मी पाहिलेले मयत
लेखनप्रकार
साधारण ७-८ वर्षापूर्वीची कथा. आषाढातला रविवार. पाउस धो धो कोसळत होता. दुपारची जेवणे होउन जरा पडापड होतेय तेवढ्यात फोन वाजला. गावाकडे चुलत आजी वारल्याची बातमी आली. सगळी आवराआवर करुन आम्ही घरातले सगळे २० मैलावर आसलेल्या गावी निघालो. गावाकडचा आमचा दुमजली वाडा एकदम टिपिकल आहे. दगडी पायर्या. दींडी दरवाजा , तटबंदी,पायर्यांना लागुन डाव्याबाजुला दगडी कट्टा. पायर्यांच्या उजव्या बाजुला मोकळे वावर. तिथे म्हशींचे गोठे. गोबरग्यासची टाकी. दरवाज्यातून आत गेले की मोठे अंगण. खालचा सोपा, वरचा सोपा, माजघर, स्वयंपाकघर. ७-७ फूटी मातीच्या भिंती. भिंतीतून वर जायला जिने. मागच्याबाजुला २ एकराचे परस. त्यात एक आड. मोठ चिंचेच झाड,बांबूचे बन आणि किरकोळ झाडे.
पण यावेळी संपूर्ण वाड्यावर सुतकी कळा होती. पाऊस थांबला होता पण आभाळ भरुन आल्याने वातावरण कुंद होते. त्यात जमलेल्या बायकांचे माजघरात आजीच्या आठवणी सांगत रडणे सुरु होते. बाहेर सोप्यावर आणि बाहेरच्या कट्ट्यावर पुरुषमंडळींची दबक्या आवाजात "याला बोलावले का? " "त्याला कळवले का?" "पुण्याची मंडळी कधीपर्यंत पोचतील?" अशी चर्चा सुरु होती. होताहोता संध्याकाळी ६ वाजता पुण्याची माणसे रात्री ९ वाजता पोचतील अशी बातमी आली. आणि चर्चा 'पुण्याच्या लोकांसाठी थांबायचे की उरकून टाकायचे' या दिशेला वळली. एकंदरीत बघीतल की खेड्यातल्या माणसाना बाकी कशाची नसली तरी कोणी मेल की त्याला जाळून टाकायची फार घाई असते. त्यामुळे थांबायचे कि उरकून टाकायचे यावर २ तट पडून त्याविषयी लगेच सांगोपांग चर्चा सुरू झाली. शेवटी 'थांबायचे' या निर्णयावर चर्चा संपली. लोक हळुहळु पुढच्या तयारीला लागले. परसातून बांबू तोडून आणले.(अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली )त्याची तिरडी बांधली.त्यावर कडबा पसरला. कुणाला तरी सांगून लाकडे पुढे पाठवली. अंघोळ, तोंडात सोन्याचा तुकडा वगैरे सोपस्कार सुरु झाले. तो पर्यन्त ९ वाजून गेले आणि पुण्याची माणसे पण पोचली. मग त्यांचे अंत्यदर्शन, रडारड, त्यांच्या रडण्यामूळे परत जुन्या रडणार्याना येणारे नविन उमाळे हे करता करता अंत्ययात्रा निघायला रात्रीचे १०:३० वाजुन गेले.
अंत्ययात्रा स्मशानात पोचली . स्मशान म्हन्जे एका वेळी २ लोकांची सोय होइल येवढा बांधलेला चौथरा आणि त्यावर पत्रा. चौथर्याच्या एका बाजुला ओढा. दुसर्याबाजुला लगेचच एकाचे शेत होते आणि त्यात दाट ऊस आला होता. तिथले विधी पार पडून अग्नी द्यायला ११ वाजुन गेले आणि वाकडातिकडा धो धो पाउस परत सुरु झाला. अधुनमधुन वार्यामुळे बाजुने पावसाचे पाणी आत चितेवर येत होते. तेवढ्यात फाटकन कवटी फुटल्याचा आवाज वातावरण चिरत गेला व लोक हळुहळु पांगू लागले. पावसामुळे चिता विझू नये म्हणुन त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी माझ्यासहित माझ्या ३-४ चुलतभावांवर टाकुन बाकीची मंडळी परत गेली. धग लागू नये म्हणुन आम्ही थोडे लांब , चितेपासुन २०-२५ फूटावर बसलो होतो.
रात्रीचे १२ वाजत आलेले. धोधो कोसळणारा पाऊस,सूं सूं आवाज करत सुटलेला वारा थंडी हाडापर्यंत पोहोचवत होता. डाव्याबाजुला भरुन वाहणारा ओढा, उजव्याबाजुला गर्द ऊस आणि त्याच्या पानांचा वार्याने होणारा सळसळ आवाज. समोर चिता पेटलेली. आसपास चिटपाखरु नाही. अश्या वातावरणात माणुस कितीही धीट असला आणि भीती वाटत नसली तरी एक प्रकारचे दडपण येतेच. तोच अनुभव घेत आम्ही ४-५ जण बसलो होतो. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. आणि अचानक एक काळाकभिन्न , उंच , धिप्पाड माणुस त्या उसातुन बाहेर चौथर्यावर आला. डोक्याला मुंडासे, गुढग्यापर्यंतच असलेल धोतर्,अंगात पोटापाशी खिसा आसलेली बन्डी,एका खांद्यावर घोंगड, दुसर्या खांद्यावर कुर्हाड असा दैत्यासारखा हा इसम आमच्याकडे पाठ करुन चितेजवळ आला. त्याचे आमच्याकडे लक्ष नव्हते. चितेजवळ येउन त्याने घोंगड आणि कुर्हाड खाली ठेवली मुंडास काढल आणि २ पायावर बसून 'आहा हा हा' करत हात , छाती शेकू लागला. इकडे आमची पार बोबडी वळली होती. तोंडातुन शब्द फुटत नव्हता. हात आणि छाती नीट शेकुन झाल्यावर त्याने बंडीच्या खिश्यातून एक प्लास्टीकची पिशवी काढून त्यातली एक बिडी तोंडाला लावली. एका बाजुने न पेटलेला चितेतला एक लाकडाचा तुकडा उचलुन त्याने ती विडी शिलगावली. चांगले २-३ भक्कम झुरके घेउन त्याने छाती आतुन गरम केली आणि पाठ शेकायला म्हणुन तो वळला आणि त्याचे आमच्याकडे लक्ष गेल.
"ह्या ह्या ह्या" असे कसनुस हसत तो म्हणाला "तुमी आजुन हाय व्हय.... मला वाटल समदी गेली घराकड.... लै गारठा पडलाय...". असे म्हणुन त्याने पाठ शेकत शांतपणे विडी चे आजुन २ झुरके मारले. विडी जमिनीवर घासुन विझवली. घोंगडे व कुर्हाड खांद्यावर टाकली आणि मुंडासे काखोटीला मारुन तो आला तसा ऊसात गडप झाला.
क्रमशः
वाचने
14802
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
शप्पथ्थ्थ....
आंबोळी द मृत्यू एजंट
आम्ही
हम्म....
भयानक...
असेच
In reply to असेच by विकास
मला
चितेचा असला तरी
हेच हेच
कसला तो
In reply to कसला तो by भडकमकर मास्तर
अहाहा. इथे
आंबोळी मतकरी
>>हा लेख
आवरा रे या आंबोळीला :)
In reply to आवरा रे या आंबोळीला :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो
मस्त
ह्म्म..
बेष्टच.
केवळ
आठवले!
रामनगरी
लेखन आवडले
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आंबोळी
हाहाहाहाहाहा!
In reply to धन्यवाद by आंबोळी
धन्यवाद..
च्यायला, लै
In reply to च्यायला, लै by धमाल मुलगा
नेहमीच्या रटाळ धाग्यांना
In reply to नेहमीच्या रटाळ धाग्यांना by शिद
मी पण
सह्ही! :)
आंबोळीदादा
अर्या बाबो
धन्यवाद
मिसळपाव वर
In reply to मिसळपाव वर by अभिता
नक्किच
तुम्ही कधी
हाहाहाहाहाहा!
रापचीक
रापचीक
खाणकाम केल्याबद्दल धन्यवाद !
In reply to खाणकाम केल्याबद्दल धन्यवाद ! by अनुप ढेरे
शेम टो शेम हेच म्हणतो. हे
काय रापचिक मयत हो तुमचं ते
हा धागा उघडला तर २००८ सालचा