मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिअर गर्ल्सचा खेळामधे वापर किती योग्य अथवा अयोग्य/ आवश्यक अथवा अनावश्यक?

अनामिका ·

एकदम अनावश्यक....आबा मनावर घेताहेत असे आजच्या पेपरात वाचले.... कदाचित मुंबईमध्ये तरी हे हिडीस प्रकार बॅन होतील.... (फक्त क्रिकेटचा चाहता...) भडकमकर

आनंदयात्री 25/04/2008 - 14:17
वैयक्तिक रित्या त्यात काही गैर वाटत नाही बॉ ! त्या अनुषंगाने शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की बार गर्ल्स ना नाचवा, त्यांना रोजी रोटी तरी मिळेल. हे बघा

In reply to by आनंदयात्री

चित्रा 25/04/2008 - 19:05
चीअरलिडींग बघताना चांगले वाटत असेल, पण त्यात भाग घेणार्‍या मुली अनेकदा जखमी होतात. इतकेच नाही तर मरतात. अमेरिकेतील बॉस्टनजवळची एक मुलगी नुकतीच चीअरलिडींग करीत असताना मरण पावली. अजून एक बातमी - एबीसी न्यूज - 16,000 Cheerleaders Get Injured Every Year Doing Stunts and Tumbles याबाबतीत संशोधनाचे निष्कर्ष असे - स्त्रियांच्या खेळातील ५०% हून अधिक जखमा चीअरलिडिंग या "खेळा" मुळे मुली आणि त्यांचे पालकही कधीकधी हा प्रकार अत्यंत स्पर्धात्मक भावनांनी सुरू करतात ( तिला भाग घेता आला, मला नाही वगैरे - किंवा माझ्या मुलीला ह्या टीममध्ये घेतलेच गेले पाहिजे इत्यादी. आपल्याकडे चीअरलिडींग सुरू झाले की असे झाले नाही तरच नवल वाटेल). हे असले खूळ (थेर??!!) भारतीय लोकांनी एवढी उदाहरणे समोर असताना स्विकारू नये असे वाटते. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्यावर अजून पुढे काय बोलणार? त्यात होणारे अंगप्रदर्शन हा एक मुद्दा भाजपने समोर आणला, त्याऐवजी ह्या प्रकारातील धोके समोर आणले असते तर बरे झाले असते असे वाटले. असो.

मनस्वी 25/04/2008 - 14:27
तसा या "निपुण" खेळाडूंचा सहभाग तरी आवश्यक आहे का.. ते जसे स्लेजिंग / नाचकाम / हातवारे करून / एका ओव्हरला ३० रन देउन आपले मनोरंजन करतात.. तशाच या सुंदरी म्हणजे आपले मनोरंजन, शिवाय खेळाडूंना चिअरींग आणि स्पॉन्सरर्सची जाहिरात (त्यांच्या नाव आणि लोगो छापलेले कपडे घालून) अशा कामगिरींचा त्रिवेणी संगमच जणू! विनोद बाजूला, खेळाचा खेळखंडोबा झालाय. एखादी सर्कस बघतोय असे वाटते......... पण मजा येते! अडीच घटका करमणूक!

कलकत्ता टीम ने म्हणे, वॉशिंगटन मधून चिअर गर्ल्स आणल्या आहेत. माझा नवरा म्हणतो,वॉशिंगटन डान्स बार मधून आणल्या असतील? हा झाला जोक. काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते.:)))) टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात. आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते. पण युके मधे ज्या फुटबॉल लीग होतात त्यात कुठे चिअर गर्ल्स दिसल्या नाहीत. तसेच टीमचे फॅनच गाणी म्हणून चिअर अप करतात. तसेच काही खेळाडूंवर गाणी तयार केली आहेत.( ती यु ट्युब वर पाहायला मिळतील). ती म्हणून चिअर अप करतात. असो हे झाले माझे मत.

अनामिका 25/04/2008 - 16:25
आबा मनावर घेतिल पण आबांचे मालक"शरदराव" कारवाई करु देणार की नाही? आणि या सगळ्या प्रकारांना प्रतिबंध होणार की नाही हाच कळीचा मुद्दा. ज्यांना राजकारण करायचय ते राजकारण करतील बापडे!पण मी मात्र एक सर्वसामान्य खेळ प्रेमी म्हणुन याकडे पाहते आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी मधिल नेत्यांमधेच वादविवाद आहेत्.आणि यावर भाष्य करतय कोण ?तर जितेंद्र आव्हाड .काय पण विनोद म्हणायचा हा? आव्हाडांचे सार्वजनिक जिवन ठाणेकरांना सर्वशृत आहे.संस्कृती रक्षकाच्या आवेशात डांस बार बंद करणार्‍या शासन कर्त्यांची स्पष्ट भुमिका नाही . भडकमकरकाका! खरच बघावे लागेल की राज्यशासन या बाबतित कोणती पाऊले उचलतेय ते? निदान महाराष्ट्रापुरता अथवा मुंबई पुरता विचार करायचा झालाच तर चिअर गर्ल्स च्या ऐवजी लेझिम अथवा ढोलताशाचे पथक हा पर्याय कसा वाटतो ?त्या कमनियललनांचे ते आक्षेपार्ह नाचणे बघण्यापेक्षा महाराष्ट्रातील पारंपारीक नृत्य बघणे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरणार नाही का? आयपीएलच्या पहिल्या सामन्याच्या वेळेस प्रेक्षकांमधे बरेच फलक झळकत होते ज्यात "येथे आम्ही सामना बघायला आलो नसुन चिअरगर्ल्सचा उच्छाद बघायला आलो आहे"असे नमुद करण्यात आले होते. पुर्वी चेंडुफ़ळीच्या या खेळात प्रतिस्पर्धि खेळाडुंचे चित्त विचलित करण्यासाठी ललनांचा वापर करण्याचा प्रघात इंग्लंड व तत्सम देशांमधे होता . पण आयपीलने तर त्याही पुढे जाऊन सरळ विदेशातुन या ललनांना नृत्यासाठी आमंत्रित केले ते ही भरगोस पैसे देऊन.जर नृत्य करता येणे हा एकच निकष या निवडीसाठी मानला गेला असेल तर भारतात या कलेत निपुण असणार्‍यांची वानवा खचितच नाही. मनस्वी ! तुझा मुद्दा अगदी योग्य. विदेशी खेळाडुंच्या निष्ठा या सामन्यांशी आणि त्या त्या संघांशी कितपत निगडित असतिल हा तर विचार करण्यासारखाच मुद्दा आहे.विदेशी खेळाडुंना फक्त आणि फक्त आयपील कडुन मिळणार्‍या भरमसाठ पैशाशीच मतलब असु शकतो.या सामन्यातुन भारतिय संघातिल खेळाडुंमधे परस्पर वैमनस्य वाढले नाही म्हणजे मिळवले? स्वाती राजेश! टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात. आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते. खरच मला तर यावरुन कणेकरांचे माझी फटकेबा़जी यामधे पुर्वी दुरदर्शनच्या प्रक्षेपणावर केलेला विनोद आठवला.एखादा खेळाडु बाद झाल्यावर तो कसा बाद झाला हे कळण्याआधीच त्या ललनांचा धिंगाणा बघावा लागतो. काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते.:)))) आता विचलित होते की जाणिवपुर्वक केले जाते ही बाब अलाहिदा! विनोद बाजूला, खेळाचा खेळखंडोबा झालाय. एखादी सर्कस बघतोय असे वाटते हे मात्र एकदम पटेश बरं का मनस्वी! "फक्त वामनमुर्ती सचिनला खेळताना बघायला उत्सुक असलेली " अनामिका

विकास 25/04/2008 - 17:09
चिअर गर्ल्स नसताना पण खेळ चांगले चालायचे अथवा जसे तेंव्हा खेळ म्हणून चालायचे तसेच ते त्यांना ठेवले तरी चालतील. एकंदरीत असला प्रकार फालतू पणा वाटतो. कोणा राजकारण्याला यात गैर वाटत नसेल तर त्यांना त्यांच्या मुलींना/नातींना पहील्यांदा नाचायला लावा.

In reply to by विकास

कौंतेय 25/04/2008 - 20:46
तुम्हाला गैर वाटत असेल म्हणुन सगळ्यांनाच ते गैर वाटावे ही अपेक्षा का? आणि जर गैर वाटत नसेल तर ते आपल्या पोरि बाळी नाचवुन सिद्ध केले पाहिजे ह्या पेक्षा मोठा विनोद मी वाचला नव्हता. तुम्हाला अनावश्यक वाटत असेल तर अनिरुध महाराजांच्या प्रवचनाला जाउन बसा. तिथे तुमचे मन रमेल.

In reply to by कौंतेय

विकास 25/04/2008 - 21:07
>>>तुम्हाला गैर वाटत असेल म्हणुन सगळ्यांनाच ते गैर वाटावे ही अपेक्षा का? आणि जर गैर वाटत नसेल तर ते आपल्या पोरि बाळी नाचवुन सिद्ध केले पाहिजे ह्या पेक्षा मोठा विनोद मी वाचला नव्हता. तुम्हाला अनावश्यक वाटत असेल तर अनिरुध महाराजांच्या प्रवचनाला जाउन बसा. तिथे तुमचे मन रमेल. तुम्ही फारच व्यक्तीगत घेतलेले दिसतयं...पण आता मला म्हणून आपण प्रतिसाद दिलाच आहेत तर त्याला नाईलाजाने हे उत्तर... चर्चेच्या मथळ्यातल्या प्रश्नाला, "चिअर गर्ल्सचा खेळामधे वापर किती योग्य अथवा अयोग्य/ आवश्यक अथवा अनावश्यक"" मी मला वाटते ते उत्तर दिले. तुम्ही कोण, कुठले, काय करता आणि काय करायला पाहीजे हे काही मी लिहीलेले नव्हते. मी फक्त म्हणालो हा प्रकार फालतू वाटतो. आणि तसा तो मला वाटतो, तुम्हाला वाटत नसेल तर नका वाटून घेऊ मी तुम्ही / इतरांनी काय करायचे ते सांगत नाही आहे आणि तुम्ही तसे मला/इतरांना सांगावे हे अपेक्षा नाही. तेंव्हा प्रवचनाला बसावे का काय करावे ह्याचे उपदेश निदान मला तरी करू नका. बाकी मी राजकारण्यांच्या बाबतीत "स्वतःच्या पोरी बाळी" नाचवा म्हणले कारण विलासराव देशमुख म्हणाले की "अश्लिलता ही पाहणा-याच्या दृष्टीवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही चीअरगर्ल्सकडे खिलाडू वृत्तीनं पाहा... " जर अश्लीलता वाटत नसली तर स्वतःच्या पोरीबाळींनी नाचले तर चालेल का याचे त्यांनी उत्तर द्यावे (नाचायचे का नाही हे त्या पोरी बाळी ठरवतील). आज काय अश्लीलता पहाणार्‍याच्या नजरेत, उद्या भ्रष्टाचार वाटणार्‍याच्या नजरेत... वगैरे वगैरे.... जे मला योग्य वाटले नाही त्याचे उदात्तीकरण मी करण्याचा प्रश्न येत नाही. बाकी महाभारतातील कौंतेय म्हणजे कुंतीचा पहीला पूत्र कर्ण हा द्रौपदी वस्त्रहरणाला प्रोत्साहन देत होता तर कुंतीच्या लग्नानंतरचा पहीला पूत्र (कौंतेय) हा तीला त्या आधी द्युतात लावत होता तितकेच काय ते आम्हाला आजपर्यंत माहीत होते :-)

अनामिका 25/04/2008 - 17:40
मनस्वी ! काय पण कल्पकता आहे ग! मानले तुला .तुतारीचा बाजच काही और आहे. खरच "तुतारी" मनापासुन आवडेल. >("सच्चू " आजपण खेळु शकणार नाही म्हणुन अंमळ नाराज झालेली) "अनामिका"

अनामिका 25/04/2008 - 17:55
आताच हाती आलेल्या वृत्तानुसार मुकेश अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाच्या चिअरगर्ल्स नवी मुंबई येथे होणार्‍या सामन्यात पुर्ण कपड्यात मैदानात उच्छाद मांडताना दिसतील. या कमनिय ललनांचे तथाकथित नृत्याविष्कार पाहुन नेत्रसुख मिळवणार्‍यांची चंगळ यानिमित्ताने निकालात निघाली म्हणायची. असो "हे ही नसे थोडके" विकास! कोणा राजकारण्याला यात गैर वाटत नसेल तर त्यांना त्यांच्या मुलींना/नातींना पहील्यांदा नाचायला लावा. अहो राजकारणी म्हणजे "आपले ठेवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे पहायचे वाकुन" या प्रकारात मोडतात्.त्यांना कसे बरे शक्य होणार? कारण यांच्या लेकीसुना त्या घरंदाज आणि बाकी स्त्रिया ***** .पुढे बोलणेच नको. (सच्चू " आजपण खेळु शकणार नाही म्हणुन अंमळ नाराज झालेली) "अनामिका"

हेरंब 25/04/2008 - 18:29
या मुली नाचवणे हे योग्य की अयोग्य ,हे ठरवण्याचा अधिकार किमान राजकारण्यांना तरी नक्कीच नाही. त्यांची संस्कृती काय आहे हे सगळ्या जनतेला माहित आहे.

धोंडोपंत 25/04/2008 - 19:43
त्यात गैर काय आहे? जरा मजा येते. जेवतांना पंचपक्वान्नाबरोबर जसं एखादं बोट वर्‍हाडी ठेच्याचं बरं लागतं तसं आहे. संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात? आपल्या सोयीप्रमाणे संस्कृती बदलायची आणि दुसर्‍या कोणी तोकडे कपडे घातले की गळे काढायचे. चा..ला..य..च...चं आपला, (प्रेक्षक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

इनोबा म्हणे 25/04/2008 - 19:51
संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात? पंतांच्या या मुद्द्याशी सहमत पण पंत,जर नाचवायच्याच असतील तर भारतीय पोरी का नको.आपल्याकडे बारबाला काय कमी आहेत का? आणि बारबालांवर जर बारमधे नाचायची बंदी असेल तर या गोर्‍या चमडीच्या पोरींना मैदानात नाचायची परवानगी का दिली गेली? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

कौंतेय 25/04/2008 - 20:42
इनोबा तू पण इनोदीच आहेस. बारबालांना बार मध्ये नाचायला बंदी आहे मैदानावर नव्हे. आम्हाला तर बारबाला आणि मैदानबाला दोन्ही हव्यात. ह्या सोवळ्यातल्या सन्स्क्रुती रक्शकानी त्यान्च्या घरात सोवळे घालुन बसावे.

मदनबाण 25/04/2008 - 22:07
जिथे क्रिकेट या (खेळाचा ?)बाजार मांडला गेलाय तिथे चिअर गर्ल्स काय बिअर गर्ल्स पण पाहावयास मिळतील..... म्हणजे सचिने षटकार ठोकला की तो चेंडु कुठे कसा गेला हे दिसण्या आधीच या नितंब हालवणार्‍या पोरी अगदी क्लोजअप मधे दिसणार !!!!! क्रिकेट रसिकांनो हे दिवस सुद्दा पाहावयाचे राहिले होते आपल्या नशिबी अजुन काय..... च्या मारी ,,,,, काय त्या पोरी आणि काय त्यांची शरीराची घुसळण.....शरीराचा प्रत्येक भाग अगदी हवेशीर ठेवला जाईल याची पुर्ण काळजी घेतलीय त्यांनी. (उन्हाळा जास्त आहे ना !!!!! :)) ) काय म्हणे या पोरी नको तर बार गर्ल्स ना नाचवा ,,,,, अरे व्वा म्हणजे आता बार पेक्षा स्टेडिअम बरा असे म्हणाचे का? असे काही झाले की बार गर्ल्स च्या पोटांची काळजी बर्‍याच जणांना होते,का बरे पोट फक्त त्यांनाच आहेत का या देशात? (फक्त आणि फक्त क्रिकेट चा चाहता) मदनबाण

In reply to by मदनबाण

इनोबा म्हणे 26/04/2008 - 01:26
काय म्हणे या पोरी नको तर बार गर्ल्स ना नाचवा ,,,,, अरे व्वा म्हणजे आता बार पेक्षा स्टेडिअम बरा असे म्हणाचे का? असे काही झाले की बार गर्ल्स च्या पोटांची काळजी बर्‍याच जणांना होते,का बरे पोट फक्त त्यांनाच आहेत का या देशात? बारबालांची बाजु घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही,परंतू जर बारबालांचे नृत्य बेकायदेशीर ठरु शकते तर या पोरींना नाचायची परवानगी कशी दिली गेली एवढेच म्हणायचे होते. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बगाराम 26/04/2008 - 01:57
जर बारबालांचे नृत्य बेकायदेशीर ठरु शकते तर या पोरींना नाचायची परवानगी कशी दिली गेली एवढेच म्हणायचे होते. अरे इनोबा, ह्या चिअरगर्ल्सवर दारू पिउन कुणीही पैसे उधळत नाही. तसेच ब्लाउजमध्ये १००च्य नोटा खूपसुन त्या नाचताना दिसत नाहित. त्यामुळे बारबाला आणि चिअरगर्ल्स ह्यांची तुलना कशी होऊ शकेल बाळा? -बगाराम

In reply to by बगाराम

इनोबा म्हणे 26/04/2008 - 02:10
ह्या चिअरगर्ल्सवर दारू पिउन कुणीही पैसे उधळत नाही. मान्य. तसेच ब्लाउजमध्ये १००च्य नोटा खूपसुन त्या नाचताना दिसत नाहित. अरे पण बारबालांचे कपडेही जितके तोकडे नसतात त्या प्रकारचे कपडे ह्या सार्वजनिक ठिकाणी घालून फिरतात ना बाळा... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बगाराम 26/04/2008 - 03:11
अरे प्रश्न इथे कपडे किती तोकडे घालायचे हा नाही आहे. राखी सावंत तिच्या स्टेज शोला किती कपडे घालते? त्यावर आणली का बंदी? अवांतरः 'करंट जास्त राहावा' म्हणून रम पिउन दारुचा भपका मारत अनंत चतुदर्शीला 'शिराशीरी' करणार्‍या लोकांविषयी मी काय बोलणार? तू हे मजेत लिहिले असशील आणि खरोखरच असं काही करत नसशील ह्याची मला खात्री आहे पण लिहिताना देखिल थोडे भान ठेवावे. इथे येणार्‍या पाहुण्या मंडळींचा गैरसमज होऊ शकतो. खरंच असं वागत असशील तर प्रश्न मिटला.

In reply to by बगाराम

इनोबा म्हणे 26/04/2008 - 11:58
अरे प्रश्न इथे कपडे किती तोकडे घालायचे हा नाही आहे. राखी सावंत तिच्या स्टेज शोला किती कपडे घालते? त्यावर आणली का बंदी? बंदी आणली नाही हा मुद्दा मान्य.मात्र मागे एकदा कोल्हापूरात तिचा स्टेज शो झाला होता.त्यावेळी तिच्यावर याच कारणास्तव खटला भरला गेल्याची बातमी एका वाहिनीवर पाहीली होती. पुढे त्या खटल्याचे काय झाले हा प्रश्न निराळा. अवांतरः 'करंट जास्त राहावा' म्हणून रम पिउन दारुचा भपका मारत अनंत चतुदर्शीला 'शिराशीरी' करणार्‍या लोकांविषयी मी काय बोलणार? मी काय बोललो,आणि त्यामुळे तुझे माझ्याविषयी काय मत झाले याचा या चर्चेशी काही संबंध नाही.मी कसा आहे,याविषयीचे तुझे मत मनातच ठेव.जाहिररीत्या व्यक्तीगत टिका करणार असशील तर मलाही नाईलाजाने त्याला प्रत्युत्तर द्यावे लागेल.मग इथली चर्चा 'चर्चा' राहणार नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

सुनील 26/04/2008 - 06:19
अरे पण बारबालांचे कपडेही जितके तोकडे नसतात त्या प्रकारचे कपडे ह्या सार्वजनिक ठिकाणी घालून फिरतात ना बाळा... आरं इन्या, तोकडे म्हंजी कुठून तोकडे? आता ह्या चियरबाला मांड्या दाखिवतात तशा बारबाला बेंबी दाखवीत नव्ह्त्या का? ते काय तोकडे न्हाय?? असो. ह्या चियरबाला नक्की कोणाला चियर करण्यासाठी आहेत? खेळाडूंना की प्रेक्षकांना? क्रिकेटच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रेक्षकांना चौकार्-षटकाराची आतषबाजी आणि खेळाडूंना त्यांच्या चाहत्यांचा चित्कार चियर करायला पुरेसा असतो. ह्या बालांची काही गरज नाही असे वाटते. (शुद्ध क्रिकेटप्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 26/04/2008 - 01:43
ओ इनोबाजी (आनंदयात्री) त्या अनुषंगाने शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की बार गर्ल्स ना नाचवा, त्यांना रोजी रोटी तरी मिळेल. हे वाचुन माझ्या डोक्यात आलेले विचार आहेत ते..... प्लीज गैर समज नको !!!!!

वरदा 26/04/2008 - 06:22
संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात? नुसती नऊवारी आणि धोतर घातलं म्हणजे संस्क्रुती का? व्यवस्थित अंगभर कपडे मग कुठलेही असोत (पंजाबी असोत किंवा गुजराथी) घातलेले लोक काय संस्क्रुती सोडुन वागतात असं म्हणायचय का? संस्क्रुतीची ही व्याख्या मला तरी नाही पटली. चीअरलिडींग बघताना चांगले वाटत असेल, पण त्यात भाग घेणार्‍या मुली अनेकदा जखमी होतात. इतकेच नाही तर मरतात. ह्या बद्दल कुणीच काही बोलत नाही. मुली मग कोणाच्याही असोत जखमी झाल्या तरी चालतील हे संस्क्रुती काय माणुसकीला तरी शोभतं का?

In reply to by वरदा

सागर१२३ 28/04/2008 - 15:23
काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते. टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात. आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते. मी सहमत आहे.

अनामिका 28/04/2008 - 11:31
शेवटि फलषृती काय ?तर "चिअर गर्ल्स कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळात चुकीचा आहे".-इती -झुबकेदार विलासराव>.( सुपुत्र बॉलीवुड मधे धिंगाणा घालतायत त्याचाच हा परिपाक असावा) 8} चला मग तर प्रश्नच मिट्ला.उगिच काथ्याकुट करत बसण्यात काही हशील नाही. :? तेंव्हा उघड्या डोळ्यांनी बघा ,नाहितर डोळ्याला झापड लावा. :B याशिवाय दुसरा पर्याय नाही.एकच जमेची बाजु म्हणजे निदान त्या कमनिय युवती आता अंगभर कपड्यात नाचणार. आमच्या सारख्यांसाठी हिच बाब पुरेशी. नाही तरी "दुधाची तहान ताकावर भागवायची सवय जडलेली"तेंव्हा जे थोडफार चांगल घडतय त्यातच सुख मानावे. बाकी संस्कृती वगैरे जी काय जपायची ती आपण अपापल्या घरात जपु. ;;) ढोलताशे ,तुतारी जे काही वाजवायचे ते एकदा मुंबई इंडियन्सचा संघ जिंकला कि भाड्याने आणुन वाजवु ,आता तो कधी जिंकेल हे मात्र विचारु नका. (सचिनच्या दुखापतीच कोड न उलगडू शकणारी ) :S "अनामिका"

एकदम अनावश्यक....आबा मनावर घेताहेत असे आजच्या पेपरात वाचले.... कदाचित मुंबईमध्ये तरी हे हिडीस प्रकार बॅन होतील.... (फक्त क्रिकेटचा चाहता...) भडकमकर

आनंदयात्री 25/04/2008 - 14:17
वैयक्तिक रित्या त्यात काही गैर वाटत नाही बॉ ! त्या अनुषंगाने शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की बार गर्ल्स ना नाचवा, त्यांना रोजी रोटी तरी मिळेल. हे बघा

In reply to by आनंदयात्री

चित्रा 25/04/2008 - 19:05
चीअरलिडींग बघताना चांगले वाटत असेल, पण त्यात भाग घेणार्‍या मुली अनेकदा जखमी होतात. इतकेच नाही तर मरतात. अमेरिकेतील बॉस्टनजवळची एक मुलगी नुकतीच चीअरलिडींग करीत असताना मरण पावली. अजून एक बातमी - एबीसी न्यूज - 16,000 Cheerleaders Get Injured Every Year Doing Stunts and Tumbles याबाबतीत संशोधनाचे निष्कर्ष असे - स्त्रियांच्या खेळातील ५०% हून अधिक जखमा चीअरलिडिंग या "खेळा" मुळे मुली आणि त्यांचे पालकही कधीकधी हा प्रकार अत्यंत स्पर्धात्मक भावनांनी सुरू करतात ( तिला भाग घेता आला, मला नाही वगैरे - किंवा माझ्या मुलीला ह्या टीममध्ये घेतलेच गेले पाहिजे इत्यादी. आपल्याकडे चीअरलिडींग सुरू झाले की असे झाले नाही तरच नवल वाटेल). हे असले खूळ (थेर??!!) भारतीय लोकांनी एवढी उदाहरणे समोर असताना स्विकारू नये असे वाटते. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिल्यावर अजून पुढे काय बोलणार? त्यात होणारे अंगप्रदर्शन हा एक मुद्दा भाजपने समोर आणला, त्याऐवजी ह्या प्रकारातील धोके समोर आणले असते तर बरे झाले असते असे वाटले. असो.

मनस्वी 25/04/2008 - 14:27
तसा या "निपुण" खेळाडूंचा सहभाग तरी आवश्यक आहे का.. ते जसे स्लेजिंग / नाचकाम / हातवारे करून / एका ओव्हरला ३० रन देउन आपले मनोरंजन करतात.. तशाच या सुंदरी म्हणजे आपले मनोरंजन, शिवाय खेळाडूंना चिअरींग आणि स्पॉन्सरर्सची जाहिरात (त्यांच्या नाव आणि लोगो छापलेले कपडे घालून) अशा कामगिरींचा त्रिवेणी संगमच जणू! विनोद बाजूला, खेळाचा खेळखंडोबा झालाय. एखादी सर्कस बघतोय असे वाटते......... पण मजा येते! अडीच घटका करमणूक!

कलकत्ता टीम ने म्हणे, वॉशिंगटन मधून चिअर गर्ल्स आणल्या आहेत. माझा नवरा म्हणतो,वॉशिंगटन डान्स बार मधून आणल्या असतील? हा झाला जोक. काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते.:)))) टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात. आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते. पण युके मधे ज्या फुटबॉल लीग होतात त्यात कुठे चिअर गर्ल्स दिसल्या नाहीत. तसेच टीमचे फॅनच गाणी म्हणून चिअर अप करतात. तसेच काही खेळाडूंवर गाणी तयार केली आहेत.( ती यु ट्युब वर पाहायला मिळतील). ती म्हणून चिअर अप करतात. असो हे झाले माझे मत.

अनामिका 25/04/2008 - 16:25
आबा मनावर घेतिल पण आबांचे मालक"शरदराव" कारवाई करु देणार की नाही? आणि या सगळ्या प्रकारांना प्रतिबंध होणार की नाही हाच कळीचा मुद्दा. ज्यांना राजकारण करायचय ते राजकारण करतील बापडे!पण मी मात्र एक सर्वसामान्य खेळ प्रेमी म्हणुन याकडे पाहते आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी मधिल नेत्यांमधेच वादविवाद आहेत्.आणि यावर भाष्य करतय कोण ?तर जितेंद्र आव्हाड .काय पण विनोद म्हणायचा हा? आव्हाडांचे सार्वजनिक जिवन ठाणेकरांना सर्वशृत आहे.संस्कृती रक्षकाच्या आवेशात डांस बार बंद करणार्‍या शासन कर्त्यांची स्पष्ट भुमिका नाही . भडकमकरकाका! खरच बघावे लागेल की राज्यशासन या बाबतित कोणती पाऊले उचलतेय ते? निदान महाराष्ट्रापुरता अथवा मुंबई पुरता विचार करायचा झालाच तर चिअर गर्ल्स च्या ऐवजी लेझिम अथवा ढोलताशाचे पथक हा पर्याय कसा वाटतो ?त्या कमनियललनांचे ते आक्षेपार्ह नाचणे बघण्यापेक्षा महाराष्ट्रातील पारंपारीक नृत्य बघणे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरणार नाही का? आयपीएलच्या पहिल्या सामन्याच्या वेळेस प्रेक्षकांमधे बरेच फलक झळकत होते ज्यात "येथे आम्ही सामना बघायला आलो नसुन चिअरगर्ल्सचा उच्छाद बघायला आलो आहे"असे नमुद करण्यात आले होते. पुर्वी चेंडुफ़ळीच्या या खेळात प्रतिस्पर्धि खेळाडुंचे चित्त विचलित करण्यासाठी ललनांचा वापर करण्याचा प्रघात इंग्लंड व तत्सम देशांमधे होता . पण आयपीलने तर त्याही पुढे जाऊन सरळ विदेशातुन या ललनांना नृत्यासाठी आमंत्रित केले ते ही भरगोस पैसे देऊन.जर नृत्य करता येणे हा एकच निकष या निवडीसाठी मानला गेला असेल तर भारतात या कलेत निपुण असणार्‍यांची वानवा खचितच नाही. मनस्वी ! तुझा मुद्दा अगदी योग्य. विदेशी खेळाडुंच्या निष्ठा या सामन्यांशी आणि त्या त्या संघांशी कितपत निगडित असतिल हा तर विचार करण्यासारखाच मुद्दा आहे.विदेशी खेळाडुंना फक्त आणि फक्त आयपील कडुन मिळणार्‍या भरमसाठ पैशाशीच मतलब असु शकतो.या सामन्यातुन भारतिय संघातिल खेळाडुंमधे परस्पर वैमनस्य वाढले नाही म्हणजे मिळवले? स्वाती राजेश! टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात. आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते. खरच मला तर यावरुन कणेकरांचे माझी फटकेबा़जी यामधे पुर्वी दुरदर्शनच्या प्रक्षेपणावर केलेला विनोद आठवला.एखादा खेळाडु बाद झाल्यावर तो कसा बाद झाला हे कळण्याआधीच त्या ललनांचा धिंगाणा बघावा लागतो. काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते.:)))) आता विचलित होते की जाणिवपुर्वक केले जाते ही बाब अलाहिदा! विनोद बाजूला, खेळाचा खेळखंडोबा झालाय. एखादी सर्कस बघतोय असे वाटते हे मात्र एकदम पटेश बरं का मनस्वी! "फक्त वामनमुर्ती सचिनला खेळताना बघायला उत्सुक असलेली " अनामिका

विकास 25/04/2008 - 17:09
चिअर गर्ल्स नसताना पण खेळ चांगले चालायचे अथवा जसे तेंव्हा खेळ म्हणून चालायचे तसेच ते त्यांना ठेवले तरी चालतील. एकंदरीत असला प्रकार फालतू पणा वाटतो. कोणा राजकारण्याला यात गैर वाटत नसेल तर त्यांना त्यांच्या मुलींना/नातींना पहील्यांदा नाचायला लावा.

In reply to by विकास

कौंतेय 25/04/2008 - 20:46
तुम्हाला गैर वाटत असेल म्हणुन सगळ्यांनाच ते गैर वाटावे ही अपेक्षा का? आणि जर गैर वाटत नसेल तर ते आपल्या पोरि बाळी नाचवुन सिद्ध केले पाहिजे ह्या पेक्षा मोठा विनोद मी वाचला नव्हता. तुम्हाला अनावश्यक वाटत असेल तर अनिरुध महाराजांच्या प्रवचनाला जाउन बसा. तिथे तुमचे मन रमेल.

In reply to by कौंतेय

विकास 25/04/2008 - 21:07
>>>तुम्हाला गैर वाटत असेल म्हणुन सगळ्यांनाच ते गैर वाटावे ही अपेक्षा का? आणि जर गैर वाटत नसेल तर ते आपल्या पोरि बाळी नाचवुन सिद्ध केले पाहिजे ह्या पेक्षा मोठा विनोद मी वाचला नव्हता. तुम्हाला अनावश्यक वाटत असेल तर अनिरुध महाराजांच्या प्रवचनाला जाउन बसा. तिथे तुमचे मन रमेल. तुम्ही फारच व्यक्तीगत घेतलेले दिसतयं...पण आता मला म्हणून आपण प्रतिसाद दिलाच आहेत तर त्याला नाईलाजाने हे उत्तर... चर्चेच्या मथळ्यातल्या प्रश्नाला, "चिअर गर्ल्सचा खेळामधे वापर किती योग्य अथवा अयोग्य/ आवश्यक अथवा अनावश्यक"" मी मला वाटते ते उत्तर दिले. तुम्ही कोण, कुठले, काय करता आणि काय करायला पाहीजे हे काही मी लिहीलेले नव्हते. मी फक्त म्हणालो हा प्रकार फालतू वाटतो. आणि तसा तो मला वाटतो, तुम्हाला वाटत नसेल तर नका वाटून घेऊ मी तुम्ही / इतरांनी काय करायचे ते सांगत नाही आहे आणि तुम्ही तसे मला/इतरांना सांगावे हे अपेक्षा नाही. तेंव्हा प्रवचनाला बसावे का काय करावे ह्याचे उपदेश निदान मला तरी करू नका. बाकी मी राजकारण्यांच्या बाबतीत "स्वतःच्या पोरी बाळी" नाचवा म्हणले कारण विलासराव देशमुख म्हणाले की "अश्लिलता ही पाहणा-याच्या दृष्टीवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही चीअरगर्ल्सकडे खिलाडू वृत्तीनं पाहा... " जर अश्लीलता वाटत नसली तर स्वतःच्या पोरीबाळींनी नाचले तर चालेल का याचे त्यांनी उत्तर द्यावे (नाचायचे का नाही हे त्या पोरी बाळी ठरवतील). आज काय अश्लीलता पहाणार्‍याच्या नजरेत, उद्या भ्रष्टाचार वाटणार्‍याच्या नजरेत... वगैरे वगैरे.... जे मला योग्य वाटले नाही त्याचे उदात्तीकरण मी करण्याचा प्रश्न येत नाही. बाकी महाभारतातील कौंतेय म्हणजे कुंतीचा पहीला पूत्र कर्ण हा द्रौपदी वस्त्रहरणाला प्रोत्साहन देत होता तर कुंतीच्या लग्नानंतरचा पहीला पूत्र (कौंतेय) हा तीला त्या आधी द्युतात लावत होता तितकेच काय ते आम्हाला आजपर्यंत माहीत होते :-)

अनामिका 25/04/2008 - 17:40
मनस्वी ! काय पण कल्पकता आहे ग! मानले तुला .तुतारीचा बाजच काही और आहे. खरच "तुतारी" मनापासुन आवडेल. >("सच्चू " आजपण खेळु शकणार नाही म्हणुन अंमळ नाराज झालेली) "अनामिका"

अनामिका 25/04/2008 - 17:55
आताच हाती आलेल्या वृत्तानुसार मुकेश अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाच्या चिअरगर्ल्स नवी मुंबई येथे होणार्‍या सामन्यात पुर्ण कपड्यात मैदानात उच्छाद मांडताना दिसतील. या कमनिय ललनांचे तथाकथित नृत्याविष्कार पाहुन नेत्रसुख मिळवणार्‍यांची चंगळ यानिमित्ताने निकालात निघाली म्हणायची. असो "हे ही नसे थोडके" विकास! कोणा राजकारण्याला यात गैर वाटत नसेल तर त्यांना त्यांच्या मुलींना/नातींना पहील्यांदा नाचायला लावा. अहो राजकारणी म्हणजे "आपले ठेवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे पहायचे वाकुन" या प्रकारात मोडतात्.त्यांना कसे बरे शक्य होणार? कारण यांच्या लेकीसुना त्या घरंदाज आणि बाकी स्त्रिया ***** .पुढे बोलणेच नको. (सच्चू " आजपण खेळु शकणार नाही म्हणुन अंमळ नाराज झालेली) "अनामिका"

हेरंब 25/04/2008 - 18:29
या मुली नाचवणे हे योग्य की अयोग्य ,हे ठरवण्याचा अधिकार किमान राजकारण्यांना तरी नक्कीच नाही. त्यांची संस्कृती काय आहे हे सगळ्या जनतेला माहित आहे.

धोंडोपंत 25/04/2008 - 19:43
त्यात गैर काय आहे? जरा मजा येते. जेवतांना पंचपक्वान्नाबरोबर जसं एखादं बोट वर्‍हाडी ठेच्याचं बरं लागतं तसं आहे. संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात? आपल्या सोयीप्रमाणे संस्कृती बदलायची आणि दुसर्‍या कोणी तोकडे कपडे घातले की गळे काढायचे. चा..ला..य..च...चं आपला, (प्रेक्षक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

इनोबा म्हणे 25/04/2008 - 19:51
संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात? पंतांच्या या मुद्द्याशी सहमत पण पंत,जर नाचवायच्याच असतील तर भारतीय पोरी का नको.आपल्याकडे बारबाला काय कमी आहेत का? आणि बारबालांवर जर बारमधे नाचायची बंदी असेल तर या गोर्‍या चमडीच्या पोरींना मैदानात नाचायची परवानगी का दिली गेली? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

कौंतेय 25/04/2008 - 20:42
इनोबा तू पण इनोदीच आहेस. बारबालांना बार मध्ये नाचायला बंदी आहे मैदानावर नव्हे. आम्हाला तर बारबाला आणि मैदानबाला दोन्ही हव्यात. ह्या सोवळ्यातल्या सन्स्क्रुती रक्शकानी त्यान्च्या घरात सोवळे घालुन बसावे.

मदनबाण 25/04/2008 - 22:07
जिथे क्रिकेट या (खेळाचा ?)बाजार मांडला गेलाय तिथे चिअर गर्ल्स काय बिअर गर्ल्स पण पाहावयास मिळतील..... म्हणजे सचिने षटकार ठोकला की तो चेंडु कुठे कसा गेला हे दिसण्या आधीच या नितंब हालवणार्‍या पोरी अगदी क्लोजअप मधे दिसणार !!!!! क्रिकेट रसिकांनो हे दिवस सुद्दा पाहावयाचे राहिले होते आपल्या नशिबी अजुन काय..... च्या मारी ,,,,, काय त्या पोरी आणि काय त्यांची शरीराची घुसळण.....शरीराचा प्रत्येक भाग अगदी हवेशीर ठेवला जाईल याची पुर्ण काळजी घेतलीय त्यांनी. (उन्हाळा जास्त आहे ना !!!!! :)) ) काय म्हणे या पोरी नको तर बार गर्ल्स ना नाचवा ,,,,, अरे व्वा म्हणजे आता बार पेक्षा स्टेडिअम बरा असे म्हणाचे का? असे काही झाले की बार गर्ल्स च्या पोटांची काळजी बर्‍याच जणांना होते,का बरे पोट फक्त त्यांनाच आहेत का या देशात? (फक्त आणि फक्त क्रिकेट चा चाहता) मदनबाण

In reply to by मदनबाण

इनोबा म्हणे 26/04/2008 - 01:26
काय म्हणे या पोरी नको तर बार गर्ल्स ना नाचवा ,,,,, अरे व्वा म्हणजे आता बार पेक्षा स्टेडिअम बरा असे म्हणाचे का? असे काही झाले की बार गर्ल्स च्या पोटांची काळजी बर्‍याच जणांना होते,का बरे पोट फक्त त्यांनाच आहेत का या देशात? बारबालांची बाजु घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही,परंतू जर बारबालांचे नृत्य बेकायदेशीर ठरु शकते तर या पोरींना नाचायची परवानगी कशी दिली गेली एवढेच म्हणायचे होते. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बगाराम 26/04/2008 - 01:57
जर बारबालांचे नृत्य बेकायदेशीर ठरु शकते तर या पोरींना नाचायची परवानगी कशी दिली गेली एवढेच म्हणायचे होते. अरे इनोबा, ह्या चिअरगर्ल्सवर दारू पिउन कुणीही पैसे उधळत नाही. तसेच ब्लाउजमध्ये १००च्य नोटा खूपसुन त्या नाचताना दिसत नाहित. त्यामुळे बारबाला आणि चिअरगर्ल्स ह्यांची तुलना कशी होऊ शकेल बाळा? -बगाराम

In reply to by बगाराम

इनोबा म्हणे 26/04/2008 - 02:10
ह्या चिअरगर्ल्सवर दारू पिउन कुणीही पैसे उधळत नाही. मान्य. तसेच ब्लाउजमध्ये १००च्य नोटा खूपसुन त्या नाचताना दिसत नाहित. अरे पण बारबालांचे कपडेही जितके तोकडे नसतात त्या प्रकारचे कपडे ह्या सार्वजनिक ठिकाणी घालून फिरतात ना बाळा... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

बगाराम 26/04/2008 - 03:11
अरे प्रश्न इथे कपडे किती तोकडे घालायचे हा नाही आहे. राखी सावंत तिच्या स्टेज शोला किती कपडे घालते? त्यावर आणली का बंदी? अवांतरः 'करंट जास्त राहावा' म्हणून रम पिउन दारुचा भपका मारत अनंत चतुदर्शीला 'शिराशीरी' करणार्‍या लोकांविषयी मी काय बोलणार? तू हे मजेत लिहिले असशील आणि खरोखरच असं काही करत नसशील ह्याची मला खात्री आहे पण लिहिताना देखिल थोडे भान ठेवावे. इथे येणार्‍या पाहुण्या मंडळींचा गैरसमज होऊ शकतो. खरंच असं वागत असशील तर प्रश्न मिटला.

In reply to by बगाराम

इनोबा म्हणे 26/04/2008 - 11:58
अरे प्रश्न इथे कपडे किती तोकडे घालायचे हा नाही आहे. राखी सावंत तिच्या स्टेज शोला किती कपडे घालते? त्यावर आणली का बंदी? बंदी आणली नाही हा मुद्दा मान्य.मात्र मागे एकदा कोल्हापूरात तिचा स्टेज शो झाला होता.त्यावेळी तिच्यावर याच कारणास्तव खटला भरला गेल्याची बातमी एका वाहिनीवर पाहीली होती. पुढे त्या खटल्याचे काय झाले हा प्रश्न निराळा. अवांतरः 'करंट जास्त राहावा' म्हणून रम पिउन दारुचा भपका मारत अनंत चतुदर्शीला 'शिराशीरी' करणार्‍या लोकांविषयी मी काय बोलणार? मी काय बोललो,आणि त्यामुळे तुझे माझ्याविषयी काय मत झाले याचा या चर्चेशी काही संबंध नाही.मी कसा आहे,याविषयीचे तुझे मत मनातच ठेव.जाहिररीत्या व्यक्तीगत टिका करणार असशील तर मलाही नाईलाजाने त्याला प्रत्युत्तर द्यावे लागेल.मग इथली चर्चा 'चर्चा' राहणार नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

सुनील 26/04/2008 - 06:19
अरे पण बारबालांचे कपडेही जितके तोकडे नसतात त्या प्रकारचे कपडे ह्या सार्वजनिक ठिकाणी घालून फिरतात ना बाळा... आरं इन्या, तोकडे म्हंजी कुठून तोकडे? आता ह्या चियरबाला मांड्या दाखिवतात तशा बारबाला बेंबी दाखवीत नव्ह्त्या का? ते काय तोकडे न्हाय?? असो. ह्या चियरबाला नक्की कोणाला चियर करण्यासाठी आहेत? खेळाडूंना की प्रेक्षकांना? क्रिकेटच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात प्रेक्षकांना चौकार्-षटकाराची आतषबाजी आणि खेळाडूंना त्यांच्या चाहत्यांचा चित्कार चियर करायला पुरेसा असतो. ह्या बालांची काही गरज नाही असे वाटते. (शुद्ध क्रिकेटप्रेमी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मदनबाण 26/04/2008 - 01:43
ओ इनोबाजी (आनंदयात्री) त्या अनुषंगाने शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की बार गर्ल्स ना नाचवा, त्यांना रोजी रोटी तरी मिळेल. हे वाचुन माझ्या डोक्यात आलेले विचार आहेत ते..... प्लीज गैर समज नको !!!!!

वरदा 26/04/2008 - 06:22
संस्कृतीच्या नावाने गळे काढण्यासारखे त्यात काही नाही. किती संस्कृती संरक्षक आज नऊवारी साड्या नेसतात आणि धोतर परिधान करतात? नुसती नऊवारी आणि धोतर घातलं म्हणजे संस्क्रुती का? व्यवस्थित अंगभर कपडे मग कुठलेही असोत (पंजाबी असोत किंवा गुजराथी) घातलेले लोक काय संस्क्रुती सोडुन वागतात असं म्हणायचय का? संस्क्रुतीची ही व्याख्या मला तरी नाही पटली. चीअरलिडींग बघताना चांगले वाटत असेल, पण त्यात भाग घेणार्‍या मुली अनेकदा जखमी होतात. इतकेच नाही तर मरतात. ह्या बद्दल कुणीच काही बोलत नाही. मुली मग कोणाच्याही असोत जखमी झाल्या तरी चालतील हे संस्क्रुती काय माणुसकीला तरी शोभतं का?

In reply to by वरदा

सागर१२३ 28/04/2008 - 15:23
काही खेळाडूंनी सुद्धा तक्रार केली आहे म्हणे कि आमचे खेळताना लक्ष विचलीत होते. टी.व्ही.वर मॅच पाहताना रन झाली, आउट झाला तर रीप्ले दाखवायच्या ऐवजी त्या गर्ल्स दाखवतात. आणि त्यांच्या समोर नाचणारे प्रेक्षक.त्यांचे फोटो घेत असलेले प्रेक्षक. हे पाहिले कि हसू येते आणि किव करावीशी वाटते. मी सहमत आहे.

अनामिका 28/04/2008 - 11:31
शेवटि फलषृती काय ?तर "चिअर गर्ल्स कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मुळात चुकीचा आहे".-इती -झुबकेदार विलासराव>.( सुपुत्र बॉलीवुड मधे धिंगाणा घालतायत त्याचाच हा परिपाक असावा) 8} चला मग तर प्रश्नच मिट्ला.उगिच काथ्याकुट करत बसण्यात काही हशील नाही. :? तेंव्हा उघड्या डोळ्यांनी बघा ,नाहितर डोळ्याला झापड लावा. :B याशिवाय दुसरा पर्याय नाही.एकच जमेची बाजु म्हणजे निदान त्या कमनिय युवती आता अंगभर कपड्यात नाचणार. आमच्या सारख्यांसाठी हिच बाब पुरेशी. नाही तरी "दुधाची तहान ताकावर भागवायची सवय जडलेली"तेंव्हा जे थोडफार चांगल घडतय त्यातच सुख मानावे. बाकी संस्कृती वगैरे जी काय जपायची ती आपण अपापल्या घरात जपु. ;;) ढोलताशे ,तुतारी जे काही वाजवायचे ते एकदा मुंबई इंडियन्सचा संघ जिंकला कि भाड्याने आणुन वाजवु ,आता तो कधी जिंकेल हे मात्र विचारु नका. (सचिनच्या दुखापतीच कोड न उलगडू शकणारी ) :S "अनामिका"
सध्या आय पी एल ने भरवलेल्या २० षटकांच्या चेंडुफळीच्या सामन्यांत प्रत्येक षटकार आणि चौकारावर तसेच संघाने मिळावलेल्या खेळाडुंच्या बळींवर अंगप्रदर्शन करत नाचणार्‍या चिअर गर्ल्सची खरच कुठ्ल्याही खेळामधे निदान भारतात तरी गरज आहे का? नाही !असे निदान माझे तरी मत . खेळाडुंची खरेदी विक्री देखिल गैरच ,पण निदान त्यामधे अगदी हालाखीच्या परिस्थितितुन आलेल्या गुणी खेळाडुंना आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यास हातभार लागतो आहे हीच काय ती जमेची बाजु. पण खेळाडु व प्रेक्षकांचा उत्साह वाढविण्याच्या नावाखाली तो़कड्या कपड्यात नाचुन (थैमान घालुन) पुर्ण क्रिडांगण डोक्यावर घेणार्‍या चिअर गर्ल्सचा खेळामधिल वापर खरच अनावश्यक

वर्तुळाचा कोन

जयवी ·

विसुनाना 25/04/2008 - 12:28
वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं, ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी.. कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या, ज्या कापून काढतात ती वर्तुळं, खुलं करतात आकाश... स्वत:साठी आणि इतरांसाठी आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.
वा! वा! कविता आवडली.

विसोबा खेचर 25/04/2008 - 12:42
वा जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! जियो.... ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी.. कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या, ज्या कापून काढतात ती वर्तुळं, खुलं करतात आकाश... स्वत:साठी आणि इतरांसाठी आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी. कदाचित म्हणूनच मिपाचा जन्म झाला असावा... :) तात्या.

कविता खूपच आवडली. ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं... मानायची खुषी त्याच परिघात कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात... मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं या ओळी खासच...

मुक्तसुनीत 25/04/2008 - 19:02
कवितेमधला आशावाद , मानवी कर्तृत्वावरील , निर्मितीक्षमता आणि जिद्द या गुणांवरील विश्वास या गोष्टी आवडल्या. आणि मला आवडलेला भाग म्हणजे , तलवार ही "पुरोगामित्वाची" आहे ! या पुरोगामित्वाच्या मूल्यामुळे , ही कविता केवळ एका व्यक्तिगत पातळीवर रहात नाही. कविता खूप आवडली.

मदनबाण 25/04/2008 - 20:27
जीवन एक कोडं, न सुटलेलं एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं मस्तच (कुठे आहे तो पायथागोरस) असे म्हणणारा..... मदनबाण

वरदा 25/04/2008 - 23:28
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं... ह्म्म खरय्... सुंदर कविता....

जयवी 28/04/2008 - 18:02
विसुनाना, देवकाका, तात्या, स्वाती राजेश, शितल, मुक्तसुनीत, मदनबाण, वरदा....... तहे दिल से शुक्रिया ;;)

विसुनाना 25/04/2008 - 12:28
वर्तुळालाही कोन असतात हे त्यांनाच कळतं, ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी.. कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या, ज्या कापून काढतात ती वर्तुळं, खुलं करतात आकाश... स्वत:साठी आणि इतरांसाठी आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी.
वा! वा! कविता आवडली.

विसोबा खेचर 25/04/2008 - 12:42
वा जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! जियो.... ज्यांच्या हातात असतात तीक्ष्ण पुरोगामी तलवारी.. कर्तृत्वाच्या, सामर्थ्याच्या, ज्या कापून काढतात ती वर्तुळं, खुलं करतात आकाश... स्वत:साठी आणि इतरांसाठी आणि सोडवतात ती किचकट गणितं चुटकीसरशी. कदाचित म्हणूनच मिपाचा जन्म झाला असावा... :) तात्या.

कविता खूपच आवडली. ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं... मानायची खुषी त्याच परिघात कूपमंडूकासारखी स्वत:च्याच विश्वात... मान उंच करुन बघता येतं हेच मुळी विसरायचं या ओळी खासच...

मुक्तसुनीत 25/04/2008 - 19:02
कवितेमधला आशावाद , मानवी कर्तृत्वावरील , निर्मितीक्षमता आणि जिद्द या गुणांवरील विश्वास या गोष्टी आवडल्या. आणि मला आवडलेला भाग म्हणजे , तलवार ही "पुरोगामित्वाची" आहे ! या पुरोगामित्वाच्या मूल्यामुळे , ही कविता केवळ एका व्यक्तिगत पातळीवर रहात नाही. कविता खूप आवडली.

मदनबाण 25/04/2008 - 20:27
जीवन एक कोडं, न सुटलेलं एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं मस्तच (कुठे आहे तो पायथागोरस) असे म्हणणारा..... मदनबाण

वरदा 25/04/2008 - 23:28
चालून चालून सपाट, गुळगुळीत झालेली ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरायचं आणि वर्तुळ पूर्ण करुन कृतकृत्य व्हायचं... ह्म्म खरय्... सुंदर कविता....

जयवी 28/04/2008 - 18:02
विसुनाना, देवकाका, तात्या, स्वाती राजेश, शितल, मुक्तसुनीत, मदनबाण, वरदा....... तहे दिल से शुक्रिया ;;)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जीवन एक कोडं, न सुटलेलं एक कठीण प्रमेय, न उलगडलेलं आयुष्य सरतं याच धडपडीत असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधीत वाट तीच...

माझा ताटवा...

प्राजु ·

प्रमोद देव 01/05/2008 - 13:27
लेख उत्तम उतरलाय. छायाचित्रांमुळे त्याला अजूनच जास्त सौंदर्य प्राप्त झालंय. स्वस्तिकाच्या फुलांना आम्ही 'तगरीची फुले' म्हणतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विजुभाऊ 01/05/2008 - 13:31
तगर वेगळी स्वस्तिकाची फुले वेगळी. तगर गुलाबी रंगाची असते स्वस्तिकाची फुले पांढरी असतात.

In reply to by विजुभाऊ

प्रमोद देव 01/05/2008 - 13:37
तगर पांढरीच असते. माझे बालपण सगळे तगरीच्या बनात गेलंय. हो. कारण आमची वाडी म्हणजे एक तगरीचं बनच होते. अर्थात ह्याला स्वस्तिक म्हणायला माझी हरकत नाही. कारण आकार तसा दिसतोय . मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विजुभाऊ 01/05/2008 - 13:35
आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" अनन्त काणेकरांचे "आणिकॅशिया भरारला" आठवले. सरळ साधे एकदम भिडणारे वर्णन: प्राजु ची खासियत. :)

मदनबाण 01/05/2008 - 13:36
कदंबाच फुल मी कधीच पाहील नव्हत!!!!! खुपच सुंदर आहे ते.....(अगदी गोंडस ) :) ताई तुमचे हे जीवलग मित्र आणि मैत्रिणी अगदीच सुंदर आहेत..... (सुमनांचा प्रेमी) मदनबाण

प्राजु,सुंदर वर्णन आणि चित्रे! तगरीला स्वस्तिकाची फुले हे नाव छान वाटले. कदंबाचे बहरलेलं झाड मलाही माझ्या माहेरी घेऊन गेलं.आमच्याकडेही कदंबाची २,३ झाडे होती.आणि कदंब फुलला की पानापानातून ती डोकवायची आणि वार्‍याच्या झुळुकेबरोबर मंद सुवास यायचा. स्वाती

इनोबा म्हणे 01/05/2008 - 13:51
आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" खरंच, ते झाड बोलत असतं तर हेच म्हणालं असतं. फोटो खूपच छान आले आहेत.कदंबाचं फूल पहील्यांदाच पाहीलं. सहजसोपी शब्दरचना. लेख आवडला हे.सां.न.ल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

प्रगती 01/05/2008 - 13:57
ताटव्या बद्द्ल फार सुंदर लेख लिहिला आहे. " मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले". सुरेख वाक्यरचना फोटो पण अगदी हुबेहूब आलेत.

In reply to by प्रगती

आनंदयात्री 01/05/2008 - 22:31
सुंदर लेख प्राजु !! आवडला, सकाळी सकाळी घरी पोचल्यावर असेच होते, मनाची अवस्था नेमकी टिपली आहेस. बाकी कणेर ला आम्ही कन्हेर म्हणतो.

तुझ्या लेखनावरून तुझ्या बागेत खुपच रमली आहेस असे दिसते.:) मस्तच!!!!!!!! फोटो पण छान आले आहेत. असं वाटत होतं, की हि सगळी फुलं मला म्हणताहेत," कशी आहेस गं? बघ, किती दिवसांनी भेटलीस. त्या तुझ्या दुनियेत अनेक रंगिबेरंगी फुलं पहात असशिल.. पण आमची आठवण येते का गं तुला? " मी लावलेल्या, जोपासलेल्या, त्या झाडांना इतक्या देखण्या रूपात पाहून काय करावं आणि काय नको असं झालं होतं. मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले. फोटो काढताना तुझी काय मनस्थिती असेल? हे तुझ्या लेखनातून दिसत आहे. मस्त लेख.....

चतुरंग 01/05/2008 - 16:06
किती दिवसांनी फोटोत का होईना पण तगर बघायला मिळाली! :) फुलांसारखेच साधे, सरळ, सुगंधी लेखन! अभिनंदन!! बहरलेला कदंब बघून तर क्षणात मनाने ओळीच गुणगुणल्या कदंब-तरूला बांधुनि दोला, उंच-खालती झोले परस्परांनी दिले-घेतले, गेले ! ते दिन गेले चतुरंग

अभिज्ञ 01/05/2008 - 16:29
प्राजुताई, सुंदर लेखन. ब-याच दिवसांनि आपले नवीन लेखन वाचायला मिळाले. ... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" हे तर छानच. अबब.

वरदा 01/05/2008 - 17:56
सॉरी गं मी उशीरा वाचलं...तू मला माझ्या बागेची आठवण करुन दिलीस्..माझ्या तर आईबाबांनी पण ते जुनं घर सोडलं आता त्यामुळे मला ती बाग परत नाही पहायला मिळणार....:( सहज आणि मनापासून लिहीलयस..थेट आत जाऊन भिडलं...

शितल 01/05/2008 - 18:06
फुला॑चे फोटोही छान आणि तुझा लेख ही छान झाला आहे. प्रत्येक माहेरवाशीणीला आपल्या माहेरच्या घराची आठवण आठवण करुन देणारा.

सुंदर, सुबक, ठेंगणे लेखन. मुद्देसुद, उगीच फापटपसारा नाही तरीही मनीच्या (मनातल्या हो!) भावना व्यवस्थित पोहोचविणारे. दुसरा फोटो हा तगरीचाच आहे. कदाचित त्याला 'पांढरी तगर' म्हणत असावेत. (फोतो किंचित आउट ऑफ फोकस वाटतो आहे.) कदंबाची फुले प्रथमच पाहिली. मस्तच आहेत. नारळाच्या झाडाची जगण्याची धडपड आणि प्रगती कौतुकास्पद. अभिनंदन.

मानस 01/05/2008 - 20:05
फारच छान वर्णन केलं आहे. बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या. आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं त्या ३-४ फूटी नारळाचे फोटो पहायला मजा येईल. धन्यवाद मानस

देवदत्त 01/05/2008 - 20:22
छान एकदम :) कणेरीची फुले बहुधा मी नाही कधी बघितली. अरेच्च्या ही स्वस्तिकाची फुले आहेत का? मला नाव नव्हते माहित. लहानपणी घराच्यासमोर झाड होते. दररोज तोडून देवासमोर वाहण्यास घरी नेत होतो. जास्वंद मस्त आहे एकदम. एवढ्या जर्द रंगाची फुले फार कमी बघितली मी. कदंबाच्या फुलांचे झाड आमच्या शाळेत होते, त्याची आठवण झाली. फुले मस्त मऊ चेंडूप्रमाणे असतात.

नारळाच्या रोपाची उपकथा जास्त आवडली. कदंबाच्या झाडाचे फोटोही आवडले. विजुभाऊ, इथे माझ्या आवारात आहे कॅशियाचं झाड! नंतर फोटो पाठवीन... -डांबिसकाका

प्राजु 01/05/2008 - 22:09
सर्वांचे मनापासून धन्यवाद... माझा ताटवा आपल्याला आवडला यातच सगळं आलं.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

झकासराव 02/05/2008 - 14:20
चांगल लिहिलय. सोबत फोटोंमुळे लेख प्रेक्षणीय देखील झालाय. :) अवांतर : मग करवीरनिवासिनीच्या दर्शनाचा लाभ घेतला की नाही अजुन?? टॉमॅटो नावाच एक नवीन एफ एम सुरु झालय. त्यात मला दुपारी २ च्या पुढे "ह्या फुलांच्या गंधकोषी" ह्या कार्यक्रमात खुप छान अशी नवी जुनी मराठी गाणी ऐकायला मिळाली होती. हे एफ एम ऐकल का??? (कोल्हापुरि झकास)

धमाल मुलगा 02/05/2008 - 14:47
पुन्हा एकदा प्राजुताई स्पेशल लेख.... साधा...सरळ...सुटसुटीत तरीही भावना जशाच्या तशा पोहोचवण्यात यशस्वी होणारी शब्दसंरचना.... (आयला, मलाच वाटायला लागलंय कोणीतरी दुसरंच माझा आयडी वापरुन प्रतिक्रिया लिहितोय!) छान गं!!!! मजा आली वाचायला. आ व ड लं.... नारळाची गोष्टही मस्त. कण्हेरीची आणि जास्वंदाची फुलं मला आवडतात...:) छान वाटलं फोटोत पाहून. शाळेत असताना कदंबाची फुलं तोडून (किंवा खाली पडलेली उचलून) एकमेकांना मारायचो त्याची आठवण करुन दिलीस :) अवांतरः गोकर्णाच्या फुलांचा फोटो कोणि देऊ शकेल काय? मला खूप आवडतं गोकर्ण.

काळा_पहाड 02/05/2008 - 15:32
सुंदर लेख आणि फोटो त्याहुनही सुंदर. कदंब फक्त वाचुन माहित होता. प्रथमच फोटो बघायला मिळाला. धन्यवाद प्राजू. मिलिंद

अजिंक्य 04/05/2008 - 11:10
उत्तम लेख, उत्कृष्ट छायाचित्रे! प्राजुताई, लेख आवडला. वाचून एकदम छान वाटलं. वार्‍याची एखादी प्रसन्न झुळूक आल्यासारखं वाटलं. (तुम्हाला बागकामाची आणि फुलांमध्ये रमण्याची आवड आहे असं दिसतंय.) आणि फोटोंमधली फुलं तर "क्लासिक!!" जर हे फोटो तुम्हीच काढलेले असतील, तर तुम्ही ग्रेट आहात! फोटोंमुळे लेखाचं सौंदर्य आणखीनच वाढलंय. Well Done - अजिंक्य.

सुंदर, सरळ, साधा लेख, फोटोही सुंदर.. जास्वंदीचे फूल खूपच सुंदर, आणि जास्वंदची पानेही पहा, जर्द हिरवीगार.... माझ्याकडे जास्वंदीचे १६ प्रकार होते.. ज्यावेळेला गावात रहायचो.. आता ४/५च उरलेत. कोणाकडे जास्वंदीचे प्रकार (फांद्या) मिळतील का? प्रशांत

प्राजु 05/05/2008 - 09:06
सगळ्या ताटवा प्रेमींना मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रमोद देव 01/05/2008 - 13:27
लेख उत्तम उतरलाय. छायाचित्रांमुळे त्याला अजूनच जास्त सौंदर्य प्राप्त झालंय. स्वस्तिकाच्या फुलांना आम्ही 'तगरीची फुले' म्हणतो. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

विजुभाऊ 01/05/2008 - 13:31
तगर वेगळी स्वस्तिकाची फुले वेगळी. तगर गुलाबी रंगाची असते स्वस्तिकाची फुले पांढरी असतात.

In reply to by विजुभाऊ

प्रमोद देव 01/05/2008 - 13:37
तगर पांढरीच असते. माझे बालपण सगळे तगरीच्या बनात गेलंय. हो. कारण आमची वाडी म्हणजे एक तगरीचं बनच होते. अर्थात ह्याला स्वस्तिक म्हणायला माझी हरकत नाही. कारण आकार तसा दिसतोय . मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विजुभाऊ 01/05/2008 - 13:35
आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" अनन्त काणेकरांचे "आणिकॅशिया भरारला" आठवले. सरळ साधे एकदम भिडणारे वर्णन: प्राजु ची खासियत. :)

मदनबाण 01/05/2008 - 13:36
कदंबाच फुल मी कधीच पाहील नव्हत!!!!! खुपच सुंदर आहे ते.....(अगदी गोंडस ) :) ताई तुमचे हे जीवलग मित्र आणि मैत्रिणी अगदीच सुंदर आहेत..... (सुमनांचा प्रेमी) मदनबाण

प्राजु,सुंदर वर्णन आणि चित्रे! तगरीला स्वस्तिकाची फुले हे नाव छान वाटले. कदंबाचे बहरलेलं झाड मलाही माझ्या माहेरी घेऊन गेलं.आमच्याकडेही कदंबाची २,३ झाडे होती.आणि कदंब फुलला की पानापानातून ती डोकवायची आणि वार्‍याच्या झुळुकेबरोबर मंद सुवास यायचा. स्वाती

इनोबा म्हणे 01/05/2008 - 13:51
आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" खरंच, ते झाड बोलत असतं तर हेच म्हणालं असतं. फोटो खूपच छान आले आहेत.कदंबाचं फूल पहील्यांदाच पाहीलं. सहजसोपी शब्दरचना. लेख आवडला हे.सां.न.ल. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

प्रगती 01/05/2008 - 13:57
ताटव्या बद्द्ल फार सुंदर लेख लिहिला आहे. " मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले". सुरेख वाक्यरचना फोटो पण अगदी हुबेहूब आलेत.

In reply to by प्रगती

आनंदयात्री 01/05/2008 - 22:31
सुंदर लेख प्राजु !! आवडला, सकाळी सकाळी घरी पोचल्यावर असेच होते, मनाची अवस्था नेमकी टिपली आहेस. बाकी कणेर ला आम्ही कन्हेर म्हणतो.

तुझ्या लेखनावरून तुझ्या बागेत खुपच रमली आहेस असे दिसते.:) मस्तच!!!!!!!! फोटो पण छान आले आहेत. असं वाटत होतं, की हि सगळी फुलं मला म्हणताहेत," कशी आहेस गं? बघ, किती दिवसांनी भेटलीस. त्या तुझ्या दुनियेत अनेक रंगिबेरंगी फुलं पहात असशिल.. पण आमची आठवण येते का गं तुला? " मी लावलेल्या, जोपासलेल्या, त्या झाडांना इतक्या देखण्या रूपात पाहून काय करावं आणि काय नको असं झालं होतं. मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले. फोटो काढताना तुझी काय मनस्थिती असेल? हे तुझ्या लेखनातून दिसत आहे. मस्त लेख.....

चतुरंग 01/05/2008 - 16:06
किती दिवसांनी फोटोत का होईना पण तगर बघायला मिळाली! :) फुलांसारखेच साधे, सरळ, सुगंधी लेखन! अभिनंदन!! बहरलेला कदंब बघून तर क्षणात मनाने ओळीच गुणगुणल्या कदंब-तरूला बांधुनि दोला, उंच-खालती झोले परस्परांनी दिले-घेतले, गेले ! ते दिन गेले चतुरंग

अभिज्ञ 01/05/2008 - 16:29
प्राजुताई, सुंदर लेखन. ब-याच दिवसांनि आपले नवीन लेखन वाचायला मिळाले. ... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !" हे तर छानच. अबब.

वरदा 01/05/2008 - 17:56
सॉरी गं मी उशीरा वाचलं...तू मला माझ्या बागेची आठवण करुन दिलीस्..माझ्या तर आईबाबांनी पण ते जुनं घर सोडलं आता त्यामुळे मला ती बाग परत नाही पहायला मिळणार....:( सहज आणि मनापासून लिहीलयस..थेट आत जाऊन भिडलं...

शितल 01/05/2008 - 18:06
फुला॑चे फोटोही छान आणि तुझा लेख ही छान झाला आहे. प्रत्येक माहेरवाशीणीला आपल्या माहेरच्या घराची आठवण आठवण करुन देणारा.

सुंदर, सुबक, ठेंगणे लेखन. मुद्देसुद, उगीच फापटपसारा नाही तरीही मनीच्या (मनातल्या हो!) भावना व्यवस्थित पोहोचविणारे. दुसरा फोटो हा तगरीचाच आहे. कदाचित त्याला 'पांढरी तगर' म्हणत असावेत. (फोतो किंचित आउट ऑफ फोकस वाटतो आहे.) कदंबाची फुले प्रथमच पाहिली. मस्तच आहेत. नारळाच्या झाडाची जगण्याची धडपड आणि प्रगती कौतुकास्पद. अभिनंदन.

मानस 01/05/2008 - 20:05
फारच छान वर्णन केलं आहे. बर्‍याच आठवणी ताज्या झाल्या. आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं त्या ३-४ फूटी नारळाचे फोटो पहायला मजा येईल. धन्यवाद मानस

देवदत्त 01/05/2008 - 20:22
छान एकदम :) कणेरीची फुले बहुधा मी नाही कधी बघितली. अरेच्च्या ही स्वस्तिकाची फुले आहेत का? मला नाव नव्हते माहित. लहानपणी घराच्यासमोर झाड होते. दररोज तोडून देवासमोर वाहण्यास घरी नेत होतो. जास्वंद मस्त आहे एकदम. एवढ्या जर्द रंगाची फुले फार कमी बघितली मी. कदंबाच्या फुलांचे झाड आमच्या शाळेत होते, त्याची आठवण झाली. फुले मस्त मऊ चेंडूप्रमाणे असतात.

नारळाच्या रोपाची उपकथा जास्त आवडली. कदंबाच्या झाडाचे फोटोही आवडले. विजुभाऊ, इथे माझ्या आवारात आहे कॅशियाचं झाड! नंतर फोटो पाठवीन... -डांबिसकाका

प्राजु 01/05/2008 - 22:09
सर्वांचे मनापासून धन्यवाद... माझा ताटवा आपल्याला आवडला यातच सगळं आलं.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

झकासराव 02/05/2008 - 14:20
चांगल लिहिलय. सोबत फोटोंमुळे लेख प्रेक्षणीय देखील झालाय. :) अवांतर : मग करवीरनिवासिनीच्या दर्शनाचा लाभ घेतला की नाही अजुन?? टॉमॅटो नावाच एक नवीन एफ एम सुरु झालय. त्यात मला दुपारी २ च्या पुढे "ह्या फुलांच्या गंधकोषी" ह्या कार्यक्रमात खुप छान अशी नवी जुनी मराठी गाणी ऐकायला मिळाली होती. हे एफ एम ऐकल का??? (कोल्हापुरि झकास)

धमाल मुलगा 02/05/2008 - 14:47
पुन्हा एकदा प्राजुताई स्पेशल लेख.... साधा...सरळ...सुटसुटीत तरीही भावना जशाच्या तशा पोहोचवण्यात यशस्वी होणारी शब्दसंरचना.... (आयला, मलाच वाटायला लागलंय कोणीतरी दुसरंच माझा आयडी वापरुन प्रतिक्रिया लिहितोय!) छान गं!!!! मजा आली वाचायला. आ व ड लं.... नारळाची गोष्टही मस्त. कण्हेरीची आणि जास्वंदाची फुलं मला आवडतात...:) छान वाटलं फोटोत पाहून. शाळेत असताना कदंबाची फुलं तोडून (किंवा खाली पडलेली उचलून) एकमेकांना मारायचो त्याची आठवण करुन दिलीस :) अवांतरः गोकर्णाच्या फुलांचा फोटो कोणि देऊ शकेल काय? मला खूप आवडतं गोकर्ण.

काळा_पहाड 02/05/2008 - 15:32
सुंदर लेख आणि फोटो त्याहुनही सुंदर. कदंब फक्त वाचुन माहित होता. प्रथमच फोटो बघायला मिळाला. धन्यवाद प्राजू. मिलिंद

अजिंक्य 04/05/2008 - 11:10
उत्तम लेख, उत्कृष्ट छायाचित्रे! प्राजुताई, लेख आवडला. वाचून एकदम छान वाटलं. वार्‍याची एखादी प्रसन्न झुळूक आल्यासारखं वाटलं. (तुम्हाला बागकामाची आणि फुलांमध्ये रमण्याची आवड आहे असं दिसतंय.) आणि फोटोंमधली फुलं तर "क्लासिक!!" जर हे फोटो तुम्हीच काढलेले असतील, तर तुम्ही ग्रेट आहात! फोटोंमुळे लेखाचं सौंदर्य आणखीनच वाढलंय. Well Done - अजिंक्य.

सुंदर, सरळ, साधा लेख, फोटोही सुंदर.. जास्वंदीचे फूल खूपच सुंदर, आणि जास्वंदची पानेही पहा, जर्द हिरवीगार.... माझ्याकडे जास्वंदीचे १६ प्रकार होते.. ज्यावेळेला गावात रहायचो.. आता ४/५च उरलेत. कोणाकडे जास्वंदीचे प्रकार (फांद्या) मिळतील का? प्रशांत

प्राजु 05/05/2008 - 09:06
सगळ्या ताटवा प्रेमींना मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
लेखनविषय:
मंडळी, बुधवारी पहाटेच आमचे आगमन आमच्या माहेरी म्हणजे करवीर नगरीत झाले. पहाटे ३.३० ला आम्ही आमच्या मुक्कामी दाखल झालो. घरी पोहोचताच आईने आमच्यावरून्(मी आणि माझा छोटा) भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि आम्हाला घरांत घेतलं. आल्या आल्या घरातल्या लोकांबरोबरच कुत्री, मांजरी यांच्याशीही गाठीभेटी झाल्या आणि त्यांच्या मूक मायेनं मन खरंच भरून आलं. सगळ्यांसाठी आणलेल्या वस्तू बॅगेतून काढून दिल्या.. ..माझी झोप तर उडालीच होती त्यामुळे घरच्यांना (खरंतर आईलाच) झोपू देणार नाही असं सांगून टाकलं. आणि मग इथे येण्याच्या आधी काय काय धमाल चालू होती माझी.. रेडीओवर काय काय घोळ घालते आहे.. आजारी कशी पडले..

अब्दुल खान - १

पिवळा डांबिस ·

या दिलेरखानाला महाराष्ट्र माहिती नव्हता पण शिवाजी बरोब्बर माहिती होता... अभिमानाची भावना! माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांचा एक हाडवैरी, एका सर्वस्वी परक्या अमेरिकेत माझ्यासमोर गात होता... इथे वाचताना आमच्या ही अंगावर काटा उभाराहिला.. तुमच्या अब्दुल खान ला पुढे वाचायला उत्सुक, स्वाती

मनस्वी 25/04/2008 - 12:16
"अरे हमारे यहां जनरेशन्स से दादा-परदादा बताते आये हैं तुम्हारे सूरमा शिवाजी और उसके पहाडी मुल्कके बारेमे! कहते है, पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!"
वाचताना आपोआप मान ताठ झाली. साध्या सोप्या भाषेत सुंदरच लिहिलंय डांबिसकाका. पुढचे लवकर लिहा!

विसुनाना 25/04/2008 - 12:21
मा. पि. डांबिस, व्यक्तीचित्र दर्जेदार आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत... हे 'पिडा' नाव आता बदललेत तर बरे नाही का होणार?असो. नावात काय आहे म्हणा!

आनंदयात्री 25/04/2008 - 12:25
डांबिसकाका मस्त लेख, ओघावती गुंगवुन टाकणारी लेखनशैली. लेख खुप आवडला. मिपाला अजुन एक व्यक्तिचित्र किंग मिळाला.

In reply to by आनंदयात्री

अब्दुल खानाचे व्यक्तिचित्र, काय जब्रा उभं केलं राव !!! अतिशय सुरेख..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत. अवांतर काय लिहू तुम्ही आमची बोलतीच बंद केली राव :)

प्रमोद देव 25/04/2008 - 12:28
मस्तच लिहिलंय! दुसरे शब्दच नाहीत! डोळ्यासमोर उभा राहिला तुमचा तो पठाण मित्र! "सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी | बाकी सब तो मसीजीवी || हे तर खासच! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर 25/04/2008 - 12:36
पण त्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्याच्या बोलण्यात म्हणजे फाळणीपूर्व भारत हा हिन्दोस्तां, आणि फाळणीनंतर त्याचा पाकिस्तान आणि माझा इंडिया! त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! तसा धार्मिक होता, कधीकधी नमाज पढतांना दिसायचा! वा डांबिसा, सुरेखच लिहिलं आहेस रे... औरभी लिख्खो... तात्या.

नारदाचार्य 25/04/2008 - 13:48
पुढच्या भागांना मुदत किती हवी आहे ते? असे एकेक भाग टाकून आमचा चक्का करून ठेवणाऱ्यांचा निषेध, निषेध, निषेध. पुढचे भाग न देणाऱ्यांचा त्यापुढे जाऊन निषेध, निषेध, निषेध. नारद एवढेच करू शकतो. नारायण, नारायण... बाकी व्यक्तिचित्र उत्तम रंग जमवते आहे. आता पुढे लवकर कूच करा.

लिखाळ 25/04/2008 - 13:57
डांबिसकाका, व्यक्तिचित्र दर्जेदार आणि सुंदर. शिवाजीमहाराजांबद्दलचा प्रसंग काटा आणणारा. महाराष्ट्रात जन्म झाल्याचे बरे वाटले :). पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत, --लिखाळ.

वावा...आज फार उत्तमोत्तम लेख वाचायचा योग आहे.....हे सारे एकदम फिल्मसारखे डोळ्यापुढे उभे राहते... फार छान डांबिसकाका..... प्लीज लवकर टाका हो पुढचा लेख....

शितल 25/04/2008 - 18:40
चित्र डोळ्या समोर उभे राहते, आणि पठाण आपला ही आओळ्खीचा वाटु लागतो, पुढचा भाग लवकर वाचायला मिळु दे, हा भाग डोक्यातुन जाण्या आगोदर.

वरदा 25/04/2008 - 18:58
काय जबरदस्त लिहिता हो तुम्ही..तो पठाण माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला...शिवाजी राजे एवढे फेमस आहेत तिथे हे मला माहीत नव्हतं सॉलीड अभिमान वाटला..

अनामिका 25/04/2008 - 19:11
डांबिसकाका! वाह वाह!सुभानअल्ला! अख्खा पठाण आणि त्यांच्याबरोबर तुमचा चाललेला सुसंवाद ,तुमचे अपार्टमेंट सगळेच क्षणभर डोळ्यासमोर चलचित्रासारखे तरळुन गेले ."महाराजांच्या" वास्तव्याने पावन झालेल्या "महाराष्ट्रभुमीत "जन्माला आले याचा आज खर्‍या अर्थाने अभिमान वाटला. आणि पाठीचा कणा आपसुकच ताठ झाला. पुढिल भाग वाचण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या मीतीला. लवकर लिहा. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत असलेली "मी मराठी" "अनामिका"

धनंजय 25/04/2008 - 20:01
पंडितमैत्री तर होतेच, समविचारी लोकही भेटतात. "सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी | बाकी सब तो मसीजीवी ||" असा काही वाक्प्रचार मराठीत आहे काय? पठानांमधला, गोरख्यांमधला, शिखांमधला कोणी शिवाजी महाराजांसारखा लढवय्या असेलच. अब्दुल खान यांना जसे शिवाजीमहाराजांबद्दल माहिती होते, आदर होता; तशी माहिती, तसा आदर मलाही या योद्ध्यांबद्दल असावा असे मनोमन वाटते. पण अब्दुल खान यांच्या चौफेर ज्ञानापेक्षा माझे ज्ञान फारच तोकडे आहे, याबद्दल खेद वाटतो. कदाचित या क्रमशः व्यक्तिचित्रातून, पिवळा डांबीस यांच्या प्रभावी लेखणीतून ही माहिती कळू लागेल. ("मसीजीवी"वरून आठवले - माझ्या पूर्वजांच्या आठ पिढ्या, म्हणजे थेट पेशवाईपर्यंत तरी नोकरशाहीत होत्या. किंवा पुस्तकी शिक्षणाच्या व्यवसायात. आणि आताही चुलते-मामे सर्व एक तर खर्डेघाशी करणारे किंवा सुशिक्षित नोकर. तलवार सोडा, साधी गोफणसुद्धा फिरवता येत नाही कोणाला. तरी अब्दुल खानसाहेबांनी आम्हाला असिजीवी म्हटले तर उगाचच जरा बरे वाटते. न कमावलेले स्नायू थोडे फुरफुरले.)

इनोबा म्हणे 25/04/2008 - 20:32
"अरे हमारे यहां जनरेशन्स से दादा-परदादा बताते आये हैं तुम्हारे सूरमा शिवाजी और उसके पहाडी मुल्कके बारेमे! कहते है, पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!" डांबीसकाका अगदी अंगावर काटा उभा राहीला हो! मस्तच लिहीताय. एकदा अशीच गंमत झाली.... हे बरंय तुमचं. उत्कंठा वाढवून क्रमशः काय टाकताय हो? जरा पटकन द्या पुढचा भाग. टि.व्ही.सिरीयल बघणं कमी करा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

चतुरंग 25/04/2008 - 20:59
तुम्ही एकदम छुपे रुस्तुम निघालात! बरेच दिवसांनी आता एकेक अनुभव पोतडीतून बाहेर काढता आहात. एकदम चित्रदर्शी लिखाण. वाचता वाचताच अब्दुल खान मनात कुठेतरी घर करून बसला. शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठ्यांबद्दल त्याचे मत वाचून तर छाती अभिमानाने भरुन आली! (अवांतर (स्वगत) - एक करा बुवा, पुढच्या भागाची वाट मात्र बघायला लावू नका. ते पेटंट तात्यांचं आहे म्हणा!;)) चतुरंग

मदनबाण 25/04/2008 - 21:15
काका मस्तच !!!!! अगदी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे व त्या पठाणाची अदब अनुभवतोय असे मला वाटले..... त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! जबरदस्त निरिक्षण..... अजुन काय बोलु शब्दच नाही माझ्या जवऴ. (भाग २ ची वाट पाहणारा) मदनबाण

मुक्तसुनीत 26/04/2008 - 01:07
....असे या लिखाणाच्या बाबतीत म्हणावेसे वाटते. एखाद्या व्यक्तिचा दिलदारपणा, मनाचा मोठेपणा कळण्याकरता अनुभव घेणारासुद्धा त्या जातीचा असला पाहिजे. "शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकावा". त्यामुळे , लेखाचा हा आरसा , अब्दुलखानाइतकेच डांबिसखानाच्या दिलदारीचेही प्रतिबिंब दाखवतो आहे :-) बाकी या व्यक्तिच्या लकबी, छोटी छोटी वैशिष्ट्ये या सर्वगोष्टी फारच सुरेखरीतीने चित्रित झाल्या आहेत.... !

बगाराम 26/04/2008 - 01:43
वा 'सुलेश' राव! फारच सुंदर अनुभव कथन. नेमक्या शब्दात अब्दुलला छान उभे केले आहे. पुढचा भाग लवकर टाका. -बगाराम

सुनील 26/04/2008 - 06:10
फार सुंदर लिहिलेत हो डांबिसकाका. आता फार वेळ लावू नका पुढच्या भागाला. लवकर येउद्यात! केशर आणि मध घातलेला चहा हे कल्पना बाकी फक्कड. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मला यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी.. मधला प्राण आठवला मलाही.. सु॑दर लेखन, पण एकच वाईट गोष्ट..क्रमशः

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पण एकच वाईट गोष्ट..क्रमशः क्रमशः ठराविक काळाच्या क्रमाक्रमाने आले तर ठीक हो,पण अति वाट पहायला नका बाबा लावू सुलेशबाबू.. आता आम्ही तुम्हाला पि. डां. न संबोधता सुलेशबाबू म्हणणार..

फारच आवडलं. पुढील भागाच्या प्रतीक्षेत इन पठानोंमे अगर कोई उनकी दी हुयी खातिरदारीको इन्कार करता है तो वे अपना पर्सनल इन्सल्ट समझते है मी नोकरीनिमित्त कुवेत मधे आलो तेंव्हा कुवेती लोकांबद्दल मला असंच सांगण्यात आलं होतं. काही अंशी ते खरंही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण त्यांना काही ऑफर केलं तर ते नाकारण्याचं स्वातंत्र्य ते खुशाल घेतात. X(

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:29
क्या बात है! जनाब डांबीसखाँ, मज़ा आ गया.. इस नाचिज के हातों जवाब आने में चंद घंटोंकी देरी हो गयी, इस गुस्ताख़ी के लिये कीई दरख्वा़स्त-ए-मुआफि कबुल हो | बाकी हे पठाण लोक असतात बडे़ दिलखुलास ! आहे त्यांचा अनुभव आहे...एकदम 'जमलं तर सूत नाही तर भूत' असला प्रकार असतो !
आता बघा! या दिलेरखानाला महाराष्ट्र माहिती नव्हता पण शिवाजी बरोब्बर माहिती होता... पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!"
खरंच काटा आला अंगावर!!!!
"सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी | बाकी सब तो मसीजीवी ||"
:) एक नंबर !!!!
मी हिन्दू असल्याचे त्याने ताडले होते. पण कधीही स्वतःहून धर्मावरची चर्चा चुकुनही सुरू करीत नसे. त्याच्यामते व्यक्तिस्वातंत्र्याला, मित्राचं मन जपण्याला जास्त महत्त्व असावं!!
वा:! आमच्या मोहसिनखाँसारखंच अगदी! हे पठाण म्हणे, पाकिस्तानात येड्यात गणले जातात, आपल्याकडे सरदार जसे तसंच. पण इतका विचारी माणूस बघून हे खरं नाही वाटतं!!!! डांबीसकाका, मस्त लिहिताय, मजा येते वाचायला, और भी आने दो ....... आपला, -धमालुद्दीन खाँ

यशोधरा 05/05/2008 - 21:06
>>>माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांचा एक हाडवैरी, एका सर्वस्वी परक्या अमेरिकेत माझ्यासमोर गात होता... >>>सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी | बाकी सब तो मसीजीवी || खरच!! वाचतानाही इतका अभिमान वाटला!!

या दिलेरखानाला महाराष्ट्र माहिती नव्हता पण शिवाजी बरोब्बर माहिती होता... अभिमानाची भावना! माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांचा एक हाडवैरी, एका सर्वस्वी परक्या अमेरिकेत माझ्यासमोर गात होता... इथे वाचताना आमच्या ही अंगावर काटा उभाराहिला.. तुमच्या अब्दुल खान ला पुढे वाचायला उत्सुक, स्वाती

मनस्वी 25/04/2008 - 12:16
"अरे हमारे यहां जनरेशन्स से दादा-परदादा बताते आये हैं तुम्हारे सूरमा शिवाजी और उसके पहाडी मुल्कके बारेमे! कहते है, पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!"
वाचताना आपोआप मान ताठ झाली. साध्या सोप्या भाषेत सुंदरच लिहिलंय डांबिसकाका. पुढचे लवकर लिहा!

विसुनाना 25/04/2008 - 12:21
मा. पि. डांबिस, व्यक्तीचित्र दर्जेदार आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत... हे 'पिडा' नाव आता बदललेत तर बरे नाही का होणार?असो. नावात काय आहे म्हणा!

आनंदयात्री 25/04/2008 - 12:25
डांबिसकाका मस्त लेख, ओघावती गुंगवुन टाकणारी लेखनशैली. लेख खुप आवडला. मिपाला अजुन एक व्यक्तिचित्र किंग मिळाला.

In reply to by आनंदयात्री

अब्दुल खानाचे व्यक्तिचित्र, काय जब्रा उभं केलं राव !!! अतिशय सुरेख..... पुढील भागाच्या प्रतिक्षेत. अवांतर काय लिहू तुम्ही आमची बोलतीच बंद केली राव :)

प्रमोद देव 25/04/2008 - 12:28
मस्तच लिहिलंय! दुसरे शब्दच नाहीत! डोळ्यासमोर उभा राहिला तुमचा तो पठाण मित्र! "सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी | बाकी सब तो मसीजीवी || हे तर खासच! पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

विसोबा खेचर 25/04/2008 - 12:36
पण त्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्याच्या बोलण्यात म्हणजे फाळणीपूर्व भारत हा हिन्दोस्तां, आणि फाळणीनंतर त्याचा पाकिस्तान आणि माझा इंडिया! त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! तसा धार्मिक होता, कधीकधी नमाज पढतांना दिसायचा! वा डांबिसा, सुरेखच लिहिलं आहेस रे... औरभी लिख्खो... तात्या.

नारदाचार्य 25/04/2008 - 13:48
पुढच्या भागांना मुदत किती हवी आहे ते? असे एकेक भाग टाकून आमचा चक्का करून ठेवणाऱ्यांचा निषेध, निषेध, निषेध. पुढचे भाग न देणाऱ्यांचा त्यापुढे जाऊन निषेध, निषेध, निषेध. नारद एवढेच करू शकतो. नारायण, नारायण... बाकी व्यक्तिचित्र उत्तम रंग जमवते आहे. आता पुढे लवकर कूच करा.

लिखाळ 25/04/2008 - 13:57
डांबिसकाका, व्यक्तिचित्र दर्जेदार आणि सुंदर. शिवाजीमहाराजांबद्दलचा प्रसंग काटा आणणारा. महाराष्ट्रात जन्म झाल्याचे बरे वाटले :). पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत, --लिखाळ.

वावा...आज फार उत्तमोत्तम लेख वाचायचा योग आहे.....हे सारे एकदम फिल्मसारखे डोळ्यापुढे उभे राहते... फार छान डांबिसकाका..... प्लीज लवकर टाका हो पुढचा लेख....

शितल 25/04/2008 - 18:40
चित्र डोळ्या समोर उभे राहते, आणि पठाण आपला ही आओळ्खीचा वाटु लागतो, पुढचा भाग लवकर वाचायला मिळु दे, हा भाग डोक्यातुन जाण्या आगोदर.

वरदा 25/04/2008 - 18:58
काय जबरदस्त लिहिता हो तुम्ही..तो पठाण माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला...शिवाजी राजे एवढे फेमस आहेत तिथे हे मला माहीत नव्हतं सॉलीड अभिमान वाटला..

अनामिका 25/04/2008 - 19:11
डांबिसकाका! वाह वाह!सुभानअल्ला! अख्खा पठाण आणि त्यांच्याबरोबर तुमचा चाललेला सुसंवाद ,तुमचे अपार्टमेंट सगळेच क्षणभर डोळ्यासमोर चलचित्रासारखे तरळुन गेले ."महाराजांच्या" वास्तव्याने पावन झालेल्या "महाराष्ट्रभुमीत "जन्माला आले याचा आज खर्‍या अर्थाने अभिमान वाटला. आणि पाठीचा कणा आपसुकच ताठ झाला. पुढिल भाग वाचण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या मीतीला. लवकर लिहा. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत असलेली "मी मराठी" "अनामिका"

धनंजय 25/04/2008 - 20:01
पंडितमैत्री तर होतेच, समविचारी लोकही भेटतात. "सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी | बाकी सब तो मसीजीवी ||" असा काही वाक्प्रचार मराठीत आहे काय? पठानांमधला, गोरख्यांमधला, शिखांमधला कोणी शिवाजी महाराजांसारखा लढवय्या असेलच. अब्दुल खान यांना जसे शिवाजीमहाराजांबद्दल माहिती होते, आदर होता; तशी माहिती, तसा आदर मलाही या योद्ध्यांबद्दल असावा असे मनोमन वाटते. पण अब्दुल खान यांच्या चौफेर ज्ञानापेक्षा माझे ज्ञान फारच तोकडे आहे, याबद्दल खेद वाटतो. कदाचित या क्रमशः व्यक्तिचित्रातून, पिवळा डांबीस यांच्या प्रभावी लेखणीतून ही माहिती कळू लागेल. ("मसीजीवी"वरून आठवले - माझ्या पूर्वजांच्या आठ पिढ्या, म्हणजे थेट पेशवाईपर्यंत तरी नोकरशाहीत होत्या. किंवा पुस्तकी शिक्षणाच्या व्यवसायात. आणि आताही चुलते-मामे सर्व एक तर खर्डेघाशी करणारे किंवा सुशिक्षित नोकर. तलवार सोडा, साधी गोफणसुद्धा फिरवता येत नाही कोणाला. तरी अब्दुल खानसाहेबांनी आम्हाला असिजीवी म्हटले तर उगाचच जरा बरे वाटते. न कमावलेले स्नायू थोडे फुरफुरले.)

इनोबा म्हणे 25/04/2008 - 20:32
"अरे हमारे यहां जनरेशन्स से दादा-परदादा बताते आये हैं तुम्हारे सूरमा शिवाजी और उसके पहाडी मुल्कके बारेमे! कहते है, पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!" डांबीसकाका अगदी अंगावर काटा उभा राहीला हो! मस्तच लिहीताय. एकदा अशीच गंमत झाली.... हे बरंय तुमचं. उत्कंठा वाढवून क्रमशः काय टाकताय हो? जरा पटकन द्या पुढचा भाग. टि.व्ही.सिरीयल बघणं कमी करा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

चतुरंग 25/04/2008 - 20:59
तुम्ही एकदम छुपे रुस्तुम निघालात! बरेच दिवसांनी आता एकेक अनुभव पोतडीतून बाहेर काढता आहात. एकदम चित्रदर्शी लिखाण. वाचता वाचताच अब्दुल खान मनात कुठेतरी घर करून बसला. शिवाजी महाराजांबद्दल आणि मराठ्यांबद्दल त्याचे मत वाचून तर छाती अभिमानाने भरुन आली! (अवांतर (स्वगत) - एक करा बुवा, पुढच्या भागाची वाट मात्र बघायला लावू नका. ते पेटंट तात्यांचं आहे म्हणा!;)) चतुरंग

मदनबाण 25/04/2008 - 21:15
काका मस्तच !!!!! अगदी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे व त्या पठाणाची अदब अनुभवतोय असे मला वाटले..... त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! जबरदस्त निरिक्षण..... अजुन काय बोलु शब्दच नाही माझ्या जवऴ. (भाग २ ची वाट पाहणारा) मदनबाण

मुक्तसुनीत 26/04/2008 - 01:07
....असे या लिखाणाच्या बाबतीत म्हणावेसे वाटते. एखाद्या व्यक्तिचा दिलदारपणा, मनाचा मोठेपणा कळण्याकरता अनुभव घेणारासुद्धा त्या जातीचा असला पाहिजे. "शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकावा". त्यामुळे , लेखाचा हा आरसा , अब्दुलखानाइतकेच डांबिसखानाच्या दिलदारीचेही प्रतिबिंब दाखवतो आहे :-) बाकी या व्यक्तिच्या लकबी, छोटी छोटी वैशिष्ट्ये या सर्वगोष्टी फारच सुरेखरीतीने चित्रित झाल्या आहेत.... !

बगाराम 26/04/2008 - 01:43
वा 'सुलेश' राव! फारच सुंदर अनुभव कथन. नेमक्या शब्दात अब्दुलला छान उभे केले आहे. पुढचा भाग लवकर टाका. -बगाराम

सुनील 26/04/2008 - 06:10
फार सुंदर लिहिलेत हो डांबिसकाका. आता फार वेळ लावू नका पुढच्या भागाला. लवकर येउद्यात! केशर आणि मध घातलेला चहा हे कल्पना बाकी फक्कड. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मला यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी.. मधला प्राण आठवला मलाही.. सु॑दर लेखन, पण एकच वाईट गोष्ट..क्रमशः

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पण एकच वाईट गोष्ट..क्रमशः क्रमशः ठराविक काळाच्या क्रमाक्रमाने आले तर ठीक हो,पण अति वाट पहायला नका बाबा लावू सुलेशबाबू.. आता आम्ही तुम्हाला पि. डां. न संबोधता सुलेशबाबू म्हणणार..

फारच आवडलं. पुढील भागाच्या प्रतीक्षेत इन पठानोंमे अगर कोई उनकी दी हुयी खातिरदारीको इन्कार करता है तो वे अपना पर्सनल इन्सल्ट समझते है मी नोकरीनिमित्त कुवेत मधे आलो तेंव्हा कुवेती लोकांबद्दल मला असंच सांगण्यात आलं होतं. काही अंशी ते खरंही आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण त्यांना काही ऑफर केलं तर ते नाकारण्याचं स्वातंत्र्य ते खुशाल घेतात. X(

धमाल मुलगा 28/04/2008 - 17:29
क्या बात है! जनाब डांबीसखाँ, मज़ा आ गया.. इस नाचिज के हातों जवाब आने में चंद घंटोंकी देरी हो गयी, इस गुस्ताख़ी के लिये कीई दरख्वा़स्त-ए-मुआफि कबुल हो | बाकी हे पठाण लोक असतात बडे़ दिलखुलास ! आहे त्यांचा अनुभव आहे...एकदम 'जमलं तर सूत नाही तर भूत' असला प्रकार असतो !
आता बघा! या दिलेरखानाला महाराष्ट्र माहिती नव्हता पण शिवाजी बरोब्बर माहिती होता... पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!"
खरंच काटा आला अंगावर!!!!
"सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी | बाकी सब तो मसीजीवी ||"
:) एक नंबर !!!!
मी हिन्दू असल्याचे त्याने ताडले होते. पण कधीही स्वतःहून धर्मावरची चर्चा चुकुनही सुरू करीत नसे. त्याच्यामते व्यक्तिस्वातंत्र्याला, मित्राचं मन जपण्याला जास्त महत्त्व असावं!!
वा:! आमच्या मोहसिनखाँसारखंच अगदी! हे पठाण म्हणे, पाकिस्तानात येड्यात गणले जातात, आपल्याकडे सरदार जसे तसंच. पण इतका विचारी माणूस बघून हे खरं नाही वाटतं!!!! डांबीसकाका, मस्त लिहिताय, मजा येते वाचायला, और भी आने दो ....... आपला, -धमालुद्दीन खाँ

यशोधरा 05/05/2008 - 21:06
>>>माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांचा एक हाडवैरी, एका सर्वस्वी परक्या अमेरिकेत माझ्यासमोर गात होता... >>>सिख, मराठा, पठान, गोरखा, ये है असिजीवी | बाकी सब तो मसीजीवी || खरच!! वाचतानाही इतका अभिमान वाटला!!
लेखनविषय:
3

(जैव वैविध्य)

केशवसुमार ·

३ हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे..... ऑ! चुकुन हे केशाबद्दल नाही असं वाचलं गेलं.... ओंकारेश्वराच्या घाटावर कावळा आणि कावळी २ पण त्यांना होती एकमेकांना शिवायची चोरी बरोबर आहे...नाही तर उगाच कावळी म्हणेल की 'कावळा शिवला' ;) (ह. घ्या.) (आपला शिष्य) टिंग्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

हेच म्हणतो मी पण... आणि मग कावळ्याला पण काही दिवस कावळीला शिवता आले नसते... :))) पुण्याचे पेशवे

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा 25/04/2008 - 11:00
टिंग्या, फोकलिच्या, हल्ली अंमळ जास्तच आचरट झालायस रे तू! च्यायला, काय पंचेस काढलेत...तेही इडंबनातून !!!!! भले बहाद्दर! केसुशेठ, दुव्यावरुन मुळ कविता(! हरे राम!!!) वाचली. इथं विडंबनही वाचलं... आता मला खात्री आहे तुम्ही तिच्याआयला, काही नाही मिळालं तर पेपरातल्या दशक्रिया विधीच्या 'झाईराती'वर पण विडंबन करु शकता! अरे काय डोका हाय का चेष्टा???? - शेख(चिल्ली) ध मा ल अरब.

इनोबा म्हणे 25/04/2008 - 02:15
थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका काव काव काव काव काव काव काव हा हा हा :) हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे... हे कशाबद्दल आहे एवढेच मला कळले ...(च्यामारी! म्हणजे आम्ही सुज्ञांत मोडत नाही की काय?) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

रामदास 25/04/2008 - 09:57
प्रिय केसू , ही कविता स्वतंत्र एककात (stand alone ? धर्ती वर )खूप चांगली लिहीली आहे. विडंबन म्हणून ती कशी उतरली आहे हे मी सांगू शकत नाही. पण एक चांगली कविता विडंबन लिहीण्याच्या मोहात वाया जाऊ नये , दुर्लक्षीत होउ नये असे वाटले.लिहीत रहा. ही देणगी प्रत्येकाला मिळत नसते.शुभेच्छा.

विसोबा खेचर 25/04/2008 - 10:23
काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड हे सर्वात मस्त! :) आपला, तात्या डुक्कर.

केशवसुमार 26/04/2008 - 08:15
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार.

३ हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे..... ऑ! चुकुन हे केशाबद्दल नाही असं वाचलं गेलं.... ओंकारेश्वराच्या घाटावर कावळा आणि कावळी २ पण त्यांना होती एकमेकांना शिवायची चोरी बरोबर आहे...नाही तर उगाच कावळी म्हणेल की 'कावळा शिवला' ;) (ह. घ्या.) (आपला शिष्य) टिंग्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

हेच म्हणतो मी पण... आणि मग कावळ्याला पण काही दिवस कावळीला शिवता आले नसते... :))) पुण्याचे पेशवे

In reply to by ब्रिटिश टिंग्या

धमाल मुलगा 25/04/2008 - 11:00
टिंग्या, फोकलिच्या, हल्ली अंमळ जास्तच आचरट झालायस रे तू! च्यायला, काय पंचेस काढलेत...तेही इडंबनातून !!!!! भले बहाद्दर! केसुशेठ, दुव्यावरुन मुळ कविता(! हरे राम!!!) वाचली. इथं विडंबनही वाचलं... आता मला खात्री आहे तुम्ही तिच्याआयला, काही नाही मिळालं तर पेपरातल्या दशक्रिया विधीच्या 'झाईराती'वर पण विडंबन करु शकता! अरे काय डोका हाय का चेष्टा???? - शेख(चिल्ली) ध मा ल अरब.

इनोबा म्हणे 25/04/2008 - 02:15
थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका काव काव काव काव काव काव काव हा हा हा :) हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे... हे कशाबद्दल आहे एवढेच मला कळले ...(च्यामारी! म्हणजे आम्ही सुज्ञांत मोडत नाही की काय?) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

रामदास 25/04/2008 - 09:57
प्रिय केसू , ही कविता स्वतंत्र एककात (stand alone ? धर्ती वर )खूप चांगली लिहीली आहे. विडंबन म्हणून ती कशी उतरली आहे हे मी सांगू शकत नाही. पण एक चांगली कविता विडंबन लिहीण्याच्या मोहात वाया जाऊ नये , दुर्लक्षीत होउ नये असे वाटले.लिहीत रहा. ही देणगी प्रत्येकाला मिळत नसते.शुभेच्छा.

विसोबा खेचर 25/04/2008 - 10:23
काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड हे सर्वात मस्त! :) आपला, तात्या डुक्कर.

केशवसुमार 26/04/2008 - 08:15
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार.
लेखनविषय:

आमची प्रेरणा चैत्रेचैत यांचे जैव वैविध्य

(जैव वैविध्य)

थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका
काव काव काव काव काव काव काव

काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण
त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड

(केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...(एक नवविडंबन))

ब्रिटिश टिंग्या ·

इनोबा म्हणे 25/04/2008 - 01:57
तेवढ्यात त्याला आंतरजालावर 'ठेवणीतल्या आयडी'वाल्याने शिवी दिली, '***** ***' म्हणुन तो सुट्टा शिलगावत 'पक्षीनिरीक्षण' करायला निघुन गेला. अरे मग सुट्टा शिलगावण्यापेक्षा त्याचा पुठ्ठा शिलगवायचा ना! मस्तच रे टिंग्या. विडंबनसम्राट केशवाच्या विडंबनाचेही विडंबन. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

इनोबा म्हणे 25/04/2008 - 01:57
तेवढ्यात त्याला आंतरजालावर 'ठेवणीतल्या आयडी'वाल्याने शिवी दिली, '***** ***' म्हणुन तो सुट्टा शिलगावत 'पक्षीनिरीक्षण' करायला निघुन गेला. अरे मग सुट्टा शिलगावण्यापेक्षा त्याचा पुठ्ठा शिलगवायचा ना! मस्तच रे टिंग्या. विडंबनसम्राट केशवाच्या विडंबनाचेही विडंबन. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
लेखनविषय:
आमची प्रेरणा आमचे गुरुवर्य केशवसुमार यांचे एक नवविडंबन केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका... आंतरजालावर कधीतरी टिंग्याने एक वात्रट प्रतिसाद दिला...... नंतर दुसरा....नंतर तिसरा.... असे करत करत सर्व प्रतिसाद देउन संपले....एकही लेख प्रतिसादाला शिल्लक ठेवला नाही..... मग त्याने विचार केला की स्वत:च्याच प्रतिसादांना परत प्रतिसाद देउयात. तेवढ्यात त्याला आंतरजालावर 'ठेवणीतल्या आयडी'वाल्याने शिवी दिली, '***** ***' म्हणुन तो सुट्टा शिलगावत 'पक्षीनिरीक्षण' करायला निघुन गेला.
- (वात्रट) टिंग्या ;)

मानाचा मुजरा!

चतुरंग ·

शितल 24/04/2008 - 23:34
अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा!

वरदा 25/04/2008 - 01:03
झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच.....

विसोबा खेचर 25/04/2008 - 11:04
जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या.

सहज 25/04/2008 - 11:21
मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!!

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन )

शितल 24/04/2008 - 23:34
अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुर॑ग साहेब, छान कविता केली आहे, मराठमोळ्या 'सचिन' ला आमचा ही मानाचा मुजरा!

वरदा 25/04/2008 - 01:03
झकासच वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले खरंच.....

विसोबा खेचर 25/04/2008 - 11:04
जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा क्या बात है! सुंदर... तात्या.

सहज 25/04/2008 - 11:21
मुजरा आवडले. पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट वाटते. 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा!!!!

जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा एकदम मस्त कविता...........!!! -दिलीप बिरुटे (जुन्या सच्याचा फॅन )
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अठरावर्षांपूर्वी घडले एक पहा नवल चेंडु-फळीचा खेळ खेळण्या पडे एक पाऊल वामनमूर्ती बघता, त्याला भलेभले हासले तलवारीसम बॅट तळपता डोळेही दिपले एकामागुन एक मोडितो विक्रमही सगळे टीकाकरण्या जाती तेही ठरती की बावळे असा घडविती शिष्यच तेची गुरु 'रमाकांत' स्वर्गीय पित्याचा पुत्र असे हा खरा मातृभक्त 'अजित' राहुनी निभवी तोही धाकलीच पाती खेळामधला 'डॉन'ही त्याला देई यशोपावती जगात सगळ्या जरी वाजतो डंका खेळाचा पाऊल त्याचे असे भूवरी नम्र भाव त्याचा अजून खिळती त्यावर सार्‍या अभिमानी नजरा मराठमोळ्या 'सचिन' तुला रे मानाचा मुजरा! चतुरंग

शाळेत लॅगीक शिक्शण असावे का ...?

पान्डू हवालदार ·

लॅगीक आणि लेगीक हे दोन्ही शब्द चुकिचे आहेत. शुद्ध शब्द 'लैंगिक' असा आहे. माझ्या मते शाळेत लेगीक (लैंगिक) शिक्शण असावे असे आपल्याला का वाटते, ह्यावर काही विवेचनात्मक लिखाण आपल्याकडून अपेक्षित आहे.

व्यंकट 24/04/2008 - 22:23
पूर्ण विचार केलेला नाही, तरी प्राथमीक स्वगत व्यक्त करतो. लैंगीक शिक्षण हा विज्ञानाधिष्ठीत विषय आहे. साधारणपणे विज्ञानाच्या विषयांस प्रयोगशाळा आणि प्रयोग आवश्यक असतात. प्राणी-पक्षी-वृक्षवल्लींशी निगडीत प्रजोत्पत्ती आत्ताही शिकवली जाते, झाडांसंदर्भातील पुंकेसर, स्त्रीकेसर, फुलपाखरांकरवी त्यांचे मिलन वैगेरे, प्राण्यांच्या ( बेडूक, फुलपाखरे वैगेरे) लैंगीक सवयी, नरांमधली स्पर्धा, बळ, विणीचा काळ, संभोग-पद्धती सुद्धा शिकवल्या जातात. ह्या कामक्रिडा आणि प्रजनना पर्यंतची पूर्ण सायकल परिसरांत पहावयास मिळते. आता प्रस्तुत लैंगीक शिक्षण ज्यावर गदारोळ सुरु आहे तो मानवी लैंगीक शिक्षणासंदर्भात आहे का की सामान्य लैंगीक शिक्षण आहे ते बघावं लागेल. त्यात काय काय शिकवणं अपेक्षित आहे? प्रयोगांचे काय? की विद्यार्थ्यांनी आजुबाजूच्या शयनगृहांत डोकावून पहावं? असे विविध प्रश्न डोक्यात येत आहेत, तर, अजून काहिही मत नाही. व्यंकट

लैगिक शिक्षण शाळेत असावे असे वाटते. या शिक्षणाला विरोध करतांना विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असले शिक्षण बसत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असे नेते निपजल्यावर यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा करणे म्हणजे वेडेपणाच आहे. शाळेत विद्यार्थी,विद्यार्थींना या शिक्षणाची गरज का आहे, तर विशिष्ट वयात स्वतः त होणारे शारिरीक बदल हे नैसर्गीक बदल आहेत. ज्याची चर्चा विद्यार्थी,विद्यार्थीनी आपल्या पालकांसोबत करु शकत नाही त्यामुळे कदाचित त्यांच्या स्वभावात एकलकोंड्यापणामुळे निराशेची भावना निर्माण होते. त्यामुळे अशा शिक्षणाची गरज आहे. मुळात अशा शिक्षणाचे प्रशिक्षण देणा-या शिक्षकांनी सरळ वर्गावर जाऊन शिकवायचे नसुन अगोदर त्यांच्या पालकांची एक बैठ्क घेऊन सदरील अभ्यासक्रम आणि त्याची आवश्यकता का आहे समजावून सांगून त्यानंतर वर्गात तो विषय शिकवायचा आहे. अशा शिक्षणाला विधार्थी,विद्यार्थींनीं सुरुवातीला संकोचतात असा अनुभव एका शिक्षक मित्राने सांगितला आहे. पण नंतर मात्र त्या विषयाच्या बाबतीत विधार्थी धीट बनतात आणि मनमोकळपणाने चर्चाही करतात वेगवेगळ्या प्रश्नांचे समाधान करुन घेतात तेव्हा असे शिक्षण दिले पाहिजे असे आम्हाला वाटते. शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांचे शोषण करतात असा एक आक्षेप आहे तसे अपवादात प्रकरणे असतीलही म्हणुन त्या विषयीचे शिक्षणच देऊ नये हा त्याच्यावर उपाय होऊ शकत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ 25/04/2008 - 13:46
नमस्कार, १. नववीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात अकृत्यांसहित स्त्री-पुरुष पुनरुत्पादन संस्थेची माहिती होती असे अंधूकसे स्मरते. याचा अर्थ पाठ्यपुस्तकाला माध्यमिक शाळेत या शिक्षणाचा विटाळ नाही. तो धडा स्वाभ्यासासाठी आहे आणि त्यावर प्रश्न विचारले जाणार नाहित असे सांगुन त्याची वासलात लावली गेलेली सुद्धा आठवते आहे. पण आमच्या शिकवणीचे गुरुजी कॉलेजवयीन असल्याने त्यांनी पुढाकाराने आम्हाला ते सर्व सभ्यपणे सांगितले होते. ते आमच्या शाळेतल्या शिक्षकांपेक्षा जास्त जमजूतदार होते असा त्याचा अर्थ :) २. मराठीच्या पुस्तकात एका कवितेत 'माती न्हाती धुती होते' असा उल्लेख आल्यावर शिकवणार्‍या शिक्षिकेने 'वयात येणे' या प्रकाराची स्वतःच तोंडओळख करुन दिली होती (साल साधारण १९९३). ३. मी माध्यमिक शाळेत असताना एका समुपदेशकांच्या संचाला पाचारण करुन आमच्या शाळेत ९वी-१०वी च्या मुलांना लैंगिक शिक्षण दिले होते हे सुद्धा स्मरते. याचा अर्थ असा की हा विषय पाठ्यपुस्तकात आधीपासूनच आहे. तो शिक्षकांनी शिकवावा अशी अपेक्षा सुद्धा आहे. काही शिक्षक संकोच न बाळगता ते काम करत असतात. असे सर्व असताना म्हणजेच पठडीमध्ये हे शिक्षण देणे घातलेले असताना केवळ शिक्षकांना उद्युक्त करणे इतकेच काम आहे असे मला वाटते. त्या साठी हा विषय नव्याने पुढे मांडायचा घाट घालत आहोत हा सरकारी अभिनिवेष का हे समजले नाही. --लिखाळ.

In reply to by लिखाळ

पाठ्यपुस्तकात आधीपासूनच आहे. तो शिक्षकांनी शिकवावा अशी अपेक्षा सुद्धा आहे. काही शिक्षक संकोच न बाळगता ते काम करत असतात. असे सर्व असताना म्हणजेच पठडीमध्ये हे शिक्षण देणे घातलेले असताना केवळ शिक्षकांना उद्युक्त करणे इतकेच काम आहे असे मला वाटते. त्या साठी हा विषय नव्याने पुढे मांडायचा घाट घालत आहोत हा सरकारी अभिनिवेष का हे समजले नाही. +१ ... ज्या शिक्षकाला हे शिकवायचे आहे ते तो शिकवतोच... जास्तीतजास्त शिक्षकांना उद्युक्त करणे महत्त्वाचे... जास्त बडबड करून नुसता विधानसभेत दंगा होतो, आणि सगळाच प्रोजेक्ट निकालात निघतो......

धोंडोपंत 25/04/2008 - 20:11
शाळेच्या पातळीवर लैंगिक शिक्षण देण्याची काहीही गरज नाही. माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो. लैंगिक शिक्षण दिले म्हणजे मुले सुधारतील असे नाही. लैंगिक शिक्षणापेक्षा संस्कारांची गरज आहे. सुसंस्कृतपणा शिकवला गेला पाहिजे. शिवाजी महाराजांचा आदर्श मुलांना दिला गेला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जी वागणूक महाराजांनी दिली, ती महाराजांची भूमिका शिकवली गेली पाहिजे. तर सुसंस्कृत पिढी तयार होईल. संस्कारांशिवाय दिलेले लैंगिक शिक्षण मुलांना वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त करणार नाही तर ती कृत्ये करतांना निरोध वापरला पाहिजे एवढेच शिकवेल. आपला, (आदर्शवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 26/04/2008 - 08:11
माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो. हा हा हा! अगदी सहमत आहे. माझ्या मते लैंगिक शिक्षण वगैरे सगळी नसती फ्यॅडं आहेत. जळ्ळं, आमच्यावेळेला कोण आलं होतं लैंगिक शिक्षण द्यायला? तरीही आम्ही शिकलोच ना? छ्या! लैंगिक शिक्षण वगैरे सगळ्या गफ्फा आहेत गफ्फा! लैंगिक शिक्षण दिले म्हणजे मुले सुधारतील असे नाही. लैंगिक शिक्षणापेक्षा संस्कारांची गरज आहे. सुसंस्कृतपणा शिकवला गेला पाहिजे. सहमत आहे.. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जी वागणूक महाराजांनी दिली, ती महाराजांची भूमिका शिकवली गेली पाहिजे. तर सुसंस्कृत पिढी तयार होईल. लाख रुपये की बात! संस्कारांशिवाय दिलेले लैंगिक शिक्षण मुलांना वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त करणार नाही तर ती कृत्ये करतांना निरोध वापरला पाहिजे एवढेच शिकवेल. हा हा हा! हेही खरंच रे धोंड्या! :) तात्या.

विकि 26/04/2008 - 00:18
सरकारचा निर्णय योग्यच. आजच्या संगणक युगात मुलांना असले शिक्षण देणे गरजेचे आहे. कारण हल्ली अश्लील सिनेमे बघणे सोपी गोष्ट झाली आहे. आणि पौंगडावस्थेतल्या मुलांना याबाबत जास्त आकर्षण असते. या फिल्म पहाण्याने मनावर परीणाम होऊ शकतो. चांगले समुपदेशक नेमल्यास मुलांना या विषयाबाबत चांगले ज्ञान मिळेल. आपला कॉ.विकि

चतुरंग 26/04/2008 - 02:03
'अनैतिक गोष्टी' किंवा 'अश्लील गोष्टी' चा संदर्भ यायलाच हवा अशी काहीशी आपली दृढ समजूत झालेली दिसते. "पूर्वीच्या लोकांना कुठे होते ह्याचे शिक्षण? मग त्यांना काय मुले झाली नाहीत?" किंवा "वेळ आली की निसर्ग देतोच ह्याचे शिक्षण त्यासाठी आपणच फार काही करावे लागत नाही." अशा प्रकारच्या समजुती हे सोयिस्करपणे डोळ्यावर कातडे पांघरुन घेण्याचा प्रकार आहे असे मला वाटते. पूर्वीच्या काळीही (म्हणजे दोन - तीन पिढ्या आधी म्हणूयात) हे शिक्षण महत्त्वाचे झाले होतेच - त्यातूनच संततीनियमनाचे महत्त्व समाजमनावर बिंबवण्याचे प्रयत्न कै.र.धों.कर्व्यांसार्खांनी केले पण तो वेगळा विषय आहे. सद्यस्थितीत एकूणच जीवनाच्या रेट्यामधे लहान मुलांचे (मुले-मुली दोन्ही) बाल्य हे वेगवेगळ्या कारणांनी कोमेजून जात असते. त्यांचे बाल्य संपून, कुमार वय आणि तारुण्य ह्या अवस्था फारच झपाट्याने बदलताना दिसतात. (अमेरिकेत वयाच्या ८-९ वर्षात मुली वयात येऊ लागल्याची उदाहरणे आहेत आणि ही एक सामाजिक समस्या बनून राहिली आहे. स्त्री-पुरुष संबंधातील नको तेवढा उघड्यावरचा मोकळेपणा त्याचा मनावर आणि पर्यायाने हार्मोन्सवर होणारा परिणाम, अतिरिक्त मेदयुक्त खाणे आणि खेळाचा अभाव अशीही कारणे ह्यामागे आहेत). भारतातही ह्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती नसावी. ह्याला कारणे अनेक आहेत आणि बरीचशी आपल्या आवाक्याबाहेरची आहेत, अशा अर्थाने की त्यांच्या पासून आपण मुलांना झाकून ठेवू शकत नाही. टी.व्ही. वरील जाहिराती, सिनेमे आणि त्यातले आयटम डान्स, इतरत्रही उजळ माथ्याने दिसणारी बटबटीत लैंगिकता अशांपासून मुलांना नको त्या वयात नको त्या गोष्टी दिसतात त्याचे अर्थ, संदर्भ काहीच कळण्याचे त्यांचे वय नसते. अशावेळी अयोग्य मार्गावर जाण्यापासून त्यांचे त्यांनीच स्वत:ला योग्य प्रकारे कसे दूर ठेवावे ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; वयात येतानाचे शरीरातले बदल त्यातून येणारी अस्वस्थता, भीती, घृणा ह्या भावनांना योग्य प्रकाराने कसे हाताळावे ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; मुले आणि मुली ह्यांनी त्यांच्या विशिष्ठ शरीरावयवांची स्वच्छता कशी ठेवावी, त्याचे महत्त्व काय ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; शरीरसंबंध कोणत्या वयात, का, कसा ठेवावा ह्याची योग्य, शास्त्रीय जाण देणे म्हणजे लैंगिक शिक्षण. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी शाळेत असताना साधारण सातवीत असतानाची गोष्ट. मधल्या सुटीत खेळताना एका मुलीच्या स्कर्टवर अचानक रक्ताचे डाग दिसू लागले. ती तर घाबरलीच, इतरही मुली घाबरल्या, बाईंनी तिच्या पालकांना बोलावून तिला घरी पाठवले. तिची पाळी अचानक सुरु झाल्याने हा चमत्कारिक प्रसंग उद्भवला होता. आम्ही मुलेही हा प्रसंग समजल्यावर भांबावून गेलो. त्या नंतर ती मुलगी ८ दिवस शाळेत आली नाही. अशा प्रसंगांचे मुलांच्या मनावर फार खोल ओरखडे उठतात. अनेक वर्ष अशा घटना न्यूनगंड करुन ठेवू शकतात. हेच जर त्यावेळी योग्य शिक्षणाव्दारे तिला तिच्या आईने किंवा डॉक्टरांनी आधीच कल्पना देऊन ठेवून सावध केले असते तर असा प्रसंग टळू शकला असता. तसेच असुरक्षित संभोग, वेश्यागमन अशांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. पिवळी पुस्तके वाचून, नील्-चित्रफिती पाहून असे 'ज्ञान' संपादन करण्यापेक्षा डॉक्टरांकडून/ योग्य मार्गदर्शकाकडून घेणे कधीही योग्यच. पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राने नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची ही संधी गमावली ह्याचे वाईट वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

'अनैतिक गोष्टी' किंवा 'अश्लील गोष्टी' चा संदर्भ यायलाच हवा अशी काहीशी आपली दृढ समजूत झालेली दिसते. "पूर्वीच्या लोकांना कुठे होते ह्याचे शिक्षण? मग त्यांना काय मुले झाली नाहीत?" किंवा "वेळ आली की निसर्ग देतोच ह्याचे शिक्षण त्यासाठी आपणच फार काही करावे लागत नाही." अशा प्रकारच्या समजुती हे सोयिस्करपणे डोळ्यावर कातडे पांघरुन घेण्याचा प्रकार आहे असे मला वाटते. उत्तम बोललात हो... पटले... परिस्थिती वेगाने बदलते आहे...आणि या शिक्षणाची गरज आहे असे मला वाटते...

मदनबाण 26/04/2008 - 02:11
तसेच असुरक्षित संभोग, वेश्यागमन अशांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. पिवळी पुस्तके वाचून, नील्-चित्रफिती पाहून असे 'ज्ञान' संपादन करण्यापेक्षा डॉक्टरांकडून/ योग्य मार्गदर्शकाकडून घेणे कधीही योग्यच. पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राने नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची ही संधी गमावली ह्याचे वाईट वाटते. हेच म्हणतो..... (योग्य माहिती हा सर्वांचा अधिकार आहे ) असे म्हणणारा..... मदनबाण

लैंगिक शिक्षणाची आवश्यकता काही अंशी पटते. पण ते किती प्रमाणात असावे, त्याचा आवाका काय असावा ह्यावर सरकार-दरबारातून योग्य ती माहिती प्रसारीत व्हावी. म्हणजे त्याने सुशिक्षित समाजाचे प्रबोधन होऊन लैंगिक शिक्षणाला समाजाचे समर्थन लाभेल. चुकिच्या पद्धतीने 'माहिती' पुरविली तर सुरक्षित संबंधांचा संदेश बाजूला राहून 'उत्सुकता' वाढण्याचा धोका संभवतो. लैंगिक शिक्षणासोबत असुरक्षित संबंधांमुळे पसरणारे विविध त्वचा रोग आणि HIV, AIDS बद्दलही विद्यार्थीदशेतच लोकजागृती व्हावी. आमच्या काळी हे काही नव्हतं (अरे वा! हे वाक्य फेकण्याच्या वयाला पोहोचलो तर...) सुरुवाती सुरुवातीस हिन्दी चित्रपटांतून हेलन आणि बिंदूला कमरेला आणि वक्षस्थळी दोन चिंध्या बांधून नाचताना पाहून तसेच इंग्रजी चित्रपटातील चुंबनदृष्ये पाहून घशाला कोरड पडायची. पण त्याने आमचे 'कॅरेक्टर' बिघडले नाही. तसेच वारंवार तशी दृष्ये पाहून मनही निर्ढावले. हे सांगण्याचा उद्देश हा की हल्ली टिव्ही वरील दृष्ये पाहून तरूणांचे मनही असेच निवले असेल. (एक अंदाज). लैंगिक शिक्षणाचा रोख स्त्री-पुरूष संबंध कसा ठेवतात ह्याची रंजक माहिती नसून तो कसा सुरक्षित असावा त्यातून निर्माण होणारी वैयक्तिक, भावनिक, सामाजिक बांधीलकी ह्यावर भर देणारा असावा असे वाटते

मन 26/04/2008 - 16:32
सगळे प्रतिसाद वाचले. पण सगळे "मोठ्या" माणसांनी दिलेलेच आहेत. ज्या मुलांना हे शिक्षण द्यायचं आहे त्यांच्याशी बोला की राव. ते काय म्हणतात्,त्यांना काय हवयं हे समजुन घ्या की जरा. किंवा अगदि लहान मुलांशी नाही आलं बोलता तर निदान नुकतेच बालपण सोडलेल्या कुमारांशी बोलुन पहा. (म्हणजे शुद्ध भाषेत ज्याला "टीन एज" किंवा "पौगंड" म्हणतात तो वयोगट.) जर वर म्हटल्याप्रमाणे >>माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो. हे खरे असेल तर ते आपसुकच सिद्ध होइल.(म्हणजे ह्या गोष्टी त्यांना व्यवस्थित कळतात हे दिसुन येइल.) मी पाहिलेल्या घटनांवरुन असं दिसतं की माणसाला हे जे ज्ञान होतं ते यायला जरा वेळ लागतो. म्हणजे त्याच्या मनाला,बुद्धिला या गोष्टी समजणारच असतात, त्या समज्तातही! पण शरीराने मात्र ते काम आधिच सुरु केलेले असते. म्हणजे शरीर(त्यानुसार होणारी "या"बाबतीतील तीव्र उत्सुकता) यौवनाकडे आणि बुद्धी मात्र शालेय अशीही स्थिती बर्‍याचदा होते. आणि हीच वेळ सर्वादिक चुका करण्याची /धोकदायक असते. हिच ती अवस्था आहे, जिथे लैंगिक शि़क्षणाचि आवश्यकता असते. हां मात्र एकदा ह्या वयातुन ती व्यक्ती पार झाल्यावर ते ज्ञान त्याला होतेच पण हळु हळु आणि संथ गतीने. (जसे आमच्या पुर्विच्या कैक पिढ्यांना झाले होते.) "म्हणुनच आपल्याकडे सोळावं वरिस धोक्याचं " म्हणत असावेत ते ह्यासाठीच. आणि शेवटी हेहि खरेच कि "निसर्ग जी उपजत बुद्धी देतो त्यातही भेद भाव असतोच. इतर प्राण्यांना ती ज्या प्रमाणत असते तेवढी मानवाला कधिच मिळत नाही.(काही अप्वाद सोडुन)" आपलेच साठ्यांचे कार्टे.

विकि 28/04/2008 - 17:09
इथे तर बहूतेक जण लैंगिक शिक्षणाच्या विरोधात दिसत आहेत. आपला कॉ.विकि

माझ्या मते शाळेत लेगीक (लैंगिक) शिक्शण असावे असे आपल्याला का वाटते, ह्यावर काही विवेचनात्मक लिखाण आपल्याकडून अपेक्षित आहे. श्री. पान्डु हवालदार, आपण उपस्थित केलेल्या मुद्यावर जवळ जवळ डझनभर सदस्यांनी प्रतिसाद दिला आहे. पण आपल्या कडून माझ्या वरील प्रतिसादाला अनुसरुन काहीही लिखाण आलेले नाही. त्यामुळे ह्या मुद्याबद्दल आपण स्वतःच विशेष गंभीर दिसत नाहीत. एक मुद्दा मांडून त्यावर आपले सविस्तर मत नोंदविणे तसेच चर्चेत मधे-मधे सहभाग घेणे, कुठली मते पटली, कुठली पटली नाहीत आदी गोष्टींवर विस्तृत लिखाण करणे अपेक्षित आहे. तसे होणार नसेल तर पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागेल. हे सहज कळावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग 28/04/2008 - 19:54
पान्डू हवालदार साहेब, मूळ धागा सुरु करणार्‍याने त्याचा यथायोग्य वापर केला नाही तर सगळे लिखाण संदर्भहीन होते. ह्यापुढे असे होणार नाही ह्याची एका जबाबदार मि.पा.कराच्या नात्याने काळजी घ्यावी. चतुरंग

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर राव सध्या मराठी टंकलेखन शिकतो आहे. बाकी, "पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागे" जशी आपली मर्जी ..

In reply to by पान्डू हवालदार

प्रभाकर राव सध्या मराठी टंकलेखन शिकतो आहे. मुळमुद्दा आणि वरील प्रतिसाद शुद्ध लिहीण्याएवढे टंकलेखन आपल्याला नक्कीच येत आहे. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेवर (पहिल्या) 'मी मराठी टंकलेखन शिकतो आहे. विस्तृत लेखन लवकरच करेन' असा प्रतिसाद दिला असता तरी वाट पाहिली असती. बाकी, "पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागेल" जशी आपली मर्जी .. ते तर माझ्याच काय, कुणाही बाबतीत सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शब्दार्थापेक्षा भावार्थ लक्षात घेतला असतात तर एवढा राग आला नसता. मुळ प्रस्ताव मांडल्यावर किंवा एखादा चर्चेचा मुद्दा मांडल्यावर त्या सदस्याचा त्या चर्चेत 'काहीच' सहभाग नसेल तर ते अपमानकारक वाटते. संस्थळावर आपण एकमेकांना पाहू शकत नाही. त्यामुळे इतर सदस्यांनी केलेल्या प्रतिवादावरील आपली प्रतिक्रिया आम्हाला कशी दिसणार? समोरा समोर बोलताना जरी तुम्ही काही बोलला नाहीत तरी नुसती मान हलवून तुमची सहमती-असहमती समोरच्या पर्यंत पोहोचत असते. त्या योगे तुमचा चर्चेतील वैचारिक सहभाग अधोरिखित होत असतो. पण, संस्थळावर तसे नसते. तुम्हाला 'काहीतरी' लेखी प्रतिसाद द्यावा लागतो. नाहीतर वरील समोरासमोर बोलण्याच्या उदाहरणात तुम्ही चर्चेचा मुद्दा मांडल्यावर इतरांच्या मतांवर लक्ष न देता भलतीकडेच बघत बसलात किंवा चहा प्यायला निघून गेलात तर तुमच्या मुद्यावर प्रतिवाद करणार्‍या इतरांचा अपमान केल्या सारखेच होत नाही का? ह्यावर विचार करावा, ही विनंती.

लॅगीक आणि लेगीक हे दोन्ही शब्द चुकिचे आहेत. शुद्ध शब्द 'लैंगिक' असा आहे. माझ्या मते शाळेत लेगीक (लैंगिक) शिक्शण असावे असे आपल्याला का वाटते, ह्यावर काही विवेचनात्मक लिखाण आपल्याकडून अपेक्षित आहे.

व्यंकट 24/04/2008 - 22:23
पूर्ण विचार केलेला नाही, तरी प्राथमीक स्वगत व्यक्त करतो. लैंगीक शिक्षण हा विज्ञानाधिष्ठीत विषय आहे. साधारणपणे विज्ञानाच्या विषयांस प्रयोगशाळा आणि प्रयोग आवश्यक असतात. प्राणी-पक्षी-वृक्षवल्लींशी निगडीत प्रजोत्पत्ती आत्ताही शिकवली जाते, झाडांसंदर्भातील पुंकेसर, स्त्रीकेसर, फुलपाखरांकरवी त्यांचे मिलन वैगेरे, प्राण्यांच्या ( बेडूक, फुलपाखरे वैगेरे) लैंगीक सवयी, नरांमधली स्पर्धा, बळ, विणीचा काळ, संभोग-पद्धती सुद्धा शिकवल्या जातात. ह्या कामक्रिडा आणि प्रजनना पर्यंतची पूर्ण सायकल परिसरांत पहावयास मिळते. आता प्रस्तुत लैंगीक शिक्षण ज्यावर गदारोळ सुरु आहे तो मानवी लैंगीक शिक्षणासंदर्भात आहे का की सामान्य लैंगीक शिक्षण आहे ते बघावं लागेल. त्यात काय काय शिकवणं अपेक्षित आहे? प्रयोगांचे काय? की विद्यार्थ्यांनी आजुबाजूच्या शयनगृहांत डोकावून पहावं? असे विविध प्रश्न डोक्यात येत आहेत, तर, अजून काहिही मत नाही. व्यंकट

लैगिक शिक्षण शाळेत असावे असे वाटते. या शिक्षणाला विरोध करतांना विरोधी पक्षाचे नेते म्हणाले की महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असले शिक्षण बसत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असे नेते निपजल्यावर यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा करणे म्हणजे वेडेपणाच आहे. शाळेत विद्यार्थी,विद्यार्थींना या शिक्षणाची गरज का आहे, तर विशिष्ट वयात स्वतः त होणारे शारिरीक बदल हे नैसर्गीक बदल आहेत. ज्याची चर्चा विद्यार्थी,विद्यार्थीनी आपल्या पालकांसोबत करु शकत नाही त्यामुळे कदाचित त्यांच्या स्वभावात एकलकोंड्यापणामुळे निराशेची भावना निर्माण होते. त्यामुळे अशा शिक्षणाची गरज आहे. मुळात अशा शिक्षणाचे प्रशिक्षण देणा-या शिक्षकांनी सरळ वर्गावर जाऊन शिकवायचे नसुन अगोदर त्यांच्या पालकांची एक बैठ्क घेऊन सदरील अभ्यासक्रम आणि त्याची आवश्यकता का आहे समजावून सांगून त्यानंतर वर्गात तो विषय शिकवायचा आहे. अशा शिक्षणाला विधार्थी,विद्यार्थींनीं सुरुवातीला संकोचतात असा अनुभव एका शिक्षक मित्राने सांगितला आहे. पण नंतर मात्र त्या विषयाच्या बाबतीत विधार्थी धीट बनतात आणि मनमोकळपणाने चर्चाही करतात वेगवेगळ्या प्रश्नांचे समाधान करुन घेतात तेव्हा असे शिक्षण दिले पाहिजे असे आम्हाला वाटते. शाळेत शिक्षकच विद्यार्थ्यांचे शोषण करतात असा एक आक्षेप आहे तसे अपवादात प्रकरणे असतीलही म्हणुन त्या विषयीचे शिक्षणच देऊ नये हा त्याच्यावर उपाय होऊ शकत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ 25/04/2008 - 13:46
नमस्कार, १. नववीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात अकृत्यांसहित स्त्री-पुरुष पुनरुत्पादन संस्थेची माहिती होती असे अंधूकसे स्मरते. याचा अर्थ पाठ्यपुस्तकाला माध्यमिक शाळेत या शिक्षणाचा विटाळ नाही. तो धडा स्वाभ्यासासाठी आहे आणि त्यावर प्रश्न विचारले जाणार नाहित असे सांगुन त्याची वासलात लावली गेलेली सुद्धा आठवते आहे. पण आमच्या शिकवणीचे गुरुजी कॉलेजवयीन असल्याने त्यांनी पुढाकाराने आम्हाला ते सर्व सभ्यपणे सांगितले होते. ते आमच्या शाळेतल्या शिक्षकांपेक्षा जास्त जमजूतदार होते असा त्याचा अर्थ :) २. मराठीच्या पुस्तकात एका कवितेत 'माती न्हाती धुती होते' असा उल्लेख आल्यावर शिकवणार्‍या शिक्षिकेने 'वयात येणे' या प्रकाराची स्वतःच तोंडओळख करुन दिली होती (साल साधारण १९९३). ३. मी माध्यमिक शाळेत असताना एका समुपदेशकांच्या संचाला पाचारण करुन आमच्या शाळेत ९वी-१०वी च्या मुलांना लैंगिक शिक्षण दिले होते हे सुद्धा स्मरते. याचा अर्थ असा की हा विषय पाठ्यपुस्तकात आधीपासूनच आहे. तो शिक्षकांनी शिकवावा अशी अपेक्षा सुद्धा आहे. काही शिक्षक संकोच न बाळगता ते काम करत असतात. असे सर्व असताना म्हणजेच पठडीमध्ये हे शिक्षण देणे घातलेले असताना केवळ शिक्षकांना उद्युक्त करणे इतकेच काम आहे असे मला वाटते. त्या साठी हा विषय नव्याने पुढे मांडायचा घाट घालत आहोत हा सरकारी अभिनिवेष का हे समजले नाही. --लिखाळ.

In reply to by लिखाळ

पाठ्यपुस्तकात आधीपासूनच आहे. तो शिक्षकांनी शिकवावा अशी अपेक्षा सुद्धा आहे. काही शिक्षक संकोच न बाळगता ते काम करत असतात. असे सर्व असताना म्हणजेच पठडीमध्ये हे शिक्षण देणे घातलेले असताना केवळ शिक्षकांना उद्युक्त करणे इतकेच काम आहे असे मला वाटते. त्या साठी हा विषय नव्याने पुढे मांडायचा घाट घालत आहोत हा सरकारी अभिनिवेष का हे समजले नाही. +१ ... ज्या शिक्षकाला हे शिकवायचे आहे ते तो शिकवतोच... जास्तीतजास्त शिक्षकांना उद्युक्त करणे महत्त्वाचे... जास्त बडबड करून नुसता विधानसभेत दंगा होतो, आणि सगळाच प्रोजेक्ट निकालात निघतो......

धोंडोपंत 25/04/2008 - 20:11
शाळेच्या पातळीवर लैंगिक शिक्षण देण्याची काहीही गरज नाही. माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो. लैंगिक शिक्षण दिले म्हणजे मुले सुधारतील असे नाही. लैंगिक शिक्षणापेक्षा संस्कारांची गरज आहे. सुसंस्कृतपणा शिकवला गेला पाहिजे. शिवाजी महाराजांचा आदर्श मुलांना दिला गेला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जी वागणूक महाराजांनी दिली, ती महाराजांची भूमिका शिकवली गेली पाहिजे. तर सुसंस्कृत पिढी तयार होईल. संस्कारांशिवाय दिलेले लैंगिक शिक्षण मुलांना वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त करणार नाही तर ती कृत्ये करतांना निरोध वापरला पाहिजे एवढेच शिकवेल. आपला, (आदर्शवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 26/04/2008 - 08:11
माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो. हा हा हा! अगदी सहमत आहे. माझ्या मते लैंगिक शिक्षण वगैरे सगळी नसती फ्यॅडं आहेत. जळ्ळं, आमच्यावेळेला कोण आलं होतं लैंगिक शिक्षण द्यायला? तरीही आम्ही शिकलोच ना? छ्या! लैंगिक शिक्षण वगैरे सगळ्या गफ्फा आहेत गफ्फा! लैंगिक शिक्षण दिले म्हणजे मुले सुधारतील असे नाही. लैंगिक शिक्षणापेक्षा संस्कारांची गरज आहे. सुसंस्कृतपणा शिकवला गेला पाहिजे. सहमत आहे.. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जी वागणूक महाराजांनी दिली, ती महाराजांची भूमिका शिकवली गेली पाहिजे. तर सुसंस्कृत पिढी तयार होईल. लाख रुपये की बात! संस्कारांशिवाय दिलेले लैंगिक शिक्षण मुलांना वाईट कृत्ये करण्यापासून परावृत्त करणार नाही तर ती कृत्ये करतांना निरोध वापरला पाहिजे एवढेच शिकवेल. हा हा हा! हेही खरंच रे धोंड्या! :) तात्या.

विकि 26/04/2008 - 00:18
सरकारचा निर्णय योग्यच. आजच्या संगणक युगात मुलांना असले शिक्षण देणे गरजेचे आहे. कारण हल्ली अश्लील सिनेमे बघणे सोपी गोष्ट झाली आहे. आणि पौंगडावस्थेतल्या मुलांना याबाबत जास्त आकर्षण असते. या फिल्म पहाण्याने मनावर परीणाम होऊ शकतो. चांगले समुपदेशक नेमल्यास मुलांना या विषयाबाबत चांगले ज्ञान मिळेल. आपला कॉ.विकि

चतुरंग 26/04/2008 - 02:03
'अनैतिक गोष्टी' किंवा 'अश्लील गोष्टी' चा संदर्भ यायलाच हवा अशी काहीशी आपली दृढ समजूत झालेली दिसते. "पूर्वीच्या लोकांना कुठे होते ह्याचे शिक्षण? मग त्यांना काय मुले झाली नाहीत?" किंवा "वेळ आली की निसर्ग देतोच ह्याचे शिक्षण त्यासाठी आपणच फार काही करावे लागत नाही." अशा प्रकारच्या समजुती हे सोयिस्करपणे डोळ्यावर कातडे पांघरुन घेण्याचा प्रकार आहे असे मला वाटते. पूर्वीच्या काळीही (म्हणजे दोन - तीन पिढ्या आधी म्हणूयात) हे शिक्षण महत्त्वाचे झाले होतेच - त्यातूनच संततीनियमनाचे महत्त्व समाजमनावर बिंबवण्याचे प्रयत्न कै.र.धों.कर्व्यांसार्खांनी केले पण तो वेगळा विषय आहे. सद्यस्थितीत एकूणच जीवनाच्या रेट्यामधे लहान मुलांचे (मुले-मुली दोन्ही) बाल्य हे वेगवेगळ्या कारणांनी कोमेजून जात असते. त्यांचे बाल्य संपून, कुमार वय आणि तारुण्य ह्या अवस्था फारच झपाट्याने बदलताना दिसतात. (अमेरिकेत वयाच्या ८-९ वर्षात मुली वयात येऊ लागल्याची उदाहरणे आहेत आणि ही एक सामाजिक समस्या बनून राहिली आहे. स्त्री-पुरुष संबंधातील नको तेवढा उघड्यावरचा मोकळेपणा त्याचा मनावर आणि पर्यायाने हार्मोन्सवर होणारा परिणाम, अतिरिक्त मेदयुक्त खाणे आणि खेळाचा अभाव अशीही कारणे ह्यामागे आहेत). भारतातही ह्यापेक्षा फार वेगळी परिस्थिती नसावी. ह्याला कारणे अनेक आहेत आणि बरीचशी आपल्या आवाक्याबाहेरची आहेत, अशा अर्थाने की त्यांच्या पासून आपण मुलांना झाकून ठेवू शकत नाही. टी.व्ही. वरील जाहिराती, सिनेमे आणि त्यातले आयटम डान्स, इतरत्रही उजळ माथ्याने दिसणारी बटबटीत लैंगिकता अशांपासून मुलांना नको त्या वयात नको त्या गोष्टी दिसतात त्याचे अर्थ, संदर्भ काहीच कळण्याचे त्यांचे वय नसते. अशावेळी अयोग्य मार्गावर जाण्यापासून त्यांचे त्यांनीच स्वत:ला योग्य प्रकारे कसे दूर ठेवावे ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; वयात येतानाचे शरीरातले बदल त्यातून येणारी अस्वस्थता, भीती, घृणा ह्या भावनांना योग्य प्रकाराने कसे हाताळावे ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; मुले आणि मुली ह्यांनी त्यांच्या विशिष्ठ शरीरावयवांची स्वच्छता कशी ठेवावी, त्याचे महत्त्व काय ह्याचे शिक्षण म्हणजे लैंगिक शिक्षण; शरीरसंबंध कोणत्या वयात, का, कसा ठेवावा ह्याची योग्य, शास्त्रीय जाण देणे म्हणजे लैंगिक शिक्षण. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी शाळेत असताना साधारण सातवीत असतानाची गोष्ट. मधल्या सुटीत खेळताना एका मुलीच्या स्कर्टवर अचानक रक्ताचे डाग दिसू लागले. ती तर घाबरलीच, इतरही मुली घाबरल्या, बाईंनी तिच्या पालकांना बोलावून तिला घरी पाठवले. तिची पाळी अचानक सुरु झाल्याने हा चमत्कारिक प्रसंग उद्भवला होता. आम्ही मुलेही हा प्रसंग समजल्यावर भांबावून गेलो. त्या नंतर ती मुलगी ८ दिवस शाळेत आली नाही. अशा प्रसंगांचे मुलांच्या मनावर फार खोल ओरखडे उठतात. अनेक वर्ष अशा घटना न्यूनगंड करुन ठेवू शकतात. हेच जर त्यावेळी योग्य शिक्षणाव्दारे तिला तिच्या आईने किंवा डॉक्टरांनी आधीच कल्पना देऊन ठेवून सावध केले असते तर असा प्रसंग टळू शकला असता. तसेच असुरक्षित संभोग, वेश्यागमन अशांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. पिवळी पुस्तके वाचून, नील्-चित्रफिती पाहून असे 'ज्ञान' संपादन करण्यापेक्षा डॉक्टरांकडून/ योग्य मार्गदर्शकाकडून घेणे कधीही योग्यच. पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राने नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची ही संधी गमावली ह्याचे वाईट वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

'अनैतिक गोष्टी' किंवा 'अश्लील गोष्टी' चा संदर्भ यायलाच हवा अशी काहीशी आपली दृढ समजूत झालेली दिसते. "पूर्वीच्या लोकांना कुठे होते ह्याचे शिक्षण? मग त्यांना काय मुले झाली नाहीत?" किंवा "वेळ आली की निसर्ग देतोच ह्याचे शिक्षण त्यासाठी आपणच फार काही करावे लागत नाही." अशा प्रकारच्या समजुती हे सोयिस्करपणे डोळ्यावर कातडे पांघरुन घेण्याचा प्रकार आहे असे मला वाटते. उत्तम बोललात हो... पटले... परिस्थिती वेगाने बदलते आहे...आणि या शिक्षणाची गरज आहे असे मला वाटते...

मदनबाण 26/04/2008 - 02:11
तसेच असुरक्षित संभोग, वेश्यागमन अशांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे. पिवळी पुस्तके वाचून, नील्-चित्रफिती पाहून असे 'ज्ञान' संपादन करण्यापेक्षा डॉक्टरांकडून/ योग्य मार्गदर्शकाकडून घेणे कधीही योग्यच. पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राने नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची ही संधी गमावली ह्याचे वाईट वाटते. हेच म्हणतो..... (योग्य माहिती हा सर्वांचा अधिकार आहे ) असे म्हणणारा..... मदनबाण

लैंगिक शिक्षणाची आवश्यकता काही अंशी पटते. पण ते किती प्रमाणात असावे, त्याचा आवाका काय असावा ह्यावर सरकार-दरबारातून योग्य ती माहिती प्रसारीत व्हावी. म्हणजे त्याने सुशिक्षित समाजाचे प्रबोधन होऊन लैंगिक शिक्षणाला समाजाचे समर्थन लाभेल. चुकिच्या पद्धतीने 'माहिती' पुरविली तर सुरक्षित संबंधांचा संदेश बाजूला राहून 'उत्सुकता' वाढण्याचा धोका संभवतो. लैंगिक शिक्षणासोबत असुरक्षित संबंधांमुळे पसरणारे विविध त्वचा रोग आणि HIV, AIDS बद्दलही विद्यार्थीदशेतच लोकजागृती व्हावी. आमच्या काळी हे काही नव्हतं (अरे वा! हे वाक्य फेकण्याच्या वयाला पोहोचलो तर...) सुरुवाती सुरुवातीस हिन्दी चित्रपटांतून हेलन आणि बिंदूला कमरेला आणि वक्षस्थळी दोन चिंध्या बांधून नाचताना पाहून तसेच इंग्रजी चित्रपटातील चुंबनदृष्ये पाहून घशाला कोरड पडायची. पण त्याने आमचे 'कॅरेक्टर' बिघडले नाही. तसेच वारंवार तशी दृष्ये पाहून मनही निर्ढावले. हे सांगण्याचा उद्देश हा की हल्ली टिव्ही वरील दृष्ये पाहून तरूणांचे मनही असेच निवले असेल. (एक अंदाज). लैंगिक शिक्षणाचा रोख स्त्री-पुरूष संबंध कसा ठेवतात ह्याची रंजक माहिती नसून तो कसा सुरक्षित असावा त्यातून निर्माण होणारी वैयक्तिक, भावनिक, सामाजिक बांधीलकी ह्यावर भर देणारा असावा असे वाटते

मन 26/04/2008 - 16:32
सगळे प्रतिसाद वाचले. पण सगळे "मोठ्या" माणसांनी दिलेलेच आहेत. ज्या मुलांना हे शिक्षण द्यायचं आहे त्यांच्याशी बोला की राव. ते काय म्हणतात्,त्यांना काय हवयं हे समजुन घ्या की जरा. किंवा अगदि लहान मुलांशी नाही आलं बोलता तर निदान नुकतेच बालपण सोडलेल्या कुमारांशी बोलुन पहा. (म्हणजे शुद्ध भाषेत ज्याला "टीन एज" किंवा "पौगंड" म्हणतात तो वयोगट.) जर वर म्हटल्याप्रमाणे >>माजावर आलेल्या कुठल्याही जनावराला योग्य वयात ते निसर्ग देतच असतो. हे खरे असेल तर ते आपसुकच सिद्ध होइल.(म्हणजे ह्या गोष्टी त्यांना व्यवस्थित कळतात हे दिसुन येइल.) मी पाहिलेल्या घटनांवरुन असं दिसतं की माणसाला हे जे ज्ञान होतं ते यायला जरा वेळ लागतो. म्हणजे त्याच्या मनाला,बुद्धिला या गोष्टी समजणारच असतात, त्या समज्तातही! पण शरीराने मात्र ते काम आधिच सुरु केलेले असते. म्हणजे शरीर(त्यानुसार होणारी "या"बाबतीतील तीव्र उत्सुकता) यौवनाकडे आणि बुद्धी मात्र शालेय अशीही स्थिती बर्‍याचदा होते. आणि हीच वेळ सर्वादिक चुका करण्याची /धोकदायक असते. हिच ती अवस्था आहे, जिथे लैंगिक शि़क्षणाचि आवश्यकता असते. हां मात्र एकदा ह्या वयातुन ती व्यक्ती पार झाल्यावर ते ज्ञान त्याला होतेच पण हळु हळु आणि संथ गतीने. (जसे आमच्या पुर्विच्या कैक पिढ्यांना झाले होते.) "म्हणुनच आपल्याकडे सोळावं वरिस धोक्याचं " म्हणत असावेत ते ह्यासाठीच. आणि शेवटी हेहि खरेच कि "निसर्ग जी उपजत बुद्धी देतो त्यातही भेद भाव असतोच. इतर प्राण्यांना ती ज्या प्रमाणत असते तेवढी मानवाला कधिच मिळत नाही.(काही अप्वाद सोडुन)" आपलेच साठ्यांचे कार्टे.

विकि 28/04/2008 - 17:09
इथे तर बहूतेक जण लैंगिक शिक्षणाच्या विरोधात दिसत आहेत. आपला कॉ.विकि

माझ्या मते शाळेत लेगीक (लैंगिक) शिक्शण असावे असे आपल्याला का वाटते, ह्यावर काही विवेचनात्मक लिखाण आपल्याकडून अपेक्षित आहे. श्री. पान्डु हवालदार, आपण उपस्थित केलेल्या मुद्यावर जवळ जवळ डझनभर सदस्यांनी प्रतिसाद दिला आहे. पण आपल्या कडून माझ्या वरील प्रतिसादाला अनुसरुन काहीही लिखाण आलेले नाही. त्यामुळे ह्या मुद्याबद्दल आपण स्वतःच विशेष गंभीर दिसत नाहीत. एक मुद्दा मांडून त्यावर आपले सविस्तर मत नोंदविणे तसेच चर्चेत मधे-मधे सहभाग घेणे, कुठली मते पटली, कुठली पटली नाहीत आदी गोष्टींवर विस्तृत लिखाण करणे अपेक्षित आहे. तसे होणार नसेल तर पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागेल. हे सहज कळावे.

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग 28/04/2008 - 19:54
पान्डू हवालदार साहेब, मूळ धागा सुरु करणार्‍याने त्याचा यथायोग्य वापर केला नाही तर सगळे लिखाण संदर्भहीन होते. ह्यापुढे असे होणार नाही ह्याची एका जबाबदार मि.पा.कराच्या नात्याने काळजी घ्यावी. चतुरंग

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर राव सध्या मराठी टंकलेखन शिकतो आहे. बाकी, "पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागे" जशी आपली मर्जी ..

In reply to by पान्डू हवालदार

प्रभाकर राव सध्या मराठी टंकलेखन शिकतो आहे. मुळमुद्दा आणि वरील प्रतिसाद शुद्ध लिहीण्याएवढे टंकलेखन आपल्याला नक्कीच येत आहे. त्यामुळे माझ्या प्रतिक्रियेवर (पहिल्या) 'मी मराठी टंकलेखन शिकतो आहे. विस्तृत लेखन लवकरच करेन' असा प्रतिसाद दिला असता तरी वाट पाहिली असती. बाकी, "पुढच्या वेळी आपल्या मुद्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालावा की नाही ह्यावर विचार करावा लागेल" जशी आपली मर्जी .. ते तर माझ्याच काय, कुणाही बाबतीत सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शब्दार्थापेक्षा भावार्थ लक्षात घेतला असतात तर एवढा राग आला नसता. मुळ प्रस्ताव मांडल्यावर किंवा एखादा चर्चेचा मुद्दा मांडल्यावर त्या सदस्याचा त्या चर्चेत 'काहीच' सहभाग नसेल तर ते अपमानकारक वाटते. संस्थळावर आपण एकमेकांना पाहू शकत नाही. त्यामुळे इतर सदस्यांनी केलेल्या प्रतिवादावरील आपली प्रतिक्रिया आम्हाला कशी दिसणार? समोरा समोर बोलताना जरी तुम्ही काही बोलला नाहीत तरी नुसती मान हलवून तुमची सहमती-असहमती समोरच्या पर्यंत पोहोचत असते. त्या योगे तुमचा चर्चेतील वैचारिक सहभाग अधोरिखित होत असतो. पण, संस्थळावर तसे नसते. तुम्हाला 'काहीतरी' लेखी प्रतिसाद द्यावा लागतो. नाहीतर वरील समोरासमोर बोलण्याच्या उदाहरणात तुम्ही चर्चेचा मुद्दा मांडल्यावर इतरांच्या मतांवर लक्ष न देता भलतीकडेच बघत बसलात किंवा चहा प्यायला निघून गेलात तर तुमच्या मुद्यावर प्रतिवाद करणार्‍या इतरांचा अपमान केल्या सारखेच होत नाही का? ह्यावर विचार करावा, ही विनंती.
लोकसत्ता मधील बातमी http://www.loksatta.com/daily/20080424/mp03.htm माझ्या मते शाळेत लेगीक शिक्शण असावे ... आपल्याला काय वाटत ...

केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...(एक नवविडंबन)

केशवसुमार ·

वरदा 24/04/2008 - 21:18
मग तो स्वतःच कविता करुन त्याचं विडंबन करायला लागला... ही ही ही:))))))

असे करत करत सर्व कविता फाडून संपल्या. एकही कविता फाडायला शिल्लक राहिली नाही... असं होणंच शक्य नाही. आंतरजालावर सध्या दीडएक लाख कविता लिहून तयार आहे.... आणि त्यातली बहुतेक विडंबनालाच योग्य आहे! :)))) मराठी कवी (आणि म्हणून त्यांची कविता!) कधीच संपणार नाही... कारण, पुलंनी म्हटल्याप्रमाणे, "वीण मोठी!!":))) -डांबिसकाका

चतुरंग 24/04/2008 - 23:34
एकदम चोक्कस विडंबन! पण केसु तुमचा कविता संपली हा आरोप कधीही खपवून घेतला जाणार नाही - पहा शीघ्र काव्य;) कविता संपली? करु नको तू चिंता 'केश्या' अक्षय रे कविता समर्थ सगळे कवी पहा हे पाडतीच त्या विता स्वस्थ रहा तू जालावरती काव्य किती साजरे वाजताच ती पुंगी असते नाहितरी गाजरे इतकी सारी कविता भरुनी वाही जालावरी तुलाच बघ तरि जमेल कारे विडंबण्या ती खरी;) हेच पहा तू काव्य कसे मी लगेच रे पाडले दु:ख नसे ह्या'चतुरंगा' तू विडंबनी फाडले! चतुरंग

इनोबा म्हणे 25/04/2008 - 01:51
केश्या.... अरे तू मनात आणलेस तर अगदी कशाचेही विडंबन करु शकतोस रे! आवडले हे. सां. न. ल. :) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

केशवसुमार 25/04/2008 - 01:56
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा:)))))))))))) धन्य आहेस रे इनोबा.. केशवसुमार (स्वगतः- अशाने तुमचा चौकाचौकात पाट्या लावायचा धंदा कसा चालायचा)

In reply to by केशवसुमार

इनोबा म्हणे 25/04/2008 - 02:04
(स्वगतः- अशाने तुमचा चौकाचौकात पाट्या लावायचा धंदा कसा चालायचा) अरे,पाट्या लावायचा धंदा बंद झाला तरी, 'पाट्या टाकण्या'चा उद्योग चालूच राहणार ना! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

केशवसुमार 25/04/2008 - 18:02
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:22
तेवढ्यात त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर' म्हणून तो जांभई देत ऑफिसचे काम करायला निघून गेला... हा हा हा! बाकी दुसरी 'ढ' मस्तच रे केश्या! :) तात्या.

वरदा 24/04/2008 - 21:18
मग तो स्वतःच कविता करुन त्याचं विडंबन करायला लागला... ही ही ही:))))))

असे करत करत सर्व कविता फाडून संपल्या. एकही कविता फाडायला शिल्लक राहिली नाही... असं होणंच शक्य नाही. आंतरजालावर सध्या दीडएक लाख कविता लिहून तयार आहे.... आणि त्यातली बहुतेक विडंबनालाच योग्य आहे! :)))) मराठी कवी (आणि म्हणून त्यांची कविता!) कधीच संपणार नाही... कारण, पुलंनी म्हटल्याप्रमाणे, "वीण मोठी!!":))) -डांबिसकाका

चतुरंग 24/04/2008 - 23:34
एकदम चोक्कस विडंबन! पण केसु तुमचा कविता संपली हा आरोप कधीही खपवून घेतला जाणार नाही - पहा शीघ्र काव्य;) कविता संपली? करु नको तू चिंता 'केश्या' अक्षय रे कविता समर्थ सगळे कवी पहा हे पाडतीच त्या विता स्वस्थ रहा तू जालावरती काव्य किती साजरे वाजताच ती पुंगी असते नाहितरी गाजरे इतकी सारी कविता भरुनी वाही जालावरी तुलाच बघ तरि जमेल कारे विडंबण्या ती खरी;) हेच पहा तू काव्य कसे मी लगेच रे पाडले दु:ख नसे ह्या'चतुरंगा' तू विडंबनी फाडले! चतुरंग

इनोबा म्हणे 25/04/2008 - 01:51
केश्या.... अरे तू मनात आणलेस तर अगदी कशाचेही विडंबन करु शकतोस रे! आवडले हे. सां. न. ल. :) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

केशवसुमार 25/04/2008 - 01:56
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा:)))))))))))) धन्य आहेस रे इनोबा.. केशवसुमार (स्वगतः- अशाने तुमचा चौकाचौकात पाट्या लावायचा धंदा कसा चालायचा)

In reply to by केशवसुमार

इनोबा म्हणे 25/04/2008 - 02:04
(स्वगतः- अशाने तुमचा चौकाचौकात पाट्या लावायचा धंदा कसा चालायचा) अरे,पाट्या लावायचा धंदा बंद झाला तरी, 'पाट्या टाकण्या'चा उद्योग चालूच राहणार ना! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

केशवसुमार 25/04/2008 - 18:02
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

विसोबा खेचर 30/04/2008 - 09:22
तेवढ्यात त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर' म्हणून तो जांभई देत ऑफिसचे काम करायला निघून गेला... हा हा हा! बाकी दुसरी 'ढ' मस्तच रे केश्या! :) तात्या.
लेखनविषय:
आमची प्रेरणा चैत्रेचैत यांची एक नवीकविता सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका... केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका... विश्वजालावर कधीतरी केश्याने एक विडंबन पाडले... नंतर दुसरे, नंतर तिसरे... असे करत करत सर्व कविता फाडून संपल्या. एकही कविता फाडायला शिल्लक राहिली नाही... मग त्याने विचार केला की ह्या पाडलेल्या विडंबनांचे परत विडंबन करूयात. तेवढ्यात त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर' म्हणून तो जांभई देत ऑफिसचे काम करायला निघून गेला...