ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल.
शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक.
नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच!
पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.
कधी कधी बान्ध भावनान्चे
अचानक फुटतात
पण अश्रू मात्र
पापण्यान्तच गोठतात...
अचानक येणारा पाऊस
आणि नकळत येणार्या आठवणी
सरता सरत नाहीत
दोघेही चिम्ब भिजवून जातात
शरीराला अन मनालासुद्धा...
प्रेम व्यक्त करायला
का असतात, शब्दान्ची बन्धने ??
पुरेशी नसतातच का कधी
तुझ्या-माझ्या ह्रदयाची स्पन्दने ??
- १ -
वसंतातल्या पालवी-कळ्या
मोठ्या खट्याळ असतात छकुल्या
आसुसलेल्या डोळ्यांना, दडून,
हळूच आडून करतात वाकुल्या
-*-
- २ -
व्याकूळ दुपारची ऊन झुळूक
तहानेला करते त्राही त्राही
मिळता तोकडी तुझी चिठ्ठी
तळमळ होते लाही लाही
-*-
- ३ -
शिशिराच्या शिवेवर जर्द झाडं
फारच दिलदार नाही वाटत?
शिलंगणाचं सोनं काही
दसऱ्यालाच नाही वाटत
-*-
- ४ -
परवा पडलेला शुभ्र बर्फ
आज कसा दिसतो रटाळ
गतप्रेमाच्या पत्रामधले
अक्षर देखील दिसते गचाळ
-*-
(याचा कच्चा मसुदा "अप्रकाशित"वर टिचकी मारली असून मनोगतावर दिसतो आहे :-( दोन्ही ठिकाणी प्रकाशित करण्याचा हेतू नव्हता.