मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रफाल - भाग २

रणजित चितळे ·

आनन्दा 17/10/2018 - 11:47
काही प्रश्न 1. रिलायन्स सोबत दासू चा नेमका काय करार झालाय याचे काही तपशील कुठे उपलब्ध आहेत का? की केवळ त्या यादीत रिलायन्स चे नाव आहे इतक्याच भांडवलावर गदारोळ सुरू आहे? ओके, याचं उत्तर दिलंय. मनोगतावर नाहीये ही आकडेवारी 2. रिलायन्स ने आदल्या दिवशी कंपनी स्थापन करणे यात मला काही गैर दिसत नाही, कारण जर नेमक्या काय वाटाघाटी होत आहेत हे माहीत नसेल तर उगीच एक entity स्थापन करण्यात काही अर्थ नसावा.. 3. सरकारने खाजगी क्षेत्राला ला झुकते माप दिलेच नसेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते, कारण माझ्या माहितीनुसार टाटा आणि मुकेश अंबानीला यात रस नव्हता असे ऐकून आहे.. तसेच कमी वेळात जर बरेच भांडवल आणि मनुष्यबळ हवे असेल तर खाजगी कंपनीला काम देणे केव्हाही योग्य असे मला वाटते. सरकारने घ्यायचे म्हणजे पुढच्या 30 वर्षांची हमी हवी, नाहीतर ते लोक मग ओझे बनतात.

In reply to by आनन्दा

आनन्दा 17/10/2018 - 11:58
त्या फोटोमध्ये बघितले तर दसॉल्ट ने रिलायन्स सोबत व्हेंचर केले आहे.. मग याचा अर्थ असा होईल का की थोड्या फार प्रमाणात रिलायन्स ला काहीतरी ToT होईल ज्याचा रिलायन्स ला भविष्यात फायदा होईल?

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 12:11
ToT चे बर्याच श्रेण्या आहेत. मी त्या दिलेल्या आहेत. व ऑफसेट चे वेटेज टिओटी साठी वेगळे असते. पण झाली तर काय हरकत आहे. जे मला माहित आहे ते टिओटी बाबत काही कंपन्या फार सावध असतात. फ्रांन्स मधल्या कंपन्या त्यातल्या एक आहेत. एच ए एल बरोबर टिओटी साठी गाडी रखडली होती.

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 11:59
???? रीलायन्स ने पिपावाव (माझ्या टंकलेखनात चूक झाली लेखामध्ये चूकून पिपालाव असे लिहिले गेले आहे) मिसळपाव वर संशोधन करता यावे अशी विनंती करतो. आपण गुगल वर पिपावाव बद्दल वाचाव ही विनंती.

In reply to by रणजित चितळे

आनन्दा 17/10/2018 - 14:21
मी मनोगत वरचा लेख वाचून प्रश्न विचारायला आलो होतो. पण रेफरन्स साठी वरचा लेख परत वाचल्यावर त्या चित्रात उत्तरे मिळाली.. पण एव्हढे टाइप केले होते, मग फुकट कशाला घालवू :P म्हणून as a loud thinking पोस्ट केले. असो. माझ्या बर्याचश्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.. आता सध्या हा विषय इतका ऐरणीवर येण्यामागे भाजपविरोधाव्यतिरिक्त अन्य कोणते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का हा एक प्रश्न शिल्लक आहे. याची कोणती तथ्यआधारीत माहिती आहे का?

माहितगार 17/10/2018 - 12:30
शस्त्र सामग्रीसाठी इतरांवर अवलंबित्व म्हणजे हात असून पाय नसलेली स्थिती असावी. जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारतास एवढ्या दशकात स्वालंबीत्व न गाठता येणे हि अत्यंत खुपणारी बाजू आहे . बाकी धागा लेख माहितीपूर्ण रोचक आहे हे मान्यच.

सुबोध खरे 17/10/2018 - 12:32
रिलायन्स ला "तंत्रज्ञान हस्तांतरण" होणारच नाही. कारखाना बांधायचा, कामगार कामावर घ्यायचे, डेसो कंपनीने सांगितल्याबरहुकूम कच्चा माल, प्लास्टिक, रेझीन, धातू आणून त्यांनी दिलेल्या यंत्रावर त्याचे भाग बनवायचे आणि ते एकत्र करून विमानाचे सुटे भाग बनवायचे असे हे साधे सरळ कंत्राट आहे. रिलायन्स हि एकच कंपनी असे करणार नसून अशा अनेक कंपन्यांना उप कंत्राट दिले जाईल. हा धातू हे रेझीन इथे का वापरले गेले हे डेसो कंपनी कधीही सांगणार नाही. KNOW HOW आणि KNOW WHY यातील फरक समजून घ्या. याच लेखाच्या पहिल्या भागात लिहिल्या प्रमाणे २००० साली तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचे कंत्राटावर सही केल्यानंतर १८ वर्षांनी हिंदुस्थान एरॉनॉटिकसला आपल्या बळावर एकही सुखोई विमान तयार करता आलेले / येणार नाही. इतकी वर्षे मारुती चे सुझुकीबरोबर सहकार्य आहे. मारुतीचा काय फायदा झाला? सगळे तंत्रज्ञान जपान मधूनच आले होते आणि येत आहे. रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ? शेवटी अद्ययावत तंत्रज्ञान देऊन स्वतःच्या पायावर कोण कुर्हाड मारून घेईल? भरपूर पैसे ओतल्याशिवाय किंवा स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणतेही राष्ट्र तुम्हाला कोणतेही क्रिटिकल आणि अद्ययावत तंत्रज्ञान देणारच नाही हि खूणगाठ बांधणे आवश्यक आहे. तेजस तयार करणे खर्चिक असले तरी भविष्यातील फायदा लक्षात घेता त्यात गुंतवणूक करणे का आवश्यक आहे हे समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 17/10/2018 - 13:50
रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ?
परफेक्ट. मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने गव्हर्नमेंटला रोडरोलरहि विकले. परदेशातून आणि खाजगी कंपन्याकडून घेऊन. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने बसबॉड्या पण विकल्या हरयाणा आणि दिल्ली सरकारला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने विमाने पण इंपोर्ट केली आणि भारतात विकली. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. भारतात सार्वजनिक वाहतूक सेवांची जास्त गरज आहे असा अहवाल असताना छोट्या कारची निर्मीतीचा परवाना मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. इतर छोट्या कारच्या निर्मीतीत गुंतलेल्या उद्योजकांना शांत करण्यात आले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. काहिहि अनुभव नसता प्रोटोटाइप पण सादर करणे जमले नाही तरीही मारुतिला सर्वत्र हिरवा कंदील मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिच्याच नावाखाली कित्येक कंपन्या स्थापन करुन एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने पैसे फिरवत अपहार केले गेले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. कित्येक एकर मोक्याची अन सुपीक जागा कवडीमोल किंमतीत मिळवली गेली. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. हा इतिहास झाला. . नंतर एखादी सुझुकी येते, नशीबाने सगळे तारुन नेले जाते, तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत जातो, गाड्यावर सुझुकीचा लोगो दिमाखात मिरवला जातो. हे झाले वर्तमान. पण मारुतिचा पाया असाच एककल्ली व्यक्तिकेंद्रित आणि काहीच जणांचे भले करणारा होता, भविष्य मारुति सुझुकीप्रमाणेच असेच असेल असे म्हणता येणार नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 17/10/2018 - 18:45
मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. वर्तमान पंतप्रधानांना मुलगा नाहीच तेंव्हा असा इतिहास परत होण्याचा प्रश्न नाही. परंतु इटालियन गंगाभागीरथीचे सुपुत्र त्यांच्या जागी आले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न पडलाय? बटाट्यापासून सोने बनवायच्या कारखान्याला कंत्राट मिळेल इ इ. बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात. चष्मा घातला कि असंच होतंय.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 19/10/2018 - 11:44
बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात.
डॉक्टरसाहेब, अ‍ॅक्चुअली तुम्ही म्हणालात ते वाक्य अगदी खरे ठरतेय बघा. तुमच्याच बाबतीत. चष्मा घातला की असंच होतंय. हे स्पष्ट वाक्य आहे माझ्या प्रतिसादातले मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. अजुन काय स्पष्ट सांगावे, बाकी प्रतिसादात मारुतिने काय केले तेच लिहिलेले आहे, त्यात कुठेच मारुति गौरवाचा भाग नाहीये, तुमचाच प्रतिसाद कोट करुन त्यासंदर्भातच लिहिलेले आहे, पण एकदा मोदीप्रेमाची परमनंट लेन्स बसली की सगळ्यांच्याच डोळ्यावर चष्मे आहेत असा भास व्हायला लागतो. निदान प्रतिसाद तरी नीट वाचत जा. तुमच्याविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी आदर आहे पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 19/10/2018 - 12:56
मोदी प्रेमाचा येथे कुठे भास होतॊय तुम्हाला ? मी तो या लेखात कुठे तरी दाखवला आहे का? जे काही आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे काय कारण आहे? तंत्रज्ञान कोणतीही विदेशी कंपनी कधीच देत नाही हेही इ मी स्पष्टपणे लिहिलेले आहे डेसोने रिलायन्सचे नाही तर अनेक कंपन्यांशी ऑफसेट कंत्राट केले आहे ते चितळे साहेबानी व्यवस्थित सविस्तर चित्र लावून दाखवलं आहे तर मग केवळ रिलायन्सच्या "अनुभवाबद्दल" एवढा काथ्याकूट करण्याचे कारण समजले नाही. मुळात तुम्ही सर्व गोष्टी वैयक्तिक का घेत आहेत हेच समजत नाही. मारुतीचा एक केवळ संदर्भ दिला( त्यावेळेस माझ्या डोक्यात संजय गांधी किंवा काँग्रेस नव्हतेच) त्यावेळेस फॉक्स वॅगनने तंत्रज्ञान द्यायला नकार का दिला होता तेवढेच डोक्यात होते. पण एक हेतू डोक्यात ठेवून तुम्ही त्यावर एवढा इमला उभारला. पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा. श्री मोदींना माझ्या सारख्या यःकश्चित माणसाच्या मदतीची अजिबात गरज नाही आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या माणसाला ते अजिबात भीक घालत नाहीत हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. मोदी द्वेषाची झापडं लावली कि कोणत्याही गोष्टीत अंधारच नजरेस येतो. मग कितीही कोणी प्रकाश दाखवला तरी काही दिसत नाहीच.

In reply to by सुबोध खरे

मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. स्वतःचे वीजबिल नीट वाचता येत नाही आणि निघालेत दुसऱ्यांना सत्य दाखवायला. खोटं रेटून बोलणाऱ्याचा आणि खाजवून खरूज काढणाऱ्याचा पोकळ बांबूचे फटके मारूनच सत्कार होणार. दुसऱ्याला नथुराम संबोधनारे, पगार विचारणारे कोण होते? म्हणे मी वैयक्तिक होत नाही, कधी खरं बोलणार हो तुम्ही?

सुबोध खरे 17/10/2018 - 12:56
चितळे साहेब आपण महापालिकेत उंदीर मारण्याच्या खात्यात उंदीर गोळा करण्याच्या कामावर असलो तरी श्री मोदींनी किंवा राष्ट्रपतींनि आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे अशी मनोवृत्ती असलेले लोक इथे भरपूर आहेत. अशा लोकांना फाट्यावर मारावे हीच विनंती.

स्वधर्म 17/10/2018 - 15:03
अापण DIPP व रिलायन्ससंबंधी खालील माहिती दिली अाहे: “राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. “ अाणि “ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. ” अापण म्हणता तसे, भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही. दुसरे असे, की ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही. नांवे सुचवण्यापूर्वी त्या कंपन्यांची खात्री करून घेण्याची DIPP ची ड्यू डिलिजन्सची प्रोसेस नक्कीच असावी, पण… इथे सरळ प्रश्न विचारला, तरी काही अायडी जणू काही विचारणे हाच गुन्हा अाहे असे प्रतिसाद लिहीत अाहेत, त्यामुळे अाधिक खोलात जाण्याची इच्छा नाही. अापण हा विषय चांगला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला अाहे. लोकांना कॉंग्रेसबद्दल काही फार अापुलकी अाहे, अशातला भाग नाही. त्यांना त्यांनी अाधीच नाकारले अाहे. शेवटचा परिच्छेद त्यावर खर्च झाल्यामुळे लेख समतोल व निष्पक्ष न वाटता, हेतू असलेला वाटत अाहे. तो नसता टाकला तर चालले असते.

In reply to by स्वधर्म

आनन्दा 17/10/2018 - 16:33
त्याचे उत्तर त्यांनी वर दिले आहे.. रिलायन्स ने या क्षेत्रातली एक अनुभवी कंपनी विकत घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता पत मिळाली आहे.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:30
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:41
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून हे सगळे g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज एरोनॉटीक्स, रेवा रिलायनस् ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते. भेटकार्ड

In reply to by रणजित चितळे

स्वधर्म 26/10/2018 - 12:53
मिळाले. तथापि खालील प्रश्नाबाबत अापण काहीच भाष्य केले नाही, हे फक्त नोंदवतो. …भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही.  दुसरा प्रश्न होता रिलायन्स बाबत: … ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही.  यावर अापल्या उत्तरातून समजलं ते असं की रिलायन्सने पिपापाव ही कंपनी विकत घेतली अाणि त्यांना बरीच संरक्षणविषयक कामे मिळाली, मिळत अाहेत. फक्त एवढ्यावर दासू अाणि DIPP या दोन्ही संस्थांनी सरळ हजारो कोटी रूपयांचं काम इतक्या कमी वेळात त्यांना द्यावं, हे अजूनही अाश्चर्यकारक वाटतं. अापण बरीच मेहनत घेऊन दिर्घ स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यात बरीच अाजूबाजूची माहिती अाहे, पण कळीचा मुद्दा… जाऊ द्या. हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा अाहे अाणि अामच्यासारख्या सामान्य माणसाला त्यातली संपूर्ण माहीती घेऊन मत बनवणे कदाचित कधीच शक्य होणार नाही. प्रश्न उडवून न लावता व शेरेबाजी न करता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अापले अनेक अाभार.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 26/10/2018 - 13:27
आजच्याच पेपरात आले आहे की दासू रिलायनस् jv ४९ टक्के ५१ टक्के ८५० करोड. रिलायनस् कडे अनुभव नाही त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायनस् अनूभव विकत घेऊ शकते (अनुभवी निवृत्त कारागीर, अनुभवी निवृत्त अधिकारी इत्यादी) त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही ह्यात r and d काही नसणार आहे. घाल माती काढ गणपती असेल तर से सहज जमण्यासाऱखे आहे. ओनली विमल पासून रिलायनस् वर खूप जणांचा राग आहे पण आता IBC insolvency and bankruptcy code (हि पण मोदी सरकारचीच एक देणगी आहे व खूप प्रभावी आहे) आल्यावर NPA creation जास्त होऊ शकणार नाही.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 24/10/2018 - 10:19
-जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक व होता होई पर्यंत संरक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात बर्‍याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स, पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकाने कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हिल एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे मेक इन इंडिय चे धोरण असले तरी प्रत्येक संरक्षण खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे, पण त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तुस्थिती. ती हळू हळू बदलेल. सुरवात झाली हे नक्की. - रिलायन्स किंवा कोणतीही कंपनी सगळे विमान बांधणारी कंपनी होऊ शकत नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करते द्राल मिहान नागपूर मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्यात रफाल बांधण्याचे काम होते (पण पूर्णं रफाल एच ए एल कडून बांधणे व त्याच्या गुणवत्तेची हमी दासू ने देणे हे दासूला मंजूर नव्हते (कारण ते शक्य नव्हते - ह्या आधी २०१५ साली बोईंग कंपनीने एच ए एल बरोबर अस्त्रांचा कव्हर बनवण्याचा करार मोडीत काढला होता तो गुणवत्तेच्याच आधारावर)) . रिलायन्सकडे रफाल बांधण्याचे काम नाही. ऑफसेट मध्ये रिलायन्सच नाही तर बर्‍याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सॅमटेल सुद्धा आहे (कंपन्या १०० पेक्षा जास्त). डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे त्यांना अमेरीकन शिप मेंटेनन्स चे काम मिळाले. द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनुभव विकत घेतात (म्हणजे अनुभवी लोकांना कामावर ठेवतात). हा कच्छी सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपली मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायन्स बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलिकॉप्टर बांधायचे कंत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून ही सगळी g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज, एरोनॉटीक्स, रेवा रिलायन्स ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते.

गतीशील 17/10/2018 - 15:23
भारतामध्ये श्रीमंत असणे हा गुन्हा आहे. त्यातून आडनाव अंबानी असणे तर जन्मठेपेचा गुन्हा आहे. लोक असे बोलतात कि जसे काही अंबानीला रस्त्याकडेला असलेल्या मंदिरातून उचलून आणून राफेल चे काम दिले आहे. तुम्हाला झेपत असेल तर करा रजिस्टर कंपनी आणि घ्या काम , नसेल तर जे काम करत आहेत त्यांना तरी करू द्या. आता तो कर्ज बुडवा आहे आणि दिवाळखोर आहे हे तो आणि Dassault बघून घेतील. आपल्याला चांगल्या दर्जाची विमाने देणे हे त्याचे काम आहे, ते त्याने नाही केले तर बोंबाबोंब करणे ठीक आहे. पण अजून बाजारात तुरी अन भट भटीणीला मारी असं चालू आहे बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सहज सोपा आहे. अवघड गोष्टी सोप्प्या पद्धतीने सांगणे हे खूप कठीण काम असतं. चितळे साहेबानी ते उत्तम निभावलं आहे

सुबोध खरे 17/10/2018 - 19:07
डेसो कंपनीच्या दृष्टीने भारताचे कंत्राट हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण भारताची मूळ ऑर्डर थोडी थोडकी नव्हे तर १२६ रफाल विमानांची आहे त्यातुलनेत इजिप्त किंवा कतार यांची मागणी २४ +१२ म्हणजे ३६ ची आहे आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांच्या कडून अधिक मागणी येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. भारताची १२६ ची मागणी जर अस्तित्वात आली तर त्यात अधिक ३६ नौदलाची मागणी येण्याची दाट शक्यता आहे कारण नौदलाच्या विक्रमादित्य आणि येणाऱ्या विक्रांत जहाजासाठी दोन किंवा चार स्क्वाड्रनची गरज पडेल आणि नौदलाची गरज पूर्ण करू सशकेल असे रफाल हे विमान आहे जे विमानवाहू नौकेच्या STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) प्रणालीवर रफाल विमानांची चाचणी पूर्ण यशस्वी झाली आहे आणि फ्रान्सच्या चार्ल्स द गॉल या विमान वाहू नौकेवर RAFALE M या नौदलासाठी बसणाऱ्या आवृत्तीची एक स्क्वाड्रन अगोदरच तैनात आहे. जर हा सौदा दोन्हीकडून फायद्यात झाला तर याहूनही पुढची मागणी येण्याची शक्यता आहे. या सर्व कारणासाठी फ्रान्सचे सरकार आणि डेसो हि मागणी मिळ्वण्यासाठी एवढे अधीर आहेत. असे असताना फ्रांस किंवा डेसो कंपनी तीन हजार कोटीसाठी अंबानींच्या (तथाकथित) बुडत्या जहाजावर सैर करायला जाण्याइतके मूर्ख नाहीत.( हि किंमत दोन रफाल विमानांची आहे).

सुबोध खरे 17/10/2018 - 20:02
France offers 25% discount to India on purchase of 36 Rafale jets It may be noted that the rival Eurofighter that was also in contention for the contract had offered India a 20% price cut after the new government took over. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/47168431.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

नाखु 17/10/2018 - 23:38
आणि कारणमीमांसा करताना कायदा, धोरणानुसार अनिवार्य प्रणाली यांचा यथोचित परामर्श घेतला आहे. "दुसरा"समजून घेताना तिसरा (गुगली) कसा असेल असा अंदाज आकळेना. गल्ली चेंडूफळी बदली राखीव खेळाडू नाखु वाचकांची पत्रेवाला

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे किंमत गोपनीय असताना असे ठामपणे विधान कशाच्या आधारे केले?

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 19/10/2018 - 15:48
हि अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी अधिकृतपणे दिलेली माहिती असावी. युट्यूबवर मिळु शकेल.

In reply to by मार्मिक गोडसे

नाखु 19/10/2018 - 18:58
मिपा सदस्य नसतील तर त्यांना लवकरात लवकर सदस्य करून घेतले पाहिजे. आणि थेट खडसावून जाब विचारला पाहिजे. बाकी ते सरकारी सॉलिसिटर जनरल वगैरे काय काम करत असतील याची ज्याम उत्सुकता आहे. स दा बोंबले अखिल बोंबिल भिके मंडळ संचालित पानटपरी सदस्य पिंपरी-चिंचवड गावठाण

In reply to by नाखु

राहूल गांधी आणि समस्त गांधी परिवार ... समस्त काँग्रेस परिवार, ह्यांना पण मिपा सदस्य करून घेतले पाहिजे ... सध्या काँग्रेसकडे फावला वेळ भरपूर असल्याने, ते आमच्या सारखेच "मिपा-मिपा, वाद-विवाद" करायला मोकळेच असतील. बादवे, सध्या मोगा आणि चंपाबाई दिसत नाहीत, कारण असे धागे आले की, मोगा आणि चंपाबाईंचे प्रतिसाद वाचायला मजा यायची.

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 20/10/2018 - 17:41
अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, बारकाव्यांची काळजी व्यवस्थित घेतात. त्यांची युट्यूबवर मी बघीतलेल्या मुलाखतीत युपिए काळात निगोषीएट केलेली किंमत क्ष होती जी युपिए काळातील मंत्र्यांना माहितीच आहे त्यापेक्षा आम्ही कमी किमतीस निगोशीएट केले. यात अरुण जेटलींनी मूळ क्ष किंमत जाहीर न करण्याची काळजी व्यवस्थित घेतली आहे. किंमत गोपनीयता शत्रुराष्ट्राच्या दृष्टीने महत्व ठेवत असेल तरीही मर्यादीतच असे वाटते. किंमत गोपनीयतेचे कारण सहसा विशेषतः एका ग्राहकस दिलेली किंमत दुसर्‍या ग्राहकास समजू नये हे असते. आता हे कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुढे केले का हे भविष्यातील काळच सांगू शकतो. संरक्षण हे एवढे महत्वाचे क्षेत्र आहे की जगातल्या कोणत्याही सरकार वर सद्यकाळात विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नसतोच. अती संशय हे जेवणातले अती मिठ ठरु शकते त्यामुळे अती संशयवादाचे समर्थन करणे कठीण असते. सर्वात चांगला मार्ग सत्तेत निवडून येण्याच्या वर्षांवर आणि घराणेशाहीवर मर्यादा हवी म्हणजे आठ दहा वर्षांनी जेव्हा सत्तेतील लोक खर्‍या अर्थाने बदलतात तेव्हाच खरी चौकशी होण्याची शक्यता वाढते.

In reply to by माहितगार

नाखु 20/10/2018 - 17:59
पण मिपाकर नाहीत आणि मिपावर स्पष्टीकरण देत नाहीत, अगोदरच्या सरकारमधील सगळ्या धुरीणांनी निर्विवाद स्पष्टीकरण दिले आहे.आणि तपशीलवार शंका निरसन केले आहे. सबब याचा उपयोग नाही. अतिसामान्य किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला

रणजित चितळे 19/10/2018 - 09:03
मार्मिक गोडसे - मी स्वतः एच ए एल मध्ये फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये आहे. सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा.

सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा. तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद_१९८२ 19/10/2018 - 10:54
तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का? - मला वाटते, या लेखाच्या मार्फत चितळे सरांनी कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिक केलेली दिसत नाही.[पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे] लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत

In reply to by प्रसाद_१९८२

लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत विरोधी पक्ष नेमकं उलटे दावे करत करत आहेत. गोपनीय असेल तर भाजपाचे प्रवक्ते कशासाठी खंडन करत आहेत. लेखकही तेच करत आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 19/10/2018 - 20:51
गोपनीय माहिती पैकी तुम्हाला काय माहिती झाली आहे ते सांगाल का? आणि श्री चितळे यांनी कोणती माहिती येथे उघड केली आहे जी वृत्तपत्रात छापून आलेली नाही? रफाल मध्ये कोणते रडार वापरले आहे? कोणते ECM पॉड वापरले आहे? कोणते ECCM पॉड आहे आणि ते कोणत्या वारंवारतेमध्ये काम करू शकते. त्याच्या क्षेपणास्त्राच्या डेटालींक साठी कोणती वारंवारता आहे तो एकतर्फी आहे कि दोन्ही बाजूला? रफालचा रडारच्या क्रॉस सेक्शन कोणत्या कॉम्पोसिटमुळे इतका कमी आहे? रफालच्या जमिनीवर मारा करण्याच्या उच्च क्षमतेसाठी कोणते इलेक्टोऑप्टीकल लेसर पॉड वापरले गेले आहे?( अशा असंख्य गोष्टी आहेत). या प्रत्येक गोष्टीची किंमत असते ती सर्व बेरीज करून विमानाची एकूण किंमत ठरते? हि सर्व माहिती उघड केली तर तुमच्या शत्रूला( ज्यात पाकिस्तानच नव्हे तर चीन) तुमचे विमान काय तंत्रज्ञान वापरत आहे हे जाणून घेणे सोपे जाते आणि चीन रिव्हर्स इंजिनियरिंग मध्ये एकदम तरबेज आहे. त्यामुळे तुमची अशी अगदी तुटक माहिती सुद्धा जोडून ते पूर्ण माहितीपट तयार करतील. तुम्ही मिटीऑर क्षेपणास्त्रे घेत आहेत(१५० किमी टप्पा) ते पाहून त्यानी २०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात सुद्धा केली आहे. श्री राहुल गांधी केवळ राजकीय फायद्यासाठी तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला विचारले कि तुमच्या कडे एवढे दिग्गज वकील आहेत तर तुम्ही न्यायालयात का जात नाही? त्यावर ते शहाजोगपणे म्हणत आहेत कि आमच्या हातात कागदपत्रे आली कि आम्ही न्यायालयात जाऊ. https://timesofindia.indiatimes.com/india/rafale-deal-will-move-court-when-we-get-documents-says-sibal/articleshow/65646909.cms पण कागदपत्रे नाहीत तर कोणत्या आधारावर आरोप करत आहात याला उत्तर नाही. त्यांच्या सरकारातील मंत्र्यांना माहिती आहे कि जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लखोटाबंद कागदपत्रे मागितली आणि या प्रकरणात काहीही चूक नाही असा निवाडा दिला तर निवडणुकीच्या अगोदर तोंडघशी पडायला होईल. बेफाट आरोप करणे सोपे असते. जे मिपावरही चालू आहे. इथे बहुतेक लोकांना माहिती थोडी पण नाही पण उचलला हात आणि लागला टंकायला अशी स्थिती आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रम्प 20/10/2018 - 07:43
एक काम करा चितळे साहेबांनी लिहलेला लेख खोट्या माहितीवर आहे / भाजप ची भलामण करणारा आहे असं गृहीत धरून राफेल वर तुम्ही लांबलचक लेख लिहून तुमची विद्वत्ता दाखवाच !! त्या शिवाय शिवभक्त आणि मोदीभक्त मधील वाद थांबणार नाही . ही एका मोदीभक्ताची विनंती आहे = )

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 20/10/2018 - 07:50
या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. मी सेनेतून आता निवृत आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 20/10/2018 - 09:41
चितळे साहेब तुम्ही उगाच लष्करात वर्षे फुकट घालवलीत. अगोदर ऑफिशिअल सिक्रेट्स ऍक्ट मिपामधील दिग्गजांकडून शिकून घ्यायला हवा होतात. आणि काहि सिक्रेट्स त्यांना माहिती असतात ती तुम्हाला माहिती नसतात हे हि समजून घ्यायचे होते. नाही तर पोकळ बांबूचे फटके मिळतील.

In reply to by सुबोध खरे

लेखात तुम्ही तुलनात्मक किंमतीचा उल्लेख केल्यावर त्याच्या सत्यतेची मागणी होणारच,जी तुम्ही देऊ शकत नाही. मग असा उल्लेख टाळता आला नसता का चितळेसाहेब?

SHASHANKPARAB 19/10/2018 - 11:16
मला तर या लेखात कुठलिहि गोपनिय महिती उघड झालेली दिसली नाही.

अभिजित - १ 19/10/2018 - 17:07
एकंदरीत भाजप ची राफेल विमान करार किंमत यातील गोपनीयता पूर्णतः समर्थनीय आहे असा भक्तांचा सूर दिसतोय. ठीक आहे. हा काही शेवटचा करार नाही. २०१९ नंतर पण बरेच करार होतील. तेव्हा पण त्या सरकारने असाच पवित्रा घेतला तरी हीच राहील ना प्रतिक्रिया तुमची ?

In reply to by अभिजित - १

आनन्दा 19/10/2018 - 18:55
अर्थात.. हायर लेव्हल ला ज्या गोष्टी होतात त्या प्रेत्येक वेळेस डिटेल मध्ये मला कळलंच पाहीजेत असा माझा कधीच आग्रह नसतो. पण गोपनीयता आहे म्हणून 2G च्या लिलावाचे आकडे लपवायला गेलात तर मान्य होणार नाही. आता मला सांगा, रॉ अनेक देशात जाऊन अनेक गोष्टी करते, ते काय त्यांनी लेजर लिहून आम्हाला सांगायला पाहिजे का? रागा रॉ ची गुप्त माहिती कळावी म्हणून आग्रह का करत नाहीत?

In reply to by आनन्दा

आनन्दा 19/10/2018 - 18:58
बाय द वे, augasta westland चे उदाहरण घ्या.. कोणीही किंमत सांगा म्हणून आग्रह केला नव्हता.. कळल्यावर देखील भ्रष्टाचार झाला असेल म्हणून देखील ओरडले नव्हते.. ओरड झाला तो दलाली प्रकरण बाहेर पडल्यावर.. त्यात सुद्धा संरक्षण किंवा अश्या आंतरदेशीय व्यवहारात दलाली अधिकृत करावी असे माझे मत आहे. पण सरकार माझ्या मताला भीक घालणार नाही हे पण मला माहितेय

In reply to by अभिजित - १

गब्रिएल 19/10/2018 - 19:58
हांगं अश्शी... सौ सुनारकी आनी एक... अ... आपलं... लव्हारकी ! अग्ली बार रागा सर्कार !! २०१९ साली आम्चे लोक्प्रिय जनेऊधारी, शिवभक्त आनी पार्टीचे अनभिशिक्त न्येते युवराज श्रीश्रीश्री (उर्फ लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री) रागासायेब पंतपरधान व्हनारच आनी मंग त्ये नुस्त्या देसूबिसू नायतर खाल्च्या समद्या भ्रश्टाचाराचे खर्रे खर्रे आकडे सोत्ताहून पेप्रात प्रशिद्द कर्नार हाहेत होsss 2011 2जी स्पेक्ट्रम घोटाला 1,76,000 करोड़ 2011 कॉमन वेल्थ घोटाला 70,000 करोड़ 2010 आदर्श घर घोटाला 900 करोड़ 2010 S बैंड स्पेक्ट्रम घोटाला 2,00,000 करोड़ 2010 खाद्यान घोटाला 35,000 करोड़ 2009 चावल निर्यात घोटाला 2,500 करोड़ 2009 उड़ीसा खदान घोटाला7,000 करोड़ 2009 झारखण्ड खदान घोटाला 4,000करोड़ 2009 झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाला130करोड़ 2008 हसन अली हवाला घोटाला 39,120 करोड़ 2008 काला धन 2,10,000 करोड 2008 स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र 95 करोड़ 2008 सैन्य राशन घोटाला5,000 करोड़ 2008 सत्यम घोटाला 8,000 करोड 2006 पंजाब सिटी सेंटर घोटाला 1,500 करोड़ 2006 ताज कॉरिडोर घोटाला 175 करोड़ 2005 आई पि ओ कॉरिडोर घोटाला1,000करोड़ 2005 बिहार बाढ़ आपदा घोटाला 17 करोड़ 2005 सौरपियन पनडुब्बी घोटाला 18,978करोड़ 2003 स्टाम्प घोटाला 20,000 करोड़ 2002 संजय अग्रवाल गृह निवेश घोटाला 600करोड़ 2002 कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाला 120करोड़ 2001केतन पारिख प्रतिभूति घोटाला 1,000करोड़ 2001 UTI घोटाला 32 करोड़ 2001 डालमिया शेयर घोटाला 595 करोड़ 1998 टीक पौध घोटाला 8,000 करोड़ 1998 उदय गोयल कृषि उपज घोटाला 210 करोड़ 1997 बिहार भूमि घोटाला 400 करोड़ 1997 सुखराम टेलिकॉम घोटाला 1,500 करोड़ 1997 SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाला 374 करोड़ 1997 म्यूच्यूअल फण्ड घोटाला 1,200 करोड़ 1996 उर्वरक आयत घोटाला 1,300 करोड़ 1996 यूरिया घोटाला 133 करोड 1996 चारा घोटाला 950करोड़ 1995 मेघालय वन घोटाला300करोड़ 1995 प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाला 5,000 करोड़ 1995 दीनार घोटाला (हवाला) 400करोड़ 1995 कॉबलर घोटाला 1,000 करोड़ 1995 वीरेंदर गौतम (कस्टम टैक्स) घोटाला 43करोड़ 1994 चीनी घोटाला 650 करोड़ 1992 हर्षद मेहता (शेयर घोटाला) 5,000 करोड़।। 1080-90s बोफोर्स तोप घोटाला -राजीव गांधी 960करोड़ कोनाला आजून काय काय नावं म्हायती आस्सली तर नुस्तं ब्वोला बास. आमाचे लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री रागासायेब सोत्ता सम्दे आकडे आनी त्ये कोनाकोनाकडे ग्येले ते सम्दे लोक्सभेत फटाफट भाषान देउन सांगतिला. काय सम्जलानं, आँ !

In reply to by गब्रिएल

नाखु 19/10/2018 - 23:26
आणि ते पण रावण दहन नंतर!!! असं नाही करायचा, टाका ना यांना कारागृहात जसं काही हे मागे पुरावे ठेवून गेले आहेत,आणि त्यांचे भागीदार सरकारी, बॅंक कर्मचारी अगदी अलगदपणे सापडतील. काही लाभार्थी सत्ता, सरकारी ठिकाणी असतील तर ... तरी म्हणायला काय विशेष अक्कल लागत नाही, न्यायव्यवस्था कशी फरफटत जाते हे रस्त्यावर फुकटात मेलेल्या आणि त्यांना सद्गती देणार्या प्रेमने "हम आपके है कौन"असं वेडावून दाखवलं आहे. मुदलात किरकोळ सदस्य नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 20/10/2018 - 09:51
UPA २ च्या काळात झालेले एवढे सगळे घोटाळे बाहेर आले. परंतु P ८ I या विमानाच्या दोन सरकारांच्या मधील कंत्राटावर NDA ने कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या किमतीबद्दल कोणताही गदारोळ केला नाही हे कसे काय झाले? आणि आताही मोदी सरकारला ४ वर्षे झाली तरी त्याबद्दल काही चकार शब्द नाही. उलट मोदी सरकारने अजून चार विमाने विकत घेण्याचे कंत्राट दिले. कुछ तो गडबड है दया.

अभिजित - १ 20/10/2018 - 16:34
Orders dry up, HAL staff could sit idle हरकत काय ? अंबानी जगला पाहिजे. ते महत्वाचे. या लोकांना काय, सरकार फुकट पगार देऊ शकतेच कि . https://economictimes.indiatimes.com/news/defence/orders-dry-up-hal-staff-could-sit-idle/articleshow/66291103.cms HAL has 29,035 employees, including 9,000 engineers. And, they’re spread across nine locations—Bengaluru; Nashik in Maharashtra; Lucknow, Kanpur and Korwa in Uttar Pradesh; Barrackpore in West Bengal; Hyderabad and Kasargod in Kerala—with Bengaluru and Nashik accounting for 10,000 of them.

In reply to by अभिजित - १

आनन्दा 22/10/2018 - 07:52
ओपन आणि स्ट्रेट बोलतो.. ही बातमी व्यवस्थित आहे, पण सदर आयडी यातून अर्धवट माहिती काढून इतरांची दिशाभूल करत आहे .. 1. बातमीत सरळ लिहिलंय, HAL कडे 83 तेजस ची ऑर्डर येऊ घातली आहे, जी आली तर या सगळ्यांना काम मिळेल. 2. हे सगळे लोक आता या क्षणी बेंच वर येत आहेत. राफेल डील झालं असतं तर या सगळ्या आ आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे. आणि अंबानीच्या 3000 कोटी मध्ये हे 29000 लोक कसे पोसले गेले असते हे पण सांगणे, अन्यथा मिपाकरांची माफी मागावी.

In reply to by आनन्दा

अभिजित - १ 24/10/2018 - 12:59
आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे नंतर मिळाले तरीही बरेच नाही का ? कधीच न मिळण्यापेक्षा ? अंबानीच्या 3000 कोटी मध्ये फक्त ३००० कोटी ? तो सांगायचा आकडा आहे .. राफेल डील कॉस्ट किती आहे ते एकदा बघा ..

In reply to by अभिजित - १

प्रसाद_१९८२ 22/10/2018 - 10:58
तुमची आकलन क्षमता अगदी राहुल गांधीच्या तोडीची आहे. हे तुमच्या वरिल प्रतिसादातून दिसून येत आहे. -- अजून येऊ देत असे हास्यास्पद प्रतिसाद. :))

In reply to by नाखु

स्वधर्म 22/10/2018 - 11:51
ननि यांचा वरील प्रतिसाद कळला नाही. अपोलोजेटीक! बाय द वे, मी चितळे साहेबांना काही विचारले होते वरती, प्रोसिजर वाचूनच, पण त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुवा: https://www.misalpav.com/comment/1012791#comment-1012791

तर तात्पर्य काय की मोदी आणि भाजप सरकारने केलेला व्यहवार अतिशय स्वच्छ आहे. रिलायन्स ही कंपनी विमान बनवण्या/जोडण्याकरिता सर्वोत्तम भारतीय कंपनी आहे रिलायन्सला कंत्राट मिळावे याकरिता मोदी सरकारातील कुणीही शब्द टाकला नाही. मोदी सरकार जे काही करतं ते सगळं फक्त आणि फक्त देशहिताकरिताच असतं तो रागा एक मुर्ख माणूस आहे आणि यातलं कुणाला काही अमान्य असेल तर तो एक देशद्रोही म्हणून गणला जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नाखु 25/10/2018 - 22:16
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे खात्री देऊ शकत नाही. कारण ते मिपावर प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नाहीत आणि त्यांच्यापेक्षाही सरसपणे मोडतोडप्रवणअर्धहळकुंडीपीतपिपाणी वाजवणारे स्वघोषीत प्रवक्ते आहेत. बाकी मुद्दे कपील सिब्बल यांच्या कडे पाठवीले तर किरकोळ दुरुस्ती करून प्रचारपत्रिकेत समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पुन्हा शिक्कामोर्तब झालेला नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 26/10/2018 - 09:38
तो रागा एक मुर्ख माणूस आहे मी आपल्या मताशी १००% सहमत आहे. गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत. कारण इकडे बटाटे टाकून तिकडून सोनं बाहेर काढण्याचे मशीन लावणार असूनही सोन्याचा भाव कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत
खरं आहे.. रागा मुर्ख आहे आणि त्याला बाजूला सारण्याचं धाडंस बाकी काँग्रेसजनांत अजूनतरी नाही म्हणूनच इतरांच फावतंय... ते असो. पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे... २०१९ .. नाही तर २०२४ ला तरी "अब की बार pc सरकार !! ...."

In reply to by मराठी कथालेखक

पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे असं प्रकटपणे म्हणून तुम्ही पृ. चव्हाणांचे अभितव्य धोक्यात आणत आहाते, हे आपल्या ध्यानात आले काय ? पंतप्रधानपद सोडाच, आजपर्यंत 'कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या पदासाठी निवडणुकीला उभे राहणार' अशी नुसती इच्छा व्यक्त केलेल्या भल्याभल्यांची काय अवस्था झाली आहे, हे विसरलात ?! =))

सुबोध खरे 26/10/2018 - 09:35
ना खु साहेब काय होतंय कि मोदी विरोधी लोकांची फार तडफड होते आहे कारण कोणत्याही बाबतीत "घोटाळा" असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी कोणत्याही बाबतीत सबळ असा पुरावा कोणालाही देता येत नाहीये. त्यामुळे त्या पुरस्कार वापसीच्या भंपक प्रकारानंतर दर काही दिवसांनी नवीन नवीन काहीतरी काढायचे आणि मोठा आरडा ओरडा करायचा आणि ते खोटं निघालं कि शांत बसायचं सोडून परत काहीतरी भंपक शोधून काढायचं. डोंगर इकडनं पोखरला आणि उंदीर निघाला कि परत तिकडनं पोखरायला सुरुवात करायची अशी स्थिती झाली आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 27/10/2018 - 18:29
रिलायन्सला फक्त ८५० कोटीचे कंत्राट आहे. एवढा डोंगर पोखरून एक उंदीर निघाला. आता हे लोक कोणता डोंगर पोखरायला घेणार? The joint venture, Dassault Reliance Aviation Limited (DRAL), will see an investment capped at €100 million (Rs 850 crore) for setting up a plant to manufacture parts for Falcon executive jets, ET has learnt. https://economictimes.indiatimes.com/news/defence/reliance-defence-to-get-3-of-rs-30000-crore-offset/articleshow/66228334.cms

In reply to by रणजित चितळे

नाखु 28/10/2018 - 14:37
युवराज ३०००० हजार कोटींचा मलिदा अंबानींच्या कंपनीलाच राफेल करारामुळे दिला असं म्हणतात. आता कुठे बेसीकमध्ये लोच्या आहे ते पहा. काही पुरावे मागणी करणारे विचारवंत बुद्धीवादी यांसाठी खालील दैनिक भास्कर मधून कांग्रेस अध्यक्ष ने कहा- देश के प्रधानमंत्री भ्रष्ट हैं, राफेल पर जवाब दें, नहीं तो इस्तीफा दें राहुल ने कहा- खुद प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को कंपनसेशन दिलवाया राहुल का सवाल- रक्षा मंत्री को अचानक फ्रांस क्यों भेजा गया? Dainik Bhaskar Oct 11, 2018, 03:09 PM IST नई दिल्ली. राफेल विवाद पर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ने गुरुवार को फिर मोदी सरकार को आड़े हाथों लिया। राहुल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भ्रष्ट बताया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को राफेल का कॉन्ट्रैक्ट दिलाकर 30 हजार करोड़ रुपए उनकी जेब में डाले। वे देश के नहीं, अंबानी के चौकीदार हैं। अगर मोदी राफेल डील में भ्रष्टाचार को लेकर जवाब नहीं दे पा रहे हैं तो इस्तीफा दें। उधर, फ्रांस की एक मैगजीन ने राफेल बनाने वाली दैसो के आंतरिक दस्तावेजों के हवाले से दावा किया कि कंपनी के पास रिलायंस के अलावा दूसरा विकल्प नहीं था। हालांकि, दैसो ने इससे इनकार किया है।

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

और ये है तुलनात्मक ब्यौरा.... :) विशेषतः, राफालं आणि रिलायंसमधील काँट्रॅक्टसंबंधीच्या तारखा/वर्षे आणि त्यावेळेची दोन देशतिल सरकारे हे तपशील पाहणे मनोरंजक ठरू शकते

आनन्दा 17/10/2018 - 11:47
काही प्रश्न 1. रिलायन्स सोबत दासू चा नेमका काय करार झालाय याचे काही तपशील कुठे उपलब्ध आहेत का? की केवळ त्या यादीत रिलायन्स चे नाव आहे इतक्याच भांडवलावर गदारोळ सुरू आहे? ओके, याचं उत्तर दिलंय. मनोगतावर नाहीये ही आकडेवारी 2. रिलायन्स ने आदल्या दिवशी कंपनी स्थापन करणे यात मला काही गैर दिसत नाही, कारण जर नेमक्या काय वाटाघाटी होत आहेत हे माहीत नसेल तर उगीच एक entity स्थापन करण्यात काही अर्थ नसावा.. 3. सरकारने खाजगी क्षेत्राला ला झुकते माप दिलेच नसेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते, कारण माझ्या माहितीनुसार टाटा आणि मुकेश अंबानीला यात रस नव्हता असे ऐकून आहे.. तसेच कमी वेळात जर बरेच भांडवल आणि मनुष्यबळ हवे असेल तर खाजगी कंपनीला काम देणे केव्हाही योग्य असे मला वाटते. सरकारने घ्यायचे म्हणजे पुढच्या 30 वर्षांची हमी हवी, नाहीतर ते लोक मग ओझे बनतात.

In reply to by आनन्दा

आनन्दा 17/10/2018 - 11:58
त्या फोटोमध्ये बघितले तर दसॉल्ट ने रिलायन्स सोबत व्हेंचर केले आहे.. मग याचा अर्थ असा होईल का की थोड्या फार प्रमाणात रिलायन्स ला काहीतरी ToT होईल ज्याचा रिलायन्स ला भविष्यात फायदा होईल?

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 12:11
ToT चे बर्याच श्रेण्या आहेत. मी त्या दिलेल्या आहेत. व ऑफसेट चे वेटेज टिओटी साठी वेगळे असते. पण झाली तर काय हरकत आहे. जे मला माहित आहे ते टिओटी बाबत काही कंपन्या फार सावध असतात. फ्रांन्स मधल्या कंपन्या त्यातल्या एक आहेत. एच ए एल बरोबर टिओटी साठी गाडी रखडली होती.

In reply to by आनन्दा

रणजित चितळे 17/10/2018 - 11:59
???? रीलायन्स ने पिपावाव (माझ्या टंकलेखनात चूक झाली लेखामध्ये चूकून पिपालाव असे लिहिले गेले आहे) मिसळपाव वर संशोधन करता यावे अशी विनंती करतो. आपण गुगल वर पिपावाव बद्दल वाचाव ही विनंती.

In reply to by रणजित चितळे

आनन्दा 17/10/2018 - 14:21
मी मनोगत वरचा लेख वाचून प्रश्न विचारायला आलो होतो. पण रेफरन्स साठी वरचा लेख परत वाचल्यावर त्या चित्रात उत्तरे मिळाली.. पण एव्हढे टाइप केले होते, मग फुकट कशाला घालवू :P म्हणून as a loud thinking पोस्ट केले. असो. माझ्या बर्याचश्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.. आता सध्या हा विषय इतका ऐरणीवर येण्यामागे भाजपविरोधाव्यतिरिक्त अन्य कोणते आंतरराष्ट्रीय राजकारण आहे का हा एक प्रश्न शिल्लक आहे. याची कोणती तथ्यआधारीत माहिती आहे का?

माहितगार 17/10/2018 - 12:30
शस्त्र सामग्रीसाठी इतरांवर अवलंबित्व म्हणजे हात असून पाय नसलेली स्थिती असावी. जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारतास एवढ्या दशकात स्वालंबीत्व न गाठता येणे हि अत्यंत खुपणारी बाजू आहे . बाकी धागा लेख माहितीपूर्ण रोचक आहे हे मान्यच.

सुबोध खरे 17/10/2018 - 12:32
रिलायन्स ला "तंत्रज्ञान हस्तांतरण" होणारच नाही. कारखाना बांधायचा, कामगार कामावर घ्यायचे, डेसो कंपनीने सांगितल्याबरहुकूम कच्चा माल, प्लास्टिक, रेझीन, धातू आणून त्यांनी दिलेल्या यंत्रावर त्याचे भाग बनवायचे आणि ते एकत्र करून विमानाचे सुटे भाग बनवायचे असे हे साधे सरळ कंत्राट आहे. रिलायन्स हि एकच कंपनी असे करणार नसून अशा अनेक कंपन्यांना उप कंत्राट दिले जाईल. हा धातू हे रेझीन इथे का वापरले गेले हे डेसो कंपनी कधीही सांगणार नाही. KNOW HOW आणि KNOW WHY यातील फरक समजून घ्या. याच लेखाच्या पहिल्या भागात लिहिल्या प्रमाणे २००० साली तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचे कंत्राटावर सही केल्यानंतर १८ वर्षांनी हिंदुस्थान एरॉनॉटिकसला आपल्या बळावर एकही सुखोई विमान तयार करता आलेले / येणार नाही. इतकी वर्षे मारुती चे सुझुकीबरोबर सहकार्य आहे. मारुतीचा काय फायदा झाला? सगळे तंत्रज्ञान जपान मधूनच आले होते आणि येत आहे. रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ? शेवटी अद्ययावत तंत्रज्ञान देऊन स्वतःच्या पायावर कोण कुर्हाड मारून घेईल? भरपूर पैसे ओतल्याशिवाय किंवा स्वतःचा फायदा असल्याशिवाय कोणतेही राष्ट्र तुम्हाला कोणतेही क्रिटिकल आणि अद्ययावत तंत्रज्ञान देणारच नाही हि खूणगाठ बांधणे आवश्यक आहे. तेजस तयार करणे खर्चिक असले तरी भविष्यातील फायदा लक्षात घेता त्यात गुंतवणूक करणे का आवश्यक आहे हे समजून घ्या.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 17/10/2018 - 13:50
रिलायन्स ला अनुभव काय आहे हे विचारणार्यांनि मारुतीला गाड्या बनवण्याचा काय अनुभव होता हा प्रश्न कधीतरी विचारला का ?
परफेक्ट. मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने गव्हर्नमेंटला रोडरोलरहि विकले. परदेशातून आणि खाजगी कंपन्याकडून घेऊन. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने बसबॉड्या पण विकल्या हरयाणा आणि दिल्ली सरकारला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिने विमाने पण इंपोर्ट केली आणि भारतात विकली. त्यावेळचे कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. भारतात सार्वजनिक वाहतूक सेवांची जास्त गरज आहे असा अहवाल असताना छोट्या कारची निर्मीतीचा परवाना मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. इतर छोट्या कारच्या निर्मीतीत गुंतलेल्या उद्योजकांना शांत करण्यात आले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. काहिहि अनुभव नसता प्रोटोटाइप पण सादर करणे जमले नाही तरीही मारुतिला सर्वत्र हिरवा कंदील मिळाला. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. मारुतिच्याच नावाखाली कित्येक कंपन्या स्थापन करुन एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या नावाने पैसे फिरवत अपहार केले गेले. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. कित्येक एकर मोक्याची अन सुपीक जागा कवडीमोल किंमतीत मिळवली गेली. कारण एकच. मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. हा इतिहास झाला. . नंतर एखादी सुझुकी येते, नशीबाने सगळे तारुन नेले जाते, तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्राहकांचा प्रतिसाद मिळत जातो, गाड्यावर सुझुकीचा लोगो दिमाखात मिरवला जातो. हे झाले वर्तमान. पण मारुतिचा पाया असाच एककल्ली व्यक्तिकेंद्रित आणि काहीच जणांचे भले करणारा होता, भविष्य मारुति सुझुकीप्रमाणेच असेच असेल असे म्हणता येणार नाही.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 17/10/2018 - 18:45
मारुति पंतप्रधानाच्या मुलाची कंपनी होती. वर्तमान पंतप्रधानांना मुलगा नाहीच तेंव्हा असा इतिहास परत होण्याचा प्रश्न नाही. परंतु इटालियन गंगाभागीरथीचे सुपुत्र त्यांच्या जागी आले तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न पडलाय? बटाट्यापासून सोने बनवायच्या कारखान्याला कंत्राट मिळेल इ इ. बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात. चष्मा घातला कि असंच होतंय.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 19/10/2018 - 11:44
बाकी-- मूळ आपण विदेशी कंपनीने इथे कंत्राट देण्याबद्दल बोलत होतो. तेंव्हा सुझुकीने सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान देऊ केले आणि मारुतीबरोबर सामंजस्य करार केला तेंव्हा मारुतीला लहान गाड्या बनवायचा काय अनुभव होता( किंवा शून्य होता) हे आपण सांगायला विसरलात.
डॉक्टरसाहेब, अ‍ॅक्चुअली तुम्ही म्हणालात ते वाक्य अगदी खरे ठरतेय बघा. तुमच्याच बाबतीत. चष्मा घातला की असंच होतंय. हे स्पष्ट वाक्य आहे माझ्या प्रतिसादातले मारुति नुसती गाड्याच बनवत नव्हती. किंबहुना मारुतिची ती कुवत नव्हतीच. अजुन काय स्पष्ट सांगावे, बाकी प्रतिसादात मारुतिने काय केले तेच लिहिलेले आहे, त्यात कुठेच मारुति गौरवाचा भाग नाहीये, तुमचाच प्रतिसाद कोट करुन त्यासंदर्भातच लिहिलेले आहे, पण एकदा मोदीप्रेमाची परमनंट लेन्स बसली की सगळ्यांच्याच डोळ्यावर चष्मे आहेत असा भास व्हायला लागतो. निदान प्रतिसाद तरी नीट वाचत जा. तुमच्याविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी आदर आहे पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 19/10/2018 - 12:56
मोदी प्रेमाचा येथे कुठे भास होतॊय तुम्हाला ? मी तो या लेखात कुठे तरी दाखवला आहे का? जे काही आहे ते स्पष्ट आहे. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे काय कारण आहे? तंत्रज्ञान कोणतीही विदेशी कंपनी कधीच देत नाही हेही इ मी स्पष्टपणे लिहिलेले आहे डेसोने रिलायन्सचे नाही तर अनेक कंपन्यांशी ऑफसेट कंत्राट केले आहे ते चितळे साहेबानी व्यवस्थित सविस्तर चित्र लावून दाखवलं आहे तर मग केवळ रिलायन्सच्या "अनुभवाबद्दल" एवढा काथ्याकूट करण्याचे कारण समजले नाही. मुळात तुम्ही सर्व गोष्टी वैयक्तिक का घेत आहेत हेच समजत नाही. मारुतीचा एक केवळ संदर्भ दिला( त्यावेळेस माझ्या डोक्यात संजय गांधी किंवा काँग्रेस नव्हतेच) त्यावेळेस फॉक्स वॅगनने तंत्रज्ञान द्यायला नकार का दिला होता तेवढेच डोक्यात होते. पण एक हेतू डोक्यात ठेवून तुम्ही त्यावर एवढा इमला उभारला. पण उगी सगळी दुनिया मोदीच्या विरोधात उभारली आहे आणि आपल्यालाच एकट्याला त्यांच्याशी लढायचे आहे असा आव आणून लोकांना आणि त्यांच्या प्रतिसादांना तुच्छ लेखणे बंद करा. आधीहि हे बरेच वेळा तुम्ही केले आहे. व्यक्तिगत प्रतिसादाबद्दल माफ करा. श्री मोदींना माझ्या सारख्या यःकश्चित माणसाच्या मदतीची अजिबात गरज नाही आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या माणसाला ते अजिबात भीक घालत नाहीत हे असंख्य वेळेस दिसून आलेले आहे. मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. मोदी द्वेषाची झापडं लावली कि कोणत्याही गोष्टीत अंधारच नजरेस येतो. मग कितीही कोणी प्रकाश दाखवला तरी काही दिसत नाहीच.

In reply to by सुबोध खरे

मी फक्त श्री मोदींना पोकळ बांबूने फटके देणाऱ्या किंवा २० लाखाचे ट्रक फिरवणाऱ्या लोकांना त्यांची सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढेच. उगाच कुणावर वैयक्तिक पातळीवर उतरून टीका करायची मला गरज पडत नाही. स्वतःचे वीजबिल नीट वाचता येत नाही आणि निघालेत दुसऱ्यांना सत्य दाखवायला. खोटं रेटून बोलणाऱ्याचा आणि खाजवून खरूज काढणाऱ्याचा पोकळ बांबूचे फटके मारूनच सत्कार होणार. दुसऱ्याला नथुराम संबोधनारे, पगार विचारणारे कोण होते? म्हणे मी वैयक्तिक होत नाही, कधी खरं बोलणार हो तुम्ही?

सुबोध खरे 17/10/2018 - 12:56
चितळे साहेब आपण महापालिकेत उंदीर मारण्याच्या खात्यात उंदीर गोळा करण्याच्या कामावर असलो तरी श्री मोदींनी किंवा राष्ट्रपतींनि आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे अशी मनोवृत्ती असलेले लोक इथे भरपूर आहेत. अशा लोकांना फाट्यावर मारावे हीच विनंती.

स्वधर्म 17/10/2018 - 15:03
अापण DIPP व रिलायन्ससंबंधी खालील माहिती दिली अाहे: “राजकारण वेगळे सोडले तर, ज्यांना डिफेन्स परवाने मिळालेले आहेत अशा सगळ्या कंपन्यांची यादी DIPP कडे असते व त्यांना माहीत असते कोणती भारतीय कंपनी कोणत्या क्षेत्रात व्यापार करतात. व एखाद्या करारात जर करार करणाऱ्या देशाने विचारले तर कंपन्यांची नावे सांगायचे पूर्ण स्वातंत्र्य DIPP ला आहे. अशी नावे उपलब्ध करून द्यायची हे DIPP चे एक काम आहे. नाहीतर परदेशी कंपनीला त्यांचा वेळ घालवून कंपन्या शोधत हिंडावे लागेल. काही कंपन्या त्यांना कधीच मिळणार नाहीत व त्यामुळे अजाणतेपणे त्यांच्या बरोबर व्यापार केला जाऊ शकणार नाही त्यामुळेच DIPP कडे आपल्या भारतीय कंपन्यांची जाहिरात करण्याचे मोठे काम आहे. “ अाणि “ते कोणत्याही भारतीय कंपनी बरोबर बोलणी करून करार करू शकतात. फक्त त्या कंपन्यांना डिपार्टमेंट ऑफ इनडस्ट्रीयल पॉलिसी आणि प्रमोशन (DIPP) कडून परवाना उपलब्ध असला पाहिजे. ” अापण म्हणता तसे, भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही. दुसरे असे, की ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही. नांवे सुचवण्यापूर्वी त्या कंपन्यांची खात्री करून घेण्याची DIPP ची ड्यू डिलिजन्सची प्रोसेस नक्कीच असावी, पण… इथे सरळ प्रश्न विचारला, तरी काही अायडी जणू काही विचारणे हाच गुन्हा अाहे असे प्रतिसाद लिहीत अाहेत, त्यामुळे अाधिक खोलात जाण्याची इच्छा नाही. अापण हा विषय चांगला स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला अाहे. लोकांना कॉंग्रेसबद्दल काही फार अापुलकी अाहे, अशातला भाग नाही. त्यांना त्यांनी अाधीच नाकारले अाहे. शेवटचा परिच्छेद त्यावर खर्च झाल्यामुळे लेख समतोल व निष्पक्ष न वाटता, हेतू असलेला वाटत अाहे. तो नसता टाकला तर चालले असते.

In reply to by स्वधर्म

आनन्दा 17/10/2018 - 16:33
त्याचे उत्तर त्यांनी वर दिले आहे.. रिलायन्स ने या क्षेत्रातली एक अनुभवी कंपनी विकत घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता पत मिळाली आहे.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:30
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 22/10/2018 - 13:41
- मी दिवाळी भेटकार्ड बनवण्याच्या गडबडीत होतो. दर वर्षी ४० एक हातानी बनवलेली असतात गेली ४० वर्षे बनवत आहे शाळेत असल्या पासून - त्यामुळे जरा उशिर झाला. दिलगीर आहे. - जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडीया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुतवणूक व होता होई पर्यंत सरंक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात ब-याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकानी कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हील एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे जरी धोरण असले तरी प्रत्येक खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तूस्थिती ती हळू हळू बदलेले सुरवात झाली. - रिलायन्स कींवा कोणतीही सगळे विमान बांधनारी कंपनी होऊ शकणार नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करेत द्राल मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्या रफाल बांधण्याचे काम होते. रिलायन्स कडे ते नाही. रिलायन्सच नाही तर ब-याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सुद्धा आहे. डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायजेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायनस् नेव्हल इंजीनिअरींग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनूभव विकत घेतात. हा कछ्ची सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपला मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायनस् बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलीकॉप्टर बांधायचे कत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून हे सगळे g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज एरोनॉटीक्स, रेवा रिलायनस् ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते. भेटकार्ड

In reply to by रणजित चितळे

स्वधर्म 26/10/2018 - 12:53
मिळाले. तथापि खालील प्रश्नाबाबत अापण काहीच भाष्य केले नाही, हे फक्त नोंदवतो. …भारतीय कंपन्या प्रमोट करणे हे DIPP या भारत सरकारच्याच एका विभागाचे कामच अाहे. त्या अंतर्गत जर इतर कंपन्यांबरोबर रिलायन्स चे नांव सुचवले गेले असेल, तर भारत सरकार त्यात अामचा काहीच सहभाग नाही असे का सांगत अाहे, हे समजले नाही.  दुसरा प्रश्न होता रिलायन्स बाबत: … ज्या कंपनीला डिलीव्हरीचे काहीच ट्रॅक रेकाॅर्ड नाही, प्रमोटरची अार्थिक पतही चांगली नाही, अाणि जी अगदी काही दिवसांपूर्वीच अास्तित्वात अाली, त्या कंपनीचे नांव DIPP ने सुचवावे, त्यांचा परवानाही त्यांना लगेच मिळावा, ते दासूने लगेच मान्य करावे, हे खरं सांगायचं तर, तेवढं सहज पटण्यासारखं नाही.  यावर अापल्या उत्तरातून समजलं ते असं की रिलायन्सने पिपापाव ही कंपनी विकत घेतली अाणि त्यांना बरीच संरक्षणविषयक कामे मिळाली, मिळत अाहेत. फक्त एवढ्यावर दासू अाणि DIPP या दोन्ही संस्थांनी सरळ हजारो कोटी रूपयांचं काम इतक्या कमी वेळात त्यांना द्यावं, हे अजूनही अाश्चर्यकारक वाटतं. अापण बरीच मेहनत घेऊन दिर्घ स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला अाहे. त्यात बरीच अाजूबाजूची माहिती अाहे, पण कळीचा मुद्दा… जाऊ द्या. हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा अाहे अाणि अामच्यासारख्या सामान्य माणसाला त्यातली संपूर्ण माहीती घेऊन मत बनवणे कदाचित कधीच शक्य होणार नाही. प्रश्न उडवून न लावता व शेरेबाजी न करता उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अापले अनेक अाभार.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 26/10/2018 - 13:27
आजच्याच पेपरात आले आहे की दासू रिलायनस् jv ४९ टक्के ५१ टक्के ८५० करोड. रिलायनस् कडे अनुभव नाही त्याचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला आहे. रिलायनस् अनूभव विकत घेऊ शकते (अनुभवी निवृत्त कारागीर, अनुभवी निवृत्त अधिकारी इत्यादी) त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न नाही ह्यात r and d काही नसणार आहे. घाल माती काढ गणपती असेल तर से सहज जमण्यासाऱखे आहे. ओनली विमल पासून रिलायनस् वर खूप जणांचा राग आहे पण आता IBC insolvency and bankruptcy code (हि पण मोदी सरकारचीच एक देणगी आहे व खूप प्रभावी आहे) आल्यावर NPA creation जास्त होऊ शकणार नाही.

In reply to by स्वधर्म

रणजित चितळे 24/10/2018 - 10:19
-जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मेक इन इंडिया, संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूक व होता होई पर्यंत संरक्षण निर्यात वाढवणे (कारण त्यात पैसा जास्त आहे व आयातीत जास्त जातो) अशी धोरणे कायम झाली. संरक्षण क्षेत्रात बर्‍याच कंपन्यांना काही निकषांवर परवाने दिले गेले. त्यात रिलायन्स, पुंज लॉईड, महिंद्रा, टाटा , गोदरेज, लार्सन टुब्रो इत्यादी. त्या तहत प्रत्येकाने कामे सुरू केली, टाटा सिकॉरस्की, महिंद्रा ऑस्ट्रेलियन सिव्हिल एअरक्राफ्ट इत्यादी. रिलायन्स ने पिपावाव घेतली. व नेव्हल नौका बांधणी सुरू झाली. हे मेक इन इंडिय चे धोरण असले तरी प्रत्येक संरक्षण खरेदी ही फक्त भारतीय होण्यास वेळ आहे, पण त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. आपल्याकडे गुणवत्ता व तंत्रज्ञान काही क्षेत्रात कमी आहे असे नाही म्हणता येणार पण दासू किंवा बोईंग एअरबस एवढे नाही. ही वस्तुस्थिती. ती हळू हळू बदलेल. सुरवात झाली हे नक्की. - रिलायन्स किंवा कोणतीही कंपनी सगळे विमान बांधणारी कंपनी होऊ शकत नाही पण काही भाग बनवून देऊ शकतील. जसे टाटा सिकॉरस्की साठी करत आहे तसे रिलायन्स दासूच्या फाल्कन साठी करते द्राल मिहान नागपूर मध्ये. सुरवातीला एच ए एल २०११ बरोबर TOT साठी बोलणी होत होती ती quality parameters वर अडकली रखडली होती. त्यात रफाल बांधण्याचे काम होते (पण पूर्णं रफाल एच ए एल कडून बांधणे व त्याच्या गुणवत्तेची हमी दासू ने देणे हे दासूला मंजूर नव्हते (कारण ते शक्य नव्हते - ह्या आधी २०१५ साली बोईंग कंपनीने एच ए एल बरोबर अस्त्रांचा कव्हर बनवण्याचा करार मोडीत काढला होता तो गुणवत्तेच्याच आधारावर)) . रिलायन्सकडे रफाल बांधण्याचे काम नाही. ऑफसेट मध्ये रिलायन्सच नाही तर बर्‍याच कंपन्या अगदी सॅम पिट्रोडाची सॅमटेल सुद्धा आहे (कंपन्या १०० पेक्षा जास्त). डिआऱडीओ पण आहे - डिआरडीओ रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. त्यात ऑफसेट फॅक्टर वेगळा असतो मला वाटते २ असतो. पिपावाव २००५ साली सुरू झाली व वॉरशीप्स बांधण्याचा परवाना मिळाला, ती पुढे रिलायन्स ने घेतली व त्याचे नाव रिलायन्स नेव्हल इंजिनीअरिंग बदलून रिलायन्स डिफेन्स ठेवले गेले. पुढे त्यांना अमेरीकन शिप मेंटेनन्स चे काम मिळाले. द्राल - नागपूर च्या जवळ दासू बरोबर JV करून फाल्कन चे भाग बनवायचे कंत्राट (ऑफसेट) सुरू झाले. बरेच मारवाडी जे धंदा करतात ते अनुभव विकत घेतात (म्हणजे अनुभवी लोकांना कामावर ठेवतात). हा कच्छी सुद्धा विकत घेईल. जर आपल्याला संरक्षण आयुधे निर्यात करायची असतील तर आपली मान्यूफॅक्चरींग कॉस्ट कमी केली पाहिजे. जे आज HAL मध्ये शक्य नाही -बरीच कारणे आहेत काही बरोबर काही चूक पण त्याला कारणे आहेत. त्यावर वेगळा लेख लिहायला लागेल. जसे दासूने रिलायन्स बरोबर JV केले तसेच कामाव रशिया ने HAL बरोबर का-२२६ हेलिकॉप्टर बांधायचे कंत्राट दिले. जे G2G माध्यमातूनच झाले. भविष्यकाळात संरक्षण आयुधांची निर्यात व आपल्या देशात बनवणे (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे) धोरणातून ही सगळी g2g खरेदी होत आहे. टाटा सिकोरस्की, महिंद्रा गोदरेज, एरोनॉटीक्स, रेवा रिलायन्स ह्यांनी स्पर्धा आणल्या मुळे hal ला पण जाग आली आहे. ह्या सगळ्यांचे प्रमोशन dipp करत असते.

गतीशील 17/10/2018 - 15:23
भारतामध्ये श्रीमंत असणे हा गुन्हा आहे. त्यातून आडनाव अंबानी असणे तर जन्मठेपेचा गुन्हा आहे. लोक असे बोलतात कि जसे काही अंबानीला रस्त्याकडेला असलेल्या मंदिरातून उचलून आणून राफेल चे काम दिले आहे. तुम्हाला झेपत असेल तर करा रजिस्टर कंपनी आणि घ्या काम , नसेल तर जे काम करत आहेत त्यांना तरी करू द्या. आता तो कर्ज बुडवा आहे आणि दिवाळखोर आहे हे तो आणि Dassault बघून घेतील. आपल्याला चांगल्या दर्जाची विमाने देणे हे त्याचे काम आहे, ते त्याने नाही केले तर बोंबाबोंब करणे ठीक आहे. पण अजून बाजारात तुरी अन भट भटीणीला मारी असं चालू आहे बाकी लेख अतिशय माहितीपूर्ण आणि सहज सोपा आहे. अवघड गोष्टी सोप्प्या पद्धतीने सांगणे हे खूप कठीण काम असतं. चितळे साहेबानी ते उत्तम निभावलं आहे

सुबोध खरे 17/10/2018 - 19:07
डेसो कंपनीच्या दृष्टीने भारताचे कंत्राट हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण भारताची मूळ ऑर्डर थोडी थोडकी नव्हे तर १२६ रफाल विमानांची आहे त्यातुलनेत इजिप्त किंवा कतार यांची मागणी २४ +१२ म्हणजे ३६ ची आहे आणि ती पूर्ण झाल्यावर त्यांच्या कडून अधिक मागणी येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. भारताची १२६ ची मागणी जर अस्तित्वात आली तर त्यात अधिक ३६ नौदलाची मागणी येण्याची दाट शक्यता आहे कारण नौदलाच्या विक्रमादित्य आणि येणाऱ्या विक्रांत जहाजासाठी दोन किंवा चार स्क्वाड्रनची गरज पडेल आणि नौदलाची गरज पूर्ण करू सशकेल असे रफाल हे विमान आहे जे विमानवाहू नौकेच्या STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery) प्रणालीवर रफाल विमानांची चाचणी पूर्ण यशस्वी झाली आहे आणि फ्रान्सच्या चार्ल्स द गॉल या विमान वाहू नौकेवर RAFALE M या नौदलासाठी बसणाऱ्या आवृत्तीची एक स्क्वाड्रन अगोदरच तैनात आहे. जर हा सौदा दोन्हीकडून फायद्यात झाला तर याहूनही पुढची मागणी येण्याची शक्यता आहे. या सर्व कारणासाठी फ्रान्सचे सरकार आणि डेसो हि मागणी मिळ्वण्यासाठी एवढे अधीर आहेत. असे असताना फ्रांस किंवा डेसो कंपनी तीन हजार कोटीसाठी अंबानींच्या (तथाकथित) बुडत्या जहाजावर सैर करायला जाण्याइतके मूर्ख नाहीत.( हि किंमत दोन रफाल विमानांची आहे).

सुबोध खरे 17/10/2018 - 20:02
France offers 25% discount to India on purchase of 36 Rafale jets It may be noted that the rival Eurofighter that was also in contention for the contract had offered India a 20% price cut after the new government took over. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/47168431.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

नाखु 17/10/2018 - 23:38
आणि कारणमीमांसा करताना कायदा, धोरणानुसार अनिवार्य प्रणाली यांचा यथोचित परामर्श घेतला आहे. "दुसरा"समजून घेताना तिसरा (गुगली) कसा असेल असा अंदाज आकळेना. गल्ली चेंडूफळी बदली राखीव खेळाडू नाखु वाचकांची पत्रेवाला

पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे किंमत गोपनीय असताना असे ठामपणे विधान कशाच्या आधारे केले?

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 19/10/2018 - 15:48
हि अरुण जेटलींनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी अधिकृतपणे दिलेली माहिती असावी. युट्यूबवर मिळु शकेल.

In reply to by मार्मिक गोडसे

नाखु 19/10/2018 - 18:58
मिपा सदस्य नसतील तर त्यांना लवकरात लवकर सदस्य करून घेतले पाहिजे. आणि थेट खडसावून जाब विचारला पाहिजे. बाकी ते सरकारी सॉलिसिटर जनरल वगैरे काय काम करत असतील याची ज्याम उत्सुकता आहे. स दा बोंबले अखिल बोंबिल भिके मंडळ संचालित पानटपरी सदस्य पिंपरी-चिंचवड गावठाण

In reply to by नाखु

राहूल गांधी आणि समस्त गांधी परिवार ... समस्त काँग्रेस परिवार, ह्यांना पण मिपा सदस्य करून घेतले पाहिजे ... सध्या काँग्रेसकडे फावला वेळ भरपूर असल्याने, ते आमच्या सारखेच "मिपा-मिपा, वाद-विवाद" करायला मोकळेच असतील. बादवे, सध्या मोगा आणि चंपाबाई दिसत नाहीत, कारण असे धागे आले की, मोगा आणि चंपाबाईंचे प्रतिसाद वाचायला मजा यायची.

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 20/10/2018 - 17:41
अरुण जेटलीं कसलेले वकील आहेत, बारकाव्यांची काळजी व्यवस्थित घेतात. त्यांची युट्यूबवर मी बघीतलेल्या मुलाखतीत युपिए काळात निगोषीएट केलेली किंमत क्ष होती जी युपिए काळातील मंत्र्यांना माहितीच आहे त्यापेक्षा आम्ही कमी किमतीस निगोशीएट केले. यात अरुण जेटलींनी मूळ क्ष किंमत जाहीर न करण्याची काळजी व्यवस्थित घेतली आहे. किंमत गोपनीयता शत्रुराष्ट्राच्या दृष्टीने महत्व ठेवत असेल तरीही मर्यादीतच असे वाटते. किंमत गोपनीयतेचे कारण सहसा विशेषतः एका ग्राहकस दिलेली किंमत दुसर्‍या ग्राहकास समजू नये हे असते. आता हे कारण जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुढे केले का हे भविष्यातील काळच सांगू शकतो. संरक्षण हे एवढे महत्वाचे क्षेत्र आहे की जगातल्या कोणत्याही सरकार वर सद्यकाळात विश्वास ठेवण्या शिवाय पर्याय नसतोच. अती संशय हे जेवणातले अती मिठ ठरु शकते त्यामुळे अती संशयवादाचे समर्थन करणे कठीण असते. सर्वात चांगला मार्ग सत्तेत निवडून येण्याच्या वर्षांवर आणि घराणेशाहीवर मर्यादा हवी म्हणजे आठ दहा वर्षांनी जेव्हा सत्तेतील लोक खर्‍या अर्थाने बदलतात तेव्हाच खरी चौकशी होण्याची शक्यता वाढते.

In reply to by माहितगार

नाखु 20/10/2018 - 17:59
पण मिपाकर नाहीत आणि मिपावर स्पष्टीकरण देत नाहीत, अगोदरच्या सरकारमधील सगळ्या धुरीणांनी निर्विवाद स्पष्टीकरण दिले आहे.आणि तपशीलवार शंका निरसन केले आहे. सबब याचा उपयोग नाही. अतिसामान्य किरकोळ सदस्य नाखु बिनसुपारीवाला

रणजित चितळे 19/10/2018 - 09:03
मार्मिक गोडसे - मी स्वतः एच ए एल मध्ये फ्लाईट ऑपरेशन्स मध्ये आहे. सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा.

सध्या दुसरी जर गोपनिय आहे व किंमत कमी आहे हे देऊ शकत नाही तर गोपनिय असताना ती जास्त आहे असे मत देणारे कीती धादांत पणे देत फिरत आहेत बघा. तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद_१९८२ 19/10/2018 - 10:54
तुम्ही तिथे कामाला असाल तर अशी गोपनीय माहिती सार्वजनिक करणे योग्य आहे का? - मला वाटते, या लेखाच्या मार्फत चितळे सरांनी कोणतीही गोपनीय माहिती सार्वजनिक केलेली दिसत नाही.[पण तरी सुद्धा वाटाघाटी पूर्णत्वाला पोहोचलेल्या ३६ रफाल ची किंमत अर्धवट वाटाघाटीच्या यूपीए पेक्षा कमीच आहे] लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत

In reply to by प्रसाद_१९८२

लेखातील हे त्यांचे वाक्य, भाजपाचे प्रवक्ते गेले कित्येक महिने टिव्हीवर सांगत आहेत विरोधी पक्ष नेमकं उलटे दावे करत करत आहेत. गोपनीय असेल तर भाजपाचे प्रवक्ते कशासाठी खंडन करत आहेत. लेखकही तेच करत आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 19/10/2018 - 20:51
गोपनीय माहिती पैकी तुम्हाला काय माहिती झाली आहे ते सांगाल का? आणि श्री चितळे यांनी कोणती माहिती येथे उघड केली आहे जी वृत्तपत्रात छापून आलेली नाही? रफाल मध्ये कोणते रडार वापरले आहे? कोणते ECM पॉड वापरले आहे? कोणते ECCM पॉड आहे आणि ते कोणत्या वारंवारतेमध्ये काम करू शकते. त्याच्या क्षेपणास्त्राच्या डेटालींक साठी कोणती वारंवारता आहे तो एकतर्फी आहे कि दोन्ही बाजूला? रफालचा रडारच्या क्रॉस सेक्शन कोणत्या कॉम्पोसिटमुळे इतका कमी आहे? रफालच्या जमिनीवर मारा करण्याच्या उच्च क्षमतेसाठी कोणते इलेक्टोऑप्टीकल लेसर पॉड वापरले गेले आहे?( अशा असंख्य गोष्टी आहेत). या प्रत्येक गोष्टीची किंमत असते ती सर्व बेरीज करून विमानाची एकूण किंमत ठरते? हि सर्व माहिती उघड केली तर तुमच्या शत्रूला( ज्यात पाकिस्तानच नव्हे तर चीन) तुमचे विमान काय तंत्रज्ञान वापरत आहे हे जाणून घेणे सोपे जाते आणि चीन रिव्हर्स इंजिनियरिंग मध्ये एकदम तरबेज आहे. त्यामुळे तुमची अशी अगदी तुटक माहिती सुद्धा जोडून ते पूर्ण माहितीपट तयार करतील. तुम्ही मिटीऑर क्षेपणास्त्रे घेत आहेत(१५० किमी टप्पा) ते पाहून त्यानी २०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात सुद्धा केली आहे. श्री राहुल गांधी केवळ राजकीय फायद्यासाठी तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यांच्या पक्षाला विचारले कि तुमच्या कडे एवढे दिग्गज वकील आहेत तर तुम्ही न्यायालयात का जात नाही? त्यावर ते शहाजोगपणे म्हणत आहेत कि आमच्या हातात कागदपत्रे आली कि आम्ही न्यायालयात जाऊ. https://timesofindia.indiatimes.com/india/rafale-deal-will-move-court-when-we-get-documents-says-sibal/articleshow/65646909.cms पण कागदपत्रे नाहीत तर कोणत्या आधारावर आरोप करत आहात याला उत्तर नाही. त्यांच्या सरकारातील मंत्र्यांना माहिती आहे कि जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लखोटाबंद कागदपत्रे मागितली आणि या प्रकरणात काहीही चूक नाही असा निवाडा दिला तर निवडणुकीच्या अगोदर तोंडघशी पडायला होईल. बेफाट आरोप करणे सोपे असते. जे मिपावरही चालू आहे. इथे बहुतेक लोकांना माहिती थोडी पण नाही पण उचलला हात आणि लागला टंकायला अशी स्थिती आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रम्प 20/10/2018 - 07:43
एक काम करा चितळे साहेबांनी लिहलेला लेख खोट्या माहितीवर आहे / भाजप ची भलामण करणारा आहे असं गृहीत धरून राफेल वर तुम्ही लांबलचक लेख लिहून तुमची विद्वत्ता दाखवाच !! त्या शिवाय शिवभक्त आणि मोदीभक्त मधील वाद थांबणार नाही . ही एका मोदीभक्ताची विनंती आहे = )

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 20/10/2018 - 07:50
या लेखात काहीही गोपनीय माहिती उघड केलेली नाही. मला सगळे नियम माहित आहेत. मी सेनेतून आता निवृत आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 20/10/2018 - 09:41
चितळे साहेब तुम्ही उगाच लष्करात वर्षे फुकट घालवलीत. अगोदर ऑफिशिअल सिक्रेट्स ऍक्ट मिपामधील दिग्गजांकडून शिकून घ्यायला हवा होतात. आणि काहि सिक्रेट्स त्यांना माहिती असतात ती तुम्हाला माहिती नसतात हे हि समजून घ्यायचे होते. नाही तर पोकळ बांबूचे फटके मिळतील.

In reply to by सुबोध खरे

लेखात तुम्ही तुलनात्मक किंमतीचा उल्लेख केल्यावर त्याच्या सत्यतेची मागणी होणारच,जी तुम्ही देऊ शकत नाही. मग असा उल्लेख टाळता आला नसता का चितळेसाहेब?

SHASHANKPARAB 19/10/2018 - 11:16
मला तर या लेखात कुठलिहि गोपनिय महिती उघड झालेली दिसली नाही.

अभिजित - १ 19/10/2018 - 17:07
एकंदरीत भाजप ची राफेल विमान करार किंमत यातील गोपनीयता पूर्णतः समर्थनीय आहे असा भक्तांचा सूर दिसतोय. ठीक आहे. हा काही शेवटचा करार नाही. २०१९ नंतर पण बरेच करार होतील. तेव्हा पण त्या सरकारने असाच पवित्रा घेतला तरी हीच राहील ना प्रतिक्रिया तुमची ?

In reply to by अभिजित - १

आनन्दा 19/10/2018 - 18:55
अर्थात.. हायर लेव्हल ला ज्या गोष्टी होतात त्या प्रेत्येक वेळेस डिटेल मध्ये मला कळलंच पाहीजेत असा माझा कधीच आग्रह नसतो. पण गोपनीयता आहे म्हणून 2G च्या लिलावाचे आकडे लपवायला गेलात तर मान्य होणार नाही. आता मला सांगा, रॉ अनेक देशात जाऊन अनेक गोष्टी करते, ते काय त्यांनी लेजर लिहून आम्हाला सांगायला पाहिजे का? रागा रॉ ची गुप्त माहिती कळावी म्हणून आग्रह का करत नाहीत?

In reply to by आनन्दा

आनन्दा 19/10/2018 - 18:58
बाय द वे, augasta westland चे उदाहरण घ्या.. कोणीही किंमत सांगा म्हणून आग्रह केला नव्हता.. कळल्यावर देखील भ्रष्टाचार झाला असेल म्हणून देखील ओरडले नव्हते.. ओरड झाला तो दलाली प्रकरण बाहेर पडल्यावर.. त्यात सुद्धा संरक्षण किंवा अश्या आंतरदेशीय व्यवहारात दलाली अधिकृत करावी असे माझे मत आहे. पण सरकार माझ्या मताला भीक घालणार नाही हे पण मला माहितेय

In reply to by अभिजित - १

गब्रिएल 19/10/2018 - 19:58
हांगं अश्शी... सौ सुनारकी आनी एक... अ... आपलं... लव्हारकी ! अग्ली बार रागा सर्कार !! २०१९ साली आम्चे लोक्प्रिय जनेऊधारी, शिवभक्त आनी पार्टीचे अनभिशिक्त न्येते युवराज श्रीश्रीश्री (उर्फ लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री) रागासायेब पंतपरधान व्हनारच आनी मंग त्ये नुस्त्या देसूबिसू नायतर खाल्च्या समद्या भ्रश्टाचाराचे खर्रे खर्रे आकडे सोत्ताहून पेप्रात प्रशिद्द कर्नार हाहेत होsss 2011 2जी स्पेक्ट्रम घोटाला 1,76,000 करोड़ 2011 कॉमन वेल्थ घोटाला 70,000 करोड़ 2010 आदर्श घर घोटाला 900 करोड़ 2010 S बैंड स्पेक्ट्रम घोटाला 2,00,000 करोड़ 2010 खाद्यान घोटाला 35,000 करोड़ 2009 चावल निर्यात घोटाला 2,500 करोड़ 2009 उड़ीसा खदान घोटाला7,000 करोड़ 2009 झारखण्ड खदान घोटाला 4,000करोड़ 2009 झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाला130करोड़ 2008 हसन अली हवाला घोटाला 39,120 करोड़ 2008 काला धन 2,10,000 करोड 2008 स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र 95 करोड़ 2008 सैन्य राशन घोटाला5,000 करोड़ 2008 सत्यम घोटाला 8,000 करोड 2006 पंजाब सिटी सेंटर घोटाला 1,500 करोड़ 2006 ताज कॉरिडोर घोटाला 175 करोड़ 2005 आई पि ओ कॉरिडोर घोटाला1,000करोड़ 2005 बिहार बाढ़ आपदा घोटाला 17 करोड़ 2005 सौरपियन पनडुब्बी घोटाला 18,978करोड़ 2003 स्टाम्प घोटाला 20,000 करोड़ 2002 संजय अग्रवाल गृह निवेश घोटाला 600करोड़ 2002 कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाला 120करोड़ 2001केतन पारिख प्रतिभूति घोटाला 1,000करोड़ 2001 UTI घोटाला 32 करोड़ 2001 डालमिया शेयर घोटाला 595 करोड़ 1998 टीक पौध घोटाला 8,000 करोड़ 1998 उदय गोयल कृषि उपज घोटाला 210 करोड़ 1997 बिहार भूमि घोटाला 400 करोड़ 1997 सुखराम टेलिकॉम घोटाला 1,500 करोड़ 1997 SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाला 374 करोड़ 1997 म्यूच्यूअल फण्ड घोटाला 1,200 करोड़ 1996 उर्वरक आयत घोटाला 1,300 करोड़ 1996 यूरिया घोटाला 133 करोड 1996 चारा घोटाला 950करोड़ 1995 मेघालय वन घोटाला300करोड़ 1995 प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाला 5,000 करोड़ 1995 दीनार घोटाला (हवाला) 400करोड़ 1995 कॉबलर घोटाला 1,000 करोड़ 1995 वीरेंदर गौतम (कस्टम टैक्स) घोटाला 43करोड़ 1994 चीनी घोटाला 650 करोड़ 1992 हर्षद मेहता (शेयर घोटाला) 5,000 करोड़।। 1080-90s बोफोर्स तोप घोटाला -राजीव गांधी 960करोड़ कोनाला आजून काय काय नावं म्हायती आस्सली तर नुस्तं ब्वोला बास. आमाचे लोजशिपाअन्येयुश्रीश्रीश्री रागासायेब सोत्ता सम्दे आकडे आनी त्ये कोनाकोनाकडे ग्येले ते सम्दे लोक्सभेत फटाफट भाषान देउन सांगतिला. काय सम्जलानं, आँ !

In reply to by गब्रिएल

नाखु 19/10/2018 - 23:26
आणि ते पण रावण दहन नंतर!!! असं नाही करायचा, टाका ना यांना कारागृहात जसं काही हे मागे पुरावे ठेवून गेले आहेत,आणि त्यांचे भागीदार सरकारी, बॅंक कर्मचारी अगदी अलगदपणे सापडतील. काही लाभार्थी सत्ता, सरकारी ठिकाणी असतील तर ... तरी म्हणायला काय विशेष अक्कल लागत नाही, न्यायव्यवस्था कशी फरफटत जाते हे रस्त्यावर फुकटात मेलेल्या आणि त्यांना सद्गती देणार्या प्रेमने "हम आपके है कौन"असं वेडावून दाखवलं आहे. मुदलात किरकोळ सदस्य नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 20/10/2018 - 09:51
UPA २ च्या काळात झालेले एवढे सगळे घोटाळे बाहेर आले. परंतु P ८ I या विमानाच्या दोन सरकारांच्या मधील कंत्राटावर NDA ने कोणताही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या किमतीबद्दल कोणताही गदारोळ केला नाही हे कसे काय झाले? आणि आताही मोदी सरकारला ४ वर्षे झाली तरी त्याबद्दल काही चकार शब्द नाही. उलट मोदी सरकारने अजून चार विमाने विकत घेण्याचे कंत्राट दिले. कुछ तो गडबड है दया.

अभिजित - १ 20/10/2018 - 16:34
Orders dry up, HAL staff could sit idle हरकत काय ? अंबानी जगला पाहिजे. ते महत्वाचे. या लोकांना काय, सरकार फुकट पगार देऊ शकतेच कि . https://economictimes.indiatimes.com/news/defence/orders-dry-up-hal-staff-could-sit-idle/articleshow/66291103.cms HAL has 29,035 employees, including 9,000 engineers. And, they’re spread across nine locations—Bengaluru; Nashik in Maharashtra; Lucknow, Kanpur and Korwa in Uttar Pradesh; Barrackpore in West Bengal; Hyderabad and Kasargod in Kerala—with Bengaluru and Nashik accounting for 10,000 of them.

In reply to by अभिजित - १

आनन्दा 22/10/2018 - 07:52
ओपन आणि स्ट्रेट बोलतो.. ही बातमी व्यवस्थित आहे, पण सदर आयडी यातून अर्धवट माहिती काढून इतरांची दिशाभूल करत आहे .. 1. बातमीत सरळ लिहिलंय, HAL कडे 83 तेजस ची ऑर्डर येऊ घातली आहे, जी आली तर या सगळ्यांना काम मिळेल. 2. हे सगळे लोक आता या क्षणी बेंच वर येत आहेत. राफेल डील झालं असतं तर या सगळ्या आ आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे. आणि अंबानीच्या 3000 कोटी मध्ये हे 29000 लोक कसे पोसले गेले असते हे पण सांगणे, अन्यथा मिपाकरांची माफी मागावी.

In reply to by आनन्दा

अभिजित - १ 24/10/2018 - 12:59
आत्ता या क्षणी काम कसे मिळाले असते हे या आयडीने कृपया स्पष्ट करावे नंतर मिळाले तरीही बरेच नाही का ? कधीच न मिळण्यापेक्षा ? अंबानीच्या 3000 कोटी मध्ये फक्त ३००० कोटी ? तो सांगायचा आकडा आहे .. राफेल डील कॉस्ट किती आहे ते एकदा बघा ..

In reply to by अभिजित - १

प्रसाद_१९८२ 22/10/2018 - 10:58
तुमची आकलन क्षमता अगदी राहुल गांधीच्या तोडीची आहे. हे तुमच्या वरिल प्रतिसादातून दिसून येत आहे. -- अजून येऊ देत असे हास्यास्पद प्रतिसाद. :))

In reply to by नाखु

स्वधर्म 22/10/2018 - 11:51
ननि यांचा वरील प्रतिसाद कळला नाही. अपोलोजेटीक! बाय द वे, मी चितळे साहेबांना काही विचारले होते वरती, प्रोसिजर वाचूनच, पण त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दुवा: https://www.misalpav.com/comment/1012791#comment-1012791

तर तात्पर्य काय की मोदी आणि भाजप सरकारने केलेला व्यहवार अतिशय स्वच्छ आहे. रिलायन्स ही कंपनी विमान बनवण्या/जोडण्याकरिता सर्वोत्तम भारतीय कंपनी आहे रिलायन्सला कंत्राट मिळावे याकरिता मोदी सरकारातील कुणीही शब्द टाकला नाही. मोदी सरकार जे काही करतं ते सगळं फक्त आणि फक्त देशहिताकरिताच असतं तो रागा एक मुर्ख माणूस आहे आणि यातलं कुणाला काही अमान्य असेल तर तो एक देशद्रोही म्हणून गणला जाईल.

In reply to by मराठी कथालेखक

नाखु 25/10/2018 - 22:16
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे खात्री देऊ शकत नाही. कारण ते मिपावर प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नाहीत आणि त्यांच्यापेक्षाही सरसपणे मोडतोडप्रवणअर्धहळकुंडीपीतपिपाणी वाजवणारे स्वघोषीत प्रवक्ते आहेत. बाकी मुद्दे कपील सिब्बल यांच्या कडे पाठवीले तर किरकोळ दुरुस्ती करून प्रचारपत्रिकेत समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. पुन्हा शिक्कामोर्तब झालेला नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 26/10/2018 - 09:38
तो रागा एक मुर्ख माणूस आहे मी आपल्या मताशी १००% सहमत आहे. गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत. कारण इकडे बटाटे टाकून तिकडून सोनं बाहेर काढण्याचे मशीन लावणार असूनही सोन्याचा भाव कमी व्हायच्या ऐवजी वाढलाच आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गम्मत म्हणजे सगळेच भारतीय याच्याशी सहमत आहेत
खरं आहे.. रागा मुर्ख आहे आणि त्याला बाजूला सारण्याचं धाडंस बाकी काँग्रेसजनांत अजूनतरी नाही म्हणूनच इतरांच फावतंय... ते असो. पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे... २०१९ .. नाही तर २०२४ ला तरी "अब की बार pc सरकार !! ...."

In reply to by मराठी कथालेखक

पृथ्वीराज चव्हाण भारताचे पंतप्रधान बनतील हे स्वप्न मी उराशी बाळगून आहे असं प्रकटपणे म्हणून तुम्ही पृ. चव्हाणांचे अभितव्य धोक्यात आणत आहाते, हे आपल्या ध्यानात आले काय ? पंतप्रधानपद सोडाच, आजपर्यंत 'कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षाच्या पदासाठी निवडणुकीला उभे राहणार' अशी नुसती इच्छा व्यक्त केलेल्या भल्याभल्यांची काय अवस्था झाली आहे, हे विसरलात ?! =))

सुबोध खरे 26/10/2018 - 09:35
ना खु साहेब काय होतंय कि मोदी विरोधी लोकांची फार तडफड होते आहे कारण कोणत्याही बाबतीत "घोटाळा" असे कितीही उच्चरवाने सांगितले तरी कोणत्याही बाबतीत सबळ असा पुरावा कोणालाही देता येत नाहीये. त्यामुळे त्या पुरस्कार वापसीच्या भंपक प्रकारानंतर दर काही दिवसांनी नवीन नवीन काहीतरी काढायचे आणि मोठा आरडा ओरडा करायचा आणि ते खोटं निघालं कि शांत बसायचं सोडून परत काहीतरी भंपक शोधून काढायचं. डोंगर इकडनं पोखरला आणि उंदीर निघाला कि परत तिकडनं पोखरायला सुरुवात करायची अशी स्थिती झाली आहे.

In reply to by रणजित चितळे

सुबोध खरे 27/10/2018 - 18:29
रिलायन्सला फक्त ८५० कोटीचे कंत्राट आहे. एवढा डोंगर पोखरून एक उंदीर निघाला. आता हे लोक कोणता डोंगर पोखरायला घेणार? The joint venture, Dassault Reliance Aviation Limited (DRAL), will see an investment capped at €100 million (Rs 850 crore) for setting up a plant to manufacture parts for Falcon executive jets, ET has learnt. https://economictimes.indiatimes.com/news/defence/reliance-defence-to-get-3-of-rs-30000-crore-offset/articleshow/66228334.cms

In reply to by रणजित चितळे

नाखु 28/10/2018 - 14:37
युवराज ३०००० हजार कोटींचा मलिदा अंबानींच्या कंपनीलाच राफेल करारामुळे दिला असं म्हणतात. आता कुठे बेसीकमध्ये लोच्या आहे ते पहा. काही पुरावे मागणी करणारे विचारवंत बुद्धीवादी यांसाठी खालील दैनिक भास्कर मधून कांग्रेस अध्यक्ष ने कहा- देश के प्रधानमंत्री भ्रष्ट हैं, राफेल पर जवाब दें, नहीं तो इस्तीफा दें राहुल ने कहा- खुद प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को कंपनसेशन दिलवाया राहुल का सवाल- रक्षा मंत्री को अचानक फ्रांस क्यों भेजा गया? Dainik Bhaskar Oct 11, 2018, 03:09 PM IST नई दिल्ली. राफेल विवाद पर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ने गुरुवार को फिर मोदी सरकार को आड़े हाथों लिया। राहुल ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भ्रष्ट बताया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री ने अनिल अंबानी को राफेल का कॉन्ट्रैक्ट दिलाकर 30 हजार करोड़ रुपए उनकी जेब में डाले। वे देश के नहीं, अंबानी के चौकीदार हैं। अगर मोदी राफेल डील में भ्रष्टाचार को लेकर जवाब नहीं दे पा रहे हैं तो इस्तीफा दें। उधर, फ्रांस की एक मैगजीन ने राफेल बनाने वाली दैसो के आंतरिक दस्तावेजों के हवाले से दावा किया कि कंपनी के पास रिलायंस के अलावा दूसरा विकल्प नहीं था। हालांकि, दैसो ने इससे इनकार किया है।

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

और ये है तुलनात्मक ब्यौरा.... :) विशेषतः, राफालं आणि रिलायंसमधील काँट्रॅक्टसंबंधीच्या तारखा/वर्षे आणि त्यावेळेची दोन देशतिल सरकारे हे तपशील पाहणे मनोरंजक ठरू शकते
लेखनविषय:
ह्या आधीचे रफाल भाग १ भाग २ – वारंवार पडणारे प्रश्न व अंततः प्रश्न १ – मोदी सरकारने वाटाघाटी केल्या नंतरची रफालची किंमत यूपीए सरकारने ठरवल्या पेक्षा जास्त आहे का. उ१- यूपीए सरकारच्या वेळेस सुरू झालेल्या वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या नव्हत्या त्यामुळे अपूर्ण राहिलेल्या वाटाघाटीतून उद्भवणारी किंमत व पूर्णत्वाला पोहोचलेल्या वाटाघाटींच्या किमतीची आपण तुलना करू शकत नाही. वाटाघाटी ‘किमतीच्या अंदाजे आकड्यावर’ आधारलेल्या असतात. हा ‘किमतीचा अंदाजे आकडा’ नवीन नवीन मिळणाऱ्या माहिती नुसार बदलत राहतो.

रफाल - भाग १

रणजित चितळे ·

आनन्दा 16/10/2018 - 10:17
वाचत आहे. अजून थोडे विस्तृत असले तरी चालले असते. घाईघाईत लेख आटपल्यासारखा वाटला.

सुबोध खरे 16/10/2018 - 11:22
युरो फायटर न घेण्याचे महत्त्वाचे कारण जरी ते महाग आहे हे दिले जात असले तरी खरी अनेक कारणे आहेत एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्लंड, जर्मनी स्पेन आणि इटली अशा चार देशात त्याच्या वेगवेगळ्या भागांचे उत्पादन होते. त्यामुळे ऐन युद्धच्या वेळेस जर एखाद्या देशाने सुटे भाग पुरवण्यासाठी नकार दिला तरी तुमची विमाने जमिनीवरच राहतील. येतेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे विमाने हि अतिवेगाने हवेतुन जात असल्यामुळे घर्षण, उष्णता आणि हादऱ्यांमुळे त्याच्या भागांची झीज होत असते यामुळे दर काही तासांनी त्याच्या भागांची तपासणी करून झिजलेले भाग बदलावे लागतात. हि कायम चालू राहणारी प्रक्रिया आहे आणि युद्धात विमाने सतत उड्डाण करत असल्य्याने हि प्रक्रिया फार वेगाने हते त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात सुट्या भागांची गरज फारच जास्त असते. नेमके अशा वेळेस एखादा देश तुमची मान आवळू शकतो. लक्षात ठेवा कारगिल युद्धाचे ऐन वेळेस अमेरिकेने GPS वापरू देण्यास नकार दिला होता. २) युरोफायटरच्या देखभालीचा खर्च रफालच्या तुलनेत बराच जास्त आहे कारण त्याचे सुटे भाग जास्त खर्चिक आहेत शिवाय हा आंतरजातीय विवाह तेवढा यशस्वी झालेला नाही. ३) फ्रांस हा भारताचा एक अतिशय भरवशाचा साथीदार म्हणून संरक्षण क्षेत्रात काम करत आहे. अग्नी तयार होण्यापूर्वी भारताचा अणुबॉम्ब टाकण्यासाठी फ्रान्स ने भारताला आपल्या मिराज विमानात आवश्यक ते तांत्रिक बदल करवून दिले होते. असेच बदल रफालमध्ये अंतर्भूत आहेत. भारताला लागणारे(INDIA SPECIFIC) तांत्रिक बदल मध्ये हा एक न बोलता केलेला बदल आहे. ४) हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी युरोफायटर तेवढे उपयुक्त नाही. मिग २३-२७ या जुन्या विमानांच्या बदल्यात हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्यासाठी रफाल हे युरोफायटरपेक्षा किती तरी जास्त चांगले आहे. ५) हवेतून हवेत मारा करणारे मिटीओर हे क्षेपणास्त्र युरोफायटरवर निविदा काढण्याच्या वेळेस (२००७) पूर्णपणे संलग्न झालेले नव्हते. त्याची पहिली चाचणी २०१२ मध्ये झाली. मिटीओर हे क्षेपणास्त्र साधारण १४०-१६० किमी पर्यंत मारा करू शकते. याच्या तुलनेत चीनचे PL -१२ हे क्षेपणास्त्र ८० किमी पर्यंत मारा करू शकते. ( ते किती अचूक आहे हा एक वेगळा प्रश्न आहे), पाकिस्तान कडे अमेरिकेने दिलेली AMRAAM हि ८० किमी टप्पा असलेली क्षेपणास्त्रे आहेत.

स्वधर्म 16/10/2018 - 12:12
वाचण्यास उत्सुक अाहे. अाणखी थोडा विस्ताराने लिहीला तरी चालेल. पण मला खालील बाबतीत वाचण्यास नक्की अावडेल. खासकरून दासू ही जर अशी कंपनी असेल, की जी अापल्या रेप्युटेशनला खूप जपते अाणि, अापण म्हणता तसे, “आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यावसायिक कंपन्या नफ्यासाठी जगतात. दासू काही बिनसरकारी धर्मदाय संघटना नाही की सामान कमी किमतीत तोटा स्वीकारून स्वस्त दरात देईल. कोणतेही सरकार किंवा कंपनी युद्धाला लागणारी सामुग्री दुसऱ्या राष्ट्राला फुकट किंवा तोटा स्वीकारून स्वस्तात देत नाहीत..” तर कोणत्या कारणाने तिने सेट अॉफ देण्यासाठी रिलायन्स डिफेन्सची निवड केली? बाकी इतर मुद्द्यांबाबत (विमानाची तातडीची अावश्यकता, तांत्रिक मुद्दे, काही बाबतीतली गोपनियता इ) लोकांना फारशा शंका नाहीत, असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अभिजित - १ 16/10/2018 - 14:49
विमाने पॉवरफुल आहेत यात शंकाच नाही. पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले.

In reply to by अभिदेश

नाखु 16/10/2018 - 19:37
आणि समजेल अश्या भाषेत असल्याने जास्त काळजीपूर्वक वाचून काढला. बाकी मानवनिर्मित अडथळे सहज पार कराल अशी खात्री आहे. राजाराम सीताराम पासूनच लक्षात आहे. वाचकांचीच पत्रेवाला नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 16/10/2018 - 18:57
पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. On choosing Reliance Defence to be a major offset partner, Dassault said its main Indian partner in the past - HAL - was busy with several projects like the light combat aircraft and the choice was to go with a new entrant into the defence field. "We were told that HAL was fully booked. We talked to Reliance and they were very keen to create such capabilities in India. They have a track record and the financial capability as well," Trappier said. Dassualt said there would be other India partners as part of the offset programme also as the company does not have an exclusive agreement with Reliance. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/57175912.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 14/12/2018 - 18:28
पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले. सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थित उहापोह केला आहे त्यांच्या ३९ पानी आणि एकमुखी निकालात.

In reply to by जेपी

असंही crony capitalism मध्ये जनतेलाही रस नसावा. HAL किती आळशी आहे हे नाकपुड्या फुगवून संरक्षण मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मिळाला मलिदा एखाद्या कार्यक्षम दिवाळखोर उद्योगपतीला तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 17/10/2018 - 08:53
पण अत्यंत वाईट मराठी व लिंक्स मध्ये लिंक्स देऊन माळी साहेबांनी गूंतवून टाकलाय पण वाचेन (ब-याच गोष्टी माहित आहेत पण तरी सूद्धा वाचीन)

सुबोध खरे 16/10/2018 - 19:50
चितळे साहेब आपले नेहेमीचे यशस्वी कलाकार तुम्हाला रफालचा मूळ करार सुद्धा अंबानींना दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठीच झाला आहे हे पटवून देतील की नाही ते पहा. एखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल. हा का ना का.

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ 16/10/2018 - 22:51
एखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल. उगाच फिरवाफिरवी करायचा प्रयत्न करू नका. राफेल ला कोणीच कमी लेखत नाहीए. बाकी वर गोडसे साहेबानी दिलेल्या लिंक्स वाचल्यात का ?

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 17/10/2018 - 09:22
इतरांसारखे हवेत गोळीबार करायची सवय नाही मला. तिन्ही दुवे नीट वाचून मगच प्रतिसाद दिला आहे. त्या लेखातील बऱ्याच गोष्टी भंपकपण आहेत. उदाहरणार्थ पहिल्या दुव्यात तसंच रशियाकडून पाकिस्तान आणि चीनला देखील मिग-३५शी साधर्म्य असणाऱ्या तंत्रज्ञानाचा पुरवठा होत होता. आणि मूळ महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला उद्देशून प्रतिसाद दिलेलाच नव्हता. खाजवून खरूज काढायची सवय सोडून द्या.

सुंदर सुरुवात. चितळे साहेबांचे लेख म्हणजे संशोधित पुराव्यांसह विश्वासू माहिती अपेक्षित आहेच. बर्‍याच जणांच्या बर्‍याच शंकाकुशंका दूर व्हायला मदत होईल. हा भाग जरा थोडक्यात आटपला असे वाटले. सद्या जोरात चर्चेत असलेला आणि अनेक आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेला विषय असल्याने, त्याबद्दल अजून जरा विस्ताराने माहिती प्रासंगिक होईल, असे वाटते.

ट्रम्प 16/10/2018 - 22:14
विनाकारण उठाठेवी करणाऱ्या भारतातील समस्त टोळ्यांना एकच गोष्ट खटकली आणि ती म्हणजे अंबानी च्या कंपनी ची निवड !!!! आणि त्या मुद्द्यावर अजूनही भाजप व्यवस्थित कारणमीमांसा देऊ शकली नाही

In reply to by ट्रम्प

अभिजित - १ 16/10/2018 - 22:56
विनाकारण उठाठेवी ?? टोळ्या ?? सत्य बाहेर यावे इतकीच मागणी आहे फक्त. बाकी मान्य केल्या बद्दल आभार - कि भाजप कडे काही स्पष्टीकरण नाही , अंबानी चे .

In reply to by अभिजित - १

ट्रम्प 17/10/2018 - 07:47
मोदींच्या निष्कलंक राजकारणाला अंबानी मूळे डाग लागला हे नक्की , भले त्यात 5 पैशा चा भ्रष्टाचार झाला नसेल .Hal कडे 27 हजार करोड च्या ऑर्डर असताना राफेल च काम त्यांच्या गळ्यात नको म्हणून अंबानी च्या कंपनी ची निवड केली असेल परंतु ती कंपनी अननुभवी आहे . Hal च्या कर्मचाऱ्यांना रागा ने भेटून काँग्रेस किती खालच्या थरावर उतरू शकते हे दाखवले .

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 17/10/2018 - 09:39
HAL still cannot manufacture the Sukhois on its own," said a source. A HAL-made Sukhoi (around Rs 450 crore) also costs Rs 100 crmore than the price of the same jet imported from Russia. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/57546519.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst अशी स्थिती का आली आहे हे पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे. राजकारणी लोक चिखलफेक करतात त्यात राजकारण आहे म्हणून. सामान्य माणसांनी राहुल गांधींसारख्या माणसाच्या नादी लागु नये. हिंदुस्थान एरोनॉटिक्सची प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि ती का आहे याचे ज्यांना ज्ञान नाही ते केवळ राजकारणी लोकांच्या ऐकीव भाषणावर विसंबून येथे प्रतिसाद देत आहेत हे सहज लक्षात येते आहे. ज्यांना दोन सरकार मध्ये होत असलेल्या कराराबद्दल काहीही माहिती नाही तेहि केवळ स्कोअर सेटल करायला उगाच पिचक्या टाकत आहेत.

आनन्दा 16/10/2018 - 10:17
वाचत आहे. अजून थोडे विस्तृत असले तरी चालले असते. घाईघाईत लेख आटपल्यासारखा वाटला.

सुबोध खरे 16/10/2018 - 11:22
युरो फायटर न घेण्याचे महत्त्वाचे कारण जरी ते महाग आहे हे दिले जात असले तरी खरी अनेक कारणे आहेत एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंग्लंड, जर्मनी स्पेन आणि इटली अशा चार देशात त्याच्या वेगवेगळ्या भागांचे उत्पादन होते. त्यामुळे ऐन युद्धच्या वेळेस जर एखाद्या देशाने सुटे भाग पुरवण्यासाठी नकार दिला तरी तुमची विमाने जमिनीवरच राहतील. येतेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे विमाने हि अतिवेगाने हवेतुन जात असल्यामुळे घर्षण, उष्णता आणि हादऱ्यांमुळे त्याच्या भागांची झीज होत असते यामुळे दर काही तासांनी त्याच्या भागांची तपासणी करून झिजलेले भाग बदलावे लागतात. हि कायम चालू राहणारी प्रक्रिया आहे आणि युद्धात विमाने सतत उड्डाण करत असल्य्याने हि प्रक्रिया फार वेगाने हते त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात सुट्या भागांची गरज फारच जास्त असते. नेमके अशा वेळेस एखादा देश तुमची मान आवळू शकतो. लक्षात ठेवा कारगिल युद्धाचे ऐन वेळेस अमेरिकेने GPS वापरू देण्यास नकार दिला होता. २) युरोफायटरच्या देखभालीचा खर्च रफालच्या तुलनेत बराच जास्त आहे कारण त्याचे सुटे भाग जास्त खर्चिक आहेत शिवाय हा आंतरजातीय विवाह तेवढा यशस्वी झालेला नाही. ३) फ्रांस हा भारताचा एक अतिशय भरवशाचा साथीदार म्हणून संरक्षण क्षेत्रात काम करत आहे. अग्नी तयार होण्यापूर्वी भारताचा अणुबॉम्ब टाकण्यासाठी फ्रान्स ने भारताला आपल्या मिराज विमानात आवश्यक ते तांत्रिक बदल करवून दिले होते. असेच बदल रफालमध्ये अंतर्भूत आहेत. भारताला लागणारे(INDIA SPECIFIC) तांत्रिक बदल मध्ये हा एक न बोलता केलेला बदल आहे. ४) हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी युरोफायटर तेवढे उपयुक्त नाही. मिग २३-२७ या जुन्या विमानांच्या बदल्यात हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्यासाठी रफाल हे युरोफायटरपेक्षा किती तरी जास्त चांगले आहे. ५) हवेतून हवेत मारा करणारे मिटीओर हे क्षेपणास्त्र युरोफायटरवर निविदा काढण्याच्या वेळेस (२००७) पूर्णपणे संलग्न झालेले नव्हते. त्याची पहिली चाचणी २०१२ मध्ये झाली. मिटीओर हे क्षेपणास्त्र साधारण १४०-१६० किमी पर्यंत मारा करू शकते. याच्या तुलनेत चीनचे PL -१२ हे क्षेपणास्त्र ८० किमी पर्यंत मारा करू शकते. ( ते किती अचूक आहे हा एक वेगळा प्रश्न आहे), पाकिस्तान कडे अमेरिकेने दिलेली AMRAAM हि ८० किमी टप्पा असलेली क्षेपणास्त्रे आहेत.

स्वधर्म 16/10/2018 - 12:12
वाचण्यास उत्सुक अाहे. अाणखी थोडा विस्ताराने लिहीला तरी चालेल. पण मला खालील बाबतीत वाचण्यास नक्की अावडेल. खासकरून दासू ही जर अशी कंपनी असेल, की जी अापल्या रेप्युटेशनला खूप जपते अाणि, अापण म्हणता तसे, “आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यावसायिक कंपन्या नफ्यासाठी जगतात. दासू काही बिनसरकारी धर्मदाय संघटना नाही की सामान कमी किमतीत तोटा स्वीकारून स्वस्त दरात देईल. कोणतेही सरकार किंवा कंपनी युद्धाला लागणारी सामुग्री दुसऱ्या राष्ट्राला फुकट किंवा तोटा स्वीकारून स्वस्तात देत नाहीत..” तर कोणत्या कारणाने तिने सेट अॉफ देण्यासाठी रिलायन्स डिफेन्सची निवड केली? बाकी इतर मुद्द्यांबाबत (विमानाची तातडीची अावश्यकता, तांत्रिक मुद्दे, काही बाबतीतली गोपनियता इ) लोकांना फारशा शंका नाहीत, असे वाटते.

In reply to by स्वधर्म

अभिजित - १ 16/10/2018 - 14:49
विमाने पॉवरफुल आहेत यात शंकाच नाही. पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले.

In reply to by अभिदेश

नाखु 16/10/2018 - 19:37
आणि समजेल अश्या भाषेत असल्याने जास्त काळजीपूर्वक वाचून काढला. बाकी मानवनिर्मित अडथळे सहज पार कराल अशी खात्री आहे. राजाराम सीताराम पासूनच लक्षात आहे. वाचकांचीच पत्रेवाला नाखु

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 16/10/2018 - 18:57
पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? हाच मुख्य विवादास्पद मुद्दा आहे. On choosing Reliance Defence to be a major offset partner, Dassault said its main Indian partner in the past - HAL - was busy with several projects like the light combat aircraft and the choice was to go with a new entrant into the defence field. "We were told that HAL was fully booked. We talked to Reliance and they were very keen to create such capabilities in India. They have a track record and the financial capability as well," Trappier said. Dassualt said there would be other India partners as part of the offset programme also as the company does not have an exclusive agreement with Reliance. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/57175912.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 14/12/2018 - 18:28
पण काय म्हणुन अंबानी ची निवड झाली ? आणि अंबानींना कडेवर घ्यायला पर्रीकर तयार नव्हते म्हणूनच त्यांना गोव्यात परत पाठवले. सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थित उहापोह केला आहे त्यांच्या ३९ पानी आणि एकमुखी निकालात.

In reply to by जेपी

असंही crony capitalism मध्ये जनतेलाही रस नसावा. HAL किती आळशी आहे हे नाकपुड्या फुगवून संरक्षण मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मिळाला मलिदा एखाद्या कार्यक्षम दिवाळखोर उद्योगपतीला तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण काय?

In reply to by मार्मिक गोडसे

रणजित चितळे 17/10/2018 - 08:53
पण अत्यंत वाईट मराठी व लिंक्स मध्ये लिंक्स देऊन माळी साहेबांनी गूंतवून टाकलाय पण वाचेन (ब-याच गोष्टी माहित आहेत पण तरी सूद्धा वाचीन)

सुबोध खरे 16/10/2018 - 19:50
चितळे साहेब आपले नेहेमीचे यशस्वी कलाकार तुम्हाला रफालचा मूळ करार सुद्धा अंबानींना दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठीच झाला आहे हे पटवून देतील की नाही ते पहा. एखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल. हा का ना का.

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ 16/10/2018 - 22:51
एखादे वेळेस रफाल हे विमानच कसं फालतू आहे हे ही सिद्ध होईल. उगाच फिरवाफिरवी करायचा प्रयत्न करू नका. राफेल ला कोणीच कमी लेखत नाहीए. बाकी वर गोडसे साहेबानी दिलेल्या लिंक्स वाचल्यात का ?

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 17/10/2018 - 09:22
इतरांसारखे हवेत गोळीबार करायची सवय नाही मला. तिन्ही दुवे नीट वाचून मगच प्रतिसाद दिला आहे. त्या लेखातील बऱ्याच गोष्टी भंपकपण आहेत. उदाहरणार्थ पहिल्या दुव्यात तसंच रशियाकडून पाकिस्तान आणि चीनला देखील मिग-३५शी साधर्म्य असणाऱ्या तंत्रज्ञानाचा पुरवठा होत होता. आणि मूळ महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला उद्देशून प्रतिसाद दिलेलाच नव्हता. खाजवून खरूज काढायची सवय सोडून द्या.

सुंदर सुरुवात. चितळे साहेबांचे लेख म्हणजे संशोधित पुराव्यांसह विश्वासू माहिती अपेक्षित आहेच. बर्‍याच जणांच्या बर्‍याच शंकाकुशंका दूर व्हायला मदत होईल. हा भाग जरा थोडक्यात आटपला असे वाटले. सद्या जोरात चर्चेत असलेला आणि अनेक आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेला विषय असल्याने, त्याबद्दल अजून जरा विस्ताराने माहिती प्रासंगिक होईल, असे वाटते.

ट्रम्प 16/10/2018 - 22:14
विनाकारण उठाठेवी करणाऱ्या भारतातील समस्त टोळ्यांना एकच गोष्ट खटकली आणि ती म्हणजे अंबानी च्या कंपनी ची निवड !!!! आणि त्या मुद्द्यावर अजूनही भाजप व्यवस्थित कारणमीमांसा देऊ शकली नाही

In reply to by ट्रम्प

अभिजित - १ 16/10/2018 - 22:56
विनाकारण उठाठेवी ?? टोळ्या ?? सत्य बाहेर यावे इतकीच मागणी आहे फक्त. बाकी मान्य केल्या बद्दल आभार - कि भाजप कडे काही स्पष्टीकरण नाही , अंबानी चे .

In reply to by अभिजित - १

ट्रम्प 17/10/2018 - 07:47
मोदींच्या निष्कलंक राजकारणाला अंबानी मूळे डाग लागला हे नक्की , भले त्यात 5 पैशा चा भ्रष्टाचार झाला नसेल .Hal कडे 27 हजार करोड च्या ऑर्डर असताना राफेल च काम त्यांच्या गळ्यात नको म्हणून अंबानी च्या कंपनी ची निवड केली असेल परंतु ती कंपनी अननुभवी आहे . Hal च्या कर्मचाऱ्यांना रागा ने भेटून काँग्रेस किती खालच्या थरावर उतरू शकते हे दाखवले .

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 17/10/2018 - 09:39
HAL still cannot manufacture the Sukhois on its own," said a source. A HAL-made Sukhoi (around Rs 450 crore) also costs Rs 100 crmore than the price of the same jet imported from Russia. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/57546519.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst अशी स्थिती का आली आहे हे पूर्णपणे जाणून घेणे आवश्यक आहे. राजकारणी लोक चिखलफेक करतात त्यात राजकारण आहे म्हणून. सामान्य माणसांनी राहुल गांधींसारख्या माणसाच्या नादी लागु नये. हिंदुस्थान एरोनॉटिक्सची प्रत्यक्ष स्थिती काय आहे आणि ती का आहे याचे ज्यांना ज्ञान नाही ते केवळ राजकारणी लोकांच्या ऐकीव भाषणावर विसंबून येथे प्रतिसाद देत आहेत हे सहज लक्षात येते आहे. ज्यांना दोन सरकार मध्ये होत असलेल्या कराराबद्दल काहीही माहिती नाही तेहि केवळ स्कोअर सेटल करायला उगाच पिचक्या टाकत आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रफाल रफाल करार पार्श्वभूमी रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड.

मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल

चित्रगुप्त ·
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल पुणे-नगर रोडवरील (राज्य महामार्ग क्र. २७) लोणीकंद भागात 'पुष्पानगरी' नामक कालोनीत माझा एक प्लॉट आहे (क्षेत्रफळ ३००० वर्गफूट, ५० गुणिले ६० फूट ). वाघोली पासून अंतर सहा किलोमीटर आहे. हा प्लॉट विकायची माझी इच्छा आहे. तरी याबाबतीत मार्गदर्शन हवे आहे.

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

अत्रुप्त आत्मा ·

खटपट्या 12/09/2018 - 19:19
जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला!
टिळकांच्या आधिपासून ५ दिवसाचा गणपती आहे हो कोकणात जो गौरीविसर्जनाबरोबर विसर्जित केला जातो. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by खटपट्या

@
टिळकांच्या आधिपासून ५ दिवसाचा गणपती आहे हो कोकणात जो गौरीविसर्जनाबरोबर विसर्जित केला जातो. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
--- तसा इकडे घाटावरही 7व्या दिवशी मंजे गौरी बरोबर विसर्जित होणारा गणपतीही टिळकपूर्व'च आहे. पण ह्या सगळ्याला रूढी आणि परंपरा म्हणतात. मूलशास्त्र (शिल्लक) असतच. ते दिड"दिवसवालं आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आनन्दा 13/09/2018 - 13:58
मूळ शास्त्रानुसार गणपती बहुधा 1 दिवसच होता असे ऐकून आहे.. सकाळी आणला, पूजा करून नैवेद्य झाला के विसर्जित केला.. पार्थिव शाडूच्या मूर्तीचे आयुष्य तितकेच असणं अपेक्षित आहे.

In reply to by anandkale

कंजूस 13/09/2018 - 08:08
हो, हे केलं आहे लहानपणी. तीन चार इंच लांब रूंद आणि अर्धा इंच जाड असे गणपती ,मारुती केले होते. मातीत कापूस मळला होता आणि एक कीचेन घातली होती खिळ्यावर टांगायला. द्रोणागिरी नेणारा उडणारा मारुती करून त्याला पिवळा गेरू, गणपतीला लाल गेरूने रंगवले होते. नाग पंचमीसाठी नाग करून द्यायचो त्यास कोळशाने काळा रंग असायचा. त्याच्या मानेत घातलेल्या बॉलपेनच्या स्प्रिंगमुळे फणा डोलत राहायचा. '६५ नंतर प्लास्टिक खेळणी आली आणि मातीची चित्रं फिकी झाली.

खिलजि 12/09/2018 - 21:16
संत समर्थ रामदास आणि श्रीगणेशाचे अजोड नाते - सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास यांनी रचली आहे. गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. 4 ते भाद्रपद शु.14 हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !! समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथर घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा 1658 साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखाननावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी [अष्टविनायक|अष्टविनायकांतला]] पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो. वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ! हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!4 ते माघ शु.!! 5 गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली 121 खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो. समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !! आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!! घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना 11*11 म्हणजे 121 एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्यादिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा..... दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !! शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी 18 वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती 1658 ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन 1674 पर्यंत थांबले, नंतर 1675 ला गणेशोत्सव केला आणि 16 सप्टेंबर 1676 ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला. लेखक : अपूर्व हरिश्चंद्र पाटील सौजन्य : इ साहित्य

चामुंडराय 13/09/2018 - 06:04
त्या प्रसिद्ध गायिकेने म्हटलेली बाप्पाची आरती आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकली आहे. कित्येक गणेश मंडळांची आरती तर या आरतीची सीडी लावल्या शिवाय पूर्णच होत नाही. हि आरती ऐकताना मला नेहमी एक गोष्ट खटकते. ती म्हणजे, गाताना "सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची" येथे तोडून "नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची" असे 'नुरवी पुरवी' एकत्र म्हटले जाते. मला हा प्रकार म्हणजे आरती गेयते साठी गाण्याच्या मीटर (poetic meter) मध्ये बसवण्यासाठी केलेली मोड तोड वाटते आणि ऐकताना नेहमी खटकते. मला नाही वाटत समर्थ रामदास स्वामींनी असे लिहिले असेल. आपण हि आरती इतक्या वेळी ऐकली आहे आणि म्हटलेली आहे त्यामुळे हे कदाचित आपल्या लक्षात देखील येत नाही. मूळची समर्थ रामदास स्वामी लिखित आरती अशी असावी का? सुखकर्ता दुःखहर्ता I नुरवी वार्ता विघ्नाची I पुरवी प्रेम कृपा जयाची I जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by चामुंडराय

जे तुम्ही कळफलकावर टायपालाही तयार नाहीत. उगाच यू-नो-हू असं बोलायचं!

माहितगार 13/09/2018 - 08:13
...हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील...
स्त्रीयांना पळवून नेण्या एवढाच, पळवून लावण्याचा प्रश्नही व्यापक असावा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@धर्मशास्त्रीय संदर्भ आहेत की सांगोवांगीच्या गोष्टी आहेत ? --- गणेश पुराण.

In reply to by यशोधरा

@फक्त पुर्षांनी का म्हणे करायचं व्रत? -- जशी मंगळागौरी सारखी काही व्रत स्त्रियांनि करण्याची आहेत,तसच हे पुरुषांनि करायचं व्रत आहे...,म्हणून!

In reply to by यशोधरा

@फक्त पुर्षांनी का म्हणे करायचं व्रत? -- जशी मंगळागौरी सारखी काही व्रत स्त्रियांनि करण्याची आहेत,तसच हे पुरुषांनि करायचं व्रत आहे...,म्हणून!

In reply to by अत्रुप्त आत्मा

यशोधरा 14/09/2018 - 17:26
मंगळागौर करावी की पुरुषांनी. कोणतंही व्रत असेना का, ते अमाक्यानीच करावं आणि तमक्यानी करू नये हे कशावरून ठरवलं जातं, हा प्रश्न आहे. तसंच धर्मग्रंथ वा कोणतेही धार्मिक पुस्तक कोणी वाचायचे हे कोण ठरवते? सर्वांभूती आत्मा एकच आहे ना? मग असा फरक का म्हणे? तुम्हांला त्रास द्यायचा म्हणून हे विचारत नाहीये, हे मला मनापासून पडलेले प्रश्न आहेत.

In reply to by यशोधरा

सस्नेह 14/09/2018 - 18:14
यशो सारखंच म्हणते. गणेश व्रत स्त्रियांनी आणि मंगळागौर पुरुषांनी केली तर काय बॉ फरक पडेल ? गुर्जींच्या एक्स्पर्ट ओपिनियन च्या विणम्र प्रतीक्षेत, स्नेहा

In reply to by सस्नेह

नाखु 14/09/2018 - 21:47
व्रत घेतल्यासारखा कडाडून विरोध करण्याऐवजी, सगळीच व्रतवैकल्ये सर्वांना करण्याचा समान हक्क असावा हा वसा आवडला, गुरुजी कुणाला करायचीय तर करु देत की,दयाळू बाप्पा (समोरच ठेवलेली पांच फळे सोडून) आणखी काही फळे देईल ,तुम्ही का धर्माची भिती घालता? पुराण ते पुरण एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परंपरा या शोधनिबंधातून साभार एकलव्रती नाखु बिनसुपारीवाला

In reply to by सस्नेह

@गुर्जींच्या एक्स्पर्ट ओपिनियन च्या विणम्र प्रतीक्षेत, स्नेहा --- वरील लेखातील धार्मिक बाबी हे माझे मत नाही. माझे धर्माच्या बाबतीतले मत असे की धर्म व्यवस्थेमधील सर्व बाबी,गोष्टी, नियम हे त्या त्या धर्माच्या अनुयायांनी आपल्यावर लादून घेऊ नयेत..त्यात हवे ते हवे तसे बदल करावे..कमी अधिक ही करावे..नाहीतर ज्याला हे नको त्याने आजूबात आचरू ,पाळू नये..भारतोय लोकशाहीने नागरिकांना धर्मपालनाच स्वातंत्र्य दिलेलं आहे,धर्माला नागरिकांना पळायचं,स्वतः च्या कह्यात ठेवायचं स्वातंत्र्य दिलेलं नाही..उलट ते धर्माकडून काढून घेण्यात आलेला आहे. समता,बंधुता,न्याय यांच्या विरोधी जाणारा आपल्या धर्माचा जो जो भाग असतील त्याला समता बंधुता न्यायाच्या पातळीवर आणून आचरावे. आणि धर्मातल्या सनातनी व विषमतावादाचा दारुण पराभव घडवून आणावा.. त्याची जोडबाजू म्हणून आमच्या सारखे पुरोहित सहाय्य करण्यास सदैव हजर असतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

उत्तम विचारप्रवर्तक लेख आणि त्यावरील संतुलित प्रतिसाद, याच कारणासाठी "आय लौ यू गुर्जी" पैजारबुवा,

खटपट्या 12/09/2018 - 19:19
जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला!
टिळकांच्या आधिपासून ५ दिवसाचा गणपती आहे हो कोकणात जो गौरीविसर्जनाबरोबर विसर्जित केला जातो. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by खटपट्या

@
टिळकांच्या आधिपासून ५ दिवसाचा गणपती आहे हो कोकणात जो गौरीविसर्जनाबरोबर विसर्जित केला जातो. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
--- तसा इकडे घाटावरही 7व्या दिवशी मंजे गौरी बरोबर विसर्जित होणारा गणपतीही टिळकपूर्व'च आहे. पण ह्या सगळ्याला रूढी आणि परंपरा म्हणतात. मूलशास्त्र (शिल्लक) असतच. ते दिड"दिवसवालं आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आनन्दा 13/09/2018 - 13:58
मूळ शास्त्रानुसार गणपती बहुधा 1 दिवसच होता असे ऐकून आहे.. सकाळी आणला, पूजा करून नैवेद्य झाला के विसर्जित केला.. पार्थिव शाडूच्या मूर्तीचे आयुष्य तितकेच असणं अपेक्षित आहे.

In reply to by anandkale

कंजूस 13/09/2018 - 08:08
हो, हे केलं आहे लहानपणी. तीन चार इंच लांब रूंद आणि अर्धा इंच जाड असे गणपती ,मारुती केले होते. मातीत कापूस मळला होता आणि एक कीचेन घातली होती खिळ्यावर टांगायला. द्रोणागिरी नेणारा उडणारा मारुती करून त्याला पिवळा गेरू, गणपतीला लाल गेरूने रंगवले होते. नाग पंचमीसाठी नाग करून द्यायचो त्यास कोळशाने काळा रंग असायचा. त्याच्या मानेत घातलेल्या बॉलपेनच्या स्प्रिंगमुळे फणा डोलत राहायचा. '६५ नंतर प्लास्टिक खेळणी आली आणि मातीची चित्रं फिकी झाली.

खिलजि 12/09/2018 - 21:16
संत समर्थ रामदास आणि श्रीगणेशाचे अजोड नाते - सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास यांनी रचली आहे. गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. 4 ते भाद्रपद शु.14 हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !! समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथर घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा 1658 साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखाननावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी [अष्टविनायक|अष्टविनायकांतला]] पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो. वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ! हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!4 ते माघ शु.!! 5 गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली 121 खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो. समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !! आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!! घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना 11*11 म्हणजे 121 एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्यादिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा..... दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !! शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी 18 वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती 1658 ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन 1674 पर्यंत थांबले, नंतर 1675 ला गणेशोत्सव केला आणि 16 सप्टेंबर 1676 ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला. लेखक : अपूर्व हरिश्चंद्र पाटील सौजन्य : इ साहित्य

चामुंडराय 13/09/2018 - 06:04
त्या प्रसिद्ध गायिकेने म्हटलेली बाप्पाची आरती आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकली आहे. कित्येक गणेश मंडळांची आरती तर या आरतीची सीडी लावल्या शिवाय पूर्णच होत नाही. हि आरती ऐकताना मला नेहमी एक गोष्ट खटकते. ती म्हणजे, गाताना "सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची" येथे तोडून "नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची" असे 'नुरवी पुरवी' एकत्र म्हटले जाते. मला हा प्रकार म्हणजे आरती गेयते साठी गाण्याच्या मीटर (poetic meter) मध्ये बसवण्यासाठी केलेली मोड तोड वाटते आणि ऐकताना नेहमी खटकते. मला नाही वाटत समर्थ रामदास स्वामींनी असे लिहिले असेल. आपण हि आरती इतक्या वेळी ऐकली आहे आणि म्हटलेली आहे त्यामुळे हे कदाचित आपल्या लक्षात देखील येत नाही. मूळची समर्थ रामदास स्वामी लिखित आरती अशी असावी का? सुखकर्ता दुःखहर्ता I नुरवी वार्ता विघ्नाची I पुरवी प्रेम कृपा जयाची I जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by चामुंडराय

जे तुम्ही कळफलकावर टायपालाही तयार नाहीत. उगाच यू-नो-हू असं बोलायचं!

माहितगार 13/09/2018 - 08:13
...हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील...
स्त्रीयांना पळवून नेण्या एवढाच, पळवून लावण्याचा प्रश्नही व्यापक असावा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@धर्मशास्त्रीय संदर्भ आहेत की सांगोवांगीच्या गोष्टी आहेत ? --- गणेश पुराण.

In reply to by यशोधरा

@फक्त पुर्षांनी का म्हणे करायचं व्रत? -- जशी मंगळागौरी सारखी काही व्रत स्त्रियांनि करण्याची आहेत,तसच हे पुरुषांनि करायचं व्रत आहे...,म्हणून!

In reply to by यशोधरा

@फक्त पुर्षांनी का म्हणे करायचं व्रत? -- जशी मंगळागौरी सारखी काही व्रत स्त्रियांनि करण्याची आहेत,तसच हे पुरुषांनि करायचं व्रत आहे...,म्हणून!

In reply to by अत्रुप्त आत्मा

यशोधरा 14/09/2018 - 17:26
मंगळागौर करावी की पुरुषांनी. कोणतंही व्रत असेना का, ते अमाक्यानीच करावं आणि तमक्यानी करू नये हे कशावरून ठरवलं जातं, हा प्रश्न आहे. तसंच धर्मग्रंथ वा कोणतेही धार्मिक पुस्तक कोणी वाचायचे हे कोण ठरवते? सर्वांभूती आत्मा एकच आहे ना? मग असा फरक का म्हणे? तुम्हांला त्रास द्यायचा म्हणून हे विचारत नाहीये, हे मला मनापासून पडलेले प्रश्न आहेत.

In reply to by यशोधरा

सस्नेह 14/09/2018 - 18:14
यशो सारखंच म्हणते. गणेश व्रत स्त्रियांनी आणि मंगळागौर पुरुषांनी केली तर काय बॉ फरक पडेल ? गुर्जींच्या एक्स्पर्ट ओपिनियन च्या विणम्र प्रतीक्षेत, स्नेहा

In reply to by सस्नेह

नाखु 14/09/2018 - 21:47
व्रत घेतल्यासारखा कडाडून विरोध करण्याऐवजी, सगळीच व्रतवैकल्ये सर्वांना करण्याचा समान हक्क असावा हा वसा आवडला, गुरुजी कुणाला करायचीय तर करु देत की,दयाळू बाप्पा (समोरच ठेवलेली पांच फळे सोडून) आणखी काही फळे देईल ,तुम्ही का धर्माची भिती घालता? पुराण ते पुरण एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परंपरा या शोधनिबंधातून साभार एकलव्रती नाखु बिनसुपारीवाला

In reply to by सस्नेह

@गुर्जींच्या एक्स्पर्ट ओपिनियन च्या विणम्र प्रतीक्षेत, स्नेहा --- वरील लेखातील धार्मिक बाबी हे माझे मत नाही. माझे धर्माच्या बाबतीतले मत असे की धर्म व्यवस्थेमधील सर्व बाबी,गोष्टी, नियम हे त्या त्या धर्माच्या अनुयायांनी आपल्यावर लादून घेऊ नयेत..त्यात हवे ते हवे तसे बदल करावे..कमी अधिक ही करावे..नाहीतर ज्याला हे नको त्याने आजूबात आचरू ,पाळू नये..भारतोय लोकशाहीने नागरिकांना धर्मपालनाच स्वातंत्र्य दिलेलं आहे,धर्माला नागरिकांना पळायचं,स्वतः च्या कह्यात ठेवायचं स्वातंत्र्य दिलेलं नाही..उलट ते धर्माकडून काढून घेण्यात आलेला आहे. समता,बंधुता,न्याय यांच्या विरोधी जाणारा आपल्या धर्माचा जो जो भाग असतील त्याला समता बंधुता न्यायाच्या पातळीवर आणून आचरावे. आणि धर्मातल्या सनातनी व विषमतावादाचा दारुण पराभव घडवून आणावा.. त्याची जोडबाजू म्हणून आमच्या सारखे पुरोहित सहाय्य करण्यास सदैव हजर असतील.

In reply to by अत्रुप्त आत्मा

उत्तम विचारप्रवर्तक लेख आणि त्यावरील संतुलित प्रतिसाद, याच कारणासाठी "आय लौ यू गुर्जी" पैजारबुवा,
लेखनप्रकार
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.

अशीही एक गोष्ट

ज्योति अळवणी ·

श्वेता२४ 03/08/2018 - 14:31
शिर्षकावरुनच काहितरी वेगळं वाचायला मिळेल असं वाटलं होतं आणि तुम्ही निराश केलं नाहीत. नेहमीच नायिका अव्हेरलेल्या प्रेमाचं दुख घेऊन आयुष्यभर रडत बसते, आणि प्रसंगी त्याच्या चुकांना माफ करुन त्याच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांसकट स्विकारते या रडतराऊ अँप्रोचचा कंटाळा आला होता. स्त्रिया नेहमीच इमोशनल फूल नसतात. आणि आताच्या काळात तर नसतातच नसतात. असो. याबाबतीत स्त्री किंवा पुरुष दोघांनीही प्रॅक्टीकल राहून आपापले मार्ग निवडावेत व पुढे जावे हेच आताच्या काळात व्यवहारीक शहाणपणाचे ठरेल. कथा 1 नं.

धन्यवाद आणि अगदी खरं! हे झुरणं किंवा आयुष्य दुसऱ्यासाठी बरबाद करणं ही आजकालच्या पिढीची मानसिकता नाही

धन्यवाद आणि अगदी खरं! हे झुरणं किंवा आयुष्य दुसऱ्यासाठी बरबाद करणं ही आजकालच्या पिढीची मानसिकता नाही

खिलजि 03/08/2018 - 15:06
फार वाईट वाटलं , रॉन उर्फ रोहन मस्त रंगवलाय , डोळ्यासमोर उभा राहिला .. छान लेखन आणि काहीअंशी सत्य उतरलंय. सध्या हायब्रीड संस्कृतीमुळे , लग्न झालं गोरी किंवा गोऱ्याबरोबर तरी कुठे ना कुठे मन खात राहत . ते जास्त मानवत नाही आणि मानवतंय असं दाखवलं तरी कुठे ना कुठे आपण स्वतः कुढत बसतो .. फार वाईट वाटत ते बघून .

कपिलमुनी 03/08/2018 - 16:10
गोष्टी मधला प्रॅक्तिकलपणा आवडला . दवणीय झाली नाही त्यामुळे आवडली.

नायक स्वार्थी असतो, त्याला नायिकेचे प्रेम एकतर कळत नाही वा त्याची कदर नसते , तर नायिका प्रेमळ, माणूसकीवाली तरीही स्वतंत्र बाण्याची आणि करारी वगैरे वगैरे असते (म्हणजे सगळे सद्गुण नायिकेकडे असतातच असतात !!) पुढे हा नायक खड्ड्यात पडतो, त्याला सगळ्या कर्माचा पश्चाताप होतो , तो नायिकेपुढे लोळण घेत तिची माफी मागतो पण ही करारी वगैरे असलेली नायिका त्याचा पोपट करुन त्याला तो कसा अगदीच नालायक आहे हे ऐकवते, मग नायक अधिकच निरुत्तर आणि हतबल. असा ठोकळेबाजपणा कथेत ठासून भरलाय असे वाटते. मितालीचे लग्न झाल्याचेही रोहनला माहित नसावे हे काही पटले नाही... त्याने नाही विचारले तरी आई ते सांगणारच हो..!!! रोहनची आई म्हणते की
मी विचारच करत होते तुला मेसेज करून फोन करू का विचारायचा. तुला एक बातमी द्यायची होती
मिताली या आधी दोनदा लंडनला येवून गेली तरी याचवेळी आईसाठी ती रोहनला देण्याची 'बातमी' कशी काय झाली ?मग मितालीचे लग्न ही मात्र 'बातमी' नव्हती का कधी आईसाठी ? पण कुठूनतरी रोहनचा पोपट दाखवायचाच होता !! आणि मितालीला रोहनचा इतका राग आहे तरी ती अगदी उत्साहाने त्याला भेटायला गेली .. बहूधा त्याला भेटण्याच्या इच्छेपेक्षा त्याचा पोपट करायची संधी मिळणार आहे हे तिच्या सहाव्या ज्ञानेंद्रियाने ओळखले असावे .. असो. सहसा मिपावरील एखादी कथा विशेष आवडली नाही तरी माझी प्रतिक्रिया म्हणजे 'प्रतिसाद न देणे' इतकीच असते. ज्योतिजी, आपल्या लेखनाचा अनादर करण्याचा हेतु नाही. पण या कथेत एकूणच 'नायकाचा (म्हणजे एका पुरुषाचा )पोपट' हेच कथेचे उद्दिष्ट वाटले म्हणून स्पष्टपणे इतका प्रतिसाद दिला. नाती , माणसाचा स्वभाव एका रात्रीत बदलत नाही तर त्यात हळूहळू सुक्ष्म बदल होतात. इथे रोहन आणि कॅटीची केमिस्ट्री आधी कशी जुळली , नंतर कशी बिनसली .. त्यांच्या स्वभावात अंतर असूनही सहा वर्षे ते आनंदाने सहजीवन कसे जगले ह्या गोष्टी नीटपणे समोर येत नाहीत.

In reply to by मराठी कथालेखक

माझेही काहीसे असेच मत आहे. कथा ओघवती आहे व नाट्यमयता आहे. कॅटीला का विलन केले आहे.? माझ्यामते कॅटी/रोहन ला होणारे मूल वगैरे फाफटपसारा आवरला असता व दोन-तीन वर्षातच तिथल्या संस्कृतिनुसार दोघांचा ब्रेक-अप झाला आहे व रोहन आशाळभूत पणे मितालीची अजुनही अपेक्षा करतो आहे व मिताली स्वच्छ व स्पष्ट नकार देते आहे असे दाखवले असते तर तो शेवट परिणामकारक झाला असता.

In reply to by कानडाऊ योगेशु

रोहन आशाळभूत पणे मितालीची अजुनही अपेक्षा करतो आहे
पण रोहनला मितालीत कधीच रस नव्हता वा त्याचे तिच्यावर प्रेम नव्हते त्यामुळे त्याला उगाच आशाळभूत दाखवऊन नंतर मितालीचा स्पष्ट स्वच्छ नकार (करारी !!) म्हणजे त्याचा पोपट असे दाखवायची गरज नसावी. नायकाला /पुरुषाला सगळे दुर्गुण चिकटवण्यापेक्षा नात्यांचा प्रवाह , त्यांत होणारे हळूवार नैसर्गिक बदल दाखवलेत तर ते जास्त पटू शकतात. म्हणजे सहा वाजता कॅटीने डच्चू दिल्यावर आपल्या आशाळभूत नायकाला साडेसहाला मितालीची आठवण बेचैन करु लागली , सात वाजता तो पश्चातापदग्ध झाला, साडेसातला त्याने मितालीचे पाय धरलेत असं ते नसावं... त्यापेक्षा कॅटी सोडून गेल्यावर एकतर योगायोगाने मितालीशी संपर्क झाला किवा हळूहळू जुन्या आठवणी दाटून त्याने तिच्याशी संपर्क केला आणि पुन्हा नव्याने होणार्‍या संभाषणातून त्याला मितालीबद्दल ओढ निर्माण झाली असं काही दाखवलं तर ते जास्त पटेल. आणि त्यात पण 'नायकाचा पोपट' आणि 'नायिकेचा करारीपणा' अधोरेखित करण्यापेक्षा नात्यांचा हळूवार प्रवास उलगडला तर जास्त आवडेल. इथे मितालीनं दुसर्‍या मुलाच्या प्रेमात पडून स्वतःच्या आयुष्यात पुढे जाणं यात काहीच गैरे नाहीये पण ते रोहनच्या समोर ज्या पद्धतीने आलेल दाखवलंय त्यात फक्त 'बघा रोहनची फजिती' असाच सूर जास्त दिसतोय. असो. अर्थात ही कथा आहे आणि व्यक्तिरेखा कशा रंगवायच्यात ते कथालेखिकेचं पुर्ण स्वातंत्र्य आहेच.

In reply to by मराठी कथालेखक

तुमच्या स्पष्ट मताचा मला आदरच आहे. मात्र ही कथा असल्याने इथे एखाद्या धारावाईकारारखे बारीक तपशील द्यावेत असे मला वाटले नाही. मात्र आपल्यासाठी सांगू इच्छिते, आईने म्हंटले की तुला कळवण्याचा विचार करत होते; म्हणजे कळवले नाही. यातून हेच प्रतीत होते की कदाचित आईला प्रत्येक वेळी काही ना काही बातमी देण्याची इच्छा होती; मात्र मुलाला आपल्या आयुष्यात फार रस नाही हे लक्षात आल्याने तिने प्रत्येक वेळी ही इच्छा मनातून काढून टाकली. नायक वाईट आहे असे मी कुठेच चित्रित केलेले नाही. तसे तुमचे परसेप्शन असू शकते. माझ्या दृष्टिकोनातून नायक त्याचे इन्स्टिन्ट जे त्याला सांगत होते तसा वागत गेला. मिताली सद्गुणांचा पुतळा पुतळा आहे हे देखील दाखवलेले नाही. तर ती प्रॅक्टिकल आहे हेच सांगितले आहे. जो मुलगा आवडतो त्याच्या मनात जर आपले स्थान नाही तर त्याच्यासाठी झुरण्याची तिची इच्छा नाही. अलीकडे अनेक घरात एकच मूल असते. तशी ती एकटीच असल्याने आईच्या मृत्यू नंतर वडिलांसाठी त्यांच्याकडे राहायला जाण्याचा तिने निर्णय घेतला तर तो वेगळा असू शकत नाही. वर्षानुवर्षे ज्यांच्याशी भावनिक संबंध आहेत असे नायकाचे पालक जवळ राहातात आणि ते देखील वयोवृद्ध झाले आहेत; तर त्यांना मदत करणे ही आपली संस्कृती नाही का? यात नायिकेला कुठे उदात्त केले? मुळात आजच्या पिढीतील मानसिकता आहे या कथेत

चिनार 04/08/2018 - 12:37
कथेतलं एक वाक्य , "कोणाचंही कोणावाचून काही अडत नाही" मनापासून पटलेलं आहे. ही परिस्थिती सध्या शब्दशः अनुभवतो आहे. आयुष्यभर ज्या नात्यांसाठी,लोकांसाठी आपण सगळं काही करतो त्यांच्याचकडून 'तुम्ही काही नसतं केलं तरी आमचं काही अडत नव्हतं' अशी वागणूक मिळू शकते. अर्थात अनावधानाने किंवा स्वभावाप्रमाणे आपणही इतरांशी असंच वागत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथा छान !!

" आयुष्यभर ज्या नात्यांसाठी,लोकांसाठी आपण सगळं काही करतो त्यांच्याचकडून 'तुम्ही काही नसतं केलं तरी आमचं काही अडत नव्हतं' अशी वागणूक मिळू शकते. " खरी विटंबना तर मला " मिपावर एका धाग्या मध्ये घरातील वयोवृद्धांना आजची तरुण पिढी ' डस्टबीन ' संबोधिते " इथे दिसली .

नाखु 04/08/2018 - 22:51
कथेच्या बंधनातून मुक्त वास्तव कथा. पुलेशु कुठलीही खाल न काढता "बालकथा"ही वाचणारा वाचकांची पत्रेवाला नाखु

श्वेता२४ 03/08/2018 - 14:31
शिर्षकावरुनच काहितरी वेगळं वाचायला मिळेल असं वाटलं होतं आणि तुम्ही निराश केलं नाहीत. नेहमीच नायिका अव्हेरलेल्या प्रेमाचं दुख घेऊन आयुष्यभर रडत बसते, आणि प्रसंगी त्याच्या चुकांना माफ करुन त्याच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांसकट स्विकारते या रडतराऊ अँप्रोचचा कंटाळा आला होता. स्त्रिया नेहमीच इमोशनल फूल नसतात. आणि आताच्या काळात तर नसतातच नसतात. असो. याबाबतीत स्त्री किंवा पुरुष दोघांनीही प्रॅक्टीकल राहून आपापले मार्ग निवडावेत व पुढे जावे हेच आताच्या काळात व्यवहारीक शहाणपणाचे ठरेल. कथा 1 नं.

धन्यवाद आणि अगदी खरं! हे झुरणं किंवा आयुष्य दुसऱ्यासाठी बरबाद करणं ही आजकालच्या पिढीची मानसिकता नाही

धन्यवाद आणि अगदी खरं! हे झुरणं किंवा आयुष्य दुसऱ्यासाठी बरबाद करणं ही आजकालच्या पिढीची मानसिकता नाही

खिलजि 03/08/2018 - 15:06
फार वाईट वाटलं , रॉन उर्फ रोहन मस्त रंगवलाय , डोळ्यासमोर उभा राहिला .. छान लेखन आणि काहीअंशी सत्य उतरलंय. सध्या हायब्रीड संस्कृतीमुळे , लग्न झालं गोरी किंवा गोऱ्याबरोबर तरी कुठे ना कुठे मन खात राहत . ते जास्त मानवत नाही आणि मानवतंय असं दाखवलं तरी कुठे ना कुठे आपण स्वतः कुढत बसतो .. फार वाईट वाटत ते बघून .

कपिलमुनी 03/08/2018 - 16:10
गोष्टी मधला प्रॅक्तिकलपणा आवडला . दवणीय झाली नाही त्यामुळे आवडली.

नायक स्वार्थी असतो, त्याला नायिकेचे प्रेम एकतर कळत नाही वा त्याची कदर नसते , तर नायिका प्रेमळ, माणूसकीवाली तरीही स्वतंत्र बाण्याची आणि करारी वगैरे वगैरे असते (म्हणजे सगळे सद्गुण नायिकेकडे असतातच असतात !!) पुढे हा नायक खड्ड्यात पडतो, त्याला सगळ्या कर्माचा पश्चाताप होतो , तो नायिकेपुढे लोळण घेत तिची माफी मागतो पण ही करारी वगैरे असलेली नायिका त्याचा पोपट करुन त्याला तो कसा अगदीच नालायक आहे हे ऐकवते, मग नायक अधिकच निरुत्तर आणि हतबल. असा ठोकळेबाजपणा कथेत ठासून भरलाय असे वाटते. मितालीचे लग्न झाल्याचेही रोहनला माहित नसावे हे काही पटले नाही... त्याने नाही विचारले तरी आई ते सांगणारच हो..!!! रोहनची आई म्हणते की
मी विचारच करत होते तुला मेसेज करून फोन करू का विचारायचा. तुला एक बातमी द्यायची होती
मिताली या आधी दोनदा लंडनला येवून गेली तरी याचवेळी आईसाठी ती रोहनला देण्याची 'बातमी' कशी काय झाली ?मग मितालीचे लग्न ही मात्र 'बातमी' नव्हती का कधी आईसाठी ? पण कुठूनतरी रोहनचा पोपट दाखवायचाच होता !! आणि मितालीला रोहनचा इतका राग आहे तरी ती अगदी उत्साहाने त्याला भेटायला गेली .. बहूधा त्याला भेटण्याच्या इच्छेपेक्षा त्याचा पोपट करायची संधी मिळणार आहे हे तिच्या सहाव्या ज्ञानेंद्रियाने ओळखले असावे .. असो. सहसा मिपावरील एखादी कथा विशेष आवडली नाही तरी माझी प्रतिक्रिया म्हणजे 'प्रतिसाद न देणे' इतकीच असते. ज्योतिजी, आपल्या लेखनाचा अनादर करण्याचा हेतु नाही. पण या कथेत एकूणच 'नायकाचा (म्हणजे एका पुरुषाचा )पोपट' हेच कथेचे उद्दिष्ट वाटले म्हणून स्पष्टपणे इतका प्रतिसाद दिला. नाती , माणसाचा स्वभाव एका रात्रीत बदलत नाही तर त्यात हळूहळू सुक्ष्म बदल होतात. इथे रोहन आणि कॅटीची केमिस्ट्री आधी कशी जुळली , नंतर कशी बिनसली .. त्यांच्या स्वभावात अंतर असूनही सहा वर्षे ते आनंदाने सहजीवन कसे जगले ह्या गोष्टी नीटपणे समोर येत नाहीत.

In reply to by मराठी कथालेखक

माझेही काहीसे असेच मत आहे. कथा ओघवती आहे व नाट्यमयता आहे. कॅटीला का विलन केले आहे.? माझ्यामते कॅटी/रोहन ला होणारे मूल वगैरे फाफटपसारा आवरला असता व दोन-तीन वर्षातच तिथल्या संस्कृतिनुसार दोघांचा ब्रेक-अप झाला आहे व रोहन आशाळभूत पणे मितालीची अजुनही अपेक्षा करतो आहे व मिताली स्वच्छ व स्पष्ट नकार देते आहे असे दाखवले असते तर तो शेवट परिणामकारक झाला असता.

In reply to by कानडाऊ योगेशु

रोहन आशाळभूत पणे मितालीची अजुनही अपेक्षा करतो आहे
पण रोहनला मितालीत कधीच रस नव्हता वा त्याचे तिच्यावर प्रेम नव्हते त्यामुळे त्याला उगाच आशाळभूत दाखवऊन नंतर मितालीचा स्पष्ट स्वच्छ नकार (करारी !!) म्हणजे त्याचा पोपट असे दाखवायची गरज नसावी. नायकाला /पुरुषाला सगळे दुर्गुण चिकटवण्यापेक्षा नात्यांचा प्रवाह , त्यांत होणारे हळूवार नैसर्गिक बदल दाखवलेत तर ते जास्त पटू शकतात. म्हणजे सहा वाजता कॅटीने डच्चू दिल्यावर आपल्या आशाळभूत नायकाला साडेसहाला मितालीची आठवण बेचैन करु लागली , सात वाजता तो पश्चातापदग्ध झाला, साडेसातला त्याने मितालीचे पाय धरलेत असं ते नसावं... त्यापेक्षा कॅटी सोडून गेल्यावर एकतर योगायोगाने मितालीशी संपर्क झाला किवा हळूहळू जुन्या आठवणी दाटून त्याने तिच्याशी संपर्क केला आणि पुन्हा नव्याने होणार्‍या संभाषणातून त्याला मितालीबद्दल ओढ निर्माण झाली असं काही दाखवलं तर ते जास्त पटेल. आणि त्यात पण 'नायकाचा पोपट' आणि 'नायिकेचा करारीपणा' अधोरेखित करण्यापेक्षा नात्यांचा हळूवार प्रवास उलगडला तर जास्त आवडेल. इथे मितालीनं दुसर्‍या मुलाच्या प्रेमात पडून स्वतःच्या आयुष्यात पुढे जाणं यात काहीच गैरे नाहीये पण ते रोहनच्या समोर ज्या पद्धतीने आलेल दाखवलंय त्यात फक्त 'बघा रोहनची फजिती' असाच सूर जास्त दिसतोय. असो. अर्थात ही कथा आहे आणि व्यक्तिरेखा कशा रंगवायच्यात ते कथालेखिकेचं पुर्ण स्वातंत्र्य आहेच.

In reply to by मराठी कथालेखक

तुमच्या स्पष्ट मताचा मला आदरच आहे. मात्र ही कथा असल्याने इथे एखाद्या धारावाईकारारखे बारीक तपशील द्यावेत असे मला वाटले नाही. मात्र आपल्यासाठी सांगू इच्छिते, आईने म्हंटले की तुला कळवण्याचा विचार करत होते; म्हणजे कळवले नाही. यातून हेच प्रतीत होते की कदाचित आईला प्रत्येक वेळी काही ना काही बातमी देण्याची इच्छा होती; मात्र मुलाला आपल्या आयुष्यात फार रस नाही हे लक्षात आल्याने तिने प्रत्येक वेळी ही इच्छा मनातून काढून टाकली. नायक वाईट आहे असे मी कुठेच चित्रित केलेले नाही. तसे तुमचे परसेप्शन असू शकते. माझ्या दृष्टिकोनातून नायक त्याचे इन्स्टिन्ट जे त्याला सांगत होते तसा वागत गेला. मिताली सद्गुणांचा पुतळा पुतळा आहे हे देखील दाखवलेले नाही. तर ती प्रॅक्टिकल आहे हेच सांगितले आहे. जो मुलगा आवडतो त्याच्या मनात जर आपले स्थान नाही तर त्याच्यासाठी झुरण्याची तिची इच्छा नाही. अलीकडे अनेक घरात एकच मूल असते. तशी ती एकटीच असल्याने आईच्या मृत्यू नंतर वडिलांसाठी त्यांच्याकडे राहायला जाण्याचा तिने निर्णय घेतला तर तो वेगळा असू शकत नाही. वर्षानुवर्षे ज्यांच्याशी भावनिक संबंध आहेत असे नायकाचे पालक जवळ राहातात आणि ते देखील वयोवृद्ध झाले आहेत; तर त्यांना मदत करणे ही आपली संस्कृती नाही का? यात नायिकेला कुठे उदात्त केले? मुळात आजच्या पिढीतील मानसिकता आहे या कथेत

चिनार 04/08/2018 - 12:37
कथेतलं एक वाक्य , "कोणाचंही कोणावाचून काही अडत नाही" मनापासून पटलेलं आहे. ही परिस्थिती सध्या शब्दशः अनुभवतो आहे. आयुष्यभर ज्या नात्यांसाठी,लोकांसाठी आपण सगळं काही करतो त्यांच्याचकडून 'तुम्ही काही नसतं केलं तरी आमचं काही अडत नव्हतं' अशी वागणूक मिळू शकते. अर्थात अनावधानाने किंवा स्वभावाप्रमाणे आपणही इतरांशी असंच वागत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथा छान !!

" आयुष्यभर ज्या नात्यांसाठी,लोकांसाठी आपण सगळं काही करतो त्यांच्याचकडून 'तुम्ही काही नसतं केलं तरी आमचं काही अडत नव्हतं' अशी वागणूक मिळू शकते. " खरी विटंबना तर मला " मिपावर एका धाग्या मध्ये घरातील वयोवृद्धांना आजची तरुण पिढी ' डस्टबीन ' संबोधिते " इथे दिसली .

नाखु 04/08/2018 - 22:51
कथेच्या बंधनातून मुक्त वास्तव कथा. पुलेशु कुठलीही खाल न काढता "बालकथा"ही वाचणारा वाचकांची पत्रेवाला नाखु
लेखनविषय:
लेखनप्रकार
अशीही एक गोष्ट कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली. "Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले. "Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली. रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली. **** मिताली आणि रोहन एकाच शाळेत आणि मग पुढे बारावी पर्यंत एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे जाणे-येणे एकत्र. पक्की दोस्ती दोघांची. मिताली प्रचंड बडबडी. रोहन मात्र तसा कमी बोलणारा.

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप

मार्गी ·

भुजंगराव 01/07/2018 - 19:35
४५ डिग्रीत लाहीलाही वातावरणातील रोज ५०/६० किमी सध्या सायकलवरून जाने ,हटके प्रयोग न प्रचारासाठी योग ...... व्वा ......पुढील मोहिमे साठी शुभेच्या

निशाचर 02/07/2018 - 03:50
लिखाणातील सहजता आणि प्रांजळपणा यांमुळे हे मनोगत भावलं. आवड असली कि सवड मिळते, हे या यात्रेबद्दल वाचताना अनेकदा जाणवलं. निरामय संस्थेच्या कार्याला आणि भावी उपक्रमांसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!

लेखमाला आवर्जून वाचत होतो, एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेउन तो निष्ठेने तडीला नेल्या बद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. लिखाणातला प्रामाणिक पणा आणि साधेपणा अतिशय भावला. पैजारबुवा,

भुजंगराव 01/07/2018 - 19:35
४५ डिग्रीत लाहीलाही वातावरणातील रोज ५०/६० किमी सध्या सायकलवरून जाने ,हटके प्रयोग न प्रचारासाठी योग ...... व्वा ......पुढील मोहिमे साठी शुभेच्या

निशाचर 02/07/2018 - 03:50
लिखाणातील सहजता आणि प्रांजळपणा यांमुळे हे मनोगत भावलं. आवड असली कि सवड मिळते, हे या यात्रेबद्दल वाचताना अनेकदा जाणवलं. निरामय संस्थेच्या कार्याला आणि भावी उपक्रमांसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!

लेखमाला आवर्जून वाचत होतो, एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेउन तो निष्ठेने तडीला नेल्या बद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. लिखाणातला प्रामाणिक पणा आणि साधेपणा अतिशय भावला. पैजारबुवा,
लेखनविषय:
लेखनप्रकार

राजयोग - १३

रातराणी ·

श्वेता२४ 18/06/2018 - 16:08
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. खुपच छान चाललीय कथामाला. व्यनि केल्याला तुम्ही कृतीतून पुढील भाग लगेच टाकून उत्तर दिलंत याबद्दल धन्यवाद. पुभाप्र

शाली 18/06/2018 - 18:43
तिसरा भाग वाचला आणि वाचन थांबवले. विचार केला, जरा जास्त भाग आले की सलग वाचता येईल. थांबलो ते बरं केलं असं वाटले पहिल्या भागापासुन वाचल्यावर. वा! मस्तच! छान! लिहायची स्टाईल आवडली.

श्वेता२४ 18/06/2018 - 16:08
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. खुपच छान चाललीय कथामाला. व्यनि केल्याला तुम्ही कृतीतून पुढील भाग लगेच टाकून उत्तर दिलंत याबद्दल धन्यवाद. पुभाप्र

शाली 18/06/2018 - 18:43
तिसरा भाग वाचला आणि वाचन थांबवले. विचार केला, जरा जास्त भाग आले की सलग वाचता येईल. थांबलो ते बरं केलं असं वाटले पहिल्या भागापासुन वाचल्यावर. वा! मस्तच! छान! लिहायची स्टाईल आवडली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. रघुपतीला पाहताच टेहेळणी बुरुजावरचे पहारेकरी सावध झाले. शंख वाजू लागले.

अ का पेला - A cappella

राघवेंद्र ·

बांवरे 08/06/2018 - 05:19
मध्यंतरी अलावर्दी असाच प्रसिद्ध झालेला https://www.youtube.com/watch?v=WikcPREx0DM ए आर रेहमान समोर त्याच्या गाण्यांचे अका पेला : https://www.youtube.com/watch?v=B1vJYhVZmuY दिल से : https://www.youtube.com/watch?v=tv242qOnHJA पेन मसाला या ग्रुपने हा प्रकार खूपच वापरला .. अल्बमही आला होता त्यांचा बहुतेक.

हर्मायनी 08/06/2018 - 09:25
फार छान आणि इंटरेस्टिंग प्रकार आहे हा. 'पिच परफेक्ट' नावाचा चित्रपट पण यावरती. गाणी आणि प्रेसेंटेशन चांगले आहे या चित्रपटात. याचा दुसरा भाग हि मध्यंतरी प्रदर्शित झाला. जाता जाता : या चित्रपटात Anna Kendrick ने कप सॉंग पण प्रेसेंट केलंय .

एस 08/06/2018 - 09:34
अशा नवीन प्रकारच्या संगीताची ओळख नाहीये. पण मागे एकदा एक टाळ्यांच्या ठेक्यावर ए आर रहमानची गाणी गायलेला एक व्हिडिओ पाहण्यात आला होता.

बांवरे 08/06/2018 - 05:19
मध्यंतरी अलावर्दी असाच प्रसिद्ध झालेला https://www.youtube.com/watch?v=WikcPREx0DM ए आर रेहमान समोर त्याच्या गाण्यांचे अका पेला : https://www.youtube.com/watch?v=B1vJYhVZmuY दिल से : https://www.youtube.com/watch?v=tv242qOnHJA पेन मसाला या ग्रुपने हा प्रकार खूपच वापरला .. अल्बमही आला होता त्यांचा बहुतेक.

हर्मायनी 08/06/2018 - 09:25
फार छान आणि इंटरेस्टिंग प्रकार आहे हा. 'पिच परफेक्ट' नावाचा चित्रपट पण यावरती. गाणी आणि प्रेसेंटेशन चांगले आहे या चित्रपटात. याचा दुसरा भाग हि मध्यंतरी प्रदर्शित झाला. जाता जाता : या चित्रपटात Anna Kendrick ने कप सॉंग पण प्रेसेंट केलंय .

एस 08/06/2018 - 09:34
अशा नवीन प्रकारच्या संगीताची ओळख नाहीये. पण मागे एकदा एक टाळ्यांच्या ठेक्यावर ए आर रहमानची गाणी गायलेला एक व्हिडिओ पाहण्यात आला होता.
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.

आंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्‍या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अ‍ॅप्स)

डॉ सुहास म्हात्रे ·

Office Editing for Docs, Sheets & Slides * किंमत - मोफत. * थोडक्यात वर्णन आणि / किंवा आवडलेल्या सोयी-सवलती-पर्याय-फायदे आमच्या हापिसात मायक्रोसॉफ्ट ऑफिस काढून टाकणे चालू आहे. त्याच्या ऐवजी गुगल स्मार्ट ऑफिस वापरलं जातंय. म्हणजे एक्सेल ऐवजी गुगल शीट्स, वर्ड ऐवजी गुगल डॉक्स, पॉवरपॉइंट ऐवजी गिगल स्लाईड. पण बऱ्याचदा काही जुन्या Office फाइल्स उघडाव्या लागतात. किंवा सप्लायर/कस्टमर Office फाइल्स पाठवतात. त्या पटकन उघडून बघण्यासाठी हे क्रोम एक्स्टेंशन आम्ही वापरतो.

In reply to by तुषार काळभोर

आता दुसरं कोणतंही एक्स्टेंशन क्रोमवर वापरत नाही, पण नऊ दहा वर्षांपूर्वी (नोकरी करायच्या आधीचा काळ) फाफॉ, क्रोम दोन्हीवर काही उपप्रणाल्या वापरल्या होत्या. आता आहेत की नाही माहिती नाही. १) साईटवर पेजच्या शेवटी पोचलो आणि जर साईटची रचना १, २, ३... (मिपासारखी) असेल तर पहिल्या पानाखाली दुसरे आपोआप लोड होते. नेक्स्ट किंवा पुढील पानाच्या क्रमांकावर क्लिक करावे लागत नाही. २) गुगल सर्च रिजल्ट्स मध्ये किंवा कुठेही लिंकवर माउस नेऊन काही सेकंद ठेवल्यास त्या पानाचा प्रिव्यु एका छोट्या चौकोनात दिसतो.

In reply to by तुषार काळभोर

धन्यवाद ! खरं तर गुगलची डॉक्स, शीट्स आणि स्लाईड्स ही चांगली अ‍ॅप्स/एक्सटेन्शन्स आहेत. पण, एमएस ऑफिसची सवय झाल्याने आणि ते बहुदा लॅपटॉप/पीसी बरोबर बंडल्ड येत असल्याने गुगल अ‍ॅप्स वापरण्याचे प्रमाण कमी आहे. कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी एमएस ऑफिस वापरणे बंद केले तर मात्र, गुगल अ‍ॅप्सना बरे दिवस येतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मायक्रोसॉफ्ट्चा स्टॅण्डर्ड पॅक (एक्सेल्+वर्ड्+पापॉ) साधारण १५-२५ हजारात असेल. आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्याने ९०% लोकांना पापॉची गरज नसते. ८०% लोकांना वर्डची गरज नसते. एक्सेल बहुतेकांना लागते,पण १०-२० % लोकांना तेसुद्धा नसले तरी चालते. गुगलच्या उत्पादनांमध्ये बरेचसे फीचर्स नाहीत. उदा व्ही-लुकअपला खूप मर्यादा आहेत. पण एक्सेल वापरणार्‍या ७०% + लोकांना त्याची गरजसुद्धा नसते. (मी स्वतः कधीही व्ही-लुकअप असलेली फाईल वापरली नाही/बनवली नाही. मला ते जमतसुद्धा नाही.) अशा सर्वांनी मायक्रोसोफ्टची उत्पादने (जर विकत घेणार असतील तर) वापरण्याऐवजी गुगल वापरले तर बराच खर्च वाचू शकतो. (आमच्य कंपनीत १८० पैकी १५० कॉम्प्युटरवरून ऑफिसपॅक काढलाय. राहिलेल्या ३०वर गरजेप्रमाणे एक्सेल्/वर्ड्/पापॉ पैकी एकच किंवा दोन इन्स्टॉल केलेले आहेत. उदा. मॅक्रो असणार्‍या एक्सेल वापरणारे लोक. बचत = १५०*१५०००=अंदाजे २२ लाख पाच वर्षांसाठी)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एमएस ऑफिस सूट सर्वोत्तम आहे यात वाद नाही. पण त्याच्यात असलेल्या काही शे किंवा हजारेक सुविधांपैकी सर्वसामान्य खाजगी /ऑफिसमधील वापरकर्ता फक्त निवडक ५ ते १० च वापरतो. त्यामुळे आपल्याला जरूर असणार्‍या सुविधा असलेला कमी किंमतीचा (किंवा मोफत) पर्याय वापरणे केव्हाही उत्तम. त्यातील काही खास व्यवस्था (उदा: मेलमर्ज, इ) वापरायची असल्यास एमएस ऑफिसचा खर्ज वाजवी ठरू शकेल. किंवा लॅपटॉपबरोबर एमएस ऑफिस मोफत बंडल्ड आले असले तरही ठीक ! :)

In reply to by तुषार काळभोर

अभ्या.. 02/06/2018 - 15:19
गुगलवाल्यांनी सुरुवातीला जीमेल फुकट दिले, आता त्याला पण पैसे मागायले आहेत. १५ जीबी ची लिमिट आमच्यासारख्या ग्राफिक्सवाल्यांना पुरत नाही. आता त्यासाठी मार्ग हुडकावे लागतात. प्रत्येक वेळी तेच पाहात मेंटेन करत बसणे जमत नाही. एमेस ऑफिस काढुन गुगल टाकले आणि सगळा व्यवहार त्यावर सुरु झाल्यावर परत पैसे वाढवले तर?

In reply to by अभ्या..

जीमेल अजूनही फुकटच आहे. जीड्राईव्ह सुद्धा १५ जीबीची पर्यंतच मोफत आहे. मात्र, जास्तिला पैसे मोजावे लागतात. जास्तिचा उपयोग करणार्‍यांना १०० जीबीला रु१३०/महिना (रु१३००/वर्ष) आणि १ टीबीला रु६५०/महिना (रु६,५००/वर्ष) असे दर आहेत. गुगल ड्राईव्हवर फोटो/चित्रे 'ओरिजिनल रिझॉल्युशन' ऐवजी 'हाय रिझॉल्युशन'मध्ये साठवली तर त्यांना १५ जीबी मध्ये मोजत नाही. पण, हा पर्याय तुम्झ्यासारख्या व्यावसायिक मंडळींना सोईचा नसेल. हल्ली फ्लॅश ड्राईव्ह (एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह) इतके स्वस्त व इतके लहान आकाराचे झाले आहेत की ते मुख्य साठवण आणि प्रत साठवण यासाठी उत्तम पर्याय झाले आहेत. WDचा उत्तम प्रतिचा १टीबी ड्राईव्ह रु३,७००/- आणि ४ टीबी ड्राईव्ह रु६,७४०/- फक्त मध्ये मिळतात. म्हणजे 'जी ड्राईव्हच्या एका वर्षाच्या भाड्यात' 'चारपट जास्त साठवणीची कायमची व्यवस्था' आणि शिवाय आंजा असो-नसो जिथे हवे तिथे वापरायची सोय, अशी डबल बेनेफिट स्कीम होईल ! :) मायक्रोसॉफ्टचा वन ड्राईव्ह तर फक्त ५जीबी मोफत देतो. मासिक/वार्षिक फी देऊन घेतलेल्या ऑफिस सूटबरोबर १टीबी मोफत आहे... मात्र, मुदत वाढवली नाही तर लिमिट ५जीबी होऊन डेटा गायब होऊ शकतो !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

WDचा उत्तम प्रतिचा १टीबी ड्राईव्ह रु३,७००/- आणि ४ टीबी ड्राईव्ह रु६,७४०/- फक्त मध्ये मिळतात. म्हणजे 'जी ड्राईव्हच्या एका वर्षाच्या भाड्यात' 'चारपट जास्त साठवणीची कायमची व्यवस्था' आणि शिवाय आंजा असो-नसो जिथे हवे तिथे वापरायची सोय, अशी डबल बेनेफिट स्कीम होईल ! :)
कितीही उत्तम प्रतीचा असला तरी एक्स्टर्नल ड्राईव्ह हा फक्त ट्रान्सफर साठी वापरावा, विशेषतः व्यावसायिकांनी. शक्य तितका जास्त डाटा क्लाऊडवर ठेवावा. मला सध्या ते सर्वाधिक सोयिस्कर व सुरक्षित डेटा स्टोरेज वाटतं. अर्थात डेटा लीक/हॅक असे प्रसंग कोणत्याही डेटाच्या बाबतीत होऊ शकतात. त्यातल्या त्यात युएसबी डेटा स्टोरेज हे सर्वाधिक बेभरवशाचे! हरवायची भीती, पोर्टेबल असल्याने शारिरीक नुकसानीची भीती, शेअरिंअमुळे डेटा करप्ट होण्याची भीती... अतिशोयक्ती उदाहरणः समजा कुठे फिरायला गेलो, आठ दिवस फिरून फोटो काढले (मोबाईल वा कॅमेरा) आणि मोबाईल/कॅमेरा हरवला/फॉर्मॅट झाला/एसडी कार्ड करप्ट झालं तर? मी जर वन्स इन लाइफटाईम असा कुठे गेलो (युरोप टूर वगैरे) तर रोज रात्री निवासस्थानी परतल्यावर फोटो लॅपटॉप वर कॉपी करून ड्राइव्हवर अपलोड करेन. म्हणजे डेटा कॅमेर्‍यात, लॅपटॉपवर आणि क्लाऊडवर असा तीन ठिकाणी असेल. व्यावसायिकांनी ज्यांचा सगळा व्यवसाय डेटावर आहे, त्यांनी आवर्जून नियमितपणे क्लाऊडवर डेटा बॅकअप नक्की घ्यावा. जगात सुरक्षित काहीच नसतं. मला वैयक्तिक गुगलड्राईव्हचा डेटा त्यातल्या त्यात सुरक्षित वाटतो.

In reply to by तुषार काळभोर

कोणतेच एक साधन १००% सुरक्षित असू शकत नाही. क्रिटिकल डेटासाठी एकापेक्षा जास्त स्वतंत्र साठवण साधने (Data redundancy) असणे जरूरीचे असते, नो रिस्क इज वर्थ टेकिंग, पिरियड. मी स्वतः माझा डेटा : (अ) दोन स्वतंत्र एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्हवर (१टिबी + २टीबी) 'पूर्ण डेटाची' प्रत्येकी एक अश्या दोन प्रती आहेत. साधारण आठवड्यातून एकदा व महत्वाचा डेटा निर्माण/जमा झाल्यास त्यावेळेस ताबडतोप अपडेट करतो. हे २५०जीबीचे एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्ह मिळु लागल्यापासून करत आहे. (आ) 'फक्त अतीमहत्वाचा (कारण एकूण डेटा २० जीबीपेक्षा जास्त आहे) डेटा, एक जादाची प्रत असावी यासाठी' विभागून जीड्राईव्ह (१५जीबी) + वन ड्राईव्ह (५ जीबी) यांच्यावर आहे. क्लाऊड ऑटोअपडेट होउ शकतात, पण डेटाच्या आकारमानावर लक्ष रहावे यासाठी स्वतः अपडेट करतो. (इ) लॅपटॉपवर 'पूर्ण डेटाची' एक प्रत आहे, ज्यामुळे 'सर्व डेटा' कामासाठी/संदर्भासाठी सतत उपलब्ध असतो. लॅपटॉपवर असल्याने नेट अथवा वीज गेली (जे हल्ली फार विरळा आहे) तरी तास दोन तास काम बंद पडत नाही. (ई) अपडेट होत जाणार्‍या फाईल्सची एक कॉपी लॅपटॉपला सतत लावलेल्या ३२जीबी फ्लॅश पिनवर सेव्ह करतो. १जीबी फ्लॅश पिन्स मिळायल्या लागल्यापासून ही प्रथा पाळतो आहे. त्यामुळे २०+ वर्षांत, (अ) एकदा लॅपटॉपची हार्ड डिस्क गचकली, पण फ्लॅश पिनवर शेवटच्या फाईल सेव्हपर्यंतचा डेटा वाचला होता. बाकी सगळा डेटा एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्हवर होताच. (आ) एकदा विंडोने संप पुकारला म्हणून सगळी हार्ड डिस्क फॉर्मॅट करावी लागली. असे एकदाच झाले, कारण त्या लॅपटॉपवर प्रि-ईंस्टॉल्ड विंडो आली होती आणि तिच्यात डेटासाठी वेगळे पार्टीशन नव्हते. मी नेहमी हार्ड डिस्कची दोन पार्टिशन्स करून विंडो 'सी'वर आणि डेटा 'डी'वर ठेवतो, म्हणजे विंडोने संप पुकारला तर फक्त 'सी' फॉर्मॅट करून विंडो रिइंस्टॉल करता येते व डेटाला धक्का लागत नाही. (इ) मायक्रोसॉफ्टने एकाएकी वन ड्राईव्हवरचे मोफत साठवणीचे आकारमान १५ वरून ५ जीबीवर आणले तेव्हाही वरच्या व्यवस्थेमुळे काळजी, गडबड, इ झाले नाही. (ई) एकदा दोनपैकी एका एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्हने डोळे मिटले, नवीन एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्ह आणून त्याच्यावर चांगल्या ड्राईव्हची कॉपी टाकली. (उ) पूर्वी छोट्या आकारमानाच्या फ्लॅश पिन्स बर्‍यापैकी बेभरवशाच्या होत्या. पण ती व्यवस्था केवळ अतिरिक्त काळजीस्तव असल्याने व लॅपटॉपवर शेवटच्या क्षणापर्यंतच्या अपडेटेड फाईल्स असल्याने, शून्य धोका झाला आहे. हल्लीच्या फ्लॅश पिन्समध्ये ही समस्या विरळ आहे. अर्थातच, क्रिटिकल डेटा नाहीसा झाला असे एकदाही झालेले नाही. थोडक्यात, परत एकदा, क्रिटिकल डेटासाठी एकापेक्षा जास्त स्वतंत्र साठवण साधने (Data redundancy) असणे जरूरीचे असते, नो रिस्क इज वर्थ टेकिंग, पिरियड. मोठ्या कंपन्यांत रिडंडन्सीची काळजी घ्यायला स्वतंत्र व्यवस्था असते. तेव्हा प्रत्येक कर्मचार्‍याने कामाच्या डेटासाठी स्वतंत्र काळजी घेण्याची गरज नसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

If it is at one place it is not backed up and highly vulnerable... तुमचा प्रतिसाद लै आवडलेला आहे. मी जेव्हा लॅपटॉपवर काही महत्वाचा डेटा येईल तो 1टीबी हार्डडिस्कवर बाहेर घेत राहतो. त्यामुळे तो किमान दोन ठिकाणी असतो. शिवाय मोबाईलचा डेटा ड्राईव्ह वर टाकत राहतो.

In reply to by तुषार काळभोर

१. क्लाऊडवरच्या डेटाची सोय लोकांना सवय लागेपर्यंत मोफत असेल. लोकांना तिची गरज अनिवार्य वाटू लागेल तेव्हा कंपन्या आपला फायदा काढून घेण्यासाठी तिच्यासाठी फी घेणारच. त्यात वाईट काहीच नाही. कारण, त्या धर्मदाय संस्था नाहीत, व्यापारी कंपन्या आहेत. गुगल आणि मायक्रोसॉफ्टने आधी साठवण मोफत देवून आता आकारमान कमी करून वरच्या आकारमानासाठी फी घ्यायला सुरुवात केली आहेच. त्यांना जेव्हा मोफत सेवा पूर्णपणे बंद करण्यात 'तोटा नाही' आणि / किंवा 'फायदा आहे' असे दिसून येईल तेव्हा संपूर्ण सेवेसाठी फी द्यायची तयारी ठेवायला हवी. २. मासिक/वार्षिक फी भरण्याची मुदत चुकली तर मोठ्या प्रमाणात क्लाऊडवर असलेला डेटा केव्हा डिलीट करायचा, हे केवळ त्या कंपनीच्या नियमांवर अवलंबून असेल. ३. क्लाऊडवरचा डेटा वीज व नेट असल्याशिवाय वापरायला मिळत नाही. ऑफिसबाहेर आणि विशेषतः फिरतीवर असताना, या दोन गोष्टी सर्वच ठिकाणी २४ X ७ मिळतील याची १००% खात्री देता येत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. 02/06/2018 - 20:04
इन्स्टॉल्ड ओएस असलेली स्टॅटिक हार्डडिस्क हा कितपत व्यवहार्य उपाय होऊ शकेल डेटा बॅकप आणि रेग्यिलर युज साठी? बरेचसे फोटोग्राफर (लग्न समारंभ करीझ्मा स्पेशालिस्ट)ती वापरतात असे ऐकले आहे.

In reply to by अभ्या..

१. हार्ड डिस्कवरची ओएस स्वतंत्र (सी) ड्राईव्हवर असावी व डेटा स्वतंत्र (डी) ड्राईव्हवर असावा. त्यामुळे ओएसमध्ये गडबड झाली तरी डेटाला धक्का न लावता सी ड्राईव्ह फॉर्मॅट करून ओएस रिइंन्स्टॉल करता येते. मात्र, हार्ड डिस्क फेल झाली तर डेटाची शाश्वती देता येत नाही. २. कितीही आधुनिक आणि कितीही सुरक्षित वाटत असलेला, कोणताही एकच पर्याय, १००% सुरक्षा देवू शकत नाही. हुमन्स फेल अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, टू ! देअर आर नो एक्सेप्शन्स. :) म्हणूनच, (अ) अनेक ठिकाणी ठेवलेल्या, (आ) एकापेक्षा जास्त स्वतंत्र पर्यायांवर महत्वाच्या डेटाच्या प्रति असाव्यात. यालाच डेटा रिडंडसी म्हणतात. याचा परिणाम म्हणजे, कोणत्याही आपत्कालात डेटाची कोणती तरी एक किंवा जास्त प्रति सुरक्षित राहतात. यासाठी वापरलेल्या पर्यायांची संख्या डेटाच्या महत्वाच्या प्रमाणात वाढते. मात्र, विचारपूर्वक व्यवस्था केल्यास ती संख्या तीन-चारच्या वर सहसा जाऊ नये. कारण, त्यापेक्षा जास्त पर्याय वापरल्यास "फायदा-किंमत गुणोत्तर (बेनेफिट-कॉस्ट रेशो)" अवास्तव व अस्विकार्य बनते.

In reply to by अभ्या..

फुटूवाला 02/06/2018 - 23:56
मी वापरतो. अतिमहत्वाच्या डाटा ३.० पेनड्राईव्ह ला ठेवतो आणि त्यासाठीच्या बॉक्स मध्ये ठेऊन सरळ कपाटातच. कारण लग्नाचा data loss झाला तर लै अवघड. सॉलीड स्टेट ड्राईव्ह गेल्या सहा महिन्यांपूर्वी घेतलीय. फोटोशॉप दुप्पट स्पीडने चालतंय आता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कंजूस 02/06/2018 - 18:06
१) माझ्या वाचनात ( बहुतेक क्वोरा) आले की गुगल पेड अकाउंट वरूनही दोन महिने हालचाल न केल्यास डेटा उडवतात. या लेखकाने आईफोन वापरायला सुरुवात केल्याने गुगलचा विसर पडला आणि दोन तीन वार्निंगा वाचल्या गेल्या नाहीत. २) माझ्याकडे असलेल्या एका विंडोज फोन 8.1 वरचे अॉफिस सूट चालूच आहे पण केविलवाणे आहे. अपडेट्स बंद झाल्यामुळे. २०१५ साली दिलेली १५जिबी काढून ५ केली . दुसय्रा एका विंडोजला लुमिया (540)विंडोज 10 अपग्रेड झाल्या ने दर मंगळवारी/ महिन्यात दोनदा एक्सेल/वर्ड अपडेट्स येतात आणि ते बहुतेक फिचर्स पिसीइतकेच फुल असावेत असे वाटते. या लुमिया फोनांंस फ्री बंडल्ड अॉफिस सूट मिळणार या आनंदाने च फोन घेतलेले. ३)मध्यंतरी ओफिस फ्री सोय काढून घेतली एमेसने ( सहा महिने). अॉफिस 365 सबस्क्राईब करा रु ५०००/वर्षाला सांगायले. परंतू answers./ support. ms dot com वर फार आरडाओरड झाली आणि अॉफिस सूट पुन्हा फ्री झाला मागच्या आठवड्यात. ## सांगण्याचा मुद्दा म्हणजे हे मायक्रोसॉफ्ट प्रकरण विंडोज 10 फोनमध्ये चालूच राहायला हवे स्पर्धा म्हणून अन्यथा गुगल गळा आवळेल कधीही. # कालचीच बातमी - माइक्रोसॉफ्टने मार्केट क्यापिट्लाइझेशनमध्ये गुगल अल्फाबेटला मागे टाकले. कसे ते माहित नाही. अझुअरला फार गिह्राइक आहे म्हणे. मुद्दे लेखाला धरून आहेत का माहिती नाही पण लिहिले माझे अनुभव.

In reply to by कंजूस

व्यापारी व्यवस्थेतील (ज्यात संगणक क्षेत्रही येतेच) काही मूलभूत नियम लक्षात ठेवले पाहिजेतच : १. सुरुवातीला काही काळ मोफत वस्तू/सेवा देणे हा विपणनाची (मार्केटिंग) एक रणनीति असते. त्याने गिर्‍हाईकाला आपल्या वस्तू/सेवेची ओळख व महत्व दाखवून देणे सोपे होते... आणि जमलेच तर चटकही लावता येते. २. देअर आर नो फ्री लंचेस इन धिस वर्ल्ड... अ‍ॅट लिस्ट नॉट फॉर लॉन्ग. ३. जेव्हा एखाद्या विक्रिची किंमत तुम्हाला देण्याची गरज नसते, तेव्हा प्रत्यक्षात, तुम्ही त्या विक्रितले वापरकर्ते/खरेदीदार नसून विक्रीची वस्तू असता.

In reply to by चौकटराजा

फ्रेंच आहे. ;) जगभरातील ९०००० कॉम्पुटर्सवर हे करायचं चालू आहे. त्याशिवाय शक्य तिथे संपूर्ण कॉम्पुटरऐवजी Thinclient (n-कॉम्पुटिंग)वापरणं, पेपर वर्क व वेळेचा अपव्यय टाळण्याआठी सर्व प्रकारचे अप्रुव्हल्स ऑनलाइन करणं, असे बरेच प्रकार चालू आहेत. आजच एक नवा ऑनलाइन फॉरमॅट सादर केला, एखादा कर्मचारी कंपनी सोडून जाताना कागद हातात घेऊन स्वतःच्या मॅनेजरकडे, मग HRकडे, फायनान्सकडे व आयटी कडे जायचा, क्लियरन्ससाठी. आजपासून हे काम ऑनलाइन.

In reply to by तुषार काळभोर

तुमचा एमडी व्यवहारवादी (ट्रान्झॅक्शनल) नसून परिवर्तनवादी (ट्रान्सफॉर्मेशनल) व्यवस्थापक दिसतो आहे... तो तुमच्या कंपनीची मूल्यवान मालमत्ता (व्हॅल्युएबल अ‍ॅसेट) आहे.

कंजूस 02/06/2018 - 08:49
संगणकासाठी आहे. कारण मोबाईलवर क्रोम डेटा फार खातो. यामुळेच नकाशात भारत युसी ब्राउजर वापरतो असं दिसतं. जिओ आल्यामुळे डेटा दोनशेपट स्वस्त झाल्याने चित्र बदलेल. अॉफिसची गोष्ट वेगळी आहे. बाकी लेख माहितीपूर्ण आहे.

In reply to by कंजूस

धन्यवाद ! पॉकेट आणि कीप अँड्रॉईड वर आहेत. मला तरी ते वापरताना समस्या येत नाही. विकिवांड मोबाईलवर वापरून पाहिली नाही कारण मोबाईलवर फार वाचन करत नाही, त्यासाठी लॅपटॉपच आवडतो. पण, विकिवांड लॅपटॉपवर वापरणे खूप छान अनुभव आहे.

खिलजि 02/06/2018 - 14:19
या वैचारिक मंथनाचा मला पुढे भविष्यात नक्कीच फायदा होईल असं वाटतंय . धन्यवाद म्हात्रे सर , हा लेख लिहिल्याबद्दल . सिद्धेश्वर विलास पाटणकर

कंजूस 02/06/2018 - 14:48
मॅासॅा ओफिस / गुगलच याचे पर्याय यात काय फरक आहे किंवा त्याचे वापर करणे /न करणे यात फायदे तोटे एका सामान्य वापरकर्त्यास कळत नाही आणि अडचण आल्याशिवाय शोधाशोध सुरू केली जात नाही. लेखात दिलेले फिचर तपाससले नाहीत कधी. जे लोक कामाच्या ठिकाणी जी काही सोय असेल ती वापरत असतील पण छोटे व्यावसायिक निरनिराळ्या सोयींचा वापर करतात. एक ओळखीचा मुंबईतला व्यापारी आहे तो सर्व काम ड्राइववरच करतो. मोबाइलमध्ये ओर्डरीच्या पिडिएफ घेणे,उत्तर देणे कुठुनही,जिएसटी वगैरे सर्व. मिपावर Excel धडे आलेले. आता Excel फक्त विंडोजवर नसून android appसुद्धा आहे. लॅागिन सिंक केले की कुठल्याही डिवाइसात मिळते. * मुख्य प्रश्न असा की विंडोजवर गुगलचे प्रॅाडक्टस स्टार्ट होत नाहीत. कारण काय तर म्हणे Android मध्ये windows 10 इतकी security नाही. खरे खोटे माहित नाही. पुर्वी क्रोम अॅप विंडोज १० स्टोर वर आले होते ते MISOFT ने ताबडतोब उडवले. ( मोबाइल,S वर्शनमध्ये देत नाहीत.) #- मिपावर जर पिडिएफ लिंक द्यायची झाली तर गुगल डॅाक/ड्राइवची लिंक देता येते का?

In reply to by कंजूस

सुमो 04/09/2018 - 17:46
आपण पीडीएफ फाईल शेअर केल्या नंतर साधारणत: https://drive.google.com/file/d/[1D5fj-t5vRcHuLhgA9XY3iV8uKQP6rNIU]/view?usp=drivesdk अशी लिंक मिळते. [मूळ लिंक मध्ये कंस नसतो तो मी टाकला आहे] त्यावर क्लिक केल्यानंतर हे पान उघडते आणि त्यावरील डाऊनलोड बटन वापरून फाईल डाऊनलोड करता येते. Screenshot_2018_09_04_15_54_39_182_com_cloudmosa_puffin_Free पण जर आपल्याला वरील पान न उघडता फक्त डाऊनलोड लिंक द्यायची असेल तर लिंक मध्ये थोडासा फेरफार करून डायरेक्ट डाऊनलोड करण्यासाठी लिंक अशी द्यायची. मूळ लिंक मधील file/d/ काढून त्याठिकाणी uc? export=download&id= टाकायचे. आणि शेवटचे /view?usp=drivesdk काढायचे. मग ती लिंक अशी दिसेल. https://drive.google.com/uc?export=download&id=1D5fj-t5vRcHuLhgA9XY3iV8uKQP6rNIU ह्या लिंकवर क्लिकल्यास थेट पीडीएफ फाईलची डाऊनलोड लिंक उघडेल. ड्राईव्ह पीडीएफ

मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट हे सर्वात चांगले अ‍ॅप्लीकेशन आहे. . . . . . . . . गुगल क्रोम आणि फाफॉ डाऊनलोड करण्यासाठी. ओपन सोर्स चळवळीचा चाहता असल्याने फायरफॉक्सचा चाहता आहे. मेलसाठी त्यांचेच थंडरबर्ड वापरतो. ऑनलाईन वृत्तपत्रे वाचणे, मिसळपाव वाचणे, युट्युब आणि इतर जनरल सर्फींग साठी फाफॉ वापरतो. बँकींग अप्लीकेशन्स साठी फक्त क्रोम वापरतो. बाकी लेख उत्तम !

चौकटराजा 03/06/2018 - 06:47
कोणताही एक जिव्हाळ्याचा विषय घेऊन त्याच्या सम्बन्धी अनेकांकडून माहिती घेउन त्याचे काहीसे विस्कळीत का होईना पण तपशिलीकरण करणे ही संकल्पनाचा फार मोलाची आहे . त्या बद्दल श्री म्हात्रे यांचे किती आभार मानावेत ? असा " ऑन लाईन सापळे" ( लॉटरी , खरेदी, फुकट डाउनलोड ई ) असा विषय ही घेता येईल.

In reply to by चौकटराजा

असा " ऑन लाईन सापळे" ( लॉटरी , खरेदी, फुकट डाउनलोड ई ) असा विषय ही घेता येईल. उत्तम कल्पना आहे. तुम्हीच पुढाकार घेऊन धागा/धागे टाका.

शशिकांत ओक 04/06/2018 - 14:30
आंतरजालावरील विश्वातील घडामोडी, नवनव्या संकल्पना, वापरणाऱ्यांच्या सोई व पंचाईती, असे सोप्या भाषेत समजावून सांगितले जाते आहे याचे समाधान वाटते...

चौकटराजा 05/06/2018 - 09:01
संगणक खरेदी करताना अनेक वेळा विक्रेता आपली सोय पहातो व चुकीची माहिती देऊन नको ते कॉन्फिगरेशन गळ्यात मारतो . यासाठी साक्षरता अनेक वेळा अनेकात नसते . बाप मुलाला ४० हजाराचा ८ व्या जनरेशन वाला पी सी केवळ तू नळी व एक्सेल साठी आणून देतो . यासाठी निरनिराळ्या लोकांनी हार्ड वेअर व उपयोजिता यांचा परस्पर संबंध हा विषय घेउन धागा काढला तर बरे होईल . अर्थात यावर तू नळी वर उपयुक्त असा माल बराच उपलब्ध आहे .

चहाबिस्कीट 05/06/2018 - 09:17
क्रोम मध्ये फॉर्म ऑटोसेव्ह करणारे Lazarus Form Recovery नावाचे एक्सटेंशन होते. फार उपयोगाचे होते ते, फॉर्म भरात असताना पेज रिफ्रेश झाले तरी जुना डेटा सेव्ह राहायचा. पण आता हे एक्स्टेंशन वेबस्टोअर वर नाही. कोणाला दुसरे चांगले Form Recovery एक्सटेंशन माहित आहे का?

मदनबाण 05/06/2018 - 21:30
मी फाफॉ आणि क्रोम बरोबरच ऑपेरा आणि एपिक ब्राउजर्र्स सुद्धा वापरतो... दोन्ही मध्ये बिल्टइन व्हीपीएन असणे हे ही ब्राउजर्स वापरण्या मागे मुख्य कारण आहे. Opera Browser Epic Browser याच बरोबर टॉर ब्राउजर देखील वापरले आहे, पण ते कमालीचे स्लो असल्याने काढुन टाकले. बाकी ब्राउजर एक्सटेन्शन्स बद्धल मी माझ्याकडुन अनेक वेगवेगळे एक्सटेन्शन्स दिलेले आहेत :- ब्राउजर एक्स्टेंशन्स

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नशा ये प्यार का नशा है ये मेरी बात यारों मानों नशे में यार डूब जाओ रहो ना होश में दीवानों... :- Mann

योगी९०० 06/06/2018 - 08:21
माहितीपूर्ण लेख! फक्त ते कोठला ब्राऊझर कोठल्या देशात वापरला जातो त्याचा ग्राफ पटला नाही. भारतात युसी ब्राऊझर?? आणि चीन मध्ये क्रोम? चीन मध्ये गुगलच्या प्रॉडक्टसवर सरसक्ट बंदी आहे.

In reply to by तुषार काळभोर

लेखातील उणीव दाखवून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद, पैलवानसाहेब ! तो नकाशा आणि विकीवरचा नकाशा दोन्ही योग्य वस्तूस्थिती दाखवत नाहीत. त्यामानाने, gizmodo.com वरचा नकाशा जास्त योग्य वाटत आहे. त्यामुळे, लेखातल्या नकाशात तसा बदल केला आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाय द वे, इथं दिसणारा डेटा बऱ्यापैकी खात्रीशीर वाटतोय. काही आकडे: १. जगभरात क्रोम 58% , सफारी 14% व युसी 8% २. भारतात क्रोम 49%, युसी 33%, ऑपेरा 6% २.१ भारतात डेस्कटॉपवर क्रोम 73%, फाफॉ 12%, युसी 8%(डेस्कटॉपवर!!) आणि IE फक्त 1.63% २.२ भारतात मोबाईलवर क्रोम 43%, यूसी 40%, ऑपेरा 8% ३. चीनमध्ये क्रोम 50%, युसी 15%, सफारी 12% काही निरीक्षणं: १. युसी ब्राऊजर जो चिनी कंपनी अलिबाबाच्या मालकीचा आहे, तो भारतात 40% व चीनमध्ये 15% वापरला जातो. २. जगात सफारी 14% व चीनमध्ये 12% वापरला जातो, जे अर्थातच प्रामुख्याने iphoneमुळे आहे. मॅकचं प्रमाण नगण्य आहे. भारतात सफारी 2% वापरला जातो. iphone चं हे प्रमाण जनरल आर्थिक संपन्नतेचे लक्षण मानता येईल का? ३. क्रोम चीनमध्ये भारतापेक्षा जास्त वापरला जातो. (चीनमध्ये गुगल चालत नाही, पण त्यांचा ब्राऊजर चालतो.) ४. भारतात डेस्कटॉपवरसुद्धा 8% युसी ब्राऊजर वापरला जातो!

शाली 07/06/2018 - 13:35
माहितीपुर्ण लेख. मला सफारी उत्तम वाटते. ऑफीस पेक्षा पेजेस, नंबर्स जास्त जास्त छान वाटतात वापरायला. आणि डाटा स्टोअर करायला (जो फारसा नसतो) iCloud व G-Drive (गुगल ड्राईव्ह नाही) वापरतो. गेल्या काही वर्षात एकदाही त्रास नाही.

जीमेलची नवीन आवृत्ती

मी हा धागा इथे टाकला हे गुगलला कसे समजले कळत नाही. पण तो लेख वाचून गुगलचे धाबे दणालले असे दिसते ! अन्यथा, इथे सांगितलेल्या अ‍ॅप्स आणि एस्कटेन्शन्समध्ये असलेल्या अनेक उपयोगी सोयी असलेली एक नवीन आवृत्ती (व्हर्शन), गुगलने काल-परवाच घाईघाईने का बरे प्रसिद्ध केली असती ?! =)) =)) =)) ;) असो. नव्या आवृत्तीत असलेल्या काही उपयोगी सोयी अश्या... १. Organize emails from your inbox: संदेशावर पॉइंटर नेला की लगेच; Archive, Delete, Mark as unread Unread / Read आणि Snooze हे पर्याय दिसू लागतात. त्यांच्यावरच्या एकाच टिचकीने जागेवरच हवे ते काम साधता येते. २. Smart Reply उर्फ Use suggested replies & follow-ups: याने निवडलेल्या संदेशातील मजकूर ध्यानात घेऊन त्याला साजेशे उत्तर जीमेल तयार करते. ते तसेच अथवा हवे ते बदल करून पुढे पाठवता येतात. ३. Expand or shrink your inbox : "सेटिंग्ज --> डिस्प्ले डेन्सिटी" वापरून इनबॉक्समध्ये दिसणार्‍या संदेशांची मांडणी बदलता येते. ४. Show or hide the menu : खिडकिच्या डाव्या बाजूच्या, स्क्रिनची जागा खाणार्‍या, मेन्युची जाडी कमी/जास्त करता येते. ५. View Calendar, Tasks, Keep & Add-ons : खिडकीच्या उजव्या बाजूवरील नव्या उभ्या टूलबारमध्ये नेहमीच्या वापरातल्या उपप्रणाल्या ठेवून त्यांना एका टिचकीने सहजपणे वापरता येते. ६. Send emails & attachments confidentially : संदेशांना (अ) मुदतीची तारीख (expiration date), (आ) परवलीचा शब्द (passcode) आणि (इ) Prevent forwarding, downloading, copying, व pasting; इत्यादी अटी लावून पाठवता येतात. ७. Themes : या आधीपासून असणार्‍या सोयीत जास्त पर्याय दिलेले आहेत. वरच्या मूळ सचित्र माहितीचा स्त्रोत इथे दिसेल.

फार उपयुक्त धागा आहे, मी माझ्या परीने भर घालतो. मी वापरलेली सर्व एक्स्टेन्शन आठवतील तशी इथे टाकत राहीन. १. Gorgias- वारंवार लागणाऱ्या Email template पुनःपुन्हा टाइप करायला लागू नयेत म्हणून हे अत्यंत उपयुक्त आहे. उदा. rs असं लिहून Tab दाबलं कि त्वरित Respected sir अशी अक्षरे इमेल मध्ये येतील. PFA असं लिहिल्यावर Please find attachment असं येईल. हे फक्त जीमेल साठी वापरता येईल. Outlook version असेल तर मला कल्पना नाही. २. Auto BCC- मला मी केलेल्या प्रत्येक इमेल मध्ये माझ्या manager ला cc मध्ये ठेवावं लागतं. हे extension, cc आणि bcc मध्ये जो नियम लावला आहे त्याप्रमाणे स्वत:हून add करून टाकेल. एकापेक्षा अनेक इमेल वरून Login असाल तरी घोळ होत नाही कारण आपण नियमचं तसा सेट केलेला आहे की ह्या इमेल वरून मेल गेला तर हा व्यक्ती cc मध्ये आणि त्या इमेल वरून गेला तर तो व्यक्ती cc मध्ये. ३. Adblock Plus- बऱ्याच जणांना माहीत असेल. सर्व ठिकाणच्या सर्व जाहिराती बंद करण्यासाठी उत्तम extension . युट्युब वरील सर्व जाहिराती सुद्धा बंद होतात. ४. Ghostery- सर्व वेबसाईट वर अनेक tracker असतात जे सतत आपल्या क्लिक करण्याकडे डोळे लावून असतात आणि आपल्या त्या अनुशंगाने जाहिराती पाठवतात. ह्या extension मुळेहे सर्व बंद होऊन जाईल. तुमची माहिती, तुम्ही वापरलेलं इंटरनेट व इतर माहिती कुणाकडे जाणार नाही. हे आणि adblock मी कायम वापरतो. ५. Todoist- आपल्या जीमेल ने लॉगीन करा. फोन वर पण हे app टाका. मग ह्यात तुम्ही लिहून ठेवलेली सर्व कामांची तुम्हाला त्या त्या दिवशी सकाळी आठवण करून दिली जाईल. तसेच कामे प्राधान्य क्रमाने पण लिहून ठेवता येतात. ६. Hola VPN- काही दुष्ट लोक, महत्वाच्या वेबसाईट ब्लॉक करून ठेवतात, तेव्हा, आपली एक वेगळीच लोकेशन सेट करून हव्या त्या वेब साईट उघडण्यासाठी उत्तम extension. तसेच भारतासाठी न बनलेली वेबसाईट उघडायची असेल तरी ह्याचा उपयोग करून आपली सध्याची जागा virtually बदलून त्या देशातली दर्शवू शकता. (ही माहिती आहे फक्त. वापरकर्त्यांनी आपल्या विवेकाने उपयोग करावा.) ७. Video Downloader Pro- अनेक साईट्सवर डाउनलोड होऊ न शकणारे पण प्ले होणारे जे व्हिडीओ असतात ते डाउनलोड करून घेण्यासाठी एक उत्तम पर्याय. ८. Session Buddy- अनेकदा असं होतं कि आपल्याल laptop बंद करायचा असतो पण अनेक tab उघड्या असतात, किंवा त्या नंतर लागणार असतात. अशा वेळी सेशन बडी वापरून सध्या उघड्या असलेल्या सर्व tab सेव्ह करून ठेवता येतील. नंतर फक्त त्या सेशन वर क्लिक केलं कि हव्या असलेल्या सर्व tab क्षणार्धात उघडतील. (हे एक्सटेंशन ऑफलाईन काम करणार नाही.)

charming atheist 25/06/2018 - 12:26
Tapatalk नावाचे ॲप आहे त्यावरुन १ लाखापेक्षा जास्त फोरम्स ॲक्सेस करता येतात.मिपा त्यात आहे की नाही ठाऊक नाही.पण अनेक मोठे फोरम्स ॲक्सेस करायला ते एक चांगके ॲप आहे.

भुमन्यु 25/06/2018 - 19:34
show Highlights: गुगल मध्ये सर्च केलेले शब्द अधोरेखित करण्यासाठी Kindle Cloud reader: किंडल वर सेव्ह केलेली पुस्तके लॅपटॉप वर वाचण्यासाठी Amazon assistant: एखादी गोष्ट गुगल वर सर्च केली आणि ती वस्तू जर अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असेल तर, तुम्हाला अअ‍ॅमेझॉनचा लिंक बार येतो Multi highlighter

Jayant Naik 24/07/2018 - 10:38
इतक्या वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्ही प्रकाश टाकला आहे कि ...याचा आवाका पाहून दचकायलाच झाले. कसे काय जमवता हे सर्व ?

Office Editing for Docs, Sheets & Slides * किंमत - मोफत. * थोडक्यात वर्णन आणि / किंवा आवडलेल्या सोयी-सवलती-पर्याय-फायदे आमच्या हापिसात मायक्रोसॉफ्ट ऑफिस काढून टाकणे चालू आहे. त्याच्या ऐवजी गुगल स्मार्ट ऑफिस वापरलं जातंय. म्हणजे एक्सेल ऐवजी गुगल शीट्स, वर्ड ऐवजी गुगल डॉक्स, पॉवरपॉइंट ऐवजी गिगल स्लाईड. पण बऱ्याचदा काही जुन्या Office फाइल्स उघडाव्या लागतात. किंवा सप्लायर/कस्टमर Office फाइल्स पाठवतात. त्या पटकन उघडून बघण्यासाठी हे क्रोम एक्स्टेंशन आम्ही वापरतो.

In reply to by तुषार काळभोर

आता दुसरं कोणतंही एक्स्टेंशन क्रोमवर वापरत नाही, पण नऊ दहा वर्षांपूर्वी (नोकरी करायच्या आधीचा काळ) फाफॉ, क्रोम दोन्हीवर काही उपप्रणाल्या वापरल्या होत्या. आता आहेत की नाही माहिती नाही. १) साईटवर पेजच्या शेवटी पोचलो आणि जर साईटची रचना १, २, ३... (मिपासारखी) असेल तर पहिल्या पानाखाली दुसरे आपोआप लोड होते. नेक्स्ट किंवा पुढील पानाच्या क्रमांकावर क्लिक करावे लागत नाही. २) गुगल सर्च रिजल्ट्स मध्ये किंवा कुठेही लिंकवर माउस नेऊन काही सेकंद ठेवल्यास त्या पानाचा प्रिव्यु एका छोट्या चौकोनात दिसतो.

In reply to by तुषार काळभोर

धन्यवाद ! खरं तर गुगलची डॉक्स, शीट्स आणि स्लाईड्स ही चांगली अ‍ॅप्स/एक्सटेन्शन्स आहेत. पण, एमएस ऑफिसची सवय झाल्याने आणि ते बहुदा लॅपटॉप/पीसी बरोबर बंडल्ड येत असल्याने गुगल अ‍ॅप्स वापरण्याचे प्रमाण कमी आहे. कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी एमएस ऑफिस वापरणे बंद केले तर मात्र, गुगल अ‍ॅप्सना बरे दिवस येतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मायक्रोसॉफ्ट्चा स्टॅण्डर्ड पॅक (एक्सेल्+वर्ड्+पापॉ) साधारण १५-२५ हजारात असेल. आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्याने ९०% लोकांना पापॉची गरज नसते. ८०% लोकांना वर्डची गरज नसते. एक्सेल बहुतेकांना लागते,पण १०-२० % लोकांना तेसुद्धा नसले तरी चालते. गुगलच्या उत्पादनांमध्ये बरेचसे फीचर्स नाहीत. उदा व्ही-लुकअपला खूप मर्यादा आहेत. पण एक्सेल वापरणार्‍या ७०% + लोकांना त्याची गरजसुद्धा नसते. (मी स्वतः कधीही व्ही-लुकअप असलेली फाईल वापरली नाही/बनवली नाही. मला ते जमतसुद्धा नाही.) अशा सर्वांनी मायक्रोसोफ्टची उत्पादने (जर विकत घेणार असतील तर) वापरण्याऐवजी गुगल वापरले तर बराच खर्च वाचू शकतो. (आमच्य कंपनीत १८० पैकी १५० कॉम्प्युटरवरून ऑफिसपॅक काढलाय. राहिलेल्या ३०वर गरजेप्रमाणे एक्सेल्/वर्ड्/पापॉ पैकी एकच किंवा दोन इन्स्टॉल केलेले आहेत. उदा. मॅक्रो असणार्‍या एक्सेल वापरणारे लोक. बचत = १५०*१५०००=अंदाजे २२ लाख पाच वर्षांसाठी)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एमएस ऑफिस सूट सर्वोत्तम आहे यात वाद नाही. पण त्याच्यात असलेल्या काही शे किंवा हजारेक सुविधांपैकी सर्वसामान्य खाजगी /ऑफिसमधील वापरकर्ता फक्त निवडक ५ ते १० च वापरतो. त्यामुळे आपल्याला जरूर असणार्‍या सुविधा असलेला कमी किंमतीचा (किंवा मोफत) पर्याय वापरणे केव्हाही उत्तम. त्यातील काही खास व्यवस्था (उदा: मेलमर्ज, इ) वापरायची असल्यास एमएस ऑफिसचा खर्ज वाजवी ठरू शकेल. किंवा लॅपटॉपबरोबर एमएस ऑफिस मोफत बंडल्ड आले असले तरही ठीक ! :)

In reply to by तुषार काळभोर

अभ्या.. 02/06/2018 - 15:19
गुगलवाल्यांनी सुरुवातीला जीमेल फुकट दिले, आता त्याला पण पैसे मागायले आहेत. १५ जीबी ची लिमिट आमच्यासारख्या ग्राफिक्सवाल्यांना पुरत नाही. आता त्यासाठी मार्ग हुडकावे लागतात. प्रत्येक वेळी तेच पाहात मेंटेन करत बसणे जमत नाही. एमेस ऑफिस काढुन गुगल टाकले आणि सगळा व्यवहार त्यावर सुरु झाल्यावर परत पैसे वाढवले तर?

In reply to by अभ्या..

जीमेल अजूनही फुकटच आहे. जीड्राईव्ह सुद्धा १५ जीबीची पर्यंतच मोफत आहे. मात्र, जास्तिला पैसे मोजावे लागतात. जास्तिचा उपयोग करणार्‍यांना १०० जीबीला रु१३०/महिना (रु१३००/वर्ष) आणि १ टीबीला रु६५०/महिना (रु६,५००/वर्ष) असे दर आहेत. गुगल ड्राईव्हवर फोटो/चित्रे 'ओरिजिनल रिझॉल्युशन' ऐवजी 'हाय रिझॉल्युशन'मध्ये साठवली तर त्यांना १५ जीबी मध्ये मोजत नाही. पण, हा पर्याय तुम्झ्यासारख्या व्यावसायिक मंडळींना सोईचा नसेल. हल्ली फ्लॅश ड्राईव्ह (एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह) इतके स्वस्त व इतके लहान आकाराचे झाले आहेत की ते मुख्य साठवण आणि प्रत साठवण यासाठी उत्तम पर्याय झाले आहेत. WDचा उत्तम प्रतिचा १टीबी ड्राईव्ह रु३,७००/- आणि ४ टीबी ड्राईव्ह रु६,७४०/- फक्त मध्ये मिळतात. म्हणजे 'जी ड्राईव्हच्या एका वर्षाच्या भाड्यात' 'चारपट जास्त साठवणीची कायमची व्यवस्था' आणि शिवाय आंजा असो-नसो जिथे हवे तिथे वापरायची सोय, अशी डबल बेनेफिट स्कीम होईल ! :) मायक्रोसॉफ्टचा वन ड्राईव्ह तर फक्त ५जीबी मोफत देतो. मासिक/वार्षिक फी देऊन घेतलेल्या ऑफिस सूटबरोबर १टीबी मोफत आहे... मात्र, मुदत वाढवली नाही तर लिमिट ५जीबी होऊन डेटा गायब होऊ शकतो !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

WDचा उत्तम प्रतिचा १टीबी ड्राईव्ह रु३,७००/- आणि ४ टीबी ड्राईव्ह रु६,७४०/- फक्त मध्ये मिळतात. म्हणजे 'जी ड्राईव्हच्या एका वर्षाच्या भाड्यात' 'चारपट जास्त साठवणीची कायमची व्यवस्था' आणि शिवाय आंजा असो-नसो जिथे हवे तिथे वापरायची सोय, अशी डबल बेनेफिट स्कीम होईल ! :)
कितीही उत्तम प्रतीचा असला तरी एक्स्टर्नल ड्राईव्ह हा फक्त ट्रान्सफर साठी वापरावा, विशेषतः व्यावसायिकांनी. शक्य तितका जास्त डाटा क्लाऊडवर ठेवावा. मला सध्या ते सर्वाधिक सोयिस्कर व सुरक्षित डेटा स्टोरेज वाटतं. अर्थात डेटा लीक/हॅक असे प्रसंग कोणत्याही डेटाच्या बाबतीत होऊ शकतात. त्यातल्या त्यात युएसबी डेटा स्टोरेज हे सर्वाधिक बेभरवशाचे! हरवायची भीती, पोर्टेबल असल्याने शारिरीक नुकसानीची भीती, शेअरिंअमुळे डेटा करप्ट होण्याची भीती... अतिशोयक्ती उदाहरणः समजा कुठे फिरायला गेलो, आठ दिवस फिरून फोटो काढले (मोबाईल वा कॅमेरा) आणि मोबाईल/कॅमेरा हरवला/फॉर्मॅट झाला/एसडी कार्ड करप्ट झालं तर? मी जर वन्स इन लाइफटाईम असा कुठे गेलो (युरोप टूर वगैरे) तर रोज रात्री निवासस्थानी परतल्यावर फोटो लॅपटॉप वर कॉपी करून ड्राइव्हवर अपलोड करेन. म्हणजे डेटा कॅमेर्‍यात, लॅपटॉपवर आणि क्लाऊडवर असा तीन ठिकाणी असेल. व्यावसायिकांनी ज्यांचा सगळा व्यवसाय डेटावर आहे, त्यांनी आवर्जून नियमितपणे क्लाऊडवर डेटा बॅकअप नक्की घ्यावा. जगात सुरक्षित काहीच नसतं. मला वैयक्तिक गुगलड्राईव्हचा डेटा त्यातल्या त्यात सुरक्षित वाटतो.

In reply to by तुषार काळभोर

कोणतेच एक साधन १००% सुरक्षित असू शकत नाही. क्रिटिकल डेटासाठी एकापेक्षा जास्त स्वतंत्र साठवण साधने (Data redundancy) असणे जरूरीचे असते, नो रिस्क इज वर्थ टेकिंग, पिरियड. मी स्वतः माझा डेटा : (अ) दोन स्वतंत्र एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्हवर (१टिबी + २टीबी) 'पूर्ण डेटाची' प्रत्येकी एक अश्या दोन प्रती आहेत. साधारण आठवड्यातून एकदा व महत्वाचा डेटा निर्माण/जमा झाल्यास त्यावेळेस ताबडतोप अपडेट करतो. हे २५०जीबीचे एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्ह मिळु लागल्यापासून करत आहे. (आ) 'फक्त अतीमहत्वाचा (कारण एकूण डेटा २० जीबीपेक्षा जास्त आहे) डेटा, एक जादाची प्रत असावी यासाठी' विभागून जीड्राईव्ह (१५जीबी) + वन ड्राईव्ह (५ जीबी) यांच्यावर आहे. क्लाऊड ऑटोअपडेट होउ शकतात, पण डेटाच्या आकारमानावर लक्ष रहावे यासाठी स्वतः अपडेट करतो. (इ) लॅपटॉपवर 'पूर्ण डेटाची' एक प्रत आहे, ज्यामुळे 'सर्व डेटा' कामासाठी/संदर्भासाठी सतत उपलब्ध असतो. लॅपटॉपवर असल्याने नेट अथवा वीज गेली (जे हल्ली फार विरळा आहे) तरी तास दोन तास काम बंद पडत नाही. (ई) अपडेट होत जाणार्‍या फाईल्सची एक कॉपी लॅपटॉपला सतत लावलेल्या ३२जीबी फ्लॅश पिनवर सेव्ह करतो. १जीबी फ्लॅश पिन्स मिळायल्या लागल्यापासून ही प्रथा पाळतो आहे. त्यामुळे २०+ वर्षांत, (अ) एकदा लॅपटॉपची हार्ड डिस्क गचकली, पण फ्लॅश पिनवर शेवटच्या फाईल सेव्हपर्यंतचा डेटा वाचला होता. बाकी सगळा डेटा एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्हवर होताच. (आ) एकदा विंडोने संप पुकारला म्हणून सगळी हार्ड डिस्क फॉर्मॅट करावी लागली. असे एकदाच झाले, कारण त्या लॅपटॉपवर प्रि-ईंस्टॉल्ड विंडो आली होती आणि तिच्यात डेटासाठी वेगळे पार्टीशन नव्हते. मी नेहमी हार्ड डिस्कची दोन पार्टिशन्स करून विंडो 'सी'वर आणि डेटा 'डी'वर ठेवतो, म्हणजे विंडोने संप पुकारला तर फक्त 'सी' फॉर्मॅट करून विंडो रिइंस्टॉल करता येते व डेटाला धक्का लागत नाही. (इ) मायक्रोसॉफ्टने एकाएकी वन ड्राईव्हवरचे मोफत साठवणीचे आकारमान १५ वरून ५ जीबीवर आणले तेव्हाही वरच्या व्यवस्थेमुळे काळजी, गडबड, इ झाले नाही. (ई) एकदा दोनपैकी एका एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्हने डोळे मिटले, नवीन एक्सटर्नल फ्लॅश ड्राईव्ह आणून त्याच्यावर चांगल्या ड्राईव्हची कॉपी टाकली. (उ) पूर्वी छोट्या आकारमानाच्या फ्लॅश पिन्स बर्‍यापैकी बेभरवशाच्या होत्या. पण ती व्यवस्था केवळ अतिरिक्त काळजीस्तव असल्याने व लॅपटॉपवर शेवटच्या क्षणापर्यंतच्या अपडेटेड फाईल्स असल्याने, शून्य धोका झाला आहे. हल्लीच्या फ्लॅश पिन्समध्ये ही समस्या विरळ आहे. अर्थातच, क्रिटिकल डेटा नाहीसा झाला असे एकदाही झालेले नाही. थोडक्यात, परत एकदा, क्रिटिकल डेटासाठी एकापेक्षा जास्त स्वतंत्र साठवण साधने (Data redundancy) असणे जरूरीचे असते, नो रिस्क इज वर्थ टेकिंग, पिरियड. मोठ्या कंपन्यांत रिडंडन्सीची काळजी घ्यायला स्वतंत्र व्यवस्था असते. तेव्हा प्रत्येक कर्मचार्‍याने कामाच्या डेटासाठी स्वतंत्र काळजी घेण्याची गरज नसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

If it is at one place it is not backed up and highly vulnerable... तुमचा प्रतिसाद लै आवडलेला आहे. मी जेव्हा लॅपटॉपवर काही महत्वाचा डेटा येईल तो 1टीबी हार्डडिस्कवर बाहेर घेत राहतो. त्यामुळे तो किमान दोन ठिकाणी असतो. शिवाय मोबाईलचा डेटा ड्राईव्ह वर टाकत राहतो.

In reply to by तुषार काळभोर

१. क्लाऊडवरच्या डेटाची सोय लोकांना सवय लागेपर्यंत मोफत असेल. लोकांना तिची गरज अनिवार्य वाटू लागेल तेव्हा कंपन्या आपला फायदा काढून घेण्यासाठी तिच्यासाठी फी घेणारच. त्यात वाईट काहीच नाही. कारण, त्या धर्मदाय संस्था नाहीत, व्यापारी कंपन्या आहेत. गुगल आणि मायक्रोसॉफ्टने आधी साठवण मोफत देवून आता आकारमान कमी करून वरच्या आकारमानासाठी फी घ्यायला सुरुवात केली आहेच. त्यांना जेव्हा मोफत सेवा पूर्णपणे बंद करण्यात 'तोटा नाही' आणि / किंवा 'फायदा आहे' असे दिसून येईल तेव्हा संपूर्ण सेवेसाठी फी द्यायची तयारी ठेवायला हवी. २. मासिक/वार्षिक फी भरण्याची मुदत चुकली तर मोठ्या प्रमाणात क्लाऊडवर असलेला डेटा केव्हा डिलीट करायचा, हे केवळ त्या कंपनीच्या नियमांवर अवलंबून असेल. ३. क्लाऊडवरचा डेटा वीज व नेट असल्याशिवाय वापरायला मिळत नाही. ऑफिसबाहेर आणि विशेषतः फिरतीवर असताना, या दोन गोष्टी सर्वच ठिकाणी २४ X ७ मिळतील याची १००% खात्री देता येत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. 02/06/2018 - 20:04
इन्स्टॉल्ड ओएस असलेली स्टॅटिक हार्डडिस्क हा कितपत व्यवहार्य उपाय होऊ शकेल डेटा बॅकप आणि रेग्यिलर युज साठी? बरेचसे फोटोग्राफर (लग्न समारंभ करीझ्मा स्पेशालिस्ट)ती वापरतात असे ऐकले आहे.

In reply to by अभ्या..

१. हार्ड डिस्कवरची ओएस स्वतंत्र (सी) ड्राईव्हवर असावी व डेटा स्वतंत्र (डी) ड्राईव्हवर असावा. त्यामुळे ओएसमध्ये गडबड झाली तरी डेटाला धक्का न लावता सी ड्राईव्ह फॉर्मॅट करून ओएस रिइंन्स्टॉल करता येते. मात्र, हार्ड डिस्क फेल झाली तर डेटाची शाश्वती देता येत नाही. २. कितीही आधुनिक आणि कितीही सुरक्षित वाटत असलेला, कोणताही एकच पर्याय, १००% सुरक्षा देवू शकत नाही. हुमन्स फेल अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी, टू ! देअर आर नो एक्सेप्शन्स. :) म्हणूनच, (अ) अनेक ठिकाणी ठेवलेल्या, (आ) एकापेक्षा जास्त स्वतंत्र पर्यायांवर महत्वाच्या डेटाच्या प्रति असाव्यात. यालाच डेटा रिडंडसी म्हणतात. याचा परिणाम म्हणजे, कोणत्याही आपत्कालात डेटाची कोणती तरी एक किंवा जास्त प्रति सुरक्षित राहतात. यासाठी वापरलेल्या पर्यायांची संख्या डेटाच्या महत्वाच्या प्रमाणात वाढते. मात्र, विचारपूर्वक व्यवस्था केल्यास ती संख्या तीन-चारच्या वर सहसा जाऊ नये. कारण, त्यापेक्षा जास्त पर्याय वापरल्यास "फायदा-किंमत गुणोत्तर (बेनेफिट-कॉस्ट रेशो)" अवास्तव व अस्विकार्य बनते.

In reply to by अभ्या..

फुटूवाला 02/06/2018 - 23:56
मी वापरतो. अतिमहत्वाच्या डाटा ३.० पेनड्राईव्ह ला ठेवतो आणि त्यासाठीच्या बॉक्स मध्ये ठेऊन सरळ कपाटातच. कारण लग्नाचा data loss झाला तर लै अवघड. सॉलीड स्टेट ड्राईव्ह गेल्या सहा महिन्यांपूर्वी घेतलीय. फोटोशॉप दुप्पट स्पीडने चालतंय आता.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कंजूस 02/06/2018 - 18:06
१) माझ्या वाचनात ( बहुतेक क्वोरा) आले की गुगल पेड अकाउंट वरूनही दोन महिने हालचाल न केल्यास डेटा उडवतात. या लेखकाने आईफोन वापरायला सुरुवात केल्याने गुगलचा विसर पडला आणि दोन तीन वार्निंगा वाचल्या गेल्या नाहीत. २) माझ्याकडे असलेल्या एका विंडोज फोन 8.1 वरचे अॉफिस सूट चालूच आहे पण केविलवाणे आहे. अपडेट्स बंद झाल्यामुळे. २०१५ साली दिलेली १५जिबी काढून ५ केली . दुसय्रा एका विंडोजला लुमिया (540)विंडोज 10 अपग्रेड झाल्या ने दर मंगळवारी/ महिन्यात दोनदा एक्सेल/वर्ड अपडेट्स येतात आणि ते बहुतेक फिचर्स पिसीइतकेच फुल असावेत असे वाटते. या लुमिया फोनांंस फ्री बंडल्ड अॉफिस सूट मिळणार या आनंदाने च फोन घेतलेले. ३)मध्यंतरी ओफिस फ्री सोय काढून घेतली एमेसने ( सहा महिने). अॉफिस 365 सबस्क्राईब करा रु ५०००/वर्षाला सांगायले. परंतू answers./ support. ms dot com वर फार आरडाओरड झाली आणि अॉफिस सूट पुन्हा फ्री झाला मागच्या आठवड्यात. ## सांगण्याचा मुद्दा म्हणजे हे मायक्रोसॉफ्ट प्रकरण विंडोज 10 फोनमध्ये चालूच राहायला हवे स्पर्धा म्हणून अन्यथा गुगल गळा आवळेल कधीही. # कालचीच बातमी - माइक्रोसॉफ्टने मार्केट क्यापिट्लाइझेशनमध्ये गुगल अल्फाबेटला मागे टाकले. कसे ते माहित नाही. अझुअरला फार गिह्राइक आहे म्हणे. मुद्दे लेखाला धरून आहेत का माहिती नाही पण लिहिले माझे अनुभव.

In reply to by कंजूस

व्यापारी व्यवस्थेतील (ज्यात संगणक क्षेत्रही येतेच) काही मूलभूत नियम लक्षात ठेवले पाहिजेतच : १. सुरुवातीला काही काळ मोफत वस्तू/सेवा देणे हा विपणनाची (मार्केटिंग) एक रणनीति असते. त्याने गिर्‍हाईकाला आपल्या वस्तू/सेवेची ओळख व महत्व दाखवून देणे सोपे होते... आणि जमलेच तर चटकही लावता येते. २. देअर आर नो फ्री लंचेस इन धिस वर्ल्ड... अ‍ॅट लिस्ट नॉट फॉर लॉन्ग. ३. जेव्हा एखाद्या विक्रिची किंमत तुम्हाला देण्याची गरज नसते, तेव्हा प्रत्यक्षात, तुम्ही त्या विक्रितले वापरकर्ते/खरेदीदार नसून विक्रीची वस्तू असता.

In reply to by चौकटराजा

फ्रेंच आहे. ;) जगभरातील ९०००० कॉम्पुटर्सवर हे करायचं चालू आहे. त्याशिवाय शक्य तिथे संपूर्ण कॉम्पुटरऐवजी Thinclient (n-कॉम्पुटिंग)वापरणं, पेपर वर्क व वेळेचा अपव्यय टाळण्याआठी सर्व प्रकारचे अप्रुव्हल्स ऑनलाइन करणं, असे बरेच प्रकार चालू आहेत. आजच एक नवा ऑनलाइन फॉरमॅट सादर केला, एखादा कर्मचारी कंपनी सोडून जाताना कागद हातात घेऊन स्वतःच्या मॅनेजरकडे, मग HRकडे, फायनान्सकडे व आयटी कडे जायचा, क्लियरन्ससाठी. आजपासून हे काम ऑनलाइन.

In reply to by तुषार काळभोर

तुमचा एमडी व्यवहारवादी (ट्रान्झॅक्शनल) नसून परिवर्तनवादी (ट्रान्सफॉर्मेशनल) व्यवस्थापक दिसतो आहे... तो तुमच्या कंपनीची मूल्यवान मालमत्ता (व्हॅल्युएबल अ‍ॅसेट) आहे.

कंजूस 02/06/2018 - 08:49
संगणकासाठी आहे. कारण मोबाईलवर क्रोम डेटा फार खातो. यामुळेच नकाशात भारत युसी ब्राउजर वापरतो असं दिसतं. जिओ आल्यामुळे डेटा दोनशेपट स्वस्त झाल्याने चित्र बदलेल. अॉफिसची गोष्ट वेगळी आहे. बाकी लेख माहितीपूर्ण आहे.

In reply to by कंजूस

धन्यवाद ! पॉकेट आणि कीप अँड्रॉईड वर आहेत. मला तरी ते वापरताना समस्या येत नाही. विकिवांड मोबाईलवर वापरून पाहिली नाही कारण मोबाईलवर फार वाचन करत नाही, त्यासाठी लॅपटॉपच आवडतो. पण, विकिवांड लॅपटॉपवर वापरणे खूप छान अनुभव आहे.

खिलजि 02/06/2018 - 14:19
या वैचारिक मंथनाचा मला पुढे भविष्यात नक्कीच फायदा होईल असं वाटतंय . धन्यवाद म्हात्रे सर , हा लेख लिहिल्याबद्दल . सिद्धेश्वर विलास पाटणकर

कंजूस 02/06/2018 - 14:48
मॅासॅा ओफिस / गुगलच याचे पर्याय यात काय फरक आहे किंवा त्याचे वापर करणे /न करणे यात फायदे तोटे एका सामान्य वापरकर्त्यास कळत नाही आणि अडचण आल्याशिवाय शोधाशोध सुरू केली जात नाही. लेखात दिलेले फिचर तपाससले नाहीत कधी. जे लोक कामाच्या ठिकाणी जी काही सोय असेल ती वापरत असतील पण छोटे व्यावसायिक निरनिराळ्या सोयींचा वापर करतात. एक ओळखीचा मुंबईतला व्यापारी आहे तो सर्व काम ड्राइववरच करतो. मोबाइलमध्ये ओर्डरीच्या पिडिएफ घेणे,उत्तर देणे कुठुनही,जिएसटी वगैरे सर्व. मिपावर Excel धडे आलेले. आता Excel फक्त विंडोजवर नसून android appसुद्धा आहे. लॅागिन सिंक केले की कुठल्याही डिवाइसात मिळते. * मुख्य प्रश्न असा की विंडोजवर गुगलचे प्रॅाडक्टस स्टार्ट होत नाहीत. कारण काय तर म्हणे Android मध्ये windows 10 इतकी security नाही. खरे खोटे माहित नाही. पुर्वी क्रोम अॅप विंडोज १० स्टोर वर आले होते ते MISOFT ने ताबडतोब उडवले. ( मोबाइल,S वर्शनमध्ये देत नाहीत.) #- मिपावर जर पिडिएफ लिंक द्यायची झाली तर गुगल डॅाक/ड्राइवची लिंक देता येते का?

In reply to by कंजूस

सुमो 04/09/2018 - 17:46
आपण पीडीएफ फाईल शेअर केल्या नंतर साधारणत: https://drive.google.com/file/d/[1D5fj-t5vRcHuLhgA9XY3iV8uKQP6rNIU]/view?usp=drivesdk अशी लिंक मिळते. [मूळ लिंक मध्ये कंस नसतो तो मी टाकला आहे] त्यावर क्लिक केल्यानंतर हे पान उघडते आणि त्यावरील डाऊनलोड बटन वापरून फाईल डाऊनलोड करता येते. Screenshot_2018_09_04_15_54_39_182_com_cloudmosa_puffin_Free पण जर आपल्याला वरील पान न उघडता फक्त डाऊनलोड लिंक द्यायची असेल तर लिंक मध्ये थोडासा फेरफार करून डायरेक्ट डाऊनलोड करण्यासाठी लिंक अशी द्यायची. मूळ लिंक मधील file/d/ काढून त्याठिकाणी uc? export=download&id= टाकायचे. आणि शेवटचे /view?usp=drivesdk काढायचे. मग ती लिंक अशी दिसेल. https://drive.google.com/uc?export=download&id=1D5fj-t5vRcHuLhgA9XY3iV8uKQP6rNIU ह्या लिंकवर क्लिकल्यास थेट पीडीएफ फाईलची डाऊनलोड लिंक उघडेल. ड्राईव्ह पीडीएफ

मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट हे सर्वात चांगले अ‍ॅप्लीकेशन आहे. . . . . . . . . गुगल क्रोम आणि फाफॉ डाऊनलोड करण्यासाठी. ओपन सोर्स चळवळीचा चाहता असल्याने फायरफॉक्सचा चाहता आहे. मेलसाठी त्यांचेच थंडरबर्ड वापरतो. ऑनलाईन वृत्तपत्रे वाचणे, मिसळपाव वाचणे, युट्युब आणि इतर जनरल सर्फींग साठी फाफॉ वापरतो. बँकींग अप्लीकेशन्स साठी फक्त क्रोम वापरतो. बाकी लेख उत्तम !

चौकटराजा 03/06/2018 - 06:47
कोणताही एक जिव्हाळ्याचा विषय घेऊन त्याच्या सम्बन्धी अनेकांकडून माहिती घेउन त्याचे काहीसे विस्कळीत का होईना पण तपशिलीकरण करणे ही संकल्पनाचा फार मोलाची आहे . त्या बद्दल श्री म्हात्रे यांचे किती आभार मानावेत ? असा " ऑन लाईन सापळे" ( लॉटरी , खरेदी, फुकट डाउनलोड ई ) असा विषय ही घेता येईल.

In reply to by चौकटराजा

असा " ऑन लाईन सापळे" ( लॉटरी , खरेदी, फुकट डाउनलोड ई ) असा विषय ही घेता येईल. उत्तम कल्पना आहे. तुम्हीच पुढाकार घेऊन धागा/धागे टाका.

शशिकांत ओक 04/06/2018 - 14:30
आंतरजालावरील विश्वातील घडामोडी, नवनव्या संकल्पना, वापरणाऱ्यांच्या सोई व पंचाईती, असे सोप्या भाषेत समजावून सांगितले जाते आहे याचे समाधान वाटते...

चौकटराजा 05/06/2018 - 09:01
संगणक खरेदी करताना अनेक वेळा विक्रेता आपली सोय पहातो व चुकीची माहिती देऊन नको ते कॉन्फिगरेशन गळ्यात मारतो . यासाठी साक्षरता अनेक वेळा अनेकात नसते . बाप मुलाला ४० हजाराचा ८ व्या जनरेशन वाला पी सी केवळ तू नळी व एक्सेल साठी आणून देतो . यासाठी निरनिराळ्या लोकांनी हार्ड वेअर व उपयोजिता यांचा परस्पर संबंध हा विषय घेउन धागा काढला तर बरे होईल . अर्थात यावर तू नळी वर उपयुक्त असा माल बराच उपलब्ध आहे .

चहाबिस्कीट 05/06/2018 - 09:17
क्रोम मध्ये फॉर्म ऑटोसेव्ह करणारे Lazarus Form Recovery नावाचे एक्सटेंशन होते. फार उपयोगाचे होते ते, फॉर्म भरात असताना पेज रिफ्रेश झाले तरी जुना डेटा सेव्ह राहायचा. पण आता हे एक्स्टेंशन वेबस्टोअर वर नाही. कोणाला दुसरे चांगले Form Recovery एक्सटेंशन माहित आहे का?

मदनबाण 05/06/2018 - 21:30
मी फाफॉ आणि क्रोम बरोबरच ऑपेरा आणि एपिक ब्राउजर्र्स सुद्धा वापरतो... दोन्ही मध्ये बिल्टइन व्हीपीएन असणे हे ही ब्राउजर्स वापरण्या मागे मुख्य कारण आहे. Opera Browser Epic Browser याच बरोबर टॉर ब्राउजर देखील वापरले आहे, पण ते कमालीचे स्लो असल्याने काढुन टाकले. बाकी ब्राउजर एक्सटेन्शन्स बद्धल मी माझ्याकडुन अनेक वेगवेगळे एक्सटेन्शन्स दिलेले आहेत :- ब्राउजर एक्स्टेंशन्स

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नशा ये प्यार का नशा है ये मेरी बात यारों मानों नशे में यार डूब जाओ रहो ना होश में दीवानों... :- Mann

योगी९०० 06/06/2018 - 08:21
माहितीपूर्ण लेख! फक्त ते कोठला ब्राऊझर कोठल्या देशात वापरला जातो त्याचा ग्राफ पटला नाही. भारतात युसी ब्राऊझर?? आणि चीन मध्ये क्रोम? चीन मध्ये गुगलच्या प्रॉडक्टसवर सरसक्ट बंदी आहे.

In reply to by तुषार काळभोर

लेखातील उणीव दाखवून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद, पैलवानसाहेब ! तो नकाशा आणि विकीवरचा नकाशा दोन्ही योग्य वस्तूस्थिती दाखवत नाहीत. त्यामानाने, gizmodo.com वरचा नकाशा जास्त योग्य वाटत आहे. त्यामुळे, लेखातल्या नकाशात तसा बदल केला आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाय द वे, इथं दिसणारा डेटा बऱ्यापैकी खात्रीशीर वाटतोय. काही आकडे: १. जगभरात क्रोम 58% , सफारी 14% व युसी 8% २. भारतात क्रोम 49%, युसी 33%, ऑपेरा 6% २.१ भारतात डेस्कटॉपवर क्रोम 73%, फाफॉ 12%, युसी 8%(डेस्कटॉपवर!!) आणि IE फक्त 1.63% २.२ भारतात मोबाईलवर क्रोम 43%, यूसी 40%, ऑपेरा 8% ३. चीनमध्ये क्रोम 50%, युसी 15%, सफारी 12% काही निरीक्षणं: १. युसी ब्राऊजर जो चिनी कंपनी अलिबाबाच्या मालकीचा आहे, तो भारतात 40% व चीनमध्ये 15% वापरला जातो. २. जगात सफारी 14% व चीनमध्ये 12% वापरला जातो, जे अर्थातच प्रामुख्याने iphoneमुळे आहे. मॅकचं प्रमाण नगण्य आहे. भारतात सफारी 2% वापरला जातो. iphone चं हे प्रमाण जनरल आर्थिक संपन्नतेचे लक्षण मानता येईल का? ३. क्रोम चीनमध्ये भारतापेक्षा जास्त वापरला जातो. (चीनमध्ये गुगल चालत नाही, पण त्यांचा ब्राऊजर चालतो.) ४. भारतात डेस्कटॉपवरसुद्धा 8% युसी ब्राऊजर वापरला जातो!

शाली 07/06/2018 - 13:35
माहितीपुर्ण लेख. मला सफारी उत्तम वाटते. ऑफीस पेक्षा पेजेस, नंबर्स जास्त जास्त छान वाटतात वापरायला. आणि डाटा स्टोअर करायला (जो फारसा नसतो) iCloud व G-Drive (गुगल ड्राईव्ह नाही) वापरतो. गेल्या काही वर्षात एकदाही त्रास नाही.

जीमेलची नवीन आवृत्ती

मी हा धागा इथे टाकला हे गुगलला कसे समजले कळत नाही. पण तो लेख वाचून गुगलचे धाबे दणालले असे दिसते ! अन्यथा, इथे सांगितलेल्या अ‍ॅप्स आणि एस्कटेन्शन्समध्ये असलेल्या अनेक उपयोगी सोयी असलेली एक नवीन आवृत्ती (व्हर्शन), गुगलने काल-परवाच घाईघाईने का बरे प्रसिद्ध केली असती ?! =)) =)) =)) ;) असो. नव्या आवृत्तीत असलेल्या काही उपयोगी सोयी अश्या... १. Organize emails from your inbox: संदेशावर पॉइंटर नेला की लगेच; Archive, Delete, Mark as unread Unread / Read आणि Snooze हे पर्याय दिसू लागतात. त्यांच्यावरच्या एकाच टिचकीने जागेवरच हवे ते काम साधता येते. २. Smart Reply उर्फ Use suggested replies & follow-ups: याने निवडलेल्या संदेशातील मजकूर ध्यानात घेऊन त्याला साजेशे उत्तर जीमेल तयार करते. ते तसेच अथवा हवे ते बदल करून पुढे पाठवता येतात. ३. Expand or shrink your inbox : "सेटिंग्ज --> डिस्प्ले डेन्सिटी" वापरून इनबॉक्समध्ये दिसणार्‍या संदेशांची मांडणी बदलता येते. ४. Show or hide the menu : खिडकिच्या डाव्या बाजूच्या, स्क्रिनची जागा खाणार्‍या, मेन्युची जाडी कमी/जास्त करता येते. ५. View Calendar, Tasks, Keep & Add-ons : खिडकीच्या उजव्या बाजूवरील नव्या उभ्या टूलबारमध्ये नेहमीच्या वापरातल्या उपप्रणाल्या ठेवून त्यांना एका टिचकीने सहजपणे वापरता येते. ६. Send emails & attachments confidentially : संदेशांना (अ) मुदतीची तारीख (expiration date), (आ) परवलीचा शब्द (passcode) आणि (इ) Prevent forwarding, downloading, copying, व pasting; इत्यादी अटी लावून पाठवता येतात. ७. Themes : या आधीपासून असणार्‍या सोयीत जास्त पर्याय दिलेले आहेत. वरच्या मूळ सचित्र माहितीचा स्त्रोत इथे दिसेल.

फार उपयुक्त धागा आहे, मी माझ्या परीने भर घालतो. मी वापरलेली सर्व एक्स्टेन्शन आठवतील तशी इथे टाकत राहीन. १. Gorgias- वारंवार लागणाऱ्या Email template पुनःपुन्हा टाइप करायला लागू नयेत म्हणून हे अत्यंत उपयुक्त आहे. उदा. rs असं लिहून Tab दाबलं कि त्वरित Respected sir अशी अक्षरे इमेल मध्ये येतील. PFA असं लिहिल्यावर Please find attachment असं येईल. हे फक्त जीमेल साठी वापरता येईल. Outlook version असेल तर मला कल्पना नाही. २. Auto BCC- मला मी केलेल्या प्रत्येक इमेल मध्ये माझ्या manager ला cc मध्ये ठेवावं लागतं. हे extension, cc आणि bcc मध्ये जो नियम लावला आहे त्याप्रमाणे स्वत:हून add करून टाकेल. एकापेक्षा अनेक इमेल वरून Login असाल तरी घोळ होत नाही कारण आपण नियमचं तसा सेट केलेला आहे की ह्या इमेल वरून मेल गेला तर हा व्यक्ती cc मध्ये आणि त्या इमेल वरून गेला तर तो व्यक्ती cc मध्ये. ३. Adblock Plus- बऱ्याच जणांना माहीत असेल. सर्व ठिकाणच्या सर्व जाहिराती बंद करण्यासाठी उत्तम extension . युट्युब वरील सर्व जाहिराती सुद्धा बंद होतात. ४. Ghostery- सर्व वेबसाईट वर अनेक tracker असतात जे सतत आपल्या क्लिक करण्याकडे डोळे लावून असतात आणि आपल्या त्या अनुशंगाने जाहिराती पाठवतात. ह्या extension मुळेहे सर्व बंद होऊन जाईल. तुमची माहिती, तुम्ही वापरलेलं इंटरनेट व इतर माहिती कुणाकडे जाणार नाही. हे आणि adblock मी कायम वापरतो. ५. Todoist- आपल्या जीमेल ने लॉगीन करा. फोन वर पण हे app टाका. मग ह्यात तुम्ही लिहून ठेवलेली सर्व कामांची तुम्हाला त्या त्या दिवशी सकाळी आठवण करून दिली जाईल. तसेच कामे प्राधान्य क्रमाने पण लिहून ठेवता येतात. ६. Hola VPN- काही दुष्ट लोक, महत्वाच्या वेबसाईट ब्लॉक करून ठेवतात, तेव्हा, आपली एक वेगळीच लोकेशन सेट करून हव्या त्या वेब साईट उघडण्यासाठी उत्तम extension. तसेच भारतासाठी न बनलेली वेबसाईट उघडायची असेल तरी ह्याचा उपयोग करून आपली सध्याची जागा virtually बदलून त्या देशातली दर्शवू शकता. (ही माहिती आहे फक्त. वापरकर्त्यांनी आपल्या विवेकाने उपयोग करावा.) ७. Video Downloader Pro- अनेक साईट्सवर डाउनलोड होऊ न शकणारे पण प्ले होणारे जे व्हिडीओ असतात ते डाउनलोड करून घेण्यासाठी एक उत्तम पर्याय. ८. Session Buddy- अनेकदा असं होतं कि आपल्याल laptop बंद करायचा असतो पण अनेक tab उघड्या असतात, किंवा त्या नंतर लागणार असतात. अशा वेळी सेशन बडी वापरून सध्या उघड्या असलेल्या सर्व tab सेव्ह करून ठेवता येतील. नंतर फक्त त्या सेशन वर क्लिक केलं कि हव्या असलेल्या सर्व tab क्षणार्धात उघडतील. (हे एक्सटेंशन ऑफलाईन काम करणार नाही.)

charming atheist 25/06/2018 - 12:26
Tapatalk नावाचे ॲप आहे त्यावरुन १ लाखापेक्षा जास्त फोरम्स ॲक्सेस करता येतात.मिपा त्यात आहे की नाही ठाऊक नाही.पण अनेक मोठे फोरम्स ॲक्सेस करायला ते एक चांगके ॲप आहे.

भुमन्यु 25/06/2018 - 19:34
show Highlights: गुगल मध्ये सर्च केलेले शब्द अधोरेखित करण्यासाठी Kindle Cloud reader: किंडल वर सेव्ह केलेली पुस्तके लॅपटॉप वर वाचण्यासाठी Amazon assistant: एखादी गोष्ट गुगल वर सर्च केली आणि ती वस्तू जर अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असेल तर, तुम्हाला अअ‍ॅमेझॉनचा लिंक बार येतो Multi highlighter

Jayant Naik 24/07/2018 - 10:38
इतक्या वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्ही प्रकाश टाकला आहे कि ...याचा आवाका पाहून दचकायलाच झाले. कसे काय जमवता हे सर्व ?
लेखनविषय:
आजच्या जीवनावश्यक गोष्टींची यादी केली तर त्यात आंतरजालाची निवड नक्कीच होईल, असे म्हणतात. यातला विनोदाचा भाग सोडला तरी आंतरजालाने आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान बनवले आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना आपल्याला सहन होणार नाही, यात संशय नाही. खानपानच्या वेळांमध्ये तीन-चार तासांचा अवधी आपण सहजपणे पेलतो पण "तेवढा सलग वेळ डेस्कटॉप-लॅपटॉप-टॅब-मोबाईल इत्यादीमध्ये तोंड न खुपसता घालवल्याला किती दिवस झाले? " या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी देता येणार नाही, नाही का?!

माझे नेहरवायण १

माहितगार ·

In reply to by सुहासवन

माहितगार 27/05/2018 - 09:23
सरमिसळ नाही, लेखन एका बैठकीत न झाल्याने लेखन जरासे पुढे मागे झाले होते, ते आता जरासे पुर्नरचीत केले आहे. मन मोकळ्या प्रतिसादासाठी आभार.

मदनबाण 27/05/2018 - 09:49
दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हंटले कि मला मालिका आठवते... आणि त्याचे गाणे देखील ! राजकारण आणि अर्थशात्र म्हंटले या मालिके बरोबरच चाणाक्य या मालिकेचा देखील प्रभाव माझ्यावर अजुनही जाणवतो ! चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा आवाज आजही ऐकावा वाटतो आणि मालिकांचा "दर्जा" कसा असावा याचा बेंचमार्क या मालिका असाव्यात असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही ! अशीच अजुन एक मालिका उपनिषद गंगा आहे आणि तिचा ही प्रभाव माझ्यावर झालेला आहे. बाकी घराणेशाही म्हंटली तर राजकारण आणि बॉलिवूड मध्ये ती पाय रोवुन उभी असलेली आपल्याला स्पष्ट दिसते ! या दोन्हींमध्ये दांभिकता देखील तितकीच उठुन दिसते. इतर येणारे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू

In reply to by मदनबाण

माहितगार 27/05/2018 - 10:25
...बाकी घराणेशाही म्हंटली तर राजकारण आणि बॉलिवूड मध्ये ती पाय रोवुन उभी असलेली आपल्याला स्पष्ट दिसते ! या दोन्हींमध्ये दांभिकता देखील तितकीच उठुन दिसते.
खासगी क्षेत्रात ही समान संधीचे महत्व असते पण मालकाने मुलाला दिलेली संधी तेवढी खुपत नाही कारण जे काही नफा नुकसान आहे ती व्यावसायिकाची एका अर्थाने निजी बाब असते. राजकारणातली घराणेशाही अधिक खुपते कारण - सर्वसामान्य जनतेच्या नेतृत्वाच्या संधी आणि स्वप्ने हिरावली जाण्याचा इथे धोका मोठा असतो- राजकारणातली घराणेशाही लागे-बांधे आणि हितसंबंधांच्या संरक्षणावर जगावयास लागलेली असते. असे वाटते.

In reply to by मदनबाण

माहितगार 27/05/2018 - 10:36
दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया दुरचित्रवाणि मालिकेचे सर्व भाग कोणत्या दुव्यावर बघण्यास उपलब्ध असल्यास दुवा अवश्य द्यावा. (मी स्वतः काही भाग पाहीले आहेत.) काय आहे ईंदिरा गांधी घराणे सत्ते पासून दूर जाईल तेव्हाच त्यांना आपण नेहरु तत्वज्ञानाला आणि काँग्रेसच्या मूळात अभिप्रेत वैचारीक बैठकीला आपण घराणेशाही आणि नेहरुंच्या पुस्तकांवरच्या कॉपीराईट मध्ये बांधून संपवले आहे हे लक्षात येईल, तो पर्यंत नाही असे वाटते. महत्व म. गांधी आणि नेहरुंच्या कालसुसंगत तेवढ्या विचारांना असावयास हवे घराण्यास नाही पण नेमके उलटे घडणे ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे. एक वेळ परंपरावाद्यांनी सरंजामदार आणि उमरावांची बाजू घेतली असती तर समजण्यासारखे होते पण इथे नेमके उलटे घडताना दिसते आहे, परंपरावादी स्वतः ला सरंजामशाही पासून दूर नेण्याचे किमान काही प्रयत्न करताना दिसताहेत तर ज्यांनी सरंजामशाही विरोधी असावयास हवे त्यांचेच पाय कर्णाच्या रथाच्या चक्रासारखे घराणेशाहीत घट्ट रोवले जाताना दिसताहेत याचा शेवट काय असेल हे ओळखण्यास भविष्यवेत्त्याची आवश्यकता नसावी

In reply to by मदनबाण

माहितगार 27/05/2018 - 10:40
२००६ नंतर ज्ञानकोशीय कामात व्यस्त होण्याने टिव्ही पहाणे कमी झाले त्याच काळात हि उपनिषद गंगा हि सिरीयल येऊन गेली असावी . मला कल्पना असती तर नक्किच बघितली असती आणि स्वड झाल्यास युट्ञूबवर नक्कीच बघेन.

In reply to by माहितगार

मदनबाण 27/05/2018 - 16:52
दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया दुरचित्रवाणि मालिकेचे सर्व भाग कोणत्या दुव्यावर बघण्यास उपलब्ध असल्यास दुवा अवश्य द्यावा. https://www.youtube.com/user/PublicResourceOrg/videos किंवा इथुन सर्व भाग पाहता येतील. :- https://www.youtube.com/watch?v=lwbo5xjBD90&list=PL-k_liNMvNQAT5G52uCfWFXgOgU-2lBF2 प्रजेचे सुख तेच राजाचे सुख हे ज्या देशातील राज्यकर्त्यांना समजते आणि त्या दॄष्टीने जिथे पाउले उचलली जातात तिथे खर्‍या अर्थाने ज्ञान, व्यापार,कला यांचे स्थान प्रबळ होतेआणि तेथील नागरिकांचे जीवनमान सुखी आणि संपंन्न होते. आपल्या देशातील राजकारणी नेमकी हेच गोष्ट करण्याची टाळत आले आहेत आणि स्वतःची आणि स्वसंबंधीतांचे हित सांभाळत आले आहेत. प्रत्येक गोष्टीत "राजकारण" करण्याच्या प्रवॄत्तीमुळेच देशाची अवस्था आज अशी आहे.या राजकारण्यांच्या राष्ट्र / राज्य यांच्या प्रति असलेल्या कर्त्व्याचे मोजमापन करणारी कुठलीच व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. स्वतःचाच पगार स्वतःच वाढवुन घेण्याच्या "माजावर" ही पोहचली आहेत तर इतर सोयी सुविधांचा अपहार किती होत असावा याची कल्पना न केलेलीच बरी ! असो... २००६ नंतर ज्ञानकोशीय कामात व्यस्त होण्याने टिव्ही पहाणे कमी झाले त्याच काळात हि अपनिषद गंगा हि सिरीयल येऊन गेली असावी . मला कल्पना असती तर नक्किच बघितली असती आणि स्वड झाल्यास युट्ञूबवर नक्कीच बघेन. मी स्वतः सगळे भाग पाहिलेले नाहीत पण जशी सवड मिळेल तसे भाग पाहत असतो... राजकारण आणि चाण्यक्य यांचा आधी वर उल्लेख केल्यामुळेच खाली एक भाग देतो... सगळे भाग एकाच चॅनलखाली मला अजुन दिसले नाहीत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू

कंजूस 27/05/2018 - 10:45
महाभारतातही कर्ण,अर्जुन ज्या देवांचे अवतार आहेत ते रदबदली/याचना करायला येतात आपापल्या मुलांसाठी (!) नेहरुंवर ( अथवा इतर शक्तिमान नेते) टीका करायची झाली तर अमचे तेवढे वाचन नाही. हे सर्व नेते त्यांची धोरणे रेटत असतात आणि अशां लोकांने चमचे होऊन बय्राच गोष्टी मिळवणाय्रा लोकांचे कोंडाळे अवतीभवती असते. खरं म्हणजे देशातल्या जनतेचा पैसा वापरून उठसूठ सर्व मुख्य पुल,विमानतळ,रस्ते,बंदरे यांना यांच्या घराण्यातील लोकांनी नावे देण्याचा सपाटा लावलेला दिसतो. मी पंतप्रधान झालो तर प्रथम ही सर्व नावेच काढून टाकेन.

In reply to by कंजूस

माहितगार 27/05/2018 - 11:21
महाभारतातही कर्ण,अर्जुन ज्या देवांचे अवतार आहेत ते रदबदली/याचना करायला येतात आपापल्या मुलांसाठी (!)

Jayant Naik 27/05/2018 - 11:55
तुमचे मनापासून कौतुक . खरे तर भारत वर्षामध्ये घराणे शाही पूर्वापासून आहे. रामाचा वंश कुठून सुरु झाला आणि तो कुठ पर्यंत होता याची एक १०० पिढ्यांची यादी काही दिवसापूर्वी वाचनात आली . या ईश्वाकू वंशात अतिशय पराक्रमी राजे झाले. जैन धर्मातील निमी नावाचे तीर्थांकर याच वंशाचे. तसेच गुप्त वंशात हि झाले. हे जेव्हा राज्य करत होते तेव्हाच्या काळास सुवर्णकाळ असे म्हणत . चंद्रगुप्त ... समुद्रगुप्त ,विष्णू गुप्त वगैरे . या राज घराण्यात सुद्धा नालायक राजे होते. पण आपल्या ऋषी मुनींची अशी धारणा होती कि अश्या राज घराण्यात काही गुण हे वंश परंपरा येतात आणि राज्य करण्यासाठी जे आवश्यक गुण असतात ते अश्या घराण्यातील मुलात उपजत असतात आणि योग्य म्हणजे राजा किवा राज्यकर्ते होण्यास जे शिक्षण आवश्यक असते ते देऊन या गुणांचा उत्कर्ष करता येतो . भारताच्या मानसिकतेत हे इतके बिंबले आहे कि लोकशाहीत सुद्धा आता शहराशहरात असे राजे निर्माण होत आहेत. तर मुद्दा हा कि घराणेशाही हि इतक्या सहजासहजी अजिबात जाणार नाही . कपूर घराण्यातील मुले त्यांच्या अंगभूत गुणामुळे आणि योग्य संधी मिळाल्यामुळे पुढे आली. ज्यांच्यात हे गुण नव्हते ते आपोआप मागे पडले. शशी कपूर च्या पुढच्या पिढीचे फारसे नाव झाले नाही जेवढे राज कपूरच्या पुढच्या पिढीचे झाले. मला वाटते कि लोकशाहीत फक्त निवडून आले म्हणून त्यांची योग्यता न पाहता आपला देश चालवायला देणे या सारखा दुसरा मूर्ख पणा नाही ,म्हणून या घराणेशाही मुळे देश चालवायला योग्य असे काही नेते आपल्याला मिळालेत का ? लोकशाहीमुळे तरी मिळालेत का ? याचा खरा शोध घ्यावा. मला वाटते कि लोकशाही काय किवा राजेशाही काय या पद्धती मुळे देशाचा उत्कर्ष होतोय का हा खरा प्रश्न आहे. तसे नसेल तर त्या दोन्ही पध्दतीत काही आमुलाग्र बदल घडवायला हवा. बाकी आपल्या सारख्या देशात जिथे बहुतांश लोक हे जाती कडे पाहून मते देतात किवा काही रूपयासाठी आपले मत विकतात किवा मत देतच नाहीत अश्या देशात लोकशाही कितपत योग्य आहे या बद्दल माझ्या मनात शंका आहे. . माझे असे मत आहे कि आपल्या देशात लोकशाही फक्त नावाला आहे ...इथे घराणेशाहीच वेगळे नाव घेऊन वावरते आहे. आपल्या या विचारमंथनातून कृती करण्यास योग्य मुद्दे बाहेर येतील या बद्दल माझ्या मनात शंका नाही . आपल्या पुढील लेखनाला खूप शुभेच्छा. प्रतीक्षेत आहे.

In reply to by Jayant Naik

विजुभाऊ 28/05/2018 - 12:49
या ईश्वाकू वंशात अतिशय पराक्रमी राजे झाले.
हे वाक्य " कपूर" घराण्यात अनेक नामवंत अभिनेते झाले. असेही वाचता येईल खरेतर ते पराक्रमी असतील पण केवळ राजघराण्यात जन्माला आले म्हणून त्याना पराक्रम गाजवण्यासाठीचे शिक्षण आणि संधी मिळाली. सिनेमात ही संधी घराण्यामुळे आणि त्या वातावरणात राहिल्यामुळे मिळते. सिनेमात ज्याला सिनेमाचे कसलेच वलय नाही त्याला स्वतःला सिद्ध करायची संधी मिळणे हेच जवळजवळ अशक्यप्राय असते.

कपिलमुनी 27/05/2018 - 12:12
सध्या सगळ्या पक्षात घराणेशाही आहे. पूर्वी जनता घराणेशाही सहज स्वीकारत असे. आता मात्र तशी परिस्थिती राहीलि नाही. लोक जोवर घराणेशाहीने झालेल नेत्याला मत देत राहतील तोवर हे चालू राहणार . आपल्याकडे आई वडिलांनी पोराचा भले करायचा असते ही कॉमन समजूत आहे. प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.

In reply to by कपिलमुनी

माहितगार 27/05/2018 - 14:21
...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.
नक्कीच चांगला एक्सक्युज आहे :) पण मग असे राकारणात करण्यास सरंजामशाही किंवा राजेशाहीच म्हणावे, लोकशाही जनतेचे राज्य म्हणण्याचे ढोंग रचून जनतेची फसवणूक करु नये. अश्या पद्धतीचे समर्थन एकवेळ व्यवसायाधारीत जन्माधारीत जातीयतेचे समर्थन करणर्‍यांनी केले तर समजण्यासारखे आहे. मी / आम्ही क्षत्रीय परीवारातील आहोत आणि आमचीच मुले राज्यकर्ती राहतील कारण ती जन्माने क्षत्रीय आहेत हेच वाक्य मी / आम्ही राजकीय परीवारातील आहोत आणि आमचीच मुले राज्यकर्ती राहतील कारण आम्ही जन्माने राजकीय परिवारातील आहोत . पण असे समर्थन तथाकथीत पुरोगामी प्रगतीशील लोकशाहीवादी करत असतील तर तो विरोधाभास ठरणार नाही का ?

In reply to by कपिलमुनी

माहितगार 27/05/2018 - 15:40
...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.
सकाळाचे मंगल हे लोकशाहीचे उद्दिष्ट असेल तर याचे परीक्षण ज्ञानदेवांच्या पसायदाना सोबत करणे वावगे नसावे . पसायदानाच्या अनुषंगाने र काही मुद्दे अधोरेखित करता येतात का ते पाहूया . ज्ञानदेव जो जे वांछील तो ते लाहो , स्व धर्म सूर्ये पाहो म्हणतात खरे पण त्या आधी खळांची व्यंकटी सांडलेली असण्याचा आग्रह धरतात . आणि जन्माधारित जातीयवाद जुना असो वा नवा ती खल प्रवृत्ती नव्हे काय ? चंद्र लांच्छनहीन असावा अशी अपेक्षा करतात पण इतरांच्या समान संधी डावलून केवळ स्वतः:साचा मुले आणि स्वतः:चेच कुटुंबीय पुढे करणे लांछनीय नाही का ? केवळ आपलेच अपत्य आणि आप्त यांचे मंगल = सकाळाचे मंगल असा अर्थ काढणे विपर्यस्त ठरत नाही का ?
लोक जोवर घराणेशाहीने झालेल नेत्याला मत देत राहतील तोवर हे चालू राहणार .
लोक परकीय सत्तेस ‘जु’मानत होते तो पर्यंतच परकीय सत्ता होती , पण नेहरूंनीच अन्याय कारक ‘ जु ‘ ना मानण्याचे आवाहनास जनतेने प्रतिसाद दिला . देश इथे प्रत्येकाचा आहे कि काही मोजक्या राज परिवारांचे राखीव कुरण आहे ? एक सुज्ञ सजग नागरीक म्हणून लोकशाहीची थट्टा ना स्विकारता प्रत्येक सुज्ञ सजग नागरीकाने घराणेशाहीस नकार दिला तर घराणे शाहीचा ‘ जु ‘ सहज झुगारता येऊ शकेल. स्वतः:च्या अधिकारासाठी हातात गीता घेऊन प्रयत्न करण्याचे महात्मा गांधी आवाहन करत होते तेव्हा भारतात केवळ १२ टक्के लोक साक्षर होते पण त्यांच्यासाठी त्यांचे राज्य असेल या अपेक्षेने आजच्याच जनतेच्या मागच्या शतकातील पूर्वज स्वातंत्र्य आंदोलनात उतरले . त्यांच्या त्यागाने नव्या पिढ्यानी साक्षरता शिक्षण घेतले तरी घराणेशाहीचे ‘जू आपापापल्या मानेवरून फेकण्याचे धारिष्ट्य होता नाही ! “...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.” या आणि अशा अनेक एक्स्क्यूजेसना स्वीकारून माना खाली घालून दशको न दशके आपण सर्व पुढे जात आहोत ? वाढलेल्या साक्षरता शिक्षण आणि जागरूकतेने घराणेशाहीचा आजार नाकारण्याचा विवेक अद्याप का तयार होत नाही ? हा अनाकलनीय प्रश्न का असावा ?

तिमा 27/05/2018 - 15:30
काही वर्षांपूर्वी मी एका ओळखीच्या पत्रकाराशी , भारतीय राजकारणातली घराणेशाही, यावर चर्चा केली होती. त्याच्याकडून जी , मला कल्पना नसलेली माहिती समोर आली, ती लिहितो. ती बरोबर आहे का नाही, हे वाचकांनी ठरवावे. राजकारणातल्या घराणेशाहीला मूळ कारण आहे भ्रष्टाचाराचे. एखाद्या नेत्याने त्याच्या हयातीत, स्वतःसाठी आणि पक्षाच्या नांवाने, अमाप पैसा कमावलेला असतो. तो मेल्यावर, किंवा काही कारणाने पदावरुन बाजूला झाल्याने, पक्षाला त्या पैशाची गरज असते. म्हणून पक्षही, त्यांच्या सोईसाठी त्याच्या वारसाला गादीवर बसवतो. शिवाय, तो मेल्यानंतर जो इमोशनल गेन असतो, त्याचाही निवडणुकीत फायदा उठवायचा असतोच. भारतीय जनतेचीही मानसिकता, घराणेशाहीला अनुकूल असल्याने, हा लोकशाहीवरचा अत्याचार आहे, हे त्यांना कळतच नाही. ज्यांना कळते, ते मूठभर असतात. एखाद्या परिवाराची अशी सत्ता, अनेक पिढ्या चाललेली असेल, तर आत्ताच्या पिढीपर्यंत, त्यांचे 'संचित पुण्य' फारच वाढलेले असते. त्यामुळे अशा 'पुण्यवान' परिवाराला विरोध करुन, पायावर धोडा पाडून घेण्यापेक्षा, त्याची हांजी हांजी करुन, सत्तेत रहाण्यातच शहाणपणा असतो. अशामुळे, त्या परिवाराला पक्षांत विरोधच होत नाही.

In reply to by तिमा

माहितगार 27/05/2018 - 16:24
राजकारणातल्या घराणेशाहीला मूळ कारण आहे भ्रष्टाचाराचे. एखाद्या नेत्याने त्याच्या हयातीत, स्वतःसाठी आणि पक्षाच्या नांवाने, अमाप पैसा कमावलेला असतो. तो मेल्यावर, किंवा काही कारणाने पदावरुन बाजूला झाल्याने, पक्षाला त्या पैशाची गरज असते. म्हणून पक्षही, त्यांच्या सोईसाठी त्याच्या वारसाला गादीवर बसवतो. शिवाय, तो मेल्यानंतर जो इमोशनल गेन असतो, त्याचाही निवडणुकीत फायदा उठवायचा असतोच.
जवळपास असेच आहे, त्यांनी स्वतः:- खरे म्हणजे सर्वसामान्य जनतेस हे दिसत असते , सगळा खेळ त्यांच्या समोर त्यांच्या नावाने चाललेला असतो - सांगण्यासारखे बरेच किस्से आहेत , पण जी माय बाप घराणे शाहीस जनता घराणे शाहीस मते देते त्यांचे समर्थन काते त्यांनी स्वतः अशी माहिती शेअर केल्यास माहितीस वस्तुनिष्ठता येऊ शकते - जोडीला एवढेच कि घरातली माणसेच असली कि भ्रष्टाचार दबलेला राहातो अथवा दाबणे सोपे राहाते . दुसऱ्र्या बाजूला जात बिरादरी आधारित उपकृतांची संस्कृती जोपासली जाते . खरेतर ‘आशा आणि उपकार यांचे गणित जुळणारे नसते ‘ पण मानवी आशा मोठी चिवट असते . सायबांनी दिलाय ना चिटकवून मग पगार होईल सरकार सबसिड्या वाटेल तेव्हा . जनतेचा हिशेब म्हणजे पगार / लाभ पदरात पडला तर सायबामुळे, , सत्तेत असून विलंब लागला तर विरोधकांमुळे , आणि सत्तेत नसले आणि आश्वासने पदरी पडली नाय तर सरकार दोषी . कायच लाभ झाला नाही तरी known devil is better than unknown saint या न्यायाने समर्थन मिळत राहाते . इमिडेट उपकृत करणारे स्थानिक नेते असतात , ग्रामीण भागातले लग्न समारंभ बघा लग्नाच्या नवरामुलामुली ऐवजीवरचे हे ग्रामपंचायत सदस्य सरपंच नगरसेवक मंडळीच सत्कार मूर्ती असतात . या स्थानिक पुढाऱ्यांना त्यांच्या वरचे उपकृत करून ठेवतात . सगळा प्रकार तसा आयजीच्या जीवावर बायजी ची स्वप्ने उधार असा असतो. आयजीच्या जीवावर बायजी उद्धाराचे रहाटगाडे साखळीने घराणेशाहीस जनतेचा पैसा बसल्या बसल्या ओतता राहाते . जनतेस हे कळेल आणि घराणेशाही नाकारणे चालू करेल तो त्यांच्यासाठी सुदीन

आनन्दा 29/10/2019 - 15:34
अवांतर, घराणेशही म्हटली तर ती अमेरिकेत पण चुकलेली नाही - १. थोरल्या बुश नंतर काही दिवसांनी धाकले बुश अध्यक्ष झाले. २. बिल भौंनंतर हिलरीताई निवडणूक लढवत आहेतच. यावेळेस काय असेल ते माहीत नाही, पण २०१६ ला त्या प्रायमरी जिंकल्य होत्याच ना!

In reply to by सुहासवन

माहितगार 27/05/2018 - 09:23
सरमिसळ नाही, लेखन एका बैठकीत न झाल्याने लेखन जरासे पुढे मागे झाले होते, ते आता जरासे पुर्नरचीत केले आहे. मन मोकळ्या प्रतिसादासाठी आभार.

मदनबाण 27/05/2018 - 09:49
दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हंटले कि मला मालिका आठवते... आणि त्याचे गाणे देखील ! राजकारण आणि अर्थशात्र म्हंटले या मालिके बरोबरच चाणाक्य या मालिकेचा देखील प्रभाव माझ्यावर अजुनही जाणवतो ! चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा आवाज आजही ऐकावा वाटतो आणि मालिकांचा "दर्जा" कसा असावा याचा बेंचमार्क या मालिका असाव्यात असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही ! अशीच अजुन एक मालिका उपनिषद गंगा आहे आणि तिचा ही प्रभाव माझ्यावर झालेला आहे. बाकी घराणेशाही म्हंटली तर राजकारण आणि बॉलिवूड मध्ये ती पाय रोवुन उभी असलेली आपल्याला स्पष्ट दिसते ! या दोन्हींमध्ये दांभिकता देखील तितकीच उठुन दिसते. इतर येणारे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू

In reply to by मदनबाण

माहितगार 27/05/2018 - 10:25
...बाकी घराणेशाही म्हंटली तर राजकारण आणि बॉलिवूड मध्ये ती पाय रोवुन उभी असलेली आपल्याला स्पष्ट दिसते ! या दोन्हींमध्ये दांभिकता देखील तितकीच उठुन दिसते.
खासगी क्षेत्रात ही समान संधीचे महत्व असते पण मालकाने मुलाला दिलेली संधी तेवढी खुपत नाही कारण जे काही नफा नुकसान आहे ती व्यावसायिकाची एका अर्थाने निजी बाब असते. राजकारणातली घराणेशाही अधिक खुपते कारण - सर्वसामान्य जनतेच्या नेतृत्वाच्या संधी आणि स्वप्ने हिरावली जाण्याचा इथे धोका मोठा असतो- राजकारणातली घराणेशाही लागे-बांधे आणि हितसंबंधांच्या संरक्षणावर जगावयास लागलेली असते. असे वाटते.

In reply to by मदनबाण

माहितगार 27/05/2018 - 10:36
दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया दुरचित्रवाणि मालिकेचे सर्व भाग कोणत्या दुव्यावर बघण्यास उपलब्ध असल्यास दुवा अवश्य द्यावा. (मी स्वतः काही भाग पाहीले आहेत.) काय आहे ईंदिरा गांधी घराणे सत्ते पासून दूर जाईल तेव्हाच त्यांना आपण नेहरु तत्वज्ञानाला आणि काँग्रेसच्या मूळात अभिप्रेत वैचारीक बैठकीला आपण घराणेशाही आणि नेहरुंच्या पुस्तकांवरच्या कॉपीराईट मध्ये बांधून संपवले आहे हे लक्षात येईल, तो पर्यंत नाही असे वाटते. महत्व म. गांधी आणि नेहरुंच्या कालसुसंगत तेवढ्या विचारांना असावयास हवे घराण्यास नाही पण नेमके उलटे घडणे ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे. एक वेळ परंपरावाद्यांनी सरंजामदार आणि उमरावांची बाजू घेतली असती तर समजण्यासारखे होते पण इथे नेमके उलटे घडताना दिसते आहे, परंपरावादी स्वतः ला सरंजामशाही पासून दूर नेण्याचे किमान काही प्रयत्न करताना दिसताहेत तर ज्यांनी सरंजामशाही विरोधी असावयास हवे त्यांचेच पाय कर्णाच्या रथाच्या चक्रासारखे घराणेशाहीत घट्ट रोवले जाताना दिसताहेत याचा शेवट काय असेल हे ओळखण्यास भविष्यवेत्त्याची आवश्यकता नसावी

In reply to by मदनबाण

माहितगार 27/05/2018 - 10:40
२००६ नंतर ज्ञानकोशीय कामात व्यस्त होण्याने टिव्ही पहाणे कमी झाले त्याच काळात हि उपनिषद गंगा हि सिरीयल येऊन गेली असावी . मला कल्पना असती तर नक्किच बघितली असती आणि स्वड झाल्यास युट्ञूबवर नक्कीच बघेन.

In reply to by माहितगार

मदनबाण 27/05/2018 - 16:52
दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया दुरचित्रवाणि मालिकेचे सर्व भाग कोणत्या दुव्यावर बघण्यास उपलब्ध असल्यास दुवा अवश्य द्यावा. https://www.youtube.com/user/PublicResourceOrg/videos किंवा इथुन सर्व भाग पाहता येतील. :- https://www.youtube.com/watch?v=lwbo5xjBD90&list=PL-k_liNMvNQAT5G52uCfWFXgOgU-2lBF2 प्रजेचे सुख तेच राजाचे सुख हे ज्या देशातील राज्यकर्त्यांना समजते आणि त्या दॄष्टीने जिथे पाउले उचलली जातात तिथे खर्‍या अर्थाने ज्ञान, व्यापार,कला यांचे स्थान प्रबळ होतेआणि तेथील नागरिकांचे जीवनमान सुखी आणि संपंन्न होते. आपल्या देशातील राजकारणी नेमकी हेच गोष्ट करण्याची टाळत आले आहेत आणि स्वतःची आणि स्वसंबंधीतांचे हित सांभाळत आले आहेत. प्रत्येक गोष्टीत "राजकारण" करण्याच्या प्रवॄत्तीमुळेच देशाची अवस्था आज अशी आहे.या राजकारण्यांच्या राष्ट्र / राज्य यांच्या प्रति असलेल्या कर्त्व्याचे मोजमापन करणारी कुठलीच व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. स्वतःचाच पगार स्वतःच वाढवुन घेण्याच्या "माजावर" ही पोहचली आहेत तर इतर सोयी सुविधांचा अपहार किती होत असावा याची कल्पना न केलेलीच बरी ! असो... २००६ नंतर ज्ञानकोशीय कामात व्यस्त होण्याने टिव्ही पहाणे कमी झाले त्याच काळात हि अपनिषद गंगा हि सिरीयल येऊन गेली असावी . मला कल्पना असती तर नक्किच बघितली असती आणि स्वड झाल्यास युट्ञूबवर नक्कीच बघेन. मी स्वतः सगळे भाग पाहिलेले नाहीत पण जशी सवड मिळेल तसे भाग पाहत असतो... राजकारण आणि चाण्यक्य यांचा आधी वर उल्लेख केल्यामुळेच खाली एक भाग देतो... सगळे भाग एकाच चॅनलखाली मला अजुन दिसले नाहीत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- देवाक काळजी रे... :- रेडू

कंजूस 27/05/2018 - 10:45
महाभारतातही कर्ण,अर्जुन ज्या देवांचे अवतार आहेत ते रदबदली/याचना करायला येतात आपापल्या मुलांसाठी (!) नेहरुंवर ( अथवा इतर शक्तिमान नेते) टीका करायची झाली तर अमचे तेवढे वाचन नाही. हे सर्व नेते त्यांची धोरणे रेटत असतात आणि अशां लोकांने चमचे होऊन बय्राच गोष्टी मिळवणाय्रा लोकांचे कोंडाळे अवतीभवती असते. खरं म्हणजे देशातल्या जनतेचा पैसा वापरून उठसूठ सर्व मुख्य पुल,विमानतळ,रस्ते,बंदरे यांना यांच्या घराण्यातील लोकांनी नावे देण्याचा सपाटा लावलेला दिसतो. मी पंतप्रधान झालो तर प्रथम ही सर्व नावेच काढून टाकेन.

In reply to by कंजूस

माहितगार 27/05/2018 - 11:21
महाभारतातही कर्ण,अर्जुन ज्या देवांचे अवतार आहेत ते रदबदली/याचना करायला येतात आपापल्या मुलांसाठी (!)

Jayant Naik 27/05/2018 - 11:55
तुमचे मनापासून कौतुक . खरे तर भारत वर्षामध्ये घराणे शाही पूर्वापासून आहे. रामाचा वंश कुठून सुरु झाला आणि तो कुठ पर्यंत होता याची एक १०० पिढ्यांची यादी काही दिवसापूर्वी वाचनात आली . या ईश्वाकू वंशात अतिशय पराक्रमी राजे झाले. जैन धर्मातील निमी नावाचे तीर्थांकर याच वंशाचे. तसेच गुप्त वंशात हि झाले. हे जेव्हा राज्य करत होते तेव्हाच्या काळास सुवर्णकाळ असे म्हणत . चंद्रगुप्त ... समुद्रगुप्त ,विष्णू गुप्त वगैरे . या राज घराण्यात सुद्धा नालायक राजे होते. पण आपल्या ऋषी मुनींची अशी धारणा होती कि अश्या राज घराण्यात काही गुण हे वंश परंपरा येतात आणि राज्य करण्यासाठी जे आवश्यक गुण असतात ते अश्या घराण्यातील मुलात उपजत असतात आणि योग्य म्हणजे राजा किवा राज्यकर्ते होण्यास जे शिक्षण आवश्यक असते ते देऊन या गुणांचा उत्कर्ष करता येतो . भारताच्या मानसिकतेत हे इतके बिंबले आहे कि लोकशाहीत सुद्धा आता शहराशहरात असे राजे निर्माण होत आहेत. तर मुद्दा हा कि घराणेशाही हि इतक्या सहजासहजी अजिबात जाणार नाही . कपूर घराण्यातील मुले त्यांच्या अंगभूत गुणामुळे आणि योग्य संधी मिळाल्यामुळे पुढे आली. ज्यांच्यात हे गुण नव्हते ते आपोआप मागे पडले. शशी कपूर च्या पुढच्या पिढीचे फारसे नाव झाले नाही जेवढे राज कपूरच्या पुढच्या पिढीचे झाले. मला वाटते कि लोकशाहीत फक्त निवडून आले म्हणून त्यांची योग्यता न पाहता आपला देश चालवायला देणे या सारखा दुसरा मूर्ख पणा नाही ,म्हणून या घराणेशाही मुळे देश चालवायला योग्य असे काही नेते आपल्याला मिळालेत का ? लोकशाहीमुळे तरी मिळालेत का ? याचा खरा शोध घ्यावा. मला वाटते कि लोकशाही काय किवा राजेशाही काय या पद्धती मुळे देशाचा उत्कर्ष होतोय का हा खरा प्रश्न आहे. तसे नसेल तर त्या दोन्ही पध्दतीत काही आमुलाग्र बदल घडवायला हवा. बाकी आपल्या सारख्या देशात जिथे बहुतांश लोक हे जाती कडे पाहून मते देतात किवा काही रूपयासाठी आपले मत विकतात किवा मत देतच नाहीत अश्या देशात लोकशाही कितपत योग्य आहे या बद्दल माझ्या मनात शंका आहे. . माझे असे मत आहे कि आपल्या देशात लोकशाही फक्त नावाला आहे ...इथे घराणेशाहीच वेगळे नाव घेऊन वावरते आहे. आपल्या या विचारमंथनातून कृती करण्यास योग्य मुद्दे बाहेर येतील या बद्दल माझ्या मनात शंका नाही . आपल्या पुढील लेखनाला खूप शुभेच्छा. प्रतीक्षेत आहे.

In reply to by Jayant Naik

विजुभाऊ 28/05/2018 - 12:49
या ईश्वाकू वंशात अतिशय पराक्रमी राजे झाले.
हे वाक्य " कपूर" घराण्यात अनेक नामवंत अभिनेते झाले. असेही वाचता येईल खरेतर ते पराक्रमी असतील पण केवळ राजघराण्यात जन्माला आले म्हणून त्याना पराक्रम गाजवण्यासाठीचे शिक्षण आणि संधी मिळाली. सिनेमात ही संधी घराण्यामुळे आणि त्या वातावरणात राहिल्यामुळे मिळते. सिनेमात ज्याला सिनेमाचे कसलेच वलय नाही त्याला स्वतःला सिद्ध करायची संधी मिळणे हेच जवळजवळ अशक्यप्राय असते.

कपिलमुनी 27/05/2018 - 12:12
सध्या सगळ्या पक्षात घराणेशाही आहे. पूर्वी जनता घराणेशाही सहज स्वीकारत असे. आता मात्र तशी परिस्थिती राहीलि नाही. लोक जोवर घराणेशाहीने झालेल नेत्याला मत देत राहतील तोवर हे चालू राहणार . आपल्याकडे आई वडिलांनी पोराचा भले करायचा असते ही कॉमन समजूत आहे. प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.

In reply to by कपिलमुनी

माहितगार 27/05/2018 - 14:21
...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.
नक्कीच चांगला एक्सक्युज आहे :) पण मग असे राकारणात करण्यास सरंजामशाही किंवा राजेशाहीच म्हणावे, लोकशाही जनतेचे राज्य म्हणण्याचे ढोंग रचून जनतेची फसवणूक करु नये. अश्या पद्धतीचे समर्थन एकवेळ व्यवसायाधारीत जन्माधारीत जातीयतेचे समर्थन करणर्‍यांनी केले तर समजण्यासारखे आहे. मी / आम्ही क्षत्रीय परीवारातील आहोत आणि आमचीच मुले राज्यकर्ती राहतील कारण ती जन्माने क्षत्रीय आहेत हेच वाक्य मी / आम्ही राजकीय परीवारातील आहोत आणि आमचीच मुले राज्यकर्ती राहतील कारण आम्ही जन्माने राजकीय परिवारातील आहोत . पण असे समर्थन तथाकथीत पुरोगामी प्रगतीशील लोकशाहीवादी करत असतील तर तो विरोधाभास ठरणार नाही का ?

In reply to by कपिलमुनी

माहितगार 27/05/2018 - 15:40
...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.
सकाळाचे मंगल हे लोकशाहीचे उद्दिष्ट असेल तर याचे परीक्षण ज्ञानदेवांच्या पसायदाना सोबत करणे वावगे नसावे . पसायदानाच्या अनुषंगाने र काही मुद्दे अधोरेखित करता येतात का ते पाहूया . ज्ञानदेव जो जे वांछील तो ते लाहो , स्व धर्म सूर्ये पाहो म्हणतात खरे पण त्या आधी खळांची व्यंकटी सांडलेली असण्याचा आग्रह धरतात . आणि जन्माधारित जातीयवाद जुना असो वा नवा ती खल प्रवृत्ती नव्हे काय ? चंद्र लांच्छनहीन असावा अशी अपेक्षा करतात पण इतरांच्या समान संधी डावलून केवळ स्वतः:साचा मुले आणि स्वतः:चेच कुटुंबीय पुढे करणे लांछनीय नाही का ? केवळ आपलेच अपत्य आणि आप्त यांचे मंगल = सकाळाचे मंगल असा अर्थ काढणे विपर्यस्त ठरत नाही का ?
लोक जोवर घराणेशाहीने झालेल नेत्याला मत देत राहतील तोवर हे चालू राहणार .
लोक परकीय सत्तेस ‘जु’मानत होते तो पर्यंतच परकीय सत्ता होती , पण नेहरूंनीच अन्याय कारक ‘ जु ‘ ना मानण्याचे आवाहनास जनतेने प्रतिसाद दिला . देश इथे प्रत्येकाचा आहे कि काही मोजक्या राज परिवारांचे राखीव कुरण आहे ? एक सुज्ञ सजग नागरीक म्हणून लोकशाहीची थट्टा ना स्विकारता प्रत्येक सुज्ञ सजग नागरीकाने घराणेशाहीस नकार दिला तर घराणे शाहीचा ‘ जु ‘ सहज झुगारता येऊ शकेल. स्वतः:च्या अधिकारासाठी हातात गीता घेऊन प्रयत्न करण्याचे महात्मा गांधी आवाहन करत होते तेव्हा भारतात केवळ १२ टक्के लोक साक्षर होते पण त्यांच्यासाठी त्यांचे राज्य असेल या अपेक्षेने आजच्याच जनतेच्या मागच्या शतकातील पूर्वज स्वातंत्र्य आंदोलनात उतरले . त्यांच्या त्यागाने नव्या पिढ्यानी साक्षरता शिक्षण घेतले तरी घराणेशाहीचे ‘जू आपापापल्या मानेवरून फेकण्याचे धारिष्ट्य होता नाही ! “...प्रत्येक पालक हे करत असताना नेत्यांना नावे का ठेवावी हा देखील प्रश्न आहे.” या आणि अशा अनेक एक्स्क्यूजेसना स्वीकारून माना खाली घालून दशको न दशके आपण सर्व पुढे जात आहोत ? वाढलेल्या साक्षरता शिक्षण आणि जागरूकतेने घराणेशाहीचा आजार नाकारण्याचा विवेक अद्याप का तयार होत नाही ? हा अनाकलनीय प्रश्न का असावा ?

तिमा 27/05/2018 - 15:30
काही वर्षांपूर्वी मी एका ओळखीच्या पत्रकाराशी , भारतीय राजकारणातली घराणेशाही, यावर चर्चा केली होती. त्याच्याकडून जी , मला कल्पना नसलेली माहिती समोर आली, ती लिहितो. ती बरोबर आहे का नाही, हे वाचकांनी ठरवावे. राजकारणातल्या घराणेशाहीला मूळ कारण आहे भ्रष्टाचाराचे. एखाद्या नेत्याने त्याच्या हयातीत, स्वतःसाठी आणि पक्षाच्या नांवाने, अमाप पैसा कमावलेला असतो. तो मेल्यावर, किंवा काही कारणाने पदावरुन बाजूला झाल्याने, पक्षाला त्या पैशाची गरज असते. म्हणून पक्षही, त्यांच्या सोईसाठी त्याच्या वारसाला गादीवर बसवतो. शिवाय, तो मेल्यानंतर जो इमोशनल गेन असतो, त्याचाही निवडणुकीत फायदा उठवायचा असतोच. भारतीय जनतेचीही मानसिकता, घराणेशाहीला अनुकूल असल्याने, हा लोकशाहीवरचा अत्याचार आहे, हे त्यांना कळतच नाही. ज्यांना कळते, ते मूठभर असतात. एखाद्या परिवाराची अशी सत्ता, अनेक पिढ्या चाललेली असेल, तर आत्ताच्या पिढीपर्यंत, त्यांचे 'संचित पुण्य' फारच वाढलेले असते. त्यामुळे अशा 'पुण्यवान' परिवाराला विरोध करुन, पायावर धोडा पाडून घेण्यापेक्षा, त्याची हांजी हांजी करुन, सत्तेत रहाण्यातच शहाणपणा असतो. अशामुळे, त्या परिवाराला पक्षांत विरोधच होत नाही.

In reply to by तिमा

माहितगार 27/05/2018 - 16:24
राजकारणातल्या घराणेशाहीला मूळ कारण आहे भ्रष्टाचाराचे. एखाद्या नेत्याने त्याच्या हयातीत, स्वतःसाठी आणि पक्षाच्या नांवाने, अमाप पैसा कमावलेला असतो. तो मेल्यावर, किंवा काही कारणाने पदावरुन बाजूला झाल्याने, पक्षाला त्या पैशाची गरज असते. म्हणून पक्षही, त्यांच्या सोईसाठी त्याच्या वारसाला गादीवर बसवतो. शिवाय, तो मेल्यानंतर जो इमोशनल गेन असतो, त्याचाही निवडणुकीत फायदा उठवायचा असतोच.
जवळपास असेच आहे, त्यांनी स्वतः:- खरे म्हणजे सर्वसामान्य जनतेस हे दिसत असते , सगळा खेळ त्यांच्या समोर त्यांच्या नावाने चाललेला असतो - सांगण्यासारखे बरेच किस्से आहेत , पण जी माय बाप घराणे शाहीस जनता घराणे शाहीस मते देते त्यांचे समर्थन काते त्यांनी स्वतः अशी माहिती शेअर केल्यास माहितीस वस्तुनिष्ठता येऊ शकते - जोडीला एवढेच कि घरातली माणसेच असली कि भ्रष्टाचार दबलेला राहातो अथवा दाबणे सोपे राहाते . दुसऱ्र्या बाजूला जात बिरादरी आधारित उपकृतांची संस्कृती जोपासली जाते . खरेतर ‘आशा आणि उपकार यांचे गणित जुळणारे नसते ‘ पण मानवी आशा मोठी चिवट असते . सायबांनी दिलाय ना चिटकवून मग पगार होईल सरकार सबसिड्या वाटेल तेव्हा . जनतेचा हिशेब म्हणजे पगार / लाभ पदरात पडला तर सायबामुळे, , सत्तेत असून विलंब लागला तर विरोधकांमुळे , आणि सत्तेत नसले आणि आश्वासने पदरी पडली नाय तर सरकार दोषी . कायच लाभ झाला नाही तरी known devil is better than unknown saint या न्यायाने समर्थन मिळत राहाते . इमिडेट उपकृत करणारे स्थानिक नेते असतात , ग्रामीण भागातले लग्न समारंभ बघा लग्नाच्या नवरामुलामुली ऐवजीवरचे हे ग्रामपंचायत सदस्य सरपंच नगरसेवक मंडळीच सत्कार मूर्ती असतात . या स्थानिक पुढाऱ्यांना त्यांच्या वरचे उपकृत करून ठेवतात . सगळा प्रकार तसा आयजीच्या जीवावर बायजी ची स्वप्ने उधार असा असतो. आयजीच्या जीवावर बायजी उद्धाराचे रहाटगाडे साखळीने घराणेशाहीस जनतेचा पैसा बसल्या बसल्या ओतता राहाते . जनतेस हे कळेल आणि घराणेशाही नाकारणे चालू करेल तो त्यांच्यासाठी सुदीन

आनन्दा 29/10/2019 - 15:34
अवांतर, घराणेशही म्हटली तर ती अमेरिकेत पण चुकलेली नाही - १. थोरल्या बुश नंतर काही दिवसांनी धाकले बुश अध्यक्ष झाले. २. बिल भौंनंतर हिलरीताई निवडणूक लढवत आहेतच. यावेळेस काय असेल ते माहीत नाही, पण २०१६ ला त्या प्रायमरी जिंकल्य होत्याच ना!
लेखनप्रकार
* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__ विविध कारणांनी विविध ठिकाणी आस्था असतात , तशी अगदी शालेय वयात असताना वाचलेल्या नेहरू लिखित डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथा बद्दल आस्था आहे. तसे नेहरू लिखित दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया अद्यापही कॉपीराईटेड असावे पण कुठूनसे बऱ्याच वर्षांनंतर डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पीडीएफ हाती आली.