Skip to main content

साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 18/05/2008 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
आई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट! घरावर मी आणि माझा धाकटा भाऊ दोघांचच राज्य होतं. भावाने चतुराईने टिव्हीच्या रिमोटवरचं वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. अगदी बाथरूमला जातानाही रिमोट बरोबर घेऊन जात होता म्हणा ना! त्यामुळे चालु कार्यक्रम आवडता असुनही, त्याने लावलेला कार्यक्रम कसा बघणार, असा प्रश्न इगोचा असल्याने मी टिव्ही बघु शकत नव्हतो. माझे मित्र (ज्यांबरोबर फिरताना रविवार कमी पडत असे) आता एकच मिळणार्‍या रविवारी झोपलो नाहि तर ऑफिसात लागलेली सवय मोडेल या कारणाने दुपारच्या झोपा काढत होते.

आलू पराठे

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 18/05/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
स्टफ्ड आलू पराठे आपण नेहमी करतो पण ते जरा वेळखाऊ आणि किचकट काम असते.सारण न भरताही आलूपराठे चांगले होतात.वेळ थोडा कमी लागतो आणि कमी किचकट काम ! साहित्य - ४/५ मध्यम आकाराचे बटाटे,एका पेराएवढं आलं,२/३ लसूण पाकळ्या,२/३ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार,तेल, मावेल तेवढी कणिक. कृती - बटाटे उकडून घ्या,साले काढून कुस्करा, आले लसूण मिरचीचे वाटण करुन त्यात घाला.मीठ व चमचाभर तेल घाला.मावेल तेवढी कणिक घाला.पाणी अजिबात घालू नका.जरा घट्टसर मळा, गोळा जास

अरे काय हे!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 18/05/2008 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
अरे काय, हे काय मांडलयंत काय तुम्ही लोकांनी? आम्ही हल्ली मिपावर हजर असतो तेंव्हा काहीतरी बेसुर्‍या चर्चा, प्रेमभंगाच्या कविता, निर्बोध रेसेपी (आम्हाला निर्बोध, कारण कुकिंगमधलं आम्हाला काही कळत नसल्यामुळे हो!) वगैरे टाकता आणि आम्ही जरा दोन-तीन दिवस दूर गेलो की अशी छान-छान चित्रं लोड करतां!! अरे ओंकार, चतुरंग, भाग्यश्री, सतलज! अरे काय सुरेख चित्रं काढली आहेत रे तुम्ही लोकांनी! कायहो केशवसुमार? देवाने इतकी चांगली कला तुमच्या बोटांत ठेवली आहे आणि विडंबनं कसली करता? आणि कुठे गेलं ते आमचं ईनोबा?

कातरवेळ...

लेखक नि३ यांनी रविवार, 18/05/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
उन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत भर उन्हात पाउस घेऊन आभाळ मनात दाटत तरी सुदधा पावल चालत राह्तात मन चालत नाही घामाशीवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो इतक्यात कुठुन एक ढग सुर्यासमोर येतो ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो .

संभाषणातील आनंद

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 17/05/2008 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा कुणीतरी आपल्याशी फार रंगात येऊन बोलत असतं. अशा वेळेस त्या व्यक्तिकडून काही चुकीचे संदर्भ दिले जातात. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही लगेच त्याला त्याची चूक दाखवता वा त्याच्या चुका न दाखवता, त्याच्या रंगाचा बेरंग न करीत संभाषण चालू ठेवता? उदाहरणार्थ, गेल्या वर्षी पावसाळ्यातली घटना. आमच्या स्नेह्यांच्या मोबाईलवर आम्ही फोन केला. ते मुंबईत असतील ही आमची समजूत. पण ते तेव्हा कोकणात होते. त्यांनी फोन घेताच ते उत्साहाने बोलायला लागले. "नमस्कार पंत... आत्ता गुहागरला आहे.....समुद्रकिनार्‍यावर भटकतोय. काय मौसम आहे हो! वा वा. हलकासा पाऊस पडतोय.... आभाळ मेघाच्छादित आहे.