मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हस्तर कविता :- महायुती

हस्तर ·
हस्तर कविता :- महायुती महायुती करून काय फायदा झाला ? जर सरकार एकत्र स्थापन करायचे नव्हते तर निवडणूक का आले एकत्र लढ्याला ? एक दुसऱ्याचा जागा अडवायला ? युती नावाचा प्रकार केलाच का ? एक दुसऱ्याची मते लाटायला ? मजा येत होती ५ वर्षे भांडायला अफझलखान म्हणून एक दुसऱ्याचे उणे दुणे काढायला का आनंद झाला जनादेश झुगारायला संगीत खुर्ची खेळ खेळून मनोरंजन करायला शेतकरी लागले आसू ढाळायला आणि तुम्ही बस आपले आपले शपत विधी करायला

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

गंगाधर मुटे ·

पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..

In reply to by इरामयी

गंगाधर मुटे 26/07/2019 - 14:55
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.

पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..

In reply to by इरामयी

गंगाधर मुटे 26/07/2019 - 14:55
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

ऑफिसात जाऊन आलो

महासंग्राम ·

नाखु 02/07/2019 - 19:15
सुट्टी जाहीर केली तेंव्हा नाही गेलात हापिसात,हेलपाटा पडला असता शिवाय घरी लवकर यायचा कंटाळा आला असता तो वेगळाच. विडंबन आवडले

नाखु 02/07/2019 - 19:15
सुट्टी जाहीर केली तेंव्हा नाही गेलात हापिसात,हेलपाटा पडला असता शिवाय घरी लवकर यायचा कंटाळा आला असता तो वेगळाच. विडंबन आवडले
ऑफिसात गेलो, गप्पा मारून आलो कॅन्टीनला जाऊन मी भजे खाऊन आलो जरी थेंब पावसाचे आले ओला .. भिजून आलो भांबावल्या दुपारी झोपा काढून आलो होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे पाट्या टाकून आलो.. ? पाकीट जरी रिकामे अकाऊंट भरून आले.. चुकू मुळी न देता लॉगिन करून आलो. मूळ पेरणा इथे आहे

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

नाखु 06/05/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

वृद्धाश्रम

तृप्ति २३ ·

चौथा कोनाडा 17/09/2018 - 16:53
छान कविता ! साधी पण भीडणारी. काही ठिकाणी आढळणारे कटू वास्तव ! बदलती वेगवान जीवन शैली कुटूंब आणि नाते संबंध उध्वस्त करत आहे, करू पहात आहे.

खिलजि 17/09/2018 - 18:30
भिकारी आणि पाखंडी आहे तो ज्याने माऊलीची सेवा केली नाही . दुःख याचे सदैव मनात माझ्या , मी करूनही ती मला मिळाली नाही .. चुकत नसतो , त्याचा हिशेब कधीच चुकत नसतो जो करतो तोच फेडतो या जन्मी साधं गणित आहे, लेका इथे फक्त भागाकार होत असतो तू एव्हढं करतो , तुला किती मोल तयाचे पोटाला बांध गोळे चार पौंडांचे दोन दिवस काढले तरी खूप झाले विसरून जाशील हगायचे ? माउलीपुढं विज्ञान नाही माउलीपुढं ज्ञान नाही माउलीपुढं देव नाही इथे नतमस्तक आस्तिकही आणि नास्तिकही माऊलीवाणी कुणीच नाही

काजुकतली 04/10/2018 - 11:21
का बरे हताश निराश व्हायचे? जुन्या जमान्यात एकत्र कुटुंब पद्धतीत नातवंडे आजी आजोबासोबत वाढायची. आजचे आजी आजोबा त्यांच्या जवानीत नव्या वाटा शोधायला वेगळे झाले. त्यांची मुले त्यांच्यापेक्षा वेगळ्या वाटा शोधताहेत. आज लोकांची एकंदर प्रवृत्ती स्वतंत्र राहायची आहे. वृद्ध माणसांचे लोढणे वाटते. थकलेल्या शरीर मनाने परत संसाराची जबाबदारी ओढण्यापेक्षा वृद्धाश्रमात मजेत वेळ वाया घालवलेला बरा. याची तरतुद करून मग काही उरलेच तर ते मुलांना देऊन आपण मजेत राहावे. जिंदगी ना मिले दोबारा. मुलांच्या आठवणीत डोळे भरुन आयुष्य कंठण्यापेक्षा हे जास्त बरे.

चौथा कोनाडा 17/09/2018 - 16:53
छान कविता ! साधी पण भीडणारी. काही ठिकाणी आढळणारे कटू वास्तव ! बदलती वेगवान जीवन शैली कुटूंब आणि नाते संबंध उध्वस्त करत आहे, करू पहात आहे.

खिलजि 17/09/2018 - 18:30
भिकारी आणि पाखंडी आहे तो ज्याने माऊलीची सेवा केली नाही . दुःख याचे सदैव मनात माझ्या , मी करूनही ती मला मिळाली नाही .. चुकत नसतो , त्याचा हिशेब कधीच चुकत नसतो जो करतो तोच फेडतो या जन्मी साधं गणित आहे, लेका इथे फक्त भागाकार होत असतो तू एव्हढं करतो , तुला किती मोल तयाचे पोटाला बांध गोळे चार पौंडांचे दोन दिवस काढले तरी खूप झाले विसरून जाशील हगायचे ? माउलीपुढं विज्ञान नाही माउलीपुढं ज्ञान नाही माउलीपुढं देव नाही इथे नतमस्तक आस्तिकही आणि नास्तिकही माऊलीवाणी कुणीच नाही

काजुकतली 04/10/2018 - 11:21
का बरे हताश निराश व्हायचे? जुन्या जमान्यात एकत्र कुटुंब पद्धतीत नातवंडे आजी आजोबासोबत वाढायची. आजचे आजी आजोबा त्यांच्या जवानीत नव्या वाटा शोधायला वेगळे झाले. त्यांची मुले त्यांच्यापेक्षा वेगळ्या वाटा शोधताहेत. आज लोकांची एकंदर प्रवृत्ती स्वतंत्र राहायची आहे. वृद्ध माणसांचे लोढणे वाटते. थकलेल्या शरीर मनाने परत संसाराची जबाबदारी ओढण्यापेक्षा वृद्धाश्रमात मजेत वेळ वाया घालवलेला बरा. याची तरतुद करून मग काही उरलेच तर ते मुलांना देऊन आपण मजेत राहावे. जिंदगी ना मिले दोबारा. मुलांच्या आठवणीत डोळे भरुन आयुष्य कंठण्यापेक्षा हे जास्त बरे.
वृद्धाश्रम आज एका आजीला मी वृद्धाश्रमात पाहिलं तीच्या डोळ्यातील दुःख मी जवळून अनुभवलं ती निराश होती हतबल होती दाराकडे नजर रोखून वाट बघत होती काय चुकलं तिचं की वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय सार काही मुलाला देऊन तिला मात्र अस जगावं लागतंय डोळ्यातले अश्रु ही तिचे काही वेळाने थांबून गेले पुण्य केलं की पाप हे तिला ही कळेनासे झाले म्हणुनच म्हणते की …….. नका रे मुलांनो वागु असे आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ ह्या जगात कोणी नसे त्यांना फक्त एक हक्काचं घर द्या उर्वरित आयुष्य त्यांना आनंदाने घालवु द्या ….. Trupti Sameer Tilloo Vrud

असाव कोणीतरी

तृप्ति २३ ·
आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com

सालं, आज जीव कासावीस झालाय

खिलजि ·

पद्मावति 27/04/2018 - 23:46
फारच दुर्दैवी घटना ड्राइवरने इयरफोन्स लावले होते. समोर ट्रेन बघून मुलं जिवाच्या आकांताने ओरडून त्याला सावध करत होती पण त्याला ऐकूच आले नाही :(

पद्मावति 27/04/2018 - 23:46
फारच दुर्दैवी घटना ड्राइवरने इयरफोन्स लावले होते. समोर ट्रेन बघून मुलं जिवाच्या आकांताने ओरडून त्याला सावध करत होती पण त्याला ऐकूच आले नाही :(
सालं, आज जीव कासावीस झालाय तिकडं अकरा कळ्यांचा विनाकारण बळी गेलाय आज मी पण एक बाप आहे पण खरं सांगू मित्रानो या देशात बाप होणं , श्राप आहे केलं असेल त्यांनीही त्यांच्या मुलांना टाटा बाय बाय त्यांना थोडंच ठाऊक होतं पुढे होणार आहे काय ? त्या माउलींचा तीळतीळ तुटला असेल जीव पण इथे कोणालाच पडली नाही आहे त्याची जाणीव आजूबाजूच्या लोकांनी केली असेल चौकशी आपली मुलं कुठे आणि आहेत कशी ? जो तो आपापलं बघून सांत्वनाला गेला असेल थोडा वेळ रडेल तिथं आणि परत कामाला लागेल त्या मायबापाचे अश्रू असेच ओघळत राहतील बाराव्यानंतरही आणि भरणीलाही पुन्हा कुठे तरी अजून कळ्या खुरडल्या जातील बातम्

पुतळा म्हणजे....

प्राची अश्विनी ·

नाखु 07/03/2018 - 08:46
म्हणजे मध्यरात्री भेकड उच्चाटन अणि दिवसा कोडग जाणते समर्थन

माहितगार 07/03/2018 - 09:14
पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..
हि ओळ विशेषतः आवडली. पुतळ्यांमध्ये, लोकमान्य टिळक प्रेरणा मुल्य शोधत. त्यांच्या मते व्यक्तीपुजा म्हणजे त्या व्यक्तिचे अंध-अनुकरण करणे नव्हे पण त्यातून केवळ प्रेरणा घेणे. टिळकांच्या मते पुतळा/मुर्ती बघणार्‍या हजारो व्यक्तींना प्रेरणा मिळत नाही पण एखाद्या व्यक्तीनेही प्रेरणा मिळाली आणि त्याच्या कडून काही चांगले घडले तर पुतळा संकल्पनेस यश येते. माझ्या मते , राजकीय पुढारी जेव्हा पुतळे बसवण्याचे राजकारण करतात तेव्हा त्यात त्यांच्या स्वतःच्या प्रेरणा घेण्यापेक्षा, इतर अंधभक्तांना तुम्हा अनुयायांचा मी पुढारी हे सिद्ध करण्याचा / होण्याचा उद्देश असतो - हि शुद्ध धूळफेक असते. पुतळ्याच्या रुपाने व्यक्ती पुजा केली जाणार्‍या व्यक्तीची मते बर्‍ञाचदा कालसुसंगत अथवा प्रॅक्टीकल राहीलेली नसतात, काही/ बर्‍याच अनुयायांची अपेक्षा काळ आणि परिस्थिती बदलली तरी शब्द ग्रंथपुजेने अंधानुकरण होत रहावे अशी अपेक्षा असते. शब्द पुजा व्यक्ती पूजा उणीवग्रस्त असतात हे कळले तरी बर्‍याचदा वळत नाही. त्यामुळे ज्यांना प्रॅक्टीकल अथवा काळसूसंगत निर्णय घेण्याची गरज पडते असे त्या त्या काळातील नेतृत्वाने पुतळे बनवणे / मुर्तीकण करणे मुर्तीपूजेकडे ढकलणे रास्त असते म्हणजे अंधभक्तांना पुतळा/मुर्तीपूजेच्या कर्ममांडात गुंतवले की अंधभक्तांची पावती मिळते आपले नेतृत्व प्रस्थापीत करता येते आणि दुसरीकडे पुस्तकपूजा टाळून प्रॅक्टीकल निर्णय घेता येतात. पुस्तकांची काळानूरुप कालसुसंगतता राहत नाही आणि अनेक वेळा प्रॅक्टीकल अस्पेक्ट्स काँटेक्स्ट बदलले असतात -पुस्तकपूजा अनेकदा तापदायक ठरतात . पुस्तक पुजेपेक्षा पुतळा / मुर्तीपूजा बरी पडते. एकदा पुतळा/मुर्ती पूजा करुन झाली हार घालून झाला की प्रत्यक्षात व्यावहारीक गरजे प्रमाणे वागता येते आणि पुस्तकपुजे पेक्षा तेच बरे असते.

In reply to by माहितगार

माहितगार 07/03/2018 - 09:21
सांगण्याचा मुद्दा असा की, पत्त्याची खूण शिल्लक ठेवून पत्र हरवणे एका अर्थाने नव्या काळास नव्या परिस्थितीनुरुप वागू देणारे न्याय देणारे म्हणून चांगलेच असावे. आणि पुतळ्यांचे काम संपले आहे हे, हे हरवलेल्या पत्रावरचे पत्ते आहेत हे लक्षात आल्यावर ते पुतळे खाली उतरवून त्यांचे विसर्जन करण्यातही काही अयोग्य नसावे. असो

पुतळा म्हणजे रस्तावर पडलेले टिनाचे डबडे कोणीही यावे आणि लाथ मारुन उडवावे पुतळा म्हणजे कोणाची तरी जाज्वल्य अस्मिता त्या मानाने देवळातले देव बरेच सुरक्षित असतात पुण्यात कर्वे रोड वरचा महर्षि कर्व्यांचा पुतळा देखिल बरेच दिवस गायब झाला आहे. तिकडे म्हणे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. पैजारबुवा,

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 07/03/2018 - 10:58
कमाल आहे, कुणी कुठे केव्हा आणि का नम्र व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतरांनी कुठेतरी नम्र होण्याबद्दल नकारात्मक अर्थ काढण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्विकारुनही एकतर ते नकारात्मक तर्क केवळ तर्कच असतात. दुसरे कुठेतरी नम्र होणार्‍ञांना त्यांच्या व्यक्तिगत इच्छे नुसार नम्र होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास नकारात्मक अर्थ काढणार्‍यांपुढे नम्र होण्याची अथवा तमा बाळगण्याची मुळीच अरज नसते.

In reply to by माहितगार

चौथा कोनाडा 07/03/2018 - 16:56
सहमत. पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते. बाकी "नकारात्मक तर्क हे केवळ तर्कच असू शकतात" आणि "तमा बाळगण्याची मुळीच गरज नसते" याच्याशी सहमत.

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 08/03/2018 - 20:16
पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते.
बर्‍यापैकी सहमत, इथे प्रगल्भता शब्दा अर्थछटेसाठी काही पर्यायी शब्द सुचतो का म्हणून विचारात पडलोय .

In reply to by चौथा कोनाडा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौको. पण ओशोंचे मत पटले नाही. निसर्गासमोर नतमस्तक होणे आणि मूर्तीसमोर या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्या परस्पर विरोधी असतीलच असं नाही.

In reply to by प्राची अश्विनी

चौथा कोनाडा 09/03/2018 - 13:31
धन्यवाद. मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे. आपल्याकडे वड अथवा इतर वृक्षाचे पुजन किंवा देवराई हा निसर्गपुजनाचाच भाग आहे. पंचमहाभुतांना नमन( सूर्य, वारा, पृथ्वी /जमीन, पाणी आणि आकाश) हा त्याचाच भाग. मुर्तीपुजन ते निसर्गपुजन हा टप्पा अवघड असणार. आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच ! जे लोक फक्त मुर्तीपुजा मानतात, त्यांना उद्देशून ते एक्झागरेट करून सांगितलं ओशो यांनी. (एक शंका: ओशो-विचारची इमेज मला का दिसत नाहीय ? मी गुगल फोटोज मध्ये अपलोड केलीय. मी गुगल लॉगीन केल्यावर दिसतेय. काय सेटिंग्ज करावी लागतात ?)

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 09/03/2018 - 14:18
मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे..... आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच !
'निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे ' हा वाक्प्रयोग आपण आधीच्या प्रतिसादातून केला आहे. सकारात्मक अनुभूती पावित्र्य, मांगल्य, श्रद्धेय बनवण्यास साहाय्यक असते, पण अनुभूती आणि पूजा यात अल्प अंतर असावे. दुसरे मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रॉपॉल्जीकल सिक्वेन्स पाहिला तर पूजांची सूरवात निसर्ग झाली असावी. त्यानंतर पूर्वज पूजा आली असावी. निसर्गाचे मानवीकरण किंवा पर्सोनीफीकेशन होतानाची स्टेज ऋग्वेदात दिसून येते (चुभुदेघे) . निसर्गपूजेचा एक उपप्रकार नैसर्गिक शक्तींना स्पिरीट आपण जसे पंच महाभूते कल्पतो तसे काहीसे समजून झाल्याचे दिसून येते. नास्तिक सुद्धा निसर्गाच्या पंच महाभूतांनी रुद्ररुप धारण करु नये अशीच इच्छा करेल. समोरच्यांना नमवण्याची निसर्गाची क्षमता आजही असीम आहे असे वाटते. पण निसर्गाने रौद्ररुप धारण करणे काहीसे परिस्थिती जन्य आहे. सर्वसामान्य मानवास रोजच्या समस्यातून सुटका हवी यासाठी तो इतर विवीध श्रद्धांचा आसरा घेताना दिसतो त्यातच मुर्तीपूजेचाही समावेश होतो. मूर्ती पूजा पूजांच्या स्वरुपात बरीच उशीरा आलेली दिसते. निसर्ग पूजा ते ओबड धोबड खडकांची पूजा एका बाजूला दुसर्‍या बाजूला वृक्ष पूजा (ते काठी पूजा) तिसरी पूर्वज पूजा असे पूजेचे स्वरुप विकसीत झाले असावे. सर्वसाधारण पूजा असो की मुर्ती पूजा , पूजा होण्यासाठी श्रद्धा निर्माणास साहाय्यक कथासूत्राची किमान आरंभीच्या क्षणी गरज असावी, किमान पक्षी एखादी गोष्ट पावू शकेल अथवा एखादी गोष्ट कोपू शकेल अशी भावना बळ पकडली की तिथून पुढे पुजेची कर्मकांडे आकारास येतात. अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते. असो

In reply to by माहितगार

चौथा कोनाडा 11/03/2018 - 17:24
अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते.
बरोबर. सुंदर प्रतिसाद.

नाखु, अनंतयात्री, एस, प्रचेतस, चामुंडराय, चौथा कोनाडा, माहितगार आणि पैजारबुवा ( आजकाल माझ्या मोबाईल वर पैसे टाईपलं की पैजारबुवाच येतं) मनापासून धन्यवाद!

श्वेता२४ 07/03/2018 - 12:54
पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण. पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन. या ओळी खास वाटल्या. खूपच छान आणि अर्थपूर्ण कविता सध्याच्या वातावरणात.

manguu@mail.com 07/03/2018 - 17:35
हाथ आओ तो बुथ हात न आओ तो खुदा हो तुम एक गोरखधंदा हो

इरसाल 07/03/2018 - 20:43
प्रत्येक राज्यसरकारने राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी १०० एकर जागा देवुन ज्यांना आपापल्या नेते, धर्मगुरु, किंवा तत्सम लोकांचे पुतळे लावायला परवानगी द्यावी. त्यासाठी भरमसाठ शुल्क लावावे म्हणजे ज्यांना खरोखरच कळकळ आहे ते जातील तिथे.

तिमा 07/03/2018 - 20:51
आणि..... पुतळा म्हणजे हमखास शिटण्याची जागा, पक्ष्यांची आणि पक्षांचीही!!!

चौथा कोनाडा 07/03/2018 - 23:13
या वरून एक चारोळी आठवली पुतळे उभा करून खरंच स्फुर्ती मिळते का एकदा सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का ? बहुधा चंद्रशेखर गोखले यांची आहे.

In reply to by चौथा कोनाडा

हो आणि कुसुमाग्रजांची आहे ती, अखेर कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले . ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा. आंबेडकर म्हणाले , मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले , मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती

पैसा 08/03/2018 - 19:42
पुतळा उभा करताना किंवा फोडताना त्या माणसाबद्दल आदर किंवा तिरस्कार दाखवण्यापेक्षा आपली पावर दाखवणे याचे ते साधन असते. जुन्या देवळातल्या भंगलेल्या मूर्ती, बामियान बुद्ध किती लांब यादी वाचावी? दुसर्‍या कोणाच्या आदेशावरून त्या फोडणार्‍याना त्यांच्या सौंदर्याची जाणीव एक क्षणही होत नसेल का?

भीडस्त 09/03/2018 - 09:44
पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन. एकदम चपखल

अभ्या.. 10/03/2018 - 15:55
मला कधीच पुतळे असे ऑड किंवा कशाचे तरी प्रतिक म्हणून वाटलेच नाहीत. अर्थात खूप पुतळे असलेल्या गावात राहतो म्हणून असेल कदाचित. बस स्टॅण्डसमोरचा डिव्हायडरचा रोड आणि शिवाजीमहाराजांचा अश्वारुढ पुतळा हे मराठवाड्यातले प्रातिनिधीक चित्र डोळ्यासमोर त्या पुतळ्याशिवाय पूर्णपणे येतच नाही. पुतळे मस्त वाटतात चौकात. कलाकाराने जीव ओतलेले पुतळे खरेच दृष्ट लागावी इतके सुंदर दिसतात. बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे. त्या घोड्याच्या नसाननसा सुध्दा धातूत उतरवणार्‍या शिल्पकाराचा हेवा वाटे. त्या देखण्या कलाकृतीला जातीय आणि राजकीय अस्मिता चिकटल्या की सगळ्यांचीच माती होते. पुतळ्याला हार घालणारे लोक, त्याला देव बनवणारे लोक, त्या पुतळ्याचे विटंबन केले म्हणून माणुसकी पेटवणारे लोक हे खरेतर महाभयंकर.

In reply to by अभ्या..

बिटाकाका 11/03/2018 - 20:52
+१००००००, अभ्या!!
बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे.
यासाठी अजून +१०००००००.

In reply to by अभ्या..

चौथा कोनाडा 12/03/2018 - 16:23
अभ्याजी यांच्याशी सहमत ! +११,१११ आमच्या महानगरातील भक्तिशक्ती शिल्पसमुह असेच नजर खिळवून ठेवणारे आहे. संत तुकाराम महाराज यांच्या बरोबरचे वारकरी व शिवाजी महाराज यांच्या सोबतचे मावळे यांचं अतिशय कौशल्यपुर्ण मर्जिंग सुंदर आहे. तुकाराम महाराजांच्या पुतळयाची उंची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंची पेक्षा जास्त ठेवून उत्तुंगता साधलेली आहे. ज्या ज्या वेळी इथं भेट देतो त्या त्या वेळी त्यातली अद्भुतता पाहतच राहतो. हा सुंदर शिल्पसमुह नाशिक येथिल विख्यात शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी घडवलेला आहे. पण त्यांचे नाव तिथं लिहिण्याची सजगता दाखवलेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे. भक्तिशक्ती जेंव्हा अश्या जीव ओतून तयार केलेल्या सुंदर कलाकृतींचा राजकारणात "वस्तू" म्हणून वापर होतो तेव्हा अत्यंत वाईट वाटते. कलात्मक सौंदर्यदृष्टीचा र्‍हास, दुसरं काय !

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 12/03/2018 - 19:15
चौ. को. साहेब, तुम्हाला आठवत असेल, भक्ती शक्ती शिल्प पहिल्यांदा बसवले तेंव्हा मागे पुर्ण मोकळे होते. त्या मोकळ्या अवकाशात हे शिल्प खूप उठून दिसायचे. अतिशय भव्य वाटायचे ते शिल्प. पण कर्म दरीद्र्यांनी मागे बिल्डींगा बांधायच्या परवानग्या दिलया आणि त्या शिल्पाच्या सौंदर्यात बाधा आली. आता तरी मागे झाडे आहेत म्हणुन मागची बिल्डींग दिसत नाही. नाहीतर आधी त्या पुतळ्यामागे असलेल्या बिल्डींगच्या बाल्कनीतुन कपडे/साड्या वाळत घातलेले असायचे ते पुतळ्याच्या बॅकग्राउंडला असलयामुळे खूप घाण दिसायचे.

In reply to by बबन ताम्बे

विशुमित 12/03/2018 - 20:14
शिल्प बांधायच्या आधी तिथे बिल्डिंगा बांधायच्या परवानग्या नव्हत्या का ?

In reply to by विशुमित

चौथा कोनाडा 12/03/2018 - 21:40
परवानगीचा प्रश्न नाही, माझ्या पाहण्यात शिल्पसमुह उभारणीच्यावेळी तिथं तथाकथीत "विकास" झाला नव्हता.

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 12/03/2018 - 22:45
होय सर. इमारती व्ह्यायच्या अगोदरचे शिल्प मला चांगलेच आठवतेय. तेंव्हा वाहतुक अन गजबजाटही कमी होता, पथारीवाले, खेळणीवाले यांचे अतिक्रमण व्ह्यायचे होते. खुपच रमणीय सुंदर होता हा परिसर. आता हा परिसर पाहिला की वाईट वाटते की एव्हढं सुंदर स्फुर्तीस्थळ आता लहान मुलांचा बगिच्या व मोठ्यांसाठी पिकनिक स्पॉट झालाय ! पुतळ्यांच्या मागे इमारती होणार आहेत हे कळताच शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी लगेचच बिल्डर लोकांची संपर्क साधून या पुतळयांचं सौंदर्य बाधीत होऊ नये म्हणुन योग्य त्या सुचना, मार्गदर्शन दिले होते, पण ते पाळले गेले नाही. इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती, पण काही उपयोग झाला नाही. दुर्दैव !

In reply to by चौथा कोनाडा

विशुमित 12/03/2018 - 23:15
तुमच्या सौंदर्य दृष्टीशी १००% सहमत आहे. पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ? या पैकी काहीजण प्रेरणा आणि रसग्रहण घेतच असतील. त्या गणेश तलावाचा उपयोग बगिच्यासाठी करायला हवा होता. पण तिथे एन्ट्री फी आकारतात बहुतेक. (इतरही काही करणे असतील ) .... कै. गर्गे नी चुकीच्या लोकांकडे संपर्क केला असे राहून राहून वाटते. ( त्या आधी प्रशासनाकडे देखील म्हणणे मांडलेच असणार). इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती तरी ते करून घायला काय हरकत होती?

In reply to by विशुमित

चौथा कोनाडा 15/03/2018 - 22:47
धन्यवाद.
पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ?
फारच गंभीर प्रश्न आहे हा. मैदाने व मोकळ्या जागा इ अतिक्रमण / कमर्शियलाझेशन ने व्यापून टाकल्या जाताहेत. भविष्यात अवघड आहे. गणेश तलावाचा वापर करून त्याभोवती सुंदर उद्यानाची (लॅण्डस्केपड गार्डन) रचना केलेली आहे. हे वीर सावरकर उद्यान प्राधिकरणातला आकर्षण बिंदू आहे. आंजावर फोटो आहेत. पाहता येतील. योग आलयास नक्की भेट द्या. माझ्या माहिती नुसार गणेश तलावाला एन्ट्री फी नाहीय, फक्त वीर सावरकर उद्यानाला आहे. दोन्हीची कंपाऊंडस वेगवेगळी आहेत. दोनतीन वर्षापुर्वी तिथं मिपाचा कट्टा झाला होता. मी पहिल्यांदाच मिपाकट्टयाला उपस्थित राहिलो. ज्याम धमाल आली होती त्याची आठवण झाली. डॉ सुहास म्हात्रे यांनी सावरकर उद्यानाचे काही सुंदर फोटो कट्ट्याच्या वृतांतात प्रतिसादात टाकलेले आहेत ते खालील लिंक वर दिसतील. प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

पुंबा 13/03/2018 - 11:34
कविता खुप आवडली. गोखले अर्थशास्त्र संस्थेत नामदार गोखलेंचा पुतळा आहे. संगमरवरात केलेला, इतका सुबक, सुंदर पुतळा मी आजवर पाहिला नव्हता. असे, संगमरवरात केलेले पुतळी नसतात का आज काल? तो कमीत कमी ८०-९० वर्षे जुना असावा.

Sanjay Uwach 14/03/2018 - 13:12
कुणाला पुतळे हे प्रेरणा देणारे वाटतात तर कोणाला ते कालांतराने निरुपयोगी वाटतात.कधी कधी या पुतळ्याची मार्मिक चर्चाही घडत असते."पुतळे म्हणजे पक्षाची सोय"अशा प्रकारचे द्विअर्थी विधान ऐका नेत्याने केले होते. कांही नेत्यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांच्या वर विश्वास नसल्या मुळे आपल्या जिवंपणीच स्वतःचा पुतळा उभा करून घेतला.मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची तर एक सत्य घटना अशी की लोकांनी श्री.राजीव गांधी यांचा पुतळा मोठ्या प्रेमानी उभा केला, मात्र बनवणाऱ्याने तो इतका चुकीचा बनवला की त्यात राजीव गांधी कुठेच दिसत नव्हते. यावर आनेक वादंग झाले. पुतळा काढून टाकण्या साठी निर्वाणीचे इशारे झाले , मोर्चे झाले. हा पुतळा कुणा सारखा दिसतो याचे रोज एक नवनविन नाव पुढे येत असे.

नाखु 07/03/2018 - 08:46
म्हणजे मध्यरात्री भेकड उच्चाटन अणि दिवसा कोडग जाणते समर्थन

माहितगार 07/03/2018 - 09:14
पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..
हि ओळ विशेषतः आवडली. पुतळ्यांमध्ये, लोकमान्य टिळक प्रेरणा मुल्य शोधत. त्यांच्या मते व्यक्तीपुजा म्हणजे त्या व्यक्तिचे अंध-अनुकरण करणे नव्हे पण त्यातून केवळ प्रेरणा घेणे. टिळकांच्या मते पुतळा/मुर्ती बघणार्‍या हजारो व्यक्तींना प्रेरणा मिळत नाही पण एखाद्या व्यक्तीनेही प्रेरणा मिळाली आणि त्याच्या कडून काही चांगले घडले तर पुतळा संकल्पनेस यश येते. माझ्या मते , राजकीय पुढारी जेव्हा पुतळे बसवण्याचे राजकारण करतात तेव्हा त्यात त्यांच्या स्वतःच्या प्रेरणा घेण्यापेक्षा, इतर अंधभक्तांना तुम्हा अनुयायांचा मी पुढारी हे सिद्ध करण्याचा / होण्याचा उद्देश असतो - हि शुद्ध धूळफेक असते. पुतळ्याच्या रुपाने व्यक्ती पुजा केली जाणार्‍या व्यक्तीची मते बर्‍ञाचदा कालसुसंगत अथवा प्रॅक्टीकल राहीलेली नसतात, काही/ बर्‍याच अनुयायांची अपेक्षा काळ आणि परिस्थिती बदलली तरी शब्द ग्रंथपुजेने अंधानुकरण होत रहावे अशी अपेक्षा असते. शब्द पुजा व्यक्ती पूजा उणीवग्रस्त असतात हे कळले तरी बर्‍याचदा वळत नाही. त्यामुळे ज्यांना प्रॅक्टीकल अथवा काळसूसंगत निर्णय घेण्याची गरज पडते असे त्या त्या काळातील नेतृत्वाने पुतळे बनवणे / मुर्तीकण करणे मुर्तीपूजेकडे ढकलणे रास्त असते म्हणजे अंधभक्तांना पुतळा/मुर्तीपूजेच्या कर्ममांडात गुंतवले की अंधभक्तांची पावती मिळते आपले नेतृत्व प्रस्थापीत करता येते आणि दुसरीकडे पुस्तकपूजा टाळून प्रॅक्टीकल निर्णय घेता येतात. पुस्तकांची काळानूरुप कालसुसंगतता राहत नाही आणि अनेक वेळा प्रॅक्टीकल अस्पेक्ट्स काँटेक्स्ट बदलले असतात -पुस्तकपूजा अनेकदा तापदायक ठरतात . पुस्तक पुजेपेक्षा पुतळा / मुर्तीपूजा बरी पडते. एकदा पुतळा/मुर्ती पूजा करुन झाली हार घालून झाला की प्रत्यक्षात व्यावहारीक गरजे प्रमाणे वागता येते आणि पुस्तकपुजे पेक्षा तेच बरे असते.

In reply to by माहितगार

माहितगार 07/03/2018 - 09:21
सांगण्याचा मुद्दा असा की, पत्त्याची खूण शिल्लक ठेवून पत्र हरवणे एका अर्थाने नव्या काळास नव्या परिस्थितीनुरुप वागू देणारे न्याय देणारे म्हणून चांगलेच असावे. आणि पुतळ्यांचे काम संपले आहे हे, हे हरवलेल्या पत्रावरचे पत्ते आहेत हे लक्षात आल्यावर ते पुतळे खाली उतरवून त्यांचे विसर्जन करण्यातही काही अयोग्य नसावे. असो

पुतळा म्हणजे रस्तावर पडलेले टिनाचे डबडे कोणीही यावे आणि लाथ मारुन उडवावे पुतळा म्हणजे कोणाची तरी जाज्वल्य अस्मिता त्या मानाने देवळातले देव बरेच सुरक्षित असतात पुण्यात कर्वे रोड वरचा महर्षि कर्व्यांचा पुतळा देखिल बरेच दिवस गायब झाला आहे. तिकडे म्हणे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. पैजारबुवा,

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 07/03/2018 - 10:58
कमाल आहे, कुणी कुठे केव्हा आणि का नम्र व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इतरांनी कुठेतरी नम्र होण्याबद्दल नकारात्मक अर्थ काढण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्विकारुनही एकतर ते नकारात्मक तर्क केवळ तर्कच असतात. दुसरे कुठेतरी नम्र होणार्‍ञांना त्यांच्या व्यक्तिगत इच्छे नुसार नम्र होण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यास नकारात्मक अर्थ काढणार्‍यांपुढे नम्र होण्याची अथवा तमा बाळगण्याची मुळीच अरज नसते.

In reply to by माहितगार

चौथा कोनाडा 07/03/2018 - 16:56
सहमत. पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते. बाकी "नकारात्मक तर्क हे केवळ तर्कच असू शकतात" आणि "तमा बाळगण्याची मुळीच गरज नसते" याच्याशी सहमत.

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 08/03/2018 - 20:16
पण, मानवनिर्मित प्रतिमेच्या पुजनाच्या (मंदिर्/मुर्ती/चित्र) पलिकडे जाऊन निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे हे जास्त प्रगल्भतेचे लक्षण वाटते.
बर्‍यापैकी सहमत, इथे प्रगल्भता शब्दा अर्थछटेसाठी काही पर्यायी शब्द सुचतो का म्हणून विचारात पडलोय .

In reply to by चौथा कोनाडा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौको. पण ओशोंचे मत पटले नाही. निसर्गासमोर नतमस्तक होणे आणि मूर्तीसमोर या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्या परस्पर विरोधी असतीलच असं नाही.

In reply to by प्राची अश्विनी

चौथा कोनाडा 09/03/2018 - 13:31
धन्यवाद. मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे. आपल्याकडे वड अथवा इतर वृक्षाचे पुजन किंवा देवराई हा निसर्गपुजनाचाच भाग आहे. पंचमहाभुतांना नमन( सूर्य, वारा, पृथ्वी /जमीन, पाणी आणि आकाश) हा त्याचाच भाग. मुर्तीपुजन ते निसर्गपुजन हा टप्पा अवघड असणार. आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच ! जे लोक फक्त मुर्तीपुजा मानतात, त्यांना उद्देशून ते एक्झागरेट करून सांगितलं ओशो यांनी. (एक शंका: ओशो-विचारची इमेज मला का दिसत नाहीय ? मी गुगल फोटोज मध्ये अपलोड केलीय. मी गुगल लॉगीन केल्यावर दिसतेय. काय सेटिंग्ज करावी लागतात ?)

In reply to by चौथा कोनाडा

माहितगार 09/03/2018 - 14:18
मला वाटतं मुर्तीपुजेचा पुढचा टप्पा निसर्गपुजा हा आहे..... आपल्यावर जन्मापासून मुर्तीपुजेचे संस्कार केल्यामुळं ते सोडुन निसर्गपुजेकडे वळणं आव्हानात्मकच !
'निसर्गनिर्मित प्रतिमांची अनुभुती घेणे ' हा वाक्प्रयोग आपण आधीच्या प्रतिसादातून केला आहे. सकारात्मक अनुभूती पावित्र्य, मांगल्य, श्रद्धेय बनवण्यास साहाय्यक असते, पण अनुभूती आणि पूजा यात अल्प अंतर असावे. दुसरे मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रॉपॉल्जीकल सिक्वेन्स पाहिला तर पूजांची सूरवात निसर्ग झाली असावी. त्यानंतर पूर्वज पूजा आली असावी. निसर्गाचे मानवीकरण किंवा पर्सोनीफीकेशन होतानाची स्टेज ऋग्वेदात दिसून येते (चुभुदेघे) . निसर्गपूजेचा एक उपप्रकार नैसर्गिक शक्तींना स्पिरीट आपण जसे पंच महाभूते कल्पतो तसे काहीसे समजून झाल्याचे दिसून येते. नास्तिक सुद्धा निसर्गाच्या पंच महाभूतांनी रुद्ररुप धारण करु नये अशीच इच्छा करेल. समोरच्यांना नमवण्याची निसर्गाची क्षमता आजही असीम आहे असे वाटते. पण निसर्गाने रौद्ररुप धारण करणे काहीसे परिस्थिती जन्य आहे. सर्वसामान्य मानवास रोजच्या समस्यातून सुटका हवी यासाठी तो इतर विवीध श्रद्धांचा आसरा घेताना दिसतो त्यातच मुर्तीपूजेचाही समावेश होतो. मूर्ती पूजा पूजांच्या स्वरुपात बरीच उशीरा आलेली दिसते. निसर्ग पूजा ते ओबड धोबड खडकांची पूजा एका बाजूला दुसर्‍या बाजूला वृक्ष पूजा (ते काठी पूजा) तिसरी पूर्वज पूजा असे पूजेचे स्वरुप विकसीत झाले असावे. सर्वसाधारण पूजा असो की मुर्ती पूजा , पूजा होण्यासाठी श्रद्धा निर्माणास साहाय्यक कथासूत्राची किमान आरंभीच्या क्षणी गरज असावी, किमान पक्षी एखादी गोष्ट पावू शकेल अथवा एखादी गोष्ट कोपू शकेल अशी भावना बळ पकडली की तिथून पुढे पुजेची कर्मकांडे आकारास येतात. अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते. असो

In reply to by माहितगार

चौथा कोनाडा 11/03/2018 - 17:24
अमूक एका पूजेकडून अथवा श्रद्धेकडून दुसर्‍या श्रद्धेकडे , पुजेकडे वळणे कठीण असले साहाय्यक कथासूत्राची मनावर पकड मिळण्यास यश मिळेल तसे पूजेचे देव बदलत जात असावेत असे वाटते.
बरोबर. सुंदर प्रतिसाद.

नाखु, अनंतयात्री, एस, प्रचेतस, चामुंडराय, चौथा कोनाडा, माहितगार आणि पैजारबुवा ( आजकाल माझ्या मोबाईल वर पैसे टाईपलं की पैजारबुवाच येतं) मनापासून धन्यवाद!

श्वेता२४ 07/03/2018 - 12:54
पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण. पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन. या ओळी खास वाटल्या. खूपच छान आणि अर्थपूर्ण कविता सध्याच्या वातावरणात.

manguu@mail.com 07/03/2018 - 17:35
हाथ आओ तो बुथ हात न आओ तो खुदा हो तुम एक गोरखधंदा हो

इरसाल 07/03/2018 - 20:43
प्रत्येक राज्यसरकारने राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी १०० एकर जागा देवुन ज्यांना आपापल्या नेते, धर्मगुरु, किंवा तत्सम लोकांचे पुतळे लावायला परवानगी द्यावी. त्यासाठी भरमसाठ शुल्क लावावे म्हणजे ज्यांना खरोखरच कळकळ आहे ते जातील तिथे.

तिमा 07/03/2018 - 20:51
आणि..... पुतळा म्हणजे हमखास शिटण्याची जागा, पक्ष्यांची आणि पक्षांचीही!!!

चौथा कोनाडा 07/03/2018 - 23:13
या वरून एक चारोळी आठवली पुतळे उभा करून खरंच स्फुर्ती मिळते का एकदा सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का ? बहुधा चंद्रशेखर गोखले यांची आहे.

In reply to by चौथा कोनाडा

हो आणि कुसुमाग्रजांची आहे ती, अखेर कमाई. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले . ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ़्यांचा. आंबेडकर म्हणाले , मी फ़क्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले , मी तर फ़क्त चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती

पैसा 08/03/2018 - 19:42
पुतळा उभा करताना किंवा फोडताना त्या माणसाबद्दल आदर किंवा तिरस्कार दाखवण्यापेक्षा आपली पावर दाखवणे याचे ते साधन असते. जुन्या देवळातल्या भंगलेल्या मूर्ती, बामियान बुद्ध किती लांब यादी वाचावी? दुसर्‍या कोणाच्या आदेशावरून त्या फोडणार्‍याना त्यांच्या सौंदर्याची जाणीव एक क्षणही होत नसेल का?

भीडस्त 09/03/2018 - 09:44
पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन. एकदम चपखल

अभ्या.. 10/03/2018 - 15:55
मला कधीच पुतळे असे ऑड किंवा कशाचे तरी प्रतिक म्हणून वाटलेच नाहीत. अर्थात खूप पुतळे असलेल्या गावात राहतो म्हणून असेल कदाचित. बस स्टॅण्डसमोरचा डिव्हायडरचा रोड आणि शिवाजीमहाराजांचा अश्वारुढ पुतळा हे मराठवाड्यातले प्रातिनिधीक चित्र डोळ्यासमोर त्या पुतळ्याशिवाय पूर्णपणे येतच नाही. पुतळे मस्त वाटतात चौकात. कलाकाराने जीव ओतलेले पुतळे खरेच दृष्ट लागावी इतके सुंदर दिसतात. बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे. त्या घोड्याच्या नसाननसा सुध्दा धातूत उतरवणार्‍या शिल्पकाराचा हेवा वाटे. त्या देखण्या कलाकृतीला जातीय आणि राजकीय अस्मिता चिकटल्या की सगळ्यांचीच माती होते. पुतळ्याला हार घालणारे लोक, त्याला देव बनवणारे लोक, त्या पुतळ्याचे विटंबन केले म्हणून माणुसकी पेटवणारे लोक हे खरेतर महाभयंकर.

In reply to by अभ्या..

बिटाकाका 11/03/2018 - 20:52
+१००००००, अभ्या!!
बार्शीला बी आर खेडकरांनी घडवलेला शिवाजीराजांचा पुतळा बघत बसावासा वाटे.
यासाठी अजून +१०००००००.

In reply to by अभ्या..

चौथा कोनाडा 12/03/2018 - 16:23
अभ्याजी यांच्याशी सहमत ! +११,१११ आमच्या महानगरातील भक्तिशक्ती शिल्पसमुह असेच नजर खिळवून ठेवणारे आहे. संत तुकाराम महाराज यांच्या बरोबरचे वारकरी व शिवाजी महाराज यांच्या सोबतचे मावळे यांचं अतिशय कौशल्यपुर्ण मर्जिंग सुंदर आहे. तुकाराम महाराजांच्या पुतळयाची उंची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंची पेक्षा जास्त ठेवून उत्तुंगता साधलेली आहे. ज्या ज्या वेळी इथं भेट देतो त्या त्या वेळी त्यातली अद्भुतता पाहतच राहतो. हा सुंदर शिल्पसमुह नाशिक येथिल विख्यात शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी घडवलेला आहे. पण त्यांचे नाव तिथं लिहिण्याची सजगता दाखवलेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे. भक्तिशक्ती जेंव्हा अश्या जीव ओतून तयार केलेल्या सुंदर कलाकृतींचा राजकारणात "वस्तू" म्हणून वापर होतो तेव्हा अत्यंत वाईट वाटते. कलात्मक सौंदर्यदृष्टीचा र्‍हास, दुसरं काय !

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे 12/03/2018 - 19:15
चौ. को. साहेब, तुम्हाला आठवत असेल, भक्ती शक्ती शिल्प पहिल्यांदा बसवले तेंव्हा मागे पुर्ण मोकळे होते. त्या मोकळ्या अवकाशात हे शिल्प खूप उठून दिसायचे. अतिशय भव्य वाटायचे ते शिल्प. पण कर्म दरीद्र्यांनी मागे बिल्डींगा बांधायच्या परवानग्या दिलया आणि त्या शिल्पाच्या सौंदर्यात बाधा आली. आता तरी मागे झाडे आहेत म्हणुन मागची बिल्डींग दिसत नाही. नाहीतर आधी त्या पुतळ्यामागे असलेल्या बिल्डींगच्या बाल्कनीतुन कपडे/साड्या वाळत घातलेले असायचे ते पुतळ्याच्या बॅकग्राउंडला असलयामुळे खूप घाण दिसायचे.

In reply to by बबन ताम्बे

विशुमित 12/03/2018 - 20:14
शिल्प बांधायच्या आधी तिथे बिल्डिंगा बांधायच्या परवानग्या नव्हत्या का ?

In reply to by विशुमित

चौथा कोनाडा 12/03/2018 - 21:40
परवानगीचा प्रश्न नाही, माझ्या पाहण्यात शिल्पसमुह उभारणीच्यावेळी तिथं तथाकथीत "विकास" झाला नव्हता.

In reply to by बबन ताम्बे

चौथा कोनाडा 12/03/2018 - 22:45
होय सर. इमारती व्ह्यायच्या अगोदरचे शिल्प मला चांगलेच आठवतेय. तेंव्हा वाहतुक अन गजबजाटही कमी होता, पथारीवाले, खेळणीवाले यांचे अतिक्रमण व्ह्यायचे होते. खुपच रमणीय सुंदर होता हा परिसर. आता हा परिसर पाहिला की वाईट वाटते की एव्हढं सुंदर स्फुर्तीस्थळ आता लहान मुलांचा बगिच्या व मोठ्यांसाठी पिकनिक स्पॉट झालाय ! पुतळ्यांच्या मागे इमारती होणार आहेत हे कळताच शिल्पकार कै. मदन गर्गे यांनी लगेचच बिल्डर लोकांची संपर्क साधून या पुतळयांचं सौंदर्य बाधीत होऊ नये म्हणुन योग्य त्या सुचना, मार्गदर्शन दिले होते, पण ते पाळले गेले नाही. इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती, पण काही उपयोग झाला नाही. दुर्दैव !

In reply to by चौथा कोनाडा

विशुमित 12/03/2018 - 23:15
तुमच्या सौंदर्य दृष्टीशी १००% सहमत आहे. पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ? या पैकी काहीजण प्रेरणा आणि रसग्रहण घेतच असतील. त्या गणेश तलावाचा उपयोग बगिच्यासाठी करायला हवा होता. पण तिथे एन्ट्री फी आकारतात बहुतेक. (इतरही काही करणे असतील ) .... कै. गर्गे नी चुकीच्या लोकांकडे संपर्क केला असे राहून राहून वाटते. ( त्या आधी प्रशासनाकडे देखील म्हणणे मांडलेच असणार). इमारती झाल्यावर सुद्धा पार्श्वभुमीसाठी भित्तीचित्र (म्युरल) डिझाईन करून देण्याची तयारी दाखवली होती तरी ते करून घायला काय हरकत होती?

In reply to by विशुमित

चौथा कोनाडा 15/03/2018 - 22:47
धन्यवाद.
पण गर्दी वाढली की जागा अपुरी पडणारच. पोरासोरांनी खेळायला कुठे जायचे मग हा पण एक प्रश्न आहेच ?
फारच गंभीर प्रश्न आहे हा. मैदाने व मोकळ्या जागा इ अतिक्रमण / कमर्शियलाझेशन ने व्यापून टाकल्या जाताहेत. भविष्यात अवघड आहे. गणेश तलावाचा वापर करून त्याभोवती सुंदर उद्यानाची (लॅण्डस्केपड गार्डन) रचना केलेली आहे. हे वीर सावरकर उद्यान प्राधिकरणातला आकर्षण बिंदू आहे. आंजावर फोटो आहेत. पाहता येतील. योग आलयास नक्की भेट द्या. माझ्या माहिती नुसार गणेश तलावाला एन्ट्री फी नाहीय, फक्त वीर सावरकर उद्यानाला आहे. दोन्हीची कंपाऊंडस वेगवेगळी आहेत. दोनतीन वर्षापुर्वी तिथं मिपाचा कट्टा झाला होता. मी पहिल्यांदाच मिपाकट्टयाला उपस्थित राहिलो. ज्याम धमाल आली होती त्याची आठवण झाली. डॉ सुहास म्हात्रे यांनी सावरकर उद्यानाचे काही सुंदर फोटो कट्ट्याच्या वृतांतात प्रतिसादात टाकलेले आहेत ते खालील लिंक वर दिसतील. प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

पुंबा 13/03/2018 - 11:34
कविता खुप आवडली. गोखले अर्थशास्त्र संस्थेत नामदार गोखलेंचा पुतळा आहे. संगमरवरात केलेला, इतका सुबक, सुंदर पुतळा मी आजवर पाहिला नव्हता. असे, संगमरवरात केलेले पुतळी नसतात का आज काल? तो कमीत कमी ८०-९० वर्षे जुना असावा.

Sanjay Uwach 14/03/2018 - 13:12
कुणाला पुतळे हे प्रेरणा देणारे वाटतात तर कोणाला ते कालांतराने निरुपयोगी वाटतात.कधी कधी या पुतळ्याची मार्मिक चर्चाही घडत असते."पुतळे म्हणजे पक्षाची सोय"अशा प्रकारचे द्विअर्थी विधान ऐका नेत्याने केले होते. कांही नेत्यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांच्या वर विश्वास नसल्या मुळे आपल्या जिवंपणीच स्वतःचा पुतळा उभा करून घेतला.मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची तर एक सत्य घटना अशी की लोकांनी श्री.राजीव गांधी यांचा पुतळा मोठ्या प्रेमानी उभा केला, मात्र बनवणाऱ्याने तो इतका चुकीचा बनवला की त्यात राजीव गांधी कुठेच दिसत नव्हते. यावर आनेक वादंग झाले. पुतळा काढून टाकण्या साठी निर्वाणीचे इशारे झाले , मोर्चे झाले. हा पुतळा कुणा सारखा दिसतो याचे रोज एक नवनविन नाव पुढे येत असे.
पुतळा म्हणजे कधी गडकरी, सावरकर तर कधी तो लेनीन, नाव बदलता मते बदलती, पुतळा त्या वृत्तीचे दर्शन. पुतळा म्हणजे अंध धुंद निर्बंध कधी सत्तेचा दर्पण. पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन. पुतळा म्हणजे मूर्ती नाही, धर्म रुढींचे ना त्या बंधन. पुतळा म्हणजे दगड नी धातू, तरीही देई कुणास चेतन. पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण. पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन. पुतळा म्हणजे चुकार कुठल्या पक्ष्याचे हक्काचे घरपण.. पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..

स्वराज्याचे शिलेदार

खिलजि ·
तोबरे भरुनी निघाले सारे स्वराज्याचे शिलेदार शिवशाहीचा घोष दुमदुमे मांडला झेंड्यांचा बाजार भगवे निघाले , नभी फडफडले उद्या निघतील हिरवे न लाल धर्मावरून पेटतो इथे जहालांसंगे मवाल जर द्याल इजाजत करतो इथे मी, तुम्हांसी एक सवाल धर्म वेगळे मान्य मलापण रक्त का साऱ्यांचे लाल ? भगवा मनात माझ्या भगवा तनात माझ्या सोनेरी तेज जो देई तो सूर्यही भगवा माझा सिद्धेश्वर विलास पाटणकर C

मुक्तपीठ

चुकार ·

पैसा 11/02/2018 - 10:48
मुक्तपीठ नाव बघून वेगळ्याच विचाराने उघडली होती. ब्रह्मे आणि गॅंग आले का काय म्हणून

वेगळ्याच अपेक्षेने आलो, पण कविता चुकार निघाली. ह.घ्या. मुक्तपीठ चा संदर्भ समजला नसेल तर ई-सकाळ उघडून मुक्तपीठ सदर वाचा म्हणजे तुम्ही किती अपेक्षा वाढवल्या ते कळेल. जमल्यास लुनावाले ब्रम्हे, पोतदार पावसकर मँडम यांची रत्ने वाचून काढा.

पैसा 11/02/2018 - 10:48
मुक्तपीठ नाव बघून वेगळ्याच विचाराने उघडली होती. ब्रह्मे आणि गॅंग आले का काय म्हणून

वेगळ्याच अपेक्षेने आलो, पण कविता चुकार निघाली. ह.घ्या. मुक्तपीठ चा संदर्भ समजला नसेल तर ई-सकाळ उघडून मुक्तपीठ सदर वाचा म्हणजे तुम्ही किती अपेक्षा वाढवल्या ते कळेल. जमल्यास लुनावाले ब्रम्हे, पोतदार पावसकर मँडम यांची रत्ने वाचून काढा.
प्रवास खडतर, सापडेना वाट ती. वाटसरु नवे, हरदिवस भेटती. रोज नवा प्रश्न उभा समोर ठाके, थांब जरा, घे उसासा मन माझे सांगे. जुळता बंध नात्यांचे, कधी हेच धागे गुंतता, बाकी निसटून जाती एक सांधता साधता. वाटे व्हावे फुलपाखरू, मनमोकळे हुंदाडवे. स्वप्नांचे ओझे डोईपरी हलके व्हावे. विशाल आसमंत फिरुनी यावा एकदा, भरारीला बळ मिळावे मग पुन्हा एकदा. भुईचा भूचर कधीतरी पाखरू व्हावा, निर्भय, निश्चिंत, स्वच्छंदी, अनंत तो उडवा. वाटे द्यावे झुगारून सारे बंध. निखळून जावे साखळदंड. हुंदडणाऱ्या अल्लड मनास... मिळावे एक मुक्तपीठ....