गडकर्यांच्या सर्व नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत -
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?)
------------------
अजून काही:
भावबंधन
राजसंन्यास
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?)
काही आठवतात ती -
संयस्त खड्ग
राजसंन्यास (बहुधा हे अपूर्ण राहिले)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अहो व्हती गडबड कदि कदि. त्ये "जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते " ह्ये गानं बी सावरकरांचे म्हनून वाटतय. आता "ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" ह्या सावरकरांच्या गान्याने तो घोटाळा व्हतोय.
प्रकाश घाटपांडे
"वेड्यांचा बाजार" नावाचे सुद्धा अपूर्ण राहिले बहुतेक.... त्या अपूर्ण नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले आहे फार पूर्वी...त्यात एक कोट्या करणारे पात्र असते, एवढेच आठव्तेय.......
राम गणेश गडकर्यांचे समग्र साहित्य इ-पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध असल्याची बातमी मागे वाचली होती. [दुवा - येथे]
कुणाला याबाबत अधिक माहिती आहे का?
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
मला वाटते, गडकर्यांच्या स्मृतिंची ज्योत पिढ्यानुपिढ्यांकरता तेवत ठेवण्याचे सारे श्रेय अत्र्यांना द्यायला हवे. चतुरंगरावानी लिहिलेले बहुतेक किस्से अत्र्यांच्या लेखांतून, भाषणांच्या संग्रहातून आलेले असावेत असा माझा अंदाज आहे. अत्र्यांची लोकप्रियता , आणि मुख्य म्हणजे एखाद्या व्यक्तिची योग्यता जाणून ती आपल्या ओघवत्या शैलीत लिहिण्या-सांगण्याची त्यांची हातोटी याचा सर्वात सुंदर मिलाफ झाला , तो गडकर्यांच्या गुणवर्णनात. केवळ गडकर्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यानी शेकडो भाषणे केली, डझनावारी लेख लिहिले. सुदैवाने , हे सारे परचुर्यांसारख्या अत्रेभक्तामुळे मुद्रितस्वरूपात उपलब्ध आहे ....
ह्यातले बहुतेक किस्से मी माझ्या वडिलांशी बोलताना त्यांच्याकडून ऐकले आहेत. काही माझ्या वाचनात आलेत.
आपण उल्लेख केलेले परचुर्यांचे पुस्तक कोणते ते सांगू शकाल का? ते मिळवून मी जरुर वाचेन.
अवांतर - वाचनाची गोडी ही आयुष्य संपन्न करते. माझ्या आजोबांचा पुस्तकांचा संग्रह जवळपास २००० पुस्तकांचा होता. त्यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि ती वडिलांमुळे टिकून राहिली.
चतुरंग
अत्र्यांची अनेक पुस्तके आहेत, आणि गडकर्यांचे संदर्भ बर्याच लेख आणि भाषणसंग्रहातून मिळतात. मला चटकन आठवणारी २ नावे :
"कर्हेचे पाणी" या अत्र्यांच्या आत्मचरित्रामधे गडकरी, त्याकाळातले पुणे आदिंची रसाळ वर्णने आहेत.
"आषाढस्य प्रथम दिवसे" नावाच्या लेखसंग्रहात गडकर्यांवर एक सोडून दोन-तीन लेख आहेत असे मला आठवते ...
(परचुरे हे लेखक नव्हेत. ते अत्र्यांचे प्रकाशक. सावरकर आणि अत्र्यांचे खूपसे लिखाण "परचुरे प्रकाशन मंदिर" यांनी छापले आहे. या दोन लेखकांशिवाय परचुर्यांची मोठी कामगिरी म्हणजे जी एंच्या शेवटच्या वर्षातली (आणि त्यांच्या मृत्यूनंतरची त्यांची) पुस्तके या प्रकाशनाने काढली ...
सहजच मनात विचार आला -
गडकर्यांचे सर्वात गाजलेले नाटक - एकच प्याला.
त्यांचे नाव, राम - दोन अक्षरी.
वडिलांचे नाव, गणेश - तीन अक्षरी.
आडनाव, गडकरी - चार अक्षरी.
कवी म्हणून टोपणनाव, गोविंदाग्रज - पाच अक्षरी.
(आकडेबहाद्दर) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अजून एक दुर्दैवी योगायोग - गडकर्यांचा जन्म गुजरातेतल्या 'नवसारी' चा (१८८५) आणि मृत्यू विदर्भातल्या 'सावनेर' चा (१९१९)!
अवघं ३४ वर्षांचं आयुष्य! ही 'मोठी' माणसं लहान वयात का जातात??
चतुरंग
समग्र गडकरी नामक पुस्तकात त्या॑चे सर्व साहित्य आहे. कर्हेचे पाणीमध्येसुद्धा गडकर्या॑चे पुष्कळ किस्से दिले आहेत. पर॑तु त्यातील सत्या-असत्त्याबद्दल प्रवाद आहेत. काही तत्कालीन टीकाकारा॑च्या मते गडकरी आणि अत्रे या॑ची कधी भेटच झाली नव्हती. अर्थात ह्या वादात आता पडण्याचे काही कारण नाही..
प्रतिक्रिया
पाच अक्षरी नाटके
अजून दोन
संन्यस्त खड्ग ?
अरेच्चा !
व्हती गडबड
धन्यवाद,
"वेड्यांचा
इ-बुक समग्र गडकरी
मजा आली..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
गडकरी आणि अत्रे
अत्र्यांची काही मोजकीच पुस्तके मी वाचली आहेत.
पुस्तकांची नावे
१ २ ३ ४ ५
खरचं की अजब आहे!
खरे आहे ..
राम गणेश गडकरी या नावातच
मूकनायक
गडकरी आणि अत्रे