मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रिय प्राजुस....

स्वाती राजेश ·

इनोबा म्हणे Sun, 01/20/2008 - 02:27
मी ही तेच म्हणतोय तीला... असे लोक तर भेटतच राहणार ... म्हणून काही आपण आपले ध्येय सोडायचे नसते... (चारोळीमित्र) -इनोबा

ऋषिकेश Sun, 01/20/2008 - 03:02
तेव्हा माझी तुला कळकळीची विनंती आहे परत चारोळ्या, विणी गुंफायला लाग. +१ -ऋषिकेश

झंप्या Sun, 01/20/2008 - 13:11
'त्या' सदस्याचा 'तो' प्रतिसाद मी सुद्धा वाचलेला होता. त्याला फार फार तर 'अत्यंत आगऊ टिप्पणी' म्हणता येईल.. पण त्यात विकृतपणा काय होता बॉ? -सबका डॉन एक

चतुरंग Sun, 01/20/2008 - 17:33
कोणीतरी ते, काहीतरी ते, लिहिते चारोळीवर चिखलफेक करते तव तू चारोळी लिहिणे थांबविते? आठव, कमल हे अंबुज असते! चतुरंग

धोंडोपंत Sun, 01/20/2008 - 18:53
प्राजुताई, आम्हाला काही दिवस मिसळपावावर येणे जमले नव्हते. त्यामुळे नक्की काय घडले हे आम्हांला माहित नाही. पण कोणाच्यातरी टिपण्णीला बळी पडून तुम्ही तुमच्या प्रतिभेचा बळी देत आहात असा अर्थबोध झाला. म्हणून सांगावेसे वाटले. तुम्ही तुमच्या प्रतिभेला अशा प्रकारे दडपून टाकू नका. लोक येतात, बोलतात, चालू पडतात. त्याचा परिणाम आपल्या लेखनावर होऊ देऊ नये. कुछ तो लोग कहेंगे । लोगोंका काम है कहना॥ लिहायला लागा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपला, (आग्रही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव Mon, 01/28/2008 - 17:29
प्राजु , धोंडोपंतांच्या मताशी मी पुर्ण सहमत ! काय झाले मलाही माहीत नाही. त्याची गरजहि नाही. पण कुणीतरी काहीतरी बोलते आणि आपण आपले कार्यच सोडायचे हे बरोबर नाही. बोलणारा वाईट हेतूने बोलतो असेही नसते. आणि टिका कुणाला सहन करावि लागली नाही ? बी ब्रेव्ह ऍण्ड कम ऑन!

सर्वसाक्षी Mon, 01/28/2008 - 18:14
कोणते काव्य? कोणती प्रतिक्रिया? कशावरून काव्यत्याग? अहो संचालक , आमच्या सारख्या ढ आणि अनियमीत विद्यार्थ्याला सविस्तर समजावून सांगाल का? प्रकरण गंभीर दिसते असो. पण कुणीतरी प्रतिक्रिया दिली म्हणुन लेखन बंद करणे पटण्यासारखे नाही! असभ्य/ अशिष्ट/ हीन प्रतिक्रिया देउन सभासदाना खच्ची करणारे तसेच चांगले बहरात आलेले संकेतस्थळ सुकवायची सुपारी घेतलेले महाभाग सर्वत्र असतात आणि असणारच. त्याना कितपत किंमत द्यायची हे आपण ठरवायचे. असे जर कुणी भावनाप्रधान होऊन लेखन बंद करू लागले तर यांचे काम सुकर होईल, तेव्हा काही झाले तरी तो आनंद त्याना मिळुन देऊ नका.

सर्वसाक्षी Mon, 01/28/2008 - 18:29
प्राजु, आपण काय निर्णय घेणार ते केवळ आपल्यालाच माहीत पण पुन्हा नव्या उमेदीने लिहायचा निर्णय घेतलात (आणि तो अवश्य घ्यावा - तुम्हाला अधिक महत्वाचे काय वाटते? एक नकारात्मक प्रतिसाद की हे सगळे सकारात्मक प्रतिसाद?) तर एखादी खवचट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे ( उदा: 'बघा, लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग' किंवा 'याला म्हणतात अग अग म्हशी' वगैरे). वाचा आणि पुढे जा. त्याची दखल न घेता.ज्याचा एक प्रयत्न फसला तो दुसरा करणारच. अशा प्रयत्नाना यश देणे वा तो हाणुन पाडणे हे सर्वस्वी आपल्या हाती आहे. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

इनोबा म्हणे Sun, 01/20/2008 - 02:27
मी ही तेच म्हणतोय तीला... असे लोक तर भेटतच राहणार ... म्हणून काही आपण आपले ध्येय सोडायचे नसते... (चारोळीमित्र) -इनोबा

ऋषिकेश Sun, 01/20/2008 - 03:02
तेव्हा माझी तुला कळकळीची विनंती आहे परत चारोळ्या, विणी गुंफायला लाग. +१ -ऋषिकेश

झंप्या Sun, 01/20/2008 - 13:11
'त्या' सदस्याचा 'तो' प्रतिसाद मी सुद्धा वाचलेला होता. त्याला फार फार तर 'अत्यंत आगऊ टिप्पणी' म्हणता येईल.. पण त्यात विकृतपणा काय होता बॉ? -सबका डॉन एक

चतुरंग Sun, 01/20/2008 - 17:33
कोणीतरी ते, काहीतरी ते, लिहिते चारोळीवर चिखलफेक करते तव तू चारोळी लिहिणे थांबविते? आठव, कमल हे अंबुज असते! चतुरंग

धोंडोपंत Sun, 01/20/2008 - 18:53
प्राजुताई, आम्हाला काही दिवस मिसळपावावर येणे जमले नव्हते. त्यामुळे नक्की काय घडले हे आम्हांला माहित नाही. पण कोणाच्यातरी टिपण्णीला बळी पडून तुम्ही तुमच्या प्रतिभेचा बळी देत आहात असा अर्थबोध झाला. म्हणून सांगावेसे वाटले. तुम्ही तुमच्या प्रतिभेला अशा प्रकारे दडपून टाकू नका. लोक येतात, बोलतात, चालू पडतात. त्याचा परिणाम आपल्या लेखनावर होऊ देऊ नये. कुछ तो लोग कहेंगे । लोगोंका काम है कहना॥ लिहायला लागा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपला, (आग्रही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव Mon, 01/28/2008 - 17:29
प्राजु , धोंडोपंतांच्या मताशी मी पुर्ण सहमत ! काय झाले मलाही माहीत नाही. त्याची गरजहि नाही. पण कुणीतरी काहीतरी बोलते आणि आपण आपले कार्यच सोडायचे हे बरोबर नाही. बोलणारा वाईट हेतूने बोलतो असेही नसते. आणि टिका कुणाला सहन करावि लागली नाही ? बी ब्रेव्ह ऍण्ड कम ऑन!

सर्वसाक्षी Mon, 01/28/2008 - 18:14
कोणते काव्य? कोणती प्रतिक्रिया? कशावरून काव्यत्याग? अहो संचालक , आमच्या सारख्या ढ आणि अनियमीत विद्यार्थ्याला सविस्तर समजावून सांगाल का? प्रकरण गंभीर दिसते असो. पण कुणीतरी प्रतिक्रिया दिली म्हणुन लेखन बंद करणे पटण्यासारखे नाही! असभ्य/ अशिष्ट/ हीन प्रतिक्रिया देउन सभासदाना खच्ची करणारे तसेच चांगले बहरात आलेले संकेतस्थळ सुकवायची सुपारी घेतलेले महाभाग सर्वत्र असतात आणि असणारच. त्याना कितपत किंमत द्यायची हे आपण ठरवायचे. असे जर कुणी भावनाप्रधान होऊन लेखन बंद करू लागले तर यांचे काम सुकर होईल, तेव्हा काही झाले तरी तो आनंद त्याना मिळुन देऊ नका.

सर्वसाक्षी Mon, 01/28/2008 - 18:29
प्राजु, आपण काय निर्णय घेणार ते केवळ आपल्यालाच माहीत पण पुन्हा नव्या उमेदीने लिहायचा निर्णय घेतलात (आणि तो अवश्य घ्यावा - तुम्हाला अधिक महत्वाचे काय वाटते? एक नकारात्मक प्रतिसाद की हे सगळे सकारात्मक प्रतिसाद?) तर एखादी खवचट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे ( उदा: 'बघा, लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग' किंवा 'याला म्हणतात अग अग म्हशी' वगैरे). वाचा आणि पुढे जा. त्याची दखल न घेता.ज्याचा एक प्रयत्न फसला तो दुसरा करणारच. अशा प्रयत्नाना यश देणे वा तो हाणुन पाडणे हे सर्वस्वी आपल्या हाती आहे. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय प्राजुस, काल पासून तु मिसळपाव वर दिसत नव्हतीस. मला वाटले तुला काही नविन रेडिओ प्रोग्रॅम ची तयारी करावराची असेल पण, आत्ताच तुझी प्रतिक्रिया वाचली. तू मिसळ्पाव वर चारोळ्या लिहिणार नाहीस म्हणून वाईट वाटले. पण असे करू नकोस आम्ही तुझ्या चारोळ्या, गुंफलेल्या विणी खूप खूप ऍन्जोय करतो. कोणा एका विक्रुत माणसापायी आम्ही एका चांगल्या कवियित्रीला मुकणार नाही निदान मिसळ्पाव वर तरी.. तु परत लिहायला चालू कर... आम्ही वाट पाहात आहोत..... तुझ्या प्रेरणेमुळे तर मी मिसळ्पाव वर लिहायला चालू केले आहे.. कित्येक जण कविता करायला लागले... तुझ्यामुळे...

संडे स्पेशल (मेथी मलई मटर)

स्वाती राजेश ·

विसोबा खेचर Sun, 01/20/2008 - 00:02
स्वातीजी, उत्तम पाककृती! मेथी मलई मटर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. एकंदरीतच मेथीची भाजी, वांग्याची भाजी हे माझे अत्यंत लाडके खाद्यपदार्थ आहेत... स्वातीजी, मिसळपाववर आपल्याकडून आणीही अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे. आपल्या पाककृतींमुळे मिसळपाव उत्तरोत्तर अधिक चविष्ट बनत राहो हीच शुभकामना..! आपला, (खादाड) तात्या.

स्वाती राजेश Sun, 01/20/2008 - 00:11
आभारी आहे. तुमच्या सारखे खवय्ये असतील तर का नाही? मी माझ्याकडून प्रयत्न करेनच उत्तम पाकक्रुती मिसळपाव वर देण्याचा.

सुनील Sun, 01/20/2008 - 00:46
दर आठवड्याला एक पाककृती देण्याचा उपक्रम चांगला आहे. मेथी मलई मटर तर उत्तमच जमलयं! मेथीचा रंग जर तसाच ठेवायचा असेल तर अजून एक प्रकार करून बघता येईल. मेथीची पाने उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे ठेवून लगेचच थडगार पाण्यात टाकायची. या पद्धतीला ब्लान्च म्हणतात. हेच पालकाबाबतही करता येईल. आवडत असेल तर पनीरचे तुकडे किंचित तळून या भाजीत टाकता येतील. किंवा अगदी लहान बटाटे आधी उकडून मग थोडे तळून, अख्खेच टाकता येतील. (खवैय्या) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती राजेश Sun, 01/20/2008 - 01:47
मस्तच...सुनिल असेच एक एक चेंजेस केले तर नविन नविन पदार्थ बनतील. वरील प्रयोग लवकरच करेन. अशाच प्रतिक्रिये मधून नविन शिकायला मिळते. आभारी आहे.

संजय अभ्यंकर Tue, 01/22/2008 - 23:12
परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो. लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा. दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे. ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते. बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे: बाटी: माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्‍यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते. ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात. बाफले: माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात. ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्‍यांवर मंदपणे भाजावेत. हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत. टीपः शहरात गोवरर्‍यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग Tue, 01/22/2008 - 23:29
ये आपने अच्छा नहीं किया, दाल-बाटी की याद जो दिलायी! (ती सुध्दा माझं जेवण सुरु असताना!!) माझं मूळ गाव अहमदनगर (अवांतर - एकही काना, मात्रा, वेलांटी नसलेलं!). आपल्याला ऐकून माहिती असलं तर इथे मारवाडी समाजाची भरपूर वस्ती. माझेही खूपसे मित्र मारवाडी. त्यांच्यातल्या लग्नात मी आवर्जून दाल-बाटी, साजूक तूप व पिठीसाखर घातलेली चापायला जायचा! (बाफले हा प्रकार मात्र पहिल्यांदाच ऐकतोय.) बर्‍याच वर्षात तो योग नाही. इकडे अमेरिकेत तर काय विचारायची सोयच नाही. असो, त्यानिमित्ताने आठवणी तरी जागल्या. धन्यवाद! चतुरंग

सुनील Tue, 01/22/2008 - 23:29
दाल बाटी / बाफल्याची पाककृती दिलीत हे चांगलेच! परंतु ती मेथी मलई मटर मध्ये देण्याऐवजी स्वतंत्रपणे दिली असतीत तर उत्तम झाले असते. बाकी, मीदेखील दाल्-बाटी हा प्रकार इंदूरात खाल्ला होता बर्‍याच वर्षांपूर्वी. त्याची छान आठवण अजूनही जिभेवर आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संजय अभ्यंकर Tue, 01/22/2008 - 23:37
चतुरंगजी, सुनीलजी, प्रतिक्रियां बद्दल आभार. दाल बाटी / बाफले हा प्रकार चतुरंगजीनी सांगितल्या प्रमाणे मारवाडी समाजातही लोकप्रिय आहे. ह्या पाकक्रुती, पश्चिम म.प्र., पूर्व राजस्थान ह्या भागांत प्रचलित आहेत. संजय अभ्यंकर

प्राजु Wed, 01/23/2008 - 08:43
विकपॉईंट... आहे. त्यात ही मेथी मलाईमटर... आजच आणली आहे मेथी.. करतेच थांब. - प्राजु.

असंका गुरुवार, 10/22/2015 - 05:16
अगदी सुरुवातीच्या दिवसातला घागा वर काढून आणल्याबद्दल धन्यवाद... मेथी मटर मलाई आणि दाल बाटी दाल बाफले यात नक्की काय संबंध आहे याचा विचार करतोय....

प्रश्नलंका गुरुवार, 10/22/2015 - 18:23
वाह !! मस्तं रेसेपी चव तर मी प्रत्यक्ष घेतली च आहे :) स्वातीताईच्या हातची मेथी मटर मलाई अहाहा!! .. अजुन चव रेंगाळते आहे जीभेवर.. लाजवाब !!

In reply to by प्रश्नलंका

अस्वस्थामा गुरुवार, 10/22/2015 - 18:29
नक्की कधी खाल्ली होती वो ? नै म्हंजे २००८ सालचा धागा आहे आणि अजून चव जीभेवर रेंगाळतेय म्हणून आपली "शंका" .. ;)

In reply to by अस्वस्थामा

प्रश्नलंका गुरुवार, 10/22/2015 - 18:39
नुकतीच खाल्ली होती अनाहिता कट्ट्याला.. बाद्वे.. तुम्हाला काय करायच्यात हो नसत्या चौकश्या ;)

विसोबा खेचर Sun, 01/20/2008 - 00:02
स्वातीजी, उत्तम पाककृती! मेथी मलई मटर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ आहे. एकंदरीतच मेथीची भाजी, वांग्याची भाजी हे माझे अत्यंत लाडके खाद्यपदार्थ आहेत... स्वातीजी, मिसळपाववर आपल्याकडून आणीही अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे. आपल्या पाककृतींमुळे मिसळपाव उत्तरोत्तर अधिक चविष्ट बनत राहो हीच शुभकामना..! आपला, (खादाड) तात्या.

स्वाती राजेश Sun, 01/20/2008 - 00:11
आभारी आहे. तुमच्या सारखे खवय्ये असतील तर का नाही? मी माझ्याकडून प्रयत्न करेनच उत्तम पाकक्रुती मिसळपाव वर देण्याचा.

सुनील Sun, 01/20/2008 - 00:46
दर आठवड्याला एक पाककृती देण्याचा उपक्रम चांगला आहे. मेथी मलई मटर तर उत्तमच जमलयं! मेथीचा रंग जर तसाच ठेवायचा असेल तर अजून एक प्रकार करून बघता येईल. मेथीची पाने उकळत्या पाण्यात १-२ मिनिटे ठेवून लगेचच थडगार पाण्यात टाकायची. या पद्धतीला ब्लान्च म्हणतात. हेच पालकाबाबतही करता येईल. आवडत असेल तर पनीरचे तुकडे किंचित तळून या भाजीत टाकता येतील. किंवा अगदी लहान बटाटे आधी उकडून मग थोडे तळून, अख्खेच टाकता येतील. (खवैय्या) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती राजेश Sun, 01/20/2008 - 01:47
मस्तच...सुनिल असेच एक एक चेंजेस केले तर नविन नविन पदार्थ बनतील. वरील प्रयोग लवकरच करेन. अशाच प्रतिक्रिये मधून नविन शिकायला मिळते. आभारी आहे.

संजय अभ्यंकर Tue, 01/22/2008 - 23:12
परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो. लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा. दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे. ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते. बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे: बाटी: माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्‍यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते. ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात. बाफले: माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात. ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्‍यांवर मंदपणे भाजावेत. हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत. टीपः शहरात गोवरर्‍यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो. संजय अभ्यंकर

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग Tue, 01/22/2008 - 23:29
ये आपने अच्छा नहीं किया, दाल-बाटी की याद जो दिलायी! (ती सुध्दा माझं जेवण सुरु असताना!!) माझं मूळ गाव अहमदनगर (अवांतर - एकही काना, मात्रा, वेलांटी नसलेलं!). आपल्याला ऐकून माहिती असलं तर इथे मारवाडी समाजाची भरपूर वस्ती. माझेही खूपसे मित्र मारवाडी. त्यांच्यातल्या लग्नात मी आवर्जून दाल-बाटी, साजूक तूप व पिठीसाखर घातलेली चापायला जायचा! (बाफले हा प्रकार मात्र पहिल्यांदाच ऐकतोय.) बर्‍याच वर्षात तो योग नाही. इकडे अमेरिकेत तर काय विचारायची सोयच नाही. असो, त्यानिमित्ताने आठवणी तरी जागल्या. धन्यवाद! चतुरंग

सुनील Tue, 01/22/2008 - 23:29
दाल बाटी / बाफल्याची पाककृती दिलीत हे चांगलेच! परंतु ती मेथी मलई मटर मध्ये देण्याऐवजी स्वतंत्रपणे दिली असतीत तर उत्तम झाले असते. बाकी, मीदेखील दाल्-बाटी हा प्रकार इंदूरात खाल्ला होता बर्‍याच वर्षांपूर्वी. त्याची छान आठवण अजूनही जिभेवर आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संजय अभ्यंकर Tue, 01/22/2008 - 23:37
चतुरंगजी, सुनीलजी, प्रतिक्रियां बद्दल आभार. दाल बाटी / बाफले हा प्रकार चतुरंगजीनी सांगितल्या प्रमाणे मारवाडी समाजातही लोकप्रिय आहे. ह्या पाकक्रुती, पश्चिम म.प्र., पूर्व राजस्थान ह्या भागांत प्रचलित आहेत. संजय अभ्यंकर

प्राजु Wed, 01/23/2008 - 08:43
विकपॉईंट... आहे. त्यात ही मेथी मलाईमटर... आजच आणली आहे मेथी.. करतेच थांब. - प्राजु.

असंका गुरुवार, 10/22/2015 - 05:16
अगदी सुरुवातीच्या दिवसातला घागा वर काढून आणल्याबद्दल धन्यवाद... मेथी मटर मलाई आणि दाल बाटी दाल बाफले यात नक्की काय संबंध आहे याचा विचार करतोय....

प्रश्नलंका गुरुवार, 10/22/2015 - 18:23
वाह !! मस्तं रेसेपी चव तर मी प्रत्यक्ष घेतली च आहे :) स्वातीताईच्या हातची मेथी मटर मलाई अहाहा!! .. अजुन चव रेंगाळते आहे जीभेवर.. लाजवाब !!

In reply to by प्रश्नलंका

अस्वस्थामा गुरुवार, 10/22/2015 - 18:29
नक्की कधी खाल्ली होती वो ? नै म्हंजे २००८ सालचा धागा आहे आणि अजून चव जीभेवर रेंगाळतेय म्हणून आपली "शंका" .. ;)

In reply to by अस्वस्थामा

प्रश्नलंका गुरुवार, 10/22/2015 - 18:39
नुकतीच खाल्ली होती अनाहिता कट्ट्याला.. बाद्वे.. तुम्हाला काय करायच्यात हो नसत्या चौकश्या ;)
3

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

पुष्कर ·

'विनोद' नावाची ही फार मोठी गझल आहे. आणि त्याची सुरुवात 'चंद्रमा हासे नभी, शांत शीतल चांदणे इथून आहे'. अर्थात गझलेची सुरुवात आपणास आवडलेल्या शेरांपासून केली असे आम्ही समजतो. आपल्या उत्साहाचे खच्चीकरण करतोय असा कृपया अर्थ घेऊ नये, फार थोड्या शब्दांची अदलाबदल झाली आहे. आपल्याच विनंतीवरुन ते सांगण्याचा मोह होत आहे. पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली धाडिली होती अशी की, नसतील कोणी धाडिली धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे पत्रात त्या जेव्हा तिचेही, पत्र हाती लागले वाटले जैसे कुणाचे, गाल हाती लागले पत्रातही त्या हाय ! तेथे, काय ती लिहिते बघा माकडा, आरशात अपुला, चेहरा थोडा बघा सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे या गझलेत एकूण १२६ ओळी आहेत. वरील ओळीतील दुरुस्ती केल्यानंतर आम्ही आमचा प्रतिसाद काढून घेऊ !!!! जिंदादिल- भाऊसाहेब पाटणकर पृ.क्र. २२ जिंदादिल हे माझ्याकडे संग्रही असलेले एकमेव पुस्तक आहे. त्यांचे 'मराठी शायरी, 'मराठी मुशायरा, 'मैफिल, आणि दोस्त हो, या शायरींच्या पुस्तकात जर वरील इतक्याच ओळींची गझल असेल तर ते मला माहित नाही.( चु.भु. दे. घे. ) भाऊसाहेबांच्या शेरोशायरीचा चाहता प्रा.डॉ. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुष्कर Mon, 02/04/2008 - 20:27
बिरुटे साहेब, आपल्यासारखे दर्दी लोक इथे आहेत हे पाहून खूप बरं वाटलं. आपण सांगितलेले बदल मी मूळ लेखनात करण्याचा गेले कित्येक दिवस खूप प्रयत्न केला. पण काही केल्या "संपादन" हा पर्याय मला दिसत नाहिये. तो पूर्वी होता, आणि त्याचा वापर मी यापूर्वी केलेला आहे. आपण आणि तात्यांनीही सांगितल्याप्रमाणे तो पर्याय अजूनही उपलब्ध आहे. पण मग मलाच तो कसा दिसत नाही? मी मला दिसणार्‍या webpage चा फोटो काढून दाखवायला तयार आहे, पण माझ्याकडे कॅमेरा उपलब्ध नाही. तो पर्याय सर्वांना उपलब्ध असावा आणि केवळ मलाच नसावा हा काय प्रकार आहे? (इथे मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण) नक्की तांत्रिक गोची कुठे झाली असेल? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावं - पुष्कर

In reply to by शिवाजी होळगे

पुष्कर गुरुवार, 11/04/2021 - 09:26
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद! :)

सुनील Sun, 01/20/2008 - 00:50
भाऊसाहेबांची चंद्रावर एक कविता होती, किंचित विनोदी. आता आठवत नाही. कुणाच्या लक्षात असेल तर कृपया इथे द्यावी. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by अविनाश ओगले

सुनील Mon, 01/21/2008 - 22:07
"त्या" कवितेचा गोषवारा साधारणतः असा होता - हे चंद्रा, तू पुरुषासारखा पुरुष, परंतु यच्चयावत सगळे कवी प्रेयसीच्या मुखाला तुझी उपमा देतात! .... .... .... नेहमी तारकांच्या गरड्यात असतोस, तरीही रोहिणीला त्याचे अजिबातच वैषम्य वाटत नाही. कारण ......... संपूर्ण माहित आहे काय? असल्यास कृपया द्यावी! (भाऊसाहेबांचा पंखा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/07/2008 - 22:04
खेळू नको बेधुंद ऐसा, चंद्रा अरे, तारांसवे घे जरा लक्षात आहे, रोहिणीही तुजसवे पृथ्वीवरी असतास जर का, छंद तू हा घेतला खास तुझिया रोहिणीने,डायव्होर्स असता घेतला -भाऊसाहेब पाटणकर

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुनील Tue, 02/11/2014 - 09:24
नाही. ह्या त्या ओळी नव्हेत. बरीच शोधाशोध करावी लागेलसे दिसते! असो. सहा वर्षांनी प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व! ;)

ऋषिकेश Sun, 01/20/2008 - 04:10
वा पुष्कर, अतिशय धन्यवाद!!! फार मस्त प्रकल्प सुरु करताय :) शुभेच्छा आनि अभिनंदन! पुढील गझलेच्या प्रतिक्षेत :) -ऋषिकेश

एक मला आवडलेला शेर द्यायचा मोह आवरत नाही. भाऊसाहेब म्हणतात. "दोस्तहो मैफील आपुली रंगण्या जर का हवी.. आम्हा नको सौजन्य तुमचे 'जिंदादिली' नुसती हवी" पुण्याचे पेशवे

पुष्कर Mon, 02/04/2008 - 20:38
क्या बात है पेशवे, -आपला (जिंदादिल) बाळाजी विश्वनाथ भट

रिकामटेकडा Tue, 02/05/2008 - 10:34
सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे तो कविंचा मान, तितुकी पायरी मझी नव्हे |१| आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सम्मानितो सम्मानितो हासू, तसे या आसवा सम्मानितो |२| जाणतो अंति ,अम्हाला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत, दुसरे काय असते व्हायचे |३| मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे|४| आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे|५|

या ओळी मला फार आवडतात.... "आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे" पुण्याचे पेशवे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 21:38
याविषयी थोडेसे. "जे न देखे रवि ते देखे कवि" या थाटात शायर सूर्याला म्हणतो "भास्करा कीव मजला येऊ लागते आधि मधि, रात्र प्रणयाची तू रे पाहीली आहे कधि?" (वरील शेराचे शब्द नक्की आठवत नाहीत. कोणास स्मरले तर सुधारणा सुचवावी) यावर भास्कर जो स्वतःच तेजाचे, बाणेदार पणाचे प्रतिक आहे तो उत्तर देतो पहा काय ते "मला ही या शायराची कीव येऊ लागते, याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते" -भाऊसाहेबांचा पंखा (फॅन:) ) डॅनी. पुण्याचे पेशवे

नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो आम्ही गेलो आम्ही भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो आम्ही शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन, ना आम्हा विसरेल ती भाउसाहेब म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व :) एके ठिकाणी ते म्हणतात ... तू तरी या अप्सरांच्या नादी असा लागू नको सांगूच का मृत्यो तुला मी का असा म्हणतो नको? दुर्दशा आमुच्यापरी ऐसी जरी आली तुला कुठवरी रडशील वेड्या, मरणही नाही तुला... |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अनंत छंदी Wed, 12/03/2008 - 15:48
मराठी गझलांवर एक धागा हवाच होता, ती उणीव या धाग्याने भरून निघाली आहे. आता सुरेश भटांच्या गझलांवरही चर्चा घडू द्या! एकूण मराठी गझलेचा प्रवास या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे. बिरुटे सर आपल्याकडून मराठी गझलेच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण लेख येण्याची अपेक्षा आहे.

In reply to by अनंत छंदी

बिरुटे सर आपल्याकडून मराठी गझलेच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण लेख येण्याची अपेक्षा आहे. मराठी गझलांवर काथ्याकूट करता येईल, जसे की 'मराठीतील गझल काल आज आणि उद्या' त्यात वाचक म्हणून मलाही सहभागी होता येईल. मात्र गझलेसाठी आवश्यक असलेला मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता यांचा किंवा गझलेवर हुकुमत गाजवून लेख लिहिता येईल इतका असा अभ्यास माझा नाही, त्यामुळे आपल्याला अपेक्षीत असलेला लेख आमच्याकडून घडेल याची शक्यता दिसत नाही. :( असे असले तरी नवोदितांच्या गझलेवर आणि सुरेश भटांच्या गझलांवर इथे लेखन आणि चर्चा चालूच असते त्याचबरोबर मिपावर गझल आणि गझलांच्या अभ्यासावर लिहिणारी बरीच जाणकार मंडळी असल्यामुळे कधीतरी या विषयावरही उत्तम लेख नक्की येईल. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे ! दिलीप बिरुटे

संदीप चित्रे Wed, 12/03/2008 - 21:53
चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे अमुच्या मात्र कपाळी अमृतांजन लावणे लावण्या ते तसा नसतो कधी नाराज मी हाय पण दैवा तेही आहे आमुच्याच हाती लावणे.. ------ योग्य शब्दरचना नीट आठवत नाहीये... चूभूद्याघ्या... योग्य तिथे सुधारणा सुचवाव्या

सुनील Wed, 12/03/2008 - 21:55
भाउसाहेबांचे खालील शेर माझ्या फार आवडीचे आहेत - खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो. अवांतर - भाउसाहेब दृष्टीने अधू होते, हे खरे का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विश्वास कल्याणकर गुरुवार, 09/15/2011 - 09:59
भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले - भाऊसाहेब पाटणकर

बन्ड्या गुरुवार, 12/04/2008 - 00:17
मला आवडलेली अजून एक जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कुणीतरी किर्तने सारीकडे ..सारीकडे ज्ञानेश्वरी काळ्जी आमच्या हिताची एवढी घेवू नका जावू सुखे नरकात तेथे तरी येवू नका. भाऊसाहेबांचा फॅन ...बन्ड्या

स्टार माझा वरील व्हिडिओ आता आंतरजालावर देखिल उपलब्ध झाला आहे, तो येथे उपल्ब्ध आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

नितीनमहाजन Mon, 01/05/2009 - 19:02
हे वर्ष भाऊसाहेब पाटणकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. पेशाने वकील असलेल्या भाऊसाहेबांनी डोळे साथ देत नाहीत म्हणून वकिली बंद केली व त्यानंतर योगायोगाने ते शायरीकडे वळले. उर्दू शायरी वाचून त्यांच्या व आपल्या संस्कृतीतील फरक व त्याला अनुसरून उर्दू शायरीला आपण मराठी जन देत असलेला प्रतिसाद यातील फरक त्यांच्या लक्षात आला. अस्सल मराठी शायरी कशी असू शकते / कशी असावी याचा वास्तुपाठ भाऊसाहेबांनी घालून दिला. उर्दू प्रियकर आपल्या प्रेयसीच्या मागे लाळ्घोटेपणा करीत फिरत असलेला शायरीमधे रंगवलेला असलो. तिची खुशामत करणे या शिवाय त्याला दुसरे काही सुचतच नाही. उदा. "जो तुमको हो पसंद व्ही बात करेंगे, तुम दिनको अगर रात कहो तो रात कहेंगें". तिने 'हो' म्हणावे यासाठी काहिही करायला तो तयार असतो. विचार करा हे आपल्याला कितपत पटते ते. भाऊसाहेब म्हणतात: कुसुमे स्वये हासून ना म्हणती ना ये, पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमची नव्हे या बागेत फुललेल्या फुलांनी आम्हाला आमंत्रण दिले पाहिजे अन्यथा आम्ही येणार नाही (गेले उडत, काही गरज नाही आम्हाला.). हा जो एक आत्मसम्मान आपण अपेक्षितो तो आपल्या संस्कृतीमधला आहे. पुढे ते म्हणतातः भ्रमरापरी सौंदर्यवेडे असू जरी आम्ही, इश्कात ना कधी भिक्षुकी केली आम्ही. अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच ना विसरलो आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो. खेळलो इश्कात बेधुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो. रडलो इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे, इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले आसूंवरी अधिकार असेल ज्याला साधला नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधला. शायर सूर्याला विचारतो: भास्करा आम्हा दयाही येते तुझी अधिमधी पाहिली आहेस का रे कधी रात्र प्रणयाची कधी? तो सूर्यही काही कमी वस्ताद नाही तो शायराला उत्तर देतो: आम्हासही या शायराची कीव येऊ लागते याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते!! भाऊसाहेबांची ही गजल मला फार आवडते. नाजुकता यापेक्षा नाजूक असू शकतच नाही: नाजुकता ऐसी आम्ही पाहिली नाही कधी नजरही तिच्यावरी टाकिली नाही कधी भय मज नाजुकतेचे इतुके होते वाटले भार या नजरेतला सोसेल नव्हते वाटले टाकिसी हळुवार अपुली नाजुक इतुकी पाउले टपकती हलकेच जैसी पारिजातकाची फुले नाजुकता जाणून आम्ही आधीच होती बिछविली पायतळी केव्हाच तुझिया विकल ह्रदये आमची इतुका तरी स्पर्श ह्रदया होईल ऐसे वाटले इतुकेतरी सौभाग्य उदया येईल ऐसे वाटले कल्पना पण नाजुकतेची केव्हाच ना आली कधी तुडवून गेली आम्हा, ना कळे गेली कधी

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 09/15/2011 - 18:03
असा धोका दिला हाय ! तु आहे तरीही आम्हा असा धोका दिला सांग ना मृत्यो, तुला आहे कधी का मी दिला जन्मांतरी ज्या ज्या क्षणी , मी दुत तुमचा पाहीला हातचे टाकून आलो , मी स्वार्थ नाही पाहिला दोष ना देऊ जरी का आहेस आम्हा विसरलास देवेंद्रही नादात ह्यांच्या इमान आहे विसरला अप्सरांना त्याच आम्ही,आदाब केला शेवटी मृत्युवरही हाय माझ्या, त्यांचीच सत्ता शेवटी ………भाऊसाहेब पाटणकर ....................................... हंसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये पाऊल ना टाकू तिथे,बाग ती अमुची नव्हे भ्रमरापरी सौंदर्य वेडॆ आहो जरी ऐसे अम्ही इष्कातही नाही कुठे भिक्षुकी केली अम्ही. ............................... भीड मज बाई कुणाची, मोडवत नाही कधी सुचवता कोणी कसेही,नाहीच ना म्हणवे कधी एकदा सांगून बघते, " हे बघा ऐका जरा " सांगते खुश्शाल मग मी " काय वाट्टेल ते करा "

पांथस्थ Fri, 09/16/2011 - 13:21
भाऊसाहेबांचा एक मिश्कील शेर (बर्‍याच वर्षापूर्वी वाचला आहे तेव्हा शब्द थोडे मागे पुढे झाल्याची शक्यता आहे. माफी असावी.) - वार्धक्य जरी खुणावते मला वरच्या वरी मी ही असा बेरकी त्याला चोरुन करतो शायरी भाऊसाहेबांच्या जिंदादिलीला सलाम....

भाऊसाहेब म्हणतात- '' पाहिली असती जरी का, लैला तशी कोठे आम्ही शायरी नक्कीच काही, निर्मिली असती आम्ही दैन्य पण अमुचे असे की, मीच सारे व्हायचे मीच लैला व्हायचे अन् मीच मजनू व्हायचे'' -दिलीप बिरुटे

लई भारी Fri, 09/23/2011 - 10:40
सुरेख धागा! व. पुं च भाउसाहेबांच्या शायरीवर एक छान पुस्तक आहे. त्यावेळीच ह्या विलक्षण कलाकाराची ओळख झाली. अप्रतिम रचना आहेत!

In reply to by लई भारी

व पुं ची भाउसाहेबांच्या शायरीवर रसग्रहणाची ऑडीयो कैसेट देखील होती. ती ऐकुनच मी भाउसाहेबांच्या शायरी कडे आकर्षीत झालो. त्याची सी.डी आता झाली आहे का. कारण ती कैसेट आता खराब झाली आहे.

च्यायला, ............................ भाऊसाहेब म्हणतात- विसरावया हवेच तुला, विसरायचे कसे ? नयनात येत नीर तया, रोकायचे कसे ? वाटे नको कुणास व्यथा, माझी कळावया गाली हसू , परंतु बळे, आणायचे कसे ? -दिलीप बिरुटे

चौकटराजा Fri, 03/09/2012 - 09:06
मृत्यू बद्दल ईश्वरा बद्द्ल भाउसाहेब काय म्हणतात यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय? सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते

In reply to by चौकटराजा

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/30/2021 - 16:28
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले ऐसे जरी संतोष तेव्हा मानीला इतुकाच मी कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली। कवी - भाऊसाहेब पाटणकर जो खऱ्या अर्थानं जगला त्याला मृत्यू पण कळला

In reply to by कर्नलतपस्वी

पुष्कर Sun, 10/03/2021 - 08:09
इतक्या वर्षांनी ही पोस्ट शोधून काढून प्रतिसाद दिल्याबद्दल अने आभार, कर्नलतपस्वी. शायरी तर छानच आहे ती, प्रश्नच नाही.

मिपावर कविता आणि गझलेचे लेखन करणारे सीमाभागातील साहित्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते अविनाश ओगलेंची आठवण झाली. :( -दिलीप बिरुटे

युगंधर Wed, 02/12/2014 - 19:19
शायरी ऐकून माझी सांगेल जो कि आता पुरे. तो रातीच्या चुंबनाहि सांगेल कि आता पुरे?

In reply to by युगंधर

पुष्कर Sun, 10/03/2021 - 08:14
दुसर्‍या ओळीत 'तो रतीच्या चुंबनाही' असे आहे, बहुधा टंकोचित्रित (टायपोग्राफिक) चुकीने राती झालेले असावे. काय जबरदस्त ओळ आहे ती!

शुचि Fri, 04/11/2014 - 18:05
विलक्षण धागा. रसिकांसाठी मेजवानीच आहे. ज्या ज्या कोणी ओळी/कविता उधृत केल्या त्या सर्वांचे आभार.
सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते
उफ्फ!! क्या बात है!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुचि Mon, 04/14/2014 - 18:50
क्या नज़ाकत है की आरीज़ उनके नीले पड गये, हमने तो बोसा लिया था ख्वाब मे तस्वीर का ~अमीर मीनाई आरीज = गाल बोसा = चुंबन

nasatiuthathev Fri, 04/18/2014 - 20:16
विशेष माहिती पूर्ण लेख ...... भाऊ साहेबांबद्दल एवढी माहिती पहिल्यांदाच कळली... प्रतिसादातला खालील शेर विशेष आवडला
खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो."

बोबो Mon, 04/21/2014 - 01:34
फारच छान. वपुंच्या एका पुस्तकात लेख आहे भाऊसाहेबांच्या शायरीवर… मला आवडते त्यांची शायरी…

चौथा कोनाडा गुरुवार, 10/14/2021 - 17:39
झकास धागा. भाऊसाहेब पाटणकरांची किर्ती आणि शेरोसायरी बर्‍याच ऐकण्यात आली, पण युगंधर यांनी दिलेल्या लिंकमुळे साक्षात त्यांच्या तोंडून शायरी ऐकता आली. मला आठवतंय त्या प्रमाणे भाऊसाहेब पाटणकर हे तसे दुर्लक्षितच होते पण वपुंनी त्यांच्यावर लेख लिहिला तेव्हा रसिक त्यांच्या प्रतिभेशी परिचित झाले. असेच विमल लिमये यांच्या बद्दल " घर असावे घरा सारखे, नकोत नुसती नाती" ही घराघरात आणि मनामनात पोहोचलेली कविता हि विमल लिमये यांची आहे हे शोधून काढले आणि जगाला त्यांच्या प्रतिभेचा परिचय करुन दिला !

'विनोद' नावाची ही फार मोठी गझल आहे. आणि त्याची सुरुवात 'चंद्रमा हासे नभी, शांत शीतल चांदणे इथून आहे'. अर्थात गझलेची सुरुवात आपणास आवडलेल्या शेरांपासून केली असे आम्ही समजतो. आपल्या उत्साहाचे खच्चीकरण करतोय असा कृपया अर्थ घेऊ नये, फार थोड्या शब्दांची अदलाबदल झाली आहे. आपल्याच विनंतीवरुन ते सांगण्याचा मोह होत आहे. पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली धाडिली होती अशी की, नसतील कोणी धाडिली धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे पत्रात त्या जेव्हा तिचेही, पत्र हाती लागले वाटले जैसे कुणाचे, गाल हाती लागले पत्रातही त्या हाय ! तेथे, काय ती लिहिते बघा माकडा, आरशात अपुला, चेहरा थोडा बघा सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे या गझलेत एकूण १२६ ओळी आहेत. वरील ओळीतील दुरुस्ती केल्यानंतर आम्ही आमचा प्रतिसाद काढून घेऊ !!!! जिंदादिल- भाऊसाहेब पाटणकर पृ.क्र. २२ जिंदादिल हे माझ्याकडे संग्रही असलेले एकमेव पुस्तक आहे. त्यांचे 'मराठी शायरी, 'मराठी मुशायरा, 'मैफिल, आणि दोस्त हो, या शायरींच्या पुस्तकात जर वरील इतक्याच ओळींची गझल असेल तर ते मला माहित नाही.( चु.भु. दे. घे. ) भाऊसाहेबांच्या शेरोशायरीचा चाहता प्रा.डॉ. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुष्कर Mon, 02/04/2008 - 20:27
बिरुटे साहेब, आपल्यासारखे दर्दी लोक इथे आहेत हे पाहून खूप बरं वाटलं. आपण सांगितलेले बदल मी मूळ लेखनात करण्याचा गेले कित्येक दिवस खूप प्रयत्न केला. पण काही केल्या "संपादन" हा पर्याय मला दिसत नाहिये. तो पूर्वी होता, आणि त्याचा वापर मी यापूर्वी केलेला आहे. आपण आणि तात्यांनीही सांगितल्याप्रमाणे तो पर्याय अजूनही उपलब्ध आहे. पण मग मलाच तो कसा दिसत नाही? मी मला दिसणार्‍या webpage चा फोटो काढून दाखवायला तयार आहे, पण माझ्याकडे कॅमेरा उपलब्ध नाही. तो पर्याय सर्वांना उपलब्ध असावा आणि केवळ मलाच नसावा हा काय प्रकार आहे? (इथे मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण) नक्की तांत्रिक गोची कुठे झाली असेल? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावं - पुष्कर

In reply to by शिवाजी होळगे

पुष्कर गुरुवार, 11/04/2021 - 09:26
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद! :)

सुनील Sun, 01/20/2008 - 00:50
भाऊसाहेबांची चंद्रावर एक कविता होती, किंचित विनोदी. आता आठवत नाही. कुणाच्या लक्षात असेल तर कृपया इथे द्यावी. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by अविनाश ओगले

सुनील Mon, 01/21/2008 - 22:07
"त्या" कवितेचा गोषवारा साधारणतः असा होता - हे चंद्रा, तू पुरुषासारखा पुरुष, परंतु यच्चयावत सगळे कवी प्रेयसीच्या मुखाला तुझी उपमा देतात! .... .... .... नेहमी तारकांच्या गरड्यात असतोस, तरीही रोहिणीला त्याचे अजिबातच वैषम्य वाटत नाही. कारण ......... संपूर्ण माहित आहे काय? असल्यास कृपया द्यावी! (भाऊसाहेबांचा पंखा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/07/2008 - 22:04
खेळू नको बेधुंद ऐसा, चंद्रा अरे, तारांसवे घे जरा लक्षात आहे, रोहिणीही तुजसवे पृथ्वीवरी असतास जर का, छंद तू हा घेतला खास तुझिया रोहिणीने,डायव्होर्स असता घेतला -भाऊसाहेब पाटणकर

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुनील Tue, 02/11/2014 - 09:24
नाही. ह्या त्या ओळी नव्हेत. बरीच शोधाशोध करावी लागेलसे दिसते! असो. सहा वर्षांनी प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व! ;)

ऋषिकेश Sun, 01/20/2008 - 04:10
वा पुष्कर, अतिशय धन्यवाद!!! फार मस्त प्रकल्प सुरु करताय :) शुभेच्छा आनि अभिनंदन! पुढील गझलेच्या प्रतिक्षेत :) -ऋषिकेश

एक मला आवडलेला शेर द्यायचा मोह आवरत नाही. भाऊसाहेब म्हणतात. "दोस्तहो मैफील आपुली रंगण्या जर का हवी.. आम्हा नको सौजन्य तुमचे 'जिंदादिली' नुसती हवी" पुण्याचे पेशवे

पुष्कर Mon, 02/04/2008 - 20:38
क्या बात है पेशवे, -आपला (जिंदादिल) बाळाजी विश्वनाथ भट

रिकामटेकडा Tue, 02/05/2008 - 10:34
सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे तो कविंचा मान, तितुकी पायरी मझी नव्हे |१| आम्ही अरे साध्याच, अपुल्या जीवना सम्मानितो सम्मानितो हासू, तसे या आसवा सम्मानितो |२| जाणतो अंति ,अम्हाला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत, दुसरे काय असते व्हायचे |३| मानतो देवासही, ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतुकेच की, तो आमुचा कोणी नव्हे|४| आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे|५|

या ओळी मला फार आवडतात.... "आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे" पुण्याचे पेशवे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/07/2008 - 21:38
याविषयी थोडेसे. "जे न देखे रवि ते देखे कवि" या थाटात शायर सूर्याला म्हणतो "भास्करा कीव मजला येऊ लागते आधि मधि, रात्र प्रणयाची तू रे पाहीली आहे कधि?" (वरील शेराचे शब्द नक्की आठवत नाहीत. कोणास स्मरले तर सुधारणा सुचवावी) यावर भास्कर जो स्वतःच तेजाचे, बाणेदार पणाचे प्रतिक आहे तो उत्तर देतो पहा काय ते "मला ही या शायराची कीव येऊ लागते, याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते" -भाऊसाहेबांचा पंखा (फॅन:) ) डॅनी. पुण्याचे पेशवे

नुसतेच ना दुनियेत तुमच्या, आलो आम्ही गेलो आम्ही भगवन तुझ्या दुनियेस काही, देऊनी गेलो आम्ही शायरी तुला अर्पून गेलो, माझे सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन, ना आम्हा विसरेल ती भाउसाहेब म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व :) एके ठिकाणी ते म्हणतात ... तू तरी या अप्सरांच्या नादी असा लागू नको सांगूच का मृत्यो तुला मी का असा म्हणतो नको? दुर्दशा आमुच्यापरी ऐसी जरी आली तुला कुठवरी रडशील वेड्या, मरणही नाही तुला... |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

अनंत छंदी Wed, 12/03/2008 - 15:48
मराठी गझलांवर एक धागा हवाच होता, ती उणीव या धाग्याने भरून निघाली आहे. आता सुरेश भटांच्या गझलांवरही चर्चा घडू द्या! एकूण मराठी गझलेचा प्रवास या विषयावर चर्चा होणे गरजेचे आहे. बिरुटे सर आपल्याकडून मराठी गझलेच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण लेख येण्याची अपेक्षा आहे.

In reply to by अनंत छंदी

बिरुटे सर आपल्याकडून मराठी गझलेच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण लेख येण्याची अपेक्षा आहे. मराठी गझलांवर काथ्याकूट करता येईल, जसे की 'मराठीतील गझल काल आज आणि उद्या' त्यात वाचक म्हणून मलाही सहभागी होता येईल. मात्र गझलेसाठी आवश्यक असलेला मिसरा, मतला, काफिया,रदीफ,मक्ता यांचा किंवा गझलेवर हुकुमत गाजवून लेख लिहिता येईल इतका असा अभ्यास माझा नाही, त्यामुळे आपल्याला अपेक्षीत असलेला लेख आमच्याकडून घडेल याची शक्यता दिसत नाही. :( असे असले तरी नवोदितांच्या गझलेवर आणि सुरेश भटांच्या गझलांवर इथे लेखन आणि चर्चा चालूच असते त्याचबरोबर मिपावर गझल आणि गझलांच्या अभ्यासावर लिहिणारी बरीच जाणकार मंडळी असल्यामुळे कधीतरी या विषयावरही उत्तम लेख नक्की येईल. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे ! दिलीप बिरुटे

संदीप चित्रे Wed, 12/03/2008 - 21:53
चंद्रमा हासे नभी शांत शीतल चांदणे अमुच्या मात्र कपाळी अमृतांजन लावणे लावण्या ते तसा नसतो कधी नाराज मी हाय पण दैवा तेही आहे आमुच्याच हाती लावणे.. ------ योग्य शब्दरचना नीट आठवत नाहीये... चूभूद्याघ्या... योग्य तिथे सुधारणा सुचवाव्या

सुनील Wed, 12/03/2008 - 21:55
भाउसाहेबांचे खालील शेर माझ्या फार आवडीचे आहेत - खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो. अवांतर - भाउसाहेब दृष्टीने अधू होते, हे खरे का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विश्वास कल्याणकर गुरुवार, 09/15/2011 - 09:59
भीती तिला प्रणयात कोणी पाहील याची वाटते येवूनही स्वप्नी माझ्या हेच तिजला वाटते म्हणते कशी कैसी तरी स्वप्नात ह्या आले तुझ्या सारेच पण आहेत बाई भोवती जागे तुझ्या जाणते सर्वांस यांना मी ही नव्हते साधी तशी स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे स्वप्नातही अपुल्या स्वत:च्या हाय ती नव्हती तिथे त्रास ऐशा अप्सरेला हाच असतो सारखा नेतो तिला उचलून जो तो आपुल्याच स्वप्नी सारखा ऐकिले दुसर्‍या कुणाच्या स्वप्नात ती आहे तिथे बोलाविले नव्हते तरीही धावुनी गेलो तिथे आता तरी दुर्दैव वाटे नकीच माझे संपले पोचण्या आधीच ते ही स्वप्न सारे संपले - भाऊसाहेब पाटणकर

बन्ड्या गुरुवार, 12/04/2008 - 00:17
मला आवडलेली अजून एक जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कुणीतरी किर्तने सारीकडे ..सारीकडे ज्ञानेश्वरी काळ्जी आमच्या हिताची एवढी घेवू नका जावू सुखे नरकात तेथे तरी येवू नका. भाऊसाहेबांचा फॅन ...बन्ड्या

स्टार माझा वरील व्हिडिओ आता आंतरजालावर देखिल उपलब्ध झाला आहे, तो येथे उपल्ब्ध आहे. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

नितीनमहाजन Mon, 01/05/2009 - 19:02
हे वर्ष भाऊसाहेब पाटणकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. पेशाने वकील असलेल्या भाऊसाहेबांनी डोळे साथ देत नाहीत म्हणून वकिली बंद केली व त्यानंतर योगायोगाने ते शायरीकडे वळले. उर्दू शायरी वाचून त्यांच्या व आपल्या संस्कृतीतील फरक व त्याला अनुसरून उर्दू शायरीला आपण मराठी जन देत असलेला प्रतिसाद यातील फरक त्यांच्या लक्षात आला. अस्सल मराठी शायरी कशी असू शकते / कशी असावी याचा वास्तुपाठ भाऊसाहेबांनी घालून दिला. उर्दू प्रियकर आपल्या प्रेयसीच्या मागे लाळ्घोटेपणा करीत फिरत असलेला शायरीमधे रंगवलेला असलो. तिची खुशामत करणे या शिवाय त्याला दुसरे काही सुचतच नाही. उदा. "जो तुमको हो पसंद व्ही बात करेंगे, तुम दिनको अगर रात कहो तो रात कहेंगें". तिने 'हो' म्हणावे यासाठी काहिही करायला तो तयार असतो. विचार करा हे आपल्याला कितपत पटते ते. भाऊसाहेब म्हणतात: कुसुमे स्वये हासून ना म्हणती ना ये, पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमची नव्हे या बागेत फुललेल्या फुलांनी आम्हाला आमंत्रण दिले पाहिजे अन्यथा आम्ही येणार नाही (गेले उडत, काही गरज नाही आम्हाला.). हा जो एक आत्मसम्मान आपण अपेक्षितो तो आपल्या संस्कृतीमधला आहे. पुढे ते म्हणतातः भ्रमरापरी सौंदर्यवेडे असू जरी आम्ही, इश्कात ना कधी भिक्षुकी केली आम्ही. अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच ना विसरलो आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो. खेळलो इश्कात बेधुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो. रडलो इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे, इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले आसूंवरी अधिकार असेल ज्याला साधला नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधला. शायर सूर्याला विचारतो: भास्करा आम्हा दयाही येते तुझी अधिमधी पाहिली आहेस का रे कधी रात्र प्रणयाची कधी? तो सूर्यही काही कमी वस्ताद नाही तो शायराला उत्तर देतो: आम्हासही या शायराची कीव येऊ लागते याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते!! भाऊसाहेबांची ही गजल मला फार आवडते. नाजुकता यापेक्षा नाजूक असू शकतच नाही: नाजुकता ऐसी आम्ही पाहिली नाही कधी नजरही तिच्यावरी टाकिली नाही कधी भय मज नाजुकतेचे इतुके होते वाटले भार या नजरेतला सोसेल नव्हते वाटले टाकिसी हळुवार अपुली नाजुक इतुकी पाउले टपकती हलकेच जैसी पारिजातकाची फुले नाजुकता जाणून आम्ही आधीच होती बिछविली पायतळी केव्हाच तुझिया विकल ह्रदये आमची इतुका तरी स्पर्श ह्रदया होईल ऐसे वाटले इतुकेतरी सौभाग्य उदया येईल ऐसे वाटले कल्पना पण नाजुकतेची केव्हाच ना आली कधी तुडवून गेली आम्हा, ना कळे गेली कधी

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 09/15/2011 - 18:03
असा धोका दिला हाय ! तु आहे तरीही आम्हा असा धोका दिला सांग ना मृत्यो, तुला आहे कधी का मी दिला जन्मांतरी ज्या ज्या क्षणी , मी दुत तुमचा पाहीला हातचे टाकून आलो , मी स्वार्थ नाही पाहिला दोष ना देऊ जरी का आहेस आम्हा विसरलास देवेंद्रही नादात ह्यांच्या इमान आहे विसरला अप्सरांना त्याच आम्ही,आदाब केला शेवटी मृत्युवरही हाय माझ्या, त्यांचीच सत्ता शेवटी ………भाऊसाहेब पाटणकर ....................................... हंसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये पाऊल ना टाकू तिथे,बाग ती अमुची नव्हे भ्रमरापरी सौंदर्य वेडॆ आहो जरी ऐसे अम्ही इष्कातही नाही कुठे भिक्षुकी केली अम्ही. ............................... भीड मज बाई कुणाची, मोडवत नाही कधी सुचवता कोणी कसेही,नाहीच ना म्हणवे कधी एकदा सांगून बघते, " हे बघा ऐका जरा " सांगते खुश्शाल मग मी " काय वाट्टेल ते करा "

पांथस्थ Fri, 09/16/2011 - 13:21
भाऊसाहेबांचा एक मिश्कील शेर (बर्‍याच वर्षापूर्वी वाचला आहे तेव्हा शब्द थोडे मागे पुढे झाल्याची शक्यता आहे. माफी असावी.) - वार्धक्य जरी खुणावते मला वरच्या वरी मी ही असा बेरकी त्याला चोरुन करतो शायरी भाऊसाहेबांच्या जिंदादिलीला सलाम....

भाऊसाहेब म्हणतात- '' पाहिली असती जरी का, लैला तशी कोठे आम्ही शायरी नक्कीच काही, निर्मिली असती आम्ही दैन्य पण अमुचे असे की, मीच सारे व्हायचे मीच लैला व्हायचे अन् मीच मजनू व्हायचे'' -दिलीप बिरुटे

लई भारी Fri, 09/23/2011 - 10:40
सुरेख धागा! व. पुं च भाउसाहेबांच्या शायरीवर एक छान पुस्तक आहे. त्यावेळीच ह्या विलक्षण कलाकाराची ओळख झाली. अप्रतिम रचना आहेत!

In reply to by लई भारी

व पुं ची भाउसाहेबांच्या शायरीवर रसग्रहणाची ऑडीयो कैसेट देखील होती. ती ऐकुनच मी भाउसाहेबांच्या शायरी कडे आकर्षीत झालो. त्याची सी.डी आता झाली आहे का. कारण ती कैसेट आता खराब झाली आहे.

च्यायला, ............................ भाऊसाहेब म्हणतात- विसरावया हवेच तुला, विसरायचे कसे ? नयनात येत नीर तया, रोकायचे कसे ? वाटे नको कुणास व्यथा, माझी कळावया गाली हसू , परंतु बळे, आणायचे कसे ? -दिलीप बिरुटे

चौकटराजा Fri, 03/09/2012 - 09:06
मृत्यू बद्दल ईश्वरा बद्द्ल भाउसाहेब काय म्हणतात यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय? सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते

In reply to by चौकटराजा

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/30/2021 - 16:28
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले ऐसे जरी संतोष तेव्हा मानीला इतुकाच मी कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली। कवी - भाऊसाहेब पाटणकर जो खऱ्या अर्थानं जगला त्याला मृत्यू पण कळला

In reply to by कर्नलतपस्वी

पुष्कर Sun, 10/03/2021 - 08:09
इतक्या वर्षांनी ही पोस्ट शोधून काढून प्रतिसाद दिल्याबद्दल अने आभार, कर्नलतपस्वी. शायरी तर छानच आहे ती, प्रश्नच नाही.

मिपावर कविता आणि गझलेचे लेखन करणारे सीमाभागातील साहित्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते अविनाश ओगलेंची आठवण झाली. :( -दिलीप बिरुटे

युगंधर Wed, 02/12/2014 - 19:19
शायरी ऐकून माझी सांगेल जो कि आता पुरे. तो रातीच्या चुंबनाहि सांगेल कि आता पुरे?

In reply to by युगंधर

पुष्कर Sun, 10/03/2021 - 08:14
दुसर्‍या ओळीत 'तो रतीच्या चुंबनाही' असे आहे, बहुधा टंकोचित्रित (टायपोग्राफिक) चुकीने राती झालेले असावे. काय जबरदस्त ओळ आहे ती!

शुचि Fri, 04/11/2014 - 18:05
विलक्षण धागा. रसिकांसाठी मेजवानीच आहे. ज्या ज्या कोणी ओळी/कविता उधृत केल्या त्या सर्वांचे आभार.
सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते
उफ्फ!! क्या बात है!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुचि Mon, 04/14/2014 - 18:50
क्या नज़ाकत है की आरीज़ उनके नीले पड गये, हमने तो बोसा लिया था ख्वाब मे तस्वीर का ~अमीर मीनाई आरीज = गाल बोसा = चुंबन

nasatiuthathev Fri, 04/18/2014 - 20:16
विशेष माहिती पूर्ण लेख ...... भाऊ साहेबांबद्दल एवढी माहिती पहिल्यांदाच कळली... प्रतिसादातला खालील शेर विशेष आवडला
खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो."

बोबो Mon, 04/21/2014 - 01:34
फारच छान. वपुंच्या एका पुस्तकात लेख आहे भाऊसाहेबांच्या शायरीवर… मला आवडते त्यांची शायरी…

चौथा कोनाडा गुरुवार, 10/14/2021 - 17:39
झकास धागा. भाऊसाहेब पाटणकरांची किर्ती आणि शेरोसायरी बर्‍याच ऐकण्यात आली, पण युगंधर यांनी दिलेल्या लिंकमुळे साक्षात त्यांच्या तोंडून शायरी ऐकता आली. मला आठवतंय त्या प्रमाणे भाऊसाहेब पाटणकर हे तसे दुर्लक्षितच होते पण वपुंनी त्यांच्यावर लेख लिहिला तेव्हा रसिक त्यांच्या प्रतिभेशी परिचित झाले. असेच विमल लिमये यांच्या बद्दल " घर असावे घरा सारखे, नकोत नुसती नाती" ही घराघरात आणि मनामनात पोहोचलेली कविता हि विमल लिमये यांची आहे हे शोधून काढले आणि जगाला त्यांच्या प्रतिभेचा परिचय करुन दिला !
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.

प्रेम

raje1981 ·

सुनील Sun, 01/20/2008 - 02:08
दुसरी कुठलीच प्रतिक्रिया सुचत नाही. (सुन्न) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुधीर कांदळकर Sat, 01/26/2008 - 08:09
कथेची आठवण झाली. हॅन्स अँडरसन बहुधा कथालेखक. कथाकाळ सुमारे १९२५. म्हणजे फारशी औषधे नव्हती व साध्या रोगांतही माणसे दगावत. कथानायकची प्रेयसी चित्रकार. कथानायक अशिक्षित मॉडेल. पण असामान्य चित्रकार व्हावे अशी त्याचि आकांक्षा असते. त्याचे तिच्यावरील प्रेम श्रेष्ठ चित्रकार म्हणून नावारुपाला आल्यावरच व्यक्त करावे अशी त्याची इच्छा असते. ती आजारी पडते. तिची तब्येत खालावत असते. तिच्या कॉटच्या बाजूला एक खिडकी असते. खिडकीतून तिला एक भिंत दिसत असते. या भिंतीवर एक वेल असते. हिवाळ्याचा मोसम सुरू झालेला असतो. वेलीचे एकेक पान गळायला लागते. तिचे मन निराशेने ग्रासून जाते. या वेलीचे शेवटचे पान गळल्यावर आपण मरणार असे तिला वाटते. शेवटी एकच पान राहाते. बर्फाचे वादळ सुरु होते. तिला वाटते आता वेल मरणार व आपण देखील. तो खीडकी लावून घेतो. दोनतीन दिवसांनी तिला किंचित बरे वाटते. ती खिडकी उघडते. तिला वेलिवर एक पान दिसते. ती खाली उतरते. ती वेल नसून ते वेलीचे चित्र होते. ती मॉडेलला बोलावणे पाठवते. परंतु ते चित्र काढतांना बर्फात भिजल्यामुळे न्युमोनिया होऊन त्याचा मृत्यू झालेला असतो.

सुनील Sun, 01/20/2008 - 02:08
दुसरी कुठलीच प्रतिक्रिया सुचत नाही. (सुन्न) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुधीर कांदळकर Sat, 01/26/2008 - 08:09
कथेची आठवण झाली. हॅन्स अँडरसन बहुधा कथालेखक. कथाकाळ सुमारे १९२५. म्हणजे फारशी औषधे नव्हती व साध्या रोगांतही माणसे दगावत. कथानायकची प्रेयसी चित्रकार. कथानायक अशिक्षित मॉडेल. पण असामान्य चित्रकार व्हावे अशी त्याचि आकांक्षा असते. त्याचे तिच्यावरील प्रेम श्रेष्ठ चित्रकार म्हणून नावारुपाला आल्यावरच व्यक्त करावे अशी त्याची इच्छा असते. ती आजारी पडते. तिची तब्येत खालावत असते. तिच्या कॉटच्या बाजूला एक खिडकी असते. खिडकीतून तिला एक भिंत दिसत असते. या भिंतीवर एक वेल असते. हिवाळ्याचा मोसम सुरू झालेला असतो. वेलीचे एकेक पान गळायला लागते. तिचे मन निराशेने ग्रासून जाते. या वेलीचे शेवटचे पान गळल्यावर आपण मरणार असे तिला वाटते. शेवटी एकच पान राहाते. बर्फाचे वादळ सुरु होते. तिला वाटते आता वेल मरणार व आपण देखील. तो खीडकी लावून घेतो. दोनतीन दिवसांनी तिला किंचित बरे वाटते. ती खिडकी उघडते. तिला वेलिवर एक पान दिसते. ती खाली उतरते. ती वेल नसून ते वेलीचे चित्र होते. ती मॉडेलला बोलावणे पाठवते. परंतु ते चित्र काढतांना बर्फात भिजल्यामुळे न्युमोनिया होऊन त्याचा मृत्यू झालेला असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
असंही प्रेम असतं!! अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं.... काय करु? काहीच सुचतं नव्हतं... उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात.... गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले.... थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल! कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल? आजार? खून? का...

चारोळी

raje1981 ·
खरच तुझ्या आठवनिंना दुसरी कुठलीच तोड नाही ...... तुझ्या आठवण झऱ्यां इतकी तर साखरही गोड नाही !!!

संमेलनांना शुभेच्छा...

विसोबा खेचर ·

अवलिया Sat, 01/19/2008 - 11:35
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा नाना

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा !!! दोन्हीही संमेलने वाद-विवादांनी /अभ्यासपूर्ण परिसंवादांनी भरलेली राहावीत यासाठी आमच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा !!! :) १) अरुण साधू अभासासं तसहभागी होणार नाहीत- बातमी वाचक प्रा.डॊ.

अवलिया Sat, 01/19/2008 - 11:35
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा नाना

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा !!! दोन्हीही संमेलने वाद-विवादांनी /अभ्यासपूर्ण परिसंवादांनी भरलेली राहावीत यासाठी आमच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा !!! :) १) अरुण साधू अभासासं तसहभागी होणार नाहीत- बातमी वाचक प्रा.डॊ.
आई सरस्वती आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून मिसळपाव डॉट कॉम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा देत आहे.... आपला, (आंतरजालीय मराठी साहित्यिक) तात्या.

भारत जिंकणार काय?

सखाराम बाइंडर ·

प्रमोद देव Sat, 01/19/2008 - 11:18
पंचांनी जर त्यांचे काम "प्रामाणिकपणे" आणि आपल्या क्षेत्ररक्षकांनी "कसून" क्षेत्ररक्षण केले तरच हे शक्य आहे! नाहीतर..... जाऊ द्या.

दिनेश - सुर्य Sat, 01/19/2008 - 12:44
ताज्या बातमी नुसार कांगारुंच्या ७ विकेटस गेल्या असुन धावसंख्या २४३ आहे भारत जिंकणारच कांगारुंना जीकण्या साठी ४१३ धावा पाहिजेत ३ विकेटस १७० धावा ऑन् लाईन स्कोर साठी लॉग ऑन करा http://imsports.rediff.com/score/in_match8579.html दिनेश - सुर्य

भडकमकर मास्तर Sat, 01/19/2008 - 17:25
फ़ार मजा आली....भारताने नेटाने खेळ केला आणि आस्ट्रेलियाच्या उद्दामपणाला जबरदस्त उत्तर दिले.... ...सिडनी टेस्ट नंतर "जाउदेत, पळून या, खेळू नका."असे सांगणार्यांना मी नेहमी उत्तर देत असे, " त्यापेक्षा खेळा आणी पुढची टेस्ट जिंकून दाखवा..."....तसे खरेच आपल्या लोकांनी करून दाखवले, माझा विश्वास बसत नाहीये....

स्वाती राजेश Sat, 01/19/2008 - 18:57
त्यांच्या (ऑस्ट्रेलियाचा)विक्रम होणार होता सलग मॅचेस जिंकण्याचा. तो आपण करू दिला नाही.मस्तच...

प्रमोद देव Sat, 01/19/2008 - 11:18
पंचांनी जर त्यांचे काम "प्रामाणिकपणे" आणि आपल्या क्षेत्ररक्षकांनी "कसून" क्षेत्ररक्षण केले तरच हे शक्य आहे! नाहीतर..... जाऊ द्या.

दिनेश - सुर्य Sat, 01/19/2008 - 12:44
ताज्या बातमी नुसार कांगारुंच्या ७ विकेटस गेल्या असुन धावसंख्या २४३ आहे भारत जिंकणारच कांगारुंना जीकण्या साठी ४१३ धावा पाहिजेत ३ विकेटस १७० धावा ऑन् लाईन स्कोर साठी लॉग ऑन करा http://imsports.rediff.com/score/in_match8579.html दिनेश - सुर्य

भडकमकर मास्तर Sat, 01/19/2008 - 17:25
फ़ार मजा आली....भारताने नेटाने खेळ केला आणि आस्ट्रेलियाच्या उद्दामपणाला जबरदस्त उत्तर दिले.... ...सिडनी टेस्ट नंतर "जाउदेत, पळून या, खेळू नका."असे सांगणार्यांना मी नेहमी उत्तर देत असे, " त्यापेक्षा खेळा आणी पुढची टेस्ट जिंकून दाखवा..."....तसे खरेच आपल्या लोकांनी करून दाखवले, माझा विश्वास बसत नाहीये....

स्वाती राजेश Sat, 01/19/2008 - 18:57
त्यांच्या (ऑस्ट्रेलियाचा)विक्रम होणार होता सलग मॅचेस जिंकण्याचा. तो आपण करू दिला नाही.मस्तच...
3

तुम्ही काय कराल....?

स्वाती राजेश ·

सुनील Sat, 01/19/2008 - 00:26
सकाळी फर्मास चहा बनवून घेईन आणि मग एखादे छानसे पुस्तक घेऊन वाचेन. नंतर महाजालावर थोडी टिचका-टिचकी करेन. दुपारच्या जेवणासाठी एखादी फर्स्ट्-क्लास पाककृती बनवून फस्त करेन. त्यांनंतर वामकुक्षी साठी अर्धा तास म्हणून पडेन आणि दोन्-एक तासांनी उठेन. संध्याकाळी एक फेरफटका मारून आल्यावर, रात्रीच्या जेवणासाठी पुन्हा एखादी डिश बनवेन. मग त्या डिशला साजेशी वारूणी बरोबर घेऊन त्या डिशचा आस्वाद घेईन. शेवटी, टीव्ही वर एखादा डोक्याला ताप न देणारा कार्यक्रम बघत झोपून जाईन. (स्वच्छंदी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर Sat, 01/19/2008 - 00:28
तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल? सकाळी निवांतपणे उठेन. भरपेट नाष्टापाणी झाल्यावर झकासपैकी तानपुरा लावून तोडी किंवा रामकली किंवा कोमल रिषभ आसावरी ची मैफल जमवेन.. त्यानंतर मस्तपैकी थंड पाण्याने अंघोळ व नंतर ताज्या मासळीचं गरमागरम भरपेट जेवण. नंतर झकाससं तंबाखूपान व त्यानंतर गोविंदाचा एखादा मारामारी असलेला मसाला हिंदी चित्रपट! मग जरा तासभर झोप काढून मित्रमंडळींना जमवून मुलतानी पासून अगदी मारव्यापुरिया पर्यंतची मैफल जमवेन. मैफल आटपली की पुन्हा एकदा थंडगार पाण्याने अंघोळ, नंतर जरा दिवाबत्ती वगैरे करून रामरक्षा आणि थोडासा माफक पर्वचा! मग संध्याकाळी थोडंसं उशिरा, आवडत्या स्त्री सोबत सुखदु:खाच्या गप्पा मारत निवांतपणे दोन पेग विदेशी मद्य किंवा मग झक्कपैकी अत्तरबित्तर लावून,छानसे कपडे करून मुंबईतील एखाद्या कोठ्यावर विदेशी मद्याचे घुटके घेत घेत, सोबत हुक्का ओढत, जीव ओवाळून टाकावा अश्या एखाद्या तवायफेचं गाणं ऐकेन...! क्या बात है! साला दिवस असावा तर असा! खल्लास...:) आपला, (ऐय्याश!) तात्या.

ध्रुव Mon, 01/21/2008 - 12:39
एक दिवस सुट्टी आणि काहीही डोक्याला त्रास होणार नसेल तर... सकाळी सकाळी पहाटे उठुन मोटारसायकल काढायची. जवळच्या बॅगेमध्ये एक कॅमेरा, (पाण्याची) बाटली घ्यायची आणि जंगलाच्या दिशेने सुटायचे. पहाटे पहाटे कुठेतरी डेरा टाकुन मस्त फोटो काढायचे. मग साधारण दुपारी मिसळपावखायचा, मस्त गार गार पाणी पिउन ताणुन द्यायची. संध्याकाळी परत कुठल्यातरी टेकडीवर जाउन सुर्यास्त बघायचा, तिथेच तंबु टाकून मस्त रात्री तारे बघत बघत झोपायचे. बास..... दिवस असावा तर असा. डोक्याला त्रास नाही कोणाचाच.... , कशाचाच... :) -- ध्रुव

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 12:42
ध्रुवा, तुझा दिवस आपल्याला आवडला, एकदम पसंद पडला. मस्त रंगवला आहेस.... साला, माझ्या कल्पनेतील दिवस कॅन्सल करून तुझ्यासोबत तुझ्या कल्पनेतल्या दिवसात एखाददा रमीन म्हणतो! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ध्रुव Mon, 01/21/2008 - 12:56
असे किती तरी दिवस मनात घर करुन आहेत. कोकणात जायचे, सकाळी समुद्रावर लोळायचे, मग अंघोळ करायची मस्त आमरस हाणायचा, दुपारी छान बाहेरच्या झोपाळ्यावर पडी टाकायची. काहीच करायचे नाही, नुसते बसायचे... :) अरे एक ना दोन.... किती आणि काय काय करु असे वाटते. पण लगेच लक्षात येते की हे करायचे असेल तर त्याला लागणारे कष्ट नको का करायला. आणि मग कामाला लागायचे. :) -- ध्रुव

धमाल मुलगा Mon, 01/21/2008 - 16:52
तात्या, एकदम गुलछबु आईडियाची कल्पना आहे हा॑! मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन. आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!! अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!! मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला. आsss हा... स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय? मरुदे तो "PM" आन् बसूदे तो "Client" बो॑बलत. -(भटक्या) धमाल.

चतुरंग Tue, 01/22/2008 - 09:13
सकाळी सकाळी 'रुपाली'त २ प्लेट गरमागरम उप्पीट चेपणे, नंतर फक्कडसा चहा. घरी येऊन झकासपैकी आण्णांचे अभंग सोडायचे. मग बाकी आन्हिके आटपणे. नंतर निवांत वाचत, गाणी ऐकत बसणे. दुपारी छानसा वरण-भात-तूप-मीठ-लिंबू असा वाफाळता बेत! (च्यायला, तोंडाला पाणी सुटलं!) हलकीशी वामकुक्षी झाल्यावर डेक्कनला जाऊन इराण्याचा चहा (कॅफे सनराइ़ज, ते त्या चहात काय घालतात हे मला न उलगडलेलं एक कोडं आहे, आपला चहा कधीच तसा होत नाही!) मग तशीच स्वारी चांगल्या पुस्तकाच्या दुकानात. भरपूर पुस्तके चाळणे, मनाजोगी असली तर विकत घेणे. नंतर मित्रांना जमवून डेरा टाकणे. मनसोक्त गप्पा झाल्यावर नवीन कुठल्या हॉटेलात धाड मारायची ते ठरवून हल्ला बोल. भरपेट जेवण, नंतर छानसं पान. मग पुन्हा एकदा गप्पांचा अड्डा. जाम झोप यायला लागली की मगच घरी. (आ हा हा....क्या बात है - कधी जमेल असं!!) किंवा - सकाळी सकाळी - बॅकपॅक, कॅमेरा, पाणी, गॉगल, दुर्बीण - गाडी खडकवासल्याकडे. तिथला जलाशय बघून तसाच सिंहगड पायथा. मि.पा.चापून गडावर स्वारी. जराशी धुक्याची सकाळ असेल तर गडावर अप्रतीम दृश्य दिसतं. (मागं एकदा भर पावसाळ्यात गेलो होतो तेव्हा लांबून पाऊस येताना बघितला होता - ते दृश्य चकित करणारं असतं - ५-१० मैलावरुन पाऊस असा सरकत-सरकत आपल्यापाशी येतो आणि बघताबघता आपल्याला कवेत घेतो. फारच भन्नाट!) संध्याकाळच्या सुमारास घरी - अशा ठिकाणी जाऊन आलं की बाकी शहरी गोष्टी तुच्छ वाटतात त्यामुळे घरी. निवांत आमटी भात चापून पुलंची व्यक्तिचित्रे ऐकत निद्रादेवीच्या आधीन! स्वाती तुझ्या ह्या एका कल्पनेमुळे माझी ही मानसिक सफर तरी पूर्ण झाली - शतशः धन्यवाद! चतुरंग

स्वयम्भू Tue, 01/22/2008 - 22:23
मझे मला हवे तसे दीवस मी भरपुर जगलोय. पण पुन्हा सन्धी मीळाल्यास ह्यात्ला इथे नमूद करतोय तो एक दीवस मला पुन्हा जगय्ला आवडेल. भल्या पहाटे ऊठाय्च आणी बाईक काढून माझ्या सर्वात आवडत्या रोड वर नीघाय्च. हा रोड म्हनजे जुना मुम्बई - पुणे महामार्ग. अप्रतीम रस्ता आहे हो. आणी वीक डेज ना तर ह्या रस्त्यावर चीट्पखरूही नसतं. चहुकडे हीरवा नीसर्ग, झकास वेडी वाकडी वळणं, मस्तं रस्ता. अशी मजा येते की सन्गता सोय नही. मुम्बई - पुणे महामार्गाला लागायच्या आधी अवर्जून करय्ची गोष्ट म्हणजे पनवेल ला दत्त स्नेक्स इथे चरणे. इथली तरी मारलेली मीसळ खाउन जीव त्रुप्त झाला (जो कधी होत नाहीच) की मग त्यावर अजुन १-२ वडा पाव आणी सबूदाण्याची खीचडी चापयची म्हणजे लोनावळा येइ पर्यन्त भूक लागत नही. पोटोबा भरला की मग त्या वर चहा आणी सीगारेट म्हणजे ब्रह्मानन्दी टाळीच. मग प्रवसाला सुरुवात कराय्ची. उगाच वेगात जाय्च नही. ५०-६० च्या वेगात, नीसर्गाच सौन्द्र्य डोळ्यात साठवत साठवत प्रवास कराय्चा. जर फार लवकर नीघाला असाल तर सुर्यदेव अवतरताना बघायला मीळतील. वारा चेहेर्यावर घेत घेत लोणावळ्याला पोचाय्च. तीथे जास्त वेळ दवडाय्चा नाही. उभ्या उभ्याच चोकोलेट फज चापाय्च, थोडा वाटण्यासाथी वीकत घ्यय्च नी परत फीराय्च. परतीचा प्रवास मत्र न थम्बता कराय्चा. (अश्यानी दुपार्च्या झोपाय्च्या वेळे पर्यन्त घरी पोचता येत.) सधाराण मुम्बई ला पोचे पर्तन्त १२ वजलेले असतात. त्या नन्तर तडक कुलाबा मधल्या केफे मोन्डेगार मध्ये जाय्च, एक झक्कस गारेगार बीयर घशाखली उतरवाय्ची. अत्मा त्रुप्त झाला की मग जेवणा साठी वळाय्च बेलर्ड पीअर मधल्या केफे ब्रीटानीया कडे. इथल्या सर्खा अन्डा मसाला आणी केरेमल कस्डर्ड जगात कुठेही मीळत नही. इथे चापून झाल की मग तड्क घरि पोचय्च. (सधारण सडे चार वाजलेले असतात) आणी हो, वाटेवर ग्रान्ट रोड ला मेरवान मधून मावा केक पार्सल घ्यायला वीसरू नका. घरी पोचल की मग सरळ तणून द्यय्ची. सात ला वगेरे उठाय्च. कट्टयावर जाय्च नी परत याय्च. घरी आल की आई च्या मागे लगून तीला भात, कान्द्याची आमटी, बटट्याची सुकी भाजी, कान्दा भजी नी त्या सोबत तकातले पोह्याचे पापड असा बेत कराय्ला लवाय्चा. आणी ह्या सगळ्याचा यथेच्छ समाचार घेउन मग शेवटी नीद्रा देवी ची आराधना सुरु कराय्ची. असा दीवस मी लवकरच पुन्हा एक्दा जगेन. आपला, स्वयंभू

केशवराव Mon, 01/28/2008 - 17:19
स्वाती, ' मला पंख असते तर.....' टाईप कल्पना रम्य निबंध लिहील्यागत लिहीत नाही. महिन्यातून १ दिवस या साठी रिक्त ठेवतो. भल्या सकाळी [५.३०-६.००] 'कॅलीबर क्रोमा' [हमारा बजाज] काढायची , किक मारली कि १०० -१२५ कि.मी. रपेट. [ वय वर्षे ६० ] अलीबागहुन रायगड, लोणावळा,कर्जत,शिवथर घळ ,मुरूड असे भटकायचे. कुणी बरोबर आले तर ठिक नाहितर अकेला! [पुर्वी आमच्या बाईसाहेब नक्की यायच्या ,आता तिला नाही जमत.] बरोबर वॉकमन; सतार, सरोद, बासरी च्या केसेटस . पाण्याची बाटली, कॅमेरा, बायनॉ. बस! वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई. झोडायचे. मुरूडला गेलो तर मस्त ताडी / माडी आणि शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .] संध्याकाळी परत. दुसर्‍या दिवशीच्या कामासाठी सज्ज !

In reply to by केशवराव

गिरिजा Sat, 05/31/2008 - 18:09
छानच..
वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई.
आणि
शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .]
तर सहीच्चे!! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

प्राजु Tue, 01/29/2008 - 01:14
कोकणांत समुद्र दिसेल अशा ठीकाणी घर बांधायचं स्वप्न आहे माझं. आजूबाजूला १-२ आंबा, नारळ, काजू.. इ. (हे जर पूर्ण झाले असेल तर) मी सकाळी लवकर उठून तडक कोकणांत जाईन ( बरोबर कोणी नको, नवरा सुद्धा..!). माझी दोन्ही कुत्री आणि मांजर सोबत घेईन नक्की. त्यांच्यासोबत .. मनसोक्त समुद्रावर हिन्डेन. वाचायला भरपूर पुस्तके, ऐकायला सुंदर गाणी. आणि प्रत्येक वेळी फुल मग भरून चहा.. मग दुपारी, तिथेच कोकणातली फणसाची भाजी, तांदूळाची भाकरी, ताक, कोकमचं सरबत. आणि त्या जाड्या उकड्या तांदळाचा भात, कुळथाचं पिठलं, नाचणीचा पापड, किंवा भाजलेली सालपापडी. वा.. वा... क्या बात है. संध्याकाळी, चिकन किंवा माशाचं जेवण. माझ्यासोबत माझं मांजर आणि कुत्री यांचीही चैन. रात्री अंगणात बाजल्यावर चांदणं पहात निवांत झोप. काय हवं अजून??? स्वाती, मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन. - (कोकणी) प्राजु

In reply to by प्राजु

ध्रुव Tue, 01/29/2008 - 12:07
मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन. अगं, पण याची वाट बघण्यापेक्षा काहीतरी (वेळ) प्लॅन करून आधीच आपल्या इच्छा पुर्ण करुयात :) -- ध्रुव

किशोरी Tue, 01/29/2008 - 13:16
मस्त सकाळी आवरुन पॅराग्लायडींग,वॉटर-स्पोर्टस असतील तिथे जाऊन आकाशात उडायच,पाण्यात खेळायच धमाल करायची मग दुपारी मित्रपरिवाराबरोबर थालीपीठ,मसालेभात अस अस्सल मराठी जेवण वेळ मिळालाच तर एखाद्या डान्स क्लासला जाऊन नवीन डान्स प्रकार शिकायचा मग एखाद्या बोटीवर जायच,छान २-३ तास एकटेच बोटीवर मस्त गाणी ऐकत निसर्गाचा आस्वाद घ्यायचा मन अगदी शांत होऊन जाईल,दिवसभर मुक्त जगायच कशाचीही पर्वा न करता (दुसरया दिवशी काम..नको) एक दिवस जरा कमी पडतो आहे,स्वातीजी अजुन जरा एक-दोन दिवस वाढवा ना!!!!

इनोबा म्हणे Tue, 01/29/2008 - 15:41
डोंगर दर्‍यांमधे मी जास्त रमतो. कारण तिथे एकांत जास्त मिळतो.... माझी इच्छा आहे जगातल्या कोणत्यातरी एका कोपर्‍यात जिथे माणूस नावाचा प्राणी शोधून ही सापडायचा नाही अशा ठिकाणी रहावे. डोंगर दर्‍यांमधे,झाडा झूडपांमधे अगदी नैसर्गीक जिवन जगावे. समाजाचे किचकट नियम नको आणि प्रपंचातली ओढाताण नको. मी आणि फक्त मीच... मनसोक्त उनाडक्या कराव्या... पक्ष्यांचा कलकलाट, झाडांचे सळसळणे आणि नदीच्या खळखळाटातले संगीत मनसोक्त ऐकावे...आणि हवे तेव्हा,हवे तिथे ताणून द्यावी. (रानरेडा) -इनोबा

नि३ Sat, 05/31/2008 - 14:42
तो दीवस.....मला माझ्या गावी ..माझ्या घरी घालवायला आवडेल त्या दीवशी मी.. सकाळी ५.०० वाजता उठेल ..आईची देवघरात पुजा सुरु झालेली असणार त्या माऊलीचे ते थोडे देवमंत्र ऐकुन .. थंड-गरम मीश्रीत पाण्याने आंघोळ करुण ताजेतवाने होईल..नंतर आईच्या हातचे गरमागरम पराठे आणी पोळ्यांच। चुरा त्यावर एक ईलायची ,अद्रक आणी नीव्वळ दुधाची अशी एक पेलाभर चाय असा नाष्टा करुन आजोंबासोबत शेतीवीषयक गप्पा करत मराठी लोकमत पेपर वाचत बसायचे.. तेवढ्यात माझे खास मीत्र अज्या(खोंडीन),सतीश(बाबा),उम्या,अभी(कानपुरी),गोलु(ढ्क्कण) हातात बॅट आणी टेनीस बॉल घेऊन तयार अरे नितिन चल लवकर यार मॅच चा टाईम झाला ....अरे आलो चलो... त्या वीशाल टीम बरोबर मॅच ना आपली आज त्यांना कोनत्याही हालतीत धुळ चारवायची बघ ....मस्त २-३ तास मॅच झाली की आईच्या हातचे माझे आवड्ते जेवण ..गरमागरम रोडगे ..मीसळ दाळ ..लींबु ..कोथींबीर .पापड ..लोणचे आणी गुलाब जामुण आहाहा......... नंतर ( झोपायचे छे.. माझ्या त्या आवड्त्या एका दीवसातला एक्..एक क्षण मह्त्वाचा त्यात माझे मौल्यवाण ३-४ तास झोपेत वाया घालवायचे ??कदापी नाही) सु.शीं च एखाद मी न वाचलेल कींवा जाई अथवा दुनियादारी हे पुस्तक वाचत बसायचे.... संध्याकाळी ५ च्या दरम्यान मोटारसायकल बाहेर काढावी आणी मस्त निसर्गाचा आनंद घेत शेतात पोचावे ...संपुर्ण शेतात गच्च भरुन आलेली संत्र्याची झाडे बघत पुर्ण शेतात एक चक्कर मारावी ....... ७.०० -७.३० वाजता बाजारात जावे ... तेथे ठरल्याप्रमाणे एक -एक मित्र जमा होत राहील तोपर्यंत असलेल्यांबरोबर एक चहा मारायचा साधारण ८.०० वाजता सर्व जमा झाले की बाईक्स घेऊन नीघाली स्वारी गावाबाहेरच्या ढाब्यावर .... रेसींग करत ...गाड्या पळवायच्या ताकदीने .... ढाब्यावर गप्पा ,चर्चा ,जोक्स(नॉन व्हेज )नुसती धमाल , ऑर्डर ... १० कींगफीशर , २ ओल्ड मंक ,२ बॅगपायपर ,४ सोबत मसाला पापड ,चणे,भजे,खारा.... काजु करी ,दाल तड्का,कोल्हापुरी करी,पनीर बटर मसाला,पालक पनीर,नान ,तंदुर रोटी.... जेवन झाले की एक चमन चटनी पान ,मीठा पान............. आनी नंतर ...एक छानशी ...मंद वेगात मोटरसायकल वरन थोडादुर्.ट्रीप..तेथुन परत फिरून ...थेट घरी बीछ्यानात............... ह्म्म्म्म्म ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

मन Sat, 05/31/2008 - 16:03
मस्त एका आडरानातल्या शांत्-प्रसन्न मंदिरात येणारे अज्ञात बासरीचे सूर ऐकत होइन भेभान. मग होइन एक मांजर, जाउन पुन्हा एकदा आईला छळणार, दुधा-दह्याची भांडी उपडी करणार. ती मला पकडायला धावणार (खरोखरचं मांजर समजुन) आणि अचानक मूळ रुपात प्रकट होउन धमाल उडवुन देणार. मग मी होइन अदृश्य आणि जाइन बॉसच्या घरी, शिंचा तो सदैव खार खाउन का असतो, ते शोधीन. ह्याच्या पर्सनल लाइफ मध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे ते शोधीन. मग होइन मी एक पोपट् हिरवेगार पंख, लालचुटुक ओठ असलेला पोपट. मुक्त, स्वच्छंद पोपट्. अजुन कधीही पिंजर्‍यात न आलेला पोपट. उंचावरुन उडाताना, माणसं छोटी छोटी दिसताना नक्की वाटतं कसं ते पाहिन. एखाद्या उंच दरिच्या मधोमध स्वैर उड्ण्याची मजा घेइन. अल्गद अधांतरी तरंगत राहेन कित्येक वेळ. मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात. एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन. जाता जाता, अदृष्य रुपानं थेट मैदानात उतरुन ऐन बहरात असलेला सचिन कशी फटकेअबाजी करतो, ते थेट मैदानात उतरुन पाहिन. अगदि त्याच्या बाजुला उभं राहुन! आणि मग जाइन मी माझ्या ग्यानबा नाय तर तुकोबा कडं . तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन. तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त. अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच संपलं कि ह्या इच्छात! अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच पुर्ण झालं कि ह्या इच्छात! बस्स.......... फार हावरट नाही.इतकच हवय. आपलाच, मनोबा

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 16:24
मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात. एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन. वा! सुंदर...!

मदनबाण Sat, 05/31/2008 - 16:58
तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन. तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त. व्वा हे फार आवडल..... (तल्लिन होण्यास आतुर) मदनबाण.....

शितल Sat, 05/31/2008 - 20:03
माझ्या जवळच्या मैत्रीणि बरोबर कुणकेश्वरला जाईन तीच्याशी मस्त गप्पा टप्पा, स्॑दीप खरे या॑ची गाणी सतत कानाला सुखावतील अशी व्यवस्था करून समुद्र किनार्‍यावर पहाटेच जाईन आणि मनसोक्त लाटा पहात बसेन,मला लाटा॑चा आवाज खुप आवडतो. आणि तेथुन जवळच असलेल्या शिव म्॑दीराच्या घ॑टेचा निनाद ऐकत वाळु तुन शिप॑ले गोळा करत दुपार पर्यत राहीन, परत घरी येऊन मस्त आ॑बा, फणस, चुलीवर भाजलेले काजु आणि गरम गरम ता॑दळाचे उकडीचे मोदक खाईन आणि परत समुद्र किनार्‍यावर अगदी सुर्य मावळल्या न॑तर ही चा॑दणे दिसेस पर्यत राहीन.

गणा मास्तर Sun, 06/01/2008 - 09:00
मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन. आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!! अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!! मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला. आयला माझ्या मनातले लिहिलय. माचीवरुन बोंबा ठोकल्या की वज्रगड उर्फ रुद्रमाळावरून मस्त प्रतिध्वनी ऐकू येतो!!! पावसाळा असेल तर आणखीनच झकास. जाताना कात्रज घाटातुन जायचे आणि येताना दिवे घाटातुन यायचे.

ऋचा Mon, 06/02/2008 - 10:37
बाईक काढायची पाण्याची बाटली घ्यायची आणि कोणतही ठीकाण न ठरवता नुसतं भटकत रहायचं.... भुक लागली की खायच आणि पुढे जायचं

सुनील Sat, 01/19/2008 - 00:26
सकाळी फर्मास चहा बनवून घेईन आणि मग एखादे छानसे पुस्तक घेऊन वाचेन. नंतर महाजालावर थोडी टिचका-टिचकी करेन. दुपारच्या जेवणासाठी एखादी फर्स्ट्-क्लास पाककृती बनवून फस्त करेन. त्यांनंतर वामकुक्षी साठी अर्धा तास म्हणून पडेन आणि दोन्-एक तासांनी उठेन. संध्याकाळी एक फेरफटका मारून आल्यावर, रात्रीच्या जेवणासाठी पुन्हा एखादी डिश बनवेन. मग त्या डिशला साजेशी वारूणी बरोबर घेऊन त्या डिशचा आस्वाद घेईन. शेवटी, टीव्ही वर एखादा डोक्याला ताप न देणारा कार्यक्रम बघत झोपून जाईन. (स्वच्छंदी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर Sat, 01/19/2008 - 00:28
तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल? सकाळी निवांतपणे उठेन. भरपेट नाष्टापाणी झाल्यावर झकासपैकी तानपुरा लावून तोडी किंवा रामकली किंवा कोमल रिषभ आसावरी ची मैफल जमवेन.. त्यानंतर मस्तपैकी थंड पाण्याने अंघोळ व नंतर ताज्या मासळीचं गरमागरम भरपेट जेवण. नंतर झकाससं तंबाखूपान व त्यानंतर गोविंदाचा एखादा मारामारी असलेला मसाला हिंदी चित्रपट! मग जरा तासभर झोप काढून मित्रमंडळींना जमवून मुलतानी पासून अगदी मारव्यापुरिया पर्यंतची मैफल जमवेन. मैफल आटपली की पुन्हा एकदा थंडगार पाण्याने अंघोळ, नंतर जरा दिवाबत्ती वगैरे करून रामरक्षा आणि थोडासा माफक पर्वचा! मग संध्याकाळी थोडंसं उशिरा, आवडत्या स्त्री सोबत सुखदु:खाच्या गप्पा मारत निवांतपणे दोन पेग विदेशी मद्य किंवा मग झक्कपैकी अत्तरबित्तर लावून,छानसे कपडे करून मुंबईतील एखाद्या कोठ्यावर विदेशी मद्याचे घुटके घेत घेत, सोबत हुक्का ओढत, जीव ओवाळून टाकावा अश्या एखाद्या तवायफेचं गाणं ऐकेन...! क्या बात है! साला दिवस असावा तर असा! खल्लास...:) आपला, (ऐय्याश!) तात्या.

ध्रुव Mon, 01/21/2008 - 12:39
एक दिवस सुट्टी आणि काहीही डोक्याला त्रास होणार नसेल तर... सकाळी सकाळी पहाटे उठुन मोटारसायकल काढायची. जवळच्या बॅगेमध्ये एक कॅमेरा, (पाण्याची) बाटली घ्यायची आणि जंगलाच्या दिशेने सुटायचे. पहाटे पहाटे कुठेतरी डेरा टाकुन मस्त फोटो काढायचे. मग साधारण दुपारी मिसळपावखायचा, मस्त गार गार पाणी पिउन ताणुन द्यायची. संध्याकाळी परत कुठल्यातरी टेकडीवर जाउन सुर्यास्त बघायचा, तिथेच तंबु टाकून मस्त रात्री तारे बघत बघत झोपायचे. बास..... दिवस असावा तर असा. डोक्याला त्रास नाही कोणाचाच.... , कशाचाच... :) -- ध्रुव

In reply to by ध्रुव

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 12:42
ध्रुवा, तुझा दिवस आपल्याला आवडला, एकदम पसंद पडला. मस्त रंगवला आहेस.... साला, माझ्या कल्पनेतील दिवस कॅन्सल करून तुझ्यासोबत तुझ्या कल्पनेतल्या दिवसात एखाददा रमीन म्हणतो! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ध्रुव Mon, 01/21/2008 - 12:56
असे किती तरी दिवस मनात घर करुन आहेत. कोकणात जायचे, सकाळी समुद्रावर लोळायचे, मग अंघोळ करायची मस्त आमरस हाणायचा, दुपारी छान बाहेरच्या झोपाळ्यावर पडी टाकायची. काहीच करायचे नाही, नुसते बसायचे... :) अरे एक ना दोन.... किती आणि काय काय करु असे वाटते. पण लगेच लक्षात येते की हे करायचे असेल तर त्याला लागणारे कष्ट नको का करायला. आणि मग कामाला लागायचे. :) -- ध्रुव

धमाल मुलगा Mon, 01/21/2008 - 16:52
तात्या, एकदम गुलछबु आईडियाची कल्पना आहे हा॑! मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन. आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!! अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!! मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला. आsss हा... स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच काय? मरुदे तो "PM" आन् बसूदे तो "Client" बो॑बलत. -(भटक्या) धमाल.

चतुरंग Tue, 01/22/2008 - 09:13
सकाळी सकाळी 'रुपाली'त २ प्लेट गरमागरम उप्पीट चेपणे, नंतर फक्कडसा चहा. घरी येऊन झकासपैकी आण्णांचे अभंग सोडायचे. मग बाकी आन्हिके आटपणे. नंतर निवांत वाचत, गाणी ऐकत बसणे. दुपारी छानसा वरण-भात-तूप-मीठ-लिंबू असा वाफाळता बेत! (च्यायला, तोंडाला पाणी सुटलं!) हलकीशी वामकुक्षी झाल्यावर डेक्कनला जाऊन इराण्याचा चहा (कॅफे सनराइ़ज, ते त्या चहात काय घालतात हे मला न उलगडलेलं एक कोडं आहे, आपला चहा कधीच तसा होत नाही!) मग तशीच स्वारी चांगल्या पुस्तकाच्या दुकानात. भरपूर पुस्तके चाळणे, मनाजोगी असली तर विकत घेणे. नंतर मित्रांना जमवून डेरा टाकणे. मनसोक्त गप्पा झाल्यावर नवीन कुठल्या हॉटेलात धाड मारायची ते ठरवून हल्ला बोल. भरपेट जेवण, नंतर छानसं पान. मग पुन्हा एकदा गप्पांचा अड्डा. जाम झोप यायला लागली की मगच घरी. (आ हा हा....क्या बात है - कधी जमेल असं!!) किंवा - सकाळी सकाळी - बॅकपॅक, कॅमेरा, पाणी, गॉगल, दुर्बीण - गाडी खडकवासल्याकडे. तिथला जलाशय बघून तसाच सिंहगड पायथा. मि.पा.चापून गडावर स्वारी. जराशी धुक्याची सकाळ असेल तर गडावर अप्रतीम दृश्य दिसतं. (मागं एकदा भर पावसाळ्यात गेलो होतो तेव्हा लांबून पाऊस येताना बघितला होता - ते दृश्य चकित करणारं असतं - ५-१० मैलावरुन पाऊस असा सरकत-सरकत आपल्यापाशी येतो आणि बघताबघता आपल्याला कवेत घेतो. फारच भन्नाट!) संध्याकाळच्या सुमारास घरी - अशा ठिकाणी जाऊन आलं की बाकी शहरी गोष्टी तुच्छ वाटतात त्यामुळे घरी. निवांत आमटी भात चापून पुलंची व्यक्तिचित्रे ऐकत निद्रादेवीच्या आधीन! स्वाती तुझ्या ह्या एका कल्पनेमुळे माझी ही मानसिक सफर तरी पूर्ण झाली - शतशः धन्यवाद! चतुरंग

स्वयम्भू Tue, 01/22/2008 - 22:23
मझे मला हवे तसे दीवस मी भरपुर जगलोय. पण पुन्हा सन्धी मीळाल्यास ह्यात्ला इथे नमूद करतोय तो एक दीवस मला पुन्हा जगय्ला आवडेल. भल्या पहाटे ऊठाय्च आणी बाईक काढून माझ्या सर्वात आवडत्या रोड वर नीघाय्च. हा रोड म्हनजे जुना मुम्बई - पुणे महामार्ग. अप्रतीम रस्ता आहे हो. आणी वीक डेज ना तर ह्या रस्त्यावर चीट्पखरूही नसतं. चहुकडे हीरवा नीसर्ग, झकास वेडी वाकडी वळणं, मस्तं रस्ता. अशी मजा येते की सन्गता सोय नही. मुम्बई - पुणे महामार्गाला लागायच्या आधी अवर्जून करय्ची गोष्ट म्हणजे पनवेल ला दत्त स्नेक्स इथे चरणे. इथली तरी मारलेली मीसळ खाउन जीव त्रुप्त झाला (जो कधी होत नाहीच) की मग त्यावर अजुन १-२ वडा पाव आणी सबूदाण्याची खीचडी चापयची म्हणजे लोनावळा येइ पर्यन्त भूक लागत नही. पोटोबा भरला की मग त्या वर चहा आणी सीगारेट म्हणजे ब्रह्मानन्दी टाळीच. मग प्रवसाला सुरुवात कराय्ची. उगाच वेगात जाय्च नही. ५०-६० च्या वेगात, नीसर्गाच सौन्द्र्य डोळ्यात साठवत साठवत प्रवास कराय्चा. जर फार लवकर नीघाला असाल तर सुर्यदेव अवतरताना बघायला मीळतील. वारा चेहेर्यावर घेत घेत लोणावळ्याला पोचाय्च. तीथे जास्त वेळ दवडाय्चा नाही. उभ्या उभ्याच चोकोलेट फज चापाय्च, थोडा वाटण्यासाथी वीकत घ्यय्च नी परत फीराय्च. परतीचा प्रवास मत्र न थम्बता कराय्चा. (अश्यानी दुपार्च्या झोपाय्च्या वेळे पर्यन्त घरी पोचता येत.) सधाराण मुम्बई ला पोचे पर्तन्त १२ वजलेले असतात. त्या नन्तर तडक कुलाबा मधल्या केफे मोन्डेगार मध्ये जाय्च, एक झक्कस गारेगार बीयर घशाखली उतरवाय्ची. अत्मा त्रुप्त झाला की मग जेवणा साठी वळाय्च बेलर्ड पीअर मधल्या केफे ब्रीटानीया कडे. इथल्या सर्खा अन्डा मसाला आणी केरेमल कस्डर्ड जगात कुठेही मीळत नही. इथे चापून झाल की मग तड्क घरि पोचय्च. (सधारण सडे चार वाजलेले असतात) आणी हो, वाटेवर ग्रान्ट रोड ला मेरवान मधून मावा केक पार्सल घ्यायला वीसरू नका. घरी पोचल की मग सरळ तणून द्यय्ची. सात ला वगेरे उठाय्च. कट्टयावर जाय्च नी परत याय्च. घरी आल की आई च्या मागे लगून तीला भात, कान्द्याची आमटी, बटट्याची सुकी भाजी, कान्दा भजी नी त्या सोबत तकातले पोह्याचे पापड असा बेत कराय्ला लवाय्चा. आणी ह्या सगळ्याचा यथेच्छ समाचार घेउन मग शेवटी नीद्रा देवी ची आराधना सुरु कराय्ची. असा दीवस मी लवकरच पुन्हा एक्दा जगेन. आपला, स्वयंभू

केशवराव Mon, 01/28/2008 - 17:19
स्वाती, ' मला पंख असते तर.....' टाईप कल्पना रम्य निबंध लिहील्यागत लिहीत नाही. महिन्यातून १ दिवस या साठी रिक्त ठेवतो. भल्या सकाळी [५.३०-६.००] 'कॅलीबर क्रोमा' [हमारा बजाज] काढायची , किक मारली कि १०० -१२५ कि.मी. रपेट. [ वय वर्षे ६० ] अलीबागहुन रायगड, लोणावळा,कर्जत,शिवथर घळ ,मुरूड असे भटकायचे. कुणी बरोबर आले तर ठिक नाहितर अकेला! [पुर्वी आमच्या बाईसाहेब नक्की यायच्या ,आता तिला नाही जमत.] बरोबर वॉकमन; सतार, सरोद, बासरी च्या केसेटस . पाण्याची बाटली, कॅमेरा, बायनॉ. बस! वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई. झोडायचे. मुरूडला गेलो तर मस्त ताडी / माडी आणि शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .] संध्याकाळी परत. दुसर्‍या दिवशीच्या कामासाठी सज्ज !

In reply to by केशवराव

गिरिजा Sat, 05/31/2008 - 18:09
छानच..
वेगवेगळ्या ठिकाणची जेवणे, मिसळ पाव, बटाटे वडे, कांद्याची भजी ई.
आणि
शहाळ्याचे पाणी प्यायचे. खुप संगीत ऐकायचे .[ आनि हो.. मोबाईल बंद .]
तर सहीच्चे!! -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------

प्राजु Tue, 01/29/2008 - 01:14
कोकणांत समुद्र दिसेल अशा ठीकाणी घर बांधायचं स्वप्न आहे माझं. आजूबाजूला १-२ आंबा, नारळ, काजू.. इ. (हे जर पूर्ण झाले असेल तर) मी सकाळी लवकर उठून तडक कोकणांत जाईन ( बरोबर कोणी नको, नवरा सुद्धा..!). माझी दोन्ही कुत्री आणि मांजर सोबत घेईन नक्की. त्यांच्यासोबत .. मनसोक्त समुद्रावर हिन्डेन. वाचायला भरपूर पुस्तके, ऐकायला सुंदर गाणी. आणि प्रत्येक वेळी फुल मग भरून चहा.. मग दुपारी, तिथेच कोकणातली फणसाची भाजी, तांदूळाची भाकरी, ताक, कोकमचं सरबत. आणि त्या जाड्या उकड्या तांदळाचा भात, कुळथाचं पिठलं, नाचणीचा पापड, किंवा भाजलेली सालपापडी. वा.. वा... क्या बात है. संध्याकाळी, चिकन किंवा माशाचं जेवण. माझ्यासोबत माझं मांजर आणि कुत्री यांचीही चैन. रात्री अंगणात बाजल्यावर चांदणं पहात निवांत झोप. काय हवं अजून??? स्वाती, मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन. - (कोकणी) प्राजु

In reply to by प्राजु

ध्रुव Tue, 01/29/2008 - 12:07
मरताना यमराजाने जरी मला शेवटची इच्छा विचारली तरी मी त्याच्याकडे असाच एक दिवस मागून घेईन. अगं, पण याची वाट बघण्यापेक्षा काहीतरी (वेळ) प्लॅन करून आधीच आपल्या इच्छा पुर्ण करुयात :) -- ध्रुव

किशोरी Tue, 01/29/2008 - 13:16
मस्त सकाळी आवरुन पॅराग्लायडींग,वॉटर-स्पोर्टस असतील तिथे जाऊन आकाशात उडायच,पाण्यात खेळायच धमाल करायची मग दुपारी मित्रपरिवाराबरोबर थालीपीठ,मसालेभात अस अस्सल मराठी जेवण वेळ मिळालाच तर एखाद्या डान्स क्लासला जाऊन नवीन डान्स प्रकार शिकायचा मग एखाद्या बोटीवर जायच,छान २-३ तास एकटेच बोटीवर मस्त गाणी ऐकत निसर्गाचा आस्वाद घ्यायचा मन अगदी शांत होऊन जाईल,दिवसभर मुक्त जगायच कशाचीही पर्वा न करता (दुसरया दिवशी काम..नको) एक दिवस जरा कमी पडतो आहे,स्वातीजी अजुन जरा एक-दोन दिवस वाढवा ना!!!!

इनोबा म्हणे Tue, 01/29/2008 - 15:41
डोंगर दर्‍यांमधे मी जास्त रमतो. कारण तिथे एकांत जास्त मिळतो.... माझी इच्छा आहे जगातल्या कोणत्यातरी एका कोपर्‍यात जिथे माणूस नावाचा प्राणी शोधून ही सापडायचा नाही अशा ठिकाणी रहावे. डोंगर दर्‍यांमधे,झाडा झूडपांमधे अगदी नैसर्गीक जिवन जगावे. समाजाचे किचकट नियम नको आणि प्रपंचातली ओढाताण नको. मी आणि फक्त मीच... मनसोक्त उनाडक्या कराव्या... पक्ष्यांचा कलकलाट, झाडांचे सळसळणे आणि नदीच्या खळखळाटातले संगीत मनसोक्त ऐकावे...आणि हवे तेव्हा,हवे तिथे ताणून द्यावी. (रानरेडा) -इनोबा

नि३ Sat, 05/31/2008 - 14:42
तो दीवस.....मला माझ्या गावी ..माझ्या घरी घालवायला आवडेल त्या दीवशी मी.. सकाळी ५.०० वाजता उठेल ..आईची देवघरात पुजा सुरु झालेली असणार त्या माऊलीचे ते थोडे देवमंत्र ऐकुन .. थंड-गरम मीश्रीत पाण्याने आंघोळ करुण ताजेतवाने होईल..नंतर आईच्या हातचे गरमागरम पराठे आणी पोळ्यांच। चुरा त्यावर एक ईलायची ,अद्रक आणी नीव्वळ दुधाची अशी एक पेलाभर चाय असा नाष्टा करुन आजोंबासोबत शेतीवीषयक गप्पा करत मराठी लोकमत पेपर वाचत बसायचे.. तेवढ्यात माझे खास मीत्र अज्या(खोंडीन),सतीश(बाबा),उम्या,अभी(कानपुरी),गोलु(ढ्क्कण) हातात बॅट आणी टेनीस बॉल घेऊन तयार अरे नितिन चल लवकर यार मॅच चा टाईम झाला ....अरे आलो चलो... त्या वीशाल टीम बरोबर मॅच ना आपली आज त्यांना कोनत्याही हालतीत धुळ चारवायची बघ ....मस्त २-३ तास मॅच झाली की आईच्या हातचे माझे आवड्ते जेवण ..गरमागरम रोडगे ..मीसळ दाळ ..लींबु ..कोथींबीर .पापड ..लोणचे आणी गुलाब जामुण आहाहा......... नंतर ( झोपायचे छे.. माझ्या त्या आवड्त्या एका दीवसातला एक्..एक क्षण मह्त्वाचा त्यात माझे मौल्यवाण ३-४ तास झोपेत वाया घालवायचे ??कदापी नाही) सु.शीं च एखाद मी न वाचलेल कींवा जाई अथवा दुनियादारी हे पुस्तक वाचत बसायचे.... संध्याकाळी ५ च्या दरम्यान मोटारसायकल बाहेर काढावी आणी मस्त निसर्गाचा आनंद घेत शेतात पोचावे ...संपुर्ण शेतात गच्च भरुन आलेली संत्र्याची झाडे बघत पुर्ण शेतात एक चक्कर मारावी ....... ७.०० -७.३० वाजता बाजारात जावे ... तेथे ठरल्याप्रमाणे एक -एक मित्र जमा होत राहील तोपर्यंत असलेल्यांबरोबर एक चहा मारायचा साधारण ८.०० वाजता सर्व जमा झाले की बाईक्स घेऊन नीघाली स्वारी गावाबाहेरच्या ढाब्यावर .... रेसींग करत ...गाड्या पळवायच्या ताकदीने .... ढाब्यावर गप्पा ,चर्चा ,जोक्स(नॉन व्हेज )नुसती धमाल , ऑर्डर ... १० कींगफीशर , २ ओल्ड मंक ,२ बॅगपायपर ,४ सोबत मसाला पापड ,चणे,भजे,खारा.... काजु करी ,दाल तड्का,कोल्हापुरी करी,पनीर बटर मसाला,पालक पनीर,नान ,तंदुर रोटी.... जेवन झाले की एक चमन चटनी पान ,मीठा पान............. आनी नंतर ...एक छानशी ...मंद वेगात मोटरसायकल वरन थोडादुर्.ट्रीप..तेथुन परत फिरून ...थेट घरी बीछ्यानात............... ह्म्म्म्म्म ---नितिन. (पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)

मन Sat, 05/31/2008 - 16:03
मस्त एका आडरानातल्या शांत्-प्रसन्न मंदिरात येणारे अज्ञात बासरीचे सूर ऐकत होइन भेभान. मग होइन एक मांजर, जाउन पुन्हा एकदा आईला छळणार, दुधा-दह्याची भांडी उपडी करणार. ती मला पकडायला धावणार (खरोखरचं मांजर समजुन) आणि अचानक मूळ रुपात प्रकट होउन धमाल उडवुन देणार. मग मी होइन अदृश्य आणि जाइन बॉसच्या घरी, शिंचा तो सदैव खार खाउन का असतो, ते शोधीन. ह्याच्या पर्सनल लाइफ मध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे ते शोधीन. मग होइन मी एक पोपट् हिरवेगार पंख, लालचुटुक ओठ असलेला पोपट. मुक्त, स्वच्छंद पोपट्. अजुन कधीही पिंजर्‍यात न आलेला पोपट. उंचावरुन उडाताना, माणसं छोटी छोटी दिसताना नक्की वाटतं कसं ते पाहिन. एखाद्या उंच दरिच्या मधोमध स्वैर उड्ण्याची मजा घेइन. अल्गद अधांतरी तरंगत राहेन कित्येक वेळ. मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात. एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन. जाता जाता, अदृष्य रुपानं थेट मैदानात उतरुन ऐन बहरात असलेला सचिन कशी फटकेअबाजी करतो, ते थेट मैदानात उतरुन पाहिन. अगदि त्याच्या बाजुला उभं राहुन! आणि मग जाइन मी माझ्या ग्यानबा नाय तर तुकोबा कडं . तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन. तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त. अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच संपलं कि ह्या इच्छात! अरेच्चा! दिवस कसला, आयुष्यच पुर्ण झालं कि ह्या इच्छात! बस्स.......... फार हावरट नाही.इतकच हवय. आपलाच, मनोबा

विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 16:24
मग हळुच घुसेन मा. अण्णांच्या(पं भीमसेन ह्यांच्या) घरात. एकांतात करत असलेला त्यांचा सराव नक्की असतो कसा, ते ऐकुन कान तृप्त करुन घेइन. वा! सुंदर...!

मदनबाण Sat, 05/31/2008 - 16:58
तल्लिन होणं कशाला म्हणतात, त्याची अनुभुती घेइन. तल्ल्लिन होइन्.आणि होउन जाइन लुप्त. व्वा हे फार आवडल..... (तल्लिन होण्यास आतुर) मदनबाण.....

शितल Sat, 05/31/2008 - 20:03
माझ्या जवळच्या मैत्रीणि बरोबर कुणकेश्वरला जाईन तीच्याशी मस्त गप्पा टप्पा, स्॑दीप खरे या॑ची गाणी सतत कानाला सुखावतील अशी व्यवस्था करून समुद्र किनार्‍यावर पहाटेच जाईन आणि मनसोक्त लाटा पहात बसेन,मला लाटा॑चा आवाज खुप आवडतो. आणि तेथुन जवळच असलेल्या शिव म्॑दीराच्या घ॑टेचा निनाद ऐकत वाळु तुन शिप॑ले गोळा करत दुपार पर्यत राहीन, परत घरी येऊन मस्त आ॑बा, फणस, चुलीवर भाजलेले काजु आणि गरम गरम ता॑दळाचे उकडीचे मोदक खाईन आणि परत समुद्र किनार्‍यावर अगदी सुर्य मावळल्या न॑तर ही चा॑दणे दिसेस पर्यत राहीन.

गणा मास्तर Sun, 06/01/2008 - 09:00
मी आपला मस्त सक्काळी सक्काळी गाडी काढून पुर॑दर पायथ्याला जाईन. त्यान॑तर पैलेझूट काम म्हणजे तिथली मिसळपाव (डबल तर्री आन् हिरव्या मिरच्या यक्श्ट्रा) चापून, सरळ गड चढायला सुरूवात करेन. निवा॑त हव॑ तिथे भटकून शेवटी केदारेश्वराच्या गारगार पि॑डीवर डोक॑ ठेऊन स्वतः गारगार होईन. आणि मग तिथेच बाहेर, डबा खायचा. कड्याच्या टोकाशी उभ॑ राहून स्वतःलाच हाका मारयच्या, अन् त्या॑चा एको (मराठी ?) ऐकून परत ओरडायच॑, शेवटी थकून गडमाथ्यावरच्या भन्नाट वा-यात आणि भवतालच्या ढगा॑त पडून रहायच॑...अगदी ह्या जगात आपणच फक्त एकटे असल्यासारख॑ !!! अ॑धार पडता-पडता घरी परत, वर मुजोरी करत आईला चहा-पोह्या॑ची आर्डर सोडून पुल. नाहीतर सु.शी. वाचत पडायच॑ !!!!!! मोबाईल बिबाईल ब॑द करून पार उशीखाली...चुकून केकाटलाच तरी कोणाला ऐकू नको जायला. आयला माझ्या मनातले लिहिलय. माचीवरुन बोंबा ठोकल्या की वज्रगड उर्फ रुद्रमाळावरून मस्त प्रतिध्वनी ऐकू येतो!!! पावसाळा असेल तर आणखीनच झकास. जाताना कात्रज घाटातुन जायचे आणि येताना दिवे घाटातुन यायचे.

ऋचा Mon, 06/02/2008 - 10:37
बाईक काढायची पाण्याची बाटली घ्यायची आणि कोणतही ठीकाण न ठरवता नुसतं भटकत रहायचं.... भुक लागली की खायच आणि पुढे जायचं
लेखनविषय:
लेखनप्रकार
पेशवे बाजीराव तिसरे यांच्या "एकांत"कवितेवरून मनात एक विचार आला. खरेच माणसाला या धक्काधक्कीच्या जीवनात एक दिवस दिला आणि त्याला सांगितले तुला काही हवे ते तू कर... हा दिवस तुझा एकट्याचा. तुम्हाला कुणी हे कर, ते कर असे म्हणणार नाही, काही काम सांगणार नाही अशावेळी तुम्ही काय कराल? तुमची राहिलेली कामे, इच्छा पुर्ण कराल? कि एकांत पणाचा कंटाळा येईल? मला अशावेळी वॉकमन मधून (इतरांना त्रास होऊ नये म्हणून) कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकायला आवडेल.

" निरंतर "

पेशवे बाजीराव तिसरे ·

स्वाती राजेश Fri, 01/18/2008 - 23:24
छान कविता संग्रह आहे तुमचा. राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी.. या ओळी सुंदर.. कविता दोनदा वाचली कारण खूप नेहमीपेक्षा वेगळे शब्द आहेत प्रथम कळायला अवघड गेली. पण कवितेचा अर्थ खूपच छान आहे.

स्वाती राजेश Fri, 01/18/2008 - 23:24
छान कविता संग्रह आहे तुमचा. राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी.. या ओळी सुंदर.. कविता दोनदा वाचली कारण खूप नेहमीपेक्षा वेगळे शब्द आहेत प्रथम कळायला अवघड गेली. पण कवितेचा अर्थ खूपच छान आहे.
लेखनविषय:
विसरुन सर्व गेले इतक्यात लोक मजला ह्रदयी कधी जयांच्या मी वस्ती करुन होतो.. कोण राहीले निरंतर येथे हे मलाच का ऊमजेना अस्तित्व पुसुनी जाण्याची का मी भिती धरुन होतो.. बांधती जीवा ह्या अजुनी चार धागे त्या विश्वासाचे धावतात शरीरामधुनी वेग बनुनी ते श्वासांचे.. आहेस तु सन्निध स्वरसाज बनुनी ह्या गीताचा जाणवे आधार अजुनी त्या समर्थ हातामधल्या हाताचा.. राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी..

" एकान्त "

पेशवे बाजीराव तिसरे ·

स्वाती राजेश Fri, 01/18/2008 - 23:32
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा.. या ओळी आवडल्या. असा एकांत आजच्या फास्ट लाइफ मध्ये मिळाला तर?...

स्वाती राजेश Fri, 01/18/2008 - 23:32
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा.. या ओळी आवडल्या. असा एकांत आजच्या फास्ट लाइफ मध्ये मिळाला तर?...
लेखनविषय:
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. अशा एकान्ताच्या क्षणी ती बसते समोर येऊनी.. मग तीच होते कविता माझी व्यक्त होते शब्दातुनी.. मनात वाजत राही आठवणीचा पावा.. वेदना सगळ्या जुन्याच परि चेहरा नवा.. नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी.. ओठावरती येते तरी का जुनीच विराणी.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..