नको सत्ता
(गैरमुरद्दफ गझल)
नको सत्ता, नको दौलत
हवी केवळ तुझी सोबत
पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत
कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली गंमत
कधी होणार तू माझी
कळू दे ना तुझेही मत
सभोती रंग मुबलक पण
निराळी ही तुझी रंगत
(समाप्त)
(गैरमुरद्दफ गझल)
नको सत्ता, नको दौलत
हवी केवळ तुझी सोबत
पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत
कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली गंमत
कधी होणार तू माझी
कळू दे ना तुझेही मत
सभोती रंग मुबलक पण
निराळी ही तुझी रंगत
(समाप्त)
भिजा चिंब आधी,पुन्हा जीव जाळा
नको वाटतो ना? असा पावसाळा!
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही.
खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....
भिंतीवरती उगा टांगशी घाव कशाला?
दुःखांचे मोजसी सदा तू भाव कशाला?
पावसाची सर जशी बरसून गेली
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!
गुणगुणत होतीस का तू गझल माझी?
एक कोकीळा इथे गावून गेली!
अस्पर्शिता एक राधा मानसीं दडून आहे..
रिक्त रुक्ष ओंजळीच्या रसतळीं भरुन वाहे..
वठला जरी तरु तो वैशाख अग्निदाहे..
नि:शब्द भावनांचे तृण-अंकुर गर्भि वाहे..
वनवास वाटचाल पायातळीं निखारे..
अंतरी परि चित्ताच्या श्रीहरी नित्य पाहे..
होरपळे तनु विरहाचा वैशाख-दाह साहे...
हृदयी परि गोविंद मीलनाची आस आहे..
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती
क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही
हात घे हातात आधी,आरसा नाही!
टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा
फायदा नात्यात आता फारसा नाही!
एवढा केला खुबीने खूनही माझा
वारही केला असा जो वारसा नाही!
सांगतो आहे जगाला कोण हा वेडा!
मी असा नाही असा नाही असा नाही!
कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना
एवढीही या मनाला लालसा नाही!
तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही...
—सत्यजित
हसण्या उसंत नाही
रडण्यास अंत नाही.
निळे सावळे जगणे
मजला पसंत नाही.
बहरली जरी झाडे
हा तो वसंत नाही.
दिले टाकुन जरी तू
मी नाशवंत नाही.
सांगुन थकलो मी, पण
दुनिया ज्वलंत नाही.
-कौस्तुभ
शुद्धसती मात्रावृत्त
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला,
वाराच काळजाच्या, ओघात साठलेला.
पाळीव हस्तकांनी, मागून वार केले,
त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला.
माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले,
त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला.
प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी,
रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला.
आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली,
झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला.
-कौस्तुभ
वृत्त -आनंदकंद
मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले
आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले
शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले...
अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले
सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी...
दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले
बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे
माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले
चालणे नशिबात होते का म्हणू मी...
राहण्यासाठी कुठे घर होत गेले?
प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे
मौनही माझे निरुत्तर होत गेले
- कुमार जावडेकर