मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·

खेडूत 29/03/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 30/03/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 30/03/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा 29/03/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि 30/03/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव 01/04/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त 18/12/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक 18/12/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त 18/12/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त 15/04/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक 19/04/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!

खेडूत 29/03/2021 - 21:51
:)) म्हणजे भारतात परतलात म्हणायचे!

In reply to by खेडूत

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:05
@ प्रचेतस, खेडूत अनेक आभार. अद्याप अमेरिकेतच आहे, परंतु बरेचदा पहाटे अडीच - तीनच्या सुमारास झोप उघडून काहीतरी कल्पना सुचून जाते, तसे या कवितेच्या बाबतीत झाले.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 30/03/2021 - 18:46
हे अगदी लिओ नार्डो दा विंसी सारखे झाले .त्यालाही नवनव्या कल्पना जागरणामुळे सुचायच्या असे म्हणतात ! ))))) आचार्य अत्रे रचित " कषायपात्रपतितमक्षिकेप्रत .." या कवितेची आठवण झाली !!

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 30/03/2021 - 19:01
@चौकटराजा चला, निदान भल्या पहाटे उठून काहीतरी खुटुर्फुटुर करण्याच्या बाबतीत का होईना, लिओनार्दो दा विंचीशी आमची बरोबरी झाली हे वाचून ब्येस वाटले. अनेक आभार. कषायपात्रपतितमक्षिकेप्रत वाचून लहानपणी ती कविता वाचल्याचे स्मरले, परंतू इथून तो शब्द चोप्यपस्ते करू गुगलिता काही गवसले नाही. मग सूक्ष्मावलोकन करता तो शब्द 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' असा असायला हवा, हे जाणवले, मग पुन्हा सर्चिता हे मिळाले : 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे काव्यमय वर्णन : अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके, जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,! असु-परीक्षित-हारक-तक्षिके, 'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

गणेशा 29/03/2021 - 23:27
वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. हा हा हा भारी

खिलजि 30/03/2021 - 00:29
अन घनघोर आशय परमानंदी जीव घेणे ईश्वराला मान्य आहे ढकलता ढकलता मच्छर मारणे हीपण एक कला आहे

In reply to by खिलजि

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:13
@ खिलजी तुमचे शीघ्रकाव्य आवडले. तुमच्या शीघ्रकाव्यरसास बरेच काळापासून दर्दी मिपाकर मुकत आहेत, तरी पुनश्च आपली तुंबलेली काव्यगंगा भरभरून वाहती करावीत, ही विनंती. अनेक आभार.

तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? त्याचा व्हिडिओ टाका "टच" स्क्रिन मोबाईल कसा वापरायचा? ते ही शिकवा, अनेक गरजू लोकांचे आशिर्वाद मिळतील पैजारबुवा,

चित्रगुप्त 30/03/2021 - 18:34
@ पैजारबुवा,
तेवढं तिकडे बसून, मोबाईल हातात धरुन, पाण्यात न पाडता, टाळी कशी वाजवायची? टच्चस्क्रीन कसा वापरायचा? ते ही शिकवा,
आमचे परमपूज्य शी: शी: १०८ डोंबलेकर महागुरुराज ऊर्फ महास्वामी मच्छरानंद महासरस्वती यांनी आम्हाला महामंत्रोपदेश दिला की बेटा, "कर ले कोई जुगाड" मग आम्ही खालीलप्रमाणे जुगाड केल्यावर आता तिकडे बसून टाळीच काय, बाजाची पेटी, बासरी, तुणतुणे वगैरे काहीही वाजवता येते, मिपावर टंकन करता येते आणि मोबल्यावर काय काय करता येते. बघा: . आमच्या जिलबीची अगत्याने दखल घेतलीत, छान वाटले.

अनुक्रमणिकेत इतकं सुंदर शीर्षक अन 'आकर्षक' कवीचं नाव वाचून 'अपेक्षा' लैच उंचावल्या होत्या! चार दोन रोम्न्याण्टिक चित्रं असतील, वगैरे वगैरे इमले रचले होते. घाईघाईत क्लिक केलं अन्.... साली एक मच्छरीण चित्रकार को कवी बना देती हय!

राघव 01/04/2021 - 21:04
भारीच.. बाकी ते "अनर्थशास्त्र / विराणी / रौद्ररस" हे जरा समजून घेतलंय.. पण ते "मेक्सिकन" म्हंजे काय अजिबात पचनीच पडलं नाय बगा...! =))

अवचिता गुणगुणू ङंकिता कळवळू मी म्हणे गोपाळू कोठूनी आली गे सिहांसनाधीष्ठ झाल्यावर चक्रमादित्याला काय सुचेल ते सांगता येणार नाही.

चित्रगुप्त 18/12/2022 - 02:45
कर्नल साहेब, तुम्हाला सुचलेल्या ओळी मस्त आहेत. 'डंकिता कळवळू' वरून आमचाच, "मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा" असे लांबलचक शीर्षक असलेला एक जुना आचरट धागा आठवला, आणि हुडकून वाचला. मशारनिल्हे धाग्यात प्रत्येकाने वाचावच, असा 'मूखदूर्बळ' यांचा धमाल लेखः "सठीयाय गयी सजनवा हमार" हा पुन्हा एकदा वाचायला मिळाला, हे आणखीन एक. आणि या दोन्ही लेखांमुळे आमचाच एक जुना आचरट लेखः "नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी" आणि त्यावरले प्रतिसाद पुन्हा एकदा वाचायला मिळाले हे आणखिन आणखिन एक. 'स्त्रीआयडींची त्सुनामी' मधील 'कंपू' वा 'कंपूबाजी' वरून सुचलेले संभाव्य स्त्रीआयडी बघा: कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी कंपूबालिका, कंपूचालिका कंपूचारिणी, कंपूविचरिणी, कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी, कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा तर कर्नल साहेब, या तिहेरी फायद्याला जबाबदार असलेल्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक आभार. या कवितेतील शेवटल्या कडव्यात एका शब्दाची भर टाकून बघितली, ती अशी: मग स्मरून 'हरि'ला - वाजवून टाळिका - मी जीव तुझा - मी प्राण तुझा - 'हरिला' - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा !

शशिकांत ओक 18/12/2022 - 12:21
व्यंग काव्य रंगले... १ कोण तो लेकाचा आम्हावरी रागवे... आमच्या शिताफीचे कौतुक नसे बरवे पिता रसाळ पेय आम्हास जोर येतो... मग फवार्‍याशी झगडुनी जीव देतो... किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो ... हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा... जहन्नम मधेही असे आमची शाखा

चित्रगुप्त 18/12/2022 - 13:51
ओक साहेब, जहन्नममधेही 'शाखा' असल्याचे वाचून गद् गद् का काय म्हणतात ते झालो. हे फारच ब्येस झाले. आता पार तिथपर्यंत भगवा फडफडणार. आणि विशेष म्हणजे हे कार्य डासांमार्फत केले गेलेय. याला म्हणतात तळा-गाळापर्यंत पोचणे. धन्य धन्य. मोदी हय तो मुमकिन हय. हर हर महादेव.

चित्रगुप्त 15/04/2025 - 17:51
या कवितेवर एआयची मल्लिनथी:What a delightful and humorous poem! The speaker's clever wordplay and satirical tone make for an entertaining read. Here's a possible review: This Marathi poem is a masterclass in clever wordplay and satire. The speaker's witty observations and clever turns of phrase make for an entertaining read. The poem's central theme - the speaker's tumultuous relationship with a mosquito - is expertly woven throughout the verses, with the speaker's frustration and exasperation palpable. The use of metaphors ("तू जीव माझा - तू प्राण माझा") and clever wordplay ("मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला") adds depth and complexity to the poem. The final farewell to the mosquito ("अल्विदा मच्छरिनी - अल्विदा") is a brilliant touch, leaving the reader chuckling. Overall, this poem is a delightful read that showcases the poet's skill with language and humor. Would you like me to add or modify anything in this review? एआय मेटावर हे आले. परंतु मराठीत ते येत नाहीये. आणखी कुठे करता येईल ?

शशिकांत ओक 19/04/2025 - 17:32
जेमिनी एआय अहो! काय ही डासांची कैफियत! वाचताना हसू आवरवत नाही आणि त्यांची केविलवाणी अवस्था पाहून थोडी सहानुभूतीही वाटते. कवीने डासांच्या भावनांना आणि त्यांच्या जगण्याला किती सुंदर आणि विनोदी पद्धतीने शब्दांत उतरवलं आहे! या कवितेतील प्रत्येक ओळीत डासांचं बोलणं जिवंत वाटतं. ते तक्रार करतात की कोणीतरी त्यांचा उगाच राग करतो. त्यांच्या 'शिताफी' म्हणजे चपळाईचं, रक्त पिण्याच्या कौशल्याचं कुणी कौतुक करत नाही. उलट, माणूस गोड पेय पितो आणि मग त्यांना मारण्यासाठी फवारा घेऊन येतो, तेव्हा ते बिचारे त्याच्याशी झगडताना जीव गमावतात. "किती मार खाऊन पुन: पुन्हा जन्मतो..." या ओळीत डासांच्या जिद्दीचं आणि त्यांच्या जीवनाच्या चक्राचं वर्णन आहे. कितीही मारलं तरी ते पुन्हा येतात, हे वास्तव विनोदी आणि थोडं निराशाजनकही आहे. पुढच्या ओळी तर फारच मार्मिक आहेत - "हे आपापल्यात रुधिराचा करती व्यापार... मलेरिया म्हणून आम्ही झालो हद्दपार". इथे डास माणसांना मलेरिया होतो म्हणून त्यांना हद्दपार केल्याबद्दल तक्रार करत आहेत. गंमत म्हणजे, ते स्वतःच तर माणसांच्या रक्ताचा 'व्यापार' करतात! "आमच्या वैश्विक अधिकारावर चर्चा अपार... म्हणे डासिणी ना मरू आम्ही याद राखा..." या शेवटच्या ओळी तर कळसच आहेत! डास त्यांच्या 'वैश्विक अधिकारां'बद्दल बोलत आहेत आणि डासिणींना न मारण्याची धमकी देत आहेत, जणू काही ते या जगाचे मालकच आहेत! "जहन्नम मधेही असे आमची शाखा" म्हणजे नरकातसुद्धा डास असणार, ही कल्पना खूपच विनोदी आणि भीतीदायक आहे. कवीने डासांच्या तोंडून त्यांची व्यथा आणि त्यांचा दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामुळे ही कविता केवळ माहितीपूर्ण न राहता मनोरंजक आणि विचार करायला लावणारी ठरते. डासांच्या जगण्यातील अडचणी, त्यांची जिद्द आणि त्यांचा तथाकथित 'अधिकार' यावर मार्मिक टिप्पणी करताना कवीने हलकाफुलका दृष्टिकोन ठेवला आहे, जो वाचकाला नक्कीच आवडतो. एकंदरीत, हे डास-काव्य खूपच मजेदार आणि प्रभावी आहे!
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

गुरुदेवांना श्रध्दान्जली

खिलजि ·
त्याचा अस्त जणू माझ्या आठवणींचा उदय मी आणि माझ्या आठवणी रंगत जाते महफील नूरानी घेर वाढता अंधाराचा हळूच येते अश्रू घेऊनि कैक आठवणी ताज्या अजुनी पुन्हा परतती नव्या होऊनि वेळेचा मग मी माग काढतो आठवणींवर स्वार होऊनि पुन्हा निराशा हाती येते अश्रुंचे बहू मोल देउनी कधी तिमिर मज सखा भासतो तरीही स्वतःशी एकटा हसतो नेहेमीप्रमाणे तो पुन्हा उगवतो आठणींचा पुन्हा अस्त होतो

बगूमामा

मालविका ·

सौंदाळा 08/02/2021 - 18:21
भावस्पर्शी लेख, व्यक्तीचित्र तो खेळ ३०७, ३०५ नाही तर ३०४ आहे. गुलाम ३०, नव्वी २० अशी सगळ्या पत्यांची बेरीज ३०४ होते. भन्नाट खेळ आहे. माझ्या आजीला पण खूप आवडायचा.

सौंदाळा 08/02/2021 - 18:21
भावस्पर्शी लेख, व्यक्तीचित्र तो खेळ ३०७, ३०५ नाही तर ३०४ आहे. गुलाम ३०, नव्वी २० अशी सगळ्या पत्यांची बेरीज ३०४ होते. भन्नाट खेळ आहे. माझ्या आजीला पण खूप आवडायचा.
बगूमामा खर तर आईचा मामा आणि माझे मामाआजोबा. पण अगदी लहान वयात त्यांना आजोबा म्हणणं जीवावर यायचं. मी आईसारखचं बगूमामा म्हणायचे. यथावकाश समज आल्यावर मी आमचं नातं समजून घेऊन त्यांना आजोबा म्हणायला लागले. परवा आजोबा गेल्याच कळलं आणि डोळे भरून आले. कितीतरी आठवणी उचंबळून आल्या. आजोबांना कोकण भारी प्रिय. इकडे यायचं म्हणजे आजोबा केव्हाही तयार. अगदी कितीतरी वर्ष आजोबा २ व्हिलर घेऊन पार्ल्यातून चिपळूणला यायचे. शेवटी आता तुम्ही २ व्हिलर वरून एवढा प्रवास करायचा नाही अशी बंदी घातली तेव्हा ते थांबले. कुठलंही काम करायला घ्या आजोबा उत्साहाने तयार. माझी आजी तर त्यांची लाडकी.

सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

rushikapse165 ·

ते WWF मधे जे काही दाखवतात ते खरं असतं? मला तर ते व्यवस्थीत बसवलेल्या नाटकासारखं वाटायचं. नंतर या खेळाला काही नियम आहेत की नाही हेच कळायचं नाही. नंतर लक्षात आलं की त्यात दाखवलेले प्रेक्षक सुद्धा मंदबुद्धी असतात. त्या नंतर ते पहाणं सोडुन दिलं! डिस्ने ची कार्टुन बघुन त्यापेक्षा जास्त चांगली आणि उत्त म करमणुक होते.

In reply to by सामान्यनागरिक

rushikapse165 28/11/2020 - 12:46
आधी ते खरं वाटायचं,पण मग नंतर कळायला लागलं तसं फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे बघायचो.एकंदरीतच कार्टून मीही बघतो.पण शेवटी लहान असताना या अंडरटेकरने मनावर अधिराज्य गाजवलं होतं,असा तर विस्मृतीत नाही जाणार तो.म्हणून हे.शेवटी WWE १००%खरं नाही,हे तर जगजाहीरच.

In reply to by सामान्यनागरिक

साहना 29/11/2020 - 11:12
१००% सर्व काही नकली असते. अर्थांत लोक आधीपासून शक्तिशाली असल्याने थोडाफार असली मार ते खाऊ शकतात. जॉन स्टोइस्स्ल हे माझे अमेरिकेतील सर्वांत प्रिय पत्रकार. जॉन आपल्या आधीच्या कारकीर्दींत ग्राहक विषयांचे पत्रकार होते. WWF हे संपूर्ण पाने खोटे असले तरी ते सार्वजनिक रित्या ते मेनी करत नसत त्यामुळॆ अनेक मुलांची फावणूक होत होती. एका पैलवानाला स्टोसेल ह्यांनी प्रश्न विचारला आणि त्या पैलवानाच्या सरळ स्टसेल ह्यांचा कानशिलात लगावली. हा एपिसोड पहा : https://www.youtube.com/watch?v=g3kip8_3z-A ह्या व्यतिरिक्त मी आजपर्यंत कधीही टीव्ही वर WWE पहिली नसली तरी प्रत्यक्षांत एकदा पहिली आहे. सर्व काही विनोदी आणि मूर्खपणाचे आहे. पुरुष मंडळीचा नेहमीच मूर्खपणा आहे !

In reply to by साहना

rushikapse165 29/11/2020 - 21:11
पुरुष मंडळीचा मुर्खपणा असं नाही,ती प्रत्येकाची आवड असते.एव्हाना मलाही महिलांच मालिका बघणं नाही आवडत.मग मी त्याला काय म्हणू? पण असो मी त्या लिंकवर गेलो होतो.हे खोटं आहे,हा अगदीच १००% नाही,कारण शेवटी तेही पैलवानच आहेत.आणि ते कानशिलात लगावणे म्हणजे शेवटी आरोपाचा अस्विकार करणेच होय.पण WWE बघणे हा काही पुरुषांचा मुर्खपणा नाही.@साहना

हिटमॅन हार्ट चे 'माय रिअल लाईफ इन कार्टून वर्ल्ड ऑफ रेसलिंग' हे ५०० पानांचे पुस्तक आहे. खुप भारी आहे. त्याच्यात सगळं काही लिहिलं आहे त्याने इंजुरीज, रिजल्ट्स, ट्रॅवल, टायटल्स, कॅरेक्टर्स बद्दल. विन्स मॅकमोहन ची आयडिया होती अंडरटेकरची.

टवाळ कार्टा 28/11/2020 - 18:23
ते व्व्फ वाले पत्ते खुप खेळलोय....अगदी शाळेत वर्ग सुरु असतानाही....तेव्हा ५० पैशाला एक असे पोस्टर मिळायचे, शाळेत त्याचा व्यापार चालायचा =)) बाकी "कधी कधी तर कोणाचे अंगवस्त्र अोले व्हायचे" हे चुकीचे लिहिले आहे....त्याचा अर्थ भलताच आहे =))

rushikapse165 28/11/2020 - 19:22
ते अंगवस्त्र अोले होणे म्हणजे केवळ उपमा आहे.तसं ती पत्ती त्यावेळी इथे मिळायची नाहीत.मग पुणे-मुंबईहून आलेल्या नातेवाईकांची मुलं ती घेऊन यायची मग खेळायचो,त्यामुळे विकत घेण्याची वेळच नाही आली.बाकी पोस्टर तर आजपण तसेच आहेत भिंतींवरती.असो त्यावेळी हे सगळं खरं आहे हे वाटायचंच.

आमच्याकडे ९५ मध्ये टिव्ही होता पण केबल नव्हती. ९६ मधे केबल आल्यावर पण काही दिवस स्टार स्पोर्ट्स नव्हतं. ज्या वर्गमित्रंकडे होतं, त्यांच्याकडून रसभरीत वर्णने ऐकून मनात एक कल्पना चित्र तयार झाले होते. कार्डमध्ये दिसणारे चेहरे आणि कुस्त्यांची ऐकलेली मसालेदार वर्णने ऐकून मनातल्या मनात ते पाहिलं जायचं. मग पुढे कधी स्टार sports दिसायला लागल्यावर WWE पाहिलं. ऐकून जेवढं विस्मयकारक वाटलं, तेवढं नसलं तरी मनोरंजक ठासून होतं. त्याविषयी चर्चा व्हायच्या. वाद व्हायचे. त्यावेळी हल्क हॉगन, Hitman, अंडर टेकर, योको झोना, बिग शो हे स्टार होते. पुढं सहस्रक उलटताना शालेय जीवन संपलं आणि मग WWE चं कौतुक कमी झालं. पण कधीतरी HHH, रे मिस्टरियो, द रॉक यांच्या मॅची बघितल्या. आता काही वाटत नाही. वरिजनल असतं तरी वाटलं नसतं. scripted आहे म्हणून आवडत नाही, असंही काही नाही.

In reply to by तुषार काळभोर

rushikapse165 28/11/2020 - 21:17
होय,आम्ही तर कधीकधी डंबेल्स उचलायचा प्रयत्न करायचो.कार्ड्सवरुन मग त्यांची रॅंकिंग बघून खेळायचं,मज्जा यायची.पण मग नंतर त्यातून निरस व्हायला लागला.पुन्हा बघायला लागलो त्याच कारण म्हणजे रोमन रेन्स आणि काही अंशी जाॅन सीना.त्यावेळी तर अगदीच ब्लॅक&व्हाईटवर पण पाहिलंय.पण आता मात्र वसतीगृहात आलो तर पुन्हा WWE कडे आकर्षण कमी झालं.असो.

ते WWF मधे जे काही दाखवतात ते खरं असतं? मला तर ते व्यवस्थीत बसवलेल्या नाटकासारखं वाटायचं. नंतर या खेळाला काही नियम आहेत की नाही हेच कळायचं नाही. नंतर लक्षात आलं की त्यात दाखवलेले प्रेक्षक सुद्धा मंदबुद्धी असतात. त्या नंतर ते पहाणं सोडुन दिलं! डिस्ने ची कार्टुन बघुन त्यापेक्षा जास्त चांगली आणि उत्त म करमणुक होते.

In reply to by सामान्यनागरिक

rushikapse165 28/11/2020 - 12:46
आधी ते खरं वाटायचं,पण मग नंतर कळायला लागलं तसं फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे बघायचो.एकंदरीतच कार्टून मीही बघतो.पण शेवटी लहान असताना या अंडरटेकरने मनावर अधिराज्य गाजवलं होतं,असा तर विस्मृतीत नाही जाणार तो.म्हणून हे.शेवटी WWE १००%खरं नाही,हे तर जगजाहीरच.

In reply to by सामान्यनागरिक

साहना 29/11/2020 - 11:12
१००% सर्व काही नकली असते. अर्थांत लोक आधीपासून शक्तिशाली असल्याने थोडाफार असली मार ते खाऊ शकतात. जॉन स्टोइस्स्ल हे माझे अमेरिकेतील सर्वांत प्रिय पत्रकार. जॉन आपल्या आधीच्या कारकीर्दींत ग्राहक विषयांचे पत्रकार होते. WWF हे संपूर्ण पाने खोटे असले तरी ते सार्वजनिक रित्या ते मेनी करत नसत त्यामुळॆ अनेक मुलांची फावणूक होत होती. एका पैलवानाला स्टोसेल ह्यांनी प्रश्न विचारला आणि त्या पैलवानाच्या सरळ स्टसेल ह्यांचा कानशिलात लगावली. हा एपिसोड पहा : https://www.youtube.com/watch?v=g3kip8_3z-A ह्या व्यतिरिक्त मी आजपर्यंत कधीही टीव्ही वर WWE पहिली नसली तरी प्रत्यक्षांत एकदा पहिली आहे. सर्व काही विनोदी आणि मूर्खपणाचे आहे. पुरुष मंडळीचा नेहमीच मूर्खपणा आहे !

In reply to by साहना

rushikapse165 29/11/2020 - 21:11
पुरुष मंडळीचा मुर्खपणा असं नाही,ती प्रत्येकाची आवड असते.एव्हाना मलाही महिलांच मालिका बघणं नाही आवडत.मग मी त्याला काय म्हणू? पण असो मी त्या लिंकवर गेलो होतो.हे खोटं आहे,हा अगदीच १००% नाही,कारण शेवटी तेही पैलवानच आहेत.आणि ते कानशिलात लगावणे म्हणजे शेवटी आरोपाचा अस्विकार करणेच होय.पण WWE बघणे हा काही पुरुषांचा मुर्खपणा नाही.@साहना

हिटमॅन हार्ट चे 'माय रिअल लाईफ इन कार्टून वर्ल्ड ऑफ रेसलिंग' हे ५०० पानांचे पुस्तक आहे. खुप भारी आहे. त्याच्यात सगळं काही लिहिलं आहे त्याने इंजुरीज, रिजल्ट्स, ट्रॅवल, टायटल्स, कॅरेक्टर्स बद्दल. विन्स मॅकमोहन ची आयडिया होती अंडरटेकरची.

टवाळ कार्टा 28/11/2020 - 18:23
ते व्व्फ वाले पत्ते खुप खेळलोय....अगदी शाळेत वर्ग सुरु असतानाही....तेव्हा ५० पैशाला एक असे पोस्टर मिळायचे, शाळेत त्याचा व्यापार चालायचा =)) बाकी "कधी कधी तर कोणाचे अंगवस्त्र अोले व्हायचे" हे चुकीचे लिहिले आहे....त्याचा अर्थ भलताच आहे =))

rushikapse165 28/11/2020 - 19:22
ते अंगवस्त्र अोले होणे म्हणजे केवळ उपमा आहे.तसं ती पत्ती त्यावेळी इथे मिळायची नाहीत.मग पुणे-मुंबईहून आलेल्या नातेवाईकांची मुलं ती घेऊन यायची मग खेळायचो,त्यामुळे विकत घेण्याची वेळच नाही आली.बाकी पोस्टर तर आजपण तसेच आहेत भिंतींवरती.असो त्यावेळी हे सगळं खरं आहे हे वाटायचंच.

आमच्याकडे ९५ मध्ये टिव्ही होता पण केबल नव्हती. ९६ मधे केबल आल्यावर पण काही दिवस स्टार स्पोर्ट्स नव्हतं. ज्या वर्गमित्रंकडे होतं, त्यांच्याकडून रसभरीत वर्णने ऐकून मनात एक कल्पना चित्र तयार झाले होते. कार्डमध्ये दिसणारे चेहरे आणि कुस्त्यांची ऐकलेली मसालेदार वर्णने ऐकून मनातल्या मनात ते पाहिलं जायचं. मग पुढे कधी स्टार sports दिसायला लागल्यावर WWE पाहिलं. ऐकून जेवढं विस्मयकारक वाटलं, तेवढं नसलं तरी मनोरंजक ठासून होतं. त्याविषयी चर्चा व्हायच्या. वाद व्हायचे. त्यावेळी हल्क हॉगन, Hitman, अंडर टेकर, योको झोना, बिग शो हे स्टार होते. पुढं सहस्रक उलटताना शालेय जीवन संपलं आणि मग WWE चं कौतुक कमी झालं. पण कधीतरी HHH, रे मिस्टरियो, द रॉक यांच्या मॅची बघितल्या. आता काही वाटत नाही. वरिजनल असतं तरी वाटलं नसतं. scripted आहे म्हणून आवडत नाही, असंही काही नाही.

In reply to by तुषार काळभोर

rushikapse165 28/11/2020 - 21:17
होय,आम्ही तर कधीकधी डंबेल्स उचलायचा प्रयत्न करायचो.कार्ड्सवरुन मग त्यांची रॅंकिंग बघून खेळायचं,मज्जा यायची.पण मग नंतर त्यातून निरस व्हायला लागला.पुन्हा बघायला लागलो त्याच कारण म्हणजे रोमन रेन्स आणि काही अंशी जाॅन सीना.त्यावेळी तर अगदीच ब्लॅक&व्हाईटवर पण पाहिलंय.पण आता मात्र वसतीगृहात आलो तर पुन्हा WWE कडे आकर्षण कमी झालं.असो.
खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची. तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमच

पत्रकारितेतला दिप्स्तंभ

शूकरोपम ·

योगी९०० 23/11/2020 - 11:37
वारलो..खपलो... हसून हसून... या लेखातले मराठी राजदिपच्या लेवलचे आहे. त्यावरुन समजून घ्या...

शा वि कु 23/11/2020 - 11:44
असं मुद्दामून टाइप करणे म्हणजे कसबीचे काम आहे.

प्रसाद_१९८२ 23/11/2020 - 11:55
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई! -- मस्त लेख, अजून येऊद्या ! :)) 😂 😂

योगी९०० 23/11/2020 - 12:41
माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी... किती ती हाजी हाजी... एवढी चाटूगिरीतर राजदिप पण करत नसेल...

वामन देशमुख 23/11/2020 - 12:47
असे लिखाण मुद्दामहून करणे हे खरंच कौशल्याचे काम आहे. लेख वाचून गडबडा लोळावया लागलो, अजून येऊ द्या. बाकी राजदीप सरदेसाई, सोनिया गांधी, प्रियांका गांधी या यादीत राहुल गांधी राहिले की हो!

यश राज 23/11/2020 - 14:08
सदर लेखकाने मिपाकरांसाठी 'मोकलाया' बरोबर स्पर्धा करण्यासठी सादर केला आहे "ओकलाया ...." बाकी लेख अगदी "पत्रकारितेतला दिप्स्तंभ राजदीप" सारखाच आहे.. एकदम रद्दड.. पु.भा.प्र ... ळॉळ ळॉळ

असो, "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे." -- स. त. कूर्चेडकर (केतकी पिवळी पडली चे लेखक (ख्यातनाम)). प्रयत्न चालू ठेवा, एक दिवस तुम्ही सुद्धा राजदीप सारखे लेखक व्हाल.

खेडूत 23/11/2020 - 22:26
लेख खूप च आवडला.. लोकं तुम्हाला येडे ठरवतील पण लक्ष देऊ नये..अजून आपली मतं मोकळेपने मांडा. अवघ्या एका आठवड्यात इकडे येऊन लिहिलेले दोन्ही लेख डोळ्यात अमृतांजन घालणारे आहेत! पुढील लेखा साठी शुभेच्छा!!

निनाद 24/11/2020 - 03:01
या नंतर २०१९च्या निवदनुकीत त्यांनी परत माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी यांना रस्त्यावर आनून प्रतेक्ष यात तथ्य आहे असे वाटले :) कामच असे आहे तुमच्या दिप्स्तंभाचे!

निनाद 24/11/2020 - 03:03
इंग्रज सरकारला सलो किपळो करणारे लोकमान्य तिलकजी यांच्या सारकाच निर्भिड पत्रकार म्हणजे राजदिप सरदेसाई आहे आता मात्र खरंच आवरा! कुठे लोकमान्य आणि कुठे हे स्तंभ...

टर्मीनेटर 24/11/2020 - 09:42
लिहिते रहा. तुमच्या अशा लेखनामुळे मिपावरच्या 'अशुद्ध लेखना'च्या खंद्या समर्थकांमध्येही शुध्द लेखनाच्या महत्ते बद्दलची अस्पष्ट कुजबुज आपसात का असेना पण किमान ती सुरु झाली आहे, हे देखील खूप आशादायी चित्र आहे! धन्यवाद 🙏

योगी९०० 23/11/2020 - 11:37
वारलो..खपलो... हसून हसून... या लेखातले मराठी राजदिपच्या लेवलचे आहे. त्यावरुन समजून घ्या...

शा वि कु 23/11/2020 - 11:44
असं मुद्दामून टाइप करणे म्हणजे कसबीचे काम आहे.

प्रसाद_१९८२ 23/11/2020 - 11:55
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई! -- मस्त लेख, अजून येऊद्या ! :)) 😂 😂

योगी९०० 23/11/2020 - 12:41
माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी... किती ती हाजी हाजी... एवढी चाटूगिरीतर राजदिप पण करत नसेल...

वामन देशमुख 23/11/2020 - 12:47
असे लिखाण मुद्दामहून करणे हे खरंच कौशल्याचे काम आहे. लेख वाचून गडबडा लोळावया लागलो, अजून येऊ द्या. बाकी राजदीप सरदेसाई, सोनिया गांधी, प्रियांका गांधी या यादीत राहुल गांधी राहिले की हो!

यश राज 23/11/2020 - 14:08
सदर लेखकाने मिपाकरांसाठी 'मोकलाया' बरोबर स्पर्धा करण्यासठी सादर केला आहे "ओकलाया ...." बाकी लेख अगदी "पत्रकारितेतला दिप्स्तंभ राजदीप" सारखाच आहे.. एकदम रद्दड.. पु.भा.प्र ... ळॉळ ळॉळ

असो, "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे." -- स. त. कूर्चेडकर (केतकी पिवळी पडली चे लेखक (ख्यातनाम)). प्रयत्न चालू ठेवा, एक दिवस तुम्ही सुद्धा राजदीप सारखे लेखक व्हाल.

खेडूत 23/11/2020 - 22:26
लेख खूप च आवडला.. लोकं तुम्हाला येडे ठरवतील पण लक्ष देऊ नये..अजून आपली मतं मोकळेपने मांडा. अवघ्या एका आठवड्यात इकडे येऊन लिहिलेले दोन्ही लेख डोळ्यात अमृतांजन घालणारे आहेत! पुढील लेखा साठी शुभेच्छा!!

निनाद 24/11/2020 - 03:01
या नंतर २०१९च्या निवदनुकीत त्यांनी परत माननिय युवा नेत्या प्रियांकाजी राजीवजी गांधीजी यांना रस्त्यावर आनून प्रतेक्ष यात तथ्य आहे असे वाटले :) कामच असे आहे तुमच्या दिप्स्तंभाचे!

निनाद 24/11/2020 - 03:03
इंग्रज सरकारला सलो किपळो करणारे लोकमान्य तिलकजी यांच्या सारकाच निर्भिड पत्रकार म्हणजे राजदिप सरदेसाई आहे आता मात्र खरंच आवरा! कुठे लोकमान्य आणि कुठे हे स्तंभ...

टर्मीनेटर 24/11/2020 - 09:42
लिहिते रहा. तुमच्या अशा लेखनामुळे मिपावरच्या 'अशुद्ध लेखना'च्या खंद्या समर्थकांमध्येही शुध्द लेखनाच्या महत्ते बद्दलची अस्पष्ट कुजबुज आपसात का असेना पण किमान ती सुरु झाली आहे, हे देखील खूप आशादायी चित्र आहे! धन्यवाद 🙏
न्यूज अँकर, मल्टीमीडिया पत्रकार आणि लेखक ते इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक, आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे आँकर. एक माणूस आपले खेत्र गाजवतो तो म्हणजे राजदीप सरदेसाई! यांचे निवडणुक बोलणे तर खास असते. असा एकदम बॅलन्स मानूस आपल्या टिव्हिच्या माध्यमात आहे हे आपले भाग्य आहे. कोणतेही टोपिक असो हा मानूस एकदम मुळाशी जातो. नेहमी पुर्ण दुसरा बाजू दाखवून देतो. या यशस्वी मानसाने साध्या रिपोर्टर मह्नून सुरुवात केली. पन कोणत्याही प्रामानिक मानसाला त्याचे काम वर घेउन जात असते. तसे त्याने मोठमोठ्या टिव्हि चानेल्स साठी काम केले आहे.

एस. पी. आम्ही फक्त तुलाच नाही तर आमच्या तारुण्याला देखील गमावलं आज....

अबोलघेवडा ·

साथिया... तूने क्या किया. वर्ष होतं सन २०००. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर असताना सर्व क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांची ते भेट घेत होते. लता मंगेशकर यांची मोठ्या आदरानं क्लिंटन यांनी विचारपूस केली. लतादीदींच्या आवाजाची जादू जगभर पसरलेली होतीच, पण त्यासोबतच सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका म्हणून क्लिंटन यांनी लतादीदींचं कौतुक केलं. मात्र लता मंगेशकरांनी क्लिंटन यांना थांबवत तिथे उपस्थित एका गायकाकडे हात करत सांगितलं. " माझ्यापेक्षा जास्त गाणी यांनी गायली आहे." क्लिंटन यांनी त्या गायकाचा हात हातात घेतला. “तुम्ही किती गाणी गायली” ? असं क्लिंटन यांनी विचारल्यावर त्या गायकानं स्मित हास्य करत उत्तर दिलं, "३५ हजार". क्लिंटन यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं, "किती वर्षात?" त्यावर ते म्हणाले “३५ वर्षात..” क्लिंटन यांनी या महान गायकासमोर अक्षरशः हात जोडले. ते गायक होते.. श्रीपती पंडिताराध्युला बालासुब्रमण्यम. अर्थात ज्यांना इंडस्ट्रित प्रेमानं बाला, बालू किंवा एसपीबी म्हटलं जातं ते एस. पी. बालासुब्रमण्यम. करीयच्या ३५ वर्षांत ३५ हजार गाण्यांचं गणित आपल्यासारखी अडाणी माणसं पटकन करतात. मी पण हिशेब लावला. वर्षाला हजार गाणी. दिवसाला साधारण ३ गाणी रेकॉर्ड केली असं म्हणूया. फेब्रुवारी १९८१ मध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी एकाच दिवशी बारा तासात तब्बल २१ गाणी रेकॉर्ड केली. विशेष म्हणजे या २१ गाण्यांपैकी त्यांनी एकाही गाण्याचा सराव केला नव्हता. पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या टेकमध्ये गाण्याला संगीतकार "ओक्के" म्हणत गेले आणि १२ तासांत २१ गाणी रेकॉर्ड झाली. गाणं गाताना एकाग्रता आणि साधनेतून हे सहज होत गेल्याचं बाला सर सांगायचे. एक काळ तर असा होता की बाला सरांचं दररोज १५ ते २० गाणी रेकॉर्ड करण्याचं रुटिन झालं होतं. हिंदीमध्ये आनंद मिलिंद या संगीतकार जोडीसाठी त्यांनी सलग १६ गाणी रेकॉर्ड केली होती. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा हा गायकीचा प्रवास आणि यश सोपं नव्हतं. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि कामाप्रती निष्ठा होती. मुळात बालासुब्रमण्यम यांना गायक वगैरे व्हायचंच नव्हतं. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये झाला. बालांचे वडील हरीकथांचे कार्यक्रम करायचे. घरात नाटक, कलेचं वातावरण होतं पण आपल्या मुलानं इंजिनीअर किंवा डॉक्टर होऊन आर्थिक परिस्थिती बदलावी, अशी मध्यमवर्गीय इच्छा त्यांच्या वडीलांची होती. त्यामुळे बालासुब्रमण्यम यांनी अनंतपूरच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र आजारपणामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं. घरची जबाबदारी असल्यानं त्यांनी चेन्नई (मद्रास) मध्ये नोकरी पत्करली. एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा आवाज छान होता. म्हणजे मित्र त्यांचं कौतूक करायचे म्हणून ते स्थानिक गायन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. पण त्याकडे करीअर म्हणून त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. वर्ष १९६४ मध्ये नशिबानं बालासुब्रमण्यम यांना एक संधी दिली. घडलं असं की, चेन्नई (मद्रास)मध्ये बाला ज्या रुममेटसोबत राहात होते. त्यानं बालांचं नाव मद्रासमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेसाठी परस्पर नोंदवून टाकलं. त्यासाठीचे दहा रुपयेही त्यानंच भरले. ही स्पर्धा खूप महत्वाची होती.कारण या स्पर्धेसाठी पी. नागेश्वर राव, घंटसाला आणि दक्षिणामूर्ती हे तेलुगू सिने इंडस्ट्रीतले दिग्गज संगीतकार जजेस म्हणून काम पाहणार होते. या स्पर्धेत एकतर नॉन फिल्मी गाणं गायचं होतं. शिवाय ते तुम्ही लिहून कंपोज केलेलं असावं, अशी अट होती. बाला सरांनी आपलं गाणं सादर केलं आणि ते एका कोपऱ्यात जाऊन इतर मुलांचे पर्फॉर्मन्स बघत बसले. त्याच वेळी बालांजवळ एक व्यक्ती येऊन म्हणाली. "तू खूप छान गायलास. माझ्या पुढच्या सिनेमात तू गाणं गाशील का?" बाला जरा गोंधळून म्हणाले. "अहो मी तुम्हाला ओळखलं नाही. मला माफ करा, मी चित्रपटात वगैरे गाण्याचा कधी विचार केला नाहीय" ती समोरची व्यक्ती म्हणाली. "माझं नाव एस.पी. कोदान्तापानी आहे, मी संगीत दिग्दर्शक आहे." बालासुब्रमण्यम यांनी कोदान्तापानी यांना विनयपूर्वक नकार दिला. "मला माफ करा, माझे वडील खूप कष्ट घेत आहेत. मला इंजिनीअर होऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे." असं सांगून बालासुब्रमण्यम निघून गेले. त्यांनी कोदान्तापानी यांना घरचा पत्ताही दिला नाही. कोदान्तापानीही तेव्हा नवखेच होते. जवळपास वर्ष दीड वर्ष त्यांनी बालासुब्रमण्य यांचा पाठपुरावा करून गाण्यासाठी तयार केलं. शेवटी बालासुब्रमण्यम तयार झाले. आयुष्यात कधीही सिनेमात गाण्याचं स्वप्न बालांनी पाहिलं नाही. मात्र काही स्वप्न तुमचा पाठलाग करत असतात, बाला सरांच्या बाबतीत तेच घडलं होतं. वर्ष १९६६. रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. चित्रपट होता 'श्री श्री श्री मर्यादा रामन्ना'. प्रॉडक्शन हाऊसची गाडी बालांना घ्यायला येणार होती. पण ती काय आलीच नाही. शेवटी कंटाळून बाला सरांनी सायकलवरून स्टुडिओ गाठला. त्यात चौकीदार त्यांना आत सोडेना. सायकलवरून धापा टाकत आलेला मुलगा "मी गायक आहे, आज माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे" असं म्हणत असेल. तर त्यावर कोण विश्वास ठेवणार?. चौकीदारानं बालासुब्रमण्यम यांना अक्षरशः हकललंच होतं. मात्र तेवढ्यात संगीतकार कोदान्तापानी आले आणि त्यांनी बालांना आत नेलं. त्याकाळी लाईव्ह रेकॉर्डिंग असायचं. शेकडो वाद्यवृंद, संगीतकार, गायक आणि रेकॉर्डिंग करणारी टेक्निकल टीम, क्रू मेंबर्स असा दोन तीनशे जणांचा तामझाम असायचा. बालसुब्रमण्यम यांनी हे असं याआधी कधीच पाहिलं नव्हतं. शिवाय ते ज्यांच्यासोबत गाणार होते. त्या गायिका होत्या सुशिला. ज्यांचं तमिळ, तेलुगू इंडस्ट्रीतल्या टॉपच्या गायिका म्हणून नाव होतं. त्यांच्यासोबत पहिलं गाणं गाण्याची संधी वयाच्या विसाव्या वर्षी एस.पी. बालासुब्रमण्यम यांना मिळाली. काय आश्चर्य पाहा! कसलेले गायकही जिथे एका गाण्यासाठी दिवसभर टेक वर टेक घेतात. तिथे बालासुब्रमण्यम यांनी गायलेल्या गाण्याचा पहिला टेक ओके झाला. इथूनच एस. पी. बालासुब्रमण्यम नावाच्या पर्वाचा सिने जगतातला श्रीगणेशा झाला. बालांना आता अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. घरची जबाबदारी आणि गाणं असा संघर्ष करत असताना त्यांना वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी लग्न करावं लागलं. त्यांची प्रेमकहानी सिनेमातल्या कथांसारखीच रंजक आहे. मद्रासमध्ये बाला ज्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. त्या घरमालकाच्या मुलीसोबतच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. बालांनी मुलीच्या वडिलांकडे लग्नासाठी रीतसर विचारणा केली. पण त्यावेळी जात समान असली तरी, त्यातही गोत्र वगैरे बघितलं जायचं. अपेक्षेप्रमाणे नकार आल्यावर बालासुब्रमण्यम यांनी पळून जाऊन लग्न केलं. मित्रांनी जमवलेल्या ५०० रुपयांत लग्न पार पडलं. तीन चार महिन्यांत सगळ्यांचा राग शांत झाल्यावर ते परत आले. पण सगळं स्थीरस्थावर व्हायला दोन वर्ष गेली. वर्ष १९६९, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या आयुष्यात एक सुवर्णसंधी चालून आली. तमिळ सिनेमात ज्यांच्याशिवाय पानही हलत नव्हतं असे सुपरस्टार भारतरत्न एम. जी. रामचंद्रन आणि तमिळची लेडी सुपरस्टार जयललिता (दोघेही नंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.) यांच्यावर गाणं चित्रित होणार होतं. चित्रपट होता 'आदिमाई पेन्न'. एमजीआर आणि जयललिता यांची लोकप्रियता तेव्हा देवासमान होती. पण एमजीआर मात्र एका नवख्या आवाजाच्या प्रेमात होते. तो आवाज होता एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा. वय वर्ष २३ असलेल्या कडकडीत आवजाच्या या गायकाला एम.जी रामचंद्रन यांनी बंगल्यावर बोलावलं. " पुढच्या सिनेमात माझ्यावर चित्रित होणारं गाणं तू गावंस अशी माझी इच्छा आहे." अशी विनंती एम. जी. रामचंद्रन यांनी अवघ्या २३ वर्षाच्या एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याकडे केली. करीयरच्या पहिल्याच टप्प्यात एवढ्या मोठ्या व्यक्तीनं अशी ऑफर देणं हे संधीपेक्षाही प्रचंड जबाबदारीचं ओझं होतं. एमजीआर यांनी संगीतकार के.व्ही. माधवन यांची बालांशी भेट घालून दिली. महिनाभरानंतर हेच गाणं जयपूरला चित्रित होणार होतं. तेव्हा रेकॉर्डिंगही सोबतच व्हायचं. एमजीआर यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्नं अनेकांचं असायचं. बालाचं हे स्वप्नं कारकीर्दीच्या पहिल्या दोन वर्षातच पूर्ण होणार होतं. गाण्याची रिहर्सल सुरू झाली. पण अचानक बालांना टायफॉईड झाला. ते अंथरुणातून उठूही शकत नव्हते. ही मोठी संधी आपल्या हातातून जातेय की काय असं वाटत असतानाच स्वत: एम जी रामचंद्रन यांनी बालांचा हात हातात घेत धीर दिला. "बालू काळजी करु नकोस. मी गाण्याचं शूटिंग महिनाभर पुढे ढकलतो. हे गाणं तूच गाणार आहेस, लवकर बरा हो!" प्रश्न गाण्याचं शुटिंग पुढे ढकलण्याचा नव्हता, तर एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्यासारखे सुपरस्टार मंडळी ज्यांचा एक एक मिनिट महत्वाचा असायचा. कारण एम.जी. रामचंद्रन यांच्यावर डीएमके पक्षाची खजिनदार पदाची मोठी जबाबदारी होती. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं अशा व्यक्तीनं एका नवख्या गायकासाठी आपलं महिनाभराचं शेड्युल्ड बदललं. जयललिता यांचाही तसाच बोलबाला होता. सोबत शेकडो क्रू मेंबर्स, वाद्यवृंद आणि जयपूरच्या ज्या लोकेशनवर शुटिंग होणार होतं त्या ठिकाणच्या परवानग्या असं सगळंच बदलावं लागणार होतं. या सगळ्यात एमजीआर यांना एस पी बालासुब्रमण्यम यांचा आवाज असणं महत्वाचं वाटलं. यातच सर्वकाही आलं. ७० च्या दशकात एम.जी. रामचंद्रन, जेमिनी गणेसन, शिवाजी गनेसन अशा अनेक सुपस्टारचा आवाज बालासुब्रमण्यम बनले होते. पी. सुशिला, एस. जानकी, वाणी जयराम, एल. आर. ईस्वरी या दिग्गज गायिकांसोबत त्यांचे ड्युएट गाजू लागले. त्यामध्ये ७०च्या दशकात इलयाराजा या संगीतकाराचा उदय झाला होता. इलायाराजा यांच्यासोबत केलेली अनेक गाणी हिट झाली. ७० चं दशक तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत बालासुब्रमण्यम यांनी गाजवून सोडलं. १९७९ साली 'संकराभारनम' या सांगितीक चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण आपल्या सर्वांना एस. पी. बालासुब्रमण्यम यांची ओळख झाली ती 'एक दुजे के लिए' या सिनेमामुळे. मुकेश, मोहम्मद रफी यांच्यानंतर ८०च्या दशकाच्या सुरूवातीपर्यंत सिनेमांमध्ये किशोर कुमार यांच्या आवाजातल्या गाण्यांचा बोलबाला होता. अशावेळी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं. वर्ष होतं १९८१. तमिळ, तेलुगू सिनेसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक बालाचंदर यांनी आपल्या तेलुगू चित्रपट 'मारो चरित्र' चा हिंदी रिमेक करायचं ठरवलं. त्या सिनेमानचं हिंदी नाव होतं 'एक दुजे के लिए'. सिनेमातलं मुख्य पात्र दक्षिण भारतातलं असल्यानं त्याला हिंदी येत नाही. मग सिनेमातली गाणीही दक्षिणेतल्या गायकानं गावी असा विचार झाला. संगीतकार लक्ष्मिकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधूर संगीतावर एस पी सुब्रमण्यम यांच्या आवाजानं चार चाँद लावले. "तेेरे मेरे बिच मे कैसा है ये बंधन. अंजाना.... तुने नही जाना मैने नही जाना..." किंवा "हम बने तुम बने इक दुजे के लिएं" या गाण्यात i dont know What u say! असं सहज हसत हसत गाणाऱ्या आवाजानं सगळ्यांना प्रेमात पाडलं. दिग्दर्शक बालाचंदर, अभिनेता कमल हासन, रती अग्निहोत्री यांच्यासह अनेकांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. संगीतकार लक्ष्मिकांत प्यारेलाल हे मात्र बालासुब्रमण्यम यांच्या हिंदी उच्चाराबाबत साशंक होते. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बालांच्या आवाजाला लोकांनी खूप पसंत केलं आणि सिनेमाला डोक्यावर घेतलं. प्रेमी जीवांचा विद्रोह दाखवणारा 'एक दुजे के लिए' सिनेसृष्टीतला महत्वाचा टप्पा मानला जातो. सिनेमा सुपरहिट तर झालाच. पण या चित्रपटातील गाण्यांनी नवे कीर्तीमान स्थापित केले. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच वर्षी 'तेरे मेरे बिच मे' या गाण्यासाठी एस. पी. बालासुब्रमण्य यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पहिल्याच हिंदी सिनेमात थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे बालांसाठी सुरेल पोचपावतीच होती. ‘एक दुजे के लिए’ मधल्या गाण्यांनी हिंदी सिनेमाला एस.पी. बालासुब्रमण्यम - लता मंगेशकर अशी ड्युएट जोडी दिली. पुढे या जोडीनं जवळपास दीड दशक गाजवलं. त्यातला पुढचा टप्पा होता 'मैने प्यार किया' 'मैने प्यार किया' हा सलमान खानचा पहिलाच सिनेमा. यात सलमानचा आवाज बनले एस. पी. बालासुब्रमण्यम. सलमान तेव्हा अगदीच कोवळा होता. त्याउलट बाला सरांचा आवाज भारदस्त आणि मॅच्युअर्ड असल्यानं तो योग्य वाटेल का? अशी अनेकांना शंका होती. पण ‘मैने प्यार किया’ सिनेमाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ती गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकरांच्या आवाजानं सजलेल्या या गाण्यांमुळे सलमान खान रातोरात स्टार झाला. "दिल दिवाना बिन सजना के माने ना..... यह पगला है, समझाने से समझें ना....." ‌या गाण्याठी एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदीतला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे अनेक सिनेमांत सलमान खानचा आवाज एस. पी. बालासुब्रमण्यम यांचाच असायचा. सलमानचा सिनेमा सुरू असताना गाणं लागलं तर प्रेक्षकांच्या मनात फक्त बालांचाच आवाज असणार हे समीकरणच झालं होतं. मैने प्यार किया नंतर सलमान खानच्या लव, पत्थर के फुल, साजन, अंदाज अपना अपना, हम आपके है कौन या सिनेमांमध्ये बाला सरांचे जादूई स्वर होते. ‘लव’ आणि ‘पत्थर के फुल’ हे सिनेमे दणकून आपटले. पण लव सिनेमातलं " साथिया..... ये तुने क्या किया.." हे गाणं आजही लहान थोरांच्या ओठावर असतं. हम आपके है कौन मधल्या "भाभी तेरी बहेना को माना, हाय राम कुडियों का है जमाना" हे गाणं आजही युनिव्हर्सल हिट आहे. वंश सिनेमातलं "आके तेरी बाहों मे हर शाम लगे सिंदुरी" हे बाला सरांचं सर्वात लोकप्रिय गाणं. साजन सिनेमातली आर्त आणि मस्तीखोर अशा दोन्ही अंदाजातली गाणी गाण्याचं कसब एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याकडे होते. त्यांनी ते सिद्धही केलं. 1985 साली आलेल्या 'सागर' सिनेमातल्या "युंही गाते रहो, मुस्कुराते रहो.... नाचों रे सब झुंम के गाओ रे.. आओ रे...." हे मस्तीखोर गाणं गाण्यासाठी किशोर कुमार यांच्या तोडीस तोड गायक हवा होता. पण किशोर दांच्या समोर टिकायची हिंमत तेव्हा कोणत्याच गायकात नव्हती. अशावेळी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी ते गाणं गायलं आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली. ‘सागर’ सिनेमात ऋषी कपूर यांना किशोर दा यांनी आवाज दिला, तर कमल हासन यांचा आवाज एस.पी. बालासुब्रमण्यम बनले. सागर सिनेमामधलंच.. सच मेरे यार है, बस वही प्यार है, जिसके बदले में कोई तो प्यार दे, बाकी बेकार है, यार मेरे. हो यार मेरे.. हे गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. 1991 साली मणिरत्न यांच्या 'रोजा' सिनेमात ए. आर. रहमान यांचं संगीत आणि बाला सरांच्या आवाजातली गाणी कोण विसरू शकेल. " रोजा जानेमन......" हा स्वर सिने रसिकांच्या हृदयावर कोरला गेला तो कायमचाच. याव्यतिरिक्त अनेक हिंदी सिनेमांमधून एस. पी. बालासुब्रमण्यम गात होते. पण १९९५-९६ नंतर विशेषतः २० व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना सिने जगतात अनेक बदल झाले. त्याची बरीच कारणं होती. नवीन संगीतकार आले, नवे गायक आले, तंत्रज्ञान बदललं. निर्माते दिग्दर्शक यांचा व्यवहारीपणा वाढला. अशा वातावरणात बाला सर फार रुळले नाही. त्यांनी बॉलिवूडमधली गाणी गाणं बंदच केलं. मात्र तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये ते गात राहिले. अलिकडेच आलेल्या शाहरुख खानच्या 'चेन्नई एकस्प्रेस' सिनेमाचं टायटल सॉन्ग एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी गायलं होतं. आपण एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या गाण्याविषयीच बोलतोय. पण त्यांची प्रतिभा फक्त गाण्यांपुरतीच मर्यादित नाहीय. बाला सर कमल हासनचा तेलुगू आवाज म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कमल हासनचे तमिळ सिनेमे तेलुगूमध्ये बालासुब्रमण्य सरांच्या आवाजातच डब्ड केले जातात. कमल हासनच्या ‘दशावतारम’ या तमिळ सिनेमाचं तेलुगू व्हर्जन एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आलंय. ज्यामध्ये त्यांनी सात वेगवेगळ्या पुरुषांचे आवाज आणि एका स्त्री पात्राचाही आवाज काढला. एवढंच नाही तर एम. जी. रामचंद्रन, गिरीश कार्नाड, अनिल कपूर, के. भाग्यराज, सलमान खान, रजनिकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या आवाजाचं डबिंग बाला सरांनी केलंय. सर बेन केंग्जली यांनी गांधिजींची भूमिका साकारलेल्या 'गांधी' या हॉलिवूडपटाच्या तेलुगू व्हर्जनचा आवाजही एस. पी. बालासुब्रमण्यम यांचाच आहे. गायक आणि डबिंग आर्टिस्ट व्यतिरिक्त एस.पी. बालासुब्रमण्यम हे उत्कृष्ट अभिनेते सुद्धा आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांनी तब्बल ७५ चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केलाय. आयुष्यात आपण काहीही न करता, वेळ नाही अशी ओरड करत असतो. पण हे असं कर्तृत्व बघितल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, कधी केलं असेल या माणसानं हे सगळं! आजच्या घडीला एस.पी. बालासुब्रमण्यम यांच्या नावावर १६ विविध भाषांमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड आहे. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. ६ राष्ट्रीय पुरस्कार, तेलुगू सिनेमातला प्रतिष्ठित नंदी पुरस्कार तब्बल २५ वेळा त्यांनी पटकावलाय. बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्स, साऊथचे सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स, NTR नॅशनल अवॉर्ड, तर २०१६ साली नॅशनल फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. २००१ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २०११ साली पद्म भूषण पुरस्कारानं एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा गौरव करण्यात आला होता. एवढं सगळं भरभरून जगलेल्या माणसाची एक छोटीशी शेवटची इच्छा काय असावी? तर त्यांना शास्त्रिय संगीताची एक मैफल सजवायची होती. या वयातही शास्त्रिय गाणं शिकण्याची त्यांची इच्छा होती हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या तारखेला ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गायलेल्या बालासुब्रमण्यम हे कधीही गाणं शिकलेले नाहीत. गाणं शिकले असता तर आणखी यश मिळालं असतं का? या प्रश्नावर त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. "शास्त्रिय गायक फार शिस्तबद्ध आणि साचेबंद गाणं गात असतात. याऊलट चित्रपट संगीतात नवरसांचा वापर उलट सूलट आणि मजेशीर पद्धतीनं केला जातो. चित्रपट संगीताला कुठलंही बंधन नसतं, उलट नवीन प्रयोगाचं इथे स्वागत केलं जातं. त्यामुळे शास्त्रिय गाणं शिकलो असतो तर कदाचित मी सिनेमाकडे वळलोही नसतो" असं त्यांना वाटायचं. एस. पी. बालासुब्रमण्यम आपल्या कामाविषयी प्रचंड प्रामाणिक होते. त्याचं छोटसं उदाहरण सांगतो. ब्रिदलेस हा प्रकार आपल्याला शंकर महादेवन यांच्यामुळे कळला. पण तमिळ सिनेमा ‘केलादी कन्मणी’ मध्ये बालासुब्रमण्यम यांनी ब्रिदलेस गायल्याची चर्चा रंगली होती. त्यावर काही वर्षांनी त्यांनी स्पष्टिकरण दिलं, की ब्रिदलेस गाणं हे गिम्मिक होतं. तुम्ही श्वास रोखून ठेवू शकता. पण गाताना श्वास रोखणं हे केवळ अशक्य आहे. कोणीही गायक साडे तीन ते चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ श्वास रोखूच शकत नाही. चित्रपटातलं ते ब्रिदलेस गाणं हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. सिने इंडस्ट्रितले लोक प्रेक्षकांना असं नवीन काहीतरी करून आकर्षित करत असतात. मला या सगळ्याचं श्रेय घ्यायचं नाहीय." हे त्यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केलं होतं. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा हाच सच्चेपणा त्यांच्या गाण्यात दिसून आला. आपल्या गायकीवर मोहम्मद रफी यांच्या गायकीचा प्रभाव असल्याचं ते सांगत. रफी साहेबच का तर, त्यांचं गाणं डोळे बंद करून ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर दृश्यं, ते प्रसंग तो रोमान्स अक्षरशः दिसायला लागतो. इंजिनियरींग कॉलेजला असताना रोज सकाळी सायकलवरून जाताना ते रफी साहेबांची गाणी ऐकायचे. कोणीतरी प्रेयसी तुमच्या कानाजवळ येऊन तुम्हाला साद घालतेय की काय असं रफी साहेबाचं गाणं ऐकताना वाटायचं. कारण रफी हे एक सहृदयी व्यक्ती होते. म्हणूनच एक चांगला गायक होण्याआधी तुम्ही एक चांगली व्यक्ती असायला हवं. हे ते सगळ्या गायकांना आवर्जुन सांगायचे. चांगल्या व्यक्तीचा चांगुलपणा कलेतही उतरतो आणि कला बहरत जाते असा त्यांचा विश्वास होता. या विचारांशी बांधील राहून ते जगलेही तसेच. त्यामुळे एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा आवाज हा आपला वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो. भावपूर्ण श्रद्धांजली बाला सर ©अमोल किन्होळकर

nutanm 07/10/2020 - 02:25
छान लेख, एस.पी बद्दल खूप माहिती कळली. s.p.ना श्रद्धांजली.

साथिया... तूने क्या किया. वर्ष होतं सन २०००. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर असताना सर्व क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांची ते भेट घेत होते. लता मंगेशकर यांची मोठ्या आदरानं क्लिंटन यांनी विचारपूस केली. लतादीदींच्या आवाजाची जादू जगभर पसरलेली होतीच, पण त्यासोबतच सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका म्हणून क्लिंटन यांनी लतादीदींचं कौतुक केलं. मात्र लता मंगेशकरांनी क्लिंटन यांना थांबवत तिथे उपस्थित एका गायकाकडे हात करत सांगितलं. " माझ्यापेक्षा जास्त गाणी यांनी गायली आहे." क्लिंटन यांनी त्या गायकाचा हात हातात घेतला. “तुम्ही किती गाणी गायली” ? असं क्लिंटन यांनी विचारल्यावर त्या गायकानं स्मित हास्य करत उत्तर दिलं, "३५ हजार". क्लिंटन यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं, "किती वर्षात?" त्यावर ते म्हणाले “३५ वर्षात..” क्लिंटन यांनी या महान गायकासमोर अक्षरशः हात जोडले. ते गायक होते.. श्रीपती पंडिताराध्युला बालासुब्रमण्यम. अर्थात ज्यांना इंडस्ट्रित प्रेमानं बाला, बालू किंवा एसपीबी म्हटलं जातं ते एस. पी. बालासुब्रमण्यम. करीयच्या ३५ वर्षांत ३५ हजार गाण्यांचं गणित आपल्यासारखी अडाणी माणसं पटकन करतात. मी पण हिशेब लावला. वर्षाला हजार गाणी. दिवसाला साधारण ३ गाणी रेकॉर्ड केली असं म्हणूया. फेब्रुवारी १९८१ मध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी एकाच दिवशी बारा तासात तब्बल २१ गाणी रेकॉर्ड केली. विशेष म्हणजे या २१ गाण्यांपैकी त्यांनी एकाही गाण्याचा सराव केला नव्हता. पहिल्या किंवा फार तर दुसऱ्या टेकमध्ये गाण्याला संगीतकार "ओक्के" म्हणत गेले आणि १२ तासांत २१ गाणी रेकॉर्ड झाली. गाणं गाताना एकाग्रता आणि साधनेतून हे सहज होत गेल्याचं बाला सर सांगायचे. एक काळ तर असा होता की बाला सरांचं दररोज १५ ते २० गाणी रेकॉर्ड करण्याचं रुटिन झालं होतं. हिंदीमध्ये आनंद मिलिंद या संगीतकार जोडीसाठी त्यांनी सलग १६ गाणी रेकॉर्ड केली होती. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा हा गायकीचा प्रवास आणि यश सोपं नव्हतं. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि कामाप्रती निष्ठा होती. मुळात बालासुब्रमण्यम यांना गायक वगैरे व्हायचंच नव्हतं. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म ४ जून १९४६ रोजी आंध्रप्रदेशच्या नेल्लोरमध्ये झाला. बालांचे वडील हरीकथांचे कार्यक्रम करायचे. घरात नाटक, कलेचं वातावरण होतं पण आपल्या मुलानं इंजिनीअर किंवा डॉक्टर होऊन आर्थिक परिस्थिती बदलावी, अशी मध्यमवर्गीय इच्छा त्यांच्या वडीलांची होती. त्यामुळे बालासुब्रमण्यम यांनी अनंतपूरच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र आजारपणामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं. घरची जबाबदारी असल्यानं त्यांनी चेन्नई (मद्रास) मध्ये नोकरी पत्करली. एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा आवाज छान होता. म्हणजे मित्र त्यांचं कौतूक करायचे म्हणून ते स्थानिक गायन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. पण त्याकडे करीअर म्हणून त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. वर्ष १९६४ मध्ये नशिबानं बालासुब्रमण्यम यांना एक संधी दिली. घडलं असं की, चेन्नई (मद्रास)मध्ये बाला ज्या रुममेटसोबत राहात होते. त्यानं बालांचं नाव मद्रासमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेसाठी परस्पर नोंदवून टाकलं. त्यासाठीचे दहा रुपयेही त्यानंच भरले. ही स्पर्धा खूप महत्वाची होती.कारण या स्पर्धेसाठी पी. नागेश्वर राव, घंटसाला आणि दक्षिणामूर्ती हे तेलुगू सिने इंडस्ट्रीतले दिग्गज संगीतकार जजेस म्हणून काम पाहणार होते. या स्पर्धेत एकतर नॉन फिल्मी गाणं गायचं होतं. शिवाय ते तुम्ही लिहून कंपोज केलेलं असावं, अशी अट होती. बाला सरांनी आपलं गाणं सादर केलं आणि ते एका कोपऱ्यात जाऊन इतर मुलांचे पर्फॉर्मन्स बघत बसले. त्याच वेळी बालांजवळ एक व्यक्ती येऊन म्हणाली. "तू खूप छान गायलास. माझ्या पुढच्या सिनेमात तू गाणं गाशील का?" बाला जरा गोंधळून म्हणाले. "अहो मी तुम्हाला ओळखलं नाही. मला माफ करा, मी चित्रपटात वगैरे गाण्याचा कधी विचार केला नाहीय" ती समोरची व्यक्ती म्हणाली. "माझं नाव एस.पी. कोदान्तापानी आहे, मी संगीत दिग्दर्शक आहे." बालासुब्रमण्यम यांनी कोदान्तापानी यांना विनयपूर्वक नकार दिला. "मला माफ करा, माझे वडील खूप कष्ट घेत आहेत. मला इंजिनीअर होऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे." असं सांगून बालासुब्रमण्यम निघून गेले. त्यांनी कोदान्तापानी यांना घरचा पत्ताही दिला नाही. कोदान्तापानीही तेव्हा नवखेच होते. जवळपास वर्ष दीड वर्ष त्यांनी बालासुब्रमण्य यांचा पाठपुरावा करून गाण्यासाठी तयार केलं. शेवटी बालासुब्रमण्यम तयार झाले. आयुष्यात कधीही सिनेमात गाण्याचं स्वप्न बालांनी पाहिलं नाही. मात्र काही स्वप्न तुमचा पाठलाग करत असतात, बाला सरांच्या बाबतीत तेच घडलं होतं. वर्ष १९६६. रेकॉर्डिंगचा दिवस ठरला. चित्रपट होता 'श्री श्री श्री मर्यादा रामन्ना'. प्रॉडक्शन हाऊसची गाडी बालांना घ्यायला येणार होती. पण ती काय आलीच नाही. शेवटी कंटाळून बाला सरांनी सायकलवरून स्टुडिओ गाठला. त्यात चौकीदार त्यांना आत सोडेना. सायकलवरून धापा टाकत आलेला मुलगा "मी गायक आहे, आज माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे" असं म्हणत असेल. तर त्यावर कोण विश्वास ठेवणार?. चौकीदारानं बालासुब्रमण्यम यांना अक्षरशः हकललंच होतं. मात्र तेवढ्यात संगीतकार कोदान्तापानी आले आणि त्यांनी बालांना आत नेलं. त्याकाळी लाईव्ह रेकॉर्डिंग असायचं. शेकडो वाद्यवृंद, संगीतकार, गायक आणि रेकॉर्डिंग करणारी टेक्निकल टीम, क्रू मेंबर्स असा दोन तीनशे जणांचा तामझाम असायचा. बालसुब्रमण्यम यांनी हे असं याआधी कधीच पाहिलं नव्हतं. शिवाय ते ज्यांच्यासोबत गाणार होते. त्या गायिका होत्या सुशिला. ज्यांचं तमिळ, तेलुगू इंडस्ट्रीतल्या टॉपच्या गायिका म्हणून नाव होतं. त्यांच्यासोबत पहिलं गाणं गाण्याची संधी वयाच्या विसाव्या वर्षी एस.पी. बालासुब्रमण्यम यांना मिळाली. काय आश्चर्य पाहा! कसलेले गायकही जिथे एका गाण्यासाठी दिवसभर टेक वर टेक घेतात. तिथे बालासुब्रमण्यम यांनी गायलेल्या गाण्याचा पहिला टेक ओके झाला. इथूनच एस. पी. बालासुब्रमण्यम नावाच्या पर्वाचा सिने जगतातला श्रीगणेशा झाला. बालांना आता अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. घरची जबाबदारी आणि गाणं असा संघर्ष करत असताना त्यांना वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी लग्न करावं लागलं. त्यांची प्रेमकहानी सिनेमातल्या कथांसारखीच रंजक आहे. मद्रासमध्ये बाला ज्यांच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. त्या घरमालकाच्या मुलीसोबतच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. बालांनी मुलीच्या वडिलांकडे लग्नासाठी रीतसर विचारणा केली. पण त्यावेळी जात समान असली तरी, त्यातही गोत्र वगैरे बघितलं जायचं. अपेक्षेप्रमाणे नकार आल्यावर बालासुब्रमण्यम यांनी पळून जाऊन लग्न केलं. मित्रांनी जमवलेल्या ५०० रुपयांत लग्न पार पडलं. तीन चार महिन्यांत सगळ्यांचा राग शांत झाल्यावर ते परत आले. पण सगळं स्थीरस्थावर व्हायला दोन वर्ष गेली. वर्ष १९६९, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या आयुष्यात एक सुवर्णसंधी चालून आली. तमिळ सिनेमात ज्यांच्याशिवाय पानही हलत नव्हतं असे सुपरस्टार भारतरत्न एम. जी. रामचंद्रन आणि तमिळची लेडी सुपरस्टार जयललिता (दोघेही नंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.) यांच्यावर गाणं चित्रित होणार होतं. चित्रपट होता 'आदिमाई पेन्न'. एमजीआर आणि जयललिता यांची लोकप्रियता तेव्हा देवासमान होती. पण एमजीआर मात्र एका नवख्या आवाजाच्या प्रेमात होते. तो आवाज होता एस.पी. बालासुब्रमण्यम यांचा. वय वर्ष २३ असलेल्या कडकडीत आवजाच्या या गायकाला एम.जी रामचंद्रन यांनी बंगल्यावर बोलावलं. " पुढच्या सिनेमात माझ्यावर चित्रित होणारं गाणं तू गावंस अशी माझी इच्छा आहे." अशी विनंती एम. जी. रामचंद्रन यांनी अवघ्या २३ वर्षाच्या एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याकडे केली. करीयरच्या पहिल्याच टप्प्यात एवढ्या मोठ्या व्यक्तीनं अशी ऑफर देणं हे संधीपेक्षाही प्रचंड जबाबदारीचं ओझं होतं. एमजीआर यांनी संगीतकार के.व्ही. माधवन यांची बालांशी भेट घालून दिली. महिनाभरानंतर हेच गाणं जयपूरला चित्रित होणार होतं. तेव्हा रेकॉर्डिंगही सोबतच व्हायचं. एमजीआर यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्नं अनेकांचं असायचं. बालाचं हे स्वप्नं कारकीर्दीच्या पहिल्या दोन वर्षातच पूर्ण होणार होतं. गाण्याची रिहर्सल सुरू झाली. पण अचानक बालांना टायफॉईड झाला. ते अंथरुणातून उठूही शकत नव्हते. ही मोठी संधी आपल्या हातातून जातेय की काय असं वाटत असतानाच स्वत: एम जी रामचंद्रन यांनी बालांचा हात हातात घेत धीर दिला. "बालू काळजी करु नकोस. मी गाण्याचं शूटिंग महिनाभर पुढे ढकलतो. हे गाणं तूच गाणार आहेस, लवकर बरा हो!" प्रश्न गाण्याचं शुटिंग पुढे ढकलण्याचा नव्हता, तर एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्यासारखे सुपरस्टार मंडळी ज्यांचा एक एक मिनिट महत्वाचा असायचा. कारण एम.जी. रामचंद्रन यांच्यावर डीएमके पक्षाची खजिनदार पदाची मोठी जबाबदारी होती. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं अशा व्यक्तीनं एका नवख्या गायकासाठी आपलं महिनाभराचं शेड्युल्ड बदललं. जयललिता यांचाही तसाच बोलबाला होता. सोबत शेकडो क्रू मेंबर्स, वाद्यवृंद आणि जयपूरच्या ज्या लोकेशनवर शुटिंग होणार होतं त्या ठिकाणच्या परवानग्या असं सगळंच बदलावं लागणार होतं. या सगळ्यात एमजीआर यांना एस पी बालासुब्रमण्यम यांचा आवाज असणं महत्वाचं वाटलं. यातच सर्वकाही आलं. ७० च्या दशकात एम.जी. रामचंद्रन, जेमिनी गणेसन, शिवाजी गनेसन अशा अनेक सुपस्टारचा आवाज बालासुब्रमण्यम बनले होते. पी. सुशिला, एस. जानकी, वाणी जयराम, एल. आर. ईस्वरी या दिग्गज गायिकांसोबत त्यांचे ड्युएट गाजू लागले. त्यामध्ये ७०च्या दशकात इलयाराजा या संगीतकाराचा उदय झाला होता. इलायाराजा यांच्यासोबत केलेली अनेक गाणी हिट झाली. ७० चं दशक तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत बालासुब्रमण्यम यांनी गाजवून सोडलं. १९७९ साली 'संकराभारनम' या सांगितीक चित्रपटातल्या गाण्यासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण आपल्या सर्वांना एस. पी. बालासुब्रमण्यम यांची ओळख झाली ती 'एक दुजे के लिए' या सिनेमामुळे. मुकेश, मोहम्मद रफी यांच्यानंतर ८०च्या दशकाच्या सुरूवातीपर्यंत सिनेमांमध्ये किशोर कुमार यांच्या आवाजातल्या गाण्यांचा बोलबाला होता. अशावेळी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं. वर्ष होतं १९८१. तमिळ, तेलुगू सिनेसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक बालाचंदर यांनी आपल्या तेलुगू चित्रपट 'मारो चरित्र' चा हिंदी रिमेक करायचं ठरवलं. त्या सिनेमानचं हिंदी नाव होतं 'एक दुजे के लिए'. सिनेमातलं मुख्य पात्र दक्षिण भारतातलं असल्यानं त्याला हिंदी येत नाही. मग सिनेमातली गाणीही दक्षिणेतल्या गायकानं गावी असा विचार झाला. संगीतकार लक्ष्मिकांत प्यारेलाल यांच्या कर्णमधूर संगीतावर एस पी सुब्रमण्यम यांच्या आवाजानं चार चाँद लावले. "तेेरे मेरे बिच मे कैसा है ये बंधन. अंजाना.... तुने नही जाना मैने नही जाना..." किंवा "हम बने तुम बने इक दुजे के लिएं" या गाण्यात i dont know What u say! असं सहज हसत हसत गाणाऱ्या आवाजानं सगळ्यांना प्रेमात पाडलं. दिग्दर्शक बालाचंदर, अभिनेता कमल हासन, रती अग्निहोत्री यांच्यासह अनेकांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. संगीतकार लक्ष्मिकांत प्यारेलाल हे मात्र बालासुब्रमण्यम यांच्या हिंदी उच्चाराबाबत साशंक होते. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बालांच्या आवाजाला लोकांनी खूप पसंत केलं आणि सिनेमाला डोक्यावर घेतलं. प्रेमी जीवांचा विद्रोह दाखवणारा 'एक दुजे के लिए' सिनेसृष्टीतला महत्वाचा टप्पा मानला जातो. सिनेमा सुपरहिट तर झालाच. पण या चित्रपटातील गाण्यांनी नवे कीर्तीमान स्थापित केले. हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याच वर्षी 'तेरे मेरे बिच मे' या गाण्यासाठी एस. पी. बालासुब्रमण्य यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पहिल्याच हिंदी सिनेमात थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे बालांसाठी सुरेल पोचपावतीच होती. ‘एक दुजे के लिए’ मधल्या गाण्यांनी हिंदी सिनेमाला एस.पी. बालासुब्रमण्यम - लता मंगेशकर अशी ड्युएट जोडी दिली. पुढे या जोडीनं जवळपास दीड दशक गाजवलं. त्यातला पुढचा टप्पा होता 'मैने प्यार किया' 'मैने प्यार किया' हा सलमान खानचा पहिलाच सिनेमा. यात सलमानचा आवाज बनले एस. पी. बालासुब्रमण्यम. सलमान तेव्हा अगदीच कोवळा होता. त्याउलट बाला सरांचा आवाज भारदस्त आणि मॅच्युअर्ड असल्यानं तो योग्य वाटेल का? अशी अनेकांना शंका होती. पण ‘मैने प्यार किया’ सिनेमाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. आजही ती गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकरांच्या आवाजानं सजलेल्या या गाण्यांमुळे सलमान खान रातोरात स्टार झाला. "दिल दिवाना बिन सजना के माने ना..... यह पगला है, समझाने से समझें ना....." ‌या गाण्याठी एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदीतला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पुढे अनेक सिनेमांत सलमान खानचा आवाज एस. पी. बालासुब्रमण्यम यांचाच असायचा. सलमानचा सिनेमा सुरू असताना गाणं लागलं तर प्रेक्षकांच्या मनात फक्त बालांचाच आवाज असणार हे समीकरणच झालं होतं. मैने प्यार किया नंतर सलमान खानच्या लव, पत्थर के फुल, साजन, अंदाज अपना अपना, हम आपके है कौन या सिनेमांमध्ये बाला सरांचे जादूई स्वर होते. ‘लव’ आणि ‘पत्थर के फुल’ हे सिनेमे दणकून आपटले. पण लव सिनेमातलं " साथिया..... ये तुने क्या किया.." हे गाणं आजही लहान थोरांच्या ओठावर असतं. हम आपके है कौन मधल्या "भाभी तेरी बहेना को माना, हाय राम कुडियों का है जमाना" हे गाणं आजही युनिव्हर्सल हिट आहे. वंश सिनेमातलं "आके तेरी बाहों मे हर शाम लगे सिंदुरी" हे बाला सरांचं सर्वात लोकप्रिय गाणं. साजन सिनेमातली आर्त आणि मस्तीखोर अशा दोन्ही अंदाजातली गाणी गाण्याचं कसब एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याकडे होते. त्यांनी ते सिद्धही केलं. 1985 साली आलेल्या 'सागर' सिनेमातल्या "युंही गाते रहो, मुस्कुराते रहो.... नाचों रे सब झुंम के गाओ रे.. आओ रे...." हे मस्तीखोर गाणं गाण्यासाठी किशोर कुमार यांच्या तोडीस तोड गायक हवा होता. पण किशोर दांच्या समोर टिकायची हिंमत तेव्हा कोणत्याच गायकात नव्हती. अशावेळी एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी ते गाणं गायलं आणि सगळ्यांचीच वाहवा मिळवली. ‘सागर’ सिनेमात ऋषी कपूर यांना किशोर दा यांनी आवाज दिला, तर कमल हासन यांचा आवाज एस.पी. बालासुब्रमण्यम बनले. सागर सिनेमामधलंच.. सच मेरे यार है, बस वही प्यार है, जिसके बदले में कोई तो प्यार दे, बाकी बेकार है, यार मेरे. हो यार मेरे.. हे गाणं माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. 1991 साली मणिरत्न यांच्या 'रोजा' सिनेमात ए. आर. रहमान यांचं संगीत आणि बाला सरांच्या आवाजातली गाणी कोण विसरू शकेल. " रोजा जानेमन......" हा स्वर सिने रसिकांच्या हृदयावर कोरला गेला तो कायमचाच. याव्यतिरिक्त अनेक हिंदी सिनेमांमधून एस. पी. बालासुब्रमण्यम गात होते. पण १९९५-९६ नंतर विशेषतः २० व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना सिने जगतात अनेक बदल झाले. त्याची बरीच कारणं होती. नवीन संगीतकार आले, नवे गायक आले, तंत्रज्ञान बदललं. निर्माते दिग्दर्शक यांचा व्यवहारीपणा वाढला. अशा वातावरणात बाला सर फार रुळले नाही. त्यांनी बॉलिवूडमधली गाणी गाणं बंदच केलं. मात्र तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये ते गात राहिले. अलिकडेच आलेल्या शाहरुख खानच्या 'चेन्नई एकस्प्रेस' सिनेमाचं टायटल सॉन्ग एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी गायलं होतं. आपण एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या गाण्याविषयीच बोलतोय. पण त्यांची प्रतिभा फक्त गाण्यांपुरतीच मर्यादित नाहीय. बाला सर कमल हासनचा तेलुगू आवाज म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कमल हासनचे तमिळ सिनेमे तेलुगूमध्ये बालासुब्रमण्य सरांच्या आवाजातच डब्ड केले जातात. कमल हासनच्या ‘दशावतारम’ या तमिळ सिनेमाचं तेलुगू व्हर्जन एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्याच आवाजात रेकॉर्ड करण्यात आलंय. ज्यामध्ये त्यांनी सात वेगवेगळ्या पुरुषांचे आवाज आणि एका स्त्री पात्राचाही आवाज काढला. एवढंच नाही तर एम. जी. रामचंद्रन, गिरीश कार्नाड, अनिल कपूर, के. भाग्यराज, सलमान खान, रजनिकांतपर्यंत अनेक दिग्गजांच्या आवाजाचं डबिंग बाला सरांनी केलंय. सर बेन केंग्जली यांनी गांधिजींची भूमिका साकारलेल्या 'गांधी' या हॉलिवूडपटाच्या तेलुगू व्हर्जनचा आवाजही एस. पी. बालासुब्रमण्यम यांचाच आहे. गायक आणि डबिंग आर्टिस्ट व्यतिरिक्त एस.पी. बालासुब्रमण्यम हे उत्कृष्ट अभिनेते सुद्धा आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांनी तब्बल ७५ चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केलाय. आयुष्यात आपण काहीही न करता, वेळ नाही अशी ओरड करत असतो. पण हे असं कर्तृत्व बघितल्यावर आपल्याला प्रश्न पडतो, कधी केलं असेल या माणसानं हे सगळं! आजच्या घडीला एस.पी. बालासुब्रमण्यम यांच्या नावावर १६ विविध भाषांमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक गाणी गायल्याचं रेकॉर्ड आहे. ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. ६ राष्ट्रीय पुरस्कार, तेलुगू सिनेमातला प्रतिष्ठित नंदी पुरस्कार तब्बल २५ वेळा त्यांनी पटकावलाय. बॉलिवूड फिल्मफेअर अवॉर्ड्स, साऊथचे सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स, NTR नॅशनल अवॉर्ड, तर २०१६ साली नॅशनल फिल्म पर्सनॅलिटी पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. २००१ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २०११ साली पद्म भूषण पुरस्कारानं एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा गौरव करण्यात आला होता. एवढं सगळं भरभरून जगलेल्या माणसाची एक छोटीशी शेवटची इच्छा काय असावी? तर त्यांना शास्त्रिय संगीताची एक मैफल सजवायची होती. या वयातही शास्त्रिय गाणं शिकण्याची त्यांची इच्छा होती हे ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या तारखेला ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गायलेल्या बालासुब्रमण्यम हे कधीही गाणं शिकलेले नाहीत. गाणं शिकले असता तर आणखी यश मिळालं असतं का? या प्रश्नावर त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं. "शास्त्रिय गायक फार शिस्तबद्ध आणि साचेबंद गाणं गात असतात. याऊलट चित्रपट संगीतात नवरसांचा वापर उलट सूलट आणि मजेशीर पद्धतीनं केला जातो. चित्रपट संगीताला कुठलंही बंधन नसतं, उलट नवीन प्रयोगाचं इथे स्वागत केलं जातं. त्यामुळे शास्त्रिय गाणं शिकलो असतो तर कदाचित मी सिनेमाकडे वळलोही नसतो" असं त्यांना वाटायचं. एस. पी. बालासुब्रमण्यम आपल्या कामाविषयी प्रचंड प्रामाणिक होते. त्याचं छोटसं उदाहरण सांगतो. ब्रिदलेस हा प्रकार आपल्याला शंकर महादेवन यांच्यामुळे कळला. पण तमिळ सिनेमा ‘केलादी कन्मणी’ मध्ये बालासुब्रमण्यम यांनी ब्रिदलेस गायल्याची चर्चा रंगली होती. त्यावर काही वर्षांनी त्यांनी स्पष्टिकरण दिलं, की ब्रिदलेस गाणं हे गिम्मिक होतं. तुम्ही श्वास रोखून ठेवू शकता. पण गाताना श्वास रोखणं हे केवळ अशक्य आहे. कोणीही गायक साडे तीन ते चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ श्वास रोखूच शकत नाही. चित्रपटातलं ते ब्रिदलेस गाणं हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. सिने इंडस्ट्रितले लोक प्रेक्षकांना असं नवीन काहीतरी करून आकर्षित करत असतात. मला या सगळ्याचं श्रेय घ्यायचं नाहीय." हे त्यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केलं होतं. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा हाच सच्चेपणा त्यांच्या गाण्यात दिसून आला. आपल्या गायकीवर मोहम्मद रफी यांच्या गायकीचा प्रभाव असल्याचं ते सांगत. रफी साहेबच का तर, त्यांचं गाणं डोळे बंद करून ऐकलं तर आपल्या डोळ्यासमोर दृश्यं, ते प्रसंग तो रोमान्स अक्षरशः दिसायला लागतो. इंजिनियरींग कॉलेजला असताना रोज सकाळी सायकलवरून जाताना ते रफी साहेबांची गाणी ऐकायचे. कोणीतरी प्रेयसी तुमच्या कानाजवळ येऊन तुम्हाला साद घालतेय की काय असं रफी साहेबाचं गाणं ऐकताना वाटायचं. कारण रफी हे एक सहृदयी व्यक्ती होते. म्हणूनच एक चांगला गायक होण्याआधी तुम्ही एक चांगली व्यक्ती असायला हवं. हे ते सगळ्या गायकांना आवर्जुन सांगायचे. चांगल्या व्यक्तीचा चांगुलपणा कलेतही उतरतो आणि कला बहरत जाते असा त्यांचा विश्वास होता. या विचारांशी बांधील राहून ते जगलेही तसेच. त्यामुळे एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा आवाज हा आपला वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो. भावपूर्ण श्रद्धांजली बाला सर ©अमोल किन्होळकर

nutanm 07/10/2020 - 02:25
छान लेख, एस.पी बद्दल खूप माहिती कळली. s.p.ना श्रद्धांजली.
हॅलो SP ... कालच बातमी आली तू आम्हाला सोडून गेल्याची आणि खरं सांगतो तुझा चेहरा आणि आमच्या आठवणीतलं आमचं तारुण्य दोन्हीही पकडीतून निसटून गेलं बघ... बातमी वाचली तेव्हा कुठे कळलं की तू ७४ वर्षांचा होतास. हो कारण या अगोदर आम्ही तुला तुझ्या आवाजामुळे सतत तरुणच समजत होतो. आवाजाला कुठे रे असतं कधी वय? आणि तू जी हिट गाणी दिलीस ना तेव्हा आमचं तारुण्य ऐन भरात होतं त्यामुळे SP कधी म्हातारा होऊच शकत नाही अशी ठाम समजूत झाली होती आमची. मैने प्यार किया (१९८९) पासून तू जो आमच्या तारुण्यात आलास तिथपासून ते हम आपके है कौन (१९९४) पर्यंत म्हणजे आमचं सगळं कॉलेज विश्व तू बरोबर व्यापून राहिलास.

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

नंस न ओढताही आठवत काहीबाही

माहितगार ·
कोविडमुळे नाक-शिंकर-प्राणायाम करताना आठवतं काहीबाही.. 'शिंच्या येणारे, तंबाखू चुना आण 'आऽआऽऽआऽऽआक्षीऽऽऽऽऽ' गाय-छाप!

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

शशिकांत ओक ·

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.