Skip to main content

देवस्थाने आणि भटजी....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/01/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव. आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत. आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.) आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते. लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्‍यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्‍यांसाठी टांकसाळ?" असो, पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली. भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर." मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही." गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे." जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती. एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला. गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्‍यात गेलो. जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली. दक्षिणा विचारली. भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?" मी,"हो." भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील." योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे. डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45289
प्रतिक्रिया 204

प्रतिक्रिया

In reply to by स्रुजा

आपल्या बुवांची (अतृप्त आत्मा) कॅसेट लावायची.. अधिक माहितीसाठी त्यांनाच संपर्क करा.. (बुवांचा सत्यनारायण पर्त्येक्ष ऐकण्याचे भाग्य लाभलेला)

In reply to by हाडक्या

ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!
(कथा"पुनर्रचनाकथन-कार:- आत्मूबाबा'सुधारणावाले! ;) ) हि घ्या... मराठी/हिंदी कथा. - डाऊनलोडवा...आणि हवी तेंव्हा ऐका. नायतर एका चौरंगावर नुसता सत्यनारायणाचा फोटू ठिवा,त्येला गंध/अक्षता/हळद/कुकू/गुलाल्/बुक्का..फुलं/हार/तुळस वहा.. उदबत्ती/निरांजन ओवाळा..नंतर आपला शिर्‍याचा निवद दाखवा..आनी मंग ह्यी कथा ऐकून ,आरती करा... मंजी पंचोपचारी पूजा,कथा,आरती...असा सुटसुटीत खेळ व्हईल... :HAPPY: णाय का? :) १) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व! http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3 २) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकायला सुरसही वाटेल..) http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg ===================================== कथा बदलली वग्रे का? अन कशासाटी ? ..अशे प्रश्न कुनाला पडत असतील.. तर शंका णिर्सनासाटी इकडे या!

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमच्या वरच्या लेखाकडे शीर्षक वाचून उघडला नव्हता पण आता तो लेख वाचला कथा फार मोठी आहे आणि मोबल्यात फ्लैश प्लेअर नाही तेव्हा एक विनंती तुमच्या आवडीचे कोणतेही (सत्यनारायणचेच हवेत असे नाही)पाच दहा श्लोक दोन तीन मिनीटे कालावधिचे साउंड रेकॉर्डीँग करून vocaroo dot com वर अपलोड करा अन लिंक द्या जे ऐकता येतील.एक झलक.

@ मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे ? म्हणजे कुठली करण्याची पद्धत धार्मिक द्रिष्ट्या योग्य इत्यादि धार्मिक मध्येही अनेक प्रकार असणार गोत्राप्रमाणे इत्यादि असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत ? हळू घ्या अशी विनंती

In reply to by देशपांडे विनायक

"मूवी तुम्हाला अभिषेक कसा करतात हे माहित आहे?" अजिबात नाही.भटजी सांगतात त्याप्रमाणे करतो. =============== "असे असताना तुम्हाला अभिषेक झाल्यावर समाधान वाटले ते कशाचे हे कधी तपासलेत?" मला बर्‍याच वेळा मंदिरात गेल्या नंतर कधी उत्तम मानसिक समाधान वाटते. विशेषतः गुहागर, वेळणेश्र्वर किंवा विंध्यवासिनी (चिपळूण) एक तर तिथे प्रगाढ शांतता असते आणि कुठलाही भटजी पैसे लुबाडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुहागरला थेट गाभार्‍यात जावून अभिषेक करता येतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या मंदिरात गेल्या नंतर कुणाला समाधान वाटेल किंवा कुणाला नाही वाटणार.प्रत्येकाचे अनुभव वेगळे.

कस्तूरी कुन्डल बसे, मृग ढूढै बन माहि । ऐसे घट-घट राम हैं, दुनिया देखे नाहि ॥ इति:- संत कबिर

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

देवस्थानाचे संस्थान झालेले असलेल्या ठिकाणी फक्त बाहेरुन स्थापत्य,मूर्तीकला बघुन अामची पूजा होते!त्यासाठी पूजारी लागत नाही!गर्दी गजबज बकाली झालेल्या तीर्थक्षेत्रात देव स्वतःच राहात नसणार!मग जाऊन आपला वेळ आणि ऊर्जा फुकट का घालवावी,भटजींची धन करायला!

पैसे कमावण्यातही एकेका देवस्थानाचे {आणि वहिवाटदार पुजाऱ्यांचेही}भाग्य असते. बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते. (मारवाड्यांचा पंधरा दिवस अगोदर सुरू होतो ) .ट्रेकरांना या भोलेनाथाचा फार आधार आहे .एरवी इतक्या रानात कोण सोयी करेल ?

In reply to by कंजूस

बारा ज्योतिर्लिँगांपैकी एक असूनही श्रीक्षेत्रभिमाशंकर फारच बापुडवाणे आहे. श्रावणातला दीड महिना काय ती कमाई होते.
याचा अनुभव आमच्या एका छुप्या सनातनी मित्राने घेतला आहे. भटकंतीनिमित्त भिमाशंकरला गेलो असता मंदिरातील पुजार्यांनी गाभार्यात शंकराच्या पिंडीच्या जवळ जाण्यास मनाई केली. ती सुविधा फक्त पावती फाडून अभिषेक घालणार्यांसाठीच होती. आमचा हा मित्र एरव्ही वाद-विवादात कोणालाही सहसा हार न जाणारा. मात्र त्या दिवशी त्याचे काही चालले नाही. देवाच्या दरबारात कोणाचेच काही चालत नाही.

In reply to by सतिश गावडे

ब्राह्मण नसाल तर बहुतेक ठिकाणी (सगळीकडेच नव्हे तरीपण) हा अनुभव लाभतोच. तुमच्या छुप्या सनातनी मित्रास याचा तितकासा अनुभव नसावा. ;)

In reply to by हाडक्या

तोच तर मुद्दा आहे !! ब्राह्मण असुनही मंदीरातल्या पुजार्यांनी त्या छुपा सनातनी मित्राला तशी ट्र्रीटमेन्ट दिली , अर्थात त्यांना ब्राह्मण्याशी काही घेणे देणे नाहीये . त्यांचा संबंध फक्त पैशाशी आहे ... पैसा टाकेल तो देव आहे त्यांच्यासाठी अन पैसा टाकेल तो ब्राह्मण ! लाखभर रुपये देणगी टाकतो तेही विदाउट पावती असे म्हणाल तर पिंडी भोवती मिठी मारुन सेल्फीही काढुन देतील ते तुम्हाला यो मॅन पोझ मधे ! :D

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमचा मित्र ब्राह्मण आहे हे त्या पुजार्‍याला कसे कळले? कुतूहल आहे म्हणून विचारले.

सत्यनारायणाची पूजा घालताना झालेल्या खर्चाबाबत अशी नापसंती व्यक्त केल्यास त्याचा फलप्राप्तीवर परिणाम होत नाही का?

In reply to by सतिश गावडे

देव, पूजा याबाबतीत सत्य नक्कीच कंडिशनल असते!!शुध्द व्यवहार आहे तो!तुम्ही अशी पूजा करा हे फळ मिळेल!५०$मध्ये जरा कमी ,२००$मध्ये जास्त मिळेल ^_~

In reply to by अजया

आमच्या सत्यनारायणाला तुम्ही पण आला होतातच की... पैशांनी देव विकत घेता येत नाही आणि देव जर पैशांमुळे आणि रोज दर्शनाला गेल्यामुळे प्रसन्न होत असेल, तर तो देव नाही, असे माझे मत आहे. नाही वेचली कवडी-दमडी नाही वेचीला दाम बाई, मी विकत घेतला श्याम

In reply to by मुक्त विहारि

भाव तिथे देव. सू. : 'भाव' याचा अनर्थ घेऊ नये.

गुहागरला आमची कुलदेवी आहे दुर्गा व्याडेशवरी. मंदिरात गेल्यावर छान प्रसन्न वाटतं. ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या धाग्याची जाहिरात करुन घेतो... फ्लेक्स चे पैसे वाचवण्याची संधी दिल्या बद्धल धन्यवाद ! ;) चित्रमय कोकण दर्शन (भाग २) श्री व्याडेश्वर मंदिर चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी जाता जाता :- तुळजाभवानी मंदिराची 'लूट'!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

In reply to by मदनबाण

जाता जाता :- तुळजाभवानी मंदिराची 'लूट'!
खुप वाईट वाटलं ही बातमी वाचली तेव्हा. मंदिरांकडे जमा होणारी संपत्ती ही भाविकांनी श्रद्धेपोटी "देवाने आपल्याला भरभरुन दिलं. तेव्हा आपणही फुल ना फुलाची पाकळी देवाला द्यायला हवी" या भावनेने दानपेटीत टाकलेले पैसे, सोने वगैरे असते. या पैशाचे पुढे काय होते याच्याशी दान पेटीत पैसा टाकणार्यांना भाविकांना काही घेणे देणे नसते त्यामुळे अशा घटना घडतात. देवस्थाने जमा होणार्या संपत्तीच्या पाच दहा टक्के संपत्ती समोर दाखवण्यापुरती "समाजोपयोगी" कार्यात वापरतात. उरलेल्या संपत्तीचे काय होते हे कोणालाच माहिती नसते. पैशाचा पूर वाहणारे एक देवस्थान मंदिरात जाण्यापूर्वी मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्याचे पाच दहा रुपये घेण्याची चिंधीगिरी करते. देशातील बहुतांश जनता देवभोळी असल्यामुळे देवस्थाने सॉरी "मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी भांडवलात प्रचंड परतावा देणारा व्यवसाय बनला आहे.

In reply to by सतिश गावडे

"मंदिर संस्थाने" हा अतिशय कमी भांडवलात प्रचंड परतावा देणारा व्यवसाय बनला आहे. सहमत ! तरी काही अपवाद अजुन शिलक्क आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

In reply to by मदनबाण

वरचा दुर्गादेवी लेख वाचला. उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ?व्याडेश्वर ,उफराट्यापेक्षा हेच आवडले होते.

In reply to by कंजूस

उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ? ज्या देवळात मी गेलो तेच दुर्गा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे, अजुन दुसरे कुठले असल्यास ठावूक नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }

In reply to by कंजूस

उफराट्या गणपतीपुढे थोड्या अंतरावरचे ग्रामदैवत लाकडी कोरीवकाम केलेले खांब तुळया असलेले हेच दुर्गादेवी आहे का ?
नाही. ते मंदिर गुहागरचे ग्रामदैवत श्री व्याघ्राम्बरी देवीचे आहे. :) आणि दुर्गादेवीचे मंदिर खूप लांब आहे. कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सांगितले ते बरोबर आहे दुर्गादेवी म्हणजेच बागेतली देवी

In reply to by के.पी.

गुहागर एसटी स्टँडकडुन दुर्गादेवीच्या देवळाकडे येताना मधे एक शाळा लागते त्याच्या जवळचं मंदिर का? कारण दुर्गा व्याडेश्वरी माझं कुलदैवत असल्यानी दरवर्षी एकदा नं चुकता जाणं होतं. माझ्या माहितीप्रमाणे कोरीव खांब असलेलं मंदिर ते हेचं. व्याघ्रांबरी देवीच्या खांबाचा फोटो असेल तर टाकाल का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गुहागर एसटी स्टँडकडुन दुर्गादेवीच्या देवळाकडे येताना मधे एक शाळा लागते त्याच्या जवळचं मंदिर का?
होय तिथे २ मंदिरे आहेत. त्यातील शाळेला लागून मंदिर आहे ते उफराटा गणपती मंदिर आहे. आणि तिथुन जर्रास्स पुढे व्याघ्रांबरी देवीचे मंदिर आहे.
व्याघ्रांबरी देवीच्या खांबाचा फोटो असेल तर टाकाल का?
माफ करा,सध्यातरी माझ्याकडे फोटो नाहिये. तिकडे जाण झाल तर नक्की क्लिक करुन टाकेन :)

In reply to by मदनबाण

=)) आमच्या प्रतिसादावर आपल्या धाग्याची झैरात करायला बंदी आहे =)) तस्मात दंड म्हणुन अजुन चार कोकणातले धागे टाकायची शिक्षा कोर्ट तुम्हाला देत आहे.

भरपुर मंदिरात जाणं झालयं आजपर्यंत पण एवढं शांत आणि समाधानी फक्त दुर्गाव्याडेश्वरीच्या, कोल्हापुरच्या अंबाबाईच्या आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिरातचं वाटतं.

In reply to by टवाळ कार्टा

तसे काही होणार नाही...... माणसांना देवाची गरज जास्त आहे आणि मग त्या बरोबर येणार्‍या रुढी आणि परंपरेची देखील.

In reply to by अनुप ढेरे

मना मध्ये अज्जुन बर्‍याच शंका आहेत आणि खेळी-मेळीच्या वातावरणात शंका-निरसन, फक्त मिपावरच होते असा स्वानुभव आहे.

हा एक उच्च कारभार आहे. बोलायलाच नको. त्या भवानीला डोळे भरून पहाण्यासाठीच तिकडे जायचं. फार फार सुरेख आहे ती. मागे मी देवीला नेसवण्यासाठी चांगली उत्तम साडी इकडून (मुंबई) घेऊन गेले होते. तर तिथला पुजारी म्हणाला की देवीला कशाला एवढी भारी साडी? माझ्या मुलीच या महिन्यात लग्न आहे तर तिच्यासाठी मी ही ठेवतो. (विचारलं नाही.. सांगितलं) आणि मी बाहेरून एक साधीशी साडी आणतो म्हणे. आईशप्पत असलं भांडण झालं होतं तेव्हा माझ्या नवर्‍याचं आणि त्याचं की बास. तरीपण त्याला आपण चुकतोय असं वाटतच नव्हतं. पण यात फायदा एवढा मस्त झाला की नवर्‍याने चढवलेला एकूण आवाज ऐकुन तिथल्याच इतर पुजार्‍यांनी मध्यस्ती करून आम्हाला मस्त पूजाही करू दिली. आणि आमचीच साडी आमच्यासमोरच त्या देवीला नेसवली. नाहीतर तुळजापूर हे देवस्थान म्हणून भिक्कारच आहे.

In reply to by टवाळ कार्टा

ते नव्हतं लक्षात घेतलं. कारण माहित असलं तरीही इतकं समोरासमोर कुणी सांगत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे. आपण समोर नसताना हे चालतच हे माहिती आहेच. त्या पुजार्‍याने सरळ विचारलं त्याची चीड आली. निदान आम्हाला. आम्ही त्याच्या मुलीच्या लग्नाचा आहेर म्हणून नव्हती नेली हो साडी. ती तशीही त्या लोकांनी लाटलीच असती नंतर.

In reply to by सविता००१

नवरात्राच्या सुमारास गोव्याला जा. तिथे बर्‍याच मंदिरात साड्यांचा लिलाव होतो. मी २ वर्षांपुर्वी तिथूनच साड्या आणि पीतांबर आणले. पहिला फायदा १०-१२ हजाराची पैठणी ७-८ हजारात मिळून जाते आणि गोवा बघणे होते, हा दुसरा फायदा. तिसरा फायदा, पैसा ताईंची भेट पण होते. चौथा फायदा, ह्या साडी खरेदीत नवरे मंडळींना जास्त रस असतो.विशेषतः लिलावाच्या वेळेला. पाचवा फायदा, ह्या सगळ्या साड्या देवीचा प्रसाद म्हणून असल्याने, सासू जास्त बोंबलत नाही.

In reply to by मुक्त विहारि

यातलं पैसा ताईशी भेट हे सोडल्यास सगळं झालं. सासूचा बोंबलण्याचा प्रश्न आला नाही कारण त्यांनाच पहिली घेउन दिली. ;)

In reply to by मुक्त विहारि

@ह्या सगळ्या साड्या देवीचा प्रसाद म्हणून असल्याने,सासू जास्त बोंबलत नाही.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/hearty-laugh.gif

In reply to by सविता००१

माहित असलं तरीही इतकं समोरासमोर कुणी सांगत नाहीत असा माझा तरी अनुभव आहे. आपण समोर नसताना हे चालतच हे माहिती आहेच
हे समजत असतानासुद्धा तुम्ही साडी दिलीत...सुशिक्षित असूनही तुम्ही असे करता तर मग अशिक्षित देवभोळे लोक याच्यावर आणखी करतात यात काहिच आश्चर्य नाही...इथेच तर घोडे पेंड खाते आणि मग देवळे पैशाचा बाजार बनतात

देवीला आलेले नारळ/साड्या वगैरे बाहेरच्या विक्रेत्यांना होलसेलमधे विकण्यात येतातच. पण बाहेर स्वतात वि़कण्यापेक्षा, आता नविन ऐड्या वापरतात. भाविकाने (पक्षी गिर्‍हायकाने) १०० ची नोट टेकवली तर प्रसादाचा नारळ! ५०० ला नारळ + हार + पेढे !! आणी ग्र्याण्ड प्रसाद म्हणून १००० च्या नोटेला या सगळ्यासहित (देविला याआधी नेसवलेली) साडी !!! ४-५ रुपयाला बाहेर विक्रेत्याला नारळ विकल्यापे़क्षा हे परवडतेच्च.

लेख आवडला.एकेकाळी या विषयावरील लेखांमध्ये मी अगदी हिरीरीने भाग घेत असे. सध्या दिल्ली विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत फेसबुकवर आआपला झोडपण्यात व्यस्त आहे.त्यामुळे इस्पिक एक्का साहेबांच्या आणि माझ्या जिव्हाळ्याच्या चर्चेतही पाहिजे तितका भाग घेता आलेला नाही.मुवि काकांचा धागा असल्यामुळे १० फेब्रुवारीनंतरही हा धागा प्रतिसाद घेत राहिलच.त्यामुळे डिटेल्ड प्रतिसाद त्यावेळी :) तूर्तास लेख आवडला ही पोच. (आआप जिंकल्यास फेसबुकवरील दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या पदाचा सर्वात प्रबळ दावेदार) क्लिंटन

In reply to by क्लिंटन

फेसबुकवर आआपला झोडपण्यात व्यस्त आहे
आम्ही पण झाडू हाती घेउ

अजमेरला ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींना भेटावसं वाटलं म्हणून गेलो. तिथे तुम्ही प्रांगणात शिरलात की लगेच एक पोरगा तुम्हाला ओढत कोणा एका मौलवी/खादिमापाशी बसवतो. पैसे उकळतो, तुमच्यासाठी दुवा मागतो. हा पैसा गोरगरीबांच्या जेवणासाठी वापरतो असे म्हणतात, खरे खोटे अल्ला जाणे. अमुकच रुपडे द्या असा आग्रह नसतो ही जमेची बाजू. पण तुम्ही जास्त पैसे द्यावेत असा प्रयत्न ते करतात. प्रत्यक्ष दर्ग्यात चादर घेऊन ४-५ खादिम कबरीपाशी उभे असतात. दोघे-तिघे मोरपीसांचा झाडू घेऊन उभे असतात. तुमच्या डोक्यावर चादर टाकली की टाका १०-२०रुपये. झाडू मारला की टाका १०-२० रुपये. एका चादरीखाली गेलात तरी दुसरा चादरवाला तुम्हाला आपल्यापाशी खेचत असतो. माझ्या मनात सूफी संतांविषयी आणि चिश्ती सिलसिल्याबद्दल फार आदर आहे. ह्या गोळा केलेल्या पैशाचा योग्य विनियोग होत असेल तर ह्या प्रकाराला फार विरोध नाही. पण हे खादिमांच्या घशात जात असेल तर ह्यांनींसुद्धा सूफी संतांच्या शिकवणीला तिलांजली दिली आणि हिंदू तीर्थक्षेत्रांचा 'गुण घेतला' असेच म्हणावे लागेल.

In reply to by दादा पेंगट

असाच नुभव फतेहपूर सीक्रीला आला होता. रस्त्यातच २ पोरे गाडीला लोंबकळली. टॅक्सीड्रायव्हर पण घाबरून गप होता. ते दोघे आम्ही गाईड आहोत म्हणाले. मग ते सांगतील तिथे ती काय चादर वगैरे विकत घ्यायलाच पाहिजे. पैसे टाका म्हटले की टाका. इतर किल्ला वगैरे काही न दाखवता परत रस्त्यावर आणून सोडले. तो टेक्सीड्रायव्हर नंतर सांगायला लागला की हे सगळे गुंड लोक आहेत. मी जर त्याना टाळून गाडी पुढे नेली असती तर पुढच्या फेरीला मला मारले असते.

In reply to by पैसा

अगदी असाच अनुभव मला पण फतेहपूर सीक्रीला आला होता. पहिल्यांदा कार( भाड्याची) पार्किंगसाठी १०० रुपये. तेवढ्यात मी काही सरकारी गाड्या बर्याच पुढे जाऊन पार्क करीत असलेल्या पाहिल्या. आमची गाडी मी माझे लष्कराचे ओळखपत्र दाखविल्यावर पुढे जाऊ दिली त्याना फुकट पार्किंग होते . मग मी माझे लष्कराचे ओळखपत्र दाखविल्यावर पार्किंग वाला म्हणाला पैसे देऊ नका . आता पर्यंत कारच्या खिडकीला लटकलेली पोरं( गाईड आहेत सांगणारी) जरा बिचकली. मी त्यांना सांगितले मला गाईड नकोच. फारच गयावया केल्यावर मी एकाला विचारले तुमचे किती पैसे? त्यावर त्यांचे आपापसात ठरले आणि एक पोरगं तयार झालं ते म्हणालं कि तुम्ही काय द्याल ते. आम्ही आत गेलो तेथे तो पोरगा म्हणाला इथ चादर विकत घ्या. एक झिरझिरीत चादर ३०० रुपये म्हणाला मी त्याला म्हणालो मला चादर घ्यायचीच नाही. फार आग्रह चालला होता. पण मी ठाम होतो. असे सर्व ठिकाणी चालले होते. प्रत्येक इमारतीचा मासळी बाजार पाहून उद्विग्न व्हायला होते. शेवटी वैतागून मी परत कार मध्ये आलो. परत येताना त्या पोराला ५० रुपये देऊ केले तर तो माजाने म्हणाला. मी तुमचे पार्किंगचे पैसे वाचवले मी आवाज चढवून म्हणालो कि मी लष्करात आहे म्हणून पैसे वाचले आहेत तुला हवे असतील तर ५० रुपये घे नाही तर चालू लाग. तो म्हणाला मग हे तरी कशाला देता. मी शांतपणे ड्रायव्हर ला सांगितले गाडी चालू कर आणि निघून आलो. सगळाच चावटपणा आणि हरामखोरी.

In reply to by प्रसाद गोडबोले

१२+३+२?

In reply to by सूड

१८ = १२+३+२+१ ! हा एक बेनीफिट ऑफ डाऊट म्हणुन मी सोडुन दिला होता =))

In reply to by कंजूस

कोणी कसली आशा ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नै? मी माझ्या आश्रमात तर कसलीही आशा ठेवून येऊ नका असे स्पष्ट सांगतो. आशा ठेवून येतच आहात तर आपल्या जबाबदारीवर येणे, निराश झाल्यास आश्रम जबाबदार नाही हे आधीच बजावून देतो.

In reply to by पैसा

आमचा देव कर्म! कर्म करा, खड्ड्यात जाणार असाल तर जाणे काय चुकते हो? शिखर गाठणार असाल तर गाठणे काय चुकते हो? चिल मारा, चिलम मारा.. न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति....

In reply to by बॅटमॅन

असल्या पांचट प्रतिसादासाठी तुला अनुमोदन.. फार फार विचार खुप खुप लवकर करावा लागतो त्यासाठी. जावा ह्या शब्दाचा अनेकांगी वापर जमला आहे.

In reply to by केदार-मिसळपाव

=))

In reply to by पैसा

असं थेट खड्ड्यात जा सांगू लागलो तर आमचे आश्रम कसे चालणार?