शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात
आली ती पलीकडुन!
सांगितले कानात
येताहेत भेटायला तुला!
किती आनंदलो मी!
बहुता दिसा भेट होणार
का जन्मासी आलो मी!
जगण्याला अर्थ येणार
आली ती देवळात
निघाली माझ्याकडे येण्यासाठी!
आता रिते झाले मन
नवे वर्म भरून घेण्यासाठी!
थांब कुलटा
घणाघात झाला!
परंपरा तोडशिल?
मुलाला भेटायला!
परंपरा आड आली
भरल्या डोळ्याने परत निघाली!
मुलाला भेटावयाची इच्छा
इच्छा अधुरीच राहिली!
माता गेली माघारी
मुलाचा कोप झाला!
आणि परंपरा तोडून
देव गाभाऱ्याबाहेर निघाला!
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!
१.
तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते.
रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.
"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही."
"इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!"
"पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!"
"मान्य आहे.
गेल्या उन्हाळ्यातली एक दुपार. टळटळत होते. बाईक घेउन निघालं.
एरवी गावात आंब्या-चिंचेखालची पोरं किंवा आईस्क्रीम-कुल्फीवाला सोडल्यास विशेष लगबग नसेल. बळीराजा रानावनात झोपलेलं. दुपारचे दोन वाजत आलेलं. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. गाव नेहमीसारखंच आळसावलेलं. संध्याकाळी अजून काही कामे होती. म्हणून या भेटीकरता दुपारच उत्तम म्हणून निवडलेलं.
मॅडम एका बसस्टॉपवर बसलं होतं. मला बघताच स्माईल करत उठलं. कानातले हेडफोन काढून मोबाईल पर्समध्ये ठेवलं. 'हाय' म्हणून हस्तांदोलन केलं चक्क. (असो..!)
दुपार थोडी अधिकच टळटळत होतं.
आजचा दिवस संपतांना एक समाधानाची भावना आहे …
कारण आहे लिओनार्डो दि काप्रिओ ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे ऑस्कर मिळाले तो क्षण ….
अनेक महान अभिनेत्यांना कधीच ऑस्कर मिळाला नाही आहे त्यात
लिओ पण येतो कि काय अशी धाकधुक मनाला होती, तसे ऑस्कर काही अभिनयाचे सर्वस्व नाही हे पण वास्तव आहेच पण तरीही
अखेर लिओला ती बाहुली मिळालीच !!
(आपल्या मिसळ पाव वर चित्रपटान्चे आणिक तेही हिन्दी चित्रपटान्चे परीक्षण खुप होते पण दुर्दैवाने मराठी नाटकाचे परीक्षण समीक्षण होत नाही. वीर सावरकरान्च्या आयुष्यावर आधारीत " अनादि मी अनन्त मी " ह्या नाटकावर समीक्षण/ परीक्षण नोहे पण भाष्य करायचे भाग्य मला मिळाले हा मी माझा बहुमान समजतो. आणिक माझ्या तोकड्या लेखन शैलीला मिपाकर समजून घेतील ही अपेक्षा बाळगतो )
वीर सावरकरान्च्या आत्मसमर्पणाच्या ५० व्या वर्ष दिनी म्हणजे २६/०२/२०१६ रोजी अनादि मी अनन्त मी ह्या नाटकाचा प्रयोग पहाण्याचे भाग्य मला लाभले.
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले.
तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...
नाटक वेड्या मंडळीचे नाटक वेड हा एक लेखनाचा वेगळा विषय ठरावा. नाटकासाठी हे मंडळी कायकाय करतील सांगणे कट्।ईण आहे. स्टेजवर येवून सादरीकरण करतानाची उण्यापुर्या अडीच तीन तासांची ती झिंग त्याना आयुष्यभर जिवंत ठेवते.
एखाद्या नाटकाच्या संहीता लिहीण्या पासून ते ते नाटक स्टेजवर अवतरणापर्यन्त प्रवास हा काही वेगळाच असतो.
दक्षीण अफ्रीकेत असताना मी एक नाटक लिहिले. अस्सल आपल्या मातीतले.
इकडे आल्यानंतर मी ते काही निर्मात्याना दाखवले. नाटकाचा विषय अगदी आपल्या नेहमीच्या परिचयातला. निर्मात्याना नाटकाची थीम आवडायची पण नाटकात पंधरा सोळा कलाकार आहेत म्हंटल्यावर गाडी व्यावसायीक गणीताच्या रुळांवर अडकायची.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.