Skip to main content

मांडणी

दुष्काळवाडा भाग ८ इन्फ्रास्ट्रक्चरच्या कचाट्यात शेती

लेखक pradnya deshpande यांनी सोमवार, 07/09/2015 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
इन्फ्रास्ट्रक्चरच्या कचाट्यात शेती शेती मोठी धरणे, कालवे आणि प्रक्रिया उद्योगाच्या चर्चा कायम जोरात सुरु असतात. यांच्या होण्याने शेतकऱ्यांना लाभ होईल आणि त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी आशा जागवली जाते. तथापी मराठवाड्यातील शेतीला गरज आहे ती छोट्या छोट्या पायाभूत सुविधांची.

Silence used to grow around him....

लेखक मारवा यांनी सोमवार, 07/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
1 कवी रायनर मारीया रिल्के ची पहीली भेट झाली कवी ग्रेस यांच्या ललित लेखनाच्या वाचनांतुन. तेव्हापासुन त्याच आकर्षण वाटु लागलं, त्याच्या काही कविता मिळवुन वाचल्या पण पहिल्या वाचनातुन काहीच गवसलं नाही, सर्व डोक्यावरुन गेलं.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

दुष्काळवाडा .... भाग ७ हमीचा (अ) भाव

लेखक pradnya deshpande यांनी शनिवार, 05/09/2015 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
हमीचा (अ) भाव कापूस १.‘कापसाला सात हजार रुपये प्रती क्विंटल भाव देणार, उत्पादन खर्चावर आधारीत भाव शेतकऱ्याना मिळतील, अच्छे दिन येणार’- प्रतप्रधान नरेंद्र मोदी, सोलापूरची सभा. २.सत्ता द्या, शेतमालाला भाव देतो’- राज ठाकरे, ९ ऑक्टोबर २०१४. ३.शेतमालाला भाव नाही, अस्मानी संकटात मदत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय- सेनेचे ट्विट दि.

दुष्काळवाडा.. भाग ६ कोरडवाहू मिशनची कुंठीत गती

लेखक pradnya deshpande यांनी शुक्रवार, 04/09/2015 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळवाडा.. भाग ६ कोरडवाहू मिशनची कुंठीत गती दुष्काळ पर्जन्यआधारित पिक रचनेला फाटा, पाण्याची वारेमाप उधळपट्टी, जमिनीचे बिघडलेले आरोग्य यामुळे मराठवाड्यातील दुष्काळाला मानवनिर्मित कारणांची गडद किनार लाभली आहे. केवळ हवामान बदलाचा हा दुष्काळ नाही तो बNयापैकी मनुष्यनिर्मित आहे.मराठवाड्याची मूळ कोरडवाहू भूभाग ही ओळख नाकारुन नगदी पिकाची स्वप्ने पडायला लागली. या स्वप्नांना उभारी देण्यात आल्याने मराठवाडा दुष्काळी गर्तेत लोटला गेला.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादीत पुस्तके सुचवा.

लेखक जेपी यांनी गुरुवार, 03/09/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, या धाग्यावर इतर भारतीय भाषांमधुन मराठीत अनुवादित पुस्तके सुचवावी ही विनंती. भारतीय लेखकांची इंग्रजीतुन मराठीत अनुवादित पुस्तकेही चालतील. धन्यवाद. प्रतिसादातुन भर टाकेन.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

दुष्काळवाडा ... भाग ६ घुसमट श्रावणाची……..

लेखक pradnya deshpande यांनी गुरुवार, 03/09/2015 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
घुसमट श्रावणाची…….. shravan आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षाऋूतू तरी काळ्या ढेकाळांच्या गेला गंध भरुन कळ्यात काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत कविवर्य बा.सी.मर्ढेकरांनी श्रावणाचे केलेले हे वर्णन प्रत्येक वर्षी श्रावण आला आठवत राहते. श्रावणाचे हे मोहक रुप कथा कादंबऱ्या, कवितांमधून वाचताना होणारा आनंद कुठे हिरावलाय कोण जाणे? श्रावण सरी कुठे लोप पावल्या?

दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 02/09/2015 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ दुष्काळवाडा...... भाग ५ काठोकाठ भरू द्या प्याला बियर लेखाचे शीर्षक वाचल्यावर कदाचित मराठवाड्यातील पाणी टंचाईवर आजचा लेख असणार असे वाटण्याची शक्यता आहे. तसे नाही. मी येथे चर्चा करणार आहे ती मद्याची. अर्थात औरंगाबादमधील बियर इंडस्ट्रीची.