मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.

कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.

In reply to by कर्नलतपस्वी

शशिकांत ओक 17/09/2022 - 23:51
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 18:11
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !

इंद्रधनू 17/09/2022 - 23:20
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत

कपिलमुनी 18/09/2022 - 02:46
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Running

In reply to by Bhakti

प्रदीप 18/09/2022 - 10:41
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).

मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.

खेडूत 18/09/2022 - 10:37
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..

पाषाणभेद 18/09/2022 - 11:43
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. mipakatta pune 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर long shot मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा near mipakatta 2022 मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा inside caves पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील भाग समजावून देतांना प्रचेतस- वल्ली पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली last photo with Ramchandra सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.

In reply to by श्रीगुरुजी

रामचंद्र 18/09/2022 - 17:48
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.

In reply to by शाम भागवत

पाषाणभेद 18/09/2022 - 11:59
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.

In reply to by पाषाणभेद

शाम भागवत 18/09/2022 - 13:06
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.

टर्मीनेटर 18/09/2022 - 14:14
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे

In reply to by शाम भागवत

चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.

प्रचेतस 18/09/2022 - 18:01
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.

In reply to by प्रचेतस

सुरिया 18/09/2022 - 20:15
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)

In reply to by सुरिया

म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:55
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)

शाम भागवत 18/09/2022 - 19:19
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.

कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प

सस्नेह 19/09/2022 - 15:06
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!

MipaPremiYogesh 19/09/2022 - 16:41
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.

चौथा कोनाडा 19/09/2022 - 22:41
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! werdNBDH2 एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको

श्रीगणेशा 20/09/2022 - 03:40
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 20/09/2022 - 13:15
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगणेशा 21/09/2022 - 01:02
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!

In reply to by श्रीगणेशा

चौथा कोनाडा 21/09/2022 - 12:37
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा

पाषाणभेद 20/09/2022 - 13:23
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.

पर्णिका 21/09/2022 - 04:02
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.

In reply to by पर्णिका

कंजूस 21/09/2022 - 09:11
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)

जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

nutanm 22/09/2022 - 02:29
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?

In reply to by nutanm

असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 22/09/2022 - 17:15
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१

In reply to by nutanm

'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

बिग बुल

लॉरी टांगटूंगकर ·

एकदम समयोचित लेख! राकेश झुनझुनवाला हे नाव मी कधीतरी ऑफिसमधील गप्पात ऐकले आणि मग त्यांचा पोर्टफोलिओ गुगलुन बघितला. मग ऑफिसच्या गॉसिपमध्ये "आज राकेश ने ये स्टॉक उठाया" वगैरे ऐकत राहिलो. त्यांचे काही किस्से ऐकण्यात येउ लागले, ट्रेडर विरुद्ध इन्व्हेस्टर वगैरे कल्पना डोक्यात मूळ धरु लागली. थोडक्यात मार्केटकडे जरा लक्षपुर्वक पहायला लागलो. त्याचवेळेला १९९१ वेब सीरीज बघण्यात आली आणि माझ्या नजरेत राकेश झुनझुनवाला एक आयडॉल बनत गेले. राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वेब सीरीज स्कॅम १९९२ असे वाचावे आणि हो!! लेखात राकेश झुनझुनवालांच्या अनुषंगाने शेअर मार्केट्बद्दल सगळे मुद्दे चांगले मांडले आहेत. लेख त्य द्रुष्टीनेही आवडला.

सुबोध खरे 17/08/2022 - 19:13
काही गोष्टी येथे लिहाव्याशा वाटतात. एक म्हणजे माणूस मनस्वी होता. जे आहे ते खुलेपणाने बोलण्याची हिम्मत ठेवणारा होता. मी भरपूर दारू आणि सिगरेट पितो हे खुलेपणाने जसे बोलत तसेच मी भाजपचा सपोर्टर आहे हेही मोकळेपणाने बोलत असत. तिसरी गोष्ट म्हंजे मी बाजारात पैसे लावला पण बाजारात कधी ढवळा ढवळ केली नाही( manipulate) हेही ते स्वच्छपणे सांगतात. याचबरोबर माझ्या बापाकडे पैसा होता भावाकडे बाजारात पत होती त्यामुळे लोकांनाही मला गुंतवायला पैसा दिला हि नशिबाची गोष्ट होती हेही प्रामाणिकपणे सांगत असत. मला वेळेत शिक्षण मिळाले आणि भाग्याने साथ दिली हेही ते स्वच्छपणे बोलत असत. आंबट द्राक्ष असणारे अनेक लोक- एवढा पैसा मिळाला पण ६२ व्या वर्षी शेवटी इथेच सोडून जावे लागले हे परत परत चघळताना दिसतात. अर्थात बाजारात बऱ्याच लोकांना त्यांच्या इतके यश मिळाले नाही म्हणून असणारा मत्सर सुद्धा याला कारणीभूत आहे. कारण केवळ आयुष्यभर सचोटीने सरकारी कारकुनी करणारे दारू सिगरेट सारखी कोणतीही व्यसने न करणारे आमचे स्नेही आणि नातेवाईक सुद्धा साठीच्या आत बाहेर कैलासवासी झालेले मी पाहतो आहे. तसेच लोकांच्या शिव्याशाप घेणारे, भयंकर व्यसने आणि अनके लफडी कुलंगडी करणारे पाताळयंत्री राजकारणी सुद्धा ऐशी पार करून पुढे वाटचाल करताना दिसतात. याला प्राक्तन/ भाग्यच म्हणावे लागेल. जाता जाता - केवळ सवंग गुजराती लोकांच्या द्वेषापायी राकेश झुनझुनवाला याना ( ते गुजराती आहेत समजून) शिव्याशाप देणारे लोकही जालावर आढळतात. पण झुनझुनवाला हे मारवाडी होते गुजराती नव्हे. श्री राकेश झुनझुनवाला याना भावपूर्ण श्रद्धांजली

मित्रहो 17/08/2022 - 21:13
लेख आवडला खूप जोखीम घेऊन गुंतवणुक करणारा माणूस होता. बहुतेक गुंतवणुक कर्जात डुबलेल्या कंपन्यांमधे होती आणि हळूहळू कंपन्या त्यातून बाहेर यायच्या. काही कंपन्यां तितक्या चांगल्या करु शकल्या नाही. पब्लीक सेक्टर बँक, टाटा कंपन्यांमधे गुंतवणूक होती. डॉ. खरे यांच्या प्रतिसादाशी सहमत जे आहे ते बिनधास्त बोलणारा माणूस होता. लेखात म्हटल्याप्रमाणे भारत आणि भारताचे उज्वल भविष्य यावर विश्वास ठेवणारा माणूस होता. मला आवडलेले काही वाक्ये For country to grow it need two things Skills and Democracy. Growth comes from chaos not from order. श्रद्धांजली बिग बुल

निनाद 18/08/2022 - 09:10
लॉरी टांगटूंगकर यांनी फार सुंदर लेख लिहिला आहे. इन्व्हेस्टर/ शेअर होल्डर अ‍ॅक्टीविझम ची माहिती फार आवडली. समायोचित लेख.

तर्कवादी 18/08/2022 - 16:31
(फेसबुकवरुन साभार) 46 हजार कोटींचा मालक होते... शेअर मार्केट कोळून प्यालेला माणूस... 1 :- मी माशासारखी दारू पितो म्हणायचा. सिगारेटला तर मोजदाद नव्हती. मधुमेह होऊन पाय सुजला आणि खुर्चीवरच आयुष्य जाऊ लागलं तेंव्हा म्हणाला, आयुष्याला शिस्त हवी. व्यायाम करायला हवा होता. 2 :- 1985 ला 5 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक केली होती.2022 ला एकूण मालमत्ता 46 हजार कोटीवर गेली. याबद्दल कसं वाटतंय म्हणून विचारल्यावर म्हणाला, "कोण मोजत बसलंय संपत्ती? कुणाला दाखवायची आहे बॅलन्स शीट? माझी एक पार्टनर आहे पण तिलाही त्यात इंटरेस्ट नाही. आणि सध्याच्या तुलनेत 15-20 % संपत्ती असती तरी तीच गाडी, तेच घर असतं, तीच व्हिस्की पीत राहिलो असतो!" 3 :- राकेश झुणझूनवाला रिस्क घ्यायला कचरत नव्हता. रिटर्न मिळण्याची एकदा खात्री वाटली की बायकोच्या बांगड्या विकून गुंतवणूक करेन म्हणायचा. 4 :- 46 हजार कोटींचा मालक होता, पण पंतप्रधान मोदींना भेटायला गेला तेंव्हा शर्ट चुरगाळलेला होता. विचारल्यावर म्हणाला,600 रुपये देऊन इस्त्री केली, तरी तो चुरगाळला, मी काय करू? निर्मला सीतारामणला भेटला तेंव्हा पायात फ्लोटर होती. 5 :- झुणझूनवाला बोलायला बेधडक होता. मला मार्केट आणि स्त्रियांमध्ये जास्त रस आहे म्हणायचा. माझी पोरं 25 वर्षांची झालेली बघायची आहेत म्हणायचा, पण 2009 ला जन्मलेली जुळी पोरं अजून 14 च वर्षांची आहेत. मुलगी मात्र 18 वर्षांची आहे. पत्नी रेखा सोबत लग्न 1987 ला झाले, पण मुलं 17 वर्षांनी झाली. ययातिसारखे सारे भोगून झाल्यावर झुणझूनवाला "आयुष्याला शिस्त हवी होती" म्हणत राहिला. आपल्यासाठी हा एक मेसेजच.!!!

चौकस२१२ 19/08/2022 - 06:32
झुनझुनवाला हे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर दोन्ही होते हे माहित नवहते ... त्यांनी कधी पब्लिक फंड उभा केलं होता कि फक्त स्वतःचेच पैसे गुंतव्ययचे / खेळायायचे ?

टर्मीनेटर 20/08/2022 - 13:55
छान माहितीपूर्ण लेख 👍 राकेश झुनझुनवाला ही व्यक्ती माहिती होती पण त्यांच्याबद्दल विशेष माहिती नव्हती. राकेश झुनझुनवालांना श्रद्धांजली 🙏

विवेकपटाईत 23/08/2022 - 16:20
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाकी पैसा कमविता येतो पण तो उपभोग करण्यासाठी शरीर ही दुरुस्त पाहिजे. त्यांना जे उशिरा कळले ते आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवले पाहिजे.

एकदम समयोचित लेख! राकेश झुनझुनवाला हे नाव मी कधीतरी ऑफिसमधील गप्पात ऐकले आणि मग त्यांचा पोर्टफोलिओ गुगलुन बघितला. मग ऑफिसच्या गॉसिपमध्ये "आज राकेश ने ये स्टॉक उठाया" वगैरे ऐकत राहिलो. त्यांचे काही किस्से ऐकण्यात येउ लागले, ट्रेडर विरुद्ध इन्व्हेस्टर वगैरे कल्पना डोक्यात मूळ धरु लागली. थोडक्यात मार्केटकडे जरा लक्षपुर्वक पहायला लागलो. त्याचवेळेला १९९१ वेब सीरीज बघण्यात आली आणि माझ्या नजरेत राकेश झुनझुनवाला एक आयडॉल बनत गेले. राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वेब सीरीज स्कॅम १९९२ असे वाचावे आणि हो!! लेखात राकेश झुनझुनवालांच्या अनुषंगाने शेअर मार्केट्बद्दल सगळे मुद्दे चांगले मांडले आहेत. लेख त्य द्रुष्टीनेही आवडला.

सुबोध खरे 17/08/2022 - 19:13
काही गोष्टी येथे लिहाव्याशा वाटतात. एक म्हणजे माणूस मनस्वी होता. जे आहे ते खुलेपणाने बोलण्याची हिम्मत ठेवणारा होता. मी भरपूर दारू आणि सिगरेट पितो हे खुलेपणाने जसे बोलत तसेच मी भाजपचा सपोर्टर आहे हेही मोकळेपणाने बोलत असत. तिसरी गोष्ट म्हंजे मी बाजारात पैसे लावला पण बाजारात कधी ढवळा ढवळ केली नाही( manipulate) हेही ते स्वच्छपणे सांगतात. याचबरोबर माझ्या बापाकडे पैसा होता भावाकडे बाजारात पत होती त्यामुळे लोकांनाही मला गुंतवायला पैसा दिला हि नशिबाची गोष्ट होती हेही प्रामाणिकपणे सांगत असत. मला वेळेत शिक्षण मिळाले आणि भाग्याने साथ दिली हेही ते स्वच्छपणे बोलत असत. आंबट द्राक्ष असणारे अनेक लोक- एवढा पैसा मिळाला पण ६२ व्या वर्षी शेवटी इथेच सोडून जावे लागले हे परत परत चघळताना दिसतात. अर्थात बाजारात बऱ्याच लोकांना त्यांच्या इतके यश मिळाले नाही म्हणून असणारा मत्सर सुद्धा याला कारणीभूत आहे. कारण केवळ आयुष्यभर सचोटीने सरकारी कारकुनी करणारे दारू सिगरेट सारखी कोणतीही व्यसने न करणारे आमचे स्नेही आणि नातेवाईक सुद्धा साठीच्या आत बाहेर कैलासवासी झालेले मी पाहतो आहे. तसेच लोकांच्या शिव्याशाप घेणारे, भयंकर व्यसने आणि अनके लफडी कुलंगडी करणारे पाताळयंत्री राजकारणी सुद्धा ऐशी पार करून पुढे वाटचाल करताना दिसतात. याला प्राक्तन/ भाग्यच म्हणावे लागेल. जाता जाता - केवळ सवंग गुजराती लोकांच्या द्वेषापायी राकेश झुनझुनवाला याना ( ते गुजराती आहेत समजून) शिव्याशाप देणारे लोकही जालावर आढळतात. पण झुनझुनवाला हे मारवाडी होते गुजराती नव्हे. श्री राकेश झुनझुनवाला याना भावपूर्ण श्रद्धांजली

मित्रहो 17/08/2022 - 21:13
लेख आवडला खूप जोखीम घेऊन गुंतवणुक करणारा माणूस होता. बहुतेक गुंतवणुक कर्जात डुबलेल्या कंपन्यांमधे होती आणि हळूहळू कंपन्या त्यातून बाहेर यायच्या. काही कंपन्यां तितक्या चांगल्या करु शकल्या नाही. पब्लीक सेक्टर बँक, टाटा कंपन्यांमधे गुंतवणूक होती. डॉ. खरे यांच्या प्रतिसादाशी सहमत जे आहे ते बिनधास्त बोलणारा माणूस होता. लेखात म्हटल्याप्रमाणे भारत आणि भारताचे उज्वल भविष्य यावर विश्वास ठेवणारा माणूस होता. मला आवडलेले काही वाक्ये For country to grow it need two things Skills and Democracy. Growth comes from chaos not from order. श्रद्धांजली बिग बुल

निनाद 18/08/2022 - 09:10
लॉरी टांगटूंगकर यांनी फार सुंदर लेख लिहिला आहे. इन्व्हेस्टर/ शेअर होल्डर अ‍ॅक्टीविझम ची माहिती फार आवडली. समायोचित लेख.

तर्कवादी 18/08/2022 - 16:31
(फेसबुकवरुन साभार) 46 हजार कोटींचा मालक होते... शेअर मार्केट कोळून प्यालेला माणूस... 1 :- मी माशासारखी दारू पितो म्हणायचा. सिगारेटला तर मोजदाद नव्हती. मधुमेह होऊन पाय सुजला आणि खुर्चीवरच आयुष्य जाऊ लागलं तेंव्हा म्हणाला, आयुष्याला शिस्त हवी. व्यायाम करायला हवा होता. 2 :- 1985 ला 5 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक केली होती.2022 ला एकूण मालमत्ता 46 हजार कोटीवर गेली. याबद्दल कसं वाटतंय म्हणून विचारल्यावर म्हणाला, "कोण मोजत बसलंय संपत्ती? कुणाला दाखवायची आहे बॅलन्स शीट? माझी एक पार्टनर आहे पण तिलाही त्यात इंटरेस्ट नाही. आणि सध्याच्या तुलनेत 15-20 % संपत्ती असती तरी तीच गाडी, तेच घर असतं, तीच व्हिस्की पीत राहिलो असतो!" 3 :- राकेश झुणझूनवाला रिस्क घ्यायला कचरत नव्हता. रिटर्न मिळण्याची एकदा खात्री वाटली की बायकोच्या बांगड्या विकून गुंतवणूक करेन म्हणायचा. 4 :- 46 हजार कोटींचा मालक होता, पण पंतप्रधान मोदींना भेटायला गेला तेंव्हा शर्ट चुरगाळलेला होता. विचारल्यावर म्हणाला,600 रुपये देऊन इस्त्री केली, तरी तो चुरगाळला, मी काय करू? निर्मला सीतारामणला भेटला तेंव्हा पायात फ्लोटर होती. 5 :- झुणझूनवाला बोलायला बेधडक होता. मला मार्केट आणि स्त्रियांमध्ये जास्त रस आहे म्हणायचा. माझी पोरं 25 वर्षांची झालेली बघायची आहेत म्हणायचा, पण 2009 ला जन्मलेली जुळी पोरं अजून 14 च वर्षांची आहेत. मुलगी मात्र 18 वर्षांची आहे. पत्नी रेखा सोबत लग्न 1987 ला झाले, पण मुलं 17 वर्षांनी झाली. ययातिसारखे सारे भोगून झाल्यावर झुणझूनवाला "आयुष्याला शिस्त हवी होती" म्हणत राहिला. आपल्यासाठी हा एक मेसेजच.!!!

चौकस२१२ 19/08/2022 - 06:32
झुनझुनवाला हे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर दोन्ही होते हे माहित नवहते ... त्यांनी कधी पब्लिक फंड उभा केलं होता कि फक्त स्वतःचेच पैसे गुंतव्ययचे / खेळायायचे ?

टर्मीनेटर 20/08/2022 - 13:55
छान माहितीपूर्ण लेख 👍 राकेश झुनझुनवाला ही व्यक्ती माहिती होती पण त्यांच्याबद्दल विशेष माहिती नव्हती. राकेश झुनझुनवालांना श्रद्धांजली 🙏

विवेकपटाईत 23/08/2022 - 16:20
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाकी पैसा कमविता येतो पण तो उपभोग करण्यासाठी शरीर ही दुरुस्त पाहिजे. त्यांना जे उशिरा कळले ते आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवले पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

पाषाणभेद ·

पाषाणभेद 11/08/2022 - 13:25
कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे. "नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8

चौथा कोनाडा 11/08/2022 - 18:29
मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !

In reply to by प्रचेतस

पाषाणभेद 11/08/2022 - 20:38
साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे. उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 11/08/2022 - 22:30
विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 12/08/2022 - 06:45
आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)

In reply to by सतिश गावडे

सोत्रि 12/08/2022 - 14:24
रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली 😉 - (लॉर्ड) सोकाजी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुरिया 12/08/2022 - 16:38
असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे. फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे. . माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका) बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.

पाषाणभेद 11/08/2022 - 13:25
कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे. "नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8

चौथा कोनाडा 11/08/2022 - 18:29
मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !

In reply to by प्रचेतस

पाषाणभेद 11/08/2022 - 20:38
साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे. उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 11/08/2022 - 22:30
विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 12/08/2022 - 06:45
आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)

In reply to by सतिश गावडे

सोत्रि 12/08/2022 - 14:24
रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली 😉 - (लॉर्ड) सोकाजी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुरिया 12/08/2022 - 16:38
असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे. फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे. . माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका) बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा.

पुस्तक परिचय - कोकणच्या आख्यायिका

चिमी ·

मनो 30/07/2022 - 03:40
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी https://www.legendsofkokan.com/ इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.

@चिमी लेखाबद्दल धन्यवाद @ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.

मनो 30/07/2022 - 03:40
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी https://www.legendsofkokan.com/ इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.

@चिमी लेखाबद्दल धन्यवाद @ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.
लेखनप्रकार
कोकणच्या आख्यायिका हे अफाट भारी पुस्तक वाचून पूर्ण झाले. Arthur Crawford (हो, हा म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट ज्याच्या नावावर आहे ना, तोच हा) मुंबईचा पहिला Municipal Commissioner .. याने आपल्या कोकणातल्या वास्तव्यामध्ये एका भटजीबुवांबरोबर मैत्री केली. या भटजीबुवांकडे एक पोथी-पुराणांचे बाड होते. या पोथ्यांमध्ये लिहिलेल्या होत्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टी.

पुस्तक परिचय - काबुलीवाल्याची बंगाली बायको

चिमी ·

क्लिंटन 20/07/2022 - 09:08
छान पुस्तक परिचय. पुस्तक वाचले आहे. ते पुस्तक वाचणे हा अक्षरशः शहारे आणणारा अनुभव आहे. यावर एस्केप फ्रॉम तालिबान हा हिंदी चित्रपट आहे. अपेक्षेप्रमाणे तो चित्रपट एकदम फिका आहे. या सुश्मिता बॅनर्जी एकदा अफगाणिस्तानातून पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्या. पण त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे. ८-९ वर्षांपूर्वी तालिबानने त्यांना तिथल्या गावात गोळी घालून ठार मारले.

In reply to by क्लिंटन

चिमी 20/07/2022 - 10:00
पुस्तक वाचून झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने सुश्मितांबद्दल गुगल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये परत आल्यावर इथे काही वर्षे राहून सुश्मिता २०१३ मध्ये परत अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि तिथल्या स्त्रियांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी जातात. दुर्दैवाने या वेळी तालिबानी अतिरेक्यांनी त्यांची राहत्या घरात घुसून हत्या केली. त्यामुळे मुळात एकदा भारतात आल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचे कारण काय, सुश्मिता खरचं भारतीय गुप्तहेर होत्या का, असे प्रश्न निःशब्द करून सोडतात. हा शेवटचा परिच्छेद चुकून टाकायचा राहिला. आता edit करायला जमत नाहीये. :(

कंजूस 20/07/2022 - 09:30
त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे.
कमालच आहे.

कंजूस 20/07/2022 - 10:30
या विषयी त्याच समाजातील लोकांनी पुढे येऊन निराकरण करायला हवे. दुसऱ्यांनी बाहेरून येऊन का लक्ष घालायचे? फुले,आंबेडकर,सानेगुरुजी ही काही महाराष्ट्रातील उदाहरणे. सती प्रथा विरोधी आंदोलन सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी लक्ष घातले. १८५७ नंतर त्यांनी ठरवून टाकले होते की धार्मिक बाबींत घुसायचं नाही.

गामा पैलवान 20/07/2022 - 18:22
चिमी, पुस्तक परिचय रंजक आहे. सुस्मिता वंद्योपाध्याय यांचं आयुष्य त्याहूनही रोचक व थरारक आहे. त्यांच्याबद्दल विकिवर महिती वाचली. एकंदरीत चित्रं असं उभं राहिलं की त्या गुप्तचर असाव्यात. त्यांचे वडीलही गुप्तवार्ता विभागात कामाला असावेत. त्यांचा नवरा जानबाझ खान हा ही भारतीय हस्ती ( asset ) असावा. बाई गांधारातनं भारतात पळून आल्यावर त्यांना तिथेच दुसरी कामगिरी करावयास भाग पाडण्यात आलं. त्यानुसार त्या तिथं परत गेल्या. पण भारतीय परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारी छाप देशद्रोह्यांना बाईंचं हिंदुत्व सहन झालं नाही. भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं. पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
बाप्रे.अंगावर काटा आला हे वाचुन. फार कणखर मनस्थितीची स्त्री असणार.

In reply to by गामा पैलवान

क्लिंटन 20/07/2022 - 19:00
भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
भारतातूनच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या याचा काही संदर्भ आहे का?तालिबानच्या कोणत्याही गोटाने समजा त्यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली नसली याचा अर्थ तालिबानने त्यांची हत्या केली नाही असा कसा होईल? तालिबान्यांनी हजारो-लाखो हत्या केल्या होत्या. प्रत्येक हत्येची जबाबदारी कोणीतरी स्विकारायचे का?

In reply to by क्लिंटन

गामा पैलवान 21/07/2022 - 18:48
क्लिंटन, यांचा काटा काढायची सूचना भारतातनं दिल्या गेलेल्या असाव्यात असा माझा समज कशामुळे झाला ते सांगतो. आम्ही भावनेच्या भरात बामियानचे बुद्धपुतळे पाडले. असं तालिबानचा तत्कालीन नेता म्हणतोय : https://www.youtube.com/watch?v=bbdr_LZTBW4 याचाच अर्थ जर भारताने तीव्र आक्षेप घेतला असता तर तालिबानने ते नष्ट केले नसते. नव्या दिल्लीतून कोणीतरी या विध्वंसक मोहिमेस आशीर्वाद दिलेला असणार. बहुतेक वाजपेयी सरकार होतं. तरीही डीप स्टेट ने आपलं काम बजावलंच. तसाच काहीसा प्रकार सुस्मितावाईनच्या बाबतीत घडलेला दिसतोय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कंधार प्रकरण डीसेंबर १९९९ ला घडलं व मार्च २००० ला बामीयान मुर्त्या ऊडवल्या गेल्या. कंधार प्रकरणावेळी वाजपेयीं सारख्या दुबळ्या पंतप्रधानाची कार्यक्षमता पाहून तालिबान ने त्यांचं एकलं असतं ह्याची शंकाच आहे.

In reply to by गामा पैलवान

क्लिंटन 21/07/2022 - 22:25
या लॉजिकला _/\_ तालिबानने कंदाहारला विमान नेले तेव्हाही सोवळेपणाचा आव आणून त्यांचा अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांशी काहीही संबंध नाही असे चित्र उभे केले होते. इतका की आपल्या मीडियातून नेहमीचे यशस्वी कलाकार friendly Taliban वगैरे बोलायला लागले होते. अशा गोष्टी खऱ्या थोडीच असतात? दुसरे म्हणजे बामियानचे पुतळे पाडले तेव्हा पूर्ण जगातून निषेध झाला होता, भारतातून सुध्दा. तरीही तालिबान्यांनी त्या निषेधाला हिंग लावून विचारले नव्हते. त्याचा अर्थ बामियानचे बुध्द पाडा हा आदेश तालिबानला भारतातून गेला होता? जसे काही तालिबान ' कधी एकदा भारतातून आदेश येतो ' याची वाटच बघत होते. तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार? म्हणजे भारतात तालिबानी प्रवृत्तीचे लोक नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही. फक्त भारतातून सूत्रे हलल्याने या घटना घडल्या हे आपण छातीठोकपणे म्हणण्याइतका आधार आपल्याकडे आहे असे वाटत नाही.

In reply to by गामा पैलवान

चिमी 20/07/2022 - 20:15
एका तालिबान्यानी स्वीकारली होती म्हणे जबाबदारी.. त्यांचा नवरा जानबाझ खान हा भारताचा asset असावा – हो हे पण नक्की असू शकत.

डँबिस००७ 20/07/2022 - 19:43
सुश्मिता बॅनर्जी बद्दल फार पुर्वी बातमीत वाचल होत. भारतात परतल्यावर पुन्हा अफगानिस्तानात गेलेल्या व तिथेच त्यांची हत्या झालेली पाहुन कोड पडल होत की ईतकी मेहनत करुन भारतात परतलेल्या ह्या स्त्रीने अफगानिस्तानात परत का गेली ? तिने तिथे जाण्या मागे हेर गीरी असेल ह्याचा किंचीतसाही संदेह आला नाही. बाकी परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारीने इराण मधल्या भारताच्या बर्याच रॉ च्या अ‍ॅसेट्सना रॉ अधिकार्याच्या मानेवर सुरा फिरवलेला आहे. ह्या गुप्तहेराच्या मृत्युमागे अश्या नराधमाचा हात असु शकतो.

टर्मीनेटर 21/07/2022 - 11:15
पुस्तक परिचय, पुस्तकाचे "काबुलीवाल्याची बंगाली बायको" हे शिर्षक आणि तुमची लेखनशैली सगळेच आवडले 👍 वरती विजुभाऊंनी म्हंटल्या प्रमाणे हा लेख वाचताना मलाही "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली! मागे तुम्ही लिहिलेला "जंगल" बद्दलचा लेखही आवडला होता. चित्रपट, पुस्तकाचा परिचय करून देताना लेखनाला छोट्याशा कथानकाची पार्श्वभूमी देण्याची कल्पनाही छानच. त्यामुळे लिहित्या रहा, वाचायला आवडेल!

In reply to by टर्मीनेटर

चिमी 29/07/2022 - 23:31
खुप खुप धन्यवाद आणि "जंगल" बद्दल लिहिलेला लेख तुमच्या लक्षात आहे, हे पाहून तर खूपच छान वाटले .. _/\_ _/\_

सिरुसेरि 21/07/2022 - 14:06
छान पुस्तक परिचय . वरील प्रतिक्रियांमधे उल्लेख केल्याप्रमाणे हा लेख वाचताना "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली . तसेच शेवटचा परिच्छेद वाचुन "राजी" आणी "Munich" हे चित्रपट आठवले .

श्रीगुरुजी 22/07/2022 - 00:01
हे पुस्तक वाचले आहे. या सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला. असा मुलगा या लेखिकेला आवडणे, त्याची व त्याच्या कुटुंबियांची शून्य माहिती असूनही त्याच्याशी लग्न करणे आणि हे का केले तर म्हणे तिचा आधीच्या बॉयफ्रेंढबरोबर ब्रेकअप झाला म्हणून. बुद्धीची सर्व दारे, डोळे, कान वगैरे पूर्ण बंद केल्यानंतरच असले आत्मघातकी निर्णय सुचतात. लग्नानंतर ही सुशिक्षित मुलगी अफगाणिस्तान या अत्यंत मागास देशात जाऊन झोपडीत राहते. तेथे गेल्यावर तिला समजते की त्याचे आधीचे कुटुंब तेथेच आहे व त्यांची सेवा करीत बसावे लागते. तो मात्र तिला तेथेच सोडून भारतात निघून येतो. रोज खाण्याची मारामार. रोजचे अन्न म्हणजे चहा आणि नान. असल्या भीषण परिस्थितीतून जिवानीशी सुटून कलकत्त्याला परत आल्यानंतरही आपण पराकोटीचा मूर्खपणा केला होता हे हिला समजतच नाही. ती पुन्हा एकदा त्याच्याबरोबर अफगाणिस्तान नावाच्या नरकात जाऊन शेवटी जीव गमावते. हे सर्व अनाकलनीय आहे. _______________ अशीच कथा आशा पाटील नावाच्या एका बेळगावच्या मुलीची आहे. आंतरजालावर ओळख झालेल्या एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात ती पडते. इतके प्रेम वाढते की त्याच्याशी फोनवरून लग्न करण्याचे मान्य करते. त्यासाठी हिंदू असूनही घरच्यांचा विरोध असूनही धर्म बदलते, कुराण शिकते, बुरखा वापरायला लागते आणि हे सर्व एकदाही न पाहिलेल्या, ज्याची शून्य माहिती आहे अशा पाकिस्तानातील संपूर्ण अनोळखी मुस्लिमासाठी. नंतर काही वर्षे धडपडून व्हिसा मिळाल्यानंतर नवऱ्याकडे पाकिस्तानात जाते. तिथे तर अजून भयंकर वातावरण. तिच्या दुर्दैवाने २ वर्षातच नवरा मरतो. मग हिला परत बेळगावात यावेसे वाटते. पण तिने आता दिराशी लग्न करावे अशी बळजबरी सासरी सुरू होते. शेवटी बरीच धडपड करून ती भारतात आईवडिलांकडे परत येते व काही दिवसांनंतर पुन्हा सासरी पाकिस्तानात जाण्यास निघते कारण तिला म्हणे सासूसासऱ्यांची सेवा करण्याचीक इच्छा आहे. पुढे काय झाले माहिती नाही. ______________ मूर्खपणाला मर्यादा नाही असे बहुतेक आईनस्टाईन म्हटले होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. स्वानूभावावरून सांगतो. मी १३ साली फेसबूक चॅटींग करायचो बर्याच मूलींशी, एक पनवेल ची मूलगी तर घरदार सोडून पळून यायला तयार होती. त्यासाठी खुप मागेही लागली होती, मी त्या मूलीला कधी पाहीलं/भेटलोही नव्हतो तरी. मूली प्रेमात एकदा फसल्या की काहीही करायला तयार असतात, प्रेमवीरांना जग कायम लक्षात ठेवतं, अमरप्रेमकथा वगैरे हे टीवी सिरीयल्स नी प्रत्येक सिनेमात दाखवलेलं असतंचं, आपणही तसंच काहीतरी करावं ही भावना भयानक ऊचंबळून आलेली असते, त्यात मग जाती पाती ची भिंत असेल तर ती तोडायला त्या ऊत्स्फूर्त असतात, मग पुढे धर्म नी देश वगैरे आले तर त्या प्रेम स्ट्रगल ला आणखी धुमारे फूटतात. तो अनूभव घ्यायची तर त्यांची भयानक ईच्छा होते. प्रत्येक लवस्टोरीला व्हिलन असावा लागतो, मग ह्या मुली आई, बाप, भाऊ ह्यांनाच व्हिलन बनवतात. काही दिवसानी मग हे स्ट्रगल वगैरे ओसरलं, नी समाज, आई,वडील,भाऊ ह्यांनी वार्यावर सोडलं की खाडकन डोळे ऊघडतात. काही परत येऊन स्थिरावतात, काहींचे परतीचे दोर कापले जातात, काहीना काहीच न सुचल्याने परत सासरी जाऊन बसतात. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला आधी कुणीही कट्टर वगैरे असल्याचं दाखवत नाहीत, बर्याच फसवणूकात तर मूलांनी हिंदू नाव धारण केलेलं असतं, बाकी कितीही सुशिक्षीत असो अनेक मुलींना आपल्या राज्यातील जिल्हे नीट माहीत नसतात तर अफगाणीस्तान वगैरे माहीत असण्याची शक्यता शून्य. बी. ई मेकॅनीकल झालेल्या मूलींचं आरटीओ प्री परिक्षेसाठीचं मेरीट शंभर पैकी फक्त १ मार्काला लागलं होतं. सरकारी नियमाप्रमाणे ० चं मेरीट लावता येत नाही नाहीतर सरकारने ते लावलं असतं, ईतकं पक्कं जीके असतं मूलींचं. पुण्यातच कितीतरी मूलींना जळगाव दक्षीणेला की बेळगाव ऊत्तरेला विचारलं तर सांगता येत नाही हे मी स्वत: पाहीलंय. वास्तवीक जगाचं भान ह्या बाबतीत मूली फार म्हणजे फारच कमजोर असतात. ह्यावर एक लेख पाडू म्हणतो…..

गामा पैलवान 22/07/2022 - 01:30
क्लिंटन
तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार?
या ( व बामियान व कंदाहार च्या ) प्रकरणांत reading between the lines करायचं असतं. या असल्या गोष्टींचे माग कोणी आपणहून सोडून जात नसतं. मी जी काही विधानं केलीयेत ती अन्वेषणाची पहिली पायरी आहेत. तुम्हांस ती अंतिम निष्कर्ष वाटली तर क्षमस्व. आ.न., -गा.पै.

क्लिंटन 20/07/2022 - 09:08
छान पुस्तक परिचय. पुस्तक वाचले आहे. ते पुस्तक वाचणे हा अक्षरशः शहारे आणणारा अनुभव आहे. यावर एस्केप फ्रॉम तालिबान हा हिंदी चित्रपट आहे. अपेक्षेप्रमाणे तो चित्रपट एकदम फिका आहे. या सुश्मिता बॅनर्जी एकदा अफगाणिस्तानातून पळून जाण्यात यशस्वी झाल्या होत्या. पण त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे. ८-९ वर्षांपूर्वी तालिबानने त्यांना तिथल्या गावात गोळी घालून ठार मारले.

In reply to by क्लिंटन

चिमी 20/07/2022 - 10:00
पुस्तक वाचून झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने सुश्मितांबद्दल गुगल केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये परत आल्यावर इथे काही वर्षे राहून सुश्मिता २०१३ मध्ये परत अफगाणिस्तानमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी आणि तिथल्या स्त्रियांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी जातात. दुर्दैवाने या वेळी तालिबानी अतिरेक्यांनी त्यांची राहत्या घरात घुसून हत्या केली. त्यामुळे मुळात एकदा भारतात आल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाण्याचे कारण काय, सुश्मिता खरचं भारतीय गुप्तहेर होत्या का, असे प्रश्न निःशब्द करून सोडतात. हा शेवटचा परिच्छेद चुकून टाकायचा राहिला. आता edit करायला जमत नाहीये. :(

कंजूस 20/07/2022 - 09:30
त्यांना परत तिथे जायची बुध्दी का झाली असेल हे समजण्यापलीकडचे आहे.
कमालच आहे.

कंजूस 20/07/2022 - 10:30
या विषयी त्याच समाजातील लोकांनी पुढे येऊन निराकरण करायला हवे. दुसऱ्यांनी बाहेरून येऊन का लक्ष घालायचे? फुले,आंबेडकर,सानेगुरुजी ही काही महाराष्ट्रातील उदाहरणे. सती प्रथा विरोधी आंदोलन सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी लक्ष घातले. १८५७ नंतर त्यांनी ठरवून टाकले होते की धार्मिक बाबींत घुसायचं नाही.

गामा पैलवान 20/07/2022 - 18:22
चिमी, पुस्तक परिचय रंजक आहे. सुस्मिता वंद्योपाध्याय यांचं आयुष्य त्याहूनही रोचक व थरारक आहे. त्यांच्याबद्दल विकिवर महिती वाचली. एकंदरीत चित्रं असं उभं राहिलं की त्या गुप्तचर असाव्यात. त्यांचे वडीलही गुप्तवार्ता विभागात कामाला असावेत. त्यांचा नवरा जानबाझ खान हा ही भारतीय हस्ती ( asset ) असावा. बाई गांधारातनं भारतात पळून आल्यावर त्यांना तिथेच दुसरी कामगिरी करावयास भाग पाडण्यात आलं. त्यानुसार त्या तिथं परत गेल्या. पण भारतीय परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारी छाप देशद्रोह्यांना बाईंचं हिंदुत्व सहन झालं नाही. भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं. पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
बाप्रे.अंगावर काटा आला हे वाचुन. फार कणखर मनस्थितीची स्त्री असणार.

In reply to by गामा पैलवान

क्लिंटन 20/07/2022 - 19:00
भारतातनंच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या. तालिबानच्या कोणत्याही मुख्य गोटाने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. यावरून हा अंतर्गत स्पर्धेचा गळेकापू प्रकार असावासं प्रथमदर्शनी वाटतं.
भारतातूनच त्यांचा परस्पर काटा काढायच्या सूचना दिल्या गेल्या याचा काही संदर्भ आहे का?तालिबानच्या कोणत्याही गोटाने समजा त्यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली नसली याचा अर्थ तालिबानने त्यांची हत्या केली नाही असा कसा होईल? तालिबान्यांनी हजारो-लाखो हत्या केल्या होत्या. प्रत्येक हत्येची जबाबदारी कोणीतरी स्विकारायचे का?

In reply to by क्लिंटन

गामा पैलवान 21/07/2022 - 18:48
क्लिंटन, यांचा काटा काढायची सूचना भारतातनं दिल्या गेलेल्या असाव्यात असा माझा समज कशामुळे झाला ते सांगतो. आम्ही भावनेच्या भरात बामियानचे बुद्धपुतळे पाडले. असं तालिबानचा तत्कालीन नेता म्हणतोय : https://www.youtube.com/watch?v=bbdr_LZTBW4 याचाच अर्थ जर भारताने तीव्र आक्षेप घेतला असता तर तालिबानने ते नष्ट केले नसते. नव्या दिल्लीतून कोणीतरी या विध्वंसक मोहिमेस आशीर्वाद दिलेला असणार. बहुतेक वाजपेयी सरकार होतं. तरीही डीप स्टेट ने आपलं काम बजावलंच. तसाच काहीसा प्रकार सुस्मितावाईनच्या बाबतीत घडलेला दिसतोय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कंधार प्रकरण डीसेंबर १९९९ ला घडलं व मार्च २००० ला बामीयान मुर्त्या ऊडवल्या गेल्या. कंधार प्रकरणावेळी वाजपेयीं सारख्या दुबळ्या पंतप्रधानाची कार्यक्षमता पाहून तालिबान ने त्यांचं एकलं असतं ह्याची शंकाच आहे.

In reply to by गामा पैलवान

क्लिंटन 21/07/2022 - 22:25
या लॉजिकला _/\_ तालिबानने कंदाहारला विमान नेले तेव्हाही सोवळेपणाचा आव आणून त्यांचा अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांशी काहीही संबंध नाही असे चित्र उभे केले होते. इतका की आपल्या मीडियातून नेहमीचे यशस्वी कलाकार friendly Taliban वगैरे बोलायला लागले होते. अशा गोष्टी खऱ्या थोडीच असतात? दुसरे म्हणजे बामियानचे पुतळे पाडले तेव्हा पूर्ण जगातून निषेध झाला होता, भारतातून सुध्दा. तरीही तालिबान्यांनी त्या निषेधाला हिंग लावून विचारले नव्हते. त्याचा अर्थ बामियानचे बुध्द पाडा हा आदेश तालिबानला भारतातून गेला होता? जसे काही तालिबान ' कधी एकदा भारतातून आदेश येतो ' याची वाटच बघत होते. तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार? म्हणजे भारतात तालिबानी प्रवृत्तीचे लोक नाहीत असे मला अजिबात म्हणायचे नाही. फक्त भारतातून सूत्रे हलल्याने या घटना घडल्या हे आपण छातीठोकपणे म्हणण्याइतका आधार आपल्याकडे आहे असे वाटत नाही.

In reply to by गामा पैलवान

चिमी 20/07/2022 - 20:15
एका तालिबान्यानी स्वीकारली होती म्हणे जबाबदारी.. त्यांचा नवरा जानबाझ खान हा भारताचा asset असावा – हो हे पण नक्की असू शकत.

डँबिस००७ 20/07/2022 - 19:43
सुश्मिता बॅनर्जी बद्दल फार पुर्वी बातमीत वाचल होत. भारतात परतल्यावर पुन्हा अफगानिस्तानात गेलेल्या व तिथेच त्यांची हत्या झालेली पाहुन कोड पडल होत की ईतकी मेहनत करुन भारतात परतलेल्या ह्या स्त्रीने अफगानिस्तानात परत का गेली ? तिने तिथे जाण्या मागे हेर गीरी असेल ह्याचा किंचीतसाही संदेह आला नाही. बाकी परराष्ट्रखात्यातल्या हमीद अन्सारीने इराण मधल्या भारताच्या बर्याच रॉ च्या अ‍ॅसेट्सना रॉ अधिकार्याच्या मानेवर सुरा फिरवलेला आहे. ह्या गुप्तहेराच्या मृत्युमागे अश्या नराधमाचा हात असु शकतो.

टर्मीनेटर 21/07/2022 - 11:15
पुस्तक परिचय, पुस्तकाचे "काबुलीवाल्याची बंगाली बायको" हे शिर्षक आणि तुमची लेखनशैली सगळेच आवडले 👍 वरती विजुभाऊंनी म्हंटल्या प्रमाणे हा लेख वाचताना मलाही "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली! मागे तुम्ही लिहिलेला "जंगल" बद्दलचा लेखही आवडला होता. चित्रपट, पुस्तकाचा परिचय करून देताना लेखनाला छोट्याशा कथानकाची पार्श्वभूमी देण्याची कल्पनाही छानच. त्यामुळे लिहित्या रहा, वाचायला आवडेल!

In reply to by टर्मीनेटर

चिमी 29/07/2022 - 23:31
खुप खुप धन्यवाद आणि "जंगल" बद्दल लिहिलेला लेख तुमच्या लक्षात आहे, हे पाहून तर खूपच छान वाटले .. _/\_ _/\_

सिरुसेरि 21/07/2022 - 14:06
छान पुस्तक परिचय . वरील प्रतिक्रियांमधे उल्लेख केल्याप्रमाणे हा लेख वाचताना "नॉट विदाउट माय डॉटर" ह्या पुस्तकाची आठवण आली . तसेच शेवटचा परिच्छेद वाचुन "राजी" आणी "Munich" हे चित्रपट आठवले .

श्रीगुरुजी 22/07/2022 - 00:01
हे पुस्तक वाचले आहे. या सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला. असा मुलगा या लेखिकेला आवडणे, त्याची व त्याच्या कुटुंबियांची शून्य माहिती असूनही त्याच्याशी लग्न करणे आणि हे का केले तर म्हणे तिचा आधीच्या बॉयफ्रेंढबरोबर ब्रेकअप झाला म्हणून. बुद्धीची सर्व दारे, डोळे, कान वगैरे पूर्ण बंद केल्यानंतरच असले आत्मघातकी निर्णय सुचतात. लग्नानंतर ही सुशिक्षित मुलगी अफगाणिस्तान या अत्यंत मागास देशात जाऊन झोपडीत राहते. तेथे गेल्यावर तिला समजते की त्याचे आधीचे कुटुंब तेथेच आहे व त्यांची सेवा करीत बसावे लागते. तो मात्र तिला तेथेच सोडून भारतात निघून येतो. रोज खाण्याची मारामार. रोजचे अन्न म्हणजे चहा आणि नान. असल्या भीषण परिस्थितीतून जिवानीशी सुटून कलकत्त्याला परत आल्यानंतरही आपण पराकोटीचा मूर्खपणा केला होता हे हिला समजतच नाही. ती पुन्हा एकदा त्याच्याबरोबर अफगाणिस्तान नावाच्या नरकात जाऊन शेवटी जीव गमावते. हे सर्व अनाकलनीय आहे. _______________ अशीच कथा आशा पाटील नावाच्या एका बेळगावच्या मुलीची आहे. आंतरजालावर ओळख झालेल्या एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात ती पडते. इतके प्रेम वाढते की त्याच्याशी फोनवरून लग्न करण्याचे मान्य करते. त्यासाठी हिंदू असूनही घरच्यांचा विरोध असूनही धर्म बदलते, कुराण शिकते, बुरखा वापरायला लागते आणि हे सर्व एकदाही न पाहिलेल्या, ज्याची शून्य माहिती आहे अशा पाकिस्तानातील संपूर्ण अनोळखी मुस्लिमासाठी. नंतर काही वर्षे धडपडून व्हिसा मिळाल्यानंतर नवऱ्याकडे पाकिस्तानात जाते. तिथे तर अजून भयंकर वातावरण. तिच्या दुर्दैवाने २ वर्षातच नवरा मरतो. मग हिला परत बेळगावात यावेसे वाटते. पण तिने आता दिराशी लग्न करावे अशी बळजबरी सासरी सुरू होते. शेवटी बरीच धडपड करून ती भारतात आईवडिलांकडे परत येते व काही दिवसांनंतर पुन्हा सासरी पाकिस्तानात जाण्यास निघते कारण तिला म्हणे सासूसासऱ्यांची सेवा करण्याचीक इच्छा आहे. पुढे काय झाले माहिती नाही. ______________ मूर्खपणाला मर्यादा नाही असे बहुतेक आईनस्टाईन म्हटले होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुशिक्षित मुली आंधळेपणाने एखाद्याच्या प्रेमात कशा पडतात याचे मला कायमच कुतुहल वाटत आले आहे. स्वानूभावावरून सांगतो. मी १३ साली फेसबूक चॅटींग करायचो बर्याच मूलींशी, एक पनवेल ची मूलगी तर घरदार सोडून पळून यायला तयार होती. त्यासाठी खुप मागेही लागली होती, मी त्या मूलीला कधी पाहीलं/भेटलोही नव्हतो तरी. मूली प्रेमात एकदा फसल्या की काहीही करायला तयार असतात, प्रेमवीरांना जग कायम लक्षात ठेवतं, अमरप्रेमकथा वगैरे हे टीवी सिरीयल्स नी प्रत्येक सिनेमात दाखवलेलं असतंचं, आपणही तसंच काहीतरी करावं ही भावना भयानक ऊचंबळून आलेली असते, त्यात मग जाती पाती ची भिंत असेल तर ती तोडायला त्या ऊत्स्फूर्त असतात, मग पुढे धर्म नी देश वगैरे आले तर त्या प्रेम स्ट्रगल ला आणखी धुमारे फूटतात. तो अनूभव घ्यायची तर त्यांची भयानक ईच्छा होते. प्रत्येक लवस्टोरीला व्हिलन असावा लागतो, मग ह्या मुली आई, बाप, भाऊ ह्यांनाच व्हिलन बनवतात. काही दिवसानी मग हे स्ट्रगल वगैरे ओसरलं, नी समाज, आई,वडील,भाऊ ह्यांनी वार्यावर सोडलं की खाडकन डोळे ऊघडतात. काही परत येऊन स्थिरावतात, काहींचे परतीचे दोर कापले जातात, काहीना काहीच न सुचल्याने परत सासरी जाऊन बसतात. तो मुलगा परधर्मी म्हणजे स्त्रियांना कस्पटाचीही किंमत न देणारा मुस्लिम, त्यातून अफगाणिस्तान या अत्यंत कट्टर धर्मांध भागातून आलेला आधी कुणीही कट्टर वगैरे असल्याचं दाखवत नाहीत, बर्याच फसवणूकात तर मूलांनी हिंदू नाव धारण केलेलं असतं, बाकी कितीही सुशिक्षीत असो अनेक मुलींना आपल्या राज्यातील जिल्हे नीट माहीत नसतात तर अफगाणीस्तान वगैरे माहीत असण्याची शक्यता शून्य. बी. ई मेकॅनीकल झालेल्या मूलींचं आरटीओ प्री परिक्षेसाठीचं मेरीट शंभर पैकी फक्त १ मार्काला लागलं होतं. सरकारी नियमाप्रमाणे ० चं मेरीट लावता येत नाही नाहीतर सरकारने ते लावलं असतं, ईतकं पक्कं जीके असतं मूलींचं. पुण्यातच कितीतरी मूलींना जळगाव दक्षीणेला की बेळगाव ऊत्तरेला विचारलं तर सांगता येत नाही हे मी स्वत: पाहीलंय. वास्तवीक जगाचं भान ह्या बाबतीत मूली फार म्हणजे फारच कमजोर असतात. ह्यावर एक लेख पाडू म्हणतो…..

गामा पैलवान 22/07/2022 - 01:30
क्लिंटन
तिसरे म्हणजे मुळात बामियान मधील मूर्ती पाडायची घटना आणि भारत याचा संबंधच तुम्हाला लावता आलेला नाही तेव्हा त्याचं धर्तीवर सुश्मिता बॅनर्जी यांची हत्या भारतातून सूत्रे हलविली म्हणून झाली हे कसे मान्य करणार?
या ( व बामियान व कंदाहार च्या ) प्रकरणांत reading between the lines करायचं असतं. या असल्या गोष्टींचे माग कोणी आपणहून सोडून जात नसतं. मी जी काही विधानं केलीयेत ती अन्वेषणाची पहिली पायरी आहेत. तुम्हांस ती अंतिम निष्कर्ष वाटली तर क्षमस्व. आ.न., -गा.पै.
लेखनप्रकार
आता ऑफिस सुरु होणार म्हणून एकदा घरी जाऊन येऊ म्हणलं आणि गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाय खूप वाईट मुरगळला. आईच्या शब्दात “आल्या आल्या घेतलं का तंगडं मोडून?” तिची कामामुळे होणारी दगदग पाहून खूप वाईट वाटत होतं पण आता गप एका जागेवर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. घरी गेल्यावर मोबाईलला हातपण लावायचा नाही असा ठरवलं होतं पण एका जागी बसून दुसरं करणार तरी काय? म्हणून मग किंडलवर “काबुलीवाल्याची बंगाली बायको” वाचायला सुरु केलं. सुश्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या या मूळ बंगाली सत्यकथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी.

किल्ला ( चित्रपट - २०१५ )

चक्कर_बंडा ·

छान लिहिलंय. सिनेमा पाहिलाय. आवडला होता. आठवण करुन दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 18/07/2022 - 11:11
पूर्ण चित्रपटभर कॅमेरा बोलतो.मात्र काही शॉट्स सुंदर आहेत मात्र ते उगाचच घेतल्यासारखे वाटतात. उदा: खेडक्यांचे वाळूत चालणे . याचा चित्रपटाशी काहीच संबन्ध नाही. एक शॉट " मुले तळ्यात उडी मारतात" हा ऑस्कर लेव्हलचा शॉट आहे. या एका शॉट्साठी चित्रपट थेटरात पहावा. पैसा वसूल......

चौथा कोनाडा 18/07/2022 - 16:01
चित्रपटाची अतिशय समर्पक ओळख. सुंदर लिहिलंय! किल्ला पाहिलेला नाही, पण हा लेख वाचून किल्ला पाहण्याची इच्छा निर्माण झालीय ! असे सिनेमे खास वेळ काढून "फुरसतके टाईममें" बघायला हवा !

Bhakti 18/07/2022 - 16:51
खुपदा पाहिलाय.दरवेळी पाहते.सुंदर सिनेमा आहे.
स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला मनात जसा आहे तसाच तिथे राहू द्यावा आणि वास्तवात समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देत, जुने डाव निगुतीने मोडत आणि नवे डाव जबाबदारीनं मांडत आयुष्य जगत राहावे हे "किल्ला" आपल्याला शिकवून जातो
. +१११

सिरुसेरि 21/07/2022 - 14:16
+१. शांत सुंदर सिनेमा आहे . २०१४ च्या आसपास विहिर , शाळा , सायकल , राजवाडे अ‍ॅन्ड सन्स , देऊळ , गुलाबजाम असे अनेक चांगले मराठी चित्रपट आले होते .

VRINDA MOGHE 21/07/2022 - 14:58
खुपदा टिव्हीवर थोडा थोडा पाहिलाय. संपूर्ण असा एकदा बसून पाहिला नाही. पण तुमचं रसग्रहण वाचून परत नक्की पाहिन. खुप छान.

छान लिहिलंय. सिनेमा पाहिलाय. आवडला होता. आठवण करुन दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 18/07/2022 - 11:11
पूर्ण चित्रपटभर कॅमेरा बोलतो.मात्र काही शॉट्स सुंदर आहेत मात्र ते उगाचच घेतल्यासारखे वाटतात. उदा: खेडक्यांचे वाळूत चालणे . याचा चित्रपटाशी काहीच संबन्ध नाही. एक शॉट " मुले तळ्यात उडी मारतात" हा ऑस्कर लेव्हलचा शॉट आहे. या एका शॉट्साठी चित्रपट थेटरात पहावा. पैसा वसूल......

चौथा कोनाडा 18/07/2022 - 16:01
चित्रपटाची अतिशय समर्पक ओळख. सुंदर लिहिलंय! किल्ला पाहिलेला नाही, पण हा लेख वाचून किल्ला पाहण्याची इच्छा निर्माण झालीय ! असे सिनेमे खास वेळ काढून "फुरसतके टाईममें" बघायला हवा !

Bhakti 18/07/2022 - 16:51
खुपदा पाहिलाय.दरवेळी पाहते.सुंदर सिनेमा आहे.
स्वप्नातून जागे होण्यापेक्षा आठवणींचा किल्ला मनात जसा आहे तसाच तिथे राहू द्यावा आणि वास्तवात समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देत, जुने डाव निगुतीने मोडत आणि नवे डाव जबाबदारीनं मांडत आयुष्य जगत राहावे हे "किल्ला" आपल्याला शिकवून जातो
. +१११

सिरुसेरि 21/07/2022 - 14:16
+१. शांत सुंदर सिनेमा आहे . २०१४ च्या आसपास विहिर , शाळा , सायकल , राजवाडे अ‍ॅन्ड सन्स , देऊळ , गुलाबजाम असे अनेक चांगले मराठी चित्रपट आले होते .

VRINDA MOGHE 21/07/2022 - 14:58
खुपदा टिव्हीवर थोडा थोडा पाहिलाय. संपूर्ण असा एकदा बसून पाहिला नाही. पण तुमचं रसग्रहण वाचून परत नक्की पाहिन. खुप छान.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चित्रपट तब्बल सात-आठ वर्षे जुना आहे, हे लिहून ही आता बरीच वर्षे झालीत. मला या चित्रपटात काय दिसलं ते मांडायचा छोटासा प्रयत्न !

पुण्यात मेट्रो धावू लागली!

पराग१२२६३ ·

कंजूस 20/03/2022 - 05:42
एरपोर्ट ते शहरातील आतील भाग जोडल्यास खूप उपयोगाची सेवा ठरेल. मुंबई इं एरपोर्ट ते मेट्रो स्टेशन पाचशे मिटरस असेल. पण तेवढे अंतर सामान घेऊन कुणी चालत जाणार नाही.

चौथा कोनाडा 21/03/2022 - 20:06
सर्वांगाने आढावा घेणारा उत्तम लेख! पहिल्या आठवड्यात प्रवासची उत्सुकता होती, आता शमली आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास करण्याचा योग आलेला नाही. पुण्याच्या कारभाऱ्यांनी उद्योग नाही केले तर मेट्रो नक्कीच अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही!

कंजूस 20/03/2022 - 05:42
एरपोर्ट ते शहरातील आतील भाग जोडल्यास खूप उपयोगाची सेवा ठरेल. मुंबई इं एरपोर्ट ते मेट्रो स्टेशन पाचशे मिटरस असेल. पण तेवढे अंतर सामान घेऊन कुणी चालत जाणार नाही.

चौथा कोनाडा 21/03/2022 - 20:06
सर्वांगाने आढावा घेणारा उत्तम लेख! पहिल्या आठवड्यात प्रवासची उत्सुकता होती, आता शमली आहे. त्यामुळे मेट्रोचा प्रवास करण्याचा योग आलेला नाही. पुण्याच्या कारभाऱ्यांनी उद्योग नाही केले तर मेट्रो नक्कीच अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही!
लेखनविषय:
गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.

ऑपरेशन गंगा

पराग१२२६३ ·

पराग१२२६३ 12/03/2022 - 15:55
या लेखात नजरचुकीने बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट असा उल्लेख राहून गेला आहे. तो रोमानियाची राजधानी बुखारेस्ट असा हवा होता.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी 12/03/2022 - 22:24
रोमानियाच्या माणसाचे वागणे काही रुचले नाही बुवा. फार भडक माथ्याचा माणूस वाटला. सिंधिया सभ्यपणे बोलले.

sunil kachure 12/03/2022 - 20:53
सरकार म्हणून सरकार ची काही तरी कर्तव्य असतात. ते काम कारणे सरकार कडून अपेक्षित च असते. नाही तर सरकार हवं च कशाला फक्त टॅक्स गोळा करणे आणि लोकांवर निर्बंध टाकणे ह्या साठी. सरकार त्यांचे काम केले आहे त्याची जाहिरात करण्याचे काही कारण नाही. झाडून सर्व हिंदी चॅनेल ऑपरेशन गंगा वर च 24 तास चालले होते. बाकी सर्व न्यूज गायब. फक्त सरकार ची कृपा दृष्टी राहावी ह्या साठी हे हिंदी चॅनल वाले चापलुसी करत असतात.

सुखीमाणूस 13/03/2022 - 00:04
आता काचेच्या घरात राहतो आहोत. सोशल मीडिआ मुळे प्रत्येक गोष्टीची बातमी काही सेकन्दात सगळीकडे पोचते. १९९० साली कुवेत युद्ध झाले तेव्हा आपण दुरदर्शन वरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यावर फक्त अवलम्बुन होतो. त्यामुळे अडकलेल्या लोकान्च्या भावना आणि सरकारचे सुटकेचे प्रयत्न यातील यश किवा त्रुटी हे मर्यादीत प्रमाणात आपल्यापर्यन्त पोहोचत होते. तेही बरचसे सरकारी नियन्त्रणा़खाली. आता तसे नाही. आपल्यावर माहितीचा सतत मारा होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजु जास्त ठळकपणे (किवा बटबटीतपणे) पुढे येत असतात त्यात नेमका पाच राज्यातला निवडणुकान्चा काळ. त्यामुळे अजुन कहर झाला विरुध्द बाजुने सरकारचे अपयश दाखवायचा आणि सरकारकडुन यश दाखवायचा.. चालायचच!! कोणी सगळीकडे सन्स्थाना, विमान्तळाना, सरकारी इमारतीना स्वताची नाव देउन अजरामर व्ह्यायचा प्रयत्न करते तर कोणी केलेल्या कामाचे मार्केटीन्ग करुन...

पराग१२२६३ 12/03/2022 - 15:55
या लेखात नजरचुकीने बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट असा उल्लेख राहून गेला आहे. तो रोमानियाची राजधानी बुखारेस्ट असा हवा होता.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर? ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी? ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी 12/03/2022 - 22:24
रोमानियाच्या माणसाचे वागणे काही रुचले नाही बुवा. फार भडक माथ्याचा माणूस वाटला. सिंधिया सभ्यपणे बोलले.

sunil kachure 12/03/2022 - 20:53
सरकार म्हणून सरकार ची काही तरी कर्तव्य असतात. ते काम कारणे सरकार कडून अपेक्षित च असते. नाही तर सरकार हवं च कशाला फक्त टॅक्स गोळा करणे आणि लोकांवर निर्बंध टाकणे ह्या साठी. सरकार त्यांचे काम केले आहे त्याची जाहिरात करण्याचे काही कारण नाही. झाडून सर्व हिंदी चॅनेल ऑपरेशन गंगा वर च 24 तास चालले होते. बाकी सर्व न्यूज गायब. फक्त सरकार ची कृपा दृष्टी राहावी ह्या साठी हे हिंदी चॅनल वाले चापलुसी करत असतात.

सुखीमाणूस 13/03/2022 - 00:04
आता काचेच्या घरात राहतो आहोत. सोशल मीडिआ मुळे प्रत्येक गोष्टीची बातमी काही सेकन्दात सगळीकडे पोचते. १९९० साली कुवेत युद्ध झाले तेव्हा आपण दुरदर्शन वरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यावर फक्त अवलम्बुन होतो. त्यामुळे अडकलेल्या लोकान्च्या भावना आणि सरकारचे सुटकेचे प्रयत्न यातील यश किवा त्रुटी हे मर्यादीत प्रमाणात आपल्यापर्यन्त पोहोचत होते. तेही बरचसे सरकारी नियन्त्रणा़खाली. आता तसे नाही. आपल्यावर माहितीचा सतत मारा होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजु जास्त ठळकपणे (किवा बटबटीतपणे) पुढे येत असतात त्यात नेमका पाच राज्यातला निवडणुकान्चा काळ. त्यामुळे अजुन कहर झाला विरुध्द बाजुने सरकारचे अपयश दाखवायचा आणि सरकारकडुन यश दाखवायचा.. चालायचच!! कोणी सगळीकडे सन्स्थाना, विमान्तळाना, सरकारी इमारतीना स्वताची नाव देउन अजरामर व्ह्यायचा प्रयत्न करते तर कोणी केलेल्या कामाचे मार्केटीन्ग करुन...
लेखनविषय:
लेखनप्रकार
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती.

जहाजांचा मेळावा

पराग१२२६३ ·
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत. आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (Presidential Fleet Review) हा समारंभ. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो.

जहाजांचा मेळावा

पराग१२२६३ ·
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत. आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (Presidential Fleet Review) हा समारंभ. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो.