मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभय-गझल

साक्षीला दिवस आहे

गंगाधर मुटे ·

स्वागत आहे.
आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो
छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सन्माने राहणारा)

स्वागत आहे.
आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो
छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सन्माने राहणारा)
साक्षीला दिवस आहे दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो आपला सन्मान असतो आपणच राखायचा तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो तारतम्य लागले जर हेलकावे खायला भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो - गंगाधर मुटे 'अभय' ====== बारा/आठ/चोवीस

(चकणा जरा)

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 11/12/2021 - 20:01
कविता काय किंवा चित्र वगैरे काय, ते जर 'कळत' नसेल, तर ते काहीतरी लई भारी, हुच्च दर्जाचे आहे, आपल्याला कळले नाही यात आपलीच काहीतरी चूक आहे, अशी ओशाळलेपणाची भावना वाचका/दर्शकाच्या मनात निर्माण करणे, हा आधुनिक कवी/चित्रकार इत्यादींचा आवडता उद्योग असतो, आणि अशांनाच वाहवा, गिर्हाईक, बक्षिसे, अध्यक्षपदे वगैरे मिळतात.... एकतर या कवितेत हळवा स्पर्श, हळव्या वाटा, हळवे श्वास, हळवे अमूक, हळवे तमूक, गंधित आणाभाका, कोवळी पहाट, लाजरे ओठ, तांबडी वाट, प्राजक्तफुलोरा, गहिवर, पैंजण, किणकिण वगैरे वगैरे काहीच नाही, त्यातून कहर म्हणजे ही कविता तर कुणालाही सहज पूर्णपणे कळेल अशी आहे, आता काय करावे बरे ?? कुठे फेडाल हे महत्पाप कविवर्य ?

Bhakti 11/12/2021 - 21:45
छ्या ! रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || हे मला का नाही सुचलं 😃 भारीच!

पहिला साधा मग पटियाली नको सोडा नकोच पाणी बर्फाच्या तुकड्यावरूनी घसरत जाऊ गिरी शिखरावरती मग नकोत काजू नकोत पापड दिव्यत्वाची येईल झापड मुक्त मनाने विहार करू मग एव्हरेस्ट ही रेश्ट न करता लिलया पार करू

In reply to by कर्नलतपस्वी

सहमत आहे दर शनिवारी, आमची अशीच अवस्था असते... सुक्ष्मात जायचे आणि 3-13-1760 ह्या ग्रहावर फेरफेटका मारून यायचा...

वैधानिक इशार्‍यासकट वाचली आणि आवडली, कडव्या कडव्यात नशा ठासून भरला आहे. वकार युनुस प्रसन्न होणे ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे, कोणाला तो अर्ध्या पेगात पावतो तर कोणाला खंबा रिचवूनही दर्शन देत नाही. पैजारबुवा,

चित्रगुप्त 11/12/2021 - 20:01
कविता काय किंवा चित्र वगैरे काय, ते जर 'कळत' नसेल, तर ते काहीतरी लई भारी, हुच्च दर्जाचे आहे, आपल्याला कळले नाही यात आपलीच काहीतरी चूक आहे, अशी ओशाळलेपणाची भावना वाचका/दर्शकाच्या मनात निर्माण करणे, हा आधुनिक कवी/चित्रकार इत्यादींचा आवडता उद्योग असतो, आणि अशांनाच वाहवा, गिर्हाईक, बक्षिसे, अध्यक्षपदे वगैरे मिळतात.... एकतर या कवितेत हळवा स्पर्श, हळव्या वाटा, हळवे श्वास, हळवे अमूक, हळवे तमूक, गंधित आणाभाका, कोवळी पहाट, लाजरे ओठ, तांबडी वाट, प्राजक्तफुलोरा, गहिवर, पैंजण, किणकिण वगैरे वगैरे काहीच नाही, त्यातून कहर म्हणजे ही कविता तर कुणालाही सहज पूर्णपणे कळेल अशी आहे, आता काय करावे बरे ?? कुठे फेडाल हे महत्पाप कविवर्य ?

Bhakti 11/12/2021 - 21:45
छ्या ! रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || हे मला का नाही सुचलं 😃 भारीच!

पहिला साधा मग पटियाली नको सोडा नकोच पाणी बर्फाच्या तुकड्यावरूनी घसरत जाऊ गिरी शिखरावरती मग नकोत काजू नकोत पापड दिव्यत्वाची येईल झापड मुक्त मनाने विहार करू मग एव्हरेस्ट ही रेश्ट न करता लिलया पार करू

In reply to by कर्नलतपस्वी

सहमत आहे दर शनिवारी, आमची अशीच अवस्था असते... सुक्ष्मात जायचे आणि 3-13-1760 ह्या ग्रहावर फेरफेटका मारून यायचा...

वैधानिक इशार्‍यासकट वाचली आणि आवडली, कडव्या कडव्यात नशा ठासून भरला आहे. वकार युनुस प्रसन्न होणे ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे, कोणाला तो अर्ध्या पेगात पावतो तर कोणाला खंबा रिचवूनही दर्शन देत नाही. पैजारबुवा,
आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620 मागवतो चकणा जरा नेक्स्ट पेग आधी घाल पाणी, घाल सोडा "कच्ची" पोटास बाधी || चालते व्हिस्की किंवा रम माँन्कच्या वतीने टाळतो आता बीयर ढेरी सुटायच्या भीतीने || संपवला चकणा पुन्हा न पिणार्‍या हातांनी अन पिणारे केव्हाच गेले उंच आकाशी विमानी || रंगते रात्र पुन्हा अन पडे गफ्फांचा सडा, किचन बंद होण्याआधी मागवु चकणा जरा || - टल्ली * वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे.

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

गंगाधर मुटे ·

पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..

In reply to by इरामयी

गंगाधर मुटे 26/07/2019 - 14:55
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.

पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..

In reply to by इरामयी

गंगाधर मुटे 26/07/2019 - 14:55
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

पावलांना अंत नाही

आनंदमयी ·
पावलांना अंत नाही वेदनेला गाव नाही चालते ही व्यर्थ चिंता थांबण्याचे नाव नाही दूर काळोखात कोणी गुंफली माझी कहाणी? त्या तिथे सूर्यास सुद्धा, उगवण्याचे ठाव नाही.. लाख स्तोत्रे अर्पुनी मी मांडले वैफल्य माझे.. टेकला मी जेथ माथा, मंदिरी त्या देव नाही! अंतरीच्या शून्यतेला गीत मी कैसे म्हणावे गोठलेले शब्द नुसते छंद नाही, भाव नाही! अदिती

(बार हो)

प्रसाद गोडबोले ·

अभ्या.. 22/03/2018 - 16:00
जब्बरदस्तच. . बादवे हा व्हाटसप कंपू ट्रेड मार्क का आहे म्हणे? कसले ट्रेडिंग करता आपण?

नाखु 22/03/2018 - 20:09
सांप्रदायिक काव्य दिसते आहे शिलकीतला बाकीचा साक्षीदार नाखु

अभ्या.. 22/03/2018 - 16:00
जब्बरदस्तच. . बादवे हा व्हाटसप कंपू ट्रेड मार्क का आहे म्हणे? कसले ट्रेडिंग करता आपण?

नाखु 22/03/2018 - 20:09
सांप्रदायिक काव्य दिसते आहे शिलकीतला बाकीचा साक्षीदार नाखु
प्रेरणा : यारहो ... दादाश्रींची विनम्र माफी मागुन ..... अर्ज़ किया है .... ह्या उन्हाचा जोर आहे वाढलेला यारहो शोधुया नजदीक साधा एक बियर बार हो ड्रॉट ज्या त्या ब्रॅन्ड्ची तिथलीच बॉटल चांगली पण अता चालेल काही फक्त असु दे गार हो मागवा चकली चना अन हाफ चीकन तंदुरी कावळ्यांना भूक आहे लागलेली फार हो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले दावले "जमवून" मग "ठरवून" वारंवार हो एकदा केसांस वेडे मोकळे सोडून बघ नेत्रसुख असती गडे हे झाकले उभार* हो कोण तो चु$@ भिकारी पेग अर्धा सांडतो वाटते होईल ह्याचा आज युनुस वकार हो माँक कुठला? कोण मल्ल्या?

( ते पहा पब्लिक हसंल )

माम्लेदारचा पन्खा ·
पेर्णा सांगायलाच हवी का ? ती पहा पडली विडंबने ती,पैजा लागल्यासारखी खाजही यावी कुठे ,ते न दाखवण्यासारखी!? नवकवी असलास जरी,तू नको काही लिहू... मिपाकरांची खिल्ली करेल मेल्याहून मेल्यासारखी! कवितेवरती कुठलीही पिंक कोणी टाकते रंगते मैफील इथली श्राध्दकावळ्यांसारखी ! हो!जरा साशंक हो तू,कविता विडंबताच मी पब्लिक जल्लोष करते,दाद दिल्यासारखी! काय तू लिहिले जरासे . . मिपाकर वेडावले लागले मागेच तुझ्या समस्त गाजरपारखी ! —आडमापीगीत

कोरडा स्वर

प्राजु ·

मारवा 11/12/2016 - 18:34
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर मनाचे व्यथेने गर्भार होणे......... हे फारच सुंदर जमलयं

मारवा 11/12/2016 - 18:34
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर मनाचे व्यथेने गर्भार होणे......... हे फारच सुंदर जमलयं
व्यर्थ धावाधाव झाली, पण खरोखर जीवना नाराज मी नाही तुझ्यावर मी किती कोठे दडू पाहुन तुम्हाला आठवांनो घाव घाला.. या..! मनावर फेरफटका मारण्याचे टाळते मी आठवांची वाट झाली खूप खडतर तू नको घालूस फुंकर , ऐक वाऱ्या या निखाऱ्याला पुन्हा येईल गहिवर आपले नाते सुगंधी राहिले ना पण तरी सजवू फुलांनी आपुले घर मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर फक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन् मौन समजावून गेले कोरडा स्वर शोधसी ‘प्राजू’ खुणांतूनी कुणाला सांग निर्माल्यात का भेटेल ईश्वर? - प्राजू

कळले नाही

सोहम कामत ·
कळले नाही कोठे चाललो मी.. तुझ्याच दारी जणु भुललो मी.. प्रेमात तुझ्या जरी पडलो परि.. अंतरी तुझ्या पार हरलो मी.. संपले दुवे सारे संपली आशा.. आभाळी कोठे धुंद विरलो मी.. आकांक्षा सार्या गेल्या उडूनी माझ्या.. स्वप्नात फक्त आता उरलो मी.. होतीस तेंव्हा तूच मनाची आस.. अजूनी का तुझ्यात अडलो मी?...

वयम् अपि कवय:॥

सूड ·

स्पा 25/07/2016 - 15:43
अगागा बर्याच दिवसांनी मनसोक्त बाजार उठीवलास

In reply to by रुपी

"जोड़े मारणे" वगैरे हे काय रस्त्यावरचं भांड्न आहे का ? लोकांच्या टाळ्या मिळवायच्या असल्या तर त्या कुठेही मिळतील. पण टीका शत्रुलाही आवड़ली पाहिजे. रचना शैली उच्च दर्जाची पण त्या ओळीने अतिशय गल्लीतल्या भांडनासारखं स्वरूप वाटलं बाकी काही नाही. पण रचना मला आवडलीच आहे. (ती ओळ सोडून) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 26/07/2016 - 21:35
आता तुमचा "मुटे" होणार हे नक्की. अहो. मिसळपाववर काही झुंडीच्या टीकास्त्राचे भक्ष व्हायचे नसेल तर असं मनातलं बोलू नका. त्यांना काय आवडते, याचा विचार करून लिहावे, हाच सौदा फ़ायद्याचा राहू शकतो.

टवाळ कार्टा 25/07/2016 - 15:53
कं लिव्लय कं लिव्लय रं बाला...सूडक्याकडे सरस्वती पाणी भरायला आलेली काय रे? बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))

In reply to by टवाळ कार्टा

पगला गजोधर 25/07/2016 - 15:56
बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))
तळ्टिप पहा : अभय गझल

अभ्या.. 25/07/2016 - 15:58
भारीच रे सुडक्या. आवडले शब्दप्रभुत्व. .
हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा
हे तर जबरदस्तच. बाकी अगदी विडंबनास परफेक्ट असा माल टाकलायस. ;)

In reply to by आदूबाळ

रुपी 26/07/2016 - 00:30
याची आठवण झाली. यात "वृंदगान" नावाचा एक कहर प्रकार होता. >> हेच लिहायला आले होते.. :) शब्दांवरची पकड भारी आहे..

In reply to by विवेकपटाईत

गंगाधर मुटे 25/07/2016 - 22:00
हृदयापर्यंत कसले पोचतात हो असले बाण. मोहिमेवर निघणारा कवच कुंडले परिधान करूनच निघत असतो मोहिमेवर.

गंगाधर मुटे 25/07/2016 - 21:35
v हा धागा वाचला आणि हायसे वाटले. आपल्यासंबंधी (एखाद्या व्यक्ती विशेषासंबंधी) स्वतंत्रपणे सात-आठ धागे निघतात आणि तेही मिसळपावसारख्या अग्रणी संकेतस्थळावर माझं मलाच लई कौतूक वाटलंय राव. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ अवांतर : जोडे मोजुनि मारावे >>>> हे भडक शब्द टाळुनही रचना टोकदार करता आली असती. त्यामुळे असा शब्दप्रयोग टाळणे चांगले राहिले असते, असे मलाही वाटते. बाकी रचना ठीकठाक. पुलेशू

विवेकपटाईत 26/07/2016 - 15:08
अवांतर म्हणून, कुणाला जोडे मारणे सौपे असते. मी स्वत:कृषी भवन मध्ये १३ वर्ष आणि प्रधानमंत्री कार्यालयात शेती हा विषय बघणाऱ्या अधिकार्याच्या खाली किमान ३ वर्ष तरी कार्य केले आहे. सरकारी नीती मुळे आपल्या देशातील शेती चौपट होते आहे, हे निदान मला तरी कळते. ग्राहक हिताच्या नावाने परदेशी पामोलीन (७०%) ग्राहकांच्या गळ्यात ओतले जात आहे. दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला (हि क्रांती घडली नसती तर आज कदाचित भारत दुग्ध निर्यातक असता) ( या वर एक लेख लवकरच लिहिणार आहे). आता डाळी विदेशातून येणार. पण किती दिवस असे चालेल. आपल्या देशाची लोक संख्या बघता या व्यवसायात आपल्याला आत्म निर्भर होणे गरजेचे आहे. ग्राहक हिताच्या नावाने शेतकर्यांचे शोषण करणे सोडण्याची गरज आहे. प्रती हेक्टरी शेतकर्याला किमान भाव किती मिळाला पाहिजे हे निर्धारित करणे गरजेचे आहे. मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते.

In reply to by विवेकपटाईत

स्पा 26/07/2016 - 15:16
सातवा आयोग खून वर सरकारलाच शिव्या देणाऱ्या निष्क्रिय* सरकारी बाबूंची तळमळ आम्हाला कळेल तो सुदीन *सक्रीय बाबूंनी उगा अंगावर येऊ नये

In reply to by विवेकपटाईत

मोदक 26/07/2016 - 15:31
दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला हे अमुल ला उद्देशून आहे का? यावर आवर्जुन लिहा. मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते. ओके मान्य. पण यावर आमच्यासारख्या असंवेदनशील शहरी लोकांना कळेल अशा भाषेत प्लीज लिहा आणि आम्ही मूर्खासारख्या शंका विचारल्या तर आमच्या बुद्धीवर शंका घेवू नका. कसे आहे.. आंम्हाला पण अनेक प्रश्न पडतात. ते पडतात कारण आंम्ही पूर्णवेळ शेती करत नाही. त्यामुळे नक्की काय? कसे? असे विचारल्यानंतर "मग शेती करा आणि उत्तरे मिळवा" असे उत्तर देणे सोपे असते पण त्याने आमचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात आणि (कदाचित) खरी असणारी तळमळ रडगाणे वाटू लागते. तुमच्याकडून एका अभ्यासपूर्ण लेखमालेच्या प्रतिक्षेत.

खटपट्या 26/07/2016 - 21:58
लयंच भारी. गंडा बांधला पायजे. दोन वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक. तांब्याकाव्य = गुर्जी आसूडकाव्य = सूड

अभ्या.. 26/07/2016 - 22:16
सुडक्या लेका आज ते गाडीच्या साईडबाराला गुंडाळण्यासाठी दोर आनायाला बाजारात गेलेलो, तिथे बैलांसाठी चाबूक पण होते. ब्रँडेड बरंका. बालाजी नाथ चाबूक नावाने. खाली मजबूत आणि मुलायम असे छापलेले चक्क. च्यायला तुझ्या कवितांची आठवण आली. ;)

स्पा 25/07/2016 - 15:43
अगागा बर्याच दिवसांनी मनसोक्त बाजार उठीवलास

In reply to by रुपी

"जोड़े मारणे" वगैरे हे काय रस्त्यावरचं भांड्न आहे का ? लोकांच्या टाळ्या मिळवायच्या असल्या तर त्या कुठेही मिळतील. पण टीका शत्रुलाही आवड़ली पाहिजे. रचना शैली उच्च दर्जाची पण त्या ओळीने अतिशय गल्लीतल्या भांडनासारखं स्वरूप वाटलं बाकी काही नाही. पण रचना मला आवडलीच आहे. (ती ओळ सोडून) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 26/07/2016 - 21:35
आता तुमचा "मुटे" होणार हे नक्की. अहो. मिसळपाववर काही झुंडीच्या टीकास्त्राचे भक्ष व्हायचे नसेल तर असं मनातलं बोलू नका. त्यांना काय आवडते, याचा विचार करून लिहावे, हाच सौदा फ़ायद्याचा राहू शकतो.

टवाळ कार्टा 25/07/2016 - 15:53
कं लिव्लय कं लिव्लय रं बाला...सूडक्याकडे सरस्वती पाणी भरायला आलेली काय रे? बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))

In reply to by टवाळ कार्टा

पगला गजोधर 25/07/2016 - 15:56
बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))
तळ्टिप पहा : अभय गझल

अभ्या.. 25/07/2016 - 15:58
भारीच रे सुडक्या. आवडले शब्दप्रभुत्व. .
हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा
हे तर जबरदस्तच. बाकी अगदी विडंबनास परफेक्ट असा माल टाकलायस. ;)

In reply to by आदूबाळ

रुपी 26/07/2016 - 00:30
याची आठवण झाली. यात "वृंदगान" नावाचा एक कहर प्रकार होता. >> हेच लिहायला आले होते.. :) शब्दांवरची पकड भारी आहे..

In reply to by विवेकपटाईत

गंगाधर मुटे 25/07/2016 - 22:00
हृदयापर्यंत कसले पोचतात हो असले बाण. मोहिमेवर निघणारा कवच कुंडले परिधान करूनच निघत असतो मोहिमेवर.

गंगाधर मुटे 25/07/2016 - 21:35
v हा धागा वाचला आणि हायसे वाटले. आपल्यासंबंधी (एखाद्या व्यक्ती विशेषासंबंधी) स्वतंत्रपणे सात-आठ धागे निघतात आणि तेही मिसळपावसारख्या अग्रणी संकेतस्थळावर माझं मलाच लई कौतूक वाटलंय राव. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ अवांतर : जोडे मोजुनि मारावे >>>> हे भडक शब्द टाळुनही रचना टोकदार करता आली असती. त्यामुळे असा शब्दप्रयोग टाळणे चांगले राहिले असते, असे मलाही वाटते. बाकी रचना ठीकठाक. पुलेशू

विवेकपटाईत 26/07/2016 - 15:08
अवांतर म्हणून, कुणाला जोडे मारणे सौपे असते. मी स्वत:कृषी भवन मध्ये १३ वर्ष आणि प्रधानमंत्री कार्यालयात शेती हा विषय बघणाऱ्या अधिकार्याच्या खाली किमान ३ वर्ष तरी कार्य केले आहे. सरकारी नीती मुळे आपल्या देशातील शेती चौपट होते आहे, हे निदान मला तरी कळते. ग्राहक हिताच्या नावाने परदेशी पामोलीन (७०%) ग्राहकांच्या गळ्यात ओतले जात आहे. दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला (हि क्रांती घडली नसती तर आज कदाचित भारत दुग्ध निर्यातक असता) ( या वर एक लेख लवकरच लिहिणार आहे). आता डाळी विदेशातून येणार. पण किती दिवस असे चालेल. आपल्या देशाची लोक संख्या बघता या व्यवसायात आपल्याला आत्म निर्भर होणे गरजेचे आहे. ग्राहक हिताच्या नावाने शेतकर्यांचे शोषण करणे सोडण्याची गरज आहे. प्रती हेक्टरी शेतकर्याला किमान भाव किती मिळाला पाहिजे हे निर्धारित करणे गरजेचे आहे. मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते.

In reply to by विवेकपटाईत

स्पा 26/07/2016 - 15:16
सातवा आयोग खून वर सरकारलाच शिव्या देणाऱ्या निष्क्रिय* सरकारी बाबूंची तळमळ आम्हाला कळेल तो सुदीन *सक्रीय बाबूंनी उगा अंगावर येऊ नये

In reply to by विवेकपटाईत

मोदक 26/07/2016 - 15:31
दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला हे अमुल ला उद्देशून आहे का? यावर आवर्जुन लिहा. मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते. ओके मान्य. पण यावर आमच्यासारख्या असंवेदनशील शहरी लोकांना कळेल अशा भाषेत प्लीज लिहा आणि आम्ही मूर्खासारख्या शंका विचारल्या तर आमच्या बुद्धीवर शंका घेवू नका. कसे आहे.. आंम्हाला पण अनेक प्रश्न पडतात. ते पडतात कारण आंम्ही पूर्णवेळ शेती करत नाही. त्यामुळे नक्की काय? कसे? असे विचारल्यानंतर "मग शेती करा आणि उत्तरे मिळवा" असे उत्तर देणे सोपे असते पण त्याने आमचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात आणि (कदाचित) खरी असणारी तळमळ रडगाणे वाटू लागते. तुमच्याकडून एका अभ्यासपूर्ण लेखमालेच्या प्रतिक्षेत.

खटपट्या 26/07/2016 - 21:58
लयंच भारी. गंडा बांधला पायजे. दोन वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक. तांब्याकाव्य = गुर्जी आसूडकाव्य = सूड

अभ्या.. 26/07/2016 - 22:16
सुडक्या लेका आज ते गाडीच्या साईडबाराला गुंडाळण्यासाठी दोर आनायाला बाजारात गेलेलो, तिथे बैलांसाठी चाबूक पण होते. ब्रँडेड बरंका. बालाजी नाथ चाबूक नावाने. खाली मजबूत आणि मुलायम असे छापलेले चक्क. च्यायला तुझ्या कवितांची आठवण आली. ;)
मक्षिकेपरि चिवट। मनी मुळी बोथट॥ काव्य पाडुनि ओषट। संवेदना दाखवि॥१॥ मांडुनि भावनांचा बाजार। घेई फुकाचा कैवार॥ यासि शतोत्तरि चार। जोडे मोजुनि मारावे॥२॥ ऊर बडवि धडधडा। सदा फोडितसे हंबरडा॥ जणु एकटाचि बापुडा। सर्वांमाजि॥३॥ प्रसिद्धीची वखवख। मुखवटे घेई सुरेख॥ साहित्यशेतीचा काळोख। उजेड म्हणोनि दाखवि॥४॥ डास उडे पखियांपरि। काजवे तार्‍यांपरि॥ हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा॥५॥

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...