शिद्दत-आणखिन एक अभागी मज्नू
शिद्दत याचा ट्रेलर मला वाटतं मागच्या महिन्यात पाहिला होता. आवडला होता. परवा सध्याची स्टार गायिका योहानीचं ‘शिद्दत’ गाणं ऐकलं, मस्तच आहे. (थोडी उच्चाराचा खडा जाणवतो पण चालतंय). झालं. मग पाहायचा ठरवला.
शिद्दत याचा ट्रेलर मला वाटतं मागच्या महिन्यात पाहिला होता. आवडला होता. परवा सध्याची स्टार गायिका योहानीचं ‘शिद्दत’ गाणं ऐकलं, मस्तच आहे. (थोडी उच्चाराचा खडा जाणवतो पण चालतंय). झालं. मग पाहायचा ठरवला.
बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ
देव आनंद साहेबांचा चा अव्वल नंबर आठवतो ? त्यात देव आनंद क्रिकेट टीम चा अध्यक्ष पण असतात,पोलीस कंमीनेर पण असतो(dig ) ,बोर्ड प्रेसिडेंट पण असतो ,हेलिकॉप्टर मध्ये बसून जमिनीवरच्या लोकांशी बोलू शकता आणि चक्क cindy crowferd च्या पोटी जन्म घेतात
विजय तेंडुलकरांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचा वाचकांना यापूर्वी इथे परिचय करून दिला आहे. त्या पुस्तकात सुमारे पंचवीस नामवंतांनी तेंडुलकरांच्या विपुल साहित्याचा परामर्श घेतला आहे. ‘तें’नी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांपैकी त्यांचे सदरलेखन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या प्रकारच्या लेखनाचा मी चाहता आहे. अशा लेखनापैकी ‘कोवळी उन्हे’ हे पुस्तक माझे भलतेच आवडते आहे. याच धर्तीवर ‘तें’चे अजून एक पुस्तक म्हणजे ‘रातराणी’.
समुद्र ,सागर नजर टाकावी तिथपर्यंत अथांग असतो.म्हणूनच तो मला कायम खुणावतो. सागर किनारा अलवार लाटांच घर असतं.कधी त्या दुडू दुडू अवखळपणे धावत येतात बिलगतात त्या किनाऱ्याला,तर कधी उंच उंच होत जोरात धडकतात.. पटकन किनारी मोकळ्या होतात. लाटांचा आवाज म्हणजे सागराच हृदयाची स्पंदने भासतात.अजूनही डोळे बंद करतातच कानात नादमधुर लाटांचे आवाज घुमतात.या आवाजात हळुवार फुंकर असते.सागर कितीही खोल असला.खूप काही दडलेल असलं तरी सागर किनाराच रम्य वाटतो.
खालील गोष्टी वाचल्या-
१. ककोल्ड-
Loreak - flowers.
Directors: Jon Garaño, José María Goenaga
काही दिवसांपूर्वी लिन मॅन्युएल मिरांडा ह्या भन्नाट व्यक्तीने लिहीलेले, संगीत दिलेले, अभिनय केलेले आणि रॅप केलेले 'म्युजिकल', म्हणजेच संगीत नाटक पाहिले. खूप आवडले. त्याबद्दल काही.
भाग ९ : https://www.misalpav.com/node/49146
……………..
२ जून २०२१ पासून सुरू केलेली लेखमाला आता संपवत आहे. साहित्याच्या अनेक प्रकारांपैकी (लघु)कथा हा एक महत्त्वाचा आणि वाचकांना रिझवणारा प्रकार. जागतिक कथासागर अफाट आहे. या लेखमालेच्या निमित्ताने त्यातील काही निवडक विदेशी कथांचा आस्वाद घेता आला. या लेखमालेची सुरुवात अगदी ठरवून अशी काही झाली नाही. ती कशी झाली ते सांगतो.
सगळं सगळं ठीक होतं
भा. रा. भागवतांची पुस्तकं मिळवता मिळवता कधी सेंचुरी मारली कळलेच नाही. या प्रवासात अनेक लोकांनी सर्वतोपरीने मदत केली. एखादे दुर्मिळ पुस्तक मिळवायला, स्वत:च्या कलेक्शनमधून काढून द्यायला आणि काहींनी चक्क ती मी येत नाही तोपर्यंत अगदी जपून ठेवली होती. अशातच कधी काही पुस्तके गहाळ झाली, काही देतो म्हणून नंतर यू-टर्न घेऊन गेले. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कळाली. आयुष्य सुंदर आहे. फक्त हवे असणारे पुस्तक कधी ना कधी मिळाले पाहिजे.
एकदा सहा ऋषी जनकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन सत्याच्या शोधात हिमालयात पोहचले. एका हिमाच्छादित पर्वतावर त्यांनी कठोर तपस्या सुरु केली. सत्य त्यांच्या समोर प्रगट झाले. सर्वांनी सत्याला तपासले. आनंदाने सर्वांनी सत्याचे वर्णन करणे सुरु केले. प्रत्येकाने केलेल्या सत्याचे वर्णन वेगवेगळे होते. सर्व प्रज्ञांवंत होते. सर्व विचार करू लागले, आपल्यापैकी कुणीही असत्य बोलत नाही. सर्वच सत्यधर्म पाळणारे आहे. मग प्रत्येकाने सत्याचे वेगळे स्वरूप कसे काय अनुभवले. शेवटी त्यांच्यापैकी एका वृद्ध ऋषीने मौन सोडले, तो सर्वांना उद्देश्यून म्हणाला, बहुतेक प्रत्येकाचे सत्य वेगळे असते.