मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वार्तालाप: कर्माची फळे आणि आधि भौतिक ताप

विवेकपटाईत ·

आणि समाजासाठी किंवा मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी केलेले कर्म वेगळे... ------ नौकरी करत असताना, उत्तम बॉस असेल आणि उत्तम सहाचारी असेल तर, कर्माचे फळ मिळतेच मिळते. पण, बॉस किंवा सहचारी साथ देत नसतील तर शिकायचे आणि नौकरी सोडून द्यायची. ------- सध्या वृद्धाश्रमात सेवा देत असल्याने, वृद्ध माणसांना उत्तम सेवा दिली की उत्तम फळ मिळतेच, ह्याचे खुप चांगले अनुभव आले आहेत. ------

तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. आपण एखादे उद्दिष्ट ठेवून कर्म केले तर आपल्या इप्सिताप्रमाणेच फळ मिळेल असं काही नाही. पण त्यातून आपण काहीतरी शिकू जे कुठेतरी उपयोगीच पडेल, किंवा वेगळे काहीतरी फळ मिळेल. म्हणून फळ मिळणार नाहीये तर कर्मच कशाला करा अशी वृत्ती असू नये, असा अर्थ मी नेहमी घेते.

आणि समाजासाठी किंवा मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी केलेले कर्म वेगळे... ------ नौकरी करत असताना, उत्तम बॉस असेल आणि उत्तम सहाचारी असेल तर, कर्माचे फळ मिळतेच मिळते. पण, बॉस किंवा सहचारी साथ देत नसतील तर शिकायचे आणि नौकरी सोडून द्यायची. ------- सध्या वृद्धाश्रमात सेवा देत असल्याने, वृद्ध माणसांना उत्तम सेवा दिली की उत्तम फळ मिळतेच, ह्याचे खुप चांगले अनुभव आले आहेत. ------

तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. आपण एखादे उद्दिष्ट ठेवून कर्म केले तर आपल्या इप्सिताप्रमाणेच फळ मिळेल असं काही नाही. पण त्यातून आपण काहीतरी शिकू जे कुठेतरी उपयोगीच पडेल, किंवा वेगळे काहीतरी फळ मिळेल. म्हणून फळ मिळणार नाहीये तर कर्मच कशाला करा अशी वृत्ती असू नये, असा अर्थ मी नेहमी घेते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात. एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.

संगीत प्र(या)वास

कुमार जावडेकर ·

कंजूस 05/10/2023 - 06:48
लेखी साक्षात्कार आवडला. स्वर सात बारा असले तरी आमच्या लेखी अक्षरे आहेत,ऐकू येत नाहीत. काही गायक बरे गातात एवढं मात्र कळतं. भजनं,आरत्या शा. गायकांपेक्षा साधे गायकच चांगले म्हणतात . ते त्यामध्ये भाव आणतात गायकी ताना घुसडत नाहीत.

मनो 05/10/2023 - 09:00
मला अनेक वर्षे शास्त्रीय संगीत ऐकताना कानांना गोड वाटे. बुवांकडून एखादी चूक झाली तर ती जाणवे. परंतु संगीताची परिभाषा अगम्यच राहिली. अलीकडे पं. सत्यशील देशपांडे यांचे काही व्हिडीओ युट्युबवर पाहिले/ऐकले, त्यातून हळूहळू गाण्याच्या मागचे शास्त्र आणि गायकाची मनस्थिती समजली. अशी काही समजून घेण्यासाठी सुंदर साधने अजून असतील तर पुढच्या भागात जरूर सांगावीत.

In reply to by मनो

धन्यवाद! सत्यशील देशपांड्यांचं 'गाणगुणगान' हे पुस्तक हल्लीच वाचलं. सुंदर आहे, युट्यूबचे बरेच दुवे त्यांनी दिले आहेत. - कुमार

कोपरखळ्या मारत केलेले लेखन आवडले. संगीत हा मोठा समुद्र आहे. खुद्द भीमसेनजी एका मुलाखतीत म्हणाले होते (बहुतेक मुव्हर्स अँड शेखर्स मधे) की संगीत ईतके प्रचंड आहे की एखाद्या गवयाचे पूर्ण आयुष्य १०-१२ राग शिकण्यात आणि नीट सादर करण्यात निघुन जाते. त्यामुळे 'मला संगीतातलं काही कळत नाही' हे माझ्या दृष्टीने सुरक्षित वाक्य आहे. आता वेगवेगळ्या रागांवर आणि गाण्याच्या प्रकारांवर (उदा. ठुमरी,कजरी,होरी,टप्पा,ख्याल्,ध्रुपद्,धमार झालेच तर गण्,गौळण्,नांदी,भजन,वग,किर्तन्,भारुड,पोवाडा) येउंद्या.

नठ्यारा 07/10/2023 - 20:23
बाळासाहेब जर असुर असतील तर मी संगीतातला बेसूर असून माझी ( बेसुरी ) महत्त्वाकांक्षा भेसूर बनावयची आहे. खंत इतकीच की त्यात शास्त्रीय भेसूर असा वर्ग उपलब्ध नाही. पण प्रयत्न केल्यास कदाचित गवसेल. एकंदरीत या प्रांतीही अफाट मेहनत केल्याविना गत्यंतर नाही. मला कोणी मदत करेल काय? - नाठाळ नठ्या

कंजूस 05/10/2023 - 06:48
लेखी साक्षात्कार आवडला. स्वर सात बारा असले तरी आमच्या लेखी अक्षरे आहेत,ऐकू येत नाहीत. काही गायक बरे गातात एवढं मात्र कळतं. भजनं,आरत्या शा. गायकांपेक्षा साधे गायकच चांगले म्हणतात . ते त्यामध्ये भाव आणतात गायकी ताना घुसडत नाहीत.

मनो 05/10/2023 - 09:00
मला अनेक वर्षे शास्त्रीय संगीत ऐकताना कानांना गोड वाटे. बुवांकडून एखादी चूक झाली तर ती जाणवे. परंतु संगीताची परिभाषा अगम्यच राहिली. अलीकडे पं. सत्यशील देशपांडे यांचे काही व्हिडीओ युट्युबवर पाहिले/ऐकले, त्यातून हळूहळू गाण्याच्या मागचे शास्त्र आणि गायकाची मनस्थिती समजली. अशी काही समजून घेण्यासाठी सुंदर साधने अजून असतील तर पुढच्या भागात जरूर सांगावीत.

In reply to by मनो

धन्यवाद! सत्यशील देशपांड्यांचं 'गाणगुणगान' हे पुस्तक हल्लीच वाचलं. सुंदर आहे, युट्यूबचे बरेच दुवे त्यांनी दिले आहेत. - कुमार

कोपरखळ्या मारत केलेले लेखन आवडले. संगीत हा मोठा समुद्र आहे. खुद्द भीमसेनजी एका मुलाखतीत म्हणाले होते (बहुतेक मुव्हर्स अँड शेखर्स मधे) की संगीत ईतके प्रचंड आहे की एखाद्या गवयाचे पूर्ण आयुष्य १०-१२ राग शिकण्यात आणि नीट सादर करण्यात निघुन जाते. त्यामुळे 'मला संगीतातलं काही कळत नाही' हे माझ्या दृष्टीने सुरक्षित वाक्य आहे. आता वेगवेगळ्या रागांवर आणि गाण्याच्या प्रकारांवर (उदा. ठुमरी,कजरी,होरी,टप्पा,ख्याल्,ध्रुपद्,धमार झालेच तर गण्,गौळण्,नांदी,भजन,वग,किर्तन्,भारुड,पोवाडा) येउंद्या.

नठ्यारा 07/10/2023 - 20:23
बाळासाहेब जर असुर असतील तर मी संगीतातला बेसूर असून माझी ( बेसुरी ) महत्त्वाकांक्षा भेसूर बनावयची आहे. खंत इतकीच की त्यात शास्त्रीय भेसूर असा वर्ग उपलब्ध नाही. पण प्रयत्न केल्यास कदाचित गवसेल. एकंदरीत या प्रांतीही अफाट मेहनत केल्याविना गत्यंतर नाही. मला कोणी मदत करेल काय? - नाठाळ नठ्या
लेखनविषय:
अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.

वार्तालाप: नेणतां वैरी जिंकती

विवेकपटाईत ·

लिओ 01/09/2023 - 18:42
छान लिहिले आहे. एक प्रश्न राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हि ओवी फक्त नेहेरुंनीच आचरणात घेण्याची गरज होती काय ? समर्थांची ही ओवी फक्त नेहेरुंसाठी लिहिलि होती का ??

Nitin Palkar 01/09/2023 - 19:03
मोजक्या शब्दात चांगला आशय मंडला आहे. समर्थ रामदासांचे कार्य महानच आहे. नेहरूंच्या अनेक चुकांपैकी एकच तुम्ही दाखवली आहे. अनेकांना ते सलू शकेल. राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हे सदा सर्वदा सत्य आहे.

अहिरावण 01/09/2023 - 19:09
आता पुढील ओव्यांचे प्रवचन करतांना खालिल क्रमाने नेते घ्या, नेहरुंना सध्या विश्रांती द्या बोस शास्री पटेल नंदा इंदिरा गांधी संजय गांधी रा़जीव गांधी चंद्रशेखर वीपीसिंग नरसिंह राव अटल बिहारी सोनीया गांधी मनमोहन सिंग नरेंद्र मोदी आणि हो, विश्लेषण करतांना यांच्या चुकाच दाखवा. नाहीतर सोईने त्यांचे गोडवे गाल. नसेल जमत तर निदान यांच्या चुका दाखवा सावरकर गांधी इतकेही नसेल जमत तर परखडपणे तुमची स्वतःची चुक दाखवा बघु दासबोध किती उमजला आहे तुम्हाला ते

सर टोबी 01/09/2023 - 20:22
लुबाडला गेलेला देश. जिथे अन्नधान्य, अवजारं, वाहतुकीची साधनं या सर्वांची वानवा होती. भरीला शिक्षण, आरोग्य, सिंचन, दळणवळण या महत्वाच्या प्राथमिकता होत्या. अशा खचलेल्या देशाची धुरा वाहणाऱ्यांनी कधीही दुसऱ्याला किंवा परिस्थीला दोष दिला नाही. त्या उलट, एक प्रबळ लष्कर असतांना चीनच्या नव्या आक्रमकतेपुढे मौनात गेलेल्या सध्याच्या नेतृत्वाची काहीही करून री ओढायची असा खाक्या आहे. दासबोधाचं निरूपण फक्त निमित्त आहे.

भागो 02/09/2023 - 08:51
दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी>>> कोण हे नेहरू? माझ्या माहितीप्रमाणे "नेहरू" ही एक प्रधान खुंटी आहे. कुणीही यावे टपली मारून जावे. कुणीही यावे नि त्यावर काहीही लटकावून जावे. नेहरू नसते तर ह्या देशाचे काय झाले असते? जाता जाता दासबोधाचे हिंदी/गुजराती भाषांतर आहेका? नसेल तर मग मोठ्या लोकांचे काही खरे नाही रे बाबा.

In reply to by भागो

नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” असे म्हणावेसे वाटते. वाईट काळात ज्याने घर सावरलं, श्रीमंती आणली , त्यालाच नंतरच्या नालायक पिढ्या शिव्या देतात अशी अवस्था नेहरूंची झालीय. पण ह्यामूळे नेहरूंचे महत्व आजीबात कमी होत नाही. नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. मोतीलाल नेहरूंनी कोंग्रेसला भरमसाठ पैसा लावला होता, इंदिरा गांधींबद्दल तर काय वर्णावे? वाघीन होती भारताची. असो. कूठे राजा भोज…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 04/09/2023 - 13:43
नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. आणि आपण त्यांची गुलामगिरी आणि लोकशाही च्या नावाखाली आपण त्यांची घराणेशाही चालू दयायची असेच ना

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 04/09/2023 - 10:10
जिथे तुम्ही विषयाला धरुन लिहित नाही तिथे प्रतिसाद कसे काय येतील? तुम्ही राजनीती आणता आम्ही नाही

चित्रगुप्त 02/09/2023 - 21:51
अज्ञानात असणारे 'सुख'(असलेच तर) तोपावेतोच टिकून रहाते, जोवर तुमच्याहून अधिक ज्ञानी- जाणकार येऊन तुमच्या डोक्यावर बसत नाही. त्या त्या काळी उपलब्ध असलेले 'तंत्रज्ञान' ज्यांनी जाणतेपणे वापरले (मुळात असे तंत्रज्ञान विकसित केले-) त्यांचा विजय होत असल्याची उदाहरणे इतिहासात विपुल मिळतात. समर्थांनी केलेल्या छ्त्रपतींच्या वर्णनात आलेले 'जाणता राजा' हे विशेषण महत्वाचे आहे: निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

लिओ 01/09/2023 - 18:42
छान लिहिले आहे. एक प्रश्न राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हि ओवी फक्त नेहेरुंनीच आचरणात घेण्याची गरज होती काय ? समर्थांची ही ओवी फक्त नेहेरुंसाठी लिहिलि होती का ??

Nitin Palkar 01/09/2023 - 19:03
मोजक्या शब्दात चांगला आशय मंडला आहे. समर्थ रामदासांचे कार्य महानच आहे. नेहरूंच्या अनेक चुकांपैकी एकच तुम्ही दाखवली आहे. अनेकांना ते सलू शकेल. राजनीती क्षेत्रात सफल होण्यासाठी नेत्यांनी समर्थांची ही ओवी आचरणात आणली पाहिजे. हे सदा सर्वदा सत्य आहे.

अहिरावण 01/09/2023 - 19:09
आता पुढील ओव्यांचे प्रवचन करतांना खालिल क्रमाने नेते घ्या, नेहरुंना सध्या विश्रांती द्या बोस शास्री पटेल नंदा इंदिरा गांधी संजय गांधी रा़जीव गांधी चंद्रशेखर वीपीसिंग नरसिंह राव अटल बिहारी सोनीया गांधी मनमोहन सिंग नरेंद्र मोदी आणि हो, विश्लेषण करतांना यांच्या चुकाच दाखवा. नाहीतर सोईने त्यांचे गोडवे गाल. नसेल जमत तर निदान यांच्या चुका दाखवा सावरकर गांधी इतकेही नसेल जमत तर परखडपणे तुमची स्वतःची चुक दाखवा बघु दासबोध किती उमजला आहे तुम्हाला ते

सर टोबी 01/09/2023 - 20:22
लुबाडला गेलेला देश. जिथे अन्नधान्य, अवजारं, वाहतुकीची साधनं या सर्वांची वानवा होती. भरीला शिक्षण, आरोग्य, सिंचन, दळणवळण या महत्वाच्या प्राथमिकता होत्या. अशा खचलेल्या देशाची धुरा वाहणाऱ्यांनी कधीही दुसऱ्याला किंवा परिस्थीला दोष दिला नाही. त्या उलट, एक प्रबळ लष्कर असतांना चीनच्या नव्या आक्रमकतेपुढे मौनात गेलेल्या सध्याच्या नेतृत्वाची काहीही करून री ओढायची असा खाक्या आहे. दासबोधाचं निरूपण फक्त निमित्त आहे.

भागो 02/09/2023 - 08:51
दुसरीकडे आपले पहिले प्रधानमंत्री नेहरुजी>>> कोण हे नेहरू? माझ्या माहितीप्रमाणे "नेहरू" ही एक प्रधान खुंटी आहे. कुणीही यावे टपली मारून जावे. कुणीही यावे नि त्यावर काहीही लटकावून जावे. नेहरू नसते तर ह्या देशाचे काय झाले असते? जाता जाता दासबोधाचे हिंदी/गुजराती भाषांतर आहेका? नसेल तर मग मोठ्या लोकांचे काही खरे नाही रे बाबा.

In reply to by भागो

नेहरूंहद्दल ”जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” असे म्हणावेसे वाटते. वाईट काळात ज्याने घर सावरलं, श्रीमंती आणली , त्यालाच नंतरच्या नालायक पिढ्या शिव्या देतात अशी अवस्था नेहरूंची झालीय. पण ह्यामूळे नेहरूंचे महत्व आजीबात कमी होत नाही. नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. मोतीलाल नेहरूंनी कोंग्रेसला भरमसाठ पैसा लावला होता, इंदिरा गांधींबद्दल तर काय वर्णावे? वाघीन होती भारताची. असो. कूठे राजा भोज…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 04/09/2023 - 13:43
नेहरूंच्या वडीलांपासून ते नातू-पनतू पर्यंत पिढ्यान पिढ्या देशसेवा करताहेत. आणि आपण त्यांची गुलामगिरी आणि लोकशाही च्या नावाखाली आपण त्यांची घराणेशाही चालू दयायची असेच ना

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 04/09/2023 - 10:10
जिथे तुम्ही विषयाला धरुन लिहित नाही तिथे प्रतिसाद कसे काय येतील? तुम्ही राजनीती आणता आम्ही नाही

चित्रगुप्त 02/09/2023 - 21:51
अज्ञानात असणारे 'सुख'(असलेच तर) तोपावेतोच टिकून रहाते, जोवर तुमच्याहून अधिक ज्ञानी- जाणकार येऊन तुमच्या डोक्यावर बसत नाही. त्या त्या काळी उपलब्ध असलेले 'तंत्रज्ञान' ज्यांनी जाणतेपणे वापरले (मुळात असे तंत्रज्ञान विकसित केले-) त्यांचा विजय होत असल्याची उदाहरणे इतिहासात विपुल मिळतात. समर्थांनी केलेल्या छ्त्रपतींच्या वर्णनात आलेले 'जाणता राजा' हे विशेषण महत्वाचे आहे: निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥ परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥ यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेणतां वैरी जिंकती. नेणतां अपाई पडती. नेणतां संहारती घडती. जीवनाश. समर्थ म्हणतात नेणते पणामुळे शत्रु पराभव करतात. संकटे येतात. फडशा उडतो आणि जीवनाश होतो. या मृत्यू लोकात येताच छोट्या बाळालाही जाणण्याचा प्रयत्न करावा लागतो. बिना जाणता आईचे दूध प्राशन करणे ही त्याला जमणे शक्य नाही. शिक्षण असो, प्रपंच असो, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल किंवा राजनीती असो जो जाणण्याचा प्रयत्न करत नाही तो त्याच्या क्षेत्रात असफल होतो. समर्थांनी ही ओवी बहुधा राजनेत्यांसाठी रचली आहे.

"स्वामी" तिन्ही जगाचा..... मी मात्र भिकारी

अहिरावण ·

चित्रगुप्त 19/08/2023 - 20:36
प्रांजळ लिखाण एकंदरित आवडले. वाचनाबद्दलच्या लोकांच्या आवडीनिवडी, दृष्टीकोण वगैरे कालानुसार कसे बदलत जातात याच्यावर उत्तम प्रकाश टाकला गेला आहे असे वाटले. माझे शिक्षण मध्यप्रदेशातील इंदूरात नववी पर्‍यंत मराठी शाळेत झाले. नववीत साने गुरुजींची 'क्रांती' कादंबरी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून होती. त्याच सुमारास लायब्ररीतून आणून अर्नाळकरांच्या रहस्यकथा वगैरे वाचायचो तेंव्हा (१९६७ -७० चे सुमारास) 'स्वामी' वाचल्याचे आठवते. परंतु मी भारून वगैरे गेलो नव्हतो. त्याकाळात लोकप्रिय असलेले 'गीतरामायण' तर मला अजिबात आवडायचे नाही. माझी आवड जरा अजबच होती. तेंव्हाच वाचलेले जे. कृष्णमूर्ती यांचे 'मुक्त जीवन' वाचून मी अगदी झपाटून गेलो होतो, आणि माझे आयुष्य बदलून टाकण्याचे (दोन वर्षे इंजिनियरिंग कॉलेजात शिकून मग ते सोडून चित्रकलेला वाहून घेणे) श्रेय मुख्यतः 'मुक्त जीवन' पुस्तकालाच द्यावे लागेल. त्याच काळात 'व्यायाम ज्ञानकोष, डॉ. गणपुले यांचा मानसशास्त्रावरील 'मानसोन्नती' हा अद्भुत ग्रंथ, 'जगात वागावे कसे' 'मुंबईचे वर्णन' रमेश मंत्री, जयवंत दळवी, आचार्य रजनीश वगैरेंची पुस्तके आणि मुख्यतः दासबोध वगैरे वाचायचो. वाचनाची नोंद ठेवायचो. --- महाराष्ट्राबाहेरच वास्तव्य घडल्याने ब्राम्हण-ब्राम्हणेतर वगैरे बाबींशी संबंध आला नाही. होळकरांमुळे तात्कालीन इंदुरात 'धनगर' समाजाला मानाचे स्थान असले, तरी होळकरांच्या राज्यात एकंदरित ब्राम्हणांना चांगले स्थान होते असे आठवते. असो. --- इथे 'स्वामी' बद्दल वाचून हे सगळे आठवले, आणि त्याकाळी लिहीत असलेल्या रोजनिश्या आता वाचायला हव्यात हे नव्याने जाणवले.

मनो 19/08/2023 - 21:28
> राजकीय आयुष्य १९२० ला टिळकांच्या मृत्युसमवेत संपले. ब्राह्मणांचे राजकीय आयुष्य संपले ते १९९० च्या मंडल-कमंडल ध्रुवीकरणाच्या नंतर. अगदी पुण्यात म्हणाल तर टिळकांच्या नंतर गाडगीळ, कलमाडी यांनी दीर्घ काळ पुण्याचे राजकारण चालवले, काल-परवापर्यंत गिरीश बापट होतेच की. १९९०-२००० पर्यन्त ब्राह्मणांनी अनेक सर्वोच्च पदे भूषविली आहेत, नुसते देशाचे पंतप्रधानपद पाहिले तर त्यात कित्येक ब्राह्मण आहेत.

In reply to by मनो

अहिरावण 21/08/2023 - 14:16
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी जेव्हा ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व संपले असे म्हणतो तेव्हा ब्राह्मणांचे समाज म्हणून असलेला दबाव, त्यांच्या हिताला साधक ठरतील अशा कृती शासन्/प्रशासन स्तरावर करुन घेणे, हितास बाधक ठरणार्या कृती बासनात बांधायला लावणे अशा प्रकारे गट म्हणून काम करणे अपेक्षित आहे. जे इतर समाज सहज करत असल्याचे दिसते. आपण दिलेली उदाहरणे ब्राह्मण व्यक्तिंची आहेत, आणि अशी शेकड्याने आढळतील. जैन मारवाडी समाजाचा एकही पंतप्रधान झाला नाही पण त्यांचा राजकारणातील प्रभाव (कमी लोकसंख्या असूनही) लक्षणीय आहे. चुभुद्याघ्या

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 23/08/2023 - 04:59
अहिरावण आपण म्हणता तसे ३.५% चा राजकीय दबाव / अस्तित्व संपले .. हे खरे असले तर चांगलेच आहे ( आणि सहमत आहे कि तसे ते संपले आहे, ज्या व्यक्ती ब्राह्माण असून पुढे येत आहेत आहे ते केवळ वयक्तिक कर्तृत्व , जात म्हणून न्हाई आणि झालाच तर जातीचा त्रासच ) ) पण साहेब हळू आवाजात बोला, कारण असे कि हे आपले विधान जर व्हायरल झाले ना तर काही राजकीय गटांचा "झोडप शेंडी मिळावं मते " हा धंदा राज्यात चालू आहे त्याला खीळ बसेल.... तेव्हा असले काही बोलू नका . नॅरेटिव्ह एकच पाहिजे "पगडी नको पागोटे ... हाणत ऱ्हायचंच

In reply to by अहिरावण

माझ्या मते .. गुप्त काळापासून ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व प्रभुत्व (ब्राह्मणांचे समाज म्हणून असलेला दबाव, त्यांच्या हिताला साधक ठरतील अशा कृती शासन्/प्रशासन स्तरावर करुन घेणे, हितास बाधक ठरणार्या कृती बासनात बांधायला लावणे अशा प्रकारे गट म्हणून काम करणे ) शिखर स्थानाला पोहोचले ... ते उत्तरोत्तर शिखरावरच राहिले ते आजतागायत... त्यामुळे " ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व संपले " अश्याप्रकारे कोणी नॅरेटिव्ह सेट करत असेल ... तर ते " ब्राह्मणांचे राजकीय प्रभुत्व वाढावे" याचं अंतर्यामी अजेंड्याने काम करत असणाऱ्या एका संघटनेचे , स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर चा एक भाग असावा, असे मला वाटते .. बाकी लोकसंख्येतील प्रमाणाबाबत काही जण गळे काढताना आढळतात .. पण याच डेटा पॉईंटच्या बाजूला, आजपासून मागील १०० वर्ष्यातील "लोक संख्येतील % टक्के " आणि "प्रशासनातील %" असा आलेख मिळाला असता तर बरं झालं असतं ... असे वाटते .. म्हणजे दलित, ओबीसी यांचे सुद्धा आलेख , अभ्यासता आले असते ... मागील १०० वर्ष्यातील, विविध समाज जातीचा जीडीपी पर ईअर , यांचे आलेख मिळाले असते तर बरं झालं असतं ... असे वाटते .. तेव्हाच निश्चितपणे आपल्या सर्वांना यावर भाष्य करता येईल ...

टर्मीनेटर 19/08/2023 - 21:31
पण कादंबरीकार मात्र हे भान न ठेवता हिरोला सुपर हिरो करतातच पण प्रसंगी व्हिलनला सुद्धा सुपरहिरो बनवतात.
+१००० तेवढ्यावरच ते लोकं आणि नाटककार थांबत नाहीत, अनेक ऐतिहासीक व्यक्तीमत्वांना व्हीलन/बदफैली म्हणुन पेश करण्यातही ते मागे नाहित! साक्षात छत्रपती संभाजी महाराज तसेच आनंदीबाई (ध चा मा वरून कुठल्याही सबळ पुराव्याविना बदनाम केल्या गेलेल्या) आदी मंडळी सुद्धा त्यांच्या तावडीतून सुटली नाहीत. अजुन एक पात्र आहे, ‘समशेर बहाद्दर’ ह्याचे मला वाटतं विश्वास पाटलांच्या पानिपत मध्ये असं काही वर्णन केलंय की मी त्यावेळी ‘बाजीराव का बेटा’ असलेल्या ह्या पात्राच्या गरीमेने भारावुनच गेलो होतो 😀 ते पात्र खरेच तसे पराक्रमी वगैरे होते की विश्वास पाटलांनी ते ग्लोरीफाय केले हे मी पुढे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही कारण त्या दारूण पराभवाच्या इतिहासांत मला तरी अजिबात स्वारस्य नाही, मात्र कोणा जाणकाराने त्यावर प्रकाश टाकल्यास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल!

In reply to by टर्मीनेटर

मनो 19/08/2023 - 23:27
> ते पात्र खरेच तसे पराक्रमी वगैरे होते की विश्वास पाटलांनी ते ग्लोरीफाय केले त्यांच्याबद्दल पुरेशी महितीच इतिहासात मिळत नाही, त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची असा तो प्रकार आहे. कादंबरीकार इतिहासातील असेच भाग निवडतात कारण कल्पनेच्या घोड्याला इथे फुल्ल मैदान मोकळे असते.

In reply to by मनो

टर्मीनेटर 19/08/2023 - 23:42
अच्छा, म्हणजे जंगल मे मोर नाचा किसने देखा टाईप प्रकार आहे तो… तुमच्या सारख्या अधिकारी व्यक्ती कडुन माहिती मिळाली ह्यासाठी धन्यवाद मनो…

Bhakti 19/08/2023 - 22:20
स्वामी कादंबरी वाचून मीही भारावून गेले होते,मैत्रिणींना घेऊन थेऊरची समाधी पहायला गेले होते, भरभरून त्यांना सांगत होते बहुतेक रडले होते (हा हा)!

चित्रगुप्त 20/08/2023 - 00:14
स्वामी कादंबरी वाचून मीही भारावून गेले होते,मैत्रिणींना घेऊन थेऊरची समाधी पहायला गेले होते, भरभरून त्यांना सांगत होते बहुतेक रडले होते (हा हा)!
... लहानपणी बाहुल्यांशी खेळणे, आई-बाबांचा हात धरून चालणे, बागुलबुवाला घाबरणे ... त्यानंतरच्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर त्या त्या काळी जे जे खरे वा खोटे वाटले, आवडले वा नावडले, करावेसे वा न करावेसे वाटले, ... त्या गोष्टी आणखी पुढील आयुष्यात हास्यास्पद वाटणे, वा त्याबद्दल खंत/अपराधीपणाची भावना/पश्चात्ताप वाटणे, हे तितकेसे योग्य नाही. अशा पश्चात्तापाबद्दलही आणखी पुढे कधीतरी पश्चात्ताप वाटू शकतो. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. जे काल होते ते आज नाही आणि आजचे उद्या नाही .... हे असेच चालत रहाणार.. कश्याला अपराधी वाटून घ्यायचे...वगैरे.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 20/08/2023 - 20:43
आपल्या मतांचा आदर आहेच. तेव्हाच्या आणि आताच्या दोन्ही भावनांशी प्रामाणिक आहे त्यामुळे पश्चात्ताप,अपराधी वगैरे काही नाही वाटत.

भागो 20/08/2023 - 10:07
लेख आवडला हे प्रथम नमूद करतो. ब्राह्मण समाजाची घालमेल, ना इधारका ना उधारका, फुका राष्ट्राभिमान पण अमेरिकेची ओढ सोडवत नाही, कॉलेजात वैज्ञानिक दृष्टीकोनाशी परिचय झाला, तो बराचसा पटला पण रूढी सोडवत नाहीत, मग धर्म आणि विज्ञान ह्यांचे सुंदर "फ्युजन" करण्याचा केविलवाणा प्रयत्न, लतादीदी -पुल-जीए ह्यांच्या पलीकडे जग आहे ह्याची जाणीव नाही, अशी ही कुतरओढ! आम्ही जेव्हा कोलेजात होतो तेव्हा वाटायचे कि हे सगळे बदलेल पण आज जेव्हा शाळेतले सवंगडी पत्रिका मागताना दिसले ते बघून धक्का बसतो . महाराष्ट्र हा इंग्लंड, फ्रांस. जर्मनी, जपान एव्हढाच मोठा देश आहे/असावा. पण त्या प्रत्येक देशाला स्वतःची प्रगत भाषा आहे. इंग्लिश शब्दांना मराठी/संस्कृत शब्द शोधायची गरज पडत नाहीये. अग्निरथगमनागमनदर्शकताम्रलोहपट्टीका! माझा मित्र हिंदू-हिताची शिष्यवृत्ती घेऊन जपानला इलेक्ट्रॉनिक्सच्या उच्च शिक्षणासाठी गेला होता. त्याला प्रथम जपानी भाषा शिकावी लागली. आता राहिल्या मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या. मी त्यांच्याकडे "हासिक" कादंबऱ्या म्हणून बघतो. उगाच भारून जायचे काम नाही. उद्या छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, सवाई माधवराव ह्यांनी बाय चान्स ह्या कादंबऱ्या वाचल्या तर ते लेखकांना हत्तीच्या पायाखाली... जाऊ देत झाल. अर्थात अपवाद आहेत, असणारच! त्या शिवाय का आपण इथपोत्तर आलो?

यावर बरेच काही अवलंबून असते. इतिहासकालीन व्यक्तीरेखा आणि कादंबरीमधील व्यक्तीरेखा यांच्यामधे फरक करणार्‍या विवेकाचा अभाव होता. देसाई, पाटलांची कादंबरी मनोरंजन म्हणून वाचली जाते. राजवाडे,बलकवडे यांचे ग्रंथ संदर्भ म्हणून आभ्यासले जातात. मनोरंजक साहित्य निर्मीती मधे लेखकास मर्यादित बंधने तर काही प्रमाणात कल्पनाविलासाचे स्वातंत्र्य असते. याची निर्मीती वाचक वर्ग, व्यावसायिक उद्देश इ. लक्षात ठेवून होते. या विरुद्ध संशोधनात्मक साहित्य केवळ इतिहासाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन सत्य उजेडात आणणे असल्यामुळे ते रुक्ष वाटते व सर्वसामान्य वाचक विरंगुळा म्हणून वाचत नाही. वाचकाचे वय असते त्या प्रमाणेच पुस्तकांचेही वय असते. गुलबकावली,रेपोनझील मधे रमणारा बालक वय वाढले की सिदंबादच्या सफरी व नारायण धारपांकडे वळतो. नंतर काकोडकर त्याला रिझवतात,असो याला काही अपवाद असतातच. कधीकाळी आवडलेली 'स्वामी',वयाच्या दुसर्‍या टप्प्यात इररिलीव्हंट आणी अतिरंजित वाटू शकते. प्रसंगी कर्ज काढले जात होते. मुंजीचे औचित्य संपुन दोन हजार वर्षे उलटली आहेत पण ब्राह्मण अजुनही मुंजीत अडकला होता. व्हॅलेंटाइन मरून किती वर्ष झाली,बहिण भावापेक्षा मोठी ,सक्षम असली तरीही राखी बांधते. मुंजीचे औचित्य संपले तरीही दुरदूरर्चे नातेवाईक, मित्र जमा होता. संपलेल्या,संपत आलेल्या नात्यांचे पुनरूज्जीवन होते. प्रत्येक गोष्टीत औचित्य शोधत बसलो तर सर्व काही फाफटपसारा वाटू शकेल. प्रसाद वाटणारा बुंदीचे लाडू कुणाला बेसनाचा गोड पदार्थ वाटू शकतो. सदर लेख, स्वामी मला का आवडत नाही याची कारण मिमांसा तुम्हाला कदाचित पटणार नाही. यावर समारोपीत केल्यामुळे,ब्राह्मण, पेशवाई आणी इतर गोष्टींची दखल घेतली नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

भागो 20/08/2023 - 11:51
देसाई, पाटलांची कादंबरी मनोरंजन म्हणून वाचली जाते>>> कर्नल साहेब, आपण विचारी विचक्षण वाचक आहात. म्हणून ठीक आहे. इतरांचे तसे नसते. उदा. -- शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव ह्यांचे काय काय संबंध होते? इतिहास कुठे संपतो आणि कल्पना विलास कुठे सुरु होतो? -- रामायण हे काव्य आहे की इतिहास आहे? राम सेतू या मागचे सत्य काय आहे ? हे असले प्रश्न निर्माण होतात. त्याचे काय करायचे?

In reply to by भागो

शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव ह्यांचे काय काय संबंध होते? इतिहास कुठे संपतो आणि कल्पना विलास कुठे सुरु होतो? जिथे इतिहासाचा वापर स्वार्था साठी होतो, मग तो व्यवसायिक अथवा राजकिय असो आणी सारासार विवेकबुद्धी आढ्याला टांगणीवर टाकतात तिथे. रामायण हे काव्य आहे की इतिहास आहे? राम सेतू या मागचे सत्य काय आहे ? हे अधिकारीक पणे सांगण्या इतके मला ज्ञान नाही. एवढेच सांगू शकतो हजारो वर्षानंतरही आय्योध्या आहे,रामेश्वरम् आहे,श्रीलंका आहे ,कुरुक्षेत्र आहे त्या अर्थी या गोष्टी घडल्या असाव्यात. काळाच्या ओघात त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी अभ्यासक नाही त्यामुळे यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, ते ते माझे.....

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 21/08/2023 - 14:19
आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल आभारी आहे. किमान लेखाची दखल घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपली मते वाचण्यास आणि (जमल्यास) खोडून काढण्यात अथवा मान्य करण्यात बैद्धिक आनंद मिळाला असता, तो राहीला. हरकत नाही.

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 21/08/2023 - 16:49
एका महान करमणुकीला आपण मुकला आहात.
--- हे बरीक खरे. कंजूस यांच्याप्रमाणे मी फार गवगवा झालेले सिनेमे बघत नाही. उदा. शोले, बॉबी, मुगले आझम, जोधा अकबर, वगैरे. मात्र दुर्दैवाने परवा 'गदर २' बघायला घरच्यांबरोबर गेलो, पण 'करमणूक' सुद्धा न होता वैतागच आला. असो.

सर टोबी 20/08/2023 - 21:58
हा प्रकार इतका कृत्रिम असतो कि काही काळानंतर त्याचा उबग येतो. याची सर्वसाधारण उदाहरणं बघू यात. टीप: उदाहरणं काल्पनिक आहेत आणि मुद्दा विशद करण्यासाठी कदाचित माझ्याकडून अतिशयोक्ती होऊ शकते. चित्रदर्शी लेखन: 'म्हणजे?', महाराज उद्गारले. त्यांच्या कपाळावर एक सूक्ष्मशी आठी उमटली आणि आवाजात आपोआप करारीपणा आला आणि जिरेटोपावरील मोत्यांची माळ थरथरली. चित्रदर्शी निवेदन: तृषार्त धरणीने पहिल्या पावसाचा आवेग आपल्यात सामावून घ्यावा तशी xxxx. यात जमेल तशी वाचकांनी भर घालावी. अशी वाक्य उच्चारतांना आवाजात कातरता, हळवेपणा जितका जास्त तितका प्रेक्षकांचं भारावलेपण जास्त. चित्रदर्शी चित्रीकरण: खास दिवाणखान्यातील प्रेक्षकांसाठी असलेल्या मालिकांमधील एक प्रसंग. 'अगं बाई वन्स अचानक इकडे?' इथे बोलणारी स्त्री व्यवस्थित पदर ओठांपाशी नेऊन आश्चर्य व्यक्त करणार, मग क्रमाने वन्संच्या चेहेऱ्यावरील अवघडले भाव, इतरांचे गोरे मोरे झालेले चेहरे, आणि कुणाच्यातरी चेहऱ्यावरील करारी भाव.

In reply to by सर टोबी

भागो 20/08/2023 - 22:49
सरजी प्रतिसाद एकदम पातला. मी जेव्हा वर लिहिले कि ऐतिहासिक नाही तर "हासिक" म्हणजे हास्य निर्माण करणारे. ते गरकन, सरकन सोडून दिले तरी पात्रांची खासगीतील संभाषणे म्हणजे अगदी कहर!

In reply to by भागो

भागो 20/08/2023 - 23:42
सरजी प्रतिसाद एकदम पटला. मी जेव्हा वर लिहिले कि ऐतिहासिक नाही तर "हासिक" म्हणजे हास्य निर्माण करणारे. ते गरकन, सरकन सोडून दिले तरी पात्रांची खासगीतील संभाषणे म्हणजे अगदी कहर! पटला! हा हा हा हासिक झाला. चूक सुधारली.

सौन्दर्य 21/08/2023 - 08:54
मी देखील स्वामी कादंबरी वयाच्या तेरा-चौदा ह्या वयात वाचली व तिचा जबरदस्त पगडा मनावर बसला. दुसर्यांदा ती अंदाजे बावीस -तेविसाव्या वर्षी वाचली. अर्थात पहिल्यांदा वाचली तेव्हढी ती उत्कट किंवा भारावून टाकणारी वाटली नाही. त्याची अनेक कारणे आहेत, असू शकतील. वयाच्या प्रत्येक वयात अमुक एक प्रकारचे साहित्य आवडून जाते पण ते कायम आवडत राहील असे नाही, वयाप्रमाणे येणारी परिपक्वता किंवा वाचनाचा जो परीघ वाढत जातो त्यामुळे असे होत असते. असेच आपण पाहिलेल्या व आवडलेल्या सिनेमांविषयी देखील होते असे मला वाटते. अपवादात्मक सिनेमे आहेत अगदी नाहीतच असे नाही. लेखकाने स्वामी कादंबरीचा आधार घेऊन ब्राह्मण समाजाचा जो उपमर्द करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अजिबात आवडला नाही. त्यामागचे कारण मी ब्राह्मण आहे म्हणून ते मला आवडले नाही असे नसून असा कोणत्याही एखाद्या जातीचा अपमान करणे हे सुसंस्कृतपणात बसत नाही असे मला वाटते. वेगवेगळ्या जातींच्या लेखकांनी त्यांच्या अनुभवाप्रमाणे लिखाण केले, त्यातील एखादा भाग किंवा वर्णन समोर घेऊन त्यावर वाटेल तेव्हढी टीका करता येते व ज्यांना ती करायचा अधिकार आहे त्यांनी ती करावी किंवा त्यांनी ती केली देखील पण त्यात लेखकाच्या जातीवर टीका करणे हे अनुचित आहे. आता ब्राह्मणांनी काय केले किंवा आपले अस्तित्व कसे टिकवून धरले ह्या विषयावर लिहायला घेतले तर मुद्दा भलतीकडेच भरकटत जाईल म्हणून आवरते घेतो. नमस्कार.

In reply to by सौन्दर्य

अहिरावण 21/08/2023 - 14:23
इतर कोणालाही जाणवला नाही पण आपणांस माझ्या लेखात ब्राह्मणांचा उपमर्द जाणवला याबद्दल मी दिलगीर आहे. आपण माझ्या कृतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून उदार मनाने दुर्लक्ष करावे आणि मुद्दा तेवढा घ्यावा असे सुचवतो. बाकी मुद्देसुद अशा तुमच्या लेखाची प्रतिक्षा आहे, ती लवकर पूर्ण व्हावी ही अपेक्षा !

ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्‍याचदा आढळले आहे. खरं आहे. प्रत्येकाला मनातून ब्राह्मण व्हायचे असते पण तसे बनायला बर्‍याच मर्यादा आड येतात. मग ब्राह्मणांच्या बोलण्याची नक्कल करणे, मुद्दाम नाकात बोलणे असे काहीबाही उपद्व्याप केले जातात. शेवटी ब्राह्मण बनता नाही आले की शिव्या घालायचा असा बहुतेकांचा प्रवास असतो. मी देखील स्वामी कादंबरी तुम्ही वाचली त्याच वयात वाचली पण मला काही भारावून गेल्यासारखे झाले नाही. कदाचित मी त्याच बरोबर दलित लेखकांचे देखील लिखाण वाचत असल्यामुळे तेवढा प्रभाव जाणवला नसेल. किंबहूना जास्त अलंकारिक भाषेमुळे मला ती भावली नाही. दलित साहित्य देखील सुरुवातीला चांगले वाटले. त्यांचे गावकुसाबाहेरचे जीवन, त्यांच्या हालाअपेष्टा वाचून मला स्वतःची चीड येत असे मात्र नंतर त्या लिखाणाचा कंटाळा यायला लागला. कोणत्याही दलित लेखकाची कादंबरी वाचली की तेच ते रडगाणे असायचे त्यामुळे कंटाळून वाचणे सोडून दिले.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 21/08/2023 - 14:27
सहमत आहे. सध्याचे दलित, ग्रामीण, विद्रोही, सामाजिक किंवा लेटेस्ट फ्याशनचे असलेले समलैगिक, स्त्रीवादी, तृतीयपंथी लोकांचे जीवन रंगवणारे लेखन एकसुरी, बटबटीत, प्रसंगी शिराताण शिवीगाळ असे आढळते. सन्माननीय अपवाद नियम सिद्ध करणारे

स्वधर्म 21/08/2023 - 16:40
इतिहास कादंबरीपेक्षा महत्वाचा हे पटतं. पण त्यातही जाम घोऴ आहे. उदा. पानसरे यांचे ‘शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज’ हे भाषण व गजानन मेहेंदळे किंवा निनाद बेडेकर या इतिहासकारांची भाषणे ऐकून शिवाजी महाराजांचा मुस्लिमांविषयीचा अगदी परस्परविरोधी दृष्टीकोन समोर येतो. पानसरे हे आवर्जून शिवाजी महाराजांची मूळ पत्रे वाचा असे सांगतात. मेहेंदळे व बेडेकर यांच्या भाषणात इतर इतिहासकार हेतूपूर्वक कसे चुकीचे लिहित आहेत आणि महाराजांचा लढा हिंदूहितासाठी व यावनी सत्ता उलथून टाकण्यासाठीच होता, असा सूर आढळला. ही सगळी भाषणे यूट्यूबर सहज सापडतील.

In reply to by स्वधर्म

अहिरावण 21/08/2023 - 18:59
हिंदवी स्वराज्य या नावामुळे अनेकांचा घोळ होतो की हे हिंदूंचे राज्य व्हावे अशी इच्छा आहे की काय ! परंतु (माझ्या मते) शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी म्हणजे येथे जन्म झालेला, या भुमीला आपला मानणारा मग तो कोणत्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे असे स्थानदर्शक मत असावे. कारण, मुघल, तुर्क हे परक्या देशातील अशी त्याकाळात स्पष्ट भावना होती. त्यामुळे यावनी किंवा यवन याचा अर्थ पुराणकाळापासुन (आयोनियन) ग्रीक देशांपलीकडला प्रदेशातुन आलेले असा असावा. मुस्लिमांसाठी अनेकदा म्लेंच्छ असा शब्द वापरल्याचे दिसते. पानसरे यांच्याबद्दल आदर बाळगुन सुद्धा अनेकदा त्यांची मते डाव्यांची (अनेकदा चुकीची असलेली) धारणा मांडणारी दिसतात. जी तरतम भावाने सहज दिसतात आणि दुर्लक्ष करता येतात. अर्थात , आपण उल्लेख केलेली सर्व मंडळी महान आहेत. आपण त्यांच्या खिजगणतीत नाही.

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 22/08/2023 - 10:39
शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी म्हणजे येथे जन्म झालेला, या भुमीला आपला मानणारा मग तो कोणत्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे असे स्थानदर्शक मत असावे. ही अत्यंत बुळबुळीत विचारसरणी आहे. हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिँदूंचे स्वराज्य जेथे हिंदू धर्मियांना आपल्या आयाबहिणींना नासवण्याची/ बाटवण्याची भीती नसेल. शिवाजी महाराजांच्यानंतर गेल्या ३०० वर्षाचा पाकिस्तान अफगाणिस्तान इराण बांगला देश या देशांचा इतिहास पाहिला तर या सर्व देशातून हिंदू आया बहिणींना जबरदस्तीने नासवले बाटवले जात आहे असे असून आपण डोळेझाक करून हिंदू आणि हिंदवी मध्ये घोळ घालत बसलात तर निष्पन्न काहीही होणार नाही. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवि स्वराज्यामुळे भारताचे संपूर्ण इस्लामीकरण थांबले आणि दक्षिणेतील बहुसंख्य सुंदर मंदिरे ध्वस्त होण्यापासून वाचली हि वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 22/08/2023 - 13:04
मालक ! जरा शांततेत घ्या ! एकदम हातघाईवर येऊ नका ! >>>ही अत्यंत बुळबुळीत विचारसरणी आहे. असेलही. विनायक दामोदर सावरकर यांची विचारसरणी सुद्धा अशीच काही होती. आता आम्ही पण त्यांच्या पंक्तीत बसलो याचा अभिमान बाळगायचा की खेद ते नंतर पाहू. >>हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिँदूंचे स्वराज्य जेथे हिंदू धर्मियांना आपल्या आयाबहिणींना नासवण्याची/ बाटवण्याची भीती नसेल. असेलही. पण कुतुबशाहाशी आपल्या दख्खनीयांचे एकदिल एकमत झाल्यास तुर्क मोंगलांना सहजी परस्त करु अशी बोलणी काय गंमत म्हणुन झाली होती की काय? >>>शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवि स्वराज्यामुळे भारताचे संपूर्ण इस्लामीकरण थांबले आणि दक्षिणेतील बहुसंख्य सुंदर मंदिरे ध्वस्त होण्यापासून वाचली हि वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा. दख्खन वाचला ह्यात शंका नाही. आणि आम्ही ते कधीही नाकारणार नाही. पण शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते आणि ते विश्वासु होते ह्याचे काय? असो.

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 23/08/2023 - 07:15
दख्खन वाचला ह्यात शंका नाही. आणि आम्ही ते कधीही नाकारणार नाही. हे मान्य करताय हे हि नसे थोडके आणि उत्तर हि बहुल हिंदूच राहिला सुरवातीला तरी ... पण शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते आणि ते विश्वासु होते ह्याचे काय? आली गाडी मूळ रस्त्यावर ! अहो हेच तर जाणत्या राजाचे वैशिष्ट्य .. शिवाजी महाराजांचं काळात आधीच मुगल सत्तेत आणि धर्मांतर झालेलं हिंदू होते हे त्यांनाही मान्य करावेच लागले होते ,, त्यांना जाग आली कि ह्याला विरोध केला नाही तर कायमचे अंकित होऊ आणि स्वतःची ओळख ( धर्म / चालीरीती / परंपरा) हे सगळंच जाईल ... म्हणून त्यांनी सुरवंट केली ( पॉसिटीव्ह ऍक्शन आजच्या भाषेत ) आता याचा अर्थ ना टोकाचं हिंदुत्ववाद्यांनी असा लावून नये कि छत्रपती अगदी "चला धर्म प्रसार करूयात म्हणून बाहेर पडले " तसेच तुमच्या विचारसरणी ने याचा गैरवापर करून "बघा महाराजांना हिंदू धर्माची फिकीर नव्हती आणि म्हणून ते कसे सर्वधर्मसमभावी " महाराज सर्वधर्मसमभावी होतेच पण ते आजचं हुकलेलय व्याख्येप्रमाणे नाही

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 23/08/2023 - 07:28
विनायक दामोदर सावरकर यांची विचारसरणी सुद्धा अशीच काही होती सरळ काय ते बोला,,, पण त्याआधी तू नळीवरील लेखक विक्रम संपत यांच्या अनेक मुलाखती आहेत त्या पाहून घ्या

In reply to by सुबोध खरे

भागो 22/08/2023 - 13:10
रजपुतांचे तसे मत नसावे. उदा जोधाबाई, मिर्झा राजे, उदयभानू इत्यादि. अजूनही असतील. शिवाजी महाराजांचे पिताश्री. जाऊ दे.

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 23/08/2023 - 07:19
वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा. हुकलेली डावी विचारसरणी एवढी "शातीर " आहे कि कळत असून सुद्धा ढोंग करायचे

स्वधर्म 21/08/2023 - 21:18
हे पटण्यासारखे आहेच. बाकी पानसरे मूळ कागदपत्रे बघून ठरवा, नुसते मी म्हणतोय म्हणून नव्हे; असे म्हणतात. त्यामुळे ते डावे किंवा कुठलेही असले तरी, हा खुलेपणा दखलपात्र. बाकीचे मात्र अधिकारवाणीने बोलतात, हा ठळक फरक स्पष्ट दिसतो.

चौकस२१२ 22/08/2023 - 06:14
हिंदवी स्वराज्य या नावामुळे अनेकांचा घोळ होतो की हे हिंदूंचे राज्य व्हावे अशी इच्छा आहे की काय ! जसे शिवाजी महाराजांचा वापर उजव्यानी टोकाचे हिंदुत्व म्हणून करू नये तसाच डावखुर्यांनी "शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या धर्माचा संबंध कसा नाही " असला बाष्कळ पणा करू नये असे मला अल्पबुद्धीला वाटते सध्या जे "काही करा" पण शिवाजी महाराजांना हिंदू वैगरे पासून दूर करा हे जे टूल किट मधील हत्यार आहे त्याचा हा भाग अर्थात माझे म्हणेन हे हि नाही कि सध्याच्या व्याख्येप्रमाणे त्या काली काही शिवाजी महाराज हिंदुत्व वैग्रे ( हा शब्द फार नंतर आला असावा नाही का ) पुरस्कारीत करीत फिरत होते . गोष्ट सोपी आहे १) बहुतेक समाज हिंदू होता २) आक्रमणकारी जे होते ते त्यांचा धर्म स्थानिक समाजावर लाडात होते ) ( मुसलमानांनी आक्रमकपणे केला , ईस्ट इंडिया कंपनी ने पुढे धार्मिक प्रचार अप्रत्यक्ष रित्या केला पण इंग्रज सरकारने सत्ता आणि संपत्ती यावर भर आणि धर्माला जरा तरी बाजूला सारले ) ३) सर्वांनां साथीला घेऊन राजय करणाऱ्या शिवाजी महाराजांना जसे अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे महत्वाचे होते तसेच बहुसंख्यांक समाजचे पण रक्षण करणे आवश्यक होते तर त्या अर्थाने "हिंदू धर्माचे संरक्षण करणारे होते " असे म्हणले तर का कोणाचं पोटात दुखते ? ४) धर्म बाजूला ठेवून स्वराज आधी मिळवणे हा मूळच हेतू होता त्यांनी त्यांचे कर्म केले ...

सुबोध खरे 22/08/2023 - 10:33
शिवाजी महाराजांना सेक्युलर बनवण्याच्या नादात त्यांना हिंदुपदपातशाही निर्माण करणारा किंवा धर्माचे रक्षण करणारा या पदापासून दूर नेले जात आहे. केवळ स्वराज्य स्थापन करायचे असते तर त्यांच्यात आणि इतर सरदार मनसबदार यांच्यात काय फरक राहिल? धर्मावर अत्याचार होत असताना हे अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या विरोधात जीवावर उदार होऊन लढण्याचे काय कारण होते? वडिलोपार्जित सरंजाम होताच कि हा डावा दांभिक पणा आता डोक्यात जायला लागला आहे. मंदिरांचे उच्छेद आणि प्रजेला बाटवणे हे थांबवण्यासाठी धर्मरक्षक राजा असणेच आवश्यक होते. आपल्या धर्माचे रक्षण करताना परधर्मावर आक्रमण केले नाही हा महाराजांचा मोठेपणा होता म्हणून त्यांना सेक्युलर म्हणण्याचा दळभद्रीपणा करण्याची अजिबात गरज नाही शिवाजी महाराजांनी केवळ इस्लामी राज्यकर्त्यांना थोपवले असे नव्हे तर सर्वात पहिली घरवापसी सुद्धा केली ( नेताजी पालकर याना परत हिंदू धर्मात घेऊन). तेंव्हा शिवाजी महाराज हे धर्मरक्षक हिंदू राजेच होते उगाच त्यांना सेक्युलर करण्याची राजकीय गरज असण्याचे सामान्य माणसांना अजिबात कारण नाही. मुसलमानांची मते मिळवण्याची गरज असलेल्या राजकारण्यांना फाटा मारा आणि सत्य काय आहे ते समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 22/08/2023 - 13:07
तुमचा संदर्भरहीत अस्थानी प्रतिसाद आहे हे नमुद करतो आणि थोडं शांततेत घ्यायला शिका असे सुचवतो. मानाच असा आग्रह नाही. डावे माझ्या डोक्यात जातात तसे उजवे सुद्धा जातात. मी मध्यम मार्गी बुद्धाचा अनुयायी.

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 22/08/2023 - 19:30
या भूमंडळाचे ठायी

धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्रधर्म राहिला काही

तुम्हा कारणे! कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकासी आश्रयो जाहला शिवकल्याण राजा! हे समर्थ रामदास स्वामी नि सोळाव्या शतकात लिहून ठेवले आहे

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 22/08/2023 - 19:41
महाराष्ट्र धर्म म्हणजे काय यावर एक विस्तृत लेख लिहा. कोणा कोणास संहारले? कोणा कोणास धाक लावला? कोणा कोणास आश्रय झाला? कल्याण नेमके कसे आणि काय केले? जरा शिवरायांच्या कार्याचा परिचय करुन द्या. म्हणजे आमच्या सारख्या अजाण अडाणी मनुष्यांना जरा अक्कल येईल. कसे? बाकी एखादे वाक्य मुळ लेखावर आले असते तर बरे झाले असते असे आम्हास वाटते. पण ते वाटणेच आहे. असो.

In reply to by सुबोध खरे

सुरिया 22/08/2023 - 14:44
शिवाजी महाराजांनी केवळ इस्लामी राज्यकर्त्यांना थोपवले असे नव्हे तर सर्वात पहिली घरवापसी सुद्धा केली ( नेताजी पालकर याना परत हिंदू धर्मात घेऊन). तेंव्हा शिवाजी महाराज हे धर्मरक्षक हिंदू राजेच होते उगाच त्यांना सेक्युलर करण्याची राजकीय गरज असण्याचे सामान्य माणसांना अजिबात कारण नाही.
हे असे नॅरेटिव्ह पसरवयाचे धंदेच घात करत आहेत. नेतोजी पालकर ह्यांना हिंदू धर्मात घेण्याचे कार्य अप्रतिम असे राष्ट्रकार्य म्हणता येईल. किंबहुना त्यात आपणास एक संवेदीनशील नेता, काळाची आणि वेळेची गरज ओऴखणारा राजा दिसेल. नेतोजी पालकर हे शूर योध्दे म्हणून ओळखले जात.अगदी त्यांना प्रतिशिवाजी असेही म्हणले जाते. अशा माणसांचे मोल राजे ओळखून होते. ज्यावेळी त्यांना परत स्वराज्यात येऊ वाटले तेंव्हा ते धर्म बदलून किंवा धर्मासाठी राजांकडे आले नाहीत. ते स्वराज्यासाठी आल्यानंतर नंतर त्यांचे मन खाऊ लागले. नातेवाईकात मान मिळेनासा होत असे. नेतोजीनी कितीही ठरवले असते तरी तत्कालीन धर्म व्यवस्था त्यांना पुन्हा हिंदू करत नव्हतीच. अवघड प्रायश्चित्ते आणि बहिष्कार स्वीकारण्यापेक्षा त्यांना परत हिंदू धर्मात घेणे गरजेचे होते तेंव्हा राजांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना हिंदू धर्मात आणवले. तत्कालीन धर्मधुरंधराचा हा जाच खुद्द राजांना पण राज्याभिषेकावेळी जाणवलेला आहे. अशा प्र्त्येक राष्ट्र की धर्म अशा कसोटीच्या वेळी राजांनी राष्ट्रकार्यास प्राधान्य देऊन मधला मार्ग काढलेला आहे.

In reply to by सुरिया

सुबोध खरे 22/08/2023 - 19:25
आरशाच्या पलीकडे गेल्यास आपला चेहरा (सत्य) तर दिसत नाहीच पण केवळ अंधारच दिसतो ( म्हणजे खरं तर काहीच दिसत नाही). तुमचं चालू द्या

In reply to by सुरिया

चौकस२१२ 23/08/2023 - 04:26
राजांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना हिंदू धर्मात आणवले. केवळ गेलेला मोहरा परत मिळावा ( राजकीय चाल) आणि धर्मधुरंधराचा जाच कमी करण्यासाठी केवळ या दोन कारणांसाठी छत्रपतींनी नेताजी पालकरांना हिंदू धर्मात परत घेण्यात पुढाकार घेतलं असा तुमचं म्हणण्याचा सूर दिसतोय हे तर ठरविक टूल किट मधले "काहीही करा पण छत्रपतींच्या जीवनात हिंदूतला हासुद्धा येऊन द्यायचा नाही " हा नॅरेटिव्ह दिसतोय ... छत्रपतींनी आपला धर्म (राजकीय खेळी म्हणून का होईना) टिकवण्यासाठी आणि परकी आक्रमण जे धार्मिक आक्रमण हि होते ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले हे दिसत असून सुद्धा हि खोटी डावी विचारसरणी असा अप्रचार का करते ... राजाचे कर्तव्य सगळ्यांचे रक्षण करणे असते ना मग त्यात हिंदू पण आले का नाही? मग का त्रास होतोय मेनी करायला ?

In reply to by चौकस२१२

सुरिया 23/08/2023 - 16:50
ठरविक एक विचार सोडुन सगळे कसे टूलकिट असते हो तुमच्या मते. जिंदगी एक टूलकीट केलीय नुसती. आणि कुठलाही खोटा अपप्रचार केलेला नाहीये. राष्ट्रासाठी केले तर ते हिंदू राष्ट्रासाठी केलेय म्हणायचे. घरवापसी धर्मासाठी केली म्हणायची. ही घरवापसी राष्ट्रासाठी केले म्हणले की पापड मोडतो लगेच. धर्मासाठीच करायचे म्हणले तर कितीतरी सैनिक मुस्लीम असुन राजांच्या पदरी होते. अगदी सर्वांगीण घरवापसी करायची राजांनी ठरवले असते तर ते शक्यही होते. पण बजाजी निंबाळकर आणि नेतोजी पालकर दोन नावे सोडता केलीय का कुठली घरवापसी? उलट राजांनी प्रत्येक धर्माचा आदरच केलेला दिसतो. हे खरे राष्ट्रकारण. आणि धर्मकारण म्हणले तर अगदी पार पेशवाईपर्यंत खुद्द राऊपुत्राला मनात असताना घरवापसी करता आली नाही तेंव्हा धर्माचे राज्य हा विषयच सोडा. काय मान्य करायचे आणि काय टूलकीट ठरवायचे ते तुमचे तुम्ही बघा.

In reply to by सुरिया

चौकस२१२ 23/08/2023 - 20:14
कुठलाही खोटा अपप्रचार केलेला नाहीये.? सतत महाराजांचा आणि धर्मरक्षणाचा ( हिंदू ) काही हे संबंध नाही हे दाखवणे अगदी सर्वांगीण घरवापसी करायची राजांनी ठरवले असते तर ते शक्यही होते. पण असा कुठंही दावा केलेला नाहीये,,, उलट माझे विधान वाचा "टोकाच्या हिंद्त्ववाद्यांनी महाराजांचे हिंदू धर्म रक्षणाचे काम हे हिंदुत्व वैगरे म्हणून उगाच उर बडवू नये आणि इतरांनी उगाचच त्यांचा धर्म रक्षणाशी संबंध नव्हतं असा अप्रचार करू नये ते म्हणले आहे मी .. महाराजांचा हेतू तसा नसावा,, रयतेचा आणि स्वतःचा जो मूळ धर्म आहे त्यावर जो अन्याय चौ होता आणि परवलंबित्व आलाय ते झुगारून द्यायचे हे " स्वराज्य "ध्येय मग असे असताना त्यांनी जे केलं ते हिंदू धर्म टिकवनयसाठी केला असे म्हणले तर का जळफळाट होतो? तान्हाजी या हिंदी चित्रपटत एक प्रसंग दाखयलाय .. तान्हाजी जेवहा गावकऱ्यांना शिवबा ला साथ द्या असे सांगायला जातो तेव्हा कशाला अंहित्य शिवबा ला साथ देऊ असे विचारल्यावर तो म्हणतो कि हे जे तुतुमचे हे जर सण वार आहेत / प्रथा आहेत त्या टिकण्यासाठी ( नक्की सवांद आठवत नाही पण मतितार्थ हा कि जे आहे ते टिकवण्यासाठी ) येवध सरळ असताना मुददमून शिवाजी महाराजांनच्या या कृतीचा वापर स्वताच्या भंजाळलेलय सर्वधर्मसमभावाशी जोडायच हे जे सत्र ते एका ठराविक साच्यातून आलेलं दिसत ते पाहून ... म्हणून टूल किट म्हणले ...

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 23/08/2023 - 04:33
हा डावा दांभिक पणा आता डोक्यात जायला लागला आहे. अगदी योग्य शब्दात भावना मांडल्या आहेत तुम्ही डॉ. मी (माझ्या देशात) डाव्यान्न मत देणारा असून सुद्धा तुमच्याशी १००% सहमत पण काय आहे एक तर तुम्ही "खरे" त्यातून तुम्ही महाराजांना हिंदूतलं ह चिकटवला म्हणजे नक्कीच संघी हालफ चड्डी वैगरे त्यामुळे तुमच्या या विचारणकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाईल ... ( ते मुद्दे किती हा तर्काला धरून असले तरी ) आणि गंमत बघा हा आज एक "खरे " मानतो कोणाला तर "भोसलेंना" जर "अजेंडा" जातीचा असता तर सतत पेशवाई चा उदो उदो केला असता "एखाद्या खरे" ने असो ... दुरदैवाने यात "न जाणारी जात" आणावी लागली त्यामुळे कदाचित हा प्रतिसाद उडवलं हि जाईल

फक्त एका वयात स्वामी आवडली पुढच्या वाढलेल्या वयात आवडली नाही. हे सर्वां बरोबरच होते. पण लेखकाने पेशवाई, ब्राह्मण, हिंदवी स्वराज्य आणी इतर वादग्रस्त मुद्दे घेऊन बराच धुराळा ऊडवून घेतला. इथून पुढे आपला पास. जसे शिवाजी महाराजांचा वापर उजव्यानी टोकाचे हिंदुत्व म्हणून करू नये तसाच डावखुर्यांनी "शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या धर्माचा संबंध कसा नाही " असला बाष्कळ पणा करू नये असे मला अल्पबुद्धीला वाटते डाव्या उजव्या राजकीय ऐजंडा असू शकेल पण मिपाकर कशाला चालवतात. स्वामी होणे फार कठीण कमीत कमी विचाराने भिकारी तरी बनू नये. चौकस भौ याच्या म्हणण्याशी सहमत. ते आपले कर्म करून गेले

प्रचेतस 22/08/2023 - 22:32
स्वामी, श्रीमान योगी ह्या रणजित देसाईंच्या कादंबऱ्या अगदी रटाळ वाटल्या. किंबहुना देसाईंनी बरेचदा कादंबरी लिहिताना स्वैर स्वातंत्र्य घेतलेले जाणवते. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय वगळता (कर्णाचे उदात्तीकरण सोडून द्या) युगंधर, छावा या अतिलालित्यपूर्ण वर्णनामुळे अतिरटाळ झालेल्या कादंबऱ्या आहेत. त्यामुळे शक्यतो उत्तम चरित्र संदर्भ पुस्तके वाचावीत अशा मताचा मी आहे. पेशव्यांच्या बाबतीत श्रीराम साठे यांचे 'पेशवे' आणि प्रमोद ओकांचे 'पेशवे घराण्याचा इतिहास' ही दोन उत्तम संदर्भ पुस्तके आहेत.

चौकस२१२ 23/08/2023 - 04:47
आपला हा लेख परत वाचला .. मूळ स्वामी कादंबरी तील त्रुटी किंवा त्यातील ओढून आणलेले अलंकारिक पणा वैगरे हा हेतू होता असे वाटले सुरवातीला आणि त्यादृष्टीने तसे विश्लेषण अधिक असते तर बरे झाले असते उलट त्याचे रूपांतर "एका जातीवर आग पाखड करणे हा दिसला .. मिपावर हे चालते? हे म्हणजे मध्यन्तरी एक सिने दिग्दरक्षकाने " मराठी चित्रपट एकाच जातीचे लोक का घेतात " असे विधान केलं होते तसेच आहे असो यावर सचिन पाटील ने छान वक्तवय केलं आहे पहा https://www.youtube.com/watch?v=uVuMsV4MfYI https://www.youtube.com/watch?v=zbV0LfIPDQk

या आय डी ची कुंडली व प्रगल्भ विचार सरणी बघता कोणीतरी पुनर्जन्म घेऊन आलेला दिसतोय. वय दोन महीने तीन दिवसात ऐव्हढे ज्ञान,अद्भुत बाळक दिसतोय.

अहिरावण 23/08/2023 - 09:52
सर्व वाचक प्रतिसादकांचे पुनश्च अभिनंदन आणि आभार ! काही डाव्यांना मी उजवा वाटतो, तर काही उजव्यांना मी डावा. गंमतीशीर आहे एकंदरीत त्यामुळे मजा वाटते. आता मते मांडली की धुरळा उडणारच, मतमतांतरामुळेच भारतातील लोकशाही जिवंत आहे आणि ती अशीच रहावी. माणसाने व्यक्त होणे सोडू नये. भांडण मताशी असावे माणसाशी नको अशी भुमिका सर्वांची असली तर आनंद अधिक असतो. आपणा सर्वांना आरोग्यपुर्ण दिर्घायुष्य लाभावे ही मनोकामना. ही चर्चा आपण इथे थांबवु, परत केव्हातरी असेच व्यक्त होऊ ! धन्यवाद.

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 23/08/2023 - 09:59
असेच व्यक्त होऊ ! डाव्यांना मी उजवा वाटतो ... अहिरावण डावे वा उजवे प्रश्न नाही .. काय आणि कसे मांडले आहे ... त्यामागे काही "अजेंडा" आहे का हे महत्वाचे तुमची दोन वाक्येच काय ते सांगून जातात "सावरकर बुळबुळीत विचारसरणीचे" आणि " छत्रपतींचं सैन्यात मुस्लिम नवहते का ! अजेंड्याच्या भरभक्कम भावना पोचल्या विषयांप्रमाणे दावे उजवे असते ... उदा पाश्चिमात्य लोकशाहीत बहुतेकदा डाव्यानां मत देणार असलो तरी काही बाबतीत उजवा आहे

In reply to by चौकस२१२

अहिरावण 23/08/2023 - 14:44
शोध पत्रकारीता अशी असते हे माहित नव्हते. तुमच्या भावना पोचल्या. तुमच्याबद्दल नितांत आदर आहेच आणि तो अजुन वाढवाल याची खात्री आहे. शुभेच्छा !

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 23/08/2023 - 19:05
काही डाव्यांना मी उजवा वाटतो, तर काही उजव्यांना मी डावा. मी पोलिसांना हात भट्टी वाला वाटतो आणि हात भट्टी वालयाला मी पोलीस वाटतो. माझा चेहराच असा आहे -- श्री राम नगरकर

अर्धवटराव 24/08/2023 - 03:11
स्वामी वाचल्याचा काय परिणाम झाला होता हे आठवत नाहि. नसेलच झाला बहुतेक :) पण कादंबरीच्या प्रस्तावनेत एका इंग्रज अधिकार्‍याचं टिपण दिल्याचं आठवतय... माधवराव पेशव्याच्या अकाली निधनामुळे पेशवाईचं आणि पर्यायाने मराठेशाहीचं प्रचंड नुकसान झालं असं काहिसं मत दिलं होतं साहेबाने. माधवराव काहि एक कर्तुत्ववान होता, व तदनुषंगाने देसाईंनी त्याला कादंबरीचा हिरो बनवलं असल्यास, आणि ललित साहित्य कलाकृती निर्माण केली असल्यास काहि गैर नाहि. बाकि मला स्वामी काहि विशेष आवडल्याचं आठवत नाहि. श्रीमान योगी मात्र आवडली होती. सावंतांचं मृत्युंजय थोडं रटाळ वाटलं होतं. युगांधर आणि छावा तर अजीबात आवडलं नव्हतं. राहिला मुद्दा ब्राह्मणांच्या मानसीकतेचा. ओसाड गावची पाटिलकी करण्याचं नशीबात आलं तर आणखी काय होणार. ज्या ब्राह्मणेतरांच्या हातुन सत्ता, संपत्ती वगैरे मटेरीयल गोष्टी निघुन गेल्या तरिही स्वभावतला पीळ गेला नाहि, त्यांची मानसीकता समजणं सोपं आहे. पण विद्वत्ता, धर्मदर्शन वगैरे अमूर्त बाबतीत हा पीळ किती खरा किती खोटा हे कळणं कठीण असतं.. स्वतःचं स्वतःला देखील. अनेकांची यात खुप ओढाताण झाली. जे सावरले त्यातल्या बर्‍याच जणांनी या ब्राह्मण्याला कायमचा रामराम ठोकला. काहिंनी त्यातल्या उदात्ततेवर आलेली काजळी साफ करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. उर्वरीत भट आपापला गोंधळ आपापल्या परिने निस्तरण्याचा प्रयत्न करत असतात. मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या कृपेने एकजात सर्व ब्राह्मणांना तुतार्‍या टोचण्याचं काम इमाने इतबारे चालु आहेच. त्यामुळे सरमिसळी मानसीकतेचा एक वेगळाच ब्रह्मवृंद आकाराला येतोय असं दिसतं.

चौकस२१२ 24/08/2023 - 04:43
मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या कृपेने एकजात सर्व ब्राह्मणांना तुतार्‍या टोचण्याचं काम इमाने इतबारे चालु आहेच. हेच किती एकांगी आहे आणि हास्यस्पद आहे , महाराष्ट्रात तर असा कांगावा केला जातो कि बघ ते ३.५% कसे सगळे बळकावून बसले आहेत? हायला मग उरलेलले ९६.५% अशी गुलामगिरी काय सहन करतात असे काबुल केल्यासारखेच आहे ! कदाचित नाट्य कला क्षेत्र सोडलं आणि काही थोडे खाजगी वयसाय आणि लष्करच्या भाकऱ्या असे सामाजिक उद्योग या ठिकाणी काय ते ब्राह्मणांचे थोडे फार प्रभुत्व शिल्लक असेल ( एखांदा गडकरी किंवा फडणवीस म्हणजे काही अख्या ब्राह्मणांनी गिळंकृत केलाय असे होत नाही- संघ ब्राह्मणाचा म्हणणारे हे विसरतात कि ना मोदी ना योगी ना शहा ब्राह्माण ,, ) आणि flogging horse mhnun मारायला सोपे पानिपतात लाखो मराठे ( जात आणि समाज दोन्ही ) गेले पण त्यात भोसले राजे का नव्हेत पुढे हा प्रश्न विचारला तर? 2 पेव्श्वे मेले / शिन्दे मेले पन भोस्ले जख्मि झले असे कहि ऐक्लेले नाहि? या राजकीय आगलावू पनामुळेच जे काही उरले सुरले ब्राह्माण भारतात आहेत ते कारण नसताना कडवे बनत चालले आहेत... लै झाले,,, लै ऐकून घेतले " गेले बा......" म्हणतात

सौन्दर्य 25/08/2023 - 03:20
लेखकांनी स्वामी कादंबरीचे कारण किंवा ढाल पुढे करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला येथेच्छ दूषणे दिली आहेत. आता त्यात भर म्हणून शिवाजी महाराज, सावरकर ह्यांच्या विचारसरणीवर धुराळा उडवत आहे. स्वतःचे विचार मांडणे ह्यात गैर काहीच नाही तरी देखील इतिहासाला सोडून वाटेल ती विधाने करणे अत्यंत गैर आहे.

चौकस२१२ 25/08/2023 - 05:32
लेखकांनी स्वामी कादंबरीचे कारण किंवा ढाल पुढे करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला येथेच्छ दूषणे दिली आहेत नक्किच मिपाचं संपादकांना राजकीय घडामोडी वरील चर्चा थांबव्यावयश्या वाटल्या पण अश्या जातीवाद वाढवणाऱ्या लेख लिहिलेले चालतो !

चित्रगुप्त 19/08/2023 - 20:36
प्रांजळ लिखाण एकंदरित आवडले. वाचनाबद्दलच्या लोकांच्या आवडीनिवडी, दृष्टीकोण वगैरे कालानुसार कसे बदलत जातात याच्यावर उत्तम प्रकाश टाकला गेला आहे असे वाटले. माझे शिक्षण मध्यप्रदेशातील इंदूरात नववी पर्‍यंत मराठी शाळेत झाले. नववीत साने गुरुजींची 'क्रांती' कादंबरी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून होती. त्याच सुमारास लायब्ररीतून आणून अर्नाळकरांच्या रहस्यकथा वगैरे वाचायचो तेंव्हा (१९६७ -७० चे सुमारास) 'स्वामी' वाचल्याचे आठवते. परंतु मी भारून वगैरे गेलो नव्हतो. त्याकाळात लोकप्रिय असलेले 'गीतरामायण' तर मला अजिबात आवडायचे नाही. माझी आवड जरा अजबच होती. तेंव्हाच वाचलेले जे. कृष्णमूर्ती यांचे 'मुक्त जीवन' वाचून मी अगदी झपाटून गेलो होतो, आणि माझे आयुष्य बदलून टाकण्याचे (दोन वर्षे इंजिनियरिंग कॉलेजात शिकून मग ते सोडून चित्रकलेला वाहून घेणे) श्रेय मुख्यतः 'मुक्त जीवन' पुस्तकालाच द्यावे लागेल. त्याच काळात 'व्यायाम ज्ञानकोष, डॉ. गणपुले यांचा मानसशास्त्रावरील 'मानसोन्नती' हा अद्भुत ग्रंथ, 'जगात वागावे कसे' 'मुंबईचे वर्णन' रमेश मंत्री, जयवंत दळवी, आचार्य रजनीश वगैरेंची पुस्तके आणि मुख्यतः दासबोध वगैरे वाचायचो. वाचनाची नोंद ठेवायचो. --- महाराष्ट्राबाहेरच वास्तव्य घडल्याने ब्राम्हण-ब्राम्हणेतर वगैरे बाबींशी संबंध आला नाही. होळकरांमुळे तात्कालीन इंदुरात 'धनगर' समाजाला मानाचे स्थान असले, तरी होळकरांच्या राज्यात एकंदरित ब्राम्हणांना चांगले स्थान होते असे आठवते. असो. --- इथे 'स्वामी' बद्दल वाचून हे सगळे आठवले, आणि त्याकाळी लिहीत असलेल्या रोजनिश्या आता वाचायला हव्यात हे नव्याने जाणवले.

मनो 19/08/2023 - 21:28
> राजकीय आयुष्य १९२० ला टिळकांच्या मृत्युसमवेत संपले. ब्राह्मणांचे राजकीय आयुष्य संपले ते १९९० च्या मंडल-कमंडल ध्रुवीकरणाच्या नंतर. अगदी पुण्यात म्हणाल तर टिळकांच्या नंतर गाडगीळ, कलमाडी यांनी दीर्घ काळ पुण्याचे राजकारण चालवले, काल-परवापर्यंत गिरीश बापट होतेच की. १९९०-२००० पर्यन्त ब्राह्मणांनी अनेक सर्वोच्च पदे भूषविली आहेत, नुसते देशाचे पंतप्रधानपद पाहिले तर त्यात कित्येक ब्राह्मण आहेत.

In reply to by मनो

अहिरावण 21/08/2023 - 14:16
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी जेव्हा ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व संपले असे म्हणतो तेव्हा ब्राह्मणांचे समाज म्हणून असलेला दबाव, त्यांच्या हिताला साधक ठरतील अशा कृती शासन्/प्रशासन स्तरावर करुन घेणे, हितास बाधक ठरणार्या कृती बासनात बांधायला लावणे अशा प्रकारे गट म्हणून काम करणे अपेक्षित आहे. जे इतर समाज सहज करत असल्याचे दिसते. आपण दिलेली उदाहरणे ब्राह्मण व्यक्तिंची आहेत, आणि अशी शेकड्याने आढळतील. जैन मारवाडी समाजाचा एकही पंतप्रधान झाला नाही पण त्यांचा राजकारणातील प्रभाव (कमी लोकसंख्या असूनही) लक्षणीय आहे. चुभुद्याघ्या

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 23/08/2023 - 04:59
अहिरावण आपण म्हणता तसे ३.५% चा राजकीय दबाव / अस्तित्व संपले .. हे खरे असले तर चांगलेच आहे ( आणि सहमत आहे कि तसे ते संपले आहे, ज्या व्यक्ती ब्राह्माण असून पुढे येत आहेत आहे ते केवळ वयक्तिक कर्तृत्व , जात म्हणून न्हाई आणि झालाच तर जातीचा त्रासच ) ) पण साहेब हळू आवाजात बोला, कारण असे कि हे आपले विधान जर व्हायरल झाले ना तर काही राजकीय गटांचा "झोडप शेंडी मिळावं मते " हा धंदा राज्यात चालू आहे त्याला खीळ बसेल.... तेव्हा असले काही बोलू नका . नॅरेटिव्ह एकच पाहिजे "पगडी नको पागोटे ... हाणत ऱ्हायचंच

In reply to by अहिरावण

माझ्या मते .. गुप्त काळापासून ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व प्रभुत्व (ब्राह्मणांचे समाज म्हणून असलेला दबाव, त्यांच्या हिताला साधक ठरतील अशा कृती शासन्/प्रशासन स्तरावर करुन घेणे, हितास बाधक ठरणार्या कृती बासनात बांधायला लावणे अशा प्रकारे गट म्हणून काम करणे ) शिखर स्थानाला पोहोचले ... ते उत्तरोत्तर शिखरावरच राहिले ते आजतागायत... त्यामुळे " ब्राह्मणांचे राजकीय अस्तित्व संपले " अश्याप्रकारे कोणी नॅरेटिव्ह सेट करत असेल ... तर ते " ब्राह्मणांचे राजकीय प्रभुत्व वाढावे" याचं अंतर्यामी अजेंड्याने काम करत असणाऱ्या एका संघटनेचे , स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर चा एक भाग असावा, असे मला वाटते .. बाकी लोकसंख्येतील प्रमाणाबाबत काही जण गळे काढताना आढळतात .. पण याच डेटा पॉईंटच्या बाजूला, आजपासून मागील १०० वर्ष्यातील "लोक संख्येतील % टक्के " आणि "प्रशासनातील %" असा आलेख मिळाला असता तर बरं झालं असतं ... असे वाटते .. म्हणजे दलित, ओबीसी यांचे सुद्धा आलेख , अभ्यासता आले असते ... मागील १०० वर्ष्यातील, विविध समाज जातीचा जीडीपी पर ईअर , यांचे आलेख मिळाले असते तर बरं झालं असतं ... असे वाटते .. तेव्हाच निश्चितपणे आपल्या सर्वांना यावर भाष्य करता येईल ...

टर्मीनेटर 19/08/2023 - 21:31
पण कादंबरीकार मात्र हे भान न ठेवता हिरोला सुपर हिरो करतातच पण प्रसंगी व्हिलनला सुद्धा सुपरहिरो बनवतात.
+१००० तेवढ्यावरच ते लोकं आणि नाटककार थांबत नाहीत, अनेक ऐतिहासीक व्यक्तीमत्वांना व्हीलन/बदफैली म्हणुन पेश करण्यातही ते मागे नाहित! साक्षात छत्रपती संभाजी महाराज तसेच आनंदीबाई (ध चा मा वरून कुठल्याही सबळ पुराव्याविना बदनाम केल्या गेलेल्या) आदी मंडळी सुद्धा त्यांच्या तावडीतून सुटली नाहीत. अजुन एक पात्र आहे, ‘समशेर बहाद्दर’ ह्याचे मला वाटतं विश्वास पाटलांच्या पानिपत मध्ये असं काही वर्णन केलंय की मी त्यावेळी ‘बाजीराव का बेटा’ असलेल्या ह्या पात्राच्या गरीमेने भारावुनच गेलो होतो 😀 ते पात्र खरेच तसे पराक्रमी वगैरे होते की विश्वास पाटलांनी ते ग्लोरीफाय केले हे मी पुढे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही कारण त्या दारूण पराभवाच्या इतिहासांत मला तरी अजिबात स्वारस्य नाही, मात्र कोणा जाणकाराने त्यावर प्रकाश टाकल्यास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल!

In reply to by टर्मीनेटर

मनो 19/08/2023 - 23:27
> ते पात्र खरेच तसे पराक्रमी वगैरे होते की विश्वास पाटलांनी ते ग्लोरीफाय केले त्यांच्याबद्दल पुरेशी महितीच इतिहासात मिळत नाही, त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची असा तो प्रकार आहे. कादंबरीकार इतिहासातील असेच भाग निवडतात कारण कल्पनेच्या घोड्याला इथे फुल्ल मैदान मोकळे असते.

In reply to by मनो

टर्मीनेटर 19/08/2023 - 23:42
अच्छा, म्हणजे जंगल मे मोर नाचा किसने देखा टाईप प्रकार आहे तो… तुमच्या सारख्या अधिकारी व्यक्ती कडुन माहिती मिळाली ह्यासाठी धन्यवाद मनो…

Bhakti 19/08/2023 - 22:20
स्वामी कादंबरी वाचून मीही भारावून गेले होते,मैत्रिणींना घेऊन थेऊरची समाधी पहायला गेले होते, भरभरून त्यांना सांगत होते बहुतेक रडले होते (हा हा)!

चित्रगुप्त 20/08/2023 - 00:14
स्वामी कादंबरी वाचून मीही भारावून गेले होते,मैत्रिणींना घेऊन थेऊरची समाधी पहायला गेले होते, भरभरून त्यांना सांगत होते बहुतेक रडले होते (हा हा)!
... लहानपणी बाहुल्यांशी खेळणे, आई-बाबांचा हात धरून चालणे, बागुलबुवाला घाबरणे ... त्यानंतरच्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर त्या त्या काळी जे जे खरे वा खोटे वाटले, आवडले वा नावडले, करावेसे वा न करावेसे वाटले, ... त्या गोष्टी आणखी पुढील आयुष्यात हास्यास्पद वाटणे, वा त्याबद्दल खंत/अपराधीपणाची भावना/पश्चात्ताप वाटणे, हे तितकेसे योग्य नाही. अशा पश्चात्तापाबद्दलही आणखी पुढे कधीतरी पश्चात्ताप वाटू शकतो. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. जे काल होते ते आज नाही आणि आजचे उद्या नाही .... हे असेच चालत रहाणार.. कश्याला अपराधी वाटून घ्यायचे...वगैरे.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 20/08/2023 - 20:43
आपल्या मतांचा आदर आहेच. तेव्हाच्या आणि आताच्या दोन्ही भावनांशी प्रामाणिक आहे त्यामुळे पश्चात्ताप,अपराधी वगैरे काही नाही वाटत.

भागो 20/08/2023 - 10:07
लेख आवडला हे प्रथम नमूद करतो. ब्राह्मण समाजाची घालमेल, ना इधारका ना उधारका, फुका राष्ट्राभिमान पण अमेरिकेची ओढ सोडवत नाही, कॉलेजात वैज्ञानिक दृष्टीकोनाशी परिचय झाला, तो बराचसा पटला पण रूढी सोडवत नाहीत, मग धर्म आणि विज्ञान ह्यांचे सुंदर "फ्युजन" करण्याचा केविलवाणा प्रयत्न, लतादीदी -पुल-जीए ह्यांच्या पलीकडे जग आहे ह्याची जाणीव नाही, अशी ही कुतरओढ! आम्ही जेव्हा कोलेजात होतो तेव्हा वाटायचे कि हे सगळे बदलेल पण आज जेव्हा शाळेतले सवंगडी पत्रिका मागताना दिसले ते बघून धक्का बसतो . महाराष्ट्र हा इंग्लंड, फ्रांस. जर्मनी, जपान एव्हढाच मोठा देश आहे/असावा. पण त्या प्रत्येक देशाला स्वतःची प्रगत भाषा आहे. इंग्लिश शब्दांना मराठी/संस्कृत शब्द शोधायची गरज पडत नाहीये. अग्निरथगमनागमनदर्शकताम्रलोहपट्टीका! माझा मित्र हिंदू-हिताची शिष्यवृत्ती घेऊन जपानला इलेक्ट्रॉनिक्सच्या उच्च शिक्षणासाठी गेला होता. त्याला प्रथम जपानी भाषा शिकावी लागली. आता राहिल्या मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या. मी त्यांच्याकडे "हासिक" कादंबऱ्या म्हणून बघतो. उगाच भारून जायचे काम नाही. उद्या छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, सवाई माधवराव ह्यांनी बाय चान्स ह्या कादंबऱ्या वाचल्या तर ते लेखकांना हत्तीच्या पायाखाली... जाऊ देत झाल. अर्थात अपवाद आहेत, असणारच! त्या शिवाय का आपण इथपोत्तर आलो?

यावर बरेच काही अवलंबून असते. इतिहासकालीन व्यक्तीरेखा आणि कादंबरीमधील व्यक्तीरेखा यांच्यामधे फरक करणार्‍या विवेकाचा अभाव होता. देसाई, पाटलांची कादंबरी मनोरंजन म्हणून वाचली जाते. राजवाडे,बलकवडे यांचे ग्रंथ संदर्भ म्हणून आभ्यासले जातात. मनोरंजक साहित्य निर्मीती मधे लेखकास मर्यादित बंधने तर काही प्रमाणात कल्पनाविलासाचे स्वातंत्र्य असते. याची निर्मीती वाचक वर्ग, व्यावसायिक उद्देश इ. लक्षात ठेवून होते. या विरुद्ध संशोधनात्मक साहित्य केवळ इतिहासाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन सत्य उजेडात आणणे असल्यामुळे ते रुक्ष वाटते व सर्वसामान्य वाचक विरंगुळा म्हणून वाचत नाही. वाचकाचे वय असते त्या प्रमाणेच पुस्तकांचेही वय असते. गुलबकावली,रेपोनझील मधे रमणारा बालक वय वाढले की सिदंबादच्या सफरी व नारायण धारपांकडे वळतो. नंतर काकोडकर त्याला रिझवतात,असो याला काही अपवाद असतातच. कधीकाळी आवडलेली 'स्वामी',वयाच्या दुसर्‍या टप्प्यात इररिलीव्हंट आणी अतिरंजित वाटू शकते. प्रसंगी कर्ज काढले जात होते. मुंजीचे औचित्य संपुन दोन हजार वर्षे उलटली आहेत पण ब्राह्मण अजुनही मुंजीत अडकला होता. व्हॅलेंटाइन मरून किती वर्ष झाली,बहिण भावापेक्षा मोठी ,सक्षम असली तरीही राखी बांधते. मुंजीचे औचित्य संपले तरीही दुरदूरर्चे नातेवाईक, मित्र जमा होता. संपलेल्या,संपत आलेल्या नात्यांचे पुनरूज्जीवन होते. प्रत्येक गोष्टीत औचित्य शोधत बसलो तर सर्व काही फाफटपसारा वाटू शकेल. प्रसाद वाटणारा बुंदीचे लाडू कुणाला बेसनाचा गोड पदार्थ वाटू शकतो. सदर लेख, स्वामी मला का आवडत नाही याची कारण मिमांसा तुम्हाला कदाचित पटणार नाही. यावर समारोपीत केल्यामुळे,ब्राह्मण, पेशवाई आणी इतर गोष्टींची दखल घेतली नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

भागो 20/08/2023 - 11:51
देसाई, पाटलांची कादंबरी मनोरंजन म्हणून वाचली जाते>>> कर्नल साहेब, आपण विचारी विचक्षण वाचक आहात. म्हणून ठीक आहे. इतरांचे तसे नसते. उदा. -- शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव ह्यांचे काय काय संबंध होते? इतिहास कुठे संपतो आणि कल्पना विलास कुठे सुरु होतो? -- रामायण हे काव्य आहे की इतिहास आहे? राम सेतू या मागचे सत्य काय आहे ? हे असले प्रश्न निर्माण होतात. त्याचे काय करायचे?

In reply to by भागो

शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव ह्यांचे काय काय संबंध होते? इतिहास कुठे संपतो आणि कल्पना विलास कुठे सुरु होतो? जिथे इतिहासाचा वापर स्वार्था साठी होतो, मग तो व्यवसायिक अथवा राजकिय असो आणी सारासार विवेकबुद्धी आढ्याला टांगणीवर टाकतात तिथे. रामायण हे काव्य आहे की इतिहास आहे? राम सेतू या मागचे सत्य काय आहे ? हे अधिकारीक पणे सांगण्या इतके मला ज्ञान नाही. एवढेच सांगू शकतो हजारो वर्षानंतरही आय्योध्या आहे,रामेश्वरम् आहे,श्रीलंका आहे ,कुरुक्षेत्र आहे त्या अर्थी या गोष्टी घडल्या असाव्यात. काळाच्या ओघात त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी अभ्यासक नाही त्यामुळे यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, ते ते माझे.....

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण 21/08/2023 - 14:19
आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल आभारी आहे. किमान लेखाची दखल घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपली मते वाचण्यास आणि (जमल्यास) खोडून काढण्यात अथवा मान्य करण्यात बैद्धिक आनंद मिळाला असता, तो राहीला. हरकत नाही.

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 21/08/2023 - 16:49
एका महान करमणुकीला आपण मुकला आहात.
--- हे बरीक खरे. कंजूस यांच्याप्रमाणे मी फार गवगवा झालेले सिनेमे बघत नाही. उदा. शोले, बॉबी, मुगले आझम, जोधा अकबर, वगैरे. मात्र दुर्दैवाने परवा 'गदर २' बघायला घरच्यांबरोबर गेलो, पण 'करमणूक' सुद्धा न होता वैतागच आला. असो.

सर टोबी 20/08/2023 - 21:58
हा प्रकार इतका कृत्रिम असतो कि काही काळानंतर त्याचा उबग येतो. याची सर्वसाधारण उदाहरणं बघू यात. टीप: उदाहरणं काल्पनिक आहेत आणि मुद्दा विशद करण्यासाठी कदाचित माझ्याकडून अतिशयोक्ती होऊ शकते. चित्रदर्शी लेखन: 'म्हणजे?', महाराज उद्गारले. त्यांच्या कपाळावर एक सूक्ष्मशी आठी उमटली आणि आवाजात आपोआप करारीपणा आला आणि जिरेटोपावरील मोत्यांची माळ थरथरली. चित्रदर्शी निवेदन: तृषार्त धरणीने पहिल्या पावसाचा आवेग आपल्यात सामावून घ्यावा तशी xxxx. यात जमेल तशी वाचकांनी भर घालावी. अशी वाक्य उच्चारतांना आवाजात कातरता, हळवेपणा जितका जास्त तितका प्रेक्षकांचं भारावलेपण जास्त. चित्रदर्शी चित्रीकरण: खास दिवाणखान्यातील प्रेक्षकांसाठी असलेल्या मालिकांमधील एक प्रसंग. 'अगं बाई वन्स अचानक इकडे?' इथे बोलणारी स्त्री व्यवस्थित पदर ओठांपाशी नेऊन आश्चर्य व्यक्त करणार, मग क्रमाने वन्संच्या चेहेऱ्यावरील अवघडले भाव, इतरांचे गोरे मोरे झालेले चेहरे, आणि कुणाच्यातरी चेहऱ्यावरील करारी भाव.

In reply to by सर टोबी

भागो 20/08/2023 - 22:49
सरजी प्रतिसाद एकदम पातला. मी जेव्हा वर लिहिले कि ऐतिहासिक नाही तर "हासिक" म्हणजे हास्य निर्माण करणारे. ते गरकन, सरकन सोडून दिले तरी पात्रांची खासगीतील संभाषणे म्हणजे अगदी कहर!

In reply to by भागो

भागो 20/08/2023 - 23:42
सरजी प्रतिसाद एकदम पटला. मी जेव्हा वर लिहिले कि ऐतिहासिक नाही तर "हासिक" म्हणजे हास्य निर्माण करणारे. ते गरकन, सरकन सोडून दिले तरी पात्रांची खासगीतील संभाषणे म्हणजे अगदी कहर! पटला! हा हा हा हासिक झाला. चूक सुधारली.

सौन्दर्य 21/08/2023 - 08:54
मी देखील स्वामी कादंबरी वयाच्या तेरा-चौदा ह्या वयात वाचली व तिचा जबरदस्त पगडा मनावर बसला. दुसर्यांदा ती अंदाजे बावीस -तेविसाव्या वर्षी वाचली. अर्थात पहिल्यांदा वाचली तेव्हढी ती उत्कट किंवा भारावून टाकणारी वाटली नाही. त्याची अनेक कारणे आहेत, असू शकतील. वयाच्या प्रत्येक वयात अमुक एक प्रकारचे साहित्य आवडून जाते पण ते कायम आवडत राहील असे नाही, वयाप्रमाणे येणारी परिपक्वता किंवा वाचनाचा जो परीघ वाढत जातो त्यामुळे असे होत असते. असेच आपण पाहिलेल्या व आवडलेल्या सिनेमांविषयी देखील होते असे मला वाटते. अपवादात्मक सिनेमे आहेत अगदी नाहीतच असे नाही. लेखकाने स्वामी कादंबरीचा आधार घेऊन ब्राह्मण समाजाचा जो उपमर्द करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अजिबात आवडला नाही. त्यामागचे कारण मी ब्राह्मण आहे म्हणून ते मला आवडले नाही असे नसून असा कोणत्याही एखाद्या जातीचा अपमान करणे हे सुसंस्कृतपणात बसत नाही असे मला वाटते. वेगवेगळ्या जातींच्या लेखकांनी त्यांच्या अनुभवाप्रमाणे लिखाण केले, त्यातील एखादा भाग किंवा वर्णन समोर घेऊन त्यावर वाटेल तेव्हढी टीका करता येते व ज्यांना ती करायचा अधिकार आहे त्यांनी ती करावी किंवा त्यांनी ती केली देखील पण त्यात लेखकाच्या जातीवर टीका करणे हे अनुचित आहे. आता ब्राह्मणांनी काय केले किंवा आपले अस्तित्व कसे टिकवून धरले ह्या विषयावर लिहायला घेतले तर मुद्दा भलतीकडेच भरकटत जाईल म्हणून आवरते घेतो. नमस्कार.

In reply to by सौन्दर्य

अहिरावण 21/08/2023 - 14:23
इतर कोणालाही जाणवला नाही पण आपणांस माझ्या लेखात ब्राह्मणांचा उपमर्द जाणवला याबद्दल मी दिलगीर आहे. आपण माझ्या कृतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून उदार मनाने दुर्लक्ष करावे आणि मुद्दा तेवढा घ्यावा असे सुचवतो. बाकी मुद्देसुद अशा तुमच्या लेखाची प्रतिक्षा आहे, ती लवकर पूर्ण व्हावी ही अपेक्षा !

ब्राह्मण जे करतो जसे वागतो बोलतो तसे इतर समाज करत असतो हे बर्‍याचदा आढळले आहे. खरं आहे. प्रत्येकाला मनातून ब्राह्मण व्हायचे असते पण तसे बनायला बर्‍याच मर्यादा आड येतात. मग ब्राह्मणांच्या बोलण्याची नक्कल करणे, मुद्दाम नाकात बोलणे असे काहीबाही उपद्व्याप केले जातात. शेवटी ब्राह्मण बनता नाही आले की शिव्या घालायचा असा बहुतेकांचा प्रवास असतो. मी देखील स्वामी कादंबरी तुम्ही वाचली त्याच वयात वाचली पण मला काही भारावून गेल्यासारखे झाले नाही. कदाचित मी त्याच बरोबर दलित लेखकांचे देखील लिखाण वाचत असल्यामुळे तेवढा प्रभाव जाणवला नसेल. किंबहूना जास्त अलंकारिक भाषेमुळे मला ती भावली नाही. दलित साहित्य देखील सुरुवातीला चांगले वाटले. त्यांचे गावकुसाबाहेरचे जीवन, त्यांच्या हालाअपेष्टा वाचून मला स्वतःची चीड येत असे मात्र नंतर त्या लिखाणाचा कंटाळा यायला लागला. कोणत्याही दलित लेखकाची कादंबरी वाचली की तेच ते रडगाणे असायचे त्यामुळे कंटाळून वाचणे सोडून दिले.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 21/08/2023 - 14:27
सहमत आहे. सध्याचे दलित, ग्रामीण, विद्रोही, सामाजिक किंवा लेटेस्ट फ्याशनचे असलेले समलैगिक, स्त्रीवादी, तृतीयपंथी लोकांचे जीवन रंगवणारे लेखन एकसुरी, बटबटीत, प्रसंगी शिराताण शिवीगाळ असे आढळते. सन्माननीय अपवाद नियम सिद्ध करणारे

स्वधर्म 21/08/2023 - 16:40
इतिहास कादंबरीपेक्षा महत्वाचा हे पटतं. पण त्यातही जाम घोऴ आहे. उदा. पानसरे यांचे ‘शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज’ हे भाषण व गजानन मेहेंदळे किंवा निनाद बेडेकर या इतिहासकारांची भाषणे ऐकून शिवाजी महाराजांचा मुस्लिमांविषयीचा अगदी परस्परविरोधी दृष्टीकोन समोर येतो. पानसरे हे आवर्जून शिवाजी महाराजांची मूळ पत्रे वाचा असे सांगतात. मेहेंदळे व बेडेकर यांच्या भाषणात इतर इतिहासकार हेतूपूर्वक कसे चुकीचे लिहित आहेत आणि महाराजांचा लढा हिंदूहितासाठी व यावनी सत्ता उलथून टाकण्यासाठीच होता, असा सूर आढळला. ही सगळी भाषणे यूट्यूबर सहज सापडतील.

In reply to by स्वधर्म

अहिरावण 21/08/2023 - 18:59
हिंदवी स्वराज्य या नावामुळे अनेकांचा घोळ होतो की हे हिंदूंचे राज्य व्हावे अशी इच्छा आहे की काय ! परंतु (माझ्या मते) शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी म्हणजे येथे जन्म झालेला, या भुमीला आपला मानणारा मग तो कोणत्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे असे स्थानदर्शक मत असावे. कारण, मुघल, तुर्क हे परक्या देशातील अशी त्याकाळात स्पष्ट भावना होती. त्यामुळे यावनी किंवा यवन याचा अर्थ पुराणकाळापासुन (आयोनियन) ग्रीक देशांपलीकडला प्रदेशातुन आलेले असा असावा. मुस्लिमांसाठी अनेकदा म्लेंच्छ असा शब्द वापरल्याचे दिसते. पानसरे यांच्याबद्दल आदर बाळगुन सुद्धा अनेकदा त्यांची मते डाव्यांची (अनेकदा चुकीची असलेली) धारणा मांडणारी दिसतात. जी तरतम भावाने सहज दिसतात आणि दुर्लक्ष करता येतात. अर्थात , आपण उल्लेख केलेली सर्व मंडळी महान आहेत. आपण त्यांच्या खिजगणतीत नाही.

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 22/08/2023 - 10:39
शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी म्हणजे येथे जन्म झालेला, या भुमीला आपला मानणारा मग तो कोणत्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे असे स्थानदर्शक मत असावे. ही अत्यंत बुळबुळीत विचारसरणी आहे. हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिँदूंचे स्वराज्य जेथे हिंदू धर्मियांना आपल्या आयाबहिणींना नासवण्याची/ बाटवण्याची भीती नसेल. शिवाजी महाराजांच्यानंतर गेल्या ३०० वर्षाचा पाकिस्तान अफगाणिस्तान इराण बांगला देश या देशांचा इतिहास पाहिला तर या सर्व देशातून हिंदू आया बहिणींना जबरदस्तीने नासवले बाटवले जात आहे असे असून आपण डोळेझाक करून हिंदू आणि हिंदवी मध्ये घोळ घालत बसलात तर निष्पन्न काहीही होणार नाही. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवि स्वराज्यामुळे भारताचे संपूर्ण इस्लामीकरण थांबले आणि दक्षिणेतील बहुसंख्य सुंदर मंदिरे ध्वस्त होण्यापासून वाचली हि वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 22/08/2023 - 13:04
मालक ! जरा शांततेत घ्या ! एकदम हातघाईवर येऊ नका ! >>>ही अत्यंत बुळबुळीत विचारसरणी आहे. असेलही. विनायक दामोदर सावरकर यांची विचारसरणी सुद्धा अशीच काही होती. आता आम्ही पण त्यांच्या पंक्तीत बसलो याचा अभिमान बाळगायचा की खेद ते नंतर पाहू. >>हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिँदूंचे स्वराज्य जेथे हिंदू धर्मियांना आपल्या आयाबहिणींना नासवण्याची/ बाटवण्याची भीती नसेल. असेलही. पण कुतुबशाहाशी आपल्या दख्खनीयांचे एकदिल एकमत झाल्यास तुर्क मोंगलांना सहजी परस्त करु अशी बोलणी काय गंमत म्हणुन झाली होती की काय? >>>शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवि स्वराज्यामुळे भारताचे संपूर्ण इस्लामीकरण थांबले आणि दक्षिणेतील बहुसंख्य सुंदर मंदिरे ध्वस्त होण्यापासून वाचली हि वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा. दख्खन वाचला ह्यात शंका नाही. आणि आम्ही ते कधीही नाकारणार नाही. पण शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते आणि ते विश्वासु होते ह्याचे काय? असो.

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 23/08/2023 - 07:15
दख्खन वाचला ह्यात शंका नाही. आणि आम्ही ते कधीही नाकारणार नाही. हे मान्य करताय हे हि नसे थोडके आणि उत्तर हि बहुल हिंदूच राहिला सुरवातीला तरी ... पण शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते आणि ते विश्वासु होते ह्याचे काय? आली गाडी मूळ रस्त्यावर ! अहो हेच तर जाणत्या राजाचे वैशिष्ट्य .. शिवाजी महाराजांचं काळात आधीच मुगल सत्तेत आणि धर्मांतर झालेलं हिंदू होते हे त्यांनाही मान्य करावेच लागले होते ,, त्यांना जाग आली कि ह्याला विरोध केला नाही तर कायमचे अंकित होऊ आणि स्वतःची ओळख ( धर्म / चालीरीती / परंपरा) हे सगळंच जाईल ... म्हणून त्यांनी सुरवंट केली ( पॉसिटीव्ह ऍक्शन आजच्या भाषेत ) आता याचा अर्थ ना टोकाचं हिंदुत्ववाद्यांनी असा लावून नये कि छत्रपती अगदी "चला धर्म प्रसार करूयात म्हणून बाहेर पडले " तसेच तुमच्या विचारसरणी ने याचा गैरवापर करून "बघा महाराजांना हिंदू धर्माची फिकीर नव्हती आणि म्हणून ते कसे सर्वधर्मसमभावी " महाराज सर्वधर्मसमभावी होतेच पण ते आजचं हुकलेलय व्याख्येप्रमाणे नाही

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 23/08/2023 - 07:28
विनायक दामोदर सावरकर यांची विचारसरणी सुद्धा अशीच काही होती सरळ काय ते बोला,,, पण त्याआधी तू नळीवरील लेखक विक्रम संपत यांच्या अनेक मुलाखती आहेत त्या पाहून घ्या

In reply to by सुबोध खरे

भागो 22/08/2023 - 13:10
रजपुतांचे तसे मत नसावे. उदा जोधाबाई, मिर्झा राजे, उदयभानू इत्यादि. अजूनही असतील. शिवाजी महाराजांचे पिताश्री. जाऊ दे.

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 23/08/2023 - 07:19
वस्तुस्थिती डोळेझाक करायची असेल तर करा. हुकलेली डावी विचारसरणी एवढी "शातीर " आहे कि कळत असून सुद्धा ढोंग करायचे

स्वधर्म 21/08/2023 - 21:18
हे पटण्यासारखे आहेच. बाकी पानसरे मूळ कागदपत्रे बघून ठरवा, नुसते मी म्हणतोय म्हणून नव्हे; असे म्हणतात. त्यामुळे ते डावे किंवा कुठलेही असले तरी, हा खुलेपणा दखलपात्र. बाकीचे मात्र अधिकारवाणीने बोलतात, हा ठळक फरक स्पष्ट दिसतो.

चौकस२१२ 22/08/2023 - 06:14
हिंदवी स्वराज्य या नावामुळे अनेकांचा घोळ होतो की हे हिंदूंचे राज्य व्हावे अशी इच्छा आहे की काय ! जसे शिवाजी महाराजांचा वापर उजव्यानी टोकाचे हिंदुत्व म्हणून करू नये तसाच डावखुर्यांनी "शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या धर्माचा संबंध कसा नाही " असला बाष्कळ पणा करू नये असे मला अल्पबुद्धीला वाटते सध्या जे "काही करा" पण शिवाजी महाराजांना हिंदू वैगरे पासून दूर करा हे जे टूल किट मधील हत्यार आहे त्याचा हा भाग अर्थात माझे म्हणेन हे हि नाही कि सध्याच्या व्याख्येप्रमाणे त्या काली काही शिवाजी महाराज हिंदुत्व वैग्रे ( हा शब्द फार नंतर आला असावा नाही का ) पुरस्कारीत करीत फिरत होते . गोष्ट सोपी आहे १) बहुतेक समाज हिंदू होता २) आक्रमणकारी जे होते ते त्यांचा धर्म स्थानिक समाजावर लाडात होते ) ( मुसलमानांनी आक्रमकपणे केला , ईस्ट इंडिया कंपनी ने पुढे धार्मिक प्रचार अप्रत्यक्ष रित्या केला पण इंग्रज सरकारने सत्ता आणि संपत्ती यावर भर आणि धर्माला जरा तरी बाजूला सारले ) ३) सर्वांनां साथीला घेऊन राजय करणाऱ्या शिवाजी महाराजांना जसे अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे महत्वाचे होते तसेच बहुसंख्यांक समाजचे पण रक्षण करणे आवश्यक होते तर त्या अर्थाने "हिंदू धर्माचे संरक्षण करणारे होते " असे म्हणले तर का कोणाचं पोटात दुखते ? ४) धर्म बाजूला ठेवून स्वराज आधी मिळवणे हा मूळच हेतू होता त्यांनी त्यांचे कर्म केले ...

सुबोध खरे 22/08/2023 - 10:33
शिवाजी महाराजांना सेक्युलर बनवण्याच्या नादात त्यांना हिंदुपदपातशाही निर्माण करणारा किंवा धर्माचे रक्षण करणारा या पदापासून दूर नेले जात आहे. केवळ स्वराज्य स्थापन करायचे असते तर त्यांच्यात आणि इतर सरदार मनसबदार यांच्यात काय फरक राहिल? धर्मावर अत्याचार होत असताना हे अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या विरोधात जीवावर उदार होऊन लढण्याचे काय कारण होते? वडिलोपार्जित सरंजाम होताच कि हा डावा दांभिक पणा आता डोक्यात जायला लागला आहे. मंदिरांचे उच्छेद आणि प्रजेला बाटवणे हे थांबवण्यासाठी धर्मरक्षक राजा असणेच आवश्यक होते. आपल्या धर्माचे रक्षण करताना परधर्मावर आक्रमण केले नाही हा महाराजांचा मोठेपणा होता म्हणून त्यांना सेक्युलर म्हणण्याचा दळभद्रीपणा करण्याची अजिबात गरज नाही शिवाजी महाराजांनी केवळ इस्लामी राज्यकर्त्यांना थोपवले असे नव्हे तर सर्वात पहिली घरवापसी सुद्धा केली ( नेताजी पालकर याना परत हिंदू धर्मात घेऊन). तेंव्हा शिवाजी महाराज हे धर्मरक्षक हिंदू राजेच होते उगाच त्यांना सेक्युलर करण्याची राजकीय गरज असण्याचे सामान्य माणसांना अजिबात कारण नाही. मुसलमानांची मते मिळवण्याची गरज असलेल्या राजकारण्यांना फाटा मारा आणि सत्य काय आहे ते समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 22/08/2023 - 13:07
तुमचा संदर्भरहीत अस्थानी प्रतिसाद आहे हे नमुद करतो आणि थोडं शांततेत घ्यायला शिका असे सुचवतो. मानाच असा आग्रह नाही. डावे माझ्या डोक्यात जातात तसे उजवे सुद्धा जातात. मी मध्यम मार्गी बुद्धाचा अनुयायी.

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 22/08/2023 - 19:30
या भूमंडळाचे ठायी

धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्रधर्म राहिला काही

तुम्हा कारणे! कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकासी आश्रयो जाहला शिवकल्याण राजा! हे समर्थ रामदास स्वामी नि सोळाव्या शतकात लिहून ठेवले आहे

In reply to by सुबोध खरे

अहिरावण 22/08/2023 - 19:41
महाराष्ट्र धर्म म्हणजे काय यावर एक विस्तृत लेख लिहा. कोणा कोणास संहारले? कोणा कोणास धाक लावला? कोणा कोणास आश्रय झाला? कल्याण नेमके कसे आणि काय केले? जरा शिवरायांच्या कार्याचा परिचय करुन द्या. म्हणजे आमच्या सारख्या अजाण अडाणी मनुष्यांना जरा अक्कल येईल. कसे? बाकी एखादे वाक्य मुळ लेखावर आले असते तर बरे झाले असते असे आम्हास वाटते. पण ते वाटणेच आहे. असो.

In reply to by सुबोध खरे

सुरिया 22/08/2023 - 14:44
शिवाजी महाराजांनी केवळ इस्लामी राज्यकर्त्यांना थोपवले असे नव्हे तर सर्वात पहिली घरवापसी सुद्धा केली ( नेताजी पालकर याना परत हिंदू धर्मात घेऊन). तेंव्हा शिवाजी महाराज हे धर्मरक्षक हिंदू राजेच होते उगाच त्यांना सेक्युलर करण्याची राजकीय गरज असण्याचे सामान्य माणसांना अजिबात कारण नाही.
हे असे नॅरेटिव्ह पसरवयाचे धंदेच घात करत आहेत. नेतोजी पालकर ह्यांना हिंदू धर्मात घेण्याचे कार्य अप्रतिम असे राष्ट्रकार्य म्हणता येईल. किंबहुना त्यात आपणास एक संवेदीनशील नेता, काळाची आणि वेळेची गरज ओऴखणारा राजा दिसेल. नेतोजी पालकर हे शूर योध्दे म्हणून ओळखले जात.अगदी त्यांना प्रतिशिवाजी असेही म्हणले जाते. अशा माणसांचे मोल राजे ओळखून होते. ज्यावेळी त्यांना परत स्वराज्यात येऊ वाटले तेंव्हा ते धर्म बदलून किंवा धर्मासाठी राजांकडे आले नाहीत. ते स्वराज्यासाठी आल्यानंतर नंतर त्यांचे मन खाऊ लागले. नातेवाईकात मान मिळेनासा होत असे. नेतोजीनी कितीही ठरवले असते तरी तत्कालीन धर्म व्यवस्था त्यांना पुन्हा हिंदू करत नव्हतीच. अवघड प्रायश्चित्ते आणि बहिष्कार स्वीकारण्यापेक्षा त्यांना परत हिंदू धर्मात घेणे गरजेचे होते तेंव्हा राजांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना हिंदू धर्मात आणवले. तत्कालीन धर्मधुरंधराचा हा जाच खुद्द राजांना पण राज्याभिषेकावेळी जाणवलेला आहे. अशा प्र्त्येक राष्ट्र की धर्म अशा कसोटीच्या वेळी राजांनी राष्ट्रकार्यास प्राधान्य देऊन मधला मार्ग काढलेला आहे.

In reply to by सुरिया

सुबोध खरे 22/08/2023 - 19:25
आरशाच्या पलीकडे गेल्यास आपला चेहरा (सत्य) तर दिसत नाहीच पण केवळ अंधारच दिसतो ( म्हणजे खरं तर काहीच दिसत नाही). तुमचं चालू द्या

In reply to by सुरिया

चौकस२१२ 23/08/2023 - 04:26
राजांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना हिंदू धर्मात आणवले. केवळ गेलेला मोहरा परत मिळावा ( राजकीय चाल) आणि धर्मधुरंधराचा जाच कमी करण्यासाठी केवळ या दोन कारणांसाठी छत्रपतींनी नेताजी पालकरांना हिंदू धर्मात परत घेण्यात पुढाकार घेतलं असा तुमचं म्हणण्याचा सूर दिसतोय हे तर ठरविक टूल किट मधले "काहीही करा पण छत्रपतींच्या जीवनात हिंदूतला हासुद्धा येऊन द्यायचा नाही " हा नॅरेटिव्ह दिसतोय ... छत्रपतींनी आपला धर्म (राजकीय खेळी म्हणून का होईना) टिकवण्यासाठी आणि परकी आक्रमण जे धार्मिक आक्रमण हि होते ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले हे दिसत असून सुद्धा हि खोटी डावी विचारसरणी असा अप्रचार का करते ... राजाचे कर्तव्य सगळ्यांचे रक्षण करणे असते ना मग त्यात हिंदू पण आले का नाही? मग का त्रास होतोय मेनी करायला ?

In reply to by चौकस२१२

सुरिया 23/08/2023 - 16:50
ठरविक एक विचार सोडुन सगळे कसे टूलकिट असते हो तुमच्या मते. जिंदगी एक टूलकीट केलीय नुसती. आणि कुठलाही खोटा अपप्रचार केलेला नाहीये. राष्ट्रासाठी केले तर ते हिंदू राष्ट्रासाठी केलेय म्हणायचे. घरवापसी धर्मासाठी केली म्हणायची. ही घरवापसी राष्ट्रासाठी केले म्हणले की पापड मोडतो लगेच. धर्मासाठीच करायचे म्हणले तर कितीतरी सैनिक मुस्लीम असुन राजांच्या पदरी होते. अगदी सर्वांगीण घरवापसी करायची राजांनी ठरवले असते तर ते शक्यही होते. पण बजाजी निंबाळकर आणि नेतोजी पालकर दोन नावे सोडता केलीय का कुठली घरवापसी? उलट राजांनी प्रत्येक धर्माचा आदरच केलेला दिसतो. हे खरे राष्ट्रकारण. आणि धर्मकारण म्हणले तर अगदी पार पेशवाईपर्यंत खुद्द राऊपुत्राला मनात असताना घरवापसी करता आली नाही तेंव्हा धर्माचे राज्य हा विषयच सोडा. काय मान्य करायचे आणि काय टूलकीट ठरवायचे ते तुमचे तुम्ही बघा.

In reply to by सुरिया

चौकस२१२ 23/08/2023 - 20:14
कुठलाही खोटा अपप्रचार केलेला नाहीये.? सतत महाराजांचा आणि धर्मरक्षणाचा ( हिंदू ) काही हे संबंध नाही हे दाखवणे अगदी सर्वांगीण घरवापसी करायची राजांनी ठरवले असते तर ते शक्यही होते. पण असा कुठंही दावा केलेला नाहीये,,, उलट माझे विधान वाचा "टोकाच्या हिंद्त्ववाद्यांनी महाराजांचे हिंदू धर्म रक्षणाचे काम हे हिंदुत्व वैगरे म्हणून उगाच उर बडवू नये आणि इतरांनी उगाचच त्यांचा धर्म रक्षणाशी संबंध नव्हतं असा अप्रचार करू नये ते म्हणले आहे मी .. महाराजांचा हेतू तसा नसावा,, रयतेचा आणि स्वतःचा जो मूळ धर्म आहे त्यावर जो अन्याय चौ होता आणि परवलंबित्व आलाय ते झुगारून द्यायचे हे " स्वराज्य "ध्येय मग असे असताना त्यांनी जे केलं ते हिंदू धर्म टिकवनयसाठी केला असे म्हणले तर का जळफळाट होतो? तान्हाजी या हिंदी चित्रपटत एक प्रसंग दाखयलाय .. तान्हाजी जेवहा गावकऱ्यांना शिवबा ला साथ द्या असे सांगायला जातो तेव्हा कशाला अंहित्य शिवबा ला साथ देऊ असे विचारल्यावर तो म्हणतो कि हे जे तुतुमचे हे जर सण वार आहेत / प्रथा आहेत त्या टिकण्यासाठी ( नक्की सवांद आठवत नाही पण मतितार्थ हा कि जे आहे ते टिकवण्यासाठी ) येवध सरळ असताना मुददमून शिवाजी महाराजांनच्या या कृतीचा वापर स्वताच्या भंजाळलेलय सर्वधर्मसमभावाशी जोडायच हे जे सत्र ते एका ठराविक साच्यातून आलेलं दिसत ते पाहून ... म्हणून टूल किट म्हणले ...

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 23/08/2023 - 04:33
हा डावा दांभिक पणा आता डोक्यात जायला लागला आहे. अगदी योग्य शब्दात भावना मांडल्या आहेत तुम्ही डॉ. मी (माझ्या देशात) डाव्यान्न मत देणारा असून सुद्धा तुमच्याशी १००% सहमत पण काय आहे एक तर तुम्ही "खरे" त्यातून तुम्ही महाराजांना हिंदूतलं ह चिकटवला म्हणजे नक्कीच संघी हालफ चड्डी वैगरे त्यामुळे तुमच्या या विचारणकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाईल ... ( ते मुद्दे किती हा तर्काला धरून असले तरी ) आणि गंमत बघा हा आज एक "खरे " मानतो कोणाला तर "भोसलेंना" जर "अजेंडा" जातीचा असता तर सतत पेशवाई चा उदो उदो केला असता "एखाद्या खरे" ने असो ... दुरदैवाने यात "न जाणारी जात" आणावी लागली त्यामुळे कदाचित हा प्रतिसाद उडवलं हि जाईल

फक्त एका वयात स्वामी आवडली पुढच्या वाढलेल्या वयात आवडली नाही. हे सर्वां बरोबरच होते. पण लेखकाने पेशवाई, ब्राह्मण, हिंदवी स्वराज्य आणी इतर वादग्रस्त मुद्दे घेऊन बराच धुराळा ऊडवून घेतला. इथून पुढे आपला पास. जसे शिवाजी महाराजांचा वापर उजव्यानी टोकाचे हिंदुत्व म्हणून करू नये तसाच डावखुर्यांनी "शिवाजी महाराज यांचा आणि त्यांच्या धर्माचा संबंध कसा नाही " असला बाष्कळ पणा करू नये असे मला अल्पबुद्धीला वाटते डाव्या उजव्या राजकीय ऐजंडा असू शकेल पण मिपाकर कशाला चालवतात. स्वामी होणे फार कठीण कमीत कमी विचाराने भिकारी तरी बनू नये. चौकस भौ याच्या म्हणण्याशी सहमत. ते आपले कर्म करून गेले

प्रचेतस 22/08/2023 - 22:32
स्वामी, श्रीमान योगी ह्या रणजित देसाईंच्या कादंबऱ्या अगदी रटाळ वाटल्या. किंबहुना देसाईंनी बरेचदा कादंबरी लिहिताना स्वैर स्वातंत्र्य घेतलेले जाणवते. शिवाजी सावंतांचे मृत्युंजय वगळता (कर्णाचे उदात्तीकरण सोडून द्या) युगंधर, छावा या अतिलालित्यपूर्ण वर्णनामुळे अतिरटाळ झालेल्या कादंबऱ्या आहेत. त्यामुळे शक्यतो उत्तम चरित्र संदर्भ पुस्तके वाचावीत अशा मताचा मी आहे. पेशव्यांच्या बाबतीत श्रीराम साठे यांचे 'पेशवे' आणि प्रमोद ओकांचे 'पेशवे घराण्याचा इतिहास' ही दोन उत्तम संदर्भ पुस्तके आहेत.

चौकस२१२ 23/08/2023 - 04:47
आपला हा लेख परत वाचला .. मूळ स्वामी कादंबरी तील त्रुटी किंवा त्यातील ओढून आणलेले अलंकारिक पणा वैगरे हा हेतू होता असे वाटले सुरवातीला आणि त्यादृष्टीने तसे विश्लेषण अधिक असते तर बरे झाले असते उलट त्याचे रूपांतर "एका जातीवर आग पाखड करणे हा दिसला .. मिपावर हे चालते? हे म्हणजे मध्यन्तरी एक सिने दिग्दरक्षकाने " मराठी चित्रपट एकाच जातीचे लोक का घेतात " असे विधान केलं होते तसेच आहे असो यावर सचिन पाटील ने छान वक्तवय केलं आहे पहा https://www.youtube.com/watch?v=uVuMsV4MfYI https://www.youtube.com/watch?v=zbV0LfIPDQk

या आय डी ची कुंडली व प्रगल्भ विचार सरणी बघता कोणीतरी पुनर्जन्म घेऊन आलेला दिसतोय. वय दोन महीने तीन दिवसात ऐव्हढे ज्ञान,अद्भुत बाळक दिसतोय.

अहिरावण 23/08/2023 - 09:52
सर्व वाचक प्रतिसादकांचे पुनश्च अभिनंदन आणि आभार ! काही डाव्यांना मी उजवा वाटतो, तर काही उजव्यांना मी डावा. गंमतीशीर आहे एकंदरीत त्यामुळे मजा वाटते. आता मते मांडली की धुरळा उडणारच, मतमतांतरामुळेच भारतातील लोकशाही जिवंत आहे आणि ती अशीच रहावी. माणसाने व्यक्त होणे सोडू नये. भांडण मताशी असावे माणसाशी नको अशी भुमिका सर्वांची असली तर आनंद अधिक असतो. आपणा सर्वांना आरोग्यपुर्ण दिर्घायुष्य लाभावे ही मनोकामना. ही चर्चा आपण इथे थांबवु, परत केव्हातरी असेच व्यक्त होऊ ! धन्यवाद.

In reply to by अहिरावण

चौकस२१२ 23/08/2023 - 09:59
असेच व्यक्त होऊ ! डाव्यांना मी उजवा वाटतो ... अहिरावण डावे वा उजवे प्रश्न नाही .. काय आणि कसे मांडले आहे ... त्यामागे काही "अजेंडा" आहे का हे महत्वाचे तुमची दोन वाक्येच काय ते सांगून जातात "सावरकर बुळबुळीत विचारसरणीचे" आणि " छत्रपतींचं सैन्यात मुस्लिम नवहते का ! अजेंड्याच्या भरभक्कम भावना पोचल्या विषयांप्रमाणे दावे उजवे असते ... उदा पाश्चिमात्य लोकशाहीत बहुतेकदा डाव्यानां मत देणार असलो तरी काही बाबतीत उजवा आहे

In reply to by चौकस२१२

अहिरावण 23/08/2023 - 14:44
शोध पत्रकारीता अशी असते हे माहित नव्हते. तुमच्या भावना पोचल्या. तुमच्याबद्दल नितांत आदर आहेच आणि तो अजुन वाढवाल याची खात्री आहे. शुभेच्छा !

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 23/08/2023 - 19:05
काही डाव्यांना मी उजवा वाटतो, तर काही उजव्यांना मी डावा. मी पोलिसांना हात भट्टी वाला वाटतो आणि हात भट्टी वालयाला मी पोलीस वाटतो. माझा चेहराच असा आहे -- श्री राम नगरकर

अर्धवटराव 24/08/2023 - 03:11
स्वामी वाचल्याचा काय परिणाम झाला होता हे आठवत नाहि. नसेलच झाला बहुतेक :) पण कादंबरीच्या प्रस्तावनेत एका इंग्रज अधिकार्‍याचं टिपण दिल्याचं आठवतय... माधवराव पेशव्याच्या अकाली निधनामुळे पेशवाईचं आणि पर्यायाने मराठेशाहीचं प्रचंड नुकसान झालं असं काहिसं मत दिलं होतं साहेबाने. माधवराव काहि एक कर्तुत्ववान होता, व तदनुषंगाने देसाईंनी त्याला कादंबरीचा हिरो बनवलं असल्यास, आणि ललित साहित्य कलाकृती निर्माण केली असल्यास काहि गैर नाहि. बाकि मला स्वामी काहि विशेष आवडल्याचं आठवत नाहि. श्रीमान योगी मात्र आवडली होती. सावंतांचं मृत्युंजय थोडं रटाळ वाटलं होतं. युगांधर आणि छावा तर अजीबात आवडलं नव्हतं. राहिला मुद्दा ब्राह्मणांच्या मानसीकतेचा. ओसाड गावची पाटिलकी करण्याचं नशीबात आलं तर आणखी काय होणार. ज्या ब्राह्मणेतरांच्या हातुन सत्ता, संपत्ती वगैरे मटेरीयल गोष्टी निघुन गेल्या तरिही स्वभावतला पीळ गेला नाहि, त्यांची मानसीकता समजणं सोपं आहे. पण विद्वत्ता, धर्मदर्शन वगैरे अमूर्त बाबतीत हा पीळ किती खरा किती खोटा हे कळणं कठीण असतं.. स्वतःचं स्वतःला देखील. अनेकांची यात खुप ओढाताण झाली. जे सावरले त्यातल्या बर्‍याच जणांनी या ब्राह्मण्याला कायमचा रामराम ठोकला. काहिंनी त्यातल्या उदात्ततेवर आलेली काजळी साफ करण्याचा थोडाफार प्रयत्न केला. उर्वरीत भट आपापला गोंधळ आपापल्या परिने निस्तरण्याचा प्रयत्न करत असतात. मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या कृपेने एकजात सर्व ब्राह्मणांना तुतार्‍या टोचण्याचं काम इमाने इतबारे चालु आहेच. त्यामुळे सरमिसळी मानसीकतेचा एक वेगळाच ब्रह्मवृंद आकाराला येतोय असं दिसतं.

चौकस२१२ 24/08/2023 - 04:43
मीन व्हाईल, राजकीय पक्षांच्या कृपेने एकजात सर्व ब्राह्मणांना तुतार्‍या टोचण्याचं काम इमाने इतबारे चालु आहेच. हेच किती एकांगी आहे आणि हास्यस्पद आहे , महाराष्ट्रात तर असा कांगावा केला जातो कि बघ ते ३.५% कसे सगळे बळकावून बसले आहेत? हायला मग उरलेलले ९६.५% अशी गुलामगिरी काय सहन करतात असे काबुल केल्यासारखेच आहे ! कदाचित नाट्य कला क्षेत्र सोडलं आणि काही थोडे खाजगी वयसाय आणि लष्करच्या भाकऱ्या असे सामाजिक उद्योग या ठिकाणी काय ते ब्राह्मणांचे थोडे फार प्रभुत्व शिल्लक असेल ( एखांदा गडकरी किंवा फडणवीस म्हणजे काही अख्या ब्राह्मणांनी गिळंकृत केलाय असे होत नाही- संघ ब्राह्मणाचा म्हणणारे हे विसरतात कि ना मोदी ना योगी ना शहा ब्राह्माण ,, ) आणि flogging horse mhnun मारायला सोपे पानिपतात लाखो मराठे ( जात आणि समाज दोन्ही ) गेले पण त्यात भोसले राजे का नव्हेत पुढे हा प्रश्न विचारला तर? 2 पेव्श्वे मेले / शिन्दे मेले पन भोस्ले जख्मि झले असे कहि ऐक्लेले नाहि? या राजकीय आगलावू पनामुळेच जे काही उरले सुरले ब्राह्माण भारतात आहेत ते कारण नसताना कडवे बनत चालले आहेत... लै झाले,,, लै ऐकून घेतले " गेले बा......" म्हणतात

सौन्दर्य 25/08/2023 - 03:20
लेखकांनी स्वामी कादंबरीचे कारण किंवा ढाल पुढे करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला येथेच्छ दूषणे दिली आहेत. आता त्यात भर म्हणून शिवाजी महाराज, सावरकर ह्यांच्या विचारसरणीवर धुराळा उडवत आहे. स्वतःचे विचार मांडणे ह्यात गैर काहीच नाही तरी देखील इतिहासाला सोडून वाटेल ती विधाने करणे अत्यंत गैर आहे.

चौकस२१२ 25/08/2023 - 05:32
लेखकांनी स्वामी कादंबरीचे कारण किंवा ढाल पुढे करून संपूर्ण ब्राह्मण समाजाला येथेच्छ दूषणे दिली आहेत नक्किच मिपाचं संपादकांना राजकीय घडामोडी वरील चर्चा थांबव्यावयश्या वाटल्या पण अश्या जातीवाद वाढवणाऱ्या लेख लिहिलेले चालतो !
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या वयातल्या इतर कुणाही मुलाप्रमाणे मी सहावी किंवा सातवीत पहिल्यांदा स्वामी कादंबरी वाचली. मला हे कबुल करायला अजिबात संकोच वाटत नाही की ती कादंबरी त्यावेळी मला खुप आवडली होती. माधवरावांची एक प्रतिमा माझ्या मनात नोंदली गेली होती. कादंबरीच्या सुरवातीच्या पानावर असलेल्या इतिहासकारांच्या काही अभिप्रायामुळे शेंदराचा टीळा व्यवस्थित लागला होता. एकंदर ब्राह्मणी वातावरणात लहानपण गेल्यामुळे लावणी वगैरे अतिशय घाण प्रकार असतो त्याला टाळणे हेच उत्तम असा संस्कार असल्यामुळे कादंबरीतील माधवराव मधुन उठून जातात इत्यादी प्रसंग दाद देणारे आणि माधवराव या व्यक्तीबद्दल आदर वाढवणारे ठरले.

एकटा जीव सदाशिव

निओ ·

चलत मुसाफिर 13/07/2023 - 21:29
लेखातली भावना जाणवली. मी अनेक लहानमोठ्या शहरांत दीर्घकाळ वास्तव्य केले आहे. सुरुवातीला 'अनोळखी' असलेली ही शहरे कधी जिवाभावाची होऊन गेली हे कळले नाही. तसेच दूर निसर्गाच्या कुशीत असलेल्या गावसदृश ठिकाणीही प्रदीर्घ काळ कुटुंबाशिवाय राहिलो आहे. तेथील सहकारी हेच एकमेकांचे कुटुंब होते. एकटेपणा हा अवाढव्य महानगरातही राशीला येऊ शकतो. जीव लावणारे मित्रमैत्रिणी दुर्गम गावातही लाभू शकतात.

In reply to by चलत मुसाफिर

निओ 30/07/2023 - 21:36
खरं आहे, तिथले लोक, त्यांचं राहणीमान, तिथले खाद्यपदार्थ, स्थानिक वाहतूक व्यवस्था, प्रसिद्ध ठिकाणे आदी आठवणी मनावर कायमच्या कोरल्या जातात. घरी परत आले कि तिकडचे काही किस्से सांगून माफक भाव खाता येतो. त्या ठिकाणचं नाव निघालं कि जुनी ओळख असल्यासारखे वाटते. आपल्या सारखे एकल वनवासी जीव आपले मित्र बनून जातात.

शानबा५१२ 14/07/2023 - 11:20
प्रत्येक समाजात, प्रातांत, शहरात चांगल्या बरोबरच वाईट गोष्टी, माणसे व जागाही असतात. नविन जागि सर्व माहीती करत असताना त्या वाईट गोष्टींबद्दल ही माहिति करत रहावी असे सुचवेन.

In reply to by कर्नलतपस्वी

निओ 30/07/2023 - 21:45
खरं आहे, कुटूंबापासून दूर जाताना भरल्या ताटावरून उठल्यासारखा अनुभव येतो. नाईलाज असतो. एकटे पणा अवघड असतो. त्यातल्यात्यात सकारात्मक बाजूंचा विचार करून लेख लिहिला. तेवढंच बळ मिळतं.

किल्लेदार 17/07/2023 - 05:31
एकट्याने वास्तव्य करायचा बराच अनुभव घेऊन झालाय. कुठल्याही पाशात न अडकता मनाला वाटेल तसा दिवस घालवायचा. बऱ्याच वेळी तर अजिबात प्लॅन न करता...मी गमतीने याला शवासन म्हणतो. डोक्याला कुठल्याही प्रकारचा ताण न देता घालवलेला वेळ.

वामन देशमुख 17/07/2023 - 10:38
लिखाण आवडलं. आधी थोडसं घाईत सरसर वाचलं होतं तेव्हा solo travel बद्दल लिहिताय असं वाटलं होतं. आता पुन्हा एकदा वाचलं आणि प्रतिक्रिया ही वाचल्या मग हे लेखन म्हणजे कदाचित कामानिमित्त एखाद्या शहरात, गावात राहण्याबद्दल आहे हे लक्षात आलं. कामानिमित्त भारतातील शहरांमध्ये दोन दोन तीन महिने घरापासून दूर एकटं राहण्याचा अनुभव मला आहे. या लिखाणात व्यक्त केल्याप्रमाणे कधी विचार केला नव्हता.

In reply to by वामन देशमुख

वामन देशमुख 17/07/2023 - 10:40
माझा एक जिवलग मित्र मागच्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या गावी deputation वर गेला आहे त्याला या लिखाणाची लिंक पाठवीन.

In reply to by वामन देशमुख

निओ 30/07/2023 - 21:52
धन्यवाद सर. कामानिमित्त ७/८ महिन्यापासून पर राज्यात एकटा राहत आहे. एकटेपणात सकारात्मक विचारांची फार गरज असते.

चित्रगुप्त 20/07/2023 - 21:27
छान लिहीले आहे. हे वाचून भालचंद्र नेमाडे यांची बिढार - जरीला - झूल ही कादंबरी- मालिका आठवली. नव्वदच्या दशकात ती अनेकदा वाचली. त्यावेळी कामानिमित्त अनेकदा एकटाच विविध शहरात जाऊन रहात असे, त्या प्रवासात हमखास वाचायचो. वाचताना ही आपलीच कहाणी आहे, असे वाटायचे. (आताच्या तरूण पिढीला याबद्दल कितपत माहिती आहे हे ठाऊक नाही)

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 22/07/2023 - 13:38
+१ (कोसलाचा काही कंटाळवाणा भाग सोडला तर) कोसला + बिढार + जरीला + झूल हे कांदबरी चतुष्टय ह्रुदयात घर करून राहिले आहे. प्रत्येक कांदबरीच्या शेवटी उदास व्ह्यायला व्हायचं ... कित्येक दिवस हॅन्गओव्हर रहायचा ! क्वचितच वेगळ्या शहरात जाऊन एकटं फारस्ं अनुभवलं नाहीय .... पण हे चतुष्टय माझ्या हृदयाच्या खुप जवळचं आहे त्याचे कारण ही आपली कहाणी आहे, असं जाणवायं !

रामचंद्र 21/07/2023 - 00:42
आणि हूल? खरंच विषय असा आहे म्हटल्यावर नेमाड्यांचंच नाव आठवलं. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्या एक तर अशाच पार्श्वभूमीवरच्या आहेत आणि त्यातली तीव्र, मनस्वी संवेदना, पात्रांचे उत्कटतेने जगलेले दिवस आपण विसरूच शकत नाही. खासकरून जरीला.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 22/07/2023 - 13:41
बहुतेक कादंबऱ्या एक तर अशाच पार्श्वभूमीवरच्या आहेत आणि त्यातली तीव्र, मनस्वी संवेदना, पात्रांचे उत्कटतेने जगलेले दिवस आपण विसरूच शकत नाही. खासकरून जरीला.
अगदी +१ बाकी शून्य ही कांदबरी देखिल काही प्रमाणात असाच अनुभव देते. विशेषतः त्यातले इंजिनियरींगचे होस्टेलवरचे दिवस आजही आठवण करून दे दे ता त

निओ 30/07/2023 - 21:28
@कंजूस, @चलत मुसाफिर @शानबा५१२ @राजेंद्र मेहेंदळे @अथांग आकाश @कर्नलतपस्वी @किल्लेदार @वामन देशमुख @चित्रगुप्त @रामचंद्र सर्व मान्यवरांचे मनापासून आभार !

चलत मुसाफिर 13/07/2023 - 21:29
लेखातली भावना जाणवली. मी अनेक लहानमोठ्या शहरांत दीर्घकाळ वास्तव्य केले आहे. सुरुवातीला 'अनोळखी' असलेली ही शहरे कधी जिवाभावाची होऊन गेली हे कळले नाही. तसेच दूर निसर्गाच्या कुशीत असलेल्या गावसदृश ठिकाणीही प्रदीर्घ काळ कुटुंबाशिवाय राहिलो आहे. तेथील सहकारी हेच एकमेकांचे कुटुंब होते. एकटेपणा हा अवाढव्य महानगरातही राशीला येऊ शकतो. जीव लावणारे मित्रमैत्रिणी दुर्गम गावातही लाभू शकतात.

In reply to by चलत मुसाफिर

निओ 30/07/2023 - 21:36
खरं आहे, तिथले लोक, त्यांचं राहणीमान, तिथले खाद्यपदार्थ, स्थानिक वाहतूक व्यवस्था, प्रसिद्ध ठिकाणे आदी आठवणी मनावर कायमच्या कोरल्या जातात. घरी परत आले कि तिकडचे काही किस्से सांगून माफक भाव खाता येतो. त्या ठिकाणचं नाव निघालं कि जुनी ओळख असल्यासारखे वाटते. आपल्या सारखे एकल वनवासी जीव आपले मित्र बनून जातात.

शानबा५१२ 14/07/2023 - 11:20
प्रत्येक समाजात, प्रातांत, शहरात चांगल्या बरोबरच वाईट गोष्टी, माणसे व जागाही असतात. नविन जागि सर्व माहीती करत असताना त्या वाईट गोष्टींबद्दल ही माहिति करत रहावी असे सुचवेन.

In reply to by कर्नलतपस्वी

निओ 30/07/2023 - 21:45
खरं आहे, कुटूंबापासून दूर जाताना भरल्या ताटावरून उठल्यासारखा अनुभव येतो. नाईलाज असतो. एकटे पणा अवघड असतो. त्यातल्यात्यात सकारात्मक बाजूंचा विचार करून लेख लिहिला. तेवढंच बळ मिळतं.

किल्लेदार 17/07/2023 - 05:31
एकट्याने वास्तव्य करायचा बराच अनुभव घेऊन झालाय. कुठल्याही पाशात न अडकता मनाला वाटेल तसा दिवस घालवायचा. बऱ्याच वेळी तर अजिबात प्लॅन न करता...मी गमतीने याला शवासन म्हणतो. डोक्याला कुठल्याही प्रकारचा ताण न देता घालवलेला वेळ.

वामन देशमुख 17/07/2023 - 10:38
लिखाण आवडलं. आधी थोडसं घाईत सरसर वाचलं होतं तेव्हा solo travel बद्दल लिहिताय असं वाटलं होतं. आता पुन्हा एकदा वाचलं आणि प्रतिक्रिया ही वाचल्या मग हे लेखन म्हणजे कदाचित कामानिमित्त एखाद्या शहरात, गावात राहण्याबद्दल आहे हे लक्षात आलं. कामानिमित्त भारतातील शहरांमध्ये दोन दोन तीन महिने घरापासून दूर एकटं राहण्याचा अनुभव मला आहे. या लिखाणात व्यक्त केल्याप्रमाणे कधी विचार केला नव्हता.

In reply to by वामन देशमुख

वामन देशमुख 17/07/2023 - 10:40
माझा एक जिवलग मित्र मागच्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या गावी deputation वर गेला आहे त्याला या लिखाणाची लिंक पाठवीन.

In reply to by वामन देशमुख

निओ 30/07/2023 - 21:52
धन्यवाद सर. कामानिमित्त ७/८ महिन्यापासून पर राज्यात एकटा राहत आहे. एकटेपणात सकारात्मक विचारांची फार गरज असते.

चित्रगुप्त 20/07/2023 - 21:27
छान लिहीले आहे. हे वाचून भालचंद्र नेमाडे यांची बिढार - जरीला - झूल ही कादंबरी- मालिका आठवली. नव्वदच्या दशकात ती अनेकदा वाचली. त्यावेळी कामानिमित्त अनेकदा एकटाच विविध शहरात जाऊन रहात असे, त्या प्रवासात हमखास वाचायचो. वाचताना ही आपलीच कहाणी आहे, असे वाटायचे. (आताच्या तरूण पिढीला याबद्दल कितपत माहिती आहे हे ठाऊक नाही)

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 22/07/2023 - 13:38
+१ (कोसलाचा काही कंटाळवाणा भाग सोडला तर) कोसला + बिढार + जरीला + झूल हे कांदबरी चतुष्टय ह्रुदयात घर करून राहिले आहे. प्रत्येक कांदबरीच्या शेवटी उदास व्ह्यायला व्हायचं ... कित्येक दिवस हॅन्गओव्हर रहायचा ! क्वचितच वेगळ्या शहरात जाऊन एकटं फारस्ं अनुभवलं नाहीय .... पण हे चतुष्टय माझ्या हृदयाच्या खुप जवळचं आहे त्याचे कारण ही आपली कहाणी आहे, असं जाणवायं !

रामचंद्र 21/07/2023 - 00:42
आणि हूल? खरंच विषय असा आहे म्हटल्यावर नेमाड्यांचंच नाव आठवलं. त्यांच्या बहुतेक कादंबऱ्या एक तर अशाच पार्श्वभूमीवरच्या आहेत आणि त्यातली तीव्र, मनस्वी संवेदना, पात्रांचे उत्कटतेने जगलेले दिवस आपण विसरूच शकत नाही. खासकरून जरीला.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 22/07/2023 - 13:41
बहुतेक कादंबऱ्या एक तर अशाच पार्श्वभूमीवरच्या आहेत आणि त्यातली तीव्र, मनस्वी संवेदना, पात्रांचे उत्कटतेने जगलेले दिवस आपण विसरूच शकत नाही. खासकरून जरीला.
अगदी +१ बाकी शून्य ही कांदबरी देखिल काही प्रमाणात असाच अनुभव देते. विशेषतः त्यातले इंजिनियरींगचे होस्टेलवरचे दिवस आजही आठवण करून दे दे ता त

निओ 30/07/2023 - 21:28
@कंजूस, @चलत मुसाफिर @शानबा५१२ @राजेंद्र मेहेंदळे @अथांग आकाश @कर्नलतपस्वी @किल्लेदार @वामन देशमुख @चित्रगुप्त @रामचंद्र सर्व मान्यवरांचे मनापासून आभार !
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको. तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते. वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही.

आणीबाणी : लुटमारीचे 'उद्योग' !

सुधीर मुतालीक ·

कंजूस 26/06/2023 - 04:33
ते वाचल्याचं आठवतंय. आणि मग कॉंग्रेसचा धसकाच घेतला. लोकशाही हा शब्द पक्षांपुरता वेगळ्या अर्थाने घ्यायचा. 'एकाच कुटुंबातील लोकांनी चालवलेला पक्ष.'(अमेरिकेतल्या लिबरल, रिपब्लिकनचे माहीत नाही.)

The Washington Post या दैनिकाने भारतात सुरु असणाऱ्या लुटमारीविषयी खरमरीत लिहिले आहे. " The public believe a vast swindle is going on. Sanjay ( Gandhi ) calls up secreteries and says give the contract to so and so."
Washington Post आजकाल खरमरीत भाषेत संपादकीय छापते, भारतात "हिंदू नेशनलिस्ट भाजप सरकार" ने अमुक केले अन् तमुक केले इत्यादी. त्यांची प्रायोरिटी ही सत्य मांडणे नसून त्यांना किंवा त्यांच्या व्यवस्थेला हवे तसे जागतिक चित्र रंगवून अमेरिकन जनतेला पेश करणे होय. १९ आणीबाणी वेळी वॉशिंग्टन पोस्ट काहीही छापू शकत होते कारण नुकतेच काही वर्षे अगोदर १९७१ चे युद्ध झाले होते. निक्सन अन् सातव्या आरमाराच्या नाकावर टिच्चून झाले होते..... आणीबाणी नो डाऊट भयानक होती, पण आपण तिच्या नेमक्या भागावर focus करण्याच्या ऐवजी संगोवांगी वर करतो. मला वाटते आणीबाणीची सगळ्यात मोठी पनौती म्हणजे बेचाळीसावी घटना दुरुस्ती (42 constitutional amendment). मिनी constitution म्हणवली गेलेली ही घटना दुरुस्ती भयानक होती.

In reply to by इपित्तर इतिहासकार

वाशिंग्टन पोस्ट मधला बातमी संबधातला हा लेख नाही. तो निव्वळ संदर्भ आहे. शिवाय त्यांच्या बातम्या पूर्वग्रहदूषित आहेत / होत्या असे जरी गृहित धरले तरी मी ONGC चा किस्सा लिहिला आहे त्याच्यावर निक्सनचा काहीच कंट्रोल नव्हता ना हरियाणाने दिलेल्या रोड रोलर्सच्या पर्चेस ऑर्डरवर.  घटना दुरुस्ती वगैरे हिमनगाचे टोक असावे इतक्या भानगडी त्या आणीबाणीमध्ये बाईंनी करून ठेवल्यात. मी दोन्ही उल्लेख केले आहेत : १) साधारण अप्रकाशित बाबींवर हा लेख आहे, ज्याची चर्चा फारशी होत नाही २) किती लिहिणार ? तुम्ही किती वाचणार ? त्यामुळे शब्दमर्यादा आणि अटेन्शन स्पॅनची काळजी घेऊन एखाद दुसराच किस्सा लिहिला आहे.  आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 

साहना 28/06/2023 - 10:53
गोवा भारता सोबत स्वतंत्र नाही झाला हे गोमंतकियांचे नशीब आहे. गोव्यांत युरोप सोबत फ्री ट्रेड असल्याने त्या काळी मर्सडिज, बीटल इत्यादी गाड्या सहज उपलब्ध होत्या. साधारण मध्यमवर्गीय सरकारी नोकराला गाडी परवडत असे. आमचे एक नातलग गोव्यांत होते आणि माझ्या आईने सर्वप्रथम त्यांच्या घरी पोर्तुगाल हुन आणलेले वॉशिंग मशीन पहिले आणि ती थक्क झाली होती.

In reply to by साहना

चौकस२१२ 29/06/2023 - 08:02
अजिबात असहमत... फारच उथल विचार, मग तसे तर ब्रिटिश इंडिया च राहिला असता तर अजून प्रगती झाली असती असे म्हणण्यासारखे आहे शेवटी स्वत्रंतता हि स्वतंत्रता असते ! मग त्यासाठी काही गोष्टीनं मूकावे लागते एवढे आपल्याला लक्षात येत असावे बहुतेक तुम्ही ज्या खुलया आर्थिक धोरणाचे ( गोव्यात असलेले) समर्थन करीत आहात ते तसे देश्भर असते तर सुरवातीचं काळात जी देशभर काही संस्थांची उभारणी झाली ती झाली नसती .. लांब पल्याचं दृष्टीने सुरवातीला तरी समाजवादी पद्धतीचे वाटणारे धोरण हे देश उभारणीला मदतीचेच झाले ( पुढे त्या नेहरूंविय धोरणाचा अतिरेक झाला हे खरे ) एक गोवेकर म्हणून तुम्हाला गोव्या बद्दल प्रेम असणे साहजिक आहे पण देशच विचार केलं तर वॉशिंग मशीन उपलब्ध होते म्हणून पारतंत्र्य ओके म्हणणे हे फार उथळ झाले

In reply to by चौकस२१२

साहना 29/06/2023 - 10:30
> समर्थन करीत आहात ते तसे देश्भर असते तर सुरवातीचं काळात जी देशभर काही संस्थांची उभारणी झाली ती झाली नसती उलट आहे. आणखीन जास्त आणि दर्जेदार संस्थांची उभारणी झाली असती. आणि नक्की कसल्या संस्था उभ्या राहिल्या ? भारत अजून नायजेरिया चीच बरोबरी करत आहे. उलट प्रचंड प्रमाणांत अधोगती झाली. नशीब १९९० मध्ये इतर देशांनी भारताला मुक्त (थोडीफार) आर्थिक व्यवस्था अंगिकारण्यास भाग पाडले नाहीतर सध्या परिस्थिती पाकिस्तान सारखी असती. स्वातंत्र्य ह्याचा नक्की अर्थ काय ? सध्या भारतीय लोक अमेरिका आणि ब्रिटिश दूतावासापुढे रंग लावून उभे आहेत ! हा त्यांचा विजय आणि आपल्या तथाकथित स्वातंत्र्याचा पराभव नाही का ? > वॉशिंग मशीन उपलब्ध होते म्हणून पारतंत्र्य ओके चांगल्या लिविंग साठी लोक पारतंत्र्य काय देश सोडून जाऊन अत्यंत गर्वाने ब्रिटिश , अमेरिकन, फ्रेंच, ऑस्टेलियन नागरिकत्व घेत आहेत.

In reply to by साहना

चौकस२१२ 29/06/2023 - 11:26
उत्पादन क्षेत्राबद्दल बोलूयात कारण त्यात अनुभ व आहे म्हणून - तुम्ही म्हणताय ते नुसते तयार आयात करणे ( गोव्यात सहज ती उतपादने मिलाळायची तो काळ ) , सगळे ब्रँड परदेशी असते स्थानिक निदान सुरु तरी झाले - हेवी इंडस्ट्री : आणि डिफेन्स : यावर स्थानिक स्वातंत्र्य असणे हे किती महत्वाचे आहे त्याची कल्पना आहे का? भेल / हेच एम टी /. इसरो भारतात ४ ऍडव्हान्स टूल रम ट्रेनिंग सेन्टर निर्माण झाले, २) चांगलया आणि सहज राहणीमानासाठी परदेशी जाणे आणि त्या त्या देशात स्वतःचे उद्योग विकसित होणे याचाच घोळ घालू नका कृपया ... आज रहिवाशी देशांत सर्वात जास्त कोळसा आणि खनिजे बनतात पण "value ADDITION " काही नाही पूर्ण खुली आयात धोरण भारतासारखाय मोठ्या देशाने आणि ते सुधा अगदी सुरवातीला देश नवीन स्वातंत्र्य झालेला असताना हे पायावर धोंडा पडून घेण्यासारखे होते अर्थात त्याचं उलटे जे केलं गेले त्याचाच अतिरेक झाला हे हि मी मेनी केलं आहे पण सरसकट गोवा पोर्तुगाल पद्धतीकट राहिले असते तर जास्त बरे हे फार टोकच झाले "स्वातंत्र्य ह्याचा नक्की अर्थ काय ? सध्या भारतीय लोक अमेरिका आणि ब्रिटिश दूतावासापुढे रंग लावून उभे आहेत ! हा त्यांचा विजय आणि आपल्या तथाकथित स्वातंत्र्याचा पराभव नाही का ? " उगाच वादासाठी ,,, भारतात भरपूर हुशार लोक आहेत, थोडी गेल्याने बिघडत नाही ..

In reply to by कर्नलतपस्वी

कैक भारतीय राज्यांमधून मधून तरुणाई सेंट्रल अमेरिकेत ग्वाटेमाला, होंडुरास, बेलीझ, पनामा वगैरे मध्ये जाऊन तिथून अतिशय खतरनाक अशी जंगले पार करून आधी मेक्सिको आणि मग अमेरिकेत जायसाठी मरमर करतायत....

In reply to by इपित्तर इतिहासकार

अहिरावण 29/06/2023 - 13:37
जाऊ द्या हो... उद्या बाजी पलटली तर पहीले हेच वाचवा वाचवा करत येतील.... सध्या ओकत आहेत भारताबद्दल ... ओकु द्या... आईबापसासुसासरेबायको यांच्यावरचा राग निचरा होत असेल होउ द्या आपण म्हणु.. गेट वेल सुन.. हाय काय नाय काय

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 29/06/2023 - 15:19
अन् जाणारे सगळे हुशार असतातच असेही नाही ! हो मि हि .. पोटार्थी तर सगळेच , फुरसुंगीघून पुण्यात येणारा काय कि पुण्यातून टोरांटो ला जाणारा काय मूळ गावाला / देशाला " गुरुदक्षिणा देणे" एवढे केले कि झाले

In reply to by चौकस२१२

साहना 29/06/2023 - 13:35
> तुम्ही म्हणताय ते नुसते तयार आयात करणे ( गोव्यात सहज ती उतपादने मिलाळायची तो काळ ) , सगळे ब्रँड परदेशी असते स्थानिक निदान सुरु तरी झाले ब्रँड कुठले ह्यावर काहीही फरक पडत नाही. खटारा अँबॅसिडर आणि त्याहून खटारा बजाज स्कुटर (जी काँग्रेसी परिवाराचा आणखीन एक अपराध होता) ह्या निव्वळ पैश्यांचा अपव्यय होता. इतकी वर्षे सरकारी मोनोपॉली द्वारे ह्यांनी भारतीयांचा पैसा चोरून त्यांना निकृष्ट दर्जाची सेवा दिली. आणि आज कुठे आहेत ह्या ? सगळीकडे सुझुकी, होंडा आणि टोयोटा. ज्या स्वस्त आहे, चांगल्या आहेत आणि रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतात. सुझुकी ह्यांचा प्रचंड अपमान काँग्रेस सरकारने केला होता त्यांत मी घुसत नाही. भारत सरकारचा धोरणांनी भोपाळ गॅस दुर्घटना सारख्या दुर्घटना घडून लोकांचा जीव सुद्धा कसा गेला ह्यावर मी अत्यंत विस्तृत लेखन ह्या आधी इथे केलेले आहे. भारतीय सरकारचे पूर्णतः चुकीचे आर्थिक धोरण ह्यामुळे भारतीय तरुणांना सध्या भिकेचा कटोरा घेऊन कतार, सौदी सारख्या देशांत कामे करावी लागतात. > भेल / हेच एम टी /. इसरो भेल/ हेच एम टी ह्यांनी नक्की काय दिवे लावले ? आणि मुक्त अर्थव्यवस्थेत भारतांत कित्येक अश्या कंपन्या निर्माण झाल्या असत्या. इस्रो त्यातल्या त्यांत थोडीफार कार्यक्षम आहे पण तो झाला अपवाद. त्यांत सुद्धा चुकीचं धोरणाने इसरो जास्त प्रगती करू शकली नाही. > पूर्ण खुली आयात धोरण भारतासारखाय मोठ्या देशाने आणि ते सुधा अगदी सुरवातीला देश नवीन स्वातंत्र्य झालेला असताना हे पायावर धोंडा पडून घेण्यासारखे होते आणि ह्या समाजवादी धोरणाने काय आता आम्ही भारतीयांनी गळ्यांत मणिहार घालून घेतला आहे का ? अजून सुद्धा भारतीयांची तुलना फार तर नायजेरिआ शी होऊ शकते. > पण सरसकट गोवा पोर्तुगाल पद्धतीकट राहिले असते तर जास्त बरे हे फार टोकच झाले पोर्तुगीज कायदे भारतीय कायद्यापेक्षा कैकपटीने चांगले होते आणि सध्या ते गोव्यांत लागू असल्याने ते आपण पाहू सुद्धा शकतो. बहुतेक गोमंतकीय सार्वजनिक जमीन हि स्थानिक कोमुनिदाद संस्थांच्या मालकीची आहे. हिंदू मंदिरे पूर्णतः खाजगी मालमत्ता आहेत आणि युनिफॉर्म सिविल कोड आहे. पूर्णतः जास्त प्रगत युरोपियन कायद्या मुळे हे शक्य झाले. नाहीतर UCC सारखया विषयावर इतर भारतांत झिम्मा सुरु आहे आणि हिंदू मंदिरे तर कधीच सेकुलर झाली आहेत.

In reply to by साहना

प्रचेतस 29/06/2023 - 14:05
पोर्तुगीज कायदे भारतीय कायद्यापेक्षा कैकपटीने चांगले होते आणि सध्या ते गोव्यांत लागू असल्याने ते आपण पाहू सुद्धा शकतो. बहुतेक गोमंतकीय सार्वजनिक जमीन हि स्थानिक कोमुनिदाद संस्थांच्या मालकीची आहे.
गोवा धर्मन्यायधिकरणावरील प्रियोळकरांचे पुस्तक वाचलेत का?

In reply to by प्रचेतस

गवि 29/06/2023 - 14:13
गोवा धर्मन्यायधिकरणावरील प्रियोळकरांचे पुस्तक वाचलेत का?
जरा तरी उलगडून सांगा हो. थोडे तरी चार शब्द पार्श्वभूमी, की नेमके काय आहे. आता लगेच ते पुस्तक कुठे जाऊन वाचणार या धाग्याचे वाचक..?

In reply to by प्रचेतस

गवि 29/06/2023 - 14:49
थोडे कष्ट? ३२० पानी पुस्तकाची लिंक देऊन म्हणता? वरील प्रतिसाद मलिकेशी सुसंगत त्या पुस्तकात काय आहे याबद्दल चार ओळी द्याव्या असा अर्थ होता.

In reply to by गवि

Trump 29/06/2023 - 15:06
वरील प्रतिसाद मलिकेशी सुसंगत त्या पुस्तकात काय आहे याबद्दल चार ओळी द्याव्या असा अर्थ होता.
+१ बाकीच्या दणकादणकीत सहभागी होण्यात रस नाही. पण पुस्तकाबद्दल उत्सुकता आहे.

In reply to by गवि

प्रचेतस 29/06/2023 - 16:09
हा जगभरातील इन्क्विझिशनचा आणि गोव्यातील इन्क्विझिशनचा इतिहास आहे. यात डॉ. डेलॉन यांना गोव्यात इन्क्विझिशनच्या अधिकाऱ्यांनी कसे खोटेनाटे आरोप ठेऊन अटक केली आणि नंतर त्याचे जे हाल झाले त्याबद्दल लिहिले गेले आहे. डॉ डेलॉनने हे सगळे त्याच्या आत्मवृत्तात लिहून जगासमोर आणल्यावर या भयंकर संस्थेला ओहोटी लागली. भारतात सेंट झेव्हियरने इन्क्विझिशनला आमंत्रण दिले.. एका पत्रात तो काय म्हणतो ते पाहा.. ...अखेरीस मी त्यांना योग्य पद्धतीने बाप्तिस्मा दिला आणि त्यांच्या हातात त्यांच्या नवीन नावाची चिठ्ठी ठेवली. मग त्यांना घरी जाऊन त्यांच्या बायका पोरांना घेऊन येण्यास सांगितले. सगळ्यांना बाटवून झाल्यावर मी त्यांना त्यांची देवळे उद्ध्वस्त करण्याचा हुकूम दिला. ज्या माणसांनी त्यांचे देव प्राचीन काळापासून पुजले त्यांच्याच हातून त्या मूर्तींच्या ठिकऱ्या उडताना पाहून माझ्या मनाला किती हर्ष होत होता याची तुम्हाला कल्पना यायची नाही... - सेंट झेव्हियर एका पत्रात. आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी हे पुस्तक मराठीत देखील आणले आहे आणि ते येथे उपलब्ध आहे.

In reply to by प्रचेतस

साहना 29/06/2023 - 19:55
फक्त वाचलेच नाही तर विस्मृतीत गेलेले ते पुस्तक मीच voice ऑफ इंडिया कडून मिळवून त्याच्या प्रति बनवून विविध लायब्रेरीत वगैरे पाठवले. हे पुस्तक नंतर शेफाली वैद्य आणि इतर सोशल मीडिया वाल्यानी जास्त प्रसिद्ध केले. मूळ प्रत माझ्याकडे अजून आहे. ज्यांना ठाऊक नाही त्यांच्या साठी : अनंत प्रियोळकर ह्यांनी Goa Inquisition वर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले होते. ह्यांत त्यांनी कॅथॉलिक चर्च आणि पोर्तुगीज सत्ताधार्यांनी जे धार्मिक अत्याचार गोमंतकीय हिंदूंवर केले त्याचा इतिहास अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे. अर्धवट ज्ञान असलेल्या लोकांसाठी : Inquisition हा काळ साधारण १५००-१७०० चा. १९११ मध्ये कॅथॉलिक चर्च च्या जुलुमाला विटून पोर्तुगाल मध्ये क्रांती झाली आणि "फर्स्ट रिपब्लिक" ची निर्मिती झाली. चर्च आणि सरकार वेगळे झाले आणि पोर्तुगीज लोक अत्यंत वेगाने कॅथॉलिक चर्च विरोधी झाले. ह्याच काळांत पोर्तुगीज अभ्यासकांनी मेहनत घेऊन कॅथॉलिक चर्च च्या गुन्ह्याचा इतिहास लिहिला. गोव्यांतील चर्च च्या हडप केलेल्या जमिनी लोकांना परत दिल्या, हिंदू मंदिरे आणि धर्माला सामान अधिकार दिले आणि सर्व नागरिकांना समान अधिकार दिला. युनिफॉर्म सिविल कॉड वगैरे गोष्टी ह्याच कालावधीतल्या. ह्या काळांतील पोर्तुगीज कायदे हे फ्रेंच राज्यक्रांती, युरोपिअन रेनेसाँस इत्यादी गोष्टींनी प्रभावित झाले होते आणि "क्लासिकल लिबरल" पद्धतीचे होते. हा कालावधी १९२६ पर्यंत चालला, त्यानंतर सालाझार ह्यांची हुकूमशाही आली आणि त्यानंतर डाव्या लोकांचे अहिसंक क्रांतीचे सरकार. पण १९११ मध्ये चर्च ची जी हकालपट्टी झाली ती मात्र इतर सर्वानीच कायम ठेवली. १९११ नंतर चा पोर्तुगीज काळ आणि १९४७ नंतर चे भारत सरकार ह्यांत फक्त स्वातंत्र्य आणि जुलुमाच्या दृष्टीकोणातून पहिले तर भारत सरकार कित्येधिक पटीने जास्त जाचक, अकार्यक्षम आणि लोकांच्या स्वातंत्र्य विरोधी होते ह्यांत शंकाच नाही. १९४७ नंतर गोव्याला स्वतंत्र करण्यात इतका काळ गेला ह्यांतच त्यांची अकार्यक्षमता दिसून येते. टीप: ह्याचा अर्थ गोमंतकियानी स्वातंत्र्याचा हट्ट धरणे चुकीचा होता असे अजिबात नाही. नैतिक दृष्ट्या गोमंतभूमीचे स्वातंत्र्य त्यांचा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही होते. टीप : मी गोमंतकीय नाही.

In reply to by साहना

चौकस२१२ 29/06/2023 - 15:09
भेल/ हेच एम टी ह्यांनी नक्की काय दिवे लावले ? तुम्हाला उत्पादन क्षेत्रातील काय अनुभव आहे हो? मशीन टूल चे तंत्रन्यान , जड यंत्रसामुग्री हिंदुस्थान अएरॉनॉटिकस राष्ट्रीय डिझाईन संस्था मी हे मान्य केले आहे कि सगळं सरकारी या धोरणाचा अतिरेक झाला / शिक्षण धोरण चुकले, नाही कुठे म्हणतोय.. पण महिंद्रा आणि टाटा पण उभे राहिले पण तुम्हाला जर मुद्डमून टोचणारी टोकाची भाषा वापरून लोकांनां दुःवययचे असेल तर करा तसे ( गोवयाचे नशीब कि महाराष्ट्रात विलीन नाही झाला वैगरे ) पण तुम्ही मूळ प्रश्न कि जो होता इतके खुले आर्थिक धोरण सुरवातीला तरी परवडणार होते का याचे उत्तर देतच नाहीत जाऊद्या मी हि खुल्या अर्थवयवस्थेचा समर्थक आहे पण तसे समर्थन करताना काही जुनी सरकारी घोरणे सरसकट चुकीची होती हे म्हणणे टोकाचे वाटते दुसरे असे कि गोव्या सारखाय लहान प्रदेशात जे करणे शकय आहे ते सगळ्या भारतात करणे शक्य होते का?

In reply to by चौकस२१२

जाऊद्या मी हि खुल्या अर्थवयवस्थेचा समर्थक आहे पण तसे समर्थन करताना काही जुनी सरकारी घोरणे सरसकट चुकीची होती हे म्हणणे टोकाचे वाटते
तुम्ही खुल्या अन् बंदिस्त अश्या दोन्ही नाही तर मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थक आहात अन् ते प्रॅक्टिकल आहे अगदी. पूर्णपणे खुली अर्थव्यवस्था आज अमेरिकेची सुद्धा नाहीये. ती पण मिश्रच आहे, वेलफेअर स्टेट ही सेंट्रल संकल्पना असते कुठल्याही राजकीय विचारात. त्यामुळे अगदी अमेरिका ते चीन कुठलीच अर्थव्यवस्था पूर्णपणे मुक्त अन् पूर्णपणे बंद नाहीच. नॉर्थ कोरिया हा एकमेव कुप्रसिद्ध अपवाद सोडता पूर्णपणे बंद अर्थव्यवस्था नसेलच जगात, असल्यास कोणीही सांगावी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

चौकस२१२ 30/06/2023 - 06:07
सहमत , आत्तापर्यंत पाहिलेली - पूर्ण खुल्याच्या जवळपास = युनाइटेड स्टेट्स - मिश्र पण खुल्याच्या जास्त जवळ = सिंगापोर - मिश्र = ऑस्ट्रेलिया - मिश्र पण जर थोड्या डावीकडे वळणारी = न्यु झीलंड - आखाती देश , वर्णन करणे अवघड वाटते ..

In reply to by साहना

चौकस२१२ 30/06/2023 - 06:19
कोणत्या? क्षेत्रांत? आणि तुम्ही २०२३ जागतिकर्णमुळे भारतात परदेशी मालकीचे ब्रँड जास्त आहेत याचा आणि मुळात भारतात उत्पादन आणि त्यासाठी लागणाऱ्रे मनुष्य बळ तयार व्हावे यासाठीचे सुरवातीचे प्रयत्न याचे मिश्रण का करताय? अर्थात आजही भारत बऱ्याच बाबतीत पाश्चिमात्यांबरोबर तुलना करू शकणार नाही खरे पण म्हणून काहीच केले नाही , ब्रिटिश असते तर बरे वैगरे हे काय ? छोट्या गोव्यात त्याकाळी परदेशी उतपादने सहज मिळत म्हणून पोर्तुगीज कायदे बरे वैगरे काय ! आज चीन +१ यासाठी भारताकडे बघितले जाती त्याचा जास्त फायदा भारताने उठवावा जास्त VALUE ADDITION करावे आणि त्यासाठी सध्याचं सरकारची धोरणे, मध्ये मनमोहन सरकारनी उचललेली पावले आणि काही मूलभूत नेहरू सरकाने केलेले काम या सर्वांचा योग्य असा maaन ठेवायला काय हरकत आहे ? भारत "मेक इन इंडिया फॉर इंडियन्स अँड मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड" या दोन्ही साठी माझया तरी शुभेच्छा आज २००+ मी,इलिअन चा इंडोनेशिया स्वतःची गाडी बनवू शकत नाही तिथे भारतात टाटा आणि महिंद्रा बनवत आहेत गोदरेज आहे हे उल्लेखनीय आहे , असे अनेक गोदरेज आणि किर्लोस्कर निर्माण व्हावो हीच इच्छा

In reply to by साहना

ह्या सर्व क्षेत्रांत भारत मागासलेला आहे ! खूपच म्हणजे खूपच मागे आहे. हो कि नाही ?
नाही बुआ मला असे वाटत नाही.

Trump 28/06/2023 - 11:37
गोवा भारता सोबत स्वतंत्र नाही झाला हे गोमंतकियांचे नशीब आहे.
श्री साहना, तुमचे विचार वेगळे असले तरी हे अती आहे. तुम्ही भारतीयांनी केलेल्या संघर्षाची तुलना मर्सडिज, बीटल,वॉशिंग मशीन यांच्याबरोबर करत आहात.

In reply to by Trump

साहना 28/06/2023 - 12:21
गोवा १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असता तर इतर भारताप्रमाणेच दळिद्री आर्थिक धोरण तसेच इतर कायदे तिथे लागू झाले असते आणि कोंकण प्रांताप्रमाणेच हा प्रदेश दळिद्री राहिला असता. गोवा स्वतंत्र झाला ह्याबद्दल मी दुःख व्यक्त करत नाही, परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य हा गोमंतकीय जनतेचा अधिकार होताच फक्त पोर्तुगीज आर्थिक धोरण (आणि इतर कायदे त्या काही दशकांत) भारतापेक्षा पेक्षा खूप पटीने चांगले असल्याने गोमंतकीय जनतेचा फायदा झाला आणि अजून सुद्धा होत आहे.

In reply to by साहना

Trump 28/06/2023 - 14:20
श्री सावरकर, श्री गांधी, श्री बाबु गेणु इ. यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाला मिळावे म्हणुन स्वदेशीचा नारा दिला, परदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यास प्रोत्साहन दिले, परदेशी कपड्यांची होळी केली. त्यामुळे तुमचा प्रतिसाद योग्य वाटत नाही.

In reply to by Trump

साहना 29/06/2023 - 02:00
त्या काली परदेशी वस्तूंची होळी का करायची ह्याला एक तात्विक बैठक होती आणि एक पार्श्वभूमी होती. ती हल्लीच्या काली अप्रस्तुत आहे.

In reply to by साहना

Trump 29/06/2023 - 11:11
त्या काली परदेशी वस्तूंची होळी का करायची ह्याला एक तात्विक बैठक होती आणि एक पार्श्वभूमी होती. ती हल्लीच्या काली अप्रस्तुत आहे.
तो विषय हल्लीचा नसुन १९४७ आणि १९६१ च्या दरम्यानचा आहे.

In reply to by Trump

साहना 29/06/2023 - 13:17
> श्री सावरकर, श्री गांधी, श्री बाबु गेणु इ. यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाला मिळावे म्हणुन स्वदेशीचा नारा दिला, परदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यास प्रोत्साहन दिले, परदेशी कपड्यांची होळी केली हे सर्व ह्या १९४७ नंतरच्या कालावधीत घडलं ?

In reply to by साहना

Trump 29/06/2023 - 15:43
श्री साहना, तुमचा मुळ प्रतिसाद आणि त्याचे समर्थन मला चुकीचे वाटते. पण मी सदर चर्चेतुन तुर्त रजा घेतो.

पण, आणीबाणी लागलेली होती तेव्हा/ त्यादरम्यान गोवा खास केंद्रशासित प्रदेश होता की ! १९६१ पासून थेट १९८७ पर्यंत. म्हणजे आणीबाणी संबंधी जे काही निर्णय अन् (साधक बाधक) निती असतील त्या केंद्रशासित प्रदेशाच्या स्टेटस मुळे गोव्यात.... ह्यात गोवा महाराष्ट्र विलानिकरण, स्वातंत्र्याच्या वेळच्या आर्थिक पॉलिसी इत्यादींचा संबंध काय ?

In reply to by इपित्तर इतिहासकार

साहना 29/06/2023 - 13:23
आणखी काय चर्चा करायची ? आणीबाणीनंतर इंदिरा गांधी ह्यांचा पराभव झाला आणि जे नवीन लोक सत्तेवर आले ते आणखीन महामूर्ख निघाले. एवढे महामूर्ख कि कालचा गोंधळ बरा होता म्हणून लोकांनी इंदिरा गांधी ह्यांना पुन्हा निवडून आणले ! आणि त्यापुढे बरीच वर्षे बिगर काँग्रेसी मंडळींचा धसकाच जनतेने घेतला. थोडक्यांत भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील अशी दाट शक्यता आहे.

In reply to by साहना

अहिरावण 29/06/2023 - 13:34
>>>भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील अशी दाट शक्यता आहे. हा हा हा

In reply to by साहना

भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील =)) सहमत. -दिलीप बिरुटे

परदेशी राहून भारत विरोधी गरळ ओकायची. कधीकाळी मी पण दुतावासा पुढे रांग लावली होती सोईस्कर पणे विसरायचं. दुसर्‍याचे धागे विषयांतर करून आपलं घोडं पुढं काढायचं हा माझा सफल गनिमी कावा. जाऊ द्या ना,द्या सोडून.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 29/06/2023 - 15:13
कर्नल तपस्वी मी कुठे भारतावर गरळ ओकाली? > उलट सुरवातीच्या भारतीय सरकारची काही धोरणे बरोबर होती हे म्हणतोय .. उगा का आरोप करताय? "दुसर्‍याचे धागे विषयांतर करून आपलं घोडं पुढं काढायचं" अहो सहन यांनी गोवा आणि तेथील पोर्तुगाल पद्धत आणि उर्वरित भारत आणि महाराष्ट्र्र बद्दल काही तरी ना पटणारे बोलली म्हणून मी त्यावर प्रतिसाद दिला ...

विवेकपटाईत 30/06/2023 - 11:33
ब्रिटिश आणि अमेरिकन मीडिया नेहमीच भारताविरुद्ध गरळ ओकणाचे काम करतात. ९० टक्के खोट्या किंवा भ्रमित करणाऱ्या बातम्या देतात. सत्ता कुणाचोही का असेना. बाकी सत्तेसाठी आणीबाणी लावली आणि विरोधी पक्ष नेत्यांवर अत्याचार केले, हे एकमेव सत्य.

उनाड 02/07/2023 - 06:21
त्याकाळी आर के लक्षमण यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींच्या मागे संजय गांधी व त्यांच्या हातात एक दोरीने बांधलेली खेळातील मोटार हमखास दिसे.

कंजूस 26/06/2023 - 04:33
ते वाचल्याचं आठवतंय. आणि मग कॉंग्रेसचा धसकाच घेतला. लोकशाही हा शब्द पक्षांपुरता वेगळ्या अर्थाने घ्यायचा. 'एकाच कुटुंबातील लोकांनी चालवलेला पक्ष.'(अमेरिकेतल्या लिबरल, रिपब्लिकनचे माहीत नाही.)

The Washington Post या दैनिकाने भारतात सुरु असणाऱ्या लुटमारीविषयी खरमरीत लिहिले आहे. " The public believe a vast swindle is going on. Sanjay ( Gandhi ) calls up secreteries and says give the contract to so and so."
Washington Post आजकाल खरमरीत भाषेत संपादकीय छापते, भारतात "हिंदू नेशनलिस्ट भाजप सरकार" ने अमुक केले अन् तमुक केले इत्यादी. त्यांची प्रायोरिटी ही सत्य मांडणे नसून त्यांना किंवा त्यांच्या व्यवस्थेला हवे तसे जागतिक चित्र रंगवून अमेरिकन जनतेला पेश करणे होय. १९ आणीबाणी वेळी वॉशिंग्टन पोस्ट काहीही छापू शकत होते कारण नुकतेच काही वर्षे अगोदर १९७१ चे युद्ध झाले होते. निक्सन अन् सातव्या आरमाराच्या नाकावर टिच्चून झाले होते..... आणीबाणी नो डाऊट भयानक होती, पण आपण तिच्या नेमक्या भागावर focus करण्याच्या ऐवजी संगोवांगी वर करतो. मला वाटते आणीबाणीची सगळ्यात मोठी पनौती म्हणजे बेचाळीसावी घटना दुरुस्ती (42 constitutional amendment). मिनी constitution म्हणवली गेलेली ही घटना दुरुस्ती भयानक होती.

In reply to by इपित्तर इतिहासकार

वाशिंग्टन पोस्ट मधला बातमी संबधातला हा लेख नाही. तो निव्वळ संदर्भ आहे. शिवाय त्यांच्या बातम्या पूर्वग्रहदूषित आहेत / होत्या असे जरी गृहित धरले तरी मी ONGC चा किस्सा लिहिला आहे त्याच्यावर निक्सनचा काहीच कंट्रोल नव्हता ना हरियाणाने दिलेल्या रोड रोलर्सच्या पर्चेस ऑर्डरवर.  घटना दुरुस्ती वगैरे हिमनगाचे टोक असावे इतक्या भानगडी त्या आणीबाणीमध्ये बाईंनी करून ठेवल्यात. मी दोन्ही उल्लेख केले आहेत : १) साधारण अप्रकाशित बाबींवर हा लेख आहे, ज्याची चर्चा फारशी होत नाही २) किती लिहिणार ? तुम्ही किती वाचणार ? त्यामुळे शब्दमर्यादा आणि अटेन्शन स्पॅनची काळजी घेऊन एखाद दुसराच किस्सा लिहिला आहे.  आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 

साहना 28/06/2023 - 10:53
गोवा भारता सोबत स्वतंत्र नाही झाला हे गोमंतकियांचे नशीब आहे. गोव्यांत युरोप सोबत फ्री ट्रेड असल्याने त्या काळी मर्सडिज, बीटल इत्यादी गाड्या सहज उपलब्ध होत्या. साधारण मध्यमवर्गीय सरकारी नोकराला गाडी परवडत असे. आमचे एक नातलग गोव्यांत होते आणि माझ्या आईने सर्वप्रथम त्यांच्या घरी पोर्तुगाल हुन आणलेले वॉशिंग मशीन पहिले आणि ती थक्क झाली होती.

In reply to by साहना

चौकस२१२ 29/06/2023 - 08:02
अजिबात असहमत... फारच उथल विचार, मग तसे तर ब्रिटिश इंडिया च राहिला असता तर अजून प्रगती झाली असती असे म्हणण्यासारखे आहे शेवटी स्वत्रंतता हि स्वतंत्रता असते ! मग त्यासाठी काही गोष्टीनं मूकावे लागते एवढे आपल्याला लक्षात येत असावे बहुतेक तुम्ही ज्या खुलया आर्थिक धोरणाचे ( गोव्यात असलेले) समर्थन करीत आहात ते तसे देश्भर असते तर सुरवातीचं काळात जी देशभर काही संस्थांची उभारणी झाली ती झाली नसती .. लांब पल्याचं दृष्टीने सुरवातीला तरी समाजवादी पद्धतीचे वाटणारे धोरण हे देश उभारणीला मदतीचेच झाले ( पुढे त्या नेहरूंविय धोरणाचा अतिरेक झाला हे खरे ) एक गोवेकर म्हणून तुम्हाला गोव्या बद्दल प्रेम असणे साहजिक आहे पण देशच विचार केलं तर वॉशिंग मशीन उपलब्ध होते म्हणून पारतंत्र्य ओके म्हणणे हे फार उथळ झाले

In reply to by चौकस२१२

साहना 29/06/2023 - 10:30
> समर्थन करीत आहात ते तसे देश्भर असते तर सुरवातीचं काळात जी देशभर काही संस्थांची उभारणी झाली ती झाली नसती उलट आहे. आणखीन जास्त आणि दर्जेदार संस्थांची उभारणी झाली असती. आणि नक्की कसल्या संस्था उभ्या राहिल्या ? भारत अजून नायजेरिया चीच बरोबरी करत आहे. उलट प्रचंड प्रमाणांत अधोगती झाली. नशीब १९९० मध्ये इतर देशांनी भारताला मुक्त (थोडीफार) आर्थिक व्यवस्था अंगिकारण्यास भाग पाडले नाहीतर सध्या परिस्थिती पाकिस्तान सारखी असती. स्वातंत्र्य ह्याचा नक्की अर्थ काय ? सध्या भारतीय लोक अमेरिका आणि ब्रिटिश दूतावासापुढे रंग लावून उभे आहेत ! हा त्यांचा विजय आणि आपल्या तथाकथित स्वातंत्र्याचा पराभव नाही का ? > वॉशिंग मशीन उपलब्ध होते म्हणून पारतंत्र्य ओके चांगल्या लिविंग साठी लोक पारतंत्र्य काय देश सोडून जाऊन अत्यंत गर्वाने ब्रिटिश , अमेरिकन, फ्रेंच, ऑस्टेलियन नागरिकत्व घेत आहेत.

In reply to by साहना

चौकस२१२ 29/06/2023 - 11:26
उत्पादन क्षेत्राबद्दल बोलूयात कारण त्यात अनुभ व आहे म्हणून - तुम्ही म्हणताय ते नुसते तयार आयात करणे ( गोव्यात सहज ती उतपादने मिलाळायची तो काळ ) , सगळे ब्रँड परदेशी असते स्थानिक निदान सुरु तरी झाले - हेवी इंडस्ट्री : आणि डिफेन्स : यावर स्थानिक स्वातंत्र्य असणे हे किती महत्वाचे आहे त्याची कल्पना आहे का? भेल / हेच एम टी /. इसरो भारतात ४ ऍडव्हान्स टूल रम ट्रेनिंग सेन्टर निर्माण झाले, २) चांगलया आणि सहज राहणीमानासाठी परदेशी जाणे आणि त्या त्या देशात स्वतःचे उद्योग विकसित होणे याचाच घोळ घालू नका कृपया ... आज रहिवाशी देशांत सर्वात जास्त कोळसा आणि खनिजे बनतात पण "value ADDITION " काही नाही पूर्ण खुली आयात धोरण भारतासारखाय मोठ्या देशाने आणि ते सुधा अगदी सुरवातीला देश नवीन स्वातंत्र्य झालेला असताना हे पायावर धोंडा पडून घेण्यासारखे होते अर्थात त्याचं उलटे जे केलं गेले त्याचाच अतिरेक झाला हे हि मी मेनी केलं आहे पण सरसकट गोवा पोर्तुगाल पद्धतीकट राहिले असते तर जास्त बरे हे फार टोकच झाले "स्वातंत्र्य ह्याचा नक्की अर्थ काय ? सध्या भारतीय लोक अमेरिका आणि ब्रिटिश दूतावासापुढे रंग लावून उभे आहेत ! हा त्यांचा विजय आणि आपल्या तथाकथित स्वातंत्र्याचा पराभव नाही का ? " उगाच वादासाठी ,,, भारतात भरपूर हुशार लोक आहेत, थोडी गेल्याने बिघडत नाही ..

In reply to by कर्नलतपस्वी

कैक भारतीय राज्यांमधून मधून तरुणाई सेंट्रल अमेरिकेत ग्वाटेमाला, होंडुरास, बेलीझ, पनामा वगैरे मध्ये जाऊन तिथून अतिशय खतरनाक अशी जंगले पार करून आधी मेक्सिको आणि मग अमेरिकेत जायसाठी मरमर करतायत....

In reply to by इपित्तर इतिहासकार

अहिरावण 29/06/2023 - 13:37
जाऊ द्या हो... उद्या बाजी पलटली तर पहीले हेच वाचवा वाचवा करत येतील.... सध्या ओकत आहेत भारताबद्दल ... ओकु द्या... आईबापसासुसासरेबायको यांच्यावरचा राग निचरा होत असेल होउ द्या आपण म्हणु.. गेट वेल सुन.. हाय काय नाय काय

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 29/06/2023 - 15:19
अन् जाणारे सगळे हुशार असतातच असेही नाही ! हो मि हि .. पोटार्थी तर सगळेच , फुरसुंगीघून पुण्यात येणारा काय कि पुण्यातून टोरांटो ला जाणारा काय मूळ गावाला / देशाला " गुरुदक्षिणा देणे" एवढे केले कि झाले

In reply to by चौकस२१२

साहना 29/06/2023 - 13:35
> तुम्ही म्हणताय ते नुसते तयार आयात करणे ( गोव्यात सहज ती उतपादने मिलाळायची तो काळ ) , सगळे ब्रँड परदेशी असते स्थानिक निदान सुरु तरी झाले ब्रँड कुठले ह्यावर काहीही फरक पडत नाही. खटारा अँबॅसिडर आणि त्याहून खटारा बजाज स्कुटर (जी काँग्रेसी परिवाराचा आणखीन एक अपराध होता) ह्या निव्वळ पैश्यांचा अपव्यय होता. इतकी वर्षे सरकारी मोनोपॉली द्वारे ह्यांनी भारतीयांचा पैसा चोरून त्यांना निकृष्ट दर्जाची सेवा दिली. आणि आज कुठे आहेत ह्या ? सगळीकडे सुझुकी, होंडा आणि टोयोटा. ज्या स्वस्त आहे, चांगल्या आहेत आणि रोजगार सुद्धा उपलब्ध करून देतात. सुझुकी ह्यांचा प्रचंड अपमान काँग्रेस सरकारने केला होता त्यांत मी घुसत नाही. भारत सरकारचा धोरणांनी भोपाळ गॅस दुर्घटना सारख्या दुर्घटना घडून लोकांचा जीव सुद्धा कसा गेला ह्यावर मी अत्यंत विस्तृत लेखन ह्या आधी इथे केलेले आहे. भारतीय सरकारचे पूर्णतः चुकीचे आर्थिक धोरण ह्यामुळे भारतीय तरुणांना सध्या भिकेचा कटोरा घेऊन कतार, सौदी सारख्या देशांत कामे करावी लागतात. > भेल / हेच एम टी /. इसरो भेल/ हेच एम टी ह्यांनी नक्की काय दिवे लावले ? आणि मुक्त अर्थव्यवस्थेत भारतांत कित्येक अश्या कंपन्या निर्माण झाल्या असत्या. इस्रो त्यातल्या त्यांत थोडीफार कार्यक्षम आहे पण तो झाला अपवाद. त्यांत सुद्धा चुकीचं धोरणाने इसरो जास्त प्रगती करू शकली नाही. > पूर्ण खुली आयात धोरण भारतासारखाय मोठ्या देशाने आणि ते सुधा अगदी सुरवातीला देश नवीन स्वातंत्र्य झालेला असताना हे पायावर धोंडा पडून घेण्यासारखे होते आणि ह्या समाजवादी धोरणाने काय आता आम्ही भारतीयांनी गळ्यांत मणिहार घालून घेतला आहे का ? अजून सुद्धा भारतीयांची तुलना फार तर नायजेरिआ शी होऊ शकते. > पण सरसकट गोवा पोर्तुगाल पद्धतीकट राहिले असते तर जास्त बरे हे फार टोकच झाले पोर्तुगीज कायदे भारतीय कायद्यापेक्षा कैकपटीने चांगले होते आणि सध्या ते गोव्यांत लागू असल्याने ते आपण पाहू सुद्धा शकतो. बहुतेक गोमंतकीय सार्वजनिक जमीन हि स्थानिक कोमुनिदाद संस्थांच्या मालकीची आहे. हिंदू मंदिरे पूर्णतः खाजगी मालमत्ता आहेत आणि युनिफॉर्म सिविल कोड आहे. पूर्णतः जास्त प्रगत युरोपियन कायद्या मुळे हे शक्य झाले. नाहीतर UCC सारखया विषयावर इतर भारतांत झिम्मा सुरु आहे आणि हिंदू मंदिरे तर कधीच सेकुलर झाली आहेत.

In reply to by साहना

प्रचेतस 29/06/2023 - 14:05
पोर्तुगीज कायदे भारतीय कायद्यापेक्षा कैकपटीने चांगले होते आणि सध्या ते गोव्यांत लागू असल्याने ते आपण पाहू सुद्धा शकतो. बहुतेक गोमंतकीय सार्वजनिक जमीन हि स्थानिक कोमुनिदाद संस्थांच्या मालकीची आहे.
गोवा धर्मन्यायधिकरणावरील प्रियोळकरांचे पुस्तक वाचलेत का?

In reply to by प्रचेतस

गवि 29/06/2023 - 14:13
गोवा धर्मन्यायधिकरणावरील प्रियोळकरांचे पुस्तक वाचलेत का?
जरा तरी उलगडून सांगा हो. थोडे तरी चार शब्द पार्श्वभूमी, की नेमके काय आहे. आता लगेच ते पुस्तक कुठे जाऊन वाचणार या धाग्याचे वाचक..?

In reply to by प्रचेतस

गवि 29/06/2023 - 14:49
थोडे कष्ट? ३२० पानी पुस्तकाची लिंक देऊन म्हणता? वरील प्रतिसाद मलिकेशी सुसंगत त्या पुस्तकात काय आहे याबद्दल चार ओळी द्याव्या असा अर्थ होता.

In reply to by गवि

Trump 29/06/2023 - 15:06
वरील प्रतिसाद मलिकेशी सुसंगत त्या पुस्तकात काय आहे याबद्दल चार ओळी द्याव्या असा अर्थ होता.
+१ बाकीच्या दणकादणकीत सहभागी होण्यात रस नाही. पण पुस्तकाबद्दल उत्सुकता आहे.

In reply to by गवि

प्रचेतस 29/06/2023 - 16:09
हा जगभरातील इन्क्विझिशनचा आणि गोव्यातील इन्क्विझिशनचा इतिहास आहे. यात डॉ. डेलॉन यांना गोव्यात इन्क्विझिशनच्या अधिकाऱ्यांनी कसे खोटेनाटे आरोप ठेऊन अटक केली आणि नंतर त्याचे जे हाल झाले त्याबद्दल लिहिले गेले आहे. डॉ डेलॉनने हे सगळे त्याच्या आत्मवृत्तात लिहून जगासमोर आणल्यावर या भयंकर संस्थेला ओहोटी लागली. भारतात सेंट झेव्हियरने इन्क्विझिशनला आमंत्रण दिले.. एका पत्रात तो काय म्हणतो ते पाहा.. ...अखेरीस मी त्यांना योग्य पद्धतीने बाप्तिस्मा दिला आणि त्यांच्या हातात त्यांच्या नवीन नावाची चिठ्ठी ठेवली. मग त्यांना घरी जाऊन त्यांच्या बायका पोरांना घेऊन येण्यास सांगितले. सगळ्यांना बाटवून झाल्यावर मी त्यांना त्यांची देवळे उद्ध्वस्त करण्याचा हुकूम दिला. ज्या माणसांनी त्यांचे देव प्राचीन काळापासून पुजले त्यांच्याच हातून त्या मूर्तींच्या ठिकऱ्या उडताना पाहून माझ्या मनाला किती हर्ष होत होता याची तुम्हाला कल्पना यायची नाही... - सेंट झेव्हियर एका पत्रात. आपल्याच मिपाकर जयंत कुलकर्णी ह्यांनी हे पुस्तक मराठीत देखील आणले आहे आणि ते येथे उपलब्ध आहे.

In reply to by प्रचेतस

साहना 29/06/2023 - 19:55
फक्त वाचलेच नाही तर विस्मृतीत गेलेले ते पुस्तक मीच voice ऑफ इंडिया कडून मिळवून त्याच्या प्रति बनवून विविध लायब्रेरीत वगैरे पाठवले. हे पुस्तक नंतर शेफाली वैद्य आणि इतर सोशल मीडिया वाल्यानी जास्त प्रसिद्ध केले. मूळ प्रत माझ्याकडे अजून आहे. ज्यांना ठाऊक नाही त्यांच्या साठी : अनंत प्रियोळकर ह्यांनी Goa Inquisition वर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले होते. ह्यांत त्यांनी कॅथॉलिक चर्च आणि पोर्तुगीज सत्ताधार्यांनी जे धार्मिक अत्याचार गोमंतकीय हिंदूंवर केले त्याचा इतिहास अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे. अर्धवट ज्ञान असलेल्या लोकांसाठी : Inquisition हा काळ साधारण १५००-१७०० चा. १९११ मध्ये कॅथॉलिक चर्च च्या जुलुमाला विटून पोर्तुगाल मध्ये क्रांती झाली आणि "फर्स्ट रिपब्लिक" ची निर्मिती झाली. चर्च आणि सरकार वेगळे झाले आणि पोर्तुगीज लोक अत्यंत वेगाने कॅथॉलिक चर्च विरोधी झाले. ह्याच काळांत पोर्तुगीज अभ्यासकांनी मेहनत घेऊन कॅथॉलिक चर्च च्या गुन्ह्याचा इतिहास लिहिला. गोव्यांतील चर्च च्या हडप केलेल्या जमिनी लोकांना परत दिल्या, हिंदू मंदिरे आणि धर्माला सामान अधिकार दिले आणि सर्व नागरिकांना समान अधिकार दिला. युनिफॉर्म सिविल कॉड वगैरे गोष्टी ह्याच कालावधीतल्या. ह्या काळांतील पोर्तुगीज कायदे हे फ्रेंच राज्यक्रांती, युरोपिअन रेनेसाँस इत्यादी गोष्टींनी प्रभावित झाले होते आणि "क्लासिकल लिबरल" पद्धतीचे होते. हा कालावधी १९२६ पर्यंत चालला, त्यानंतर सालाझार ह्यांची हुकूमशाही आली आणि त्यानंतर डाव्या लोकांचे अहिसंक क्रांतीचे सरकार. पण १९११ मध्ये चर्च ची जी हकालपट्टी झाली ती मात्र इतर सर्वानीच कायम ठेवली. १९११ नंतर चा पोर्तुगीज काळ आणि १९४७ नंतर चे भारत सरकार ह्यांत फक्त स्वातंत्र्य आणि जुलुमाच्या दृष्टीकोणातून पहिले तर भारत सरकार कित्येधिक पटीने जास्त जाचक, अकार्यक्षम आणि लोकांच्या स्वातंत्र्य विरोधी होते ह्यांत शंकाच नाही. १९४७ नंतर गोव्याला स्वतंत्र करण्यात इतका काळ गेला ह्यांतच त्यांची अकार्यक्षमता दिसून येते. टीप: ह्याचा अर्थ गोमंतकियानी स्वातंत्र्याचा हट्ट धरणे चुकीचा होता असे अजिबात नाही. नैतिक दृष्ट्या गोमंतभूमीचे स्वातंत्र्य त्यांचा अधिकार आणि कर्तव्य दोन्ही होते. टीप : मी गोमंतकीय नाही.

In reply to by साहना

चौकस२१२ 29/06/2023 - 15:09
भेल/ हेच एम टी ह्यांनी नक्की काय दिवे लावले ? तुम्हाला उत्पादन क्षेत्रातील काय अनुभव आहे हो? मशीन टूल चे तंत्रन्यान , जड यंत्रसामुग्री हिंदुस्थान अएरॉनॉटिकस राष्ट्रीय डिझाईन संस्था मी हे मान्य केले आहे कि सगळं सरकारी या धोरणाचा अतिरेक झाला / शिक्षण धोरण चुकले, नाही कुठे म्हणतोय.. पण महिंद्रा आणि टाटा पण उभे राहिले पण तुम्हाला जर मुद्डमून टोचणारी टोकाची भाषा वापरून लोकांनां दुःवययचे असेल तर करा तसे ( गोवयाचे नशीब कि महाराष्ट्रात विलीन नाही झाला वैगरे ) पण तुम्ही मूळ प्रश्न कि जो होता इतके खुले आर्थिक धोरण सुरवातीला तरी परवडणार होते का याचे उत्तर देतच नाहीत जाऊद्या मी हि खुल्या अर्थवयवस्थेचा समर्थक आहे पण तसे समर्थन करताना काही जुनी सरकारी घोरणे सरसकट चुकीची होती हे म्हणणे टोकाचे वाटते दुसरे असे कि गोव्या सारखाय लहान प्रदेशात जे करणे शकय आहे ते सगळ्या भारतात करणे शक्य होते का?

In reply to by चौकस२१२

जाऊद्या मी हि खुल्या अर्थवयवस्थेचा समर्थक आहे पण तसे समर्थन करताना काही जुनी सरकारी घोरणे सरसकट चुकीची होती हे म्हणणे टोकाचे वाटते
तुम्ही खुल्या अन् बंदिस्त अश्या दोन्ही नाही तर मिश्र अर्थव्यवस्थेचे समर्थक आहात अन् ते प्रॅक्टिकल आहे अगदी. पूर्णपणे खुली अर्थव्यवस्था आज अमेरिकेची सुद्धा नाहीये. ती पण मिश्रच आहे, वेलफेअर स्टेट ही सेंट्रल संकल्पना असते कुठल्याही राजकीय विचारात. त्यामुळे अगदी अमेरिका ते चीन कुठलीच अर्थव्यवस्था पूर्णपणे मुक्त अन् पूर्णपणे बंद नाहीच. नॉर्थ कोरिया हा एकमेव कुप्रसिद्ध अपवाद सोडता पूर्णपणे बंद अर्थव्यवस्था नसेलच जगात, असल्यास कोणीही सांगावी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

चौकस२१२ 30/06/2023 - 06:07
सहमत , आत्तापर्यंत पाहिलेली - पूर्ण खुल्याच्या जवळपास = युनाइटेड स्टेट्स - मिश्र पण खुल्याच्या जास्त जवळ = सिंगापोर - मिश्र = ऑस्ट्रेलिया - मिश्र पण जर थोड्या डावीकडे वळणारी = न्यु झीलंड - आखाती देश , वर्णन करणे अवघड वाटते ..

In reply to by साहना

चौकस२१२ 30/06/2023 - 06:19
कोणत्या? क्षेत्रांत? आणि तुम्ही २०२३ जागतिकर्णमुळे भारतात परदेशी मालकीचे ब्रँड जास्त आहेत याचा आणि मुळात भारतात उत्पादन आणि त्यासाठी लागणाऱ्रे मनुष्य बळ तयार व्हावे यासाठीचे सुरवातीचे प्रयत्न याचे मिश्रण का करताय? अर्थात आजही भारत बऱ्याच बाबतीत पाश्चिमात्यांबरोबर तुलना करू शकणार नाही खरे पण म्हणून काहीच केले नाही , ब्रिटिश असते तर बरे वैगरे हे काय ? छोट्या गोव्यात त्याकाळी परदेशी उतपादने सहज मिळत म्हणून पोर्तुगीज कायदे बरे वैगरे काय ! आज चीन +१ यासाठी भारताकडे बघितले जाती त्याचा जास्त फायदा भारताने उठवावा जास्त VALUE ADDITION करावे आणि त्यासाठी सध्याचं सरकारची धोरणे, मध्ये मनमोहन सरकारनी उचललेली पावले आणि काही मूलभूत नेहरू सरकाने केलेले काम या सर्वांचा योग्य असा maaन ठेवायला काय हरकत आहे ? भारत "मेक इन इंडिया फॉर इंडियन्स अँड मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड" या दोन्ही साठी माझया तरी शुभेच्छा आज २००+ मी,इलिअन चा इंडोनेशिया स्वतःची गाडी बनवू शकत नाही तिथे भारतात टाटा आणि महिंद्रा बनवत आहेत गोदरेज आहे हे उल्लेखनीय आहे , असे अनेक गोदरेज आणि किर्लोस्कर निर्माण व्हावो हीच इच्छा

In reply to by साहना

ह्या सर्व क्षेत्रांत भारत मागासलेला आहे ! खूपच म्हणजे खूपच मागे आहे. हो कि नाही ?
नाही बुआ मला असे वाटत नाही.

Trump 28/06/2023 - 11:37
गोवा भारता सोबत स्वतंत्र नाही झाला हे गोमंतकियांचे नशीब आहे.
श्री साहना, तुमचे विचार वेगळे असले तरी हे अती आहे. तुम्ही भारतीयांनी केलेल्या संघर्षाची तुलना मर्सडिज, बीटल,वॉशिंग मशीन यांच्याबरोबर करत आहात.

In reply to by Trump

साहना 28/06/2023 - 12:21
गोवा १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला असता तर इतर भारताप्रमाणेच दळिद्री आर्थिक धोरण तसेच इतर कायदे तिथे लागू झाले असते आणि कोंकण प्रांताप्रमाणेच हा प्रदेश दळिद्री राहिला असता. गोवा स्वतंत्र झाला ह्याबद्दल मी दुःख व्यक्त करत नाही, परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य हा गोमंतकीय जनतेचा अधिकार होताच फक्त पोर्तुगीज आर्थिक धोरण (आणि इतर कायदे त्या काही दशकांत) भारतापेक्षा पेक्षा खूप पटीने चांगले असल्याने गोमंतकीय जनतेचा फायदा झाला आणि अजून सुद्धा होत आहे.

In reply to by साहना

Trump 28/06/2023 - 14:20
श्री सावरकर, श्री गांधी, श्री बाबु गेणु इ. यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाला मिळावे म्हणुन स्वदेशीचा नारा दिला, परदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यास प्रोत्साहन दिले, परदेशी कपड्यांची होळी केली. त्यामुळे तुमचा प्रतिसाद योग्य वाटत नाही.

In reply to by Trump

साहना 29/06/2023 - 02:00
त्या काली परदेशी वस्तूंची होळी का करायची ह्याला एक तात्विक बैठक होती आणि एक पार्श्वभूमी होती. ती हल्लीच्या काली अप्रस्तुत आहे.

In reply to by साहना

Trump 29/06/2023 - 11:11
त्या काली परदेशी वस्तूंची होळी का करायची ह्याला एक तात्विक बैठक होती आणि एक पार्श्वभूमी होती. ती हल्लीच्या काली अप्रस्तुत आहे.
तो विषय हल्लीचा नसुन १९४७ आणि १९६१ च्या दरम्यानचा आहे.

In reply to by Trump

साहना 29/06/2023 - 13:17
> श्री सावरकर, श्री गांधी, श्री बाबु गेणु इ. यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाला मिळावे म्हणुन स्वदेशीचा नारा दिला, परदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यास प्रोत्साहन दिले, परदेशी कपड्यांची होळी केली हे सर्व ह्या १९४७ नंतरच्या कालावधीत घडलं ?

In reply to by साहना

Trump 29/06/2023 - 15:43
श्री साहना, तुमचा मुळ प्रतिसाद आणि त्याचे समर्थन मला चुकीचे वाटते. पण मी सदर चर्चेतुन तुर्त रजा घेतो.

पण, आणीबाणी लागलेली होती तेव्हा/ त्यादरम्यान गोवा खास केंद्रशासित प्रदेश होता की ! १९६१ पासून थेट १९८७ पर्यंत. म्हणजे आणीबाणी संबंधी जे काही निर्णय अन् (साधक बाधक) निती असतील त्या केंद्रशासित प्रदेशाच्या स्टेटस मुळे गोव्यात.... ह्यात गोवा महाराष्ट्र विलानिकरण, स्वातंत्र्याच्या वेळच्या आर्थिक पॉलिसी इत्यादींचा संबंध काय ?

In reply to by इपित्तर इतिहासकार

साहना 29/06/2023 - 13:23
आणखी काय चर्चा करायची ? आणीबाणीनंतर इंदिरा गांधी ह्यांचा पराभव झाला आणि जे नवीन लोक सत्तेवर आले ते आणखीन महामूर्ख निघाले. एवढे महामूर्ख कि कालचा गोंधळ बरा होता म्हणून लोकांनी इंदिरा गांधी ह्यांना पुन्हा निवडून आणले ! आणि त्यापुढे बरीच वर्षे बिगर काँग्रेसी मंडळींचा धसकाच जनतेने घेतला. थोडक्यांत भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील अशी दाट शक्यता आहे.

In reply to by साहना

अहिरावण 29/06/2023 - 13:34
>>>भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील अशी दाट शक्यता आहे. हा हा हा

In reply to by साहना

भारतीयांना ऑप्शन असता आणि निवडणुका घेतल्या तर ब्रिटिश मंडळींना भारतीय मतदाते पुन्हा बोलावतील =)) सहमत. -दिलीप बिरुटे

परदेशी राहून भारत विरोधी गरळ ओकायची. कधीकाळी मी पण दुतावासा पुढे रांग लावली होती सोईस्कर पणे विसरायचं. दुसर्‍याचे धागे विषयांतर करून आपलं घोडं पुढं काढायचं हा माझा सफल गनिमी कावा. जाऊ द्या ना,द्या सोडून.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 29/06/2023 - 15:13
कर्नल तपस्वी मी कुठे भारतावर गरळ ओकाली? > उलट सुरवातीच्या भारतीय सरकारची काही धोरणे बरोबर होती हे म्हणतोय .. उगा का आरोप करताय? "दुसर्‍याचे धागे विषयांतर करून आपलं घोडं पुढं काढायचं" अहो सहन यांनी गोवा आणि तेथील पोर्तुगाल पद्धत आणि उर्वरित भारत आणि महाराष्ट्र्र बद्दल काही तरी ना पटणारे बोलली म्हणून मी त्यावर प्रतिसाद दिला ...

विवेकपटाईत 30/06/2023 - 11:33
ब्रिटिश आणि अमेरिकन मीडिया नेहमीच भारताविरुद्ध गरळ ओकणाचे काम करतात. ९० टक्के खोट्या किंवा भ्रमित करणाऱ्या बातम्या देतात. सत्ता कुणाचोही का असेना. बाकी सत्तेसाठी आणीबाणी लावली आणि विरोधी पक्ष नेत्यांवर अत्याचार केले, हे एकमेव सत्य.

उनाड 02/07/2023 - 06:21
त्याकाळी आर के लक्षमण यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींच्या मागे संजय गांधी व त्यांच्या हातात एक दोरीने बांधलेली खेळातील मोटार हमखास दिसे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या भयानक कालावधी मधली ही बाजु फारशी चर्चेमध्ये नसते... २५ जुन १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात रीतसर आणीबाणी जाहीर केली. जगाच्या इतिहासात आजवर ज्ञात असणाऱ्या चमत्कारिक आणि भयानक पाशवी राजसत्तांपैकी एक स्वतंत्र भारताच्या नशिबी आली हे या देशाचे दुर्दैव. त्या संपुर्ण कालावधीमधली इंदिरा गांधी यांची हुकुमशाही, संजय गांधींची पाशवी अरेरावी आणि पोलिसांच्या क्रौर्याची परिसीमा या विषयी अनेकवेळा अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. त्या भयंकर परिस्थितीमधून गेलेले लोक आजही अनेक किस्से सांगत असतात.

भोला चित्रपट...भोळा प्रेक्षक.....

कर्नलतपस्वी ·

शिवाय बघितल्यानंतर परत तसलाच भोला बघण्याची सहनशक्ती नाहीये. बऱ्याचदा परीक्षण लेखानंतर प्रतिसाद आता बघायलाच हवा, आजच संध्याकाळी बघतो असे काहीसे असतात. पण आपण थेट सांगतो, हा चित्रपट आपण काय बघणार नाही. त्यापेक्षा funcho चे शॉर्ट्स बघत बसेल! शष्प : काहीही हं, श्री...

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 28/05/2023 - 16:34
तुकाशेठ तुम्ही 'शिवाय' संपूर्ण पाहिला आहे? मग तुम्हाला संतपद प्राप्त झाले आहे असे मानण्यास हरकत नाही 😀 यापुढे माझ्याकडून तुमचा उल्लेख केवळ 'तुकाशेठ' असा न करता "संत तुकाशेठ"असा करण्यात येईल असे मी ह्याठिकाणी जाहीर करतो 🙏

हेमंतकुमार 28/05/2023 - 16:19
चित्रपटाच्या जाहिरातीतला चेहरा पाहूनच ठरवलं होतं की चुकून सुद्धा त्याच्यावर टिचकी मारणार नाही. बरं झालं सांगितलंत ! कित्येक महिन्यात प्राईमवर माझ्या आवडीचा हिंदी/ मराठी मला अजिबात बघायला मिळालेला नाही. यावर्षी प्रथमच असे वाटले, की कशाला आपण त्याची वर्गणी भरत आहोत ? ( या उलट युट्युबवरील मनोरंजनाने तृप्त केले आहे).

टर्मीनेटर 28/05/2023 - 16:24
वरिजनल तामिळ चित्रपट 'काईथी' (हिंदी डब्ड) पाहिला असल्याने 'भोला' बघण्याचा कोणताही विचार नव्हताच! आणि आता हे परीक्षण वाचल्यावर चुकून-माकून कधीतरी बघितला जाण्याची जी काही ०.०००००००००१% शक्यता उरली होती ती पण मावळली 😀

In reply to by टर्मीनेटर

हाच तर लोचा आहे.सगळं कस भारी भारी लागतं. कहानी है,ड्रामा है, एक्शन है, इ-मोशन है तरच चित्रपट चांगला..... आमच्या पिढीचे बघा अन्न हे पुर्ण ब्रह्म समजून जे समोर येईल ते आनंदाने ग्रहण करायचे. जेव्हढ्या तन्मयतेने किस्सा कुर्सी का,पार,पार्टी,पोस्टर,जय संतोषी माॅ बघीतले तेव्हढ्याच भक्तिभावाने तिस्मारखाॅ,शिवाय, भोला सारखे आता बघतो. फाईट मास्तर, स्टंट मास्तर,स्पाॅट बाईज,सिनेमॅटोग्राफर, एडिटर हे पण तर कलाकार आहेत. जरा त्यांचा विचार करा.

तुमच्याविषयी पुर्ण आदर ठेऊन सांगावेसे वाटते की तुमची गाडी मुळ रस्ता सोडून बरीच आडवी तिडवी धावते. त्यामुळे "भाई, कहना क्या चाहते हो? " असे विचारावे लागते. अवांतर लिखाण यामुळे लेख वाचण्यात नीरसता येण्याचा धोका असतो त्यामुळे काही करता आलं तर बघा. कळावे. लोभ असावा.

यश राज 29/05/2023 - 03:19
भारीच लिहिलंय. मी सुद्धा वेळ जात नव्हता म्हणून प्राईम वर पळवून पहिला. तंतोतंत बरोबर लिहिलंय. फक्त एकच करेक्शन .. सौरभ शुक्ला च्या जागी संजय शुक्ला असे करावे. खरच अवलिया कलाकार .

In reply to by यश राज

चुक निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद. हे डोक्यात होते पण दुरूस्त करणे राहून गेले. संजय शुक्ला व निना गुप्ता यांचा वध चित्रपट बघीतला का? खुपच सहज आणी सुदंर अभिनय दोन्ही कसलेल्या कलाकारांनी केला आहे. धन्यवाद.

In reply to by सुखी

तसा माझा पहिलाच प्रयत्न. कदाचित चित्रपट बघतानाच शब्दांची जुळवाजुळव झाली असावी. एकाच बैठकीत लिहीले. अजून थोडे लिहायचे होते पण विस्तारभयास्तव आवरते घेतले.

In reply to by सर टोबी

धन्यवाद. चित्रपट पाहत असताना राहून राहून सैन्यातल्या फिल्ड क्राफ्ट, बॅटल इन्याकुलेशन टेस्ट, वार्षिक गोळीबारीचा सराव,फिल्ड फायरिंग इत्यादीबद्दल गमतीदार आठवणी जाग्या झाल्या आणी कवीता पार विसरलो.

शिवाय बघितल्यानंतर परत तसलाच भोला बघण्याची सहनशक्ती नाहीये. बऱ्याचदा परीक्षण लेखानंतर प्रतिसाद आता बघायलाच हवा, आजच संध्याकाळी बघतो असे काहीसे असतात. पण आपण थेट सांगतो, हा चित्रपट आपण काय बघणार नाही. त्यापेक्षा funcho चे शॉर्ट्स बघत बसेल! शष्प : काहीही हं, श्री...

In reply to by तुषार काळभोर

टर्मीनेटर 28/05/2023 - 16:34
तुकाशेठ तुम्ही 'शिवाय' संपूर्ण पाहिला आहे? मग तुम्हाला संतपद प्राप्त झाले आहे असे मानण्यास हरकत नाही 😀 यापुढे माझ्याकडून तुमचा उल्लेख केवळ 'तुकाशेठ' असा न करता "संत तुकाशेठ"असा करण्यात येईल असे मी ह्याठिकाणी जाहीर करतो 🙏

हेमंतकुमार 28/05/2023 - 16:19
चित्रपटाच्या जाहिरातीतला चेहरा पाहूनच ठरवलं होतं की चुकून सुद्धा त्याच्यावर टिचकी मारणार नाही. बरं झालं सांगितलंत ! कित्येक महिन्यात प्राईमवर माझ्या आवडीचा हिंदी/ मराठी मला अजिबात बघायला मिळालेला नाही. यावर्षी प्रथमच असे वाटले, की कशाला आपण त्याची वर्गणी भरत आहोत ? ( या उलट युट्युबवरील मनोरंजनाने तृप्त केले आहे).

टर्मीनेटर 28/05/2023 - 16:24
वरिजनल तामिळ चित्रपट 'काईथी' (हिंदी डब्ड) पाहिला असल्याने 'भोला' बघण्याचा कोणताही विचार नव्हताच! आणि आता हे परीक्षण वाचल्यावर चुकून-माकून कधीतरी बघितला जाण्याची जी काही ०.०००००००००१% शक्यता उरली होती ती पण मावळली 😀

In reply to by टर्मीनेटर

हाच तर लोचा आहे.सगळं कस भारी भारी लागतं. कहानी है,ड्रामा है, एक्शन है, इ-मोशन है तरच चित्रपट चांगला..... आमच्या पिढीचे बघा अन्न हे पुर्ण ब्रह्म समजून जे समोर येईल ते आनंदाने ग्रहण करायचे. जेव्हढ्या तन्मयतेने किस्सा कुर्सी का,पार,पार्टी,पोस्टर,जय संतोषी माॅ बघीतले तेव्हढ्याच भक्तिभावाने तिस्मारखाॅ,शिवाय, भोला सारखे आता बघतो. फाईट मास्तर, स्टंट मास्तर,स्पाॅट बाईज,सिनेमॅटोग्राफर, एडिटर हे पण तर कलाकार आहेत. जरा त्यांचा विचार करा.

तुमच्याविषयी पुर्ण आदर ठेऊन सांगावेसे वाटते की तुमची गाडी मुळ रस्ता सोडून बरीच आडवी तिडवी धावते. त्यामुळे "भाई, कहना क्या चाहते हो? " असे विचारावे लागते. अवांतर लिखाण यामुळे लेख वाचण्यात नीरसता येण्याचा धोका असतो त्यामुळे काही करता आलं तर बघा. कळावे. लोभ असावा.

यश राज 29/05/2023 - 03:19
भारीच लिहिलंय. मी सुद्धा वेळ जात नव्हता म्हणून प्राईम वर पळवून पहिला. तंतोतंत बरोबर लिहिलंय. फक्त एकच करेक्शन .. सौरभ शुक्ला च्या जागी संजय शुक्ला असे करावे. खरच अवलिया कलाकार .

In reply to by यश राज

चुक निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद. हे डोक्यात होते पण दुरूस्त करणे राहून गेले. संजय शुक्ला व निना गुप्ता यांचा वध चित्रपट बघीतला का? खुपच सहज आणी सुदंर अभिनय दोन्ही कसलेल्या कलाकारांनी केला आहे. धन्यवाद.

In reply to by सुखी

तसा माझा पहिलाच प्रयत्न. कदाचित चित्रपट बघतानाच शब्दांची जुळवाजुळव झाली असावी. एकाच बैठकीत लिहीले. अजून थोडे लिहायचे होते पण विस्तारभयास्तव आवरते घेतले.

In reply to by सर टोबी

धन्यवाद. चित्रपट पाहत असताना राहून राहून सैन्यातल्या फिल्ड क्राफ्ट, बॅटल इन्याकुलेशन टेस्ट, वार्षिक गोळीबारीचा सराव,फिल्ड फायरिंग इत्यादीबद्दल गमतीदार आठवणी जाग्या झाल्या आणी कवीता पार विसरलो.
लेखनविषय:
अविभाज्य अमेझोनचा (Amezon Prime) सन्माननीय सदस्य म्हणून कंपनीने सुचना पाठवली की भोला सिनेमा आपण चकटफू बघू शकता. हल्ली ही कंपनी सुद्धा भारी लब्बाड झालीयं.सिनेमे भाड्या ने(मुळ शब्द भाडे याचे ब.व.,घराचे भाडे,बसचे भाडे सारखे) किंवा विकतही देतात. पहिल्यांदा असे काही नव्हते.अ.प्रा वर पुर्व प्रकाशित २१ सरफरोश मी फुकट पाहीला पण आता मात्र पैसे मोजावे लागतात.(बरे झाले मी लवकर पाहीला) साX, विपणन तज्ञ (Marketing Expert) सुद्धा एक भारीच जमात आहे.आपला ढोल आणी ग्राहकाचा बॅण्ड कसा जोरात वाजवायचा यांना बरोबर समजते. खुल्या चित्रपटगृहाची सवय, बंद चित्रपटगृहांत बसवत नाही.आता अंतरजालावर सोईस्कर वाटते.

शंभर अदाणी हवे आहेत…

सुधीर मुतालीक ·

आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ? (म्हणजे आतचे १ + आणखी १०० = टोटल १०१) काय करणार तुम्ही १०१ अडाण्यांच ? तुम्हाला असं म्हणायचं का की जर १ अडाणी म्हणून १ पोर्ट, १ विमानतळ, १ हायवे, १ कोळसा खाण.... तर १०० अडाणी म्हणून १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी ?? असं जर असेल तर, त्या १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी साठी "भागभांडवल" येणार कोठून ? उभारणार कसे ?

In reply to by आग्या१९९०

अनंतफंदी 07/02/2023 - 13:50
फारच उत्तम माहिती मिळाली. अदानींची फसवेगिरी आहेच. पण भारतात अजुन असे सगळे उद्योग करणारे ईतर समूह नसतील कशावरुन? हे सगळे प्रकरण ईतके गुंतागुंतीचे आहे, की जिथे सरकारी ऑडिटर्सनाही समजायला वेळ लागेल तिथे सामान्यांची काय कथा? एक मात्र खरे!!अदानी समूहाने हिंडेनबर्गवर बदनामीचा खटला किवा ईतर कायदेशीर कारवाई लवकर करावी लागेल तरच त्यांची प्रतिमा टिकेल, अन्यथा हिंडेन बर्गच्या आरोपांनाच दुजोरा मिळाल्यासारखे होईल. अजुन एक--- सुधीर भाऊंचा लेख वाचुन ह्या प्रकरणाला अशीही एक बाजु असेल असे नक्कीच वाटुन गेले.

कंजूस 07/02/2023 - 14:41
तर यांचा तारणहार कोण यांच्याशी काहीही संबंध नाही. वालचंद हिराचंद यांनी ब्रिटिश बोट कंपन्यांना कशी फाईट दिली तेसुद्धा ब्रिटिश राज्य असताना हे कुणी वाचलं आहे का? तेव्हा कुठे तारणहार होते?

सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत.
हे कुठल्या सरकारी कंपन्याबद्दल बोलत आहात कळेल का? माझाही संबंध सरकारी व्यवस्थेशी येतच असतो थोडक्यात सांगायचे तर जिल्हा परिषद, सावजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी वगैरे वगैरे. त्यामुळे 'भयानक गुंतागुंतीच्या'शी सहमत आहे पण स्वच्छ!
घरी बसल्या बसल्या लिंबाचे लोणचे खोचलेला बशीभर गोड शिरा खात खात हे मोदी आणि अदाणी देशाला लुटताहेत अशी बडबड करणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर शक्य असेल तर विश्वास ठेवावा.
अनुभवाचे बोल आहेत, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास केव्हाच उडून गेला आहे. लोकशाहीवरही फार काळ टिकेल असं वाटत नाही. बाकी, अशी दिशाभूल करणारे लेख दोन्ही बाजूने चालू असतात त्यामुळे चालू द्या! सं - दी - प

मित्रहो 07/02/2023 - 16:36
खूप रोखठोक आहे. इतका की उपहास आहे का असे वाटावे.
दाढीचे खुंट वाढवून खांद्याला झोळी लटकवून अदाणीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या समस्त महारथीपैकी एकालाही पोर्ट बांधता येत नसेल काय ? नाही. अशा बोलघेवड्यांनाच काय पण आपल्या कल्पनेतल्या भलाभल्याना असे प्रकल्प हाती घेण्याची आणि ते पूर्ण करण्याची कुवत नसते.
अदाणी नको असेल तर एखादा प्रकल्प उभा करण्याचा धंदा करावा किंवा जे धंदा करीत आहेत त्यांना आपल्या सर्व ताकदीनिशी मोठे करावे.
हे दोन्ही आवडले सरकारी व्यवस्था गुंतागुंतीची असते यात शंका नाही पण स्वच्छ असते यावर सामान्यांचा विश्वास बसणे कठीण आहे. सध्यातरी अदाणींविषयी जो गोंधळ सुरु आहे तो व्यवसायाविषयी नाही तर समभागाच्या किंमतींविषयी आहे. देशाला झोलावाला नाही तर उद्योगपतींची, छोट्या व्यावसायिकांची गरज आहे यात काही दुमत नाही.

सौंदाळा 07/02/2023 - 16:36
+/- शंभर अदानी हवे आहेत याच्याशी सहमत सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत - असहमत माझा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सरकरी कंपन्यांशी जो काही संबंध आला आहे त्यावरुन त्यांना अजिबात स्वच्छ म्हणणार नाही.

कॉमी 07/02/2023 - 16:56
तद्दन फालतू लेख. एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.

In reply to by कॉमी

Trump 07/02/2023 - 22:44
तद्दन फालतू लेख.
सहमत
एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.
असहमत

लेखातील काही मतांशी अमान्य आहे . पण तेच तेच लिहित बसत नाही आता. पण देशात व्यवसाय वृध्दी व्हाय्लाच हवी ह्यात शंका नाही . पण ती अदानीनेच का करावी ? टाटा , बिर्ला , अंबानी , बजाज, पुनावाला हीच आडनावे का ? मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे , पण किमान पाटील, भोसले, कांबळे, गुरव, मोरे , अन गेलाबाजार मुतालिक वगैरे आडनावांना तरी यशस्वी बिजनेस करता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन द्या ! इझ ऑफ डूईंग बिजनेस , वेन्चर कॅपिटल , एम.आय.डी.सी , वीज, पाणी, रस्ते , मध्ये सुविधा वगैरे उपलब्ध्द करुन द्या ! पण कसं आहे की लोकांना " अनाजीपंत , कृष्णाजी भास्कर अन पेशवे " ह्या गफ्फांमध्ये इतकं मस्त गुंगवुन ठेवलें आहे की कशाला हवेत बिजनेस अन फिजनेस ! आता त्यात अडाणी ही नवीन भर ! टाक गाडीत २०० चें पेट्रोल , अन फेक पाचशेची नोट अन चपटी की पोरं लगेच तयार होतात वाट्टेल तो झेंडा लाऊन फिरायला . हाय काय अन नाय काय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 07/02/2023 - 22:57
मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे ,
फक्त काही पक्षांचे कार्यकर्ते तसे आहेत. हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.

In reply to by Trump

हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.
हां , थोडे गणित चुकले . आता नुकतेच ३० जानेवारी १९४८ ला २०-२५ वर्षे पुर्ण झाली . या एकदा सातार्‍यात , आमच्या आजोबांचा मस्त चिरेबंदी वाडा आहे त्याची सफर करवतो तुम्हाला . नंतर मस्त आमच्या शेतात बसुन हुरडा पार्टी करुयात . =))))

अर्धवटराव 08/02/2023 - 00:01
ब्रिटीशांनी भारतातली औद्योगीक मानसीकता खच्ची केली हे एका स्थूलमानाने खरं आहे. भारतात एकीकडे शेती, बलुतेदारी, कुटीर उद्योग इत्यादी रुपाने अगदी ग्रासरूट लेव्हलला उद्योग धंदे होते. तर दुसरीकडे कापड, मसाले वगैरे एक्स्पोर्ट करणारे मोठे उद्योजकही होते. या एव्हढ्या मोठ्या स्पेक्ट्रममधे बाकी अनेक उद्योग-धंदे असतील. या उद्योजकतेला ब्रिटीशांनी संपवलं एक एक नुकसान, आणि त्यामुळे आधुनीक जगाच्या उद्योगविश्वाशी नाळ जोडता न येणे हे आनुशांगीक नुकसान (जे कदाचीत मूळ नुकसानीपेक्शाही भयंकर होते) अदानी वा इतर कुठल्याही उद्योगसमुहाला सरकारी पातळीवरुन मदत मिळणे आणि त्यातुन उद्योगसाम्राज्य मोठी होणे यात विशेष काहि नाहि. जगात सर्वत्र हेच होत असतं. त्यात काहिही गैर नाहि. उद्योगात भ्रष्टाचार होणं आणि भ्रष्टाचारासाठी उद्योग तयार करणं यात मूलभूत फरक आहे. अदानीची केस पहिल्या प्रकाराची असावी. आम्हि वैयक्तीक रित्या त्यांच्यावर बेटींग करतो आहोतच. पडलेल्या समभागांत गुंतवणुक करण्याची संधी कोण सोडेल :) बाकी अदानी, आणि त्याला जोडुन मोदी विरोध, या प्रकरणावर काहि किमान बौद्धीक पातळीचे विवेचन वाचायला मिळते का हे बरच शोधलं.. आणि अपेक्शेनुसार भ्रमनिरास झालाच. भारतात अदानीच्या तोडीचे अनेकानेक उद्योजक तयार व्हावेत. त्यांच्या कल्पकतेतुन भारताचा आर्थीक विकास व्हावा. सामान्य लोकांनी शेअरमार्केट मधुन बक्कळ पैसा कमवावा. सगळ्यांना बरोबरीची संधी मिळण्याच्या आणि पिळवणुक टाळायच्या उद्देशाने कायद्याचं पालन व्हावं. हे काहि दिवास्वप्न नाहि. भारत त्या दिशेने मार्गक्रमण करतोय असं आश्वासक चित्रं आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय पुणे. जय काका हलवाई आणि चितळे बाकरवडी.

स्वधर्म 10/02/2023 - 17:42
मा. मुतालिक साहेब, आपण कोणता उद्योग करता ते माहिती नाही, पण अशा प्रकारचा लेख लिहिण्याआधी थोड़े जमिनीवरील वास्तव समजून घ्यायची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. अगदी अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, सध्या आपल्या महावितरण या सरकारी कंपनीने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वीजदर असणारे राज्य असतानाही! गुजरातचे वीजदर काय आहेत? तर आपल्यापेक्षा ३५% कमी, आंध्र, कर्नाटकचे आपल्यापेक्षा १५% कमी. प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जावेत म्हणून तर हे केलं जात नाही ना, हे आपली सारासार विवेकबुध्दी शाबूत ठेऊन विचार करण्याची गोष्ट आहे. गेल्या रविवारी सजग नागरिक मंच यांची मासिक सभा पुण्यात झाली, तिचे संपूर्ण चित्रिकरण यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात प्रताप होगाडे या उद्योजकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. या धाग्यात हे देण्याचे कारण म्हणजे अडाणी यांचा या दरवाढीशी असलेला संबंध त्यांनी उलगडून सांगितला! महावितरण हे महाजनको आणि अनेक खाजगी उद्योगाकडून वीज खरेदी करते. त्यात साडेतीन रु. प्रतियुनिटपासून ५ रू. ७६ पै प्रतियुनिट इतका दर पड़ला आहें. सर्वात जास्त दर (रू. ५.७६ ) हा अडाणी पावर कंपनीकडून घेतलेल्या वीजेचा आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत जी वीज अडाणी कंपनीकडून घेतली, त्याचा परिणाम म्हणून इंधन समायोजन आकार १५ ते २० पैशापासून वाढून १ रू. ३० पैसे इतका झाला आहें. मागे असेच एनटीपीसी व इतर ऊर्जा निर्मिती करणार्या कंपन्यांना कोल इंडीया या कडून कोळसा न घेता अडाणीकडून कोळसा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही वाचले होते. अडाणीचा दर अर्थातच खूप जास्त होता (काही पटीत). आपल्या प्रत्येक वीजबीलातून किमान १५० रू. ते कितीही हे या कंपनीवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे त्यांना जातात, हे सामान्य माणसाला समजत नाही. खालील चित्रफितीत काही प्रमाणात हे मांडले गेले आहे. सामान्य माणसाकडून अडाणी यांच्या केवळ एका धंद्यात कसे पैसे वळवले जातात, हे सहज समजून येईल. अडाणी यांचे बाकी सगळे धंदे उदा. विमानतळ, बंदरे, धान्य कोठारे असे सरकारचेच नेमके का आहेत? आपण याचा कधी विचार केला आहे का? सगळी सभाच मुळी महावितरण कसे चालते, त्यात भ्रष्टाचार आहे का? त्यांचे व्यवस्थापन काय दर्जाचे आहे? खरोखरच शेतीपंपाला दिलेली वीज मोफत आहे का? आणि दरवाढ यातील वास्तव मांडणारी झाली. पण निदान खालील तुकडे तरी पहा आणि मग १०० अडाणी आपल्याला हवेत का, सरकारी आस्थापने खरोखरच पारदर्शक व भ्रषटाचारमुक्त आहेत का याचा विचार करा. दुवा: https://www.youtube.com/watch?v=E--ofniwq44 १३:०० ते १५:०० ३५:०० ते ३५:३० ४५:०० ते ४८:०० आपण प्रिय आहें त्याला निसर्गत: महत्व देणारच, पण सत्य हे त्याहिपेक्षा महत्वाचे असते, ही जाणीव जेंव्हा आपल्या नागरिकांस होईल तेव्हाच आशेला काही जागा राहिल. अन्यथा भ्रामक प्रचारातून, स्वस्तुतीतून (पहा कालचे संसदेतील भाषण) उभ्या केलेल्या ब्रॅंडमधून जे प्रेम उपजते, ते आंधळे असते. पण वरच्याप्रमाणे प्रचारकी, भावनेला हात घालणार्या लेखांच्या रतिबात हे सांगणार तरी कुणाला?

श्रीगुरुजी 10/02/2023 - 18:55
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० 10/02/2023 - 19:26
पावसाळ्यात माझा कृषि पंप वापर शून्य असतानाही प्रत्येक महिन्यात ५०० पेक्षा अधिक युनिट्स वापर दाखवून बिल यायचे. चार महिने बिल भरले नाही. MSEB अधिकाऱ्यांना शेतात आणून प्रत्यक्ष मिटर रिडिंग दाखवले. शून्य वापर असतानाही वाढीव बिल का पाठवले? हे विचारले तर , निम्मे बिल करून देतो,लगेच भरत असल्यास. मी म्हटले पूर्ण भरतो पण मिटर रिडिंग तपासल्याची फॉर्मवर नोंद करा. त्यांनी तशी नोंद केली. ऑफीस मध्ये जाऊन शिक्का मारून घेतला. अजून बिल भरले नाही. पद्धतशीर तक्रार केली आहे. तक्रार मागे घ्यायला सांगत आहे. बघू काय होते ते. https://www.newsclick.in/inflated-power-bills-maharashtra-farmers-smell-scam

विवेकपटाईत 17/02/2023 - 11:08
गेल्या पाच वर्षांत 105 स्टार्टअप प्रत्येकी 6000 कोटींचे झाले आहेत. यातले काही अडाणी अंबानी निश्चित बनतील. टाटा ने 470 विमानांची ऑर्डर दिलइये तब्बल साडे पाच लाख कोटींची.विमान तळांची संख्या आज 147 आहेत दोन वर्षांत 200 वर जाणार. पुढील दोन वर्षांत डिफेंस उत्पादन 2 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे आणि निर्यात ही 35000 कोटींचा करण्याचा. उद्योगांसाठी उत्तम रास्ते, रेल्वे, optic फायबर लाइन, विमान तळ एवढेच काय वीज उत्पादन ही आठ वर्षणत 40 टक्के वाढले. सोलर स्वस्त वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बाकी शून्य तकनिकी असलेले उद्योग लाऊन पेप्सिको, कोकाकोला, यूनिलिव्हर, नेस्ले, अॅमवे समेत डझन भर अमेरिकी कंपन्या देशाला लुटतात. कुणीही त्यावर बोलात नाही. पंजाबत विदेशी कंपन्यांचे नाही तर किसान आंदोलनशी संबंध नसला तरी जिओ चे टावर जाळून 1500 कोटींचे नुकसान केले. पतंजलि फूड पार्क नुकताच सुरू झाला होता. त्यावर आक्रमण झाले. त्यात प्लांट जळला असता तर फूड पार्क =ची भ्रूण हत्या तेंव्हाच झाली असती. अर्थात हे कुणाच्या इशार्‍यांवर होते हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. पुढील दहा वर्षांत हीच सरकार राहिली तर देशांत 100 अडाणी निश्चित बनतील.

तर्कवादी 17/02/2023 - 11:50
शंभर अदाणी हवे आहेत
हं.. थोडं कठीण वाटतंय. पण गौतम अडाणी आणि त्यांच्या दोन मुलांनी पुढची काही वर्षे इतर उद्योगांवरचं लक्ष थोडं कमी करुन "अदाणी १००" प्रोजेक्टवर अहोरात्र मेहनत घेतली तर होवू शकेल कदाचित :)

आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ? (म्हणजे आतचे १ + आणखी १०० = टोटल १०१) काय करणार तुम्ही १०१ अडाण्यांच ? तुम्हाला असं म्हणायचं का की जर १ अडाणी म्हणून १ पोर्ट, १ विमानतळ, १ हायवे, १ कोळसा खाण.... तर १०० अडाणी म्हणून १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी ?? असं जर असेल तर, त्या १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी साठी "भागभांडवल" येणार कोठून ? उभारणार कसे ?

In reply to by आग्या१९९०

अनंतफंदी 07/02/2023 - 13:50
फारच उत्तम माहिती मिळाली. अदानींची फसवेगिरी आहेच. पण भारतात अजुन असे सगळे उद्योग करणारे ईतर समूह नसतील कशावरुन? हे सगळे प्रकरण ईतके गुंतागुंतीचे आहे, की जिथे सरकारी ऑडिटर्सनाही समजायला वेळ लागेल तिथे सामान्यांची काय कथा? एक मात्र खरे!!अदानी समूहाने हिंडेनबर्गवर बदनामीचा खटला किवा ईतर कायदेशीर कारवाई लवकर करावी लागेल तरच त्यांची प्रतिमा टिकेल, अन्यथा हिंडेन बर्गच्या आरोपांनाच दुजोरा मिळाल्यासारखे होईल. अजुन एक--- सुधीर भाऊंचा लेख वाचुन ह्या प्रकरणाला अशीही एक बाजु असेल असे नक्कीच वाटुन गेले.

कंजूस 07/02/2023 - 14:41
तर यांचा तारणहार कोण यांच्याशी काहीही संबंध नाही. वालचंद हिराचंद यांनी ब्रिटिश बोट कंपन्यांना कशी फाईट दिली तेसुद्धा ब्रिटिश राज्य असताना हे कुणी वाचलं आहे का? तेव्हा कुठे तारणहार होते?

सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत.
हे कुठल्या सरकारी कंपन्याबद्दल बोलत आहात कळेल का? माझाही संबंध सरकारी व्यवस्थेशी येतच असतो थोडक्यात सांगायचे तर जिल्हा परिषद, सावजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी वगैरे वगैरे. त्यामुळे 'भयानक गुंतागुंतीच्या'शी सहमत आहे पण स्वच्छ!
घरी बसल्या बसल्या लिंबाचे लोणचे खोचलेला बशीभर गोड शिरा खात खात हे मोदी आणि अदाणी देशाला लुटताहेत अशी बडबड करणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर शक्य असेल तर विश्वास ठेवावा.
अनुभवाचे बोल आहेत, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास केव्हाच उडून गेला आहे. लोकशाहीवरही फार काळ टिकेल असं वाटत नाही. बाकी, अशी दिशाभूल करणारे लेख दोन्ही बाजूने चालू असतात त्यामुळे चालू द्या! सं - दी - प

मित्रहो 07/02/2023 - 16:36
खूप रोखठोक आहे. इतका की उपहास आहे का असे वाटावे.
दाढीचे खुंट वाढवून खांद्याला झोळी लटकवून अदाणीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या समस्त महारथीपैकी एकालाही पोर्ट बांधता येत नसेल काय ? नाही. अशा बोलघेवड्यांनाच काय पण आपल्या कल्पनेतल्या भलाभल्याना असे प्रकल्प हाती घेण्याची आणि ते पूर्ण करण्याची कुवत नसते.
अदाणी नको असेल तर एखादा प्रकल्प उभा करण्याचा धंदा करावा किंवा जे धंदा करीत आहेत त्यांना आपल्या सर्व ताकदीनिशी मोठे करावे.
हे दोन्ही आवडले सरकारी व्यवस्था गुंतागुंतीची असते यात शंका नाही पण स्वच्छ असते यावर सामान्यांचा विश्वास बसणे कठीण आहे. सध्यातरी अदाणींविषयी जो गोंधळ सुरु आहे तो व्यवसायाविषयी नाही तर समभागाच्या किंमतींविषयी आहे. देशाला झोलावाला नाही तर उद्योगपतींची, छोट्या व्यावसायिकांची गरज आहे यात काही दुमत नाही.

सौंदाळा 07/02/2023 - 16:36
+/- शंभर अदानी हवे आहेत याच्याशी सहमत सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत - असहमत माझा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सरकरी कंपन्यांशी जो काही संबंध आला आहे त्यावरुन त्यांना अजिबात स्वच्छ म्हणणार नाही.

कॉमी 07/02/2023 - 16:56
तद्दन फालतू लेख. एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.

In reply to by कॉमी

Trump 07/02/2023 - 22:44
तद्दन फालतू लेख.
सहमत
एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.
असहमत

लेखातील काही मतांशी अमान्य आहे . पण तेच तेच लिहित बसत नाही आता. पण देशात व्यवसाय वृध्दी व्हाय्लाच हवी ह्यात शंका नाही . पण ती अदानीनेच का करावी ? टाटा , बिर्ला , अंबानी , बजाज, पुनावाला हीच आडनावे का ? मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे , पण किमान पाटील, भोसले, कांबळे, गुरव, मोरे , अन गेलाबाजार मुतालिक वगैरे आडनावांना तरी यशस्वी बिजनेस करता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन द्या ! इझ ऑफ डूईंग बिजनेस , वेन्चर कॅपिटल , एम.आय.डी.सी , वीज, पाणी, रस्ते , मध्ये सुविधा वगैरे उपलब्ध्द करुन द्या ! पण कसं आहे की लोकांना " अनाजीपंत , कृष्णाजी भास्कर अन पेशवे " ह्या गफ्फांमध्ये इतकं मस्त गुंगवुन ठेवलें आहे की कशाला हवेत बिजनेस अन फिजनेस ! आता त्यात अडाणी ही नवीन भर ! टाक गाडीत २०० चें पेट्रोल , अन फेक पाचशेची नोट अन चपटी की पोरं लगेच तयार होतात वाट्टेल तो झेंडा लाऊन फिरायला . हाय काय अन नाय काय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 07/02/2023 - 22:57
मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे ,
फक्त काही पक्षांचे कार्यकर्ते तसे आहेत. हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.

In reply to by Trump

हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.
हां , थोडे गणित चुकले . आता नुकतेच ३० जानेवारी १९४८ ला २०-२५ वर्षे पुर्ण झाली . या एकदा सातार्‍यात , आमच्या आजोबांचा मस्त चिरेबंदी वाडा आहे त्याची सफर करवतो तुम्हाला . नंतर मस्त आमच्या शेतात बसुन हुरडा पार्टी करुयात . =))))

अर्धवटराव 08/02/2023 - 00:01
ब्रिटीशांनी भारतातली औद्योगीक मानसीकता खच्ची केली हे एका स्थूलमानाने खरं आहे. भारतात एकीकडे शेती, बलुतेदारी, कुटीर उद्योग इत्यादी रुपाने अगदी ग्रासरूट लेव्हलला उद्योग धंदे होते. तर दुसरीकडे कापड, मसाले वगैरे एक्स्पोर्ट करणारे मोठे उद्योजकही होते. या एव्हढ्या मोठ्या स्पेक्ट्रममधे बाकी अनेक उद्योग-धंदे असतील. या उद्योजकतेला ब्रिटीशांनी संपवलं एक एक नुकसान, आणि त्यामुळे आधुनीक जगाच्या उद्योगविश्वाशी नाळ जोडता न येणे हे आनुशांगीक नुकसान (जे कदाचीत मूळ नुकसानीपेक्शाही भयंकर होते) अदानी वा इतर कुठल्याही उद्योगसमुहाला सरकारी पातळीवरुन मदत मिळणे आणि त्यातुन उद्योगसाम्राज्य मोठी होणे यात विशेष काहि नाहि. जगात सर्वत्र हेच होत असतं. त्यात काहिही गैर नाहि. उद्योगात भ्रष्टाचार होणं आणि भ्रष्टाचारासाठी उद्योग तयार करणं यात मूलभूत फरक आहे. अदानीची केस पहिल्या प्रकाराची असावी. आम्हि वैयक्तीक रित्या त्यांच्यावर बेटींग करतो आहोतच. पडलेल्या समभागांत गुंतवणुक करण्याची संधी कोण सोडेल :) बाकी अदानी, आणि त्याला जोडुन मोदी विरोध, या प्रकरणावर काहि किमान बौद्धीक पातळीचे विवेचन वाचायला मिळते का हे बरच शोधलं.. आणि अपेक्शेनुसार भ्रमनिरास झालाच. भारतात अदानीच्या तोडीचे अनेकानेक उद्योजक तयार व्हावेत. त्यांच्या कल्पकतेतुन भारताचा आर्थीक विकास व्हावा. सामान्य लोकांनी शेअरमार्केट मधुन बक्कळ पैसा कमवावा. सगळ्यांना बरोबरीची संधी मिळण्याच्या आणि पिळवणुक टाळायच्या उद्देशाने कायद्याचं पालन व्हावं. हे काहि दिवास्वप्न नाहि. भारत त्या दिशेने मार्गक्रमण करतोय असं आश्वासक चित्रं आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय पुणे. जय काका हलवाई आणि चितळे बाकरवडी.

स्वधर्म 10/02/2023 - 17:42
मा. मुतालिक साहेब, आपण कोणता उद्योग करता ते माहिती नाही, पण अशा प्रकारचा लेख लिहिण्याआधी थोड़े जमिनीवरील वास्तव समजून घ्यायची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. अगदी अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, सध्या आपल्या महावितरण या सरकारी कंपनीने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वीजदर असणारे राज्य असतानाही! गुजरातचे वीजदर काय आहेत? तर आपल्यापेक्षा ३५% कमी, आंध्र, कर्नाटकचे आपल्यापेक्षा १५% कमी. प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जावेत म्हणून तर हे केलं जात नाही ना, हे आपली सारासार विवेकबुध्दी शाबूत ठेऊन विचार करण्याची गोष्ट आहे. गेल्या रविवारी सजग नागरिक मंच यांची मासिक सभा पुण्यात झाली, तिचे संपूर्ण चित्रिकरण यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात प्रताप होगाडे या उद्योजकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. या धाग्यात हे देण्याचे कारण म्हणजे अडाणी यांचा या दरवाढीशी असलेला संबंध त्यांनी उलगडून सांगितला! महावितरण हे महाजनको आणि अनेक खाजगी उद्योगाकडून वीज खरेदी करते. त्यात साडेतीन रु. प्रतियुनिटपासून ५ रू. ७६ पै प्रतियुनिट इतका दर पड़ला आहें. सर्वात जास्त दर (रू. ५.७६ ) हा अडाणी पावर कंपनीकडून घेतलेल्या वीजेचा आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत जी वीज अडाणी कंपनीकडून घेतली, त्याचा परिणाम म्हणून इंधन समायोजन आकार १५ ते २० पैशापासून वाढून १ रू. ३० पैसे इतका झाला आहें. मागे असेच एनटीपीसी व इतर ऊर्जा निर्मिती करणार्या कंपन्यांना कोल इंडीया या कडून कोळसा न घेता अडाणीकडून कोळसा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही वाचले होते. अडाणीचा दर अर्थातच खूप जास्त होता (काही पटीत). आपल्या प्रत्येक वीजबीलातून किमान १५० रू. ते कितीही हे या कंपनीवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे त्यांना जातात, हे सामान्य माणसाला समजत नाही. खालील चित्रफितीत काही प्रमाणात हे मांडले गेले आहे. सामान्य माणसाकडून अडाणी यांच्या केवळ एका धंद्यात कसे पैसे वळवले जातात, हे सहज समजून येईल. अडाणी यांचे बाकी सगळे धंदे उदा. विमानतळ, बंदरे, धान्य कोठारे असे सरकारचेच नेमके का आहेत? आपण याचा कधी विचार केला आहे का? सगळी सभाच मुळी महावितरण कसे चालते, त्यात भ्रष्टाचार आहे का? त्यांचे व्यवस्थापन काय दर्जाचे आहे? खरोखरच शेतीपंपाला दिलेली वीज मोफत आहे का? आणि दरवाढ यातील वास्तव मांडणारी झाली. पण निदान खालील तुकडे तरी पहा आणि मग १०० अडाणी आपल्याला हवेत का, सरकारी आस्थापने खरोखरच पारदर्शक व भ्रषटाचारमुक्त आहेत का याचा विचार करा. दुवा: https://www.youtube.com/watch?v=E--ofniwq44 १३:०० ते १५:०० ३५:०० ते ३५:३० ४५:०० ते ४८:०० आपण प्रिय आहें त्याला निसर्गत: महत्व देणारच, पण सत्य हे त्याहिपेक्षा महत्वाचे असते, ही जाणीव जेंव्हा आपल्या नागरिकांस होईल तेव्हाच आशेला काही जागा राहिल. अन्यथा भ्रामक प्रचारातून, स्वस्तुतीतून (पहा कालचे संसदेतील भाषण) उभ्या केलेल्या ब्रॅंडमधून जे प्रेम उपजते, ते आंधळे असते. पण वरच्याप्रमाणे प्रचारकी, भावनेला हात घालणार्या लेखांच्या रतिबात हे सांगणार तरी कुणाला?

श्रीगुरुजी 10/02/2023 - 18:55
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० 10/02/2023 - 19:26
पावसाळ्यात माझा कृषि पंप वापर शून्य असतानाही प्रत्येक महिन्यात ५०० पेक्षा अधिक युनिट्स वापर दाखवून बिल यायचे. चार महिने बिल भरले नाही. MSEB अधिकाऱ्यांना शेतात आणून प्रत्यक्ष मिटर रिडिंग दाखवले. शून्य वापर असतानाही वाढीव बिल का पाठवले? हे विचारले तर , निम्मे बिल करून देतो,लगेच भरत असल्यास. मी म्हटले पूर्ण भरतो पण मिटर रिडिंग तपासल्याची फॉर्मवर नोंद करा. त्यांनी तशी नोंद केली. ऑफीस मध्ये जाऊन शिक्का मारून घेतला. अजून बिल भरले नाही. पद्धतशीर तक्रार केली आहे. तक्रार मागे घ्यायला सांगत आहे. बघू काय होते ते. https://www.newsclick.in/inflated-power-bills-maharashtra-farmers-smell-scam

विवेकपटाईत 17/02/2023 - 11:08
गेल्या पाच वर्षांत 105 स्टार्टअप प्रत्येकी 6000 कोटींचे झाले आहेत. यातले काही अडाणी अंबानी निश्चित बनतील. टाटा ने 470 विमानांची ऑर्डर दिलइये तब्बल साडे पाच लाख कोटींची.विमान तळांची संख्या आज 147 आहेत दोन वर्षांत 200 वर जाणार. पुढील दोन वर्षांत डिफेंस उत्पादन 2 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे आणि निर्यात ही 35000 कोटींचा करण्याचा. उद्योगांसाठी उत्तम रास्ते, रेल्वे, optic फायबर लाइन, विमान तळ एवढेच काय वीज उत्पादन ही आठ वर्षणत 40 टक्के वाढले. सोलर स्वस्त वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बाकी शून्य तकनिकी असलेले उद्योग लाऊन पेप्सिको, कोकाकोला, यूनिलिव्हर, नेस्ले, अॅमवे समेत डझन भर अमेरिकी कंपन्या देशाला लुटतात. कुणीही त्यावर बोलात नाही. पंजाबत विदेशी कंपन्यांचे नाही तर किसान आंदोलनशी संबंध नसला तरी जिओ चे टावर जाळून 1500 कोटींचे नुकसान केले. पतंजलि फूड पार्क नुकताच सुरू झाला होता. त्यावर आक्रमण झाले. त्यात प्लांट जळला असता तर फूड पार्क =ची भ्रूण हत्या तेंव्हाच झाली असती. अर्थात हे कुणाच्या इशार्‍यांवर होते हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. पुढील दहा वर्षांत हीच सरकार राहिली तर देशांत 100 अडाणी निश्चित बनतील.

तर्कवादी 17/02/2023 - 11:50
शंभर अदाणी हवे आहेत
हं.. थोडं कठीण वाटतंय. पण गौतम अडाणी आणि त्यांच्या दोन मुलांनी पुढची काही वर्षे इतर उद्योगांवरचं लक्ष थोडं कमी करुन "अदाणी १००" प्रोजेक्टवर अहोरात्र मेहनत घेतली तर होवू शकेल कदाचित :)
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

पैशाचे झाड- भाग शेवटचा

अतरंगी ·

एखादी गोष्ट मिळावी, व्हावी असं वाटणं ही झाली ईच्छा. त्यासाठी आपण प्रयत्न करुन, कष्ट करुन ती मिळवायची ही झाली प्रेरणा. आणि वाट्टेल ती संकटं येऊ देत, विघ्नं येऊ देत, त्यांच्यावर मात करुन मला हवी ती गोष्ट मी करुन, मिळवून दाखवणारच, ही झाली ईच्छाशक्ती. __/\__ लेखमाला आवडली.

गवि 01/02/2023 - 12:46
उत्तम मालिका. अनेक विचार घेण्यासारखे आहेत. नुसती कोरडी माहिती देण्याऐवजी ती गुंफण्यासाठी सर्वांना कुठे ना कुठे रीलेट करता येईल असा कथेचा फॉरमॅट वापरण्याची कल्पना सुरेख. असेच आणखी लेखन येत राहावे.

स्मिताके 01/02/2023 - 19:35
>>संयम, शिस्त, सातत्य राखणे कोणत्याही ध्येयाला उपयुक्त असा हा कळीचा मुद्दा.. पण हेच तर जमत नाही ना! मोलाचे विचार मांडणार्‍या लेखमालेबद्द्ल आभारी आहे.

वामन देशमुख 06/02/2024 - 15:39
आज पूर्ण लेखमाला वाचून काढली. अतरंगी साहेब - छान, उपयुक्त, मार्गदर्शक, विचारप्रवर्तक लिहिलंय. --- अश्याच उपयुक्त विषयांवर अजून काही येऊ द्या.

एखादी गोष्ट मिळावी, व्हावी असं वाटणं ही झाली ईच्छा. त्यासाठी आपण प्रयत्न करुन, कष्ट करुन ती मिळवायची ही झाली प्रेरणा. आणि वाट्टेल ती संकटं येऊ देत, विघ्नं येऊ देत, त्यांच्यावर मात करुन मला हवी ती गोष्ट मी करुन, मिळवून दाखवणारच, ही झाली ईच्छाशक्ती. __/\__ लेखमाला आवडली.

गवि 01/02/2023 - 12:46
उत्तम मालिका. अनेक विचार घेण्यासारखे आहेत. नुसती कोरडी माहिती देण्याऐवजी ती गुंफण्यासाठी सर्वांना कुठे ना कुठे रीलेट करता येईल असा कथेचा फॉरमॅट वापरण्याची कल्पना सुरेख. असेच आणखी लेखन येत राहावे.

स्मिताके 01/02/2023 - 19:35
>>संयम, शिस्त, सातत्य राखणे कोणत्याही ध्येयाला उपयुक्त असा हा कळीचा मुद्दा.. पण हेच तर जमत नाही ना! मोलाचे विचार मांडणार्‍या लेखमालेबद्द्ल आभारी आहे.

वामन देशमुख 06/02/2024 - 15:39
आज पूर्ण लेखमाला वाचून काढली. अतरंगी साहेब - छान, उपयुक्त, मार्गदर्शक, विचारप्रवर्तक लिहिलंय. --- अश्याच उपयुक्त विषयांवर अजून काही येऊ द्या.
लेखनप्रकार
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 भाग ५ https://www.misalpav.com/node/51053 दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच अमोलचा मेसेज आलेला पाहून अभिने कुतूहलाने तो मेसेज ऊघडला. आदल्या दिवशी बोलण्याच्या ओघात अभ्याने गरिबीचे दुष्ट्चक्र आणि संपत्तीच्या भाग्यचक्र याचा ऊल्लेख केला होता. पण त्यानंतर त्याविषयी सांगायचे विसरला होता. अमोलने त्याचीच आठवण करुन द्यायला मेसेज केला होता.

पैशाचे झाड- भाग ५

अतरंगी ·

अत्रंगी भौ... किती सोप्या भाषेत कठीण वाटणारा विषय मांडला आहे. जब जागो तब सवेरा.... अगदी याच पद्धतीने शुन्य मंडळ भेदून आज सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य मस्त चालले आहे. लेख पुढे वाढवा, मार्गदर्शक ठरू शकेल. हा लेख त्यांच्या करता, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण यम बी ए फायनान्स चे वचन नकळे आम्हां

अत्रंगी भौ... किती सोप्या भाषेत कठीण वाटणारा विषय मांडला आहे. जब जागो तब सवेरा.... अगदी याच पद्धतीने शुन्य मंडळ भेदून आज सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य मस्त चालले आहे. लेख पुढे वाढवा, मार्गदर्शक ठरू शकेल. हा लेख त्यांच्या करता, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण यम बी ए फायनान्स चे वचन नकळे आम्हां
लेखनप्रकार
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 अमोलच्या डोक्यात चाललेल्या विचारांनी त्याला चांगलंच पछाडलं होतं. त्याला जितका विचार करु तितके जास्त प्रश्न पडत होते. गुंता वाढतच चालला होता. शेवटी त्याने अभ्यालाच फोन करुन एके दिवशी निवांत गप्पा मारायच्या तयारीने ये असे म्हणून बोलवून घेतले. बराच वेळ शिळोप्याच्या जनरल गप्पा झाल्यावर अमोलने विषय काढला. " अभ्या तू मागच्या काही महिन्यात जे जे बोलला आहेस ते माझ्या डोक्यातून काही जात नाहीये.