्रज्ञांनी विमानाचे इंजिन "छापण्याचे" तंत्र विकसित केले आहे आणि जवळच्या भविष्यात तुम्ही त्या तंत्राने बनवलेले इंजिन आणि इतर भाग वापरून बनवलेल्या विमानातून प्रवास करू शकाल ! .

त्रिमिती छपाई (3D printing) अथवा संयोगी वस्तुनिर्माण (Additive Manufacturing, AM)

तसे बघितले तर 3D छपाई ही काही नवीनं गोष्ट नाही. हे तंत्र १९८० मध्ये नागोया मुनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (जपान) मधील हिदेओ कोदामा या तंत्रज्ञाने विकसित केले.

देवस्थाने आणि भटजी....

मुक्त विहारि ·

hitesh 23/01/2015 - 01:47
धर्म हा इश्वरनिर्मित नसुन मानवनिर्मित व्यवसाय आहे

In reply to by hitesh

आजकाल तुमच्या , नेफळे , माई वगैरे लोकांच्या प्रतिसादाचा चांगला अंदाज बांधता यायला लागला आहे मला ;)

In reply to by कंजूस

खटपट्या 23/01/2015 - 05:39
हिंदुधर्मात अशी काही मतं व्यक्त करायचं आणि वेगळं वागण्याचं स्वातंत्र्यतरी आहे हेही नसे थोडके.
१००% सहमत. माझा गोरा बॉस मला विचारत होता की हींदू धर्मात असे काय आहे की तो तुला वेगळा वाटतो. मी सांगीतले की हींदू धर्म म्हणजे स्वातंत्र्य. अमकेच एक पुस्तक वाचले पाहीजे. नमाज पडलाच पाहीजे. पुजा केलीच पाहीजे असे काही नाही. कोणताही धर्मग्रंथ वाचा. कुराण वाचा, बायबल वाचा. मसजीदमधे जाउन नमाज पडा. चर्चमधे जा. काहीही खा. अगदी गोमांससुध्दा !! सर्व धर्म पाळायचे स्वातंत्र्य ज्याला आहे तो हींदू.

In reply to by टवाळ कार्टा

अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबर इंडोनेशियाच्या बाली प्रांतामध्ये ८०% पेक्षा जास्त जनता हिंदू आहे. तेथिल जनता गोमांस खाते, सणासुदीला तर नक्कीच (भारतात कोंबडी-मटण खाल्ले जाते तसेच). फक्त पुजारी मंडळी (ब्राच्मन) गोमांस खात नाहीत. अनेक संप्रदाय आणि चार वर्ण असले तरी त्या सर्वांत रोटीबेटी व्यवहार सहजपणे होतात. बालीत हिंदू धर्म भारतातून गेला. मात्र गेल्या काही शे वर्षांच्या इंडोनेशियाच्या मुस्लिमीकरणाच्या प्रक्रियेने ते बेट सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाने वेढले गेले आणि त्याचा भारतिय हिंदू समाजाशी संपर्क तुटला होता. हा इतिहास पाहता जातीव्यवस्थेची, शाकाहाराची आणि विषेशतः गोमांस न खाण्याची रुढी सुरू होण्यापूर्वी भारतातल्या हिंदू धर्माची काय परिस्थिती असावी याचा ठोकळ अंदाज बालीवरून यावा. बाकी प्राचीन भारतिय साहित्यात गोमांस खाण्याचेच नव्हे तर यज्ञाच्या कोणत्या प्रकारच्या पुरोहितांना यज्ञात बळी दिलेल्या पशूंचा (यात गायीबैलही होते) कोणता भाग द्यावा याचेही नियम नमूद केलेले आहेत. अवांतर : अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या 23/01/2015 - 15:46
अगदी मान्य.. फार काय पण आपल्याच देशात at least केरळमध्ये तरी कित्येक हिंदू कुटुंबे आवडीने गोमांस खातात. खात्रीने सांगतोय कारण पद्मनाभन मंदीराच्या ब्राह्मण वारसदाराने बनवलेली मस्तपैकी केरला बीफ करी खाल्ली आहे. आणि इतर केरळीयांकडून हे जाणून घेतलंय की तिकडे बीफ खाणे हा मोठ्ठा मुद्दा नाहीये.
अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.
याच्याशी बाडिस

In reply to by बॅटमॅन

बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय अथवा बैलाचे मांस. वील (Veal) : गाईच्या वासराचे मांस. कॅराबीफ (carabeef) : म्हैस अथवा रेड्याचे मांस.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 23/01/2015 - 17:13
वील आणि कॅराबीफ या संज्ञा माहिती नव्हत्या. गाय-बैल व म्हैस-रेडा या चारांपैकी कुणाचेही मांस म्हणजे बॉफ असे अगोदर समजत होतो. आता उलगडा झाला. धन्यवाद.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या 23/01/2015 - 17:19
+१ .. हेच म्हणायला आलो होतो. बादवे, भारतात बीफ मध्ये गाईपेक्षा बैल जास्त मिळतात असे ऐकून आहे ( प्रत्यक्ष विदा नाही आणि अनुभवही नाही). गाई उपयोगी असतात म्हणून खाटकाकडे लवकर नाही पोचत. बैल आजकाल ट्रॅक्टर वगैरेमुळे लगेच पोचतात. आता बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्या की तर Veal मध्येही त्यांचा टक्का अजून वाढेल.) पाश्चिमात्य देशात मात्र या बाबतीत "गाय-बैल समानता" आहे. :) व्यक्तिशः मी फक्त भारताबाहेर बीफ खाल्लय. भारतात बीफ न खाण्याचे कारण या प्राण्यांची निवड फक्त "अन्य उपयुक्तता संपल्यावर" आणि नकोसे झाल्यावर अशी होत असल्याने आणि बोकड अथवा कोंबडा जसा खाद्य-प्राणी म्हणून (पशु-शेती) वाढवला जातो तशी होत नसल्याने दर्जा बाबत शंकाच आहेत. बाकी मांसाहाराबाबत एक धागा हवा राव. अजून हरिण वगैरे चघळायला येतील मग.. ;)

In reply to by हाडक्या

बाकी मांसाहाराबाबत एक धागा हवा राव
एकदा रानडुकराची शिकार करुन बेत करावा काय हाडुकराव ;) ?

In reply to by कपिलमुनी

शेतात घुसलेल्या रानडुकराची शिकार करणे बेकायदेशीर नाही फक्त शिकार केरायच्या आधी पोलिसांना कळवावे की रानडुक्करे शेतात घुसुन नासाडी करीत आहेत , लोकांच्या जिवाला धोखा आहे . मग शिकार करावी . शिकार केली की वनविभागाला व्यवस्थित कळवावे , मग ते येवुन व्यवस्थित पंचनामा वगैरे करतात आणि रानडुकराला खड्डा वगैरे खणुन पुरतात आणि निघुन जातात . ते निघुन गेले की लगेच त्याला परत बाहेर काढावे आणि वजन करुन वाटण्या बिटण्या करुन पुढील बेत करावा !! असा विधी आजवर ऐकत आलो आहे , दुर्दैवाने कधी प्रत्यक्ष पहाण्याचा अनुभवण्याचा योग आलेला नाही . हमेरिकेत गेल्यावर एकदा तरी बिग गेम हंटिंग करायचा मानस आहे तिकडे इतके सव्यापसव्य करावे लागत नसावेत , स्टेट परमिट घेतले की झाले !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या 23/01/2015 - 19:19
एवढा सव्यपसव्य कुणी करायला सांगितलाय.. ? इथे आंग्लदेशात venison (शिकारीचे मटण) मिळते जे की नेहमी हरिण असते, ते आपले घ्यावे आणि खुश रहावे. बाकी तुम्ही हे आधी कधी केलेत आणि खाल्लेत की आपले नुसतेच शब्द ? ;)

In reply to by हाडक्या

इथे आंग्लदेशात venison (शिकारीचे मटण) मिळते जे की नेहमी हरिण असते, ते आपले घ्यावे आणि खुश रहावे.
श्या: 'विकत घेवुन' खाण्यात काय मजा . शिकार ती शिकारच ;) तुर्तास नुसतेच शब्द आहेत हो ... येतो एकदा आंग्ल देशात.... मग जावुयात मृगयेला !!

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या 23/01/2015 - 20:06
शब्दच काय.. बर्र.. :) या या .. आमाला पण मृगया करायला आवडेल हो, ती पण मृगाचीच. पण इथे रानटी हरणं मारायला बंदी आहे. पाळीव हरणांचे पदार्थ हाटिलात मिळतात. बादवे, भारतात रानडुकराच्या शिकारीबद्दल तुम्हास एवढे कसे माहीत असा प्रश्न पडलाय ? ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

खटपट्या 23/01/2015 - 23:15
कोकणात तर रानडुकराची शिकार सर्रास होते. आणि पोलीसही येत नाहीत. (तसे तर बोलावल्यावरही पोलीस येत नाहीत कोकणात :) ) पोलीस येउन मेलेल्या डुकराला गाडतात हे माहीत नव्हते. कोकणातले पोलीस तर वाटा घेउन जातील :)

In reply to by खटपट्या

हाडक्या 24/01/2015 - 18:42
पोलिस गाडत नाहीत सहसा.. त्यांना ही लॉजिकल कल्पना अस्ते आता काय बेत असणार ते. मग बर्‍याचदा ते चिरीमिरी, वाटा किंवा मग पार्टीचा लाभ घेणे प्रेफर कवाटा, ते पण अगदीच त्यांच्यापर्यंत पोचले तर. तुमचे शेत असेल, तुमचे गाव असेल तर पोलीस पण तुमचेच असतात इकडून तिकडून.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती 23/01/2015 - 01:51
+१. कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी । हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी ॥ किती वर्षांनी वाचले.

In reply to by रेवती

आणि हे दुसरे उदाहरण "देव देर्‍यात नाही देव नाही देवालयी" या गाण्यातल्या या ओळी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे

गदिमांना अभिवादन.

स्रुजा 23/01/2015 - 03:07
आवडला आणि पटला पण . लग्न झाल्यावर आई आम्हाला घेऊन कोल्हापूर ला गेली होती , तिथे जाई पर्यंत गर्दी , उन , रजा असले विचार मनात येत होते. त्यात नवरा पक्का नास्तिक त्याच्या मते हे कर्मकांडांच स्तोम ( पण पन्हाळा बघायला म्हणून साहेब यायला तयार झाले होते ). ते एक डोक्यात नसतं टेन्शन. दुपारी १२ च्या दरम्यान पोहोचलो मंदिरात , पार्किंग ची शोधा शोध करून आत गेलो , लाईन होतीच बऱ्यापैकी . पण आमचा नंबर आला आणि आरती ची वेळ झाली. त्या दिवशी गाभाऱ्यात फक्त बायकांना प्रवेश होता आरतीच्या वेळेला , आई मी आणि बहिण असं तिघींना गुरुजी आत घेऊन गेले , आत सगळ्या बायका होत्या . आत गेलो , आरती सुरु झाली आणि तो माहोल; तो गाभारा; देवीचा मुखवटा बघून अक्षरशः तिघींचे डोळे एका च वेळी भरून आले . का ? ते अजून ही कळलं नाही पण खूप खूप समाधान वाटून गेलं . तेन्व्हापासून कोल्हापूर आवडीचं मंदिर झालं आहे. तुमच्या गुहागरच्या आठवणीने ही आठवण ताजी झाली . जाता जाता : बिना गूरुजी सत्यनारायण कसा करायचा? इथले गुरुजी पूजा सांगायचे २०० $ घेतात , दक्षिणा आणि सामग्री अलग . एवढ्यात देव अक्खा भेटेल . म्हणून विचारते आहे. शिवाय मराठी गुरुजी नाही कुणी इथे.

In reply to by मंदार कात्रे

रच्याकने , कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील मुवि जी. मीदेखील इन्जिनीयरिंग पूर्ण होण्याआधी अर्धवेळ पुरोहितच होतो !

In reply to by मंदार कात्रे

एक गणपती-पुळे सोडले तर कोकणात "देवस्थाने आणि भटजी" ह्यांचा अनुभव उत्तम आहे.चिपळूणची विंध्य-वासिनी असो किंवा पावस किंवा मार्लेश्र्वेर किंवा वेळणेश्र्वेर..बहूतेक ठिकाणी भटजींचा अनुभव उत्तम आला आहे.जी दक्षिणा द्याल त्यात समाधान मानतात आणि कुठेही हपापले-पण नाही. गणपती-पुळ्याला १९७२ पासून दरवर्षी जात असल्याने सध्या तरी गणपती-पुळे इथे न जायचा निर्णय घेतला आहे. एक पिकनिक स्पॉट म्हणून गणपती-पुळे उत्तम. चिपळूणला असतांना बर्‍याच वेळा गेलो आहे.पाहुणे मंदिरात आणि आम्ही समुद्र-किनार्‍यावर. त्यांना मंदिरात देव भेटत असेल ही कदाचित, पण मला मात्र सुर्य-देव घरी जाता-जाता सुंदर रंगी-बेरंगी खेळ दाखवायचा. "गणपती-पुळ्यातील गणपती-दर्शन---> उत्कर्ष की र्‍हास?" हा पण एक काथ्या-कुट होवू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

स्पंदना 23/01/2015 - 05:59
>>"गणपती-पुळ्यातील गणपती-दर्शन---> उत्कर्ष की र्‍हास?" हा पण एक काथ्या-कुट होवू शकतो. >> या पेक्षा भारी काथ्या त्र्यबंकेश्वर मंदिर दर्शनाचा होउ शकतो. आणि कुटायच म्हंटल तर मी त्या त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!! *aggressive*

In reply to by स्पंदना

ह्या मंदिराबाबतीत आम्ही नशीबवान. एका पुजार्‍याने एक नवा पैसा न घेता, मागच्या दरवाज्याने प्रवेश दिला. असो, देवाची मर्जी. पण तिथला एकूण रागरंग बघता परत गेलो नाही.

In reply to by मुक्त विहारि

स्पंदना 23/01/2015 - 06:24
अहो १५ वर्षापूर्वी त्या मंदिराच्या फरसबंदीवर एक कोपरा गाठुन गप्प बसलो होतो. सारं मंदिर भोवताली फिरुन पाह्यलं होतं. तेथुन दिसणारा मागचा गोदावरीचा उगम असलेला डोंगर डोळेभरुन पाह्यला होता, आणि पायाखालुन झुळ्झुळ वाहणारं पाणी अनुभवलं होतं. या मंदिराच्या छताच्या तर मी खंप्लीट प्रेमात होते. काय उरलय आता तेथे? भिकार व्यवस्थापन.

In reply to by स्पंदना

पैसा 23/01/2015 - 12:28
त्र्यंबकेश्वराला त्या पुजार्‍यांच्या कैदेतून मुक्ती कधी मिळणार? मी आणि अपर्णा धडपडत तिथे पोचलो. रांगेत उभं राहण्याएवढा वेळ नव्हता. बाहेर देवडीवर बोर्ड लावलेला की पुजार्‍यांच्या माणसाला २०० रुपये द्या आणि लवकर दर्शन घ्या. फुकट २०० रुपये देण्यापेक्षा म्हटलं देवळाच्या आवारातून देवाचं लांबून दर्शन घेऊ आणि ते शिल्पसमृद्ध देऊळ बाहेरून तरी मनापासून बघू. कसलं नि काय! :( देवळाचा प्रांगणाचा मुख्य दरवाजा आणि मागचा दरवाजा दोन्ही दरवाज्यांवर पुजार्‍यांचे गुंड उभे होते. आम्ही आवाज चढवला पण त्यांनी प्रांगणात जाऊ दिलं नाही ते नाहीच. अपशब्दही वापरले. फक्त आम्ही बायका असल्याने धक्काबुक्की केली नाही इतकंच. पोलीस कुठेही नव्हते. देवळापासून एक किमि अंतरावर गाडी ठेवावी लागते. तिथे स्वस्तात दर्शन करवून देऊ असे बोर्ड आहेत. गाडी चोरीला जायची भीती आहे असे ही ऐकायला मिळाले. एवढ्या लांब जाऊन त्र्यंबकेश्वर काही भेटला नाही. विठोबाला मुक्ती मिळाली. असे आणखी किती देव पुजार्‍यांच्या विळख्यात अडकले आहेत तो देवच जाणे! याच्या उलट अनुभव शिर्डी आणि कोल्हापूरला आला. शिर्डीला व्यवस्था उत्तम आहे आणि व्यवस्थापनाचे लोकही नम्रपणे वागतात. परवा पुण्याहून येताना मी आणि प्रीतमोहर कोल्हापूरला गेलो होतो. अंबाबाईच्या दर्शनाला पुन्हा रांग होती. पण दुसर्‍या दरवाज्याने आत जाऊन लांबून देवीचे दर्शन घेऊन सहज बाहेर पडता येते. सामान ठेवायला मोठे लॉकर्स तासावारी भाड्याने देवळाच्या व्यवस्थापनाकडून मिळतात. चपला ठेवायचे पैसे अपेक्षित नाहीत. खांद्यावरच्या बॅगा आणि मोबाईल आत न्यायला बंदी नाही. एकूण मनसोक्त देऊळ बाहेरून पाहता येतं, आणि फोटोही काढता येतात.

In reply to by पैसा

सविता००१ 23/01/2015 - 12:43
कोल्हापूर द बेस्ट. मस्तच आहे. त्र्यंबकेश्वर बद्द्ल अतीव सहमत. तिथे आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच गेलो होतो तरीही धक्कबुक्की होतीच. व्यवस्थित आवाज चढवला आणि नीट वागा म्हणून सांगितलं तेव्हा आमच्यापुरती तरी गुर्मी उतरली होती.

In reply to by पैसा

उदय के'सागर 23/01/2015 - 14:42
१५ दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरला जाणं झालं, देव-दर्शनासाठी नाही पण काही नातेवाईंकाकडे जाण्यासाठी. गावात शिरता शिरताच त्या पार्किंगच्या इथला कलकलाट. तुम्हाला गावात गाडी नेता येत नाही, जरी मग देवदर्शनासाठी जात नसून नातेवाईकाकडे जायचं असेल तरीही. मग पार्कींग ची जी जागा होती, बापरे.. अशक्या चिचकुळ्या दगडांचं ते मैदान्, वाटलं गाडीचे टायर फुटतील. कश्याही गाड्या लावलेल्या, पार्कींग करण्यासाठी कूणी मार्गदर्शकही नाही. एवढ्या गर्दीत आणि तिथे फुगेवाले, भुट्टेवाले आणि इतर फेरीवाले - क-ह-र!!! एवढं करून कशीतरी गाडी पार्क करून, पायी चालायला सुरुवात केली (विनावाहन रस्त्यावर) तर नुसत्या माणसांची ही अशक्य गर्दी, रस्ते छोटे आणि घाण तर... अगं आई गं.... विचारू नका. गाडीतून उतरल्या उतरल्या पहिलंच पाऊल माझं एका कागदी द्रोणावर पडलं त्यात समोस्याची गोड चटणी असावी ती माझ्या पायावर सांडली, फ्लोटर मधून पायात शिरलं ते सगळं आणि तसाच चिकट पाय घेत चालावं लागलं पाणी मिळेपर्यंत, संताप नुसता. रस्त्यावर जनावरं कुठेही बसलेली, त्यांची घाण इतस्ततः.. खड्डे, त्यात साचलेलं पाणी त्यावर घोंघवाणारे किडे आणि त्याच्याच बाजूला खाण्याचे दुकानं आणि रमत-गमत खाणारे लोक. पर्यटक म्हणून किंवा भक्तगण म्हणून जे जातात ते एक-दोन फार्फार तर आठवडाभरासाठी तिथे जातात पण तिथले स्थानिक लोक कसे रहातात देव जाणे कि ते फक्त पैसा कमावतात त्यामुळे ह्या गोष्टींकडे त्याचं दुर्लक्ष असतं? हे सगळं त्र्यंबकेश्वराचं रुप पाहून वाटलं ईट्स वर्स्ट प्लेस ऑन प्लानेट अरे ज्या देवाच्या भक्तीने ओढीने तुम्ही जाता, त्याच्या दारात येउन असली घाण करायची लाज नाही का वाटत? ज्याला मानता त्याची तरी कदर करा, ही कसली भक्ती.

In reply to by मंदार कात्रे

सूड 23/01/2015 - 16:43
>>कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील मुवि जी.
अगदी!! आमच्या घरी जो येतो पुजा सांगायला तो मूळ गुहागरचा आहे. गेली जवळजवळ पाच-सहा वर्षे येतोय, पण दक्षिणा अमुक इतकी दे असं कधीही म्हटलेला नाही. भटजी कोब्रा असतील तर सांगितल्या वेळेला आणि तारखेला काहीही करुन हजर होतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. ;)

In reply to by मंदार कात्रे

स्रुजा 23/01/2015 - 04:07
तर काय ! आम्हाला वाटलंच होतं की थोडं महाग असेल म्हणजे ५० $ वगैरे. सामग्री वेगळी . त्याची तयारी होती आमची . २०० ऐकून च सर्द झालो. इथे जिथे मानवी हस्तक्षेप किंवा सहकार्य हवंय ते सगळंच महाग आहे पण साधारण ५०-६० $ तासाच्या हिशेबाने तुम्हाला ते सहकार्य मिळतं . आम्ही निघालो मग तिथून कसं बसं थातूर मातुर कारणं देत , आम्ही म्हणजे काय मीच. नवरा तिथे जणू भिंती बघायला आला होता. तुम्ही येताय ? या न ! ओळख करून देते मराठी मंडळात तुमची . बाकी तुम्ही पण २०० च घेणार असाल तर मधुरा म्हणते ती सीडी आणा हो प्लीज :P

In reply to by स्रुजा

रेवती 23/01/2015 - 07:13
आमच्या इथले गुर्जी वास्तूशांतीला $१२५ पहिल्या दोन तासासाठी, जर यजमानाने टैमपास केला तर दोन तासापुढील प्रत्येक तासाला $१००. या धाकाने सगळे यजमान जय्यत तयारी ठेवतात, व पटापट आवरतात. ;)

In reply to by स्रुजा

मी नास्तिक नाही. पण कर्मकांडांचा मी तीव्र विरोधक नक्कीच आहे. सत्यनारायण, गृहशांती, देवस्थान भेटी, वार्‍या आदी मी कधीच केलं नाही. बायको (अंध)श्रद्धावान आहे. तिच्या आग्रहाखातिर सोलापूर, पंढरपूर, आळंदी, जेजूरी, तुळजापूर, शिर्डी वगैरे ठिकाणी भेटी दिल्या पण देवस्थान परिसराची अस्वच्छ्ता, पुजारी-पुजेच्या सामानाचे विक्रेते, 'दलाल' आदींनी अत्यंत निराशाजनक अनुभव दिला आणि माझी नास्तिकता टोकाला पोहोचली. आस्तिक-श्रद्धावान विचारवंतांनी ह्यावर अनेकदा माझ्याशी वाद घालूनही मी बधत नाही पाहिल्यावर 'तूझी मतं तुझ्याजवळ, आमची मतं आमच्याजवळ' अशा वाक्याने वाद वादाचा समारोप करून माझे मुद्दे पटत असल्याचे स्विकारणे टाळले आहे. असो. हल्ली मी वादही घालत नाही. सत्यनारायण, गणेश स्थापना, गृहशांती आणि इतर अनेक शुभ कार्यांप्रमाणेच श्राद्ध-पक्ष, अस्थिविसर्जन वगैरे कार्यही मी टाळतो. माझ्या मृत्यूनंतर देहदान करण्याबाबतही मी माझ्या बायको-मुलाजवळ बोललो आहे. माझे स्वतःचेही कुठलेच 'दिवस' कार्य करायची नाहीत असा माझा आग्रह आहे. जी शुभकार्य करणे सर्वसामान्यपणे लोकांना 'आवडते' त्यातली कुठलीच मी आजतागायत केलेली नाहीत आणि करणार नाही. माझं कांहीही नुकसान झालेलं नाही. होमहवन, सत्यनारायण, भागवतसप्ताह, रोजची पूजाअर्चा वगैरे वगैरे करून आर्थिक स्पर्धेत इतरांवर अन्याय, दैनंदिन खोटारडेपणा, स्वार्थ, गैरव्यवहार करणारी अनेक माणसे फार जवळून मी पाहीली आहेत. (नीट परिक्षण केल्यास आपल्या सर्वांनाच ती दिसतील, कांही दिव्यदृष्टी लागत नाही). माणसांच्या वृत्तीतील हे वैगुण्य, विरोधाभास मला अधिकाधिक नास्तिक (त्यांच्या दृष्टीने) बनवितो. असो. कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या. तुम्हाला कुठल्याही देवस्थानाची, भडजींची, मोठमोठ्या दक्षिणांची कधी गरजच भासणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

खटपट्या 23/01/2015 - 11:48
१००% सहमत काका. कुलदैवत असल्यामुळे तुळजापूरला थोडा नाखुशीनेच गेलो होतो. पण देवळाच्या बाहेर घाण आणि डुकरे बघून उबग आला. त्यात हातात भेट्वस्तू घेउन फिरणारे फेरीवाले मागे लागत होते. मग त्यांच्यावरच राग काढायचे ठरवले. जो कोणी फेरीवाला येईल त्याला सांगायचो, "यावर तुमचे पोट आहे ना मग इथे जास्तीत जास्त लोक यावेत म्हणून तुम्हाला हा परीसर स्वच्छ ठेवावासा नाही वाटत?" यावर प्रत्येक जण "कुठून आलं हे यडं आमाला शानपना शीकवायला?" या अविर्भावात बघायला लागला. शेवटी ही माझी इथली शेवटची फेरी असे घरच्याना सांगून तिथून काढता पाय घेतला. --संपूर्ण नास्तिकतेकडे झूकत चाललेला

In reply to by खटपट्या

खटपट्या, अहो, फेरीवाल्यांनाच काय, मी तिथल्या व्यवस्थापक्/विश्वस्तांना लेखी तक्रार दिली होती. त्या काऊंटरवरच्या माणसाकडे पाहिल्यावर तो म्हणाला, 'काय लागेल ते लिहा, साहेब. कोणी वाचत नाही ही तक्रारवही.' त्याच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता. त्यापुढे जाऊन मी तिथल्या जिल्हाधिकार्‍याकडेही तक्रार पाठविली. आजतागायत कांही उत्तर/कारवाई/कार्यवाही नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

हाडक्या 23/01/2015 - 17:30
'काय लागेल ते लिहा, साहेब. कोणी वाचत नाही ही तक्रारवही.' त्याच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता.
हा हा हा .. हे भारी होतं काका. हेच आपल्या देशाचं दुखणं आहे. सर्वसामान्यतः लोकच इतके भ्रष्ट आहेत की सरकारला काय नावे ठेवायची ? पण ही अस्वच्छता लोकांच्या धार्मिक भावना कशा दुखवत नाही हे कोडेच आहे. शिकले सवरलेले लोक यापासून (म्हणजे तथाकथित धर्म, कर्मकांडे, संस्कृती इ.) दूर का जाताहेत ह्याचा मात्र याच स्वयंघोषित धर्म-रक्षकांना बोध होत नाही आणि मग मॅकालेपासून ते आजकालच्या पिढीपर्यंत सगळ्याचे उद्धार मात्र होत असतात.

In reply to by हाडक्या

बॅटमॅन 23/01/2015 - 17:38
आणि हे अख्ख्या देशभरच होतं असंही नाही बरंका...दक्षिणेतली देवळं बरी स्वच्छ टापटीप असतात एकदम? मग बाकीच्यांना काय धाड भरलीये? वायझेड साले.

In reply to by प्रभाकर पेठकर

बहुतेक देवस्थाने धर्मिक स्थाने न राहता "पैसा कमावणार्‍या धंद्याची स्थाने" झाल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे, देवस्थानांना भेट देणार्‍या गिर्‍हाईकांनी (श्रद्धाळू / पर्यटक) अस्वच्छता पाहून येणे बंद करायला लागल्याशिवाय स्वच्छतेवरचा खर्च हा "अनुत्पादक आणि पर्यायाने अनावश्यक खर्च" समजला जाईल. : हुकुमावरून

In reply to by स्रुजा

बिना गूरुजी सत्यनारायण कसा करायचा? सत्य नारायणावर आधी पण विचार मांडले आहेत.त्याची लिंक मिळाली तर देतो. आमच्या सत्यनारायाणाला मेहूण, ब्राह्मण किंवा कथा असे काही नसते. अत्यंत खेळीमेळीच्या आणि घरच्या ग्रुहिणीला आराम देत शिवाय थोडे-फार व्यावहारिक शिक्षण घेत आमचा सत्य-नारायण होतो.

In reply to by स्रुजा

सत्यनारायण पुजेची सीडी मिळते. ती आणु शकतेस. पुढच्या भारतभेटीत घेऊन ये किंवा कुणी येणारे असेल तिकडे तर त्यांना सांग.

In reply to by स्रुजा

जुइ 23/01/2015 - 04:51
कोल्हापुर हे आवड्ते देवस्थान आहे. त्याउलट अनुभव पंढरपुरात येतो ते तेथील पुजार्‍यांनमुळे. बाकी पुजा कशी करावी याची छोटी पुस्तके भारतात मिळतात.

In reply to by जुइ

स्रुजा 23/01/2015 - 04:56
अगं जर शोधाशोध करून app पण मिळालंय पण त्याचे पैसे दिल्याशिवाय ते कामाचं आहे की नाही कळणार नाही . गणपती बसवतो आम्ही दर वर्षी इथे तो अशाच एका app ची पूजा ऐकून च करतो , छान आहे ते app . हे पण तसं असलं तर बरं .

In reply to by स्रुजा

अनन्त अवधुत 23/01/2015 - 05:16
$२००? मला द्या, मी इकडेच असतो तुमचा तिकिटाचा पण खर्च वाचेल, शिवाय २०० मध्ये प्रसाद आणि पूजेचे सामान पण आणीन. पूजा online पण सांगू शकतो . सत्य नारायणाच्या पूजेला कशाला भटजी पाहिजे. आंतरजालावर शोधा समग्र पूजा कळेल. मी येथे सांगितलेली पूजा करतो.

In reply to by स्रुजा

स्पंदना 23/01/2015 - 05:46
सृजा, अग सीडी मिळते सत्यनारायण कथेची. नाहीतर मी सांगू का? अगदी व्यवस्थीत पूजा मांड आणि घरच्याच भटजीला बसव कथा वाचायला. पूजीसाठी भटजीच पाहिजे हे भटजींनी काढलेल्म पिल्लू आहे. खेड्यापाड्यातुन कुठे असतात भटजी? आमच सगळ बिन भटजीच चालत, आणि आमच्या देवाला चालत पण!!

In reply to by स्पंदना

स्रुजा 23/01/2015 - 05:54
अगं मला पण भटजी पाहिजेच असं नाही पण माझ्या नवऱ्याचा आनंद आहे एक नंबर या भानगडीत . मी नैवेद्याचा स्वैपाक करू का याला सांगू का आलेल्या मैत्रिणीला अटेंड करू असं होणार. गणपती बसवताना आम्ही ते app लावतो , तयारी असतेच, नवरा पूजा करतो , माझा स्वैपाक होतो एकिकडे . तसं मिळायला हवं गं . तुम्ही सीडी म्हणताय ती मी बघते बर्न करून मिळते आहे का , नाही तर i पूजा म्हणून app मिळालंय ते घेणार. आणि मला ना खरं तर , ते मंत्र वगैरे छान घरात घुमायला हवे आहेत , डिजिटल पण चालतील . @ अनंत अवधूत , मी तुमची साईट बघितली आत्ता तरी डावून आहे , थोड्या वेळाने पुन्हा बघते . धन्यवाद.

In reply to by स्रुजा

पण मुळात सत्यनारायण करायचाच कशाला आहे तुला? तुझा देवावर विश्वास आहे तर मन लावुन पुजा कर, छान नैवेद्य बनव, सत्यनारायणाचा शिरा बनव, इच्छा असल्यास लोकांना घरी खायला बोलाव म्हणजे त्या निमित्त्ताने लोक येतात. पण २००$ खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाच काहीतरी विधायक कर की.. तू म्हणुन बिन्धास्त सांगतेय.. तू आणि तुझा नवरा वेगळा विचार करु शकणार्‍यातले आहात.. बाकी अनेक हिंदु सण साज्रे करण्याच कारण मी समजु शकते.. पण "सत्यनारायण" मला तरी थोतांडच वाटतं.. (अवांतर - काल वॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज वाचला.. गाडगेबाबांचे सत्यनारायणाविषयीचे प्रवचन.. सुरेख आहे.. म्हणे पहिला सत्यनारायण केला त्या बायकांनी (पोथीतल्या गोष्टीतल्या ) त्यांनी कुठली पोथी वाचली मग?! )

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 23/01/2015 - 11:44
विषय निघालाच आहे म्हणून सांगायला हरकत नाही. सत्यनारायणाचा उगम बंगालमधील 'सत्यपीर' नामक कन्सेप्टमध्ये आहे.

In reply to by पिलीयन रायडर

स्पंदना 23/01/2015 - 17:04
नाहीतर काय? त्यात आणी भर म्हणजे त्यात भटजी किंवा ब्राह्मण बोलावल्याचे किंवा मेहूण जेवल्याचेपण वाचल्याचे आठवत नाही. उलट प्रसाद खावा असा माझ्या आवडीचा भाग आहे ;)

In reply to by पिलीयन रायडर

स्रुजा 23/01/2015 - 23:33
अगं २०० $ खर्च नाहीच करणार , भटजी नको च असं ते २०० $ ऐकून च ठरवलं . मला सत्यनारायण पूजे वर अति विश्वास नाहीये आणि मला ते थोतांड पण वाटत नाही . नवरा त्याला थोतांड म्हणतो आणि तावातावाने कथेच्या डीटेल्स वर वाद घालतो. मी त्या कथेकडे , खास करून सगळ्या वादग्रस्त मुद्द्यांकडे लक्ष देत नाही म्हणजे साधू वाण्याची कशी पंचाईत केली आणि कसं त्याला लायनीवर आणलं वगैरे. मला वाटतं की थोतांड हे बऱ्याचदा माणसांमुळे होतं म्हणजे त्या मंदिरातले गुरुजी आम्हाला म्हणे तुम्हाला काय त्रास आहे सांगा आम्ही यज्ञ सांगतो उपाय करतो . म्हणजे सत्यनारायण कदाचित एकदम स्वस्त पूजा असणार , म्हणून हे सगळं . आता या अशा वागण्यामुळे त्या पुजेचे वलय एकदम मानवी पातळीवर येतं . मला हे थोतांड वाटतं . बाकी असं पाहायला गेलं तर मला पूजा का करायची आहे तर घरात ते प्रसन्न वातावरण हवंय . त्यात संकल्प , उपासना आणि अगदी अथर्वशीर्ष म्हणलं तरी मला चालणार आहे . पण हे सगळं वर्षातून झालं की मला बरं वाटतं , का ते मला पण माहिती नाही. मला काही त्रास , संकटं आहेत का? तर नाही . मी उपास तापास करत नाही , नवरात्री ची सवाष्ण म्हणून पण त्या ९ दिवसांमध्ये जो रविवार असेल तेंवा मैत्रिणी ला बोलावते आणि तिच्या आवडीचा स्वैपाक करते, खास कुळधर्म म्हणून काही नाही . जिथे करायचे तिथे आपण बदल करतोच कालानुरूप पण मला ही नाळ तोडता येत नाहीये आणि मला त्यात जो पर्यंत मी त्याच्या आहारी जात नाही तो पर्यंत त्याच्यात काही चूक वाटत नाही . खरं सांगायचं तर ज्यांचा पर्ण विश्वास असतो आणि कधीच विश्वास नसतो अशांबद्दल मला आदर वाटतो जाम . कारण या एका विषयावर मला अजून माझा ठाम मत बनवता आलेलं नाहीये . मी माझ्यापुरतं एक धोरण ठेवलंय आणि तेवढं मी पाळते , आता काय करणार ? बाकी तू, आणि पेठकर का म्हन्तायेत तसा माझा नवरा आहे , नास्तिक . कर्मावर , माणसांवर विश्वास ठेवणारा . तो पूजा करणार आहे कारण त्याला तो स्वैपाक येत नाही . इतकं सरळ डिव्हिजन ऑफ लेबर आहे .

In reply to by स्रुजा

आमच्या बायकोचे पण हेच म्हणणे होते. साधा उपाय केला. गणपतीच्या दिवसात, १०-१२ मुलांना बोलावले आणि मस्त उदबत्ती लावून, अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केली.समारोपाला इडली-चटणी.मुलांना थोडी दक्षिणा पण दिली. बायको पण खूष, अनावश्यक अवडंबर नसल्याने आम्ही पण खूष आणि अन्न्दान झाल्याने सासू पण खूष आणि दक्षिणेसकट खायला मिळाल्याने ती मुले पण खूष.

In reply to by स्रुजा

इरसाल 24/01/2015 - 11:35
बघा त्याच अस झालं की साधुवाणी जहाज घेवुन किनार्‍याकडे येत असताना त्याला असे दिसले की पाकिस्तान वाले अमेरिकावाल्यांच्या मदतीने त्याच जहाज(ती पाणबुडी होती ;) ) अपहरण करायला येत आहेत. त्याने मारली पाण्यात बुडी, नेमकी त्याची बायको घाईघाईने त्याला पहायला धावतपळत आली प्रसाद न खाता बघते तर काय जहाज गायब. लोकांना संधी मिळाली बघ बघ प्रसाद नाही खाल्लास ना म्हणुन हे झाले, तिथे बसुन काय करणार म्हणुन गेली परत थोडा नाश्ता करुन येवु या विचारने खाल्ला थोडा शिरा. इकडे भारतीय हद्दीत जास्त वेळ काढु न शकल्याने गेले अमे-पाकी परत मग काय आली पाणबुडी (ते जहाज होते ;) ) वर. जहाज( ती पाणबुडी होती ;) ) वर साधु वाणी खुश, साधुवाणी परत आला म्हणुन त्याची बायको खुश, शिरा खाल्ला प्रसाद म्हणुन भटजी खुश. *** मी इतकेच पाहिले होते आगचे-मागचे मला नाय माहित, उगा आचरट प्रश्न विचारु नये.

In reply to by स्रुजा

हाडक्या 23/01/2015 - 16:54
आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा) कॅसेट लावायची.. अधिक माहितीसाठी त्यांनाच संपर्क करा.. (बुवांचा सत्यनारायण पर्त्येक्ष ऐकण्याचे भाग्य लाभलेला)

In reply to by हाडक्या

ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!
(कथा"पुनर्रचनाकथन-कार:- आत्मूबाबा'सुधारणावाले! ;) ) हि घ्या... मराठी/हिंदी कथा. - डाऊनलोडवा...आणि हवी तेंव्हा ऐका. नायतर एका चौरंगावर नुसता सत्यनारायणाचा फोटू ठिवा,त्येला गंध/अक्षता/हळद/कुकू/गुलाल्/बुक्का..फुलं/हार/तुळस वहा.. उदबत्ती/निरांजन ओवाळा..नंतर आपला शिर्‍याचा निवद दाखवा..आनी मंग ह्यी कथा ऐकून ,आरती करा... मंजी पंचोपचारी पूजा,कथा,आरती...असा सुटसुटीत खेळ व्हईल... :HAPPY: णाय का? :) १) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकायला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg ===================================== कथा बदलली वग्रे का? अन कशासाटी ? ..अशे प्रश्न कुनाला पडत असतील.. तर शंका णिर्सनासाटी इकडे या!

In reply to by अत्रुप्त आत्मा

कंजूस 23/01/2015 - 22:43
तुमच्या वरच्या लेखाकडे शीर्षक वाचून उघडला नव्हता पण आता तो लेख वाचला कथा फार मोठी आहे आणि मोबल्यात फ्लैश प्लेअर नाही तेव्हा एक विनंती तुमच्या आवडीचे कोणतेही (सत्यनारायणचेच हवेत असे नाही)पाच दहा श्लोक दोन तीन मिनीटे कालावधिचे साउंड रेकॉर्डीँग करून vocaroo dot com वर अपलोड करा अन लिंक द्या जे ऐकता येतील.एक झलक.

@ मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे ? म्हणजे कुठली करण्याची पद्धत धार्मिक द्रिष्ट्या योग्य इत्यादि धार्मिक मध्येही अनेक प्रकार असणार गोत्राप्रमाणे इत्यादि असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत ? हळू घ्या अशी विनंती

In reply to by देशपांडे विनायक

"मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे?" अजिबात नाही.भटजी सांगतात त्याप्रमाणे करतो. =============== "असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत?" मला बर्‍याच वेळा मंदिरात गेल्या नंतर कधी उत्तम मानसिक समाधान वाटते. विशेषतः गुहागर, वेळणेश्र्वर किंवा विंध्यवासिनी (चिपळूण) एक तर तिथे प्रगाढ शांतता असते आणि कुठलाही भटजी पैसे लुबाडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुहागरला थेट गाभार्‍यात जावून अभिषेक करता येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या मंदिरात गेल्या नंतर कुणाला समाधान वाटेल किंवा कुणाला नाही वाटणार.प्रत्येकाचे अनुभव वेगळे.

मदनबाण 23/01/2015 - 07:04
कस्तूरी कुन्डल बसे, मृग ढूढै बन माहि । ऐसे घट-घट राम हैं, दुनिया देखे नाहि ॥ इति:- संत कबिर

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

अजया 23/01/2015 - 07:25
देवस्थानाचे संस्थान झालेले असलेल्या ठिकाणी फक्त बाहेरुन स्थापत्य,मूर्तीकला बघुन अामची पूजा होते!त्यासाठी पूजारी लागत नाही!गर्दी गजबज बकाली झालेल्या तीर्थक्षेत्रात देव स्वतःच राहात नसणार!मग जाऊन आपला वेळ आणि ऊर्जा फुकट का घालवावी,भटजींची धन करायला!

कंजूस 23/01/2015 - 09:08
पैसे कमावण्यातही एकेका देवस्थानाचे {आणि वहिवाटदार पुजाऱ्यांचेही}भाग्य असते. बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते. (मारवाड्यांचा पंधरा दिवस अगोदर सुरू होतो ) .ट्रेकरांना या भोलेनाथाचा फार आधार आहे .एरवी इतक्या रानात कोण सोयी करेल ?

In reply to by कंजूस

सतिश गावडे 23/01/2015 - 09:48
बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते.
याचा अनुभव आमच्या एका छुप्या सनातनी मित्राने घेतला आहे. भटकंतीनिमित्त भिमाशंकरला गेलो असता मंदिरातील पुजार्यांनी गाभार्यात शंकराच्या पिंडीच्या जवळ जाण्यास मनाई केली. ती सुविधा फक्त पावती फाडून अभिषेक घालणार्यांसाठीच होती. आमचा हा मित्र एरव्ही वाद-विवादात कोणालाही सहसा हार न जाणारा. मात्र त्या दिवशी त्याचे काही चालले नाही. देवाच्या दरबारात कोणाचेच काही चालत नाही.

In reply to by सतिश गावडे

हाडक्या 23/01/2015 - 16:56
ब्राह्मण नसाल तर बहुतेक ठिकाणी (सगळीकडेच नव्हे तरीपण) हा अनुभव लाभतोच. तुमच्या छुप्या सनातनी मित्रास याचा तितकासा अनुभव नसावा. ;)

In reply to by हाडक्या

तोच तर मुद्दा आहे !! ब्राह्मण असुनही मंदीरातल्या पुजार्यांनी त्या छुपा सनातनी मित्राला तशी ट्र्रीटमेन्ट दिली , अर्थात त्यांना ब्राह्मण्याशी काही घेणे देणे नाहीये . त्यांचा संबंध फक्त पैशाशी आहे ... पैसा टाकेल तो देव आहे त्यांच्यासाठी अन पैसा टाकेल तो ब्राह्मण ! लाखभर रुपये देणगी टाकतो तेही विदाउट पावती असे म्हणाल तर पिंडी भोवती मिठी मारुन सेल्फीही काढुन देतील ते तुम्हाला यो मॅन पोझ मधे ! :D

In reply to by सतिश गावडे

अजया 23/01/2015 - 10:08
देव, पूजा याबाबतीत सत्य नक्कीच कंडिशनल असते!!शुध्द व्यवहार आहे तो!तुम्ही अशी पूजा करा हे फळ मिळेल!५०$मध्ये जरा कमी ,२००$मध्ये जास्त मिळेल ^_~

In reply to by अजया

आमच्या सत्यनारायणाला तुम्ही पण आला होतातच की... पैशांनी देव विकत घेता येत नाही आणि देव जर पैशांमुळे आणि रोज दर्शनाला गेल्यामुळे प्रसन्न होत असेल, तर तो देव नाही, असे माझे मत आहे. नाही वेचली कवडी-दमडी नाही वेचीला दाम बाई, मी विकत घेतला श्याम

hitesh 23/01/2015 - 01:47
धर्म हा इश्वरनिर्मित नसुन मानवनिर्मित व्यवसाय आहे

In reply to by hitesh

आजकाल तुमच्या , नेफळे , माई वगैरे लोकांच्या प्रतिसादाचा चांगला अंदाज बांधता यायला लागला आहे मला ;)

In reply to by कंजूस

खटपट्या 23/01/2015 - 05:39
हिंदुधर्मात अशी काही मतं व्यक्त करायचं आणि वेगळं वागण्याचं स्वातंत्र्यतरी आहे हेही नसे थोडके.
१००% सहमत. माझा गोरा बॉस मला विचारत होता की हींदू धर्मात असे काय आहे की तो तुला वेगळा वाटतो. मी सांगीतले की हींदू धर्म म्हणजे स्वातंत्र्य. अमकेच एक पुस्तक वाचले पाहीजे. नमाज पडलाच पाहीजे. पुजा केलीच पाहीजे असे काही नाही. कोणताही धर्मग्रंथ वाचा. कुराण वाचा, बायबल वाचा. मसजीदमधे जाउन नमाज पडा. चर्चमधे जा. काहीही खा. अगदी गोमांससुध्दा !! सर्व धर्म पाळायचे स्वातंत्र्य ज्याला आहे तो हींदू.

In reply to by टवाळ कार्टा

अगदी गोमांससुध्दा >> याबाबत साशंक पण बाकी सग्ळे बरोबर इंडोनेशियाच्या बाली प्रांतामध्ये ८०% पेक्षा जास्त जनता हिंदू आहे. तेथिल जनता गोमांस खाते, सणासुदीला तर नक्कीच (भारतात कोंबडी-मटण खाल्ले जाते तसेच). फक्त पुजारी मंडळी (ब्राच्मन) गोमांस खात नाहीत. अनेक संप्रदाय आणि चार वर्ण असले तरी त्या सर्वांत रोटीबेटी व्यवहार सहजपणे होतात. बालीत हिंदू धर्म भारतातून गेला. मात्र गेल्या काही शे वर्षांच्या इंडोनेशियाच्या मुस्लिमीकरणाच्या प्रक्रियेने ते बेट सर्व बाजूंनी मुस्लिम समाजाने वेढले गेले आणि त्याचा भारतिय हिंदू समाजाशी संपर्क तुटला होता. हा इतिहास पाहता जातीव्यवस्थेची, शाकाहाराची आणि विषेशतः गोमांस न खाण्याची रुढी सुरू होण्यापूर्वी भारतातल्या हिंदू धर्माची काय परिस्थिती असावी याचा ठोकळ अंदाज बालीवरून यावा. बाकी प्राचीन भारतिय साहित्यात गोमांस खाण्याचेच नव्हे तर यज्ञाच्या कोणत्या प्रकारच्या पुरोहितांना यज्ञात बळी दिलेल्या पशूंचा (यात गायीबैलही होते) कोणता भाग द्यावा याचेही नियम नमूद केलेले आहेत. अवांतर : अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या 23/01/2015 - 15:46
अगदी मान्य.. फार काय पण आपल्याच देशात at least केरळमध्ये तरी कित्येक हिंदू कुटुंबे आवडीने गोमांस खातात. खात्रीने सांगतोय कारण पद्मनाभन मंदीराच्या ब्राह्मण वारसदाराने बनवलेली मस्तपैकी केरला बीफ करी खाल्ली आहे. आणि इतर केरळीयांकडून हे जाणून घेतलंय की तिकडे बीफ खाणे हा मोठ्ठा मुद्दा नाहीये.
अर्थातच, मांस / गोमांस खावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आणि हक्क आहे हे नि:संशय. पण त्याचा अस्मिता वगैरेसाठी उपयोग करणे हास्यास्पद आहे.
याच्याशी बाडिस

In reply to by बॅटमॅन

बीफ : पूर्ण वाढ झालेल्या गाय अथवा बैलाचे मांस. वील (Veal) : गाईच्या वासराचे मांस. कॅराबीफ (carabeef) : म्हैस अथवा रेड्याचे मांस.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन 23/01/2015 - 17:13
वील आणि कॅराबीफ या संज्ञा माहिती नव्हत्या. गाय-बैल व म्हैस-रेडा या चारांपैकी कुणाचेही मांस म्हणजे बॉफ असे अगोदर समजत होतो. आता उलगडा झाला. धन्यवाद.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या 23/01/2015 - 17:19
+१ .. हेच म्हणायला आलो होतो. बादवे, भारतात बीफ मध्ये गाईपेक्षा बैल जास्त मिळतात असे ऐकून आहे ( प्रत्यक्ष विदा नाही आणि अनुभवही नाही). गाई उपयोगी असतात म्हणून खाटकाकडे लवकर नाही पोचत. बैल आजकाल ट्रॅक्टर वगैरेमुळे लगेच पोचतात. आता बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्या की तर Veal मध्येही त्यांचा टक्का अजून वाढेल.) पाश्चिमात्य देशात मात्र या बाबतीत "गाय-बैल समानता" आहे. :) व्यक्तिशः मी फक्त भारताबाहेर बीफ खाल्लय. भारतात बीफ न खाण्याचे कारण या प्राण्यांची निवड फक्त "अन्य उपयुक्तता संपल्यावर" आणि नकोसे झाल्यावर अशी होत असल्याने आणि बोकड अथवा कोंबडा जसा खाद्य-प्राणी म्हणून (पशु-शेती) वाढवला जातो तशी होत नसल्याने दर्जा बाबत शंकाच आहेत. बाकी मांसाहाराबाबत एक धागा हवा राव. अजून हरिण वगैरे चघळायला येतील मग.. ;)

In reply to by हाडक्या

बाकी मांसाहाराबाबत एक धागा हवा राव
एकदा रानडुकराची शिकार करुन बेत करावा काय हाडुकराव ;) ?

In reply to by कपिलमुनी

शेतात घुसलेल्या रानडुकराची शिकार करणे बेकायदेशीर नाही फक्त शिकार केरायच्या आधी पोलिसांना कळवावे की रानडुक्करे शेतात घुसुन नासाडी करीत आहेत , लोकांच्या जिवाला धोखा आहे . मग शिकार करावी . शिकार केली की वनविभागाला व्यवस्थित कळवावे , मग ते येवुन व्यवस्थित पंचनामा वगैरे करतात आणि रानडुकराला खड्डा वगैरे खणुन पुरतात आणि निघुन जातात . ते निघुन गेले की लगेच त्याला परत बाहेर काढावे आणि वजन करुन वाटण्या बिटण्या करुन पुढील बेत करावा !! असा विधी आजवर ऐकत आलो आहे , दुर्दैवाने कधी प्रत्यक्ष पहाण्याचा अनुभवण्याचा योग आलेला नाही . हमेरिकेत गेल्यावर एकदा तरी बिग गेम हंटिंग करायचा मानस आहे तिकडे इतके सव्यापसव्य करावे लागत नसावेत , स्टेट परमिट घेतले की झाले !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या 23/01/2015 - 19:19
एवढा सव्यपसव्य कुणी करायला सांगितलाय.. ? इथे आंग्लदेशात venison (शिकारीचे मटण) मिळते जे की नेहमी हरिण असते, ते आपले घ्यावे आणि खुश रहावे. बाकी तुम्ही हे आधी कधी केलेत आणि खाल्लेत की आपले नुसतेच शब्द ? ;)

In reply to by हाडक्या

इथे आंग्लदेशात venison (शिकारीचे मटण) मिळते जे की नेहमी हरिण असते, ते आपले घ्यावे आणि खुश रहावे.
श्या: 'विकत घेवुन' खाण्यात काय मजा . शिकार ती शिकारच ;) तुर्तास नुसतेच शब्द आहेत हो ... येतो एकदा आंग्ल देशात.... मग जावुयात मृगयेला !!

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या 23/01/2015 - 20:06
शब्दच काय.. बर्र.. :) या या .. आमाला पण मृगया करायला आवडेल हो, ती पण मृगाचीच. पण इथे रानटी हरणं मारायला बंदी आहे. पाळीव हरणांचे पदार्थ हाटिलात मिळतात. बादवे, भारतात रानडुकराच्या शिकारीबद्दल तुम्हास एवढे कसे माहीत असा प्रश्न पडलाय ? ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

खटपट्या 23/01/2015 - 23:15
कोकणात तर रानडुकराची शिकार सर्रास होते. आणि पोलीसही येत नाहीत. (तसे तर बोलावल्यावरही पोलीस येत नाहीत कोकणात :) ) पोलीस येउन मेलेल्या डुकराला गाडतात हे माहीत नव्हते. कोकणातले पोलीस तर वाटा घेउन जातील :)

In reply to by खटपट्या

हाडक्या 24/01/2015 - 18:42
पोलिस गाडत नाहीत सहसा.. त्यांना ही लॉजिकल कल्पना अस्ते आता काय बेत असणार ते. मग बर्‍याचदा ते चिरीमिरी, वाटा किंवा मग पार्टीचा लाभ घेणे प्रेफर कवाटा, ते पण अगदीच त्यांच्यापर्यंत पोचले तर. तुमचे शेत असेल, तुमचे गाव असेल तर पोलीस पण तुमचेच असतात इकडून तिकडून.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रेवती 23/01/2015 - 01:51
+१. कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी । हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी ॥ किती वर्षांनी वाचले.

In reply to by रेवती

आणि हे दुसरे उदाहरण "देव देर्‍यात नाही देव नाही देवालयी" या गाण्यातल्या या ओळी

देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे

गदिमांना अभिवादन.

स्रुजा 23/01/2015 - 03:07
आवडला आणि पटला पण . लग्न झाल्यावर आई आम्हाला घेऊन कोल्हापूर ला गेली होती , तिथे जाई पर्यंत गर्दी , उन , रजा असले विचार मनात येत होते. त्यात नवरा पक्का नास्तिक त्याच्या मते हे कर्मकांडांच स्तोम ( पण पन्हाळा बघायला म्हणून साहेब यायला तयार झाले होते ). ते एक डोक्यात नसतं टेन्शन. दुपारी १२ च्या दरम्यान पोहोचलो मंदिरात , पार्किंग ची शोधा शोध करून आत गेलो , लाईन होतीच बऱ्यापैकी . पण आमचा नंबर आला आणि आरती ची वेळ झाली. त्या दिवशी गाभाऱ्यात फक्त बायकांना प्रवेश होता आरतीच्या वेळेला , आई मी आणि बहिण असं तिघींना गुरुजी आत घेऊन गेले , आत सगळ्या बायका होत्या . आत गेलो , आरती सुरु झाली आणि तो माहोल; तो गाभारा; देवीचा मुखवटा बघून अक्षरशः तिघींचे डोळे एका च वेळी भरून आले . का ? ते अजून ही कळलं नाही पण खूप खूप समाधान वाटून गेलं . तेन्व्हापासून कोल्हापूर आवडीचं मंदिर झालं आहे. तुमच्या गुहागरच्या आठवणीने ही आठवण ताजी झाली . जाता जाता : बिना गूरुजी सत्यनारायण कसा करायचा? इथले गुरुजी पूजा सांगायचे २०० $ घेतात , दक्षिणा आणि सामग्री अलग . एवढ्यात देव अक्खा भेटेल . म्हणून विचारते आहे. शिवाय मराठी गुरुजी नाही कुणी इथे.

In reply to by मंदार कात्रे

रच्याकने , कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील मुवि जी. मीदेखील इन्जिनीयरिंग पूर्ण होण्याआधी अर्धवेळ पुरोहितच होतो !

In reply to by मंदार कात्रे

एक गणपती-पुळे सोडले तर कोकणात "देवस्थाने आणि भटजी" ह्यांचा अनुभव उत्तम आहे.चिपळूणची विंध्य-वासिनी असो किंवा पावस किंवा मार्लेश्र्वेर किंवा वेळणेश्र्वेर..बहूतेक ठिकाणी भटजींचा अनुभव उत्तम आला आहे.जी दक्षिणा द्याल त्यात समाधान मानतात आणि कुठेही हपापले-पण नाही. गणपती-पुळ्याला १९७२ पासून दरवर्षी जात असल्याने सध्या तरी गणपती-पुळे इथे न जायचा निर्णय घेतला आहे. एक पिकनिक स्पॉट म्हणून गणपती-पुळे उत्तम. चिपळूणला असतांना बर्‍याच वेळा गेलो आहे.पाहुणे मंदिरात आणि आम्ही समुद्र-किनार्‍यावर. त्यांना मंदिरात देव भेटत असेल ही कदाचित, पण मला मात्र सुर्य-देव घरी जाता-जाता सुंदर रंगी-बेरंगी खेळ दाखवायचा. "गणपती-पुळ्यातील गणपती-दर्शन---> उत्कर्ष की र्‍हास?" हा पण एक काथ्या-कुट होवू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

स्पंदना 23/01/2015 - 05:59
>>"गणपती-पुळ्यातील गणपती-दर्शन---> उत्कर्ष की र्‍हास?" हा पण एक काथ्या-कुट होवू शकतो. >> या पेक्षा भारी काथ्या त्र्यबंकेश्वर मंदिर दर्शनाचा होउ शकतो. आणि कुटायच म्हंटल तर मी त्या त्रंबकेश्वरच्या व्यव्स्थापनाला, चांगल उखळात घालुन कुटेन!! *aggressive*

In reply to by स्पंदना

ह्या मंदिराबाबतीत आम्ही नशीबवान. एका पुजार्‍याने एक नवा पैसा न घेता, मागच्या दरवाज्याने प्रवेश दिला. असो, देवाची मर्जी. पण तिथला एकूण रागरंग बघता परत गेलो नाही.

In reply to by मुक्त विहारि

स्पंदना 23/01/2015 - 06:24
अहो १५ वर्षापूर्वी त्या मंदिराच्या फरसबंदीवर एक कोपरा गाठुन गप्प बसलो होतो. सारं मंदिर भोवताली फिरुन पाह्यलं होतं. तेथुन दिसणारा मागचा गोदावरीचा उगम असलेला डोंगर डोळेभरुन पाह्यला होता, आणि पायाखालुन झुळ्झुळ वाहणारं पाणी अनुभवलं होतं. या मंदिराच्या छताच्या तर मी खंप्लीट प्रेमात होते. काय उरलय आता तेथे? भिकार व्यवस्थापन.

In reply to by स्पंदना

पैसा 23/01/2015 - 12:28
त्र्यंबकेश्वराला त्या पुजार्‍यांच्या कैदेतून मुक्ती कधी मिळणार? मी आणि अपर्णा धडपडत तिथे पोचलो. रांगेत उभं राहण्याएवढा वेळ नव्हता. बाहेर देवडीवर बोर्ड लावलेला की पुजार्‍यांच्या माणसाला २०० रुपये द्या आणि लवकर दर्शन घ्या. फुकट २०० रुपये देण्यापेक्षा म्हटलं देवळाच्या आवारातून देवाचं लांबून दर्शन घेऊ आणि ते शिल्पसमृद्ध देऊळ बाहेरून तरी मनापासून बघू. कसलं नि काय! :( देवळाचा प्रांगणाचा मुख्य दरवाजा आणि मागचा दरवाजा दोन्ही दरवाज्यांवर पुजार्‍यांचे गुंड उभे होते. आम्ही आवाज चढवला पण त्यांनी प्रांगणात जाऊ दिलं नाही ते नाहीच. अपशब्दही वापरले. फक्त आम्ही बायका असल्याने धक्काबुक्की केली नाही इतकंच. पोलीस कुठेही नव्हते. देवळापासून एक किमि अंतरावर गाडी ठेवावी लागते. तिथे स्वस्तात दर्शन करवून देऊ असे बोर्ड आहेत. गाडी चोरीला जायची भीती आहे असे ही ऐकायला मिळाले. एवढ्या लांब जाऊन त्र्यंबकेश्वर काही भेटला नाही. विठोबाला मुक्ती मिळाली. असे आणखी किती देव पुजार्‍यांच्या विळख्यात अडकले आहेत तो देवच जाणे! याच्या उलट अनुभव शिर्डी आणि कोल्हापूरला आला. शिर्डीला व्यवस्था उत्तम आहे आणि व्यवस्थापनाचे लोकही नम्रपणे वागतात. परवा पुण्याहून येताना मी आणि प्रीतमोहर कोल्हापूरला गेलो होतो. अंबाबाईच्या दर्शनाला पुन्हा रांग होती. पण दुसर्‍या दरवाज्याने आत जाऊन लांबून देवीचे दर्शन घेऊन सहज बाहेर पडता येते. सामान ठेवायला मोठे लॉकर्स तासावारी भाड्याने देवळाच्या व्यवस्थापनाकडून मिळतात. चपला ठेवायचे पैसे अपेक्षित नाहीत. खांद्यावरच्या बॅगा आणि मोबाईल आत न्यायला बंदी नाही. एकूण मनसोक्त देऊळ बाहेरून पाहता येतं, आणि फोटोही काढता येतात.

In reply to by पैसा

सविता००१ 23/01/2015 - 12:43
कोल्हापूर द बेस्ट. मस्तच आहे. त्र्यंबकेश्वर बद्द्ल अतीव सहमत. तिथे आम्ही मैत्रिणी मैत्रिणीच गेलो होतो तरीही धक्कबुक्की होतीच. व्यवस्थित आवाज चढवला आणि नीट वागा म्हणून सांगितलं तेव्हा आमच्यापुरती तरी गुर्मी उतरली होती.

In reply to by पैसा

उदय के'सागर 23/01/2015 - 14:42
१५ दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरला जाणं झालं, देव-दर्शनासाठी नाही पण काही नातेवाईंकाकडे जाण्यासाठी. गावात शिरता शिरताच त्या पार्किंगच्या इथला कलकलाट. तुम्हाला गावात गाडी नेता येत नाही, जरी मग देवदर्शनासाठी जात नसून नातेवाईकाकडे जायचं असेल तरीही. मग पार्कींग ची जी जागा होती, बापरे.. अशक्या चिचकुळ्या दगडांचं ते मैदान्, वाटलं गाडीचे टायर फुटतील. कश्याही गाड्या लावलेल्या, पार्कींग करण्यासाठी कूणी मार्गदर्शकही नाही. एवढ्या गर्दीत आणि तिथे फुगेवाले, भुट्टेवाले आणि इतर फेरीवाले - क-ह-र!!! एवढं करून कशीतरी गाडी पार्क करून, पायी चालायला सुरुवात केली (विनावाहन रस्त्यावर) तर नुसत्या माणसांची ही अशक्य गर्दी, रस्ते छोटे आणि घाण तर... अगं आई गं.... विचारू नका. गाडीतून उतरल्या उतरल्या पहिलंच पाऊल माझं एका कागदी द्रोणावर पडलं त्यात समोस्याची गोड चटणी असावी ती माझ्या पायावर सांडली, फ्लोटर मधून पायात शिरलं ते सगळं आणि तसाच चिकट पाय घेत चालावं लागलं पाणी मिळेपर्यंत, संताप नुसता. रस्त्यावर जनावरं कुठेही बसलेली, त्यांची घाण इतस्ततः.. खड्डे, त्यात साचलेलं पाणी त्यावर घोंघवाणारे किडे आणि त्याच्याच बाजूला खाण्याचे दुकानं आणि रमत-गमत खाणारे लोक. पर्यटक म्हणून किंवा भक्तगण म्हणून जे जातात ते एक-दोन फार्फार तर आठवडाभरासाठी तिथे जातात पण तिथले स्थानिक लोक कसे रहातात देव जाणे कि ते फक्त पैसा कमावतात त्यामुळे ह्या गोष्टींकडे त्याचं दुर्लक्ष असतं? हे सगळं त्र्यंबकेश्वराचं रुप पाहून वाटलं ईट्स वर्स्ट प्लेस ऑन प्लानेट अरे ज्या देवाच्या भक्तीने ओढीने तुम्ही जाता, त्याच्या दारात येउन असली घाण करायची लाज नाही का वाटत? ज्याला मानता त्याची तरी कदर करा, ही कसली भक्ती.

In reply to by मंदार कात्रे

सूड 23/01/2015 - 16:43
>>कोकणात शक्यतो सर्वत्र चांगलेच अनुभव येतील मुवि जी.
अगदी!! आमच्या घरी जो येतो पुजा सांगायला तो मूळ गुहागरचा आहे. गेली जवळजवळ पाच-सहा वर्षे येतोय, पण दक्षिणा अमुक इतकी दे असं कधीही म्हटलेला नाही. भटजी कोब्रा असतील तर सांगितल्या वेळेला आणि तारखेला काहीही करुन हजर होतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. ;)

In reply to by मंदार कात्रे

स्रुजा 23/01/2015 - 04:07
तर काय ! आम्हाला वाटलंच होतं की थोडं महाग असेल म्हणजे ५० $ वगैरे. सामग्री वेगळी . त्याची तयारी होती आमची . २०० ऐकून च सर्द झालो. इथे जिथे मानवी हस्तक्षेप किंवा सहकार्य हवंय ते सगळंच महाग आहे पण साधारण ५०-६० $ तासाच्या हिशेबाने तुम्हाला ते सहकार्य मिळतं . आम्ही निघालो मग तिथून कसं बसं थातूर मातुर कारणं देत , आम्ही म्हणजे काय मीच. नवरा तिथे जणू भिंती बघायला आला होता. तुम्ही येताय ? या न ! ओळख करून देते मराठी मंडळात तुमची . बाकी तुम्ही पण २०० च घेणार असाल तर मधुरा म्हणते ती सीडी आणा हो प्लीज :P

In reply to by स्रुजा

रेवती 23/01/2015 - 07:13
आमच्या इथले गुर्जी वास्तूशांतीला $१२५ पहिल्या दोन तासासाठी, जर यजमानाने टैमपास केला तर दोन तासापुढील प्रत्येक तासाला $१००. या धाकाने सगळे यजमान जय्यत तयारी ठेवतात, व पटापट आवरतात. ;)

In reply to by स्रुजा

मी नास्तिक नाही. पण कर्मकांडांचा मी तीव्र विरोधक नक्कीच आहे. सत्यनारायण, गृहशांती, देवस्थान भेटी, वार्‍या आदी मी कधीच केलं नाही. बायको (अंध)श्रद्धावान आहे. तिच्या आग्रहाखातिर सोलापूर, पंढरपूर, आळंदी, जेजूरी, तुळजापूर, शिर्डी वगैरे ठिकाणी भेटी दिल्या पण देवस्थान परिसराची अस्वच्छ्ता, पुजारी-पुजेच्या सामानाचे विक्रेते, 'दलाल' आदींनी अत्यंत निराशाजनक अनुभव दिला आणि माझी नास्तिकता टोकाला पोहोचली. आस्तिक-श्रद्धावान विचारवंतांनी ह्यावर अनेकदा माझ्याशी वाद घालूनही मी बधत नाही पाहिल्यावर 'तूझी मतं तुझ्याजवळ, आमची मतं आमच्याजवळ' अशा वाक्याने वाद वादाचा समारोप करून माझे मुद्दे पटत असल्याचे स्विकारणे टाळले आहे. असो. हल्ली मी वादही घालत नाही. सत्यनारायण, गणेश स्थापना, गृहशांती आणि इतर अनेक शुभ कार्यांप्रमाणेच श्राद्ध-पक्ष, अस्थिविसर्जन वगैरे कार्यही मी टाळतो. माझ्या मृत्यूनंतर देहदान करण्याबाबतही मी माझ्या बायको-मुलाजवळ बोललो आहे. माझे स्वतःचेही कुठलेच 'दिवस' कार्य करायची नाहीत असा माझा आग्रह आहे. जी शुभकार्य करणे सर्वसामान्यपणे लोकांना 'आवडते' त्यातली कुठलीच मी आजतागायत केलेली नाहीत आणि करणार नाही. माझं कांहीही नुकसान झालेलं नाही. होमहवन, सत्यनारायण, भागवतसप्ताह, रोजची पूजाअर्चा वगैरे वगैरे करून आर्थिक स्पर्धेत इतरांवर अन्याय, दैनंदिन खोटारडेपणा, स्वार्थ, गैरव्यवहार करणारी अनेक माणसे फार जवळून मी पाहीली आहेत. (नीट परिक्षण केल्यास आपल्या सर्वांनाच ती दिसतील, कांही दिव्यदृष्टी लागत नाही). माणसांच्या वृत्तीतील हे वैगुण्य, विरोधाभास मला अधिकाधिक नास्तिक (त्यांच्या दृष्टीने) बनवितो. असो. कर्मकांडं टाळा, सदवर्तनावर भर द्या. तुम्हाला कुठल्याही देवस्थानाची, भडजींची, मोठमोठ्या दक्षिणांची कधी गरजच भासणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

खटपट्या 23/01/2015 - 11:48
१००% सहमत काका. कुलदैवत असल्यामुळे तुळजापूरला थोडा नाखुशीनेच गेलो होतो. पण देवळाच्या बाहेर घाण आणि डुकरे बघून उबग आला. त्यात हातात भेट्वस्तू घेउन फिरणारे फेरीवाले मागे लागत होते. मग त्यांच्यावरच राग काढायचे ठरवले. जो कोणी फेरीवाला येईल त्याला सांगायचो, "यावर तुमचे पोट आहे ना मग इथे जास्तीत जास्त लोक यावेत म्हणून तुम्हाला हा परीसर स्वच्छ ठेवावासा नाही वाटत?" यावर प्रत्येक जण "कुठून आलं हे यडं आमाला शानपना शीकवायला?" या अविर्भावात बघायला लागला. शेवटी ही माझी इथली शेवटची फेरी असे घरच्याना सांगून तिथून काढता पाय घेतला. --संपूर्ण नास्तिकतेकडे झूकत चाललेला

In reply to by खटपट्या

खटपट्या, अहो, फेरीवाल्यांनाच काय, मी तिथल्या व्यवस्थापक्/विश्वस्तांना लेखी तक्रार दिली होती. त्या काऊंटरवरच्या माणसाकडे पाहिल्यावर तो म्हणाला, 'काय लागेल ते लिहा, साहेब. कोणी वाचत नाही ही तक्रारवही.' त्याच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता. त्यापुढे जाऊन मी तिथल्या जिल्हाधिकार्‍याकडेही तक्रार पाठविली. आजतागायत कांही उत्तर/कारवाई/कार्यवाही नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

हाडक्या 23/01/2015 - 17:30
'काय लागेल ते लिहा, साहेब. कोणी वाचत नाही ही तक्रारवही.' त्याच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास कौतुकास्पद होता.
हा हा हा .. हे भारी होतं काका. हेच आपल्या देशाचं दुखणं आहे. सर्वसामान्यतः लोकच इतके भ्रष्ट आहेत की सरकारला काय नावे ठेवायची ? पण ही अस्वच्छता लोकांच्या धार्मिक भावना कशा दुखवत नाही हे कोडेच आहे. शिकले सवरलेले लोक यापासून (म्हणजे तथाकथित धर्म, कर्मकांडे, संस्कृती इ.) दूर का जाताहेत ह्याचा मात्र याच स्वयंघोषित धर्म-रक्षकांना बोध होत नाही आणि मग मॅकालेपासून ते आजकालच्या पिढीपर्यंत सगळ्याचे उद्धार मात्र होत असतात.

In reply to by हाडक्या

बॅटमॅन 23/01/2015 - 17:38
आणि हे अख्ख्या देशभरच होतं असंही नाही बरंका...दक्षिणेतली देवळं बरी स्वच्छ टापटीप असतात एकदम? मग बाकीच्यांना काय धाड भरलीये? वायझेड साले.

In reply to by प्रभाकर पेठकर

बहुतेक देवस्थाने धर्मिक स्थाने न राहता "पैसा कमावणार्‍या धंद्याची स्थाने" झाल्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे, देवस्थानांना भेट देणार्‍या गिर्‍हाईकांनी (श्रद्धाळू / पर्यटक) अस्वच्छता पाहून येणे बंद करायला लागल्याशिवाय स्वच्छतेवरचा खर्च हा "अनुत्पादक आणि पर्यायाने अनावश्यक खर्च" समजला जाईल. : हुकुमावरून

In reply to by स्रुजा

बिना गूरुजी सत्यनारायण कसा करायचा? सत्य नारायणावर आधी पण विचार मांडले आहेत.त्याची लिंक मिळाली तर देतो. आमच्या सत्यनारायाणाला मेहूण, ब्राह्मण किंवा कथा असे काही नसते. अत्यंत खेळीमेळीच्या आणि घरच्या ग्रुहिणीला आराम देत शिवाय थोडे-फार व्यावहारिक शिक्षण घेत आमचा सत्य-नारायण होतो.

In reply to by स्रुजा

सत्यनारायण पुजेची सीडी मिळते. ती आणु शकतेस. पुढच्या भारतभेटीत घेऊन ये किंवा कुणी येणारे असेल तिकडे तर त्यांना सांग.

In reply to by स्रुजा

जुइ 23/01/2015 - 04:51
कोल्हापुर हे आवड्ते देवस्थान आहे. त्याउलट अनुभव पंढरपुरात येतो ते तेथील पुजार्‍यांनमुळे. बाकी पुजा कशी करावी याची छोटी पुस्तके भारतात मिळतात.

In reply to by जुइ

स्रुजा 23/01/2015 - 04:56
अगं जर शोधाशोध करून app पण मिळालंय पण त्याचे पैसे दिल्याशिवाय ते कामाचं आहे की नाही कळणार नाही . गणपती बसवतो आम्ही दर वर्षी इथे तो अशाच एका app ची पूजा ऐकून च करतो , छान आहे ते app . हे पण तसं असलं तर बरं .

In reply to by स्रुजा

अनन्त अवधुत 23/01/2015 - 05:16
$२००? मला द्या, मी इकडेच असतो तुमचा तिकिटाचा पण खर्च वाचेल, शिवाय २०० मध्ये प्रसाद आणि पूजेचे सामान पण आणीन. पूजा online पण सांगू शकतो . सत्य नारायणाच्या पूजेला कशाला भटजी पाहिजे. आंतरजालावर शोधा समग्र पूजा कळेल. मी येथे सांगितलेली पूजा करतो.

In reply to by स्रुजा

स्पंदना 23/01/2015 - 05:46
सृजा, अग सीडी मिळते सत्यनारायण कथेची. नाहीतर मी सांगू का? अगदी व्यवस्थीत पूजा मांड आणि घरच्याच भटजीला बसव कथा वाचायला. पूजीसाठी भटजीच पाहिजे हे भटजींनी काढलेल्म पिल्लू आहे. खेड्यापाड्यातुन कुठे असतात भटजी? आमच सगळ बिन भटजीच चालत, आणि आमच्या देवाला चालत पण!!

In reply to by स्पंदना

स्रुजा 23/01/2015 - 05:54
अगं मला पण भटजी पाहिजेच असं नाही पण माझ्या नवऱ्याचा आनंद आहे एक नंबर या भानगडीत . मी नैवेद्याचा स्वैपाक करू का याला सांगू का आलेल्या मैत्रिणीला अटेंड करू असं होणार. गणपती बसवताना आम्ही ते app लावतो , तयारी असतेच, नवरा पूजा करतो , माझा स्वैपाक होतो एकिकडे . तसं मिळायला हवं गं . तुम्ही सीडी म्हणताय ती मी बघते बर्न करून मिळते आहे का , नाही तर i पूजा म्हणून app मिळालंय ते घेणार. आणि मला ना खरं तर , ते मंत्र वगैरे छान घरात घुमायला हवे आहेत , डिजिटल पण चालतील . @ अनंत अवधूत , मी तुमची साईट बघितली आत्ता तरी डावून आहे , थोड्या वेळाने पुन्हा बघते . धन्यवाद.

In reply to by स्रुजा

पण मुळात सत्यनारायण करायचाच कशाला आहे तुला? तुझा देवावर विश्वास आहे तर मन लावुन पुजा कर, छान नैवेद्य बनव, सत्यनारायणाचा शिरा बनव, इच्छा असल्यास लोकांना घरी खायला बोलाव म्हणजे त्या निमित्त्ताने लोक येतात. पण २००$ खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाच काहीतरी विधायक कर की.. तू म्हणुन बिन्धास्त सांगतेय.. तू आणि तुझा नवरा वेगळा विचार करु शकणार्‍यातले आहात.. बाकी अनेक हिंदु सण साज्रे करण्याच कारण मी समजु शकते.. पण "सत्यनारायण" मला तरी थोतांडच वाटतं.. (अवांतर - काल वॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज वाचला.. गाडगेबाबांचे सत्यनारायणाविषयीचे प्रवचन.. सुरेख आहे.. म्हणे पहिला सत्यनारायण केला त्या बायकांनी (पोथीतल्या गोष्टीतल्या ) त्यांनी कुठली पोथी वाचली मग?! )

In reply to by पिलीयन रायडर

बॅटमॅन 23/01/2015 - 11:44
विषय निघालाच आहे म्हणून सांगायला हरकत नाही. सत्यनारायणाचा उगम बंगालमधील 'सत्यपीर' नामक कन्सेप्टमध्ये आहे.

In reply to by पिलीयन रायडर

स्पंदना 23/01/2015 - 17:04
नाहीतर काय? त्यात आणी भर म्हणजे त्यात भटजी किंवा ब्राह्मण बोलावल्याचे किंवा मेहूण जेवल्याचेपण वाचल्याचे आठवत नाही. उलट प्रसाद खावा असा माझ्या आवडीचा भाग आहे ;)

In reply to by पिलीयन रायडर

स्रुजा 23/01/2015 - 23:33
अगं २०० $ खर्च नाहीच करणार , भटजी नको च असं ते २०० $ ऐकून च ठरवलं . मला सत्यनारायण पूजे वर अति विश्वास नाहीये आणि मला ते थोतांड पण वाटत नाही . नवरा त्याला थोतांड म्हणतो आणि तावातावाने कथेच्या डीटेल्स वर वाद घालतो. मी त्या कथेकडे , खास करून सगळ्या वादग्रस्त मुद्द्यांकडे लक्ष देत नाही म्हणजे साधू वाण्याची कशी पंचाईत केली आणि कसं त्याला लायनीवर आणलं वगैरे. मला वाटतं की थोतांड हे बऱ्याचदा माणसांमुळे होतं म्हणजे त्या मंदिरातले गुरुजी आम्हाला म्हणे तुम्हाला काय त्रास आहे सांगा आम्ही यज्ञ सांगतो उपाय करतो . म्हणजे सत्यनारायण कदाचित एकदम स्वस्त पूजा असणार , म्हणून हे सगळं . आता या अशा वागण्यामुळे त्या पुजेचे वलय एकदम मानवी पातळीवर येतं . मला हे थोतांड वाटतं . बाकी असं पाहायला गेलं तर मला पूजा का करायची आहे तर घरात ते प्रसन्न वातावरण हवंय . त्यात संकल्प , उपासना आणि अगदी अथर्वशीर्ष म्हणलं तरी मला चालणार आहे . पण हे सगळं वर्षातून झालं की मला बरं वाटतं , का ते मला पण माहिती नाही. मला काही त्रास , संकटं आहेत का? तर नाही . मी उपास तापास करत नाही , नवरात्री ची सवाष्ण म्हणून पण त्या ९ दिवसांमध्ये जो रविवार असेल तेंवा मैत्रिणी ला बोलावते आणि तिच्या आवडीचा स्वैपाक करते, खास कुळधर्म म्हणून काही नाही . जिथे करायचे तिथे आपण बदल करतोच कालानुरूप पण मला ही नाळ तोडता येत नाहीये आणि मला त्यात जो पर्यंत मी त्याच्या आहारी जात नाही तो पर्यंत त्याच्यात काही चूक वाटत नाही . खरं सांगायचं तर ज्यांचा पर्ण विश्वास असतो आणि कधीच विश्वास नसतो अशांबद्दल मला आदर वाटतो जाम . कारण या एका विषयावर मला अजून माझा ठाम मत बनवता आलेलं नाहीये . मी माझ्यापुरतं एक धोरण ठेवलंय आणि तेवढं मी पाळते , आता काय करणार ? बाकी तू, आणि पेठकर का म्हन्तायेत तसा माझा नवरा आहे , नास्तिक . कर्मावर , माणसांवर विश्वास ठेवणारा . तो पूजा करणार आहे कारण त्याला तो स्वैपाक येत नाही . इतकं सरळ डिव्हिजन ऑफ लेबर आहे .

In reply to by स्रुजा

आमच्या बायकोचे पण हेच म्हणणे होते. साधा उपाय केला. गणपतीच्या दिवसात, १०-१२ मुलांना बोलावले आणि मस्त उदबत्ती लावून, अथर्वशीर्षाची २१ आवर्तने केली.समारोपाला इडली-चटणी.मुलांना थोडी दक्षिणा पण दिली. बायको पण खूष, अनावश्यक अवडंबर नसल्याने आम्ही पण खूष आणि अन्न्दान झाल्याने सासू पण खूष आणि दक्षिणेसकट खायला मिळाल्याने ती मुले पण खूष.

In reply to by स्रुजा

इरसाल 24/01/2015 - 11:35
बघा त्याच अस झालं की साधुवाणी जहाज घेवुन किनार्‍याकडे येत असताना त्याला असे दिसले की पाकिस्तान वाले अमेरिकावाल्यांच्या मदतीने त्याच जहाज(ती पाणबुडी होती ;) ) अपहरण करायला येत आहेत. त्याने मारली पाण्यात बुडी, नेमकी त्याची बायको घाईघाईने त्याला पहायला धावतपळत आली प्रसाद न खाता बघते तर काय जहाज गायब. लोकांना संधी मिळाली बघ बघ प्रसाद नाही खाल्लास ना म्हणुन हे झाले, तिथे बसुन काय करणार म्हणुन गेली परत थोडा नाश्ता करुन येवु या विचारने खाल्ला थोडा शिरा. इकडे भारतीय हद्दीत जास्त वेळ काढु न शकल्याने गेले अमे-पाकी परत मग काय आली पाणबुडी (ते जहाज होते ;) ) वर. जहाज( ती पाणबुडी होती ;) ) वर साधु वाणी खुश, साधुवाणी परत आला म्हणुन त्याची बायको खुश, शिरा खाल्ला प्रसाद म्हणुन भटजी खुश. *** मी इतकेच पाहिले होते आगचे-मागचे मला नाय माहित, उगा आचरट प्रश्न विचारु नये.

In reply to by स्रुजा

हाडक्या 23/01/2015 - 16:54
आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा) कॅसेट लावायची.. अधिक माहितीसाठी त्यांनाच संपर्क करा.. (बुवांचा सत्यनारायण पर्त्येक्ष ऐकण्याचे भाग्य लाभलेला)

In reply to by हाडक्या

ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!
(कथा"पुनर्रचनाकथन-कार:- आत्मूबाबा'सुधारणावाले! ;) ) हि घ्या... मराठी/हिंदी कथा. - डाऊनलोडवा...आणि हवी तेंव्हा ऐका. नायतर एका चौरंगावर नुसता सत्यनारायणाचा फोटू ठिवा,त्येला गंध/अक्षता/हळद/कुकू/गुलाल्/बुक्का..फुलं/हार/तुळस वहा.. उदबत्ती/निरांजन ओवाळा..नंतर आपला शिर्‍याचा निवद दाखवा..आनी मंग ह्यी कथा ऐकून ,आरती करा... मंजी पंचोपचारी पूजा,कथा,आरती...असा सुटसुटीत खेळ व्हईल... :HAPPY: णाय का? :) १) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकायला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg ===================================== कथा बदलली वग्रे का? अन कशासाटी ? ..अशे प्रश्न कुनाला पडत असतील.. तर शंका णिर्सनासाटी इकडे या!

In reply to by अत्रुप्त आत्मा

कंजूस 23/01/2015 - 22:43
तुमच्या वरच्या लेखाकडे शीर्षक वाचून उघडला नव्हता पण आता तो लेख वाचला कथा फार मोठी आहे आणि मोबल्यात फ्लैश प्लेअर नाही तेव्हा एक विनंती तुमच्या आवडीचे कोणतेही (सत्यनारायणचेच हवेत असे नाही)पाच दहा श्लोक दोन तीन मिनीटे कालावधिचे साउंड रेकॉर्डीँग करून vocaroo dot com वर अपलोड करा अन लिंक द्या जे ऐकता येतील.एक झलक.

@ मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे ? म्हणजे कुठली करण्याची पद्धत धार्मिक द्रिष्ट्या योग्य इत्यादि धार्मिक मध्येही अनेक प्रकार असणार गोत्राप्रमाणे इत्यादि असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत ? हळू घ्या अशी विनंती

In reply to by देशपांडे विनायक

"मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे?" अजिबात नाही.भटजी सांगतात त्याप्रमाणे करतो. =============== "असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत?" मला बर्‍याच वेळा मंदिरात गेल्या नंतर कधी उत्तम मानसिक समाधान वाटते. विशेषतः गुहागर, वेळणेश्र्वर किंवा विंध्यवासिनी (चिपळूण) एक तर तिथे प्रगाढ शांतता असते आणि कुठलाही भटजी पैसे लुबाडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुहागरला थेट गाभार्‍यात जावून अभिषेक करता येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या मंदिरात गेल्या नंतर कुणाला समाधान वाटेल किंवा कुणाला नाही वाटणार.प्रत्येकाचे अनुभव वेगळे.

मदनबाण 23/01/2015 - 07:04
कस्तूरी कुन्डल बसे, मृग ढूढै बन माहि । ऐसे घट-घट राम हैं, दुनिया देखे नाहि ॥ इति:- संत कबिर

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

अजया 23/01/2015 - 07:25
देवस्थानाचे संस्थान झालेले असलेल्या ठिकाणी फक्त बाहेरुन स्थापत्य,मूर्तीकला बघुन अामची पूजा होते!त्यासाठी पूजारी लागत नाही!गर्दी गजबज बकाली झालेल्या तीर्थक्षेत्रात देव स्वतःच राहात नसणार!मग जाऊन आपला वेळ आणि ऊर्जा फुकट का घालवावी,भटजींची धन करायला!

कंजूस 23/01/2015 - 09:08
पैसे कमावण्यातही एकेका देवस्थानाचे {आणि वहिवाटदार पुजाऱ्यांचेही}भाग्य असते. बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते. (मारवाड्यांचा पंधरा दिवस अगोदर सुरू होतो ) .ट्रेकरांना या भोलेनाथाचा फार आधार आहे .एरवी इतक्या रानात कोण सोयी करेल ?

In reply to by कंजूस

सतिश गावडे 23/01/2015 - 09:48
बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते.
याचा अनुभव आमच्या एका छुप्या सनातनी मित्राने घेतला आहे. भटकंतीनिमित्त भिमाशंकरला गेलो असता मंदिरातील पुजार्यांनी गाभार्यात शंकराच्या पिंडीच्या जवळ जाण्यास मनाई केली. ती सुविधा फक्त पावती फाडून अभिषेक घालणार्यांसाठीच होती. आमचा हा मित्र एरव्ही वाद-विवादात कोणालाही सहसा हार न जाणारा. मात्र त्या दिवशी त्याचे काही चालले नाही. देवाच्या दरबारात कोणाचेच काही चालत नाही.

In reply to by सतिश गावडे

हाडक्या 23/01/2015 - 16:56
ब्राह्मण नसाल तर बहुतेक ठिकाणी (सगळीकडेच नव्हे तरीपण) हा अनुभव लाभतोच. तुमच्या छुप्या सनातनी मित्रास याचा तितकासा अनुभव नसावा. ;)

In reply to by हाडक्या

तोच तर मुद्दा आहे !! ब्राह्मण असुनही मंदीरातल्या पुजार्यांनी त्या छुपा सनातनी मित्राला तशी ट्र्रीटमेन्ट दिली , अर्थात त्यांना ब्राह्मण्याशी काही घेणे देणे नाहीये . त्यांचा संबंध फक्त पैशाशी आहे ... पैसा टाकेल तो देव आहे त्यांच्यासाठी अन पैसा टाकेल तो ब्राह्मण ! लाखभर रुपये देणगी टाकतो तेही विदाउट पावती असे म्हणाल तर पिंडी भोवती मिठी मारुन सेल्फीही काढुन देतील ते तुम्हाला यो मॅन पोझ मधे ! :D

In reply to by सतिश गावडे

अजया 23/01/2015 - 10:08
देव, पूजा याबाबतीत सत्य नक्कीच कंडिशनल असते!!शुध्द व्यवहार आहे तो!तुम्ही अशी पूजा करा हे फळ मिळेल!५०$मध्ये जरा कमी ,२००$मध्ये जास्त मिळेल ^_~

In reply to by अजया

आमच्या सत्यनारायणाला तुम्ही पण आला होतातच की... पैशांनी देव विकत घेता येत नाही आणि देव जर पैशांमुळे आणि रोज दर्शनाला गेल्यामुळे प्रसन्न होत असेल, तर तो देव नाही, असे माझे मत आहे. नाही वेचली कवडी-दमडी नाही वेचीला दाम बाई, मी विकत घेतला श्याम
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.

आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२

५० फक्त ·

आयला.... स्पार्टाकस्,बोका, अ.आ. आणि ५० फक्त ही एक नंबरची डामरट चौकडी आहे. काय एक एक वाचायला आणतील, ह्याचा नेम नाही.... कथानक मस्त रंगत आहे.

In reply to by किसन शिंदे

स्पंदना 22/01/2015 - 09:42
आवं मागल्या टायमाला वैनी गोद बातमी द्यायच्या होत्या. आता मेंबरं वाढल्याचे पण सांगुन झाले. मग लागणारच ना टाईम.

खमक्या 23/01/2015 - 07:41
त्ये 'धन्या'भाउजी कोण ते समजले. पर म्या ईच्चार करुन राह्यलोय की ते भूत कोण असेल? ईथं कुठल्या नावानं असंल. 'आत्मा' असं हाय इथं एकाचं नाव. पर त्यो माणूस चांगला हाय. देवाधर्माचं, पुजेचं बघतो त्यो. त्यो नसंल भूत.

आयला.... स्पार्टाकस्,बोका, अ.आ. आणि ५० फक्त ही एक नंबरची डामरट चौकडी आहे. काय एक एक वाचायला आणतील, ह्याचा नेम नाही.... कथानक मस्त रंगत आहे.

In reply to by किसन शिंदे

स्पंदना 22/01/2015 - 09:42
आवं मागल्या टायमाला वैनी गोद बातमी द्यायच्या होत्या. आता मेंबरं वाढल्याचे पण सांगुन झाले. मग लागणारच ना टाईम.

खमक्या 23/01/2015 - 07:41
त्ये 'धन्या'भाउजी कोण ते समजले. पर म्या ईच्चार करुन राह्यलोय की ते भूत कोण असेल? ईथं कुठल्या नावानं असंल. 'आत्मा' असं हाय इथं एकाचं नाव. पर त्यो माणूस चांगला हाय. देवाधर्माचं, पुजेचं बघतो त्यो. त्यो नसंल भूत.
आर्ट ऑफ द स्टेट भाग -०१ http://misalpav.com/node/29885 ' हेम्या, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर' भाग -०२ 'माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा, शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या. मेव्हणा खिडकीत उभा राहुन टॅबकडं पाहात होता वेड्यासारखा.

श्रद्धांजली - डॉ. वसंत गोवारीकर

विकास ·

बोका-ए-आझम 03/01/2015 - 02:10
मी पुणे विद्यापीठात शिकत असताना डाॅ.गोवारीकर कुलगुरू होते. दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेटीचा योग आला होता. अतिशय साधे, शिस्तप्रिय आणि तितकेच प्रेमळ व्यक्तिमत्त्व. विांनम्र श्रद्धांजली!

सुधीर 03/01/2015 - 13:46
डॉ. गोवारीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बोका-ए-आझम 03/01/2015 - 02:10
मी पुणे विद्यापीठात शिकत असताना डाॅ.गोवारीकर कुलगुरू होते. दोन-तीन वेळा प्रत्यक्ष भेटीचा योग आला होता. अतिशय साधे, शिस्तप्रिय आणि तितकेच प्रेमळ व्यक्तिमत्त्व. विांनम्र श्रद्धांजली!

सुधीर 03/01/2015 - 13:46
डॉ. गोवारीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Dr.

आर्ट ऑफ द स्टेट

५० फक्त ·

पैसा 01/01/2015 - 12:09
हेम्या इस ब्याक! मजा आली!! क्रमशः विसरलंय ना?

आज ऑफीसमधली कामे निपटली आणि ह्या हेम्याचा शोध घेतला... सुसाट लिहीले आहे.... (आता हेम्या-पार्ट-२ प्रतिक्षेत.)

मदनबाण 02/01/2015 - 13:46

पैसा 01/01/2015 - 12:09
हेम्या इस ब्याक! मजा आली!! क्रमशः विसरलंय ना?

आज ऑफीसमधली कामे निपटली आणि ह्या हेम्याचा शोध घेतला... सुसाट लिहीले आहे.... (आता हेम्या-पार्ट-२ प्रतिक्षेत.)

मदनबाण 02/01/2015 - 13:46
नेहमी सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती. मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो. एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं आमच्या आयुष्

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

डॉ सुहास म्हात्रे ·

लेखात मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत. बरेचदा एखाद्या देशातील हुकूमशहाला पदच्युत करण्यासाठी त्याच्या विरोधी गटाला शस्त्रास्त्रे, पैसा वगैरे पुरवला जातो अन मागाहून त्याची फळे भोगावी लागतात. जसे २०१२-१३ मध्ये सिरियातील असाद राजवटीविरुद्ध तेथील बंडखोरांना मदत केली गेली. असाद पदच्युत होणे दूरच पण आयसिसचे भूत उरावर बसले.
त्या कुप्रसिद्ध तस्कराचे नाव आता पटकन आठवत नाही
- वीरप्पन.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 19/12/2014 - 20:40
मध्य भारतातील हस्तिदंताची तस्करी
दक्षिण भारतातील साईमंगलम् च्या जंगलात त्याचा हा उद्योग चालायचा. त्याचबरोबर चंदनतस्करीही. कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सुटकेसाठी कर्नाटक सरकारने म्हणे तीस की पन्नास कोटींची खंडणी दिली होती वीरप्पनला. त्याचे त्याने काय केले, कुठे इतका पैसा लपवून ठेवला हे कधीच बाहेर आले नाही. त्याला मारायला तब्बल वीस वर्षे लागली. एवढे अवांतर सांगत बसण्याचे कारण म्हणजे अशा गोष्टींमागे खूप खोलवर दडलेले राजकारण आणि अर्थकारण असते. त्यात वरवर परस्परविरोधी वाटणार्‍या पण आतून एकमेकांशी संधान बांधलेल्या अनेक हितसंबंधांचा गुंता असतो. लेख छानच.

In reply to by एस

श्रीगुरुजी 19/12/2014 - 20:59
>>> एवढे अवांतर सांगत बसण्याचे कारण म्हणजे अशा गोष्टींमागे खूप खोलवर दडलेले राजकारण आणि अर्थकारण असते. त्यात वरवर परस्परविरोधी वाटणार्‍या पण आतून एकमेकांशी संधान बांधलेल्या अनेक हितसंबंधांचा गुंता असतो. बरोबर. वीरप्पन मूळचा तामिळ होता पण तस्करी कर्नाटक व तामिळनाडूच्या सीमेवरील जंगलात करायचा. १९९० च्या दशकाच्या सुरवातीला कावेरी नदी पाणीवाटप वादामुळे कर्नाटक व तामिळनाडूतील संबंध विकोपाला गेले होते. त्यामुळे दोन्ही राज्यातील पोलिस कारवाईत सुसूत्रता नव्हती. त्याचा फायदा त्याने उठविला. राजकुमार या कन्नड नटाचे त्याने अपहरण केल्यावर कर्नाटकात संतापाची लाट उसळली होती परंतु तामिळ लोकांना त्यात फारसे काही वाईट वाटले नव्हते. द्रमुक व अद्रमुक अशा दोन्ही पक्षातील काही मंत्र्यांचे त्याला गुपचूप पाठबळ होते. तो काही काळ श्रीलंकेविरूद्ध लिट्टेच्या बाजूने बोलत होता. त्यामुळे काही तामिळींची त्याला सहानुभूती होती. जयललिता सरकारने शेवटी २००४ मध्ये त्याचा एन्काऊंटर केला तो सुद्धा २००६ मधील निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 19/12/2014 - 13:02
तेलाचे राजकारण आहे. अमेरिका सध्या युक्रेन वरुन रशियाची कोंडी करण्यासाठी तेलाचे उत्पादन वाढवत आहे.मदतीला भारत जाऊ नये म्हणुन अमेरिका पाक कडे दुर्लक्ष करतय.

In reply to by जेपी

काळा पहाड 19/12/2014 - 18:04
मदतीला भारत जाऊ नये म्हणुन अमेरिका पाक कडे दुर्लक्ष करतय.
हे सगळे मुद्दे असते तरी सुद्धा अमेरिकेने पाकवर अंकुश लावला असता असं नाही. एक लक्षात घ्या की अमेरिका हा फक्त त्याचा स्वतःचा मित्र आहे. तो फक्त स्वतःच्या फायद्याचं करतो. आणि पाकिस्तानला दुखावणं म्हणजे अफगाणिस्तानचा रस्ता बंद करणं. त्यामुळे जोपर्यंत एखादा अतिरेकी अमेरिकेला धोकादायक ठरत नाही तो पर्यंत अमेरिका तिकडे लक्ष देत नाही आणि देणार नाही.

अर्धवटराव 19/12/2014 - 01:49
मुख्य प्रॉब्लेम या शब्दातच आहे. संपूर्ण संयुक्त राष्ट्रसंघ कुणा एका व्यक्तीला/व्यक्तीसमुहाला "अतिरेकी" म्हणत असेल काय? नसल्यास अतिरेकी वि. उर्वरीत जग असा भेदच उरत नाहि, मग त्यावर अ‍ॅक्शन तर फार लांब राहिली. इबोला सारख्या व्हायरस कंट्रोल आणि जागतीक तापमान वाढीसारख्या मुद्द्यांवर जागतीक एकमत व्हायला युनोची दमछाक होते, तर असल्या सो कॉल्ड अतिरेकी कंट्रोल करता काय हालत होईल... आणि हे सगळं आवरायचं कोणि? कुणाला शस्त्र विकायची आहेत, कुणाला तेल. कोणि अणु तंत्रज्ञान घ्या म्हणुन मागे लागलाय तर कोणाला चक्क धान्य पिकणारी जमीन आणि पाणि हवय. शिवाय आपापले श्रेष्ठत्वाचे भावनीक मुद्दे आणि जुनी उणिदुणी. सगळे खंड एकमेकांच्या पायात पाय घालताहेत, एका खंडातले देश वर्चस्वाची लढाई लढताहेत, तर उपखंडात देखील पाय खेचणे सुरु आहे. मग त्याकरता कट-काटशह करायचे, एकमेकांचे शत्रु निर्माण करायचे, शत्रुंना पाठबळ द्यायचं या सगळ्या उपद्व्यापातच अतिरेकी बिजांना खतपाणि मिळते व ते फोफावतात... कसली आलिय आरपारकी लडाई ??

जगभरातील प्रमुख देश अण्वस्त्र सज्ज झाले त्यामुळे निर्णायक पारंपारिक युद्धाची शक्यता फारच दुर्मीळ झाली . आज जग अण्वस्त्र विरहीत असते तर शीत युद्ध हा प्रकार जन्माला आला नसता ह्यातून पुढे दोन्ही गटातून एखाद्या देशात सत्ताधारी व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी विरोधी गटाला शस्त्रे , प्रशिक्षण , व पैसा देण्यात आला त्यांचा आपापल्या देशात स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वतंत्रता चळवळ म्हणून हवा देण्यात आली ह्यातून जे काही त्रांगडे निर्माण झाले त्याचे एका वाक्यात उत्तर मुशरफ ह्यांचे जगप्रसिद्ध विधान करते एका देशासाठी असलेला अतिरेकी दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो ह्यामुळे प्रत्येक देश जगात घडणाऱ्या अतिरेकी कृत्यांवर त्या आपापल्या चष्म्यातून पाहतो व त्यानुसार त्या घटनेला कमी अधिक महत्व देतो , संयुक्त राष्ट्र संघ नावापुरता असून जगातील बडी धेंडे जी २० , नेटो अश्या संघटना उभारतात त्यांना उत्तर देण्यास ब्रिक निर्माण होते आताच्या काळात दहशत वादाच्या पाठी मोठे अर्थकारण आहे जगात जो पर्यंत धर्म अस्तित्वात असणार , शस्त्रास्त्रांचा बाजार आणि विक्रेते असणार तो पर्यंत दहशतवाद किंवा त्याच्या समानार्थी शब्द स्वातंत्र्य चळवळ जगभर चालू राहणार. तो थांबविण्याची इच्छाशक्ती सध्यातरी कोण च्याही देशात नाही.

चौकटराजा 19/12/2014 - 07:22
आपल्या सोसायटीत ज्याप्रमाणे खाली पटांगणात घाण पडली तर वरच्या मजल्यावर रहाणारा त्याचा "आपल्याला काय त्याचे ?" असा विचार करतो.तसेच दहशतवादाचे आहे. तो कोण तरी असा माणूस पोसतो जो कधीतरी त्याचा बळी ( ९/११) डिसें१४ होउ शकतो.अमेरिकेने फक्त ९/११ चा अपराधी मारला पण २६/११ च्या अपराध्याला काही करण्याची त्यांची तयारी नाही. हे लक्षात घ्यावे. टीव्ही वर मिळालेली माहिती अशी की, सौदी अरेबिया हा देश यातील शेटजी आहे. त्याची अमेरिकेला गरज आहे. ती गरज संपली की तिची अर्थव्यवस्था धोक्यात येईल व तिचे शेटजीपण संपेल. मग फंडिंग थांवेल. व याला काहीसा आळा बसेल.त्यात अमेरिकेचा तोटा असा होउ शकतो की तेथील शस्त्रास्त्र उत्पादकांचा सरकारवर असलेला दबाव याचे काय करायचे ? त्यामुळे अमेरिकेने आत्ता तरी बघ्याची भूमिका घेतली आहे.

चांगले विश्लेषण. दहशतवादी कारवायांना पैसा मिळण्याचे अनेक स्त्रोत आहेत - छुप्या मार्गाने तेल विकून (जे सध्या ISIS करते आहे.), अमलीपदार्थांची तस्करी, नागरिकांना ओलीस ठेवून मिळवलेला पैसा (यात फ्रांसने आत्तापर्यंत सर्वात जास्त म्हणजे अंदाजे ४० दशलक्ष डॉलर्स एवढा पैसा दिला आहे.), विविध देशातील मुस्लीम नागरिकांकडून गोळा होणारा पैसा हे मुख्य काही. ओबामा यांनी सत्तेवर आल्यावर दहशतवादा विरुध्द लढण्यासाठी चार मुद्दांवर आधारित एक कार्यक्रम तयार केला होता- हिलरी क्लिनटन यांच्या 'हार्ड चोईसिस' या पुस्तकात तो दिला आहे. १.आंतरजालावरून प्रसारित होणाऱ्या ideology ला रोखणं २.लेखात म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न करणं- यात मुस्लीम देशांना सहभागी करून घेणं. ३. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशातल्या सरकारांबरोबर प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबवणं. ४.दहशतवादाची मुळे असलेल्या देशांमध्ये विकासाची कामे हाती घेणं (अमेरिका आर्थिक मदत देत असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक सर्वात वर त्यासाठीच आहे. पण तिथली लष्करशाही आणि लोकशाही ह्यांच्या खेळात तो पैसा दुसरीकडेच वळला.) हा कार्यक्रम आखल्यानंतर अरब क्रांती, अमेरिकेची त्यात झालेली अडचण, पाकिस्तानचं धोरण, आर्थिक कारण असे अनेक अडथळे त्यात आले. युरोपिअन देशांनी deradicalization हा त्यावरचा एक उपाय शोधला. पण ISIS च्या उगमाने तो ही अयशस्वीच ठरला.

अतिशय सखोल विवेचन....म्हणजे इतके ..कि मग आपले काय होणार आपल्या पुढच्या पिढ्यांचे काय होणार ह्या विचाराने अस्वस्थ व्हयला होते.. त्यामुळे सर्व्ह्याव्ल ऑफ द फिटेस्ट ह्या न्यायाने प्रस्थापित नैतिकतेचे निकषच बाजूला पडतील कि काय आणि मग अश्मयुग नाही तरी ...जंगलराज हेच शेवटी टिकेल कि काय असे वाटते ... .....फिलिंग लैच होपलेस ...

राही 19/12/2014 - 13:45
समतोल आणि माहितीपूर्ण लेख आवडला. आपल्याकडे अतिरेक्यांच्या बीमोडावचा मुद्दा निघाला की अतिरेक्यांपेक्षा अतिरेकी भाषा वापरली जाते. 'यांना ठेचून काढले पाहिजे, पाकिस्तानला बेचिराग केले पाहिजे' वगैरे. अगदी उचलली जीभ, लावली टाळ्याला. या सर्वातले धोके, अडचणी, शक्याशक्यता, व्यवहार्यता यांचा कोणीच विचार करीत नाही. एखादी विचारधारा काही काळ म्हणजे एखादे शतक पूर्ण व्यापून टाकते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून कडव्या इस्लामची विचारधारा जगभर अशीच प्रभावी राहिली आहे. अदाचित अरेबियामधली सत्ता बदलेल, तिथे समाजसुधारणा होईल, कदाचित धर्मसुधारणा होतील, या आशेवर एकविसाव्या शतकाची वाटचाल चालू आहे. इथे शॉर्टकट अजिबात नाहीत. आणखी एकदोन पिढ्या वाट पहावी लागेल असे दिसते.

श्रीगुरुजी 19/12/2014 - 14:21
>>> तरीही अशी कृती केली जात नाही. ते का? मी या लेखावर पूर्वीच खरडवहीतून प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे परत लिहीत नाही. परंतु, थोडक्यात सांगायचं तर दहशतवाद संपविण्यासाठी सर्व देशांनी (निदान प्रमुख २५-३० देशांनी तरी) एकत्र येऊन लष्करी कारवाई करणे हाच एकमेव उपाय शिल्लक राहतो. तुमच्या वरील सविस्तर व सखोल विवेचनानुसार हा उपाय अंमलात आणणे अत्यंत अवघड असले तरी हाच एकमेव उपाय असू शकतो. दुसर्‍या कोणत्याही मार्गाने दहशतवाद नष्ट होऊ शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या वरील सविस्तर व सखोल विवेचनानुसार हा उपाय अंमलात आणणे अत्यंत अवघड असले तरी हाच एकमेव उपाय असू शकतो. दुसर्‍या कोणत्याही मार्गाने दहशतवाद नष्ट होऊ शकणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट समोरासमोर (हेड ऑन) हल्ला करून ("एक घाव दोन तुकडे" अशी) नष्ट करणे शक्य नसते अथवा तसे करण्याची किंमत अवास्तवी जास्त असते; तेव्हा "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" म्हणजे "त्या गोष्टीचा प्रभाव शक्य तेवढा ताब्यात ठेवत वेळकाढू धोरण स्विकारणे" हे वास्तविकतेला जास्त धरून असते. याचा अर्थ तिकडे दुर्लक्ष करणे असा नाही; याउलट सतत बारीक निरिक्षण चालू ठेवून जरूर तेव्हा व जरूर तेवढाच हस्तक्षेप करणे असा आहे. या डॉक्ट्रीनची परिणती दोनपैकी एकाने होणे अपेक्षित असते: १. ताब्यात ठेवलेल्या अनेक गोष्टींचा प्रभाव वेळेबरोबर कमी होऊन त्या नष्ट पावतात अथवा अतिशय कमकुवत होतात. २. सतत लक्ष ठेवून असल्याने योग्य मोक्याचा फायदा घेऊन मर्माघाती वार करून ती गोष्ट नष्ट अथवा अतिशय कमकुवत करता येते. सरळ सरळ उत्तर देण्याच्या कृतीला खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर (बेनेफिट्/कॉस्ट रेशो) असल्यास "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" वापरून केलेल्या कृती जास्त फायदेशीर असतात. भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे.

नाखु 19/12/2014 - 15:35
महोदयांनी एका धाग्यावर मागीतलेल्या म्हणींची प्रकर्षाने आठवण झाली. १.ज्याचे जळते त्यालाच कळते २.पाळलेला नाग तुम्हाला डसणारच नाही असे नाही ३.कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे (पाकडे) मूळ अवांतर :धागा विषय विस्तार विचारप्रवर्तक आणि माहीतीपूर्ण आहे पण प्रतिसादात एकदाही "एखादी योजना" विनाविलंब अमलात आणावी असे कोणीही म्हटले नाही *SCRATCH* विलंबीत न्याय म्हणजे अन्याय असे कुठेसे वाचलेले आठ्वते.

माहितगार 19/12/2014 - 19:26
आतापर्यंत आपण केवळ उघड दिसणारी शोरूम बघितली आहे...
धागा लेखातील काही मुद्दे कळाले, पण बर्‍याच शंका शिल्लक राहील्या असे वाटते. संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वात बलाढ्य असलेला नाटो गट जेथे प्रचंड पैसा आणि सैन्यबळ वापरून परिस्थिती सुधारणा करण्यात यशस्वी झाला नाही तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने संयुक्त कार्यवाही कितपत यशस्वी ठरेल हा एक प्रश्न झाला. माझ्या अल्प माहितीनुसार संयुक्त राष्ट्रसंघाच कार्य शांतता प्रस्थापनेच आहे युद्धाचं नव्हे. जिथे स्थानिक समाजाची इच्छाशक्ती नाही सुंदोपसुंदी आहे तेथे बहुदेशीय सेनांच्या बाबतीतील यापुर्वीचे अनुभव कितपत यशस्वी झाले आहेत हे कदाचित तपासून पहाणे रोचक ठरू शकेल. इथे महत्वाचा प्रश्न वेगळाच उपस्थित होतो भारताची आता पर्यंतची अधिकृत भूमीका, स्थानिक सत्तांनी आपापसातील प्रश्न आपापसात सोडवले पाहिजेत, स्थानिक प्रश्नांचे भान आणि जाण नसताना महासत्तांनी असो वा संयूक्तराष्ट्रांनी असो उंटावरून शेळ्या हाकण्याचे हस्तक्षेप करण्याचे टाळावे अशी राहिलेली आहे. पण गेल्या काही वर्षात भारतीयांची मनोभूमीका या विषयावर बदलत आहे का ? काश्मिर प्रश्नात आपण बाहेरच्या देशांची अथवा संयुक्तराष्ट्रांची भूमीका स्विकारणार आहोत का ? अतिरेकी जेव्हा सिव्हिलीयन्स मध्ये मिसळलेले असतात आणि स्थानिक समाज मदत करतो अथवा दहशतीने मौनबाळगतो अशा ठिकाणी कोणत्याही सैनिकी कार्यवाहीत काहीना काही सिव्हिलीयन्स कॅज्युअल्टी अटळपणे होतात अशा कॅज्युअल्टी झाल्या की समाजाचे सहानुभूती अतिरेक्यांच्याच बाजूने वळण्याची शक्यता असते. सैन्यदले पोलीसदलांना आत्मविश्वास देऊ शकतात पोलीसदलांची जागा घेऊ शकत नाहीत हे बर्‍याचदा अनुभवले जाते. उलटपक्षी अतिरेक्यां घटनांविरुद्ध ट्रासंपरंट कार्यवाही, पोलीसदलांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि अगदी अशांत परिस्थितीतही संबंधीत राज्यात लोकशाही निवडणूका घेत राहण्याच्या भारतीय स्ट्रॅटेजीला फळे उशीरा लागत असतील पण चांगली फळे आल्याचे अनुभव आहेत ते या मिपाचर्चां प्रतिसादामधून दुर्लक्षीले तर जात नाहीएत अशी शंका वाटते. बादवे वरील धागा आणि प्रतिसाद लक्षात घेता हे आणि हे वृत्त चर्चेत सहभागी होत असलेल्यांना रोचक वाटू शकेल असे वाटते.

बोका-ए-आझम 19/12/2014 - 21:52
कुठलाही अतिरेकी गट किंवा संघटना यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात - १. नवनवीन उमेदवार सहज भरती करता येतील असा स्त्रोत २. हे लोक क्रूरतेच्या कुठल्याही थराला जाऊ शकतात असा लोकांमध्ये विश्वास किंवा भीती. ३. पैसे. आत्ता सध्यातरी तालिबान (अफगाणी आणि पाकिस्तानी) कडे या तीनही गोष्टी आहेत. यांच्यातल्या क्रमांक १ आणि ३ च्या गोष्टींवर नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यापूर्वी लिबरेशन टायगर्स आॅफ तामिळ इलम (LTTE) आणि IRA (Irish Republican Army) या दोन दहशतवादी संघटनांचा असाच दरारा होता. पण आता त्यांचा प्रभाव ओसरला आहे. तालिबानची आर्थिक उलाढाल ही मुख्यतः अफू आणि त्यापासून बनणा-या इतर अंमली पदार्थांच्या व्यापारातून चालते. शिवाय ते इतर दहशतवादी गटांना शस्त्रं आणि प्रशिक्षणही पुरवतात. दुर्दैवाने जो समन्वय या दहशतवादी संघटनांमध्ये आहे तो जगभरच्या पोलिसांमध्ये नाही.

कोलॅटरलची काळजी नं करता ह्या भि.चो. अतिरेकी राष्ट्रांवर २-४ अणुबाँब टाकुन द्यायला हवेत. तसही त्यांच्याविरुद्ध थेट कारवाई नं करतासुद्ध हे दुसर्‍या देशात अतिरेकी कारवाया करतचं आहेत की. सामान्य नागरीक मरतील वगैरे प्रश्ण कशाला हवेत? आमचे सामान्य नागरीक मरतात तेव्हा कोणं काळजी करतं का? तसही त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देणारे सो कॉल्ड सामान्य नागरिकचं आहेत बहुतांश प्रमाणात. ते अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश चं नामोनिशाण मिटलं ना जगाच्या नकाशावरुन तर सर्व जगाच्या डोकेदुखी कमी होतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमाला गुडघेदुखी सुरु झाली तर आख्खा पाय काढणारा डॉक्टर चालेल काय? तसेचय ते ,कोलॅटरल डॅमेज नकोच.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

कुठलातरी बादरायण संबध जोडु नका. आणि गुढगेदुखी जर काही कारणानी जीवावर बेतणारी असेल तर डॉक्टर तोच सल्ला देईल बहुदा. सो असल्या दहशतवादरुपी कॅन्सरचा नायनाट करण्यासाठी अणुथेरपी हवीचं. मग ते *^&@^#& पाकिस्तानी आणि तालिबानी मेले तर मरु देत की त्यांच्याबद्दल तुम्हाला येवढा कळवळा का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यसवायजी 19/12/2014 - 23:11
तसही त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देणारे सो कॉल्ड सामान्य नागरिकचं आहेत बहुतांश प्रमाणात. परवाच प्रकाश आमटेंवरचा चित्रपट पाहिला. नक्षलवाद्यांच्या बाबतीत पण अगदी असंच चाल्लंय. सामान्य नागरिकाच्या कानाजवळ एके-४७ धरल्यावर त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देण्यावाचून पर्याय काय राहतो बॉस्स?

In reply to by यसवायजी

ऩक्षलवाद्यांना कानापाशी एके४७ धरावी लागते तेव्हा आश्रय मिळतं असेल.....पाकिस्तान काय आणि तालिबानच्या प्रभावक्षेत्राखालील "सामान्य" शांतीवादी नागरिक काय, हिंदु/काफिर/ भारत विरोधी बोललं की लगेचं आश्रय मिळत असेल. ड्रोन कारवायांमधे "सामान्य" नागरिक मरायचं हेचं तर कारणं आहे. कारण आंतरराष्ट्रिय युद्धनियमावली प्रमाणे कुठल्याही देशाच्या सैन्याला रहिवासी विभागांवर थेट हल्ला करता येत नाही. ह्या नियमाचा फायदा घेऊन दबावानी म्हणा किंवा सहानभुतीनी म्हणा रहिवासी विभागात दहशतवाद्यांचे अड्डे तयार होतात. तालिबान/ अल कायदा प्रणित दहशतवाद कॅन्सर सारखा आहे. मुळासकट नष्ट केल्याशिवाय जगात शांतता नांदु शकणार नाही. तस्मात, २-४ अणुबाँब टाकुन दयावे ह्या उपायापर्यंत कारवाई केली पाहिजे किंवा कमीत कमी त्याची भिती दाखवुन दहशतवाद्यांना गप बसवलं पाहिजे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तस्मात, २-४ अणुबाँब टाकुन दयावे ह्या उपायापर्यंत कारवाई केली पाहिजे किंवा कमीत कमी त्याची भिती दाखवुन दहशतवाद्यांना गप बसवलं पाहिजे. :) अणुबाँबचे परिणाम स्थानिक न राहता ते किती प्रमाणात जागतिक धोका निर्माण करू शकतात हे चेर्नोबिल अपघाताच्या अनुभवावरून लक्षात यावे. विशेषतः भारत या कारवाईतल्या महत्वाच्या भूभागाच्या अतिजवळ आहे हे लक्षात घेता अश्या कारवाईचे फायदा/व्यय गुणोत्तर भारताच्या दृष्टीने अत्यंत घाटयाचे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण 22/12/2014 - 17:00
अणुबाँबचे परिणाम स्थानिक न राहता ते किती प्रमाणात जागतिक धोका निर्माण करू शकतात हे चेर्नोबिल अपघाताच्या अनुभवावरून लक्षात यावे. विशेषतः भारत या कारवाईतल्या महत्वाच्या भूभागाच्या अतिजवळ आहे हे लक्षात घेता अश्या कारवाईचे फायदा/व्यय गुणोत्तर भारताच्या दृष्टीने अत्यंत घाटयाचे आहे. अहो एक्का काका आपल्या देशातले लोक काटक आहेत ! ते काहीही पचवु शकतात... Bitter butter

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काळा पहाड 22/12/2014 - 17:13
टॅक्टिकल न्युक्लीयर वेपन्स (उदा: सब किलोटन रेंज ची वेपन्स: http://en.wikipedia.org/wiki/Tactical_nuclear_weapon) हा प्रॉब्लेम सोडवू शकतात. त्यांचं यील्ड आणि परिणाम कमी असतो. पण एकदा न्युक्लीयर वेपन टाकलं की त्याचा मानसिक आणि आंतरराष्ट्रीय परिणाम खूप जास्त आहे. एक खून केला काय किंवा दहा खून केले काय, ते खूनच. म्हणून टॅक्टीकल न्युक्लीयर वेपन्सचा उपयोग फारसा नाही. न्यूक्लीयर वेपन्सचा उपयोग शत्रूची राखरांगोळी करण्यासाठीच होतो आणि त्यासाठी स्ट्रॅटेजीक न्युक्लीयर वेपन्स (http://en.wikipedia.org/wiki/Strategic_nuclear_weapon) हीच परिणामकारक आहेत आणि त्यांचा उपयोग हा दुर्मिळातील दुर्मिळ वेळी करायची गोष्ट आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही म्हणताय त्याच्यात तत्थ्य आहे. पण एक विचार करा. पाकिस्तानमधली स्थिती दिवसेंदिवस अस्थिर होतीये. त्यांचं लष्कर आणि आय.एस.आय. उघडपणे दहशतवादाला पाठिंबा देतायत. जर का एखादा अतिरेकी मुशर्र्फ प्रमाणे लष्करी हुकुमशहा बनला तर अण्वस्त्रांचा वापर कुठे पहिला होईल हे सांगायला तज्ञाची गरज नाही. भारत, इस्त्राईल आणि अमेरिका ही मह्त्तवाची टारगेट्स्स ठरतील. अमेरिकेच्या सुदैवानी पाकिस्तानकडे आय.सी.बी.एम्स आजमितीला नाहीत पण चीन त्यांना ही टेक्नॉलॉजी देउ शकतो. आपण मात्र अगदी शेजारी असल्यानी घौरी वगैरे क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात बहुतेक सगळी महत्त्वाची शहरे आहेत. अश्या परिस्थितीमधे "फास्टेस्ट फिंगर ऑन ट्रिगर विन्स" अशीच परिस्थिती असेल. आता फक्त प्रश्ण एवढाच आहे की रोग झाल्यानंतर औषध द्यायचं का रोगप्रतिकारक लस टोचायची.

खटपट्या 19/12/2014 - 22:44
काहीही झाले तरी त्याला भारतच जबाबदार अशी पाकीस्तानी जनतेची मानसिकता बनलेली दिसतेय. आपण त्यांच्यासाठी मेणबत्ती मोर्चे आणि मौन वगैरे पाळतोय आणी चेपू आणि ट्वीटरवर मात्र पाकड्यांची अत्यंत हीन पातळीवर शेरेबाजी चालू आहे.

In reply to by खटपट्या

अगदी अगदी. आणि आमचं ** मिडीया त्यांच्या नावानी गळे काढतयं. आणि मेणबत्त्या लावुन फिरतयं.

मदनबाण 22/12/2014 - 12:31
पाकिस्तान हा जागतिक सुरक्षेला झालेला मोठा धोका आहे... त्यापेक्षाही आपल्या टाळक्याला तो अधिक ताप देणारा ठरला आहे आणि त्यात भर पडेल हे निश्चित ! बाकी Cold Start (military doctrine) बद्धल काही अधिक माहिती / बातम्या असतील तर वाचायला आवडेल...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

माहितगार 22/12/2014 - 13:23
काही अधिक माहिती / बातम्या असतील तर वाचायला आवडेल...
आपण दिलेला इंग्रजी विकिपीडिया दुवा वाचला. भारताची जी काही सामरीक व्यूहरचना असेल ती गोपनीय असावयास नको का ? मनमोहनसिंग काळात आमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताची माहिती नेली असावी त्यांच्या पर्यंत पोहोचू नये पोहोचलीच तर ती पाकीस्तान पर्यंत पोहोचू नये आणि समजा तसेही झाले तर मिडीयात एवढ्या उघडपणे चर्चीत होऊ नये. आमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणांना गोपनीय कारवाया मित्रराष्ट्रातही करणे जमते पण अशा कारवाया आणि त्यातून येणारी माहिती गोपनीय राखणे जमत नाही असे दिसते. किमान एवढ्यासाठी तरी भारतीयांनी सामरीक व्यूहरचने बाबत अधिक गोपनीयता पाळावयास हवी. अर्थात जे आधीच आंतरजालावर चर्चेत आहे त्या बद्दल चर्चा करणे ठिक आहे. पण नवी गोपनीय माहिती उघड होणे ठिक नाही.

In reply to by माहितगार

मदनबाण 22/12/2014 - 13:31
.भारताची जी काही सामरीक व्यूहरचना असेल ती गोपनीय असावयास नको का ? अगदी योग्य प्रश्न विचारलात ! ती गोपनियच असायला हवी मग कोल्डस्टार्ट बाहेर कसं आल ? लष्कराच्या कुठल्याही महत्वाच्या गोष्टी बाहेत उघडकीस येणे धोकादायकच, पण आपला दुबळेपणा वारंवार उघडा पडुनही आहे त्या परिस्थीतीत बदल होताना दिसत नाही. एकदाच काही तरी परिणामकारक "सर्जरी" करा की रोग समूळ नष्ट करणे जरी लगेच शक्य नसेल तरी त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

माहितगार 22/12/2014 - 13:53
एकदाच काही तरी परिणामकारक "सर्जरी" करा की रोग समूळ नष्ट करणे जरी लगेच शक्य नसेल तरी त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल
आता मोदी आणि पर्रीकर आहेत ना, सोबतीस राजनाथ सिंग आणि सुषमाबाईंची टिम आहे ते योग्य काय ते ठरवतील. अर्थात मिपावर बर्‍याच जणांचे मत काही तरी आश्चर्यचकीत करणारे लष्करी काम करून पाकीस्तानला धूळ चाटावी असे असावे असे दिसते. एनी वे तुम्ही (म्हणजे अशी मते असलेले मिपाकर) स्वतहा सुरक्षा सल्लागार असते तर नेमकी काय निती त्यांना सुचवली असती आणि वास्तवाचे भान ठेऊन फूलप्रूफ कशी केली असती हे भारताच्या खर्‍या संरक्षण निती पेक्षा अधिक समजून घेण्यास आवडेल.

In reply to by माहितगार

मदनबाण 22/12/2014 - 14:46
मिपावर बर्‍याच जणांचे मत काही तरी आश्चर्यचकीत करणारे लष्करी काम करून पाकीस्तानला धूळ चाटावी असे असावे असे दिसते. युद्ध कोणाला हवे असते ? जे अघोषीत युद्ध आपण लढत आहोत, ते अजुन किती वर्ष लढायचे ? किती जवान आणि सिव्हीलियन्सा बळी यात देण्याचे ठरवले आहे ? एनी वे तुम्ही (म्हणजे अशी मते असलेले मिपाकर) स्वतहा सुरक्षा सल्लागार असते तर नेमकी काय निती त्यांना सुचवली असती आणि वास्तवाचे भान ठेऊन फूलप्रूफ कशी केली असती हे भारताच्या खर्‍या संरक्षण निती पेक्षा अधिक समजून घेण्यास आवडेल. कारगिल युद्ध आणि संददेवरील हल्ला या दोन्ही घटनांचा { त्या-त्या वेळी} आधार घेत आपण लष्करी कारवाई करण्याची वेळ घालवुन बसलो आहोत असे माझे स्पष्ट मत आहे. सर्व प्रथम लष्करातील सर्व प्रमुखांना तुम्हाला पाकित्सानची गचांडी आवळायला किती वेळ लागेल ? हा प्रश्न विचारला असता, त्यासाठी ऑपरेशला लागणारा खर्च / दारुगोळा / ड्रील / आणि संपूर्ण कारवाई करण्यासाठी लागणारा वेळ विचारला असता. हे सर्व होउ पर्यंत वेळ घ्या पण रिझल्ट द्या असे निक्षुन सांगितले असते. लष्करातली युद्धाचा अनुभव असलेली, सध्या कार्यरत असलेली आणि रिटायर्ड झालेली मंडळी. तसेच डिफेन्स एक्स्पर्ट यांची एक टीम बनवली असती. मुखत्वे पायदळाचे निर्णय या मंडळीनीच घ्यावेत... नेव्ही आणि वायु सेना यांची टीम या एकाच वेळी कोऑरडिनेट होवुन नेव्हीला कराची आणि ग्वादार बंदर उध्वस्त करायला सांगुन पाकिस्तानला समुद्र मार्गाने येणारी तेल आणि इतर आवश्यक रसद बंद पाडली असती. वायु सेनेला पाकिस्तानले महत्वाचे मिलेटरी एअर बेस तसेच धरणे आणि महत्वाचे पूल उडवुन टाकण्याचे आदेश दिले असते. पाकिस्तान कडुन पहिल्या आण्विक हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेउन त्यांच्या स्टॉकपील आणि अणूभट्या उडवुन देण्याचा आणि धरणे उडवण्याचा सल्ला सुद्धा दिला असता... एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावुन परत या... जगाच्या नकाशातुन पाकिस्तान हे नाव पुसले गेले तरी हरकत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

क्लिंटन 22/12/2014 - 15:40
आपण हे सगळे करेपर्यंत पाकिस्तान हातावर हात ठेऊन स्वस्थ बसणार आहे असे तुम्हाला वाटते का? डिसेंबर २००१ मध्ये संसदभवनावर हल्ला झाला आणि त्यानंतर युध्दाचे ढग जमू लागले.तात्पुरते ते विरले पण मे २००२ मध्ये कालूचक येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परत एकदा युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली.त्यावेळी इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री जॅक स्ट्रॉ आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल पहिल्यांदा पाकिस्तान आणि नंतर भारत भेटीवर आले होते.दोघांनाही मुशर्रफने असे स्पष्ट संकेत दिले की भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान मागेपुढे न पाहता भारतावर अणूबॉम्ब टाकेल.दोघांनाही मुशर्रफने काय सांगितले हे दिल्लीमध्ये येऊन वाजपेयी-जसवंत सिंगांच्या कानावर घातलेच.त्यानंतर वाजपेयींसारख्या नेत्यानेही पाकिस्तानवर हल्ला करायचे टाळले यातच सगळे काही आले. पाकिस्तानातून भारतावर दहशतवादी हल्ले होतात, त्यात अनेक निरपराध भारतीयांचा बळी जातो ही सत्य परिस्थिती आहेच.दरवर्षी काश्मीरात आणि देशात इतर ठिकाणी मिळून २००० बळी जातात असे समजले तरी २००० लोकांना वाचवायला म्हणून नी-जर्क रिअ‍ॅक्शन म्हणून पाकिस्तानवर हल्ला करायचा आणि त्यातून अणुयुध्द झाल्यास २ कोटी लोकांचा बळी घालवायचा का? आपल्याकडे अणुबॉम्ब आहे पण आपणच "नो फर्स्ट युज" चे लोढणे आपल्याच पायात अडकवले आहे.ते लोढणे पाकिस्तानच्या पायात नाही.वास्तविकपणे पाकिस्तानसारख्या शेजार्‍याचा अगदी पूर्ण विध्वंस होऊन पाकिस्तान हे नामोनिशाण नष्ट होईल आणि त्याचा आपल्याला त्रास कमीतकमी होईल इतक्या क्षमतेचे लागतील तितके अणुबॉम्ब पाकिस्तानवर टाकावेत असे मलाही वाटते.पण आपणच आपल्या पायात ते नो फर्स्ट युजचे लोढणे अडकवले आहे त्यामुळे आपण तसे करू शकू का? आणि असा हल्ला पाकिस्तानवर केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्की काय प्रतिक्रिया होईल (कदाचित चीनचा भारतावर हल्ला, गल्फमधून आयात होणारे तेल बंद होणे इत्यादी इत्यादी अनेक) हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे.त्या सगळ्या परिणामांना तोंड देऊ इतपत आपली तयारी आहे का? नाहीतर घाईघाईने काहीतरी करून बसले आणि नंतर पश्चात्तापाची वेळ आली असे झाल्यास काय? मला वाटते असले काहीही होणे केवळ अशक्य आहे.काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी करणारे लोक मोठी पदे भूषवत असलेल्या पक्षाला लोक मते देतात, पूर्ण भारतीय कायद्याला अनुसरून पध्दतीने अफझलला फाशी दिल्यानंतरही त्याविरूध्द आरडाओरडा करणार्‍या मानवाधिकारवाल्यांच्या तोंडावर आपण थुंकत नाही, पकडलेल्या दहशतवाद्यांना आपण वर्षानुवर्षे जिवंत सोडतो आणि मग त्यांना सोडा ही मागणी करायला विमान अपहरण होते तरीही त्यांना आपण ताबडतोब फासावर लटकवत नाही अशी परिस्थिती असताना पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकणे वगैरे खूपच दुरच्या गोष्टी आहेत.

In reply to by क्लिंटन

मदनबाण 22/12/2014 - 15:58
क्लिंटनराव... अहो अणू युद्ध करायची उर्मी हिंदूस्थानला नाही, पण पाकिस्तान त्याचा वापर पहिल्यांदी करेल याची खात्री आहे ना ? मे २००२ मध्ये कालूचक येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परत एकदा युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली.त्यावेळी इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री जॅक स्ट्रॉ आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल पहिल्यांदा पाकिस्तान आणि नंतर भारत भेटीवर आले होते.दोघांनाही मुशर्रफने असे स्पष्ट संकेत दिले की भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान मागेपुढे न पाहता भारतावर अणूबॉम्ब टाकेल.दोघांनाही मुशर्रफने काय सांगितले हे दिल्लीमध्ये येऊन वाजपेयी-जसवंत सिंगांच्या कानावर घातलेच.त्यानंतर वाजपेयींसारख्या नेत्यानेही पाकिस्तानवर हल्ला करायचे टाळले यातच सगळे काही आले. आपल्याकडे अणवस्त्र असताना आपण अश्या दबावाला का बळी पडतो ? आपण जे नो फोस्ट युज चे लोढणे अडकवुन घेतले त्याचाच परिणाम आहे ना हा ? जी काही पॄथ्वी,अग्नी आणि इतर मिसाइल्स डेव्हलप केली गेली आहेत ती फक्त टेस्टींग साठीच का ? पाकिस्तानातून भारतावर दहशतवादी हल्ले होतात, त्यात अनेक निरपराध भारतीयांचा बळी जातो ही सत्य परिस्थिती आहेच.दरवर्षी काश्मीरात आणि देशात इतर ठिकाणी मिळून २००० बळी जातात असे समजले तरी २००० लोकांना वाचवायला म्हणून नी-जर्क रिअ‍ॅक्शन म्हणून पाकिस्तानवर हल्ला करायचा आणि त्यातून अणुयुध्द झाल्यास २ कोटी लोकांचा बळी घालवायचा का? आपल्याशी युद्ध करण्याची खाज पाकड्यांना आहे की नाही ? आत्ता पर्यंत त्यांनीच आपल्याशी युद्ध केले आहे की नाही ? या दोन्ही प्रश्नांची उत्तर जर हो असतील तर त्यांची ही खुमखुमी युद्ध करुन काढली तर त्यात काय चूक ? २ कोटींचा बळी देण्याची आमची इच्छा कुठे आहे, पण मस्ती त्यांनाच आहे ना ? { आजच्या घडीला सुद्धा तालिबान सारख्या अतिरेकी संघटने पेक्षा त्यांना हिदूस्थान हाच शत्रु क्रमांक १ वाटतो ना ?} मग त्यांचा बळी लष्करी कारवाईत बळी जाणारच ! तसेही अमेरिका जर इराक / अफागाणिस्तान सारखी राष्ट्र त्यांच्या नागरिकां सकट बेचिराख करु शकते तर पाकिस्तान तर आपल्याला वारंवार आघात करतो आहे तर त्याचा निप्पात केला तर काय बिघडले ? बरं उध्या अश्या काही युद्धाला सुरुवात झाली आणि पाकिस्तानने मुंबईवर आण्विक हल्ला केला तर आपण त्यातुन सावरुन पाकिस्तान /चीन ला तोंड देण्यास सक्षम राहु ? मला वाटते असले काहीही होणे केवळ अशक्य आहे.काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी करणारे लोक मोठी पदे भूषवत असलेल्या पक्षाला लोक मते देतात, पूर्ण भारतीय कायद्याला अनुसरून पध्दतीने अफझलला फाशी दिल्यानंतरही त्याविरूध्द आरडाओरडा करणार्‍या मानवाधिकारवाल्यांच्या तोंडावर आपण थुंकत नाही, पकडलेल्या दहशतवाद्यांना आपण वर्षानुवर्षे जिवंत सोडतो आणि मग त्यांना सोडा ही मागणी करायला विमान अपहरण होते तरीही त्यांना आपण ताबडतोब फासावर लटकवत नाही अशी परिस्थिती असताना पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकणे वगैरे खूपच दुरच्या गोष्टी आहेत. पूर्णपणे सहमत... परंतु मिपाकर म्हणुन "मी" काय निर्णय घेइन त्यावर मी माझे मत प्रदर्शन केले आहे.आजच्या काळातल्या युद्धात तोच विजयी होइल जो पहिल्यांदाच घाणाघाती हल्ला करुन शत्रु राष्ट्राचे कंबरडे मोडेल...आपण ही संधी पाकिस्तानला देउ नये एव्हढच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

माहितगार 22/12/2014 - 17:08
आपण म्हणता तसे फिजीबल व्हावयाचे असेल तर पाकीस्तानला जवळपास हतबल केल्या शिवाय अणूयुद्धाचा धोका टळणार नाही. पहिला हवाई हल्ला केला तरीही दोन्ही साईडचा हवाई आणि आण्विक रिस्पॉन्स टाईममध्ये ८ १० मिनीटांपेक्षा अधीक फरक पडेल असे मला वाटत नाही. पाकीस्तानची पूर्ण एअरस्पेस आणि मिसाईल स्पेस एकाच घटकेत ऑकुपाय करणे आणि शस्त्र उपयोगापासून अशक्य करणे एवढी क्षमता भारतापाशी आहे असे वाटते का ? त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. आणि त्या वेळी आमेरीका अथवा चीनलाही हस्तक्षेप करता यावयास नको. या साठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ? ( मला तौलनीक सामरीक आकडेवारीची कल्पना नाही.)

In reply to by माहितगार

त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. असे विधान करण्याअगोदर उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती चेर्नोबिलच्या घटनेवरून येउ शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्लिंटन 22/12/2014 - 17:23
उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे.
हो बरोबर आहे. पण पाकिस्तानने आपल्यावर अणुबॉम्ब टाकून त्यातून प्रायमरी नुकसान होण्यापेक्षा आपण पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून किरणोत्सर्गामुळे झालेले सेकंडरी नुकसान झालेले परवडले. दगडापेक्षा वीट मऊ की काहीतरी म्हणतात ना त्याप्रमाणे.

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 22/12/2014 - 17:37
अजिबात चूक. पाकिस्तान वर अणुबॉम्ब चा हल्ला हा भारताच्या विकासात्मक हितांना बाधा पोचवेल आणि भारताला एकही व्यापारिक पार्टनर रहाणार नाही. भारतावर त्वरित आर्थिक निर्बंध लादले जातील. भारताशी असलेले संबंध सगळे देश खटकन तोडून टाकतील. देश आर्थिक पारतंत्र्यात लोटला जाईल. जसा इराण किंवा उत्तर कोरिया आहे तसा. त्यात आपल्याकडे तेल किंवा चीन सारखा मित्र देखील नाहिये. पाकिस्तानचा प्रश्न हा अतिशय नाजूक पणे सोडवायला हवा. पाकिस्तान बरोबर मैत्रीचं नाटक करत त्याला आर्थिक दृष्टया खिळखिळा करायला हवा. शॉर्ट टर्म गोल म्हणून पाकिस्तान मधली अस्थिरता कशी वाढेल, पाकिस्तान ची आंतरराष्ट्रीय पत कशी कमी होईल इत्यादी गोष्टी कराव्यात. लाँग टर्म गोल म्हणून पाकिस्तान चे चार (किंवा जास्त) तुकडे उदा: पंजाब, बलुचिस्तान, सिंध, एन.डब्ल्यू.एफ.पी. कसे करता येतील हे पहावं. बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 22/12/2014 - 17:49
अर्थातच जर अशा प्रकारच्या हल्ल्याचा फॉल-आऊट आपण सांभाळू शकू ही १००% खात्री नसेल तर असा हल्ला आत्मघातकी ठरेल हे वरील प्रतिसादातच म्हटले आहे.तरीही अणुयुध्दापर्यंत गोष्ट गेली तर ते आपल्यावर अणुबॉम्ब टाकणार आणि मग आपण प्रत्युत्तर द्यायचे या प्रकारात आपले प्रचंड प्रमाणावर प्रायमरी नुकसान होईल.तसा अणुबॉम्ब टाकायची संधीच शत्रूला द्यायची नाही आणि त्याआधीच कंबरडे मोडायचे असे करायचे असल्यास त्यातूनही आपल्यावर किरणोत्सर्गाचे परिणाम होतीलच.पण त्यातून होणारे सेकंडरी नुकसान प्रायमरी नुकसानापेक्षा कमी असेल एवढाच सांगायचा हेतू आहे.
लाँग टर्म गोल म्हणून पाकिस्तान चे चार (किंवा जास्त) तुकडे उदा: पंजाब, बलुचिस्तान, सिंध, एन.डब्ल्यू.एफ.पी. कसे करता येतील हे पहावं.
छे हो त्यातून आपली डोकेदुखी चौपट वाढेल.जगातील दोन-तृतीयांश देशांच्या विरोधाला न जुमानता आपण बांगलादेश वेगळा केला.सध्या तिथे शेख हसीना सत्तेत आहेत म्हणून ठिक.अन्यथा तिथेही भारतविरोधी प्रवृत्तीच डोके वर काढतात हे अनेकवेळा आपण बघितले आहे. पॅलेस्टाईनच्या लढ्याला आपण इतकी वर्षे पाठिंबा दिला.तरीही १९९८ मध्ये पाकिस्तानने अणुचाचण्या केल्यानंतर एका मुस्लिम देशाकडे अणुबॉम्ब आला याचा अराफात यांना आनंद झाला होता.तेव्हा आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी नंतर त्यांना धर्म अधिक महत्वाचा वाटून ते आपल्याच विरोधात जाणार ही शक्यता सगळ्यात मोठी.
बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते.
असेच व्हावे ही सदिच्छा.

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी 22/12/2014 - 20:20
>>> बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते. पेशावरमधील शाळेवरील हल्ल्यावरच्या धाग्यात मी हेच लिहिले होते. आपल्याला धोका निर्माण होत आहे असे दिसले तरच अमेरिका पाकड्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायच्या मागे लागेल. जोपर्यंत आपल्याला धोका नाही तोपर्यंत अमेरिका लांबून मजा बघेल. पाकिस्तान अतिरेकी संघटनांच्या ताब्यात जावा असे मला वाटते. त्यामुळे अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हातात पडण्याचा धोका ओळखून अमेरिका स्वतःहून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागे लागेल हे नक्की, कारण ही अण्वस्त्रे भारताप्रमाणे इस्राईल, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका या देशांविरूद्ध सुद्धा वापरली जातील.

In reply to by माहितगार

मदनबाण 22/12/2014 - 17:17
सर्वात प्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की अणूयुद्धाचा धोका पाकिस्तानकडुन आपल्याला आहे, आपल्याकडुन पाकिस्तानला नाही ! अणू युद्ध आणि आफ्टर इपॅक्टससाठी आपली कुठलीच तयारी नाही ! पहिला हवाई हल्ला केला तरीही दोन्ही साईडचा हवाई आणि आण्विक रिस्पॉन्स टाईममध्ये ८ १० मिनीटांपेक्षा अधीक फरक पडेल असे मला वाटत नाही. पाकीस्तानची पूर्ण एअरस्पेस आणि मिसाईल स्पेस एकाच घटकेत ऑकुपाय करणे आणि शस्त्र उपयोगापासून अशक्य करणे एवढी क्षमता भारतापाशी आहे असे वाटते का ? त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. आणि त्या वेळी आमेरीका अथवा चीनलाही हस्तक्षेप करता यावयास नको. यासाठीच मी माझ्या प्रतिसादात लिहले :- सर्व प्रथम लष्करातील सर्व प्रमुखांना तुम्हाला पाकित्सानची गचांडी आवळायला किती वेळ लागेल ? हा प्रश्न विचारला असता, त्यासाठी ऑपरेशला लागणारा खर्च / दारुगोळा / ड्रील / आणि संपूर्ण कारवाई करण्यासाठी लागणारा वेळ विचारला असता. हे सर्व होउ पर्यंत वेळ घ्या पण रिझल्ट द्या असे निक्षुन सांगितले असते. यासाठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ? निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे ! आपल्या देशातल्या तिन्ही दलांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. फक्त गरज आहे, ती "योग्य वेळी" त्यांना फ्री-हँड देण्याची.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

माहितगार 23/12/2014 - 14:02
यासाठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ? निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे ! आपल्या देशातल्या तिन्ही दलांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. फक्त गरज आहे, ती "योग्य वेळी" त्यांना फ्री-हँड देण्याची.
सैन्यदलांबाबत विश्वास आणि अभिमान असणे चांगली गोष्ट आहे. पण तांत्रिक क्षमतांच्या बाबतीत वास्तवाचे भानही महत्वाचे असावे असे वाटते. हि डेक्कन क्रॉनीकलची संसदीय समिती बद्दलची बातमी काय सांगते आहे ते अभ्यासणे सयुक्तीक ठरू शकेल असे वाटते.

In reply to by माहितगार

मदनबाण 23/12/2014 - 14:06
धन्यवाद. आपण दिलेला दुवा इकडे हापिसात उघडत नाहीये... घरी गेल्यावर नक्की वाचीन. बाकी इथे सुद्धा पहा :- http://www.tejas.gov.in/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

In reply to by मदनबाण

क्लिंटन 23/12/2014 - 14:07
निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे !
मग कारगीलमध्ये आत घुसलेल्या पाकड्यांना मारायला/हकलवायला दोन महिने का लागले हो आपल्याला? आपले सैन्य प्रचंड शक्तीशाली आहे असा माझाही त्यापूर्वी समज होता पण त्यानंतर मात्र मी अशा दाव्यांवर विश्वास ठेऊ शकत नाही.

In reply to by क्लिंटन

मदनबाण 23/12/2014 - 15:02
मग कारगीलमध्ये आत घुसलेल्या पाकड्यांना मारायला/हकलवायला दोन महिने का लागले हो आपल्याला? इथे काही उत्तरे सापडतात का ? ते पहा. Kargil: Ex-air marshal returns army fire Kargil: Lessons to be learnt जाता जाता :- Pakistan Is Building Smaller Nukes, But They Just Might Be More Dangerous Pakistan Could Soon Have More Nukes Than the U.K. and France And smaller and more destabilizing ones, too

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 23/12/2014 - 17:43
कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं. कारगिल हा सैन्य मोहिमेच्या दृष्टीनं अतिशय अवघड प्रदेश आहे. वर असलेल्याला फक्त प्रचंडच नव्हे तर संपूर्ण अ‍ॅडव्हान्टेज आहे. वरच्या बंकरमध्ये बसलेला पाकिस्तानी हा अतिशय सुरक्षीत अशा दगडी कवचात होता आणि खालून वर चढाई करताना झाडांचा किंवा दगडाचा आडोसा नव्हता. खालून वर मोहीम ही जवळ जवळ आत्महत्या या सदरात येते. चिलखती गाड्या वापरता येत नाहीत. अशा ठिकाणी माणसं तर सोडाच, यंत्रं सुद्धा दमतात. त्यातून पाकड्यांजवळ अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पण होती. कारगिलचा विजय हा खरोखरच मानवी बळापलिकडे जावून मिळवलेला विजय होता. बाकी जाणकार सांगतीलच.

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी 23/12/2014 - 20:18
+१११ आणि मुख्य म्हणजे वाजपेयींनी पायदळाला व हवाई दलाला सीमारेषा न ओलांडण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळेही भारतीय मोहिमेला मर्यादा आल्या होत्या.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 23/12/2014 - 20:38
कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं.
आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही. आणि कारगीलमध्ये अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही. बाकी आपल्या हवाईदलाकडील नक्की किती विमाने शत्रूने पाडली आहेत आणि किती विमाने अपघाताने पडली याविषयी काही आकडेवारी आहे का?त्यात आपले किती शे वैमानिक मारले गेलेत? इतकी वर्षे नुसती मीग विमाने पडत होती.मध्यंतरी सुखोई विमानही पडले म्हणून सुखोई विमानांची फ्लिट ग्राऊंड केली.आपल्या नक्की किती पाणबुड्या आग लागून बुडल्या आहेत आणि नक्की किती शत्रूने बुडविल्या आहेत? मध्यंतरी आपल्याकडे १५ दिवस (की महिनाभर) पुरेल इतकाच दारूगोळा आहे असे सैन्यप्रमुखांनी म्हटले होते असे वाचल्याचे आठवते. सैन्याचा अभिमान आणि कृतज्ञता वाटणे वगैरे सगळे ठिक आहे पण अशा प्रकारच्या बेभरवशाच्या शस्त्रांनिशी आपण सहजासहजी कसे काय जिंकणार आहोत? जरा तरी रिअ‍ॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 23/12/2014 - 22:19
आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही.
युद्धाचा एक महत्वाचा नियम हा कि शत्रूला सोयिस्कर नव्हे, तर आपल्याला सोयिस्कर जागी युद्ध करण्यासाठी शत्रूला भाग पाडा. इथे भारतीय सैन्याचे हात दगडाखाली होते. दुसरी कुठलीच आघाडी उघडण्यासारखी नव्हती. आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडण्याची दक्षता घ्यायची होती आणि सैन्याच्या तुकड्या शत्रूच्या टप्प्यात होत्या. लक्षात ठेवा की बरचसं सैन्य हे शत्रू च्या लेह हायवे माराच्या टप्प्यात असल्यानं मारलं गेलं (वरची मदनबाण यांची दुसरी लिंक पहा). परिस्थीती किती गंभीर आहे याची कल्पना राजकीय नेतृत्वाला दिली गेली नव्हती आणि हा एक स्थानिक प्रश्न आहे असं गृहीत धरलं गेलं आणि त्याप्रमाणं निर्णय घेतले गेले, त्याप्रमाणं सैन्याला आज्ञा दिल्या गेल्या. या चुका मुख्यतः राजकीय आणि स्ट्रॅटेजिक होत्या आणि सैन्याच्या कार्यक्षमतेचा त्यात काही संबंध नव्हता.
आणि कारगीलमध्ये अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही.
मला असं म्हणायचंय की त्यामुळे एअरफोर्स च्या हालचालींवर बंधनं आली. ही शिखरं ज्या उंचीवर आहेत तिथे मुळातच मर्यादित हालचाली होवू शकतात. शिवाय एअरफोर्स सुद्धा सीमा पार करू शकत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अ‍ॅप्रोच रूटवर पण बंधनं असणार. आपण अशा युद्धाबद्दल बोलतोय जिथे आपला एक हात पाठिमागे बांधलेला होता.
जरा तरी रिअ‍ॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.
तुम्ही जे सांगताय त्यातल्या बर्याच (बहुतांश) घटना या सुट्ट्या भागांच्या कमतरतेमुळे, मनमोहन सरकारच्या नवीन शस्त्रे व टेक्नॉलोजी घेण्याबद्दलच्या धरसोड धोरणामुळे आणि राजकीय निर्णयक्षमतेच्या अभावामुळे घडलेल्या आहेत. त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 23/12/2014 - 22:26
त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.
अहो वैयक्तिक शौर्याच्या जोरावर युध्द जिंकायचे दिवस मागे पडून कित्येक दशके झाली. सैन्याचे शौर्य हवेच त्यात शंकाच नाही.पण नुसते तितके पुरेसे नाही.त्याबरोबरच शस्त्रास्त्रे गरजेची असतात.जर आपली विमाने इतक्या मोठ्या प्रमाणावर शांततेच्या काळात पडत असतील तर युध्दाच्या वेळी नुसत्या सैन्याच्या शौर्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याचे काय?

In reply to by क्लिंटन

मदनबाण 24/12/2014 - 00:09
क्लिंटनराव मिलेटरी मॉर्डनायझेशनची अत्यंत गरज आहे या बद्धल काही वादच नाही ! सध्याचं सरकार काय निर्णय घेतय त्या बद्धल उत्सुकता आहेच... काही घेतले गेले आहेत, काही लवकरच घेतले जातील ही अपेक्षा ! बाकी काही व्हिडीयो देण्याची इच्छा तीव्र झाल्याने इथे देत आहे :- १}कारगिल मधील भारतीय सैन्याची मुव्हमेंट आणि बोफोर्सची फायरिंग २} मध्यंतरी पाकिस्तानने सातत्याने फायरिंग केल्यावर आपल्या मिलेटरी ने दिलेले घाणाघाती प्रतिउत्तर ! ३} पाकिस्तानच्या नूक्लिअर ब्लॅकमेलिंगवर चाललेली चर्चा ४} माझ्या मते ही India's Multi-Barrel Rocket Launchers - BM-21 / 30 आहेत. कारगिल युद्धात टायगर हिल वर यांचा मारा करण्यात आला होता. ५}Indian Army - Artillery of India मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

In reply to by मदनबाण

मदनबाण 09/05/2015 - 23:09
इथे जे जनरल व्ही के सिंह म्हणाले होते, त्याच बद्धल आता CAG रिपोर्ट सांगत आहे ! संदर्भ :- Army ammo reserves may last just 20 days of intense fighting: CAG India faces severe ammunition shortage, can fight war for only 20 days: CAG India faces acute shortage of ammunition: CAG tells Defence Ministry in report आपल्या देशाची अशी लष्करी दुरावस्था का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आई शपऽऽथ्थ साडी मधे दिसते झकाऽऽऽस्स्स तू ;)

In reply to by नितिन थत्ते

मदनबाण 22/12/2014 - 16:16
केम छो चच्चा ! ;) मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती. तमारो टेलरिंग नो साईड बिझनेस छे के ? ;) मने तो खात्रीच हती, की तमे आ धागाना प्रतिसाद देवा माटे जरुर आवशे... [ मदन शहा ] ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by नितिन थत्ते

अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या... भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. शिवाय, पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे. (सर्व प्रकारच्या नजरांना दिसायला सोपे जावे म्हणून महत्वाचा भाग येथे उठावदार केलेला आहे :) ) ...या वाक्यांचा अर्थ कळेल. नाहीतर "सर्वात पहिले स्वार्थी राजकारण, देशकारण गेले चुलीत" या मंत्राचा जप करणे काही जण चालू ठेवतीलच म्हणा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्लिंटन 22/12/2014 - 17:25
अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या...या वाक्यांचा अर्थ कळेल.
छे बुवा भलत्याच अपेक्षा तुमच्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 22/12/2014 - 17:36
चिल् .... प्रतिसाद हा धागालेखकाच्या धाग्यातल्या मुद्द्यांसाठी नव्हता. तो ज्यांच्यासाठी होता त्यांना कळला असेल. धाग्यातल्या प्रतिपादनाशी सहमतच आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अनुप ढेरे 23/12/2014 - 09:52
गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे
एक्का साहेब, गेल्या सहा सात महिन्यांत काय काय वेगळं झालय याचा काही संदर्भ मिळेल काय?

In reply to by अनुप ढेरे

सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या छापील आणि एलेक्ट्रॉनिक स्रोतांवर यासंबंधात असंख्य संदर्भ उपलब्ध आहेत... यात रोजची वर्तमानपत्रे आणि टी व्ही आहेतच. त्यांचा प्रामाणिक विचार पुरेसा आहे. कोणताही राजकारणी चष्मा न वापरता ते वाचले/ऐकले तर मग मी काही न सांगताही सर्व समजेल. त्याविना इथे किती वादविवाद केले तर केवळ बँड्विड्थ खर्च होण्यापलिकडे काहिही होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अनुप ढेरे 23/12/2014 - 13:44
उगीच का वैतागताय एक्का साहेब. मी फक्त एवढं विचारलं की नव्या सरकारमुळे काश्मिर आणि इतर ठीकाणी ताबारेषेवरील धोरणात झालेल्या बदलांचा आणि त्याच्या परिणामांचा कोणी अभ्यास केलाय का आणि उत्सुकता म्हणून संदर्भ मागितले. ते न देता उगाच राजकीय चष्मा, प्रामाणिक विचार, बँडविड्थ वगैरे मध्येच का आणताय?

In reply to by अनुप ढेरे

बघा एक लेख मिळाला ना पटकन ! थोडेसे अजून उत्खनन केले तर अजून बरेच "विश्वासू" धागेदोरे मिळतिल :) . शिवाय माझे निरिक्षण एकाच लेखावरून अथवा एका बातमीवर केलेले नसून; गेल्या काही महिन्यांत पाकिस्तान बरोबरच्या व्यवहारात सद्याच्या सरकारने केलेल्या "नो नॉनसेन्स" कारवाया आणि त्यामुळे आंतरराष्ट्रिय राजकारणात मोदी आणि भारताला मिळणारी वागणूक खालील गोष्टींवरून स्पष्ट होईल : १. पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत झालेली फजिती, २. त्यानंतर एकामागोमाग एक सर्व महत्वाच्या देशांनी पाकिस्तानच्या काश्मीर बद्दलच्या तक्रारीं/रडगाण्यांकडे केलेली डोळेझाक, ३. मोठा अडसर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानाने भारतात येऊन अणुकरावर सह्या करणे, ४. WTO मध्ये भारताने हट्ट धरलेली (आणि भारताच्या सद्यस्थितीत महत्वाची सबसिडीबद्दलची सुधारणा, जी न करण्याचे पूर्वीच्या सरकारने मान्य केले होते) अमेरिकेने प्रथम प्रखर विरोध करून नंतर भारताच्या आग्रहाखातर मान्य करणे, ५. याशिवाय आंतरराष्ट्रिय राजकारणात सहसा न दिले जाणारे / आतापर्यंत न दिले गेलेले जवळिकेचे / मानाचे संदेश; उदा. कार्यक्रमपत्रिकेत नसताना प्रे ओबामाने मोदींना स्वतः बरोबर मार्टिन ल्युथर किंगचे स्मारक पहायला नेणे; अमेरिकेच्या प्रेसिडेंटने २६ जानेवारीच्या समारंभाला मुख्य आतिथीचे आमंत्रण स्विकारणे, भारताच्या पंतप्रधानाचे जपानच्या पंतप्रधानाने (हे जपानच्या इतिहासात प्रथमतः झाले आहे) आणि इतर प्रेसिडँट्स/पंतप्रधानांनी (हे अगोदर झाले असलेच तर अत्यंत विरळा असेल) आलिंगन देऊन स्वागत करणे, इ. वरवर या गोष्टी साध्यासरळ वाटल्या तरी सर्वसाधारण आंतरराष्ट्रिय सभ्यतेच्या फार पुढे जाऊन जवळीक साधण्याचे संकेत आहेत आणि ते उगाचच / उथळपणे दिले जात नाहीत. या आणि इतर गोष्टी (अ) मुळातून, (आ) त्यांचे स्वतःचे आकलन आणि (इ) त्यांचे "विश्वासू" स्त्रोतांतून मिळणारे विश्लेषण; या सर्वांच्या समन्वयाने मी माझे मत बनवले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अनुप ढेरे 23/12/2014 - 20:53
इतर परराष्ट्रीय धोरणाबद्दल सहमत आहे. मला उत्सुकता सीमारेषेवरच्या बदलांबद्दल होती. त्याचा एकच संदर्भ मिळाला आहे अजुन.

In reply to by नितिन थत्ते

श्रीगुरुजी 22/12/2014 - 20:25
>>> मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती. छातीचा साईझ नाही हो, 'वरून' आदेश नसल्याने कृती केली जात नव्हती. आणि 'साधनसंपत्ती'वर पहिला हक्क ज्यांचा आहे त्यांच्याविरूद्ध कृती करण्याचा आदेश 'वरून' कसा येणार?

In reply to by श्रीगुरुजी

नितिन थत्ते 22/12/2014 - 21:57
बॉर्र..... वरून आदेश देणार्‍यांच्या* छातीचा साईझ कमी असल्याने असं म्हणू !!! *हा प्रतिसाद अश्लील नाही याची नोंद घ्यावी.

माहितगार 23/12/2014 - 11:50
* From Jinping to Obama: Here's how the world still hyphenates India with Pakistan * Pakistan faces risks if economic reforms slip: IMF * Barack Obama signs massive defence budget; $1 billion to Pakistan * China-Pakistan Economic Corridor — A new vista of development in South Asia (पाकीस्तान टुडे डॉट्कॉमवर) * Socio-economic impact of terrorism on Pakistan डेली टाईम्स डॉट्कॉम डॉत पीके ऑनलाईन पाकीस्तानी वृत्तपत्र

अर्धवटराव 24/12/2014 - 01:40
सैन्य शक्तीने पाकिस्तान प्रॉब्लेम निर्णायकरित्या सोडवणं भारताला प्रॅक्टीकली शक्य असतं तर मला वाटतं भारताने ते एव्हाना केलं असतं. पण भारत तसं करत नाहि याचं कारण आपण फार सहिष्णु आहोत किंवा आपल्या नेत्यांमधे तेव्हढी धमक नाहि असं काहि नाहि (आपण थोडेफार सहिष्णु नक्कीच आहोत, व आपले बरेचसे नेते संसदेत बसायच्या लायकीचे नाहित हे खरे आहे). पण आपण तसं करत नाहि याचं कारण तसलं काहि करण्याची गरज नाहि, आणि करतो म्हटलं तरी ते शक्य नाहि. लमहोंने खता कि और सदियोंने भुगतान किया हे आपल्याला परवडणारं नाहि.

In reply to by अर्धवटराव

सहमत. मात्र आतापर्यंतचा पाकिस्तानचा विरोध फक्त "हातावर हात ठेऊन फक्त निषेध नोंदवणे" या जगभर हास्यास्पद समजल्या गेलेल्या पद्धतीने होत होता. सिमेवरच्या गोळीबाराचे सोडा, पाकिस्तानने आयोजित केलेल्या कोणत्याही भारत-पाकिस्तान व्दिपक्षीय चर्चेच्या स्थानी भारताचा ध्वज उलटा लावला नाही तर आश्चर्य व्यक्त केले जात होते; आणि भारताची त्याप्रसंगी "अश्या चुका होत असतात, त्यांना फार महत्व देउ नये" अश्या प्रतिक्रिया गृहित होत्या. अश्या मुळमुळीत भारताला मित्र मानणे म्हणजे आपले हसे करून घेणे असे जागतिक मत झाले याचे आश्चर्य ते काय ? १. घट्ट आणि विश्वासू राजकारणी संबंध (अ) तो असल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना फायदा होणार असला तर किंवा (आ) तो नसल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना धोका होणार असला तर किंवा (इ) वरच्या दोन्ही शक्यता असल्या तर आणि तरच प्रस्थापित होतात. २. मुळमुळीत धोरण असलेल्या आणि केवळ नीतिमत्तेच्या गप्पा मारणार्‍या देशांना फारसे महत्व मिळ्त नाही. याचे कारण जेवढा वरचा १ क्रमांकाचा मुद्दा असतो तेवढाच असे देश बेभरवश्याचे असतात (वेळप्रसंगी कच खाऊन पाठीराख्या देशाला अडचणीत आणतात) हे ही असते. आंतरराष्ट्रिय राजकारणात भित्र्याचा कोणीच मित्र होऊ इच्छित नाही आणि जो घाबरवू शकतो त्याची मैत्री सगळ्यांना हवी असते किंवा कमीत कमी त्याला उघड विरोध तरी केला जात नाही, हे एक नग्न सत्य आहे. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताच्या अणूकार्यक्रमाला असलेला अमेरिकेचा पायओढा कारभार आणि ऑस्ट्रेलियाचा (ज्यांच्याकडे जगातला विक्रीसाठी उपलब्ध असलेला सर्वात मोठा युरेनियमचा साठा आहे) सबळ विरोध लक्षणियरित्या बदलून त्यांत कृतिशीलता आलेली दिसत आहे. यामागे गेल्या काही महिन्यात "भारतामध्ये पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची राजकिय इच्छाशक्ती असल्याची" आंतरराष्ट्रिय समुदायात झालेली जाणीव आहे. याची मुख्य कारणे : अ) पाकिस्तानला सीमेवरच्या गोळाबरी व इतर कुरापतींची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा कृतिशील संदेश आ) तसे करण्याबरोबरच राजकिय भेटींत पडद्यामागे करण्यात आलेल्या अनेक विश्वासदर्शक खलबते... ज्याची परिणती अशी झाली की, पाकिस्तानने केलेल्या कांगाव्यांचा उपयोग आतापर्यंत भारताला दाबून ठेवण्यात कसा वापरता येईल हे पाहिले जात होते त्याऐवजी त्या कांगाव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आणि पाकिस्तान एकाकी पडण्यात झाली. दुसरी राजकिय खेळी राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार म्हणून श्री अजित दोवाल यांच्या निवडणूकीने खेळली गेली आहे. या पूर्व आयबी संचालकाचे जागतिक व प्रादेशिक गुप्तहेर कारवायांचे ज्ञान आणि पूर्वकर्तृत्व वादातीत आहे... या एकाच घटनेने आयएसआयची झोप बर्‍यापैकी उडाली आहे असे म्हटले जाते. नुकतेच ISIS ने इराकमधे बंदी केलेले भारतिय नागरिक सुखरूप परत आले त्यामध्ये दोवाल यांचे बरेच योगदान होते. आजपर्यंत भारताच्या कोणत्याही निषेधाकडे हास्यास्पद कारणे देत दुर्लक्ष करणार्‍या पाकिस्तानाला तोंडदेखला मान देत का होईना पण मुंबई हल्ल्याचा आरोपी लष्करे तोयबाच्या झाकी उर रहमानला परत नजरकैदेत ठेवावे लागले. या झाल्या उघड कृती. पडद्यामागे याच्या अनेक पटींनी हालचाली सुरू नसल्या तर आश्चर्य असेल. त्या जरी वर दिसत नसल्या तरी उघड कृतींपेक्षा जास्त परिणामकारक असतात. युद्धतंत्राचे सर्वात मोठे तत्व असे आहे की, गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळून मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो. कारण थोड्या कालावधित पूर्ण विजय मिळविण्याच्या भरात जेत्यालाही पराभवाचा धोका अथवा अश्या युद्धाची तात्कालिक व/किंवा दीर्घकालीन न परवडणारी किंमत चुकवावी लागते. उदा : १. मराठे आणि अबदाल्ली यांच्यातल्या पानिपतच्या तिसर्‍या युद्धात मराठ्यांचा पराभव होऊन मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली असली तरी अबदाल्लीचेही इतके नुकसान झाले की त्याला सैन्याच्या विरोधामुळे आणि बंडाळीमुळे अफगाणीस्तानात परतणे भाग पडले. २. इराक आणि अफगाणिस्तानमधल्या युद्धांत झालेला खर्च हे सुद्धा अमेरिकेच्या १८ ट्रिलियन डॉलर इतक्या महाप्रचंड राष्ट्रिय कर्जाचे कारण आहे; आणि त्यामुळे अमेरिकेच्या जागतिक राकारणातल्या वजनात लक्षणिय घट झालेली आहे. ३. दुसरे महायुद्ध जिंकूनही आर्थिक आणि सामरिक रित्या खिळखिळे झालेल्या ब्रिटनला पुढ्च्या पाच-दहा वर्षांत त्याच्या सर्व महत्वाच्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे भाग पडले आणि जागतिक महासत्तेचा मुकुट अमेरिकेकडे गेला. असो. ही केवळ सुरुवात आहे. (अ) सद्या योग्य दिशेने चाललेल्या भारताच्या आंतरराष्ट्रिय पटलावरच्या वाटचालीने भविष्यात वेग पकडला, (आ) तिला देशांतर्गत सबळ विकासाचे पाठबळ मिळाले आणि (इ) "भारताशी दुष्मनी फारच महागात पडते" हे भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल. इतके सर्व असले तरी पाकिस्तानच्या संबंधात (अ) हातावर हात ठेऊन बसणे किंवा (आ) सर्वशक्तीनिशी हल्ला हे दोनही पर्याय सद्यकाळात व्यवहार्य नाहीत. मात्र पाकिस्तानला त्याच्या दु:साहसांची सामरिक, आर्थिक आणि राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू आहे अशी लक्षणे दिसत आहेत.

सुबोध खरे 25/12/2014 - 12:25
अणु शक्ती हे दुधारी शास्त्र आहे आणी अणुयुद्ध आतापर्यंत न होण्याचे कारण म्हणजे MAD (mutually assuared destruction) म्हणजे उभयपक्षी विनाश हा ठरलेला असल्याने सहसा कोणी अणु युद्धास धजावलेले नाही. राहिली गोष्ट प्रथम हल्ला करणार नाही (NO FIRST USE) हे लोढणे सुद्धा कागदी आहे. एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे. जर यदाकदाचित पाकिस्तानचा समूळ नाश झाला नाही तर वाचलेल्या अणु शस्त्रानी त्यांनी प्रतिहल्ला केला तर दोन तृतीयांश भारत नष्ट होईल. वरील भीती मुळेच पाकिस्तान काही शे अणुशस्त्रे निर्माण करण्याच्या मागे आहे. भारत अणु पाणबुडीतून( चक्र आणी अरिहंत ) डागण्याची आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी याच साठी करीत आहे कि जर जमिनीवरील सर्व शस्त्रे अणूहल्ल्यात नष्ट झाली तरी पाणबुडीतील वाचलेल्या शस्त्रास्त्रांनी पाकिस्तान किंवा चीनचा संपूर्ण विध्वंस करता यावा. http://en.wikipedia.org/wiki/Second_strike http://en.wikipedia.org/wiki/Sagarika_(missile) http://en.wikipedia.org/wiki/K-4_%28SLBM%29

In reply to by सुबोध खरे

सहमत. पारंपारिक युद्ध आणि अगदी सुक्ष्म (लो की) अणूयुद्ध यांच्यातही जमीन-अस्मानाचा फरक आहे. अणूयुद्ध म्हणजे एकाच बाँबने एक शहर उद्ध्वस्त करून युद्ध जिंकणे असा समज दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेल्या अणूबॉंब्जमुळे आणि त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाचे पारडे दोस्तराष्ट्रांच्या बाजूने झुकण्यात झाल्याने झाला आहे. सद्याच्या बदललेल्या राजकिय आणि सामरिक वस्तुस्थितीत हे शक्य नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण 26/12/2014 - 00:06
@ एक्का काका आपले घटनांचे विश्लेषण आवडले ! गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळूण मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो. हा विचार अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल. पाकिस्तानचे अस्तित्व हे फक्त आपल्या द्वेषावर अवलंबुन आहे...इथे राज्य करणार्‍याला / नियंत्रण ठेवणार्‍याला हिंदूस्थान्द्वेषाचा एक कलमी कार्यक्रम राबवण्या शिवाय पर्याय नाही,हा त्यांचा इतिहास सुद्धा सांगतो आणि वर्तमान सुद्धा. त्यांची आपल्याशी सरळ युद्ध करण्याची क्षमता नाही हे ते स्वतः जाणुन आहेत त्यामुळेच त्यांनी आपल्या विरुद्ध thousand cuts निती अवलंबली. ते आपल्याशी शांततेने राहु शकत नाहीत कारण प्रचंड हिंसाचार होउनच त्यांच्या या राष्ट्राची निर्मीती झाली आहे.त्यामुळे Pakistan isn't ready for peace with India हेच सत्य आहे आणि आपण हे सत्य कायम ध्यानात ठेवले पाहिजे. राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू अशी लक्षणे दिसत आहेत. +१ @ डॉक एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). हा दॄष्टीकोन लक्षात आला... यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे. होय... याचे सध्याचे उदाहरण आपल्या नजरे समोर येत आहे { अर्थात अणूबॉम्बच्या जागी रिअ‍ॅक्टर आहेत.} ११ मार्च २०११ साली जपानच्या फुकुशिमा दायची रिअ‍ॅक्टर अपघात झाला आणि सुनामी बरोबरच जगाने नूक्लिअर रिअ‍ॅक्टर ब्लास्ट सुद्धा पाहिला. या घटनेचे परिणाम आता युएस च्या वेस्ट कोस्ट मधे दिसायला लागले आहेत... Fukushima radation त्यामुळे तुमचे प्रतिपादन योग्यच आहे आणि पाकिस्तानवर असा हल्ला करणं आपल्या हिताच नाही हेच खरं आहे...पण मग सतत न्यूक्लिअर वेपन्स /मटेरिअल जिहादींच्या हाती लागण्याची भिती आहे त्याच काय करायच ? आता अफगाणिस्तान मधुन अमेरिकेचे सैन्य माघारी जायला सुरु होइल आणि या जिहादींना काही काम उरणार नाही,पाकिस्तान आता त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्या सारखे भासवेल नंतर याच मंडळींना आपल्या विरुद्ध जुंपतील त्याचे काय ? कारण जे नवाझ शरिफ आज आतंकवादाच्या विरोधात सुर आळवत आहेत त्यांनीच काही दिवसां पूर्वीच हाफिद सईदच्या सभेला जनसागर पाठवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती.त्यामुळे ह्यांच्याकडुन आपल्याला त्रास आहेच ! येत्या वर्षात काय घडामोडी होतात ते पहायला हवे... जाता जाता :- हे दुवे हिंदूस्थान-पाकिस्तानशी संबंधीत नसुन रेडियेशनशी संबंधीत मुद्धाशी असल्याने माहितीसाठी देउन ठेवत आहे. http://www.netc.com/ Tiny amounts of Fukushima radiation found in California Fukushima Radioactivity Detected Off West Coast Sickened by service: More US sailors claim cancer from helping at Fukushima मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz

In reply to by मदनबाण

मदनबाण 26/12/2014 - 12:31
एक्का कांकाचा चेर्नोबिल वरचा प्रतिसाद आणि डॉक यांचा किरणोत्साराचा प्रादुर्भावाचे थोडक्यात विष्लेषण मला या विषयावर अधिक विचार आणि वाचन करण्यास प्रवॄत्त करणारे ठरले.., यातील चेर्नोबिल घटना मला माहित होती आणि त्याबद्धल थोडी फार माहिती होती आणि त्यामुळेच पटकन Bitter butter चा दुवा मला देता आला... यावर अजुन विचार करतोय कारण आपली एनर्जीची गरज आहे आणि न्यूक्लिअर पावरची गरज आणि सेटअप वाढणार आहे. खालील दोन्ही व्हिडीयो नीट ऐकण्या सारखे आहेत...कारण फुकुशिमाचा परिणाम हा चेर्नोबिल पेक्षा जवळपास ८५% जास्त आहेत म्हणतात... आणि ही कधीही न-संपणारी दुर्घटना आहे. ! न्यूक्लिअर वेपनचा वापर करणे हे किती भयानक आहे याचा अंदाजा आला ! Fukushima Forever मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- नायक नही, खलनायक हुं मै :- खलनायक

प्यारे१ 25/12/2014 - 13:44
आमचा एक्स (सर्वार्थानं) मित्र परा म्हणतो तसं खरंच भारतीय च नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची सगळी सूत्रं मिपावरुनच हलतात असा भास होत आहे. :)

लेखात मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत. बरेचदा एखाद्या देशातील हुकूमशहाला पदच्युत करण्यासाठी त्याच्या विरोधी गटाला शस्त्रास्त्रे, पैसा वगैरे पुरवला जातो अन मागाहून त्याची फळे भोगावी लागतात. जसे २०१२-१३ मध्ये सिरियातील असाद राजवटीविरुद्ध तेथील बंडखोरांना मदत केली गेली. असाद पदच्युत होणे दूरच पण आयसिसचे भूत उरावर बसले.
त्या कुप्रसिद्ध तस्कराचे नाव आता पटकन आठवत नाही
- वीरप्पन.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 19/12/2014 - 20:40
मध्य भारतातील हस्तिदंताची तस्करी
दक्षिण भारतातील साईमंगलम् च्या जंगलात त्याचा हा उद्योग चालायचा. त्याचबरोबर चंदनतस्करीही. कन्नड अभिनेते राजकुमार यांच्या सुटकेसाठी कर्नाटक सरकारने म्हणे तीस की पन्नास कोटींची खंडणी दिली होती वीरप्पनला. त्याचे त्याने काय केले, कुठे इतका पैसा लपवून ठेवला हे कधीच बाहेर आले नाही. त्याला मारायला तब्बल वीस वर्षे लागली. एवढे अवांतर सांगत बसण्याचे कारण म्हणजे अशा गोष्टींमागे खूप खोलवर दडलेले राजकारण आणि अर्थकारण असते. त्यात वरवर परस्परविरोधी वाटणार्‍या पण आतून एकमेकांशी संधान बांधलेल्या अनेक हितसंबंधांचा गुंता असतो. लेख छानच.

In reply to by एस

श्रीगुरुजी 19/12/2014 - 20:59
>>> एवढे अवांतर सांगत बसण्याचे कारण म्हणजे अशा गोष्टींमागे खूप खोलवर दडलेले राजकारण आणि अर्थकारण असते. त्यात वरवर परस्परविरोधी वाटणार्‍या पण आतून एकमेकांशी संधान बांधलेल्या अनेक हितसंबंधांचा गुंता असतो. बरोबर. वीरप्पन मूळचा तामिळ होता पण तस्करी कर्नाटक व तामिळनाडूच्या सीमेवरील जंगलात करायचा. १९९० च्या दशकाच्या सुरवातीला कावेरी नदी पाणीवाटप वादामुळे कर्नाटक व तामिळनाडूतील संबंध विकोपाला गेले होते. त्यामुळे दोन्ही राज्यातील पोलिस कारवाईत सुसूत्रता नव्हती. त्याचा फायदा त्याने उठविला. राजकुमार या कन्नड नटाचे त्याने अपहरण केल्यावर कर्नाटकात संतापाची लाट उसळली होती परंतु तामिळ लोकांना त्यात फारसे काही वाईट वाटले नव्हते. द्रमुक व अद्रमुक अशा दोन्ही पक्षातील काही मंत्र्यांचे त्याला गुपचूप पाठबळ होते. तो काही काळ श्रीलंकेविरूद्ध लिट्टेच्या बाजूने बोलत होता. त्यामुळे काही तामिळींची त्याला सहानुभूती होती. जयललिता सरकारने शेवटी २००४ मध्ये त्याचा एन्काऊंटर केला तो सुद्धा २००६ मधील निवडणुक डोळ्यासमोर ठेवूनच.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 19/12/2014 - 13:02
तेलाचे राजकारण आहे. अमेरिका सध्या युक्रेन वरुन रशियाची कोंडी करण्यासाठी तेलाचे उत्पादन वाढवत आहे.मदतीला भारत जाऊ नये म्हणुन अमेरिका पाक कडे दुर्लक्ष करतय.

In reply to by जेपी

काळा पहाड 19/12/2014 - 18:04
मदतीला भारत जाऊ नये म्हणुन अमेरिका पाक कडे दुर्लक्ष करतय.
हे सगळे मुद्दे असते तरी सुद्धा अमेरिकेने पाकवर अंकुश लावला असता असं नाही. एक लक्षात घ्या की अमेरिका हा फक्त त्याचा स्वतःचा मित्र आहे. तो फक्त स्वतःच्या फायद्याचं करतो. आणि पाकिस्तानला दुखावणं म्हणजे अफगाणिस्तानचा रस्ता बंद करणं. त्यामुळे जोपर्यंत एखादा अतिरेकी अमेरिकेला धोकादायक ठरत नाही तो पर्यंत अमेरिका तिकडे लक्ष देत नाही आणि देणार नाही.

अर्धवटराव 19/12/2014 - 01:49
मुख्य प्रॉब्लेम या शब्दातच आहे. संपूर्ण संयुक्त राष्ट्रसंघ कुणा एका व्यक्तीला/व्यक्तीसमुहाला "अतिरेकी" म्हणत असेल काय? नसल्यास अतिरेकी वि. उर्वरीत जग असा भेदच उरत नाहि, मग त्यावर अ‍ॅक्शन तर फार लांब राहिली. इबोला सारख्या व्हायरस कंट्रोल आणि जागतीक तापमान वाढीसारख्या मुद्द्यांवर जागतीक एकमत व्हायला युनोची दमछाक होते, तर असल्या सो कॉल्ड अतिरेकी कंट्रोल करता काय हालत होईल... आणि हे सगळं आवरायचं कोणि? कुणाला शस्त्र विकायची आहेत, कुणाला तेल. कोणि अणु तंत्रज्ञान घ्या म्हणुन मागे लागलाय तर कोणाला चक्क धान्य पिकणारी जमीन आणि पाणि हवय. शिवाय आपापले श्रेष्ठत्वाचे भावनीक मुद्दे आणि जुनी उणिदुणी. सगळे खंड एकमेकांच्या पायात पाय घालताहेत, एका खंडातले देश वर्चस्वाची लढाई लढताहेत, तर उपखंडात देखील पाय खेचणे सुरु आहे. मग त्याकरता कट-काटशह करायचे, एकमेकांचे शत्रु निर्माण करायचे, शत्रुंना पाठबळ द्यायचं या सगळ्या उपद्व्यापातच अतिरेकी बिजांना खतपाणि मिळते व ते फोफावतात... कसली आलिय आरपारकी लडाई ??

जगभरातील प्रमुख देश अण्वस्त्र सज्ज झाले त्यामुळे निर्णायक पारंपारिक युद्धाची शक्यता फारच दुर्मीळ झाली . आज जग अण्वस्त्र विरहीत असते तर शीत युद्ध हा प्रकार जन्माला आला नसता ह्यातून पुढे दोन्ही गटातून एखाद्या देशात सत्ताधारी व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी विरोधी गटाला शस्त्रे , प्रशिक्षण , व पैसा देण्यात आला त्यांचा आपापल्या देशात स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वतंत्रता चळवळ म्हणून हवा देण्यात आली ह्यातून जे काही त्रांगडे निर्माण झाले त्याचे एका वाक्यात उत्तर मुशरफ ह्यांचे जगप्रसिद्ध विधान करते एका देशासाठी असलेला अतिरेकी दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो ह्यामुळे प्रत्येक देश जगात घडणाऱ्या अतिरेकी कृत्यांवर त्या आपापल्या चष्म्यातून पाहतो व त्यानुसार त्या घटनेला कमी अधिक महत्व देतो , संयुक्त राष्ट्र संघ नावापुरता असून जगातील बडी धेंडे जी २० , नेटो अश्या संघटना उभारतात त्यांना उत्तर देण्यास ब्रिक निर्माण होते आताच्या काळात दहशत वादाच्या पाठी मोठे अर्थकारण आहे जगात जो पर्यंत धर्म अस्तित्वात असणार , शस्त्रास्त्रांचा बाजार आणि विक्रेते असणार तो पर्यंत दहशतवाद किंवा त्याच्या समानार्थी शब्द स्वातंत्र्य चळवळ जगभर चालू राहणार. तो थांबविण्याची इच्छाशक्ती सध्यातरी कोण च्याही देशात नाही.

चौकटराजा 19/12/2014 - 07:22
आपल्या सोसायटीत ज्याप्रमाणे खाली पटांगणात घाण पडली तर वरच्या मजल्यावर रहाणारा त्याचा "आपल्याला काय त्याचे ?" असा विचार करतो.तसेच दहशतवादाचे आहे. तो कोण तरी असा माणूस पोसतो जो कधीतरी त्याचा बळी ( ९/११) डिसें१४ होउ शकतो.अमेरिकेने फक्त ९/११ चा अपराधी मारला पण २६/११ च्या अपराध्याला काही करण्याची त्यांची तयारी नाही. हे लक्षात घ्यावे. टीव्ही वर मिळालेली माहिती अशी की, सौदी अरेबिया हा देश यातील शेटजी आहे. त्याची अमेरिकेला गरज आहे. ती गरज संपली की तिची अर्थव्यवस्था धोक्यात येईल व तिचे शेटजीपण संपेल. मग फंडिंग थांवेल. व याला काहीसा आळा बसेल.त्यात अमेरिकेचा तोटा असा होउ शकतो की तेथील शस्त्रास्त्र उत्पादकांचा सरकारवर असलेला दबाव याचे काय करायचे ? त्यामुळे अमेरिकेने आत्ता तरी बघ्याची भूमिका घेतली आहे.

चांगले विश्लेषण. दहशतवादी कारवायांना पैसा मिळण्याचे अनेक स्त्रोत आहेत - छुप्या मार्गाने तेल विकून (जे सध्या ISIS करते आहे.), अमलीपदार्थांची तस्करी, नागरिकांना ओलीस ठेवून मिळवलेला पैसा (यात फ्रांसने आत्तापर्यंत सर्वात जास्त म्हणजे अंदाजे ४० दशलक्ष डॉलर्स एवढा पैसा दिला आहे.), विविध देशातील मुस्लीम नागरिकांकडून गोळा होणारा पैसा हे मुख्य काही. ओबामा यांनी सत्तेवर आल्यावर दहशतवादा विरुध्द लढण्यासाठी चार मुद्दांवर आधारित एक कार्यक्रम तयार केला होता- हिलरी क्लिनटन यांच्या 'हार्ड चोईसिस' या पुस्तकात तो दिला आहे. १.आंतरजालावरून प्रसारित होणाऱ्या ideology ला रोखणं २.लेखात म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न करणं- यात मुस्लीम देशांना सहभागी करून घेणं. ३. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशातल्या सरकारांबरोबर प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबवणं. ४.दहशतवादाची मुळे असलेल्या देशांमध्ये विकासाची कामे हाती घेणं (अमेरिका आर्थिक मदत देत असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक सर्वात वर त्यासाठीच आहे. पण तिथली लष्करशाही आणि लोकशाही ह्यांच्या खेळात तो पैसा दुसरीकडेच वळला.) हा कार्यक्रम आखल्यानंतर अरब क्रांती, अमेरिकेची त्यात झालेली अडचण, पाकिस्तानचं धोरण, आर्थिक कारण असे अनेक अडथळे त्यात आले. युरोपिअन देशांनी deradicalization हा त्यावरचा एक उपाय शोधला. पण ISIS च्या उगमाने तो ही अयशस्वीच ठरला.

अतिशय सखोल विवेचन....म्हणजे इतके ..कि मग आपले काय होणार आपल्या पुढच्या पिढ्यांचे काय होणार ह्या विचाराने अस्वस्थ व्हयला होते.. त्यामुळे सर्व्ह्याव्ल ऑफ द फिटेस्ट ह्या न्यायाने प्रस्थापित नैतिकतेचे निकषच बाजूला पडतील कि काय आणि मग अश्मयुग नाही तरी ...जंगलराज हेच शेवटी टिकेल कि काय असे वाटते ... .....फिलिंग लैच होपलेस ...

राही 19/12/2014 - 13:45
समतोल आणि माहितीपूर्ण लेख आवडला. आपल्याकडे अतिरेक्यांच्या बीमोडावचा मुद्दा निघाला की अतिरेक्यांपेक्षा अतिरेकी भाषा वापरली जाते. 'यांना ठेचून काढले पाहिजे, पाकिस्तानला बेचिराग केले पाहिजे' वगैरे. अगदी उचलली जीभ, लावली टाळ्याला. या सर्वातले धोके, अडचणी, शक्याशक्यता, व्यवहार्यता यांचा कोणीच विचार करीत नाही. एखादी विचारधारा काही काळ म्हणजे एखादे शतक पूर्ण व्यापून टाकते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून कडव्या इस्लामची विचारधारा जगभर अशीच प्रभावी राहिली आहे. अदाचित अरेबियामधली सत्ता बदलेल, तिथे समाजसुधारणा होईल, कदाचित धर्मसुधारणा होतील, या आशेवर एकविसाव्या शतकाची वाटचाल चालू आहे. इथे शॉर्टकट अजिबात नाहीत. आणखी एकदोन पिढ्या वाट पहावी लागेल असे दिसते.

श्रीगुरुजी 19/12/2014 - 14:21
>>> तरीही अशी कृती केली जात नाही. ते का? मी या लेखावर पूर्वीच खरडवहीतून प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे परत लिहीत नाही. परंतु, थोडक्यात सांगायचं तर दहशतवाद संपविण्यासाठी सर्व देशांनी (निदान प्रमुख २५-३० देशांनी तरी) एकत्र येऊन लष्करी कारवाई करणे हाच एकमेव उपाय शिल्लक राहतो. तुमच्या वरील सविस्तर व सखोल विवेचनानुसार हा उपाय अंमलात आणणे अत्यंत अवघड असले तरी हाच एकमेव उपाय असू शकतो. दुसर्‍या कोणत्याही मार्गाने दहशतवाद नष्ट होऊ शकणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या वरील सविस्तर व सखोल विवेचनानुसार हा उपाय अंमलात आणणे अत्यंत अवघड असले तरी हाच एकमेव उपाय असू शकतो. दुसर्‍या कोणत्याही मार्गाने दहशतवाद नष्ट होऊ शकणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट समोरासमोर (हेड ऑन) हल्ला करून ("एक घाव दोन तुकडे" अशी) नष्ट करणे शक्य नसते अथवा तसे करण्याची किंमत अवास्तवी जास्त असते; तेव्हा "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" म्हणजे "त्या गोष्टीचा प्रभाव शक्य तेवढा ताब्यात ठेवत वेळकाढू धोरण स्विकारणे" हे वास्तविकतेला जास्त धरून असते. याचा अर्थ तिकडे दुर्लक्ष करणे असा नाही; याउलट सतत बारीक निरिक्षण चालू ठेवून जरूर तेव्हा व जरूर तेवढाच हस्तक्षेप करणे असा आहे. या डॉक्ट्रीनची परिणती दोनपैकी एकाने होणे अपेक्षित असते: १. ताब्यात ठेवलेल्या अनेक गोष्टींचा प्रभाव वेळेबरोबर कमी होऊन त्या नष्ट पावतात अथवा अतिशय कमकुवत होतात. २. सतत लक्ष ठेवून असल्याने योग्य मोक्याचा फायदा घेऊन मर्माघाती वार करून ती गोष्ट नष्ट अथवा अतिशय कमकुवत करता येते. सरळ सरळ उत्तर देण्याच्या कृतीला खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर (बेनेफिट्/कॉस्ट रेशो) असल्यास "कंटेनमेंट डॉक्ट्रीन" वापरून केलेल्या कृती जास्त फायदेशीर असतात. भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे.

नाखु 19/12/2014 - 15:35
महोदयांनी एका धाग्यावर मागीतलेल्या म्हणींची प्रकर्षाने आठवण झाली. १.ज्याचे जळते त्यालाच कळते २.पाळलेला नाग तुम्हाला डसणारच नाही असे नाही ३.कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे (पाकडे) मूळ अवांतर :धागा विषय विस्तार विचारप्रवर्तक आणि माहीतीपूर्ण आहे पण प्रतिसादात एकदाही "एखादी योजना" विनाविलंब अमलात आणावी असे कोणीही म्हटले नाही *SCRATCH* विलंबीत न्याय म्हणजे अन्याय असे कुठेसे वाचलेले आठ्वते.

माहितगार 19/12/2014 - 19:26
आतापर्यंत आपण केवळ उघड दिसणारी शोरूम बघितली आहे...
धागा लेखातील काही मुद्दे कळाले, पण बर्‍याच शंका शिल्लक राहील्या असे वाटते. संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वात बलाढ्य असलेला नाटो गट जेथे प्रचंड पैसा आणि सैन्यबळ वापरून परिस्थिती सुधारणा करण्यात यशस्वी झाला नाही तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने संयुक्त कार्यवाही कितपत यशस्वी ठरेल हा एक प्रश्न झाला. माझ्या अल्प माहितीनुसार संयुक्त राष्ट्रसंघाच कार्य शांतता प्रस्थापनेच आहे युद्धाचं नव्हे. जिथे स्थानिक समाजाची इच्छाशक्ती नाही सुंदोपसुंदी आहे तेथे बहुदेशीय सेनांच्या बाबतीतील यापुर्वीचे अनुभव कितपत यशस्वी झाले आहेत हे कदाचित तपासून पहाणे रोचक ठरू शकेल. इथे महत्वाचा प्रश्न वेगळाच उपस्थित होतो भारताची आता पर्यंतची अधिकृत भूमीका, स्थानिक सत्तांनी आपापसातील प्रश्न आपापसात सोडवले पाहिजेत, स्थानिक प्रश्नांचे भान आणि जाण नसताना महासत्तांनी असो वा संयूक्तराष्ट्रांनी असो उंटावरून शेळ्या हाकण्याचे हस्तक्षेप करण्याचे टाळावे अशी राहिलेली आहे. पण गेल्या काही वर्षात भारतीयांची मनोभूमीका या विषयावर बदलत आहे का ? काश्मिर प्रश्नात आपण बाहेरच्या देशांची अथवा संयुक्तराष्ट्रांची भूमीका स्विकारणार आहोत का ? अतिरेकी जेव्हा सिव्हिलीयन्स मध्ये मिसळलेले असतात आणि स्थानिक समाज मदत करतो अथवा दहशतीने मौनबाळगतो अशा ठिकाणी कोणत्याही सैनिकी कार्यवाहीत काहीना काही सिव्हिलीयन्स कॅज्युअल्टी अटळपणे होतात अशा कॅज्युअल्टी झाल्या की समाजाचे सहानुभूती अतिरेक्यांच्याच बाजूने वळण्याची शक्यता असते. सैन्यदले पोलीसदलांना आत्मविश्वास देऊ शकतात पोलीसदलांची जागा घेऊ शकत नाहीत हे बर्‍याचदा अनुभवले जाते. उलटपक्षी अतिरेक्यां घटनांविरुद्ध ट्रासंपरंट कार्यवाही, पोलीसदलांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि अगदी अशांत परिस्थितीतही संबंधीत राज्यात लोकशाही निवडणूका घेत राहण्याच्या भारतीय स्ट्रॅटेजीला फळे उशीरा लागत असतील पण चांगली फळे आल्याचे अनुभव आहेत ते या मिपाचर्चां प्रतिसादामधून दुर्लक्षीले तर जात नाहीएत अशी शंका वाटते. बादवे वरील धागा आणि प्रतिसाद लक्षात घेता हे आणि हे वृत्त चर्चेत सहभागी होत असलेल्यांना रोचक वाटू शकेल असे वाटते.

बोका-ए-आझम 19/12/2014 - 21:52
कुठलाही अतिरेकी गट किंवा संघटना यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात - १. नवनवीन उमेदवार सहज भरती करता येतील असा स्त्रोत २. हे लोक क्रूरतेच्या कुठल्याही थराला जाऊ शकतात असा लोकांमध्ये विश्वास किंवा भीती. ३. पैसे. आत्ता सध्यातरी तालिबान (अफगाणी आणि पाकिस्तानी) कडे या तीनही गोष्टी आहेत. यांच्यातल्या क्रमांक १ आणि ३ च्या गोष्टींवर नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यापूर्वी लिबरेशन टायगर्स आॅफ तामिळ इलम (LTTE) आणि IRA (Irish Republican Army) या दोन दहशतवादी संघटनांचा असाच दरारा होता. पण आता त्यांचा प्रभाव ओसरला आहे. तालिबानची आर्थिक उलाढाल ही मुख्यतः अफू आणि त्यापासून बनणा-या इतर अंमली पदार्थांच्या व्यापारातून चालते. शिवाय ते इतर दहशतवादी गटांना शस्त्रं आणि प्रशिक्षणही पुरवतात. दुर्दैवाने जो समन्वय या दहशतवादी संघटनांमध्ये आहे तो जगभरच्या पोलिसांमध्ये नाही.

कोलॅटरलची काळजी नं करता ह्या भि.चो. अतिरेकी राष्ट्रांवर २-४ अणुबाँब टाकुन द्यायला हवेत. तसही त्यांच्याविरुद्ध थेट कारवाई नं करतासुद्ध हे दुसर्‍या देशात अतिरेकी कारवाया करतचं आहेत की. सामान्य नागरीक मरतील वगैरे प्रश्ण कशाला हवेत? आमचे सामान्य नागरीक मरतात तेव्हा कोणं काळजी करतं का? तसही त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देणारे सो कॉल्ड सामान्य नागरिकचं आहेत बहुतांश प्रमाणात. ते अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश चं नामोनिशाण मिटलं ना जगाच्या नकाशावरुन तर सर्व जगाच्या डोकेदुखी कमी होतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमाला गुडघेदुखी सुरु झाली तर आख्खा पाय काढणारा डॉक्टर चालेल काय? तसेचय ते ,कोलॅटरल डॅमेज नकोच.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

कुठलातरी बादरायण संबध जोडु नका. आणि गुढगेदुखी जर काही कारणानी जीवावर बेतणारी असेल तर डॉक्टर तोच सल्ला देईल बहुदा. सो असल्या दहशतवादरुपी कॅन्सरचा नायनाट करण्यासाठी अणुथेरपी हवीचं. मग ते *^&@^#& पाकिस्तानी आणि तालिबानी मेले तर मरु देत की त्यांच्याबद्दल तुम्हाला येवढा कळवळा का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यसवायजी 19/12/2014 - 23:11
तसही त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देणारे सो कॉल्ड सामान्य नागरिकचं आहेत बहुतांश प्रमाणात. परवाच प्रकाश आमटेंवरचा चित्रपट पाहिला. नक्षलवाद्यांच्या बाबतीत पण अगदी असंच चाल्लंय. सामान्य नागरिकाच्या कानाजवळ एके-४७ धरल्यावर त्यांच्याकडे अतिरेक्यांना आश्रय देण्यावाचून पर्याय काय राहतो बॉस्स?

In reply to by यसवायजी

ऩक्षलवाद्यांना कानापाशी एके४७ धरावी लागते तेव्हा आश्रय मिळतं असेल.....पाकिस्तान काय आणि तालिबानच्या प्रभावक्षेत्राखालील "सामान्य" शांतीवादी नागरिक काय, हिंदु/काफिर/ भारत विरोधी बोललं की लगेचं आश्रय मिळत असेल. ड्रोन कारवायांमधे "सामान्य" नागरिक मरायचं हेचं तर कारणं आहे. कारण आंतरराष्ट्रिय युद्धनियमावली प्रमाणे कुठल्याही देशाच्या सैन्याला रहिवासी विभागांवर थेट हल्ला करता येत नाही. ह्या नियमाचा फायदा घेऊन दबावानी म्हणा किंवा सहानभुतीनी म्हणा रहिवासी विभागात दहशतवाद्यांचे अड्डे तयार होतात. तालिबान/ अल कायदा प्रणित दहशतवाद कॅन्सर सारखा आहे. मुळासकट नष्ट केल्याशिवाय जगात शांतता नांदु शकणार नाही. तस्मात, २-४ अणुबाँब टाकुन दयावे ह्या उपायापर्यंत कारवाई केली पाहिजे किंवा कमीत कमी त्याची भिती दाखवुन दहशतवाद्यांना गप बसवलं पाहिजे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तस्मात, २-४ अणुबाँब टाकुन दयावे ह्या उपायापर्यंत कारवाई केली पाहिजे किंवा कमीत कमी त्याची भिती दाखवुन दहशतवाद्यांना गप बसवलं पाहिजे. :) अणुबाँबचे परिणाम स्थानिक न राहता ते किती प्रमाणात जागतिक धोका निर्माण करू शकतात हे चेर्नोबिल अपघाताच्या अनुभवावरून लक्षात यावे. विशेषतः भारत या कारवाईतल्या महत्वाच्या भूभागाच्या अतिजवळ आहे हे लक्षात घेता अश्या कारवाईचे फायदा/व्यय गुणोत्तर भारताच्या दृष्टीने अत्यंत घाटयाचे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण 22/12/2014 - 17:00
अणुबाँबचे परिणाम स्थानिक न राहता ते किती प्रमाणात जागतिक धोका निर्माण करू शकतात हे चेर्नोबिल अपघाताच्या अनुभवावरून लक्षात यावे. विशेषतः भारत या कारवाईतल्या महत्वाच्या भूभागाच्या अतिजवळ आहे हे लक्षात घेता अश्या कारवाईचे फायदा/व्यय गुणोत्तर भारताच्या दृष्टीने अत्यंत घाटयाचे आहे. अहो एक्का काका आपल्या देशातले लोक काटक आहेत ! ते काहीही पचवु शकतात... Bitter butter

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काळा पहाड 22/12/2014 - 17:13
टॅक्टिकल न्युक्लीयर वेपन्स (उदा: सब किलोटन रेंज ची वेपन्स: http://en.wikipedia.org/wiki/Tactical_nuclear_weapon) हा प्रॉब्लेम सोडवू शकतात. त्यांचं यील्ड आणि परिणाम कमी असतो. पण एकदा न्युक्लीयर वेपन टाकलं की त्याचा मानसिक आणि आंतरराष्ट्रीय परिणाम खूप जास्त आहे. एक खून केला काय किंवा दहा खून केले काय, ते खूनच. म्हणून टॅक्टीकल न्युक्लीयर वेपन्सचा उपयोग फारसा नाही. न्यूक्लीयर वेपन्सचा उपयोग शत्रूची राखरांगोळी करण्यासाठीच होतो आणि त्यासाठी स्ट्रॅटेजीक न्युक्लीयर वेपन्स (http://en.wikipedia.org/wiki/Strategic_nuclear_weapon) हीच परिणामकारक आहेत आणि त्यांचा उपयोग हा दुर्मिळातील दुर्मिळ वेळी करायची गोष्ट आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही म्हणताय त्याच्यात तत्थ्य आहे. पण एक विचार करा. पाकिस्तानमधली स्थिती दिवसेंदिवस अस्थिर होतीये. त्यांचं लष्कर आणि आय.एस.आय. उघडपणे दहशतवादाला पाठिंबा देतायत. जर का एखादा अतिरेकी मुशर्र्फ प्रमाणे लष्करी हुकुमशहा बनला तर अण्वस्त्रांचा वापर कुठे पहिला होईल हे सांगायला तज्ञाची गरज नाही. भारत, इस्त्राईल आणि अमेरिका ही मह्त्तवाची टारगेट्स्स ठरतील. अमेरिकेच्या सुदैवानी पाकिस्तानकडे आय.सी.बी.एम्स आजमितीला नाहीत पण चीन त्यांना ही टेक्नॉलॉजी देउ शकतो. आपण मात्र अगदी शेजारी असल्यानी घौरी वगैरे क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात बहुतेक सगळी महत्त्वाची शहरे आहेत. अश्या परिस्थितीमधे "फास्टेस्ट फिंगर ऑन ट्रिगर विन्स" अशीच परिस्थिती असेल. आता फक्त प्रश्ण एवढाच आहे की रोग झाल्यानंतर औषध द्यायचं का रोगप्रतिकारक लस टोचायची.

खटपट्या 19/12/2014 - 22:44
काहीही झाले तरी त्याला भारतच जबाबदार अशी पाकीस्तानी जनतेची मानसिकता बनलेली दिसतेय. आपण त्यांच्यासाठी मेणबत्ती मोर्चे आणि मौन वगैरे पाळतोय आणी चेपू आणि ट्वीटरवर मात्र पाकड्यांची अत्यंत हीन पातळीवर शेरेबाजी चालू आहे.

In reply to by खटपट्या

अगदी अगदी. आणि आमचं ** मिडीया त्यांच्या नावानी गळे काढतयं. आणि मेणबत्त्या लावुन फिरतयं.

मदनबाण 22/12/2014 - 12:31
पाकिस्तान हा जागतिक सुरक्षेला झालेला मोठा धोका आहे... त्यापेक्षाही आपल्या टाळक्याला तो अधिक ताप देणारा ठरला आहे आणि त्यात भर पडेल हे निश्चित ! बाकी Cold Start (military doctrine) बद्धल काही अधिक माहिती / बातम्या असतील तर वाचायला आवडेल...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

माहितगार 22/12/2014 - 13:23
काही अधिक माहिती / बातम्या असतील तर वाचायला आवडेल...
आपण दिलेला इंग्रजी विकिपीडिया दुवा वाचला. भारताची जी काही सामरीक व्यूहरचना असेल ती गोपनीय असावयास नको का ? मनमोहनसिंग काळात आमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणांनी भारताची माहिती नेली असावी त्यांच्या पर्यंत पोहोचू नये पोहोचलीच तर ती पाकीस्तान पर्यंत पोहोचू नये आणि समजा तसेही झाले तर मिडीयात एवढ्या उघडपणे चर्चीत होऊ नये. आमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणांना गोपनीय कारवाया मित्रराष्ट्रातही करणे जमते पण अशा कारवाया आणि त्यातून येणारी माहिती गोपनीय राखणे जमत नाही असे दिसते. किमान एवढ्यासाठी तरी भारतीयांनी सामरीक व्यूहरचने बाबत अधिक गोपनीयता पाळावयास हवी. अर्थात जे आधीच आंतरजालावर चर्चेत आहे त्या बद्दल चर्चा करणे ठिक आहे. पण नवी गोपनीय माहिती उघड होणे ठिक नाही.

In reply to by माहितगार

मदनबाण 22/12/2014 - 13:31
.भारताची जी काही सामरीक व्यूहरचना असेल ती गोपनीय असावयास नको का ? अगदी योग्य प्रश्न विचारलात ! ती गोपनियच असायला हवी मग कोल्डस्टार्ट बाहेर कसं आल ? लष्कराच्या कुठल्याही महत्वाच्या गोष्टी बाहेत उघडकीस येणे धोकादायकच, पण आपला दुबळेपणा वारंवार उघडा पडुनही आहे त्या परिस्थीतीत बदल होताना दिसत नाही. एकदाच काही तरी परिणामकारक "सर्जरी" करा की रोग समूळ नष्ट करणे जरी लगेच शक्य नसेल तरी त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

माहितगार 22/12/2014 - 13:53
एकदाच काही तरी परिणामकारक "सर्जरी" करा की रोग समूळ नष्ट करणे जरी लगेच शक्य नसेल तरी त्याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल
आता मोदी आणि पर्रीकर आहेत ना, सोबतीस राजनाथ सिंग आणि सुषमाबाईंची टिम आहे ते योग्य काय ते ठरवतील. अर्थात मिपावर बर्‍याच जणांचे मत काही तरी आश्चर्यचकीत करणारे लष्करी काम करून पाकीस्तानला धूळ चाटावी असे असावे असे दिसते. एनी वे तुम्ही (म्हणजे अशी मते असलेले मिपाकर) स्वतहा सुरक्षा सल्लागार असते तर नेमकी काय निती त्यांना सुचवली असती आणि वास्तवाचे भान ठेऊन फूलप्रूफ कशी केली असती हे भारताच्या खर्‍या संरक्षण निती पेक्षा अधिक समजून घेण्यास आवडेल.

In reply to by माहितगार

मदनबाण 22/12/2014 - 14:46
मिपावर बर्‍याच जणांचे मत काही तरी आश्चर्यचकीत करणारे लष्करी काम करून पाकीस्तानला धूळ चाटावी असे असावे असे दिसते. युद्ध कोणाला हवे असते ? जे अघोषीत युद्ध आपण लढत आहोत, ते अजुन किती वर्ष लढायचे ? किती जवान आणि सिव्हीलियन्सा बळी यात देण्याचे ठरवले आहे ? एनी वे तुम्ही (म्हणजे अशी मते असलेले मिपाकर) स्वतहा सुरक्षा सल्लागार असते तर नेमकी काय निती त्यांना सुचवली असती आणि वास्तवाचे भान ठेऊन फूलप्रूफ कशी केली असती हे भारताच्या खर्‍या संरक्षण निती पेक्षा अधिक समजून घेण्यास आवडेल. कारगिल युद्ध आणि संददेवरील हल्ला या दोन्ही घटनांचा { त्या-त्या वेळी} आधार घेत आपण लष्करी कारवाई करण्याची वेळ घालवुन बसलो आहोत असे माझे स्पष्ट मत आहे. सर्व प्रथम लष्करातील सर्व प्रमुखांना तुम्हाला पाकित्सानची गचांडी आवळायला किती वेळ लागेल ? हा प्रश्न विचारला असता, त्यासाठी ऑपरेशला लागणारा खर्च / दारुगोळा / ड्रील / आणि संपूर्ण कारवाई करण्यासाठी लागणारा वेळ विचारला असता. हे सर्व होउ पर्यंत वेळ घ्या पण रिझल्ट द्या असे निक्षुन सांगितले असते. लष्करातली युद्धाचा अनुभव असलेली, सध्या कार्यरत असलेली आणि रिटायर्ड झालेली मंडळी. तसेच डिफेन्स एक्स्पर्ट यांची एक टीम बनवली असती. मुखत्वे पायदळाचे निर्णय या मंडळीनीच घ्यावेत... नेव्ही आणि वायु सेना यांची टीम या एकाच वेळी कोऑरडिनेट होवुन नेव्हीला कराची आणि ग्वादार बंदर उध्वस्त करायला सांगुन पाकिस्तानला समुद्र मार्गाने येणारी तेल आणि इतर आवश्यक रसद बंद पाडली असती. वायु सेनेला पाकिस्तानले महत्वाचे मिलेटरी एअर बेस तसेच धरणे आणि महत्वाचे पूल उडवुन टाकण्याचे आदेश दिले असते. पाकिस्तान कडुन पहिल्या आण्विक हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेउन त्यांच्या स्टॉकपील आणि अणूभट्या उडवुन देण्याचा आणि धरणे उडवण्याचा सल्ला सुद्धा दिला असता... एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावुन परत या... जगाच्या नकाशातुन पाकिस्तान हे नाव पुसले गेले तरी हरकत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

क्लिंटन 22/12/2014 - 15:40
आपण हे सगळे करेपर्यंत पाकिस्तान हातावर हात ठेऊन स्वस्थ बसणार आहे असे तुम्हाला वाटते का? डिसेंबर २००१ मध्ये संसदभवनावर हल्ला झाला आणि त्यानंतर युध्दाचे ढग जमू लागले.तात्पुरते ते विरले पण मे २००२ मध्ये कालूचक येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परत एकदा युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली.त्यावेळी इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री जॅक स्ट्रॉ आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल पहिल्यांदा पाकिस्तान आणि नंतर भारत भेटीवर आले होते.दोघांनाही मुशर्रफने असे स्पष्ट संकेत दिले की भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान मागेपुढे न पाहता भारतावर अणूबॉम्ब टाकेल.दोघांनाही मुशर्रफने काय सांगितले हे दिल्लीमध्ये येऊन वाजपेयी-जसवंत सिंगांच्या कानावर घातलेच.त्यानंतर वाजपेयींसारख्या नेत्यानेही पाकिस्तानवर हल्ला करायचे टाळले यातच सगळे काही आले. पाकिस्तानातून भारतावर दहशतवादी हल्ले होतात, त्यात अनेक निरपराध भारतीयांचा बळी जातो ही सत्य परिस्थिती आहेच.दरवर्षी काश्मीरात आणि देशात इतर ठिकाणी मिळून २००० बळी जातात असे समजले तरी २००० लोकांना वाचवायला म्हणून नी-जर्क रिअ‍ॅक्शन म्हणून पाकिस्तानवर हल्ला करायचा आणि त्यातून अणुयुध्द झाल्यास २ कोटी लोकांचा बळी घालवायचा का? आपल्याकडे अणुबॉम्ब आहे पण आपणच "नो फर्स्ट युज" चे लोढणे आपल्याच पायात अडकवले आहे.ते लोढणे पाकिस्तानच्या पायात नाही.वास्तविकपणे पाकिस्तानसारख्या शेजार्‍याचा अगदी पूर्ण विध्वंस होऊन पाकिस्तान हे नामोनिशाण नष्ट होईल आणि त्याचा आपल्याला त्रास कमीतकमी होईल इतक्या क्षमतेचे लागतील तितके अणुबॉम्ब पाकिस्तानवर टाकावेत असे मलाही वाटते.पण आपणच आपल्या पायात ते नो फर्स्ट युजचे लोढणे अडकवले आहे त्यामुळे आपण तसे करू शकू का? आणि असा हल्ला पाकिस्तानवर केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्की काय प्रतिक्रिया होईल (कदाचित चीनचा भारतावर हल्ला, गल्फमधून आयात होणारे तेल बंद होणे इत्यादी इत्यादी अनेक) हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे.त्या सगळ्या परिणामांना तोंड देऊ इतपत आपली तयारी आहे का? नाहीतर घाईघाईने काहीतरी करून बसले आणि नंतर पश्चात्तापाची वेळ आली असे झाल्यास काय? मला वाटते असले काहीही होणे केवळ अशक्य आहे.काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी करणारे लोक मोठी पदे भूषवत असलेल्या पक्षाला लोक मते देतात, पूर्ण भारतीय कायद्याला अनुसरून पध्दतीने अफझलला फाशी दिल्यानंतरही त्याविरूध्द आरडाओरडा करणार्‍या मानवाधिकारवाल्यांच्या तोंडावर आपण थुंकत नाही, पकडलेल्या दहशतवाद्यांना आपण वर्षानुवर्षे जिवंत सोडतो आणि मग त्यांना सोडा ही मागणी करायला विमान अपहरण होते तरीही त्यांना आपण ताबडतोब फासावर लटकवत नाही अशी परिस्थिती असताना पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकणे वगैरे खूपच दुरच्या गोष्टी आहेत.

In reply to by क्लिंटन

मदनबाण 22/12/2014 - 15:58
क्लिंटनराव... अहो अणू युद्ध करायची उर्मी हिंदूस्थानला नाही, पण पाकिस्तान त्याचा वापर पहिल्यांदी करेल याची खात्री आहे ना ? मे २००२ मध्ये कालूचक येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परत एकदा युध्द होणार अशी चिन्हे दिसू लागली.त्यावेळी इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री जॅक स्ट्रॉ आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल पहिल्यांदा पाकिस्तान आणि नंतर भारत भेटीवर आले होते.दोघांनाही मुशर्रफने असे स्पष्ट संकेत दिले की भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान मागेपुढे न पाहता भारतावर अणूबॉम्ब टाकेल.दोघांनाही मुशर्रफने काय सांगितले हे दिल्लीमध्ये येऊन वाजपेयी-जसवंत सिंगांच्या कानावर घातलेच.त्यानंतर वाजपेयींसारख्या नेत्यानेही पाकिस्तानवर हल्ला करायचे टाळले यातच सगळे काही आले. आपल्याकडे अणवस्त्र असताना आपण अश्या दबावाला का बळी पडतो ? आपण जे नो फोस्ट युज चे लोढणे अडकवुन घेतले त्याचाच परिणाम आहे ना हा ? जी काही पॄथ्वी,अग्नी आणि इतर मिसाइल्स डेव्हलप केली गेली आहेत ती फक्त टेस्टींग साठीच का ? पाकिस्तानातून भारतावर दहशतवादी हल्ले होतात, त्यात अनेक निरपराध भारतीयांचा बळी जातो ही सत्य परिस्थिती आहेच.दरवर्षी काश्मीरात आणि देशात इतर ठिकाणी मिळून २००० बळी जातात असे समजले तरी २००० लोकांना वाचवायला म्हणून नी-जर्क रिअ‍ॅक्शन म्हणून पाकिस्तानवर हल्ला करायचा आणि त्यातून अणुयुध्द झाल्यास २ कोटी लोकांचा बळी घालवायचा का? आपल्याशी युद्ध करण्याची खाज पाकड्यांना आहे की नाही ? आत्ता पर्यंत त्यांनीच आपल्याशी युद्ध केले आहे की नाही ? या दोन्ही प्रश्नांची उत्तर जर हो असतील तर त्यांची ही खुमखुमी युद्ध करुन काढली तर त्यात काय चूक ? २ कोटींचा बळी देण्याची आमची इच्छा कुठे आहे, पण मस्ती त्यांनाच आहे ना ? { आजच्या घडीला सुद्धा तालिबान सारख्या अतिरेकी संघटने पेक्षा त्यांना हिदूस्थान हाच शत्रु क्रमांक १ वाटतो ना ?} मग त्यांचा बळी लष्करी कारवाईत बळी जाणारच ! तसेही अमेरिका जर इराक / अफागाणिस्तान सारखी राष्ट्र त्यांच्या नागरिकां सकट बेचिराख करु शकते तर पाकिस्तान तर आपल्याला वारंवार आघात करतो आहे तर त्याचा निप्पात केला तर काय बिघडले ? बरं उध्या अश्या काही युद्धाला सुरुवात झाली आणि पाकिस्तानने मुंबईवर आण्विक हल्ला केला तर आपण त्यातुन सावरुन पाकिस्तान /चीन ला तोंड देण्यास सक्षम राहु ? मला वाटते असले काहीही होणे केवळ अशक्य आहे.काश्मीरात सार्वमत घ्यावे ही मागणी करणारे लोक मोठी पदे भूषवत असलेल्या पक्षाला लोक मते देतात, पूर्ण भारतीय कायद्याला अनुसरून पध्दतीने अफझलला फाशी दिल्यानंतरही त्याविरूध्द आरडाओरडा करणार्‍या मानवाधिकारवाल्यांच्या तोंडावर आपण थुंकत नाही, पकडलेल्या दहशतवाद्यांना आपण वर्षानुवर्षे जिवंत सोडतो आणि मग त्यांना सोडा ही मागणी करायला विमान अपहरण होते तरीही त्यांना आपण ताबडतोब फासावर लटकवत नाही अशी परिस्थिती असताना पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकणे वगैरे खूपच दुरच्या गोष्टी आहेत. पूर्णपणे सहमत... परंतु मिपाकर म्हणुन "मी" काय निर्णय घेइन त्यावर मी माझे मत प्रदर्शन केले आहे.आजच्या काळातल्या युद्धात तोच विजयी होइल जो पहिल्यांदाच घाणाघाती हल्ला करुन शत्रु राष्ट्राचे कंबरडे मोडेल...आपण ही संधी पाकिस्तानला देउ नये एव्हढच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

माहितगार 22/12/2014 - 17:08
आपण म्हणता तसे फिजीबल व्हावयाचे असेल तर पाकीस्तानला जवळपास हतबल केल्या शिवाय अणूयुद्धाचा धोका टळणार नाही. पहिला हवाई हल्ला केला तरीही दोन्ही साईडचा हवाई आणि आण्विक रिस्पॉन्स टाईममध्ये ८ १० मिनीटांपेक्षा अधीक फरक पडेल असे मला वाटत नाही. पाकीस्तानची पूर्ण एअरस्पेस आणि मिसाईल स्पेस एकाच घटकेत ऑकुपाय करणे आणि शस्त्र उपयोगापासून अशक्य करणे एवढी क्षमता भारतापाशी आहे असे वाटते का ? त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. आणि त्या वेळी आमेरीका अथवा चीनलाही हस्तक्षेप करता यावयास नको. या साठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ? ( मला तौलनीक सामरीक आकडेवारीची कल्पना नाही.)

In reply to by माहितगार

त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. असे विधान करण्याअगोदर उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती चेर्नोबिलच्या घटनेवरून येउ शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्लिंटन 22/12/2014 - 17:23
उघड्या अणुस्फोटामुळे होणारा घातक किरणोत्सर्ग किती दूरवर पोहोचतो याची माहिती असणे आवश्यक आहे.
हो बरोबर आहे. पण पाकिस्तानने आपल्यावर अणुबॉम्ब टाकून त्यातून प्रायमरी नुकसान होण्यापेक्षा आपण पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकून किरणोत्सर्गामुळे झालेले सेकंडरी नुकसान झालेले परवडले. दगडापेक्षा वीट मऊ की काहीतरी म्हणतात ना त्याप्रमाणे.

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 22/12/2014 - 17:37
अजिबात चूक. पाकिस्तान वर अणुबॉम्ब चा हल्ला हा भारताच्या विकासात्मक हितांना बाधा पोचवेल आणि भारताला एकही व्यापारिक पार्टनर रहाणार नाही. भारतावर त्वरित आर्थिक निर्बंध लादले जातील. भारताशी असलेले संबंध सगळे देश खटकन तोडून टाकतील. देश आर्थिक पारतंत्र्यात लोटला जाईल. जसा इराण किंवा उत्तर कोरिया आहे तसा. त्यात आपल्याकडे तेल किंवा चीन सारखा मित्र देखील नाहिये. पाकिस्तानचा प्रश्न हा अतिशय नाजूक पणे सोडवायला हवा. पाकिस्तान बरोबर मैत्रीचं नाटक करत त्याला आर्थिक दृष्टया खिळखिळा करायला हवा. शॉर्ट टर्म गोल म्हणून पाकिस्तान मधली अस्थिरता कशी वाढेल, पाकिस्तान ची आंतरराष्ट्रीय पत कशी कमी होईल इत्यादी गोष्टी कराव्यात. लाँग टर्म गोल म्हणून पाकिस्तान चे चार (किंवा जास्त) तुकडे उदा: पंजाब, बलुचिस्तान, सिंध, एन.डब्ल्यू.एफ.पी. कसे करता येतील हे पहावं. बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 22/12/2014 - 17:49
अर्थातच जर अशा प्रकारच्या हल्ल्याचा फॉल-आऊट आपण सांभाळू शकू ही १००% खात्री नसेल तर असा हल्ला आत्मघातकी ठरेल हे वरील प्रतिसादातच म्हटले आहे.तरीही अणुयुध्दापर्यंत गोष्ट गेली तर ते आपल्यावर अणुबॉम्ब टाकणार आणि मग आपण प्रत्युत्तर द्यायचे या प्रकारात आपले प्रचंड प्रमाणावर प्रायमरी नुकसान होईल.तसा अणुबॉम्ब टाकायची संधीच शत्रूला द्यायची नाही आणि त्याआधीच कंबरडे मोडायचे असे करायचे असल्यास त्यातूनही आपल्यावर किरणोत्सर्गाचे परिणाम होतीलच.पण त्यातून होणारे सेकंडरी नुकसान प्रायमरी नुकसानापेक्षा कमी असेल एवढाच सांगायचा हेतू आहे.
लाँग टर्म गोल म्हणून पाकिस्तान चे चार (किंवा जास्त) तुकडे उदा: पंजाब, बलुचिस्तान, सिंध, एन.डब्ल्यू.एफ.पी. कसे करता येतील हे पहावं.
छे हो त्यातून आपली डोकेदुखी चौपट वाढेल.जगातील दोन-तृतीयांश देशांच्या विरोधाला न जुमानता आपण बांगलादेश वेगळा केला.सध्या तिथे शेख हसीना सत्तेत आहेत म्हणून ठिक.अन्यथा तिथेही भारतविरोधी प्रवृत्तीच डोके वर काढतात हे अनेकवेळा आपण बघितले आहे. पॅलेस्टाईनच्या लढ्याला आपण इतकी वर्षे पाठिंबा दिला.तरीही १९९८ मध्ये पाकिस्तानने अणुचाचण्या केल्यानंतर एका मुस्लिम देशाकडे अणुबॉम्ब आला याचा अराफात यांना आनंद झाला होता.तेव्हा आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी नंतर त्यांना धर्म अधिक महत्वाचा वाटून ते आपल्याच विरोधात जाणार ही शक्यता सगळ्यात मोठी.
बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते.
असेच व्हावे ही सदिच्छा.

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी 22/12/2014 - 20:20
>>> बाकी पाकिस्तानातल्या अणूबॉम्ब वर अमेरिकेचं लक्ष आहेच. जर ते अतिरेक्यांच्या हाती लागायची वेळ आली तर अमेरिका त्याना कुचकामी करायची मोहीम राबवू शकते. पेशावरमधील शाळेवरील हल्ल्यावरच्या धाग्यात मी हेच लिहिले होते. आपल्याला धोका निर्माण होत आहे असे दिसले तरच अमेरिका पाकड्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायच्या मागे लागेल. जोपर्यंत आपल्याला धोका नाही तोपर्यंत अमेरिका लांबून मजा बघेल. पाकिस्तान अतिरेकी संघटनांच्या ताब्यात जावा असे मला वाटते. त्यामुळे अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हातात पडण्याचा धोका ओळखून अमेरिका स्वतःहून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागे लागेल हे नक्की, कारण ही अण्वस्त्रे भारताप्रमाणे इस्राईल, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका या देशांविरूद्ध सुद्धा वापरली जातील.

In reply to by माहितगार

मदनबाण 22/12/2014 - 17:17
सर्वात प्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की अणूयुद्धाचा धोका पाकिस्तानकडुन आपल्याला आहे, आपल्याकडुन पाकिस्तानला नाही ! अणू युद्ध आणि आफ्टर इपॅक्टससाठी आपली कुठलीच तयारी नाही ! पहिला हवाई हल्ला केला तरीही दोन्ही साईडचा हवाई आणि आण्विक रिस्पॉन्स टाईममध्ये ८ १० मिनीटांपेक्षा अधीक फरक पडेल असे मला वाटत नाही. पाकीस्तानची पूर्ण एअरस्पेस आणि मिसाईल स्पेस एकाच घटकेत ऑकुपाय करणे आणि शस्त्र उपयोगापासून अशक्य करणे एवढी क्षमता भारतापाशी आहे असे वाटते का ? त्यांचे एकही मिसाईल भारतीय भूमी पर्यंत पोहोचणार नाही हवेतल्या हवेत भारतात येण्या आधीच उडवली जावयास हवी. आणि त्या वेळी आमेरीका अथवा चीनलाही हस्तक्षेप करता यावयास नको. यासाठीच मी माझ्या प्रतिसादात लिहले :- सर्व प्रथम लष्करातील सर्व प्रमुखांना तुम्हाला पाकित्सानची गचांडी आवळायला किती वेळ लागेल ? हा प्रश्न विचारला असता, त्यासाठी ऑपरेशला लागणारा खर्च / दारुगोळा / ड्रील / आणि संपूर्ण कारवाई करण्यासाठी लागणारा वेळ विचारला असता. हे सर्व होउ पर्यंत वेळ घ्या पण रिझल्ट द्या असे निक्षुन सांगितले असते. यासाठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ? निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे ! आपल्या देशातल्या तिन्ही दलांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. फक्त गरज आहे, ती "योग्य वेळी" त्यांना फ्री-हँड देण्याची.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by मदनबाण

माहितगार 23/12/2014 - 14:02
यासाठी भारत किती सक्षम आहे असे वाटते ? निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे ! आपल्या देशातल्या तिन्ही दलांवर आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर माझा विश्वास आहे. फक्त गरज आहे, ती "योग्य वेळी" त्यांना फ्री-हँड देण्याची.
सैन्यदलांबाबत विश्वास आणि अभिमान असणे चांगली गोष्ट आहे. पण तांत्रिक क्षमतांच्या बाबतीत वास्तवाचे भानही महत्वाचे असावे असे वाटते. हि डेक्कन क्रॉनीकलची संसदीय समिती बद्दलची बातमी काय सांगते आहे ते अभ्यासणे सयुक्तीक ठरू शकेल असे वाटते.

In reply to by माहितगार

मदनबाण 23/12/2014 - 14:06
धन्यवाद. आपण दिलेला दुवा इकडे हापिसात उघडत नाहीये... घरी गेल्यावर नक्की वाचीन. बाकी इथे सुद्धा पहा :- http://www.tejas.gov.in/

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

In reply to by मदनबाण

क्लिंटन 23/12/2014 - 14:07
निदान पाकिस्तानचे कंबरडे मोडुन काढण्या इतपत आपली क्षमता नक्कीच आहे !
मग कारगीलमध्ये आत घुसलेल्या पाकड्यांना मारायला/हकलवायला दोन महिने का लागले हो आपल्याला? आपले सैन्य प्रचंड शक्तीशाली आहे असा माझाही त्यापूर्वी समज होता पण त्यानंतर मात्र मी अशा दाव्यांवर विश्वास ठेऊ शकत नाही.

In reply to by क्लिंटन

मदनबाण 23/12/2014 - 15:02
मग कारगीलमध्ये आत घुसलेल्या पाकड्यांना मारायला/हकलवायला दोन महिने का लागले हो आपल्याला? इथे काही उत्तरे सापडतात का ? ते पहा. Kargil: Ex-air marshal returns army fire Kargil: Lessons to be learnt जाता जाता :- Pakistan Is Building Smaller Nukes, But They Just Might Be More Dangerous Pakistan Could Soon Have More Nukes Than the U.K. and France And smaller and more destabilizing ones, too

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 23/12/2014 - 17:43
कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं. कारगिल हा सैन्य मोहिमेच्या दृष्टीनं अतिशय अवघड प्रदेश आहे. वर असलेल्याला फक्त प्रचंडच नव्हे तर संपूर्ण अ‍ॅडव्हान्टेज आहे. वरच्या बंकरमध्ये बसलेला पाकिस्तानी हा अतिशय सुरक्षीत अशा दगडी कवचात होता आणि खालून वर चढाई करताना झाडांचा किंवा दगडाचा आडोसा नव्हता. खालून वर मोहीम ही जवळ जवळ आत्महत्या या सदरात येते. चिलखती गाड्या वापरता येत नाहीत. अशा ठिकाणी माणसं तर सोडाच, यंत्रं सुद्धा दमतात. त्यातून पाकड्यांजवळ अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पण होती. कारगिलचा विजय हा खरोखरच मानवी बळापलिकडे जावून मिळवलेला विजय होता. बाकी जाणकार सांगतीलच.

In reply to by काळा पहाड

श्रीगुरुजी 23/12/2014 - 20:18
+१११ आणि मुख्य म्हणजे वाजपेयींनी पायदळाला व हवाई दलाला सीमारेषा न ओलांडण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळेही भारतीय मोहिमेला मर्यादा आल्या होत्या.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 23/12/2014 - 20:38
कारण पाकिस्तानी सैन्य हे चांगल्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं.
आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही. आणि कारगीलमध्ये अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही. बाकी आपल्या हवाईदलाकडील नक्की किती विमाने शत्रूने पाडली आहेत आणि किती विमाने अपघाताने पडली याविषयी काही आकडेवारी आहे का?त्यात आपले किती शे वैमानिक मारले गेलेत? इतकी वर्षे नुसती मीग विमाने पडत होती.मध्यंतरी सुखोई विमानही पडले म्हणून सुखोई विमानांची फ्लिट ग्राऊंड केली.आपल्या नक्की किती पाणबुड्या आग लागून बुडल्या आहेत आणि नक्की किती शत्रूने बुडविल्या आहेत? मध्यंतरी आपल्याकडे १५ दिवस (की महिनाभर) पुरेल इतकाच दारूगोळा आहे असे सैन्यप्रमुखांनी म्हटले होते असे वाचल्याचे आठवते. सैन्याचा अभिमान आणि कृतज्ञता वाटणे वगैरे सगळे ठिक आहे पण अशा प्रकारच्या बेभरवशाच्या शस्त्रांनिशी आपण सहजासहजी कसे काय जिंकणार आहोत? जरा तरी रिअ‍ॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.

In reply to by क्लिंटन

काळा पहाड 23/12/2014 - 22:19
आणि आपण जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य वाईट ठिकाणी तैनात केले जाईल असे मानायचे काही कारण नाही.
युद्धाचा एक महत्वाचा नियम हा कि शत्रूला सोयिस्कर नव्हे, तर आपल्याला सोयिस्कर जागी युद्ध करण्यासाठी शत्रूला भाग पाडा. इथे भारतीय सैन्याचे हात दगडाखाली होते. दुसरी कुठलीच आघाडी उघडण्यासारखी नव्हती. आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडण्याची दक्षता घ्यायची होती आणि सैन्याच्या तुकड्या शत्रूच्या टप्प्यात होत्या. लक्षात ठेवा की बरचसं सैन्य हे शत्रू च्या लेह हायवे माराच्या टप्प्यात असल्यानं मारलं गेलं (वरची मदनबाण यांची दुसरी लिंक पहा). परिस्थीती किती गंभीर आहे याची कल्पना राजकीय नेतृत्वाला दिली गेली नव्हती आणि हा एक स्थानिक प्रश्न आहे असं गृहीत धरलं गेलं आणि त्याप्रमाणं निर्णय घेतले गेले, त्याप्रमाणं सैन्याला आज्ञा दिल्या गेल्या. या चुका मुख्यतः राजकीय आणि स्ट्रॅटेजिक होत्या आणि सैन्याच्या कार्यक्षमतेचा त्यात काही संबंध नव्हता.
आणि कारगीलमध्ये अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट आर्टीलरी पाकड्यांकडे होती ती आर्टीलरी आपण हल्ला केल्यास पाकडे वापरणार नाहीत असे मानायचेही काही कारण नाही.
मला असं म्हणायचंय की त्यामुळे एअरफोर्स च्या हालचालींवर बंधनं आली. ही शिखरं ज्या उंचीवर आहेत तिथे मुळातच मर्यादित हालचाली होवू शकतात. शिवाय एअरफोर्स सुद्धा सीमा पार करू शकत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अ‍ॅप्रोच रूटवर पण बंधनं असणार. आपण अशा युद्धाबद्दल बोलतोय जिथे आपला एक हात पाठिमागे बांधलेला होता.
जरा तरी रिअ‍ॅलिस्टिक अपेक्षा असू द्या.
तुम्ही जे सांगताय त्यातल्या बर्याच (बहुतांश) घटना या सुट्ट्या भागांच्या कमतरतेमुळे, मनमोहन सरकारच्या नवीन शस्त्रे व टेक्नॉलोजी घेण्याबद्दलच्या धरसोड धोरणामुळे आणि राजकीय निर्णयक्षमतेच्या अभावामुळे घडलेल्या आहेत. त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन 23/12/2014 - 22:26
त्या आपलं सैन्य कमी शिक्षित आहे म्हणून घडलेल्या नाहीत.
अहो वैयक्तिक शौर्याच्या जोरावर युध्द जिंकायचे दिवस मागे पडून कित्येक दशके झाली. सैन्याचे शौर्य हवेच त्यात शंकाच नाही.पण नुसते तितके पुरेसे नाही.त्याबरोबरच शस्त्रास्त्रे गरजेची असतात.जर आपली विमाने इतक्या मोठ्या प्रमाणावर शांततेच्या काळात पडत असतील तर युध्दाच्या वेळी नुसत्या सैन्याच्या शौर्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याचे काय?

In reply to by क्लिंटन

मदनबाण 24/12/2014 - 00:09
क्लिंटनराव मिलेटरी मॉर्डनायझेशनची अत्यंत गरज आहे या बद्धल काही वादच नाही ! सध्याचं सरकार काय निर्णय घेतय त्या बद्धल उत्सुकता आहेच... काही घेतले गेले आहेत, काही लवकरच घेतले जातील ही अपेक्षा ! बाकी काही व्हिडीयो देण्याची इच्छा तीव्र झाल्याने इथे देत आहे :- १}कारगिल मधील भारतीय सैन्याची मुव्हमेंट आणि बोफोर्सची फायरिंग २} मध्यंतरी पाकिस्तानने सातत्याने फायरिंग केल्यावर आपल्या मिलेटरी ने दिलेले घाणाघाती प्रतिउत्तर ! ३} पाकिस्तानच्या नूक्लिअर ब्लॅकमेलिंगवर चाललेली चर्चा ४} माझ्या मते ही India's Multi-Barrel Rocket Launchers - BM-21 / 30 आहेत. कारगिल युद्धात टायगर हिल वर यांचा मारा करण्यात आला होता. ५}Indian Army - Artillery of India मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015

In reply to by मदनबाण

मदनबाण 09/05/2015 - 23:09
इथे जे जनरल व्ही के सिंह म्हणाले होते, त्याच बद्धल आता CAG रिपोर्ट सांगत आहे ! संदर्भ :- Army ammo reserves may last just 20 days of intense fighting: CAG India faces severe ammunition shortage, can fight war for only 20 days: CAG India faces acute shortage of ammunition: CAG tells Defence Ministry in report आपल्या देशाची अशी लष्करी दुरावस्था का ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आई शपऽऽथ्थ साडी मधे दिसते झकाऽऽऽस्स्स तू ;)

In reply to by नितिन थत्ते

मदनबाण 22/12/2014 - 16:16
केम छो चच्चा ! ;) मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती. तमारो टेलरिंग नो साईड बिझनेस छे के ? ;) मने तो खात्रीच हती, की तमे आ धागाना प्रतिसाद देवा माटे जरुर आवशे... [ मदन शहा ] ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…

In reply to by नितिन थत्ते

अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या... भारताशी सरळ सरळ युद्ध ही खूप कमी फायदा/व्यय गुणोत्तर असलेली कृती असल्यामुळेच पाकिस्तान अतिरेकी कारवायांचे छुपे युद्ध खेळण्याची कारवाई करीत आहे आणि उघडपणे "त्यांत आमचा काही हात नाही" अशी भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या कारवायांना गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे पाकिस्तानसाठी फायदा/व्यय गुणोत्तर अधिकाधिक गैरसोईचे होऊ लागले आहे. शिवाय, पाकिस्तानातील अंतर्गत अतिरेकी घटनांमुळे ते पारडे सद्यस्थितीत तरी काहीसे भारताच्या बाजूनेच झुकण्यासाठी मदत झाली आहे. (सर्व प्रकारच्या नजरांना दिसायला सोपे जावे म्हणून महत्वाचा भाग येथे उठावदार केलेला आहे :) ) ...या वाक्यांचा अर्थ कळेल. नाहीतर "सर्वात पहिले स्वार्थी राजकारण, देशकारण गेले चुलीत" या मंत्राचा जप करणे काही जण चालू ठेवतीलच म्हणा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्लिंटन 22/12/2014 - 17:25
अंध राजकारण बाजूला ठेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आले तर, माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी लिहिलेल्या...या वाक्यांचा अर्थ कळेल.
छे बुवा भलत्याच अपेक्षा तुमच्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 22/12/2014 - 17:36
चिल् .... प्रतिसाद हा धागालेखकाच्या धाग्यातल्या मुद्द्यांसाठी नव्हता. तो ज्यांच्यासाठी होता त्यांना कळला असेल. धाग्यातल्या प्रतिपादनाशी सहमतच आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अनुप ढेरे 23/12/2014 - 09:52
गेल्या काही महिन्यांत भारताने दिलेल्या सीमेवरच्या सामरिक व आंतरराष्ट्रीय पटलावरच्या राजकिय खेळींच्या उत्तरांमुळे
एक्का साहेब, गेल्या सहा सात महिन्यांत काय काय वेगळं झालय याचा काही संदर्भ मिळेल काय?

In reply to by अनुप ढेरे

सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या छापील आणि एलेक्ट्रॉनिक स्रोतांवर यासंबंधात असंख्य संदर्भ उपलब्ध आहेत... यात रोजची वर्तमानपत्रे आणि टी व्ही आहेतच. त्यांचा प्रामाणिक विचार पुरेसा आहे. कोणताही राजकारणी चष्मा न वापरता ते वाचले/ऐकले तर मग मी काही न सांगताही सर्व समजेल. त्याविना इथे किती वादविवाद केले तर केवळ बँड्विड्थ खर्च होण्यापलिकडे काहिही होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अनुप ढेरे 23/12/2014 - 13:44
उगीच का वैतागताय एक्का साहेब. मी फक्त एवढं विचारलं की नव्या सरकारमुळे काश्मिर आणि इतर ठीकाणी ताबारेषेवरील धोरणात झालेल्या बदलांचा आणि त्याच्या परिणामांचा कोणी अभ्यास केलाय का आणि उत्सुकता म्हणून संदर्भ मागितले. ते न देता उगाच राजकीय चष्मा, प्रामाणिक विचार, बँडविड्थ वगैरे मध्येच का आणताय?

In reply to by अनुप ढेरे

बघा एक लेख मिळाला ना पटकन ! थोडेसे अजून उत्खनन केले तर अजून बरेच "विश्वासू" धागेदोरे मिळतिल :) . शिवाय माझे निरिक्षण एकाच लेखावरून अथवा एका बातमीवर केलेले नसून; गेल्या काही महिन्यांत पाकिस्तान बरोबरच्या व्यवहारात सद्याच्या सरकारने केलेल्या "नो नॉनसेन्स" कारवाया आणि त्यामुळे आंतरराष्ट्रिय राजकारणात मोदी आणि भारताला मिळणारी वागणूक खालील गोष्टींवरून स्पष्ट होईल : १. पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत झालेली फजिती, २. त्यानंतर एकामागोमाग एक सर्व महत्वाच्या देशांनी पाकिस्तानच्या काश्मीर बद्दलच्या तक्रारीं/रडगाण्यांकडे केलेली डोळेझाक, ३. मोठा अडसर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानाने भारतात येऊन अणुकरावर सह्या करणे, ४. WTO मध्ये भारताने हट्ट धरलेली (आणि भारताच्या सद्यस्थितीत महत्वाची सबसिडीबद्दलची सुधारणा, जी न करण्याचे पूर्वीच्या सरकारने मान्य केले होते) अमेरिकेने प्रथम प्रखर विरोध करून नंतर भारताच्या आग्रहाखातर मान्य करणे, ५. याशिवाय आंतरराष्ट्रिय राजकारणात सहसा न दिले जाणारे / आतापर्यंत न दिले गेलेले जवळिकेचे / मानाचे संदेश; उदा. कार्यक्रमपत्रिकेत नसताना प्रे ओबामाने मोदींना स्वतः बरोबर मार्टिन ल्युथर किंगचे स्मारक पहायला नेणे; अमेरिकेच्या प्रेसिडेंटने २६ जानेवारीच्या समारंभाला मुख्य आतिथीचे आमंत्रण स्विकारणे, भारताच्या पंतप्रधानाचे जपानच्या पंतप्रधानाने (हे जपानच्या इतिहासात प्रथमतः झाले आहे) आणि इतर प्रेसिडँट्स/पंतप्रधानांनी (हे अगोदर झाले असलेच तर अत्यंत विरळा असेल) आलिंगन देऊन स्वागत करणे, इ. वरवर या गोष्टी साध्यासरळ वाटल्या तरी सर्वसाधारण आंतरराष्ट्रिय सभ्यतेच्या फार पुढे जाऊन जवळीक साधण्याचे संकेत आहेत आणि ते उगाचच / उथळपणे दिले जात नाहीत. या आणि इतर गोष्टी (अ) मुळातून, (आ) त्यांचे स्वतःचे आकलन आणि (इ) त्यांचे "विश्वासू" स्त्रोतांतून मिळणारे विश्लेषण; या सर्वांच्या समन्वयाने मी माझे मत बनवले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अनुप ढेरे 23/12/2014 - 20:53
इतर परराष्ट्रीय धोरणाबद्दल सहमत आहे. मला उत्सुकता सीमारेषेवरच्या बदलांबद्दल होती. त्याचा एकच संदर्भ मिळाला आहे अजुन.

In reply to by नितिन थत्ते

श्रीगुरुजी 22/12/2014 - 20:25
>>> मला वाटायचं की आधीच्या पंप्रच्या छातीचा साइझ कमी असल्याने कृती केली जात नव्हती. छातीचा साईझ नाही हो, 'वरून' आदेश नसल्याने कृती केली जात नव्हती. आणि 'साधनसंपत्ती'वर पहिला हक्क ज्यांचा आहे त्यांच्याविरूद्ध कृती करण्याचा आदेश 'वरून' कसा येणार?

In reply to by श्रीगुरुजी

नितिन थत्ते 22/12/2014 - 21:57
बॉर्र..... वरून आदेश देणार्‍यांच्या* छातीचा साईझ कमी असल्याने असं म्हणू !!! *हा प्रतिसाद अश्लील नाही याची नोंद घ्यावी.

माहितगार 23/12/2014 - 11:50
* From Jinping to Obama: Here's how the world still hyphenates India with Pakistan * Pakistan faces risks if economic reforms slip: IMF * Barack Obama signs massive defence budget; $1 billion to Pakistan * China-Pakistan Economic Corridor — A new vista of development in South Asia (पाकीस्तान टुडे डॉट्कॉमवर) * Socio-economic impact of terrorism on Pakistan डेली टाईम्स डॉट्कॉम डॉत पीके ऑनलाईन पाकीस्तानी वृत्तपत्र

अर्धवटराव 24/12/2014 - 01:40
सैन्य शक्तीने पाकिस्तान प्रॉब्लेम निर्णायकरित्या सोडवणं भारताला प्रॅक्टीकली शक्य असतं तर मला वाटतं भारताने ते एव्हाना केलं असतं. पण भारत तसं करत नाहि याचं कारण आपण फार सहिष्णु आहोत किंवा आपल्या नेत्यांमधे तेव्हढी धमक नाहि असं काहि नाहि (आपण थोडेफार सहिष्णु नक्कीच आहोत, व आपले बरेचसे नेते संसदेत बसायच्या लायकीचे नाहित हे खरे आहे). पण आपण तसं करत नाहि याचं कारण तसलं काहि करण्याची गरज नाहि, आणि करतो म्हटलं तरी ते शक्य नाहि. लमहोंने खता कि और सदियोंने भुगतान किया हे आपल्याला परवडणारं नाहि.

In reply to by अर्धवटराव

सहमत. मात्र आतापर्यंतचा पाकिस्तानचा विरोध फक्त "हातावर हात ठेऊन फक्त निषेध नोंदवणे" या जगभर हास्यास्पद समजल्या गेलेल्या पद्धतीने होत होता. सिमेवरच्या गोळीबाराचे सोडा, पाकिस्तानने आयोजित केलेल्या कोणत्याही भारत-पाकिस्तान व्दिपक्षीय चर्चेच्या स्थानी भारताचा ध्वज उलटा लावला नाही तर आश्चर्य व्यक्त केले जात होते; आणि भारताची त्याप्रसंगी "अश्या चुका होत असतात, त्यांना फार महत्व देउ नये" अश्या प्रतिक्रिया गृहित होत्या. अश्या मुळमुळीत भारताला मित्र मानणे म्हणजे आपले हसे करून घेणे असे जागतिक मत झाले याचे आश्चर्य ते काय ? १. घट्ट आणि विश्वासू राजकारणी संबंध (अ) तो असल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना फायदा होणार असला तर किंवा (आ) तो नसल्याने स्वतःच्या हितसंबंद्धांना धोका होणार असला तर किंवा (इ) वरच्या दोन्ही शक्यता असल्या तर आणि तरच प्रस्थापित होतात. २. मुळमुळीत धोरण असलेल्या आणि केवळ नीतिमत्तेच्या गप्पा मारणार्‍या देशांना फारसे महत्व मिळ्त नाही. याचे कारण जेवढा वरचा १ क्रमांकाचा मुद्दा असतो तेवढाच असे देश बेभरवश्याचे असतात (वेळप्रसंगी कच खाऊन पाठीराख्या देशाला अडचणीत आणतात) हे ही असते. आंतरराष्ट्रिय राजकारणात भित्र्याचा कोणीच मित्र होऊ इच्छित नाही आणि जो घाबरवू शकतो त्याची मैत्री सगळ्यांना हवी असते किंवा कमीत कमी त्याला उघड विरोध तरी केला जात नाही, हे एक नग्न सत्य आहे. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताच्या अणूकार्यक्रमाला असलेला अमेरिकेचा पायओढा कारभार आणि ऑस्ट्रेलियाचा (ज्यांच्याकडे जगातला विक्रीसाठी उपलब्ध असलेला सर्वात मोठा युरेनियमचा साठा आहे) सबळ विरोध लक्षणियरित्या बदलून त्यांत कृतिशीलता आलेली दिसत आहे. यामागे गेल्या काही महिन्यात "भारतामध्ये पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची राजकिय इच्छाशक्ती असल्याची" आंतरराष्ट्रिय समुदायात झालेली जाणीव आहे. याची मुख्य कारणे : अ) पाकिस्तानला सीमेवरच्या गोळाबरी व इतर कुरापतींची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा कृतिशील संदेश आ) तसे करण्याबरोबरच राजकिय भेटींत पडद्यामागे करण्यात आलेल्या अनेक विश्वासदर्शक खलबते... ज्याची परिणती अशी झाली की, पाकिस्तानने केलेल्या कांगाव्यांचा उपयोग आतापर्यंत भारताला दाबून ठेवण्यात कसा वापरता येईल हे पाहिले जात होते त्याऐवजी त्या कांगाव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आणि पाकिस्तान एकाकी पडण्यात झाली. दुसरी राजकिय खेळी राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार म्हणून श्री अजित दोवाल यांच्या निवडणूकीने खेळली गेली आहे. या पूर्व आयबी संचालकाचे जागतिक व प्रादेशिक गुप्तहेर कारवायांचे ज्ञान आणि पूर्वकर्तृत्व वादातीत आहे... या एकाच घटनेने आयएसआयची झोप बर्‍यापैकी उडाली आहे असे म्हटले जाते. नुकतेच ISIS ने इराकमधे बंदी केलेले भारतिय नागरिक सुखरूप परत आले त्यामध्ये दोवाल यांचे बरेच योगदान होते. आजपर्यंत भारताच्या कोणत्याही निषेधाकडे हास्यास्पद कारणे देत दुर्लक्ष करणार्‍या पाकिस्तानाला तोंडदेखला मान देत का होईना पण मुंबई हल्ल्याचा आरोपी लष्करे तोयबाच्या झाकी उर रहमानला परत नजरकैदेत ठेवावे लागले. या झाल्या उघड कृती. पडद्यामागे याच्या अनेक पटींनी हालचाली सुरू नसल्या तर आश्चर्य असेल. त्या जरी वर दिसत नसल्या तरी उघड कृतींपेक्षा जास्त परिणामकारक असतात. युद्धतंत्राचे सर्वात मोठे तत्व असे आहे की, गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळून मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो. कारण थोड्या कालावधित पूर्ण विजय मिळविण्याच्या भरात जेत्यालाही पराभवाचा धोका अथवा अश्या युद्धाची तात्कालिक व/किंवा दीर्घकालीन न परवडणारी किंमत चुकवावी लागते. उदा : १. मराठे आणि अबदाल्ली यांच्यातल्या पानिपतच्या तिसर्‍या युद्धात मराठ्यांचा पराभव होऊन मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली असली तरी अबदाल्लीचेही इतके नुकसान झाले की त्याला सैन्याच्या विरोधामुळे आणि बंडाळीमुळे अफगाणीस्तानात परतणे भाग पडले. २. इराक आणि अफगाणिस्तानमधल्या युद्धांत झालेला खर्च हे सुद्धा अमेरिकेच्या १८ ट्रिलियन डॉलर इतक्या महाप्रचंड राष्ट्रिय कर्जाचे कारण आहे; आणि त्यामुळे अमेरिकेच्या जागतिक राकारणातल्या वजनात लक्षणिय घट झालेली आहे. ३. दुसरे महायुद्ध जिंकूनही आर्थिक आणि सामरिक रित्या खिळखिळे झालेल्या ब्रिटनला पुढ्च्या पाच-दहा वर्षांत त्याच्या सर्व महत्वाच्या वसाहतींना स्वातंत्र्य देणे भाग पडले आणि जागतिक महासत्तेचा मुकुट अमेरिकेकडे गेला. असो. ही केवळ सुरुवात आहे. (अ) सद्या योग्य दिशेने चाललेल्या भारताच्या आंतरराष्ट्रिय पटलावरच्या वाटचालीने भविष्यात वेग पकडला, (आ) तिला देशांतर्गत सबळ विकासाचे पाठबळ मिळाले आणि (इ) "भारताशी दुष्मनी फारच महागात पडते" हे भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल. इतके सर्व असले तरी पाकिस्तानच्या संबंधात (अ) हातावर हात ठेऊन बसणे किंवा (आ) सर्वशक्तीनिशी हल्ला हे दोनही पर्याय सद्यकाळात व्यवहार्य नाहीत. मात्र पाकिस्तानला त्याच्या दु:साहसांची सामरिक, आर्थिक आणि राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू आहे अशी लक्षणे दिसत आहेत.

सुबोध खरे 25/12/2014 - 12:25
अणु शक्ती हे दुधारी शास्त्र आहे आणी अणुयुद्ध आतापर्यंत न होण्याचे कारण म्हणजे MAD (mutually assuared destruction) म्हणजे उभयपक्षी विनाश हा ठरलेला असल्याने सहसा कोणी अणु युद्धास धजावलेले नाही. राहिली गोष्ट प्रथम हल्ला करणार नाही (NO FIRST USE) हे लोढणे सुद्धा कागदी आहे. एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे. जर यदाकदाचित पाकिस्तानचा समूळ नाश झाला नाही तर वाचलेल्या अणु शस्त्रानी त्यांनी प्रतिहल्ला केला तर दोन तृतीयांश भारत नष्ट होईल. वरील भीती मुळेच पाकिस्तान काही शे अणुशस्त्रे निर्माण करण्याच्या मागे आहे. भारत अणु पाणबुडीतून( चक्र आणी अरिहंत ) डागण्याची आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी याच साठी करीत आहे कि जर जमिनीवरील सर्व शस्त्रे अणूहल्ल्यात नष्ट झाली तरी पाणबुडीतील वाचलेल्या शस्त्रास्त्रांनी पाकिस्तान किंवा चीनचा संपूर्ण विध्वंस करता यावा. http://en.wikipedia.org/wiki/Second_strike http://en.wikipedia.org/wiki/Sagarika_(missile) http://en.wikipedia.org/wiki/K-4_%28SLBM%29

In reply to by सुबोध खरे

सहमत. पारंपारिक युद्ध आणि अगदी सुक्ष्म (लो की) अणूयुद्ध यांच्यातही जमीन-अस्मानाचा फरक आहे. अणूयुद्ध म्हणजे एकाच बाँबने एक शहर उद्ध्वस्त करून युद्ध जिंकणे असा समज दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेल्या अणूबॉंब्जमुळे आणि त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाचे पारडे दोस्तराष्ट्रांच्या बाजूने झुकण्यात झाल्याने झाला आहे. सद्याच्या बदललेल्या राजकिय आणि सामरिक वस्तुस्थितीत हे शक्य नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मदनबाण 26/12/2014 - 00:06
@ एक्का काका आपले घटनांचे विश्लेषण आवडले ! गोळीबार/रक्तपात न करता युद्धाची ल़क्ष्ये पदरात पाडणारे डावपेच खेळूण मिळवलेला विजय सर्वोत्तम असतो. हा विचार अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारत पाकिस्तानला ठोस कृतीने दाखवत राहिला तरच भारतात खरे अच्छे दिन येतील. असे झाल्यास पाकिस्तानमध्ये भारतव्देषाचे राजकारण सोडायला भाग पाडणारा दबावगट तयार होईल. असे नक्की होईल का ? आणि कधी होईल ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे केवळ भविष्यकाळच देईल. पाकिस्तानचे अस्तित्व हे फक्त आपल्या द्वेषावर अवलंबुन आहे...इथे राज्य करणार्‍याला / नियंत्रण ठेवणार्‍याला हिंदूस्थान्द्वेषाचा एक कलमी कार्यक्रम राबवण्या शिवाय पर्याय नाही,हा त्यांचा इतिहास सुद्धा सांगतो आणि वर्तमान सुद्धा. त्यांची आपल्याशी सरळ युद्ध करण्याची क्षमता नाही हे ते स्वतः जाणुन आहेत त्यामुळेच त्यांनी आपल्या विरुद्ध thousand cuts निती अवलंबली. ते आपल्याशी शांततेने राहु शकत नाहीत कारण प्रचंड हिंसाचार होउनच त्यांच्या या राष्ट्राची निर्मीती झाली आहे.त्यामुळे Pakistan isn't ready for peace with India हेच सत्य आहे आणि आपण हे सत्य कायम ध्यानात ठेवले पाहिजे. राजकिय किंमत चुकवावी लागेल आणि ती अधिकाधीक असह्य होईल अशी कृती करणे भारताच्या हातात आहे... आणि सुदैवाने या दिशेने भारताची वाटचाल चालू अशी लक्षणे दिसत आहेत. +१ @ डॉक एकदा तुम्ही ठरवले कि अणुशस्त्रे वापरायची कि पहिल्यांदा एक लहानसा अणु बॉम्ब (१-१० किलोटन) निर्मनुष्य जागी( राजस्थानच्या वाळवंटात/ कछ्च्ह च्या रणात स्फोट करायचा आणी पाकिस्तानने अणुहल्ला केला हि अवी उठवून पुढच्या पाच मिनिटात समूळ विनाश करायच्या इराद्याने पाकिस्तानवर अणू हल्ला( आणू आणी हायड्रोजन बॉम्ब ने करायचा). हा दॄष्टीकोन लक्षात आला... यात पाकिस्तानचा संपूर्ण खात्मा होईल परंतु जवळ जवळ एक तृतीयांश ते अर्ध्या भारताला किरणोत्साराचा प्रादुर्भाव पुढची वीस वर्षे पर्यंत होत राहण्याचा धोका आहे.यात काही कोटी भारतीय लोक मृत्यू मुखी पडतील. त्या तुलनेत सध्या तरी काही शे लोक गमावणे हे परवडण्या सारखे आहे. होय... याचे सध्याचे उदाहरण आपल्या नजरे समोर येत आहे { अर्थात अणूबॉम्बच्या जागी रिअ‍ॅक्टर आहेत.} ११ मार्च २०११ साली जपानच्या फुकुशिमा दायची रिअ‍ॅक्टर अपघात झाला आणि सुनामी बरोबरच जगाने नूक्लिअर रिअ‍ॅक्टर ब्लास्ट सुद्धा पाहिला. या घटनेचे परिणाम आता युएस च्या वेस्ट कोस्ट मधे दिसायला लागले आहेत... Fukushima radation त्यामुळे तुमचे प्रतिपादन योग्यच आहे आणि पाकिस्तानवर असा हल्ला करणं आपल्या हिताच नाही हेच खरं आहे...पण मग सतत न्यूक्लिअर वेपन्स /मटेरिअल जिहादींच्या हाती लागण्याची भिती आहे त्याच काय करायच ? आता अफगाणिस्तान मधुन अमेरिकेचे सैन्य माघारी जायला सुरु होइल आणि या जिहादींना काही काम उरणार नाही,पाकिस्तान आता त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्या सारखे भासवेल नंतर याच मंडळींना आपल्या विरुद्ध जुंपतील त्याचे काय ? कारण जे नवाझ शरिफ आज आतंकवादाच्या विरोधात सुर आळवत आहेत त्यांनीच काही दिवसां पूर्वीच हाफिद सईदच्या सभेला जनसागर पाठवण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली होती.त्यामुळे ह्यांच्याकडुन आपल्याला त्रास आहेच ! येत्या वर्षात काय घडामोडी होतात ते पहायला हवे... जाता जाता :- हे दुवे हिंदूस्थान-पाकिस्तानशी संबंधीत नसुन रेडियेशनशी संबंधीत मुद्धाशी असल्याने माहितीसाठी देउन ठेवत आहे. http://www.netc.com/ Tiny amounts of Fukushima radiation found in California Fukushima Radioactivity Detected Off West Coast Sickened by service: More US sailors claim cancer from helping at Fukushima मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Tokyo Drift - Teriyaki Boyz

In reply to by मदनबाण

मदनबाण 26/12/2014 - 12:31
एक्का कांकाचा चेर्नोबिल वरचा प्रतिसाद आणि डॉक यांचा किरणोत्साराचा प्रादुर्भावाचे थोडक्यात विष्लेषण मला या विषयावर अधिक विचार आणि वाचन करण्यास प्रवॄत्त करणारे ठरले.., यातील चेर्नोबिल घटना मला माहित होती आणि त्याबद्धल थोडी फार माहिती होती आणि त्यामुळेच पटकन Bitter butter चा दुवा मला देता आला... यावर अजुन विचार करतोय कारण आपली एनर्जीची गरज आहे आणि न्यूक्लिअर पावरची गरज आणि सेटअप वाढणार आहे. खालील दोन्ही व्हिडीयो नीट ऐकण्या सारखे आहेत...कारण फुकुशिमाचा परिणाम हा चेर्नोबिल पेक्षा जवळपास ८५% जास्त आहेत म्हणतात... आणि ही कधीही न-संपणारी दुर्घटना आहे. ! न्यूक्लिअर वेपनचा वापर करणे हे किती भयानक आहे याचा अंदाजा आला ! Fukushima Forever मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- नायक नही, खलनायक हुं मै :- खलनायक

प्यारे१ 25/12/2014 - 13:44
आमचा एक्स (सर्वार्थानं) मित्र परा म्हणतो तसं खरंच भारतीय च नाही तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची सगळी सूत्रं मिपावरुनच हलतात असा भास होत आहे. :)
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही.

  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २

लॉरी टांगटूंगकर ·

या दोन्ही भागातली विषयाची मांडणी, क्लिष्ट संकल्पना सोप्या करून सांगण्याची पद्धत यामुळे हे लेखन खूप आवडलं. पुलेशु.

युद्धस्य कथा रम्य म्हणतात , पण उद्योजकस्य कथा अतिरम्य नि अतिदिव्य असतात. connect the dots नंतर असे वाचन झाले नव्हते. सत्य कथा आणी लेखन शैली आवडली हे वेगळे सांगायला नको.

In reply to by राघवेंद्र

शलभ 19/12/2014 - 10:17
खूप आवडली. कधीपासून वाट पहात होतो ह्या भागाची.

सांगण्याचा मुद्दा हा की तंत्रज्ञान बर्‍याच जणांकडे असते पण ते वापरावे कसे हे पण जमले पाहिजे. अवांतर : आपण जेव्हा एखाद्या ऑनलाईन शॉपींग साईटवर सर्फींंग करत असतो, तर आपल्यापैकी काही जण प्रत्यक्ष खरेदी करत असतात. अशावेळी केवळ विंडो शॉपींगवाले कोण आणि कोण प्रत्यक्ष खरेदी करत आहे हे काही विशिष्ट अप्लायन्सच्या साह्याने शोधून काढले जाते. अशा खरेदीदाराला विंडो शॉपींगवाल्यापेक्षा जास्त वेगाने वेबपेजेस दिसावे, सर्फ करता यावे म्हणून त्या साईटतर्फे एक्स्ट्रा ब्यान्डविड्थ उपलब्ध करुन दिली जाते. वेब बिजनेसमधे वेबपेजचा सुटसुटीतपणा आणि वेगाने पेजेस सर्फ करता येणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते. हळू वेगाने चालणार्‍या साईटवर गिर्‍हाईक जास्त काळ थांबत नाही. अपवाद फक्त 'आयआरसीटीसी' या वेबसाईटचा. मला वाटत जगातील ही सर्वात मोठी तिकीटविक्री वेबसाईट असावी.

खटपट्या 19/12/2014 - 00:12
जबरद्स्त !!! वाचताना रोमांचीत झालो. अशा जास्तीत जास्त सक्सेस स्टोरीज यायला पाहीजेत.

सुरेख रे मंद्या.
गुगलचे बिग क्वेरीवर काम सुरु असतानाच त्यावर रेडबस चे काम सुरु होते. आणि ऑफिशिअल लॉन्च नंतर बिग क्वेरी वर चालणारी पूर्ण सिस्टीम रेडबस कडे होती
म्हणजे काय रे? बिग क्वेरी म्हणजे काय ते गूगलून पाहिले (http://en.wikipedia.org/wiki/BigQuery ). म्हणजे रेड बसचे धावणे,डेटा शोधणे हे काम गूगलतर्फे,म्हणजे त्यांच्या त्या बिग क्वेरीमार्फत होते. होय ना?

In reply to by मुक्त विहारि

खिक्क. अगदी बसचे धावणे,डेटा शोधणे वगैरे नाही. कोणत्या मार्गावर बसची जास्त गरज आहे. कोणत्या मार्गावर ऑपरेटरचे रेटींग वाईट आहे. एखाद्या बँकेचा कस्टमर तिकीट गेटवे मध्ये अडकतो आहे का आणि कॅन्सल होतो आहे. बुकींगचे पॅटर्न, एखादी सीट बुक करण्याआधी किती सर्च होतोय (कमीत कमी क्लिक मध्ये सर्वोत्तम रिझल्टसाठी). तीस सेकंदात दोन टीबी डेटा प्रोसेस केला जातो. हडूपपेक्षा हा वेग जास्त आहे. बिग डेटा अ‍ॅनॅलिटीक्स मला जास्त कळत नाही. जितकं कळालं तितकं खरडलो.

जबर्‍या... दोन्ही भाग अप्रतीम! SME मधल्या अश्या अजून यशस्वी उदाहरणांबद्दल लिही ना! छोट्या / मध्यम उद्योगांमध्ये जी नीतिमत्ता आणि व्यावसायिक "निरागसता" असते ती मोठ्या उद्योगांमधे कमी आढळते. अशी लोकं एक उद्योग यशस्वी झाला की तो सोडून दुसर्‍या कल्पनेच्या मागे लागतात! एखादी गोष्ट "जमली" की ह्यांचा त्यातला इंटरेस्ट संपतो आणि ते नव्या आव्हानाच्या शोधात पुढे जातात. मस्त लिहिलं आहेस! और आने दो भइ! जे.पी.

आयुर्हित 22/12/2014 - 13:21
एक क्लिष्ट विषय अत्यंत सरळ पद्दतीने सर्वांना समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. अजून येवू द्या असाच एखादा नवीन विषय.

या दोन्ही भागातली विषयाची मांडणी, क्लिष्ट संकल्पना सोप्या करून सांगण्याची पद्धत यामुळे हे लेखन खूप आवडलं. पुलेशु.

युद्धस्य कथा रम्य म्हणतात , पण उद्योजकस्य कथा अतिरम्य नि अतिदिव्य असतात. connect the dots नंतर असे वाचन झाले नव्हते. सत्य कथा आणी लेखन शैली आवडली हे वेगळे सांगायला नको.

In reply to by राघवेंद्र

शलभ 19/12/2014 - 10:17
खूप आवडली. कधीपासून वाट पहात होतो ह्या भागाची.

सांगण्याचा मुद्दा हा की तंत्रज्ञान बर्‍याच जणांकडे असते पण ते वापरावे कसे हे पण जमले पाहिजे. अवांतर : आपण जेव्हा एखाद्या ऑनलाईन शॉपींग साईटवर सर्फींंग करत असतो, तर आपल्यापैकी काही जण प्रत्यक्ष खरेदी करत असतात. अशावेळी केवळ विंडो शॉपींगवाले कोण आणि कोण प्रत्यक्ष खरेदी करत आहे हे काही विशिष्ट अप्लायन्सच्या साह्याने शोधून काढले जाते. अशा खरेदीदाराला विंडो शॉपींगवाल्यापेक्षा जास्त वेगाने वेबपेजेस दिसावे, सर्फ करता यावे म्हणून त्या साईटतर्फे एक्स्ट्रा ब्यान्डविड्थ उपलब्ध करुन दिली जाते. वेब बिजनेसमधे वेबपेजचा सुटसुटीतपणा आणि वेगाने पेजेस सर्फ करता येणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते. हळू वेगाने चालणार्‍या साईटवर गिर्‍हाईक जास्त काळ थांबत नाही. अपवाद फक्त 'आयआरसीटीसी' या वेबसाईटचा. मला वाटत जगातील ही सर्वात मोठी तिकीटविक्री वेबसाईट असावी.

खटपट्या 19/12/2014 - 00:12
जबरद्स्त !!! वाचताना रोमांचीत झालो. अशा जास्तीत जास्त सक्सेस स्टोरीज यायला पाहीजेत.

सुरेख रे मंद्या.
गुगलचे बिग क्वेरीवर काम सुरु असतानाच त्यावर रेडबस चे काम सुरु होते. आणि ऑफिशिअल लॉन्च नंतर बिग क्वेरी वर चालणारी पूर्ण सिस्टीम रेडबस कडे होती
म्हणजे काय रे? बिग क्वेरी म्हणजे काय ते गूगलून पाहिले (http://en.wikipedia.org/wiki/BigQuery ). म्हणजे रेड बसचे धावणे,डेटा शोधणे हे काम गूगलतर्फे,म्हणजे त्यांच्या त्या बिग क्वेरीमार्फत होते. होय ना?

In reply to by मुक्त विहारि

खिक्क. अगदी बसचे धावणे,डेटा शोधणे वगैरे नाही. कोणत्या मार्गावर बसची जास्त गरज आहे. कोणत्या मार्गावर ऑपरेटरचे रेटींग वाईट आहे. एखाद्या बँकेचा कस्टमर तिकीट गेटवे मध्ये अडकतो आहे का आणि कॅन्सल होतो आहे. बुकींगचे पॅटर्न, एखादी सीट बुक करण्याआधी किती सर्च होतोय (कमीत कमी क्लिक मध्ये सर्वोत्तम रिझल्टसाठी). तीस सेकंदात दोन टीबी डेटा प्रोसेस केला जातो. हडूपपेक्षा हा वेग जास्त आहे. बिग डेटा अ‍ॅनॅलिटीक्स मला जास्त कळत नाही. जितकं कळालं तितकं खरडलो.

जबर्‍या... दोन्ही भाग अप्रतीम! SME मधल्या अश्या अजून यशस्वी उदाहरणांबद्दल लिही ना! छोट्या / मध्यम उद्योगांमध्ये जी नीतिमत्ता आणि व्यावसायिक "निरागसता" असते ती मोठ्या उद्योगांमधे कमी आढळते. अशी लोकं एक उद्योग यशस्वी झाला की तो सोडून दुसर्‍या कल्पनेच्या मागे लागतात! एखादी गोष्ट "जमली" की ह्यांचा त्यातला इंटरेस्ट संपतो आणि ते नव्या आव्हानाच्या शोधात पुढे जातात. मस्त लिहिलं आहेस! और आने दो भइ! जे.पी.

आयुर्हित 22/12/2014 - 13:21
एक क्लिष्ट विषय अत्यंत सरळ पद्दतीने सर्वांना समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. अजून येवू द्या असाच एखादा नवीन विषय.
  एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन २ पहीला भाग इथे पाहता येईल h एक चुकलेली बस, ते पकडलेली पहिली बस. बस आत्ताशी सुरु होत होती, अजून पुढे बराच प्रवास बाकी होता. रेडबसचे बिझनेस मॉडेल अगदी नवीन नव्हते. ऑनलाइन तिकीट एजंट सिस्टीम जगभर सर्वत्र विमानांच्या तिकीटांसाठी वापरली जाते. बहुतांश इंटरनेट सुशिक्षित वर्गाला या कार्यपद्धतीची कल्पना असते.