सावरकरांचे मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे - ते मातृभूमी ला उद्देशून हे सांगत आहेत
शतदा नकार मज राजमुकुट सोन्याचा,
मी तृप्त पाहुनी काळ हा स्वातंत्र्याचा,
घेऊन हजारो जन्म तुझ्या उदरातून,
मी सदैव राहीन, दास तुझ्या चरणांचा !!
प्राणांची देऊन आहुती या यज्ञाला,
मी किंचित केले भार कमी खांद्याला,
नसता हे जीवन व्यर्थ मानले असते,
तुझं कारण आले अर्थ नवे मारण्याला !!