मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धुकट सकाळ

धनंजय ·

सहज 02/02/2009 - 08:46
पण पांस्थस्ताने जसे मिपावर पाकृ चित्रमय करुन टाकले तसे कविता आता धनंजय नादमय / श्राव्य करणार. मनासज्जनाचा ठेका लावुन हे शब्द म्हणायचे काही झेपले नसते. :-) बाकी कवीता वगैरे काय ते जाणकार सांगतील.

In reply to by सहज

धनंजय 02/02/2009 - 09:05
पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली मला आठवेना तुला आठवेना कशी रात्र गेली कुणाला कळेना ... (कवी : सुरेश भट) हेसुद्धा भुजंगप्रयातातच आहे. हे वृत्त खूप लोकांनी वापरले आहे, वेगवेगळ्या "विषया"बाबतही... पण बर्‍याच लोकांची याची पहिली ओळख मनाच्या श्लोकांमधून होते. "वाद" मात्रा मोजण्याबाबत आहे - मी मेट्रोनोम लावून दाखवले आहे की वृत्त कटेकोरपणे पाळले आहे. (मागच्या कवितेच्या बाबतीत वृत्त पाळले नव्हते, अशी शंका व्यक्त झाली होती.)

या धनंजयाने सकाळी सकाळी आमची फ्रिक्वेन्सीच बदलली. अगोदर चित्र पाहिले. मग कविता वाचली. मग कविता ऐकली. तसा कविता आमचा प्रांत नाही. पण पहाणे ,वाचणे, ऐकणे या क्रमाने गेल्यावर आमच्यातला बदल आम्ही टिपत गेलो. चि. बिट्टुभुभु प्रकाश घाटपांडे याचा आज प्रथम स्मृती दिन. स्मृतींच्या असंख्य पोकळ्या मनात फेर धरुन होत्या. डॉक्टरांनी त्याला शांत मृत्युसाठी इ़ंजेक्शन दिले. माझ्याकडे बघता बघता त्याचे डोळे निष्प्राण झाले. डॉक्टरांनी त्याच्या पापण्या मिटवल्या. हुंदका आवरला नाही. टंकतानाही आवरत नाही.
नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी असेल का? विचारून शहारलो मनात मी
शहारलो मनी मी अधिक नादमय वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रमोद देव

धनंजय 02/02/2009 - 10:43
मेट्रोनोमच्या टाळ्या बरोबर लगागा | लगागा | लगागा | लगागा वरती येत आहेत. (दुसरी ओळ) अकल्पीज्ज़शीगूढ्पिशाच्चेयसावीत् (मेट्रोनोमशिवायच्या, आणि मेट्रोनोमबरोबरच्या, दोन्ही वाचनांत मी उच्चार असाच केला आहे.) तुम्ही या मराठी वाक्याचा यावेगळा उच्चार कराल काय? (येथे मेट्रोनोम, आणि "गा"वर टाळी "लगागा | लगागा | ", हे कालमापन करण्यासाठी आहेत, आघातस्वर [सम] सांगण्यासाठी नव्हेत) मना सज् | जना भक् | तिपंथे | चिजावे असे आघातस्वर मराठीत त्या ठिकाणी येत नाहीत. तसेच : अल्पीज् | ज़शीगूढ् | पिशाच्चे | यसावीत् सुरेश वाडकर यांच्या "पहाटे पहाटे तुला जाग आली" गाण्यात सम (आघातस्वर) अशा तीन-तीन अक्षरांवर येत नाही, कधी 'ल' वर येते, तर कधी 'गा' वर येते. अक्षरांना दिलेल्या टाळ्याही कमी-जास्त लांबीच्या आहेत.
Get this widget | Track details | eSnips Social DNA

In reply to by धनंजय

प्रमोद देव 02/02/2009 - 11:06
त्यामुळे तुम्ही केलेला खुलासा डोक्यावरून गेला. त्याबद्दल माफी असावी. पण मी जसे मनाचे श्लोक पाठ केलेले होते त्या चालीत आणि ठेक्यात मात्र , दुसर्‍या चारोळीतलली दुसरी आणि चौथी ओळ मला म्हणता येत नाहीये. तिथे फारच ओढाताण होतेय.

विसोबा खेचर 02/02/2009 - 09:33
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी असेल का? विचारून शहारलो मनात मी लूक! नाऊ धीस इज धनंजय'ज कविता..! यू सी..! :) जबरा कविता रे धन्या. तुझ्याकडून अश्याच कविता मला अपेक्षित आहेत.. कविता वाचनही क्लास, अगदी नाट्यमय.. धन्या, तुझं कविता वाचन विशेष सुंदर असतं! तात्या.

विसुनाना 02/02/2009 - 11:03
कविता आवडली. का..? वगैरे ते सांगणार नाही. गरज नसली तरीही काही बदल सुचवतो. न पटल्यास का..? वगैरे ते सांगावे. धुकट सकाळ *** किती बर्फ पडला पहाटे बघितला आसमंत हा स्तब्ध नि:शब्द झाला सुटीच्या सकाळी असावा तसा हा दिसे गप्प रस्ता रिकामा रिकामा * धुराड्यांतून फुटती धुमारे धुराचे जशी गूढ धूसर असावी पिशाच्चे नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी आहे का? विचारून शहारे मनी मी

In reply to by विसुनाना

धनंजय 02/02/2009 - 11:57
> किती बर्फ पडला पहाटे बघितला ठीक > आसमंत हा स्तब्ध नि:शब्द झाला वृत्तभंग - "आसमंत" याचा काय उच्चार अपेक्षित आहे? "आस्मंत" - काही का असेना "आ" दीर्घ आहे, आणि प्रथम अक्षर लघू हवे. > सुटीच्या सकाळी असावा तसा हा ठीक > दिसे गप्प रस्ता रिकामा रिकामा ठीक * > धुराड्यांतून फुटती धुमारे धुराचे वृत्तभंग. लगागा असे हवे. > जशी गूढ धूसर असावी पिशाच्चे उच्चार कसा अपेक्षित आहे? "जशी गूढ्धूसर्रसावी पिशाच्चे" असा उच्चार आहे का? असे असल्यास अधोरेखित खंडाच्या आधी एक लघू अक्षर कमी पडते आहे. > नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी (हे बदललेले नाही) > आहे का? विचारून शहारे मनी मी वृत्तभंग - सुरुवातीचे अक्षर लघू हवे. अर्थात, तुम्ही जिथे बदल केला आहे, शैली वेगळी आहे. काही ठिकाणी अर्थ बदलला आहे. त्यामुळे वेगळी कविता म्हणून त्यात काहीच दोष नाही. १. "आसमंत" म्हणजे आजूबाजूचा प्रदेश; वातावरण म्हणजे "आजूबाजूचे" पण "हवेचे आवरण" हा अर्थ अधिक स्पष्ट असतो. (म्हणजे "आसमंत" स्वतंत्र अर्थ म्हणून चुकला असे मुळीच म्हणायचे नाही. तुम्हाला तेच दृश्य बघून तो मथितार्थ वाचकाला सांगायचा असेल. २. धुराड्यांवरून धुमारे धुराचे हा अनुप्रास छान साधला आहे धुमारा म्हणजे झाडाला फुटलेला [मोठा] कोंभ. हे नवे रूपक तुम्ही वापरायचे ठरवले. धुमारा हा साधारणपणे चांगला असतो. त्याला पुढे पिशाच्च म्हणून आणखी एक उपमा देऊन तुम्हाला विरोधाभास अधिक गडद करायचा असेल. (पण मला सुरुवातीपासूनच "आकृती" ठेवून एकच "पिशाच्च" ही उपमा द्यायची आहे. माझ्या पूर्ण कवितेत फक्त एकच उपमा आहे, तीच उत्प्रेक्षा पद्धतीने रंगवली आहे, हे लक्षात आलेच असेल.) ३. "आहे का?"/"असेल का?" हे अर्थ वेगवेगळे आहेत. त्यामुळे कुठला चुकला आहे, असे म्हणायचे नाही. ४. मनी मी/ मनात मी : माझ्या (या) कवितेत पूर्णपणे आधुनिक शब्दप्रयोग वापरायचे मी ठरवले आहे. म्हणजे वाटल्यास साधा संवाद म्हणून ती वाचता यावी. पण तुम्ही मनीं हा काव्य-किंवा-पुराणमराठी प्रयोग वापरण्यास काहीच हरकत नाही. (म्हणूनच 'मी शहारे', 'धुमारे फुटती' हे प्रयोग मी [या कवितेत] वापरले नसते [अन्यत्र वापरेनही], पण तुम्ही वापरण्यास काहीच हरकत नाही.) पण काही बदल समजले नाहीत. मला अनेक रस्ते रिकामे दिसलेत, बदललेल्या कवितेत एकच दिसतो - चूक बरोबर कुठलेच नाही, पण हा बदल कशासाठी केला असावा? "अकल्पित"च्या ऐवजी "धूसर" पिशाच्चे का बदलली असावीत? "अकल्पित" मधली स्वतःची भलावणी करण्याची प्रवृत्ती तुम्हाला पटली नाही का? (भित्यापाठचा ब्रह्मराक्षस खरेच अकल्पित नसतो, पण त्या व्यक्तीला विचारल्यास "छे, मुद्दामून का हवी मला भीती" असेच मनापासून म्हणतो.) त्या मानाने "धूसर पिशाच्चे" मागची कथा वेगळी काही असावी. अशा प्रकारे, तुमची कविता वेगळे अर्थ आणि संदर्भ घेऊन येते. ते ठीकच आहे. त्यामुळे "पटले नाही" असे मुळीच म्हणत नाही (वृत्तभंग सोडला तर).

In reply to by धनंजय

विसुनाना 02/02/2009 - 13:10
अनेक कल्पना शब्दात मांडताना सर्वात योग्य अर्थछटा असलेले शब्द केवळ अक्षरगणवृत्तात बसत नाहीत म्हणून बदलावे लागतात. त्यामानाने मात्रावृत्ते थोडी सुटसुटीत आहेत. गेयतेलाही धक्का लागत नाही. परंतु प्रयोग म्हणून भुजंगप्रयात अथवा मंदाक्रांता यासारख्या पारंपारिक वृत्तात आधुनिक (पक्षी असंस्कृतोद्भव) शब्द वापरणे हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग रियालिस्टीक पद्धतीने केल्यासारखे वाटते. (मागे एका चर्चेत तुम्ही नवी कवितांत लगक्रम कसा ठरवावा याबद्दल नवे विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता.) आधुनिकतेला (आधुनिक शब्दांना) योग्य न्याय द्यायचा असेल आणि तरीही कवितेची लय सांभाळायची असेल तर यमक अष्टाक्षरी उत्तम. (पायलॉन्स, फलाटदादा, पंक्चरली - असे शब्दही सहज वापरता येतील.)
माझ्या (या) कवितेत पूर्णपणे आधुनिक शब्दप्रयोग वापरायचे मी ठरवले आहे. म्हणजे वाटल्यास साधा संवाद म्हणून ती वाचता यावी.
असे असेल तर मुक्तछंदात का लिहू नये? मुक्तछंदात लयबद्ध आधुनिकता आहे. गेयता हा निकष न लावता केवळ अर्थ थेट पोहोचवणारे शब्द वापरता येतील.

In reply to by विसुनाना

श्रावण मोडक 02/02/2009 - 15:46
ठेका, वृत्त, ताल वगैरेच्या पलीकडे दोन्ही रचना स्वतंत्रपणे आवडल्या. दोन्हीमध्ये गुणगुणतांना काही छोट्या जागा धोका देतात, पण ते ठीक आहे.

In reply to by विसुनाना

धनंजय 02/02/2009 - 22:08
बरोबर आहे. म्हणून या प्रकारची पहिली कविता "अजूनही प्रेम तसेच आहे का?" ६ | ६ (यमक) | ६ (यमक) | ४ या छंदात रचली होती. मला वाटते, एखादी कविता सुचताना सुरुवातीला एखादी लय मनाची पकड घेते. मग अक्षर-छंद असो, की मात्रा-वृत्त, ते जे काय मनाची पकड घेते, ते वापरावे.
"मुक्तछंदात का लिहू नये?"
जरूर लिहावे. पण मुक्तछंदातच लिहावे असा काही नियम नाही. वाटल्यास साधा संवाद म्हणून वाचता यावी. असे दुहेरी लिहायची पद्धत प्राचीन काळापासून प्रचलित आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत, संजय? हे साधा संवाद म्हणून हेल देऊन सहज वाचता येते. आणि अनुष्टुभ् श्लोकासाठी तुमची काही विशिष्ट चाल असेल, तर त्या चालीत आळवता येते. आणि बरोबर आहे, मर्ढेकरांमुळे असे लिहिण्याचे मी धाडस केले. ते एका कवितेत लिहितात : दण्.कट दंडस्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग ... (इथे त्यांनी मात्रावृत्त वापरले आहे, हे लक्षात येईलच. बाकी सर्व ठिकाणी संवादासारखे किंवा पुराणमराठी शैलीने वाचले तरी चालते : "वळ्ळे" किंवा " ले" दोन्हींनी लय जमते पण दण्.कटकिंवा मध्ये लयीत फरक पडतो. पैकी कवीला कुठला एकच उच्चार अभिप्रेत आहे, ते कवीला स्पष्ट सांगायचे आहे. म्हणूनच कवीने नेहमीपेक्षा वेगळा असा तो शब्द लिहिला आहे.

In reply to by धनंजय

पुष्कर 05/02/2009 - 13:29
मर्ढेकरांच्या लाडूत 'दणकट' हा शब्द बेदाण्यासारखा वाटतो. तुम्ही मात्र बेदाण्यांचाच लाडू केलेला दिसतो. असो. मात्रांमध्ये बोली शब्द बसवण्याचे अतिस्वातंत्र्य असले तरी प्रयोग म्हणून चांगले आहे.

In reply to by पुष्कर

धनंजय 05/02/2009 - 21:41
नेहमीच्या बोलण्यातले उच्चार लयबद्ध स्वरूपात पूर्ण कविता रचणे हे गेले काही दशके होत आहे. हल्लीच मिसळपावावर "देणार्‍याचे हात घ्यावे" हा लेख आला. करंदीकरांच्या त्या कवितेतील एक कडवे येथे देत आहे : उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी; भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी याचा उच्चार नेहमीच्या बोलण्याप्रमाणे केला तर्च लय साधते, प्रत्येक अक्षर लिहिल्याप्रमाणे मात्रा देऊन उच्चारले तर लय बिघडते. उच्चार असाच करावा लागतो : उसळ्.लेल्या दर्याकडून् पिसाळ्.लेली आयाळ् घ्यावी; भर्.लेल्याश्या भीमेकडून् तुकोबाची माळ् घ्यावी असा उच्चार केला तर विचित्र वाटते : उसळऽलेल्या दर्याकडूनऽ पिसाळऽलेली आयाळऽ घ्यावी; भरऽलेल्याश्या भीमेकडूनऽ तुकोबाची माळऽ घ्यावी मंगेश पाडगांवकरांच्या बहुतेक कविता तशाच असतात. परंतु त्या कवितांच्या छंद-शास्त्रात आघातस्वरांची संख्या प्रत्येक ओळीमधे ठरलेली असते. येथे मात्र मी मात्रांचा क्रम राखला आहे, इतकेच काय नवीन आहे. बेदाण्यांचा लाडू असे न म्हणता मी "पोह्यांचा लाडू" म्हणेन. गोडमिट्ट (नेहमीच्या जेवणापेक्षा गोड) अशा बेसनाच्या लाडवात कोणी कुरकुरीतपणासाठी थोडेसे पोहे घालतात. पण थोडेच गोड असे पोह्यांचे लाडूसुद्धा करता येतात. कधी बेसनाचा लाडू खावा, कधी पोह्याचा लाडू खावा... कविता बोलीच (ध्वन्याश्रित) असली पाहिजे, लेखी "शुद्धलेखनाच्या नियमांच्या मात्रा" गौण असतात, हा विचारही नवीन नव्हे. मराठीत अनाघात जोडाक्षराच्या आधीचे ह्रस्व लघूच राहाते, "जोडाक्षरा-आधीचे" म्हणून उगाच गुरू होत नाही. तर्‍हेचा = लगागा तर्रीचा = गागागा लयीत लिहिण्या-वाचण्याचा सराव असलेला कोणीही मात्रा अशाच मोजेल.

सुक्या 02/02/2009 - 11:18
तसं मला कविता अन् नाद / मात्रा वगेरे काही कळत नाही. सहज म्हनुन 'पहाटे पहाटे मला जाग आली' च्या चालीवर ही कवीता म्हनुन पाहीली (मनातच. मी गायला लागल्यावर सगळे दचकतात). सुंदर जमलीय. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

फुस्स 02/02/2009 - 12:30
असेल्का विचारुन्शहार्लोमनात्मी जसे म्हटले आहे तसे लिहिले असते तर अर्थच कळला नसता. शेवटची ओळ सुधारायला हवी. च्या मारी. चांगल्या कवितेची वाट लागत्ये फूटपट्टीने मोजमापे घेऊन. कविता चांगलीच आहे.

दशानन 02/02/2009 - 13:24
बापरे किती ही चिरफाड =)) मस्त कविता ! आपल्याला तर आवडली बॉ... ते छंद / राग / यमक काही समजत नाहि.. पण मनाला भावली म्हणजे आवडली हा एकच नियम माहीत आहे. *******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

In reply to by दशानन

फुस्स 02/02/2009 - 13:37
सहमत. जेव्हा कविता आवडते तेव्हा ते ताल छंद वगैरे बाजूला ठेवायला हरकत नाही. धनंजय यानी ते मेट्रो.. का काय ते इथे आणले नसते तर कदाचित एवढी चिरफाड झाली नसती.

>> नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी असेल का? विचारून शहारलो मनात मी या ओळी तर खासच आहेत धनंजय. कविता अजून ऐकू शकलो नाहीये पण जमेल तेव्हा लगेच ऐकीन.

चतुरंग 02/02/2009 - 21:44
एका धुकट, बर्फाळ सकाळच्या कुंद वातावरणात तुला सुचलेली ही कविता भुजंगप्रयातात आणि लयीत बसवण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. अभिनंदन! चतुरंग

बेसनलाडू 02/02/2009 - 22:14
कविता चांगली वाटली. दुसर्‍या कडव्यातील कल्पना विशेष भावली नि पहिल्या कडव्यातील साधेपणा आणि/किंवा चित्रमयता. मात्रावृत्त, गेयतादी बाबींबद्दल सध्या तरी चर्चा करावीशी वाटत नाही; मात्र मात्रावृत्त गेयसुलभतेच्या दृष्टीने कल्पकतेने वापरण्याचा, त्यांच्या सुटसुटीतपणाबद्दलचा विसुनानांचा मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा वाटला. (वृत्तबद्ध)बेसनलाडू

लिखाळ 02/02/2009 - 22:23
कवितेतली पिशाच्चाची कल्पना आवडली. कविता मनात रुंजी घालत राहिल अशी नाही. विसूनानांनी बनवलेली आवृत्ती अधीक चांगली वाटली. कविता वाचन छानच :) -- लिखाळ.

सुवर्णमयी 02/02/2009 - 22:26
कवितेतला पंच माझ्यापर्यंत पोहोचला नाही. कविता चित्रदर्शी असली तरी ही कविता आधीच्या कवितांच्या तुलनेत कमी पडते असे मला वाटले. (इथे बर्फाळलेली सकाळ इत्यादी मी पाहिले आहे. त्यामुळे अपेक्षा उंचावली असेल.) आधुनिक कल्पना आणि शब्दाकरता भुजंगप्रयात इतर वृत्तांपेक्षा सोपे ठरावे. कवितेची फेरमांडणी धनंजय नक्की करू शकतील . ( मात्रावृत्त आणि मुक्तछंद हे नंतरचे पर्याय- त्याची गरज पडेल असे वाटत नाही. )

In reply to by सुवर्णमयी

विसोबा खेचर 02/02/2009 - 22:50
आधुनिक कल्पना आणि शब्दाकरता भुजंगप्रयात इतर वृत्तांपेक्षा सोपे ठरावे. कवितेची फेरमांडणी धनंजय नक्की करू शकतील . हम्म! च्यामारी आता आमच्या धन्याला कविता कशी करावी हेही तूच शिकव! :) (एक्स मनोगती) तात्या.

छान कविता. आवडली. आणि घाटपांडेकाकांचा प्रतिसाद मनाला चटका लावून गेला. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

रामदास 02/02/2009 - 23:50
प्रांत नसल्यामुळे त्याबद्दल काही बोलू शकत नाही.मला कविता आवडली.मुक्तकासारखी असती तरी आवडली असती. अवांतरःधुक्याचा पडदा नेहमीच गूढ वाटतो.(अर्थात आमच्याकडे मुंबईत धुके पडणार ते काय ?) त्यामुळे शॉवर कर्टनवरचे धुके माझ्या कल्पनाशक्तीला आव्हान देते.

मीनल 03/02/2009 - 00:09
चित्र पहायला मिळण , कविता वाचायला मिळण आणि मग ती ऐकायला ही मिळण .... एकूणच सर्व मस्त आहे. शिवाय त्या कविता लेखनाच्या विषयी माहिती .... मला अश्या लोकांचा हेवा वाटतो. कस काय जमत सगळ? ग्रेट. कविते बद्दल ... कल्पना मस्त आहे. पण वाटत की ती मात्रा,वृत्त त्या मुळे सहज झाली नाही. कल्पना ओढून ताणून शब्दात बसवल्यासारखी वाटते. मी हे ही मान्य करते की मला हे जमत नाही. कल्पनाच येत नाही .ओढाताण तिथ पासूनच सुरू होती. त्यामुळे मला दुस-यांचे कौतुक वाटते. मीनल.

प्राजु 03/02/2009 - 00:18
कविता आणि त्यावरची चर्चा.. दोन्ही इंटरेस्टींग. कविता गूढ आहे.. पण कल्पना सुंदर आहे. दुसरे कडवे थोडे खेचा खेची केल्यासारखे वाटते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 03/02/2009 - 00:40
चाचणी प्रतिसाद.. सभासदांच्या 'प्रतिसाद टाकता येत नाही..' या तक्रारीनुसार हा चाचणी प्रतिसाद. क्षमस्व.. तात्या.

ऋषिकेश 23/02/2010 - 09:33
कविता चांगली.. दुसरे कडवे काहिसे फसले आहे (त्यावरचे एक्प्लनेशन वाचले पण कळले नाहि) ह्या प्रमोदकाकांच्या मताशी सहमत ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

sur_nair 25/02/2010 - 06:57
पदार्धाची चव अनुभवण्यापेक्षा recipe पाळली का नाही याची चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आवडलं तर खावं नाहीतर नको म्हणावं आणि पचेल ते खावं. बंधनांच्या चौकोनातच सदैव बसवायचे ठरवले तर नवीन कलाविष्कार वगैरे कधी शक्यच नाही होणार, मग ते काव्य असो वा पाककला.

सहज 02/02/2009 - 08:46
पण पांस्थस्ताने जसे मिपावर पाकृ चित्रमय करुन टाकले तसे कविता आता धनंजय नादमय / श्राव्य करणार. मनासज्जनाचा ठेका लावुन हे शब्द म्हणायचे काही झेपले नसते. :-) बाकी कवीता वगैरे काय ते जाणकार सांगतील.

In reply to by सहज

धनंजय 02/02/2009 - 09:05
पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली मला आठवेना तुला आठवेना कशी रात्र गेली कुणाला कळेना ... (कवी : सुरेश भट) हेसुद्धा भुजंगप्रयातातच आहे. हे वृत्त खूप लोकांनी वापरले आहे, वेगवेगळ्या "विषया"बाबतही... पण बर्‍याच लोकांची याची पहिली ओळख मनाच्या श्लोकांमधून होते. "वाद" मात्रा मोजण्याबाबत आहे - मी मेट्रोनोम लावून दाखवले आहे की वृत्त कटेकोरपणे पाळले आहे. (मागच्या कवितेच्या बाबतीत वृत्त पाळले नव्हते, अशी शंका व्यक्त झाली होती.)

या धनंजयाने सकाळी सकाळी आमची फ्रिक्वेन्सीच बदलली. अगोदर चित्र पाहिले. मग कविता वाचली. मग कविता ऐकली. तसा कविता आमचा प्रांत नाही. पण पहाणे ,वाचणे, ऐकणे या क्रमाने गेल्यावर आमच्यातला बदल आम्ही टिपत गेलो. चि. बिट्टुभुभु प्रकाश घाटपांडे याचा आज प्रथम स्मृती दिन. स्मृतींच्या असंख्य पोकळ्या मनात फेर धरुन होत्या. डॉक्टरांनी त्याला शांत मृत्युसाठी इ़ंजेक्शन दिले. माझ्याकडे बघता बघता त्याचे डोळे निष्प्राण झाले. डॉक्टरांनी त्याच्या पापण्या मिटवल्या. हुंदका आवरला नाही. टंकतानाही आवरत नाही.
नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी असेल का? विचारून शहारलो मनात मी
शहारलो मनी मी अधिक नादमय वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रमोद देव

धनंजय 02/02/2009 - 10:43
मेट्रोनोमच्या टाळ्या बरोबर लगागा | लगागा | लगागा | लगागा वरती येत आहेत. (दुसरी ओळ) अकल्पीज्ज़शीगूढ्पिशाच्चेयसावीत् (मेट्रोनोमशिवायच्या, आणि मेट्रोनोमबरोबरच्या, दोन्ही वाचनांत मी उच्चार असाच केला आहे.) तुम्ही या मराठी वाक्याचा यावेगळा उच्चार कराल काय? (येथे मेट्रोनोम, आणि "गा"वर टाळी "लगागा | लगागा | ", हे कालमापन करण्यासाठी आहेत, आघातस्वर [सम] सांगण्यासाठी नव्हेत) मना सज् | जना भक् | तिपंथे | चिजावे असे आघातस्वर मराठीत त्या ठिकाणी येत नाहीत. तसेच : अल्पीज् | ज़शीगूढ् | पिशाच्चे | यसावीत् सुरेश वाडकर यांच्या "पहाटे पहाटे तुला जाग आली" गाण्यात सम (आघातस्वर) अशा तीन-तीन अक्षरांवर येत नाही, कधी 'ल' वर येते, तर कधी 'गा' वर येते. अक्षरांना दिलेल्या टाळ्याही कमी-जास्त लांबीच्या आहेत.
Get this widget | Track details | eSnips Social DNA

In reply to by धनंजय

प्रमोद देव 02/02/2009 - 11:06
त्यामुळे तुम्ही केलेला खुलासा डोक्यावरून गेला. त्याबद्दल माफी असावी. पण मी जसे मनाचे श्लोक पाठ केलेले होते त्या चालीत आणि ठेक्यात मात्र , दुसर्‍या चारोळीतलली दुसरी आणि चौथी ओळ मला म्हणता येत नाहीये. तिथे फारच ओढाताण होतेय.

विसोबा खेचर 02/02/2009 - 09:33
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी असेल का? विचारून शहारलो मनात मी लूक! नाऊ धीस इज धनंजय'ज कविता..! यू सी..! :) जबरा कविता रे धन्या. तुझ्याकडून अश्याच कविता मला अपेक्षित आहेत.. कविता वाचनही क्लास, अगदी नाट्यमय.. धन्या, तुझं कविता वाचन विशेष सुंदर असतं! तात्या.

विसुनाना 02/02/2009 - 11:03
कविता आवडली. का..? वगैरे ते सांगणार नाही. गरज नसली तरीही काही बदल सुचवतो. न पटल्यास का..? वगैरे ते सांगावे. धुकट सकाळ *** किती बर्फ पडला पहाटे बघितला आसमंत हा स्तब्ध नि:शब्द झाला सुटीच्या सकाळी असावा तसा हा दिसे गप्प रस्ता रिकामा रिकामा * धुराड्यांतून फुटती धुमारे धुराचे जशी गूढ धूसर असावी पिशाच्चे नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी आहे का? विचारून शहारे मनी मी

In reply to by विसुनाना

धनंजय 02/02/2009 - 11:57
> किती बर्फ पडला पहाटे बघितला ठीक > आसमंत हा स्तब्ध नि:शब्द झाला वृत्तभंग - "आसमंत" याचा काय उच्चार अपेक्षित आहे? "आस्मंत" - काही का असेना "आ" दीर्घ आहे, आणि प्रथम अक्षर लघू हवे. > सुटीच्या सकाळी असावा तसा हा ठीक > दिसे गप्प रस्ता रिकामा रिकामा ठीक * > धुराड्यांतून फुटती धुमारे धुराचे वृत्तभंग. लगागा असे हवे. > जशी गूढ धूसर असावी पिशाच्चे उच्चार कसा अपेक्षित आहे? "जशी गूढ्धूसर्रसावी पिशाच्चे" असा उच्चार आहे का? असे असल्यास अधोरेखित खंडाच्या आधी एक लघू अक्षर कमी पडते आहे. > नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी (हे बदललेले नाही) > आहे का? विचारून शहारे मनी मी वृत्तभंग - सुरुवातीचे अक्षर लघू हवे. अर्थात, तुम्ही जिथे बदल केला आहे, शैली वेगळी आहे. काही ठिकाणी अर्थ बदलला आहे. त्यामुळे वेगळी कविता म्हणून त्यात काहीच दोष नाही. १. "आसमंत" म्हणजे आजूबाजूचा प्रदेश; वातावरण म्हणजे "आजूबाजूचे" पण "हवेचे आवरण" हा अर्थ अधिक स्पष्ट असतो. (म्हणजे "आसमंत" स्वतंत्र अर्थ म्हणून चुकला असे मुळीच म्हणायचे नाही. तुम्हाला तेच दृश्य बघून तो मथितार्थ वाचकाला सांगायचा असेल. २. धुराड्यांवरून धुमारे धुराचे हा अनुप्रास छान साधला आहे धुमारा म्हणजे झाडाला फुटलेला [मोठा] कोंभ. हे नवे रूपक तुम्ही वापरायचे ठरवले. धुमारा हा साधारणपणे चांगला असतो. त्याला पुढे पिशाच्च म्हणून आणखी एक उपमा देऊन तुम्हाला विरोधाभास अधिक गडद करायचा असेल. (पण मला सुरुवातीपासूनच "आकृती" ठेवून एकच "पिशाच्च" ही उपमा द्यायची आहे. माझ्या पूर्ण कवितेत फक्त एकच उपमा आहे, तीच उत्प्रेक्षा पद्धतीने रंगवली आहे, हे लक्षात आलेच असेल.) ३. "आहे का?"/"असेल का?" हे अर्थ वेगवेगळे आहेत. त्यामुळे कुठला चुकला आहे, असे म्हणायचे नाही. ४. मनी मी/ मनात मी : माझ्या (या) कवितेत पूर्णपणे आधुनिक शब्दप्रयोग वापरायचे मी ठरवले आहे. म्हणजे वाटल्यास साधा संवाद म्हणून ती वाचता यावी. पण तुम्ही मनीं हा काव्य-किंवा-पुराणमराठी प्रयोग वापरण्यास काहीच हरकत नाही. (म्हणूनच 'मी शहारे', 'धुमारे फुटती' हे प्रयोग मी [या कवितेत] वापरले नसते [अन्यत्र वापरेनही], पण तुम्ही वापरण्यास काहीच हरकत नाही.) पण काही बदल समजले नाहीत. मला अनेक रस्ते रिकामे दिसलेत, बदललेल्या कवितेत एकच दिसतो - चूक बरोबर कुठलेच नाही, पण हा बदल कशासाठी केला असावा? "अकल्पित"च्या ऐवजी "धूसर" पिशाच्चे का बदलली असावीत? "अकल्पित" मधली स्वतःची भलावणी करण्याची प्रवृत्ती तुम्हाला पटली नाही का? (भित्यापाठचा ब्रह्मराक्षस खरेच अकल्पित नसतो, पण त्या व्यक्तीला विचारल्यास "छे, मुद्दामून का हवी मला भीती" असेच मनापासून म्हणतो.) त्या मानाने "धूसर पिशाच्चे" मागची कथा वेगळी काही असावी. अशा प्रकारे, तुमची कविता वेगळे अर्थ आणि संदर्भ घेऊन येते. ते ठीकच आहे. त्यामुळे "पटले नाही" असे मुळीच म्हणत नाही (वृत्तभंग सोडला तर).

In reply to by धनंजय

विसुनाना 02/02/2009 - 13:10
अनेक कल्पना शब्दात मांडताना सर्वात योग्य अर्थछटा असलेले शब्द केवळ अक्षरगणवृत्तात बसत नाहीत म्हणून बदलावे लागतात. त्यामानाने मात्रावृत्ते थोडी सुटसुटीत आहेत. गेयतेलाही धक्का लागत नाही. परंतु प्रयोग म्हणून भुजंगप्रयात अथवा मंदाक्रांता यासारख्या पारंपारिक वृत्तात आधुनिक (पक्षी असंस्कृतोद्भव) शब्द वापरणे हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग रियालिस्टीक पद्धतीने केल्यासारखे वाटते. (मागे एका चर्चेत तुम्ही नवी कवितांत लगक्रम कसा ठरवावा याबद्दल नवे विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता.) आधुनिकतेला (आधुनिक शब्दांना) योग्य न्याय द्यायचा असेल आणि तरीही कवितेची लय सांभाळायची असेल तर यमक अष्टाक्षरी उत्तम. (पायलॉन्स, फलाटदादा, पंक्चरली - असे शब्दही सहज वापरता येतील.)
माझ्या (या) कवितेत पूर्णपणे आधुनिक शब्दप्रयोग वापरायचे मी ठरवले आहे. म्हणजे वाटल्यास साधा संवाद म्हणून ती वाचता यावी.
असे असेल तर मुक्तछंदात का लिहू नये? मुक्तछंदात लयबद्ध आधुनिकता आहे. गेयता हा निकष न लावता केवळ अर्थ थेट पोहोचवणारे शब्द वापरता येतील.

In reply to by विसुनाना

श्रावण मोडक 02/02/2009 - 15:46
ठेका, वृत्त, ताल वगैरेच्या पलीकडे दोन्ही रचना स्वतंत्रपणे आवडल्या. दोन्हीमध्ये गुणगुणतांना काही छोट्या जागा धोका देतात, पण ते ठीक आहे.

In reply to by विसुनाना

धनंजय 02/02/2009 - 22:08
बरोबर आहे. म्हणून या प्रकारची पहिली कविता "अजूनही प्रेम तसेच आहे का?" ६ | ६ (यमक) | ६ (यमक) | ४ या छंदात रचली होती. मला वाटते, एखादी कविता सुचताना सुरुवातीला एखादी लय मनाची पकड घेते. मग अक्षर-छंद असो, की मात्रा-वृत्त, ते जे काय मनाची पकड घेते, ते वापरावे.
"मुक्तछंदात का लिहू नये?"
जरूर लिहावे. पण मुक्तछंदातच लिहावे असा काही नियम नाही. वाटल्यास साधा संवाद म्हणून वाचता यावी. असे दुहेरी लिहायची पद्धत प्राचीन काळापासून प्रचलित आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत, संजय? हे साधा संवाद म्हणून हेल देऊन सहज वाचता येते. आणि अनुष्टुभ् श्लोकासाठी तुमची काही विशिष्ट चाल असेल, तर त्या चालीत आळवता येते. आणि बरोबर आहे, मर्ढेकरांमुळे असे लिहिण्याचे मी धाडस केले. ते एका कवितेत लिहितात : दण्.कट दंडस्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग कभिन्न काळ्या मांड्या जैसा पोलादाचा चिरला साग ... (इथे त्यांनी मात्रावृत्त वापरले आहे, हे लक्षात येईलच. बाकी सर्व ठिकाणी संवादासारखे किंवा पुराणमराठी शैलीने वाचले तरी चालते : "वळ्ळे" किंवा " ले" दोन्हींनी लय जमते पण दण्.कटकिंवा मध्ये लयीत फरक पडतो. पैकी कवीला कुठला एकच उच्चार अभिप्रेत आहे, ते कवीला स्पष्ट सांगायचे आहे. म्हणूनच कवीने नेहमीपेक्षा वेगळा असा तो शब्द लिहिला आहे.

In reply to by धनंजय

पुष्कर 05/02/2009 - 13:29
मर्ढेकरांच्या लाडूत 'दणकट' हा शब्द बेदाण्यासारखा वाटतो. तुम्ही मात्र बेदाण्यांचाच लाडू केलेला दिसतो. असो. मात्रांमध्ये बोली शब्द बसवण्याचे अतिस्वातंत्र्य असले तरी प्रयोग म्हणून चांगले आहे.

In reply to by पुष्कर

धनंजय 05/02/2009 - 21:41
नेहमीच्या बोलण्यातले उच्चार लयबद्ध स्वरूपात पूर्ण कविता रचणे हे गेले काही दशके होत आहे. हल्लीच मिसळपावावर "देणार्‍याचे हात घ्यावे" हा लेख आला. करंदीकरांच्या त्या कवितेतील एक कडवे येथे देत आहे : उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी; भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी याचा उच्चार नेहमीच्या बोलण्याप्रमाणे केला तर्च लय साधते, प्रत्येक अक्षर लिहिल्याप्रमाणे मात्रा देऊन उच्चारले तर लय बिघडते. उच्चार असाच करावा लागतो : उसळ्.लेल्या दर्याकडून् पिसाळ्.लेली आयाळ् घ्यावी; भर्.लेल्याश्या भीमेकडून् तुकोबाची माळ् घ्यावी असा उच्चार केला तर विचित्र वाटते : उसळऽलेल्या दर्याकडूनऽ पिसाळऽलेली आयाळऽ घ्यावी; भरऽलेल्याश्या भीमेकडूनऽ तुकोबाची माळऽ घ्यावी मंगेश पाडगांवकरांच्या बहुतेक कविता तशाच असतात. परंतु त्या कवितांच्या छंद-शास्त्रात आघातस्वरांची संख्या प्रत्येक ओळीमधे ठरलेली असते. येथे मात्र मी मात्रांचा क्रम राखला आहे, इतकेच काय नवीन आहे. बेदाण्यांचा लाडू असे न म्हणता मी "पोह्यांचा लाडू" म्हणेन. गोडमिट्ट (नेहमीच्या जेवणापेक्षा गोड) अशा बेसनाच्या लाडवात कोणी कुरकुरीतपणासाठी थोडेसे पोहे घालतात. पण थोडेच गोड असे पोह्यांचे लाडूसुद्धा करता येतात. कधी बेसनाचा लाडू खावा, कधी पोह्याचा लाडू खावा... कविता बोलीच (ध्वन्याश्रित) असली पाहिजे, लेखी "शुद्धलेखनाच्या नियमांच्या मात्रा" गौण असतात, हा विचारही नवीन नव्हे. मराठीत अनाघात जोडाक्षराच्या आधीचे ह्रस्व लघूच राहाते, "जोडाक्षरा-आधीचे" म्हणून उगाच गुरू होत नाही. तर्‍हेचा = लगागा तर्रीचा = गागागा लयीत लिहिण्या-वाचण्याचा सराव असलेला कोणीही मात्रा अशाच मोजेल.

सुक्या 02/02/2009 - 11:18
तसं मला कविता अन् नाद / मात्रा वगेरे काही कळत नाही. सहज म्हनुन 'पहाटे पहाटे मला जाग आली' च्या चालीवर ही कवीता म्हनुन पाहीली (मनातच. मी गायला लागल्यावर सगळे दचकतात). सुंदर जमलीय. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

फुस्स 02/02/2009 - 12:30
असेल्का विचारुन्शहार्लोमनात्मी जसे म्हटले आहे तसे लिहिले असते तर अर्थच कळला नसता. शेवटची ओळ सुधारायला हवी. च्या मारी. चांगल्या कवितेची वाट लागत्ये फूटपट्टीने मोजमापे घेऊन. कविता चांगलीच आहे.

दशानन 02/02/2009 - 13:24
बापरे किती ही चिरफाड =)) मस्त कविता ! आपल्याला तर आवडली बॉ... ते छंद / राग / यमक काही समजत नाहि.. पण मनाला भावली म्हणजे आवडली हा एकच नियम माहीत आहे. *******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

In reply to by दशानन

फुस्स 02/02/2009 - 13:37
सहमत. जेव्हा कविता आवडते तेव्हा ते ताल छंद वगैरे बाजूला ठेवायला हरकत नाही. धनंजय यानी ते मेट्रो.. का काय ते इथे आणले नसते तर कदाचित एवढी चिरफाड झाली नसती.

>> नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी असेल का? विचारून शहारलो मनात मी या ओळी तर खासच आहेत धनंजय. कविता अजून ऐकू शकलो नाहीये पण जमेल तेव्हा लगेच ऐकीन.

चतुरंग 02/02/2009 - 21:44
एका धुकट, बर्फाळ सकाळच्या कुंद वातावरणात तुला सुचलेली ही कविता भुजंगप्रयातात आणि लयीत बसवण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. अभिनंदन! चतुरंग

बेसनलाडू 02/02/2009 - 22:14
कविता चांगली वाटली. दुसर्‍या कडव्यातील कल्पना विशेष भावली नि पहिल्या कडव्यातील साधेपणा आणि/किंवा चित्रमयता. मात्रावृत्त, गेयतादी बाबींबद्दल सध्या तरी चर्चा करावीशी वाटत नाही; मात्र मात्रावृत्त गेयसुलभतेच्या दृष्टीने कल्पकतेने वापरण्याचा, त्यांच्या सुटसुटीतपणाबद्दलचा विसुनानांचा मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा वाटला. (वृत्तबद्ध)बेसनलाडू

लिखाळ 02/02/2009 - 22:23
कवितेतली पिशाच्चाची कल्पना आवडली. कविता मनात रुंजी घालत राहिल अशी नाही. विसूनानांनी बनवलेली आवृत्ती अधीक चांगली वाटली. कविता वाचन छानच :) -- लिखाळ.

सुवर्णमयी 02/02/2009 - 22:26
कवितेतला पंच माझ्यापर्यंत पोहोचला नाही. कविता चित्रदर्शी असली तरी ही कविता आधीच्या कवितांच्या तुलनेत कमी पडते असे मला वाटले. (इथे बर्फाळलेली सकाळ इत्यादी मी पाहिले आहे. त्यामुळे अपेक्षा उंचावली असेल.) आधुनिक कल्पना आणि शब्दाकरता भुजंगप्रयात इतर वृत्तांपेक्षा सोपे ठरावे. कवितेची फेरमांडणी धनंजय नक्की करू शकतील . ( मात्रावृत्त आणि मुक्तछंद हे नंतरचे पर्याय- त्याची गरज पडेल असे वाटत नाही. )

In reply to by सुवर्णमयी

विसोबा खेचर 02/02/2009 - 22:50
आधुनिक कल्पना आणि शब्दाकरता भुजंगप्रयात इतर वृत्तांपेक्षा सोपे ठरावे. कवितेची फेरमांडणी धनंजय नक्की करू शकतील . हम्म! च्यामारी आता आमच्या धन्याला कविता कशी करावी हेही तूच शिकव! :) (एक्स मनोगती) तात्या.

छान कविता. आवडली. आणि घाटपांडेकाकांचा प्रतिसाद मनाला चटका लावून गेला. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

रामदास 02/02/2009 - 23:50
प्रांत नसल्यामुळे त्याबद्दल काही बोलू शकत नाही.मला कविता आवडली.मुक्तकासारखी असती तरी आवडली असती. अवांतरःधुक्याचा पडदा नेहमीच गूढ वाटतो.(अर्थात आमच्याकडे मुंबईत धुके पडणार ते काय ?) त्यामुळे शॉवर कर्टनवरचे धुके माझ्या कल्पनाशक्तीला आव्हान देते.

मीनल 03/02/2009 - 00:09
चित्र पहायला मिळण , कविता वाचायला मिळण आणि मग ती ऐकायला ही मिळण .... एकूणच सर्व मस्त आहे. शिवाय त्या कविता लेखनाच्या विषयी माहिती .... मला अश्या लोकांचा हेवा वाटतो. कस काय जमत सगळ? ग्रेट. कविते बद्दल ... कल्पना मस्त आहे. पण वाटत की ती मात्रा,वृत्त त्या मुळे सहज झाली नाही. कल्पना ओढून ताणून शब्दात बसवल्यासारखी वाटते. मी हे ही मान्य करते की मला हे जमत नाही. कल्पनाच येत नाही .ओढाताण तिथ पासूनच सुरू होती. त्यामुळे मला दुस-यांचे कौतुक वाटते. मीनल.

प्राजु 03/02/2009 - 00:18
कविता आणि त्यावरची चर्चा.. दोन्ही इंटरेस्टींग. कविता गूढ आहे.. पण कल्पना सुंदर आहे. दुसरे कडवे थोडे खेचा खेची केल्यासारखे वाटते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 03/02/2009 - 00:40
चाचणी प्रतिसाद.. सभासदांच्या 'प्रतिसाद टाकता येत नाही..' या तक्रारीनुसार हा चाचणी प्रतिसाद. क्षमस्व.. तात्या.

ऋषिकेश 23/02/2010 - 09:33
कविता चांगली.. दुसरे कडवे काहिसे फसले आहे (त्यावरचे एक्प्लनेशन वाचले पण कळले नाहि) ह्या प्रमोदकाकांच्या मताशी सहमत ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

sur_nair 25/02/2010 - 06:57
पदार्धाची चव अनुभवण्यापेक्षा recipe पाळली का नाही याची चर्चा करण्यात काय अर्थ आहे? आवडलं तर खावं नाहीतर नको म्हणावं आणि पचेल ते खावं. बंधनांच्या चौकोनातच सदैव बसवायचे ठरवले तर नवीन कलाविष्कार वगैरे कधी शक्यच नाही होणार, मग ते काव्य असो वा पाककला.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
धुकट सकाळ
(आमच्या गावात नेहमीपेक्षा थोडासुद्धा अधिक बर्फ पडला, तर सगळे काही ठप्प होते. अशा एका सकाळचे हे चित्र) picture (पुढील शब्द वाचण्यापूर्वी, जमले तर ते ऐकावेत - नाहीतर मात्रा/वृत्त या बाबतीत तुम्हाला पटणार नाहीत. **म्हणूनच कविता "वाद" प्रकारात घातली आहे.

विद्रोही साहित्य संमेलनात उच्चवर्णीय मस्तानी

कपिल काळे ·

आर्य 24/01/2009 - 23:19
बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही - या बाबत शंकाच नाही पण यात मायावतींचा उल्लेख राहुन गेला, आजकाल यांचाही पुतळा याच रांगेत आहे. आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो......हे नव्यानेच कळले, या विशेष माहिती बद्दल धन्यवाद. बामसेफ चा अर्थ कोणी सांगु शकल का ?????? - मी हा शब्द फक्त भिंती वर वाचला आहे, मला याचा संबध लहानपणी झेंडूबामशी वाटायचा पण नंतर मी तो विद्रोही साहित्य संमेलनाशी लावला. आपला अनभिज्ञ

In reply to by आर्य

पनवेलला २०००ते ०३ दरम्यान एक बामसेफ अधिवेशन झाले होते. उत्सुकतेपोटी व घराजवळच असल्याने मी त्याला आवर्जून हजेरी लावली होती. "शेंडी-जाणव्यावाले ढेरपोटे" हे विषेशन जवळपास प्रत्येक वक्त्याच्या तोंडी ऐकून व त्याच-त्याच द्वेषाधारित व मत्सरी भाषणांनी शेवटी कंटाळून काही प्रश्न उभे केले. प्र: गोखल्यांपासून ते सावरकरांपर्यंत बहुतांश सगळ्याच तथाकथित उच्चवर्णीय नेत्यांनी सुद्धा जातीभेद नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम केले. तसेच अनेक सामान्य ब्राम्हणांनी बाबासाहेबांच्या चळवळीला सक्रीय पाठिंबा व मदत दिली. तरी पण तुम्ही एकटाक सर्व ब्राम्हणांना शिव्या का घालता? उत्तर: तू दिलेली उदाहरणे ही अपवादात्मक होत. मात्र सरसकट त्यांच्या समाजानेच आपल्या अनेक पिढ्या उध्वस्त केल्या. शिवाय त्या बामनी नेत्यांचा त्यात स्वार्थ होता, राजकारण होते, म्हणून त्यांनी तो देखावा केला. त्यांना माहित होते की काही वर्षात त्यांचा पूर्ण पाडाव होणार आहे म्हणून त्यांनी हुशारीने अशा खेळ्या केल्या. प्र: समजा तुमचे म्हणने ग्राह्य धरले तरी मला हा प्रश्न पडतो... समजा माझ्या दणकट भावाने गरीब शेजार्‍याचे घर लुटले व म्हणून त्या शेजार्‍याचे व माझ्या भावाचे भांडण सुरु झाले आणि मी जर त्या शेजार्‍याच्या न्याय्य बाजूने होऊन भावाशी भांडू लागलो. अशा परिस्थितीत अन्यायग्रस्त शेजार्‍याचे माझ्या भावाशी भांडणे नैसर्गिक वाटते पण मी स्वतःचा फायदा सोडून शेजार्‍याला मदत करणे म्हणजे माणुसकीचे लक्षण नव्हे का? मग तोच न्याय तुम्ही तथाकथित उच्चवर्णियांना का लावत नाही? उत्तर: तू म्हणतोस ते उदाहरण येथे पूर्णपणे लागू होत नाही. मी तुला सांगितले तसे त्यांचा पाडाव होणार होता म्हणून त्यांनी धूर्तपणे अधिच आपले मोठेपण दाखवण्यासाठी धूर्त खेळ्या केल्या. प्र: बरं इतिहासाचं जाऊ द्या. समजा मी एका तथाकथित उच्चवर्णीयाच्या घरात जन्मलो. मात्र आज शिवाजी महाराज व सावकरांप्रमाणेच आंबेडकरांनाही माझे दैवत मानत असेल तसेच जातीची ओळख द्यायची नसेल तर मला तुमच्या स्वप्नातल्या समाजात काय स्थान आहे? (प्रेक्षकांमधून - ये खाली बस. इच्यायला.. खाली बस ये... मायला याच्या वडा रं ह्याला) उत्तर: आपल्याला त्यांच्या घरा-घरांत अशीच तर पिढी निर्माण करायची आहे. प्र: पण जर आपणे येथे असे त्यांच्यावर आगपाखड करत सुटलो तर ते आपल्या जवळ कसे येतील? (प्रेक्षकांमधून एव्हाना प्रचंड आरडा ओरड सुरु झाली होती). उ: ती त्यांची गरज आहे. व आपली शक्ति पाहून ते नक्कीच आपल्या आश्रयाला येतील. प्र: बरे मला महितीत असलेल्या एकाही तथाकथित ब्राम्हणाला शेंडी नाहिये. जाणव्याचे माहित नाही आणि ढेर्‍या सुद्धा सर्वसाधारण इथे असलेल्या लोकांप्रमाणेच आहेत.... गोंधळामुळे पुढे प्रश्न विचारायला जमले नाही. एक दोन संजस कार्यकर्त्यांमुळे माझी सुखरुप सुटका झाली. या दरम्यान माझी अलिबागेतल्या एका प्राध्यपकांशी ओळख झाली. ते दलित चळवळीत एक नेते/कार्यकर्ते आहेत. त्यांचे मागच्या वर्षी औरंगाबादला एका मोठ्या कार्यक्रमात भाषण झाल्याचेही ऐकले. आमचे एकमेकांकडे जाणे येणे सुरु झाले. एकदा त्यांच्या घरी मुक्काम पडला असता चर्चेत टिळकांचा विषय निघाला. त्यांचे अगाध ज्ञान आणि त्यावरचा अंधविश्वास पाहून मी थक्क झालो. टिळक कसे दलित अत्याचाराचे पुरस्कर्ते होते हे त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केला. त्यांच्या मते टिळकांना स्त्रीयांचा नाद होता व त्यांनी त्यासाठी अमुक-अमुक अत्याचार केले.... अर्थात त्यानंतर मी अजून त्या सरांचे तोंड पाहिले नाही. आपला, (अजात) भास्कर

स्वामि 26/01/2009 - 01:18
आपल्या समाजातील लोकांना जर ब्राम्हणांच्या तोडीचे बनवायचे असेल तर त्यांचा तिरस्कार करणे अथवा त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी नाकारणे असा होत नाही.अशा ठरावांमुळे जातीय तेढ वाढण्याशिवाय काहीही साध्य होत नाही.ब्राम्हणी अहंकाराला तुम्ही अशा प्रकारे लढा देउ शकत नाही.प.महाराष्ट्रातील(विषेशत:सांगली-सातारा येथील)देशस्थ ब्राम्हणांचे उदाहरण येथे घेण्यासारखे आहे.ते सुध्दा बहुजन समाजाबरोबर गावगाड्यात अडकलेले होते.परंतु गांधीवधाची सर्वात मोठी किंमत या समाजाने चुकवली.घरदार,जमीनजुमला एका रात्रीत हिरावला गेला.त्या मानाने पुण्यातील ब्राम्हण समाज जो पेशवाई पासून पुढारलेला व बहुसंख्य कोकणस्थ(चित्पावन)होता,तो स.गो.बर्वे (तत्कालीन जिल्हाधिकारी)यांच्या कॄपेमुळे सुऱक्षित राहीला.पुढील ५० वर्षात या देशस्थ समाजाने पुण्यातील चित्पावनांचे आवश्यक तिथे अनुकरण करीत आपली प्रगती साध्य केली.आज हाच सामाज जो एकेकाळी त्याच्या मातीतून उखडून टाकलेला होता,पुण्यात चित्पावनांच्या तोडीस तोड बस्तान बसवून आहे.विद्रोही साहित्यिकांनी इतिहासापासून धडा घेउन आपल्या बांधवांना तिरस्काराच्या नव्हे तर आत्मसन्मानाच्या वाटेने जाण्याची दिशा दाखवली पाहीजे.

In reply to by स्वामि

माझ्या एका मित्राचे वडील म्हणत 'गांधीहत्येच्यावेळेला जर गावाबाहेर पडलो नसतो तर आयुष्यभर कुलधर्म कुलाचारच सांभाळत बसलो असतो. कुलधर्म सांभाळणे वाईट आहे असे नाही पण त्याही पुढे काहीतरी आहे हे कळणे तेव्हा महत्वाचे होते.' पुण्याचे पेशवे Since 1984

कपिल काळे 26/01/2009 - 12:34
पेशव्यांचा उल्लेख आल्यावर, पेशव्यांचा प्रतिसाद त्याला साजेसाच. आर्य- बामसेफ ही संघटना आरक्षणातून भरती झालेल्या सरकारी सेवकांची असून ती कांशिराम यांनी स्थापन केली आहे. स्वामी जी आपले म्हणणे पटले . लेखाचा उद्देश तुम्ही योग्य शब्दात सांगितला आहे. पण ब्राम्हणी अहंकाराला तुम्ही अशा प्रकारे लढा देउ शकत नाही>> म्हणजे काय? उलट र.धो कर्वे, गोपाळकृष्ण गोखले , फुल्यांना शाळेसाठी रहाता वाडा देणारे कोण होते? मग अहंकाराचे लेबल का बरे लावले जाते?

मृगनयनी 27/01/2009 - 15:18
गाढव हे कष्टाचे प्रतीक आहे. ओझी वाहून ते पिचून गेले आहे. उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले. त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो. =)) =)) =)) हा शुद्ध गाढवपणा आहे! हे विद्रोही... त्यांना रोज लागणारे दूध ही कदाचित त्यांच्या पूर्वजांचेच वापरत असावेत! मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी. अश्या उच्चवर्णीय राजाची एय्याशी त्याच्या मृत्यूनंतरही पुरवणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे. =)) =)) =)) =)) हे अतिइइइइइ होतंय! आणि यांचं असंच जर म्हणणं असेल, तर शाहू महाराजांचे दुर्मिळ लिखाण, सम्भाजी राजांची दुर्मिळ कागदपत्रे वर्षानुवर्षे जपुन ठेवलेल्या "भान्डारकर प्राच्यविद्या इन्स्टीट्यूट" वर भेकड हल्ला करुन इतिहासाचे अतोनात नुकसान करणार्‍या तथाकथित शिवधर्मी, बी-ग्रेडी उपटसुम्भांबद्दल या "विद्रोही" जनांचे काय मत असू शकते? :-? जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय ! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

तथाकथित शिवधर्मी, बी-ग्रेडी उपटसुम्भांबद्दल या "विद्रोही" जनांचे काय मत असू शकते? -- विद्रोही साहित्य संमेलनात वा बामसेफात मी कधीही यांच्याबद्दल वा मराठा समाजाबद्दल काही आगपाखड ऐकलेली नाही. मला वाटते "३% आपले काय वाकडे करणार" या अलिखित नियमानुसार त्यांची आगपाखड असते.

ऍडीजोशी 27/01/2009 - 17:24
ह. ह. पु. वा.

आम्हाघरीधन 27/01/2009 - 18:24
जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय ! यात नेमका जयघोष तुम्हाला कुणाचा करायचा आहे ? शिवरायान्चा नाही केलात तरी चालेल. इतर दोघान्चा जोराने चालु ठेवा. कारण सुर्य दाखवावा लागत नसतो. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

In reply to by आम्हाघरीधन

मृगनयनी 28/01/2009 - 10:24
जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय ! यात नेमका जयघोष तुम्हाला कुणाचा करायचा आहे ? शिवरायान्चा नाही केलात तरी चालेल. इतर दोघान्चा जोराने चालु ठेवा. कारण सुर्य दाखवावा लागत नसतो. :-? "समर्थ रामदास स्वामी" आणि "दादोजी कोन्डदेव" हे दोघेही शिवरायांचे गुरुवर्य असल्याकारणाने, या तिघांचाही एकत्र जयघोष होणे, अपरिहार्य आहे. आणि गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस बहुजनोद्धारक शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यामुळे खर्‍या इतिहासाला साक्षी ठेऊन "शिवरायांचा" जयघोष हा "समर्थ रामदास" आणि "दादोजी कोन्डदेव" या गुरुवर्यांबरोबर चिरंतन होत राहील. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'. » आपण "मनाचे श्लोक" नित्यनेमाने वाचावेत, म्हणजे आपल्या दिसण्या आणि असण्यातील अंतर कायमचे नष्ट होईल. आणि "सूर्याचा" लख्ख, तेजस्वी प्रकाश आपल्याही डोळ्यांपर्यंत पोचू शकेल. :) जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय ! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नाना बेरके 27/01/2009 - 19:47
म्हणे, आपल्याला ग्रंथ वाचायला मिळत नाहीत तसेच घरी खायला तेल नसते तर दिव्यात घालायल कुठून आणणार? - दररोज रात्री नवटाक लावायला ह्या डांबीसाकडे पैशे मोप असत्येत, म्हणे तेल कुठून आणणार ? उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले.त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो. - संमेलनाची सुरवात अध्यक्श्यांच्या पुजेनी कर. तो एक गाढवच बनला आहे, तुमच्यात येऊन. आणि संमेलन झाल्यावर तो तुमच्यावर दुगाण्याच झाडणार आहे, फोकलीच्यान्नो. आपल्या वार्षिक समारंभाला संमेलन न म्हणता दुसरा शब्द सुचवा असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो. - अगोदर "आवाहन" ह्याला दुसरा शब्द तु सुचवून दाखव बोंब्ल्या ! मग संमेलनाचं बोल. साजूक तुपातील शिरा खाता खाता, आपल्या घराच्या बागेत बसून ह्या उच्चवर्णीयांनी हे नियम बनवले. - आता तू आपल्या घरातल्या हागनदारीत बसून * खाता-खाता सोताचे नियम बनंव, म्हन्जे तुला लई भारी ढेकर यील गड्या. मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी. - उकिरडे फुंकता, फुंकता विचाराचे काय दिवे लावतोय बघा. संमेलनाची सुरवात ह्याच्याच पुजनाने व्हायला पाहीजे.

कपिल काळे 27/01/2009 - 21:32
ह्या लेखाचा उद्देश विद्रोही चळवळीचा , द्वेषाधारित आणि डळमळीत वैचारिक पाया दर्शवणे हा होता. मी कोणत्याही प्रकारे ह्या चळवळीशी संबंधित नाही. तसेच हा लेख मी २४ जाने ला लिहिला आहे. त्यात ३१ जाने ला होउ घातलेल्या संमेलनातील (काल्पनिक )भाषणाचा गोषवारा दिला आहे. एक विद्रोही संमेलन मी जवळून पाहिले होते. तेव्हा तेथील चर्चा ठराव कसे असतात ह्याची एक झलक दाखवणे एवढाच हेतू ह्या लेखनामागे आहे. कळत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माफी चाहतो. सगळ्या प्रतिसादकांना धन्यवाद.

स्वामि 27/01/2009 - 21:44
कपिल काळे साहेब,आपण जी उदाहरणे दिलीत ती लोकोत्तर पुरुषांची दिलीत.सर्व अभिजन समाज हा कर्वे अथवा गोखल्यांसारख्या अद्वितीय विचारसरणीचा असेल अशी समजुत करुन घेणे हा भाबडे पणा किंवा एकांगी विचार झाला.अभिजन समाजात अशा नरपुंगवांची असंख्य उदाहरणे सापडतील कि जे आपण ह्या असामान्य पुरषांच्या जातीत जन्माला आलो(किंवा "ते" आपल्या जातीत जन्मिले)या एकमेव गुणविशेषावर आयुष्यभर इतरांना तुच्छ लेखतात.

In reply to by स्वामि

कपिल काळे 27/01/2009 - 22:02
गोखल्या कर्व्यांच्या व्यतिरिक्तही अनेक असे लोक आहेत की ज्यांनी बहुजन समाजासाठी तितकेच महान कार्य केले आहे. तुम्ही म्हणता ते काही अंशी सत्य असले तरी त्याचे सार्वत्रीकीकरण ( मराठीत जनरायलेझशन)करणे कितपत योग्य?

आर्य 24/01/2009 - 23:19
बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही - या बाबत शंकाच नाही पण यात मायावतींचा उल्लेख राहुन गेला, आजकाल यांचाही पुतळा याच रांगेत आहे. आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो......हे नव्यानेच कळले, या विशेष माहिती बद्दल धन्यवाद. बामसेफ चा अर्थ कोणी सांगु शकल का ?????? - मी हा शब्द फक्त भिंती वर वाचला आहे, मला याचा संबध लहानपणी झेंडूबामशी वाटायचा पण नंतर मी तो विद्रोही साहित्य संमेलनाशी लावला. आपला अनभिज्ञ

In reply to by आर्य

पनवेलला २०००ते ०३ दरम्यान एक बामसेफ अधिवेशन झाले होते. उत्सुकतेपोटी व घराजवळच असल्याने मी त्याला आवर्जून हजेरी लावली होती. "शेंडी-जाणव्यावाले ढेरपोटे" हे विषेशन जवळपास प्रत्येक वक्त्याच्या तोंडी ऐकून व त्याच-त्याच द्वेषाधारित व मत्सरी भाषणांनी शेवटी कंटाळून काही प्रश्न उभे केले. प्र: गोखल्यांपासून ते सावरकरांपर्यंत बहुतांश सगळ्याच तथाकथित उच्चवर्णीय नेत्यांनी सुद्धा जातीभेद नष्ट करण्यासाठी अथक परिश्रम केले. तसेच अनेक सामान्य ब्राम्हणांनी बाबासाहेबांच्या चळवळीला सक्रीय पाठिंबा व मदत दिली. तरी पण तुम्ही एकटाक सर्व ब्राम्हणांना शिव्या का घालता? उत्तर: तू दिलेली उदाहरणे ही अपवादात्मक होत. मात्र सरसकट त्यांच्या समाजानेच आपल्या अनेक पिढ्या उध्वस्त केल्या. शिवाय त्या बामनी नेत्यांचा त्यात स्वार्थ होता, राजकारण होते, म्हणून त्यांनी तो देखावा केला. त्यांना माहित होते की काही वर्षात त्यांचा पूर्ण पाडाव होणार आहे म्हणून त्यांनी हुशारीने अशा खेळ्या केल्या. प्र: समजा तुमचे म्हणने ग्राह्य धरले तरी मला हा प्रश्न पडतो... समजा माझ्या दणकट भावाने गरीब शेजार्‍याचे घर लुटले व म्हणून त्या शेजार्‍याचे व माझ्या भावाचे भांडण सुरु झाले आणि मी जर त्या शेजार्‍याच्या न्याय्य बाजूने होऊन भावाशी भांडू लागलो. अशा परिस्थितीत अन्यायग्रस्त शेजार्‍याचे माझ्या भावाशी भांडणे नैसर्गिक वाटते पण मी स्वतःचा फायदा सोडून शेजार्‍याला मदत करणे म्हणजे माणुसकीचे लक्षण नव्हे का? मग तोच न्याय तुम्ही तथाकथित उच्चवर्णियांना का लावत नाही? उत्तर: तू म्हणतोस ते उदाहरण येथे पूर्णपणे लागू होत नाही. मी तुला सांगितले तसे त्यांचा पाडाव होणार होता म्हणून त्यांनी धूर्तपणे अधिच आपले मोठेपण दाखवण्यासाठी धूर्त खेळ्या केल्या. प्र: बरं इतिहासाचं जाऊ द्या. समजा मी एका तथाकथित उच्चवर्णीयाच्या घरात जन्मलो. मात्र आज शिवाजी महाराज व सावकरांप्रमाणेच आंबेडकरांनाही माझे दैवत मानत असेल तसेच जातीची ओळख द्यायची नसेल तर मला तुमच्या स्वप्नातल्या समाजात काय स्थान आहे? (प्रेक्षकांमधून - ये खाली बस. इच्यायला.. खाली बस ये... मायला याच्या वडा रं ह्याला) उत्तर: आपल्याला त्यांच्या घरा-घरांत अशीच तर पिढी निर्माण करायची आहे. प्र: पण जर आपणे येथे असे त्यांच्यावर आगपाखड करत सुटलो तर ते आपल्या जवळ कसे येतील? (प्रेक्षकांमधून एव्हाना प्रचंड आरडा ओरड सुरु झाली होती). उ: ती त्यांची गरज आहे. व आपली शक्ति पाहून ते नक्कीच आपल्या आश्रयाला येतील. प्र: बरे मला महितीत असलेल्या एकाही तथाकथित ब्राम्हणाला शेंडी नाहिये. जाणव्याचे माहित नाही आणि ढेर्‍या सुद्धा सर्वसाधारण इथे असलेल्या लोकांप्रमाणेच आहेत.... गोंधळामुळे पुढे प्रश्न विचारायला जमले नाही. एक दोन संजस कार्यकर्त्यांमुळे माझी सुखरुप सुटका झाली. या दरम्यान माझी अलिबागेतल्या एका प्राध्यपकांशी ओळख झाली. ते दलित चळवळीत एक नेते/कार्यकर्ते आहेत. त्यांचे मागच्या वर्षी औरंगाबादला एका मोठ्या कार्यक्रमात भाषण झाल्याचेही ऐकले. आमचे एकमेकांकडे जाणे येणे सुरु झाले. एकदा त्यांच्या घरी मुक्काम पडला असता चर्चेत टिळकांचा विषय निघाला. त्यांचे अगाध ज्ञान आणि त्यावरचा अंधविश्वास पाहून मी थक्क झालो. टिळक कसे दलित अत्याचाराचे पुरस्कर्ते होते हे त्यांनी पटवून द्यायचा प्रयत्न केला. त्यांच्या मते टिळकांना स्त्रीयांचा नाद होता व त्यांनी त्यासाठी अमुक-अमुक अत्याचार केले.... अर्थात त्यानंतर मी अजून त्या सरांचे तोंड पाहिले नाही. आपला, (अजात) भास्कर

स्वामि 26/01/2009 - 01:18
आपल्या समाजातील लोकांना जर ब्राम्हणांच्या तोडीचे बनवायचे असेल तर त्यांचा तिरस्कार करणे अथवा त्यांनी केलेल्या सर्व गोष्टी नाकारणे असा होत नाही.अशा ठरावांमुळे जातीय तेढ वाढण्याशिवाय काहीही साध्य होत नाही.ब्राम्हणी अहंकाराला तुम्ही अशा प्रकारे लढा देउ शकत नाही.प.महाराष्ट्रातील(विषेशत:सांगली-सातारा येथील)देशस्थ ब्राम्हणांचे उदाहरण येथे घेण्यासारखे आहे.ते सुध्दा बहुजन समाजाबरोबर गावगाड्यात अडकलेले होते.परंतु गांधीवधाची सर्वात मोठी किंमत या समाजाने चुकवली.घरदार,जमीनजुमला एका रात्रीत हिरावला गेला.त्या मानाने पुण्यातील ब्राम्हण समाज जो पेशवाई पासून पुढारलेला व बहुसंख्य कोकणस्थ(चित्पावन)होता,तो स.गो.बर्वे (तत्कालीन जिल्हाधिकारी)यांच्या कॄपेमुळे सुऱक्षित राहीला.पुढील ५० वर्षात या देशस्थ समाजाने पुण्यातील चित्पावनांचे आवश्यक तिथे अनुकरण करीत आपली प्रगती साध्य केली.आज हाच सामाज जो एकेकाळी त्याच्या मातीतून उखडून टाकलेला होता,पुण्यात चित्पावनांच्या तोडीस तोड बस्तान बसवून आहे.विद्रोही साहित्यिकांनी इतिहासापासून धडा घेउन आपल्या बांधवांना तिरस्काराच्या नव्हे तर आत्मसन्मानाच्या वाटेने जाण्याची दिशा दाखवली पाहीजे.

In reply to by स्वामि

माझ्या एका मित्राचे वडील म्हणत 'गांधीहत्येच्यावेळेला जर गावाबाहेर पडलो नसतो तर आयुष्यभर कुलधर्म कुलाचारच सांभाळत बसलो असतो. कुलधर्म सांभाळणे वाईट आहे असे नाही पण त्याही पुढे काहीतरी आहे हे कळणे तेव्हा महत्वाचे होते.' पुण्याचे पेशवे Since 1984

कपिल काळे 26/01/2009 - 12:34
पेशव्यांचा उल्लेख आल्यावर, पेशव्यांचा प्रतिसाद त्याला साजेसाच. आर्य- बामसेफ ही संघटना आरक्षणातून भरती झालेल्या सरकारी सेवकांची असून ती कांशिराम यांनी स्थापन केली आहे. स्वामी जी आपले म्हणणे पटले . लेखाचा उद्देश तुम्ही योग्य शब्दात सांगितला आहे. पण ब्राम्हणी अहंकाराला तुम्ही अशा प्रकारे लढा देउ शकत नाही>> म्हणजे काय? उलट र.धो कर्वे, गोपाळकृष्ण गोखले , फुल्यांना शाळेसाठी रहाता वाडा देणारे कोण होते? मग अहंकाराचे लेबल का बरे लावले जाते?

मृगनयनी 27/01/2009 - 15:18
गाढव हे कष्टाचे प्रतीक आहे. ओझी वाहून ते पिचून गेले आहे. उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले. त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो. =)) =)) =)) हा शुद्ध गाढवपणा आहे! हे विद्रोही... त्यांना रोज लागणारे दूध ही कदाचित त्यांच्या पूर्वजांचेच वापरत असावेत! मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी. अश्या उच्चवर्णीय राजाची एय्याशी त्याच्या मृत्यूनंतरही पुरवणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे. =)) =)) =)) =)) हे अतिइइइइइ होतंय! आणि यांचं असंच जर म्हणणं असेल, तर शाहू महाराजांचे दुर्मिळ लिखाण, सम्भाजी राजांची दुर्मिळ कागदपत्रे वर्षानुवर्षे जपुन ठेवलेल्या "भान्डारकर प्राच्यविद्या इन्स्टीट्यूट" वर भेकड हल्ला करुन इतिहासाचे अतोनात नुकसान करणार्‍या तथाकथित शिवधर्मी, बी-ग्रेडी उपटसुम्भांबद्दल या "विद्रोही" जनांचे काय मत असू शकते? :-? जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय ! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

तथाकथित शिवधर्मी, बी-ग्रेडी उपटसुम्भांबद्दल या "विद्रोही" जनांचे काय मत असू शकते? -- विद्रोही साहित्य संमेलनात वा बामसेफात मी कधीही यांच्याबद्दल वा मराठा समाजाबद्दल काही आगपाखड ऐकलेली नाही. मला वाटते "३% आपले काय वाकडे करणार" या अलिखित नियमानुसार त्यांची आगपाखड असते.

ऍडीजोशी 27/01/2009 - 17:24
ह. ह. पु. वा.

आम्हाघरीधन 27/01/2009 - 18:24
जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय ! यात नेमका जयघोष तुम्हाला कुणाचा करायचा आहे ? शिवरायान्चा नाही केलात तरी चालेल. इतर दोघान्चा जोराने चालु ठेवा. कारण सुर्य दाखवावा लागत नसतो. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

In reply to by आम्हाघरीधन

मृगनयनी 28/01/2009 - 10:24
जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय ! यात नेमका जयघोष तुम्हाला कुणाचा करायचा आहे ? शिवरायान्चा नाही केलात तरी चालेल. इतर दोघान्चा जोराने चालु ठेवा. कारण सुर्य दाखवावा लागत नसतो. :-? "समर्थ रामदास स्वामी" आणि "दादोजी कोन्डदेव" हे दोघेही शिवरायांचे गुरुवर्य असल्याकारणाने, या तिघांचाही एकत्र जयघोष होणे, अपरिहार्य आहे. आणि गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस बहुजनोद्धारक शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यामुळे खर्‍या इतिहासाला साक्षी ठेऊन "शिवरायांचा" जयघोष हा "समर्थ रामदास" आणि "दादोजी कोन्डदेव" या गुरुवर्यांबरोबर चिरंतन होत राहील. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'. » आपण "मनाचे श्लोक" नित्यनेमाने वाचावेत, म्हणजे आपल्या दिसण्या आणि असण्यातील अंतर कायमचे नष्ट होईल. आणि "सूर्याचा" लख्ख, तेजस्वी प्रकाश आपल्याही डोळ्यांपर्यंत पोचू शकेल. :) जय रामदास समर्थ ! जय दादोजी कोन्डदेव ! जय शिवराय ! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

नाना बेरके 27/01/2009 - 19:47
म्हणे, आपल्याला ग्रंथ वाचायला मिळत नाहीत तसेच घरी खायला तेल नसते तर दिव्यात घालायल कुठून आणणार? - दररोज रात्री नवटाक लावायला ह्या डांबीसाकडे पैशे मोप असत्येत, म्हणे तेल कुठून आणणार ? उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले.त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो. - संमेलनाची सुरवात अध्यक्श्यांच्या पुजेनी कर. तो एक गाढवच बनला आहे, तुमच्यात येऊन. आणि संमेलन झाल्यावर तो तुमच्यावर दुगाण्याच झाडणार आहे, फोकलीच्यान्नो. आपल्या वार्षिक समारंभाला संमेलन न म्हणता दुसरा शब्द सुचवा असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो. - अगोदर "आवाहन" ह्याला दुसरा शब्द तु सुचवून दाखव बोंब्ल्या ! मग संमेलनाचं बोल. साजूक तुपातील शिरा खाता खाता, आपल्या घराच्या बागेत बसून ह्या उच्चवर्णीयांनी हे नियम बनवले. - आता तू आपल्या घरातल्या हागनदारीत बसून * खाता-खाता सोताचे नियम बनंव, म्हन्जे तुला लई भारी ढेकर यील गड्या. मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी. - उकिरडे फुंकता, फुंकता विचाराचे काय दिवे लावतोय बघा. संमेलनाची सुरवात ह्याच्याच पुजनाने व्हायला पाहीजे.

कपिल काळे 27/01/2009 - 21:32
ह्या लेखाचा उद्देश विद्रोही चळवळीचा , द्वेषाधारित आणि डळमळीत वैचारिक पाया दर्शवणे हा होता. मी कोणत्याही प्रकारे ह्या चळवळीशी संबंधित नाही. तसेच हा लेख मी २४ जाने ला लिहिला आहे. त्यात ३१ जाने ला होउ घातलेल्या संमेलनातील (काल्पनिक )भाषणाचा गोषवारा दिला आहे. एक विद्रोही संमेलन मी जवळून पाहिले होते. तेव्हा तेथील चर्चा ठराव कसे असतात ह्याची एक झलक दाखवणे एवढाच हेतू ह्या लेखनामागे आहे. कळत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माफी चाहतो. सगळ्या प्रतिसादकांना धन्यवाद.

स्वामि 27/01/2009 - 21:44
कपिल काळे साहेब,आपण जी उदाहरणे दिलीत ती लोकोत्तर पुरुषांची दिलीत.सर्व अभिजन समाज हा कर्वे अथवा गोखल्यांसारख्या अद्वितीय विचारसरणीचा असेल अशी समजुत करुन घेणे हा भाबडे पणा किंवा एकांगी विचार झाला.अभिजन समाजात अशा नरपुंगवांची असंख्य उदाहरणे सापडतील कि जे आपण ह्या असामान्य पुरषांच्या जातीत जन्माला आलो(किंवा "ते" आपल्या जातीत जन्मिले)या एकमेव गुणविशेषावर आयुष्यभर इतरांना तुच्छ लेखतात.

In reply to by स्वामि

कपिल काळे 27/01/2009 - 22:02
गोखल्या कर्व्यांच्या व्यतिरिक्तही अनेक असे लोक आहेत की ज्यांनी बहुजन समाजासाठी तितकेच महान कार्य केले आहे. तुम्ही म्हणता ते काही अंशी सत्य असले तरी त्याचे सार्वत्रीकीकरण ( मराठीत जनरायलेझशन)करणे कितपत योग्य?
लेखनविषय:
लेखनप्रकार
कणकवली- सिंधुदुर्ग येथे ३१ जानेवारीला होणारया १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या २५ पानी अध्यक्षीय भाषणातील काही पाने काल आमच्या हाती लागली. त्या पानांचा गोषवारा तसेच तिथे मांडले जाणारे काही ठराव इथे देत आहे. पान क्र. १. आज दहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना मला विशेष आनंद होत आहे. कष्टकरी समाज जो वंचित होता तो आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही. आपण ज्या समाजातून वर आलो त्या कष्ट्करी समाजाचे प्रतीक म्हणून आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो.

आजची मुक्ताफळे (Quote of The Day)

एकलव्य ·

एकलव्य 11/01/2009 - 10:45
श्रीगणेशा म्हणून शिळी बातमी देतो आहे... पण हेच ते वाक्य जे माझ्या मित्राने पाठविले. "The Indians, after the attacks, were deeply offended and furious, but they are also clever. We may be crazy in Pakistan, but not completely out of our minds." - इति आयएसआयचा प्रमुख अहमद पाशा आर आर पाटलांपासून ते झरदारीपर्यंत तोल सुटलेल्या विधानांचे तीर वेडेवाकडे सुटत असताना पाशाचे वक्तव्य मुत्सद्दीपणाची वेगळी पातळी दाखवून जाते.

एकलव्य 11/01/2009 - 10:48
अमेरिकेच्या होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षाने आर्थिक परिस्थितीवर टिपण्णी करताना आज म्हटले की - "Only government" can provide the solution to the country’s economic ills." "मार्केट शुड क्युअर बाय ईटसेल्फ" आणि "सेंट्रल प्लॅनिंग म्हणजे बरबादी" ह्यावर अमेरिकन सरकारचाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकाचाही मोठा विश्वास आहे... अगदी अंधश्रद्धा म्हणावी या टोकाइतका. त्या पार्श्वभूमीवर ओबामाने दिलेली (किंवा खरे तर देण्यास भाग पडलेली) कबुली बरेच काही सांगून जाते.

In reply to by नंदन

लिखाळ 09/01/2009 - 17:05
सत्यम मधला अंतर्गत विरोधाभास एकदम आवडला. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

मदनबाण 09/01/2009 - 13:45
Arriving at one point is the starting point to another. John Dewey मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

If fate means you to lose, give it a good fight anyhow... ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by चाणक्य

धनंजय 24/01/2009 - 04:43
चांगले वाक्य कोणी म्हटले ते महत्त्वाचे नाही. पण हे वाक्य आइन्स्टाईनचे नसावे. याचे अनेक पाठभेद दिसतात : A problem can not be solved with the same consciousness that ... “The significant problems we face cannot be solved at the same level of thinking we were at when we created them.” वगैरे. ते पाठभेद वेगवेगळे लोक आपल्याला ठीक वाटतील त्या प्रसंगात वापरतात. "the same consciousness" हे श्री-चिन्मय यांच्या दुव्यावर दिसते - त्यांना अर्थात चैतन्याबद्दल काही सांगण्यात रस आहे. "same level of thinking we were at when" वापरणारे साधारण बंडखोर असतात, म्हणजे पूर्वीच्या काळच्या विचारधारेपेक्षा भविष्यातली विचारधारा वेगळी हवी असे त्यांना सांगायचे आहे. "by today's wisdom" या पाठात पूर्वीचे ज्ञान उजवे होते, असा काही अर्थ निघतो ("विजडम" शब्दात अनुभवी ऋजू सदसद्विवेक - असा काही अर्थ आहे.) उगीच बिचार्‍या आइन्स्टाइनला असले विसंवादी विचार सांगायला लावतात. त्याच्या ज्ञात साहित्यात अशा प्रकारचे कुठले वाक्य असेल तर बघायला आवडेल. यांच्यापैकी कुठलेही मुक्ताफळ चांगलेच आहे, पण आइन्स्टाइनच्या नावानी भारदस्तपणा आणता-आणता बिचार्‍या आइन्स्टाईनबुवाचे काय मत होते, ते कळतच नाही.

किट्टु 09/01/2009 - 20:19
" If your success is not on your own terms, if it looks good to the world but does not feel good in your heart, it is not success at all."

चतुरंग 09/01/2009 - 22:28
एका धूळभरल्या गाडीवरच्या मागल्या काचेवरल्या धुळीत गिरगटलेली अक्षरं "आता तरी पुसा!" हा मला नेहेमीच क्वोट ऑफ द डे वाटत आलाय! ;) चतुरंग

विकास 09/01/2009 - 22:41
हा चर्चा विषय छान आहे. वास्तवीक "मुक्ताफळे" म्हणले की "सुविचार" म्हणून डोक्यात येत नाहीत :-) तर "अकलेचे तारे तोडणे" येते. त्या संदर्भात जॉर्ज बुश इतका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुक्ताफळे उधळणारा कोणी झाला असेल असे वाटत नाही :-) खाली काही माझी आवडती वाक्ये देतो. जालावर "बुशिझम"च्या नावाखाली बरेच हसायला मिळू शकते! "Our enemies are innovative and resourceful, and so are we. They never stop thinking about new ways to harm our country and our people, and neither do we." —Washington, D.C., Aug. 5, 2004 We're concerned about AIDS inside our White House - make no mistake about it. "People say, well, do you ever hear any other voices other than, like, a few people? Of course I do."—Washington, D.C., Dec. 18, 2008 "I want to thank my friend, Senator Bill Frist, for joining us today. He married a Texas girl, I want you to know. Karyn is with us. A West Texas girl, just like me." --Nashville, Tennessee, May 27, 2004 "Yesterday, you made note of my—the lack of my talent when it came to dancing. But nevertheless, I want you to know I danced with joy. And no question Liberia has gone through very difficult times."—Speaking with the president of Liberia, Washington, D.C., Oct. 22, 2008 इत्यादी! :-)

एकलव्य 09/01/2009 - 22:59
... आपल्या सहभागाबद्दल आभार. तुम्ही येथे प्रतिसादात मांडलेली "थोरामोठ्यांची मार्गदर्शनपर वचने" किंवा "उधळलेले तारे" हे चांगलेच खाद्य आहे. (तसेच संपादकांनी उडवलेले अन्य काही प्रतिसाद तर खूपच प्रतिभासंपन्न होते असेही आम्हाला समजले. ;) ) हा धागा सुरू करताना माझ्या मनातील विचार मात्र आजच्या ताज्या बातम्या/ न्यूज चॅनेलवर झळकणारे एखादे वाक्य येथे प्रकाशित व्हावे असा होता/आहे. म्हणजे दिवसाला ३-४ पेक्षा प्रतिसाद म्हणजे डोक्यावरून पाणी! जर प्रकाशित केलेल्या मुक्ताफळांवर खूपच प्रतिक्रिया आल्या किंवा जास्तच वाद रंगला तर "ते" मुक्ताफळ उचलून स्वतंत्र चर्चाविषय करता येऊ शकतो. (बातम्यांतील स्टंटबाजीही आवडणारा) एकलव्य

वेतनवाढीसाठी पेट्रोल-डिझेलच्या निमित्ताने भारतीयांना वेठीस धरणार्‍या अधिकार्‍यांना जोडे हाणले पाहिजेत - प्रा.डॉ :)

सुचेल तसं 10/01/2009 - 08:59
एका ट्रकच्या मागे लिहीलं होतं.. थोडा कम पी रानी, महेंगा है इराक का पानी!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

घाटावरचे भट 10/01/2009 - 09:11
एका ट्रकच्या मागे वाचलेले वाक्य - "विठ्ठल-रखुमाईच्या आशीर्वादाच्या लाटा, म्हणून चालते ही जगदाळेची टाटा" :)

In reply to by घाटावरचे भट

निखिलराव 10/01/2009 - 11:42
एका ट्रकच्या मागे वाचलेले वाक्य - " घासल्या शिवाय तलवारीच्या पात्यांना धार नाही " " शिवबा शिवाय मराठी मातीला मान नाही " आणि त्याच्या खाली लिहले होते :- " आता बघतो काय मुजरा कर..."

In reply to by निखिलराव

या जगातील १० सत्य 1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे. २. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. ३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते. ४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी ५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात. ६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. ७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं. ८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब! ९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून! १०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो! संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.

एकलव्य 11/01/2009 - 10:38
हुतात्मा तुकाराम ओम्बळे यांची कन्या वैशाली उवाच - कसाबला माफी कसली देता? सहानुभूती कसली दाखविता? त्याला तत्काळ फाशी द्या!

अमोल केळकर 10/01/2009 - 11:04
ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही ते नास्तिक आहेत असे प्राचीन धर्मानी म्हटले आहे. नवा धर्म म्हणतो की ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही ते नास्तिक होत - स्वामी विवेकानंद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

Great People Don't Do Any Different Thing, They Do Thing Differently. Sometimes Majority Means All The Fools Standing On One Side! I Received Nothing I Wanted, But Everything I Needed. The Only Job Where You Start At The Top, Is Digging A Hole. Fortune Does Not Change A Man, It Unmasks Him. The Difference Between Genius And Stupidity Is That The Genius Has Its Limits. An Apple A Day Keep The Doctor Away,Unfortunately The Nurse Too..... PREVENT HANGOVER, Stay Drunk. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मनस्वी 10/01/2009 - 11:56
महागुरु उवाच : "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

जृंभणश्वान 10/01/2009 - 12:01
Sometimes a road less traveled is traveled less for a reason एवढा सोप्पा रस्ता सोडुन लोक पायऱ्यांनी का जात आहेत असा विचार केला. थोड्यावेळाने असा धडपडलो की वरील वाक्याचे महत्व पटले

खादाड 10/01/2009 - 13:04
''फक्त इमानदार लोक ह्या देशात अल्प्सन्ख्यक आहेत!'' हे कोणत्या तरी जीप वर होत .

वेताळ 10/01/2009 - 18:39
महान संत शिबु सोरेन ह्यानी त्याचा झारखंड मध्ये झालेल्या पराभवानंतर काढलेले उदगार "आजच मी पराभवानंतर संपुआ नेते लालु प्रसाद यादव याची भेट घेतली,नैतिकतेला अनुसरुन राजीनाम्याची गरज नसलेचे त्याचे मत.म्हणुन मी राजीनामा देणार नाही." कालच एका कॉग्रेस नेत्याने राहुल गांधी भारताचे पुढील पंतप्रधान असतील असे सांगितले.त्यावर मनु श्रिवास्तव ह्यानी सांगितले "राहुल गांधी ना पंतप्रधान करायचे की नाही ह्याबाबत सर्व निर्णय कॉग्रेस पक्ष घेईल.व त्याबाबत कॉग्रेस वर्किग कमीटीने आपले सर्व निर्णय श्रीमती सोनिया गांधीवर सोपवले आहेत." वेताळ

एकलव्य 11/01/2009 - 10:35
पाकिस्तान पंतप्रधान गिलानी उवाच - जहां तक दुनिआ का ताल्लूक है कि दुनिआ अगर इक इन्सिडन्स (= मुंबई हत्याकांड) को इतना बढाके पेश करती है, जो कि वो उनका अपना इन्टिलिजन्स फेल्युअर है । कि वो नहिं कि हमारा (= पाकिस्तानका) फेल्युअर है । वो कहते है कि दस लोगोंने पूरे हिन्दुस्तानको होस्टेज कर लिया । तो अब ए बताऍ हम तो रोजाना उनकी उमर की दुआऍ करते है कि खुदा न करे अगर फिर अगर कोई ... हो जाऍ तो वोभी हमारे खातें में आ जाऍ । तो अब हम इक मुल्क नहिं दो दो मुल्कोंका निफाजा कर रहै है http://media1.itgo.in/aajtak/video/012009/011009101444_10gilani1.wmv

एकलव्य 12/01/2009 - 06:59
स्वामिनॉमिक्सच्या आजच्या लेखात मांडलेले सूत्र आहे - While Enron deserved to die, Satyam deserves to be rescued. जगातील मोठमोठ्या आर्थिक व्यवस्थांमध्ये (प्रामुख्याने अमेरिकन आर्थिक जगतात) सरकारच्या मदतीने बुडत्या कंपन्यांना वाचविण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आर्थिक गैरव्यवहाराने कंपनी बुडते आहे की व्यवस्थेतील उलथापालथीने याचा विचार मह्त्त्वाचा राहिलेला दिसत नाही. "टू बिग टू लेट फेल" या -- योग्य अथवा अयोग्य -- एकमेव कारणाखाली सत्यमही वाचणार किंवा कसे ही एकप्रकारे वयात येऊ घातलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचीही कसोटी आहे. http://timesofindia.indiatimes.com/articleshow/3961881.cms?frm=mailtofriend

अमोल केळकर 12/01/2009 - 12:07
BEING IGNORANT IS NOT SO MUCH A SHAME AS BEING UNWILLING TO LEARN TO DO THINGS IN RIGHTWAY -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

एकलव्य 13/01/2009 - 06:53
Not having weapons of mass destruction was a significant disappointment - जॉर्ज बुश अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या समारोपाच्या (?) मुलाखतीतही अनेक तारे तोडले. (No Pain - No Gain! No Brain - No Pain!!) नमुने येथे पाहा... http://www.cnn.com/video/#/video/bestoftv/2009/01/12/nr.bush.speech.analysis.cnn?iref=videosearch अधिक माहिती - http://www.cnn.com/video/#/video/bestoftv/2009/01/12/njacns.best.bushisms.cnn?iref=videosearch

वेदनयन 14/01/2009 - 12:20
I have not failed. I've just found 10,000 ways that won't work The value of an idea lies in the using of it We don't know a millionth of one percent about anything I never did a day's work in my life. It was all fun

शंकरराव 16/01/2009 - 15:43
© २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. सखाराम गटणे

एकलव्य 17/01/2009 - 10:23
"If it weren't for the political power of the industry, nationalizing is what you'd want to do. It's almost a no-brainer!" डीन बेकर यांचे अमेरिकन अर्थव्यवस्थेवरील एक प्रातिनिधिक भाष्य http://www.financialweek.com/apps/pbcs.dll/article?AID=/20090116/REG/901169989/1036/FREE आज अमेरिकेतील (आणि पर्यायाने जगातल्याही) दोन भल्यामोठ्या बँकांनी -- बँक ऑफ अमेरिका आणि पंडितांची सिटी -- दोघात मिळून जवळपास १० बिलिअन डॉलर्सचा तोटा नोंदविला. सरकारने आतापर्यंत या दोघांना मिळून ~९० बिलिअन डॉलर्सचे कॅपिटल इंजेक्शन दिलेले आहे तरीही येत्या काही दिवसात पुन्हा मोठी पडझड व्हायची शक्यता आहे. अमेरिकेच्या ट्रेझररने पुन्हा "ऍग्रीगेट" बॅकेचे तुणतुणे वाजविले... अर्थात हे नुसते तुणतुणे नाही. TARP, TGLP, TALF या आणि अशा अनेक मार्गांनी अमेरिकन सरकार आधीच मार्केटवर डायरेक्ट प्रभाव टाकते आहेच. जगातील भांडवलशाही देशात आणि जगातही नवीन वर्षात कोणत्या दिशेने बदलांचे वारे वाहणार याची चाहूल वॉल स्ट्रीटवरच्या आजच्या घडामोडीत लागते.

एकलव्य 17/01/2009 - 10:28
सदर लेखास अनेक अवांतर प्रतिसाद आलेले दिसत आहेत. हे प्रतिसाद चांगले आहेत आणि अतिअवांतर नाहीत हेही खरे आहे. त्यांत वाह्यातपणा नसल्याने संपादकांचे दुर्लक्ष झालेले असू शकते पण तरीही हे सर्व प्रतिसाद एकाच प्रतिसादाखाली संकलित केल्यास मूळ लेखाच्या हेतूस हातभार लागेल असे वाटते. - एकलव्य

एकलव्य 19/01/2009 - 10:03
काश्मीरमध्ये नुकत्याच दहशतावादाला न जुमानता तडीस गेलेल्या निवडणुका, निकालानंतर झपाट्याने जन्मास आलेली युती, अलगतावादाचे अजेंडे आणि भारताशी नाळ जोडलेली राखण्याची कसरत, दिल्लीने बरखास्त न केलेले सरकार ह्या सार्‍या पार्श्वभूमीवर तरुण मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला याच्या समोरील आव्हाने अनेक आहेत... त्यातील एक आहे ते काश्मीरच्या राजकारणावरील समीक्षकांच्या खालील टिपण्णीस पुरून उरण्याचे - Kashmir is a graveyard of reputations for politicians.

एकलव्य 19/01/2009 - 22:11
"I have a dream that my four little children will one day live in a nation where they will not be judged by the color of their skin, but by the content of their character." - मार्टिन ल्युथर किंग यांचे हे जगप्रसिद्ध वाक्य आजचे नाही... पण MLK च्या आजच्या स्मृतीदिनी हे वाक्य आज कधी नव्हे तेव्हढे अनेकांच्या मनात घोळत असेल. ओबामाच्या रूपाने पहिला आफ्रिकन अमेरिकन जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्राच्या अध्यक्षपदाची शपथ उद्या येथे घेईल तेव्हा आपल्या स्वप्नाची जणू पूर्तता झाल्याचे किंवा त्यादिशेने एक फार मोठे पाऊल पडल्याचे समाधान मार्टिन ल्युथर किंग यांना आज मिळत असेल. ओबामा शपथविधी स्थान "Has that dream been fulfilled? With the election of Barack Obama, two thirds of African-Americans believe it has," CNN senior political analyst Bill Schneider said. "Most blacks and whites went to bed on election night saying, 'I never thought I'd live to see the day.' That's what the nation is celebrating on this King holiday: We have lived to see the day," Schneider said.

एकलव्य 22/01/2009 - 07:23
अमेरिकन अर्थव्यवस्थेचे आणि बर्‍याच अर्थांनी अमेरिकन सामर्थ्याचे प्रतीक असणार्‍या GM and Chrysler या अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. बेलआउटची लाईफलाईन आणखी काही आठवडे पुरेल त्यानंतरचे भविष्य अवघड आहे हे सांगताना GM and Chrysler येथील व्यवस्थापनावर चालू असलेल्या टीकेचा हा आजचा नमुना - "This is like an alcoholic who is drinking two quarts a day, saying he'll go down to one quart a day"

In reply to by एकलव्य

लिखाळ 23/01/2009 - 18:19
अल्कोहोलच्या उल्लेखाने बुश यांच्या शेवटच्या वार्ताहरपरिशदेतले वाक्य आठवले. बेलाआउतचे पैसे सामान्यांचेच आहेत आणि त्यांनी कर वेळोवेळी भरलेलाच आहे. तरी सुद्धा पुन्हा बेलाआउटच्या मार्गाने त्यांनी पैसे का द्यावे असा प्रश्न त्यांना पडेल असे बुश म्हणाले आणी वर अश्या तर्‍हेचे काही... की वॉलस्ट्रीटने दारु ढोसली आणि त्याचा हेंगओवर आम्हाला..अशी सामन्यांची भावना होऊ शकते..इत्यादी. मला ती उपमा आवडली.. -- लिखाळ.

एकलव्य 22/01/2009 - 08:25
Heroes only if system fails - अतिरेक्यांच्या हल्याच्यावेळी उघडकीस आलेली गोंधळ आणि व्यवस्थेतील त्रुटी यांवर राहुल गांधी यांनी केलेली मार्मिक टिपण्णी

एकलव्य 23/01/2009 - 09:48
आज खरे तर आणखीही बर्‍याच घडामोडी झाल्या... पण एकच वाक्य उचलायचे म्हटले तर हे घ्या - "Only a foreigner could have made such a film" - Slumdog Millionaire ला ऑस्करसाठी १० वेगवेगळ्या शिफारसी (नामांकने) मिळाल्यानंतर इरफान यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे ;)

अमोल केळकर 23/01/2009 - 18:01
हजारो मैलाचा प्रवास एका पावलाने सुरु होतो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

एकलव्य 24/01/2009 - 03:53
येणार्‍या वादळाची -- बहुदा पेल्यातीलच कारण खरे वादळ झेपणारे नाही -- चाहूल अमेरिकन ट्रेझररने नवीन राजवटीच्या सुरुवातीस चीनवर केलेला डायरेक्ट आरोप - "President Obama -- backed by the conclusions of a broad range of economists -- believes that China is manipulating its currency." त्यावर चीनने अधिकृतरित्या मारलेला टोला - "Directing unsubstantiated criticism at China on the exchange rate issue will only help US protectionism and will not help towards a real solution to the issue"

In reply to by एकलव्य

एकलव्य 25/01/2009 - 11:00
China and America - War of words अगदी माझ्या मनात असेच विचार आले असे म्हणायला हरकत नाही! तपशील देत नाही पण इच्छुकांनी लेख http://www.economist.com/finance/displaystory.cfm?story_id=13005072 येथे वाचावा.

प्रदीप 25/01/2009 - 18:32
हे अलिकडचे बूकर पारितोषिक विजेते, त्यांच्या 'द व्हाईट टायगर' ह्या पुस्तकासाठी. आमच्या येथील वर्तमानपत्राने आज त्यांची मुलाखत छापली आहे. त्यात त्यांना त्यांच्या एजंटशी झालेल्या तथाकथित वादाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांची मल्लिनाथी: "ब्रिटिश वृत्तपत्रांत माझ्याबद्दल काही छापून आले तरी त्याबद्दल मला काही वैषम्य नाही, कारण मी मुंबईत रहातो. (पण) भारतीय माध्यमे त्यांचा ५० % वेळ, वसाहतवादी ब्रिटिश, जे त्यांच्या देशातून ६१ वर्षांपूर्वी निघून गेले आहेत, त्यांच्यावर टिका करण्यात घालवतात. व उरलेला ५०% वेळ ब्रिटनमधील गटारपत्रांतील 'बातम्या' इमानेइतबारे उचलून घेण्यात!" ["The British press is of no concern to me because I live in Mumbai. The Indian media spends half its time attacking the British colonial masters who left them 61 years ago, and the other half faithfully copying stories from the English gutter press"]

एकलव्य 27/01/2009 - 06:23
ओबामाचे राष्ट्राध्यक्ष होणे आणि वंशभेदाची त्यानिमित्याने झालेली ऐशीतैशी यांवर मिपाकर "सहज"रावांना गवसलेले हे अवतरण - Excellent black people have always been compensated for excellence. Always. The real equality is when we can have a black president as dumb as George Bush - Comedian Chris Rock joking after President Obama's inauguration.

एकलव्य 30/01/2009 - 08:05
"This is the first I've heard of Prime Minister Putin coming out for free enterprise," Clinton joked "I hope it works for him." अर्थव्यवस्थेची उलथापालथ येऊ घातलेल्या काळात सेन्ट्रल प्लॅनिंगचे जगातील आजवरचे विक्रम मागे टाकण्याची शक्यता असलेल्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाने गंजलेले पोलादी दरवाजे किलकिले करू पाहणार्‍या रशियाच्या सर्वेसर्व्यावर केलेली ही टिपण्णी म्हणजे अर्थव्यवस्थेतील उलथापालथीचा एक मासलेवाईक नमुना आहे. Putin has often been criticized for exerting state control over Russia's key industries such as oil and gas.

एकलव्य 31/01/2009 - 18:19
इराणी दूरदर्शनवरील एका समीक्षेत हॅरि पॉट्टरच्या अतिलोकप्रिय पुस्तकावर आणि चित्रपटाचे केलेले हे समीक्षण - Propaganda for purity of blood and race ... is openly portrayed and emphasized in the second Harry Potter film. हॅरि पॉट्टरच्या वाटेला आम्ही कधी गेलो नाही... तेव्हा वरील विधानातील विनोदीपणा अथवा दाहकातेची आम्हाला नेमकी कल्पना नाही हे समजून घ्यावे - एकलव्य

Put your hand on a hot stove for a minute, and it seems like an hour. Sit with a pretty girl for an hour, and it seems like a minute. THAT'S relativity. - Albert Einstein The brain is a wonderful organ. It starts working the moment you get up in the morning and does not stop until you get into the office. - Robert Frost The trouble with being punctual is that nobody's there to appreciate it. - Franklin P. Jones We must believe in luck. For how else can we explain the success of those we don't like? - Jean Cocturan It matters not whether you win or lose; what matters is whether I win or lose. - Darrin Weinberg

एकलव्य 20/02/2009 - 10:56
बुडणार्‍या किंवा सरकारी अनुदानावर तरणार्‍या बँका ह्याची "न्यूज"व्हॅल्यू राहिलेली नाही. पण झाकलेली अब्रू आणि दडपलेली पापे उघड्यावर आणू शकणार्‍या ह्या एका डेव्हलपमेन्टकडे लक्ष खेचले गेले. स्विस बँकेतील छुपी खाती ही जगभरातील उद्योगपतींचे, माफियांचे आणि राजकारण्यांची भलतीच सोय मानली जाते. पण त्यांचे दिवस भरले आहेत असे (वरवर तरी) दिसते आहे... The Swiss are saying that this is the end of Swiss banking as they knew it. JACK BLUM, a specialist in offshore banking, on the decision of UBS to reveal the names of Americans who may have used the Swiss bank to avoid paying income tax http://www.nytimes.com/2009/02/19/business/worldbusiness/19ubs.html

एकलव्य 11/01/2009 - 10:45
श्रीगणेशा म्हणून शिळी बातमी देतो आहे... पण हेच ते वाक्य जे माझ्या मित्राने पाठविले. "The Indians, after the attacks, were deeply offended and furious, but they are also clever. We may be crazy in Pakistan, but not completely out of our minds." - इति आयएसआयचा प्रमुख अहमद पाशा आर आर पाटलांपासून ते झरदारीपर्यंत तोल सुटलेल्या विधानांचे तीर वेडेवाकडे सुटत असताना पाशाचे वक्तव्य मुत्सद्दीपणाची वेगळी पातळी दाखवून जाते.

एकलव्य 11/01/2009 - 10:48
अमेरिकेच्या होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षाने आर्थिक परिस्थितीवर टिपण्णी करताना आज म्हटले की - "Only government" can provide the solution to the country’s economic ills." "मार्केट शुड क्युअर बाय ईटसेल्फ" आणि "सेंट्रल प्लॅनिंग म्हणजे बरबादी" ह्यावर अमेरिकन सरकारचाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकाचाही मोठा विश्वास आहे... अगदी अंधश्रद्धा म्हणावी या टोकाइतका. त्या पार्श्वभूमीवर ओबामाने दिलेली (किंवा खरे तर देण्यास भाग पडलेली) कबुली बरेच काही सांगून जाते.

In reply to by नंदन

लिखाळ 09/01/2009 - 17:05
सत्यम मधला अंतर्गत विरोधाभास एकदम आवडला. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

मदनबाण 09/01/2009 - 13:45
Arriving at one point is the starting point to another. John Dewey मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

If fate means you to lose, give it a good fight anyhow... ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by चाणक्य

धनंजय 24/01/2009 - 04:43
चांगले वाक्य कोणी म्हटले ते महत्त्वाचे नाही. पण हे वाक्य आइन्स्टाईनचे नसावे. याचे अनेक पाठभेद दिसतात : A problem can not be solved with the same consciousness that ... “The significant problems we face cannot be solved at the same level of thinking we were at when we created them.” वगैरे. ते पाठभेद वेगवेगळे लोक आपल्याला ठीक वाटतील त्या प्रसंगात वापरतात. "the same consciousness" हे श्री-चिन्मय यांच्या दुव्यावर दिसते - त्यांना अर्थात चैतन्याबद्दल काही सांगण्यात रस आहे. "same level of thinking we were at when" वापरणारे साधारण बंडखोर असतात, म्हणजे पूर्वीच्या काळच्या विचारधारेपेक्षा भविष्यातली विचारधारा वेगळी हवी असे त्यांना सांगायचे आहे. "by today's wisdom" या पाठात पूर्वीचे ज्ञान उजवे होते, असा काही अर्थ निघतो ("विजडम" शब्दात अनुभवी ऋजू सदसद्विवेक - असा काही अर्थ आहे.) उगीच बिचार्‍या आइन्स्टाइनला असले विसंवादी विचार सांगायला लावतात. त्याच्या ज्ञात साहित्यात अशा प्रकारचे कुठले वाक्य असेल तर बघायला आवडेल. यांच्यापैकी कुठलेही मुक्ताफळ चांगलेच आहे, पण आइन्स्टाइनच्या नावानी भारदस्तपणा आणता-आणता बिचार्‍या आइन्स्टाईनबुवाचे काय मत होते, ते कळतच नाही.

किट्टु 09/01/2009 - 20:19
" If your success is not on your own terms, if it looks good to the world but does not feel good in your heart, it is not success at all."

चतुरंग 09/01/2009 - 22:28
एका धूळभरल्या गाडीवरच्या मागल्या काचेवरल्या धुळीत गिरगटलेली अक्षरं "आता तरी पुसा!" हा मला नेहेमीच क्वोट ऑफ द डे वाटत आलाय! ;) चतुरंग

विकास 09/01/2009 - 22:41
हा चर्चा विषय छान आहे. वास्तवीक "मुक्ताफळे" म्हणले की "सुविचार" म्हणून डोक्यात येत नाहीत :-) तर "अकलेचे तारे तोडणे" येते. त्या संदर्भात जॉर्ज बुश इतका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुक्ताफळे उधळणारा कोणी झाला असेल असे वाटत नाही :-) खाली काही माझी आवडती वाक्ये देतो. जालावर "बुशिझम"च्या नावाखाली बरेच हसायला मिळू शकते! "Our enemies are innovative and resourceful, and so are we. They never stop thinking about new ways to harm our country and our people, and neither do we." —Washington, D.C., Aug. 5, 2004 We're concerned about AIDS inside our White House - make no mistake about it. "People say, well, do you ever hear any other voices other than, like, a few people? Of course I do."—Washington, D.C., Dec. 18, 2008 "I want to thank my friend, Senator Bill Frist, for joining us today. He married a Texas girl, I want you to know. Karyn is with us. A West Texas girl, just like me." --Nashville, Tennessee, May 27, 2004 "Yesterday, you made note of my—the lack of my talent when it came to dancing. But nevertheless, I want you to know I danced with joy. And no question Liberia has gone through very difficult times."—Speaking with the president of Liberia, Washington, D.C., Oct. 22, 2008 इत्यादी! :-)

एकलव्य 09/01/2009 - 22:59
... आपल्या सहभागाबद्दल आभार. तुम्ही येथे प्रतिसादात मांडलेली "थोरामोठ्यांची मार्गदर्शनपर वचने" किंवा "उधळलेले तारे" हे चांगलेच खाद्य आहे. (तसेच संपादकांनी उडवलेले अन्य काही प्रतिसाद तर खूपच प्रतिभासंपन्न होते असेही आम्हाला समजले. ;) ) हा धागा सुरू करताना माझ्या मनातील विचार मात्र आजच्या ताज्या बातम्या/ न्यूज चॅनेलवर झळकणारे एखादे वाक्य येथे प्रकाशित व्हावे असा होता/आहे. म्हणजे दिवसाला ३-४ पेक्षा प्रतिसाद म्हणजे डोक्यावरून पाणी! जर प्रकाशित केलेल्या मुक्ताफळांवर खूपच प्रतिक्रिया आल्या किंवा जास्तच वाद रंगला तर "ते" मुक्ताफळ उचलून स्वतंत्र चर्चाविषय करता येऊ शकतो. (बातम्यांतील स्टंटबाजीही आवडणारा) एकलव्य

वेतनवाढीसाठी पेट्रोल-डिझेलच्या निमित्ताने भारतीयांना वेठीस धरणार्‍या अधिकार्‍यांना जोडे हाणले पाहिजेत - प्रा.डॉ :)

सुचेल तसं 10/01/2009 - 08:59
एका ट्रकच्या मागे लिहीलं होतं.. थोडा कम पी रानी, महेंगा है इराक का पानी!!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

घाटावरचे भट 10/01/2009 - 09:11
एका ट्रकच्या मागे वाचलेले वाक्य - "विठ्ठल-रखुमाईच्या आशीर्वादाच्या लाटा, म्हणून चालते ही जगदाळेची टाटा" :)

In reply to by घाटावरचे भट

निखिलराव 10/01/2009 - 11:42
एका ट्रकच्या मागे वाचलेले वाक्य - " घासल्या शिवाय तलवारीच्या पात्यांना धार नाही " " शिवबा शिवाय मराठी मातीला मान नाही " आणि त्याच्या खाली लिहले होते :- " आता बघतो काय मुजरा कर..."

In reply to by निखिलराव

या जगातील १० सत्य 1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे. २. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. ३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते. ४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी ५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात. ६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. ७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं. ८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब! ९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून! १०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो! संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.

एकलव्य 11/01/2009 - 10:38
हुतात्मा तुकाराम ओम्बळे यांची कन्या वैशाली उवाच - कसाबला माफी कसली देता? सहानुभूती कसली दाखविता? त्याला तत्काळ फाशी द्या!

अमोल केळकर 10/01/2009 - 11:04
ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही ते नास्तिक आहेत असे प्राचीन धर्मानी म्हटले आहे. नवा धर्म म्हणतो की ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही ते नास्तिक होत - स्वामी विवेकानंद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

Great People Don't Do Any Different Thing, They Do Thing Differently. Sometimes Majority Means All The Fools Standing On One Side! I Received Nothing I Wanted, But Everything I Needed. The Only Job Where You Start At The Top, Is Digging A Hole. Fortune Does Not Change A Man, It Unmasks Him. The Difference Between Genius And Stupidity Is That The Genius Has Its Limits. An Apple A Day Keep The Doctor Away,Unfortunately The Nurse Too..... PREVENT HANGOVER, Stay Drunk. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मनस्वी 10/01/2009 - 11:56
महागुरु उवाच : "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

जृंभणश्वान 10/01/2009 - 12:01
Sometimes a road less traveled is traveled less for a reason एवढा सोप्पा रस्ता सोडुन लोक पायऱ्यांनी का जात आहेत असा विचार केला. थोड्यावेळाने असा धडपडलो की वरील वाक्याचे महत्व पटले

खादाड 10/01/2009 - 13:04
''फक्त इमानदार लोक ह्या देशात अल्प्सन्ख्यक आहेत!'' हे कोणत्या तरी जीप वर होत .

वेताळ 10/01/2009 - 18:39
महान संत शिबु सोरेन ह्यानी त्याचा झारखंड मध्ये झालेल्या पराभवानंतर काढलेले उदगार "आजच मी पराभवानंतर संपुआ नेते लालु प्रसाद यादव याची भेट घेतली,नैतिकतेला अनुसरुन राजीनाम्याची गरज नसलेचे त्याचे मत.म्हणुन मी राजीनामा देणार नाही." कालच एका कॉग्रेस नेत्याने राहुल गांधी भारताचे पुढील पंतप्रधान असतील असे सांगितले.त्यावर मनु श्रिवास्तव ह्यानी सांगितले "राहुल गांधी ना पंतप्रधान करायचे की नाही ह्याबाबत सर्व निर्णय कॉग्रेस पक्ष घेईल.व त्याबाबत कॉग्रेस वर्किग कमीटीने आपले सर्व निर्णय श्रीमती सोनिया गांधीवर सोपवले आहेत." वेताळ

एकलव्य 11/01/2009 - 10:35
पाकिस्तान पंतप्रधान गिलानी उवाच - जहां तक दुनिआ का ताल्लूक है कि दुनिआ अगर इक इन्सिडन्स (= मुंबई हत्याकांड) को इतना बढाके पेश करती है, जो कि वो उनका अपना इन्टिलिजन्स फेल्युअर है । कि वो नहिं कि हमारा (= पाकिस्तानका) फेल्युअर है । वो कहते है कि दस लोगोंने पूरे हिन्दुस्तानको होस्टेज कर लिया । तो अब ए बताऍ हम तो रोजाना उनकी उमर की दुआऍ करते है कि खुदा न करे अगर फिर अगर कोई ... हो जाऍ तो वोभी हमारे खातें में आ जाऍ । तो अब हम इक मुल्क नहिं दो दो मुल्कोंका निफाजा कर रहै है http://media1.itgo.in/aajtak/video/012009/011009101444_10gilani1.wmv

एकलव्य 12/01/2009 - 06:59
स्वामिनॉमिक्सच्या आजच्या लेखात मांडलेले सूत्र आहे - While Enron deserved to die, Satyam deserves to be rescued. जगातील मोठमोठ्या आर्थिक व्यवस्थांमध्ये (प्रामुख्याने अमेरिकन आर्थिक जगतात) सरकारच्या मदतीने बुडत्या कंपन्यांना वाचविण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आर्थिक गैरव्यवहाराने कंपनी बुडते आहे की व्यवस्थेतील उलथापालथीने याचा विचार मह्त्त्वाचा राहिलेला दिसत नाही. "टू बिग टू लेट फेल" या -- योग्य अथवा अयोग्य -- एकमेव कारणाखाली सत्यमही वाचणार किंवा कसे ही एकप्रकारे वयात येऊ घातलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचीही कसोटी आहे. http://timesofindia.indiatimes.com/articleshow/3961881.cms?frm=mailtofriend

अमोल केळकर 12/01/2009 - 12:07
BEING IGNORANT IS NOT SO MUCH A SHAME AS BEING UNWILLING TO LEARN TO DO THINGS IN RIGHTWAY -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

एकलव्य 13/01/2009 - 06:53
Not having weapons of mass destruction was a significant disappointment - जॉर्ज बुश अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष यांनी आपल्या समारोपाच्या (?) मुलाखतीतही अनेक तारे तोडले. (No Pain - No Gain! No Brain - No Pain!!) नमुने येथे पाहा... http://www.cnn.com/video/#/video/bestoftv/2009/01/12/nr.bush.speech.analysis.cnn?iref=videosearch अधिक माहिती - http://www.cnn.com/video/#/video/bestoftv/2009/01/12/njacns.best.bushisms.cnn?iref=videosearch

वेदनयन 14/01/2009 - 12:20
I have not failed. I've just found 10,000 ways that won't work The value of an idea lies in the using of it We don't know a millionth of one percent about anything I never did a day's work in my life. It was all fun

शंकरराव 16/01/2009 - 15:43
© २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही. सखाराम गटणे

एकलव्य 17/01/2009 - 10:23
"If it weren't for the political power of the industry, nationalizing is what you'd want to do. It's almost a no-brainer!" डीन बेकर यांचे अमेरिकन अर्थव्यवस्थेवरील एक प्रातिनिधिक भाष्य http://www.financialweek.com/apps/pbcs.dll/article?AID=/20090116/REG/901169989/1036/FREE आज अमेरिकेतील (आणि पर्यायाने जगातल्याही) दोन भल्यामोठ्या बँकांनी -- बँक ऑफ अमेरिका आणि पंडितांची सिटी -- दोघात मिळून जवळपास १० बिलिअन डॉलर्सचा तोटा नोंदविला. सरकारने आतापर्यंत या दोघांना मिळून ~९० बिलिअन डॉलर्सचे कॅपिटल इंजेक्शन दिलेले आहे तरीही येत्या काही दिवसात पुन्हा मोठी पडझड व्हायची शक्यता आहे. अमेरिकेच्या ट्रेझररने पुन्हा "ऍग्रीगेट" बॅकेचे तुणतुणे वाजविले... अर्थात हे नुसते तुणतुणे नाही. TARP, TGLP, TALF या आणि अशा अनेक मार्गांनी अमेरिकन सरकार आधीच मार्केटवर डायरेक्ट प्रभाव टाकते आहेच. जगातील भांडवलशाही देशात आणि जगातही नवीन वर्षात कोणत्या दिशेने बदलांचे वारे वाहणार याची चाहूल वॉल स्ट्रीटवरच्या आजच्या घडामोडीत लागते.

एकलव्य 17/01/2009 - 10:28
सदर लेखास अनेक अवांतर प्रतिसाद आलेले दिसत आहेत. हे प्रतिसाद चांगले आहेत आणि अतिअवांतर नाहीत हेही खरे आहे. त्यांत वाह्यातपणा नसल्याने संपादकांचे दुर्लक्ष झालेले असू शकते पण तरीही हे सर्व प्रतिसाद एकाच प्रतिसादाखाली संकलित केल्यास मूळ लेखाच्या हेतूस हातभार लागेल असे वाटते. - एकलव्य

एकलव्य 19/01/2009 - 10:03
काश्मीरमध्ये नुकत्याच दहशतावादाला न जुमानता तडीस गेलेल्या निवडणुका, निकालानंतर झपाट्याने जन्मास आलेली युती, अलगतावादाचे अजेंडे आणि भारताशी नाळ जोडलेली राखण्याची कसरत, दिल्लीने बरखास्त न केलेले सरकार ह्या सार्‍या पार्श्वभूमीवर तरुण मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला याच्या समोरील आव्हाने अनेक आहेत... त्यातील एक आहे ते काश्मीरच्या राजकारणावरील समीक्षकांच्या खालील टिपण्णीस पुरून उरण्याचे - Kashmir is a graveyard of reputations for politicians.

एकलव्य 19/01/2009 - 22:11
"I have a dream that my four little children will one day live in a nation where they will not be judged by the color of their skin, but by the content of their character." - मार्टिन ल्युथर किंग यांचे हे जगप्रसिद्ध वाक्य आजचे नाही... पण MLK च्या आजच्या स्मृतीदिनी हे वाक्य आज कधी नव्हे तेव्हढे अनेकांच्या मनात घोळत असेल. ओबामाच्या रूपाने पहिला आफ्रिकन अमेरिकन जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्राच्या अध्यक्षपदाची शपथ उद्या येथे घेईल तेव्हा आपल्या स्वप्नाची जणू पूर्तता झाल्याचे किंवा त्यादिशेने एक फार मोठे पाऊल पडल्याचे समाधान मार्टिन ल्युथर किंग यांना आज मिळत असेल. ओबामा शपथविधी स्थान "Has that dream been fulfilled? With the election of Barack Obama, two thirds of African-Americans believe it has," CNN senior political analyst Bill Schneider said. "Most blacks and whites went to bed on election night saying, 'I never thought I'd live to see the day.' That's what the nation is celebrating on this King holiday: We have lived to see the day," Schneider said.

एकलव्य 22/01/2009 - 07:23
अमेरिकन अर्थव्यवस्थेचे आणि बर्‍याच अर्थांनी अमेरिकन सामर्थ्याचे प्रतीक असणार्‍या GM and Chrysler या अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. बेलआउटची लाईफलाईन आणखी काही आठवडे पुरेल त्यानंतरचे भविष्य अवघड आहे हे सांगताना GM and Chrysler येथील व्यवस्थापनावर चालू असलेल्या टीकेचा हा आजचा नमुना - "This is like an alcoholic who is drinking two quarts a day, saying he'll go down to one quart a day"

In reply to by एकलव्य

लिखाळ 23/01/2009 - 18:19
अल्कोहोलच्या उल्लेखाने बुश यांच्या शेवटच्या वार्ताहरपरिशदेतले वाक्य आठवले. बेलाआउतचे पैसे सामान्यांचेच आहेत आणि त्यांनी कर वेळोवेळी भरलेलाच आहे. तरी सुद्धा पुन्हा बेलाआउटच्या मार्गाने त्यांनी पैसे का द्यावे असा प्रश्न त्यांना पडेल असे बुश म्हणाले आणी वर अश्या तर्‍हेचे काही... की वॉलस्ट्रीटने दारु ढोसली आणि त्याचा हेंगओवर आम्हाला..अशी सामन्यांची भावना होऊ शकते..इत्यादी. मला ती उपमा आवडली.. -- लिखाळ.

एकलव्य 22/01/2009 - 08:25
Heroes only if system fails - अतिरेक्यांच्या हल्याच्यावेळी उघडकीस आलेली गोंधळ आणि व्यवस्थेतील त्रुटी यांवर राहुल गांधी यांनी केलेली मार्मिक टिपण्णी

एकलव्य 23/01/2009 - 09:48
आज खरे तर आणखीही बर्‍याच घडामोडी झाल्या... पण एकच वाक्य उचलायचे म्हटले तर हे घ्या - "Only a foreigner could have made such a film" - Slumdog Millionaire ला ऑस्करसाठी १० वेगवेगळ्या शिफारसी (नामांकने) मिळाल्यानंतर इरफान यांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे ;)

अमोल केळकर 23/01/2009 - 18:01
हजारो मैलाचा प्रवास एका पावलाने सुरु होतो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

एकलव्य 24/01/2009 - 03:53
येणार्‍या वादळाची -- बहुदा पेल्यातीलच कारण खरे वादळ झेपणारे नाही -- चाहूल अमेरिकन ट्रेझररने नवीन राजवटीच्या सुरुवातीस चीनवर केलेला डायरेक्ट आरोप - "President Obama -- backed by the conclusions of a broad range of economists -- believes that China is manipulating its currency." त्यावर चीनने अधिकृतरित्या मारलेला टोला - "Directing unsubstantiated criticism at China on the exchange rate issue will only help US protectionism and will not help towards a real solution to the issue"

In reply to by एकलव्य

एकलव्य 25/01/2009 - 11:00
China and America - War of words अगदी माझ्या मनात असेच विचार आले असे म्हणायला हरकत नाही! तपशील देत नाही पण इच्छुकांनी लेख http://www.economist.com/finance/displaystory.cfm?story_id=13005072 येथे वाचावा.

प्रदीप 25/01/2009 - 18:32
हे अलिकडचे बूकर पारितोषिक विजेते, त्यांच्या 'द व्हाईट टायगर' ह्या पुस्तकासाठी. आमच्या येथील वर्तमानपत्राने आज त्यांची मुलाखत छापली आहे. त्यात त्यांना त्यांच्या एजंटशी झालेल्या तथाकथित वादाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांची मल्लिनाथी: "ब्रिटिश वृत्तपत्रांत माझ्याबद्दल काही छापून आले तरी त्याबद्दल मला काही वैषम्य नाही, कारण मी मुंबईत रहातो. (पण) भारतीय माध्यमे त्यांचा ५० % वेळ, वसाहतवादी ब्रिटिश, जे त्यांच्या देशातून ६१ वर्षांपूर्वी निघून गेले आहेत, त्यांच्यावर टिका करण्यात घालवतात. व उरलेला ५०% वेळ ब्रिटनमधील गटारपत्रांतील 'बातम्या' इमानेइतबारे उचलून घेण्यात!" ["The British press is of no concern to me because I live in Mumbai. The Indian media spends half its time attacking the British colonial masters who left them 61 years ago, and the other half faithfully copying stories from the English gutter press"]

एकलव्य 27/01/2009 - 06:23
ओबामाचे राष्ट्राध्यक्ष होणे आणि वंशभेदाची त्यानिमित्याने झालेली ऐशीतैशी यांवर मिपाकर "सहज"रावांना गवसलेले हे अवतरण - Excellent black people have always been compensated for excellence. Always. The real equality is when we can have a black president as dumb as George Bush - Comedian Chris Rock joking after President Obama's inauguration.

एकलव्य 30/01/2009 - 08:05
"This is the first I've heard of Prime Minister Putin coming out for free enterprise," Clinton joked "I hope it works for him." अर्थव्यवस्थेची उलथापालथ येऊ घातलेल्या काळात सेन्ट्रल प्लॅनिंगचे जगातील आजवरचे विक्रम मागे टाकण्याची शक्यता असलेल्या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाने गंजलेले पोलादी दरवाजे किलकिले करू पाहणार्‍या रशियाच्या सर्वेसर्व्यावर केलेली ही टिपण्णी म्हणजे अर्थव्यवस्थेतील उलथापालथीचा एक मासलेवाईक नमुना आहे. Putin has often been criticized for exerting state control over Russia's key industries such as oil and gas.

एकलव्य 31/01/2009 - 18:19
इराणी दूरदर्शनवरील एका समीक्षेत हॅरि पॉट्टरच्या अतिलोकप्रिय पुस्तकावर आणि चित्रपटाचे केलेले हे समीक्षण - Propaganda for purity of blood and race ... is openly portrayed and emphasized in the second Harry Potter film. हॅरि पॉट्टरच्या वाटेला आम्ही कधी गेलो नाही... तेव्हा वरील विधानातील विनोदीपणा अथवा दाहकातेची आम्हाला नेमकी कल्पना नाही हे समजून घ्यावे - एकलव्य

Put your hand on a hot stove for a minute, and it seems like an hour. Sit with a pretty girl for an hour, and it seems like a minute. THAT'S relativity. - Albert Einstein The brain is a wonderful organ. It starts working the moment you get up in the morning and does not stop until you get into the office. - Robert Frost The trouble with being punctual is that nobody's there to appreciate it. - Franklin P. Jones We must believe in luck. For how else can we explain the success of those we don't like? - Jean Cocturan It matters not whether you win or lose; what matters is whether I win or lose. - Darrin Weinberg

एकलव्य 20/02/2009 - 10:56
बुडणार्‍या किंवा सरकारी अनुदानावर तरणार्‍या बँका ह्याची "न्यूज"व्हॅल्यू राहिलेली नाही. पण झाकलेली अब्रू आणि दडपलेली पापे उघड्यावर आणू शकणार्‍या ह्या एका डेव्हलपमेन्टकडे लक्ष खेचले गेले. स्विस बँकेतील छुपी खाती ही जगभरातील उद्योगपतींचे, माफियांचे आणि राजकारण्यांची भलतीच सोय मानली जाते. पण त्यांचे दिवस भरले आहेत असे (वरवर तरी) दिसते आहे... The Swiss are saying that this is the end of Swiss banking as they knew it. JACK BLUM, a specialist in offshore banking, on the decision of UBS to reveal the names of Americans who may have used the Swiss bank to avoid paying income tax http://www.nytimes.com/2009/02/19/business/worldbusiness/19ubs.html
लेखनविषय:
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्‍याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही. तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात.

जाहीर विचारणा आणि आवाहन

घाटावरचे भट ·

विसोबा खेचर 24/12/2008 - 09:12
मिपा नुकतंच नवीन सर्व्हरवर गेलंय असं ऐकंलं, त्यामुळे एवढ्या एका रेकार्डसाठी काही मिपाची जागा कमी पडणार नाही, काय? हम्म! चालू द्या.. आम्ही पुन्हा पैशे भरू..!

आपण उल्लेख केलेला लेख हे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्याचं (आमच्या मते!!!!) आदर्श उदाहरण ठरत नाही.... जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणारा लेख असा असावा की ते प्रतिसाद वेगवेगळ्या लोकांकडून एकदाच मिळालेले असावेत... माफ करा, पण आपण उल्लेख केलेल्या लेखावर काही ठराविक लोकंच पुन्हा पुन्हा प्रतिसाद देऊन (आमच्या मते) वितंडवाद घालताहेत... बाकी समस्त मिपा जनता तिथे प्रतिसाद देण्यापासून अलिप्त राहिलेली दिसतेय असे आम्हाला दिसतेय..... तेंव्हा तुम्हाला सर्वाधिक प्रतिसाद मिळणारा (पक्षी: लोकप्रिय) लेख निवडायचा असेल तर जरूर निवडा पण वरील उल्लेखित लेखाचा त्यात समावेश करण्यापूर्वी ही बाब विचारात घ्यावी ही नम्र विनंती..... आपला, कशातच काहीही न कळणारा, पिवळा डांबिस

विसोबा खेचर 24/12/2008 - 09:12
मिपा नुकतंच नवीन सर्व्हरवर गेलंय असं ऐकंलं, त्यामुळे एवढ्या एका रेकार्डसाठी काही मिपाची जागा कमी पडणार नाही, काय? हम्म! चालू द्या.. आम्ही पुन्हा पैशे भरू..!

आपण उल्लेख केलेला लेख हे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवण्याचं (आमच्या मते!!!!) आदर्श उदाहरण ठरत नाही.... जास्तीत जास्त प्रतिसाद मिळवणारा लेख असा असावा की ते प्रतिसाद वेगवेगळ्या लोकांकडून एकदाच मिळालेले असावेत... माफ करा, पण आपण उल्लेख केलेल्या लेखावर काही ठराविक लोकंच पुन्हा पुन्हा प्रतिसाद देऊन (आमच्या मते) वितंडवाद घालताहेत... बाकी समस्त मिपा जनता तिथे प्रतिसाद देण्यापासून अलिप्त राहिलेली दिसतेय असे आम्हाला दिसतेय..... तेंव्हा तुम्हाला सर्वाधिक प्रतिसाद मिळणारा (पक्षी: लोकप्रिय) लेख निवडायचा असेल तर जरूर निवडा पण वरील उल्लेखित लेखाचा त्यात समावेश करण्यापूर्वी ही बाब विचारात घ्यावी ही नम्र विनंती..... आपला, कशातच काहीही न कळणारा, पिवळा डांबिस
रामराम मंडळी, मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.

इरफान हुसैन

एकलव्य ·

मुक्तसुनीत 09/12/2008 - 09:20
"मझदाक" या नावाने ते लिहायचे तेव्हापासून , म्हणजे ९९ पासून मी वाचत आलो आहे. डॉन मधे ते लिहायचे - अजूनही लिहितात. त्यांच्या लिखाणाचा मी चाहता होतो/आहे. बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात.

In reply to by मुक्तसुनीत

सुनील 09/12/2008 - 13:46
बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात विनोदाचा भाग सोडून द्या. पण फ्रायडे टाइम्सचे नजम सेठी हे पाकिस्तानातच वास्तव्य करून आहेत आणि इरफान हुसेन याच्याइतकेच (किंवा जरा जास्तच) रोखठोक भाषेत लिहितात. अर्थात इरफान हुसेन तसेच एजाज हैदर यांचेही लेख वाचण्यासारखे असतात, यावर दुमत नसावे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सौदी अरेबिया मधे गेलो (आणि इंटरनेटचा सुकाळ झाला) तेव्हापासून 'डॉन' नियमित वाचत होतो. तेव्हाच इरफान हुसैन ह्यांची ओळख झाली. (कावसजी हा दुसरा... पाकिस्तानी पारशी बावाजी.) बरेच वेळा पारंपारिक भारतद्वेष्टी पाकिस्तानी भूमिका न घेता अतिशय मुद्देसूद आणि वास्तविक लेखन करणारे इरफान हुसैन. प्रस्तुत लेखही चांगलाच आहे. बिपिन कार्यकर्ते

चांगल्या लेखाची ओळख करुन दिल्याबद्दल एकलव्य यांचे आभार. पाकी मिडीयाची ही दुसरी आक्रस्ताळी बाजू .. http://www.youtube.com/watch?v=yvaXOLpZeMs&feature=related http://www.youtube.com/watch?v=OfYlaF5_q1Y&feature=related http://www.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY&feature=related http://www.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&feature=related http://www.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U&feature=related

धम्मकलाडू 09/12/2008 - 12:36
ही चर्चाही ऐका, बघा. परवेझ हूडभॉय यांच्यासारखी काही चंदनाची झाडे अजूनही पाकिस्तानात आहेत. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

धनंजय 11/12/2008 - 01:23
परवेझ हूदभाई यांच्याशी माझी भेट झालेली आहे. सौम्य पण अण्वस्त्रविरोधाबाबत प्रामाणिकपणे कामसू असे सज्जन आहेत. (डॉन वर्तमानपत्र मी पूर्वी दररोज वाचत असे. [आजकाल वेळेअभावी वाचत नाही.] तालिबानविरोध करताना अधिक माहितीपूर्ण लेखन तिथे वाचायला मिळे. भारतीय वर्तमानपत्रांत बातम्या कमी असत. १९९०-२००० काळात पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रांत तालिबानबद्दल कुठलीही माहिती नसे.)

राघव 11/12/2008 - 15:48
या लेखनावरून आठवण झाली मुझफ्फर हुसैन यांची. ते भारतातलेच आहेत पण अतिशय आत्मीयतेने लिहितात. इतर मुस्लीम देशांबाबतचा त्यांचा अभ्यास चांगलाच आहे. तरूण भारत या दैनिकात त्यांचे लेख वाचलेत. मुमुक्षु

कलंत्री 11/12/2008 - 22:07
असे अनुवादीत लिखाण भारतीय वर्तमानपत्रातही प्रसिद्ध व्हावेत. पूर्वी सोबत नावाचे साप्ताहिक होते. त्यात उर्दु वर्तमानपत्रातील लिखाण प्रसिद्ध होत असे.

टग्या 16/12/2008 - 22:06
दुवा १ "डॉन" वर्तमानपत्रातल्या "वाचकांच्या पत्रव्यवहारा"च्या या सदरातील पहिले पत्र विचार करण्याजोगे आहे. दुवा २ मात्र या बातमीचा अर्थ काय लावावा हे कळत नाही.

एकलव्य 17/12/2008 - 08:30
प्रतिक्रियांचे आणि वाचकांचे आभार. हुसैन यांचे चाहते पाहून मस्तच वाटले. निवडल प्रतिप्रतिसाद - बिपिनभाई - कासवजींचे वाचायला आम्हाला थोडा कंटाळा येतो. पुढेमागे रस वाढेलही कदाचित... असो! मुमुक्षु - मुझफ्फर यांचे आंतरजालावर काही लिखाण असल्यास जरूर कळवा. टगेदादा - इंटरेस्टिंग दुवे पुरविल्याबद्दल आभार. सविस्तर चाळतो आणि कळवितो. आणखी एक - असाच अजून एक कलंदर माणूस म्हणजे ए जी नूराणी. यांची सर्व मते मला पटत नसली तरी त्यांचे लिखाण म्हणजे एक पर्वणी असते... रूढिबद्ध विचारांना अभ्यासाचे एक आव्हान असते. आपण जरूर आस्वाद घ्यावा. स्नेहपूर्वक, एकलव्य

मुक्तसुनीत 09/12/2008 - 09:20
"मझदाक" या नावाने ते लिहायचे तेव्हापासून , म्हणजे ९९ पासून मी वाचत आलो आहे. डॉन मधे ते लिहायचे - अजूनही लिहितात. त्यांच्या लिखाणाचा मी चाहता होतो/आहे. बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात.

In reply to by मुक्तसुनीत

सुनील 09/12/2008 - 13:46
बहुदा पाकिस्तानमधे ते वास्तव्य करत नसल्यानेच ते अजून जिवंत आहेत आणि असे काहीतरी लिहू शकतात विनोदाचा भाग सोडून द्या. पण फ्रायडे टाइम्सचे नजम सेठी हे पाकिस्तानातच वास्तव्य करून आहेत आणि इरफान हुसेन याच्याइतकेच (किंवा जरा जास्तच) रोखठोक भाषेत लिहितात. अर्थात इरफान हुसेन तसेच एजाज हैदर यांचेही लेख वाचण्यासारखे असतात, यावर दुमत नसावे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सौदी अरेबिया मधे गेलो (आणि इंटरनेटचा सुकाळ झाला) तेव्हापासून 'डॉन' नियमित वाचत होतो. तेव्हाच इरफान हुसैन ह्यांची ओळख झाली. (कावसजी हा दुसरा... पाकिस्तानी पारशी बावाजी.) बरेच वेळा पारंपारिक भारतद्वेष्टी पाकिस्तानी भूमिका न घेता अतिशय मुद्देसूद आणि वास्तविक लेखन करणारे इरफान हुसैन. प्रस्तुत लेखही चांगलाच आहे. बिपिन कार्यकर्ते

चांगल्या लेखाची ओळख करुन दिल्याबद्दल एकलव्य यांचे आभार. पाकी मिडीयाची ही दुसरी आक्रस्ताळी बाजू .. http://www.youtube.com/watch?v=yvaXOLpZeMs&feature=related http://www.youtube.com/watch?v=OfYlaF5_q1Y&feature=related http://www.youtube.com/watch?v=5F4_qwtM5yY&feature=related http://www.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&feature=related http://www.youtube.com/watch?v=tQT9cgqdJ6U&feature=related

धम्मकलाडू 09/12/2008 - 12:36
ही चर्चाही ऐका, बघा. परवेझ हूडभॉय यांच्यासारखी काही चंदनाची झाडे अजूनही पाकिस्तानात आहेत. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

धनंजय 11/12/2008 - 01:23
परवेझ हूदभाई यांच्याशी माझी भेट झालेली आहे. सौम्य पण अण्वस्त्रविरोधाबाबत प्रामाणिकपणे कामसू असे सज्जन आहेत. (डॉन वर्तमानपत्र मी पूर्वी दररोज वाचत असे. [आजकाल वेळेअभावी वाचत नाही.] तालिबानविरोध करताना अधिक माहितीपूर्ण लेखन तिथे वाचायला मिळे. भारतीय वर्तमानपत्रांत बातम्या कमी असत. १९९०-२००० काळात पाश्चिमात्त्य वर्तमानपत्रांत तालिबानबद्दल कुठलीही माहिती नसे.)

राघव 11/12/2008 - 15:48
या लेखनावरून आठवण झाली मुझफ्फर हुसैन यांची. ते भारतातलेच आहेत पण अतिशय आत्मीयतेने लिहितात. इतर मुस्लीम देशांबाबतचा त्यांचा अभ्यास चांगलाच आहे. तरूण भारत या दैनिकात त्यांचे लेख वाचलेत. मुमुक्षु

कलंत्री 11/12/2008 - 22:07
असे अनुवादीत लिखाण भारतीय वर्तमानपत्रातही प्रसिद्ध व्हावेत. पूर्वी सोबत नावाचे साप्ताहिक होते. त्यात उर्दु वर्तमानपत्रातील लिखाण प्रसिद्ध होत असे.

टग्या 16/12/2008 - 22:06
दुवा १ "डॉन" वर्तमानपत्रातल्या "वाचकांच्या पत्रव्यवहारा"च्या या सदरातील पहिले पत्र विचार करण्याजोगे आहे. दुवा २ मात्र या बातमीचा अर्थ काय लावावा हे कळत नाही.

एकलव्य 17/12/2008 - 08:30
प्रतिक्रियांचे आणि वाचकांचे आभार. हुसैन यांचे चाहते पाहून मस्तच वाटले. निवडल प्रतिप्रतिसाद - बिपिनभाई - कासवजींचे वाचायला आम्हाला थोडा कंटाळा येतो. पुढेमागे रस वाढेलही कदाचित... असो! मुमुक्षु - मुझफ्फर यांचे आंतरजालावर काही लिखाण असल्यास जरूर कळवा. टगेदादा - इंटरेस्टिंग दुवे पुरविल्याबद्दल आभार. सविस्तर चाळतो आणि कळवितो. आणखी एक - असाच अजून एक कलंदर माणूस म्हणजे ए जी नूराणी. यांची सर्व मते मला पटत नसली तरी त्यांचे लिखाण म्हणजे एक पर्वणी असते... रूढिबद्ध विचारांना अभ्यासाचे एक आव्हान असते. आपण जरूर आस्वाद घ्यावा. स्नेहपूर्वक, एकलव्य
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंग मोडेपर्यंत आणि डोक्याचा भुगा होईपर्यंत काम करून आता कोठे घरी आलो. लिहायचे खरे तर जीवावर आले आहे... पण हा लेख तुमच्यापर्यंत पोहचवाच असे वाटले म्हणून दोन चार ओळी टंकतो आहे. भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ दुखणे तसे जुनेच आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा महाप्रचंड कारखाना आहे... पॉलिटिकली करेक्ट हवे असेल असेल तर पाकिस्तानचे सध्याचे स्वरूप घातक आहे असे म्हणा हवे तर. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे अगदी जन्मापासून पाकिस्तान अगदी असेच गुण उधळणार याची आणि याचीच लक्षणे दिसत होती. इंग्रजांनी फाळणीला छुपे प्रोत्साहन दिले ते ही अशीच फळे यावीत याच हेतूने.

सुमारांच्या तावडीत...

श्रावण मोडक ·

आनंदयात्री 05/12/2008 - 18:27
आम्हाला वाटले आमच्या प्रातःस्मरणीय परमपुजनीय सदगुरु केशवसुमारांबद्दल काही आहे की काय .. हुश्श .. बरे झाले काही नाही .. एक लढाई वाचली.

लिखाळ 05/12/2008 - 18:48
अहो पेट्रोल स्वस्त झाले आहे.. आता विकेंडला थोडे बाहेर फिरुन येतो.... आणि सगळे राजकारणी सारखेच हो ! एकाला झाका दुसर्‍याला काढा... चालायचंच.. --(प्रातिनिधिक सुमार) लिखाळ.

In reply to by लिखाळ

विसुनाना 05/12/2008 - 19:04
अनायसे परकीय प्रवाशांचा लोंढा थांबल्यामुळे भारतात पर्यटन स्वस्त झालेच आहे. आता तर काय? पेट्रोल,डिझेलही उतरले! वा! चला, निवडणूकीच्या आसपास रजा टाकून केरळ किंवा थंडी नसेल तर कुलू,मनालीला जाऊन येऊ. नाहीतरी मी मतदान करून काय उजेड पडणार ते दिसतेच आहे! ----(बेसुमार सुमार) विसुनाना

In reply to by विसुनाना

सुवर्णमयी 05/12/2008 - 19:33
मोडक, वेगळे काय घडले? काय करायचे कसे करायचे ते सर्व ठरलेले असते. त्यांना सुमार म्हणायला आधी आपण सुमार आहोत का असे प्रश्न मनात येतात आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हीच दिले आहे. - स्वतःच्या हिताभोवतीच्या परीघात माणसे फिरत असतात. चार सुशि़क्षित माणसे काय फरक पडतो मतदान करून म्हणून करत नाही, किंवा अगदी जाऊन मतदान करतात पण सगळी चक्रे फिरवणारी मते वेगळीच आहेत आणि ती कशी मिळवायची ते उमेदवारांना माहिती आहे! त्यामुळे हे थांबणार कसे? एकापाठोपाठ एक घटना तशाच घडत गेल्या की हळूहळू काही जण हे असेच असते आणि असेच होईल असे मान्य करतात.. तसे झाले माझे असे म्हणू. दूर्घटना घडल्याचे वाईट नक्कीच वाटते पण त्यावर काही उपाययोजना करतील अशी आशा सुद्धा वाटत नाही..करावी अशी सदिच्छा. पण करू शकतील का? तेवढी पात्रता आहे का? इत्यादी प्रश्न फार गुंतागुंतीचे वाटतात. सोनाली

विकास 05/12/2008 - 19:25
मला वाटले लोकसत्तेत काहीतरी नेहमी प्रमाणे अग्रलेख आला की काय... ;) म्हणून वाचायला घेतले तर एक चांगला लेख वाचायला मिळाला. अधिक प्रतिसाद नंतर देतो.

विजय राणे 06/12/2008 - 01:13
आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला सरकार मिळते, असे म्हणतात. आता राजकारणी सुमार आहेत हा त्यांचा दोष नाही. कारण आपणच सुमार आहोत. खरे की नाही? नसेल तर नाही म्हणा. आपल्या स्वार्थी वृत्तीमुळेच ते आपल्यावर राज्य करीत आहेत. वरील लेख लिहून तुम्ही स्वत: सुमार आहात, हे प्रांजळपणे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

अनिल हटेला 06/12/2008 - 08:06
खरये..... >>>एक चांगला लेख वाचायला मिळाला. असेच म्हणतो..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्रावण, छान लेख होता.... ... लेखाचा हताश शेवट सुद्धा अगदी अगदी प्रातिनिधिक आहे....मलाही असंच वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 06/12/2008 - 12:35
मला वाटते, खुजेपणा आणि सुमारपणा या गोष्टींकरता आपल्या पुढार्‍यांनाच केवळ दोष देऊन चालणार नाही. वर श्री. राणे यांनी "आपण सुद्धा सुमारच आहोत" अशा अर्थाचे विधान केले आहे , ते मला पटते. आपल्या कक्षेच्या , वर्तुळाच्या पलिकडे जाण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते. कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. थोडे विषयांतर होईल , पण विषय राजकारणी लोकांचा चालला आहे, त्यामुळे मी जिथे आहे तिथल्या राजकारणाबद्दलच्या अत्यल्प अशा माहितीवरून मला असे दिसते की, ओबामा यांच्या निवडून येण्यामागे, त्यांच्या "ऑल्सो रॅन"पेक्षा वेगळे असण्याच्या प्रतिमेचाही भाग नि:संशय आहे. अर्थात हे म्हणजे अजून मैदानातच न उतरलेल्या खेळाडूबद्दल आधीच कौतुक वाटण्याजोगे आहे हे खरे , पण, सांगायची गोष्ट म्हणजे लोकांना सुमारपणापेक्षा काहीतरी वेगळे , असामान्यत्वाच्या निदान काही खाणाखुणा दाखवणारे काही हवे असते , त्याचे आकर्षण असते. तर , या सुमारपणाचा निकष लावून पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारंणात आशा वाटेल असा कुणी माईचा लाल राजकारणी सध्याच्या स्थितीत अस्तित्त्वात नाही असे दिसते. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही ,(आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे ) काही एक समज असणारे , करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. राजकारणातून हे दोघेही निवृत्त झालेलेनसले तरी एकूण परतीचे वारे सुरू झाल्यागत स्थिती दिसते. पण त्यांची पोकळी भरून काढणारे नेतृत्त्व अजून तयार झालेले दिसत नाही. यशवंतराव चव्हाण , वसंतरराव नाईक , वसांतदादा पाटील यांनंतर त्यांच्या इतके मोठेपण ज्याप्रमाणे (काँग्रेस च्या संदर्भात ) पवारानी मिळवले तितपत कुणी इतर आजतरी दिसत नाही.

In reply to by मुक्तसुनीत

कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. सहमत. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही, (आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे) काही एक समज असणारे, करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. या दोघांमधे एक सूक्ष्म फरक करावा असं वाटतं. शरद पवार निवडणूका लढवून, कायदेशीर जबाबदारी घेऊनच राजकारण करत होते आणि करतात. बाळ ठाकरेंनी निवडणूक लढवल्याचे (भले ती राज्यसभेची असेल) माझ्यातरी माहितीत नाही. श्रावणकाकांचा लेख आवडला. आणि शेवट तर जास्तच आवडला.

मृदुला 08/12/2008 - 04:53
कारण आपण सारेच सुमार आहोत का?
नेते सार्‍यांचे नाही तर बहुसंख्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे सुमारांची बहुसंख्या आहे असे म्हणावे लागेल. पण माझ्यामते, प्रश्न कुवतीचा नसून क्षमतेच्या वापराचा आहे. बहुसंख्यांना आवश्यक तेव्हढे शिक्षण, ज्ञान नसण्याचा आहे. नेत्याचा मुलगा नेता ही सरंजामी मनोवृत्ती घासून काढता आली तरी प्रतिनिधित्वाचा दर्जा उंचावेल असे वाटते.

आनंदयात्री 05/12/2008 - 18:27
आम्हाला वाटले आमच्या प्रातःस्मरणीय परमपुजनीय सदगुरु केशवसुमारांबद्दल काही आहे की काय .. हुश्श .. बरे झाले काही नाही .. एक लढाई वाचली.

लिखाळ 05/12/2008 - 18:48
अहो पेट्रोल स्वस्त झाले आहे.. आता विकेंडला थोडे बाहेर फिरुन येतो.... आणि सगळे राजकारणी सारखेच हो ! एकाला झाका दुसर्‍याला काढा... चालायचंच.. --(प्रातिनिधिक सुमार) लिखाळ.

In reply to by लिखाळ

विसुनाना 05/12/2008 - 19:04
अनायसे परकीय प्रवाशांचा लोंढा थांबल्यामुळे भारतात पर्यटन स्वस्त झालेच आहे. आता तर काय? पेट्रोल,डिझेलही उतरले! वा! चला, निवडणूकीच्या आसपास रजा टाकून केरळ किंवा थंडी नसेल तर कुलू,मनालीला जाऊन येऊ. नाहीतरी मी मतदान करून काय उजेड पडणार ते दिसतेच आहे! ----(बेसुमार सुमार) विसुनाना

In reply to by विसुनाना

सुवर्णमयी 05/12/2008 - 19:33
मोडक, वेगळे काय घडले? काय करायचे कसे करायचे ते सर्व ठरलेले असते. त्यांना सुमार म्हणायला आधी आपण सुमार आहोत का असे प्रश्न मनात येतात आणि त्याचे उत्तर सुद्धा तुम्हीच दिले आहे. - स्वतःच्या हिताभोवतीच्या परीघात माणसे फिरत असतात. चार सुशि़क्षित माणसे काय फरक पडतो मतदान करून म्हणून करत नाही, किंवा अगदी जाऊन मतदान करतात पण सगळी चक्रे फिरवणारी मते वेगळीच आहेत आणि ती कशी मिळवायची ते उमेदवारांना माहिती आहे! त्यामुळे हे थांबणार कसे? एकापाठोपाठ एक घटना तशाच घडत गेल्या की हळूहळू काही जण हे असेच असते आणि असेच होईल असे मान्य करतात.. तसे झाले माझे असे म्हणू. दूर्घटना घडल्याचे वाईट नक्कीच वाटते पण त्यावर काही उपाययोजना करतील अशी आशा सुद्धा वाटत नाही..करावी अशी सदिच्छा. पण करू शकतील का? तेवढी पात्रता आहे का? इत्यादी प्रश्न फार गुंतागुंतीचे वाटतात. सोनाली

विकास 05/12/2008 - 19:25
मला वाटले लोकसत्तेत काहीतरी नेहमी प्रमाणे अग्रलेख आला की काय... ;) म्हणून वाचायला घेतले तर एक चांगला लेख वाचायला मिळाला. अधिक प्रतिसाद नंतर देतो.

विजय राणे 06/12/2008 - 01:13
आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला सरकार मिळते, असे म्हणतात. आता राजकारणी सुमार आहेत हा त्यांचा दोष नाही. कारण आपणच सुमार आहोत. खरे की नाही? नसेल तर नाही म्हणा. आपल्या स्वार्थी वृत्तीमुळेच ते आपल्यावर राज्य करीत आहेत. वरील लेख लिहून तुम्ही स्वत: सुमार आहात, हे प्रांजळपणे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!

अनिल हटेला 06/12/2008 - 08:06
खरये..... >>>एक चांगला लेख वाचायला मिळाला. असेच म्हणतो..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्रावण, छान लेख होता.... ... लेखाचा हताश शेवट सुद्धा अगदी अगदी प्रातिनिधिक आहे....मलाही असंच वाटलं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 06/12/2008 - 12:35
मला वाटते, खुजेपणा आणि सुमारपणा या गोष्टींकरता आपल्या पुढार्‍यांनाच केवळ दोष देऊन चालणार नाही. वर श्री. राणे यांनी "आपण सुद्धा सुमारच आहोत" अशा अर्थाचे विधान केले आहे , ते मला पटते. आपल्या कक्षेच्या , वर्तुळाच्या पलिकडे जाण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते. कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. थोडे विषयांतर होईल , पण विषय राजकारणी लोकांचा चालला आहे, त्यामुळे मी जिथे आहे तिथल्या राजकारणाबद्दलच्या अत्यल्प अशा माहितीवरून मला असे दिसते की, ओबामा यांच्या निवडून येण्यामागे, त्यांच्या "ऑल्सो रॅन"पेक्षा वेगळे असण्याच्या प्रतिमेचाही भाग नि:संशय आहे. अर्थात हे म्हणजे अजून मैदानातच न उतरलेल्या खेळाडूबद्दल आधीच कौतुक वाटण्याजोगे आहे हे खरे , पण, सांगायची गोष्ट म्हणजे लोकांना सुमारपणापेक्षा काहीतरी वेगळे , असामान्यत्वाच्या निदान काही खाणाखुणा दाखवणारे काही हवे असते , त्याचे आकर्षण असते. तर , या सुमारपणाचा निकष लावून पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारंणात आशा वाटेल असा कुणी माईचा लाल राजकारणी सध्याच्या स्थितीत अस्तित्त्वात नाही असे दिसते. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही ,(आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे ) काही एक समज असणारे , करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. राजकारणातून हे दोघेही निवृत्त झालेलेनसले तरी एकूण परतीचे वारे सुरू झाल्यागत स्थिती दिसते. पण त्यांची पोकळी भरून काढणारे नेतृत्त्व अजून तयार झालेले दिसत नाही. यशवंतराव चव्हाण , वसंतरराव नाईक , वसांतदादा पाटील यांनंतर त्यांच्या इतके मोठेपण ज्याप्रमाणे (काँग्रेस च्या संदर्भात ) पवारानी मिळवले तितपत कुणी इतर आजतरी दिसत नाही.

In reply to by मुक्तसुनीत

कुठल्याही काळात , सुमार लोक हे पैशाला पासरीच असायचे. सहमत. शरद पवार , बाळ ठाकरे यांच्या समस्त दोषांना स्वीकारूनही, (आणि त्यांच्यावरील आरोप गंभीरच आहेत. विशेषतः ठाकरे यांच्यावरचे) काही एक समज असणारे, करीष्मा असणारे हे दोन नेते होते हे मान्य व्हावे. या दोघांमधे एक सूक्ष्म फरक करावा असं वाटतं. शरद पवार निवडणूका लढवून, कायदेशीर जबाबदारी घेऊनच राजकारण करत होते आणि करतात. बाळ ठाकरेंनी निवडणूक लढवल्याचे (भले ती राज्यसभेची असेल) माझ्यातरी माहितीत नाही. श्रावणकाकांचा लेख आवडला. आणि शेवट तर जास्तच आवडला.

मृदुला 08/12/2008 - 04:53
कारण आपण सारेच सुमार आहोत का?
नेते सार्‍यांचे नाही तर बहुसंख्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे सुमारांची बहुसंख्या आहे असे म्हणावे लागेल. पण माझ्यामते, प्रश्न कुवतीचा नसून क्षमतेच्या वापराचा आहे. बहुसंख्यांना आवश्यक तेव्हढे शिक्षण, ज्ञान नसण्याचा आहे. नेत्याचा मुलगा नेता ही सरंजामी मनोवृत्ती घासून काढता आली तरी प्रतिनिधित्वाचा दर्जा उंचावेल असे वाटते.
लेखनप्रकार
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला. राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले - १. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.

अनाम वीरा ...

मैत्र ·

मैत्र 23/11/2012 - 05:54
सुदैवाने काही काळ दिग्गजांच्या मृत्युमुळे काहीसे झाकोळले गेलेले ओंबळे यांचे हौतात्म्य राजकारणातून का होईना गौरवले गेले. गिरगाव चौपाटीजवळ त्यांचा पुतळा आणि प्रेरणा स्थळ उभारण्यात आले - २६/११/११ रोजी.. ओंबळे यांना शांतताकाळातला सर्वोच्च पुरस्कार - अशोक चक्र देण्यात आला. खटला पूर्ण करून संविधानिक दृष्ट्या काम पूर्ण करून सार्वभौमत्वावर हल्ला या आरोपाखाली कसाबला फाशी देण्यात आले.. कसाबला मृत्यूदंड देणे हा एकमेव उद्देश नक्कीच नव्हता ज्यासाठी मरण पत्करून ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले. कसाबची फाशी हे या सर्व करकरे, साळसकर, ओंबळे यांपासून ते उज्ज्वल निकम यांच्यापर्यंत सर्वांच्या इतक्या प्रचंड कामाचे, प्रयत्नांवरचे केवळ शिक्कामोर्तब. भारताला २६/११ च्या कटाची माहिती मिळवण्यासाठी आणि जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी कसाबचा उपयोग झाला. आणि निशःस्त्र ओंबळे यांच्या ज्याला आर्मीच्या भाषेत Supreme Sacrifice - सर्वोच्च त्याग / बलिदान म्हणतात त्याचे सार्थक झाले. मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. असो.. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना पुनःश्च विनम्र श्रद्धांजली.

दत्ता काळे 23/11/2012 - 12:15
मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. .. खरं आहे. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना विनम्र श्रद्धांजली.

मैत्र 23/11/2012 - 05:54
सुदैवाने काही काळ दिग्गजांच्या मृत्युमुळे काहीसे झाकोळले गेलेले ओंबळे यांचे हौतात्म्य राजकारणातून का होईना गौरवले गेले. गिरगाव चौपाटीजवळ त्यांचा पुतळा आणि प्रेरणा स्थळ उभारण्यात आले - २६/११/११ रोजी.. ओंबळे यांना शांतताकाळातला सर्वोच्च पुरस्कार - अशोक चक्र देण्यात आला. खटला पूर्ण करून संविधानिक दृष्ट्या काम पूर्ण करून सार्वभौमत्वावर हल्ला या आरोपाखाली कसाबला फाशी देण्यात आले.. कसाबला मृत्यूदंड देणे हा एकमेव उद्देश नक्कीच नव्हता ज्यासाठी मरण पत्करून ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले. कसाबची फाशी हे या सर्व करकरे, साळसकर, ओंबळे यांपासून ते उज्ज्वल निकम यांच्यापर्यंत सर्वांच्या इतक्या प्रचंड कामाचे, प्रयत्नांवरचे केवळ शिक्कामोर्तब. भारताला २६/११ च्या कटाची माहिती मिळवण्यासाठी आणि जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी कसाबचा उपयोग झाला. आणि निशःस्त्र ओंबळे यांच्या ज्याला आर्मीच्या भाषेत Supreme Sacrifice - सर्वोच्च त्याग / बलिदान म्हणतात त्याचे सार्थक झाले. मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. असो.. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना पुनःश्च विनम्र श्रद्धांजली.

दत्ता काळे 23/11/2012 - 12:15
मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्‍या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. .. खरं आहे. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना विनम्र श्रद्धांजली.
लेखनविषय:
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

इस घर को बचाये कैसे ?

नेटकिडा ·

प्राजु 30/11/2008 - 08:48
प्रत्येक राजकारण्याने एकदा तरी जरूर वाचावा. जे काही प्रश्न विचारले आहेत खरोखरच सामान्य माणसाच्या मनाला दिवसातून एकदा तरी नक्की शिवत असतील.. शंकाच नाही. दुव्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कपिल काळे 30/11/2008 - 09:08
पेपरातल्या लेखांचे दुवे देणे आता बास. पेपर सगळेच वाचतात. ह्या घटनेबद्दल आपले काही विचार असले तर मांडावेत. मी संपादकांना विनंती करतो की, त्यांनी खास पेपरातील लेखांसाठी एक धाग बनवावा. ज्यांना पेपरातील लेख सगळ्यांच्या नजरेस आणायचे आहेत त्यांनी त्या स्पेशल धाग्यावर अश्या लेखांचे दुवे दयावेत. अश्या लेखाचा निराळा धागा निर्माण झाला तर तो ऊड्वून लावावा. मी भावना समजू शकतो , पण शेवटी असे आजच दोन धागे आले आहेत. असे आता कित्येक लेख छापून येतील. तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? संपादकांनी कृपया विचार करावा. http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

विसोबा खेचर 30/11/2008 - 09:27
तूर्तास तरी नेटकिडा यांनी दिलेला दुवा प्रसंगानुरुप वाटतो आहे असे मी म्हणेन.. मी संपादकांना विनंती करतो की, त्यांनी खास पेपरातील लेखांसाठी एक धाग बनवावा. सूचनेचा अवश्य विचार केला जाईल.. असे आता कित्येक लेख छापून येतील. तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? प्र्श्न वाजवी आहे, परंतु प्रसंगानुरुप असे दुवे देणारे धागे यायचेच.. असो, काळेसाहेब, आपल्या कंन्सर्नकरता आभारी आहे.... तात्या.

प्राजु 30/11/2008 - 09:11
तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? प्रत्येक लेखाचे मिपावर धाग्यात रूपांतर होऊ लागले तर संपादक मंडळ योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ आहे. तेव्हा काळे साहेब आपण निश्चिंत रहा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

कपिल काळे 30/11/2008 - 09:34
अहो प्राजुताई काही वेळा समर्थ माणसांच्या पाठिशी समर्थपणे उभे रहायची गरज असते हो. म्हणून केला प्रतिक्रिया प्रपंच.

प्राजु 30/11/2008 - 08:48
प्रत्येक राजकारण्याने एकदा तरी जरूर वाचावा. जे काही प्रश्न विचारले आहेत खरोखरच सामान्य माणसाच्या मनाला दिवसातून एकदा तरी नक्की शिवत असतील.. शंकाच नाही. दुव्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कपिल काळे 30/11/2008 - 09:08
पेपरातल्या लेखांचे दुवे देणे आता बास. पेपर सगळेच वाचतात. ह्या घटनेबद्दल आपले काही विचार असले तर मांडावेत. मी संपादकांना विनंती करतो की, त्यांनी खास पेपरातील लेखांसाठी एक धाग बनवावा. ज्यांना पेपरातील लेख सगळ्यांच्या नजरेस आणायचे आहेत त्यांनी त्या स्पेशल धाग्यावर अश्या लेखांचे दुवे दयावेत. अश्या लेखाचा निराळा धागा निर्माण झाला तर तो ऊड्वून लावावा. मी भावना समजू शकतो , पण शेवटी असे आजच दोन धागे आले आहेत. असे आता कित्येक लेख छापून येतील. तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? संपादकांनी कृपया विचार करावा. http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

विसोबा खेचर 30/11/2008 - 09:27
तूर्तास तरी नेटकिडा यांनी दिलेला दुवा प्रसंगानुरुप वाटतो आहे असे मी म्हणेन.. मी संपादकांना विनंती करतो की, त्यांनी खास पेपरातील लेखांसाठी एक धाग बनवावा. सूचनेचा अवश्य विचार केला जाईल.. असे आता कित्येक लेख छापून येतील. तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? प्र्श्न वाजवी आहे, परंतु प्रसंगानुरुप असे दुवे देणारे धागे यायचेच.. असो, काळेसाहेब, आपल्या कंन्सर्नकरता आभारी आहे.... तात्या.

प्राजु 30/11/2008 - 09:11
तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? प्रत्येक लेखाचे मिपावर धाग्यात रूपांतर होऊ लागले तर संपादक मंडळ योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ आहे. तेव्हा काळे साहेब आपण निश्चिंत रहा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

कपिल काळे 30/11/2008 - 09:34
अहो प्राजुताई काही वेळा समर्थ माणसांच्या पाठिशी समर्थपणे उभे रहायची गरज असते हो. म्हणून केला प्रतिक्रिया प्रपंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3774751.cms खरेच विचार करायला लावणारा लेख ( महाराष्ट्र टाईम्स मधून )

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

श्रावण मोडक ·

सुनील 28/11/2008 - 18:17
श्रावण सर, तुमचा रोख हा पॅलेस्टीनींवरील इस्रायली सत्ता, काश्मिर खोर्‍यातील भारताची सत्ता आणि चेचेन्यावरील रशियाची सत्ता इ. वर आहे, हे उघड. जरा वेळ द्या. डोकं खरोखरच थंड झाल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिजीत 29/11/2008 - 00:17
खूपच चांगला लेख. सध्याच्या परिस्थितीत इतकं संयमी आणि सर्वांगिण लिहिल्याबद्दल धन्यवाद. इतकी वर्षं दहशतवादाला आपण तोंड देत आहोत. काश्मिर, पंजाब, उत्तर-पुर्व भारत इथला दहशतवादाला शक्यतो लष्करी ताकतीने उत्तर देण्यात आले. सीमाभागातील दहशतवाद आता नागरी भागात पसरु लागला आहे हे या नव्या हल्ल्यातून सिद्ध होतंय. जसं हे युद्ध व्यापक बनलं आहे तशीच उपाययोजना ही तितकीच व्यापक बनवावी लागेल. आर्थिक, सांस्कृतिक, राष्ट्रिय आणि धार्मिक अशा चढत्या भाजणीच्या फरकांचे संदर्भ यात आणावे लागतील. सॅम्युअल हंटिग्टन यांच्या 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन' चा संदर्भ या चर्चेसाठी उपयोगी पडु शकतो. (अर्थात, अमेरिकेच्या युद्धखोरपणाचे उदात्तिकरण हा जरी या पुस्तकावरचा आक्षेप असला तरीही ... ) - अभिजीत

मुक्तसुनीत 29/11/2008 - 03:01
लेख आवडला. मुद्देसूद वाटला. त्यात मांडलेल्या अनेक मुद्द्यांपैकी , सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेणे योग्य. धर्माचा आधार घेऊन या संघटनांची बाधणी होत असल्याने हा सारा प्रकार म्हणजे इस्लामी दहशतवाद असे आजवर सारेच मानत आले आहेत. पण ते तितकेच आहे का? किंवा खरोखर हा इस्लामी दहशतवाद आहे का? मूळ हेतू राजकीय आहे ("स्वातंत्र्य", "राष्ट्रउभारणी", "परकीय ताबा संपवणे") हे ध्यानी घेतले तर त्याला असलेला धर्माचा आधार हा मुखवट्यासारखा ठरतो. अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक. साध्या भाषेत सांगावयाचे तर मुल्ला-मौलवी, अनेक देशांत कागदोपत्री असलेल्या सरकारव्यवस्थेतील त्यांची प्रभावळ. मला वाटते, वरील वाक्ये आणि त्यात मांडलेले मुद्दे म्हणजे या लेखाचा "हार्ट ऑफ द मॅटर". बाकीचे अनेक उपमुद्दे आणि महितीचे घटक या मुख्य मुद्द्याला पूरक आहेत(असे मला वाटले). दहशतीच्या कारवायांचा पाया राजकीय आहे , हे मला काही पुरते पटलेले नाही. एखाद्या गोष्टीला , राजकीय पाया असणे म्हणजे काय हे आपण समजावून घेतले पाहिजे. हजारो उदाहरणांतून १-२ उदाहरणे पाहू. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा मुद्दा राजकीय होता. म्हणजे काय ? तर तो मुद्दा लावून धरण्यामागे , त्याचे समर्थन करण्या वा विरोध करण्यामागे राजकीय उद्दिष्ट होते ते महाराष्ट्रातील दलित-दलितेतर मतांना ओढून घेण्याचे. याची परिणती शेवटी निवडणूक , सत्ताग्रहणात किंवा सत्तेत वाटा मिळण्यात व्हायची होती. हाच मुद्दा राज ठाकरे यांचा. उत्तर भारतीय काय अमिताभ बच्चन काय , हे मुद्दे काही नवे नव्हते , किंवा त्याबाबतच्या प्रश्नांनी काही वेगळे वळणही घेतले नव्हते. तर एका पोकळीतून राज यांनी प्रश्न आहेत असे अधोरेखित केले. समाजाचे ध्रुवीकरण केले. याची परिणती मतांमधे होणार. सत्तेच्या समीकरणात राज ठाकरे येणार. जास्त हिंसाचारी उदाहरणे घ्यायची तर आसामातील विद्द्यार्थ्यांचे घेऊ. काही वर्षांपूर्वी त्याला अतिशय गंभीर वळण लागलेले होते. पण त्याची परिणती राजकीय सत्ता मिळवण्यात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल बोलू. क्रांतिकारकांच्या बलिदानाबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. त्यांचे आपण नेहमी स्मरण करतो. एक व्यक्ती , एक भारतीय म्हणून मलाही तसे वाटतेच. भगतसिंग, आझाद , वासुदेव बळवंत , चापेकर या सगळ्यांबद्दल इतरांप्रमाणे मलाही आदर आहे, देशाकरता ते शहीद झाले असेच वाटते. पण एकूणा राजकीय घडामोडींमधे त्यांच्या कामामुळे काही निर्णायक फरक पडला काय ? त्यांच्या कामाचा पाया राजकीय आहे असे म्हणता येईल कदाचित. कारण त्यांना खरोखरच राजकीय सत्तांतरण हवे होते. याच प्रकारे , एकेकाळाच्या आयर्लंडमधील दहशतवादामागे जे चाललेले आहे त्याचे स्वरूप राजकीय होते असे म्हणायला जागा आहे. माझ्या अंधुक माहितीप्रमाणे या कारवायांच्या अंती आयर्लंड आणि यूके मधे सत्तेच्या वाटपाबद्दल आणि सार्वभौमत्त्वाबद्दल समझौता झाला. (चूभूद्याघ्या) तात्पर्य काय ? की एखादे हिंसक/अहिंसक सामूहिक कृत्य करताना , त्याचा "पाया राजकीय" असतो , तेव्हा त्याचे उद्दिष्ट पोलिटीकल प्रोसेसशी मेळ खाणारे असते. जगभर चालणार्‍या इस्लामी दहशतवादाला अशी राजकीय चौकट आहे असे मला म्हणवत नाही. रशियन प्रजासत्ताकांपासून अमेरिकेपर्यंत , भारतापासून अफ्रिकेतील देशांपर्यंत , युरोपमधे लंडन, स्पेन मधे , ऑस्ट्रेलियन बेटांमधे जे घडले आहे , घडते आहे त्यात एक आणि एकच कॉमन धागा आहे : इस्लामाचे कडवे, जिहादी स्वरूप. आयर्लंड मधील दहशतवाद्यानी भारतात हल्ले केले नाहीत. सावरकर वगैरेंनी आपल्या क्रांतिकारक कारवाया इंगंडपुरत्या सीमित ठेवल्या. इस्लामी दहशतवादाचे तसे नाही. "इस्लाम खतरेमे" आहे असे त्याना वाटते म्हणून त्याचे परिणाम जगभर होतात. सर्व मुस्लिम दहशतवादी नक्कीच नसतात , एक टक्क्याच्या अगदी छोट्या हिस्शाइतकेच मुसलमान दहशतवादी असतील. पण सर्व दहशतवादी मात्र मुसलमान असतात. असे असेल तर दहशतवादाचे स्वरूप धर्माधिष्ठित नाही असे कसे म्हणायचे ? जिहाद आणि हिंसाचार ही इस्लामची शिकवण नाही , इस्लाममधून असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे अशी एक मतप्रणाली आहे. घटकाभर जर ती खरी मानली तरी , "मिस्-इंटरप्रिटेशन" केले आहे ते इस्लामचेच , आणि ते करणार्‍या घटकांमधला कॉमन धागा म्हणजे ते सगळे मुसलमान आहेत , हाच. तेव्हा लेखाचा हा जो आधारभूत मुद्दा आहे तो मला पटलेला नाही आणि तो का पटला नाही याची मीमांसा वर दिलेली आहे.

विसुनाना 29/11/2008 - 13:20
लेखकाने मूलगामी विचार करून हा लेख लिहिला आहे. लेख विचारप्रवर्तक आहे यात वाद नाही. काही मुद्दे जरूर सहमत होण्यासारखे आहेत. तरीही या लेखात व्यक्त झालेल्या विचारांच्या मूळ गाभ्याशी मात्र दुर्दैवाने असहमती प्रगट करावी लागत आहे. या लेखात व्यक्त झालेल्या मतांना समर्पकपणे खोडून काढण्यासाठी एक सखोल लेख लिहावा लागेल. त्यावर विचार करत आहे. सध्या प्रत्येक मुद्दा घेत नाही.
होणारा हल्ला त्यांच्या धर्माला लक्ष्य करून होत नाही तर "राज्य" या संकल्पनेला लक्ष्य करून होत आहे.
अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक.
प्रतिस्पर्ध्याची राजकीय उद्दिष्ट्ये संपवण्याऐवजी त्यामागील कारणांचा नायनाट करणे हे खरे राजकीय उद्दिष्ट्य अशा कोणत्याही युद्धामागे असले पाहिजे. तसे करावयाचे झाले तर आमूलाग्र धोरणबदल हा एकमेव पर्याय संबंधित सर्व घटकांपुढे येतो. इथेच खरी गोम आहे. कारण असा आमूलाग्र धोरणबदल केवळ राजकीय आघाडीवर होऊन चालणार नाही. त्यामागे सांस्कृतीक, आर्थीक यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रांचाही विचार आवश्यक ठरतो. आणि सध्याच्या परिस्थितीत तरी ती तयारी कोणाचीच दिसत नाही.
तो करावयाचा असेल तर आधी मुखवट्याचा फैसला करावा लागेल.
हे काही मुद्दे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अमान्य आहेत.

सुनील 29/11/2008 - 14:53
"सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीनही पांडवांना देणार नाही", ही दुर्योधनाची गर्जना महाभारतीय युद्धाला कारणीभूत ठरली. मातृभूमीचे स्वातंत्र्य हा जगातील बर्‍याच युद्धांचे कारण आहे. इथे मातृभूमी या शब्दाचा अर्थ आधुनिक नेशन-स्टेट या संकल्पनेत बसेलच असे नाही. पांडवांना "त्यांची" भूमी कौरवांनी अन्यायाने बळकावली असे वाटले. अर्वाचिन काळात तीच भावना श्रीलंकेतील तामिळींची, आयरीश लोकांची, असमियांची, पॅलेस्टीनींची आणि काश्मिर खोर्‍यातील मुस्लीमांची आहे. त्यांना वाटणारा "अन्याय" हा खरा अथवा आभासी (पर्सीव्ड) असू शकतो. पण ती भावना आहे हे नाकारता येणार नाही. "आपली" भूमी ही दुसर्‍याच्या जोखडातून मुक्त करणे, हे उद्दिष्ट्य राजकीयच आहे. ते गाठण्यासाठी चोखाळलेले मार्ग जरी विविध समुदायांनी वेगवेगळे अनुसरले असले, तरी अंतीमतः त्यावर राजकीय तोडगा हाच दीर्घकालीन उपाय आहे, यावर दुमत नसावे. पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीवर ज्या लाजीरवाण्या अटी लादल्या गेल्या होत्या, त्यातच दुसर्‍या महायुद्धाची बीजे रोवली गेली होती. वास्तविक दुसर्‍या महायुद्धातही जर्मनीचा निर्णायक पराभव झाला होता, पण यात तिसर्‍या महायुद्धाची बीजे नव्हती. कारण देश जरी विभागला गेला असला तरी बेचिराख झालेल्या जर्मनीला (आणि जपानलाही) पुन्हा उभे राहण्यासाठी अमेरिकेने भरीव अशी आर्थिक मदत दिली होती. यालाच आपण विन-विन सिच्युएशन म्हणूयात का? लष्करी प्रश्नांवर लष्करी उत्तर, हे ठीकच. पण राजकीय प्रश्नावर उत्तर राजकीयच हवे. आयर्लंडच्या प्रश्नावर जसे विन-विन पद्धतीने तोडगा काढला गेला तसाच जर पॅलेस्टीन आणि काश्मिरवर काढला गेला तरच हा "इस्लामी" दहशतवाद आटोक्यात येईल. काही महिन्यांपूर्वी मी इथे काश्मिरवर एक लेख टाकला होता. त्यातील काही वाक्ये पुन्हा उद्धृत करतो - सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे लागेल की, काश्मिर हा राजकीय प्रश्न आहे त्यामुळे त्याचे राजकीय उत्तरच शोधावे लागेल. लष्करी उपायांनी फारतर काश्मिरच्या भूभागावर ताबा ठेवता येईल पण तेथील जनतेला भारताच्या बाजूने वळवता येणार नाही. शेवटी प्रदेश म्हणंजे त्या प्रदेशातील माणसे, केवळ जमीन नव्हे. १) अधिक स्वायत्तता देणे - २) लष्करी जांच कमी करणे - ३) घट्ट आर्थिक संबंध निर्माण करणे - ४) देशाचे स्थान उंचावणे - एक वेगळा विचार करण्यास चालना देणारा लेख लिहिल्याबद्दल श्रावणसरांचे अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनंत छंदी 29/11/2008 - 15:05
श्रावणजी कालचा हल्ला हा केवळ एका देशाचा प्रश्न नाही तर तो आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे हा तुमचा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. हिरव्या दहशतवादाने सार्‍या जगाला वेठीस धरले आहे, त्यामुळे जगातील सर्व देशांनी या दहशतवादाविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली पाहिजे. आपल्या देशात "त्यांचे" इतके लाड चालू असतानाही हे दहशतवादी त्यांचा छळ थांबवा अशी मागणी करीत असतील तर ती बाब गंभीर आहे. यावेळी सरदार पटेलांची आठवण येते आहे. फाळणीच्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंवर अनन्वीत अत्याचार सुरू असताना त्यांनी केलेली एक कृती पुरेशी ठरली होती.

विजय राणे 29/11/2008 - 16:52
श्री मोडक आपला लेख वाचला. आपण लष्करात वगैरे होतात का की आहात? एखाद्या युद्धात आपण भाग घेतला आहे का? की केवळ वाचलेल्या माहितीवर विश्‍लेषण केले आहे? हे विचारण्याचा कारण असे की काही विधाने ठोस वाटतात आणि खूपशी कच्ची. हे नवे हत्यार थोडे पूर्वनियोजन केले तर प्रभावी ठरते. हे पूर्वनियोजन बॉम्ब पेरण्याइतके सखोल गरजेचे नाही. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करणेच हेच एक जोखमीचे काम असते. येथे ते नाही. तयार सामग्री घेऊन केलेला हल्ला असे हे स्वरूप आहे. लक्ष्य, कालावधी, अनुयायी या तीन बाबी असतील तर शस्त्रे पुरवणे, दारूगोळा पुरवणे सोपे ठरते. ग्रेनेडचा वापर असल्याने प्रभावक्षमता वाढते. अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची गरजच नाही. हे विधान फार धाडसाचे वाटते. हल्ल्यासाठी सखोल नियोजनाची गरज नाही, असा आपला दावा आहे. तो फारच पोकळ आणि बालीश वाटतो. कारण या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत येण्याची गेल्याच वर्षी रंगीत तालिम केल्याचे वाचनात आले आहे. आणि गेली साठ सात त्यांनी सुरक्षा यंत्रणेला झुंजत ठेवले आहे. त्यामुळे ते सुचेल तसे खचितच वागले वागले नसतील. त्यामुळे नियोजनाची गरज नाही, असे म्हणणे अयोग्य ठरते आणि आपण हा लेख टाइमपास म्हणून लिहिला की काय, अशी शंकाही वाटू लागते.

जीएस 29/11/2008 - 20:46
एक मुद्देसूद लेख लिहायचा उत्तम प्रयत्न केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय इतिहास व वस्तुस्थिती याच्या फारच अपुर्‍या आकलनापोटी, वा पुरेशा अभ्यासाअभावी फार मोठे निष्कर्ष बेधडकपणे मांडले गेले आहेत असे लेख वाचून वाटते. विसूनाना यांनीही मु़ख्य गाभ्यातील विसंगतीवर बोट ठेवले आहेच. मात्र, विचारप्रवर्तक चर्चा कुठल्या भाषेत वा पातळीवर व्हावी याचे मात्र हा लेख चाम्गले उदाहरण आहे. धन्यवाद

सुनील 28/11/2008 - 18:17
श्रावण सर, तुमचा रोख हा पॅलेस्टीनींवरील इस्रायली सत्ता, काश्मिर खोर्‍यातील भारताची सत्ता आणि चेचेन्यावरील रशियाची सत्ता इ. वर आहे, हे उघड. जरा वेळ द्या. डोकं खरोखरच थंड झाल्यावर सविस्तर प्रतिसाद देईन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अभिजीत 29/11/2008 - 00:17
खूपच चांगला लेख. सध्याच्या परिस्थितीत इतकं संयमी आणि सर्वांगिण लिहिल्याबद्दल धन्यवाद. इतकी वर्षं दहशतवादाला आपण तोंड देत आहोत. काश्मिर, पंजाब, उत्तर-पुर्व भारत इथला दहशतवादाला शक्यतो लष्करी ताकतीने उत्तर देण्यात आले. सीमाभागातील दहशतवाद आता नागरी भागात पसरु लागला आहे हे या नव्या हल्ल्यातून सिद्ध होतंय. जसं हे युद्ध व्यापक बनलं आहे तशीच उपाययोजना ही तितकीच व्यापक बनवावी लागेल. आर्थिक, सांस्कृतिक, राष्ट्रिय आणि धार्मिक अशा चढत्या भाजणीच्या फरकांचे संदर्भ यात आणावे लागतील. सॅम्युअल हंटिग्टन यांच्या 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन' चा संदर्भ या चर्चेसाठी उपयोगी पडु शकतो. (अर्थात, अमेरिकेच्या युद्धखोरपणाचे उदात्तिकरण हा जरी या पुस्तकावरचा आक्षेप असला तरीही ... ) - अभिजीत

मुक्तसुनीत 29/11/2008 - 03:01
लेख आवडला. मुद्देसूद वाटला. त्यात मांडलेल्या अनेक मुद्द्यांपैकी , सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेणे योग्य. धर्माचा आधार घेऊन या संघटनांची बाधणी होत असल्याने हा सारा प्रकार म्हणजे इस्लामी दहशतवाद असे आजवर सारेच मानत आले आहेत. पण ते तितकेच आहे का? किंवा खरोखर हा इस्लामी दहशतवाद आहे का? मूळ हेतू राजकीय आहे ("स्वातंत्र्य", "राष्ट्रउभारणी", "परकीय ताबा संपवणे") हे ध्यानी घेतले तर त्याला असलेला धर्माचा आधार हा मुखवट्यासारखा ठरतो. अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक. साध्या भाषेत सांगावयाचे तर मुल्ला-मौलवी, अनेक देशांत कागदोपत्री असलेल्या सरकारव्यवस्थेतील त्यांची प्रभावळ. मला वाटते, वरील वाक्ये आणि त्यात मांडलेले मुद्दे म्हणजे या लेखाचा "हार्ट ऑफ द मॅटर". बाकीचे अनेक उपमुद्दे आणि महितीचे घटक या मुख्य मुद्द्याला पूरक आहेत(असे मला वाटले). दहशतीच्या कारवायांचा पाया राजकीय आहे , हे मला काही पुरते पटलेले नाही. एखाद्या गोष्टीला , राजकीय पाया असणे म्हणजे काय हे आपण समजावून घेतले पाहिजे. हजारो उदाहरणांतून १-२ उदाहरणे पाहू. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हा मुद्दा राजकीय होता. म्हणजे काय ? तर तो मुद्दा लावून धरण्यामागे , त्याचे समर्थन करण्या वा विरोध करण्यामागे राजकीय उद्दिष्ट होते ते महाराष्ट्रातील दलित-दलितेतर मतांना ओढून घेण्याचे. याची परिणती शेवटी निवडणूक , सत्ताग्रहणात किंवा सत्तेत वाटा मिळण्यात व्हायची होती. हाच मुद्दा राज ठाकरे यांचा. उत्तर भारतीय काय अमिताभ बच्चन काय , हे मुद्दे काही नवे नव्हते , किंवा त्याबाबतच्या प्रश्नांनी काही वेगळे वळणही घेतले नव्हते. तर एका पोकळीतून राज यांनी प्रश्न आहेत असे अधोरेखित केले. समाजाचे ध्रुवीकरण केले. याची परिणती मतांमधे होणार. सत्तेच्या समीकरणात राज ठाकरे येणार. जास्त हिंसाचारी उदाहरणे घ्यायची तर आसामातील विद्द्यार्थ्यांचे घेऊ. काही वर्षांपूर्वी त्याला अतिशय गंभीर वळण लागलेले होते. पण त्याची परिणती राजकीय सत्ता मिळवण्यात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल बोलू. क्रांतिकारकांच्या बलिदानाबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. त्यांचे आपण नेहमी स्मरण करतो. एक व्यक्ती , एक भारतीय म्हणून मलाही तसे वाटतेच. भगतसिंग, आझाद , वासुदेव बळवंत , चापेकर या सगळ्यांबद्दल इतरांप्रमाणे मलाही आदर आहे, देशाकरता ते शहीद झाले असेच वाटते. पण एकूणा राजकीय घडामोडींमधे त्यांच्या कामामुळे काही निर्णायक फरक पडला काय ? त्यांच्या कामाचा पाया राजकीय आहे असे म्हणता येईल कदाचित. कारण त्यांना खरोखरच राजकीय सत्तांतरण हवे होते. याच प्रकारे , एकेकाळाच्या आयर्लंडमधील दहशतवादामागे जे चाललेले आहे त्याचे स्वरूप राजकीय होते असे म्हणायला जागा आहे. माझ्या अंधुक माहितीप्रमाणे या कारवायांच्या अंती आयर्लंड आणि यूके मधे सत्तेच्या वाटपाबद्दल आणि सार्वभौमत्त्वाबद्दल समझौता झाला. (चूभूद्याघ्या) तात्पर्य काय ? की एखादे हिंसक/अहिंसक सामूहिक कृत्य करताना , त्याचा "पाया राजकीय" असतो , तेव्हा त्याचे उद्दिष्ट पोलिटीकल प्रोसेसशी मेळ खाणारे असते. जगभर चालणार्‍या इस्लामी दहशतवादाला अशी राजकीय चौकट आहे असे मला म्हणवत नाही. रशियन प्रजासत्ताकांपासून अमेरिकेपर्यंत , भारतापासून अफ्रिकेतील देशांपर्यंत , युरोपमधे लंडन, स्पेन मधे , ऑस्ट्रेलियन बेटांमधे जे घडले आहे , घडते आहे त्यात एक आणि एकच कॉमन धागा आहे : इस्लामाचे कडवे, जिहादी स्वरूप. आयर्लंड मधील दहशतवाद्यानी भारतात हल्ले केले नाहीत. सावरकर वगैरेंनी आपल्या क्रांतिकारक कारवाया इंगंडपुरत्या सीमित ठेवल्या. इस्लामी दहशतवादाचे तसे नाही. "इस्लाम खतरेमे" आहे असे त्याना वाटते म्हणून त्याचे परिणाम जगभर होतात. सर्व मुस्लिम दहशतवादी नक्कीच नसतात , एक टक्क्याच्या अगदी छोट्या हिस्शाइतकेच मुसलमान दहशतवादी असतील. पण सर्व दहशतवादी मात्र मुसलमान असतात. असे असेल तर दहशतवादाचे स्वरूप धर्माधिष्ठित नाही असे कसे म्हणायचे ? जिहाद आणि हिंसाचार ही इस्लामची शिकवण नाही , इस्लाममधून असे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे अशी एक मतप्रणाली आहे. घटकाभर जर ती खरी मानली तरी , "मिस्-इंटरप्रिटेशन" केले आहे ते इस्लामचेच , आणि ते करणार्‍या घटकांमधला कॉमन धागा म्हणजे ते सगळे मुसलमान आहेत , हाच. तेव्हा लेखाचा हा जो आधारभूत मुद्दा आहे तो मला पटलेला नाही आणि तो का पटला नाही याची मीमांसा वर दिलेली आहे.

विसुनाना 29/11/2008 - 13:20
लेखकाने मूलगामी विचार करून हा लेख लिहिला आहे. लेख विचारप्रवर्तक आहे यात वाद नाही. काही मुद्दे जरूर सहमत होण्यासारखे आहेत. तरीही या लेखात व्यक्त झालेल्या विचारांच्या मूळ गाभ्याशी मात्र दुर्दैवाने असहमती प्रगट करावी लागत आहे. या लेखात व्यक्त झालेल्या मतांना समर्पकपणे खोडून काढण्यासाठी एक सखोल लेख लिहावा लागेल. त्यावर विचार करत आहे. सध्या प्रत्येक मुद्दा घेत नाही.
होणारा हल्ला त्यांच्या धर्माला लक्ष्य करून होत नाही तर "राज्य" या संकल्पनेला लक्ष्य करून होत आहे.
अनुयायी मिळवण्यासाठीचा धर्माचा आधार सोडला तर या युद्धाला धर्माची संदर्भचौकट नाही. हे ध्यानी घेतले तर या हत्याराचा सामना करण्यासाठी आधी म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेंदूपर्यंत जावे लागेल. हा मेंदू राष्ट्रविहीन आहे हे सत्य स्वीकारणे आता तरी आवश्यक झाले आहे. हा मेंदू म्हणजेच इस्लामचा मुखवटा घेत विशिष्ट राजकीय हेतूंसाठी युद्ध मांडून बसणारे घटक.
प्रतिस्पर्ध्याची राजकीय उद्दिष्ट्ये संपवण्याऐवजी त्यामागील कारणांचा नायनाट करणे हे खरे राजकीय उद्दिष्ट्य अशा कोणत्याही युद्धामागे असले पाहिजे. तसे करावयाचे झाले तर आमूलाग्र धोरणबदल हा एकमेव पर्याय संबंधित सर्व घटकांपुढे येतो. इथेच खरी गोम आहे. कारण असा आमूलाग्र धोरणबदल केवळ राजकीय आघाडीवर होऊन चालणार नाही. त्यामागे सांस्कृतीक, आर्थीक यासारख्या जीवनाच्या इतर क्षेत्रांचाही विचार आवश्यक ठरतो. आणि सध्याच्या परिस्थितीत तरी ती तयारी कोणाचीच दिसत नाही.
तो करावयाचा असेल तर आधी मुखवट्याचा फैसला करावा लागेल.
हे काही मुद्दे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अमान्य आहेत.

सुनील 29/11/2008 - 14:53
"सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीनही पांडवांना देणार नाही", ही दुर्योधनाची गर्जना महाभारतीय युद्धाला कारणीभूत ठरली. मातृभूमीचे स्वातंत्र्य हा जगातील बर्‍याच युद्धांचे कारण आहे. इथे मातृभूमी या शब्दाचा अर्थ आधुनिक नेशन-स्टेट या संकल्पनेत बसेलच असे नाही. पांडवांना "त्यांची" भूमी कौरवांनी अन्यायाने बळकावली असे वाटले. अर्वाचिन काळात तीच भावना श्रीलंकेतील तामिळींची, आयरीश लोकांची, असमियांची, पॅलेस्टीनींची आणि काश्मिर खोर्‍यातील मुस्लीमांची आहे. त्यांना वाटणारा "अन्याय" हा खरा अथवा आभासी (पर्सीव्ड) असू शकतो. पण ती भावना आहे हे नाकारता येणार नाही. "आपली" भूमी ही दुसर्‍याच्या जोखडातून मुक्त करणे, हे उद्दिष्ट्य राजकीयच आहे. ते गाठण्यासाठी चोखाळलेले मार्ग जरी विविध समुदायांनी वेगवेगळे अनुसरले असले, तरी अंतीमतः त्यावर राजकीय तोडगा हाच दीर्घकालीन उपाय आहे, यावर दुमत नसावे. पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीवर ज्या लाजीरवाण्या अटी लादल्या गेल्या होत्या, त्यातच दुसर्‍या महायुद्धाची बीजे रोवली गेली होती. वास्तविक दुसर्‍या महायुद्धातही जर्मनीचा निर्णायक पराभव झाला होता, पण यात तिसर्‍या महायुद्धाची बीजे नव्हती. कारण देश जरी विभागला गेला असला तरी बेचिराख झालेल्या जर्मनीला (आणि जपानलाही) पुन्हा उभे राहण्यासाठी अमेरिकेने भरीव अशी आर्थिक मदत दिली होती. यालाच आपण विन-विन सिच्युएशन म्हणूयात का? लष्करी प्रश्नांवर लष्करी उत्तर, हे ठीकच. पण राजकीय प्रश्नावर उत्तर राजकीयच हवे. आयर्लंडच्या प्रश्नावर जसे विन-विन पद्धतीने तोडगा काढला गेला तसाच जर पॅलेस्टीन आणि काश्मिरवर काढला गेला तरच हा "इस्लामी" दहशतवाद आटोक्यात येईल. काही महिन्यांपूर्वी मी इथे काश्मिरवर एक लेख टाकला होता. त्यातील काही वाक्ये पुन्हा उद्धृत करतो - सर्वप्रथम हे लक्षात ठेवावे लागेल की, काश्मिर हा राजकीय प्रश्न आहे त्यामुळे त्याचे राजकीय उत्तरच शोधावे लागेल. लष्करी उपायांनी फारतर काश्मिरच्या भूभागावर ताबा ठेवता येईल पण तेथील जनतेला भारताच्या बाजूने वळवता येणार नाही. शेवटी प्रदेश म्हणंजे त्या प्रदेशातील माणसे, केवळ जमीन नव्हे. १) अधिक स्वायत्तता देणे - २) लष्करी जांच कमी करणे - ३) घट्ट आर्थिक संबंध निर्माण करणे - ४) देशाचे स्थान उंचावणे - एक वेगळा विचार करण्यास चालना देणारा लेख लिहिल्याबद्दल श्रावणसरांचे अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनंत छंदी 29/11/2008 - 15:05
श्रावणजी कालचा हल्ला हा केवळ एका देशाचा प्रश्न नाही तर तो आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे हा तुमचा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. हिरव्या दहशतवादाने सार्‍या जगाला वेठीस धरले आहे, त्यामुळे जगातील सर्व देशांनी या दहशतवादाविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली पाहिजे. आपल्या देशात "त्यांचे" इतके लाड चालू असतानाही हे दहशतवादी त्यांचा छळ थांबवा अशी मागणी करीत असतील तर ती बाब गंभीर आहे. यावेळी सरदार पटेलांची आठवण येते आहे. फाळणीच्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंवर अनन्वीत अत्याचार सुरू असताना त्यांनी केलेली एक कृती पुरेशी ठरली होती.

विजय राणे 29/11/2008 - 16:52
श्री मोडक आपला लेख वाचला. आपण लष्करात वगैरे होतात का की आहात? एखाद्या युद्धात आपण भाग घेतला आहे का? की केवळ वाचलेल्या माहितीवर विश्‍लेषण केले आहे? हे विचारण्याचा कारण असे की काही विधाने ठोस वाटतात आणि खूपशी कच्ची. हे नवे हत्यार थोडे पूर्वनियोजन केले तर प्रभावी ठरते. हे पूर्वनियोजन बॉम्ब पेरण्याइतके सखोल गरजेचे नाही. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करणेच हेच एक जोखमीचे काम असते. येथे ते नाही. तयार सामग्री घेऊन केलेला हल्ला असे हे स्वरूप आहे. लक्ष्य, कालावधी, अनुयायी या तीन बाबी असतील तर शस्त्रे पुरवणे, दारूगोळा पुरवणे सोपे ठरते. ग्रेनेडचा वापर असल्याने प्रभावक्षमता वाढते. अनेकांना असे वाटते की या हल्ल्यामागे सखोल नियोजन आहे. त्याची गरजच नाही. हे विधान फार धाडसाचे वाटते. हल्ल्यासाठी सखोल नियोजनाची गरज नाही, असा आपला दावा आहे. तो फारच पोकळ आणि बालीश वाटतो. कारण या दहशतवाद्यांनी समुद्रामार्गे मुंबईत येण्याची गेल्याच वर्षी रंगीत तालिम केल्याचे वाचनात आले आहे. आणि गेली साठ सात त्यांनी सुरक्षा यंत्रणेला झुंजत ठेवले आहे. त्यामुळे ते सुचेल तसे खचितच वागले वागले नसतील. त्यामुळे नियोजनाची गरज नाही, असे म्हणणे अयोग्य ठरते आणि आपण हा लेख टाइमपास म्हणून लिहिला की काय, अशी शंकाही वाटू लागते.

जीएस 29/11/2008 - 20:46
एक मुद्देसूद लेख लिहायचा उत्तम प्रयत्न केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय इतिहास व वस्तुस्थिती याच्या फारच अपुर्‍या आकलनापोटी, वा पुरेशा अभ्यासाअभावी फार मोठे निष्कर्ष बेधडकपणे मांडले गेले आहेत असे लेख वाचून वाटते. विसूनाना यांनीही मु़ख्य गाभ्यातील विसंगतीवर बोट ठेवले आहेच. मात्र, विचारप्रवर्तक चर्चा कुठल्या भाषेत वा पातळीवर व्हावी याचे मात्र हा लेख चाम्गले उदाहरण आहे. धन्यवाद
लेखनप्रकार
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...१

श्रावण मोडक ·

In reply to by मन१

नाना चेंगट 16/02/2013 - 11:51
तसे पूर्णपणे म्हणता येणार नाही. पण एकंदरीत धर्म / पंथ / संप्रदाय हे सत्ताकांक्षा या हेतूने ग्रासलेले असतात. थेट नियंत्रण नसले तरी नियंत्रकावर प्रभाव / नियंत्रण गाजवण्याची परंपरा सर्वत्र आहे. आणि राजकीय संघटना धर्माचा वापर करत असतातच

श्रावण मोडक 16/02/2013 - 11:51
हे लेखन तेव्हाच पूर्ण केले आहे. का धागा वर काढून माझी पंचाईत करताय? भाग १ भाग २ प्रतिसादांचा सारांश आणि माझे मत आणखी एक लेख

नितिन थत्ते 16/02/2013 - 15:20
त्या काळात मिपासदस्य नव्हतो त्यामुळे हे लेख वाचले नव्हते. लेख चांगले आहेतच. एक मुद्दा पूर्णपणे पटला नाही. इस्लाम हा अनुयायी मिळवण्यापुरता मुखवटा आहे आणि त्यामागचा मूळ हेतू राजकीय आहे हे खरे आहेच. पण हे पूर्णपणे खरे आहे की नाही याबाबत शंका आहे. काश्मीरमधील्या दहशतवाद्यांना पॅलेस्टाइनबद्दल काही प्रेम नसेल हे कदाचित खरे असले तरी अफगाणिस्तानाबद्दल तसे नसेलच याची खात्री नाही.

In reply to by मन१

नाना चेंगट 16/02/2013 - 11:51
तसे पूर्णपणे म्हणता येणार नाही. पण एकंदरीत धर्म / पंथ / संप्रदाय हे सत्ताकांक्षा या हेतूने ग्रासलेले असतात. थेट नियंत्रण नसले तरी नियंत्रकावर प्रभाव / नियंत्रण गाजवण्याची परंपरा सर्वत्र आहे. आणि राजकीय संघटना धर्माचा वापर करत असतातच

श्रावण मोडक 16/02/2013 - 11:51
हे लेखन तेव्हाच पूर्ण केले आहे. का धागा वर काढून माझी पंचाईत करताय? भाग १ भाग २ प्रतिसादांचा सारांश आणि माझे मत आणखी एक लेख

नितिन थत्ते 16/02/2013 - 15:20
त्या काळात मिपासदस्य नव्हतो त्यामुळे हे लेख वाचले नव्हते. लेख चांगले आहेतच. एक मुद्दा पूर्णपणे पटला नाही. इस्लाम हा अनुयायी मिळवण्यापुरता मुखवटा आहे आणि त्यामागचा मूळ हेतू राजकीय आहे हे खरे आहेच. पण हे पूर्णपणे खरे आहे की नाही याबाबत शंका आहे. काश्मीरमधील्या दहशतवाद्यांना पॅलेस्टाइनबद्दल काही प्रेम नसेल हे कदाचित खरे असले तरी अफगाणिस्तानाबद्दल तसे नसेलच याची खात्री नाही.
लेखनप्रकार
3