मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...!

विसोबा खेचर ·

नीलकांत Wed, 04/23/2008 - 17:04
असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद... झकास उत्सुकता ताणल्या गेलीये. लवकर लिहा पुढे काय झालं ते. नीलकांत

In reply to by नीलकांत

विसुनाना Wed, 04/23/2008 - 18:47
असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद... झकास उत्सुकता ताणली गेलीय. लवकर लिहा पुढे काय झालं ते. मला तर ब्रेकमधली 'रॉयल चॅलेंज'ची (म्हंजे मल्ल्याबाबाच्या आयपीएल टीमची हो!) जाहिरातही दिसत आहे. ;)

धमाल मुलगा Wed, 04/23/2008 - 17:39
तात्याबा, तुम्हाला भिती नाही वाटली? च्यामारी, एखादा इमानदार पोलिस बघितला तरी आपली हवा टाईट होते बॉ! डेंजरच आहे प्रकरण... लवकर टाका बॉ पुढचा भाग! -(घाबरट) ध मा ल.

स्वाती राजेश Wed, 04/23/2008 - 17:44
तात्या मस्त लिहिले आहे पण अर्धवट का सोडले? वाचता वाचता विचारांची तारच तोडली.. आम्ही आपले तात्या आत पोलिसांच्या गाडीत बसलेत.. कसे असतील? याविचारात असतानाच पुढील भागात असे लिहिले. उत्सुकता लावून ठेवली... लवकर लिहा....

In reply to by स्वाती राजेश

प्राजु गुरुवार, 04/24/2008 - 12:58
स्वाती म्हणते ते अगदी खरं आहे.. आम्ही आपले तात्या आत पोलिसांच्या गाडीत बसलेत.. कसे असतील? याविचारात असतानाच पुढील भागात असे लिहिले. उत्सुकता लावून ठेवली... .. काय तात्या...?? पण हे असं खुशालचेंडू वागणं खरंच शोभतं तुम्हाला.. :)) आता पुढचा भाग मात्र लवकर लिहा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण Wed, 04/23/2008 - 17:47
आता मात्र त्या शिंदेसाहेबांमधला पोलिस जागा झाला आणि दुसर्‍याच क्षणी तो त्या पंजाब्याला स्वच्छ मराठीतून बोलता झाला,"ए आता गप बसतो, का कानाखाली दोनचार आवाज काढू? बड्या साहेबाशी बोलायच्या धमक्या कुणाला देतोस रे मादरचोद? भडव्या, एक तर दारू पिऊन गाडी चालवतोस आणि वर पुन्हा पैशाची मस्ती करतोस? कर, तुला ज्याला कुणाला फोन करायचाय तो कर. पण मी कुणाशीही बोलणार नाही!" याला म्हणतात मराठी दणका !!!!! कंसातला प्रश्न अर्थातच मनातल्या मनात होता! ;) :) (१०० मालिकेचा जबरदस्त पंखा) आणि पुढील ४८ तासांच्या प्रतिक्षेत..... मदनबाण

लिखाळ Wed, 04/23/2008 - 18:49
मस्त ! ४८ तासांची वाट पाहतो आहे. लवकर लिहा. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

शितल Wed, 04/23/2008 - 18:58
तात्या माझ्या माहिते प्रमाणे तुमचा तत्सम गुन्हा हा आय.पी.सी. कलम १८५ नसुन मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ अन्वये आहे. कारण आय.पी.सी. १८५ हा Illegal purchase or bid for property offered for sale by authority of public servant आहे, मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ हा Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. असा आहे. ४८ तास कधी स॑पत आहेत ह्या प्रतिक्षेत असलेली शितल.

In reply to by शितल

विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:59
तत्सम गुन्हा हा आय.पी.सी. कलम १८५ नसुन मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ अन्वये आहे. मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ हा Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. धत् तेरीकी! मला वाटलं हे आय पी सी मधलं कलम आहे. धन्यवाद शितल. या भागात आणि पुढल्या भागात तशी सुधारणा करेन.. आपला, (मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५ अंतर्गत सजा झालेला आरोपी) तात्या.

स्वाती दिनेश Wed, 04/23/2008 - 19:31
काय रे बाबा असे तुकड्यातुकड्यात देतोस? आता आले ना ४८ तास वाट पाहणे? हा भाग झकास जमला आहे हे वेसांन ल. स्वाती

विदेश Wed, 04/23/2008 - 20:53
मोजत बसलोय की तात्या! अजून किती तास-मिनिटे-सेकंद राहिले हो ४८ तास संपायला?

धनंजय गुरुवार, 04/24/2008 - 00:57
पण हे कलम भा.दं.सं.१८५ म्हणजे काय भानगड आहे बुवा? हे मला कळलेच नव्हते. वर शितल यांनी सांगितले म्हणून मोटार वाहातुक कायद्याबद्दल १८५ कळले... चौकीवर जाऊन रक्तचाचणी करण्यापेक्षा तिथल्या तिथे काही चाचण्या केल्या असत्या तर बरे झाले असते. म्हणजे सरळ रेषेवर पावलापुढे पाऊल ठेवून चालणे, डोळे बंद करून उभे राहाणे, वगैरे. शक्यतोवर जे पोलीस दारूच्या गुत्त्यासमोर पाळत ठेवून असतात, त्यांच्यापाशीच श्वासातल्या आल्कोहोलची चाचणी करण्याचे यंत्र असले तर बरे असते. असे केल्याने एकच पेग घेणार्‍या तात्यांचा खोळंबा झाला नसता. तसेच पोलीस अधिकार्‍याने त्यांना जातीने स्टेशनावरती नेले. तिथे आणखी चार फुल्टू लोक स्कूटर, गाड्या चालवत गेले असतील! चाचणी तिथल्या तिथे केली असती, तर या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचे कामही कार्यक्षम झाले असते. असो. लिहिताय म्हणजे सहीसलामत सुटलात. कसे सुटलात त्याबद्दल कुतूहल आहे.

विकास Wed, 04/23/2008 - 22:44
लेख चांगलाच उत्कंठावर्धक आहे आणि स्वतःसंदर्भात नसल्याने वाचायला मजा आली :-) बाकी मद्यपानानंतर स्कूटर चालवायची नाही इथपर्यंत ठिक आहे पण आपण (४८ तासाची वाट पहायला न लावता) लिहीणे चालू ठेवले असते तर बरे झाले असते! :-)

भाई Wed, 04/23/2008 - 23:06
खुमासदार आणि ओघवत्या वर्णनामुळे मुळातच चटपटीत असलेला विषय अधिक रंजक झालेला आहे. पोलिस आणि आमचे कसे जमायचे कारण आम्ही तर नांवापासूनच, भाई

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2008 - 01:47
उत्तम वातावरण निर्मिती!! बरं शिंदेसाहेबांचा चेहेराच इतका करडाकठोर होता की जास्त वाद घालण्यात काही अर्थ नव्हता! साला कुठल्याही क्षणी फाडकन कानफटात बसायची! होय बाबा, आम्ही पाह्यलंय या लोकांना दुसर्‍यांना कानफटवतांना!! विशेषतः आयपीएस अधिकार्‍यांना!! काय त्यांना कानफटात कसं मारायचं याचंही ट्रेनिंग देतात का काय नकळे. पण काडकन आवाज काढतात!!!:))) तात्या अभ्यंकर, आरोपी - भारतीय दंड विधान, कलम १८५! व्वा! काय जबरदस्त टायटल आहे!! आत्तापर्यंतच्या वाचलेल्या तुझ्या सगळ्या टायटल्सपेक्षा जोरदार!!!!:)) पुढल्या भागाची वाट पहात आहे.... फोलिसांपासून दूर रहाणारा, पिवळा डांबिस

भोचक गुरुवार, 04/24/2008 - 14:50
मैफल रंगात यावी अन माईक बंद पडावा असं झालंय. ४८ तास संपण्याची वाट पहाणारा. (भोचक)

प्रमोद देव गुरुवार, 04/24/2008 - 15:19
मी आपला तंद्रीतच गुणगुणायला लागलो. "लट उलझी,सुलझा जा बालम!" तुम्हाला सांगतो चीज काय नजाकतदार आहे. प्रेयसी अशी आपल्या प्रियकराला..... जाऊ द्या. मुद्याचे सांगतो. नाहीतर तुम्ही म्हणाल... तो इनस्पेक्टर माझ्याकडे संशयाने पाहतोय असे वाटायला लागले... अहो खरंच होते ते. खस्सकन खेचून त्याने मला कोपच्यात घेतले. मी टरकलो. म्हटलं आज काही आपले खरे नाही. मनातल्या मनात अण्णांचा धावा केला.... आणि चमत्कार झाला. "आत्ता तुम्ही गात होता ती चीज बिहागमधली काय हो!" इन्स्पेक्टरच्या ह्या अनाहूत प्रश्नाने मी तर गारच पडलो. इन्स्पेक्टरला हे 'अंग' असेल असे कधीच वाटले नाही. मी होकार देताच त्याने मला हळूच इतरांपासून अगदी दूर नेले आणि ही चीज मला नीट म्हणायला सांगितली. मग काय महाराजा! आपण समजलो. पंछी पिंजडेमे फस गयेला है! असा काय जोरदार गायलोय की इन्स्पेक्टर साहेब खूश झाला आणि मला चक्क माझ्याच स्कुटरवरून त्या हवालदारामार्फत घरी पोचवले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:48
मी टरकलो. म्हटलं आज काही आपले खरे नाही. मनातल्या मनात अण्णांचा धावा केला.... आणि चमत्कार झाला. असा काय जोरदार गायलोय की इन्स्पेक्टर साहेब खूश झाला आणि मला चक्क माझ्याच स्कुटरवरून त्या हवालदारामार्फत घरी पोचवले. हा हा! सह्ही लिहिलं आहे प्रमोदशेठ... तात्या.

चित्रा Fri, 04/25/2008 - 01:33
लेखाचे शीर्षक बघून मला आधी वाटले तात्या काहीतरी "माहितीपूर्ण" लिहीतायत की काय?! ४८ तास कधी संपणार, म्हणे?

केशवसुमार Fri, 04/25/2008 - 01:52
चित्रगुप्त दादरला बसलो होतो तेव्हा ऐकवला होता..उत्तम शंब्दांकन.. आणि तो पुढचा भाग लवकर टाक..पुढे काय झाले ते मला माहिती आहे पण लोकांना असे टांगत ठेऊ नकोस.. केशवसुमार (स्वगत:-'बरी अद्दल घडली !'असे किती जण मनातल्या मनात म्हणाले असतील बरं?)

मनस्वी Fri, 04/25/2008 - 11:42
अरे ओ सांबा.. अठ्ठेचाळीस तास खतम होनेको कितने तास है रे.. बस्स ५ तास सरकार.. कहाणी एका रात्रीची.. आणि ब्रेक ४८ तासांचा.. बहुत नाईन्साफी है..

भडकमकर मास्तर Fri, 04/25/2008 - 14:07
आहाहा..तात्या... हा लेख म्हणजे खणखणीत सिक्सर आहे.... लै मजा आली राव..... ..............हा प्रसंग कधीही कोणाच्याही आयुष्यात घडू शकतो...इतका रिअलिस्टिक लेख !!!! एक विनंती : प्लीज पुढचा लेख क्रमशः नको... वेळ घ्या पण काय ते एकदम संपवा...

अभिज्ञ Fri, 04/25/2008 - 19:33
तात्या, आपल्या वाद्याप्रमाणे ४८ तास उंलटून गेलेले आहेत तरिहि आपला पुढचा भाग अजुन आलेला नाहि. अजुन किति वेळ वाट पाहायचि??????? आपल्या केसचि आतुरतेने वाट पाहणारा.. (हायकोर्ट जज्ज) अबब. »

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग Fri, 04/25/2008 - 22:17
अहो काय हा ऍटमबाँब??!! एकदम हसू सुध्दा नीट बाहेर येईना;०० मी ऑफिसातल्या खुर्चीतून घसरलोच, तरी बरं लॅबमधे असल्यामुळे आजूबाजूला कोणी नाहीये नाही तर काही खरं नव्हतं!;))) चतुरंग

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Fri, 04/25/2008 - 22:27
हे वाचुन जज्ज साहेबांना मात्र नक्कीच उरात धडकी बसेल..... :))))) (कोर्टची पायरी कधीही न चढलेला) मदनबाण

In reply to by प्रभाकर पेठकर

अभिज्ञ Sat, 04/26/2008 - 00:24
चुकलेच कि, पेठकर काका लै भारी......) कथेचा भाग असेच वाचावे....) तात्या,पुढचा भाग (लेखाचा हो) लगिच येउ द्यात. हि विनंती अबब अवांतर-आमचे उपनाम "वाघ" असल्याने ,आम्हि शिकार "भाग" करुन खात नाहि बरे...)

वरदा Fri, 04/25/2008 - 23:36
मला तर जवळ तिकीट असलं तरी समोरुन टी सी आला की उगाच भिती वाट्टे..कधी बिनातिकीट गेले नाही तरी मला टी सी ने पकडल्याची स्वप्न पडायची लोकांना पकडलेलं पाहून्..... हे तर एकदम भारीच्...

सुनील Sat, 04/26/2008 - 05:49
तुमची तात्याकहाणी वाचून ३-४ महिन्यांपूर्वी (गेल्या डिसेंबरात) घडलेला प्रसंग आठवला. आमच्या कंपनीची ख्रिसमस पार्टी होती. परंतु काही कामामुळे मला फार काळ थांबता येणार नव्ह्ते. तेव्हा मी फक्त एक बाटली बियर घेतली (अमेरीकेतील बियरची बाटली भारतात मिळणार्‍या बाटलीच्या निम्मी असते) आणि थोडेसे खाऊन निघालो. तरीही रिस्क नको म्हणून फ्रीवेने न जाता शहरातील रस्त्याने जाण्याचा विचार केला (आणि फसलो!). तसा बियरच्या अर्ध्या बाटलीने कोलमडणारा मी नव्हेच! त्यामुळे निदान माझ्यामते तरी मी व्यवस्थित गाडी हाकीत होतो. एक सिग्नल पार करून मी पुढे निघालो आणि तेव्हढ्यात गाडीच्या आरशात निळे दिवे चमकताना दिसले. ट्रॅफिक पोलीसाला भिडण्याचा हा चौथा प्रसंग असल्यामुळे अगदी सराईताप्रमाणे गाडी रस्याच्या कडेला नेऊन थांबवली. लायसन्स व इतर कागदपत्रे असल्याची खातरजमा करून स्वस्थ बसून राहिलो. मिनिटाभरात तो आलाच. बहुदा त्यानेही माझ्याक्डे शत्र वगैरे काही नसल्याची खात्री केली असावी. "कुठून आलात?" मी साळसूदपणे रस्त्याचे आणि छेदरस्त्याचे नाव सांगितले. "हो, पण तेथे होते काय? रेस्टॉरन्ट वगैरे?" "हो. रेस्टॉरन्ट." "अच्छा. मग काही ड्रिन्क्स वगैरे?" "होय साहेब." "किती घेतलीत?" "फार नाही. फक्त एक बियर!" "ह्म्म. जरा इकडे पहा.", असे म्हणून त्याने एक प्रकाशझोत माझ्या डोळ्यावर टाकला. स्वतःचे एक बोट माझ्या डोळ्यापुढे ठेवून तो म्हणाला, " मी हे बोट फिरवीन त्याप्रमाणे तुम्ही डोळे फिरवायचे, समजले?" मी मान डोलावली. तो त्याचे बोट उजवीकडून डावीकडे फिरवत गेला तसा मीही मान फिरवून त्याच्या बोटाकडे पाहत राहिलो. "अहं. मान नाही फिरवायची. मान सरळ. फक्त डोळे फिरवायचे." आता मान न वळवता नुसते डोळे फिरवून आसपासचा अंदाज घ्यायची जनानी पद्धत मला कुठे जमायला? काही "बघणेबल" दिसले की अगदी ९० (क्वचित १८० देखिल) अंशात मान फिरवून बघायची आमची सवय! असो. कसेबसे जमवले. तोही डोळ्यात प्रकाशझोत टाकून काहितरी बघत होता. "नक्की एकच बियर?" "होय साहेब, एकच." "जरा तुमचे लायसन्स बघू." मी लायसन्स काढून दिले. ते घेऊन तो आपल्या गाडीकडे गेला. आता मला थोडा धीर आला. कारण जरी त्यापूर्वी तीन वेळा मला ट्रॅफिक पोलीसाने अडवले असले तरी प्रत्येक वेळेस वॉर्निंग देऊन सोडले होते त्यामुळे माझ्या नावावर नोंद अशी नव्हती. तो परत आला. "कुठपर्यंत जाणार? " मी घरचा पत्ता सांगितला. तिथून एक्-दीड मैलाचाच तर पल्ला होता. "नक्की ना? की अजून कुठे बसणार?" "नाही साहेब. अगदी थेट घरी." "नीट जा." लायसन्स हातात देऊन तो म्हणाला. मी गाडी चालू केली. घरी आलो. फ्रीजमधून करोनाची बाटली काढली. त्यात एक लिंबाची फोड घालून सोफ्यावर अंग टाकले आणि एक एक घोट घेत डोके शांत करू लागलो! आता मी तुम्हाला काय सल्ला देणार म्हणा. पण भारतात एक नियम मी पाळ्तो तो म्हणजे वाहन कधीही बारच्या समोर उभे करीत नाही. थोडे दूर एखाद्या आतल्या गल्लीत ठेवतो. तुमच्या तात्याकहाणीचा दुसरा भाग वाचण्याची उत्सुकता आहे. लवकर टाका. जाता जाता - हायवे चेकनाक्यावरच्या एकाही बारमध्ये जाण्याचा योग अद्याप आला नाही. पण तुम्ही म्हणता तो कुठला बार? "सोनिया" की काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धोंडोपंत Sat, 04/26/2008 - 08:07
क्या बात है तात्या!!! अप्रतिम कथन. गेले अनेक दिवस याची वाट पहात होतो. कारण तुला पकडल्यानंतर तू बोलतांना याचा उल्लेख केला होतास. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

भडकमकर मास्तर Sat, 04/26/2008 - 17:02
या लेखावरून आम्हीही स्फूर्ती घेऊन आमचा एक अनुभव लिहिणार आहोत....क्रमशः नाही...पूर्ण अनुभव एकत्र...

डॉ.प्रसाद दाढे Sat, 04/26/2008 - 17:19
रोशनीची आठवण उरात ताजी असता॑ना हा नवा वार करू नका..तुम्ही आम्हा गरीब वाचका॑ना अस॑ चक्क्यासारख॑ टा॑गू नका..एकतर इतक॑ छान लिहिता, आणि तेही क्रमशः?का अ॑त पाहता??

झकासराव Sat, 04/26/2008 - 18:34
४८ तासाचा वादा करुन तो पार न केल्याबद्दल तात्या शेट वर इन्डियन पीनल कोड ४२० नुसार खटला लावायचा का काय आता???????????????? :) आणि किती वाट बघु?? अवांतर : तात्या शेठ काल तुमच्या मामलेदाराची मिसळ (तिखट अशी ऑर्डर देवुन) खाल्ली. चांगली आहे. :) अजुनच अवांतर : नुकतेच मिसळपाव.कॉम चे उर्ध्वश्रेणीकरण ( अपग्रेडेशन )>>>> तो उर्ध्वश्रेणीकरन हा शब्द मनात म्हणताना देखील आमचाच उर्ध्व लागला की. डेंजर शब्द हाये.

विसोबा खेचर Sat, 04/26/2008 - 18:51
झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी मनापासून क्षमा मागतो. अचानक काही घरगुती/कार्यालयीन कामं आल्यामुळे दुसर्‍या भागास थोडा विलंब झाला आहे. दुसरा (अंतीम) भागही बराचसा लिहून तयार आहे. परंतु त्यामध्ये काही ठिकाणी अद्याप माझ्या मनासारखं लेखन झालेलं नाही, ते जरा ठाकठीक करून सोमवार दिनांक २८ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आत दुसरा भाग प्रसिद्ध करतो... येत्या आठवड्यातच रौशनीचं लेखनही पूर्ण करण्याचा मानस आहे... असो, झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी पुनश्च एकदा क्षमा मागतो. मिपाकर रसिक मला उदार अंत:करणाने क्षमा करतील अशी खात्री आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

असो, झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी पुनश्च एकदा क्षमा मागतो. मिपाकर रसिक मला उदार अंत:करणाने क्षमा करतील अशी खात्री आहे... कोयी बात नही, माफ किया ;) सोमवार दिनांक २८ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आत दुसरा भाग प्रसिद्ध करतो... या दिवशी कोणतेही घरगुती/कार्यालयीन काम निघू नये असे वाटते :) येत्या आठवड्यातच रौशनीचं लेखनही पूर्ण करण्याचा मानस आहे... आपल्या इच्छेला शुभेच्छा !!! आपला बिरुटेसेठ, (तात्याचा लेखनाचा जुना पंखा)

नीलकांत Wed, 04/23/2008 - 17:04
असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद... झकास उत्सुकता ताणल्या गेलीये. लवकर लिहा पुढे काय झालं ते. नीलकांत

In reply to by नीलकांत

विसुनाना Wed, 04/23/2008 - 18:47
असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद... झकास उत्सुकता ताणली गेलीय. लवकर लिहा पुढे काय झालं ते. मला तर ब्रेकमधली 'रॉयल चॅलेंज'ची (म्हंजे मल्ल्याबाबाच्या आयपीएल टीमची हो!) जाहिरातही दिसत आहे. ;)

धमाल मुलगा Wed, 04/23/2008 - 17:39
तात्याबा, तुम्हाला भिती नाही वाटली? च्यामारी, एखादा इमानदार पोलिस बघितला तरी आपली हवा टाईट होते बॉ! डेंजरच आहे प्रकरण... लवकर टाका बॉ पुढचा भाग! -(घाबरट) ध मा ल.

स्वाती राजेश Wed, 04/23/2008 - 17:44
तात्या मस्त लिहिले आहे पण अर्धवट का सोडले? वाचता वाचता विचारांची तारच तोडली.. आम्ही आपले तात्या आत पोलिसांच्या गाडीत बसलेत.. कसे असतील? याविचारात असतानाच पुढील भागात असे लिहिले. उत्सुकता लावून ठेवली... लवकर लिहा....

In reply to by स्वाती राजेश

प्राजु गुरुवार, 04/24/2008 - 12:58
स्वाती म्हणते ते अगदी खरं आहे.. आम्ही आपले तात्या आत पोलिसांच्या गाडीत बसलेत.. कसे असतील? याविचारात असतानाच पुढील भागात असे लिहिले. उत्सुकता लावून ठेवली... .. काय तात्या...?? पण हे असं खुशालचेंडू वागणं खरंच शोभतं तुम्हाला.. :)) आता पुढचा भाग मात्र लवकर लिहा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण Wed, 04/23/2008 - 17:47
आता मात्र त्या शिंदेसाहेबांमधला पोलिस जागा झाला आणि दुसर्‍याच क्षणी तो त्या पंजाब्याला स्वच्छ मराठीतून बोलता झाला,"ए आता गप बसतो, का कानाखाली दोनचार आवाज काढू? बड्या साहेबाशी बोलायच्या धमक्या कुणाला देतोस रे मादरचोद? भडव्या, एक तर दारू पिऊन गाडी चालवतोस आणि वर पुन्हा पैशाची मस्ती करतोस? कर, तुला ज्याला कुणाला फोन करायचाय तो कर. पण मी कुणाशीही बोलणार नाही!" याला म्हणतात मराठी दणका !!!!! कंसातला प्रश्न अर्थातच मनातल्या मनात होता! ;) :) (१०० मालिकेचा जबरदस्त पंखा) आणि पुढील ४८ तासांच्या प्रतिक्षेत..... मदनबाण

लिखाळ Wed, 04/23/2008 - 18:49
मस्त ! ४८ तासांची वाट पाहतो आहे. लवकर लिहा. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

शितल Wed, 04/23/2008 - 18:58
तात्या माझ्या माहिते प्रमाणे तुमचा तत्सम गुन्हा हा आय.पी.सी. कलम १८५ नसुन मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ अन्वये आहे. कारण आय.पी.सी. १८५ हा Illegal purchase or bid for property offered for sale by authority of public servant आहे, मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ हा Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. असा आहे. ४८ तास कधी स॑पत आहेत ह्या प्रतिक्षेत असलेली शितल.

In reply to by शितल

विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:59
तत्सम गुन्हा हा आय.पी.सी. कलम १८५ नसुन मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ अन्वये आहे. मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ हा Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. धत् तेरीकी! मला वाटलं हे आय पी सी मधलं कलम आहे. धन्यवाद शितल. या भागात आणि पुढल्या भागात तशी सुधारणा करेन.. आपला, (मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५ अंतर्गत सजा झालेला आरोपी) तात्या.

स्वाती दिनेश Wed, 04/23/2008 - 19:31
काय रे बाबा असे तुकड्यातुकड्यात देतोस? आता आले ना ४८ तास वाट पाहणे? हा भाग झकास जमला आहे हे वेसांन ल. स्वाती

विदेश Wed, 04/23/2008 - 20:53
मोजत बसलोय की तात्या! अजून किती तास-मिनिटे-सेकंद राहिले हो ४८ तास संपायला?

धनंजय गुरुवार, 04/24/2008 - 00:57
पण हे कलम भा.दं.सं.१८५ म्हणजे काय भानगड आहे बुवा? हे मला कळलेच नव्हते. वर शितल यांनी सांगितले म्हणून मोटार वाहातुक कायद्याबद्दल १८५ कळले... चौकीवर जाऊन रक्तचाचणी करण्यापेक्षा तिथल्या तिथे काही चाचण्या केल्या असत्या तर बरे झाले असते. म्हणजे सरळ रेषेवर पावलापुढे पाऊल ठेवून चालणे, डोळे बंद करून उभे राहाणे, वगैरे. शक्यतोवर जे पोलीस दारूच्या गुत्त्यासमोर पाळत ठेवून असतात, त्यांच्यापाशीच श्वासातल्या आल्कोहोलची चाचणी करण्याचे यंत्र असले तर बरे असते. असे केल्याने एकच पेग घेणार्‍या तात्यांचा खोळंबा झाला नसता. तसेच पोलीस अधिकार्‍याने त्यांना जातीने स्टेशनावरती नेले. तिथे आणखी चार फुल्टू लोक स्कूटर, गाड्या चालवत गेले असतील! चाचणी तिथल्या तिथे केली असती, तर या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचे कामही कार्यक्षम झाले असते. असो. लिहिताय म्हणजे सहीसलामत सुटलात. कसे सुटलात त्याबद्दल कुतूहल आहे.

विकास Wed, 04/23/2008 - 22:44
लेख चांगलाच उत्कंठावर्धक आहे आणि स्वतःसंदर्भात नसल्याने वाचायला मजा आली :-) बाकी मद्यपानानंतर स्कूटर चालवायची नाही इथपर्यंत ठिक आहे पण आपण (४८ तासाची वाट पहायला न लावता) लिहीणे चालू ठेवले असते तर बरे झाले असते! :-)

भाई Wed, 04/23/2008 - 23:06
खुमासदार आणि ओघवत्या वर्णनामुळे मुळातच चटपटीत असलेला विषय अधिक रंजक झालेला आहे. पोलिस आणि आमचे कसे जमायचे कारण आम्ही तर नांवापासूनच, भाई

पिवळा डांबिस गुरुवार, 04/24/2008 - 01:47
उत्तम वातावरण निर्मिती!! बरं शिंदेसाहेबांचा चेहेराच इतका करडाकठोर होता की जास्त वाद घालण्यात काही अर्थ नव्हता! साला कुठल्याही क्षणी फाडकन कानफटात बसायची! होय बाबा, आम्ही पाह्यलंय या लोकांना दुसर्‍यांना कानफटवतांना!! विशेषतः आयपीएस अधिकार्‍यांना!! काय त्यांना कानफटात कसं मारायचं याचंही ट्रेनिंग देतात का काय नकळे. पण काडकन आवाज काढतात!!!:))) तात्या अभ्यंकर, आरोपी - भारतीय दंड विधान, कलम १८५! व्वा! काय जबरदस्त टायटल आहे!! आत्तापर्यंतच्या वाचलेल्या तुझ्या सगळ्या टायटल्सपेक्षा जोरदार!!!!:)) पुढल्या भागाची वाट पहात आहे.... फोलिसांपासून दूर रहाणारा, पिवळा डांबिस

भोचक गुरुवार, 04/24/2008 - 14:50
मैफल रंगात यावी अन माईक बंद पडावा असं झालंय. ४८ तास संपण्याची वाट पहाणारा. (भोचक)

प्रमोद देव गुरुवार, 04/24/2008 - 15:19
मी आपला तंद्रीतच गुणगुणायला लागलो. "लट उलझी,सुलझा जा बालम!" तुम्हाला सांगतो चीज काय नजाकतदार आहे. प्रेयसी अशी आपल्या प्रियकराला..... जाऊ द्या. मुद्याचे सांगतो. नाहीतर तुम्ही म्हणाल... तो इनस्पेक्टर माझ्याकडे संशयाने पाहतोय असे वाटायला लागले... अहो खरंच होते ते. खस्सकन खेचून त्याने मला कोपच्यात घेतले. मी टरकलो. म्हटलं आज काही आपले खरे नाही. मनातल्या मनात अण्णांचा धावा केला.... आणि चमत्कार झाला. "आत्ता तुम्ही गात होता ती चीज बिहागमधली काय हो!" इन्स्पेक्टरच्या ह्या अनाहूत प्रश्नाने मी तर गारच पडलो. इन्स्पेक्टरला हे 'अंग' असेल असे कधीच वाटले नाही. मी होकार देताच त्याने मला हळूच इतरांपासून अगदी दूर नेले आणि ही चीज मला नीट म्हणायला सांगितली. मग काय महाराजा! आपण समजलो. पंछी पिंजडेमे फस गयेला है! असा काय जोरदार गायलोय की इन्स्पेक्टर साहेब खूश झाला आणि मला चक्क माझ्याच स्कुटरवरून त्या हवालदारामार्फत घरी पोचवले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 11:48
मी टरकलो. म्हटलं आज काही आपले खरे नाही. मनातल्या मनात अण्णांचा धावा केला.... आणि चमत्कार झाला. असा काय जोरदार गायलोय की इन्स्पेक्टर साहेब खूश झाला आणि मला चक्क माझ्याच स्कुटरवरून त्या हवालदारामार्फत घरी पोचवले. हा हा! सह्ही लिहिलं आहे प्रमोदशेठ... तात्या.

चित्रा Fri, 04/25/2008 - 01:33
लेखाचे शीर्षक बघून मला आधी वाटले तात्या काहीतरी "माहितीपूर्ण" लिहीतायत की काय?! ४८ तास कधी संपणार, म्हणे?

केशवसुमार Fri, 04/25/2008 - 01:52
चित्रगुप्त दादरला बसलो होतो तेव्हा ऐकवला होता..उत्तम शंब्दांकन.. आणि तो पुढचा भाग लवकर टाक..पुढे काय झाले ते मला माहिती आहे पण लोकांना असे टांगत ठेऊ नकोस.. केशवसुमार (स्वगत:-'बरी अद्दल घडली !'असे किती जण मनातल्या मनात म्हणाले असतील बरं?)

मनस्वी Fri, 04/25/2008 - 11:42
अरे ओ सांबा.. अठ्ठेचाळीस तास खतम होनेको कितने तास है रे.. बस्स ५ तास सरकार.. कहाणी एका रात्रीची.. आणि ब्रेक ४८ तासांचा.. बहुत नाईन्साफी है..

भडकमकर मास्तर Fri, 04/25/2008 - 14:07
आहाहा..तात्या... हा लेख म्हणजे खणखणीत सिक्सर आहे.... लै मजा आली राव..... ..............हा प्रसंग कधीही कोणाच्याही आयुष्यात घडू शकतो...इतका रिअलिस्टिक लेख !!!! एक विनंती : प्लीज पुढचा लेख क्रमशः नको... वेळ घ्या पण काय ते एकदम संपवा...

अभिज्ञ Fri, 04/25/2008 - 19:33
तात्या, आपल्या वाद्याप्रमाणे ४८ तास उंलटून गेलेले आहेत तरिहि आपला पुढचा भाग अजुन आलेला नाहि. अजुन किति वेळ वाट पाहायचि??????? आपल्या केसचि आतुरतेने वाट पाहणारा.. (हायकोर्ट जज्ज) अबब. »

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग Fri, 04/25/2008 - 22:17
अहो काय हा ऍटमबाँब??!! एकदम हसू सुध्दा नीट बाहेर येईना;०० मी ऑफिसातल्या खुर्चीतून घसरलोच, तरी बरं लॅबमधे असल्यामुळे आजूबाजूला कोणी नाहीये नाही तर काही खरं नव्हतं!;))) चतुरंग

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Fri, 04/25/2008 - 22:27
हे वाचुन जज्ज साहेबांना मात्र नक्कीच उरात धडकी बसेल..... :))))) (कोर्टची पायरी कधीही न चढलेला) मदनबाण

In reply to by प्रभाकर पेठकर

अभिज्ञ Sat, 04/26/2008 - 00:24
चुकलेच कि, पेठकर काका लै भारी......) कथेचा भाग असेच वाचावे....) तात्या,पुढचा भाग (लेखाचा हो) लगिच येउ द्यात. हि विनंती अबब अवांतर-आमचे उपनाम "वाघ" असल्याने ,आम्हि शिकार "भाग" करुन खात नाहि बरे...)

वरदा Fri, 04/25/2008 - 23:36
मला तर जवळ तिकीट असलं तरी समोरुन टी सी आला की उगाच भिती वाट्टे..कधी बिनातिकीट गेले नाही तरी मला टी सी ने पकडल्याची स्वप्न पडायची लोकांना पकडलेलं पाहून्..... हे तर एकदम भारीच्...

सुनील Sat, 04/26/2008 - 05:49
तुमची तात्याकहाणी वाचून ३-४ महिन्यांपूर्वी (गेल्या डिसेंबरात) घडलेला प्रसंग आठवला. आमच्या कंपनीची ख्रिसमस पार्टी होती. परंतु काही कामामुळे मला फार काळ थांबता येणार नव्ह्ते. तेव्हा मी फक्त एक बाटली बियर घेतली (अमेरीकेतील बियरची बाटली भारतात मिळणार्‍या बाटलीच्या निम्मी असते) आणि थोडेसे खाऊन निघालो. तरीही रिस्क नको म्हणून फ्रीवेने न जाता शहरातील रस्त्याने जाण्याचा विचार केला (आणि फसलो!). तसा बियरच्या अर्ध्या बाटलीने कोलमडणारा मी नव्हेच! त्यामुळे निदान माझ्यामते तरी मी व्यवस्थित गाडी हाकीत होतो. एक सिग्नल पार करून मी पुढे निघालो आणि तेव्हढ्यात गाडीच्या आरशात निळे दिवे चमकताना दिसले. ट्रॅफिक पोलीसाला भिडण्याचा हा चौथा प्रसंग असल्यामुळे अगदी सराईताप्रमाणे गाडी रस्याच्या कडेला नेऊन थांबवली. लायसन्स व इतर कागदपत्रे असल्याची खातरजमा करून स्वस्थ बसून राहिलो. मिनिटाभरात तो आलाच. बहुदा त्यानेही माझ्याक्डे शत्र वगैरे काही नसल्याची खात्री केली असावी. "कुठून आलात?" मी साळसूदपणे रस्त्याचे आणि छेदरस्त्याचे नाव सांगितले. "हो, पण तेथे होते काय? रेस्टॉरन्ट वगैरे?" "हो. रेस्टॉरन्ट." "अच्छा. मग काही ड्रिन्क्स वगैरे?" "होय साहेब." "किती घेतलीत?" "फार नाही. फक्त एक बियर!" "ह्म्म. जरा इकडे पहा.", असे म्हणून त्याने एक प्रकाशझोत माझ्या डोळ्यावर टाकला. स्वतःचे एक बोट माझ्या डोळ्यापुढे ठेवून तो म्हणाला, " मी हे बोट फिरवीन त्याप्रमाणे तुम्ही डोळे फिरवायचे, समजले?" मी मान डोलावली. तो त्याचे बोट उजवीकडून डावीकडे फिरवत गेला तसा मीही मान फिरवून त्याच्या बोटाकडे पाहत राहिलो. "अहं. मान नाही फिरवायची. मान सरळ. फक्त डोळे फिरवायचे." आता मान न वळवता नुसते डोळे फिरवून आसपासचा अंदाज घ्यायची जनानी पद्धत मला कुठे जमायला? काही "बघणेबल" दिसले की अगदी ९० (क्वचित १८० देखिल) अंशात मान फिरवून बघायची आमची सवय! असो. कसेबसे जमवले. तोही डोळ्यात प्रकाशझोत टाकून काहितरी बघत होता. "नक्की एकच बियर?" "होय साहेब, एकच." "जरा तुमचे लायसन्स बघू." मी लायसन्स काढून दिले. ते घेऊन तो आपल्या गाडीकडे गेला. आता मला थोडा धीर आला. कारण जरी त्यापूर्वी तीन वेळा मला ट्रॅफिक पोलीसाने अडवले असले तरी प्रत्येक वेळेस वॉर्निंग देऊन सोडले होते त्यामुळे माझ्या नावावर नोंद अशी नव्हती. तो परत आला. "कुठपर्यंत जाणार? " मी घरचा पत्ता सांगितला. तिथून एक्-दीड मैलाचाच तर पल्ला होता. "नक्की ना? की अजून कुठे बसणार?" "नाही साहेब. अगदी थेट घरी." "नीट जा." लायसन्स हातात देऊन तो म्हणाला. मी गाडी चालू केली. घरी आलो. फ्रीजमधून करोनाची बाटली काढली. त्यात एक लिंबाची फोड घालून सोफ्यावर अंग टाकले आणि एक एक घोट घेत डोके शांत करू लागलो! आता मी तुम्हाला काय सल्ला देणार म्हणा. पण भारतात एक नियम मी पाळ्तो तो म्हणजे वाहन कधीही बारच्या समोर उभे करीत नाही. थोडे दूर एखाद्या आतल्या गल्लीत ठेवतो. तुमच्या तात्याकहाणीचा दुसरा भाग वाचण्याची उत्सुकता आहे. लवकर टाका. जाता जाता - हायवे चेकनाक्यावरच्या एकाही बारमध्ये जाण्याचा योग अद्याप आला नाही. पण तुम्ही म्हणता तो कुठला बार? "सोनिया" की काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धोंडोपंत Sat, 04/26/2008 - 08:07
क्या बात है तात्या!!! अप्रतिम कथन. गेले अनेक दिवस याची वाट पहात होतो. कारण तुला पकडल्यानंतर तू बोलतांना याचा उल्लेख केला होतास. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

भडकमकर मास्तर Sat, 04/26/2008 - 17:02
या लेखावरून आम्हीही स्फूर्ती घेऊन आमचा एक अनुभव लिहिणार आहोत....क्रमशः नाही...पूर्ण अनुभव एकत्र...

डॉ.प्रसाद दाढे Sat, 04/26/2008 - 17:19
रोशनीची आठवण उरात ताजी असता॑ना हा नवा वार करू नका..तुम्ही आम्हा गरीब वाचका॑ना अस॑ चक्क्यासारख॑ टा॑गू नका..एकतर इतक॑ छान लिहिता, आणि तेही क्रमशः?का अ॑त पाहता??

झकासराव Sat, 04/26/2008 - 18:34
४८ तासाचा वादा करुन तो पार न केल्याबद्दल तात्या शेट वर इन्डियन पीनल कोड ४२० नुसार खटला लावायचा का काय आता???????????????? :) आणि किती वाट बघु?? अवांतर : तात्या शेठ काल तुमच्या मामलेदाराची मिसळ (तिखट अशी ऑर्डर देवुन) खाल्ली. चांगली आहे. :) अजुनच अवांतर : नुकतेच मिसळपाव.कॉम चे उर्ध्वश्रेणीकरण ( अपग्रेडेशन )>>>> तो उर्ध्वश्रेणीकरन हा शब्द मनात म्हणताना देखील आमचाच उर्ध्व लागला की. डेंजर शब्द हाये.

विसोबा खेचर Sat, 04/26/2008 - 18:51
झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी मनापासून क्षमा मागतो. अचानक काही घरगुती/कार्यालयीन कामं आल्यामुळे दुसर्‍या भागास थोडा विलंब झाला आहे. दुसरा (अंतीम) भागही बराचसा लिहून तयार आहे. परंतु त्यामध्ये काही ठिकाणी अद्याप माझ्या मनासारखं लेखन झालेलं नाही, ते जरा ठाकठीक करून सोमवार दिनांक २८ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आत दुसरा भाग प्रसिद्ध करतो... येत्या आठवड्यातच रौशनीचं लेखनही पूर्ण करण्याचा मानस आहे... असो, झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी पुनश्च एकदा क्षमा मागतो. मिपाकर रसिक मला उदार अंत:करणाने क्षमा करतील अशी खात्री आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

असो, झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी पुनश्च एकदा क्षमा मागतो. मिपाकर रसिक मला उदार अंत:करणाने क्षमा करतील अशी खात्री आहे... कोयी बात नही, माफ किया ;) सोमवार दिनांक २८ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आत दुसरा भाग प्रसिद्ध करतो... या दिवशी कोणतेही घरगुती/कार्यालयीन काम निघू नये असे वाटते :) येत्या आठवड्यातच रौशनीचं लेखनही पूर्ण करण्याचा मानस आहे... आपल्या इच्छेला शुभेच्छा !!! आपला बिरुटेसेठ, (तात्याचा लेखनाचा जुना पंखा)
लेखनप्रकार
3

औरंगझेब - एक (बर)बादशहा !

उदय सप्रे ·

ध्रुव Wed, 04/23/2008 - 15:51
अत्यंत सुरेख माहितीपुर्ण लेख. असेच लेख लिहीत राहा. - ध्रुव

भडकमकर मास्तर Wed, 04/23/2008 - 17:00
लेख खूप छान आहे.... तुमच्या अभ्यासाला सलाम.... मला वाटते, त्या काळात भावाभावांनी सत्ता काबीज करायसाठी लढायची पद्धत असावी... म्हणजे औरन्गजेबाने इतरांना मारले नसते तर त्याला कोणीतरी दुसर्‍या भावाने मारले असते आणि त्याचे प्रेत दिल्लीभर फिरले असते...असो... (हा आपला आमचा अन्दाज....त्याचे भाऊ कितपत प्रेमळ वगैरे होते ते ठाऊक नाही मला...) मूळ लेखाची लिन्क शोधून काढली...ही घ्या लिन्क.... http://www.loksatta.com/daily/20070107/mp07.htm .... हाही लेख माहितीपूर्ण वाटला....या लेखात मला तरी आक्षेपार्ह काही दिसले नाही...किंवा औरन्गजेबाचे वृथा कौतुक आहे असेही वाटले नाही.... ..

धमाल मुलगा Wed, 04/23/2008 - 17:28
छान ! आनंद वाटला... 'दै. लोकसत्ता' चे अभिनंदन. श्री.भूषण देशमुखांना शतशः आभार! हे..हे असले 'भूषण' देशमुखीला आहेत म्हणूनच आमच्या माना खाली जातात. मात्र देशमुख तसे इमानदार हं सप्रेसाहेब, खाल्या मिठाला जागणारे! सगळ्या पिढ्या औरंग्याची थुंकी झेलून देशमुखी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात कार्यरत राहिल्या असतील तर होणारे संस्कार ही असेच उच्चकोटीचे असतात..ही गोष्ट तुमच्यासारख्या ईतिहासाच्या अभ्यासकाला कळू नये? त्यातून स्वराज्याच्या छाताडावर नाचण्यासाठी मराठी साम्राज्याविरुध्द भडवेगिरी करायची मराठी माणसाची खोड काही नविन नाही हो!
१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या ! त्यांची ४०९ वी जयंती असा लेख काही लोकसत्ता मधे वाचायला जास्त आवडले असते !
कोण ही बाई? कोणाबद्दल बोलताय? अच्छा अच्छा..उस बेमुर्व्वत दख्खन के चुहे की माँ ! बरं मग? त्यांचा काय संबंध? त्या कुठे शाही घराण्यात जन्माला आल्या? त्या कुठे 'पातशाही'च्या म्हणजेच 'अल्लाहच्या मानवी रुपाच्या' मातोश्री होत? वेडे आहात...आपण मरहट्ट्यांनी फक्त दिल्लीच्या दिशेला तोंड करुन गुढघे टेकून सज़दे करायचे असतात... दर काही वर्षांनी आपल्या आई भवानीनं छिन्नी-हातोड्यांचे घाव सोसायचे असतात, जेजुरीच्या खंडेरायानं तोंड लपवून कडेपठारावर पळून जायचं असतं आणि आपल्यासारख्यांनी एकतर 'हे सगळं घडतंय, पण माझी तुंबडी भरतेय' म्हणून जल्लोष करायचा असतो किंवा हिजड्यासारखं हातात कांकणं भरून जोरजोरात छाती बडवत फिरायचं असतं ! मान मिळवायचा तर त्याला पातशाहीचे पाईक असणं मोठ्या गरजेचं असतं. उगाच स्वराज्य, मराठी अस्मिता वगैरे दळभद्री कल्पना डोक्यात ठेऊन भिकेचे डोहाळेच फक्त लागू शकतात. आजही महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्यावर कडक ऊन्हाच्या तिरिपी येत असतात, पण म्हराठी स्वराज्यावर पाशवी बलात्कार करणारा हरामजादा अफजल्या मात्र प्रतापगडावरच्या प्रशस्त आलिशान मशीदीतल्या कबरीत उदा-धूपाच्या दरवळात राजेशाही थाटात लोळत असतो....तिथे ह्या बातमीची ती काय मातब्बरी? थू:! त्या मुघली अंमलात अजुनही तरंगणार्‍या हिणकसांच्या जिन्दगानीवर ! आज...गेल्या सत्तावीस वर्षांत आज पहिल्यांदा मला स्वतःच्या देशमुख असण्याची लाज वाटतीये. -(हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणार्‍या, घरादारावर तुळशीपत्र ठेऊन औरंगजेबादि दुश्मनांशी लढणार्‍या खर्‍याखुर्‍या देशमुखांचा वारस) ध मा ल.

अजय Wed, 04/23/2008 - 19:25
औरंगजेबावर लिहिलेले छानच आहे. ज्या त्वेषाने लिहिले आहे. त्यातून तुम्हाला वाटणारी कळकळ दिसते. मुळ मुद्दा आहे, तो बातमीचा. औरंगजेबाच्या मृत्यूला 300 वर्षे पूर्ण होतात, यात बातमी आहे. म्हणून बातमी (लेख स्वरूपात) आहे. केवळ अशी बातमी लिहीली, त्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नसूनही बातमी लिहिणारा व्यक्ती नालायक आणि छापणारा पेपरही? यामागचं आपलं तर्कशास्त्र कळत नाही. भडकमकरांनी त्या बातमीची लिंक दिली त्याबद्दल धन्यवाद. नेमके काय आहे. ते कळले तरी. आता ज्याला तुम्ही तीन आठवड्यांचे संशोधन म्हणतात, त्याला काय आधार आहे ते तुमच्या अपार देशभक्तीने भारलेल्या लेखात कुठेही दिसत नाही. निदान संदर्भाचा उल्लेख करावा. ऐतिहासिक कादंबऱ्यांचा नको. त्यातून माझ्या मनातल्या काही शंकाचे निरसन होईल. 1) औरंगाजेब क्रुर होताच. यात शंका नाही. तो हुशारही तितकाच होता. त्याला आपले राज्य कसे चालवावे आणि कशा पद्धतीने हे नक्कीच कळत होते. जरा या संशोधनातून हेही स्पष्ट करा, की ज्या सख्या भावाला आईवडिलांचे, सैनिकांचे संरक्षण आहे, त्याला ठार करून त्याच्या मृतदेहाची विटंबना करायला न चुकणारा औरंगजेब, हात आलेल्या शिवाजींना बराच काळ जिवंत ठेवतो कसा? कैदेतील काळात त्याला हे करणे सहज शक्‍य होते. शिवाजी महाराजांना दिल्लीत नेताना मिर्झाराजे जयसिंग आणि त्यांचा मुलगा रामसिंग यांनी शब्द दिला होता. त्यांचा शब्द वाया गेला असता तर राजपूत दिल्ली सल्तनतीच्या विरोधात गेले असते. राजकारणातील डोकेदुखी वाढली असती, राजपुतान्यात आणि महाराष्ट्रात मोठा लोकक्षोभ उसळला असता म्हणून त्याने असे केले नाही, हे गृहीत धरले. तरीही औरंगजेबाचा स्वभाव पाहता त्याने एवढा वेळकाढू पणा का केला. (तेव्हा तो तसे करू शकला नाही, म्हणूनच तर आज आपण हे दिवस पाहतो आहोत, हे खरेच!) 2) तो फक्त इस्लामचा पाईक होता, दख्खनेतील मराठे त्याचे तीव्र शत्रू होते. हे मान्य केले तर तो आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाहीच्या मागे का लागला होता? (फक्त इस्लामप्रेमासाठीच की राज्यविस्तारासाठी?) 3) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने राजा म्हणून आपल्या कट्टर शत्रूला मान्यता का दिली? या तीनही प्रश्‍नांची वस्तुनिष्ठ उत्तरे मिळतील. पुन्हा आपण बातमी का दिली किंवा लेख का छापला त्याकडे वळू या. भूषण देशमुखांनी जो काही मजकूर लिहिला, त्यात ""जगातील एका मोठ्या साम्राज्याचा प्रमुख असलेल्या बादशाहची नगरच्या भूमीत अशी अखेर झाली'' (संदर्भ- लोकसत्ता लिंक. शेवटची ओळ) हे वगळता औरंगाजेबाचे उदात्तीकरण होईल, असे काहीही लिहीलेले नाही. तरीही तुम्ही जोरदार संशोधन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र तुमच्या संशोधनपर मजकूरात - "अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !" ही वाक्‍ये आहेत. तो निष्कर्ष अभ्यासपूर्ण संशोधनाअंतीच आहे? उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे. माझी ही प्रतिक्रीया तुम्हाला डिवचण्यासाठी नक्कीच नाही, हे तुम्ही समजून घ्याल. कारण, एवढे मोठे साम्राज्य, विश्‍वासघाताची घरण्यात रुजलेली परंपरा त्याच पद्धतीने मोडीत काढून, समर्थपणे सांभाळणारा. दिल्लीचा कारभार दक्षिणेत येऊनही तेवढ्याच तडफेने प्रशासन व युद्धमोहीम सांभाळणारा औरंगजेब (शिवरायांच्या विरोधात असला तरीही) काही अंशी तरी महान असेलच ना. त्यातूनच तुम्ही "ती' वाक्‍ये लिहिली असावीत.

In reply to by अजय

उदय सप्रे Wed, 04/23/2008 - 21:40
अजय साहेब, लेख पुन्हा एकदा वाचा ! औरंगझेबावर लिहिले म्हणून लिहिणारा नालायक किंवा पेपरही असे मी कुठेही म्हटलेले नाही.हे तुमचे विधान आहे. माझे म्हणनी इतकेच की फक्त अल्पसंख्यांकांचेच लेख का छापता? जानेवारीतच शहाजी महाराजा>चा अंत झाला, त्याविषयी काही लिहिलेत का?जिजाऊ मॉसाहेबांच्या जन्माबध्दल काही लिहिलेत का? आता तुमच्या दुसर्‍या मुद्द्याकडे वळूया : संदर्भ : हे काही ऐतिहासिक पुस्तक किंवा कादंबरी नव्हे की जिथे सगळे संदर्भ देणे शक्य होईल.तरी तुम्हाला सांगतो : काका विधाते यांचे दर्यादिल पासून ते पवार यांचे "संभाजी-एक विवाद्य व्यक्तिमत्व पर्यंत सगळी ऐतिहासिक पुस्तकी यात येतात्.किती नावे लिहू? तुमच्या ३ प्रश्नांची उत्तरे: १.औरंगजेबाचा स्वभाव पाहता त्याने एवढा वेळकाढू पणा का केला. (तेव्हा तो तसे करू शकला नाही, म्हणूनच तर आज आपण हे दिवस पाहतो आहोत, हे खरेच!) : औरंगझेब उतावळा नव्हता , महाराजांना पण एका कोठीत दुसर्‍या दिवशी नेऊन ठार करायचाच त्याचा बेत होता, पण महाराज त्याच्यापेक्षा हुशार निघाले आणि म्हणून आपण आज हे दिवस पहातो आहे ! औरंगझेबच्या वेळकाढू धोरणाने नव्हे ! रा़जपुतांच्या उठावाला घाबरून नव्हे तर महाराष्ट्रात असलेल्या जयसिंग आणि मुघल सैन्याचे डावपेच , विजापूर जिंकण्याचे केलेले डावपेच फुकट जातील म्हणून तो दमाने घेत होता.तसेच जयसिंगाने महाराजांना काय काय वचने दिली आहेत याची खातरजमा करत होता ! 2) तो फक्त इस्लामचा पाईक होता, दख्खनेतील मराठे त्याचे तीव्र शत्रू होते. हे मान्य केले तर तो आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाहीच्या मागे का लागला होता? (फक्त इस्लामप्रेमासाठीच की राज्यविस्तारासाठी?) अर्थातच राज्यविस्तार प्रथम पण त्यातही अखिल हिंदुस्थानात इस्लाम बघण्याचे स्वप्न बघणारा तो एक वेडा पीर होता हे जगजाहीर आहे ! 3) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने राजा म्हणून आपल्या कट्टर शत्रूला मान्यता का दिली? तुम्ही इतिहासात हे कुठे वाचलेत ते मला माहित नाही की त्याने मान्यता दिली.उलट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने आकांड्तांडव केले होते हा इतिहास आहे ! राजा म्हणुन त्याने फक्त एकदाच महाराजांना वस्त्र पाठविली पण ती ही राजकारणी बनूनच ! तो काही कुणी संत नव्हता ! औरंगझेब महान नक्कीच नव्हता ! एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ! नाहीतर एव्हढे ऐश्वर्य असूनही, त्याच्या पदरी शूर लोक असूनही त्याला व्यवस्थित राज्य शकट हाकता आला नाही हे सत्य आहे ! उत्तरेमधे मुघलांचे मिंधे असलेले राजपुत यांना संभाजी महाराजांनी खूप जागविण्याचा प्रयत्न करेस्तोवर कुणीही विरोधक त्याला नव्हता , यातही त्याचे ५० वर्षे राज्य टिकण्याचे गुपीत आहे ! दक्षिणेत नंतर आदिलशाही आणि कुतुबशाही विलासात मग्न होती. जी शांतता अकबराने त्याच्या काळात आणली, ती या मूर्खाला आणता आली नाही हे सत्य आहे ! अन्यथा अकबराच्या दसपट त्याला यश निश्चित मिळाले असतेच आणि तो जर राज्यावर न येता दारा शोकोह आला असता , तर महाराजांनी मुघलांची खोड कधीच काढली नसती ! "राज्य" वाढविणे ते पण दिखाव्यासाठी हा महाराजांचा कधीच हेतू नव्हता.आंधळ्या धर्मप्रेमाने या औरंगझेबाने जर का सामान्य रयतेला गांजले नसते (यात लेखात लिहिल्याप्रमाणे हिंदुस्थानातील मुसलमान पण आले !) तर महाराज त्याच्या वाटे कधीही गेले नसते.महराश्ट्राबाहेर फार तर दक्षिणेत कर्नाटकात आणि भागानगरात (आजचे आंध्र) त्यांने विस्तार केला असता ! उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे.हे मलाही माहित नाही , पण या अशा उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे.त्यांनी माझ्या लेखाला चंगले म्हटले आहे म्हणून असे लिहिण्यएव्हढा मी लहान नाही हे तुमच्याही लक्षात आले असेलच. तुमची ही प्रतिक्रीया मला डिवचण्यासाठी नक्कीच नाही , पण बुध्दीजीवी म्हणवणार्‍या तुमच्या सारख्या काही लोकांमुळेच तर मणीशंकर अय्यर सारखे मंत्री सावरकरांची प्रतिमा डागाळतात.तुम्ही लोकसत्ता चा वृथा उदो उदो करताय ! मी ही त्यांना वाईट म्हटलेले नाही , फक्त आपल्या माणसांचे का कौतुक त्यांना नसावे हामाझा प्रामाणइक प्रश्न आहे. मी लेखात लिहिलेच आहे योग्य माणसांचे कौतुक करावे , औरंगझेबासारख्या नालायक माणसाचे आपण कौतुक करतो आणि म्हणूनच तर दिल्लीत त्याच्या नावे रस्ते आहेत ना? असो, मी ही कुठल्याही आकसाने लिहिले नाहिये हे तुम्हालाहे कळले आहे यात सर्व आले, पण आपलं तर्कशास्त्र कळत नाही. भडकमकरांनी त्या बातमीची लिंक दिली त्याबद्दल धन्यवाद. नेमके काय आहे. ते कळले तरी. आता ज्याला तुम्ही तीन आठवड्यांचे संशोधन म्हणतात, त्याला काय आधार आहे ते तुमच्या अपार देशभक्तीने भारलेल्या लेखात कुठेही दिसत नाही. ही तुमची वा़क्ये इतकी उपहासात्मक वाट्तात , आणि हे काम बुध्दीजीवी लोक फारच छान करतात , आपण काही लिहायचे व करायचे नाही आणि इतर कुणी लिहिले की त्याला उपहासात्मक बोलून बेजार करायचे.लेख पुन्हा एकदा शांत चित्ताने वाचा अशी विनंती आहे माझी तुम्हाला ! जमल्यास माझ्या पुढील २ ब्लॉग्ज ला भेट देवून बघा , त्यात बर्‍याच कविता आणि लेख आहेत. उदय सप्रे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ आणि कवितांजली :

In reply to by उदय सप्रे

मदनबाण गुरुवार, 04/24/2008 - 13:42
माझे म्हणनी इतकेच की फक्त अल्पसंख्यांकांचेच लेख का छापता? एकदम बरोबर ..... (अवांतर :--पण खरच हे लोक अल्पसंख्यांक आहेत का ?) औरंगझेब महान नक्कीच नव्हता ! एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ! एकदम मान्य..... उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे. व्वा,,,,, मनातल बोललात बघा. पण बुध्दीजीवी म्हणवणार्‍या तुमच्या सारख्या काही लोकांमुळेच तर मणीशंकर अय्यर सारखे मंत्री सावरकरांची प्रतिमा डागाळतात. या अय्यर च्या xxxxx,,,,, मायला हे हे असे आमचे नेते?????,,,,,कुठे जातात अशा वेळी हिंदूत्ववादी लोक????? ह्या अशा राजकारणी लोकांपेक्शा हिजडे बरे हो !!!!! ते निदान फक्त ठरलेल्या दिवशीच पैसे गोळा करतात !!!!! कोलू पिसुन दाखवा एक दिवस तरी..... मग कळेल अंदमान म्हणजे काय!!!!! (कट्टर संभाजी व सावरकर प्रेमी )

डॉ.प्रसाद दाढे Wed, 04/23/2008 - 19:39
दिल्लीत तर और॑गझेबाच्या नावाने एक रस्तासुद्धा आहे..आणि महाराष्ट्रातही त्याच्या नावाने शहर आहेच ज्याला 'स॑भाजीनगर' कोणीही म्हणायला तयार नाही (कारण ते शिवसेनेने दिले आहे..) सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.. अरसिकेषू कवित्व निवेदन॑ शिरसि मा लिख मा लिख मा लिख.. उदय सप्रे या॑नी अतिशय परिश्रमपूर्वक लेख लिहिला आहे..त्या॑च्या मेहेनतीला आमचा मुजरा.. अवा॑तर: उत्सूक वाचका॑नी रवि गोडबोलेकृत 'और॑गझेबः शक्यता व शोका॑तिका' (रा.ज.देशमुख प्रकाशन) हे उत्कृष्ट पुस्तक वाचावे. गोडबोले या॑नी ते पुस्तक (प्रयत्नपूर्वक) तटस्थ दृष्टिकोनातून व कुठल्याही अभिनिवेशाशिवाय लिहिले आहे (त्यामुळे हि॑दूत्ववाद्या॑च्या विरोधका॑नीही ते वाचायला हरकत नाही

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

एक Wed, 04/23/2008 - 23:25
"..सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.. अरसिकेषू कवित्व निवेदन॑ शिरसि मा लिख मा लिख मा लिख.." अत्यंत खरं आहे..असा लेख पुन्हा कधीही कुठल्याही मराठी संस्थळांवर लिहू नका ही नम्र विनंती आहे.. इथले बरेचसे स्वघोषित इतिहास संशोधक, बुद्धीजीवी, कातडी सोलायला येतील. ही लोकं भावना बघणार नाहीत पण निट्-पिकर सारखे तुमचेच दोष दाखवायला सुरूवात करतील. उदय तुमचा लेख आवडला.धमाल मुलाचा प्रतिसाद पण आवडला.

परीचा परा Wed, 04/23/2008 - 21:03
डॉक्टरसाहेब एकदम सोळा आणे खरे बोललात. "सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.." अहो कसल्या त्या औरंग्यावर लेख लिहिता? मराठी मातीचे हे दुर्दैवच आहे की आपल्या निष्ठा ह्या मराठी मातीपेक्षा दुसर्‍यांच्याच चरणी जास्त वाहिल्या जातात एकीकडे प्राण गेला तरी तत्त्वासाठी कोणतीही तडजोड न करणारी छत्रपती संभाजीराजांसारखे छावे ह्याच भूमीत जन्माला येतात. आणि त्याच मातीत खंडोजी खोपडे सारखे गद्दारही पैदा होतात.आर्थात शिवाजी महाराजांनी मात्र खंडोजी खोपड्याचा १ हात आणि १ पाय कलम करुन त्याला अद्दल घडवली. पण आज महाराजांचा वारसा कोण चालवणार? इथे आपलाच मराठी बांधव एकमेकांचे पाय ओढतोय आणि आपल्याच मायभूमीत परप्रांतीय लोक दमबाजी करुन करोडपती होत आहेत आज एक तरी मराठी माणूस मोठा बिल्डर आहे काय? सगळे सिंधी, मारवाडी आणि उत्तरेतलेच लोक आहेत ना? त्या 'राज' ने त्या उत्तरभारतीयांना चोप देऊन लई भारी काम केले. परत मराठी माणसाच्या वाटेला जायची हिम्मत कोणी करणार नाही शिपुर्डे... 'उदय सप्रे' लगे रहो.. तुमच्याबरोबर मोठी मावळ्यांची फौज आहे .... चिंता नको.... महाराजांनी निर्माण केलेल्या मराठी साम्राज्याची चाके एवढी तकलादू नाहियेत.आजदेखील महाराजांनी पेटवलेले मराठी स्फुल्लिंग असंख्य मराठी मनांमधून धगधगत आहे. आणि अजय साहेब.... माफ करा पण म.टा.चा जो लेख मी वाचला त्याच्या लेखक महाशयांनीदेखील त्यांच्या लेखात कसलेही पुरावे दिलेले नाहीयेत एक कुराणाची प्रत आजही उपलब्ध आहे त्याव्यतिरिक्त. तेव्हा उदय सप्रेंसारख्या कडव्या शिवभक्ताला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तर ती छत्रपतींच्या पायाची एक छोटीसी सेवा होईल असे आम्हास वाटते. बाकी महाराजांच्या अनेक पत्रांत महाराजांनी लिहिले आहे की सुज्ञांस अजून काय सांगणे.... तेव्हा आम्ही थांबावे हे बरे जय भवानी जय शिवाजी..... {परीच्या प्रतिक्षेत} परा ....

शितल गुरुवार, 04/24/2008 - 01:22
तुमच्या अभ्यास पुर्वक लेख वाचुन मन एकदम सुन्न झाले. तुम्ही असेच लिहा आम्हाला वाचायला आवडेल.

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/24/2008 - 01:42
लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही ! सनातन प्रभात हे इतरांप्रमाणेच ( सामना / लोकसत्ता )वृत्तपत्र आहे का ? ...

पान्डू हवालदार गुरुवार, 04/24/2008 - 02:01
उदय साहेब लेख अवड्ला पण पटला नाही. मुळ लोकसत्ता लेखात फक्त ईतिहास सन्गितला आहे , औरंगझेबा ची तरिफ केलेलि नाही.

In reply to by पान्डू हवालदार

उदय सप्रे गुरुवार, 04/24/2008 - 08:54
पान्डू हवालदार साहेब, मुळात "अशा या नराधमाची बातमी पहिल्या पानावर येते आणि आपल्या जिजाऊंच्या जन्मतारखेवर किंवा शहाजी महाराजांच्या त्याच (जानेवारी) महिन्यातील निर्वाणावरून त्यांना मानाचा मुजरा देणारा लेख हेच वॄत्तपत्र पहिल्या पानावर देऊ शकत नाही " यापेक्षा वेगळी तारीफ आणि कोणती असेल? देशाच्या सीमेवर आपले प्राण खर्ची घालून आपल्यासारख्या तमाम सिव्हिलियन्सना शांतपणे झोपता यावं यासाठी झटणार्‍या सैनिकांऐवजी पहिल्या पानावर सलमान खान आणि संजय दत्त यांच्यावरील कारवाया या बातम्या येतात , त्यात त्यांचं अवास्तव महत्व वाढतं असं आपलं माझ्या अल्पबुध्दीला वाटलं ! वास्तवाचं भान न ठेवून आपण पेपर वाचतो आणि त्यामुळेच असले पोटार्थी पेपर्स खपतात हे एक विदारक सत्य स्वीकारलंय आम्ही साहेब ! मी प्रामाणिकपणे लिहिलंय , सगळ्यांनाच माझी मते पटावीत असा आग्रह धरणारा मी कोण? पुढील दोन वर्षे पुरतील असे लेख माझ्या पोतडीत आहेत , पण सत्य ऐकायचे असेल तर ऐका, म.टा. वाले म्हणाले की "ऐतिहासिक" विषय आमच्याकडे कॉलम नसतो , ते आमचे धोरण (स्ट्रॅटेजी!) नाही. आता बोला राव ! असो, राग नाही , आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही , हीच जर का शिक्षणाची देणगी असेल तर मी स्वतःला अशिक्षित म्हणवून घेणंच जास्त पसंद करीन ! आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ! नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं ! आपण फक्त आपली खळगी कशी भरेल हे पहातो हे दुर्दैव आहे ! योग्य माणसांचे कौतुक करा - आम्ही औरंगझेबासारखे धर्मांध नाही ! पण नीचांचे कौतुक कराल तर मी असे वारंवार लिहिणारच ! राग नसावा साहेब , काहीही झाले तरी तुम्ही एक "भारतीय" आहात आणि म्हणून माझे बांधव आहात हे मी कधीही विसरणार नाही , मग तुम्ही हइंदू असा वा ज्यू ! उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 10:49
श्री. उदय सप्रे, आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? समाजातल्या किती अनिष्ट गोष्टींनी पेटून उठावे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का? तुम्ही तरी घातला आहे का? वृत्तपत्रावर, वाहिन्यांवर, रेडीओवर बहिष्कार घाला, शक्य आहे का ते? हीच जर का शिक्षणाची देणगी असेल तर मी स्वतःला अशिक्षित म्हणवून घेणंच जास्त पसंद करीन! शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते? तुम्हाला जे इतिहास प्रेम मिळाले आहे ते शिक्षणातूनच मिळाले आहे नं? जे नोकरी-धंद्यासाठी आवश्यक असे ज्ञान आहे ते शिक्षणानेच दिले आहे नं? ज्या ज्ञानाच्या जोरावर आज तुम्ही आम्ही पैसे कमवून टॅक्स भरतो आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावतो ती शिक्षणाचीच देणगी असते नं? आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ! बरे झाले हे वास्तव आपण सुवाच्य भाषेत आमच्या लक्षात आणून दिलेत. उद्याच बाजारात कुठे एखादी तलवार मिळते का ते पाहतो आणि कापूनच काढतो त्या वृत्तपत्रवाल्यांना ज्यांनी तुमचे लेख छापले नाहीत. नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं आजच्या 'अफजल्'च्या जिवंत असण्याला आणि कलाम साहेबांच्या राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवरून पायउतार होण्याला मराठी GXXX फाटूपणा कारणीभूत आहे असा जावईशोध आपण कसा लावलात? पण फक्त आपली खळगी कशी भरेल हे पहातो हे दुर्दैव आहे हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला निष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही. योग्य माणसांचे कौतुक करा - आम्ही औरंगझेबासारखे धर्मांध नाही! हल्ली धर्मांधपणा फक्त मुसलमानांमध्येच राहिलेला नाही ख्रिश्चन समाजातही आहे आणि दुर्दैवाने राजकारण्यांनी तो हिंदूंमध्येही पसरवला आहे. पण नीचांचे कौतुक कराल तर मी असे वारंवार लिहिणारच ! लिहीत राहा. आम्ही वाचत राहू. पण एकटा औरंगझेब नीच होता अशा भावनेत लिहू नका. आपल्या सामजात बलात्कार करणारे आहेत. खून करणारे आहेत, खेडोपाडी वीज पोहोचली नसताना मुलाच्या लग्नात आठवडा आठवडा भपकेबाज रोषणाई करणारे मुख्यमंत्री आहेत, अन्नधान्याची साठेबाजी करणारे आहेत, संरक्षण खात्यात भ्रष्टाचार करणारे आहेत, नकली डॉक्टर्स आहेत, नकली औषधे बनविणारे आहेत, नकली दूध बनविणारे आहेत, सलमान खान सारखे मद्यधुंद अवस्थेत पदपथावरील माणसांना मारून पैशाच्या जोरावर सुटनारे आहेत, बॉम्बस्फोट घडविणारे आहेत, कच्चे बांधकाम करून लोकांच्या जीवाशी खेळणारे बिल्डर्स आहेत, राजकारण्यांबद्दल तर लिहायलाच नको. हे सर्व नीच आहेत हे विसरू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

उदय सप्रे गुरुवार, 04/24/2008 - 11:02
पेठकर साहेब , एकूणच आपण लिहिलेल्या सगळ्या प्रतिसादामधे तुम्ही मला माझी "जागा" दाखविण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. मी काय काय जावई शोध लावले यापेक्षा ही जास्त , "तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का?" हा तुमचा "सासरेबुवा" शोध फारच मनोरंजक आणि अगदीच बाळबोध वाटतो आहे ! असो, माझ्याच तोंडून ऐकायचे हौस असेल तर ऐका , मी अगदे स्वच्छ मनाने कबूल करतो की आपण माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत महान आहात ! आपण जिथे आहात तिथे रहा आणि मला पण माझ्या लहान पणातच राहु द्या ही विनंती ! बाकी तुमची पुधील विधाने पण फारच करमणूक करून गेली : बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? असे लिहिणार्‍याच्या विरोधात लिहीत सुटावे ! शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते? तुम्हाला जे इतिहास प्रेम मिळाले आहे ते शिक्षणातूनच मिळाले आहे नं? जे नोकरी-धंद्यासाठी आवश्यक असे ज्ञान आहे ते शिक्षणानेच दिले आहे नं? ज्या ज्ञानाच्या जोरावर आज तुम्ही आम्ही पैसे कमवून टॅक्स भरतो आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावतो ती शिक्षणाचीच देणगी असते नं? नकीच नाही , आपण त्यातून काय ते घ्यायचे असते , शिक्षण काहीच देत नाहे - जर का घेणारा डोळे मिटून बसला तर ! आणि मला वाटते जागे असून झोपेचे सोंग घेणार्‍या काही लोकांना कसे जागे करणार हो? हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला नष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आजचा सर्वसामान्य समाज आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही. मग काय अशा लेखांवरती प्रतिक्रिया देऊन तो विचारवंत ठरतो का? आपण तर फारच थोर विचारवंत आहात ! लिहीत राहा. आम्ही वाचत राहू. पण एकटा औरंगझेब नीच होता अशा भावनेत लिहू नका. साहेब, एकटा औरंबझेब नीच होता अशा भावनेतून ते लिहिलेलेच नाहिये, असे इतर कुणीही त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलेले नाही ! लेख पुन्हा एकदा वाचा - त्याची सुरुवातच मुळी औरंगझेबाच्या सद्गुणांपासून केली नाहिये का? पण मुद्दा असा आहे की - त्याचे कौतुक तुम्हाला दिसले नाही पण नीच्पणा दाखवून दिला तो मात्र इतका झोंबला की तुम्ही अगदी रस्त्यावर मारामारी करणार्‍या मुलांप्रमाणे आमच्यावर चिखलफेक केलीत ! असो , तुमच्यासारर्खे विचारवंत आणि कुणी न भेटोत ही ईश्वर चरणी प्रार्थना !

In reply to by उदय सप्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 12:45
आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही ह्या वाक्याने तथाकथित सर्व बुद्धीजीवींना हिणवले आहे. एवढे करून बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? ह्या माझ्या प्रश्नाला बगल दिली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का? हा माझा वास्तवाला धरून विचारलेला प्रश्न तुम्हाला खटकलेला दिसतो आहे. त्याच प्रमाणे आपण सर्व बुद्धीजीवी पेटून उठत नाही ह्या तुमच्या विधानात तुम्ही तुमच्या प्रमाणे मलाही गोवलेत हे मलाही खटकले. पेटून उठणे म्हणजे काय? तुम्ही नक्की काय करता? ह्यावर दोन शब्द लिहिले असतेत तर ते समर्पक उत्तर झाले असते. मी काय काय जावई शोध लावले यापेक्षा ही जास्त , "तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का?" हा तुमचा "सासरेबुवा" शोध फारच मनोरंजक आणि अगदीच बाळबोध वाटतो आहे ! मनोरंजक वाटला असेल तर माझा काहीच आक्षेप नाही पण बाळबोध म्हणणे म्हणजे आपला चडफडट नक्की कशाने झाला आहे ह्याचे त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून परिक्षण न करणे आहे. असे परिक्षण करायला मनाची ताकद लागते. असो, माझ्याच तोंडून ऐकायचे हौस असेल तर ऐका , मी अगदे स्वच्छ मनाने कबूल करतो की आपण माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत महान आहात ! आपण जिथे आहात तिथे रहा आणि मला पण माझ्या लहान पणातच राहु द्या ही विनंती ! राग-राग, चीडचिड करणे सगळ्यात सोप्पे. मुद्देसूद प्रतिवाद करणे कठीण असते. पुन्ह औरंगझेब विषयाकडे वळून एकच सांगू इच्छितो की शत्रूच्या गुणांचेही मोठ्या मनाने कौतुक करावे. औरंगझेब क्रूर जरूर होता पण तुम्ही म्हणता तसा मूर्ख अजिबात नव्हता. असो. तुम्हाला तुमच्या मतांचा अधिकार आहे पण तसाच मलाही माझ्या मतांचा अधिकार आहे हे लक्षात असू द्या. उगीच सरसकट सर्व बुद्घीवाद्यांना झोडपायचा उद्योग करू नका. बाकी तुमची पुधील विधाने पण फारच करमणूक करून गेली : तुम्ही स्वतःची करमणूक कशी करून घ्यावी हे मी कोण सांगणार. आपण आपल्या विचारांचे स्वामी आहात. बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? असे लिहिणार्‍याच्या विरोधात लिहीत सुटावे ! विरोधात लिहिलेले नाही. फक्त 'मूर्ख' ह्या शब्दावर माझा अक्षेप होता आणि आहे. औरंगझेब एक सद्गुणी राजा होता असे विधान मी केले असते तर ते तुमच्या लिखाणाच्या विरोधात लिहिल्यासारखे झाले असते. शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते? नकीच नाही , आपण त्यातून काय ते घ्यायचे असते , शिक्षण काहीच देत नाहे - जर का घेणारा डोळे मिटून बसला तर ! आणि मला वाटते जागे असून झोपेचे सोंग घेणार्‍या काही लोकांना कसे जागे करणार हो? माझा प्रश्न हा तुमच्या बुद्धीजीवी पेटून उठत नाहीत तर शिक्षणाचा उपयोग काय? ह्या विचारांच्या संदर्भात आहे. झोपेचे सोंग घेण्याची मला गरज काय? तिरकस बोलण्यातूल तुम्हाला प्रचंड आनंद मिळवायचा असेल तर मिळवा बाबा! मी ,मुद्दा सोडून बोलणे भांडखोर पणाचे मानतो त्यामुळे मी मुद्दा सोडणार नाही. हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला नष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आजचा सर्वसामान्य समाज आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही. मग काय अशा लेखांवरती प्रतिक्रिया देऊन तो विचारवंत ठरतो का? आपण तर फारच थोर विचारवंत आहात ! मी उद्घृत केलेल्या एकाही समस्येवर उत्तर देणे दूरच राहो साधी सहमती दर्शविण्याचे सौजन्यही तुम्ही दाखवू शकला नाहीत. कसा वाद घालावा कोणी तुमच्याशी? साहेब, एकटा औरंबझेब नीच होता अशा भावनेतून ते लिहिलेलेच नाहिये, असे इतर कुणीही त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलेले नाही ! लेख पुन्हा एकदा वाचा - त्याची सुरुवातच मुळी औरंगझेबाच्या सद्गुणांपासून केली नाहिये का? पण मुद्दा असा आहे की - त्याचे कौतुक तुम्हाला दिसले नाही पण नीच्पणा दाखवून दिला तो मात्र इतका झोंबला की तुम्ही अगदी रस्त्यावर मारामारी करणार्‍या मुलांप्रमाणे आमच्यावर चिखलफेक केलीत ! तुमचा लेख आणि माझी त्यावरील प्रतिक्रिया तुम्हीच एकदा नीऽऽऽट वाचा. औरंगझेबाचा नीच पणा मला क्शला झोंबावा? तो काही माझा बाप नव्हे. पण शिवाजी महाराजांच्या तुल्यबळ शत्रूला सरसकट मूर्ख हे लेबल चिकटवलेत ते चूकीचे होते एवढेच दाखऊन देण्याचा प्रयत्न केला. आता तेही तुम्हाला झोंबेल ह्याची काय कल्पना? असो , तुमच्यासारर्खे विचारवंत आणि कुणी न भेटोत ही ईश्वर चरणी प्रार्थना ! हेच विचार वाचकांचेही लेखकाबद्दल असू शकतात हे कायम ध्यानात ठेवा.

विसोबा खेचर गुरुवार, 04/24/2008 - 08:19
यावर गुस्ताख औरंगझेब म्हणाला,"हत्तीसारख्या बलाढ्य जनावराशी लढताना मौत आली असती तरी त्यात नाचक्की कोणती होती?मोठमोठ्या शहा सुलतानांच्या आयुष्यावर मृत्यू अचानक पडदा टाकतो.मृत्यूत नाचक्की कसली?त्यात लांज वाटायचं काय कारण? क्या बात है! हे आवडलं...! सप्रेसाहेब, तुमच्या अभ्यासपूर्ण लेखाला सलाम! औरंग्या होताच मुळी कपटी आणि क्रूर! तात्या.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 09:49
लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली . त्यांच्या दूसर्‍या विधानातील मूर्ख ह्या शब्दावर माझा आक्षेप आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. औरंगझेब क्रुर असेल, धर्मांध असेल, नव्हे होताच, पण मूर्ख खचितच नव्हता. एवढे मोठे साम्राज्य उभारायचे, सांभाळायचे, पदोपदी होणारी बंडाळी यशस्वी पणे मोडून काढायची. कानाकोपर्‍यातील बातम्या वेळ न दवडता मिळवायच्या, प्रतिस्पर्ध्याच्या संभाव्य चालींचा विचार करून आधीच रणनिती आखायची अशा अनेक गोष्टीत तो वाकबगार होता असे अनेकदा वाचनात आले आहे. फक्त त्याला कोणी विरोधक नव्हता म्हणून तो राज्य करू शकला हे विधान फारच भाबडेपणाचे वाटते. त्याचा कोणावरच विश्वास नव्हता. तत्कालीन सामाजिक, राजकिय आणि मुसलमान धर्मियांची वैचारीक बैठक बघता त्याचे वागणे अत्यंत चलाख राज्यकर्त्याचे होते. औरंगझेब दक्षिणेत सरदार म्हणून कारभार पाहत असताना जसे शहाजहानने औरंगझेबाच्या शिक्षणाच्या निमित्ताने एक मौलवी स्वतःचा हेर म्हणून त्याच्या बरोबर ठेवला होता तसेच औरंगझेबानेही शहाजहानच्या दरबारातील बित्तमबातमी मिळविण्यासाठी स्वतःच्या बहिणीलाच फितवून ठेवले होते. सत्तेसाठी भावाभावांमध्ये, बाप-लेकांमध्ये मारामर्‍या ही त्या काळातली, मुस्लीम घराणातली परंपरा होती. औरंगझेब मूर्ख असता तर तो गाफिल राहिला असता आणि त्याच्या भावांनीच त्याला ठार मारले असते. पण औरंगझेब मूर्ख नव्हता. शत्रू कितीही क्रूर, बलाढ्य असला तरी त्याला मूर्ख समजणे चूक होते. शत्रूची बलस्थानं आधीच ओळखून आपली रणनिती ठरवावी लागते. शिवाजी महाराजांना ह्या सर्व गोष्टींचा पुरेपुर अंदाज होता. अखिल हिन्दूस्थानात मुघल बादशहा औरंगझेब हाच एकमेव स्वराज्याचा बलाढ्य शत्रू आहे हे त्यांनी मनोमनी जाणले होते. खुद्द त्यांनीही औरंगझेबाला मूर्ख मानले नाही. असो. मी कोणी इतिहासकार नाही. ज्या काही ऐतिहासिक कादंबर्‍या वाचल्या आहेत त्यावरून माझी मते बनलेली आहेत.

उदय सप्रे गुरुवार, 04/24/2008 - 10:18
तुमच्या या वृत्तीला सलाम ! लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली . त्यांच्या दूसर्‍या विधानातील मूर्ख ह्या शब्दावर माझा आक्षेप आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. तुम्हाला औरंगझेब मूर्ख होता याचे एक मोठ्ठे उदाहरण देतोच आता : शायिस्तेखान पुण्यात उतरला होता त्याच वेळेस सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता.जर त्यावेळी औरंगझेबाने शायिस्तेखानाला सांगून विजापूरकरांशी संधान साधले असते , तर.....(असे लिहिताना पण मनाला असंख्य यातना होतायत , पण हे लॉजि़क आहे म्हणून लिहितोय, महाराज माफी असावी!).....तर "स्वराज्य" केवळ एका आठवड्यात संपले असते ! औरंगझेबाच्या जागी शहाजहान असता , तर त्याने नक्कीच ही संधी सोडली नसती , तो शासक होता आणि म्हणूनच त्याने विजापूरकरांशी संधान बांधून शहाजीराजांना माहुली गडावर कोंडून शरण आणले आणि कोवळ्या मुर्तुझा निजामाबरोबरच निजामशाही संपवली , हा इतिहास आहे.ज्या शासकाला या इतिहासापासून धडा घेता येत नाही तो मूर्ख नव्हे शतमूर्ख होय ! निव्वळ तैमूरलंगासारखे क्रूर असून भागत नाही , शासकाला थोर राजकारणी पण असावे लागते ! याबाबत विजापूरकरांना आणि निजामशाहीला जास्त गूण देता येतील ! कारण अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी पण बड्या साहेबीणीने फार दूरचे राजकारण साधले होते ! निजामशाह तर त्यापेक्षा एक पायरी वरचढ होता म्हणून तर मालोजी राजेंपासून ते शहाजी पर्यंत त्याने सर्वांना आपल्या पदराखाली ठेवले होते ना? इतिहास फक्त कादंबर्‍यात वाचायचा नसतो , आधी डोक्यात पण लॉजिक बसवावे लागते. आण्खीन एक उदाहरण औरंग्याच्या मूर्खपणाचे : कुतुबशाही विरुध्द लढताना ऐन युध्दात तो रणात नमाझ पढायला बसला होता , एक गोळा त्याच्या अंगरक्षकाला लागून तो ठार झाला , हे असे काही मूर्ख्पणाचे कॄत्य शिवाजी महाराजांनी केले असते कां? याचा विचार करा. ज्याला राज्य करावयाचे आहे त्याला "डोके" वापरावे लागते , जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तो शहाणा आणि जो इतरांचा चुकांमधून शिकतो तो चतुर आणि जो कुणाच्याच चुकांमधून काहीच न शिकता समोरचा कधी चूक करतोय ही वाट बघत बसतो आणि आपल्या माणसांनी अशा वेळी चूक केली तर त्यांना क्रूर पणे सझा देतो - स्वतःचे असलेले डोके वापरत नाही , तो मूर्खच नव्हे तर शतमूर्ख होय !हे सगळे गून (?) औरंगझेबाकडे होते ! असो, औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव !

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर गुरुवार, 04/24/2008 - 10:58
औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव ! सप्रेसाहेब, केवळ मुद्द्याने मुद्दा खोडून काढा. पेठकरसाहेबांवर व्यक्तिगत शेरे नकोत.. तात्या.

In reply to by उदय सप्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 11:30
लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली . आपण इतिहासकार आहात. मी कोण? एक अज्ञ वाचक. पण आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले. शायिस्तेखान पुण्यात उतरला होता त्याच वेळेस सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता.जर त्यावेळी औरंगझेबाने शायिस्तेखानाला सांगून विजापूरकरांशी संधान साधले असते , तर.....(असे लिहिताना पण मनाला असंख्य यातना होतायत , पण हे लॉजि़क आहे म्हणून लिहितोय, महाराज माफी असावी!).....तर "स्वराज्य" केवळ एका आठवड्यात संपले असते ! मानायला पाहिजे तुम्हाला. जे इतके वर्षांनी नुसती कागदपत्रे वाचून तुमच्या लक्षात आले ते काश्मिर ते महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत राज्य करणार्‍या आणि हाताशी अनेक मुत्सद्दी, विचारवंत असताना, प्रत्यक्ष परिस्थितीत असताना, प्रत्यक्ष राजकारण खेळताना औरंगझेबाच्या लक्षातच नाही आले. औरंगझेबाच्या जागी शहाजहान असता , तर त्याने नक्कीच ही संधी सोडली नसती , तो शासक होता आणि म्हणूनच त्याने विजापूरकरांशी संधान बांधून शहाजीराजांना माहुली गडावर कोंडून शरण आणले आणि कोवळ्या मुर्तुझा निजामाबरोबरच निजामशाही संपवली , हा इतिहास आहे.ज्या शासकाला या इतिहासापासून धडा घेता येत नाही तो मूर्ख नव्हे शतमूर्ख होय ! निव्वळ तैमूरलंगासारखे क्रूर असून भागत नाही , शासकाला थोर राजकारणी पण असावे लागते ! याबाबत विजापूरकरांना आणि निजामशाहीला जास्त गूण देता येतील ! म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का? म्हणून तर मालोजी राजेंपासून ते शहाजी पर्यंत त्याने सर्वांना आपल्या पदराखाली ठेवले होते ना? पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे. इतिहास फक्त कादंबर्‍यात वाचायचा नसतो , आधी डोक्यात पण लॉजिक बसवावे लागते. सप्रे साहेब आपण स्वयंघोषित इतिहासकार आहात. वाचकांच्या डोक्यात लॉजिक नसते तो फक्त एका लेखकाचेच विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका. नाहीतर एकदा बाबासाहेब पुरंदरे वाचल्यावर इनामदारांचे विचार वाचावेसे त्याला वाटणारच नाही. डायरेक्ट वाचकाच्या डोक्यावरच हल्ला केलात तर नाईलाजाने वाचकांनाही तुमच्या डोक्याबद्दल शंका येऊ शकते. आण्खीन एक उदाहरण औरंग्याच्या मूर्खपणाचे : कुतुबशाही विरुध्द लढताना ऐन युध्दात तो रणात नमाझ पढायला बसला होता , एक गोळा त्याच्या अंगरक्षकाला लागून तो ठार झाला , हे असे काही मूर्ख्पणाचे कॄत्य शिवाजी महाराजांनी केले असते कां? याचा विचार करा. तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते. ज्याला राज्य करावयाचे आहे त्याला "डोके" वापरावे लागते , जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तो शहाणा आणि जो इतरांचा चुकांमधून शिकतो तो चतुर आणि जो कुणाच्याच चुकांमधून काहीच न शिकता समोरचा कधी चूक करतोय ही वाट बघत बसतो आणि आपल्या माणसांनी अशा वेळी चूक केली तर त्यांना क्रूर पणे सझा देतो - स्वतःचे असलेले डोके वापरत नाही , तो मूर्खच नव्हे तर शतमूर्ख होय !हे सगळे गून (?) औरंगझेबाकडे होते ! ह्यावर काय म्हणणार. तुम्हाला औरंगझेब द्वेषाची काविळ झाली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. असो, औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव ! आपल्याच लेखाच्या वाचकाला उद्देशून लिहिलेल्या खडूस वाक्यांनी इतिहास बदलत नसतो. मिसळ पाव हे संस्थळ सर्वांसाठी आहे. तुम्ही काही लिखाण केलेत तर ज्याला त्याला आपल्या बुद्धीला झेपेल, रुचेल त्या प्रमाणे प्रतिसाद द्यायचा हक्क आहे असे मला वाटते. माझ्या वाटण्यात कांही वावगे असेल तर श्री. तात्यांनी मला तसे सांगावे मी कोणालाच प्रतिसाद देणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

उदय सप्रे गुरुवार, 04/24/2008 - 12:11
पेठकर साहेब, तुमच्या एकूणच लिहिण्याच्या पध्दतीवरून सारसार विचार करण्याची कुवत तुमच्याकडे असेल्से वाटत नाही्ए माझे शेवटचे उत्तर : "आपण इतिहासकार आहात. मी कोण? एक अज्ञ वाचक. पण आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले." साहेब , मी एक नगण्य असा लहान माणूस आहे , काही ऐतिहासिक लेख लिहिले , कविता केल्या , खूपशी ऐतिहासिक प्स्तकी वाचली म्हणजे आपण इतिहासकार झालो अशा गोड गैरसमजामधे मी कधीही नव्हतो , आज नाही आणि इथून पुढेही नसेन ! शासक म्हणून औरंगझबाने केलेल्या चुकांमुळे त्याला मूर्ख म्हटले आहे."त्याच्याकडे असलेल्या गुणांच्या बळावर तो खूप काही करू शकला असता पण ते त्यानी आपल्या दुराग्रही स्वभावामुळे केले नाही"अशी या विधानाची दुसरी बाजू तुमच्या ध्यानात कशी बरे यावी? "सप्रे साहेब आपण स्वयंघोषित इतिहासकार आहात. वाचकांच्या डोक्यात लॉजिक नसते तो फक्त एका लेखकाचेच विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका. नाहीतर एकदा बाबासाहेब पुरंदरे वाचल्यावर इनामदारांचे विचार वाचावेसे त्याला वाटणारच नाही. डायरेक्ट वाचकाच्या डोक्यावरच हल्ला केलात तर नाईलाजाने वाचकांनाही तुमच्या डोक्याबद्दल शंका येऊ शकते." पुन्हा एकदा सांगतो , मी एक नगण्य माणूस आहे ! कुठलीही ङ्होषणा मी केलेली नाही आणि करणारही नाही ! लॉजिक वाचकाने वापरायचे असते एव्ह्ढेच म्हणायचे होते मला ! "तुमच्या विधानातच विरोधाभास आहे : एका लेखकाचे विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका !"अहो, मी पण हेच म्हणतोय , की सगळ्यांचे वाचून हे लॉजिक विचार तरी कराल की नाही? "तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते" व्वा ! तुमचेच विधान नीट वाचा आता - औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते .....म्हणजेच तुम्ही कबूल नाही का केलंत की औरंगझेब शासक म्हणून मूर्ख होता ? "ह्यावर काय म्हणणार. तुम्हाला औरंगझेब द्वेषाची काविळ झाली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागेल" मला काय झाले आहे यापेक्षा तुम्ही आधी वैयक्तीक विधाने करण्याच्या स्वतःच्या काविळीवर उपाय करावा हे बरे ! "आपल्याच लेखाच्या वाचकाला उद्देशून लिहिलेल्या खडूस वाक्यांनी इतिहास बदलत नसतो. मिसळ पाव हे संस्थळ सर्वांसाठी आहे. तुम्ही काही लिखाण केलेत तर ज्याला त्याला आपल्या बुद्धीला झेपेल, रुचेल त्या प्रमाणे प्रतिसाद द्यायचा हक्क आहे असे मला वाटते. माझ्या वाटण्यात कांही वावगे असेल तर श्री. तात्यांनी मला तसे सांगावे मी कोणालाच प्रतिसाद देणार नाही. " छान , आम्ही लिहिले तर ते खडूस आणि तुम्ही जी मुक्ताफळे उधळली आहेत ते काय आहे? प्रतिसाद जरूर द्यावा..... "पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे. " साहेब , तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की मला बोललात ते ठीक आहे हो , पण निदान त्या थोर लोकांना तरी नाकर्तेपणा आणि विलासी अशी विशेषणे लावण्याआधी हजार वेळा विचार करा ! शहाजीराजे जरूर विलासी होते , पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या ही आधी ३ वेळा स्वराज्याचे प्रयत्न केलेले होते हा इतिहास विसरलात का? नुसती नावे ठेवण्याने काहेच साध्य होत नाही राव, "म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का?" ही वाक्ये तुमच्या विचारशक्तीची मर्यादा दाखवून देतात ! असो, तुम्ही चिखलफेक करत रहा , तात्यांना मी आधीच लिहिले आहे , माझी चूक आहे असे त्यांना वाटले आहे म्हणून मी माफी ही मागितली आहे त्यांची !

In reply to by उदय सप्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 13:42
तुमच्या एकूणच लिहिण्याच्या पध्दतीवरून सारसार विचार करण्याची कुवत तुमच्याकडे असेल्से वाटत नाही्ए माझे शेवटचे उत्तर : तुम्ही असे वैयक्तीक हल्ले करता म्हणून नाईलाजाने मलाही तसेच शब्द वापरावे लागतात. तुम्ही संयमाने लिहा मग माझे लिखाण पहा कसे बदलते. जे पेराल तेच उगवेल. आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले." साहेब , मी एक नगण्य असा लहान माणूस आहे , काही ऐतिहासिक लेख लिहिले , कविता केल्या , खूपशी ऐतिहासिक प्स्तकी वाचली म्हणजे आपण इतिहासकार झालो अशा गोड गैरसमजामधे मी कधीही नव्हतो , आज नाही आणि इथून पुढेही नसेन ! शासक म्हणून औरंगझबाने केलेल्या चुकांमुळे त्याला मूर्ख म्हटले आहे."त्याच्याकडे असलेल्या गुणांच्या बळावर तो खूप काही करू शकला असता पण ते त्यानी आपल्या दुराग्रही स्वभावामुळे केले नाही"अशी या विधानाची दुसरी बाजू तुमच्या ध्यानात कशी बरे यावी? तुम्ही त्याला मूर्ख आणि शतमूर्ख संबोधिले आहे. त्याच बरोबर त्याच्या कडे कुशाग्र बुद्धीमत्ता होती असेही म्हणता. हे चूक आहे. तो मूर्ख आणि शतमूर्ख नव्हता तो हुशार होता पण त्यानेही काही चुका केल्या असे लिहायला हवे होते. लॉजिक वाचकाने वापरायचे असते एव्ह्ढेच म्हणायचे होते मला ! म्हणजेच ते लॉजिक वापरायला मी वाचक म्हणून असमर्थ ठरलो आहे असा सूर/आरोप तुमच्या वाक्यात आहे. "तुमच्या विधानातच विरोधाभास आहे : एका लेखकाचे विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका !"अहो, मी पण हेच म्हणतोय , की सगळ्यांचे वाचून हे लॉजिक विचार तरी कराल की नाही? पण तुमची काही मते मी खोडून काढायचा प्रयत्न केला म्हणजे मी 'लॉजिकल विचार केलेला नाही' किंवा 'माझी तेवढी कुवत नाही ' असेच तुम्ही तुमच्या सोयी साठी गृहीत धरलेले आहे. "तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते" व्वा ! तुमचेच विधान नीट वाचा आता - औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते .....म्हणजेच तुम्ही कबूल नाही का केलंत की औरंगझेब शासक म्हणून मूर्ख होता ? धर्मांधतेच्या संदर्भात सारासार बुद्धी नसणे आणि शासक म्हणून मूर्ख असणे हे एकच कसे? धर्मांध औरंगझेब आणि शासक, राजकारणी औरंगझेब ह्या दोन भिन्न प्रवृत्ती आहेत. मला काय झाले आहे यापेक्षा तुम्ही आधी वैयक्तीक विधाने करण्याच्या स्वतःच्या काविळीवर उपाय करावा हे बरे ! वैयक्तिक विधाने आपण टाळलीत तर मला हौस नाही . छान , आम्ही लिहिले तर ते खडूस आणि तुम्ही जी मुक्ताफळे उधळली आहेत ते काय आहे? प्रतिसाद जरूर द्यावा..... तुमच्या प्रत्येक मुद्याला मी ते ते मुदे ठळक अक्षरात लिहून त्या त्या मुद्यांखाली माझा प्रतिवाद केला आहे. त्याला मुक्ताफळे म्हणत नाहीत. तुम्हाला म्हणायचे असेल तर तसे म्हणा. म्हणणार्‍याचे तोंड धरता येत नाही. "पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे. " साहेब , तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की मला बोललात ते ठीक आहे हो , पण निदान त्या थोर लोकांना तरी नाकर्तेपणा आणि विलासी अशी विशेषणे लावण्याआधी हजार वेळा विचार करा ! बाबासाहेब पुरंदरे, ना. स. इनामदार वगैरे मात्तबरांच्या कादंबर्‍यावाचून माझे हे मत झाले आहे. मालोजीराजे, शहाजीराजे हे मा़णूसच होते त्यांनी कधी चुका केल्याच नाहीत असे समजायला मी त्यांना देव मानत नाही. आणि खुद्द देवही चुका करतो. लुळे-पांगले, जन्मांध, एकमेकांना जोडलेले जीव जन्माला घालतो. तिथे मानवाची काय मातब्बरी? शहाजीराजे जरूर विलासी होते , पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या ही आधी ३ वेळा स्वराज्याचे प्रयत्न केलेले होते हा इतिहास विसरलात का? ते प्रयत्न असफल झाले हे तुम्ही विसरताय का? विलासी माणसाला विलास , सुख प्रिय असते. स्वराज्य उभारण्यातील कष्टप्रद जीवन नको असते. त्या मुळे असे काही प्रयत्न पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा सरदारकी सांभाळावी स्वार्‍या-शिकारी कराव्यात आणि मदीरा आणि नृत्यांगनांना जवळ करावे हा नाकर्तेपणा नाही का? "म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का?" ही वाक्ये तुमच्या विचारशक्तीची मर्यादा दाखवून देतात ! पाहिलंत, काढलीत नं शेवटी माझी विचारशक्ती? कारण काय? तुमची अविचारशक्तीच नं शेवटी? मुद्याला धरून बोला. माझ्या प्रश्नांना उत्तर असेल तर बोला. अन्यथा...... असो, तुम्ही चिखलफेक करत रहा , तात्यांना मी आधीच लिहिले आहे , माझी चूक आहे असे त्यांना वाटले आहे म्हणून मी माफी ही मागितली आहे त्यांची ! धन्यवाद.

धमाल मुलगा गुरुवार, 04/24/2008 - 10:56
आम्ही कोणी इतिहास संशोधक नाही, ना इतिहासाचे गाढे अभ्यासक! आमचं भाषाज्ञानही तसं यथा-तथाच! त्यामुळे....
"अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !"
ह्या अभ्यासपुर्ण संशोधनाअंतीच्या निष्कर्षातल्या वाक्यांचं पचन कदाचित आम्हाला झालं नसेल.....
उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे.
:-)))))))))))))))))))))))))))))))) शंकेला जरुर वाव आहे ! पण........ आमची पचनशक्ति तशी कमजोरच आहे! आम्हाला जिजाऊंच्या ४०९ जयंतीच्या बातमीऐवजी 'महान'..(निदान काही अंशी !) औरंग्याच्या मृत्यूची (..की पुण्यतिथी म्हणावं बरं?) पहिल्या पानावर आलेली बातमीही पचनी पडली नाही! खचितच तो हलकट जिजाऊंपेक्षा मोठा...महान नाही! की इथंही चुकलं बुवा आमचं? अल्पसंख्यांकाचं काही ना काही कारणानं केलेलं तुष्टीकरणही आमच्या कधीच पचनी पडत नाही.. महाराष्ट्रातल्या 'संभाजीनगर' ला अजुनही 'औरंगाबाद' संबोधलेलं आमच्या पचनी पडत नाही! कारण अजुनही आमच्या रक्तातून लाव्हा वाहतो....मिंधेपणाचं गटार नव्हे! आम्ही घडणार्‍या घटनांमुळे आमच्या माणसांना त्याचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे जर त्रास होत/होणार असेल तर त्याविरोधात आवाज हा नक्कीच उठवणार! त्या घटनांची साधकबाधक चर्चा सदरेवरची पंतमंडळी करतील...ते बुध्दीजीवी...आम्ही फक्त समशेरबहाद्दर!!!!! आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी...वैचारिक गुर्‍हाळं मांडून त्यातून शब्दांचा चोथा करायला वेळ असावा लागतो...समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला.... आम्ही दिल्हेला जवाब हा फक्त आणि फक्त त्या लेखकाने आणि दैनिकाने थोरल्या आऊसाहेबांच्या जयंतीऐवजी औरंग्याच्या मरणाची आठवण करवणारा लेख लिहिण्याबद्दल आणि तोही पहिल्या पानावर छापण्याबद्दल होता...ह्याची जाणिव आमच्यासारखे हात-पाय चालवण्याऐवजी सुपीक बुध्दीचं बळ वापरुन शब्दच्छल मांडणार्‍यांना असेलच...कारण हे समजणं हे बुध्दीवाद्यांचं लक्षण आहे असं मी मानतो! मला वाटतं माझ्या
आजही महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्यावर कडक ऊन्हाच्या तिरिपी येत असतात, पण म्हराठी स्वराज्यावर पाशवी बलात्कार करणारा हरामजादा अफजल्या मात्र प्रतापगडावरच्या प्रशस्त आलिशान मशीदीतल्या कबरीत उदा-धूपाच्या दरवळात राजेशाही थाटात लोळत असतो....तिथे ह्या बातमीची ती काय मातब्बरी?
ह्या वाक्यांकडे त्या दुर्लक्ष झालेलं दिसतंय, काय? नाही का? असो, आम्ही वयाने लहान आहो, रक्तातला खानदानी जोश आमच्या दिमागास शांत बसु देत नाही...तोंडून कधी मोठा घासही घेतला जातो, पण आमचं चुकलं माकलं मोठ्या दिलानं स्विकारलं जाईल ह्याची आम्हाला खात्री आहे.
पण या अशा उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे.
:-)) सप्रेसाहेब, आम्ही इतकेही मोठे कर्तबगार नाही आहो की आम्हा संदर्भात अशी वाक्यं यावीत! तरीही आमच्या भावना समजावून घेतल्याबद्दल आभार! -(महाराष्ट्राचा पुढचा शिवराय माझ्या पोटी यावा अशी ओढ लागलेला) शिवबांचा मावळा, धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे गुरुवार, 04/24/2008 - 11:30
त्या घटनांची साधकबाधक चर्चा सदरेवरची पंतमंडळी करतील...ते बुध्दीजीवी...आम्ही फक्त समशेरबहाद्दर!!!!! आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी...वैचारिक गुर्‍हाळं मांडून त्यातून शब्दांचा चोथा करायला वेळ असावा लागतो...समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला.... आम्ही दिल्हेला जवाब हा फक्त आणि फक्त त्या लेखकाने आणि दैनिकाने थोरल्या आऊसाहेबांच्या जयंतीऐवजी औरंग्याच्या मरणाची आठवण करवणारा लेख लिहिण्याबद्दल आणि तोही पहिल्या पानावर छापण्याबद्दल होता...ह्याची जाणिव आमच्यासारखे हात-पाय चालवण्याऐवजी सुपीक बुध्दीचं बळ वापरुन शब्दच्छल मांडणार्‍यांना असेलच...कारण हे समजणं हे बुध्दीवाद्यांचं लक्षण आहे असं मी मानतो! आम्ही तुमच्याशी सहमत आहोत... उदयरावांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा! (तुकोबाचा वारकरी आणि शिवबाचा धारकरी)-इनोबा || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

बगाराम गुरुवार, 04/24/2008 - 19:16
आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला.... बापरे तुमच्या इतरत्र दिलेल्या प्रतिसादांवरुन तुही आयटी मध्ये वगैरे काम करता असा माझा गैर समझ झाला होता. पण हे काही भलतेच की हो. तुम्ही इराक/अफगाणिस्तान वगैरे प्रातांत असता का?

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 15:42
-(महाराष्ट्राचा पुढचा शिवराय माझ्या पोटी यावा अशी ओढ लागलेला) शिवबांचा मावळा, धमालराव देशमुख-पाटील. धमाल राव देशमुख पाटील या वाक्यात तुम्हाला माझ्या पोटी या ऐवजी माझ्या घरात असे म्हणायचे आहे का?

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 16:04
ह्म्म..जरा विचारांच्या तेजतर्रार वेगापायी गडबड झाली खरं... माझ्या घरात असेच वाचावे. विजुभाऊ, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद!

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/24/2008 - 14:48
आम्ही सर्व मते बारकाईने वाचण्याचा प्रयत्न केला ....सगळेच मुद्दे ठळक दिसत आहेत त्यामुळे कोणास कोण काय म्हणाले याचा अभ्यास अशक्य झालाय....

In reply to by भडकमकर मास्तर

मनस्वी गुरुवार, 04/24/2008 - 14:51
सगळेच मुद्दे ठळक दिसत आहेत त्यामुळे कोणास कोण काय म्हणाले याचा अभ्यास अशक्य झालाय....
+१ सगळी अक्षरे आपोआपच ठळक होतायत बहुतेक.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/24/2008 - 15:03
औरंगजेब द्वेषाची काविळ जर उदयजीना झाली असेल तर ती मलाही होवो... कारण तसा कर्मठ, शिवभक्त रावण पण होता. पण म्हणून रावणाचा उदो उदो काही लुंगीवाले दाक्षिणात्य लोक सोडले तर इतर कोण करताना दिसत नाही. औरंगजेबाचा मनोसोक्त द्वेष करण्याने काही फार मोठी चूक होत आहे असे मला तरी वाटत नाही.... आणि वरील विधाने लिहील्याबद्दल जर कोणी माझ्या बुध्दीची कीव केली तर मला मुळीच वाईट वाटणार नाही...औरंगजेबाचा द्वेष करावा इतका मी अज्ञानी आहे याचा उलट मला आनंद वाटेल. पुण्याचे पेशवे

नारदाचार्य गुरुवार, 04/24/2008 - 15:36
कादंबऱ्या वाचून मत बनवत असल्याची कबुली देऊनही प्रभाकररावांनी नीट मांडले त्यांचे म्हणणे (ते पटो ना पटो). इतिहासाचा कथित अभ्यास, जर-तरच्या मांडणीतील लॉजिक - बापरे, काय भयंकर आहे हे? धमाल मुलगा यांचा उत्साह, उर्जा समजण्याजोगी. बाकी साऱ्यांचे सारेच ठळक अक्षरातले किरकोळ... खुर्दा... अरे लांगुल्चालनच करायचे असेल तुम्हाला तर , आमचे राष्ट्रपती व महान संशोधक ए.पी.जे.अब्दुल कलाम किंवा मदारी मेहेतर यांचे करा ना ! आवेशात किती आणि काय लिहावे, कसे लिहावे याचे भान सुटले की असे होते. या मंडळींचे लांगूलचालन करण्याची कल्पनाच भयंकर आहे. लांगूलचालन अपात्रांचेच होत असते, पात्र व्यक्तींचे नाही. त्यामुळे औरंगजेबाला अपात्र ठरवून त्याचे लांगूलचालन होतेय, असे म्हणताना कलाम, मेहतर तिथं यावेत याला लॉपसाईडेड किंवा इललॉजिक म्हणावे का? अर्थात, एकाचवेळी औरंगझेब कुशाग्रही आणि मूर्खही असेल तर असे होतेच म्हणा. (इतिवृत्तकार) नारदाचार्य

डॉ. श्लोक _भातखंडे गुरुवार, 04/24/2008 - 15:38
कोण कुठला तो औरंग्या, त्याचे इथेही वर्णन?? का का? या औरंग्याची माहिती मिसळपावाच्या मुखपृष्ठावर पाहून फार फार दु:ख झाले. लोकसत्तेत देशमुख वर्णन लिहिणार आणि मिसळपावावरती सप्रे.... मिसळपावासारख्या प्रथितयश संस्थळाने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला !. का हे लांगूलचालन??? या विषयावर कोणालाही लेख लिहावासा वाटूच कसा शकतो??तुम्हाला वाटला म्हणून कौतुक करण्यास आमचे शब्द अपुरे आहेत, शब्दसंपत्ती आटली आहे,....आणि माझे तडफडणारे मन अश्रू ढाळत आहे....

डॉ. श्लोक _भातखंडे गुरुवार, 04/24/2008 - 17:21
कारणे काहीही असोत् , मरणोत्तर औरंग्याने मायमराठीच्या मनावर सत्ता गाजविणार्‍या मिसळपावामध्ये प्रथम पॄष्ठावर झळकून छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांवर निस्सीम प्रेम आणि श्रध्दा बाळगणार्‍या तमाम मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अढळपद मिळवलंय !.... .... खूप दु:ख झाले हे पाहून...

डॉ. श्लोक _भातखंडे गुरुवार, 04/24/2008 - 17:44
आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ! नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं !
वरील तीन वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते अजिबात कळले नाही....तीन आठवडे अनेक पुस्तके वाचून संशोधन केले नसल्यामुळे कदाचित आमच्या मूढमतीला कळत नसेल...कृपया समजावून सांगावे.

बगाराम गुरुवार, 04/24/2008 - 19:07
बुद्धीजीवी ही शिवी आहे का? मी स्वतःला बुद्धीजिवी वगैरे समजत नसलो तरी तसे बनण्याचा प्रयत्न करत असतो.टिळक, आगरकर, सावरकर इ.इ. मराठी मंडळी बुद्धीजीवी नव्हती का? ज्या कलामांचे लांगुलचालन (!)करायला सांगितले जाते आहे, (ज्यांच्या राष्ट्रपती पद जाण्याला मराठी माणूस कारणीभूत आहे) ते कलाम देखिल बुद्धीजीवीच नाहीत का? मलाही पेठकरांचे प्रतिसाद जास्त पटले आणि त्यांची संयमीत भाषा (कि GXXX फाटू भाषा ??) आवडली. लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही ! ह्यातले सनातन प्रभात सोडले तर बाकिच्या दोन्ही नियतकालीकांना एक किमान तारतम्य असावे असे वाटते. सनातन प्रभातने मात्र असले भडक साहित्य का नाकारले ते समजले नाही.

एक Fri, 04/25/2008 - 22:58
तसच ते सापेक्षपण असतात... औरंगजेब उत्तम राजकारणी, प्रशासक, काटकसरी वगैरे वगैरे असेल पण तो ज्या प्रदेशात राज्य करत होता किंवा त्याच्या राजवटीमुळे ज्यांना फायदा झाला होता त्यांच्यासाठी.. तत्कालीन महाराष्ट्राला आणि आमच्या सारख्या काहीजणांना तो अजुनही शत्रूच वाटतो. त्याचं गूणगान आम्ही का करावं? त्याचे गूण कदाचित Appreciate करूही -जसे रावणाचे केले.. पण आमच्या लोकांवर (शिवाजी, संभाजी) अन्याय करून नाही. त्यांच्यापेक्षा त्याचं महत्त्व वाढ्वून नाही. मला उदय च्या लेखामधे हा उद्देश दिसतो. आमच्या शत्रुची मृत्यूची तारीख लक्षात ठेवून, पहिल्या पानावर मोठा लेख देवून बातमी देणं हे कमीतकमी मराठी म्हणवणार्‍या वृत्तपत्राकडून तरी अपेक्षिलं नव्हतं. एकतर अनुल्लेखानं तरी मारायला हवं होतं किंवा त्यावर पॉझीटीव्ह स्पिन तरी हवा होता. रावणा संदर्भात: रावण महज्ञानी, बुद्धीमान, वेदपारंगत होता पण आजही आपण रावण-दहन करतो आणि रामाची पुजा करतो. रावण मेल्याच्या दिवशी आपण आनंददिन साजरा करतो (सध्यातरी) पण काय सांगावं, वरचे काही प्रतिसाद वाचले तर रावणाची जयंती आणि पुण्यतिथी ला शोक करणारी लोकं पण जन्माला येतील असं दिसतं आहे किंवा कदाचित आलीही असतील. पेठकरांनी मला माझ्या वरील वाक्यातील चूक दाखवली... खरच..रावणाची जयंती आणि पुण्यतिथीला शोक करणारा एकच कसा असु शकेल.. वाक्य असं असायला हवं होतं.. पण काय सांगावं, वरचे काही प्रतिसाद वाचले तर रावणाची जयंती साजरी करणारी आणि पुण्यतिथी ला शोक करणारी लोकं पण जन्माला येतील असं दिसतं आहे किंवा कदाचित आलीही असतील. माझा हा प्रतिसाद त्यांना उद्देशून नव्हता. हे पन लिहायचं राहिलं होतं.

भडकमकर मास्तर Fri, 04/25/2008 - 08:12
परवा मी तुमचा लेख आवडला असा प्रतिसाद दिला होता.....तुमच्या अभ्यासाला सलाम असे म्हटले होते , याची आधी आठवण करून देतो.... परंतु काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात.... १. कोणत्या वर्तमानपत्रांनी तुमचा लेख रिजेक्ट केला , ही सांगणे टाळायला हवे होते.... २. मी सतत ३ आठवडे अगदी दिवस रात्र एक करून संशोधन करून काही लिहिले ते पुढे मांडत आहे हे वाक्य टाळले असते तर बरे झाले असते... का सांगतो, कारण तुमच्या लेखाला त्यामुळे काहीच फरक पडत नाही पण लेखाला उत्तर सोडून भलत्याच प्रतिक्रिया येतात... ३.त्वेषाने लिहिताना आपण फार तलवारबाजी केली आहे , तुम्ही म्हणता, आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ..तुमच्या या वाक्याचा मी निषेध करतो....तुमचे मत काहीही असले तरी सार्वजनिक फोरमवर समस्त मराठी बान्धवांना शिव्या दिल्याने तुमची तळमळ अधिक व्यक्त होते असे आपणास वाटत असेल तर प्रश्नच मिटला..... परंतु तसे जर वाटत नसेल तर मात्र आपण येथील समस्त मराठी बांधवांची माफी मागावी, असे मला वाटते.... आणि जो तुमच्या चुका दाखवेल तो औरंगजेबाचा मित्र ... असं गृहित धरायचं कारण नाही.... आता लगेच म्हणाल की मी कुठे तसे म्हणालो ? पण संयमित प्रतिसादांनासुद्धा पेटून उठून उत्तरे लिहिण्याची तुमची सवय मी वर पाहिली, त्यावरून असेच वाटते.......मला कृपया कोणीही औरन्गजेबाचा, रावणाचा, लोकसत्तेचा मित्र समजू नये.

In reply to by भडकमकर मास्तर

सप्रे साहेब, आपला लेख आवडलाच होता. पण आपल्या लेखाच्या निमित्ताने होणा-या चर्चेवरुन मात्र आपला तोल गेला असे वाटते. (आता तो कुठे कुठे गेला आम्ही दाखवत बसत नाही. ) वरील काही चर्चेतील मुद्यांना उत्तरे देतांना आपला संयम सुटल्यासारखा वाटला म्हणजे आपला विचार आपण लादण्याचा प्रयत्न केला. एखाद्या अभ्यासकाने मेहनतीने लेख तयार केल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियांची उत्तरे ही वाचकांना आवडणारी नसली तरी विचार पटणारा असावा,विचार मुद्देसुद असला पाहिजे. असे असले म्हणजे त्या लेखाची, लेखकाची उंची वाढते असे आमचे मत आहे. अर्थात पेठकरसाहेबांचीच मते त्या तुलनेत आम्हाला अधिक पटलीत त्या तुलनेत आपण मुद्दे खोडण्याऐवजी लादत आहात असे वाटले. खरे तर इतिसातील मुडदे उकरुन त्यावर वर्तमानात वाद होऊ नये असे आमचे मत आहे. कोणी काय छापावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात इतिहास बदलत असेल, इतिहास अधिक सत्याकडे जात असेल तर असा इतिहास आम्हाला वाचायला आवडतोच पण समाजात तेढ निर्माण करणा-या विचारापासून आम्ही कोसभर दूर राहू इच्छितो हेही आम्ही नम्रपणे नमुद करतो. आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे.........या वाक्याचा आम्हीही निषेध व्यक्त करतो.

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 10:14
३.त्वेषाने लिहिताना आपण फार तलवारबाजी केली आहे , तुम्ही म्हणता, आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ..तुमच्या या वाक्याचा मी निषेध करतो....तुमचे मत काहीही असले तरी सार्वजनिक फोरमवर समस्त मराठी बान्धवांना शिव्या दिल्याने तुमची तळमळ अधिक व्यक्त होते असे आपणास वाटत असेल तर प्रश्नच मिटला..... परंतु तसे जर वाटत नसेल तर मात्र आपण येथील समस्त मराठी बांधवांची माफी मागावी, असे मला वाटते.... भडकमकरांशी सहमत आहे.. उदयरावांनी माफी मागितल्यास बरं होईल... तात्या.

आंबोळी Fri, 04/25/2008 - 10:04
कोणी काय XXXवे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे माझ्यामते मिसळपाववरील सर्वात विनोदी वाक्य आहे. कारण प्रत्तेकजण हे वाक्य फेकुन समोरच्याला गप्प करत आसतो. पण वाक्य फेकताना हे विसरत आसतो की काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा प्रश्न आहे. असो. मुद्देसूद लिखाणामुळे पेठकरांचे म्हणणे जास्त भावले. भावना योग्य असूनही , आकाण्ड्तांडव, चिडचिड, वैयक्तिक हल्ले यामुळे सप्रेंचे विचार लादल्यासारखे वाटतात. आणि त्यामुळेच वाचक विरोधी प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त होतो असे वाटते. बाकी चालू द्या.

कोणत्या दैनिकांनी कोणते लेख छापावेत आणि कोणते परत करावेत हा त्या त्या दैनिकांच्या विचारांचा प्रश्न आहे, असे असुनही कोणी काय XXXवे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे माझ्यामते मिसळपाववरील सर्वात विनोदी वाक्य आहे. हे विनोदी वाक्य असेल तर त्यात विनोद कुठे दडला आहे, ते जर स्पष्ट करुन सांगितले तर आम्हीही आपल्या विनोदी प्रतिसादाला दाद देऊ :) पण वाक्य फेकताना हे विसरत आसतो की काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा प्रश्न आहे. सहमत !!! कोणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न नक्कीच आहे. पण काय लिहायचे आहे आणि काय लिहितो हे जर कळत नसेल तर अशा लिहिण्याला काहीच अर्थ नसावा असे वाटते.

आंबोळी Fri, 04/25/2008 - 11:39
शाळेत असताना विनोदाचे प्रकार शिकलो होतो. त्यातील विरोधाभासातून विनोद हा प्रकार फार आवडला. कारण दैनंदीन जीवनात हा प्रकार फार आढळतो. "कारण प्रत्तेकजण हे वाक्य फेकुन समोरच्याला गप्प करत असतो. पण काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा(ज्याचा त्याचा) प्रश्न आहे." हा विरोधाभास दिसला म्हणून विनोदी म्हणालो. बाकी औरंगजेबाने वारसाहक्काच्या जेवढ्या लढाया केल्या नसतील तेवढ्या येथे त्याच्या नावाने येथे सुरु आहेत. चालू द्या.

कलंत्री Mon, 04/28/2008 - 15:23
कधी कधी एकांगी विचार केला की साधकबाधक विचार आपोआपच मारले जातात. उदा घ्यायचे झाले तर नकळतच औरंगजेबाचे उदाहरण नजरेसमोर येत जाते. १. अकबराच्या वेळेस हिंदु सरदारांची संख्या ६% होती, ती शहाजहानाच्या वेळेस १६ % झाली आणि औरंगजेबाच्या उत्कर्षाच्या काळी ३२% झाली. राजकारणाचा समतोल, स्पर्धा, कुरघोडी आणि विघटनाचा विचार केला तरी आपोआपच ( शिवाजी नसता तरी) हिंदुंचे सरदार अथवा साम्राज्य प्रबळ झालेच असते. २. औरंगजेबापासुन किंवा त्याने भारतीय वंशाच्या लोकांचे राज्य ( मुसलमान अथवा हिंदु) असे स्थापन करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इराणच्या शहाशी त्याला सतत झगडावे लागले. ३. प्रचंड अंतर्विरोध : एकीकडे इस्लामचे राज्य स्थापायचे आणि दुसरीकडे कुतुबशहा, अदिलशहा इत्यादींना अदिलखान, कुतुबखान असे संबोधायचे, दुसरीकडे ही राज्य बळकावयची त्यासाठी भले परत हिंदुचे साह्य घ्यायचे. शहाजहानला कैद करायचे मात्र त्याला न मारता जीवंत ठेवायचे, दाराभाई, शुजा अणि मुराद यांची वाट लावायची, एकीकडे विस्तीर्ण साम्राज्य निर्मायचे आणि आपण मात्र काटकसरीने रहायचे. असो. एकदा काय झाले की औरंगजेबाला संगिताचे प्रचंड वावडे होते, तेंव्हा एका रात्री त्याला संगिता-वाद्यासह एक मिरवणुक जातांना दिसली, त्याने विचारले क्या जा रहा है, - त्याला सांगितले की संगितका जनाजा जा रहा है - अच्छा है- ऐसा दफनाओ की फिर बाहर कभी ना आये - सत्यस्थिती - आजही त्याच्या कबरीवर त्याच्या मृत्युतीथीला रात्र भर कवाली आणि भजनाचा कार्यक्रम होत असतो.

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 15:46
( शिवाजी नसता तरी) हिंदुंचे सरदार अथवा साम्राज्य प्रबळ झालेच असते. अरे वा.. हे नवे संशोधन.... आजही त्याच्या कबरीवर त्याच्या मृत्युतीथीला रात्र भर कवाली आणि भजनाचा कार्यक्रम होत असतो. यालाच मेलेल्याला मारणे म्हणतात का?

In reply to by विजुभाऊ

कलंत्री Tue, 04/29/2008 - 15:40
विजुभाऊ, अहो, ३२ % सरदार आज नाही तर उद्या प्रबळः झाल्याशिवाय राहिले असते काय? त्यात संशोधनाची आवश्यकता आहे काय? औरंगजेब आणि संगीत हेही एक वास्तव आहे. शिवाजीचे मोठेपण मान्य आहेच पण त्याबरोबरही हिंदुचे असंख्य प्रयत्न चालु होते हे मान्य करायला काय हरकत आहे? माझ्या मते कोणताही विचार कोणताही ग्रह न ठेवता केला पाहिजे. कलंत्री

sandeshmule Tue, 09/12/2017 - 00:47
१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या ! येथे जन्मवर्ष १५९८ आहे. १६९८ नव्हे. चूक दुरुस्त करावी.

पिनाक Tue, 09/12/2017 - 05:00
औरंगजेबाला असं दाखवणं हा ब्राह्मणी कावा आहे. खरा औरंगजेब हा महाराजांना सन्मान देणारा हुशार सम्राट होता. पाच हजारी मनसब दारी हा त्याचा पुरावा आहे. ब्राम्हणांनी औरंगजेबाला हिंदुविरोधी आणि म्हणून महाराजांना मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी या अफवा फैलावल्या. जहरी मनुवृत्ती च्या लोकांनी औरंगजेबाला नाहक बदनाम केले.

ध्रुव Wed, 04/23/2008 - 15:51
अत्यंत सुरेख माहितीपुर्ण लेख. असेच लेख लिहीत राहा. - ध्रुव

भडकमकर मास्तर Wed, 04/23/2008 - 17:00
लेख खूप छान आहे.... तुमच्या अभ्यासाला सलाम.... मला वाटते, त्या काळात भावाभावांनी सत्ता काबीज करायसाठी लढायची पद्धत असावी... म्हणजे औरन्गजेबाने इतरांना मारले नसते तर त्याला कोणीतरी दुसर्‍या भावाने मारले असते आणि त्याचे प्रेत दिल्लीभर फिरले असते...असो... (हा आपला आमचा अन्दाज....त्याचे भाऊ कितपत प्रेमळ वगैरे होते ते ठाऊक नाही मला...) मूळ लेखाची लिन्क शोधून काढली...ही घ्या लिन्क.... http://www.loksatta.com/daily/20070107/mp07.htm .... हाही लेख माहितीपूर्ण वाटला....या लेखात मला तरी आक्षेपार्ह काही दिसले नाही...किंवा औरन्गजेबाचे वृथा कौतुक आहे असेही वाटले नाही.... ..

धमाल मुलगा Wed, 04/23/2008 - 17:28
छान ! आनंद वाटला... 'दै. लोकसत्ता' चे अभिनंदन. श्री.भूषण देशमुखांना शतशः आभार! हे..हे असले 'भूषण' देशमुखीला आहेत म्हणूनच आमच्या माना खाली जातात. मात्र देशमुख तसे इमानदार हं सप्रेसाहेब, खाल्या मिठाला जागणारे! सगळ्या पिढ्या औरंग्याची थुंकी झेलून देशमुखी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात कार्यरत राहिल्या असतील तर होणारे संस्कार ही असेच उच्चकोटीचे असतात..ही गोष्ट तुमच्यासारख्या ईतिहासाच्या अभ्यासकाला कळू नये? त्यातून स्वराज्याच्या छाताडावर नाचण्यासाठी मराठी साम्राज्याविरुध्द भडवेगिरी करायची मराठी माणसाची खोड काही नविन नाही हो!
१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या ! त्यांची ४०९ वी जयंती असा लेख काही लोकसत्ता मधे वाचायला जास्त आवडले असते !
कोण ही बाई? कोणाबद्दल बोलताय? अच्छा अच्छा..उस बेमुर्व्वत दख्खन के चुहे की माँ ! बरं मग? त्यांचा काय संबंध? त्या कुठे शाही घराण्यात जन्माला आल्या? त्या कुठे 'पातशाही'च्या म्हणजेच 'अल्लाहच्या मानवी रुपाच्या' मातोश्री होत? वेडे आहात...आपण मरहट्ट्यांनी फक्त दिल्लीच्या दिशेला तोंड करुन गुढघे टेकून सज़दे करायचे असतात... दर काही वर्षांनी आपल्या आई भवानीनं छिन्नी-हातोड्यांचे घाव सोसायचे असतात, जेजुरीच्या खंडेरायानं तोंड लपवून कडेपठारावर पळून जायचं असतं आणि आपल्यासारख्यांनी एकतर 'हे सगळं घडतंय, पण माझी तुंबडी भरतेय' म्हणून जल्लोष करायचा असतो किंवा हिजड्यासारखं हातात कांकणं भरून जोरजोरात छाती बडवत फिरायचं असतं ! मान मिळवायचा तर त्याला पातशाहीचे पाईक असणं मोठ्या गरजेचं असतं. उगाच स्वराज्य, मराठी अस्मिता वगैरे दळभद्री कल्पना डोक्यात ठेऊन भिकेचे डोहाळेच फक्त लागू शकतात. आजही महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्यावर कडक ऊन्हाच्या तिरिपी येत असतात, पण म्हराठी स्वराज्यावर पाशवी बलात्कार करणारा हरामजादा अफजल्या मात्र प्रतापगडावरच्या प्रशस्त आलिशान मशीदीतल्या कबरीत उदा-धूपाच्या दरवळात राजेशाही थाटात लोळत असतो....तिथे ह्या बातमीची ती काय मातब्बरी? थू:! त्या मुघली अंमलात अजुनही तरंगणार्‍या हिणकसांच्या जिन्दगानीवर ! आज...गेल्या सत्तावीस वर्षांत आज पहिल्यांदा मला स्वतःच्या देशमुख असण्याची लाज वाटतीये. -(हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणार्‍या, घरादारावर तुळशीपत्र ठेऊन औरंगजेबादि दुश्मनांशी लढणार्‍या खर्‍याखुर्‍या देशमुखांचा वारस) ध मा ल.

अजय Wed, 04/23/2008 - 19:25
औरंगजेबावर लिहिलेले छानच आहे. ज्या त्वेषाने लिहिले आहे. त्यातून तुम्हाला वाटणारी कळकळ दिसते. मुळ मुद्दा आहे, तो बातमीचा. औरंगजेबाच्या मृत्यूला 300 वर्षे पूर्ण होतात, यात बातमी आहे. म्हणून बातमी (लेख स्वरूपात) आहे. केवळ अशी बातमी लिहीली, त्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नसूनही बातमी लिहिणारा व्यक्ती नालायक आणि छापणारा पेपरही? यामागचं आपलं तर्कशास्त्र कळत नाही. भडकमकरांनी त्या बातमीची लिंक दिली त्याबद्दल धन्यवाद. नेमके काय आहे. ते कळले तरी. आता ज्याला तुम्ही तीन आठवड्यांचे संशोधन म्हणतात, त्याला काय आधार आहे ते तुमच्या अपार देशभक्तीने भारलेल्या लेखात कुठेही दिसत नाही. निदान संदर्भाचा उल्लेख करावा. ऐतिहासिक कादंबऱ्यांचा नको. त्यातून माझ्या मनातल्या काही शंकाचे निरसन होईल. 1) औरंगाजेब क्रुर होताच. यात शंका नाही. तो हुशारही तितकाच होता. त्याला आपले राज्य कसे चालवावे आणि कशा पद्धतीने हे नक्कीच कळत होते. जरा या संशोधनातून हेही स्पष्ट करा, की ज्या सख्या भावाला आईवडिलांचे, सैनिकांचे संरक्षण आहे, त्याला ठार करून त्याच्या मृतदेहाची विटंबना करायला न चुकणारा औरंगजेब, हात आलेल्या शिवाजींना बराच काळ जिवंत ठेवतो कसा? कैदेतील काळात त्याला हे करणे सहज शक्‍य होते. शिवाजी महाराजांना दिल्लीत नेताना मिर्झाराजे जयसिंग आणि त्यांचा मुलगा रामसिंग यांनी शब्द दिला होता. त्यांचा शब्द वाया गेला असता तर राजपूत दिल्ली सल्तनतीच्या विरोधात गेले असते. राजकारणातील डोकेदुखी वाढली असती, राजपुतान्यात आणि महाराष्ट्रात मोठा लोकक्षोभ उसळला असता म्हणून त्याने असे केले नाही, हे गृहीत धरले. तरीही औरंगजेबाचा स्वभाव पाहता त्याने एवढा वेळकाढू पणा का केला. (तेव्हा तो तसे करू शकला नाही, म्हणूनच तर आज आपण हे दिवस पाहतो आहोत, हे खरेच!) 2) तो फक्त इस्लामचा पाईक होता, दख्खनेतील मराठे त्याचे तीव्र शत्रू होते. हे मान्य केले तर तो आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाहीच्या मागे का लागला होता? (फक्त इस्लामप्रेमासाठीच की राज्यविस्तारासाठी?) 3) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने राजा म्हणून आपल्या कट्टर शत्रूला मान्यता का दिली? या तीनही प्रश्‍नांची वस्तुनिष्ठ उत्तरे मिळतील. पुन्हा आपण बातमी का दिली किंवा लेख का छापला त्याकडे वळू या. भूषण देशमुखांनी जो काही मजकूर लिहिला, त्यात ""जगातील एका मोठ्या साम्राज्याचा प्रमुख असलेल्या बादशाहची नगरच्या भूमीत अशी अखेर झाली'' (संदर्भ- लोकसत्ता लिंक. शेवटची ओळ) हे वगळता औरंगाजेबाचे उदात्तीकरण होईल, असे काहीही लिहीलेले नाही. तरीही तुम्ही जोरदार संशोधन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र तुमच्या संशोधनपर मजकूरात - "अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !" ही वाक्‍ये आहेत. तो निष्कर्ष अभ्यासपूर्ण संशोधनाअंतीच आहे? उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे. माझी ही प्रतिक्रीया तुम्हाला डिवचण्यासाठी नक्कीच नाही, हे तुम्ही समजून घ्याल. कारण, एवढे मोठे साम्राज्य, विश्‍वासघाताची घरण्यात रुजलेली परंपरा त्याच पद्धतीने मोडीत काढून, समर्थपणे सांभाळणारा. दिल्लीचा कारभार दक्षिणेत येऊनही तेवढ्याच तडफेने प्रशासन व युद्धमोहीम सांभाळणारा औरंगजेब (शिवरायांच्या विरोधात असला तरीही) काही अंशी तरी महान असेलच ना. त्यातूनच तुम्ही "ती' वाक्‍ये लिहिली असावीत.

In reply to by अजय

उदय सप्रे Wed, 04/23/2008 - 21:40
अजय साहेब, लेख पुन्हा एकदा वाचा ! औरंगझेबावर लिहिले म्हणून लिहिणारा नालायक किंवा पेपरही असे मी कुठेही म्हटलेले नाही.हे तुमचे विधान आहे. माझे म्हणनी इतकेच की फक्त अल्पसंख्यांकांचेच लेख का छापता? जानेवारीतच शहाजी महाराजा>चा अंत झाला, त्याविषयी काही लिहिलेत का?जिजाऊ मॉसाहेबांच्या जन्माबध्दल काही लिहिलेत का? आता तुमच्या दुसर्‍या मुद्द्याकडे वळूया : संदर्भ : हे काही ऐतिहासिक पुस्तक किंवा कादंबरी नव्हे की जिथे सगळे संदर्भ देणे शक्य होईल.तरी तुम्हाला सांगतो : काका विधाते यांचे दर्यादिल पासून ते पवार यांचे "संभाजी-एक विवाद्य व्यक्तिमत्व पर्यंत सगळी ऐतिहासिक पुस्तकी यात येतात्.किती नावे लिहू? तुमच्या ३ प्रश्नांची उत्तरे: १.औरंगजेबाचा स्वभाव पाहता त्याने एवढा वेळकाढू पणा का केला. (तेव्हा तो तसे करू शकला नाही, म्हणूनच तर आज आपण हे दिवस पाहतो आहोत, हे खरेच!) : औरंगझेब उतावळा नव्हता , महाराजांना पण एका कोठीत दुसर्‍या दिवशी नेऊन ठार करायचाच त्याचा बेत होता, पण महाराज त्याच्यापेक्षा हुशार निघाले आणि म्हणून आपण आज हे दिवस पहातो आहे ! औरंगझेबच्या वेळकाढू धोरणाने नव्हे ! रा़जपुतांच्या उठावाला घाबरून नव्हे तर महाराष्ट्रात असलेल्या जयसिंग आणि मुघल सैन्याचे डावपेच , विजापूर जिंकण्याचे केलेले डावपेच फुकट जातील म्हणून तो दमाने घेत होता.तसेच जयसिंगाने महाराजांना काय काय वचने दिली आहेत याची खातरजमा करत होता ! 2) तो फक्त इस्लामचा पाईक होता, दख्खनेतील मराठे त्याचे तीव्र शत्रू होते. हे मान्य केले तर तो आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाहीच्या मागे का लागला होता? (फक्त इस्लामप्रेमासाठीच की राज्यविस्तारासाठी?) अर्थातच राज्यविस्तार प्रथम पण त्यातही अखिल हिंदुस्थानात इस्लाम बघण्याचे स्वप्न बघणारा तो एक वेडा पीर होता हे जगजाहीर आहे ! 3) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने राजा म्हणून आपल्या कट्टर शत्रूला मान्यता का दिली? तुम्ही इतिहासात हे कुठे वाचलेत ते मला माहित नाही की त्याने मान्यता दिली.उलट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने आकांड्तांडव केले होते हा इतिहास आहे ! राजा म्हणुन त्याने फक्त एकदाच महाराजांना वस्त्र पाठविली पण ती ही राजकारणी बनूनच ! तो काही कुणी संत नव्हता ! औरंगझेब महान नक्कीच नव्हता ! एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ! नाहीतर एव्हढे ऐश्वर्य असूनही, त्याच्या पदरी शूर लोक असूनही त्याला व्यवस्थित राज्य शकट हाकता आला नाही हे सत्य आहे ! उत्तरेमधे मुघलांचे मिंधे असलेले राजपुत यांना संभाजी महाराजांनी खूप जागविण्याचा प्रयत्न करेस्तोवर कुणीही विरोधक त्याला नव्हता , यातही त्याचे ५० वर्षे राज्य टिकण्याचे गुपीत आहे ! दक्षिणेत नंतर आदिलशाही आणि कुतुबशाही विलासात मग्न होती. जी शांतता अकबराने त्याच्या काळात आणली, ती या मूर्खाला आणता आली नाही हे सत्य आहे ! अन्यथा अकबराच्या दसपट त्याला यश निश्चित मिळाले असतेच आणि तो जर राज्यावर न येता दारा शोकोह आला असता , तर महाराजांनी मुघलांची खोड कधीच काढली नसती ! "राज्य" वाढविणे ते पण दिखाव्यासाठी हा महाराजांचा कधीच हेतू नव्हता.आंधळ्या धर्मप्रेमाने या औरंगझेबाने जर का सामान्य रयतेला गांजले नसते (यात लेखात लिहिल्याप्रमाणे हिंदुस्थानातील मुसलमान पण आले !) तर महाराज त्याच्या वाटे कधीही गेले नसते.महराश्ट्राबाहेर फार तर दक्षिणेत कर्नाटकात आणि भागानगरात (आजचे आंध्र) त्यांने विस्तार केला असता ! उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे.हे मलाही माहित नाही , पण या अशा उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे.त्यांनी माझ्या लेखाला चंगले म्हटले आहे म्हणून असे लिहिण्यएव्हढा मी लहान नाही हे तुमच्याही लक्षात आले असेलच. तुमची ही प्रतिक्रीया मला डिवचण्यासाठी नक्कीच नाही , पण बुध्दीजीवी म्हणवणार्‍या तुमच्या सारख्या काही लोकांमुळेच तर मणीशंकर अय्यर सारखे मंत्री सावरकरांची प्रतिमा डागाळतात.तुम्ही लोकसत्ता चा वृथा उदो उदो करताय ! मी ही त्यांना वाईट म्हटलेले नाही , फक्त आपल्या माणसांचे का कौतुक त्यांना नसावे हामाझा प्रामाणइक प्रश्न आहे. मी लेखात लिहिलेच आहे योग्य माणसांचे कौतुक करावे , औरंगझेबासारख्या नालायक माणसाचे आपण कौतुक करतो आणि म्हणूनच तर दिल्लीत त्याच्या नावे रस्ते आहेत ना? असो, मी ही कुठल्याही आकसाने लिहिले नाहिये हे तुम्हालाहे कळले आहे यात सर्व आले, पण आपलं तर्कशास्त्र कळत नाही. भडकमकरांनी त्या बातमीची लिंक दिली त्याबद्दल धन्यवाद. नेमके काय आहे. ते कळले तरी. आता ज्याला तुम्ही तीन आठवड्यांचे संशोधन म्हणतात, त्याला काय आधार आहे ते तुमच्या अपार देशभक्तीने भारलेल्या लेखात कुठेही दिसत नाही. ही तुमची वा़क्ये इतकी उपहासात्मक वाट्तात , आणि हे काम बुध्दीजीवी लोक फारच छान करतात , आपण काही लिहायचे व करायचे नाही आणि इतर कुणी लिहिले की त्याला उपहासात्मक बोलून बेजार करायचे.लेख पुन्हा एकदा शांत चित्ताने वाचा अशी विनंती आहे माझी तुम्हाला ! जमल्यास माझ्या पुढील २ ब्लॉग्ज ला भेट देवून बघा , त्यात बर्‍याच कविता आणि लेख आहेत. उदय सप्रे कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ आणि कवितांजली :

In reply to by उदय सप्रे

मदनबाण गुरुवार, 04/24/2008 - 13:42
माझे म्हणनी इतकेच की फक्त अल्पसंख्यांकांचेच लेख का छापता? एकदम बरोबर ..... (अवांतर :--पण खरच हे लोक अल्पसंख्यांक आहेत का ?) औरंगझेब महान नक्कीच नव्हता ! एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ! एकदम मान्य..... उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे. व्वा,,,,, मनातल बोललात बघा. पण बुध्दीजीवी म्हणवणार्‍या तुमच्या सारख्या काही लोकांमुळेच तर मणीशंकर अय्यर सारखे मंत्री सावरकरांची प्रतिमा डागाळतात. या अय्यर च्या xxxxx,,,,, मायला हे हे असे आमचे नेते?????,,,,,कुठे जातात अशा वेळी हिंदूत्ववादी लोक????? ह्या अशा राजकारणी लोकांपेक्शा हिजडे बरे हो !!!!! ते निदान फक्त ठरलेल्या दिवशीच पैसे गोळा करतात !!!!! कोलू पिसुन दाखवा एक दिवस तरी..... मग कळेल अंदमान म्हणजे काय!!!!! (कट्टर संभाजी व सावरकर प्रेमी )

डॉ.प्रसाद दाढे Wed, 04/23/2008 - 19:39
दिल्लीत तर और॑गझेबाच्या नावाने एक रस्तासुद्धा आहे..आणि महाराष्ट्रातही त्याच्या नावाने शहर आहेच ज्याला 'स॑भाजीनगर' कोणीही म्हणायला तयार नाही (कारण ते शिवसेनेने दिले आहे..) सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.. अरसिकेषू कवित्व निवेदन॑ शिरसि मा लिख मा लिख मा लिख.. उदय सप्रे या॑नी अतिशय परिश्रमपूर्वक लेख लिहिला आहे..त्या॑च्या मेहेनतीला आमचा मुजरा.. अवा॑तर: उत्सूक वाचका॑नी रवि गोडबोलेकृत 'और॑गझेबः शक्यता व शोका॑तिका' (रा.ज.देशमुख प्रकाशन) हे उत्कृष्ट पुस्तक वाचावे. गोडबोले या॑नी ते पुस्तक (प्रयत्नपूर्वक) तटस्थ दृष्टिकोनातून व कुठल्याही अभिनिवेशाशिवाय लिहिले आहे (त्यामुळे हि॑दूत्ववाद्या॑च्या विरोधका॑नीही ते वाचायला हरकत नाही

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

एक Wed, 04/23/2008 - 23:25
"..सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.. अरसिकेषू कवित्व निवेदन॑ शिरसि मा लिख मा लिख मा लिख.." अत्यंत खरं आहे..असा लेख पुन्हा कधीही कुठल्याही मराठी संस्थळांवर लिहू नका ही नम्र विनंती आहे.. इथले बरेचसे स्वघोषित इतिहास संशोधक, बुद्धीजीवी, कातडी सोलायला येतील. ही लोकं भावना बघणार नाहीत पण निट्-पिकर सारखे तुमचेच दोष दाखवायला सुरूवात करतील. उदय तुमचा लेख आवडला.धमाल मुलाचा प्रतिसाद पण आवडला.

परीचा परा Wed, 04/23/2008 - 21:03
डॉक्टरसाहेब एकदम सोळा आणे खरे बोललात. "सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.." अहो कसल्या त्या औरंग्यावर लेख लिहिता? मराठी मातीचे हे दुर्दैवच आहे की आपल्या निष्ठा ह्या मराठी मातीपेक्षा दुसर्‍यांच्याच चरणी जास्त वाहिल्या जातात एकीकडे प्राण गेला तरी तत्त्वासाठी कोणतीही तडजोड न करणारी छत्रपती संभाजीराजांसारखे छावे ह्याच भूमीत जन्माला येतात. आणि त्याच मातीत खंडोजी खोपडे सारखे गद्दारही पैदा होतात.आर्थात शिवाजी महाराजांनी मात्र खंडोजी खोपड्याचा १ हात आणि १ पाय कलम करुन त्याला अद्दल घडवली. पण आज महाराजांचा वारसा कोण चालवणार? इथे आपलाच मराठी बांधव एकमेकांचे पाय ओढतोय आणि आपल्याच मायभूमीत परप्रांतीय लोक दमबाजी करुन करोडपती होत आहेत आज एक तरी मराठी माणूस मोठा बिल्डर आहे काय? सगळे सिंधी, मारवाडी आणि उत्तरेतलेच लोक आहेत ना? त्या 'राज' ने त्या उत्तरभारतीयांना चोप देऊन लई भारी काम केले. परत मराठी माणसाच्या वाटेला जायची हिम्मत कोणी करणार नाही शिपुर्डे... 'उदय सप्रे' लगे रहो.. तुमच्याबरोबर मोठी मावळ्यांची फौज आहे .... चिंता नको.... महाराजांनी निर्माण केलेल्या मराठी साम्राज्याची चाके एवढी तकलादू नाहियेत.आजदेखील महाराजांनी पेटवलेले मराठी स्फुल्लिंग असंख्य मराठी मनांमधून धगधगत आहे. आणि अजय साहेब.... माफ करा पण म.टा.चा जो लेख मी वाचला त्याच्या लेखक महाशयांनीदेखील त्यांच्या लेखात कसलेही पुरावे दिलेले नाहीयेत एक कुराणाची प्रत आजही उपलब्ध आहे त्याव्यतिरिक्त. तेव्हा उदय सप्रेंसारख्या कडव्या शिवभक्ताला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तर ती छत्रपतींच्या पायाची एक छोटीसी सेवा होईल असे आम्हास वाटते. बाकी महाराजांच्या अनेक पत्रांत महाराजांनी लिहिले आहे की सुज्ञांस अजून काय सांगणे.... तेव्हा आम्ही थांबावे हे बरे जय भवानी जय शिवाजी..... {परीच्या प्रतिक्षेत} परा ....

शितल गुरुवार, 04/24/2008 - 01:22
तुमच्या अभ्यास पुर्वक लेख वाचुन मन एकदम सुन्न झाले. तुम्ही असेच लिहा आम्हाला वाचायला आवडेल.

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/24/2008 - 01:42
लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही ! सनातन प्रभात हे इतरांप्रमाणेच ( सामना / लोकसत्ता )वृत्तपत्र आहे का ? ...

पान्डू हवालदार गुरुवार, 04/24/2008 - 02:01
उदय साहेब लेख अवड्ला पण पटला नाही. मुळ लोकसत्ता लेखात फक्त ईतिहास सन्गितला आहे , औरंगझेबा ची तरिफ केलेलि नाही.

In reply to by पान्डू हवालदार

उदय सप्रे गुरुवार, 04/24/2008 - 08:54
पान्डू हवालदार साहेब, मुळात "अशा या नराधमाची बातमी पहिल्या पानावर येते आणि आपल्या जिजाऊंच्या जन्मतारखेवर किंवा शहाजी महाराजांच्या त्याच (जानेवारी) महिन्यातील निर्वाणावरून त्यांना मानाचा मुजरा देणारा लेख हेच वॄत्तपत्र पहिल्या पानावर देऊ शकत नाही " यापेक्षा वेगळी तारीफ आणि कोणती असेल? देशाच्या सीमेवर आपले प्राण खर्ची घालून आपल्यासारख्या तमाम सिव्हिलियन्सना शांतपणे झोपता यावं यासाठी झटणार्‍या सैनिकांऐवजी पहिल्या पानावर सलमान खान आणि संजय दत्त यांच्यावरील कारवाया या बातम्या येतात , त्यात त्यांचं अवास्तव महत्व वाढतं असं आपलं माझ्या अल्पबुध्दीला वाटलं ! वास्तवाचं भान न ठेवून आपण पेपर वाचतो आणि त्यामुळेच असले पोटार्थी पेपर्स खपतात हे एक विदारक सत्य स्वीकारलंय आम्ही साहेब ! मी प्रामाणिकपणे लिहिलंय , सगळ्यांनाच माझी मते पटावीत असा आग्रह धरणारा मी कोण? पुढील दोन वर्षे पुरतील असे लेख माझ्या पोतडीत आहेत , पण सत्य ऐकायचे असेल तर ऐका, म.टा. वाले म्हणाले की "ऐतिहासिक" विषय आमच्याकडे कॉलम नसतो , ते आमचे धोरण (स्ट्रॅटेजी!) नाही. आता बोला राव ! असो, राग नाही , आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही , हीच जर का शिक्षणाची देणगी असेल तर मी स्वतःला अशिक्षित म्हणवून घेणंच जास्त पसंद करीन ! आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ! नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं ! आपण फक्त आपली खळगी कशी भरेल हे पहातो हे दुर्दैव आहे ! योग्य माणसांचे कौतुक करा - आम्ही औरंगझेबासारखे धर्मांध नाही ! पण नीचांचे कौतुक कराल तर मी असे वारंवार लिहिणारच ! राग नसावा साहेब , काहीही झाले तरी तुम्ही एक "भारतीय" आहात आणि म्हणून माझे बांधव आहात हे मी कधीही विसरणार नाही , मग तुम्ही हइंदू असा वा ज्यू ! उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 10:49
श्री. उदय सप्रे, आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? समाजातल्या किती अनिष्ट गोष्टींनी पेटून उठावे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का? तुम्ही तरी घातला आहे का? वृत्तपत्रावर, वाहिन्यांवर, रेडीओवर बहिष्कार घाला, शक्य आहे का ते? हीच जर का शिक्षणाची देणगी असेल तर मी स्वतःला अशिक्षित म्हणवून घेणंच जास्त पसंद करीन! शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते? तुम्हाला जे इतिहास प्रेम मिळाले आहे ते शिक्षणातूनच मिळाले आहे नं? जे नोकरी-धंद्यासाठी आवश्यक असे ज्ञान आहे ते शिक्षणानेच दिले आहे नं? ज्या ज्ञानाच्या जोरावर आज तुम्ही आम्ही पैसे कमवून टॅक्स भरतो आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावतो ती शिक्षणाचीच देणगी असते नं? आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ! बरे झाले हे वास्तव आपण सुवाच्य भाषेत आमच्या लक्षात आणून दिलेत. उद्याच बाजारात कुठे एखादी तलवार मिळते का ते पाहतो आणि कापूनच काढतो त्या वृत्तपत्रवाल्यांना ज्यांनी तुमचे लेख छापले नाहीत. नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं आजच्या 'अफजल्'च्या जिवंत असण्याला आणि कलाम साहेबांच्या राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवरून पायउतार होण्याला मराठी GXXX फाटूपणा कारणीभूत आहे असा जावईशोध आपण कसा लावलात? पण फक्त आपली खळगी कशी भरेल हे पहातो हे दुर्दैव आहे हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला निष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही. योग्य माणसांचे कौतुक करा - आम्ही औरंगझेबासारखे धर्मांध नाही! हल्ली धर्मांधपणा फक्त मुसलमानांमध्येच राहिलेला नाही ख्रिश्चन समाजातही आहे आणि दुर्दैवाने राजकारण्यांनी तो हिंदूंमध्येही पसरवला आहे. पण नीचांचे कौतुक कराल तर मी असे वारंवार लिहिणारच ! लिहीत राहा. आम्ही वाचत राहू. पण एकटा औरंगझेब नीच होता अशा भावनेत लिहू नका. आपल्या सामजात बलात्कार करणारे आहेत. खून करणारे आहेत, खेडोपाडी वीज पोहोचली नसताना मुलाच्या लग्नात आठवडा आठवडा भपकेबाज रोषणाई करणारे मुख्यमंत्री आहेत, अन्नधान्याची साठेबाजी करणारे आहेत, संरक्षण खात्यात भ्रष्टाचार करणारे आहेत, नकली डॉक्टर्स आहेत, नकली औषधे बनविणारे आहेत, नकली दूध बनविणारे आहेत, सलमान खान सारखे मद्यधुंद अवस्थेत पदपथावरील माणसांना मारून पैशाच्या जोरावर सुटनारे आहेत, बॉम्बस्फोट घडविणारे आहेत, कच्चे बांधकाम करून लोकांच्या जीवाशी खेळणारे बिल्डर्स आहेत, राजकारण्यांबद्दल तर लिहायलाच नको. हे सर्व नीच आहेत हे विसरू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

उदय सप्रे गुरुवार, 04/24/2008 - 11:02
पेठकर साहेब , एकूणच आपण लिहिलेल्या सगळ्या प्रतिसादामधे तुम्ही मला माझी "जागा" दाखविण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. मी काय काय जावई शोध लावले यापेक्षा ही जास्त , "तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का?" हा तुमचा "सासरेबुवा" शोध फारच मनोरंजक आणि अगदीच बाळबोध वाटतो आहे ! असो, माझ्याच तोंडून ऐकायचे हौस असेल तर ऐका , मी अगदे स्वच्छ मनाने कबूल करतो की आपण माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत महान आहात ! आपण जिथे आहात तिथे रहा आणि मला पण माझ्या लहान पणातच राहु द्या ही विनंती ! बाकी तुमची पुधील विधाने पण फारच करमणूक करून गेली : बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? असे लिहिणार्‍याच्या विरोधात लिहीत सुटावे ! शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते? तुम्हाला जे इतिहास प्रेम मिळाले आहे ते शिक्षणातूनच मिळाले आहे नं? जे नोकरी-धंद्यासाठी आवश्यक असे ज्ञान आहे ते शिक्षणानेच दिले आहे नं? ज्या ज्ञानाच्या जोरावर आज तुम्ही आम्ही पैसे कमवून टॅक्स भरतो आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावतो ती शिक्षणाचीच देणगी असते नं? नकीच नाही , आपण त्यातून काय ते घ्यायचे असते , शिक्षण काहीच देत नाहे - जर का घेणारा डोळे मिटून बसला तर ! आणि मला वाटते जागे असून झोपेचे सोंग घेणार्‍या काही लोकांना कसे जागे करणार हो? हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला नष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आजचा सर्वसामान्य समाज आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही. मग काय अशा लेखांवरती प्रतिक्रिया देऊन तो विचारवंत ठरतो का? आपण तर फारच थोर विचारवंत आहात ! लिहीत राहा. आम्ही वाचत राहू. पण एकटा औरंगझेब नीच होता अशा भावनेत लिहू नका. साहेब, एकटा औरंबझेब नीच होता अशा भावनेतून ते लिहिलेलेच नाहिये, असे इतर कुणीही त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलेले नाही ! लेख पुन्हा एकदा वाचा - त्याची सुरुवातच मुळी औरंगझेबाच्या सद्गुणांपासून केली नाहिये का? पण मुद्दा असा आहे की - त्याचे कौतुक तुम्हाला दिसले नाही पण नीच्पणा दाखवून दिला तो मात्र इतका झोंबला की तुम्ही अगदी रस्त्यावर मारामारी करणार्‍या मुलांप्रमाणे आमच्यावर चिखलफेक केलीत ! असो , तुमच्यासारर्खे विचारवंत आणि कुणी न भेटोत ही ईश्वर चरणी प्रार्थना !

In reply to by उदय सप्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 12:45
आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही ह्या वाक्याने तथाकथित सर्व बुद्धीजीवींना हिणवले आहे. एवढे करून बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? ह्या माझ्या प्रश्नाला बगल दिली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का? हा माझा वास्तवाला धरून विचारलेला प्रश्न तुम्हाला खटकलेला दिसतो आहे. त्याच प्रमाणे आपण सर्व बुद्धीजीवी पेटून उठत नाही ह्या तुमच्या विधानात तुम्ही तुमच्या प्रमाणे मलाही गोवलेत हे मलाही खटकले. पेटून उठणे म्हणजे काय? तुम्ही नक्की काय करता? ह्यावर दोन शब्द लिहिले असतेत तर ते समर्पक उत्तर झाले असते. मी काय काय जावई शोध लावले यापेक्षा ही जास्त , "तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का?" हा तुमचा "सासरेबुवा" शोध फारच मनोरंजक आणि अगदीच बाळबोध वाटतो आहे ! मनोरंजक वाटला असेल तर माझा काहीच आक्षेप नाही पण बाळबोध म्हणणे म्हणजे आपला चडफडट नक्की कशाने झाला आहे ह्याचे त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून परिक्षण न करणे आहे. असे परिक्षण करायला मनाची ताकद लागते. असो, माझ्याच तोंडून ऐकायचे हौस असेल तर ऐका , मी अगदे स्वच्छ मनाने कबूल करतो की आपण माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत महान आहात ! आपण जिथे आहात तिथे रहा आणि मला पण माझ्या लहान पणातच राहु द्या ही विनंती ! राग-राग, चीडचिड करणे सगळ्यात सोप्पे. मुद्देसूद प्रतिवाद करणे कठीण असते. पुन्ह औरंगझेब विषयाकडे वळून एकच सांगू इच्छितो की शत्रूच्या गुणांचेही मोठ्या मनाने कौतुक करावे. औरंगझेब क्रूर जरूर होता पण तुम्ही म्हणता तसा मूर्ख अजिबात नव्हता. असो. तुम्हाला तुमच्या मतांचा अधिकार आहे पण तसाच मलाही माझ्या मतांचा अधिकार आहे हे लक्षात असू द्या. उगीच सरसकट सर्व बुद्घीवाद्यांना झोडपायचा उद्योग करू नका. बाकी तुमची पुधील विधाने पण फारच करमणूक करून गेली : तुम्ही स्वतःची करमणूक कशी करून घ्यावी हे मी कोण सांगणार. आपण आपल्या विचारांचे स्वामी आहात. बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? असे लिहिणार्‍याच्या विरोधात लिहीत सुटावे ! विरोधात लिहिलेले नाही. फक्त 'मूर्ख' ह्या शब्दावर माझा अक्षेप होता आणि आहे. औरंगझेब एक सद्गुणी राजा होता असे विधान मी केले असते तर ते तुमच्या लिखाणाच्या विरोधात लिहिल्यासारखे झाले असते. शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते? नकीच नाही , आपण त्यातून काय ते घ्यायचे असते , शिक्षण काहीच देत नाहे - जर का घेणारा डोळे मिटून बसला तर ! आणि मला वाटते जागे असून झोपेचे सोंग घेणार्‍या काही लोकांना कसे जागे करणार हो? माझा प्रश्न हा तुमच्या बुद्धीजीवी पेटून उठत नाहीत तर शिक्षणाचा उपयोग काय? ह्या विचारांच्या संदर्भात आहे. झोपेचे सोंग घेण्याची मला गरज काय? तिरकस बोलण्यातूल तुम्हाला प्रचंड आनंद मिळवायचा असेल तर मिळवा बाबा! मी ,मुद्दा सोडून बोलणे भांडखोर पणाचे मानतो त्यामुळे मी मुद्दा सोडणार नाही. हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला नष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आजचा सर्वसामान्य समाज आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही. मग काय अशा लेखांवरती प्रतिक्रिया देऊन तो विचारवंत ठरतो का? आपण तर फारच थोर विचारवंत आहात ! मी उद्घृत केलेल्या एकाही समस्येवर उत्तर देणे दूरच राहो साधी सहमती दर्शविण्याचे सौजन्यही तुम्ही दाखवू शकला नाहीत. कसा वाद घालावा कोणी तुमच्याशी? साहेब, एकटा औरंबझेब नीच होता अशा भावनेतून ते लिहिलेलेच नाहिये, असे इतर कुणीही त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलेले नाही ! लेख पुन्हा एकदा वाचा - त्याची सुरुवातच मुळी औरंगझेबाच्या सद्गुणांपासून केली नाहिये का? पण मुद्दा असा आहे की - त्याचे कौतुक तुम्हाला दिसले नाही पण नीच्पणा दाखवून दिला तो मात्र इतका झोंबला की तुम्ही अगदी रस्त्यावर मारामारी करणार्‍या मुलांप्रमाणे आमच्यावर चिखलफेक केलीत ! तुमचा लेख आणि माझी त्यावरील प्रतिक्रिया तुम्हीच एकदा नीऽऽऽट वाचा. औरंगझेबाचा नीच पणा मला क्शला झोंबावा? तो काही माझा बाप नव्हे. पण शिवाजी महाराजांच्या तुल्यबळ शत्रूला सरसकट मूर्ख हे लेबल चिकटवलेत ते चूकीचे होते एवढेच दाखऊन देण्याचा प्रयत्न केला. आता तेही तुम्हाला झोंबेल ह्याची काय कल्पना? असो , तुमच्यासारर्खे विचारवंत आणि कुणी न भेटोत ही ईश्वर चरणी प्रार्थना ! हेच विचार वाचकांचेही लेखकाबद्दल असू शकतात हे कायम ध्यानात ठेवा.

विसोबा खेचर गुरुवार, 04/24/2008 - 08:19
यावर गुस्ताख औरंगझेब म्हणाला,"हत्तीसारख्या बलाढ्य जनावराशी लढताना मौत आली असती तरी त्यात नाचक्की कोणती होती?मोठमोठ्या शहा सुलतानांच्या आयुष्यावर मृत्यू अचानक पडदा टाकतो.मृत्यूत नाचक्की कसली?त्यात लांज वाटायचं काय कारण? क्या बात है! हे आवडलं...! सप्रेसाहेब, तुमच्या अभ्यासपूर्ण लेखाला सलाम! औरंग्या होताच मुळी कपटी आणि क्रूर! तात्या.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 09:49
लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली . त्यांच्या दूसर्‍या विधानातील मूर्ख ह्या शब्दावर माझा आक्षेप आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. औरंगझेब क्रुर असेल, धर्मांध असेल, नव्हे होताच, पण मूर्ख खचितच नव्हता. एवढे मोठे साम्राज्य उभारायचे, सांभाळायचे, पदोपदी होणारी बंडाळी यशस्वी पणे मोडून काढायची. कानाकोपर्‍यातील बातम्या वेळ न दवडता मिळवायच्या, प्रतिस्पर्ध्याच्या संभाव्य चालींचा विचार करून आधीच रणनिती आखायची अशा अनेक गोष्टीत तो वाकबगार होता असे अनेकदा वाचनात आले आहे. फक्त त्याला कोणी विरोधक नव्हता म्हणून तो राज्य करू शकला हे विधान फारच भाबडेपणाचे वाटते. त्याचा कोणावरच विश्वास नव्हता. तत्कालीन सामाजिक, राजकिय आणि मुसलमान धर्मियांची वैचारीक बैठक बघता त्याचे वागणे अत्यंत चलाख राज्यकर्त्याचे होते. औरंगझेब दक्षिणेत सरदार म्हणून कारभार पाहत असताना जसे शहाजहानने औरंगझेबाच्या शिक्षणाच्या निमित्ताने एक मौलवी स्वतःचा हेर म्हणून त्याच्या बरोबर ठेवला होता तसेच औरंगझेबानेही शहाजहानच्या दरबारातील बित्तमबातमी मिळविण्यासाठी स्वतःच्या बहिणीलाच फितवून ठेवले होते. सत्तेसाठी भावाभावांमध्ये, बाप-लेकांमध्ये मारामर्‍या ही त्या काळातली, मुस्लीम घराणातली परंपरा होती. औरंगझेब मूर्ख असता तर तो गाफिल राहिला असता आणि त्याच्या भावांनीच त्याला ठार मारले असते. पण औरंगझेब मूर्ख नव्हता. शत्रू कितीही क्रूर, बलाढ्य असला तरी त्याला मूर्ख समजणे चूक होते. शत्रूची बलस्थानं आधीच ओळखून आपली रणनिती ठरवावी लागते. शिवाजी महाराजांना ह्या सर्व गोष्टींचा पुरेपुर अंदाज होता. अखिल हिन्दूस्थानात मुघल बादशहा औरंगझेब हाच एकमेव स्वराज्याचा बलाढ्य शत्रू आहे हे त्यांनी मनोमनी जाणले होते. खुद्द त्यांनीही औरंगझेबाला मूर्ख मानले नाही. असो. मी कोणी इतिहासकार नाही. ज्या काही ऐतिहासिक कादंबर्‍या वाचल्या आहेत त्यावरून माझी मते बनलेली आहेत.

उदय सप्रे गुरुवार, 04/24/2008 - 10:18
तुमच्या या वृत्तीला सलाम ! लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली . त्यांच्या दूसर्‍या विधानातील मूर्ख ह्या शब्दावर माझा आक्षेप आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. तुम्हाला औरंगझेब मूर्ख होता याचे एक मोठ्ठे उदाहरण देतोच आता : शायिस्तेखान पुण्यात उतरला होता त्याच वेळेस सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता.जर त्यावेळी औरंगझेबाने शायिस्तेखानाला सांगून विजापूरकरांशी संधान साधले असते , तर.....(असे लिहिताना पण मनाला असंख्य यातना होतायत , पण हे लॉजि़क आहे म्हणून लिहितोय, महाराज माफी असावी!).....तर "स्वराज्य" केवळ एका आठवड्यात संपले असते ! औरंगझेबाच्या जागी शहाजहान असता , तर त्याने नक्कीच ही संधी सोडली नसती , तो शासक होता आणि म्हणूनच त्याने विजापूरकरांशी संधान बांधून शहाजीराजांना माहुली गडावर कोंडून शरण आणले आणि कोवळ्या मुर्तुझा निजामाबरोबरच निजामशाही संपवली , हा इतिहास आहे.ज्या शासकाला या इतिहासापासून धडा घेता येत नाही तो मूर्ख नव्हे शतमूर्ख होय ! निव्वळ तैमूरलंगासारखे क्रूर असून भागत नाही , शासकाला थोर राजकारणी पण असावे लागते ! याबाबत विजापूरकरांना आणि निजामशाहीला जास्त गूण देता येतील ! कारण अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी पण बड्या साहेबीणीने फार दूरचे राजकारण साधले होते ! निजामशाह तर त्यापेक्षा एक पायरी वरचढ होता म्हणून तर मालोजी राजेंपासून ते शहाजी पर्यंत त्याने सर्वांना आपल्या पदराखाली ठेवले होते ना? इतिहास फक्त कादंबर्‍यात वाचायचा नसतो , आधी डोक्यात पण लॉजिक बसवावे लागते. आण्खीन एक उदाहरण औरंग्याच्या मूर्खपणाचे : कुतुबशाही विरुध्द लढताना ऐन युध्दात तो रणात नमाझ पढायला बसला होता , एक गोळा त्याच्या अंगरक्षकाला लागून तो ठार झाला , हे असे काही मूर्ख्पणाचे कॄत्य शिवाजी महाराजांनी केले असते कां? याचा विचार करा. ज्याला राज्य करावयाचे आहे त्याला "डोके" वापरावे लागते , जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तो शहाणा आणि जो इतरांचा चुकांमधून शिकतो तो चतुर आणि जो कुणाच्याच चुकांमधून काहीच न शिकता समोरचा कधी चूक करतोय ही वाट बघत बसतो आणि आपल्या माणसांनी अशा वेळी चूक केली तर त्यांना क्रूर पणे सझा देतो - स्वतःचे असलेले डोके वापरत नाही , तो मूर्खच नव्हे तर शतमूर्ख होय !हे सगळे गून (?) औरंगझेबाकडे होते ! असो, औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव !

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर गुरुवार, 04/24/2008 - 10:58
औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव ! सप्रेसाहेब, केवळ मुद्द्याने मुद्दा खोडून काढा. पेठकरसाहेबांवर व्यक्तिगत शेरे नकोत.. तात्या.

In reply to by उदय सप्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 11:30
लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली . आपण इतिहासकार आहात. मी कोण? एक अज्ञ वाचक. पण आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले. शायिस्तेखान पुण्यात उतरला होता त्याच वेळेस सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता.जर त्यावेळी औरंगझेबाने शायिस्तेखानाला सांगून विजापूरकरांशी संधान साधले असते , तर.....(असे लिहिताना पण मनाला असंख्य यातना होतायत , पण हे लॉजि़क आहे म्हणून लिहितोय, महाराज माफी असावी!).....तर "स्वराज्य" केवळ एका आठवड्यात संपले असते ! मानायला पाहिजे तुम्हाला. जे इतके वर्षांनी नुसती कागदपत्रे वाचून तुमच्या लक्षात आले ते काश्मिर ते महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत राज्य करणार्‍या आणि हाताशी अनेक मुत्सद्दी, विचारवंत असताना, प्रत्यक्ष परिस्थितीत असताना, प्रत्यक्ष राजकारण खेळताना औरंगझेबाच्या लक्षातच नाही आले. औरंगझेबाच्या जागी शहाजहान असता , तर त्याने नक्कीच ही संधी सोडली नसती , तो शासक होता आणि म्हणूनच त्याने विजापूरकरांशी संधान बांधून शहाजीराजांना माहुली गडावर कोंडून शरण आणले आणि कोवळ्या मुर्तुझा निजामाबरोबरच निजामशाही संपवली , हा इतिहास आहे.ज्या शासकाला या इतिहासापासून धडा घेता येत नाही तो मूर्ख नव्हे शतमूर्ख होय ! निव्वळ तैमूरलंगासारखे क्रूर असून भागत नाही , शासकाला थोर राजकारणी पण असावे लागते ! याबाबत विजापूरकरांना आणि निजामशाहीला जास्त गूण देता येतील ! म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का? म्हणून तर मालोजी राजेंपासून ते शहाजी पर्यंत त्याने सर्वांना आपल्या पदराखाली ठेवले होते ना? पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे. इतिहास फक्त कादंबर्‍यात वाचायचा नसतो , आधी डोक्यात पण लॉजिक बसवावे लागते. सप्रे साहेब आपण स्वयंघोषित इतिहासकार आहात. वाचकांच्या डोक्यात लॉजिक नसते तो फक्त एका लेखकाचेच विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका. नाहीतर एकदा बाबासाहेब पुरंदरे वाचल्यावर इनामदारांचे विचार वाचावेसे त्याला वाटणारच नाही. डायरेक्ट वाचकाच्या डोक्यावरच हल्ला केलात तर नाईलाजाने वाचकांनाही तुमच्या डोक्याबद्दल शंका येऊ शकते. आण्खीन एक उदाहरण औरंग्याच्या मूर्खपणाचे : कुतुबशाही विरुध्द लढताना ऐन युध्दात तो रणात नमाझ पढायला बसला होता , एक गोळा त्याच्या अंगरक्षकाला लागून तो ठार झाला , हे असे काही मूर्ख्पणाचे कॄत्य शिवाजी महाराजांनी केले असते कां? याचा विचार करा. तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते. ज्याला राज्य करावयाचे आहे त्याला "डोके" वापरावे लागते , जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तो शहाणा आणि जो इतरांचा चुकांमधून शिकतो तो चतुर आणि जो कुणाच्याच चुकांमधून काहीच न शिकता समोरचा कधी चूक करतोय ही वाट बघत बसतो आणि आपल्या माणसांनी अशा वेळी चूक केली तर त्यांना क्रूर पणे सझा देतो - स्वतःचे असलेले डोके वापरत नाही , तो मूर्खच नव्हे तर शतमूर्ख होय !हे सगळे गून (?) औरंगझेबाकडे होते ! ह्यावर काय म्हणणार. तुम्हाला औरंगझेब द्वेषाची काविळ झाली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागेल. असो, औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव ! आपल्याच लेखाच्या वाचकाला उद्देशून लिहिलेल्या खडूस वाक्यांनी इतिहास बदलत नसतो. मिसळ पाव हे संस्थळ सर्वांसाठी आहे. तुम्ही काही लिखाण केलेत तर ज्याला त्याला आपल्या बुद्धीला झेपेल, रुचेल त्या प्रमाणे प्रतिसाद द्यायचा हक्क आहे असे मला वाटते. माझ्या वाटण्यात कांही वावगे असेल तर श्री. तात्यांनी मला तसे सांगावे मी कोणालाच प्रतिसाद देणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

उदय सप्रे गुरुवार, 04/24/2008 - 12:11
पेठकर साहेब, तुमच्या एकूणच लिहिण्याच्या पध्दतीवरून सारसार विचार करण्याची कुवत तुमच्याकडे असेल्से वाटत नाही्ए माझे शेवटचे उत्तर : "आपण इतिहासकार आहात. मी कोण? एक अज्ञ वाचक. पण आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले." साहेब , मी एक नगण्य असा लहान माणूस आहे , काही ऐतिहासिक लेख लिहिले , कविता केल्या , खूपशी ऐतिहासिक प्स्तकी वाचली म्हणजे आपण इतिहासकार झालो अशा गोड गैरसमजामधे मी कधीही नव्हतो , आज नाही आणि इथून पुढेही नसेन ! शासक म्हणून औरंगझबाने केलेल्या चुकांमुळे त्याला मूर्ख म्हटले आहे."त्याच्याकडे असलेल्या गुणांच्या बळावर तो खूप काही करू शकला असता पण ते त्यानी आपल्या दुराग्रही स्वभावामुळे केले नाही"अशी या विधानाची दुसरी बाजू तुमच्या ध्यानात कशी बरे यावी? "सप्रे साहेब आपण स्वयंघोषित इतिहासकार आहात. वाचकांच्या डोक्यात लॉजिक नसते तो फक्त एका लेखकाचेच विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका. नाहीतर एकदा बाबासाहेब पुरंदरे वाचल्यावर इनामदारांचे विचार वाचावेसे त्याला वाटणारच नाही. डायरेक्ट वाचकाच्या डोक्यावरच हल्ला केलात तर नाईलाजाने वाचकांनाही तुमच्या डोक्याबद्दल शंका येऊ शकते." पुन्हा एकदा सांगतो , मी एक नगण्य माणूस आहे ! कुठलीही ङ्होषणा मी केलेली नाही आणि करणारही नाही ! लॉजिक वाचकाने वापरायचे असते एव्ह्ढेच म्हणायचे होते मला ! "तुमच्या विधानातच विरोधाभास आहे : एका लेखकाचे विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका !"अहो, मी पण हेच म्हणतोय , की सगळ्यांचे वाचून हे लॉजिक विचार तरी कराल की नाही? "तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते" व्वा ! तुमचेच विधान नीट वाचा आता - औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते .....म्हणजेच तुम्ही कबूल नाही का केलंत की औरंगझेब शासक म्हणून मूर्ख होता ? "ह्यावर काय म्हणणार. तुम्हाला औरंगझेब द्वेषाची काविळ झाली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागेल" मला काय झाले आहे यापेक्षा तुम्ही आधी वैयक्तीक विधाने करण्याच्या स्वतःच्या काविळीवर उपाय करावा हे बरे ! "आपल्याच लेखाच्या वाचकाला उद्देशून लिहिलेल्या खडूस वाक्यांनी इतिहास बदलत नसतो. मिसळ पाव हे संस्थळ सर्वांसाठी आहे. तुम्ही काही लिखाण केलेत तर ज्याला त्याला आपल्या बुद्धीला झेपेल, रुचेल त्या प्रमाणे प्रतिसाद द्यायचा हक्क आहे असे मला वाटते. माझ्या वाटण्यात कांही वावगे असेल तर श्री. तात्यांनी मला तसे सांगावे मी कोणालाच प्रतिसाद देणार नाही. " छान , आम्ही लिहिले तर ते खडूस आणि तुम्ही जी मुक्ताफळे उधळली आहेत ते काय आहे? प्रतिसाद जरूर द्यावा..... "पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे. " साहेब , तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की मला बोललात ते ठीक आहे हो , पण निदान त्या थोर लोकांना तरी नाकर्तेपणा आणि विलासी अशी विशेषणे लावण्याआधी हजार वेळा विचार करा ! शहाजीराजे जरूर विलासी होते , पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या ही आधी ३ वेळा स्वराज्याचे प्रयत्न केलेले होते हा इतिहास विसरलात का? नुसती नावे ठेवण्याने काहेच साध्य होत नाही राव, "म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का?" ही वाक्ये तुमच्या विचारशक्तीची मर्यादा दाखवून देतात ! असो, तुम्ही चिखलफेक करत रहा , तात्यांना मी आधीच लिहिले आहे , माझी चूक आहे असे त्यांना वाटले आहे म्हणून मी माफी ही मागितली आहे त्यांची !

In reply to by उदय सप्रे

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 13:42
तुमच्या एकूणच लिहिण्याच्या पध्दतीवरून सारसार विचार करण्याची कुवत तुमच्याकडे असेल्से वाटत नाही्ए माझे शेवटचे उत्तर : तुम्ही असे वैयक्तीक हल्ले करता म्हणून नाईलाजाने मलाही तसेच शब्द वापरावे लागतात. तुम्ही संयमाने लिहा मग माझे लिखाण पहा कसे बदलते. जे पेराल तेच उगवेल. आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले." साहेब , मी एक नगण्य असा लहान माणूस आहे , काही ऐतिहासिक लेख लिहिले , कविता केल्या , खूपशी ऐतिहासिक प्स्तकी वाचली म्हणजे आपण इतिहासकार झालो अशा गोड गैरसमजामधे मी कधीही नव्हतो , आज नाही आणि इथून पुढेही नसेन ! शासक म्हणून औरंगझबाने केलेल्या चुकांमुळे त्याला मूर्ख म्हटले आहे."त्याच्याकडे असलेल्या गुणांच्या बळावर तो खूप काही करू शकला असता पण ते त्यानी आपल्या दुराग्रही स्वभावामुळे केले नाही"अशी या विधानाची दुसरी बाजू तुमच्या ध्यानात कशी बरे यावी? तुम्ही त्याला मूर्ख आणि शतमूर्ख संबोधिले आहे. त्याच बरोबर त्याच्या कडे कुशाग्र बुद्धीमत्ता होती असेही म्हणता. हे चूक आहे. तो मूर्ख आणि शतमूर्ख नव्हता तो हुशार होता पण त्यानेही काही चुका केल्या असे लिहायला हवे होते. लॉजिक वाचकाने वापरायचे असते एव्ह्ढेच म्हणायचे होते मला ! म्हणजेच ते लॉजिक वापरायला मी वाचक म्हणून असमर्थ ठरलो आहे असा सूर/आरोप तुमच्या वाक्यात आहे. "तुमच्या विधानातच विरोधाभास आहे : एका लेखकाचे विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका !"अहो, मी पण हेच म्हणतोय , की सगळ्यांचे वाचून हे लॉजिक विचार तरी कराल की नाही? पण तुमची काही मते मी खोडून काढायचा प्रयत्न केला म्हणजे मी 'लॉजिकल विचार केलेला नाही' किंवा 'माझी तेवढी कुवत नाही ' असेच तुम्ही तुमच्या सोयी साठी गृहीत धरलेले आहे. "तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते" व्वा ! तुमचेच विधान नीट वाचा आता - औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते .....म्हणजेच तुम्ही कबूल नाही का केलंत की औरंगझेब शासक म्हणून मूर्ख होता ? धर्मांधतेच्या संदर्भात सारासार बुद्धी नसणे आणि शासक म्हणून मूर्ख असणे हे एकच कसे? धर्मांध औरंगझेब आणि शासक, राजकारणी औरंगझेब ह्या दोन भिन्न प्रवृत्ती आहेत. मला काय झाले आहे यापेक्षा तुम्ही आधी वैयक्तीक विधाने करण्याच्या स्वतःच्या काविळीवर उपाय करावा हे बरे ! वैयक्तिक विधाने आपण टाळलीत तर मला हौस नाही . छान , आम्ही लिहिले तर ते खडूस आणि तुम्ही जी मुक्ताफळे उधळली आहेत ते काय आहे? प्रतिसाद जरूर द्यावा..... तुमच्या प्रत्येक मुद्याला मी ते ते मुदे ठळक अक्षरात लिहून त्या त्या मुद्यांखाली माझा प्रतिवाद केला आहे. त्याला मुक्ताफळे म्हणत नाहीत. तुम्हाला म्हणायचे असेल तर तसे म्हणा. म्हणणार्‍याचे तोंड धरता येत नाही. "पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे. " साहेब , तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की मला बोललात ते ठीक आहे हो , पण निदान त्या थोर लोकांना तरी नाकर्तेपणा आणि विलासी अशी विशेषणे लावण्याआधी हजार वेळा विचार करा ! बाबासाहेब पुरंदरे, ना. स. इनामदार वगैरे मात्तबरांच्या कादंबर्‍यावाचून माझे हे मत झाले आहे. मालोजीराजे, शहाजीराजे हे मा़णूसच होते त्यांनी कधी चुका केल्याच नाहीत असे समजायला मी त्यांना देव मानत नाही. आणि खुद्द देवही चुका करतो. लुळे-पांगले, जन्मांध, एकमेकांना जोडलेले जीव जन्माला घालतो. तिथे मानवाची काय मातब्बरी? शहाजीराजे जरूर विलासी होते , पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या ही आधी ३ वेळा स्वराज्याचे प्रयत्न केलेले होते हा इतिहास विसरलात का? ते प्रयत्न असफल झाले हे तुम्ही विसरताय का? विलासी माणसाला विलास , सुख प्रिय असते. स्वराज्य उभारण्यातील कष्टप्रद जीवन नको असते. त्या मुळे असे काही प्रयत्न पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा सरदारकी सांभाळावी स्वार्‍या-शिकारी कराव्यात आणि मदीरा आणि नृत्यांगनांना जवळ करावे हा नाकर्तेपणा नाही का? "म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का?" ही वाक्ये तुमच्या विचारशक्तीची मर्यादा दाखवून देतात ! पाहिलंत, काढलीत नं शेवटी माझी विचारशक्ती? कारण काय? तुमची अविचारशक्तीच नं शेवटी? मुद्याला धरून बोला. माझ्या प्रश्नांना उत्तर असेल तर बोला. अन्यथा...... असो, तुम्ही चिखलफेक करत रहा , तात्यांना मी आधीच लिहिले आहे , माझी चूक आहे असे त्यांना वाटले आहे म्हणून मी माफी ही मागितली आहे त्यांची ! धन्यवाद.

धमाल मुलगा गुरुवार, 04/24/2008 - 10:56
आम्ही कोणी इतिहास संशोधक नाही, ना इतिहासाचे गाढे अभ्यासक! आमचं भाषाज्ञानही तसं यथा-तथाच! त्यामुळे....
"अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !"
ह्या अभ्यासपुर्ण संशोधनाअंतीच्या निष्कर्षातल्या वाक्यांचं पचन कदाचित आम्हाला झालं नसेल.....
उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे.
:-)))))))))))))))))))))))))))))))) शंकेला जरुर वाव आहे ! पण........ आमची पचनशक्ति तशी कमजोरच आहे! आम्हाला जिजाऊंच्या ४०९ जयंतीच्या बातमीऐवजी 'महान'..(निदान काही अंशी !) औरंग्याच्या मृत्यूची (..की पुण्यतिथी म्हणावं बरं?) पहिल्या पानावर आलेली बातमीही पचनी पडली नाही! खचितच तो हलकट जिजाऊंपेक्षा मोठा...महान नाही! की इथंही चुकलं बुवा आमचं? अल्पसंख्यांकाचं काही ना काही कारणानं केलेलं तुष्टीकरणही आमच्या कधीच पचनी पडत नाही.. महाराष्ट्रातल्या 'संभाजीनगर' ला अजुनही 'औरंगाबाद' संबोधलेलं आमच्या पचनी पडत नाही! कारण अजुनही आमच्या रक्तातून लाव्हा वाहतो....मिंधेपणाचं गटार नव्हे! आम्ही घडणार्‍या घटनांमुळे आमच्या माणसांना त्याचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे जर त्रास होत/होणार असेल तर त्याविरोधात आवाज हा नक्कीच उठवणार! त्या घटनांची साधकबाधक चर्चा सदरेवरची पंतमंडळी करतील...ते बुध्दीजीवी...आम्ही फक्त समशेरबहाद्दर!!!!! आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी...वैचारिक गुर्‍हाळं मांडून त्यातून शब्दांचा चोथा करायला वेळ असावा लागतो...समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला.... आम्ही दिल्हेला जवाब हा फक्त आणि फक्त त्या लेखकाने आणि दैनिकाने थोरल्या आऊसाहेबांच्या जयंतीऐवजी औरंग्याच्या मरणाची आठवण करवणारा लेख लिहिण्याबद्दल आणि तोही पहिल्या पानावर छापण्याबद्दल होता...ह्याची जाणिव आमच्यासारखे हात-पाय चालवण्याऐवजी सुपीक बुध्दीचं बळ वापरुन शब्दच्छल मांडणार्‍यांना असेलच...कारण हे समजणं हे बुध्दीवाद्यांचं लक्षण आहे असं मी मानतो! मला वाटतं माझ्या
आजही महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्यावर कडक ऊन्हाच्या तिरिपी येत असतात, पण म्हराठी स्वराज्यावर पाशवी बलात्कार करणारा हरामजादा अफजल्या मात्र प्रतापगडावरच्या प्रशस्त आलिशान मशीदीतल्या कबरीत उदा-धूपाच्या दरवळात राजेशाही थाटात लोळत असतो....तिथे ह्या बातमीची ती काय मातब्बरी?
ह्या वाक्यांकडे त्या दुर्लक्ष झालेलं दिसतंय, काय? नाही का? असो, आम्ही वयाने लहान आहो, रक्तातला खानदानी जोश आमच्या दिमागास शांत बसु देत नाही...तोंडून कधी मोठा घासही घेतला जातो, पण आमचं चुकलं माकलं मोठ्या दिलानं स्विकारलं जाईल ह्याची आम्हाला खात्री आहे.
पण या अशा उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे.
:-)) सप्रेसाहेब, आम्ही इतकेही मोठे कर्तबगार नाही आहो की आम्हा संदर्भात अशी वाक्यं यावीत! तरीही आमच्या भावना समजावून घेतल्याबद्दल आभार! -(महाराष्ट्राचा पुढचा शिवराय माझ्या पोटी यावा अशी ओढ लागलेला) शिवबांचा मावळा, धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे गुरुवार, 04/24/2008 - 11:30
त्या घटनांची साधकबाधक चर्चा सदरेवरची पंतमंडळी करतील...ते बुध्दीजीवी...आम्ही फक्त समशेरबहाद्दर!!!!! आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी...वैचारिक गुर्‍हाळं मांडून त्यातून शब्दांचा चोथा करायला वेळ असावा लागतो...समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला.... आम्ही दिल्हेला जवाब हा फक्त आणि फक्त त्या लेखकाने आणि दैनिकाने थोरल्या आऊसाहेबांच्या जयंतीऐवजी औरंग्याच्या मरणाची आठवण करवणारा लेख लिहिण्याबद्दल आणि तोही पहिल्या पानावर छापण्याबद्दल होता...ह्याची जाणिव आमच्यासारखे हात-पाय चालवण्याऐवजी सुपीक बुध्दीचं बळ वापरुन शब्दच्छल मांडणार्‍यांना असेलच...कारण हे समजणं हे बुध्दीवाद्यांचं लक्षण आहे असं मी मानतो! आम्ही तुमच्याशी सहमत आहोत... उदयरावांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा! (तुकोबाचा वारकरी आणि शिवबाचा धारकरी)-इनोबा || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

बगाराम गुरुवार, 04/24/2008 - 19:16
आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला.... बापरे तुमच्या इतरत्र दिलेल्या प्रतिसादांवरुन तुही आयटी मध्ये वगैरे काम करता असा माझा गैर समझ झाला होता. पण हे काही भलतेच की हो. तुम्ही इराक/अफगाणिस्तान वगैरे प्रातांत असता का?

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 15:42
-(महाराष्ट्राचा पुढचा शिवराय माझ्या पोटी यावा अशी ओढ लागलेला) शिवबांचा मावळा, धमालराव देशमुख-पाटील. धमाल राव देशमुख पाटील या वाक्यात तुम्हाला माझ्या पोटी या ऐवजी माझ्या घरात असे म्हणायचे आहे का?

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 16:04
ह्म्म..जरा विचारांच्या तेजतर्रार वेगापायी गडबड झाली खरं... माझ्या घरात असेच वाचावे. विजुभाऊ, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद!

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/24/2008 - 14:48
आम्ही सर्व मते बारकाईने वाचण्याचा प्रयत्न केला ....सगळेच मुद्दे ठळक दिसत आहेत त्यामुळे कोणास कोण काय म्हणाले याचा अभ्यास अशक्य झालाय....

In reply to by भडकमकर मास्तर

मनस्वी गुरुवार, 04/24/2008 - 14:51
सगळेच मुद्दे ठळक दिसत आहेत त्यामुळे कोणास कोण काय म्हणाले याचा अभ्यास अशक्य झालाय....
+१ सगळी अक्षरे आपोआपच ठळक होतायत बहुतेक.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/24/2008 - 15:03
औरंगजेब द्वेषाची काविळ जर उदयजीना झाली असेल तर ती मलाही होवो... कारण तसा कर्मठ, शिवभक्त रावण पण होता. पण म्हणून रावणाचा उदो उदो काही लुंगीवाले दाक्षिणात्य लोक सोडले तर इतर कोण करताना दिसत नाही. औरंगजेबाचा मनोसोक्त द्वेष करण्याने काही फार मोठी चूक होत आहे असे मला तरी वाटत नाही.... आणि वरील विधाने लिहील्याबद्दल जर कोणी माझ्या बुध्दीची कीव केली तर मला मुळीच वाईट वाटणार नाही...औरंगजेबाचा द्वेष करावा इतका मी अज्ञानी आहे याचा उलट मला आनंद वाटेल. पुण्याचे पेशवे

नारदाचार्य गुरुवार, 04/24/2008 - 15:36
कादंबऱ्या वाचून मत बनवत असल्याची कबुली देऊनही प्रभाकररावांनी नीट मांडले त्यांचे म्हणणे (ते पटो ना पटो). इतिहासाचा कथित अभ्यास, जर-तरच्या मांडणीतील लॉजिक - बापरे, काय भयंकर आहे हे? धमाल मुलगा यांचा उत्साह, उर्जा समजण्याजोगी. बाकी साऱ्यांचे सारेच ठळक अक्षरातले किरकोळ... खुर्दा... अरे लांगुल्चालनच करायचे असेल तुम्हाला तर , आमचे राष्ट्रपती व महान संशोधक ए.पी.जे.अब्दुल कलाम किंवा मदारी मेहेतर यांचे करा ना ! आवेशात किती आणि काय लिहावे, कसे लिहावे याचे भान सुटले की असे होते. या मंडळींचे लांगूलचालन करण्याची कल्पनाच भयंकर आहे. लांगूलचालन अपात्रांचेच होत असते, पात्र व्यक्तींचे नाही. त्यामुळे औरंगजेबाला अपात्र ठरवून त्याचे लांगूलचालन होतेय, असे म्हणताना कलाम, मेहतर तिथं यावेत याला लॉपसाईडेड किंवा इललॉजिक म्हणावे का? अर्थात, एकाचवेळी औरंगझेब कुशाग्रही आणि मूर्खही असेल तर असे होतेच म्हणा. (इतिवृत्तकार) नारदाचार्य

डॉ. श्लोक _भातखंडे गुरुवार, 04/24/2008 - 15:38
कोण कुठला तो औरंग्या, त्याचे इथेही वर्णन?? का का? या औरंग्याची माहिती मिसळपावाच्या मुखपृष्ठावर पाहून फार फार दु:ख झाले. लोकसत्तेत देशमुख वर्णन लिहिणार आणि मिसळपावावरती सप्रे.... मिसळपावासारख्या प्रथितयश संस्थळाने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला !. का हे लांगूलचालन??? या विषयावर कोणालाही लेख लिहावासा वाटूच कसा शकतो??तुम्हाला वाटला म्हणून कौतुक करण्यास आमचे शब्द अपुरे आहेत, शब्दसंपत्ती आटली आहे,....आणि माझे तडफडणारे मन अश्रू ढाळत आहे....

डॉ. श्लोक _भातखंडे गुरुवार, 04/24/2008 - 17:21
कारणे काहीही असोत् , मरणोत्तर औरंग्याने मायमराठीच्या मनावर सत्ता गाजविणार्‍या मिसळपावामध्ये प्रथम पॄष्ठावर झळकून छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांवर निस्सीम प्रेम आणि श्रध्दा बाळगणार्‍या तमाम मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अढळपद मिळवलंय !.... .... खूप दु:ख झाले हे पाहून...

डॉ. श्लोक _भातखंडे गुरुवार, 04/24/2008 - 17:44
आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ! नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं !
वरील तीन वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते अजिबात कळले नाही....तीन आठवडे अनेक पुस्तके वाचून संशोधन केले नसल्यामुळे कदाचित आमच्या मूढमतीला कळत नसेल...कृपया समजावून सांगावे.

बगाराम गुरुवार, 04/24/2008 - 19:07
बुद्धीजीवी ही शिवी आहे का? मी स्वतःला बुद्धीजिवी वगैरे समजत नसलो तरी तसे बनण्याचा प्रयत्न करत असतो.टिळक, आगरकर, सावरकर इ.इ. मराठी मंडळी बुद्धीजीवी नव्हती का? ज्या कलामांचे लांगुलचालन (!)करायला सांगितले जाते आहे, (ज्यांच्या राष्ट्रपती पद जाण्याला मराठी माणूस कारणीभूत आहे) ते कलाम देखिल बुद्धीजीवीच नाहीत का? मलाही पेठकरांचे प्रतिसाद जास्त पटले आणि त्यांची संयमीत भाषा (कि GXXX फाटू भाषा ??) आवडली. लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही ! ह्यातले सनातन प्रभात सोडले तर बाकिच्या दोन्ही नियतकालीकांना एक किमान तारतम्य असावे असे वाटते. सनातन प्रभातने मात्र असले भडक साहित्य का नाकारले ते समजले नाही.

एक Fri, 04/25/2008 - 22:58
तसच ते सापेक्षपण असतात... औरंगजेब उत्तम राजकारणी, प्रशासक, काटकसरी वगैरे वगैरे असेल पण तो ज्या प्रदेशात राज्य करत होता किंवा त्याच्या राजवटीमुळे ज्यांना फायदा झाला होता त्यांच्यासाठी.. तत्कालीन महाराष्ट्राला आणि आमच्या सारख्या काहीजणांना तो अजुनही शत्रूच वाटतो. त्याचं गूणगान आम्ही का करावं? त्याचे गूण कदाचित Appreciate करूही -जसे रावणाचे केले.. पण आमच्या लोकांवर (शिवाजी, संभाजी) अन्याय करून नाही. त्यांच्यापेक्षा त्याचं महत्त्व वाढ्वून नाही. मला उदय च्या लेखामधे हा उद्देश दिसतो. आमच्या शत्रुची मृत्यूची तारीख लक्षात ठेवून, पहिल्या पानावर मोठा लेख देवून बातमी देणं हे कमीतकमी मराठी म्हणवणार्‍या वृत्तपत्राकडून तरी अपेक्षिलं नव्हतं. एकतर अनुल्लेखानं तरी मारायला हवं होतं किंवा त्यावर पॉझीटीव्ह स्पिन तरी हवा होता. रावणा संदर्भात: रावण महज्ञानी, बुद्धीमान, वेदपारंगत होता पण आजही आपण रावण-दहन करतो आणि रामाची पुजा करतो. रावण मेल्याच्या दिवशी आपण आनंददिन साजरा करतो (सध्यातरी) पण काय सांगावं, वरचे काही प्रतिसाद वाचले तर रावणाची जयंती आणि पुण्यतिथी ला शोक करणारी लोकं पण जन्माला येतील असं दिसतं आहे किंवा कदाचित आलीही असतील. पेठकरांनी मला माझ्या वरील वाक्यातील चूक दाखवली... खरच..रावणाची जयंती आणि पुण्यतिथीला शोक करणारा एकच कसा असु शकेल.. वाक्य असं असायला हवं होतं.. पण काय सांगावं, वरचे काही प्रतिसाद वाचले तर रावणाची जयंती साजरी करणारी आणि पुण्यतिथी ला शोक करणारी लोकं पण जन्माला येतील असं दिसतं आहे किंवा कदाचित आलीही असतील. माझा हा प्रतिसाद त्यांना उद्देशून नव्हता. हे पन लिहायचं राहिलं होतं.

भडकमकर मास्तर Fri, 04/25/2008 - 08:12
परवा मी तुमचा लेख आवडला असा प्रतिसाद दिला होता.....तुमच्या अभ्यासाला सलाम असे म्हटले होते , याची आधी आठवण करून देतो.... परंतु काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात.... १. कोणत्या वर्तमानपत्रांनी तुमचा लेख रिजेक्ट केला , ही सांगणे टाळायला हवे होते.... २. मी सतत ३ आठवडे अगदी दिवस रात्र एक करून संशोधन करून काही लिहिले ते पुढे मांडत आहे हे वाक्य टाळले असते तर बरे झाले असते... का सांगतो, कारण तुमच्या लेखाला त्यामुळे काहीच फरक पडत नाही पण लेखाला उत्तर सोडून भलत्याच प्रतिक्रिया येतात... ३.त्वेषाने लिहिताना आपण फार तलवारबाजी केली आहे , तुम्ही म्हणता, आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ..तुमच्या या वाक्याचा मी निषेध करतो....तुमचे मत काहीही असले तरी सार्वजनिक फोरमवर समस्त मराठी बान्धवांना शिव्या दिल्याने तुमची तळमळ अधिक व्यक्त होते असे आपणास वाटत असेल तर प्रश्नच मिटला..... परंतु तसे जर वाटत नसेल तर मात्र आपण येथील समस्त मराठी बांधवांची माफी मागावी, असे मला वाटते.... आणि जो तुमच्या चुका दाखवेल तो औरंगजेबाचा मित्र ... असं गृहित धरायचं कारण नाही.... आता लगेच म्हणाल की मी कुठे तसे म्हणालो ? पण संयमित प्रतिसादांनासुद्धा पेटून उठून उत्तरे लिहिण्याची तुमची सवय मी वर पाहिली, त्यावरून असेच वाटते.......मला कृपया कोणीही औरन्गजेबाचा, रावणाचा, लोकसत्तेचा मित्र समजू नये.

In reply to by भडकमकर मास्तर

सप्रे साहेब, आपला लेख आवडलाच होता. पण आपल्या लेखाच्या निमित्ताने होणा-या चर्चेवरुन मात्र आपला तोल गेला असे वाटते. (आता तो कुठे कुठे गेला आम्ही दाखवत बसत नाही. ) वरील काही चर्चेतील मुद्यांना उत्तरे देतांना आपला संयम सुटल्यासारखा वाटला म्हणजे आपला विचार आपण लादण्याचा प्रयत्न केला. एखाद्या अभ्यासकाने मेहनतीने लेख तयार केल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियांची उत्तरे ही वाचकांना आवडणारी नसली तरी विचार पटणारा असावा,विचार मुद्देसुद असला पाहिजे. असे असले म्हणजे त्या लेखाची, लेखकाची उंची वाढते असे आमचे मत आहे. अर्थात पेठकरसाहेबांचीच मते त्या तुलनेत आम्हाला अधिक पटलीत त्या तुलनेत आपण मुद्दे खोडण्याऐवजी लादत आहात असे वाटले. खरे तर इतिसातील मुडदे उकरुन त्यावर वर्तमानात वाद होऊ नये असे आमचे मत आहे. कोणी काय छापावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात इतिहास बदलत असेल, इतिहास अधिक सत्याकडे जात असेल तर असा इतिहास आम्हाला वाचायला आवडतोच पण समाजात तेढ निर्माण करणा-या विचारापासून आम्ही कोसभर दूर राहू इच्छितो हेही आम्ही नम्रपणे नमुद करतो. आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे.........या वाक्याचा आम्हीही निषेध व्यक्त करतो.

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Fri, 04/25/2008 - 10:14
३.त्वेषाने लिहिताना आपण फार तलवारबाजी केली आहे , तुम्ही म्हणता, आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ..तुमच्या या वाक्याचा मी निषेध करतो....तुमचे मत काहीही असले तरी सार्वजनिक फोरमवर समस्त मराठी बान्धवांना शिव्या दिल्याने तुमची तळमळ अधिक व्यक्त होते असे आपणास वाटत असेल तर प्रश्नच मिटला..... परंतु तसे जर वाटत नसेल तर मात्र आपण येथील समस्त मराठी बांधवांची माफी मागावी, असे मला वाटते.... भडकमकरांशी सहमत आहे.. उदयरावांनी माफी मागितल्यास बरं होईल... तात्या.

आंबोळी Fri, 04/25/2008 - 10:04
कोणी काय XXXवे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे माझ्यामते मिसळपाववरील सर्वात विनोदी वाक्य आहे. कारण प्रत्तेकजण हे वाक्य फेकुन समोरच्याला गप्प करत आसतो. पण वाक्य फेकताना हे विसरत आसतो की काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा प्रश्न आहे. असो. मुद्देसूद लिखाणामुळे पेठकरांचे म्हणणे जास्त भावले. भावना योग्य असूनही , आकाण्ड्तांडव, चिडचिड, वैयक्तिक हल्ले यामुळे सप्रेंचे विचार लादल्यासारखे वाटतात. आणि त्यामुळेच वाचक विरोधी प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त होतो असे वाटते. बाकी चालू द्या.

कोणत्या दैनिकांनी कोणते लेख छापावेत आणि कोणते परत करावेत हा त्या त्या दैनिकांच्या विचारांचा प्रश्न आहे, असे असुनही कोणी काय XXXवे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे माझ्यामते मिसळपाववरील सर्वात विनोदी वाक्य आहे. हे विनोदी वाक्य असेल तर त्यात विनोद कुठे दडला आहे, ते जर स्पष्ट करुन सांगितले तर आम्हीही आपल्या विनोदी प्रतिसादाला दाद देऊ :) पण वाक्य फेकताना हे विसरत आसतो की काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा प्रश्न आहे. सहमत !!! कोणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न नक्कीच आहे. पण काय लिहायचे आहे आणि काय लिहितो हे जर कळत नसेल तर अशा लिहिण्याला काहीच अर्थ नसावा असे वाटते.

आंबोळी Fri, 04/25/2008 - 11:39
शाळेत असताना विनोदाचे प्रकार शिकलो होतो. त्यातील विरोधाभासातून विनोद हा प्रकार फार आवडला. कारण दैनंदीन जीवनात हा प्रकार फार आढळतो. "कारण प्रत्तेकजण हे वाक्य फेकुन समोरच्याला गप्प करत असतो. पण काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा(ज्याचा त्याचा) प्रश्न आहे." हा विरोधाभास दिसला म्हणून विनोदी म्हणालो. बाकी औरंगजेबाने वारसाहक्काच्या जेवढ्या लढाया केल्या नसतील तेवढ्या येथे त्याच्या नावाने येथे सुरु आहेत. चालू द्या.

कलंत्री Mon, 04/28/2008 - 15:23
कधी कधी एकांगी विचार केला की साधकबाधक विचार आपोआपच मारले जातात. उदा घ्यायचे झाले तर नकळतच औरंगजेबाचे उदाहरण नजरेसमोर येत जाते. १. अकबराच्या वेळेस हिंदु सरदारांची संख्या ६% होती, ती शहाजहानाच्या वेळेस १६ % झाली आणि औरंगजेबाच्या उत्कर्षाच्या काळी ३२% झाली. राजकारणाचा समतोल, स्पर्धा, कुरघोडी आणि विघटनाचा विचार केला तरी आपोआपच ( शिवाजी नसता तरी) हिंदुंचे सरदार अथवा साम्राज्य प्रबळ झालेच असते. २. औरंगजेबापासुन किंवा त्याने भारतीय वंशाच्या लोकांचे राज्य ( मुसलमान अथवा हिंदु) असे स्थापन करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इराणच्या शहाशी त्याला सतत झगडावे लागले. ३. प्रचंड अंतर्विरोध : एकीकडे इस्लामचे राज्य स्थापायचे आणि दुसरीकडे कुतुबशहा, अदिलशहा इत्यादींना अदिलखान, कुतुबखान असे संबोधायचे, दुसरीकडे ही राज्य बळकावयची त्यासाठी भले परत हिंदुचे साह्य घ्यायचे. शहाजहानला कैद करायचे मात्र त्याला न मारता जीवंत ठेवायचे, दाराभाई, शुजा अणि मुराद यांची वाट लावायची, एकीकडे विस्तीर्ण साम्राज्य निर्मायचे आणि आपण मात्र काटकसरीने रहायचे. असो. एकदा काय झाले की औरंगजेबाला संगिताचे प्रचंड वावडे होते, तेंव्हा एका रात्री त्याला संगिता-वाद्यासह एक मिरवणुक जातांना दिसली, त्याने विचारले क्या जा रहा है, - त्याला सांगितले की संगितका जनाजा जा रहा है - अच्छा है- ऐसा दफनाओ की फिर बाहर कभी ना आये - सत्यस्थिती - आजही त्याच्या कबरीवर त्याच्या मृत्युतीथीला रात्र भर कवाली आणि भजनाचा कार्यक्रम होत असतो.

विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 15:46
( शिवाजी नसता तरी) हिंदुंचे सरदार अथवा साम्राज्य प्रबळ झालेच असते. अरे वा.. हे नवे संशोधन.... आजही त्याच्या कबरीवर त्याच्या मृत्युतीथीला रात्र भर कवाली आणि भजनाचा कार्यक्रम होत असतो. यालाच मेलेल्याला मारणे म्हणतात का?

In reply to by विजुभाऊ

कलंत्री Tue, 04/29/2008 - 15:40
विजुभाऊ, अहो, ३२ % सरदार आज नाही तर उद्या प्रबळः झाल्याशिवाय राहिले असते काय? त्यात संशोधनाची आवश्यकता आहे काय? औरंगजेब आणि संगीत हेही एक वास्तव आहे. शिवाजीचे मोठेपण मान्य आहेच पण त्याबरोबरही हिंदुचे असंख्य प्रयत्न चालु होते हे मान्य करायला काय हरकत आहे? माझ्या मते कोणताही विचार कोणताही ग्रह न ठेवता केला पाहिजे. कलंत्री

sandeshmule Tue, 09/12/2017 - 00:47
१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या ! येथे जन्मवर्ष १५९८ आहे. १६९८ नव्हे. चूक दुरुस्त करावी.

पिनाक Tue, 09/12/2017 - 05:00
औरंगजेबाला असं दाखवणं हा ब्राह्मणी कावा आहे. खरा औरंगजेब हा महाराजांना सन्मान देणारा हुशार सम्राट होता. पाच हजारी मनसब दारी हा त्याचा पुरावा आहे. ब्राम्हणांनी औरंगजेबाला हिंदुविरोधी आणि म्हणून महाराजांना मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी या अफवा फैलावल्या. जहरी मनुवृत्ती च्या लोकांनी औरंगजेबाला नाहक बदनाम केले.
लेखनविषय:
लोकसत्ता-रविवार दिनांक ०७-जानेवारी'०७ : मुखपृष्ठावरील बातमी : "औरंगजेबाच्या मॄत्यूला फेब्रुवारीत ३०० वर्षे पूर्ण - भूषण देशमुख-नगर" वरील लेख वाचनात आला आणि मन विषण्ण झाले ! लोकसत्ता सारख्या प्रथितयश वॄत्तपत्राने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला !

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा

भडकमकर मास्तर ·

अभिज्ञ Wed, 04/23/2008 - 14:37
दादानु,ह्यो प्रकार बी लै भन्नाट लिवलाय तुमी. अभिनंदन, तुमच्या ह्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा पाहून आम्हि आता कशात करियर करावे ह्या संभ्रमात आहोत. तुमच्या बरोबर एकदा "बसुन"च आपले मार्गदर्शन घ्यावे म्हणतो.-) अबब

आंबोळी Wed, 04/23/2008 - 18:11
तुमच्या ह्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा पाहून आम्हि आता कशात करियर करावे ह्या संभ्रमात आहोत. खरे आहे. कशात करियर करायचे या विषयी एक गायडंस वर्ग काढा भौ.... तसेच कल चाचणी कशी पास करायची याचेही वर्ग काढलेत तर आमच्यासारख्यांना जरा बरे पडेल. (संभ्रमी)आंबोळी

मदनबाण Wed, 04/23/2008 - 20:40
योग्य माणूस योग्य वेळी शोधून काढून त्याचा उपयोग करून घेणे या सगळ्या बेसिक गोष्टी तर आम्ही शिकवतोच.....पण हे तर काय कुठच्याही मेहनती माणसाला जमेल... पण आमच्या क्लास मध्ये आम्ही मुळात कार्यक्रम मिळवावेत कसे यावरही मार्गदर्शन करतो आणि आजच्या युगात तेच जास्त महत्त्वाचे आहे, त्यावरच आमचा भर असतो... व्वा गुरुजी मानगया आपको...... अवांतरः-- एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही दर्जेदार इव्हेंट मॆनेजर होणारच मला याची १०० % खात्री आहे..... जरा कल्पनाशक्तीला चालना द्या दिली..... इव्हेंट मॅनेजमेंटचे अमर्याद जग तुमच्यापुढे खुले होईलच ह्म्म..... प्रश्नच नाही... ? लवकरात लवकर खालच्या संस्थळावर सम्पर्क साधा.. या संकेतस्थळाला जरूर भेट द्या... bhadakamakar'scareermanagementsystems.org/eventmanager व्वा संकेतस्थळ उघडायला अजिबात वेळ लागला नाही..... मस्तच !!!! ( इव्हेंट प्रेमी ) मदनबाण

एक Wed, 04/23/2008 - 23:43
तुमचे हे गायडन्स वर्ग तरूणांना नवीन दिशा देत आहेत. तुमच्यामुळे किती बेकारी कमी होणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आम्ही तुमचा एक सत्कार करायच्या विचारात आहोत. तुम्हाला "तरूण्-मित्र" हा पुरस्कार देण्यात येईल. तसच समाजातील क्रियेटीव्ह तरूणांना तुमच्या हस्ते पारितोषिकं देण्यात येतील.. मग करायचा ना सत्कार या शनिवारी..आणि तो १००० चा चेक कलेक्ट करायला आमची माणसं येतील उगाच तुम्हाला कशाला त्या स्टॅम्प्-बिम्प चा त्रास ;-)

विसुनाना गुरुवार, 04/24/2008 - 14:27
स्_भडकमकरसाहेब, काय तुफान वक्रोक्ती लिहिताय तुम्ही!(ही वक्रोक्ती नव्हे.) आमच्या 'जागतिक मराठी वक्रोक्त साहित्य मंडळ, वाकडवाट बुद्रुक' तर्फे आपणास 'अखिल मराठी ई-विश्व वक्रलेखन पुरस्कार' देण्याचे आम्ही मेहेरबानांस जाहीर करतो. माकडवाडी खुर्द ते वाकडवाट बुद्रुक अशी आपली जंगी बैलगाडी मिरवणूक काढण्याची आमची मनिषा आहे. या वृत्ताला योग्य ती प्रसिद्धी देता यावी आणि बैलगाडीच्या बैलांना चारापाणी व्हावे म्हणून आपण रुपये दहा हजार फक्त मनीऑर्डरने खालील पत्त्यावर पाठवावेतः स.दा. खाणारे, चिटणीस, जागतिक मराठी वक्रोक्त साहित्य मंडळ, वाकडवाट बुद्रुक, जि. गडचिरोली. ता.क. नक्षलवाद्यांना या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आमंत्रण देण्यासाठी कदाचित एखादा लाख रुपये लागतील. तेंव्हा कार्यक्रमास येताना त्याचीही तरतूद असावी ही नम्र विनंती.

भडकमकर मास्तर Sat, 04/26/2008 - 16:36
अबब, मनस्वी, आंबोळी,स्वाती दिनेश, मदनबाण, एक , विसुनाना आणि तात्या आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद....

अभिज्ञ Wed, 04/23/2008 - 14:37
दादानु,ह्यो प्रकार बी लै भन्नाट लिवलाय तुमी. अभिनंदन, तुमच्या ह्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा पाहून आम्हि आता कशात करियर करावे ह्या संभ्रमात आहोत. तुमच्या बरोबर एकदा "बसुन"च आपले मार्गदर्शन घ्यावे म्हणतो.-) अबब

आंबोळी Wed, 04/23/2008 - 18:11
तुमच्या ह्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा पाहून आम्हि आता कशात करियर करावे ह्या संभ्रमात आहोत. खरे आहे. कशात करियर करायचे या विषयी एक गायडंस वर्ग काढा भौ.... तसेच कल चाचणी कशी पास करायची याचेही वर्ग काढलेत तर आमच्यासारख्यांना जरा बरे पडेल. (संभ्रमी)आंबोळी

मदनबाण Wed, 04/23/2008 - 20:40
योग्य माणूस योग्य वेळी शोधून काढून त्याचा उपयोग करून घेणे या सगळ्या बेसिक गोष्टी तर आम्ही शिकवतोच.....पण हे तर काय कुठच्याही मेहनती माणसाला जमेल... पण आमच्या क्लास मध्ये आम्ही मुळात कार्यक्रम मिळवावेत कसे यावरही मार्गदर्शन करतो आणि आजच्या युगात तेच जास्त महत्त्वाचे आहे, त्यावरच आमचा भर असतो... व्वा गुरुजी मानगया आपको...... अवांतरः-- एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही दर्जेदार इव्हेंट मॆनेजर होणारच मला याची १०० % खात्री आहे..... जरा कल्पनाशक्तीला चालना द्या दिली..... इव्हेंट मॅनेजमेंटचे अमर्याद जग तुमच्यापुढे खुले होईलच ह्म्म..... प्रश्नच नाही... ? लवकरात लवकर खालच्या संस्थळावर सम्पर्क साधा.. या संकेतस्थळाला जरूर भेट द्या... bhadakamakar'scareermanagementsystems.org/eventmanager व्वा संकेतस्थळ उघडायला अजिबात वेळ लागला नाही..... मस्तच !!!! ( इव्हेंट प्रेमी ) मदनबाण

एक Wed, 04/23/2008 - 23:43
तुमचे हे गायडन्स वर्ग तरूणांना नवीन दिशा देत आहेत. तुमच्यामुळे किती बेकारी कमी होणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही. आम्ही तुमचा एक सत्कार करायच्या विचारात आहोत. तुम्हाला "तरूण्-मित्र" हा पुरस्कार देण्यात येईल. तसच समाजातील क्रियेटीव्ह तरूणांना तुमच्या हस्ते पारितोषिकं देण्यात येतील.. मग करायचा ना सत्कार या शनिवारी..आणि तो १००० चा चेक कलेक्ट करायला आमची माणसं येतील उगाच तुम्हाला कशाला त्या स्टॅम्प्-बिम्प चा त्रास ;-)

विसुनाना गुरुवार, 04/24/2008 - 14:27
स्_भडकमकरसाहेब, काय तुफान वक्रोक्ती लिहिताय तुम्ही!(ही वक्रोक्ती नव्हे.) आमच्या 'जागतिक मराठी वक्रोक्त साहित्य मंडळ, वाकडवाट बुद्रुक' तर्फे आपणास 'अखिल मराठी ई-विश्व वक्रलेखन पुरस्कार' देण्याचे आम्ही मेहेरबानांस जाहीर करतो. माकडवाडी खुर्द ते वाकडवाट बुद्रुक अशी आपली जंगी बैलगाडी मिरवणूक काढण्याची आमची मनिषा आहे. या वृत्ताला योग्य ती प्रसिद्धी देता यावी आणि बैलगाडीच्या बैलांना चारापाणी व्हावे म्हणून आपण रुपये दहा हजार फक्त मनीऑर्डरने खालील पत्त्यावर पाठवावेतः स.दा. खाणारे, चिटणीस, जागतिक मराठी वक्रोक्त साहित्य मंडळ, वाकडवाट बुद्रुक, जि. गडचिरोली. ता.क. नक्षलवाद्यांना या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आमंत्रण देण्यासाठी कदाचित एखादा लाख रुपये लागतील. तेंव्हा कार्यक्रमास येताना त्याचीही तरतूद असावी ही नम्र विनंती.

भडकमकर मास्तर Sat, 04/26/2008 - 16:36
अबब, मनस्वी, आंबोळी,स्वाती दिनेश, मदनबाण, एक , विसुनाना आणि तात्या आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद....
लेखनविषय:
आजकाल लोकांकडे पैसा खुळखुळायला लागला आहे आणि कला, क्रीडा क्षेत्राला बरे दिवस यायला लागले आहेत..गल्लोगल्ली निघालेले नृत्य वर्ग, वाद्यवृंद, नाट्यसंस्था , मॊडेलिंग एजन्सीज यातून नक्कलवाले अभिनेते, किंचित गायक, अर्धेमुर्धे नर्तक, मॊडेल तयार होत आहेत पण या सार्‍यांची तक्रार एकच आहे की व्यासपीठ उपलब्ध होत नाहीये.....शिवाय काही छंदवाली मंडळी आहेत, काही व्यावसायिक मंडळी आहेत , त्यांना त्यांच्या व्यावसायिक कलेचे प्रदर्शन मांडायला व्यासपीठ नाहीये...

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ७)

चतुरंग ·

अभिज्ञ Wed, 04/23/2008 - 12:55
मागिल सर्वच भागांप्रमाणे हा हि अनुवाद छान झालाय. आवडला. बाकि. अवांतर - मुले एखाद्या गोष्टीत जेवढी तल्लीन होतात तसा मी एक दिवस जरी होऊ शकलो तरी तो दिवस अत्यंत समाधानाचा, आत्मानंद देणारा जातो: वा, क्या बात है. अगदि मनातले बोललात. अबब

विसोबा खेचर Wed, 04/23/2008 - 15:38
नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख अनुवाद! ह्यातली रुपके वाचत जाताना बालकवींची निसर्गकविता तर वाचत नाहीये ना इतका मी अचंबित होऊन गेलो! अगदी सहमत आहे..! एक एक ओळ अगदी अप्रतीम उतरली आहे रे रंगा! जियो..! आपला, (मधुशालाप्रेमी!) अवांतर - इतक्या सुंदर भाषांतरीत काव्याला इतके कमी प्रतिसाद मिळावेत याची एक मिपाकर म्हणून मला शरम वाटते! आपला, (उदास!) तात्या.

अजय Wed, 04/23/2008 - 19:39
अधरों पर हो कोई भी रस जिहवा पर लगती हाला, भाजन हो कोई हाथों में लगता रक्खा है प्याला, हर सूरत साकी की सूरत में परिवर्तित हो जाती, आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला।।३२। --- अधरांवरि जरि रस कुठलाही, भासे मदिरा रसनेला, पात्रहि कुठले धरता हाती , दिसे जणू करि मधु प्याला, बदलुन जाती चेहरे सगळे बनती सारे साकीचे काहि असो तरि नजरेपुढती, नयनांमधुनी मधुशाला सुन्दर भावानुवाद!!!!!!! आपला, (मधुशालाप्रेमी!)

धनंजय Wed, 04/23/2008 - 20:47
प्रत्येक हप्ता बढियाच बढिया. काही बदल सुचवतो - (३१) मत्त समीरण साकी बनकर अधरों पर छलका जाए, येथे माझ्या मते साकी ओठांवर छलकत नसून साकी ओठांवर मदिरेला छलकवत आहे म्हणून : हिंदोळे अधरावर बनुनी, धुंद साकी जणु वायूही, ऐवजी हिंदोळे अधरावर तिजला, धुंद साकी जणु वायूही, असे चालेल का? "तिजला" म्हणजे सिंधुजलाच्या मदिरेला. (३२) आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला याचा तुमचा भावानुवाद आहे काहि असो तरि नजरेपुढती, नयनांमधुनी मधुशाला हे मला फार आवडले आहे, आणि तुमचा मौलिक विचार आहे. (नयनां"मध्ये" मधुशाला, आणि नयनां"मधून" मधुशाला या कल्पनांत बराच मोठा फरक आहे. पहिली बच्चन यांची, दुसरी तुमची - दोन्ही कल्पना मोठ्या रम्य आहेत.) बच्चनांचे रूपक ठेवण्यासाठी असे करता येईल का? काहि असो तरि नजरेपुढती, नयनीं वसते मधुशाला तुमचे नवे रूपकही फार आवडले, हे पुन्हा सांगतो. (३३) पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला, याचा तुमचा भावानुवाद आहे वल्लरि बनता साकी तू ही घे सुमनांचा करि प्याला, "ले ले" चे दोन अर्थ होऊ शकतात "१. घेऊन-घेऊन" किंवा "२. तू घेऊन टाक" तुम्ही दुसरा अर्थ मानला असला तरीही, माझ्या मते मधुशालेच्या रूपकात प्रथम अर्थ अधिक चांगला बसतो. मद्य = फुलांचा सुगंध प्याला=फूल साकी=फुलझाडे पीणारे=भुंगे मधुशाला=बगीचा मग इथे हा "तू" कोण चोंबडा रूपक बिघडवतो आहे :-) "ले ले" चा पहिला अर्थ वापरावा, असे करता येईल का? (तुमचा अर्थ चूक आहे, असे म्हणत नाही. तुम्हाला पटत असेल तर तसाच ठेवा.) (३४) छक जिसको मतवाली कोयल कूक रही डाली डाली याचा तुमचा भावानुवाद आहे लुब्ध त्यावरी कोकिलकूजन आम्रतरुंवर चालतसे, येथे मुळातल्या रूपकात कोकिळ (कोकीळा म्हणा) पिणारा मतवाला आहे, हे स्पष्ट रूपक आहे. पण तुमच्या भावानुवादात कोकिलकूजन लुब्ध आहे, त्यामुळे रूपकात मतवाला कोण आहे ते जरा अस्पष्ट आहे. असे काही चालेल का?: चाखुनी त्याला कोकिल करिती आम्रतरुंवर कूजनही (३५) येथे मुळात रूपक असे आहे : मद्य = मधुऋतु-सौरभ प्याला=झकोर साकी=अनिल पीणारे=मधु-मद (झिंग चढलेल्या वनस्पती) मधुशाला=मधुवन हे जितके स्पष्ट दिसते तितके भावानुवादात दिसत नाही. मंद झुळुक जणु भरुनी आणिते वसंतसौरभ मद्याला, धुंदच होउन पुन्हा पुन्हा तो वायू भरितसे प्यालाला, हरित पल्लवी आणिक तरुगण, शाखा नूतन वल्लरिही छमछम छुमछुम डोलत राही, मधुबनि आहे मधुशाला ||३५|| प्याला म्हणजे नेमके काय? पिणारे नेमके कोण? हे रूपक नीट समजून येत नाही. काहीतरी बारीकसारीक बदल करावा लागेल असे वाटते. मी भावानुवादाची प्रगती आनंदाने वाचत आहे. या कस्पटासारख्या शंका-कुशंका ओसांडणार्‍या कौतुकाच्या पुरात वाहाणारा केवळ पाचोळा आहे, असे समजा.

In reply to by धनंजय

चतुरंग Sat, 04/26/2008 - 18:30
तुम्ही सुचविलेल्या बदलांपैकी मला ३१ आणि ३५ मधले बदल भावले त्याप्रमाणे अगदी थोडासा बदल करुन अर्थात अधिक सुस्पष्टता आली आहे. रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा आभार. चतुरंग

प्राजु Wed, 04/23/2008 - 20:53
पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला, भरी हुई है जिसके अंदर पिरमल-मधु-सुरिभत हाला, माँग माँगकर भ्रमरों के दल रस की मदिरा पीते हैं, झूम झपक मद-झंपित होते, उपवन क्या है मधुशाला!।३३। वल्लरि बनता साकी तू ही घे सुमनांचा करि प्याला, अंतरात ती घेउन बसती परिमल गंधित मद्याला, सततच मागति भ्रमरदले मधु मदिरा करण्या प्राशनही, मंदचि होती, झिंगुन जाती, उपवन जणु हे मधुशाला ||३३|| क्या बात है...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण Wed, 04/23/2008 - 21:07
रसभरित तरुही साकी असती, पुष्पमंजिरी जणु प्याला, हिंदोळती मग तेच आतुनी मंद सुगंधित मद्याला, लुब्ध त्यावरी कोकिलकूजन आम्रतरुंवर चालतसे, वसंतऋतु हा घेउन येई, आमराई जणु मधुशाला सुरेख..... (वसंत प्रेमी) मदनबाण

अभिज्ञ Wed, 04/23/2008 - 12:55
मागिल सर्वच भागांप्रमाणे हा हि अनुवाद छान झालाय. आवडला. बाकि. अवांतर - मुले एखाद्या गोष्टीत जेवढी तल्लीन होतात तसा मी एक दिवस जरी होऊ शकलो तरी तो दिवस अत्यंत समाधानाचा, आत्मानंद देणारा जातो: वा, क्या बात है. अगदि मनातले बोललात. अबब

विसोबा खेचर Wed, 04/23/2008 - 15:38
नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख अनुवाद! ह्यातली रुपके वाचत जाताना बालकवींची निसर्गकविता तर वाचत नाहीये ना इतका मी अचंबित होऊन गेलो! अगदी सहमत आहे..! एक एक ओळ अगदी अप्रतीम उतरली आहे रे रंगा! जियो..! आपला, (मधुशालाप्रेमी!) अवांतर - इतक्या सुंदर भाषांतरीत काव्याला इतके कमी प्रतिसाद मिळावेत याची एक मिपाकर म्हणून मला शरम वाटते! आपला, (उदास!) तात्या.

अजय Wed, 04/23/2008 - 19:39
अधरों पर हो कोई भी रस जिहवा पर लगती हाला, भाजन हो कोई हाथों में लगता रक्खा है प्याला, हर सूरत साकी की सूरत में परिवर्तित हो जाती, आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला।।३२। --- अधरांवरि जरि रस कुठलाही, भासे मदिरा रसनेला, पात्रहि कुठले धरता हाती , दिसे जणू करि मधु प्याला, बदलुन जाती चेहरे सगळे बनती सारे साकीचे काहि असो तरि नजरेपुढती, नयनांमधुनी मधुशाला सुन्दर भावानुवाद!!!!!!! आपला, (मधुशालाप्रेमी!)

धनंजय Wed, 04/23/2008 - 20:47
प्रत्येक हप्ता बढियाच बढिया. काही बदल सुचवतो - (३१) मत्त समीरण साकी बनकर अधरों पर छलका जाए, येथे माझ्या मते साकी ओठांवर छलकत नसून साकी ओठांवर मदिरेला छलकवत आहे म्हणून : हिंदोळे अधरावर बनुनी, धुंद साकी जणु वायूही, ऐवजी हिंदोळे अधरावर तिजला, धुंद साकी जणु वायूही, असे चालेल का? "तिजला" म्हणजे सिंधुजलाच्या मदिरेला. (३२) आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला याचा तुमचा भावानुवाद आहे काहि असो तरि नजरेपुढती, नयनांमधुनी मधुशाला हे मला फार आवडले आहे, आणि तुमचा मौलिक विचार आहे. (नयनां"मध्ये" मधुशाला, आणि नयनां"मधून" मधुशाला या कल्पनांत बराच मोठा फरक आहे. पहिली बच्चन यांची, दुसरी तुमची - दोन्ही कल्पना मोठ्या रम्य आहेत.) बच्चनांचे रूपक ठेवण्यासाठी असे करता येईल का? काहि असो तरि नजरेपुढती, नयनीं वसते मधुशाला तुमचे नवे रूपकही फार आवडले, हे पुन्हा सांगतो. (३३) पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला, याचा तुमचा भावानुवाद आहे वल्लरि बनता साकी तू ही घे सुमनांचा करि प्याला, "ले ले" चे दोन अर्थ होऊ शकतात "१. घेऊन-घेऊन" किंवा "२. तू घेऊन टाक" तुम्ही दुसरा अर्थ मानला असला तरीही, माझ्या मते मधुशालेच्या रूपकात प्रथम अर्थ अधिक चांगला बसतो. मद्य = फुलांचा सुगंध प्याला=फूल साकी=फुलझाडे पीणारे=भुंगे मधुशाला=बगीचा मग इथे हा "तू" कोण चोंबडा रूपक बिघडवतो आहे :-) "ले ले" चा पहिला अर्थ वापरावा, असे करता येईल का? (तुमचा अर्थ चूक आहे, असे म्हणत नाही. तुम्हाला पटत असेल तर तसाच ठेवा.) (३४) छक जिसको मतवाली कोयल कूक रही डाली डाली याचा तुमचा भावानुवाद आहे लुब्ध त्यावरी कोकिलकूजन आम्रतरुंवर चालतसे, येथे मुळातल्या रूपकात कोकिळ (कोकीळा म्हणा) पिणारा मतवाला आहे, हे स्पष्ट रूपक आहे. पण तुमच्या भावानुवादात कोकिलकूजन लुब्ध आहे, त्यामुळे रूपकात मतवाला कोण आहे ते जरा अस्पष्ट आहे. असे काही चालेल का?: चाखुनी त्याला कोकिल करिती आम्रतरुंवर कूजनही (३५) येथे मुळात रूपक असे आहे : मद्य = मधुऋतु-सौरभ प्याला=झकोर साकी=अनिल पीणारे=मधु-मद (झिंग चढलेल्या वनस्पती) मधुशाला=मधुवन हे जितके स्पष्ट दिसते तितके भावानुवादात दिसत नाही. मंद झुळुक जणु भरुनी आणिते वसंतसौरभ मद्याला, धुंदच होउन पुन्हा पुन्हा तो वायू भरितसे प्यालाला, हरित पल्लवी आणिक तरुगण, शाखा नूतन वल्लरिही छमछम छुमछुम डोलत राही, मधुबनि आहे मधुशाला ||३५|| प्याला म्हणजे नेमके काय? पिणारे नेमके कोण? हे रूपक नीट समजून येत नाही. काहीतरी बारीकसारीक बदल करावा लागेल असे वाटते. मी भावानुवादाची प्रगती आनंदाने वाचत आहे. या कस्पटासारख्या शंका-कुशंका ओसांडणार्‍या कौतुकाच्या पुरात वाहाणारा केवळ पाचोळा आहे, असे समजा.

In reply to by धनंजय

चतुरंग Sat, 04/26/2008 - 18:30
तुम्ही सुचविलेल्या बदलांपैकी मला ३१ आणि ३५ मधले बदल भावले त्याप्रमाणे अगदी थोडासा बदल करुन अर्थात अधिक सुस्पष्टता आली आहे. रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा आभार. चतुरंग

प्राजु Wed, 04/23/2008 - 20:53
पौधे आज बने हैं साकी ले ले फूलों का प्याला, भरी हुई है जिसके अंदर पिरमल-मधु-सुरिभत हाला, माँग माँगकर भ्रमरों के दल रस की मदिरा पीते हैं, झूम झपक मद-झंपित होते, उपवन क्या है मधुशाला!।३३। वल्लरि बनता साकी तू ही घे सुमनांचा करि प्याला, अंतरात ती घेउन बसती परिमल गंधित मद्याला, सततच मागति भ्रमरदले मधु मदिरा करण्या प्राशनही, मंदचि होती, झिंगुन जाती, उपवन जणु हे मधुशाला ||३३|| क्या बात है...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण Wed, 04/23/2008 - 21:07
रसभरित तरुही साकी असती, पुष्पमंजिरी जणु प्याला, हिंदोळती मग तेच आतुनी मंद सुगंधित मद्याला, लुब्ध त्यावरी कोकिलकूजन आम्रतरुंवर चालतसे, वसंतऋतु हा घेउन येई, आमराई जणु मधुशाला सुरेख..... (वसंत प्रेमी) मदनबाण
लेखनविषय:
3

गोखूळवाडी बुद्रूकचा गंपू-भाग दूसरा

इनोबा म्हणे ·

शितल Sun, 10/05/2008 - 01:37
हा भाग ही आवडला. मस्त लिहिले आहेस इनोबा. :) आधुनिक आणी ऐतहासिक अशी सागंड घालत गंपु छान साकारला आहेस. :) अजुन लिहुन पुर्ण कर हा भाग.

प्राजु Sun, 10/05/2008 - 01:52
कधी लिहिलास हा भाग?? वाचलाच नव्ह्ता मी. मस्त झालाय की. हरकत नाही... पौराणिक कथा कलियुगात छान रंगवली आहेस. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन Sun, 10/05/2008 - 02:25
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खवाट ... माथेरान, कणसे बेष्ट ... चियर्स इन्याभौ .. जबराट .. पहिला भाग ही आत्ताच वाचला . तुझ्या बागायती डोक्याच्या सुपिकतेला सलाम :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

पिवळा डांबिस Sun, 10/05/2008 - 07:55
आयला, मस्त लिखाण रे इन्या!!! हे वाचून झाल्यावर पुन्हा पहिला भाग आणि हे सलग वाचून काढलं...... मर्‍हाटी पिच्चर काढूयात का रे याच्यावर? तू रायटर कम डायरेक्टर हो....... आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्‍या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!):) मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!! :) (स्वगतः तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!! :)देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा!! अगदी "दक्षिणेची" नसली तरी चालेल पण सावळी हवी!!!! नायतर गंपूला बघून, "वासूआण्णा, हा तुमचाच ना?" असं लोकं विचारायची!!!!! आमचा कोकणस्थी रंग नको तिथे आडवा येतो तिच्यायला!!!!:)) कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर!! :)) चावट, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

पिडाकाका, तुम्ही पहिला भाग नीट वाचलेला दिसत नाही आहे; वासूअण्णा सावळेच आहेत. अर्थात तुम्ही इनोबांना लाच देऊन, पटवून थोडी "सिनेमॅटीक लिबर्टी" घेऊ शकता! ;-) अवांतरः इन्या, भारी लिवतो आहेस रे, आता पुढचे भागही पटापट टाक. नाहीतर रोज सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन! ;-) अदिती (बाणेर खुर्द)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पिवळा डांबिस Sun, 10/05/2008 - 10:23
आमचा अभिप्राय कधी दिसतो, कधी दिसत नाही.... हि काय संपादकमंडळाची, सर्व्हरची की लोडशेडिंगची करामत म्हणायची? :)

In reply to by पिवळा डांबिस

>> हि काय संपादकमंडळाची, सर्व्हरची की लोडशेडिंगची करामत म्हणायची? पिडाकाका, यूएस ऑफ ए च्या कोकणातही लोडशेडींग असतं का हो?

In reply to by पिवळा डांबिस

टारझन Sun, 10/05/2008 - 13:29
आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्‍या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!) एनी टाइम काका =)) कलर तर फुल्टू मॅच होतोच पण पाप्या घ्यायच्या सिन चे कमीत कमी ५०-६० तरी रि-टेक पायचे .. मंग मानधन नाय मिळालं तरी चालेल... मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!! आहो त्याच पाकळीने ८ फुलं तयार केलेली ... वासूअण्णा असलात तरी अंघोळ मात्र करा .. नाहीतर जाल नावावर.. पुर्ण कथेत घुसायचात आणि देवकीला नाकाला चिमटा लाउन बसायला लागायचं .. परत त्यामुळे किती काँप्लिकेशन्स होतील ते वेगळंच =)) तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!! आगायायाया =)) =)) =)) ते च्यवनप्राश स्वर्णभस्मयुक्त आहे का ते चेक करा नाय तर पोपट व्हायचा . बाकी च्यवनप्राश विकत आणायचे कष्ट करण्यापेक्षा कुठून उकिरड्यावरुनच उचलून आणायची ना पोरं .. नाय तरी पुन्हा तिथेच जाणार :) मग कणशाचा पोपट ... देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा! मला अर्ध्या सेकंदांसाठी देवकाका चं की काय असं वाटून गेलं, सॉरी शक्तीमान. तसही देवकी मिपा बाहेरचीच घ्या.. याला अनुमोदन .. बाकी पाप्या देणार्‍या पोरी कुठ्ल्या हो घ्यायच्या काकानु ? कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर! +१००, लै वेळा असेच म्हणतो, लै लै लै लै सहमत सावळ्या रामोशी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

यशोधरा Sun, 10/05/2008 - 10:37
वा, वा!! इणूभाव, तू पण जमात- ए- क्रमशः मधे शामिल का??? लिही पटापटा!!

प्रमोद देव Sun, 10/05/2008 - 10:56
हा भागही मस्त जमलाय. येऊ दे पुढचा भाग केव्हाही..पण असाच मस्त असू दे! त्यात कोणतीही तडजोड नको.

इनोबा म्हणे Sun, 10/05/2008 - 16:25
खरेतर हा भाग मनासारखा झाला नाही म्हणून अप्रकाशित ठेवला होता. कसा आणि कधी प्रकाशित झाला मलाच माहीत नाही. तरीही तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. पुढचे भाग देतो लवकरच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मृदुला Sun, 10/05/2008 - 21:30
उत्तम चालले आहे. गोवर्धन अमृततुल्य विशेष. नम्रपणे हेतू समजावून डोळ्यात अश्रू ...! आता शिशुपाल, रुक्मिणीहरण वगैरे कसे येते याची उत्सुकता आहे.

विजुभाऊ Mon, 10/06/2008 - 13:14
बाळूने त्यातील एक्-दोन जणांचे दात(त्यांच्याच) घशात घातले तेव्हापासून बाळूच्या कथा 'दंतकथा' म्हणून =)) आपले डॉ.दाढेभाव देतील तालीम हीरोला त्याची. आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे. बेष्ट लेख ल्हिलास ..इन्या लेका ही असली माणके झाकुन ठीवतोस व्हय ? "आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्‍याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Mon, 10/06/2008 - 15:32
आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे. या प्रतिसादामध्ये अभिनंदनाचा ठराव मांडण्याची गरज होती काय? :? आता यावर ही एखादा कौल घ्यायला पाहीजे. :B "आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्‍याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ आपली इच्छा असल्यास आम्ही पुढच्या वेळी 'न झाकता' दर्शन देतो. :) (दिगंबर) -इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अनिल हटेला Mon, 10/06/2008 - 15:14
क्या बात है ? एकदम ढींच्याक ईष्टाईल मधी ईष्टोरी ल्हिवली की राव !!! येउ द्यात , हवे तेवढे क्रमशः येउ द्यात !!! पण जरा फटाफट काय !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

शितल Sun, 10/05/2008 - 01:37
हा भाग ही आवडला. मस्त लिहिले आहेस इनोबा. :) आधुनिक आणी ऐतहासिक अशी सागंड घालत गंपु छान साकारला आहेस. :) अजुन लिहुन पुर्ण कर हा भाग.

प्राजु Sun, 10/05/2008 - 01:52
कधी लिहिलास हा भाग?? वाचलाच नव्ह्ता मी. मस्त झालाय की. हरकत नाही... पौराणिक कथा कलियुगात छान रंगवली आहेस. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन Sun, 10/05/2008 - 02:25
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खवाट ... माथेरान, कणसे बेष्ट ... चियर्स इन्याभौ .. जबराट .. पहिला भाग ही आत्ताच वाचला . तुझ्या बागायती डोक्याच्या सुपिकतेला सलाम :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

पिवळा डांबिस Sun, 10/05/2008 - 07:55
आयला, मस्त लिखाण रे इन्या!!! हे वाचून झाल्यावर पुन्हा पहिला भाग आणि हे सलग वाचून काढलं...... मर्‍हाटी पिच्चर काढूयात का रे याच्यावर? तू रायटर कम डायरेक्टर हो....... आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्‍या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!):) मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!! :) (स्वगतः तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!! :)देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा!! अगदी "दक्षिणेची" नसली तरी चालेल पण सावळी हवी!!!! नायतर गंपूला बघून, "वासूआण्णा, हा तुमचाच ना?" असं लोकं विचारायची!!!!! आमचा कोकणस्थी रंग नको तिथे आडवा येतो तिच्यायला!!!!:)) कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर!! :)) चावट, डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

पिडाकाका, तुम्ही पहिला भाग नीट वाचलेला दिसत नाही आहे; वासूअण्णा सावळेच आहेत. अर्थात तुम्ही इनोबांना लाच देऊन, पटवून थोडी "सिनेमॅटीक लिबर्टी" घेऊ शकता! ;-) अवांतरः इन्या, भारी लिवतो आहेस रे, आता पुढचे भागही पटापट टाक. नाहीतर रोज सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन! ;-) अदिती (बाणेर खुर्द)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पिवळा डांबिस Sun, 10/05/2008 - 10:23
आमचा अभिप्राय कधी दिसतो, कधी दिसत नाही.... हि काय संपादकमंडळाची, सर्व्हरची की लोडशेडिंगची करामत म्हणायची? :)

In reply to by पिवळा डांबिस

>> हि काय संपादकमंडळाची, सर्व्हरची की लोडशेडिंगची करामत म्हणायची? पिडाकाका, यूएस ऑफ ए च्या कोकणातही लोडशेडींग असतं का हो?

In reply to by पिवळा डांबिस

टारझन Sun, 10/05/2008 - 13:29
आपला टारूबाळ होईल गंपू (काहीनाही तरी कलर जुळतोय!!!! टार्‍या, भाव नको खाऊ, तयार हो, तरूण पोरी पकापक पाप्या घेतात म्हनं!!!!) एनी टाइम काका =)) कलर तर फुल्टू मॅच होतोच पण पाप्या घ्यायच्या सिन चे कमीत कमी ५०-६० तरी रि-टेक पायचे .. मंग मानधन नाय मिळालं तरी चालेल... मी आपला फूल ना फुलाची पाकळी म्हणून वासूअण्णा व्हायला तयार आहे!! आहो त्याच पाकळीने ८ फुलं तयार केलेली ... वासूअण्णा असलात तरी अंघोळ मात्र करा .. नाहीतर जाल नावावर.. पुर्ण कथेत घुसायचात आणि देवकीला नाकाला चिमटा लाउन बसायला लागायचं .. परत त्यामुळे किती काँप्लिकेशन्स होतील ते वेगळंच =)) तिच्यायला आठ पोरं काढायची? च्यवनप्राश आणलं पाहिजे विकत!! आगायायाया =)) =)) =)) ते च्यवनप्राश स्वर्णभस्मयुक्त आहे का ते चेक करा नाय तर पोपट व्हायचा . बाकी च्यवनप्राश विकत आणायचे कष्ट करण्यापेक्षा कुठून उकिरड्यावरुनच उचलून आणायची ना पोरं .. नाय तरी पुन्हा तिथेच जाणार :) मग कणशाचा पोपट ... देवकी तेव्हढी मिपाबाहेरची आणा! मला अर्ध्या सेकंदांसाठी देवकाका चं की काय असं वाटून गेलं, सॉरी शक्तीमान. तसही देवकी मिपा बाहेरचीच घ्या.. याला अनुमोदन .. बाकी पाप्या देणार्‍या पोरी कुठ्ल्या हो घ्यायच्या काकानु ? कणसेच्या रोलसाठी पन लई मान्सं हायेत मिपावर! +१००, लै वेळा असेच म्हणतो, लै लै लै लै सहमत सावळ्या रामोशी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

यशोधरा Sun, 10/05/2008 - 10:37
वा, वा!! इणूभाव, तू पण जमात- ए- क्रमशः मधे शामिल का??? लिही पटापटा!!

प्रमोद देव Sun, 10/05/2008 - 10:56
हा भागही मस्त जमलाय. येऊ दे पुढचा भाग केव्हाही..पण असाच मस्त असू दे! त्यात कोणतीही तडजोड नको.

इनोबा म्हणे Sun, 10/05/2008 - 16:25
खरेतर हा भाग मनासारखा झाला नाही म्हणून अप्रकाशित ठेवला होता. कसा आणि कधी प्रकाशित झाला मलाच माहीत नाही. तरीही तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. पुढचे भाग देतो लवकरच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मृदुला Sun, 10/05/2008 - 21:30
उत्तम चालले आहे. गोवर्धन अमृततुल्य विशेष. नम्रपणे हेतू समजावून डोळ्यात अश्रू ...! आता शिशुपाल, रुक्मिणीहरण वगैरे कसे येते याची उत्सुकता आहे.

विजुभाऊ Mon, 10/06/2008 - 13:14
बाळूने त्यातील एक्-दोन जणांचे दात(त्यांच्याच) घशात घातले तेव्हापासून बाळूच्या कथा 'दंतकथा' म्हणून =)) आपले डॉ.दाढेभाव देतील तालीम हीरोला त्याची. आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे. बेष्ट लेख ल्हिलास ..इन्या लेका ही असली माणके झाकुन ठीवतोस व्हय ? "आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्‍याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Mon, 10/06/2008 - 15:32
आडनाव आणि व्यवसायाची सांगड घालणारा माणूस म्हणुन त्यांचे मिपावर अबिनन्दनाचा ठराव घ्याचा आहे. या प्रतिसादामध्ये अभिनंदनाचा ठराव मांडण्याची गरज होती काय? :? आता यावर ही एखादा कौल घ्यायला पाहीजे. :B "आपल ठीवायचे झाकुन आन दुसर्‍याचे बघायचे वाकुन" ही सवय वैट रे भौ आपली इच्छा असल्यास आम्ही पुढच्या वेळी 'न झाकता' दर्शन देतो. :) (दिगंबर) -इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अनिल हटेला Mon, 10/06/2008 - 15:14
क्या बात है ? एकदम ढींच्याक ईष्टाईल मधी ईष्टोरी ल्हिवली की राव !!! येउ द्यात , हवे तेवढे क्रमशः येउ द्यात !!! पण जरा फटाफट काय !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

मांसाहार व अन्नटंचाई

ऐश्वर्या राय ·

मनापासुन Tue, 04/22/2008 - 18:35
धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार ? धर्म च जर सांगत असेल की दुसर्‍या प्राण्याला ठार मारा.मग तो धर्म कसला....अधर्म च की यासाठी श्रावण्या करतात हे माहीत होते मांसाहर करणे माहीत नव्हते?ती ही एक चैनच असते. माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो ?मला सांगा दूध शाकाहारी की मांसाहारी आणि ते मानवाला किती आवश्यक आहे? मानव सोडला तर इतर कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याचे दूध काढुन पीत नाही. ते गरजेचे ही नसते शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे असे मला मनापासुन वाटते

In reply to by मनापासुन

ऐश्वर्या राय Tue, 04/22/2008 - 19:33
अपेक्षेप्रमाणे ही प्रतिक्रिया आलीच. आपल्याला लेखाचा संदर्भ समजला नाही की दुर्लक्षित करावासा वाटला? दिलेले दुवे, या प्रश्नाची सामाजिक बाजू सांगत आहेत. दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू. इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे. कोणत्याही संवेदनाक्षम विषयासंदर्भात 'हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे' ही खूप सोयीस्कर पळवाट आहे. कोणाला दुखावण्याची भिती नको मग समाजाची दीर्घकालीन हानि झाली तरी चालेले. मला कोणी वाईट म्हणायला नको. ही टीपिकल भारतीय मनोवृत्ती आहे आणि त्याचे बरेच दुष्परीणाम आपण भोगलेले आहेत (उदा. लोकसंख्या). आता तरी यातून बाहेर पडायचा प्रयत्न होऊ दे. टीपः तुम्ही, कदाचित तुमच्या नकळत 'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. मला तसे म्हणायचे नव्हते असा खुलासा देऊ शकता ;-)

In reply to by ऐश्वर्या राय

मनापासुन Tue, 04/22/2008 - 20:27
'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. हा हा हा हा मानले बुआ तुमच्या तर्काला . का इस्लाम सोडला तर इतर धर्मात हिंसा वर्ज्य आहे? रामायणात सुद्धा मांसभक्षणाचे /धर्मा साठी प्राण्याम्च्या हत्येचे बळीचे उल्लेख आहेत. ( उदा: अश्व मेध यज्ञ / नरमेध यज्ञ) त्यावेळीस तर इस्लाम चा उदय झालेला नव्हता. जत्रेत देवाला बोकड / कोंबडा कापणे हे कोणत्या धर्मात बसते? पैगम्बराला जेंव्हा अन्नासाठी हिंसा याबद्दल विचारले तेंव्हा ते उद्गारले की तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार करा हिंसा ही होत असतेच. फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. तुम्ही सिद्धा विसरु नका की तुम्ही ही कधी तरी धुळीचा / एखाद्या प्राण्याच्या शरीराचा अंश होतात. ( संदर्भ्...प्रेषीत :खलील जिब्रान) असो तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार कर पर्यावरण नाश तर होणारच आहे. जगातल्या सर्वानी जर ठरवले की शाकाहार करायचा तर अशी वेळ येइल की लोक अन्नासाठी एकमेकांचे खून करतील्.जगातील मोठी जनसंख्या ही समुद्राकाठी रहाते. त्यानी काय शाकाहारासाठीसमुद्रात शेती करावी? दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू दूध हे गायीचे रक्तापासुन निर्माण होते. एका अर्थाने गायीचे रक्तच म्हणाना . त्यासाठी रोज गायीचे रक्त पिळुन काढले जाते. हे हत्येपेक्षा भयंकर नाही वाटत तुम्हाला? तुम्ही रोज चहा पिताना चहात दोन चमचे गायीचे रक्त पित असता. हे सगळे लक्षात न घेता केवळ शाकाहार की मांसाहार असला वाद फक्त वादासाठी म्हणुन आणल्यासरखा वाटतो. हा विषय अजिबात संवेदनाक्षम नाही. तो केवळ ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे म्हंटल्याबद्दल मला कोणी वाईट म्हणाले तरी वाईट वाटणार नाही इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे. अन्न टंचाई मांसाहारा मुळे होत नाही ती लोकसंख्येमुळे होते . त्यामुळे ती चर्चा तशीही निरर्थक आहे. दुर्लक्षित करावी अशीच वाटली. हे मनापासुन

In reply to by मनापासुन

ऐश्वर्या राय Wed, 04/23/2008 - 09:09
"फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. " या तर्काप्रमाणे उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.' मग, सोडून द्यायचे का त्या चोराला (कारण त्याने खलिल जिब्रान ची प्रॉफेट ही कादंबरी वाचलेली आहे अथवा त्यातले हे सोयीचे - त्याच्या धंद्याच्या दृष्टीने - अवतरण त्याला माहीत आहे)? अरे चोरा, पण मूळ मालक काय तुझ्या मागे लागला होता का की कसे पण कर आणि या संपत्तिला 'तुझा अंश' बनव? तसेच, तो प्राणी काय तुम्हाला आग्रह करतो का तुमचा अंश बनवा म्हणून? इस्लाम, प्राणिहत्या, हलाल इ. विषय हे खूप सविस्तर मांडण्याच्या लायकीचे आहेत पण ही ती चर्चा नव्हे. माझ्या लिखाणातले धार्मिक या शब्दानंतरचे उद्गारवाचक चिन्ह आपण लक्षात घेतलेले दिसत नाही. कित्येकदा मनुष्य स्वतःच्या सोयीसाठी, चैनीसाठी काही गोष्टी करतो आणि अपराधगंडातून मुक्ती मिळावी म्हाणून ती धार्मिक गरज असल्याची बतावणी करतो. देवदासी हे जसे त्याचे एक उदाहरण तसेच जत्रेत 'देवासाठी' बोकड कापणे हे सुध्दा. मांसाहार करताना कित्येक लोक (ज्यांना काही प्रमाणात अपराधगंड जाणवतो असे, निर्ढावलेले नव्हे) धार्मिक कारणाने खातो असा स्वतःचा गोड गैरसमज करून घेतात. त्याबद्दल ते उद्गारवाचक चिन्ह होते. वाचनाची सवय असणार्‍या कोणाला ते समजायला अवघड गेले नसावे.

इनोबा म्हणे Tue, 04/22/2008 - 18:59
शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे यांच्याशी सहमत मूळात शाकाहार किंवा मांसाहार,दोन्ही प्रकारांत हत्या ही अटळ आहे. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

ऐश्वर्या राय Tue, 04/22/2008 - 19:38
किती हत्या कोणत्या प्रकारात होते ते महत्वाचे आहे. दिलेले दुवे तोच मुद्दा मांडत आहेत. एक पाऊंड बीफ बनवायला ५ पाउंड धान्य लागते असे त्यात दिले आहे. थोडक्यात, किमान ५ पट जास्त र्‍हास.

प्रशांतकवळे Tue, 04/22/2008 - 19:14
माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो हे जरी विचारात घेतले जात नसले तरी मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले झाडात जीव नसतो का? बरं पाश्चात्य विचारवंत काय लिहीतात त्यावर विश्वास किती ठेवावा? कधी ते चहाला अपायकारक संबोधतात तर कधी उपायकारक.. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो हे लिहिणारे व मानणारे पाश्चात्य होते. "ब्लॅक होल" मधुन काहीच उत्सर्जीत होत नाही हे लिहीणारा पाश्चात्य आहे जे त्याने कबुल केले की चुकीचे आहे म्हणुन! प्रशांत

In reply to by प्रशांतकवळे

कोलबेर Tue, 04/22/2008 - 20:03
प्रशांतराव जो संगणक आणि माहिती जाल वापरुन तुम्ही हा प्रतिसाद लिहिलात त्या दोन्हीही ह्या लबाड पाश्चात्यांच्याच देणग्या आहेत. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

In reply to by व्यंकट

कोलबेर Tue, 04/22/2008 - 19:59
शिकरण, श्रीखंड, शेवयांची खीर वगैरे पदार्थांतुन पर्यावरणाची (तितकी) हानी होत नाही जितकी एखादा बर्गर अथवा लुसलुशीत स्टेक खाण्यातुन होते. त्यामूळे श्रीखंड शिकरण ह्यांची तुलना इथे अप्रस्तुत आहे.

कोलबेर Tue, 04/22/2008 - 19:56
पर्यावरणाच्या र्‍हासाचा विचार केला असता मांसाहार कमी झाला पाहिजे ह्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. पूर्वी केवळ 'निरपराध जीवांची हत्या नको' ह्या कारणास्तव विरोध होणार्‍या ह्या विषयाला आता ही नविन (अधिक गंभीर) डायमेन्शन मिळाली आहे ह्या ऐश्वर्या राय ह्यांच्या म्हणण्याशी सहमत आहे. पण तसेही भारतीयांच्या आहारात इतर खाद्य संस्कृतींच्या तुलनेत मांसाहाराचे प्रमाण नगण्य आहे. पाश्चात्य देशांमध्ये रोज दोन्ही वेळच्या जेवणाला (मोठ्या प्रमाणात) मांसाहार करणारे बहुसंख्येने आहेत. ते जो पर्यंत आपला मांसाहार (विशेषतः गाय आणि डूक्कर) जाणवण्या इतपत कमी करत नाहीत तो पर्यंत ह्या प्रश्नावर तोडगा निघणे कठीण आहे. -कोलबेर

In reply to by कोलबेर

व्यंकट Tue, 04/22/2008 - 22:09
नैसर्गीक रित्या निर्माण केलेले नसून त्यांची शेती केली जाते, व मागणी / आवश्यकते नुसार त्यांची पैदास होते, जस्ट लाईक केळी, दूध आणि तांदूळ... म्हणूनच मी तसे उदाहरणही दिले होते. व्यंकट

In reply to by कोलबेर

ऐश्वर्या राय Wed, 04/23/2008 - 09:23
हे पूर्णपणे मान्य. आणि, दिलेला दुवा, त्यांच्यापैकी काही याबबत जागृत होत आहे हे दर्शविणारा आहे. इथे, भारतीयांनीही आपल्याला जमेल तशी ही जबाबदारी घ्यावी. ज्याप्रमाणे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ही पाश्चात्यांची जास्त जबाबदारी आहे पण भारतीयांनीही आपला वाटा त्यात उचलला पाहीजे त्याप्रमाणेच. अन्नटंचाईचा सर्वात जास्त फटका आपल्यासारख्या देशाला बसतो. अमेरिका व इतर धनवान देश जास्त काळ ही अडचण सहन करू शकतात. या लेखात नमूद केलेले फिजीमधले दंगे हे एक उदाहरण आहे. गेले २-३ आठवडे भारतात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. इतका की सरकार बिथरून गेलेले आहे. आणि, ही महागाई प्रत्यक्ष टंचाईमुळे झालेली आहे. ही टंचाई भारतीय नाही तर जागतिक आहे. आज भारत धान्य विकत घ्यायला तयार असूनही विकायला इतर देश तयार नाहीत कारण तेच आज टंचाईचा सामना करत आहेत. हा लेख इतक्या योग्य वेळेस प्रकाशित झाल्याने इथे त्याचा दुवा दिला.

धोंडोपंत Tue, 04/22/2008 - 20:28
कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे आहे. त्यात धार्मिक बाबी आणू नयेत असे वाटते. आम्ही स्वतः मालवणी पदार्थांचे दिवाने आहोत. कोंबडीवडे, सागुती, सोलकढी हे आम्हाला अमृतासमान आहेत. उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म|| आपला, (मांसाहारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पिवळा डांबिस Tue, 04/22/2008 - 22:59
सर्व मांसाहारी मिपाकरांना आम्ही जाहीर आवाहन करू इच्छितो की आजपासून त्यांनी मांसाहार सोडून द्यावा आणि पूर्णपणे शाकाहार अंगिकारावा! स्वगतः त्यामुळां तरी माशे-मटणाचे भाव खाली येतंत काय तां बघूयां! साली बाजाराक जावंची सोय उरली नाय!! चांगली पापलेटाची जोडी साली ६०० रुपयांच्या खाली गावणां नाय! काय म्हागाई म्हणूची का सोंग!! म्हागाईन गांजलेलो पिवळो डांबिस

विसोबा खेचर Wed, 04/23/2008 - 00:08
मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे). आपल्या आजारांचं काय करायचं अन काय नाही ते मांसाहार करणारी मंडळी पाहून घेतील असं मला वाटतं! इतरांनी त्याची नसती काळजी करू नये असंही मला वाटतं! सालं उद्या आजारी पडलो तर आमची आम्हीच बीलं भरणार आहोत ना? की कुणी शाकाहारी माईचा लाल आमची बिलं भरायला येणार आहे? नाही ना? मग आमचं आम्ही पाहून घेऊ! मेलो तरी बेहत्तर पण तिच्यायला मरण्यापूर्वी चापून मटणवडे, माश्याची आमटी, तळलेले बोंबिल आणि कोलंबीभात खाऊ! ;) महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले. हा हा हा! दॅट्स इट! :) भलतीसलती कामं करायला घेतली की फारसं यश येतच नाही! च्यामारी, आम्ही काय खायचं नी काय नाही हे तो बुद्ध कोण ठरवणार? साला, आम्ही काय त्याच्या पैशांनी खातो का? त्यातले फारच थोडे आरोग्यासाठी वा धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार करत असावेत. हो हो! मी त्यापैकी एक! ;) मात्र, जे कोणी संवेदनाशील सभासद असतील ते किमान एकदा याबाबत विचार करतील अशीही खात्री आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या संवेदना मी खात असलेल्या बोंबलाबरोबरच मेल्या आहेत! :) मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले तरी या लिखाणाचा उपयोग झाला असे मला मानता येईल. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्याकरता तरी आपल्या या लिखाणाचा शून्य उपयोग आहे असंच म्हणावं लागेल! असो, तरीही आपण जे काही लिहिलं आहे ते आपले व्यक्तिगत विचार असावेत असं मला वाटतं आणि त्याचा मी आदर करतो! सर्वे भद्राणि पश्यन्तु| म्हणजे काय? तुमचं ते शाकाहारी संसकृत आपल्याला कळत नाय साहेब! आवशीच्या भाषेत काही कळेल असं लिवा! आपला, (बोंबिल व मालवणी मटणाचा प्रेमी) तात्या.

विकास Wed, 04/23/2008 - 06:35
मांसाहाराबद्दलचा पर्यावरणीय दृष्टिकोन मान्य आहे. त्याबद्दल अजून एक म्हणावेसे वाटते की (जे मी पण पाळायचा प्रयत्न करतो - मांसाहाराबद्दल आणि शाकाहाराबद्दल पण) : आपण शक्यतोवर अन्न वाया घालवू नये. एक तर अनेकांना खायला मिळत नसते तसेच साधनसंपत्ती ते अन्न आपल्यापर्यंत पोचायला वापरलेली असते. त्यामुळे ते वाया घालवणे हे कुठेतरी अनैतिक आणि बेजबाबदारपणाचे वाटते. बाकी आता जगाला बाजरपेठ जागतीक करण्याचे "ज्ञान" देऊन अमेरीकेन्स आता "लोकल फूड" वगैरेची भाषा करू लागले आहेत - त्यात पर्यावरणाबद्दलची जशी (कधी कधी) तळमळ असते तशीच स्वतःची स्थानीक अर्थव्यवस्था टिकवण्याबाबतची काळजी पण!

In reply to by विकास

कोलबेर Wed, 04/23/2008 - 07:25
अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. उदा. पानात थोडा जास्तच भात पडला असता आता वाया कसा घालवायचा? म्हणून पोटात अनावश्यक भरायचा हे देखिल अयोग्यच. थोडक्यात, हवे तितकेच पानात वाढून घ्यावे आणि तरीही जास्त पडल्यास ते झाकून ठेवावे/ दान करावे अथवा मनावर दगड ठेवून त्याची विल्हेवाट लावावी.

In reply to by कोलबेर

विकास Wed, 04/23/2008 - 07:55
>>>अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. अगदी मान्य! म्हणूनच मी "शक्यतोवर" म्हणले. आपण म्हणता ती सवय विशेष करून अमेरिकन रेस्टॉरंट मधे ठेवावी लागते (मनावर दगड ठेवून विल्हेवाट) - विशेष करून ऑन द बॉर्डर्स अथवा चिज केक फॅक्टरी सारखी ठिकाणी. (अमेरीकेत नसलेल्यांना - चिज केक फॅक्टरी हे रेस्टॉरंटच आहे फक्त चिज केक नाहीत!)

ॐकार Wed, 04/23/2008 - 08:12
बुद्धासंबंधी मासांहाराचे विवेचन वेगळे आहे. हिंसा टाळावी असे सूत्र प्रामुख्याने दिसते. परंतु मांसाहार केवळ हिंसा होते म्हणून टाळावा असे विवेचन सापडत नाही. अन्नटंचाईला मासांहारापेक्षा अन्ननिर्मिती, अन्नसाठा, अन्नग्रहणक्षमता यांचा न जुळणारा ताळमेळ कारणीभूत आहे. शाकाहार/मांसाहार यांचे बरे-वाईट परिणाम हा लेखाच मुद्दा नसल्याने, अन्ननिर्मिती, अन्नसाठा आणि ग्रहण ह्या मुद्द्यांवर विचार व्हायला हवा. मागे एकदा दूधाला रास्त भाव न आल्याने महाराष्ट्रात/मुंबईत कितीतरी लि. दूध रस्त्यावर ओतल्याची सचित्र बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. अन्नटंचाईचे प्रमुख कारण mass production ही आहे. महिनाभराच्या पाहणीनुसार आमच्या ऑफिसमध्ये साधारण ५ दिवसांमागे तब्बल १००० किग्रॅ अन्न वाया जात होते (शाकाहार + मांसाहार) ! मग पोस्टर्स, तक्ते, मेल्स यातून केटरर्सने लोकांना याची जाण करून दिली तेव्हा ते प्रमाण ५०० किग्रॅ वर आले. अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे.

In reply to by ॐकार

ऐश्वर्या राय Wed, 04/23/2008 - 09:31
हे कसे काय अन्नटंचाईला कारण आहे? कृपया खुलासा व्हावा. नेहमी मास प्रोडक्शनमुळे वस्तूची उपलब्धता वाढते मग अन्नाचीच टंचाई कशी होते? तुम्ही दिलेले दुधाचे उदाहरण हे टंचाई संदर्भात योग्य वाटत नाही. ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो.

In reply to by ऐश्वर्या राय

ॐकार Wed, 04/23/2008 - 14:36
दूधाचा नास, कांदे सडून फुकट जाणे, भरपूर डंप्लिंग्ज खराब होणे याने कृत्रिम टंचाई उद्भवत नाही काय? मास प्रॉडक्शन चा परिणामा नाही का हा? मास प्रॉडक्शनही मागणी तसा पुरवठा तत्त्वावरच बेतलेले आहे. नाशिवंत पदार्थांबाबत हा ताळमेळ चुकला तर नक्कीच फरक पडतो. ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो लेखात हा सूर असता तर नक्कीच प्रतिसाद तसा आला असता!

विजुभाऊ Wed, 04/23/2008 - 09:59
ऐश्वर्या राय भौ तुम्ही इथे प्रत्येकाचे म्हणणे खोडुन काढायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे तेच कोणाला कळालेले दिसत नाही इथे. मला वाटते की ते तुम्हाला स्वत:लाच कळलेले नसावे. तुम्ही सनातन प्रभाती आहात काहो? असो अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे. १००००००% सहमत ***उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.'**** त्याच जिब्रान ने मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार ही त्यात उधृत केले आहेत " चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" हे विचार आपण वाचले नाहीत की ते सोयीस्करपणे तुमच्याकडच्या पुस्तकात छापले नव्हते? "गायीचे दूध" हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर पणे टाळलेला दिसतो. असो **"पर्यावरणाच्या र्‍हासाला मांसाहार जबाबदार आहे"** हे तुमचे एकुण मत आहे असे दिसते. प्रत्येकाला आपले मत बाळगण्याचा हक्क आहे. "Every One has Right to go Wrong" ऐश्वर्या राय भौ तुम्ही तुमचा हक्क बजावला.आता इतराना त्यांची मते बाळगण्याचा हक्क मिळू द्या. किमान हक्कांच्या आग्रहात : विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

ऐश्वर्या राय Wed, 04/23/2008 - 13:47
मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार: "चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" मूळ विषयाला सोडून पण एक उपयुक्त माहीती (जर खरी असेल तर) दिल्याबद्दल आभार. भारतीय दंडविधान लिहीणार्‍या कोणालाच कशी बरे ही माहीती नाही? भारतीय राहूदे, अरबस्तानात तरी?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ Wed, 04/23/2008 - 14:13
तुमच्या माहीतीखातर :माहीतीचे खरेपण पवित्र कुराणशरीफ वाचुन ताडुन घेणे The robbed is equally responsible as the robber is.........हा त्या कुराणाच्या ११ :०५ व्या आयतीचा अनुवाद. त्यासोबत आणखी एक उप आयत आहे "जुल्म ढानेवाले से भी ज्यादा जुल्म सहनेवाला सजा का हकदार है" मला अरबी दंडविधान माहीत नाही. जिब्रान हा लेबनीज होता. वरच्या दोन्ही गोष्टी ह्या त्याने मो. पैगंबरांनी पर्वतावरुन आल्यानन्तर लोकानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना लिहिल्या आहेत. पैगंबरानी लोकाना समान हक्क मिळावे ; ते मागुन मिळणार नाहीत ;त्यासाठी लोकांत आत्मसंमान जागृत व्हावा.लोकानी गुलामगिरी सहन करु नये म्हणुन हे सांगितले आहे. राहता राहिला शरियत : तो कायदा अनेक देशात लागु आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी बरीच कमी झाली आहे. अर्थात कायद्याचा अर्थ कोण कस काढतो त्यावर बरेच असते. आपल्याकडेही कायद्याचा कीस काढणारी बरीच मंडळी आहेत. उ.सू.: वाचता येत असेल तर "प्रॉफेट" या खलील जिब्रानच्या नीतान्तसुंदर पुस्तकाचे कधीतरी वाचन करुन बघा.

अवलिया Wed, 04/23/2008 - 13:28
महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले. बुद्धाचा मृत्यु बोकडाचे मांस खावुन अजीर्ण झाल्यामुळे झाला या गोष्टीचा आपणास विसर पड्ला असावा (अधुन मधुन शाकाहारी) नाना

लिखाळ Wed, 04/23/2008 - 14:59
नमस्कार, आपले, कोलबेरचे आणि विकास यांचे चर्चेसंदर्भातले विचार पटले. अन्नटंचाईया विषयाला अनेक पैलू आहेत त्यातील हा एक. अन्न्साखळी (खरेतर फूडपिरॅमिड) मध्ये बायोमास हे पिरॅमिडच्या शिखराकडे जावे तसे कमी होते हे खरेच आहे. पण १. या बाबत विचार करताना स्थानिक परिसंस्थांचा विचार मुख्यत्वाने झाला पाहिजे. त्यामुळेच सरसकट विधानातून तत्व सांगितले तरी अंमलबजावणी मात्र स्थानिक जैवविविधता आणि रचना पाहून झाली पाहिजे. उदा. गुहागरच्या सागरकिनार्‍यावरील लोक त्याच किनार्‍यावर आणि आसपास असणार्‍या प्राण्यांवर जगत असतील तर त्यांनी ते बंद करण्याचे काही कारण नाही. ते स्वतःच त्या परिसंस्थेचा भाग आहेत. पण पुण्यातले लोक जर तेथे मिळणार्‍या 'तिसर्‍या'* ट्रक भरौन आणून विकून संपवत असतील तर कालांतराने मोठा प्रश्न उद्भवेल. २. त्यामुळेच एकेठिकाणी प्राण्यांची पैदास होते पण त्यांना लागणारे तृणधान्य भलतीकडून येते आणि दोनही ठिकाणच्या नैसर्गिक-उर्जा-वहन पद्धतिचा विचका होतो. या सारख्या बाबतीत तारतम्य कसे सिद्ध करावे आणि त्यातील अर्थकारण कसे सांभाळावे हा मोठा प्रश्नच आहे. * तिसर्‍या हा किनार्‍यानजीक मिळणारा काही जीव आहे अशी माझी समजूत आहे. तसे नसेल इतर कोणते नाव घ्यावे :) उदाहरण म्हणून केवळ एक नाव घेतले. -- लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

In reply to by लिखाळ

सहज Wed, 04/23/2008 - 15:26
गेल्या महिनाभरात सर्व देशातील प्रमुख बातम्यात अन्नटंचाई, वाढत्या किमती ही बातमी हमखास येते आहे. विचार करायला लावणारे दुवे आहेत. तीच मुख्य अपेक्षा आहे. व जमेल तशी आपल्या परीने थोडि का होईना कृती.

देवदत्त Wed, 04/30/2008 - 23:19
इथे काही सदस्य म्हणताहेत की मांसाहार करू नये. जगात अन्नटंचाई होतेय. शाकाहारानेही अन्नटंचाई होतेय. अहो, आपण इथे मांसाहार/शाकाहारावर चर्चा करत बसलोय. तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय. छ्य्या... आता झुणका भाकरच खावे लागेल. बहुधा कंदमुळेच. :''( अरे हो, ते विजेचे बल्ब, ट्युबलाईट, माती खाणारेच बरे. ;)

In reply to by देवदत्त

प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 23:52
तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय. तिला म्हणावं, भारतात राईस जास्त खातात. सांभाळून मुक्ताफळे उधळ...

In reply to by देवदत्त

चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 00:07
म्हणजे इकडे माणशी दोन दोन जणांचे खाणे हादडून गेल्या वीस वर्षात अमेरिका कशी अतिलठ्ठ झाली आहे ते आधी बघा म्हणावं. :$ चतुरंग

मनापासुन Tue, 04/22/2008 - 18:35
धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार ? धर्म च जर सांगत असेल की दुसर्‍या प्राण्याला ठार मारा.मग तो धर्म कसला....अधर्म च की यासाठी श्रावण्या करतात हे माहीत होते मांसाहर करणे माहीत नव्हते?ती ही एक चैनच असते. माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो ?मला सांगा दूध शाकाहारी की मांसाहारी आणि ते मानवाला किती आवश्यक आहे? मानव सोडला तर इतर कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याचे दूध काढुन पीत नाही. ते गरजेचे ही नसते शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे असे मला मनापासुन वाटते

In reply to by मनापासुन

ऐश्वर्या राय Tue, 04/22/2008 - 19:33
अपेक्षेप्रमाणे ही प्रतिक्रिया आलीच. आपल्याला लेखाचा संदर्भ समजला नाही की दुर्लक्षित करावासा वाटला? दिलेले दुवे, या प्रश्नाची सामाजिक बाजू सांगत आहेत. दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू. इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे. कोणत्याही संवेदनाक्षम विषयासंदर्भात 'हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे' ही खूप सोयीस्कर पळवाट आहे. कोणाला दुखावण्याची भिती नको मग समाजाची दीर्घकालीन हानि झाली तरी चालेले. मला कोणी वाईट म्हणायला नको. ही टीपिकल भारतीय मनोवृत्ती आहे आणि त्याचे बरेच दुष्परीणाम आपण भोगलेले आहेत (उदा. लोकसंख्या). आता तरी यातून बाहेर पडायचा प्रयत्न होऊ दे. टीपः तुम्ही, कदाचित तुमच्या नकळत 'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. मला तसे म्हणायचे नव्हते असा खुलासा देऊ शकता ;-)

In reply to by ऐश्वर्या राय

मनापासुन Tue, 04/22/2008 - 20:27
'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. हा हा हा हा मानले बुआ तुमच्या तर्काला . का इस्लाम सोडला तर इतर धर्मात हिंसा वर्ज्य आहे? रामायणात सुद्धा मांसभक्षणाचे /धर्मा साठी प्राण्याम्च्या हत्येचे बळीचे उल्लेख आहेत. ( उदा: अश्व मेध यज्ञ / नरमेध यज्ञ) त्यावेळीस तर इस्लाम चा उदय झालेला नव्हता. जत्रेत देवाला बोकड / कोंबडा कापणे हे कोणत्या धर्मात बसते? पैगम्बराला जेंव्हा अन्नासाठी हिंसा याबद्दल विचारले तेंव्हा ते उद्गारले की तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार करा हिंसा ही होत असतेच. फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. तुम्ही सिद्धा विसरु नका की तुम्ही ही कधी तरी धुळीचा / एखाद्या प्राण्याच्या शरीराचा अंश होतात. ( संदर्भ्...प्रेषीत :खलील जिब्रान) असो तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार कर पर्यावरण नाश तर होणारच आहे. जगातल्या सर्वानी जर ठरवले की शाकाहार करायचा तर अशी वेळ येइल की लोक अन्नासाठी एकमेकांचे खून करतील्.जगातील मोठी जनसंख्या ही समुद्राकाठी रहाते. त्यानी काय शाकाहारासाठीसमुद्रात शेती करावी? दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू दूध हे गायीचे रक्तापासुन निर्माण होते. एका अर्थाने गायीचे रक्तच म्हणाना . त्यासाठी रोज गायीचे रक्त पिळुन काढले जाते. हे हत्येपेक्षा भयंकर नाही वाटत तुम्हाला? तुम्ही रोज चहा पिताना चहात दोन चमचे गायीचे रक्त पित असता. हे सगळे लक्षात न घेता केवळ शाकाहार की मांसाहार असला वाद फक्त वादासाठी म्हणुन आणल्यासरखा वाटतो. हा विषय अजिबात संवेदनाक्षम नाही. तो केवळ ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे म्हंटल्याबद्दल मला कोणी वाईट म्हणाले तरी वाईट वाटणार नाही इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे. अन्न टंचाई मांसाहारा मुळे होत नाही ती लोकसंख्येमुळे होते . त्यामुळे ती चर्चा तशीही निरर्थक आहे. दुर्लक्षित करावी अशीच वाटली. हे मनापासुन

In reply to by मनापासुन

ऐश्वर्या राय Wed, 04/23/2008 - 09:09
"फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. " या तर्काप्रमाणे उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.' मग, सोडून द्यायचे का त्या चोराला (कारण त्याने खलिल जिब्रान ची प्रॉफेट ही कादंबरी वाचलेली आहे अथवा त्यातले हे सोयीचे - त्याच्या धंद्याच्या दृष्टीने - अवतरण त्याला माहीत आहे)? अरे चोरा, पण मूळ मालक काय तुझ्या मागे लागला होता का की कसे पण कर आणि या संपत्तिला 'तुझा अंश' बनव? तसेच, तो प्राणी काय तुम्हाला आग्रह करतो का तुमचा अंश बनवा म्हणून? इस्लाम, प्राणिहत्या, हलाल इ. विषय हे खूप सविस्तर मांडण्याच्या लायकीचे आहेत पण ही ती चर्चा नव्हे. माझ्या लिखाणातले धार्मिक या शब्दानंतरचे उद्गारवाचक चिन्ह आपण लक्षात घेतलेले दिसत नाही. कित्येकदा मनुष्य स्वतःच्या सोयीसाठी, चैनीसाठी काही गोष्टी करतो आणि अपराधगंडातून मुक्ती मिळावी म्हाणून ती धार्मिक गरज असल्याची बतावणी करतो. देवदासी हे जसे त्याचे एक उदाहरण तसेच जत्रेत 'देवासाठी' बोकड कापणे हे सुध्दा. मांसाहार करताना कित्येक लोक (ज्यांना काही प्रमाणात अपराधगंड जाणवतो असे, निर्ढावलेले नव्हे) धार्मिक कारणाने खातो असा स्वतःचा गोड गैरसमज करून घेतात. त्याबद्दल ते उद्गारवाचक चिन्ह होते. वाचनाची सवय असणार्‍या कोणाला ते समजायला अवघड गेले नसावे.

इनोबा म्हणे Tue, 04/22/2008 - 18:59
शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे यांच्याशी सहमत मूळात शाकाहार किंवा मांसाहार,दोन्ही प्रकारांत हत्या ही अटळ आहे. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

ऐश्वर्या राय Tue, 04/22/2008 - 19:38
किती हत्या कोणत्या प्रकारात होते ते महत्वाचे आहे. दिलेले दुवे तोच मुद्दा मांडत आहेत. एक पाऊंड बीफ बनवायला ५ पाउंड धान्य लागते असे त्यात दिले आहे. थोडक्यात, किमान ५ पट जास्त र्‍हास.

प्रशांतकवळे Tue, 04/22/2008 - 19:14
माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो हे जरी विचारात घेतले जात नसले तरी मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले झाडात जीव नसतो का? बरं पाश्चात्य विचारवंत काय लिहीतात त्यावर विश्वास किती ठेवावा? कधी ते चहाला अपायकारक संबोधतात तर कधी उपायकारक.. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो हे लिहिणारे व मानणारे पाश्चात्य होते. "ब्लॅक होल" मधुन काहीच उत्सर्जीत होत नाही हे लिहीणारा पाश्चात्य आहे जे त्याने कबुल केले की चुकीचे आहे म्हणुन! प्रशांत

In reply to by प्रशांतकवळे

कोलबेर Tue, 04/22/2008 - 20:03
प्रशांतराव जो संगणक आणि माहिती जाल वापरुन तुम्ही हा प्रतिसाद लिहिलात त्या दोन्हीही ह्या लबाड पाश्चात्यांच्याच देणग्या आहेत. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.

In reply to by व्यंकट

कोलबेर Tue, 04/22/2008 - 19:59
शिकरण, श्रीखंड, शेवयांची खीर वगैरे पदार्थांतुन पर्यावरणाची (तितकी) हानी होत नाही जितकी एखादा बर्गर अथवा लुसलुशीत स्टेक खाण्यातुन होते. त्यामूळे श्रीखंड शिकरण ह्यांची तुलना इथे अप्रस्तुत आहे.

कोलबेर Tue, 04/22/2008 - 19:56
पर्यावरणाच्या र्‍हासाचा विचार केला असता मांसाहार कमी झाला पाहिजे ह्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. पूर्वी केवळ 'निरपराध जीवांची हत्या नको' ह्या कारणास्तव विरोध होणार्‍या ह्या विषयाला आता ही नविन (अधिक गंभीर) डायमेन्शन मिळाली आहे ह्या ऐश्वर्या राय ह्यांच्या म्हणण्याशी सहमत आहे. पण तसेही भारतीयांच्या आहारात इतर खाद्य संस्कृतींच्या तुलनेत मांसाहाराचे प्रमाण नगण्य आहे. पाश्चात्य देशांमध्ये रोज दोन्ही वेळच्या जेवणाला (मोठ्या प्रमाणात) मांसाहार करणारे बहुसंख्येने आहेत. ते जो पर्यंत आपला मांसाहार (विशेषतः गाय आणि डूक्कर) जाणवण्या इतपत कमी करत नाहीत तो पर्यंत ह्या प्रश्नावर तोडगा निघणे कठीण आहे. -कोलबेर

In reply to by कोलबेर

व्यंकट Tue, 04/22/2008 - 22:09
नैसर्गीक रित्या निर्माण केलेले नसून त्यांची शेती केली जाते, व मागणी / आवश्यकते नुसार त्यांची पैदास होते, जस्ट लाईक केळी, दूध आणि तांदूळ... म्हणूनच मी तसे उदाहरणही दिले होते. व्यंकट

In reply to by कोलबेर

ऐश्वर्या राय Wed, 04/23/2008 - 09:23
हे पूर्णपणे मान्य. आणि, दिलेला दुवा, त्यांच्यापैकी काही याबबत जागृत होत आहे हे दर्शविणारा आहे. इथे, भारतीयांनीही आपल्याला जमेल तशी ही जबाबदारी घ्यावी. ज्याप्रमाणे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ही पाश्चात्यांची जास्त जबाबदारी आहे पण भारतीयांनीही आपला वाटा त्यात उचलला पाहीजे त्याप्रमाणेच. अन्नटंचाईचा सर्वात जास्त फटका आपल्यासारख्या देशाला बसतो. अमेरिका व इतर धनवान देश जास्त काळ ही अडचण सहन करू शकतात. या लेखात नमूद केलेले फिजीमधले दंगे हे एक उदाहरण आहे. गेले २-३ आठवडे भारतात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. इतका की सरकार बिथरून गेलेले आहे. आणि, ही महागाई प्रत्यक्ष टंचाईमुळे झालेली आहे. ही टंचाई भारतीय नाही तर जागतिक आहे. आज भारत धान्य विकत घ्यायला तयार असूनही विकायला इतर देश तयार नाहीत कारण तेच आज टंचाईचा सामना करत आहेत. हा लेख इतक्या योग्य वेळेस प्रकाशित झाल्याने इथे त्याचा दुवा दिला.

धोंडोपंत Tue, 04/22/2008 - 20:28
कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे आहे. त्यात धार्मिक बाबी आणू नयेत असे वाटते. आम्ही स्वतः मालवणी पदार्थांचे दिवाने आहोत. कोंबडीवडे, सागुती, सोलकढी हे आम्हाला अमृतासमान आहेत. उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म|| आपला, (मांसाहारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पिवळा डांबिस Tue, 04/22/2008 - 22:59
सर्व मांसाहारी मिपाकरांना आम्ही जाहीर आवाहन करू इच्छितो की आजपासून त्यांनी मांसाहार सोडून द्यावा आणि पूर्णपणे शाकाहार अंगिकारावा! स्वगतः त्यामुळां तरी माशे-मटणाचे भाव खाली येतंत काय तां बघूयां! साली बाजाराक जावंची सोय उरली नाय!! चांगली पापलेटाची जोडी साली ६०० रुपयांच्या खाली गावणां नाय! काय म्हागाई म्हणूची का सोंग!! म्हागाईन गांजलेलो पिवळो डांबिस

विसोबा खेचर Wed, 04/23/2008 - 00:08
मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे). आपल्या आजारांचं काय करायचं अन काय नाही ते मांसाहार करणारी मंडळी पाहून घेतील असं मला वाटतं! इतरांनी त्याची नसती काळजी करू नये असंही मला वाटतं! सालं उद्या आजारी पडलो तर आमची आम्हीच बीलं भरणार आहोत ना? की कुणी शाकाहारी माईचा लाल आमची बिलं भरायला येणार आहे? नाही ना? मग आमचं आम्ही पाहून घेऊ! मेलो तरी बेहत्तर पण तिच्यायला मरण्यापूर्वी चापून मटणवडे, माश्याची आमटी, तळलेले बोंबिल आणि कोलंबीभात खाऊ! ;) महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले. हा हा हा! दॅट्स इट! :) भलतीसलती कामं करायला घेतली की फारसं यश येतच नाही! च्यामारी, आम्ही काय खायचं नी काय नाही हे तो बुद्ध कोण ठरवणार? साला, आम्ही काय त्याच्या पैशांनी खातो का? त्यातले फारच थोडे आरोग्यासाठी वा धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार करत असावेत. हो हो! मी त्यापैकी एक! ;) मात्र, जे कोणी संवेदनाशील सभासद असतील ते किमान एकदा याबाबत विचार करतील अशीही खात्री आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या संवेदना मी खात असलेल्या बोंबलाबरोबरच मेल्या आहेत! :) मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले तरी या लिखाणाचा उपयोग झाला असे मला मानता येईल. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्याकरता तरी आपल्या या लिखाणाचा शून्य उपयोग आहे असंच म्हणावं लागेल! असो, तरीही आपण जे काही लिहिलं आहे ते आपले व्यक्तिगत विचार असावेत असं मला वाटतं आणि त्याचा मी आदर करतो! सर्वे भद्राणि पश्यन्तु| म्हणजे काय? तुमचं ते शाकाहारी संसकृत आपल्याला कळत नाय साहेब! आवशीच्या भाषेत काही कळेल असं लिवा! आपला, (बोंबिल व मालवणी मटणाचा प्रेमी) तात्या.

विकास Wed, 04/23/2008 - 06:35
मांसाहाराबद्दलचा पर्यावरणीय दृष्टिकोन मान्य आहे. त्याबद्दल अजून एक म्हणावेसे वाटते की (जे मी पण पाळायचा प्रयत्न करतो - मांसाहाराबद्दल आणि शाकाहाराबद्दल पण) : आपण शक्यतोवर अन्न वाया घालवू नये. एक तर अनेकांना खायला मिळत नसते तसेच साधनसंपत्ती ते अन्न आपल्यापर्यंत पोचायला वापरलेली असते. त्यामुळे ते वाया घालवणे हे कुठेतरी अनैतिक आणि बेजबाबदारपणाचे वाटते. बाकी आता जगाला बाजरपेठ जागतीक करण्याचे "ज्ञान" देऊन अमेरीकेन्स आता "लोकल फूड" वगैरेची भाषा करू लागले आहेत - त्यात पर्यावरणाबद्दलची जशी (कधी कधी) तळमळ असते तशीच स्वतःची स्थानीक अर्थव्यवस्था टिकवण्याबाबतची काळजी पण!

In reply to by विकास

कोलबेर Wed, 04/23/2008 - 07:25
अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. उदा. पानात थोडा जास्तच भात पडला असता आता वाया कसा घालवायचा? म्हणून पोटात अनावश्यक भरायचा हे देखिल अयोग्यच. थोडक्यात, हवे तितकेच पानात वाढून घ्यावे आणि तरीही जास्त पडल्यास ते झाकून ठेवावे/ दान करावे अथवा मनावर दगड ठेवून त्याची विल्हेवाट लावावी.

In reply to by कोलबेर

विकास Wed, 04/23/2008 - 07:55
>>>अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. अगदी मान्य! म्हणूनच मी "शक्यतोवर" म्हणले. आपण म्हणता ती सवय विशेष करून अमेरिकन रेस्टॉरंट मधे ठेवावी लागते (मनावर दगड ठेवून विल्हेवाट) - विशेष करून ऑन द बॉर्डर्स अथवा चिज केक फॅक्टरी सारखी ठिकाणी. (अमेरीकेत नसलेल्यांना - चिज केक फॅक्टरी हे रेस्टॉरंटच आहे फक्त चिज केक नाहीत!)

ॐकार Wed, 04/23/2008 - 08:12
बुद्धासंबंधी मासांहाराचे विवेचन वेगळे आहे. हिंसा टाळावी असे सूत्र प्रामुख्याने दिसते. परंतु मांसाहार केवळ हिंसा होते म्हणून टाळावा असे विवेचन सापडत नाही. अन्नटंचाईला मासांहारापेक्षा अन्ननिर्मिती, अन्नसाठा, अन्नग्रहणक्षमता यांचा न जुळणारा ताळमेळ कारणीभूत आहे. शाकाहार/मांसाहार यांचे बरे-वाईट परिणाम हा लेखाच मुद्दा नसल्याने, अन्ननिर्मिती, अन्नसाठा आणि ग्रहण ह्या मुद्द्यांवर विचार व्हायला हवा. मागे एकदा दूधाला रास्त भाव न आल्याने महाराष्ट्रात/मुंबईत कितीतरी लि. दूध रस्त्यावर ओतल्याची सचित्र बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. अन्नटंचाईचे प्रमुख कारण mass production ही आहे. महिनाभराच्या पाहणीनुसार आमच्या ऑफिसमध्ये साधारण ५ दिवसांमागे तब्बल १००० किग्रॅ अन्न वाया जात होते (शाकाहार + मांसाहार) ! मग पोस्टर्स, तक्ते, मेल्स यातून केटरर्सने लोकांना याची जाण करून दिली तेव्हा ते प्रमाण ५०० किग्रॅ वर आले. अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे.

In reply to by ॐकार

ऐश्वर्या राय Wed, 04/23/2008 - 09:31
हे कसे काय अन्नटंचाईला कारण आहे? कृपया खुलासा व्हावा. नेहमी मास प्रोडक्शनमुळे वस्तूची उपलब्धता वाढते मग अन्नाचीच टंचाई कशी होते? तुम्ही दिलेले दुधाचे उदाहरण हे टंचाई संदर्भात योग्य वाटत नाही. ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो.

In reply to by ऐश्वर्या राय

ॐकार Wed, 04/23/2008 - 14:36
दूधाचा नास, कांदे सडून फुकट जाणे, भरपूर डंप्लिंग्ज खराब होणे याने कृत्रिम टंचाई उद्भवत नाही काय? मास प्रॉडक्शन चा परिणामा नाही का हा? मास प्रॉडक्शनही मागणी तसा पुरवठा तत्त्वावरच बेतलेले आहे. नाशिवंत पदार्थांबाबत हा ताळमेळ चुकला तर नक्कीच फरक पडतो. ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो लेखात हा सूर असता तर नक्कीच प्रतिसाद तसा आला असता!

विजुभाऊ Wed, 04/23/2008 - 09:59
ऐश्वर्या राय भौ तुम्ही इथे प्रत्येकाचे म्हणणे खोडुन काढायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे तेच कोणाला कळालेले दिसत नाही इथे. मला वाटते की ते तुम्हाला स्वत:लाच कळलेले नसावे. तुम्ही सनातन प्रभाती आहात काहो? असो अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे. १००००००% सहमत ***उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.'**** त्याच जिब्रान ने मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार ही त्यात उधृत केले आहेत " चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" हे विचार आपण वाचले नाहीत की ते सोयीस्करपणे तुमच्याकडच्या पुस्तकात छापले नव्हते? "गायीचे दूध" हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर पणे टाळलेला दिसतो. असो **"पर्यावरणाच्या र्‍हासाला मांसाहार जबाबदार आहे"** हे तुमचे एकुण मत आहे असे दिसते. प्रत्येकाला आपले मत बाळगण्याचा हक्क आहे. "Every One has Right to go Wrong" ऐश्वर्या राय भौ तुम्ही तुमचा हक्क बजावला.आता इतराना त्यांची मते बाळगण्याचा हक्क मिळू द्या. किमान हक्कांच्या आग्रहात : विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

ऐश्वर्या राय Wed, 04/23/2008 - 13:47
मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार: "चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" मूळ विषयाला सोडून पण एक उपयुक्त माहीती (जर खरी असेल तर) दिल्याबद्दल आभार. भारतीय दंडविधान लिहीणार्‍या कोणालाच कशी बरे ही माहीती नाही? भारतीय राहूदे, अरबस्तानात तरी?

In reply to by ऐश्वर्या राय

विजुभाऊ Wed, 04/23/2008 - 14:13
तुमच्या माहीतीखातर :माहीतीचे खरेपण पवित्र कुराणशरीफ वाचुन ताडुन घेणे The robbed is equally responsible as the robber is.........हा त्या कुराणाच्या ११ :०५ व्या आयतीचा अनुवाद. त्यासोबत आणखी एक उप आयत आहे "जुल्म ढानेवाले से भी ज्यादा जुल्म सहनेवाला सजा का हकदार है" मला अरबी दंडविधान माहीत नाही. जिब्रान हा लेबनीज होता. वरच्या दोन्ही गोष्टी ह्या त्याने मो. पैगंबरांनी पर्वतावरुन आल्यानन्तर लोकानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना लिहिल्या आहेत. पैगंबरानी लोकाना समान हक्क मिळावे ; ते मागुन मिळणार नाहीत ;त्यासाठी लोकांत आत्मसंमान जागृत व्हावा.लोकानी गुलामगिरी सहन करु नये म्हणुन हे सांगितले आहे. राहता राहिला शरियत : तो कायदा अनेक देशात लागु आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी बरीच कमी झाली आहे. अर्थात कायद्याचा अर्थ कोण कस काढतो त्यावर बरेच असते. आपल्याकडेही कायद्याचा कीस काढणारी बरीच मंडळी आहेत. उ.सू.: वाचता येत असेल तर "प्रॉफेट" या खलील जिब्रानच्या नीतान्तसुंदर पुस्तकाचे कधीतरी वाचन करुन बघा.

अवलिया Wed, 04/23/2008 - 13:28
महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले. बुद्धाचा मृत्यु बोकडाचे मांस खावुन अजीर्ण झाल्यामुळे झाला या गोष्टीचा आपणास विसर पड्ला असावा (अधुन मधुन शाकाहारी) नाना

लिखाळ Wed, 04/23/2008 - 14:59
नमस्कार, आपले, कोलबेरचे आणि विकास यांचे चर्चेसंदर्भातले विचार पटले. अन्नटंचाईया विषयाला अनेक पैलू आहेत त्यातील हा एक. अन्न्साखळी (खरेतर फूडपिरॅमिड) मध्ये बायोमास हे पिरॅमिडच्या शिखराकडे जावे तसे कमी होते हे खरेच आहे. पण १. या बाबत विचार करताना स्थानिक परिसंस्थांचा विचार मुख्यत्वाने झाला पाहिजे. त्यामुळेच सरसकट विधानातून तत्व सांगितले तरी अंमलबजावणी मात्र स्थानिक जैवविविधता आणि रचना पाहून झाली पाहिजे. उदा. गुहागरच्या सागरकिनार्‍यावरील लोक त्याच किनार्‍यावर आणि आसपास असणार्‍या प्राण्यांवर जगत असतील तर त्यांनी ते बंद करण्याचे काही कारण नाही. ते स्वतःच त्या परिसंस्थेचा भाग आहेत. पण पुण्यातले लोक जर तेथे मिळणार्‍या 'तिसर्‍या'* ट्रक भरौन आणून विकून संपवत असतील तर कालांतराने मोठा प्रश्न उद्भवेल. २. त्यामुळेच एकेठिकाणी प्राण्यांची पैदास होते पण त्यांना लागणारे तृणधान्य भलतीकडून येते आणि दोनही ठिकाणच्या नैसर्गिक-उर्जा-वहन पद्धतिचा विचका होतो. या सारख्या बाबतीत तारतम्य कसे सिद्ध करावे आणि त्यातील अर्थकारण कसे सांभाळावे हा मोठा प्रश्नच आहे. * तिसर्‍या हा किनार्‍यानजीक मिळणारा काही जीव आहे अशी माझी समजूत आहे. तसे नसेल इतर कोणते नाव घ्यावे :) उदाहरण म्हणून केवळ एक नाव घेतले. -- लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

In reply to by लिखाळ

सहज Wed, 04/23/2008 - 15:26
गेल्या महिनाभरात सर्व देशातील प्रमुख बातम्यात अन्नटंचाई, वाढत्या किमती ही बातमी हमखास येते आहे. विचार करायला लावणारे दुवे आहेत. तीच मुख्य अपेक्षा आहे. व जमेल तशी आपल्या परीने थोडि का होईना कृती.

देवदत्त Wed, 04/30/2008 - 23:19
इथे काही सदस्य म्हणताहेत की मांसाहार करू नये. जगात अन्नटंचाई होतेय. शाकाहारानेही अन्नटंचाई होतेय. अहो, आपण इथे मांसाहार/शाकाहारावर चर्चा करत बसलोय. तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय. छ्य्या... आता झुणका भाकरच खावे लागेल. बहुधा कंदमुळेच. :''( अरे हो, ते विजेचे बल्ब, ट्युबलाईट, माती खाणारेच बरे. ;)

In reply to by देवदत्त

प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 23:52
तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय. तिला म्हणावं, भारतात राईस जास्त खातात. सांभाळून मुक्ताफळे उधळ...

In reply to by देवदत्त

चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 00:07
म्हणजे इकडे माणशी दोन दोन जणांचे खाणे हादडून गेल्या वीस वर्षात अमेरिका कशी अतिलठ्ठ झाली आहे ते आधी बघा म्हणावं. :$ चतुरंग
मांसाहारामुळे अन्नटंचाईच्या समस्येला कसा मोठा हातभार लागत आहे त्याबद्दल माहीतीपूर्ण दुवे: http://blog.wired.com/wiredscience/2008/04/food-riots-begi.html http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/index.html आजची पिढी ही पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत मांसाहाराकडे जास्त वळलेली आहे आणि रोज त्यात भर पडत आहे. मांसाहाराचे इतर बरेच तोटे अनेक वेळेस अनेक ठिकाणी नमूद केलेले आहेतच (मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे).

आझमचाचा! (२)

श्रावण मोडक ·

वरदा Tue, 04/22/2008 - 18:54
या देशाचा हा मोठा वारसा असाच निसर्गाच्या कुशीत विरून जाणार आहे हे जाणवून पाणावलेले डोळे... छान लिहिलय...

सहज Tue, 04/22/2008 - 20:33
दोन्ही भाग आवडले. पण आझमचाचा चा एखादा फोटो काढायला, निदान कुठूनतरी मिळवुन टाकायला पाहीजे होता असे वाटते.

चतुरंग Tue, 04/22/2008 - 21:10
फारच सुंदर. दोन्ही भाग एकदम चोख सोनं. श्रावणसर, सुंदर लिखाणाबद्दल अभिनंदन. चतुरंग

प्रमोद देव Wed, 04/23/2008 - 08:39
मोडकसाहेब आपण लिहिलेले हे जे काही आहे ते निव्वळ आझमचाचाचे व्यक्तिचित्र नसून जीवंत व्यक्तिशिल्पही आहे असे वाटते. अतिशय उत्कृष्ट लेखनाचा नमुना तुम्ही पेश केलाय. अभिनंदन! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसुनाना Wed, 04/23/2008 - 13:05
त्यामुळं त्याची सारीच मांडणी अनाग्रही असायची. कदाचित त्यामुळंच ती अनेकांना भावत असली तरी, विद्वज्जड होत नसल्यानं अशी दुर्लक्षितही रहात असावी. मला कुतुहल आहे ते माणसं अशी का वागतात यात. ही लेणीच घे. ती कोरावीशी त्या काळातही त्या लोकांना का वाटलं असावं हा प्रश्न मला लेण्यांकडं खेचून नेतो. मग त्या लेण्यांचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास असाच प्रत्येक ठिकाणी कुतुहल निर्माण करून जातो. ते कुतुहल माणसाच्या वर्तनाविषयीचंच असतं. मग त्या-त्या गोष्टींकडं पाहण्यासाठी मी मिळेल तिथून माहिती मिळवून माझी दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न करतो. चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता.... मोठाच मार्मिक लेख.असे लेखन सातत्याने वाचायला आवडेल.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 22:30
श्री. श्रावण मोडक, दोन्ही भाग वाचले अतिशय उत्कृष्ट झाले आहेत. अभिनंदन. वाचता वाचतानाच आझमचाचांना भेटण्याची, त्यांच्या नजरेतून लेणी पाहण्याची, तो इतिहास जागवण्याची ओढ निर्माण झाली. परंतु, आझमचाचा आज हयात नाहीत हे वाचून मन विषण्ण झाले. आपण खरेच भाग्यवान आहात.

अर्धवटराव गुरुवार, 07/26/2012 - 01:23
श्रामो सारख्यांची लेखणी "तयार" कशी होते? उत्तर मिळतय कि या लेखणीचे मूळं आझमचाचा सारख्या काळ्या मातीत रुजलेली असतात. मला माणुस म्हणुन जगण्याचा अभिमान वाटावा असे आझमचाचा पार काळजात उतरवले श्रामो जी. धन्यवाद. अर्धवटराव

वीणा३ गुरुवार, 07/26/2012 - 05:23
अशी जीव ओतून काम करणारी लोक खरच खूप कमी असतात. दुर्दैवाने हे लोक फक्त आपल्या कामात उत्तम असतात. त्यामुळे त्यांचं काम मर्यादित राहत. हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by वीणा३

स्पंदना गुरुवार, 07/26/2012 - 07:46
अगदी कारण त्या कामाशी त्यांच भावविश्व जुळलेल असत. व्वा श्रामो! हॅटस ऑफ! खोदकाम करणार्‍यांनाही धन्स.

फारच सुंदर व्यक्तीचित्रण... लेणी-किल्ले-मंदिरे-शिल्पे पाहताना असा जाणकार बरोबर असला तर भटकंतीचे सोने होते. पहिला धागा पण वर काढा कृपया.

वरदा Tue, 04/22/2008 - 18:54
या देशाचा हा मोठा वारसा असाच निसर्गाच्या कुशीत विरून जाणार आहे हे जाणवून पाणावलेले डोळे... छान लिहिलय...

सहज Tue, 04/22/2008 - 20:33
दोन्ही भाग आवडले. पण आझमचाचा चा एखादा फोटो काढायला, निदान कुठूनतरी मिळवुन टाकायला पाहीजे होता असे वाटते.

चतुरंग Tue, 04/22/2008 - 21:10
फारच सुंदर. दोन्ही भाग एकदम चोख सोनं. श्रावणसर, सुंदर लिखाणाबद्दल अभिनंदन. चतुरंग

प्रमोद देव Wed, 04/23/2008 - 08:39
मोडकसाहेब आपण लिहिलेले हे जे काही आहे ते निव्वळ आझमचाचाचे व्यक्तिचित्र नसून जीवंत व्यक्तिशिल्पही आहे असे वाटते. अतिशय उत्कृष्ट लेखनाचा नमुना तुम्ही पेश केलाय. अभिनंदन! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसुनाना Wed, 04/23/2008 - 13:05
त्यामुळं त्याची सारीच मांडणी अनाग्रही असायची. कदाचित त्यामुळंच ती अनेकांना भावत असली तरी, विद्वज्जड होत नसल्यानं अशी दुर्लक्षितही रहात असावी. मला कुतुहल आहे ते माणसं अशी का वागतात यात. ही लेणीच घे. ती कोरावीशी त्या काळातही त्या लोकांना का वाटलं असावं हा प्रश्न मला लेण्यांकडं खेचून नेतो. मग त्या लेण्यांचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास असाच प्रत्येक ठिकाणी कुतुहल निर्माण करून जातो. ते कुतुहल माणसाच्या वर्तनाविषयीचंच असतं. मग त्या-त्या गोष्टींकडं पाहण्यासाठी मी मिळेल तिथून माहिती मिळवून माझी दृष्टी विस्तारण्याचा प्रयत्न करतो. चाचाला वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकल्याचा उल्लेख मी मघा केला होता.... मोठाच मार्मिक लेख.असे लेखन सातत्याने वाचायला आवडेल.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/24/2008 - 22:30
श्री. श्रावण मोडक, दोन्ही भाग वाचले अतिशय उत्कृष्ट झाले आहेत. अभिनंदन. वाचता वाचतानाच आझमचाचांना भेटण्याची, त्यांच्या नजरेतून लेणी पाहण्याची, तो इतिहास जागवण्याची ओढ निर्माण झाली. परंतु, आझमचाचा आज हयात नाहीत हे वाचून मन विषण्ण झाले. आपण खरेच भाग्यवान आहात.

अर्धवटराव गुरुवार, 07/26/2012 - 01:23
श्रामो सारख्यांची लेखणी "तयार" कशी होते? उत्तर मिळतय कि या लेखणीचे मूळं आझमचाचा सारख्या काळ्या मातीत रुजलेली असतात. मला माणुस म्हणुन जगण्याचा अभिमान वाटावा असे आझमचाचा पार काळजात उतरवले श्रामो जी. धन्यवाद. अर्धवटराव

वीणा३ गुरुवार, 07/26/2012 - 05:23
अशी जीव ओतून काम करणारी लोक खरच खूप कमी असतात. दुर्दैवाने हे लोक फक्त आपल्या कामात उत्तम असतात. त्यामुळे त्यांचं काम मर्यादित राहत. हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by वीणा३

स्पंदना गुरुवार, 07/26/2012 - 07:46
अगदी कारण त्या कामाशी त्यांच भावविश्व जुळलेल असत. व्वा श्रामो! हॅटस ऑफ! खोदकाम करणार्‍यांनाही धन्स.

फारच सुंदर व्यक्तीचित्रण... लेणी-किल्ले-मंदिरे-शिल्पे पाहताना असा जाणकार बरोबर असला तर भटकंतीचे सोने होते. पहिला धागा पण वर काढा कृपया.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

आझमचाचा!(१)

श्रावण मोडक ·

भुमन्यु Sat, 06/01/2013 - 16:25
सापडला...भाग २ वाचला आणि भाग एक वाचायची तिव्र ईच्छा झाली... अखेर सापडला

In reply to by भुमन्यु

भाग १ शोधल्याबद्दल धन्यवाद ! मलाही तो वाचायची खूप इच्छा झाली होती. तुमच्या उत्खननामुळे ती पुरी झाली !

भुमन्यु Sat, 06/01/2013 - 16:25
सापडला...भाग २ वाचला आणि भाग एक वाचायची तिव्र ईच्छा झाली... अखेर सापडला

In reply to by भुमन्यु

भाग १ शोधल्याबद्दल धन्यवाद ! मलाही तो वाचायची खूप इच्छा झाली होती. तुमच्या उत्खननामुळे ती पुरी झाली !
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

विश्वकर्मा नीलकांत

आनंदयात्री ·

मनस्वी Tue, 04/22/2008 - 14:31
* विश्वकर्मा नीलकांत * शशांक * ॐकार * तात्या * * अभिनंदन * धन्यवाद * शुभेच्छा *

धमाल मुलगा Tue, 04/22/2008 - 14:30
आनंदयात्रीसाहेबांनी आमच्या जणू तोंडची वाक्यंच पळवली... त्यानी एव्हढं छान अभिनंदन आणि धन्यवाद देण्याचं तंत्र अवलंबलं की आम्हाला आता काही बोलण्याची गरजच उरलेली नाही.. तरीही.. विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद. आपलाच, ध मा ल.

विसोबा खेचर Tue, 04/22/2008 - 14:36
एखाद्या सुग्रण गृहिणीला खुप दिवसांनी ओट्याला बसवलेल्या किचन ट्रॉलीचा आनंद, एखाद्या कॉलेजकुमाराला नव्याने मिळलेल्या क्यामेरावाल्या मोबाइलचा आनंद, एखाद्या तरुणाला आपल्या गोडश्या गर्लफ्रेंडला मित्रात मिरवण्याचा आनंद कित्ती कित्ती असेल नाई !! तसाच आम्हालाही आमच्या मिपावरच्या या सुधारणेचा खुप खुप आनंद झालाय. वा! क्या बात है... :) आणी हो याचबरोबर आपल्या घराची ओसरी अगदी आनंदाने आम्हाला खेळायला देणार्‍या तात्यांचे पण धन्यवाद. :) अहो तुमच्यासारखी चार स्वच्छंदी, दिलखुलास माणसं या ओसरीवर वावरतात म्हणून तर तिला शोभा आहे! त्यामुळे उलटपक्षी, मिपाचं अंगण, पडवी, ओसरी हसतीखेळती, जिवंत ठेवल्याबद्दल खरं तर मीच सर्वांचा आभारी आहे...! या ओसरीवर कितीही खेळा, हसा, बागडा, रडा, धिंगाणा घाला, काय हव्वं ते करा! परंतु फक्त एकच अट! या ओसरीवर प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या गप्पा मारायच्या नाहीत! बाकी काय हव्वं ते करा! :))))))))))))))))) आपला, (मिपाच्या ओसरीवरचा एक सांगाती) तात्या.

शितल Tue, 04/22/2008 - 17:24
विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद.

मनस्वी Tue, 04/22/2008 - 14:31
* विश्वकर्मा नीलकांत * शशांक * ॐकार * तात्या * * अभिनंदन * धन्यवाद * शुभेच्छा *

धमाल मुलगा Tue, 04/22/2008 - 14:30
आनंदयात्रीसाहेबांनी आमच्या जणू तोंडची वाक्यंच पळवली... त्यानी एव्हढं छान अभिनंदन आणि धन्यवाद देण्याचं तंत्र अवलंबलं की आम्हाला आता काही बोलण्याची गरजच उरलेली नाही.. तरीही.. विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद. आपलाच, ध मा ल.

विसोबा खेचर Tue, 04/22/2008 - 14:36
एखाद्या सुग्रण गृहिणीला खुप दिवसांनी ओट्याला बसवलेल्या किचन ट्रॉलीचा आनंद, एखाद्या कॉलेजकुमाराला नव्याने मिळलेल्या क्यामेरावाल्या मोबाइलचा आनंद, एखाद्या तरुणाला आपल्या गोडश्या गर्लफ्रेंडला मित्रात मिरवण्याचा आनंद कित्ती कित्ती असेल नाई !! तसाच आम्हालाही आमच्या मिपावरच्या या सुधारणेचा खुप खुप आनंद झालाय. वा! क्या बात है... :) आणी हो याचबरोबर आपल्या घराची ओसरी अगदी आनंदाने आम्हाला खेळायला देणार्‍या तात्यांचे पण धन्यवाद. :) अहो तुमच्यासारखी चार स्वच्छंदी, दिलखुलास माणसं या ओसरीवर वावरतात म्हणून तर तिला शोभा आहे! त्यामुळे उलटपक्षी, मिपाचं अंगण, पडवी, ओसरी हसतीखेळती, जिवंत ठेवल्याबद्दल खरं तर मीच सर्वांचा आभारी आहे...! या ओसरीवर कितीही खेळा, हसा, बागडा, रडा, धिंगाणा घाला, काय हव्वं ते करा! परंतु फक्त एकच अट! या ओसरीवर प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या गप्पा मारायच्या नाहीत! बाकी काय हव्वं ते करा! :))))))))))))))))) आपला, (मिपाच्या ओसरीवरचा एक सांगाती) तात्या.

शितल Tue, 04/22/2008 - 17:24
विश्वकर्मा नीलकांत, शशांक, ॐकार ह्यांना मनापासून धन्यवाद.
अरे हो हो हो ... सांगतो .. असे शीर्षक का ते सांगतो ... "विश्वकर्मा नीलकांत" असे धमालराव आमच्या कांताला संबोधत असतात, कारण दिवसभर (ऍटलिष्ट धा तास तरी) मिपा आमच्या साठी विश्व असते हो. आम्ही दिवसभर इकडे वावरतो, चकाट्या पिटतो, एकमेकांची खेचतो, एकमेकांची सुख दु:ख्खे वाटतो झालच तर आत्मानंदी गुरु वैगेरे पण मिळवतो :).

आबांच्या राज्यात...

अजय जोशी ·

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:20
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. खरं आहे! हे आबा आणि विलास देशमुख लेकाचे वातानुकुलीत खोल्यात बसतात आणि इथे आम्ही मात्र रोजच्या तीन ते पाच तासांचे भारनियमन सहन करतो आहोत! भोगतील साले आपल्या कर्माची फळं! उकाड्याने भाजून आणि अंगाची आग आग होऊन मरतील साले! तात्या.

मदनबाण Wed, 04/30/2008 - 09:29
श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला तर पहाटे ५ च्या काकड आरतीच्या सुमारास वीज जाते व सकाळी अंदाजे १० /११ च्या सुमारास परत येते.... ज्या राज्यात देवालयातही वीज पुरवठा धड होत नाही त्या राज्याचा जनतेचे हाल कोण पहाणार ????? (भारनियमाने त्रस्त झालेला.....) मदनबाण

कुंदन Wed, 05/07/2008 - 13:05
तासली म्हणजे नक्की काय केले ? वायफळ गप्पा मारण्यापलीकडे काही भरीव केल्याचे स्मरत नाही. जसे की गृहमंत्री या नात्याने विनापरवाना मुंबईत राहणार्‍या बांगलादेशी नागरीकांना हुसकावून लावले ... .... दारूबंदी , गुटकाबंदी केली..... आणि असेच काही....

विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 09:20
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. खरं आहे! हे आबा आणि विलास देशमुख लेकाचे वातानुकुलीत खोल्यात बसतात आणि इथे आम्ही मात्र रोजच्या तीन ते पाच तासांचे भारनियमन सहन करतो आहोत! भोगतील साले आपल्या कर्माची फळं! उकाड्याने भाजून आणि अंगाची आग आग होऊन मरतील साले! तात्या.

मदनबाण Wed, 04/30/2008 - 09:29
श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला तर पहाटे ५ च्या काकड आरतीच्या सुमारास वीज जाते व सकाळी अंदाजे १० /११ च्या सुमारास परत येते.... ज्या राज्यात देवालयातही वीज पुरवठा धड होत नाही त्या राज्याचा जनतेचे हाल कोण पहाणार ????? (भारनियमाने त्रस्त झालेला.....) मदनबाण

कुंदन Wed, 05/07/2008 - 13:05
तासली म्हणजे नक्की काय केले ? वायफळ गप्पा मारण्यापलीकडे काही भरीव केल्याचे स्मरत नाही. जसे की गृहमंत्री या नात्याने विनापरवाना मुंबईत राहणार्‍या बांगलादेशी नागरीकांना हुसकावून लावले ... .... दारूबंदी , गुटकाबंदी केली..... आणि असेच काही....
लेखनविषय:
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. तासून तासून तासणार काय? आबांनी कोणाची ठेवलीय काय?