विद्रोही साहित्य संमेलनात उच्चवर्णीय मस्तानी
कणकवली- सिंधुदुर्ग येथे ३१ जानेवारीला होणारया १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या २५ पानी अध्यक्षीय भाषणातील काही पाने काल आमच्या हाती लागली. त्या पानांचा गोषवारा तसेच तिथे मांडले जाणारे काही ठराव इथे देत आहे.
पान क्र. १.
आज दहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना मला विशेष आनंद होत आहे. कष्टकरी समाज जो वंचित होता तो आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही. आपण ज्या समाजातून वर आलो त्या कष्ट्करी समाजाचे प्रतीक म्हणून आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो. गाढव हे कष्टाचे प्रतीक आहे. ओझी वाहून ते पिचून गेले आहे. उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले. त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो.
त्यांच्या संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडी तसेच दीप प्रज्वलनाने होते. आपल्याला ग्रंथ वाचायला मिळत नाहीत तसेच घरी खायला तेल नसते तर दिव्यात घालायल कुठून आणणार? त्यामुळे अश्या उच्चवर्णीय परंपरांचा हे संमेलन धिक्कार करत आहे…( टाळ्या…)
पान ५
संमेलन हा शब्द उच्च वर्णीयांच्या एका आता वापरात नसणारया भाषेतून आलेला आ्हे. त्यामुळे आपल्या वार्षिक समारंभाला संमेलन न म्हणता दुसरा शब्द सुचवा असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो/ तसेच आपल्या लेखनात, बोलण्यात असे ह्या वापरात नसलेल्या, उच्चवर्णीयांनी ज्या भाषेत सगळे ज्ञान बंदिस्त करुन ठेवले त्या भाषेतील शब्द वापरु नयेत असे मी आपल्याला आवहन करतो.
विद्रोही चळवळीत अनेक लेखक कवी कादंबरीकार झाले आहेत. त्यांच्या लेखनातील असे ह्या भाषेमधून आलेले शब्द घालवून, त्याएवजी बोलीभाषेतील शब्द वापरुन, त्यांचे पुन्हा एकदा लेखन करण्याची गरज आहे. हे महान कार्य हाती घेण्यासाठी मी विद्रोही चळवळीतील तरुण लेखक-लेखिकांना हाक देत आहे.
पान ७
शुद्धलेखन म्हणजे काय? त्याचे नियम कोणी ठरवले? ते नियम आपण का पाळायचे? ह्याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. साजूक तुपातील शिरा खाता खाता, आपल्या घराच्या बागेत बसून ह्या उच्चवर्णीयांनी हे नियम बनवले. तेव्हा घराच्या खिडकीतून त्यांनी समोर नजर टाकली असता, त्यांना जेवढी काही पेठ , जिमखाना किंवा पार्क दिसला तेवढ्यांना समजेल असे नियम त्यांनी बनवले. ते आम्ही का शिकावे? शिकले तरी का पाळावे?
तेव्हा विद्रोही चळवळीच्या पुढ्च्या पिढीवर ही जबाबादारी मी अध्यक्षाच्या नात्याने टाकत आहे. तरुण पिढी असे नवीन नियम बनवेल आणि ते आपण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करु.
सध्या पुणेरी बोलीचा हिच प्रमाण भाषा बनवण्याचा एक कट शिजत आहे. बरेच लेखक इथं, तिथं, तिनं, त्यानं असे शब्द तसेच सागरनी केलं, मीनलनी सांगितलं असा जगावेगळा नी हा विभक्तीप्रत्यय आपल्या लेखनात वापरुन, ही पुणेरी बोली रुढ करु पहात आहेत. हा कट आपण हाणून पाडला पाहिजे.
अशी अनेक आव्हाने , विद्रोही चळवळीसमोर उभी आहेत. ती पेलण्यासाठी चळवळीतील सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पान १७
अमेरिकेतील साहित्य संमेलनावर टीका करणे ही आता फॅशन झाली आहे. उच्च वर्णीय लेखकांनी ह्या संमेलनावर् टीका करुन प्रसिद्धी मिळवली. त्यांना खरेतर तिकडे जायचे होते. पण वयोमाना प्रमाणे जाउ न शकल्यामुळे आता टीका करुन ते प्रसिद्धी मिळवत आहेत. अश्या लोकांपासून सावध रहाण्याचा मी आपल्याला वडिलकीचा सल्ला देत आहे.
खरे तर अनेक उच्च वर्णीय लेखकांनी आपल्या लेकी- सुनांच्या बाळंतपणासाठीच्या तारखांप्रमाणे हे संमेलन ठरवले आहे. त्यासाठी शासनाच्या खर्चाने हे तिकडे जात आहेत. निमित्त मात्र संमेलनाचे आहे.
अश्या संमेलनासाठी २५ लाख देणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे.
पान २५
आपल्यासारखेच कष्टकरी जनतेतून वरती आलेले पण सध्या विद्रोही चळवळीशी फारकत घेतलेले प्रा. डॉ. आनंद यादव ह्यांची, त्यांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा मी विद्रोही चळवळीचा विजय समजतो. ते फिरुन चळवळीत येतीलच ह्याची मला खात्री आहे.
जय साहित्य जय विद्रोह!
प्रा.डॉ.दंगाधर तानपावणे ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी एक महत्त्वाचा ठराव मांडावा.
ठराव :
पाबळ येथे असलेली, मस्तानीची समाधी काही समाजकंटकांनी गुप्तधनाच्या अपेक्षेने उखडली. ह्या समाधीचे सरकारी खर्चाने पुन्हा बांधकाम करुन दिले जात आहे. मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी. अश्या उच्चवर्णीय राजाची एय्याशी त्याच्या मृत्यूनंतरही पुरवणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे.
जय साहित्य जय विद्रोह!
वाचने
5311
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
बाबासाहेब
In reply to बाबासाहेब by आर्य
बामसेफ अधिवेशनातला अनुभव
In reply to बामसेफ अधिवेशनातला अनुभव by भास्कर केन्डे
मोठ्या
हसून हसून पुरेवाट
In reply to हसून हसून पुरेवाट by स्वामि
+१ स्वामीराव
धन्यवाद
गाढव हे
In reply to गाढव हे by मृगनयनी
तथाकथित
.
जय रामदास
In reply to जय रामदास by आम्हाघरीधन
जय रामदास
येडचाप विद्रोही
उद्देश
अहंकार सामान्यांना असतो...
In reply to अहंकार सामान्यांना असतो... by स्वामि
गोखले कर्वे ही उदाहरणे