मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २

योगविवेक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

नाडी ग्रंथ भविष्य आणि नवग्रह शांती अर्थात कर्म महात्म्य भाग २

प्रा अद्वयानंद गळतगे

अशा रितीने ग्रहांचा मानवावर प्रभाव पडत नसेल तर नाडी ग्रंथात त्यांची शांती-पुजा करण्यास का सांगितले जाते? (वरील प्रश्नातील दुसरा मुद्दा ) त्या पूजेचा काय उपयोग? ( तिसरा मुद्दा) असे साहजिकच प्रश्न निर्माण होतात. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की ब्रम्हविज्ञानानुसार ग्रहांची शांती-पुजा ही खरे तर त्या व्यक्तीची आपल्याच कर्मांची शांती पुजा असते. ग्रह हे त्या व्यक्तीच्या कर्मांची केवळ प्रतिके (symbols) आहेत. त्या प्रतिकांची शांती-पुजा म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या कर्माची शांती-पुजा असते.

रॅंपेज

आकाश खोत ·
"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम." निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते. "बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना." "अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात." "कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही..

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

अजया ·
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

निकाल (शतशब्दकथा )

खेडूत ·
लेखनप्रकार
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

स्वस्तिक ३ अंतिम भाग

शब्दानुज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुर्वाध - स्वस्तिककडुन सापडलेल्या अोल्या चिठ्ठीवर मला माझ्याच विरहाचा कविता दिसतात. हेच स्वस्तिकला विचारल्यावर त्याकडुन यास अमान्यता. पुण्यालत्या पावसामुळे कागद ओले झाल्याचे म्हणणे. --------------------------------------- दुसर्या दिवशी माझ्या पुण्याच्या मावसभावाचा वाढदिवस होता.सकाळीच मावशिला मी फोन लावला. बाहेर बघितले तर पाऊस चालू झाला होता. "काय ग तिकडे काल खुप पाऊस झाला का? इथेही आत्ता चालु झाला आहे" " पाऊस ? कसाच काय! इकडे आठवडा झाला आभाळ कोरडेच आहे." त्याच क्षणी चिठ्ठी कशामुळे भिजली हे मला कळाले. थोड्यावेळाने कॉलेजला गेलो.

स्वस्तिक २

शब्दानुज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुर्वाध- स्वतिक ,माझा एक मित्र घरी भांडुन घर सोडुन जातो. रात्र्ी स्वताःच पुन्हा पुण्याहुन परततो. मी त्याच्या खिशातुन एक चिठठी हस्तगत करतो ज्यावर माझे नाव असते. -------------------------------------- ती चिठ्ठी अोलसर झालेली होती. त्यामुळेच मला माझ्या नावाची अक्षरे वाचता आली होती. आता सगळ्यांसमोर ती उघडुन वाचत बसलो असतो तर अनर्थ झाला असता. मी ती चिठ्ठी हळुच खिशात ठेवली. स्वस्तिकची आई थोड्यावेळाने बाहेर आली. रडुन रडुन त्या माऊलीने डोळे सुजवुन घेतले होते. त्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलावले. या एवढ्या घोर प्रसंगातही त्यांनी जेवण बनवले होते अगदी स्वस्तिकच्या नावाचेही!

उर्जा घड्याळ

खेडूत ·
कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू. उर्जा म्हणजेच पैसा … त्यामुळे निर्मिती, वितरण, गळती , यातली मोजणी आणि वसुली यात प्रचंड तफावत असते. वीजेच्या वितरणामधून कोट्यावधीचे घोटाळे राजरोसपणे सुरु असतात, '' घोटाळा आवडे सर्वांना '' हे आपलं अघोषित ब्रीदवाक्य असल्यागत सगळं सुरळीत चालू असतं.

मलाही कविता सुचली

दमामि ·
मलाही कविता सुचली मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।। सक्काळी सक्काळी उठून ब्रशला पेस्ट मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। १ ।। आंघोळीसाठी दरवाज्याची कडी मी लावली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। २ ।। हाफिसात निघताना बुटाची लेस मी बांधली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ३ ।। बायकोच्या आज्ञे वरून रात्री भांडी मी घासली आणि काय सांगू चक्क मला कविता सुचली ।। ४ ।। कवी - अथक घासकडवी (माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती . तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )

मन अतर्क्य....

निनाद जोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानवी मन खरंच किती चंचल असतं. मनाचे झालेले समज,मनाने तयार केलेल्या अनेक दिवसांच्या ओळखी पूर्णपणे बदलायला काही क्षणच पुरेसे असतात. आपल्याला सर्वात जवळचा वाटणारा व्यक्ती काही क्षणातच इतका परका होतो कि ज्याच्या बरोबर आपण अनेक गोष्टी शेअर केलेल्या असतात त्याला नुसते समोर पाहायला हि आपल्याला नकोसे वाटू लागते. त्याच्याशी बोलणे तर सोडाचत्याचा आवाज ऐकला तरी आपल्या मनातील कोलाहल जागृत होऊ लागतो. अश्यावेळी मनाला शांतकरणे अगदीच अशक्य होते. हे मनाचे बदलच मानवी मनाला अतर्क्य बनवतात.